मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसाळी भटकंती - खोपोली

कंजूस ·
पावसाळी भटकंती - खोपोली.

पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला, सगळा परिसर हिरवा होतो, झरे धावू लागतात आणि आपली सॅक भरण्याची गडबड सुरू होते.

खोपोली हे गाव खंडाळा घाटाच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. पावसाळा सुरू झाला की डोंगरावरून वाहणारे धबधबे दिसू लागतात. मुंबई लोकल ट्रेनस दर दोन तासांनी खोपोलीला येतात. तिकिट फक्त वीस रुपये. दोन तासांच्या प्रवासानंतर निसर्गात. तर इकडे

१. KP waterfall.
२. झेनिथ धबधबा.इथल्या झेनिथ कंपनीने काही सोयी पुरवल्या होत्या म्हणून ते नाव पडले.
३.याच्या उजवीकडे आणखी एक धबधबा,

बघा,प्रेक्षणीयच. फोटो नंबर एक,असे वाटत आहे की कुणी साधू महाराज गळ्यात स्फटिकाच्या माळा घालून सुखासना मधे साधनेला बसले आहेत. मस्तच.

मस्त भटकंती. प्रकाशचित्रे मस्त . स्वस्तात मस्त भटकंती ... तरी यावेळी खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले का ? वारंवारता कमी आहे त्यामुळे टाकले तर बरे होईल. कर्जतहून खोपोलीला जाण्याचा काही इतर पर्याय असल्यास पण कळवा ....

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 02/07/2025 - 14:45
>> खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले>> मुंबईतील पर्यटकच इथे अधिक जातात आणि त्या सर्वांना m indicator app माहीत असते त्यामुळे त्या वेळापत्रकाची देण्याची गरज वाटली नाही. किंवा पनवेल ते खोपोली रस्ता आहेच. सिंहगड कर्जत ला 8:05 ला आल्यास 8:36 ची खोपोली ट्रेन आहे. UTS APP ने तिकिट काढता येईल. प्रगती एक्सप्रेस साठी (९:१८) ०९:४०ची खोपोली आहे. A.पण पुण्याहून( रेल्वेने )येणारे असतील तर त्यासाठी देतो. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या आहेत तसेच लोकल ट्रेनसही आहेत त्याने लोणावळ्याला येता येते. लोणावळ्याला बाहेर पडून एसटीबस डेपोकडे जाताना अगोदरच डावीकडे एका गल्लीत " लोणावळा ते खोपोली" जाणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या बसेस उभ्या असतात. ( विचारा, सापडेल) साधारणपणे अर्धा ते एक तासाने बस असतात. त्यात बसून शेवटच्या खोपोली डेपोत उतरावे. येथून पाचशे मिटर्सवर खोपोली रेल्वे स्टेशन आहे. तिथे वेगवेगळे ओटो रिक्षा स्टँड आहेत. १.खोपोली रेल्वे स्टेशन ते गगनगिरी महाराज मठ ( एक किलोमीटर) १५/प्रती सीट २.खोपोली रेल्वे स्टेशन ते झेनिथ वाटरफालसाठी /KP WATERFALLS नाका दत्तमंदिर आहे ( अंदाजे दोन किलोमिटर) २०रु/सीट आहे. ३. गगनगिरी मठ ते दत्तमंदिर झेनिथ वाटरफालसाठी ४०/- सीट. खोपोली ते कर्जत रस्त्याने कुणी जात नाही. लोकल ट्रेनच सोयीची आहे. वाटेत पळसधरी स्टेशनला उतरून तलाव, अक्कलकोट स्वामी मंदिर मठ आणि एक धबधबा आहे ते पाहता येईल. शिवाय सोनगिरी ट्रेकही आहे. B. पुण्याहून वाहनाने रस्त्याने येणार असाल तर घाटातले "खोपोली डायवर्शन" पकडून खाली "खालापूर" नाक्या पर्यंत यावे. तिथून राईट टर्न घेऊन बाजार रस्त्याने खोपोली स्टेशन गाठता येईल. शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते . शक्यतो टाळावे. तिकडे तीन चार तास खूप होतात.

In reply to by कंजूस

धन्यवाद. विचारणारच होतो कारण पळसदरी पुणे मुंबई प्रवासात पास होतांना दिसते पण तिथे असणारी प्रेक्षणीय स्थळांची माहिती नव्हती.

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 03/07/2025 - 15:41
भाविकांसाठी पळसदरीच्या अक्कलकोट स्वामी मठात दर गुरुवारी आणि पौर्णिमेला प्रसादाचे जेवण दुपारी असते. खोपोलीच्या गगनगिरी मठातही दुपारी अकरा ते दीड भोजन प्रसाद ( रु वीस फक्त) रोजच असतो. इथे मात्र विकांत नसला तरी दोनशे भाविक प्रसादाला असतात.

In reply to by श्वेता व्यास

कंजूस 03/07/2025 - 15:36
आपल्या वाहनाने जर का माथेरानला जाणार असाल तर तिकडून हॉटेलातून सकाळी चेकाऊट केल्यावर भिवपुरी येथील धरण पाहता येईल. किंवा भिवपुरी फॉल्स ( पूर्वीचं नाव अशाणे धबधबा) पाहता येईल. कुटुंबासह जाण्यासाठी हा उत्तम आहे. तसेच पुढे खोपोलीला जाऊन झेनिथ धबधबा पाहता येईल. परतताना पुणे किंवा मुंबई महामार्ग आहेच. म्हणजे तो दिवसही मजेत जाईल.

In reply to by कंजूस

होय, आपल्या वाहनानेच प्रवासाचा बेत असतो, त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुसरा दिवसही सत्कारणी लागेल. यापैकी फक्त गगनगिरी मठ पाहिलेला आहे आधी. पावसाळा नसतानाही निसर्गरम्य परिसर असतो, आता तर तुमच्या प्रचिंप्रमाणे नक्कीच सुंदर दिसेल.

नूतन 17/07/2025 - 02:50
निसर्गरम्य ठिकाण आहे. लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना म्हणजे 75/76 साली गेल्याचं आठवतंय. माझ्या आठवणीप्रमाणे तिथे झेनिथ कंपनीची वसाहत होती. माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक तिथे रहात होते. म्हणून मैत्रिणी मैत्रीणी गेलो होतो.

कंजूस 17/07/2025 - 04:00
नेरळचा आनंदवाडी धबधबाही सुंदर आणि जाण्यासाठी योग्य आहे. स्टेशनपासून शेअर रिक्षा मिळतात.( ५०/- सीट). बाजारातून महावीर चौकातून रिक्षा घेतल्यास २०/- सीट आहे. हा चौक जवळच आहे. शनिवार रविवारी मात्र जाऊ नका.

बघा,प्रेक्षणीयच. फोटो नंबर एक,असे वाटत आहे की कुणी साधू महाराज गळ्यात स्फटिकाच्या माळा घालून सुखासना मधे साधनेला बसले आहेत. मस्तच.

मस्त भटकंती. प्रकाशचित्रे मस्त . स्वस्तात मस्त भटकंती ... तरी यावेळी खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले का ? वारंवारता कमी आहे त्यामुळे टाकले तर बरे होईल. कर्जतहून खोपोलीला जाण्याचा काही इतर पर्याय असल्यास पण कळवा ....

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 02/07/2025 - 14:45
>> खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले>> मुंबईतील पर्यटकच इथे अधिक जातात आणि त्या सर्वांना m indicator app माहीत असते त्यामुळे त्या वेळापत्रकाची देण्याची गरज वाटली नाही. किंवा पनवेल ते खोपोली रस्ता आहेच. सिंहगड कर्जत ला 8:05 ला आल्यास 8:36 ची खोपोली ट्रेन आहे. UTS APP ने तिकिट काढता येईल. प्रगती एक्सप्रेस साठी (९:१८) ०९:४०ची खोपोली आहे. A.पण पुण्याहून( रेल्वेने )येणारे असतील तर त्यासाठी देतो. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या आहेत तसेच लोकल ट्रेनसही आहेत त्याने लोणावळ्याला येता येते. लोणावळ्याला बाहेर पडून एसटीबस डेपोकडे जाताना अगोदरच डावीकडे एका गल्लीत " लोणावळा ते खोपोली" जाणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या बसेस उभ्या असतात. ( विचारा, सापडेल) साधारणपणे अर्धा ते एक तासाने बस असतात. त्यात बसून शेवटच्या खोपोली डेपोत उतरावे. येथून पाचशे मिटर्सवर खोपोली रेल्वे स्टेशन आहे. तिथे वेगवेगळे ओटो रिक्षा स्टँड आहेत. १.खोपोली रेल्वे स्टेशन ते गगनगिरी महाराज मठ ( एक किलोमीटर) १५/प्रती सीट २.खोपोली रेल्वे स्टेशन ते झेनिथ वाटरफालसाठी /KP WATERFALLS नाका दत्तमंदिर आहे ( अंदाजे दोन किलोमिटर) २०रु/सीट आहे. ३. गगनगिरी मठ ते दत्तमंदिर झेनिथ वाटरफालसाठी ४०/- सीट. खोपोली ते कर्जत रस्त्याने कुणी जात नाही. लोकल ट्रेनच सोयीची आहे. वाटेत पळसधरी स्टेशनला उतरून तलाव, अक्कलकोट स्वामी मंदिर मठ आणि एक धबधबा आहे ते पाहता येईल. शिवाय सोनगिरी ट्रेकही आहे. B. पुण्याहून वाहनाने रस्त्याने येणार असाल तर घाटातले "खोपोली डायवर्शन" पकडून खाली "खालापूर" नाक्या पर्यंत यावे. तिथून राईट टर्न घेऊन बाजार रस्त्याने खोपोली स्टेशन गाठता येईल. शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते . शक्यतो टाळावे. तिकडे तीन चार तास खूप होतात.

In reply to by कंजूस

धन्यवाद. विचारणारच होतो कारण पळसदरी पुणे मुंबई प्रवासात पास होतांना दिसते पण तिथे असणारी प्रेक्षणीय स्थळांची माहिती नव्हती.

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 03/07/2025 - 15:41
भाविकांसाठी पळसदरीच्या अक्कलकोट स्वामी मठात दर गुरुवारी आणि पौर्णिमेला प्रसादाचे जेवण दुपारी असते. खोपोलीच्या गगनगिरी मठातही दुपारी अकरा ते दीड भोजन प्रसाद ( रु वीस फक्त) रोजच असतो. इथे मात्र विकांत नसला तरी दोनशे भाविक प्रसादाला असतात.

In reply to by श्वेता व्यास

कंजूस 03/07/2025 - 15:36
आपल्या वाहनाने जर का माथेरानला जाणार असाल तर तिकडून हॉटेलातून सकाळी चेकाऊट केल्यावर भिवपुरी येथील धरण पाहता येईल. किंवा भिवपुरी फॉल्स ( पूर्वीचं नाव अशाणे धबधबा) पाहता येईल. कुटुंबासह जाण्यासाठी हा उत्तम आहे. तसेच पुढे खोपोलीला जाऊन झेनिथ धबधबा पाहता येईल. परतताना पुणे किंवा मुंबई महामार्ग आहेच. म्हणजे तो दिवसही मजेत जाईल.

In reply to by कंजूस

होय, आपल्या वाहनानेच प्रवासाचा बेत असतो, त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुसरा दिवसही सत्कारणी लागेल. यापैकी फक्त गगनगिरी मठ पाहिलेला आहे आधी. पावसाळा नसतानाही निसर्गरम्य परिसर असतो, आता तर तुमच्या प्रचिंप्रमाणे नक्कीच सुंदर दिसेल.

नूतन 17/07/2025 - 02:50
निसर्गरम्य ठिकाण आहे. लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना म्हणजे 75/76 साली गेल्याचं आठवतंय. माझ्या आठवणीप्रमाणे तिथे झेनिथ कंपनीची वसाहत होती. माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक तिथे रहात होते. म्हणून मैत्रिणी मैत्रीणी गेलो होतो.

कंजूस 17/07/2025 - 04:00
नेरळचा आनंदवाडी धबधबाही सुंदर आणि जाण्यासाठी योग्य आहे. स्टेशनपासून शेअर रिक्षा मिळतात.( ५०/- सीट). बाजारातून महावीर चौकातून रिक्षा घेतल्यास २०/- सीट आहे. हा चौक जवळच आहे. शनिवार रविवारी मात्र जाऊ नका.

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

राघवेंद्र ·

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.

आहुपे - चिंब पावसाळी भटकंती

प्रचेतस ·

राघवेंद्र 27/06/2025 - 01:40
ही सहल म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक स्वर्गीय अनुभव! सगळी हवा, धुके, धबधबे आणि हिरवळ मनाला आल्हाददायक वाटली. आठवणीत राहणारी, मन भरून टाकणारी एक अप्रतिम ट्रिप!

चिंब पावसानं रानं झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी झाकू नको कमळनबाई, चांदणं गोंदणी अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी सांगता ना येई काही साजणा बोलांनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी ना धो महानोर आठवले (आठवले क्रियापद)

किल्लेदार 29/06/2025 - 08:10
सुंदरच. आणि मुख्य म्हणजे तीट लावण्यापुरताही मनुष्यप्राणी दिसत नाही त्यामुळे दृष्ट लागण्याएवढे सुंदर.

प्रचि बघुनच गारेगार वाटले. मस्त केलीत भटकंती. गोरख मच्छिन्द्राचे सुळके बघुन अंगावर रोमांच आले. जुने दिवस आठवले :)

राघवेंद्र 27/06/2025 - 01:40
ही सहल म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक स्वर्गीय अनुभव! सगळी हवा, धुके, धबधबे आणि हिरवळ मनाला आल्हाददायक वाटली. आठवणीत राहणारी, मन भरून टाकणारी एक अप्रतिम ट्रिप!

चिंब पावसानं रानं झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी झाकू नको कमळनबाई, चांदणं गोंदणी अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी सांगता ना येई काही साजणा बोलांनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी ना धो महानोर आठवले (आठवले क्रियापद)

किल्लेदार 29/06/2025 - 08:10
सुंदरच. आणि मुख्य म्हणजे तीट लावण्यापुरताही मनुष्यप्राणी दिसत नाही त्यामुळे दृष्ट लागण्याएवढे सुंदर.

प्रचि बघुनच गारेगार वाटले. मस्त केलीत भटकंती. गोरख मच्छिन्द्राचे सुळके बघुन अंगावर रोमांच आले. जुने दिवस आठवले :)
पावसात भिजलेले सह्याद्रीतले चिंब रस्ते, धुक्यात हरवलेली गूढरम्य देवराई आणि खोलवर कोसळणारे कडे; याहून अधिक सुंदर काही असतं का? पुणे, नगर, नाशिक, सातारा कोणत्याही जिल्ह्यांच्या पश्चिमेकडे या दिवसांत जावं, सर्वत्र थोड्या फार फरकाने असंच दृश्य सगळीकडे दिसत असतं. पण पुण्याचा पश्चिम भाग त्यामानाने जवळ, एका दिवसांत अगदी आटोपशीपणे उरकणारा त्यामुळे यंदा ऐन पावसाळ्यात जायचं ठरवलं ते आहुप्याला. खरं तर खूप पूर्वी आहुपे घाटातून कोकणात खोपीवलीला उतरलो होतो पण नंतर ह्या नितांतसुंदर ठिकाणी जाणं झालंच नव्हतं. मात्र काही योग येतात ते असे अचानकच. आहुपे तसं पुण्याला जवळ. घरापासून जेमतेम सव्वाशे किमी.

पाच सागर

लाल गेंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
निळ्या जळाच्या पृथ्वीवरती सागर ते पाच जमीन आपली करू लागते मधोमध नाच भारतभूमीचे पद धुणारा हिंदी तो सागर दक्षिणेला जाऊन भेटतो दक्षिण सागरास दोन खंडांच्या मध्येच रुळतो अटलांटिक सागर सगळ्या खंडांना मिळून उरतो प्रशांत महासागर पृथ्वीच्या त्या शीरकमलावर व्रतस्थ तो आर्टिक्ट सतत ध्यानस्थ बसुनी राहतो सर्वात छोटा सागर

जागतिक योग दिवशी ऋषभ पंतचं प्रात्यक्षिक!

मार्गी ·

क्रिकेटमधे अशा प्रकारचं सिलेब्रेशन जरा नवंच वाटलं. सर्कशीतल्या त्या सुंदर युवती आपल्या शरिराच्या अशा विविध लवचिक हालचाली करतांना पाहिलंय पण क्रिकेटमधे पंत ज्या पद्धतीने लिलया उडी मारतो ते लैच भारी. 'पत्त्यामधले राजे आम्ही, मी असा कसा, असा कसा वेगळा वेगळा' बावळा. म्हणा नंदुशेठ. सॉरी पंतशेठ.
मागच्या चेंडूवर काहीही होवो, पुढचा चेंडू- पुढचा क्षण नवीन आहे. मागच्या क्षणाचं "बॅगेज" मी नेणार नाही आणि तो चेंडू जसा वाटेल, तसा खेळेन हे पंतचं ब्रीद!
सहमत. माझं तर लै डोकं खराब होतं त्याची बॅटींग पाहतांना. पुढच्या बॉलला हा भावड्या झोपून शॉट मारेल, बसून शॉट मारेल, पळत मारेल याचा काहीच भरवसा नाही. याचं क्रिकेटच वेगळं आहे. पंत नीट खेळ रे भावड्या असे सारखे तोंडून शब्द येत असतात. -दिलीप बिरुटे

क्रिकेटमधे अशा प्रकारचं सिलेब्रेशन जरा नवंच वाटलं. सर्कशीतल्या त्या सुंदर युवती आपल्या शरिराच्या अशा विविध लवचिक हालचाली करतांना पाहिलंय पण क्रिकेटमधे पंत ज्या पद्धतीने लिलया उडी मारतो ते लैच भारी. 'पत्त्यामधले राजे आम्ही, मी असा कसा, असा कसा वेगळा वेगळा' बावळा. म्हणा नंदुशेठ. सॉरी पंतशेठ.
मागच्या चेंडूवर काहीही होवो, पुढचा चेंडू- पुढचा क्षण नवीन आहे. मागच्या क्षणाचं "बॅगेज" मी नेणार नाही आणि तो चेंडू जसा वाटेल, तसा खेळेन हे पंतचं ब्रीद!
सहमत. माझं तर लै डोकं खराब होतं त्याची बॅटींग पाहतांना. पुढच्या बॉलला हा भावड्या झोपून शॉट मारेल, बसून शॉट मारेल, पळत मारेल याचा काहीच भरवसा नाही. याचं क्रिकेटच वेगळं आहे. पंत नीट खेळ रे भावड्या असे सारखे तोंडून शब्द येत असतात. -दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील) ✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा ✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द ✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक ✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता ✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ ✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही! ✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य ✪ मैदानावरचं मैदानावर सोडून देण्याची कला! नुकताच झालेला भारत- इंग्लंड कसोटी सामना! शेवटच्या तासापर्यंत रंगत कायम असलेला व अटी- तटीचा झालेला हा सामना!

( ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,)

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस 26/06/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार 26/06/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"

प्रचेतस 26/06/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार 26/06/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही.