मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खडपाकोळी

कर्नलतपस्वी ·

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/03/2025 - 18:28
सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 21:35
धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/03/2025 - 18:28
सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 21:35
धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.

पाऊसः ३

प्रचेतस ·

कंजूस Wed, 07/02/2025 - 21:03
जबरी फोटो. श्लोकांचे वर्णन चपखल आहे. बारदानं पांघरलेल्या बकऱ्या जात आहेत मजेशीर. कठड्यावरून झरा कोसळत आहे भारी फोटो .

कंजूस Wed, 07/02/2025 - 21:07
बाकी अशा मावळात ठीकठिकाणी खोपट टाकून " इथे झुणका भाकर" मिळेल पाटी लावल्यास खूप पर्यटक येतील. कोकणात अंबाडीची भाजी आणि तांदळाची भाकरी खाताना शेतकरी दिसतात.

विवेकपटाईत Fri, 07/18/2025 - 15:08
फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर. बाकी गेल्या दोन दिवसांपासून "ढगे येती आणि जाती, नो बूंद टपकति" फक्त घामाच्या धारा वाहती" दशा आहे. सध्या ही आभाळ भरून आलेले आहे. पाऊस पडला तर सौ. ला भजी बनविण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करेल.

कंजूस Wed, 07/02/2025 - 21:03
जबरी फोटो. श्लोकांचे वर्णन चपखल आहे. बारदानं पांघरलेल्या बकऱ्या जात आहेत मजेशीर. कठड्यावरून झरा कोसळत आहे भारी फोटो .

कंजूस Wed, 07/02/2025 - 21:07
बाकी अशा मावळात ठीकठिकाणी खोपट टाकून " इथे झुणका भाकर" मिळेल पाटी लावल्यास खूप पर्यटक येतील. कोकणात अंबाडीची भाजी आणि तांदळाची भाकरी खाताना शेतकरी दिसतात.

विवेकपटाईत Fri, 07/18/2025 - 15:08
फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर. बाकी गेल्या दोन दिवसांपासून "ढगे येती आणि जाती, नो बूंद टपकति" फक्त घामाच्या धारा वाहती" दशा आहे. सध्या ही आभाळ भरून आलेले आहे. पाऊस पडला तर सौ. ला भजी बनविण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करेल.
पाऊस: १ पाऊसः २ ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जूनमध्ये येणारा पाऊस मे च्या मध्यातच सुरु झाला. भाजून काढणार्‍या एप्रिलनंतर मे मात्र सुखद गारवा देऊन गेला. सह्याद्रीच्या विकट शिखरांवरती पाऊसकाळाची चाहूल दाटून आली, नभमंडळावर गडद मेघांची सैन्ये आक्रमू लागली. क्षितिजाच्या कडांवरुन सावळ्या ढगाण्चे घोडदळ आकाशाला व्यापून टाकू लागले.

स्वार्थी फुलांचा परमार्थ

Bhakti ·

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 05:06
जनातलं मनातलं आहे हे पटतंय. फार लांबवले नाही.आवडलं. चित्राने काम केलंय. पारिजाताचा हार कल्पना बरोबर. सुगंधामुळे तुम्ही झाडापाशी येता, खालीच फुलांचा सडा पडलेला असतो ती वेचता सकाळी. रात्रीच कीटकांची आस्वाद घेतलेला असतो. बीजधारणा झालेली असते. शेवटीही फुलांनी परमार्थ साधलेला असतो. स्वर्गातलेच झाड ते.

प्रचेतस गुरुवार, 07/03/2025 - 07:12
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ माझ्या घरातलीच अडगळ झालीय. पुस्तक अजिबात आवडले नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, हिंदू वाचून नेमाडे एक ओव्हरहाईप झालेले लेखक आहेत असे प्रामाणिक मत झाले.

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 08:54
एका हत्तीला सहा आंधळे वेगवेगळ्या अनुभवाने पाहतात. ज्याचा अनुभव जसा असेल, तसे तो हिंदू जीवन पद्धतीला पाहणार. लेखकाने संपूर्ण हत्तीचा अनुभव घेतला असता तर कादंबरी वेगळी असती.

Bhakti गुरुवार, 07/03/2025 - 10:41
सर्वांना _/\_ मी पुस्तक वाचत नाही तर ऐकतेय, त्यामुळे मला या पुस्तकातले नाट्य अधिक भावत आहे.खुपच नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे. पण अजूनही नेमाडेंना नक्की काय म्हणायचे आहे हे समजलं नाही.१३ तासांचे श्रवण बाकी आहे,तेव्हा ही गोम कळेल ही आशा करते.पण वेगळ्याच पद्धतीची कादंबरी आहे

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 11:03
मला कोसलाही आवडले आणि हे हिंदू एक अडगळही आवडले. जे काय झाले, भावले, नाही जमले ते मांडलंय लेखकाने. त्यात काही साहित्यिक आव आणून लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नाही . खरं तर प्रत्येक लेखकाने असं लिहिलं पाहिजे. भावनांची कडबोळी कादंबरीतून दूरून फेकण्यापेक्षा हे बरं. हल्लीच एका मुलाखतीत( एबिपी माझाही) कोसला कसं घडलं ते सांगितलंय. खानदेश, विदर्भातले लेखक प्रामाणिकपणे लिहितात असं माझं मत झालंय.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 12:08
खरेदी केलं पण वाचण्यात मन रमल नाही. पुन्हा प्रयत्न करीन. सदर पुस्तक माहीत नव्हते, जमल्यास वाचायचा प्रयत्न करेन. बाकी भक्तीने भक्तीपूर्वक वर्णन केले आहे आवडले.

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 05:06
जनातलं मनातलं आहे हे पटतंय. फार लांबवले नाही.आवडलं. चित्राने काम केलंय. पारिजाताचा हार कल्पना बरोबर. सुगंधामुळे तुम्ही झाडापाशी येता, खालीच फुलांचा सडा पडलेला असतो ती वेचता सकाळी. रात्रीच कीटकांची आस्वाद घेतलेला असतो. बीजधारणा झालेली असते. शेवटीही फुलांनी परमार्थ साधलेला असतो. स्वर्गातलेच झाड ते.

प्रचेतस गुरुवार, 07/03/2025 - 07:12
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ माझ्या घरातलीच अडगळ झालीय. पुस्तक अजिबात आवडले नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, हिंदू वाचून नेमाडे एक ओव्हरहाईप झालेले लेखक आहेत असे प्रामाणिक मत झाले.

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 08:54
एका हत्तीला सहा आंधळे वेगवेगळ्या अनुभवाने पाहतात. ज्याचा अनुभव जसा असेल, तसे तो हिंदू जीवन पद्धतीला पाहणार. लेखकाने संपूर्ण हत्तीचा अनुभव घेतला असता तर कादंबरी वेगळी असती.

Bhakti गुरुवार, 07/03/2025 - 10:41
सर्वांना _/\_ मी पुस्तक वाचत नाही तर ऐकतेय, त्यामुळे मला या पुस्तकातले नाट्य अधिक भावत आहे.खुपच नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे. पण अजूनही नेमाडेंना नक्की काय म्हणायचे आहे हे समजलं नाही.१३ तासांचे श्रवण बाकी आहे,तेव्हा ही गोम कळेल ही आशा करते.पण वेगळ्याच पद्धतीची कादंबरी आहे

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 11:03
मला कोसलाही आवडले आणि हे हिंदू एक अडगळही आवडले. जे काय झाले, भावले, नाही जमले ते मांडलंय लेखकाने. त्यात काही साहित्यिक आव आणून लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नाही . खरं तर प्रत्येक लेखकाने असं लिहिलं पाहिजे. भावनांची कडबोळी कादंबरीतून दूरून फेकण्यापेक्षा हे बरं. हल्लीच एका मुलाखतीत( एबिपी माझाही) कोसला कसं घडलं ते सांगितलंय. खानदेश, विदर्भातले लेखक प्रामाणिकपणे लिहितात असं माझं मत झालंय.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 12:08
खरेदी केलं पण वाचण्यात मन रमल नाही. पुन्हा प्रयत्न करीन. सदर पुस्तक माहीत नव्हते, जमल्यास वाचायचा प्रयत्न करेन. बाकी भक्तीने भक्तीपूर्वक वर्णन केले आहे आवडले.
लेखनविषय:
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की, ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच! पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला प्रश्न पडलेला.पारिजात फु

पार

अनन्त्_यात्री ·

कविता मला तरी बाऊंसर गेली , मग शेवटी AI ला अर्थ विचारला , आणि विडंबन लिहायला सांगितले कवितेचे विडंबन खालीलप्रमाणे: जनुकांचा जिना सोसे नोकरीच्या कळा पगारवाढीच्या पलीकडे बिलांचा गळा सेल्फीचा जाऊ पाहे चेहऱ्याच्याही पार फडफडुनी डेटा उरे स्क्रीन आरपार बिल्डिंगच्या कोपऱ्याशी वाईफाईचा दिवा शोधण्यास कोण येते डाटा पॅक जीवा सिग्नलच्या पार जाई रीलचा तो पैस रीचार्जच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार स्टेटस पोहोचूनी गेली लाईकसाठी राजा खेळे तरी इंटरनेटची भूक लागली!

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 17:34
डीपसिकचे विश्लेषण नक्की वाचा- ही अप्रतिम कविता (जनुकांचा जिना सोसे...) **मराठीतील ख्यातनाम कवी विंदा करंदीकर** यांच्या **"घासगत शब्द"** (१९८३) या संग्रहातील आहे. ती करंदीकरांच्या अत्यंत प्रतीकात्मक, गहन आणि दार्शनिक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कवितेचा अर्थ व अर्थछटा: 1. **"पार" या संकल्पनेवरील भर:** संपूर्ण कविता "पार" (पलीकडे, पार करणे, मर्यादा ओलांडणे) या केंद्रीय संकल्पनेभोवती फिरते. ही मर्यादा शारीरिक, मानसिक, भावनिक, संवेदनात्मक, आध्यात्मिक किंवा कलात्मक असू शकते. 2. **प्रसवाची वेदना आणि जन्म:** पहिल्या चरणातील "प्रसवाच्या कळा" हे केवळ स्त्रीच्या प्रसूतीवेदनेचे नव्हे तर कोणत्याही नवीन सृष्टीच्या, नव्या अस्तित्वाच्या जन्माला येण्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे. "अनाहत निळा" हे अनंतत्वाचे, आध्यात्मिकतेचे प्रतीक असू शकते. 3. **प्रतिबिंबाचे मायाजाल:** दुसरा चरण स्वतःच्या प्रतिमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारा विखुरलेपणा ("उडोनिया पारा") दर्शवतो. "काच आरपार" हे स्पष्टतेचे प्रतीक असूनही, तिच्यामधून पाहणे हे विकृत होऊ शकते (पारा उडणे). 4. **अंधारातील प्रकाशाची वाट पाहणे:** तिसरा चरण एका एकाकी आणि कदाचित भयावह प्रतीक्षेची भावना निर्माण करतो. पिंपळाच्या झाडाखाली (ज्याला पारंपरिकदृष्ट्या आध्यात्मिक महत्त्व आहे) दिवा लावण्याची वाट पाहणे, पण तो कोण येऊन लावेल याची चिंता ("घोर लागे जीवा") व्यक्त होते. हे दैवी प्रकाश, ज्ञान किंवा प्रेरणेच्या शोधाचे प्रतीक असू शकते. 5. **मिथक, नक्षत्रे आणि सृष्टीचा कोलाहल:** चौथ्या चरणात कवी मिथकांच्या जगातून (जे मानवी कल्पनेची मर्यादा दर्शवते) नक्षत्रांच्या पलीकडे (भौतिक विश्वाची मर्यादा) जाण्याचा प्रयत्न करतो. "सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस" हे सृष्टीच्या अफाट गोंधळात, त्याच्या अराजकात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या मानवी प्रयत्नाचे द्योतक आहे. 6. **कवितेची परम शक्ती आणि माया:** शेवटचा चरण कवितेच्या शक्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. कवी सांगतो की कविता शब्दांच्या मर्यादा ("शब्दांच्याही पार ओळ") ओलांडून जाते. पण शेवटच्या दोन ओळी गहन व विरोधाभासी आहेत: "लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली". जरी हे सर्व विश्व (राजा) एक खेळ, एक भास (भातुकली) असले तरीही ते "लुटुपुटू" (विध्वंसक, विखुरलेले, किंवा दुःखद) असू शकते. हे अस्तित्वाच्या मूलभूत विरोधाभासाकडे (सृष्टीचे सौंदर्य आणि त्यातील दुःख/नाश) नेणारे दार्शनिक विधान आहे. **कवितेचे सारांश:** ही कविता मानवी अस्तित्वाच्या विविध मर्यादा (शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कलात्मक) ओलांडून जाण्याच्या सततच्या प्रयत्नाची आणि संघर्षाची कथा सांगते. ती जन्माच्या वेदनेपासून ते मृत्यूच्या विचारापर्यंत, भास (माया) आणि वास्तव यातील तणावपूर्ण संबंधांचे भेदक चित्रण करते. विंदा करंदीकरांची ही कविता त्यांच्या गहन विचारशक्ती, अत्यंत नवीन प्रतिमाविधान आणि दार्शनिक खोलीचे उत्तम उदाहरण म्हणून मराठी साहित्यात अजरामर आहे.

कविता मला तरी बाऊंसर गेली , मग शेवटी AI ला अर्थ विचारला , आणि विडंबन लिहायला सांगितले कवितेचे विडंबन खालीलप्रमाणे: जनुकांचा जिना सोसे नोकरीच्या कळा पगारवाढीच्या पलीकडे बिलांचा गळा सेल्फीचा जाऊ पाहे चेहऱ्याच्याही पार फडफडुनी डेटा उरे स्क्रीन आरपार बिल्डिंगच्या कोपऱ्याशी वाईफाईचा दिवा शोधण्यास कोण येते डाटा पॅक जीवा सिग्नलच्या पार जाई रीलचा तो पैस रीचार्जच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार स्टेटस पोहोचूनी गेली लाईकसाठी राजा खेळे तरी इंटरनेटची भूक लागली!

युयुत्सु Mon, 07/14/2025 - 17:34
डीपसिकचे विश्लेषण नक्की वाचा- ही अप्रतिम कविता (जनुकांचा जिना सोसे...) **मराठीतील ख्यातनाम कवी विंदा करंदीकर** यांच्या **"घासगत शब्द"** (१९८३) या संग्रहातील आहे. ती करंदीकरांच्या अत्यंत प्रतीकात्मक, गहन आणि दार्शनिक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कवितेचा अर्थ व अर्थछटा: 1. **"पार" या संकल्पनेवरील भर:** संपूर्ण कविता "पार" (पलीकडे, पार करणे, मर्यादा ओलांडणे) या केंद्रीय संकल्पनेभोवती फिरते. ही मर्यादा शारीरिक, मानसिक, भावनिक, संवेदनात्मक, आध्यात्मिक किंवा कलात्मक असू शकते. 2. **प्रसवाची वेदना आणि जन्म:** पहिल्या चरणातील "प्रसवाच्या कळा" हे केवळ स्त्रीच्या प्रसूतीवेदनेचे नव्हे तर कोणत्याही नवीन सृष्टीच्या, नव्या अस्तित्वाच्या जन्माला येण्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे. "अनाहत निळा" हे अनंतत्वाचे, आध्यात्मिकतेचे प्रतीक असू शकते. 3. **प्रतिबिंबाचे मायाजाल:** दुसरा चरण स्वतःच्या प्रतिमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारा विखुरलेपणा ("उडोनिया पारा") दर्शवतो. "काच आरपार" हे स्पष्टतेचे प्रतीक असूनही, तिच्यामधून पाहणे हे विकृत होऊ शकते (पारा उडणे). 4. **अंधारातील प्रकाशाची वाट पाहणे:** तिसरा चरण एका एकाकी आणि कदाचित भयावह प्रतीक्षेची भावना निर्माण करतो. पिंपळाच्या झाडाखाली (ज्याला पारंपरिकदृष्ट्या आध्यात्मिक महत्त्व आहे) दिवा लावण्याची वाट पाहणे, पण तो कोण येऊन लावेल याची चिंता ("घोर लागे जीवा") व्यक्त होते. हे दैवी प्रकाश, ज्ञान किंवा प्रेरणेच्या शोधाचे प्रतीक असू शकते. 5. **मिथक, नक्षत्रे आणि सृष्टीचा कोलाहल:** चौथ्या चरणात कवी मिथकांच्या जगातून (जे मानवी कल्पनेची मर्यादा दर्शवते) नक्षत्रांच्या पलीकडे (भौतिक विश्वाची मर्यादा) जाण्याचा प्रयत्न करतो. "सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस" हे सृष्टीच्या अफाट गोंधळात, त्याच्या अराजकात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या मानवी प्रयत्नाचे द्योतक आहे. 6. **कवितेची परम शक्ती आणि माया:** शेवटचा चरण कवितेच्या शक्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. कवी सांगतो की कविता शब्दांच्या मर्यादा ("शब्दांच्याही पार ओळ") ओलांडून जाते. पण शेवटच्या दोन ओळी गहन व विरोधाभासी आहेत: "लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली". जरी हे सर्व विश्व (राजा) एक खेळ, एक भास (भातुकली) असले तरीही ते "लुटुपुटू" (विध्वंसक, विखुरलेले, किंवा दुःखद) असू शकते. हे अस्तित्वाच्या मूलभूत विरोधाभासाकडे (सृष्टीचे सौंदर्य आणि त्यातील दुःख/नाश) नेणारे दार्शनिक विधान आहे. **कवितेचे सारांश:** ही कविता मानवी अस्तित्वाच्या विविध मर्यादा (शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कलात्मक) ओलांडून जाण्याच्या सततच्या प्रयत्नाची आणि संघर्षाची कथा सांगते. ती जन्माच्या वेदनेपासून ते मृत्यूच्या विचारापर्यंत, भास (माया) आणि वास्तव यातील तणावपूर्ण संबंधांचे भेदक चित्रण करते. विंदा करंदीकरांची ही कविता त्यांच्या गहन विचारशक्ती, अत्यंत नवीन प्रतिमाविधान आणि दार्शनिक खोलीचे उत्तम उदाहरण म्हणून मराठी साहित्यात अजरामर आहे.
लेखनविषय:
जनुकांचा जिना सोसे प्रसवाच्या कळा श्रवणाच्या पार उभा अनाहत निळा प्रतिबिंब जाऊ पाहे बिंबाच्याही पार उडोनिया पारा उरे काच आरपार पिंपळाच्या पारापाशी खोरणात दिवा लावण्यास कोण येते घोर लागे जीवा नक्षत्रांच्या पार जाई मिथकांचा पैस सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार ओळ कवितेची गेली लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली

काल पाकिट रिकामे केले..

