मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्रिमितीच्या तुरुंगात

अनन्त्_यात्री ·

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 14:01
शेवटची दोन कडवी समजली,आणी आवडली सुद्धा. पण बाकी कवीता समजली नाही. श्रीधर फडके यांनी ग्रेसांच्या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केला.पण पुढील कडवी समजली नाहीत. ग्रेसांचा व त्यांचा परिचय नव्हता म्हणून ते सुधीर मोघ्यांकडे गेले. त्यांनी सोपे करून दाखवले. https://youtu.be/Ikx26HFj_SM?si=sdn-l2uFSf7haigV अगदी तसेच माझे झाले म्हणून तुम्हीच उलगडून सांगा म्हणजे कवीतेचा अस्वाद घेता येईल.

In reply to by कर्नलतपस्वी

अनन्त्_यात्री Tue, 06/10/2025 - 19:05
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! हे मुक्तक लिहिताना wormholes in space-time हा विषय डोक्यात होता. ह्या संकल्पनेचे सुलभ मराठीत स्पष्टिकरण मी देऊ शकत नाही पण: Many physicists postulate that wormholes are merely projections of a fourth spatial dimension. Also, Wormholes have the theoretical potential to disrupt causality, meaning the natural order of cause and effect could be violated.

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 14:01
शेवटची दोन कडवी समजली,आणी आवडली सुद्धा. पण बाकी कवीता समजली नाही. श्रीधर फडके यांनी ग्रेसांच्या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केला.पण पुढील कडवी समजली नाहीत. ग्रेसांचा व त्यांचा परिचय नव्हता म्हणून ते सुधीर मोघ्यांकडे गेले. त्यांनी सोपे करून दाखवले. https://youtu.be/Ikx26HFj_SM?si=sdn-l2uFSf7haigV अगदी तसेच माझे झाले म्हणून तुम्हीच उलगडून सांगा म्हणजे कवीतेचा अस्वाद घेता येईल.

In reply to by कर्नलतपस्वी

अनन्त्_यात्री Tue, 06/10/2025 - 19:05
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! हे मुक्तक लिहिताना wormholes in space-time हा विषय डोक्यात होता. ह्या संकल्पनेचे सुलभ मराठीत स्पष्टिकरण मी देऊ शकत नाही पण: Many physicists postulate that wormholes are merely projections of a fourth spatial dimension. Also, Wormholes have the theoretical potential to disrupt causality, meaning the natural order of cause and effect could be violated.
लेखनविषय:
त्रिमितीच्या तुरुंगात घुसमटे जीव ज्यांचा उघडीन त्यांच्यासाठी मार्ग चवथ्या मितीचा कळसा नंतर पाया तिथे नियम असतो कार्यकारण भावाचा जाच जराही नसतो स्थळ-काळात तिथल्या पेव खाच खळग्यांचे उतरवी वर्तमान भूत वेडे भविष्याचे दोर परतीचे मात्र नाही कापणार नक्की आपापल्या कोठडीची खूण ध्यानी ठेवा पक्की :)

पंचमयकोश

Bhakti ·
लेखनविषय:
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे. "१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा" मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय.. यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते. याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद

सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट

नपा ·

चौथा कोनाडा Wed, 06/11/2025 - 12:41
अ ति श य सुंदर चित्रपट ओळख ... बघणयादीत लिहुन ठेवला आहे. नक्की बघणार ! असाच एक वैद्यकिय पार्श्वभुमीवरचा चित्रपट "स्काय इज पिंक" हा सत्यकथे वर आधारित सुनेमा पहिला होता ... आवडला होता !

चौथा कोनाडा Wed, 06/11/2025 - 12:41
अ ति श य सुंदर चित्रपट ओळख ... बघणयादीत लिहुन ठेवला आहे. नक्की बघणार ! असाच एक वैद्यकिय पार्श्वभुमीवरचा चित्रपट "स्काय इज पिंक" हा सत्यकथे वर आधारित सुनेमा पहिला होता ... आवडला होता !
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.

ब्राह्मणद्वेष

युयुत्सु ·

सुबोध खरे Sat, 06/07/2025 - 09:59
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला लेख आहे. आजमितीस सर्वात जास्त सुधारणा या ब्राम्हण समाजातच दिसून येतात. ब्राम्हणात जातपंचायत /खाप नाही. कुणी सुधारणा केल्यास त्याला वाळीत टाकणे हे गेल्या ५० वर्षात निदान ब्राम्हण समाजात दिसलेले नाही. लग्न समारंभात सर्वात जास्त सुधारणा ब्राम्हण समाजातच दिसते. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्तीचे प्रमाण सुद्धा ब्राम्हण समाजात सर्वात जास्त दिसते. कुळकायद्यात जमिनी गेल्या गांधीहत्ये नंतरच्या दंगलीत स्थावर मिळकत धुळीस मिळाली असे असून सर्वात जास्त आर्थिक उन्नती ब्राम्हण समाजाने केली. शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हि याच समाजात दिसते. बाकी चालू द्या

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 10:16
ब्राह्मणांमधले सुधारक हे व्यक्तीगतपातळीवर प्रयत्न करत राहीले. समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत. सर्वच सुधारकांना ब्राह्मणांनी भरपूर त्रास दिला आहे. फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. आणि त्याला प्राथमिकता द्यायची असेल तर बरेच लिहीण्यासारखे आहे. विशेषतः ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत.

सुबोध खरे Sat, 06/07/2025 - 10:30
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. तेवढंच वाचलं का? स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्ती आर्थिक उन्नती शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हे मुद्दे वाचलेच नाही का? कुटुंब नियोजन, आर्थिक स्थिरता, आणि एकंदर नियोजन ब्राम्हण समाजात नक्कीच चांगले आहे. वायफळ खर्च उधळेपणा ऋण काढून सण करणे हे एकंदर ब्राम्हण समाजात जवळ जवळ नाहीच समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत.मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच परंतु एकंदर देश आणि समाज कुठे चाललाय याची सर्वात उत्तम जाणीव ब्राम्हण समाजाला आहेच त्यामुळे कोणताही अधिकारीक निर्णय न घेता त्याची अंमलबजावणी करण्यात ब्राम्हण समाज पुढे आहे. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे बाकी जी व्यक्ती/जात /समाज सर्वात प्रगती करते तिच्याबद्दल द्वेष करणे हा मानवी स्वभाव आहे. या द्वेषाला जाणीवपूर्वक खतपाणी देऊन आपला स्वार्थ साधणारे राजकारणी महाराष्ट्र्र कमी आहेत का? असे असताना केवळ ब्राम्हण समाजास दूषणे देण्यात या लेखाने नक्की काय साधले?

जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
धर्मांतर करणे कायदेशीर आहे. तशी सोय आहे पण जात्यांतर करता येत नाही.लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही. बाकी वृत्तीने ब्राह्मण असलेले अनेक ब्राह्मणेतर सुसंस्कृत समाजात दिसतात. उलट चित्रही दिसते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 10:59
लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही.> हे सर्व मानसिक बेड्यांचे परिणाम आहेत. स्वगत - मानसिक बेड्या फक्त उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की सुटतात, त्याला हायपोफ्रंटॅलिटी अशी वैज्ञानिक संज्ञा आहे. उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की कायदे मोडणे दिसते तसेच समाजाचे जोखड झुगारून देणे पण दिसते. ध्यानाने उपाग्रखण्डाची पकड ढिली होते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 11:22
पण जात्यांतर करता येत नाही.> या मुळमुळीत विधानाशिवाय कोणताही भक्कम युक्तीवाद मला आजवर बघायला मिळालेला नाही. प्रथम जात म्हणजे काय हे वस्तूनिष्ठ पणे मांडावे आणि मग ते का बदलता येत नाही हे सांगावे. ब्राह्मण म्हणजे काय हे आज कुणालाही सांगता येणार नाही. नेमके त्याचमुळे कुणालाही ब्राह्मण होणे शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

जात ही अंधश्रद्धा आहे ही अंनिसची स्पष्ट भूमिका आहे.मग तिचे निर्मूलन व्हायचे असेल तर प्रथम ती शासकीय कागदपत्रावरुन हटवली पाहिजे.यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो. जात ही जन्माधिष्टित असलेली बाब आहे. ब्राह्मण कुणाला म्हणावे हा वाद सांस्कृतिक आहे. कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. आतातर देश मागे मागे चालला आहे. जातीनिर्मूलना ऐवजी जातीआधारे जनगणना होत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 11:41
यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो.> मनःपूर्वक अभिनंदन! कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. > कायदा समाजातील चालीरितींवर आधारीत असतो. त्याशिवाय लोक रस्त्यावर आले की कायदा बदलतो. नव्या चालीरीती सतत जन्माला येतच असतात. त्याचा आधार घेऊन कायदे पण बदलत राहतात. त्यामुळे "जात्यंतर" विषयक चालीरीती बदलल्या की कायदे आपोआप बदलतील.

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 10:52
मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच वेगवेगळ्या ज्ञातींचे संघ अस्तित्वात आहेत आणि ते मह्त्त्वाची भूमिका बजावू शकले असते. याशिवाय फतवे काढणार्या अनेक मठांचे अधिपती ब्राह्मणच आहेत. त्यांचे पण दात पडून गेले आहेत. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे> म्हणून आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो असा निष्कर्ष काढायला वाव आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Sat, 06/07/2025 - 12:46
आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो हा हा हा आपण इतर सर्वाना आपल्यापेक्षा कुरूप, ढ आणि गरीब समजताय यात केवळ आपला अहंगंड आणि आत्मकेंद्रितता दिसते आहे. बाकी जगातील सर्व ज्ञान केवळ काही संस्थांची मक्तेदारी असते हा गैरसमज असणाऱ्या संस्थांमध्ये आय आय टी चा क्रमांक वर लागतो आणि हा अहंगंड असणाऱ्या माणसांचा हा इगो तेथे जाणीवपूर्वक पोसला जातो हे मी कित्येक वेळेस पाहिले आहे. तेंव्हा तुमची स्वलालधन्यता चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:56
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत. हा हा हा.... भन्नाट.

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:24
डाॅ खरे यांच्याबरोबर सहमत. ब्राम्हणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी कसले प्रश्न, कुठले प्रश्न? कुठली पोझिशन? आजही ब्राह्मण पुर्वी प्रमाणेच बदलत्या समाज रचनेनुसार सक्षम आहेत. समाज रचना फक्त नावापुरतीच राहिलेली आहे. चातुर्वर्ण्य केव्हाच मोडीत निघालेत. कुलगुरू,उपाध्ये फक्त आडनावापुरतेच शिल्लक आहेत. ब्राह्मणांनी आरक्षण फाट्यावर मारले आहे.शिक्षणाला प्राधान्य देवून आपला मार्ग सुकर केला आहे. इतर समाज काय करतो यावर मला भाष्य करणे संयुक्तिक वाटत नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ब्राह्मण सुरवातीपासून जहालमतवादी, इंग्रजांनी त्यानां किनाऱ्यावर ठेवले. सावरकर, टिळक, चाफेकर, रानडे,राजगुरू ,मंगल पांडे आणी अनेक ब्राह्मण जहालमतवादी असल्याने त्यानां फाशी दिले किंवा तुरूंगात डांबले. मवाळ नेत्यांना इंग्रजानी कुरवाळले व मोठे केले. संपुर्ण समाज व्यवस्था औद्योगिक क्रांतीनंतर बदलली. बलुतेदार संपले,गुरुकुल जाऊन शाळा आल्या. गावगाड्याचे रूप बदलले. शिक्षित समाज वाढल्याने व संतानी प्रचार केलेल्या भक्तीपंथाने यज्ञ,याग पुजा मर्यादित झाल्या पुढे त्याचे स्वरूप बदलले. पौरोहित्य व्यवसाय संपुष्टात आला किंवा नाममात्र राहीला. आजही ज्ञानेश्वर माऊली,एक ब्राह्मण, समाज बाधंणीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. भुतकाळात जे काही घडले त्याचे खापर वर्तमान पिढीवर फोडले. तथाकथित समाज सुधारकांनी ब्राह्मणद्वेषावर आपली पोळी भाजली व आजही भाजत आहेत. तथाकथित सुधारक ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण द्वेषाचे समर्थन करून त्यांनी आपला उल्लू सिधा केला/करत आहेत. ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत. ब्राह्मण समाज इतर समाजाच्या तुलनेत , संख्याबळात नगण्य. इंग्रज आपली सत्ता वाढवण्यात इन्टरेस्टेड होते त्यांना जाती व्यवस्थेशी काही घेणेदेणे नव्हते. बरोबरच धर्मप्रसार हा ही एजंडा असल्याने त्यांच्या उदेश्यात ब्राह्मण मुख्य अडथळा होता. त्यांनी इतर समाजाला कुरवाळत ब्राह्मण द्वेषातून धर्मप्रचार केला असे माझे मत आहे. त्यात रेव्हरंड सारख्यांनी भर घातली. संख्याबळाने कमी असलेले कितीही ओरडले तरी काही उपयोग नसतो. त्यांचा आवाज सहज दाबता येतो. ब्राह्मणद्वेषावर लक्ष न देता ब्राह्मणांनी आपला मार्ग चोखाळला. मुळात लेख पूर्वग्रह दूषित ,त्यामुळेच कितीही प्रयत्न केला तरी मत परिवर्तन होणे शक्यच नाही. तो माझा प्रयत्न नाही. यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही. यातून बोध घेण्यासारखे काहीच नाही. सदर लेख हा ब्राह्मणांना डिमीन करण्याचा प्रयत्न आहे तो संपादकांनी उडवून टाकावा. बादवे, लेखकाच्या नावावरून ते स्वता ब्राह्मण असावेत असे वाटते. त्यांनी ब्राह्मण द्वेषातून उत्पन्न झालेल्या परिस्थीतीवर कही काम केले आहे का? केले असल्यास जरूर लिंक देणे. सुचवलेले उपाय मी इतर ब्राह्मण मित्रांना सांगेन त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित द्वेष कमी होईल. जरी झाला नाही तरी काही फरक पडणार नाही.

कॉमी Sat, 06/07/2025 - 14:48
लेख पटला नाही. मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत. परशुरामाला आयकॉन बनवले हे देखील काही "कार्यकर्ते "लोकांपूरते मर्यादित असते. इतर कोणी असले उद्योग करायच्या फंदात पडत नाही. बाकी तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?

In reply to by कॉमी

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 15:31
मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत.> मुळात मी जे लिहीले आहे ते तुम्ही वाचत नसून तुम्ही तुम्हाला हवं ते (सोईनुसार) वाचत आहात. ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे. तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 16:41
जात कशी काम करते याचे उत्कृष्ट उदाहरणः तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही. टीपः हे फक्त ब्राम्हण याच जातीकडून होते असे नाही. भारतीय उपखंडातील प्रत्येकाच्या डी एन ए मध्ये ती भिनलेली आहे. ती जाणे खूप खूप कठीण आहे.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश Sun, 07/27/2025 - 13:58
ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे.
अरे बावळट माणसा ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले नाहीत हाच तर मुद्दा आहे.

मारवा Sat, 06/07/2025 - 18:42
1 ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता. 2 जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे. आपणाला या दोन विधानातून नेमकं काय म्हणायचं आहे ? कृपया आपण थोडे विस्तारपूर्वक मांडले तर आपली भूमिका अचूक कळण्यास मदत होईल.

In reply to by मारवा

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 20:44
श्री० मारवा प्रथम थयथयाट न करता नेमके प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद! खुलासा १ - तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे "शूद्र पूर्वी कोण होते?" हे पुस्तक जर वाचले, तर ब्राह्मण/ब्राह्मणेतर दरीचे *खरे आणि विश्वासार्ह* कारण समजायला मदत होते. मला बाबासाहेबांच्या विद्वतेबद्दल नितांत आदर आहे. ब्राह्मणांनी शूद्राना "जानव्याचा अधिकार" नाकारून तसेच सोवळ्या/ओवळ्याद्वारे अपमानकारक वागणूक देऊन नाकारले, हे ढळढळीत सत्य आहे. तुम्ही आमच्यातले नाही, तसेच तुम्ही आमच्यात येऊ शकत नाही (तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही) असा संदेश देऊन एक अभेद्य पण मानसिक आणि सामाजिक दरी निर्माण केली, जी आजही अस्तित्वात आहे. ब्राह्मणांच्या समाजमाध्यमातील वेगवेगळ्या समूहातून आजही अनेक कडवे वेडगळ कल्पनांचा पाठपुरावा करताना दिसतात. खुलासा २ - जात म्हणजे काय या प्रश्नाचा मी शोध घेतला तेव्हा मला उमजलेली जात म्हणजे - भाषा, चालीरीती (उभ्या गौरी/खड्याच्या गौरी), वर्तन-व्यवहार (हिशेबीपणा, अघळ-पघळपणा), अस्मितेची प्रतिके (पूर्वजांचा पराक्रम), काही प्रमाणात आहार (उदा० ज्यात-त्यात साखर घालणे किंवा लसूण घालणे वगैरे) इ०च्या अजब मिश्रणाने तयार होणारे संकल्पनात्मक रसायन, जे वंशपरंपरागत चालू राहते! हे रसायन त्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीने, कुटुंबाने किंवा समूहाने जाणीवपूर्वक प्यायचे ठरवले तर जात्यंतर झाले असे मानायला मला तरी अडचण वाटत नाही. त्यात जात फक्त वडिलांच्याकडून येते आणि आईकडून येऊ शकत नाही ही धारणा हास्यास्पद नाहीतर, स्त्रियांचा अपमान करणारी आहे! आजचे ब्राह्मण कितीही पुढारलेले दाखवत असले तरी अशा प्रश्नाना भिडायचे टाळतात. आता माझ्या मूळ विधानाकडे येऊ - वेदांचा रक्षण करणारा जर ब्राह्मण असेल आणि एखाद्या ब्राह्मणेतर व्यक्तीने जर हे करण्याची उत्सूकता दाखवली तर त्याला ते करू देण्याचे औदार्य ब्राह्मणांनी दाखवायला हवे (त्याला जानवे बहाल करण्यात यावे). दक्षिणेत दलिताना पौरोहित्याचे अधिकार दिल्याचे काही माहितीपट बघून कळले. आज महाराष्ट्रात कदाचित एखाद्या पाठशाळेत एखाद्या दलिताला प्रवेश दिला असेलही तरी पण याला पुरेशी प्रतिष्ठा आणि सातत्य मिळवून देण्यात आले्ले नाही. यात समाजाने एकत्र येऊन (मराठ्यांसारखे) धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे आज माणसे देश, धर्म, दैवत, अन्न, भाषा, लिंग, आडनाव काहीही बदलू शकतात पण जात बदलू शकत नाहीत, ये बात हजम नही होती. मग वर उपस्थित झालेला प्रश्न सतावत राहतो - जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे अशी आशा करतो...

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Sun, 06/08/2025 - 09:34
थयथयाट न करता नेमके प्रश्न लेखकाने आपले मत मांडले,प्रतिसादकांनी त्यांचे मत मांडले. यात थयथयाट कुठे आला. तुम करें तो रासलिला, हम करे तो थयथयाट. कुछ भी......

शाम भागवत Mon, 06/09/2025 - 15:49
बाकी लेखात फक्त महाराष्ट्रातील ब्राह्मण विचारत घेतलेले दिसत आहेत.
एकदम 🎯" माझे वैयक्तिक मत असे आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्यामुळे जन्म कुठे झाला ते महत्वाचे नसून, जन्म झाल्यावर काय केले हे महत्वाचे. पण ही व्याख्या फारच उच्च दर्जाची आहे असे मला वाटते. त्यामुळे मी माझ्यापुरती ही व्याख्या थोडीशी सैल केलीय. त्यानुसार ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले धेय्य आहे, असे जो मानतो तो ब्राह्मण होय. या व्याख्येनुसार, ब्राह्मण असणे ही अभिमानाने मिरवायची गोष्ट वाटत नाही. त्याचा गर्व वगैरे असणे ही तर खूपच दूरची बात. मला ती एक मोठी जबाबदारी वाटते. सर्व संत सज्जनांमधे ही जबाबदारीची जाणीव दिसून येते.

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 16:47
एक विशिष्ट जातीचा द्वेष का केला जात आहे असा आपला प्रश्न आहे. ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल. खरे तर सगळ्या जातीच एकमेकांचा द्वेष करत आल्यात. जन्मावर आधारित आपआपला समूह बनवायचा आणि इतरांना 'परके' मानायला सुरूवात करायची याचेच नांव जात. त्याच्या व्याख्येतच इतरांचा द्वेष करणं येतं.

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 17:35
ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल.> नावं घेऊन उदा० दिली तर गहजब होईल पण ब्राह्मण पण इतरांचा द्वेष करतात आणि त्यापेक्षा इतरांबद्दल तुच्छता जास्त बाळगतात.

विवेकपटाईत Fri, 06/13/2025 - 10:41
भारतात सर्वात जास्त सुधारलेला जो समाज आहे तो ब्राम्हण आहे. महाराष्ट्रात ब्राम्हण द्वेष फक्त राजनीति पुरता आहे. सामान्य जनता ब्राह्मणांचा आदर करते. त्यांचे उदाहरण देते. आरक्षण नसल्याने जवळ पास सर्वच घराण्यात एक तरी अपत्य अमेरिकेत आहे. बाकी ब्राह्मण विरोधक नेता ही त्यांच्या संस्थेत उच्चपदीय नौकरीसाठी ब्राह्मणांना प्राधान्य देतात. आज जर सैन्यात ही मराठी कमिशन प्राप्त अधिकारी पहाल तर अनुपात अनुसार ब्राह्मण सर्वात जास्त आहेत.

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 11:09
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Sat, 06/14/2025 - 09:54
आर्य शब्दांचा जाती समूहाशी काहीही घेणे देणे नाही. फक्त कोरी कल्पना आहे. बाबा साहेबांच्या मते जे लोक इथल्या नद्या पर्वत तलावांना तीर्थ मानतात ते इथलेच मूल निवासी.ब्राह्मण ते शूद्र इथलेच. मोहन जदोडो असो की ऋग्वेद ऋषभ हा पवित्र पशू आहे. बाहेरून जे धर्म आले त्यांचे भक्ति स्थळे आज ही वेटिकन किंवा मक्का आहे.

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 11:10
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 11:13
प्रत्येक घरातील एक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते. असे वाचावे

अभ्या.. Fri, 06/13/2025 - 15:15
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
हे नॉर्मल झाले आहे सध्या. कुठल्याच जातीला साधा बुध्दीजीवी, विचारवंत किंवा कलासंपन्न आयकॉन नको आहे. म्हणजे आयकॉन लढाऊ शस्त्रधारी पाहिजे, त्याच्यात आधीचे गुण कला, शास्त्र असले तर उत्तम पण मुख्य म्हन्जे शस्त्रधारी पाहिजे. हाता शिवलिंग घेतलेली शांत सोज्ज्वळ अहिल्यादेवी कालबाह्य झाली, आता घोड्यावर बसून तलवार घेतलेलल्या राजमाता अहिल्यादेवींचा बोलबाला आहे. सो रक्त ओघळणारा परशुधारी सिक्सपॅकायुक्त परशुराम आयकॉन बनावा ह्यात नवल नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 15:57
तुमच्या ब्लॉगवरच्या कथा आवडल्या! फकत टंकताना थोडी व्हाईट-स्पेस सोडली तर वाचन-सौख्य जास्त मिळेल.

खटपट्या Fri, 07/25/2025 - 00:48
(आज ब्राह्मणेतर समाज जसा "घटनेवर" निष्ठा ठेवतो (कारणे स्पष्ट आहेत), तसे ब्राह्मण "घटने"बद्दल आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत...) संपुर्ण्र ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवतो आणि संपुर्ण ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवत नाही, असे वाटत नाही. प्रत्येक समाजात अशी काही माणसे असतात नसतात. (ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता.) बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की. पुर्वी ग्रामिण भागात चालत असेल पण आज काल ज्याला कोणाला हवे आहे तो जानवे घालतो. (ब्राह्मणांनी समाजाच्या ऐक्यासाठी/स्वास्थ्यासाठी मोठे निर्णय घेतल्याचे माझ्या आठवणीत नाही.) असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का? (सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले.) काही अंशी सहमत. ऊत्तरेतले ब्राम्हण देखील परशूरामाला आयकॉन् मानतात का? मुळात महाराष्ट्रातले तरी मानतात का? (नुकतेच माझ्या घराचे वॉटरप्रुफींगचे काम केले तेव्हा मी ब्राह्मण व्यावसायिकाना प्राधान्य द्यायचे ठरवले होते) सध्या तरी ब्राम्हण न बघता मराठी माणूस बघून काम देण्याची गरज आहे. बाकी तुम्ही न्युनगंडाच्या फेर्‍यात अडकत आहात असे वाटते आहे. १.मराठी साहीत्य पताका ब्राम्हण समाजाने तेवत ठेवली, नंतर इतर त्यात सामील झाले. २.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी ब्राम्हण लोकांनी योगदान दिले, बलीदान दिले. ३. आभिमान वाटावे अशा मराठी प्रमाण भाषेचे अस्तीत्व साहित्याद्वारे आणि शाळा विद्यालयात अध्यापन करुन टिकवून ठेवले. आताशा शाळामध्ये ब्राम्हण शिक्षकव्रुन्द राहीला नसल्याने मुले प्रमाणभाषा न बोलता हिंदीबटीक धेड्गुजरी भाषा बोलत आहेत. ४. आरक्षणामुळे विविध सरकारी अस्थापनातील नोकर्‍या ब्राम्हण समाजाला मिळेनाशा झाल्यावर याच समाजाने आपापले मार्ग धुंडाळून आपला उत्कर्ष साधला. आजही अमेरिकेत मराठी ब्राम्हण एलिट वर्गात मोडतो. थोडक्यात - निराशेच्या किंवा न्युनगंडाच्या भावनेतून लिहीलेला लेख वाटला.

युयुत्सु Fri, 07/25/2025 - 08:19
श्री० खटपट्या तुमचा आयडी आणि लिखाणातला अभिनिवेश बघता तुमचे वय साधारण माझ्या निम्मे असावे असे वाटते, म्हणूनच तुमच्या मताबद्दल आदर आहे. ;) आपण म्हणता की - "बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की." 'परवानगी' शिवाय जानवे घालतात का हे माहित नाही (शूद्र सोडून इतरांना जानव्याचा अधिकार आहे, असे "शूद्र पूर्वी कोण होते" या पुस्तकात वाचले आहे). बरेच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर मध्यंतरी भिकबाळी घालू लागले होते, आता ते खुळ कमी झाल्यासारखे वाटते. ग्रामीण भागात उतरंडी अधिक घट्ट असतात, त्यामुळे 'परवानगी' शिवाय म्हणजे बंड करून जानवे घालत असतील असे वाटत नाही. तसेच उतरंडी जाचक झाल्या की रिअ‍ॅकशन येते, त्याची परिणती अधिकार धूडकावून लावण्यात होते, हे आपल्याला माहित असेलच. शिवाय "पात्र व्यक्तीना जानवी वाटणे" आणि "परवनगी शिवाय जानवी घालणे" यात गुणात्मक आहे. त्यावर आपण चिंतन करावे ही विनंती. यात १ली कृती काही प्रमाणात सर्वसमावेशकता आणि खुलेपणा दाखवते आणि दुसरी कृती बंडखोर वृत्ती दाखवते, असे आपल्या लक्षात येईल, याची खात्री आहे. (असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का?) इथे परत आपली गल्ल्त झाली आहे असे वाटते. ब्राह्मण सुधारकांचा अपमान मी करत नसून निरर्थक कालबाह्य कल्पनांची पुनर्स्थापना करणारे सनातनी ब्राह्मण करत आहेत. उदा० गोत्राची पुनर्स्थापना, तसेच मुलीना जास्त शिकवू नये (कारण त्यामुळे मुलांची लगने होत नाहीत) इ० आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मण सुधारकांनी सुधारणा करणे (ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) आणि समाजाने एकत्र येऊन स्वतःमध्ये बदल घडवणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सभ्य आणि संयमी भाषेत प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष मनःपूर्वक अभिनंदन!

