मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्विक कॉमर्स आणि आपण

आकाश खोत ·

विवेकपटाईत Mon, 07/21/2025 - 13:56
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्‍यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.

गवि Mon, 07/21/2025 - 14:11
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते. फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय. आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू. या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या. पण चक्र चालूच राहते.

In reply to by गवि

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 14:28
बरोबर आहे.  नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.  सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.  मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.  शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं. 

In reply to by आकाश खोत

गवि Mon, 07/21/2025 - 14:53
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे. बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...

In reply to by गवि

कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे. त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे. त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 14:40
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्‍याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.

अभ्या.. Mon, 07/21/2025 - 17:28
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा. नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती? डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अ‍ॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा. राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्‍या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.

In reply to by अभ्या..

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 20:53
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.

In reply to by अभ्या..

बहुतेक वेळा आपण फुकटातली अ‍ॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अ‍ॅप च्या वापरासाठी ते सगळे अ‍ॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही. यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अ‍ॅनालिसिस करायला ए आय आहेच. त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल,अ‍ॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे. यापुढे जाउन काही उदाहरणे -- ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.

श्वेता व्यास Mon, 07/21/2025 - 18:03
काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे. लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली. बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)

कर्नलतपस्वी Mon, 07/21/2025 - 18:06
पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत. आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 21:03
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.  नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.  आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते. माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच. 

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:38
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)

कर्नलतपस्वी Tue, 07/22/2025 - 14:57
खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो. संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।। तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।। पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र || रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज|| या चक्रव्यूहातून सुटका नाही. सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन

लेख आवडला.
दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्‍यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.

विवेकपटाईत Mon, 07/21/2025 - 13:56
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्‍यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.

गवि Mon, 07/21/2025 - 14:11
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते. फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय. आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू. या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या. पण चक्र चालूच राहते.

In reply to by गवि

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 14:28
बरोबर आहे.  नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.  सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.  मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.  शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं. 

In reply to by आकाश खोत

गवि Mon, 07/21/2025 - 14:53
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे. बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...

In reply to by गवि

कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे. त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे. त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 14:40
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्‍याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.

अभ्या.. Mon, 07/21/2025 - 17:28
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा. नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती? डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अ‍ॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा. राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्‍या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.

In reply to by अभ्या..

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 20:53
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.

In reply to by अभ्या..

बहुतेक वेळा आपण फुकटातली अ‍ॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अ‍ॅप च्या वापरासाठी ते सगळे अ‍ॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही. यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अ‍ॅनालिसिस करायला ए आय आहेच. त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल,अ‍ॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे. यापुढे जाउन काही उदाहरणे -- ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.

श्वेता व्यास Mon, 07/21/2025 - 18:03
काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे. लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली. बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)

कर्नलतपस्वी Mon, 07/21/2025 - 18:06
पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत. आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 21:03
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.  नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.  आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते. माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच. 

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:38
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)

कर्नलतपस्वी Tue, 07/22/2025 - 14:57
खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो. संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।। तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।। पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र || रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज|| या चक्रव्यूहातून सुटका नाही. सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन

लेख आवडला.
दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्‍यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते. पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स".

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

विवेकपटाईत ·

कपिलमुनी Mon, 07/21/2025 - 10:45
तात्या घाबरले .. तिकडे पुतीन पण घबरले होते .. मग पापाने वॉर रुकवा दी आणि लोकांना बाहेर काढले .. तिकडे जिन्पिंग ला हगवण लागली .. त्याने डोक्लाम , लडाख मधून माघार घेतली.. शेठनी कामच असल्या जबर्‍या केला आहे..

In reply to by कपिलमुनी

उत्तम. पराकोटीच्या व्यक्ती द्वेषाचे अजून एक उत्तम उदाहरण ! मोदींचा इतका द्वेष करायचा की ते करताना ऑपरेशन सिन्दुर करणाऱ्या सैन्यच्या कारवाई वर देखील प्रश्न चिन्ह उभे राहील ! नवरा मेला तरी चालेल , पण सवत रंडकी व्हायला पाहिजेल =)))) मिसळपाव प्रशासन हे असले प्रतिसाद खपवून घेते ह्यातूनच त्यांचा एकांगीपणा उघड होतो ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कपिलमुनी Mon, 07/21/2025 - 14:09
आर्मी च्या मोठ्या ऑफिसर ने सांगितले आहे की आपण काही जेट्स गमावले . यात ट्रंपचा काय संबंध ? बाकी लडाख विषयी भाजप खासदारनेच सांगितला आहे. पापाने वॉर रुकवा दी क्या ? असा प्रश्न जयशंकर ला विचारला तेव्हाचे उत्तर ऐका .. उगा फुकाच्या बाता मारू नका बाकी सैन्याचा अभिमान हवा तेवढाच आहे .

In reply to by कपिलमुनी

दूत्त दूत्त. अशा कोतालद्या मोदी शलकाल ला आपन 2029 मदे शतेथून काली केच्चु अन् त्याचं घल उन्हात बांधू. तो पल्यांत ललत लाहु काय ना काय कालन कादून ! :))))

In reply to by कपिलमुनी

ते की. 2029 पर्यंत रुदाली कशाला उगाच चालू ठेवा, पण काहीकाही लोकांना वाटतं की दिसेल तिथं मोदी भाजप ल शिव्या घालून काहीतरी क्रांती होणार आहे म्हणून आम्ही मजा घेतो ह्या रडक्या लोकांची. =)))) मागे पुलवामाच्या वेळेस सुरू झालेली रुदाली कुठे हवेत विरून गेली देव जाणे .

In reply to by प्रसाद गोडबोले

आग्या१९९० Mon, 07/21/2025 - 14:11
विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची हवाई हद्द ओलांडल्याचे अधिकृतपणे जाहीर न केल्याने, पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय वैमानिक पकडले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. भारतीय मिडिया ' एक पाऊल पुढे ' असल्याने त्यांनी भारतीय हल्ल्याने कराची, लाहोर आणि इस्लामाबाद बेचिराख झाल्याच्या बातम्या दिल्या, खोटे व्हिडिओ दाखवले होते. अख्खी भारतीय मिडिया पाकिस्तानात घुसल्याने भारतीय हद्दीचे वृत्तांकन करायला कोणाला वेळ होता? उगाच बेडकाला फुगवायचा बालिशपणा बंद करा.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत Mon, 07/21/2025 - 14:03
असे आहे, पुतीन ज्या भागातून भारतीय विद्यार्थ्यांना काढायचे होते तिथे युद्ध विराम ठेवले होते. हे जागतिक सत्य आहे. डोकलाम लद्दाख कुठे ही भारताने माघारी घेतली नाही उलट क्षेत्र वाढविले आहे. चीनला चांगला धडा शिकविला आहे. भारताची द्रोण आणि मिसाईल सुरक्षा प्रणाली इजराईल अमेरिका पेक्षा उत्तम ठरली आहे. याचा प्रत्यय जगाला आला. भारतीय शस्त्रांची विक्री अनेकपट वाढणार. बाकी मोदी विरोधात मानसिक रोगांची लक्षणे अनेकांत दिसून येऊ लागली आहे.

In reply to by कपिलमुनी

झालं मोदी द्वेषाची , भाजप द्वेषाची गाडी हिंदू द्वेषाकडे वळाली, आता फायनल स्थानक ब्राह्मण द्वेष यायला किती वेळ लागतो ते पाहू :))))

साधी गोष्ट आहे. समजा आपली विमाने पडली असती तर ती एक तर आपल्या हद्दीत पडली असती नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत पडली असती. पाकिस्तानच्या हद्दीत आपले विमान पडले असते तर त्यांनी त्या विमानाचे अवशेष सगळ्या जगाला दाखविले असते आणि बघा आम्ही भारताचे कसे नुकसान केले हे मोठ्या अभिमानाने सांगितले असते. तसे झाले नाही. त्यामुळे आपले एकही विमान तिकडे पडले नाही असे म्हणायला जागा आहे. समजा भारतात आपले विमान पडले असते तर ते कुठे पडले असते? पंजाबात दाट लोकवस्ती आहे त्यामुळे कुठेही विमान पडले असते तरी ते लपवून ठेवता येणे अशक्य. गावातील/शहरातील लोकांनी विमान पडल्याविषयी त्यावेळेस नाही तरी आता तरी एक अवाक्षर उच्चारले नाही हे कसे शक्य आहे? समजा काश्मीरमध्ये विमान पडले आणि ते कोणीही राहात नाही अशा ठिकाणी कोणत्या तरी दरीत पडले तरी त्यात मारल्या गेलेल्या वैमानिकांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या परत न येण्याविषयी कोणीही काहीही बोलले नाही? समजा कुटुंबिय जाहीरपणे बोलले नसले असे गृहित धरले तरी शेजारी-पाजारी, मित्र वगैरे पण कोणी काही बोलले नाही? गेला बाजार आपल्या अती उत्साही मिडियातील कोणीतरी कॅमेरे घेऊन त्यांच्या घरी पोचलेच असते. ते पण झालेले नाही? बाकी पूंछ किंवा अन्य ठिकाणी एल.ओ.सी वर गोळीबारात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांची नावे आली होती. मग याच वैमानिकांची नावे आपले सैन्यदल जाहीर करणार नाही यावर कसा विश्वास ठेवायचा? याचाच अर्थ आपले एकही विमान पडले नाही हे म्हणायला जागा आहे. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर या धर्तीवर वर लिहिलेल्या मुद्द्यांपैकी एका तरी मुद्द्यावर आपले एक किंवा अनेक विमाने पडली होती हे सिध्द करावे नाहीतर आपले एकही विमान पडले नाही हे मान्य करायचे आव्हान डापु गँगला देत आहे. दुसरे म्हणजे केरळमध्ये मागच्या महिन्यात उतरलेले एफ-३५ विमान कोणतेही रडार पकडू शकत नाही असा बराच गाजावाजा झाला होता पण ते आपल्या रडार यंत्रणेने पकडले. त्यामुळे त्या अदृश्यतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तात्या ती विमाने जगभर तितक्या सहजपणे विकू शकणार नाहीत हे पण तात्या पिसाळायचे एक कारण असू शकेल. बाकी ट्रम्पतात्या जी बडबड करत असतात ती नक्की कोण गांभीर्याने घेते हे पण बघायलाच हवे. तेव्हा तात्यांना फाट्यावर मारावे आणि त्यांच्या तालावर डोलणार्‍या भारतातील विरोधी पक्षांनाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी Mon, 07/21/2025 - 14:25
व्हाटस अ‍ॅप मधून कधी बाहेर येणार देव जाणे ! एफ-३५ आपल्या रडार यंत्रणेने पकडले--- एक चांगला संदर्भ दाखवा . बाकी ट्रंप सोडा .. भारतीय आर्मी ऑफिसर १ बाबत काय म्हणणे आहे ?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 14:49
चंसूकु अजूनही भारताचे *एकही* विमान पडले नाही असा आपला समज आहे की ते तसे असावे अशी आपली इच्छा आहे? आपल्या इच्छेचा अर्थात वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. प्रत्यक्ष तीन्ही दलाच्या प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर कबुली देऊनही आपला समज जर आपण कायम ठेवत असाल, तर भाजप समर्थकांच्या डोक्यात नक्की कोणता केमीकल लोच्या झाला असावा याची प्रचंड उत्सुकता आहे.

मुळात, विमान पाडल्याबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत. ११ मे रोजीच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये DGAO एअर मार्शल भारती यांनी, विमान पाडल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले: > "Losses are part of any operation." ही एक प्रकारची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. त्यानंतर CDS अनिल चौहान यांनी Shangri-La Dialogue मध्ये स्पष्टपणे कबूल केले की, > "Indian Air Force had suffered aircraft losses in the early phase of Operation Sindoor." तसेच त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी काही टॅक्टिकल चुका झाल्या, पण तिसऱ्या दिवशी त्या दुरुस्त करून हल्ला पुन्हा सुरू करण्यात आला. इंडोनेशियामध्येही आपण तेच मान्य केलं. संरक्षणदूत कॅप्टन शिवकुमार यांनी सांगितले की, राजकीय निर्बंधांमुळे सुरुवातीला फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी होती, त्यामुळे काही नुकसान झालं. बरं समजा की ऑपरेशन सुरू असताना शत्रूला माहिती जाऊ नये म्हणून सांगितलं नाही, तर आता अडीच महिने महिने उलटले आहेत.आज तरी सत्य सांगायला हवं. आणि जर लपवायचंच असेल, तर ते तरी नको का स्पष्ट सांगायला? > “ की आमची विमान पडलीच नाहीत म्हणून. किंवा पाडले ते इस्राएली 'डेकॉय' होते आणि ते राफेल विमानाची सिग्नेचर emits करत होते" आपण सत्य लपवल्या मुळे किंवा स्पष्ट उत्तर न दिल्याचा फायदा पाकिस्तान आणि चीन पद्धतशीर पणे घेत आहेत. एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.
अगदी सपाटून मार खाल्ला तरी पाकडे आपणच जिंकलो असाच दावा करणार. तो त्यांचा स्वभाव आहे. ते सगळे सोडा पण... जर आपले विमान/विमाने पडले/पडली असतील तर त्याचे अवशेष मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया वगैरे कुठेच कसे दिसत नाहीत? गेलाबाजार फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर एखादे रील, एखादा मनुष्य म्हणत आहे की मी विमान पडताना बघितले किंवा त्याचे अवशेष बघितले असे काहीही अजून पर्यंत आले कसे नाही? समजा आपले विमान/विमाने पडले/पडली तर त्यात एकही वैमानिक जखमी झाला नाही/मारला गेला नाही? तसे झाले असते तर कुठेतरी आतापर्यंत नक्कीच आले असते. जर बरखा दत्त १९९९ मध्ये कारगीलला जाऊन तिकडे काय चालले आहे हे बातम्यांमधून कव्हर करत असेल तर २०२५ मध्ये असलेच कोणीतरी पंजाब/काश्मीरात पडलेल्या तथाकथित विमानाच्या अवशेषापर्यंत पोचू शकले नाही आणि देशात कुठेतरी राहायला असलेल्या त्या वैमानिकाच्या घरी पोचले नाहीत हे शक्य वाटते का? आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. परत एकदा- अनेक कोटी लोक राहात असलेल्या प्रदेशात आपले विमान समजा पडले ते कोणालाच कळले नाही हे कोडे कसे सोडवायचे? म्हणूनच बाप दाखव नाहीतर श्राध्द कर असे म्हटले आहे. विमान कुठे पडले, त्याचे अवशेष कुठे आहेत, त्या अवशेषांचे काय झाले, ते सगळे कोणीच कसे बघितले नाही, त्या वैमानिकांचे काय झाले, त्यांची नावे कुठेच कशी आली नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपली विमाने पडली आहेत हे मान्य करायला काहीच हरकत नाही. तो बाप दाखवा नाहीतर श्राध्द करा. पण आतापर्यंत तो बाप अस्तित्वात आहे या दिशेने अगदी कणभरही पुरावा मिळालेला नाही त्यामुळे मी तर श्राध्द करायला तयारच आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Tue, 07/22/2025 - 20:29
>> आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. तुंम्ही आपल्या सेनाधिकार्‍यांनी केलेल्या विधानांवर सरळ अविश्वास दाखवत आहात व तुमच्या मनात 'असे काहीसे असावे' असा जो समज आहे त्याला 'बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल' असे सोयीस्कर विज्ञानवादी वाटावं असं नांव देत आहात. खरे तर हे आपल्या सेनाधिकार्‍यांच्या कथनावर अविश्वास दाखवणे आहे. एवढा प्रमाद जर कोणी तुमच्या विरूध्द मते असलेल्या कोणी केला असता तर तुंम्ही त्यावर एक दोन पानांचा तरी शाब्दीक हल्ला केला असता :-)

सुक्या Tue, 07/22/2025 - 11:48
साधारणपणे एखादा देशातील माणुस, माझा देश आहे त्याच्या ईभ्रतीला तडा जाईल असे मी करणार नाही किंवा माझ्या देशाच्या लष्कराच्या कारवाईवर शंका घेणार नाही वगेरे वगेरे करतो. ईथे मात्र भारतावर / भारतीय सेनेवर / भारतिय नेत्यांवर शिंतोडे उडवण्याची कोण शर्यत लागली आहे. आणी त्यातुन काय सिध्द करणार आहेत? गावात एखादा ड्रोन कुणाच्या डोक्यावर पडला तर त्याची ब्रेकिंग न्युज होते. १० / १५ व्हिडीयो बाजारात येतात. ईथे आख्खे विमान पडल्याची बात आहे .. त्यतही एक नाही ३ ते ५ लढाऊ विमान पडले / पाडले अशी बात आहे. फक्त बाता आहेत. कुठे पडले / कुणी पाडले ? वैमाणिकाचे काय झाले ? कुणालाही एकही बात दिसली नाही? पाकड्यांनाही नाही. मग उगा आपले राहुल गांधी सारखे शेंडा ना बुडखा बाता करण्यात काय हशील? राहीली बात पाकड्यांची. ईतका मार खाउनही त्यांनी किती लोक मेले किती दहशत्वादी मेले किती सैनिक मेले. किती विमाने जमीनीवर खराब झाली ? दिली का माहीती ? ईतके होउनही मीच जिंकलो म्हणुन बाता मारत आहेत. मग त्यांचे खरे मानता का? उगाच आपला फालतु अजेंडा चालवायला काळ / वेळ / स्थळ याचे भान असायला हवे. अजुन एक. आपण भारताचे नागरीक आहोत , टॅक्स देतो तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्याच पाहिजे असे नाही. काही बाबी फक्त आणी फक्त ठराविक लोकांनाच माहीती असतात. आपल्याला त्या माहीती मिळाव्यात असा आपला हेका असेल तर ज्यांना ती माहीती मिळते त्या लोकांच्या समकक्ष हुद्या वर जावे. सगळी माहीती मिळेल. नगरपालीकेत पाणीपुरवठा विभागात काम करत असाल तर ती माहीती मिळवण्यात आपण पात्र नाही हे समजुन गप्प बसावे.

In reply to by सुक्या

कपिलमुनी Tue, 07/22/2025 - 11:52
अहो काका , आर्मीचे मोठे मोठे उछ्पदस्थ अधिकारी ह्या बाता मारत आहेत . सामान्य नागरीकांनी नक्की काय खरे अहे हे विचारले तर काय चुकले ? प्रत्येक वेळी प्रश्न विचारणार्याला अजेंडा , डावे , देशद्रोही ठरवून गप्प्प करायचे हा भाजपी अजेंडा आहे.. हा सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव म्हणायचा का ?

In reply to by कपिलमुनी

सुक्या Tue, 07/22/2025 - 11:59
मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी सामान्य नागरीकाला मिळाल्याच हव्या हा हेका बरा नाही. आपल्याला ती माहीती हवी असेल तर त्या हुद्यावर पोहोचा ... हाय काय अन नाय काय. बाकी अजेंडा वगेरे चालु द्या. मला शष्प फरक पडत नाही. मी लॉजीकल बाता करतो. सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव आहे असे तुम्हाला वाटते. तो तुमचा विचार आहे. खरा असेलच असे नाही. पुन्हा तेच सांगतो. जर उच्च व गुप्त माहीती हवी असेल तर त्या प्रकारचे अधिकारी व्हा. ते होता येत नसेल तर कांगावा करु नका.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत Wed, 07/23/2025 - 21:19
जनतेला सर्व माहिती आर्मीने प्रेस कॉन्फेस करून सर्व डिटेल देशातील जनतेला दिलेली आहे.आपली आर्मी खोटं बोलते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? जे राजनेता मुंबई हल्ला पाकिस्तानने नाही आरएसएसने केला असा प्रचार करणारे होते त्यांना आतंकी मरण्याचे निश्चित दुःख झाले असेल. अशा नेत्यांच्या बोलण्यावर फक्त अशिक्षित माणूस विश्वास ठेवू शकतो शिक्षित नाही. पाकिस्तानला झालेली नुकसान विपक्षीदलांना आवडलेले नाही. मसूद अजहरचा वीडियो आहे हम लाशे लाशे उठाते उठाते थक गए . हैं.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.youtube.com/watch%3Fv%3D1md2ES_iCR4&ved=2ahUKEwikmsnnqNOOAxVTh1YBHQjxKB4QFnoECCYQAQ&usg=AOvVaw3Y9_XKVyGwvDLV0mCz9zPu

लोकशाही म्हणजे काय तर - कारगिल युद्धाच्या वेळेला बरखा दत्त भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल पाकिस्तानला न्यूज चॅनेल मार्फत लाईव्ह अपडेट देत होती ती खरी लोकशाही - 2611 च्या वेळेस जसे बरखा मुंबईतील पोलिसांचे चालू प्रक्षेपण करून टेररिस्ट ना बित्तंबातमी पोहचवत होती ती खरी लोकशाही ह्या शेटजी भटजी सरकारने गळा घोटाळा लोकशाहीचा. त्यांनी कसं विमानावर gps अन् कॅमेरे लाऊन ह्यांना लाईव्ह अपडेट द्यायला हवे होते. कारण भारतीय सैन्याची विमाने पडल्याचा आनंद पाकिस्तान पेक्षा इंडियात जास्त झालाय . इकडे जास्त TRP मिळाला असता. =))))

पाकिस्तानकडून आपलं विमान पाडल्याचा दावा झाल्यानंतर आपल्या जनरल्सनी दिलेल्या विधानांकडे पाहिलं, तर त्यातून प्रत्यक्षात आपलं विमान पडल्याचं स्पष्ट होतं. मग तुम्ही भारतप्रेमी असाल वा भारतविरोधी, ह्यांन काहीच फरक पडत नाही. यात आनंद मानण्यासारखंही काही नाही.पण इतक्या जबाबदारीच्या पदावरचे अधिकारी जर असं वक्तव्य करत असेतील, तर त्यावर विश्वास ठेवायला हवाच. त्यात पुन्हा अजित डोवाल आणि CDS जनरल चौहान यांच्यातही वक्तव्यांमध्ये विसंगती दिसून आली आहे, म्हणजे यामध्ये एकसंघपणा नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांवर दोष ठेवण्यात काही अर्थ नाही. वरती चंद्रसूर्याकुमार यांनी म्हटल्याप्रमाणे, जर यामागे काही मोठं मुत्सद्देगिरीचं कारण असेल, जसं की राफेलचे स्रोतकोड मिळवण्यासाठी डसॉल्टवर दबाव टाकणं, तर ती वेगळी बाब आहे. पण यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, हे देखील तितकंच खरं. विमान पडले असेल, तर ते जंगलात असो वा अन्यत्र – ते पूर्णपणे लपवणं शक्य वाटत नाही. अर्थात, हा फक्त एक अंदाज आहे. कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही, पण यावेळी मात्र आपली मीडिया अत्यंत बेजबाबदारपणे वागली, हे नक्की. आठवा, ८ मेची रात्र – त्या वेळी जणू पाकिस्तान जिंकून इराणसुद्धा घेतोय की काय, असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. अशा गैरजबाबदार चॅनेल्स वर कोणतीही कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. जगभरात आपलं हसू होत असणार. यादरम्यान, बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली, हे लक्षात घ्यायला हवं.

In reply to by रात्रीचे चांदणे

कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही,
आणि
बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली,
ह्या दोन विधानातूनच कळायचं ते कळलं. असो.

सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 11:05
एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप किंवा दावे यात न पडता माझ्या लष्करी मित्रांच्या एकंदर चर्चेतून मला जे आकलन झाले ते असे आहे. यातील सत्य आणि असत्य काही काळाने दृगोच्चर होईलच. सुरवातीला सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार न करता भारतीय वायुदलाला भारतीय हद्दीतच राहूनच (STAND OFF) दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरून दहशतवादी तळावर हल्ले करायला सांगितले. सहसा वायुदल हल्ला करते तेंव्हा SEAD / DEAD करून मग हल्ल्याला सुरुवात करतात. SEAD, or Suppression of Enemy Air Defenses, involves disrupting or neutralizing enemy air defense systems, while DEAD, or Destruction of Enemy Air Defenses, refers to the physical elimination of these threats. सरकारने नियंत्रण रेषा पार करू नका आणि पाकिस्तानी लष्करी/ वायुदलाच्या लक्ष्यावर थेट हल्ला करू नका असा हुकूम दिला होता. यामुळे भारतीय हद्दीतच राहून आपण त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले केले परंतु SEAD / DEAD ना केल्याने पाकिस्तानी वायुदलाने आपल्या विमानांवर पाकिस्तानी हवाई हद्दीत राहून दूर पल्ल्याच्या PL १५ या क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील बहुसंख्य क्षेपणास्त्रे आपण पाडली यामुळे त्यांचे अवशेष भारतात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. माझा असा कयास आहे कि काही विमानांचे या क्षेपणास्त्रांमुळे नुकसान झाले असावे पण एकही विमान पडले नाही किंवा एखाद दोन विमाने पडली असली तरी सर्व वैमानिक त्यातून इजेकट झाल्यामुळे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत. वायू दलाच्या हवाई हल्ल्याच्या महानिदेशकांच्या विधानाचा अर्थ मी तरी असा काढलेला आहे. पाकिस्तानी पत्रकार काय म्हणतात त्यात काहीही अर्थ नाही कारण १९४७, १९६५ आणि कारगिल या युद्धात पाकिस्तानला जबरदस्त विजय मिळाला असेच तेथील इतिहासात शिकवले जाते. १९७१ मध्ये मात्र प्रत्यक्ष ९३ हजार युद्धकैदी पकडून पाकिस्तानी सैन्याला शरणागती यायला लागले हे त्यांना नाकारता येत नाहीये. असो या विमानांच्या नुकसानीनंतर वायुदलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली वर हल्ला करण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून पाकिस्तानवर भारताने जबरदस्त हल्ला चढवून त्यांच्या वायुदलाचे निदान ३०-३५ % नुकसान केले. S -४०० प्रणालीच्या क्षेपणास्त्राने भारताने पाकिस्तानचे AWACS विमान पाकिस्तानच्या हद्दीत साधारण ३५० किमी आतमध्ये उडवून दिल्यामुळे पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरली आहे. कारण आता पाकिस्तानमध्ये कोणतीच जागा सुरक्षित नाही. पाकिस्तानची STRATEGIC DEPTH बद्दल असलेली सुरक्षेची भावना आता नष्ट झाली आहे. याशिवाय पाकिस्तानकडे असलेली चिनी HQ ९ हि क्षेपणास्त्र प्रणाली कुचकामी ठरवली आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेली अमेरिकी रडार आपण उडवून दिली आहेत. Indian forces targeted and destroyed multiple Pakistani air defense radar systems, including some recently acquired American AN/TPS-77 radars, during a series of strikes. The destruction of these radars significantly weakens Pakistan's air defense network, potentially impacting its ability to detect and respond to aerial threats. ब्रम्होस क्षेपणास्त्राने केलेला प्रचंड विध्वंस पाहून पाकिस्तानने ताबडतोब शस्त्रसंधी साठी विनवण्या केल्या. मग ते तात्यांनी सांगितल्यामुळे झाले कि नाही हा प्रश्न भारताच्या दृष्टीने गौण आहे. नोबेल पारितोषिकासाठी हपापलयामुळे तात्या बरीच बेताल बडबड करत आहेत असे दिसते. एका अंदाजाप्रमाणे पाकिस्तानचे निदान २० हजार कोटी (भारतीय) रुपयांची युद्धसामग्री नष्ट झाली आहे. हे नुकसान त्यांना भरून काढणे आवश्यकच आहे कारण भारताने त्यांची हवाई संरक्षण प्रणालीच उध्वस्त केली आहे( ज्यात रडार क्षेपणास्त्रे आणि त्यांची नियंत्रण प्रणाली येते) (पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून १००० कोटी रुपयांचे कर्ज ( एकंदर ७००० कोटी पैकी) यावर्षी मिळाले आहे. भारतीय विमानांचे झालेले नुकसान (हि सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे) सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे वायुदलाला दोष देणे शक्य नाही. जर एक राफाल आणि एक मिराज २००० पडले असतील तर ती विमाने का पडली आणि त्यांच्या संरक्षण प्रणालीत काय त्रुटी आहे हे आपले वायू द्लच नव्हे तर फ्रान्सचे सरकारसुद्धा जाणून घेण्यास उत्सुक असेल. कारण हि सुरक्षाप्रणालीतील हि भेग ताबडतोब बुजवणे आवश्यक असेल. यामुळेच याबद्दलची बातमी उघड करणे म्हणजे शत्रूला (पाकिस्तान आणि चीन) तुमच्या गुप्त गोष्टी उघड करण्यासारखे आहे. बाकी उंदीर मारण्याच्या विभागात कामाला असलेल्या लुंग्या सुंग्याला विमाने पडली आहेत किंवा किती विमाने पाडली गेली आहेत हे सांगण्याची मुळी सुद्धा आवश्यकता नाही. आपण केवळ एक मत देतो म्हणून आपल्याला सर्वच जाणून घ्यायचा हक्क आहे असे दावे करणाऱ्या भंपक लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत Wed, 07/23/2025 - 13:06
फ्रान्सच्या राफेलला बदनाम करता आलं तरच अमेरिकेची एफ16 ची इज्जत शिल्लक राहील. त्यामुळे भारताची विमाने पडली हा मुद्दा सतत ऐरणीवर आणणे अमेरिकन सरकारला अत्यावश्यक आहे. त्यासाठी ते सर्वप्रकारे प्रयत्न करताहेत. मात्र त्यासाठी कोणताही ठोस पुरावा अमेरिकेकडे नाही. चीन भारताच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असूनही चीनकडेही त्याचा पुरावा नाही. अन्यथा अमेरिका व चीनने त्याचा पुरेपुर वापर केला असता. याबाबतीत चीन व अमेरिका यांचे हेतू सारखेच आहेत. सिंदूरमुळे या दोघांच्या शस्त्रविक्रीवर परिणाम होणार आहे. तर भारत एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होतो आहे. ते दोघांनाही नको असणार. यासाठी भारतातील विरोधी पक्षांचा कळत नकळत उपयोग होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच संसद अधिवेशना अगोदर तात्यांनी व्यक्तव्य केलेले दिसते आहे. थोडक्यात राफेल विषयी शंका निर्माण करण्यासाठी लागणारा टीआरपीचा योग्य काळ अमेरिकेने शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ६१००० कोटींचे फ्रान्सबरोबर डिल होण्याची शक्यता असताना अमेरिकेने एवढे तरी करायलाच पाहिजे होते, असे वाटते. एखादं विमान कोसळले तर त्याचा ठावठिकाणा नकाशावरून ताबडतोब नाहीसा होतो. त्यामुळे विमान पडल्याचे लागलीच कळते. कसे पडले हे कळत नसले तरी अंदाजे लोकेशन काढता येऊ शकते व त्यानुसार उपग्रहातर्फे आणखी खोदकाम करता येऊ शकते. पण विमानाचे नुकसान होऊनही ते कसेबसे विमानतळावर उतरले तर मात्र विमान शेवटपर्यंत नकाशात दिसत राहिल्याने ते पडल्याचे पुरावे राहात नाहीत. आपल्या विमानांचे थोडे बहुत नुकसान होऊनही ती कोणत्यातरी विमानतळावर उतरली असावीत असा कयास आहे.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत Wed, 07/23/2025 - 21:27
भारतात सर्वांत जवळ मोबाईल आहे जर एखादे विमान नष्ट झाले आणि पायलट इजेक्ट करून भारतात उतरला तरी तो व्हिडिओ लोकांनी काढला असता आणि जिथे पायलट उतरले असते तिथे लोक पोचले असते. व्हिडीओ काढले असते. बाकी मोदी सरकारने सैन्याला पूर्णपणे सूट होती त्यामुळे नियंत्रण रेखा पार केली /नाही केली हा प्रश्न येतच नाही. बाकी पूर्वीच्या सरकारने कधीही आता की हल्ल्याचा बदला घेतला नाही. आतंकींना वाचविण्याचे कामच केले आहे. २००६ च्या हल्ल्यात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी लोकांची ग्वाही उशिरा घेतली या कारणांनी उच्च न्यायालयाने ग्वाही केल्या नाही. पोलिसांनी तपास नियमानुसार केला नाही. यावरून ही स्पष्ट होते.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2025 - 11:41
मुळात पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्यासाठी दहशतवाद हा युद्धापेक्षा बराच स्वस्त पर्याय शोधला होता. पण आता भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला कि गेल्या कितीतरी वर्षात झाले नाही एवढे नुकसान झाले आहे. पण यामुळे पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सहजासहजी सोडेल हि अपेक्षा करणे बालिशपणा होईल. भारताशी कायम युद्धमान परिस्थिती ठेवणे हे तेथील लष्कराला सवतासुभा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय पाकिस्तानचे चार तुकडे एकत्र ठेवण्यासाठी भारतद्वेष हा एक मोठा दुवा आहे. बांगला देशाच्या निर्मितीनंतर धार्मिक अस्मिता देश एकसंध ठेवण्यासाठी पुरा पडत नाही हे स्पष्ट झाले आहे. पंजाबी वर्चस्व आणि त्यातून होणारी गळचेपी यामुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे प्रांत पाकिस्तानपासून फुटून निघण्यास उत्सुक आहेत. एकदा युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण केली कि राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण करता येतो आणि मग भाषिक वांशिक आणि पंथिक अस्मिता आपोआप मागे पडते. यामुळे पाकिस्तान दहशतवाद, काश्मीर प्रश्न, भारत द्वेष कधीही सोडणार नाही हे सत्य आहे. ऑपरेशन सिंदूर मुळे भारत पाकिस्तानात किती खोलवर हल्ला करू शकतो आणि किती विध्वंस करू शकतो याची झलक पाकिस्तानला मिळाली आहे आणि त्यापासून चीनची तथाकथीत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाही हे हि कळून चुकले आहे त्यामुळे पाकिस्तान निदान कारगिल सारखे दु:साहस करणार नाही असे वाटते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/24/2025 - 09:03
ट्रंप आत्तापर्यंत चोवीस वेळा ( संदर्भ लोकसभा चर्चा ) माझ्या मध्यमस्थीमुळे अणुयुद्धाची टळली असे म्हणाले. आणि काल पंचवीसाव्या वेळी अणूयुद्धाची शक्यता मध्यस्थीमुळे टळली असे म्हणाले. '' त्यांनी पाच विमाने पाडली. तरी दोघे माघार घेण्यास तयार नव्हते. मी त्यांना फोन केला आणि तुम्ही असेच करत राहिलात तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आता तुमच्याशी व्यापार होणार नाही. ते दोन्ही शक्तिशाली अण्वस्त्रधारी देश आहेत आणि याचा परिणाम काय झाला असता, कोणास ठाऊक ? पण, मी ते थांबवले'' -महाराष्ट्र टाईम्स आमचा भारत देश कोणत्याही परिणामाला भित नाही. हमारी बहुमत वाली सरकार है, आम्ही कोणाकडेही लक्ष देत नाही. आम्ही जगभर फिरलो भले आम्हाला किरकोळ युद्धात कोणी साथ दिली नसेल, दिली नाही. आमचं परराष्ट्र धोरण गंडले असेल पण आम्ही सर्व जगाला पुरुन उरु. विषय संपला. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2025 - 09:21
ट्रम्प तात्या वरच विश्वास ठेवायचा म्हटल्यावर विषयच संपला. "नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे" या मनोवृत्तीला उतारा नाही. चालू द्या

In reply to by सुबोध खरे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/24/2025 - 09:37
आपल्या अ-विचारांचा जो 'परिमळु दरवळत' असतो तोही हवाहवासा वाटतो. आता वयपरत्वे माणूस म्हटला की, एवढे तेवढे काही गुण-दोष असायचेच. माऊलींचा अभंग ऐकतोय. अविचिता परिमळु झुळकला अळुमाळु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2025 - 11:28
ऐका ऐका माउलींच्या कृपेने द्वेषाची जळमटे आणि अंधार दूर होवोत आणि सद्विचारांचा प्रकाश पडो.

रात्रीचे चांदणे गुरुवार, 07/24/2025 - 20:03
तात्या वर विश्वास ठेवायचा तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना समजावा लागेल. मुळात आपलं उद्धीष्ट पूर्ण झाल्यावर चाकमकी बंद करण्याचा निर्णय योग्य वाटतोय.

कपिलमुनी Mon, 07/21/2025 - 10:45
तात्या घाबरले .. तिकडे पुतीन पण घबरले होते .. मग पापाने वॉर रुकवा दी आणि लोकांना बाहेर काढले .. तिकडे जिन्पिंग ला हगवण लागली .. त्याने डोक्लाम , लडाख मधून माघार घेतली.. शेठनी कामच असल्या जबर्‍या केला आहे..

In reply to by कपिलमुनी

उत्तम. पराकोटीच्या व्यक्ती द्वेषाचे अजून एक उत्तम उदाहरण ! मोदींचा इतका द्वेष करायचा की ते करताना ऑपरेशन सिन्दुर करणाऱ्या सैन्यच्या कारवाई वर देखील प्रश्न चिन्ह उभे राहील ! नवरा मेला तरी चालेल , पण सवत रंडकी व्हायला पाहिजेल =)))) मिसळपाव प्रशासन हे असले प्रतिसाद खपवून घेते ह्यातूनच त्यांचा एकांगीपणा उघड होतो ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कपिलमुनी Mon, 07/21/2025 - 14:09
आर्मी च्या मोठ्या ऑफिसर ने सांगितले आहे की आपण काही जेट्स गमावले . यात ट्रंपचा काय संबंध ? बाकी लडाख विषयी भाजप खासदारनेच सांगितला आहे. पापाने वॉर रुकवा दी क्या ? असा प्रश्न जयशंकर ला विचारला तेव्हाचे उत्तर ऐका .. उगा फुकाच्या बाता मारू नका बाकी सैन्याचा अभिमान हवा तेवढाच आहे .

In reply to by कपिलमुनी

दूत्त दूत्त. अशा कोतालद्या मोदी शलकाल ला आपन 2029 मदे शतेथून काली केच्चु अन् त्याचं घल उन्हात बांधू. तो पल्यांत ललत लाहु काय ना काय कालन कादून ! :))))

In reply to by कपिलमुनी

ते की. 2029 पर्यंत रुदाली कशाला उगाच चालू ठेवा, पण काहीकाही लोकांना वाटतं की दिसेल तिथं मोदी भाजप ल शिव्या घालून काहीतरी क्रांती होणार आहे म्हणून आम्ही मजा घेतो ह्या रडक्या लोकांची. =)))) मागे पुलवामाच्या वेळेस सुरू झालेली रुदाली कुठे हवेत विरून गेली देव जाणे .

In reply to by प्रसाद गोडबोले

आग्या१९९० Mon, 07/21/2025 - 14:11
विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची हवाई हद्द ओलांडल्याचे अधिकृतपणे जाहीर न केल्याने, पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय वैमानिक पकडले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. भारतीय मिडिया ' एक पाऊल पुढे ' असल्याने त्यांनी भारतीय हल्ल्याने कराची, लाहोर आणि इस्लामाबाद बेचिराख झाल्याच्या बातम्या दिल्या, खोटे व्हिडिओ दाखवले होते. अख्खी भारतीय मिडिया पाकिस्तानात घुसल्याने भारतीय हद्दीचे वृत्तांकन करायला कोणाला वेळ होता? उगाच बेडकाला फुगवायचा बालिशपणा बंद करा.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत Mon, 07/21/2025 - 14:03
असे आहे, पुतीन ज्या भागातून भारतीय विद्यार्थ्यांना काढायचे होते तिथे युद्ध विराम ठेवले होते. हे जागतिक सत्य आहे. डोकलाम लद्दाख कुठे ही भारताने माघारी घेतली नाही उलट क्षेत्र वाढविले आहे. चीनला चांगला धडा शिकविला आहे. भारताची द्रोण आणि मिसाईल सुरक्षा प्रणाली इजराईल अमेरिका पेक्षा उत्तम ठरली आहे. याचा प्रत्यय जगाला आला. भारतीय शस्त्रांची विक्री अनेकपट वाढणार. बाकी मोदी विरोधात मानसिक रोगांची लक्षणे अनेकांत दिसून येऊ लागली आहे.

In reply to by कपिलमुनी

झालं मोदी द्वेषाची , भाजप द्वेषाची गाडी हिंदू द्वेषाकडे वळाली, आता फायनल स्थानक ब्राह्मण द्वेष यायला किती वेळ लागतो ते पाहू :))))

साधी गोष्ट आहे. समजा आपली विमाने पडली असती तर ती एक तर आपल्या हद्दीत पडली असती नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत पडली असती. पाकिस्तानच्या हद्दीत आपले विमान पडले असते तर त्यांनी त्या विमानाचे अवशेष सगळ्या जगाला दाखविले असते आणि बघा आम्ही भारताचे कसे नुकसान केले हे मोठ्या अभिमानाने सांगितले असते. तसे झाले नाही. त्यामुळे आपले एकही विमान तिकडे पडले नाही असे म्हणायला जागा आहे. समजा भारतात आपले विमान पडले असते तर ते कुठे पडले असते? पंजाबात दाट लोकवस्ती आहे त्यामुळे कुठेही विमान पडले असते तरी ते लपवून ठेवता येणे अशक्य. गावातील/शहरातील लोकांनी विमान पडल्याविषयी त्यावेळेस नाही तरी आता तरी एक अवाक्षर उच्चारले नाही हे कसे शक्य आहे? समजा काश्मीरमध्ये विमान पडले आणि ते कोणीही राहात नाही अशा ठिकाणी कोणत्या तरी दरीत पडले तरी त्यात मारल्या गेलेल्या वैमानिकांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या परत न येण्याविषयी कोणीही काहीही बोलले नाही? समजा कुटुंबिय जाहीरपणे बोलले नसले असे गृहित धरले तरी शेजारी-पाजारी, मित्र वगैरे पण कोणी काही बोलले नाही? गेला बाजार आपल्या अती उत्साही मिडियातील कोणीतरी कॅमेरे घेऊन त्यांच्या घरी पोचलेच असते. ते पण झालेले नाही? बाकी पूंछ किंवा अन्य ठिकाणी एल.ओ.सी वर गोळीबारात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांची नावे आली होती. मग याच वैमानिकांची नावे आपले सैन्यदल जाहीर करणार नाही यावर कसा विश्वास ठेवायचा? याचाच अर्थ आपले एकही विमान पडले नाही हे म्हणायला जागा आहे. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर या धर्तीवर वर लिहिलेल्या मुद्द्यांपैकी एका तरी मुद्द्यावर आपले एक किंवा अनेक विमाने पडली होती हे सिध्द करावे नाहीतर आपले एकही विमान पडले नाही हे मान्य करायचे आव्हान डापु गँगला देत आहे. दुसरे म्हणजे केरळमध्ये मागच्या महिन्यात उतरलेले एफ-३५ विमान कोणतेही रडार पकडू शकत नाही असा बराच गाजावाजा झाला होता पण ते आपल्या रडार यंत्रणेने पकडले. त्यामुळे त्या अदृश्यतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तात्या ती विमाने जगभर तितक्या सहजपणे विकू शकणार नाहीत हे पण तात्या पिसाळायचे एक कारण असू शकेल. बाकी ट्रम्पतात्या जी बडबड करत असतात ती नक्की कोण गांभीर्याने घेते हे पण बघायलाच हवे. तेव्हा तात्यांना फाट्यावर मारावे आणि त्यांच्या तालावर डोलणार्‍या भारतातील विरोधी पक्षांनाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी Mon, 07/21/2025 - 14:25
व्हाटस अ‍ॅप मधून कधी बाहेर येणार देव जाणे ! एफ-३५ आपल्या रडार यंत्रणेने पकडले--- एक चांगला संदर्भ दाखवा . बाकी ट्रंप सोडा .. भारतीय आर्मी ऑफिसर १ बाबत काय म्हणणे आहे ?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 14:49
चंसूकु अजूनही भारताचे *एकही* विमान पडले नाही असा आपला समज आहे की ते तसे असावे अशी आपली इच्छा आहे? आपल्या इच्छेचा अर्थात वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. प्रत्यक्ष तीन्ही दलाच्या प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर कबुली देऊनही आपला समज जर आपण कायम ठेवत असाल, तर भाजप समर्थकांच्या डोक्यात नक्की कोणता केमीकल लोच्या झाला असावा याची प्रचंड उत्सुकता आहे.

मुळात, विमान पाडल्याबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत. ११ मे रोजीच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये DGAO एअर मार्शल भारती यांनी, विमान पाडल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले: > "Losses are part of any operation." ही एक प्रकारची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. त्यानंतर CDS अनिल चौहान यांनी Shangri-La Dialogue मध्ये स्पष्टपणे कबूल केले की, > "Indian Air Force had suffered aircraft losses in the early phase of Operation Sindoor." तसेच त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी काही टॅक्टिकल चुका झाल्या, पण तिसऱ्या दिवशी त्या दुरुस्त करून हल्ला पुन्हा सुरू करण्यात आला. इंडोनेशियामध्येही आपण तेच मान्य केलं. संरक्षणदूत कॅप्टन शिवकुमार यांनी सांगितले की, राजकीय निर्बंधांमुळे सुरुवातीला फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी होती, त्यामुळे काही नुकसान झालं. बरं समजा की ऑपरेशन सुरू असताना शत्रूला माहिती जाऊ नये म्हणून सांगितलं नाही, तर आता अडीच महिने महिने उलटले आहेत.आज तरी सत्य सांगायला हवं. आणि जर लपवायचंच असेल, तर ते तरी नको का स्पष्ट सांगायला? > “ की आमची विमान पडलीच नाहीत म्हणून. किंवा पाडले ते इस्राएली 'डेकॉय' होते आणि ते राफेल विमानाची सिग्नेचर emits करत होते" आपण सत्य लपवल्या मुळे किंवा स्पष्ट उत्तर न दिल्याचा फायदा पाकिस्तान आणि चीन पद्धतशीर पणे घेत आहेत. एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.
अगदी सपाटून मार खाल्ला तरी पाकडे आपणच जिंकलो असाच दावा करणार. तो त्यांचा स्वभाव आहे. ते सगळे सोडा पण... जर आपले विमान/विमाने पडले/पडली असतील तर त्याचे अवशेष मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया वगैरे कुठेच कसे दिसत नाहीत? गेलाबाजार फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर एखादे रील, एखादा मनुष्य म्हणत आहे की मी विमान पडताना बघितले किंवा त्याचे अवशेष बघितले असे काहीही अजून पर्यंत आले कसे नाही? समजा आपले विमान/विमाने पडले/पडली तर त्यात एकही वैमानिक जखमी झाला नाही/मारला गेला नाही? तसे झाले असते तर कुठेतरी आतापर्यंत नक्कीच आले असते. जर बरखा दत्त १९९९ मध्ये कारगीलला जाऊन तिकडे काय चालले आहे हे बातम्यांमधून कव्हर करत असेल तर २०२५ मध्ये असलेच कोणीतरी पंजाब/काश्मीरात पडलेल्या तथाकथित विमानाच्या अवशेषापर्यंत पोचू शकले नाही आणि देशात कुठेतरी राहायला असलेल्या त्या वैमानिकाच्या घरी पोचले नाहीत हे शक्य वाटते का? आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. परत एकदा- अनेक कोटी लोक राहात असलेल्या प्रदेशात आपले विमान समजा पडले ते कोणालाच कळले नाही हे कोडे कसे सोडवायचे? म्हणूनच बाप दाखव नाहीतर श्राध्द कर असे म्हटले आहे. विमान कुठे पडले, त्याचे अवशेष कुठे आहेत, त्या अवशेषांचे काय झाले, ते सगळे कोणीच कसे बघितले नाही, त्या वैमानिकांचे काय झाले, त्यांची नावे कुठेच कशी आली नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपली विमाने पडली आहेत हे मान्य करायला काहीच हरकत नाही. तो बाप दाखवा नाहीतर श्राध्द करा. पण आतापर्यंत तो बाप अस्तित्वात आहे या दिशेने अगदी कणभरही पुरावा मिळालेला नाही त्यामुळे मी तर श्राध्द करायला तयारच आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Tue, 07/22/2025 - 20:29
>> आपल्या सेनाधिकार्‍यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. तुंम्ही आपल्या सेनाधिकार्‍यांनी केलेल्या विधानांवर सरळ अविश्वास दाखवत आहात व तुमच्या मनात 'असे काहीसे असावे' असा जो समज आहे त्याला 'बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल' असे सोयीस्कर विज्ञानवादी वाटावं असं नांव देत आहात. खरे तर हे आपल्या सेनाधिकार्‍यांच्या कथनावर अविश्वास दाखवणे आहे. एवढा प्रमाद जर कोणी तुमच्या विरूध्द मते असलेल्या कोणी केला असता तर तुंम्ही त्यावर एक दोन पानांचा तरी शाब्दीक हल्ला केला असता :-)

सुक्या Tue, 07/22/2025 - 11:48
साधारणपणे एखादा देशातील माणुस, माझा देश आहे त्याच्या ईभ्रतीला तडा जाईल असे मी करणार नाही किंवा माझ्या देशाच्या लष्कराच्या कारवाईवर शंका घेणार नाही वगेरे वगेरे करतो. ईथे मात्र भारतावर / भारतीय सेनेवर / भारतिय नेत्यांवर शिंतोडे उडवण्याची कोण शर्यत लागली आहे. आणी त्यातुन काय सिध्द करणार आहेत? गावात एखादा ड्रोन कुणाच्या डोक्यावर पडला तर त्याची ब्रेकिंग न्युज होते. १० / १५ व्हिडीयो बाजारात येतात. ईथे आख्खे विमान पडल्याची बात आहे .. त्यतही एक नाही ३ ते ५ लढाऊ विमान पडले / पाडले अशी बात आहे. फक्त बाता आहेत. कुठे पडले / कुणी पाडले ? वैमाणिकाचे काय झाले ? कुणालाही एकही बात दिसली नाही? पाकड्यांनाही नाही. मग उगा आपले राहुल गांधी सारखे शेंडा ना बुडखा बाता करण्यात काय हशील? राहीली बात पाकड्यांची. ईतका मार खाउनही त्यांनी किती लोक मेले किती दहशत्वादी मेले किती सैनिक मेले. किती विमाने जमीनीवर खराब झाली ? दिली का माहीती ? ईतके होउनही मीच जिंकलो म्हणुन बाता मारत आहेत. मग त्यांचे खरे मानता का? उगाच आपला फालतु अजेंडा चालवायला काळ / वेळ / स्थळ याचे भान असायला हवे. अजुन एक. आपण भारताचे नागरीक आहोत , टॅक्स देतो तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्याच पाहिजे असे नाही. काही बाबी फक्त आणी फक्त ठराविक लोकांनाच माहीती असतात. आपल्याला त्या माहीती मिळाव्यात असा आपला हेका असेल तर ज्यांना ती माहीती मिळते त्या लोकांच्या समकक्ष हुद्या वर जावे. सगळी माहीती मिळेल. नगरपालीकेत पाणीपुरवठा विभागात काम करत असाल तर ती माहीती मिळवण्यात आपण पात्र नाही हे समजुन गप्प बसावे.

In reply to by सुक्या

कपिलमुनी Tue, 07/22/2025 - 11:52
अहो काका , आर्मीचे मोठे मोठे उछ्पदस्थ अधिकारी ह्या बाता मारत आहेत . सामान्य नागरीकांनी नक्की काय खरे अहे हे विचारले तर काय चुकले ? प्रत्येक वेळी प्रश्न विचारणार्याला अजेंडा , डावे , देशद्रोही ठरवून गप्प्प करायचे हा भाजपी अजेंडा आहे.. हा सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव म्हणायचा का ?

In reply to by कपिलमुनी

सुक्या Tue, 07/22/2025 - 11:59
मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी सामान्य नागरीकाला मिळाल्याच हव्या हा हेका बरा नाही. आपल्याला ती माहीती हवी असेल तर त्या हुद्यावर पोहोचा ... हाय काय अन नाय काय. बाकी अजेंडा वगेरे चालु द्या. मला शष्प फरक पडत नाही. मी लॉजीकल बाता करतो. सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव आहे असे तुम्हाला वाटते. तो तुमचा विचार आहे. खरा असेलच असे नाही. पुन्हा तेच सांगतो. जर उच्च व गुप्त माहीती हवी असेल तर त्या प्रकारचे अधिकारी व्हा. ते होता येत नसेल तर कांगावा करु नका.

In reply to by कपिलमुनी

विवेकपटाईत Wed, 07/23/2025 - 21:19
जनतेला सर्व माहिती आर्मीने प्रेस कॉन्फेस करून सर्व डिटेल देशातील जनतेला दिलेली आहे.आपली आर्मी खोटं बोलते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? जे राजनेता मुंबई हल्ला पाकिस्तानने नाही आरएसएसने केला असा प्रचार करणारे होते त्यांना आतंकी मरण्याचे निश्चित दुःख झाले असेल. अशा नेत्यांच्या बोलण्यावर फक्त अशिक्षित माणूस विश्वास ठेवू शकतो शिक्षित नाही. पाकिस्तानला झालेली नुकसान विपक्षीदलांना आवडलेले नाही. मसूद अजहरचा वीडियो आहे हम लाशे लाशे उठाते उठाते थक गए . हैं.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.youtube.com/watch%3Fv%3D1md2ES_iCR4&ved=2ahUKEwikmsnnqNOOAxVTh1YBHQjxKB4QFnoECCYQAQ&usg=AOvVaw3Y9_XKVyGwvDLV0mCz9zPu

लोकशाही म्हणजे काय तर - कारगिल युद्धाच्या वेळेला बरखा दत्त भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल पाकिस्तानला न्यूज चॅनेल मार्फत लाईव्ह अपडेट देत होती ती खरी लोकशाही - 2611 च्या वेळेस जसे बरखा मुंबईतील पोलिसांचे चालू प्रक्षेपण करून टेररिस्ट ना बित्तंबातमी पोहचवत होती ती खरी लोकशाही ह्या शेटजी भटजी सरकारने गळा घोटाळा लोकशाहीचा. त्यांनी कसं विमानावर gps अन् कॅमेरे लाऊन ह्यांना लाईव्ह अपडेट द्यायला हवे होते. कारण भारतीय सैन्याची विमाने पडल्याचा आनंद पाकिस्तान पेक्षा इंडियात जास्त झालाय . इकडे जास्त TRP मिळाला असता. =))))

पाकिस्तानकडून आपलं विमान पाडल्याचा दावा झाल्यानंतर आपल्या जनरल्सनी दिलेल्या विधानांकडे पाहिलं, तर त्यातून प्रत्यक्षात आपलं विमान पडल्याचं स्पष्ट होतं. मग तुम्ही भारतप्रेमी असाल वा भारतविरोधी, ह्यांन काहीच फरक पडत नाही. यात आनंद मानण्यासारखंही काही नाही.पण इतक्या जबाबदारीच्या पदावरचे अधिकारी जर असं वक्तव्य करत असेतील, तर त्यावर विश्वास ठेवायला हवाच. त्यात पुन्हा अजित डोवाल आणि CDS जनरल चौहान यांच्यातही वक्तव्यांमध्ये विसंगती दिसून आली आहे, म्हणजे यामध्ये एकसंघपणा नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांवर दोष ठेवण्यात काही अर्थ नाही. वरती चंद्रसूर्याकुमार यांनी म्हटल्याप्रमाणे, जर यामागे काही मोठं मुत्सद्देगिरीचं कारण असेल, जसं की राफेलचे स्रोतकोड मिळवण्यासाठी डसॉल्टवर दबाव टाकणं, तर ती वेगळी बाब आहे. पण यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, हे देखील तितकंच खरं. विमान पडले असेल, तर ते जंगलात असो वा अन्यत्र – ते पूर्णपणे लपवणं शक्य वाटत नाही. अर्थात, हा फक्त एक अंदाज आहे. कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही, पण यावेळी मात्र आपली मीडिया अत्यंत बेजबाबदारपणे वागली, हे नक्की. आठवा, ८ मेची रात्र – त्या वेळी जणू पाकिस्तान जिंकून इराणसुद्धा घेतोय की काय, असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. अशा गैरजबाबदार चॅनेल्स वर कोणतीही कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. जगभरात आपलं हसू होत असणार. यादरम्यान, बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली, हे लक्षात घ्यायला हवं.

In reply to by रात्रीचे चांदणे

कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही,
आणि
बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली,
ह्या दोन विधानातूनच कळायचं ते कळलं. असो.

सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 11:05
एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप किंवा दावे यात न पडता माझ्या लष्करी मित्रांच्या एकंदर चर्चेतून मला जे आकलन झाले ते असे आहे. यातील सत्य आणि असत्य काही काळाने दृगोच्चर होईलच. सुरवातीला सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार न करता भारतीय वायुदलाला भारतीय हद्दीतच राहूनच (STAND OFF) दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरून दहशतवादी तळावर हल्ले करायला सांगितले. सहसा वायुदल हल्ला करते तेंव्हा SEAD / DEAD करून मग हल्ल्याला सुरुवात करतात. SEAD, or Suppression of Enemy Air Defenses, involves disrupting or neutralizing enemy air defense systems, while DEAD, or Destruction of Enemy Air Defenses, refers to the physical elimination of these threats. सरकारने नियंत्रण रेषा पार करू नका आणि पाकिस्तानी लष्करी/ वायुदलाच्या लक्ष्यावर थेट हल्ला करू नका असा हुकूम दिला होता. यामुळे भारतीय हद्दीतच राहून आपण त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले केले परंतु SEAD / DEAD ना केल्याने पाकिस्तानी वायुदलाने आपल्या विमानांवर पाकिस्तानी हवाई हद्दीत राहून दूर पल्ल्याच्या PL १५ या क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील बहुसंख्य क्षेपणास्त्रे आपण पाडली यामुळे त्यांचे अवशेष भारतात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. माझा असा कयास आहे कि काही विमानांचे या क्षेपणास्त्रांमुळे नुकसान झाले असावे पण एकही विमान पडले नाही किंवा एखाद दोन विमाने पडली असली तरी सर्व वैमानिक त्यातून इजेकट झाल्यामुळे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत. वायू दलाच्या हवाई हल्ल्याच्या महानिदेशकांच्या विधानाचा अर्थ मी तरी असा काढलेला आहे. पाकिस्तानी पत्रकार काय म्हणतात त्यात काहीही अर्थ नाही कारण १९४७, १९६५ आणि कारगिल या युद्धात पाकिस्तानला जबरदस्त विजय मिळाला असेच तेथील इतिहासात शिकवले जाते. १९७१ मध्ये मात्र प्रत्यक्ष ९३ हजार युद्धकैदी पकडून पाकिस्तानी सैन्याला शरणागती यायला लागले हे त्यांना नाकारता येत नाहीये. असो या विमानांच्या नुकसानीनंतर वायुदलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली वर हल्ला करण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून पाकिस्तानवर भारताने जबरदस्त हल्ला चढवून त्यांच्या वायुदलाचे निदान ३०-३५ % नुकसान केले. S -४०० प्रणालीच्या क्षेपणास्त्राने भारताने पाकिस्तानचे AWACS विमान पाकिस्तानच्या हद्दीत साधारण ३५० किमी आतमध्ये उडवून दिल्यामुळे पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरली आहे. कारण आता पाकिस्तानमध्ये कोणतीच जागा सुरक्षित नाही. पाकिस्तानची STRATEGIC DEPTH बद्दल असलेली सुरक्षेची भावना आता नष्ट झाली आहे. याशिवाय पाकिस्तानकडे असलेली चिनी HQ ९ हि क्षेपणास्त्र प्रणाली कुचकामी ठरवली आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेली अमेरिकी रडार आपण उडवून दिली आहेत. Indian forces targeted and destroyed multiple Pakistani air defense radar systems, including some recently acquired American AN/TPS-77 radars, during a series of strikes. The destruction of these radars significantly weakens Pakistan's air defense network, potentially impacting its ability to detect and respond to aerial threats. ब्रम्होस क्षेपणास्त्राने केलेला प्रचंड विध्वंस पाहून पाकिस्तानने ताबडतोब शस्त्रसंधी साठी विनवण्या केल्या. मग ते तात्यांनी सांगितल्यामुळे झाले कि नाही हा प्रश्न भारताच्या दृष्टीने गौण आहे. नोबेल पारितोषिकासाठी हपापलयामुळे तात्या बरीच बेताल बडबड करत आहेत असे दिसते. एका अंदाजाप्रमाणे पाकिस्तानचे निदान २० हजार कोटी (भारतीय) रुपयांची युद्धसामग्री नष्ट झाली आहे. हे नुकसान त्यांना भरून काढणे आवश्यकच आहे कारण भारताने त्यांची हवाई संरक्षण प्रणालीच उध्वस्त केली आहे( ज्यात रडार क्षेपणास्त्रे आणि त्यांची नियंत्रण प्रणाली येते) (पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून १००० कोटी रुपयांचे कर्ज ( एकंदर ७००० कोटी पैकी) यावर्षी मिळाले आहे. भारतीय विमानांचे झालेले नुकसान (हि सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे) सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे वायुदलाला दोष देणे शक्य नाही. जर एक राफाल आणि एक मिराज २००० पडले असतील तर ती विमाने का पडली आणि त्यांच्या संरक्षण प्रणालीत काय त्रुटी आहे हे आपले वायू द्लच नव्हे तर फ्रान्सचे सरकारसुद्धा जाणून घेण्यास उत्सुक असेल. कारण हि सुरक्षाप्रणालीतील हि भेग ताबडतोब बुजवणे आवश्यक असेल. यामुळेच याबद्दलची बातमी उघड करणे म्हणजे शत्रूला (पाकिस्तान आणि चीन) तुमच्या गुप्त गोष्टी उघड करण्यासारखे आहे. बाकी उंदीर मारण्याच्या विभागात कामाला असलेल्या लुंग्या सुंग्याला विमाने पडली आहेत किंवा किती विमाने पाडली गेली आहेत हे सांगण्याची मुळी सुद्धा आवश्यकता नाही. आपण केवळ एक मत देतो म्हणून आपल्याला सर्वच जाणून घ्यायचा हक्क आहे असे दावे करणाऱ्या भंपक लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत Wed, 07/23/2025 - 13:06
फ्रान्सच्या राफेलला बदनाम करता आलं तरच अमेरिकेची एफ16 ची इज्जत शिल्लक राहील. त्यामुळे भारताची विमाने पडली हा मुद्दा सतत ऐरणीवर आणणे अमेरिकन सरकारला अत्यावश्यक आहे. त्यासाठी ते सर्वप्रकारे प्रयत्न करताहेत. मात्र त्यासाठी कोणताही ठोस पुरावा अमेरिकेकडे नाही. चीन भारताच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असूनही चीनकडेही त्याचा पुरावा नाही. अन्यथा अमेरिका व चीनने त्याचा पुरेपुर वापर केला असता. याबाबतीत चीन व अमेरिका यांचे हेतू सारखेच आहेत. सिंदूरमुळे या दोघांच्या शस्त्रविक्रीवर परिणाम होणार आहे. तर भारत एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होतो आहे. ते दोघांनाही नको असणार. यासाठी भारतातील विरोधी पक्षांचा कळत नकळत उपयोग होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच संसद अधिवेशना अगोदर तात्यांनी व्यक्तव्य केलेले दिसते आहे. थोडक्यात राफेल विषयी शंका निर्माण करण्यासाठी लागणारा टीआरपीचा योग्य काळ अमेरिकेने शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ६१००० कोटींचे फ्रान्सबरोबर डिल होण्याची शक्यता असताना अमेरिकेने एवढे तरी करायलाच पाहिजे होते, असे वाटते. एखादं विमान कोसळले तर त्याचा ठावठिकाणा नकाशावरून ताबडतोब नाहीसा होतो. त्यामुळे विमान पडल्याचे लागलीच कळते. कसे पडले हे कळत नसले तरी अंदाजे लोकेशन काढता येऊ शकते व त्यानुसार उपग्रहातर्फे आणखी खोदकाम करता येऊ शकते. पण विमानाचे नुकसान होऊनही ते कसेबसे विमानतळावर उतरले तर मात्र विमान शेवटपर्यंत नकाशात दिसत राहिल्याने ते पडल्याचे पुरावे राहात नाहीत. आपल्या विमानांचे थोडे बहुत नुकसान होऊनही ती कोणत्यातरी विमानतळावर उतरली असावीत असा कयास आहे.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत Wed, 07/23/2025 - 21:27
भारतात सर्वांत जवळ मोबाईल आहे जर एखादे विमान नष्ट झाले आणि पायलट इजेक्ट करून भारतात उतरला तरी तो व्हिडिओ लोकांनी काढला असता आणि जिथे पायलट उतरले असते तिथे लोक पोचले असते. व्हिडीओ काढले असते. बाकी मोदी सरकारने सैन्याला पूर्णपणे सूट होती त्यामुळे नियंत्रण रेखा पार केली /नाही केली हा प्रश्न येतच नाही. बाकी पूर्वीच्या सरकारने कधीही आता की हल्ल्याचा बदला घेतला नाही. आतंकींना वाचविण्याचे कामच केले आहे. २००६ च्या हल्ल्यात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी लोकांची ग्वाही उशिरा घेतली या कारणांनी उच्च न्यायालयाने ग्वाही केल्या नाही. पोलिसांनी तपास नियमानुसार केला नाही. यावरून ही स्पष्ट होते.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2025 - 11:41
मुळात पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्यासाठी दहशतवाद हा युद्धापेक्षा बराच स्वस्त पर्याय शोधला होता. पण आता भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला कि गेल्या कितीतरी वर्षात झाले नाही एवढे नुकसान झाले आहे. पण यामुळे पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सहजासहजी सोडेल हि अपेक्षा करणे बालिशपणा होईल. भारताशी कायम युद्धमान परिस्थिती ठेवणे हे तेथील लष्कराला सवतासुभा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय पाकिस्तानचे चार तुकडे एकत्र ठेवण्यासाठी भारतद्वेष हा एक मोठा दुवा आहे. बांगला देशाच्या निर्मितीनंतर धार्मिक अस्मिता देश एकसंध ठेवण्यासाठी पुरा पडत नाही हे स्पष्ट झाले आहे. पंजाबी वर्चस्व आणि त्यातून होणारी गळचेपी यामुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे प्रांत पाकिस्तानपासून फुटून निघण्यास उत्सुक आहेत. एकदा युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण केली कि राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण करता येतो आणि मग भाषिक वांशिक आणि पंथिक अस्मिता आपोआप मागे पडते. यामुळे पाकिस्तान दहशतवाद, काश्मीर प्रश्न, भारत द्वेष कधीही सोडणार नाही हे सत्य आहे. ऑपरेशन सिंदूर मुळे भारत पाकिस्तानात किती खोलवर हल्ला करू शकतो आणि किती विध्वंस करू शकतो याची झलक पाकिस्तानला मिळाली आहे आणि त्यापासून चीनची तथाकथीत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाही हे हि कळून चुकले आहे त्यामुळे पाकिस्तान निदान कारगिल सारखे दु:साहस करणार नाही असे वाटते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/24/2025 - 09:03
ट्रंप आत्तापर्यंत चोवीस वेळा ( संदर्भ लोकसभा चर्चा ) माझ्या मध्यमस्थीमुळे अणुयुद्धाची टळली असे म्हणाले. आणि काल पंचवीसाव्या वेळी अणूयुद्धाची शक्यता मध्यस्थीमुळे टळली असे म्हणाले. '' त्यांनी पाच विमाने पाडली. तरी दोघे माघार घेण्यास तयार नव्हते. मी त्यांना फोन केला आणि तुम्ही असेच करत राहिलात तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आता तुमच्याशी व्यापार होणार नाही. ते दोन्ही शक्तिशाली अण्वस्त्रधारी देश आहेत आणि याचा परिणाम काय झाला असता, कोणास ठाऊक ? पण, मी ते थांबवले'' -महाराष्ट्र टाईम्स आमचा भारत देश कोणत्याही परिणामाला भित नाही. हमारी बहुमत वाली सरकार है, आम्ही कोणाकडेही लक्ष देत नाही. आम्ही जगभर फिरलो भले आम्हाला किरकोळ युद्धात कोणी साथ दिली नसेल, दिली नाही. आमचं परराष्ट्र धोरण गंडले असेल पण आम्ही सर्व जगाला पुरुन उरु. विषय संपला. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2025 - 09:21
ट्रम्प तात्या वरच विश्वास ठेवायचा म्हटल्यावर विषयच संपला. "नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे" या मनोवृत्तीला उतारा नाही. चालू द्या

In reply to by सुबोध खरे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/24/2025 - 09:37
आपल्या अ-विचारांचा जो 'परिमळु दरवळत' असतो तोही हवाहवासा वाटतो. आता वयपरत्वे माणूस म्हटला की, एवढे तेवढे काही गुण-दोष असायचेच. माऊलींचा अभंग ऐकतोय. अविचिता परिमळु झुळकला अळुमाळु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2025 - 11:28
ऐका ऐका माउलींच्या कृपेने द्वेषाची जळमटे आणि अंधार दूर होवोत आणि सद्विचारांचा प्रकाश पडो.

रात्रीचे चांदणे गुरुवार, 07/24/2025 - 20:03
तात्या वर विश्वास ठेवायचा तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना समजावा लागेल. मुळात आपलं उद्धीष्ट पूर्ण झाल्यावर चाकमकी बंद करण्याचा निर्णय योग्य वाटतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले.

भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0

प्रसाद गोडबोले ·

कानडाऊ योगेशु Sun, 07/20/2025 - 14:43
पूर्ण जगच मटेरिअलिस्टीक ( मराठी शब्द?) होत आहे त्यात भाषा सुध्दा सध्याच्या मागणीनुसार वळण घेत आहे. प्रत्येक चॅनेल गणिक डान्स रिअ‍ॅलिटी शोज चे पेव फुटले आहे आणि त्यात किती चॅनेल वर शुध्द शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात हे पाहणे शोधाचे विषय ठरेल. त्यानुसार कसरत वाटावे लागणारे नृत्य व त्यांना पूरक गाणी हेच चलनी नाणे बनले आहे. खुद्द जावेद अख्तरे भाषेच्या र्‍हासाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याची अपत्ये हे हिंदी चित्रपट बनवतात पण त्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे आणि हिंदी चे स्क्रिट जे देवनागरी अथवा उर्दूत पाहण्याची जावेद अख्तरला सवय होती तिथे ही जनरेशन रोमन लिपी वापरुन हिंदी चित्रपटाचे संवाद अथवा कथानक लिहितात. अर्थात हे लोण घरोघरी पसरलेले आहेच.

धर्मराजमुटके Sun, 07/20/2025 - 17:19
भाषिक अधः पतनाचा मुद्दा सोडला तर गाणे एक प्रकारे आध्यात्मिक संदेशचं देत आहे. उद्याचा काही भरोसा नाही, तु कधीही चितेवर जाऊ शकतोस त्यामुळे तु अर्थीची तयारी करुन ठेव. म्हणजे खर्‍या अर्थाने आपल्या भविष्याबद्दलचे प्लानिंग करुन ठेव, आपला इहलोक आणि परलोकीचा प्रवास सुखकर होईल अशी तयारी आतापासूनच करुन ठेव अशा प्रकारचा आशय असावा. शिवाय तुम्ही हिमालयातून पंजाब मार्गे दिल्लीकडे प्रवास करत होता त्या अनुषंगाने देखील हा एक इशाराच होता. परंतू तुम्ही पडले संस्कृत चे प्रकांड पंडित. तुम्हाला साधी सोपी हरयाणवी भाषा कुठून कळणार ? बरं ते एक जाऊद्या. जाटांचा मेंदू गुडघ्यात असतो इतके देखील तुम्हाला माहिती असते तर तुमची इतकी चिडचिड झाली नसती. असो .

अभ्या.. Mon, 07/21/2025 - 17:33
आपल्या सर्वच प्रकारच्या ऊर्ध्वरोहणासाठी शुभेच्छा. ब्रिंगिटपम्यान........

In reply to by अभ्या..

अभ्या, ऊर्ध्वरोहण म्हणजे काय रे ? मी आपलं प्रयत्न करतो की ज्या भाषेत माऊली " अमृतातेही पैजा जिंके" असे म्हणाले त्या भाषेत किमान काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा ! आणि माऊलींच्या माळेत स्वतःला ओवून घ्यावे ! सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥ तुमच्यासारख्या अगदी मोजक्या मित्रांना कळतं काय लिहितोय ते . हे खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ! मनःपूर्वक धन्यवाद !

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:43
अंध:पतन खुप हार्श (कठीण?)/डिसरिसपेक्टफूल शब्द वाटते.प्रत्येक काळातील भाषेचे एक एक सौंदर्य होते.तत्कालीन भाषांनी सामाजिक क्रांतीकारक साहित्य घडवले नसते तर भक्तीमार्गाची/सलोख्याची चळवळ उभी राहिली नसती.बाकी लेख ब्रम्हा पर्यंत तसाही पोहचला असता.चराचर अद्वैत असताना,कशाला एका गाण्यामुळे इतकी चिड चिड करायची ;) :)

In reply to by Bhakti

एका गाण्यामुळे
>>> गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Tue, 07/22/2025 - 07:41
अच्छा,मी अशावेळी माझे हेडफोन्स वापरते.१२ तास तर माझ्यासाठी खुपच मोठा बोनस झाला असता.एखादी खुप दिवसांपासुन पाहायची राहिलेली सिरीज, लेक्चर्स पाहून ऐकून झाले असते.जरा वेळ कापसाचे बोळे कानात टाकून बाहेर पाहत बसले असते ;) असो,चिड चिड करून काही बदलणार नसेल .तेव्हा आपल्या आनंदाचे उपाय करण्याचा प्रयत्न केला तर सोपं होईल.

कॉमी Mon, 07/21/2025 - 23:51
कला, संगीत, भाषा - ह्यांची "गुणवत्ता" ही सापेक्ष गोष्ट आहे. ही साधी सिंपल सत्य बाब आहे. आजचे संगीत कसे कनिष्ठ आहे ह्यावर अत्यंत विनोदी संवाद खाली देतो आहे. त्या संवादातला माणूस सुद्धा एका प्रकारचा मनुवादी म्हणावा का? (थोडा मोठा व्हिडीओ आहे पण मजेशीर आहे.) https://youtu.be/B4KYTUNg8lc?si=1krpvzKhUNgNDPYw

कानडाऊ योगेशु Sun, 07/20/2025 - 14:43
पूर्ण जगच मटेरिअलिस्टीक ( मराठी शब्द?) होत आहे त्यात भाषा सुध्दा सध्याच्या मागणीनुसार वळण घेत आहे. प्रत्येक चॅनेल गणिक डान्स रिअ‍ॅलिटी शोज चे पेव फुटले आहे आणि त्यात किती चॅनेल वर शुध्द शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात हे पाहणे शोधाचे विषय ठरेल. त्यानुसार कसरत वाटावे लागणारे नृत्य व त्यांना पूरक गाणी हेच चलनी नाणे बनले आहे. खुद्द जावेद अख्तरे भाषेच्या र्‍हासाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याची अपत्ये हे हिंदी चित्रपट बनवतात पण त्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे आणि हिंदी चे स्क्रिट जे देवनागरी अथवा उर्दूत पाहण्याची जावेद अख्तरला सवय होती तिथे ही जनरेशन रोमन लिपी वापरुन हिंदी चित्रपटाचे संवाद अथवा कथानक लिहितात. अर्थात हे लोण घरोघरी पसरलेले आहेच.

धर्मराजमुटके Sun, 07/20/2025 - 17:19
भाषिक अधः पतनाचा मुद्दा सोडला तर गाणे एक प्रकारे आध्यात्मिक संदेशचं देत आहे. उद्याचा काही भरोसा नाही, तु कधीही चितेवर जाऊ शकतोस त्यामुळे तु अर्थीची तयारी करुन ठेव. म्हणजे खर्‍या अर्थाने आपल्या भविष्याबद्दलचे प्लानिंग करुन ठेव, आपला इहलोक आणि परलोकीचा प्रवास सुखकर होईल अशी तयारी आतापासूनच करुन ठेव अशा प्रकारचा आशय असावा. शिवाय तुम्ही हिमालयातून पंजाब मार्गे दिल्लीकडे प्रवास करत होता त्या अनुषंगाने देखील हा एक इशाराच होता. परंतू तुम्ही पडले संस्कृत चे प्रकांड पंडित. तुम्हाला साधी सोपी हरयाणवी भाषा कुठून कळणार ? बरं ते एक जाऊद्या. जाटांचा मेंदू गुडघ्यात असतो इतके देखील तुम्हाला माहिती असते तर तुमची इतकी चिडचिड झाली नसती. असो .

अभ्या.. Mon, 07/21/2025 - 17:33
आपल्या सर्वच प्रकारच्या ऊर्ध्वरोहणासाठी शुभेच्छा. ब्रिंगिटपम्यान........

In reply to by अभ्या..

अभ्या, ऊर्ध्वरोहण म्हणजे काय रे ? मी आपलं प्रयत्न करतो की ज्या भाषेत माऊली " अमृतातेही पैजा जिंके" असे म्हणाले त्या भाषेत किमान काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा ! आणि माऊलींच्या माळेत स्वतःला ओवून घ्यावे ! सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥ तुमच्यासारख्या अगदी मोजक्या मित्रांना कळतं काय लिहितोय ते . हे खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ! मनःपूर्वक धन्यवाद !

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:43
अंध:पतन खुप हार्श (कठीण?)/डिसरिसपेक्टफूल शब्द वाटते.प्रत्येक काळातील भाषेचे एक एक सौंदर्य होते.तत्कालीन भाषांनी सामाजिक क्रांतीकारक साहित्य घडवले नसते तर भक्तीमार्गाची/सलोख्याची चळवळ उभी राहिली नसती.बाकी लेख ब्रम्हा पर्यंत तसाही पोहचला असता.चराचर अद्वैत असताना,कशाला एका गाण्यामुळे इतकी चिड चिड करायची ;) :)

In reply to by Bhakti

एका गाण्यामुळे
>>> गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Tue, 07/22/2025 - 07:41
अच्छा,मी अशावेळी माझे हेडफोन्स वापरते.१२ तास तर माझ्यासाठी खुपच मोठा बोनस झाला असता.एखादी खुप दिवसांपासुन पाहायची राहिलेली सिरीज, लेक्चर्स पाहून ऐकून झाले असते.जरा वेळ कापसाचे बोळे कानात टाकून बाहेर पाहत बसले असते ;) असो,चिड चिड करून काही बदलणार नसेल .तेव्हा आपल्या आनंदाचे उपाय करण्याचा प्रयत्न केला तर सोपं होईल.

कॉमी Mon, 07/21/2025 - 23:51
कला, संगीत, भाषा - ह्यांची "गुणवत्ता" ही सापेक्ष गोष्ट आहे. ही साधी सिंपल सत्य बाब आहे. आजचे संगीत कसे कनिष्ठ आहे ह्यावर अत्यंत विनोदी संवाद खाली देतो आहे. त्या संवादातला माणूस सुद्धा एका प्रकारचा मनुवादी म्हणावा का? (थोडा मोठा व्हिडीओ आहे पण मजेशीर आहे.) https://youtu.be/B4KYTUNg8lc?si=1krpvzKhUNgNDPYw
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0 ______ #स्वांत:सुखाय् #मनुवादी सनातनी लेखन ________ काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो. बाकी हे म्हणजे अगदीच शास्त्रीय संगीतात एखाद्या रागाचे सादरीकरण करताना वारंवार तेच तेच शब्द वेगळ्या अंगाने परत परत सादर केले जाते तसे काहीसे चालू आहे. हां तर निमित्त असे झाले की हिमालयातून मधून पंजाब मार्गे दिल्ली असा प्रवास करत होतो. नुसते गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच. ढिंच्याक ढिंच्याक.

गर्भलिंग आणि पर्यावरण

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गर्भलिंग आणि पर्यावरण =====================  गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते. निसर्गाच्या या चुकीचे उंदरांमधले कारण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. गर्भधारणेच्या काळात लोहाची कमतरता या दोषाला कारणीभूत ठरते, असे उंदरावरील संशोधनात आढळले आहे.

नक्षत्रांचे देणे होते

अनन्त्_यात्री ·

निनाद गुरुवार, 08/21/2025 - 14:54
विषय छान आहे. नक्षत्रांनी अव्हेरून उल्का पाठविली काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली चमत्कृती आहे, गझल होऊ शकेल.

गणेशा Sun, 08/24/2025 - 09:46
नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले जगण्याच्या वाटेवर काटेच भेटले छान... पहिल्या दोन ओळींवरुन.. जगायचं राहिलं ह्या ओळी सुचल्या.. नंतर कधी post करेल

मनिष Tue, 09/09/2025 - 11:03
हे सुरेख आहे...
सृजनाच्या मृदेवर आमुची पाखर निर्मितीची उर्मी गाठो एक नवा स्तर

निनाद गुरुवार, 08/21/2025 - 14:54
विषय छान आहे. नक्षत्रांनी अव्हेरून उल्का पाठविली काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली चमत्कृती आहे, गझल होऊ शकेल.

गणेशा Sun, 08/24/2025 - 09:46
नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले जगण्याच्या वाटेवर काटेच भेटले छान... पहिल्या दोन ओळींवरुन.. जगायचं राहिलं ह्या ओळी सुचल्या.. नंतर कधी post करेल

मनिष Tue, 09/09/2025 - 11:03
हे सुरेख आहे...
सृजनाच्या मृदेवर आमुची पाखर निर्मितीची उर्मी गाठो एक नवा स्तर
लेखनविषय:
नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले जगण्याच्या वाटेवर काटेच भेटले नक्षत्रांनी अव्हेरून उल्का पाठविली काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली एकेका फुलाचे रंग आठवत होतो निर्माल्य फुलांचे झाले -बेसावध होतो निर्माल्य होताना फुले नि:शब्द म्हणाली, "खत होणे हेच थोर भाग्य आम्हा भाळी सृजनाच्या मृदेवर आमुची पाखर निर्मितीची उर्मी गाठो एक नवा स्तर पीक विलक्षणाचेच येईल, तोवरी नक्षत्रांनो थांबा,आज रिक्त देणेकरी"

निसर्गायण (ऐसी अक्षरे -३०)

Bhakti ·

In reply to by श्वेता व्यास

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:36
धन्यवाद श्वेता.व्यक्तीनिष्ठता नैतिक वैचारिक घडवून आणल्यास हळूहळू जागतिक गोंधळ कमी होऊन भोगवादी होण्याऐवजी,निसर्गाच्या‌ ऋणात व्यक्ती येईल,असे पुस्तकात सुचवले आहे.समोरचा करत नाही तर मी का सुरुवात करू ही वृत्ती बदलली पाहिजे.

In reply to by श्वेता व्यास

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:36
धन्यवाद श्वेता.व्यक्तीनिष्ठता नैतिक वैचारिक घडवून आणल्यास हळूहळू जागतिक गोंधळ कमी होऊन भोगवादी होण्याऐवजी,निसर्गाच्या‌ ऋणात व्यक्ती येईल,असे पुस्तकात सुचवले आहे.समोरचा करत नाही तर मी का सुरुवात करू ही वृत्ती बदलली पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
निसर्गायण लेखक- दिलीप कुलकर्णी. १ जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे. हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो.

फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी ·

कर्नलतपस्वी Sat, 07/19/2025 - 17:10
भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.

कर्नलतपस्वी Sat, 07/19/2025 - 17:10
भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.
लेखनप्रकार
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!

कवडसे

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा गुरुवार, 07/17/2025 - 08:56
सुंदर कोलाज सर्वच किस्से आवडले - पण थिरकवा यांचा सगळ्यात जास्त. तबल्याच्या ४ परिक्षा दिल्या आणि पाचव्या परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केला पण दहावीमुळे तबला सोडला तो सोडलाच. आता त्याचे वैषम्य वाटते. तुमचे तबलावादन चालू आहे का? त्याबद्दलचे पण किस्से, आठवणी लिहा ही विनंती.

सुधीर कांदळकर Sat, 07/19/2025 - 16:27
एकापेक्षा एक सरस किस्से. वाघमारे, गंगावणे आणि गुरुजी छानच. थिरकवासाहेबांचे नव्वदीतले वादन मी ऐकलेले आहे. उस्ताद गामेखां समारोहात. धड उभे पण राहता येत नव्हते पण हट्टाने वाजवले आण तेही जबरदस्त. छान लेख धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

यावरुन एक आठवले-थिरकवा मोठ्या अभिमानाने "मै बालगंधर्वजीका तबलिया हुं" असे सांगायचे. त्यानी खरेच अनेक वर्षे बालगंधर्वाना साथ केली होती.

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 15:41
मस्त किस्से आहेत. अस्सल कलावंत असेच असतात. गुरुजींचे नांव लेखात आले नाही, ते समजून घ्यायची उत्सुकता लागली.

सौंदाळा गुरुवार, 07/17/2025 - 08:56
सुंदर कोलाज सर्वच किस्से आवडले - पण थिरकवा यांचा सगळ्यात जास्त. तबल्याच्या ४ परिक्षा दिल्या आणि पाचव्या परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केला पण दहावीमुळे तबला सोडला तो सोडलाच. आता त्याचे वैषम्य वाटते. तुमचे तबलावादन चालू आहे का? त्याबद्दलचे पण किस्से, आठवणी लिहा ही विनंती.

सुधीर कांदळकर Sat, 07/19/2025 - 16:27
एकापेक्षा एक सरस किस्से. वाघमारे, गंगावणे आणि गुरुजी छानच. थिरकवासाहेबांचे नव्वदीतले वादन मी ऐकलेले आहे. उस्ताद गामेखां समारोहात. धड उभे पण राहता येत नव्हते पण हट्टाने वाजवले आण तेही जबरदस्त. छान लेख धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

यावरुन एक आठवले-थिरकवा मोठ्या अभिमानाने "मै बालगंधर्वजीका तबलिया हुं" असे सांगायचे. त्यानी खरेच अनेक वर्षे बालगंधर्वाना साथ केली होती.

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 15:41
मस्त किस्से आहेत. अस्सल कलावंत असेच असतात. गुरुजींचे नांव लेखात आले नाही, ते समजून घ्यायची उत्सुकता लागली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तबल्याचा क्लास झाला होता आणि गुरुजींबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सहसा अशा वेळी काहीतरी किस्से ऐकायला मिळत. तर विषय निघाला पिंजरा चित्रपटाचा. तर प्रभात स्टुडिओ मध्ये "ग साजणी -आली ठुमकत नार लचकत " या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. गाणे वरच्या पट्टीत होते त्यामुळे हाय पीच आवाज असणारा गायक पाहिजे होता. प्रभात मध्ये साफसफाई करणाऱ्यांचे मुख्य विष्णू वाघमारे म्हणून होते. कधी कधी ते झील देण्याचे म्हणजे कोरस चेही काम करत. जसे की जी जी रे जी जी वगैरे गाणे. तर त्यांना सहज तिकडे बोलावले गेले आणि गाणे गायला सांगितले. वाघमारेंनी असा काय आवाज लावला की ज्याचे नाव ते.

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत Tue, 07/15/2025 - 14:01
समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन केले तर आयुष्यात संपन्न आणि वैभवशाली बनता येते. याशिवाय दासबोध वाचल्याने किडलेले विचार मनात येत नाही. मानसिक उन्नती होते आणि डोक्यातला केमिकल लोचा दूर करण्यास मदत होते

विवेकपटाईत Tue, 07/15/2025 - 14:01
समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन केले तर आयुष्यात संपन्न आणि वैभवशाली बनता येते. याशिवाय दासबोध वाचल्याने किडलेले विचार मनात येत नाही. मानसिक उन्नती होते आणि डोक्यातला केमिकल लोचा दूर करण्यास मदत होते
लेखनविषय:
लेखनप्रकार
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.

ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या

युयुत्सु ·

विवेकपटाईत Tue, 07/15/2025 - 10:45
उचित आहार, उचित व्यायाम आणि प्राणायाम इत्यादि केल्याने नैराश्य दूर होते. सकारात्मक अर्थात मेंदूने विचार करून उजव्या हाताने पुरुषार्थ करून जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला की नैराश्य दूर होते. बाकी नैराश्याची भावना, अर्थात केमिकल लोचा , ही तरुणांच्या डोक्यात भरवली जाऊ शकते. डावी विचारधारवाले हेच करतात. जो पर्यन्त देशात शोषण करणारे पूंजीपती आहेत, तो पर्यन्त श्रमिकांना, नौकरी करणार्‍यांना, शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही. हे डोक्यात भरले की तरुणांची पुरुषार्थ करून जगण्याची इच्छा होत नाही. स्वत:च्या गरिबीला मुंबईत बसलेला पूंजीपती असेच त्याला वाटू लागते. त्या तरुणांचा उपयोग हडताळ, तोडफोड करण्यात आणि नक्षली तैयार करण्यासाठी होतो. मग कोर्ट केसेस होतात. नौकरी मिळत नाही. मग एखादा शिक्षित पण निराश वेमूला आत्महत्या करतो (ट्यूशन करून ही चांगले पैसे कमवू शकला असता).

मूकवाचक Tue, 07/15/2025 - 11:45
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही. कित्येक वेळा टॉक्सिक व्यक्ती समाजात वेगळाच मुखवटा घालून वावरत असल्याने त्या ओळखू येत नाहीत. त्यामुळे नैराश्यामागचे मूळ कारण तसेच राहते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला दोष तिच्यातच आहे (किंवा तिच्या विचारपद्धतीत आहे) असे गृहीत धरून दिलेल्या सल्ल्यांचा देखील मनस्ताप सोसावा लागतो. असो.

In reply to by मूकवाचक

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 12:12
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही.> १००१% बरोबर

लेखक याऐवजी औषधी उपचारांवर एकट्यावर अवलंबून राहण्यापेक्षा, चिकित्सा (थेरपी) आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे जीवनातील तणाव, मानसिक आघात आणि सामाजिक घटकांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याचे समर्थन करतात.
या संशोधनाविषयी काहीही माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची फारशी इच्छाही नाही. तरीही या लेखात दिलेल्या मर्यादित माहितीवरून हे संशोधन म्हणजे डोंगर पोखरून उंदीर की झुरळ शोधण्यासारखा प्रयत्न वाटतो आहे. दोन अगदी एकसारख्या परिस्थितीत राहणार्‍या दोघांचा त्याच परिस्थितीकडे बघायचा दृष्टीकोन एकदम परस्परविरोधी असू शकतो. एकाचा सकारात्मक आणि दुसर्‍याचा नकारात्मक असू शकतो. पहिला माणूस आपल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडेलच याची खात्री देता येणार नाही पण तो त्यातून बाहेर पडायची शक्यता नक्कीच वाढते. मात्र दुसरा माणूस त्याच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडणे फारच कठीण याची मात्र बर्‍यापैकी खात्री देता येते. आता त्या दोघांच्या अंगातील केमिकल शोधली तर त्यात फरक असेल हे समजता येते. आता त्या दोन माणसांच्या मानसिकतेत बदल आहे तो त्यांच्या अंगातील केमिकल्समुळे की मुळातील त्यांच्या मानसिकतेत असलेल्या बदलांमुळे अंगातील केमिकल वेगळी आहेत? म्हणजे केमिकल हा कॉज आणि मानसिकता हा इफेक्ट आहे की मानसिकता हा कॉज आणि केमिकल हा इफेक्ट आहे? मला वाटते दुसरे. एखादी गोष्ट 'इंट्युटिव्हली' समजते त्यासाठी फार संशोधन करण्यात वेळ आणि कष्ट व्यर्थ घालवू नयेत असे मला तरी वाटते. बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सकारात्मकता, जीवनशैली बदल वगैरे गोष्टींवर भर द्यायला सुरवात केली. मला वाटते आता मेडिकल प्रोफेशनमध्ये डॉ. ब्रुस लिप्टन हे नाव ऐकले तरी अनेकांच्या डोक्यावर आठ्या दिसतात. डॉ. ब्रुस लिप्टन यांच्याच 'स्कूल ऑफ थॉट'च्या डॉ. लिस्सा रॅन्किन आहेत. त्यांनी 'माईंड ओव्हर मेडिसिन' हे जबराट पुस्तक लिहिले आहे. त्यांचा https://www.youtube.com/watch?v=gcai0i2tJt0 हा व्हिडिओ मी आतापर्यंत अनेकदा बघितला आहे. त्यात एक उल्लेख आहे- स्टॅमॅटिस मोरॅटिस नावाचा अमेरिकेत राहणारा एक ग्रीक मनुष्य होता. त्याला अमेरिकेतील डॉक्टर्सनी कर्करोगाचे निदान केले आणि तुझ्याकडे दोन महिने आहेत असे सांगितले. त्याने मग विचार केला की एवीतेवी दोनच महिने असतील तर मग मी माझे शेवटचे दिवस माझ्या लोकांबरोबर आणि माझ्या देशात घालवेन. मग तो ग्रीसमधील एका बेटावर त्याच्या कुटुंबियांबरोबर राहायला गेला. त्याच्या मानसिकतेत खूप बदल त्यामुळे झाला आणि कर्करोगातून तो बरा झाला. दोन महिने कुठचे त्यानंतर तो अनेक वर्षे जगला. मधल्या वर्षांमध्ये तो त्याला दोन महिने देणार्‍या डॉक्टरांना भेटायला म्हणून अमेरिकेला गेला होता. पण कुठचे काय- त्याला दोन महिने देणारे डॉक्टरच गेले होते आणि तो जिवंत होता. अशाप्रकारे मानसिकतेत आणि जीवनशैलीत बदल करून अगदी असाध्य समजल्या जाणार्‍या कर्करोगावर मात केलेल्या लोकांच्या कथा केली टर्नर या लेखिकेने लिहिलेल्या रॅडिकल रेमिशन या पुस्तकात अगदी वेल डॉक्युमेन्टेड आहेत. त्याविषयी https://www.radicalremission.com/healing-stories वरही वाचता येईल. (पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रचंड मोठ्ठा फॅन) नेव्हिलिअन चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 12:21
बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. ब्रुस लिप्टनचे बायॉलॉजी ऑफ बिलिफ हे पुस्तक माझ्या वैयक्तीक ग्रंथालयात आहे. त्यातला महत्तवाचा भाग पुस्तक शोधून स्कॅन करून इथे टाक्तो.

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 12:24
मुळात जो मनोविकार शास्त्राच्या नियत कालिकत आलेला लेख इथे सार्वजनिक न्यासावर देण्याचा मूळ हेतूच समजला नाही. आपले ज्ञान किती चौफेर आहे हे दाखवण्याचा हेतू समजला नाही. केवळ एका व्यापक आढाव्यावर (मेटा ऍनालिसिस वर) आधारित असलेले संशोधन हे सामान्य माणसांसाठी नाहीच कारण या संशोधनात असलेल्या अक्षम्य त्रुटी त्यावर अनेक मनोविकार तज्ज्ञांनी दाखवल्या आहेत. आपल्या अशा बेजबाबदार लेखावर विश्वास ठेवून एखाद्या रुग्णाने आपली नैराश्य विरोधी औषधे बंद केली तर त्याला जबाबदार कोण? Perhaps the worst flaw of the 2022 review is that it casts doubts on the effectiveness of antidepressant medication, without presenting any evidence in support of this conclusion. There is incontrovertible evidence that antidepressant medications are effective in treating people with clinically-significant depression. The decision to use antidepressants, with or without psychological therapy, is taken by the person with depression jointly with their treating physician. https://www.kcl.ac.uk/news/a-response-to-the-serotonin-theory-of-depression-a-systematic-umbrella-review-of-the-evidence researchers at the Institute of Psychiatry, Psychology & Neuroscience (IoPPN), King’s College London प्रत्येक वैद्यकीय संशीधन हे वैद्यक शास्त्र न समजणाऱ्या सामान्य माणसासाठी नसते हा मूलभूत विचार पण इथे विसरला गेलेला आहे. असे अनेक शोध निबंध डॉक्टरांच्या वाचनात येत असतात. जोवर त्यावर अधिक संशोधन होऊन सज्जड पुराव्या निशी सिद्ध होत नाही तोवर ती गोष्ट १०० % सत्य आहे असे मानले जात नाही. सनसनाटी पसरवणाऱ्या अशा लेखनाकडे वाचकांनी दुर्लक्ष करावे असे माझे मत आहे.

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 12:33
Electroconvulsive therapy (ECT) सामान्य माणसांच्या भाषेत शॉक थेरपी याला सुद्धा आजतागायत जैविक पुरावा सापडलेला नाही परंतु निदान ८० % रुग्णांना त्याचा भरपूर फायदा होतो असे गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवातून आढळलेला आहे आणि अनेक सांख्यि़की पृथक्करणात मध्ये ते सिद्ध झालेले आहे. शॉक बद्दल सिनेमा आणि सामाजिक चर्चामधून इतका अपप्रचार झालेला आहे कि सामान्य माणसांत त्याबद्दल एक भयगंड निर्माण झालेला आहे. अशी स्थिती या नैराश्य विरोधी औषधाबद्दल न होवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना.

कपिलमुनी Tue, 07/15/2025 - 13:40
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या आढाव्याला (Moncrieff et al., 2022) विरोध करताना, असे म्हणता येईल की नैराश्य हे सेरोटोनिनच्या कमी पातळीमुळे किंवा रासायनिक असंतुलनामुळे होते याला समर्थन देणारे महत्त्वाचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, कुपरस्मिथ आणि लियोन (1993) यांच्या अभ्यासात (Coupier-Smith, A., & Leon, M., 1993, "Serotonin and Depression: A Clinical Perspective," Journal of Psychopharmacology) असे आढळले की सेरोटोनिनच्या पातळीतील बदल आणि नैराश्याची लक्षणे यांच्यात थेट संबंध आहे. तसेच, डेलगाडो et al. (1990) यांच्या संशोधनात (Delgado, P. L., et al., 1990, "Serotonin Function and the Mechanism of Antidepressant Action," Archives of General Psychiatry) सेरोटोनिनच्या कमी झालेल्या कार्यामुळे नैराश्याची लक्षणे वाढतात आणि एसएसआरआय (SSRI) औषधे ही लक्षणे कमी करण्यास प्रभावी ठरतात असा निष्कर्ष काढला. सेरोटोनिन सिद्धांत हा मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. बरोज आणि डिमेलो (2002) यांनी (American Journal of Psychiatry) म्हटले आहे, "सेरोटोनिन सिद्धांताने नैराश्याच्या जैविक आधाराला समजण्यास आणि प्रभावी उपचार विकसित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे." एसएसआरआय औषधांचा व्यापक वापर हा केवळ लोकप्रिय सिद्धांतावर आधारित नाही, तर क्लिनिकल चाचण्यांमधील यशस्वी परिणामांवर आधारित आहे, जसे की क्विटकिन et al. (2000) यांच्या अभ्यासात (Quitkin, F. M., et al., 2000, "Placebo-Controlled Trials of SSRIs," American Journal of Psychiatry) दिसून आले आहे की एसएसआरआय वापरल्याने रुग्णांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. हा सिद्धांत सामान्य लोकांच्या समजुतीवर सकारात्मक परिणाम करतो, कारण तो रुग्णांना त्यांच्या स्थितीला एक जैविक आधार आहे याची जाणीव करून देतो, ज्यामुळे उपचारांबद्दल आशावाद निर्माण होतो. ९० टक्के लोकांचा रासायनिक असंतुलनावरील विश्वास हा चुकीचा नसून, वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे, जसे की हिर्शफेल्ड (2000) यांनी (Journal of Clinical Psychiatry) म्हटले आहे, "रासायनिक असंतुलनाची समजूत रुग्णांना उपचार घेण्यास प्रोत्साहित करते." तसेच, असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत की प्रतिनैराश्य औषधांमुळे सेरोटोनिनची पातळी दीर्घकाळ कमी होते; उलट, ही औषधे मेंदूतील रासायनिक संतुलन सुधारण्यास मदत करतात, जसे की Blier et al. (1998) यांनी (Biological Psychiatry) दाखवले आहे. थेरपी आणि जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे असले तरी, जैविक घटकांकडे दुर्लक्ष करून केवळ तणाव किंवा सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित करणे अपुरे ठरू शकते. त्यामुळे, प्रतिनैराश्य औषधांचा समावेश असलेला एक सर्वसमावेशक उपचार दृष्टिकोन नैराश्याच्या व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी ठरू शकतो, जसे की थेस आणि स्टायन (2003) यांनी (The Lancet) सुचवले आहे.

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 14:51
खुलासा १. मला हा पेपर महत्त्वाचा वाटण्याचे मुख्य कारण काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. ५. "चेतारसायनांचे असंतुलन" असा निष्कर्ष काढण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही लॅबटेस्ट अजून अस्तित्त्वात नाहीत. टीप - शक्य तेव्ह्ढ्या सभ्य भाषेत आणि संयमाने खुलासा केला आहे याची नोंद घ्यावी. कुचेष्टा, मिस-कोटींग, घाईने चुकीचे अर्थ काढणे इ० आढळल्यास मुलाहिजा ठेवला जाणार नाही तसेच बेसिक आदर पण ठेवला जाणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 20:27
१ काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. मी वर दुवा दिलेला असून त्यातील महत्त्वाचा भागही उद्धृत केलाय २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. रुग्ण आणि डॉक्टर जर एकाच पातळीवर असतील तर डॉक्टर कडे जायचेच कशाला? डॉक्टर औषध बंद करायला सांगतात त्यामागे काही तरी तर्कशास्त्र असते शिवाय त्यांचा मोठा अनुभव असतो. . डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरेच "हुशार" रुग्ण डॉक्तरची उलट तपासणी करण्याच्या स्वरात विचारतात तेंव्हा डॉक्टर फारसे आनंदित होत नाहीत'. त्याच बरोबर काही वरिष्ठ डॉक्टरांचा अहं पण असतो ( तू मला विचारणारा कोण/ डॉक्टर तू का मी). माझाच एक वर्ग मित्र (इंजियनीयर आणि एम बी ए) एका डॉक्टरांकडे बायकोच्या ऍबसेस बद्दल अँटिबायोटिकस पॉलिसी डिस्कस करू पाहत होता. त्या डॉक्टरांनी त्याच्या बायकोला स्पष्ट सांगितले परत माझ्याकडे येऊ नका. टाळी एकाच हाताने वाजत नाही. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. कोणत्याही औषधाचा इतर दुष्परिणाम पण असू शकतो. परंतु नैराश्य असणारा/असणारी रुग्ण त्यातून स्वतःचे सांत्वन (SOLACE) करण्यासाठी अतिरिक्त खातात हे फार मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण स्वादिष्ट अन्न हे नेहमीच मनाला आनंददायक असते त्यामुळे नैराश्य असलेल्या व्यक्ती अशा निराशावादी विचारातून तात्पुरती सुटका करण्यासाठी स्ववादिष्ट अन्न अतिरिक्त प्रमाणात खातात. कित्येक वेळा रुग्ण स्वतःच्या मनाने मध्येच औषधे (SSRI) थांबवतात याला त्या औषधांबद्दल अपप्रचार फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे त्यामुळे औषध बंद केले कि आजार परत उफाळतो आणि दोष बऱ्याचदा औषधावर येतो

आता सगळेच अकलेचे तारे तोडत आहेत तेव्हा मी ही 2 4 तारे तोडून घेतो. माझे एक नल हायपोथेसिस आहे की Depression is not in brain, depression is in guts. डिप्रेशन मध्ये उपवास, तोही दीघकालीन, 3, 4 , 5 वगैरे दिवस, तोही केवळ पाणी पिऊन, आणि ह्या प्रक्रियेत muscle loss कमीत कमी व्हावा म्हणून हलका व्यायाम असे केल्यास काय फरक पडतो हे तपासून पाहायला मजा येईल . अनावश्यक अन्नाचे सेवन हे अनेक आजारांना कारणीभूत ठरते हे सर्वांना ज्ञात आहेच , फक्त डिप्रेशन बाबत ते खरे आहे का तपासून पाहायला हवे.

In reply to by युयुत्सु

बऱ्यापैकी सत्य म्हणजे काय ? एक तर सत्य असते किंवा असत्य असते. बऱ्यापैकी सत्य हा काय नवीन प्रकार ? =))))

In reply to by युयुत्सु

तुम्हाला सत्य आणि अंदाज ह्यातील फरक कळतो का ? उद्या तुम्ही साडी नेसून इमेज रिकाग्निशन पुढे आलात आणि अल्गोरीडम ने, 50- 50% स्त्री किंवा पुरुष म्हणाले, किंवा 80 टक्के बैल आणि 20 टक्के गाय म्हणले किंवा 100% गाढव असे म्हणाले किंवा अजून काही म्हणाले तर ते सत्य होईल काय ? बऱ्यापैकी सत्य असे काही नसते. तसे असते त्याला अंदाज, ठोकताळा वगैरे म्हणतात. सत्य नाही. पण असो. तुम्ही भाजप, संघ, हिंदू धर्म , ब्राह्मण वगैरे जे लेख पाडता त्या विषयातील तुमचे आकलन जे की " बऱ्यापैकी सत्य" आहे, हे माझ्या आता आकलनास आले. आता मी थांबतो. बऱ्यापैकी क्षमा केली पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 02:33
काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग तुम्हाला मान्य नसतील तर मी आता माफ करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 07:41
गोडबोल्याना सँपल-स्पेस ची संकल्पना कळते का, असा मला प्रश्न पडला आहे. अंदाज वर्तवण्यासाठी ऐतिहासिक घटनांचे (सत्य आणि असत्य) फ्रिक्वेन्सी डीस्ट्रीब्युशन हे प्राथमिक आधार असते हे पण त्यांना माहित नाही आणि मुख्य म्ह० जेव्हा आकडेवारी उपलब्ध नसते तेव्हा काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग केले जातात हेही त्यांना मान्य नसेल तर मोठा चिंतेचा विषय आहे स्वगत- नामस्मरणाने मेंदूचे बर्‍यापैकी नेक्रॉसिस घडून येत असावे यावर पी०एच्०डी० करावी म्हणतो.

In reply to by युयुत्सु

मी आधीच अन्यत्र म्हणालो होतो तसे - सत्य म्हणजे Truth असे शिकलेल्या लोकांना सत्य म्हणजे काय कळूच शकत नाही. असो.

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 18:30
बऱ्यापैकी सत्य म्हणजे - गट-ब्रेन संभाषण ही कल्पना आता मान्य आहे पण पूर्णपणे विकसित नाही की जिचा क्लिनिकल प्रॅक्टिस्मध्ये नैराश्याच्या उपचारांसाठी समावेश केला आहे. तसेच डीप्रेशनच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याने पूर्ण सत्य नाही,म्हणून बर्‍यापैकी सत्य!

कंजूस Tue, 07/15/2025 - 18:58
काही अपेक्षा ठेवून प्रयत्न करणाऱ्याला आपटी खाल्ली की नैराश्य येते. मग वेगवेगळी हार्मोन्स शरिरात अनिर्बंध धावू लागतात. तर ती औषधाने कमी करून किंवा दाबून टाकण्याचे नैराश्य कसे जाणार? कोण कोणाचे कारण आणि परिणाम आहे हे ध्यानात घ्यावे. डॉक्टरांकडे जाऊन काहीही होणार नाही. नैराश्याचे कारण पराभव, अपेक्षाभंग, अपयश हे आहेत. ती दूर झाली तर कामच झाले. औषधे घेऊन फक्त असेडिटी वाढते.

कपिलमुनी Tue, 07/15/2025 - 21:49
मुलाहिजा ठेवणार नाही, यांव त्यांव करणार नाही टाईप धमक्या द्यायची काय गरज असते ?? आमच्या शेटे सरांच्या बागेतील गवत उपटणार का ?

विवेकपटाईत Tue, 07/15/2025 - 10:45
उचित आहार, उचित व्यायाम आणि प्राणायाम इत्यादि केल्याने नैराश्य दूर होते. सकारात्मक अर्थात मेंदूने विचार करून उजव्या हाताने पुरुषार्थ करून जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला की नैराश्य दूर होते. बाकी नैराश्याची भावना, अर्थात केमिकल लोचा , ही तरुणांच्या डोक्यात भरवली जाऊ शकते. डावी विचारधारवाले हेच करतात. जो पर्यन्त देशात शोषण करणारे पूंजीपती आहेत, तो पर्यन्त श्रमिकांना, नौकरी करणार्‍यांना, शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही. हे डोक्यात भरले की तरुणांची पुरुषार्थ करून जगण्याची इच्छा होत नाही. स्वत:च्या गरिबीला मुंबईत बसलेला पूंजीपती असेच त्याला वाटू लागते. त्या तरुणांचा उपयोग हडताळ, तोडफोड करण्यात आणि नक्षली तैयार करण्यासाठी होतो. मग कोर्ट केसेस होतात. नौकरी मिळत नाही. मग एखादा शिक्षित पण निराश वेमूला आत्महत्या करतो (ट्यूशन करून ही चांगले पैसे कमवू शकला असता).

मूकवाचक Tue, 07/15/2025 - 11:45
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही. कित्येक वेळा टॉक्सिक व्यक्ती समाजात वेगळाच मुखवटा घालून वावरत असल्याने त्या ओळखू येत नाहीत. त्यामुळे नैराश्यामागचे मूळ कारण तसेच राहते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला दोष तिच्यातच आहे (किंवा तिच्या विचारपद्धतीत आहे) असे गृहीत धरून दिलेल्या सल्ल्यांचा देखील मनस्ताप सोसावा लागतो. असो.

In reply to by मूकवाचक

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 12:12
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही.> १००१% बरोबर

लेखक याऐवजी औषधी उपचारांवर एकट्यावर अवलंबून राहण्यापेक्षा, चिकित्सा (थेरपी) आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे जीवनातील तणाव, मानसिक आघात आणि सामाजिक घटकांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याचे समर्थन करतात.
या संशोधनाविषयी काहीही माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची फारशी इच्छाही नाही. तरीही या लेखात दिलेल्या मर्यादित माहितीवरून हे संशोधन म्हणजे डोंगर पोखरून उंदीर की झुरळ शोधण्यासारखा प्रयत्न वाटतो आहे. दोन अगदी एकसारख्या परिस्थितीत राहणार्‍या दोघांचा त्याच परिस्थितीकडे बघायचा दृष्टीकोन एकदम परस्परविरोधी असू शकतो. एकाचा सकारात्मक आणि दुसर्‍याचा नकारात्मक असू शकतो. पहिला माणूस आपल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडेलच याची खात्री देता येणार नाही पण तो त्यातून बाहेर पडायची शक्यता नक्कीच वाढते. मात्र दुसरा माणूस त्याच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडणे फारच कठीण याची मात्र बर्‍यापैकी खात्री देता येते. आता त्या दोघांच्या अंगातील केमिकल शोधली तर त्यात फरक असेल हे समजता येते. आता त्या दोन माणसांच्या मानसिकतेत बदल आहे तो त्यांच्या अंगातील केमिकल्समुळे की मुळातील त्यांच्या मानसिकतेत असलेल्या बदलांमुळे अंगातील केमिकल वेगळी आहेत? म्हणजे केमिकल हा कॉज आणि मानसिकता हा इफेक्ट आहे की मानसिकता हा कॉज आणि केमिकल हा इफेक्ट आहे? मला वाटते दुसरे. एखादी गोष्ट 'इंट्युटिव्हली' समजते त्यासाठी फार संशोधन करण्यात वेळ आणि कष्ट व्यर्थ घालवू नयेत असे मला तरी वाटते. बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सकारात्मकता, जीवनशैली बदल वगैरे गोष्टींवर भर द्यायला सुरवात केली. मला वाटते आता मेडिकल प्रोफेशनमध्ये डॉ. ब्रुस लिप्टन हे नाव ऐकले तरी अनेकांच्या डोक्यावर आठ्या दिसतात. डॉ. ब्रुस लिप्टन यांच्याच 'स्कूल ऑफ थॉट'च्या डॉ. लिस्सा रॅन्किन आहेत. त्यांनी 'माईंड ओव्हर मेडिसिन' हे जबराट पुस्तक लिहिले आहे. त्यांचा https://www.youtube.com/watch?v=gcai0i2tJt0 हा व्हिडिओ मी आतापर्यंत अनेकदा बघितला आहे. त्यात एक उल्लेख आहे- स्टॅमॅटिस मोरॅटिस नावाचा अमेरिकेत राहणारा एक ग्रीक मनुष्य होता. त्याला अमेरिकेतील डॉक्टर्सनी कर्करोगाचे निदान केले आणि तुझ्याकडे दोन महिने आहेत असे सांगितले. त्याने मग विचार केला की एवीतेवी दोनच महिने असतील तर मग मी माझे शेवटचे दिवस माझ्या लोकांबरोबर आणि माझ्या देशात घालवेन. मग तो ग्रीसमधील एका बेटावर त्याच्या कुटुंबियांबरोबर राहायला गेला. त्याच्या मानसिकतेत खूप बदल त्यामुळे झाला आणि कर्करोगातून तो बरा झाला. दोन महिने कुठचे त्यानंतर तो अनेक वर्षे जगला. मधल्या वर्षांमध्ये तो त्याला दोन महिने देणार्‍या डॉक्टरांना भेटायला म्हणून अमेरिकेला गेला होता. पण कुठचे काय- त्याला दोन महिने देणारे डॉक्टरच गेले होते आणि तो जिवंत होता. अशाप्रकारे मानसिकतेत आणि जीवनशैलीत बदल करून अगदी असाध्य समजल्या जाणार्‍या कर्करोगावर मात केलेल्या लोकांच्या कथा केली टर्नर या लेखिकेने लिहिलेल्या रॅडिकल रेमिशन या पुस्तकात अगदी वेल डॉक्युमेन्टेड आहेत. त्याविषयी https://www.radicalremission.com/healing-stories वरही वाचता येईल. (पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रचंड मोठ्ठा फॅन) नेव्हिलिअन चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 12:21
बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. ब्रुस लिप्टनचे बायॉलॉजी ऑफ बिलिफ हे पुस्तक माझ्या वैयक्तीक ग्रंथालयात आहे. त्यातला महत्तवाचा भाग पुस्तक शोधून स्कॅन करून इथे टाक्तो.

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 12:24
मुळात जो मनोविकार शास्त्राच्या नियत कालिकत आलेला लेख इथे सार्वजनिक न्यासावर देण्याचा मूळ हेतूच समजला नाही. आपले ज्ञान किती चौफेर आहे हे दाखवण्याचा हेतू समजला नाही. केवळ एका व्यापक आढाव्यावर (मेटा ऍनालिसिस वर) आधारित असलेले संशोधन हे सामान्य माणसांसाठी नाहीच कारण या संशोधनात असलेल्या अक्षम्य त्रुटी त्यावर अनेक मनोविकार तज्ज्ञांनी दाखवल्या आहेत. आपल्या अशा बेजबाबदार लेखावर विश्वास ठेवून एखाद्या रुग्णाने आपली नैराश्य विरोधी औषधे बंद केली तर त्याला जबाबदार कोण? Perhaps the worst flaw of the 2022 review is that it casts doubts on the effectiveness of antidepressant medication, without presenting any evidence in support of this conclusion. There is incontrovertible evidence that antidepressant medications are effective in treating people with clinically-significant depression. The decision to use antidepressants, with or without psychological therapy, is taken by the person with depression jointly with their treating physician. https://www.kcl.ac.uk/news/a-response-to-the-serotonin-theory-of-depression-a-systematic-umbrella-review-of-the-evidence researchers at the Institute of Psychiatry, Psychology & Neuroscience (IoPPN), King’s College London प्रत्येक वैद्यकीय संशीधन हे वैद्यक शास्त्र न समजणाऱ्या सामान्य माणसासाठी नसते हा मूलभूत विचार पण इथे विसरला गेलेला आहे. असे अनेक शोध निबंध डॉक्टरांच्या वाचनात येत असतात. जोवर त्यावर अधिक संशोधन होऊन सज्जड पुराव्या निशी सिद्ध होत नाही तोवर ती गोष्ट १०० % सत्य आहे असे मानले जात नाही. सनसनाटी पसरवणाऱ्या अशा लेखनाकडे वाचकांनी दुर्लक्ष करावे असे माझे मत आहे.

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 12:33
Electroconvulsive therapy (ECT) सामान्य माणसांच्या भाषेत शॉक थेरपी याला सुद्धा आजतागायत जैविक पुरावा सापडलेला नाही परंतु निदान ८० % रुग्णांना त्याचा भरपूर फायदा होतो असे गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवातून आढळलेला आहे आणि अनेक सांख्यि़की पृथक्करणात मध्ये ते सिद्ध झालेले आहे. शॉक बद्दल सिनेमा आणि सामाजिक चर्चामधून इतका अपप्रचार झालेला आहे कि सामान्य माणसांत त्याबद्दल एक भयगंड निर्माण झालेला आहे. अशी स्थिती या नैराश्य विरोधी औषधाबद्दल न होवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना.

कपिलमुनी Tue, 07/15/2025 - 13:40
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या आढाव्याला (Moncrieff et al., 2022) विरोध करताना, असे म्हणता येईल की नैराश्य हे सेरोटोनिनच्या कमी पातळीमुळे किंवा रासायनिक असंतुलनामुळे होते याला समर्थन देणारे महत्त्वाचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, कुपरस्मिथ आणि लियोन (1993) यांच्या अभ्यासात (Coupier-Smith, A., & Leon, M., 1993, "Serotonin and Depression: A Clinical Perspective," Journal of Psychopharmacology) असे आढळले की सेरोटोनिनच्या पातळीतील बदल आणि नैराश्याची लक्षणे यांच्यात थेट संबंध आहे. तसेच, डेलगाडो et al. (1990) यांच्या संशोधनात (Delgado, P. L., et al., 1990, "Serotonin Function and the Mechanism of Antidepressant Action," Archives of General Psychiatry) सेरोटोनिनच्या कमी झालेल्या कार्यामुळे नैराश्याची लक्षणे वाढतात आणि एसएसआरआय (SSRI) औषधे ही लक्षणे कमी करण्यास प्रभावी ठरतात असा निष्कर्ष काढला. सेरोटोनिन सिद्धांत हा मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. बरोज आणि डिमेलो (2002) यांनी (American Journal of Psychiatry) म्हटले आहे, "सेरोटोनिन सिद्धांताने नैराश्याच्या जैविक आधाराला समजण्यास आणि प्रभावी उपचार विकसित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे." एसएसआरआय औषधांचा व्यापक वापर हा केवळ लोकप्रिय सिद्धांतावर आधारित नाही, तर क्लिनिकल चाचण्यांमधील यशस्वी परिणामांवर आधारित आहे, जसे की क्विटकिन et al. (2000) यांच्या अभ्यासात (Quitkin, F. M., et al., 2000, "Placebo-Controlled Trials of SSRIs," American Journal of Psychiatry) दिसून आले आहे की एसएसआरआय वापरल्याने रुग्णांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. हा सिद्धांत सामान्य लोकांच्या समजुतीवर सकारात्मक परिणाम करतो, कारण तो रुग्णांना त्यांच्या स्थितीला एक जैविक आधार आहे याची जाणीव करून देतो, ज्यामुळे उपचारांबद्दल आशावाद निर्माण होतो. ९० टक्के लोकांचा रासायनिक असंतुलनावरील विश्वास हा चुकीचा नसून, वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे, जसे की हिर्शफेल्ड (2000) यांनी (Journal of Clinical Psychiatry) म्हटले आहे, "रासायनिक असंतुलनाची समजूत रुग्णांना उपचार घेण्यास प्रोत्साहित करते." तसेच, असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत की प्रतिनैराश्य औषधांमुळे सेरोटोनिनची पातळी दीर्घकाळ कमी होते; उलट, ही औषधे मेंदूतील रासायनिक संतुलन सुधारण्यास मदत करतात, जसे की Blier et al. (1998) यांनी (Biological Psychiatry) दाखवले आहे. थेरपी आणि जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे असले तरी, जैविक घटकांकडे दुर्लक्ष करून केवळ तणाव किंवा सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित करणे अपुरे ठरू शकते. त्यामुळे, प्रतिनैराश्य औषधांचा समावेश असलेला एक सर्वसमावेशक उपचार दृष्टिकोन नैराश्याच्या व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी ठरू शकतो, जसे की थेस आणि स्टायन (2003) यांनी (The Lancet) सुचवले आहे.

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 14:51
खुलासा १. मला हा पेपर महत्त्वाचा वाटण्याचे मुख्य कारण काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. ५. "चेतारसायनांचे असंतुलन" असा निष्कर्ष काढण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही लॅबटेस्ट अजून अस्तित्त्वात नाहीत. टीप - शक्य तेव्ह्ढ्या सभ्य भाषेत आणि संयमाने खुलासा केला आहे याची नोंद घ्यावी. कुचेष्टा, मिस-कोटींग, घाईने चुकीचे अर्थ काढणे इ० आढळल्यास मुलाहिजा ठेवला जाणार नाही तसेच बेसिक आदर पण ठेवला जाणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 07/15/2025 - 20:27
१ काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. मी वर दुवा दिलेला असून त्यातील महत्त्वाचा भागही उद्धृत केलाय २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. रुग्ण आणि डॉक्टर जर एकाच पातळीवर असतील तर डॉक्टर कडे जायचेच कशाला? डॉक्टर औषध बंद करायला सांगतात त्यामागे काही तरी तर्कशास्त्र असते शिवाय त्यांचा मोठा अनुभव असतो. . डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरेच "हुशार" रुग्ण डॉक्तरची उलट तपासणी करण्याच्या स्वरात विचारतात तेंव्हा डॉक्टर फारसे आनंदित होत नाहीत'. त्याच बरोबर काही वरिष्ठ डॉक्टरांचा अहं पण असतो ( तू मला विचारणारा कोण/ डॉक्टर तू का मी). माझाच एक वर्ग मित्र (इंजियनीयर आणि एम बी ए) एका डॉक्टरांकडे बायकोच्या ऍबसेस बद्दल अँटिबायोटिकस पॉलिसी डिस्कस करू पाहत होता. त्या डॉक्टरांनी त्याच्या बायकोला स्पष्ट सांगितले परत माझ्याकडे येऊ नका. टाळी एकाच हाताने वाजत नाही. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. कोणत्याही औषधाचा इतर दुष्परिणाम पण असू शकतो. परंतु नैराश्य असणारा/असणारी रुग्ण त्यातून स्वतःचे सांत्वन (SOLACE) करण्यासाठी अतिरिक्त खातात हे फार मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण स्वादिष्ट अन्न हे नेहमीच मनाला आनंददायक असते त्यामुळे नैराश्य असलेल्या व्यक्ती अशा निराशावादी विचारातून तात्पुरती सुटका करण्यासाठी स्ववादिष्ट अन्न अतिरिक्त प्रमाणात खातात. कित्येक वेळा रुग्ण स्वतःच्या मनाने मध्येच औषधे (SSRI) थांबवतात याला त्या औषधांबद्दल अपप्रचार फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे त्यामुळे औषध बंद केले कि आजार परत उफाळतो आणि दोष बऱ्याचदा औषधावर येतो

आता सगळेच अकलेचे तारे तोडत आहेत तेव्हा मी ही 2 4 तारे तोडून घेतो. माझे एक नल हायपोथेसिस आहे की Depression is not in brain, depression is in guts. डिप्रेशन मध्ये उपवास, तोही दीघकालीन, 3, 4 , 5 वगैरे दिवस, तोही केवळ पाणी पिऊन, आणि ह्या प्रक्रियेत muscle loss कमीत कमी व्हावा म्हणून हलका व्यायाम असे केल्यास काय फरक पडतो हे तपासून पाहायला मजा येईल . अनावश्यक अन्नाचे सेवन हे अनेक आजारांना कारणीभूत ठरते हे सर्वांना ज्ञात आहेच , फक्त डिप्रेशन बाबत ते खरे आहे का तपासून पाहायला हवे.

In reply to by युयुत्सु

बऱ्यापैकी सत्य म्हणजे काय ? एक तर सत्य असते किंवा असत्य असते. बऱ्यापैकी सत्य हा काय नवीन प्रकार ? =))))

In reply to by युयुत्सु

तुम्हाला सत्य आणि अंदाज ह्यातील फरक कळतो का ? उद्या तुम्ही साडी नेसून इमेज रिकाग्निशन पुढे आलात आणि अल्गोरीडम ने, 50- 50% स्त्री किंवा पुरुष म्हणाले, किंवा 80 टक्के बैल आणि 20 टक्के गाय म्हणले किंवा 100% गाढव असे म्हणाले किंवा अजून काही म्हणाले तर ते सत्य होईल काय ? बऱ्यापैकी सत्य असे काही नसते. तसे असते त्याला अंदाज, ठोकताळा वगैरे म्हणतात. सत्य नाही. पण असो. तुम्ही भाजप, संघ, हिंदू धर्म , ब्राह्मण वगैरे जे लेख पाडता त्या विषयातील तुमचे आकलन जे की " बऱ्यापैकी सत्य" आहे, हे माझ्या आता आकलनास आले. आता मी थांबतो. बऱ्यापैकी क्षमा केली पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 02:33
काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग तुम्हाला मान्य नसतील तर मी आता माफ करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 07:41
गोडबोल्याना सँपल-स्पेस ची संकल्पना कळते का, असा मला प्रश्न पडला आहे. अंदाज वर्तवण्यासाठी ऐतिहासिक घटनांचे (सत्य आणि असत्य) फ्रिक्वेन्सी डीस्ट्रीब्युशन हे प्राथमिक आधार असते हे पण त्यांना माहित नाही आणि मुख्य म्ह० जेव्हा आकडेवारी उपलब्ध नसते तेव्हा काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग केले जातात हेही त्यांना मान्य नसेल तर मोठा चिंतेचा विषय आहे स्वगत- नामस्मरणाने मेंदूचे बर्‍यापैकी नेक्रॉसिस घडून येत असावे यावर पी०एच्०डी० करावी म्हणतो.

In reply to by युयुत्सु

मी आधीच अन्यत्र म्हणालो होतो तसे - सत्य म्हणजे Truth असे शिकलेल्या लोकांना सत्य म्हणजे काय कळूच शकत नाही. असो.

युयुत्सु Tue, 07/15/2025 - 18:30
बऱ्यापैकी सत्य म्हणजे - गट-ब्रेन संभाषण ही कल्पना आता मान्य आहे पण पूर्णपणे विकसित नाही की जिचा क्लिनिकल प्रॅक्टिस्मध्ये नैराश्याच्या उपचारांसाठी समावेश केला आहे. तसेच डीप्रेशनच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याने पूर्ण सत्य नाही,म्हणून बर्‍यापैकी सत्य!

कंजूस Tue, 07/15/2025 - 18:58
काही अपेक्षा ठेवून प्रयत्न करणाऱ्याला आपटी खाल्ली की नैराश्य येते. मग वेगवेगळी हार्मोन्स शरिरात अनिर्बंध धावू लागतात. तर ती औषधाने कमी करून किंवा दाबून टाकण्याचे नैराश्य कसे जाणार? कोण कोणाचे कारण आणि परिणाम आहे हे ध्यानात घ्यावे. डॉक्टरांकडे जाऊन काहीही होणार नाही. नैराश्याचे कारण पराभव, अपेक्षाभंग, अपयश हे आहेत. ती दूर झाली तर कामच झाले. औषधे घेऊन फक्त असेडिटी वाढते.

कपिलमुनी Tue, 07/15/2025 - 21:49
मुलाहिजा ठेवणार नाही, यांव त्यांव करणार नाही टाईप धमक्या द्यायची काय गरज असते ?? आमच्या शेटे सरांच्या बागेतील गवत उपटणार का ?
लेखनविषय:
ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या ====================== एक महत्त्वाच्या व्यापक आढाव्यातून आढळले आहे की नैराश्य हे रासायनिक असंतुलनामुळे होते याला कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या एका प्रमुख व्यापक आढाव्यात असे आढळून आले आहे की नैराश्य हे सेरोटोनिनची कमी पातळी किंवा सेरोटोनिन क्रियेतील घट यामुळे होते याचा पटवणारा पुरावा मिळत नाही.