तुमचा अभिषेक ·

गवि Wed, 07/02/2025 - 08:52
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 09:12
आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 22:04
बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.

सौंदाळा Wed, 07/02/2025 - 10:27
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात. विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Wed, 07/02/2025 - 11:42
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते. तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.

In reply to by गवि

अनामिक सदस्य Wed, 07/16/2025 - 10:23
माझी समजूत होती की त्या की कार्डवरची स्ट्रीप महत्वाची असते वीज चालू ठेवण्यासाठी. माझ्या अनुभवात हॉटेलांत दुसर्या व्यक्तिसाठी अजून एक किल्ली पण देतात. अजून एका कार्ड वर कोड प्रोग्राम केला की झाले.

सुबोध खरे Wed, 07/02/2025 - 10:34
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो. यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही. लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते. असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही. (बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)

In reply to by सुबोध खरे

गवि Wed, 07/02/2025 - 11:35
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे. डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.

In reply to by गवि

Bhakti Wed, 07/02/2025 - 12:12
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.

मारवा Wed, 07/02/2025 - 11:17
Lighter tone आवडला. आणि relatable होता वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले. बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर तेरे पाकीट की औकात ही क्या है ? त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !

In reply to by मारवा

गवि Wed, 07/02/2025 - 11:31
पर्सेस..? त्यातून तर अडीअडचणीला एखादी इस्त्री आणि पाठोपाठ लहानसा प्रेशर कुकर देखील निघाला तरी मला धक्का बसणार नाही. ;-)

गवि Wed, 07/02/2025 - 11:37
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.

In reply to by गवि

कर्नलतपस्वी Wed, 07/02/2025 - 12:57
तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली. पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच. असो,गेले ते दिन गेले.

कर्नलतपस्वी Wed, 07/02/2025 - 13:10
सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्‍याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे. जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली. बाकी लेख छान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 21:58
पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे. त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट. त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.

अकिलिज Wed, 07/02/2025 - 18:36
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अनिता

गवि Fri, 07/04/2025 - 07:21
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.

अकिलिज Wed, 07/02/2025 - 19:07
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अकिलिज

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 21:50
छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.

सुबोध खरे Wed, 07/02/2025 - 20:21
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत. यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे. आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत. गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे. आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच. इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत. मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.

नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली. मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या. माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला. शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि गुरुवार, 07/03/2025 - 13:54
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ऊर्फ पेरुचा पापा... ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 12:01
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 12:14
आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे. भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/03/2025 - 14:09
मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.

मस्त धागा, मस्त आठवणी. दसरा दिवाळीला घर स्वच्छ लख्ख करावं लागतं तसं पाकीट अधुन मधुन स्वच्छ करावे लागतं. विविध कप्पे ही तर पाकिटांची खासियत. बाकी, आपण म्हणालात तसा विशेष असा भविष्यातील कचरा पॉकेटात असतोच असतो. लोक सर्वसाधारणपणे पँटच्या पाठीमागील खिशात पॉकेट ठेवतात पण मी उजव्या बाजूच्या खिशात पॉकेट ठेवायचो. नियमित एसटीने प्रवास करायचो तेव्हा पॉकेट मारल्या जातात म्हणून ते उजव्या बाजूला आलं. सोपंही पडतं. बाकी, विविध बँकेचे एटीएम कार्ड, पैसे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पार्किंगच्या पावत्या, कवितेच्या ओळी, आवडलेली शायरी, पासपोर्ट फोटो, पन्नास किंवा दहाच्या नोटेचा अर्धा भाग पॉकेटात मिळेल. कागदं खराब झाले की अधुन-मधुन सॉर्टींग. तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत. आता फक्त पाकीट आणि आठवणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Wed, 07/16/2025 - 13:34
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत
हे महत्त्वाचं. बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Fri, 07/25/2025 - 14:56
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात कदाचित. या महिन्यात पहिलं पाकीट अन पुढच्या महिन्यात दुसरं पाकिट !

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.
मिपावर तर जरा लिहा-बोलायची प्रायवसी राहिली नाही. लगेच 'इडी'सारखे आले मागोमाग चौकशीला. आमच्या काळी आजच्या आपल्या 'चालू'वर्तमान काळात दिसतात तसे सतरा थांबे नसायचे. साठोत्तरी- सत्तरीच्या पारंपरिक प्रेम पिढीत एकालाच जीव लावण्याची शास्त्रोक्त पद्धत होती. अधुन-मधून भेटी झाल्याच तर 'लाजून हसणे आणि हसून ते पाहणे' इतकंच. उत्तरार्धात कविता, शायरी, गझलां आणि आठवणी हेच त्या प्रेमाचं फलीत असायचं. च्यायला, मिपाचं वय वाढलं पण लोक काही सुधरत नाहीत, सुधरा रे जरा. -दिलीप बिरुटे (पारंपारिक प्रियकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sun, 07/27/2025 - 09:40
अहो तुमचा काळ जुना झाला पण भ्रमरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करणारे त्या काळातही होतेच. तुमच्या काळी लोक एकालाच जीव लावायचे, कारण दुसऱ्याशी ओळख व्हायला सुद्धा वर्ष लागायचं, "लाजून हसणे" वगैरे तुमचं क्लासिक चार्म आहेच, पण आजचं प्रेम स्पष्ट आणि थेट आहे, तुमच्यावेळी लोक आठवणीत मरायचे, आता लोक ब्लॉक करून पुढे जातात. तुमच्या काळात लोक कविता शायरी करायचे आता लोक रिल्स करतात. तुमचं प्रेम म्हणजे लँडलाईनवरचा एकुलता एक कॉल, आमचं प्रेम म्हणजे व्हिडिओ कॉलवरची लॉंग डिस्टन्स डेट, तुमचं प्रेम लिहिलेलं,आमचं प्रेम टाईप करून सेव्ह केलेलं, जेवलीस का विचारणारं आणि फुल्ली बँक्ड अप.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Sun, 07/27/2025 - 10:38
करण्याची खरी पद्धत ही आशी आहे..... दर्दी खलाशा सारखं प्रेम करावे नव्या बंदरात नवे पाखरू शोधावे

In reply to by प्रचेतस

गणपा Sun, 07/27/2025 - 11:14
बाकी अश्या आठवणी जागवून आम्हालाही मैत्रीणी होत्या बरका हे सांगून आपलं आपणच मोरपीस फिरवून घेतलं आहे हे चाणक्ष वाचकांनी हेरलं आहेच म्हणा. ;)

In reply to by प्रचेतस

मारवा Mon, 07/28/2025 - 05:23
जेवलीस का? जे 1 झालं का? असाही टाईप केला जातो हा अनेक विशेषणे लावता येतील असा प्रश्न आहे. ऑनलाईन प्रेमीयुगुलांमधील सर्वाधिक वापरला गेलेला प्रश्न आहे. हा मला मनोरंजक वाटतो प्रेमळ वाटतो Time pass वाटतो Ice breaker वाटतो. पण थोडा विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक प्रेमी पिढीचा एक keyholder प्रश्न असतो मुळात जे प्रेमात पडलेले असतात ते तासन् तास बोलतात तर ते काय बोलतात असे अप्रेमिना प्रश्न पडत असतो नेहमी. तर असे आहे की त्यांना बोलायचं काही नसतं फारसे त्यांना सहवासातून एकमेकांच्या उपस्थितीत मोठा आनंद स्त्रवत असतो dopamine ,oxytosin च्या लाटा येत असतात . मग हे प्रश्न आपले काहीतरी बोलायचं म्हणून असतात तो.मधुर आवाज ऐकून मधुर शांतता भंग करण्यासाठी असतात बॉलीवूड चे गाणे जसे म्हणते कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.. क्या कहना है ? क्या सूनना है ? पण कधी कधी काही ना बोलायचे असते मग मुलगा म्हणतो क्या खूब दिखती हो बडी सुंदर लगती हो (प्रेमात आंधळा म्हणा किंवा ब्युटी लाइजे इन ...म्हणा मुलगी पण वेडीच असते और फिर तारीफ किसे अच्छी नहीं लगती ? मग मुलगी म्हणते कहते रहो फिरसे कहो अच्छा लागता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. म्हणून ते.पुन्हा पुन्हा जे1 झालं का अस असत असो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti Sun, 07/27/2025 - 20:44
+१ पारंपरिक प्रियकर!शब्द आवडला गेलाय :) -भक्तीआज्जी ;)

गणपा Sun, 07/27/2025 - 11:34
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः विकत घेत नाही म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं ठरलंय आजवर. सगळ्यात पहिलं आईकडून मग बहिणीकडून भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट, मग कॉलेजात असताना मैत्रिणींकडून बड्डे गिफ्ट, पुढे बायकोकडून अश्या क्रमाने पाकिटं मिळतच गेली. कितीही जीर्ण झालं तरी हे पाकिटं आपल्याला 'लाभतंय' हा विश्वास एवढा ठाम असतो की ते स्वतः हून बदलायची हिंम्मत होतं नाही. एकेकाळी पाकिटं येवढं फुगलेलं असायचा की रिक्षावाल्यांसारख एका कुल्यावर तिरकं बसावं लागायचं. हल्ली UPI आणि डिजि लॉकर आल्यापासून अनेक प्लास्टिक आणि कागदी ऐवजाना थारा मिळत नाही त्यात त्यामुळे ते रोड झालंय. कधी ट्रेनने प्रवास झालाच तर मात्र न चुकता हात मागच्या खिशात जातो आणि आपसूक पाकिट पुढल्या खिशात येऊन स्थिरावत. अलीकडे तर लोकल ठिकाणी फिरताना पाकिटं नेणंच सोडून दिलंय. लेख आवडला, प्रत्येक पुरुषाला अपील होईल असा काहींना नकळत भूतकाळाची सैर घडवून आणेल असा. बायकांची पर्स हा एक स्वतंत्र PhD चा विषय आहे. :D

गवि Wed, 07/02/2025 - 08:52
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 09:12
आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 22:04
बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.

सौंदाळा Wed, 07/02/2025 - 10:27
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात. विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Wed, 07/02/2025 - 11:42
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते. तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.

In reply to by गवि

अनामिक सदस्य Wed, 07/16/2025 - 10:23
माझी समजूत होती की त्या की कार्डवरची स्ट्रीप महत्वाची असते वीज चालू ठेवण्यासाठी. माझ्या अनुभवात हॉटेलांत दुसर्या व्यक्तिसाठी अजून एक किल्ली पण देतात. अजून एका कार्ड वर कोड प्रोग्राम केला की झाले.

सुबोध खरे Wed, 07/02/2025 - 10:34
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो. यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही. लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते. असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही. (बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)

In reply to by सुबोध खरे

गवि Wed, 07/02/2025 - 11:35
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे. डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.

In reply to by गवि

Bhakti Wed, 07/02/2025 - 12:12
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.

मारवा Wed, 07/02/2025 - 11:17
Lighter tone आवडला. आणि relatable होता वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले. बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर तेरे पाकीट की औकात ही क्या है ? त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !

In reply to by मारवा

गवि Wed, 07/02/2025 - 11:31
पर्सेस..? त्यातून तर अडीअडचणीला एखादी इस्त्री आणि पाठोपाठ लहानसा प्रेशर कुकर देखील निघाला तरी मला धक्का बसणार नाही. ;-)

गवि Wed, 07/02/2025 - 11:37
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.

In reply to by गवि

कर्नलतपस्वी Wed, 07/02/2025 - 12:57
तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली. पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच. असो,गेले ते दिन गेले.

कर्नलतपस्वी Wed, 07/02/2025 - 13:10
सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्‍याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे. जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली. बाकी लेख छान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 21:58
पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे. त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट. त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.

अकिलिज Wed, 07/02/2025 - 18:36
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अनिता

गवि Fri, 07/04/2025 - 07:21
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.

अकिलिज Wed, 07/02/2025 - 19:07
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अकिलिज

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 21:50
छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.

सुबोध खरे Wed, 07/02/2025 - 20:21
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत. यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे. आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत. गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे. आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच. इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत. मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.

नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली. मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या. माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला. शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि गुरुवार, 07/03/2025 - 13:54
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ऊर्फ पेरुचा पापा... ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 12:01
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 12:14
आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे. भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/03/2025 - 14:09
मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.

मस्त धागा, मस्त आठवणी. दसरा दिवाळीला घर स्वच्छ लख्ख करावं लागतं तसं पाकीट अधुन मधुन स्वच्छ करावे लागतं. विविध कप्पे ही तर पाकिटांची खासियत. बाकी, आपण म्हणालात तसा विशेष असा भविष्यातील कचरा पॉकेटात असतोच असतो. लोक सर्वसाधारणपणे पँटच्या पाठीमागील खिशात पॉकेट ठेवतात पण मी उजव्या बाजूच्या खिशात पॉकेट ठेवायचो. नियमित एसटीने प्रवास करायचो तेव्हा पॉकेट मारल्या जातात म्हणून ते उजव्या बाजूला आलं. सोपंही पडतं. बाकी, विविध बँकेचे एटीएम कार्ड, पैसे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पार्किंगच्या पावत्या, कवितेच्या ओळी, आवडलेली शायरी, पासपोर्ट फोटो, पन्नास किंवा दहाच्या नोटेचा अर्धा भाग पॉकेटात मिळेल. कागदं खराब झाले की अधुन-मधुन सॉर्टींग. तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत. आता फक्त पाकीट आणि आठवणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Wed, 07/16/2025 - 13:34
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत
हे महत्त्वाचं. बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Fri, 07/25/2025 - 14:56
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात कदाचित. या महिन्यात पहिलं पाकीट अन पुढच्या महिन्यात दुसरं पाकिट !

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.
मिपावर तर जरा लिहा-बोलायची प्रायवसी राहिली नाही. लगेच 'इडी'सारखे आले मागोमाग चौकशीला. आमच्या काळी आजच्या आपल्या 'चालू'वर्तमान काळात दिसतात तसे सतरा थांबे नसायचे. साठोत्तरी- सत्तरीच्या पारंपरिक प्रेम पिढीत एकालाच जीव लावण्याची शास्त्रोक्त पद्धत होती. अधुन-मधून भेटी झाल्याच तर 'लाजून हसणे आणि हसून ते पाहणे' इतकंच. उत्तरार्धात कविता, शायरी, गझलां आणि आठवणी हेच त्या प्रेमाचं फलीत असायचं. च्यायला, मिपाचं वय वाढलं पण लोक काही सुधरत नाहीत, सुधरा रे जरा. -दिलीप बिरुटे (पारंपारिक प्रियकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sun, 07/27/2025 - 09:40
अहो तुमचा काळ जुना झाला पण भ्रमरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करणारे त्या काळातही होतेच. तुमच्या काळी लोक एकालाच जीव लावायचे, कारण दुसऱ्याशी ओळख व्हायला सुद्धा वर्ष लागायचं, "लाजून हसणे" वगैरे तुमचं क्लासिक चार्म आहेच, पण आजचं प्रेम स्पष्ट आणि थेट आहे, तुमच्यावेळी लोक आठवणीत मरायचे, आता लोक ब्लॉक करून पुढे जातात. तुमच्या काळात लोक कविता शायरी करायचे आता लोक रिल्स करतात. तुमचं प्रेम म्हणजे लँडलाईनवरचा एकुलता एक कॉल, आमचं प्रेम म्हणजे व्हिडिओ कॉलवरची लॉंग डिस्टन्स डेट, तुमचं प्रेम लिहिलेलं,आमचं प्रेम टाईप करून सेव्ह केलेलं, जेवलीस का विचारणारं आणि फुल्ली बँक्ड अप.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Sun, 07/27/2025 - 10:38
करण्याची खरी पद्धत ही आशी आहे..... दर्दी खलाशा सारखं प्रेम करावे नव्या बंदरात नवे पाखरू शोधावे

In reply to by प्रचेतस

गणपा Sun, 07/27/2025 - 11:14
बाकी अश्या आठवणी जागवून आम्हालाही मैत्रीणी होत्या बरका हे सांगून आपलं आपणच मोरपीस फिरवून घेतलं आहे हे चाणक्ष वाचकांनी हेरलं आहेच म्हणा. ;)

In reply to by प्रचेतस

मारवा Mon, 07/28/2025 - 05:23
जेवलीस का? जे 1 झालं का? असाही टाईप केला जातो हा अनेक विशेषणे लावता येतील असा प्रश्न आहे. ऑनलाईन प्रेमीयुगुलांमधील सर्वाधिक वापरला गेलेला प्रश्न आहे. हा मला मनोरंजक वाटतो प्रेमळ वाटतो Time pass वाटतो Ice breaker वाटतो. पण थोडा विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक प्रेमी पिढीचा एक keyholder प्रश्न असतो मुळात जे प्रेमात पडलेले असतात ते तासन् तास बोलतात तर ते काय बोलतात असे अप्रेमिना प्रश्न पडत असतो नेहमी. तर असे आहे की त्यांना बोलायचं काही नसतं फारसे त्यांना सहवासातून एकमेकांच्या उपस्थितीत मोठा आनंद स्त्रवत असतो dopamine ,oxytosin च्या लाटा येत असतात . मग हे प्रश्न आपले काहीतरी बोलायचं म्हणून असतात तो.मधुर आवाज ऐकून मधुर शांतता भंग करण्यासाठी असतात बॉलीवूड चे गाणे जसे म्हणते कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.. क्या कहना है ? क्या सूनना है ? पण कधी कधी काही ना बोलायचे असते मग मुलगा म्हणतो क्या खूब दिखती हो बडी सुंदर लगती हो (प्रेमात आंधळा म्हणा किंवा ब्युटी लाइजे इन ...म्हणा मुलगी पण वेडीच असते और फिर तारीफ किसे अच्छी नहीं लगती ? मग मुलगी म्हणते कहते रहो फिरसे कहो अच्छा लागता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. म्हणून ते.पुन्हा पुन्हा जे1 झालं का अस असत असो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti Sun, 07/27/2025 - 20:44
+१ पारंपरिक प्रियकर!शब्द आवडला गेलाय :) -भक्तीआज्जी ;)

गणपा Sun, 07/27/2025 - 11:34
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः विकत घेत नाही म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं ठरलंय आजवर. सगळ्यात पहिलं आईकडून मग बहिणीकडून भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट, मग कॉलेजात असताना मैत्रिणींकडून बड्डे गिफ्ट, पुढे बायकोकडून अश्या क्रमाने पाकिटं मिळतच गेली. कितीही जीर्ण झालं तरी हे पाकिटं आपल्याला 'लाभतंय' हा विश्वास एवढा ठाम असतो की ते स्वतः हून बदलायची हिंम्मत होतं नाही. एकेकाळी पाकिटं येवढं फुगलेलं असायचा की रिक्षावाल्यांसारख एका कुल्यावर तिरकं बसावं लागायचं. हल्ली UPI आणि डिजि लॉकर आल्यापासून अनेक प्लास्टिक आणि कागदी ऐवजाना थारा मिळत नाही त्यात त्यामुळे ते रोड झालंय. कधी ट्रेनने प्रवास झालाच तर मात्र न चुकता हात मागच्या खिशात जातो आणि आपसूक पाकिट पुढल्या खिशात येऊन स्थिरावत. अलीकडे तर लोकल ठिकाणी फिरताना पाकिटं नेणंच सोडून दिलंय. लेख आवडला, प्रत्येक पुरुषाला अपील होईल असा काहींना नकळत भूतकाळाची सैर घडवून आणेल असा. बायकांची पर्स हा एक स्वतंत्र PhD चा विषय आहे. :D
लेखनविषय:
काल पाकिट रिकामे केले.. पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता. कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला.. गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली. एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते. एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला.. आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही. एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला..

