राधा
कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..
पण एकदा तू हे जाणलस कि,
सदैव सचैल भिजत राहशील
या महालांच्या कोलाहलात
पावा होऊन वाजत राहशील..
-शैलेंद्र
कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..
पण एकदा तू हे जाणलस कि,
सदैव सचैल भिजत राहशील
या महालांच्या कोलाहलात
पावा होऊन वाजत राहशील..
-शैलेंद्र
चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता
वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता!
चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या
सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता!
मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती
पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता!
देह विझलेले जगाची वासना जाळीत होते
चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता!
हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती...
हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता!
—सत्यजित
कोहम्
भाग 4
जर आपल्याकडे आज (किंवा भविष्यात) टाइम मशीन असेल आणि त्यात बसून जर आपण लाखभर वर्षांपूर्वीच्या पूर्व आफ्रिकेत गेलो तर आपल्याला आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवांचे अनेक समूह दिसतील, लहान लहान मुलं आईच्या कडेवर बसलेली असतील, काही मागे फिरत असतील, पुरुष शेकोटीभोवती किंवा नुकत्याच मारलेल्या शिकारीभोवती बसून तिचे वाटे करत असतील, काही तरुण तरुणी स्वतःत मश्गुल असतील तर काही वृद्ध शांतपणे हे सगळं बघत, आपलं दुखर शरीर घेऊन बाजूला बसले असतील..
[खो कथा] पोस्ट क्र. १
[खो कथा] पोस्ट क्र. २
[खो कथा] पोस्ट क्र. ३
[खो कथा] पोस्ट क्र. ४
[खो कथा भाग १ ते ४ - आतापर्यंत... आणि भाग ५]
'आज स्वाती आणि गौरवच्या घरातून खुपचं आवाज येतोय, नाही?', डोळे किलकिले करत स्वातीच्या बाल्कनीकडे बघत जोशीकाकू बोलल्या. पेपरात खुपसलेलं डोकं आणखीनच खुपसंत काका फक्त 'हुं' एवढंच म्हणाले. 'अहो नेहमीपेक्षा जास्त वाटतंय आज', नं रहावुन त्या परत बोलल्या. 'तुझं आपलं काहीतरीच असतं मला पेपर वाचू देत बऱ', पेपरचं पान बदलत काका म्हणाले. 'थांबा मी बेडरुमच्या खिडकीतून काही कळतंय का बघते.' असे म्हणत काकू बेडरूम कडे धावल्या. 'तुला फार चौकशा लागतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू नको नाक खुपसू त्यात,' काका बोलले. पण काकूंनी लक्षच नाही दिलं.
नमस्कार मिपाकरहो,
तू असतीस तर ...
अमराठी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा एकच प्रोब्लेम असतो , तुम्ही तिला मराठी कविता नाही समजाऊन सांगु शकत. भाषांतर करता येते , अगदीच नाही असं नाही, पण भाषांतराने कवितेचा आत्माच हरवुन जातो. हे म्हणजे अगदी खुप काही तरी सांगायचय पण व्यक्त करता येत नाहीये अशी काही अवस्था ! मग असं वाटतं की तुमची प्रेयसी तुमच्याकडे जणु ऑटिझम असलेल्या मुलाकडे पहावे तसे काहीसे पहात आहे अन कविता तिच्या जागी बसुन तुमच्या अगतिकतेवर गालातल्या गालात हसत आहे की काय !
स्वप्न माझे मनीच माझ्या
जीवन वाहे खळाळ सरिता
गोडी तयांची अवीट भासे
मन.. सरितेचे अबोल नाते
मनास येता भरती माझ्या
जीवन सरिता स्थब्द असे
प्रवाही जीवनाच्या संगे
मन हे वेडे धावतसे
एक स्वप्न-एक सत्य भासे मज
शब्दात वर्णू कसे किती
दोन्ही माझे मी दोघांची
मन-जीवन असे अमूर्त जरी
आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या (स्वामी संकेतानंद) मस्करीला उत्तर देताना एक मित्र कौतुक शिरोडकर याने हां शेर लिहीला होता.
माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही
मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ?
******************************************************
त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी !
रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल का हो काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल का हो काही ?
सगळे खरेच आहे खोटे न येथे कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ?
एका मग्न तळ्याला होता आठवणींचा गहिरा डोह
भौवतालच्या पर्वत रंगांना आकाश शिवण्याचा होता मोह
ह्या पर्वत रांगांच्या दरीत होते साठवणींचे कवडसे
कुठे होते तापवणारे ऊन तर, कुठे झोंबणारे गार वारे
कुठे तरी लपून बसल्या होत्या काळ्याकुट्ट रहस्यांच्या गुहा
तर कुठे होता पठारावर फिरणारा उनाड मनमोकळा स्वछंदी वारा
त्या तळ्याच्या काठून एक पायवाट भविष्यात जाणारी
तर एक होती विसाव्याची जागा क्षणभर विश्रांती देणारी
विसावा घ्यावा म्हणून जरासा त्या ठिकाणी थांबलो
न राहवून गहिऱ्या डोहाच्या पाण्यात जरा डोकावलो