युयुत्सु Fri, 07/25/2025 - 08:23
ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) ऐवजी ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला नाही तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे)

माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. आणि हो!! मी लोकल फालतु ईंजिनीयरिंग कॉलेजमधुन पदवी घेतली आहे,आणि माझे तसे बरे चालले आहे. पण आजकाल म्हणे आय आय टीचे पदवीधरही बेकार राहतात. कारण त्याना पहिल्याच नोकरीत कोटीचे पॅकेज पाहीजे असते. आधीच मार्केट मध्ये नोकर्‍या कमी असताना ते कोण देणार? असो. बाकी चालु द्या.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धर्मराजमुटके Sat, 07/26/2025 - 09:51
माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. थोडीशी दुरुस्ती, भैया ही काही जात नव्हे. तुम्ही किमान त्याचे आडनाव पांडे, मिश्रा, शर्मा, दुबे, कनोजिया आहे की पासवान एवढे जरी विचारले असते तर तुम्हाला कदाचित त्याची जात कळाली असती. :)

युयुत्सु Sat, 07/26/2025 - 10:15
श्री० राजेंद्र मेहेंदळे तुमचे 'तसे बरे चालले आहे' हे वाचून अतिशय आनंद झाला. तेव्हा मनः पूर्वक अभिनंदन. पण एक गोष्ट मला समजली नाही - ती म्हणजे ब्राह्मणद्वेष (या धाग्याचा विषय) आणि बेकार आय०आय्०टीयन यांचा संबंध काय हे स्पष्ट झालेले नाही. म्हणजे बघा तुमच्या मनात नक्की काहीतरी योजलेले असेल पण ते लिखाणाच्या आवेगात बाहेर पडलेले दिसत नाही. आता माझ्यादृष्टीने बेकार आय०आय्०टीयन, तसेच पी०एच्०डी० होऊनही कारकुनी किंवा शिपायाची नोकरी करावी लागणे हे त्या व्यक्तींचे अपयश मानायचे की बुद्धीमत्ता वाया घालविण्यार्‍या देशाचे, त्यातील समाजाचे आणि सरकारचे अपयश मानायचे हा खरा प्रश्न आहे. आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही. सांगायचे तात्पर्य - जे १ कोटीचा पगार घेण्यासाठी जन्माला आले आहेत त्यांना १ कोटी नाही तरी ५० लाख तरी मिळणे आवश्यक आहे, नाही तर वरील समस्येसारख्या समस्या निर्माण होऊन समाजाचे स्वास्थ्य आणखी बिघडते.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश Sun, 07/27/2025 - 14:22
अरे बावळट माणसा. "आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही." तू जे केले होतेस ते इतरांच्या हक्कावर गदा आणणारे होते हे तुझ्यासारख्या क्षुद्रबुद्धीच्या माणसाच्या लक्षात आले नाही हे ग्राह्य आहे पण हे स्वीकार करता येण्या जोगे होते? #बावळट माणूस

कानडाऊ योगेशु Sun, 07/27/2025 - 13:09
ब्राह्मणांनी जात विसर्जित करणे हे ब्राह्मण समाजाच्या कितीही फायद्यासाठी असले तरी आपला त्यात काहीही फायदा नाही हे कुटील राजकारणी ओळखुन आहेत त्यामुळे जिथे तिथे ब्राह्माणांना प्रोवोक (उत्तेजित) करुन एखादा वाद जात पातळीवरुन आणुन त्यात ब्राह्मण(मूळ शब्द बामण) कसे कारस्थानी आहेत हे दाखवणे हेतुपुर्रस्सर घडवले जाते. उदा. सध्या चर्चित असलेल्या छावा चित्रपटाबद्दल. एका राजकारण्याने संभाजी महाराजांची हत्या होण्यामागे मनुवादी होते का? ह्याचा शोध घेतला जावा असे विधान करुन आपली वोटबँक सुरक्षित ठेवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला होता. जेव्हा जेव्हा समाज मॅच्युरिटी दाखवताना दिसतो तेव्हा असे कपटी राजकारणी येनकेन प्रकारेण त्यात मीठाचा खडा घालतात.

सुबोध खरे Sat, 06/07/2025 - 09:59
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला लेख आहे. आजमितीस सर्वात जास्त सुधारणा या ब्राम्हण समाजातच दिसून येतात. ब्राम्हणात जातपंचायत /खाप नाही. कुणी सुधारणा केल्यास त्याला वाळीत टाकणे हे गेल्या ५० वर्षात निदान ब्राम्हण समाजात दिसलेले नाही. लग्न समारंभात सर्वात जास्त सुधारणा ब्राम्हण समाजातच दिसते. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्तीचे प्रमाण सुद्धा ब्राम्हण समाजात सर्वात जास्त दिसते. कुळकायद्यात जमिनी गेल्या गांधीहत्ये नंतरच्या दंगलीत स्थावर मिळकत धुळीस मिळाली असे असून सर्वात जास्त आर्थिक उन्नती ब्राम्हण समाजाने केली. शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हि याच समाजात दिसते. बाकी चालू द्या

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 10:16
ब्राह्मणांमधले सुधारक हे व्यक्तीगतपातळीवर प्रयत्न करत राहीले. समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत. सर्वच सुधारकांना ब्राह्मणांनी भरपूर त्रास दिला आहे. फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. आणि त्याला प्राथमिकता द्यायची असेल तर बरेच लिहीण्यासारखे आहे. विशेषतः ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत.

सुबोध खरे Sat, 06/07/2025 - 10:30
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा म्हणजे पुढारलेपण नव्हे. तेवढंच वाचलं का? स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्ती आर्थिक उन्नती शिक्षणाबद्दलची सर्वात जास्त कळकळ हे मुद्दे वाचलेच नाही का? कुटुंब नियोजन, आर्थिक स्थिरता, आणि एकंदर नियोजन ब्राम्हण समाजात नक्कीच चांगले आहे. वायफळ खर्च उधळेपणा ऋण काढून सण करणे हे एकंदर ब्राम्हण समाजात जवळ जवळ नाहीच समाजाने एकत्र येऊन ठोस निर्णय कधीही घेतले नाहीत.मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच परंतु एकंदर देश आणि समाज कुठे चाललाय याची सर्वात उत्तम जाणीव ब्राम्हण समाजाला आहेच त्यामुळे कोणताही अधिकारीक निर्णय न घेता त्याची अंमलबजावणी करण्यात ब्राम्हण समाज पुढे आहे. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे बाकी जी व्यक्ती/जात /समाज सर्वात प्रगती करते तिच्याबद्दल द्वेष करणे हा मानवी स्वभाव आहे. या द्वेषाला जाणीवपूर्वक खतपाणी देऊन आपला स्वार्थ साधणारे राजकारणी महाराष्ट्र्र कमी आहेत का? असे असताना केवळ ब्राम्हण समाजास दूषणे देण्यात या लेखाने नक्की काय साधले?

जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
धर्मांतर करणे कायदेशीर आहे. तशी सोय आहे पण जात्यांतर करता येत नाही.लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही. बाकी वृत्तीने ब्राह्मण असलेले अनेक ब्राह्मणेतर सुसंस्कृत समाजात दिसतात. उलट चित्रही दिसते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 10:59
लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही.> हे सर्व मानसिक बेड्यांचे परिणाम आहेत. स्वगत - मानसिक बेड्या फक्त उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की सुटतात, त्याला हायपोफ्रंटॅलिटी अशी वैज्ञानिक संज्ञा आहे. उपाग्रखण्डाची पकड ढिली झाली की कायदे मोडणे दिसते तसेच समाजाचे जोखड झुगारून देणे पण दिसते. ध्यानाने उपाग्रखण्डाची पकड ढिली होते

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 11:22
पण जात्यांतर करता येत नाही.> या मुळमुळीत विधानाशिवाय कोणताही भक्कम युक्तीवाद मला आजवर बघायला मिळालेला नाही. प्रथम जात म्हणजे काय हे वस्तूनिष्ठ पणे मांडावे आणि मग ते का बदलता येत नाही हे सांगावे. ब्राह्मण म्हणजे काय हे आज कुणालाही सांगता येणार नाही. नेमके त्याचमुळे कुणालाही ब्राह्मण होणे शक्य आहे.

In reply to by युयुत्सु

जात ही अंधश्रद्धा आहे ही अंनिसची स्पष्ट भूमिका आहे.मग तिचे निर्मूलन व्हायचे असेल तर प्रथम ती शासकीय कागदपत्रावरुन हटवली पाहिजे.यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो. जात ही जन्माधिष्टित असलेली बाब आहे. ब्राह्मण कुणाला म्हणावे हा वाद सांस्कृतिक आहे. कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. आतातर देश मागे मागे चालला आहे. जातीनिर्मूलना ऐवजी जातीआधारे जनगणना होत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 11:41
यासाठी अंनिस काय करते? असा प्रश्न मी कैक वर्षे विचारतो.> मनःपूर्वक अभिनंदन! कायदा फक्त असे मानतो कि ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो जातीने ब्राह्मण. > कायदा समाजातील चालीरितींवर आधारीत असतो. त्याशिवाय लोक रस्त्यावर आले की कायदा बदलतो. नव्या चालीरीती सतत जन्माला येतच असतात. त्याचा आधार घेऊन कायदे पण बदलत राहतात. त्यामुळे "जात्यंतर" विषयक चालीरीती बदलल्या की कायदे आपोआप बदलतील.

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 10:52
मुळात ब्राम्हणात जातपंचायत नाहीच वेगवेगळ्या ज्ञातींचे संघ अस्तित्वात आहेत आणि ते मह्त्त्वाची भूमिका बजावू शकले असते. याशिवाय फतवे काढणार्या अनेक मठांचे अधिपती ब्राह्मणच आहेत. त्यांचे पण दात पडून गेले आहेत. आपल्यापेक्षा जास्त सुंदर हुशार श्रीमंत सुधारलेला कोणी असल्यास त्याबद्दल द्वेष वाटणे हा स्था यीभाव आहे> म्हणून आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो असा निष्कर्ष काढायला वाव आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Sat, 06/07/2025 - 12:46
आय्०आय्०टी० चा इथे सर्रास द्वेष चालतो हा हा हा आपण इतर सर्वाना आपल्यापेक्षा कुरूप, ढ आणि गरीब समजताय यात केवळ आपला अहंगंड आणि आत्मकेंद्रितता दिसते आहे. बाकी जगातील सर्व ज्ञान केवळ काही संस्थांची मक्तेदारी असते हा गैरसमज असणाऱ्या संस्थांमध्ये आय आय टी चा क्रमांक वर लागतो आणि हा अहंगंड असणाऱ्या माणसांचा हा इगो तेथे जाणीवपूर्वक पोसला जातो हे मी कित्येक वेळेस पाहिले आहे. तेंव्हा तुमची स्वलालधन्यता चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:56
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत. हा हा हा.... भन्नाट.

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:24
डाॅ खरे यांच्याबरोबर सहमत. ब्राम्हणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी कसले प्रश्न, कुठले प्रश्न? कुठली पोझिशन? आजही ब्राह्मण पुर्वी प्रमाणेच बदलत्या समाज रचनेनुसार सक्षम आहेत. समाज रचना फक्त नावापुरतीच राहिलेली आहे. चातुर्वर्ण्य केव्हाच मोडीत निघालेत. कुलगुरू,उपाध्ये फक्त आडनावापुरतेच शिल्लक आहेत. ब्राह्मणांनी आरक्षण फाट्यावर मारले आहे.शिक्षणाला प्राधान्य देवून आपला मार्ग सुकर केला आहे. इतर समाज काय करतो यावर मला भाष्य करणे संयुक्तिक वाटत नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ब्राह्मण सुरवातीपासून जहालमतवादी, इंग्रजांनी त्यानां किनाऱ्यावर ठेवले. सावरकर, टिळक, चाफेकर, रानडे,राजगुरू ,मंगल पांडे आणी अनेक ब्राह्मण जहालमतवादी असल्याने त्यानां फाशी दिले किंवा तुरूंगात डांबले. मवाळ नेत्यांना इंग्रजानी कुरवाळले व मोठे केले. संपुर्ण समाज व्यवस्था औद्योगिक क्रांतीनंतर बदलली. बलुतेदार संपले,गुरुकुल जाऊन शाळा आल्या. गावगाड्याचे रूप बदलले. शिक्षित समाज वाढल्याने व संतानी प्रचार केलेल्या भक्तीपंथाने यज्ञ,याग पुजा मर्यादित झाल्या पुढे त्याचे स्वरूप बदलले. पौरोहित्य व्यवसाय संपुष्टात आला किंवा नाममात्र राहीला. आजही ज्ञानेश्वर माऊली,एक ब्राह्मण, समाज बाधंणीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. भुतकाळात जे काही घडले त्याचे खापर वर्तमान पिढीवर फोडले. तथाकथित समाज सुधारकांनी ब्राह्मणद्वेषावर आपली पोळी भाजली व आजही भाजत आहेत. तथाकथित सुधारक ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण द्वेषाचे समर्थन करून त्यांनी आपला उल्लू सिधा केला/करत आहेत. ब्राह्मणद्वेष संपुष्टात आणण्यास ब्राह्मण असमर्थ ठरले आहेत. ब्राह्मण समाज इतर समाजाच्या तुलनेत , संख्याबळात नगण्य. इंग्रज आपली सत्ता वाढवण्यात इन्टरेस्टेड होते त्यांना जाती व्यवस्थेशी काही घेणेदेणे नव्हते. बरोबरच धर्मप्रसार हा ही एजंडा असल्याने त्यांच्या उदेश्यात ब्राह्मण मुख्य अडथळा होता. त्यांनी इतर समाजाला कुरवाळत ब्राह्मण द्वेषातून धर्मप्रचार केला असे माझे मत आहे. त्यात रेव्हरंड सारख्यांनी भर घातली. संख्याबळाने कमी असलेले कितीही ओरडले तरी काही उपयोग नसतो. त्यांचा आवाज सहज दाबता येतो. ब्राह्मणद्वेषावर लक्ष न देता ब्राह्मणांनी आपला मार्ग चोखाळला. मुळात लेख पूर्वग्रह दूषित ,त्यामुळेच कितीही प्रयत्न केला तरी मत परिवर्तन होणे शक्यच नाही. तो माझा प्रयत्न नाही. यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही. यातून बोध घेण्यासारखे काहीच नाही. सदर लेख हा ब्राह्मणांना डिमीन करण्याचा प्रयत्न आहे तो संपादकांनी उडवून टाकावा. बादवे, लेखकाच्या नावावरून ते स्वता ब्राह्मण असावेत असे वाटते. त्यांनी ब्राह्मण द्वेषातून उत्पन्न झालेल्या परिस्थीतीवर कही काम केले आहे का? केले असल्यास जरूर लिंक देणे. सुचवलेले उपाय मी इतर ब्राह्मण मित्रांना सांगेन त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित द्वेष कमी होईल. जरी झाला नाही तरी काही फरक पडणार नाही.

कॉमी Sat, 06/07/2025 - 14:48
लेख पटला नाही. मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत. परशुरामाला आयकॉन बनवले हे देखील काही "कार्यकर्ते "लोकांपूरते मर्यादित असते. इतर कोणी असले उद्योग करायच्या फंदात पडत नाही. बाकी तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?

In reply to by कॉमी

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 15:31
मराठा जातीतल्या लोकांनी अमुक केलं आणि ब्राम्हण जातीने काहीही केले नाही ही सरसकट विधाने चुकीची आहेत.> मुळात मी जे लिहीले आहे ते तुम्ही वाचत नसून तुम्ही तुम्हाला हवं ते (सोईनुसार) वाचत आहात. ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे. तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 16:41
जात कशी काम करते याचे उत्कृष्ट उदाहरणः तुम्ही का म्हणून ब्राम्हण व्यवसायिकांना प्राधान्य देत होता?> आर्थिक, बौद्धिक, भावनिक इ० गरजा पूर्ण होणे हे स्वस्थ नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. जी कुटुंबे, समूह एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात ती घट्टपणे बांधलेली राहतात. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही. टीपः हे फक्त ब्राम्हण याच जातीकडून होते असे नाही. भारतीय उपखंडातील प्रत्येकाच्या डी एन ए मध्ये ती भिनलेली आहे. ती जाणे खूप खूप कठीण आहे.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश Sun, 07/27/2025 - 13:58
ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे.
अरे बावळट माणसा ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले नाहीत हाच तर मुद्दा आहे.

मारवा Sat, 06/07/2025 - 18:42
1 ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता. 2 जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे. आपणाला या दोन विधानातून नेमकं काय म्हणायचं आहे ? कृपया आपण थोडे विस्तारपूर्वक मांडले तर आपली भूमिका अचूक कळण्यास मदत होईल.

In reply to by मारवा

युयुत्सु Sat, 06/07/2025 - 20:44
श्री० मारवा प्रथम थयथयाट न करता नेमके प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद! खुलासा १ - तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे "शूद्र पूर्वी कोण होते?" हे पुस्तक जर वाचले, तर ब्राह्मण/ब्राह्मणेतर दरीचे *खरे आणि विश्वासार्ह* कारण समजायला मदत होते. मला बाबासाहेबांच्या विद्वतेबद्दल नितांत आदर आहे. ब्राह्मणांनी शूद्राना "जानव्याचा अधिकार" नाकारून तसेच सोवळ्या/ओवळ्याद्वारे अपमानकारक वागणूक देऊन नाकारले, हे ढळढळीत सत्य आहे. तुम्ही आमच्यातले नाही, तसेच तुम्ही आमच्यात येऊ शकत नाही (तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही) असा संदेश देऊन एक अभेद्य पण मानसिक आणि सामाजिक दरी निर्माण केली, जी आजही अस्तित्वात आहे. ब्राह्मणांच्या समाजमाध्यमातील वेगवेगळ्या समूहातून आजही अनेक कडवे वेडगळ कल्पनांचा पाठपुरावा करताना दिसतात. खुलासा २ - जात म्हणजे काय या प्रश्नाचा मी शोध घेतला तेव्हा मला उमजलेली जात म्हणजे - भाषा, चालीरीती (उभ्या गौरी/खड्याच्या गौरी), वर्तन-व्यवहार (हिशेबीपणा, अघळ-पघळपणा), अस्मितेची प्रतिके (पूर्वजांचा पराक्रम), काही प्रमाणात आहार (उदा० ज्यात-त्यात साखर घालणे किंवा लसूण घालणे वगैरे) इ०च्या अजब मिश्रणाने तयार होणारे संकल्पनात्मक रसायन, जे वंशपरंपरागत चालू राहते! हे रसायन त्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीने, कुटुंबाने किंवा समूहाने जाणीवपूर्वक प्यायचे ठरवले तर जात्यंतर झाले असे मानायला मला तरी अडचण वाटत नाही. त्यात जात फक्त वडिलांच्याकडून येते आणि आईकडून येऊ शकत नाही ही धारणा हास्यास्पद नाहीतर, स्त्रियांचा अपमान करणारी आहे! आजचे ब्राह्मण कितीही पुढारलेले दाखवत असले तरी अशा प्रश्नाना भिडायचे टाळतात. आता माझ्या मूळ विधानाकडे येऊ - वेदांचा रक्षण करणारा जर ब्राह्मण असेल आणि एखाद्या ब्राह्मणेतर व्यक्तीने जर हे करण्याची उत्सूकता दाखवली तर त्याला ते करू देण्याचे औदार्य ब्राह्मणांनी दाखवायला हवे (त्याला जानवे बहाल करण्यात यावे). दक्षिणेत दलिताना पौरोहित्याचे अधिकार दिल्याचे काही माहितीपट बघून कळले. आज महाराष्ट्रात कदाचित एखाद्या पाठशाळेत एखाद्या दलिताला प्रवेश दिला असेलही तरी पण याला पुरेशी प्रतिष्ठा आणि सातत्य मिळवून देण्यात आले्ले नाही. यात समाजाने एकत्र येऊन (मराठ्यांसारखे) धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे आज माणसे देश, धर्म, दैवत, अन्न, भाषा, लिंग, आडनाव काहीही बदलू शकतात पण जात बदलू शकत नाहीत, ये बात हजम नही होती. मग वर उपस्थित झालेला प्रश्न सतावत राहतो - जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे अशी आशा करतो...

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Sun, 06/08/2025 - 09:34
थयथयाट न करता नेमके प्रश्न लेखकाने आपले मत मांडले,प्रतिसादकांनी त्यांचे मत मांडले. यात थयथयाट कुठे आला. तुम करें तो रासलिला, हम करे तो थयथयाट. कुछ भी......

शाम भागवत Mon, 06/09/2025 - 15:49
बाकी लेखात फक्त महाराष्ट्रातील ब्राह्मण विचारत घेतलेले दिसत आहेत.
एकदम 🎯" माझे वैयक्तिक मत असे आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्यामुळे जन्म कुठे झाला ते महत्वाचे नसून, जन्म झाल्यावर काय केले हे महत्वाचे. पण ही व्याख्या फारच उच्च दर्जाची आहे असे मला वाटते. त्यामुळे मी माझ्यापुरती ही व्याख्या थोडीशी सैल केलीय. त्यानुसार ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले धेय्य आहे, असे जो मानतो तो ब्राह्मण होय. या व्याख्येनुसार, ब्राह्मण असणे ही अभिमानाने मिरवायची गोष्ट वाटत नाही. त्याचा गर्व वगैरे असणे ही तर खूपच दूरची बात. मला ती एक मोठी जबाबदारी वाटते. सर्व संत सज्जनांमधे ही जबाबदारीची जाणीव दिसून येते.

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 16:47
एक विशिष्ट जातीचा द्वेष का केला जात आहे असा आपला प्रश्न आहे. ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल. खरे तर सगळ्या जातीच एकमेकांचा द्वेष करत आल्यात. जन्मावर आधारित आपआपला समूह बनवायचा आणि इतरांना 'परके' मानायला सुरूवात करायची याचेच नांव जात. त्याच्या व्याख्येतच इतरांचा द्वेष करणं येतं.

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 17:35
ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि सगळे मात्र त्यांचा द्वेष करतात असे मानायला काय आधार आहे, हे स्पष्ट केले तर चर्चा करता येईल.> नावं घेऊन उदा० दिली तर गहजब होईल पण ब्राह्मण पण इतरांचा द्वेष करतात आणि त्यापेक्षा इतरांबद्दल तुच्छता जास्त बाळगतात.

विवेकपटाईत Fri, 06/13/2025 - 10:41
भारतात सर्वात जास्त सुधारलेला जो समाज आहे तो ब्राम्हण आहे. महाराष्ट्रात ब्राम्हण द्वेष फक्त राजनीति पुरता आहे. सामान्य जनता ब्राह्मणांचा आदर करते. त्यांचे उदाहरण देते. आरक्षण नसल्याने जवळ पास सर्वच घराण्यात एक तरी अपत्य अमेरिकेत आहे. बाकी ब्राह्मण विरोधक नेता ही त्यांच्या संस्थेत उच्चपदीय नौकरीसाठी ब्राह्मणांना प्राधान्य देतात. आज जर सैन्यात ही मराठी कमिशन प्राप्त अधिकारी पहाल तर अनुपात अनुसार ब्राह्मण सर्वात जास्त आहेत.

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 11:09
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Sat, 06/14/2025 - 09:54
आर्य शब्दांचा जाती समूहाशी काहीही घेणे देणे नाही. फक्त कोरी कल्पना आहे. बाबा साहेबांच्या मते जे लोक इथल्या नद्या पर्वत तलावांना तीर्थ मानतात ते इथलेच मूल निवासी.ब्राह्मण ते शूद्र इथलेच. मोहन जदोडो असो की ऋग्वेद ऋषभ हा पवित्र पशू आहे. बाहेरून जे धर्म आले त्यांचे भक्ति स्थळे आज ही वेटिकन किंवा मक्का आहे.

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 11:10
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सध्याची राजनीति कधी नव्हे इतकी गलीच्छ आहे. अशा गलीच्छ राजनितीचे सामाजिक परिणाम दूरगामी असतात. माझा एक जुना हिंदुत्ववादी मित्र म्हणायचा की आर्य पूर्वी बाहेरून हिंदुस्थानात आले आणि आता हिंदुस्थानातून परत बाहेर चालले आहेत. प्रत्येक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते.

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 11:13
प्रत्येक घरातील एक मूल अमेरिकेत असणे हे एक प्रकारे विस्थापन (डीस्प्लेसमेंट)/विलगीकरण (मार्जिनलायझेशन?) आहे आणि तो गलीच्छ राजनितीचा सामाजिक परिणाम आहे, असे मला वाटते. असे वाचावे

अभ्या.. Fri, 06/13/2025 - 15:15
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
हे नॉर्मल झाले आहे सध्या. कुठल्याच जातीला साधा बुध्दीजीवी, विचारवंत किंवा कलासंपन्न आयकॉन नको आहे. म्हणजे आयकॉन लढाऊ शस्त्रधारी पाहिजे, त्याच्यात आधीचे गुण कला, शास्त्र असले तर उत्तम पण मुख्य म्हन्जे शस्त्रधारी पाहिजे. हाता शिवलिंग घेतलेली शांत सोज्ज्वळ अहिल्यादेवी कालबाह्य झाली, आता घोड्यावर बसून तलवार घेतलेलल्या राजमाता अहिल्यादेवींचा बोलबाला आहे. सो रक्त ओघळणारा परशुधारी सिक्सपॅकायुक्त परशुराम आयकॉन बनावा ह्यात नवल नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 15:57
तुमच्या ब्लॉगवरच्या कथा आवडल्या! फकत टंकताना थोडी व्हाईट-स्पेस सोडली तर वाचन-सौख्य जास्त मिळेल.

खटपट्या Fri, 07/25/2025 - 00:48
(आज ब्राह्मणेतर समाज जसा "घटनेवर" निष्ठा ठेवतो (कारणे स्पष्ट आहेत), तसे ब्राह्मण "घटने"बद्दल आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत...) संपुर्ण्र ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवतो आणि संपुर्ण ब्राम्हणेतर समाज घटनेवर निष्ठा ठेवत नाही, असे वाटत नाही. प्रत्येक समाजात अशी काही माणसे असतात नसतात. (ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता.) बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की. पुर्वी ग्रामिण भागात चालत असेल पण आज काल ज्याला कोणाला हवे आहे तो जानवे घालतो. (ब्राह्मणांनी समाजाच्या ऐक्यासाठी/स्वास्थ्यासाठी मोठे निर्णय घेतल्याचे माझ्या आठवणीत नाही.) असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का? (सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले.) काही अंशी सहमत. ऊत्तरेतले ब्राम्हण देखील परशूरामाला आयकॉन् मानतात का? मुळात महाराष्ट्रातले तरी मानतात का? (नुकतेच माझ्या घराचे वॉटरप्रुफींगचे काम केले तेव्हा मी ब्राह्मण व्यावसायिकाना प्राधान्य द्यायचे ठरवले होते) सध्या तरी ब्राम्हण न बघता मराठी माणूस बघून काम देण्याची गरज आहे. बाकी तुम्ही न्युनगंडाच्या फेर्‍यात अडकत आहात असे वाटते आहे. १.मराठी साहीत्य पताका ब्राम्हण समाजाने तेवत ठेवली, नंतर इतर त्यात सामील झाले. २.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी ब्राम्हण लोकांनी योगदान दिले, बलीदान दिले. ३. आभिमान वाटावे अशा मराठी प्रमाण भाषेचे अस्तीत्व साहित्याद्वारे आणि शाळा विद्यालयात अध्यापन करुन टिकवून ठेवले. आताशा शाळामध्ये ब्राम्हण शिक्षकव्रुन्द राहीला नसल्याने मुले प्रमाणभाषा न बोलता हिंदीबटीक धेड्गुजरी भाषा बोलत आहेत. ४. आरक्षणामुळे विविध सरकारी अस्थापनातील नोकर्‍या ब्राम्हण समाजाला मिळेनाशा झाल्यावर याच समाजाने आपापले मार्ग धुंडाळून आपला उत्कर्ष साधला. आजही अमेरिकेत मराठी ब्राम्हण एलिट वर्गात मोडतो. थोडक्यात - निराशेच्या किंवा न्युनगंडाच्या भावनेतून लिहीलेला लेख वाटला.

युयुत्सु Fri, 07/25/2025 - 08:19
श्री० खटपट्या तुमचा आयडी आणि लिखाणातला अभिनिवेश बघता तुमचे वय साधारण माझ्या निम्मे असावे असे वाटते, म्हणूनच तुमच्या मताबद्दल आदर आहे. ;) आपण म्हणता की - "बराच ब्राम्हणेतर समाज कोणाच्याही परवानगी शिवाय जाणवे घालतोच की." 'परवानगी' शिवाय जानवे घालतात का हे माहित नाही (शूद्र सोडून इतरांना जानव्याचा अधिकार आहे, असे "शूद्र पूर्वी कोण होते" या पुस्तकात वाचले आहे). बरेच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर मध्यंतरी भिकबाळी घालू लागले होते, आता ते खुळ कमी झाल्यासारखे वाटते. ग्रामीण भागात उतरंडी अधिक घट्ट असतात, त्यामुळे 'परवानगी' शिवाय म्हणजे बंड करून जानवे घालत असतील असे वाटत नाही. तसेच उतरंडी जाचक झाल्या की रिअ‍ॅकशन येते, त्याची परिणती अधिकार धूडकावून लावण्यात होते, हे आपल्याला माहित असेलच. शिवाय "पात्र व्यक्तीना जानवी वाटणे" आणि "परवनगी शिवाय जानवी घालणे" यात गुणात्मक आहे. त्यावर आपण चिंतन करावे ही विनंती. यात १ली कृती काही प्रमाणात सर्वसमावेशकता आणि खुलेपणा दाखवते आणि दुसरी कृती बंडखोर वृत्ती दाखवते, असे आपल्या लक्षात येईल, याची खात्री आहे. (असे बोलुन आपण ब्राम्हण समाजसुधारकांचा अपमान करतो असे वाटत नाही का?) इथे परत आपली गल्ल्त झाली आहे असे वाटते. ब्राह्मण सुधारकांचा अपमान मी करत नसून निरर्थक कालबाह्य कल्पनांची पुनर्स्थापना करणारे सनातनी ब्राह्मण करत आहेत. उदा० गोत्राची पुनर्स्थापना, तसेच मुलीना जास्त शिकवू नये (कारण त्यामुळे मुलांची लगने होत नाहीत) इ० आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मण सुधारकांनी सुधारणा करणे (ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) आणि समाजाने एकत्र येऊन स्वतःमध्ये बदल घडवणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सभ्य आणि संयमी भाषेत प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष मनःपूर्वक अभिनंदन!

युयुत्सु Fri, 07/25/2025 - 08:23
ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला तरी तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे) ऐवजी ज्याला ब्राह्मण समाजानाने नुसता विरोधच केला नाही तर सुधारकांचा अनन्वित छळ पण केला, उदा कर्वे)

माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. आणि हो!! मी लोकल फालतु ईंजिनीयरिंग कॉलेजमधुन पदवी घेतली आहे,आणि माझे तसे बरे चालले आहे. पण आजकाल म्हणे आय आय टीचे पदवीधरही बेकार राहतात. कारण त्याना पहिल्याच नोकरीत कोटीचे पॅकेज पाहीजे असते. आधीच मार्केट मध्ये नोकर्‍या कमी असताना ते कोण देणार? असो. बाकी चालु द्या.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धर्मराजमुटके Sat, 07/26/2025 - 09:51
माझ्या घरी संडास साफ करायचे काम होते त्यासाठी मी ब्राम्हण व्यवसायिक शोधत होतो. पण तसे कुणीच मिळाले नाही. शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन घेतले. थोडीशी दुरुस्ती, भैया ही काही जात नव्हे. तुम्ही किमान त्याचे आडनाव पांडे, मिश्रा, शर्मा, दुबे, कनोजिया आहे की पासवान एवढे जरी विचारले असते तर तुम्हाला कदाचित त्याची जात कळाली असती. :)

युयुत्सु Sat, 07/26/2025 - 10:15
श्री० राजेंद्र मेहेंदळे तुमचे 'तसे बरे चालले आहे' हे वाचून अतिशय आनंद झाला. तेव्हा मनः पूर्वक अभिनंदन. पण एक गोष्ट मला समजली नाही - ती म्हणजे ब्राह्मणद्वेष (या धाग्याचा विषय) आणि बेकार आय०आय्०टीयन यांचा संबंध काय हे स्पष्ट झालेले नाही. म्हणजे बघा तुमच्या मनात नक्की काहीतरी योजलेले असेल पण ते लिखाणाच्या आवेगात बाहेर पडलेले दिसत नाही. आता माझ्यादृष्टीने बेकार आय०आय्०टीयन, तसेच पी०एच्०डी० होऊनही कारकुनी किंवा शिपायाची नोकरी करावी लागणे हे त्या व्यक्तींचे अपयश मानायचे की बुद्धीमत्ता वाया घालविण्यार्‍या देशाचे, त्यातील समाजाचे आणि सरकारचे अपयश मानायचे हा खरा प्रश्न आहे. आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही. सांगायचे तात्पर्य - जे १ कोटीचा पगार घेण्यासाठी जन्माला आले आहेत त्यांना १ कोटी नाही तरी ५० लाख तरी मिळणे आवश्यक आहे, नाही तर वरील समस्येसारख्या समस्या निर्माण होऊन समाजाचे स्वास्थ्य आणखी बिघडते.

In reply to by युयुत्सु

अथांग आकाश Sun, 07/27/2025 - 14:22
अरे बावळट माणसा. "आता तुम्हाला मी एक गमतीदार असा स्वतःचा अनुभव सांगतो - माझ्या १ल्या जॉबमध्ये मला माझ्या बॉसने सुरुवातीला २-३ महिने थोडे "डर्टी काम" करावे लागेल असे बजावले होते. अर्थात माझी तयारी होतीच. हे "डर्टी काम" म्हणजे मला काही दिवस चक्क डेटा एण्ट्री करावी लागली होती. हे काम माझ्याबरोबरच इतर अनेक ठिकाणी पण चालू होते. हे काम करताना मी अशी पद्धत शोधून काढली की काम इतरांच्या तूलनेत वेगाने आणि अचूक झाले. यामुळे इतर डेटा एण्ट्री करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली कारण माझ्या बॉसने संबंधिताना प्रश्न विचारला की माझा विद्यार्थी जर हे काम इतक्या वेळात करू शकतो तर तुमच्या माणसांना हे का जमत नाही." तू जे केले होतेस ते इतरांच्या हक्कावर गदा आणणारे होते हे तुझ्यासारख्या क्षुद्रबुद्धीच्या माणसाच्या लक्षात आले नाही हे ग्राह्य आहे पण हे स्वीकार करता येण्या जोगे होते? #बावळट माणूस

कानडाऊ योगेशु Sun, 07/27/2025 - 13:09
ब्राह्मणांनी जात विसर्जित करणे हे ब्राह्मण समाजाच्या कितीही फायद्यासाठी असले तरी आपला त्यात काहीही फायदा नाही हे कुटील राजकारणी ओळखुन आहेत त्यामुळे जिथे तिथे ब्राह्माणांना प्रोवोक (उत्तेजित) करुन एखादा वाद जात पातळीवरुन आणुन त्यात ब्राह्मण(मूळ शब्द बामण) कसे कारस्थानी आहेत हे दाखवणे हेतुपुर्रस्सर घडवले जाते. उदा. सध्या चर्चित असलेल्या छावा चित्रपटाबद्दल. एका राजकारण्याने संभाजी महाराजांची हत्या होण्यामागे मनुवादी होते का? ह्याचा शोध घेतला जावा असे विधान करुन आपली वोटबँक सुरक्षित ठेवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला होता. जेव्हा जेव्हा समाज मॅच्युरिटी दाखवताना दिसतो तेव्हा असे कपटी राजकारणी येनकेन प्रकारेण त्यात मीठाचा खडा घालतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्राह्मणद्वेष ===== प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत.

युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष

माहितगार ·

diggi12 Mon, 07/07/2025 - 16:40
मस्त ते डीप स्टेट चे राहील की हो

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 05:06
चाट जीपीटी चे यावर काय म्हणणे आहे, ते जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे संवाद साधला गेला: मी: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप : युरो-अमेरिका (युरोप आणि अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी घटनांपुरता मर्यादित नाही, तर तो खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांवर आधारित आहे का ? असल्यास यावर एक व्यापक लेख लिहून सर्वांगीण माहिती द्या चाट जीपीटी : होय, युरो-अमेरिका (युरोप व अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी संघर्ष नसून, तो अनेक दशकांपासून चालत आलेला एक दीर्घकालीन, बहुआयामी हितसंघर्ष आहे. या संघर्षाचे स्वरूप ऐतिहासिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय अशा अनेक स्तरांवर पसरलेले आहे. खाली यावर एक सर्वांगीण, सुसंगत लेख दिला आहे: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप १. ऐतिहासिक पार्श्वभूमी: युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांचा उगम १९व्या शतकातच झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर (१९४५) जग दोन गटांमध्ये विभागले गेले — एकीकडे अमेरिका आणि तिचे युरोपीय सहयोगी (नाटो), आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया (USSR). यामुळे शीतयुद्ध (Cold War) सुरू झाले, ज्यामध्ये थेट युद्ध टाळले गेले, पण प्रॉक्सी वॉर, हेरगिरी, शस्त्रस्पर्धा, तांत्रिक व आर्थिक वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. शीतयुद्ध संपल्यानंतर USSR चे विघटन झाले (१९९१), पण रशियाची जागतिक सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याची आकांक्षा कायम राहिली. याउलट, युरो-अमेरिकन शक्तींनी त्यांच्या प्रभावक्षेत्राचा विस्तार सुरूच ठेवला — यामध्ये नाटोचा विस्तार, युरोपीय संघाचे प्रसार, आणि पूर्व युरोपमध्ये उदारमतवादी लोकशाहींचा प्रसार यांचा समावेश आहे. २. आर्थिक हितसंबंध आणि संसाधनांचे राजकारण: रशिया हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेले राष्ट्र आहे — विशेषतः नैसर्गिक वायू, तेल, कोळसा. युरोप या स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. रशिया ही गोष्ट एक प्रकारचे "ऊर्जास्त्र" म्हणून वापरत आले आहे. दुसरीकडे, अमेरिका व युरोप रशियावर अवलंबन कमी करण्यासाठी नव्या ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत व इतर देशांशी व्यवहार वाढवत आहेत. याशिवाय, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठेवण्यासाठी पश्चिमेकडून आर्थिक निर्बंध लादले जातात, विशेषतः युक्रेन युद्धानंतर. त्यामुळे रशिया आणि युरो-अमेरिका यांच्यातील आर्थिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ३. भौगोलिक आणि सामरिक संघर्ष: रशिया आपल्या सीमांच्या सुरक्षेला प्रचंड महत्त्व देते. नाटोचा पूर्वेकडे विस्तार — म्हणजेच पूर्व युरोपातील देशांना नाटोमध्ये सामील करणे — रशियाला थेट धोका वाटतो. युक्रेन व जॉर्जिया यांना नाटोमध्ये सामावून घेण्याच्या योजना रशियासाठी "रेड लाईन" होत्या. युक्रेनमधील २०१४ मधील राजकीय उलथापालथ, आणि त्यानंतर रशियाने क्रिमिया ताब्यात घेणे, हे या संघर्षाचे ठळक उदाहरण आहे. यानंतरचा २०२२ मधील पूर्णपणे युद्धात परिवर्तित झालेला संघर्ष म्हणजेच युरो-अमेरिका आणि रशियामधील हितसंघर्षाची पराकाष्ठा आहे. ४. मानसिकता व सांस्कृतिक ध्रुवीकरण: रशियन नेतृत्व – विशेषतः व्लादिमीर पुतीन – हे रशियाच्या ऐतिहासिक साम्राज्यवादी गौरवाची पुनर्स्थापना करण्याच्या विचाराने प्रेरित आहे. त्यांच्यामते, पश्चिमी लोकशाही मॉडेल हे रशियाच्या पारंपरिक मूल्यांशी विसंगत आहे. त्यामुळे रशिया एक वेगळ्या ‘सभ्यतासंस्था’ (civilizational model) म्हणून स्वतःला मांडते. अमेरिका आणि युरोप हे उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, आणि खुले बाजार यांच्या मूल्यांवर आधारित आहेत. रशिया हे या मूल्यांनाही खुले आव्हान देतो. यामुळे या संघर्षाला वैचारिक आणि मानसशास्त्रीय स्वरूपही प्राप्त झाले आहे. ५. माहिती युद्ध आणि सायबर संघर्ष: २१व्या शतकात संघर्ष फक्त रणांगणावर होत नाही, तर तो माहितीच्या पातळीवर, इंटरनेटवर, माध्यमांमध्ये आणि सायबर स्पेसमध्येही होतो. रशियावर अनेकदा आरोप झाले आहेत की त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याउलट, युरोप व अमेरिका देखील रशियात लोकशाहीसाठी चळवळी प्रोत्साहित करतात, आणि अनेक वेळा त्या देशातील सत्ताधाऱ्यांविरोधातील प्रचार करतात. हे एक "मुल्ययुद्ध" (values war) बनले आहे. निष्कर्ष: युरो-अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्ष हा केवळ लष्करी नव्हे, तर तो एक भूराजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक संघर्ष आहे. तो शतकानुशतकेच्या इतिहासात रुजलेला असून, आजही वेगवेगळ्या स्वरूपात पुढे जात आहे. युद्ध, निर्बंध, शस्त्रस्पर्धा, सायबर युद्ध, माहिती नियंत्रण, ऊर्जा राजकारण – हे सर्व त्या संघर्षाचे विविध पडसाद आहेत. आणि म्हणूनच हा संघर्ष तात्कालिक नसून दीर्घकालीन आहे – ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर उमटतात. तुम्हाला या विषयावर विशिष्ट पैलूंवर अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास जरूर सांगा. मी: पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया हा केवळ एक देश नसून एक वेगळी 'सभ्यता' (civilization) आहे आणि तिला पाश्चिमात्य उदारमतवादापासून वाचवले पाहिजे, असा विचार रशियन राष्ट्रवादात प्रभावी आहे..... या विषयावर लिहा. चाट जीपीटी: १. सभ्यतात्मक राष्ट्र म्हणून रशियाची कल्पना: रशियन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि धोरणकर्ते (जसे की अलेक्झांडर दुगिन) रशियाला केवळ एका राजकीय राष्ट्राच्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांच्या मते, रशिया ही एक युरेशियन सभ्यता आहे — जी युरोप आणि आशिया यांच्या सीमेवर उभी राहून स्वतंत्र मूल्य, धर्म, परंपरा आणि सामाजिक रचना जोपासते. पुतिन यांनीही वेळोवेळी हाच विचार प्रतिपादित केला आहे — की रशिया ही एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे, जी पाश्चिमात्यांच्या सार्वत्रिक मूल्यसंकल्पनांपासून भिन्न आहे आणि त्या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे रशियाच्या आत्म्याचा नाश होणे होय. २. पाश्चिमात्य उदारमतवादावर टीका: रशियन राष्ट्रवादी विचारसरणीत पाश्चिमात्य उदारमतवाद म्हणजे: व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरेकी रूप पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे विघटन धर्माचे स्थान कमी करणे राष्ट्रवादावर आधारित ऐक्याचा अभाव पुतिन यांनी अनेक वेळा समलैंगिक विवाह, लैंगिक ओळख, बहुसंस्कृतीवाद, आणि उदारवादी लोकशाहीच्या नावाखाली होणाऱ्या अस्थैर्यांवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, या गोष्टी समाजाला कमकुवत करतात, आणि रशिया त्याच्या ऐतिहासिक मूल्यांवर आधारित "मजबूत राष्ट्र" उभारू इच्छितो. ३. रूढीवादी मूल्यांचा आग्रह: पुतिन यांचे शासन रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी घनिष्ठ संबंध ठेवते. धर्म, परंपरा, सैन्यशक्ती, आणि "वास्तविक पुरुषार्थ" या मूल्यांचा प्रचार करून एक मजबूत राष्ट्रीय ओळख तयार केली जाते. उदा. रशियन शाळांमध्ये देशभक्तीपर शिक्षणावर भर, इतिहासाचे पुनर्लेखन, किंवा LGBTQ हक्कांवरील बंदी ही सर्व उदाहरणे रशियाच्या रूढीवादी विचारसरणीची आहेत. ४. उदारमतवादाविरोधातील संघर्षाचा भू-राजकीय आयाम: पुतिन यांच्या मते, पश्चिमेकडून उदारमतवाद फक्त सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय अस्त्र म्हणून वापरले जाते — जे इतर देशांमध्ये "लोकशाहीच्या नावाखाली" हस्तक्षेप करते, सरकारे उलथवते (उदा. युक्रेनमधील 'मैदान क्रांती'), आणि रशियासारख्या देशांवर दबाव आणते. या पार्श्वभूमीवर, रशिया स्वतःला एक "संस्कृतीचा संरक्षक" (Defender of Civilization) म्हणून पाहतो — जिथे पाश्चिमात्य हस्तक्षेपाविरुद्ध आणि त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांविरुद्ध रक्षण केले जाते. ५. या विचारसरणीचे परिणाम: आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडणे: पश्चिमी देशांकडून रशियावर निर्बंध, टीका, आणि अलिप्तता वाढलेली आहे. घरेलू राजकारणात एकाधिकारशाहीचा उदय: राष्ट्रवादाच्या नावाखाली विरोधकांचे दमन, माध्यमांचे नियंत्रण, आणि लोकशाही संस्थांचे क्षीणकरण. विकल्पात्मक जागतिक व्यवस्था: रशिया चीन, इराण, भारतासारख्या देशांशी विविध प्रकारचे सहयोग वाढवून एक बहुपक्षीय जागतिक शक्तिसंतुलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्ष: पुतिन यांच्या नेतृत्वातील रशिया "एक देश" म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र सभ्यता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ही सभ्यता पाश्चिमात्य उदारमतवादास नकार देऊन, पारंपरिक मूल्यांवर आधारित असलेली, सशक्त, राष्ट्रीय अस्मिता जोपासणारी आहे. या विचारसरणीचा प्रभाव केवळ रशियन अंतर्गत राजकारणावरच नाही, तर संपूर्ण जागतिक भूराजकारणावर पडत आहे. हे मूल्यसंघर्षाचे (values conflict) एक स्पष्ट उदाहरण आहे — जिथे एक बाजू सार्वत्रिक उदारमतवादी मूल्यांची घोषणा करते, तर दुसरी बाजू स्थानिक, पारंपरिक मूल्यांच्या आधारे स्वतंत्र सभ्यतेची पुनर्रचना करते. तुम्हाला हाच विषय अधिक सखोल सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून हवा असल्यास जरूर सांगा. ------ हे सगळे एकातून दुसरी, दुसर्यातून तिसरी.... अशी गोष्टींची मालिका बनवण्यासारखी उठाठेव आहे, तस्मात इथेच थांबतो. 'ए.आय.चा मिपावर परिणाम' असा लेख कुणीतरी पाडावा आता.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Tue, 07/08/2025 - 08:57
@चित्रगुप्त एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का? तुमची अडचण अधिक व्यवस्थीत समजल्यास सुधारणेस सोपे जाईल. केवळ हातात एआय आत्ता आलेले आहे म्हणून लेख पाडून मोकळा झालो असे नक्कीच नाही. अदमासे ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची माझी रुची सर्वसामान्यपेक्षा अधिक सखोल राहीलेली आहे. ज्ञानकोशीय लेखनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माझा वेगळा दृष्टीकोण मी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुष्टीसाठी मी पुर्वी स्वतः संदर्भ चाळत होतो. संदर्भ उपलब्ध करण्यास वेळ देता आला नाही तर लेखनाचा योग बर्‍याचदा टळत असे. ते काम आता एआय मुळे हलके झाले एवढेच. एआय जे लिहुन देते ते संबंधीत विषयाच्या संदर्भात तथ्यात्मकदृष्ट्या पुरेसे योग्य झाले आहे का हे पडताळण्याची क्षमता माझ्यात आहे. एआयच्या लेखन शैली व शब्द योजनेत अद्याप कृत्रिमता जाणवते हे खरे आहे. मी माझे स्वतःचे लेखन आणि एआयचे स्वतंत्र दाखवून देतो.

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 22:34
एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का?
नाही. मी ए.आय. संबंधित विविध प्रयोग करून बघतो आहे. अर्थात माझे प्रयोग प्रतिमा निर्मितीविषयी आहेत आणि त्यासाठी चाट जीपीटी पैसे भरून वापरतो आहे. त्यात काही प्रयोग मराठी लिखाणाबद्दल -- किंबहुना इंग्रजी पेक्षा मला मराठी वाचणे सोपे पडते म्हणून - देखील करतो, त्यापैकी हा एक होता. म्हणजे एकादा विषय किती खेचला जाऊ शकतो, ते मला बघायचे होते. या प्रकारचे प्रयोग खरेतर मला माझ्या आवडीच्या विषयांसंबंधी केले पाहिजेत, म्हणजे निदान कळेल तरी काय चालले आहे ते. आता पर्यंतच्या प्रयत्नातून अजून तरी मला अगदी हव्या तशा प्रतिमा - बराच खटाटोप करून देखील - बनवता येत नाहीयेत.

विवेकपटाईत Wed, 07/09/2025 - 19:15
माझ्या पासून प्रेरणा घेऊन लेख लिहला यासाठी धन्यवाद. आज पर्यन्त जगात झालेल्या अधिकान्श युद्धांचे कारण आर्थिक असतात. ( फक्त जेहादी युद्ध काफिरांना मारून त्यांची संपत्ति आणि स्त्रिया आणि मुलांना गुलाम करण्यासाठी होतात). अमेरिकन अर्थव्यवस्था आणि डॉलरचे साम्राज्य टिकविण्यासाठी जगात अस्थिरता राहिली पाहिजे ही नीती अमेरिकेने द्वितीय युद्धांनंतर लगेच सुरू केली. आज युरोप मध्ये अस्थिरता त्यामुळे युरोवर जगाचा विश्वास नाही. पेट्रोल वर आधारित अर्थव्यवस्था जिथे आहे त्या मध्य आशियात सतत अस्थिरता ठेवली जाणे आपण पाहतच आहो. जगाला डॉलर शिवाय पर्याय नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी trillions डॉलरचे बॉन्ड विका. पुन्हा बॉन्ड विकून व्याज चुकवा. जगाला डॉलर वर आश्रित ठेवा आणि चैन करा. हे अमेरिकेचे ध्येय आहे. अमेरिका यात यशस्वी झाला नसता तर आज अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडून पडली असती. उदा: "The U.S. government will spend a record $1.2 trillion on interest payments in 2024, the highest amount ever recorded" अमेरिका अस्त्र शस्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि विक्री ही करतो. जगात युद्ध सुरू राहील तर शस्त्र विक्री वाढत राहणार. भारताने ओपेरेशन सिंदूर दोन दिवसात पूर्ण करून युद्धविराम केला त्याचे सर्वात जास्त दु:ख अमेरिकेला झाले असेल. या शिवाय आता जगात भारतीय शस्त्रांची विक्री ही वाढणार. त्याचे नुकसान ही अमेरिकेलाच. भविष्यात अमेरिका भारताविरुद्ध काही ना काही कुरघोडी करणार. माझ्या मते विभिन्न विचारसरणीचा युक्रेन रशिया युद्धाशी काहीही संबंध नाही. बाकी इराण आणि इझराईल युद्धात मात्र जेहादी विचारसरणी ही येते. ती नसती तर इराण ने शांत राहून चर्चा करत परमाणु अस्त्र बनवून टाकले असते. हिजिबुल्लाला मदत करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.

diggi12 Mon, 07/07/2025 - 16:40
मस्त ते डीप स्टेट चे राहील की हो

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 05:06
चाट जीपीटी चे यावर काय म्हणणे आहे, ते जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे संवाद साधला गेला: मी: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप : युरो-अमेरिका (युरोप आणि अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी घटनांपुरता मर्यादित नाही, तर तो खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांवर आधारित आहे का ? असल्यास यावर एक व्यापक लेख लिहून सर्वांगीण माहिती द्या चाट जीपीटी : होय, युरो-अमेरिका (युरोप व अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी संघर्ष नसून, तो अनेक दशकांपासून चालत आलेला एक दीर्घकालीन, बहुआयामी हितसंघर्ष आहे. या संघर्षाचे स्वरूप ऐतिहासिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय अशा अनेक स्तरांवर पसरलेले आहे. खाली यावर एक सर्वांगीण, सुसंगत लेख दिला आहे: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप १. ऐतिहासिक पार्श्वभूमी: युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांचा उगम १९व्या शतकातच झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर (१९४५) जग दोन गटांमध्ये विभागले गेले — एकीकडे अमेरिका आणि तिचे युरोपीय सहयोगी (नाटो), आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया (USSR). यामुळे शीतयुद्ध (Cold War) सुरू झाले, ज्यामध्ये थेट युद्ध टाळले गेले, पण प्रॉक्सी वॉर, हेरगिरी, शस्त्रस्पर्धा, तांत्रिक व आर्थिक वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. शीतयुद्ध संपल्यानंतर USSR चे विघटन झाले (१९९१), पण रशियाची जागतिक सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याची आकांक्षा कायम राहिली. याउलट, युरो-अमेरिकन शक्तींनी त्यांच्या प्रभावक्षेत्राचा विस्तार सुरूच ठेवला — यामध्ये नाटोचा विस्तार, युरोपीय संघाचे प्रसार, आणि पूर्व युरोपमध्ये उदारमतवादी लोकशाहींचा प्रसार यांचा समावेश आहे. २. आर्थिक हितसंबंध आणि संसाधनांचे राजकारण: रशिया हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेले राष्ट्र आहे — विशेषतः नैसर्गिक वायू, तेल, कोळसा. युरोप या स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. रशिया ही गोष्ट एक प्रकारचे "ऊर्जास्त्र" म्हणून वापरत आले आहे. दुसरीकडे, अमेरिका व युरोप रशियावर अवलंबन कमी करण्यासाठी नव्या ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत व इतर देशांशी व्यवहार वाढवत आहेत. याशिवाय, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठेवण्यासाठी पश्चिमेकडून आर्थिक निर्बंध लादले जातात, विशेषतः युक्रेन युद्धानंतर. त्यामुळे रशिया आणि युरो-अमेरिका यांच्यातील आर्थिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ३. भौगोलिक आणि सामरिक संघर्ष: रशिया आपल्या सीमांच्या सुरक्षेला प्रचंड महत्त्व देते. नाटोचा पूर्वेकडे विस्तार — म्हणजेच पूर्व युरोपातील देशांना नाटोमध्ये सामील करणे — रशियाला थेट धोका वाटतो. युक्रेन व जॉर्जिया यांना नाटोमध्ये सामावून घेण्याच्या योजना रशियासाठी "रेड लाईन" होत्या. युक्रेनमधील २०१४ मधील राजकीय उलथापालथ, आणि त्यानंतर रशियाने क्रिमिया ताब्यात घेणे, हे या संघर्षाचे ठळक उदाहरण आहे. यानंतरचा २०२२ मधील पूर्णपणे युद्धात परिवर्तित झालेला संघर्ष म्हणजेच युरो-अमेरिका आणि रशियामधील हितसंघर्षाची पराकाष्ठा आहे. ४. मानसिकता व सांस्कृतिक ध्रुवीकरण: रशियन नेतृत्व – विशेषतः व्लादिमीर पुतीन – हे रशियाच्या ऐतिहासिक साम्राज्यवादी गौरवाची पुनर्स्थापना करण्याच्या विचाराने प्रेरित आहे. त्यांच्यामते, पश्चिमी लोकशाही मॉडेल हे रशियाच्या पारंपरिक मूल्यांशी विसंगत आहे. त्यामुळे रशिया एक वेगळ्या ‘सभ्यतासंस्था’ (civilizational model) म्हणून स्वतःला मांडते. अमेरिका आणि युरोप हे उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, आणि खुले बाजार यांच्या मूल्यांवर आधारित आहेत. रशिया हे या मूल्यांनाही खुले आव्हान देतो. यामुळे या संघर्षाला वैचारिक आणि मानसशास्त्रीय स्वरूपही प्राप्त झाले आहे. ५. माहिती युद्ध आणि सायबर संघर्ष: २१व्या शतकात संघर्ष फक्त रणांगणावर होत नाही, तर तो माहितीच्या पातळीवर, इंटरनेटवर, माध्यमांमध्ये आणि सायबर स्पेसमध्येही होतो. रशियावर अनेकदा आरोप झाले आहेत की त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याउलट, युरोप व अमेरिका देखील रशियात लोकशाहीसाठी चळवळी प्रोत्साहित करतात, आणि अनेक वेळा त्या देशातील सत्ताधाऱ्यांविरोधातील प्रचार करतात. हे एक "मुल्ययुद्ध" (values war) बनले आहे. निष्कर्ष: युरो-अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्ष हा केवळ लष्करी नव्हे, तर तो एक भूराजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक संघर्ष आहे. तो शतकानुशतकेच्या इतिहासात रुजलेला असून, आजही वेगवेगळ्या स्वरूपात पुढे जात आहे. युद्ध, निर्बंध, शस्त्रस्पर्धा, सायबर युद्ध, माहिती नियंत्रण, ऊर्जा राजकारण – हे सर्व त्या संघर्षाचे विविध पडसाद आहेत. आणि म्हणूनच हा संघर्ष तात्कालिक नसून दीर्घकालीन आहे – ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर उमटतात. तुम्हाला या विषयावर विशिष्ट पैलूंवर अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास जरूर सांगा. मी: पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया हा केवळ एक देश नसून एक वेगळी 'सभ्यता' (civilization) आहे आणि तिला पाश्चिमात्य उदारमतवादापासून वाचवले पाहिजे, असा विचार रशियन राष्ट्रवादात प्रभावी आहे..... या विषयावर लिहा. चाट जीपीटी: १. सभ्यतात्मक राष्ट्र म्हणून रशियाची कल्पना: रशियन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि धोरणकर्ते (जसे की अलेक्झांडर दुगिन) रशियाला केवळ एका राजकीय राष्ट्राच्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांच्या मते, रशिया ही एक युरेशियन सभ्यता आहे — जी युरोप आणि आशिया यांच्या सीमेवर उभी राहून स्वतंत्र मूल्य, धर्म, परंपरा आणि सामाजिक रचना जोपासते. पुतिन यांनीही वेळोवेळी हाच विचार प्रतिपादित केला आहे — की रशिया ही एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे, जी पाश्चिमात्यांच्या सार्वत्रिक मूल्यसंकल्पनांपासून भिन्न आहे आणि त्या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे रशियाच्या आत्म्याचा नाश होणे होय. २. पाश्चिमात्य उदारमतवादावर टीका: रशियन राष्ट्रवादी विचारसरणीत पाश्चिमात्य उदारमतवाद म्हणजे: व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरेकी रूप पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे विघटन धर्माचे स्थान कमी करणे राष्ट्रवादावर आधारित ऐक्याचा अभाव पुतिन यांनी अनेक वेळा समलैंगिक विवाह, लैंगिक ओळख, बहुसंस्कृतीवाद, आणि उदारवादी लोकशाहीच्या नावाखाली होणाऱ्या अस्थैर्यांवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, या गोष्टी समाजाला कमकुवत करतात, आणि रशिया त्याच्या ऐतिहासिक मूल्यांवर आधारित "मजबूत राष्ट्र" उभारू इच्छितो. ३. रूढीवादी मूल्यांचा आग्रह: पुतिन यांचे शासन रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी घनिष्ठ संबंध ठेवते. धर्म, परंपरा, सैन्यशक्ती, आणि "वास्तविक पुरुषार्थ" या मूल्यांचा प्रचार करून एक मजबूत राष्ट्रीय ओळख तयार केली जाते. उदा. रशियन शाळांमध्ये देशभक्तीपर शिक्षणावर भर, इतिहासाचे पुनर्लेखन, किंवा LGBTQ हक्कांवरील बंदी ही सर्व उदाहरणे रशियाच्या रूढीवादी विचारसरणीची आहेत. ४. उदारमतवादाविरोधातील संघर्षाचा भू-राजकीय आयाम: पुतिन यांच्या मते, पश्चिमेकडून उदारमतवाद फक्त सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय अस्त्र म्हणून वापरले जाते — जे इतर देशांमध्ये "लोकशाहीच्या नावाखाली" हस्तक्षेप करते, सरकारे उलथवते (उदा. युक्रेनमधील 'मैदान क्रांती'), आणि रशियासारख्या देशांवर दबाव आणते. या पार्श्वभूमीवर, रशिया स्वतःला एक "संस्कृतीचा संरक्षक" (Defender of Civilization) म्हणून पाहतो — जिथे पाश्चिमात्य हस्तक्षेपाविरुद्ध आणि त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांविरुद्ध रक्षण केले जाते. ५. या विचारसरणीचे परिणाम: आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडणे: पश्चिमी देशांकडून रशियावर निर्बंध, टीका, आणि अलिप्तता वाढलेली आहे. घरेलू राजकारणात एकाधिकारशाहीचा उदय: राष्ट्रवादाच्या नावाखाली विरोधकांचे दमन, माध्यमांचे नियंत्रण, आणि लोकशाही संस्थांचे क्षीणकरण. विकल्पात्मक जागतिक व्यवस्था: रशिया चीन, इराण, भारतासारख्या देशांशी विविध प्रकारचे सहयोग वाढवून एक बहुपक्षीय जागतिक शक्तिसंतुलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्ष: पुतिन यांच्या नेतृत्वातील रशिया "एक देश" म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र सभ्यता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ही सभ्यता पाश्चिमात्य उदारमतवादास नकार देऊन, पारंपरिक मूल्यांवर आधारित असलेली, सशक्त, राष्ट्रीय अस्मिता जोपासणारी आहे. या विचारसरणीचा प्रभाव केवळ रशियन अंतर्गत राजकारणावरच नाही, तर संपूर्ण जागतिक भूराजकारणावर पडत आहे. हे मूल्यसंघर्षाचे (values conflict) एक स्पष्ट उदाहरण आहे — जिथे एक बाजू सार्वत्रिक उदारमतवादी मूल्यांची घोषणा करते, तर दुसरी बाजू स्थानिक, पारंपरिक मूल्यांच्या आधारे स्वतंत्र सभ्यतेची पुनर्रचना करते. तुम्हाला हाच विषय अधिक सखोल सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून हवा असल्यास जरूर सांगा. ------ हे सगळे एकातून दुसरी, दुसर्यातून तिसरी.... अशी गोष्टींची मालिका बनवण्यासारखी उठाठेव आहे, तस्मात इथेच थांबतो. 'ए.आय.चा मिपावर परिणाम' असा लेख कुणीतरी पाडावा आता.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Tue, 07/08/2025 - 08:57
@चित्रगुप्त एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का? तुमची अडचण अधिक व्यवस्थीत समजल्यास सुधारणेस सोपे जाईल. केवळ हातात एआय आत्ता आलेले आहे म्हणून लेख पाडून मोकळा झालो असे नक्कीच नाही. अदमासे ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची माझी रुची सर्वसामान्यपेक्षा अधिक सखोल राहीलेली आहे. ज्ञानकोशीय लेखनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माझा वेगळा दृष्टीकोण मी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुष्टीसाठी मी पुर्वी स्वतः संदर्भ चाळत होतो. संदर्भ उपलब्ध करण्यास वेळ देता आला नाही तर लेखनाचा योग बर्‍याचदा टळत असे. ते काम आता एआय मुळे हलके झाले एवढेच. एआय जे लिहुन देते ते संबंधीत विषयाच्या संदर्भात तथ्यात्मकदृष्ट्या पुरेसे योग्य झाले आहे का हे पडताळण्याची क्षमता माझ्यात आहे. एआयच्या लेखन शैली व शब्द योजनेत अद्याप कृत्रिमता जाणवते हे खरे आहे. मी माझे स्वतःचे लेखन आणि एआयचे स्वतंत्र दाखवून देतो.

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 22:34
एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का?
नाही. मी ए.आय. संबंधित विविध प्रयोग करून बघतो आहे. अर्थात माझे प्रयोग प्रतिमा निर्मितीविषयी आहेत आणि त्यासाठी चाट जीपीटी पैसे भरून वापरतो आहे. त्यात काही प्रयोग मराठी लिखाणाबद्दल -- किंबहुना इंग्रजी पेक्षा मला मराठी वाचणे सोपे पडते म्हणून - देखील करतो, त्यापैकी हा एक होता. म्हणजे एकादा विषय किती खेचला जाऊ शकतो, ते मला बघायचे होते. या प्रकारचे प्रयोग खरेतर मला माझ्या आवडीच्या विषयांसंबंधी केले पाहिजेत, म्हणजे निदान कळेल तरी काय चालले आहे ते. आता पर्यंतच्या प्रयत्नातून अजून तरी मला अगदी हव्या तशा प्रतिमा - बराच खटाटोप करून देखील - बनवता येत नाहीयेत.

विवेकपटाईत Wed, 07/09/2025 - 19:15
माझ्या पासून प्रेरणा घेऊन लेख लिहला यासाठी धन्यवाद. आज पर्यन्त जगात झालेल्या अधिकान्श युद्धांचे कारण आर्थिक असतात. ( फक्त जेहादी युद्ध काफिरांना मारून त्यांची संपत्ति आणि स्त्रिया आणि मुलांना गुलाम करण्यासाठी होतात). अमेरिकन अर्थव्यवस्था आणि डॉलरचे साम्राज्य टिकविण्यासाठी जगात अस्थिरता राहिली पाहिजे ही नीती अमेरिकेने द्वितीय युद्धांनंतर लगेच सुरू केली. आज युरोप मध्ये अस्थिरता त्यामुळे युरोवर जगाचा विश्वास नाही. पेट्रोल वर आधारित अर्थव्यवस्था जिथे आहे त्या मध्य आशियात सतत अस्थिरता ठेवली जाणे आपण पाहतच आहो. जगाला डॉलर शिवाय पर्याय नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी trillions डॉलरचे बॉन्ड विका. पुन्हा बॉन्ड विकून व्याज चुकवा. जगाला डॉलर वर आश्रित ठेवा आणि चैन करा. हे अमेरिकेचे ध्येय आहे. अमेरिका यात यशस्वी झाला नसता तर आज अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडून पडली असती. उदा: "The U.S. government will spend a record $1.2 trillion on interest payments in 2024, the highest amount ever recorded" अमेरिका अस्त्र शस्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि विक्री ही करतो. जगात युद्ध सुरू राहील तर शस्त्र विक्री वाढत राहणार. भारताने ओपेरेशन सिंदूर दोन दिवसात पूर्ण करून युद्धविराम केला त्याचे सर्वात जास्त दु:ख अमेरिकेला झाले असेल. या शिवाय आता जगात भारतीय शस्त्रांची विक्री ही वाढणार. त्याचे नुकसान ही अमेरिकेलाच. भविष्यात अमेरिका भारताविरुद्ध काही ना काही कुरघोडी करणार. माझ्या मते विभिन्न विचारसरणीचा युक्रेन रशिया युद्धाशी काहीही संबंध नाही. बाकी इराण आणि इझराईल युद्धात मात्र जेहादी विचारसरणी ही येते. ती नसती तर इराण ने शांत राहून चर्चा करत परमाणु अस्त्र बनवून टाकले असते. हिजिबुल्लाला मदत करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
धागा लेख प्रेर्ना आपले पटाईत सर हे खरं आहे की युरो-अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध साध्य करण्यासाठी नव-आर्थिक वसाहतवादाचे प्रारूप राबवले. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी असंख्य देशांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचंड हस्तक्षेप केला आहे आणि तो आजही चालू आहे.

अमेरिकन पक्षी भाग -२

कर्नलतपस्वी ·
अमेरिकन पक्षी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।। १- https://youtu.be/5IooMEmQRe8?si=Nrz6-g0QxRc0ymI3 २- https://youtube.com/shorts/ZG3WH62rc5U?si=I8jcFP0RiCpS8kgf ३- https://youtu.be/DVvfyi-5XSU?si=FHn1rOrDiFQnH_Pz ४- https://youtu.be/X7ocw6bzY3U?si=QqDUj4YIiAzIKHsv ५- https://youtu.be/easwY52elvk?si=ivH4yyNHG6Q7XAWe

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?

राजेंद्र मेहेंदळे ·

युयुत्सु गुरुवार, 06/05/2025 - 18:00
समाजात वाढलेल्या बेपर्वाईची जीवशास्त्रीय चिकीत्सा करणारा लेख मी इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता. जीवशास्त्रीय कारणे समजून घेतली तर या समस्या हाताबाहेर गेल्या आहेत, हे कटुसत्य मान्य करावे लागते. https://www.misalpav.com/node/52557

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 18:57
आय पी एल मधील चेंगराचेंगरी,काळुबाईच्या यात्रेतील भगदाड किंवा रस्त्यावर ह,आणले अपघात याचे कारण केवळ बेशिस्त वाहतूक, बेशिस्त पादचारी, बेशिस्त नागरीक आणी डोळेझाक करणारे कायदा सुव्यवस्थेचे मालक. मेलो तरी बेहत्तर, आम्हीं नाही सुधारणार.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/05/2025 - 21:42
मा. महोदय, पुण्यात वाहतुक यंत्रणा निष्प्रभ झाली आहे. लोक आक्रमक पद्धतीने वाहतूक नियम तोडताना दिसतात कारण कुठलीही कारवाई होत नाही. रहरदारीवर लक्ष ठेवणारे कॅमेरे काम करत नसावेत. सेकंदा सेकंदाला पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन होत आहे. नुकतेच मी या अंदाधुंद वाहतुकीचा बळी होता होता मी वाचलो आहे. दिनांक- 15/04/2024 स्थळ- कर्वे रस्त्यावरील डहाणुकर कॉलनी चौक वेळ- सायंकाळी 6.05 मी एक जेष्ठ नागरिक असून डहाणुकर कॉलनी कडून हॅपी कॉलनी कडे चौकातून स्कूटरवरुन जात होतो. सिग्नल पुर्णपणे ग्रीन होता. अचानक वारजे कडून डेक्कन कडे जाण्यार्‍या रस्त्याने काही दुचाकीस्वार लाल सिग्नल बेफिकिरीने तोडून जात होते. थोडक्यात मला धडकता धडकता वेगाने निघून गेले. माझी स्कूटर जरा घसरली पण मी वाचलो. ही परिस्थिती अपवादात्मक नसून पुण्यात सर्रास या गोष्टी सातत्याने घडत आहेत. वाहतूक पोलिस प्रत्येक ठिकाणी ठेवणे शक्य नाही. पण traffic monitoring system with camera ही यंत्रणाच काम करत नाही. हे कॅमेरे नुसतेच शोभेचे झाले आहेत. प्रबोधनाची तमा नाही व शिक्षेचे भय नाही अशी परिस्थिती झाल्याने वाहतुक अराजक पुण्यात निर्माण झाले आहे. अपघात होता होता वाचल्याची संख्या प्रचंड आहे. त्याची कुठेही नोंद होत नाही. पोलिसांकडून काही कारवाई होईल अशी नागरिकांकडून असलेली अपेक्षा व्यर्थ आहे पोलिसांकडून युद्धजन्य परिस्थिती सारखी आक्रमक कारवाई जर सातत्याने होत राहिली तरच या बेबंद नियम तोडणार्‍यांना वचक बसेल. सिग्नल तोडून बेफान वेगाने जाणे, उलट दिशेने जाणे हे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याने तो केवळ वाहतुकीचे नियम तोडल्याचा गुन्हा नाही. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आहे. आपण जरी कितीही वाहतुकीचे नियम पाळले तरी इतरांनी ते पाळले नाही तर धोका तुमच्या जीवाला निर्माण होत असतो. तरी या बाबत योग्य ती कारवाई व्हावी.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/05/2025 - 21:51
13 डिसेंबर 2024ला शुक्रवारी मॉर्निंग वॉक करून घरी येताना ठेच लागून तोंडावर पडलो. फ़ूटपाथ वरील फरशी तुटली होती. डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाली लोकांच्या मदतीने उठून घरी आलो सोसायटीच्या समोरच पडल्याने चालत घरी आलो. शेजारच्या कनवाळू डॉक्टर बाईंनी शाश्वत हॉस्पिटलला मला घेऊन गेले व ऍडमिट केले. कॅशलेस.वैद्यकीय विमा होता त्यामुळे पुढील सर्व गोष्टी हॉस्पिटलने केल्या. ऒपरेशन करुन प्लेट मनगटात टाकली. एनेस्थिशिया मधे अजून काही अडचणी आल्या त्यामुळे आयसीयू व व्हेंटिलेटर लावावा लागला

सुक्या गुरुवार, 06/05/2025 - 23:22
लहानपणी अकबर-बिरबलाची गोष्ट वाचलेली. ५ प्रश्नांचे एकच उत्तर. तसेच तुमच्या "अपघात झाल्यास कोण जबाबदार?" ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. जबाबदार आहे ती "जनता". मी हे गमतीने नाही तर अगदी सिरियसली बोलतोय. जोपर्यंत भारतीय मुलांना / तरुणांना सार्वजनीक ठिकाणी कसे वागावे ह्याचे शिक्षण मिळत नाही तोवर ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. तुम्ही जबाबदारी ढकलुन पोलिस, गावगुण्ड, अतीक्रमण, भ्रष्टाचार यांना कितीही जबाब्दार धरले तरी या सार्‍या समस्येचे मुळ एकच आहे "बेशिस्ती". त्यावर ईलाज एकच आहे. जनतेने शिस्तीत वागावे. फक्त उदाहरणादाखल घ्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपरीवर खायला जे लोक येतात त्यांना तिथे यायला कुणी जबर्दस्ती करते का? मग त्याचे खापर कुणावर फोडणार? जर कुणी तिथे खाल्लेच नाही तर ती टपरी तिथे राहणार नाही. असो. भारतीय लोकांची बेदरकारी फक्त भारतातच नाहीये. परदेशात ही बरेच लोक असेच वागतात. भारतीय लोकांचा सिविक सेंस हा गमतीचा विषय आहे. तीच गत स्वच्छतेची. तेव्हा दुसर्‍यांवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे ईतकाच सल्ला देईन.

In reply to by सुक्या

जनता बेशिस्तीने वागत असल्यास कारवाई चे अधिकार पोलिसांना आहेत. ९० टक्के लोक जर कायदा धाब्यावर बसवत असतील तर अराजक

सौन्दर्य गुरुवार, 06/05/2025 - 23:34
आज सर्वच मोठ्या शहरात रस्त्यावर फळे, भाजीपाला विकणार्याची आणि त्यांच्याकडून विकत घेणाऱ्याची संख्या प्रचंड वाढली आहे. हे विक्रेते संपूर्ण फुटपाथ, खुपसा रस्ता अडवून उभे राहतात. मंडईपेक्षा त्यांचा माल स्वस्त मिळत असल्यामुळे मंडई ओस पडलेली असते व रस्ते व्यापलेले असतात. वर सुक्यानी म्हंटल्याप्रमाणे अश्या सर्व विक्रेत्यांवर बहिष्कार घालणे हाच एक मार्ग रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याचा आहे.

विवेकपटाईत Fri, 06/06/2025 - 09:58
आपल्या देशातील लोकांना कायद्यांचे पालन न करण्याचे बाळकडू लहानपणा पासून पाजले जाते. एक ही पालक बगीच्यात क्रिकेट खेळू नका गवत खराब होईल असे मुलांना म्हणत नाही. बिना हेलमेट घालून जाणार्‍या अवयस्क तरुणांना त्यांचे आई वडील कधीच जाब विचारत नाही. कचरा कुठे ही फेकला जातो. आज नालीची सफाई झाली असली की दुसर्‍या दिवशी पासून दुकानदार आणि रहवासी नालीत कचरा ओतून ती लवकर पुन्हा भरली जाईल याचा बंदोबस्त करतात. चालत्या गाडीतून, रस्त्यावर, कार्यालयात पानाची पीक ओकली तरी कुणी आक्षेप घेत नाही इत्यादि. जनता ही व्होट बँक असल्याने सरकार ही दुर्लक्ष करते. बाकी या सर्वांचा परिणाम जनतेलच भोगावा लागतो. हिंदीतली "जैसी करनी वैसी भरनी" ही म्हण भारतीय लोकांना तंतोतंत लागू पडते।

सुबोध खरे Fri, 06/06/2025 - 10:25
मुघलांचा इतिहास इतक्या विस्तृत प्रमाणात शिकवण्यापेक्षा नागरिकशास्त्र सविस्तर पणे शिकवणे आवश्यक आहे. दुसर्याच्या त्रासाची अजिबात फिकीर न करणे हे बहुसंख्य वेळेस होणाऱ्या अपघातांचे कारण आहे. मग यात बेशिस्त पार्किंग असो कि उलट दिशेने गाडी चालवणे असो कि सिग्नल तोडणे, वेगाने गाडी चालवणे, किंवा वेळेवर ब्रेकचे सर्व्हिसिंग न करणे असो. डीजे लावून मिरवणूक काढणे, ढोल ताशे वाजवत रस्ता बंद करून वरात/ मिरवणूक नेणे ( यात नवरात्र आणि गणपती विसर्जन येते), मशिदीवर बेफाट आवाजात दिवसात पाच वेळेस अजान देणे हा याच मनोवृत्तीचा परिणाम आहे. दुसऱ्याला त्रास देऊ नये हे आपल्याला नागरिकशास्त्रात शिकवलेच जात नाही. राज्यसभेच्या निवडणूका कशा होतात, लोकसभेचे सदस्य किती आणि विधानसभेचा अध्यक्ष कसा निवडला जातो याच बरोबर नागरिकांची कर्तव्ये काय हे किमान पाच वर्षे तरी शिकवले गेले पाहिजे. उगाच तीन भाषा आणि कार्यानुभव शिकवण्यापेक्षा या गोष्टी शिकवल्यातर याच मुलांचे आयुष्य पुढे थोडे अधिक सुसह्य होईल. ( त्यांच्या आयुष्यकाळात भारताची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता नाही)

सोसायटी असो वा अपार्टमेन्ट : आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे. वरच्या मजल्यावर राहणारे मोठ्यांदा आवाज करतात, सतत फर्निचर हलवतात, जोरात गाणी लावतात.. अश्या सततच्या आवाजांमुळे मानसिक शांतता बिघडू शकते..म्हणून civic sense हा लहानपणापासूनच बिंबवला पाहिजे, नुसता १० मार्कांकरिता असून काही उपयोग नाही महाराष्ट्र टाइम्स - ॲड. रोहित एरंडे © पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर https://vedhkaydyacha.blogspot.com/2025/03/blog-post_25.html

स्वधर्म Fri, 06/06/2025 - 17:24
पहिल्यांदा हे मान्य केले पाहिजे की, - आपण सर्व जगात महान नाही. - आपली संस्कृती सर्वात महान नाही - आपण प्रगत झालो नाही, ते खूप दूर आहे. थोडक्यात आपण खूप मागास समाज आहोत. हे मान्य केले तरच सुधारणेला वाव आहे. असं म्हणतात की प्रश्न आहे हे मान्य करणे हीच प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी आहे.

युयुत्सु गुरुवार, 06/05/2025 - 18:00
समाजात वाढलेल्या बेपर्वाईची जीवशास्त्रीय चिकीत्सा करणारा लेख मी इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता. जीवशास्त्रीय कारणे समजून घेतली तर या समस्या हाताबाहेर गेल्या आहेत, हे कटुसत्य मान्य करावे लागते. https://www.misalpav.com/node/52557

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 18:57
आय पी एल मधील चेंगराचेंगरी,काळुबाईच्या यात्रेतील भगदाड किंवा रस्त्यावर ह,आणले अपघात याचे कारण केवळ बेशिस्त वाहतूक, बेशिस्त पादचारी, बेशिस्त नागरीक आणी डोळेझाक करणारे कायदा सुव्यवस्थेचे मालक. मेलो तरी बेहत्तर, आम्हीं नाही सुधारणार.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/05/2025 - 21:42
मा. महोदय, पुण्यात वाहतुक यंत्रणा निष्प्रभ झाली आहे. लोक आक्रमक पद्धतीने वाहतूक नियम तोडताना दिसतात कारण कुठलीही कारवाई होत नाही. रहरदारीवर लक्ष ठेवणारे कॅमेरे काम करत नसावेत. सेकंदा सेकंदाला पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन होत आहे. नुकतेच मी या अंदाधुंद वाहतुकीचा बळी होता होता मी वाचलो आहे. दिनांक- 15/04/2024 स्थळ- कर्वे रस्त्यावरील डहाणुकर कॉलनी चौक वेळ- सायंकाळी 6.05 मी एक जेष्ठ नागरिक असून डहाणुकर कॉलनी कडून हॅपी कॉलनी कडे चौकातून स्कूटरवरुन जात होतो. सिग्नल पुर्णपणे ग्रीन होता. अचानक वारजे कडून डेक्कन कडे जाण्यार्‍या रस्त्याने काही दुचाकीस्वार लाल सिग्नल बेफिकिरीने तोडून जात होते. थोडक्यात मला धडकता धडकता वेगाने निघून गेले. माझी स्कूटर जरा घसरली पण मी वाचलो. ही परिस्थिती अपवादात्मक नसून पुण्यात सर्रास या गोष्टी सातत्याने घडत आहेत. वाहतूक पोलिस प्रत्येक ठिकाणी ठेवणे शक्य नाही. पण traffic monitoring system with camera ही यंत्रणाच काम करत नाही. हे कॅमेरे नुसतेच शोभेचे झाले आहेत. प्रबोधनाची तमा नाही व शिक्षेचे भय नाही अशी परिस्थिती झाल्याने वाहतुक अराजक पुण्यात निर्माण झाले आहे. अपघात होता होता वाचल्याची संख्या प्रचंड आहे. त्याची कुठेही नोंद होत नाही. पोलिसांकडून काही कारवाई होईल अशी नागरिकांकडून असलेली अपेक्षा व्यर्थ आहे पोलिसांकडून युद्धजन्य परिस्थिती सारखी आक्रमक कारवाई जर सातत्याने होत राहिली तरच या बेबंद नियम तोडणार्‍यांना वचक बसेल. सिग्नल तोडून बेफान वेगाने जाणे, उलट दिशेने जाणे हे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याने तो केवळ वाहतुकीचे नियम तोडल्याचा गुन्हा नाही. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आहे. आपण जरी कितीही वाहतुकीचे नियम पाळले तरी इतरांनी ते पाळले नाही तर धोका तुमच्या जीवाला निर्माण होत असतो. तरी या बाबत योग्य ती कारवाई व्हावी.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/05/2025 - 21:51
13 डिसेंबर 2024ला शुक्रवारी मॉर्निंग वॉक करून घरी येताना ठेच लागून तोंडावर पडलो. फ़ूटपाथ वरील फरशी तुटली होती. डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाली लोकांच्या मदतीने उठून घरी आलो सोसायटीच्या समोरच पडल्याने चालत घरी आलो. शेजारच्या कनवाळू डॉक्टर बाईंनी शाश्वत हॉस्पिटलला मला घेऊन गेले व ऍडमिट केले. कॅशलेस.वैद्यकीय विमा होता त्यामुळे पुढील सर्व गोष्टी हॉस्पिटलने केल्या. ऒपरेशन करुन प्लेट मनगटात टाकली. एनेस्थिशिया मधे अजून काही अडचणी आल्या त्यामुळे आयसीयू व व्हेंटिलेटर लावावा लागला

सुक्या गुरुवार, 06/05/2025 - 23:22
लहानपणी अकबर-बिरबलाची गोष्ट वाचलेली. ५ प्रश्नांचे एकच उत्तर. तसेच तुमच्या "अपघात झाल्यास कोण जबाबदार?" ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. जबाबदार आहे ती "जनता". मी हे गमतीने नाही तर अगदी सिरियसली बोलतोय. जोपर्यंत भारतीय मुलांना / तरुणांना सार्वजनीक ठिकाणी कसे वागावे ह्याचे शिक्षण मिळत नाही तोवर ह्या प्रश्नाचे एकच उत्तर. तुम्ही जबाबदारी ढकलुन पोलिस, गावगुण्ड, अतीक्रमण, भ्रष्टाचार यांना कितीही जबाब्दार धरले तरी या सार्‍या समस्येचे मुळ एकच आहे "बेशिस्ती". त्यावर ईलाज एकच आहे. जनतेने शिस्तीत वागावे. फक्त उदाहरणादाखल घ्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपरीवर खायला जे लोक येतात त्यांना तिथे यायला कुणी जबर्दस्ती करते का? मग त्याचे खापर कुणावर फोडणार? जर कुणी तिथे खाल्लेच नाही तर ती टपरी तिथे राहणार नाही. असो. भारतीय लोकांची बेदरकारी फक्त भारतातच नाहीये. परदेशात ही बरेच लोक असेच वागतात. भारतीय लोकांचा सिविक सेंस हा गमतीचा विषय आहे. तीच गत स्वच्छतेची. तेव्हा दुसर्‍यांवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे ईतकाच सल्ला देईन.

In reply to by सुक्या

जनता बेशिस्तीने वागत असल्यास कारवाई चे अधिकार पोलिसांना आहेत. ९० टक्के लोक जर कायदा धाब्यावर बसवत असतील तर अराजक

सौन्दर्य गुरुवार, 06/05/2025 - 23:34
आज सर्वच मोठ्या शहरात रस्त्यावर फळे, भाजीपाला विकणार्याची आणि त्यांच्याकडून विकत घेणाऱ्याची संख्या प्रचंड वाढली आहे. हे विक्रेते संपूर्ण फुटपाथ, खुपसा रस्ता अडवून उभे राहतात. मंडईपेक्षा त्यांचा माल स्वस्त मिळत असल्यामुळे मंडई ओस पडलेली असते व रस्ते व्यापलेले असतात. वर सुक्यानी म्हंटल्याप्रमाणे अश्या सर्व विक्रेत्यांवर बहिष्कार घालणे हाच एक मार्ग रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याचा आहे.

विवेकपटाईत Fri, 06/06/2025 - 09:58
आपल्या देशातील लोकांना कायद्यांचे पालन न करण्याचे बाळकडू लहानपणा पासून पाजले जाते. एक ही पालक बगीच्यात क्रिकेट खेळू नका गवत खराब होईल असे मुलांना म्हणत नाही. बिना हेलमेट घालून जाणार्‍या अवयस्क तरुणांना त्यांचे आई वडील कधीच जाब विचारत नाही. कचरा कुठे ही फेकला जातो. आज नालीची सफाई झाली असली की दुसर्‍या दिवशी पासून दुकानदार आणि रहवासी नालीत कचरा ओतून ती लवकर पुन्हा भरली जाईल याचा बंदोबस्त करतात. चालत्या गाडीतून, रस्त्यावर, कार्यालयात पानाची पीक ओकली तरी कुणी आक्षेप घेत नाही इत्यादि. जनता ही व्होट बँक असल्याने सरकार ही दुर्लक्ष करते. बाकी या सर्वांचा परिणाम जनतेलच भोगावा लागतो. हिंदीतली "जैसी करनी वैसी भरनी" ही म्हण भारतीय लोकांना तंतोतंत लागू पडते।

सुबोध खरे Fri, 06/06/2025 - 10:25
मुघलांचा इतिहास इतक्या विस्तृत प्रमाणात शिकवण्यापेक्षा नागरिकशास्त्र सविस्तर पणे शिकवणे आवश्यक आहे. दुसर्याच्या त्रासाची अजिबात फिकीर न करणे हे बहुसंख्य वेळेस होणाऱ्या अपघातांचे कारण आहे. मग यात बेशिस्त पार्किंग असो कि उलट दिशेने गाडी चालवणे असो कि सिग्नल तोडणे, वेगाने गाडी चालवणे, किंवा वेळेवर ब्रेकचे सर्व्हिसिंग न करणे असो. डीजे लावून मिरवणूक काढणे, ढोल ताशे वाजवत रस्ता बंद करून वरात/ मिरवणूक नेणे ( यात नवरात्र आणि गणपती विसर्जन येते), मशिदीवर बेफाट आवाजात दिवसात पाच वेळेस अजान देणे हा याच मनोवृत्तीचा परिणाम आहे. दुसऱ्याला त्रास देऊ नये हे आपल्याला नागरिकशास्त्रात शिकवलेच जात नाही. राज्यसभेच्या निवडणूका कशा होतात, लोकसभेचे सदस्य किती आणि विधानसभेचा अध्यक्ष कसा निवडला जातो याच बरोबर नागरिकांची कर्तव्ये काय हे किमान पाच वर्षे तरी शिकवले गेले पाहिजे. उगाच तीन भाषा आणि कार्यानुभव शिकवण्यापेक्षा या गोष्टी शिकवल्यातर याच मुलांचे आयुष्य पुढे थोडे अधिक सुसह्य होईल. ( त्यांच्या आयुष्यकाळात भारताची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता नाही)

सोसायटी असो वा अपार्टमेन्ट : आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वर्तन असावे. वरच्या मजल्यावर राहणारे मोठ्यांदा आवाज करतात, सतत फर्निचर हलवतात, जोरात गाणी लावतात.. अश्या सततच्या आवाजांमुळे मानसिक शांतता बिघडू शकते..म्हणून civic sense हा लहानपणापासूनच बिंबवला पाहिजे, नुसता १० मार्कांकरिता असून काही उपयोग नाही महाराष्ट्र टाइम्स - ॲड. रोहित एरंडे © पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर https://vedhkaydyacha.blogspot.com/2025/03/blog-post_25.html

स्वधर्म Fri, 06/06/2025 - 17:24
पहिल्यांदा हे मान्य केले पाहिजे की, - आपण सर्व जगात महान नाही. - आपली संस्कृती सर्वात महान नाही - आपण प्रगत झालो नाही, ते खूप दूर आहे. थोडक्यात आपण खूप मागास समाज आहोत. हे मान्य केले तरच सुधारणेला वाव आहे. असं म्हणतात की प्रश्न आहे हे मान्य करणे हीच प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का? मी चालकांच्या बाजूने मुळीच बोलत नाहीये, अपराध्याला शासन हे झालेच पाहिजे पण नेहमी चूक फक्त चालकाचीच असते का? मला खटकणारे काही मुद्दे इथे मांडतो आहे --रस्त्यावरील अतिक्रमणे - आजकाल अनेक मुख्य रस्ते आणि गल्ल्या अतिक्रमणाने व्यापल्या आहेत.

एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम

युयुत्सु ·

माहितगार गुरुवार, 06/05/2025 - 12:32
याचा मोठा परिणाम सुशिक्षित गुन्हेगारांची संख्या वाढण्यात होउ शकतो. कुणाला याचं भान आहे का?
लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या शक्यतेचे एक्झगरेशन आहे. संगणकीकरणामुळे असंगणकीय काळातील बराच रोजगार हरवला पण इतर रोजगारांची निर्मितीही होत राहिली. लोकसंख्या वाढते तशी मागणी आणि पुरवठ्याचे चक्र फिरणारच आणि सगळाच रोजगार पुसला जाईल असे नाही. नवे मार्गही निघत रहातात. पण जे काळासोबत चालत नाहीत ते मागे पडणार यातही तथ्य आहेच. खरे पहाता प्रश्न केवळ एआयचा नाही इंडस्ट्रीयल क्षेत्रात रोबोटीक्स आणि इंटरनेट ऑफ थींग्सनीही मोठे अ‍ॅटॉमेशन झाले तोही रोजगार हरवत आहे. तरीही गूगलचे एआय हँडल करणारे गुरुमहाशयांची मुलाखत काल परवाच ऐकली त्यांच्या म्हणण्यानुसार जरी रोजगार कमी होतील असे वाटले तरी नवीन विद्यार्थी पिढ्यांनी रोजगारासाठी विज्ञान गणित तंत्रज्ञान यांनाच चिटकून रहावयास हवे. ज्या संशोधन क्षेत्रात पैसा घालता आला नाही त्या संशोधन क्षेत्रात पैसा वाढून तिकडे संधी निर्माण होऊ शकतात. नॅचरल रिसोर्ससची कमतरता झाल्यामुळे पर्यायी रिसोर्सेस शोधणे आणि त्यांचे उत्पादन वितरण या क्षेत्रात येत्या काळात संधी असतील. युरोमेरीकेने सुशिक्षीत बेरोजगारीचा प्रश्न अजून दोन -तीन मार्गांनी गेल्या ७० वर्षांच्या अनुभवावरून दिसून येते. पर्यटन, क्रिडा व मनोरंजन आणि एन जी ओ क्षेत्र इरत क्षेत्रातील नवे रोजगार तयार होण्यापुर्वीचा काळ सांभाळून नेऊ शकतात त्या शिवाय क्रिडा आणि मनोरंजन आणि समाजसेवा क्षेत्रात युवा व्यस्त असेल तर तो केवळ रोजगारीच्या अनुपलब्धतेमु़ळे गुन्हेगारी मार्गांना लागण्याच्या शक्यताही कमी होतात.

In reply to by माहितगार

युयुत्सु गुरुवार, 06/05/2025 - 16:29
पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या शक्यतेचे एक्झगरेशन आहे. > असे वाटणे स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण मी हे विधान जबाबदारीने केले आहे. आपल्याकडे अनेक ढुड्ढाचार्य समाजाला ए०आय० अभिमुख करण्या ऐवजी ए० आय० कसा निरर्थक्,फसवा आहे याबद्दल इ० दिशाभूल करतात. याचा मोठा परिणाम म्ह० त्यावर विश्वास ठेऊन अनेक नवखे गाफील राहतात. हे गाफील महाभाग नंतर वैफल्याचे शिकार बनून गुन्हेगारीकडे वळू शकतात. आपल्याकडे पी०एच्०डी० झालेले शिपायाची नोकरी करत असल्याच्या बातम्या अधून्मधून झळकतात, तर मध्यंतरी एका वेश्यालयाच्या चालकाने मुलाखतीत (अभिमानाने) सांगितले की त्याच्याकडच्या काही 'सेक्सवर्कर' पी०एच०डी० झालेल्या आहेत. असो.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 20:19
असे गुन्हे वाढत जातील- https://www.msn.com/en-in/money/topstories/bengaluru-tech-drama-how-an-ex-employee-sabotaged-company-after-being-laid-off/ar-AA1GkKAM?ocid=winp2fptaskbarhover&cvid=8277881d76104b7591d3343344b33616&ei=4

In reply to by युयुत्सु

मारवा Tue, 06/10/2025 - 09:27
तुम्ही जे म्हणताय ते असे दिसत आहे की होणार नाही already होणे सुरू झालेले आहे पुढे ते फक्त वाढून अधिक भयावह रूप घेणार आहे. समाजशास्त्रद्नांनी यावर नक्कीच चिंतन केले पाहिजे. "AI ने निर्माण होणारी सुशिक्षित गुन्हेगारी स्वरूप परिणाम आणि भविष्य व उपाय" हा माझ्या मतेPhD च्या साठी एक उत्कृष्ठ विषय आहे. असे विषय असावेत असे मी म्हणतो.

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 13:36
https://www.msn.com/en-in/money/topstories/bengaluru-tech-drama-how-an-ex-employee-sabotaged-company-after-being-laid-off/ar-AA1GkKAM?ocid=winp2fptaskbarhover&cvid=8277881d76104b7591d3343344b33616&ei=4 संदर्भ लेख वाचला. असले प्रकार ए आय च्या आगोदर होते आणी नंतरही असणार आहेत. यात काही नवीन नाही. ही घटना का घडली याचे कारणही याच लेखात दिले आहे. The incident highlights how internal disputes and structural changes, if not managed with clarity and caution, can lead to serious operational vulnerabilities. चोर व पोलीस हे अविनाशी तत्त्व आहे व याचा खेळ चालूच रहाणार आहे. एक आणी शुन्य, म्हणजे संगणका बरोबर "हॅपी बर्थडे जोशी" पण जन्माला आला. त्यावर उपाय योजना झाली. पुण्यात म्हणे आय आय टी वाल्यांनी मिसळपाव विकून कोटी कोटी कमवले म्हणे. खरं काय ते नक्की नाही माहीत पण उदाहरण म्हणून दिले. नोकरी म्हणजे रोजगार असा गैरसमज समाजात पसरवला गेला आहे. "पप्पू पानवाला", याचा राजकारणाशी काहीच संबध नाही, ही एक दुकानाची शृंखला आहे आणी तीथे काम करणारे हजाराने पगार घेतात. पण नोकरी नाही म्हणून बेरोजगार म्हणणार का? पुण्यात कल्याण भेळ एक ब्रांड आहे त्याचा माल अमेरिकेत सुद्धा निर्यात होतो. तो स्वता कमी शिकलेला भेळ विकतो,पुढची पिढी इंजिनिअर वगैरे तरीही याच धंद्यात आहेत. स्काय इज लिमिट, सुशिक्षित काहिही करू शकतात. असे अनेक क्षेत्र आहेत जिथे ए आय ची गरज नाही. सुशिक्षित बेरोजगार होणार आणी गुन्हेगारी वाढणार अशी भ्रांती समाजात पसरवून ए आय च महत्व विनाकारण वाढवलं जात आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/05/2025 - 14:32
भारत पुन्हा कोड मंकीज निर्माण करणार की काय अशी भीती वाटत आहे.वाय-टू-केच्या काळात हेच झाले. नंतरच्या काळात परिस्थिती जरा बरी होती. मग तुमचे ते कॉल-सेन्टर ,बी पी ओ. कंपनीच्या प्रवर्तकांनी मात्र उखळ पांढरे केले. ए आयमध्ये ४/५ परदेशी कंपन्यांची मक्तेदारी असल्याचे दिसत आहे. आता चॅट-जी पीटी अभियंता/जेमीनी अभियंता टायटल्स येत आहेत. असो. नाक्यावर उभे राहुन सिगारेट फुंकत सरकारवर टीका करण्यापेक्षा कोणतेही नोकरी असलेली बरी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मारवा Tue, 06/10/2025 - 09:29
नाक्यावर उभे राहुन सिगारेट फुंकत सरकारवर टीका करण्यापेक्षा कोणतेही नोकरी असलेली बरी. Cynicism सर्वात वाईट. ही भूमिका परफेक्ट आहे.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/05/2025 - 16:55
काही वाक्यांचा अर्थच लागत नाहिये टीअर-२ शहरांमध्ये नोकऱ्यांची वाढ (४८%) जास्त आहे, पण या पदांना अनुभव लागतो. त्यामुळे टीअर-१ शहरांतील फ्रेशर्स अडचणीत आहेत. - कंपन्या एआय मेंटरशिप प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत जे फ्रेशर्ससाठी अनुभवाच्या अंतरावर उपाय ठरू शकतात. म्हणजे काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

युयुत्सु गुरुवार, 06/05/2025 - 17:09
१.सदर विधानाचा अर्थ लावण्यासाठी पुढील संदर्भ पहावा- नोकर्‍या उच्च श्रेणीच्या शहरांकडून निम्नश्रेणीच्या शहरांकडे जात आहेत, असा अर्थ आहे -https://analyticsindiamag.com/ai-features/entry-level-tech-jobs-are-collapsing/ २. अनुभवाच्या अभावाची समस्या सोडवण्यासाठी कंपन्या एआय मेंटरशिप प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत, असे वाचावे. :)

कपिलमुनी Mon, 06/09/2025 - 10:48
इंधनावर चालणार्‍या गाड्या आल्या तेव्हा घोडा गाडी वर चालणारी संपूर्ण इंडस्ट्री संपली , पण जगरहाटी चालू राहीली ..लोकांनी नवीन जॉब स्विकारले.. सीडी प्लेयर, फिल्म कॅमेरा तत्सम बाबतीत हेच झाले . लोक नवीन गोष्टी अ‍ॅडॉप्ट करतात .. फार काळजी क्रू नै

In reply to by कपिलमुनी

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 11:26
लोक नवीन गोष्टी अ‍ॅडॉप्ट करतात .. फार काळजी क्रू नै> तुमची जीवशास्त्राची जाण फारच नगण्य किंवा नाहीच असे खेदाने म्हणावे लागेल. जुळवून घेणे (अ‍ॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते. लोकसंख्येचा ताण, कुपोषण, विषद्रव्यांचा मारा, जगण्याचा ताण यामुळे जुळवून घेण्यावर मोठा परिणाम होतो. अगोदर मधुमेहाची जागतिक राजधानी असलेला देश मग कर्करोगाची जागतिक राजधानी म्हणुन प्रसिध्दी पावतो. उद्या देश १ल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तरी पेटंट इकॉनॉमी न बनता टेंपल इकॉनॉमितच गुरफटुन राहणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला देशात गुणशाही हवी. त्यासाठी कल्पकतेला उत्तेजन हवे. इथे समाजाची जुनाट कल्पना सोडायची तयारी नाही आणि अ‍ॅडापटेशनचे कौतूक कुणाला सांगताय?

In reply to by युयुत्सु

सुक्या Mon, 06/09/2025 - 12:50
पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला देशात गुणशाही हवी. त्यासाठी कल्पकतेला उत्तेजन हवे. ह्या ह्या ह्या . . . बाता बर्‍या आहेत. भारतात गुणवंत लोकांना संधी मिळत नाही. मिळाली तरी त्याचे फळ मिळत नाही. आरक्षणाच्या कुबडीवर जाणारे गुणवंत लोकांचे बॉस होतात मग ते त्यांचा वाटा खातात. बाता करुन काहीही मिळत नाही. त्याला काम करणारे हवे व केलेल्या कामाचे कौतुक व्हायला हवे. उदाहरणादाखल सांगतो. माझा एक वर्गमित्र .. दोन पीएचडी आहेत. एक भारतात, एक अमेरिकेत. अमेरिकेत त्याला पाठवले तेव्हा बॉंड लिहुन द्यावा लागला. भारतात गेल्यावर जे संशोधन केले त्याचे पेटंट वर त्याला त्याच्याबरोबर ईतर सहकारी, त्याचे डिपार्ट्मेंट हेड ह्या सगळ्याण्ची नावे लिहावी लागली. शेवटी वैतागुन त्याने बॉंड कालावधी संपल्यावर अमेरिकेत नोकरी (जिथे पीएचडी केली तिथे) पकडली (ईबी १ विसा). आता ३ पेटण्ट आहेत, २ विचाराधीन आहेत. आता संशोधनाबरोबर त्या विद्यापीठात प्रोफेसर म्हणुन काम करतोय. वर वर्षे ४८. तेव्हा "देशात गुणशाही हवी" म्हणायला ठीक आहे. त्यावर कामही व्हायला हवे. भारतात यच्च यावत पुढारी १५०० व ३००० खटाखट स्कीम मधे व्यग्र आहेत.

In reply to by सुक्या

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 13:14
श्री० सुक्या, मी तुमच्याशी १००१% सहमत आहे. आपल्याकडे १०० मधले ९९ प्राध्यापक आणि वरीष्ठ श्रेयलंपट असतात. त्यांना उद्देशून मी एक श्लोक संस्कृतमध्ये रचला होता- गुरुवर्यास्ते हल्कटा: नीचाश्च श्रेयलंपटा:| फकन्तु क्षुद्रमानसा: पुजासक्ता: तथैव च||

In reply to by युयुत्सु

कपिलमुनी Mon, 06/09/2025 - 13:50
देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्हीच काय ते लाईन मध्ये पहिले उभे होता !

In reply to by कपिलमुनी

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 14:00
लाईन मध्ये पहिला होतो का माहित नाही पण वेगळ्या आणि कमी गर्दीच्या लाईन मध्ये नक्कीच होतो.

In reply to by कपिलमुनी

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 11:40
कपिलमुनी तुमच्या सारख्या भाबड्या लोकांना हे कळावे ही अपेक्षा नाही पण देश कॅन्सरची जागतिक राजधानी बनला म्हणजे अ‍ॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे, हा निसर्गाचा संदेश आहे आणि तो इतक्या इथल्या विद्वानांना समजणार नाही

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:03
देश कॅन्सरची जागतिक राजधानी बनला म्हणजे अ‍ॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे, हा निसर्गाचा संदेश आहे आणि तो इतक्या इथल्या विद्वानांना समजणार नाही मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे मी बरोबर आहेच म्हटलं कि झालं भारताची लोकसन्ख्या च इतकी जास्त आहे कि एकंदर कर्करोगाचे रुग्ण जास्त असणारच. पण पिवळा चष्मा घातला कि जगाला कावीळ झाली आहे असं भासतं Despite reporting more than a million new cases every year, India’s cancer rate has not yet surpassed countries like Denmark, Ireland, and Belgium, which record some of the highest cancer rates in the world. It is also currently lower than the U.S., reporting 100 cases for every 100,000 people compared with 300 in the U.S. https://time.com/6965528/india-cancer-capital-world-study/ आता हे तुमचं टाईम म्याग्झिनच म्हणतंय बरं का? आता यावर शब्दांचा डोंगर उभा करून तुम्ही टाईम नियतकालिकाच्या विधानाचा विपर्यास कसा केला जातोय यावर काथ्याकूट करा आम्ही बसलोय पॉप कॉर्न घेऊन चालू द्या

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 11:41
मंडळी ए०एफ्०एम्०सी मधल्या लोकांना गणित येत नाही हे एकवेळ समजून घेता येईल. पण आता इंग्लीश पण वाचता येत नाही म्हणजे हद्द झाली. वरील टाईम मासिकाच्या लेखात स्पष्ट म्हटले आहे की - "But that could soon change due to what some experts have called an “epidemiological transition.” ... In particular, the number of cancer cases is expected to rise at a rate that will surpass global averages—from 1.39 million in 2020 to 1.57 million by 2025." सरासरीशी केलेली तूलना जास्त महत्त्वाची असते, हे गणित ऑप्शनला टाकणार्‍यांना कळले असते तर देश वेगळा घडला असता. समाजाची सतत दिशाभूल करणारे वैद्यकीय व्यावसायिक ज्या देशात घडवले जातात त्या देशात दूसरे काय होणार? म्हणतात ना ....... कालची वार्ता आज नाही!!

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:46
सरासरीशी केलेली तूलना जास्त महत्त्वाची असते, सरासरी म्हणजे काय आपले पाय भट्टीत ठेवले आणि डोके डीप फ्रिझर मध्ये कि सरासरी तापमान २३ अंश सेल्सियस झाल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटते. बाकी तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 12:10
मंड्ळी, मी आय० आय० टी०त असताना तिथे बायो-मेडीकल एंजि०चा अभ्यासक्रम सुरु झाला होता. त्या अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी त्यावर्षी आमच्या हॉस्टेलमध्ये यात प्रामुख्याने एम०बी०बी०एस० झालेले विद्यार्थी होते. त्यांची गणित आणि फिजिक्समध्ये सॉल्लीड भंबेरी उडायची कारण दहावीनंतर एकदम व्हेक्टर कॅलक्युलस, फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे सगळ कठीणच मामला होता. त्यांच्या असाईनमेण्ट्स आमचे हॉस्टेलच करून द्यायचे. मग चालू व्हायच्या येता जाता आय्०आय्०टी० ला शिव्या... तर शिव्या ऐकायची सवय मला तेव्हा पासून्च आहे. झालं काय की त्याच्यातल्या एका डॉक्टरची आणि माझी गट्टी व्हायला सुरुवात झाली. त्याने मला रक्तदाब कसा बघायचा ते शिकवले, ऑस्क्लटेशन शिकवल्यावर मी एक मरमर आणि मिसिंग हार्ट्बीट्ची केस पण स्वतंत्रपणे डाय्ग्नोज केली होती. मग मी हॉस्टेलमधल्या ज्याला-त्याला "तपासत" असे. एक दिवस काय झालं की एका रात्री ९ वाजता हा मित्र माझ्या रूमवर आला आणि म्हणाला - "तुला वेळ आहे का" "हो" - मी म्हटलं "एक विचारू का? पण कुणाला सांगू नकोस" आता माझी उत्सूकता वाढली. मी त्याला आश्वास्न दिले की मी कुणाला काहीही सांगणार नाही. त्याने मला विचारले की " चालत्या आगगाडीमध्ये हवेत चेंडू फेकला तर तो आपल्या हातात का येतो? तो आपल्या पुढे पडायला हवा" मग मी त्याला रात्री ९ ते पहाटे ४ चेंडू हातात परत का येतो या मागचे फिजिक्स समजाऊन सांगत होतो. सांगायचे तात्पर्य - आपण ज्याना 'देव' मानतो त्यांना गणित, फिजिक्स येत नाहीच पण आता इंग्लीश पण वाचता येत नाही. देशाचं कठीण आहे, हे मात्र नक्की!

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 12:16
Almost 40% of cancer cases in India are due to rampant tobacco use, which significantly elevates the risk of lung, oral, and throat cancers, while factors like poor diet and lack of physical activity cause 10% of cases. सर्वज्ञ पणा चा आव आणताना खोटारडेपणा कराल असे वाटले नव्हते "याच" दुव्यातील वरील वाक्ये लक्षात घेतली तर भारतातील ५० टक्के कॅन्सरचा प्रदूरभाव कमी करण्यासारखा आहे. याचा अ‍ॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे या आपल्या अतिशयोक्त वाक्याशी सुतराम संबंध नाही हे सहज लक्षात येतील. पण आपण किडकी प्रजा आणि ऍडाप्टेशन चा दुराग्रह इतका टोकाला नेला आहे कि त्यातून बाहेर पडणे आपल्याला अशक्य झालेले आहे. आकाशातील ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही. मी पोपकोर्न घेऊन बसलो होतो पण इतका दांभिकपणा पाहून राहवले नाही

कर्नलतपस्वी Mon, 06/09/2025 - 12:13
जुळवून घेणे (अ‍ॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते. ते कसे काय बुवा? ॲडाॅप्ट तर प्रतिकूल परिस्थिती मधे करायला लागते. न केल्यास नाश होतो. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ या प्रमाणे समाज सुद्धा अविनाशी ,अमर आहे. त्यामुळे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत बदलण्याची जुळवून घेण्याची त्याच्यामधे क्षमता आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

मारवा Tue, 06/10/2025 - 09:21
अगदी हाच प्रश्न मलाही पडलेला आहे. Adaptation हेच मुळात तुम्ही प्रतिकूल परिस्थितीला adapt केल्यातूनच होते ना ?

In reply to by मारवा

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 10:46
आपण एक प्रयोग करू या. त्याच्या पाय-या पुढील प्रमाणे असतील- ० प्रथम आत्म्याचे अस्तित्व बियॉण्ड डाऊट सिद्ध करावे. ० मग सदर व्यक्ती इहलोकीची यात्रा आटोपती घेईल, तेव्हा तिचा आत्मा रितसर घट्ट झाकणाच्या बाटलीत वेगळा करूया. तशी त्यांच्या आप्तांना सूचना देऊन ठेवावी. ० मग ही आत्मायुक्त बाटली विस्तवावर उच्च तापमानावर तापवावी आणि त्याची निरीक्षणे नोंदवावीत ० सदर बाटली मग थंड करून एखाद्या शीतपेटीत दीर्घकाळ ठेऊन त्याची निरीक्षणे नोंदवावीत या दोन्ही प्रक्रियांमध्ये आत्म्याचे गुणधर्म बदलले तर आत्मा अ‍ॅडाप्ट झाला असे म्हणावे लागेल. मग नैनं दहति पावकः इत्यादि दावे निकालात निघतील. आत्म्याचे गुणधर्म बदलले नाही तर आत्मा अ‍ॅडाप्ट झाला नाही असे म्हणावे लागेल. मग हाच प्रयोग अनेक व्यक्तींच्या आत्म्यावर, कत्तलखान्यातील प्राण्यांच्या आत्म्यावर मोठ्या प्रमाणात करता येईल.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:31
एक पेशीय जीव उदा अमीबा- जिवन्त अमीबा आणि मृत अमीबा यातील फरक म्हणजे आत्मा. इतर रसायने आणि विषाणू मधील रसायने (जी स्वतःची पुनरुत्पत्ती करू शकतात) यातील फरक म्हणजे आत्मा. एखादे वनस्पतीचे बी याच्या दोन बिया घ्या त्याती एका वर किरणोत्साराचा मारा करा. आता या दोन्ही बियांतील फरक म्हणजे आत्मा. दुर्दैवाने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व चाचण्या आत्म्याचे अस्तित्व तपासण्यात सक्षम नाहीत. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागण्या अगोदर जिवाणू बघता येत नव्हते याचा अर्थ ते अस्तित्वात नव्हते असा नव्हे त्यामुळे तुमचे अतिजीवशास्त्रीय विवेचन मुळातूनच भंपक आहे. आत्मा काही भूत किंवा पिशाच्च किंवा एखादा वायू नाही तेंव्हा आत्मा तापवा किंवा बाटली बंद करा सारखी विधाने तुमच्या कल्पनाशक्तीची सुमार मर्यादा दाखवतात.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:34
प्रथम आत्म्याचे अस्तित्व बियॉण्ड डाऊट सिद्ध करावे. उद्या जेंव्हा ते दाखवता आले तेंव्हा तुमच्यासारखे सर्वज्ञ हे अस्तित्वाचे पुरावे पुरेसे नाहीत असेच म्हणतील जसे एवढे पुरावे दाखवून सुद्धा पाकिस्तान सतत सांगते कि मुंबई हल्ला किंवा इतर हल्ले हे सज्जड बियॉण्ड डाऊट पुरावे दाखवून सिद्ध करा. तुमची स्थिती पाकिस्तानपेक्षा वेगळी नाही बियॉण्ड डाऊट हेच मुळी निसरडे विधान आहे

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 13:51
चला तीस सेकंद गरम करून बघू नंतर थंड चटणीत बुडवून बघू..... भगवद्गीतेतील श्र्लोकाचा संदर्भ फक्त तुलनात्मक समानता दाखवण्यासाठी दिला होता. जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो. इतकेच. आध्यात्म,आत्मा इ. अशिक्षित, अंधश्रद्धाळुंचे विषय. बुद्धिवंत आणी त्यात हुच्च शिक्षितांना काय कळणार....

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 17:56
तसेच पूर्णपणे नाहीशा जमाती याप्रमाणे - Below are examples of communities that have vanished completely or nearly so, leaving little to no trace of their existence. These cases span different time periods and regions, with reasons ranging from natural disasters to human intervention. I’ve included well-documented historical examples and some lesser-known ones, focusing on communities that have effectively disappeared rather than those merely abandoned with significant remains. --- ### 1. **Roanoke Colony (North Carolina, USA)** - **Time Period**: Late 16th century (1587–1590) - **Description**: The Roanoke Colony, often called the "Lost Colony," was an early English settlement on Roanoke Island, established under Sir Walter Raleigh. In 1587, about 115 settlers, including men, women, and children, were left on the island. When a supply ship returned in 1590, the entire colony had vanished, with no signs of struggle or remains. The only clue was the word "Croatoan" carved into a post and "Cro" on a tree. - **Reason for Disappearance**: Unknown. Theories include assimilation with local Native American tribes, attack by hostile groups, starvation, or migration to another area. No definitive evidence of their fate has been found. - **Current Status**: The site has no remaining structures from the colony. Archaeological efforts have uncovered some artifacts, but the settlers’ fate remains one of America’s oldest unsolved mysteries.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.cnbc.com/2011/11/09/Cities-That-Vanished.html)[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) - **Why It’s "Vanished"**: No bodies, structures, or clear evidence of what happened were left behind, making it a true case of a community disappearing without a trace. --- ### 2. **Angikuni Village (Nunavut, Canada)** - **Time Period**: 1930 - **Description**: Angikuni was a small Inuit village near Lake Angikuni in northern Canada. In 1930, a trapper named Joe Labelle visited the village and found it completely deserted. Houses contained personal belongings, meals were left uneaten, and sled dogs were found dead, suggesting a sudden departure. The village’s roughly 30 inhabitants were never seen again. - **Reason for Disappearance**: Unknown. Theories range from mass abduction (including paranormal or extraterrestrial claims) to starvation, disease, or migration due to harsh conditions. The story is controversial, with some suggesting it may be exaggerated or a myth, but it remains a notable case of a vanished community. - **Current Status**: No physical remains of the village exist today, and the story relies heavily on Labelle’s account and subsequent investigations, which found no trace of the inhabitants.[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) - **Why It’s "Vanished"**: The lack of remains, coupled with the sudden and unexplained nature of the disappearance, makes this a mysterious case, though its historical accuracy is debated. --- ### 3. **Shexia Village (Fujian, China)** - **Time Period**: Qing Dynasty (exact date debated, possibly 19th century) - **Description**: Shexia, a village in Jinjiang city, Fujian, reportedly housed over 1,000 residents, primarily of the Xie and Huang families. According to legend, the entire village disappeared overnight, leaving no trace of its inhabitants. Some accounts claim the disappearance occurred during the reign of the Guangxu or Daoguang Emperor. - **Reason for Disappearance**: Unknown. Theories include supernatural events (e.g., UFO abductions), natural disasters, or a secret military operation that relocated the villagers. The story is considered a rumor by some, with sparse historical records, but it has captured attention online. A modern Shexia village exists in the area, possibly linked to the legend via a Bronze Age sand dune relic.[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujian-and-qinling/) - **Current Status**: No confirmed remains of the original village or its people have been identified, and the story persists as a mix of folklore and speculation. - **Why It’s "Vanished"**: The absence of physical evidence and the overnight disappearance narrative align with the idea of a community vanishing completely. --- ### 4. **Qinling Mountain Village (Shaanxi, China)** - **Time Period**: 1987 - **Description**: An unnamed village at the foot of the Qinling Mountains in Shaanxi province allegedly disappeared overnight on October 12, 1987. All residents and livestock vanished, with no signs of where they went. Local accounts mention sightings of UFOs and fleeing wildlife prior to the event, dubbed the "Night Leopard Cat Incident." - **Reason for Disappearance**: Unknown. Popular theories include alien abduction, a secret military relocation, or a natural disaster. The story originated from a 2010 online post that went viral, but Baidu Baike labels it a rumor due to lack of verifiable evidence.[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujian-and-qinling/) - **Current Status**: No physical remnants or official records confirm the village’s existence or disappearance, making it a modern mystery with questionable historicity. - **Why It’s "Vanished"**: The complete lack of evidence, combined with the sudden and total disappearance, fits the pattern of a vanished community, though its status as a rumor reduces certainty. --- ### 5. **Penybanc and Pantywaun (Wales, UK)** - **Time Period**: 20th century (exact date unclear, likely mid-20th century) - **Description**: These were small mining communities in the Welsh valleys, part of the broader decline of coal-mining villages. The houses were deemed unfit for habitation by the Gelligaer Urban Council, and residents were relocated to nearby areas like Fochriw. Residents, including a widow named Catharine Gallier, reported being unable to afford repairs, leading to the villages’ abandonment. - **Reason for Disappearance**: Economic decline and government intervention. The collapse of the mining industry and the poor condition of housing led to forced relocation under the Housing Act, with compensation offered for well-maintained properties.[](https://silo.pub/the-lost-villages-in-search-of-britains-vanished-communities.html) - **Current Status**: No significant remains of Penybanc or Pantywaun exist today. The sites have likely been reclaimed by nature or redeveloped, with little to mark their former presence. - **Why It’s "Vanished"**: These communities were entirely dismantled and their populations relocated, leaving no notable physical trace. --- ### 6. **Godwick (Norfolk, UK)** - **Time Period**: 15th–16th centuries - **Description**: Godwick was a small medieval village recorded in the Domesday Book (1086) with 14 peasants. By the 15th century, it had shrunk significantly, with only five households paying tax by 1525. The village was abandoned as economic troubles and land consolidation by lords turned it into sheep pasture. - **Reason for Disappearance**: Economic and social changes. Landlords expanded their flocks, forcing tenants out, and the village’s small size made it unsustainable. Scottish raids, famine, and disease also contributed to its decline.[](https://www.historyextra.com/membership/villages-towns-disappeared-abandoned-why/) - **Current Status**: Virtually no remains exist today. The site is marked by faint earthworks, but the village itself has vanished, with its land repurposed for agriculture. - **Why It’s "Vanished"**: The complete depopulation and lack of surviving structures make Godwick a clear example of a community that disappeared entirely. --- ### Notes on Selection and Context - **Definition of "Vanished Completely"**: I focused on communities where little to no physical evidence (e.g., buildings, artifacts) remains, or where the population disappeared without clear explanation. Some cases, like Roanoke and Angikuni, are famous for their mysterious nature, while others, like Penybanc and Godwick, reflect more mundane but complete erasure due to economic or social factors. - **Exclusions**: I avoided examples like Pompeii or Machu Picchu, which left significant archaeological remains, as they don’t fit the "completely vanished" criterion. Similarly, ghost towns like Bodie or Centralia, which still have structures or a few residents, were excluded.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.bbc.co.uk/bitesize/articles/z2rmg2p)[](https://www.thequeenzone.com/americas-modern-ghost-towns-10-communities-abandoned-since-1970/) - **Reliability**: Some cases (e.g., Shexia, Qinling Mountain Village) are based on limited or anecdotal evidence and may be partly legendary. I included them due to their cultural significance but noted their questionable historicity. - **Sources**: Information is drawn from the provided web references, cross-checked for accuracy. Where sources conflict (e.g., Angikuni’s authenticity), I noted the uncertainty.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.cnbc.com/2011/11/09/Cities-That-Vanished.html)[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) --- ### Additional Considerations - **Common Causes**: Vanished communities often result from natural disasters (e.g., volcanic eruptions, floods), economic collapse (e.g., mining industry decline), forced relocation (e.g., government expropriation), or unexplained events (e.g., Roanoke, Angikuni).[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://vocal.media/history/a-town-that-vanished-without-a-trace) - **Cultural Impact**: These disappearances often spark fascination, leading to myths, legends, or renewed historical interest. For example, Roanoke inspired books and media, while Shexia and Qinling fuel online speculation.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujian-and-qinling/) - **Preservation Efforts**: In some cases (e.g., Roanoke), archaeological work continues, but for others (e.g., Godwick), the sites are effectively gone, with no active preservation.[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) If you’d like more details on any of these examples, want to explore specific regions, or need help visualizing data (e.g., a chart of disappearance causes), let me know! तेव्हा जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो. वगैरे वाक्य बिन्बुडाची आणी बिन्डोक आहेत

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 18:40
जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो. हिंदू समाज इस्लामच्या आक्रमणात नष्ट न होता जिवंत का आणि कसा राहिला याचे संशोधन समाजशास्त्रज्ञ अजून करत आहेत. पश्चिमेला सुरुवात होऊन इस्लाम भारताच्या पलीकडे पूर्वेला सुद्धा गेला आणि तेथील संस्कृतीवर घाला घालून तेथे इस्लामीकरण पुर्णत्वाजवळ नेले काशी हे शहर इतिहासातील सर्वात पुरातन शहर जे शतकानुशतके सलग वस्ती केलेले शहर आहे. इतकी आक्रमणे होऊन सुद्धा हे शहर अजून आपली संस्कृती टिकवून आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता हातात लागली म्हणजे सर्व ज्ञान आले असे नव्हे. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाच्या पासंगालाही पुरणार नाही हि वस्तुस्थिती.

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 17:51
नॉनस्टॉप अडाणीपणा काही लोकांचा नॉन्स्टॉप अडाणीपणा करमणूक करतो- मी सहज म्हणून ग्रोकला विचारलं की - are there any communities in the world that are on the verge of vanishing? त्याने मला जगातले १० समाज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे सांगितले. Yes, there are several communities around the world that are on the verge of vanishing due to various factors such as depopulation, economic decline, environmental changes, modernization, and cultural assimilation. Below, I highlight some examples based on available information, including small towns, indigenous groups, and cultural communities, with a focus on their challenges and the reasons behind their potential disappearance. ### 1. **Small Towns in Canada** Many small towns in Canada are facing depopulation and economic decline, particularly those reliant on single industries like fishing, mining, or agriculture. These communities are fading as younger generations move to urban centers for better opportunities, leaving behind aging populations and abandoned infrastructure. Examples include: - **Little Bay Islands, Newfoundland**: Once a thriving fishing community, the collapse of the fishing industry led to its near abandonment. Families resettled, and the town is now largely a ghost town, with nature reclaiming its spaces.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) - **Kitsault, British Columbia**: A modern ghost town built in the 1970s for molybdenum mining, Kitsault was abandoned almost overnight when the market collapsed. Its preserved buildings stand as a relic of economic ambition and loss.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) - **Nordegg, Alberta**: A former coal-mining town, Nordegg’s population dwindled after mining operations ceased. Its abandoned mines and homes reflect the risks of single-industry reliance.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) - **Sandon, British Columbia**: Once sustained by mining and agriculture, Sandon’s resources dried up, leaving behind overgrown paths and a sense of nostalgia for its vibrant past.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) These towns face challenges like dwindling economies, lack of job opportunities, and an aging population, which contribute to their decline. Their cultural and historical significance remains, but without intervention, many may vanish entirely. ### 2. **Genkai Shūraku (Vanishing Villages) in Japan** In Japan, the phenomenon of **genkai shūraku** refers to rural villages on the brink of extinction due to severe depopulation and aging populations. These communities, often located in remote areas, struggle to maintain their traditional lifestyles and cultural heritage as younger generations migrate to urban centers. Key points include: - **Demographic Shifts**: Japan’s population declined to less than 125 million by 2020, with a loss of over 1.3 million people in five years. Rural areas are particularly affected, with many villages having over 50% of residents aged 65 or older.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue) - **Cultural Loss**: These villages hold centuries-old traditions, but the lack of successors threatens their survival. For example, traditional crafts, festivals, and agricultural practices are fading as elderly residents pass away. - **Tourism as a Solution**: Some villages are turning to sustainable rural tourism to revitalize their communities. By promoting unique cultural and natural attractions, they attract visitors and generate income. However, challenges like commercialization and tensions with tourists over cultural respect remain.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue) - **Example: Iketani Village, Niigata Prefecture**: This village, once at risk of disappearing after a 2004 earthquake, increased its population from a low point by welcoming urban volunteers for farming and reconstruction work. Its success highlights the potential of community-driven revitalization.[](https://www.gov-online.go.jp/eng/publicity/book/hlj/html/201905/201905_04_en.html) ### 3. **Indigenous Communities in the Philippines** The Philippines is home to 14–17 million Indigenous Peoples across 110 ethnic groups, many of whom face threats to their cultural practices due to modernization, environmental degradation, and economic pressures. Specific examples include: - **Ifugao Weavers in Kiangan**: Traditional weaving, a cornerstone of Ifugao culture, is declining due to low economic returns. Weavers spend significant time on intricate patterns but receive meager compensation, discouraging younger generations from continuing the practice.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring-indigenous-rituals-customs-in-the-philippines) - **Alangan Mangyans**: Traditionally living in large communal houses called *balaylakoy*, many have shifted to modern housing due to external influences, reducing the prevalence of these cultural centers.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring-indigenous-rituals-customs-in-the-philippines) - **Badjao Burial Customs**: The Badjao, a sea-faring people, practice unique burial traditions tied to their coastal lands. Modernization, economic hardship, and disregard for tradition threaten these customs, which hold wisdom about sustainable living and community cohesion.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring-indigenous-rituals-customs-in-the-philippines) Preserving these traditions is critical not only for cultural heritage but also for their contributions to global knowledge about sustainable practices and medicinal plants. ### 4. **Palestinian Bedouin Communities** Some Palestinian Bedouin communities in the Middle East are at risk of disappearing due to displacement and external pressures. Posts on X highlight a specific community that "no longer exists," pointing to issues like ethnic cleansing and forced relocation. While these claims are serious, they require further verification due to their sensitive and controversial nature. The loss of such communities involves not only physical displacement but also the erasure of nomadic traditions and cultural identity.[](https://x.com/Torikit/status/1929879492463362340)[](https://x.com/BLM4Corbyn/status/1929897572098826421)[](https://x.com/Razrsharp19/status/1930641444961677619) ### 5. **Hidden Christians in Japan** A rare form of Christianity practiced by the "Hidden Christians" (*Kakure Kirishitan*) in Japan is on the verge of extinction. This unique religious community, which developed in secrecy during Japan’s ban on Christianity in the 17th–19th centuries, is dying out as its practitioners age and younger generations do not continue the traditions. The loss of this group would erase a distinct cultural and religious heritage shaped by centuries of isolation.[](https://x.com/sommelier50/status/1930640550908022972) ### 6. **Yezidis and Assyrians in the Middle East** Small ethnoreligious groups like the Yezidis and Assyrians, primarily in Iraq and Syria, face existential threats due to urbanization, emigration, and historical persecution. Many members of these communities live in diaspora, and their cultural practices, languages, and traditions are at risk of fading within the next 100–200 years. The Yezidis, for example, have faced significant displacement due to conflict, further endangering their cultural survival.[](https://x.com/levantophile/status/1932209136902533529) ### 7. **Hopeville, Arizona (Black Community)** Hopeville, a historically Black neighborhood in Buckeye, Arizona, is at risk of vanishing due to growth-driven local policies and demographic changes. Established in the 1980s as a relocation site for Black residents displaced from Allenville after floods, Hopeville faces pressures from urban development and an influx of non-Black residents, which has weakened its cultural cohesion. Residents fear that local officials’ focus on growth could erase this community’s identity, a concern rooted in historical patterns of racial distrust and displacement.[](https://www.miamiherald.com/detour/article276630131.html) ### 8. **Japantowns in the United States** The three remaining Japantowns in the U.S. (in San Francisco, Los Angeles, and San Jose) are at risk of disappearing due to economic pressures, gentrification, and displacement. Rising rents and commercial development threaten mom-and-pop shops, which are vital to these communities’ cultural identity. For example, since the 2008 recession, 43 businesses in Los Angeles’ Little Tokyo have closed or relocated. Community advocates are pushing for local control over land to preserve these historic neighborhoods, but the challenges of corporate ownership and urban renewal persist.[](https://www.yahoo.com/news/pandemic-threatens-destroy-americas-three-164345518.html) ### 9. **Indigenous Tribes in India’s Andaman Islands** Only four indigenous tribes remain in India’s Andaman Islands, and they face extinction due to external intrusions, habitat loss, and cultural assimilation. These tribes, such as the Sentinelese and Jarawa, have lived in isolation for centuries but are increasingly threatened by tourism, illegal contact, and environmental changes. Their small populations and lack of immunity to outside diseases make them particularly vulnerable.[](https://x.com/Chellaney/status/1907799806807867834) ### 10. **Hippie Culture in Goa, India** The hippie culture that defined Goa’s tourism in the 1960s and 1970s is nearly extinct due to commercialization. Once a haven for countercultural travelers, Goa’s image as a free-spirited paradise has been replaced by mass tourism, which prioritizes profit over cultural authenticity. This shift has eroded the unique lifestyle and communal values that attracted hippies, leaving only traces of their legacy.[](https://www.incrediblegoa.org/feature/hippie-culture-almost-on-the-verge-of-vanishing-from-goa-due-to-high-level-of-commercialisation-in-the-tourism-sector/) ### Common Themes and Challenges These communities share several challenges that contribute to their risk of vanishing: - **Depopulation**: Migration to urban areas for economic opportunities leaves rural and small communities with aging populations unable to sustain themselves. - **Economic Decline**: Reliance on single industries (e.g., mining, fishing) makes communities vulnerable to market collapses or resource depletion. - **Cultural Assimilation**: Modernization and globalization often erode traditional practices, as younger generations adopt dominant cultural norms. - **Environmental Pressures**: Climate change, floods, and land degradation threaten the physical spaces where communities thrive. - **Displacement**: Urban development, conflict, or government policies can force communities to relocate, disrupting their cultural and social fabric. - **Lack of Resources**: Limited access to funding, education, or infrastructure hinders efforts to preserve cultural heritage or revitalize communities. ### Efforts to Preserve These Communities Some communities are taking steps to survive: - **Tourism and Cultural Promotion**: Japan’s genkai shūraku and Canada’s ghost towns are leveraging tourism to generate income and raise awareness, though sustainable practices are crucial to avoid commercialization.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue) - **Community-Led Initiatives**: Iketani Village’s success with urban volunteers shows the power of grassroots efforts.[](https://www.gov-online.go.jp/eng/publicity/book/hlj/html/201905/201905_04_en.html) - **Advocacy and Legal Protections**: In the U.S., Japantown advocates are fighting for community ownership of land to protect cultural businesses.[](https://www.yahoo.com/news/pandemic-threatens-destroy-americas-three-164345518.html) - **Documentation and Education**: Projects like the Vanishing Cultures Project work with indigenous groups to document traditions and fund preservation initiatives.[](https://www.vcproject.org/about/what_we_do/) ### Critical Perspective While the sources provide valuable insights, they often reflect mainstream narratives that may overlook local voices or exaggerate decline for dramatic effect. For example, claims of “ethnic cleansing” in Palestinian Bedouin communities are serious but need corroboration beyond social media posts. Similarly, tourism as a solution, while promising, risks commodifying cultures if not managed carefully, as seen in Japan and Goa. The focus on “vanishing” can also overshadow communities’ resilience and agency, as seen in Hopeville’s continued cultural pride despite external pressures.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://www.incrediblegoa.org/feature/hippie-culture-almost-on-the-verge-of-vanishing-from-goa-due-to-high-level-of-commercialisation-in-the-tourism-sector/)[](https://www.miamiherald.com/detour/article276630131.html) ### Conclusion Communities on the verge of vanishing span diverse regions and cultures, from Canadian ghost towns to Japanese villages, indigenous groups in the Philippines, and ethnoreligious minorities in the Middle East. Their struggles highlight broader global trends of urbanization, economic shifts, and cultural homogenization. While some are finding innovative ways to survive, such as through tourism or advocacy, their futures remain uncertain without sustained support. Preserving these communities is not just about saving their physical presence but also about safeguarding the knowledge, traditions, and diversity they contribute to the world. स्वगत - ए०आय्०चे महत्त्व ज्यांना कळले नाही त्यांना ए०आय० वापराय्ची सवय कशी लागणार?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 18:33
हायला जे जीव किंवा समाज बदला ला अनुकूल असे स्वतः मध्ये बदल करत नाहीत ते नष्ट होतात हे डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे मुलतत्व आहे त्यासाठी इंग्रजीत मेगाबायटी प्रतिसादाची आवश्यकता का पडते? आणि त्यात गोव्याच्या हिप्पी कल्चरचा काय संबंध? ते जीवशास्त्रीय दृष्ट्या वेगळे जीव किंवा समाज नाहीत. Many hippies from the West, disillusioned with materialism, found their way to Goa, drawn by its peaceful atmosphere and natural beauty कदाचित आपल्याच थिअरीप्रमाणे किडके समाज नाहीत/ नव्हते.

मारवा Mon, 06/09/2025 - 17:29
सुशिक्षित व्यक्तींना गुन्हेगारीकडे वळावे लागणे हे फार tragic आणि अस्वस्थ करणारं असं आहे. आणि PhD वेश्या व्यवसायात? काय म्हणावं याला ? ठीक आहे काही PhD चे विषय हे फारचं अनुपयुक्त असेच असतात विशेषतः भाषा विषयातील किंवा एकूण नॉन सायन्स शाखेतील PhD मध्ये अनुपयुक्त अव्यव्हारीक या अर्थाने. तरीही त्यात परिश्रम तर असतातच. आणि तरीही वेश्या व्यवसाय करावा लागणे म्हणजे एकूण फारच कठिण असा काळ आलेला आहे असे म्हणावे लागते. खेद hi होतोच. या व्यतिरिक्त मला नेहमीच phd चे जे non science आणि भाषे चे phd विषय असतात ते अनेकदा फारचं फालतू असे वाटतात. Phd चे निवडलेले संशोधनाचे विषय उदा अमक्या अमक्या लेखकाच्या कादंबऱ्यातील स्त्री पात्रांचा अमुक अमुक निकष लावून केलेला अभ्यास, अमुक अमुक. च्या लेखनातील सामाजिक चित्रण फारचं Non creative,, unchallenging, impractical ,narrow focused असे विषय असतात. बहुतांश वेळा विषयांची निवड सोपे कमी कष्टात काम व्हावे या हेतूने आणि नंतर सर्वात मुख्य उद्देश नोकरीत बढती आणि पगारवाढ आणि नावापुढे मिरवण्यासाठी हाच असतो. Guide सुद्धा तसेच एकूण PhD चे विशेषतः नॉन सायन्स क्षेत्रातील संशोधनासाठी निवडलेले फालतू विषय हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे.

In reply to by युयुत्सु

मारवा Tue, 06/10/2025 - 09:10
दोन्ही व्हिडिओ बघितले. एका बाजूने खेद वाटतो त्यांची परिस्थिती बघून दुःख होते. त्याच बरोबर त्यांची जिद्द, निर्धार आणि struggle याचे ही कौतुकच वाटले.

मारवा Mon, 06/09/2025 - 17:39
एक गमतीदार चांगले phd चे विषय बघा. भाषेतील phd विषयांपैकी एकूण किती विषय हे creative, challenging एकवेळ व्यवहारिक उपयुक्तता सोडून देऊ पण किमान काही तरी नवीन अस pathbreaking असं काहीतरी शोधलं . एखादी नवीन संकल्पना निर्माण केली असे एकूण किती पेपर्स मराठीत झाले ? हा वरील विषय नक्कीच महत्त्वाचा असा संशोधनाचा आहे. उदा. रा भा पाटणकर सारखे संशोधक जेव्हा संशोधन करतात तेव्हा ते किती thoght provoking किती सघन अशी निर्मिती करतात असे भाषा संदर्भातील किंवा तत्वद्न्यान संदर्भातील संशोधनात कितीनप्रमाणात आले असेल ?

In reply to by मारवा

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 18:58
भाषा ही गणितापेक्षा खूप जास्त महत्वाची आहे असं विजय भटकर हे २५ वर्षांपूर्वी म्हणाले होते, तेंव्हा मला खूपच आश्चर्य वाटलेले होते. पण आता ए आय मध्ये काम करत असताना, लॉजिक महत्वाचे व भाषा फक्त 'आलेले उत्तर' सांगण्यासाठी असा जो समज होता, तो ढासळला आहे. लॉजिक हे भाषेच्या आत मध्ये आहे अशी मान्यता आता रूढ होत आहे. त्यामुळे खासकरून ए आय च्या काळात भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे यात मला तरी शंका नाही.

In reply to by स्वधर्म

मारवा Mon, 06/09/2025 - 19:07
परंतु सहसा भाषा त्यातही मराठी भाषेतील PhD साठी निवडलेले विषय आणि त्यांचा दर्जा यात असलेल्या Quality संदर्भात वरील विधान होते. त्यातही मराठीत सुद्धा नक्कीच सुंदर अपवाद असतातच. पण एकूण सर्वसाधारण जे निरर्थक फालतू सोपे "पगारवाढी पीएचडी" विषय जे निवडलेले असतात ते एकूण विद्यापीठा च्या रिसोर्सेस चा गैरवापर आहेत. (यातून मिळणारी पगारवाढ इत्यादी)

In reply to by मारवा

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 19:41
पगारवाढीसाठी केलेली कोणतीही पी एच डी निरूपयोगीच असते. त्याला STEM तसेच इंजिनिअरिंगही अपवाद नाही.

गवि Tue, 06/10/2025 - 08:15
या आपल्या नावामागे "डॉक्टर" शब्द लावण्याच्या इच्छेसाठी आताशा नवीन मार्ग उपलब्ध होत आहेत. विदेशी किंवा कोपऱ्यातली कुठली तरी विद्यापीठे एका वर्षात कसलातरी कोर्स करून डॉक्टरेट देऊ करत आहेत. अनेक ठिकाणी ऑलरेडी केलेल्या "सामाजिक कार्यासाठी" मानद म्हणून पीएचडी किंवा तत्सम बिरूद दिले जात आहे. काही राजकारणी लोक देखील ते मिरवत आहेत. एका कॉर्पोरेटमध्ये सेमिनार अटेंड करताना एका वरिष्ठाने (असाच एक वर्षात झटपट नावामागे डॉ लावा, अशा प्रकारचा कोर्स केलेला) आपली स्वतःची ओळख देताना मी डॉ. मनीष असे म्हणताच सर्व लोक फिस्स करून मोठ्याने हसले आणि एकदम वरमून गप्प झाले. त्याचा "डॉ"साठी केलेला सर्व खर्च मातीत गेला.

In reply to by गवि

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:42
मान मिळवण्यासाठी आपली लायकी सिद्ध करावी. diamonds command great price in market. They dont need to demand. कमांडचा अर्थच हा आहे कि आपल्या लायकीमुळे आपल्याला समाजाने किंमत द्यावी. आपल्या पदवी किंवा बिरुदामुळे नव्हे. आपल्या नावापुढे बिरुद लावून लोकांनी मान द्यायला पाहिजे असा आग्रह धरणे हे एक मूर्खपणाचे लक्षण आहे. जर लोकांनी आपल्याला हुशार म्हणावे यासाठी कोणी अशी "डॉक्टरकी" करत असेल तर तो एक भंपकपणा ठरेल. मुळात "लोकांनी" आपल्याला चांगले म्हणावे हि अपेक्षाच का असावी?

माहितगार गुरुवार, 06/05/2025 - 12:32
याचा मोठा परिणाम सुशिक्षित गुन्हेगारांची संख्या वाढण्यात होउ शकतो. कुणाला याचं भान आहे का?
लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या शक्यतेचे एक्झगरेशन आहे. संगणकीकरणामुळे असंगणकीय काळातील बराच रोजगार हरवला पण इतर रोजगारांची निर्मितीही होत राहिली. लोकसंख्या वाढते तशी मागणी आणि पुरवठ्याचे चक्र फिरणारच आणि सगळाच रोजगार पुसला जाईल असे नाही. नवे मार्गही निघत रहातात. पण जे काळासोबत चालत नाहीत ते मागे पडणार यातही तथ्य आहेच. खरे पहाता प्रश्न केवळ एआयचा नाही इंडस्ट्रीयल क्षेत्रात रोबोटीक्स आणि इंटरनेट ऑफ थींग्सनीही मोठे अ‍ॅटॉमेशन झाले तोही रोजगार हरवत आहे. तरीही गूगलचे एआय हँडल करणारे गुरुमहाशयांची मुलाखत काल परवाच ऐकली त्यांच्या म्हणण्यानुसार जरी रोजगार कमी होतील असे वाटले तरी नवीन विद्यार्थी पिढ्यांनी रोजगारासाठी विज्ञान गणित तंत्रज्ञान यांनाच चिटकून रहावयास हवे. ज्या संशोधन क्षेत्रात पैसा घालता आला नाही त्या संशोधन क्षेत्रात पैसा वाढून तिकडे संधी निर्माण होऊ शकतात. नॅचरल रिसोर्ससची कमतरता झाल्यामुळे पर्यायी रिसोर्सेस शोधणे आणि त्यांचे उत्पादन वितरण या क्षेत्रात येत्या काळात संधी असतील. युरोमेरीकेने सुशिक्षीत बेरोजगारीचा प्रश्न अजून दोन -तीन मार्गांनी गेल्या ७० वर्षांच्या अनुभवावरून दिसून येते. पर्यटन, क्रिडा व मनोरंजन आणि एन जी ओ क्षेत्र इरत क्षेत्रातील नवे रोजगार तयार होण्यापुर्वीचा काळ सांभाळून नेऊ शकतात त्या शिवाय क्रिडा आणि मनोरंजन आणि समाजसेवा क्षेत्रात युवा व्यस्त असेल तर तो केवळ रोजगारीच्या अनुपलब्धतेमु़ळे गुन्हेगारी मार्गांना लागण्याच्या शक्यताही कमी होतात.

In reply to by माहितगार

युयुत्सु गुरुवार, 06/05/2025 - 16:29
पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या शक्यतेचे एक्झगरेशन आहे. > असे वाटणे स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण मी हे विधान जबाबदारीने केले आहे. आपल्याकडे अनेक ढुड्ढाचार्य समाजाला ए०आय० अभिमुख करण्या ऐवजी ए० आय० कसा निरर्थक्,फसवा आहे याबद्दल इ० दिशाभूल करतात. याचा मोठा परिणाम म्ह० त्यावर विश्वास ठेऊन अनेक नवखे गाफील राहतात. हे गाफील महाभाग नंतर वैफल्याचे शिकार बनून गुन्हेगारीकडे वळू शकतात. आपल्याकडे पी०एच्०डी० झालेले शिपायाची नोकरी करत असल्याच्या बातम्या अधून्मधून झळकतात, तर मध्यंतरी एका वेश्यालयाच्या चालकाने मुलाखतीत (अभिमानाने) सांगितले की त्याच्याकडच्या काही 'सेक्सवर्कर' पी०एच०डी० झालेल्या आहेत. असो.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 20:19
असे गुन्हे वाढत जातील- https://www.msn.com/en-in/money/topstories/bengaluru-tech-drama-how-an-ex-employee-sabotaged-company-after-being-laid-off/ar-AA1GkKAM?ocid=winp2fptaskbarhover&cvid=8277881d76104b7591d3343344b33616&ei=4

In reply to by युयुत्सु

मारवा Tue, 06/10/2025 - 09:27
तुम्ही जे म्हणताय ते असे दिसत आहे की होणार नाही already होणे सुरू झालेले आहे पुढे ते फक्त वाढून अधिक भयावह रूप घेणार आहे. समाजशास्त्रद्नांनी यावर नक्कीच चिंतन केले पाहिजे. "AI ने निर्माण होणारी सुशिक्षित गुन्हेगारी स्वरूप परिणाम आणि भविष्य व उपाय" हा माझ्या मतेPhD च्या साठी एक उत्कृष्ठ विषय आहे. असे विषय असावेत असे मी म्हणतो.

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 13:36
https://www.msn.com/en-in/money/topstories/bengaluru-tech-drama-how-an-ex-employee-sabotaged-company-after-being-laid-off/ar-AA1GkKAM?ocid=winp2fptaskbarhover&cvid=8277881d76104b7591d3343344b33616&ei=4 संदर्भ लेख वाचला. असले प्रकार ए आय च्या आगोदर होते आणी नंतरही असणार आहेत. यात काही नवीन नाही. ही घटना का घडली याचे कारणही याच लेखात दिले आहे. The incident highlights how internal disputes and structural changes, if not managed with clarity and caution, can lead to serious operational vulnerabilities. चोर व पोलीस हे अविनाशी तत्त्व आहे व याचा खेळ चालूच रहाणार आहे. एक आणी शुन्य, म्हणजे संगणका बरोबर "हॅपी बर्थडे जोशी" पण जन्माला आला. त्यावर उपाय योजना झाली. पुण्यात म्हणे आय आय टी वाल्यांनी मिसळपाव विकून कोटी कोटी कमवले म्हणे. खरं काय ते नक्की नाही माहीत पण उदाहरण म्हणून दिले. नोकरी म्हणजे रोजगार असा गैरसमज समाजात पसरवला गेला आहे. "पप्पू पानवाला", याचा राजकारणाशी काहीच संबध नाही, ही एक दुकानाची शृंखला आहे आणी तीथे काम करणारे हजाराने पगार घेतात. पण नोकरी नाही म्हणून बेरोजगार म्हणणार का? पुण्यात कल्याण भेळ एक ब्रांड आहे त्याचा माल अमेरिकेत सुद्धा निर्यात होतो. तो स्वता कमी शिकलेला भेळ विकतो,पुढची पिढी इंजिनिअर वगैरे तरीही याच धंद्यात आहेत. स्काय इज लिमिट, सुशिक्षित काहिही करू शकतात. असे अनेक क्षेत्र आहेत जिथे ए आय ची गरज नाही. सुशिक्षित बेरोजगार होणार आणी गुन्हेगारी वाढणार अशी भ्रांती समाजात पसरवून ए आय च महत्व विनाकारण वाढवलं जात आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/05/2025 - 14:32
भारत पुन्हा कोड मंकीज निर्माण करणार की काय अशी भीती वाटत आहे.वाय-टू-केच्या काळात हेच झाले. नंतरच्या काळात परिस्थिती जरा बरी होती. मग तुमचे ते कॉल-सेन्टर ,बी पी ओ. कंपनीच्या प्रवर्तकांनी मात्र उखळ पांढरे केले. ए आयमध्ये ४/५ परदेशी कंपन्यांची मक्तेदारी असल्याचे दिसत आहे. आता चॅट-जी पीटी अभियंता/जेमीनी अभियंता टायटल्स येत आहेत. असो. नाक्यावर उभे राहुन सिगारेट फुंकत सरकारवर टीका करण्यापेक्षा कोणतेही नोकरी असलेली बरी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मारवा Tue, 06/10/2025 - 09:29
नाक्यावर उभे राहुन सिगारेट फुंकत सरकारवर टीका करण्यापेक्षा कोणतेही नोकरी असलेली बरी. Cynicism सर्वात वाईट. ही भूमिका परफेक्ट आहे.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/05/2025 - 16:55
काही वाक्यांचा अर्थच लागत नाहिये टीअर-२ शहरांमध्ये नोकऱ्यांची वाढ (४८%) जास्त आहे, पण या पदांना अनुभव लागतो. त्यामुळे टीअर-१ शहरांतील फ्रेशर्स अडचणीत आहेत. - कंपन्या एआय मेंटरशिप प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत जे फ्रेशर्ससाठी अनुभवाच्या अंतरावर उपाय ठरू शकतात. म्हणजे काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

युयुत्सु गुरुवार, 06/05/2025 - 17:09
१.सदर विधानाचा अर्थ लावण्यासाठी पुढील संदर्भ पहावा- नोकर्‍या उच्च श्रेणीच्या शहरांकडून निम्नश्रेणीच्या शहरांकडे जात आहेत, असा अर्थ आहे -https://analyticsindiamag.com/ai-features/entry-level-tech-jobs-are-collapsing/ २. अनुभवाच्या अभावाची समस्या सोडवण्यासाठी कंपन्या एआय मेंटरशिप प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत, असे वाचावे. :)

कपिलमुनी Mon, 06/09/2025 - 10:48
इंधनावर चालणार्‍या गाड्या आल्या तेव्हा घोडा गाडी वर चालणारी संपूर्ण इंडस्ट्री संपली , पण जगरहाटी चालू राहीली ..लोकांनी नवीन जॉब स्विकारले.. सीडी प्लेयर, फिल्म कॅमेरा तत्सम बाबतीत हेच झाले . लोक नवीन गोष्टी अ‍ॅडॉप्ट करतात .. फार काळजी क्रू नै

In reply to by कपिलमुनी

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 11:26
लोक नवीन गोष्टी अ‍ॅडॉप्ट करतात .. फार काळजी क्रू नै> तुमची जीवशास्त्राची जाण फारच नगण्य किंवा नाहीच असे खेदाने म्हणावे लागेल. जुळवून घेणे (अ‍ॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते. लोकसंख्येचा ताण, कुपोषण, विषद्रव्यांचा मारा, जगण्याचा ताण यामुळे जुळवून घेण्यावर मोठा परिणाम होतो. अगोदर मधुमेहाची जागतिक राजधानी असलेला देश मग कर्करोगाची जागतिक राजधानी म्हणुन प्रसिध्दी पावतो. उद्या देश १ल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तरी पेटंट इकॉनॉमी न बनता टेंपल इकॉनॉमितच गुरफटुन राहणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला देशात गुणशाही हवी. त्यासाठी कल्पकतेला उत्तेजन हवे. इथे समाजाची जुनाट कल्पना सोडायची तयारी नाही आणि अ‍ॅडापटेशनचे कौतूक कुणाला सांगताय?

In reply to by युयुत्सु

सुक्या Mon, 06/09/2025 - 12:50
पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला देशात गुणशाही हवी. त्यासाठी कल्पकतेला उत्तेजन हवे. ह्या ह्या ह्या . . . बाता बर्‍या आहेत. भारतात गुणवंत लोकांना संधी मिळत नाही. मिळाली तरी त्याचे फळ मिळत नाही. आरक्षणाच्या कुबडीवर जाणारे गुणवंत लोकांचे बॉस होतात मग ते त्यांचा वाटा खातात. बाता करुन काहीही मिळत नाही. त्याला काम करणारे हवे व केलेल्या कामाचे कौतुक व्हायला हवे. उदाहरणादाखल सांगतो. माझा एक वर्गमित्र .. दोन पीएचडी आहेत. एक भारतात, एक अमेरिकेत. अमेरिकेत त्याला पाठवले तेव्हा बॉंड लिहुन द्यावा लागला. भारतात गेल्यावर जे संशोधन केले त्याचे पेटंट वर त्याला त्याच्याबरोबर ईतर सहकारी, त्याचे डिपार्ट्मेंट हेड ह्या सगळ्याण्ची नावे लिहावी लागली. शेवटी वैतागुन त्याने बॉंड कालावधी संपल्यावर अमेरिकेत नोकरी (जिथे पीएचडी केली तिथे) पकडली (ईबी १ विसा). आता ३ पेटण्ट आहेत, २ विचाराधीन आहेत. आता संशोधनाबरोबर त्या विद्यापीठात प्रोफेसर म्हणुन काम करतोय. वर वर्षे ४८. तेव्हा "देशात गुणशाही हवी" म्हणायला ठीक आहे. त्यावर कामही व्हायला हवे. भारतात यच्च यावत पुढारी १५०० व ३००० खटाखट स्कीम मधे व्यग्र आहेत.

In reply to by सुक्या

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 13:14
श्री० सुक्या, मी तुमच्याशी १००१% सहमत आहे. आपल्याकडे १०० मधले ९९ प्राध्यापक आणि वरीष्ठ श्रेयलंपट असतात. त्यांना उद्देशून मी एक श्लोक संस्कृतमध्ये रचला होता- गुरुवर्यास्ते हल्कटा: नीचाश्च श्रेयलंपटा:| फकन्तु क्षुद्रमानसा: पुजासक्ता: तथैव च||

In reply to by युयुत्सु

कपिलमुनी Mon, 06/09/2025 - 13:50
देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्हीच काय ते लाईन मध्ये पहिले उभे होता !

In reply to by कपिलमुनी

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 14:00
लाईन मध्ये पहिला होतो का माहित नाही पण वेगळ्या आणि कमी गर्दीच्या लाईन मध्ये नक्कीच होतो.

In reply to by कपिलमुनी

युयुत्सु Mon, 06/09/2025 - 11:40
कपिलमुनी तुमच्या सारख्या भाबड्या लोकांना हे कळावे ही अपेक्षा नाही पण देश कॅन्सरची जागतिक राजधानी बनला म्हणजे अ‍ॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे, हा निसर्गाचा संदेश आहे आणि तो इतक्या इथल्या विद्वानांना समजणार नाही

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:03
देश कॅन्सरची जागतिक राजधानी बनला म्हणजे अ‍ॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे, हा निसर्गाचा संदेश आहे आणि तो इतक्या इथल्या विद्वानांना समजणार नाही मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे मी बरोबर आहेच म्हटलं कि झालं भारताची लोकसन्ख्या च इतकी जास्त आहे कि एकंदर कर्करोगाचे रुग्ण जास्त असणारच. पण पिवळा चष्मा घातला कि जगाला कावीळ झाली आहे असं भासतं Despite reporting more than a million new cases every year, India’s cancer rate has not yet surpassed countries like Denmark, Ireland, and Belgium, which record some of the highest cancer rates in the world. It is also currently lower than the U.S., reporting 100 cases for every 100,000 people compared with 300 in the U.S. https://time.com/6965528/india-cancer-capital-world-study/ आता हे तुमचं टाईम म्याग्झिनच म्हणतंय बरं का? आता यावर शब्दांचा डोंगर उभा करून तुम्ही टाईम नियतकालिकाच्या विधानाचा विपर्यास कसा केला जातोय यावर काथ्याकूट करा आम्ही बसलोय पॉप कॉर्न घेऊन चालू द्या

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 11:41
मंडळी ए०एफ्०एम्०सी मधल्या लोकांना गणित येत नाही हे एकवेळ समजून घेता येईल. पण आता इंग्लीश पण वाचता येत नाही म्हणजे हद्द झाली. वरील टाईम मासिकाच्या लेखात स्पष्ट म्हटले आहे की - "But that could soon change due to what some experts have called an “epidemiological transition.” ... In particular, the number of cancer cases is expected to rise at a rate that will surpass global averages—from 1.39 million in 2020 to 1.57 million by 2025." सरासरीशी केलेली तूलना जास्त महत्त्वाची असते, हे गणित ऑप्शनला टाकणार्‍यांना कळले असते तर देश वेगळा घडला असता. समाजाची सतत दिशाभूल करणारे वैद्यकीय व्यावसायिक ज्या देशात घडवले जातात त्या देशात दूसरे काय होणार? म्हणतात ना ....... कालची वार्ता आज नाही!!

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:46
सरासरीशी केलेली तूलना जास्त महत्त्वाची असते, सरासरी म्हणजे काय आपले पाय भट्टीत ठेवले आणि डोके डीप फ्रिझर मध्ये कि सरासरी तापमान २३ अंश सेल्सियस झाल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटते. बाकी तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 12:10
मंड्ळी, मी आय० आय० टी०त असताना तिथे बायो-मेडीकल एंजि०चा अभ्यासक्रम सुरु झाला होता. त्या अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी त्यावर्षी आमच्या हॉस्टेलमध्ये यात प्रामुख्याने एम०बी०बी०एस० झालेले विद्यार्थी होते. त्यांची गणित आणि फिजिक्समध्ये सॉल्लीड भंबेरी उडायची कारण दहावीनंतर एकदम व्हेक्टर कॅलक्युलस, फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे सगळ कठीणच मामला होता. त्यांच्या असाईनमेण्ट्स आमचे हॉस्टेलच करून द्यायचे. मग चालू व्हायच्या येता जाता आय्०आय्०टी० ला शिव्या... तर शिव्या ऐकायची सवय मला तेव्हा पासून्च आहे. झालं काय की त्याच्यातल्या एका डॉक्टरची आणि माझी गट्टी व्हायला सुरुवात झाली. त्याने मला रक्तदाब कसा बघायचा ते शिकवले, ऑस्क्लटेशन शिकवल्यावर मी एक मरमर आणि मिसिंग हार्ट्बीट्ची केस पण स्वतंत्रपणे डाय्ग्नोज केली होती. मग मी हॉस्टेलमधल्या ज्याला-त्याला "तपासत" असे. एक दिवस काय झालं की एका रात्री ९ वाजता हा मित्र माझ्या रूमवर आला आणि म्हणाला - "तुला वेळ आहे का" "हो" - मी म्हटलं "एक विचारू का? पण कुणाला सांगू नकोस" आता माझी उत्सूकता वाढली. मी त्याला आश्वास्न दिले की मी कुणाला काहीही सांगणार नाही. त्याने मला विचारले की " चालत्या आगगाडीमध्ये हवेत चेंडू फेकला तर तो आपल्या हातात का येतो? तो आपल्या पुढे पडायला हवा" मग मी त्याला रात्री ९ ते पहाटे ४ चेंडू हातात परत का येतो या मागचे फिजिक्स समजाऊन सांगत होतो. सांगायचे तात्पर्य - आपण ज्याना 'देव' मानतो त्यांना गणित, फिजिक्स येत नाहीच पण आता इंग्लीश पण वाचता येत नाही. देशाचं कठीण आहे, हे मात्र नक्की!

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 12:16
Almost 40% of cancer cases in India are due to rampant tobacco use, which significantly elevates the risk of lung, oral, and throat cancers, while factors like poor diet and lack of physical activity cause 10% of cases. सर्वज्ञ पणा चा आव आणताना खोटारडेपणा कराल असे वाटले नव्हते "याच" दुव्यातील वरील वाक्ये लक्षात घेतली तर भारतातील ५० टक्के कॅन्सरचा प्रदूरभाव कमी करण्यासारखा आहे. याचा अ‍ॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे या आपल्या अतिशयोक्त वाक्याशी सुतराम संबंध नाही हे सहज लक्षात येतील. पण आपण किडकी प्रजा आणि ऍडाप्टेशन चा दुराग्रह इतका टोकाला नेला आहे कि त्यातून बाहेर पडणे आपल्याला अशक्य झालेले आहे. आकाशातील ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही. मी पोपकोर्न घेऊन बसलो होतो पण इतका दांभिकपणा पाहून राहवले नाही

कर्नलतपस्वी Mon, 06/09/2025 - 12:13
जुळवून घेणे (अ‍ॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते. ते कसे काय बुवा? ॲडाॅप्ट तर प्रतिकूल परिस्थिती मधे करायला लागते. न केल्यास नाश होतो. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ या प्रमाणे समाज सुद्धा अविनाशी ,अमर आहे. त्यामुळे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत बदलण्याची जुळवून घेण्याची त्याच्यामधे क्षमता आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

मारवा Tue, 06/10/2025 - 09:21
अगदी हाच प्रश्न मलाही पडलेला आहे. Adaptation हेच मुळात तुम्ही प्रतिकूल परिस्थितीला adapt केल्यातूनच होते ना ?

In reply to by मारवा

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 10:46
आपण एक प्रयोग करू या. त्याच्या पाय-या पुढील प्रमाणे असतील- ० प्रथम आत्म्याचे अस्तित्व बियॉण्ड डाऊट सिद्ध करावे. ० मग सदर व्यक्ती इहलोकीची यात्रा आटोपती घेईल, तेव्हा तिचा आत्मा रितसर घट्ट झाकणाच्या बाटलीत वेगळा करूया. तशी त्यांच्या आप्तांना सूचना देऊन ठेवावी. ० मग ही आत्मायुक्त बाटली विस्तवावर उच्च तापमानावर तापवावी आणि त्याची निरीक्षणे नोंदवावीत ० सदर बाटली मग थंड करून एखाद्या शीतपेटीत दीर्घकाळ ठेऊन त्याची निरीक्षणे नोंदवावीत या दोन्ही प्रक्रियांमध्ये आत्म्याचे गुणधर्म बदलले तर आत्मा अ‍ॅडाप्ट झाला असे म्हणावे लागेल. मग नैनं दहति पावकः इत्यादि दावे निकालात निघतील. आत्म्याचे गुणधर्म बदलले नाही तर आत्मा अ‍ॅडाप्ट झाला नाही असे म्हणावे लागेल. मग हाच प्रयोग अनेक व्यक्तींच्या आत्म्यावर, कत्तलखान्यातील प्राण्यांच्या आत्म्यावर मोठ्या प्रमाणात करता येईल.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:31
एक पेशीय जीव उदा अमीबा- जिवन्त अमीबा आणि मृत अमीबा यातील फरक म्हणजे आत्मा. इतर रसायने आणि विषाणू मधील रसायने (जी स्वतःची पुनरुत्पत्ती करू शकतात) यातील फरक म्हणजे आत्मा. एखादे वनस्पतीचे बी याच्या दोन बिया घ्या त्याती एका वर किरणोत्साराचा मारा करा. आता या दोन्ही बियांतील फरक म्हणजे आत्मा. दुर्दैवाने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व चाचण्या आत्म्याचे अस्तित्व तपासण्यात सक्षम नाहीत. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागण्या अगोदर जिवाणू बघता येत नव्हते याचा अर्थ ते अस्तित्वात नव्हते असा नव्हे त्यामुळे तुमचे अतिजीवशास्त्रीय विवेचन मुळातूनच भंपक आहे. आत्मा काही भूत किंवा पिशाच्च किंवा एखादा वायू नाही तेंव्हा आत्मा तापवा किंवा बाटली बंद करा सारखी विधाने तुमच्या कल्पनाशक्तीची सुमार मर्यादा दाखवतात.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:34
प्रथम आत्म्याचे अस्तित्व बियॉण्ड डाऊट सिद्ध करावे. उद्या जेंव्हा ते दाखवता आले तेंव्हा तुमच्यासारखे सर्वज्ञ हे अस्तित्वाचे पुरावे पुरेसे नाहीत असेच म्हणतील जसे एवढे पुरावे दाखवून सुद्धा पाकिस्तान सतत सांगते कि मुंबई हल्ला किंवा इतर हल्ले हे सज्जड बियॉण्ड डाऊट पुरावे दाखवून सिद्ध करा. तुमची स्थिती पाकिस्तानपेक्षा वेगळी नाही बियॉण्ड डाऊट हेच मुळी निसरडे विधान आहे

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 13:51
चला तीस सेकंद गरम करून बघू नंतर थंड चटणीत बुडवून बघू..... भगवद्गीतेतील श्र्लोकाचा संदर्भ फक्त तुलनात्मक समानता दाखवण्यासाठी दिला होता. जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो. इतकेच. आध्यात्म,आत्मा इ. अशिक्षित, अंधश्रद्धाळुंचे विषय. बुद्धिवंत आणी त्यात हुच्च शिक्षितांना काय कळणार....

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 17:56
तसेच पूर्णपणे नाहीशा जमाती याप्रमाणे - Below are examples of communities that have vanished completely or nearly so, leaving little to no trace of their existence. These cases span different time periods and regions, with reasons ranging from natural disasters to human intervention. I’ve included well-documented historical examples and some lesser-known ones, focusing on communities that have effectively disappeared rather than those merely abandoned with significant remains. --- ### 1. **Roanoke Colony (North Carolina, USA)** - **Time Period**: Late 16th century (1587–1590) - **Description**: The Roanoke Colony, often called the "Lost Colony," was an early English settlement on Roanoke Island, established under Sir Walter Raleigh. In 1587, about 115 settlers, including men, women, and children, were left on the island. When a supply ship returned in 1590, the entire colony had vanished, with no signs of struggle or remains. The only clue was the word "Croatoan" carved into a post and "Cro" on a tree. - **Reason for Disappearance**: Unknown. Theories include assimilation with local Native American tribes, attack by hostile groups, starvation, or migration to another area. No definitive evidence of their fate has been found. - **Current Status**: The site has no remaining structures from the colony. Archaeological efforts have uncovered some artifacts, but the settlers’ fate remains one of America’s oldest unsolved mysteries.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.cnbc.com/2011/11/09/Cities-That-Vanished.html)[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) - **Why It’s "Vanished"**: No bodies, structures, or clear evidence of what happened were left behind, making it a true case of a community disappearing without a trace. --- ### 2. **Angikuni Village (Nunavut, Canada)** - **Time Period**: 1930 - **Description**: Angikuni was a small Inuit village near Lake Angikuni in northern Canada. In 1930, a trapper named Joe Labelle visited the village and found it completely deserted. Houses contained personal belongings, meals were left uneaten, and sled dogs were found dead, suggesting a sudden departure. The village’s roughly 30 inhabitants were never seen again. - **Reason for Disappearance**: Unknown. Theories range from mass abduction (including paranormal or extraterrestrial claims) to starvation, disease, or migration due to harsh conditions. The story is controversial, with some suggesting it may be exaggerated or a myth, but it remains a notable case of a vanished community. - **Current Status**: No physical remains of the village exist today, and the story relies heavily on Labelle’s account and subsequent investigations, which found no trace of the inhabitants.[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) - **Why It’s "Vanished"**: The lack of remains, coupled with the sudden and unexplained nature of the disappearance, makes this a mysterious case, though its historical accuracy is debated. --- ### 3. **Shexia Village (Fujian, China)** - **Time Period**: Qing Dynasty (exact date debated, possibly 19th century) - **Description**: Shexia, a village in Jinjiang city, Fujian, reportedly housed over 1,000 residents, primarily of the Xie and Huang families. According to legend, the entire village disappeared overnight, leaving no trace of its inhabitants. Some accounts claim the disappearance occurred during the reign of the Guangxu or Daoguang Emperor. - **Reason for Disappearance**: Unknown. Theories include supernatural events (e.g., UFO abductions), natural disasters, or a secret military operation that relocated the villagers. The story is considered a rumor by some, with sparse historical records, but it has captured attention online. A modern Shexia village exists in the area, possibly linked to the legend via a Bronze Age sand dune relic.[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujian-and-qinling/) - **Current Status**: No confirmed remains of the original village or its people have been identified, and the story persists as a mix of folklore and speculation. - **Why It’s "Vanished"**: The absence of physical evidence and the overnight disappearance narrative align with the idea of a community vanishing completely. --- ### 4. **Qinling Mountain Village (Shaanxi, China)** - **Time Period**: 1987 - **Description**: An unnamed village at the foot of the Qinling Mountains in Shaanxi province allegedly disappeared overnight on October 12, 1987. All residents and livestock vanished, with no signs of where they went. Local accounts mention sightings of UFOs and fleeing wildlife prior to the event, dubbed the "Night Leopard Cat Incident." - **Reason for Disappearance**: Unknown. Popular theories include alien abduction, a secret military relocation, or a natural disaster. The story originated from a 2010 online post that went viral, but Baidu Baike labels it a rumor due to lack of verifiable evidence.[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujian-and-qinling/) - **Current Status**: No physical remnants or official records confirm the village’s existence or disappearance, making it a modern mystery with questionable historicity. - **Why It’s "Vanished"**: The complete lack of evidence, combined with the sudden and total disappearance, fits the pattern of a vanished community, though its status as a rumor reduces certainty. --- ### 5. **Penybanc and Pantywaun (Wales, UK)** - **Time Period**: 20th century (exact date unclear, likely mid-20th century) - **Description**: These were small mining communities in the Welsh valleys, part of the broader decline of coal-mining villages. The houses were deemed unfit for habitation by the Gelligaer Urban Council, and residents were relocated to nearby areas like Fochriw. Residents, including a widow named Catharine Gallier, reported being unable to afford repairs, leading to the villages’ abandonment. - **Reason for Disappearance**: Economic decline and government intervention. The collapse of the mining industry and the poor condition of housing led to forced relocation under the Housing Act, with compensation offered for well-maintained properties.[](https://silo.pub/the-lost-villages-in-search-of-britains-vanished-communities.html) - **Current Status**: No significant remains of Penybanc or Pantywaun exist today. The sites have likely been reclaimed by nature or redeveloped, with little to mark their former presence. - **Why It’s "Vanished"**: These communities were entirely dismantled and their populations relocated, leaving no notable physical trace. --- ### 6. **Godwick (Norfolk, UK)** - **Time Period**: 15th–16th centuries - **Description**: Godwick was a small medieval village recorded in the Domesday Book (1086) with 14 peasants. By the 15th century, it had shrunk significantly, with only five households paying tax by 1525. The village was abandoned as economic troubles and land consolidation by lords turned it into sheep pasture. - **Reason for Disappearance**: Economic and social changes. Landlords expanded their flocks, forcing tenants out, and the village’s small size made it unsustainable. Scottish raids, famine, and disease also contributed to its decline.[](https://www.historyextra.com/membership/villages-towns-disappeared-abandoned-why/) - **Current Status**: Virtually no remains exist today. The site is marked by faint earthworks, but the village itself has vanished, with its land repurposed for agriculture. - **Why It’s "Vanished"**: The complete depopulation and lack of surviving structures make Godwick a clear example of a community that disappeared entirely. --- ### Notes on Selection and Context - **Definition of "Vanished Completely"**: I focused on communities where little to no physical evidence (e.g., buildings, artifacts) remains, or where the population disappeared without clear explanation. Some cases, like Roanoke and Angikuni, are famous for their mysterious nature, while others, like Penybanc and Godwick, reflect more mundane but complete erasure due to economic or social factors. - **Exclusions**: I avoided examples like Pompeii or Machu Picchu, which left significant archaeological remains, as they don’t fit the "completely vanished" criterion. Similarly, ghost towns like Bodie or Centralia, which still have structures or a few residents, were excluded.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.bbc.co.uk/bitesize/articles/z2rmg2p)[](https://www.thequeenzone.com/americas-modern-ghost-towns-10-communities-abandoned-since-1970/) - **Reliability**: Some cases (e.g., Shexia, Qinling Mountain Village) are based on limited or anecdotal evidence and may be partly legendary. I included them due to their cultural significance but noted their questionable historicity. - **Sources**: Information is drawn from the provided web references, cross-checked for accuracy. Where sources conflict (e.g., Angikuni’s authenticity), I noted the uncertainty.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.cnbc.com/2011/11/09/Cities-That-Vanished.html)[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) --- ### Additional Considerations - **Common Causes**: Vanished communities often result from natural disasters (e.g., volcanic eruptions, floods), economic collapse (e.g., mining industry decline), forced relocation (e.g., government expropriation), or unexplained events (e.g., Roanoke, Angikuni).[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://vocal.media/history/a-town-that-vanished-without-a-trace) - **Cultural Impact**: These disappearances often spark fascination, leading to myths, legends, or renewed historical interest. For example, Roanoke inspired books and media, while Shexia and Qinling fuel online speculation.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disappearance-of-a-town)[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujian-and-qinling/) - **Preservation Efforts**: In some cases (e.g., Roanoke), archaeological work continues, but for others (e.g., Godwick), the sites are effectively gone, with no active preservation.[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disappearances-17482730e1f5) If you’d like more details on any of these examples, want to explore specific regions, or need help visualizing data (e.g., a chart of disappearance causes), let me know! तेव्हा जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो. वगैरे वाक्य बिन्बुडाची आणी बिन्डोक आहेत

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 18:40
जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो. हिंदू समाज इस्लामच्या आक्रमणात नष्ट न होता जिवंत का आणि कसा राहिला याचे संशोधन समाजशास्त्रज्ञ अजून करत आहेत. पश्चिमेला सुरुवात होऊन इस्लाम भारताच्या पलीकडे पूर्वेला सुद्धा गेला आणि तेथील संस्कृतीवर घाला घालून तेथे इस्लामीकरण पुर्णत्वाजवळ नेले काशी हे शहर इतिहासातील सर्वात पुरातन शहर जे शतकानुशतके सलग वस्ती केलेले शहर आहे. इतकी आक्रमणे होऊन सुद्धा हे शहर अजून आपली संस्कृती टिकवून आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता हातात लागली म्हणजे सर्व ज्ञान आले असे नव्हे. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाच्या पासंगालाही पुरणार नाही हि वस्तुस्थिती.

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु Tue, 06/10/2025 - 17:51
नॉनस्टॉप अडाणीपणा काही लोकांचा नॉन्स्टॉप अडाणीपणा करमणूक करतो- मी सहज म्हणून ग्रोकला विचारलं की - are there any communities in the world that are on the verge of vanishing? त्याने मला जगातले १० समाज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे सांगितले. Yes, there are several communities around the world that are on the verge of vanishing due to various factors such as depopulation, economic decline, environmental changes, modernization, and cultural assimilation. Below, I highlight some examples based on available information, including small towns, indigenous groups, and cultural communities, with a focus on their challenges and the reasons behind their potential disappearance. ### 1. **Small Towns in Canada** Many small towns in Canada are facing depopulation and economic decline, particularly those reliant on single industries like fishing, mining, or agriculture. These communities are fading as younger generations move to urban centers for better opportunities, leaving behind aging populations and abandoned infrastructure. Examples include: - **Little Bay Islands, Newfoundland**: Once a thriving fishing community, the collapse of the fishing industry led to its near abandonment. Families resettled, and the town is now largely a ghost town, with nature reclaiming its spaces.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) - **Kitsault, British Columbia**: A modern ghost town built in the 1970s for molybdenum mining, Kitsault was abandoned almost overnight when the market collapsed. Its preserved buildings stand as a relic of economic ambition and loss.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) - **Nordegg, Alberta**: A former coal-mining town, Nordegg’s population dwindled after mining operations ceased. Its abandoned mines and homes reflect the risks of single-industry reliance.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) - **Sandon, British Columbia**: Once sustained by mining and agriculture, Sandon’s resources dried up, leaving behind overgrown paths and a sense of nostalgia for its vibrant past.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-the-verge-of-vanishing/) These towns face challenges like dwindling economies, lack of job opportunities, and an aging population, which contribute to their decline. Their cultural and historical significance remains, but without intervention, many may vanish entirely. ### 2. **Genkai Shūraku (Vanishing Villages) in Japan** In Japan, the phenomenon of **genkai shūraku** refers to rural villages on the brink of extinction due to severe depopulation and aging populations. These communities, often located in remote areas, struggle to maintain their traditional lifestyles and cultural heritage as younger generations migrate to urban centers. Key points include: - **Demographic Shifts**: Japan’s population declined to less than 125 million by 2020, with a loss of over 1.3 million people in five years. Rural areas are particularly affected, with many villages having over 50% of residents aged 65 or older.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue) - **Cultural Loss**: These villages hold centuries-old traditions, but the lack of successors threatens their survival. For example, traditional crafts, festivals, and agricultural practices are fading as elderly residents pass away. - **Tourism as a Solution**: Some villages are turning to sustainable rural tourism to revitalize their communities. By promoting unique cultural and natural attractions, they attract visitors and generate income. However, challenges like commercialization and tensions with tourists over cultural respect remain.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue) - **Example: Iketani Village, Niigata Prefecture**: This village, once at risk of disappearing after a 2004 earthquake, increased its population from a low point by welcoming urban volunteers for farming and reconstruction work. Its success highlights the potential of community-driven revitalization.[](https://www.gov-online.go.jp/eng/publicity/book/hlj/html/201905/201905_04_en.html) ### 3. **Indigenous Communities in the Philippines** The Philippines is home to 14–17 million Indigenous Peoples across 110 ethnic groups, many of whom face threats to their cultural practices due to modernization, environmental degradation, and economic pressures. Specific examples include: - **Ifugao Weavers in Kiangan**: Traditional weaving, a cornerstone of Ifugao culture, is declining due to low economic returns. Weavers spend significant time on intricate patterns but receive meager compensation, discouraging younger generations from continuing the practice.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring-indigenous-rituals-customs-in-the-philippines) - **Alangan Mangyans**: Traditionally living in large communal houses called *balaylakoy*, many have shifted to modern housing due to external influences, reducing the prevalence of these cultural centers.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring-indigenous-rituals-customs-in-the-philippines) - **Badjao Burial Customs**: The Badjao, a sea-faring people, practice unique burial traditions tied to their coastal lands. Modernization, economic hardship, and disregard for tradition threaten these customs, which hold wisdom about sustainable living and community cohesion.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring-indigenous-rituals-customs-in-the-philippines) Preserving these traditions is critical not only for cultural heritage but also for their contributions to global knowledge about sustainable practices and medicinal plants. ### 4. **Palestinian Bedouin Communities** Some Palestinian Bedouin communities in the Middle East are at risk of disappearing due to displacement and external pressures. Posts on X highlight a specific community that "no longer exists," pointing to issues like ethnic cleansing and forced relocation. While these claims are serious, they require further verification due to their sensitive and controversial nature. The loss of such communities involves not only physical displacement but also the erasure of nomadic traditions and cultural identity.[](https://x.com/Torikit/status/1929879492463362340)[](https://x.com/BLM4Corbyn/status/1929897572098826421)[](https://x.com/Razrsharp19/status/1930641444961677619) ### 5. **Hidden Christians in Japan** A rare form of Christianity practiced by the "Hidden Christians" (*Kakure Kirishitan*) in Japan is on the verge of extinction. This unique religious community, which developed in secrecy during Japan’s ban on Christianity in the 17th–19th centuries, is dying out as its practitioners age and younger generations do not continue the traditions. The loss of this group would erase a distinct cultural and religious heritage shaped by centuries of isolation.[](https://x.com/sommelier50/status/1930640550908022972) ### 6. **Yezidis and Assyrians in the Middle East** Small ethnoreligious groups like the Yezidis and Assyrians, primarily in Iraq and Syria, face existential threats due to urbanization, emigration, and historical persecution. Many members of these communities live in diaspora, and their cultural practices, languages, and traditions are at risk of fading within the next 100–200 years. The Yezidis, for example, have faced significant displacement due to conflict, further endangering their cultural survival.[](https://x.com/levantophile/status/1932209136902533529) ### 7. **Hopeville, Arizona (Black Community)** Hopeville, a historically Black neighborhood in Buckeye, Arizona, is at risk of vanishing due to growth-driven local policies and demographic changes. Established in the 1980s as a relocation site for Black residents displaced from Allenville after floods, Hopeville faces pressures from urban development and an influx of non-Black residents, which has weakened its cultural cohesion. Residents fear that local officials’ focus on growth could erase this community’s identity, a concern rooted in historical patterns of racial distrust and displacement.[](https://www.miamiherald.com/detour/article276630131.html) ### 8. **Japantowns in the United States** The three remaining Japantowns in the U.S. (in San Francisco, Los Angeles, and San Jose) are at risk of disappearing due to economic pressures, gentrification, and displacement. Rising rents and commercial development threaten mom-and-pop shops, which are vital to these communities’ cultural identity. For example, since the 2008 recession, 43 businesses in Los Angeles’ Little Tokyo have closed or relocated. Community advocates are pushing for local control over land to preserve these historic neighborhoods, but the challenges of corporate ownership and urban renewal persist.[](https://www.yahoo.com/news/pandemic-threatens-destroy-americas-three-164345518.html) ### 9. **Indigenous Tribes in India’s Andaman Islands** Only four indigenous tribes remain in India’s Andaman Islands, and they face extinction due to external intrusions, habitat loss, and cultural assimilation. These tribes, such as the Sentinelese and Jarawa, have lived in isolation for centuries but are increasingly threatened by tourism, illegal contact, and environmental changes. Their small populations and lack of immunity to outside diseases make them particularly vulnerable.[](https://x.com/Chellaney/status/1907799806807867834) ### 10. **Hippie Culture in Goa, India** The hippie culture that defined Goa’s tourism in the 1960s and 1970s is nearly extinct due to commercialization. Once a haven for countercultural travelers, Goa’s image as a free-spirited paradise has been replaced by mass tourism, which prioritizes profit over cultural authenticity. This shift has eroded the unique lifestyle and communal values that attracted hippies, leaving only traces of their legacy.[](https://www.incrediblegoa.org/feature/hippie-culture-almost-on-the-verge-of-vanishing-from-goa-due-to-high-level-of-commercialisation-in-the-tourism-sector/) ### Common Themes and Challenges These communities share several challenges that contribute to their risk of vanishing: - **Depopulation**: Migration to urban areas for economic opportunities leaves rural and small communities with aging populations unable to sustain themselves. - **Economic Decline**: Reliance on single industries (e.g., mining, fishing) makes communities vulnerable to market collapses or resource depletion. - **Cultural Assimilation**: Modernization and globalization often erode traditional practices, as younger generations adopt dominant cultural norms. - **Environmental Pressures**: Climate change, floods, and land degradation threaten the physical spaces where communities thrive. - **Displacement**: Urban development, conflict, or government policies can force communities to relocate, disrupting their cultural and social fabric. - **Lack of Resources**: Limited access to funding, education, or infrastructure hinders efforts to preserve cultural heritage or revitalize communities. ### Efforts to Preserve These Communities Some communities are taking steps to survive: - **Tourism and Cultural Promotion**: Japan’s genkai shūraku and Canada’s ghost towns are leveraging tourism to generate income and raise awareness, though sustainable practices are crucial to avoid commercialization.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue) - **Community-Led Initiatives**: Iketani Village’s success with urban volunteers shows the power of grassroots efforts.[](https://www.gov-online.go.jp/eng/publicity/book/hlj/html/201905/201905_04_en.html) - **Advocacy and Legal Protections**: In the U.S., Japantown advocates are fighting for community ownership of land to protect cultural businesses.[](https://www.yahoo.com/news/pandemic-threatens-destroy-americas-three-164345518.html) - **Documentation and Education**: Projects like the Vanishing Cultures Project work with indigenous groups to document traditions and fund preservation initiatives.[](https://www.vcproject.org/about/what_we_do/) ### Critical Perspective While the sources provide valuable insights, they often reflect mainstream narratives that may overlook local voices or exaggerate decline for dramatic effect. For example, claims of “ethnic cleansing” in Palestinian Bedouin communities are serious but need corroboration beyond social media posts. Similarly, tourism as a solution, while promising, risks commodifying cultures if not managed carefully, as seen in Japan and Goa. The focus on “vanishing” can also overshadow communities’ resilience and agency, as seen in Hopeville’s continued cultural pride despite external pressures.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-villages-in-japan-and-the-touristic-solution-to-the-issue)[](https://www.incrediblegoa.org/feature/hippie-culture-almost-on-the-verge-of-vanishing-from-goa-due-to-high-level-of-commercialisation-in-the-tourism-sector/)[](https://www.miamiherald.com/detour/article276630131.html) ### Conclusion Communities on the verge of vanishing span diverse regions and cultures, from Canadian ghost towns to Japanese villages, indigenous groups in the Philippines, and ethnoreligious minorities in the Middle East. Their struggles highlight broader global trends of urbanization, economic shifts, and cultural homogenization. While some are finding innovative ways to survive, such as through tourism or advocacy, their futures remain uncertain without sustained support. Preserving these communities is not just about saving their physical presence but also about safeguarding the knowledge, traditions, and diversity they contribute to the world. स्वगत - ए०आय्०चे महत्त्व ज्यांना कळले नाही त्यांना ए०आय० वापराय्ची सवय कशी लागणार?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 18:33
हायला जे जीव किंवा समाज बदला ला अनुकूल असे स्वतः मध्ये बदल करत नाहीत ते नष्ट होतात हे डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे मुलतत्व आहे त्यासाठी इंग्रजीत मेगाबायटी प्रतिसादाची आवश्यकता का पडते? आणि त्यात गोव्याच्या हिप्पी कल्चरचा काय संबंध? ते जीवशास्त्रीय दृष्ट्या वेगळे जीव किंवा समाज नाहीत. Many hippies from the West, disillusioned with materialism, found their way to Goa, drawn by its peaceful atmosphere and natural beauty कदाचित आपल्याच थिअरीप्रमाणे किडके समाज नाहीत/ नव्हते.

मारवा Mon, 06/09/2025 - 17:29
सुशिक्षित व्यक्तींना गुन्हेगारीकडे वळावे लागणे हे फार tragic आणि अस्वस्थ करणारं असं आहे. आणि PhD वेश्या व्यवसायात? काय म्हणावं याला ? ठीक आहे काही PhD चे विषय हे फारचं अनुपयुक्त असेच असतात विशेषतः भाषा विषयातील किंवा एकूण नॉन सायन्स शाखेतील PhD मध्ये अनुपयुक्त अव्यव्हारीक या अर्थाने. तरीही त्यात परिश्रम तर असतातच. आणि तरीही वेश्या व्यवसाय करावा लागणे म्हणजे एकूण फारच कठिण असा काळ आलेला आहे असे म्हणावे लागते. खेद hi होतोच. या व्यतिरिक्त मला नेहमीच phd चे जे non science आणि भाषे चे phd विषय असतात ते अनेकदा फारचं फालतू असे वाटतात. Phd चे निवडलेले संशोधनाचे विषय उदा अमक्या अमक्या लेखकाच्या कादंबऱ्यातील स्त्री पात्रांचा अमुक अमुक निकष लावून केलेला अभ्यास, अमुक अमुक. च्या लेखनातील सामाजिक चित्रण फारचं Non creative,, unchallenging, impractical ,narrow focused असे विषय असतात. बहुतांश वेळा विषयांची निवड सोपे कमी कष्टात काम व्हावे या हेतूने आणि नंतर सर्वात मुख्य उद्देश नोकरीत बढती आणि पगारवाढ आणि नावापुढे मिरवण्यासाठी हाच असतो. Guide सुद्धा तसेच एकूण PhD चे विशेषतः नॉन सायन्स क्षेत्रातील संशोधनासाठी निवडलेले फालतू विषय हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे.

In reply to by युयुत्सु

मारवा Tue, 06/10/2025 - 09:10
दोन्ही व्हिडिओ बघितले. एका बाजूने खेद वाटतो त्यांची परिस्थिती बघून दुःख होते. त्याच बरोबर त्यांची जिद्द, निर्धार आणि struggle याचे ही कौतुकच वाटले.

मारवा Mon, 06/09/2025 - 17:39
एक गमतीदार चांगले phd चे विषय बघा. भाषेतील phd विषयांपैकी एकूण किती विषय हे creative, challenging एकवेळ व्यवहारिक उपयुक्तता सोडून देऊ पण किमान काही तरी नवीन अस pathbreaking असं काहीतरी शोधलं . एखादी नवीन संकल्पना निर्माण केली असे एकूण किती पेपर्स मराठीत झाले ? हा वरील विषय नक्कीच महत्त्वाचा असा संशोधनाचा आहे. उदा. रा भा पाटणकर सारखे संशोधक जेव्हा संशोधन करतात तेव्हा ते किती thoght provoking किती सघन अशी निर्मिती करतात असे भाषा संदर्भातील किंवा तत्वद्न्यान संदर्भातील संशोधनात कितीनप्रमाणात आले असेल ?

In reply to by मारवा

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 18:58
भाषा ही गणितापेक्षा खूप जास्त महत्वाची आहे असं विजय भटकर हे २५ वर्षांपूर्वी म्हणाले होते, तेंव्हा मला खूपच आश्चर्य वाटलेले होते. पण आता ए आय मध्ये काम करत असताना, लॉजिक महत्वाचे व भाषा फक्त 'आलेले उत्तर' सांगण्यासाठी असा जो समज होता, तो ढासळला आहे. लॉजिक हे भाषेच्या आत मध्ये आहे अशी मान्यता आता रूढ होत आहे. त्यामुळे खासकरून ए आय च्या काळात भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे यात मला तरी शंका नाही.

In reply to by स्वधर्म

मारवा Mon, 06/09/2025 - 19:07
परंतु सहसा भाषा त्यातही मराठी भाषेतील PhD साठी निवडलेले विषय आणि त्यांचा दर्जा यात असलेल्या Quality संदर्भात वरील विधान होते. त्यातही मराठीत सुद्धा नक्कीच सुंदर अपवाद असतातच. पण एकूण सर्वसाधारण जे निरर्थक फालतू सोपे "पगारवाढी पीएचडी" विषय जे निवडलेले असतात ते एकूण विद्यापीठा च्या रिसोर्सेस चा गैरवापर आहेत. (यातून मिळणारी पगारवाढ इत्यादी)

In reply to by मारवा

स्वधर्म Mon, 06/09/2025 - 19:41
पगारवाढीसाठी केलेली कोणतीही पी एच डी निरूपयोगीच असते. त्याला STEM तसेच इंजिनिअरिंगही अपवाद नाही.

गवि Tue, 06/10/2025 - 08:15
या आपल्या नावामागे "डॉक्टर" शब्द लावण्याच्या इच्छेसाठी आताशा नवीन मार्ग उपलब्ध होत आहेत. विदेशी किंवा कोपऱ्यातली कुठली तरी विद्यापीठे एका वर्षात कसलातरी कोर्स करून डॉक्टरेट देऊ करत आहेत. अनेक ठिकाणी ऑलरेडी केलेल्या "सामाजिक कार्यासाठी" मानद म्हणून पीएचडी किंवा तत्सम बिरूद दिले जात आहे. काही राजकारणी लोक देखील ते मिरवत आहेत. एका कॉर्पोरेटमध्ये सेमिनार अटेंड करताना एका वरिष्ठाने (असाच एक वर्षात झटपट नावामागे डॉ लावा, अशा प्रकारचा कोर्स केलेला) आपली स्वतःची ओळख देताना मी डॉ. मनीष असे म्हणताच सर्व लोक फिस्स करून मोठ्याने हसले आणि एकदम वरमून गप्प झाले. त्याचा "डॉ"साठी केलेला सर्व खर्च मातीत गेला.

In reply to by गवि

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 11:42
मान मिळवण्यासाठी आपली लायकी सिद्ध करावी. diamonds command great price in market. They dont need to demand. कमांडचा अर्थच हा आहे कि आपल्या लायकीमुळे आपल्याला समाजाने किंमत द्यावी. आपल्या पदवी किंवा बिरुदामुळे नव्हे. आपल्या नावापुढे बिरुद लावून लोकांनी मान द्यायला पाहिजे असा आग्रह धरणे हे एक मूर्खपणाचे लक्षण आहे. जर लोकांनी आपल्याला हुशार म्हणावे यासाठी कोणी अशी "डॉक्टरकी" करत असेल तर तो एक भंपकपणा ठरेल. मुळात "लोकांनी" आपल्याला चांगले म्हणावे हि अपेक्षाच का असावी?
लेखनविषय:
लेखनप्रकार
एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम एआयच्या प्रगतीमुळे जागतिक स्तरावर नोकरी बाजार बदलत आहे आणि भारतातही याचा मोठा प्रभाव पडतोय. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेशस्तरीय नोकऱ्या विशेषतः एआय ऑटोमेशनमुळे धोक्यात आहेत. अलीकडील अहवालांवर आधारित भारतीय परिस्थितीचे विश्लेषण: १. तंत्रज्ञान क्षेत्रात फ्रेशर हायरींगमध्ये भीषण घट - २०१९ पासून भारतातील मोठ्या टेक कंपन्यांनी फ्रेशर भरती ५०% पेक्षा जास्त कमी केली आहे. नवीन भरतीत फ्रेशर्सचा वाटा आता फक्त ७% (पूर्वी १५%) आहे. - टीसीएस, इन्फोसिस सारख्या कंपन्या फ्रेशर्सची नियुक्ती मंदावल्या आहेत.

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

Bhakti ·

In reply to by कंजूस

Bhakti Wed, 06/04/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 06:49
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.

In reply to by कंजूस

Bhakti Wed, 06/04/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 06:49
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा गुरुवार, 06/05/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.
लेखनविषय:
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा..