मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोनार बांगला...! भाग ६ – सिल्हेट बांगलादेश

समर्पक ·
Sunrise

श्री गणेश लेखमाला २०२४ -ब्रह्मघोटाळा

ज्ञानोबाचे पैजार ·
उपनिषदे म्हणजे भारतातील अनेक ऋषिमुनींच्या सखोल चिंतनाचा परिपाक आहे. विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानांचे हे भांडार आहे. 'उपनिषद' या शब्दाचा अर्थ 'गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या' असा होतो. उप-नि-सद असा विग्रह केला, तर जवळ जाणे, रहस्य उलगडणे असाही एक अर्थ निघू शकतो. या विश्वाचे कार्य चालवणाऱ्या शक्तीच्या जवळ जाऊन तिचे रहस्य उलगडण्याचा मार्ग म्हणजे उपनिषद. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असे म्हणतात. उपनिषदे ही वेदांचे अंतिम अंग आहे, म्हणून त्यांना 'वेदान्त' असेही म्हणतात. ज्ञानाची उच्चतम परिसीमा म्हणजे उपनिषदे.

उपनिषदांची प्राथमिक तोंडओळख अतीशय साध्या सोप्या सरळ भाषेत करून दिल्याबद्दल धन्यवाद. या विषयात अजीबात गती नाही पण जाणून घेण्याची उत्सुकता जरूर आहे. देवभाषा अवगत नसल्याने प्राकृत भाषेत कुठल्या विद्वानांनी याचा समर्पक उहापोह केला आहे कळाल्यास वाचण्याचा प्रयत्न करेन. वर दिलेले संस्कृत श्र्लोक सर्वश्रुत व साधारण रोजच्याच पठणातले ,ऐकण्यातले असल्याने लेख अधिक सोपा व वाचनीय वाटला. गणपती बाप्पा मोरया.

Bhakti 10/09/2024 - 13:03
वाह ! वाह! अतिशय रसाळ भाषेत समजावून सांगितले. वेद अपौरुषेय म्हणजे
याचा अर्थ इतकाच की हे दिव्य ज्ञान कोणाला तरी स्फुरलेले आहे
. माझ्या माहितीप्रमाणे ते कोणाला स्फुरलेही नाही.स्फुरणे ही क्रिया स्व साठी होत असते ना? ते ऋषींना दिसले,ते त्यांनी उतरून/लिहून घेतले. जाणकारांनी यावर आणखिन भाष्य करावे.

In reply to by Bhakti

मला उलगडलेला अर्थ असा की पुण्याहून मुंबईला जाताना काही ऋषी एक्स्प्रेसवेने गेले, काही जुन्या हायवेने गेले, काही इगतपुरी कसाराघाट मार्गे गेले, काही विमानाने गेले, तर काही रेल्वेने गेले आणि ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतल्यावर तो शब्दबद्ध करण्याचा प्रत्येक महर्षीने आपापल्या परी प्रयत्न केला. त्यांना जे दिसले ते जरा त्यांनी जसेच्या तसे उतरवून घेतले असते (कॉपी पेस्ट) तर प्रत्येक उपनिषद इतरांपेक्षा वेगळे (युनिक) झाले नसते. एडिसन ने विजेचा शोध लावला त्या आधी जगाला वीज माहीत नव्हती . विजेचा शोध कोणीही ऐरागैरा व्यक्ती लावू शकत नाही त्या करता विशेष बुद्धी, ज्ञान व कष्टांची गरज आहे. ब्रह्मज्ञानाचे तसे नाही ते सर्वांकरता समान उपलब्ध आहे. ऋषींनी वर्णन करण्या आधी सुद्धा ते अस्तित्वात होतेच आणि ज्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे त्या प्रत्येकाला स्वतःलाच त्याचा स्वतंत्रपणे शोध घ्यावा लागतो. या अर्थाने ते स्फुरले असा शब्द प्रयोग इथे केला आहे. पण जरा कोणाला या पेक्षाही जास्त चपखल प्रतिशद्ब सापडला तर त्याचे स्वागतच आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 11/09/2024 - 06:42
माझ्या माहितीप्रमाणे ते कोणाला स्फुरलेही नाही
वेदांमधे आणि उपनिषदांमधे काय समजावून सांगितलं आहे किंवा त्यात काय आहे हे महत्वाचं आहे. ते जर उपयुक्त आणि आचरण्यायोग्य असेल तर ते अपौरुषेय किंवा पौरुषेय असल्याने (कोणाला स्फुरले असेल नसेल) काही फरक पडायला नको असं मला वाटतं. चिंतन वेदांच्या आणि उपनिषदांच्या आशयावर केल्याने साध्य प्राप्तीकडे वाटचाल करता येइल न कि चिंतन त्यांच्या उगमावर केल्याने. थोडक्यात, कोणि आणि कधी लिहीले आहे त्यापेक्षा काय लिहीले आहे हे महत्वाचं! - (जाणकार नसलेला) सोकाजी तळटीपः माझं मत मांडलं आहे, जाणकार नसलो तरी. त्याबद्दल क्षमस्व. :)

In reply to by सोत्रि

Bhakti 11/09/2024 - 15:19
हे तर मान्यच आहे.पण अपौरुषेय हाच शब्द पहिल्यांदा वापरला जातो.याचा उहापोह करावा वाटतो.अपौरूषेय म्हणजे सृष्टी ज्ञान जे स्फुरत नाही ,ते नियम आहे म्हणजे आहेतच.ते कोणीच बनवले नाही ,रचले नाही. चार वेदांतून हे ज्ञान समजल्यावर त्यावर जे प्रश्न ,जिज्ञासा निर्माण झाली ती उपनिषदे रचना घडली. ऋषींनी शिष्यांसाठी एका उपनिषदांत एका विशिष्ट जिज्ञासेचे समाधान दिले.अजूनही जिज्ञासावर मनुष्य रचना करीत राहतो.

In reply to by Bhakti

Bhakti 10/04/2025 - 22:54
नादब्रह्मापासून शब्दब्रह्मरूपात अभिव्यक्त झालेले वेद आणि ही सर्व सृष्टी प्रलय काली पुनः नादब्रह्मातच विलीन होते आणि पुनः कल्पप्रादुर्भावाचे वेळी त्यातूनच साकार होत अभिव्यक्त होते. 'सूर्याचन्द्रमसौ धाता 'यथापूर्वमकल्पयत्। दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्वः'। (ऋ १०.१९०.३) या मंत्राचा हाच अभिप्राय दिसतो. एवंच, ब्रह्मयाने सृष्टीच्या प्रारंभी उच्चारलेल्या ॐ या ध्ननिलहरीतून मागील कल्पाप्रमाणेच नंतरच्या कल्पातही वेदांची अभिव्यक्ती झाली असल्यानेही वेद अपौरुषेय ठरतात. -संदर्भ: आपली वैदिक संस्कृती डॉ.त्रि.ना.धर्माधिकारी

Bhakti 10/09/2024 - 22:15
त्यांना जे दिसले ते जरा त्यांनी जसेच्या तसे उतरवून घेतले असते (कॉपी पेस्ट) तर प्रत्येक उपनिषद इतरांपेक्षा वेगळे (युनिक) झाले नसते.
उपनिषदे अपौरुषेय नाहीत..ते तर वेगवेगळ्या ऋषींनी अभ्यास करून लिहिले आहेत ना. वेद अपौरुषेय-श्रुतींनी पुढे पुढे जात राहिले.त्यात आजपर्यंत किंचितही बदल झाला नाही कारण त्यांची पठण करण्याची पद्धती,मागचा श्लोक जोडून पुढचा म्हटला जातो.कृष्ण द्वैपायन व्यासांनी हे सारे वेद व्यवस्थित चार भागात विभागले.

In reply to by सोत्रि

Bhakti 11/09/2024 - 15:08
अहो संहिता,मंत्र बदलले नाहीत.कारण तेच ते श्रुति स्मृतिने ,कडक नियमात पुढे येत गेले. बाकी ठिकाणी नक्कीच पाणी ओतून वाढीव काम झालं असणार.गमतीने म्हणतात की महाभारतात इतके श्लोक वाढवले गेले/जातात की काही दिवसांनी उंटावरून महाभारत घ्या पोथ्या वाहाव्या लागतील.

प्रचेतस 14/09/2024 - 11:03
व्वा.. माऊली, सुरेख लिहिलंय. महाभारतातले उल्लेखलेले परब्रह्म हे उपनिषदोत्तर असल्याने त्याचे निर्गुण स्वरुपात न दिसता सगुण स्वरुपात आपल्याला दिसते. परब्रह्म हेच जगताचे परम आदिकारण असून अत्यंत तेजस्वी आणि प्रकाशक आहे. त्यालाच योगी आपल्या अंतर्यामाने पाहतात. सूर्याला त्याचे ते ह्याच ब्रह्मापासून मिळालेले आहे. इंद्रियांना शक्तीदेखील त्याच ब्रह्मापासून मिळालेली आहे. त्या सनातन भगवंताचे दर्शन केवळ ज्ञानयोग्यांनाच होते. रसैर्वियुक्तं विविधैश्च गन्धै; रशब्दमस्पर्शमरूपवच्च | अग्राह्यमव्यक्तमवर्णमेकं; पञ्चप्रकारं ससृजे प्रजानाम् || न स्त्री पुमान्वापि नपुंसकं च; न सन्न चासत्सदसच्च तन्न | पश्यन्ति यद्ब्रह्मविदो मनुष्या; स्तदक्षरं न क्षरतीति विद्धि || त्याला विविध प्रकारचे रस, गंध, शब्द, स्पर्श, रूप यांचा यत्किंतही संपर्क नसून ते अव्यक्त आहे. ते, स्त्री, पुरुष किंवा नपुंसकही नाही. ते सत् आहे असे नाही किंवा ते असत् आहे असेही नाही. ते सद्सत्ही नाही. केवळ ब्रह्मवेत्त्या मनुष्यांनाच सा़क्षात्कार होतो. ते केव्हाही नष्ट होणारे नसल्याने त्यला अक्षर म्हणतात.

उपनिषदांची प्राथमिक तोंडओळख अतीशय साध्या सोप्या सरळ भाषेत करून दिल्याबद्दल धन्यवाद. या विषयात अजीबात गती नाही पण जाणून घेण्याची उत्सुकता जरूर आहे. देवभाषा अवगत नसल्याने प्राकृत भाषेत कुठल्या विद्वानांनी याचा समर्पक उहापोह केला आहे कळाल्यास वाचण्याचा प्रयत्न करेन. वर दिलेले संस्कृत श्र्लोक सर्वश्रुत व साधारण रोजच्याच पठणातले ,ऐकण्यातले असल्याने लेख अधिक सोपा व वाचनीय वाटला. गणपती बाप्पा मोरया.

Bhakti 10/09/2024 - 13:03
वाह ! वाह! अतिशय रसाळ भाषेत समजावून सांगितले. वेद अपौरुषेय म्हणजे
याचा अर्थ इतकाच की हे दिव्य ज्ञान कोणाला तरी स्फुरलेले आहे
. माझ्या माहितीप्रमाणे ते कोणाला स्फुरलेही नाही.स्फुरणे ही क्रिया स्व साठी होत असते ना? ते ऋषींना दिसले,ते त्यांनी उतरून/लिहून घेतले. जाणकारांनी यावर आणखिन भाष्य करावे.

In reply to by Bhakti

मला उलगडलेला अर्थ असा की पुण्याहून मुंबईला जाताना काही ऋषी एक्स्प्रेसवेने गेले, काही जुन्या हायवेने गेले, काही इगतपुरी कसाराघाट मार्गे गेले, काही विमानाने गेले, तर काही रेल्वेने गेले आणि ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतल्यावर तो शब्दबद्ध करण्याचा प्रत्येक महर्षीने आपापल्या परी प्रयत्न केला. त्यांना जे दिसले ते जरा त्यांनी जसेच्या तसे उतरवून घेतले असते (कॉपी पेस्ट) तर प्रत्येक उपनिषद इतरांपेक्षा वेगळे (युनिक) झाले नसते. एडिसन ने विजेचा शोध लावला त्या आधी जगाला वीज माहीत नव्हती . विजेचा शोध कोणीही ऐरागैरा व्यक्ती लावू शकत नाही त्या करता विशेष बुद्धी, ज्ञान व कष्टांची गरज आहे. ब्रह्मज्ञानाचे तसे नाही ते सर्वांकरता समान उपलब्ध आहे. ऋषींनी वर्णन करण्या आधी सुद्धा ते अस्तित्वात होतेच आणि ज्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे त्या प्रत्येकाला स्वतःलाच त्याचा स्वतंत्रपणे शोध घ्यावा लागतो. या अर्थाने ते स्फुरले असा शब्द प्रयोग इथे केला आहे. पण जरा कोणाला या पेक्षाही जास्त चपखल प्रतिशद्ब सापडला तर त्याचे स्वागतच आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 11/09/2024 - 06:42
माझ्या माहितीप्रमाणे ते कोणाला स्फुरलेही नाही
वेदांमधे आणि उपनिषदांमधे काय समजावून सांगितलं आहे किंवा त्यात काय आहे हे महत्वाचं आहे. ते जर उपयुक्त आणि आचरण्यायोग्य असेल तर ते अपौरुषेय किंवा पौरुषेय असल्याने (कोणाला स्फुरले असेल नसेल) काही फरक पडायला नको असं मला वाटतं. चिंतन वेदांच्या आणि उपनिषदांच्या आशयावर केल्याने साध्य प्राप्तीकडे वाटचाल करता येइल न कि चिंतन त्यांच्या उगमावर केल्याने. थोडक्यात, कोणि आणि कधी लिहीले आहे त्यापेक्षा काय लिहीले आहे हे महत्वाचं! - (जाणकार नसलेला) सोकाजी तळटीपः माझं मत मांडलं आहे, जाणकार नसलो तरी. त्याबद्दल क्षमस्व. :)

In reply to by सोत्रि

Bhakti 11/09/2024 - 15:19
हे तर मान्यच आहे.पण अपौरुषेय हाच शब्द पहिल्यांदा वापरला जातो.याचा उहापोह करावा वाटतो.अपौरूषेय म्हणजे सृष्टी ज्ञान जे स्फुरत नाही ,ते नियम आहे म्हणजे आहेतच.ते कोणीच बनवले नाही ,रचले नाही. चार वेदांतून हे ज्ञान समजल्यावर त्यावर जे प्रश्न ,जिज्ञासा निर्माण झाली ती उपनिषदे रचना घडली. ऋषींनी शिष्यांसाठी एका उपनिषदांत एका विशिष्ट जिज्ञासेचे समाधान दिले.अजूनही जिज्ञासावर मनुष्य रचना करीत राहतो.

In reply to by Bhakti

Bhakti 10/04/2025 - 22:54
नादब्रह्मापासून शब्दब्रह्मरूपात अभिव्यक्त झालेले वेद आणि ही सर्व सृष्टी प्रलय काली पुनः नादब्रह्मातच विलीन होते आणि पुनः कल्पप्रादुर्भावाचे वेळी त्यातूनच साकार होत अभिव्यक्त होते. 'सूर्याचन्द्रमसौ धाता 'यथापूर्वमकल्पयत्। दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्वः'। (ऋ १०.१९०.३) या मंत्राचा हाच अभिप्राय दिसतो. एवंच, ब्रह्मयाने सृष्टीच्या प्रारंभी उच्चारलेल्या ॐ या ध्ननिलहरीतून मागील कल्पाप्रमाणेच नंतरच्या कल्पातही वेदांची अभिव्यक्ती झाली असल्यानेही वेद अपौरुषेय ठरतात. -संदर्भ: आपली वैदिक संस्कृती डॉ.त्रि.ना.धर्माधिकारी

Bhakti 10/09/2024 - 22:15
त्यांना जे दिसले ते जरा त्यांनी जसेच्या तसे उतरवून घेतले असते (कॉपी पेस्ट) तर प्रत्येक उपनिषद इतरांपेक्षा वेगळे (युनिक) झाले नसते.
उपनिषदे अपौरुषेय नाहीत..ते तर वेगवेगळ्या ऋषींनी अभ्यास करून लिहिले आहेत ना. वेद अपौरुषेय-श्रुतींनी पुढे पुढे जात राहिले.त्यात आजपर्यंत किंचितही बदल झाला नाही कारण त्यांची पठण करण्याची पद्धती,मागचा श्लोक जोडून पुढचा म्हटला जातो.कृष्ण द्वैपायन व्यासांनी हे सारे वेद व्यवस्थित चार भागात विभागले.

In reply to by सोत्रि

Bhakti 11/09/2024 - 15:08
अहो संहिता,मंत्र बदलले नाहीत.कारण तेच ते श्रुति स्मृतिने ,कडक नियमात पुढे येत गेले. बाकी ठिकाणी नक्कीच पाणी ओतून वाढीव काम झालं असणार.गमतीने म्हणतात की महाभारतात इतके श्लोक वाढवले गेले/जातात की काही दिवसांनी उंटावरून महाभारत घ्या पोथ्या वाहाव्या लागतील.

प्रचेतस 14/09/2024 - 11:03
व्वा.. माऊली, सुरेख लिहिलंय. महाभारतातले उल्लेखलेले परब्रह्म हे उपनिषदोत्तर असल्याने त्याचे निर्गुण स्वरुपात न दिसता सगुण स्वरुपात आपल्याला दिसते. परब्रह्म हेच जगताचे परम आदिकारण असून अत्यंत तेजस्वी आणि प्रकाशक आहे. त्यालाच योगी आपल्या अंतर्यामाने पाहतात. सूर्याला त्याचे ते ह्याच ब्रह्मापासून मिळालेले आहे. इंद्रियांना शक्तीदेखील त्याच ब्रह्मापासून मिळालेली आहे. त्या सनातन भगवंताचे दर्शन केवळ ज्ञानयोग्यांनाच होते. रसैर्वियुक्तं विविधैश्च गन्धै; रशब्दमस्पर्शमरूपवच्च | अग्राह्यमव्यक्तमवर्णमेकं; पञ्चप्रकारं ससृजे प्रजानाम् || न स्त्री पुमान्वापि नपुंसकं च; न सन्न चासत्सदसच्च तन्न | पश्यन्ति यद्ब्रह्मविदो मनुष्या; स्तदक्षरं न क्षरतीति विद्धि || त्याला विविध प्रकारचे रस, गंध, शब्द, स्पर्श, रूप यांचा यत्किंतही संपर्क नसून ते अव्यक्त आहे. ते, स्त्री, पुरुष किंवा नपुंसकही नाही. ते सत् आहे असे नाही किंवा ते असत् आहे असेही नाही. ते सद्सत्ही नाही. केवळ ब्रह्मवेत्त्या मनुष्यांनाच सा़क्षात्कार होतो. ते केव्हाही नष्ट होणारे नसल्याने त्यला अक्षर म्हणतात.

श्री गणेश लेखमाला २०२४ - फार, फार, फार वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवातली गोष्ट

आजी ·
फार, फार, फार वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवातली गोष्ट फार, फार, फार, फार, फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. फार शब्द फार वेळा वापरला, नाही का हो? त्याला कारण आहे. कारण ही खरंच फाssssर जुनी अगदी प्राचीन कथा आहे. माझीच. मी प्राचीन आहे हे माझ्याच तोंडाने कबूल करणं एक स्त्री म्हणून मला शोभत नाही. पण आता माझं म्हातारपण 'छुपाए न छुपाया जाय' ह्या कॅटेगरीत आलंय. मी आज ७५ वर्षांची आहे आणि ही गोष्ट आहे माझ्या लग्नानंतर लगेच घडलेली. लग्नात मी होते चोविशी उलटलेली. म्हणजे ५० वर्षं झाली आहेत या हकिकतीला. तर आमचं नवं नवं लग्न झालेलं होतं. घरात आम्ही दोघंच.

गवि 10/09/2024 - 08:34
हा हा हा . थोडक्यात आणि सुटसुटीत प्लॅनची चांगलीच वाट लागली म्हणायची. कधी तरी उजव्या सोंडेचा गणपती आणून त्याचे कडक नियम असतात त्यातले काहीतरी करायचे हातून राहून गेले असेल.. म्हणून त्याने हे घडवून आणले असेल ;-)) गंमत अपार्ट. लेख आवडला. शेवटचा लालूवाला प्रसंग तर फारच भारी. कॉलेज मधले असे अनेक लालू आठवले.

Bhakti 11/09/2024 - 10:30
हा हा, मस्तच! म्हणूनच मी गाऊनवर समोरच्या दुकानातही जात नाही.कोणीतरी भेटतच, युनिव्हर्सल प्रोब्लेम आहे हा ;)

खेडूत 11/09/2024 - 17:37
खूपच छान आठवण आणि लेखनशैली आजीबाई! (आमच्या हिला वाचायला देणार होतो, पण नको बाबा. पंचवीस वर्षापूर्वीच्या जुन्यापान्या आठवणी काढेल - ज्या मी कधीच विसरून गेलो असणार..)

वामन देशमुख 18/09/2024 - 13:08
व्वा आज्जे! काय भारी लिहिलंय! वाक्यावाक्याला चिमटे-गुदगुल्या होताहेत...
सटवी खूप नटलेली होती
घरी जाऊन याबद्दल अधिक चौकशी करणं आवश्यक होतं
असली पंचपेरणी म्हणजे आधीच खमंग झालेल्या चिवड्यात तळून टाकलेले खुसखुशीत खारे काजू! खरंच हेवा वाटतो तुमच्या निवेदन शैलीचा! अजून किमान पंचवीस वर्षे तुम्ही असेच लिहीत राहो ही गणपती बाप्पाला प्रार्थना! _/\_

चौथा कोनाडा 21/09/2024 - 17:38
हा .... हा .... हा .... ! लै चित्रदर्शी लिव्हलंय ! समदं चित्र डोळ्याफुडं उबं राह्यलं बगा ! मस्त सिनेमा काढण्यासारखी सिच्युएशन आन पटक-कथा ! मजा आली आजी !

गवि 10/09/2024 - 08:34
हा हा हा . थोडक्यात आणि सुटसुटीत प्लॅनची चांगलीच वाट लागली म्हणायची. कधी तरी उजव्या सोंडेचा गणपती आणून त्याचे कडक नियम असतात त्यातले काहीतरी करायचे हातून राहून गेले असेल.. म्हणून त्याने हे घडवून आणले असेल ;-)) गंमत अपार्ट. लेख आवडला. शेवटचा लालूवाला प्रसंग तर फारच भारी. कॉलेज मधले असे अनेक लालू आठवले.

Bhakti 11/09/2024 - 10:30
हा हा, मस्तच! म्हणूनच मी गाऊनवर समोरच्या दुकानातही जात नाही.कोणीतरी भेटतच, युनिव्हर्सल प्रोब्लेम आहे हा ;)

खेडूत 11/09/2024 - 17:37
खूपच छान आठवण आणि लेखनशैली आजीबाई! (आमच्या हिला वाचायला देणार होतो, पण नको बाबा. पंचवीस वर्षापूर्वीच्या जुन्यापान्या आठवणी काढेल - ज्या मी कधीच विसरून गेलो असणार..)

वामन देशमुख 18/09/2024 - 13:08
व्वा आज्जे! काय भारी लिहिलंय! वाक्यावाक्याला चिमटे-गुदगुल्या होताहेत...
सटवी खूप नटलेली होती
घरी जाऊन याबद्दल अधिक चौकशी करणं आवश्यक होतं
असली पंचपेरणी म्हणजे आधीच खमंग झालेल्या चिवड्यात तळून टाकलेले खुसखुशीत खारे काजू! खरंच हेवा वाटतो तुमच्या निवेदन शैलीचा! अजून किमान पंचवीस वर्षे तुम्ही असेच लिहीत राहो ही गणपती बाप्पाला प्रार्थना! _/\_

चौथा कोनाडा 21/09/2024 - 17:38
हा .... हा .... हा .... ! लै चित्रदर्शी लिव्हलंय ! समदं चित्र डोळ्याफुडं उबं राह्यलं बगा ! मस्त सिनेमा काढण्यासारखी सिच्युएशन आन पटक-कथा ! मजा आली आजी !

श्री गणेश लेखमाला २०२४ - नाचणी - सुपर फूड

Bhakti ·
नाचणी, नागली याला फिंगर मिलेट, रागी याही नावांनी ओळखतात. शास्त्रीय नाव – एल्युसिन कोराकाना (Eleusine coracana) आहे. E. caracana subsp. Africana आफ्रिकाना यापासून उत्क्रांत झाली आहे. ही गवतासारखी दिसणारी एक तृणधान्य वनस्पती आहे. ३०००-५००० वर्षांपूर्वी पश्चिम युगांडा आणि इथियोपिया या अफ्रिकन देशांत नाचणीचे उत्पादन सुरू झाले. भारतामध्ये इ.स.पू. ३००च्या आसपास पश्चिम घाटापर्यंत पसरले. नाचणीचे बी / दाणे मोहरीसारखेच बारीक पण करड्या रंगांचे तपकिरी असते. त्यामुळे याची मळणी खूप आव्हानात्मक आहे. यातील गोदावरी, बी-११, पीईएस-११० इंडाफ८, दापोली-१, व्ही एल-१४९, निमगरवा, गरवा या जाती पिकवल्या जातात.

टर्मीनेटर 08/09/2024 - 13:08
छान! नाचणी महोत्सव तुम्ही अगदी दणक्यात साजरा केलेला दिसतोय 😀 पुर्वी केरळमध्ये पुट्टू तयार करण्याच्या परंपारीक पद्धतीत बांबुचा वापर केला जात असे. नंतर हे धातुचे साचे आल्यावर त्यात बनणाऱ्या पुट्टूची मजा मात्र कमी झाल्यासारखी वाटते! ह्या पार्श्वभुमिवर तुमचा हा नारळाच्या करवंटीचा प्रयोग भलताच आवडला आहे 👍

कंजूस 08/09/2024 - 13:58
पुट्टू नारळाच्या करवंटीत यासाठी दहा पैकी दहा गुण. पापड फार आवडतात. नाचणी रागी मुद्दे खाण्याचा प्रयोग चिकमगळुरात असफल झाला. मुद्दे आहे का विचारल्यावर तिकडे नानवेज रश्शात खातात हे हॉटेल मालकांनी सांगितले. आंबील करून ताकात चांगली लागते. (विदुला घरच्या पातळ कण्या म्हणजे कोणत्या कण्या वापरत असत माहीत नाही .पण ज्वारीचा रवा/कण्या भातासारखा उकडून ताक आणि लोणच्याबरोबर खाल्ला आहे. चविष्ट लागतो.. भाताची आठवण येत नाही.

नागलीची भाकरी,मिरचीचे लोणचे ,खास कोकणातले,वर तेलाची धार हा काॅम्बो फार आवडतो. बाकी विषयात हातखंडा असल्याने लेख माहितीपूर्ण झालाय. धन्यवाद.

प्रचेतस 08/09/2024 - 15:37
वा, नाचणीच्या पाकृ भारी झाल्यात. नाचणीचे पापड फार आवडतात. नाशिकसाईडला नागलीचे प्रमाण जास्त असल्याने तिथं जास्त होतात. पापडासाठीच्या उकड काढलेल्या गरमागरम लाट्या खायला फार आवडत असत.

nutanm 11/09/2024 - 12:08
जय जय महाराष्ट देशा|गरजा महाराष्टर देशा राकट देशा कणखर देशा दगडांचया देशा| सहयाद्रीला वरी नागली आणिक कणीकोंडा |प्रणाम घयावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा| लेख वाचताना ही कविता आठवत होती.( माझया कळफलकात बरीच जौडाकशरे नसल्याने असे अशुद्ध वाटणारे लेखन करावे लागते) kshamaswa। खूप सुंदर कविता असून वयामुळे. कविता आठवत नाही.. कविता आठवत होती..

चौथा कोनाडा 21/09/2024 - 21:53
नाचणीची भाकरी अत्यंत आवडीची ! एक नंबर रेसिपीज पुट्टू एक दोन वेळाच खाल्लेलं आहे.. आता चव सुध्दा लक्षात नाहीय ! आता आस्वाद घ्यायलाच हवा !

जुइ 15/10/2024 - 22:30
डिटेल पाकृ आवडल्या. नाचणी सत्वात तांदूळाचे प्रमाण किती घ्यायचे? नाचणी आंबिल सोपे वाटत आहे करायला.

टर्मीनेटर 08/09/2024 - 13:08
छान! नाचणी महोत्सव तुम्ही अगदी दणक्यात साजरा केलेला दिसतोय 😀 पुर्वी केरळमध्ये पुट्टू तयार करण्याच्या परंपारीक पद्धतीत बांबुचा वापर केला जात असे. नंतर हे धातुचे साचे आल्यावर त्यात बनणाऱ्या पुट्टूची मजा मात्र कमी झाल्यासारखी वाटते! ह्या पार्श्वभुमिवर तुमचा हा नारळाच्या करवंटीचा प्रयोग भलताच आवडला आहे 👍

कंजूस 08/09/2024 - 13:58
पुट्टू नारळाच्या करवंटीत यासाठी दहा पैकी दहा गुण. पापड फार आवडतात. नाचणी रागी मुद्दे खाण्याचा प्रयोग चिकमगळुरात असफल झाला. मुद्दे आहे का विचारल्यावर तिकडे नानवेज रश्शात खातात हे हॉटेल मालकांनी सांगितले. आंबील करून ताकात चांगली लागते. (विदुला घरच्या पातळ कण्या म्हणजे कोणत्या कण्या वापरत असत माहीत नाही .पण ज्वारीचा रवा/कण्या भातासारखा उकडून ताक आणि लोणच्याबरोबर खाल्ला आहे. चविष्ट लागतो.. भाताची आठवण येत नाही.

नागलीची भाकरी,मिरचीचे लोणचे ,खास कोकणातले,वर तेलाची धार हा काॅम्बो फार आवडतो. बाकी विषयात हातखंडा असल्याने लेख माहितीपूर्ण झालाय. धन्यवाद.

प्रचेतस 08/09/2024 - 15:37
वा, नाचणीच्या पाकृ भारी झाल्यात. नाचणीचे पापड फार आवडतात. नाशिकसाईडला नागलीचे प्रमाण जास्त असल्याने तिथं जास्त होतात. पापडासाठीच्या उकड काढलेल्या गरमागरम लाट्या खायला फार आवडत असत.

nutanm 11/09/2024 - 12:08
जय जय महाराष्ट देशा|गरजा महाराष्टर देशा राकट देशा कणखर देशा दगडांचया देशा| सहयाद्रीला वरी नागली आणिक कणीकोंडा |प्रणाम घयावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा| लेख वाचताना ही कविता आठवत होती.( माझया कळफलकात बरीच जौडाकशरे नसल्याने असे अशुद्ध वाटणारे लेखन करावे लागते) kshamaswa। खूप सुंदर कविता असून वयामुळे. कविता आठवत नाही.. कविता आठवत होती..

चौथा कोनाडा 21/09/2024 - 21:53
नाचणीची भाकरी अत्यंत आवडीची ! एक नंबर रेसिपीज पुट्टू एक दोन वेळाच खाल्लेलं आहे.. आता चव सुध्दा लक्षात नाहीय ! आता आस्वाद घ्यायलाच हवा !

जुइ 15/10/2024 - 22:30
डिटेल पाकृ आवडल्या. नाचणी सत्वात तांदूळाचे प्रमाण किती घ्यायचे? नाचणी आंबिल सोपे वाटत आहे करायला.

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

चित्रगुप्त ·

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

श्री गणेश लेखमाला २०२४ - ॥ श्रीगणेश स्तवन ॥

मी-दिपाली ·
॥ श्रीगणेश स्तवन ॥ जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु.॥ तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे सुमुख तुझे स्मरता अवघे खल,

गणेश स्तवन सुंदर झालंय गीत आणि साज संगीत मजा आगया. वृत्तात लिहिण्याचं कायम कौतुक आहे. पुलेशु. मिपास १८ व्या वर्धापनदिनाच्या खुप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

राघव 09/09/2024 - 04:59
अप्रतीम! खूप आवडले. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! :-)

गणेश स्तवन सुंदर झालंय गीत आणि साज संगीत मजा आगया. वृत्तात लिहिण्याचं कायम कौतुक आहे. पुलेशु. मिपास १८ व्या वर्धापनदिनाच्या खुप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

राघव 09/09/2024 - 04:59
अप्रतीम! खूप आवडले. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! :-)

श्रीकांत बोल्ला: दृष्टीहिन व्यक्तीचा डोळे उघडणारा प्रवास

मार्गी ·

चौथा कोनाडा 06/09/2024 - 13:21
थक्क करणारा संघर्ष .... लेखातुन उतरलेलं चित्र सिनेमा पहावाच असं वाटायला लावणारं आहे. एकच म्हणावेसे वाटते : दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती !

मार्गी 14/09/2024 - 11:52
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद व नमस्कार.

चौथा कोनाडा 06/09/2024 - 13:21
थक्क करणारा संघर्ष .... लेखातुन उतरलेलं चित्र सिनेमा पहावाच असं वाटायला लावणारं आहे. एकच म्हणावेसे वाटते : दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती !

मार्गी 14/09/2024 - 11:52
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद व नमस्कार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ “मै कोई बेचारा नही हूँ, हमें बेचारगी नही, बराबरी चाहिए" ✪ २% लोकांकडे दृष्टी नाही, पण ९८% लोकांकडे व्हिजन नाही ✪ जन्मल्यावर अंध बाळ म्हणून वडिलांनी जमिनीत पुरायचं ठरवलं ✪ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दूल कलामांसोबत भेट आणि त्यांची मदत ✪ क्षमतेला साकार करण्याची‌ वाट दाखवणारी शिक्षिका ✪ सिस्टीमसोबत संघर्ष करून बारावीनंतर विज्ञान घेतलेला पहिला भारतीय दृष्टीहिन विद्यार्थी ✪ अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि भारतामध्ये ८०% दिव्यांगांना रोजगार देणारा उद्योगपती ✪ प्रतिष्ठेचा पुरस्कार "स्पेशल कॅटेगरीतून नको" म्हणून नाकारण्याची हिंमत ✪ Know us not for our disability, but for our abilities! नमस्कार.

शोनार बांगला...! भाग ५ – चट्टग्राम/चितगांव

समर्पक ·

श्वेता२४ 05/09/2024 - 11:13
पाण्यामध्ये अग्नी कसा काय प्रज्वलित आहे. फारच आश्चर्य वाटले. निसर्गचित्रे व वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर

Bhakti 05/09/2024 - 19:06
पण हिमाचलच्या ज्वालादेवी व अझरबैजान-बाकूच्या ज्वालाजी प्रमाणे हे नैसर्गिक अग्नीचे स्थान असलेले मंदिर पाण्यावरील ज्योतिमुळे बाकी दोहोंपेक्षा विशेष वेगळे आहे. अझरबैजान -बाकू विषयी कालच समजले होते.म्हणजे सीताकुंड सह जगात अशी तीनच स्थान आहेत का? खुप छान माहिती आहे. खुपच सुंदर भटकंतीचा अनुभव आहे...कमाल!

In reply to by Bhakti

समर्पक 06/09/2024 - 13:41
"नैसर्गिक अग्नीचे स्थान असलेले मंदिर" अशी स्थाने माझ्या महितीत तरी ही तीनच आहेत. अन्यथा अशा ज्योती/ज्वाला अन्य अनेक ठिकाणी पहावयास मिळतात.

In reply to by समर्पक

नठ्यारा 06/09/2024 - 15:00
ज्वालापूर, नेपाळ, बाकू, वगैरे धरून तेराचौदा स्थाने सापडली आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.msn.com/en-gb/news/world/map-reveals-the-world-s-mysterious-eternal-flames/ss-BB1q00ct -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

समर्पक 06/09/2024 - 20:28
माझा प्रतिसाद मुख्यतो जिथे मन्दिरे आहेत त्या अनुशंगाने होता. वरील यादी मधील दरवाजे-तुर्कमेनिस्तान तर खासच आहे, नरकाचे द्वार म्हणून दरवाजे, परंतु ते एका फसलेल्या शोधकार्याचे फलित आहे. अन्य ज्योति-ज्वाला आहेत परंतु मन्दिरे नाहीत. मुक्तिनाथ मात्र या यादीत आहे. कालच टर्मिनेटर यांना व्यनी केलेला, की त्यांच्या नेपाळ भटकंतीचे वर्णन उत्तम चालू आहे, त्यात मुक्तिनाथ आहे का, नसल्यास एक पुरवणी लेख त्याविषयी लिहीन. ती ज्योत फारच लहान आहे मात्र...

In reply to by नठ्यारा

Bhakti 07/09/2024 - 19:06
कुदरती ज्वाला' अशा थीमबेस्ड भटकंतीत ही सगळी ठिकाणं पाहायची ;) ते नरकाचं दार खुपचं छान आहे.पण यातले बरेचसे कोळसा खाणीला आग लागून वर्षोनुवर्षे धगधगणारे अग्नी स्थाने आहेत.नैसर्गिक वायूचे ती मंदिर सोडून अजून दोन -तीनच दिसत आहेत.परत नीट वाचाव लागेल. धन्यवाद नाठाळ.

श्वेता२४ 05/09/2024 - 11:13
पाण्यामध्ये अग्नी कसा काय प्रज्वलित आहे. फारच आश्चर्य वाटले. निसर्गचित्रे व वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर

Bhakti 05/09/2024 - 19:06
पण हिमाचलच्या ज्वालादेवी व अझरबैजान-बाकूच्या ज्वालाजी प्रमाणे हे नैसर्गिक अग्नीचे स्थान असलेले मंदिर पाण्यावरील ज्योतिमुळे बाकी दोहोंपेक्षा विशेष वेगळे आहे. अझरबैजान -बाकू विषयी कालच समजले होते.म्हणजे सीताकुंड सह जगात अशी तीनच स्थान आहेत का? खुप छान माहिती आहे. खुपच सुंदर भटकंतीचा अनुभव आहे...कमाल!

In reply to by Bhakti

समर्पक 06/09/2024 - 13:41
"नैसर्गिक अग्नीचे स्थान असलेले मंदिर" अशी स्थाने माझ्या महितीत तरी ही तीनच आहेत. अन्यथा अशा ज्योती/ज्वाला अन्य अनेक ठिकाणी पहावयास मिळतात.

In reply to by समर्पक

नठ्यारा 06/09/2024 - 15:00
ज्वालापूर, नेपाळ, बाकू, वगैरे धरून तेराचौदा स्थाने सापडली आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.msn.com/en-gb/news/world/map-reveals-the-world-s-mysterious-eternal-flames/ss-BB1q00ct -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

समर्पक 06/09/2024 - 20:28
माझा प्रतिसाद मुख्यतो जिथे मन्दिरे आहेत त्या अनुशंगाने होता. वरील यादी मधील दरवाजे-तुर्कमेनिस्तान तर खासच आहे, नरकाचे द्वार म्हणून दरवाजे, परंतु ते एका फसलेल्या शोधकार्याचे फलित आहे. अन्य ज्योति-ज्वाला आहेत परंतु मन्दिरे नाहीत. मुक्तिनाथ मात्र या यादीत आहे. कालच टर्मिनेटर यांना व्यनी केलेला, की त्यांच्या नेपाळ भटकंतीचे वर्णन उत्तम चालू आहे, त्यात मुक्तिनाथ आहे का, नसल्यास एक पुरवणी लेख त्याविषयी लिहीन. ती ज्योत फारच लहान आहे मात्र...

In reply to by नठ्यारा

Bhakti 07/09/2024 - 19:06
कुदरती ज्वाला' अशा थीमबेस्ड भटकंतीत ही सगळी ठिकाणं पाहायची ;) ते नरकाचं दार खुपचं छान आहे.पण यातले बरेचसे कोळसा खाणीला आग लागून वर्षोनुवर्षे धगधगणारे अग्नी स्थाने आहेत.नैसर्गिक वायूचे ती मंदिर सोडून अजून दोन -तीनच दिसत आहेत.परत नीट वाचाव लागेल. धन्यवाद नाठाळ.
Bridge

प्रवास

प्रसाद गोडबोले ·

In reply to by प्रचेतस

मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
थोडी मनाच्या श्लोकांच्या अंगाने जाणारी वाटली.
ही खुप मोठ्ठी शाब्बासकी आहे माझ्यासाठी . समर्थांच्या सानिध्यात राहुन थोडातरी परिणाम झाला हा विचार खुप सुखद आहे ! _/\_

राघव 04/09/2024 - 17:50
आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे.
हे खास आणि गहिरं. बाकी आशय छान आणि मांडणीही!

In reply to by राघव

मनःपुर्वक धन्यवाद राघव ! नुकतेच गावाला जाऊन आलो. संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास अजिंक्यतार्‍याच्या पश्चिम टोकावर उभेराहुन तुफान पाऊस झेलताना सुचली ही ! नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ ज्ञानेश्वरीतील नाही पण अमृतानुभवातील एक ओवी "अनुभवाला" आली! घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥ __/\__

In reply to by प्रचेतस

मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
थोडी मनाच्या श्लोकांच्या अंगाने जाणारी वाटली.
ही खुप मोठ्ठी शाब्बासकी आहे माझ्यासाठी . समर्थांच्या सानिध्यात राहुन थोडातरी परिणाम झाला हा विचार खुप सुखद आहे ! _/\_

राघव 04/09/2024 - 17:50
आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे.
हे खास आणि गहिरं. बाकी आशय छान आणि मांडणीही!

In reply to by राघव

मनःपुर्वक धन्यवाद राघव ! नुकतेच गावाला जाऊन आलो. संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास अजिंक्यतार्‍याच्या पश्चिम टोकावर उभेराहुन तुफान पाऊस झेलताना सुचली ही ! नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ ज्ञानेश्वरीतील नाही पण अमृतानुभवातील एक ओवी "अनुभवाला" आली! घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥ __/\__
लेखनविषय:
काव्यरस
प्रवास कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा प्रवासाकडे लक्ष होते कुठे अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची कशाला फुका वेळ दवडा कुठे आता पोहचल्यावर असे वाटते की कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ? कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ? अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ? इथे नित्य होतो अनादी अनंतीं इथे जन्मलो, वाढलोही इथे इथे जागलो तुझिया कृपेने इथे बध्द अन् मुक्त झालो इथे निघालो जिथुनि तिथेची पोहचलो जिथे चालली वाट ती ही तिथे आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे. Welcome Home ! _________________________________

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)

Bhakti ·

श्वेता२४ 30/08/2024 - 15:52
बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे. माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल. हे कशाच्या अनुषंगाने आहे ते नाही कळले. मला तर वाटते की मानवाचा नको इतका हस्तक्षेप आधिच होतो आहे जंगलात व त्यामुळे नैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या प्राणी व झाडे, वनस्पती यांना हानी निर्माण होत आहे.

In reply to by श्वेता२४

Bhakti 30/08/2024 - 16:07
जंगलतोड,जंगलातील झाडांचे ५०-६० वय हे तर बाल्यावस्था आहे.२०० वय वगैरे त्यांचे वार्धक्याकडे जाणारे वय असते.पण आता वनखाते ठरवून एकाच पद्धतीने या झाडांची, परदेशी झाडांची लागवड करतात.संसाधनासाठी त्यांची लवकरच तोड करतात.मग अशा जमिनीवरच्या , जमिनीखालील परिसंस्था कशा टिकणार ? शहरातील झाडं एकल असतात आपल्या बांधवांपासून दूर,बोलणार कोणाशी?
बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे
आहे खरी.पण खरं सांगते भाषांतर खुप जड झालंय, पुस्तक इतके सहज समजत नाही.

In reply to by Bhakti

Bhakti 30/08/2024 - 17:53
कदाचित पुस्तकात बीच,स्प्रुस,ओक,विलो हे कधीही न पाहिलेल्या झाडांविषयी हे पुस्तक असल्याने समजायला वेळ लागला.पण एकदा नक्की वाचा.

कंजूस 30/08/2024 - 16:31
इंग्रजी पुस्तक वाचून झालं आहे. पाऊस पडल्यावर गवताचे हिरवे गार गालीचे पसरतात. पण हे गवताचे बी मागच्या वर्षी आठ महिन्यांपूर्वी मातीत पडलेले मुंग्या, पक्षी यांच्यापासून वाचते कसे? तेरडा, टाकळा, आघाडा,कुरडू वगैरे छोट्या झुडुपांचंही तेच. यांचेही कंद नसतात, बियाच असतात.

In reply to by कंजूस

Bhakti 30/08/2024 - 19:43
मुंग्या हे एकमेव प्रमुख कीटक बियाणे पसरवणारे आहेत. मुंग्यांच्या विखुरण्याशी जुळवून घेतलेल्या मायर्मेकोरस बियांमध्ये अनेकदा स्टार्च- किंवा लिपिड-युक्त शरीर असते ज्याला इलिओसोम म्हणतात ज्याला कठीण आणि गुळगुळीत बियाणे कोट जोडलेले असते जे मुंग्यांना क्रॅक करणे कठीण असते. मुंग्यांच्या निवडीमुळे बियांचा आकार देखील मर्यादित असतो - मोठ्या मुंग्या लहान मुंग्यांपेक्षा मोठ्या बिया वाहून नेतात. पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेत मुंग्या फार दूर बिया वाहून नेत नाहीत. तरीसुद्धा, मुंग्या अनेक वनस्पतींसाठी महत्त्वपूर्ण विखुरणारे असू शकतात. मुंग्या एकतर घरट्यात बिया साठवून ठेवू शकतात किंवा इलिओसोम काढून टाकतात आणि नंतर घरट्याच्या प्रवेशद्वारावर किंवा वसाहतीतील कचरा ढिगाऱ्यावर बिया टाकून देतात. दोन्ही ठिकाणी चांगली वायूयुक्त, पोषक-समृद्ध माती असते जी वनस्पतींची वाढ सुधारू शकते. मुंग्यांद्वारे गोळा केलेल्या बियांना इतर बियांच्या भक्षकांपासून त्यांच्या सक्रिय मुंग्यांच्या घरट्यांसोबत काही प्रमाणात संरक्षण देखील मिळू शकते , जे सहसा इतर प्राणी टाळतात. इरिडोमायरमेक्स ह्युमिलिस ), जे मायरमेकोरस बियाण्यांकडे जोरदारपणे आकर्षित होत नाहीत. कधीकधी बिया मुंग्यांव्यतिरिक्त इतर कीटकांद्वारे विखुरल्या जातात. उदाहरणार्थ, स्कॅरॅब बीटल बिया शेणाने पुरू शकतात. गवताळ प्रदेशात दीमक गवताच्या बिया पसरवण्यास मदत करते
.

आग्या१९९० 01/09/2024 - 08:53
तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक उगाच जास्त पाने खात बसला की Phyto chemical सोडून त्यांची चव तर खराब करतातच पण कित्येक मैल फेरोमोन्स या केमिकलचा गंध इतर झाडांना शत्रूपासून सावध राहायला संरक्षण होते. अशाच प्रकारची एक रहस्यमय माहिती https://www.maayboli.com/node/81754

धन्स. चांगली माहिती ओळख. झाडं लावली पाहिजेत. वाढवली पाहिजेत. काल अजिंठ्यांच्या डोंगररांगातील दाट जंगलात फिरलो. निसर्ग किमया कळते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 30/08/2024 - 15:52
बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे. माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल. हे कशाच्या अनुषंगाने आहे ते नाही कळले. मला तर वाटते की मानवाचा नको इतका हस्तक्षेप आधिच होतो आहे जंगलात व त्यामुळे नैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या प्राणी व झाडे, वनस्पती यांना हानी निर्माण होत आहे.

In reply to by श्वेता२४

Bhakti 30/08/2024 - 16:07
जंगलतोड,जंगलातील झाडांचे ५०-६० वय हे तर बाल्यावस्था आहे.२०० वय वगैरे त्यांचे वार्धक्याकडे जाणारे वय असते.पण आता वनखाते ठरवून एकाच पद्धतीने या झाडांची, परदेशी झाडांची लागवड करतात.संसाधनासाठी त्यांची लवकरच तोड करतात.मग अशा जमिनीवरच्या , जमिनीखालील परिसंस्था कशा टिकणार ? शहरातील झाडं एकल असतात आपल्या बांधवांपासून दूर,बोलणार कोणाशी?
बरीच रोचक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल असे वाटत आहे
आहे खरी.पण खरं सांगते भाषांतर खुप जड झालंय, पुस्तक इतके सहज समजत नाही.

In reply to by Bhakti

Bhakti 30/08/2024 - 17:53
कदाचित पुस्तकात बीच,स्प्रुस,ओक,विलो हे कधीही न पाहिलेल्या झाडांविषयी हे पुस्तक असल्याने समजायला वेळ लागला.पण एकदा नक्की वाचा.

कंजूस 30/08/2024 - 16:31
इंग्रजी पुस्तक वाचून झालं आहे. पाऊस पडल्यावर गवताचे हिरवे गार गालीचे पसरतात. पण हे गवताचे बी मागच्या वर्षी आठ महिन्यांपूर्वी मातीत पडलेले मुंग्या, पक्षी यांच्यापासून वाचते कसे? तेरडा, टाकळा, आघाडा,कुरडू वगैरे छोट्या झुडुपांचंही तेच. यांचेही कंद नसतात, बियाच असतात.

In reply to by कंजूस

Bhakti 30/08/2024 - 19:43
मुंग्या हे एकमेव प्रमुख कीटक बियाणे पसरवणारे आहेत. मुंग्यांच्या विखुरण्याशी जुळवून घेतलेल्या मायर्मेकोरस बियांमध्ये अनेकदा स्टार्च- किंवा लिपिड-युक्त शरीर असते ज्याला इलिओसोम म्हणतात ज्याला कठीण आणि गुळगुळीत बियाणे कोट जोडलेले असते जे मुंग्यांना क्रॅक करणे कठीण असते. मुंग्यांच्या निवडीमुळे बियांचा आकार देखील मर्यादित असतो - मोठ्या मुंग्या लहान मुंग्यांपेक्षा मोठ्या बिया वाहून नेतात. पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेत मुंग्या फार दूर बिया वाहून नेत नाहीत. तरीसुद्धा, मुंग्या अनेक वनस्पतींसाठी महत्त्वपूर्ण विखुरणारे असू शकतात. मुंग्या एकतर घरट्यात बिया साठवून ठेवू शकतात किंवा इलिओसोम काढून टाकतात आणि नंतर घरट्याच्या प्रवेशद्वारावर किंवा वसाहतीतील कचरा ढिगाऱ्यावर बिया टाकून देतात. दोन्ही ठिकाणी चांगली वायूयुक्त, पोषक-समृद्ध माती असते जी वनस्पतींची वाढ सुधारू शकते. मुंग्यांद्वारे गोळा केलेल्या बियांना इतर बियांच्या भक्षकांपासून त्यांच्या सक्रिय मुंग्यांच्या घरट्यांसोबत काही प्रमाणात संरक्षण देखील मिळू शकते , जे सहसा इतर प्राणी टाळतात. इरिडोमायरमेक्स ह्युमिलिस ), जे मायरमेकोरस बियाण्यांकडे जोरदारपणे आकर्षित होत नाहीत. कधीकधी बिया मुंग्यांव्यतिरिक्त इतर कीटकांद्वारे विखुरल्या जातात. उदाहरणार्थ, स्कॅरॅब बीटल बिया शेणाने पुरू शकतात. गवताळ प्रदेशात दीमक गवताच्या बिया पसरवण्यास मदत करते
.

आग्या१९९० 01/09/2024 - 08:53
तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक उगाच जास्त पाने खात बसला की Phyto chemical सोडून त्यांची चव तर खराब करतातच पण कित्येक मैल फेरोमोन्स या केमिकलचा गंध इतर झाडांना शत्रूपासून सावध राहायला संरक्षण होते. अशाच प्रकारची एक रहस्यमय माहिती https://www.maayboli.com/node/81754

धन्स. चांगली माहिती ओळख. झाडं लावली पाहिजेत. वाढवली पाहिजेत. काल अजिंठ्यांच्या डोंगररांगातील दाट जंगलात फिरलो. निसर्ग किमया कळते. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
*द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्-पुस्तकपरिचय अ जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेल ते दुसऱ्यांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही व्यवस्था कोलमडत नाही.