ए० आय० पेक्षा भयानक तंत्रज्ञान येत आहे...

युयुत्सु ·

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 09:48
काही तरी निश्चित भयंकर घटित होत आहे. आजच एका आणखीन देशाने एका संघोट्याला सर्वोच्च पुरस्कार दिला. आता पर्यन्त बहुतेक 25 देशांनी दिला असेल. ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. मला तर शंका आहे, डीएनए बदल तंत्रज्ञानाचे योगदान यात असण्याची शक्यता आहे. कदाचित 2029 मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी संघोटे सर्वांचे डीएनए ही बदलतील. (एक तांनाशाह दुसर्‍या तांनाशाहची मदत नक्कीच करणार). सावधान करण्यासाठी लेखकाला धन्यवाद.

युयुत्सु गुरुवार, 07/03/2025 - 11:44
ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. > हरदासाची कथा मूळ पदावर आली... मोदींना मिळणार्‍या पुरकारांनी देशात पेटंट इकॉनॉमी थोडीच येणार आहे?

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 15:43
. मोदी आले आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती झाली ही सत्य नाकारण्यात अर्थ नाही. बाकी गुगल वरून 2014 से 2024 के बीच भारत में लगभग 1 लाख पेटेंट पंजीकृत हुए हैं। 2023-24 में, 41,010 पेटेंट दिए गए, जो एक रिकॉर्ड है. 2013-14 में यह संख्या 4,227 थी.

In reply to by युयुत्सु

माहितगार Wed, 07/16/2025 - 18:20
भविष्य चांगलं दिसतयं कि मग, सगळ्यांना हवे ते बॉडी पार्ट्स रिप्लेस करता येतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या शब्दात कोणी किडके असणार नाही सगळेच सुदृढ!!

In reply to by माहितगार

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 20:10
भविष्य चांगलं दिसतयं कि मग,> तुम्हाला वाटतं तितक रोझी चित्र नसणार आहे. ए० आय० ने जसं जग नव्या विषमतेमध्ये ढकललं तसंच या नव्या संशोधनाने होईल.

In reply to by युयुत्सु

माहितगार गुरुवार, 07/17/2025 - 08:03
विज्ञान विज्ञान असतं, उपयोग चांगला की वाईट करायचा ते प्रत्येक मनुष्य प्रवृत्तीवर आहे. पण ज्या जगात प्रत्येक जण सुविधा संपन्न असेल तिथे कुणाचे वाईट करण्याची गरज सहसा कमी होईल. पुर्वी जन्माधारीत जातीय उतरंड तयार झाली होती तिचे क्लास उतरंड मध्ये रुपांतरण होत चालले आहे. तुम्ही जनुकीय उतरंडीचा सिद्धांत मांडता आहात आणि प्रत्येकांला समान जनुकीय संधी कशा मिळतील या बद्दल संशोधन करण्या एवजी जनुकीय उतरंडीचा सिद्धांताधारीत वीषमतेच्या शक्यते कडे तुमच्याकडून दुर्लक्ष होत नाही किंवा कसे. जनुकीय उतरंड मेंदुच्या विकासावर आधारीत उतरंड आधारीत वीषमते पेक्षा आरोग्यदायी मेंदु आरोग्यदायी जनुके सर्वांना विनासायास उपलब्ध झाल्यास वीषमता मला तरी कमी होईल असे वाटते .

In reply to by माहितगार

युयुत्सु गुरुवार, 07/17/2025 - 10:04
श्री० माहितगार तुम्ही जनुकीय उतरंडीचा सिद्धांत मांडता आहात आणि प्रत्येकांला समान जनुकीय संधी कशा मिळतील या बद्दल संशोधन करण्या एवजी > आपला थोडासा गोंधळ झाला आहे- मी जनुकीय उतरंडीचा सिद्धान्त मांडत नसून मानवी दुटप्पीपणा कडे दूर्लक्ष करू इच्छितो- मानव इतर जीवांसाठी जे नीति-नियम तयार करतो ते स्वतःसाठी स्वीकारत नाही. मला ही एक प्रकारची लबाडी वाटते. समान जनुकीय संधी ही कल्पना पुढच्या ५० वर्षात अस्तित्त्वात येईल असे वाटत नाही. समानतेची पण एक किंमत असते आणि ती मोजल्याशिवाय समानता येत नाही. नीतिमत्ता धुडकावणार्‍या चीन सारख्या देशांना याचा मोठा फायदा मिळेल आणि भारत मागे जाईल. आपण "बेल कर्व्ह" या गणितीय कल्पनेचा परिचय करून घेतला तर "उतरंडी" कधीही टाळता येतील असे वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

सागर Fri, 03/06/2026 - 23:21
नीतिमत्ता धुडकावणार्‍या चीन सारख्या देशांना याचा मोठा फायदा मिळेल आणि भारत मागे जाईल. सहमत आहे किमान चीन हुकुमशाही पद्धतीने चालतो असे दिसत असले तरी तेथील सामान्य लोक व्यवस्थित जगत आहेत. त्यांचे दर डोई उत्पन्न सुखाने आयुष्य जगता येईल एवढे नक्कीच आहे. त्या मानाने आपल्या देशात अजुनही सरकार उद्योगपतींच्याच भजनी लागलेले दिसते आहे आणि रेवड्या वाटण्यात धन्यता मानत आहे. हाच दृष्टीकोन एक दिवस घात करणार

गामा पैलवान गुरुवार, 07/17/2025 - 14:28
युयुत्सु,
समानतेची पण एक किंमत असते आणि ती मोजल्याशिवाय समानता येत नाही.
एक तात्विक प्रश्न आहे. समानता म्हणजे काय आणि ती प्राप्त व्हावी म्हणून किंमत मोजण्याइतका अट्टाहास का करायचा? निसर्गात कुठेही समानता आढळून येत नाही. प्रश्न तात्विक असल्याने हो/नाही असं उत्तर अपेक्षित नाही. आ.न., -गा.पै.

युयुत्सु गुरुवार, 07/17/2025 - 17:10
निसर्गात कुठेही समानता आढळून येत नाही.> मुद्दा मान्य आहे. विद्वानांच्या असंख्य पिढ्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात व्यग्र आहेत, होत्या आणि राहतील. माहितगार यांनी काहीसा भाबडा आशावाद वर व्यक्त केला आहे, की आज ना उद्या सगळ्यांना हवे ते बॉडी पार्ट्स रिप्लेस करता येतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या शब्दात कोणी किडके असणार नाही सगळेच सुदृढ!! पण अशा तंत्रज्ञानाचे लाभ सर्वांपर्यंत पोचणे जवळजवळ अशक्य असते. उदा० द्यायचे झाले तर Nivolumab या कर्करोगावरील इंजेक्शनचे देता येईल. त्यामुळे कर्करोगाच्या उपचारात बराच सुटसुटीतपणा येईल आणि रूग्णालयातला कालावधी कमी होईल, असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये ते एन्०एच्०एस मार्फत उपलब्ध करून दिले आहे. आपल्याकडे त्याच्या एका डोसची किंमत ~४०००० (चाळीस हजार) रु आहे. https://www.msn.com/en-in/health/other/no-drip-no-delay-new-cancer-injection-cuts-treatment-time-to-just-minutes-in-the-uk/ar-AA1IEnrn?ocid=BingNewsVerp वरील कार्यक्रम आपल्याकडे राबवला जाईल का? माझ्यमते त्याची शक्यता शून्य. त्यामुळे विज्ञानाचे फायदे सरसकट सर्वाना मिळ्वून देता येत नाहीत. त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.

माहितगार गुरुवार, 07/17/2025 - 18:49
ठिके ना, युरोमेरीकेत मेडीकल क्षेत्रातील पेटटं सर्वसाधारणपणे २०-२५ वर्षे काही एक्सटेंशन शक्यता मिळून ३५ वर्षे डोक्यावरून पाणि गेले. केवळ काय महाग आहे आणि काय उपलब्ध नाही हेच मोजत बसल्याने, काळाच्या ओघात खूप काही वैद्यकीय सुविधा सामान्यांच्याही क्क्षेत आल्या आहेत हे सहज लक्षात येत नाही.

गामा पैलवान गुरुवार, 03/05/2026 - 03:02
मानवी मेंदूच्या जिवंत पेशींना सिलिकॉनसोबत सांधून त्यांना प्रक्रमेय ( programmable ) बनवले आहे. म्हणजे नेमकं काय केलं ते नीटसं कळलं नाही. परंतु ( इंग्रजी ) बातमी इथे आहे : https://interestingengineering.com/science/biological-computer-with-human-neurons-play-doom -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि गुरुवार, 03/05/2026 - 10:52
डॅन ब्राउनच्या 'सिक्रेट्स ऑफ सिक्रेट्स' ह्या लेटेस्ट कादंदरीची हीच सेंट्रल थीम आहे. कॉम्पुटींग चिप मेंदूशी संलग्न करण्यासाठी म्हणजे मेंदूतल्या पेशींची कनेक्टीव्हिटी कॉम्पुटींग चिपला जोडण्यासाठी सिलिकॉन पेशी अ‍ॅडॅप्टर म्हणून वापरल्या जाणार. त्यामुळे मेंदूला डिजीटल सिग्नल देता येऊन त्याला programmable करता येऊ शकणार. - (डिजटल) सोकाजी

In reply to by सोत्रि

सागर Fri, 03/06/2026 - 23:28
ही संकल्पना छान आहे. नक्की वाचणार आहे हे पुस्तक. मला वेब सिरिज जास्त प्रभावी माध्यमे वाटतात पुढील काही वेब सिरिज ची नावे देतोय. भविष्य किती प्रगत होऊ शकते आणि किती भयानक देखील होऊ शकते याची या माध्यमातुन मांडणी छान बघायला मिळते. कोणाला ट्रेलर्स एका जागी बघायचे असतील तर ही लिन्क बघा : https://scifiwebseries.blogspot.com/ 1. The First 2. Away 3. Another Life 4. Altered Carbon 5.Lost in Space 6. Black Mirror 7. The Expanse 8. Halo 9. 3 Body Problem

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 09:48
काही तरी निश्चित भयंकर घटित होत आहे. आजच एका आणखीन देशाने एका संघोट्याला सर्वोच्च पुरस्कार दिला. आता पर्यन्त बहुतेक 25 देशांनी दिला असेल. ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. मला तर शंका आहे, डीएनए बदल तंत्रज्ञानाचे योगदान यात असण्याची शक्यता आहे. कदाचित 2029 मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी संघोटे सर्वांचे डीएनए ही बदलतील. (एक तांनाशाह दुसर्‍या तांनाशाहची मदत नक्कीच करणार). सावधान करण्यासाठी लेखकाला धन्यवाद.

युयुत्सु गुरुवार, 07/03/2025 - 11:44
ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. > हरदासाची कथा मूळ पदावर आली... मोदींना मिळणार्‍या पुरकारांनी देशात पेटंट इकॉनॉमी थोडीच येणार आहे?

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 15:43
. मोदी आले आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती झाली ही सत्य नाकारण्यात अर्थ नाही. बाकी गुगल वरून 2014 से 2024 के बीच भारत में लगभग 1 लाख पेटेंट पंजीकृत हुए हैं। 2023-24 में, 41,010 पेटेंट दिए गए, जो एक रिकॉर्ड है. 2013-14 में यह संख्या 4,227 थी.

In reply to by युयुत्सु

माहितगार Wed, 07/16/2025 - 18:20
भविष्य चांगलं दिसतयं कि मग, सगळ्यांना हवे ते बॉडी पार्ट्स रिप्लेस करता येतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या शब्दात कोणी किडके असणार नाही सगळेच सुदृढ!!

In reply to by माहितगार

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 20:10
भविष्य चांगलं दिसतयं कि मग,> तुम्हाला वाटतं तितक रोझी चित्र नसणार आहे. ए० आय० ने जसं जग नव्या विषमतेमध्ये ढकललं तसंच या नव्या संशोधनाने होईल.

In reply to by युयुत्सु

माहितगार गुरुवार, 07/17/2025 - 08:03
विज्ञान विज्ञान असतं, उपयोग चांगला की वाईट करायचा ते प्रत्येक मनुष्य प्रवृत्तीवर आहे. पण ज्या जगात प्रत्येक जण सुविधा संपन्न असेल तिथे कुणाचे वाईट करण्याची गरज सहसा कमी होईल. पुर्वी जन्माधारीत जातीय उतरंड तयार झाली होती तिचे क्लास उतरंड मध्ये रुपांतरण होत चालले आहे. तुम्ही जनुकीय उतरंडीचा सिद्धांत मांडता आहात आणि प्रत्येकांला समान जनुकीय संधी कशा मिळतील या बद्दल संशोधन करण्या एवजी जनुकीय उतरंडीचा सिद्धांताधारीत वीषमतेच्या शक्यते कडे तुमच्याकडून दुर्लक्ष होत नाही किंवा कसे. जनुकीय उतरंड मेंदुच्या विकासावर आधारीत उतरंड आधारीत वीषमते पेक्षा आरोग्यदायी मेंदु आरोग्यदायी जनुके सर्वांना विनासायास उपलब्ध झाल्यास वीषमता मला तरी कमी होईल असे वाटते .

In reply to by माहितगार

युयुत्सु गुरुवार, 07/17/2025 - 10:04
श्री० माहितगार तुम्ही जनुकीय उतरंडीचा सिद्धांत मांडता आहात आणि प्रत्येकांला समान जनुकीय संधी कशा मिळतील या बद्दल संशोधन करण्या एवजी > आपला थोडासा गोंधळ झाला आहे- मी जनुकीय उतरंडीचा सिद्धान्त मांडत नसून मानवी दुटप्पीपणा कडे दूर्लक्ष करू इच्छितो- मानव इतर जीवांसाठी जे नीति-नियम तयार करतो ते स्वतःसाठी स्वीकारत नाही. मला ही एक प्रकारची लबाडी वाटते. समान जनुकीय संधी ही कल्पना पुढच्या ५० वर्षात अस्तित्त्वात येईल असे वाटत नाही. समानतेची पण एक किंमत असते आणि ती मोजल्याशिवाय समानता येत नाही. नीतिमत्ता धुडकावणार्‍या चीन सारख्या देशांना याचा मोठा फायदा मिळेल आणि भारत मागे जाईल. आपण "बेल कर्व्ह" या गणितीय कल्पनेचा परिचय करून घेतला तर "उतरंडी" कधीही टाळता येतील असे वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

सागर Fri, 03/06/2026 - 23:21
नीतिमत्ता धुडकावणार्‍या चीन सारख्या देशांना याचा मोठा फायदा मिळेल आणि भारत मागे जाईल. सहमत आहे किमान चीन हुकुमशाही पद्धतीने चालतो असे दिसत असले तरी तेथील सामान्य लोक व्यवस्थित जगत आहेत. त्यांचे दर डोई उत्पन्न सुखाने आयुष्य जगता येईल एवढे नक्कीच आहे. त्या मानाने आपल्या देशात अजुनही सरकार उद्योगपतींच्याच भजनी लागलेले दिसते आहे आणि रेवड्या वाटण्यात धन्यता मानत आहे. हाच दृष्टीकोन एक दिवस घात करणार

गामा पैलवान गुरुवार, 07/17/2025 - 14:28
युयुत्सु,
समानतेची पण एक किंमत असते आणि ती मोजल्याशिवाय समानता येत नाही.
एक तात्विक प्रश्न आहे. समानता म्हणजे काय आणि ती प्राप्त व्हावी म्हणून किंमत मोजण्याइतका अट्टाहास का करायचा? निसर्गात कुठेही समानता आढळून येत नाही. प्रश्न तात्विक असल्याने हो/नाही असं उत्तर अपेक्षित नाही. आ.न., -गा.पै.

युयुत्सु गुरुवार, 07/17/2025 - 17:10
निसर्गात कुठेही समानता आढळून येत नाही.> मुद्दा मान्य आहे. विद्वानांच्या असंख्य पिढ्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात व्यग्र आहेत, होत्या आणि राहतील. माहितगार यांनी काहीसा भाबडा आशावाद वर व्यक्त केला आहे, की आज ना उद्या सगळ्यांना हवे ते बॉडी पार्ट्स रिप्लेस करता येतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या शब्दात कोणी किडके असणार नाही सगळेच सुदृढ!! पण अशा तंत्रज्ञानाचे लाभ सर्वांपर्यंत पोचणे जवळजवळ अशक्य असते. उदा० द्यायचे झाले तर Nivolumab या कर्करोगावरील इंजेक्शनचे देता येईल. त्यामुळे कर्करोगाच्या उपचारात बराच सुटसुटीतपणा येईल आणि रूग्णालयातला कालावधी कमी होईल, असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये ते एन्०एच्०एस मार्फत उपलब्ध करून दिले आहे. आपल्याकडे त्याच्या एका डोसची किंमत ~४०००० (चाळीस हजार) रु आहे. https://www.msn.com/en-in/health/other/no-drip-no-delay-new-cancer-injection-cuts-treatment-time-to-just-minutes-in-the-uk/ar-AA1IEnrn?ocid=BingNewsVerp वरील कार्यक्रम आपल्याकडे राबवला जाईल का? माझ्यमते त्याची शक्यता शून्य. त्यामुळे विज्ञानाचे फायदे सरसकट सर्वाना मिळ्वून देता येत नाहीत. त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.

माहितगार गुरुवार, 07/17/2025 - 18:49
ठिके ना, युरोमेरीकेत मेडीकल क्षेत्रातील पेटटं सर्वसाधारणपणे २०-२५ वर्षे काही एक्सटेंशन शक्यता मिळून ३५ वर्षे डोक्यावरून पाणि गेले. केवळ काय महाग आहे आणि काय उपलब्ध नाही हेच मोजत बसल्याने, काळाच्या ओघात खूप काही वैद्यकीय सुविधा सामान्यांच्याही क्क्षेत आल्या आहेत हे सहज लक्षात येत नाही.

गामा पैलवान गुरुवार, 03/05/2026 - 03:02
मानवी मेंदूच्या जिवंत पेशींना सिलिकॉनसोबत सांधून त्यांना प्रक्रमेय ( programmable ) बनवले आहे. म्हणजे नेमकं काय केलं ते नीटसं कळलं नाही. परंतु ( इंग्रजी ) बातमी इथे आहे : https://interestingengineering.com/science/biological-computer-with-human-neurons-play-doom -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि गुरुवार, 03/05/2026 - 10:52
डॅन ब्राउनच्या 'सिक्रेट्स ऑफ सिक्रेट्स' ह्या लेटेस्ट कादंदरीची हीच सेंट्रल थीम आहे. कॉम्पुटींग चिप मेंदूशी संलग्न करण्यासाठी म्हणजे मेंदूतल्या पेशींची कनेक्टीव्हिटी कॉम्पुटींग चिपला जोडण्यासाठी सिलिकॉन पेशी अ‍ॅडॅप्टर म्हणून वापरल्या जाणार. त्यामुळे मेंदूला डिजीटल सिग्नल देता येऊन त्याला programmable करता येऊ शकणार. - (डिजटल) सोकाजी

In reply to by सोत्रि

सागर Fri, 03/06/2026 - 23:28
ही संकल्पना छान आहे. नक्की वाचणार आहे हे पुस्तक. मला वेब सिरिज जास्त प्रभावी माध्यमे वाटतात पुढील काही वेब सिरिज ची नावे देतोय. भविष्य किती प्रगत होऊ शकते आणि किती भयानक देखील होऊ शकते याची या माध्यमातुन मांडणी छान बघायला मिळते. कोणाला ट्रेलर्स एका जागी बघायचे असतील तर ही लिन्क बघा : https://scifiwebseries.blogspot.com/ 1. The First 2. Away 3. Another Life 4. Altered Carbon 5.Lost in Space 6. Black Mirror 7. The Expanse 8. Halo 9. 3 Body Problem
लेखनविषय:
 माझ्या या पोस्ट्मध्ये (https://www.misalpav.com/node/52703) २०२२४ मध्ये एका संघोट्याशी झालेल्या भांडणाची हकीकत लिहीली होती. चीनबद्दल मी जेव्हा ही भूमिका घेतली तेव्हा ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या एका परिसंवादात केलेल्या भाषणाचा त्याला आधार होता. हा चीनचा प्रतिनिधी मोठ्या अभिमानाने सांगत होता की आमची पॉलिसी डॉक्युमेण्ट वाचा. आमच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीचा दर ८०-८५% टक्के आहे. भविष्यात चिनी अर्थव्यवस्था मुख्यतः ए० आय० आणि कृत्रिम जीवशास्त्र या दोन तंत्रज्ञानामधल्या चीनच्या आघाडीवर अवलंबून असेल.

पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

कपिलमुनी ·

"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती" कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी Tue, 07/01/2025 - 10:52
गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे . इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही. भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती. त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात . सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल).. तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही. पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत .. आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..

सुबोध खरे Tue, 07/01/2025 - 19:42
देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. हायला उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार. जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात किंवा जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली. एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती. त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली. फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही. परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला." पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले. New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-document-signatures/ patel ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption kirit https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-accuses-minister-mushrif-of-over-100-cr-corruption/articleshow/86178643.cms?from=mdr पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.

कंजूस Wed, 07/02/2025 - 17:17
सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत. बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच. आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.

In reply to by कंजूस

चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही. स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 11:58
बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 12:35
जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत. बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.

कपिलमुनी Fri, 07/04/2025 - 09:59
मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार. गणित फिट्ट बसणार

कंजूस Sat, 07/05/2025 - 01:19
हेच होणार >> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>> शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार? .

एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Sat, 07/05/2025 - 22:53
थुंकलेले चाटावे ते राजकीय पक्षांनी.. पवार , चव्हाण , भुजबळ , राणे पवित्र करणे असो.. की पवार ठाकरे घरोबा असो. किंवा सध्याचा ठाकरे बंधुप्रेम असो... सब घोडे बारा टक्के

कंजूस Sat, 07/05/2025 - 20:45
हिंदीच्या ओक्टोपसने मराठीला केव्हाच विळखा घातला आहे. मुंबईत दोन अमराठी लोक भेटले तर ते मराठीत कशाला बोलतील? पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि आता जागे झाले.

अगदी १०१% राजकीय हेतूने प्रेरीत निर्णय होता असे वैयक्तिक मत. कदाचित तो निर्णय घेतानाच अंमलात येण्यापूर्वी तो मागे घ्यायचा असाच डाव असेल पण त्यातून ठाकरेंना मात्र अडकवायचे हा हेतू असेल. महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यावर होतील. मुंबई सोडून इतर महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत याने फारसा फरक पडणार नाही. अनेक राज्यांपेक्षा मोठी आर्थिक उलाढाल असलेली मुंबई महापालिकाच सगळ्यात महत्वाची. नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला पूर्ण राज्यात २० च जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील १० मुंबईतील आहेत. मुंबईत तो गट प्रभाव राखून आहे हे नक्की. तसेच महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक उपयोगाला येते. तिथे उबाठा गटाची ताकद आहे हे नक्की. तसेच अनेक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरील स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. उबाठामध्ये अनेक दशकांपासून असलेले असे लोक आहेत. त्यांना मते मिळतात ती स्वतःची असतात- उबाठा पक्षासाठी मिळालेली असतीलच असे नाही. त्यामुळे विधानसभेत जसा स्वीप केला तसा महापालिका निवडणुकीत होईलच असे नक्कीच नाही. उलट महापालिका निवडणुक भाजपला या स्थानिक कारणांमुळे जड गेली तरी आश्चर्य वाटू नये. एकतर उबाठाला (पूर्वी पक्ष एकसंध होता तेव्हापासूनच) मराठी मतदारांची मते सगळी नक्कीच नाही पण मोठ्या प्रमाणावर मिळत आली आहेत. ती एकनिष्ठ मते भाजपकडे जाणार नाहीत. शिंदे त्यातील किती मते आणतात ते बघायचे पण मुंबईत शिंदे गटापेक्षा उबाठाची ताकद जास्त आहे असे वाटते. भाजपशी युती तोडल्यानंतर भाजपविरोधी अमराठी मते उबाठाकडे जाऊ शकली असती. तसेच बदललेल्या परिस्थितीत मुस्लिम मतेही जाऊ शकली असती- अजूनही जातील. अशावेळेस तो हिंदी सक्तीचा निर्णय आला. त्यानंतर मग ठाकरेंना त्याविरोधात भूमिका घेणे भाग झाले. त्यामुळे मग उबाठाकडे जी अमराठी मते अन्यथा गेली असती त्या मतदारांना संभ्रमात टाकले गेले. त्यात अपेक्षेप्रमाणे मीरा-भाईंदरला त्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. त्याविरोधात मोर्चा निघाला आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला. त्या दुकानदाराला बदडून २००३ मध्ये रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या बिहारी लोकांना बदडून केली तशीच चूक केली गेली आहे असे वाटते. त्या घटनेमुळे २००४ मध्ये उत्तर भारतीयांचे काँग्रेसकडे counter polarization झाले होते. तसे यावेळी व्हायला आपण होऊन त्यांनी मदत केली आहे. आणि ते पोलरायझेशन भाजपच्याच बाजूने होणार ही शक्यता जास्त. तसेच राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. समजा राज-उध्दव एकत्र आले तर मग उबाठाच्या मुस्लिम मतदारांमध्येही काही प्रमाणात चलबिचल होईल ही पण अपेक्षा असेल. तसेच कोणीही उसकावले की लगेच ते लोक तलवार उपसून अंगावर येतात. पण आपण असे डोके गरम करून काहीतरी करावे म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा फायदा होईल म्हणून आपला प्रतिस्पर्धीच आपल्याला उसकावत असेल, त्याच्या सापळ्यात आपण बळी पडायचे नाही तर आपले डोकं थंड ठेवायचे इतका विचार दोन्ही सेनावाले कधीच करत नाहीत. त्या केडियाला भाजपनेच 'मराठी बोलणार नाही जा....' असे वक्तव्य करायला सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली- खरं तर अशी तोडफोड त्यांनी करावी म्हणूनच मुद्दामून ते वक्तव्य केडियाने कशावरून दिले नसेल? केडिया बिल्डर आहे. जर ऑफिसमध्ये तोडफोड झाली आणि त्यातून ५-१० लाखाचे नुकसान झाले तरी त्याला ती रक्कम विशेष नाही. पण अशा घटना झाल्या की त्यातून मग अमराठी मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि काँग्रेस-उबाठा एकत्र असतील तर अमराठी मतदारांपुढे भाजप हा एकच पर्याय राहतो आणि अशी तोडफोड करून आपण त्या मतदारांना भाजपकडे ढकलत आहोत याचा विचार ते करणार नाहीत या अपेक्षेने- खरं तर खात्रीनेच केडियाला ते वक्तव्य द्यायला भाजपने सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. बाकी महापालिका निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नगरसेवक आणि बिल्डर यांच्यामधील अभद्र युती कायमच राहणार आहे. शहरात अजून मोठे मोठे टॉवर उभे राहून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्त्रोत बुजवले जाऊन दरवर्षी तेवढ्यात पावसात अधिकाधिक मोठे पूर येणारच आहेत. त्यामुळे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडणार नाहीये. तरीही उबाठासेनेचा माज उतरवायला त्यांचा पराभव व्हावा असे मला नक्कीच वाटते. नवे भाजपचे नगरसेवक आले की मग केडिया त्याचे जे काही तुटपुंजे नुकसान त्या तोडफोडीतून झाले असेल ते अधिक टी.डी.आर किंवा एफ.एस.आय मिळवून शेकडो पटींनी भरून काढेल. बाकी मराठी माणसासाठी सेनेने जे काही केले होते ते स्थानिय लोकाधिकार समितीने- त्याला ५० वर्षे झालीत आता. यांची मर्दुमकी फक्त मराठी बोलत नाही म्हणून फेरीवाले, इस्त्रीवाले वगैरे साध्यासाध्या माणसांना बदडण्यापुरतीच. मुंबईतील मराठी टक्का कमी होत होता, मराठी शाळा बंद पडत होत्या त्याविषयी त्यांनी काही भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. आता ठाकरेंनी परत एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर या सगळ्या गोष्टी पुढे आणून त्यातील किमान काही मराठी मतदारांमध्येही चलबिचल निर्माण करायची संधी आता भाजपकडे आहे. फडणवीसांनी तेवढ्यापुरता हा एक निर्णय घेऊन उबाठांना सापळ्यात अडकवले असे दिसते. आणि त्यात नेहमीप्रमाणे मारहाण, तोडफोड करून ते त्या सापळ्यात चालत गेले असे वाटते. एकूणच जी मराठी मते उबाठाकडे अन्यथाही गेली असती ती तिथेच राहणार आहेत. पण अमराठी मते जी उबाठाकडे गेली असती त्यांना मात्र भाजपकडे जायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी कोणत्याही निवडणुकीत मते किती फिरतात यावरच निकाल बदलत असतो. या सगळ्या प्रकारात उबाठाकडे नव्याने किती मते येतील आणि विरोधात किती जातील हा हिशेब केल्यावर उबाठासाठी तो हिशेब ऋण असेल असे वैयक्तिक मत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही म्हणता तस खरंच झालं असेल तर एक प्रश्न पडतो की एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती? बरं समजा राज उद्धव यांनी हा मुद्दा उचलूनच धरला नसता तर पहिली पासून तीन तीन भाषा शिकवणार होते का? म्हणजे आपल्या राजकीय सोयीसाठी ६ वर्षाच्या मुलांचा वापर.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?
याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्‍यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही. राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंजूस Sun, 07/06/2025 - 22:36
दुकानदारांना कानफाटवल्याचा जो प्रकार मनसेने चालवलाय त्याला कांग्रेसचा विरोधच असेल. पण आता सेना विकास आघाडीत आहे आणि त्यांनी राजला हात धरून आणल्यावर कासावीस झाले असतील. त्यामुळे मविआ फुटणार हे निश्चित.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कर्नलतपस्वी Sun, 07/06/2025 - 20:51
निवडणूक निर्णयाकडे लक्ष ठेवून सगळ्या हालचाली. सापळे सगळेच लावतात. कोण आडकतय ते बघावे लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी Sun, 07/06/2025 - 22:47
सुरुवातीला हा विचार मांडला तेव्हा लोकांना पटला नव्हता. आता हळूहळू त्याचे राजकीय परिणाम समोर येत आहेत. यात काँग्रेसची फरफट झाली. परवा सुळेंना पाठवून पवारांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा नेहमीचा प्रकार केला आहे. जिथे जास्त शिते तिथे ते जातील

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप कार्यकर्ते, प्रत्येक गोष्टीत जी काही चूक घडेल किंवा घडले की त्याचं भविष्याच्या दृष्टीने कसा फायदा असतो, त्याला 'गोबरयुगात' केंद्रात 'माष्टर ष्ट्रोक' असे म्हणतात. तर इकडे महाराष्ट्रात फडणविसांचे डावपेच किंवा हे सगळं त्यांचं 'स्क्रीप्टे'ड प्रयोग आहेत, इतकं म्हटलं की, शाब्दिक पोचा-यांची गरज पडत नाही. खरी मेख अशी आहे की, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर भविष्यात आपल्या सत्तेला किती हादरे बसू शकतील या कल्पनेनेच सध्या भाजप गटात अस्वस्था आहे. फडणविसांनी मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हणने यात सगळं आलं. मुंबई महानगरपालिका ही रंगीत तालीम असेल. दोघांची युती झाली तर, मुंबई महानगरपालीकेत भाजपचा प्रवास अजूण कठीण होईल हे कोणीही सांगेल त्याला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. आता राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करतील का ? तर मला स्वतःला अशी काही युती महानगर पालिकेत जरी युती झाली तरी भविष्यात अशी युती अशी होईल असे वाटत नाही, दोघांची इच्छा असली तरी. सद्य भाजप सरकार आपल्या साम,दाम, दंड भेद या नितीचा वापर करुन या दोघा भावांना एकत्र येऊ देणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मनसे- जागा वाटप त्या त्या तालुक्यातील काम करणारे नेते कार्यकर्ते यांच्यातील दोन्ही पक्षातील मतभेद पुढे चव्हाट्यावर येतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात प्रभाव सोडला तर इतर जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. राज ठाकरे यांचे भाषण, विचार अगदी मार्मिक असतात. सभांना गर्दी होते पण निवडून येण्याइतकी त्यांची ताकद लागत नाही, त्याचं कारण इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न करणे, युती करणे, कार्यकर्त्यांची फौज बूथवर उभे करणे, निवडणूकांपूर्वी वातावरण करणे आणि इतर गोष्टीत सुरुवात जोरदार करुनही ते कायम मागे पडतात. मनसेला नाश्कातून महाराष्ट्रात इमेज बिल्ट करण्याची संधी होती पण ते झालं नाही. भाजप विरोधात राज ठाकरे यांनी पूर्वीच्या लोकसभेत भाजप विरोधात प्रचारात मुसंडी घेतली होती. 'लाव रे तो व्हीडीयो' म्हणून त्यांच्या सभा गाजल्या होत्या. पण पुढे ते भाजपच्या गळाला लागले आणि त्यांचा भाजप विरोध कमी होत होत त्यांच्या दावनीला ते गेले. भरवशाचं राजकारण करायचं तर, एकदा आपण स्थिरास्थावर होईपर्यंत थेट भूमिका व्यवस्थेविरुद्ध घेतली पाहिजे, नेमके यांचं राजकारण अशावेळी कच खातं आणि त्यांच्या वाट्याला अपयश येतं. मनसे, भाजपाच्या अमिषाला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी नाही. सारांश, युती अवघड वाटते. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी Sun, 07/06/2025 - 22:49
कोणी कितीही काही म्हणले तरी याचा डायरेक्ट फटका शिंदेंना बसणार आहे आणि फायदा भाजपला.. देवाभाऊचे पत्ते फिट बसत आहेत..

एक गोष्ट कळत नाही. इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही. तरीही तोंडदेखल्या ते दोन मुद्दे त्यांचे होते. मग त्यांना एका कृतीतून दोन्ही मुद्दे रेटता येतील अशी नामी संधी होती. पूर्ण भारतात काही लाख/कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यापैकी काही हजार/लाख मुंबईत राहतात हे मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे. २०११ मध्ये माझे ऑफिस महालक्ष्मी स्टेशनजवळ फेमस स्टुडिओच्या शेजारी होते. तिथे जायला मी रे रोड या हार्बर लाईनच्या स्थानकात उतरून १६४ नंबरची बस पकडून जायचो. रे रोड स्टेशनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ती बांगलादेशींनी भरलेली आहे हे उघड गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न केलेले अंगाला वास मारणारे ते घाणेरडे बांगलादेशी बसमध्ये आजूबाजूला वावरायचे त्याची किळस यायची. पण करता काही यायचे नाही. कारण माझ्यासारखे लोक मारामारी करू शकत नाहीत. पण उबाठावाल्यांचा मारामारी करण्यात पहिल्यापासूनच हातखंडा होता. मग मुंबईत जिथेजिथे बांगलादेशी आहेत तिथेतिथे जाऊन त्यांना बदड बदड बदडून मुंबई आणि देश सोडून जायला त्यांना भाग पाडायची नामी संधी त्यांच्याकडे होती. त्या बांगलादेशींना कायदेशीरपणे हाकलता येणे फारच कठीण आहे कारण त्यांनी पैसे चारून सगळी डॉक्युमेन्ट्स बनवून घेतली आहेत. त्यांना हाकलायचा एकच उपाय म्हणजे हा- उठता लाथ बसता बुक्की असे करत बदड बदड बदडायचे आणि इथे राहायलाच नको असे वाटणे भाग पाडायचे. तसेही ते लोक मराठीभाषिक नाहीत, भारतीय नाहीत आणि हिंदूही नाहीत. मग असे बांगलादेशींना बदडून उबाठासेनेचे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे साध्य झाले नसते का? तसे झाले असते तर मग मी अगदी आजन्म उबाठासेना समर्थक झालो असतो. भाजपवाल्यांना मारामारी जमत नाही त्यामुळे ते काही बांगलादेशींना हाकलणार नाहीत पण उबाठावाल्यांनी हाकलले असते तर पूर्ण देशावर आणि मुंबईवर कधी न फेडता येतील असे उपकार त्यांनी करून ठेवले असते. पण कुठचे काय- त्यांची मर्दुमकी फक्त युपीतून आलेले फेरीवाले, इस्त्रीवाले, दुकानदार वगैरे हातावर पोट असलेल्या साध्यासाध्या लोकांविरूध्दच. आणि त्यातील बरेचसे हिंदूच असावेत असे म्हणायला जागा आहे. आणि हे यांचे हिंदुत्व.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.
अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/08/2025 - 10:09
सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. मुदलात खोट आहे. गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा बाळ ठाकरेंचे बाळासाहेब होण्याच्या अगोदर पासून विश्व हिंदू परिषदेने लावलेला आहे कोणताही क्लेम साहेबांसारखा बाळासाहेबांच्या नावावर खपवला जातो. बाकी "तुमचं" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेची स्थापना झाली १९६६ मध्ये. बाळासाहेबांनी १९८७ पर्यंत हिंदुत्व मधील हिं पण उच्चारला नव्हता. मराठी मराठी करून फार तर मुंबईत काही नगरसेवक निवडून आणता येतील पण त्यापलीकडे जायचे असेल तर मराठी मुद्दा उपयोगाचा नाही हे लक्षात आल्यावर. १९८० च्या दशकात देशात हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. १९८२ मध्ये मदुराईला धर्मांतरे झाली त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. १९८४ पासून संघ परिवाराने राममंदिर मुद्दा लावून धरायला सुरवात केली. मग शहाबानो आणि अयोध्येत कुलूप उघडणे यातून हळूहळू हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. ती वेळ हेरून मग बाळासाहेबांनी १९८७ मधील पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाचा उच्चार केला - पक्षाची स्थापना झाल्यानंतर २१ वर्षांनंतर. तोपर्यंत मराठी हाच मुद्दा त्यांचा होता. आणि मराठी हा मुद्दा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे काम होते त्यातून अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या. अन्यथा मराठी पाट्या, बेस्टची तिकिटे मराठीत छापा यापलीकडे लोकाधिकार समितीप्रमाणे फार विधायक कामे मराठी माणसांसाठी नव्हती. म्हणजे या सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.' पण शिवसेनेचे दोन्ही मुद्दे मान्य झाले तर. शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी विषय घेवून राजकारण केले हे तरी मान्य झालं. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाला रोजगार दिला यात शिवसेना होती. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू'चाही नारा महाराष्ट्रात दिला. मराठी भाषा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा महाराष्ट्रात कुठे होती एवढे सांगा आता. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/08/2025 - 10:53
भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. काय सांगताय? भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. आणि त्यानंतर सलग पहिल्या पाच लोकसभांमध्ये त्यांना मिळणाऱ्या जागा ३,४,१४,३५ आणि २२ अशा आहेत. आणीबाणीत जनता पक्षात विलीन झाल्यानंतर नव्या अवतारात भाजप आला तेंव्हा १९८४ साली २, नंतर १९८९ साली ८५ आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे तीन आकड्यात खासदार निवडून येत आहेत. शिवसेनेचा पहिला खासदार १९८९ साली निवडून आला आणि केवळ १९९६ साली भाजप बरोबर युती केल्या वर शिवसेनेला ११ खासदार निवडून आणता आले. अन्यथा दोन आकड्यात खासदार नाहीत कि तीन आकड्यात आमदार काही निवडून आणता आले नाहीत. बेडकीने किती वल्गना केल्या तरी तिचा बैल होत नाही. तेंव्हा "तुमचं" चालु द्या

In reply to by सुबोध खरे

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली त्यानंतर त्यानंतर त्यांचं इकडे तिकडे आणि तुकडे वगैरे पडले. नवा 'भारतीय जनता पार्टी' नावाचा पक्ष स्थापन व्हायला १९८० उजाडला. स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना झाली १९६६ ला. कोणता पक्ष मोठा आहे, वयाने एवढेही कळत नसेल तर बोलणे खुंटले. -दिलीप बिरुटे

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.
याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का? १. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती. २. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? ३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे. ४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून. ५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते. आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आणि मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले. १९७० पासून त्याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली. पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं. कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेबांकडे युतीची भिक मागितली. स्व. बाळासाहेबांनी भाजपाला भिक द्यायच्या ऐवजी जेवणाचं ताट आणि पाट दोन्हीही दिले आणि इथेच घाताला सुरुवात झाली. दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे. शिवसेनेने भाजपाला बोट दिलं नसतं तर महाराष्ट्रात भाजपा एव्हाना भिकेला लागला असता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.
कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?
भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.
भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?
पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.
बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.
महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.
तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?
कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.
जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ
दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.
हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला. जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे, आवरा. >>>> आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती. विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे.. >>> टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात. >>>> १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या.... पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे. >>> जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. =)) गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले. -दिलीप बिरुटे

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..
कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.
शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.
या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.
पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.
घंटा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.
ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्‍यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्‍यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.
मराठी वाचता येत नाही वाटतं. >>>>आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. म्हणूनच शाब्दिक पोचारे म्हणालो. =)) बाकी, चालू दया... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे Tue, 07/08/2025 - 19:10
@ चंद्रसूर्यकुमार कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतंय याच चालीवर आता कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय? असे म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे. बहिऱ्या माणसाला जोरात ओरडून बोलल्यास समजते किंवा ओठाच्या हालचालीने तो समजून घेतो. पण बधिरपणाचा आव आणणाऱ्याला तुम्ही कानाशी बोम्बल्या (लाऊडस्पिकर) लावलात तरी ऐकू येणारच नाही. तेंव्हा सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

बहुतेक वेळा तेच करतो पण माझ्याच प्रतिसादाला उत्तर द्यायला आले तर कधीकधी दखल घ्यावी लागते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्या चार-पाच वर्षांत नक्की कोणते ४-५ आमदार आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आणले होते हे त्यांनी चुकूनमाकून लिहिले तर पुढचे बघू. अर्थात ते त्यांना लिहिता येणार नाहीच कारण मुळात तसे कोणीही आमदार निवडून गेलेच नव्हते. आणि कोणती कोणती काल्पनिक नावे पुढे आणली तर मग निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील नावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्या थापा आहेत हे जगजाहीर करायला मला तो प्रतिसाद लिहायला लागेल तितकाच वेळ लागेल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला ढाण्या वाघ होता वामन महाडिक १९६९-७० पोटनिवडणुकीत एवढ्यात विसरले का ? भाजपचा महाराष्ट्रात जन्मही झाला नव्हता.. आपल्या शाब्दिक पोचा-यांवर भरवसा तसा नाहीच म्हणून लिहिते राहावे लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या पाच सहा वर्षाच्या आत शिवसेने वामन महाडिक आणि प्रमोद नवलकर दोन आमदार दिले. आता चार कुठे दिले त्या शब्दावर आडून राहा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर यूती केली म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. ओसरी दिली नसती तर, भाजप कधीच शिरजोर झाला नसता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर ही नावे मीच वर दिली आहेत. तीच वाचून परत मलाच काय देताय? की स्वतःचे विश्लेषण काहीही न करता ढापाढापी करायची सवय आहे ? तुम्हाला निवडणुकांच्या इतिहासातील घंटा काहीही माहिती नाही तर मग ती झाकली मूठ ठेवावी हो. आपले अज्ञान असे जगजाहीर का करत आहात? आणि परत परत तेच तेच पालुपद -बाठांमुळे भाजप वाढला चालू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्या काळात भाजप वाढला तसाच तो महाराष्ट्रातही वाढतच होता. उलट शिवसेनेशी युती करायची चूक केल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या. बाकी तुम्ही माझे शाब्दिक पोचारे वाचत नाही नाही असे म्हणत बरेच वाचता की. मग खुलेपणाने कबुल करा की. बाळासाहेब दिलदार होते ना? की उध्दवसारखा कुचकटपणा आणि खत्रुडपणा तुम्हाला अधिक भावतो?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते. बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =)) थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले. -दिलीप बिरुटे

काल मुंबई मराठी माणसाचा एकत्रीत असा महामोर्चा निघाला. 'हिंदीसक्ती'च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना एका मिठाईविक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने मराठीजन मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर उतरले. सुरुवातीला मोर्चाची परवानगी नाकारण्यासह पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईमुळे तणाव निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने हजारोंच्या संख्येने मराठीजनांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकूणच मराठी भाषा, मराठी माणूस विरुद्ध अमराठी असे वातातवरण धुसमुसायला लागले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस राजकारणासाठी जरी विषय असला तरी येत्या काळात हे मुद्दे अधिक तीव्र होतील असे वाटते. भाषिक मुद्याची तीव्रता कमी करण्यासाठी हिंदू धर्म खतरेमेचं पिल्लू सोडून मराठी भाषा, मराठी माणूस यात दूही माजवण्याचं षडयंत्र सुरु होईल. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/09/2025 - 11:39
मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. कुठे रुग्णवाहिका उपलब्ध करून दे किंवा रिक्षात हरवलेलय गोष्टी मिळवून दे सारख्या ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी सोडल्या तर. त्या मानाने शरद पवार विखे पाटील पतंगराव कदम सारख्या नेत्यांनी साडे तीन का होईना जिल्ह्यांत सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या शिक्षण संस्था सारखे उद्योग सुरु करून स्थानिक मराठी माणसासाठी थोडी फार तरी कामे केली. मोर्चे काढणे, शक्तिप्रदर्शन करणे सोडून काही भरीव कार्य केले तरच शिवसेनेला काही भवितव्य आहे माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो. त्याच्या कडे ४० ते ५० कामगार काम करतात. आजतागायत केवळ मराठी माणसानाच त्याने कामावर ठेवले आहे. दांड्या मारणे, उत्सवासाठी चार दिवस गावी जाऊन परत येतो सांगून १० दिवसांनी उगवणे, लोकांकडून उसने पैसे घेऊन परत न करणे असे केले तरी अजून तरी त्याने भैय्या लोकांना कामावर ठेवलेले नाही. पण भूमिपुत्र म्हणून माज दाखवण्यापलीकडे मराठी कामगारांनी फार काही नाव घेण्यासारखे केलेले नाही. मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान Wed, 07/09/2025 - 18:26
दुर्दैवाने हे खरं आहे. याच कारणांमुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं असावं असं मला कधीकधी वाटतं. पण नक्की सांगता येत नाही. -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

कानडाऊ योगेशु Wed, 07/09/2025 - 23:34
माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.
आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
खरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. आपल्या मताचा आदर आहेच. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मधील व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रातला सत्ता काळ हा मोठा कालखंड आहे. शिवसेनेने मराठी माणसांठी काय केले हा खरं तर एखादा 'खंड' होईल इतका तो लेखनाचा मोठा विषय आहे. एका शांत, संयमी व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणूस ते शिवसेनेचा जहाल पक्षाकडे प्रवास कसा होत गेला. साठच्या दशकातील महाराष्ट्राचं राजकारण, मराठी माणसाच्या रोजगारासाठीच नव्हे तर, मराठी माणसाठी खासगी कंपन्यात आणि सरकारी नोक-यात आरक्षण मागणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असावा. मराठी माणसाच्या मुद्याकडून हिदूत्वाकडे झालेला प्रवास. शिवसेना स्थापनेच्या अगोदरही मार्मिकमधून 'अमराठी' लोकांची यादी प्रसिद्ध करुन 'वाचा आणि थंड बसा' असे म्हणून मराठी माणसांमधे जनजागृतीच केली नाही तर, वाचा आणि उठा अशी हाक मारली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार कसा होत गेला. आपला पक्ष, राजकारण, पाठींबा देणे, नेते, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कायम वेगळं राहिलं. चित्रपटसृष्टीवरही कसा दबदबा निर्माण केला. देशभर ठाकरेंचं कसं वलय होतं. गावखेड्यात गावोगावी शिवसेनेचे फलक असायचे. गावागावात भगवे उपरणे घालून कार्यकर्ते अभिमानाने शिवसैनिक म्हणून कसे मिरवायचे. बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांचा एक मोठा वर्ग. मोठा विषय. शिवसेनेच्या राजकारणाच्या यश अपयशाची चर्चा होत राहील. पण भरीव काही दिसलं नाही, इतकं सहज बोलून शिवसेना पक्षाची बोळवण होऊ शकत नाही. पुस्तक वगैरे वाचत असाल तर, स्व. बाळ ठाकरेंवर, वैभव पुरंदरेचं एक चांगलं माहितीवजा पुस्तक आहे, कधी मिळालं तर नक्की वाचा. शिवसेनेचा सविस्तर प्रवास वाचायला मिळेल. मराठी माणसासाठी काय काय केलं आणि शिवसेनेचा पक्ष स्थापनेपासून ते त्यांचा राजकारणाचा प्रवास चांगला समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/16/2025 - 12:10
भरीव काही दिसलं नाही तुम्हाला भरीव काही दिसलं का? तसं असेल तर मांडा कि इथे. उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचा भात कशाला

In reply to by सुबोध खरे

प्रिय काका. आज मुंबईत जो मराठी माणूस दिसतो त्याचं श्रेय शिवसेनेला दिलं पाहिजे. अमराठी लोकांच्या काळात मराठी माणसाला रोजगार दिला. मुंबैत शिवसेना बेरोजगार तरुणांना खासगी कंपन्यात नोक-या मिळाव्यात यासाठी तरुणांच्या नोंदवह्यात नोंद करुन तरुणांना, प्रशिक्षण, देऊन पात्रताधारक व्हावा म्हणून युवकांचे मेळावे, अभ्यासिका, फिस भरणे हे राजकीय पक्षाने केले त्याचं नाव शिवसेना. मराठी माणसाला अमराठींच्या भाऊगर्दीत जिथे जिथे रोजगाराच्या संधी नाकारली तिथे तिथे मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मराठी माणसावर अन्याय अत्याचार तेव्हाही होत होता, त्यांच्यासाठी संघटन उभारले त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला. महाराष्ट्रातील माणूस एकजूट केला. गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. शिवसेनेची मार्गदेशक पाहिल्यावर मराठी माणसाला तो आपला पक्ष वाटला. महाराष्ट्रीयन उद्योगपतींनी मराठी माणसाला नोकरी द्यावी. वगैरे महाराष्ट्र गृहनिर्माण महामण्डलाची 80 टक्के घरे महाराष्ट्रातील माणसाला आरक्षित ठेवली पाहिजे ही मागणी केली. राज्यातील सरकारी नोक-या मराठी लिहिता वाचता येते त्याला मिळाली पाहिजे अशी मागणी केली पाठपुरावा केला. मराठी माणसाच्या हक्कासाठीच प्रस्थापित राजकारण्यांना शह देत ठाणे-मुंबई महापालिकेत यश मिळवले. सामान्य माणसांना अगदी वडा-पाव विकणा-यांना राजकारणात प्रतिनिधीत्व दिले. तळागाळातील लोकांचा आणि त्यातून आलेल्या सामान्य माणसाचाच पक्ष असतो हे पुढेही राजकारणात पहिल्यांदा शिवसेनेमुळेच घडले. एक ना हजार गोष्टी शिवसेनेच्या आहेत. कधीतरी त्यावर स्वतंत्र लेखन करीन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे शिवसेना असेच एकत आलोय, नी जेव्हा जेव्हा मराठी किंवा मराठी माणसावर संकट आले तेव्हा शिवसेनाच उभी राहिली हे ही दिसलेय. कोवळ्या मुलांवर हिंदी लादण्याचा भाजपचा डाव उधळून लावला तो शिवसेना मनसे मराठी एकीकरण समिती ह्यांनीच! शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभी राहिलेली खोटी शिवसेना ह्यावेळी उघडी पडली. शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक म्हणजे भाजपला महाराष्ट्रात वाढवले, मातोश्रीवर येऊन पाया पडून, ११७ जागा “मागून” मागून मोठे झालेले पक्ष आता शिवसेनेवरच उलटलेत! भविष्यात सेनेने सावध राहावे व भाजपला लवकरात लवकर महाराष्ट्रातून उपटून फेकावे, व मुंबईत मराठी माणूस वा शिवसेना वाचवावी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 15:29
मला शिवसेनेबद्दल फार राग-आणि लोभ नाही (त्यांच्या वैचारिक उड्या फार लांब पडत नाहीत). पण कुणी एक नांदगावकर नावाच्या शिवसैनिकाच्या क्लिप्स अधूनमधून फेबुवर बघायला मिळतात. त्यांचा जनता दरबार सेनाभवनात भरतो. सामान्य लुबाडले गेलेले गरीब लोक, विशेषतः ज्यांना पोलिसांकदून मदत होत नाही असे, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि हे गृहस्थ वेगवेगळे मार्ग अवलंबून न्याय, मदत मिळवून देतात. वसंत मोरे नावाचे गृहस्थ असेच धडक कारवाई साठी प्रसिद्ध आहेत. माझ्यामते हे खुप मोठे भरीव कार्य आहे...

In reply to by युयुत्सु

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/17/2025 - 13:14
ते नितीन नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे पोलिसदेखील समस्या घेऊन येतात. मागे एका पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता, त्या पोलीस हवालदाराने सगळीकडे हेलपाटे मारले पण काहीही झाले नाही शेवटी नितीन नांदगावकरांच्या एका फोनवर काम झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुक्या गुरुवार, 07/31/2025 - 05:41
काय पण करतात लोक. त्यावर अजुन उदो उदो. व्यवथा चालयला हवी .. असली रिकाम्टेकडी थेरे फक्त भारतात चालतात. पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता यात काय गोची होती? कोण कुणाची अडवणुक करत होते .. त्यावर रितसर खटला टाकुन व्यवस्थेवर सरळ करायचे सोडुन असल्या राजकारणी लोकांच्या आश्रयाला जाणे वर त्याचा उदो उदो करणे हे लोकशाही चे लक्षण नाही. असली कोणती चेकलिस्ट होती त्यात नांदगावकरांचा फोन आला तरच घराचा ताबा मिळेल असे लिहिले होते? व्यक्ती पुजा अजुन किती करावी ...

In reply to by सुक्या

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/31/2025 - 10:29
तो खटला वर्षानुवर्षे चालला असता नी पोलिसाला असता नी बिल्डरने तोंडाला पाने पुसली असती. सिस्टीम जर स्ट्राँग असती तर का म्हणून नांदगावकरांकडे ते पोलीस आले असते? एका फोनवर काम झाले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 11:24
बिरुटे मास्तर आपण लिहिलेल्या बहुसंख्य गोष्टी ऐकीव आहेत त्यातून भरीव असे काहीही निष्पन्न झाले नाही हि वस्तुस्थिती. आमचे सर्व नातेवाईक मुंबईच्या सर्व विभागात विखुरलेले आहेत आणि आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झालेले आहेत आणि आमच्या चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना हक्क मिळवून द्यायच्या जितक्या वल्गना केल्या त्याच्या १० % जरी काम झालं असतं तरी ते मी मान्य केलं असतं. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जागा बळकावून तेथे शिववडापाव झुणका भाकर केंद्रे आपल्या शिवसैनिकांना ( अनधिकृत असली तरी ) मिळवून दिली ती त्यांनी परप्रांतीयांना विकून दौलत केली. याला तुम्ही भूमिपुत्रांसाठी लढा म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं. एक तरी शिक्षणसंस्था ,उद्योग धंदा, रुग्णालय किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे दूरगामी काम केलेले दाखवता येईल का? कम्युनिस्टांची युनियन जाऊन शिवसेनेची युनियन आल्यामुळे कोणत्या कारखान्यात कामगाराला फायदा झाला हे सांगता येईल का? गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. याला काही पुरावा? राष्ट्रीय मिल मजदूर संघ हि काँग्रेस प्रणित संघटना होती तिचा कम्युनिस्टांशी संबंध नाही. त्यांच्या जागी श्री दत्ता सामंत आले आणि गिरणी कामगार संपाची वाताहत झाली. निदान नीट माहिती घेऊन लिहीत चला आमचे वडील त्या काळात ३६ वर्षे एच आर मॅनेजर होते आणि एकंदर शिवसेनेच्या युनियनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे काका. नावडतीचे मीठ अळणी असते त्यामुळे तुम्हाला काहीही पचने तसे अशक्य आहे. शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला त्याचं थोडं वाचन करा. आपल्या प्रतिसादातील विधानं ही परस्पर विरोधी आहेत त्यामुळे आपल्याला समजून घेणे कठीण होत आहे, अर्थात वाढत्या वयात आणि वयपरत्वे असं होतं असतं आम्ही समजून घेतो. आपल्या मुंबईतील आदरणीय चार-पाच पिढ्यांकडूनही आपणास त्या काळातील योग्य माहिती मिळाली नाही असे दिसते. आपण गंभीरपणे माहिती घेतली असती तर, विविध पक्ष, कामगार संघटनेच्या काही गोष्टी, माहिती झाल्या असत्या. पण काही मुलं लहानपणी 'ढ' असतात पुढे त्यांचं कधी कधी एवढं भारी जमून जातं की आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं. बाय द वे, त्यांनी आपणास काही गोष्टी सांगितल्या नसाव्यात त्यामुळे त्याबद्दल काहीही माहिती नाही हे, लक्षात आले आहे. मुंबई हा कम्युनिष्टांचा बालेकिल्ला होता. शिवसेनेला आपली ताकद वाढवायची तर शिवसेनेला आपला संघर्ष कम्युनिष्टांशी करावा लागणार होता. शिवसेनेची आपली स्वतःची कामगार संघटना उभी केली पाहिजे हा बाळ ठाकरेंच्या मनात विचार आला आणि आणि त्यांनी ९ ऑगष्ट १९६८ रोजी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष होते दत्ताजी साळवी तर, सरचिटणीस होते अरुण मेहता. कम्युनिष्टांना विरोध करुन शिवसेनेने मराठी माणसाचा कसा फायदा करुन दिला आणि शिवसेनेला पक्ष म्हणून कसा फायदा झाला हाही मोठा विषय आहे. तर, पहिली गोष्ट विविध कारखान्यांमधे रिक्त जागांची माहिती शिवसेनेकडे यायला लागली. शिवसेनेच्या बेरोजगार तरुणांना माहिती मिळायला लागली. बाळ ठाकरेंनी शिवसेनेत रोजगार विनिमय केंद्र सुरु केलं. हा झाला रोजगाराचा पहिला भाग. दुसरा भाग विविध कंपन्यामधे भारतीय कामगार सेनेने आपली पाळंमुळं रोवण्यासाठी जी काही रणनिती आखली होती त्याबाबत मतभेद होतील पण त्यावेळच्या संघटनांना शह देण्यासाठी त्यांची भूमिका योग्यच अशी होती. बाकी आपलंही चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 18:38
या सगळ्या फापटपसाऱ्यात शिवसेनेने मराठी माणसासाठी ठोस असं काय केलं ते लिहायला विसरलात. आणि कम्युनिस्टांना विरोध केल्यामुळे मराठी माणसाला कसा काय फायदा झाला बुवा? शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला याचा सामान्य माणसाशी काय संबंध एक डांबरट काढून दुसरा आणल्यामुळे काय होतं? बाकी आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे आपली चिडचिड होत आहे हे स्पष्ट आहे. मुळात नीट न वाचता प्रतिसाद लिहिल्यामुळे पितळ उघडं पडलं कि अशी चिडचिड होते असू द्या चालायचंच

सौन्दर्य Wed, 07/09/2025 - 23:30
मुंबईत मला वाटते शिवसेनेनी स्थानीय लोकांच्या रोजगारासाठी झुणका-भाकर केंद्रे उघडली होती, परंतु पाचएक वर्षांतच त्यांची मालकी दक्षिण व उत्तर भारतीयांकडे गेली. झुणका - भाकरी लुप्त होऊन त्या ठिकाणी वडा - सांभार, इडली - डोसा, पाणीपुरी वगैरे मिळू लागली होती. आता ह्याचे श्रेय कोणाला द्यायचे किंवा खापर कोणावर फोडायचे हे मिपावरचे जाणकारचं सांगू शकतील .

रात्रीचे चांदणे गुरुवार, 07/17/2025 - 09:42
देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला पहिली पासून हिंदी शिकवायचीच आहे असं दिसतंय. अत्ता समितीला पुढे करून निर्णय घेतला जाईल. बचवासाठी ते ठाकरे आणि इंग्रजीचा आधार घेत आहेत. ह्यांची स्वतः ची मुलगी इंग्रजी मिडीयम मध्ये होती.

"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती" कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी Tue, 07/01/2025 - 10:52
गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे . इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही. भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती. त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात . सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल).. तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही. पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत .. आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..

सुबोध खरे Tue, 07/01/2025 - 19:42
देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. हायला उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार. जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात किंवा जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली. एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती. त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली. फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही. परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला." पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले. New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-document-signatures/ patel ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption kirit https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-accuses-minister-mushrif-of-over-100-cr-corruption/articleshow/86178643.cms?from=mdr पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.

कंजूस Wed, 07/02/2025 - 17:17
सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत. बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच. आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.

In reply to by कंजूस

चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही. स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 11:58
बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 12:35
जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत. बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.

कपिलमुनी Fri, 07/04/2025 - 09:59
मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार. गणित फिट्ट बसणार

कंजूस Sat, 07/05/2025 - 01:19
हेच होणार >> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>> शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार? .

एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Sat, 07/05/2025 - 22:53
थुंकलेले चाटावे ते राजकीय पक्षांनी.. पवार , चव्हाण , भुजबळ , राणे पवित्र करणे असो.. की पवार ठाकरे घरोबा असो. किंवा सध्याचा ठाकरे बंधुप्रेम असो... सब घोडे बारा टक्के

कंजूस Sat, 07/05/2025 - 20:45
हिंदीच्या ओक्टोपसने मराठीला केव्हाच विळखा घातला आहे. मुंबईत दोन अमराठी लोक भेटले तर ते मराठीत कशाला बोलतील? पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि आता जागे झाले.

अगदी १०१% राजकीय हेतूने प्रेरीत निर्णय होता असे वैयक्तिक मत. कदाचित तो निर्णय घेतानाच अंमलात येण्यापूर्वी तो मागे घ्यायचा असाच डाव असेल पण त्यातून ठाकरेंना मात्र अडकवायचे हा हेतू असेल. महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यावर होतील. मुंबई सोडून इतर महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत याने फारसा फरक पडणार नाही. अनेक राज्यांपेक्षा मोठी आर्थिक उलाढाल असलेली मुंबई महापालिकाच सगळ्यात महत्वाची. नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला पूर्ण राज्यात २० च जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील १० मुंबईतील आहेत. मुंबईत तो गट प्रभाव राखून आहे हे नक्की. तसेच महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक उपयोगाला येते. तिथे उबाठा गटाची ताकद आहे हे नक्की. तसेच अनेक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरील स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. उबाठामध्ये अनेक दशकांपासून असलेले असे लोक आहेत. त्यांना मते मिळतात ती स्वतःची असतात- उबाठा पक्षासाठी मिळालेली असतीलच असे नाही. त्यामुळे विधानसभेत जसा स्वीप केला तसा महापालिका निवडणुकीत होईलच असे नक्कीच नाही. उलट महापालिका निवडणुक भाजपला या स्थानिक कारणांमुळे जड गेली तरी आश्चर्य वाटू नये. एकतर उबाठाला (पूर्वी पक्ष एकसंध होता तेव्हापासूनच) मराठी मतदारांची मते सगळी नक्कीच नाही पण मोठ्या प्रमाणावर मिळत आली आहेत. ती एकनिष्ठ मते भाजपकडे जाणार नाहीत. शिंदे त्यातील किती मते आणतात ते बघायचे पण मुंबईत शिंदे गटापेक्षा उबाठाची ताकद जास्त आहे असे वाटते. भाजपशी युती तोडल्यानंतर भाजपविरोधी अमराठी मते उबाठाकडे जाऊ शकली असती. तसेच बदललेल्या परिस्थितीत मुस्लिम मतेही जाऊ शकली असती- अजूनही जातील. अशावेळेस तो हिंदी सक्तीचा निर्णय आला. त्यानंतर मग ठाकरेंना त्याविरोधात भूमिका घेणे भाग झाले. त्यामुळे मग उबाठाकडे जी अमराठी मते अन्यथा गेली असती त्या मतदारांना संभ्रमात टाकले गेले. त्यात अपेक्षेप्रमाणे मीरा-भाईंदरला त्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. त्याविरोधात मोर्चा निघाला आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला. त्या दुकानदाराला बदडून २००३ मध्ये रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या बिहारी लोकांना बदडून केली तशीच चूक केली गेली आहे असे वाटते. त्या घटनेमुळे २००४ मध्ये उत्तर भारतीयांचे काँग्रेसकडे counter polarization झाले होते. तसे यावेळी व्हायला आपण होऊन त्यांनी मदत केली आहे. आणि ते पोलरायझेशन भाजपच्याच बाजूने होणार ही शक्यता जास्त. तसेच राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. समजा राज-उध्दव एकत्र आले तर मग उबाठाच्या मुस्लिम मतदारांमध्येही काही प्रमाणात चलबिचल होईल ही पण अपेक्षा असेल. तसेच कोणीही उसकावले की लगेच ते लोक तलवार उपसून अंगावर येतात. पण आपण असे डोके गरम करून काहीतरी करावे म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा फायदा होईल म्हणून आपला प्रतिस्पर्धीच आपल्याला उसकावत असेल, त्याच्या सापळ्यात आपण बळी पडायचे नाही तर आपले डोकं थंड ठेवायचे इतका विचार दोन्ही सेनावाले कधीच करत नाहीत. त्या केडियाला भाजपनेच 'मराठी बोलणार नाही जा....' असे वक्तव्य करायला सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली- खरं तर अशी तोडफोड त्यांनी करावी म्हणूनच मुद्दामून ते वक्तव्य केडियाने कशावरून दिले नसेल? केडिया बिल्डर आहे. जर ऑफिसमध्ये तोडफोड झाली आणि त्यातून ५-१० लाखाचे नुकसान झाले तरी त्याला ती रक्कम विशेष नाही. पण अशा घटना झाल्या की त्यातून मग अमराठी मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि काँग्रेस-उबाठा एकत्र असतील तर अमराठी मतदारांपुढे भाजप हा एकच पर्याय राहतो आणि अशी तोडफोड करून आपण त्या मतदारांना भाजपकडे ढकलत आहोत याचा विचार ते करणार नाहीत या अपेक्षेने- खरं तर खात्रीनेच केडियाला ते वक्तव्य द्यायला भाजपने सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. बाकी महापालिका निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नगरसेवक आणि बिल्डर यांच्यामधील अभद्र युती कायमच राहणार आहे. शहरात अजून मोठे मोठे टॉवर उभे राहून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्त्रोत बुजवले जाऊन दरवर्षी तेवढ्यात पावसात अधिकाधिक मोठे पूर येणारच आहेत. त्यामुळे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडणार नाहीये. तरीही उबाठासेनेचा माज उतरवायला त्यांचा पराभव व्हावा असे मला नक्कीच वाटते. नवे भाजपचे नगरसेवक आले की मग केडिया त्याचे जे काही तुटपुंजे नुकसान त्या तोडफोडीतून झाले असेल ते अधिक टी.डी.आर किंवा एफ.एस.आय मिळवून शेकडो पटींनी भरून काढेल. बाकी मराठी माणसासाठी सेनेने जे काही केले होते ते स्थानिय लोकाधिकार समितीने- त्याला ५० वर्षे झालीत आता. यांची मर्दुमकी फक्त मराठी बोलत नाही म्हणून फेरीवाले, इस्त्रीवाले वगैरे साध्यासाध्या माणसांना बदडण्यापुरतीच. मुंबईतील मराठी टक्का कमी होत होता, मराठी शाळा बंद पडत होत्या त्याविषयी त्यांनी काही भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. आता ठाकरेंनी परत एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर या सगळ्या गोष्टी पुढे आणून त्यातील किमान काही मराठी मतदारांमध्येही चलबिचल निर्माण करायची संधी आता भाजपकडे आहे. फडणवीसांनी तेवढ्यापुरता हा एक निर्णय घेऊन उबाठांना सापळ्यात अडकवले असे दिसते. आणि त्यात नेहमीप्रमाणे मारहाण, तोडफोड करून ते त्या सापळ्यात चालत गेले असे वाटते. एकूणच जी मराठी मते उबाठाकडे अन्यथाही गेली असती ती तिथेच राहणार आहेत. पण अमराठी मते जी उबाठाकडे गेली असती त्यांना मात्र भाजपकडे जायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी कोणत्याही निवडणुकीत मते किती फिरतात यावरच निकाल बदलत असतो. या सगळ्या प्रकारात उबाठाकडे नव्याने किती मते येतील आणि विरोधात किती जातील हा हिशेब केल्यावर उबाठासाठी तो हिशेब ऋण असेल असे वैयक्तिक मत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही म्हणता तस खरंच झालं असेल तर एक प्रश्न पडतो की एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती? बरं समजा राज उद्धव यांनी हा मुद्दा उचलूनच धरला नसता तर पहिली पासून तीन तीन भाषा शिकवणार होते का? म्हणजे आपल्या राजकीय सोयीसाठी ६ वर्षाच्या मुलांचा वापर.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?
याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्‍यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही. राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंजूस Sun, 07/06/2025 - 22:36
दुकानदारांना कानफाटवल्याचा जो प्रकार मनसेने चालवलाय त्याला कांग्रेसचा विरोधच असेल. पण आता सेना विकास आघाडीत आहे आणि त्यांनी राजला हात धरून आणल्यावर कासावीस झाले असतील. त्यामुळे मविआ फुटणार हे निश्चित.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कर्नलतपस्वी Sun, 07/06/2025 - 20:51
निवडणूक निर्णयाकडे लक्ष ठेवून सगळ्या हालचाली. सापळे सगळेच लावतात. कोण आडकतय ते बघावे लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी Sun, 07/06/2025 - 22:47
सुरुवातीला हा विचार मांडला तेव्हा लोकांना पटला नव्हता. आता हळूहळू त्याचे राजकीय परिणाम समोर येत आहेत. यात काँग्रेसची फरफट झाली. परवा सुळेंना पाठवून पवारांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा नेहमीचा प्रकार केला आहे. जिथे जास्त शिते तिथे ते जातील

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप कार्यकर्ते, प्रत्येक गोष्टीत जी काही चूक घडेल किंवा घडले की त्याचं भविष्याच्या दृष्टीने कसा फायदा असतो, त्याला 'गोबरयुगात' केंद्रात 'माष्टर ष्ट्रोक' असे म्हणतात. तर इकडे महाराष्ट्रात फडणविसांचे डावपेच किंवा हे सगळं त्यांचं 'स्क्रीप्टे'ड प्रयोग आहेत, इतकं म्हटलं की, शाब्दिक पोचा-यांची गरज पडत नाही. खरी मेख अशी आहे की, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर भविष्यात आपल्या सत्तेला किती हादरे बसू शकतील या कल्पनेनेच सध्या भाजप गटात अस्वस्था आहे. फडणविसांनी मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हणने यात सगळं आलं. मुंबई महानगरपालिका ही रंगीत तालीम असेल. दोघांची युती झाली तर, मुंबई महानगरपालीकेत भाजपचा प्रवास अजूण कठीण होईल हे कोणीही सांगेल त्याला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. आता राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करतील का ? तर मला स्वतःला अशी काही युती महानगर पालिकेत जरी युती झाली तरी भविष्यात अशी युती अशी होईल असे वाटत नाही, दोघांची इच्छा असली तरी. सद्य भाजप सरकार आपल्या साम,दाम, दंड भेद या नितीचा वापर करुन या दोघा भावांना एकत्र येऊ देणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मनसे- जागा वाटप त्या त्या तालुक्यातील काम करणारे नेते कार्यकर्ते यांच्यातील दोन्ही पक्षातील मतभेद पुढे चव्हाट्यावर येतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात प्रभाव सोडला तर इतर जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. राज ठाकरे यांचे भाषण, विचार अगदी मार्मिक असतात. सभांना गर्दी होते पण निवडून येण्याइतकी त्यांची ताकद लागत नाही, त्याचं कारण इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न करणे, युती करणे, कार्यकर्त्यांची फौज बूथवर उभे करणे, निवडणूकांपूर्वी वातावरण करणे आणि इतर गोष्टीत सुरुवात जोरदार करुनही ते कायम मागे पडतात. मनसेला नाश्कातून महाराष्ट्रात इमेज बिल्ट करण्याची संधी होती पण ते झालं नाही. भाजप विरोधात राज ठाकरे यांनी पूर्वीच्या लोकसभेत भाजप विरोधात प्रचारात मुसंडी घेतली होती. 'लाव रे तो व्हीडीयो' म्हणून त्यांच्या सभा गाजल्या होत्या. पण पुढे ते भाजपच्या गळाला लागले आणि त्यांचा भाजप विरोध कमी होत होत त्यांच्या दावनीला ते गेले. भरवशाचं राजकारण करायचं तर, एकदा आपण स्थिरास्थावर होईपर्यंत थेट भूमिका व्यवस्थेविरुद्ध घेतली पाहिजे, नेमके यांचं राजकारण अशावेळी कच खातं आणि त्यांच्या वाट्याला अपयश येतं. मनसे, भाजपाच्या अमिषाला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी नाही. सारांश, युती अवघड वाटते. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी Sun, 07/06/2025 - 22:49
कोणी कितीही काही म्हणले तरी याचा डायरेक्ट फटका शिंदेंना बसणार आहे आणि फायदा भाजपला.. देवाभाऊचे पत्ते फिट बसत आहेत..

एक गोष्ट कळत नाही. इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही. तरीही तोंडदेखल्या ते दोन मुद्दे त्यांचे होते. मग त्यांना एका कृतीतून दोन्ही मुद्दे रेटता येतील अशी नामी संधी होती. पूर्ण भारतात काही लाख/कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यापैकी काही हजार/लाख मुंबईत राहतात हे मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे. २०११ मध्ये माझे ऑफिस महालक्ष्मी स्टेशनजवळ फेमस स्टुडिओच्या शेजारी होते. तिथे जायला मी रे रोड या हार्बर लाईनच्या स्थानकात उतरून १६४ नंबरची बस पकडून जायचो. रे रोड स्टेशनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ती बांगलादेशींनी भरलेली आहे हे उघड गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न केलेले अंगाला वास मारणारे ते घाणेरडे बांगलादेशी बसमध्ये आजूबाजूला वावरायचे त्याची किळस यायची. पण करता काही यायचे नाही. कारण माझ्यासारखे लोक मारामारी करू शकत नाहीत. पण उबाठावाल्यांचा मारामारी करण्यात पहिल्यापासूनच हातखंडा होता. मग मुंबईत जिथेजिथे बांगलादेशी आहेत तिथेतिथे जाऊन त्यांना बदड बदड बदडून मुंबई आणि देश सोडून जायला त्यांना भाग पाडायची नामी संधी त्यांच्याकडे होती. त्या बांगलादेशींना कायदेशीरपणे हाकलता येणे फारच कठीण आहे कारण त्यांनी पैसे चारून सगळी डॉक्युमेन्ट्स बनवून घेतली आहेत. त्यांना हाकलायचा एकच उपाय म्हणजे हा- उठता लाथ बसता बुक्की असे करत बदड बदड बदडायचे आणि इथे राहायलाच नको असे वाटणे भाग पाडायचे. तसेही ते लोक मराठीभाषिक नाहीत, भारतीय नाहीत आणि हिंदूही नाहीत. मग असे बांगलादेशींना बदडून उबाठासेनेचे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे साध्य झाले नसते का? तसे झाले असते तर मग मी अगदी आजन्म उबाठासेना समर्थक झालो असतो. भाजपवाल्यांना मारामारी जमत नाही त्यामुळे ते काही बांगलादेशींना हाकलणार नाहीत पण उबाठावाल्यांनी हाकलले असते तर पूर्ण देशावर आणि मुंबईवर कधी न फेडता येतील असे उपकार त्यांनी करून ठेवले असते. पण कुठचे काय- त्यांची मर्दुमकी फक्त युपीतून आलेले फेरीवाले, इस्त्रीवाले, दुकानदार वगैरे हातावर पोट असलेल्या साध्यासाध्या लोकांविरूध्दच. आणि त्यातील बरेचसे हिंदूच असावेत असे म्हणायला जागा आहे. आणि हे यांचे हिंदुत्व.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.
अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/08/2025 - 10:09
सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. मुदलात खोट आहे. गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा बाळ ठाकरेंचे बाळासाहेब होण्याच्या अगोदर पासून विश्व हिंदू परिषदेने लावलेला आहे कोणताही क्लेम साहेबांसारखा बाळासाहेबांच्या नावावर खपवला जातो. बाकी "तुमचं" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेची स्थापना झाली १९६६ मध्ये. बाळासाहेबांनी १९८७ पर्यंत हिंदुत्व मधील हिं पण उच्चारला नव्हता. मराठी मराठी करून फार तर मुंबईत काही नगरसेवक निवडून आणता येतील पण त्यापलीकडे जायचे असेल तर मराठी मुद्दा उपयोगाचा नाही हे लक्षात आल्यावर. १९८० च्या दशकात देशात हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. १९८२ मध्ये मदुराईला धर्मांतरे झाली त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. १९८४ पासून संघ परिवाराने राममंदिर मुद्दा लावून धरायला सुरवात केली. मग शहाबानो आणि अयोध्येत कुलूप उघडणे यातून हळूहळू हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. ती वेळ हेरून मग बाळासाहेबांनी १९८७ मधील पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाचा उच्चार केला - पक्षाची स्थापना झाल्यानंतर २१ वर्षांनंतर. तोपर्यंत मराठी हाच मुद्दा त्यांचा होता. आणि मराठी हा मुद्दा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे काम होते त्यातून अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या. अन्यथा मराठी पाट्या, बेस्टची तिकिटे मराठीत छापा यापलीकडे लोकाधिकार समितीप्रमाणे फार विधायक कामे मराठी माणसांसाठी नव्हती. म्हणजे या सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.' पण शिवसेनेचे दोन्ही मुद्दे मान्य झाले तर. शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी विषय घेवून राजकारण केले हे तरी मान्य झालं. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाला रोजगार दिला यात शिवसेना होती. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू'चाही नारा महाराष्ट्रात दिला. मराठी भाषा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा महाराष्ट्रात कुठे होती एवढे सांगा आता. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/08/2025 - 10:53
भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. काय सांगताय? भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. आणि त्यानंतर सलग पहिल्या पाच लोकसभांमध्ये त्यांना मिळणाऱ्या जागा ३,४,१४,३५ आणि २२ अशा आहेत. आणीबाणीत जनता पक्षात विलीन झाल्यानंतर नव्या अवतारात भाजप आला तेंव्हा १९८४ साली २, नंतर १९८९ साली ८५ आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे तीन आकड्यात खासदार निवडून येत आहेत. शिवसेनेचा पहिला खासदार १९८९ साली निवडून आला आणि केवळ १९९६ साली भाजप बरोबर युती केल्या वर शिवसेनेला ११ खासदार निवडून आणता आले. अन्यथा दोन आकड्यात खासदार नाहीत कि तीन आकड्यात आमदार काही निवडून आणता आले नाहीत. बेडकीने किती वल्गना केल्या तरी तिचा बैल होत नाही. तेंव्हा "तुमचं" चालु द्या

In reply to by सुबोध खरे

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली त्यानंतर त्यानंतर त्यांचं इकडे तिकडे आणि तुकडे वगैरे पडले. नवा 'भारतीय जनता पार्टी' नावाचा पक्ष स्थापन व्हायला १९८० उजाडला. स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना झाली १९६६ ला. कोणता पक्ष मोठा आहे, वयाने एवढेही कळत नसेल तर बोलणे खुंटले. -दिलीप बिरुटे

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.
याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का? १. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती. २. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? ३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे. ४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून. ५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते. आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आणि मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले. १९७० पासून त्याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली. पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं. कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेबांकडे युतीची भिक मागितली. स्व. बाळासाहेबांनी भाजपाला भिक द्यायच्या ऐवजी जेवणाचं ताट आणि पाट दोन्हीही दिले आणि इथेच घाताला सुरुवात झाली. दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे. शिवसेनेने भाजपाला बोट दिलं नसतं तर महाराष्ट्रात भाजपा एव्हाना भिकेला लागला असता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.
कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?
भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.
भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?
पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.
बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.
महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.
तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?
कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.
जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ
दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.
हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला. जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे, आवरा. >>>> आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती. विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे.. >>> टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात. >>>> १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या.... पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे. >>> जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. =)) गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले. -दिलीप बिरुटे

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..
कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.
शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.
या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.
पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.
घंटा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.
ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्‍यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्‍यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.
मराठी वाचता येत नाही वाटतं. >>>>आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. म्हणूनच शाब्दिक पोचारे म्हणालो. =)) बाकी, चालू दया... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे Tue, 07/08/2025 - 19:10
@ चंद्रसूर्यकुमार कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतंय याच चालीवर आता कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय? असे म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे. बहिऱ्या माणसाला जोरात ओरडून बोलल्यास समजते किंवा ओठाच्या हालचालीने तो समजून घेतो. पण बधिरपणाचा आव आणणाऱ्याला तुम्ही कानाशी बोम्बल्या (लाऊडस्पिकर) लावलात तरी ऐकू येणारच नाही. तेंव्हा सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

बहुतेक वेळा तेच करतो पण माझ्याच प्रतिसादाला उत्तर द्यायला आले तर कधीकधी दखल घ्यावी लागते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्या चार-पाच वर्षांत नक्की कोणते ४-५ आमदार आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आणले होते हे त्यांनी चुकूनमाकून लिहिले तर पुढचे बघू. अर्थात ते त्यांना लिहिता येणार नाहीच कारण मुळात तसे कोणीही आमदार निवडून गेलेच नव्हते. आणि कोणती कोणती काल्पनिक नावे पुढे आणली तर मग निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील नावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्या थापा आहेत हे जगजाहीर करायला मला तो प्रतिसाद लिहायला लागेल तितकाच वेळ लागेल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला ढाण्या वाघ होता वामन महाडिक १९६९-७० पोटनिवडणुकीत एवढ्यात विसरले का ? भाजपचा महाराष्ट्रात जन्मही झाला नव्हता.. आपल्या शाब्दिक पोचा-यांवर भरवसा तसा नाहीच म्हणून लिहिते राहावे लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या पाच सहा वर्षाच्या आत शिवसेने वामन महाडिक आणि प्रमोद नवलकर दोन आमदार दिले. आता चार कुठे दिले त्या शब्दावर आडून राहा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर यूती केली म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. ओसरी दिली नसती तर, भाजप कधीच शिरजोर झाला नसता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर ही नावे मीच वर दिली आहेत. तीच वाचून परत मलाच काय देताय? की स्वतःचे विश्लेषण काहीही न करता ढापाढापी करायची सवय आहे ? तुम्हाला निवडणुकांच्या इतिहासातील घंटा काहीही माहिती नाही तर मग ती झाकली मूठ ठेवावी हो. आपले अज्ञान असे जगजाहीर का करत आहात? आणि परत परत तेच तेच पालुपद -बाठांमुळे भाजप वाढला चालू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्या काळात भाजप वाढला तसाच तो महाराष्ट्रातही वाढतच होता. उलट शिवसेनेशी युती करायची चूक केल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या. बाकी तुम्ही माझे शाब्दिक पोचारे वाचत नाही नाही असे म्हणत बरेच वाचता की. मग खुलेपणाने कबुल करा की. बाळासाहेब दिलदार होते ना? की उध्दवसारखा कुचकटपणा आणि खत्रुडपणा तुम्हाला अधिक भावतो?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते. बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =)) थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले. -दिलीप बिरुटे

काल मुंबई मराठी माणसाचा एकत्रीत असा महामोर्चा निघाला. 'हिंदीसक्ती'च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना एका मिठाईविक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने मराठीजन मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर उतरले. सुरुवातीला मोर्चाची परवानगी नाकारण्यासह पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईमुळे तणाव निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने हजारोंच्या संख्येने मराठीजनांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकूणच मराठी भाषा, मराठी माणूस विरुद्ध अमराठी असे वातातवरण धुसमुसायला लागले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस राजकारणासाठी जरी विषय असला तरी येत्या काळात हे मुद्दे अधिक तीव्र होतील असे वाटते. भाषिक मुद्याची तीव्रता कमी करण्यासाठी हिंदू धर्म खतरेमेचं पिल्लू सोडून मराठी भाषा, मराठी माणूस यात दूही माजवण्याचं षडयंत्र सुरु होईल. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/09/2025 - 11:39
मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. कुठे रुग्णवाहिका उपलब्ध करून दे किंवा रिक्षात हरवलेलय गोष्टी मिळवून दे सारख्या ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी सोडल्या तर. त्या मानाने शरद पवार विखे पाटील पतंगराव कदम सारख्या नेत्यांनी साडे तीन का होईना जिल्ह्यांत सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या शिक्षण संस्था सारखे उद्योग सुरु करून स्थानिक मराठी माणसासाठी थोडी फार तरी कामे केली. मोर्चे काढणे, शक्तिप्रदर्शन करणे सोडून काही भरीव कार्य केले तरच शिवसेनेला काही भवितव्य आहे माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो. त्याच्या कडे ४० ते ५० कामगार काम करतात. आजतागायत केवळ मराठी माणसानाच त्याने कामावर ठेवले आहे. दांड्या मारणे, उत्सवासाठी चार दिवस गावी जाऊन परत येतो सांगून १० दिवसांनी उगवणे, लोकांकडून उसने पैसे घेऊन परत न करणे असे केले तरी अजून तरी त्याने भैय्या लोकांना कामावर ठेवलेले नाही. पण भूमिपुत्र म्हणून माज दाखवण्यापलीकडे मराठी कामगारांनी फार काही नाव घेण्यासारखे केलेले नाही. मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान Wed, 07/09/2025 - 18:26
दुर्दैवाने हे खरं आहे. याच कारणांमुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं असावं असं मला कधीकधी वाटतं. पण नक्की सांगता येत नाही. -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

कानडाऊ योगेशु Wed, 07/09/2025 - 23:34
माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.
आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
खरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. आपल्या मताचा आदर आहेच. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मधील व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रातला सत्ता काळ हा मोठा कालखंड आहे. शिवसेनेने मराठी माणसांठी काय केले हा खरं तर एखादा 'खंड' होईल इतका तो लेखनाचा मोठा विषय आहे. एका शांत, संयमी व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणूस ते शिवसेनेचा जहाल पक्षाकडे प्रवास कसा होत गेला. साठच्या दशकातील महाराष्ट्राचं राजकारण, मराठी माणसाच्या रोजगारासाठीच नव्हे तर, मराठी माणसाठी खासगी कंपन्यात आणि सरकारी नोक-यात आरक्षण मागणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असावा. मराठी माणसाच्या मुद्याकडून हिदूत्वाकडे झालेला प्रवास. शिवसेना स्थापनेच्या अगोदरही मार्मिकमधून 'अमराठी' लोकांची यादी प्रसिद्ध करुन 'वाचा आणि थंड बसा' असे म्हणून मराठी माणसांमधे जनजागृतीच केली नाही तर, वाचा आणि उठा अशी हाक मारली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार कसा होत गेला. आपला पक्ष, राजकारण, पाठींबा देणे, नेते, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कायम वेगळं राहिलं. चित्रपटसृष्टीवरही कसा दबदबा निर्माण केला. देशभर ठाकरेंचं कसं वलय होतं. गावखेड्यात गावोगावी शिवसेनेचे फलक असायचे. गावागावात भगवे उपरणे घालून कार्यकर्ते अभिमानाने शिवसैनिक म्हणून कसे मिरवायचे. बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांचा एक मोठा वर्ग. मोठा विषय. शिवसेनेच्या राजकारणाच्या यश अपयशाची चर्चा होत राहील. पण भरीव काही दिसलं नाही, इतकं सहज बोलून शिवसेना पक्षाची बोळवण होऊ शकत नाही. पुस्तक वगैरे वाचत असाल तर, स्व. बाळ ठाकरेंवर, वैभव पुरंदरेचं एक चांगलं माहितीवजा पुस्तक आहे, कधी मिळालं तर नक्की वाचा. शिवसेनेचा सविस्तर प्रवास वाचायला मिळेल. मराठी माणसासाठी काय काय केलं आणि शिवसेनेचा पक्ष स्थापनेपासून ते त्यांचा राजकारणाचा प्रवास चांगला समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/16/2025 - 12:10
भरीव काही दिसलं नाही तुम्हाला भरीव काही दिसलं का? तसं असेल तर मांडा कि इथे. उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचा भात कशाला

In reply to by सुबोध खरे

प्रिय काका. आज मुंबईत जो मराठी माणूस दिसतो त्याचं श्रेय शिवसेनेला दिलं पाहिजे. अमराठी लोकांच्या काळात मराठी माणसाला रोजगार दिला. मुंबैत शिवसेना बेरोजगार तरुणांना खासगी कंपन्यात नोक-या मिळाव्यात यासाठी तरुणांच्या नोंदवह्यात नोंद करुन तरुणांना, प्रशिक्षण, देऊन पात्रताधारक व्हावा म्हणून युवकांचे मेळावे, अभ्यासिका, फिस भरणे हे राजकीय पक्षाने केले त्याचं नाव शिवसेना. मराठी माणसाला अमराठींच्या भाऊगर्दीत जिथे जिथे रोजगाराच्या संधी नाकारली तिथे तिथे मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मराठी माणसावर अन्याय अत्याचार तेव्हाही होत होता, त्यांच्यासाठी संघटन उभारले त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला. महाराष्ट्रातील माणूस एकजूट केला. गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. शिवसेनेची मार्गदेशक पाहिल्यावर मराठी माणसाला तो आपला पक्ष वाटला. महाराष्ट्रीयन उद्योगपतींनी मराठी माणसाला नोकरी द्यावी. वगैरे महाराष्ट्र गृहनिर्माण महामण्डलाची 80 टक्के घरे महाराष्ट्रातील माणसाला आरक्षित ठेवली पाहिजे ही मागणी केली. राज्यातील सरकारी नोक-या मराठी लिहिता वाचता येते त्याला मिळाली पाहिजे अशी मागणी केली पाठपुरावा केला. मराठी माणसाच्या हक्कासाठीच प्रस्थापित राजकारण्यांना शह देत ठाणे-मुंबई महापालिकेत यश मिळवले. सामान्य माणसांना अगदी वडा-पाव विकणा-यांना राजकारणात प्रतिनिधीत्व दिले. तळागाळातील लोकांचा आणि त्यातून आलेल्या सामान्य माणसाचाच पक्ष असतो हे पुढेही राजकारणात पहिल्यांदा शिवसेनेमुळेच घडले. एक ना हजार गोष्टी शिवसेनेच्या आहेत. कधीतरी त्यावर स्वतंत्र लेखन करीन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे शिवसेना असेच एकत आलोय, नी जेव्हा जेव्हा मराठी किंवा मराठी माणसावर संकट आले तेव्हा शिवसेनाच उभी राहिली हे ही दिसलेय. कोवळ्या मुलांवर हिंदी लादण्याचा भाजपचा डाव उधळून लावला तो शिवसेना मनसे मराठी एकीकरण समिती ह्यांनीच! शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभी राहिलेली खोटी शिवसेना ह्यावेळी उघडी पडली. शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक म्हणजे भाजपला महाराष्ट्रात वाढवले, मातोश्रीवर येऊन पाया पडून, ११७ जागा “मागून” मागून मोठे झालेले पक्ष आता शिवसेनेवरच उलटलेत! भविष्यात सेनेने सावध राहावे व भाजपला लवकरात लवकर महाराष्ट्रातून उपटून फेकावे, व मुंबईत मराठी माणूस वा शिवसेना वाचवावी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु Wed, 07/16/2025 - 15:29
मला शिवसेनेबद्दल फार राग-आणि लोभ नाही (त्यांच्या वैचारिक उड्या फार लांब पडत नाहीत). पण कुणी एक नांदगावकर नावाच्या शिवसैनिकाच्या क्लिप्स अधूनमधून फेबुवर बघायला मिळतात. त्यांचा जनता दरबार सेनाभवनात भरतो. सामान्य लुबाडले गेलेले गरीब लोक, विशेषतः ज्यांना पोलिसांकदून मदत होत नाही असे, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि हे गृहस्थ वेगवेगळे मार्ग अवलंबून न्याय, मदत मिळवून देतात. वसंत मोरे नावाचे गृहस्थ असेच धडक कारवाई साठी प्रसिद्ध आहेत. माझ्यामते हे खुप मोठे भरीव कार्य आहे...

In reply to by युयुत्सु

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/17/2025 - 13:14
ते नितीन नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे पोलिसदेखील समस्या घेऊन येतात. मागे एका पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता, त्या पोलीस हवालदाराने सगळीकडे हेलपाटे मारले पण काहीही झाले नाही शेवटी नितीन नांदगावकरांच्या एका फोनवर काम झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुक्या गुरुवार, 07/31/2025 - 05:41
काय पण करतात लोक. त्यावर अजुन उदो उदो. व्यवथा चालयला हवी .. असली रिकाम्टेकडी थेरे फक्त भारतात चालतात. पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता यात काय गोची होती? कोण कुणाची अडवणुक करत होते .. त्यावर रितसर खटला टाकुन व्यवस्थेवर सरळ करायचे सोडुन असल्या राजकारणी लोकांच्या आश्रयाला जाणे वर त्याचा उदो उदो करणे हे लोकशाही चे लक्षण नाही. असली कोणती चेकलिस्ट होती त्यात नांदगावकरांचा फोन आला तरच घराचा ताबा मिळेल असे लिहिले होते? व्यक्ती पुजा अजुन किती करावी ...

In reply to by सुक्या

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/31/2025 - 10:29
तो खटला वर्षानुवर्षे चालला असता नी पोलिसाला असता नी बिल्डरने तोंडाला पाने पुसली असती. सिस्टीम जर स्ट्राँग असती तर का म्हणून नांदगावकरांकडे ते पोलीस आले असते? एका फोनवर काम झाले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 11:24
बिरुटे मास्तर आपण लिहिलेल्या बहुसंख्य गोष्टी ऐकीव आहेत त्यातून भरीव असे काहीही निष्पन्न झाले नाही हि वस्तुस्थिती. आमचे सर्व नातेवाईक मुंबईच्या सर्व विभागात विखुरलेले आहेत आणि आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झालेले आहेत आणि आमच्या चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना हक्क मिळवून द्यायच्या जितक्या वल्गना केल्या त्याच्या १० % जरी काम झालं असतं तरी ते मी मान्य केलं असतं. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जागा बळकावून तेथे शिववडापाव झुणका भाकर केंद्रे आपल्या शिवसैनिकांना ( अनधिकृत असली तरी ) मिळवून दिली ती त्यांनी परप्रांतीयांना विकून दौलत केली. याला तुम्ही भूमिपुत्रांसाठी लढा म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं. एक तरी शिक्षणसंस्था ,उद्योग धंदा, रुग्णालय किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे दूरगामी काम केलेले दाखवता येईल का? कम्युनिस्टांची युनियन जाऊन शिवसेनेची युनियन आल्यामुळे कोणत्या कारखान्यात कामगाराला फायदा झाला हे सांगता येईल का? गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. याला काही पुरावा? राष्ट्रीय मिल मजदूर संघ हि काँग्रेस प्रणित संघटना होती तिचा कम्युनिस्टांशी संबंध नाही. त्यांच्या जागी श्री दत्ता सामंत आले आणि गिरणी कामगार संपाची वाताहत झाली. निदान नीट माहिती घेऊन लिहीत चला आमचे वडील त्या काळात ३६ वर्षे एच आर मॅनेजर होते आणि एकंदर शिवसेनेच्या युनियनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे काका. नावडतीचे मीठ अळणी असते त्यामुळे तुम्हाला काहीही पचने तसे अशक्य आहे. शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला त्याचं थोडं वाचन करा. आपल्या प्रतिसादातील विधानं ही परस्पर विरोधी आहेत त्यामुळे आपल्याला समजून घेणे कठीण होत आहे, अर्थात वाढत्या वयात आणि वयपरत्वे असं होतं असतं आम्ही समजून घेतो. आपल्या मुंबईतील आदरणीय चार-पाच पिढ्यांकडूनही आपणास त्या काळातील योग्य माहिती मिळाली नाही असे दिसते. आपण गंभीरपणे माहिती घेतली असती तर, विविध पक्ष, कामगार संघटनेच्या काही गोष्टी, माहिती झाल्या असत्या. पण काही मुलं लहानपणी 'ढ' असतात पुढे त्यांचं कधी कधी एवढं भारी जमून जातं की आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं. बाय द वे, त्यांनी आपणास काही गोष्टी सांगितल्या नसाव्यात त्यामुळे त्याबद्दल काहीही माहिती नाही हे, लक्षात आले आहे. मुंबई हा कम्युनिष्टांचा बालेकिल्ला होता. शिवसेनेला आपली ताकद वाढवायची तर शिवसेनेला आपला संघर्ष कम्युनिष्टांशी करावा लागणार होता. शिवसेनेची आपली स्वतःची कामगार संघटना उभी केली पाहिजे हा बाळ ठाकरेंच्या मनात विचार आला आणि आणि त्यांनी ९ ऑगष्ट १९६८ रोजी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष होते दत्ताजी साळवी तर, सरचिटणीस होते अरुण मेहता. कम्युनिष्टांना विरोध करुन शिवसेनेने मराठी माणसाचा कसा फायदा करुन दिला आणि शिवसेनेला पक्ष म्हणून कसा फायदा झाला हाही मोठा विषय आहे. तर, पहिली गोष्ट विविध कारखान्यांमधे रिक्त जागांची माहिती शिवसेनेकडे यायला लागली. शिवसेनेच्या बेरोजगार तरुणांना माहिती मिळायला लागली. बाळ ठाकरेंनी शिवसेनेत रोजगार विनिमय केंद्र सुरु केलं. हा झाला रोजगाराचा पहिला भाग. दुसरा भाग विविध कंपन्यामधे भारतीय कामगार सेनेने आपली पाळंमुळं रोवण्यासाठी जी काही रणनिती आखली होती त्याबाबत मतभेद होतील पण त्यावेळच्या संघटनांना शह देण्यासाठी त्यांची भूमिका योग्यच अशी होती. बाकी आपलंही चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 18:38
या सगळ्या फापटपसाऱ्यात शिवसेनेने मराठी माणसासाठी ठोस असं काय केलं ते लिहायला विसरलात. आणि कम्युनिस्टांना विरोध केल्यामुळे मराठी माणसाला कसा काय फायदा झाला बुवा? शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला याचा सामान्य माणसाशी काय संबंध एक डांबरट काढून दुसरा आणल्यामुळे काय होतं? बाकी आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे आपली चिडचिड होत आहे हे स्पष्ट आहे. मुळात नीट न वाचता प्रतिसाद लिहिल्यामुळे पितळ उघडं पडलं कि अशी चिडचिड होते असू द्या चालायचंच

सौन्दर्य Wed, 07/09/2025 - 23:30
मुंबईत मला वाटते शिवसेनेनी स्थानीय लोकांच्या रोजगारासाठी झुणका-भाकर केंद्रे उघडली होती, परंतु पाचएक वर्षांतच त्यांची मालकी दक्षिण व उत्तर भारतीयांकडे गेली. झुणका - भाकरी लुप्त होऊन त्या ठिकाणी वडा - सांभार, इडली - डोसा, पाणीपुरी वगैरे मिळू लागली होती. आता ह्याचे श्रेय कोणाला द्यायचे किंवा खापर कोणावर फोडायचे हे मिपावरचे जाणकारचं सांगू शकतील .

रात्रीचे चांदणे गुरुवार, 07/17/2025 - 09:42
देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला पहिली पासून हिंदी शिकवायचीच आहे असं दिसतंय. अत्ता समितीला पुढे करून निर्णय घेतला जाईल. बचवासाठी ते ठाकरे आणि इंग्रजीचा आधार घेत आहेत. ह्यांची स्वतः ची मुलगी इंग्रजी मिडीयम मध्ये होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली.

सुरीला दारूडा,..

Bhakti ·

Bhakti Wed, 07/02/2025 - 11:09
दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला... एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!
तळीराम - बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं! तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

गवि Wed, 07/02/2025 - 11:46
तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.

In reply to by गवि

Bhakti Wed, 07/02/2025 - 12:15
होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.

Bhakti Wed, 07/02/2025 - 11:09
दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला... एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!
तळीराम - बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं! तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

गवि Wed, 07/02/2025 - 11:46
तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.

In reply to by गवि

Bhakti Wed, 07/02/2025 - 12:15
होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.
लेखनविषय:
संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी "चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.." असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा. घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाह‌ता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा . बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत. "बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..." हे तो इतकं अप्रतिम गायचा. वरच्या आवाजात बाई ठिपक्यांची गात हळू हळू आवाज करत, बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची..

मराठी गाणे ai चा वापर करून

स्वरुपसुमित ·

युयुत्सु Tue, 07/01/2025 - 12:49
आधुनिक भारतीय संगीताचं आता संगणकाशी अविभाज्य नाते निर्माण झाले आहे. आता ए० आय० मुळे नव्या संगीतरचना तयार करता येतात. पण कंप्युटरचा संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी, नव्या चाली बांधण्यासाठी वापर करण्याची कल्पना मी सुमारे ३२ वर्षापूर्वी (बहुदा प्रथमच)मांडली. अर्थातच त्याला प्रचंड विरोध झाला आणि मला माझा प्रकल्प बंद करायला भाग पाडले गेले. भारतात दूसरे काही झाले तरच नवल! आजच्या एल०एल०एम मध्ये जसे पुढे काय येणार याची शक्यता संदर्भानुसार निश्चित करून उत्तर तयार होते, तसाच काहीसा प्रकार संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी मी तेव्हा वापरला होता.

स्वरुपसुमित Tue, 07/01/2025 - 14:32
Mamachya Gavala Jauya - Marathi Balgeet For Kids (with lyrics) पुर्ण एक मिनट विडीयो,लौकर ३:३० चा पुर्ण बनवेन https://youtube.com/shorts/x-ftgc_wwtE?feature=share

युयुत्सु Tue, 07/01/2025 - 12:49
आधुनिक भारतीय संगीताचं आता संगणकाशी अविभाज्य नाते निर्माण झाले आहे. आता ए० आय० मुळे नव्या संगीतरचना तयार करता येतात. पण कंप्युटरचा संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी, नव्या चाली बांधण्यासाठी वापर करण्याची कल्पना मी सुमारे ३२ वर्षापूर्वी (बहुदा प्रथमच)मांडली. अर्थातच त्याला प्रचंड विरोध झाला आणि मला माझा प्रकल्प बंद करायला भाग पाडले गेले. भारतात दूसरे काही झाले तरच नवल! आजच्या एल०एल०एम मध्ये जसे पुढे काय येणार याची शक्यता संदर्भानुसार निश्चित करून उत्तर तयार होते, तसाच काहीसा प्रकार संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी मी तेव्हा वापरला होता.

स्वरुपसुमित Tue, 07/01/2025 - 14:32
Mamachya Gavala Jauya - Marathi Balgeet For Kids (with lyrics) पुर्ण एक मिनट विडीयो,लौकर ३:३० चा पुर्ण बनवेन https://youtube.com/shorts/x-ftgc_wwtE?feature=share
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे ai चा वापस करून मराठी गाणे १) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे २) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा ३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन

राडा

तुमचा अभिषेक ·

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 10:55
धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि Mon, 06/30/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 14:15
राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

चौथा कोनाडा Mon, 06/30/2025 - 17:15
झकास शब्दचित्र रंगवलेय ! सगळा प्रसंग डोळ्यापुढे तंतोतंत साकारला.... खरंय ..... निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही ! आणखी येऊद्यात !

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:19
आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा Tue, 07/01/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 22:10
आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 10:55
धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि Mon, 06/30/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 14:15
राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

चौथा कोनाडा Mon, 06/30/2025 - 17:15
झकास शब्दचित्र रंगवलेय ! सगळा प्रसंग डोळ्यापुढे तंतोतंत साकारला.... खरंय ..... निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही ! आणखी येऊद्यात !

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:19
आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा Tue, 07/01/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 22:10
आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
राडा ______ स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते. आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती.