मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रवास कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा प्रवासाकडे लक्ष होते कुठे अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची कशाला फुका वेळ दवडा कुठे आता पोहचल्यावर असे वाटते की कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ? कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ? अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ? इथे नित्य होतो अनादी अनंतीं इथे जन्मलो, वाढलोही इथे इथे जागलो तुझिया कृपेने इथे बध्द अन् मुक्त झालो इथे निघालो जिथुनि तिथेची पोहचलो जिथे चालली वाट ती ही तिथे आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे. Welcome Home ! _________________________________

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
*द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्-पुस्तकपरिचय अ जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेल ते दुसऱ्यांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही व्यवस्था कोलमडत नाही.

त्रांगडे

चौकस२१२ ·
त्रांगडे थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे इमर्जन्सी नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून १) भाजप विरोधी याला "इंदिरा गांधींना राष्टवादी आणि म्हणून "प्रोजेकट " करणारा अप्रत्यक्ष भाजप च्या राष्ट्रवादा बद्दल प्रोपोगांडा करणारा चित्रपट म्हणून नाराज किंवा केवळ कंगना रानौत त्यात आहे तेम्हणून विरोध , पण मग गोची अशी कि आपल्याच या दिवंगत नेत्यावर चित्रपट काढला जातोय तर आनंद कसा दाखवय्यांचा ? नाही दाखवलं तर पंचाईत , दाखवलं तर भाजप प्रोपोगांडा ला साथ ..

देव माझा निळा निळा

Bhakti ·
लेखनविषय:
अ कृष्ण निळा निळा बासुरीचा लावितो लळा.. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!! कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे?

"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

भम्पक ·
लेखनविषय:
काव्यरस
न करीशी व्यर्थ चिंता तू ठाऊक मज सामर्थ्य माझे ! कुणाशी कसे वदावे कसे वागावे काय केल्याने काय होईल.... हि चिंता तयास ज्याने क्रमिला पथ दुहेरी माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ कण भारही किंतु तयात नाही ! नकोत सला-मशवरा मजला ठाऊक मज मार्गक्रमण माझे ! मान्यता जगात उदंड जाहल्या त्या प्रती जगणारे अमाप ... मी तर अव्यक्ताचा चाहता जी माझी कृती तीच परिणती ! का कशाचीही बाळगावी मी भीती ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!

अवघड काळात निर्णय कसा घ्यावा?

शाम भागवत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोरोना काळात एका इंग्रजी लेखाचे हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे. ते मी मायबोलीवर टाकले होते. पण मिसळपाववर टाकले नव्हते. ते आज लक्षात आल्याने इथे चिकटवत आहे. महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले - "माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?" "मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही. याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही." "एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला.

फलाफल

Bhakti ·
अ काहीतरी चुरचुरीत खायची इच्छा होती.खुप दिवस अख्खे हिरवे मूग वापरून रेसिपी झाली नव्हती. रात्री दीड वाटी हिरवे मूग ,एक वाटी हरभरा डाळ,अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धा चमचा मेथ्या एकत्र भिजवलेल्या.सकाळी जिरे, आलं तुकडा,दोन मिरच्या टाकून मिक्सरमधून भिजलेल्या डाळी जाडसर वाटून घेतल्या. आता कांदा आणि कोथिंबीर