मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

चित्रगुप्त ·

भागो 17/06/2024 - 23:46
बघितली. आता मला सांगा, सर, कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:44
कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे? -- हा प्रश्न कला-निर्मितीशी संबंधित असेल तर केलेली साधना कधीच वाया जात नाही. नवनवीन साधने आत्मसात करत नवनवीन प्रयोग करत रहाण्यातून सृजनशीलतेचे क्षितिज आणखी विस्तीर्ण होत असते. -- मात्र हा प्रश्न कलेतून पैसा मिळवण्यासंबंधित असेल, तर अमूक एका पद्धतीने काम करणारे कलावंत ती पद्धत कालबाह्य झाल्यावर अडचणीत येऊ शकतात. मला स्वतःला आता कलेतून पैसा मिळवायचा नसल्याने माझ्यासाठी नवीन असलेल्या गोष्टी शिकणे खूप आनंददायक आहे. उदाहरणार्थ एकीकडे कृत्रीम बुद्धिमत्तेने निर्माण होणारी कला, तर दर दुसरीकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या युरोपियन चित्रकारांची पद्धत, या दोन्ही नवीन गोष्टी मी शिकतो आहे. गंमत म्हणजे या दोन्हीचे एकत्रिकरण करणेही शक्य, आणि खूप उपयोगीपण आहे.

कंजूस 18/06/2024 - 05:47
जमलं आहे. प्राथमिक प्रयोग एवढं देऊ शकतात आता तर आणखी पाच वर्षांत काय होईल.

पिक्चर मेकर,स्टोरी बोर्ड, स्टोरी बोर्ड प्लस, माया.... ते आज या टप्प्यावर पोहोचायला कित्येक दशके लागली. तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे. तरी सुद्धा सध्यातरी पारंपरिक चित्रकलेला पर्याय नाही. भाषे बरोबर कल्पनेचा विलास मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. बघुया काय पुढे होते ते. दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेले छायाचित्रण आज कुठल्याकुठे पोहचले आहे याची कल्पना रामोजी चित्र सृष्टी बघितल्यावर स्पष्ट कल्पना आली व मानवाच्या सृजन आणी इच्छाशक्तीचे कौतुक वाटले. चित्रगुप्त यांच्यापासून पेर्णा घेवून मी सुद्धा चित्रकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आता १९६० सालच्या कन्यादान चित्रपटातील पी सावळाराम यांनी लिहीलेले गीत बदलायची वेळ आलेली दिसतेय. मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो भेट पहिली अपुली घडता निळी मोहीनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उषेचे भरतो ममस्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्याविण ही तुझी चारुता मावळतीचे सूर्यफूल ते करतो तुझ्या परी तव प्रीतीसरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 23/06/2024 - 23:38
तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.
तुम्ही वर म्हटले तसे घडून आता खूप वर्षे झाली. तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा उगम आणि वाटचाल यातून झाली, त्यालाही आता अनेक दशके उलटलीत. -- आता पुन्हा चक्र उलटे फिरून, आणि काही लोकांकडे अमाप पैसा आल्यापासून पुन्हा प्रासादतुल्य इमारती, हंड्या-झुंबरे, जुनी चित्रे-पुतळे, जुन्या शैलीच्या, उत्तम पॉलिश केलेल्या उंची लाकडाच्या फर्निचरने सजवलेले दिवाणखाने वगैरेची फॅशन येत आहे. इंदुरातील माझ्या परिचयातील दोन (सख्खे भाऊ असलेल्या) चित्रकारांना फ्रेंच प्रासादाबरहुकूम छतावर आणि भिंतींवर भव्य चित्रे, कुटुंबातील व्यक्तींची जुन्या पद्धतीची व्यक्तिचित्रे वगैरे रंगवण्याचे मोठे काम मिळालेले आहे. मी आणि माझ्या मुलाने जुन्या बाजारातून एक ८०-९० वर्षे जुना, मोहोगनी लाकडाचा तुटका सोफा आणून त्याला स्वतः दुरुस्त करून, पूर्वीची कापूस भरलेली गादी काढून टाकून हुबेहुब तशी दिसणारी फोमची गादी घरी बनवून त्यावर जुन्या डिझाईनचे कापड आणून व्यवस्थित बसवले आहे. हे सगळे करायला एक आठवडा लागला. आता लंबक पुन्हा उलट्या दिशेने जाऊ लागला आहे. माझ्यासारख्या 'जुने ते सोने' वाटणार्‍यांसाठी ही समाधानाची बाब आहे.

भागो 18/06/2024 - 09:45
चित्र क्र ६ मला "भरत" च्या चित्राची आठवण आली. ह्या वर्षीच्या मिपाच्या दिवाळी अंकातली चित्रे ही पण अशीच काढली असणार. 3d render, cinematicचा अर्थ फोड करून सांगणार का?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:14
यांचे नेमके अर्थ मलाही ठाउक नव्हते. चित्र बनवताना खाली विविध पर्याय असतात, त्यापैकी वेगवेगळे निवडले तर वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सध्या मी निशुल्क वापरत असल्याने रोजच्या वापरावर मर्यादा आहे, त्यामुळे भरपूर प्रयोग करून बघता येत नाहीयेत. मी अंदाजाने हे दोन पर्याय निवडले होते. बरे झाले तुम्ही अर्थ विचारलात, त्यामुळे मी गुगलून बघितले, ते असे: --- A 3D render is a computer-generated image (CGI) created from a 3D model using specialized software. The process of creating a 3D render is called 3D rendering, and it's the final step in the 3D visualization process. 3D rendering can be used to create photorealistic or artistic images of a variety of scenes and locations, including interiors and exteriors, landscapes, and structures. --- Cinematic AI images are images created using artificial intelligence (AI) to mimic the style of cinematic photography. Cinematic photography is a style that aims to create images with depth and emotion that resemble movie stills.

In reply to by चित्रगुप्त

भागो 18/06/2024 - 17:25
मी जेव्हा 3d शिकत होतो( Blender) ती इमेज आपल्याला तिन्ही अक्सिस मधून फिरवता येते. मला वाटले तस काही आहे कि काय. असेलही. नसेल तर पुढे मागे येईलही. इन जनरल मला राजा रविवर्माची स्टाईल वाटली.

सुरिया 18/06/2024 - 18:26
कितीही एआय आलं. रंगानं हात बरबाटवायचा थांबला, स्काय इज द लिमिट सोडा, ब्रेन इज द लिमिट कमी पडायलं तरी बुढऊ पेंटरबाबू आपला थांबलेला काळ अन फ्यांटस्या सोडायला तयार नाहीत असं दिसतंय. त्याच त्याच बाया अन तीच ब्यागरांडं तर आधी प्यारीसातल्या पेंटिंगात आणि गेलाबाजार चांदोबात बघितल्याच आहेत की. . आर्टिस्ट आहात, अनुभवी आहात अन एआय हाताशी हाय तर बनवा की एखादी कालातीत काहीतरी. उगी तेच तेच काय. एआय प्लस चित्रगुप्त हे कॉबोच कसे हिट्ट वाजले पाहिजे, बाकी स्क्रीप्टा बडवुन छान छान म्हणायला आम्ही हावोतच की.

In reply to by सुरिया

चित्रगुप्त 18/06/2024 - 20:01
@ सुरिया: धन्यवाद. 'बुढऊ पेंटरबाबू' आवडले. आत्ता आठ दहा दिवसांपूर्वी हे माध्यम हाती लागून सुरुवात झाली आहे. अनेक प्रयोग करायचे आहेत. बघूया पुढे काय काय होते. अर्थातच मूळचे तैलरंगात चित्रे रंगवणे थांबवायचे नाहीच. सत्तरीत आल्यावर बालपणीचा 'गुजरा हुवा जमाना' हवाहवासा, पुन्हा जगावासा वाटू लागतो. 'आता नही दुबारा' हे बुद्धीला कळत असले तरी काळाचे चक्र उलटे फिरून आता कालबाह्य/दुर्लभ झालेल्या गोष्टींमधे पुन्हा रमावेसे वाटू लागते, हे नैसर्गिकच असते, आणि ते त्या अवस्थेला पोचल्यावरच कळते. काही अद्वितीय, हटके, (मुद्दाम ओढून ताणून -) 'कालातीत' वगैरे करून दाखवायची, आपण ग्रेट वगैरे आहोत असे सिद्ध करण्याची खाज आणि मानसिक गरज/रुग्णता माझ्यात तरी अजिबात नाही. ज्यांना असेल त्यांनी तसे अवश्य करावे. -- बाकी नवनवीन क्षितिजांचा शोध घेत रहावा हे जरी खरे असले, तरी त्यात स्वतःची म्हणून असलेली आवड ही रहाणारच. त्यात गैर काही नाही. ज्यांना त्यात रस वाटेल त्यांनी बघावे, नसेल त्यांनी सोडून द्यावे. हा.का.ना.का.

चौकस२१२ 18/06/2024 - 19:00
सुरवातीला रोचक वाटले पण तोच तोच पण साहजिक लगेच जाणवतो त्यामुळे काही गोष्टीत वापरता येईल पण पुढे काय? आणि सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:50
मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ
-- खरे आहे. परंतु रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध घेता येत असल्याने त्यांचा उपयोग करून घेत आपली कला परिपूर्ण करायला मदत मिळू शकते, माझा सध्या तोच प्रयत्न आहे.
सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ
सप्तसूर, सव्वीस वा अठ्ठेचाळीस मूळाक्षरे वगैरे सगळेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेनुसार निर्मितीत फरक पडत जातो तसे यातही होईल.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 24/06/2024 - 14:49
नक्कीच प्रयोग करीत राहा ...पण एक चित्रांचा ग्राहक/ आवड असणारा ( मग ते स्थापत्य असो किंवा जाहिरात क्षेत्र असो ) म्हणून आलेली पहिली प्रतिक्रिया होती

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:34
या सगळ्या प्रकारात प्रॉम्ट कसे लिहावे? याची माहिती मिळाली. व्यक्तीला सजवायला, जितके जास्त वर्णन लिहून ठेवले पाहिजे. बाकीचे तपशील साजेसे दिले की चित्र बनते हे समजले. मला यात विचारणा करावीशी वाटते की हे लेखी प्रॉम्ट लिहून देता देता आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का? कोणी असे प्रयोग केले असतील तर ते बघायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:40
आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?
यासाठी बहुत काळापासून फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखीही असतीलच.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:57
प्रॉम्ट कसे लिहावे हाच यात कळीचा मुद्दा आहे. नेमके कोणते शब्द/वाक्य कोणत्या क्रमाने लिहायचे, कोणत्या तांत्रिक बाबी सांगायच्या वगैरेवर मार्गदर्शक लेख, व्हिडियो वगैरे आहेत, ते हळूहळू बघणार आहे. तुम्ही जर काही वाचले-बघितले तर ते इथे अवश्य लिहा. तुमच्या शिवकालीन युद्धतंत्र वगैरेवरील लेखनासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

चौथा कोनाडा 19/06/2024 - 17:22
जबरदस्त चित्रं आहेत ! चिगु साहेबांच्या प्रयोगशीलतेला परिस सापडला आहे.. य लेखाच्या निमित्ताने प्रॉम्प्ट कसे लिहितात, त्यांचा क्रम, योग्य शब्द जुळवणी याची चुणु़क मिळाली ! ही नविन इंटरेस्टींग लेखमाला वाचानिय अ‍ॅज वेल बघणीय होणार यात शंका नाही ! आगे बढो चित्रगुप्त साहेब !

वकील साहेब 24/06/2024 - 12:01
आपण अपलोड केलेल्या एखाद्या फोटो वर आपल्या आदेशानुसार संस्कार करून नवीन इमेज ideogram बनवून देते का ? असेल तर ते कसे साध्य करावे ?

In reply to by चित्रगुप्त

गवि 24/06/2024 - 18:08
आधीच्या फोटोवर, विशेषतः व्यक्तीच्या फोटोवर बेमालूम संस्करण करून नवीन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणे यात बरेच कायदेशीर आणि नैतिक इश्युज आहेत. कोणतीही मुख्य प्रवाहातील लेजिट कंपनी असे फीचर (उपलब्ध असले तरी) वापरायला देणार नाहीत. इतक्यात तरी. पण या तंत्रात प्रवीण असलेले लोक स्वतः खटपट करून तसे बनवत असतातच. यात मुख्य समस्या डीप फेक टाईप व्हिडिओजची आहे. कोणाचे नग्न, बदनामीकारक चित्र किंवा त्याहून वाईट म्हणजे कोण्या समाजाच्या भावना दुखावणारे शब्द तोंडात घालून व्हिडिओ बेमालूम बनवले तर सध्या तरी बरेच मोठे नुकसान होऊ शकते. लोकांना अशा फेक गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल.

वकील साहेब 01/07/2024 - 03:37
Whatsapp अपडेट केलं तर whatsapp च नवीन फिचर असलेली जांभळी रिंग तुमच्या whatsapp च्या होम स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Meta AI नावाची नवीन चॅट बॉक्स ओपन होईल. इथे तुम्ही chat got ला विचारतात तसे अनेक प्रश्न विचारू शकतात. त्याची तात्काळ उत्तरे मिळतात. आणि त्याहून गंमत म्हणजे ideogram सारख्या प्रतिमाही बनवून मिळतात. त्याही अगदी त्वरित. त्यासाठी फक्त एक करायचं promt लिहितांना सुरवातीला फक्त imagine एवढा शब्द लिहायचा बस. Ideogram जसे 4 Result देते तसे meta ai फक्त एकच result देते. पण तोही छान असतो. मी गम्मत म्हणून चित्रगुप्त यांच्या promt कॉपी करून तिथे टाकून पहिल्या. हाती आलेल्या प्रतिमा खूपच छान होत्या. इथे डकवता येत नाहीये. पण तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता.

चित्रगुप्त 01/07/2024 - 07:44
Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे असे दिसले. उदाहरणार्थ मानवाकृती ideogram पेक्षा जास्त चांगल्या येतात. दर दिवशी अमूक इतकी चित्रे असे काही बंधनही नाही, one more version असे लिहीले की पुन्हा आणखी एक नवीन चित्र मिळते. त्यात सुधारणांसाठी पण लिहून पाठवू शकतो, पण नेमक्या त्याच सुधारणा होतीलच असे नाही. काही वेडेवाकडे, चुकीचे पण होते. आधी /image असे लिहून मग इंग्रजीत prompt लिहायचा आणि मेसेज पाठवायचा.मिनीटभारात एक चित्र येते. मात्र ते चौरसाकारच असते. लांबट उभे वा आडवे मिळत नाही.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 01/07/2024 - 09:14
दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे ? ( जरी भाऊ असले तरी ) तुम्ही इनपुट काय दिले होते ? एकाला ३ रा हात? आणि काही - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? -बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 01/07/2024 - 16:21
तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. १. चेहरे कसे येतील यावर आपले काहीही कंट्रोल नाही (मलातरी जमलेले नाही) हे जे गदायुद्धाचे चित्र इथे दिले, त्यासाठी अनेकदा प्रॉम्प्ट बदलून जी चित्रे येत गेली, त्या सर्वात काही ना काहीतरी चुका होत्याच, शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले. कशात दोघांना चारचार हात, चार गदा, कशात गदांना दोन्हीकडे गोलाकार डोकी (किंवा जे काही म्हणतात ते) गदा वाट्टेल तश्या धरलेल्या, शेवटी वैताग आला. बरेचदा पात्रांचे चेहरे चिनी-जपानी प्रकारचे, माना वाट्टेलतश्या वळलेल्या, हातांचे बोटे कमिजास्त किंवा चुकीची, असा सगळा घोळ असतो. मी फुकटवाले कॄबु वापरतो त्यामुळे असे होते का ते ठाऊक नाही. कदाचित टर्मिनेटर याविषयी सांगू शकतील.तीन हात वाले फक्त हेच होते, बाकीच्यात किमान चार-चार तरी होते. यातला मागच्या बाजूचा एक हात मी फोटोशॉपमधे मिटवला, पण ते चित्र इथे चढवता आले नाही. २. - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? उत्तरः ती माझी वैयक्तिक आवड आहे. मुळात मला संध्याकाळची वेळ, संध्याकाळची चित्रे लहानपणापासून आवडतात. आकाशातले रंग, ढग, मावळता सूर्य, हळू हळू गडद होणारा आसमंत, लांब सावल्या, इमारतींवर, झाडा-खडकांवर रेंगाळणारे सूर्याचे शेवटले सोनेरी किरण वगैरे अजूनही फार रम्य वाटतात. काहीतरी सरत आलेले, संपत आलेले असल्याची भावना हुरहुर निर्माण करते, ती आवडते. ३. बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? -- मुख्यतः वैय्यक्तिक आवडीमुळेच. ग्रीक-रोमन पुराणकथांवरील महान युरोपियन चित्रकारांची चित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पॅरीस, रोम, फ्लॉरेन्स वगरेच्या संग्रहालयांमधे खजिनेच आहेत त्या चित्रांचे. कितीदाही बघितले तरी दर वेळी त्यात नवीन काहीतरी दिसते. भारतीय पुराणावरील कांगडा, गुलेर, बसौली, बूंदी, किशनगड वगैरे शैलीची चित्रेही अद्भुत वाटतात. लहानपणी बघितलेली 'चांदोबा' तील चित्रे तर फार सुंदर असायची. (त्यामानाने रविवर्मा सामान्य वाटतो) 'भीम-दुर्योधन गदायुद्ध' असा विषय घेऊनच रमलचित्र बनवायचे (१९६० च्या सुमाराचे चांदोबाच्या मलपृष्ठावरील ते चित्र अजून लक्षात आहे), असे ठरवून प्रयत्न केला, ते बरेच कठीण असल्याचे दिसून आले. मुळात 'गदा' ला इंग्रजीत काय म्हणतात तेच ठाऊक नव्हते, Mace हा शब्द सापडला. तो वापरला तर मोठ्ठा घण्/हतोडा येऊ लागला. मग त्यात 'mace with big spherical head' असे केल्यावर नुस्ता साधा दांडा आणि त्यावर गोल फुटबॉलएवढा गोळा. असे करता करता वैताग आला. त्या मानाने 'हेलन ऑफ ट्रॉय' वगैरे युरोपियन विषय घेतले तर फार सुंदर चित्रे बनतात असा अनुभव आला. - मुळात कृत्रीम बुद्धिमता अल्पावधीत ही चित्रे कशी बनवते, हे कुणी जाणकारांनी व्यवस्थित समजावून सांगितले तर कदाचित अशा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश पडेल, आणि मार्ग सापडेल. तोपर्यंत जमेल तशी खटपट करायची. त्याचाही हळू हळू कंटाळा येईल बहुतेक. ४. समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर? -- करून बघा. माझ्यात तेवढा उत्साह उरलेला नाही आता.

In reply to by चित्रगुप्त

गवि 01/07/2024 - 09:47
जेव्हा एखादे शहर कायमचे समुद्रात बुडते तेव्हा एखाद्या तुफानात प्रचंड मोठ्या लाटांनी बुडत नसून अनेक वर्षे हळुहळू पाण्याची पातळी वाढत वाढत ते कणाकणाने पाण्याच्या पातळीच्या खाली जात असावे. तुफानी लाटांनी पाणी शहरात भरले तरी ते ओसरून जाईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 02/07/2024 - 06:25
द्वारका समुद्रात बुडाली ह्याचे वर्णन केवळ दोन तीनच श्लोकांत महाभारतकारांनी केले आहे. तत्सागरसमप्रख्यं वृष्णिचक्रं महर्द्धिमत् | उवाह रथिनां श्रेष्ठः पार्थः परपुरञ्जयः || निर्याते तु जने तस्मिन्सागरो मकरालयः | द्वारकां रत्नसम्पूर्णां जलेनाप्लावयत्तदा || तदद्भुतमभिप्रेक्ष्य द्वारकावासिनो जनाः | तूर्णात्तूर्णतरं जग्मुरहो दैवमिति ब्रुवन् || , याप्रमाणें अर्जुनामागून द्वारकेंतील सर्व माणसें बाहेर पडून वाट चालू लागलीं असतां मागें समुद्रानें आपल्या पाण्यांत रत्नसंपन्न अशी सर्व द्वारका नगरी बुडवून टाकिली. अर्जुन जसा जसा त्या नगरीपासून पुढें पुढें जाई, तसा तसा तो तो नगरीचा भाग समुद्र बुडवून टाकी ! तो अद्भुत प्रकार पाहून द्वारकावासी मंडळी 'काय हो हैं दैव!' असें म्हणत अधिकाधिक वेगानें पुढें जाऊं लागली.

भागो 17/06/2024 - 23:46
बघितली. आता मला सांगा, सर, कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:44
कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे? -- हा प्रश्न कला-निर्मितीशी संबंधित असेल तर केलेली साधना कधीच वाया जात नाही. नवनवीन साधने आत्मसात करत नवनवीन प्रयोग करत रहाण्यातून सृजनशीलतेचे क्षितिज आणखी विस्तीर्ण होत असते. -- मात्र हा प्रश्न कलेतून पैसा मिळवण्यासंबंधित असेल, तर अमूक एका पद्धतीने काम करणारे कलावंत ती पद्धत कालबाह्य झाल्यावर अडचणीत येऊ शकतात. मला स्वतःला आता कलेतून पैसा मिळवायचा नसल्याने माझ्यासाठी नवीन असलेल्या गोष्टी शिकणे खूप आनंददायक आहे. उदाहरणार्थ एकीकडे कृत्रीम बुद्धिमत्तेने निर्माण होणारी कला, तर दर दुसरीकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या युरोपियन चित्रकारांची पद्धत, या दोन्ही नवीन गोष्टी मी शिकतो आहे. गंमत म्हणजे या दोन्हीचे एकत्रिकरण करणेही शक्य, आणि खूप उपयोगीपण आहे.

कंजूस 18/06/2024 - 05:47
जमलं आहे. प्राथमिक प्रयोग एवढं देऊ शकतात आता तर आणखी पाच वर्षांत काय होईल.

पिक्चर मेकर,स्टोरी बोर्ड, स्टोरी बोर्ड प्लस, माया.... ते आज या टप्प्यावर पोहोचायला कित्येक दशके लागली. तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे. तरी सुद्धा सध्यातरी पारंपरिक चित्रकलेला पर्याय नाही. भाषे बरोबर कल्पनेचा विलास मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. बघुया काय पुढे होते ते. दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेले छायाचित्रण आज कुठल्याकुठे पोहचले आहे याची कल्पना रामोजी चित्र सृष्टी बघितल्यावर स्पष्ट कल्पना आली व मानवाच्या सृजन आणी इच्छाशक्तीचे कौतुक वाटले. चित्रगुप्त यांच्यापासून पेर्णा घेवून मी सुद्धा चित्रकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आता १९६० सालच्या कन्यादान चित्रपटातील पी सावळाराम यांनी लिहीलेले गीत बदलायची वेळ आलेली दिसतेय. मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो भेट पहिली अपुली घडता निळी मोहीनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उषेचे भरतो ममस्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्याविण ही तुझी चारुता मावळतीचे सूर्यफूल ते करतो तुझ्या परी तव प्रीतीसरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 23/06/2024 - 23:38
तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.
तुम्ही वर म्हटले तसे घडून आता खूप वर्षे झाली. तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा उगम आणि वाटचाल यातून झाली, त्यालाही आता अनेक दशके उलटलीत. -- आता पुन्हा चक्र उलटे फिरून, आणि काही लोकांकडे अमाप पैसा आल्यापासून पुन्हा प्रासादतुल्य इमारती, हंड्या-झुंबरे, जुनी चित्रे-पुतळे, जुन्या शैलीच्या, उत्तम पॉलिश केलेल्या उंची लाकडाच्या फर्निचरने सजवलेले दिवाणखाने वगैरेची फॅशन येत आहे. इंदुरातील माझ्या परिचयातील दोन (सख्खे भाऊ असलेल्या) चित्रकारांना फ्रेंच प्रासादाबरहुकूम छतावर आणि भिंतींवर भव्य चित्रे, कुटुंबातील व्यक्तींची जुन्या पद्धतीची व्यक्तिचित्रे वगैरे रंगवण्याचे मोठे काम मिळालेले आहे. मी आणि माझ्या मुलाने जुन्या बाजारातून एक ८०-९० वर्षे जुना, मोहोगनी लाकडाचा तुटका सोफा आणून त्याला स्वतः दुरुस्त करून, पूर्वीची कापूस भरलेली गादी काढून टाकून हुबेहुब तशी दिसणारी फोमची गादी घरी बनवून त्यावर जुन्या डिझाईनचे कापड आणून व्यवस्थित बसवले आहे. हे सगळे करायला एक आठवडा लागला. आता लंबक पुन्हा उलट्या दिशेने जाऊ लागला आहे. माझ्यासारख्या 'जुने ते सोने' वाटणार्‍यांसाठी ही समाधानाची बाब आहे.

भागो 18/06/2024 - 09:45
चित्र क्र ६ मला "भरत" च्या चित्राची आठवण आली. ह्या वर्षीच्या मिपाच्या दिवाळी अंकातली चित्रे ही पण अशीच काढली असणार. 3d render, cinematicचा अर्थ फोड करून सांगणार का?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:14
यांचे नेमके अर्थ मलाही ठाउक नव्हते. चित्र बनवताना खाली विविध पर्याय असतात, त्यापैकी वेगवेगळे निवडले तर वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सध्या मी निशुल्क वापरत असल्याने रोजच्या वापरावर मर्यादा आहे, त्यामुळे भरपूर प्रयोग करून बघता येत नाहीयेत. मी अंदाजाने हे दोन पर्याय निवडले होते. बरे झाले तुम्ही अर्थ विचारलात, त्यामुळे मी गुगलून बघितले, ते असे: --- A 3D render is a computer-generated image (CGI) created from a 3D model using specialized software. The process of creating a 3D render is called 3D rendering, and it's the final step in the 3D visualization process. 3D rendering can be used to create photorealistic or artistic images of a variety of scenes and locations, including interiors and exteriors, landscapes, and structures. --- Cinematic AI images are images created using artificial intelligence (AI) to mimic the style of cinematic photography. Cinematic photography is a style that aims to create images with depth and emotion that resemble movie stills.

In reply to by चित्रगुप्त

भागो 18/06/2024 - 17:25
मी जेव्हा 3d शिकत होतो( Blender) ती इमेज आपल्याला तिन्ही अक्सिस मधून फिरवता येते. मला वाटले तस काही आहे कि काय. असेलही. नसेल तर पुढे मागे येईलही. इन जनरल मला राजा रविवर्माची स्टाईल वाटली.

सुरिया 18/06/2024 - 18:26
कितीही एआय आलं. रंगानं हात बरबाटवायचा थांबला, स्काय इज द लिमिट सोडा, ब्रेन इज द लिमिट कमी पडायलं तरी बुढऊ पेंटरबाबू आपला थांबलेला काळ अन फ्यांटस्या सोडायला तयार नाहीत असं दिसतंय. त्याच त्याच बाया अन तीच ब्यागरांडं तर आधी प्यारीसातल्या पेंटिंगात आणि गेलाबाजार चांदोबात बघितल्याच आहेत की. . आर्टिस्ट आहात, अनुभवी आहात अन एआय हाताशी हाय तर बनवा की एखादी कालातीत काहीतरी. उगी तेच तेच काय. एआय प्लस चित्रगुप्त हे कॉबोच कसे हिट्ट वाजले पाहिजे, बाकी स्क्रीप्टा बडवुन छान छान म्हणायला आम्ही हावोतच की.

In reply to by सुरिया

चित्रगुप्त 18/06/2024 - 20:01
@ सुरिया: धन्यवाद. 'बुढऊ पेंटरबाबू' आवडले. आत्ता आठ दहा दिवसांपूर्वी हे माध्यम हाती लागून सुरुवात झाली आहे. अनेक प्रयोग करायचे आहेत. बघूया पुढे काय काय होते. अर्थातच मूळचे तैलरंगात चित्रे रंगवणे थांबवायचे नाहीच. सत्तरीत आल्यावर बालपणीचा 'गुजरा हुवा जमाना' हवाहवासा, पुन्हा जगावासा वाटू लागतो. 'आता नही दुबारा' हे बुद्धीला कळत असले तरी काळाचे चक्र उलटे फिरून आता कालबाह्य/दुर्लभ झालेल्या गोष्टींमधे पुन्हा रमावेसे वाटू लागते, हे नैसर्गिकच असते, आणि ते त्या अवस्थेला पोचल्यावरच कळते. काही अद्वितीय, हटके, (मुद्दाम ओढून ताणून -) 'कालातीत' वगैरे करून दाखवायची, आपण ग्रेट वगैरे आहोत असे सिद्ध करण्याची खाज आणि मानसिक गरज/रुग्णता माझ्यात तरी अजिबात नाही. ज्यांना असेल त्यांनी तसे अवश्य करावे. -- बाकी नवनवीन क्षितिजांचा शोध घेत रहावा हे जरी खरे असले, तरी त्यात स्वतःची म्हणून असलेली आवड ही रहाणारच. त्यात गैर काही नाही. ज्यांना त्यात रस वाटेल त्यांनी बघावे, नसेल त्यांनी सोडून द्यावे. हा.का.ना.का.

चौकस२१२ 18/06/2024 - 19:00
सुरवातीला रोचक वाटले पण तोच तोच पण साहजिक लगेच जाणवतो त्यामुळे काही गोष्टीत वापरता येईल पण पुढे काय? आणि सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:50
मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ
-- खरे आहे. परंतु रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध घेता येत असल्याने त्यांचा उपयोग करून घेत आपली कला परिपूर्ण करायला मदत मिळू शकते, माझा सध्या तोच प्रयत्न आहे.
सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ
सप्तसूर, सव्वीस वा अठ्ठेचाळीस मूळाक्षरे वगैरे सगळेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेनुसार निर्मितीत फरक पडत जातो तसे यातही होईल.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 24/06/2024 - 14:49
नक्कीच प्रयोग करीत राहा ...पण एक चित्रांचा ग्राहक/ आवड असणारा ( मग ते स्थापत्य असो किंवा जाहिरात क्षेत्र असो ) म्हणून आलेली पहिली प्रतिक्रिया होती

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:34
या सगळ्या प्रकारात प्रॉम्ट कसे लिहावे? याची माहिती मिळाली. व्यक्तीला सजवायला, जितके जास्त वर्णन लिहून ठेवले पाहिजे. बाकीचे तपशील साजेसे दिले की चित्र बनते हे समजले. मला यात विचारणा करावीशी वाटते की हे लेखी प्रॉम्ट लिहून देता देता आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का? कोणी असे प्रयोग केले असतील तर ते बघायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:40
आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?
यासाठी बहुत काळापासून फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखीही असतीलच.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:57
प्रॉम्ट कसे लिहावे हाच यात कळीचा मुद्दा आहे. नेमके कोणते शब्द/वाक्य कोणत्या क्रमाने लिहायचे, कोणत्या तांत्रिक बाबी सांगायच्या वगैरेवर मार्गदर्शक लेख, व्हिडियो वगैरे आहेत, ते हळूहळू बघणार आहे. तुम्ही जर काही वाचले-बघितले तर ते इथे अवश्य लिहा. तुमच्या शिवकालीन युद्धतंत्र वगैरेवरील लेखनासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

चौथा कोनाडा 19/06/2024 - 17:22
जबरदस्त चित्रं आहेत ! चिगु साहेबांच्या प्रयोगशीलतेला परिस सापडला आहे.. य लेखाच्या निमित्ताने प्रॉम्प्ट कसे लिहितात, त्यांचा क्रम, योग्य शब्द जुळवणी याची चुणु़क मिळाली ! ही नविन इंटरेस्टींग लेखमाला वाचानिय अ‍ॅज वेल बघणीय होणार यात शंका नाही ! आगे बढो चित्रगुप्त साहेब !

वकील साहेब 24/06/2024 - 12:01
आपण अपलोड केलेल्या एखाद्या फोटो वर आपल्या आदेशानुसार संस्कार करून नवीन इमेज ideogram बनवून देते का ? असेल तर ते कसे साध्य करावे ?

In reply to by चित्रगुप्त

गवि 24/06/2024 - 18:08
आधीच्या फोटोवर, विशेषतः व्यक्तीच्या फोटोवर बेमालूम संस्करण करून नवीन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणे यात बरेच कायदेशीर आणि नैतिक इश्युज आहेत. कोणतीही मुख्य प्रवाहातील लेजिट कंपनी असे फीचर (उपलब्ध असले तरी) वापरायला देणार नाहीत. इतक्यात तरी. पण या तंत्रात प्रवीण असलेले लोक स्वतः खटपट करून तसे बनवत असतातच. यात मुख्य समस्या डीप फेक टाईप व्हिडिओजची आहे. कोणाचे नग्न, बदनामीकारक चित्र किंवा त्याहून वाईट म्हणजे कोण्या समाजाच्या भावना दुखावणारे शब्द तोंडात घालून व्हिडिओ बेमालूम बनवले तर सध्या तरी बरेच मोठे नुकसान होऊ शकते. लोकांना अशा फेक गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल.

वकील साहेब 01/07/2024 - 03:37
Whatsapp अपडेट केलं तर whatsapp च नवीन फिचर असलेली जांभळी रिंग तुमच्या whatsapp च्या होम स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Meta AI नावाची नवीन चॅट बॉक्स ओपन होईल. इथे तुम्ही chat got ला विचारतात तसे अनेक प्रश्न विचारू शकतात. त्याची तात्काळ उत्तरे मिळतात. आणि त्याहून गंमत म्हणजे ideogram सारख्या प्रतिमाही बनवून मिळतात. त्याही अगदी त्वरित. त्यासाठी फक्त एक करायचं promt लिहितांना सुरवातीला फक्त imagine एवढा शब्द लिहायचा बस. Ideogram जसे 4 Result देते तसे meta ai फक्त एकच result देते. पण तोही छान असतो. मी गम्मत म्हणून चित्रगुप्त यांच्या promt कॉपी करून तिथे टाकून पहिल्या. हाती आलेल्या प्रतिमा खूपच छान होत्या. इथे डकवता येत नाहीये. पण तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता.

चित्रगुप्त 01/07/2024 - 07:44
Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे असे दिसले. उदाहरणार्थ मानवाकृती ideogram पेक्षा जास्त चांगल्या येतात. दर दिवशी अमूक इतकी चित्रे असे काही बंधनही नाही, one more version असे लिहीले की पुन्हा आणखी एक नवीन चित्र मिळते. त्यात सुधारणांसाठी पण लिहून पाठवू शकतो, पण नेमक्या त्याच सुधारणा होतीलच असे नाही. काही वेडेवाकडे, चुकीचे पण होते. आधी /image असे लिहून मग इंग्रजीत prompt लिहायचा आणि मेसेज पाठवायचा.मिनीटभारात एक चित्र येते. मात्र ते चौरसाकारच असते. लांबट उभे वा आडवे मिळत नाही.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 01/07/2024 - 09:14
दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे ? ( जरी भाऊ असले तरी ) तुम्ही इनपुट काय दिले होते ? एकाला ३ रा हात? आणि काही - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? -बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 01/07/2024 - 16:21
तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. १. चेहरे कसे येतील यावर आपले काहीही कंट्रोल नाही (मलातरी जमलेले नाही) हे जे गदायुद्धाचे चित्र इथे दिले, त्यासाठी अनेकदा प्रॉम्प्ट बदलून जी चित्रे येत गेली, त्या सर्वात काही ना काहीतरी चुका होत्याच, शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले. कशात दोघांना चारचार हात, चार गदा, कशात गदांना दोन्हीकडे गोलाकार डोकी (किंवा जे काही म्हणतात ते) गदा वाट्टेल तश्या धरलेल्या, शेवटी वैताग आला. बरेचदा पात्रांचे चेहरे चिनी-जपानी प्रकारचे, माना वाट्टेलतश्या वळलेल्या, हातांचे बोटे कमिजास्त किंवा चुकीची, असा सगळा घोळ असतो. मी फुकटवाले कॄबु वापरतो त्यामुळे असे होते का ते ठाऊक नाही. कदाचित टर्मिनेटर याविषयी सांगू शकतील.तीन हात वाले फक्त हेच होते, बाकीच्यात किमान चार-चार तरी होते. यातला मागच्या बाजूचा एक हात मी फोटोशॉपमधे मिटवला, पण ते चित्र इथे चढवता आले नाही. २. - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? उत्तरः ती माझी वैयक्तिक आवड आहे. मुळात मला संध्याकाळची वेळ, संध्याकाळची चित्रे लहानपणापासून आवडतात. आकाशातले रंग, ढग, मावळता सूर्य, हळू हळू गडद होणारा आसमंत, लांब सावल्या, इमारतींवर, झाडा-खडकांवर रेंगाळणारे सूर्याचे शेवटले सोनेरी किरण वगैरे अजूनही फार रम्य वाटतात. काहीतरी सरत आलेले, संपत आलेले असल्याची भावना हुरहुर निर्माण करते, ती आवडते. ३. बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? -- मुख्यतः वैय्यक्तिक आवडीमुळेच. ग्रीक-रोमन पुराणकथांवरील महान युरोपियन चित्रकारांची चित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पॅरीस, रोम, फ्लॉरेन्स वगरेच्या संग्रहालयांमधे खजिनेच आहेत त्या चित्रांचे. कितीदाही बघितले तरी दर वेळी त्यात नवीन काहीतरी दिसते. भारतीय पुराणावरील कांगडा, गुलेर, बसौली, बूंदी, किशनगड वगैरे शैलीची चित्रेही अद्भुत वाटतात. लहानपणी बघितलेली 'चांदोबा' तील चित्रे तर फार सुंदर असायची. (त्यामानाने रविवर्मा सामान्य वाटतो) 'भीम-दुर्योधन गदायुद्ध' असा विषय घेऊनच रमलचित्र बनवायचे (१९६० च्या सुमाराचे चांदोबाच्या मलपृष्ठावरील ते चित्र अजून लक्षात आहे), असे ठरवून प्रयत्न केला, ते बरेच कठीण असल्याचे दिसून आले. मुळात 'गदा' ला इंग्रजीत काय म्हणतात तेच ठाऊक नव्हते, Mace हा शब्द सापडला. तो वापरला तर मोठ्ठा घण्/हतोडा येऊ लागला. मग त्यात 'mace with big spherical head' असे केल्यावर नुस्ता साधा दांडा आणि त्यावर गोल फुटबॉलएवढा गोळा. असे करता करता वैताग आला. त्या मानाने 'हेलन ऑफ ट्रॉय' वगैरे युरोपियन विषय घेतले तर फार सुंदर चित्रे बनतात असा अनुभव आला. - मुळात कृत्रीम बुद्धिमता अल्पावधीत ही चित्रे कशी बनवते, हे कुणी जाणकारांनी व्यवस्थित समजावून सांगितले तर कदाचित अशा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश पडेल, आणि मार्ग सापडेल. तोपर्यंत जमेल तशी खटपट करायची. त्याचाही हळू हळू कंटाळा येईल बहुतेक. ४. समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर? -- करून बघा. माझ्यात तेवढा उत्साह उरलेला नाही आता.

In reply to by चित्रगुप्त

गवि 01/07/2024 - 09:47
जेव्हा एखादे शहर कायमचे समुद्रात बुडते तेव्हा एखाद्या तुफानात प्रचंड मोठ्या लाटांनी बुडत नसून अनेक वर्षे हळुहळू पाण्याची पातळी वाढत वाढत ते कणाकणाने पाण्याच्या पातळीच्या खाली जात असावे. तुफानी लाटांनी पाणी शहरात भरले तरी ते ओसरून जाईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 02/07/2024 - 06:25
द्वारका समुद्रात बुडाली ह्याचे वर्णन केवळ दोन तीनच श्लोकांत महाभारतकारांनी केले आहे. तत्सागरसमप्रख्यं वृष्णिचक्रं महर्द्धिमत् | उवाह रथिनां श्रेष्ठः पार्थः परपुरञ्जयः || निर्याते तु जने तस्मिन्सागरो मकरालयः | द्वारकां रत्नसम्पूर्णां जलेनाप्लावयत्तदा || तदद्भुतमभिप्रेक्ष्य द्वारकावासिनो जनाः | तूर्णात्तूर्णतरं जग्मुरहो दैवमिति ब्रुवन् || , याप्रमाणें अर्जुनामागून द्वारकेंतील सर्व माणसें बाहेर पडून वाट चालू लागलीं असतां मागें समुद्रानें आपल्या पाण्यांत रत्नसंपन्न अशी सर्व द्वारका नगरी बुडवून टाकिली. अर्जुन जसा जसा त्या नगरीपासून पुढें पुढें जाई, तसा तसा तो तो नगरीचा भाग समुद्र बुडवून टाकी ! तो अद्भुत प्रकार पाहून द्वारकावासी मंडळी 'काय हो हैं दैव!' असें म्हणत अधिकाधिक वेगानें पुढें जाऊं लागली.
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

मारवा ·

In reply to by आंद्रे वडापाव

समर्थन कारण सर्वच माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नसतात. मायथॉ़ईतील कथा अर्धवट उचलुन त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ लावणे हे काही मोजक्या लोकांचे टूलकिट आहे. खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण कथा वाचतात , आणि त्यातील भावार्थ समजुन घेतात . सगळ्यांना जमतेच असं नाही, जमलं पाहिजे असेही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सहमत भारतातील आपल्यासारखे खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण बकरी ईद ची कथा वाचून , आणि त्यातील भावार्थ समजुन घेवुनचं, त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ न लावता ...सोशल मीडियावर वावरत, माणसा माणसात प्रेम वाढवण्याचे नागपुरी मंत्र तंत्र (टूलकिट) वापरताना रोज पाहतोच आहोत.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 12:25
तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.
अ ति श य स्तुत्य !

सर टोबी 17/06/2024 - 12:28
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.

टर्मीनेटर 17/06/2024 - 13:50
स्त्युत्य उपक्रम? पेटा इंडियाचा प्रसिद्धीचा सोस?, कि नवीन 'टूलकिट'? पेटा इंडियाने पेश केलेल्या 'दावत-ए-ईद' ह्या उपक्रमाच्या हेतू विषयी शंका घेण्यास वाव आहे. गेल्या अडीच दशकात जगातलया अनेक विकसित/अविकसित देशांना अधून मधून आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही किंचित मंद वेगाने असली तरी सातत्याने शाश्वत वाढ नोंदवत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत खोडा घालण्यासाठी तसेच भारताच्या पायाभूत विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संघटना, एनजीओ'ज चा समावेश असलेली इको-सिस्टीम सतत कुठली ना कुठली आंदोलने/अभियाने/उपक्रम राबवून देशात अराजकता माजवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कधी ते धरण किंवा पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांना विरोध, कधी बोगस शेतकऱ्यांचे आंदोलन, कधी सीएएचा विरोध तर कधी पर्यावरण /प्रदूषणाच्या नावाखाली 'दिवाळीत फटाके फोडू नका' सारखा कानांना सुखावेल असा प्रचार. सदर 'दावत-ए-ईद' हा उपक्रम देखील ह्याच पठडीतला वाटतोय. भूतदया, नितिमत्ता वगैरेचा मुलामा चढवून 'प्राणिहत्या' करू नका वगैरे संदेश ऐकायला छान वाटतो. त्याला शाकाहारी, वेगन (आणि कट्टर मुस्लिम विरोधी विचारसरणीच्या) लोकांचा पाठिंबाही भरपूर मिळेल, आणि असले विचार प्रत्यक्षात आल्यास शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या गरीब शेकऱ्यांचे संभाव्य नुकसान आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम होईल ह्याविषयी अनभिद्न्य असलेले भोळेभाबडे लोक नकळतपणे त्याचा उस्फूर्तपणे फुकट प्रचारही करतील! भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय पशुधन अभियान' (National Livestock Mission - NLM) अंतर्गत कमाल ५० लाखांपर्यंतचे अनुदान, एक कोटी पर्यंतचे कर्ज अशा योजनांचा लाभ घेऊन देशभरातल्या असंख्य लहानमोठ्या शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालनास सुरुवात केली आहे. आपल्या पशुधनाची देखभाल करताना चारा व्यवस्थापन, रोगराई-आजार, बँकेच्या कर्जाचे हप्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत, खास ईदच्या कुरबानीसाठी विक्री करून चांगला मोबदला मिळून नफ्यातोट्याचे गणित जमून येईल ह्या आशेवर वर्ष-दोन वर्ष भर मेहनतीने पोसून तयार केलेल्या बोकडांची मागणी घटली तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? 'पेटा इंडिया' त्यांच्या आणि पर्यायाने बॅंकेच्या होणाऱ्या काही हजार कोटींच्या नुकसानीची भरपाई करेल का? कि नुकसानीत गेलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपला नेहमीचा आत्महत्येचा पर्याय स्वीकारायचा? आपण लेखात म्हंटले आहे,
एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला.
मग भारतात हा आकडा किती असेल? निदान पाकिस्तानातल्या '४.१६ अब्ज डॉलर्स' ह्या आकड्यापेक्षा नक्कीच जास्त असेल! अर्थात उत्सवप्रेमी भारतीय असल्या प्रचाराला भीक न घालता दणक्यात आपापले धर्मिक सण-उत्सव साजरे करतात हि गोष्ट आपल्या प्रवाही अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक असल्याने फार काही काळजी करायचे कारण नाही, पण अर्थकारणाला अपायकारक अशा प्रचाराचा आपण एक भाग होऊ नये अशी सदिच्छा! शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेल्या आमच्या बिरुटे सरांची 'अतिशय चांगला. स्तुत्य उपक्रम.' अशी प्रतिक्रिया वाचून खरंतर धक्का बसला होता, पण त्यांनीच दिलेला 'आपण प्रबोधनाचे काम करत राहायचे' ह्या मंत्राचे स्मरण झाल्याने हा प्रतिसाद प्रपंच. इति लेखनसीमा.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 17:02
हेच तर्कशास्त्र वापरून… माणसाला हानिकारक तंबाखू किंवा दारू उद्योग बंद करणं कुणालाही शक्य झालं नाही. सगळ्यांना माहिती आहे, की मानवजातीला पडणारी एकूण किंमत ही त्या उद्योगात कार्यरत असलेल्या घटकांच्या आर्थिक लाभापेक्षा कैक पट जास्त असेल. या कारणासाठी सगळीकडे धूम्रपान, मद्यपान कमी व्हावे यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्था प्रयत्न करतात. त्यालाही टूलकीट म्हणावे काय? इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? पण मग हे मानवाला अपायकारक म्हणून सिध्द झालेले उद्योग चालूच ठेवले तर, दवाखानेही उत्तम चालतात, त्यांचे उत्पन्न वाढते, परिणामी अर्थव्यवस्थेला सतत वाढ मिळत राहते. अर्थस्य पुरुषो दास: असे महाभारतात भीष्म का कुणीतरी म्हटले आहेच. सबब सर्व मानवजात सुखाने जगावी यासाठी अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:17
"अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या दोन प्रश्नांची 'अ' आणि 'ब' अशा दोन प्रकारे उत्तरे देता येतील त्यातले जे पटेल ते घ्यावे, चॉईस इज युअर्स... 😀 अ) पूर्णपणे शुद्धीत, वास्तवाचे भान असलेल्या आणि आधुनिक जीवनशैलीशी एकरूप झालेल्या व्यक्तीसाठी 'अर्थशास्त्रा'चा हवाला देऊन उत्तरे द्यायची झाल्यास : १) अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशातली 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दोन वर्गांतली सामाजिक दरी बुजवण्यासाठी, गेला बाजार ती कमी करून १००% जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा भागवून सर्व सामाजिक घटकांना एक समाधानकारक जीवनशैली मिळावी ह्यासाठी "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे!" आणि, २) "मानवी इच्छा अमर्याद आहेत आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने मर्यादित आहेत." हा अर्थशास्त्रीय नियम लक्षात घेऊन, देशातल्या सर्व जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर, अन्य इच्छा आणि आकांक्षा ज्या अर्थशास्त्रात 'मानवी इच्छा' (Human wants) म्हणून ओळखल्या जातात, त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती/उपलब्धता वाढवण्यासाठी संसाधनांच्या उपलब्धतेत वाढ करून त्यांच्या मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन साधत गेल्या कित्येक दशकांपासून भारताला चिकटलेला 'विकसनशील' हा स्टेटस बदलून तो 'विकसित' असा होऊन जनतेचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी "अर्थव्यवस्थेला सतत वाढतच रहावे लागेल!" ब) 'कार्ल मार्क्स' छाप नशेची गोळी घेऊन बधिर झालेला मेंदू आणि मिटल्या डोळ्यांनी कल्पनेतल्या जगात वावरण्यातून वास्तवाचे भान सुटलेल्या व्यक्तीसाठी उत्तरे द्यायची झाल्यास : १) "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का?" ह्या प्रश्नाचे एका शब्दातले, साधे सोपे उत्तर "नाही" असे आहे. आणि, २) मुळात संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्था वाढवण्याची नसती उठाठेव करण्याची गरजच नसल्याने, "तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या प्रश्नाचे दोन शब्दांतले उत्तर "अजिबात नाही" असे आहे. (वरील दोन्ही प्रकारची उत्तरे हि माझी अल्पमती आणि अर्थशास्त्राचे जुजबी ज्ञान ह्यावर आधारित असल्याने पटली तर घ्या, नाहीतर केराच्या टोपलीत टाका. हाय काय अन नाय काय 😀) बाकी आपल्या प्रतिसादातील तंबाखू आणि दारूचा मुद्दा रास्त आहे, त्याबद्दल दुमत नसले तरी ते 'शौक, मौज, व्यसन' प्रकारात मोडत असल्याने त्याला आणि जगातल्या बहुसंख्य लोकांचा आहार, म्हणजे पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या अन्नाला एकच मोजपट्टी लावणे किंवा एकच तर्कशास्त्र वापरणे काही योग्य वाटत नाही! असो, आमच्या बिरुटे सरांच्या शब्दांत सांगायचे तर "सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच." त्याला काही इलाज नाही, आणि आमचे ह.भ.प. , पपू , श्री श्री श्री मुक्तविहारी महाराज डोंबिवलीकर त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात कि, "मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत"! ह्या दोन्ही सिद्धपुरुषांच्या सिद्धवचनांवर दृढ विश्वास असल्याने अधून-मधून अशी मत-मतांतरे व्यक्त करण्यास मनोबल मिळत असते. चालायचेच, मिपा, मिपाकर आणि बिरुटे सर आपलेच आहेत! (समाजातल्या तळागाळातील लोकांशी नाळ न तुटलेला आणि 'टूलकिट' गॅंगविषयी सावध असलेला, संवेदनशील हौशी शेतकरी) - टर्मीनेटर.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 22:19
सर, आपण सर्वप्रथम माणसांचे वर्गीकरण केले आहे, आणि मग त्या त्या गटाच्या दृष्टिकोनातून प्रश्नाचा विचार केला आहे. असं का, ते समजलेलं नाही. अर्थशास्त्रातलं मलाही फार कळतं असं नाही, पण ज्या अर्थी त्याला शास्त्र समजलं जातं, त्याअर्थी कोण प्रश्न विचारतो, याला महत्व नाही. शास्त्र हे विचारणार्याच्या निरपेक्षच उत्तर देणार. असो. तर जर आपण भारताचा विचार केला तर, आपली अधिक महत्वाची समस्या वाढीची आहे का वितरणाची याचा विचार करावा लागेल. आपल्याकडे दिवसाला ३००- ५०० रु मजूरी, तीही रोज नाही, मिळवणारे मनरेगाचे मजूर आहेत आणि दिवसाला ५ लाख कमावणारे सर्वोच्च न्यायालयातले वकीलही आहेत आणि ज्यांचा पैसाच त्यांच्यासाठी अहोरात्र काम करून दिवसाला करोडो रूपयांची भर घालतो असे महा-उद्योजकही आहेत. त्यांची भूक अधिक मोठ्या प्रकल्पांची, जीडीपीच्या वाढीची आहे आणि त्यांचे धोरणांवर वर्चस्व आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. तर वाढ ही त्यांना पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अर्ध्यापासून आज ३ ट्रिलीयन वगैरे झाली तरी मनरेगाचे मजूर प्रचंड प्रमाणात आहेतच. त्यांच्यापर्यंत समृध्दी या वाढीच्या प्रमाणात पोहोचलेली नाहीच. आज जे देश विकसित आहेत, तिथे समाजात एवढी टोकाची विषमता नाही, हे तर सहजच दिसते. लोकांना आता समजत आहे की मोठ्या चमकदार घोषणा व मेगा प्रकल्प करून आपल्याला काही मिळत नाही, रोजचा संघर्ष काही कमी होत नाही. त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:27
त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.
म्हणजे सोप्या भाषेत मध्यमवर्गीयांकडून, त्यांची पांढरी संपत्ती - घरे, वाहने, सोनेनाणे, एफडी वगैरे काढून घेऊन ती तथाकथित दारिद्र्यरेषेखालील लोकांना देऊन टाकणे! "संपत्तीचे वितरण" याचा याहून वेगळा काही अर्थ असेल तर तो आम्हा मिपामरांना समजेल असा स्पष्ट करून सांगावा.

In reply to by कांदा लिंबू

भागो 18/06/2024 - 06:09
जो झोपला आहे त्याला जागे करता येतं पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला कसे जागे करणार? हा जोक आधीच येऊन गेला आहे. तुम्ही पण "यमे यंटायर यिकनामिक्ष" केलेले दिसतंय.

In reply to by भागो

स्वधर्म 18/06/2024 - 14:38
मध्यमवर्गियांची संपत्ती काढून वगैरे मी कुठेही लिहिले नाही. महाउद्योजक असे म्हटले होते. त्यांना बॅंकांनी हेअरकटच्या नावाखाली प्रचंड कर्जमाफी दिलेली आहे. विकासाचे नांव घेऊन प्रकल्पाच्या जमिनी नगण्य भावाने आंदण दिल्या आहेत. मी लिहिलेले महाउद्योजक वगैरे अत्यंत सोईस्कररित्या दुर्लक्षित करून मध्यमवर्गीय असा शब्द घुसडण्याला काय म्हणणार? खरंच झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.

In reply to by चौकस२१२

स्वधर्म 18/06/2024 - 22:24
त्यावर काय बोलणार? आपल्याला न पटणारा मुद्दा आला, की तो एकदम ताणून चुकीचा दाखवता येतो. ही एक सामान्य युक्ती आहे. पण गोरगरीब जनतेच्या तुलनेत महाउद्योजक हे सरकारवर आपल्याला हवे तसे धोरण बनवण्यासाठी अधिक प्रभाव टाकू शकतात, हे तर सहज दिसून येते. ही वस्तुस्थिती आपण नाकारता आहात का? हे सांगा. अगदी साधी उदाहरणं आहेत हो, फक्त पहायला पाहिजे. मागे त्या विश्वास पाटील या लेखक अधिकार्याने निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ३५ एक प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आयुष्यभराच्या कार्यक्षमतेपेक्षा ५० पट कार्यक्षमता दाखवली होती त्याने. अंगणवाडी सेविका मात्र १००० - ५०० रूपयांची वाढ मागण्यासाठी वर्षभर आंदोलने करत आहेत. जाईल तिकडे सामान्य माणूस नाडला जातो, आणि बड्या धेंडांची काम चुटकीसरशी होतात, याचा अनुभव आला नाही का तुंम्हाला कधीच?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 18/06/2024 - 15:22
ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांनी नंदा खरे यांचा २०१७ मधला हा लेख जरूर वाचावा. https://www.loksatta.com/lokrang/lekha/violence-after-conviction-of-baba-gurmeet-ram-rahim-singh-1542623/

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 15:40
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.
जगाची इमानदार आणि काफिर अशी विभागणी करणारा आणि काफिरांना अस्तित्वहक्क नाकारणारा "मुसलमान हा धर्म मूळचा समतावादी" असे म्हणणारा लेख मिपावर लिंक देण्याच्या लायकीचा आहे का?

In reply to by कांदा लिंबू

स्वधर्म 18/06/2024 - 22:32
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात? लेखाचा मूळ विषय काय? संदर्भ काय? बाकी ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांच्यासाठीच तो लेख दिला होता. त्यामुळे, तुंम्ही द्या सोडून विषय सर. आपल्याला कसं अगदी सगळं सकारात्मकच हवं. सत्याचा त्याच्याशी संबंध नसला तरी चालेल.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 19/06/2024 - 05:04
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात?
हे तुम्ही तो लेख लिहिणाऱ्यांना म्हणताय ना? बरोबर आहे, ते त्यांना लागू आहे. यावरूनच कळून येते लेखात काय कन्टेन्ट असणार आहे.

In reply to by कांदा लिंबू

भागो 20/06/2024 - 09:00
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.>>> कारण हे सगळे मुळचे हिंदूच आहेत.

In reply to by स्वधर्म

चौकस२१२ 20/06/2024 - 04:58
इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? येथे खान्यासाठी प्राण्यांची हत्या होते आहे , हे तर नेहमीच होते मग ते सणा मुळे असो किंवा इतर दिवशी ,, फरक काय?

In reply to by टर्मीनेटर

आग्या१९९० 17/06/2024 - 18:02
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याचेही आकडे येऊ द्या. उगाच भाकड गाई सांभाळण्यावर शेतकऱ्यांचा खर्च होतो.

In reply to by आग्या१९९०

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:59
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याविषयीची निश्चित आकडेवारी मलातरी कुठे दिसली नाही, पण ह्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गायी आणि निरुपयोगी बैल मोकाट सोडून दिल्याने ही मोकाट गुरेढोरे गायपट्ट्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्याच्या अनेक बातम्या काहीवर्षांपूर्वी वाचल्या होत्या. २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने ह्या मुद्द्याचे भांडवल करून आपल्या प्रचारात त्यावरून प्रचंड काहुरही माजवले होते. पण तरी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांचे सरकार बहुमताने निवडून आल्याने हा मुद्दा निष्प्रभ ठरला होता असे म्हणता येईल. बाकी भाकड गायींमुळे शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याची कल्पना नसली तरी अशा गायी, बैलांचा आनंदाने स्वीकार करून कित्येक गोशाळांनी त्यांचा सांभाळ करतानाच त्यांच्या मलमूत्रापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु करून स्वतःच्या आणि आसपासच्या अनेक गरीब कुटुंबांची स्वयंपाकासाठीच्या इंधनाची गरज भागवल्याचे, ONGC शी केलेल्या सहकार्य करारातून CNG निर्मिती सुरु केल्याचे तसेच वीजनिर्मिती प्रकल्प, बायोगॅस स्लरी, गायीच्या शेणापासून कंपोस्ट, गांडूळ खत अशी सैंद्रीय खते आणि धूप, उदबत्ती व रंग अशा अनेक गोष्टींचे उत्पादन आणि विक्री असा फायदेशीर व्यवसाय आणि त्याद्वारे रोजगार निर्माण केल्याच्या यशोगाथा वाचल्या आहेत, असे कित्येक प्रेरणादायी व्हिडीओज युट्युबवरही पाहायला मिळतात. समस्येत संधी शोधून सेवाभावी कार्यातूनही आर्थिक लाभ मिळू शकतो हे दाखवणाऱ्या अशा गोशाळांच्या सर्जनशीलतेस सलाम! आणि धागाविषय भरकटवणे हा उद्देश नसला तरी माझ्या दोन प्रतिसादांतून थोडे अवांतर झाले असल्याने धागा लेखकाची मनापासून क्षमा मागतो 🙏

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 18/06/2024 - 16:36
लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... एकूण खालेलं प्राणी मगर, ससा, शहामृग, हरीण , बैल / गाय कबुतर , तितर ( क्वेल ) टर्की ,बेडूक शन्ख , ईल , साप ( बहुतेक सापच आठवत नाही ४ पेग झाले होते चीन मध्ये तेवहा ) ऑकटोपस, तिसऱ्या , लॉंगस्टीन , कच्चे मासे , कॅट फिश , कलामारी इत्यादी याशिवाय मेंढा / बकरी . बोकड / शेळी / डुक्कर हे आहेच

In reply to by टर्मीनेटर

प्रतिसाद वाचायला सुरुवात केली आणि पुढे ते टुलकिट वगैरे वाचलं आणि पुढे काही वाचू नये असं ठरवलं. पण, प्रतिसाद चाळता चाळता तळटीपेकडे येतांना आमची आठवण झाल्यामुळे दोन शब्द लिहावे वाटले. बाकी, सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच. स्वागत. कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, कोणाला मजुरांची आंदोलन बोगस वाटतात, कोणाला विद्यार्थ्यांची आंदोलने बोगस वाटतात, कोणाला अंगणवाडी स्त्रियांची आंदोलने बोगस वाटतात, धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, गरिब, शोषित पिडित, हक्कासाठी लढणा-या लोकांची आंदोलने काहींना बोगस वाटू शकतात. अगदी शांततापूर्ण आणि जगाच्या प्रगतीच्या वाटेत देश अगदी विकासाच्या अग्रक्रमात भारत देश अगदी टॉपवर असतांना अशी ही सगळी आंदोलनजीवी जनता देशाच्या प्रगतीत खोडा घालणारी, अराजकता माजवणारी आहे असेही वाटू शकतं. टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. आपल्याबद्दल लिहित नाही. पण, अशा विचार करणा-या लोकांचं हल्ली अजिबात आश्चर्य वाटत नाही. अशा, संवेदनहीन जनतेचं, किंवा अशा संवेदना गमावलेल्या लोकांचा समुहाचा, वृत्तीचा, विचारांचा खरंच तळागाळातील लोकांशी काही थेट संबंध येत असेल याची अजिबात शक्यता वाटत नाही. आणि असा कोणताही संबंध येत नसल्यामुळे अशा समुहातील लोकांना हे सगळं खोटं नाटं वाटू शकतं. दिवाळीत फटाके फोडणा-यांमुळे बिचा-या कंपनीचं किती नुकसान होत असेल. फटाक्यामधील दारु-गोळा भरणा-या किती तरी मजूरांवर उपासमारीची वेळ येत असेल. सालं ते फटाक्याचा आवाजात हा विचार आलाच नाही. देशी-विषारी दारु बनविणा-या आणि त्यामुळे मरण पावणा-या लोकांपेक्षा त्या हातभट्टीचं किती आर्थिक नुकसान होतं हा विचार मनात आलाच नाही. तद्वतच, देशभरातील हजारो लाखो शेतकरी 'कुरबानीच्या' निमित्ताने बोकडांचे उत्पन्न घेतात आणि त्यामुळे होणा-या करोडो अब्जोंनी नुकसान होणा-या शेतक-यांचा विचार आमच्यासारख्या शेतक-यांविषयी कळवळा असणा-याच्यां मनात येऊ नये, हे फार दु:खदायक आहे. आम्ही सालं, ते विदा नसल्यामुळे शेळीपालन म्हणजे फ़क्त जोडधंडा, रोजगार, मांस, दूध, खत, वगैरे इतकंच समजत होतो. पण, 'कुरबानीमुळे' होणारं देशाचं आणि शेतक-यांचं आर्थिक नुकसान लक्षात आलंच नाही, लक्षात आणून दिल्याबद्दल किती आभार मानू....! ;) ' कुरबानी कुरबानी' -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संवेदना ई.व्ही.एम. मशीन वर मोजतात का हो सर ? कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. =)))) दुत्त दुत्त, ह्या उजव्या विचारसरणीच्या लोकांन्ना हार्टच नसतं मुळी =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 18/06/2024 - 19:06
कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. ,,,,, ++++

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ 18/06/2024 - 16:44
कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, प्रामाणिक असते तर शीख धर्माचे ध्वज नसते आणि सर्व राज्यात तेवढेच जोर लावून असते पंजाब आणि हरयाणात का? धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, आंदोलनाच मूळ हेतू केवळ विरोधात विरोध दिस ला म्हणून , भारताचं ऊर्जा गरजेवर काही उत्तर नाही ,, ( अरुंधती रॉय सारखया महान विचारवंतांना एकदा भर सभेत हा प्रश्न विचारला मी कि तुमचे आंदोलन विस्थापितांची नुकसान भरपाई व्हावी रस्ताही आह की उद्योग वाढूच नयेत या साठी आहे ? टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. हो कधी कधी वाटते ... का वाटू नये , अर्थात या प्रतिसादवार प्रोफेसर " ऑस्ट्रेल्यात आंदोलने होतात का हो असले फालतू प्रश्न विचारतील यात शंका नाहीच संवेदना गमावलेल्या ओह ओके तर प्रश्न विचारला कि संवेदना गमावलेला का बाकी कुर्बानी कुर्बानी म्हणाल तर आमचच्या डोक्यात एकाच ती म्हणजे झीनत बेगम ची

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:31
१. तुम्ही दिलेले विकी पान म्हणते -
... स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला.
तुम्ही दिलेले पेटा चे पान म्हणते -
इस्लाम प्राण्यांबद्धल दयाळूपणा शिकवतो. Islam Teaches Kindness to Animals
दोन्ही विधाने १८० अंशात परस्परविरोधी आहेत. काहीतरी एक निश्चित करा मग पुढे बोलता येईल. २. भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेने नागरिकांना प्रार्थना स्वातंत्र्य दिलेले आहे. इस्लाममध्ये जर मेंढा / बोकड आदी प्राण्यांची कत्तल करण्याची आज्ञा दिलेली असेल तर त्याचे पालन करण्यात बेकायदेशीर काय आहे?

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 18:59
1-सर्वप्रथम तुम्ही जी विसंगती दाखवलेली आहे ती पूर्णपणे मान्य आहे 2-प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. 3-मुळात सर्व धर्म हे माणसांनी स्वतःसाठी बनवलेली साधने आहेत त्याचप्रमाणे सर्व तत्त्वज्ञाने सर्व विचार सरणी या मानवनिर्मित आणि मानवाच्या जगण्यास सुसह्य करण्यासाठी विकसित करण्यासाठी आहे 4-कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? 7-हिंदू धर्मातही चाळणी लावण्यासाठी .कलीवर्ज्य सारखी अधिकृत व्यवस्था होती. 8-कुठला भाग कालबाह्य कुठला काल सुसंगत यात मतभेद अर्थातच राहणार राहतील पण प्रक्रियेला चालू ठेवण्यात अडचण काय ,? 9-मतभेद तर उलट स्वागतारहच आहेत. त्यानेच पुढची दिशा स्पष्ट होईल.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/06/2024 - 19:45
प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. हे विधान भयानक पाखंडी आहे आणि असे विधान केल्यास इस्लामी देशात आपल्याला केवळ मृत्युदंड एवढीच शिक्षा आहे. Islam means “submission to the will of God” इस्लाम चा अर्थच असा आहे कि अल्लाच्या इच्छेपुढे समर्पण. आता अल्ला ची इच्छा काय आहे याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कर्मठ आणि मागासलेल्या मुल्ला मौलवींच्या हातात असल्यामुळे त्या धर्मात कोणतीही सुधारणा संभवतच नाही. यामुळे त्या धर्मात गेल्या १४०० वर्षात फारशा सुधारणा झालेल्या नाहीत आणि होण्याची शक्यता पण नगण्य आहे. कारण कुराण हे सार्वकालिक सत्य च आहे आणि त्यात एक अक्षराचाही बदल संभवत नाही अशीच इस्लामिक जगताची भावना आहे. आम्ही म्हणू तोच आणि तेवढाच धर्म असे असल्यामुळे इस्लामच्या इतर शाखांबरोबर सुद्धा त्यांचा सलोखा नाहीच. सुन्नी लोक तर अहमदिया किंवा बहाई अथवा बोहरी या लोकांना मुसलमान मानतच नाहीत आणि त्यांची सर्रास कत्तल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शिया आणि सुन्नी यातील संघर्ष कायम चालूच असतो आणि यामुळेच जगभर सर्वच धर्माबरोबर त्यांचे कायमच संघर्ष होत आलेले आहेत. ४८ इस्लामिक देशांपैकी कोणत्याही इस्लामी देशात इतर धर्माला थारा नाहीच. आणि इस्लामला लोकशाही मान्यच नाही. त्यामुळे आपण लिहिलेले खालील मुद्दे बादच होतात ४) कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे. कुराण मध्ये काहीही त्याज्य नाही त्यामुळे कालबाह्य भाग टाकून देणे हे सर्वथा अशक्य आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? कुराण मध्ये विसंगती नाहीच कारण ती अल्ला चीच इच्छा आहे आणि त्यात कोणताही बदल संभवतच नाही.

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:39
खरोखरच स्तुत्य उपक्रम. सर्वच धर्मांमधल्या पशुहत्या बंद व्हाव्यात.
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.
Islam Teaches Kindness to Animals
पिटाचे आवाहन इस्लामचे पालन करणाऱ्यांना आहे हे तिथे स्पष्ट लिहिले आहे; त्यात काफिरांच्या प्रार्थनापद्धतींना ओढण्याचे कारण नाही. पान वाचून पहा, "इस्लाम सांगतो म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश आहे; "माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश नाही. म्हणून हे सारे पिटाचे (खरेखोटे जे काही असेल ते) प्रकरण काफिरांना लागू नाही.

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 19:09
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे. जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही. जे करत आहे त्यांची मूळ प्रेरणाच हे करण्यामागची धर्म आहे तर अशा व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच त्यांच्याच धर्मातील विरोधी तत्वे दाखवून देणे हे एकदम समर्पक आणि सुयोग्य असे आहे

In reply to by मारवा

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:33
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे.
म्हणजे जे इस्लाम मानतात ते, "माणुसकी म्हणून अमुक करा" या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत की काय? काय म्हणताय?
जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही.
"जे मुळातच काफिर आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही." असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नास्तिक ही हिंदू धर्म विचारातील एक विशिष्ट कल्पना आहे. सदर संदर्भात तिचा काही संबंध नाही.

मारवा 17/06/2024 - 16:42
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:59
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो
१. मान्य आहे. मागे घेतो. पण इतर कुणाला फारश्या त्रासदायक न ठरणाऱ्या अश्या एखाद्याच्या प्रार्थना पद्धतीत बदल करण्याचे आवाहन नैतिकदृष्ट्या ठीक आहे का? --- कोणते आवाहन ऐकून कुणी मांसाहार करणे थांबवत नाही. पिटाने, त्यांना खरंच भूतदया असेल तर हलाल पद्धतीने प्राणी मारण्याऐवजी झटका पद्धतीने प्राणी मारले जावेत याचा पुरस्कार करावा, ते जास्त व्यावहारिक + नैतिक होईल. २. पहिल्या मुद्यावरही वाट पाहतो.

एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे हे पेटा वाले बक्र्यांची कुठून सुटका करणार आहेत?

नठ्यारा 18/06/2024 - 13:25
लोकहो, इस्लामिक कट्टरपणास पर्याय उपलब्ध करवून दिल्याबद्दल पेटावाल्यांचं अभिनंदन. अब्राहमने मेंढा मारला म्हणून प्रत्येक मुसलमानाने मारलाच पाहिजे, हा कुठला न्याय? हा अरबस्थानात वगैरे ठीके. भारतात कशाला पाहिजे? त्यातूनही बकऱ्यांची संख्या अमाप वाढली तर इतर उपाय काढता येतील. या बाबतीत जननीच्या उत्सवाचं उदाहरण चपखल आहे. जननीचा डोंगर हा कोकण रेलवेवरील कोलाडच्या जवळ आहे. ही देवी स्थानिकांचे स्थानदैवत व मुंबईतील काही कुटुंबांचे कुळदैवत आहे. दर वर्षी माघपौर्णिमेस गडावर उत्सव भरतो. तीनेक दिवस चालतो. हे खाजगी देवस्थान असल्याने त्याचा फारसा बोलबाला होत नाही. दरवर्षी एखाद दोन बोकड बळी दिले जातात. हे साधारणत: कोण्या भक्ताने प्रायोजित केलेले असतात. एके वर्षी बरेच प्रायोजक उत्सवास आल्याने प्रत्येकाने बोकड अर्पण केला. त्यामुळे माणसे कमी आणि बोकड फार अशी परिस्थिती उद्भवली. तीनचारच्या जागी बारातेरा बोकड कापले गेले. गावकरी तरी किती खाऊन खाऊन किती खाणार. बोकडाचं मटण हा देवीचा प्रसाद असल्याने फेकून देता येत नव्हता. मग शेवटी परतणाऱ्या भक्तांना डब्यांत भरून दिला. गडावर जेवायची सोय नसल्याने प्रत्येक भक्तकुटुंबे खाणं वा शिधा डब्यातून आणतात. त्यामुळे डब्यांची वानवा नव्हती. तर असा हा प्रकार झाला. तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. मोठ्या प्रमाणावर हिंसा टाळलेली बरी. त्यानुसार ईदेस मौलवीने एक बोकड बळी चढवावा. सगळ्या मुस्लिमांनी बळी द्यायची गरज नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 18/06/2024 - 19:10
तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. एवढा सुजाणपणा असले तर ना... बदल होऊच कसा शकतो "पाक" ग्रंथात लिहिलंय ना मग बदलायाच नाही .. चालुद्या मुस्लिम सत्यशोधक समाजाचं दलवाईंना केवडः त्रास सोसावा लागला...

In reply to by चौकस२१२

नठ्यारा 18/06/2024 - 22:40
चौकस२१२, माझ्या माहितीप्रमाणे बोकड बळी द्यायची प्रथा कुराणातली नाही. पण याबाबत चूकभूल देणेघेणे. पण अर्थात तुमचा कट्टरपणाचा मुद्दा वैध आहेच. एरव्ही हा.पा.ला फतवे काढणारे मुल्लामौलवी कधी अनावश्यक हत्येविरोधात फतवे काढतात का? आज गोहत्येच्या विरोधात फतवा काढला तर हिंदूमुस्लीम तेढ कितीतरी कमी होईल. पण लक्षांत कोण घेतो. -नाठाळ नठ्या

बकरी ईदनिमित्त मुस्लिम समुदायात बकऱ्यांची कत्तल केली जाते. परंतु, जैन धर्मातील एका तरुणाने तब्बल १२४ बकऱ्यांचा जीव वाचवला आहे. यासाठी त्याने मुस्लिम बांधवांचा पेहराव केला होता. एवढे नव्हे तर १२४ बकरे खरेदी करण्याकरता त्यांनी १५ लाखांचा निधीही गोळा केला. जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील मंदिराच्या प्रांगणात या बकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दि प्रिंटने दिलं आहे. ही बातमी

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 19/06/2024 - 20:43
मुटके साहेब बातमी वाचली, आपल्या लेख/प्रतिसादावर प्रतिसाद/उपप्रतिसाद द्यायला गेलो तर तो इतका मेगाबायटी होतो कि स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित करण्याची पाळी येते. मागे 'युट्युब'च्या बाबतीत असा अनुभव पहिल्यांदा आला होता, आणि ह्या धाग्यावरच्या आपल्या प्रतिसादातील बातमीच्या निमित्ताने आज दुसऱ्यांदा तसा अनुभव आला आहे 😀 असो, सदर बातमी वाचताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि 'व्यावहारिक चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला तर तो बराच लांबल्याने "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" ह्या शीर्षकाने स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित केला आहे. लेखनाला विषय पुरवल्या बद्दल आपले आभार, आणि ध्यानीमनी नसताना अचानक एक लेख पाडायला लावलात त्यासाठी आपला तीव्र णिषेध 😂

मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरीही धर्मात ढवळा ढवळ केली म्हणून त्या जैन मुलाचा गळा चिरला नाही म्हणजे बर होईल.

भागो 20/06/2024 - 08:56
About 900,000 cows are slaughtered every day. If every cow was 2 meters long, and they all walked right behind each other, this line of cows would stretch for 1800 kilometers.1 This represents the number of cows slaughtered every day. For chickens, the daily count is extremely large – 202 million chickens every day. To comprehend the scale, it is better to bring it down to the average minute: 140,000 chickens are slaughtered every minute. certainly, hundreds of millions of fish are killed every day. बकरे, डुकरे , बदके ह्यांची पण संख्या प्रचंड आहे. तेव्हा उगाचच ईदच्या बळी बकर्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळू नका.

In reply to by भागो

सुबोध खरे 20/06/2024 - 10:43
मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून फुरोगाम्यांच्या दांभिकपणा बद्दल आहे जे केवळ हिंदू सणांबद्दल गरळ ओकताना दिसतात. उदा कोरडी होळी खेळा, फटाकेमुक्त दिवाळी असावी. पण मुसलमान लोकांच्या सणाबाबत काही बोलण्याची हिम्मत दाखवत नाहीत. यांचा दांभिकपणा म्हणजे लिटरला पाच किमी जाणाऱ्या गाडीतून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मोर्चाला जातात तसा आहे. कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती. The Bombay High Court on Thursday said that it would not permit unregulated or unmonitored slaughter of animals anywhere in Maharashtra and that hygiene and sanitation were important. https://indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-hc-slaughter-animals-sacrifice-vishalgad-fort-kolhapur-8664410/ हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे. बाकी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे. मतांसाठी मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो. येथे मला लष्करातील शिस्तीची आठवण येते. तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.

In reply to by सुबोध खरे

कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
सहमत.
.हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.
सहमत.
कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.
सहमत.
मतांसाठी ( हिंदू असो की ) मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

डोळे पाणावले.
अरे सुधरा रे.... देशाची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर, कोंबड्या, मासे, खेकडे, कोळंबी, आणि इतर जीव खाण्यास शास्त्रात ''जीवो जीवस्य जीवनम्'' चा संदर्भ घेऊन काही आड़काठी नसली तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?
हे राम. गणपाच्या हातच्या कोलंबी आणि पापलेट असतील तर, अगोदर पानात हे सर्व वाढून घ्यायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात जोडायचे. डोळे मिटायचे. ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. असे म्हणून जेवणास सुरुवात करायची. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे असे समजून खाल्ले की चालते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/06/2024 - 12:44
तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.
ह्यातल्या 'खान' बद्दल १०००% सहमत आहे पण 'पान?'... No way 😂

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 20/06/2024 - 11:49
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!
"मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती."
हा निर्णय खूप आधीच यायला हवा होता, पण ठीक आहे... 'देर आये, दुरुस्त आये' म्हणायचे, अजून काय! पूर्वी मुलुंडच्या 'वोक्हार्ट' (आताचे - फोर्टिस) हॉस्पिटलच्या गच्चीवर त्याचे संस्थापक,मालक, चेअरमन असलेल्या 'हबील खोराकीवाला' ह्यांनी जाहीररीत्या बोकडाची कुरबानी दिली होती आणि हा तमाशा बघायला बरीच गर्दी गोळा झाली होती. (असे कृत्य त्यांनी अनेकदा केले होते म्हणतात) असला प्रकार कोणीही केला असता तरी तो निंदनीयच आहे, पण हबील खोराकीवालांसारख्या उच्च विद्याविभूषित, अब्जाधीश, नामांकित व्यावसायिक व्यक्तीने केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर त्यांच्या प्रतिमेला अशोभनीयही होते!

In reply to by सुबोध खरे

रामचंद्र 20/06/2024 - 12:58
तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.> यात जर कुणाच्याही भावना न दुखावता लोकमान्य पद्धतीने धार्मिक परंपरांचे पालन होत असेल तर इतरत्रही याचे पालन व्हायला काय अडचण आहे? सर्वांच्याच मनासारखं पण त्रास (फारसा) कुणालाच नाही!

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 14:18
यात जर कुणाच्याही भावना न दुखावता>>>मग त्यात काय मजा राहिलि? अहो भावना दुखावण्यासाठी तर सारा खटाटोप.

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 17:43
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं । सर, माझ्या प्रतिसादाचा आशय लक्षात आला असावा असे मी समजतो.

In reply to by भागो

रामचंद्र 20/06/2024 - 18:00
अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून त्रास न होण्याची भूमिका घ्यायला तयार नसतात म्हणून मी तसं म्हटलं... पण अशा आडमुठ्या भूमिकेमुळे पीडित लोक दोन्ही गोटांतले आहेत, शिवाय याचा अनिष्ट परिणाम होणारे मुके प्राणी-पक्षी, पर्यावरण हेही आहेतच.

रामचंद्र 20/06/2024 - 18:04
शिवाय 'ते कसं वागतात' असं म्हणत चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा किमान आपण शहाणपणाची भूमिका घेतली तर काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी कमी होतील असा विवेक दोन्ही बाजूचे लोक दाखवत नाहीत.

In reply to by आंद्रे वडापाव

समर्थन कारण सर्वच माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नसतात. मायथॉ़ईतील कथा अर्धवट उचलुन त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ लावणे हे काही मोजक्या लोकांचे टूलकिट आहे. खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण कथा वाचतात , आणि त्यातील भावार्थ समजुन घेतात . सगळ्यांना जमतेच असं नाही, जमलं पाहिजे असेही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सहमत भारतातील आपल्यासारखे खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण बकरी ईद ची कथा वाचून , आणि त्यातील भावार्थ समजुन घेवुनचं, त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ न लावता ...सोशल मीडियावर वावरत, माणसा माणसात प्रेम वाढवण्याचे नागपुरी मंत्र तंत्र (टूलकिट) वापरताना रोज पाहतोच आहोत.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 12:25
तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.
अ ति श य स्तुत्य !

सर टोबी 17/06/2024 - 12:28
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.

टर्मीनेटर 17/06/2024 - 13:50
स्त्युत्य उपक्रम? पेटा इंडियाचा प्रसिद्धीचा सोस?, कि नवीन 'टूलकिट'? पेटा इंडियाने पेश केलेल्या 'दावत-ए-ईद' ह्या उपक्रमाच्या हेतू विषयी शंका घेण्यास वाव आहे. गेल्या अडीच दशकात जगातलया अनेक विकसित/अविकसित देशांना अधून मधून आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही किंचित मंद वेगाने असली तरी सातत्याने शाश्वत वाढ नोंदवत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत खोडा घालण्यासाठी तसेच भारताच्या पायाभूत विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संघटना, एनजीओ'ज चा समावेश असलेली इको-सिस्टीम सतत कुठली ना कुठली आंदोलने/अभियाने/उपक्रम राबवून देशात अराजकता माजवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कधी ते धरण किंवा पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांना विरोध, कधी बोगस शेतकऱ्यांचे आंदोलन, कधी सीएएचा विरोध तर कधी पर्यावरण /प्रदूषणाच्या नावाखाली 'दिवाळीत फटाके फोडू नका' सारखा कानांना सुखावेल असा प्रचार. सदर 'दावत-ए-ईद' हा उपक्रम देखील ह्याच पठडीतला वाटतोय. भूतदया, नितिमत्ता वगैरेचा मुलामा चढवून 'प्राणिहत्या' करू नका वगैरे संदेश ऐकायला छान वाटतो. त्याला शाकाहारी, वेगन (आणि कट्टर मुस्लिम विरोधी विचारसरणीच्या) लोकांचा पाठिंबाही भरपूर मिळेल, आणि असले विचार प्रत्यक्षात आल्यास शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या गरीब शेकऱ्यांचे संभाव्य नुकसान आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम होईल ह्याविषयी अनभिद्न्य असलेले भोळेभाबडे लोक नकळतपणे त्याचा उस्फूर्तपणे फुकट प्रचारही करतील! भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय पशुधन अभियान' (National Livestock Mission - NLM) अंतर्गत कमाल ५० लाखांपर्यंतचे अनुदान, एक कोटी पर्यंतचे कर्ज अशा योजनांचा लाभ घेऊन देशभरातल्या असंख्य लहानमोठ्या शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालनास सुरुवात केली आहे. आपल्या पशुधनाची देखभाल करताना चारा व्यवस्थापन, रोगराई-आजार, बँकेच्या कर्जाचे हप्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत, खास ईदच्या कुरबानीसाठी विक्री करून चांगला मोबदला मिळून नफ्यातोट्याचे गणित जमून येईल ह्या आशेवर वर्ष-दोन वर्ष भर मेहनतीने पोसून तयार केलेल्या बोकडांची मागणी घटली तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? 'पेटा इंडिया' त्यांच्या आणि पर्यायाने बॅंकेच्या होणाऱ्या काही हजार कोटींच्या नुकसानीची भरपाई करेल का? कि नुकसानीत गेलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपला नेहमीचा आत्महत्येचा पर्याय स्वीकारायचा? आपण लेखात म्हंटले आहे,
एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला.
मग भारतात हा आकडा किती असेल? निदान पाकिस्तानातल्या '४.१६ अब्ज डॉलर्स' ह्या आकड्यापेक्षा नक्कीच जास्त असेल! अर्थात उत्सवप्रेमी भारतीय असल्या प्रचाराला भीक न घालता दणक्यात आपापले धर्मिक सण-उत्सव साजरे करतात हि गोष्ट आपल्या प्रवाही अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक असल्याने फार काही काळजी करायचे कारण नाही, पण अर्थकारणाला अपायकारक अशा प्रचाराचा आपण एक भाग होऊ नये अशी सदिच्छा! शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेल्या आमच्या बिरुटे सरांची 'अतिशय चांगला. स्तुत्य उपक्रम.' अशी प्रतिक्रिया वाचून खरंतर धक्का बसला होता, पण त्यांनीच दिलेला 'आपण प्रबोधनाचे काम करत राहायचे' ह्या मंत्राचे स्मरण झाल्याने हा प्रतिसाद प्रपंच. इति लेखनसीमा.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 17:02
हेच तर्कशास्त्र वापरून… माणसाला हानिकारक तंबाखू किंवा दारू उद्योग बंद करणं कुणालाही शक्य झालं नाही. सगळ्यांना माहिती आहे, की मानवजातीला पडणारी एकूण किंमत ही त्या उद्योगात कार्यरत असलेल्या घटकांच्या आर्थिक लाभापेक्षा कैक पट जास्त असेल. या कारणासाठी सगळीकडे धूम्रपान, मद्यपान कमी व्हावे यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्था प्रयत्न करतात. त्यालाही टूलकीट म्हणावे काय? इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? पण मग हे मानवाला अपायकारक म्हणून सिध्द झालेले उद्योग चालूच ठेवले तर, दवाखानेही उत्तम चालतात, त्यांचे उत्पन्न वाढते, परिणामी अर्थव्यवस्थेला सतत वाढ मिळत राहते. अर्थस्य पुरुषो दास: असे महाभारतात भीष्म का कुणीतरी म्हटले आहेच. सबब सर्व मानवजात सुखाने जगावी यासाठी अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:17
"अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या दोन प्रश्नांची 'अ' आणि 'ब' अशा दोन प्रकारे उत्तरे देता येतील त्यातले जे पटेल ते घ्यावे, चॉईस इज युअर्स... 😀 अ) पूर्णपणे शुद्धीत, वास्तवाचे भान असलेल्या आणि आधुनिक जीवनशैलीशी एकरूप झालेल्या व्यक्तीसाठी 'अर्थशास्त्रा'चा हवाला देऊन उत्तरे द्यायची झाल्यास : १) अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशातली 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दोन वर्गांतली सामाजिक दरी बुजवण्यासाठी, गेला बाजार ती कमी करून १००% जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा भागवून सर्व सामाजिक घटकांना एक समाधानकारक जीवनशैली मिळावी ह्यासाठी "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे!" आणि, २) "मानवी इच्छा अमर्याद आहेत आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने मर्यादित आहेत." हा अर्थशास्त्रीय नियम लक्षात घेऊन, देशातल्या सर्व जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर, अन्य इच्छा आणि आकांक्षा ज्या अर्थशास्त्रात 'मानवी इच्छा' (Human wants) म्हणून ओळखल्या जातात, त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती/उपलब्धता वाढवण्यासाठी संसाधनांच्या उपलब्धतेत वाढ करून त्यांच्या मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन साधत गेल्या कित्येक दशकांपासून भारताला चिकटलेला 'विकसनशील' हा स्टेटस बदलून तो 'विकसित' असा होऊन जनतेचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी "अर्थव्यवस्थेला सतत वाढतच रहावे लागेल!" ब) 'कार्ल मार्क्स' छाप नशेची गोळी घेऊन बधिर झालेला मेंदू आणि मिटल्या डोळ्यांनी कल्पनेतल्या जगात वावरण्यातून वास्तवाचे भान सुटलेल्या व्यक्तीसाठी उत्तरे द्यायची झाल्यास : १) "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का?" ह्या प्रश्नाचे एका शब्दातले, साधे सोपे उत्तर "नाही" असे आहे. आणि, २) मुळात संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्था वाढवण्याची नसती उठाठेव करण्याची गरजच नसल्याने, "तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या प्रश्नाचे दोन शब्दांतले उत्तर "अजिबात नाही" असे आहे. (वरील दोन्ही प्रकारची उत्तरे हि माझी अल्पमती आणि अर्थशास्त्राचे जुजबी ज्ञान ह्यावर आधारित असल्याने पटली तर घ्या, नाहीतर केराच्या टोपलीत टाका. हाय काय अन नाय काय 😀) बाकी आपल्या प्रतिसादातील तंबाखू आणि दारूचा मुद्दा रास्त आहे, त्याबद्दल दुमत नसले तरी ते 'शौक, मौज, व्यसन' प्रकारात मोडत असल्याने त्याला आणि जगातल्या बहुसंख्य लोकांचा आहार, म्हणजे पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या अन्नाला एकच मोजपट्टी लावणे किंवा एकच तर्कशास्त्र वापरणे काही योग्य वाटत नाही! असो, आमच्या बिरुटे सरांच्या शब्दांत सांगायचे तर "सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच." त्याला काही इलाज नाही, आणि आमचे ह.भ.प. , पपू , श्री श्री श्री मुक्तविहारी महाराज डोंबिवलीकर त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात कि, "मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत"! ह्या दोन्ही सिद्धपुरुषांच्या सिद्धवचनांवर दृढ विश्वास असल्याने अधून-मधून अशी मत-मतांतरे व्यक्त करण्यास मनोबल मिळत असते. चालायचेच, मिपा, मिपाकर आणि बिरुटे सर आपलेच आहेत! (समाजातल्या तळागाळातील लोकांशी नाळ न तुटलेला आणि 'टूलकिट' गॅंगविषयी सावध असलेला, संवेदनशील हौशी शेतकरी) - टर्मीनेटर.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 22:19
सर, आपण सर्वप्रथम माणसांचे वर्गीकरण केले आहे, आणि मग त्या त्या गटाच्या दृष्टिकोनातून प्रश्नाचा विचार केला आहे. असं का, ते समजलेलं नाही. अर्थशास्त्रातलं मलाही फार कळतं असं नाही, पण ज्या अर्थी त्याला शास्त्र समजलं जातं, त्याअर्थी कोण प्रश्न विचारतो, याला महत्व नाही. शास्त्र हे विचारणार्याच्या निरपेक्षच उत्तर देणार. असो. तर जर आपण भारताचा विचार केला तर, आपली अधिक महत्वाची समस्या वाढीची आहे का वितरणाची याचा विचार करावा लागेल. आपल्याकडे दिवसाला ३००- ५०० रु मजूरी, तीही रोज नाही, मिळवणारे मनरेगाचे मजूर आहेत आणि दिवसाला ५ लाख कमावणारे सर्वोच्च न्यायालयातले वकीलही आहेत आणि ज्यांचा पैसाच त्यांच्यासाठी अहोरात्र काम करून दिवसाला करोडो रूपयांची भर घालतो असे महा-उद्योजकही आहेत. त्यांची भूक अधिक मोठ्या प्रकल्पांची, जीडीपीच्या वाढीची आहे आणि त्यांचे धोरणांवर वर्चस्व आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. तर वाढ ही त्यांना पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अर्ध्यापासून आज ३ ट्रिलीयन वगैरे झाली तरी मनरेगाचे मजूर प्रचंड प्रमाणात आहेतच. त्यांच्यापर्यंत समृध्दी या वाढीच्या प्रमाणात पोहोचलेली नाहीच. आज जे देश विकसित आहेत, तिथे समाजात एवढी टोकाची विषमता नाही, हे तर सहजच दिसते. लोकांना आता समजत आहे की मोठ्या चमकदार घोषणा व मेगा प्रकल्प करून आपल्याला काही मिळत नाही, रोजचा संघर्ष काही कमी होत नाही. त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:27
त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.
म्हणजे सोप्या भाषेत मध्यमवर्गीयांकडून, त्यांची पांढरी संपत्ती - घरे, वाहने, सोनेनाणे, एफडी वगैरे काढून घेऊन ती तथाकथित दारिद्र्यरेषेखालील लोकांना देऊन टाकणे! "संपत्तीचे वितरण" याचा याहून वेगळा काही अर्थ असेल तर तो आम्हा मिपामरांना समजेल असा स्पष्ट करून सांगावा.

In reply to by कांदा लिंबू

भागो 18/06/2024 - 06:09
जो झोपला आहे त्याला जागे करता येतं पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला कसे जागे करणार? हा जोक आधीच येऊन गेला आहे. तुम्ही पण "यमे यंटायर यिकनामिक्ष" केलेले दिसतंय.

In reply to by भागो

स्वधर्म 18/06/2024 - 14:38
मध्यमवर्गियांची संपत्ती काढून वगैरे मी कुठेही लिहिले नाही. महाउद्योजक असे म्हटले होते. त्यांना बॅंकांनी हेअरकटच्या नावाखाली प्रचंड कर्जमाफी दिलेली आहे. विकासाचे नांव घेऊन प्रकल्पाच्या जमिनी नगण्य भावाने आंदण दिल्या आहेत. मी लिहिलेले महाउद्योजक वगैरे अत्यंत सोईस्कररित्या दुर्लक्षित करून मध्यमवर्गीय असा शब्द घुसडण्याला काय म्हणणार? खरंच झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.

In reply to by चौकस२१२

स्वधर्म 18/06/2024 - 22:24
त्यावर काय बोलणार? आपल्याला न पटणारा मुद्दा आला, की तो एकदम ताणून चुकीचा दाखवता येतो. ही एक सामान्य युक्ती आहे. पण गोरगरीब जनतेच्या तुलनेत महाउद्योजक हे सरकारवर आपल्याला हवे तसे धोरण बनवण्यासाठी अधिक प्रभाव टाकू शकतात, हे तर सहज दिसून येते. ही वस्तुस्थिती आपण नाकारता आहात का? हे सांगा. अगदी साधी उदाहरणं आहेत हो, फक्त पहायला पाहिजे. मागे त्या विश्वास पाटील या लेखक अधिकार्याने निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ३५ एक प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आयुष्यभराच्या कार्यक्षमतेपेक्षा ५० पट कार्यक्षमता दाखवली होती त्याने. अंगणवाडी सेविका मात्र १००० - ५०० रूपयांची वाढ मागण्यासाठी वर्षभर आंदोलने करत आहेत. जाईल तिकडे सामान्य माणूस नाडला जातो, आणि बड्या धेंडांची काम चुटकीसरशी होतात, याचा अनुभव आला नाही का तुंम्हाला कधीच?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 18/06/2024 - 15:22
ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांनी नंदा खरे यांचा २०१७ मधला हा लेख जरूर वाचावा. https://www.loksatta.com/lokrang/lekha/violence-after-conviction-of-baba-gurmeet-ram-rahim-singh-1542623/

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 15:40
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.
जगाची इमानदार आणि काफिर अशी विभागणी करणारा आणि काफिरांना अस्तित्वहक्क नाकारणारा "मुसलमान हा धर्म मूळचा समतावादी" असे म्हणणारा लेख मिपावर लिंक देण्याच्या लायकीचा आहे का?

In reply to by कांदा लिंबू

स्वधर्म 18/06/2024 - 22:32
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात? लेखाचा मूळ विषय काय? संदर्भ काय? बाकी ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांच्यासाठीच तो लेख दिला होता. त्यामुळे, तुंम्ही द्या सोडून विषय सर. आपल्याला कसं अगदी सगळं सकारात्मकच हवं. सत्याचा त्याच्याशी संबंध नसला तरी चालेल.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 19/06/2024 - 05:04
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात?
हे तुम्ही तो लेख लिहिणाऱ्यांना म्हणताय ना? बरोबर आहे, ते त्यांना लागू आहे. यावरूनच कळून येते लेखात काय कन्टेन्ट असणार आहे.

In reply to by कांदा लिंबू

भागो 20/06/2024 - 09:00
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.>>> कारण हे सगळे मुळचे हिंदूच आहेत.

In reply to by स्वधर्म

चौकस२१२ 20/06/2024 - 04:58
इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? येथे खान्यासाठी प्राण्यांची हत्या होते आहे , हे तर नेहमीच होते मग ते सणा मुळे असो किंवा इतर दिवशी ,, फरक काय?

In reply to by टर्मीनेटर

आग्या१९९० 17/06/2024 - 18:02
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याचेही आकडे येऊ द्या. उगाच भाकड गाई सांभाळण्यावर शेतकऱ्यांचा खर्च होतो.

In reply to by आग्या१९९०

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:59
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याविषयीची निश्चित आकडेवारी मलातरी कुठे दिसली नाही, पण ह्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गायी आणि निरुपयोगी बैल मोकाट सोडून दिल्याने ही मोकाट गुरेढोरे गायपट्ट्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्याच्या अनेक बातम्या काहीवर्षांपूर्वी वाचल्या होत्या. २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने ह्या मुद्द्याचे भांडवल करून आपल्या प्रचारात त्यावरून प्रचंड काहुरही माजवले होते. पण तरी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांचे सरकार बहुमताने निवडून आल्याने हा मुद्दा निष्प्रभ ठरला होता असे म्हणता येईल. बाकी भाकड गायींमुळे शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याची कल्पना नसली तरी अशा गायी, बैलांचा आनंदाने स्वीकार करून कित्येक गोशाळांनी त्यांचा सांभाळ करतानाच त्यांच्या मलमूत्रापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु करून स्वतःच्या आणि आसपासच्या अनेक गरीब कुटुंबांची स्वयंपाकासाठीच्या इंधनाची गरज भागवल्याचे, ONGC शी केलेल्या सहकार्य करारातून CNG निर्मिती सुरु केल्याचे तसेच वीजनिर्मिती प्रकल्प, बायोगॅस स्लरी, गायीच्या शेणापासून कंपोस्ट, गांडूळ खत अशी सैंद्रीय खते आणि धूप, उदबत्ती व रंग अशा अनेक गोष्टींचे उत्पादन आणि विक्री असा फायदेशीर व्यवसाय आणि त्याद्वारे रोजगार निर्माण केल्याच्या यशोगाथा वाचल्या आहेत, असे कित्येक प्रेरणादायी व्हिडीओज युट्युबवरही पाहायला मिळतात. समस्येत संधी शोधून सेवाभावी कार्यातूनही आर्थिक लाभ मिळू शकतो हे दाखवणाऱ्या अशा गोशाळांच्या सर्जनशीलतेस सलाम! आणि धागाविषय भरकटवणे हा उद्देश नसला तरी माझ्या दोन प्रतिसादांतून थोडे अवांतर झाले असल्याने धागा लेखकाची मनापासून क्षमा मागतो 🙏

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 18/06/2024 - 16:36
लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... एकूण खालेलं प्राणी मगर, ससा, शहामृग, हरीण , बैल / गाय कबुतर , तितर ( क्वेल ) टर्की ,बेडूक शन्ख , ईल , साप ( बहुतेक सापच आठवत नाही ४ पेग झाले होते चीन मध्ये तेवहा ) ऑकटोपस, तिसऱ्या , लॉंगस्टीन , कच्चे मासे , कॅट फिश , कलामारी इत्यादी याशिवाय मेंढा / बकरी . बोकड / शेळी / डुक्कर हे आहेच

In reply to by टर्मीनेटर

प्रतिसाद वाचायला सुरुवात केली आणि पुढे ते टुलकिट वगैरे वाचलं आणि पुढे काही वाचू नये असं ठरवलं. पण, प्रतिसाद चाळता चाळता तळटीपेकडे येतांना आमची आठवण झाल्यामुळे दोन शब्द लिहावे वाटले. बाकी, सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच. स्वागत. कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, कोणाला मजुरांची आंदोलन बोगस वाटतात, कोणाला विद्यार्थ्यांची आंदोलने बोगस वाटतात, कोणाला अंगणवाडी स्त्रियांची आंदोलने बोगस वाटतात, धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, गरिब, शोषित पिडित, हक्कासाठी लढणा-या लोकांची आंदोलने काहींना बोगस वाटू शकतात. अगदी शांततापूर्ण आणि जगाच्या प्रगतीच्या वाटेत देश अगदी विकासाच्या अग्रक्रमात भारत देश अगदी टॉपवर असतांना अशी ही सगळी आंदोलनजीवी जनता देशाच्या प्रगतीत खोडा घालणारी, अराजकता माजवणारी आहे असेही वाटू शकतं. टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. आपल्याबद्दल लिहित नाही. पण, अशा विचार करणा-या लोकांचं हल्ली अजिबात आश्चर्य वाटत नाही. अशा, संवेदनहीन जनतेचं, किंवा अशा संवेदना गमावलेल्या लोकांचा समुहाचा, वृत्तीचा, विचारांचा खरंच तळागाळातील लोकांशी काही थेट संबंध येत असेल याची अजिबात शक्यता वाटत नाही. आणि असा कोणताही संबंध येत नसल्यामुळे अशा समुहातील लोकांना हे सगळं खोटं नाटं वाटू शकतं. दिवाळीत फटाके फोडणा-यांमुळे बिचा-या कंपनीचं किती नुकसान होत असेल. फटाक्यामधील दारु-गोळा भरणा-या किती तरी मजूरांवर उपासमारीची वेळ येत असेल. सालं ते फटाक्याचा आवाजात हा विचार आलाच नाही. देशी-विषारी दारु बनविणा-या आणि त्यामुळे मरण पावणा-या लोकांपेक्षा त्या हातभट्टीचं किती आर्थिक नुकसान होतं हा विचार मनात आलाच नाही. तद्वतच, देशभरातील हजारो लाखो शेतकरी 'कुरबानीच्या' निमित्ताने बोकडांचे उत्पन्न घेतात आणि त्यामुळे होणा-या करोडो अब्जोंनी नुकसान होणा-या शेतक-यांचा विचार आमच्यासारख्या शेतक-यांविषयी कळवळा असणा-याच्यां मनात येऊ नये, हे फार दु:खदायक आहे. आम्ही सालं, ते विदा नसल्यामुळे शेळीपालन म्हणजे फ़क्त जोडधंडा, रोजगार, मांस, दूध, खत, वगैरे इतकंच समजत होतो. पण, 'कुरबानीमुळे' होणारं देशाचं आणि शेतक-यांचं आर्थिक नुकसान लक्षात आलंच नाही, लक्षात आणून दिल्याबद्दल किती आभार मानू....! ;) ' कुरबानी कुरबानी' -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संवेदना ई.व्ही.एम. मशीन वर मोजतात का हो सर ? कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. =)))) दुत्त दुत्त, ह्या उजव्या विचारसरणीच्या लोकांन्ना हार्टच नसतं मुळी =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 18/06/2024 - 19:06
कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. ,,,,, ++++

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ 18/06/2024 - 16:44
कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, प्रामाणिक असते तर शीख धर्माचे ध्वज नसते आणि सर्व राज्यात तेवढेच जोर लावून असते पंजाब आणि हरयाणात का? धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, आंदोलनाच मूळ हेतू केवळ विरोधात विरोध दिस ला म्हणून , भारताचं ऊर्जा गरजेवर काही उत्तर नाही ,, ( अरुंधती रॉय सारखया महान विचारवंतांना एकदा भर सभेत हा प्रश्न विचारला मी कि तुमचे आंदोलन विस्थापितांची नुकसान भरपाई व्हावी रस्ताही आह की उद्योग वाढूच नयेत या साठी आहे ? टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. हो कधी कधी वाटते ... का वाटू नये , अर्थात या प्रतिसादवार प्रोफेसर " ऑस्ट्रेल्यात आंदोलने होतात का हो असले फालतू प्रश्न विचारतील यात शंका नाहीच संवेदना गमावलेल्या ओह ओके तर प्रश्न विचारला कि संवेदना गमावलेला का बाकी कुर्बानी कुर्बानी म्हणाल तर आमचच्या डोक्यात एकाच ती म्हणजे झीनत बेगम ची

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:31
१. तुम्ही दिलेले विकी पान म्हणते -
... स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला.
तुम्ही दिलेले पेटा चे पान म्हणते -
इस्लाम प्राण्यांबद्धल दयाळूपणा शिकवतो. Islam Teaches Kindness to Animals
दोन्ही विधाने १८० अंशात परस्परविरोधी आहेत. काहीतरी एक निश्चित करा मग पुढे बोलता येईल. २. भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेने नागरिकांना प्रार्थना स्वातंत्र्य दिलेले आहे. इस्लाममध्ये जर मेंढा / बोकड आदी प्राण्यांची कत्तल करण्याची आज्ञा दिलेली असेल तर त्याचे पालन करण्यात बेकायदेशीर काय आहे?

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 18:59
1-सर्वप्रथम तुम्ही जी विसंगती दाखवलेली आहे ती पूर्णपणे मान्य आहे 2-प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. 3-मुळात सर्व धर्म हे माणसांनी स्वतःसाठी बनवलेली साधने आहेत त्याचप्रमाणे सर्व तत्त्वज्ञाने सर्व विचार सरणी या मानवनिर्मित आणि मानवाच्या जगण्यास सुसह्य करण्यासाठी विकसित करण्यासाठी आहे 4-कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? 7-हिंदू धर्मातही चाळणी लावण्यासाठी .कलीवर्ज्य सारखी अधिकृत व्यवस्था होती. 8-कुठला भाग कालबाह्य कुठला काल सुसंगत यात मतभेद अर्थातच राहणार राहतील पण प्रक्रियेला चालू ठेवण्यात अडचण काय ,? 9-मतभेद तर उलट स्वागतारहच आहेत. त्यानेच पुढची दिशा स्पष्ट होईल.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/06/2024 - 19:45
प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. हे विधान भयानक पाखंडी आहे आणि असे विधान केल्यास इस्लामी देशात आपल्याला केवळ मृत्युदंड एवढीच शिक्षा आहे. Islam means “submission to the will of God” इस्लाम चा अर्थच असा आहे कि अल्लाच्या इच्छेपुढे समर्पण. आता अल्ला ची इच्छा काय आहे याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कर्मठ आणि मागासलेल्या मुल्ला मौलवींच्या हातात असल्यामुळे त्या धर्मात कोणतीही सुधारणा संभवतच नाही. यामुळे त्या धर्मात गेल्या १४०० वर्षात फारशा सुधारणा झालेल्या नाहीत आणि होण्याची शक्यता पण नगण्य आहे. कारण कुराण हे सार्वकालिक सत्य च आहे आणि त्यात एक अक्षराचाही बदल संभवत नाही अशीच इस्लामिक जगताची भावना आहे. आम्ही म्हणू तोच आणि तेवढाच धर्म असे असल्यामुळे इस्लामच्या इतर शाखांबरोबर सुद्धा त्यांचा सलोखा नाहीच. सुन्नी लोक तर अहमदिया किंवा बहाई अथवा बोहरी या लोकांना मुसलमान मानतच नाहीत आणि त्यांची सर्रास कत्तल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शिया आणि सुन्नी यातील संघर्ष कायम चालूच असतो आणि यामुळेच जगभर सर्वच धर्माबरोबर त्यांचे कायमच संघर्ष होत आलेले आहेत. ४८ इस्लामिक देशांपैकी कोणत्याही इस्लामी देशात इतर धर्माला थारा नाहीच. आणि इस्लामला लोकशाही मान्यच नाही. त्यामुळे आपण लिहिलेले खालील मुद्दे बादच होतात ४) कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे. कुराण मध्ये काहीही त्याज्य नाही त्यामुळे कालबाह्य भाग टाकून देणे हे सर्वथा अशक्य आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? कुराण मध्ये विसंगती नाहीच कारण ती अल्ला चीच इच्छा आहे आणि त्यात कोणताही बदल संभवतच नाही.

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:39
खरोखरच स्तुत्य उपक्रम. सर्वच धर्मांमधल्या पशुहत्या बंद व्हाव्यात.
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.
Islam Teaches Kindness to Animals
पिटाचे आवाहन इस्लामचे पालन करणाऱ्यांना आहे हे तिथे स्पष्ट लिहिले आहे; त्यात काफिरांच्या प्रार्थनापद्धतींना ओढण्याचे कारण नाही. पान वाचून पहा, "इस्लाम सांगतो म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश आहे; "माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश नाही. म्हणून हे सारे पिटाचे (खरेखोटे जे काही असेल ते) प्रकरण काफिरांना लागू नाही.

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 19:09
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे. जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही. जे करत आहे त्यांची मूळ प्रेरणाच हे करण्यामागची धर्म आहे तर अशा व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच त्यांच्याच धर्मातील विरोधी तत्वे दाखवून देणे हे एकदम समर्पक आणि सुयोग्य असे आहे

In reply to by मारवा

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:33
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे.
म्हणजे जे इस्लाम मानतात ते, "माणुसकी म्हणून अमुक करा" या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत की काय? काय म्हणताय?
जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही.
"जे मुळातच काफिर आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही." असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नास्तिक ही हिंदू धर्म विचारातील एक विशिष्ट कल्पना आहे. सदर संदर्भात तिचा काही संबंध नाही.

मारवा 17/06/2024 - 16:42
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:59
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो
१. मान्य आहे. मागे घेतो. पण इतर कुणाला फारश्या त्रासदायक न ठरणाऱ्या अश्या एखाद्याच्या प्रार्थना पद्धतीत बदल करण्याचे आवाहन नैतिकदृष्ट्या ठीक आहे का? --- कोणते आवाहन ऐकून कुणी मांसाहार करणे थांबवत नाही. पिटाने, त्यांना खरंच भूतदया असेल तर हलाल पद्धतीने प्राणी मारण्याऐवजी झटका पद्धतीने प्राणी मारले जावेत याचा पुरस्कार करावा, ते जास्त व्यावहारिक + नैतिक होईल. २. पहिल्या मुद्यावरही वाट पाहतो.

एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे हे पेटा वाले बक्र्यांची कुठून सुटका करणार आहेत?

नठ्यारा 18/06/2024 - 13:25
लोकहो, इस्लामिक कट्टरपणास पर्याय उपलब्ध करवून दिल्याबद्दल पेटावाल्यांचं अभिनंदन. अब्राहमने मेंढा मारला म्हणून प्रत्येक मुसलमानाने मारलाच पाहिजे, हा कुठला न्याय? हा अरबस्थानात वगैरे ठीके. भारतात कशाला पाहिजे? त्यातूनही बकऱ्यांची संख्या अमाप वाढली तर इतर उपाय काढता येतील. या बाबतीत जननीच्या उत्सवाचं उदाहरण चपखल आहे. जननीचा डोंगर हा कोकण रेलवेवरील कोलाडच्या जवळ आहे. ही देवी स्थानिकांचे स्थानदैवत व मुंबईतील काही कुटुंबांचे कुळदैवत आहे. दर वर्षी माघपौर्णिमेस गडावर उत्सव भरतो. तीनेक दिवस चालतो. हे खाजगी देवस्थान असल्याने त्याचा फारसा बोलबाला होत नाही. दरवर्षी एखाद दोन बोकड बळी दिले जातात. हे साधारणत: कोण्या भक्ताने प्रायोजित केलेले असतात. एके वर्षी बरेच प्रायोजक उत्सवास आल्याने प्रत्येकाने बोकड अर्पण केला. त्यामुळे माणसे कमी आणि बोकड फार अशी परिस्थिती उद्भवली. तीनचारच्या जागी बारातेरा बोकड कापले गेले. गावकरी तरी किती खाऊन खाऊन किती खाणार. बोकडाचं मटण हा देवीचा प्रसाद असल्याने फेकून देता येत नव्हता. मग शेवटी परतणाऱ्या भक्तांना डब्यांत भरून दिला. गडावर जेवायची सोय नसल्याने प्रत्येक भक्तकुटुंबे खाणं वा शिधा डब्यातून आणतात. त्यामुळे डब्यांची वानवा नव्हती. तर असा हा प्रकार झाला. तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. मोठ्या प्रमाणावर हिंसा टाळलेली बरी. त्यानुसार ईदेस मौलवीने एक बोकड बळी चढवावा. सगळ्या मुस्लिमांनी बळी द्यायची गरज नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 18/06/2024 - 19:10
तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. एवढा सुजाणपणा असले तर ना... बदल होऊच कसा शकतो "पाक" ग्रंथात लिहिलंय ना मग बदलायाच नाही .. चालुद्या मुस्लिम सत्यशोधक समाजाचं दलवाईंना केवडः त्रास सोसावा लागला...

In reply to by चौकस२१२

नठ्यारा 18/06/2024 - 22:40
चौकस२१२, माझ्या माहितीप्रमाणे बोकड बळी द्यायची प्रथा कुराणातली नाही. पण याबाबत चूकभूल देणेघेणे. पण अर्थात तुमचा कट्टरपणाचा मुद्दा वैध आहेच. एरव्ही हा.पा.ला फतवे काढणारे मुल्लामौलवी कधी अनावश्यक हत्येविरोधात फतवे काढतात का? आज गोहत्येच्या विरोधात फतवा काढला तर हिंदूमुस्लीम तेढ कितीतरी कमी होईल. पण लक्षांत कोण घेतो. -नाठाळ नठ्या

बकरी ईदनिमित्त मुस्लिम समुदायात बकऱ्यांची कत्तल केली जाते. परंतु, जैन धर्मातील एका तरुणाने तब्बल १२४ बकऱ्यांचा जीव वाचवला आहे. यासाठी त्याने मुस्लिम बांधवांचा पेहराव केला होता. एवढे नव्हे तर १२४ बकरे खरेदी करण्याकरता त्यांनी १५ लाखांचा निधीही गोळा केला. जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील मंदिराच्या प्रांगणात या बकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दि प्रिंटने दिलं आहे. ही बातमी

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 19/06/2024 - 20:43
मुटके साहेब बातमी वाचली, आपल्या लेख/प्रतिसादावर प्रतिसाद/उपप्रतिसाद द्यायला गेलो तर तो इतका मेगाबायटी होतो कि स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित करण्याची पाळी येते. मागे 'युट्युब'च्या बाबतीत असा अनुभव पहिल्यांदा आला होता, आणि ह्या धाग्यावरच्या आपल्या प्रतिसादातील बातमीच्या निमित्ताने आज दुसऱ्यांदा तसा अनुभव आला आहे 😀 असो, सदर बातमी वाचताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि 'व्यावहारिक चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला तर तो बराच लांबल्याने "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" ह्या शीर्षकाने स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित केला आहे. लेखनाला विषय पुरवल्या बद्दल आपले आभार, आणि ध्यानीमनी नसताना अचानक एक लेख पाडायला लावलात त्यासाठी आपला तीव्र णिषेध 😂

मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरीही धर्मात ढवळा ढवळ केली म्हणून त्या जैन मुलाचा गळा चिरला नाही म्हणजे बर होईल.

भागो 20/06/2024 - 08:56
About 900,000 cows are slaughtered every day. If every cow was 2 meters long, and they all walked right behind each other, this line of cows would stretch for 1800 kilometers.1 This represents the number of cows slaughtered every day. For chickens, the daily count is extremely large – 202 million chickens every day. To comprehend the scale, it is better to bring it down to the average minute: 140,000 chickens are slaughtered every minute. certainly, hundreds of millions of fish are killed every day. बकरे, डुकरे , बदके ह्यांची पण संख्या प्रचंड आहे. तेव्हा उगाचच ईदच्या बळी बकर्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळू नका.

In reply to by भागो

सुबोध खरे 20/06/2024 - 10:43
मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून फुरोगाम्यांच्या दांभिकपणा बद्दल आहे जे केवळ हिंदू सणांबद्दल गरळ ओकताना दिसतात. उदा कोरडी होळी खेळा, फटाकेमुक्त दिवाळी असावी. पण मुसलमान लोकांच्या सणाबाबत काही बोलण्याची हिम्मत दाखवत नाहीत. यांचा दांभिकपणा म्हणजे लिटरला पाच किमी जाणाऱ्या गाडीतून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मोर्चाला जातात तसा आहे. कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती. The Bombay High Court on Thursday said that it would not permit unregulated or unmonitored slaughter of animals anywhere in Maharashtra and that hygiene and sanitation were important. https://indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-hc-slaughter-animals-sacrifice-vishalgad-fort-kolhapur-8664410/ हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे. बाकी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे. मतांसाठी मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो. येथे मला लष्करातील शिस्तीची आठवण येते. तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.

In reply to by सुबोध खरे

कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
सहमत.
.हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.
सहमत.
कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.
सहमत.
मतांसाठी ( हिंदू असो की ) मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

डोळे पाणावले.
अरे सुधरा रे.... देशाची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर, कोंबड्या, मासे, खेकडे, कोळंबी, आणि इतर जीव खाण्यास शास्त्रात ''जीवो जीवस्य जीवनम्'' चा संदर्भ घेऊन काही आड़काठी नसली तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?
हे राम. गणपाच्या हातच्या कोलंबी आणि पापलेट असतील तर, अगोदर पानात हे सर्व वाढून घ्यायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात जोडायचे. डोळे मिटायचे. ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. असे म्हणून जेवणास सुरुवात करायची. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे असे समजून खाल्ले की चालते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/06/2024 - 12:44
तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.
ह्यातल्या 'खान' बद्दल १०००% सहमत आहे पण 'पान?'... No way 😂

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 20/06/2024 - 11:49
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!
"मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती."
हा निर्णय खूप आधीच यायला हवा होता, पण ठीक आहे... 'देर आये, दुरुस्त आये' म्हणायचे, अजून काय! पूर्वी मुलुंडच्या 'वोक्हार्ट' (आताचे - फोर्टिस) हॉस्पिटलच्या गच्चीवर त्याचे संस्थापक,मालक, चेअरमन असलेल्या 'हबील खोराकीवाला' ह्यांनी जाहीररीत्या बोकडाची कुरबानी दिली होती आणि हा तमाशा बघायला बरीच गर्दी गोळा झाली होती. (असे कृत्य त्यांनी अनेकदा केले होते म्हणतात) असला प्रकार कोणीही केला असता तरी तो निंदनीयच आहे, पण हबील खोराकीवालांसारख्या उच्च विद्याविभूषित, अब्जाधीश, नामांकित व्यावसायिक व्यक्तीने केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर त्यांच्या प्रतिमेला अशोभनीयही होते!

In reply to by सुबोध खरे

रामचंद्र 20/06/2024 - 12:58
तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.> यात जर कुणाच्याही भावना न दुखावता लोकमान्य पद्धतीने धार्मिक परंपरांचे पालन होत असेल तर इतरत्रही याचे पालन व्हायला काय अडचण आहे? सर्वांच्याच मनासारखं पण त्रास (फारसा) कुणालाच नाही!

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 14:18
यात जर कुणाच्याही भावना न दुखावता>>>मग त्यात काय मजा राहिलि? अहो भावना दुखावण्यासाठी तर सारा खटाटोप.

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 17:43
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं । सर, माझ्या प्रतिसादाचा आशय लक्षात आला असावा असे मी समजतो.

In reply to by भागो

रामचंद्र 20/06/2024 - 18:00
अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून त्रास न होण्याची भूमिका घ्यायला तयार नसतात म्हणून मी तसं म्हटलं... पण अशा आडमुठ्या भूमिकेमुळे पीडित लोक दोन्ही गोटांतले आहेत, शिवाय याचा अनिष्ट परिणाम होणारे मुके प्राणी-पक्षी, पर्यावरण हेही आहेतच.

रामचंद्र 20/06/2024 - 18:04
शिवाय 'ते कसं वागतात' असं म्हणत चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा किमान आपण शहाणपणाची भूमिका घेतली तर काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी कमी होतील असा विवेक दोन्ही बाजूचे लोक दाखवत नाहीत.
आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे. विकीपेडीया मधुन् अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे".

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

माहितगार ·
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

अरण्यऋषीचं वनोपनिषद

चक्कर_बंडा ·

माहितगार 16/06/2024 - 09:02
चक्कर बंडा तुमच्या प्रयोगानी सुरेख बोनस फुल्ल मध्ये दिलाय. ज्यांना मारुती चितमपल्लीं अजून वाचणे झाले नाही त्यांनासुद्धा वाचावे वाटतील असा सुरेख काव्यात्मक परिचय करून दिलाय तुम्ही. @ चित्रगुप्त, चित्रे सुरेख आलीत, तुम्ही प्रॉम्प्ट इंगजीत दिलेत की मराठीत देऊन जमले? दुसरे तर चित्रातील आहे त्याच अरण्यऋषीची चेहरेपट्टी मारुती चितमपल्लींशी अधिक मिळती जुळती करता येऊ शकेल का असा एक प्रश्न मनात एयून गेला.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 18/06/2024 - 23:11
कविता गूगल ट्रान्सलेटवर चोप्यपस्ते करुन आयडियोग्रामवर चढवली. स्वतःची बुद्धी फक्त एवढेच करण्यात लावली.

माहितगार 16/06/2024 - 09:02
चक्कर बंडा तुमच्या प्रयोगानी सुरेख बोनस फुल्ल मध्ये दिलाय. ज्यांना मारुती चितमपल्लीं अजून वाचणे झाले नाही त्यांनासुद्धा वाचावे वाटतील असा सुरेख काव्यात्मक परिचय करून दिलाय तुम्ही. @ चित्रगुप्त, चित्रे सुरेख आलीत, तुम्ही प्रॉम्प्ट इंगजीत दिलेत की मराठीत देऊन जमले? दुसरे तर चित्रातील आहे त्याच अरण्यऋषीची चेहरेपट्टी मारुती चितमपल्लींशी अधिक मिळती जुळती करता येऊ शकेल का असा एक प्रश्न मनात एयून गेला.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 18/06/2024 - 23:11
कविता गूगल ट्रान्सलेटवर चोप्यपस्ते करुन आयडियोग्रामवर चढवली. स्वतःची बुद्धी फक्त एवढेच करण्यात लावली.
'जंगलाचं देणं' जणु 'चकवाचांदणं' 'केशराचा पाऊस' ओते 'शब्दांचं धन' 'नवेगावबांधचे दिवस' जशी फुटे 'चैत्रपालवी' 'निळावंती' उलगडे तशी 'मृगपक्षीशास्त्रा'ची पोथी 'पक्षी जाय दिगंतरा' झाडांच्या कवेतून 'घरट्यापलीकडे' उभा 'रातवा' पाऊसथेंब पिऊन 'आनंददायी बगळे' करविती 'निसर्गवाचन' 'सुवर्णगरुड' झेपावे 'चित्रग्रीवां''च्या गर्दीतुन 'पक्षीकोश' उलगडतो 'पाखरमाये'ची गणितं 'मत्स्यकोशा'च्या जोडीने सुटे 'वृक्षायुर्वेदा'चं कोडं 'जंगलाची दुनिया' ही सारी 'रानवाटां'ची कहाणी अरण्यऋषीच्या साहित्यसोबतीने फळासं पावली... #चक्कर_बंडा रूढार्थाने ही कविता नाही तर एक प्रयोग आहे आपल्या आवडत्या साहित्यिकाच्या सर्व प्रकाशित तथा

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

माहितगार ·

बाबुराव 13/06/2024 - 13:12
रामकृष्ण परमहंस मुत्युशय्येवर असतांना त्यांची पत्नी शारदा रडू लागली. तेव्हा डोळे उघडून रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' उगी राहा गं, रडतेस का ? मी कुठे जाणारही नाही आणि कुठून आलोही नाही. मी जिथे आहे तिथे राहणार आहे. '' शारदा म्हणाली, तुमचा देह गेल्यावर माझ्या बांगड्यांचे काय ?'' रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' मी मरणारच नाही, तर तू बांगड्या फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ? तू सधवा आहेत आणि सधवाच राहशील” त्या जमान्यात बंगालमधे नव-याच्या मृत्युनंतर बांगड्या न फोडणारी अशी एकमेव स्री म्हण शारदा माता. तिच्या दृष्टीने ते अमरच होते. महमद पैंगबर म्हणतो, ''मरण्यापूर्वी एकदा मरा''. जर्मन तत्त्वज्ञ आंजेलिस सिलोसिअस म्हणतो, मृत्यूपूर्वी तुम्ही मरणाचा अनुभव घेतला नाही तर नष्ट होऊन जाल. बुनात त्सेनसी हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणतो, ''While living, be a dead one'' एकून मिशनरीच्या आत्म्याच्या गोष्टी सोडा. सर्वच धर्मात जगाला शहाणे करण्याच्या गोष्टी आहेत. * उत्तरदायित्वास नकार लागू. * अटी लागू.

In reply to by बाबुराव

चित्रगुप्त 10/04/2025 - 06:05
While living, be a dead one चा अनुभव हल्ली मला रोजच येतो - किंबहुना मुद्दाम घ्यावा लागतो. -- उदाहरणार्थ, पहाटे फिरायला निघावे तर लोकांनी हौसेने लावलेल्या फुलझाडांवरील ताजी फुले निष्ठुरतेने ओरबाडून घेणारे नराधम आणि नार्‍याधमिणी, खांद्यावर मोबाईल ठेऊन तिरपी मान करत बोलत, जोरात बाईक चालवणारा दूधवाला, अगदी लहान मुलांना खुशाल मोबाईल देणारे पालक आणि त्यांची तीन-चार वर्षे वयाची चष्मिष्ट मुले .... असे व्यथित करणारे अनेक अनुभव रोज येत असतात, तेंव्हा 'आपण या जगात नाहीच आहोत' किंवा 'आपण मरण पावलेलो आहोत' असे मानून जगणे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 10/04/2025 - 08:06
तुमच्या प्रतिसादावरून जेमिनीने बनवलेली कविता **रोजचे मरण** सकाळी फिरायला निघालो, फुलांची क्रूर तोडणी पाहिली, हौसेने लावलेली झाडे, निर्दय हातांनी ओरबाडली. खांद्यावर मोबाईल, तिरपी मान, दूधवाला बाईक चालवतो बेभान, लहानग्या हाती मोबाईल, चष्मिष्ट डोळे, निरागस ज्ञान. पालक खुश, मुलांना मोबाईल देऊन, जगण्याची दिशा झाली आहे हरवून, रोजचे हे अनुभव, रोजची ही वेदना, 'मी या जगात नाहीच' ही मनाची कल्पना. 'मृत झालो आहे मी' असा विचार, जगणे झाले आहे एक प्रकार, रोजच्या या मरणात, शोधतोय मी जीवनाचा आधार. माणुसकी हरवली, जगातली संवेदनशीलता संपली, रोज हे मरण, रोजचा हा त्रास, शोधतोय मी यातून जगण्याचा ध्यास. कविता सेक्शन मध्येही पोस्ट केली आहे

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:18
नेमके काल या धाग्यातील उद्धृत याझिदी लोकांवर अन्याय होतात हे सांगायला बी बी सीवर आयसिसच्या मुख्य बगदादीची बायको बोलताना ती क्लिपमधे दिसली . 'झाले ते चांगले नव्हते.' असे मोघम एका याझिदी मुलीला समोर बसवून ही मुलाखत चालली होती. या शिवाय अनेक अन्य मुलींना गुलाम बनवून कसे वागवले ते सांगत असताना बगदादीची बायको तरी काय करणार असा सूर मुलाखतकार मांडत असेल असे वाटत राहते. गरीब फिलिस्तीनी मुस्लिमांच्या भल्यासाठी दुवे मागणारे लोक नेटवरून पैशाची मागणी करत असतात... याझिदी लोकांना कोण वाली आहे?

बाबुराव 13/06/2024 - 13:12
रामकृष्ण परमहंस मुत्युशय्येवर असतांना त्यांची पत्नी शारदा रडू लागली. तेव्हा डोळे उघडून रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' उगी राहा गं, रडतेस का ? मी कुठे जाणारही नाही आणि कुठून आलोही नाही. मी जिथे आहे तिथे राहणार आहे. '' शारदा म्हणाली, तुमचा देह गेल्यावर माझ्या बांगड्यांचे काय ?'' रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' मी मरणारच नाही, तर तू बांगड्या फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ? तू सधवा आहेत आणि सधवाच राहशील” त्या जमान्यात बंगालमधे नव-याच्या मृत्युनंतर बांगड्या न फोडणारी अशी एकमेव स्री म्हण शारदा माता. तिच्या दृष्टीने ते अमरच होते. महमद पैंगबर म्हणतो, ''मरण्यापूर्वी एकदा मरा''. जर्मन तत्त्वज्ञ आंजेलिस सिलोसिअस म्हणतो, मृत्यूपूर्वी तुम्ही मरणाचा अनुभव घेतला नाही तर नष्ट होऊन जाल. बुनात त्सेनसी हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणतो, ''While living, be a dead one'' एकून मिशनरीच्या आत्म्याच्या गोष्टी सोडा. सर्वच धर्मात जगाला शहाणे करण्याच्या गोष्टी आहेत. * उत्तरदायित्वास नकार लागू. * अटी लागू.

In reply to by बाबुराव

चित्रगुप्त 10/04/2025 - 06:05
While living, be a dead one चा अनुभव हल्ली मला रोजच येतो - किंबहुना मुद्दाम घ्यावा लागतो. -- उदाहरणार्थ, पहाटे फिरायला निघावे तर लोकांनी हौसेने लावलेल्या फुलझाडांवरील ताजी फुले निष्ठुरतेने ओरबाडून घेणारे नराधम आणि नार्‍याधमिणी, खांद्यावर मोबाईल ठेऊन तिरपी मान करत बोलत, जोरात बाईक चालवणारा दूधवाला, अगदी लहान मुलांना खुशाल मोबाईल देणारे पालक आणि त्यांची तीन-चार वर्षे वयाची चष्मिष्ट मुले .... असे व्यथित करणारे अनेक अनुभव रोज येत असतात, तेंव्हा 'आपण या जगात नाहीच आहोत' किंवा 'आपण मरण पावलेलो आहोत' असे मानून जगणे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 10/04/2025 - 08:06
तुमच्या प्रतिसादावरून जेमिनीने बनवलेली कविता **रोजचे मरण** सकाळी फिरायला निघालो, फुलांची क्रूर तोडणी पाहिली, हौसेने लावलेली झाडे, निर्दय हातांनी ओरबाडली. खांद्यावर मोबाईल, तिरपी मान, दूधवाला बाईक चालवतो बेभान, लहानग्या हाती मोबाईल, चष्मिष्ट डोळे, निरागस ज्ञान. पालक खुश, मुलांना मोबाईल देऊन, जगण्याची दिशा झाली आहे हरवून, रोजचे हे अनुभव, रोजची ही वेदना, 'मी या जगात नाहीच' ही मनाची कल्पना. 'मृत झालो आहे मी' असा विचार, जगणे झाले आहे एक प्रकार, रोजच्या या मरणात, शोधतोय मी जीवनाचा आधार. माणुसकी हरवली, जगातली संवेदनशीलता संपली, रोज हे मरण, रोजचा हा त्रास, शोधतोय मी यातून जगण्याचा ध्यास. कविता सेक्शन मध्येही पोस्ट केली आहे

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:18
नेमके काल या धाग्यातील उद्धृत याझिदी लोकांवर अन्याय होतात हे सांगायला बी बी सीवर आयसिसच्या मुख्य बगदादीची बायको बोलताना ती क्लिपमधे दिसली . 'झाले ते चांगले नव्हते.' असे मोघम एका याझिदी मुलीला समोर बसवून ही मुलाखत चालली होती. या शिवाय अनेक अन्य मुलींना गुलाम बनवून कसे वागवले ते सांगत असताना बगदादीची बायको तरी काय करणार असा सूर मुलाखतकार मांडत असेल असे वाटत राहते. गरीब फिलिस्तीनी मुस्लिमांच्या भल्यासाठी दुवे मागणारे लोक नेटवरून पैशाची मागणी करत असतात... याझिदी लोकांना कोण वाली आहे?
इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?

आजी ·

गवि 13/06/2024 - 10:53
पावसाळा जोरदार सुरू झाला आहेच. लेख समयोचित. तूर्त मात्र जे टाळू या म्हटले आहे तेच समोर येत आहे. मुंबईची तुंबई, नालेसफाईचे दावे निष्फळ, पावसाची दमदार बॅटिंग वगैरे घिसे पिटे शब्द सर्वत्र ..

Bhakti 13/06/2024 - 11:00
खुपचं सुंदर लिहिलंय!!
पावसाळ्यात काही जण अपेय पितात. काहीजण भजी खातात. कुणी कडक काॅफी पितात. कुणी आवडती गाणी ऐकतात. कुणी रहस्यकथा वाचतात. तर काही जण गुरगुटून झोपतात. काही जण पृथ्वीदेवीनं खरंच हिरवा शालू नेसलाय का याची खात्री करून घ्यायला पिकनिकला जातात.
मस्त निरीक्षण..

गवि 13/06/2024 - 10:53
पावसाळा जोरदार सुरू झाला आहेच. लेख समयोचित. तूर्त मात्र जे टाळू या म्हटले आहे तेच समोर येत आहे. मुंबईची तुंबई, नालेसफाईचे दावे निष्फळ, पावसाची दमदार बॅटिंग वगैरे घिसे पिटे शब्द सर्वत्र ..

Bhakti 13/06/2024 - 11:00
खुपचं सुंदर लिहिलंय!!
पावसाळ्यात काही जण अपेय पितात. काहीजण भजी खातात. कुणी कडक काॅफी पितात. कुणी आवडती गाणी ऐकतात. कुणी रहस्यकथा वाचतात. तर काही जण गुरगुटून झोपतात. काही जण पृथ्वीदेवीनं खरंच हिरवा शालू नेसलाय का याची खात्री करून घ्यायला पिकनिकला जातात.
मस्त निरीक्षण..
भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती. मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता. पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती.

सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१)

चित्रगुप्त ·
तीनचार दिवसांपूर्वी एका नवीनच गोष्टीचा शोध लागला, आणि मग त्या उद्योगाला लागलो. त्यातून जन्मलेल्या काही रमलप्रतिमा इथे देतो आहे.

शशिकांत ओक 13/06/2024 - 08:58
सततोद्योगी चित्रगुप्त हो, या चित्रमालेत रमायला झाले... आता मिपाकरांनी या चित्रकथीवर आधारित कथाकारी करावी. झकास चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक मसाला आहे. चि क्र ९, १९ आणि २३ मधील ललना कथेचा कॅनव्हास जागतिक स्तरावरून अवकाशात नेतात. चि क्र ३,१२,२४ मधे सिंदबाद जहाजातून सागर सफर करताना २५ मधील बेटावर पोचला आहे असे भासवतो. कल्पना आणि सत्य याची सुरेख गल्लत भावी पिढीला कशी गोंधळात टाकेल याची चाहूल लेखकाने खुबीने दाखवली आहे. मस्त सादरीकरण.

निनाद 13/06/2024 - 09:18
एक चित्र काढाल? श्रावस्तीचे सुहेलदेव या हिंदू राजाने केलेला सैयद सालार मसूद गाझीचा पराभव संपूर्ण - पराभवाचा निर्णायक क्षण आणि सैयद सालारचे उडवले जाणारे मुंडके. यात वीर राजा सुहेलदेव आणि प्रतापी सैन्य त्यांना आवेश दिसावा. करता येईल?

In reply to by निनाद

निनाद 13/06/2024 - 09:28
२. या घटनेमुळे महमूद ग़ज़नवी ला बसलेला धक्का आणि पराभवामुळे त्याच्या महालात उडालेला हल्ल-कल्लोळ, रडारड, घाबरलेले सरदार आणि लपलेले सैनिक, यावर ही एक चित्र बनू शकेल. ३. सिवा आ गया! या आवाजामुळे *डासला बसलेला औरंगजेब घाबरला आणि धडपडला आणि या तारांबळीत त्याचा पायच मोडला. त्यावेळी केवळ मराठे आ गये अफवेने मोगल छावणीत उडालेली दाणादाण. याचे क्षणाचेही चित्र हवे आहे. ही फजिती नेमकी दिसायला हवी आणि त्यासाठी चित्रकाराची दृष्टी हवी असे वाटते!

In reply to by निनाद

चित्रगुप्त 13/06/2024 - 12:01
अगदी आत्ताच हा उद्योग शिकायला सुरूवात केलेली असल्याने त्यातल्या शक्यता - मर्यादा याविषयी नक्की माहीत नाही, तरी प्रयत्न करून बघेन. मुख्य म्हणजे कृबु ला इंग्रजीतच आदेश द्यावे लागत असल्याने नेमके शब्द वापरले गेले पाहिजेत, आणि त्यासाठी उत्तम, साहित्यिक भाषेत लिहीता आले पाहिजे. सध्या फुकट क्रुबु वापरतो आहे, त्यात आणि पैसे भरून असलेल्यात काही फरक आहे का वगैरे काहीच ठाऊक नाही. आणखी प्रयोगातून जसजसे कळत जाईल, त्याप्रमाणे करता येईल. मिपाकरांनी विविध विषय अवश्य सुचवावेत. अनेक आभार.

गवि 13/06/2024 - 10:49
ए आय चित्राची निर्मिती होण्यात प्रॉम्प्ट सर्वात महत्वाचा. एका चित्रकाराच्या अफाट सृजनशील आणि कल्पनाशक्तीने काठोकाठ भरलेल्या मनातून आलेले प्रॉम्प्ट हे आमच्या सारख्या सामान्य वापरकर्त्यांपेक्षा खूप सखोल असणार. ते वाचणे हा अधिक पूरक अनुभव ठरला असता, जर चित्रे AI वापरून काढली आहेत हे गृहीतक खरे असेल तर. तेव्हा तेही चित्रासोबत जोडल्यास पूर्णत्व येईल.

In reply to by गवि

चित्रगुप्त 13/06/2024 - 12:10
मला जसे सुचत गेले आणि जमले तसतशी ही चित्रे बनवली. प्रत्येक प्रॉम्टला चार चित्रे येतात, त्यातल्या त्यात जी बरी वाटली ती निवडून इथे दिली आहेत. एकदा नीट माहिती झाली की पैसे भरून घ्यायचा विचार आहे. कोणते सॉ.वे. सर्वात चांगले आहे, हे ठाऊक असल्यास कळवावे. सध्या आयडियोग्राम वापरतो आहे.

चौथा कोनाडा 13/06/2024 - 12:22
अद्भुत .. केवळ अद्भुत ! ❤️❤️❤️ मिपा क्रांतीकारी तंत्रज्ञानाच्या नव्या टप्प्यावर ! मिपा विशेषांका नंतर चित्रगुप्त साहेबांनी चितारली अद्भुत कृबु रंगचित्रे ! सर्व मिपाकरांची चित्रगुप्त यांची आश्वासक कलाकारी अंत्यत भावल्याच्या प्रतिक्रिया ! हॅट्स ऑफ चिगु सर ! जय हो मिपा !

नठ्यारा 13/06/2024 - 18:49
चित्रगुप्त, तुमचा प्रयोग आवडला. मला काय दिसलं ते लिहितो. . त्याचं असंय की पहिल्या चित्रातल्या बालिकेचा चेहरा तिच्या शरीराच्या मानाने जरा मोठा वाटतोय. शरीर इतकं लहान आहे की ती बालिका वाटतेय. तर दहाव्या चित्रातल्या तरुणीचा चेहरा अतिशय लहान आहे. चिमुकलाच म्हणा ना. उर्वरित अंगास आजीबात शोभून दिसंत नाही. याउलट विसाव्या चित्रातल्या योद्ध्या एकदम प्रमाणबद्ध आहेत. त्यांची अंगं किंचित मोठी वाटताहेत, पण ते प्रशिक्षणामुळे असावं. शेवटी चोविसाव्या चित्रात नृत्याची लय सुरेख जमलीये. पण बायकांच्या माना अतिशय पातळ आहेत. मात्र त्यांचे खांदे खूप छान रंगवलेत. हे सगळं जसं दिसलं तसंच लिहिलं आहे. मी चित्रकलेतला तत्ज्ञ नाही. फार काय रसिकही नाही. या निरीक्षणांना काही अर्थ आहे का नाही ते ही माहीत नाही. अगदी गा.गु.च.का. म्हंटलंत तरीही चालेल. -नाठाळ नठ्या

चित्रगुप्त 13/06/2024 - 19:05
प्रत्येक चित्राचे चार पर्याय मिळतात, त्या प्रत्येकात काही ना काही उणीव दिसते. त्यापैकी एक चित्र आपण गोड मानून घ्यायचे. फोटोशॉपमधे काही उणीवा दूर करता येतील पण सध्यातरी मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. आपण नुसते काही वर्णन लिहायचे आणि त्यावर चित्र बनून येते, हेच अद्भुत वाटते आहे. -- सध्या हे साधन मानवाकृतींपेक्षा निसर्गचित्रांसाठी जास्त उपयुक्त आहेसे दिसते. प्राथमिक चित्रे कृबु कडून बनवून घेऊन नंतर त्यात हवे ते बदल करत स्वतः हाताने चित्र रंगवावीत या हेतुने मी हा उद्योग करतो आहे.

एआयच्या माध्यमांच्या वापर करुन काढलेली चित्रे आवडली. महाराष्ट्र टाइम्सने छापील वृत्तपत्रात एआयच्या माध्यमातून चित्रे काढायला सुरुवात केली आहे. एक पावसाची गोष्टही काल परवा वाचायला मिळाली. एआयचा वापर चांगला केला तर, उत्तम चित्रे काढता येतील. आपली सर्वच चित्रे आवडली. उत्तमच आली आहेत. आपण जाणकार चित्रकार आहात. आपला धागा म्हणुन अधिक उत्सुकता. चित्रांमधील 'न्युड फॉर्म' ची चित्र कशी येतील त्याची उत्सुकता लागून राहिली होती. अशा चित्रांमधील 'आर्ट' 'रेषा' 'आकार' चित्रकारा-च्या दृष्टीने जे गवसतं तशी काही चित्र एआयच्या माध्यमातून आणि तुमच्या नजरेतून आली तर नक्की टाका. -दिलीप बिरुटे (रसिक)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 13/06/2024 - 22:15
. झूम करून बघितले तर उजवीकडील स्त्रीचा चेहरा अगदी कसातरीच आहेसे दिसते. A stunning 3D render illustration of three graceful nymphs, or 'Graces,' dancing around a massive oak tree in a dense forest. The morning sunrise casts a warm, golden glow on the scene, highlighting the nymphs' slender, toned figures and the rich details of the verdant foliage. The backdrop features a mesmerizing view of cascading waterfalls in the distance, with their sparkling waters adding a touch of magic to the atmosphere. This cinematic image captures an ethereal moment of beauty and serenity in the heart of nature., cinematic, 3d render, illustration

चित्रगुप्त 13/06/2024 - 20:54
माझ्या अल्प अनुभवाप्रमाणे मानवाकृतींची चित्रे कृबु मधे अजूनतरी खूप चांगली येत नाहीत. तरी प्रयत्न करत राहिले की कळेल नेमके कसे करायचे ते. काही कल्पना सुचवा चित्रांसाठी. अनेक आभार.

कुंचले,पेन्सिल, खडू यांच्याबरोबर कधीच नाते जुळले नाही. माझी चित्रकला म्हणजे... गुरूजींनी सांगितले दहा मुलांनी लिहीले आठ गुरूजींनी सांगीतले सहा आणी गुरुजींचे डोके पहा. आयडिओग्राम वापरून बघतो. नवीन माहीती बद्दल धन्यवाद.

शशिकांत ओक 13/06/2024 - 08:58
सततोद्योगी चित्रगुप्त हो, या चित्रमालेत रमायला झाले... आता मिपाकरांनी या चित्रकथीवर आधारित कथाकारी करावी. झकास चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक मसाला आहे. चि क्र ९, १९ आणि २३ मधील ललना कथेचा कॅनव्हास जागतिक स्तरावरून अवकाशात नेतात. चि क्र ३,१२,२४ मधे सिंदबाद जहाजातून सागर सफर करताना २५ मधील बेटावर पोचला आहे असे भासवतो. कल्पना आणि सत्य याची सुरेख गल्लत भावी पिढीला कशी गोंधळात टाकेल याची चाहूल लेखकाने खुबीने दाखवली आहे. मस्त सादरीकरण.

निनाद 13/06/2024 - 09:18
एक चित्र काढाल? श्रावस्तीचे सुहेलदेव या हिंदू राजाने केलेला सैयद सालार मसूद गाझीचा पराभव संपूर्ण - पराभवाचा निर्णायक क्षण आणि सैयद सालारचे उडवले जाणारे मुंडके. यात वीर राजा सुहेलदेव आणि प्रतापी सैन्य त्यांना आवेश दिसावा. करता येईल?

In reply to by निनाद

निनाद 13/06/2024 - 09:28
२. या घटनेमुळे महमूद ग़ज़नवी ला बसलेला धक्का आणि पराभवामुळे त्याच्या महालात उडालेला हल्ल-कल्लोळ, रडारड, घाबरलेले सरदार आणि लपलेले सैनिक, यावर ही एक चित्र बनू शकेल. ३. सिवा आ गया! या आवाजामुळे *डासला बसलेला औरंगजेब घाबरला आणि धडपडला आणि या तारांबळीत त्याचा पायच मोडला. त्यावेळी केवळ मराठे आ गये अफवेने मोगल छावणीत उडालेली दाणादाण. याचे क्षणाचेही चित्र हवे आहे. ही फजिती नेमकी दिसायला हवी आणि त्यासाठी चित्रकाराची दृष्टी हवी असे वाटते!

In reply to by निनाद

चित्रगुप्त 13/06/2024 - 12:01
अगदी आत्ताच हा उद्योग शिकायला सुरूवात केलेली असल्याने त्यातल्या शक्यता - मर्यादा याविषयी नक्की माहीत नाही, तरी प्रयत्न करून बघेन. मुख्य म्हणजे कृबु ला इंग्रजीतच आदेश द्यावे लागत असल्याने नेमके शब्द वापरले गेले पाहिजेत, आणि त्यासाठी उत्तम, साहित्यिक भाषेत लिहीता आले पाहिजे. सध्या फुकट क्रुबु वापरतो आहे, त्यात आणि पैसे भरून असलेल्यात काही फरक आहे का वगैरे काहीच ठाऊक नाही. आणखी प्रयोगातून जसजसे कळत जाईल, त्याप्रमाणे करता येईल. मिपाकरांनी विविध विषय अवश्य सुचवावेत. अनेक आभार.

गवि 13/06/2024 - 10:49
ए आय चित्राची निर्मिती होण्यात प्रॉम्प्ट सर्वात महत्वाचा. एका चित्रकाराच्या अफाट सृजनशील आणि कल्पनाशक्तीने काठोकाठ भरलेल्या मनातून आलेले प्रॉम्प्ट हे आमच्या सारख्या सामान्य वापरकर्त्यांपेक्षा खूप सखोल असणार. ते वाचणे हा अधिक पूरक अनुभव ठरला असता, जर चित्रे AI वापरून काढली आहेत हे गृहीतक खरे असेल तर. तेव्हा तेही चित्रासोबत जोडल्यास पूर्णत्व येईल.

In reply to by गवि

चित्रगुप्त 13/06/2024 - 12:10
मला जसे सुचत गेले आणि जमले तसतशी ही चित्रे बनवली. प्रत्येक प्रॉम्टला चार चित्रे येतात, त्यातल्या त्यात जी बरी वाटली ती निवडून इथे दिली आहेत. एकदा नीट माहिती झाली की पैसे भरून घ्यायचा विचार आहे. कोणते सॉ.वे. सर्वात चांगले आहे, हे ठाऊक असल्यास कळवावे. सध्या आयडियोग्राम वापरतो आहे.

चौथा कोनाडा 13/06/2024 - 12:22
अद्भुत .. केवळ अद्भुत ! ❤️❤️❤️ मिपा क्रांतीकारी तंत्रज्ञानाच्या नव्या टप्प्यावर ! मिपा विशेषांका नंतर चित्रगुप्त साहेबांनी चितारली अद्भुत कृबु रंगचित्रे ! सर्व मिपाकरांची चित्रगुप्त यांची आश्वासक कलाकारी अंत्यत भावल्याच्या प्रतिक्रिया ! हॅट्स ऑफ चिगु सर ! जय हो मिपा !

नठ्यारा 13/06/2024 - 18:49
चित्रगुप्त, तुमचा प्रयोग आवडला. मला काय दिसलं ते लिहितो. . त्याचं असंय की पहिल्या चित्रातल्या बालिकेचा चेहरा तिच्या शरीराच्या मानाने जरा मोठा वाटतोय. शरीर इतकं लहान आहे की ती बालिका वाटतेय. तर दहाव्या चित्रातल्या तरुणीचा चेहरा अतिशय लहान आहे. चिमुकलाच म्हणा ना. उर्वरित अंगास आजीबात शोभून दिसंत नाही. याउलट विसाव्या चित्रातल्या योद्ध्या एकदम प्रमाणबद्ध आहेत. त्यांची अंगं किंचित मोठी वाटताहेत, पण ते प्रशिक्षणामुळे असावं. शेवटी चोविसाव्या चित्रात नृत्याची लय सुरेख जमलीये. पण बायकांच्या माना अतिशय पातळ आहेत. मात्र त्यांचे खांदे खूप छान रंगवलेत. हे सगळं जसं दिसलं तसंच लिहिलं आहे. मी चित्रकलेतला तत्ज्ञ नाही. फार काय रसिकही नाही. या निरीक्षणांना काही अर्थ आहे का नाही ते ही माहीत नाही. अगदी गा.गु.च.का. म्हंटलंत तरीही चालेल. -नाठाळ नठ्या

चित्रगुप्त 13/06/2024 - 19:05
प्रत्येक चित्राचे चार पर्याय मिळतात, त्या प्रत्येकात काही ना काही उणीव दिसते. त्यापैकी एक चित्र आपण गोड मानून घ्यायचे. फोटोशॉपमधे काही उणीवा दूर करता येतील पण सध्यातरी मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. आपण नुसते काही वर्णन लिहायचे आणि त्यावर चित्र बनून येते, हेच अद्भुत वाटते आहे. -- सध्या हे साधन मानवाकृतींपेक्षा निसर्गचित्रांसाठी जास्त उपयुक्त आहेसे दिसते. प्राथमिक चित्रे कृबु कडून बनवून घेऊन नंतर त्यात हवे ते बदल करत स्वतः हाताने चित्र रंगवावीत या हेतुने मी हा उद्योग करतो आहे.

एआयच्या माध्यमांच्या वापर करुन काढलेली चित्रे आवडली. महाराष्ट्र टाइम्सने छापील वृत्तपत्रात एआयच्या माध्यमातून चित्रे काढायला सुरुवात केली आहे. एक पावसाची गोष्टही काल परवा वाचायला मिळाली. एआयचा वापर चांगला केला तर, उत्तम चित्रे काढता येतील. आपली सर्वच चित्रे आवडली. उत्तमच आली आहेत. आपण जाणकार चित्रकार आहात. आपला धागा म्हणुन अधिक उत्सुकता. चित्रांमधील 'न्युड फॉर्म' ची चित्र कशी येतील त्याची उत्सुकता लागून राहिली होती. अशा चित्रांमधील 'आर्ट' 'रेषा' 'आकार' चित्रकारा-च्या दृष्टीने जे गवसतं तशी काही चित्र एआयच्या माध्यमातून आणि तुमच्या नजरेतून आली तर नक्की टाका. -दिलीप बिरुटे (रसिक)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 13/06/2024 - 22:15
. झूम करून बघितले तर उजवीकडील स्त्रीचा चेहरा अगदी कसातरीच आहेसे दिसते. A stunning 3D render illustration of three graceful nymphs, or 'Graces,' dancing around a massive oak tree in a dense forest. The morning sunrise casts a warm, golden glow on the scene, highlighting the nymphs' slender, toned figures and the rich details of the verdant foliage. The backdrop features a mesmerizing view of cascading waterfalls in the distance, with their sparkling waters adding a touch of magic to the atmosphere. This cinematic image captures an ethereal moment of beauty and serenity in the heart of nature., cinematic, 3d render, illustration

चित्रगुप्त 13/06/2024 - 20:54
माझ्या अल्प अनुभवाप्रमाणे मानवाकृतींची चित्रे कृबु मधे अजूनतरी खूप चांगली येत नाहीत. तरी प्रयत्न करत राहिले की कळेल नेमके कसे करायचे ते. काही कल्पना सुचवा चित्रांसाठी. अनेक आभार.

कुंचले,पेन्सिल, खडू यांच्याबरोबर कधीच नाते जुळले नाही. माझी चित्रकला म्हणजे... गुरूजींनी सांगितले दहा मुलांनी लिहीले आठ गुरूजींनी सांगीतले सहा आणी गुरुजींचे डोके पहा. आयडिओग्राम वापरून बघतो. नवीन माहीती बद्दल धन्यवाद.

द सेकंड स्पार्क - भाग २ - उत्तरार्ध

प्रसाद गोडबोले ·

In reply to by मुक्त विहारि

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद मुवि! कथा विज्ञानाशी आणि त्यातही गहन अशा विषयांशी संबंधित असल्याने बरीच किचकट आहे. तथापि मी जमेल तितके सोपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वच वाचकांच्यासाठी काही रोचक व्हिडिओजच्या लिंक देत आहे. हे पाहिल्यावर कथेचा शेवट कळण्याची शक्यता नक्की वाढेल! परत एकदा धन्यवाद ! https://www.youtube.com/watch?v=J0KHiiTtt4w https://www.youtube.com/watch?v=pmcrG7ZZKUc&t=23s https://www.youtube.com/watch?v=yGfTDcHJHSI

In reply to by प्रसाद गोडबोले

चिर्कुट 16/07/2024 - 23:12
मला जे समजलं ते असं, की हे तीन लोक स्वतःच एका सिम्युलेशन मध्ये आहेत. आणि सेकंड स्पार्क त्या सिस्टिमचा नसून त्या तिघांचा आहे. हे बरोबर आहे, की काही चुकतंय?

In reply to by चिर्कुट

एक्झ्यॅक्टली. ते तिघेही एका सिम्युलेशन मध्ये आहेत आणि सेकंड स्पार्क म्हणजे त्या तिघांना लक्षात येते की आपण स्वतःच एक सिम्युलेशन आहोत.

माफ करा गोडबोले साहेब, कथेमध्ये कथा काहीच नाही. नुसतीच चर्चा चालली आहे. तुमच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल काही वादच नाही. पण तुम्ही जरा अजून वातावरण निर्मिती करायला पाहिजे. नुसतेच डायलॉग झालेत ते पण एककेकांना नुसत्या तांत्रिक गोष्टी समजावून देणार्‍या. एक सजेशन ते म्हणजे, कथा प्रथम पुरुषात लिहून पाहा. तुमच्या ज्ञानाबद्दल कोणतीही टीका नाही. फक्त एक वाचक म्हणून मला हे जाणवले.

थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा. तुम्हाला आवडतील. शिवाय एकदम अवघड गोष्ट कशी सांगावी याचा एक अभ्यास पण होईल. तुम्ही खूप उत्तम सायफाय लिहू शकता. तुमच्यात तो 'फर्स्ट स्पार्क' आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धन्यवाद !
थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा.
नक्की प्रयत्न करतो :)

टर्मीनेटर 13/06/2024 - 09:56
साय-फाय कथा आवडली 👍 प्रोफेसर गोडससेंच्या "पाणी सुंदर आहे." वरील निरूपणापासून खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर तोपर्यंत सुसाट वेगात सुरु असलेलया माझ्या वाचनाच्या गाडीचा वेग मंद मंद होत आता सर्व 'स्पार्क' प्लग्स एकाचवेळी उडून आचके-गचके देउ लगलेली माझी वाचनगाडी बंद पडते कि काय? असे वाटू लागले होते, पण "An intelligent being who is conscious about its own consciousness." ह्या १० शब्दांत सर्व काही स्पष्ट करणाऱ्या वाक्यापर्यंत पोचल्यावर "अरेच्चा, बायपासचा वापर करून तो खडबडीत रस्ता टाळून आपण स्मुथली इथपर्यंत पोहोचू शकलो असतो कि!" हा विचार मनात आला 😀 अवांतर: काही वर्षांपूर्वी गुगलच्या 'क्वांटम कॉम्प्युटर' विषयी वाचले होते तेव्हा त्याच्या काहीच दिवस आधी वाचलेला 'ओरॅकल'ने एक हजार साठ Raspberry Pi's चा वापर करून तयार केलेल्या 'सुपर कॉम्प्यूटर' बद्दलचा लेख आठवून आपणही 'IBM' चे तीन शक्तिशाली सर्व्हर्स + पाचशे 'Raspberry Pi's' चे क्लस्टर, 'Cisco' किंवा 'Netgear' चे अत्याधुनिक स्विचेस Illuminated पॅच कॉर्ड केबल्स वगैरेंचा वापर करून एक एनर्जी इफिशिअंट, इकॉनॉमिक असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर तयार करावा हा विचार मेंदू पोखरू लागला होता. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला तेव्हा तो सुमरे ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात भरला होता त्यामुळे अर्थातच तो विचार बाजूला पडला हा भाग वेगळा 😀 पण उद्या असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर पदरी बाळगण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली तर त्यासाठीचे १० X १० चौ. फु. जागेत, 'कुलिंग सिस्टीम' साठी केवळ दीड ते दोन टन क्षमतेचा एक एसी आणि दोन होम/ऑफिस वॉटर कुलर्स चा वापर करून दिसायला सुंदर आणि शक्तिशाली 'झुंबर' टाईप क्वांटम/सुपर कॉम्प्यूटरचे प्रोटोटाईप मॉडेल डोक्यात तयार आहे! प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्प हाती घ्यायचा झाल्यास 'मी', प्रोडक्ट डिझाईनसाठी मिपाकर 'चौकस २१२', नेटवर्क महर्षी 'प्रचेतस' बुवा आणि घरातच उपलब्ध असलेला लिनक्स, पायथन मधला एक 'किडा' अशा संभाव्य टीम मेंबर्सची प्रथमिक यादी देखील तयार आहे 😀 असो, अशा साय-फाय कथा आपल्याकडून नियमित येउद्यात, वाचायला आवडतील! धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

मनःपुर्वक धन्यवाद टर्मिनेटर ! ते "पाणी सुंदर आहे" हा खरेच एक खुप गहन विचार आहे, खोल तत्वज्ञानाचा विषय आहे. मी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यावर जास्त सविस्तर लिहिता आले नाही. बर्‍याच जणांना तो बोरिंगही वाटेल पण मध्यंतरी हिमालयात गेलो होतो तेथील एका स्वामींना मी हा विचार ऐकवला त्यावर ते म्हणाले - ज्याला तुम्ही पाणी म्हणत आहात, अचेतन गोष्टींचे प्रतिक म्हणत आहात ते अचेतन आहे कशावरुन ? ते सुषुप्त अवस्थेत नसेल कशावरुन ? कॉन्शसनेस तर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे मग ते अचेतन आहे असे कसे ? मुळात सचेतन अचेतन अशी सीमारेषाच आपल्या कल्पनेतील आहे, भास आहे . असो. ( पुढे ती चर्चा सत्चिदानंद ब्रह्म आत्मन् वगैरे अजुन गहन विषयात गेली. ते इथं लिहित बसलो असतो तर फार विषयांतर झाले असते =)) ) बाकी क्वांटम कॉम्प्युटरची सर्वसामान्य लोकांना गरज पडणार नाही, कारण आपले सध्याचे सी.पी.यु कैक पटीने प्रगत आहेत . क्वांटम कॉम्प्युटर चे अ‍ॅडव्हान्टेज येते जेव्हा एकच रीपीटेटिव्ह काम करायचे असते तेव्हा . जसे की सिम्युलेशन्स ! अर्थात क्वांटम कॉम्प्युटर्स हे अति प्रगत जी.पी.यु सारखे काम करतील असा माझा अंदाज आहे. अर्थात तुम्ही आर.एस.ए. टोकन सिस्टिम ब्रेक करणे किंवा बिटकॉईन चे इन्क्रिप्शन ब्रेक करणे असे काही काम करणार असाल तर नक्कीच तुम्ही क्वांटम कॉम्प्युटर वापरु शकाल. असे काही करणार असाल तर आम्हाला नक्की सहभागी करुन घ्या , ही अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती ;) पुनश्च एकवार मनःपुर्वक धन्यवाद !

Bhakti 13/06/2024 - 10:54
पण ती सिंग्युलॅरीटी , तो सेकंड स्पार्क कधी येईल किती वेळ लागेल हे काहीच प्रेडिक्ट करता येणे अशक्य आहे
_/\_ खुपचं अप्रतिम कथा लिहिली आहे.फर्स्ट -सेकंड स्पार्क,अचेतन-सचेतन मस्तपणे समजले.

नठ्यारा 14/06/2024 - 20:09
प्रसाद गोडबोले, विज्ञानकथेत विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान रंजकपणे मिळून मिसळून यायला हवं. कथेत अगदी झक्कासपणे जमलंय. डोस्कं लई भंजाळून गेलंय. विचारचक्र जाम गरागरा फिरू लागलंय. सविस्तर प्रतिसाद सवडीने देईन. -नाठाळ नठ्या

मनःपुर्वक धन्यवाद ! सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपुर्वक आभार ! इथे प्रतिसाद पाहुन हुरुप येतो. ही कथा जवळपास एक वर्षापुर्वी सुचलेली, मात्र लिहायला वेळच होत नव्हता , हिमालयातील ट्रिप च्या निमित्ताने लिहुन काढु शकलो. :) बाकी प्रो. जैन आणि प्रो. चौहान ह्यांचा सोबत झालेल्या अनेक चर्चा अतिषय उपयुक्त ठरल्या कथा लिहायला, त्यांची कथेवर काय प्रतिक्रिया आहे हे अजुन कळलेले नाही. :)) ( अवांतर : ते अजुन हिमालयातच आहेत , त्यांची ट्रिप अपेक्षेपेक्षा जास्त अ‍ॅडव्हेंचरस झालेली असल्याचे कळले. =)))) ) परत एकदा धन्यवाद :)

The Truman Show https://en.wikipedia.org/wiki/The_Truman_Show The film is the story of Truman Burbank (played by Jim Carrey), a man who is unaware that he is living his entire life on a colossal soundstage, and that it is being filmed and broadcast as a reality television show which has a huge international following. All of his friends and family and members of his community are paid actors whose job it is to sustain the illusion and keep Truman in the dark about the fiction he is living.

In reply to by मुक्त विहारि

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद मुवि! कथा विज्ञानाशी आणि त्यातही गहन अशा विषयांशी संबंधित असल्याने बरीच किचकट आहे. तथापि मी जमेल तितके सोपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वच वाचकांच्यासाठी काही रोचक व्हिडिओजच्या लिंक देत आहे. हे पाहिल्यावर कथेचा शेवट कळण्याची शक्यता नक्की वाढेल! परत एकदा धन्यवाद ! https://www.youtube.com/watch?v=J0KHiiTtt4w https://www.youtube.com/watch?v=pmcrG7ZZKUc&t=23s https://www.youtube.com/watch?v=yGfTDcHJHSI

In reply to by प्रसाद गोडबोले

चिर्कुट 16/07/2024 - 23:12
मला जे समजलं ते असं, की हे तीन लोक स्वतःच एका सिम्युलेशन मध्ये आहेत. आणि सेकंड स्पार्क त्या सिस्टिमचा नसून त्या तिघांचा आहे. हे बरोबर आहे, की काही चुकतंय?

In reply to by चिर्कुट

एक्झ्यॅक्टली. ते तिघेही एका सिम्युलेशन मध्ये आहेत आणि सेकंड स्पार्क म्हणजे त्या तिघांना लक्षात येते की आपण स्वतःच एक सिम्युलेशन आहोत.

माफ करा गोडबोले साहेब, कथेमध्ये कथा काहीच नाही. नुसतीच चर्चा चालली आहे. तुमच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल काही वादच नाही. पण तुम्ही जरा अजून वातावरण निर्मिती करायला पाहिजे. नुसतेच डायलॉग झालेत ते पण एककेकांना नुसत्या तांत्रिक गोष्टी समजावून देणार्‍या. एक सजेशन ते म्हणजे, कथा प्रथम पुरुषात लिहून पाहा. तुमच्या ज्ञानाबद्दल कोणतीही टीका नाही. फक्त एक वाचक म्हणून मला हे जाणवले.

थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा. तुम्हाला आवडतील. शिवाय एकदम अवघड गोष्ट कशी सांगावी याचा एक अभ्यास पण होईल. तुम्ही खूप उत्तम सायफाय लिहू शकता. तुमच्यात तो 'फर्स्ट स्पार्क' आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धन्यवाद !
थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा.
नक्की प्रयत्न करतो :)

टर्मीनेटर 13/06/2024 - 09:56
साय-फाय कथा आवडली 👍 प्रोफेसर गोडससेंच्या "पाणी सुंदर आहे." वरील निरूपणापासून खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर तोपर्यंत सुसाट वेगात सुरु असलेलया माझ्या वाचनाच्या गाडीचा वेग मंद मंद होत आता सर्व 'स्पार्क' प्लग्स एकाचवेळी उडून आचके-गचके देउ लगलेली माझी वाचनगाडी बंद पडते कि काय? असे वाटू लागले होते, पण "An intelligent being who is conscious about its own consciousness." ह्या १० शब्दांत सर्व काही स्पष्ट करणाऱ्या वाक्यापर्यंत पोचल्यावर "अरेच्चा, बायपासचा वापर करून तो खडबडीत रस्ता टाळून आपण स्मुथली इथपर्यंत पोहोचू शकलो असतो कि!" हा विचार मनात आला 😀 अवांतर: काही वर्षांपूर्वी गुगलच्या 'क्वांटम कॉम्प्युटर' विषयी वाचले होते तेव्हा त्याच्या काहीच दिवस आधी वाचलेला 'ओरॅकल'ने एक हजार साठ Raspberry Pi's चा वापर करून तयार केलेल्या 'सुपर कॉम्प्यूटर' बद्दलचा लेख आठवून आपणही 'IBM' चे तीन शक्तिशाली सर्व्हर्स + पाचशे 'Raspberry Pi's' चे क्लस्टर, 'Cisco' किंवा 'Netgear' चे अत्याधुनिक स्विचेस Illuminated पॅच कॉर्ड केबल्स वगैरेंचा वापर करून एक एनर्जी इफिशिअंट, इकॉनॉमिक असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर तयार करावा हा विचार मेंदू पोखरू लागला होता. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला तेव्हा तो सुमरे ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात भरला होता त्यामुळे अर्थातच तो विचार बाजूला पडला हा भाग वेगळा 😀 पण उद्या असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर पदरी बाळगण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली तर त्यासाठीचे १० X १० चौ. फु. जागेत, 'कुलिंग सिस्टीम' साठी केवळ दीड ते दोन टन क्षमतेचा एक एसी आणि दोन होम/ऑफिस वॉटर कुलर्स चा वापर करून दिसायला सुंदर आणि शक्तिशाली 'झुंबर' टाईप क्वांटम/सुपर कॉम्प्यूटरचे प्रोटोटाईप मॉडेल डोक्यात तयार आहे! प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्प हाती घ्यायचा झाल्यास 'मी', प्रोडक्ट डिझाईनसाठी मिपाकर 'चौकस २१२', नेटवर्क महर्षी 'प्रचेतस' बुवा आणि घरातच उपलब्ध असलेला लिनक्स, पायथन मधला एक 'किडा' अशा संभाव्य टीम मेंबर्सची प्रथमिक यादी देखील तयार आहे 😀 असो, अशा साय-फाय कथा आपल्याकडून नियमित येउद्यात, वाचायला आवडतील! धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

मनःपुर्वक धन्यवाद टर्मिनेटर ! ते "पाणी सुंदर आहे" हा खरेच एक खुप गहन विचार आहे, खोल तत्वज्ञानाचा विषय आहे. मी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यावर जास्त सविस्तर लिहिता आले नाही. बर्‍याच जणांना तो बोरिंगही वाटेल पण मध्यंतरी हिमालयात गेलो होतो तेथील एका स्वामींना मी हा विचार ऐकवला त्यावर ते म्हणाले - ज्याला तुम्ही पाणी म्हणत आहात, अचेतन गोष्टींचे प्रतिक म्हणत आहात ते अचेतन आहे कशावरुन ? ते सुषुप्त अवस्थेत नसेल कशावरुन ? कॉन्शसनेस तर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे मग ते अचेतन आहे असे कसे ? मुळात सचेतन अचेतन अशी सीमारेषाच आपल्या कल्पनेतील आहे, भास आहे . असो. ( पुढे ती चर्चा सत्चिदानंद ब्रह्म आत्मन् वगैरे अजुन गहन विषयात गेली. ते इथं लिहित बसलो असतो तर फार विषयांतर झाले असते =)) ) बाकी क्वांटम कॉम्प्युटरची सर्वसामान्य लोकांना गरज पडणार नाही, कारण आपले सध्याचे सी.पी.यु कैक पटीने प्रगत आहेत . क्वांटम कॉम्प्युटर चे अ‍ॅडव्हान्टेज येते जेव्हा एकच रीपीटेटिव्ह काम करायचे असते तेव्हा . जसे की सिम्युलेशन्स ! अर्थात क्वांटम कॉम्प्युटर्स हे अति प्रगत जी.पी.यु सारखे काम करतील असा माझा अंदाज आहे. अर्थात तुम्ही आर.एस.ए. टोकन सिस्टिम ब्रेक करणे किंवा बिटकॉईन चे इन्क्रिप्शन ब्रेक करणे असे काही काम करणार असाल तर नक्कीच तुम्ही क्वांटम कॉम्प्युटर वापरु शकाल. असे काही करणार असाल तर आम्हाला नक्की सहभागी करुन घ्या , ही अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती ;) पुनश्च एकवार मनःपुर्वक धन्यवाद !

Bhakti 13/06/2024 - 10:54
पण ती सिंग्युलॅरीटी , तो सेकंड स्पार्क कधी येईल किती वेळ लागेल हे काहीच प्रेडिक्ट करता येणे अशक्य आहे
_/\_ खुपचं अप्रतिम कथा लिहिली आहे.फर्स्ट -सेकंड स्पार्क,अचेतन-सचेतन मस्तपणे समजले.

नठ्यारा 14/06/2024 - 20:09
प्रसाद गोडबोले, विज्ञानकथेत विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान रंजकपणे मिळून मिसळून यायला हवं. कथेत अगदी झक्कासपणे जमलंय. डोस्कं लई भंजाळून गेलंय. विचारचक्र जाम गरागरा फिरू लागलंय. सविस्तर प्रतिसाद सवडीने देईन. -नाठाळ नठ्या

मनःपुर्वक धन्यवाद ! सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपुर्वक आभार ! इथे प्रतिसाद पाहुन हुरुप येतो. ही कथा जवळपास एक वर्षापुर्वी सुचलेली, मात्र लिहायला वेळच होत नव्हता , हिमालयातील ट्रिप च्या निमित्ताने लिहुन काढु शकलो. :) बाकी प्रो. जैन आणि प्रो. चौहान ह्यांचा सोबत झालेल्या अनेक चर्चा अतिषय उपयुक्त ठरल्या कथा लिहायला, त्यांची कथेवर काय प्रतिक्रिया आहे हे अजुन कळलेले नाही. :)) ( अवांतर : ते अजुन हिमालयातच आहेत , त्यांची ट्रिप अपेक्षेपेक्षा जास्त अ‍ॅडव्हेंचरस झालेली असल्याचे कळले. =)))) ) परत एकदा धन्यवाद :)

The Truman Show https://en.wikipedia.org/wiki/The_Truman_Show The film is the story of Truman Burbank (played by Jim Carrey), a man who is unaware that he is living his entire life on a colossal soundstage, and that it is being filmed and broadcast as a reality television show which has a huge international following. All of his friends and family and members of his community are paid actors whose job it is to sustain the illusion and keep Truman in the dark about the fiction he is living.
" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते." .... " लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो.

उत्तर -२

भागो ·

सौंदाळा 12/06/2024 - 12:40
ह्म्म भविष्यात शिरुन विज्ञानकथा, कारणे/परीणाम वगैरे लिहिणे म्हणजे कल्पनाशक्ती भारीच.

सौंदाळा 12/06/2024 - 12:40
ह्म्म भविष्यात शिरुन विज्ञानकथा, कारणे/परीणाम वगैरे लिहिणे म्हणजे कल्पनाशक्ती भारीच.
उत्तर -२ फ्रेड्रिक ब्राऊन ह्यांनी "Answer” कथा १९५४ साली लिहिली. त्यानंतर म्हणजे १९५६ साली असिमोव ह्यांनी “The Last Question” ही कथा लिहिली. दोन्ही कथा सुपर सुपर संगणकाच्या थीम वर आधारित आहेत. फ्रेड्रिक ब्राऊनची कथा केवळ २६० शब्दात संपते तर असिमोवची कथा जवळजवळ सात पाने व्यापते. ही कथा मानवाच्या अब्जावधी वर्षाच्या कालावधीत घडते. असिमोवने लिहिलेली कथा थोडक्यात अशी आहे. ह्या कथेत एंट्रॉपी ह्या गूढ गहन विषयावर प्रश्न विचारले आहेत.

द सेकंड स्पार्क - भाग १

प्रसाद गोडबोले ·

टर्मीनेटर 12/06/2024 - 08:52
झकास सुरुवात 👍 विषय तर आवडीचा आहेच आणि तुम्ही लिहीतायही छान. गुगलचा 'क्वांटम कॉम्प्युटर' झुंबर म्हणून बघायला मजा वाटली 😀 पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे...

सन्गणक मानवी मेन्दूत राहणार नाही इतकी माहिती साठवून ठेवील पण म्हणून त्याला तो अनुभव समजला किन्वा जाग्रुतावस्था आली असे म्हणता येईल का? 'तो' क्षण अनुभवताना, स्त्री आणि पुरुशान्ना एकमेकान्चे अनुभव पण समजू शकत नाहीत. आजुबाजुची खूप माहिती आहे म्हणून सन्गणकाला तो समजेल? अंगावर रोमांच उमटले होते हे महीत असणे वेगळे आणि प्रत्यक्श रोमांच उमटणे वेगळे.

गवि 12/06/2024 - 12:24
आणि हे फक्त एका जनरेशन साठी नव्हे तर माणुन माकडापासुन माणुस झाला त्या क्षणापासुन सर्व पिढ्यांच्या जीवनाचे! म्हणजे अजुन काहीतरी मल्टिपल ने गुणा !
हे आतापासून पुढे करणे शक्य आहे. या आधीच्या पिढ्यांचे अनुभव किंवा जीवनातील प्रसंगांचे पॅरामिटर्स आता फीड करणे शक्य वाटत नाही.

शेखर काळे 13/06/2024 - 06:48
या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संगणकाने काय विदा संकलन करावा हे आपणच त्याला सांगितलेले असते. त्या विदाचे काय करायचे ते नियमही आखून दिलेले असतात. त्या नियमानुसारच त्याचे काम असते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की संगणकाला हा सगळा विदा असल्यामुळे काही विचार - स्वजनित विचार करता येऊ शकेल. भावना या मानवप्रणितच आहेत.

टर्मीनेटर 12/06/2024 - 08:52
झकास सुरुवात 👍 विषय तर आवडीचा आहेच आणि तुम्ही लिहीतायही छान. गुगलचा 'क्वांटम कॉम्प्युटर' झुंबर म्हणून बघायला मजा वाटली 😀 पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे...

सन्गणक मानवी मेन्दूत राहणार नाही इतकी माहिती साठवून ठेवील पण म्हणून त्याला तो अनुभव समजला किन्वा जाग्रुतावस्था आली असे म्हणता येईल का? 'तो' क्षण अनुभवताना, स्त्री आणि पुरुशान्ना एकमेकान्चे अनुभव पण समजू शकत नाहीत. आजुबाजुची खूप माहिती आहे म्हणून सन्गणकाला तो समजेल? अंगावर रोमांच उमटले होते हे महीत असणे वेगळे आणि प्रत्यक्श रोमांच उमटणे वेगळे.

गवि 12/06/2024 - 12:24
आणि हे फक्त एका जनरेशन साठी नव्हे तर माणुन माकडापासुन माणुस झाला त्या क्षणापासुन सर्व पिढ्यांच्या जीवनाचे! म्हणजे अजुन काहीतरी मल्टिपल ने गुणा !
हे आतापासून पुढे करणे शक्य आहे. या आधीच्या पिढ्यांचे अनुभव किंवा जीवनातील प्रसंगांचे पॅरामिटर्स आता फीड करणे शक्य वाटत नाही.

शेखर काळे 13/06/2024 - 06:48
या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संगणकाने काय विदा संकलन करावा हे आपणच त्याला सांगितलेले असते. त्या विदाचे काय करायचे ते नियमही आखून दिलेले असतात. त्या नियमानुसारच त्याचे काम असते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की संगणकाला हा सगळा विदा असल्यामुळे काही विचार - स्वजनित विचार करता येऊ शकेल. भावना या मानवप्रणितच आहेत.
"इफ युनिव्हर्स इज द आन्सर, देन व्हॉट इज द क्वश्चन ?"
भव्य कॉरीडॉर . इन्कॅण्डेसंट पण पांढरा लख्ख प्रकाश. संपुर्ण एकांत . आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही. अन आपल्याला आपल्याच श्वासाव्यतिरिक्त कशाचाही आवाज येणार नाही इतकी शांतता. समोर कोरी पांढरी शुभ्र भिंत अन अशा त्या भिंतीवर लिहिलेले ते सुप्रसिध्द वाक्य . समोर बस बसायला एक साधीशी खुर्ची. बाकी कोणीच नाही. प्रोफेसर गोडसे त्या वाक्यासमोर आले अन क्षणभर थबले . त्यांच्या चेहर्‍यावर मंद असे हास्य पसरले... "हं, लेट मी थिंक " इतकेच म्हणुन ते समोरील खुर्चीवर जाऊन विचार करत बसले. कितीतरीवेळ निघुन गेला असेल देव जाणे.