तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले. यामध्ये अवैदिक तत्वज्ञान परंपरा बौद्ध, चार्वाक, जैन यांची मूळ विचारसरणी सांगितली आहे.तद्नंतर वैदिक परंपरेतील अभ्यासकांची मते सांगितली आहेत.
१.बौद्ध तत्वज्ञान
बुद्धाला यात वैद्यराज म्हणून भूमिका पार पाडावयाची होती म्हणून 'अनुत्तर भिषक्को (निष्णात वैदय) आणि 'अनुत्तर सल्लकतो (कुशल शल्यकार) असे म्हटले हे समजले कारण बुद्धांनी जीवनातील (मनाच्या) व्याधीचे, रोगाचे निदान करून त्यावर रामबाण उपाय सुचविलेला आहे- दुःखमय जीवन हा एक आजार आहे, असे सांगून त्या आजाराचे मूल कारण शोधून ते नष्ट करण्याचे चार आर्यसत्य सांगितले
१.जीवन दुः कामय आहे (दुःखम)
२)दु:खाला कारण आहे, तृष्णा जगण्याची धडपड
३) दुःख नाहीसे करता येते.
४) दुःखमुक्तीचे मार्ग (आर्य अष्टांग मार्ग)
(सम्यक -दृष्टी, संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती,समाधी)
तसेच सम्यक शील, प्रज्ञा, समाधी,
'भवतु सब्ब मंगलम्।'
२.इहवादी चार्वाक
चार्वाकांचे तत्वज्ञान समजण्यासाठी कोणताही विशिष्ट अस्सल ग्रंथ अगर साधन नाही इतर दर्शनांवर लिहिलेल्या ग्रंथांमधून चार्वाकाचे खंडन करतांना ली चार्वाकसूत्रे विखुरलेली दिसतात. बहुजनांसाठी उपयुक्त असे विचार यात आहेत असा वाद्यांचा दावा असल्याने याला कदाचित लोकायत असे म्हटलेले आहे.
चार्वाकाने 'प्रत्यक्ष' हे एकमेव प्रमाण मानतांना सुखवादाचा पुरस्कार केलेला आहे. आपल्या सुखवादाचा उपदेश करीत असताना चार्वाक म्हणतात,
'यावज्जीवेत सुकां जीवेत नास्ति मृत्योरगोचरः ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः ।।
"जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत सुखाने जगावे. मृत्यु कोणालाही टळलेला नाही. भस्म होणारा देह पुनः कोठून येणार?"
परंतू चार्वाकाचे विरोधक चार्वाकाच्या 'सुखाने जगा' म्हणून सांगणाऱ्या श्लोकातील दुसऱ्या चरणाचा विपर्यास करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हा निंदात्मक श्लोक पुढील प्रमाणे सांगितला गेला.
यावज्जीवेल सुखं जीवेत ऋणं कृत्वा धृतं पिवेता भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।
मूळ श्लोकात 'मृत्यु कोणालाही सुटलेला नाही' असे असताना त्या ठिकाणी 'कर्ज काढून तूप प्या' अशी शब्दरचना करण्यात आली आहे.
चार्वाकांनी पक्क्या इहवादी, जडवादी विचारांची इहवादी तार्कीक मांडणी केली. जी समाज जीवनाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक वाटतेच तसेच विज्ञानाला पोषक अशी विचारसरणी या तत्त्वज्ञानात आढळते.
३.विश्व आणि मानव-जैन दृष्टिकोन
विश्वाच्या निर्मितीविषयी जैनमतानुसार विश्वाला कर्ता म्हणून कोणीही नाही. हे विश्व अनादि वा स्वयंचलित असल्यामुळे विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही- उत्पाद, व्यय व धौव्य यांनी युक्त्त असे द्रव्य आणि स्वयंचलित कर्माचा नियम ही दोन मानल्याने विश्वाचा व्यवस्थित उलगडा होऊ शकतो.
जैनदर्शन हे माणसाच्या सामर्थ्यावर भर देते.दृढ इच्छाशक्तीने, आत्मसामर्थ्याने, तपोबलाने विशिष्ट शक्तीच्या सहकार्याविना स्वतःच्या माणूस खताच्या उत्कर्षाचा रचनाकार होऊ शकतो
- मोक्षप्राप्तीसाठी श्रद्धेय अशी सात तत्त्वे व नऊ पदार्थ सांगितले आहेत.
ही सात तत्त्वे म्हणजेच जीव, अजीव, आस्त्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष • पाप व पुण्य आस्त्रवाचे दोन विशेष प्रकार आहेत. आस्त्रव म्हणजे कर्मकणांचा ओघ आणि हा ओघ आवरणे म्हणजे संवर होय.
मोक्ष प्राप्तीची तीन साधने
सम्यग्दर्शन-जी- सात तत्वांवरील संपूर्ण श्रद्धा
सम्यरज्ञाना - जीव व अजीव याच्या स्वरुपाचे ययार्थ ज्ञान
सम्यक्चरित्र - शुद्ध आचरण त्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय ब्रम्हचर्य व अपरिग्रह ही पाच व्रते सांगितली आहेत.
***********
या तीन अवैदिक दर्शनानंतर वैदिक तत्वज्ञानाची व त्याच्या अभ्यासकांची चिकित्सा केली आहे,
वैदिक तत्त्वज्ञानात तत्त्वज्ञान व धर्म यांचा मिलाफ दिसतो. केवळ बुद्धीप्रामाण्यवादाचा आश्रय घेऊन तात्त्विक मीमांसा करता येणार नाही, तर्काच्या मर्यादा ओलांडून पुढे गेल्याशिवाय सद्वस्तूचे ज्ञान होणार नाही. याच कारणास्तव ते ज्ञानसाधनेत साक्षात्काराला, अपरोक्षनुभवाचा महत्त्व देत 'ईश्वर तत्व मान्य करतात.
१.अमृतानुभवातील तत्त्वज्ञान
वेदान्तातील सर्व सांप्रदाय साक्ष्य प्रमाणाला विशेष महत्त्व देतात. परंतू ज्ञानदेव स्वानुभवाचीच कास धरतात',त्यांचे अनुभव शब्दाबद्ध झाले हेच करे भाग्य म्हणावे लागेल.
'परी शिवे का श्रीवल्लभे । बोलिले येणेोचि लोगे। मानू ले हे लागे । न बोलताचि । [अमृ. ३-९२]
आत्मतत्त्व सिदध करण्यासाठी प्रमाणांची आवश्यकता नाही, कारण ले स्वयंसिदध व स्वयंप्रकाशी आहे. उलट ज्ञानाची प्रमाणेच आत्म तत्त्वाने प्रकाशित होतात सूर्यप्रकाशामुळे अनेक वस्तू पाहता येतात, पण या वस्तू काही सूर्याला प्रकाशित करीत नाहीत. तद्वन आत्मतत्त्वाने प्रकाशित होणारी प्रमाणे आत्मतत्त्व सिद्ध करु शकत नाहीत (अमृ.५-१६).
तैसा आत्मा सच्चिदानंदू । आपण या आपणसिदधु आता काय ते शब्द। तयाचे आता ।।
शब्द आत्मतत्त्वाकडे आपले लक्ष वेधू शकतात, पण आत्मतत्व सिद्ध करू शकत नाहीत.
अविद्येचे खंड्ण करताना ज्ञानेश्वर म्हणतांत (अमृ ७-२५) 'काजवा ज्याप्रमाणे अंधाराचा आश्रय घेऊनच आपला प्रकाश मिरवीत असतो, त्याप्रमाणे अज्ञान खोटेपणाचा आश्रय घेऊन अनादि होत असते. असे असताना अज्ञानाचा व आल्याचा संबंध कसा घडेल ?
आत्म्यावाचून अज्ञान स्वतंत्र रहात नाही, म्हणून अज्ञान केवळ शब्दमात्रच आहे, त्याला स्वरुपसत्ता नाही असे ज्ञानदेव प्रतिपादन करतात
मग जगताचे स्वरुप कसे मानावे. ज्ञानदेव म्हणतात आत्मरुपाला एकाकी रमले नाही, अनेक रूपाने प्रकट होण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्याने जगत् निर्माणकेले (अमृ. ७-१२८) आत्मतत्त्व स्वतः हाच विस्तारित होते आणि जगद्रूप धारण करते, दृष्टया वस्तु रुपात स्वतःला पाहू शकतो.
'एकोडहं बहुस्याम प्रजायेय ।'
जीव-जगतः शिवशक्त्यात्मक आत्मतत्त्वाचा चिदविलास आहे. जगत् मिथ्या नाही तर सद्स्वरुपीच आहे.
२.द्वैती तत्वज्ञान
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात
प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान.
अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही.
अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत .
शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा.
द्वैती तत्त्वात पहिले मूलतत्व स्वतंत्र आहे तर दुसरे त्याचा परिणाम अस्वतंत्र आहे.
एकमेव स्वतंत्र असे ब्रम्हतत्त्व नित्य । परिपूर्ण दोषरहित, स्वयंप्रकाशी व सद्गुणपूर्ण आहे. विष्णु अद्वितीय आहे."
सर्व उत्पत्ती - स्थिती-लयाचे कारण विष्णू होय .
मध्वाचार्याची केवलद्वैतम्य सूत्रांचा निराळा अर्थ सांगितला आहे. उदा०
१.अथतो ब्रम्ह जिज्ञासा - नारायणाच्या प्रसादावाचून मोक्ष नाही. प्रसादज्ञानाशिवाय शक्या नाही म्हणून ब्रम्हजिज्ञासा करावी.
२.जन्माद्यस्य यतः
३.शास्त्रयो नित्वात-श्रुति व स्मृती सहाय्याने प्रमाण ठरते-मध्वाचार्य यांनुसार शास्त्राचे प्रामाण्य विष्णूच्या ठिकाणी आहे.
पुढे द्वैतामध्ये विविध भेद-जीव ईश्वर, जड-ईश्वर, जीव परस्परभेद जड-ईश्वर, जड परस्पर भेद सांगून त्यांतील अनेकता ,प्रभाव प्रमाण,परात्तंबित्व दाखवले. तुर्या ही अवस्था जीवितासाठी नाहीतर ईश्वराचे ते ययार्थ स्वरूप वर्णन मानले आहे.
ईश्वर सेवा अंकन, नामकरण, भजन द्वारे होते. विष्णूप्रसादाने विष्णूषदापर्यंत पोहचण्याचा असल्याने मोक्षाचा अधिकार सर्वांना आहे. यात समाजातील कोणतीही उच्चनीच नाही, समता आहे.
३.कृष्णमूर्ती यांचे अंतर्यामाचा फुलोरा व मृत्यूची संकल्पना
*जे. कृष्णमूर्ती सांगातात हे अद्वैती नाही पण मी' चा अभ्यास म्हणून इथे
सांबधिक 'मी 'त्वाचा जेव्हा अभाव होतो तेव्हा अंतमामाचा फुलोरा प्रफ्फुलित होतो. यासाठी प्रथम विचारांची कास सोडली पाहिजे, पाहिजे. याचा अर्थ सर्व ब क्षेत्रांत विचार वर्ज्य केले पाहिजेत असे नव्हे. तर धर्मा धनार्जन करून चरितार्थ चालविण्यासाठी, तांत्रिक व व्यावहारिक कारणांसाठी विचारांचा आधार घेतलाच पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन, परस्पर संबंधामध्ये
जेव्हा विचार येतात तेव्हा विचारच विषारी व घातकी होतात त्यांच्यामुळे प्रेमाचे अस्तित्व संपते. हे समजून घेऊन विचारांना खो दिल्याने शाश्वत प्रेमाचे दर्शन होते.
*मृत्यू
मृत्यू म्हणजे काय हे समजून घ्यावयाचे असेल तर सर्व अनुभव, सर्व ज्ञान, सर्व आठवणी पुसून टाकल्या पाहिजेत. याचा अर्थ वस्तुस्थितीच्या आठवणी, वास्तवाचे अनुभव पुसून टाकणे असे मात्र नव्हे. आपले घर, घरी जायचा रस्ता, अशा व्यावहारिक आठवणी, व्यावहारिक स्मृती पुसून टाकावयाच्या नाहीत तर मनातील भावनात्मक सुरक्षिततेला चिकटून रहाण्याच्या आठवणी, सुरक्षेसाठी ज्या आठवणी उराशी बाळगलेल्या असतात त्या सर्वांचे ओझे झटकून टाकणे होय. अशा प्रकारच्या सर्व भावना पुसून टाकणे होय. प्रत्येक दिवस हा नवा, ताजा, प्रसन्न असे झाले तर जिवंतपणीच मृत्यूही जाणता येतो. अशा प्रसंगी मन पूर्णपणे रिक्त झालेले असते. एकापरीने मनाचा अंतच झालेला असतो. जेव्हां मृत्यू अनुभवावयास मिळतो तेव्हांच अगदी नवीन असे कांहीतरी उदयाला येते. मृत्यू म्हणजे ज्ञातापासून मुक्ती होय. म्हणूनच कृष्णजी एक विचार नेहमी मांडतात तो म्हणजे 'दुसऱ्याच्या व स्वतःच्या सत्तेतून मुक्त होणे म्हणजे कालच्या प्रत्येक गोष्टीचा मृत्यू होणे. म्हणजे मग तुमच मन नेहमी ताजं, टवटवीत, चिरतरूण, निरागस उत्साहात आणि उत्कट भावनेनं भरलेलं राहील' (The Life & Death of Krishnamurti महाराष्ट्र टाईम्स, २३-४-९५)
४.जी. आर. मलकानी-एक अद्वैत वेदान्ती
मलकानी यांनी दृष्टिसृष्टीवाद स्वीकारला की,
जगताची निर्मिती ही ज्ञातृसापेक्ष होत असल्याने जगत निर्मितीसाठी ईश्वराची आवश्यकता भासत नाही म्हणून डॉ. मलकानी यांनी ईश्वरी कल्पनेचा त्याग केला आहे. त्यांनी सत्-चित्- आनंदा था ब्रम्ह लक्षणांचा परस्पर संबंधही विशद केला. ही लक्षणे नकारदर्शी मानली. सत्मुळे ब्रम्ह मायास्वरुपी नाही आणि चित् मुळे तुम्ह जडस्वरूपी नाही. आनंदामुळे ते कलेशकारी नाही हे सिद्ध होते, ब्रम्ह ही सत्यस्वरुवी आहे ते सान्त नाही.
ही चारही सत्तचित् आनंद ब्रम्ह व्याकरणदृष्टाभावरूप असली तरी तार्किकदृष्ट्या अभावरुप आहेत.
************
उपसंहारामध्ये धर्म आणि विज्ञान याचा विचार केला आहे.
धर्म व विज्ञान दोन्ही मानवनिर्मित आहेत. दोन्हींत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो. एक श्रद्धा तर दुसरे इंद्रियानुभव । बुद्धीवरच भिस्त असणारे. पण दोन्ही जीवन सुकर करु शकते.
विज्ञानाने मानवाने भौतिकदृष्ट्या जग जवळ आणले व एक मानवी प्रतिसृष्टीच निर्माण केली. विज्ञानाचे अत्युच्च शिखर गाठल्याने धर्माची गरज काय, तो हळू हळू नष्ट होणार?
धर्म - ( धृ. - धारण करणे) याचा उगम निश्चित सांगता येता नसला तरी इंद्रियांच्या मर्यादा उल्लंघन जाण्याचा मानवी प्रयत्न म्हणजे धर्म). याच्या विकासाच्या तीन अवस्था गॅलोवेने सांगितल्या.
१.जमातीचा धर्म - प्राचीन खेळ्यांमध्ये अदृश्य शक्तीला संतुष्ट करण्यासाठी धार्मिक विधींची सक्ती होती. धर्मतत्त्वांविरुद्ध वर्तन करणाऱ्यास कडक शासन होत.
२.राष्ट्रीय धर्म - अनेक शोध लागले. शेतीची कल्पना सूचली. माणूस स्थिरावला, पूर्वीच्या अदृश्य शक्तींना खूप महत्त्व आले. जे गुण मानवात नाही, ते ईश्वरात असलात ही कल्पना आली. त्यातून राज्य वराष्ट्राची दैवले गरली. धार्मिक परंपरा मूर्ती, मंदिरे, यज्ञयाग, जप, तप, तंत्र-मंत्र गोष्टी धमाल शिरल्या, कला, स्थापत्य, काव्य, नृत्य इ. साहाय्याने धार्मिक भावना जागृत करण्याचा प्रयत्न होऊ लागला.
३.वैश्विक धर्म - प्रगल्भ विचारसरणीमुळे धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. सामाजिक समता, आर्थिक स्वायत्तता, राजकीय स्वातंत्र्य इ.चा धर्माशी संघर्ष नाही असे मानले.
नीतीशास्त्रापासून धर्मशास्त्र अलग झाले नीती संपन्न धार्मिक असलाच पाहिजे असे नाही. कलाही संगीतकला, नृत्यकला, शिल्पकला अशा स्वतंत्र विकसित झाल्या.
* ही अवस्था म्हणजे धर्म ही व्यक्तिगत बाब मानण्याची !धर्म व्यक्तीला शांतता व समाधान देण्याचे साधन झाले जमात, राष्ट्र बंधने झुगारुन...
मग विज्ञान युगात समाजाला धर्माची गरज आहे का? या संबंधात आइन्स्टाइन म्हणतो,
Science has progressed to far in present day society. There must emerge a new Spiritual civilizationto make full use of it'
विचार, उच्चार व आचारातून श्रेष्ठ मूल्यांचे दर्शन घडले पाहिजे म्हणजे spiritual civilization उदयास येईल.
संदर्भ -तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत
लेखक- डॉ .बी. आर जोशी
वाचने
6794
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक
In reply to प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
मस्त प्रश्न!
In reply to प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
@चंसुकू
In reply to मस्त प्रश्न! by सोत्रि
संदर्भ...
In reply to @चंसुकू by Bhakti
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने
In reply to संदर्भ... by सोत्रि
हम्म
In reply to ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने by Bhakti
हम्म
In reply to हम्म by सोत्रि
धन्यवाद!
In reply to हम्म by Bhakti
अच्छा,समजलं.
In reply to धन्यवाद! by सोत्रि
सुंदर प्रतिसाद आणि मूळ लेख
In reply to हम्म by Bhakti
आक्षेप
In reply to @चंसुकू by Bhakti
अविद्या
In reply to आक्षेप by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to मस्त प्रश्न! by सोत्रि
नक्की, तुमच्या chatgpt
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
जरूर.
In reply to नक्की, तुमच्या chatgpt by सोत्रि
भारतीय लेखकांवरील एक आक्षेप
ज्जे बात!
In reply to भारतीय लेखकांवरील एक आक्षेप by चंद्रसूर्यकुमार
नाही ओ सोत्री, सर्वच
In reply to ज्जे बात! by सोत्रि
अपवाद
In reply to नाही ओ सोत्री, सर्वच by Bhakti
सामान्य?
In reply to ज्जे बात! by सोत्रि
द्वैतवादामध्ये ज्ञानाची
अर्थबोध
In reply to द्वैतवादामध्ये ज्ञानाची by Bhakti
लेख आणी प्रतिसाद वाचून.....
मृत्यू +१
In reply to लेख आणी प्रतिसाद वाचून..... by कर्नलतपस्वी
एव्हढं सगळं रामायण लिहीलं...
या विषयावरील प्राथमिक व्हिडीओ
पुस्तक परिचय आहे.
तूच आहेस तुझ्या जिवनाचा
राजीव साने यांचे तत्त्वज्ञान स्वतः निर्मिलेले सुंदर आहे.
त्यांची व्याख्यानेही यूट्यूबवर आहेत
In reply to राजीव साने यांचे तत्त्वज्ञान स्वतः निर्मिलेले सुंदर आहे. by मारवा
त्यांच्या लेखनात कमालीची
त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे.सान्यांचे मराठीचे मला कळेल अशा मराठीत रुपांतर करताना नाका-तोंडात फेस येतो.