मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्मशान

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा 03/10/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

चौथा कोनाडा 03/10/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
लेखनविषय:
काव्यरस
शमशान . . . मुझे खुद में दिखाई दिए वो, जिन्हें मैं पागल समझता था ! एक दिन पता चला , वह साले बड़े सयाने थे ! धरम की अंधेरी खाइयों मे सेवादार बनके जीता हू । लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है उन्हे शराब बनाकर पीता हूँ आप हसोगे मुझे , कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! " मै कभी आपको समझा नही सकूंगा , की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !? जिंदगी जीने के इस झमेले मे अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा जन्मा था इन्सान बन के फिर इन्सान होकर ही मरूंगा । ------------ अतृप्त . . .

पिनाडी पिनाडी पिनाडी………

अमरेंद्र बाहुबली ·

Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना.... ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे. अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच. टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 28/09/2024 - 12:15
लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय. हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

संग्राम 29/09/2024 - 08:24
खूप छान वर्णन केलेत अबा ... या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला .... सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही .... आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा 29/09/2024 - 17:41
अ.बा., बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे. आ.न., -ना.न.

Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना.... ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे. अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच. टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 28/09/2024 - 12:15
लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय. हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

संग्राम 29/09/2024 - 08:24
खूप छान वर्णन केलेत अबा ... या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला .... सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही .... आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा 29/09/2024 - 17:41
अ.बा., बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे. आ.न., -ना.न.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं. हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू.

African Love Bird

कर्नलतपस्वी ·

कंजूस 27/09/2024 - 03:21
वा. सुंदर. पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) . पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

In reply to by कंजूस

पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला. पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस 27/09/2024 - 09:24
हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

In reply to by प्रचेतस

आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti 27/09/2024 - 12:57
A दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;) लाल गडद फुलोरा उधळला पाकळ्यांचा बोलावे प्रेम पाखरा..

In reply to by Bhakti

कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले भक्ती,धन्यवाद. सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

In reply to by Bhakti

एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत. फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा 27/09/2024 - 15:43
लेख बेहद्द आवडला. फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती. बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत. मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

श्वेता२४ 28/09/2024 - 12:14
कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१ 29/09/2024 - 11:03
अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

गवि 01/10/2024 - 14:25
लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 02/10/2024 - 12:42
दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा. ... तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर. - बाबा चमत्कार

एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता. गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते. चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.

कंजूस 27/09/2024 - 03:21
वा. सुंदर. पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) . पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

In reply to by कंजूस

पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला. पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस 27/09/2024 - 09:24
हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

In reply to by प्रचेतस

आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti 27/09/2024 - 12:57
A दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;) लाल गडद फुलोरा उधळला पाकळ्यांचा बोलावे प्रेम पाखरा..

In reply to by Bhakti

कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले भक्ती,धन्यवाद. सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

In reply to by Bhakti

एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत. फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा 27/09/2024 - 15:43
लेख बेहद्द आवडला. फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती. बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत. मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

श्वेता२४ 28/09/2024 - 12:14
कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१ 29/09/2024 - 11:03
अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

गवि 01/10/2024 - 14:25
लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 02/10/2024 - 12:42
दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा. ... तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर. - बाबा चमत्कार

एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता. गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते. चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.

भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम

srahul ·

स्टार सिष्टीमचा धावता लेखाजोगा आवडला. धावपळीतच लेखन वाचले. कुंदनलाल सैगलपर्यंत आलो आणि अटकलो. गाणं आठवलं. जब दिल ही तुटही गया आज ऐंशी वय झालीत त्या गाण्याला पण ती चाल, ते संगीत तो आवाज तितकंच भारी. लेखन आवडले. विषयही वेगळा, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 26/09/2024 - 16:07
- एकूणच भारतीय चित्रपटातील विषयातील विविधता वाढली , - वास्तवता जास्त येऊ लागली - आणि त्याच बरोबर ओटीटी तंत्रन्यान आले , मोठ्या आकाराचे टी व्ही स्वस्त झाले म्हणून घरपोच चित्र पोचवणे कमी किमतीत होऊ लागले , चित्रपट गृहात जायलाच पाहिजे असे राहीले नाही - जरा आड वळणे विचार केला तर याचा संबंध थोडा फार आलेलया या सुबत्तेशी हि आहे, कारण जेवहा खायला मरमर होती तेव्हा रंगीत दुनिया दाखवणरे स्टार वाले सिनेमे लोकांना आवडायचे, सुबत्ता आल्यावर विचार कारायाला लावणारे निव्वळ मनोरंजन ना करणारे चित्रपट बघायला उसंत मिळू लागली - तरी अजूनही स्टार आहेत फक्त तो स्टार फक्त चिकना चोपडा राजेश खन्ना ना राहता "राजकुमार राव पासून ते गजराज राव" सारखे मध्यम वयाचे हि स्टार झाले .. ( ओटीटी बद्दल फक्त एक गोष्ट आहे की त्यावर निर्बंध कमी आहेत ... ती झाली दुधारी तलवार पण तो विषय वेगळा आहे म्हणा )

नठ्यारा 26/09/2024 - 18:51
राहुल सांखवाळकर, तुम्ही वर्णन केलेलं परिप्रेक्ष्य आवडलं. माझ्यासारख्या नाटक चित्रपट वगैरेतलं फारसं काही न कळणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही केलेली स्टारपदाची कारणमीमांसा मौलिक आहे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

बदल हा स्थाई भाव असल्याने चित्रपट सृष्टी याला अपवाद कशी असेल. सिंहावलोकन करताना झालेले बदल हे अनिवार्य होते हे आपल्या लेखात प्रकर्षाने जाणवले. माहितीपूर्ण लेख.

सौंदाळा 28/09/2024 - 12:38
लेख आवडला आणि पटला. हल्लीचे बॉलिवूडछाप बहुतांश चित्रपट आवडायचे नाहीतच. पण लॉक डाऊन मध्ये हिंदी वेबसिरिज त्याचा, कंटेंट, लोकेशन, त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय बघून तर हे मत आता अजूनच पक्के झाले आहे. सहज विचार आला, खेळांमध्ये ही स्टार सिस्टीम राहीलच पण चित्रपटांमधून मात्र ती लुप्त होत चालली आहे. पुलेशु

चौथा कोनाडा 01/10/2024 - 21:00
छान मागोवा .. लेख आवडला ... काळानुरुप बदल घडत राहणार ! तो सुवर्णकाळ गेला .. ते स्टार्स, सुपरस्टार्स ... गेले ते दिवस, सध्या यू ट्युबर, रील मेकर, पॉड कास्टर, खेळाडू असले लोक स्टार झालेत पण त्यांच हे पद तसं अल्पायुषी आहे ! ओटीटी व्यासपीठ हा हव्या त्या चोखंदळ कालकृती पाहण्यासाठी एक फार छान पर्याय निर्माण झालाय ! आणखी ही बदल होतील ... आपन लक्ष ठेऊन रहायला हवे.

स्टार सिष्टीमचा धावता लेखाजोगा आवडला. धावपळीतच लेखन वाचले. कुंदनलाल सैगलपर्यंत आलो आणि अटकलो. गाणं आठवलं. जब दिल ही तुटही गया आज ऐंशी वय झालीत त्या गाण्याला पण ती चाल, ते संगीत तो आवाज तितकंच भारी. लेखन आवडले. विषयही वेगळा, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 26/09/2024 - 16:07
- एकूणच भारतीय चित्रपटातील विषयातील विविधता वाढली , - वास्तवता जास्त येऊ लागली - आणि त्याच बरोबर ओटीटी तंत्रन्यान आले , मोठ्या आकाराचे टी व्ही स्वस्त झाले म्हणून घरपोच चित्र पोचवणे कमी किमतीत होऊ लागले , चित्रपट गृहात जायलाच पाहिजे असे राहीले नाही - जरा आड वळणे विचार केला तर याचा संबंध थोडा फार आलेलया या सुबत्तेशी हि आहे, कारण जेवहा खायला मरमर होती तेव्हा रंगीत दुनिया दाखवणरे स्टार वाले सिनेमे लोकांना आवडायचे, सुबत्ता आल्यावर विचार कारायाला लावणारे निव्वळ मनोरंजन ना करणारे चित्रपट बघायला उसंत मिळू लागली - तरी अजूनही स्टार आहेत फक्त तो स्टार फक्त चिकना चोपडा राजेश खन्ना ना राहता "राजकुमार राव पासून ते गजराज राव" सारखे मध्यम वयाचे हि स्टार झाले .. ( ओटीटी बद्दल फक्त एक गोष्ट आहे की त्यावर निर्बंध कमी आहेत ... ती झाली दुधारी तलवार पण तो विषय वेगळा आहे म्हणा )

नठ्यारा 26/09/2024 - 18:51
राहुल सांखवाळकर, तुम्ही वर्णन केलेलं परिप्रेक्ष्य आवडलं. माझ्यासारख्या नाटक चित्रपट वगैरेतलं फारसं काही न कळणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही केलेली स्टारपदाची कारणमीमांसा मौलिक आहे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

बदल हा स्थाई भाव असल्याने चित्रपट सृष्टी याला अपवाद कशी असेल. सिंहावलोकन करताना झालेले बदल हे अनिवार्य होते हे आपल्या लेखात प्रकर्षाने जाणवले. माहितीपूर्ण लेख.

सौंदाळा 28/09/2024 - 12:38
लेख आवडला आणि पटला. हल्लीचे बॉलिवूडछाप बहुतांश चित्रपट आवडायचे नाहीतच. पण लॉक डाऊन मध्ये हिंदी वेबसिरिज त्याचा, कंटेंट, लोकेशन, त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय बघून तर हे मत आता अजूनच पक्के झाले आहे. सहज विचार आला, खेळांमध्ये ही स्टार सिस्टीम राहीलच पण चित्रपटांमधून मात्र ती लुप्त होत चालली आहे. पुलेशु

चौथा कोनाडा 01/10/2024 - 21:00
छान मागोवा .. लेख आवडला ... काळानुरुप बदल घडत राहणार ! तो सुवर्णकाळ गेला .. ते स्टार्स, सुपरस्टार्स ... गेले ते दिवस, सध्या यू ट्युबर, रील मेकर, पॉड कास्टर, खेळाडू असले लोक स्टार झालेत पण त्यांच हे पद तसं अल्पायुषी आहे ! ओटीटी व्यासपीठ हा हव्या त्या चोखंदळ कालकृती पाहण्यासाठी एक फार छान पर्याय निर्माण झालाय ! आणखी ही बदल होतील ... आपन लक्ष ठेऊन रहायला हवे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम" . धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला. भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल. मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती. सुरुवातीच्या काळात निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, वितरण, प्रदर्शन या साऱ्या जबाबदाऱ्या दादासाहेब फाळके (प्रत्यक्ष अथवा

शोनार बांगला...! भाग ७ – राजशाही बांगलादेश

समर्पक ·

श्वेता२४ 26/09/2024 - 15:24
प्रत्येक स्थानाचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याने खूपच माहितीपूर्ण लेखमाला झाली आहे. याला काही पर्यटन म्हणता येणार नाही. तिर्थयात्राच म्हणावे लागेल. फोटो मस्त.

झकासराव 26/09/2024 - 17:14
अत्यंत महत्वाचा दस्तऐवज तयार होत आहे. आता सत्ता पालट झाल्यावर काय स्थिती असेल देव जाणे. शक्ती पिठ असलेले मंदिर , अजिबात गर्दी नाही आणि भारतातल्या एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द गावातल्या मंदिरापेक्षा साधे मंदिर बघून काय वाटतेय ते शब्दात नीट मांडता येत नाही. केव्हातरी 51 शक्तीपीठ दर्शन व्हावे अशी इच्छा मनात आली होती. तेव्हा ही शक्तीपीठ सगळी भारतात आहे असा गैरसमज होता. उत्तम लिहिताय.

श्वेता२४ 26/09/2024 - 15:24
प्रत्येक स्थानाचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याने खूपच माहितीपूर्ण लेखमाला झाली आहे. याला काही पर्यटन म्हणता येणार नाही. तिर्थयात्राच म्हणावे लागेल. फोटो मस्त.

झकासराव 26/09/2024 - 17:14
अत्यंत महत्वाचा दस्तऐवज तयार होत आहे. आता सत्ता पालट झाल्यावर काय स्थिती असेल देव जाणे. शक्ती पिठ असलेले मंदिर , अजिबात गर्दी नाही आणि भारतातल्या एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द गावातल्या मंदिरापेक्षा साधे मंदिर बघून काय वाटतेय ते शब्दात नीट मांडता येत नाही. केव्हातरी 51 शक्तीपीठ दर्शन व्हावे अशी इच्छा मनात आली होती. तेव्हा ही शक्तीपीठ सगळी भारतात आहे असा गैरसमज होता. उत्तम लिहिताय.
Temple

पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई

प्रचेतस ·

कंजूस 25/09/2024 - 04:09
पावसाळी निसर्ग सुंदर. तिकडे जाऊनच अनुभवावे लागेल. देवराई आणि ते नाद करणारे खडक - सुंदरच. 'पाण्यात उमललेली झुडपे' - ही नंतर जांभळ्या फुलांनी भरून जातात. उंची दहा बारा इंचच राहाते. निसर्ग ठेवा. असाच राहो. 'पांढरी फुले' - यांचं 'कोकण पिंड' नाव फार आवडले.

थोडीशी विश्रांती हवी असेल तर अधून मधून जमेल तसा निसर्ग संवाद साधला पाहिजे. कित्येक व्याधीवर हा चांगला उपाय आहे. निसर्ग बघण्यास जरूरी नाही की काश्मीर, उटी महाबळेश्वर इथेच जायला हवे. मनचक्षू मिचकावले की आजूबाजूस भरपूर दिसतो. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरूणी काश्मीर.... असेच काहीसे. लेख, प्रचि नेहमीप्रमाणेच सुंदर.

झकासराव 25/09/2024 - 14:46
डोळे निवले सह्याद्रीचे हिरवेगार सौंदर्य हाच सह्याद्री उन्हाळ्यात राकट देशा वै होतो

च्यायला, मला वाटलं जुनंच दळन वर आणलय कोणी. सध्या केवळ फोटो चाळले. लेखन वाचून सविस्तर दाद देईन. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

किल्लेदार 26/09/2024 - 06:44
आजकाल ओलं व्हायला जीवावर येतं त्यामुळं मिपावर घरबसल्याच अशा सहलींची मजा घेता येते. अवांतर - सर्व फोटोज् 16:9 न ठेवता 4:3 इमेज रेशो मध्ये जास्त छान दिसतील. 16:9 मध्ये सेंसरचे पोटेन्शियल पूर्णपणे वापरल्या जात नाही. *कृपया आगाऊपणा मानू नये*

In reply to by किल्लेदार

प्रचेतस 26/09/2024 - 12:08
धन्यवाद. खरं तर मला हे फोटो अपलोड केल्यावर हे लक्षात आले. सर्व फोटो मोबाईलमधूनच काढलेले आहेत. १६:९ रेशोला मोबाईलवर पूर्ण स्क्रीन भरुन गेल्यामुळे फोटो अधिक सुंदर दिसतात मात्र हेच फोटो वेबसाईटवर अपलोड केल्यावर जरा ताणलेले दिसतात. आता ४:३ रेशो ठेवूनच फोटो काढेन. बदामीचे, ऐहोळेचे ४:३ मध्येच होते त्यामुळे ते अधिक चांगले वाटतात.

गवि 01/10/2024 - 11:49
नेहमीप्रमाणेच उत्तम वर्णन आणि छायाचित्रे. कोणा ज्येष्ठ सदस्यांनी (मी इथे कोणाचे नाव घेत नाहीये) तुमच्या जुन्या लेखनाला दळण असे म्हटल्याचा खेद वाटला हे प्रांजळपणे नमूद करतो.

कंजूस 25/09/2024 - 04:09
पावसाळी निसर्ग सुंदर. तिकडे जाऊनच अनुभवावे लागेल. देवराई आणि ते नाद करणारे खडक - सुंदरच. 'पाण्यात उमललेली झुडपे' - ही नंतर जांभळ्या फुलांनी भरून जातात. उंची दहा बारा इंचच राहाते. निसर्ग ठेवा. असाच राहो. 'पांढरी फुले' - यांचं 'कोकण पिंड' नाव फार आवडले.

थोडीशी विश्रांती हवी असेल तर अधून मधून जमेल तसा निसर्ग संवाद साधला पाहिजे. कित्येक व्याधीवर हा चांगला उपाय आहे. निसर्ग बघण्यास जरूरी नाही की काश्मीर, उटी महाबळेश्वर इथेच जायला हवे. मनचक्षू मिचकावले की आजूबाजूस भरपूर दिसतो. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरूणी काश्मीर.... असेच काहीसे. लेख, प्रचि नेहमीप्रमाणेच सुंदर.

झकासराव 25/09/2024 - 14:46
डोळे निवले सह्याद्रीचे हिरवेगार सौंदर्य हाच सह्याद्री उन्हाळ्यात राकट देशा वै होतो

च्यायला, मला वाटलं जुनंच दळन वर आणलय कोणी. सध्या केवळ फोटो चाळले. लेखन वाचून सविस्तर दाद देईन. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

किल्लेदार 26/09/2024 - 06:44
आजकाल ओलं व्हायला जीवावर येतं त्यामुळं मिपावर घरबसल्याच अशा सहलींची मजा घेता येते. अवांतर - सर्व फोटोज् 16:9 न ठेवता 4:3 इमेज रेशो मध्ये जास्त छान दिसतील. 16:9 मध्ये सेंसरचे पोटेन्शियल पूर्णपणे वापरल्या जात नाही. *कृपया आगाऊपणा मानू नये*

In reply to by किल्लेदार

प्रचेतस 26/09/2024 - 12:08
धन्यवाद. खरं तर मला हे फोटो अपलोड केल्यावर हे लक्षात आले. सर्व फोटो मोबाईलमधूनच काढलेले आहेत. १६:९ रेशोला मोबाईलवर पूर्ण स्क्रीन भरुन गेल्यामुळे फोटो अधिक सुंदर दिसतात मात्र हेच फोटो वेबसाईटवर अपलोड केल्यावर जरा ताणलेले दिसतात. आता ४:३ रेशो ठेवूनच फोटो काढेन. बदामीचे, ऐहोळेचे ४:३ मध्येच होते त्यामुळे ते अधिक चांगले वाटतात.

गवि 01/10/2024 - 11:49
नेहमीप्रमाणेच उत्तम वर्णन आणि छायाचित्रे. कोणा ज्येष्ठ सदस्यांनी (मी इथे कोणाचे नाव घेत नाहीये) तुमच्या जुन्या लेखनाला दळण असे म्हटल्याचा खेद वाटला हे प्रांजळपणे नमूद करतो.
ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज. अगदी १० दिवसांपूर्वीच ऐन गणेशोत्सवात आंबे- हातविजला जाणं झालं. खरं तर मूळ प्लॅन होता तो आहुपे घाटात जायचा, पण काही कारणास्तव मंचर ऐवजी पुढे नारायणगावनजीक मित्राच्या गावाला पिंपळवंडीला जावे लागले, तिकडून परत मंचरला जाण्याऐवजी जुन्नर जवळ, आणि जुन्नरवरुन आंबे - हातविज जवळ त्यामुळे तिथे आधी जाऊन मग तिथूनच आहुपेला जाण्याचे ठरवले. हा भाग अति परिचयाचा, नाणेघाटात इकडून अनेकदा गेल्यामुळे संपूर्ण रस्ता माहितीचा.

दिवा

अनन्त्_यात्री ·

चंद्राची धग ? आर यु किडिंग मी ? श्या पहिल्याच घासाला दाताखाली खडा लागल्यासारखं झालं. बाकी भोंवंडल्या नेणीवा वगैरे नेहमी प्रमाणे बाऊंन्स असल्याने ... असोच.

चंद्राची धग ? आर यु किडिंग मी ? श्या पहिल्याच घासाला दाताखाली खडा लागल्यासारखं झालं. बाकी भोंवंडल्या नेणीवा वगैरे नेहमी प्रमाणे बाऊंन्स असल्याने ... असोच.
लेखनविषय:
चंद्राची धग क्षीण होत सरता घेरून ये गारवा रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे वृक्षातळी पारवा तेजाचे ऋण फेडण्यास भटके तार्‍यांसवे काजवा जीर्णाचे अवशेष येथ कुठले उन्मेष जेथे नवा प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता भोवंडल्या नेणिवा अस्ताचे भय भास्करास कुठले जो चेतनांचा दिवा

अवयव दान

टीपीके ·

कंजूस 20/09/2024 - 12:23
डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एकाने सांगितले की रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक बोलावतात. यांची इच्छा होती डोळे द्यायची. त्याप्रमाणे जाऊन घेऊन येतो. पण काही उपयोग होत नाही. इथे डोळ्यांसाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. तर काय अडचण येत असावी. वयाचा प्रश्न येत असावा. डोळ्यांचा चित्र दिसणारा पडदा(रेटिना) बदलता येत असेल तरच दृष्टी येते. पण ते अशक्य असावे. बाकी खोटा डोळा लावल्याने काही उपयोग नाही.

Nitin Palkar 26/09/2024 - 20:14
अवयव दान आणि देहदान याबाबत अद्याप अनेक गैरसमज समाजात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अवयव दान हे मेंदू मृत रुग्णाचेच करता येते. मृत्यू पश्चात अवयव दान हे फक्त डोळे व त्वचा यांचेच करता येते. आज अनेक रुग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत हे खरे आहे परंतु अवयव दानाची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची राज्य शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच केंद्र शासकीय रुग्णालयांमध्ये प्रतीक्षा सूची तयार केलेली असते. अवयव दान अपेक्षीत रुग्णांनी तिथे नोंदणी करणे गरजेचे असते. अवयव दान संदर्भात राज्य शासनाने तसेच केन्द्र शासनाने Regional Organ and Tissue Transplant Organization (ROTTO) is one of the three tiers of the National Organ and Tissue Transplant Programme (NOTP) रोटो, नोटो आदी समित्या स्थापन केलेल्या आहेत. अवयव दानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांनी या इथे नोंदणी करावी लागते. या समित्यांची कार्यालय सर्व सरकारी रुग्णालये अथवा महापालिका रुग्णालये येथे असतात. कोणीही मृत्यू झाल्यानंतर यांच्या हृदय किंवा मूत्रपिंड यांचे दान करू असे म्हणून दान करता येत नाही अपघातामध्ये जेव्हा एखादा रुग्ण मेंदू मृत म्हणजे (Brain dead) घोषित केला जातो अशाच रुग्णाचे हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आदी अवयव दान करता येतात त्यासाठी अनेक चाचण्या आहेत प्रत्येक रुग्णाचे अवयव दान करता येतातच असे नव्हे अवयव दानाच्या बाबतीत मेंदू मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे आवश्यक असते, हा निर्णय रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यायचा असतो. अन्य बाबतीत संपूर्ण मृतदेहाचे दान करणे हा एक चांगला मार्ग उपलब्ध असतो. यामध्ये मृतदेह नजीकच्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये न्यावा लागतो. आणि हे काम मृताच्या नातेवाईकांनी करावयाचे असते या बाबतीत समनवयन करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. अवयव दानासंबंधी अधिक महिती साठी पुढील क्रमांकावर WhatsApp करू शकता नितीन पालकर 98691 95901.

कंजूस 20/09/2024 - 12:23
डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एकाने सांगितले की रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक बोलावतात. यांची इच्छा होती डोळे द्यायची. त्याप्रमाणे जाऊन घेऊन येतो. पण काही उपयोग होत नाही. इथे डोळ्यांसाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. तर काय अडचण येत असावी. वयाचा प्रश्न येत असावा. डोळ्यांचा चित्र दिसणारा पडदा(रेटिना) बदलता येत असेल तरच दृष्टी येते. पण ते अशक्य असावे. बाकी खोटा डोळा लावल्याने काही उपयोग नाही.

Nitin Palkar 26/09/2024 - 20:14
अवयव दान आणि देहदान याबाबत अद्याप अनेक गैरसमज समाजात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अवयव दान हे मेंदू मृत रुग्णाचेच करता येते. मृत्यू पश्चात अवयव दान हे फक्त डोळे व त्वचा यांचेच करता येते. आज अनेक रुग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत हे खरे आहे परंतु अवयव दानाची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची राज्य शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच केंद्र शासकीय रुग्णालयांमध्ये प्रतीक्षा सूची तयार केलेली असते. अवयव दान अपेक्षीत रुग्णांनी तिथे नोंदणी करणे गरजेचे असते. अवयव दान संदर्भात राज्य शासनाने तसेच केन्द्र शासनाने Regional Organ and Tissue Transplant Organization (ROTTO) is one of the three tiers of the National Organ and Tissue Transplant Programme (NOTP) रोटो, नोटो आदी समित्या स्थापन केलेल्या आहेत. अवयव दानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांनी या इथे नोंदणी करावी लागते. या समित्यांची कार्यालय सर्व सरकारी रुग्णालये अथवा महापालिका रुग्णालये येथे असतात. कोणीही मृत्यू झाल्यानंतर यांच्या हृदय किंवा मूत्रपिंड यांचे दान करू असे म्हणून दान करता येत नाही अपघातामध्ये जेव्हा एखादा रुग्ण मेंदू मृत म्हणजे (Brain dead) घोषित केला जातो अशाच रुग्णाचे हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आदी अवयव दान करता येतात त्यासाठी अनेक चाचण्या आहेत प्रत्येक रुग्णाचे अवयव दान करता येतातच असे नव्हे अवयव दानाच्या बाबतीत मेंदू मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे आवश्यक असते, हा निर्णय रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यायचा असतो. अन्य बाबतीत संपूर्ण मृतदेहाचे दान करणे हा एक चांगला मार्ग उपलब्ध असतो. यामध्ये मृतदेह नजीकच्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये न्यावा लागतो. आणि हे काम मृताच्या नातेवाईकांनी करावयाचे असते या बाबतीत समनवयन करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. अवयव दानासंबंधी अधिक महिती साठी पुढील क्रमांकावर WhatsApp करू शकता नितीन पालकर 98691 95901.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले दोन आठवडे वडिलांच्या आजारपणामुळे ICU बाहेर वेळ काढणे चालू आहे. इथे माझ्यासारखे अनेक नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. इथे अनेक जण आपल्या आप्तांसाठी कोणी अवयव दाता मिळेल का याची वाट बघत, आशेवर बसलेले आहेत. या वेळात काहींचे आप्त दाता भेटल्याने बरे होउन घरी जाताना, तर काहींचा दात्यची वाट बघता बघता मृत्यू होताना, तर काहींसाठी वाट बघताना जे उपचार द्यावे लागतात त्या मधे पैशांचा प्रचंड चुराडा होताना बघतो आहे. काही लोकं पर राज्यतून येउन महिनोंमहीने दात्याची वाट बघत आहेत. माणूस जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर पण अवयव दान करू शकतो.