मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाट्या

kool.amol ·

सुरिया 10/06/2024 - 12:02
आमच्या इथे नोकरांना रोज पगार दिला जातो ह्या पाटीचा कष्टंबरला काय उपयोग आहे हे मला जाणून घ्यायचे आहे.
ही पाटी लेबर इन्स्पेक्टर लोकांसाठी असते, म्हणजे त्याचा अर्थ इथे कोणी पगारी नोकर नाहीत, जे आहेत ते रोजंदारीवर काम करतात. कारण जास्त कामगार पगारी असले की वेगळे नियम, पगार आकाउंट, मस्टर, सुट्ट्या अशा बर्‍याच गोष्टी म्यानेज कराव्या लागु नये म्हणून ही पाटी लावले जाते. (भले कित्येक वर्षे तीच वेटर आणि आचारी मंडळी वर्‍शानुवर्षे दिसत असली तरीही)
आमच्याकडे सगळे पदार्थ refined तेलात बनवले जातात, ही पाटी बरेचदा हॉटेलच्या जवळपास बाहेर उभा राहून समोसे तळणाऱ्या आचाऱ्याच्या मागच्या भिंतीवर लावलेली असायची.
ही पाटी अन्न औशध प्रशासन (एफ्डीए) साठी असते. त्यांचे पण इन्स्पेक्टर पाहणी करतात उपहारगृहांची. . बाकी लेख फारच जुनाट आणि भाबडा आहे हे वेगळे सांगणे नलगे.

In reply to by सुरिया

kool.amol 17/06/2024 - 11:10
लेख जुनाट नाही त्यातला काळ जुना नक्कीच आहे. तसा उल्लेख सुद्धा केला आहे. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याविषयी मनात असलेले प्रश्न विचारले आहेत. मला वाटतं माझ्यासारख्या कुठल्याही सामान्य माणसाला हे प्रश्न पडत असावेत. त्यामुळे कदाचित विद्वानांना हे प्रश्न भाबडे वाटतील. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! बऱ्याच वर्षांचं कुतूहल होतं.

कंजूस 10/06/2024 - 13:44
अशा पाट्यांमुळेच भारताचे वेगळेपण जपलं आहे. भुवनेश्वरला खानावळीच्या नावाच्या पाटीवर कांदा लसूण नसलेले पदार्थ मिळण्याबद्दल लिहिलेलं असतं.

किसन शिंदे 17/06/2024 - 14:58
रच्याकने, इंदुरला राजवाड्याजवळ प्रशांत नाष्टा कॉर्नरमध्ये "आपण महाराष्ट्रीयन असाल तर मराठीतून बोला" अशी पाटी वाचली गल्ल्यावर.

भम्पक 22/06/2024 - 12:53
इकडे दिल्लीतही एक अजब प्रकार सार्वत्रिक आढळतो ,तो म्हणजे जर तुमचे गादीचे दुकान असेल तर पाटीवर "गद्दे हि गद्दे ..!"...असेच म्हणजे 'दवाईयाँ हि दवाईयाँ ', 'मूर्तियां हि मूर्तियां ', 'मिठाईयाँ हि मिठाईयाँ '.....असे.

In reply to by गवि

नठ्यारा 24/06/2024 - 18:16
अवांतर : एक किस्सा आठवला. बहुधा कल्पित आहे. शांता शेळके एकदा दादा कोंडक्यांना म्हणाल्या की तुमच्या चित्रपटांत द्व्यर्थी संवाद फार असतात. तेव्हा दादा म्हणाले की तुम्ही लिहिलेल्या 'बांबूचे घर पाहायला हवे बांबूच्या घरात रहायला हवे' या ओळींतला बांबू कसला हो? नाठाळ नठ्या

In reply to by गवि

चित्रगुप्त 24/06/2024 - 18:41
मुर्दे ही मुर्दे ... हमारे यहां हर किसम के मुर्दों को जलाने हेतु उचित सामग्री हर समय गारंटी के साथ मिलती है. सपेशल पैकेज भी उप्लब्ध है, जिसमे पंडितजी, हवन सामग्री, वाहन, शमशान घाट पर चाय-नाश्ता आदि की व्यवस्था है. संपर्क करें: प्रो. भूतनाथ जलानेवाले. पुरानी हवेली, शमशान रोड (कूडेदान के सामने) .

In reply to by भम्पक

चित्रगुप्त 25/06/2024 - 03:11
रिश्ते ही रिश्ते - दुल्हन वही जो पाठक जी दिलाये पूर्वी दिल्ली परिसरात मोठमोठ्या भिंतीवर लिहीलेले असायचे.

चित्रगुप्त 24/06/2024 - 00:31
स्टेशनातून ट्रेन निघाली, की दोन्ही बाजूच्या कारखान्यांच्या लांबलचक भिंतींवर हमखास असणारे 'शादी से पहिले या बाद' .. 'कमजोरी का शर्तिया इलाज' 'बिना आपरेशन बवासीर का शर्तिया युनानी ईलाज'... मिलीये प्रो. अमूक तमूक ... अश्या पाट्या खासच असतात. पूर्वी 'सपन दोष' 'सफेद पानी' 'मिर्गी' वगैरेवरील 'शर्तिया ईलाज'च्या पण असायच्या. आताचे ठाऊक नाही. याशिवाय 'शादी- संतान- नोकरी - कोर्टकचहरी- लाटरी - बीमारी' वगैरेंसाठी अमूकतमूक शास्त्री, ज्योतिषाचार्य वगैरे. लेख आणि प्रतिसाद रोचक आहेत.

In reply to by चित्रगुप्त

डॉक्टर,झेलम मधून जाताना रेल्वेरूळाच्या दोन्ही बाजुला असलेल्या भिंतीवर चुन्याने लिहीलेले असायचे. आता नाव विसरलो. प्रोफेसर भुतनाथ हवेली मस्तच.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 25/06/2024 - 00:44
लहानपणी मलाही वाटायचे की, ते प्रोफेसर असावे. पण गादीवाला, हजाम, उंदीर पकडण्याचे पिंजरे विकणारेही प्रोफेसर कसे असतील? मग समजले की ते प्रोप्रायटर शब्दाचे लघुरुप आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 25/06/2024 - 00:51
लहानपणी मलाही वाटायचे की, ते प्रोफेसर असावे. पण गादीवाला, हजाम, उंदीर पकडण्याचे पिंजरे विकणारेही प्रोफेसर कसे असतील? मग समजले की ते प्रोप्रायटर शब्दाचे लघुरुप आहे.

पॅट्रीक जेड 24/06/2024 - 21:22
छान लेख. त्यात पुन्हा फैशन हा शब्द उच्चारापेक्षा वेगळाच लिहिलेला. >>> हिंदी भाषकांत एक विकृती असते. जिथे जातात तिथे आपली भाषा लादतातच वरून स्थानिक किंवा इंग्रजी शब्दांची नावेही बदलतात. ह्यात सर्वात जास्त बळी पडलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. कारण भाषेबद्दल इथे अतिशय बुळचट लोक राहतात. महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावे हिंदी भाषिकांनी बदललीच. जसे धुळेचे धुलिया, ठाणेचं थाना, सोलापूरचे शोलापुर. काही ठिकाणी स्थानिक नावे जसे आंबेगाव चे अंबेगांव, कात्रजचे कत्राज. पण नेत्यांचीही नावे बदलली. पुण्यातल्या टिळक रोड वरील सर्वच बँकांच्या शाखांवर टिळक ऐवजी “तिलक” रोड लिहिलय. अगदी बँक ऑफ “महाराष्ट्राच्या” शाखेवरही.

In reply to by पॅट्रीक जेड

नठ्यारा 24/06/2024 - 21:32
सहमत आहे. पण काये की ते पडले उपरे. आपणच आपले उच्चार रुळवायला हवेत. हाथला हात म्हणणं. हाथीस हत्ती. घडियालास मगर/सुसर. भैशीस म्हैस. इत्यादि. -ना.न.

In reply to by पॅट्रीक जेड

kool.amol 25/06/2024 - 00:59
इकडे दक्षिणेत हिंदीची जी कत्तल केली आहे त्याला तोड नाही. शुद्ध हिंदी वगैरे बोलणारा इकडच्या हिंदीतल्या पाट्या पाहून एकतर ह्यांचा जीव घेईल किंवा आत्महत्या तरी करेल, इतकी भयाण अवस्था करतात हे. त्यामानाने महाराष्ट्रात बरं आहे.

In reply to by kool.amol

पॅट्रीक जेड 25/06/2024 - 01:52
हिंदीची जी कत्तल केली आहे त्या महाराष्ट्रातही हिंदीची कत्तलच करायला हवी. काय संबंध महाराष्ट्राचा/दक्षिण भारताचा हिंदीशी?

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 25/06/2024 - 02:46
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज उत्तर भारतीय सिसोदिया घराण्यातील होते. संबंध नव्हता तर पानिपत मोहिमेवर महाराष्ट्रातून मराठे का गेले?

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 25/06/2024 - 04:40
पेशवे कालात हिंदी भाषी मुलखात होळकर, शिंदे, पवार वगैरेंनी आपला अंमल बसवला तेंव्हा पासून अनेक मराठी कुटुंबे तिकडे कायमची स्थायिक झाली. मराठी आणि हिंदीचा भरपूर संबंध आहे.ग्वाल्हेर - इंदुरात अजून हिंदीभाषिक लोक मराठी भाषा समजतात. महाराष्ट्रात शिक्षणासाठी येणारे तरुणही मराठी बोलतात. असे अनेक. लोक माझ्या ओळखीचे आहेत. उगाच भाषा, जाती वगैरेत अडकून राहिले आपल्या पुढल्या पिढ्यात सगळे तैमूर, कासिम, शबाना वगैरे असतील.

In reply to by चित्रगुप्त

पॅट्रीक जेड 25/06/2024 - 09:54
काका, तुमचा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले. ते ह्या साठी की इतर कुणी हा प्रतिसाद दिला असता तर समजून शकलो असतो. असो. सिसोदिया घराणे मूळचे राजस्थानचे आहे. आणी तिथली मूळ भाषा त्या काळी आणि आजही हिंदी नाही. हिंदीचे वय उणेपुरे दीडशे वर्षे आहे. हिंदी राजस्थानात शिरून तिथल्या बाडमेरी, बिकानेरी, माळवी , मारवाडी ह्या भाषा संपवू पाहत आहे. राजस्थानचा आणी हिंदीचा काहीही संबंध नाही. ती त्यांच्यावर “लादलीय” पेशवे कालात हिंदी भाषी मुलखात होळकर, शिंदे, पवार वगैरेंनी आपला अंमल बसवला तेंव्हा पासून अनेक मराठी कुटुंबे तिकडे कायमची स्थायिक झाली. मराठी आणि हिंदीचा भरपूर संबंध आहे. हा देखील बादरायन संबंध आहे. मुळात पेशवे होते तेव्हाही हिंदी भाषाच अस्तित्वात नव्हती. ज्याला तुम्ही हिंदी भाषिक मुलुख घोषित केले तो तेव्हाही नव्हता नी आजही हिंदी भाषिक मुलूख नाही. होळकरांचा मुलुख म्हणजे इंदूर हे माळवा प्रांतात येते नी तिथे आजही माळवी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. तसेच ग्वाल्हेर हा भाग बुंदेलखंड नी बाघेलखंड ह्यापैकी एका भगत येतो. आणि बुंदेलखंडी नी बघेलखंडी ह्या स्वतंत्र भाषा आहेत. दोन्ही मूर्ख राज्यांनी आपल्या भाषा जपायच्या सोडुन हिंदी राज्यभाषा केलीय. मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक आहे. तरीही काही लोक स्थानिक भाषा संपवा नी हिंदी बोला म्हणूण प्रयत्नशील असतात ते का? हे समजले नाही.. उगाच भाषा, जाती वगैरेत अडकून राहिले आपल्या पुढल्या पिढ्यात सगळे तैमूर, कासिम, शबाना वगैरे असतील. हिंदूनी जातीपाती कधीच सोडल्यात. पण भाषेबद्दल हे म्हणणे म्हणजे अति झाले. भाषीक अस्मिता जपली तर तैमूर, शबाना कसे होणार बुवा?? मग भारतातील भाषेबद्दल सर्वात कट्टर असलेले हिंदी भाषिक आतापर्यंत का झाले नाहीत असे?? हिंदी भाषिकांनी भाषिक अस्मिता जपावी पण मराठी माणसाने आपल्याच राज्यात जपून नये असे का?

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 25/06/2024 - 01:04
चिपळूणकरकालीन मराठी पुस्तकांमधे फ्याशन, प्यारीस, क्यारम, ब्यांडबाजा, ब्यारिष्टर असेच शब्द असतात कारण तोवर इंग्रजीतील उच्चार लिहीण्यासाठी तशा वेलांट्या /मात्रा देवनागरीत नव्हत्याच. सुमारे साठ वर्षांपूर्वी मराठी व्याकरणात त्यांचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु हिंदीत मात्र अजूनही फैशन, बैंड वगैरेच लिहिले जाते. गुजराती लोक बॅंडला बेंड, फॅशनला फेशन... आणि "रॅप कर देना" ला "रेप कर देना" म्हणतात.

In reply to by पॅट्रीक जेड

कांदा लिंबू 25/06/2024 - 06:46
हिंदी भाषकांत एक विकृती असते. जिथे जातात तिथे आपली भाषा लादतातच वरून स्थानिक किंवा इंग्रजी शब्दांची नावेही बदलतात.
पटना == पाटना लखनऊ == लखनौ असम == आसाम हरयाणा == हरियाणा भोपाळ == भोपाल

चौकस२१२ 25/06/2024 - 14:03
चित्रगुप्त जी तुम्ही इंदोर / इंदौर चे आहात म्हणून विचारतो १) अनेक हिंदी भाषिक विशषतः इंग्रजी शब्दात सुरवातीला जोडाक्षर असले कि त्याचा उच्चार करताना तरी मागे ई का लावतात ? ( अगदी शुद्ध हिंदी बोलणार / देहाती / खडी बोली, नव्हे. बिहारी नव्हे तर हिंदि चा मुख्य गाभा असेलला उत्तर आणि मध्य प्रदेश ) म्हणजे ईस्कुल ? पुढे विचारणार होतो कि स्कुटर ला इस्कुटर का म्हणतात पण आता खरेच इस्कुटर मिळत असल्याने हा प्रश्न गौण होतो बहुतेक ! २) हिंदीत लिहताना बैंक असे का लिहितात ? हिंदी ला वापरल्या जाणाऱ्या देवनागरीत बॅ नाही का ? ३) पंचायत या प्रसिद्ध अश्या वेब मालिकेत एका व्यक्तिरेखेला उद्देशून / त्याचे टोपण नाव "बनरकास " असे आहे ? म्हणजे "वन राक्षस" का? पंचायत बघत असाल तर त्यातील जी बोली भाषा आहे ती कोणत्या प्रदेशातील असावी ? चित्रकूट ? ४) एक विधान मी मध्ये ऐकले ( राजकीय आहे ) कोणीतरी म्हणले कि मध्यप्रदेश गुजराथ ची प्रत ( कॉपी ) झाले आहे ( जन संघ प्रभाव या अर्थाने ) तर त्यावर तो जाणकार म्हणाला , उलट आहे मुळात माळवा प्रांत हा जनसंघाची मातृभूमी आहे ( विजयाराजे शिंदे ) गुजराथ नंतर झाला संघमय तुमचे काय मत ५) इंदोर / इंदौर मधील जीवन यावर लिहा कधीतरी ( अगदी पुलंच्या तुझं आहे तुझ पाशी सारखे कल्पावे का?)

चित्रगुप्त 25/06/2024 - 15:56
१. उत्तर माहीत नाही मला स्वता:ला असे गावठी उच्चार आवडतात आणि कानाला गोड लागतात. ते कोणत्याही भाषेतले असोत. उदा. मराठीतले म्हमई (मुंबई) लई ब्येस, अदुगर (अगोदर) प्रोफेश्वर, वगैरे. खरेतर मला भाषांविषयी कसलेच ज्ञान नाही. २. हिंदीला वापरल्या जाणार्या देवनागरीत बॅ, बॉ च्या मात्रा नाहीत. याबद्दल माझ्या एका विद्वान हिंदी प्रोफेश्वर /लेखक मित्राला विचारले होते, त्याने असेच सांगितले. ३. पंचायत बघितली नाही त्यामुळे काहीच ठाऊक नाही. ४.अजिबातच माहित नाही. माझ्या बहात्तर वर्षे वयापैकी सत्तर वर्षे राजकारणात मला मुळीच रूचि नव्हती आणि आताही नाही, फक्त अलिकडली दोन-तीन वर्षे यूट्यूब, कायप्पा मुळे काहीबाही कळायचे.. आता पुन्हा ते सुद्धा बघणे बंद केले. ५. इंदौर (आणि माळवा) बद्दल अधून मधून काही लिहीले आहे मिपावर विविध ठिकाणी. उदाहरणार्थ : श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे https://www.misalpav.com/node/47344 महेश्वरचा किल्ला: अहिल्याबाई होळकरांचे मूळ दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावरः कुणी वाचवू शकेल का? https://www.misalpav.com/node/21680 मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी... https://misalpav.com/node/18587 एका चित्रकाराच्या आठवणी... https://www.misalpav.com/node/21369

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 25/06/2024 - 16:52
पंचायत नक्की बघा , सरळ सहज सुंदर, निरागस त्यात मधय भारतातील छोटे गाव , इरसाल गाव आणि लोक असले तरी " गँग्स ऑफ वस्यापूर" किंवा "मिरझापूर" किंवा "पाताळ लोक" या पासून विरुद्ध टोक तसेच गुल्लक पण ,

चित्रगुप्त 25/06/2024 - 16:09
माझा १९५१ - १९७७ या काळात इंदौरला व्यतीत झालेला काळ फार आनंदाचा होता. पैकी १९६७-७७ काळात लिहीलेल्या रोजनिश्या माझ्याकडे आहेत. अधून मधून वाचायला फार बरे वाटते. १९७७-२०२२ दिल्लीत. त्याविषयी कधीच काही लिहावेसे वाटलेले नाही. -- २०२२ पासून पुन्हा इंदुरात, पण त्यापैकी बराचसा काळ परदेशात वास्तव्य. लहानणीच्या इंदुरातल्या जवळजवळ सगळ्याच खुणा आता पुसल्या जाऊन काँक्रीटचे अवाढव्य जंगल बनलेल्या मुख्य शहरात मला जावेसे वाटतच नाही. आताचे घर राजवाड्यापासून १७-१८ कि.मी. वर आहे. तिकडे मोकळे आहे. -- आता त्या पूर्वीच्या इंदुराबद्दल काही लिहायचे म्हणजे अरण्यरूदनच, लिहीताना मला आनंदाऐवजी वेदना आणि औदासिन्य येण्याची शक्यताच जास्त.

सुरिया 10/06/2024 - 12:02
आमच्या इथे नोकरांना रोज पगार दिला जातो ह्या पाटीचा कष्टंबरला काय उपयोग आहे हे मला जाणून घ्यायचे आहे.
ही पाटी लेबर इन्स्पेक्टर लोकांसाठी असते, म्हणजे त्याचा अर्थ इथे कोणी पगारी नोकर नाहीत, जे आहेत ते रोजंदारीवर काम करतात. कारण जास्त कामगार पगारी असले की वेगळे नियम, पगार आकाउंट, मस्टर, सुट्ट्या अशा बर्‍याच गोष्टी म्यानेज कराव्या लागु नये म्हणून ही पाटी लावले जाते. (भले कित्येक वर्षे तीच वेटर आणि आचारी मंडळी वर्‍शानुवर्षे दिसत असली तरीही)
आमच्याकडे सगळे पदार्थ refined तेलात बनवले जातात, ही पाटी बरेचदा हॉटेलच्या जवळपास बाहेर उभा राहून समोसे तळणाऱ्या आचाऱ्याच्या मागच्या भिंतीवर लावलेली असायची.
ही पाटी अन्न औशध प्रशासन (एफ्डीए) साठी असते. त्यांचे पण इन्स्पेक्टर पाहणी करतात उपहारगृहांची. . बाकी लेख फारच जुनाट आणि भाबडा आहे हे वेगळे सांगणे नलगे.

In reply to by सुरिया

kool.amol 17/06/2024 - 11:10
लेख जुनाट नाही त्यातला काळ जुना नक्कीच आहे. तसा उल्लेख सुद्धा केला आहे. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याविषयी मनात असलेले प्रश्न विचारले आहेत. मला वाटतं माझ्यासारख्या कुठल्याही सामान्य माणसाला हे प्रश्न पडत असावेत. त्यामुळे कदाचित विद्वानांना हे प्रश्न भाबडे वाटतील. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! बऱ्याच वर्षांचं कुतूहल होतं.

कंजूस 10/06/2024 - 13:44
अशा पाट्यांमुळेच भारताचे वेगळेपण जपलं आहे. भुवनेश्वरला खानावळीच्या नावाच्या पाटीवर कांदा लसूण नसलेले पदार्थ मिळण्याबद्दल लिहिलेलं असतं.

किसन शिंदे 17/06/2024 - 14:58
रच्याकने, इंदुरला राजवाड्याजवळ प्रशांत नाष्टा कॉर्नरमध्ये "आपण महाराष्ट्रीयन असाल तर मराठीतून बोला" अशी पाटी वाचली गल्ल्यावर.

भम्पक 22/06/2024 - 12:53
इकडे दिल्लीतही एक अजब प्रकार सार्वत्रिक आढळतो ,तो म्हणजे जर तुमचे गादीचे दुकान असेल तर पाटीवर "गद्दे हि गद्दे ..!"...असेच म्हणजे 'दवाईयाँ हि दवाईयाँ ', 'मूर्तियां हि मूर्तियां ', 'मिठाईयाँ हि मिठाईयाँ '.....असे.

In reply to by गवि

नठ्यारा 24/06/2024 - 18:16
अवांतर : एक किस्सा आठवला. बहुधा कल्पित आहे. शांता शेळके एकदा दादा कोंडक्यांना म्हणाल्या की तुमच्या चित्रपटांत द्व्यर्थी संवाद फार असतात. तेव्हा दादा म्हणाले की तुम्ही लिहिलेल्या 'बांबूचे घर पाहायला हवे बांबूच्या घरात रहायला हवे' या ओळींतला बांबू कसला हो? नाठाळ नठ्या

In reply to by गवि

चित्रगुप्त 24/06/2024 - 18:41
मुर्दे ही मुर्दे ... हमारे यहां हर किसम के मुर्दों को जलाने हेतु उचित सामग्री हर समय गारंटी के साथ मिलती है. सपेशल पैकेज भी उप्लब्ध है, जिसमे पंडितजी, हवन सामग्री, वाहन, शमशान घाट पर चाय-नाश्ता आदि की व्यवस्था है. संपर्क करें: प्रो. भूतनाथ जलानेवाले. पुरानी हवेली, शमशान रोड (कूडेदान के सामने) .

In reply to by भम्पक

चित्रगुप्त 25/06/2024 - 03:11
रिश्ते ही रिश्ते - दुल्हन वही जो पाठक जी दिलाये पूर्वी दिल्ली परिसरात मोठमोठ्या भिंतीवर लिहीलेले असायचे.

चित्रगुप्त 24/06/2024 - 00:31
स्टेशनातून ट्रेन निघाली, की दोन्ही बाजूच्या कारखान्यांच्या लांबलचक भिंतींवर हमखास असणारे 'शादी से पहिले या बाद' .. 'कमजोरी का शर्तिया इलाज' 'बिना आपरेशन बवासीर का शर्तिया युनानी ईलाज'... मिलीये प्रो. अमूक तमूक ... अश्या पाट्या खासच असतात. पूर्वी 'सपन दोष' 'सफेद पानी' 'मिर्गी' वगैरेवरील 'शर्तिया ईलाज'च्या पण असायच्या. आताचे ठाऊक नाही. याशिवाय 'शादी- संतान- नोकरी - कोर्टकचहरी- लाटरी - बीमारी' वगैरेंसाठी अमूकतमूक शास्त्री, ज्योतिषाचार्य वगैरे. लेख आणि प्रतिसाद रोचक आहेत.

In reply to by चित्रगुप्त

डॉक्टर,झेलम मधून जाताना रेल्वेरूळाच्या दोन्ही बाजुला असलेल्या भिंतीवर चुन्याने लिहीलेले असायचे. आता नाव विसरलो. प्रोफेसर भुतनाथ हवेली मस्तच.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 25/06/2024 - 00:44
लहानपणी मलाही वाटायचे की, ते प्रोफेसर असावे. पण गादीवाला, हजाम, उंदीर पकडण्याचे पिंजरे विकणारेही प्रोफेसर कसे असतील? मग समजले की ते प्रोप्रायटर शब्दाचे लघुरुप आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 25/06/2024 - 00:51
लहानपणी मलाही वाटायचे की, ते प्रोफेसर असावे. पण गादीवाला, हजाम, उंदीर पकडण्याचे पिंजरे विकणारेही प्रोफेसर कसे असतील? मग समजले की ते प्रोप्रायटर शब्दाचे लघुरुप आहे.

पॅट्रीक जेड 24/06/2024 - 21:22
छान लेख. त्यात पुन्हा फैशन हा शब्द उच्चारापेक्षा वेगळाच लिहिलेला. >>> हिंदी भाषकांत एक विकृती असते. जिथे जातात तिथे आपली भाषा लादतातच वरून स्थानिक किंवा इंग्रजी शब्दांची नावेही बदलतात. ह्यात सर्वात जास्त बळी पडलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. कारण भाषेबद्दल इथे अतिशय बुळचट लोक राहतात. महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावे हिंदी भाषिकांनी बदललीच. जसे धुळेचे धुलिया, ठाणेचं थाना, सोलापूरचे शोलापुर. काही ठिकाणी स्थानिक नावे जसे आंबेगाव चे अंबेगांव, कात्रजचे कत्राज. पण नेत्यांचीही नावे बदलली. पुण्यातल्या टिळक रोड वरील सर्वच बँकांच्या शाखांवर टिळक ऐवजी “तिलक” रोड लिहिलय. अगदी बँक ऑफ “महाराष्ट्राच्या” शाखेवरही.

In reply to by पॅट्रीक जेड

नठ्यारा 24/06/2024 - 21:32
सहमत आहे. पण काये की ते पडले उपरे. आपणच आपले उच्चार रुळवायला हवेत. हाथला हात म्हणणं. हाथीस हत्ती. घडियालास मगर/सुसर. भैशीस म्हैस. इत्यादि. -ना.न.

In reply to by पॅट्रीक जेड

kool.amol 25/06/2024 - 00:59
इकडे दक्षिणेत हिंदीची जी कत्तल केली आहे त्याला तोड नाही. शुद्ध हिंदी वगैरे बोलणारा इकडच्या हिंदीतल्या पाट्या पाहून एकतर ह्यांचा जीव घेईल किंवा आत्महत्या तरी करेल, इतकी भयाण अवस्था करतात हे. त्यामानाने महाराष्ट्रात बरं आहे.

In reply to by kool.amol

पॅट्रीक जेड 25/06/2024 - 01:52
हिंदीची जी कत्तल केली आहे त्या महाराष्ट्रातही हिंदीची कत्तलच करायला हवी. काय संबंध महाराष्ट्राचा/दक्षिण भारताचा हिंदीशी?

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 25/06/2024 - 02:46
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज उत्तर भारतीय सिसोदिया घराण्यातील होते. संबंध नव्हता तर पानिपत मोहिमेवर महाराष्ट्रातून मराठे का गेले?

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 25/06/2024 - 04:40
पेशवे कालात हिंदी भाषी मुलखात होळकर, शिंदे, पवार वगैरेंनी आपला अंमल बसवला तेंव्हा पासून अनेक मराठी कुटुंबे तिकडे कायमची स्थायिक झाली. मराठी आणि हिंदीचा भरपूर संबंध आहे.ग्वाल्हेर - इंदुरात अजून हिंदीभाषिक लोक मराठी भाषा समजतात. महाराष्ट्रात शिक्षणासाठी येणारे तरुणही मराठी बोलतात. असे अनेक. लोक माझ्या ओळखीचे आहेत. उगाच भाषा, जाती वगैरेत अडकून राहिले आपल्या पुढल्या पिढ्यात सगळे तैमूर, कासिम, शबाना वगैरे असतील.

In reply to by चित्रगुप्त

पॅट्रीक जेड 25/06/2024 - 09:54
काका, तुमचा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले. ते ह्या साठी की इतर कुणी हा प्रतिसाद दिला असता तर समजून शकलो असतो. असो. सिसोदिया घराणे मूळचे राजस्थानचे आहे. आणी तिथली मूळ भाषा त्या काळी आणि आजही हिंदी नाही. हिंदीचे वय उणेपुरे दीडशे वर्षे आहे. हिंदी राजस्थानात शिरून तिथल्या बाडमेरी, बिकानेरी, माळवी , मारवाडी ह्या भाषा संपवू पाहत आहे. राजस्थानचा आणी हिंदीचा काहीही संबंध नाही. ती त्यांच्यावर “लादलीय” पेशवे कालात हिंदी भाषी मुलखात होळकर, शिंदे, पवार वगैरेंनी आपला अंमल बसवला तेंव्हा पासून अनेक मराठी कुटुंबे तिकडे कायमची स्थायिक झाली. मराठी आणि हिंदीचा भरपूर संबंध आहे. हा देखील बादरायन संबंध आहे. मुळात पेशवे होते तेव्हाही हिंदी भाषाच अस्तित्वात नव्हती. ज्याला तुम्ही हिंदी भाषिक मुलुख घोषित केले तो तेव्हाही नव्हता नी आजही हिंदी भाषिक मुलूख नाही. होळकरांचा मुलुख म्हणजे इंदूर हे माळवा प्रांतात येते नी तिथे आजही माळवी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. तसेच ग्वाल्हेर हा भाग बुंदेलखंड नी बाघेलखंड ह्यापैकी एका भगत येतो. आणि बुंदेलखंडी नी बघेलखंडी ह्या स्वतंत्र भाषा आहेत. दोन्ही मूर्ख राज्यांनी आपल्या भाषा जपायच्या सोडुन हिंदी राज्यभाषा केलीय. मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक आहे. तरीही काही लोक स्थानिक भाषा संपवा नी हिंदी बोला म्हणूण प्रयत्नशील असतात ते का? हे समजले नाही.. उगाच भाषा, जाती वगैरेत अडकून राहिले आपल्या पुढल्या पिढ्यात सगळे तैमूर, कासिम, शबाना वगैरे असतील. हिंदूनी जातीपाती कधीच सोडल्यात. पण भाषेबद्दल हे म्हणणे म्हणजे अति झाले. भाषीक अस्मिता जपली तर तैमूर, शबाना कसे होणार बुवा?? मग भारतातील भाषेबद्दल सर्वात कट्टर असलेले हिंदी भाषिक आतापर्यंत का झाले नाहीत असे?? हिंदी भाषिकांनी भाषिक अस्मिता जपावी पण मराठी माणसाने आपल्याच राज्यात जपून नये असे का?

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 25/06/2024 - 01:04
चिपळूणकरकालीन मराठी पुस्तकांमधे फ्याशन, प्यारीस, क्यारम, ब्यांडबाजा, ब्यारिष्टर असेच शब्द असतात कारण तोवर इंग्रजीतील उच्चार लिहीण्यासाठी तशा वेलांट्या /मात्रा देवनागरीत नव्हत्याच. सुमारे साठ वर्षांपूर्वी मराठी व्याकरणात त्यांचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु हिंदीत मात्र अजूनही फैशन, बैंड वगैरेच लिहिले जाते. गुजराती लोक बॅंडला बेंड, फॅशनला फेशन... आणि "रॅप कर देना" ला "रेप कर देना" म्हणतात.

In reply to by पॅट्रीक जेड

कांदा लिंबू 25/06/2024 - 06:46
हिंदी भाषकांत एक विकृती असते. जिथे जातात तिथे आपली भाषा लादतातच वरून स्थानिक किंवा इंग्रजी शब्दांची नावेही बदलतात.
पटना == पाटना लखनऊ == लखनौ असम == आसाम हरयाणा == हरियाणा भोपाळ == भोपाल

चौकस२१२ 25/06/2024 - 14:03
चित्रगुप्त जी तुम्ही इंदोर / इंदौर चे आहात म्हणून विचारतो १) अनेक हिंदी भाषिक विशषतः इंग्रजी शब्दात सुरवातीला जोडाक्षर असले कि त्याचा उच्चार करताना तरी मागे ई का लावतात ? ( अगदी शुद्ध हिंदी बोलणार / देहाती / खडी बोली, नव्हे. बिहारी नव्हे तर हिंदि चा मुख्य गाभा असेलला उत्तर आणि मध्य प्रदेश ) म्हणजे ईस्कुल ? पुढे विचारणार होतो कि स्कुटर ला इस्कुटर का म्हणतात पण आता खरेच इस्कुटर मिळत असल्याने हा प्रश्न गौण होतो बहुतेक ! २) हिंदीत लिहताना बैंक असे का लिहितात ? हिंदी ला वापरल्या जाणाऱ्या देवनागरीत बॅ नाही का ? ३) पंचायत या प्रसिद्ध अश्या वेब मालिकेत एका व्यक्तिरेखेला उद्देशून / त्याचे टोपण नाव "बनरकास " असे आहे ? म्हणजे "वन राक्षस" का? पंचायत बघत असाल तर त्यातील जी बोली भाषा आहे ती कोणत्या प्रदेशातील असावी ? चित्रकूट ? ४) एक विधान मी मध्ये ऐकले ( राजकीय आहे ) कोणीतरी म्हणले कि मध्यप्रदेश गुजराथ ची प्रत ( कॉपी ) झाले आहे ( जन संघ प्रभाव या अर्थाने ) तर त्यावर तो जाणकार म्हणाला , उलट आहे मुळात माळवा प्रांत हा जनसंघाची मातृभूमी आहे ( विजयाराजे शिंदे ) गुजराथ नंतर झाला संघमय तुमचे काय मत ५) इंदोर / इंदौर मधील जीवन यावर लिहा कधीतरी ( अगदी पुलंच्या तुझं आहे तुझ पाशी सारखे कल्पावे का?)

चित्रगुप्त 25/06/2024 - 15:56
१. उत्तर माहीत नाही मला स्वता:ला असे गावठी उच्चार आवडतात आणि कानाला गोड लागतात. ते कोणत्याही भाषेतले असोत. उदा. मराठीतले म्हमई (मुंबई) लई ब्येस, अदुगर (अगोदर) प्रोफेश्वर, वगैरे. खरेतर मला भाषांविषयी कसलेच ज्ञान नाही. २. हिंदीला वापरल्या जाणार्या देवनागरीत बॅ, बॉ च्या मात्रा नाहीत. याबद्दल माझ्या एका विद्वान हिंदी प्रोफेश्वर /लेखक मित्राला विचारले होते, त्याने असेच सांगितले. ३. पंचायत बघितली नाही त्यामुळे काहीच ठाऊक नाही. ४.अजिबातच माहित नाही. माझ्या बहात्तर वर्षे वयापैकी सत्तर वर्षे राजकारणात मला मुळीच रूचि नव्हती आणि आताही नाही, फक्त अलिकडली दोन-तीन वर्षे यूट्यूब, कायप्पा मुळे काहीबाही कळायचे.. आता पुन्हा ते सुद्धा बघणे बंद केले. ५. इंदौर (आणि माळवा) बद्दल अधून मधून काही लिहीले आहे मिपावर विविध ठिकाणी. उदाहरणार्थ : श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे https://www.misalpav.com/node/47344 महेश्वरचा किल्ला: अहिल्याबाई होळकरांचे मूळ दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावरः कुणी वाचवू शकेल का? https://www.misalpav.com/node/21680 मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी... https://misalpav.com/node/18587 एका चित्रकाराच्या आठवणी... https://www.misalpav.com/node/21369

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 25/06/2024 - 16:52
पंचायत नक्की बघा , सरळ सहज सुंदर, निरागस त्यात मधय भारतातील छोटे गाव , इरसाल गाव आणि लोक असले तरी " गँग्स ऑफ वस्यापूर" किंवा "मिरझापूर" किंवा "पाताळ लोक" या पासून विरुद्ध टोक तसेच गुल्लक पण ,

चित्रगुप्त 25/06/2024 - 16:09
माझा १९५१ - १९७७ या काळात इंदौरला व्यतीत झालेला काळ फार आनंदाचा होता. पैकी १९६७-७७ काळात लिहीलेल्या रोजनिश्या माझ्याकडे आहेत. अधून मधून वाचायला फार बरे वाटते. १९७७-२०२२ दिल्लीत. त्याविषयी कधीच काही लिहावेसे वाटलेले नाही. -- २०२२ पासून पुन्हा इंदुरात, पण त्यापैकी बराचसा काळ परदेशात वास्तव्य. लहानणीच्या इंदुरातल्या जवळजवळ सगळ्याच खुणा आता पुसल्या जाऊन काँक्रीटचे अवाढव्य जंगल बनलेल्या मुख्य शहरात मला जावेसे वाटतच नाही. आताचे घर राजवाड्यापासून १७-१८ कि.मी. वर आहे. तिकडे मोकळे आहे. -- आता त्या पूर्वीच्या इंदुराबद्दल काही लिहायचे म्हणजे अरण्यरूदनच, लिहीताना मला आनंदाऐवजी वेदना आणि औदासिन्य येण्याची शक्यताच जास्त.
लेखनविषय:
पाट्या! जग बदलत चाललं आहे हे वाक्य मला वाटतं वेदांमध्ये सुद्धा असेल कदाचित! म्हणजे प्रत्येक पिढी हे वाक्य कधी ना कधी म्हणतच असते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. काय बदललं आहे? तर बरच काही! पण असं असलं तरी काही जुन्या गोष्टी एकदमच दिसून येतात. पण बऱ्याच गोष्टी आठवायला लागतात. त्याच असं झालं की सध्या मला एक नवीनच छंद लागला आहे. सांगतो. पाट्या वाचायचा. मी पुण्यात राहत नाही हे आधीच सांगतो. पाट्या काही फक्त पुण्यातच आहेत असं नाही. मला दुकानांच्या नावाच्या पाट्या वाचायला आवडत आहेत कारण मी नवी भाषा शिकतो आहे.

तटबंदी

अनन्त्_यात्री ·

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/06/2024 - 11:46
आणि ...
जड-चेतन सीमेवर धूसर तटबंदी जी असे सांग ती का न मला दिसतसे?
सुरेखच ! आणि मला या शब्दाचा वापर करुन वेगळी मिती व्यक्त केली हे खासच !

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/06/2024 - 11:46
आणि ...
जड-चेतन सीमेवर धूसर तटबंदी जी असे सांग ती का न मला दिसतसे?
सुरेखच ! आणि मला या शब्दाचा वापर करुन वेगळी मिती व्यक्त केली हे खासच !
लेखनविषय:
काव्यरस
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ओतप्रोत जे असे सांग ते का न तुला दिसतसे? त्रिमितीच्या पिंजर्‍या वेढुनी अमित असे जे वसे सांग ते का न तुला दिसतसे? धन-ऋण एकाकार होती त्या- -स्थळी शून्य जे वसे सांग त्या अभाव मानू कसे? जड-चेतन सीमेवर धूसर तटबंदी जी असे सांग ती का न मला दिसतसे?

उत्तर.

भागो ·
लेखनविषय:
उत्तर. द्वान ईव्हने समारंभपूर्वक सोन्याचे अंतिम कनेक्शन सोल्डर केले. डझनभर टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या साक्षीने संपूर्ण विश्वात तो कार्यक्रम प्रसारित होत होता. त्याची दृश्ये दाखवली जात होती. द्वान ईव्हने समाधानाने मान डोलवली. नंतर ती स्विचच्या बाजूला जाऊन उभी राहिली. विश्वातील मानवी संस्कृती असलेल्या सर्व ग्रहांच्या सर्व मॉन्स्टर कंप्युटिंग मशीनना एकाच वेळी कनेक्ट करेल असा तो स्विच होता.

धंदा

बिपीन सुरेश सांगळे ·

आवडली. वास्तव आहे. बघीतलं तरी धोका. पोलीसानां सांगीतले तरी झंझट. कोर्टात केस गेली तर मगजमारी. साक्षीदारांची 'भीक नको पण कुत्रं आवर', आशी अवस्था होते. हाय प्रोफाईल असेल तर आणखीनच वाईट परिस्थिती.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 22:07
खतरनाक धंदा ! नुकतंच वाचलेली बातमी आठवली ! पहाटे फिरायला जाणार्‍या सेवानिवृत्त कर्मचारयाला लुटायला विरोध केला म्हणून चार दारूड्यांनी त्याचा जीव घेतला... किती दुर्दैवी !

आवडली. वास्तव आहे. बघीतलं तरी धोका. पोलीसानां सांगीतले तरी झंझट. कोर्टात केस गेली तर मगजमारी. साक्षीदारांची 'भीक नको पण कुत्रं आवर', आशी अवस्था होते. हाय प्रोफाईल असेल तर आणखीनच वाईट परिस्थिती.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 22:07
खतरनाक धंदा ! नुकतंच वाचलेली बातमी आठवली ! पहाटे फिरायला जाणार्‍या सेवानिवृत्त कर्मचारयाला लुटायला विरोध केला म्हणून चार दारूड्यांनी त्याचा जीव घेतला... किती दुर्दैवी !
लेखनविषय:
धंदा त्या रस्त्यावर दारूचं एक दुकान होतं. संध्याकाळी तिथे मोप गर्दी असायची. त्यामुळे आजूबाजूची दुकानं थोडी लवकरच बंद व्हायची. एक पलीकडची पानटपरी सोडली तर. बरं, त्या रस्त्याला रात्री आठनंतर इतर लोक फारसे नसायचेच. समोर एक मोठी कंपनी होती.तिची कम्पाउंड वॉल होती. लांबलचक पसरलेली. त्यामुळे वर्दळ नाही अन शांतता. त्यामुळे रात्री तिथे बेवड्यांची फौज जमायची. बेवडा तर मारायचा; पण बारमध्ये परवडत नाही. मग बाहेरच. शहरात असे बरेच अड्डे. त्यातलाच हा एक. त्या कंपनीच्या भिंतीची कंपनी त्यांना बरी पडायची. ठरलेले मेंबर तर असायचेच.पण कधी नवीनही असायचे. जमणाऱ्यांची भांडणं - मारामाऱ्या ठरलेल्या.

तांडव (ऐसी अक्षरे -१८)

Bhakti ·

प्रचेतस 09/06/2024 - 09:35
तांडव अतिशय प्रत्ययकारी कादंबरी आहे. महाबळेश्वर सैल ह्यांनी अत्यन्त सूक्ष्मतेने मांडलेला गोवा धर्मन्यायाधिकरणाने केलेला धर्मछळ वाचकांना अस्वस्थ केल्याशिवाय राहवत नाही. ह्या विषयावर अधिक वाचावयास असल्यास आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले एका धर्मच्छळाची कहाणी पुस्तक उपलब्ध आहे. तसेच हे पुस्तक ज्यावर आधारीत आहे ते अनंत काकबा प्रियोळकर ह्यांनी लिहिलेले मूळ पुस्तक The Goa Inquisition हे अर्काइव्ह.कॉम वर उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 09/06/2024 - 10:07
Inquisition हे पहिल्यांदाच समजलं...भयानक. एक प्रश्न आहे सोजिरं आणि कपिताव म्हणजे काय? कादंबरीत खूप वेळा हे शब्द आहेत.

प्रचेतस 09/06/2024 - 09:35
तांडव अतिशय प्रत्ययकारी कादंबरी आहे. महाबळेश्वर सैल ह्यांनी अत्यन्त सूक्ष्मतेने मांडलेला गोवा धर्मन्यायाधिकरणाने केलेला धर्मछळ वाचकांना अस्वस्थ केल्याशिवाय राहवत नाही. ह्या विषयावर अधिक वाचावयास असल्यास आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले एका धर्मच्छळाची कहाणी पुस्तक उपलब्ध आहे. तसेच हे पुस्तक ज्यावर आधारीत आहे ते अनंत काकबा प्रियोळकर ह्यांनी लिहिलेले मूळ पुस्तक The Goa Inquisition हे अर्काइव्ह.कॉम वर उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 09/06/2024 - 10:07
Inquisition हे पहिल्यांदाच समजलं...भयानक. एक प्रश्न आहे सोजिरं आणि कपिताव म्हणजे काय? कादंबरीत खूप वेळा हे शब्द आहेत.
लेखनप्रकार
तांडव-पुस्तक परिचय लेखक-महाबळेश्वर सैल अ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.

तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे

वामन देशमुख ·

In reply to by कंजूस

सुबोध खरे 08/06/2024 - 20:07
लोणचे खराब होण्याची दोन कारणे १) मीठ कमी पडणे. मिठाचे प्रमाण व्यवस्थित असले तर त्यात जंतूंची वाढ होऊ शकत नाही २) तेलाचे प्रमाण कमी पडणे- लोणच्याच्या वर तेलाचा थर असेल तर लोणच्याचा हवेशी आणि आर्द्रतेशी संपर्क येत नाही आणि त्यावर बुरशी येऊ शकत नाही. या दोन्ही गीष्टींची काळजी घेतली तर लोणचं कधीही खराब होणार नाही. याशिवाय लोणचं फ्रीझ मध्ये ठेवलं तर लोणच्यात कैरीच्या फोडी करकरीत राहतात अन्यथा मुरून त्या मऊ होतात. अर्थात आपल्याला फोडी कशा आवडतात हि आपली निवड आहे.

तपशीलवार पाककृती, क्रमवार छायाचित्रे, एकदम भारी. वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते. एकच चमचा वापरा, त्यातलाच वापरा, कडुलिंबाचा पाला ठेवा. असे सर्व प्रयोग इकडे झाले आहेत. काही उपाय असेल तर तेही कळवा. पुढील पाककृतीस शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वामन देशमुख 08/06/2024 - 04:59
टिकणे हीच समस्या आहे. आंबूस होते.
वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते.
तेलुगु पद्धतीच्या कैरी, आवळा, लिंबू वगैरे लोणच्यांवर तेलाचा थर रहायला हवा. खराब होणार नाही.‌ काही महिन्यांनी तेल कमी झाले तर तेल तापवून थंड करून पुन्हा घालायला हवे. "इतकं तेलकट लोणचं खाणं आरोग्याला चांगलं आहे का?" असं वाटत असल्यास पानात वाढताना तेल काढून टाकावं. याशिवाय, आम्ही एक-एक किलोच्या बरण्यांमध्ये लोणचं घालून ठेवतो. एक संपल्यावरच दुसरी काढतो. आजवर खराब झालेलं नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 08/06/2024 - 11:41
वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते.
(तांत्रिक दृष्ट्या व्यवस्थीत, सुयोग्य व्यवस्थापित) घरगुती फ्रिजमध्ये मागच्या बाजूस ठेवलेल्या निर्जंतूक निर्वात बरण्यांमधील लोणचे सर्वसाधारण पणे वर्षभर टिकावयास हवे. सिमेंटांने तापणार्‍या घरांमध्ये फ्रिज मध्ये लोणची ठेवण्याशिवाय पर्याय नसावा. पारंपारीक लाकडी धाब्याची मोठ्या (जाड) भिंतीच्या किंवा मातीच्या घरांमधील नैसर्गिक थंडावा राखण्याची व्यवस्था सिमेंटांने तापणार्‍या घरांनी घालवली आसल्यामुळे कदाचित पारंपारीक पद्धती आता दाद देत नसाव्यात. पारंपारीक लोणचे टिकवण्याच्या पद्धतीत जाड (थिकनेस) चिनी मातीच्या मोठ्या बरण्या गरमपाण्याने निर्जंतूक करून लोणच्यातील मीठाचे मोठे प्रमाण, तेलाचा मोठा तवंग ठेवून बरणी बंद केल्यानंतर कापडाने बांधणे मग घरातील सावलीच्या त्यातल्या त्यात थंड जागी अशी बरणी ठेवली जात असे. काढताना हात चमचा आदींच्या निर्जंतुकतेची कडक काळजी घेऊन छोट्या बरणीत रोजच्या वापराचे लोणचे काढून मुख्य साठवणीची बरणी कमीत कमी वेळा उघडली जाईल याची दक्षता घेत. तरीही काही वेळा प्रयोग फसत असल्याचे ऐकण्यात येई नाही असे नाही. पण एकुण पाकशिस्तीमुळे माझ्या घरी माझ्या लहानपणी लोणची न टिकल्याचा अनुभव कधी आला नाही. आंध्र तेलंगाणा आणि मराठ्वाडा लोणचे घालण्याच्या काळातला फरक कदाचित आंध्र कोस्टल भागात वादळी पावसाचा कालावधी मुळे फरक असावा. पहिल्या पावसाच्या आधीच्या वार्‍यामुळे कैर्‍या आपोआप पडून रास्त दरातील उपलब्धता आणि तापमान जरासे कमी होण्याचा फायदा होत असावा. पण लोणची फ्रीज मध्ये साठवली जाणार असतील तर पावसाच्या आधी का नंतर याने खुपसा फरक पडू नये. तळटीप : फ्रीज मध्ये पदार्थ टिकवण्यासाठीचे नियम अर्थातच वेगळे असतात.

In reply to by माहितगार

सुचवलेल्या उपाययोजना सरकारच्या कानावर घालण्यात येतील. आभार.
नटसम्राट आणि धागालेखकाची क्षमा मागून.
=======  गप्पासम्राट=======


अप्पा   :   कावेरी, गेल्या पाच पंचवीस वर्षात एक
            गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार आहे ती.
कावेरी :   कोणती ती ?
अप्पा  :  तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.
            इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?   
अप्पा   :   अजून एक ?
कावेरी  :   काय ?
अप्पा   :   लोणचे बरणीतलं तितकं थोडं फ़्रिज मधे ठेवत चला,  बरं का !
            खराब होत नाही.
कावेरी :  आणि हे काय मला माहीत नव्हतं ? वर्षानुवर्ष तसंच करतो.
अप्पा   :   तरीही एकदा सांगावंसं वाटलं.

======== पडदा ==========

- दिलीप बिरुटे
(आपला अप्पा बेलवलकर उर्फ़  )

कंजूस 08/06/2024 - 02:44
या निमित्ताने विचारतो - गोंगुरा पचडी किंवा लोणचे म्हणा केले आहे काय? (गोंगुरा - अंबाडीची आंबट पाने. ही पाने, लसूण आणि मिरच्या तेलात परतून एकत्र कुटून होणारा तिखट आंबट आणि उग्र ठेचा. तेल ओतून भात/भाकरीबरोबर खातात आंध्रवाले. तिरुपतीला काही हॉटेलांत जेवणाच्या थाळीत मिळते.)

In reply to by कंजूस

वामन देशमुख 08/06/2024 - 05:26
गोंगुरा पचडी किंवा लोणचे म्हणा केले आहे काय?
हे काय विचारणं झालं का साहेब? माझी जीव की प्राण आहे! पेरुगु-अन्नं-पच्चडि यात बहुतेक वेळा गोंगुरा पच्चडिच असते. गोंगुरा पच्चडि == अंबाडीचा ठेचा दोन-तीन दिवसात संपवायचा असेल तर हिरव्या मिरच्या घालायच्या. महिनाभरापर्यंत हवा असेल तर वाळलेल्या लाल मिरच्या घालायच्या. या फोटो सर्वात कमी दिसणारा पदार्थ पहा - गोंगुरा पच्चडि

In reply to by वामन देशमुख

कंजूस 08/06/2024 - 09:49
याचा विडिओ पाहिला होता. आणि तिरुपतीला हॉटेलात त्याने पंचफुला लोणच्याचा आणून ठेवला. शिवाय एक वाडगाभर तेल. लगेच मी विचारले तेल कशाला. वेटरने गोंगुराचा वाडगा दाखवला. भरपूर खाल्लं. मजा आली.

वामन देशमुख 08/06/2024 - 05:31
एक लिहायचं राहिलं होतं, मराठी लोणच्यांच्या तुलनेत, तेलुगु लोणच्यांत मीठ-तिखट थोडं जास्त घालायचं असतं. इथं लोणचं हे मुख्यतः दहीभातासोबत किंवा नुसत्याच (शक्यतो वाफाळत्या) भातासोबत खाल्लं जातं.

नठ्यारा 08/06/2024 - 17:29
वामन देशमुख, ते लोणचंबिणचं राहूद्या. एकत्र केल्यावर आणि फोटोसाठी म्हणून जी चित्रं डकवलीयेत ती पाहून कच्चीच कैरी मटकावून टाकावीशी वाटतेय. लोणचं बनेपर्यंत धीर कोणाला धरवणारे. -नाठाळ नठ्या

लहानपणी आई आणी शेजारच्या आया बाया मिळून वर्षाचे लोणचे घालायचे ते आठवले. आम्ही लिंबाचे गोड लोणचे , तेल न वापरता घालतो. मुरली की मस्त लागते. रेसीपी..... बाजारातून चांगली पिवळी रसरशीत बिना डागाची लिंबे दोन किलो आणावीत. (लोणचे या प्रकारात माझा सहभाग एवढाच असल्याने पुढील रेसीपी माहीत नाही.) आणी वर्षभर मस्त लोणचे खावे. बाकी तुमची रेसिपी व छायाचित्र बघून तोंडाला पाणी सुटले. मेहुणी हैदराबाद मधे असल्याने बनवलेले लोणचे अपसुकच खायला मिळते. थोडे बांधून पण घेऊन येतो.

पण मला आपलं लोणचंच आवडते. हे लोणचं मला अजिबात आवडलं नव्हतं. खूप खारट लागते. कैरीची सगळी चव मारून टाकली जाते. तरीही फोटो झकास. तुमच्या ताटाचा फोटो जास्त आवडला! सुरेख! आणि तो जास्त तोंपासू आहे!!!

नगरी 10/06/2024 - 08:44
तोपासू, प्रयोग करून पाहायला हवा,पण निम्म्यावर म्हणजे 50%

विजुभाऊ 14/06/2024 - 17:57
आह्हाहाहाहाहा तोंडाला पणी सुटले. हैदराबादेत गाचेबावलीतेक दुकान पाहिले होते. तेथे लोणची हौदात भरून ठेवली होती. दुकानाचे नाव विसरलो. मटणाचे लोणचेही होते त्यात. तेथून येताना मस्त झाकास पैकी दोन किलो घोंगुरा लोणचे आणले होते

In reply to by कंजूस

सुबोध खरे 08/06/2024 - 20:07
लोणचे खराब होण्याची दोन कारणे १) मीठ कमी पडणे. मिठाचे प्रमाण व्यवस्थित असले तर त्यात जंतूंची वाढ होऊ शकत नाही २) तेलाचे प्रमाण कमी पडणे- लोणच्याच्या वर तेलाचा थर असेल तर लोणच्याचा हवेशी आणि आर्द्रतेशी संपर्क येत नाही आणि त्यावर बुरशी येऊ शकत नाही. या दोन्ही गीष्टींची काळजी घेतली तर लोणचं कधीही खराब होणार नाही. याशिवाय लोणचं फ्रीझ मध्ये ठेवलं तर लोणच्यात कैरीच्या फोडी करकरीत राहतात अन्यथा मुरून त्या मऊ होतात. अर्थात आपल्याला फोडी कशा आवडतात हि आपली निवड आहे.

तपशीलवार पाककृती, क्रमवार छायाचित्रे, एकदम भारी. वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते. एकच चमचा वापरा, त्यातलाच वापरा, कडुलिंबाचा पाला ठेवा. असे सर्व प्रयोग इकडे झाले आहेत. काही उपाय असेल तर तेही कळवा. पुढील पाककृतीस शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वामन देशमुख 08/06/2024 - 04:59
टिकणे हीच समस्या आहे. आंबूस होते.
वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते.
तेलुगु पद्धतीच्या कैरी, आवळा, लिंबू वगैरे लोणच्यांवर तेलाचा थर रहायला हवा. खराब होणार नाही.‌ काही महिन्यांनी तेल कमी झाले तर तेल तापवून थंड करून पुन्हा घालायला हवे. "इतकं तेलकट लोणचं खाणं आरोग्याला चांगलं आहे का?" असं वाटत असल्यास पानात वाढताना तेल काढून टाकावं. याशिवाय, आम्ही एक-एक किलोच्या बरण्यांमध्ये लोणचं घालून ठेवतो. एक संपल्यावरच दुसरी काढतो. आजवर खराब झालेलं नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 08/06/2024 - 11:41
वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते.
(तांत्रिक दृष्ट्या व्यवस्थीत, सुयोग्य व्यवस्थापित) घरगुती फ्रिजमध्ये मागच्या बाजूस ठेवलेल्या निर्जंतूक निर्वात बरण्यांमधील लोणचे सर्वसाधारण पणे वर्षभर टिकावयास हवे. सिमेंटांने तापणार्‍या घरांमध्ये फ्रिज मध्ये लोणची ठेवण्याशिवाय पर्याय नसावा. पारंपारीक लाकडी धाब्याची मोठ्या (जाड) भिंतीच्या किंवा मातीच्या घरांमधील नैसर्गिक थंडावा राखण्याची व्यवस्था सिमेंटांने तापणार्‍या घरांनी घालवली आसल्यामुळे कदाचित पारंपारीक पद्धती आता दाद देत नसाव्यात. पारंपारीक लोणचे टिकवण्याच्या पद्धतीत जाड (थिकनेस) चिनी मातीच्या मोठ्या बरण्या गरमपाण्याने निर्जंतूक करून लोणच्यातील मीठाचे मोठे प्रमाण, तेलाचा मोठा तवंग ठेवून बरणी बंद केल्यानंतर कापडाने बांधणे मग घरातील सावलीच्या त्यातल्या त्यात थंड जागी अशी बरणी ठेवली जात असे. काढताना हात चमचा आदींच्या निर्जंतुकतेची कडक काळजी घेऊन छोट्या बरणीत रोजच्या वापराचे लोणचे काढून मुख्य साठवणीची बरणी कमीत कमी वेळा उघडली जाईल याची दक्षता घेत. तरीही काही वेळा प्रयोग फसत असल्याचे ऐकण्यात येई नाही असे नाही. पण एकुण पाकशिस्तीमुळे माझ्या घरी माझ्या लहानपणी लोणची न टिकल्याचा अनुभव कधी आला नाही. आंध्र तेलंगाणा आणि मराठ्वाडा लोणचे घालण्याच्या काळातला फरक कदाचित आंध्र कोस्टल भागात वादळी पावसाचा कालावधी मुळे फरक असावा. पहिल्या पावसाच्या आधीच्या वार्‍यामुळे कैर्‍या आपोआप पडून रास्त दरातील उपलब्धता आणि तापमान जरासे कमी होण्याचा फायदा होत असावा. पण लोणची फ्रीज मध्ये साठवली जाणार असतील तर पावसाच्या आधी का नंतर याने खुपसा फरक पडू नये. तळटीप : फ्रीज मध्ये पदार्थ टिकवण्यासाठीचे नियम अर्थातच वेगळे असतात.

In reply to by माहितगार

सुचवलेल्या उपाययोजना सरकारच्या कानावर घालण्यात येतील. आभार.
नटसम्राट आणि धागालेखकाची क्षमा मागून.
=======  गप्पासम्राट=======


अप्पा   :   कावेरी, गेल्या पाच पंचवीस वर्षात एक
            गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार आहे ती.
कावेरी :   कोणती ती ?
अप्पा  :  तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.
            इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?   
अप्पा   :   अजून एक ?
कावेरी  :   काय ?
अप्पा   :   लोणचे बरणीतलं तितकं थोडं फ़्रिज मधे ठेवत चला,  बरं का !
            खराब होत नाही.
कावेरी :  आणि हे काय मला माहीत नव्हतं ? वर्षानुवर्ष तसंच करतो.
अप्पा   :   तरीही एकदा सांगावंसं वाटलं.

======== पडदा ==========

- दिलीप बिरुटे
(आपला अप्पा बेलवलकर उर्फ़  )

कंजूस 08/06/2024 - 02:44
या निमित्ताने विचारतो - गोंगुरा पचडी किंवा लोणचे म्हणा केले आहे काय? (गोंगुरा - अंबाडीची आंबट पाने. ही पाने, लसूण आणि मिरच्या तेलात परतून एकत्र कुटून होणारा तिखट आंबट आणि उग्र ठेचा. तेल ओतून भात/भाकरीबरोबर खातात आंध्रवाले. तिरुपतीला काही हॉटेलांत जेवणाच्या थाळीत मिळते.)

In reply to by कंजूस

वामन देशमुख 08/06/2024 - 05:26
गोंगुरा पचडी किंवा लोणचे म्हणा केले आहे काय?
हे काय विचारणं झालं का साहेब? माझी जीव की प्राण आहे! पेरुगु-अन्नं-पच्चडि यात बहुतेक वेळा गोंगुरा पच्चडिच असते. गोंगुरा पच्चडि == अंबाडीचा ठेचा दोन-तीन दिवसात संपवायचा असेल तर हिरव्या मिरच्या घालायच्या. महिनाभरापर्यंत हवा असेल तर वाळलेल्या लाल मिरच्या घालायच्या. या फोटो सर्वात कमी दिसणारा पदार्थ पहा - गोंगुरा पच्चडि

In reply to by वामन देशमुख

कंजूस 08/06/2024 - 09:49
याचा विडिओ पाहिला होता. आणि तिरुपतीला हॉटेलात त्याने पंचफुला लोणच्याचा आणून ठेवला. शिवाय एक वाडगाभर तेल. लगेच मी विचारले तेल कशाला. वेटरने गोंगुराचा वाडगा दाखवला. भरपूर खाल्लं. मजा आली.

वामन देशमुख 08/06/2024 - 05:31
एक लिहायचं राहिलं होतं, मराठी लोणच्यांच्या तुलनेत, तेलुगु लोणच्यांत मीठ-तिखट थोडं जास्त घालायचं असतं. इथं लोणचं हे मुख्यतः दहीभातासोबत किंवा नुसत्याच (शक्यतो वाफाळत्या) भातासोबत खाल्लं जातं.

नठ्यारा 08/06/2024 - 17:29
वामन देशमुख, ते लोणचंबिणचं राहूद्या. एकत्र केल्यावर आणि फोटोसाठी म्हणून जी चित्रं डकवलीयेत ती पाहून कच्चीच कैरी मटकावून टाकावीशी वाटतेय. लोणचं बनेपर्यंत धीर कोणाला धरवणारे. -नाठाळ नठ्या

लहानपणी आई आणी शेजारच्या आया बाया मिळून वर्षाचे लोणचे घालायचे ते आठवले. आम्ही लिंबाचे गोड लोणचे , तेल न वापरता घालतो. मुरली की मस्त लागते. रेसीपी..... बाजारातून चांगली पिवळी रसरशीत बिना डागाची लिंबे दोन किलो आणावीत. (लोणचे या प्रकारात माझा सहभाग एवढाच असल्याने पुढील रेसीपी माहीत नाही.) आणी वर्षभर मस्त लोणचे खावे. बाकी तुमची रेसिपी व छायाचित्र बघून तोंडाला पाणी सुटले. मेहुणी हैदराबाद मधे असल्याने बनवलेले लोणचे अपसुकच खायला मिळते. थोडे बांधून पण घेऊन येतो.

पण मला आपलं लोणचंच आवडते. हे लोणचं मला अजिबात आवडलं नव्हतं. खूप खारट लागते. कैरीची सगळी चव मारून टाकली जाते. तरीही फोटो झकास. तुमच्या ताटाचा फोटो जास्त आवडला! सुरेख! आणि तो जास्त तोंपासू आहे!!!

नगरी 10/06/2024 - 08:44
तोपासू, प्रयोग करून पाहायला हवा,पण निम्म्यावर म्हणजे 50%

विजुभाऊ 14/06/2024 - 17:57
आह्हाहाहाहाहा तोंडाला पणी सुटले. हैदराबादेत गाचेबावलीतेक दुकान पाहिले होते. तेथे लोणची हौदात भरून ठेवली होती. दुकानाचे नाव विसरलो. मटणाचे लोणचेही होते त्यात. तेथून येताना मस्त झाकास पैकी दोन किलो घोंगुरा लोणचे आणले होते
तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे
नमस्कार मिपाखरांनो! महाराष्ट्रात आंब्याचे लोणचे घालायचे दिवस येऊ घातलेत. त्यानिमित्ताने तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे ही पाककृती सादर करत आहे. आवड असल्यास नक्की करून पहा.

मनोरथाच्या वाटेवर जरी

अनन्त्_यात्री ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे
-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 13/06/2024 - 21:28
ही कविता इंग्रजीत गूगल भाषांतर करून कृबु प्रतिमेसाठी वापरली असता खालील चित्रे आली: (हे प्रयोदाखल करून बघितलेले आहे, बाकी हेतु काही नाही) . . .

In reply to by चित्रगुप्त

टाईमपास कवितेला चार चाँद लावल्याबद्दल चित्रगुप्ताय नम: सूर्याच्या सात घोड्यांपैकी १-२ गायबलेत. बहुधा माझी नजर चुकवून चरायला गेले असावेत.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 13/06/2024 - 22:26
यात (आपले डोके अजिबात न वापरता) भाषांतर आणि चित्रनिर्मितीत संपूर्णपणे कृबुचाच वाटा आहे. नवनवीन प्रयोग करण्यातून ज्ञान मिळत राहील.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे
-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 13/06/2024 - 21:28
ही कविता इंग्रजीत गूगल भाषांतर करून कृबु प्रतिमेसाठी वापरली असता खालील चित्रे आली: (हे प्रयोदाखल करून बघितलेले आहे, बाकी हेतु काही नाही) . . .

In reply to by चित्रगुप्त

टाईमपास कवितेला चार चाँद लावल्याबद्दल चित्रगुप्ताय नम: सूर्याच्या सात घोड्यांपैकी १-२ गायबलेत. बहुधा माझी नजर चुकवून चरायला गेले असावेत.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 13/06/2024 - 22:26
यात (आपले डोके अजिबात न वापरता) भाषांतर आणि चित्रनिर्मितीत संपूर्णपणे कृबुचाच वाटा आहे. नवनवीन प्रयोग करण्यातून ज्ञान मिळत राहील.
लेखनविषय:
भू-कवचा विंधून धरेच्या गाभ्याशी जाईन शून्य गुरुत्वाकर्षण तिथले अधांतरी मोजेन निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन जर्द तांबडी मंगळमाती शनीवरी शिंपीन शनि-मंगळ मग युती अनोखी एकवार पाहीन राहू-केतुची जोडगोळी मग समक्ष बघण्यासाठी चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद सोडवीन निरगाठी सात अश्व सूर्याचे - त्यांना थोपटीन प्रेमाने त्यांचा दाणा , पाणी , खरारा करीन मी निगुतीने कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन गळाभेट घेईन तयाची - त्यात विरुन जाईन मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे

लोकसभा निवडणूक २०२४ : अ-संपादकीय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

लोकसभेच्या २०२४ निवडणूकीची धामधूम एकदाची थांबली. निवडणूकपूर्व कल चाचण्या फोल ठरल्या. आता लोकसभेचा निकाल पाहता, कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने बहुमत नाकारले आहे असे दिसते आणि आघाड्यांच्या सरकारांकडे पुनरागमन आणि विरोधी पक्षाला बळ या निवडणूकीने दिले असे आता सर्व संमिश्र निकाल पाहता म्हणायला हरकत नाही.

बहुतेक, तुमच्या या चांगल्या लेखाला प्रतिसाद येणार नाहीत . किंवा आलेच तर , उपरोधाने ओतप्रोत असे येतील .. (हे माझे वैयक्तिक मत. )... जनता डायरेक्त्त पंतप्रधान निवडू शकत नाही , तो चॉईस कधीच नव्हता आणि नाही. आणि एक पंतप्रधान सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही, हे लोकांच्या लक्षात , अजून मोठ्या प्रमाणात यायला हवं , हि अपेक्षा व्यक्त करतो.

अहिरावण 06/06/2024 - 13:11
या निमित्ताने प्राडॉ लिहिते झाले, बोळा मोकळा झाला ! सर्वप्रथम प्राडॉचे अभिनंदन. ब-याच काळानंतर प्राडॉच्या लेखणीमधूण आक्रस्ताळी, एकांगी लेखनाऐवजी बराचसा समतोल लेख आला. अभिनंदन. बीजेपी प्रमाणे प्राडॉ जमिनीवर आले. अभिनंदन कॉग्रेसप्रमाणे प्राडॉंना आपली क्षमता, कुवत कळाली. अभिनंदन शरदपवारांप्रमाणे प्राडॉ वय झाले तरी आब राखून आहेत. अभिनंदन अजुन कौतुक केले तर प्राडॉ हवेत जातील आणि परत एकांगी प्रतिसाद पाडतील म्हणून अभिनंदन आटोपते घेतो. अजुन काय !!

In reply to by अहिरावण

अथांग आकाश 06/06/2024 - 16:26
चुकिच्या हातांत देशाची सत्ता जाण्यापासुन भारतियांना वाचवणार्या बिहारी आणि तेलुगु जनतेचे मनापासुन अभिनंदन!!

वामन देशमुख 06/06/2024 - 13:15
(महिला कुस्तीपटूंचे) त्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना फरफटत घेऊन जाणे
कधी? कुठे? पुरावे? अधीक माहितीसाठी संदर्भः https://www.misalpav.com/comment/1164322#comment-1164322 --- या शितावरुन उरलेल्या भाताची परीक्षा! --- काही आयडी क्रेडिबल असतात काही आयडी क्रेडिबल नसतात.

In reply to by अहिरावण

अनाकलनीय अहिरावण ह्यांचा आय.डी. उडवण्यात आलेला आहे. हे अनाकलनीय आहे. प्रा.डॉ ह्यांनी माझ्या संपुर्णपणे अराजकीय अशा प्रवासवर्णावर येऊन "माझे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही" अशा अर्थाची संपुर्णपणे वैयक्तिक टिप्पणी केलेली होती. तेव्हा त्यांचा आय.डी का उडवण्यात आला नाही ? त्यांचा केवळ प्रतिसाद संपादित करण्यात आला, तो देखील मी निदर्शनास आणुन दिल्यावर ! कारवाई आधी माझ्या प्रतिसादावर झाली. शिवाय मी कोणत्याही प्रकारे त्या लेखनात त्यांच्या संबंधी अवाक्षर काढले नव्हते. अर्थात त्यांचा प्रतिसाद केवळ स्कोअर सेटलिंग करण्याचा प्रयत्न होता हे निर्विवाद सत्य आहे!! अहिरावण ह्यांना एक न्याय आणो प्रा.डॉ. ह्यांना दुसरा न्याय हे काही योग्य नाही. हे असे एकांगी संपादन न्यायाला धरुन नाही. आता हा प्रतिसाद संपादित होतो की प्रा.डॉ ह्यांचा आय.डी उडवला जातो ह्यावरुन शितावरुन भाताची परीक्षा होईल. सुयोग्य आणि न्याय्य कारवाईची वाट पहात आहे - प्रसाद गोडबोले.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रा.डॉ ह्यांनी माझ्या संपुर्णपणे अराजकीय अशा प्रवासवर्णावर येऊन "माझे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही" अशा अर्थाची संपुर्णपणे वैयक्तिक टिप्पणी केलेली होती.
आपण मिपावर कोणत्या तरी एका लेखनात नेमकं कोणता तेही आठवत नाही. आपण कुठे काश्मीर की हिमाचल प्रदेश की कोणत्या तरी शिबिरात कोणत्या तरी ध्यानधारनेसाठी असं काही आठवत नाही. आपलं लेखन व्यक्तीगत अनुभव आणि कोणत्या श्लोकांचे अर्थ सांगत होता की असे काही होते. लेखनातून जाणवणा-या चंचलतेमुळे 'मन श्रांत होणे असे आवश्यक होते' असे काही तरी लिहिले होते. 'मानसिक स्वास्थ्य वगैरे' असे काही लिहिले नव्हते. उगाच 'ध ' चा 'मा' करु नका. 'श्रांत' म्हणजे दमलेल्या, थकलेल्या, शिणलेल्या, कष्टी माणसास निसर्गातला अनुभव आनंदायी ठरतो. निसर्ग माणसात उत्साह भरतो. अशा अर्थाने ते लिहिले होते. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणाला गंडवताय सर ? आम्ही काही तुमचे विद्यार्थी नाही की दुधखुळेही नाही. हा तुमचा प्रतिसाद होता :
लेखन वाचलं. आपलं मन श्रांत होणे आवश्य वाटतच होतं.काळजी घ्या जपा. वाहवत जाऊ नका.
ह्यातील गर्भितार्थ आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला ? "थकलेल्या, शिणलेल्या, कष्टी माणसास निसर्गातला अनुभव आनंदायी ठरतो, निसर्ग माणसात उत्साह भरतो " असा टोन अजिबात नाहीये ह्या प्रतिसादात. तसे असते तर तुम्ही लेखातील इतर गोष्टींविषयी दुर्लक्ष केले नसते. शिवाय काळजी घ्या जपा वाहवत जाऊ नका असले शब्द वापरले नसते. आणि खरेच तुमचा टोन तसा असता , तर व्यवस्थापनाला देखील तुमचा खरा काळजीचा आपुलकीचा टोन जाणवला असता आणि त्यांनी तो प्रतिसाद संपादित केलाच नसता. त्यांनी, व्यवस्थापकांनी प्रतिसाद संपादित केला हाच पुरावा आहे की त्यांनाही जाणवले ती वैयक्तिक टिका आहे ते! इथे अहिरावण ह्यांनीही काहीही वैयक्तिक टीका केलेली नव्हती , उलट त्यांनी प्राध्यापक लोकं सरकार विषयी असंतोष पसरावा म्हणुन काय काय आंदोलने करु शकतात ह्याची यादी दिलेली होती. केवळ तेवढ्या वरुन त्यांचा आय.डी संपादित झालाय. तुमचा मात्र वैयक्तिक टीका करणारा प्रतिसाद देखील विशेष निदर्शनास आणुन दिल्याशिवाय संपादित होत नाही. ही वस्तुस्थिती आहे . मी काही मराठी भाषेत पी.एच.डी केलेली नाही की प्राध्यापकी केलेली नाही पण इथे मला एक चपखल म्हण आठवत आहे - आपला तो बाब्या अन दुसर्‍याचे ते कार्टे !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वामन देशमुख 07/06/2024 - 15:10
लेखनावरील आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत. दुवा निवांत बघा.
दुवा वाचला. आपली भूमिका पटली. --- सदर अ-संपादकीय लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ राजकीय परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो निवडणुका ते राज्यकारभार अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या आशयघन अशा संस्थळावर, एखाद्या बल्लवाचार्याने उत्तमोत्तम पक्वान्ने रांधावीत व अत्यंत सुशोभित अश्या ताट-पाटावर ती पक्वान्ने भुकेलेल्यास भक्षण करण्यासाठी मांडावीत असा आल्हाददायक दुग्ध-शर्करा-अनुभव हे लिखाण वाचून साक्षेपी वाचकास आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच मिपावरील आजकालच्या आशयहीन लिखाणरुपी धाग्यांच्या सोसाट्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, राजकारण-समाजकारण यांचे बौद्धिक तरीही आकलनसुलभ असे विवेचन आणि नर्मविनोदी तरीही निर्भिड शैलीत मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव लिखाणाचे वाचन-मनन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - वामन देशमुख

गवि 06/06/2024 - 17:15
उत्तम समतोल लेख लिहीला आहेत प्रा डॉ सर. आता विविध विषयांवर लेखणी फुलू दे परत. २०२९ पर्यंत. प्रस्थापित व्यवस्थेत असलेली छिद्रे दाखवणे हे एक अत्यावश्यक कार्य आहे. ते तुम्ही नेहमी करत आला आहात. त्याबद्दल धन्यवाद. पण त्या नादात तुमचे ललित लेखन, इतर अभ्यासपूर्ण साहित्य, परीक्षणे अशा अनेक गोष्टी पडद्याआड जाऊ नयेत अशी विनंती. लिहीत रहा.

स्वधर्म 06/06/2024 - 17:28
मला एकूणच भारतीय जनता देवाधर्माच्या गुंगीतून भानावर येऊन जमिनीवरच्या वास्तव प्रश्नांचा विचार अजूनही करू शकते याचा मनापासून आनंद झाला. एकदा का एखाद्याला देवानेच मला पाठवले आहे असे वाटू लागते, तेंव्हा स्वत:चा कोणताही निर्णय बरोबरच वाटू लागतो. घटना, लोकशाही मूल्ये वगैरेची पत्रास बाळगायचे कारण उरत नाही, ते आता होणार नाही असे वाटते. कालांतराने लोकांचीही विचारशक्ती संपुष्टात येते. उदा. प्रेषितांनी निर्माण केलेल्या धर्मात धर्मचिकित्सा होऊ शकत नाही. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो; आता भारतीयांना बायॉलॉजिकल पंतप्रधान मिळेल अशी आशा वाढली.

In reply to by स्वधर्म

बाबुराव 16/06/2024 - 09:23
ॲडॉल्फ हिटलर सत्तेत आला, त्याला फार वर्षं नाहीएत झालेली. ती काही पुराणकथा नाही. ताजा इतिहास आहे. १९३३मध्ये हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला. अर्थात, त्यापूर्वी म्हणजे १९२१मध्येच तो नाझी पार्टीचा नेता झाला होता. १९२४मध्ये नाझी पार्टी त्याच्या पूर्ण ताब्यात आलेली होती. (हे तेच वर्ष, जेव्हा महात्मा गांधी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.) जर्मनीवर मांड ठोकल्यानंतर हिटलरने सगळ्यात पहिल्यांदा काय केले असेल, तर आपण 'प्रेषित' आहोत, हे सांगायला त्याने सुरूवात केली. तेव्हा शाळांमध्ये मुलांना हे शिकवले जात असे की, हिटलर जन्मलाच नाही. देवाने त्याला विशिष्ट कामासाठी पृथ्वीवर पाठवले आहे. त्याने त्यासाठी जर्मनीची निवड केली आहे आणि जर्मनीने त्याची निवड केली आहे. हिटलर हा काही सामान्य माणूस नाही. रादर, हिटलर हा 'माणूस'च नाही. तो देव आहे. प्रेषित आहे. इथे एका कामासाठी आलेला आहे. हे काम संपले की तो जाणार आहे. त्याला ना मानवी शरीर आहे, ना मानवी मोह-माया. त्याला ना संसार आहे, ना कसला लोभ! हे सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिटलरकडे माध्यमे होती. माध्यम तंत्रज्ञान तेव्हा फार प्रभावी होते, असे नव्हे. मात्र, लोकांच्या मनावर राज्य गाजवल्याशिवाय खरी सत्ता पादाक्रांत करता येत नाही, हे हिटलरला माहीत होते. डॉ. जोसेफ गोबेल्स याच्यासारखा सल्लागार त्याच्यासोबत होताच. हिटलरची भाषणे चमत्कारिक असत. त्यावेळी विन्स्टन चर्चिलसारखे बुद्धिमान नेते विचारी भाषणे करत. मात्र, असे नेते भाषण वाचून दाखवत. हिटलरने भाषण नावाची गोष्टच बदलून टाकली. त्याचे भाषण हा 'रंगमंचीय परफॉर्मन्स' असे. तो लोकांना खिळवून ठेवत असे. त्यांना आपल्यासोबत घेत असे. लोक ठेका धरून त्याच्यासोबत नाचत असत. "जर्मनी आपल्या पाठीशी आहे. आपल्यासमोर फक्त जर्मनी आहे. आपल्या आत जर्मनी आहे. जर्मनी... जर्मनी... जर्मनी!" "Germany is behind us! Germany is in front of us! Germany is within us!" अशा एकापाठोपाठ एक चमकदार घोषणांची मालिका असे या भाषणात. हिटलरने जर्मन माणसात भयंकर राष्ट्रवाद तयार केला. त्यानंतर, हिटलरला पाठिंबा म्हणजे देशभक्ती आणि हिटलरला विरोध म्हणजे देशद्रोह इथपर्यंत हा प्रवास गेला. हिटलर देशापेक्षा मोठा झाला! हिटलरच्या एका शब्दावर लोक मरायला तयार होत. मारायला तयार होत. लाखो लोक मारले गेले, तरी हिटलरच्या भक्तांना काही फरक पडत नसे. त्यांना ते देवाचे काम वाटत असे. हिटलर ज्या आवेशात बोलत असे, ते बहुसंख्य लोकांना पटत असे. पुराणकथांमध्ये युद्धात लोक कितीही मारले गेले, जे मारले गेले ते लोक आपले जीवलग असले तरी खुद्द प्रेषितच त्याचे समर्थन करतो. कणखर, बलसागर राज्य उभे करायचे असेल तर माणसे मारावी लागतात. हिटलरने हे पटवून दिले. शत्रू कोण, हे त्याने सांगितले. ते लोकांना पटले, कारण हिटलर हा माणूस नव्हता. तो प्रेषित होता. सगळ्यात भयंकर हे असते. मर्त्य माणसांना पराभूत करता येते. मात्र, एखादा माणूस प्रेषित झाला की, तो फक्त नेता नसतो. त्याचा 'कल्ट' तयार होतो. भक्तसंप्रदाय तयार होतो. पंथ तयार होतो. असा नेता मग संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना नव्हे, तर संतांना पाचारण करतो. आणि, मंदिराच्या उद्घाटनाला मात्र स्वतःच असतो. थेट 'मेसेंजर ऑफ गॉड'. तो थेट देवाचा निरोप्या असतो. 'बायॉलॉजिकल' नसतो. अशक्य ते शक्य करणारा असतो. अपराजित असतो. अमर्त्य असतो! मर्त्य माणसासाठी त्याचा पराभव निव्वळ अशक्य असतो. एखाद्या माणसाला 'लार्जर दॅन लाइफ' करत, पुढे हे शेवटचे टोक असते. प्रेषित होत त्याचे थेट देवाशीच नाते जोडले जाते. मात्र, हा सगळा प्रचार फोल ठरतो. देवाच्या दारातच तो पराभूत होतो. मुळात, तो पराभूत होऊ शकतो! हे घडणे किती महत्त्वाचे, याचा अनेकांना आज अंदाज येणार नाही. पण, 'म'च्या या मारामारीत एका महाप्रलयापासून 'महाभारत' वाचला आहे! अशा 'कल्ट'पासून देश वाचला आहे. आपोआप नाही अर्थात. लोकांनी ते केले आहे. आपला भारतीय माणूस आहेच बाकी भारी! - संजय आवटे

In reply to by बाबुराव

नठ्यारा 16/06/2024 - 17:30
भारत किती मोठय ते आवटे यांना बहुधा माहीत नाही. चालले आपले हिटलरच्या मागोमाग ! बाकी, हिटलरला पैसे पुरवणारे कोण होते त्याची काही खबरबात काढणं आवटेच्या कक्षेबाहेरील सायास आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 17/06/2024 - 17:17
तुंम्ही काढलेल्या खुसपटांचा (भारत किती मोठा आहे किंवा हिटलरला पैसे इ.) मूळ मुद्याशी कसलाही संबंध नाही आणि आवटे यांच्या पोष्टमध्ये जे म्हटले आहे ते असिध्द होत नाही, एवढेच म्हणतो.

नठ्यारा 06/06/2024 - 20:02
प्राडॉ, तुमचं हे विधान अजिबात म्हणजे आज्जिब्बात पटलं नाही.
आपण जेव्हा अशा प्रश्नांकडून भावनिक प्रश्नांकडे लोकांना घेऊन जाऊ पाहतो, तेव्हा काही काळ लोक भावनिक होतातही, पण हीच जनता आपली जेव्हा फसवणूक होते आहे, असे वाटते तेव्हा मतदानाच्या माध्यमातून बदल करते हा धडा या निवडणूकीने दिला.
हे वाक्य तत्त्व म्हणून ठीक आहे. पण ते चालू परिस्थितीत लागू पडंत नाही. कारण की भाजपचा मतटक्का तितकाच आहे. केवळ भाजपच नाही तर इतरांचाही साधारणत: २०१९ च्या आसपासच आहे. कृपया विकीवरून काढलेली माहिती पहा : 2024 election BJP (36.56%) INC (21.96%) SP (4.58%) AITC (4.37%) YSRCP (2.06%) BSP (2.04%) TDP (1.98%) DMK (1.82%) CPI(M) (1.76%) RJD (1.57%) NCP (1.48%) Other (21.3%) 2019 election BJP (37.7%) INC (19.67%) AITC (4.1%) BSP (3.66%) SP (2.55%) YSRCP (2.53%) DMK (2.26%) SS (2.10%) TDP (2.04%) CPI(M) (1.77%) Other (21.62%) 2014 BJP (31%) INC (19.31%) AITC (3.84%) BSP (4.14%) SP (3.37%) YSRCP (2.53%) DMK (1.74%) AIDMK (3.27%) SS (1.85%) TDP (2.55%) CPI(M) (3.25%) NCP (1.56%) ( खरंतर मी सारणी लिहायला हवी. पण तितका वेळ नाही. वाचकांनी कृपया क्षमा करावी. ) तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही लिहिलेले मुद्दे कितीही रास्त असले तरी भाजप च्या मतदारांना म्हणजे हिंदूंना कितपत लागू पडतात याची शंकाच आहे. भाजपच्या विरोधकांनी ( विशेषत: मुस्लिमांनी ) आपसांतली मतफूट टाळल्यामुळे भाजपचा विजय मर्यादित झाला आहे. शिवाय संघाचंही या वेसणीत योगदान आहे. संघ निवडणुकीत हव्या तितक्या ताकदीने उतरला नाही, असं माझं मत आहे. संघातल्या काही उच्चपदस्थांना मोदी आवडंत नाहीत. तुम्ही सांगितलेले मुद्दे भाजपने अमलांत आणले असते तर हिंदू मतदार दूर जाऊन भाजपचा पराभव निश्चित होता. हे माझं वैयक्तिक मत आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

आपल्या विचारांचं मतांचं स्वागत आहे. लेख लिहून झालं आणि असंख्य मुद्दे राहुन गेले.  दोनहजार चौदाच्या भाजपा जाहीरनाम्यात  महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, काळा पैसा हे अनुक्रमे चार मुद्दे अग्रक्रमावर होते.  विकासाचे मुद्दे निवडणूकीत होते. जनता या पूर्वीच्या सरकारच्या धोरणांना कंटाळलेली होती आणि या नव्या भूलीचा जनतेवर प्रभाव पडला. ”बस हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार’  लोकांचा चमत्कारावर विश्वास.  दोन हजार एकोनावीसला जाहिरनाम्यात मुद्दे भरकटले. आतंकवाद, सैनिक कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे गावगप्पा. दोन हजार चौवीसची निवडणूक ’मोदी की गॅरंटी” वर लढल्या गेली.  कशाची गॅरंटी तर, गरीब परिवाराची सेवा, मध्यम परिवाराचा विश्वास, महिला सक्षमीकरण, युवकांना संधी वगैरेची गॅरंटी.  पण निवडणूक प्रचारात निव्वळ ’हिंदू’  भोवती फ़िरली. जाहीरनाम्यात हिंदुंना आवडणारे कोणतेही मुद्दे नव्हते, ते केवळ भाषणबाजीचे विषय होते असे वाटते.

विकासाकडून सुरु झालेला प्रचार हिंदू भोवती फिरला. पण म्हणुन सरसकट हिंदुंना भाजपाची विचारसरणी आवडते असे समजण्याचे काही  कारण नाही, कारण की विचारसणी मानणारी जी काही हिंदू मतं पडायची ती भाजपाला मिळालीच असतील. पण हिंदू आणि इतर अशांना या हिंदुत्व सोडून जी जीवन-मरणाचे प्रश्न आणि इतर मुद्यांकडे  जायचं असेल तर भाजपाकडे त्यांना रोखण्यासाठी आता काही मुद्दे आहेत असे मला व्यक्तीगत वाटत नाही. काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षांना याचा लाभ झाला. मुस्लीमांच्या मतदारांबद्दल आपण लिहिलंय, त्यात ती एकगठ्ठा राहीली नाहीत असे वाटते, उदा. उत्तरप्रदेशात मायावतींनी आपले जे उमेदवार दिले त्या उमेदवारांनी मुस्लीम मतं घेतली आहेत. आज उत्तरप्रदेशातली आकडेवारी पाहात होतो. एकूण सोळा मतदार संघात बसपामुळे भाजपा उमेदवार विजयी झालेले दिसतात. बसपामुळे तो विजय सुकर झाला. ते अधिकचे सोळा उमेदवार भाजपेतर निवडून आले असते तर ? क्रिकेट आणि राजकारणात जर तरला तसाही काही अर्थ नसतो.

आता चंद्रबाबू नायडू आणि नितेशकुमारांच्या सत्तेतील सहभागाच्या आघाडीचे परिणाम सुरु झाले आहेत. अर्थात, काँग्रेस पक्षातील आणि इतर पक्षातील खासदारांना भाजपा आपल्या शैलीने गळाला लावेल तेव्हा लावेल पण आता जदयु आणि तेलगु देसमच्या इशा-यावर हिंदुत्वच्या मुद्याला तिलांजली देवून आता त्यांच्या इशा-यावर ”सत्तेसाठी नाचते   मी परवा कुणाची ” म्हणून मुजरे घालावे लागणार आहेत. दोघांनीही पाठींबा देतांना अटी घालायला सुरुवात केली आहे.  लोकसभेचं अध्यक्षपद, मंत्रीपदं आणि  अग्निपथ योजना मागे घ्या. समान नागरी कायद्यावर पुर्विचार करा. इकडे महाराष्ट्रातही विविध शासकीय कार्यालयात किती भरती बाकी आहे त्याची माहिती मागवली जात आहे. आघाड्यांचे सरकार, विरोधी पक्ष ताकदीने उभा राहील तेव्हा येत्या काळात एनडीएचं सरकार कसं चालेल ते पाहणे रोचक ठरणार आहे. चुभुदेघे

-दिलीप बिरुटे

ख्या ख्या ख्या . सर , फक्त एकदा कन्फर्म करुन सांगता का की निवडणुक नक्की कोण जिंकलं आहे ? कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? आणि कोणत्या पक्षाचा पंतप्रधान होणार आहे ? त्यांचे वर देखले अभिनंदन करुन , त्यानुसार लागलीच सांगुन टाका पुढील ५ वर्षात काय काय आंदोलनं करणार आहात ! =)))) बाकी ह्यावेळी ए.व्ही.एम च्या नावाने कोणी रडत नाहीये ही एक समाधानाची बाब आहे नाही का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

कितीही नि:पक्षपाती असल्याचा आव आणुन लेखन पाडले, तरी तुमच्या शब्दांच्या निवडी वरुन तुमचे अंतःस्थ हेतु आणि पुर्वग्रह दिसुन येतातच. सारांश : १. भाजपने ५४३ पैकी २४० जागा जि़ंकल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे ज्याने ९९ जा जिंकल्या आहेत ज्या की भाजपाच्या अर्ध्या पेक्षाही कमी आहेत. २. भाजप विरुध्द केलेल्या इंडि अलायन्सने ज्यात तब्बल ४० पक्ष होते, त्या सर्वांनी मिळुन २३६ जागा जिंकल्या आहेत. अर्थात सर्वजण एकत्र येऊन देखील केवळ एकट्या भाजपच्या २४०च्या तोडीस तोड देऊ शकत नाहीत. ३. एन.डी. ए. कडे सरकार बनवण्यासाठी पुरेसे बहुमत अर्थात २७२+ जागा आहेत, आणि श्री. मोदींच्याच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यात येईल असे तुर्तास तरी दिसत आहे. श्री. राहुल गांधी ह्यांच्या नेतृत्वातील सरकार बनण्याची तुर्तास तरी चिन्हे दिसत नाहीत. वरील तीन विधाने फॅक्च्युअली करेक्ट आहेत. आता काही विधाने अनुमानात्मक : ४. भाजपाचा पराभव झाला असे म्हणण्याला काहीही तार्किक आधार नाही, भाजप जर सरकार बनवु शकले नसते तर भाजपा चा पराभव झाला असे म्हणाता येईल. ५. भाजप च्या सीट्स कमी का झाल्या ह्यावर ज्यांना एरंडाचे गुर्‍हाळ चालवायचे आहे ते त्यांनी सुखनैव चालवावे. सध्या तरी भाजप श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वात सरकार बनवेल असे दिसत आहे. ही मोदींची तिसरी टर्म असेल जे की पंडीत नेहरु ह्यांच्या विक्रमाची बरोबरी आहे. अर्थात ही टर्म जर श्री. मोदी ह्यांनी पुर्ण केली तर आपण नेहरु आणि मोदी ह्यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मच लेखा जोखा मांडू शकतो. बाकी आज नितीशकुमार आणि चंद्राबाबु नायडू त्यांच्या अनुक्रमे १६ आणि १२ सीट्स सह काँग्रेस प्रणीत इंडी अलायन्स मध्ये गेले तरीही त्यांच्या टोटल सीट्स २३६ + १६ + १२ = २६४ होतात जे की सरकार बनवण्यास पुरेसे नाही. इंडि अलायन्स ला काहीतरी मोठ्ठा चमत्कार करावा लागेल सरकार बनवण्यासाठी. ६. तस्मात , तुर्तास तरी असे दिसुन येते की पुढील काही वर्षे देशात भाजप चे सरकार राहिल आणि त्यानिमित्ताने आंदोलने अन मोर्चा स्पॉन्सर होत राहतील . एकुणच पुढील काही वर्षे अफलातुन इन्टर्टेनमेंट चालु रहाणार हे निश्चित ! ७. आता २०२९ पर्यंत आपण मजा पाहु. सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करा !

In reply to by प्रसाद गोडबोले

पॅट्रीक जेड 08/06/2024 - 19:25
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करा ! सहा महिन्यानंतरचा पराभव आताच नेत्याना दिसू लागलाय. मला मोकळं करा म्हणताहेत ते. :)

कंजूस 07/06/2024 - 12:29
समीक्षा चांगली केली आहे. मोदींचे वारू त्यांच्या मीटरप्रमाणे जोरात दौडत होते. ज्या काही गोष्टी खटकत होत्या त्या कोणते भाजपवाले मोदींना सांगत असतील? आता परिणामांतून त्यांनी धडा घेतलाच असेल, आणखी कुणी सांगायला नको.

टर्मीनेटर 07/06/2024 - 15:46
संतुलन राखण्याचा प्रयत्न करत केलेले 'शुगर कोटेड' स्लेजिंग आवडले 😂 मिपासहित कुठल्याही समाजमाध्यमांवर चालणाऱ्या निरर्थक राजकीय (काथ्याकुटीय) चर्चांमध्ये रस नसला तरी अशा विश्लेषणात्मक लेखावर "एक प्रतिसाद तो बनता हैं बॉस", त्यामुळे माझेही चार शब्द... ह्या निवडणुकीचे निकाल खरंच आवडले. अतिआत्मविश्वासातून दिली गेलेली 'अबकी बार चारसों पार' सारखी घोषणा फोल ठरवत सुजाण भारतीय मतदारांनी कल्पनेच्या उंच उंच भराऱ्या घेणारे भाजपचे विमान जमिनीवर आणताना २००४ च्या "इंडिया शायनिंग" मोहिमेची उडवली होती तशी धूळधाण २०२४ मध्ये उडवली नसली तरी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान होता येईल इतपत कौल देऊन जनतेचे अनेक अत्यावश्यक प्रश्न प्रलंबित/दुर्लक्षित राहिल्याची जाणीव करून दिली हे फार बरे झाले! "काही लोक असे असतात ज्यांना पाहिल्यावर उगाचच कानफटात ठेऊन द्यावीशी वाटते" असे काहीसे पुलं म्हणतात, त्याप्रमाणेच फोटोत, टीव्हीवर दिसले तरी शेणात बुडवलेल्या चपलेने थोबाड फोडून काढावे असे वाटणारे संजय राऊत, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे वगैरे वगैरे, सकाळी सकाळी (फोटोत, टीव्हीवर) ज्यांचे दर्शन घडल्यास नाश्ता/जेवण करण्याची इच्छा सुद्धा मरून जाईल असे एक जुने जाणते, राहुल गांधींसारखे बालिश/बिनडोक आणि उद्धव ठाकरेंसारखे आत्मघातकी नेते, आणि अनेक गणंग लोकांनी (३७ कि काहीतरी पक्षांनी) एकत्र येऊन अस्तित्वात आणलेल्या दिशाहीन इंडी आघाडीच्या हाती सत्तेची सूत्रे जाण्यापेक्षा (पूर्ण होतील कि नाही ह्याची खात्री वाटत नसली तरी दुसरा कुठला पर्यायच उपलब्ध नसल्याने) असंख्य भारतीयांनी ज्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या त्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेलया स्पष्ट बहुमताचे सरकार येत आहे ह्याचे (स्वतः मतदान केले नसले तरी) समाधान वाटले. "गरीब, महिला, युवा और किसान" ह्या चार 'सामाजिक जातींच्या' विकासासाठी काम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आपल्या २०२४ च्या निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदींनी वारंवार सांगायला सुरुवात केल्यावर २०१४ आणि २०१९ ह्या दोन्ही टर्म्स मध्ये सरकारकडून असलेल्या आपल्या अपेक्षा तिसऱ्या टर्ममध्ये तरी पूर्ण होतील ह्या आशेने डोळे लावून बसलेला, वरील चार 'सामाजिक जातींमध्ये' न मोडणारा एक मोठा मतदारवर्ग मोदी/भाजपवर नाराज झाल्याने पहिल्या फेरीपासूनच मतदानापासून अलिप्त राहिला. जसा तात्कालीन परिस्थिती पाहून मतदान करणारा,"काठावरचे मतदार" म्हणवला जाणारा एक मतदारवर्ग आहे तसाच संख्येने कमी असला तरी कुठल्याही राजकीय पक्षाशी, विचारसरणीशी आणि नेत्याशी बांधिलकी नसणारा आणि पक्ष, चिन्ह वगैरे न पाहता उमेदवाराचे चारित्र्य आणि कार्यक्षमता पाहून मत देणाराही एक मतदारवर्ग आहे. मी ह्या वर्गात मोडत असल्याने "मोदींच्या नावावर काय दगड उभा केला तरी निवडून येईल/येतो" अशा फाजील आत्मविश्वासाने भाजपने आणि मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या अन्य पक्षांनीही निष्क्रिय/अकार्यक्षम/गुन्हेगारी पार्शवभूमीचे उमेदवार दिल्याने माझ्यापुरता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला (अशा परिस्थितीत 'NOTA' हा पर्याय उपलब्ध असला तरी त्याचे भारतातले नियम इतके भंपक आहेत कि 'मतदान यंत्रावरचे एक अत्यंत निरुपयोगी बटण' अशीच त्याची व्याख्या होऊ शकते). अर्थात माझ्यासारखे इतरही अनेक मतदार मतदानापासून अलिप्त राहिले असतील ज्याचा थोडाफार का होईना पण एकूण मतदानाची टक्केवारी कमी होण्यात वाटा असू शकतो. सेलिब्रेटींकडून मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी "मतदान श्रेष्ठ दान", "मतदान करणे हा तुमचा सर्वात मोठा अधिकार/हक्क आहे" वगैरे सारख्या घोषणा देत जाहिराती करणाऱ्या निवडणूक आयोगाने "चांगले उमेदवार देणे हि तुमची सर्वात महत्वाची जवाबदारी आहे" वगैरे सारखे ज्ञानामृत पाजणाऱ्या जाहिरातींचे कॅम्पेन राजकीय पक्षांसाठीही चालवावे! गेल्या दहा वर्षातली सरकारविषयीची जी काही थोडीफार असेल ती 'अँटी-इन्कम्बन्सी' आणि वरील दोन कारणांमुळे काही राज्यांत मोदी/भाजपला मिळू शकणाऱ्या संभाव्य मतांची संख्या थोड्या प्रमाणात तरी नक्कीच घटली असावी. आधीच्या दोन टर्म्समध्ये राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे नव्याने निर्माण झालेल्या "लाभार्थी व्होटबँकेने" हक्काच्या/संभाव्य मतांमध्ये झालेली हि घट बऱ्यापैकी भरून काढल्याने मोदी/भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत २०१९ पेक्षा नाममात्र घट झालेली दिसत असली तरी तब्बल ६३ जागा कमी झाल्या. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये जाती-पातीच्या राजकारणाचा मोठा फटका बसल्याचे अनेक विश्लेषक म्हणत आहेतंच पण काल मूळच्या उत्तरप्रदेशातल्या पण गेल्या कित्येक दशकांपासून मुंबईत व्यापार करणाऱ्या एका भाजपचा पारंपरिक मतदार असणाऱ्या सवर्ण वर्गातील व्यापाऱ्याकडून रोचक माहिती मिळाली. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीनही निवडणुकांत भाजपकडून तिकीट वाटपात सवर्णांवर अन्याय झाल्याच्या रागातून त्या पक्षाशी संबंधित असलेल्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी (चाणाक्ष वाचकांनी त्या संघटनेचे नाव ओळखले असेलंच 😀) त्याच्या मतदारसंघातील एकूण एक सवर्णांच्या घरी अनेकवेळा भेटी देऊन ह्यावेळी उत्तरप्रदेशात अन्य कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वात जास्त सवर्णांना तिकिटे देणाऱ्या 'समाजवादी पक्षाला' ह्यावेळी मत देण्यासाठी अक्षरशः हात जोडून - पाया पडून विनंती केली होती. हाच प्रकार तिथल्या अन्य मतदारसंघातही घडला असावा असे तिथले निवडणूक निकाल पाहून वाटतंय! अर्थात त्याच संघटनेने भाजपला धडा शिकवण्यासाठी केलेला असाच प्रकार २०१० साली झालेल्या आमच्या 'कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या' निवडणुकांच्यावेळी प्रत्यक्ष पहिला होता, ज्याच्या परिणामी त्यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 'महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पहिल्याच फटक्यात तब्बल २६ नगरसेवक निवडून आल्याने शिवसेनेला बऱ्यापैकी पण भाजपला मात्र चांगलाच फटका बसला होता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही बऱ्यापैकी जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि नाशिकमध्ये फायदा होऊ शकेल अशा विचारातून राज ठाकरेंना मोठ्या प्रेमाने मांडीवर घेण्यात आल्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात बसल्याचेही काही मुंबई आणि युपीच्या मित्रांकडून समजले आहे. त्यांची परप्रांतीयांविषयीची अविचारी भूमिका आणि हिंसक आंदोलन अजून 'ते' लोक विसरले नाहीयेत. असो, ९ तारखेला शपथविधी होऊन नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळणाऱ्या श्री. नरेंद्र मोदींचे त्रिवार अभिनंदन!!! तसेच शतक हुकले असले तरी परिश्रमपूर्वक गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँगेसच्या जागा जवळपास दुप्पट करणाऱ्या राहुल गांधींचे अभिनंदन आणि शुभेच्छा! आपल्या पक्षाच्या ५ वरून ३७ अशा सात पटींपेक्षा अधिक जागा वाढवण्यासाठी कष्ट घेतलेल्या अखिलेश यादव ह्यांचेही कौतुक आणि अभिनंदन. आपल्या जागा निम्म्या करून महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागा दुप्पट आणि काँग्रेसच्या जागा तब्बल १३ पट वाढवणाऱ्या उद्धव ठाकरेंचे तर विशेष अभिनंदन! ईव्हीएमचे अभिनंदन करणारा एक लेखच मिपावर आला असल्याने त्याचे अभिनंदन करण्याची पुनरावृत्ती टाळतो. आणि एकाबाजूला भावनिक उन्माद आणि दुसऱ्या बाजूला मातम, रडारड करण्याची संधी नाकारून मिपावर गेले काही महिने असलेले दूषित/गढूळ वातावरण लवकरात लवकर निवळण्यास हातभार लावणाऱ्या २०२४ च्या निवडणूक निकालांचे पुन्हा एकदा स्वागत करून माझे चार(?) शब्द संपवतो! जय हिंद! जय महाराष्ट्र!

काल काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमधे नेतेपदी आणि अर्थात पंतप्रधानासाठी निवड करण्यात आली. गेल्या दोन पंचवार्षिकचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बहुमताचा उत्साह आणि आता एनडीएचा उत्साहातला फरक जाणवणारा होता. बहात्तर मिनिटांच्या भाषणात एकोनावीस वेळा 'एनडीएचा' उल्लेख करावा लागला. आघाडी सरकारांना सहकारी पक्षांची जी हाजी हाजी करावी करावी लागते, त्याची सुरुवात अधिकृतपण उद्यापासून सुरु होईल. ''मोदी की गॅरंटी आणि काँग्रेसच्या 'हाथ बदलेगा हालात'' लोकसभेतील निवडणूकांचा प्रवास पंतप्रधानांच्या निवडीपर्यंत येऊन ठेपला.

sanvidhan
छायाचित्र जालावरुन साभार

संपूर्ण देशात सर्वाधीक सभा घेण्याचा मान अनुक्रमे तेजस्वी यादव, नरेंद्र मीदी प्रियंका गांधी, अमित शहा, राहुल गांधी यांनी आपापल्या मतदार संघात सभा गाजवल्या. निवडणूकांचा प्रचार संपला, निकालही लागलेत. नव्या रणनिती, नवे राजकारण त्याची धावपळ पुन्हा सुरु होईल. सर्वच पक्ष नेत्यांनी आपापला थकवा घातला असेल. ध्यानधारणा करुन प.नरेंद्र मोदी नव्या उत्साहाने उद्या तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पराभवाची नैतिक जवाबादरी घेऊन 'मला मोकळे करा' वर ठाम आहेत. महाराष्ट्रातले येत्या विधानसभेचं राजकारण कसं असेल त्याची सुरुवात आता झाली आहे.

देशातील जनतेने भाजपास दोन वेळा बहुमत दिलं. देशासाठी काय केलं आणि काय केलं नाही त्याचा लेखाजोगा लोकसभेच्या निवडणू निकालांच्या माध्यमातून जनतेसमोर आहे. भारत जोडो अभियान, न्याय यात्रा यांनी राहुल गांधी यांच्या काँग्रेस आणि आघाडीलाही चांगलंच बळ दिलं. सत्तेची सिमारेषा दिसेल इतक्या अंतरावर उभे केले. एकहाती सत्ता देऊनही काहीच जर होत नसेल तर, जनतेने पुन्हा आघाड्यांच्या सरकारांकडे ही धुरा दिली पाहिजे असे जनतेला वाटले म्हणायला हरकत नाही. देशातील अजूनही खुप प्रश्न मोठे प्रलंबीत आहेत. संसदेतील कामकाज व्यवस्थित चालले पाहिजे. असे आणि इतर गोष्टीत बदल दिसणे आवश्यक आहे.

भारत देश सर्वांचा आहे, भारतातल्या विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सर्व गुण्यागोविंदाने राहतात, दर्व भारतवासी एक आहेत, राजकारणातील वैरभाव, द्वेषाचे राजकारण सोडून एकात्मतेची भावना उभी करणे गरजेची आहे. नवे सरकार भारतातील जनतेला जपेल,त्यांच्या विकासासाठी, जीवन-मरणांच्या प्रश्नासाठी अधिक सक्षमपणे काम करेल, जगभरात आदर्श असलेल्या लोकशाहीची काळजी घेईल, प्रसारमाध्यमे अधिक निष्पक्षपाती, निर्भीड, अधिक स्वतंत्र होतील अशी शुभेच्छा नव्या सरकारास देतो आणि थांबतो.

मिपाकर आंद्रे वडापाव, अथांग आकाश, वामन देशमुख, जेष्ठ मिपाकर गवि, स्वधर्म, कॉमी,नठ्यारा, कंजुसकाका, टर्मीनेटर, आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभार, सर्व मिपाकर वाचक यांचेही आभार. चालक-मालक यांनी अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. चुभुदेघे. -दिलीप बिरुटे

हया निवडणुकीतले काही ठळक मुद्दे जे भाजपच्या मूळावर उठले - इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर न करणे. - मोदींचे अत्यंत अप्रभावी भाषणे. -१० वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा मोदीनी लोकाना भीती घालायचा प्रयत्न केला. जसे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या घरी २ म्हशी असतील तर एक ओढून नेईल. - राहुल गांधीशी डिबेट करायला मोदीनी नकार दिला. ह्याचा सरळ प्रभाव राहुल ह्यांची प्रतिमा सुधारण्यात झाला. -राम मंदिराचे घाईत उद्घाटन, शंकराचार्याचा विरोध. - उद्घाटन प्रसंगात एककल्ली पणा, फक्त मोदी आणि मोदीच जे लोकांना रूचले नाही. उद्घाटन प्रसंग हा हिंदूंचा सोहळा न राहता तो भाजपचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे अनेक हिंदू प्रभावित झाले. खासकरून युपीत. राममंदिर हा हिंदूंसाठी खूपच संवेदनशील मुद्दा होता. - “जो राम को लाये है” हा प्रचार ही लोकाना आवडला नाही. आपल्या देवापेक्षा कुणी व्यक्ती श्रेष्ठ असू शकत नाही असे हिंदू लोक उघड बोलत होते. -महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना हलक्यात घेणे नडले. २०१९ लाच २.५ वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर मोदीना महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या नसत्या, सहज २० जागा जिंकल्या असत्या नी त्याच सभा इतर राज्यात घेतल्या असत्या तर २० जागा आणखी जिंकल्या असत्या. एकट्या उद्धव ठाकरेंमुळे ३० ते ४० जागा भाजपच्या कमी झाल्या. - शरद पवारांना नाव न घेता भटकती आत्मा संबोधने महाराष्ट्रातील लोकाना रूचले नाही. - मतदार संघात भाजप खासदारांनी ५ वर्षात आपला चेहरा दाखवला नव्हता. मागच्या वेळी दीड ते दोन लाख लिड ने जिंकलो. हया वेळीही जिंकूच त्यामुळे अनेक खासदारांनी मतदारसंघात फिरणे टाळले. - इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपापले राज्य सांभाळले. उगाच बाहेर फिरले नाही. जसे ममता बंगालात, अखिलेश युपीत नी ठाकरे/पवार महाराष्ट्रातच थांबले. -मागच्या १० वर्षात काय कामे केली हे मोदीनी सांगितलेच नाही तसेच पुढे काय करणार हे देखील सांगितले नाही. - भाजपचा कोअर मतदार अजित ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे नाराज होता, त्याने मतदान केंद्रात जाणे टाळले किंवा भाजपला धडा शिकवायला सरळ विरोधात मतदान केले. - शिवसेना फोडणे अनेकांना आवडणे नाही. - ईडी सीबीआय चा गैरवापर, भ्रष्टाना पक्षात घेऊन पावन करून घेणे इतके उघडपणे सुरू होते की ह्याचा आपल्या मतदारांवर प्रभाव होत असेल ह्याचा भाजपने आजीबातच विचार केला नाही. -स्थानीक प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश. त्यांची दखल सुधा घेण्यात आली नाही. दिंडोरी की कुठल्यातरी सभेत एका शेतकऱ्याने मोदीना कांदा प्रश्नावर बोला अस सांगितल्यावर मोदीनी त्याला “जय श्रीराम “ असे उत्तर दिले. त्यामुळे त्याभागात संतापाची लाट उसळली होती. -कांद्याबाबत भेदभाव- गुजरात मधील कांद्याला एक्सपोर्टची परमिशन पण महाराष्ट्रातील कांद्याला नाही असे शेतकरी बोलून संताप व्यक्त करत होते. - मुसलमानांना विरुद्ध उगाच वक्तव्ये केली. ह्याचा परिणाम मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदानात झाले, मुसलमानातील मोदीविरोधी प्रचंड लाट ओळखून mim ने आपले उमेदवार उतरवले नाही. नाहीतर भाजपा सोबत त्यांचाही धुव्वा उडाला असता. - जरंगे प्रकरण नीट हाताळले नाही. जरांगे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत झाले होते तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मागे sit चौकशी लावण्यात आली. ह्यामुळे मराठा समाज प्रभावित झाला. - भाजपच्या संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे (भाजपनेते उघड बोलत होते) तसेच मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणे/ समर्थन करने ह्यामुळे दलित मतदार प्रभावित झाला. -मोदींची थकलेली देहबोली तसेच मुद्दे सोडून भरकटलेली भाषणे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आणखी काही मुद्दे. - ध्रुव राठीने उपस्थित केलेले मुद्दे भाजपेयीना खोडून काढता आले नाही. ध्रुव राठीचे व्हिडीओ अतिशय प्रभावशाली होते. ध्रुव राठीला न्यूज़ चॅनल्स ही उत्तरे देऊ शकले नाहीत. राठी चे व्हिडिओ बर्याच राज्यात मोठमोठे फ्लेक्स लाऊन दाखवले जात होते. ध्रुव राठीला प्रभावित होऊन त्याचे सबस्क्रायबर्स २ कोटी झाले. त्याचे व्हिडीओ ३० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. - ⁠संजय राउत यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर न देता त्यांच्यावर वयक्तिक टीका करणे, ह्यावरून भाजप नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्याना उत्तर न देता त्यापासून पळ काढतात असा मॅसेज सामान्य लोकांत गेला. - ⁠भाजपच्या काही नेत्यांची शिवराळ भाषा. - ⁠शिवसेना आणी राष्ट्रवादी फोडून ठाकरे नी पवारांचे चिन्ह नी पक्ष इतराना बहाल केल्याचा महाराष्ट्रात राग होता. - ⁠महाराष्ट्रात ठाकरे नी पवारांच्या तोडीस तोड नेता भाजपकडे नसणे. - ⁠राज्यात प्रियंका गांधी ह्यांच्या झालेल्या प्रचंड सभा. (नंदूरबार आणी नांदेड जागा ह्याच सभेने फिरवल्या.) - ⁠उद्धव ठाकरे ह्यांची आक्रमक भाषणे तसेच सभांना जमलेली प्रचंड गर्दी. तसेच लढाऊ बाणा. सोप्या जागा मित्रपक्षांना देऊन ठाकरेंनी अटीतटीच्या जागा स्वतः कडे घेतल्या. - ⁠पवार नी ठाकरेंसोबत असलेली प्रचंड सहानुभूती - ⁠१०० टक्के मोदींवर विसंबून असणे. भाजप नेत्यांनी आपली राज्यातील कामे दाखवलीच नाहीत. - ⁠चिन पाक निवडणुकीत आणणे. लोकाना ते रुचलेच नाही. सत्ताबदल झाला नाही हे म्हणणे खोटे आहे. “मोदी” सरकार जाऊन “NDA” चे सरकार आले आहे. मागच्या दहा वर्षातील नी इंदिरा/राजीव कालखंड पहिला तर एक गोष्ट लक्षात येते. एकहाती सत्ता देऊन देशाचा काहीही फायदा होत नाही. फक्त राज्यकर्त्यांचा अहंकार वाढतो नी येणकेनप्रकारे विरोधकांना त्रास देणे सुरु होते. त्यामुळे भारत देशासाठी “गठबंधन” करून आलेले सरकारच बेस्ट. त्यामुळे सत्ता राबवणाऱ्यांवर अंकुश राहतो. एक एकहाती सत्ता नेमकी कशासाठी हवी असते हे कळले नाही. जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वामन देशमुख 08/06/2024 - 17:24
जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना? दुर्दैवाने या बाबतीत अबांशी सहमत आहे. संघ-भाजप-मोदी यांना जे काही करायचे होते ते करण्यासाठी सलग एक दशकाची प्रचंड बहुमतातील सत्ता पुरेशी नव्हती का? ३०० पार असताना फारसे काही करू शकले नाहीत ते २०० पार आल्यावर काय करणार आहेत? काही नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टीपीके 09/06/2024 - 15:21
बकवास (बोलायला भरपूर आहे पण हा माझ्या नोकरीचा भाग नाही, त्या मुळे वेळेअभावी इतकाच प्रतिसाद. आणि ज्यांना पवार, उबाठा, राऊत, राठी, रागा हे प्रात: स्मरणीय वाटतात त्यांच्याशी चर्चा करून उपयोग नसतो, त्या मुळे सध्या इतकेच)

In reply to by टीपीके

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 15:44
ज्याना मोदी, शहा, फडणवीस, योगी, ब्रिजभूषण, सेंगर, प्रज्वल रेवाना असे लोक प्रातस्मरणीय वाटतात त्यांच्याशी चर्चा करून उपयोग असतो??

In reply to by पॅट्रीक जेड

टीपीके 09/06/2024 - 20:33
अहो अ बा, नाही हि लोकही नाही आहेत, पण हे नाहीत म्हणून तुमचे पवार इत्यादी आदरणीय होत नाहीत. जाऊ दे, ही भांडणं करणं तुमच्या नोकरीचा भाग असेल, मी नाही इतका वेळ घालवू शकत पण तुम्ही लिहिलेले बकवास वाटले आणि त्याची पोच द्यावीशी वाटली म्हणून दिली. उगाच तुम्हाला वाटायला नको की तुमच्या थापा सगळ्यांना पटल्या

In reply to by टीपीके

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 20:37
फक्त द्वेषातून बकवास लिहिलय अस दिसतंय. सत्य स्वीकारायची तयारी नसली की असा द्वेष बाहेर पडतो. असो.

In reply to by वेडा बेडूक

सुरिया 11/06/2024 - 18:00
मिपा पण विषामृत खेळतं काय?
गापै कितीदा खेळले की विषामृत? तेंव्हा नाही आली शंका? . आता नाठाळ होऊन आले तरी बाहुबलीच दिसतात का फक्त?

In reply to by सुरिया

पॅट्रीक जेड 11/06/2024 - 18:28
डॉक्टरांच म्हणजे कसं बघा आमच्या मूक्तविहारी काकांसारखं आहे. बलात्कारी भाजप किंवा मित्र पक्षातील असेल तर चुप बसायचे नी विरोधी पक्षातील असेल तर मीपावर धागे काढून दिवसरात्र चालवायचे. रच्याकने मुविकाका, निकाल लागल्या पासून गायबलेत. :) सगळी मेहनत वाया गेली. :)

In reply to by पॅट्रीक जेड

सुबोध खरे 11/06/2024 - 20:33
मीपावर धागे काढून दिवसरात्र चालवायचे. भुजबळ बुवा मी मिपा वर "चालवण्यासाठी" धागे काढत नाही. त्याची मला गरजही वाटत नाही. किंवा कुणी मला चांगलं म्हणावं म्हणून मी काही करावं असं मला कधीही वाटलं नाही. बाकी तुमचं असंबद्ध आत्मकुंथन चालू द्या

In reply to by सुरिया

सुबोध खरे 11/06/2024 - 20:15
@ सुरिया भुजबळ बुवा दुसऱ्यांच्या डू आय डी बद्दल ठणाणा करत होते गा पै यांनी तसे कधी केल्याचे स्मरत नाही अन्यथा माझ्यासारखे मूळ नावानिशी लोक कमीच आहेत.

नठ्यारा 08/06/2024 - 14:48
प्राडॉ,
एकहाती सत्ता देऊनही काहीच जर होत नसेल तर, जनतेने पुन्हा आघाड्यांच्या सरकारांकडे ही धुरा दिली पाहिजे असे जनतेला वाटले म्हणायला हरकत नाही.
काहीच न होणे यांत न झालेले बॉम्बस्फोट धरायचे का ? ;-) विनोदाचा भाग सोडून द्या. पण हा जो काही विरोधकांचा विजयबिजय आहे तो मुस्लीम मतांवर मिळालेला आहे. भाजपचा मतटक्का फारसा घसरलेला नाही. काही दशकांपूर्वी हिंदू ग्रोथ रेट नावाची एक अपमानजनक अर्थशास्त्रीय संज्ञा प्रचलित होती. मोदींनी तिला सन्मान प्राप्त करवून दिला. आज भारताची अर्थव्यवस्था दिमाखात भरारी घेते आहे. याच धर्तीवर उद्या हिंदू व्होट रेट या संज्ञेसही सन्मान प्राप्त होईल. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

पॅट्रीक जेड 08/06/2024 - 15:20
विरोधकांचा विजयबिजय आहे तो मुस्लीम मतांवर मिळालेला आहे. भाजपचा मतटक्का फारसा घसरलेला नाही. नठ्याजी, फक्त मुस्लिम मतदान पुरेसं नाही जिंकायला अनेक हिंदूंची आणी मरातजी लोकांची मते मिळाली आहेत शिवसेना काँग्रेस नी राष्ट्रवादीला.

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 12:48
‘मोदी ओरिजनल ब्रँड’, शिवसेना भवनासमोर बॅनर्स भाजपने लावले. 25 सभा रोड शो, सरकारी यंत्रणांचा वापर करूनही 9 जागा तितक्याच ज्या उद्धव ठाकरे यांनी पक्ष ,चिन्ह आणि सर्व गमावूनही मिळवल्या ... https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/bjp-banner-in-front-of-shiv-sena-bhavan-in-mumbai-marathi-news-1213900.html?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR2hWJTBzO8uiotzPIAkSG9qorC-Wj2-JMJSTfqGP_ZfbmsBxOkBZ1kZnJE_aem_ZmFrZWR1bW15MTZieXRlcw अजूनही केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच आहेत

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 15:45
आता सध्या भाजपने फडणविसाना बाजूला करणेच हितकारक आहे नाहीतर विधानसभेला उरलीसुरलीही जाईल. लोकणी मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून मत दिले होते तरी ९ खासदारच जिंकले. विधानसभेवेळी अजून वाईट परिस्थिती असेल.

सुबोध खरे 10/06/2024 - 10:00
हायला भुजबळ डू आय डी घेऊन परत अवतरले की आधी होता वाघ्या मग झाला पाघ्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!! कोणत्याही धाग्यावर पूर्वग्रह दूषित आणि असंबद्ध प्रतिसाद आता परत येणार हे राम

पॅट्रीक जेड 10/06/2024 - 14:01
शिंदेना राज्यमंत्रिपद आणी दादाना मंत्रिपदही नाही. कसकाय सहन करताहेत हे लोक?? की काहीही पर्याय नसल्याने आपल्याला सोडून जाणार नाहीत हा आत्मविश्वास असावा भाजपला?? तिकडे मांझी एका खासदारावर कॅबिनेट मिळवतोय नी ७ खासदार असून राज्यमंत्रिपद. भाजप हया दोघांनाही युतीतून बाहेर काढण्याच्या मार्गावर असावा का?

In reply to by पॅट्रीक जेड

नठ्यारा 10/06/2024 - 19:17
मला वाटतं की शिंदेंनी लिंबूटिंबू उमेदवार उभे केल्याची शिक्षा मिळालेली दिसतेय. जर चांगले निकाल आणले असते तर जास्त मंत्रीपदं मिळाली असती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

पॅट्रीक जेड 10/06/2024 - 20:30
शिंदेंचा स्ट्राईक रेट ३ नंबरचा आहे. १) राष्ट्रवादी- शरद पवार८/१० २) काँग्रेस १३/१७ ३)शिवसेना- शिंदे गट ७/१५ ४)शिवसेना- ठाकरे गट ९/२१ ५) भाजप- ९/? ६)राष्ट्रवादी- अजित पवार गट १/? भाजपा पेक्षाही चांगला स्ट्राईक रेट आहे शिंदे गटाचा.

बहुतेक, तुमच्या या चांगल्या लेखाला प्रतिसाद येणार नाहीत . किंवा आलेच तर , उपरोधाने ओतप्रोत असे येतील .. (हे माझे वैयक्तिक मत. )... जनता डायरेक्त्त पंतप्रधान निवडू शकत नाही , तो चॉईस कधीच नव्हता आणि नाही. आणि एक पंतप्रधान सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही, हे लोकांच्या लक्षात , अजून मोठ्या प्रमाणात यायला हवं , हि अपेक्षा व्यक्त करतो.

अहिरावण 06/06/2024 - 13:11
या निमित्ताने प्राडॉ लिहिते झाले, बोळा मोकळा झाला ! सर्वप्रथम प्राडॉचे अभिनंदन. ब-याच काळानंतर प्राडॉच्या लेखणीमधूण आक्रस्ताळी, एकांगी लेखनाऐवजी बराचसा समतोल लेख आला. अभिनंदन. बीजेपी प्रमाणे प्राडॉ जमिनीवर आले. अभिनंदन कॉग्रेसप्रमाणे प्राडॉंना आपली क्षमता, कुवत कळाली. अभिनंदन शरदपवारांप्रमाणे प्राडॉ वय झाले तरी आब राखून आहेत. अभिनंदन अजुन कौतुक केले तर प्राडॉ हवेत जातील आणि परत एकांगी प्रतिसाद पाडतील म्हणून अभिनंदन आटोपते घेतो. अजुन काय !!

In reply to by अहिरावण

अथांग आकाश 06/06/2024 - 16:26
चुकिच्या हातांत देशाची सत्ता जाण्यापासुन भारतियांना वाचवणार्या बिहारी आणि तेलुगु जनतेचे मनापासुन अभिनंदन!!

वामन देशमुख 06/06/2024 - 13:15
(महिला कुस्तीपटूंचे) त्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना फरफटत घेऊन जाणे
कधी? कुठे? पुरावे? अधीक माहितीसाठी संदर्भः https://www.misalpav.com/comment/1164322#comment-1164322 --- या शितावरुन उरलेल्या भाताची परीक्षा! --- काही आयडी क्रेडिबल असतात काही आयडी क्रेडिबल नसतात.

In reply to by अहिरावण

अनाकलनीय अहिरावण ह्यांचा आय.डी. उडवण्यात आलेला आहे. हे अनाकलनीय आहे. प्रा.डॉ ह्यांनी माझ्या संपुर्णपणे अराजकीय अशा प्रवासवर्णावर येऊन "माझे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही" अशा अर्थाची संपुर्णपणे वैयक्तिक टिप्पणी केलेली होती. तेव्हा त्यांचा आय.डी का उडवण्यात आला नाही ? त्यांचा केवळ प्रतिसाद संपादित करण्यात आला, तो देखील मी निदर्शनास आणुन दिल्यावर ! कारवाई आधी माझ्या प्रतिसादावर झाली. शिवाय मी कोणत्याही प्रकारे त्या लेखनात त्यांच्या संबंधी अवाक्षर काढले नव्हते. अर्थात त्यांचा प्रतिसाद केवळ स्कोअर सेटलिंग करण्याचा प्रयत्न होता हे निर्विवाद सत्य आहे!! अहिरावण ह्यांना एक न्याय आणो प्रा.डॉ. ह्यांना दुसरा न्याय हे काही योग्य नाही. हे असे एकांगी संपादन न्यायाला धरुन नाही. आता हा प्रतिसाद संपादित होतो की प्रा.डॉ ह्यांचा आय.डी उडवला जातो ह्यावरुन शितावरुन भाताची परीक्षा होईल. सुयोग्य आणि न्याय्य कारवाईची वाट पहात आहे - प्रसाद गोडबोले.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रा.डॉ ह्यांनी माझ्या संपुर्णपणे अराजकीय अशा प्रवासवर्णावर येऊन "माझे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही" अशा अर्थाची संपुर्णपणे वैयक्तिक टिप्पणी केलेली होती.
आपण मिपावर कोणत्या तरी एका लेखनात नेमकं कोणता तेही आठवत नाही. आपण कुठे काश्मीर की हिमाचल प्रदेश की कोणत्या तरी शिबिरात कोणत्या तरी ध्यानधारनेसाठी असं काही आठवत नाही. आपलं लेखन व्यक्तीगत अनुभव आणि कोणत्या श्लोकांचे अर्थ सांगत होता की असे काही होते. लेखनातून जाणवणा-या चंचलतेमुळे 'मन श्रांत होणे असे आवश्यक होते' असे काही तरी लिहिले होते. 'मानसिक स्वास्थ्य वगैरे' असे काही लिहिले नव्हते. उगाच 'ध ' चा 'मा' करु नका. 'श्रांत' म्हणजे दमलेल्या, थकलेल्या, शिणलेल्या, कष्टी माणसास निसर्गातला अनुभव आनंदायी ठरतो. निसर्ग माणसात उत्साह भरतो. अशा अर्थाने ते लिहिले होते. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणाला गंडवताय सर ? आम्ही काही तुमचे विद्यार्थी नाही की दुधखुळेही नाही. हा तुमचा प्रतिसाद होता :
लेखन वाचलं. आपलं मन श्रांत होणे आवश्य वाटतच होतं.काळजी घ्या जपा. वाहवत जाऊ नका.
ह्यातील गर्भितार्थ आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला ? "थकलेल्या, शिणलेल्या, कष्टी माणसास निसर्गातला अनुभव आनंदायी ठरतो, निसर्ग माणसात उत्साह भरतो " असा टोन अजिबात नाहीये ह्या प्रतिसादात. तसे असते तर तुम्ही लेखातील इतर गोष्टींविषयी दुर्लक्ष केले नसते. शिवाय काळजी घ्या जपा वाहवत जाऊ नका असले शब्द वापरले नसते. आणि खरेच तुमचा टोन तसा असता , तर व्यवस्थापनाला देखील तुमचा खरा काळजीचा आपुलकीचा टोन जाणवला असता आणि त्यांनी तो प्रतिसाद संपादित केलाच नसता. त्यांनी, व्यवस्थापकांनी प्रतिसाद संपादित केला हाच पुरावा आहे की त्यांनाही जाणवले ती वैयक्तिक टिका आहे ते! इथे अहिरावण ह्यांनीही काहीही वैयक्तिक टीका केलेली नव्हती , उलट त्यांनी प्राध्यापक लोकं सरकार विषयी असंतोष पसरावा म्हणुन काय काय आंदोलने करु शकतात ह्याची यादी दिलेली होती. केवळ तेवढ्या वरुन त्यांचा आय.डी संपादित झालाय. तुमचा मात्र वैयक्तिक टीका करणारा प्रतिसाद देखील विशेष निदर्शनास आणुन दिल्याशिवाय संपादित होत नाही. ही वस्तुस्थिती आहे . मी काही मराठी भाषेत पी.एच.डी केलेली नाही की प्राध्यापकी केलेली नाही पण इथे मला एक चपखल म्हण आठवत आहे - आपला तो बाब्या अन दुसर्‍याचे ते कार्टे !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वामन देशमुख 07/06/2024 - 15:10
लेखनावरील आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत. दुवा निवांत बघा.
दुवा वाचला. आपली भूमिका पटली. --- सदर अ-संपादकीय लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ राजकीय परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो निवडणुका ते राज्यकारभार अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या आशयघन अशा संस्थळावर, एखाद्या बल्लवाचार्याने उत्तमोत्तम पक्वान्ने रांधावीत व अत्यंत सुशोभित अश्या ताट-पाटावर ती पक्वान्ने भुकेलेल्यास भक्षण करण्यासाठी मांडावीत असा आल्हाददायक दुग्ध-शर्करा-अनुभव हे लिखाण वाचून साक्षेपी वाचकास आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच मिपावरील आजकालच्या आशयहीन लिखाणरुपी धाग्यांच्या सोसाट्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, राजकारण-समाजकारण यांचे बौद्धिक तरीही आकलनसुलभ असे विवेचन आणि नर्मविनोदी तरीही निर्भिड शैलीत मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव लिखाणाचे वाचन-मनन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - वामन देशमुख

गवि 06/06/2024 - 17:15
उत्तम समतोल लेख लिहीला आहेत प्रा डॉ सर. आता विविध विषयांवर लेखणी फुलू दे परत. २०२९ पर्यंत. प्रस्थापित व्यवस्थेत असलेली छिद्रे दाखवणे हे एक अत्यावश्यक कार्य आहे. ते तुम्ही नेहमी करत आला आहात. त्याबद्दल धन्यवाद. पण त्या नादात तुमचे ललित लेखन, इतर अभ्यासपूर्ण साहित्य, परीक्षणे अशा अनेक गोष्टी पडद्याआड जाऊ नयेत अशी विनंती. लिहीत रहा.

स्वधर्म 06/06/2024 - 17:28
मला एकूणच भारतीय जनता देवाधर्माच्या गुंगीतून भानावर येऊन जमिनीवरच्या वास्तव प्रश्नांचा विचार अजूनही करू शकते याचा मनापासून आनंद झाला. एकदा का एखाद्याला देवानेच मला पाठवले आहे असे वाटू लागते, तेंव्हा स्वत:चा कोणताही निर्णय बरोबरच वाटू लागतो. घटना, लोकशाही मूल्ये वगैरेची पत्रास बाळगायचे कारण उरत नाही, ते आता होणार नाही असे वाटते. कालांतराने लोकांचीही विचारशक्ती संपुष्टात येते. उदा. प्रेषितांनी निर्माण केलेल्या धर्मात धर्मचिकित्सा होऊ शकत नाही. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो; आता भारतीयांना बायॉलॉजिकल पंतप्रधान मिळेल अशी आशा वाढली.

In reply to by स्वधर्म

बाबुराव 16/06/2024 - 09:23
ॲडॉल्फ हिटलर सत्तेत आला, त्याला फार वर्षं नाहीएत झालेली. ती काही पुराणकथा नाही. ताजा इतिहास आहे. १९३३मध्ये हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला. अर्थात, त्यापूर्वी म्हणजे १९२१मध्येच तो नाझी पार्टीचा नेता झाला होता. १९२४मध्ये नाझी पार्टी त्याच्या पूर्ण ताब्यात आलेली होती. (हे तेच वर्ष, जेव्हा महात्मा गांधी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.) जर्मनीवर मांड ठोकल्यानंतर हिटलरने सगळ्यात पहिल्यांदा काय केले असेल, तर आपण 'प्रेषित' आहोत, हे सांगायला त्याने सुरूवात केली. तेव्हा शाळांमध्ये मुलांना हे शिकवले जात असे की, हिटलर जन्मलाच नाही. देवाने त्याला विशिष्ट कामासाठी पृथ्वीवर पाठवले आहे. त्याने त्यासाठी जर्मनीची निवड केली आहे आणि जर्मनीने त्याची निवड केली आहे. हिटलर हा काही सामान्य माणूस नाही. रादर, हिटलर हा 'माणूस'च नाही. तो देव आहे. प्रेषित आहे. इथे एका कामासाठी आलेला आहे. हे काम संपले की तो जाणार आहे. त्याला ना मानवी शरीर आहे, ना मानवी मोह-माया. त्याला ना संसार आहे, ना कसला लोभ! हे सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिटलरकडे माध्यमे होती. माध्यम तंत्रज्ञान तेव्हा फार प्रभावी होते, असे नव्हे. मात्र, लोकांच्या मनावर राज्य गाजवल्याशिवाय खरी सत्ता पादाक्रांत करता येत नाही, हे हिटलरला माहीत होते. डॉ. जोसेफ गोबेल्स याच्यासारखा सल्लागार त्याच्यासोबत होताच. हिटलरची भाषणे चमत्कारिक असत. त्यावेळी विन्स्टन चर्चिलसारखे बुद्धिमान नेते विचारी भाषणे करत. मात्र, असे नेते भाषण वाचून दाखवत. हिटलरने भाषण नावाची गोष्टच बदलून टाकली. त्याचे भाषण हा 'रंगमंचीय परफॉर्मन्स' असे. तो लोकांना खिळवून ठेवत असे. त्यांना आपल्यासोबत घेत असे. लोक ठेका धरून त्याच्यासोबत नाचत असत. "जर्मनी आपल्या पाठीशी आहे. आपल्यासमोर फक्त जर्मनी आहे. आपल्या आत जर्मनी आहे. जर्मनी... जर्मनी... जर्मनी!" "Germany is behind us! Germany is in front of us! Germany is within us!" अशा एकापाठोपाठ एक चमकदार घोषणांची मालिका असे या भाषणात. हिटलरने जर्मन माणसात भयंकर राष्ट्रवाद तयार केला. त्यानंतर, हिटलरला पाठिंबा म्हणजे देशभक्ती आणि हिटलरला विरोध म्हणजे देशद्रोह इथपर्यंत हा प्रवास गेला. हिटलर देशापेक्षा मोठा झाला! हिटलरच्या एका शब्दावर लोक मरायला तयार होत. मारायला तयार होत. लाखो लोक मारले गेले, तरी हिटलरच्या भक्तांना काही फरक पडत नसे. त्यांना ते देवाचे काम वाटत असे. हिटलर ज्या आवेशात बोलत असे, ते बहुसंख्य लोकांना पटत असे. पुराणकथांमध्ये युद्धात लोक कितीही मारले गेले, जे मारले गेले ते लोक आपले जीवलग असले तरी खुद्द प्रेषितच त्याचे समर्थन करतो. कणखर, बलसागर राज्य उभे करायचे असेल तर माणसे मारावी लागतात. हिटलरने हे पटवून दिले. शत्रू कोण, हे त्याने सांगितले. ते लोकांना पटले, कारण हिटलर हा माणूस नव्हता. तो प्रेषित होता. सगळ्यात भयंकर हे असते. मर्त्य माणसांना पराभूत करता येते. मात्र, एखादा माणूस प्रेषित झाला की, तो फक्त नेता नसतो. त्याचा 'कल्ट' तयार होतो. भक्तसंप्रदाय तयार होतो. पंथ तयार होतो. असा नेता मग संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना नव्हे, तर संतांना पाचारण करतो. आणि, मंदिराच्या उद्घाटनाला मात्र स्वतःच असतो. थेट 'मेसेंजर ऑफ गॉड'. तो थेट देवाचा निरोप्या असतो. 'बायॉलॉजिकल' नसतो. अशक्य ते शक्य करणारा असतो. अपराजित असतो. अमर्त्य असतो! मर्त्य माणसासाठी त्याचा पराभव निव्वळ अशक्य असतो. एखाद्या माणसाला 'लार्जर दॅन लाइफ' करत, पुढे हे शेवटचे टोक असते. प्रेषित होत त्याचे थेट देवाशीच नाते जोडले जाते. मात्र, हा सगळा प्रचार फोल ठरतो. देवाच्या दारातच तो पराभूत होतो. मुळात, तो पराभूत होऊ शकतो! हे घडणे किती महत्त्वाचे, याचा अनेकांना आज अंदाज येणार नाही. पण, 'म'च्या या मारामारीत एका महाप्रलयापासून 'महाभारत' वाचला आहे! अशा 'कल्ट'पासून देश वाचला आहे. आपोआप नाही अर्थात. लोकांनी ते केले आहे. आपला भारतीय माणूस आहेच बाकी भारी! - संजय आवटे

In reply to by बाबुराव

नठ्यारा 16/06/2024 - 17:30
भारत किती मोठय ते आवटे यांना बहुधा माहीत नाही. चालले आपले हिटलरच्या मागोमाग ! बाकी, हिटलरला पैसे पुरवणारे कोण होते त्याची काही खबरबात काढणं आवटेच्या कक्षेबाहेरील सायास आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

स्वधर्म 17/06/2024 - 17:17
तुंम्ही काढलेल्या खुसपटांचा (भारत किती मोठा आहे किंवा हिटलरला पैसे इ.) मूळ मुद्याशी कसलाही संबंध नाही आणि आवटे यांच्या पोष्टमध्ये जे म्हटले आहे ते असिध्द होत नाही, एवढेच म्हणतो.

नठ्यारा 06/06/2024 - 20:02
प्राडॉ, तुमचं हे विधान अजिबात म्हणजे आज्जिब्बात पटलं नाही.
आपण जेव्हा अशा प्रश्नांकडून भावनिक प्रश्नांकडे लोकांना घेऊन जाऊ पाहतो, तेव्हा काही काळ लोक भावनिक होतातही, पण हीच जनता आपली जेव्हा फसवणूक होते आहे, असे वाटते तेव्हा मतदानाच्या माध्यमातून बदल करते हा धडा या निवडणूकीने दिला.
हे वाक्य तत्त्व म्हणून ठीक आहे. पण ते चालू परिस्थितीत लागू पडंत नाही. कारण की भाजपचा मतटक्का तितकाच आहे. केवळ भाजपच नाही तर इतरांचाही साधारणत: २०१९ च्या आसपासच आहे. कृपया विकीवरून काढलेली माहिती पहा : 2024 election BJP (36.56%) INC (21.96%) SP (4.58%) AITC (4.37%) YSRCP (2.06%) BSP (2.04%) TDP (1.98%) DMK (1.82%) CPI(M) (1.76%) RJD (1.57%) NCP (1.48%) Other (21.3%) 2019 election BJP (37.7%) INC (19.67%) AITC (4.1%) BSP (3.66%) SP (2.55%) YSRCP (2.53%) DMK (2.26%) SS (2.10%) TDP (2.04%) CPI(M) (1.77%) Other (21.62%) 2014 BJP (31%) INC (19.31%) AITC (3.84%) BSP (4.14%) SP (3.37%) YSRCP (2.53%) DMK (1.74%) AIDMK (3.27%) SS (1.85%) TDP (2.55%) CPI(M) (3.25%) NCP (1.56%) ( खरंतर मी सारणी लिहायला हवी. पण तितका वेळ नाही. वाचकांनी कृपया क्षमा करावी. ) तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही लिहिलेले मुद्दे कितीही रास्त असले तरी भाजप च्या मतदारांना म्हणजे हिंदूंना कितपत लागू पडतात याची शंकाच आहे. भाजपच्या विरोधकांनी ( विशेषत: मुस्लिमांनी ) आपसांतली मतफूट टाळल्यामुळे भाजपचा विजय मर्यादित झाला आहे. शिवाय संघाचंही या वेसणीत योगदान आहे. संघ निवडणुकीत हव्या तितक्या ताकदीने उतरला नाही, असं माझं मत आहे. संघातल्या काही उच्चपदस्थांना मोदी आवडंत नाहीत. तुम्ही सांगितलेले मुद्दे भाजपने अमलांत आणले असते तर हिंदू मतदार दूर जाऊन भाजपचा पराभव निश्चित होता. हे माझं वैयक्तिक मत आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

आपल्या विचारांचं मतांचं स्वागत आहे. लेख लिहून झालं आणि असंख्य मुद्दे राहुन गेले.  दोनहजार चौदाच्या भाजपा जाहीरनाम्यात  महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, काळा पैसा हे अनुक्रमे चार मुद्दे अग्रक्रमावर होते.  विकासाचे मुद्दे निवडणूकीत होते. जनता या पूर्वीच्या सरकारच्या धोरणांना कंटाळलेली होती आणि या नव्या भूलीचा जनतेवर प्रभाव पडला. ”बस हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार’  लोकांचा चमत्कारावर विश्वास.  दोन हजार एकोनावीसला जाहिरनाम्यात मुद्दे भरकटले. आतंकवाद, सैनिक कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे गावगप्पा. दोन हजार चौवीसची निवडणूक ’मोदी की गॅरंटी” वर लढल्या गेली.  कशाची गॅरंटी तर, गरीब परिवाराची सेवा, मध्यम परिवाराचा विश्वास, महिला सक्षमीकरण, युवकांना संधी वगैरेची गॅरंटी.  पण निवडणूक प्रचारात निव्वळ ’हिंदू’  भोवती फ़िरली. जाहीरनाम्यात हिंदुंना आवडणारे कोणतेही मुद्दे नव्हते, ते केवळ भाषणबाजीचे विषय होते असे वाटते.

विकासाकडून सुरु झालेला प्रचार हिंदू भोवती फिरला. पण म्हणुन सरसकट हिंदुंना भाजपाची विचारसरणी आवडते असे समजण्याचे काही  कारण नाही, कारण की विचारसणी मानणारी जी काही हिंदू मतं पडायची ती भाजपाला मिळालीच असतील. पण हिंदू आणि इतर अशांना या हिंदुत्व सोडून जी जीवन-मरणाचे प्रश्न आणि इतर मुद्यांकडे  जायचं असेल तर भाजपाकडे त्यांना रोखण्यासाठी आता काही मुद्दे आहेत असे मला व्यक्तीगत वाटत नाही. काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षांना याचा लाभ झाला. मुस्लीमांच्या मतदारांबद्दल आपण लिहिलंय, त्यात ती एकगठ्ठा राहीली नाहीत असे वाटते, उदा. उत्तरप्रदेशात मायावतींनी आपले जे उमेदवार दिले त्या उमेदवारांनी मुस्लीम मतं घेतली आहेत. आज उत्तरप्रदेशातली आकडेवारी पाहात होतो. एकूण सोळा मतदार संघात बसपामुळे भाजपा उमेदवार विजयी झालेले दिसतात. बसपामुळे तो विजय सुकर झाला. ते अधिकचे सोळा उमेदवार भाजपेतर निवडून आले असते तर ? क्रिकेट आणि राजकारणात जर तरला तसाही काही अर्थ नसतो.

आता चंद्रबाबू नायडू आणि नितेशकुमारांच्या सत्तेतील सहभागाच्या आघाडीचे परिणाम सुरु झाले आहेत. अर्थात, काँग्रेस पक्षातील आणि इतर पक्षातील खासदारांना भाजपा आपल्या शैलीने गळाला लावेल तेव्हा लावेल पण आता जदयु आणि तेलगु देसमच्या इशा-यावर हिंदुत्वच्या मुद्याला तिलांजली देवून आता त्यांच्या इशा-यावर ”सत्तेसाठी नाचते   मी परवा कुणाची ” म्हणून मुजरे घालावे लागणार आहेत. दोघांनीही पाठींबा देतांना अटी घालायला सुरुवात केली आहे.  लोकसभेचं अध्यक्षपद, मंत्रीपदं आणि  अग्निपथ योजना मागे घ्या. समान नागरी कायद्यावर पुर्विचार करा. इकडे महाराष्ट्रातही विविध शासकीय कार्यालयात किती भरती बाकी आहे त्याची माहिती मागवली जात आहे. आघाड्यांचे सरकार, विरोधी पक्ष ताकदीने उभा राहील तेव्हा येत्या काळात एनडीएचं सरकार कसं चालेल ते पाहणे रोचक ठरणार आहे. चुभुदेघे

-दिलीप बिरुटे

ख्या ख्या ख्या . सर , फक्त एकदा कन्फर्म करुन सांगता का की निवडणुक नक्की कोण जिंकलं आहे ? कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? आणि कोणत्या पक्षाचा पंतप्रधान होणार आहे ? त्यांचे वर देखले अभिनंदन करुन , त्यानुसार लागलीच सांगुन टाका पुढील ५ वर्षात काय काय आंदोलनं करणार आहात ! =)))) बाकी ह्यावेळी ए.व्ही.एम च्या नावाने कोणी रडत नाहीये ही एक समाधानाची बाब आहे नाही का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

कितीही नि:पक्षपाती असल्याचा आव आणुन लेखन पाडले, तरी तुमच्या शब्दांच्या निवडी वरुन तुमचे अंतःस्थ हेतु आणि पुर्वग्रह दिसुन येतातच. सारांश : १. भाजपने ५४३ पैकी २४० जागा जि़ंकल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे ज्याने ९९ जा जिंकल्या आहेत ज्या की भाजपाच्या अर्ध्या पेक्षाही कमी आहेत. २. भाजप विरुध्द केलेल्या इंडि अलायन्सने ज्यात तब्बल ४० पक्ष होते, त्या सर्वांनी मिळुन २३६ जागा जिंकल्या आहेत. अर्थात सर्वजण एकत्र येऊन देखील केवळ एकट्या भाजपच्या २४०च्या तोडीस तोड देऊ शकत नाहीत. ३. एन.डी. ए. कडे सरकार बनवण्यासाठी पुरेसे बहुमत अर्थात २७२+ जागा आहेत, आणि श्री. मोदींच्याच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यात येईल असे तुर्तास तरी दिसत आहे. श्री. राहुल गांधी ह्यांच्या नेतृत्वातील सरकार बनण्याची तुर्तास तरी चिन्हे दिसत नाहीत. वरील तीन विधाने फॅक्च्युअली करेक्ट आहेत. आता काही विधाने अनुमानात्मक : ४. भाजपाचा पराभव झाला असे म्हणण्याला काहीही तार्किक आधार नाही, भाजप जर सरकार बनवु शकले नसते तर भाजपा चा पराभव झाला असे म्हणाता येईल. ५. भाजप च्या सीट्स कमी का झाल्या ह्यावर ज्यांना एरंडाचे गुर्‍हाळ चालवायचे आहे ते त्यांनी सुखनैव चालवावे. सध्या तरी भाजप श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वात सरकार बनवेल असे दिसत आहे. ही मोदींची तिसरी टर्म असेल जे की पंडीत नेहरु ह्यांच्या विक्रमाची बरोबरी आहे. अर्थात ही टर्म जर श्री. मोदी ह्यांनी पुर्ण केली तर आपण नेहरु आणि मोदी ह्यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मच लेखा जोखा मांडू शकतो. बाकी आज नितीशकुमार आणि चंद्राबाबु नायडू त्यांच्या अनुक्रमे १६ आणि १२ सीट्स सह काँग्रेस प्रणीत इंडी अलायन्स मध्ये गेले तरीही त्यांच्या टोटल सीट्स २३६ + १६ + १२ = २६४ होतात जे की सरकार बनवण्यास पुरेसे नाही. इंडि अलायन्स ला काहीतरी मोठ्ठा चमत्कार करावा लागेल सरकार बनवण्यासाठी. ६. तस्मात , तुर्तास तरी असे दिसुन येते की पुढील काही वर्षे देशात भाजप चे सरकार राहिल आणि त्यानिमित्ताने आंदोलने अन मोर्चा स्पॉन्सर होत राहतील . एकुणच पुढील काही वर्षे अफलातुन इन्टर्टेनमेंट चालु रहाणार हे निश्चित ! ७. आता २०२९ पर्यंत आपण मजा पाहु. सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करा !

In reply to by प्रसाद गोडबोले

पॅट्रीक जेड 08/06/2024 - 19:25
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करा ! सहा महिन्यानंतरचा पराभव आताच नेत्याना दिसू लागलाय. मला मोकळं करा म्हणताहेत ते. :)

कंजूस 07/06/2024 - 12:29
समीक्षा चांगली केली आहे. मोदींचे वारू त्यांच्या मीटरप्रमाणे जोरात दौडत होते. ज्या काही गोष्टी खटकत होत्या त्या कोणते भाजपवाले मोदींना सांगत असतील? आता परिणामांतून त्यांनी धडा घेतलाच असेल, आणखी कुणी सांगायला नको.

टर्मीनेटर 07/06/2024 - 15:46
संतुलन राखण्याचा प्रयत्न करत केलेले 'शुगर कोटेड' स्लेजिंग आवडले 😂 मिपासहित कुठल्याही समाजमाध्यमांवर चालणाऱ्या निरर्थक राजकीय (काथ्याकुटीय) चर्चांमध्ये रस नसला तरी अशा विश्लेषणात्मक लेखावर "एक प्रतिसाद तो बनता हैं बॉस", त्यामुळे माझेही चार शब्द... ह्या निवडणुकीचे निकाल खरंच आवडले. अतिआत्मविश्वासातून दिली गेलेली 'अबकी बार चारसों पार' सारखी घोषणा फोल ठरवत सुजाण भारतीय मतदारांनी कल्पनेच्या उंच उंच भराऱ्या घेणारे भाजपचे विमान जमिनीवर आणताना २००४ च्या "इंडिया शायनिंग" मोहिमेची उडवली होती तशी धूळधाण २०२४ मध्ये उडवली नसली तरी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान होता येईल इतपत कौल देऊन जनतेचे अनेक अत्यावश्यक प्रश्न प्रलंबित/दुर्लक्षित राहिल्याची जाणीव करून दिली हे फार बरे झाले! "काही लोक असे असतात ज्यांना पाहिल्यावर उगाचच कानफटात ठेऊन द्यावीशी वाटते" असे काहीसे पुलं म्हणतात, त्याप्रमाणेच फोटोत, टीव्हीवर दिसले तरी शेणात बुडवलेल्या चपलेने थोबाड फोडून काढावे असे वाटणारे संजय राऊत, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे वगैरे वगैरे, सकाळी सकाळी (फोटोत, टीव्हीवर) ज्यांचे दर्शन घडल्यास नाश्ता/जेवण करण्याची इच्छा सुद्धा मरून जाईल असे एक जुने जाणते, राहुल गांधींसारखे बालिश/बिनडोक आणि उद्धव ठाकरेंसारखे आत्मघातकी नेते, आणि अनेक गणंग लोकांनी (३७ कि काहीतरी पक्षांनी) एकत्र येऊन अस्तित्वात आणलेल्या दिशाहीन इंडी आघाडीच्या हाती सत्तेची सूत्रे जाण्यापेक्षा (पूर्ण होतील कि नाही ह्याची खात्री वाटत नसली तरी दुसरा कुठला पर्यायच उपलब्ध नसल्याने) असंख्य भारतीयांनी ज्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या त्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेलया स्पष्ट बहुमताचे सरकार येत आहे ह्याचे (स्वतः मतदान केले नसले तरी) समाधान वाटले. "गरीब, महिला, युवा और किसान" ह्या चार 'सामाजिक जातींच्या' विकासासाठी काम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आपल्या २०२४ च्या निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदींनी वारंवार सांगायला सुरुवात केल्यावर २०१४ आणि २०१९ ह्या दोन्ही टर्म्स मध्ये सरकारकडून असलेल्या आपल्या अपेक्षा तिसऱ्या टर्ममध्ये तरी पूर्ण होतील ह्या आशेने डोळे लावून बसलेला, वरील चार 'सामाजिक जातींमध्ये' न मोडणारा एक मोठा मतदारवर्ग मोदी/भाजपवर नाराज झाल्याने पहिल्या फेरीपासूनच मतदानापासून अलिप्त राहिला. जसा तात्कालीन परिस्थिती पाहून मतदान करणारा,"काठावरचे मतदार" म्हणवला जाणारा एक मतदारवर्ग आहे तसाच संख्येने कमी असला तरी कुठल्याही राजकीय पक्षाशी, विचारसरणीशी आणि नेत्याशी बांधिलकी नसणारा आणि पक्ष, चिन्ह वगैरे न पाहता उमेदवाराचे चारित्र्य आणि कार्यक्षमता पाहून मत देणाराही एक मतदारवर्ग आहे. मी ह्या वर्गात मोडत असल्याने "मोदींच्या नावावर काय दगड उभा केला तरी निवडून येईल/येतो" अशा फाजील आत्मविश्वासाने भाजपने आणि मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या अन्य पक्षांनीही निष्क्रिय/अकार्यक्षम/गुन्हेगारी पार्शवभूमीचे उमेदवार दिल्याने माझ्यापुरता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला (अशा परिस्थितीत 'NOTA' हा पर्याय उपलब्ध असला तरी त्याचे भारतातले नियम इतके भंपक आहेत कि 'मतदान यंत्रावरचे एक अत्यंत निरुपयोगी बटण' अशीच त्याची व्याख्या होऊ शकते). अर्थात माझ्यासारखे इतरही अनेक मतदार मतदानापासून अलिप्त राहिले असतील ज्याचा थोडाफार का होईना पण एकूण मतदानाची टक्केवारी कमी होण्यात वाटा असू शकतो. सेलिब्रेटींकडून मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी "मतदान श्रेष्ठ दान", "मतदान करणे हा तुमचा सर्वात मोठा अधिकार/हक्क आहे" वगैरे सारख्या घोषणा देत जाहिराती करणाऱ्या निवडणूक आयोगाने "चांगले उमेदवार देणे हि तुमची सर्वात महत्वाची जवाबदारी आहे" वगैरे सारखे ज्ञानामृत पाजणाऱ्या जाहिरातींचे कॅम्पेन राजकीय पक्षांसाठीही चालवावे! गेल्या दहा वर्षातली सरकारविषयीची जी काही थोडीफार असेल ती 'अँटी-इन्कम्बन्सी' आणि वरील दोन कारणांमुळे काही राज्यांत मोदी/भाजपला मिळू शकणाऱ्या संभाव्य मतांची संख्या थोड्या प्रमाणात तरी नक्कीच घटली असावी. आधीच्या दोन टर्म्समध्ये राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे नव्याने निर्माण झालेल्या "लाभार्थी व्होटबँकेने" हक्काच्या/संभाव्य मतांमध्ये झालेली हि घट बऱ्यापैकी भरून काढल्याने मोदी/भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत २०१९ पेक्षा नाममात्र घट झालेली दिसत असली तरी तब्बल ६३ जागा कमी झाल्या. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये जाती-पातीच्या राजकारणाचा मोठा फटका बसल्याचे अनेक विश्लेषक म्हणत आहेतंच पण काल मूळच्या उत्तरप्रदेशातल्या पण गेल्या कित्येक दशकांपासून मुंबईत व्यापार करणाऱ्या एका भाजपचा पारंपरिक मतदार असणाऱ्या सवर्ण वर्गातील व्यापाऱ्याकडून रोचक माहिती मिळाली. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीनही निवडणुकांत भाजपकडून तिकीट वाटपात सवर्णांवर अन्याय झाल्याच्या रागातून त्या पक्षाशी संबंधित असलेल्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी (चाणाक्ष वाचकांनी त्या संघटनेचे नाव ओळखले असेलंच 😀) त्याच्या मतदारसंघातील एकूण एक सवर्णांच्या घरी अनेकवेळा भेटी देऊन ह्यावेळी उत्तरप्रदेशात अन्य कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वात जास्त सवर्णांना तिकिटे देणाऱ्या 'समाजवादी पक्षाला' ह्यावेळी मत देण्यासाठी अक्षरशः हात जोडून - पाया पडून विनंती केली होती. हाच प्रकार तिथल्या अन्य मतदारसंघातही घडला असावा असे तिथले निवडणूक निकाल पाहून वाटतंय! अर्थात त्याच संघटनेने भाजपला धडा शिकवण्यासाठी केलेला असाच प्रकार २०१० साली झालेल्या आमच्या 'कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या' निवडणुकांच्यावेळी प्रत्यक्ष पहिला होता, ज्याच्या परिणामी त्यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 'महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पहिल्याच फटक्यात तब्बल २६ नगरसेवक निवडून आल्याने शिवसेनेला बऱ्यापैकी पण भाजपला मात्र चांगलाच फटका बसला होता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही बऱ्यापैकी जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि नाशिकमध्ये फायदा होऊ शकेल अशा विचारातून राज ठाकरेंना मोठ्या प्रेमाने मांडीवर घेण्यात आल्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात बसल्याचेही काही मुंबई आणि युपीच्या मित्रांकडून समजले आहे. त्यांची परप्रांतीयांविषयीची अविचारी भूमिका आणि हिंसक आंदोलन अजून 'ते' लोक विसरले नाहीयेत. असो, ९ तारखेला शपथविधी होऊन नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळणाऱ्या श्री. नरेंद्र मोदींचे त्रिवार अभिनंदन!!! तसेच शतक हुकले असले तरी परिश्रमपूर्वक गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँगेसच्या जागा जवळपास दुप्पट करणाऱ्या राहुल गांधींचे अभिनंदन आणि शुभेच्छा! आपल्या पक्षाच्या ५ वरून ३७ अशा सात पटींपेक्षा अधिक जागा वाढवण्यासाठी कष्ट घेतलेल्या अखिलेश यादव ह्यांचेही कौतुक आणि अभिनंदन. आपल्या जागा निम्म्या करून महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागा दुप्पट आणि काँग्रेसच्या जागा तब्बल १३ पट वाढवणाऱ्या उद्धव ठाकरेंचे तर विशेष अभिनंदन! ईव्हीएमचे अभिनंदन करणारा एक लेखच मिपावर आला असल्याने त्याचे अभिनंदन करण्याची पुनरावृत्ती टाळतो. आणि एकाबाजूला भावनिक उन्माद आणि दुसऱ्या बाजूला मातम, रडारड करण्याची संधी नाकारून मिपावर गेले काही महिने असलेले दूषित/गढूळ वातावरण लवकरात लवकर निवळण्यास हातभार लावणाऱ्या २०२४ च्या निवडणूक निकालांचे पुन्हा एकदा स्वागत करून माझे चार(?) शब्द संपवतो! जय हिंद! जय महाराष्ट्र!

काल काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमधे नेतेपदी आणि अर्थात पंतप्रधानासाठी निवड करण्यात आली. गेल्या दोन पंचवार्षिकचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बहुमताचा उत्साह आणि आता एनडीएचा उत्साहातला फरक जाणवणारा होता. बहात्तर मिनिटांच्या भाषणात एकोनावीस वेळा 'एनडीएचा' उल्लेख करावा लागला. आघाडी सरकारांना सहकारी पक्षांची जी हाजी हाजी करावी करावी लागते, त्याची सुरुवात अधिकृतपण उद्यापासून सुरु होईल. ''मोदी की गॅरंटी आणि काँग्रेसच्या 'हाथ बदलेगा हालात'' लोकसभेतील निवडणूकांचा प्रवास पंतप्रधानांच्या निवडीपर्यंत येऊन ठेपला.

sanvidhan
छायाचित्र जालावरुन साभार

संपूर्ण देशात सर्वाधीक सभा घेण्याचा मान अनुक्रमे तेजस्वी यादव, नरेंद्र मीदी प्रियंका गांधी, अमित शहा, राहुल गांधी यांनी आपापल्या मतदार संघात सभा गाजवल्या. निवडणूकांचा प्रचार संपला, निकालही लागलेत. नव्या रणनिती, नवे राजकारण त्याची धावपळ पुन्हा सुरु होईल. सर्वच पक्ष नेत्यांनी आपापला थकवा घातला असेल. ध्यानधारणा करुन प.नरेंद्र मोदी नव्या उत्साहाने उद्या तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पराभवाची नैतिक जवाबादरी घेऊन 'मला मोकळे करा' वर ठाम आहेत. महाराष्ट्रातले येत्या विधानसभेचं राजकारण कसं असेल त्याची सुरुवात आता झाली आहे.

देशातील जनतेने भाजपास दोन वेळा बहुमत दिलं. देशासाठी काय केलं आणि काय केलं नाही त्याचा लेखाजोगा लोकसभेच्या निवडणू निकालांच्या माध्यमातून जनतेसमोर आहे. भारत जोडो अभियान, न्याय यात्रा यांनी राहुल गांधी यांच्या काँग्रेस आणि आघाडीलाही चांगलंच बळ दिलं. सत्तेची सिमारेषा दिसेल इतक्या अंतरावर उभे केले. एकहाती सत्ता देऊनही काहीच जर होत नसेल तर, जनतेने पुन्हा आघाड्यांच्या सरकारांकडे ही धुरा दिली पाहिजे असे जनतेला वाटले म्हणायला हरकत नाही. देशातील अजूनही खुप प्रश्न मोठे प्रलंबीत आहेत. संसदेतील कामकाज व्यवस्थित चालले पाहिजे. असे आणि इतर गोष्टीत बदल दिसणे आवश्यक आहे.

भारत देश सर्वांचा आहे, भारतातल्या विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सर्व गुण्यागोविंदाने राहतात, दर्व भारतवासी एक आहेत, राजकारणातील वैरभाव, द्वेषाचे राजकारण सोडून एकात्मतेची भावना उभी करणे गरजेची आहे. नवे सरकार भारतातील जनतेला जपेल,त्यांच्या विकासासाठी, जीवन-मरणांच्या प्रश्नासाठी अधिक सक्षमपणे काम करेल, जगभरात आदर्श असलेल्या लोकशाहीची काळजी घेईल, प्रसारमाध्यमे अधिक निष्पक्षपाती, निर्भीड, अधिक स्वतंत्र होतील अशी शुभेच्छा नव्या सरकारास देतो आणि थांबतो.

मिपाकर आंद्रे वडापाव, अथांग आकाश, वामन देशमुख, जेष्ठ मिपाकर गवि, स्वधर्म, कॉमी,नठ्यारा, कंजुसकाका, टर्मीनेटर, आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभार, सर्व मिपाकर वाचक यांचेही आभार. चालक-मालक यांनी अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. चुभुदेघे. -दिलीप बिरुटे

हया निवडणुकीतले काही ठळक मुद्दे जे भाजपच्या मूळावर उठले - इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर न करणे. - मोदींचे अत्यंत अप्रभावी भाषणे. -१० वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा मोदीनी लोकाना भीती घालायचा प्रयत्न केला. जसे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या घरी २ म्हशी असतील तर एक ओढून नेईल. - राहुल गांधीशी डिबेट करायला मोदीनी नकार दिला. ह्याचा सरळ प्रभाव राहुल ह्यांची प्रतिमा सुधारण्यात झाला. -राम मंदिराचे घाईत उद्घाटन, शंकराचार्याचा विरोध. - उद्घाटन प्रसंगात एककल्ली पणा, फक्त मोदी आणि मोदीच जे लोकांना रूचले नाही. उद्घाटन प्रसंग हा हिंदूंचा सोहळा न राहता तो भाजपचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे अनेक हिंदू प्रभावित झाले. खासकरून युपीत. राममंदिर हा हिंदूंसाठी खूपच संवेदनशील मुद्दा होता. - “जो राम को लाये है” हा प्रचार ही लोकाना आवडला नाही. आपल्या देवापेक्षा कुणी व्यक्ती श्रेष्ठ असू शकत नाही असे हिंदू लोक उघड बोलत होते. -महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना हलक्यात घेणे नडले. २०१९ लाच २.५ वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर मोदीना महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या नसत्या, सहज २० जागा जिंकल्या असत्या नी त्याच सभा इतर राज्यात घेतल्या असत्या तर २० जागा आणखी जिंकल्या असत्या. एकट्या उद्धव ठाकरेंमुळे ३० ते ४० जागा भाजपच्या कमी झाल्या. - शरद पवारांना नाव न घेता भटकती आत्मा संबोधने महाराष्ट्रातील लोकाना रूचले नाही. - मतदार संघात भाजप खासदारांनी ५ वर्षात आपला चेहरा दाखवला नव्हता. मागच्या वेळी दीड ते दोन लाख लिड ने जिंकलो. हया वेळीही जिंकूच त्यामुळे अनेक खासदारांनी मतदारसंघात फिरणे टाळले. - इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपापले राज्य सांभाळले. उगाच बाहेर फिरले नाही. जसे ममता बंगालात, अखिलेश युपीत नी ठाकरे/पवार महाराष्ट्रातच थांबले. -मागच्या १० वर्षात काय कामे केली हे मोदीनी सांगितलेच नाही तसेच पुढे काय करणार हे देखील सांगितले नाही. - भाजपचा कोअर मतदार अजित ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे नाराज होता, त्याने मतदान केंद्रात जाणे टाळले किंवा भाजपला धडा शिकवायला सरळ विरोधात मतदान केले. - शिवसेना फोडणे अनेकांना आवडणे नाही. - ईडी सीबीआय चा गैरवापर, भ्रष्टाना पक्षात घेऊन पावन करून घेणे इतके उघडपणे सुरू होते की ह्याचा आपल्या मतदारांवर प्रभाव होत असेल ह्याचा भाजपने आजीबातच विचार केला नाही. -स्थानीक प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश. त्यांची दखल सुधा घेण्यात आली नाही. दिंडोरी की कुठल्यातरी सभेत एका शेतकऱ्याने मोदीना कांदा प्रश्नावर बोला अस सांगितल्यावर मोदीनी त्याला “जय श्रीराम “ असे उत्तर दिले. त्यामुळे त्याभागात संतापाची लाट उसळली होती. -कांद्याबाबत भेदभाव- गुजरात मधील कांद्याला एक्सपोर्टची परमिशन पण महाराष्ट्रातील कांद्याला नाही असे शेतकरी बोलून संताप व्यक्त करत होते. - मुसलमानांना विरुद्ध उगाच वक्तव्ये केली. ह्याचा परिणाम मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदानात झाले, मुसलमानातील मोदीविरोधी प्रचंड लाट ओळखून mim ने आपले उमेदवार उतरवले नाही. नाहीतर भाजपा सोबत त्यांचाही धुव्वा उडाला असता. - जरंगे प्रकरण नीट हाताळले नाही. जरांगे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत झाले होते तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मागे sit चौकशी लावण्यात आली. ह्यामुळे मराठा समाज प्रभावित झाला. - भाजपच्या संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे (भाजपनेते उघड बोलत होते) तसेच मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणे/ समर्थन करने ह्यामुळे दलित मतदार प्रभावित झाला. -मोदींची थकलेली देहबोली तसेच मुद्दे सोडून भरकटलेली भाषणे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आणखी काही मुद्दे. - ध्रुव राठीने उपस्थित केलेले मुद्दे भाजपेयीना खोडून काढता आले नाही. ध्रुव राठीचे व्हिडीओ अतिशय प्रभावशाली होते. ध्रुव राठीला न्यूज़ चॅनल्स ही उत्तरे देऊ शकले नाहीत. राठी चे व्हिडिओ बर्याच राज्यात मोठमोठे फ्लेक्स लाऊन दाखवले जात होते. ध्रुव राठीला प्रभावित होऊन त्याचे सबस्क्रायबर्स २ कोटी झाले. त्याचे व्हिडीओ ३० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. - ⁠संजय राउत यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर न देता त्यांच्यावर वयक्तिक टीका करणे, ह्यावरून भाजप नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्याना उत्तर न देता त्यापासून पळ काढतात असा मॅसेज सामान्य लोकांत गेला. - ⁠भाजपच्या काही नेत्यांची शिवराळ भाषा. - ⁠शिवसेना आणी राष्ट्रवादी फोडून ठाकरे नी पवारांचे चिन्ह नी पक्ष इतराना बहाल केल्याचा महाराष्ट्रात राग होता. - ⁠महाराष्ट्रात ठाकरे नी पवारांच्या तोडीस तोड नेता भाजपकडे नसणे. - ⁠राज्यात प्रियंका गांधी ह्यांच्या झालेल्या प्रचंड सभा. (नंदूरबार आणी नांदेड जागा ह्याच सभेने फिरवल्या.) - ⁠उद्धव ठाकरे ह्यांची आक्रमक भाषणे तसेच सभांना जमलेली प्रचंड गर्दी. तसेच लढाऊ बाणा. सोप्या जागा मित्रपक्षांना देऊन ठाकरेंनी अटीतटीच्या जागा स्वतः कडे घेतल्या. - ⁠पवार नी ठाकरेंसोबत असलेली प्रचंड सहानुभूती - ⁠१०० टक्के मोदींवर विसंबून असणे. भाजप नेत्यांनी आपली राज्यातील कामे दाखवलीच नाहीत. - ⁠चिन पाक निवडणुकीत आणणे. लोकाना ते रुचलेच नाही. सत्ताबदल झाला नाही हे म्हणणे खोटे आहे. “मोदी” सरकार जाऊन “NDA” चे सरकार आले आहे. मागच्या दहा वर्षातील नी इंदिरा/राजीव कालखंड पहिला तर एक गोष्ट लक्षात येते. एकहाती सत्ता देऊन देशाचा काहीही फायदा होत नाही. फक्त राज्यकर्त्यांचा अहंकार वाढतो नी येणकेनप्रकारे विरोधकांना त्रास देणे सुरु होते. त्यामुळे भारत देशासाठी “गठबंधन” करून आलेले सरकारच बेस्ट. त्यामुळे सत्ता राबवणाऱ्यांवर अंकुश राहतो. एक एकहाती सत्ता नेमकी कशासाठी हवी असते हे कळले नाही. जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वामन देशमुख 08/06/2024 - 17:24
जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना? दुर्दैवाने या बाबतीत अबांशी सहमत आहे. संघ-भाजप-मोदी यांना जे काही करायचे होते ते करण्यासाठी सलग एक दशकाची प्रचंड बहुमतातील सत्ता पुरेशी नव्हती का? ३०० पार असताना फारसे काही करू शकले नाहीत ते २०० पार आल्यावर काय करणार आहेत? काही नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टीपीके 09/06/2024 - 15:21
बकवास (बोलायला भरपूर आहे पण हा माझ्या नोकरीचा भाग नाही, त्या मुळे वेळेअभावी इतकाच प्रतिसाद. आणि ज्यांना पवार, उबाठा, राऊत, राठी, रागा हे प्रात: स्मरणीय वाटतात त्यांच्याशी चर्चा करून उपयोग नसतो, त्या मुळे सध्या इतकेच)

In reply to by टीपीके

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 15:44
ज्याना मोदी, शहा, फडणवीस, योगी, ब्रिजभूषण, सेंगर, प्रज्वल रेवाना असे लोक प्रातस्मरणीय वाटतात त्यांच्याशी चर्चा करून उपयोग असतो??

In reply to by पॅट्रीक जेड

टीपीके 09/06/2024 - 20:33
अहो अ बा, नाही हि लोकही नाही आहेत, पण हे नाहीत म्हणून तुमचे पवार इत्यादी आदरणीय होत नाहीत. जाऊ दे, ही भांडणं करणं तुमच्या नोकरीचा भाग असेल, मी नाही इतका वेळ घालवू शकत पण तुम्ही लिहिलेले बकवास वाटले आणि त्याची पोच द्यावीशी वाटली म्हणून दिली. उगाच तुम्हाला वाटायला नको की तुमच्या थापा सगळ्यांना पटल्या

In reply to by टीपीके

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 20:37
फक्त द्वेषातून बकवास लिहिलय अस दिसतंय. सत्य स्वीकारायची तयारी नसली की असा द्वेष बाहेर पडतो. असो.

In reply to by वेडा बेडूक

सुरिया 11/06/2024 - 18:00
मिपा पण विषामृत खेळतं काय?
गापै कितीदा खेळले की विषामृत? तेंव्हा नाही आली शंका? . आता नाठाळ होऊन आले तरी बाहुबलीच दिसतात का फक्त?

In reply to by सुरिया

पॅट्रीक जेड 11/06/2024 - 18:28
डॉक्टरांच म्हणजे कसं बघा आमच्या मूक्तविहारी काकांसारखं आहे. बलात्कारी भाजप किंवा मित्र पक्षातील असेल तर चुप बसायचे नी विरोधी पक्षातील असेल तर मीपावर धागे काढून दिवसरात्र चालवायचे. रच्याकने मुविकाका, निकाल लागल्या पासून गायबलेत. :) सगळी मेहनत वाया गेली. :)

In reply to by पॅट्रीक जेड

सुबोध खरे 11/06/2024 - 20:33
मीपावर धागे काढून दिवसरात्र चालवायचे. भुजबळ बुवा मी मिपा वर "चालवण्यासाठी" धागे काढत नाही. त्याची मला गरजही वाटत नाही. किंवा कुणी मला चांगलं म्हणावं म्हणून मी काही करावं असं मला कधीही वाटलं नाही. बाकी तुमचं असंबद्ध आत्मकुंथन चालू द्या

In reply to by सुरिया

सुबोध खरे 11/06/2024 - 20:15
@ सुरिया भुजबळ बुवा दुसऱ्यांच्या डू आय डी बद्दल ठणाणा करत होते गा पै यांनी तसे कधी केल्याचे स्मरत नाही अन्यथा माझ्यासारखे मूळ नावानिशी लोक कमीच आहेत.

नठ्यारा 08/06/2024 - 14:48
प्राडॉ,
एकहाती सत्ता देऊनही काहीच जर होत नसेल तर, जनतेने पुन्हा आघाड्यांच्या सरकारांकडे ही धुरा दिली पाहिजे असे जनतेला वाटले म्हणायला हरकत नाही.
काहीच न होणे यांत न झालेले बॉम्बस्फोट धरायचे का ? ;-) विनोदाचा भाग सोडून द्या. पण हा जो काही विरोधकांचा विजयबिजय आहे तो मुस्लीम मतांवर मिळालेला आहे. भाजपचा मतटक्का फारसा घसरलेला नाही. काही दशकांपूर्वी हिंदू ग्रोथ रेट नावाची एक अपमानजनक अर्थशास्त्रीय संज्ञा प्रचलित होती. मोदींनी तिला सन्मान प्राप्त करवून दिला. आज भारताची अर्थव्यवस्था दिमाखात भरारी घेते आहे. याच धर्तीवर उद्या हिंदू व्होट रेट या संज्ञेसही सन्मान प्राप्त होईल. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

पॅट्रीक जेड 08/06/2024 - 15:20
विरोधकांचा विजयबिजय आहे तो मुस्लीम मतांवर मिळालेला आहे. भाजपचा मतटक्का फारसा घसरलेला नाही. नठ्याजी, फक्त मुस्लिम मतदान पुरेसं नाही जिंकायला अनेक हिंदूंची आणी मरातजी लोकांची मते मिळाली आहेत शिवसेना काँग्रेस नी राष्ट्रवादीला.

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 12:48
‘मोदी ओरिजनल ब्रँड’, शिवसेना भवनासमोर बॅनर्स भाजपने लावले. 25 सभा रोड शो, सरकारी यंत्रणांचा वापर करूनही 9 जागा तितक्याच ज्या उद्धव ठाकरे यांनी पक्ष ,चिन्ह आणि सर्व गमावूनही मिळवल्या ... https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/bjp-banner-in-front-of-shiv-sena-bhavan-in-mumbai-marathi-news-1213900.html?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR2hWJTBzO8uiotzPIAkSG9qorC-Wj2-JMJSTfqGP_ZfbmsBxOkBZ1kZnJE_aem_ZmFrZWR1bW15MTZieXRlcw अजूनही केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच आहेत

पॅट्रीक जेड 09/06/2024 - 15:45
आता सध्या भाजपने फडणविसाना बाजूला करणेच हितकारक आहे नाहीतर विधानसभेला उरलीसुरलीही जाईल. लोकणी मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून मत दिले होते तरी ९ खासदारच जिंकले. विधानसभेवेळी अजून वाईट परिस्थिती असेल.

सुबोध खरे 10/06/2024 - 10:00
हायला भुजबळ डू आय डी घेऊन परत अवतरले की आधी होता वाघ्या मग झाला पाघ्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!! कोणत्याही धाग्यावर पूर्वग्रह दूषित आणि असंबद्ध प्रतिसाद आता परत येणार हे राम

पॅट्रीक जेड 10/06/2024 - 14:01
शिंदेना राज्यमंत्रिपद आणी दादाना मंत्रिपदही नाही. कसकाय सहन करताहेत हे लोक?? की काहीही पर्याय नसल्याने आपल्याला सोडून जाणार नाहीत हा आत्मविश्वास असावा भाजपला?? तिकडे मांझी एका खासदारावर कॅबिनेट मिळवतोय नी ७ खासदार असून राज्यमंत्रिपद. भाजप हया दोघांनाही युतीतून बाहेर काढण्याच्या मार्गावर असावा का?

In reply to by पॅट्रीक जेड

नठ्यारा 10/06/2024 - 19:17
मला वाटतं की शिंदेंनी लिंबूटिंबू उमेदवार उभे केल्याची शिक्षा मिळालेली दिसतेय. जर चांगले निकाल आणले असते तर जास्त मंत्रीपदं मिळाली असती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

पॅट्रीक जेड 10/06/2024 - 20:30
शिंदेंचा स्ट्राईक रेट ३ नंबरचा आहे. १) राष्ट्रवादी- शरद पवार८/१० २) काँग्रेस १३/१७ ३)शिवसेना- शिंदे गट ७/१५ ४)शिवसेना- ठाकरे गट ९/२१ ५) भाजप- ९/? ६)राष्ट्रवादी- अजित पवार गट १/? भाजपा पेक्षाही चांगला स्ट्राईक रेट आहे शिंदे गटाचा.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.

प्रसाद गोडबोले ·

In reply to by कंजूस

ओडिओ रेकॉर्ड केला आहे का?
नाही. अगदी फोटो काढतानाही मी माझा वैखरी मध्यमा पश्यंति ह्या चिंतनात गढुन गेलेलो होतो , त्यामुळे व्हिडीओ ऑडियो काढायचे लक्षातच आले नाही :( बहुतेक Himalayan woodpecker (Dendrocopos himalayensis) असावा. कसली सुंदर ढोली केली होती त्याने त्या झाडाच्या बुंध्यात !

In reply to by कंजूस

Great Barbet, पहाडी तांबट(मराठी),कटूरगा स्थानिक भाषेत संबोधला जाणारा पॅसेरियन कुळातील पक्षी हिमालयात सापडतो. दिसायला खुपच सुंदर आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पक्षी निरीक्षणाच्या चेकलिस्ट पाठवतो. पक्षीदर्शन, मला तर ताणतणाव दुर करण्यास आणी मन:शाती साठी मदत करतात.

In reply to by कंजूस

मी मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर वापरतो. Designed for anyone interested in identifying birds, Merlin is a machine learning-powered bird ID tool created by the Cornell Lab of Ornithology. As a global bird guide, it can help you identify birds anywhere in the world.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 10/06/2024 - 19:11
मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर म्हणजे कंपूटरमध्ये घ्यावं लागणार. मोबाईलमध्ये app नसणार. Greemet, inskip पुस्तकात यांचं चित्र चांगलं दिलं आहे.

In reply to by कंजूस

मर्लिन एक मोबाईल ॲप आहे. दररोज पक्षीदर्शन करताना याचा उपयोग होतो. विवीध पक्षांचे आवाज वातावरणातून संकलित करून त्या पक्षांचे विस्तृत वर्णन दिले आहे.पक्षांचे वर्णन आणी आवाज दोन्ही एकत्र माहीती मिळते. एक चांगले फिल्ड गाईड आहे. या मुळेच मला शंभर सव्वाशे पक्षी ओळखण्यात मदत मिळाली. यांच्या बद्दल मी आत्मविश्वासाने बोलू शकतो. गुगल प्ले स्टोअर मधून ङाउनलोड करता येईल. वापरून बघा. आवडेल.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 12/06/2024 - 05:09
धन्यवाद कर्नलतपस्वी. मर्लिन app टॅबमध्ये घेतले. मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात फोटो. चांगले आहे. ओफ लाईन चालते. पक्ष्यांचे आवाज हे खास वैशिष्ट्य आहे.

Bhakti 06/06/2024 - 06:44
अज्ञानातून विज्ञानाकडे, सुखदुखातून आनंदाकडे, असत्यातून सत्याकडे, आणि अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानात प्रवेश करण्याचा शास्त्रोक्त, आणि तर्कशुद्ध राजमार्ग हा फक्त आपल्या भारतात, आणि फक्त भारतीय अध्यात्मशास्त्रात, आणि संत साहित्यात. हे ग्रंथ प्रत्यक्ष स्वताच्या डोळ्यांनी याच जन्मात वाचल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभव हा कधीही येणार नाही, नाही, आणि नाही. -फडके एस.एम.एन एका सुंदर अनुभव घनाचा आनंद मिळाला, प्रगो अभिनंदन! आता त्या वर्षा मध्ये सतत सुख अनुभवत राहा.

In reply to by Bhakti

धन्यवाद भक्ती ! तुमचे प्रतिसाद खुप प्रेरणादायी होते. रादर मिपाकर , आणि फेसबुकवरील काही मित्रांच्या प्रतिसादांमुळेच लेखपुर्ण करु शकलो, नआही तर नेहमी प्रमाणे - "आपल्याला काय गरज आहे काहीही कोणालाही सांगायची ? आपलं आपण स्वान्तःसुखाय उपभोगत बसु. " असा विचार फार मनात घोळत होता. बाकी , कालच , परत येऊन एक आठवडा पुर्ण झाला . इथे शहरात परत आले की - घरदार, प्रपंच , पोरंबाळं , ऑफिस, ट्रॅफिक , पैसा, पॉलिटिक्स , आरबट चरबट खाणे, अवेळी जागरण , व्यायामचा आळस, मिसळपाव, मिपावरील स्कोअर सेटलिंग , एकांगी संपादन, वगैरे वगैरे जाणवले . पण एक गोष्ट लक्षात आली - तुम्ही जर सर्वकाही नीट लक्षपुर्वक करत असाल , ध्यानपुर्वक करत असाल , तर सर्वच ध्यान आहे. तुम्हाला ध्यानाच्या अवस्थेतुन कोणीही खाली खेचु शकत नाही एक तुमचे चंचल मन सोडले तर. भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे ! तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी ! पांडुरंग पांडुरंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ।। चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालीविसी भार सवे माझा ।। बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केली देवा ।। अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।। तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।। आता आनंदाने "खेळत" आहे . बस :) https://www.youtube.com/watch?v=BGzw9LRUclM

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 06/06/2024 - 19:27
_/\_
भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे !
अगदी बरोबर !आपण शेवटी माणूस' आहोत.स्वत:ला आधी प्रेम देणं आलंच.
तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी
! त्या गतीला मार्गक्रमण सुरूच आहे :) पांडुरंग पांडुरंग.

अहिरावण 06/06/2024 - 13:26
अतिशय सुंदर लेखमाला. आवडली. शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद यातील फरक वेळ मिळेल तेव्हा सांगावा ही आग्रहाची पण नम्र विनंती

In reply to by अहिरावण

शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद
माझ्या आकलनानुसार - श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात ते एकदम प्युअर उपनिषदांचे शब्दशः तात्पर्य आहे - ब्रह्मं सत्य जगन्मिथ्या . केवळ अविनाशी ब्रह्म सत्य आहे, त्या व्यतिरिक्त जे जे काही विनाशी असे आहे ते ते सर्व माया आहे. माया म्हणजेच या मा सा माया. जी कधी झालीच नाही ती म्हणजे माया. अर्थात विनाशी असे जे जे म्हणुन तुम्हाला भासत आहे , ते नाहीयेच . माऊली थोड्या फरकाने हेच म्हणतात की केवळ ब्रह्मच सत्य आहे, माया असे काही नाहीच , मग आसस्पास जे काही दिसत आहे , भासत आहे ते सारे काय आहे ? जर माया असे काहीच नाही तर त्याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो की ते ही ब्रह्मच आहे ! त्यालाच माऊली चिद्विलास असे म्हणतात. मला दोन्ही गोष्टी कळायला कठीण वाटल्या तेव्हा समजुन घ्यायला समर्थ रामदास स्वामींच्या आत्मारामामधील संवाद खुप जास्त उपयुक्त ठरला. समर्थ म्हणतात : आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ॥ रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥ समर्थ शिष्य कल्याण समर्थांना हाच प्रश्न विचारतात : सकळ माया ऎसेंहि म्हणतां । आणि जालीच नाही ऎसेंहि सांगतां ॥ तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥ त्यावर समर्थ उत्तर देतात : अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ॥ तितुके तुंवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥ थोडक्यात काय तर मनाला जे जे अनुभता येत आहे ते ते सारे नाशिवंत आहे , मायिक आहे , मुळात मनच मायिक आहे. तुम्हाला आचार्यांसारखे "मिथ्या" असे म्हणुन एका झटक्यात त्याग करता आला तर उत्तमच ! (मुळात त्याग करणे म्हणजे नक्की काय ? कशाचा त्याग करणार अन कोण करणार !! ) नाही आला , तर माऊली म्हणातात तसे हा सारा ब्रह्माचा चिद्विलास आहे, माया असे काही नाहीच जे जे काही तुम्हाला दिसत आहे अनुभवाला येत आहे ते सर्वच ब्रह्म आहे ही नजर विकसीत होऊ द्या . (कसली नजर अन कसलं काय ? काय बघणार अन बघणारा तरी कोण ?) असो, ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत हे मी(?) स्वानुभवावरुन(?) सांगु शकतो(?) . मला जेव्हा माऊली काय म्हणात आहेत हे लक्षात आले होते तेव्हा त्यांच्चाच अभंग आठवलेला -
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फीटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां तयासि । बाप रखुमादेवी-वरीं खूण बाणली कैसी ॥३॥
https://www.youtube.com/watch?v=1qQlC7bJV9k

In reply to by प्रसाद गोडबोले

अवांतर : मध्यंतरी एक खुप गोष्ट ऐकलीली, ती आठवली ह्या निमित्ताने. आपण जाणतोच की शुध्द द्वैतवादाचे प्रणेते मध्वाचार्य , विशिष्ठाद्वैतवादाचे प्रणेते रामानुजाचर्य आणि शुध्द अद्वैतवेदांताचे प्रणेते शंकराचार्य आहेत. एकदा त्यांचे शिष्य समुद्रकिनारी फिरायला जातात. तेव्हा मध्वाचार्यांचा शिष्य म्हणतो - अहाहा कित्ती सुंदर . हे पहा समुद्र आहे , लाटा आहेत , प्रत्येक लाट वेगळी आहे, लाट म्हणजे समुद्र नव्हे अन समुद्र म्हणजे लाट नव्हे, समुद्र अफाट आहे , अनंत आहे आणि लाटा कधीच समुद्र होऊ शकत नाहीत. त्यावर रामानुजाचार्यांचा शिष्य म्हणतो - लाटा ह्या समुद्रातच उमटालेल्या आहेत , प्रत्येक लाटेत समुद्राचाच अंश आहे, पण लाट कधीही समुद्र होऊ शकत नाही. त्यावर शंकराचार्यांचा शिष्य म्हणतो - कसल्या लाटा अन कसला समुद्र ? लाटा , समुद्र दोन्हीही मिथ्या आहे, मला तर फक्त पाणीच दिसत आहे !! ------------------ तिथे जर माऊलींचा शिष्य असता तर तो म्हणाला असता - लाटाही आहेत , समुद्रही आहे , पण मुळात सगळं पाणीच आहे ! एक पाणीच लाटा आणि समुद्र अशी भिन्न भिन्न रुपे घेऊन नटलेले आहे. लाटा समुद्र हा पाण्याचा चिद्विलास आहे ! आणि तिथे जर समर्थांचा शिष्य असता तर म्हणाला असता - लाटा आहेत हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, समुद्र आहे हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणी पाणी आहे हेही तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणि मनाला जे जे अनुभवाला येत आहे ते ते सगळं नाशिवंत आहे . (आणि हा अनुभवही तुमच्या त्याच नाशिवंत मनाला येत आहे.) असा हा सगळा मायेचा खेळ आहे !

सर्व भाग वाचले. ध्यान,धारणा वगैरे सारख्या जटिल गोष्टी लक्षात येत नाहीत पण निसर्गाच्या सान्निध्यात रहायला जरूर आवडते. तीथे भौतिक गरजा विसरून येणारी अनुभूती एक सुखद अनुभव असतो. आपले अनुभव कथन आवडले.

वामन देशमुख 06/06/2024 - 15:45
लेखमालिका व त्यातील विचार आवडले. हिंदू धर्मपरंपरेतील अध्यात्म-अनुभव हा सर्वसमावेशक असतो. तो तुम्हाला लाभला याचा आनंद वाटला. काही काळानंतर (चार-सहा महिन्यानंतर?) या अनुभवामुळे तुमच्या विचार-आचार-प्रकटन यांत काही काही बदल घडून येणे अपेक्षित असेल तर ते बदल घडून आले का वगैरे लिहावे ही विनंती.

In reply to by वामन देशमुख

आज अनेक दिवसांनी ह्या हिमालयातील अनुभवाची आठवण झाली . ध्यान नित्यनेमाने करणे होत नाही , मात्र त्या शिबिरामध्ये स्वामीजींशी बोलताना जे माझ्या लक्षात आले - जी वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेली "साधना" आहे ती मात्र आवर्जुन करत आहे. विचारांच्या बाबतीत सांगायचे तर - आता एकप्रकारची त्रयस्थ नजर विकसित झालेली आहे असे जाणवते. असे वाटते की आपण पब्जी खेळत आहोत , अन हे आपले कॅरॅक्टर आहे जे आपण बस चालवत आहोत. सुख दुख , आशा निराशेचे, काम क्रोध ह्यांचे आवेग अजुनही येतात मात्र आता त्या लाटा इतक्या इंच नसतात, आणि पटकन त्या आवेगातुन बाहेर पडता येते अन हसु येते . आचार आणि प्रकटाना बाबत काही विशेष बदल नाही मला जाणवला, थोडासा बिनधास्तपणा , बोलण्यात थोडी अनावश्यक स्पष्टता , स्ट्रेट फॉरवर्डनेस , हे जाणवतं . आणि प्रकटनाच्या बाबतीत मी आजकाल "मी आहे हा असा आहे, तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर टाकुन द्या" हे वाक्य मी जरा जास्तच वेळा वापरायला लागलो आहे . त्या मुळे नको ती माणसे दुरावली आहेत , आणि जि उरली आहेत , त्यांच्या सोबत सुकुन आहे , समाधान आहे. :) बाकी अशाच काही लोकांसोबत आता परत हिमालयात जायचा योग आहे , आत्ता फेब्रुवारीतच भयंकर हिवाळ्यात जायची इच्छा आहे, पण बघु कसे जमते ते !

चित्रगुप्त 07/06/2024 - 13:34
लेखमालिका उत्तम झाली. दोन आठवडे नेहमीच्या धबडग्यापासून दूर, निसर्ग-एकांतात निवांत जाऊन रहाणे हेच मुळात दुर्मिळ होऊन बसलेले आहे. तो अनुभव तुम्हाला घेता आला हे विशेष. (माझ्यापुरते बोलायचे तर अनेक वर्षे अध्यात्मिक, तात्विक इ.इ. वाचन, चर्चा, विविध कँप वगैरेत जाणे वगैरे सगळे करून झाल्यावर आता त्या सर्वातून मुक्त होऊन फक्त अगदी जिव्हाळ्याचे विषय - चित्रकला, आरोग्य, संगीत, नातवंडे - यातच रमलेलो आहे. ) विविध विषयांवर, अनुभवांवर जरूर लिहीत रहा.

५ हि लेख वाचले . चांगली लेखमाला आहे . ज्याप्रमाणे एखाद्या सहलीस पुढचे दहा पंधरा दिवस वेगळ्या आनंदात जातात त्याप्रमाणे शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक. अध्यात्मात रस आहे पण व्यवहारी जीवनात आध्यात्म पालन करण्याइतपत योग्यता अंगी नसल्याने लेख वाचून जिज्ञासा शमवण्याचामाझा माफक प्रयत्न असतो .

In reply to by विअर्ड विक्स

शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक.
सध्या राम दास्स ह्यांची प्रवचने ऐकत आहे, त्यामुळे कार्य , कारण, परिणाम ही विचारपध्दतीच संपुष्टात आलेली आहे :)

In reply to by कंजूस

ओडिओ रेकॉर्ड केला आहे का?
नाही. अगदी फोटो काढतानाही मी माझा वैखरी मध्यमा पश्यंति ह्या चिंतनात गढुन गेलेलो होतो , त्यामुळे व्हिडीओ ऑडियो काढायचे लक्षातच आले नाही :( बहुतेक Himalayan woodpecker (Dendrocopos himalayensis) असावा. कसली सुंदर ढोली केली होती त्याने त्या झाडाच्या बुंध्यात !

In reply to by कंजूस

Great Barbet, पहाडी तांबट(मराठी),कटूरगा स्थानिक भाषेत संबोधला जाणारा पॅसेरियन कुळातील पक्षी हिमालयात सापडतो. दिसायला खुपच सुंदर आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पक्षी निरीक्षणाच्या चेकलिस्ट पाठवतो. पक्षीदर्शन, मला तर ताणतणाव दुर करण्यास आणी मन:शाती साठी मदत करतात.

In reply to by कंजूस

मी मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर वापरतो. Designed for anyone interested in identifying birds, Merlin is a machine learning-powered bird ID tool created by the Cornell Lab of Ornithology. As a global bird guide, it can help you identify birds anywhere in the world.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 10/06/2024 - 19:11
मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर म्हणजे कंपूटरमध्ये घ्यावं लागणार. मोबाईलमध्ये app नसणार. Greemet, inskip पुस्तकात यांचं चित्र चांगलं दिलं आहे.

In reply to by कंजूस

मर्लिन एक मोबाईल ॲप आहे. दररोज पक्षीदर्शन करताना याचा उपयोग होतो. विवीध पक्षांचे आवाज वातावरणातून संकलित करून त्या पक्षांचे विस्तृत वर्णन दिले आहे.पक्षांचे वर्णन आणी आवाज दोन्ही एकत्र माहीती मिळते. एक चांगले फिल्ड गाईड आहे. या मुळेच मला शंभर सव्वाशे पक्षी ओळखण्यात मदत मिळाली. यांच्या बद्दल मी आत्मविश्वासाने बोलू शकतो. गुगल प्ले स्टोअर मधून ङाउनलोड करता येईल. वापरून बघा. आवडेल.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 12/06/2024 - 05:09
धन्यवाद कर्नलतपस्वी. मर्लिन app टॅबमध्ये घेतले. मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात फोटो. चांगले आहे. ओफ लाईन चालते. पक्ष्यांचे आवाज हे खास वैशिष्ट्य आहे.

Bhakti 06/06/2024 - 06:44
अज्ञानातून विज्ञानाकडे, सुखदुखातून आनंदाकडे, असत्यातून सत्याकडे, आणि अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानात प्रवेश करण्याचा शास्त्रोक्त, आणि तर्कशुद्ध राजमार्ग हा फक्त आपल्या भारतात, आणि फक्त भारतीय अध्यात्मशास्त्रात, आणि संत साहित्यात. हे ग्रंथ प्रत्यक्ष स्वताच्या डोळ्यांनी याच जन्मात वाचल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभव हा कधीही येणार नाही, नाही, आणि नाही. -फडके एस.एम.एन एका सुंदर अनुभव घनाचा आनंद मिळाला, प्रगो अभिनंदन! आता त्या वर्षा मध्ये सतत सुख अनुभवत राहा.

In reply to by Bhakti

धन्यवाद भक्ती ! तुमचे प्रतिसाद खुप प्रेरणादायी होते. रादर मिपाकर , आणि फेसबुकवरील काही मित्रांच्या प्रतिसादांमुळेच लेखपुर्ण करु शकलो, नआही तर नेहमी प्रमाणे - "आपल्याला काय गरज आहे काहीही कोणालाही सांगायची ? आपलं आपण स्वान्तःसुखाय उपभोगत बसु. " असा विचार फार मनात घोळत होता. बाकी , कालच , परत येऊन एक आठवडा पुर्ण झाला . इथे शहरात परत आले की - घरदार, प्रपंच , पोरंबाळं , ऑफिस, ट्रॅफिक , पैसा, पॉलिटिक्स , आरबट चरबट खाणे, अवेळी जागरण , व्यायामचा आळस, मिसळपाव, मिपावरील स्कोअर सेटलिंग , एकांगी संपादन, वगैरे वगैरे जाणवले . पण एक गोष्ट लक्षात आली - तुम्ही जर सर्वकाही नीट लक्षपुर्वक करत असाल , ध्यानपुर्वक करत असाल , तर सर्वच ध्यान आहे. तुम्हाला ध्यानाच्या अवस्थेतुन कोणीही खाली खेचु शकत नाही एक तुमचे चंचल मन सोडले तर. भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे ! तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी ! पांडुरंग पांडुरंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ।। चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालीविसी भार सवे माझा ।। बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केली देवा ।। अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।। तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।। आता आनंदाने "खेळत" आहे . बस :) https://www.youtube.com/watch?v=BGzw9LRUclM

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 06/06/2024 - 19:27
_/\_
भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे !
अगदी बरोबर !आपण शेवटी माणूस' आहोत.स्वत:ला आधी प्रेम देणं आलंच.
तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी
! त्या गतीला मार्गक्रमण सुरूच आहे :) पांडुरंग पांडुरंग.

अहिरावण 06/06/2024 - 13:26
अतिशय सुंदर लेखमाला. आवडली. शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद यातील फरक वेळ मिळेल तेव्हा सांगावा ही आग्रहाची पण नम्र विनंती

In reply to by अहिरावण

शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद
माझ्या आकलनानुसार - श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात ते एकदम प्युअर उपनिषदांचे शब्दशः तात्पर्य आहे - ब्रह्मं सत्य जगन्मिथ्या . केवळ अविनाशी ब्रह्म सत्य आहे, त्या व्यतिरिक्त जे जे काही विनाशी असे आहे ते ते सर्व माया आहे. माया म्हणजेच या मा सा माया. जी कधी झालीच नाही ती म्हणजे माया. अर्थात विनाशी असे जे जे म्हणुन तुम्हाला भासत आहे , ते नाहीयेच . माऊली थोड्या फरकाने हेच म्हणतात की केवळ ब्रह्मच सत्य आहे, माया असे काही नाहीच , मग आसस्पास जे काही दिसत आहे , भासत आहे ते सारे काय आहे ? जर माया असे काहीच नाही तर त्याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो की ते ही ब्रह्मच आहे ! त्यालाच माऊली चिद्विलास असे म्हणतात. मला दोन्ही गोष्टी कळायला कठीण वाटल्या तेव्हा समजुन घ्यायला समर्थ रामदास स्वामींच्या आत्मारामामधील संवाद खुप जास्त उपयुक्त ठरला. समर्थ म्हणतात : आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ॥ रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥ समर्थ शिष्य कल्याण समर्थांना हाच प्रश्न विचारतात : सकळ माया ऎसेंहि म्हणतां । आणि जालीच नाही ऎसेंहि सांगतां ॥ तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥ त्यावर समर्थ उत्तर देतात : अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ॥ तितुके तुंवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥ थोडक्यात काय तर मनाला जे जे अनुभता येत आहे ते ते सारे नाशिवंत आहे , मायिक आहे , मुळात मनच मायिक आहे. तुम्हाला आचार्यांसारखे "मिथ्या" असे म्हणुन एका झटक्यात त्याग करता आला तर उत्तमच ! (मुळात त्याग करणे म्हणजे नक्की काय ? कशाचा त्याग करणार अन कोण करणार !! ) नाही आला , तर माऊली म्हणातात तसे हा सारा ब्रह्माचा चिद्विलास आहे, माया असे काही नाहीच जे जे काही तुम्हाला दिसत आहे अनुभवाला येत आहे ते सर्वच ब्रह्म आहे ही नजर विकसीत होऊ द्या . (कसली नजर अन कसलं काय ? काय बघणार अन बघणारा तरी कोण ?) असो, ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत हे मी(?) स्वानुभवावरुन(?) सांगु शकतो(?) . मला जेव्हा माऊली काय म्हणात आहेत हे लक्षात आले होते तेव्हा त्यांच्चाच अभंग आठवलेला -
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फीटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां तयासि । बाप रखुमादेवी-वरीं खूण बाणली कैसी ॥३॥
https://www.youtube.com/watch?v=1qQlC7bJV9k

In reply to by प्रसाद गोडबोले

अवांतर : मध्यंतरी एक खुप गोष्ट ऐकलीली, ती आठवली ह्या निमित्ताने. आपण जाणतोच की शुध्द द्वैतवादाचे प्रणेते मध्वाचार्य , विशिष्ठाद्वैतवादाचे प्रणेते रामानुजाचर्य आणि शुध्द अद्वैतवेदांताचे प्रणेते शंकराचार्य आहेत. एकदा त्यांचे शिष्य समुद्रकिनारी फिरायला जातात. तेव्हा मध्वाचार्यांचा शिष्य म्हणतो - अहाहा कित्ती सुंदर . हे पहा समुद्र आहे , लाटा आहेत , प्रत्येक लाट वेगळी आहे, लाट म्हणजे समुद्र नव्हे अन समुद्र म्हणजे लाट नव्हे, समुद्र अफाट आहे , अनंत आहे आणि लाटा कधीच समुद्र होऊ शकत नाहीत. त्यावर रामानुजाचार्यांचा शिष्य म्हणतो - लाटा ह्या समुद्रातच उमटालेल्या आहेत , प्रत्येक लाटेत समुद्राचाच अंश आहे, पण लाट कधीही समुद्र होऊ शकत नाही. त्यावर शंकराचार्यांचा शिष्य म्हणतो - कसल्या लाटा अन कसला समुद्र ? लाटा , समुद्र दोन्हीही मिथ्या आहे, मला तर फक्त पाणीच दिसत आहे !! ------------------ तिथे जर माऊलींचा शिष्य असता तर तो म्हणाला असता - लाटाही आहेत , समुद्रही आहे , पण मुळात सगळं पाणीच आहे ! एक पाणीच लाटा आणि समुद्र अशी भिन्न भिन्न रुपे घेऊन नटलेले आहे. लाटा समुद्र हा पाण्याचा चिद्विलास आहे ! आणि तिथे जर समर्थांचा शिष्य असता तर म्हणाला असता - लाटा आहेत हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, समुद्र आहे हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणी पाणी आहे हेही तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणि मनाला जे जे अनुभवाला येत आहे ते ते सगळं नाशिवंत आहे . (आणि हा अनुभवही तुमच्या त्याच नाशिवंत मनाला येत आहे.) असा हा सगळा मायेचा खेळ आहे !

सर्व भाग वाचले. ध्यान,धारणा वगैरे सारख्या जटिल गोष्टी लक्षात येत नाहीत पण निसर्गाच्या सान्निध्यात रहायला जरूर आवडते. तीथे भौतिक गरजा विसरून येणारी अनुभूती एक सुखद अनुभव असतो. आपले अनुभव कथन आवडले.

वामन देशमुख 06/06/2024 - 15:45
लेखमालिका व त्यातील विचार आवडले. हिंदू धर्मपरंपरेतील अध्यात्म-अनुभव हा सर्वसमावेशक असतो. तो तुम्हाला लाभला याचा आनंद वाटला. काही काळानंतर (चार-सहा महिन्यानंतर?) या अनुभवामुळे तुमच्या विचार-आचार-प्रकटन यांत काही काही बदल घडून येणे अपेक्षित असेल तर ते बदल घडून आले का वगैरे लिहावे ही विनंती.

In reply to by वामन देशमुख

आज अनेक दिवसांनी ह्या हिमालयातील अनुभवाची आठवण झाली . ध्यान नित्यनेमाने करणे होत नाही , मात्र त्या शिबिरामध्ये स्वामीजींशी बोलताना जे माझ्या लक्षात आले - जी वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेली "साधना" आहे ती मात्र आवर्जुन करत आहे. विचारांच्या बाबतीत सांगायचे तर - आता एकप्रकारची त्रयस्थ नजर विकसित झालेली आहे असे जाणवते. असे वाटते की आपण पब्जी खेळत आहोत , अन हे आपले कॅरॅक्टर आहे जे आपण बस चालवत आहोत. सुख दुख , आशा निराशेचे, काम क्रोध ह्यांचे आवेग अजुनही येतात मात्र आता त्या लाटा इतक्या इंच नसतात, आणि पटकन त्या आवेगातुन बाहेर पडता येते अन हसु येते . आचार आणि प्रकटाना बाबत काही विशेष बदल नाही मला जाणवला, थोडासा बिनधास्तपणा , बोलण्यात थोडी अनावश्यक स्पष्टता , स्ट्रेट फॉरवर्डनेस , हे जाणवतं . आणि प्रकटनाच्या बाबतीत मी आजकाल "मी आहे हा असा आहे, तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर टाकुन द्या" हे वाक्य मी जरा जास्तच वेळा वापरायला लागलो आहे . त्या मुळे नको ती माणसे दुरावली आहेत , आणि जि उरली आहेत , त्यांच्या सोबत सुकुन आहे , समाधान आहे. :) बाकी अशाच काही लोकांसोबत आता परत हिमालयात जायचा योग आहे , आत्ता फेब्रुवारीतच भयंकर हिवाळ्यात जायची इच्छा आहे, पण बघु कसे जमते ते !

चित्रगुप्त 07/06/2024 - 13:34
लेखमालिका उत्तम झाली. दोन आठवडे नेहमीच्या धबडग्यापासून दूर, निसर्ग-एकांतात निवांत जाऊन रहाणे हेच मुळात दुर्मिळ होऊन बसलेले आहे. तो अनुभव तुम्हाला घेता आला हे विशेष. (माझ्यापुरते बोलायचे तर अनेक वर्षे अध्यात्मिक, तात्विक इ.इ. वाचन, चर्चा, विविध कँप वगैरेत जाणे वगैरे सगळे करून झाल्यावर आता त्या सर्वातून मुक्त होऊन फक्त अगदी जिव्हाळ्याचे विषय - चित्रकला, आरोग्य, संगीत, नातवंडे - यातच रमलेलो आहे. ) विविध विषयांवर, अनुभवांवर जरूर लिहीत रहा.

५ हि लेख वाचले . चांगली लेखमाला आहे . ज्याप्रमाणे एखाद्या सहलीस पुढचे दहा पंधरा दिवस वेगळ्या आनंदात जातात त्याप्रमाणे शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक. अध्यात्मात रस आहे पण व्यवहारी जीवनात आध्यात्म पालन करण्याइतपत योग्यता अंगी नसल्याने लेख वाचून जिज्ञासा शमवण्याचामाझा माफक प्रयत्न असतो .

In reply to by विअर्ड विक्स

शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक.
सध्या राम दास्स ह्यांची प्रवचने ऐकत आहे, त्यामुळे कार्य , कारण, परिणाम ही विचारपध्दतीच संपुष्टात आलेली आहे :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
23 may 2024 : ध्यानाचा चौथा दिवस सकाळी नेहमीप्रमाणे योग आसने ध्यानाचा वर्ग झाला. आता हे सारं अंगवळणी पडत चाललं आहे. ध्यानातील अनुभव इतके वैयक्तिक आणि खोलवरचे आहेत की ते लिहुन ठेवणं मला गरजेचे वाटत नाही. बस्स माऊलींच्या ओव्या , समर्थांचे श्लोक , तुकोबांचे अभंग आठवत राहतात.

हिंदोळे

बिपीन सुरेश सांगळे ·

वाह ! आवडले. लिहिते राहा. मुझे किसी के बदल जाने का गम नही है, बस कोई था, जिससे ये उम्मीद नही थी. -दिलीप बिरुटे (नीट घराच्या दिशेने निघालेला)

चित्रगुप्त 07/06/2024 - 13:12
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत. एक छानसा लघुपट बनवला जाऊ शकतो या कथेवर. प्रा.डाँ.नी दिलेला शेर पण चपखल.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 07/06/2024 - 19:48
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत.
+१ लहानशीच पण परिणामकारक कथा आवडलीच, फक्त मला मला मुकेश ऐवजी 'हा मैने भी प्यार किया है' चित्रपटातील काही गाणी आठवली!

वाह ! आवडले. लिहिते राहा. मुझे किसी के बदल जाने का गम नही है, बस कोई था, जिससे ये उम्मीद नही थी. -दिलीप बिरुटे (नीट घराच्या दिशेने निघालेला)

चित्रगुप्त 07/06/2024 - 13:12
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत. एक छानसा लघुपट बनवला जाऊ शकतो या कथेवर. प्रा.डाँ.नी दिलेला शेर पण चपखल.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 07/06/2024 - 19:48
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत.
+१ लहानशीच पण परिणामकारक कथा आवडलीच, फक्त मला मला मुकेश ऐवजी 'हा मैने भी प्यार किया है' चित्रपटातील काही गाणी आठवली!
लेखनविषय:
हिंदोळे आज तिचं लग्न होतं . तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं . होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ. तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं . तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील . एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती.