मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

कपिलमुनी ·

"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती" कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी 01/07/2025 - 10:52
गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे . इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही. भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती. त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात . सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल).. तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही. पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत .. आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..

सुबोध खरे 01/07/2025 - 19:42
देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. हायला उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार. जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात किंवा जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली. एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती. त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली. फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही. परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला." पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले. New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-document-signatures/ patel ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption kirit https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-accuses-minister-mushrif-of-over-100-cr-corruption/articleshow/86178643.cms?from=mdr पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.

कंजूस 02/07/2025 - 17:17
सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत. बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच. आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.

In reply to by कंजूस

चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही. स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.

विवेकपटाईत 03/07/2025 - 11:58
बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.

जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत. बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.

कपिलमुनी 04/07/2025 - 09:59
मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार. गणित फिट्ट बसणार

कंजूस 05/07/2025 - 01:19
हेच होणार >> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>> शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार? .

एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 05/07/2025 - 22:53
थुंकलेले चाटावे ते राजकीय पक्षांनी.. पवार , चव्हाण , भुजबळ , राणे पवित्र करणे असो.. की पवार ठाकरे घरोबा असो. किंवा सध्याचा ठाकरे बंधुप्रेम असो... सब घोडे बारा टक्के

कंजूस 05/07/2025 - 20:45
हिंदीच्या ओक्टोपसने मराठीला केव्हाच विळखा घातला आहे. मुंबईत दोन अमराठी लोक भेटले तर ते मराठीत कशाला बोलतील? पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि आता जागे झाले.

अगदी १०१% राजकीय हेतूने प्रेरीत निर्णय होता असे वैयक्तिक मत. कदाचित तो निर्णय घेतानाच अंमलात येण्यापूर्वी तो मागे घ्यायचा असाच डाव असेल पण त्यातून ठाकरेंना मात्र अडकवायचे हा हेतू असेल. महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यावर होतील. मुंबई सोडून इतर महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत याने फारसा फरक पडणार नाही. अनेक राज्यांपेक्षा मोठी आर्थिक उलाढाल असलेली मुंबई महापालिकाच सगळ्यात महत्वाची. नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला पूर्ण राज्यात २० च जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील १० मुंबईतील आहेत. मुंबईत तो गट प्रभाव राखून आहे हे नक्की. तसेच महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक उपयोगाला येते. तिथे उबाठा गटाची ताकद आहे हे नक्की. तसेच अनेक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरील स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. उबाठामध्ये अनेक दशकांपासून असलेले असे लोक आहेत. त्यांना मते मिळतात ती स्वतःची असतात- उबाठा पक्षासाठी मिळालेली असतीलच असे नाही. त्यामुळे विधानसभेत जसा स्वीप केला तसा महापालिका निवडणुकीत होईलच असे नक्कीच नाही. उलट महापालिका निवडणुक भाजपला या स्थानिक कारणांमुळे जड गेली तरी आश्चर्य वाटू नये. एकतर उबाठाला (पूर्वी पक्ष एकसंध होता तेव्हापासूनच) मराठी मतदारांची मते सगळी नक्कीच नाही पण मोठ्या प्रमाणावर मिळत आली आहेत. ती एकनिष्ठ मते भाजपकडे जाणार नाहीत. शिंदे त्यातील किती मते आणतात ते बघायचे पण मुंबईत शिंदे गटापेक्षा उबाठाची ताकद जास्त आहे असे वाटते. भाजपशी युती तोडल्यानंतर भाजपविरोधी अमराठी मते उबाठाकडे जाऊ शकली असती. तसेच बदललेल्या परिस्थितीत मुस्लिम मतेही जाऊ शकली असती- अजूनही जातील. अशावेळेस तो हिंदी सक्तीचा निर्णय आला. त्यानंतर मग ठाकरेंना त्याविरोधात भूमिका घेणे भाग झाले. त्यामुळे मग उबाठाकडे जी अमराठी मते अन्यथा गेली असती त्या मतदारांना संभ्रमात टाकले गेले. त्यात अपेक्षेप्रमाणे मीरा-भाईंदरला त्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. त्याविरोधात मोर्चा निघाला आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला. त्या दुकानदाराला बदडून २००३ मध्ये रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या बिहारी लोकांना बदडून केली तशीच चूक केली गेली आहे असे वाटते. त्या घटनेमुळे २००४ मध्ये उत्तर भारतीयांचे काँग्रेसकडे counter polarization झाले होते. तसे यावेळी व्हायला आपण होऊन त्यांनी मदत केली आहे. आणि ते पोलरायझेशन भाजपच्याच बाजूने होणार ही शक्यता जास्त. तसेच राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. समजा राज-उध्दव एकत्र आले तर मग उबाठाच्या मुस्लिम मतदारांमध्येही काही प्रमाणात चलबिचल होईल ही पण अपेक्षा असेल. तसेच कोणीही उसकावले की लगेच ते लोक तलवार उपसून अंगावर येतात. पण आपण असे डोके गरम करून काहीतरी करावे म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा फायदा होईल म्हणून आपला प्रतिस्पर्धीच आपल्याला उसकावत असेल, त्याच्या सापळ्यात आपण बळी पडायचे नाही तर आपले डोकं थंड ठेवायचे इतका विचार दोन्ही सेनावाले कधीच करत नाहीत. त्या केडियाला भाजपनेच 'मराठी बोलणार नाही जा....' असे वक्तव्य करायला सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली- खरं तर अशी तोडफोड त्यांनी करावी म्हणूनच मुद्दामून ते वक्तव्य केडियाने कशावरून दिले नसेल? केडिया बिल्डर आहे. जर ऑफिसमध्ये तोडफोड झाली आणि त्यातून ५-१० लाखाचे नुकसान झाले तरी त्याला ती रक्कम विशेष नाही. पण अशा घटना झाल्या की त्यातून मग अमराठी मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि काँग्रेस-उबाठा एकत्र असतील तर अमराठी मतदारांपुढे भाजप हा एकच पर्याय राहतो आणि अशी तोडफोड करून आपण त्या मतदारांना भाजपकडे ढकलत आहोत याचा विचार ते करणार नाहीत या अपेक्षेने- खरं तर खात्रीनेच केडियाला ते वक्तव्य द्यायला भाजपने सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. बाकी महापालिका निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नगरसेवक आणि बिल्डर यांच्यामधील अभद्र युती कायमच राहणार आहे. शहरात अजून मोठे मोठे टॉवर उभे राहून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्त्रोत बुजवले जाऊन दरवर्षी तेवढ्यात पावसात अधिकाधिक मोठे पूर येणारच आहेत. त्यामुळे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडणार नाहीये. तरीही उबाठासेनेचा माज उतरवायला त्यांचा पराभव व्हावा असे मला नक्कीच वाटते. नवे भाजपचे नगरसेवक आले की मग केडिया त्याचे जे काही तुटपुंजे नुकसान त्या तोडफोडीतून झाले असेल ते अधिक टी.डी.आर किंवा एफ.एस.आय मिळवून शेकडो पटींनी भरून काढेल. बाकी मराठी माणसासाठी सेनेने जे काही केले होते ते स्थानिय लोकाधिकार समितीने- त्याला ५० वर्षे झालीत आता. यांची मर्दुमकी फक्त मराठी बोलत नाही म्हणून फेरीवाले, इस्त्रीवाले वगैरे साध्यासाध्या माणसांना बदडण्यापुरतीच. मुंबईतील मराठी टक्का कमी होत होता, मराठी शाळा बंद पडत होत्या त्याविषयी त्यांनी काही भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. आता ठाकरेंनी परत एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर या सगळ्या गोष्टी पुढे आणून त्यातील किमान काही मराठी मतदारांमध्येही चलबिचल निर्माण करायची संधी आता भाजपकडे आहे. फडणवीसांनी तेवढ्यापुरता हा एक निर्णय घेऊन उबाठांना सापळ्यात अडकवले असे दिसते. आणि त्यात नेहमीप्रमाणे मारहाण, तोडफोड करून ते त्या सापळ्यात चालत गेले असे वाटते. एकूणच जी मराठी मते उबाठाकडे अन्यथाही गेली असती ती तिथेच राहणार आहेत. पण अमराठी मते जी उबाठाकडे गेली असती त्यांना मात्र भाजपकडे जायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी कोणत्याही निवडणुकीत मते किती फिरतात यावरच निकाल बदलत असतो. या सगळ्या प्रकारात उबाठाकडे नव्याने किती मते येतील आणि विरोधात किती जातील हा हिशेब केल्यावर उबाठासाठी तो हिशेब ऋण असेल असे वैयक्तिक मत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही म्हणता तस खरंच झालं असेल तर एक प्रश्न पडतो की एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती? बरं समजा राज उद्धव यांनी हा मुद्दा उचलूनच धरला नसता तर पहिली पासून तीन तीन भाषा शिकवणार होते का? म्हणजे आपल्या राजकीय सोयीसाठी ६ वर्षाच्या मुलांचा वापर.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?
याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्‍यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही. राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंजूस 06/07/2025 - 22:36
दुकानदारांना कानफाटवल्याचा जो प्रकार मनसेने चालवलाय त्याला कांग्रेसचा विरोधच असेल. पण आता सेना विकास आघाडीत आहे आणि त्यांनी राजला हात धरून आणल्यावर कासावीस झाले असतील. त्यामुळे मविआ फुटणार हे निश्चित.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निवडणूक निर्णयाकडे लक्ष ठेवून सगळ्या हालचाली. सापळे सगळेच लावतात. कोण आडकतय ते बघावे लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी 06/07/2025 - 22:47
सुरुवातीला हा विचार मांडला तेव्हा लोकांना पटला नव्हता. आता हळूहळू त्याचे राजकीय परिणाम समोर येत आहेत. यात काँग्रेसची फरफट झाली. परवा सुळेंना पाठवून पवारांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा नेहमीचा प्रकार केला आहे. जिथे जास्त शिते तिथे ते जातील

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप कार्यकर्ते, प्रत्येक गोष्टीत जी काही चूक घडेल किंवा घडले की त्याचं भविष्याच्या दृष्टीने कसा फायदा असतो, त्याला 'गोबरयुगात' केंद्रात 'माष्टर ष्ट्रोक' असे म्हणतात. तर इकडे महाराष्ट्रात फडणविसांचे डावपेच किंवा हे सगळं त्यांचं 'स्क्रीप्टे'ड प्रयोग आहेत, इतकं म्हटलं की, शाब्दिक पोचा-यांची गरज पडत नाही. खरी मेख अशी आहे की, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर भविष्यात आपल्या सत्तेला किती हादरे बसू शकतील या कल्पनेनेच सध्या भाजप गटात अस्वस्था आहे. फडणविसांनी मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हणने यात सगळं आलं. मुंबई महानगरपालिका ही रंगीत तालीम असेल. दोघांची युती झाली तर, मुंबई महानगरपालीकेत भाजपचा प्रवास अजूण कठीण होईल हे कोणीही सांगेल त्याला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. आता राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करतील का ? तर मला स्वतःला अशी काही युती महानगर पालिकेत जरी युती झाली तरी भविष्यात अशी युती अशी होईल असे वाटत नाही, दोघांची इच्छा असली तरी. सद्य भाजप सरकार आपल्या साम,दाम, दंड भेद या नितीचा वापर करुन या दोघा भावांना एकत्र येऊ देणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मनसे- जागा वाटप त्या त्या तालुक्यातील काम करणारे नेते कार्यकर्ते यांच्यातील दोन्ही पक्षातील मतभेद पुढे चव्हाट्यावर येतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात प्रभाव सोडला तर इतर जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. राज ठाकरे यांचे भाषण, विचार अगदी मार्मिक असतात. सभांना गर्दी होते पण निवडून येण्याइतकी त्यांची ताकद लागत नाही, त्याचं कारण इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न करणे, युती करणे, कार्यकर्त्यांची फौज बूथवर उभे करणे, निवडणूकांपूर्वी वातावरण करणे आणि इतर गोष्टीत सुरुवात जोरदार करुनही ते कायम मागे पडतात. मनसेला नाश्कातून महाराष्ट्रात इमेज बिल्ट करण्याची संधी होती पण ते झालं नाही. भाजप विरोधात राज ठाकरे यांनी पूर्वीच्या लोकसभेत भाजप विरोधात प्रचारात मुसंडी घेतली होती. 'लाव रे तो व्हीडीयो' म्हणून त्यांच्या सभा गाजल्या होत्या. पण पुढे ते भाजपच्या गळाला लागले आणि त्यांचा भाजप विरोध कमी होत होत त्यांच्या दावनीला ते गेले. भरवशाचं राजकारण करायचं तर, एकदा आपण स्थिरास्थावर होईपर्यंत थेट भूमिका व्यवस्थेविरुद्ध घेतली पाहिजे, नेमके यांचं राजकारण अशावेळी कच खातं आणि त्यांच्या वाट्याला अपयश येतं. मनसे, भाजपाच्या अमिषाला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी नाही. सारांश, युती अवघड वाटते. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 06/07/2025 - 22:49
कोणी कितीही काही म्हणले तरी याचा डायरेक्ट फटका शिंदेंना बसणार आहे आणि फायदा भाजपला.. देवाभाऊचे पत्ते फिट बसत आहेत..

एक गोष्ट कळत नाही. इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही. तरीही तोंडदेखल्या ते दोन मुद्दे त्यांचे होते. मग त्यांना एका कृतीतून दोन्ही मुद्दे रेटता येतील अशी नामी संधी होती. पूर्ण भारतात काही लाख/कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यापैकी काही हजार/लाख मुंबईत राहतात हे मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे. २०११ मध्ये माझे ऑफिस महालक्ष्मी स्टेशनजवळ फेमस स्टुडिओच्या शेजारी होते. तिथे जायला मी रे रोड या हार्बर लाईनच्या स्थानकात उतरून १६४ नंबरची बस पकडून जायचो. रे रोड स्टेशनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ती बांगलादेशींनी भरलेली आहे हे उघड गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न केलेले अंगाला वास मारणारे ते घाणेरडे बांगलादेशी बसमध्ये आजूबाजूला वावरायचे त्याची किळस यायची. पण करता काही यायचे नाही. कारण माझ्यासारखे लोक मारामारी करू शकत नाहीत. पण उबाठावाल्यांचा मारामारी करण्यात पहिल्यापासूनच हातखंडा होता. मग मुंबईत जिथेजिथे बांगलादेशी आहेत तिथेतिथे जाऊन त्यांना बदड बदड बदडून मुंबई आणि देश सोडून जायला त्यांना भाग पाडायची नामी संधी त्यांच्याकडे होती. त्या बांगलादेशींना कायदेशीरपणे हाकलता येणे फारच कठीण आहे कारण त्यांनी पैसे चारून सगळी डॉक्युमेन्ट्स बनवून घेतली आहेत. त्यांना हाकलायचा एकच उपाय म्हणजे हा- उठता लाथ बसता बुक्की असे करत बदड बदड बदडायचे आणि इथे राहायलाच नको असे वाटणे भाग पाडायचे. तसेही ते लोक मराठीभाषिक नाहीत, भारतीय नाहीत आणि हिंदूही नाहीत. मग असे बांगलादेशींना बदडून उबाठासेनेचे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे साध्य झाले नसते का? तसे झाले असते तर मग मी अगदी आजन्म उबाठासेना समर्थक झालो असतो. भाजपवाल्यांना मारामारी जमत नाही त्यामुळे ते काही बांगलादेशींना हाकलणार नाहीत पण उबाठावाल्यांनी हाकलले असते तर पूर्ण देशावर आणि मुंबईवर कधी न फेडता येतील असे उपकार त्यांनी करून ठेवले असते. पण कुठचे काय- त्यांची मर्दुमकी फक्त युपीतून आलेले फेरीवाले, इस्त्रीवाले, दुकानदार वगैरे हातावर पोट असलेल्या साध्यासाध्या लोकांविरूध्दच. आणि त्यातील बरेचसे हिंदूच असावेत असे म्हणायला जागा आहे. आणि हे यांचे हिंदुत्व.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.
अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:09
सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. मुदलात खोट आहे. गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा बाळ ठाकरेंचे बाळासाहेब होण्याच्या अगोदर पासून विश्व हिंदू परिषदेने लावलेला आहे कोणताही क्लेम साहेबांसारखा बाळासाहेबांच्या नावावर खपवला जातो. बाकी "तुमचं" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेची स्थापना झाली १९६६ मध्ये. बाळासाहेबांनी १९८७ पर्यंत हिंदुत्व मधील हिं पण उच्चारला नव्हता. मराठी मराठी करून फार तर मुंबईत काही नगरसेवक निवडून आणता येतील पण त्यापलीकडे जायचे असेल तर मराठी मुद्दा उपयोगाचा नाही हे लक्षात आल्यावर. १९८० च्या दशकात देशात हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. १९८२ मध्ये मदुराईला धर्मांतरे झाली त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. १९८४ पासून संघ परिवाराने राममंदिर मुद्दा लावून धरायला सुरवात केली. मग शहाबानो आणि अयोध्येत कुलूप उघडणे यातून हळूहळू हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. ती वेळ हेरून मग बाळासाहेबांनी १९८७ मधील पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाचा उच्चार केला - पक्षाची स्थापना झाल्यानंतर २१ वर्षांनंतर. तोपर्यंत मराठी हाच मुद्दा त्यांचा होता. आणि मराठी हा मुद्दा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे काम होते त्यातून अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या. अन्यथा मराठी पाट्या, बेस्टची तिकिटे मराठीत छापा यापलीकडे लोकाधिकार समितीप्रमाणे फार विधायक कामे मराठी माणसांसाठी नव्हती. म्हणजे या सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.' पण शिवसेनेचे दोन्ही मुद्दे मान्य झाले तर. शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी विषय घेवून राजकारण केले हे तरी मान्य झालं. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाला रोजगार दिला यात शिवसेना होती. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू'चाही नारा महाराष्ट्रात दिला. मराठी भाषा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा महाराष्ट्रात कुठे होती एवढे सांगा आता. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:53
भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. काय सांगताय? भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. आणि त्यानंतर सलग पहिल्या पाच लोकसभांमध्ये त्यांना मिळणाऱ्या जागा ३,४,१४,३५ आणि २२ अशा आहेत. आणीबाणीत जनता पक्षात विलीन झाल्यानंतर नव्या अवतारात भाजप आला तेंव्हा १९८४ साली २, नंतर १९८९ साली ८५ आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे तीन आकड्यात खासदार निवडून येत आहेत. शिवसेनेचा पहिला खासदार १९८९ साली निवडून आला आणि केवळ १९९६ साली भाजप बरोबर युती केल्या वर शिवसेनेला ११ खासदार निवडून आणता आले. अन्यथा दोन आकड्यात खासदार नाहीत कि तीन आकड्यात आमदार काही निवडून आणता आले नाहीत. बेडकीने किती वल्गना केल्या तरी तिचा बैल होत नाही. तेंव्हा "तुमचं" चालु द्या

In reply to by सुबोध खरे

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली त्यानंतर त्यानंतर त्यांचं इकडे तिकडे आणि तुकडे वगैरे पडले. नवा 'भारतीय जनता पार्टी' नावाचा पक्ष स्थापन व्हायला १९८० उजाडला. स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना झाली १९६६ ला. कोणता पक्ष मोठा आहे, वयाने एवढेही कळत नसेल तर बोलणे खुंटले. -दिलीप बिरुटे

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.
याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का? १. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती. २. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? ३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे. ४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून. ५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते. आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आणि मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले. १९७० पासून त्याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली. पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं. कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेबांकडे युतीची भिक मागितली. स्व. बाळासाहेबांनी भाजपाला भिक द्यायच्या ऐवजी जेवणाचं ताट आणि पाट दोन्हीही दिले आणि इथेच घाताला सुरुवात झाली. दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे. शिवसेनेने भाजपाला बोट दिलं नसतं तर महाराष्ट्रात भाजपा एव्हाना भिकेला लागला असता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.
कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?
भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.
भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?
पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.
बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.
महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.
तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?
कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.
जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ
दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.
हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला. जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे, आवरा. >>>> आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती. विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे.. >>> टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात. >>>> १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या.... पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे. >>> जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. =)) गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले. -दिलीप बिरुटे

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..
कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.
शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.
या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.
पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.
घंटा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.
ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्‍यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्‍यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.
मराठी वाचता येत नाही वाटतं. >>>>आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. म्हणूनच शाब्दिक पोचारे म्हणालो. =)) बाकी, चालू दया... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 08/07/2025 - 19:10
@ चंद्रसूर्यकुमार कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतंय याच चालीवर आता कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय? असे म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे. बहिऱ्या माणसाला जोरात ओरडून बोलल्यास समजते किंवा ओठाच्या हालचालीने तो समजून घेतो. पण बधिरपणाचा आव आणणाऱ्याला तुम्ही कानाशी बोम्बल्या (लाऊडस्पिकर) लावलात तरी ऐकू येणारच नाही. तेंव्हा सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

बहुतेक वेळा तेच करतो पण माझ्याच प्रतिसादाला उत्तर द्यायला आले तर कधीकधी दखल घ्यावी लागते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्या चार-पाच वर्षांत नक्की कोणते ४-५ आमदार आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आणले होते हे त्यांनी चुकूनमाकून लिहिले तर पुढचे बघू. अर्थात ते त्यांना लिहिता येणार नाहीच कारण मुळात तसे कोणीही आमदार निवडून गेलेच नव्हते. आणि कोणती कोणती काल्पनिक नावे पुढे आणली तर मग निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील नावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्या थापा आहेत हे जगजाहीर करायला मला तो प्रतिसाद लिहायला लागेल तितकाच वेळ लागेल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला ढाण्या वाघ होता वामन महाडिक १९६९-७० पोटनिवडणुकीत एवढ्यात विसरले का ? भाजपचा महाराष्ट्रात जन्मही झाला नव्हता.. आपल्या शाब्दिक पोचा-यांवर भरवसा तसा नाहीच म्हणून लिहिते राहावे लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या पाच सहा वर्षाच्या आत शिवसेने वामन महाडिक आणि प्रमोद नवलकर दोन आमदार दिले. आता चार कुठे दिले त्या शब्दावर आडून राहा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर यूती केली म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. ओसरी दिली नसती तर, भाजप कधीच शिरजोर झाला नसता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर ही नावे मीच वर दिली आहेत. तीच वाचून परत मलाच काय देताय? की स्वतःचे विश्लेषण काहीही न करता ढापाढापी करायची सवय आहे ? तुम्हाला निवडणुकांच्या इतिहासातील घंटा काहीही माहिती नाही तर मग ती झाकली मूठ ठेवावी हो. आपले अज्ञान असे जगजाहीर का करत आहात? आणि परत परत तेच तेच पालुपद -बाठांमुळे भाजप वाढला चालू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्या काळात भाजप वाढला तसाच तो महाराष्ट्रातही वाढतच होता. उलट शिवसेनेशी युती करायची चूक केल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या. बाकी तुम्ही माझे शाब्दिक पोचारे वाचत नाही नाही असे म्हणत बरेच वाचता की. मग खुलेपणाने कबुल करा की. बाळासाहेब दिलदार होते ना? की उध्दवसारखा कुचकटपणा आणि खत्रुडपणा तुम्हाला अधिक भावतो?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते. बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =)) थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले. -दिलीप बिरुटे

काल मुंबई मराठी माणसाचा एकत्रीत असा महामोर्चा निघाला. 'हिंदीसक्ती'च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना एका मिठाईविक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने मराठीजन मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर उतरले. सुरुवातीला मोर्चाची परवानगी नाकारण्यासह पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईमुळे तणाव निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने हजारोंच्या संख्येने मराठीजनांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकूणच मराठी भाषा, मराठी माणूस विरुद्ध अमराठी असे वातातवरण धुसमुसायला लागले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस राजकारणासाठी जरी विषय असला तरी येत्या काळात हे मुद्दे अधिक तीव्र होतील असे वाटते. भाषिक मुद्याची तीव्रता कमी करण्यासाठी हिंदू धर्म खतरेमेचं पिल्लू सोडून मराठी भाषा, मराठी माणूस यात दूही माजवण्याचं षडयंत्र सुरु होईल. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 09/07/2025 - 11:39
मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. कुठे रुग्णवाहिका उपलब्ध करून दे किंवा रिक्षात हरवलेलय गोष्टी मिळवून दे सारख्या ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी सोडल्या तर. त्या मानाने शरद पवार विखे पाटील पतंगराव कदम सारख्या नेत्यांनी साडे तीन का होईना जिल्ह्यांत सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या शिक्षण संस्था सारखे उद्योग सुरु करून स्थानिक मराठी माणसासाठी थोडी फार तरी कामे केली. मोर्चे काढणे, शक्तिप्रदर्शन करणे सोडून काही भरीव कार्य केले तरच शिवसेनेला काही भवितव्य आहे माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो. त्याच्या कडे ४० ते ५० कामगार काम करतात. आजतागायत केवळ मराठी माणसानाच त्याने कामावर ठेवले आहे. दांड्या मारणे, उत्सवासाठी चार दिवस गावी जाऊन परत येतो सांगून १० दिवसांनी उगवणे, लोकांकडून उसने पैसे घेऊन परत न करणे असे केले तरी अजून तरी त्याने भैय्या लोकांना कामावर ठेवलेले नाही. पण भूमिपुत्र म्हणून माज दाखवण्यापलीकडे मराठी कामगारांनी फार काही नाव घेण्यासारखे केलेले नाही. मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 09/07/2025 - 18:26
दुर्दैवाने हे खरं आहे. याच कारणांमुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं असावं असं मला कधीकधी वाटतं. पण नक्की सांगता येत नाही. -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.
आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
खरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. आपल्या मताचा आदर आहेच. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मधील व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रातला सत्ता काळ हा मोठा कालखंड आहे. शिवसेनेने मराठी माणसांठी काय केले हा खरं तर एखादा 'खंड' होईल इतका तो लेखनाचा मोठा विषय आहे. एका शांत, संयमी व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणूस ते शिवसेनेचा जहाल पक्षाकडे प्रवास कसा होत गेला. साठच्या दशकातील महाराष्ट्राचं राजकारण, मराठी माणसाच्या रोजगारासाठीच नव्हे तर, मराठी माणसाठी खासगी कंपन्यात आणि सरकारी नोक-यात आरक्षण मागणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असावा. मराठी माणसाच्या मुद्याकडून हिदूत्वाकडे झालेला प्रवास. शिवसेना स्थापनेच्या अगोदरही मार्मिकमधून 'अमराठी' लोकांची यादी प्रसिद्ध करुन 'वाचा आणि थंड बसा' असे म्हणून मराठी माणसांमधे जनजागृतीच केली नाही तर, वाचा आणि उठा अशी हाक मारली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार कसा होत गेला. आपला पक्ष, राजकारण, पाठींबा देणे, नेते, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कायम वेगळं राहिलं. चित्रपटसृष्टीवरही कसा दबदबा निर्माण केला. देशभर ठाकरेंचं कसं वलय होतं. गावखेड्यात गावोगावी शिवसेनेचे फलक असायचे. गावागावात भगवे उपरणे घालून कार्यकर्ते अभिमानाने शिवसैनिक म्हणून कसे मिरवायचे. बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांचा एक मोठा वर्ग. मोठा विषय. शिवसेनेच्या राजकारणाच्या यश अपयशाची चर्चा होत राहील. पण भरीव काही दिसलं नाही, इतकं सहज बोलून शिवसेना पक्षाची बोळवण होऊ शकत नाही. पुस्तक वगैरे वाचत असाल तर, स्व. बाळ ठाकरेंवर, वैभव पुरंदरेचं एक चांगलं माहितीवजा पुस्तक आहे, कधी मिळालं तर नक्की वाचा. शिवसेनेचा सविस्तर प्रवास वाचायला मिळेल. मराठी माणसासाठी काय काय केलं आणि शिवसेनेचा पक्ष स्थापनेपासून ते त्यांचा राजकारणाचा प्रवास चांगला समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 16/07/2025 - 12:10
भरीव काही दिसलं नाही तुम्हाला भरीव काही दिसलं का? तसं असेल तर मांडा कि इथे. उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचा भात कशाला

In reply to by सुबोध खरे

प्रिय काका. आज मुंबईत जो मराठी माणूस दिसतो त्याचं श्रेय शिवसेनेला दिलं पाहिजे. अमराठी लोकांच्या काळात मराठी माणसाला रोजगार दिला. मुंबैत शिवसेना बेरोजगार तरुणांना खासगी कंपन्यात नोक-या मिळाव्यात यासाठी तरुणांच्या नोंदवह्यात नोंद करुन तरुणांना, प्रशिक्षण, देऊन पात्रताधारक व्हावा म्हणून युवकांचे मेळावे, अभ्यासिका, फिस भरणे हे राजकीय पक्षाने केले त्याचं नाव शिवसेना. मराठी माणसाला अमराठींच्या भाऊगर्दीत जिथे जिथे रोजगाराच्या संधी नाकारली तिथे तिथे मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मराठी माणसावर अन्याय अत्याचार तेव्हाही होत होता, त्यांच्यासाठी संघटन उभारले त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला. महाराष्ट्रातील माणूस एकजूट केला. गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. शिवसेनेची मार्गदेशक पाहिल्यावर मराठी माणसाला तो आपला पक्ष वाटला. महाराष्ट्रीयन उद्योगपतींनी मराठी माणसाला नोकरी द्यावी. वगैरे महाराष्ट्र गृहनिर्माण महामण्डलाची 80 टक्के घरे महाराष्ट्रातील माणसाला आरक्षित ठेवली पाहिजे ही मागणी केली. राज्यातील सरकारी नोक-या मराठी लिहिता वाचता येते त्याला मिळाली पाहिजे अशी मागणी केली पाठपुरावा केला. मराठी माणसाच्या हक्कासाठीच प्रस्थापित राजकारण्यांना शह देत ठाणे-मुंबई महापालिकेत यश मिळवले. सामान्य माणसांना अगदी वडा-पाव विकणा-यांना राजकारणात प्रतिनिधीत्व दिले. तळागाळातील लोकांचा आणि त्यातून आलेल्या सामान्य माणसाचाच पक्ष असतो हे पुढेही राजकारणात पहिल्यांदा शिवसेनेमुळेच घडले. एक ना हजार गोष्टी शिवसेनेच्या आहेत. कधीतरी त्यावर स्वतंत्र लेखन करीन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे शिवसेना असेच एकत आलोय, नी जेव्हा जेव्हा मराठी किंवा मराठी माणसावर संकट आले तेव्हा शिवसेनाच उभी राहिली हे ही दिसलेय. कोवळ्या मुलांवर हिंदी लादण्याचा भाजपचा डाव उधळून लावला तो शिवसेना मनसे मराठी एकीकरण समिती ह्यांनीच! शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभी राहिलेली खोटी शिवसेना ह्यावेळी उघडी पडली. शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक म्हणजे भाजपला महाराष्ट्रात वाढवले, मातोश्रीवर येऊन पाया पडून, ११७ जागा “मागून” मागून मोठे झालेले पक्ष आता शिवसेनेवरच उलटलेत! भविष्यात सेनेने सावध राहावे व भाजपला लवकरात लवकर महाराष्ट्रातून उपटून फेकावे, व मुंबईत मराठी माणूस वा शिवसेना वाचवावी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु 16/07/2025 - 15:29
मला शिवसेनेबद्दल फार राग-आणि लोभ नाही (त्यांच्या वैचारिक उड्या फार लांब पडत नाहीत). पण कुणी एक नांदगावकर नावाच्या शिवसैनिकाच्या क्लिप्स अधूनमधून फेबुवर बघायला मिळतात. त्यांचा जनता दरबार सेनाभवनात भरतो. सामान्य लुबाडले गेलेले गरीब लोक, विशेषतः ज्यांना पोलिसांकदून मदत होत नाही असे, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि हे गृहस्थ वेगवेगळे मार्ग अवलंबून न्याय, मदत मिळवून देतात. वसंत मोरे नावाचे गृहस्थ असेच धडक कारवाई साठी प्रसिद्ध आहेत. माझ्यामते हे खुप मोठे भरीव कार्य आहे...

In reply to by युयुत्सु

ते नितीन नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे पोलिसदेखील समस्या घेऊन येतात. मागे एका पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता, त्या पोलीस हवालदाराने सगळीकडे हेलपाटे मारले पण काहीही झाले नाही शेवटी नितीन नांदगावकरांच्या एका फोनवर काम झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुक्या 31/07/2025 - 05:41
काय पण करतात लोक. त्यावर अजुन उदो उदो. व्यवथा चालयला हवी .. असली रिकाम्टेकडी थेरे फक्त भारतात चालतात. पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता यात काय गोची होती? कोण कुणाची अडवणुक करत होते .. त्यावर रितसर खटला टाकुन व्यवस्थेवर सरळ करायचे सोडुन असल्या राजकारणी लोकांच्या आश्रयाला जाणे वर त्याचा उदो उदो करणे हे लोकशाही चे लक्षण नाही. असली कोणती चेकलिस्ट होती त्यात नांदगावकरांचा फोन आला तरच घराचा ताबा मिळेल असे लिहिले होते? व्यक्ती पुजा अजुन किती करावी ...

In reply to by सुक्या

तो खटला वर्षानुवर्षे चालला असता नी पोलिसाला असता नी बिल्डरने तोंडाला पाने पुसली असती. सिस्टीम जर स्ट्राँग असती तर का म्हणून नांदगावकरांकडे ते पोलीस आले असते? एका फोनवर काम झाले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 11:24
बिरुटे मास्तर आपण लिहिलेल्या बहुसंख्य गोष्टी ऐकीव आहेत त्यातून भरीव असे काहीही निष्पन्न झाले नाही हि वस्तुस्थिती. आमचे सर्व नातेवाईक मुंबईच्या सर्व विभागात विखुरलेले आहेत आणि आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झालेले आहेत आणि आमच्या चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना हक्क मिळवून द्यायच्या जितक्या वल्गना केल्या त्याच्या १० % जरी काम झालं असतं तरी ते मी मान्य केलं असतं. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जागा बळकावून तेथे शिववडापाव झुणका भाकर केंद्रे आपल्या शिवसैनिकांना ( अनधिकृत असली तरी ) मिळवून दिली ती त्यांनी परप्रांतीयांना विकून दौलत केली. याला तुम्ही भूमिपुत्रांसाठी लढा म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं. एक तरी शिक्षणसंस्था ,उद्योग धंदा, रुग्णालय किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे दूरगामी काम केलेले दाखवता येईल का? कम्युनिस्टांची युनियन जाऊन शिवसेनेची युनियन आल्यामुळे कोणत्या कारखान्यात कामगाराला फायदा झाला हे सांगता येईल का? गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. याला काही पुरावा? राष्ट्रीय मिल मजदूर संघ हि काँग्रेस प्रणित संघटना होती तिचा कम्युनिस्टांशी संबंध नाही. त्यांच्या जागी श्री दत्ता सामंत आले आणि गिरणी कामगार संपाची वाताहत झाली. निदान नीट माहिती घेऊन लिहीत चला आमचे वडील त्या काळात ३६ वर्षे एच आर मॅनेजर होते आणि एकंदर शिवसेनेच्या युनियनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे काका. नावडतीचे मीठ अळणी असते त्यामुळे तुम्हाला काहीही पचने तसे अशक्य आहे. शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला त्याचं थोडं वाचन करा. आपल्या प्रतिसादातील विधानं ही परस्पर विरोधी आहेत त्यामुळे आपल्याला समजून घेणे कठीण होत आहे, अर्थात वाढत्या वयात आणि वयपरत्वे असं होतं असतं आम्ही समजून घेतो. आपल्या मुंबईतील आदरणीय चार-पाच पिढ्यांकडूनही आपणास त्या काळातील योग्य माहिती मिळाली नाही असे दिसते. आपण गंभीरपणे माहिती घेतली असती तर, विविध पक्ष, कामगार संघटनेच्या काही गोष्टी, माहिती झाल्या असत्या. पण काही मुलं लहानपणी 'ढ' असतात पुढे त्यांचं कधी कधी एवढं भारी जमून जातं की आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं. बाय द वे, त्यांनी आपणास काही गोष्टी सांगितल्या नसाव्यात त्यामुळे त्याबद्दल काहीही माहिती नाही हे, लक्षात आले आहे. मुंबई हा कम्युनिष्टांचा बालेकिल्ला होता. शिवसेनेला आपली ताकद वाढवायची तर शिवसेनेला आपला संघर्ष कम्युनिष्टांशी करावा लागणार होता. शिवसेनेची आपली स्वतःची कामगार संघटना उभी केली पाहिजे हा बाळ ठाकरेंच्या मनात विचार आला आणि आणि त्यांनी ९ ऑगष्ट १९६८ रोजी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष होते दत्ताजी साळवी तर, सरचिटणीस होते अरुण मेहता. कम्युनिष्टांना विरोध करुन शिवसेनेने मराठी माणसाचा कसा फायदा करुन दिला आणि शिवसेनेला पक्ष म्हणून कसा फायदा झाला हाही मोठा विषय आहे. तर, पहिली गोष्ट विविध कारखान्यांमधे रिक्त जागांची माहिती शिवसेनेकडे यायला लागली. शिवसेनेच्या बेरोजगार तरुणांना माहिती मिळायला लागली. बाळ ठाकरेंनी शिवसेनेत रोजगार विनिमय केंद्र सुरु केलं. हा झाला रोजगाराचा पहिला भाग. दुसरा भाग विविध कंपन्यामधे भारतीय कामगार सेनेने आपली पाळंमुळं रोवण्यासाठी जी काही रणनिती आखली होती त्याबाबत मतभेद होतील पण त्यावेळच्या संघटनांना शह देण्यासाठी त्यांची भूमिका योग्यच अशी होती. बाकी आपलंही चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 18:38
या सगळ्या फापटपसाऱ्यात शिवसेनेने मराठी माणसासाठी ठोस असं काय केलं ते लिहायला विसरलात. आणि कम्युनिस्टांना विरोध केल्यामुळे मराठी माणसाला कसा काय फायदा झाला बुवा? शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला याचा सामान्य माणसाशी काय संबंध एक डांबरट काढून दुसरा आणल्यामुळे काय होतं? बाकी आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे आपली चिडचिड होत आहे हे स्पष्ट आहे. मुळात नीट न वाचता प्रतिसाद लिहिल्यामुळे पितळ उघडं पडलं कि अशी चिडचिड होते असू द्या चालायचंच

सौन्दर्य 09/07/2025 - 23:30
मुंबईत मला वाटते शिवसेनेनी स्थानीय लोकांच्या रोजगारासाठी झुणका-भाकर केंद्रे उघडली होती, परंतु पाचएक वर्षांतच त्यांची मालकी दक्षिण व उत्तर भारतीयांकडे गेली. झुणका - भाकरी लुप्त होऊन त्या ठिकाणी वडा - सांभार, इडली - डोसा, पाणीपुरी वगैरे मिळू लागली होती. आता ह्याचे श्रेय कोणाला द्यायचे किंवा खापर कोणावर फोडायचे हे मिपावरचे जाणकारचं सांगू शकतील .

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला पहिली पासून हिंदी शिकवायचीच आहे असं दिसतंय. अत्ता समितीला पुढे करून निर्णय घेतला जाईल. बचवासाठी ते ठाकरे आणि इंग्रजीचा आधार घेत आहेत. ह्यांची स्वतः ची मुलगी इंग्रजी मिडीयम मध्ये होती.

"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती" कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी 01/07/2025 - 10:52
गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे . इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही. भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती. त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात . सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल).. तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही. पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत .. आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..

सुबोध खरे 01/07/2025 - 19:42
देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. हायला उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार. जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात किंवा जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली. एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती. त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली. फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही. परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला." पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले. New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-document-signatures/ patel ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption kirit https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-accuses-minister-mushrif-of-over-100-cr-corruption/articleshow/86178643.cms?from=mdr पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.

कंजूस 02/07/2025 - 17:17
सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत. बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच. आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.

In reply to by कंजूस

चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही. स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.

विवेकपटाईत 03/07/2025 - 11:58
बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.

जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत. बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.

कपिलमुनी 04/07/2025 - 09:59
मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार. गणित फिट्ट बसणार

कंजूस 05/07/2025 - 01:19
हेच होणार >> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>> शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार? .

एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 05/07/2025 - 22:53
थुंकलेले चाटावे ते राजकीय पक्षांनी.. पवार , चव्हाण , भुजबळ , राणे पवित्र करणे असो.. की पवार ठाकरे घरोबा असो. किंवा सध्याचा ठाकरे बंधुप्रेम असो... सब घोडे बारा टक्के

कंजूस 05/07/2025 - 20:45
हिंदीच्या ओक्टोपसने मराठीला केव्हाच विळखा घातला आहे. मुंबईत दोन अमराठी लोक भेटले तर ते मराठीत कशाला बोलतील? पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि आता जागे झाले.

अगदी १०१% राजकीय हेतूने प्रेरीत निर्णय होता असे वैयक्तिक मत. कदाचित तो निर्णय घेतानाच अंमलात येण्यापूर्वी तो मागे घ्यायचा असाच डाव असेल पण त्यातून ठाकरेंना मात्र अडकवायचे हा हेतू असेल. महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यावर होतील. मुंबई सोडून इतर महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत याने फारसा फरक पडणार नाही. अनेक राज्यांपेक्षा मोठी आर्थिक उलाढाल असलेली मुंबई महापालिकाच सगळ्यात महत्वाची. नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला पूर्ण राज्यात २० च जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील १० मुंबईतील आहेत. मुंबईत तो गट प्रभाव राखून आहे हे नक्की. तसेच महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक उपयोगाला येते. तिथे उबाठा गटाची ताकद आहे हे नक्की. तसेच अनेक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरील स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. उबाठामध्ये अनेक दशकांपासून असलेले असे लोक आहेत. त्यांना मते मिळतात ती स्वतःची असतात- उबाठा पक्षासाठी मिळालेली असतीलच असे नाही. त्यामुळे विधानसभेत जसा स्वीप केला तसा महापालिका निवडणुकीत होईलच असे नक्कीच नाही. उलट महापालिका निवडणुक भाजपला या स्थानिक कारणांमुळे जड गेली तरी आश्चर्य वाटू नये. एकतर उबाठाला (पूर्वी पक्ष एकसंध होता तेव्हापासूनच) मराठी मतदारांची मते सगळी नक्कीच नाही पण मोठ्या प्रमाणावर मिळत आली आहेत. ती एकनिष्ठ मते भाजपकडे जाणार नाहीत. शिंदे त्यातील किती मते आणतात ते बघायचे पण मुंबईत शिंदे गटापेक्षा उबाठाची ताकद जास्त आहे असे वाटते. भाजपशी युती तोडल्यानंतर भाजपविरोधी अमराठी मते उबाठाकडे जाऊ शकली असती. तसेच बदललेल्या परिस्थितीत मुस्लिम मतेही जाऊ शकली असती- अजूनही जातील. अशावेळेस तो हिंदी सक्तीचा निर्णय आला. त्यानंतर मग ठाकरेंना त्याविरोधात भूमिका घेणे भाग झाले. त्यामुळे मग उबाठाकडे जी अमराठी मते अन्यथा गेली असती त्या मतदारांना संभ्रमात टाकले गेले. त्यात अपेक्षेप्रमाणे मीरा-भाईंदरला त्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. त्याविरोधात मोर्चा निघाला आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला. त्या दुकानदाराला बदडून २००३ मध्ये रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या बिहारी लोकांना बदडून केली तशीच चूक केली गेली आहे असे वाटते. त्या घटनेमुळे २००४ मध्ये उत्तर भारतीयांचे काँग्रेसकडे counter polarization झाले होते. तसे यावेळी व्हायला आपण होऊन त्यांनी मदत केली आहे. आणि ते पोलरायझेशन भाजपच्याच बाजूने होणार ही शक्यता जास्त. तसेच राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. समजा राज-उध्दव एकत्र आले तर मग उबाठाच्या मुस्लिम मतदारांमध्येही काही प्रमाणात चलबिचल होईल ही पण अपेक्षा असेल. तसेच कोणीही उसकावले की लगेच ते लोक तलवार उपसून अंगावर येतात. पण आपण असे डोके गरम करून काहीतरी करावे म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा फायदा होईल म्हणून आपला प्रतिस्पर्धीच आपल्याला उसकावत असेल, त्याच्या सापळ्यात आपण बळी पडायचे नाही तर आपले डोकं थंड ठेवायचे इतका विचार दोन्ही सेनावाले कधीच करत नाहीत. त्या केडियाला भाजपनेच 'मराठी बोलणार नाही जा....' असे वक्तव्य करायला सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली- खरं तर अशी तोडफोड त्यांनी करावी म्हणूनच मुद्दामून ते वक्तव्य केडियाने कशावरून दिले नसेल? केडिया बिल्डर आहे. जर ऑफिसमध्ये तोडफोड झाली आणि त्यातून ५-१० लाखाचे नुकसान झाले तरी त्याला ती रक्कम विशेष नाही. पण अशा घटना झाल्या की त्यातून मग अमराठी मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि काँग्रेस-उबाठा एकत्र असतील तर अमराठी मतदारांपुढे भाजप हा एकच पर्याय राहतो आणि अशी तोडफोड करून आपण त्या मतदारांना भाजपकडे ढकलत आहोत याचा विचार ते करणार नाहीत या अपेक्षेने- खरं तर खात्रीनेच केडियाला ते वक्तव्य द्यायला भाजपने सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. बाकी महापालिका निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नगरसेवक आणि बिल्डर यांच्यामधील अभद्र युती कायमच राहणार आहे. शहरात अजून मोठे मोठे टॉवर उभे राहून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्त्रोत बुजवले जाऊन दरवर्षी तेवढ्यात पावसात अधिकाधिक मोठे पूर येणारच आहेत. त्यामुळे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडणार नाहीये. तरीही उबाठासेनेचा माज उतरवायला त्यांचा पराभव व्हावा असे मला नक्कीच वाटते. नवे भाजपचे नगरसेवक आले की मग केडिया त्याचे जे काही तुटपुंजे नुकसान त्या तोडफोडीतून झाले असेल ते अधिक टी.डी.आर किंवा एफ.एस.आय मिळवून शेकडो पटींनी भरून काढेल. बाकी मराठी माणसासाठी सेनेने जे काही केले होते ते स्थानिय लोकाधिकार समितीने- त्याला ५० वर्षे झालीत आता. यांची मर्दुमकी फक्त मराठी बोलत नाही म्हणून फेरीवाले, इस्त्रीवाले वगैरे साध्यासाध्या माणसांना बदडण्यापुरतीच. मुंबईतील मराठी टक्का कमी होत होता, मराठी शाळा बंद पडत होत्या त्याविषयी त्यांनी काही भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. आता ठाकरेंनी परत एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर या सगळ्या गोष्टी पुढे आणून त्यातील किमान काही मराठी मतदारांमध्येही चलबिचल निर्माण करायची संधी आता भाजपकडे आहे. फडणवीसांनी तेवढ्यापुरता हा एक निर्णय घेऊन उबाठांना सापळ्यात अडकवले असे दिसते. आणि त्यात नेहमीप्रमाणे मारहाण, तोडफोड करून ते त्या सापळ्यात चालत गेले असे वाटते. एकूणच जी मराठी मते उबाठाकडे अन्यथाही गेली असती ती तिथेच राहणार आहेत. पण अमराठी मते जी उबाठाकडे गेली असती त्यांना मात्र भाजपकडे जायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी कोणत्याही निवडणुकीत मते किती फिरतात यावरच निकाल बदलत असतो. या सगळ्या प्रकारात उबाठाकडे नव्याने किती मते येतील आणि विरोधात किती जातील हा हिशेब केल्यावर उबाठासाठी तो हिशेब ऋण असेल असे वैयक्तिक मत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही म्हणता तस खरंच झालं असेल तर एक प्रश्न पडतो की एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती? बरं समजा राज उद्धव यांनी हा मुद्दा उचलूनच धरला नसता तर पहिली पासून तीन तीन भाषा शिकवणार होते का? म्हणजे आपल्या राजकीय सोयीसाठी ६ वर्षाच्या मुलांचा वापर.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?
याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्‍यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही. राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंजूस 06/07/2025 - 22:36
दुकानदारांना कानफाटवल्याचा जो प्रकार मनसेने चालवलाय त्याला कांग्रेसचा विरोधच असेल. पण आता सेना विकास आघाडीत आहे आणि त्यांनी राजला हात धरून आणल्यावर कासावीस झाले असतील. त्यामुळे मविआ फुटणार हे निश्चित.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निवडणूक निर्णयाकडे लक्ष ठेवून सगळ्या हालचाली. सापळे सगळेच लावतात. कोण आडकतय ते बघावे लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी 06/07/2025 - 22:47
सुरुवातीला हा विचार मांडला तेव्हा लोकांना पटला नव्हता. आता हळूहळू त्याचे राजकीय परिणाम समोर येत आहेत. यात काँग्रेसची फरफट झाली. परवा सुळेंना पाठवून पवारांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा नेहमीचा प्रकार केला आहे. जिथे जास्त शिते तिथे ते जातील

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप कार्यकर्ते, प्रत्येक गोष्टीत जी काही चूक घडेल किंवा घडले की त्याचं भविष्याच्या दृष्टीने कसा फायदा असतो, त्याला 'गोबरयुगात' केंद्रात 'माष्टर ष्ट्रोक' असे म्हणतात. तर इकडे महाराष्ट्रात फडणविसांचे डावपेच किंवा हे सगळं त्यांचं 'स्क्रीप्टे'ड प्रयोग आहेत, इतकं म्हटलं की, शाब्दिक पोचा-यांची गरज पडत नाही. खरी मेख अशी आहे की, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर भविष्यात आपल्या सत्तेला किती हादरे बसू शकतील या कल्पनेनेच सध्या भाजप गटात अस्वस्था आहे. फडणविसांनी मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हणने यात सगळं आलं. मुंबई महानगरपालिका ही रंगीत तालीम असेल. दोघांची युती झाली तर, मुंबई महानगरपालीकेत भाजपचा प्रवास अजूण कठीण होईल हे कोणीही सांगेल त्याला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. आता राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करतील का ? तर मला स्वतःला अशी काही युती महानगर पालिकेत जरी युती झाली तरी भविष्यात अशी युती अशी होईल असे वाटत नाही, दोघांची इच्छा असली तरी. सद्य भाजप सरकार आपल्या साम,दाम, दंड भेद या नितीचा वापर करुन या दोघा भावांना एकत्र येऊ देणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मनसे- जागा वाटप त्या त्या तालुक्यातील काम करणारे नेते कार्यकर्ते यांच्यातील दोन्ही पक्षातील मतभेद पुढे चव्हाट्यावर येतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात प्रभाव सोडला तर इतर जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. राज ठाकरे यांचे भाषण, विचार अगदी मार्मिक असतात. सभांना गर्दी होते पण निवडून येण्याइतकी त्यांची ताकद लागत नाही, त्याचं कारण इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न करणे, युती करणे, कार्यकर्त्यांची फौज बूथवर उभे करणे, निवडणूकांपूर्वी वातावरण करणे आणि इतर गोष्टीत सुरुवात जोरदार करुनही ते कायम मागे पडतात. मनसेला नाश्कातून महाराष्ट्रात इमेज बिल्ट करण्याची संधी होती पण ते झालं नाही. भाजप विरोधात राज ठाकरे यांनी पूर्वीच्या लोकसभेत भाजप विरोधात प्रचारात मुसंडी घेतली होती. 'लाव रे तो व्हीडीयो' म्हणून त्यांच्या सभा गाजल्या होत्या. पण पुढे ते भाजपच्या गळाला लागले आणि त्यांचा भाजप विरोध कमी होत होत त्यांच्या दावनीला ते गेले. भरवशाचं राजकारण करायचं तर, एकदा आपण स्थिरास्थावर होईपर्यंत थेट भूमिका व्यवस्थेविरुद्ध घेतली पाहिजे, नेमके यांचं राजकारण अशावेळी कच खातं आणि त्यांच्या वाट्याला अपयश येतं. मनसे, भाजपाच्या अमिषाला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी नाही. सारांश, युती अवघड वाटते. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 06/07/2025 - 22:49
कोणी कितीही काही म्हणले तरी याचा डायरेक्ट फटका शिंदेंना बसणार आहे आणि फायदा भाजपला.. देवाभाऊचे पत्ते फिट बसत आहेत..

एक गोष्ट कळत नाही. इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही. तरीही तोंडदेखल्या ते दोन मुद्दे त्यांचे होते. मग त्यांना एका कृतीतून दोन्ही मुद्दे रेटता येतील अशी नामी संधी होती. पूर्ण भारतात काही लाख/कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यापैकी काही हजार/लाख मुंबईत राहतात हे मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे. २०११ मध्ये माझे ऑफिस महालक्ष्मी स्टेशनजवळ फेमस स्टुडिओच्या शेजारी होते. तिथे जायला मी रे रोड या हार्बर लाईनच्या स्थानकात उतरून १६४ नंबरची बस पकडून जायचो. रे रोड स्टेशनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ती बांगलादेशींनी भरलेली आहे हे उघड गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न केलेले अंगाला वास मारणारे ते घाणेरडे बांगलादेशी बसमध्ये आजूबाजूला वावरायचे त्याची किळस यायची. पण करता काही यायचे नाही. कारण माझ्यासारखे लोक मारामारी करू शकत नाहीत. पण उबाठावाल्यांचा मारामारी करण्यात पहिल्यापासूनच हातखंडा होता. मग मुंबईत जिथेजिथे बांगलादेशी आहेत तिथेतिथे जाऊन त्यांना बदड बदड बदडून मुंबई आणि देश सोडून जायला त्यांना भाग पाडायची नामी संधी त्यांच्याकडे होती. त्या बांगलादेशींना कायदेशीरपणे हाकलता येणे फारच कठीण आहे कारण त्यांनी पैसे चारून सगळी डॉक्युमेन्ट्स बनवून घेतली आहेत. त्यांना हाकलायचा एकच उपाय म्हणजे हा- उठता लाथ बसता बुक्की असे करत बदड बदड बदडायचे आणि इथे राहायलाच नको असे वाटणे भाग पाडायचे. तसेही ते लोक मराठीभाषिक नाहीत, भारतीय नाहीत आणि हिंदूही नाहीत. मग असे बांगलादेशींना बदडून उबाठासेनेचे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे साध्य झाले नसते का? तसे झाले असते तर मग मी अगदी आजन्म उबाठासेना समर्थक झालो असतो. भाजपवाल्यांना मारामारी जमत नाही त्यामुळे ते काही बांगलादेशींना हाकलणार नाहीत पण उबाठावाल्यांनी हाकलले असते तर पूर्ण देशावर आणि मुंबईवर कधी न फेडता येतील असे उपकार त्यांनी करून ठेवले असते. पण कुठचे काय- त्यांची मर्दुमकी फक्त युपीतून आलेले फेरीवाले, इस्त्रीवाले, दुकानदार वगैरे हातावर पोट असलेल्या साध्यासाध्या लोकांविरूध्दच. आणि त्यातील बरेचसे हिंदूच असावेत असे म्हणायला जागा आहे. आणि हे यांचे हिंदुत्व.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.
अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:09
सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. मुदलात खोट आहे. गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा बाळ ठाकरेंचे बाळासाहेब होण्याच्या अगोदर पासून विश्व हिंदू परिषदेने लावलेला आहे कोणताही क्लेम साहेबांसारखा बाळासाहेबांच्या नावावर खपवला जातो. बाकी "तुमचं" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेची स्थापना झाली १९६६ मध्ये. बाळासाहेबांनी १९८७ पर्यंत हिंदुत्व मधील हिं पण उच्चारला नव्हता. मराठी मराठी करून फार तर मुंबईत काही नगरसेवक निवडून आणता येतील पण त्यापलीकडे जायचे असेल तर मराठी मुद्दा उपयोगाचा नाही हे लक्षात आल्यावर. १९८० च्या दशकात देशात हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. १९८२ मध्ये मदुराईला धर्मांतरे झाली त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. १९८४ पासून संघ परिवाराने राममंदिर मुद्दा लावून धरायला सुरवात केली. मग शहाबानो आणि अयोध्येत कुलूप उघडणे यातून हळूहळू हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. ती वेळ हेरून मग बाळासाहेबांनी १९८७ मधील पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाचा उच्चार केला - पक्षाची स्थापना झाल्यानंतर २१ वर्षांनंतर. तोपर्यंत मराठी हाच मुद्दा त्यांचा होता. आणि मराठी हा मुद्दा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे काम होते त्यातून अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या. अन्यथा मराठी पाट्या, बेस्टची तिकिटे मराठीत छापा यापलीकडे लोकाधिकार समितीप्रमाणे फार विधायक कामे मराठी माणसांसाठी नव्हती. म्हणजे या सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.' पण शिवसेनेचे दोन्ही मुद्दे मान्य झाले तर. शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी विषय घेवून राजकारण केले हे तरी मान्य झालं. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाला रोजगार दिला यात शिवसेना होती. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू'चाही नारा महाराष्ट्रात दिला. मराठी भाषा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा महाराष्ट्रात कुठे होती एवढे सांगा आता. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:53
भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. काय सांगताय? भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. आणि त्यानंतर सलग पहिल्या पाच लोकसभांमध्ये त्यांना मिळणाऱ्या जागा ३,४,१४,३५ आणि २२ अशा आहेत. आणीबाणीत जनता पक्षात विलीन झाल्यानंतर नव्या अवतारात भाजप आला तेंव्हा १९८४ साली २, नंतर १९८९ साली ८५ आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे तीन आकड्यात खासदार निवडून येत आहेत. शिवसेनेचा पहिला खासदार १९८९ साली निवडून आला आणि केवळ १९९६ साली भाजप बरोबर युती केल्या वर शिवसेनेला ११ खासदार निवडून आणता आले. अन्यथा दोन आकड्यात खासदार नाहीत कि तीन आकड्यात आमदार काही निवडून आणता आले नाहीत. बेडकीने किती वल्गना केल्या तरी तिचा बैल होत नाही. तेंव्हा "तुमचं" चालु द्या

In reply to by सुबोध खरे

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली त्यानंतर त्यानंतर त्यांचं इकडे तिकडे आणि तुकडे वगैरे पडले. नवा 'भारतीय जनता पार्टी' नावाचा पक्ष स्थापन व्हायला १९८० उजाडला. स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना झाली १९६६ ला. कोणता पक्ष मोठा आहे, वयाने एवढेही कळत नसेल तर बोलणे खुंटले. -दिलीप बिरुटे

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.
याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का? १. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती. २. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? ३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे. ४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून. ५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते. आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आणि मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले. १९७० पासून त्याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली. पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं. कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेबांकडे युतीची भिक मागितली. स्व. बाळासाहेबांनी भाजपाला भिक द्यायच्या ऐवजी जेवणाचं ताट आणि पाट दोन्हीही दिले आणि इथेच घाताला सुरुवात झाली. दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे. शिवसेनेने भाजपाला बोट दिलं नसतं तर महाराष्ट्रात भाजपा एव्हाना भिकेला लागला असता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.
कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?
भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.
भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?
पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.
बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.
महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.
तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?
कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.
जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ
दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.
हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला. जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे, आवरा. >>>> आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती. विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे.. >>> टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात. >>>> १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या.... पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे. >>> जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. =)) गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले. -दिलीप बिरुटे

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..
कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.
शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.
या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.
पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.
घंटा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.
ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्‍यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्‍यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.
मराठी वाचता येत नाही वाटतं. >>>>आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. म्हणूनच शाब्दिक पोचारे म्हणालो. =)) बाकी, चालू दया... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 08/07/2025 - 19:10
@ चंद्रसूर्यकुमार कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतंय याच चालीवर आता कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय? असे म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे. बहिऱ्या माणसाला जोरात ओरडून बोलल्यास समजते किंवा ओठाच्या हालचालीने तो समजून घेतो. पण बधिरपणाचा आव आणणाऱ्याला तुम्ही कानाशी बोम्बल्या (लाऊडस्पिकर) लावलात तरी ऐकू येणारच नाही. तेंव्हा सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

बहुतेक वेळा तेच करतो पण माझ्याच प्रतिसादाला उत्तर द्यायला आले तर कधीकधी दखल घ्यावी लागते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्या चार-पाच वर्षांत नक्की कोणते ४-५ आमदार आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आणले होते हे त्यांनी चुकूनमाकून लिहिले तर पुढचे बघू. अर्थात ते त्यांना लिहिता येणार नाहीच कारण मुळात तसे कोणीही आमदार निवडून गेलेच नव्हते. आणि कोणती कोणती काल्पनिक नावे पुढे आणली तर मग निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील नावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्या थापा आहेत हे जगजाहीर करायला मला तो प्रतिसाद लिहायला लागेल तितकाच वेळ लागेल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला ढाण्या वाघ होता वामन महाडिक १९६९-७० पोटनिवडणुकीत एवढ्यात विसरले का ? भाजपचा महाराष्ट्रात जन्मही झाला नव्हता.. आपल्या शाब्दिक पोचा-यांवर भरवसा तसा नाहीच म्हणून लिहिते राहावे लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या पाच सहा वर्षाच्या आत शिवसेने वामन महाडिक आणि प्रमोद नवलकर दोन आमदार दिले. आता चार कुठे दिले त्या शब्दावर आडून राहा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर यूती केली म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. ओसरी दिली नसती तर, भाजप कधीच शिरजोर झाला नसता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर ही नावे मीच वर दिली आहेत. तीच वाचून परत मलाच काय देताय? की स्वतःचे विश्लेषण काहीही न करता ढापाढापी करायची सवय आहे ? तुम्हाला निवडणुकांच्या इतिहासातील घंटा काहीही माहिती नाही तर मग ती झाकली मूठ ठेवावी हो. आपले अज्ञान असे जगजाहीर का करत आहात? आणि परत परत तेच तेच पालुपद -बाठांमुळे भाजप वाढला चालू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्या काळात भाजप वाढला तसाच तो महाराष्ट्रातही वाढतच होता. उलट शिवसेनेशी युती करायची चूक केल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या. बाकी तुम्ही माझे शाब्दिक पोचारे वाचत नाही नाही असे म्हणत बरेच वाचता की. मग खुलेपणाने कबुल करा की. बाळासाहेब दिलदार होते ना? की उध्दवसारखा कुचकटपणा आणि खत्रुडपणा तुम्हाला अधिक भावतो?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते. बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =)) थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले. -दिलीप बिरुटे

काल मुंबई मराठी माणसाचा एकत्रीत असा महामोर्चा निघाला. 'हिंदीसक्ती'च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना एका मिठाईविक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने मराठीजन मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर उतरले. सुरुवातीला मोर्चाची परवानगी नाकारण्यासह पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईमुळे तणाव निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने हजारोंच्या संख्येने मराठीजनांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकूणच मराठी भाषा, मराठी माणूस विरुद्ध अमराठी असे वातातवरण धुसमुसायला लागले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस राजकारणासाठी जरी विषय असला तरी येत्या काळात हे मुद्दे अधिक तीव्र होतील असे वाटते. भाषिक मुद्याची तीव्रता कमी करण्यासाठी हिंदू धर्म खतरेमेचं पिल्लू सोडून मराठी भाषा, मराठी माणूस यात दूही माजवण्याचं षडयंत्र सुरु होईल. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 09/07/2025 - 11:39
मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. कुठे रुग्णवाहिका उपलब्ध करून दे किंवा रिक्षात हरवलेलय गोष्टी मिळवून दे सारख्या ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी सोडल्या तर. त्या मानाने शरद पवार विखे पाटील पतंगराव कदम सारख्या नेत्यांनी साडे तीन का होईना जिल्ह्यांत सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या शिक्षण संस्था सारखे उद्योग सुरु करून स्थानिक मराठी माणसासाठी थोडी फार तरी कामे केली. मोर्चे काढणे, शक्तिप्रदर्शन करणे सोडून काही भरीव कार्य केले तरच शिवसेनेला काही भवितव्य आहे माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो. त्याच्या कडे ४० ते ५० कामगार काम करतात. आजतागायत केवळ मराठी माणसानाच त्याने कामावर ठेवले आहे. दांड्या मारणे, उत्सवासाठी चार दिवस गावी जाऊन परत येतो सांगून १० दिवसांनी उगवणे, लोकांकडून उसने पैसे घेऊन परत न करणे असे केले तरी अजून तरी त्याने भैय्या लोकांना कामावर ठेवलेले नाही. पण भूमिपुत्र म्हणून माज दाखवण्यापलीकडे मराठी कामगारांनी फार काही नाव घेण्यासारखे केलेले नाही. मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 09/07/2025 - 18:26
दुर्दैवाने हे खरं आहे. याच कारणांमुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं असावं असं मला कधीकधी वाटतं. पण नक्की सांगता येत नाही. -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.
आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
खरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. आपल्या मताचा आदर आहेच. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मधील व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रातला सत्ता काळ हा मोठा कालखंड आहे. शिवसेनेने मराठी माणसांठी काय केले हा खरं तर एखादा 'खंड' होईल इतका तो लेखनाचा मोठा विषय आहे. एका शांत, संयमी व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणूस ते शिवसेनेचा जहाल पक्षाकडे प्रवास कसा होत गेला. साठच्या दशकातील महाराष्ट्राचं राजकारण, मराठी माणसाच्या रोजगारासाठीच नव्हे तर, मराठी माणसाठी खासगी कंपन्यात आणि सरकारी नोक-यात आरक्षण मागणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असावा. मराठी माणसाच्या मुद्याकडून हिदूत्वाकडे झालेला प्रवास. शिवसेना स्थापनेच्या अगोदरही मार्मिकमधून 'अमराठी' लोकांची यादी प्रसिद्ध करुन 'वाचा आणि थंड बसा' असे म्हणून मराठी माणसांमधे जनजागृतीच केली नाही तर, वाचा आणि उठा अशी हाक मारली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार कसा होत गेला. आपला पक्ष, राजकारण, पाठींबा देणे, नेते, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कायम वेगळं राहिलं. चित्रपटसृष्टीवरही कसा दबदबा निर्माण केला. देशभर ठाकरेंचं कसं वलय होतं. गावखेड्यात गावोगावी शिवसेनेचे फलक असायचे. गावागावात भगवे उपरणे घालून कार्यकर्ते अभिमानाने शिवसैनिक म्हणून कसे मिरवायचे. बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांचा एक मोठा वर्ग. मोठा विषय. शिवसेनेच्या राजकारणाच्या यश अपयशाची चर्चा होत राहील. पण भरीव काही दिसलं नाही, इतकं सहज बोलून शिवसेना पक्षाची बोळवण होऊ शकत नाही. पुस्तक वगैरे वाचत असाल तर, स्व. बाळ ठाकरेंवर, वैभव पुरंदरेचं एक चांगलं माहितीवजा पुस्तक आहे, कधी मिळालं तर नक्की वाचा. शिवसेनेचा सविस्तर प्रवास वाचायला मिळेल. मराठी माणसासाठी काय काय केलं आणि शिवसेनेचा पक्ष स्थापनेपासून ते त्यांचा राजकारणाचा प्रवास चांगला समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 16/07/2025 - 12:10
भरीव काही दिसलं नाही तुम्हाला भरीव काही दिसलं का? तसं असेल तर मांडा कि इथे. उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचा भात कशाला

In reply to by सुबोध खरे

प्रिय काका. आज मुंबईत जो मराठी माणूस दिसतो त्याचं श्रेय शिवसेनेला दिलं पाहिजे. अमराठी लोकांच्या काळात मराठी माणसाला रोजगार दिला. मुंबैत शिवसेना बेरोजगार तरुणांना खासगी कंपन्यात नोक-या मिळाव्यात यासाठी तरुणांच्या नोंदवह्यात नोंद करुन तरुणांना, प्रशिक्षण, देऊन पात्रताधारक व्हावा म्हणून युवकांचे मेळावे, अभ्यासिका, फिस भरणे हे राजकीय पक्षाने केले त्याचं नाव शिवसेना. मराठी माणसाला अमराठींच्या भाऊगर्दीत जिथे जिथे रोजगाराच्या संधी नाकारली तिथे तिथे मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मराठी माणसावर अन्याय अत्याचार तेव्हाही होत होता, त्यांच्यासाठी संघटन उभारले त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला. महाराष्ट्रातील माणूस एकजूट केला. गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. शिवसेनेची मार्गदेशक पाहिल्यावर मराठी माणसाला तो आपला पक्ष वाटला. महाराष्ट्रीयन उद्योगपतींनी मराठी माणसाला नोकरी द्यावी. वगैरे महाराष्ट्र गृहनिर्माण महामण्डलाची 80 टक्के घरे महाराष्ट्रातील माणसाला आरक्षित ठेवली पाहिजे ही मागणी केली. राज्यातील सरकारी नोक-या मराठी लिहिता वाचता येते त्याला मिळाली पाहिजे अशी मागणी केली पाठपुरावा केला. मराठी माणसाच्या हक्कासाठीच प्रस्थापित राजकारण्यांना शह देत ठाणे-मुंबई महापालिकेत यश मिळवले. सामान्य माणसांना अगदी वडा-पाव विकणा-यांना राजकारणात प्रतिनिधीत्व दिले. तळागाळातील लोकांचा आणि त्यातून आलेल्या सामान्य माणसाचाच पक्ष असतो हे पुढेही राजकारणात पहिल्यांदा शिवसेनेमुळेच घडले. एक ना हजार गोष्टी शिवसेनेच्या आहेत. कधीतरी त्यावर स्वतंत्र लेखन करीन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे शिवसेना असेच एकत आलोय, नी जेव्हा जेव्हा मराठी किंवा मराठी माणसावर संकट आले तेव्हा शिवसेनाच उभी राहिली हे ही दिसलेय. कोवळ्या मुलांवर हिंदी लादण्याचा भाजपचा डाव उधळून लावला तो शिवसेना मनसे मराठी एकीकरण समिती ह्यांनीच! शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभी राहिलेली खोटी शिवसेना ह्यावेळी उघडी पडली. शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक म्हणजे भाजपला महाराष्ट्रात वाढवले, मातोश्रीवर येऊन पाया पडून, ११७ जागा “मागून” मागून मोठे झालेले पक्ष आता शिवसेनेवरच उलटलेत! भविष्यात सेनेने सावध राहावे व भाजपला लवकरात लवकर महाराष्ट्रातून उपटून फेकावे, व मुंबईत मराठी माणूस वा शिवसेना वाचवावी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु 16/07/2025 - 15:29
मला शिवसेनेबद्दल फार राग-आणि लोभ नाही (त्यांच्या वैचारिक उड्या फार लांब पडत नाहीत). पण कुणी एक नांदगावकर नावाच्या शिवसैनिकाच्या क्लिप्स अधूनमधून फेबुवर बघायला मिळतात. त्यांचा जनता दरबार सेनाभवनात भरतो. सामान्य लुबाडले गेलेले गरीब लोक, विशेषतः ज्यांना पोलिसांकदून मदत होत नाही असे, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि हे गृहस्थ वेगवेगळे मार्ग अवलंबून न्याय, मदत मिळवून देतात. वसंत मोरे नावाचे गृहस्थ असेच धडक कारवाई साठी प्रसिद्ध आहेत. माझ्यामते हे खुप मोठे भरीव कार्य आहे...

In reply to by युयुत्सु

ते नितीन नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे पोलिसदेखील समस्या घेऊन येतात. मागे एका पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता, त्या पोलीस हवालदाराने सगळीकडे हेलपाटे मारले पण काहीही झाले नाही शेवटी नितीन नांदगावकरांच्या एका फोनवर काम झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुक्या 31/07/2025 - 05:41
काय पण करतात लोक. त्यावर अजुन उदो उदो. व्यवथा चालयला हवी .. असली रिकाम्टेकडी थेरे फक्त भारतात चालतात. पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता यात काय गोची होती? कोण कुणाची अडवणुक करत होते .. त्यावर रितसर खटला टाकुन व्यवस्थेवर सरळ करायचे सोडुन असल्या राजकारणी लोकांच्या आश्रयाला जाणे वर त्याचा उदो उदो करणे हे लोकशाही चे लक्षण नाही. असली कोणती चेकलिस्ट होती त्यात नांदगावकरांचा फोन आला तरच घराचा ताबा मिळेल असे लिहिले होते? व्यक्ती पुजा अजुन किती करावी ...

In reply to by सुक्या

तो खटला वर्षानुवर्षे चालला असता नी पोलिसाला असता नी बिल्डरने तोंडाला पाने पुसली असती. सिस्टीम जर स्ट्राँग असती तर का म्हणून नांदगावकरांकडे ते पोलीस आले असते? एका फोनवर काम झाले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 11:24
बिरुटे मास्तर आपण लिहिलेल्या बहुसंख्य गोष्टी ऐकीव आहेत त्यातून भरीव असे काहीही निष्पन्न झाले नाही हि वस्तुस्थिती. आमचे सर्व नातेवाईक मुंबईच्या सर्व विभागात विखुरलेले आहेत आणि आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झालेले आहेत आणि आमच्या चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना हक्क मिळवून द्यायच्या जितक्या वल्गना केल्या त्याच्या १० % जरी काम झालं असतं तरी ते मी मान्य केलं असतं. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जागा बळकावून तेथे शिववडापाव झुणका भाकर केंद्रे आपल्या शिवसैनिकांना ( अनधिकृत असली तरी ) मिळवून दिली ती त्यांनी परप्रांतीयांना विकून दौलत केली. याला तुम्ही भूमिपुत्रांसाठी लढा म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं. एक तरी शिक्षणसंस्था ,उद्योग धंदा, रुग्णालय किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे दूरगामी काम केलेले दाखवता येईल का? कम्युनिस्टांची युनियन जाऊन शिवसेनेची युनियन आल्यामुळे कोणत्या कारखान्यात कामगाराला फायदा झाला हे सांगता येईल का? गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. याला काही पुरावा? राष्ट्रीय मिल मजदूर संघ हि काँग्रेस प्रणित संघटना होती तिचा कम्युनिस्टांशी संबंध नाही. त्यांच्या जागी श्री दत्ता सामंत आले आणि गिरणी कामगार संपाची वाताहत झाली. निदान नीट माहिती घेऊन लिहीत चला आमचे वडील त्या काळात ३६ वर्षे एच आर मॅनेजर होते आणि एकंदर शिवसेनेच्या युनियनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे काका. नावडतीचे मीठ अळणी असते त्यामुळे तुम्हाला काहीही पचने तसे अशक्य आहे. शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला त्याचं थोडं वाचन करा. आपल्या प्रतिसादातील विधानं ही परस्पर विरोधी आहेत त्यामुळे आपल्याला समजून घेणे कठीण होत आहे, अर्थात वाढत्या वयात आणि वयपरत्वे असं होतं असतं आम्ही समजून घेतो. आपल्या मुंबईतील आदरणीय चार-पाच पिढ्यांकडूनही आपणास त्या काळातील योग्य माहिती मिळाली नाही असे दिसते. आपण गंभीरपणे माहिती घेतली असती तर, विविध पक्ष, कामगार संघटनेच्या काही गोष्टी, माहिती झाल्या असत्या. पण काही मुलं लहानपणी 'ढ' असतात पुढे त्यांचं कधी कधी एवढं भारी जमून जातं की आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं. बाय द वे, त्यांनी आपणास काही गोष्टी सांगितल्या नसाव्यात त्यामुळे त्याबद्दल काहीही माहिती नाही हे, लक्षात आले आहे. मुंबई हा कम्युनिष्टांचा बालेकिल्ला होता. शिवसेनेला आपली ताकद वाढवायची तर शिवसेनेला आपला संघर्ष कम्युनिष्टांशी करावा लागणार होता. शिवसेनेची आपली स्वतःची कामगार संघटना उभी केली पाहिजे हा बाळ ठाकरेंच्या मनात विचार आला आणि आणि त्यांनी ९ ऑगष्ट १९६८ रोजी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष होते दत्ताजी साळवी तर, सरचिटणीस होते अरुण मेहता. कम्युनिष्टांना विरोध करुन शिवसेनेने मराठी माणसाचा कसा फायदा करुन दिला आणि शिवसेनेला पक्ष म्हणून कसा फायदा झाला हाही मोठा विषय आहे. तर, पहिली गोष्ट विविध कारखान्यांमधे रिक्त जागांची माहिती शिवसेनेकडे यायला लागली. शिवसेनेच्या बेरोजगार तरुणांना माहिती मिळायला लागली. बाळ ठाकरेंनी शिवसेनेत रोजगार विनिमय केंद्र सुरु केलं. हा झाला रोजगाराचा पहिला भाग. दुसरा भाग विविध कंपन्यामधे भारतीय कामगार सेनेने आपली पाळंमुळं रोवण्यासाठी जी काही रणनिती आखली होती त्याबाबत मतभेद होतील पण त्यावेळच्या संघटनांना शह देण्यासाठी त्यांची भूमिका योग्यच अशी होती. बाकी आपलंही चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 18:38
या सगळ्या फापटपसाऱ्यात शिवसेनेने मराठी माणसासाठी ठोस असं काय केलं ते लिहायला विसरलात. आणि कम्युनिस्टांना विरोध केल्यामुळे मराठी माणसाला कसा काय फायदा झाला बुवा? शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला याचा सामान्य माणसाशी काय संबंध एक डांबरट काढून दुसरा आणल्यामुळे काय होतं? बाकी आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे आपली चिडचिड होत आहे हे स्पष्ट आहे. मुळात नीट न वाचता प्रतिसाद लिहिल्यामुळे पितळ उघडं पडलं कि अशी चिडचिड होते असू द्या चालायचंच

सौन्दर्य 09/07/2025 - 23:30
मुंबईत मला वाटते शिवसेनेनी स्थानीय लोकांच्या रोजगारासाठी झुणका-भाकर केंद्रे उघडली होती, परंतु पाचएक वर्षांतच त्यांची मालकी दक्षिण व उत्तर भारतीयांकडे गेली. झुणका - भाकरी लुप्त होऊन त्या ठिकाणी वडा - सांभार, इडली - डोसा, पाणीपुरी वगैरे मिळू लागली होती. आता ह्याचे श्रेय कोणाला द्यायचे किंवा खापर कोणावर फोडायचे हे मिपावरचे जाणकारचं सांगू शकतील .

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला पहिली पासून हिंदी शिकवायचीच आहे असं दिसतंय. अत्ता समितीला पुढे करून निर्णय घेतला जाईल. बचवासाठी ते ठाकरे आणि इंग्रजीचा आधार घेत आहेत. ह्यांची स्वतः ची मुलगी इंग्रजी मिडीयम मध्ये होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली.

सुरीला दारूडा,..

Bhakti ·

Bhakti 02/07/2025 - 11:09
दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला... एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!
तळीराम - बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं! तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

गवि 02/07/2025 - 11:46
तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:15
होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.

Bhakti 02/07/2025 - 11:09
दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला... एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!
तळीराम - बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं! तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

गवि 02/07/2025 - 11:46
तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:15
होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.
लेखनविषय:
संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी "चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.." असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा. घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाह‌ता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा . बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत. "बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..." हे तो इतकं अप्रतिम गायचा. वरच्या आवाजात बाई ठिपक्यांची गात हळू हळू आवाज करत, बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची..

मराठी गाणे ai चा वापर करून

स्वरुपसुमित ·

युयुत्सु 01/07/2025 - 12:49
आधुनिक भारतीय संगीताचं आता संगणकाशी अविभाज्य नाते निर्माण झाले आहे. आता ए० आय० मुळे नव्या संगीतरचना तयार करता येतात. पण कंप्युटरचा संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी, नव्या चाली बांधण्यासाठी वापर करण्याची कल्पना मी सुमारे ३२ वर्षापूर्वी (बहुदा प्रथमच)मांडली. अर्थातच त्याला प्रचंड विरोध झाला आणि मला माझा प्रकल्प बंद करायला भाग पाडले गेले. भारतात दूसरे काही झाले तरच नवल! आजच्या एल०एल०एम मध्ये जसे पुढे काय येणार याची शक्यता संदर्भानुसार निश्चित करून उत्तर तयार होते, तसाच काहीसा प्रकार संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी मी तेव्हा वापरला होता.

युयुत्सु 01/07/2025 - 12:49
आधुनिक भारतीय संगीताचं आता संगणकाशी अविभाज्य नाते निर्माण झाले आहे. आता ए० आय० मुळे नव्या संगीतरचना तयार करता येतात. पण कंप्युटरचा संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी, नव्या चाली बांधण्यासाठी वापर करण्याची कल्पना मी सुमारे ३२ वर्षापूर्वी (बहुदा प्रथमच)मांडली. अर्थातच त्याला प्रचंड विरोध झाला आणि मला माझा प्रकल्प बंद करायला भाग पाडले गेले. भारतात दूसरे काही झाले तरच नवल! आजच्या एल०एल०एम मध्ये जसे पुढे काय येणार याची शक्यता संदर्भानुसार निश्चित करून उत्तर तयार होते, तसाच काहीसा प्रकार संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी मी तेव्हा वापरला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे ai चा वापस करून मराठी गाणे १) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे २) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा ३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन

राडा

तुमचा अभिषेक ·

In reply to by गवि

धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि 30/06/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा 01/07/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)

In reply to by गवि

धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि 30/06/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा 01/07/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
राडा ______ स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते. आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती.

चारचाकीत घुसलेला उंदीर.

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस 29/06/2025 - 23:00
अनुभव नक्कीच उपयोगी पडतील. एक पिंजरा कायम गाडीत ठेवा. सुक्या खोबऱ्याचा तुकडा पिंजऱ्यातल्या तारेत खोचून ठेवणे. ---------------------- आमच्याकडे घरात हा प्रकार झाला एकदा. रात्री पायावरून काहीतरी गेलं. त्या खोलीला बंद करून लाकडी ड्रायवर तपासले तेव्हा 'तो' दिसला. मग तो ड्रायवर लगेच बंद करून ते कपाट ( छोटेच होते ) जिन्यात नेऊन उघडल्यावर उंदीर जिन्यावरून खाली गेला. दोन चार दिवसांनी काही पदार्थ खाल्लेले सापडले आणि लेंड्या दिसल्या. चिकट पुठ्ठा बाल्कनीत ठेवल्यावर रात्री आवाज झाला. उंदीर चिकटला होता पण पुठ्ठा इकडेतिकडे ओढत नेला होता. दुसऱ्या दिवशी मेलेला सापडला. चार पाच कुंड्या फरशी चिकट झाली ती खोबरेल तेलाने पुसून साफ केली. पुठ्ठा आणि उंदिर टाकून दिले. एका उंदरावर साठ रुपये खर्च झाले होते. चार दिवसांनी पुन्हा उंदिर आल्याची चिन्हे दिसली. यावेळी चिकट पुठ्ठा आणून तो दोन भागांत कापला. फरशीच्या जड तुकड्याला पुठ्ठे बांधले आणि ठेवले. रात्री उंदीर चिकटला पण पुठ्ठा हलवता आला नाही. सकाळी गच्चीत जाऊन एका काटकीने उंदीर बाजूला केला व पुठ्ठा घरात आणला. परत एक उंदीर आल्याचे लक्षात आल्यावर पुठ्ठा ठेवला. उंदीर मिळाला. काटकीने काढून पुठ्ठा परत ठेवला . एका अर्ध्या पुठ्ठ्यात पाच उंदीर पकडले. उंदीर कुठून येतो याचा शोध घेतल्यावर समजले की बाल्कनीबाहेर जी नेटची केबल होती त्यावरून नवनवीन उंदीर चढून येत होते. तिथून बाल्कनीतल्या झाडाच्या फांदीवरून घरात. ती केबल दूर केली. तळपायाच्या कातडीला वास असतो ती उंदीर कुरतडतात. कपडे, रद्दी कुरतडून चिंध्या नेऊन घर बांधतात. वायरी, लाकूड कुरतडून दातांना धार करतात.

In reply to by कंजूस

रोचक अनुभव, घरात शिरू शकतील अश्या सर्व फटी बंद करून टाकाव्यात. उंदराच्या लघवीला (?) एक विशिष्ट वास असतो, ज्या घरात उंदीर नसतात तिथे एकदाही उंदीर आला की तो विशिष्ट वास यायला लागतो. काही लोकांच्या घरात हा वास खूप असतो इतका की ते लोक त्या वासाल यूज टू झालेले असतात. आणी आपल्याला लक्षात आला नाही तर समजायचे की आपणही झालोय. मला अनेकवेळा तो वास काही रेस्टोरंट्स, घरे इथे जाणवतो तिथे मी पुन्हा जात नाही. बाकी फ्लॅट सिस्टीम मध्ये उंदरांचा त्रास नसतो हे जाणवले आहे.

रोचक अनुभव. यावर उपाय म्हणून मांजर पाळायचा विचार केला का? खूप गोंडस आणि प्रेमळ प्राणी असतो आणि त्यामुळे आपलेही उंदीर मारायचे काम परस्पर होऊन जाईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोसायटीत एक मांजर पाळले आहे, पण त्याने २ व्हीलर्स चे सिट खराब करण्यापलीकडे काही भरीव काम केले आहे असे जाणवले नाही. उंदीर निर्मूलनात त्या मांजराचे काहीही योगदान नाही. त्याची सुस्तावलेली हालचाल पाहुन कळते की हे मांजर काही कामाचे नाही.

उंदरासोबतच पाल सुध्दा कार वर चढु शकते. कार क्लोज्ड पार्कींग मध्ये लावत असल्याने व पार्किंगच्या जागेचा भिंती अरुंद असल्याने पाल टपावर वा बॉनेट वर चढु शकते. एकदा असा अनुभव आला होता कार भरधाव होती व वायपर चालु केले तेव्हा तिथे असलेली पाल वायपर मुळे डायरेक्ट समोरच्या काचेवरच आली आणि एकदम दचकायला झाले.

Bhakti 30/06/2025 - 11:20
खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम लिहिला. पाल..ईई मला खुप किळस येते.लिहितांनाही लाज वाटते पण ,एका पालीने तर फ्रीजच्या बाजूची फरशी तिचे वॉशरूम केलंय.रोज सकाळी तिची घाण तिथे असतेच.पालीसाठी काही उपाय?

In reply to by Bhakti

अंड्याची टरफलं ठेवली तर नाही येत म्हणे पाल. आमच्या शेजाच्यांनी एकदा सांगितलं होतं. होतो का उपयोग माहित नाही पण करून बघा १-२ दिवस.

In reply to by Bhakti

मागे एकदा कोणीतरी सांगितले होते की मोराच्या पीसाला पाल घाबरते. म्हणून चिकटपट्टीने भिंतीवर मोराचे पीस चिकटवून ठेवले होते. पण कुठचे काय. एक दिवस पाल त्या मोराच्या पीसाच्याच मागे जाऊन लपली होती :)

In reply to by Bhakti

धन्यवाद ताई, नचिकेत म्हणतात तसे अंडे लावून फायदा होतो का पहा, प्रोसेस :- अंडे घ्यायचे, त्याला बारीक छिद्रे पडायचे आतला बलक काढून घ्यायचा, त्याचे आम्लेट बनवून खाऊन टाकायचे. ते बारीक छिद्र पाडताना अंडे फुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची ते अंडे खिळ्यात जिथे पाल येते त्या ठिकाणी अडकवून ठेवायचे. दुसरी पद्धत :- भिंतीवर कांचा चीना राजा (असे काहीतरी) लिहायचे पाल सुशिक्षित असेल तर वाचून निघून जाईल निंपरत येणार नाही. :)

In reply to by Bhakti

बल्लीदर्शन करा. बरोबर कांजिवरम ची साडी पण घेऊन या. कदाचित फायदा होईल. तामीळ मधे पालीला बल्ली म्हणतात. हे एकमात्र पालीचे मंदिर आहे. मंदिराच्या छतावर मोठी चांदीची पाल आहे. तीचे दर्शन करण्यासाठी एक शिडी ठेवली आहे. कांचीपुरम मधे एक हजार मंदिरे होती. आता काहीच उरली आहेत. पण मंदिरे मात्र सुंदर आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 01/07/2025 - 21:17
अहो, सोन्याची आणि हंपीची कोरलेली पाल हलत डुलत नाही ना .. लहानपणी माझ्या कडून अनवधानाने पालीचा दारात शिरच्छेद झाला होता.मुंडक एकीकडे धड एकीकडे तेव्हा दोन दिवस तापाने आजारी होते.तेव्हापासून किळसच येते.माझी मैत्रीण तर पाल दिसली तर अर्धा तास बैचेन होते.

In reply to by Bhakti

तुम्हांला जायलाच हवे. तुमच्या हातून पालीचा मडर, मर्डर हो , त्याच्ये पापक्षालन फक्त याच मंदिरात होते अशी मान्यता आहे. झटपट जा आणी पापमुक्त व्हा.

अभ्या.. 30/06/2025 - 13:04
भौबली, गाडीत राजेश चुन्याची डब्बी पण ठेवत जावा. एखादा उंदीर गाय छापची पोटली घेउन जायाचा आणि चुना मागायला परत यायचा. ;) . पण उंदराना नाहीच आवडत गायछाप बहुतेक. :)

सैन्यात प्रशिक्षणा दरम्यान सकाळी सकाळी खुपच घाई गडबड असते. मरायला वेळ नसतो. एक दिवस सकाळ कसली पहाटच म्हणावी लागेल . घाई घाईत युनिफॉर्म चढवला व परेड ग्राऊंड कडे पळालो. पुर्ण परेड करताना बुट ॲकंल मधे अंगठ्या जवळ काहितरी वळवळत होते. परेड करताना सारखा चुकत होतो. उस्ताद सारखा माझ्यावर भडकत होता. कधी एकदा तो पिरियड संपतो आणी कधी एकदा बुट काढून चेक करतो असे झाले होते. बघतो तर काय बुटाच्या आत मधे एक रक्तबंबाळ मेलेली पाल. रात्री कधीतरी बुटात जाऊन बसली असावी. एक दोन एक,लेफ्ट राईट मधे कधी तीला सद्गती मिळाली परमेश्वर जाणे.

विवेकपटाईत 02/07/2025 - 07:24
किस्सा आवडला. पण उंदीरा सारख्या घरात घुसून आपल्याला त्रास देणार्‍या उंदीरला कधीच जिवंत ठेवले नाही पाहिजे. उत्तम नगरला गल्लीत राशनची दुकान होती. उंदीर घरात येत असे. हत्या करणे पाप मी कधीच उंदराला मारले नाही. पिंजर्‍यात उंदीर बंदिस्त झाल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात गच्चीवर पिंजरा ठेऊन देत असेल. दोन दिवसांत उंदीर शहीद. हिवाळ्याचे दिवस असेल तर रात्री पिंजरा गच्चीवर ठेऊन त्यावर थंड पाणी टाकीत असे. रात्र भारत उंदीर शहीद. हत्येचे पाप ही आपल्याला लागत नाही.

सौंदाळा 02/07/2025 - 10:22
काही वर्षांपूर्वी माझ्या कारमधे पण उंदीर घुसला होता. घूसून बाहेर गेला होता. एकदा कार मधे बसलो आणि चावी लावायच्या आधीच वडीलांनी बटन दाबून खिडकीची काच खाली केली, नंतर पाहिले तर बर्‍याच गोष्टी चावी न घालताच ऑपरेट होत होत्या. बॉनेट उघडून बघितल्यावर उंदराचे प्रताप दिसले. वडीलांना ताबडतोब कारमधून उतरवून कॅबने पाठवले. कार सर्व खिडक्या उघड्या ठेऊन हळू हळू चालवत सर्विस सेंटरला नेली. शॉर्ट सर्कीटमुळे कारला आगी लाग्॑ल्याच्या घटना पण आठवल्या, यात उंदरांचा सहभाग पण असू शकतो असे काही मित्र म्हणत होते. बर्‍याच कुरतडलेल्या वायर बदलाव्या लागल्या. त्यानंतर काही दिवस कारमधे चावी लावायच्या आधी खिडक्या उघडत आहेत का किंवा अधूनमधून बॉनेट उघडून चेक करायची सवयच लागली होती, उंदराच्या दहशतीमुळे.

भारी किस्सा आहे. एकदा उंदराने वायपरला सप्लाय करणाऱ्या पाण्याची नळी आमच्या कारमध्ये कुरतडली होती. देव करो आणि असा कारमध्येच मुक्काम न करो त्याने.

कंजूस 29/06/2025 - 23:00
अनुभव नक्कीच उपयोगी पडतील. एक पिंजरा कायम गाडीत ठेवा. सुक्या खोबऱ्याचा तुकडा पिंजऱ्यातल्या तारेत खोचून ठेवणे. ---------------------- आमच्याकडे घरात हा प्रकार झाला एकदा. रात्री पायावरून काहीतरी गेलं. त्या खोलीला बंद करून लाकडी ड्रायवर तपासले तेव्हा 'तो' दिसला. मग तो ड्रायवर लगेच बंद करून ते कपाट ( छोटेच होते ) जिन्यात नेऊन उघडल्यावर उंदीर जिन्यावरून खाली गेला. दोन चार दिवसांनी काही पदार्थ खाल्लेले सापडले आणि लेंड्या दिसल्या. चिकट पुठ्ठा बाल्कनीत ठेवल्यावर रात्री आवाज झाला. उंदीर चिकटला होता पण पुठ्ठा इकडेतिकडे ओढत नेला होता. दुसऱ्या दिवशी मेलेला सापडला. चार पाच कुंड्या फरशी चिकट झाली ती खोबरेल तेलाने पुसून साफ केली. पुठ्ठा आणि उंदिर टाकून दिले. एका उंदरावर साठ रुपये खर्च झाले होते. चार दिवसांनी पुन्हा उंदिर आल्याची चिन्हे दिसली. यावेळी चिकट पुठ्ठा आणून तो दोन भागांत कापला. फरशीच्या जड तुकड्याला पुठ्ठे बांधले आणि ठेवले. रात्री उंदीर चिकटला पण पुठ्ठा हलवता आला नाही. सकाळी गच्चीत जाऊन एका काटकीने उंदीर बाजूला केला व पुठ्ठा घरात आणला. परत एक उंदीर आल्याचे लक्षात आल्यावर पुठ्ठा ठेवला. उंदीर मिळाला. काटकीने काढून पुठ्ठा परत ठेवला . एका अर्ध्या पुठ्ठ्यात पाच उंदीर पकडले. उंदीर कुठून येतो याचा शोध घेतल्यावर समजले की बाल्कनीबाहेर जी नेटची केबल होती त्यावरून नवनवीन उंदीर चढून येत होते. तिथून बाल्कनीतल्या झाडाच्या फांदीवरून घरात. ती केबल दूर केली. तळपायाच्या कातडीला वास असतो ती उंदीर कुरतडतात. कपडे, रद्दी कुरतडून चिंध्या नेऊन घर बांधतात. वायरी, लाकूड कुरतडून दातांना धार करतात.

In reply to by कंजूस

रोचक अनुभव, घरात शिरू शकतील अश्या सर्व फटी बंद करून टाकाव्यात. उंदराच्या लघवीला (?) एक विशिष्ट वास असतो, ज्या घरात उंदीर नसतात तिथे एकदाही उंदीर आला की तो विशिष्ट वास यायला लागतो. काही लोकांच्या घरात हा वास खूप असतो इतका की ते लोक त्या वासाल यूज टू झालेले असतात. आणी आपल्याला लक्षात आला नाही तर समजायचे की आपणही झालोय. मला अनेकवेळा तो वास काही रेस्टोरंट्स, घरे इथे जाणवतो तिथे मी पुन्हा जात नाही. बाकी फ्लॅट सिस्टीम मध्ये उंदरांचा त्रास नसतो हे जाणवले आहे.

रोचक अनुभव. यावर उपाय म्हणून मांजर पाळायचा विचार केला का? खूप गोंडस आणि प्रेमळ प्राणी असतो आणि त्यामुळे आपलेही उंदीर मारायचे काम परस्पर होऊन जाईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोसायटीत एक मांजर पाळले आहे, पण त्याने २ व्हीलर्स चे सिट खराब करण्यापलीकडे काही भरीव काम केले आहे असे जाणवले नाही. उंदीर निर्मूलनात त्या मांजराचे काहीही योगदान नाही. त्याची सुस्तावलेली हालचाल पाहुन कळते की हे मांजर काही कामाचे नाही.

उंदरासोबतच पाल सुध्दा कार वर चढु शकते. कार क्लोज्ड पार्कींग मध्ये लावत असल्याने व पार्किंगच्या जागेचा भिंती अरुंद असल्याने पाल टपावर वा बॉनेट वर चढु शकते. एकदा असा अनुभव आला होता कार भरधाव होती व वायपर चालु केले तेव्हा तिथे असलेली पाल वायपर मुळे डायरेक्ट समोरच्या काचेवरच आली आणि एकदम दचकायला झाले.

Bhakti 30/06/2025 - 11:20
खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम लिहिला. पाल..ईई मला खुप किळस येते.लिहितांनाही लाज वाटते पण ,एका पालीने तर फ्रीजच्या बाजूची फरशी तिचे वॉशरूम केलंय.रोज सकाळी तिची घाण तिथे असतेच.पालीसाठी काही उपाय?

In reply to by Bhakti

अंड्याची टरफलं ठेवली तर नाही येत म्हणे पाल. आमच्या शेजाच्यांनी एकदा सांगितलं होतं. होतो का उपयोग माहित नाही पण करून बघा १-२ दिवस.

In reply to by Bhakti

मागे एकदा कोणीतरी सांगितले होते की मोराच्या पीसाला पाल घाबरते. म्हणून चिकटपट्टीने भिंतीवर मोराचे पीस चिकटवून ठेवले होते. पण कुठचे काय. एक दिवस पाल त्या मोराच्या पीसाच्याच मागे जाऊन लपली होती :)

In reply to by Bhakti

धन्यवाद ताई, नचिकेत म्हणतात तसे अंडे लावून फायदा होतो का पहा, प्रोसेस :- अंडे घ्यायचे, त्याला बारीक छिद्रे पडायचे आतला बलक काढून घ्यायचा, त्याचे आम्लेट बनवून खाऊन टाकायचे. ते बारीक छिद्र पाडताना अंडे फुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची ते अंडे खिळ्यात जिथे पाल येते त्या ठिकाणी अडकवून ठेवायचे. दुसरी पद्धत :- भिंतीवर कांचा चीना राजा (असे काहीतरी) लिहायचे पाल सुशिक्षित असेल तर वाचून निघून जाईल निंपरत येणार नाही. :)

In reply to by Bhakti

बल्लीदर्शन करा. बरोबर कांजिवरम ची साडी पण घेऊन या. कदाचित फायदा होईल. तामीळ मधे पालीला बल्ली म्हणतात. हे एकमात्र पालीचे मंदिर आहे. मंदिराच्या छतावर मोठी चांदीची पाल आहे. तीचे दर्शन करण्यासाठी एक शिडी ठेवली आहे. कांचीपुरम मधे एक हजार मंदिरे होती. आता काहीच उरली आहेत. पण मंदिरे मात्र सुंदर आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 01/07/2025 - 21:17
अहो, सोन्याची आणि हंपीची कोरलेली पाल हलत डुलत नाही ना .. लहानपणी माझ्या कडून अनवधानाने पालीचा दारात शिरच्छेद झाला होता.मुंडक एकीकडे धड एकीकडे तेव्हा दोन दिवस तापाने आजारी होते.तेव्हापासून किळसच येते.माझी मैत्रीण तर पाल दिसली तर अर्धा तास बैचेन होते.

In reply to by Bhakti

तुम्हांला जायलाच हवे. तुमच्या हातून पालीचा मडर, मर्डर हो , त्याच्ये पापक्षालन फक्त याच मंदिरात होते अशी मान्यता आहे. झटपट जा आणी पापमुक्त व्हा.

अभ्या.. 30/06/2025 - 13:04
भौबली, गाडीत राजेश चुन्याची डब्बी पण ठेवत जावा. एखादा उंदीर गाय छापची पोटली घेउन जायाचा आणि चुना मागायला परत यायचा. ;) . पण उंदराना नाहीच आवडत गायछाप बहुतेक. :)

सैन्यात प्रशिक्षणा दरम्यान सकाळी सकाळी खुपच घाई गडबड असते. मरायला वेळ नसतो. एक दिवस सकाळ कसली पहाटच म्हणावी लागेल . घाई घाईत युनिफॉर्म चढवला व परेड ग्राऊंड कडे पळालो. पुर्ण परेड करताना बुट ॲकंल मधे अंगठ्या जवळ काहितरी वळवळत होते. परेड करताना सारखा चुकत होतो. उस्ताद सारखा माझ्यावर भडकत होता. कधी एकदा तो पिरियड संपतो आणी कधी एकदा बुट काढून चेक करतो असे झाले होते. बघतो तर काय बुटाच्या आत मधे एक रक्तबंबाळ मेलेली पाल. रात्री कधीतरी बुटात जाऊन बसली असावी. एक दोन एक,लेफ्ट राईट मधे कधी तीला सद्गती मिळाली परमेश्वर जाणे.

विवेकपटाईत 02/07/2025 - 07:24
किस्सा आवडला. पण उंदीरा सारख्या घरात घुसून आपल्याला त्रास देणार्‍या उंदीरला कधीच जिवंत ठेवले नाही पाहिजे. उत्तम नगरला गल्लीत राशनची दुकान होती. उंदीर घरात येत असे. हत्या करणे पाप मी कधीच उंदराला मारले नाही. पिंजर्‍यात उंदीर बंदिस्त झाल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात गच्चीवर पिंजरा ठेऊन देत असेल. दोन दिवसांत उंदीर शहीद. हिवाळ्याचे दिवस असेल तर रात्री पिंजरा गच्चीवर ठेऊन त्यावर थंड पाणी टाकीत असे. रात्र भारत उंदीर शहीद. हत्येचे पाप ही आपल्याला लागत नाही.

सौंदाळा 02/07/2025 - 10:22
काही वर्षांपूर्वी माझ्या कारमधे पण उंदीर घुसला होता. घूसून बाहेर गेला होता. एकदा कार मधे बसलो आणि चावी लावायच्या आधीच वडीलांनी बटन दाबून खिडकीची काच खाली केली, नंतर पाहिले तर बर्‍याच गोष्टी चावी न घालताच ऑपरेट होत होत्या. बॉनेट उघडून बघितल्यावर उंदराचे प्रताप दिसले. वडीलांना ताबडतोब कारमधून उतरवून कॅबने पाठवले. कार सर्व खिडक्या उघड्या ठेऊन हळू हळू चालवत सर्विस सेंटरला नेली. शॉर्ट सर्कीटमुळे कारला आगी लाग्॑ल्याच्या घटना पण आठवल्या, यात उंदरांचा सहभाग पण असू शकतो असे काही मित्र म्हणत होते. बर्‍याच कुरतडलेल्या वायर बदलाव्या लागल्या. त्यानंतर काही दिवस कारमधे चावी लावायच्या आधी खिडक्या उघडत आहेत का किंवा अधूनमधून बॉनेट उघडून चेक करायची सवयच लागली होती, उंदराच्या दहशतीमुळे.

भारी किस्सा आहे. एकदा उंदराने वायपरला सप्लाय करणाऱ्या पाण्याची नळी आमच्या कारमध्ये कुरतडली होती. देव करो आणि असा कारमध्येच मुक्काम न करो त्याने.
लेखनविषय:

जिम कॉर्बेट नी केनिथ अँडरसन यांच्या वाघ, बिबळ्या शिकारीच्या कथा वाचताना सहज आठवले की आपण शिकार तर नाही, पण एका उपद्रवी उंदराला पकडले होते. उंदीर पकडण्यात कसला आलाय शूरपणा? पण हा उंदीर सतत चार दिवस चारचाकीत धुमाकूळ घालत होता. माणसे आणि वायर याने सोडल्या नव्हत्या. त्याला पकडणे सोपे नव्हते. तसेच चालत्या गाडीत (८०-१०० च्या स्पीडवर) याने जर मला अंगावर चढून किंवा पायात येऊन बिचकावले असते, तर गाडीसह मी कुठेतरी घुसलो असतो. माझ्या मृत्यूचे कारण कुठलाही डिटेक्टिव्ह, शेरलॉक होम्स, गोपीचंद जासूस शोधू शकला नसता. तर या अशा उंदराला मी कसे पकडले, याची ही कथा.

हिंदी सक्तीबद्दल

आकाश खोत ·

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा 30/06/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु 30/06/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 30/06/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म 30/06/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत 02/07/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० 03/07/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी 04/07/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे 03/07/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म 04/07/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा 30/06/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु 30/06/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 30/06/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म 30/06/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत 02/07/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० 03/07/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी 04/07/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे 03/07/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म 04/07/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही.

एक मिशन असेही.

भागो ·
लेखनविषय:
त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले. “बाबा, परत केव्हा येणार?” “प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती. “बरं प्रिया, सांग तुला काय आणू?” “मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.” “डन!.” तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते. “प्रिया आहा.

गेले द्यायचे राहून.....

कर्नलतपस्वी ·

nutanm 03/07/2025 - 03:08
बरोबर आहे. अपेक्षान्ची साथ देत पेक्षा फारकत होत आशा जगायची होप ब्राईट आहे असे मला वैयक्तीक रित्या वाटते, वाटत रहाते. निवृत्तीच्या वयातही. २०२२ व २०२३ साली माझ्या नाही पण जवळच्या नात्यात अतिशय दु:खद प्रसन्ग घडूनही जगायची आशा ब्राईठ आहे. हे मनाचे आश्चर्य वाटत रहाते. व हा दैवाचा खेळ निराळा पण कसला हा जीवघेणा खेळ का घडतो का ती नियती क्रूर काळ, दैव म्हणून काही असेल तर का घडवते या प्रश्नाचे ऊत्तर शोधून शोधून थकायला होते पण ऊत्तर नाहीच मिळत.. का हे दैव , काळ ईतके कृर वागते काहीन्चया आयुष्यात . सर्वाच्या नाही व ज्यानी भोगलेय आधीच खूप वाईट गोष्टी त्याच्याच का खूप मागे लागते व ज्यान्चे छान आयुष्य त्यानाच भरभरुन ओतत रहाते असे का चा प्रश्नाचा भुन्गा पाठ सोडत नाही. बाकी तर नीट चाललेय.

nutanm 03/07/2025 - 03:08
बरोबर आहे. अपेक्षान्ची साथ देत पेक्षा फारकत होत आशा जगायची होप ब्राईट आहे असे मला वैयक्तीक रित्या वाटते, वाटत रहाते. निवृत्तीच्या वयातही. २०२२ व २०२३ साली माझ्या नाही पण जवळच्या नात्यात अतिशय दु:खद प्रसन्ग घडूनही जगायची आशा ब्राईठ आहे. हे मनाचे आश्चर्य वाटत रहाते. व हा दैवाचा खेळ निराळा पण कसला हा जीवघेणा खेळ का घडतो का ती नियती क्रूर काळ, दैव म्हणून काही असेल तर का घडवते या प्रश्नाचे ऊत्तर शोधून शोधून थकायला होते पण ऊत्तर नाहीच मिळत.. का हे दैव , काळ ईतके कृर वागते काहीन्चया आयुष्यात . सर्वाच्या नाही व ज्यानी भोगलेय आधीच खूप वाईट गोष्टी त्याच्याच का खूप मागे लागते व ज्यान्चे छान आयुष्य त्यानाच भरभरुन ओतत रहाते असे का चा प्रश्नाचा भुन्गा पाठ सोडत नाही. बाकी तर नीट चाललेय.
लेखनविषय:
काव्यरस
गेले द्यायचे राहून....., म्हणत आयुष्य Mute केलं प्रारब्ध, नशीब म्हणत ..... कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं जगण्याची मजा काय विचारता? स्वतःच्या मनाला mute करून, दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय... Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर Google करून बघतोय! घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं .... इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत Telling lies करतोय.... worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय. म्हटलं तर successful...म्हटलं तर blissful Stressful आयुष्य gressful करून जगतोय. "आकांक्षाशी", break up झालं तरी heart अजून lite आहे "अपेक्षा" ची साथ

किडकी प्रजा - सायकोपथी

युयुत्सु ·

मारवा 29/06/2025 - 03:57
महत्त्वाची गोष्ट अशी की मेंदू आक्रसण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात त्यात आनुवंशिक कारणांशिवाय व्यसने, ताण, चयापयाशी संबंधीत, रक्तदाब मधुमेहा सारख्या व्याधी, विषद्रव्यांचा मारा, कुपोषण इ० मुळे पुढील गोष्टी घडून येतात -चेतापेशींचा मृत्यु, चेतापेशींच्या जोडण्यांचा क्षय, चेतापेशींच्या शाखांचा क्षय, चेता तंतूंचा क्षय, चेतापेशींच्या आवरणाचा क्षय, चेतापेशींचे रक्षण करणार्‍या ग्लाया पेशींचा क्षय इ०
तुम्ही दिलेल्या लिंक वरील संशोधन प्रबंध वाचला. त्यात जो शेवटी संशोधकांनी निष्कर्ष दिलेला आहे त्यात त्यांनी याच विषयाच्या संदर्भात भविष्यात ज्या प्रश्नांवर संशोधन करण्याची गरज आहे त्यात असे म्हटलेले आहे की वरीलप्रमाणे मेंदूत झालेले बदल हे किती प्रमाणात 1 किती प्रमाणात अनुवंशिकते शी संबंधित आहेत ? 2 किती प्रमाणात सभोवतालच्या पर्यावरणाशी संबंधित आहेत ? यावर म्हणजे मेंदूतील या बदलात वरील दोन घटकांपैकी कोणाचा वाटा किती हे ठरविण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलेली आहे. पण तुमच्या वरील विधानात तुम्ही आनुवंशिक कारणाशिवाय इतर घटक कारणीभूत आहेत असे जे म्हणत आहात त्याचा आधार किमान या तुम्ही इथे दिलेल्या पेपर मध्ये तरी आढळला नाही.

मारवा 29/06/2025 - 04:13
The results of the group comparison tentatively suggest a rather widespread disturbance of brain development in psychopathic subjects. Questions for future studies are e.g., to what degree these structural differences are heritable or associated with e.g. environmental factors. मला वाटते संशोधकांच्या गतीशी ताळमेळ राखणे गरजेचे आहे. तसेच ते जोपर्यंत ठाम निष्कर्ष काढत नाही तो पर्यंत आपणही त्यांनी वापरलेल्या tentatively शब्दाचा संकोचाचा मान राखला पाहिजे.

युयुत्सु 29/06/2025 - 08:14
श्री० मारवा, प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा बरोबर आहे पण एका मर्यादेपर्यंतच ... शोधनिबंधांमध्ये लिटरेचर रिव्ह्यु आणि मेटा-अ‍ॅनालिसिस असे दोन महत्त्वाचे मुख्य प्रकार असतात- ढोबळमानाने असे म्हणता येते की रिव्ह्यु प्रकारातले शोधनिबंध उपलब्ध संशोधानांचे गुणात्मक विश्लेषण करतात तर मेटा-अ‍ॅनालिसिस मध्ये उपलब्ध संशोधानांचे संख्यात्मक विश्लेषण करतात. या दोन अभ्यासांचे निष्कर्ष साधारण पणे असे मांडले जातात - Literature review: "Studies show mindfulness reduces anxiety in 60% of trials, though effects vary by population." Meta-analysis: *"Pooled data from 40 RCTs (n=5,000) show mindfulness reduces anxiety scores by 1.2 standard units (95% CI: 0.8–1.6)."* एकच एक अभ्यास विचारात घेतला तर तुम्ही म्हणता ती विधाने महत्त्वाची आहेत. पण तुम्ही मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती अशा बीजसंज्ञा देऊन शोध घेतला तर शोध-निबंधांचा पाऊस पडलेला दिसेल. त्यात वर दिलेले दोन प्रकारचे अभ्यास शोधले तर आणि कार्यकारणभावाचे जुजबी जरी ज्ञान असले तर पोपट मेला आहे याच्या अधिकृत घोषणेची वाट बघायची गरज उरत नाही. माझा मुद्दा लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे...

युयुत्सु 29/06/2025 - 08:38
एक राहून गेले. उदा० नेचर मध्ये प्रकाशित झालेला पुढील रिव्ह्यु मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती यावरील जास्तीत उपलब्ध संशोधनाचा आढावा घेतो Tully, J., Cross, B., Gerrie, B. et al. A systematic review and meta-analysis of brain volume abnormalities in disruptive behaviour disorders, antisocial personality disorder and psychopathy. Nat. Mental Health 1, 163–173 (2023). https://doi.org/10.1038/s44220-023-00032-0

मारवा 29/06/2025 - 09:28
तुमच्या प्रतिसादात literature review आणि meta analysis च्या सहाय्याने निष्कर्ष काढण्याची प्रचलित दिलेली पद्धत शास्त्रीय आणि उत्तम अशीच आहे याच्याशी सहमत आहे. माझा.specific प्रश्न असा की 1 तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते. 2 दुसरे कारण अनुवंशिकता हे सुद्धा असू शकते. जेव्हा अनुवंशिकता हा दोष असेल तेव्हा बिघडलेले पर्यावरण हे कारणीभूत नसणार. 3 तर या लेखात दिलेला पेपर तरी म्हणतो की यावर अजून संशोधन करणे गरजेचे आहे की कुठले कारण आहे 4 तर वरील दोन literature review आणि meta analysis या रीतीचा वापर करून असे सिद्ध झालेले आहे का की बिघडलेले पर्यावरण हे किडकी प्रजा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे ? (अनुवंशिकता नव्हे) हा वरील specific प्रश्न आहे.

युयुत्सु 29/06/2025 - 09:42
तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते.> पर्यावरणाच्या आघातांनी एका मर्यादेनंतर केंद्रकाम्लाची रचना बिघडते आणि त्यामुळे आनुवंशिक दोष निर्माण होतात. "किडकी प्रजा" ही मी योजलेली संज्ञा आहे. अशी कठोर संज्ञा वापरण्याचा उद्देश समाजाला गदागदा हलवून जागे करणे हा आहे. पर्यावरण हा भारतात एक चेष्टेचा विषय आहे. भारतातील न्यायालये पर्यावरण आणि विकास असा संघर्ष असेल तर विकासाची बाजू घेतात, अशी ऐकीव माहिती आहे.

मारवा 29/06/2025 - 03:57
महत्त्वाची गोष्ट अशी की मेंदू आक्रसण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात त्यात आनुवंशिक कारणांशिवाय व्यसने, ताण, चयापयाशी संबंधीत, रक्तदाब मधुमेहा सारख्या व्याधी, विषद्रव्यांचा मारा, कुपोषण इ० मुळे पुढील गोष्टी घडून येतात -चेतापेशींचा मृत्यु, चेतापेशींच्या जोडण्यांचा क्षय, चेतापेशींच्या शाखांचा क्षय, चेता तंतूंचा क्षय, चेतापेशींच्या आवरणाचा क्षय, चेतापेशींचे रक्षण करणार्‍या ग्लाया पेशींचा क्षय इ०
तुम्ही दिलेल्या लिंक वरील संशोधन प्रबंध वाचला. त्यात जो शेवटी संशोधकांनी निष्कर्ष दिलेला आहे त्यात त्यांनी याच विषयाच्या संदर्भात भविष्यात ज्या प्रश्नांवर संशोधन करण्याची गरज आहे त्यात असे म्हटलेले आहे की वरीलप्रमाणे मेंदूत झालेले बदल हे किती प्रमाणात 1 किती प्रमाणात अनुवंशिकते शी संबंधित आहेत ? 2 किती प्रमाणात सभोवतालच्या पर्यावरणाशी संबंधित आहेत ? यावर म्हणजे मेंदूतील या बदलात वरील दोन घटकांपैकी कोणाचा वाटा किती हे ठरविण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलेली आहे. पण तुमच्या वरील विधानात तुम्ही आनुवंशिक कारणाशिवाय इतर घटक कारणीभूत आहेत असे जे म्हणत आहात त्याचा आधार किमान या तुम्ही इथे दिलेल्या पेपर मध्ये तरी आढळला नाही.

मारवा 29/06/2025 - 04:13
The results of the group comparison tentatively suggest a rather widespread disturbance of brain development in psychopathic subjects. Questions for future studies are e.g., to what degree these structural differences are heritable or associated with e.g. environmental factors. मला वाटते संशोधकांच्या गतीशी ताळमेळ राखणे गरजेचे आहे. तसेच ते जोपर्यंत ठाम निष्कर्ष काढत नाही तो पर्यंत आपणही त्यांनी वापरलेल्या tentatively शब्दाचा संकोचाचा मान राखला पाहिजे.

युयुत्सु 29/06/2025 - 08:14
श्री० मारवा, प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा बरोबर आहे पण एका मर्यादेपर्यंतच ... शोधनिबंधांमध्ये लिटरेचर रिव्ह्यु आणि मेटा-अ‍ॅनालिसिस असे दोन महत्त्वाचे मुख्य प्रकार असतात- ढोबळमानाने असे म्हणता येते की रिव्ह्यु प्रकारातले शोधनिबंध उपलब्ध संशोधानांचे गुणात्मक विश्लेषण करतात तर मेटा-अ‍ॅनालिसिस मध्ये उपलब्ध संशोधानांचे संख्यात्मक विश्लेषण करतात. या दोन अभ्यासांचे निष्कर्ष साधारण पणे असे मांडले जातात - Literature review: "Studies show mindfulness reduces anxiety in 60% of trials, though effects vary by population." Meta-analysis: *"Pooled data from 40 RCTs (n=5,000) show mindfulness reduces anxiety scores by 1.2 standard units (95% CI: 0.8–1.6)."* एकच एक अभ्यास विचारात घेतला तर तुम्ही म्हणता ती विधाने महत्त्वाची आहेत. पण तुम्ही मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती अशा बीजसंज्ञा देऊन शोध घेतला तर शोध-निबंधांचा पाऊस पडलेला दिसेल. त्यात वर दिलेले दोन प्रकारचे अभ्यास शोधले तर आणि कार्यकारणभावाचे जुजबी जरी ज्ञान असले तर पोपट मेला आहे याच्या अधिकृत घोषणेची वाट बघायची गरज उरत नाही. माझा मुद्दा लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे...

युयुत्सु 29/06/2025 - 08:38
एक राहून गेले. उदा० नेचर मध्ये प्रकाशित झालेला पुढील रिव्ह्यु मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती यावरील जास्तीत उपलब्ध संशोधनाचा आढावा घेतो Tully, J., Cross, B., Gerrie, B. et al. A systematic review and meta-analysis of brain volume abnormalities in disruptive behaviour disorders, antisocial personality disorder and psychopathy. Nat. Mental Health 1, 163–173 (2023). https://doi.org/10.1038/s44220-023-00032-0

मारवा 29/06/2025 - 09:28
तुमच्या प्रतिसादात literature review आणि meta analysis च्या सहाय्याने निष्कर्ष काढण्याची प्रचलित दिलेली पद्धत शास्त्रीय आणि उत्तम अशीच आहे याच्याशी सहमत आहे. माझा.specific प्रश्न असा की 1 तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते. 2 दुसरे कारण अनुवंशिकता हे सुद्धा असू शकते. जेव्हा अनुवंशिकता हा दोष असेल तेव्हा बिघडलेले पर्यावरण हे कारणीभूत नसणार. 3 तर या लेखात दिलेला पेपर तरी म्हणतो की यावर अजून संशोधन करणे गरजेचे आहे की कुठले कारण आहे 4 तर वरील दोन literature review आणि meta analysis या रीतीचा वापर करून असे सिद्ध झालेले आहे का की बिघडलेले पर्यावरण हे किडकी प्रजा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे ? (अनुवंशिकता नव्हे) हा वरील specific प्रश्न आहे.

युयुत्सु 29/06/2025 - 09:42
तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते.> पर्यावरणाच्या आघातांनी एका मर्यादेनंतर केंद्रकाम्लाची रचना बिघडते आणि त्यामुळे आनुवंशिक दोष निर्माण होतात. "किडकी प्रजा" ही मी योजलेली संज्ञा आहे. अशी कठोर संज्ञा वापरण्याचा उद्देश समाजाला गदागदा हलवून जागे करणे हा आहे. पर्यावरण हा भारतात एक चेष्टेचा विषय आहे. भारतातील न्यायालये पर्यावरण आणि विकास असा संघर्ष असेल तर विकासाची बाजू घेतात, अशी ऐकीव माहिती आहे.
लेखनविषय:
 सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे.

कॉर्बेटचं मृगजळ

आकाश खोत ·

मारवा 28/06/2025 - 05:18
वाघाच्या नादात खरोखर आपण बाकी इतर इतक्या सुंदर जंगलावर त्यातील इतर प्राण्यांवर फोकस करून आनंद घेऊ शकत नाही.असे होते खरे. फोटो फार सुंदर आलेले आहेत. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्याचा आनंद मोठा. पण पर्यटक कधी कधी अतिरेक करतात माणूस हा in general सर्वात नालायक प्राणी आहे. Simulated Safari प्रकार भन्नाट आहे माहिती नव्हता जमल्यास याची अजून माहिती द्यावी

सुबोध खरे 28/06/2025 - 20:34
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो हि एक अंधश्रद्धा आहे. माझ्या माहितीतील एकालाही वाघ दिसलेला नाही. तेथे जवळच राहणारा माझा वर्गमित्र ( लष्करातून निवृत्त झालेला) स्वच्छपणे म्हणाला कॉर्बेट पार्क च्या मध्य भागात( कोअर झोन) वाघ असतात आणि तुम्हाला सफारी मध्ये तेथे मध्य भागात( कोअर झोन) घेऊनच जात नाहीत. तुमची वनखात्यात ओळख असेल तर त्या कोअर झोन मध्ये जात येते आणि एवढं करूनही वाघ दिसेल असे नाही. त्या मानाने पेंच, ताडोबा किंवा कान्हा किसली मध्ये वाघ दिसण्याची शक्यता किती तरी पट जास्त आहे

In reply to by सुबोध खरे

आकाश खोत 29/06/2025 - 19:17
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ येत असतात. पण तुम्ही म्हणता तसे फार आतले असतील. मी म्हटलो तो ढिकाला हा झोन, जिथे आत जाऊन मुक्काम करावा लागतो, तिकडेसुद्धा शक्यता जास्त आहे म्हणतात. बघू पुढे भविष्यात तुम्ही म्हणताय तिथे बघण्याचा योग आला तर चांगलंच आहे.

गोरगावलेकर 01/07/2025 - 13:11
उत्तराखंडची सहल केली मात्र कार्बेट अभयारण्य सुटले आहे . बघू कधी जमतंय . कान्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये तीन सफरी करूनही वाघाने दर्शन दिले नव्हते.

विवेकपटाईत 02/07/2025 - 07:49
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो पण वाघाचे दर्शन झाले नाही. नर्मदा पुरम इथले सतपुडा अभयारण्य जास्त सुंदर आणि भरपूर प्राणी आणि पक्षी तिथे दिसतात. वाघ दिसण्याची शक्यता 90 टक्के आहे. आम्हाला दीड दिवसांत तीन वेळा वाघाचे दर्शन झाले. मधई गेट जवळ एमपी टुरिजमचे हॉटेल देनुआ नदी काठी आहे. नदी तवा बांधला मिळते. त्यामुळे पात्र मोठे आहे. वाटर सफारी ही वेगळी आहे. मगर आणि अनेक पक्षी ही नदीकाठी दिसतात. दुसर्‍या तीरावर अभयारण्याचे कोर झोन आहे. सफारी तिथून सुरू होते. वाघ गौर सांभार हरिण अस्वल काळे आणि लाल माकडे आणि अनेक पक्षी इत्यादि. निवांत वेळ घालविण्यासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. एमपी टुरिजमची व्यवस्था ही उत्तम आहे.

मारवा 28/06/2025 - 05:18
वाघाच्या नादात खरोखर आपण बाकी इतर इतक्या सुंदर जंगलावर त्यातील इतर प्राण्यांवर फोकस करून आनंद घेऊ शकत नाही.असे होते खरे. फोटो फार सुंदर आलेले आहेत. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्याचा आनंद मोठा. पण पर्यटक कधी कधी अतिरेक करतात माणूस हा in general सर्वात नालायक प्राणी आहे. Simulated Safari प्रकार भन्नाट आहे माहिती नव्हता जमल्यास याची अजून माहिती द्यावी

सुबोध खरे 28/06/2025 - 20:34
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो हि एक अंधश्रद्धा आहे. माझ्या माहितीतील एकालाही वाघ दिसलेला नाही. तेथे जवळच राहणारा माझा वर्गमित्र ( लष्करातून निवृत्त झालेला) स्वच्छपणे म्हणाला कॉर्बेट पार्क च्या मध्य भागात( कोअर झोन) वाघ असतात आणि तुम्हाला सफारी मध्ये तेथे मध्य भागात( कोअर झोन) घेऊनच जात नाहीत. तुमची वनखात्यात ओळख असेल तर त्या कोअर झोन मध्ये जात येते आणि एवढं करूनही वाघ दिसेल असे नाही. त्या मानाने पेंच, ताडोबा किंवा कान्हा किसली मध्ये वाघ दिसण्याची शक्यता किती तरी पट जास्त आहे

In reply to by सुबोध खरे

आकाश खोत 29/06/2025 - 19:17
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ येत असतात. पण तुम्ही म्हणता तसे फार आतले असतील. मी म्हटलो तो ढिकाला हा झोन, जिथे आत जाऊन मुक्काम करावा लागतो, तिकडेसुद्धा शक्यता जास्त आहे म्हणतात. बघू पुढे भविष्यात तुम्ही म्हणताय तिथे बघण्याचा योग आला तर चांगलंच आहे.

गोरगावलेकर 01/07/2025 - 13:11
उत्तराखंडची सहल केली मात्र कार्बेट अभयारण्य सुटले आहे . बघू कधी जमतंय . कान्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये तीन सफरी करूनही वाघाने दर्शन दिले नव्हते.

विवेकपटाईत 02/07/2025 - 07:49
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो पण वाघाचे दर्शन झाले नाही. नर्मदा पुरम इथले सतपुडा अभयारण्य जास्त सुंदर आणि भरपूर प्राणी आणि पक्षी तिथे दिसतात. वाघ दिसण्याची शक्यता 90 टक्के आहे. आम्हाला दीड दिवसांत तीन वेळा वाघाचे दर्शन झाले. मधई गेट जवळ एमपी टुरिजमचे हॉटेल देनुआ नदी काठी आहे. नदी तवा बांधला मिळते. त्यामुळे पात्र मोठे आहे. वाटर सफारी ही वेगळी आहे. मगर आणि अनेक पक्षी ही नदीकाठी दिसतात. दुसर्‍या तीरावर अभयारण्याचे कोर झोन आहे. सफारी तिथून सुरू होते. वाघ गौर सांभार हरिण अस्वल काळे आणि लाल माकडे आणि अनेक पक्षी इत्यादि. निवांत वेळ घालविण्यासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. एमपी टुरिजमची व्यवस्था ही उत्तम आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता. पूर्वतयारी जिम कॉर्बेटची सफारी त्यांच्या वेबसाईट वर आधीच बुक करावी लागते. शेकडो एकर परिसर असल्यामुळे तिथे वेगवेगळे झोन आहेत. बिजरानी, झिरना, ढिकाला, ढेला अशी त्या झोन्सची नावे आहेत. अजूनही आहेत. तिथे जाण्यासाठी विमानमार्गे पंतनगर / हल्द्वानी हे विमानतळ आहे. रामनगर हे रेल्वे स्टेशन आहे. ह्याच गावाजवळ बरेच झोन आहेत त्यामुळे इथे बरीच वर्दळ असते. बहुतांश लोक याच गावात मुक्कामाला राहून कॉर्बेटला जाऊन येतात.