मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊलखुणा....... (भाग - २)

सौरभ वैशंपायन ·

शिवा जमदाडे 04/09/2008 - 09:38
तुमचा हा अनुभव खूप आवडला आणि असे काहीतरी करावे असे वाटू लागलेय..... या गणणेसाठि सहभागी होण्यासाठी काय करावे लागते? मार्गदर्शन करावे.....

In reply to by शिवा जमदाडे

दर उन्हाळ्यात सरकार तर्फे हि गणना केली जाते. मे महिन्यात जी बुध्द पौर्णिमा असते त्याच्या साधारण एक आठवडा आधी हि गणना सुरु होते. व बुध्दपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी संपते. पौर्णिमा अश्यासाठी कि रात्री जंगल कसे असते? रात्री कोण-कोणती जनावरे पाण्यावर येतात? याचे निरीक्षण करता येते. बाकी महाराष्ट्रात सर्व अभयारण्यात या गणना होतात. तुम्हि त्यात सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सहभागी होऊ शकता.

पावसाची परी 04/09/2008 - 15:41
सौरभा छान् आहे अनुभव पण आणि त्याचे लिखाण पण याचा तरी पुढचा भाग नक्की आणि लवकरात लवकर टाक रे..... -तुझी पन्खी

मिंटी 05/09/2008 - 12:42
मस्त लिहिलं आहे............ पुढचा भाग कधी टाकणार ???????????

शिवा जमदाडे 04/09/2008 - 09:38
तुमचा हा अनुभव खूप आवडला आणि असे काहीतरी करावे असे वाटू लागलेय..... या गणणेसाठि सहभागी होण्यासाठी काय करावे लागते? मार्गदर्शन करावे.....

In reply to by शिवा जमदाडे

दर उन्हाळ्यात सरकार तर्फे हि गणना केली जाते. मे महिन्यात जी बुध्द पौर्णिमा असते त्याच्या साधारण एक आठवडा आधी हि गणना सुरु होते. व बुध्दपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी संपते. पौर्णिमा अश्यासाठी कि रात्री जंगल कसे असते? रात्री कोण-कोणती जनावरे पाण्यावर येतात? याचे निरीक्षण करता येते. बाकी महाराष्ट्रात सर्व अभयारण्यात या गणना होतात. तुम्हि त्यात सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सहभागी होऊ शकता.

पावसाची परी 04/09/2008 - 15:41
सौरभा छान् आहे अनुभव पण आणि त्याचे लिखाण पण याचा तरी पुढचा भाग नक्की आणि लवकरात लवकर टाक रे..... -तुझी पन्खी

मिंटी 05/09/2008 - 12:42
मस्त लिहिलं आहे............ पुढचा भाग कधी टाकणार ???????????
लेखनप्रकार
3

पाऊलखुणा....... (भाग - १)

सौरभ वैशंपायन ·

सुनील 01/09/2008 - 19:19
लेख आवडला. पुढील भाग येउद्यात.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला 02/09/2008 - 12:51
येउ द्यात पुढील भाग !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुरूवात तर एकदम थरारक झाली आहे,प्रत्यक्ष जंगलातले अनुभव तर किती रोमांचक असतील? पुढचा भाग लवकर येऊ दे. स्वाती

लिखाळ 02/09/2008 - 19:51
मस्त अनुभवकथन आहे.. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.. मी सुद्धा एकदा भीमाशंकरच्या रानात 'प्राणी गणनेसाठी' वनखात्याच्या योजनेमध्ये जाउन बसलो होतो ते आठवले. --लिखाळ.

खरतर आल्यावर फक्त पहिल्या ३ दिवसांचच लिखाण केलय कारण त्या ६ दिवसांत इतके अनुभव घेतले कि कोणत्या दिवशी कुठला अनुभव घेतला तेच नीटसं आठवत नव्हतं. मात्र अमुक एका दिवशी कुठला/ले प्राणी बघितले याची यादि केल्यानी त्याचा फायदा होतोय. उरलेले २-३ दिवस नीट लिहुन काढीन.

सुनील 01/09/2008 - 19:19
लेख आवडला. पुढील भाग येउद्यात.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला 02/09/2008 - 12:51
येउ द्यात पुढील भाग !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुरूवात तर एकदम थरारक झाली आहे,प्रत्यक्ष जंगलातले अनुभव तर किती रोमांचक असतील? पुढचा भाग लवकर येऊ दे. स्वाती

लिखाळ 02/09/2008 - 19:51
मस्त अनुभवकथन आहे.. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.. मी सुद्धा एकदा भीमाशंकरच्या रानात 'प्राणी गणनेसाठी' वनखात्याच्या योजनेमध्ये जाउन बसलो होतो ते आठवले. --लिखाळ.

खरतर आल्यावर फक्त पहिल्या ३ दिवसांचच लिखाण केलय कारण त्या ६ दिवसांत इतके अनुभव घेतले कि कोणत्या दिवशी कुठला अनुभव घेतला तेच नीटसं आठवत नव्हतं. मात्र अमुक एका दिवशी कुठला/ले प्राणी बघितले याची यादि केल्यानी त्याचा फायदा होतोय. उरलेले २-३ दिवस नीट लिहुन काढीन.
लेखनप्रकार
3

मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत)

विजुभाऊ ·

शिप्रा 28/08/2008 - 11:53
एक होता कार्व्हर अनुवाद :- वीणा गव्हाणकर.. हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. खुप काहि शिकण्यासार्खे आहे असे वाटले ...वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

विजुभाऊ 28/08/2008 - 12:01
कार्व्हर म्हणतो जेथे असाल तेथुन , तुमच्याकडे जे आहे ते घेउन सुरुवात करा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

विकास 29/08/2008 - 04:59
कार्व्हर म्हणतो जेथे असाल तेथुन , तुमच्याकडे जे आहे ते घेउन सुरुवात करा Start where you are, with what you have, make something of it, never be satisfied. शाळेत असताना एकदा माझ्याकडून ही वाक्ये कार्व्हर म्हणून एका कार्यक्रमात म्हणून घेतल्याचे आजही स्मरते :-)

In reply to by शिप्रा

टारझन 28/08/2008 - 18:10
लेखक माहित नाही (बहुदा सुहास शिरवाडकर) पण "दुनियादारी" एक महान महान महान कादंबरी आहे, १५ तास सलग बसून पुस्तक एका झटक्यात खाउन टाकलं .. जोष, रोमांच , करूणा, राग , मस्ती , आणि श्रुंगार .. सगळी भेळ एकदम .. आणि क्लायमॅक्स असला खतरा की ४ दिवस माणूस जेऊच नये .. जबराट ... शिरीन बर तर आपण फिदाच ... आपल्या मनातली स्वप्नकंन्या उभी राहते अशी शिरीन .. दिग्याचा आडदांड पणा .. जोश्याच्या बेन्याच्या अफलातुन क्लुप्त्या .. आणि पेरियोडिकली आपली दु:खांच्या जखमेची धपली काढणारे एम.के.श्रोत्री .... पुण्याला गेल्यावर पहिलं काम.. "दुनियादारी"च पु:नश्च पारायण ... दुनियादारीच्या लेखकाला मंतरलेले १५ तास दिल्याबद्दल लाख लाख आभार .. मला त्यांचा आदर बाटतो हे वे.सां.न.ल. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

सुहास शिरवाडकर शिरवळकर ना रे ... " नावाने आपल्याला काही फरक पडत नाही, ष्टोरी महत्त्वाची ..."असा एक रिस्पॉन्स देणार टार्‍या आता.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ 28/08/2008 - 11:53
मागील दुवा http://www.misalpav.com/node/3247 पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नंदन 28/08/2008 - 12:57
उत्तम धागा सुरु केल्याबद्दल अभिनंदन, विजुभाऊ. आवडणार्‍या पुस्तकांतून एकाच पुस्तकाबद्दल लिहायचे म्हणजे कठीण काम आहे, तेव्हा नुकतेच वाचलेल्या आणि आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल लिहितो. टोनी मॉरिसन ह्या नोबेल पुरस्कारप्राप्त कृष्णवर्णीय लेखिकेची 'बिलव्हेड' ही कादंबरी. गुलामगिरीतून निसटून नवीन आयुष्य सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेथ ह्या स्त्रीची कथा. आता गुलामी, पददलित वर्ग, कृष्णवर्णीय यांच्याबद्दलची कादंबरी म्हटली की अन्यायाचा पाढा वाचणारी, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी मुख्य व्यक्तिरेखेने कशी धडपड केली किंवा जशी परिस्थिती आहे, तशी निमूटपणे कशी स्वीकारली इ. ढोबळ, नेहमीच्या यशस्वी कथानकांच्या साच्यात ही कादंबरी बसत नाही. एक व्यक्ती आणि अबोध वयातील मुलीला वाढवणारी एकटी आई हा सेथचा पैलू प्रथम समोर येतो. अर्थात, गुलामीतून ती नुकतीच सुटून आली असल्याने त्याचे संदर्भ येत राहतातच. पण ते अगदी छोट्या, छोट्या जीवघेण्या वाक्यांतून. गुलामगिरीबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी स्त्रियांच्या झालेल्या हिंसक शारीरिक शोषणाबद्दल विशेष काही लिहिले गेले नव्हते. फ्लॅशबॅकसदृश्य संवादांच्या तंत्रातून त्याचे उल्लेख मग हळूहळू येत राहतात. काहीशा त्रयस्थ पण पूर्णत: अलिप्त नाही अशा संयत पण परिणामकारक भाषाशैलीत. (लताबाईंची दु:खी गाणी जशी ओथंबून न जाता, संयत स्वरांत त्यांचा परिणाम साधतात तशी 'शुभ्र काही जीवघेणे' शैली) गुलामीतून सुटले तरी स्वतंत्र जीवन जगण्यासाठी जी ताकद, जी मूल्ये लागतात; तीच या पहिल्या पिढीत कोळपून गेली होती - आणि त्यामुळे जो गोंधळलेपणा आला त्याचंही चित्रण या कादंबरीत येतं. आईनेच पोटच्या पोरीचा जीव घ्यावा अशी आलेली परिस्थिती. त्यातून आलेला अपराधीपणा आणि दहा-पंधरा वर्षांनी तिच्याच नावाची (बिलव्हेड), तिच्याच ठेवणीची मुलगी घरी परतल्यावर सेथला आणि तिच्या मुलीला झालेला आनंद. अतींद्रिय शक्ती आहे की जवळच्या एका गावातून अत्याचारांना कंटाळून पळून आलेली मुलगी याचं गूढ. तिच्या परतण्याने सेथच्या अपराधीपणाला मिळालेलं खतपाणी आणि त्याची भरपाई करण्यासाठी स्वतःची, घरादाराची राखरांगोळी झाली तरी तमा न बाळगणारं तिचं मातृत्व. धाकट्या डेनव्हरच्या जन्माची कहाणी. कुमार वयात आलेल्या, घरात एकटी पडलेल्या मुलीचं कुढणं आणि बिलव्हेड आल्यावर तिला हक्काची मैत्रीण, बहीण मिळाल्याचा झालेला आनंद. फक्त तीन-एकशे पानात अतिशय प्रभावीपणे ह्या सार्‍या थीम्स ही कादंबरी सामावून घेते. सेथच्या आयुष्यापासून ते एकंदरीत गुलामगिरीपर्यंत, भोवतालच्या निसर्गाच्या वर्णनांपासून अमानवी शक्तींपर्यंत, नृशंस क्रौर्यापासून ते अपरंपार, सर्वस्व ओवाळून टाकणार्‍या प्रेमापर्यंत - अशा वैयक्तिक-वैश्विक, मानवी-अमानवी, माणसाच्या भावनांचं एक टोक ते दुसरं टोक अशा थीम्स या कादंबरीत सहजपणे, (मुद्दाम परस्परविरोधी गोष्टींची सांगड घातली गेली पाहिजे ह्या) अभिनिवेशाशिवाय येतात, हे कादंबरीच्या वाचनीयतेचं आणि लोकप्रियतेचं मुख्य कारण असावं. टीप - ज्या मार्गरेट गार्नरवर सेथची व्यक्तिरेखा बेतली आहे, तिच्याबद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

ऋषिकेश 28/08/2008 - 14:03
अपेक्षेप्रमाणे उत्तम विस्तृत प्रतिसाद :) तुमच्या प्रतिसादाची उत्सुकतेपोटी वाटच पाहत होतो.. ही कादंबरी वाचली नाहि पण आता वाचेन. तुझे मराठी आवडते पुस्तक? (बाकी कर्णाने आणि धनंजयने सर्वात आवडते पुस्तक सांगितले का?) स्वगतः स्वतः सांग आधी मग चौकशा कर -('मिसळ'लेला) ऋषिकेश

लिखाळ 28/08/2008 - 17:12
नमस्कार ! मला अनेक पुस्तके आवडली आहेत. त्यांबद्दल सवडिने लिहिनच..पण..पण मी ४थी इयत्तेत असताना आम्हाला असलेले इतिहासाचे पाठ्यपुस्तक मला फार आवडायचे. त्यात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास होता. मी तेव्हा सातारच्या एका शाळेत शिकायचो. तो जुना वाडा होता. शिसवी तुळया, लिंपलेल्या भींती महिरपी आकाराच्या खिडक्या इत्यादी. एकदम शिवकाळात गेल्यासारखेच वाटायचे. आसपास सज्जनगड, अजिंक्यतारा वाहवा ! समर्थ, शिवाजी यांनी भारलेले वातावरण आणि त्यात शिवाजीचाच इतिहास पुस्तकात. मी त्यात फार रमुन जायचो. (पुस्तकाच्या शेवटी असलेले जींजीवर स्वारी, सागरी किल्ले ही प्रकरणे मात्र फारशी आवडायची नाहित. कारण त्या वातावरणाशी कधी ओळख झाली नव्हती.) -- (मावळा) लिखाळ.

विजुभाऊ 28/08/2008 - 17:15
सिद्ध योगी : डॉ निषिकान्त श्रोत्री लोम्ब्संग राम्पा च्या थर्ड आय डॉक्टर फ्रॉम तिबेट आणि स्टोरी ऑफ अ लामा या तीन अद्भूत पुस्तकांचा समग्र सारांश पुस्तकात अनेक चमत्कार आहेत एक लामा जो उत्तम ऑटोमोबाईल इन्जीनीअर आहे. पायलट आहे सर्जन आहे आणि लामा ही आहे त्याच्या गुरुनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन दिव्य दृष्टी दिली ( तिसरा डोळा) ज्या योगे तो मॅग्नेटीक फिल्ड सुद्धा डोळ्यानी पाहु शकायचा. असे अनेक प्रसंग यात आहेत त्याने देहांतर ही केले होते असे पुस्तकात आहे. यातील माहिती खरी / खोटी हे ईंग्रजीतही वादग्रस्त आहे तरीपण एक वेगळे लिखाण म्हणुन वाचनीय आहे अधीक माहिती http://www.lobsangrampa.net/lobsang_rampa.html आणि इथे उपलब्ध http://www.lobsangrampa.net/rampa_books/thirdeye.doc पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by दत्ता काळे

विजुभाऊ 29/08/2008 - 09:39
चीपर बाय डझन : मूळ लेखक फ्रॅन्क बंकर गिल्ब्रेथ आणि ऍन गिल्ब्रेथ या पुस्तकाचा पुढचा भाग "बेलीज ऑन देअर टोज" यात त्या १२ मुलांच्या आईने मुलांच्या वडिलांच्या पश्चात १२ मुलांचा सांभाळ कसा केला. एक स्त्री म्हणुन तीला व्ययसाय करताना आलेल्या अडचणी याबद्दल लिहिलेले आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

जनोबा रेगे 28/08/2008 - 19:44
आमची आवडती पुस्तके- रुस्तूमची विजार हास गे ग॑गू तुटलेली नाडी शरदकुमार नावाचा बोका फोर्ट केम बट लायन वेन्ट रक्ताची गुळणी उ॑बरवाडीचा उमाजी

लिखाळ 28/08/2008 - 20:16
मिपावर अधुनमधुन खलिल जिब्रानचा उल्लेख होत असतो. त्यावरुन आठवले म्हणून लिहितो. वि स खांडेकरांनी अनुवाद केलेले जिब्रानचे वेचे 'सुवर्णकण' या नावाच्या पुस्तकात आहेत. पुस्तक चांगले आहे. ते अनुवाद काहिंना आवडतात काहिंना नाही. पण जिब्रानची मराठिमधून ओळख होते ते उत्तमच आहे. पुणे मराठी ग्रंथालयातून मी हे छोटे पुस्तक आणुन वाचले होते. आपल्याला जिब्रानबद्दल मराठीमध्ये उपल्ब्ध साहित्य माहित असल्यास कृपया सांगावे. -- (मित्र) लिखाळ.

In reply to by लिखाळ

रामदास 29/08/2008 - 14:06
कालच मला खलील जिब्रानचं प्रॉफेट नावाचं पुस्तक कोकणीत मिळालं. बा.भ. बोरकारांनी भाषांतर केलं आहे. १९७३ साली जाग प्रकाशनाने आनलेले हे पुस्तक चार रुपये छापील किमतीचं होतं. पादगावकरांचे भटके पक्षी आणि प्रॉफेट एकूण खरेदी रुपये वीस फक्त.

धनंजय 29/08/2008 - 02:41
माझे "ऑल टाइम फेव्हरिट" लहानपणापासून आतापर्यंत - लुइस कॅरॉलचे "थ्रू द लुकिंग ग्लास" ("आरशातून पार जाता" या अर्थी). लहान मुलामुलींना आवडेल, कल्पनाविलासी, शब्दांशी स्वच्छंद बागडत खेळ करणारे, पण तितकेच तर्कशुद्ध, मोठ्यांनाही आवडेल, असे हे पुस्तक आहे. ("ऍलिस इन वंडरलँड"चा हा पुढचा भाग आहे.) "निरर्थक" शब्दांशी खेळून तरी काही धूसर चित्र डोळ्यासमोर उभे राहाते, अशी एक कविता त्यात प्रसिद्ध आहे. 'Twas brillig and the slithy toves Did gyre and gimble in the wabe All mimsy were the borogoves And the mome raths outgrabe. अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो. भंपक सल्लाबाजीच्या कवितांची विडंबने उच्च प्रतीची आहेत. पण ही विडंबने केवळ "ट ला ट री ला री" नसून त्या भंपकपणाविरुद्ध खरीखरची टीका आहे. इसाक वॉट्स याच्या "How doth the little busy bee" या "आळस नका करू, कामाला लागा" कवितेचे (ऍलिस इन वंडरलँड मधले) "How doth the little crocodile" हे विडंबन त्या मूळ प्रचारकी कवितेपेक्षा आता अधिक प्रसिद्ध आहे. असेच "पांढर्‍या शिलेदाराचे गाणे" थ्रू द लुकिंग ग्लासमध्ये आहेत. (वरील एक-दोन कडव्यांच्या कविता चुटकीसरशी वाचून होतील म्हणून त्यांचे दुवे दिले आहेत.) अनेक तर्कदुष्ट आणि तर्कशुद्ध युक्तिवादांची भन्नाट आणि विनोदी उदाहरणे कथाप्रसंगांत आलेली आहेत. हे विनोदी संवाद या प्रतिभावंत गणितज्ञ-साहित्यिकालाच स्फुरोत. यातून हसत-अक्षरशः-खिदळत जर तर्कशास्त्राचे बाळकडू मिळाले तर काय वाईट? --- मराठी साहित्याचे माझे हवे तेवढे वाचन नाही. पण "ययाति आणि देवयानी" नाटकाची संहिता कित्येकदा वाचलेली आहे. आधुनिक विचारसरणीत देवयानीच्या मनाचा वेध घेतानाही पौराणिक कथा आहे असेच वाटते, कुठेच मिश्रणाच्या कालबाह्यतेमुळे रसभंग होत नाही. प्रत्यक्षात थेटरात मी अगदी लहानपणी हे नाटक एकदाच पाहिले आहे. (माझ्या मते ४-५ वर्षांचा होतो. गोव्यात नारळाच्या झावळ्यांचे थेटर...) पण ही कमालीची प्रगल्भ कथा मुळीच समजली नव्हती - कशी समजणार? हल्ली "तुझं आहे तुजपाशी"चे विसावे पारायण करतो आहे. कथा म्हणून आधीच प्रिय आहे. पण घट्ट विणलेले संवाद, "नैसर्गिक" वाटतानाही प्रत्येक संवादातून कथावस्तू पुढे जाते (एकही वाक्य वायफळ "टाकलेले" नाही) - प्रत्येकवेळी थक्क होतो.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 29/08/2008 - 03:12
धनंजय ने "जॅबरवॉकी" या ऍलिसमधील प्रसिद्ध कवितेचा उल्लेख केला आहे. धनंजय म्हणतात , "अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो. " मूळ कविता आणि या अतिशय कठीण कवितेचा माझ्या एका महान मित्राने केलेला अनुवाद पहा. या मित्रापुढे मी लोटांगण घालायचा बाकी होतो ! मित्र म्हणतो : When a nonsensical poem is translated, there can be paradoxically even more dimensions of translation than one might expect. . मूळ शीर्षक : jabberwocky `Twas brillig, and the slithy toves Did gyre and gimble in the wabe: All mimsy were the borogoves, And the mome raths outgrabe. "Beware the Jabberwock, my son! The jaws that bite, the claws that catch! Beware the Jubjub bird, and shun The frumious Bandersnatch!" He took his vorpal sword in hand: Long time the manxome foe he sought -- So rested he by the Tumtum tree, And stood awhile in thought. And, as in uffish thought he stood, The Jabberwock, with eyes of flame, Came whiffling through the tulgey wood, And burbled as it came! One, two! One, two! And through and through The vorpal blade went snicker-snack! He left it dead, and with its head He went galumphing back. "And, has thou slain the Jabberwock? Come to my arms, my beamish boy! O frabjous day! Callooh! Callay!' He chortled in his joy. `Twas brillig, and the slithy toves Did gyre and gimble in the wabe; All mimsy were the borogoves, And the mome raths outgrabe. जबडोबा प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती. बाळा! भि‍उनी जबडोबाच्या दात-नखांना सांभाळा जबजब पक्षी मक्कड कुक्षी मागे असती, पळा! पळा! नायक तलवारीला हलवे शत्रू फारा दिवसांचा तमझाडाच्या खाली बसुनी विचार करितो क्षणिकाचा. तितुक्या वेळी भडकत डोळे कडकत जबडोबा आला सरकत झाडीमधुनी घुसला, बुडबुड तोंडी करी साला. असा हाणला! तसा मारला! घावाने केले तुकडे! जबडोबाचे डोके घे‍उनी नायक परते घराकडे. "जबडोबाची मात जाहली का रे माझ्या प्रिय पोरा? शुभ दिन आला! तमस निघाला!" आनंदी हसती जोरा. प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 29/08/2008 - 03:32
आपल्या ह्या महान मित्रापुढे मी इथूनच लोटांगण घालतो. धन्य हो ! ता. क. लुईस कॅरोल, म्हणजेच चार्ल्स डॉजसन हा एक गणितज्ञ होता. अधिक माहितीसाठी , विकीपीडिया. http://en.wikipedia.org/wiki/Lewis_Carroll ज्यांनी डॉन नुथ चे "आर्ट ऑफ प्रोग्रामिंग" वाचले आहे, त्यांना लुईस कॅरोलचा परिचय आहेच. ज्यांनी आर्ट ऑफ प्रोग्रामिंग वाचलेले नाही, त्यांना संगणक शास्त्र कळलेले नाही. त्यामुळे, संगणक शास्त्र कळणार्‍या सर्वांना लुईस कॅरोल परिचित आहेच. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

ऋषिकेश 29/08/2008 - 09:55
आपल्या ह्या महान मित्रापुढे मी इथूनच लोटांगण घालतो. धन्य हो !
असेच म्हणतो -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by कोलबेर

पाषाणभेद 08/07/2009 - 09:53
आमचेही लोटांगण. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विकास 29/08/2008 - 05:19
मला सर्वात जास्त पुस्तक आवडते अशातला भाग नाही पण एखाद्या मूड मध्ये वाचलेले आणि भावलेले पुस्तक कायम आवडते झाले असे कुठे तरी वाटते. (तेच गाण्याचे आहे) - ज्यांची नावे वर आली नाहीत ती पुस्तके देत आहे:
  1. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे
  2. ययाती - वि. स. खांडेकर (हे लगेच लिहायचे कारण असे, की हे पुस्तक मला जेंव्हा वाचले तेंव्हा खूप आवडले, नंतर अनेक वर्षांनी वर उल्लेखलेले पुस्तक आणि त्यावर केलेली दुर्गा भागवतांची टिका वाचली आणि मग कळले त्यातील बरेचसे संदर्भ आपल्याल समजलेच नव्हते. अर्थात तेंव्हा मी शाळेत होतो...)
  3. लोकमान्य टिळकांच्या आठवणी - यात अनेकांनी (शंभराच्या वर) ज्यांची नावे पण माहीत नाहीत अशांपासून ते जिन्हा, म. गांधी आणि ज्यांनी त्यांना असंतोषाचे जनक म्हणले त्या चिरोलच्या आठवणी आहेत - वाचताना हा माणूस काय "ग्रेट" होता हे समजले - नुसताच फोलफटांवर भांडलेला, चांदण्या गोळा करणारा आणि एखादी अजरामर घोषणा देणारा (स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...) इतकेच काही त्याचे वर्णन होऊ शकत नाही ते समजले.
  4. समाधीवरील अश्रू - आचार्य अत्र्यांनी लिहीलेल्या मृत्यूलेखांचा संग्रह
  5. उरलंसुरलं - पुल (बाकी पुस्तके आधी वर/मागच्या धाग्यात आली आहेत)
  6. कृष्णपर्व - दुर्गा भागवत
काही आत्ता वाचत असलेली / वाचलेली इंग्रजी पुस्तके: जी खूप नाही पण बर्‍यापेकी चांगली वाटली
  • ऍल गोअरचे - ऍन ऍसॉल्ट ऑन रीझन
  • क्लिंटनचे - गिव्हींग (जरा पकाऊ पुस्तक आहे, तरी देखील वाचण्या सारखे आहे)
  • सुब्रम्हण्यम स्वामींचे - हिंदूज अंडर सिज (आत्ताच प्रकाशीत झाले आहे). - माहीती चांगली आहे. राजकारण्यापेक्षा, हार्वर्ड स्कॉलरचे ते जास्त वाटले (याचा अर्थ १००% ग्राह्य होते असा नाही ;) )
अजून जशी आठवतील तशी...

विजुभाऊ 29/08/2008 - 12:54
स्थलांतरःएका कारखान्याचे दामले हे लेखक लेखाकाने घेतलेली एक असाईनमेन्ट एका अवाढव्य स्टील प्लान्ट चे सम्पूर्ण स्थलांतर तेही पूर्व जर्मनीमधुन भारतामध्ये. लेखक हा त्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे प्रोजेक्ट को ओर्डीनेटर म्हणुन जातो.प्रोजेक्ट्सम्पेपर्यन्त त्याला आलेले लोकांचे अनुभव यात आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बबलु 29/08/2008 - 13:43
पॅपिलॉन -- मूळ लेखक: (खुद्द) हेन्री शॅरीअर (फ्रेंच). सत्यघटनेवर. अनुवादः (बहुदा रविंद्र गुर्जर). जबरी पुस्तक. हेन्रीला न केलेल्या गुन्ह्यासाठी फ्रेंच गयाना तुरूंगात जन्मठेप (काळ्या पाण्याची शिक्षा). टोकाचं Torture. हेन्री प्रचंड अशावादी. कोणीही कधीही न केलेला प्रयत्न करायचा ठरवतो. फ्रेंच गयाना मधून पळायचं. पण कसं ? अति-धाडसी निर्णय. कोणाची साथ नाही. टोकाचा Strong माणूस. पळायच्या अभ्यासाला सुरुवात. कसं पळायचं ? कसं पळायचं ? ६ वेळा पळायचे अयशस्वी प्रयत्न. प्रत्येक वेळेस दुप्पट Torture. बंद dark-cell मध्ये एकटाच कैद. पण निर्णयावर ठाम गडी. मानलं या माणसाला !! प्रत्येक पलायनाच्या वेळेस innovative ideas. ७ व्या वेळी यशस्वी पलायन..... पाठलाग.... पळतोय..... पळतोय..... एका देशातून.... दुसर्या देशात...... अनंत अडचणी. मधे भेटणारे अनेक लोक. कोणी चांगले... कोणी वाईट. शेवटी यशस्वी exile... व्हेनेझुएला मधे. अप्रतिम पुस्तक. २ दिवस.... २ रात्री बसून खाल्लं होतं. Highly Recommended.... जरूर वाचा. ....बबलु-अमेरिकन

In reply to by बबलु

असेच म्हणतो. मी देखील पॅपिलॉनची पारायणे केली आहेत, अजुनही करतोय. या पुस्तकाचा पुढचा भागही आला होता "बँको" या नावाने. त्यात यशस्वी पलायनानंतर लेखकाच्या बहुदा झांबियामधील पुनर्वसनाच्या प्रयत्नाचे अफलातुन चित्रण होते. अनुवादः रविंद्र गुर्जर डेझर्टर : लेखक गंथर बान्हमान. एक नाझी वॉर कुरिअर पर्सन. हिटलर आणि रोमेलच्या कृर आणि नितीशुन्य युद्धनीतीने सामान्य सैनिकांची झालेली ससेहोलपट आणि त्यामुळे ऐन युद्धतळावरुन पळ काढुन जीवनाच्या शोधात निघालेल्या साहसी माणसाची सत्यकथा. अतिषय रोमांचकारी आणि तितकीच भावुक करणारी देखील. अनुवादः विजय देवधर सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

ऋषिकेश 29/08/2008 - 14:05
मला आवडलेले एकच पुस्तक देता येणे अशक्य आहे. पण वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकातील आवडती पुस्तके सांगू शकतो बालकथा: मराठी: फास्टर फेणे: या पुस्तकमालिकेने माझं बालपणच बदलुन टाकलं. बाकी या विषयी अधिक काहि लिहायची गरज नाहिए :) आणि लंपनची तीनही पुस्तके हे पुस्तक मोठं झाल्यावर वाचनात आलं पण प्रचंड आवडलं. या दोन्ही पुस्तकांत निवड करणं कठीण आहे म्हणून दोन्ही दिली आहेत. इंग्रजी: अर्थात,हॅरी पॉटर: बाकी अनेक पुस्तके आवडली पण हॅरीभाऊने जी जादू केली कशानेच नाहि. भाषांतरीतः भा.रा.भागवतांनी भाषांतर केलेल्या ज्युल व्हर्न च्या कादंबर्‍या: अनेक वर्षांपूर्वी जेव्हा माणसाने कल्पनाही केली नसेल अश्या कल्पनांवरची ही पुस्तके बाळगोपाळांना नकळत भरपूर माहिती देऊन जातात. ऐतिहासिक छावा: मी वाचलेली पहिली ऐतिहासीक कादंबरी. त्यानंतर त्याहून छान कादंबर्‍या अनेक वाचल्या पण छावा जी आवडून गेली तीतके कोणतेही नाहि. आत्मचरित्र इंग्रजी: माय एक्सपरिमेंटस विथ ट्रुथ (इंग्रजी भाषांतर): महात्मा गांधींनी महात्मा होण्यापूर्वीची कथा ज्या प्रामाणिकपणे लिहिली आहे की हा माणूस महात्माच आहे हे पटावं (कोणाला वाचायची इच्छा असल्यास माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे) मराठी: असामी असामी: यावर मी पामर काय लिहिणार विज्ञान कथा प्रेषकः (जयंत नारळीकर): परग्रहावरून आलेल्या व्यक्तीच्या जीवनकहाणीने मी लहानपणी भारावलो होतोच अजूनही होतो वैज्ञानिक पुस्तक आकाशाशी जडले नाते: खगोलशास्त्राचा मराठी भाषेत सांगोपांग परिचय करून देणारे पुस्तक प्रत्येक खगोल प्रेमीच्या संग्रही असावे असे. सामाजिक अविरत: समाजातील विविध थोर परंतू प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून अविरत कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा आणि व्यक्तींचा उत्तम परिचय. प्रवासवर्णन पूर्वरंगः तसं तर पुलंची तिनही वर्णनं झकास आहेतच पण त्यातही पुर्वरंग जमून गेलंय असं माझं मत आहे भाषांतरीत कादंबरी पॉपिलॉनः ८ वेळा उडू पाहणार्‍या फुलपाखराची (कैद्याची) कथा ;) कादंबरी आणि कविता संग्रह इथे मोठी यादी आहे . तरीही या धाग्यात टाकु का? :) असो. इथेच थांबतो -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

घाटावरचे भट 29/08/2008 - 14:26
विज्ञान कथा प्रेषकः (जयंत नारळीकर): परग्रहावरून आलेल्या व्यक्तीच्या जीवनकहाणीने मी लहानपणी भारावलो होतोच अजूनही होतो तुम्हाला 'प्रेषित' म्हणायचंय काय? प्रेषित लैच भारी पुस्तक आहे.... तसंच त्यांची 'व्हायरस' आणि 'वामन परत न आला' ही पुस्तकं पण उत्तम आहेत.... विशेषतः 'व्हायरस'मधली रेडिओ दुर्बिणीचा वापर करुन व्हायरस पाठवण्याची परग्रहवासीयांची क्लुप्ती तर लाजवाबच.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

In reply to by ऋषिकेश

सागर 10/07/2009 - 12:22
बरोब्बर बोललास ऋषिकेशा, प्रेषित बरोबरच अभयारण्य, व्हायरस,वामन परत न आला ह्या कादंबर्‍या आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत जयंत नारळीकरांनी विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबरी ह्या साहित्यप्रकाराला एक सन्मान मिळवून दिलेला आहे यात शंकाच नाही. नारळीकरांची बहुतेक सर्व विज्ञानपुस्तके माझ्या संग्रही आहेत :) (विज्ञानप्रेमी) सागर

राघव१ 29/08/2008 - 15:18
आवडलेली पुस्तके अनेक आहेत. एकाबद्दलच लिहायचे म्हणजे जरा कठीणच काम आहे. प्रत्येक पुस्तकाबद्दल एक वेगळा प्रतिसाद लिहावा लागेल मग!! ;) मूळ पुस्तकः लेस मिझरेबल्स (फ्रेंच) मूळ लेखकः विक्टर ह्यूगो अनुवादः दु:ख पर्वताएवढे अनुवादकः श्री. भा. रा. भागवत फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळावर बेतलेली ही कादंबरी आहे. जिऑ वालजॉ या, एका सामान्य पण आत्यंतिक शारीरिक ताकद असलेल्या, माणसाची ही कथा आहे. अगदी साध्या अपराधासाठी त्याला तुरुंगात जावं लागतं, १९ वर्ष तुरुंगात काढल्यावर त्याला पॅरोल वर सोडण्यात येतं. शेवटपर्यंत त्याच्या भोवती कथा फिरत असते. त्याच्यातल्या गुन्हेगाराचे होणारे परिवर्तन अन् त्या ६-७ वर्षांच्या अनाथ असहाय पोरीच्या प्रेमासाठी सर्व करायची त्याची आकांक्षा, याचे इतके सुरेख वर्णन दिसून येते ना की वडील-मुलगी या नात्याचे असले नसलेले सगळे पदर उलगडलेले दिसून येतात. अगदी ती मोठी झाल्यावर तिला कोणी मुलगा आवडतोय, ती त्याच्यावर प्रेम करतेय, आपल्यावर तिचे असलेल्या प्रेमात आता कुणीतरी वाटेकरी येणार हे बघितल्यावर होणारी जिऑची घालमेल सुद्धा आपल्याला आवडून जाते. कादंबरीचा शेवट म्हणजे तर इतका अप्रतीम आहे की ज्याचे नाव ते!! कथानकाच्या ओघात येणारी काही मुख्य पात्रे जसे फान्तिन, जॅव्हेर, कोसेत, मारियुस, गॅव्हरोश (हे १०-१२ वर्षांचे पोर आपल्याला वेड लावून जाते!), तेनार्दिये (नवरा-बायको); असली अप्रतीम कथा सादर करतात की ही एक काल्पनीक कथा आहे असे कधी आपल्याला जाणवत सुद्धा नाही. विक्टर ह्युगो अन् श्री. भागवतांविषयी मी अज्ञ काय बोलणार? निव्वळ अप्रतीम कलाकृती असेच या पुस्तकाचे वर्णन करता येईल. संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक. मी हा अनुवाद प्रथम श्रीरामकृष्ण मठाच्या ग्रंथालयात वाचलेले. आजपर्यंत खूप प्रयत्न केलेत पण हे पुस्तक विकत नाही मिळाले. बहुदा प्रकाशनात नाहीये आता ते. :( असो. कुणास काही माहिती मिळाली या पुस्तकाबद्दल तर जरूर सांगावी. बाकी पुस्तकांबद्दल नवीन प्रतिसाद लिहिनच! :) राघव

आपला उपक्रम फारच सुंदर आहे. माझ्या सध्याच्या वाचनातील आवडते पुस्तक----चकवाचांदणे.--लेखक-मारुतिचितमपल्ली अत्यंत ओघवती,प्रासादिक भाषा,वन्य जीवनातील बारीक-सारीक तपशील टिपले आहेत.सर्व स्वानुभवातून लिहीलेले असल्यामुळे अधिकच वाचनीय झाले आहे.मराठीत वन्यजीवनावर त्यामानाने फारच मोजकी पुस्तके उपलब्ध आहेत.त्यामुळेही अधिकच वाचनीय.साधी, सोपी भाषा त्यामुळे कुठेही रटाळपणा येत नाही.

कार्यरत (अनिल अवचट, मॅजेस्टीक) एक उत्तम पुस्तक आहे. त्यामुळे खालील थोर व्यक्ती॑च्या अप्रसिद्ध कार्याची माहीती झाली अभय ब॑ग व राणी ब॑ग डॉ. हिम्मतराव बावस्कर (या॑चे आत्मचरित्रही अतिशय वाचनीय आहे) अरूण देशपा॑डे सुरेखा चव्हाण हिरेमठ अवचटा॑चे 'माणस॑' अस॑च अ॑गावर काटा आणणारे पुस्तक आहे.

भाग्यश्री 29/08/2008 - 22:33
द गोल - Eliyahu M. Goldratt. थोडक्यात कथा अशी, एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट जो अजिबातच नफा करत नसतो.. नफा कसला, प्रत्येक शिपमेंट किमान ४० आठवडे लांबलेली..! खरंतर तसं सगळं व्यवस्थित चालू आहे.. पण तरीही शिपमेंट उशीराच.. कधी हवे ते मटेरिअल उपलब्ध नाही,तर कधी नको असलेल्या मटेरिअल्स्चा ढीग होतोय! थोडक्यात गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत.. त्यातच त्या प्लॅन्ट मॅनेजरला डेडलाईन मिळते.. ३ महीन्यात काही सुधारणा नाही दिसल्या तर प्लॅन्ट बंद होणार.. एखादा माणूस असता तर सरळ, नवीन जॉब शोधून गप्प बसला असता.. पण मग तो नायक कसला? अलेक्स असं नाही करत.. तो मनापासून अगदी सर्व पणाला लावून तो प्लॅन्ट नफा कसा देईल याचा विचार करतो.. काय चुका होत आहेत.. त्या कशा सुधारता येतील वगैरे.. तो, त्याची टीम आणि अलेक्सचा फीजिक्सचा प्रोफ. जोआन.. ही मेन लोकं या पुस्तकातली.. जोआन प्रश्न विचारणार, काही बेसीक गोष्टी सांगणार.. पण डीरेक्ट प्रश्नाचं उत्तर कधीच नाही देणार.. अलेक्सला विचार करायला लावणार.. अलेक्सदेखील ज्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतो..(मुलाच्या कॅम्पिंग मधे) ते सर्व अफलातून आहे! वाचलीच पाहीजे ती थॉट प्रोसेस! पुस्तकात शेवटी काय होतं ते महत्वाचं नाही.. नायक आहे म्हटल्यावर तो यशस्वी होणारच.. पण कसा? त्या मागे त्याने काय कष्ट घेतले.. कसा विचार केला.. हे महत्वाचे.. सगळ्यात महत्वाची ऍटीट्युड! ’नमस्ते लंडन’ मधे अक्षयकुमार म्हणतो तसं, जोपर्यंत तुम्ही खरंच हरत नाही तो पर्यंत तुम्ही जिंकू शकता.. अगदी हेच विचार यात मांडले आहेत.. चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच! प्रेरणादायी पुस्तक !! -भाग्यश्री http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

मैत्र 30/08/2008 - 05:11
खुपच सुंदर पुस्तक तुम्ही मांडलं आहे गोल हे माझंही अतिशय आवडतं पुस्तक आहे ज्यामुळे मी या क्षेत्राकडे -मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग कडे जास्त आकर्षित झालो. पण हे पुस्तक ज्याला सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणतात त्या प्रकारातलं नाही. चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच! प्रेरणादायी पुस्तक !! हे सर्व या पुस्तकाची एक बाजू किंवा मूळ विषयापलिकडच्या काही चांगल्या गोष्टी आणि कथेचा भाग आहे. एक पुस्तक किंवा कथा म्हणून उत्तम आहे. पण तो त्याचा गाभा नाही असं मला वाटतं.. ज्याला बिझनेस नॉव्हेल म्हणतात त्या प्रकारातलं हे पुस्तक आहे गोल्डरॅट ची पुढे प्रसिद्ध झालेल्या थिअरी ऑफ कंस्ट्रेंट्स चं हे मूळ कथाबीज आहे.तसं या आधी द रेस ही लिहिलं होतं पण असं कादंबरीच्या स्वरुपात प्रथम गोल आलं ... अतिशय उत्तम तर्‍हेने उलगडत जाणारी कथा, वैयक्तिक आणि व्यावसायिक संकटं अशी एकदम रिअऍलिस्टिक परिस्थिती आणि जोनाच्या क्लूज वर मार्ग काढत जाणारी ऍलेक्स ची टीम. याचे दोन सिक्वेल आहेत इट्स नॉट लक आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठीचं क्रिटीकल चेन. बॉटलनेक्स शोधून त्यावर उपाय करणं ही थिअरी आणि परंपरागत कॉस्टिंग ला विरोध किंवा त्याच्या मर्यादा हा या पुस्तकाचा इसेंस आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाने वाचावं असं आहेच पण जसं भाग्यश्रीने म्हटलं आहे त्याप्रमाणे त्या जिद्दी साठी आणि चिकाटिसाठी सर्वांनी वाचावं. जाता जाता: एलि गोल्डरॅट हा स्वतः इस्रायली आहे त्यामुळे जोनाह हा गुरू सर्व पुस्तकांमध्य इस्रायली ज्यू आहे :) खुप जास्त प्रमाणात इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व.

In reply to by मैत्र

भाग्यश्री 30/08/2008 - 05:25
अरे वा, अजुन एक गोल फॅन सापडला याबद्द्ल सहीच वाटलं! तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. हे पुस्तक काही यु कॅन विन वगैरेच्या कॅटॅगरीतलं नाहीय.. अजुन खूप काही आहे.. मला खरंच ते मांडता नाही आलं.. मी त्या क्षेत्रातलीही नाही आहे, त्यामुळे अजुन मर्यादा येतात मांडणीवर.. पण त्या क्षेत्रातली नसूनही ते पुस्तक तेव्हढा इंटरेस्ट निर्माण करतं, शब्द,संज्ञा माहीत नसताना आपण ते वाचतच जातो, त्या थॉट प्रोसेस मधे गुंतून पडतो ते सर्व विलक्षण आहे. मी ५-६ वर्षापूर्वी वाचली ही नॉव्हेल, तेव्हा मला विशेष कळलंही नसेल कदाचित.. पण काहीतरी जबरदस्त वाचल्या सारखे वाटले.. तेव्हापासून पारायणं करते मी.. दरवेळेस काहीतरी नवीन हाताला लागतं! तुम्ही दिलेली माहीती , ठाऊक नव्हती.. ती ही पुस्तकं आणून वाचेन आता.. धन्यवाद!

In reply to by भाग्यश्री

विजुभाऊ 30/08/2008 - 16:42
मला कोणताही प्रोजेक्ट मॅनेज करताना इलियाहु भाऊची जेवढे मदत होते तेवढी इतर कशाचीच होत नाही. द गोल भाग १ आणि २ तसेच क्रीटीकल चेन ही पुस्तके नेहमी जवळ ठेवतो. एका सी ए ने मला ही पुस्तके वाचायला सांगितली. ऍक्ट्व्हीटी बेस्ड कॉस्टिंग साठी ही पुस्तके वाच म्हणुन. पण एकुणच या पुस्तकानी माझे बिझनेस प्रोसेस समजुन घेण्यासाठीचे ज्ञान अद्ययावत केले. इल्लियाहु ची इतर पुस्तकेही बेष्टच पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आजानुकर्ण 30/08/2008 - 00:12
माझे एकमेव आवडते विचाराल तर - पिंगळावेळ सध्या कामात त्यामुळे अधिक लिहिता येत नाही :(. आपला, (जीएप्रेमी) आजानुकर्ण

देवदत्त 30/08/2008 - 17:10
पार्टनर (व. पु. काळे) पार्टनर ही व्यक्तिरेखा, त्यातील विचार भावले. एका बैठकीत (मध्ये जेवणाची वेळ सोडून) पूर्ण पुस्तक वाचून काढले. आणखी ही आहेत, जसे असा मी असामी, अघळपघळ. बाकी नंतर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 01/09/2008 - 17:35
वपुंनी लिहीलेले 'आपण सारे अर्जुन' हे त्यांच्या उत्तर काळातील असल्याने जरासे "उदास" वाटले. पण जणू त्यालाच उत्तर असल्याप्रमाणे भारतीयांना उद्देशून लिहीलेले डॉ. डेव्हीड फ्रॉलींचे "अराईज अर्जूना" (अर्जूना, उठ जागा हो!) हे इंग्रजी पुस्तक पण वाचनीय आहे.

चिंचाबोरे 31/08/2008 - 05:06
अनिल अवचट यांचे "माझे छंद" आणि त्यांचि ईतरहि बरिच पुस्तके. एका वेगळ्याच जीवनशैलिचे दर्शन होते. आयुष्याचा आनंद किति वेगवेगळ्या पद्धतिंनि आणि स्वयंपाकासारख्या लहान लहान गोष्टिंमधुनहि घेता येतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. इतर सर्व मिपाकरांचे अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची तोंडओळख करुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.

In reply to by चिंचाबोरे

मैत्र 31/08/2008 - 05:22
फार छान पुस्तक... तसंच स्वतःविषयी, माणसं अनेक पुस्तकं आहेत. मुलखावेगळा माणुस... अतिशय साध्या शब्दात लिहिण्याची शैली.. आणि आजूबाजूला असलेल्या पण ज्यावर आपण सहसा फार विचार करत नाही किंवा कल्पना नसते अशा गोष्टी... जगाचं संकेत न बाळगता फक्त स्वत:च्या मनाप्रमाणे आयुष्य जगलेला माणुस... आणि तरीही इतक्या लोकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे.. ओरिगामी चे मास्टर आहेत.. मुक्तांगण, कष्टकरी लोकांसाठी केलेलं काम किंवा त्यांचे हाल लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न, मेंटल हॉस्पिटलचं पत्नीबरोबर केलेलं काम.. विलक्षण आहे सारं .. एक असाधारण सहजता आहे सगळ्यात.. त्यांचे साप्ताहिक सकाळ किंवा सकाळ दिवाळी अंकांचे लेख अतिशय उत्तम असतात..

विजुभाऊ 03/09/2008 - 17:13
अनिल अवचट यांचे "माझे छंद" गेल्याच आठवड्यात हे पुस्तक वाचले प्रत्येक छन्द स्वतन्त्र पुस्तक होऊ शकेल. चित्रे स्केचेस काष्ठ शिल्पे फोटोग्राफी बासरी.... हा माणूस नक्की काय जगला आहे आष्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शिप्रा 03/09/2008 - 17:27
स्वभाव विभाव डॉ आनंद नाडकर्णी. ... त्याचाच शब्दात विचार भावना वर्तन या विभाव त्रयीतुन बनणार्या स्वभावाच्या संगती विसंगती यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

विजुभाऊ 03/09/2008 - 18:42
जरा थोडे अधीक लिहा ना या पुस्तकाबद्दल पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शिप्रा 04/09/2008 - 10:45
डॉ. आनंद नाडकर्णी हे ट्।ण्याला मानसोपचारतज्ञ आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने तयार केलेल्या Rational emotive theory बद्दल लिहिले आहे. म्हणजेच विवेकनिश्ट विचारसरणी.. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हि थेअरि वापरुन स्वताच्या स्वभावात तर बदल केलाच पण त्याच्याकडे येणार्या अनेक लोकांना हि थेअरि छोट्या गोश्टित वापरण्यास सागुन त्यांचे मोठे प्रश्न्न सोडवले आहेत..परिक्षेत येणारे टेन्शन पासुन जवळ्च्याचा म्रुत्यु इत्यादि अडचणिंवर मात कशि करायचि याचे मार्गदर्शन त्यांनि ह्या पुस्त्कात छोटि उदा. देउन केले आहे.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

अ-मोल 08/07/2009 - 11:23
दी ओल्ड मॅन ऍ़ण्ड दी सी पर्व पानिपत शुभ्र काही जीवघेणे निशाणी डावा अंगठा

In reply to by अ-मोल

सागर 10/07/2009 - 13:06
मूळ कन्नड भाषेत लिहिली गेलेली "पर्व" ही कादंबरी अत्भुत आहे. डॉ.एस.एल. भैरप्पा यांनी स्वतः १२ वर्षे उत्तर भारतात कुरुक्षेत्र, कर्णाच्या मृत्युस्थानी, गुजरात मधे द्वारका अशा शेकडो ठिकाणी भ्रमंती करुन अतिशय अभ्यास करुन महाभारताचे हे कथानक रचले आहे. त्या काळात प्रत्येक ठिकाणचे हवामान कसे होते आणि कोणत्या प्रकारचे अन्न खाण्यात उपयोगी आणले जात होते अशा बारीक-सारीक गोष्टींचा श्री भैरप्पा यांनी अभ्यास केल्याचे पानोपानी जाणवते. महाभारताचे हे कथानक आत्तापर्यंत वाचलेल्या महाभारतकथांना हादरवून सोडते एवढे नक्की. सौ. उमा कुलकर्णी यांनी या सुंदर कादंबरीचा तेवढाच सुंदर अनुवाद मराठीतून केलेला आहे. पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेले हे सुंदर पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे. (इतिहासप्रेमी) सागर

In reply to by सागर

भोचक 10/07/2009 - 14:40
हे पुस्तक वाचल्यानंतर विचारप्रक्रिया बदलली. महाभारताकडे पहाण्याचा नवा वास्तववादी दृष्टिकोन मिळाला. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

विजुभाऊ 08/07/2009 - 11:43
मागच्याच आठवड्या चित्र॑कार रवी परांजपे यांचे आत्म चरीत्र वाचले. एका कमर्शीयल आर्टीस्टचा प्रवास कसा होतो ते फारच छान सांगितले आहे. त्यांची स्केचेस/ चित्रे/ इलस्ट्रेशन्स यावर भरभरून बोलले आहेत ते

सुबक ठेंगणी 08/07/2009 - 12:01
विजुभाउंनी म्हटल्याप्रमाणे "तोत्तोचान्"आणि तिला तोमोई शाळेतून 'आपण जसे आहोत तसेच' जगण्यासाठी मिळालेले पाठबळ. दुसरं म्हणजे, नॉट विदाऊट माय डॉटर" इराणमधील अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत काम करणा-या "मूडी"या इराणी डॉक्टरशी लग्न केलेल्या बेटीची आणि तिच्या लहानग्या 'माहतोब'ची ही गोष्ट. अमेरिकेतली नोकरी गेल्यावर ही गोष्ट बेटीपासून लपवून मुडी तिला आणि माहतोबला इराणला घेऊन जातो, हळूहळू तिचा पासपोर्ट, क्रेडिट कार्ड जप्त करतो, फोनवरून तिच्या नातेवाईकांशी संपर्क करायला बंदी घालतो आणि तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात. अत्यंत धर्मांध, गलिच्छ आणि स्त्रियांना केवळ त्यांच्या नव-यांची मालमत्ता समजणा-या अशा परक्या देशात बेटीचा तिच्याच नव-याकडून आणि नातेवाईकांकडून शारिरिक, मानसिक छळ सुरु होतो. बेटीचे हे इराणमधले अठरा महिने आणि शेवटी तिने स्वत:ची आणि माहतोबची करून घेतलेली सुटका ह्याची रोमांचक कहाणी. सत्य कल्पितापेक्षा किती अद्भुत असू शकता ह्याचा प्रत्यय देणारं पुस्तक. बाकी इतिहासातले भावनेचे पैलू उलगडून दाखवणारं स्वामी , शांता शेळक्यांचं मेघदूताचं भावांतर वगैरे वगैरे... उत्तमोत्तम पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यांचेच आभार!

विजुभाऊ 20/10/2013 - 17:26
थ्री कप्स ऑफ टी : हे आजादकश्मीर/अफगाणीस्थान भागात शाळा चालवणार्‍या एकाचे अनुभव असलेले पुस्तक खरेच रोमांचक आहे. शिक्षणामुळे समाजाची जडणघडण कशी होत जाते याचे सुंदर वर्णन आहे पुस्तकात. लेखक आठवत नाही. मेहता प्रकाशनाने पर्काशित केलेय हे पुस्तक

बॅटमॅन 20/10/2013 - 17:31
नॉट विदौट माय डॉटर बद्दल बराच खल झालेला दिसत आहे. पण त्याची दुसरी बाजू कधीच फारशी चर्चिली जात नाही. त्या दुसर्‍या बाजूशी संबंधित चर्चा इथे पाहता येईल.

चित्रगुप्त 20/10/2013 - 19:13
लहानपणी: अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा: (चिपळूणकरांचे भाषांतर) मोठेपणी: जीएंचे 'रमलखुणा'

मारवा 21/10/2013 - 13:26
ही एक अफाट कादंबरी आहे एका विशाल पटा वर ही घडते. आपल्या महाभारत स्टाइल यात एकाच कुटुंबाच्या अनेक पिढ्यांचे व माणसांचे एक जबरद्स्त असे चित्रीकरण येते जे अत्यंत सुसंघटीत पणे मांड्ले जाते. यात लॅटीन अमेरीके च्या एका काल्पनिक गावा चा आणि त्या फाउंडर च्या कुटुंबाचा एक विलक्षण असा प्रवास मांडला जातो, यात कधीही वाचली नसतील अशी एका पेक्षा एक भन्नाट पात्रे आणी मति अक्षरशः गुंग करणारी प्रसंगे एका मागो माग येत जातात तरीही कथानक अत्यंत आखिव रेखिव जरा ही पसरत नाही यातील पात्रे त्यांची फिलॉसॉफी याचे काही वर्णन येते की ज्याचे नाव ते. ही वाचल्यानंतर मला बर्‍याच दिवसांनी ही माहीती कळली की या लेखकाला १९८२ चा नोबेल पुरस्कार साहीत्या साठी मिळालेला आहे आणि याची ही कादंबरी ही विश्व साहीत्यातील एक महान कादंबरी मानण्यात येते.यातील काही कोट्स देण्याचा मोह आवरत नाही ही वाचा म्हणजे कादंबरीची थोडी आयडीया येइल. “They were so close to each other that they preferred death to separation.” “He sank into the rocking chair, the same one in which Rebecca had sat during the early days of the house to give embroidery lessons, and in which Amaranta had played Chinese checkers with Colonel Gerineldo Marquez, and in which Amarana Ursula had sewn the tiny clothing for the child, and in that flash of lucidity he became aware that he was unable to bear in his soul the crushing weight of so much past.” “In all the houses keys to memorizing objects and feelings had been written. But the system demanded so much vigilance and moral strength that many succumbed to the spell of an imaginary reality, one invented by themselves, which was less practical for them but more comforting.” “In that way the long-awaited visit, for which both had prepared questions and had even anticipated answers, was once more the usual everyday conversation.”

मिलिंद बोकील यांच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक..... वाचायला घेतले की संपवल्याशिवाय खाली ठेववत नाही... कितीही वेळा वाचले तरी नवीन वाटते दर वेळी......... वातावरण निर्मिती अफलातून आहे......

In reply to by विजुभाऊ

समीरसूर 28/06/2016 - 11:49
शांताराम खूप मोठे होते. जवळपास 1000 पाने. मी वाचले. बरीच पाने रटाळ वाटली. पण मला ठीक वाटले. अगदीच टाकाऊ नव्हते.

मारवा 27/06/2016 - 20:04
हे पुस्तक मी सध्या वाचत आहे अजुन पुर्ण वाचुन झालेले नाही जितका भाग वाचला त्या विषयी अमिताव घोष अतिशय आवडता लेखक त्याची बरेच दिवसांपासुन पेन्डींग असलेली द ग्लास पॅलेस सध्या वाचतोय. ही सुद्धा सुंदरच भट्टी जमवलेली आहे. मंडाले आणि रत्नागिरी पहीली दोन प्रकरणे संपली. घोष ने कादंबरीसाठी ५ वर्षे अतीपरीश्रम घेतलेले आहेत ते जाणवतात. कादंबरीची सुरुवात मंडालेत ब्रिटीश फौजांनी केलेल्या आक्रमणातुन होते. बर्माचा राजा थिबॉ त्याची फॅमिली ला इंग्रज युद्धात नमवुन रत्नागिरीला त्यांची रवानगी करतात.निर्वासित केलेल्या थिबॉ चे रत्नागिरीतले वास्तव्य, त्याचा एकाकीपणा, नॉस्टॅल्जीया, त्याच्या चार मुली, नोकर त्यांचे अफेयर्स, क्रुर राणी, बदलता भारत, श्रुड साहेब, राजाच हळुहळु होत जाणार डिग्रेडेशन, तिकडे बर्मातला सागवानचा बर्माटीक चा प्रचंड व्यापार, त्यातला हत्तींचा वापर. तिथला भन्नाट निसर्ग, साहेबाची धंद्यातली इन्व्हेन्शन्स, साहेबाच्या महत्वाकांक्षेने पोखरत जाणारा बर्मा, त्यातले आपल्याला सहसा अपरीचीत असणार्‍या रेसेस व लोक. फारच सुंदर उतरलय. इतिहासाची प्रचंड माहीती असुनही ती कादंबरीवर अजिबात हावी न होउ देता घोष मोठ्या कुशलतेने संक्रमणातुन जात असलेले लोक समाज फार सुंदर रेखाटतात. अत्यंत वाचनीय उत्कंठावर्धक वगैरे वगैरे आहे. इथे घोषची कॅरेक्टर्स सुरुवातीला तरी मनाची पकड घेत नाहीत पण हळुहळु ती डोक्यात सेटल होऊ लागतात. घोष ला कॅरेक्टर बिंबवायला वेळ लागतोय कारण त्याचा फोकस बहुधा जास्त मोठा असा काळावर आहे. तरी सर्वस्व गमावलेला थिबॉ फार ट्रॅजिक रेखाटलाय तो मनात घर करुन राहतो. मंडालेच्या राजवाड्यातील मुख्य हॉलला द ग्लास पॅलेस नाव त्यावरुन हे शीर्षक. कादंबरीचे मुखपृष्ठ निव्वळ अप्रतिम आहे. त्यावरची जे एम कोएट्जी ची मोजक्या शब्दातली प्रतिक्रीया पुस्तकाविषयी बरेच काही सांगुन जाते. एक सॅम्पल देण्याचा मोह आवरत नाही. ब्रिटीश आर्मीत लढणार्‍या भारतीय सैनिकांविषयी चा हा संवाद बघा “In Singapore, as a young man, I worked for a time as a hospital orderly. The patients were mainly sepoys like these—Indians, back from fighting wars for their English masters. I still remember the smell of gangrenous bandages on amputated limbs; the night-time screams of twenty-year-old boys, sitting upright in their beds. They were peasants, those men, from small countryside villages: their clothes and turbans still smelt of wood-smoke and dung fires. ‘What makes you fight,’ I would ask them, ‘when you should be planting your fields at home?’ ‘Money,’ they’d say, and yet all they earned was a few annas a day, not much more than a dockyard coolie. For a few coins they would allow their masters to use them as they wished, to destroy every trace of resistance to the power of the English. It always amazed me: Chinese peasants would never do this—allow themselves to be used to fight other people’s wars with so little profit for themselves. I would look into those faces and I would ask myself: What would it be like if I had something to defend—a home, a country, a family—and I found myself attacked by these ghostly men, these trusting boys? How do you fight an enemy who fights from neither enmity nor anger but in submission to orders from superiors, without protest and without conscience? “In English they use a word—it comes from the Bible—evil. I used to think of it when I talked to those soldiers. What other word could you use to describe their willingness to kill for their masters, to follow any command, no matter what it entailed? And yet, in the hospital, these sepoys would give me gifts, tokens of their gratitude—a carved flute, an orange. I would look into their eyes and see also a kind of innocence, a simplicity. These men, who would think nothing of setting fire to whole villages if their officers ordered, they too had a certain kind of innocence. An innocent evil. I could think of nothing more dangerous.” “Saya.” Rajkumar shrugged offhandedly. “They’re just tools. Without minds of their own. They count for nothing.” 1

In reply to by मारवा

समीरसूर 28/06/2016 - 11:47
हा परिच्छेद खूप आवडला. 'द ग्लास पॅलेस' वाचायलाच पाहिजे. खूप ओघवती आणि हृदयाला भिडणारी भाषा!

समीरसूर 28/06/2016 - 11:57
द गॉडफादर, गॉन विथ द विंड, फॉल ऑफ जायंट्स, ऑक्टॉपस, सायक्यामोर रो, उत्तरयोगी, गुड टू ग्रेट, स्वामी, नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील), व्यक्ती आणि वल्ली, चार नगरातले माझे विश्व (जयंत नारळीकर) आणि अजून बरीच पुस्तके...यातली मी काही दोनदा वाचली आहेत.

शिप्रा 28/08/2008 - 11:53
एक होता कार्व्हर अनुवाद :- वीणा गव्हाणकर.. हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. खुप काहि शिकण्यासार्खे आहे असे वाटले ...वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

विजुभाऊ 28/08/2008 - 12:01
कार्व्हर म्हणतो जेथे असाल तेथुन , तुमच्याकडे जे आहे ते घेउन सुरुवात करा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

विकास 29/08/2008 - 04:59
कार्व्हर म्हणतो जेथे असाल तेथुन , तुमच्याकडे जे आहे ते घेउन सुरुवात करा Start where you are, with what you have, make something of it, never be satisfied. शाळेत असताना एकदा माझ्याकडून ही वाक्ये कार्व्हर म्हणून एका कार्यक्रमात म्हणून घेतल्याचे आजही स्मरते :-)

In reply to by शिप्रा

टारझन 28/08/2008 - 18:10
लेखक माहित नाही (बहुदा सुहास शिरवाडकर) पण "दुनियादारी" एक महान महान महान कादंबरी आहे, १५ तास सलग बसून पुस्तक एका झटक्यात खाउन टाकलं .. जोष, रोमांच , करूणा, राग , मस्ती , आणि श्रुंगार .. सगळी भेळ एकदम .. आणि क्लायमॅक्स असला खतरा की ४ दिवस माणूस जेऊच नये .. जबराट ... शिरीन बर तर आपण फिदाच ... आपल्या मनातली स्वप्नकंन्या उभी राहते अशी शिरीन .. दिग्याचा आडदांड पणा .. जोश्याच्या बेन्याच्या अफलातुन क्लुप्त्या .. आणि पेरियोडिकली आपली दु:खांच्या जखमेची धपली काढणारे एम.के.श्रोत्री .... पुण्याला गेल्यावर पहिलं काम.. "दुनियादारी"च पु:नश्च पारायण ... दुनियादारीच्या लेखकाला मंतरलेले १५ तास दिल्याबद्दल लाख लाख आभार .. मला त्यांचा आदर बाटतो हे वे.सां.न.ल. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

सुहास शिरवाडकर शिरवळकर ना रे ... " नावाने आपल्याला काही फरक पडत नाही, ष्टोरी महत्त्वाची ..."असा एक रिस्पॉन्स देणार टार्‍या आता.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ 28/08/2008 - 11:53
मागील दुवा http://www.misalpav.com/node/3247 पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नंदन 28/08/2008 - 12:57
उत्तम धागा सुरु केल्याबद्दल अभिनंदन, विजुभाऊ. आवडणार्‍या पुस्तकांतून एकाच पुस्तकाबद्दल लिहायचे म्हणजे कठीण काम आहे, तेव्हा नुकतेच वाचलेल्या आणि आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल लिहितो. टोनी मॉरिसन ह्या नोबेल पुरस्कारप्राप्त कृष्णवर्णीय लेखिकेची 'बिलव्हेड' ही कादंबरी. गुलामगिरीतून निसटून नवीन आयुष्य सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेथ ह्या स्त्रीची कथा. आता गुलामी, पददलित वर्ग, कृष्णवर्णीय यांच्याबद्दलची कादंबरी म्हटली की अन्यायाचा पाढा वाचणारी, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी मुख्य व्यक्तिरेखेने कशी धडपड केली किंवा जशी परिस्थिती आहे, तशी निमूटपणे कशी स्वीकारली इ. ढोबळ, नेहमीच्या यशस्वी कथानकांच्या साच्यात ही कादंबरी बसत नाही. एक व्यक्ती आणि अबोध वयातील मुलीला वाढवणारी एकटी आई हा सेथचा पैलू प्रथम समोर येतो. अर्थात, गुलामीतून ती नुकतीच सुटून आली असल्याने त्याचे संदर्भ येत राहतातच. पण ते अगदी छोट्या, छोट्या जीवघेण्या वाक्यांतून. गुलामगिरीबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी स्त्रियांच्या झालेल्या हिंसक शारीरिक शोषणाबद्दल विशेष काही लिहिले गेले नव्हते. फ्लॅशबॅकसदृश्य संवादांच्या तंत्रातून त्याचे उल्लेख मग हळूहळू येत राहतात. काहीशा त्रयस्थ पण पूर्णत: अलिप्त नाही अशा संयत पण परिणामकारक भाषाशैलीत. (लताबाईंची दु:खी गाणी जशी ओथंबून न जाता, संयत स्वरांत त्यांचा परिणाम साधतात तशी 'शुभ्र काही जीवघेणे' शैली) गुलामीतून सुटले तरी स्वतंत्र जीवन जगण्यासाठी जी ताकद, जी मूल्ये लागतात; तीच या पहिल्या पिढीत कोळपून गेली होती - आणि त्यामुळे जो गोंधळलेपणा आला त्याचंही चित्रण या कादंबरीत येतं. आईनेच पोटच्या पोरीचा जीव घ्यावा अशी आलेली परिस्थिती. त्यातून आलेला अपराधीपणा आणि दहा-पंधरा वर्षांनी तिच्याच नावाची (बिलव्हेड), तिच्याच ठेवणीची मुलगी घरी परतल्यावर सेथला आणि तिच्या मुलीला झालेला आनंद. अतींद्रिय शक्ती आहे की जवळच्या एका गावातून अत्याचारांना कंटाळून पळून आलेली मुलगी याचं गूढ. तिच्या परतण्याने सेथच्या अपराधीपणाला मिळालेलं खतपाणी आणि त्याची भरपाई करण्यासाठी स्वतःची, घरादाराची राखरांगोळी झाली तरी तमा न बाळगणारं तिचं मातृत्व. धाकट्या डेनव्हरच्या जन्माची कहाणी. कुमार वयात आलेल्या, घरात एकटी पडलेल्या मुलीचं कुढणं आणि बिलव्हेड आल्यावर तिला हक्काची मैत्रीण, बहीण मिळाल्याचा झालेला आनंद. फक्त तीन-एकशे पानात अतिशय प्रभावीपणे ह्या सार्‍या थीम्स ही कादंबरी सामावून घेते. सेथच्या आयुष्यापासून ते एकंदरीत गुलामगिरीपर्यंत, भोवतालच्या निसर्गाच्या वर्णनांपासून अमानवी शक्तींपर्यंत, नृशंस क्रौर्यापासून ते अपरंपार, सर्वस्व ओवाळून टाकणार्‍या प्रेमापर्यंत - अशा वैयक्तिक-वैश्विक, मानवी-अमानवी, माणसाच्या भावनांचं एक टोक ते दुसरं टोक अशा थीम्स या कादंबरीत सहजपणे, (मुद्दाम परस्परविरोधी गोष्टींची सांगड घातली गेली पाहिजे ह्या) अभिनिवेशाशिवाय येतात, हे कादंबरीच्या वाचनीयतेचं आणि लोकप्रियतेचं मुख्य कारण असावं. टीप - ज्या मार्गरेट गार्नरवर सेथची व्यक्तिरेखा बेतली आहे, तिच्याबद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

ऋषिकेश 28/08/2008 - 14:03
अपेक्षेप्रमाणे उत्तम विस्तृत प्रतिसाद :) तुमच्या प्रतिसादाची उत्सुकतेपोटी वाटच पाहत होतो.. ही कादंबरी वाचली नाहि पण आता वाचेन. तुझे मराठी आवडते पुस्तक? (बाकी कर्णाने आणि धनंजयने सर्वात आवडते पुस्तक सांगितले का?) स्वगतः स्वतः सांग आधी मग चौकशा कर -('मिसळ'लेला) ऋषिकेश

लिखाळ 28/08/2008 - 17:12
नमस्कार ! मला अनेक पुस्तके आवडली आहेत. त्यांबद्दल सवडिने लिहिनच..पण..पण मी ४थी इयत्तेत असताना आम्हाला असलेले इतिहासाचे पाठ्यपुस्तक मला फार आवडायचे. त्यात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास होता. मी तेव्हा सातारच्या एका शाळेत शिकायचो. तो जुना वाडा होता. शिसवी तुळया, लिंपलेल्या भींती महिरपी आकाराच्या खिडक्या इत्यादी. एकदम शिवकाळात गेल्यासारखेच वाटायचे. आसपास सज्जनगड, अजिंक्यतारा वाहवा ! समर्थ, शिवाजी यांनी भारलेले वातावरण आणि त्यात शिवाजीचाच इतिहास पुस्तकात. मी त्यात फार रमुन जायचो. (पुस्तकाच्या शेवटी असलेले जींजीवर स्वारी, सागरी किल्ले ही प्रकरणे मात्र फारशी आवडायची नाहित. कारण त्या वातावरणाशी कधी ओळख झाली नव्हती.) -- (मावळा) लिखाळ.

विजुभाऊ 28/08/2008 - 17:15
सिद्ध योगी : डॉ निषिकान्त श्रोत्री लोम्ब्संग राम्पा च्या थर्ड आय डॉक्टर फ्रॉम तिबेट आणि स्टोरी ऑफ अ लामा या तीन अद्भूत पुस्तकांचा समग्र सारांश पुस्तकात अनेक चमत्कार आहेत एक लामा जो उत्तम ऑटोमोबाईल इन्जीनीअर आहे. पायलट आहे सर्जन आहे आणि लामा ही आहे त्याच्या गुरुनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन दिव्य दृष्टी दिली ( तिसरा डोळा) ज्या योगे तो मॅग्नेटीक फिल्ड सुद्धा डोळ्यानी पाहु शकायचा. असे अनेक प्रसंग यात आहेत त्याने देहांतर ही केले होते असे पुस्तकात आहे. यातील माहिती खरी / खोटी हे ईंग्रजीतही वादग्रस्त आहे तरीपण एक वेगळे लिखाण म्हणुन वाचनीय आहे अधीक माहिती http://www.lobsangrampa.net/lobsang_rampa.html आणि इथे उपलब्ध http://www.lobsangrampa.net/rampa_books/thirdeye.doc पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by दत्ता काळे

विजुभाऊ 29/08/2008 - 09:39
चीपर बाय डझन : मूळ लेखक फ्रॅन्क बंकर गिल्ब्रेथ आणि ऍन गिल्ब्रेथ या पुस्तकाचा पुढचा भाग "बेलीज ऑन देअर टोज" यात त्या १२ मुलांच्या आईने मुलांच्या वडिलांच्या पश्चात १२ मुलांचा सांभाळ कसा केला. एक स्त्री म्हणुन तीला व्ययसाय करताना आलेल्या अडचणी याबद्दल लिहिलेले आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

जनोबा रेगे 28/08/2008 - 19:44
आमची आवडती पुस्तके- रुस्तूमची विजार हास गे ग॑गू तुटलेली नाडी शरदकुमार नावाचा बोका फोर्ट केम बट लायन वेन्ट रक्ताची गुळणी उ॑बरवाडीचा उमाजी

लिखाळ 28/08/2008 - 20:16
मिपावर अधुनमधुन खलिल जिब्रानचा उल्लेख होत असतो. त्यावरुन आठवले म्हणून लिहितो. वि स खांडेकरांनी अनुवाद केलेले जिब्रानचे वेचे 'सुवर्णकण' या नावाच्या पुस्तकात आहेत. पुस्तक चांगले आहे. ते अनुवाद काहिंना आवडतात काहिंना नाही. पण जिब्रानची मराठिमधून ओळख होते ते उत्तमच आहे. पुणे मराठी ग्रंथालयातून मी हे छोटे पुस्तक आणुन वाचले होते. आपल्याला जिब्रानबद्दल मराठीमध्ये उपल्ब्ध साहित्य माहित असल्यास कृपया सांगावे. -- (मित्र) लिखाळ.

In reply to by लिखाळ

रामदास 29/08/2008 - 14:06
कालच मला खलील जिब्रानचं प्रॉफेट नावाचं पुस्तक कोकणीत मिळालं. बा.भ. बोरकारांनी भाषांतर केलं आहे. १९७३ साली जाग प्रकाशनाने आनलेले हे पुस्तक चार रुपये छापील किमतीचं होतं. पादगावकरांचे भटके पक्षी आणि प्रॉफेट एकूण खरेदी रुपये वीस फक्त.

धनंजय 29/08/2008 - 02:41
माझे "ऑल टाइम फेव्हरिट" लहानपणापासून आतापर्यंत - लुइस कॅरॉलचे "थ्रू द लुकिंग ग्लास" ("आरशातून पार जाता" या अर्थी). लहान मुलामुलींना आवडेल, कल्पनाविलासी, शब्दांशी स्वच्छंद बागडत खेळ करणारे, पण तितकेच तर्कशुद्ध, मोठ्यांनाही आवडेल, असे हे पुस्तक आहे. ("ऍलिस इन वंडरलँड"चा हा पुढचा भाग आहे.) "निरर्थक" शब्दांशी खेळून तरी काही धूसर चित्र डोळ्यासमोर उभे राहाते, अशी एक कविता त्यात प्रसिद्ध आहे. 'Twas brillig and the slithy toves Did gyre and gimble in the wabe All mimsy were the borogoves And the mome raths outgrabe. अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो. भंपक सल्लाबाजीच्या कवितांची विडंबने उच्च प्रतीची आहेत. पण ही विडंबने केवळ "ट ला ट री ला री" नसून त्या भंपकपणाविरुद्ध खरीखरची टीका आहे. इसाक वॉट्स याच्या "How doth the little busy bee" या "आळस नका करू, कामाला लागा" कवितेचे (ऍलिस इन वंडरलँड मधले) "How doth the little crocodile" हे विडंबन त्या मूळ प्रचारकी कवितेपेक्षा आता अधिक प्रसिद्ध आहे. असेच "पांढर्‍या शिलेदाराचे गाणे" थ्रू द लुकिंग ग्लासमध्ये आहेत. (वरील एक-दोन कडव्यांच्या कविता चुटकीसरशी वाचून होतील म्हणून त्यांचे दुवे दिले आहेत.) अनेक तर्कदुष्ट आणि तर्कशुद्ध युक्तिवादांची भन्नाट आणि विनोदी उदाहरणे कथाप्रसंगांत आलेली आहेत. हे विनोदी संवाद या प्रतिभावंत गणितज्ञ-साहित्यिकालाच स्फुरोत. यातून हसत-अक्षरशः-खिदळत जर तर्कशास्त्राचे बाळकडू मिळाले तर काय वाईट? --- मराठी साहित्याचे माझे हवे तेवढे वाचन नाही. पण "ययाति आणि देवयानी" नाटकाची संहिता कित्येकदा वाचलेली आहे. आधुनिक विचारसरणीत देवयानीच्या मनाचा वेध घेतानाही पौराणिक कथा आहे असेच वाटते, कुठेच मिश्रणाच्या कालबाह्यतेमुळे रसभंग होत नाही. प्रत्यक्षात थेटरात मी अगदी लहानपणी हे नाटक एकदाच पाहिले आहे. (माझ्या मते ४-५ वर्षांचा होतो. गोव्यात नारळाच्या झावळ्यांचे थेटर...) पण ही कमालीची प्रगल्भ कथा मुळीच समजली नव्हती - कशी समजणार? हल्ली "तुझं आहे तुजपाशी"चे विसावे पारायण करतो आहे. कथा म्हणून आधीच प्रिय आहे. पण घट्ट विणलेले संवाद, "नैसर्गिक" वाटतानाही प्रत्येक संवादातून कथावस्तू पुढे जाते (एकही वाक्य वायफळ "टाकलेले" नाही) - प्रत्येकवेळी थक्क होतो.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 29/08/2008 - 03:12
धनंजय ने "जॅबरवॉकी" या ऍलिसमधील प्रसिद्ध कवितेचा उल्लेख केला आहे. धनंजय म्हणतात , "अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो. " मूळ कविता आणि या अतिशय कठीण कवितेचा माझ्या एका महान मित्राने केलेला अनुवाद पहा. या मित्रापुढे मी लोटांगण घालायचा बाकी होतो ! मित्र म्हणतो : When a nonsensical poem is translated, there can be paradoxically even more dimensions of translation than one might expect. . मूळ शीर्षक : jabberwocky `Twas brillig, and the slithy toves Did gyre and gimble in the wabe: All mimsy were the borogoves, And the mome raths outgrabe. "Beware the Jabberwock, my son! The jaws that bite, the claws that catch! Beware the Jubjub bird, and shun The frumious Bandersnatch!" He took his vorpal sword in hand: Long time the manxome foe he sought -- So rested he by the Tumtum tree, And stood awhile in thought. And, as in uffish thought he stood, The Jabberwock, with eyes of flame, Came whiffling through the tulgey wood, And burbled as it came! One, two! One, two! And through and through The vorpal blade went snicker-snack! He left it dead, and with its head He went galumphing back. "And, has thou slain the Jabberwock? Come to my arms, my beamish boy! O frabjous day! Callooh! Callay!' He chortled in his joy. `Twas brillig, and the slithy toves Did gyre and gimble in the wabe; All mimsy were the borogoves, And the mome raths outgrabe. जबडोबा प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती. बाळा! भि‍उनी जबडोबाच्या दात-नखांना सांभाळा जबजब पक्षी मक्कड कुक्षी मागे असती, पळा! पळा! नायक तलवारीला हलवे शत्रू फारा दिवसांचा तमझाडाच्या खाली बसुनी विचार करितो क्षणिकाचा. तितुक्या वेळी भडकत डोळे कडकत जबडोबा आला सरकत झाडीमधुनी घुसला, बुडबुड तोंडी करी साला. असा हाणला! तसा मारला! घावाने केले तुकडे! जबडोबाचे डोके घे‍उनी नायक परते घराकडे. "जबडोबाची मात जाहली का रे माझ्या प्रिय पोरा? शुभ दिन आला! तमस निघाला!" आनंदी हसती जोरा. प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 29/08/2008 - 03:32
आपल्या ह्या महान मित्रापुढे मी इथूनच लोटांगण घालतो. धन्य हो ! ता. क. लुईस कॅरोल, म्हणजेच चार्ल्स डॉजसन हा एक गणितज्ञ होता. अधिक माहितीसाठी , विकीपीडिया. http://en.wikipedia.org/wiki/Lewis_Carroll ज्यांनी डॉन नुथ चे "आर्ट ऑफ प्रोग्रामिंग" वाचले आहे, त्यांना लुईस कॅरोलचा परिचय आहेच. ज्यांनी आर्ट ऑफ प्रोग्रामिंग वाचलेले नाही, त्यांना संगणक शास्त्र कळलेले नाही. त्यामुळे, संगणक शास्त्र कळणार्‍या सर्वांना लुईस कॅरोल परिचित आहेच. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

ऋषिकेश 29/08/2008 - 09:55
आपल्या ह्या महान मित्रापुढे मी इथूनच लोटांगण घालतो. धन्य हो !
असेच म्हणतो -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by कोलबेर

पाषाणभेद 08/07/2009 - 09:53
आमचेही लोटांगण. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विकास 29/08/2008 - 05:19
मला सर्वात जास्त पुस्तक आवडते अशातला भाग नाही पण एखाद्या मूड मध्ये वाचलेले आणि भावलेले पुस्तक कायम आवडते झाले असे कुठे तरी वाटते. (तेच गाण्याचे आहे) - ज्यांची नावे वर आली नाहीत ती पुस्तके देत आहे:
  1. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे
  2. ययाती - वि. स. खांडेकर (हे लगेच लिहायचे कारण असे, की हे पुस्तक मला जेंव्हा वाचले तेंव्हा खूप आवडले, नंतर अनेक वर्षांनी वर उल्लेखलेले पुस्तक आणि त्यावर केलेली दुर्गा भागवतांची टिका वाचली आणि मग कळले त्यातील बरेचसे संदर्भ आपल्याल समजलेच नव्हते. अर्थात तेंव्हा मी शाळेत होतो...)
  3. लोकमान्य टिळकांच्या आठवणी - यात अनेकांनी (शंभराच्या वर) ज्यांची नावे पण माहीत नाहीत अशांपासून ते जिन्हा, म. गांधी आणि ज्यांनी त्यांना असंतोषाचे जनक म्हणले त्या चिरोलच्या आठवणी आहेत - वाचताना हा माणूस काय "ग्रेट" होता हे समजले - नुसताच फोलफटांवर भांडलेला, चांदण्या गोळा करणारा आणि एखादी अजरामर घोषणा देणारा (स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...) इतकेच काही त्याचे वर्णन होऊ शकत नाही ते समजले.
  4. समाधीवरील अश्रू - आचार्य अत्र्यांनी लिहीलेल्या मृत्यूलेखांचा संग्रह
  5. उरलंसुरलं - पुल (बाकी पुस्तके आधी वर/मागच्या धाग्यात आली आहेत)
  6. कृष्णपर्व - दुर्गा भागवत
काही आत्ता वाचत असलेली / वाचलेली इंग्रजी पुस्तके: जी खूप नाही पण बर्‍यापेकी चांगली वाटली
  • ऍल गोअरचे - ऍन ऍसॉल्ट ऑन रीझन
  • क्लिंटनचे - गिव्हींग (जरा पकाऊ पुस्तक आहे, तरी देखील वाचण्या सारखे आहे)
  • सुब्रम्हण्यम स्वामींचे - हिंदूज अंडर सिज (आत्ताच प्रकाशीत झाले आहे). - माहीती चांगली आहे. राजकारण्यापेक्षा, हार्वर्ड स्कॉलरचे ते जास्त वाटले (याचा अर्थ १००% ग्राह्य होते असा नाही ;) )
अजून जशी आठवतील तशी...

विजुभाऊ 29/08/2008 - 12:54
स्थलांतरःएका कारखान्याचे दामले हे लेखक लेखाकाने घेतलेली एक असाईनमेन्ट एका अवाढव्य स्टील प्लान्ट चे सम्पूर्ण स्थलांतर तेही पूर्व जर्मनीमधुन भारतामध्ये. लेखक हा त्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे प्रोजेक्ट को ओर्डीनेटर म्हणुन जातो.प्रोजेक्ट्सम्पेपर्यन्त त्याला आलेले लोकांचे अनुभव यात आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बबलु 29/08/2008 - 13:43
पॅपिलॉन -- मूळ लेखक: (खुद्द) हेन्री शॅरीअर (फ्रेंच). सत्यघटनेवर. अनुवादः (बहुदा रविंद्र गुर्जर). जबरी पुस्तक. हेन्रीला न केलेल्या गुन्ह्यासाठी फ्रेंच गयाना तुरूंगात जन्मठेप (काळ्या पाण्याची शिक्षा). टोकाचं Torture. हेन्री प्रचंड अशावादी. कोणीही कधीही न केलेला प्रयत्न करायचा ठरवतो. फ्रेंच गयाना मधून पळायचं. पण कसं ? अति-धाडसी निर्णय. कोणाची साथ नाही. टोकाचा Strong माणूस. पळायच्या अभ्यासाला सुरुवात. कसं पळायचं ? कसं पळायचं ? ६ वेळा पळायचे अयशस्वी प्रयत्न. प्रत्येक वेळेस दुप्पट Torture. बंद dark-cell मध्ये एकटाच कैद. पण निर्णयावर ठाम गडी. मानलं या माणसाला !! प्रत्येक पलायनाच्या वेळेस innovative ideas. ७ व्या वेळी यशस्वी पलायन..... पाठलाग.... पळतोय..... पळतोय..... एका देशातून.... दुसर्या देशात...... अनंत अडचणी. मधे भेटणारे अनेक लोक. कोणी चांगले... कोणी वाईट. शेवटी यशस्वी exile... व्हेनेझुएला मधे. अप्रतिम पुस्तक. २ दिवस.... २ रात्री बसून खाल्लं होतं. Highly Recommended.... जरूर वाचा. ....बबलु-अमेरिकन

In reply to by बबलु

असेच म्हणतो. मी देखील पॅपिलॉनची पारायणे केली आहेत, अजुनही करतोय. या पुस्तकाचा पुढचा भागही आला होता "बँको" या नावाने. त्यात यशस्वी पलायनानंतर लेखकाच्या बहुदा झांबियामधील पुनर्वसनाच्या प्रयत्नाचे अफलातुन चित्रण होते. अनुवादः रविंद्र गुर्जर डेझर्टर : लेखक गंथर बान्हमान. एक नाझी वॉर कुरिअर पर्सन. हिटलर आणि रोमेलच्या कृर आणि नितीशुन्य युद्धनीतीने सामान्य सैनिकांची झालेली ससेहोलपट आणि त्यामुळे ऐन युद्धतळावरुन पळ काढुन जीवनाच्या शोधात निघालेल्या साहसी माणसाची सत्यकथा. अतिषय रोमांचकारी आणि तितकीच भावुक करणारी देखील. अनुवादः विजय देवधर सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

ऋषिकेश 29/08/2008 - 14:05
मला आवडलेले एकच पुस्तक देता येणे अशक्य आहे. पण वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकातील आवडती पुस्तके सांगू शकतो बालकथा: मराठी: फास्टर फेणे: या पुस्तकमालिकेने माझं बालपणच बदलुन टाकलं. बाकी या विषयी अधिक काहि लिहायची गरज नाहिए :) आणि लंपनची तीनही पुस्तके हे पुस्तक मोठं झाल्यावर वाचनात आलं पण प्रचंड आवडलं. या दोन्ही पुस्तकांत निवड करणं कठीण आहे म्हणून दोन्ही दिली आहेत. इंग्रजी: अर्थात,हॅरी पॉटर: बाकी अनेक पुस्तके आवडली पण हॅरीभाऊने जी जादू केली कशानेच नाहि. भाषांतरीतः भा.रा.भागवतांनी भाषांतर केलेल्या ज्युल व्हर्न च्या कादंबर्‍या: अनेक वर्षांपूर्वी जेव्हा माणसाने कल्पनाही केली नसेल अश्या कल्पनांवरची ही पुस्तके बाळगोपाळांना नकळत भरपूर माहिती देऊन जातात. ऐतिहासिक छावा: मी वाचलेली पहिली ऐतिहासीक कादंबरी. त्यानंतर त्याहून छान कादंबर्‍या अनेक वाचल्या पण छावा जी आवडून गेली तीतके कोणतेही नाहि. आत्मचरित्र इंग्रजी: माय एक्सपरिमेंटस विथ ट्रुथ (इंग्रजी भाषांतर): महात्मा गांधींनी महात्मा होण्यापूर्वीची कथा ज्या प्रामाणिकपणे लिहिली आहे की हा माणूस महात्माच आहे हे पटावं (कोणाला वाचायची इच्छा असल्यास माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे) मराठी: असामी असामी: यावर मी पामर काय लिहिणार विज्ञान कथा प्रेषकः (जयंत नारळीकर): परग्रहावरून आलेल्या व्यक्तीच्या जीवनकहाणीने मी लहानपणी भारावलो होतोच अजूनही होतो वैज्ञानिक पुस्तक आकाशाशी जडले नाते: खगोलशास्त्राचा मराठी भाषेत सांगोपांग परिचय करून देणारे पुस्तक प्रत्येक खगोल प्रेमीच्या संग्रही असावे असे. सामाजिक अविरत: समाजातील विविध थोर परंतू प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून अविरत कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा आणि व्यक्तींचा उत्तम परिचय. प्रवासवर्णन पूर्वरंगः तसं तर पुलंची तिनही वर्णनं झकास आहेतच पण त्यातही पुर्वरंग जमून गेलंय असं माझं मत आहे भाषांतरीत कादंबरी पॉपिलॉनः ८ वेळा उडू पाहणार्‍या फुलपाखराची (कैद्याची) कथा ;) कादंबरी आणि कविता संग्रह इथे मोठी यादी आहे . तरीही या धाग्यात टाकु का? :) असो. इथेच थांबतो -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

घाटावरचे भट 29/08/2008 - 14:26
विज्ञान कथा प्रेषकः (जयंत नारळीकर): परग्रहावरून आलेल्या व्यक्तीच्या जीवनकहाणीने मी लहानपणी भारावलो होतोच अजूनही होतो तुम्हाला 'प्रेषित' म्हणायचंय काय? प्रेषित लैच भारी पुस्तक आहे.... तसंच त्यांची 'व्हायरस' आणि 'वामन परत न आला' ही पुस्तकं पण उत्तम आहेत.... विशेषतः 'व्हायरस'मधली रेडिओ दुर्बिणीचा वापर करुन व्हायरस पाठवण्याची परग्रहवासीयांची क्लुप्ती तर लाजवाबच.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

In reply to by ऋषिकेश

सागर 10/07/2009 - 12:22
बरोब्बर बोललास ऋषिकेशा, प्रेषित बरोबरच अभयारण्य, व्हायरस,वामन परत न आला ह्या कादंबर्‍या आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत जयंत नारळीकरांनी विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबरी ह्या साहित्यप्रकाराला एक सन्मान मिळवून दिलेला आहे यात शंकाच नाही. नारळीकरांची बहुतेक सर्व विज्ञानपुस्तके माझ्या संग्रही आहेत :) (विज्ञानप्रेमी) सागर

राघव१ 29/08/2008 - 15:18
आवडलेली पुस्तके अनेक आहेत. एकाबद्दलच लिहायचे म्हणजे जरा कठीणच काम आहे. प्रत्येक पुस्तकाबद्दल एक वेगळा प्रतिसाद लिहावा लागेल मग!! ;) मूळ पुस्तकः लेस मिझरेबल्स (फ्रेंच) मूळ लेखकः विक्टर ह्यूगो अनुवादः दु:ख पर्वताएवढे अनुवादकः श्री. भा. रा. भागवत फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळावर बेतलेली ही कादंबरी आहे. जिऑ वालजॉ या, एका सामान्य पण आत्यंतिक शारीरिक ताकद असलेल्या, माणसाची ही कथा आहे. अगदी साध्या अपराधासाठी त्याला तुरुंगात जावं लागतं, १९ वर्ष तुरुंगात काढल्यावर त्याला पॅरोल वर सोडण्यात येतं. शेवटपर्यंत त्याच्या भोवती कथा फिरत असते. त्याच्यातल्या गुन्हेगाराचे होणारे परिवर्तन अन् त्या ६-७ वर्षांच्या अनाथ असहाय पोरीच्या प्रेमासाठी सर्व करायची त्याची आकांक्षा, याचे इतके सुरेख वर्णन दिसून येते ना की वडील-मुलगी या नात्याचे असले नसलेले सगळे पदर उलगडलेले दिसून येतात. अगदी ती मोठी झाल्यावर तिला कोणी मुलगा आवडतोय, ती त्याच्यावर प्रेम करतेय, आपल्यावर तिचे असलेल्या प्रेमात आता कुणीतरी वाटेकरी येणार हे बघितल्यावर होणारी जिऑची घालमेल सुद्धा आपल्याला आवडून जाते. कादंबरीचा शेवट म्हणजे तर इतका अप्रतीम आहे की ज्याचे नाव ते!! कथानकाच्या ओघात येणारी काही मुख्य पात्रे जसे फान्तिन, जॅव्हेर, कोसेत, मारियुस, गॅव्हरोश (हे १०-१२ वर्षांचे पोर आपल्याला वेड लावून जाते!), तेनार्दिये (नवरा-बायको); असली अप्रतीम कथा सादर करतात की ही एक काल्पनीक कथा आहे असे कधी आपल्याला जाणवत सुद्धा नाही. विक्टर ह्युगो अन् श्री. भागवतांविषयी मी अज्ञ काय बोलणार? निव्वळ अप्रतीम कलाकृती असेच या पुस्तकाचे वर्णन करता येईल. संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक. मी हा अनुवाद प्रथम श्रीरामकृष्ण मठाच्या ग्रंथालयात वाचलेले. आजपर्यंत खूप प्रयत्न केलेत पण हे पुस्तक विकत नाही मिळाले. बहुदा प्रकाशनात नाहीये आता ते. :( असो. कुणास काही माहिती मिळाली या पुस्तकाबद्दल तर जरूर सांगावी. बाकी पुस्तकांबद्दल नवीन प्रतिसाद लिहिनच! :) राघव

आपला उपक्रम फारच सुंदर आहे. माझ्या सध्याच्या वाचनातील आवडते पुस्तक----चकवाचांदणे.--लेखक-मारुतिचितमपल्ली अत्यंत ओघवती,प्रासादिक भाषा,वन्य जीवनातील बारीक-सारीक तपशील टिपले आहेत.सर्व स्वानुभवातून लिहीलेले असल्यामुळे अधिकच वाचनीय झाले आहे.मराठीत वन्यजीवनावर त्यामानाने फारच मोजकी पुस्तके उपलब्ध आहेत.त्यामुळेही अधिकच वाचनीय.साधी, सोपी भाषा त्यामुळे कुठेही रटाळपणा येत नाही.

कार्यरत (अनिल अवचट, मॅजेस्टीक) एक उत्तम पुस्तक आहे. त्यामुळे खालील थोर व्यक्ती॑च्या अप्रसिद्ध कार्याची माहीती झाली अभय ब॑ग व राणी ब॑ग डॉ. हिम्मतराव बावस्कर (या॑चे आत्मचरित्रही अतिशय वाचनीय आहे) अरूण देशपा॑डे सुरेखा चव्हाण हिरेमठ अवचटा॑चे 'माणस॑' अस॑च अ॑गावर काटा आणणारे पुस्तक आहे.

भाग्यश्री 29/08/2008 - 22:33
द गोल - Eliyahu M. Goldratt. थोडक्यात कथा अशी, एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट जो अजिबातच नफा करत नसतो.. नफा कसला, प्रत्येक शिपमेंट किमान ४० आठवडे लांबलेली..! खरंतर तसं सगळं व्यवस्थित चालू आहे.. पण तरीही शिपमेंट उशीराच.. कधी हवे ते मटेरिअल उपलब्ध नाही,तर कधी नको असलेल्या मटेरिअल्स्चा ढीग होतोय! थोडक्यात गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत.. त्यातच त्या प्लॅन्ट मॅनेजरला डेडलाईन मिळते.. ३ महीन्यात काही सुधारणा नाही दिसल्या तर प्लॅन्ट बंद होणार.. एखादा माणूस असता तर सरळ, नवीन जॉब शोधून गप्प बसला असता.. पण मग तो नायक कसला? अलेक्स असं नाही करत.. तो मनापासून अगदी सर्व पणाला लावून तो प्लॅन्ट नफा कसा देईल याचा विचार करतो.. काय चुका होत आहेत.. त्या कशा सुधारता येतील वगैरे.. तो, त्याची टीम आणि अलेक्सचा फीजिक्सचा प्रोफ. जोआन.. ही मेन लोकं या पुस्तकातली.. जोआन प्रश्न विचारणार, काही बेसीक गोष्टी सांगणार.. पण डीरेक्ट प्रश्नाचं उत्तर कधीच नाही देणार.. अलेक्सला विचार करायला लावणार.. अलेक्सदेखील ज्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतो..(मुलाच्या कॅम्पिंग मधे) ते सर्व अफलातून आहे! वाचलीच पाहीजे ती थॉट प्रोसेस! पुस्तकात शेवटी काय होतं ते महत्वाचं नाही.. नायक आहे म्हटल्यावर तो यशस्वी होणारच.. पण कसा? त्या मागे त्याने काय कष्ट घेतले.. कसा विचार केला.. हे महत्वाचे.. सगळ्यात महत्वाची ऍटीट्युड! ’नमस्ते लंडन’ मधे अक्षयकुमार म्हणतो तसं, जोपर्यंत तुम्ही खरंच हरत नाही तो पर्यंत तुम्ही जिंकू शकता.. अगदी हेच विचार यात मांडले आहेत.. चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच! प्रेरणादायी पुस्तक !! -भाग्यश्री http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

मैत्र 30/08/2008 - 05:11
खुपच सुंदर पुस्तक तुम्ही मांडलं आहे गोल हे माझंही अतिशय आवडतं पुस्तक आहे ज्यामुळे मी या क्षेत्राकडे -मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग कडे जास्त आकर्षित झालो. पण हे पुस्तक ज्याला सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणतात त्या प्रकारातलं नाही. चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच! प्रेरणादायी पुस्तक !! हे सर्व या पुस्तकाची एक बाजू किंवा मूळ विषयापलिकडच्या काही चांगल्या गोष्टी आणि कथेचा भाग आहे. एक पुस्तक किंवा कथा म्हणून उत्तम आहे. पण तो त्याचा गाभा नाही असं मला वाटतं.. ज्याला बिझनेस नॉव्हेल म्हणतात त्या प्रकारातलं हे पुस्तक आहे गोल्डरॅट ची पुढे प्रसिद्ध झालेल्या थिअरी ऑफ कंस्ट्रेंट्स चं हे मूळ कथाबीज आहे.तसं या आधी द रेस ही लिहिलं होतं पण असं कादंबरीच्या स्वरुपात प्रथम गोल आलं ... अतिशय उत्तम तर्‍हेने उलगडत जाणारी कथा, वैयक्तिक आणि व्यावसायिक संकटं अशी एकदम रिअऍलिस्टिक परिस्थिती आणि जोनाच्या क्लूज वर मार्ग काढत जाणारी ऍलेक्स ची टीम. याचे दोन सिक्वेल आहेत इट्स नॉट लक आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठीचं क्रिटीकल चेन. बॉटलनेक्स शोधून त्यावर उपाय करणं ही थिअरी आणि परंपरागत कॉस्टिंग ला विरोध किंवा त्याच्या मर्यादा हा या पुस्तकाचा इसेंस आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाने वाचावं असं आहेच पण जसं भाग्यश्रीने म्हटलं आहे त्याप्रमाणे त्या जिद्दी साठी आणि चिकाटिसाठी सर्वांनी वाचावं. जाता जाता: एलि गोल्डरॅट हा स्वतः इस्रायली आहे त्यामुळे जोनाह हा गुरू सर्व पुस्तकांमध्य इस्रायली ज्यू आहे :) खुप जास्त प्रमाणात इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व.

In reply to by मैत्र

भाग्यश्री 30/08/2008 - 05:25
अरे वा, अजुन एक गोल फॅन सापडला याबद्द्ल सहीच वाटलं! तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. हे पुस्तक काही यु कॅन विन वगैरेच्या कॅटॅगरीतलं नाहीय.. अजुन खूप काही आहे.. मला खरंच ते मांडता नाही आलं.. मी त्या क्षेत्रातलीही नाही आहे, त्यामुळे अजुन मर्यादा येतात मांडणीवर.. पण त्या क्षेत्रातली नसूनही ते पुस्तक तेव्हढा इंटरेस्ट निर्माण करतं, शब्द,संज्ञा माहीत नसताना आपण ते वाचतच जातो, त्या थॉट प्रोसेस मधे गुंतून पडतो ते सर्व विलक्षण आहे. मी ५-६ वर्षापूर्वी वाचली ही नॉव्हेल, तेव्हा मला विशेष कळलंही नसेल कदाचित.. पण काहीतरी जबरदस्त वाचल्या सारखे वाटले.. तेव्हापासून पारायणं करते मी.. दरवेळेस काहीतरी नवीन हाताला लागतं! तुम्ही दिलेली माहीती , ठाऊक नव्हती.. ती ही पुस्तकं आणून वाचेन आता.. धन्यवाद!

In reply to by भाग्यश्री

विजुभाऊ 30/08/2008 - 16:42
मला कोणताही प्रोजेक्ट मॅनेज करताना इलियाहु भाऊची जेवढे मदत होते तेवढी इतर कशाचीच होत नाही. द गोल भाग १ आणि २ तसेच क्रीटीकल चेन ही पुस्तके नेहमी जवळ ठेवतो. एका सी ए ने मला ही पुस्तके वाचायला सांगितली. ऍक्ट्व्हीटी बेस्ड कॉस्टिंग साठी ही पुस्तके वाच म्हणुन. पण एकुणच या पुस्तकानी माझे बिझनेस प्रोसेस समजुन घेण्यासाठीचे ज्ञान अद्ययावत केले. इल्लियाहु ची इतर पुस्तकेही बेष्टच पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आजानुकर्ण 30/08/2008 - 00:12
माझे एकमेव आवडते विचाराल तर - पिंगळावेळ सध्या कामात त्यामुळे अधिक लिहिता येत नाही :(. आपला, (जीएप्रेमी) आजानुकर्ण

देवदत्त 30/08/2008 - 17:10
पार्टनर (व. पु. काळे) पार्टनर ही व्यक्तिरेखा, त्यातील विचार भावले. एका बैठकीत (मध्ये जेवणाची वेळ सोडून) पूर्ण पुस्तक वाचून काढले. आणखी ही आहेत, जसे असा मी असामी, अघळपघळ. बाकी नंतर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 01/09/2008 - 17:35
वपुंनी लिहीलेले 'आपण सारे अर्जुन' हे त्यांच्या उत्तर काळातील असल्याने जरासे "उदास" वाटले. पण जणू त्यालाच उत्तर असल्याप्रमाणे भारतीयांना उद्देशून लिहीलेले डॉ. डेव्हीड फ्रॉलींचे "अराईज अर्जूना" (अर्जूना, उठ जागा हो!) हे इंग्रजी पुस्तक पण वाचनीय आहे.

चिंचाबोरे 31/08/2008 - 05:06
अनिल अवचट यांचे "माझे छंद" आणि त्यांचि ईतरहि बरिच पुस्तके. एका वेगळ्याच जीवनशैलिचे दर्शन होते. आयुष्याचा आनंद किति वेगवेगळ्या पद्धतिंनि आणि स्वयंपाकासारख्या लहान लहान गोष्टिंमधुनहि घेता येतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. इतर सर्व मिपाकरांचे अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची तोंडओळख करुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.

In reply to by चिंचाबोरे

मैत्र 31/08/2008 - 05:22
फार छान पुस्तक... तसंच स्वतःविषयी, माणसं अनेक पुस्तकं आहेत. मुलखावेगळा माणुस... अतिशय साध्या शब्दात लिहिण्याची शैली.. आणि आजूबाजूला असलेल्या पण ज्यावर आपण सहसा फार विचार करत नाही किंवा कल्पना नसते अशा गोष्टी... जगाचं संकेत न बाळगता फक्त स्वत:च्या मनाप्रमाणे आयुष्य जगलेला माणुस... आणि तरीही इतक्या लोकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे.. ओरिगामी चे मास्टर आहेत.. मुक्तांगण, कष्टकरी लोकांसाठी केलेलं काम किंवा त्यांचे हाल लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न, मेंटल हॉस्पिटलचं पत्नीबरोबर केलेलं काम.. विलक्षण आहे सारं .. एक असाधारण सहजता आहे सगळ्यात.. त्यांचे साप्ताहिक सकाळ किंवा सकाळ दिवाळी अंकांचे लेख अतिशय उत्तम असतात..

विजुभाऊ 03/09/2008 - 17:13
अनिल अवचट यांचे "माझे छंद" गेल्याच आठवड्यात हे पुस्तक वाचले प्रत्येक छन्द स्वतन्त्र पुस्तक होऊ शकेल. चित्रे स्केचेस काष्ठ शिल्पे फोटोग्राफी बासरी.... हा माणूस नक्की काय जगला आहे आष्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शिप्रा 03/09/2008 - 17:27
स्वभाव विभाव डॉ आनंद नाडकर्णी. ... त्याचाच शब्दात विचार भावना वर्तन या विभाव त्रयीतुन बनणार्या स्वभावाच्या संगती विसंगती यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

विजुभाऊ 03/09/2008 - 18:42
जरा थोडे अधीक लिहा ना या पुस्तकाबद्दल पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शिप्रा 04/09/2008 - 10:45
डॉ. आनंद नाडकर्णी हे ट्।ण्याला मानसोपचारतज्ञ आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने तयार केलेल्या Rational emotive theory बद्दल लिहिले आहे. म्हणजेच विवेकनिश्ट विचारसरणी.. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हि थेअरि वापरुन स्वताच्या स्वभावात तर बदल केलाच पण त्याच्याकडे येणार्या अनेक लोकांना हि थेअरि छोट्या गोश्टित वापरण्यास सागुन त्यांचे मोठे प्रश्न्न सोडवले आहेत..परिक्षेत येणारे टेन्शन पासुन जवळ्च्याचा म्रुत्यु इत्यादि अडचणिंवर मात कशि करायचि याचे मार्गदर्शन त्यांनि ह्या पुस्त्कात छोटि उदा. देउन केले आहे.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

अ-मोल 08/07/2009 - 11:23
दी ओल्ड मॅन ऍ़ण्ड दी सी पर्व पानिपत शुभ्र काही जीवघेणे निशाणी डावा अंगठा

In reply to by अ-मोल

सागर 10/07/2009 - 13:06
मूळ कन्नड भाषेत लिहिली गेलेली "पर्व" ही कादंबरी अत्भुत आहे. डॉ.एस.एल. भैरप्पा यांनी स्वतः १२ वर्षे उत्तर भारतात कुरुक्षेत्र, कर्णाच्या मृत्युस्थानी, गुजरात मधे द्वारका अशा शेकडो ठिकाणी भ्रमंती करुन अतिशय अभ्यास करुन महाभारताचे हे कथानक रचले आहे. त्या काळात प्रत्येक ठिकाणचे हवामान कसे होते आणि कोणत्या प्रकारचे अन्न खाण्यात उपयोगी आणले जात होते अशा बारीक-सारीक गोष्टींचा श्री भैरप्पा यांनी अभ्यास केल्याचे पानोपानी जाणवते. महाभारताचे हे कथानक आत्तापर्यंत वाचलेल्या महाभारतकथांना हादरवून सोडते एवढे नक्की. सौ. उमा कुलकर्णी यांनी या सुंदर कादंबरीचा तेवढाच सुंदर अनुवाद मराठीतून केलेला आहे. पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेले हे सुंदर पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे. (इतिहासप्रेमी) सागर

In reply to by सागर

भोचक 10/07/2009 - 14:40
हे पुस्तक वाचल्यानंतर विचारप्रक्रिया बदलली. महाभारताकडे पहाण्याचा नवा वास्तववादी दृष्टिकोन मिळाला. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

विजुभाऊ 08/07/2009 - 11:43
मागच्याच आठवड्या चित्र॑कार रवी परांजपे यांचे आत्म चरीत्र वाचले. एका कमर्शीयल आर्टीस्टचा प्रवास कसा होतो ते फारच छान सांगितले आहे. त्यांची स्केचेस/ चित्रे/ इलस्ट्रेशन्स यावर भरभरून बोलले आहेत ते

सुबक ठेंगणी 08/07/2009 - 12:01
विजुभाउंनी म्हटल्याप्रमाणे "तोत्तोचान्"आणि तिला तोमोई शाळेतून 'आपण जसे आहोत तसेच' जगण्यासाठी मिळालेले पाठबळ. दुसरं म्हणजे, नॉट विदाऊट माय डॉटर" इराणमधील अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत काम करणा-या "मूडी"या इराणी डॉक्टरशी लग्न केलेल्या बेटीची आणि तिच्या लहानग्या 'माहतोब'ची ही गोष्ट. अमेरिकेतली नोकरी गेल्यावर ही गोष्ट बेटीपासून लपवून मुडी तिला आणि माहतोबला इराणला घेऊन जातो, हळूहळू तिचा पासपोर्ट, क्रेडिट कार्ड जप्त करतो, फोनवरून तिच्या नातेवाईकांशी संपर्क करायला बंदी घालतो आणि तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात. अत्यंत धर्मांध, गलिच्छ आणि स्त्रियांना केवळ त्यांच्या नव-यांची मालमत्ता समजणा-या अशा परक्या देशात बेटीचा तिच्याच नव-याकडून आणि नातेवाईकांकडून शारिरिक, मानसिक छळ सुरु होतो. बेटीचे हे इराणमधले अठरा महिने आणि शेवटी तिने स्वत:ची आणि माहतोबची करून घेतलेली सुटका ह्याची रोमांचक कहाणी. सत्य कल्पितापेक्षा किती अद्भुत असू शकता ह्याचा प्रत्यय देणारं पुस्तक. बाकी इतिहासातले भावनेचे पैलू उलगडून दाखवणारं स्वामी , शांता शेळक्यांचं मेघदूताचं भावांतर वगैरे वगैरे... उत्तमोत्तम पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यांचेच आभार!

विजुभाऊ 20/10/2013 - 17:26
थ्री कप्स ऑफ टी : हे आजादकश्मीर/अफगाणीस्थान भागात शाळा चालवणार्‍या एकाचे अनुभव असलेले पुस्तक खरेच रोमांचक आहे. शिक्षणामुळे समाजाची जडणघडण कशी होत जाते याचे सुंदर वर्णन आहे पुस्तकात. लेखक आठवत नाही. मेहता प्रकाशनाने पर्काशित केलेय हे पुस्तक

बॅटमॅन 20/10/2013 - 17:31
नॉट विदौट माय डॉटर बद्दल बराच खल झालेला दिसत आहे. पण त्याची दुसरी बाजू कधीच फारशी चर्चिली जात नाही. त्या दुसर्‍या बाजूशी संबंधित चर्चा इथे पाहता येईल.

चित्रगुप्त 20/10/2013 - 19:13
लहानपणी: अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा: (चिपळूणकरांचे भाषांतर) मोठेपणी: जीएंचे 'रमलखुणा'

मारवा 21/10/2013 - 13:26
ही एक अफाट कादंबरी आहे एका विशाल पटा वर ही घडते. आपल्या महाभारत स्टाइल यात एकाच कुटुंबाच्या अनेक पिढ्यांचे व माणसांचे एक जबरद्स्त असे चित्रीकरण येते जे अत्यंत सुसंघटीत पणे मांड्ले जाते. यात लॅटीन अमेरीके च्या एका काल्पनिक गावा चा आणि त्या फाउंडर च्या कुटुंबाचा एक विलक्षण असा प्रवास मांडला जातो, यात कधीही वाचली नसतील अशी एका पेक्षा एक भन्नाट पात्रे आणी मति अक्षरशः गुंग करणारी प्रसंगे एका मागो माग येत जातात तरीही कथानक अत्यंत आखिव रेखिव जरा ही पसरत नाही यातील पात्रे त्यांची फिलॉसॉफी याचे काही वर्णन येते की ज्याचे नाव ते. ही वाचल्यानंतर मला बर्‍याच दिवसांनी ही माहीती कळली की या लेखकाला १९८२ चा नोबेल पुरस्कार साहीत्या साठी मिळालेला आहे आणि याची ही कादंबरी ही विश्व साहीत्यातील एक महान कादंबरी मानण्यात येते.यातील काही कोट्स देण्याचा मोह आवरत नाही ही वाचा म्हणजे कादंबरीची थोडी आयडीया येइल. “They were so close to each other that they preferred death to separation.” “He sank into the rocking chair, the same one in which Rebecca had sat during the early days of the house to give embroidery lessons, and in which Amaranta had played Chinese checkers with Colonel Gerineldo Marquez, and in which Amarana Ursula had sewn the tiny clothing for the child, and in that flash of lucidity he became aware that he was unable to bear in his soul the crushing weight of so much past.” “In all the houses keys to memorizing objects and feelings had been written. But the system demanded so much vigilance and moral strength that many succumbed to the spell of an imaginary reality, one invented by themselves, which was less practical for them but more comforting.” “In that way the long-awaited visit, for which both had prepared questions and had even anticipated answers, was once more the usual everyday conversation.”

मिलिंद बोकील यांच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक..... वाचायला घेतले की संपवल्याशिवाय खाली ठेववत नाही... कितीही वेळा वाचले तरी नवीन वाटते दर वेळी......... वातावरण निर्मिती अफलातून आहे......

In reply to by विजुभाऊ

समीरसूर 28/06/2016 - 11:49
शांताराम खूप मोठे होते. जवळपास 1000 पाने. मी वाचले. बरीच पाने रटाळ वाटली. पण मला ठीक वाटले. अगदीच टाकाऊ नव्हते.

मारवा 27/06/2016 - 20:04
हे पुस्तक मी सध्या वाचत आहे अजुन पुर्ण वाचुन झालेले नाही जितका भाग वाचला त्या विषयी अमिताव घोष अतिशय आवडता लेखक त्याची बरेच दिवसांपासुन पेन्डींग असलेली द ग्लास पॅलेस सध्या वाचतोय. ही सुद्धा सुंदरच भट्टी जमवलेली आहे. मंडाले आणि रत्नागिरी पहीली दोन प्रकरणे संपली. घोष ने कादंबरीसाठी ५ वर्षे अतीपरीश्रम घेतलेले आहेत ते जाणवतात. कादंबरीची सुरुवात मंडालेत ब्रिटीश फौजांनी केलेल्या आक्रमणातुन होते. बर्माचा राजा थिबॉ त्याची फॅमिली ला इंग्रज युद्धात नमवुन रत्नागिरीला त्यांची रवानगी करतात.निर्वासित केलेल्या थिबॉ चे रत्नागिरीतले वास्तव्य, त्याचा एकाकीपणा, नॉस्टॅल्जीया, त्याच्या चार मुली, नोकर त्यांचे अफेयर्स, क्रुर राणी, बदलता भारत, श्रुड साहेब, राजाच हळुहळु होत जाणार डिग्रेडेशन, तिकडे बर्मातला सागवानचा बर्माटीक चा प्रचंड व्यापार, त्यातला हत्तींचा वापर. तिथला भन्नाट निसर्ग, साहेबाची धंद्यातली इन्व्हेन्शन्स, साहेबाच्या महत्वाकांक्षेने पोखरत जाणारा बर्मा, त्यातले आपल्याला सहसा अपरीचीत असणार्‍या रेसेस व लोक. फारच सुंदर उतरलय. इतिहासाची प्रचंड माहीती असुनही ती कादंबरीवर अजिबात हावी न होउ देता घोष मोठ्या कुशलतेने संक्रमणातुन जात असलेले लोक समाज फार सुंदर रेखाटतात. अत्यंत वाचनीय उत्कंठावर्धक वगैरे वगैरे आहे. इथे घोषची कॅरेक्टर्स सुरुवातीला तरी मनाची पकड घेत नाहीत पण हळुहळु ती डोक्यात सेटल होऊ लागतात. घोष ला कॅरेक्टर बिंबवायला वेळ लागतोय कारण त्याचा फोकस बहुधा जास्त मोठा असा काळावर आहे. तरी सर्वस्व गमावलेला थिबॉ फार ट्रॅजिक रेखाटलाय तो मनात घर करुन राहतो. मंडालेच्या राजवाड्यातील मुख्य हॉलला द ग्लास पॅलेस नाव त्यावरुन हे शीर्षक. कादंबरीचे मुखपृष्ठ निव्वळ अप्रतिम आहे. त्यावरची जे एम कोएट्जी ची मोजक्या शब्दातली प्रतिक्रीया पुस्तकाविषयी बरेच काही सांगुन जाते. एक सॅम्पल देण्याचा मोह आवरत नाही. ब्रिटीश आर्मीत लढणार्‍या भारतीय सैनिकांविषयी चा हा संवाद बघा “In Singapore, as a young man, I worked for a time as a hospital orderly. The patients were mainly sepoys like these—Indians, back from fighting wars for their English masters. I still remember the smell of gangrenous bandages on amputated limbs; the night-time screams of twenty-year-old boys, sitting upright in their beds. They were peasants, those men, from small countryside villages: their clothes and turbans still smelt of wood-smoke and dung fires. ‘What makes you fight,’ I would ask them, ‘when you should be planting your fields at home?’ ‘Money,’ they’d say, and yet all they earned was a few annas a day, not much more than a dockyard coolie. For a few coins they would allow their masters to use them as they wished, to destroy every trace of resistance to the power of the English. It always amazed me: Chinese peasants would never do this—allow themselves to be used to fight other people’s wars with so little profit for themselves. I would look into those faces and I would ask myself: What would it be like if I had something to defend—a home, a country, a family—and I found myself attacked by these ghostly men, these trusting boys? How do you fight an enemy who fights from neither enmity nor anger but in submission to orders from superiors, without protest and without conscience? “In English they use a word—it comes from the Bible—evil. I used to think of it when I talked to those soldiers. What other word could you use to describe their willingness to kill for their masters, to follow any command, no matter what it entailed? And yet, in the hospital, these sepoys would give me gifts, tokens of their gratitude—a carved flute, an orange. I would look into their eyes and see also a kind of innocence, a simplicity. These men, who would think nothing of setting fire to whole villages if their officers ordered, they too had a certain kind of innocence. An innocent evil. I could think of nothing more dangerous.” “Saya.” Rajkumar shrugged offhandedly. “They’re just tools. Without minds of their own. They count for nothing.” 1

In reply to by मारवा

समीरसूर 28/06/2016 - 11:47
हा परिच्छेद खूप आवडला. 'द ग्लास पॅलेस' वाचायलाच पाहिजे. खूप ओघवती आणि हृदयाला भिडणारी भाषा!

समीरसूर 28/06/2016 - 11:57
द गॉडफादर, गॉन विथ द विंड, फॉल ऑफ जायंट्स, ऑक्टॉपस, सायक्यामोर रो, उत्तरयोगी, गुड टू ग्रेट, स्वामी, नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील), व्यक्ती आणि वल्ली, चार नगरातले माझे विश्व (जयंत नारळीकर) आणि अजून बरीच पुस्तके...यातली मी काही दोनदा वाचली आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला आवडलेले पुस्तक हा धागा प्रतिसादानी ओसंडुन भरुन वाहु लागल्यामुळे नवा धागा सुरु करत आहे कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा एका पुस्तकावर जास्त सदस्य प्रतिसाद देऊ शकतात प्रतिसाद देताना ते पुस्तक तुम्हाला का आवडले/ त्यात वाचनीय काय आहे ते लिहावे ही विनन्ती मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत.

मला आवडलेले पुस्तक

विजुभाऊ ·

मृगनयनी 27/08/2008 - 18:09
नक्कीच... आपण... हा उपक्रम सुरु करुया..... इथे बर्‍याच जणांना ... त्याची जाण आहे.. :)

In reply to by मृगनयनी

विजुभाऊ 28/08/2008 - 12:00
विस्तारीत धागा या इथे http://www.misalpav.com/node/3256 पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

हेन्री शॅरियर यांचं "पॅपिलॉन" खुप आवडलं होतं. ही त्यांची सत्य जीवनकथा आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली लेखकाला फ्रेंच गिनियाच्या भर समुद्रातील एकाकी बेटावर असलेल्या, मृत्युचं साम्राज्य म्हणुन ओळखल्या जाणार्‍या तुरुंगात पाठवलं जातं. तिथुन त्यांच्या साहसी पलायनाची ही कथा. सात वेळा अपयश येवुन शेवटी लेखक तिथुन पळ काढण्यात यशस्वी झाले. त्यानंतरचे त्यांचे पुनर्वसनाचे प्रयत्नही तेवढेच रोमांचक आणि रंजक आहेत. या पुस्तकाचा पुढचा भाग ही आला होता "बँको" या नावाने. पण तो तेवढासा रुचला नाही. तसेच "गंथर बान्हमान" या जर्मन नाझी आर्मीतल्या वॉर कुरिअरचे "डेझर्टर" ही खुप सुरेख आहे. हिटलर आणि रोमेलच्या कृर आणि कठोर युद्धनीतीमुळे सर्वसामान्य सैनिकांची होणारी ससेहोलपट यात खुप प्रखरपणे आली आहे. ऐन युद्धतळाहुन 'गंथर' यांनी आपल्या एका सहकार्‍यासह मोटारसायकल वरुन पळ काढला. पण त्या सहकार्‍याछा मध्येच मृत्यु झाल्याने त्यांना पुढचा काही हजार मैलाचा प्रवास एकट्यानेच करावा लागला. हे पुस्तकही अतिषय रोमांचकारी आहे. मराठीतील म्हणाल तर राजा शिवछत्रपती हे शिवशाहीरांचे पुस्तक, रविंद्र भटांचे आळंदीच्या दैवी भावंडांच्या जिवनावरील "इंद्रायणीकाठी" आणि विद्या सप्रे यांचं भक्त मीरेच्या जिवनावरील "कृष्णमयि", स्वा. सावरकरांचं "माझी जन्मठेप" आणि गोपाळ गोडसेंचं " गांधीहत्या आणि मी", तसेच आचार्य रजनिशांचं "स्वर्ण पाखि था जो कभी" हे भारतभुमीविषयक पुस्तक ही मनापासुन आवडलेली. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by मृगनयनी

तर्री 10/07/2009 - 23:03
वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही.. कादंबरी : १. रथचक्र : श्री. ना. पेंडसे २. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे ३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर ४. ब्र : कवित महाजन. ५.बलुत : दया पवार ६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख ७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे ८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे ९.धर्मांनंद : जयवंत दळवी. १०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर कादंबरी : अनुवादित १.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी. २.पाडस : अनु : राम पटवरधन ३. नेमसेक : जुंपा लाहीरी ४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय ५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम १.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर २."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते. ३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट. ४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल. ५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे. ६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र. ७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत. ८. मैत्र : पु. ल. ९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग १०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट प्रवास-वर्णन पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा / { म्हैस !(?)} कथासंग्रह १. काजळ माया : जी.ए. २. सांज शकुन :जी.ए ३.पिंगळा वेळ : जी.ए. ४.रक्त चन्दन :जी .ए. ५. हंस अकेला : मेघना पेठे नाटक १. आत्मकथा : महेश एलकुंचवार २.पुरूष : जयवंत दळवी ३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर ४.किरवंत : प्रेमानंद गज्वी. ५.ती फुलराणी : पु.ल. ६. लग्न : जयवंत दळवी ७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर ८. तुज आहे तुज पाशी : पु.ल. ९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर १०. नटस्म्राट : शिरवाडकर खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!

विसोबा खेचर 27/08/2008 - 18:13
मला आवडलेले पुस्तक - व्यक्ति आणि वल्ली! लेखक - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 27/08/2008 - 18:39
ह्यातली व्यक्तिचित्र इतकी जिवंत वाटतात, तुम्हाआम्हाला नेहमी कुठेना कुठे भेटणारी वाटतात हेच हे पुस्तक आवडण्याचं प्रमुख कारण आहे. इतक्या जिवंत आणि जिवाभावाच्या वाटणार्‍या व्यक्तिरेखा अन्य कुठल्याच पुस्तकात मला दिसल्या नाहीत! आपला, (गजा खोत प्रेमी) तात्या.

शितल 27/08/2008 - 18:16
हो तोत्तोचान मी वाचले आहे, मला ते आवडले होते अजुन चिपर बाय डसन हे ही मस्त आहे. मला आवडलेली पुस्तके नॊट विदाऊट माय डॊटर दि ग्रेट एस्केप चारचैघी (नाव लक्षात येत नाही पण हेच असावे )(शांता शेळके यांनी अनुवादित केले आहे.)

In reply to by शितल

"नॉट विदाऊट माय डॉटर" हे बेट्टी महमूदीचं पुस्तक, अंगावर काटा आणतं. ही गोरी, अमेरीकन बाई एका ईराण्याशी लग्न करते. चार वर्ष छान जातात, पण पुढे तो कट्टर ईस्लामिक बनतो. हे दोघे आणि यांची छोटी मुलगी ईराण मधे जातात आणि तिथे या मायलेकींना कोंडलं जातं. बेट्टी तिथून कशी निसटते, विथ हर डॉटर याचं खूप छान वर्णन... जरूर वाचावं असं...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश 27/08/2008 - 22:34
अप्रतिम पुस्तक. तिथकीच भेदक कथा.. इस्लामचे कायदे, बायको आणि मुलीला प्रॉपर्टी या प्रकारात मोडणं, तिथला लोकांच्या सवयी/तपशील (जसे एकाच परातीत जेवणे, स्त्रीयांचे बुरखे आतून शेंबडाने बरबटलेले असणे वगैरे) नेमके टिपले आहेत... एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारे पुस्तक वाचायचे असेल तर हे त्या यादी अग्रक्रमाने येईल. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 28/08/2008 - 07:43
बेट्टी महमूदीचं पुस्तक अंगावर काटा आणणारचं आहे..तिची धडपड वाचताना फारच अस्वस्थ वाटलं..खरचं जबरदस्त अनुभव आहे. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 20/10/2013 - 17:19
नॉट विदाउट माय डॉटर. हे पुस्तक फारच एकांगी वाटले. त्या अमेरीकन स्त्रीने जे भोगले ते खरे असेल पण त्यात तीने नवर्‍याची बाजू कुठेच मांडलेली नाही

In reply to by शितल

शितल 27/08/2008 - 23:00
दि ग्रेट एस्केप हे पुस्तक ३ कैद्यांनी केलेल्या सुटके वर आहे. त्यांचे तुरूंगातुन पलायन त्याचे त्यांनी केलेले प्लॆनिंग, मग एक दोन वेळ फसलेला प्रयत्न, आणि शेवटी तुरूंगातुन पळुन जाण्यात यशस्वी झाल्यावर पायी केलेला प्रवास ह्याचे वर्णन अप्रतिम आहे. आणि चौघीजणी ह्या पुस्तकात गरीब घरातल्या ४ बहिणींची मस्त कथा आहे. त्याचे असणारे एकमेकींवरचे प्रेम आणि त्यांनी गरीब परिस्थित कसे दिवस काढले अजुन बरेच खुप सुंदर आहे पुस्तक आहे.

इनोबा म्हणे 27/08/2008 - 18:30
आवडते पुस्तक झपाटलेल्या गोष्टी लेखकः रत्नाकर मतकरी याच्याबद्दल काय सांगू?एकदा वाचूनच पहा. (पिंपळावरचा) इन्या वेताळ कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

आगाऊ कार्टा 27/08/2008 - 18:43
रत्नाकर मतकरी यांची जवळजवळ सगळे गूढकथा संग्रह मी वाचले आहेत. पण मला आवडलेले पुस्तक "ऐक.. टोले पडताहेत". यातील सर्व कथा छोट्या पण अतिशय परिणामकारक आहेत. संपूर्ण कथेला शेवटच्या परिच्छेदात कलाटणी देण्याचे मतकरींचे तंत्र मला खूप आवडते.

In reply to by आगाऊ कार्टा

विजुभाऊ 08/07/2009 - 11:52
मतकरींची जेवणावळ" कथा लहानपणी चोरून वाचली होती. तो थरार कित्येक महिने गेला नव्हता. बरेच वर्षानी ती कथा पुन्हा अचानक हाती पडली. आणि नक्की त्यातल्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला तो थरार जाणवला होता हे कळाले नाही. हातातून काहीतरी निसटून गेल्या सारखे वाटले :(

विजुभाऊ 27/08/2008 - 18:34
पुस्तक का आवडले / इतरानी ते का वाचावे तेही लिहा. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आगाऊ कार्टा 27/08/2008 - 18:35
मला आवडलेले पुस्तक - संभाजी -- लेखक - विश्वास पाटील ही एक अतिशय छान ऐतिहासिक कादंबरी आहे. विश्वास पाटील यांची शैली इतकी छान आहे की ते प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहतात. ही कादंबरी वाचताना संभाजी महाराजांचे उमदे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील संभाजी महाराजांचे औरंगजेबाने केलेले हाल पाहून तर अंगावर काटा उभा राहतो. संभाजी महाराजांविषयीचे पसरलेले अथवा जाणूनबुजून पसरवलेले गैरसमज लेखकाने अतिशय परखडपणे दूर केले आहेत.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:00
याशिवाय जरीला, झूल, हूल, बिढार ही सर्व आवडली होती. (मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो असे म्हणणारा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

( वैयक्तिक मत ) जरीला कोसलापेक्षा जास्त छान वाटले.... येकदम झकास... उरलेली नेमाडे यांची पुस्तके वाचली नाहीयेत.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:34
मास्तर, सहमत आहे. मला स्वतःलाही कोसलापेक्षा तुलनेने इतर पुस्तके जास्त आवडली. मात्र कोसला कमी दर्जाचे आहे असे नाही. आपला, (प्राचार्य) आजानुकर्ण नेमाडे

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 27/08/2008 - 23:34
कोसलाचं कौतुक खुद्द भाईकाकांनीही केलं होतं! नेमाड्यांनी भाईकाकांचा जन्मभर दुस्वास केला परंतु भाईकाका इतक्या मोठ्या मनाचे की त्यांनी नेमाड्यांच्या दुस्चासाकडे दुर्लक्ष करून कोसलाचं कौतुकच केलं! जयवंत दळवींनी जेव्हा याबाबत विस्तृत लिहिलं होतं तेव्हा मला भाईकाकाद्वेष्ट्या नेमाड्यांची कीव आली! बिच्चारे नेमाडे! असो, तात्या.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 28/08/2008 - 00:02
कोसला एकंदर चांगले आहे पण प्रसंगी शब्दबंबाळ, नशाबाज वाटू लागते. विशेषतः अजंठाच्या लेण्यांतील बुद्ध दर्शनाच्या वेळी. त्यातील काही वाक्ये खासच आहेत, जसे 'माझ्या कवडीइतक्या दु:खानं त्याचं वाळवंटाइतकं दु:ख मोजवत नाही' वगैरे. पण त्याच वेळी '...तिथे रक्ताचे तेंब टपटपू लागतात. माझी बधीर जीभ ते चाटू लागते ...' वगैरे नक्कीच शब्दबंबाळ वाटले. (रक्तबंबाळ)बेसनलाडू दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'बुद्धदर्शन' नावाच्या धड्यात हे सगळे होते आणि उपरोल्लेखित वाक्ये नेहमी प्रश्नपत्रिकेत संदर्भासह स्पष्ट करायला यायची ;) (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण 28/08/2008 - 00:21
बेलाशेठ, बुद्धदर्शनाचा प्रसंग हा कोसलातील अत्युच्च प्रसंग आहे. अजिंठाला जाण्यापुर्वी पांडुरंगच्या बहिणीचा ज्या परिस्थितीत मृत्यू झाला ती लक्षात घ्या. 'तिच्यासोबत तिचं छोटंसं गर्भाशयही गेलं आणि खानेसुमारीची प्रचंड मोठी रांग नाहीशी झाली' अशा अर्थाचे वाक्य वाचून आम्ही हादरलो होतो. हे सगळं दडपण मनावर असताना सांगवीकरला अजिंठ्यामध्ये सुचलेले विचार हे एक मोठे तत्त्वज्ञान आहे. मला तरी ते शब्दबंबाळ न वाटता अल्पाक्षरी वाटले. बरेच काही सांगायची इच्छा असूनही शब्द जवळ नाहीत म्हणून सांगवीकरने तो प्रसंग आवरता घेतला असे वाटले. आपला, (सुरेश) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू 28/08/2008 - 00:22
कर्णा, शब्दबंबाळपणाचा आक्षेप/मत फक्त ठराविक वाक्यांपुरताच मर्यादित आहे. एकंदर पुस्तक, व्यक्ती, प्रसंग इ. चांगले आहे तसेच काही अल्पाक्षरी वाक्येही फारच सूचक आणि चांगली आहेत, हे कबूल केलेच आहे. (सहमत)बेसनलाडू

भाग्यश्री 27/08/2008 - 22:43
तोत्तोचान, चिपर बाय डझन, शाळा, झेन गार्डन -> मिलिंद बोकील, नॉट विदाऊट माय डॉटर, चौघीजणी(ओरिजिनल नॉव्हेल - Little Women by Louisa May Alcott) अनुवाद शांता शेळके. माझे लंडन, चिनिमाती, दक्षिणरंग, मेक्सिकोपर्व्,इजिप्तायन्,ग्रीकांजली,तुर्कनामा - प्रवासवर्णनं -> मीना प्रभु.. पुलंची सर्व, एकेकाळी वपुंची सर्व..गौरी देशपांडे, सानिया यांची सर्व.. आहे मनोहर तरी, सोयरे सकळ -> सुनीता देशपांडे fountainhead, all dan brown collection, all of jeffery archer, हॅरी पॉटर सिरीज.. मोस्ट फेव : The goal by Dr. Eliyahu Goldratt एंडलेस लिस्ट.. ! लिहीता लिहीता एका पुस्तकाची अट लक्षातच राहीली नाही! :|

मस्त धागा आहे विजुभौ. आपल्याला एखादी गोष्ट करावी असं वाटत असताना दुसर्‍या कुणी ती करावी आणि आपल्याला कसल्याही कष्टांविना आयती मिळावी, याहून जास्त सुखाचं काही असतं का?! माझं सध्याचं आवडतं पुस्तक - (कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल. :() नाटक - एक पडदा आणि तीन घंटा नाटकातील काल आणि अवकाश यांचा अभ्यास राजीव नाईक अक्षर प्रकाशन काही काही नाटकं एका रात्रीत घडतात. काही जवळपास पन्नास-साठ वर्षांचा कालावधी साकारतात. काही किती काळात घडतात याला काही महत्त्वच नसतं. काही नेमक्या कोणत्या काळात घडतात, यावर नाटकाचं नाटकपण ठरतं. काही एकाच वेळी दोन काळांत. काही काळाच्या गोठलेल्या पोकळीत. त्यासाठी वापरलेल्या नाट्यांतर्गत क्लृप्त्या तर कितीक. हे काळाचं झालं. काही नाटकं राजमहालात घडतात. काही बेडरुममधे. बरीचशी दिवाणखान्यात! शिवाय त्यांचे प्रयोग निरनिराळ्या मंचांवर होतात. कमानी सेट, ग्रीक नाट्यघर, निकट मंच, कधी थेट रस्त्यावर होणारं पथनाट्य. पीटर ब्रुक यांच्या महाभारतासारखी काही तळ्याकाठचा उसना अवकाश नाटकासाठी वापरणारी. हा अवकाश. या स्थळ-काळाचे लागेबांधे काय असतात नाटकातल्या आशयाशी? त्यामुळे प्रेक्षकांना नक्की काय बदल जाणवतो? कसं ठरतं हे सगळं? निरनिराळ्या नाटकांची उदाहरणं देत अगदी साध्यासोप्या भाषेत केलेली ही चिकित्सा एखाद्या कादंबरीइतकी मनोरंजक आहे. त्यामुळे घाट आणि निरनिराळी साधनं यांच्याही फार चटकन परिचय होतो आणि ते सिनेमे पाहताना वा इतर पुस्तकं वाचतानाही फार फार उपयोगी पडतं.

In reply to by मेघना भुस्कुटे

कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल त्या बर्‍याच मंडळींपैकी मी एक आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

नीधप 08/07/2009 - 19:23
ते वाचलंय. एकेकाळी केलेल्या अभ्यासाचं टेक्स्ट आहे ते. राजीव सरांचंच 'खेळ नाटकाचा' हे ही जरूर वाचा. यातल्या बर्‍याच गोष्टी आम्हाला(ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथील त्यांनी शिकवलेली पहिली बॅच) 'प्रयोगाचे सौंदर्यशास्त्र' आणि 'जागतिक रंगभूमी' हे शिकवताना त्यांनी मांडलेली निरीक्षणे आहेत. वाचल्यावर परत एकदा सरांच्या लेक्चरला बसल्यासारखं वाटलं. मरायचो आम्ही त्यांच्या लेक्चरसाठी. वाट बघत असायचो. क्लिष्ट विषय सहजपणे समजावून देणे अगदी डोक्यात पक्का बसेल असा समजावून देणे हे त्यांनीच करावं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

मला आवडलेलं सर्वात पहिलं पुस्तक, 'मी पाहिलेला रशिया' लेखकः जादूगार रघुवीर. फार लहानपणी वाचलं आहे. आवडण्याचे कारण त्या वयात (इयत्ता ७वी किंवा ८वी) जादूगार रघुवीर हे माझे दैवत होते. दूसरे कारण घरबसल्या परदेशदर्शन. आईने लावलेली वाचनाची आवड जोपासताना पुढील आयुष्यात अनेक पुस्तके आवडली, पण विजूभाऊंनी एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे बंधन घातले आहे.

शितल 27/08/2008 - 23:09
शोभा डे यांचे स्पाऊज हे पुस्तक देखिल सुरेख आहे. नवरा बायकोंचा नात्याची विण छान मांडली आहे.

आई..........आई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आपली आई.  आईबद्दल आपण कितीही बोललो, लिहिले तरी ते व्यक्त होत नाही, अर्थात आईचं प्रेम अनुभव, सर्वच मिळण्यासाठीही नशीब असावं लागतं.  मॅक्झिम गार्कीच्या आईपासून साने गुरुजींच्या शामच्या आईपर्यंत ....यशवंताच्या आईपासून नारायन सुर्व्यांना बाळगणार्‍या आईपर्यंत. कितीही वाचायला मिळालं तरी ते अपुर्णच वाटत असते.

Book_Image

'आई समजून घेतांना' हे उत्तम कांबळेचे (दै. सकाळचे संपादक ) पुस्तक वाचतांना आणखि एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी तानत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वतःसाठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वतः अतिशय कष्ट घेऊन मुलांचा वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई.  ' तुझ्या लहाणपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाचा चॉकलेटचा एकच घास करतो तुला मागचं दिवस कसं आठवत नाही'' लेखकाला वारंवार भुतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाथी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते. लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले जेवलीस का ? ती  म्हणायची, ढकलंलं दोन तुकडं पोटात...कशी आहेस ? असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय.....'' डॉक्टरांकडे जाऊया का ? ' डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो ? असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट तिच्यासमोर आजच्या सुखात भुतकाळातील  भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणी रमुन जातो. पैसे नसल्यामुळ डोक्याचे केसांचा पु़ंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई.  फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई.  असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहुन स्वतःहुन नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून ' आई समजून घेतांना लेखाकाची दमझाक होते. पुस्तक वाचल्यानंतर तोंडावर पुस्तक टाकून शुन्य अवस्थेत वाचकांना घेऊन  जाणार्‍या पुस्तकांपैकी हे नक्कीच नाही.   हे पुस्तक वाचतांना मधेच कंटाळा येतो. पुस्तक सोडून द्यावेसे वाटते. तरीही एक वेगळे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक चुकवू नये असेही प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 28/08/2008 - 09:54
हा प्रतिसाद मस्तच पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

रामदास 27/08/2008 - 23:21
बार्बेरीअन्स ऍट द गेट. सिल्वेर बेअर्स. ब्युटीफूल माईंड. जत्रा साप्ताहीकात क्रमशा कादंबरी यायची.प्र. वा.बोधे(कोयनानगर)नावाचे लेखक होते.या लेखकांच्या सगळ्या कादंबर्‍या.एव्हढा ओरीजीनल स्टफ परत वाचला नाही.

In reply to by आजानुकर्ण

रामदास 27/08/2008 - 23:55
प्रा. बोधे असं लिहायचं होतं. वयानुसार लिहीणं /वाचणं/ऐकणं यात बर्‍याच गमती जमती होतात. मॉर्गन स्टॅनले च्या ऐवजी एकदा ऑर्गन स्टॅनले लिहीलं होतं.

यादी खूप मोठी आहे विजूभाऊ प्रभाकर पे॑ढारकरा॑चे रार॑ग ढा॑ग (मौज प्रका.) हे माझे अतिशय आवडते पुस्तक आहे. लेखक स्वतः पटकथा लेखक व दिग्दर्शक असल्याने (शिवाय वडील साक्षात भालजी पे॑ढारकर!) हे पुस्तक वाचता॑ना आपण एखादा चित्रपट पाहात आहोत असे वाटते. अतिशय ओघवती शैली आणि अचूक शब्द फेक ही पे॑ढारकरा॑ची खासियत. सगळ्यात महत्वाचे कथासार- स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला जी गोष्ट पटली नाही त्याच्याविरूद्ध सगळ्या सिस्टीमशी लढा द्यायची कथानायकाची जिद्द पाहून मन स्तिमीत होते. मी ती काद॑बरी खूपदा वाचली. ऍक्च्युअल रार॑ग ढा॑ग व त्याच्याशी स॑बधित काही सत्य माहीती माझ्या हाती लागल्यावर मी अशा निष्कर्षाप्रत आलो की ही गोष्ट बरीचशी खरी आहे. मी लेखकाची भेटही घेतली व खातरजमा करून घेतली. ह्या निता॑तसु॑दर काद॑बरीवर चित्रपट होणे अत्य॑त गरजेचे आहे.

छोटा डॉन 27/08/2008 - 23:44
यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक लेखकांची निवडक पुस्तके सांगतो ... १. भाईकाका : एक शुन्य मी [ त्यांचे सगळ्यात मास्टरपीस ], व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी. २. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही. ३. ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते. ४. प्र. के. अत्रे : मी कसा घडलो, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा. ५. फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरी भारतीय स्वातंत्रसंग्रामाचे एका त्रयस्थाच्या दॄष्टीतुन केलेले विवेचन. गांधी, गोडसे, नेहरु , जीना व ब्रीटीश सत्ताधार्‍यांचे अनेक आपल्याला माहित नसलेले पैलु सापडले. अप्रतिम ! ६. संभाजी -- लेखक - विश्वास पाटील ७. वि. ग. कानिटकर : नाझी भस्मासुराचा उदयास्त, ८. बाकी शुन्य : कमलेश वालावलकर ९. शिरीष कणेकर : डो. कणेकरांचा मुलगा, डॉलरच्या देशा [ अप्रतिम ] १०. अविनाश धर्माधिकारी : अस्वस्थ दशकाची डायरी अशी लिस्ट पुर्ण होऊच शकणार नाही. पण "इति लेखनसीमा" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... दांडेकर

In reply to by छोटा डॉन

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:46
फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरी
अजिबात आवडले नाही. आपला, (स्वतंत्र) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 27/08/2008 - 23:51
कर्णा, आपल्या अभ्यासाबद्दल आदर आहे आणि मताबद्दलही ... पण न आवडल्याची कारणे द्यावीत म्हणजे आपल्याला तुलना करणे सोपे जाईल ... "अजिबात आवडले नाही" म्हणुन विषय पुर्ण होत नाही .... असो. हा विषय आणि धागा वादाचा नाही ... तरी "न आवडल्याची " कारणे व स्पष्टीकरण दिल्यास आम्हाला आनंद होईल ... शेवटी काय तर कोलबेर म्हणतात तेच खरे , मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:54
सध्या थोडा गडबडीत आहे. मात्र ते नाव वाचून काही जुन्या जखमांवरची खपली निघाली आणि रक्त भळभळून वाहू लागले म्हणून प्रतिक्रिया दिली. आपला, (जखमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 27/08/2008 - 23:56
गडबडीत असाल तर काही हरकत नाही, नंतर कधीतरी ... जर "ती जखम" पुन्हा भळभळुन वाहणार असेल त्यर टाळलेलेच बरे नाही का ? पण आपल्याबरोबर चर्चेला मजा आली असती. असो. पुन्हा कधी तरी. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मुक्तसुनीत 27/08/2008 - 23:47
ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते. हे म्हणजे "सोबतचे पहिले पान" का ?

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 27/08/2008 - 23:54
पुस्तकाचे नाव खरचं आत्ता आठवत नाही. खुप जुने होते, माझ्या आजोबांनी विकत घेतलेले, मी वाचताना पार चिंध्या चिंध्या झाल्या होत्या .... तरीही वडीलांना फोन करुन नाव विचारेन आणि "मिपावर" टाकेन ... अवांतर : "सोबती" हे बेहर्‍यांनी चालवलेले मासीक / पाक्षीक असावे ... त्यातल्याच निवडक लेखांचा हा संग्रह असण्याची शक्यता आहे. नक्की माहित नाही. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:56
सोबत हे नाव. बाईंडरच्या वेळी लालन सारंग आणि विजय तेंडुलकरांवर अतिशय घाणेरडे आरोप सोबत मधून झाले होते. विशेषतः शंकर सखाराम यांचे लेख व भाषणे. आपला, (नाट्यकर्मी) आजानुकर्ण बाईंडर

In reply to by आजानुकर्ण

मुक्तसुनीत 27/08/2008 - 23:59
माझ्या मते "सोबतचे पहिले पान" सारख्या संग्रहातून बेहर्‍यांची केवळ एकच बाजू समोर येते : समाज-संघटक , अनिष्ट-प्रथांचे विरोधक वगैरे. बाकी बेहर्‍यांची किर्ती एक "बुली" म्हणूनच होती.

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 28/08/2008 - 00:01
नावाबद्दल थोडेसे कंफ्युजन होतेच मला तरी पण तुटक आठवत होते म्हणुन टाकले ... बाकी ते "सखाराम बाईंडर" चे म्हणाल तर मला जास्त काही वावगे वाटाले नाही. कुणा एकाची बाजु घेताना दुसर्‍यावर टीका करावीच लागेल. टीका फक्त जास्तच बोचरी व जहरी होती इतकेच. पण त्यांची शैलीच तशी होती. आदरणीय बाळासाहेब ठाकरे व बेहरे हे दोघेही "बिनधास्त व सडेतोड" लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत. भाषेच्या सभ्यतेविषयी आणि साजाविषयी त्यांची मते काहीशी टोकाची आहेत. ज्यांचा त्यांचा स्वभाव... [ त्या दोघांचेही एकदा वाजले होते पण तो प्रश्न निराळा ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

विकास 28/08/2008 - 00:03
ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते. कदाचीत आपल्याला "हार आणि प्रहार" या लेख संग्रहाबाबत बोलायचे असावे. तो चांगला आहे. अर्थात ते आता वाचताना त्या काळातली पूर्वपिठीका माहीती असणे महत्वाचे आहे.

In reply to by विकास

छोटा डॉन 28/08/2008 - 16:55
आजच मी माझ्या वडीलांना फोन करुन पुस्तकाचे नाव विचारले ... ते "हार आणि प्रहारच" आहे. पटकन शंकानिरसन केल्याबदाल "विकासरावांना" धन्यवाद .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 28/08/2008 - 09:56
कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्ताकाबद्दल लिहावे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by छोटा डॉन

छोटा डॉन 28/08/2008 - 20:10
२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.
ज्याचे नाव आठवत नव्हते ते आठवले. "दास डोंगरी राहतो" असे काही तरी आहे. एकदम मस्त, समर्थ रामदासांवर आहे. चांगली गोष्ट म्हणजे हे पुस्तक ठिकठिकाणी त्यांच्या "श्लोकांनी" सजवलेले आहे त्यामुळे एकदम रसाळ वाटते. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनीषा 27/08/2008 - 23:50
वास्तव रामायण लेखक - डॉ. प. वि. वर्तक यात त्यानी आकाशातील ग्रह-ता-यांच्या स्थिती वरुन रामायणाची कालनिश्चिती केली आहे. तसेच रामायणातील अनेक घटना , ज्या आपण केवळ पुराण कथा म्हणून ऐकतो/ वाचतो आणि काही वेळा त्याचा विपर्यास केला जातो, त्याचे अतिशय तर्कशुद्ध विश्लेश्ण केले आहे. तसेच रामायण हे नुसते काल्पनीक पुराण नसुन सत्यकथा आहे या बद्दल सुद्धा खूप चांगली माहिती दिली आहे. तसेच रामायण नक्की कुठे घडले.. सीतेला शोधण्यासाठी राम कुठे आणि कसा गेला हे सुद्धा त्यानी अनेक पुरावे देउन सांगीतले आहे..

In reply to by मनीषा

विकास 28/08/2008 - 00:00
मला देखील वास्तव रामायण आवडले. तसेच त्यांचे स्वयंभू पुस्तकपण छान आहे. अर्थात दोन्ही पुस्तकात काही गोष्टी अवास्तव आहेत पण त्यामुळे संपूर्ण पुस्तकाची व्हॅलीडीटी कमी झाली असे वाटत नाही... उ.दा. शिवलींगाबद्दल खूप चांगली माहीती देत असताना अचानक त्याचा संबंध अणूभट्टीशी लावणे कारण त्याचा अकार पण तसाच असतो. :)

In reply to by मनीषा

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:14
लेखक - डॉ. प. वि. वर्तक म्हणजे सूक्ष्मरुपाने मंगळावर वगैरे जाणारे तेच ना? ;) आपला, (नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 28/08/2008 - 00:22
नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला ध्वनीरुपाने येणारे तात्या माहीती आहेत. आता जरा काळजी वाटते मागे पुढे कुठे तात्या उभे नसतील न अशी :-)

In reply to by मनीषा

चतुरंग 28/08/2008 - 00:25
वास्तव रामायण, स्वयंभू, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण (हे संपूर्ण वाचून झाले नाही, एकदोनच भाग वाचलेत) पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. त्यातील माहिती त्यांनी कशी शोधून काढली असावी ह्याबद्दल त्यांच्याशीच चर्चा करुन जास्ती समजून घेता यायला हवे. ग्रह गणित, संस्कृत इ.चा त्यांचा व्यासंग चांगलाच आहे. वेगळ्या नजरेने रुढ गोष्टींकडे बघायची त्यांची शैली हटके आहे. मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. अर्थात माझे थोड्या वाचनाने आणि परिचयाने झालेले हे मत आहे. ही पुस्तके वाचूनही बरीच वर्षे झाली. पुन्हा वाचायची इच्छा आहे. रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत. चतुरंग

In reply to by चतुरंग

विकास 28/08/2008 - 00:58
पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. एकदम मान्य! मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. मी त्यांना भेटलेलो नाही पण तीन भाषणे लहान (- म्हणजे मी लहान) असताना ऐकलेली आहेत. त्यांच्याबद्दल पुणेकरांकडून बरेच गंमतशीर किस्से ऐकलेले आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. "प्रचारकी" म्हणजे कुठल्या अर्थाने या वर आपले अनुभव सारखे आहेत का वेगळे ते ठरवावे लागेल ;) पण अजूनही लक्षात आहेत. त्यात फक्त एकच वाटते की थोडेफार "तर्कट" आहेत. रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत. १००% मान्य! अधिक माहितीसाठी इथे पाहू शकता. =)) त्यांचे संकेतस्थळ जर विश्वामित्राने बघितले तर तो ढसाढसा रडेल अथवा साक्षात ब्रम्हदेवाकडे तक्रार घेऊन जाईल" "जी पदवी मिळायला मला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागली, सरते शेवटी अहंभाव सोडावा लागला, ती पदवी म्हणजे ब्रम्हर्षी नाही , पण ब्रम्हश्री ही नवीन पदवी वर्तकांसाठी तयार केलीस का?

प्राजु 28/08/2008 - 00:01
सुधा मूर्ती यांचे वाईज ऍण्ड आदर वाईज.. तसेच त्यांचेच गोष्टी माणसांच्या... वाईज ऍण्ड आदर मध्ये सुधा मूर्तींना इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने समाजकार्य करताना आलेले माणसांचे अनुभव लिहिलेले आहेत. तर सुधा मूर्तीना लहानपणापासून ज्या व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव पाडला त्यांच्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात जे आर डी टाटा, रतन टाटा, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम , नारायण मूर्ती.. यांच्याशिवाय बर्‍याच मोठमोठ्या व्यक्तींबद्दल लिहिले आहे. अतिशय सुंदर पुस्तके आहेत दोन्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विकास 28/08/2008 - 00:16
एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल २ विज्ञान कादंबर्‍या स्तके एकाच प्रतिसादात सांगून प्रतिसादाची संख्या मर्यादीत करत आहे. तेंव्हा क्षमस्व! फाउंडेशन मालीका - आयझॅक ऍसिमोव्ह. रोबोची संकल्पना त्यात शेवटी शेवटी आली आहे असे धरले जाते (मला विशेष जाणवले नाही, पण त्या काळात वाटले असेल). बाकी त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा संबंध आपण आपल्या जगाला लावू शकतो. मिपावर सुरवातीस मी यावर लिहीले होते. आवडते वाक्य - "व्हायलन्स इज द लास्ट रेफ्यूज ऑफ इन्कॉपिटंट". (पेशन्स ठेवून) शेवटच्या पुस्तकापर्यंत वाचल्यास, "चराचर सृष्टीएकमेकांशी संलग्न आहे आणि त्या अर्थाने विश्व हे एकच जीव आहे ," असा यात अर्थ समजतो. २००१ ए स्पेस ओडीसी - आर्थर सी क्लर्क. यात हॅल कॉम्प्यूटरचा जो आत्ताच्या काळातील सूपर काँप्यूटर आहे आणि स्पेसशिपचे वर्णन आहे जेंव्हा काहीच अस्तित्वात नव्हते. यात शेवटी - पुनरपी जननम पुनरपी मरणम ही संकल्पना सांगितली आहे. मराठीत "यक्षाची देणगी" हे नारळीकरांचे पुस्तक आवडले होते.

In reply to by विकास

वाचक 28/08/2008 - 07:58
अवांतरः HAL ही अक्षरे सांकेतिक स्वरुपात IBM कडे बोट दाखवतात असा एक दावा आहे - बघा IBM च्या आधीचे प्रत्येक अक्षर म्हणजे HAL :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 29/08/2008 - 04:30
२००१ ए स्पेस ओडीसी हा चित्रपट पहाताना मला तीनदा झोप लागली. शेवटी मी प्रयत्न सोडून दिला. बहुतांशी पुस्तकांवरून काढलेल्या चित्रपटांप्रमाणेच ह्या संदर्भात घडले आहे. चित्रपट ग्रेट नाही आहे. शिवाय तो बराच जुना आहे, त्यातील सेटींग्ज पण जुन्या स्टाईलची, (बहुतेक वेळेस कथेमुळे) फक्त दोन व्यक्तींवर चित्रित केलेली असल्याने ते समजत नाही.

In reply to by विकास

धमाल मुलगा 28/08/2008 - 10:48
मी आयझॅक ऍसिमॉव्ह घेऊन ऑफिसच्या बसमध्ये वाचायचो,तेव्हा आजुबाजुच्या बर्‍याच भिवया आश्चर्य /आदर की आणखी काही कोण जाणे ह्या भावना घेऊन वर चढायच्या. तेव्हा मनाला छान गुदगुल्या व्हायच्या, आणि नाकावरचा चष्मा आणखी पुढे ओढुन मी सभोवतालास कस्पटासमान मानुन पुस्तकात शिरायचो...... ...पण खरं सांगु, कथारुप जरी असलं, तरी माझ्या बालबुध्दीला काही झेपला नाही बॉ ऍसिमॉव्ह. बर्‍याचजणांच्या गप्पा ऐकुन 'फाऊंडेशन' घेतलं खरं, पण अजुनही शेवटची काही प्रकरणं वाचायची बाकीच आहेत. शैली थोडीशी बोजड वाटली. हां पण 'सायकोहिस्ट्री'चं कव्हर मात्र छान!

मैत्र 28/08/2008 - 03:48
गोनीदांचं छोटंसं पुस्तक आहे. त्यांची सगळीच पुस्तकं सुंदर आहेत पडघवली, मॄण्मयी, रानभुली, कुण्या एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत... पण हा बुधा त्याच्या अतिशय साध्या निसर्गाच्या जवळ अशा आयुष्यानं फार कुठे तरी हलवून जातो.. जरूर वाचा... नियम मोडून दुसरं पुस्तक म्हणजे विजय देवधरांचं अनुवादित डेझर्टर...

सुचेल तसं 28/08/2008 - 08:32
फक्त एक पुस्तक निवडणं शक्य नाही.... १) व्यक्ति आणि वल्ली, असा मी असा मी = पु.ल.देशपांडे २) माणदेशी माणसं, बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर ३) शाळा - मिलिंद बोकील ४) आणि मी - मंगला गोडबोले ५) पार्टनर - व.पु.काळे ६) दिवसेंदिवस - शं. ना. नवरे (एका लग्न न झालेल्या मुलाची डायरी.... मस्त आहे.) ७) अनुवादितः डेझर्टर, पॅपिलॉन, नॉट विदाऊट माय डॉटर ८) गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

शिप्रा 28/08/2008 - 11:49
एक होता कार्व्हर अनुवाद :- वीणा गव्हाणकर.. हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

जी. ए. च्या पुस्तकान्चा कुणीच कसा उल्लेख केला नाही. त्यान्च्या सगळ्या पुस्तकातल मला आवडलेल ' माणसे: अरभाट अणि चिल्लर'. मी शाळेत असताना वाचल होत, पण अजुनी त्यातले सन्वाद जसेच्या तसे लक्शात आहेत. इथे कोणी वाचलय का?

नीधप 08/07/2009 - 19:49
स्टुडीओ - सुभाष अवचट यांचे पुस्तक. माझे अतिशय आवडते. सृजनाची प्रक्रीया, कलाकार म्हणून वाढणे, कलाकाराच्या व्यक्तित्वातली गंमत... आणि अजून बरंच काही या पुस्तकात आहे. तसं काही हे आत्मचरीत्र नाही पण त्यांच्या जगण्याच्या अनुभवाशी निगडीत आहे. हे पुस्तक म्हणजे सिप बाय सिप हळू हळू घशात उतरणारी आणि कणाकणाने हळूहळू नशा चढवणारी ही एक वाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

सचीन जी 08/07/2009 - 19:59
१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी या यादीत व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

सचीन जी 08/07/2009 - 20:00
१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी सर्व प्रतिक्रियांमधे व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

नीधप 08/07/2009 - 20:03
'लस्ट फॉर लाइफ' कादंबरीचे मूळ लेखक - आयर्व्हिंग स्टोन स्वैर अनुवाद 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग' - माधुरी पुरंदरे अप्रतिम पुस्तक. कलंदर आणि झपाटलेला अश्या चावून चोथा झालेल्या शब्दांच्या कैक योजने पलिकडे असलेल्या रंग आणि रेषा जगणार्‍या गॉग च्या आयुष्यावरची कादंबरी. प्रत्येकाने वाचावी अशी. गॉग आवडत असेलच तर परत त्याच्या प्रेमात पडाल. (त्याच्याबाबत प्रेमात पडणे नाहीतर पाठ फिरवणे ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. हा ठिक आहे म्हणत गॉगला ओलांडू शकत नाही आपण.) गॉग माहीत नसेल तर नवीन जग तुमच्यापुढे उलगडेल. गॉग आवडत नसेल तर तुम्हाला तो समजायला मदत होईल. काही असो. वाचा नक्की. अवांतरः कोणी अ‍ॅमस्टरडॅमला असेल, जाणार असेल तर तिथलं गॉग म्युझियम न चुकता बघा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

भोचक 10/07/2009 - 14:37
सहमत. हे पुस्तक खूपच छान आहे. लहानपणीच वाचले होते. तेव्हापासून गॉग मनात रुतून बसलाय. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

विमुक्त 10/07/2009 - 14:49
माची वरला बुधा .... गो.नि.दा. फार छान लिहीलय.... भटकायची आवड असल्या मुळं मला ते जाम आवडत... आणि गो.नि.दा. एकदम सोप्या भाशेत लिहीतात...

तर्री 10/07/2009 - 23:05
वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही.. कादंबरी : १. रथचक्र : श्री. ना. पेंडसे २. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे ३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर ४. ब्र : कवित महाजन. ५.बलुत : दया पवार ६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख ७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे ८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे ९.धर्मांनंद : जयवंत दळवी. १०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर कादंबरी : अनुवादित १.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी. २.पाडस : अनु : राम पटवरधन ३. नेमसेक : जुंपा लाहीरी ४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय ५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम १.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर २."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते. ३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट. ४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल. ५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे. ६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र. ७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत. ८. मैत्र : पु. ल. ९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग १०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट प्रवास-वर्णन पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा / { म्हैस !(?)} कथासंग्रह १. काजळ माया : जी.ए. २. सांज शकुन :जी.ए ३.पिंगळा वेळ : जी.ए. ४.रक्त चन्दन :जी .ए. ५. हंस अकेला : मेघना पेठे नाटक १. आत्मकथा : महेश एलकुंचवार २.पुरूष : जयवंत दळवी ३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर ४.किरवंत : प्रेमानंद गज्वी. ५.ती फुलराणी : पु.ल. ६. लग्न : जयवंत दळवी ७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर ८. तुज आहे तुज पाशी : पु.ल. ९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर १०. नटस्म्राट : शिरवाडकर खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!

मृगनयनी 27/08/2008 - 18:09
नक्कीच... आपण... हा उपक्रम सुरु करुया..... इथे बर्‍याच जणांना ... त्याची जाण आहे.. :)

In reply to by मृगनयनी

विजुभाऊ 28/08/2008 - 12:00
विस्तारीत धागा या इथे http://www.misalpav.com/node/3256 पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

हेन्री शॅरियर यांचं "पॅपिलॉन" खुप आवडलं होतं. ही त्यांची सत्य जीवनकथा आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली लेखकाला फ्रेंच गिनियाच्या भर समुद्रातील एकाकी बेटावर असलेल्या, मृत्युचं साम्राज्य म्हणुन ओळखल्या जाणार्‍या तुरुंगात पाठवलं जातं. तिथुन त्यांच्या साहसी पलायनाची ही कथा. सात वेळा अपयश येवुन शेवटी लेखक तिथुन पळ काढण्यात यशस्वी झाले. त्यानंतरचे त्यांचे पुनर्वसनाचे प्रयत्नही तेवढेच रोमांचक आणि रंजक आहेत. या पुस्तकाचा पुढचा भाग ही आला होता "बँको" या नावाने. पण तो तेवढासा रुचला नाही. तसेच "गंथर बान्हमान" या जर्मन नाझी आर्मीतल्या वॉर कुरिअरचे "डेझर्टर" ही खुप सुरेख आहे. हिटलर आणि रोमेलच्या कृर आणि कठोर युद्धनीतीमुळे सर्वसामान्य सैनिकांची होणारी ससेहोलपट यात खुप प्रखरपणे आली आहे. ऐन युद्धतळाहुन 'गंथर' यांनी आपल्या एका सहकार्‍यासह मोटारसायकल वरुन पळ काढला. पण त्या सहकार्‍याछा मध्येच मृत्यु झाल्याने त्यांना पुढचा काही हजार मैलाचा प्रवास एकट्यानेच करावा लागला. हे पुस्तकही अतिषय रोमांचकारी आहे. मराठीतील म्हणाल तर राजा शिवछत्रपती हे शिवशाहीरांचे पुस्तक, रविंद्र भटांचे आळंदीच्या दैवी भावंडांच्या जिवनावरील "इंद्रायणीकाठी" आणि विद्या सप्रे यांचं भक्त मीरेच्या जिवनावरील "कृष्णमयि", स्वा. सावरकरांचं "माझी जन्मठेप" आणि गोपाळ गोडसेंचं " गांधीहत्या आणि मी", तसेच आचार्य रजनिशांचं "स्वर्ण पाखि था जो कभी" हे भारतभुमीविषयक पुस्तक ही मनापासुन आवडलेली. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by मृगनयनी

तर्री 10/07/2009 - 23:03
वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही.. कादंबरी : १. रथचक्र : श्री. ना. पेंडसे २. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे ३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर ४. ब्र : कवित महाजन. ५.बलुत : दया पवार ६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख ७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे ८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे ९.धर्मांनंद : जयवंत दळवी. १०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर कादंबरी : अनुवादित १.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी. २.पाडस : अनु : राम पटवरधन ३. नेमसेक : जुंपा लाहीरी ४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय ५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम १.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर २."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते. ३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट. ४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल. ५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे. ६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र. ७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत. ८. मैत्र : पु. ल. ९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग १०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट प्रवास-वर्णन पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा / { म्हैस !(?)} कथासंग्रह १. काजळ माया : जी.ए. २. सांज शकुन :जी.ए ३.पिंगळा वेळ : जी.ए. ४.रक्त चन्दन :जी .ए. ५. हंस अकेला : मेघना पेठे नाटक १. आत्मकथा : महेश एलकुंचवार २.पुरूष : जयवंत दळवी ३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर ४.किरवंत : प्रेमानंद गज्वी. ५.ती फुलराणी : पु.ल. ६. लग्न : जयवंत दळवी ७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर ८. तुज आहे तुज पाशी : पु.ल. ९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर १०. नटस्म्राट : शिरवाडकर खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!

विसोबा खेचर 27/08/2008 - 18:13
मला आवडलेले पुस्तक - व्यक्ति आणि वल्ली! लेखक - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 27/08/2008 - 18:39
ह्यातली व्यक्तिचित्र इतकी जिवंत वाटतात, तुम्हाआम्हाला नेहमी कुठेना कुठे भेटणारी वाटतात हेच हे पुस्तक आवडण्याचं प्रमुख कारण आहे. इतक्या जिवंत आणि जिवाभावाच्या वाटणार्‍या व्यक्तिरेखा अन्य कुठल्याच पुस्तकात मला दिसल्या नाहीत! आपला, (गजा खोत प्रेमी) तात्या.

शितल 27/08/2008 - 18:16
हो तोत्तोचान मी वाचले आहे, मला ते आवडले होते अजुन चिपर बाय डसन हे ही मस्त आहे. मला आवडलेली पुस्तके नॊट विदाऊट माय डॊटर दि ग्रेट एस्केप चारचैघी (नाव लक्षात येत नाही पण हेच असावे )(शांता शेळके यांनी अनुवादित केले आहे.)

In reply to by शितल

"नॉट विदाऊट माय डॉटर" हे बेट्टी महमूदीचं पुस्तक, अंगावर काटा आणतं. ही गोरी, अमेरीकन बाई एका ईराण्याशी लग्न करते. चार वर्ष छान जातात, पण पुढे तो कट्टर ईस्लामिक बनतो. हे दोघे आणि यांची छोटी मुलगी ईराण मधे जातात आणि तिथे या मायलेकींना कोंडलं जातं. बेट्टी तिथून कशी निसटते, विथ हर डॉटर याचं खूप छान वर्णन... जरूर वाचावं असं...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश 27/08/2008 - 22:34
अप्रतिम पुस्तक. तिथकीच भेदक कथा.. इस्लामचे कायदे, बायको आणि मुलीला प्रॉपर्टी या प्रकारात मोडणं, तिथला लोकांच्या सवयी/तपशील (जसे एकाच परातीत जेवणे, स्त्रीयांचे बुरखे आतून शेंबडाने बरबटलेले असणे वगैरे) नेमके टिपले आहेत... एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारे पुस्तक वाचायचे असेल तर हे त्या यादी अग्रक्रमाने येईल. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 28/08/2008 - 07:43
बेट्टी महमूदीचं पुस्तक अंगावर काटा आणणारचं आहे..तिची धडपड वाचताना फारच अस्वस्थ वाटलं..खरचं जबरदस्त अनुभव आहे. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 20/10/2013 - 17:19
नॉट विदाउट माय डॉटर. हे पुस्तक फारच एकांगी वाटले. त्या अमेरीकन स्त्रीने जे भोगले ते खरे असेल पण त्यात तीने नवर्‍याची बाजू कुठेच मांडलेली नाही

In reply to by शितल

शितल 27/08/2008 - 23:00
दि ग्रेट एस्केप हे पुस्तक ३ कैद्यांनी केलेल्या सुटके वर आहे. त्यांचे तुरूंगातुन पलायन त्याचे त्यांनी केलेले प्लॆनिंग, मग एक दोन वेळ फसलेला प्रयत्न, आणि शेवटी तुरूंगातुन पळुन जाण्यात यशस्वी झाल्यावर पायी केलेला प्रवास ह्याचे वर्णन अप्रतिम आहे. आणि चौघीजणी ह्या पुस्तकात गरीब घरातल्या ४ बहिणींची मस्त कथा आहे. त्याचे असणारे एकमेकींवरचे प्रेम आणि त्यांनी गरीब परिस्थित कसे दिवस काढले अजुन बरेच खुप सुंदर आहे पुस्तक आहे.

इनोबा म्हणे 27/08/2008 - 18:30
आवडते पुस्तक झपाटलेल्या गोष्टी लेखकः रत्नाकर मतकरी याच्याबद्दल काय सांगू?एकदा वाचूनच पहा. (पिंपळावरचा) इन्या वेताळ कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

आगाऊ कार्टा 27/08/2008 - 18:43
रत्नाकर मतकरी यांची जवळजवळ सगळे गूढकथा संग्रह मी वाचले आहेत. पण मला आवडलेले पुस्तक "ऐक.. टोले पडताहेत". यातील सर्व कथा छोट्या पण अतिशय परिणामकारक आहेत. संपूर्ण कथेला शेवटच्या परिच्छेदात कलाटणी देण्याचे मतकरींचे तंत्र मला खूप आवडते.

In reply to by आगाऊ कार्टा

विजुभाऊ 08/07/2009 - 11:52
मतकरींची जेवणावळ" कथा लहानपणी चोरून वाचली होती. तो थरार कित्येक महिने गेला नव्हता. बरेच वर्षानी ती कथा पुन्हा अचानक हाती पडली. आणि नक्की त्यातल्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला तो थरार जाणवला होता हे कळाले नाही. हातातून काहीतरी निसटून गेल्या सारखे वाटले :(

विजुभाऊ 27/08/2008 - 18:34
पुस्तक का आवडले / इतरानी ते का वाचावे तेही लिहा. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आगाऊ कार्टा 27/08/2008 - 18:35
मला आवडलेले पुस्तक - संभाजी -- लेखक - विश्वास पाटील ही एक अतिशय छान ऐतिहासिक कादंबरी आहे. विश्वास पाटील यांची शैली इतकी छान आहे की ते प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहतात. ही कादंबरी वाचताना संभाजी महाराजांचे उमदे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील संभाजी महाराजांचे औरंगजेबाने केलेले हाल पाहून तर अंगावर काटा उभा राहतो. संभाजी महाराजांविषयीचे पसरलेले अथवा जाणूनबुजून पसरवलेले गैरसमज लेखकाने अतिशय परखडपणे दूर केले आहेत.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:00
याशिवाय जरीला, झूल, हूल, बिढार ही सर्व आवडली होती. (मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो असे म्हणणारा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

( वैयक्तिक मत ) जरीला कोसलापेक्षा जास्त छान वाटले.... येकदम झकास... उरलेली नेमाडे यांची पुस्तके वाचली नाहीयेत.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:34
मास्तर, सहमत आहे. मला स्वतःलाही कोसलापेक्षा तुलनेने इतर पुस्तके जास्त आवडली. मात्र कोसला कमी दर्जाचे आहे असे नाही. आपला, (प्राचार्य) आजानुकर्ण नेमाडे

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 27/08/2008 - 23:34
कोसलाचं कौतुक खुद्द भाईकाकांनीही केलं होतं! नेमाड्यांनी भाईकाकांचा जन्मभर दुस्वास केला परंतु भाईकाका इतक्या मोठ्या मनाचे की त्यांनी नेमाड्यांच्या दुस्चासाकडे दुर्लक्ष करून कोसलाचं कौतुकच केलं! जयवंत दळवींनी जेव्हा याबाबत विस्तृत लिहिलं होतं तेव्हा मला भाईकाकाद्वेष्ट्या नेमाड्यांची कीव आली! बिच्चारे नेमाडे! असो, तात्या.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 28/08/2008 - 00:02
कोसला एकंदर चांगले आहे पण प्रसंगी शब्दबंबाळ, नशाबाज वाटू लागते. विशेषतः अजंठाच्या लेण्यांतील बुद्ध दर्शनाच्या वेळी. त्यातील काही वाक्ये खासच आहेत, जसे 'माझ्या कवडीइतक्या दु:खानं त्याचं वाळवंटाइतकं दु:ख मोजवत नाही' वगैरे. पण त्याच वेळी '...तिथे रक्ताचे तेंब टपटपू लागतात. माझी बधीर जीभ ते चाटू लागते ...' वगैरे नक्कीच शब्दबंबाळ वाटले. (रक्तबंबाळ)बेसनलाडू दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'बुद्धदर्शन' नावाच्या धड्यात हे सगळे होते आणि उपरोल्लेखित वाक्ये नेहमी प्रश्नपत्रिकेत संदर्भासह स्पष्ट करायला यायची ;) (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण 28/08/2008 - 00:21
बेलाशेठ, बुद्धदर्शनाचा प्रसंग हा कोसलातील अत्युच्च प्रसंग आहे. अजिंठाला जाण्यापुर्वी पांडुरंगच्या बहिणीचा ज्या परिस्थितीत मृत्यू झाला ती लक्षात घ्या. 'तिच्यासोबत तिचं छोटंसं गर्भाशयही गेलं आणि खानेसुमारीची प्रचंड मोठी रांग नाहीशी झाली' अशा अर्थाचे वाक्य वाचून आम्ही हादरलो होतो. हे सगळं दडपण मनावर असताना सांगवीकरला अजिंठ्यामध्ये सुचलेले विचार हे एक मोठे तत्त्वज्ञान आहे. मला तरी ते शब्दबंबाळ न वाटता अल्पाक्षरी वाटले. बरेच काही सांगायची इच्छा असूनही शब्द जवळ नाहीत म्हणून सांगवीकरने तो प्रसंग आवरता घेतला असे वाटले. आपला, (सुरेश) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू 28/08/2008 - 00:22
कर्णा, शब्दबंबाळपणाचा आक्षेप/मत फक्त ठराविक वाक्यांपुरताच मर्यादित आहे. एकंदर पुस्तक, व्यक्ती, प्रसंग इ. चांगले आहे तसेच काही अल्पाक्षरी वाक्येही फारच सूचक आणि चांगली आहेत, हे कबूल केलेच आहे. (सहमत)बेसनलाडू

भाग्यश्री 27/08/2008 - 22:43
तोत्तोचान, चिपर बाय डझन, शाळा, झेन गार्डन -> मिलिंद बोकील, नॉट विदाऊट माय डॉटर, चौघीजणी(ओरिजिनल नॉव्हेल - Little Women by Louisa May Alcott) अनुवाद शांता शेळके. माझे लंडन, चिनिमाती, दक्षिणरंग, मेक्सिकोपर्व्,इजिप्तायन्,ग्रीकांजली,तुर्कनामा - प्रवासवर्णनं -> मीना प्रभु.. पुलंची सर्व, एकेकाळी वपुंची सर्व..गौरी देशपांडे, सानिया यांची सर्व.. आहे मनोहर तरी, सोयरे सकळ -> सुनीता देशपांडे fountainhead, all dan brown collection, all of jeffery archer, हॅरी पॉटर सिरीज.. मोस्ट फेव : The goal by Dr. Eliyahu Goldratt एंडलेस लिस्ट.. ! लिहीता लिहीता एका पुस्तकाची अट लक्षातच राहीली नाही! :|

मस्त धागा आहे विजुभौ. आपल्याला एखादी गोष्ट करावी असं वाटत असताना दुसर्‍या कुणी ती करावी आणि आपल्याला कसल्याही कष्टांविना आयती मिळावी, याहून जास्त सुखाचं काही असतं का?! माझं सध्याचं आवडतं पुस्तक - (कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल. :() नाटक - एक पडदा आणि तीन घंटा नाटकातील काल आणि अवकाश यांचा अभ्यास राजीव नाईक अक्षर प्रकाशन काही काही नाटकं एका रात्रीत घडतात. काही जवळपास पन्नास-साठ वर्षांचा कालावधी साकारतात. काही किती काळात घडतात याला काही महत्त्वच नसतं. काही नेमक्या कोणत्या काळात घडतात, यावर नाटकाचं नाटकपण ठरतं. काही एकाच वेळी दोन काळांत. काही काळाच्या गोठलेल्या पोकळीत. त्यासाठी वापरलेल्या नाट्यांतर्गत क्लृप्त्या तर कितीक. हे काळाचं झालं. काही नाटकं राजमहालात घडतात. काही बेडरुममधे. बरीचशी दिवाणखान्यात! शिवाय त्यांचे प्रयोग निरनिराळ्या मंचांवर होतात. कमानी सेट, ग्रीक नाट्यघर, निकट मंच, कधी थेट रस्त्यावर होणारं पथनाट्य. पीटर ब्रुक यांच्या महाभारतासारखी काही तळ्याकाठचा उसना अवकाश नाटकासाठी वापरणारी. हा अवकाश. या स्थळ-काळाचे लागेबांधे काय असतात नाटकातल्या आशयाशी? त्यामुळे प्रेक्षकांना नक्की काय बदल जाणवतो? कसं ठरतं हे सगळं? निरनिराळ्या नाटकांची उदाहरणं देत अगदी साध्यासोप्या भाषेत केलेली ही चिकित्सा एखाद्या कादंबरीइतकी मनोरंजक आहे. त्यामुळे घाट आणि निरनिराळी साधनं यांच्याही फार चटकन परिचय होतो आणि ते सिनेमे पाहताना वा इतर पुस्तकं वाचतानाही फार फार उपयोगी पडतं.

In reply to by मेघना भुस्कुटे

कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल त्या बर्‍याच मंडळींपैकी मी एक आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

नीधप 08/07/2009 - 19:23
ते वाचलंय. एकेकाळी केलेल्या अभ्यासाचं टेक्स्ट आहे ते. राजीव सरांचंच 'खेळ नाटकाचा' हे ही जरूर वाचा. यातल्या बर्‍याच गोष्टी आम्हाला(ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथील त्यांनी शिकवलेली पहिली बॅच) 'प्रयोगाचे सौंदर्यशास्त्र' आणि 'जागतिक रंगभूमी' हे शिकवताना त्यांनी मांडलेली निरीक्षणे आहेत. वाचल्यावर परत एकदा सरांच्या लेक्चरला बसल्यासारखं वाटलं. मरायचो आम्ही त्यांच्या लेक्चरसाठी. वाट बघत असायचो. क्लिष्ट विषय सहजपणे समजावून देणे अगदी डोक्यात पक्का बसेल असा समजावून देणे हे त्यांनीच करावं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

मला आवडलेलं सर्वात पहिलं पुस्तक, 'मी पाहिलेला रशिया' लेखकः जादूगार रघुवीर. फार लहानपणी वाचलं आहे. आवडण्याचे कारण त्या वयात (इयत्ता ७वी किंवा ८वी) जादूगार रघुवीर हे माझे दैवत होते. दूसरे कारण घरबसल्या परदेशदर्शन. आईने लावलेली वाचनाची आवड जोपासताना पुढील आयुष्यात अनेक पुस्तके आवडली, पण विजूभाऊंनी एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे बंधन घातले आहे.

शितल 27/08/2008 - 23:09
शोभा डे यांचे स्पाऊज हे पुस्तक देखिल सुरेख आहे. नवरा बायकोंचा नात्याची विण छान मांडली आहे.

आई..........आई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आपली आई.  आईबद्दल आपण कितीही बोललो, लिहिले तरी ते व्यक्त होत नाही, अर्थात आईचं प्रेम अनुभव, सर्वच मिळण्यासाठीही नशीब असावं लागतं.  मॅक्झिम गार्कीच्या आईपासून साने गुरुजींच्या शामच्या आईपर्यंत ....यशवंताच्या आईपासून नारायन सुर्व्यांना बाळगणार्‍या आईपर्यंत. कितीही वाचायला मिळालं तरी ते अपुर्णच वाटत असते.

Book_Image

'आई समजून घेतांना' हे उत्तम कांबळेचे (दै. सकाळचे संपादक ) पुस्तक वाचतांना आणखि एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी तानत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वतःसाठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वतः अतिशय कष्ट घेऊन मुलांचा वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई.  ' तुझ्या लहाणपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाचा चॉकलेटचा एकच घास करतो तुला मागचं दिवस कसं आठवत नाही'' लेखकाला वारंवार भुतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाथी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते. लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले जेवलीस का ? ती  म्हणायची, ढकलंलं दोन तुकडं पोटात...कशी आहेस ? असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय.....'' डॉक्टरांकडे जाऊया का ? ' डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो ? असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट तिच्यासमोर आजच्या सुखात भुतकाळातील  भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणी रमुन जातो. पैसे नसल्यामुळ डोक्याचे केसांचा पु़ंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई.  फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई.  असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहुन स्वतःहुन नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून ' आई समजून घेतांना लेखाकाची दमझाक होते. पुस्तक वाचल्यानंतर तोंडावर पुस्तक टाकून शुन्य अवस्थेत वाचकांना घेऊन  जाणार्‍या पुस्तकांपैकी हे नक्कीच नाही.   हे पुस्तक वाचतांना मधेच कंटाळा येतो. पुस्तक सोडून द्यावेसे वाटते. तरीही एक वेगळे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक चुकवू नये असेही प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 28/08/2008 - 09:54
हा प्रतिसाद मस्तच पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

रामदास 27/08/2008 - 23:21
बार्बेरीअन्स ऍट द गेट. सिल्वेर बेअर्स. ब्युटीफूल माईंड. जत्रा साप्ताहीकात क्रमशा कादंबरी यायची.प्र. वा.बोधे(कोयनानगर)नावाचे लेखक होते.या लेखकांच्या सगळ्या कादंबर्‍या.एव्हढा ओरीजीनल स्टफ परत वाचला नाही.

In reply to by आजानुकर्ण

रामदास 27/08/2008 - 23:55
प्रा. बोधे असं लिहायचं होतं. वयानुसार लिहीणं /वाचणं/ऐकणं यात बर्‍याच गमती जमती होतात. मॉर्गन स्टॅनले च्या ऐवजी एकदा ऑर्गन स्टॅनले लिहीलं होतं.

यादी खूप मोठी आहे विजूभाऊ प्रभाकर पे॑ढारकरा॑चे रार॑ग ढा॑ग (मौज प्रका.) हे माझे अतिशय आवडते पुस्तक आहे. लेखक स्वतः पटकथा लेखक व दिग्दर्शक असल्याने (शिवाय वडील साक्षात भालजी पे॑ढारकर!) हे पुस्तक वाचता॑ना आपण एखादा चित्रपट पाहात आहोत असे वाटते. अतिशय ओघवती शैली आणि अचूक शब्द फेक ही पे॑ढारकरा॑ची खासियत. सगळ्यात महत्वाचे कथासार- स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला जी गोष्ट पटली नाही त्याच्याविरूद्ध सगळ्या सिस्टीमशी लढा द्यायची कथानायकाची जिद्द पाहून मन स्तिमीत होते. मी ती काद॑बरी खूपदा वाचली. ऍक्च्युअल रार॑ग ढा॑ग व त्याच्याशी स॑बधित काही सत्य माहीती माझ्या हाती लागल्यावर मी अशा निष्कर्षाप्रत आलो की ही गोष्ट बरीचशी खरी आहे. मी लेखकाची भेटही घेतली व खातरजमा करून घेतली. ह्या निता॑तसु॑दर काद॑बरीवर चित्रपट होणे अत्य॑त गरजेचे आहे.

छोटा डॉन 27/08/2008 - 23:44
यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक लेखकांची निवडक पुस्तके सांगतो ... १. भाईकाका : एक शुन्य मी [ त्यांचे सगळ्यात मास्टरपीस ], व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी. २. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही. ३. ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते. ४. प्र. के. अत्रे : मी कसा घडलो, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा. ५. फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरी भारतीय स्वातंत्रसंग्रामाचे एका त्रयस्थाच्या दॄष्टीतुन केलेले विवेचन. गांधी, गोडसे, नेहरु , जीना व ब्रीटीश सत्ताधार्‍यांचे अनेक आपल्याला माहित नसलेले पैलु सापडले. अप्रतिम ! ६. संभाजी -- लेखक - विश्वास पाटील ७. वि. ग. कानिटकर : नाझी भस्मासुराचा उदयास्त, ८. बाकी शुन्य : कमलेश वालावलकर ९. शिरीष कणेकर : डो. कणेकरांचा मुलगा, डॉलरच्या देशा [ अप्रतिम ] १०. अविनाश धर्माधिकारी : अस्वस्थ दशकाची डायरी अशी लिस्ट पुर्ण होऊच शकणार नाही. पण "इति लेखनसीमा" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... दांडेकर

In reply to by छोटा डॉन

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:46
फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरी
अजिबात आवडले नाही. आपला, (स्वतंत्र) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 27/08/2008 - 23:51
कर्णा, आपल्या अभ्यासाबद्दल आदर आहे आणि मताबद्दलही ... पण न आवडल्याची कारणे द्यावीत म्हणजे आपल्याला तुलना करणे सोपे जाईल ... "अजिबात आवडले नाही" म्हणुन विषय पुर्ण होत नाही .... असो. हा विषय आणि धागा वादाचा नाही ... तरी "न आवडल्याची " कारणे व स्पष्टीकरण दिल्यास आम्हाला आनंद होईल ... शेवटी काय तर कोलबेर म्हणतात तेच खरे , मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:54
सध्या थोडा गडबडीत आहे. मात्र ते नाव वाचून काही जुन्या जखमांवरची खपली निघाली आणि रक्त भळभळून वाहू लागले म्हणून प्रतिक्रिया दिली. आपला, (जखमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 27/08/2008 - 23:56
गडबडीत असाल तर काही हरकत नाही, नंतर कधीतरी ... जर "ती जखम" पुन्हा भळभळुन वाहणार असेल त्यर टाळलेलेच बरे नाही का ? पण आपल्याबरोबर चर्चेला मजा आली असती. असो. पुन्हा कधी तरी. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मुक्तसुनीत 27/08/2008 - 23:47
ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते. हे म्हणजे "सोबतचे पहिले पान" का ?

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 27/08/2008 - 23:54
पुस्तकाचे नाव खरचं आत्ता आठवत नाही. खुप जुने होते, माझ्या आजोबांनी विकत घेतलेले, मी वाचताना पार चिंध्या चिंध्या झाल्या होत्या .... तरीही वडीलांना फोन करुन नाव विचारेन आणि "मिपावर" टाकेन ... अवांतर : "सोबती" हे बेहर्‍यांनी चालवलेले मासीक / पाक्षीक असावे ... त्यातल्याच निवडक लेखांचा हा संग्रह असण्याची शक्यता आहे. नक्की माहित नाही. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:56
सोबत हे नाव. बाईंडरच्या वेळी लालन सारंग आणि विजय तेंडुलकरांवर अतिशय घाणेरडे आरोप सोबत मधून झाले होते. विशेषतः शंकर सखाराम यांचे लेख व भाषणे. आपला, (नाट्यकर्मी) आजानुकर्ण बाईंडर

In reply to by आजानुकर्ण

मुक्तसुनीत 27/08/2008 - 23:59
माझ्या मते "सोबतचे पहिले पान" सारख्या संग्रहातून बेहर्‍यांची केवळ एकच बाजू समोर येते : समाज-संघटक , अनिष्ट-प्रथांचे विरोधक वगैरे. बाकी बेहर्‍यांची किर्ती एक "बुली" म्हणूनच होती.

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 28/08/2008 - 00:01
नावाबद्दल थोडेसे कंफ्युजन होतेच मला तरी पण तुटक आठवत होते म्हणुन टाकले ... बाकी ते "सखाराम बाईंडर" चे म्हणाल तर मला जास्त काही वावगे वाटाले नाही. कुणा एकाची बाजु घेताना दुसर्‍यावर टीका करावीच लागेल. टीका फक्त जास्तच बोचरी व जहरी होती इतकेच. पण त्यांची शैलीच तशी होती. आदरणीय बाळासाहेब ठाकरे व बेहरे हे दोघेही "बिनधास्त व सडेतोड" लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत. भाषेच्या सभ्यतेविषयी आणि साजाविषयी त्यांची मते काहीशी टोकाची आहेत. ज्यांचा त्यांचा स्वभाव... [ त्या दोघांचेही एकदा वाजले होते पण तो प्रश्न निराळा ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

विकास 28/08/2008 - 00:03
ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते. कदाचीत आपल्याला "हार आणि प्रहार" या लेख संग्रहाबाबत बोलायचे असावे. तो चांगला आहे. अर्थात ते आता वाचताना त्या काळातली पूर्वपिठीका माहीती असणे महत्वाचे आहे.

In reply to by विकास

छोटा डॉन 28/08/2008 - 16:55
आजच मी माझ्या वडीलांना फोन करुन पुस्तकाचे नाव विचारले ... ते "हार आणि प्रहारच" आहे. पटकन शंकानिरसन केल्याबदाल "विकासरावांना" धन्यवाद .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 28/08/2008 - 09:56
कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्ताकाबद्दल लिहावे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by छोटा डॉन

छोटा डॉन 28/08/2008 - 20:10
२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.
ज्याचे नाव आठवत नव्हते ते आठवले. "दास डोंगरी राहतो" असे काही तरी आहे. एकदम मस्त, समर्थ रामदासांवर आहे. चांगली गोष्ट म्हणजे हे पुस्तक ठिकठिकाणी त्यांच्या "श्लोकांनी" सजवलेले आहे त्यामुळे एकदम रसाळ वाटते. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनीषा 27/08/2008 - 23:50
वास्तव रामायण लेखक - डॉ. प. वि. वर्तक यात त्यानी आकाशातील ग्रह-ता-यांच्या स्थिती वरुन रामायणाची कालनिश्चिती केली आहे. तसेच रामायणातील अनेक घटना , ज्या आपण केवळ पुराण कथा म्हणून ऐकतो/ वाचतो आणि काही वेळा त्याचा विपर्यास केला जातो, त्याचे अतिशय तर्कशुद्ध विश्लेश्ण केले आहे. तसेच रामायण हे नुसते काल्पनीक पुराण नसुन सत्यकथा आहे या बद्दल सुद्धा खूप चांगली माहिती दिली आहे. तसेच रामायण नक्की कुठे घडले.. सीतेला शोधण्यासाठी राम कुठे आणि कसा गेला हे सुद्धा त्यानी अनेक पुरावे देउन सांगीतले आहे..

In reply to by मनीषा

विकास 28/08/2008 - 00:00
मला देखील वास्तव रामायण आवडले. तसेच त्यांचे स्वयंभू पुस्तकपण छान आहे. अर्थात दोन्ही पुस्तकात काही गोष्टी अवास्तव आहेत पण त्यामुळे संपूर्ण पुस्तकाची व्हॅलीडीटी कमी झाली असे वाटत नाही... उ.दा. शिवलींगाबद्दल खूप चांगली माहीती देत असताना अचानक त्याचा संबंध अणूभट्टीशी लावणे कारण त्याचा अकार पण तसाच असतो. :)

In reply to by मनीषा

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:14
लेखक - डॉ. प. वि. वर्तक म्हणजे सूक्ष्मरुपाने मंगळावर वगैरे जाणारे तेच ना? ;) आपला, (नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 28/08/2008 - 00:22
नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला ध्वनीरुपाने येणारे तात्या माहीती आहेत. आता जरा काळजी वाटते मागे पुढे कुठे तात्या उभे नसतील न अशी :-)

In reply to by मनीषा

चतुरंग 28/08/2008 - 00:25
वास्तव रामायण, स्वयंभू, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण (हे संपूर्ण वाचून झाले नाही, एकदोनच भाग वाचलेत) पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. त्यातील माहिती त्यांनी कशी शोधून काढली असावी ह्याबद्दल त्यांच्याशीच चर्चा करुन जास्ती समजून घेता यायला हवे. ग्रह गणित, संस्कृत इ.चा त्यांचा व्यासंग चांगलाच आहे. वेगळ्या नजरेने रुढ गोष्टींकडे बघायची त्यांची शैली हटके आहे. मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. अर्थात माझे थोड्या वाचनाने आणि परिचयाने झालेले हे मत आहे. ही पुस्तके वाचूनही बरीच वर्षे झाली. पुन्हा वाचायची इच्छा आहे. रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत. चतुरंग

In reply to by चतुरंग

विकास 28/08/2008 - 00:58
पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. एकदम मान्य! मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. मी त्यांना भेटलेलो नाही पण तीन भाषणे लहान (- म्हणजे मी लहान) असताना ऐकलेली आहेत. त्यांच्याबद्दल पुणेकरांकडून बरेच गंमतशीर किस्से ऐकलेले आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. "प्रचारकी" म्हणजे कुठल्या अर्थाने या वर आपले अनुभव सारखे आहेत का वेगळे ते ठरवावे लागेल ;) पण अजूनही लक्षात आहेत. त्यात फक्त एकच वाटते की थोडेफार "तर्कट" आहेत. रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत. १००% मान्य! अधिक माहितीसाठी इथे पाहू शकता. =)) त्यांचे संकेतस्थळ जर विश्वामित्राने बघितले तर तो ढसाढसा रडेल अथवा साक्षात ब्रम्हदेवाकडे तक्रार घेऊन जाईल" "जी पदवी मिळायला मला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागली, सरते शेवटी अहंभाव सोडावा लागला, ती पदवी म्हणजे ब्रम्हर्षी नाही , पण ब्रम्हश्री ही नवीन पदवी वर्तकांसाठी तयार केलीस का?

प्राजु 28/08/2008 - 00:01
सुधा मूर्ती यांचे वाईज ऍण्ड आदर वाईज.. तसेच त्यांचेच गोष्टी माणसांच्या... वाईज ऍण्ड आदर मध्ये सुधा मूर्तींना इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने समाजकार्य करताना आलेले माणसांचे अनुभव लिहिलेले आहेत. तर सुधा मूर्तीना लहानपणापासून ज्या व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव पाडला त्यांच्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात जे आर डी टाटा, रतन टाटा, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम , नारायण मूर्ती.. यांच्याशिवाय बर्‍याच मोठमोठ्या व्यक्तींबद्दल लिहिले आहे. अतिशय सुंदर पुस्तके आहेत दोन्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विकास 28/08/2008 - 00:16
एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल २ विज्ञान कादंबर्‍या स्तके एकाच प्रतिसादात सांगून प्रतिसादाची संख्या मर्यादीत करत आहे. तेंव्हा क्षमस्व! फाउंडेशन मालीका - आयझॅक ऍसिमोव्ह. रोबोची संकल्पना त्यात शेवटी शेवटी आली आहे असे धरले जाते (मला विशेष जाणवले नाही, पण त्या काळात वाटले असेल). बाकी त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा संबंध आपण आपल्या जगाला लावू शकतो. मिपावर सुरवातीस मी यावर लिहीले होते. आवडते वाक्य - "व्हायलन्स इज द लास्ट रेफ्यूज ऑफ इन्कॉपिटंट". (पेशन्स ठेवून) शेवटच्या पुस्तकापर्यंत वाचल्यास, "चराचर सृष्टीएकमेकांशी संलग्न आहे आणि त्या अर्थाने विश्व हे एकच जीव आहे ," असा यात अर्थ समजतो. २००१ ए स्पेस ओडीसी - आर्थर सी क्लर्क. यात हॅल कॉम्प्यूटरचा जो आत्ताच्या काळातील सूपर काँप्यूटर आहे आणि स्पेसशिपचे वर्णन आहे जेंव्हा काहीच अस्तित्वात नव्हते. यात शेवटी - पुनरपी जननम पुनरपी मरणम ही संकल्पना सांगितली आहे. मराठीत "यक्षाची देणगी" हे नारळीकरांचे पुस्तक आवडले होते.

In reply to by विकास

वाचक 28/08/2008 - 07:58
अवांतरः HAL ही अक्षरे सांकेतिक स्वरुपात IBM कडे बोट दाखवतात असा एक दावा आहे - बघा IBM च्या आधीचे प्रत्येक अक्षर म्हणजे HAL :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 29/08/2008 - 04:30
२००१ ए स्पेस ओडीसी हा चित्रपट पहाताना मला तीनदा झोप लागली. शेवटी मी प्रयत्न सोडून दिला. बहुतांशी पुस्तकांवरून काढलेल्या चित्रपटांप्रमाणेच ह्या संदर्भात घडले आहे. चित्रपट ग्रेट नाही आहे. शिवाय तो बराच जुना आहे, त्यातील सेटींग्ज पण जुन्या स्टाईलची, (बहुतेक वेळेस कथेमुळे) फक्त दोन व्यक्तींवर चित्रित केलेली असल्याने ते समजत नाही.

In reply to by विकास

धमाल मुलगा 28/08/2008 - 10:48
मी आयझॅक ऍसिमॉव्ह घेऊन ऑफिसच्या बसमध्ये वाचायचो,तेव्हा आजुबाजुच्या बर्‍याच भिवया आश्चर्य /आदर की आणखी काही कोण जाणे ह्या भावना घेऊन वर चढायच्या. तेव्हा मनाला छान गुदगुल्या व्हायच्या, आणि नाकावरचा चष्मा आणखी पुढे ओढुन मी सभोवतालास कस्पटासमान मानुन पुस्तकात शिरायचो...... ...पण खरं सांगु, कथारुप जरी असलं, तरी माझ्या बालबुध्दीला काही झेपला नाही बॉ ऍसिमॉव्ह. बर्‍याचजणांच्या गप्पा ऐकुन 'फाऊंडेशन' घेतलं खरं, पण अजुनही शेवटची काही प्रकरणं वाचायची बाकीच आहेत. शैली थोडीशी बोजड वाटली. हां पण 'सायकोहिस्ट्री'चं कव्हर मात्र छान!

मैत्र 28/08/2008 - 03:48
गोनीदांचं छोटंसं पुस्तक आहे. त्यांची सगळीच पुस्तकं सुंदर आहेत पडघवली, मॄण्मयी, रानभुली, कुण्या एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत... पण हा बुधा त्याच्या अतिशय साध्या निसर्गाच्या जवळ अशा आयुष्यानं फार कुठे तरी हलवून जातो.. जरूर वाचा... नियम मोडून दुसरं पुस्तक म्हणजे विजय देवधरांचं अनुवादित डेझर्टर...

सुचेल तसं 28/08/2008 - 08:32
फक्त एक पुस्तक निवडणं शक्य नाही.... १) व्यक्ति आणि वल्ली, असा मी असा मी = पु.ल.देशपांडे २) माणदेशी माणसं, बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर ३) शाळा - मिलिंद बोकील ४) आणि मी - मंगला गोडबोले ५) पार्टनर - व.पु.काळे ६) दिवसेंदिवस - शं. ना. नवरे (एका लग्न न झालेल्या मुलाची डायरी.... मस्त आहे.) ७) अनुवादितः डेझर्टर, पॅपिलॉन, नॉट विदाऊट माय डॉटर ८) गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

शिप्रा 28/08/2008 - 11:49
एक होता कार्व्हर अनुवाद :- वीणा गव्हाणकर.. हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

जी. ए. च्या पुस्तकान्चा कुणीच कसा उल्लेख केला नाही. त्यान्च्या सगळ्या पुस्तकातल मला आवडलेल ' माणसे: अरभाट अणि चिल्लर'. मी शाळेत असताना वाचल होत, पण अजुनी त्यातले सन्वाद जसेच्या तसे लक्शात आहेत. इथे कोणी वाचलय का?

नीधप 08/07/2009 - 19:49
स्टुडीओ - सुभाष अवचट यांचे पुस्तक. माझे अतिशय आवडते. सृजनाची प्रक्रीया, कलाकार म्हणून वाढणे, कलाकाराच्या व्यक्तित्वातली गंमत... आणि अजून बरंच काही या पुस्तकात आहे. तसं काही हे आत्मचरीत्र नाही पण त्यांच्या जगण्याच्या अनुभवाशी निगडीत आहे. हे पुस्तक म्हणजे सिप बाय सिप हळू हळू घशात उतरणारी आणि कणाकणाने हळूहळू नशा चढवणारी ही एक वाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

सचीन जी 08/07/2009 - 19:59
१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी या यादीत व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

सचीन जी 08/07/2009 - 20:00
१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी सर्व प्रतिक्रियांमधे व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

नीधप 08/07/2009 - 20:03
'लस्ट फॉर लाइफ' कादंबरीचे मूळ लेखक - आयर्व्हिंग स्टोन स्वैर अनुवाद 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग' - माधुरी पुरंदरे अप्रतिम पुस्तक. कलंदर आणि झपाटलेला अश्या चावून चोथा झालेल्या शब्दांच्या कैक योजने पलिकडे असलेल्या रंग आणि रेषा जगणार्‍या गॉग च्या आयुष्यावरची कादंबरी. प्रत्येकाने वाचावी अशी. गॉग आवडत असेलच तर परत त्याच्या प्रेमात पडाल. (त्याच्याबाबत प्रेमात पडणे नाहीतर पाठ फिरवणे ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. हा ठिक आहे म्हणत गॉगला ओलांडू शकत नाही आपण.) गॉग माहीत नसेल तर नवीन जग तुमच्यापुढे उलगडेल. गॉग आवडत नसेल तर तुम्हाला तो समजायला मदत होईल. काही असो. वाचा नक्की. अवांतरः कोणी अ‍ॅमस्टरडॅमला असेल, जाणार असेल तर तिथलं गॉग म्युझियम न चुकता बघा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

भोचक 10/07/2009 - 14:37
सहमत. हे पुस्तक खूपच छान आहे. लहानपणीच वाचले होते. तेव्हापासून गॉग मनात रुतून बसलाय. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

विमुक्त 10/07/2009 - 14:49
माची वरला बुधा .... गो.नि.दा. फार छान लिहीलय.... भटकायची आवड असल्या मुळं मला ते जाम आवडत... आणि गो.नि.दा. एकदम सोप्या भाशेत लिहीतात...

तर्री 10/07/2009 - 23:05
वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही.. कादंबरी : १. रथचक्र : श्री. ना. पेंडसे २. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे ३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर ४. ब्र : कवित महाजन. ५.बलुत : दया पवार ६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख ७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे ८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे ९.धर्मांनंद : जयवंत दळवी. १०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर कादंबरी : अनुवादित १.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी. २.पाडस : अनु : राम पटवरधन ३. नेमसेक : जुंपा लाहीरी ४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय ५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम १.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर २."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते. ३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट. ४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल. ५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे. ६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र. ७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत. ८. मैत्र : पु. ल. ९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग १०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट प्रवास-वर्णन पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा / { म्हैस !(?)} कथासंग्रह १. काजळ माया : जी.ए. २. सांज शकुन :जी.ए ३.पिंगळा वेळ : जी.ए. ४.रक्त चन्दन :जी .ए. ५. हंस अकेला : मेघना पेठे नाटक १. आत्मकथा : महेश एलकुंचवार २.पुरूष : जयवंत दळवी ३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर ४.किरवंत : प्रेमानंद गज्वी. ५.ती फुलराणी : पु.ल. ६. लग्न : जयवंत दळवी ७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर ८. तुज आहे तुज पाशी : पु.ल. ९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर १०. नटस्म्राट : शिरवाडकर खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो. चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात.

हू एम आय!

प्राजु ·

अरुण मनोहर 22/08/2008 - 06:53
असेच अनुभव मलाही ठिकठीकाणी आले आहेत. सरहद फक्त नकाशाच्या कागदावर असते. जमीनीवर ती दाखवण्यासाठी भलेही कुंपण घालाल, पण दोन देशांमधील हवा कोणी कशी विभाजू शकेल? देशांदेशांमधील राजकारण मानवी मनात सरहदी उभारते. आपण नागरीक त्या सरह्दींचे काटेरी कुंपण मनात तयार करतो. प्राजू, तुमचा लेख वाचून असेच काही विचार अस्वस्थ करून गेले.

विसोबा खेचर 22/08/2008 - 07:02
प्राजू, लेख चांगला आहे, आता वावरताना, कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते. सामान्य पाकिस्तानी नागरीक असेलही आपल्यासारखाच सामान्य आणि शांतताप्रिय परंतु पाकिस्तानी राजनितीतले लोक हे भारताचे दुश्मनच आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या आयएसाय सारख्या संघटनांना त्यांचीच फूस आहे..! असो, आपला, (भारतीय) तात्या.

तुमचा लेख विचार करायला भाग पाडतो आहे. कुठल्याच बाजूचा निष्कर्ष मांडायचा तुमचा अट्टाहास नाही ही अजून एक लाजवाब गोष्ट. सानियाच्या एका कादंबरीतली एक आजी म्हणते, प्रत्येकाला तपासताना थोडी जागा ठेवावी. ती कुठे, कशी भरून निघेल सांगता येत नाही... त्याची आठवण झाली.

विसोबा खेचर 22/08/2008 - 07:21
अलिकडेच कारगिलच्या युद्धात आम्ही पाकड्यांना धूळ चारली आहे. भारतामध्ये बाँबस्फोट घडवून त्यांच्या अश्याच जर दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या तर पुन्हा एकदा त्यांना माती चारायची वेळ येईल. भारतातीत दहशतवादी कारवायांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचाही हात नेहमीच असतो! आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही! पाकिस्तान आमचा दुश्मन आहे आणि राहील! या निमित्ताने कारगिलच्या धुमश्चक्रीत कामी आलेल्या सर्व भारतीय जवानांना मी श्रद्धांजली वाहतो. अजून एक - सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही! मी भारतीय आहे आणि भारतीयच राहीन. माझा देश मला जी काही दोन वेळची रुखीसुखी भाकरी देतो त्यातच मी समाधानी आहे! 'हू ऍम आय' हा प्रश्न मला तरी कधी पडला नाही आणि यापुढेही पडू नये एवढीच इच्छा आहे! आपला, (आधी भारतीय आणि मग एशियन वगैरे वगैरे!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर 22/08/2008 - 07:52
तात्याराव तुमचा जाज्वल्य देशाभिमान कौतुकास्पदच आहे. औद्योगीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या ह्या युगात देशप्रेमाची आठवणच करून द्यावी लागते. तुम्ही म्हणालात, "आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही!" मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता. मुद्दा हा की आपण सारे शांतताप्रीय आहोत, तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां? ह्याचे उत्तर म्हणून त्याने असे केले म्हणून मीही तसेच करीन हे म्हणणे सोपे आहे. तेच आपण आजवर करीत आलो आहोत. ते सोडून आपण अखंड भारताची स्वप्ने पुन्हा पहायला का लागू नये? ब्रीटीशांनी त्यांच्या गलीच्छ राजकारणासाठी आपल्याला झुंजवले. आजही ते लोक गेल्यावर आम्ही सुंदोपसुंदी करीतच आहोत. हा खंडप्राय देश पुन्हा एक झाला तर आजच एक महासत्ता म्हणून उभारेल. कोणी असेही म्हणेल की भारत एकटाच आज महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पण तसे असूनही, अखंड भारताची एकी ह्या प्रोसेस मधे वेग आणेल. पण राजकारणी लोकांनी ह्या दिशेने पाऊल टाक्न्ञासाठी आधी सामान्य नगरीकांनी मनातील दुशमनी संपवली पाहीजे. तात्याराव, तुम्ही म्हणालात, "सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही!". उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात. ज्यांना देशाबाहेर राहून इतर देशातल्या नागरीकातला सामान्य माणुस पहाता आला, त्यांना मनामनांत घातलेली सरहदींची कुंपणे तोडायला कदाचित सोपे झाले असेल.

In reply to by अरुण मनोहर

विसोबा खेचर 22/08/2008 - 17:29
मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता. मला मात्र तसेच वाटले! असो... तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां? ते कृपया पाकिस्तानी अतिरेक्यांना विचारा... उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात. अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अवलिया 22/08/2008 - 19:43
वा तात्या वा अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे! मी पुढे असे म्हणेन की जर संधी मिळाली नाही तर मी ती मातृभुमीतच मिळवेन व इतरांना पण उपलब्ध करुन देईन जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 22/08/2008 - 08:07
लेख लिहिताना मी कोणत्याही संदर्भात असे म्हंटले नाही की, मला भारतीय असल्याचा अभिमान नाही. किंबहुना या लेखाचा खटाटोप कोणाला किती देशप्रेम आहे हे समजण्यासाठी नाहीच आहे. मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे. मी पाकिस्तान बद्दलही कुठे काही वाइट लिहिलेले नाहीये. मी मानसिकतेबद्दल लिहिले आहे. मी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही. लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 22/08/2008 - 17:36
मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे प्राजू, माझ्या प्रतिसादात तुला किती देशाभिमान आहे किंवा नाही याचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही. तुझा लेख हा सामान्य पाकिस्तानी माणसाबद्दल आहे आणि कुठल्याही देशाचा सामान्य नागरीक हा शांतताप्रियच असतो असे मीही म्हटलेले आहे. तुझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे सामान्य पाकिस्तानी नागरीक हा जरी कितीही शांतताप्रिय असला तरी 'पाकिस्तान' हा मात्र भारताचा कट्टर दुश्मनच आहे आणि राहील इतकाच माझा मुद्दा होता. सबब, तुझे वरील वाक्य हे व्यक्तिगत असून मला ते गैरलागू वाटते! बाकी, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी पाणी भारताच्या डोक्यावरून जाऊ लागेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानला गर्दीस मिळवण्यास भारत समर्थ आहेच! असो... तात्या.

In reply to by प्राजु

anilanantbhate 23/08/2008 - 15:14
फारच छान प्राजु! आपन एका मुलभूत् विशयाला हात घातला आहात. मानवी मनाचे सहज सूलभ दर्शन आपल्या लेखातून घदत.! होय. भारतीय आनी पाकिस्तानी दोघन्मधेही उददामाजी काले गोरे असा केवल एका रेघे एवधाच सूक्श्म फरक आहे. म्हनुनच तर तिसर्या जगान्त ते एशिअन्स म्हनूनच ओलखले जातात. एके कालच्या अखन्द भारतातील भावन्द्,शेजारी राश्त्र (शत्रु राश्त्र ही असतील) पन सर्वसामान्य प्रजेच काय! प्रत्येक गोश्तीकदे राजकीय चश्म्यातून पाहून पाहून ज्यान्ची मन निबर झाल्येत्,चिन्तन शिबिरान्तील बौध्धिक घोतून आनी घोतवून घेतलेल्या मनावर एवधी पूत चधली आहेत , तेन्वा लक्शान्त कोन घेतो! आपनच कसे बावन्न कशी देश प्रेमी हे दाखवून देन्याचीच स्पर्धा चालू आहे प्रतिक्रिया देनार्यान्कदून!भारतीयत्वाचे थेकेदार बनता बनता जो विवेक सामान्य पाकिस्तानी स्त्रीया दाखवू शकतात, तो ही या धुध्धाचार्यान्कदे औशधाएवधाही नाही याच फार वैशम्य वातत.सार जग आज भारतामधे चालू असलेल्या मानवतेच्या एका अभिनव अद्भूत प्रयोगाकदे, आशेने आनी कौतुकाने दोले लावून बसले आहे.क्शमा, करूना आनी सहिश्नुता, असा आपला सान्स्क्रुतिक वारसाच आपन विसरत चाललो आहोत. भारतीय आनि पाकिस्तानी ,त्या एकमेकान्शी निर्व्याज, निरागसतेने खेलनार्या मुलाना काय कल्पना कि आपापल्या देशानी क्रूर, राक्शसी व्रूत्ती अन्गिकार्न्यामधे केवधी मोथी झेप घेतली आहे! आपली बदललेली मानसिकता अगदी १००%योग्य आहे. आपन मानस आहोत आनी हे मानुस पन आपन विसरला नाहीत हीच मोथी दिलासादायक गोश्त आहे. " जो जे वान्छील तो ते लाहो" अस साअन्गनार्या ज्ञानेशराना तर आम्ही विसरलेलोच आहोत, आपन कार्यपरत्वे दूर देशी असूनही ही मुल्य जपताहात, याबद्दल शतशः धन्यवाद आनी अभिनन्दन सुध्धा!

मुक्तसुनीत 22/08/2008 - 07:25
लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...

In reply to by मुक्तसुनीत

>> माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. ह्या वाक्यालाच आधी दाद गेली... तुम्हाला भेटायला फार मजा येईल राव. नेमके मी इस्ट कोस्ट जीटीजीला नव्हतो !

मुक्तसुनीत 22/08/2008 - 07:25
लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...

धनंजय 22/08/2008 - 07:32
शेजार्‍यांकडून आणि कामाच्या ठिकाणच्या सहकार्‍यांकडून आला आहे. आता अन्य लोकांचा अनुभव आहे, की पाकिस्तानी लोक गोड बोलून फसवतात. माझा तसा अनुभव नाही. कदाचित कोणी फसवू शकेल इतका भरवसा मी अनोळखी किंवा कमी ओळख असलेल्या व्यक्तीवर टाकत नाही. बाकी "बिहारी लोक एकमेकांत संगनमत करून आपल्या इकडे घुसखोरी करतात" असे ऐकून आहे. त्यामुळे गोव्याबाहेरचे वेगवेगळ्या प्रांतातले, देशांतले घाटी लोक मिळून गोड बोलून कपट करतात असे जाणवते. म्हणूनच सर्व घाटी लोकांशी काळजीपूर्वक व्यवहार केलेलाच बरा. (गोव्यातले सहिष्णू लोक मात्र एकमेकांशीच भांडत राहातात.) भांडकुदळ गोवेकरांशी तर फारच काळजीपूर्वक व्यवहार करतो.

शितल 22/08/2008 - 07:50
लेख खुप छान आहेस प्राजु, >>>>>>>>>>गोर्‍या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. हे खरं आहे.

वैद्य 22/08/2008 - 08:15
कुठे आहात ? ह्या सर्व कंपन्यांनी पाकिस्तानात ऑफिसे उघडायला हवीत. पाकिस्तानातले अनेक इंजिनेर इकडे अमेरिकेत येतात. ह्या कंपन्यांना सध्यापेक्षा ४०% प्रतिवर्ष वाढायचे असेल, तर डोकेबाज एम्प्लॉयीज पाकिस्तानात मिळतील. चीन मध्ये नाही. कुणी ऐकते आहे का रे ? -- वैद्य

सहज 22/08/2008 - 08:20
अनुभव प्रातिनिधीक. लेख अतिशय आवडला. थोडी संवेदनशीलता मनात जपलीच पाहीजेच व मानसीकता बदलण्याचे धाडस असले पाहीजे. इतिहासाचे ओझे झुगारुन नवा इतिहास घडवायला जमले पाहीजे, नाहीतर कुठल्याही कारणावरुन माणसामाणसातली दरी ही कधीच बुजली जाणार नाही. देश विदेशच्या लोकातील अंतरे सोडा तर अगदी साडेतीन टक्यातील लोकात पण पुणे वा मुंबई किंवा कोकणातले वा देशावरचे, मराठी वा इंग्रजी बोलणे, ह्या २१ व्याशतकातील सुशिक्षीत समाजात, त्यातुन निवडक प्रगत लोकात जर अजुनही गंभीरपणे स्थान, भाषा वादावादी होत असेल तर काय बोलायचे? मूळ लेखातील विचारांना अजुन थोडे पुढे नेउन फक्त "एशियन" का आपल्यासारख्या न दिसणार्‍या माणसांबद्दल पण कुठलीही अढी वाटली नाही पाहीजे. लहान मुलांना हे किती सहज जमते.

अनिल हटेला 22/08/2008 - 08:24
लेख छान वाटला... इकडे मला असे अनुभव नाही आले ... पन ब-याचदा चॅट वगैरे करताना पाकिस्तानी लोकाशी संवाद झालाये.. आणी त्यातुन एक गोष्ट जाणवली की ह्या लोकाना भारत देशा विषयी फार कुतुहल आहे .. एव्हन भारताची प्रगती मीडीया ज्याप्रकारे जगाला दाखवते आहे ते पाहुन..... असो !! चायनीज लोक सुद्धा इंडीयन म्हटल की अतिशय स्पेशल नजरेने बघतात .. आणी अभिमान वाटतो की, आय यम इंडीयन !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

देशाबाहेर पडलो की काही गोष्टींकडे बघायचा कॅलिडोस्कोप बदलतो... ह्याचा अर्थ असा नाही की भारतीय म्हणून देशाभिमान कमी होतो. मला ही असे अनुभव आले आहेत जिथे पाकिस्तानी, अफगाणी सामान्य माणूस शांतताप्रिय भेटलाय. आम्ही तर मटण - चिकन आणायला आठ - पंधरा दिवसातून पाकिस्तानी दुकानात जातोच. क्रिकेटपासून सियासत पर्यंत भरपूर गप्पा होतात.

ऋचा 22/08/2008 - 09:36
लेख खुप छान आहे . गोर्‍या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. एकदम सही!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चतुरंग 22/08/2008 - 09:48
गाव, जिल्हा, राज्य, देश, परदेश असं आपलं क्षितिज विस्तारत जाताना माणसांबद्दलचे विचारही बदलत जातात, माझे बदलले. सामान्य माणसाला एक शांत आयुष्य जगण्यात रस असतो आणि अशा इच्छेला देश-कालाच्या सीमा नसतात. चतुरंग

माणूस कितीही बुद्धिमान असला तरी देशात आणि देशाबाहेर राहून त्याच्या समजुतीत फरक हा पडतोच!! समर्थांनी "केल्याने देशांतर..." उगीचच म्हट्लेलं नाहीये!!!! भारतात राहून पाकिस्तानी अणि चिनी हे आपले शत्रू म्हणुन ओळखले जातात! आपल्या सरकारने आपल्याला तसंच शिक्षण दिलंय!! कोण म्हणतो भारत सरकार प्रोपगान्डा करत नाही म्हणून? तसे नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं...... पाकिस्तान्यांबद्दलही तेच! सर्वसाधारण पाकिस्तानी जनतेला आज भारतीयांबद्दल आपुलकीच वाट्ते! हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय? पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!! तिसर्‍या देशात गेल्यामुळे आपल्या भूमिका अधिक विशाल होत जातात! दुसर्‍या देशांच्या मानसिकतेबरोबरच आपल्या सरकारची चालबाजीही कळत जाते. तिसर्‍याच देशांची नि:पक्षपाती कागदपत्रे पहायला मिळतात (उदा. हारवर्ड लायब्ररी , युनायटेड नेशन्स पेपर्स, वा पेंटॅगॉन पेपर्स!) स्वतःची अशी एक भूमिका बनवता येते!! आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!! भारतमाता की जय!!!

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 22/08/2008 - 10:41
हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय? आपल्या वरील विधानाला आक्षेप आहे. प्रत्येक देशाला गुप्तहेर खाते जरुरीचे आहे. रॉ (रिसर्च अँड ऍनालिसिस विंग) आणि सी.बी.आय. (सेंट्रल ब्यूरो ऑफ इनवेस्टिगेशन) ह्या दोन संस्था भारताची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था कशी मजबूत राहील. कटांचे सुगावे कसे लागतील ह्याबाबत काम करीत असतात. आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत. माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत. तेव्हा त्यांची तुलना ही अयोग्य आहे. आयएसाअय ही एक पक्की विद्वेषी संघटना आहे आणि केवळ भारतद्वेष हाच त्याचा ऍजेंडा आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. उगीच सत्य नकारण्यात काही हशील नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत. याची तुम्हाला कशावरून खात्री वाटते? भारतीय वृत्तपत्रे वाचून? आणि भारताच्या हेरांनी तशी कॄत्ये तुमच्या म्हणण्यानुसार जर केली नसतील तर ते कुचकामी ठरत नाहीत काय? इन्टेलिजन्स एजन्सी वा हेरांचे ते एक कामच नाही काय? माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत. चतुरंगा! सीबीआय फक्त इन्टर्नल अफेअर्स बघते आणि तिच्या नांवावर अशी कॄत्ये भरपूर आहेत (पहा: हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन!) परकीय देशात सीबीआय नव्हे तर सीआयए धिंगाणा घालते!!!!

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 22/08/2008 - 11:32
पिडाकाका? परदेशात काही कारण नसताना बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारणे हे हेरांचे काम असते??? तर मग अशा कामात रॉ ही अजून 'रॉ'च आहे ह्याचा मला अभिमान आहे!! भारतीय वृत्तपत्रे वाचून कशाला मत बनवायचे अहो. भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर डोळा ठेऊन बसलेले बीबीसी, सीएनएन सारखी चॅनल्स काय असल्या बातम्या सोडणार आहेत? पराचा कावळा करण्यात आणि भारताची प्रतिमा मलीन करण्यात हे अग्रेसर आहेत. रॉने एक जरी असे काम केले असते तरी त्याचा जगभर गाजावाजा केला असता ह्यांनीच! सीबीआय चा उल्लेख मी अनवधानाने केला, क्षमस्व, मला आयबी म्हणायचे होते! आणि तुम्ही अमेरिकेचे सीआयए म्हणताय त्यांनी तर जगभर नंगानाचच घातलेला आहे, त्यांच्याशी केजीबीचीच तुलना! (हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?) चतुरंग

In reply to by चतुरंग

अरे. आपण निरपराध माणसे म्हणतो (अणि ते खरेही आहे!) पण त्यांच्या दृष्टीने हा शत्रूराष्ट्रात केवळ गोंधळ उडवणे नाही काय? आज पाकिस्तानातही तालिबान्यानी ऍम्यूनेशन फॅक्टरीच्या बाहेर हेच केले नाही काय? अरे आपल्या भारतात अंतर्गत हेरगिरीसाठी सीबीआय आहे. तिच्या नांवावरही अनेक कॄष्णकॄत्ये (रेफः आणिबाणी) जमा आहेत. रॉ ही परदेशात हेरगिरी करण्यासाठीचीच संस्था आहे. नाहीतर ती सीबीआयची रिडंडन्सी ठरली नसती का?:) (हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?) माझा रेफरन्स हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन च्या काळात अनेक पोलिटिकल विरोधकांना एफबीआयने 'कम्यूनिस्ट" ठरवुन त्यांची छळवणूक केल्याबद्दल होता. जगात अशी कोणतीही हेरगिरी करणारी (बाह्य वा अंतर्गत!) यशस्वी संस्था नाही की जिच्या खात्यावर काही कृष्णकृत्ये जमा नाहीत. पण त्याबद्दल मला फारशी काळजी नाही! कारण तशी नसतील तर ती फार इफेक्टीव्ह हेरगिरी संस्था आहे असे म्हणता येणार नाही. पण आपण जरा रियलिस्टिक झालेले बरे नाही का?

In reply to by चतुरंग

आनंदयात्री 22/08/2008 - 11:03
रंगाशी सहमत ! >>नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं >>आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे >>प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल. एक वैयक्तिक अनुभवः जिवाभावाचा खान आडनाव लावणारा मित्र. सगळ्या अडिअडचणीत धावुन येणारा, मित्र म्हणुन अगदी जिवलग. माझे शेखशी भांडण झाल्यावर तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करणारा, वेळप्रसंगी (हाणामारीत) अचानक पणे त्याची बाजु घेणारा. नंतर येउन कौमची कारणे देउन समजवायचा प्रयत्न करणारा. आनंदयात्री, शेख, खान यांच्या निष्ठा भारतभुशीच आहेच हे पक्के ! उदाहरण कोणत्याही अभिनिवेशातुन दिलेले नाही. अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही.

In reply to by आनंदयात्री

कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल. प्राथमिक माहितीसाठी वाचा: "वादळ माथा" श्री. यशवंतराव चव्हाणांची बायोग्राफी, लेखकः राम प्रधान, राज्यपालः अरुणाचल प्रदेश आणि मग त्यातून कागदपत्रे बॅकट्रेस करीत जा!! अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही. आम्हालाही असे लिहितांना फारसे सुख होते असे नाही पण न्यूयॉर्कमध्ये राहून असे विचित्र प्रसंग आम्ही पाहिले आहेत. निरपराध पाकिस्तानी अब्दुल (किंवा आणखी कोणितरी) खान व त्याला उगीचच त्रास देणारा भारतीय बांधव!! नाही, पूर्ण विचाराअंती आम्ही तरी त्या अब्दुलखानाचीच बाजू घेऊ!!!! भारतमातेने आम्हाला तेच शिकवलंय, दुर्बलांचा, अनाथांचा कैवार घे!!

In reply to by आनंदयात्री

चतुरंग 22/08/2008 - 11:42
डोळेझाक आणि सरदार पटेलांसारख्या द्र्ष्ट्याची दूरदृष्टी नाकारणे असला टोकाचा करंटेपणा घडलेला आहे. ह्यात आपल्या गुप्तहेर खात्याची काही चूक असण्यापेक्षा आपल्या त्यावेळच्या नेतृत्त्वाचा दुबळेपणा झाकण्यासाठी ब्रूक्स्-हेंडरसन रिपोर्ट क्लासिफाईड झालाय! चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 23/08/2008 - 00:15
आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!! जळ्ळं मरायला आम्ही कशाला तुझ्या त्या अब्दुलखानला त्रास देऊ? त्याला त्रास देण्याचा आमचा काय संबंध? तो मोठा त्याच्या घरचा! साला, आम्हाला काय पडली आहे त्याला त्रास द्यायची? कोण तो?? आणि कुणी त्रास दिला आहे त्याला? त्याआधीच हाडे नरम करण्याची भाषा?? च्यामायला बस ना घेऊन तुझ्या त्या अब्दुलखानला! कोण त्रास देत नाय तुला! च्यामारी! म्हणे भारतीयांची हाडे नरम करू..! माय फूट....! तात्या.

अरुण मनोहर 22/08/2008 - 11:01
संदर्भः http://www.misalpav.com/node/3127#comment-43809 खरतर प्राजुच्या लेखाच्या कीतीतरी बाहेर हे सगळे जात आहे. पण खालील पिडां विधान वाचून मला आक्षेप नोंदवलाच पाहीजे. पिडांने (कळत नकळत?) भारताच्या काही हितचिंतकांना अतिरेकी म्हणून दुखावले आहे. >>>पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!! मला इथे फक्त येवढेच म्हणायचे आहे की अखंड भारताची स्वप्ने पहाणारी मंडळी अतिरेकी नाहीत. पिडांने (मुद्दाम?) "अखंड हिंदुस्तानची" शब्द वापरला! हिंदुस्थान म्हणताच आम्ही ब्रीटीशांनी पेरलेले तेच धर्मांध राजकारण आणत आहोत. अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर? पण हा खूप मोठा विषय आहे. मला वाटते सारेगमाप ने झी वर नुकताच अखंड भारत स्वातंत्र्यदिन साजरा करून विषयाला उजळणी दिली आहे. ह्यावर चर्चा करायची असल्यास कृपया कोणीतरी स्वतंत्र धागा सुरू करा.

In reply to by अरुण मनोहर

मला कुणाच्या भावनांशी खेळ करायचा नाही, पण आजच्या घडीला आपले अटलबिहारी बाजपेयी म्हणाले त्याप्रमाणे "पाकिस्तान हे सत्य आहे जे कोणीही खोडून टाकू शकणार नाही!" त्यामुळे वेळोवेळी 'अखंड हिदुस्तान' चा नारा देऊन भावना भडकावणारी मंडळी ही सुद्धा अतिरेकी विचारांचीच आहेत असे आम्ही मानतो! हे आमचे मत आपल्याला पटणार नाही कदाचित, त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आपल्या मतांतराबद्दल आदरही आहे. पण ते आमचे वैयक्तिक मत आहे आणि आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहोत!!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 22/08/2008 - 12:06
अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर? ही दिवास्वप्ने आहेत. फाळणीपूर्वीचा भारत की ब्रम्हदेश बांगलादेश पाकिस्तान अफगानिस्तानपर्यन्तचा भूप्रदेश हा कधीच एकसंध देश नव्हता. भौगोलीक /भाषीक/ सांस्कृतीक/ धार्मीक कारणांमुळे तो नेहमीच वेगळा आहे ही वस्तुस्थिती आहे. सुस्थीर पाकिस्तान ही पाकिस्तानही पेक्षा भारताची गरज आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्राजु. भारताबाहेर राहणार्‍यांचा हा प्रातिनिधिक अनुभव! अशा प्रकारचे अनुभव भारताबाहेर गेल्यावर बरेच जणांना येतात. जेव्हा क्षितिजे रुंदावतात तेव्हा दृष्टिकोनही व्यापक होतो ह्याचे तुझा हा लेख म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. लेख आवडला हे वेसांन ल. स्वाती

राघव१ 22/08/2008 - 11:25
प्राजुताई, लेख फार सुंदर आहे. कोणतेही मत व्यक्त ना करता केवळ परिस्थिती मांडलेली आहे. वाचणार्‍या सगळ्यांच्या मनात निर्माण होणारे निरनिराळे भाव हेच या लेखाचे यश आहे!! सगळीकडे चांगले-वाईट लोक असतातच. जोवर मूळ गाव समजत नाही तोवर ती तुमच्या-आमच्या सारखीच माणसे असतात अन् सर्वसमावेशक असे परिमाण त्यास लागते. तीच मानवता. जेव्हा संदर्भ देशाचे/प्रांताचे/समाजाचे/जातीचे येतात तेव्हा हे परिमाण त्यानुरूप बदलत जाते. मला वाटते सामन्य माणसाचा दृष्टिकोन अन् सत्ताधारी माणसाचा दृष्टिकोन यात असलेला मूळ फरक अशा अनुभवातून दिसून येतो. असेच लिहीत राहा. शुभेच्छा. :) राघव.

तुझ्या लेखाच्या धाग्याच्या मध्येच येउन असा धिंगाणा घातल्याबद्दल क्षमस्व!:) पण हा विषयच इतका सेन्सिटिव्ह आहे की थोडीफार चर्चा होणारच! तरी वर लिहिल्याप्रमाणे तुझा लेख आवडला. किप ईट अप!! -डांबिसकाका

नंदन 22/08/2008 - 12:15
लेख आवडला. विशेषतः मुठा वि. मिठी असा वाद रंगलेला असताना एकच सिंधू दोन्ही देशांतून वाहते याची ग्वाही देणारा. बाकी, 'यू कॅनॉट सी द पिक्चर अनलेस यू स्टेप आऊट ऑफ द फ्रेम' हे जरी सार्वत्रिक सत्य नसले, तरी बर्‍याच वेळा खरे ठरते हे मात्र खरे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

प्रियाली 22/08/2008 - 14:42
'यू कॅनॉट सी द पिक्चर अनलेस यू स्टेप आऊट ऑफ द फ्रेम' हे जरी सार्वत्रिक सत्य नसले, तरी बर्‍याच वेळा खरे ठरते हे मात्र खरे.
खरे आहे. लेख आवडला.

प्राजुचा सुंदर लेख! कधितरि परदेशी जातो तेव्हा असा अनुभव येतो की, परदेशस्थ भारतीयांपेक्षा पाकीस्तानीच आपल्याशी आपुलकीने वागतात. जेव्हा परदेशस्थ भारतीयांना कळते की हा भारतातुन आला आहे, तेव्हा लोक आपल्या पासुन अंतर ठेऊन रहातात. दोन वर्षांपुर्वी ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीत गेलो होतो. टेथे किमान २५ भारतीय लोक विविध स्तरांवर कार्यरत होते. त्यांपैकी केवळ एक व्यक्ती माझ्याशी येउन बोलत असे. बाकिच्यांनी माझ्या पासुन काही फुटांचे अंतर (जाणवेल) असे ठेवले. (कदाचीत कंपनी प्रशासनाला गैर वाटू नये म्हणून त्यांचा तो प्रयत्न असावा) माझा सहाध्यायी एक कोरियन होता. कंपनीतले समस्त कोरियन त्याच्याशी ज्या आपूलकीने वागत होते, त्यामूळे आपल्या भारतीयांची मानसिकता फार जाणवली. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

भाग्यश्री 22/08/2008 - 12:54
प्राजु.. मस्तच लेख!! खूप प्रामाणिक लिहीलायस.. बाहेर राहूनच बर्‍याच गोष्टी कळतात, वळतात हेच खरं.. इथे येऊन पाकीस्तानी जनतेशी जुळवून घ्यावचं लागेल मला! कारण आमचा इंडीयन(!) ग्रोसरीवाला पाकीस्तानी आहे! :) हे आणि असेच कितीतरी प्रसंग येतात, आणि त्यातून आपण शिकतो.. एक मात्र खरं भारतात राहून उगीचच जास्त अढी निर्माण होते, ती बाहेर राहून सुटते.. मस्त लेख! भारताबाहेर राहणार्‍या लोकांना नक्कीच अपील होईल नीट!

स्नेहश्री 22/08/2008 - 13:02
ह्या लेखावरुन मला एका पुस्तकची आठवण झाली ...मिळल्यास जरुर वाचा "कुंपणापलिकडचा देश" अतिशय सुंदर पुस्तक आहे..........जरुर वाचा आणि लेखिका आहेत " मनिषा टिकेकर" --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

पक्या 22/08/2008 - 13:38
सामान्य नागरिक मग ते कोणत्या का देशाचे असेनात्...नॉर्मल परिस्थितीत एकमेकांना भेटल्यावर चांगलेच वागतात. पाकिस्तान हा देश खरोखरीच भारतासारखा सहिष्णु आहे काय? धर्मांध राजकारणामुळे पाकीस्तान भारताचा शञू बनला आहे. आणि या शत्रूत्वाचा सामना भारताला करावाच लागतो. >>कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते (परदेशी वास्तव्य असताना ) हा आपल्या सारखाच सामन्य आहे ही भावना मनात यायची पण आपल्याच भागातला आहे हे मात्र कधीही मनात आले नाही >>गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. हिंदीमधून संवाद साधता येतो , मुलेबाळे, खाणेपिणे अशा अनेक गोष्टींवर समविचार असू शकतात ह्यामुळे जव़ळीक वाटणे गैर नाही. पण जर राजकारण , इतिहास , धर्म हे विषय चर्चेत आले तर किती जवळीक वाटेल? अवांतर - मध्यंतरी मनोज वाजपेयी, रवि किशन चा १९७१ हा भारत पाक युध्दातील युध्दकैद्यांचा सिनेमा पाहीला. त्यात भारतीय युध्दकैद्यांचा पाकिस्तानी कँप मधून पळून जाण्याचा प्रयत्न दाखवला आहे. सत्यघटनेला मध्यवर्ती ठेवून सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे . या भारतीय युध्दकैद्यांचे पाकिस्तान्यांनी अतोनात हाल केले. बरेच जण कित्येक वर्ष जेल मध्ये मातृभूमीची , आपल्या घराची ,गावाची, नातेवाईकांची याद काढत सडून मेले. त्यांना म्हणे १९८३ मध्ये शेवटचे पाहीले गेले. त्यानंतर त्यांचा अजिबात ठावठिकाणा आजतागायत लागला नाही . यातीलच ६ जणांनी पाकिस्तानी कँप मधील सक्त पहारा तोडून पलायनाचा डाव आखलेला असतो. सिनेमा बघण्यासारखा आहे. http://www.youtube.com/watch?v=P8Ama-AnoVk

मराठी_माणूस 22/08/2008 - 13:20
परदेशात आपलि मानसिकता बदलते म्हणुन वेगळा अनुभव येतो. तिथे आपल्याला असुरक्षित वाटत असते आणि आपल्या सारखे कोणि आहे का, हे आपण शोधत असतो. पाकिस्तानि बरेचसे आपल्यासारखे दिसत असल्यामुळे आणि खाण्या पिण्याच्या गोष्टित साधर्म्य असल्यामुळे ते गोर्‍या पेक्षा जवळ चे वाटतात. गोरे एक विशिष्ट अंतर ठेउन असतात. त्यामुळे ह्या जवळकित गरज हा प्रमुख धागा असतो.

विसुनाना 22/08/2008 - 13:24
विचार करायला लावणारा लेख. पाकिस्तान / बांगलादेश किंवा इतर देशातील सर्वसामान्य नागरिक मूलतः दुष्ट/वैरत्वाने प्रेरित असतील असे मुळीच वाटत नाही. किंबहुना 'वसुधैव कुटुंबकम' ही भावना उच्च पातळीवर सर्व मानवात असतेच. (जर पृथ्वीवर परग्रहवासियांचे आक्रमण झाले तर चीन त्यांच्या बाजूने अमेरिकेविरुद्ध लढणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.) पण ती जितकी खोलात जाते तितकी दुरावत जाते... पृथ्वी -आशिया-भारत-राज्य-जिल्हा-तालुका-गाव-वॉर्ड--गल्ली-शेजार-कुटुंब-अगदी सख्खे भाऊही वेळ पडली की एकमेकांशी भांडतात. धर्म-जात -पोटजात -कूळ(गोत्र); प्रांत-भाषा -पोटभाषा ही वर्तुळातली वर्तुळे अशीच आहेत. परदेशात भारतीय भेटतात तेंव्हा ते अशाच कोणत्यातरी वर्तुळापुरता विचार करत असावेत असे वाटते. सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही. आपल्या लहान वर्तुळातील समूहाने सोसलेल्या कटु अनुभवांची स्मृती अजूनही ताजी आहे. आणि ती ताजी रहावी असे अनुभव अजुनही येत आहेत. त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे.

In reply to by विसुनाना

जेव्हा माझ्या देशाचे सैनिक रात्रंदिवस पाकिस्तान च्या बंदुकीच्या टप्प्यात आहेत, ११ जुलै २००६ ला मुंम्बई त लोकल मधे झालेले साखळी बॉम्ब स्फोट अनुभवले आहेत..तेव्हा असा विचार करणं कठीण आहे.. माणुस म्हणुन एक जण चांगला असेल ही.. पण देश म्हणुन?? तुम्ही दुर आहत म्हणुन हे साजिर रुप दिसत असेल.. इथे रोज टांगती तलवार डोक्यावर असताना इतका उदात विचार करणं मला अवघड वाटतं त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे. अगदी खर..

दातेकाका 22/08/2008 - 13:41
प्राजू अभिनन्दन. अतीशय छान लेख. जे लोक कामानिमित्त्/व्यवसायानिमित्त परदेशी रहात आहेत त्यान्च्या मनाला नक्की भिडेल. पण................ भारतात रहात असलेल्या लोकान्ना पटेलसे वाटत नाही.

अवलिया 22/08/2008 - 19:49
हे सर्व वाचुन मी एवढेच सांगु इच्छितो की मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो काफर म्हणजे जो मुसलमाण नाहि तो यांत हिंदु, इसाइ, ज्यु तसेच बौद्ध प्रामुख्याने धरावे बाकी मी कशावरही चर्चा करु शकत नाही कारण माझी मते तुम्हाला पटणार नाही वा आवडणार नाही

In reply to by अवलिया

अनिता 22/08/2008 - 22:44
नाना, >>मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट >>जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो +१०० अगदी खरे आहे...१००%. ९/११ च्या प्रस॑गान॑तर मला अनुभव आला आहे...अमेरिकेतील मॉलमधे फिरताना माझ्या मित्राल मुस्लिम लोका॑नी शहरातील मस्जिद मधे बोलाविले होते...अफगान स॑घटनेला लढाईसाठी मदत करायला. (मित्र दाढी-मिशा ठेवायचा. त्यावरुन त्या लोका॑नी बहुतेक ठरवले असावे की तो मुस्लिम असावा..) न॑तर समजले की काहि लोका॑ना अटक झाली त्या ठिकाणी.

व्यवसायानिमित्त २५ वर्षे आखातात काढताना अनेकदा विविध स्तरावरील पाकिस्तानी जनतेशी संबंध आला. अगदी बँक मॅनेजर ते हमाल असे सर्व संपर्कात होते. माझे निरिक्षण असे की मनातून सर्वच पाकिस्तानी अंतर ठेवून असतात (कांही अपवाद). अशिक्षित पाकिस्तानी त्यांचा भारतियांवरील राग लपवू शकत नाहीत. अशिक्षितांमध्येह काही सुसंस्कृत पाकिस्तानी भेटतात ते निदान तोंडदेखले तरी सामंजस्याने वागतात. सुशिक्षितांमध्ये हे सामंजस्याचे नाटक (ढोंग नाही म्हणत आहे मी) जास्त प्रभावीपणे वठविण्याचे सामर्थ्य असते. आणि ह्या सुशिक्षितांमध्येच मनापासून चांगले, मवाळ, भारताच्या चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करणारे असे पाकीस्तानी असतात. त्यांच्याशी आपले चांगले सूत जमू शकते. थोड्याफार फरकाने संस्कृती दोघांचीही सारखीच असते. काय चांगले, काय वाईट ह्यावर एकमत होते. दोन्ही देशातील सामान्य जनता 'अमन (शांतता) चाहते' पण स्वार्थी राजकारणी वैर वाढविण्यास खतपाणी घालतात ह्यावर एकमत होते. बहुतांश पाकिस्तानी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने केलेल्या प्रगतीबद्दल कौतुकोद्गार काढतात. PIA ह्या पाकिस्तानी राष्ट्रीय विमानसेवेने केलेल्या प्रवासादरम्यान १ दिवस कराचीत राहण्याची संधी मिळाली होती. तेंव्हा तिथल्या हॉटेलच्या शॉपिंग एरियातील एका दुकानात एका वयोवृद्ध पाकिस्तानीशी गप्पागोष्टी केल्या असता त्यांचे एक वाक्य मनाला फार भिडले. त्यांनी त्यांच्या बालपणी भारतात (मुंबईत) काही वर्षे घालवीली होती आणि फाळणीनंतर उर्वरीत आयुष्य पाकिस्तात घालविले आहे. मी त्यांना विचारले की, 'तुम्ही दोन्ही देश जवळून पाहिले आहेत. तुम्हाला ह्या दोन्ही देशांमध्ये काय फरक जाणवतो?' तेंव्हा ते म्हणाले, ' सीमा रेषा आखल्याने जमीनीचा बटवारा होतो, संस्कृतीचा नाही.' ह्यावर उदाहरणादाखल त्यांनी अनेक सणवार, रुढी, संगीतातील रागदारी, औषधोपचार (आयुर्वेदासह) आणि जेवण्याखाण्याच्या पध्दती ह्यातील साम्य त्यांनी मला दाखविले. जवळजवळ तास भर आमची चर्चा झाली. त्यांच्या आदबशीर उर्दूने मला अनेकदा लाजवलं. त्याच हॉटेलात उपहारगृहातील वेटरशी माझे जोरदार भांडणही झाले. PIA ने संध्याकाळच्या नाश्त्याची आणि रात्रीच्या जेवणाची कुपन्स दिली होती. कराची मुंबई प्रवासाच्या सीट्स आरक्षित करायच्या होत्या. ती सोय हॉटेलातच होती पण त्यांचा संगणक बिघडल्यामुळे तिथला कारकून प्रत्येक तिकिटासाठी फोन वरून बुकींग घेत होता आणि त्यात बराच वेळ जात होता. संध्याकाळी ५ वाजता उतरल्यावर ७ वाजेपर्यंत मी त्यांच्या कार्यालयातच बसून होतो. त्यानंतर मी उपहारगृहात चहा-सँडविचसाठी गेलो असता वेटरने 'नाश्त्याची वेळ संपली, आता नाश्ता मिळणार नाही' असे उर्मट उत्तर दिले. त्यावर त्याला मी PIA चा संगणक बिघडल्यामुळे मला उशीर झाल्याचे त्यात माझा काहीच दोष नसल्याचे सांगूनही तो ऐकेना. आणि वरून 'केव्हाही आलं तर नाशता मिळत नसतो, वेळेवर यायला पाहिजे होते' असे त्याने मला ऐकवले. ही आमची वादावादी आजूबाजूचे प्रवासी (पाकिस्तानी) ऐकत-पाहात होते. मला संताप आला. 'कसा मिळत नाही नाश्ता तेच पाहतो, तुम्ही काही फुकट देत नाही नाश्ता, मी पूर्ण पैसे मोजले आहेत' असे म्हंटले त्यावर तो मला म्हणाला 'तुला कोण नाश्ता देतो तेच मी पाहतो.' हा चॅलेंज होता. मी बसल्या जागेवरूनच आवाज चढवून मॅनेजरला बोलावले. तो लगेच आला. त्यावर प्रथम मी त्या उर्मट वेटरची तक्रार केली. तो वेटर काही बोलणार एवढ्यात त्या मॅनेजरने त्याला तिथून हाकलले. (तो संतापाने दूर जाऊन उभा राहिला) मॅनेजरने मला शांत करून समस्या काय आहे ते विचारले. मीही त्याला शांतपणे मला चहा आणि नाश्ता हवा असल्याचे सांगितले. (तो माझा हक्क होता). त्याने ताबडतोब तशी व्यवस्था केली. आम्हा सर्वाना चहा नाशता मिळाला. (आपले बाकी सर्व भारतिय, शेपूट घालून गप्प बसून होते. कोणीही माझ्या बाजूने चकार शब्दही काढला नाही.) आत वेटर आणि मॅनेजरची वादावादी झाली. 'मेरे मना करनेपरभी आपने क्यूं नाशता दिया?' असे वाक्य मला ऐकू आले. चहा नाश्ता झाल्यावर मी काउंटरवर जाऊन मॅनेजरला भेटलो, त्याचे आभार मानले आणि डीनरचे क्लोजिंग टाईम काय आहे असे विचारले. त्याने रात्री ११ असे सांगितले. नंतर आम्ही (मी आणि माझा एक मित्र) कराचीत फिरायला गेलो. रात्री १०|| वाजता परतलो. १०.५५ पर्यंत लाऊंजमध्ये संगीत ऐकत बसलो होतो. एक पाकिस्तानी कलाकार 'इक प्यार का नगमा है...' पियानोवर वाजविण्याचा प्रयत्न करीत होता. अकराला पाच कमी असताना मी मित्रासमवेत जेवायला गेलो. मॅनेजरने खास खातीरदारी केली. ह्या सर्व कथा सांगण्याचा उद्देश असा की मला दोन्ही प्रकारची माणसे भेटली. चांगलीही आणि वाईटही. पण मुख्यत्वे करून राजकारण्यांच्या प्रभावाखाली भरकटलेली. प्रतिसाद बराच मोठा होतो आहे. पण अजून एक इंटरेस्टींग गोष्ट. मस्कतमध्ये एक बलूची भेटला होता. चांगला सुशिक्षित. तो काही काळ पाकिस्तानी नेव्हीत होता. ७१च्या युद्धात भारतिय नौसेनेने एक पाकिस्तानी युद्धनौका पकडली आणि सर्वंना कैद केले. त्या कैद्यांमध्ये तो होता. ३ वर्षे भारतिय तुरूंगात युद्धकैदी म्हणून होता. तो म्हणाला, 'भारतिय नौसेना भयंकर हुषार आहे. पाकिस्तानच्या युद्धनौकेवर कबजा केल्यावर भारतिय अधिकारी पाकिस्तानी अधिकार्‍यांशी बोलत होते. मी जवळच होतो. भारतिय अधिकार्‍याने आमची नौका कराची बंदरातून निघाल्या पासून तिने कुठे-कुठे, कसा-कसा प्रवास केला ह्याचे इत्यंभूत वर्णन केले. आम्ही अवाक झालो. ते दोघेही मैत्रीपूर्ण वातावरणात एकमेकांशी बोलत होते. भारतिय सरकारने पाकिस्तानी अधिकार्‍यांना फार मानाची आणि चांगली वागणूक दिली. पण आम्हा जवानांना फार कुत्र्यासारखी वागणूक दिली. पण त्या तिन वर्षांच्या कालावधीत मला एक कळून चुकले पाकिस्तान हिन्दूस्थानवर कधीच विजय मिळवू शकणार नाही. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे.' असो. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे, हे प्रत्येक पाकिस्तानीही जाणतो पण ते स्विकारणे त्यांना फार जड जातय. भारताची तंत्रज्ञानातील प्रगती मात्र ते उघडपणे कबूल करतात. जय हिंद..

उत्तम लेख... कोणतीही बाजू न घेता आणि मनापासून लिहिलेला... विशेषतः खोटी वाटणारी अलंकारिक वाक्ये टाळल्यामुळे तर फारच बेस्ट झालं... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु 22/08/2008 - 17:23
बरिच चर्चा चर्वण झाले. कोणाचेही मन दुखवण्याच्या हेतूने हा लेख लिहिलेला नाहिये. फुलवा, टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही. कधी कधी ती शत्रूची असते, कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना. त्यासाठी स्थळ किंवा काळ याचे नियम नसतात. ड्रायव्हिंग करताना अपघात होतात. मला कोणि येऊन धडकण्याआधी मीच त्याला जाऊन धडकतो .. या मानसिकेमध्ये काय अर्थ आहे. नुकसान तुमचेच आहे. त्यापेक्षा जास्तीत जास्त सुरक्षित ड्रायव्हिंग करण्याकडे लोकांच कल असतो नाही का? नानाचेंगट, कोणत्याही देशाबद्दल मी कोणताही (चांगला/वाईट) निर्णय घेतला नाहीये. मी केवळ आणि केवळ मानसिकेतेबद्दल लिहिले आहे...तेही माझ्या . विसुनाना, सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही. मी इथे कुठेही पाकिस्तान हा भारताचा मित्र आहे हे विधान केल्याचे मला आढळले नाही. कोणताही निष्कर्ष यातून मी काढलेला नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माझा बघण्याचा दृष्टीकोन बदलला हेच यातून सांगायचे आहे मला. पुन्हा एकदा सांगते.... माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही. लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल. - (सर्वव्यापी)प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

शितल 23/08/2008 - 02:08
प्राजुने लेखातुन तीच्या आणि जे भारतीय देशाच्या बाहेर राहत आहेत त्याच्या मानसिकतेचा बदल दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे तीला व्यवस्थित साध्य झाले आहे. :)

In reply to by प्राजु

>>टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही. जगणं सोडावं असं मी कधीच म्ह्टल नाही,उलट मला कौतुक वाटते या दुर्दम्य जगण्याच्या इच्छाशक्ती चे. >> कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना. आणि महापुर आणि बॉम्ब्स्फोट याची तुलना करण्यात काय अर्थ?नैसर्गिक आपती स्थळ काळ बघत नसली तरी या मानव निर्मित आपत्ती पुर्वनियोजित असतात . विश्वबन्धुत्व वगैरे आदर्श कल्पना आहेत, पण ते त्यासाठी स्वाभिमान , देशाभिमान सोडु नये... इतकच.

सुंदर लेख. कोणताही चष्मा न चढवता लिहीलेला; म्हणूनच मनाला भिडणारा. अमेरीकेत आल्यावर खूप पाकिस्तानी भेटले. त्यातही हे हाडवैर असलेले पाकीस्तानी भारतीयांशी इतके मित्रत्वाने वागतील असे वाटले नव्हते. राहून राहून असे वाटायचेच की जर दहशतवादी पाकीस्तानात घडत असतील तर ते दहशतवादी काही दिवसांपूर्वी पाकीस्तानी नागरीकच होते ना? मग सामान्य नागरीक शांती वांछीत आहे असे कसे समजावे. त्यामुळे अमेरीकेत उतरल्यावर पाकीस्तानी लोकांना भारतीय लोकांबद्दल आलेल्या पुळक्याचे कारण समजले नाही. जसा जसा जास्त दिवस अमेरीकेत जास्त दिवस राहत गेलो तसे प्राजुने लिहील्याप्रमाणे आशियायी म्हणून हे प्रेम असल्याचे कळले. पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले. ;) माझी एक मैत्रीण आहे पाकीस्तानी. ती chase बँकेमधे personal banker आहे. एकदम फटाकडी. आणि देशी लोक पाहील्यावर तिला प्रेमाचं काय भरते येते म्हणून सांगू.(कदाचित त्यात थोडासा व्यावसायिक दृष्टीकोण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.) पण पोरगी छान होती. ;) माझ्या घराजवळ असणार्‍या मदिना नावाच्या पाकिस्तानी हॉटेलात वरचे वर जात असे. खरेतर हॉटेल होते पाकीस्तानी माणसाचे पण त्यावर पाटी होती इन्डो-पाकीस्तानी हॉटेल म्हणून. याचे कारण पाकिस्तानी रेस्टॉरंट असे लिहीले असते तर भारतीय लोक येत नाहीत असे दस्तुरखुद्द मालकानंच आम्हाला सांगितले. माझे बरेच मित्र विचारत की पाकीस्तानी वस्तू घेत तर नाहीस आणि त्या मदिनामधे जाऊन बरा हाणत असतोस सारखे सारखे. त्यावर मी त्याना म्हणत असे की 'दुटप्पी धोरण काय फक्त पाकीस्ताननेच ठेवावे काय! मी नाही ठेऊ शकत'. - (अस्सल भारतीय) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर 23/08/2008 - 00:18
पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले. जियो....! तात्या.

लिखाळ 22/08/2008 - 21:50
माझे पाकिस्तानी नागरिकांबद्दलचे मत जसे भारतात असताना होते, तसेच इथे आल्यावर सुद्धा आहे. इथले पाकिस्तानी आपल्याला पाहिल्यावर नजर टाळतात, ओळख देत नाहित असा माझा व्यक्तिगत अनुभव. ज्या एका पाकिस्तानी टॅक्सीवाल्याशी बोलणे झाले तो बरा होता. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल तितकारा नाही तसे प्रेमही नाही. ती माझ्यासारखेच सामान्य असतील अशी एक क्ल्पना करुन असतो. मी चौकटीबाहेर पाउल ठेवले तरी मी कोण असा प्रश्न पडला नाही. एखादेवेळी मानसिक चौकट बदललेली नसेल अशीही शक्यता आहेच. अनेकदा जीवनात येणारा भौतिक/लौकिक बदल आपल्याला पूर्ण बदलवून टाकेल अशी आपली धारणा असल्याने आपला दृष्टिकोनसुद्धा बदलला पाहिजे अशी आपण आपल्याला भीड तर घालत नाही ना?!! (कृपया या विधानाकडे एक विचार म्हणूनच पाहावे. वैयक्तिक रोख समजू नये ही विनंती.) --लिखाळ.

अमेयहसमनीस 23/08/2008 - 13:50
प्राजू ताई, काय आहे हा सगळा विचार आपण सीमे वर लढत असलेल्य (भारतीय) जवाना ला केन्द्रित करुन परत एकदा लिहा. अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे. अमेय

In reply to by अमेयहसमनीस

प्राजु 23/08/2008 - 19:07
अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे. आपण गफलत करता आहात. माझी मानसिकता आणि सीमेवर लढणारा जवान दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेत बसून लिहिणे सोपे आहे हा तुमचा गैरसमज आहे. अमेरिकेत असले तरी मी भारतीयच आहे. आणि तुम्हाला भारतात राहून जितका भारतीयत्वाचा अभिमान आहे तितकाच मलाही आहे. तुम्ही भारतात रहाता पण सीमेवर लढणार्‍या जवानासाठी तुम्ही काय करता श्रद्धांजली वाहण्या व्यतिरिक्त?? काहीच नाही ना. मग कोणत्या मुद्द्यावर तुम्ही वरचे विधान केले?? एक लक्षात ठेवा काहिही झालं तरी आज तुम्ही तुमच्या माणसांच्यात आहात. सुरक्षित आहात. आम्हाला इथे जी जवळची वाटतात त्यांना धरून रहावंच लागतं. काही बरं वाईट झालं तर नातेवाईकांच्याही आधी मदतीला हीच माणसं येतात. मग इथे राहणार्‍या एखाद्याचा शेजारी जर पाकिस्तानी किंवा बांग्लदेशी असेल तर विनाकारण वैर धरण्यात काय अर्थ आहे? दुसरी गोष्ट अशी, जी अमेरिकन बाइ मला भेटली, तिच्या "यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर" या वाक्यातून जर बांग्लादेशात राहणार्‍या माणसाच्या वागण्यावरून तिने भारतीय माणसालाही चांगले म्हंटले असेल तर ही शीतावरून भाताची परिक्षाच नाही का? आणि यात चूक आहे?? तेव्हा तुमचे वरील वाक्य माझ्यासाठी गैरलागू आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अमेयहसमनीस 25/08/2008 - 12:38
"यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर" हे वाक्य एका अमेरिकी माणसानी म्हणण आणि एका भारतीय माणसानी म्हणण यात बारच फरक आहे. अमेय

ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही. फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे. विनायक प्रभु

In reply to by विनायक प्रभू

ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही. फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे. ११ जुलॅ २००६ ला , मुम्बई त साखळी बॉम्ब्स्फोट झाले तेव्हा मी विरुध्द दिशेने (चर्चगेट जाणाया) गाडीत च होते.अगदी समोर.. आणि माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही असं मी म्हटल नाही.. मी माझ्या पुरतं सांगितल..

मनीषा 25/08/2008 - 12:14
मी सुद्धा हा अनुभव नेहमी घेते.. परक्या लोकांमधे पाकी/ बांग्लादेशी/श्रीलंकन , ही लोक 'आपलेच' वाटतात . पण तरी हे सुद्धा तितकच खरं कि हा आपलेपणा जो पर्यंत धर्म, राजकारण (आणि क्रिकेट) हा विषय निघत नाही तो पर्यंत. आणि वादाचा विषय असेल तेव्हा भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात. अर्थात हे माझं (निरिक्षण) मत आहे.

In reply to by मनीषा

भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात गुन्हेगारीकडे कलही भारतीयांपेक्षा पाकिस्तान्यांचा जास्त असतो असे ओमानच्या CIDचे मत आहे.

प्राजु 25/08/2008 - 19:57
प्रतिसाद दिलेल्या, चर्चा केलेल्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अरुण मनोहर 22/08/2008 - 06:53
असेच अनुभव मलाही ठिकठीकाणी आले आहेत. सरहद फक्त नकाशाच्या कागदावर असते. जमीनीवर ती दाखवण्यासाठी भलेही कुंपण घालाल, पण दोन देशांमधील हवा कोणी कशी विभाजू शकेल? देशांदेशांमधील राजकारण मानवी मनात सरहदी उभारते. आपण नागरीक त्या सरह्दींचे काटेरी कुंपण मनात तयार करतो. प्राजू, तुमचा लेख वाचून असेच काही विचार अस्वस्थ करून गेले.

विसोबा खेचर 22/08/2008 - 07:02
प्राजू, लेख चांगला आहे, आता वावरताना, कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते. सामान्य पाकिस्तानी नागरीक असेलही आपल्यासारखाच सामान्य आणि शांतताप्रिय परंतु पाकिस्तानी राजनितीतले लोक हे भारताचे दुश्मनच आहेत. भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या आयएसाय सारख्या संघटनांना त्यांचीच फूस आहे..! असो, आपला, (भारतीय) तात्या.

तुमचा लेख विचार करायला भाग पाडतो आहे. कुठल्याच बाजूचा निष्कर्ष मांडायचा तुमचा अट्टाहास नाही ही अजून एक लाजवाब गोष्ट. सानियाच्या एका कादंबरीतली एक आजी म्हणते, प्रत्येकाला तपासताना थोडी जागा ठेवावी. ती कुठे, कशी भरून निघेल सांगता येत नाही... त्याची आठवण झाली.

विसोबा खेचर 22/08/2008 - 07:21
अलिकडेच कारगिलच्या युद्धात आम्ही पाकड्यांना धूळ चारली आहे. भारतामध्ये बाँबस्फोट घडवून त्यांच्या अश्याच जर दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या तर पुन्हा एकदा त्यांना माती चारायची वेळ येईल. भारतातीत दहशतवादी कारवायांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचाही हात नेहमीच असतो! आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही! पाकिस्तान आमचा दुश्मन आहे आणि राहील! या निमित्ताने कारगिलच्या धुमश्चक्रीत कामी आलेल्या सर्व भारतीय जवानांना मी श्रद्धांजली वाहतो. अजून एक - सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही! मी भारतीय आहे आणि भारतीयच राहीन. माझा देश मला जी काही दोन वेळची रुखीसुखी भाकरी देतो त्यातच मी समाधानी आहे! 'हू ऍम आय' हा प्रश्न मला तरी कधी पडला नाही आणि यापुढेही पडू नये एवढीच इच्छा आहे! आपला, (आधी भारतीय आणि मग एशियन वगैरे वगैरे!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर 22/08/2008 - 07:52
तात्याराव तुमचा जाज्वल्य देशाभिमान कौतुकास्पदच आहे. औद्योगीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या ह्या युगात देशप्रेमाची आठवणच करून द्यावी लागते. तुम्ही म्हणालात, "आणि सामान्य नागरीक, मग तो कोणत्याही देशाचा का असेना, तो शांतताप्रियच असतो. माझ्यासारखा भारतीय सामान्य नागरीकही शांतताप्रियच आहे. तेव्हा पाकिस्तानच्या नागरीकांचे त्यात काही विशेष कवतिक आहे असं मला तरी वाटत नाही!" मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता. मुद्दा हा की आपण सारे शांतताप्रीय आहोत, तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां? ह्याचे उत्तर म्हणून त्याने असे केले म्हणून मीही तसेच करीन हे म्हणणे सोपे आहे. तेच आपण आजवर करीत आलो आहोत. ते सोडून आपण अखंड भारताची स्वप्ने पुन्हा पहायला का लागू नये? ब्रीटीशांनी त्यांच्या गलीच्छ राजकारणासाठी आपल्याला झुंजवले. आजही ते लोक गेल्यावर आम्ही सुंदोपसुंदी करीतच आहोत. हा खंडप्राय देश पुन्हा एक झाला तर आजच एक महासत्ता म्हणून उभारेल. कोणी असेही म्हणेल की भारत एकटाच आज महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पण तसे असूनही, अखंड भारताची एकी ह्या प्रोसेस मधे वेग आणेल. पण राजकारणी लोकांनी ह्या दिशेने पाऊल टाक्न्ञासाठी आधी सामान्य नगरीकांनी मनातील दुशमनी संपवली पाहीजे. तात्याराव, तुम्ही म्हणालात, "सुदैवाने माझ्याच देशात रहात असल्यामुळे मी भारतीय म्हणूनच ओळखला जातो. इथे येऊन कुणी गोरा मला 'एशियन' म्हणून शकत नाही!". उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात. ज्यांना देशाबाहेर राहून इतर देशातल्या नागरीकातला सामान्य माणुस पहाता आला, त्यांना मनामनांत घातलेली सरहदींची कुंपणे तोडायला कदाचित सोपे झाले असेल.

In reply to by अरुण मनोहर

विसोबा खेचर 22/08/2008 - 17:29
मला नाही वाटत, अशा सामान्य माणसाचे कौतूक करण्यासाठी हा लेख होता. मला मात्र तसेच वाटले! असो... तर मग ही दुशमनी कां? हा रक्तपात, निरपराध लोकांची हत्या कां? ते कृपया पाकिस्तानी अतिरेक्यांना विचारा... उद्योगासाठी तुम्हाला देशोदेशी जावे लागले नाही, तुम्ही खरेच सुदैवी आहात. अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अवलिया 22/08/2008 - 19:43
वा तात्या वा अगदी खरं आहे. खरंच मी सुदैवी आहे. दोन वेळची मानाची भाकरी कमवण्याइतपत शिक्षण, संधी मला माझ्या मातृभीमीने दिली आहे! ती मला माझ्या मातृभूमीतच मिळत आहे! मी पुढे असे म्हणेन की जर संधी मिळाली नाही तर मी ती मातृभुमीतच मिळवेन व इतरांना पण उपलब्ध करुन देईन जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 22/08/2008 - 08:07
लेख लिहिताना मी कोणत्याही संदर्भात असे म्हंटले नाही की, मला भारतीय असल्याचा अभिमान नाही. किंबहुना या लेखाचा खटाटोप कोणाला किती देशप्रेम आहे हे समजण्यासाठी नाहीच आहे. मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे. मी पाकिस्तान बद्दलही कुठे काही वाइट लिहिलेले नाहीये. मी मानसिकतेबद्दल लिहिले आहे. मी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही. लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 22/08/2008 - 17:36
मी भारतीयच आहे आणि नेहमीच राहणार आणि मला तात्यांच्या पेक्षा २ % जास्तच माझ्या देशाचा अभिमान आहे प्राजू, माझ्या प्रतिसादात तुला किती देशाभिमान आहे किंवा नाही याचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही. तुझा लेख हा सामान्य पाकिस्तानी माणसाबद्दल आहे आणि कुठल्याही देशाचा सामान्य नागरीक हा शांतताप्रियच असतो असे मीही म्हटलेले आहे. तुझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे सामान्य पाकिस्तानी नागरीक हा जरी कितीही शांतताप्रिय असला तरी 'पाकिस्तान' हा मात्र भारताचा कट्टर दुश्मनच आहे आणि राहील इतकाच माझा मुद्दा होता. सबब, तुझे वरील वाक्य हे व्यक्तिगत असून मला ते गैरलागू वाटते! बाकी, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी पाणी भारताच्या डोक्यावरून जाऊ लागेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानला गर्दीस मिळवण्यास भारत समर्थ आहेच! असो... तात्या.

In reply to by प्राजु

anilanantbhate 23/08/2008 - 15:14
फारच छान प्राजु! आपन एका मुलभूत् विशयाला हात घातला आहात. मानवी मनाचे सहज सूलभ दर्शन आपल्या लेखातून घदत.! होय. भारतीय आनी पाकिस्तानी दोघन्मधेही उददामाजी काले गोरे असा केवल एका रेघे एवधाच सूक्श्म फरक आहे. म्हनुनच तर तिसर्या जगान्त ते एशिअन्स म्हनूनच ओलखले जातात. एके कालच्या अखन्द भारतातील भावन्द्,शेजारी राश्त्र (शत्रु राश्त्र ही असतील) पन सर्वसामान्य प्रजेच काय! प्रत्येक गोश्तीकदे राजकीय चश्म्यातून पाहून पाहून ज्यान्ची मन निबर झाल्येत्,चिन्तन शिबिरान्तील बौध्धिक घोतून आनी घोतवून घेतलेल्या मनावर एवधी पूत चधली आहेत , तेन्वा लक्शान्त कोन घेतो! आपनच कसे बावन्न कशी देश प्रेमी हे दाखवून देन्याचीच स्पर्धा चालू आहे प्रतिक्रिया देनार्यान्कदून!भारतीयत्वाचे थेकेदार बनता बनता जो विवेक सामान्य पाकिस्तानी स्त्रीया दाखवू शकतात, तो ही या धुध्धाचार्यान्कदे औशधाएवधाही नाही याच फार वैशम्य वातत.सार जग आज भारतामधे चालू असलेल्या मानवतेच्या एका अभिनव अद्भूत प्रयोगाकदे, आशेने आनी कौतुकाने दोले लावून बसले आहे.क्शमा, करूना आनी सहिश्नुता, असा आपला सान्स्क्रुतिक वारसाच आपन विसरत चाललो आहोत. भारतीय आनि पाकिस्तानी ,त्या एकमेकान्शी निर्व्याज, निरागसतेने खेलनार्या मुलाना काय कल्पना कि आपापल्या देशानी क्रूर, राक्शसी व्रूत्ती अन्गिकार्न्यामधे केवधी मोथी झेप घेतली आहे! आपली बदललेली मानसिकता अगदी १००%योग्य आहे. आपन मानस आहोत आनी हे मानुस पन आपन विसरला नाहीत हीच मोथी दिलासादायक गोश्त आहे. " जो जे वान्छील तो ते लाहो" अस साअन्गनार्या ज्ञानेशराना तर आम्ही विसरलेलोच आहोत, आपन कार्यपरत्वे दूर देशी असूनही ही मुल्य जपताहात, याबद्दल शतशः धन्यवाद आनी अभिनन्दन सुध्धा!

मुक्तसुनीत 22/08/2008 - 07:25
लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...

In reply to by मुक्तसुनीत

>> माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. ह्या वाक्यालाच आधी दाद गेली... तुम्हाला भेटायला फार मजा येईल राव. नेमके मी इस्ट कोस्ट जीटीजीला नव्हतो !

मुक्तसुनीत 22/08/2008 - 07:25
लेख आवडला. साध्या भाषेतला , एका साध्या माणसाला काय वाटते ते सांगणारा. वर तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे, सामान्य माणसांना युद्धे, हिंसा यापैकी काही नको आहे ; पण ... माणूस चांगला असतो , जमाव वाईट. सामान्य जनता शांतताप्रिय असते , पण सत्ताकेंद्रे कारस्थाने करणारी. मी मध्यंतरी http://www.anothersubcontinent.com/forums या मिसळपाव सारख्याच , पण इंग्रजी साईटवर जायचो. नावच पहा : अनादर सब्काँटीनेंट डॉट कॉम. अपेक्षेप्रमाणेच तिथे प्रामुख्याने आपल्या देशातले , पाकिस्तान, बांगलादेशातले (आणि या देशाची पार्श्वभूमी असणारे नॉन रेसिडेंट ) लोक येतात. आपल्या उपखंडातल्या अनेकानेक गोष्टींची चर्चा होते. इतर देशीच्या लोकांना आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी , मते मतांतरे याचे रंगीबेरंगी चित्र तिथे अव्याहतपणे पहायला मिळते. प्राजु यांनी जे लिहीले त्याचेच प्रत्यंतर तेथेही येते...

धनंजय 22/08/2008 - 07:32
शेजार्‍यांकडून आणि कामाच्या ठिकाणच्या सहकार्‍यांकडून आला आहे. आता अन्य लोकांचा अनुभव आहे, की पाकिस्तानी लोक गोड बोलून फसवतात. माझा तसा अनुभव नाही. कदाचित कोणी फसवू शकेल इतका भरवसा मी अनोळखी किंवा कमी ओळख असलेल्या व्यक्तीवर टाकत नाही. बाकी "बिहारी लोक एकमेकांत संगनमत करून आपल्या इकडे घुसखोरी करतात" असे ऐकून आहे. त्यामुळे गोव्याबाहेरचे वेगवेगळ्या प्रांतातले, देशांतले घाटी लोक मिळून गोड बोलून कपट करतात असे जाणवते. म्हणूनच सर्व घाटी लोकांशी काळजीपूर्वक व्यवहार केलेलाच बरा. (गोव्यातले सहिष्णू लोक मात्र एकमेकांशीच भांडत राहातात.) भांडकुदळ गोवेकरांशी तर फारच काळजीपूर्वक व्यवहार करतो.

शितल 22/08/2008 - 07:50
लेख खुप छान आहेस प्राजु, >>>>>>>>>>गोर्‍या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. हे खरं आहे.

वैद्य 22/08/2008 - 08:15
कुठे आहात ? ह्या सर्व कंपन्यांनी पाकिस्तानात ऑफिसे उघडायला हवीत. पाकिस्तानातले अनेक इंजिनेर इकडे अमेरिकेत येतात. ह्या कंपन्यांना सध्यापेक्षा ४०% प्रतिवर्ष वाढायचे असेल, तर डोकेबाज एम्प्लॉयीज पाकिस्तानात मिळतील. चीन मध्ये नाही. कुणी ऐकते आहे का रे ? -- वैद्य

सहज 22/08/2008 - 08:20
अनुभव प्रातिनिधीक. लेख अतिशय आवडला. थोडी संवेदनशीलता मनात जपलीच पाहीजेच व मानसीकता बदलण्याचे धाडस असले पाहीजे. इतिहासाचे ओझे झुगारुन नवा इतिहास घडवायला जमले पाहीजे, नाहीतर कुठल्याही कारणावरुन माणसामाणसातली दरी ही कधीच बुजली जाणार नाही. देश विदेशच्या लोकातील अंतरे सोडा तर अगदी साडेतीन टक्यातील लोकात पण पुणे वा मुंबई किंवा कोकणातले वा देशावरचे, मराठी वा इंग्रजी बोलणे, ह्या २१ व्याशतकातील सुशिक्षीत समाजात, त्यातुन निवडक प्रगत लोकात जर अजुनही गंभीरपणे स्थान, भाषा वादावादी होत असेल तर काय बोलायचे? मूळ लेखातील विचारांना अजुन थोडे पुढे नेउन फक्त "एशियन" का आपल्यासारख्या न दिसणार्‍या माणसांबद्दल पण कुठलीही अढी वाटली नाही पाहीजे. लहान मुलांना हे किती सहज जमते.

अनिल हटेला 22/08/2008 - 08:24
लेख छान वाटला... इकडे मला असे अनुभव नाही आले ... पन ब-याचदा चॅट वगैरे करताना पाकिस्तानी लोकाशी संवाद झालाये.. आणी त्यातुन एक गोष्ट जाणवली की ह्या लोकाना भारत देशा विषयी फार कुतुहल आहे .. एव्हन भारताची प्रगती मीडीया ज्याप्रकारे जगाला दाखवते आहे ते पाहुन..... असो !! चायनीज लोक सुद्धा इंडीयन म्हटल की अतिशय स्पेशल नजरेने बघतात .. आणी अभिमान वाटतो की, आय यम इंडीयन !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

देशाबाहेर पडलो की काही गोष्टींकडे बघायचा कॅलिडोस्कोप बदलतो... ह्याचा अर्थ असा नाही की भारतीय म्हणून देशाभिमान कमी होतो. मला ही असे अनुभव आले आहेत जिथे पाकिस्तानी, अफगाणी सामान्य माणूस शांतताप्रिय भेटलाय. आम्ही तर मटण - चिकन आणायला आठ - पंधरा दिवसातून पाकिस्तानी दुकानात जातोच. क्रिकेटपासून सियासत पर्यंत भरपूर गप्पा होतात.

ऋचा 22/08/2008 - 09:36
लेख खुप छान आहे . गोर्‍या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. एकदम सही!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चतुरंग 22/08/2008 - 09:48
गाव, जिल्हा, राज्य, देश, परदेश असं आपलं क्षितिज विस्तारत जाताना माणसांबद्दलचे विचारही बदलत जातात, माझे बदलले. सामान्य माणसाला एक शांत आयुष्य जगण्यात रस असतो आणि अशा इच्छेला देश-कालाच्या सीमा नसतात. चतुरंग

माणूस कितीही बुद्धिमान असला तरी देशात आणि देशाबाहेर राहून त्याच्या समजुतीत फरक हा पडतोच!! समर्थांनी "केल्याने देशांतर..." उगीचच म्हट्लेलं नाहीये!!!! भारतात राहून पाकिस्तानी अणि चिनी हे आपले शत्रू म्हणुन ओळखले जातात! आपल्या सरकारने आपल्याला तसंच शिक्षण दिलंय!! कोण म्हणतो भारत सरकार प्रोपगान्डा करत नाही म्हणून? तसे नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं...... पाकिस्तान्यांबद्दलही तेच! सर्वसाधारण पाकिस्तानी जनतेला आज भारतीयांबद्दल आपुलकीच वाट्ते! हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय? पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!! तिसर्‍या देशात गेल्यामुळे आपल्या भूमिका अधिक विशाल होत जातात! दुसर्‍या देशांच्या मानसिकतेबरोबरच आपल्या सरकारची चालबाजीही कळत जाते. तिसर्‍याच देशांची नि:पक्षपाती कागदपत्रे पहायला मिळतात (उदा. हारवर्ड लायब्ररी , युनायटेड नेशन्स पेपर्स, वा पेंटॅगॉन पेपर्स!) स्वतःची अशी एक भूमिका बनवता येते!! आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!! भारतमाता की जय!!!

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 22/08/2008 - 10:41
हां, आयएसाआय सारख्या संस्था वैर कसं वाढावं याचे प्लान करीत असतात पण रॉ सुद्धा तेच करत असते! नाहीतर रॉ सारख्या संस्थेचे भारतात काम काय? आपल्या वरील विधानाला आक्षेप आहे. प्रत्येक देशाला गुप्तहेर खाते जरुरीचे आहे. रॉ (रिसर्च अँड ऍनालिसिस विंग) आणि सी.बी.आय. (सेंट्रल ब्यूरो ऑफ इनवेस्टिगेशन) ह्या दोन संस्था भारताची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था कशी मजबूत राहील. कटांचे सुगावे कसे लागतील ह्याबाबत काम करीत असतात. आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत. माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत. तेव्हा त्यांची तुलना ही अयोग्य आहे. आयएसाअय ही एक पक्की विद्वेषी संघटना आहे आणि केवळ भारतद्वेष हाच त्याचा ऍजेंडा आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. उगीच सत्य नकारण्यात काही हशील नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

आय्.एस्.आय, ने मुंबईत जे बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारली तसली भ्याड कृत्ये आपल्या गुप्तचर संघटनांनी केलेली नाहीत. याची तुम्हाला कशावरून खात्री वाटते? भारतीय वृत्तपत्रे वाचून? आणि भारताच्या हेरांनी तशी कॄत्ये तुमच्या म्हणण्यानुसार जर केली नसतील तर ते कुचकामी ठरत नाहीत काय? इन्टेलिजन्स एजन्सी वा हेरांचे ते एक कामच नाही काय? माझ्या माहीतीत रॉ किंवा सीबीआयवर असले घाणेरडे आरोप कधीही झालेले नाहीत. चतुरंगा! सीबीआय फक्त इन्टर्नल अफेअर्स बघते आणि तिच्या नांवावर अशी कॄत्ये भरपूर आहेत (पहा: हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन!) परकीय देशात सीबीआय नव्हे तर सीआयए धिंगाणा घालते!!!!

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 22/08/2008 - 11:32
पिडाकाका? परदेशात काही कारण नसताना बाँबस्फोट घडवून निरपराध माणसे मारणे हे हेरांचे काम असते??? तर मग अशा कामात रॉ ही अजून 'रॉ'च आहे ह्याचा मला अभिमान आहे!! भारतीय वृत्तपत्रे वाचून कशाला मत बनवायचे अहो. भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर डोळा ठेऊन बसलेले बीबीसी, सीएनएन सारखी चॅनल्स काय असल्या बातम्या सोडणार आहेत? पराचा कावळा करण्यात आणि भारताची प्रतिमा मलीन करण्यात हे अग्रेसर आहेत. रॉने एक जरी असे काम केले असते तरी त्याचा जगभर गाजावाजा केला असता ह्यांनीच! सीबीआय चा उल्लेख मी अनवधानाने केला, क्षमस्व, मला आयबी म्हणायचे होते! आणि तुम्ही अमेरिकेचे सीआयए म्हणताय त्यांनी तर जगभर नंगानाचच घातलेला आहे, त्यांच्याशी केजीबीचीच तुलना! (हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?) चतुरंग

In reply to by चतुरंग

अरे. आपण निरपराध माणसे म्हणतो (अणि ते खरेही आहे!) पण त्यांच्या दृष्टीने हा शत्रूराष्ट्रात केवळ गोंधळ उडवणे नाही काय? आज पाकिस्तानातही तालिबान्यानी ऍम्यूनेशन फॅक्टरीच्या बाहेर हेच केले नाही काय? अरे आपल्या भारतात अंतर्गत हेरगिरीसाठी सीबीआय आहे. तिच्या नांवावरही अनेक कॄष्णकॄत्ये (रेफः आणिबाणी) जमा आहेत. रॉ ही परदेशात हेरगिरी करण्यासाठीचीच संस्था आहे. नाहीतर ती सीबीआयची रिडंडन्सी ठरली नसती का?:) (हूवर ऍड्मिन. चा संदर्भ समजला नाही?) माझा रेफरन्स हूव्हर ऍडमिनिस्ट्रेशन च्या काळात अनेक पोलिटिकल विरोधकांना एफबीआयने 'कम्यूनिस्ट" ठरवुन त्यांची छळवणूक केल्याबद्दल होता. जगात अशी कोणतीही हेरगिरी करणारी (बाह्य वा अंतर्गत!) यशस्वी संस्था नाही की जिच्या खात्यावर काही कृष्णकृत्ये जमा नाहीत. पण त्याबद्दल मला फारशी काळजी नाही! कारण तशी नसतील तर ती फार इफेक्टीव्ह हेरगिरी संस्था आहे असे म्हणता येणार नाही. पण आपण जरा रियलिस्टिक झालेले बरे नाही का?

In reply to by चतुरंग

आनंदयात्री 22/08/2008 - 11:03
रंगाशी सहमत ! >>नसते तर भारत सरकारने आजवर "ब्रूक्स-हेंन्डरसन" रिपोर्ट क्लासिफाईड करून ठेवला नसता!! भारत सरकार आजवर हीच भूमिका त्याच्या नागरिकांवर बिंबवत आलेलं >>आहे की चीनने भारतावर आक्रमण केलं, भारताची काहीही आगळीक नसतांना!! वरील रिपोर्ट या भूमिकेला छेद देणारा होता आणि आज जी काही जागतिक कागदपत्रे >>प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं नेहरूंनी कारण नसतांना हे आक्रमण ओढवून घेतलं कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल. एक वैयक्तिक अनुभवः जिवाभावाचा खान आडनाव लावणारा मित्र. सगळ्या अडिअडचणीत धावुन येणारा, मित्र म्हणुन अगदी जिवलग. माझे शेखशी भांडण झाल्यावर तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करणारा, वेळप्रसंगी (हाणामारीत) अचानक पणे त्याची बाजु घेणारा. नंतर येउन कौमची कारणे देउन समजवायचा प्रयत्न करणारा. आनंदयात्री, शेख, खान यांच्या निष्ठा भारतभुशीच आहेच हे पक्के ! उदाहरण कोणत्याही अभिनिवेशातुन दिलेले नाही. अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही.

In reply to by आनंदयात्री

कदाचित हे सत्यही असेल ! काका तुम्ही काही दुवे देउ शकता का या वरच्या विधानांच्या समर्थनार्थ ? दिल्यास आमच्या माहितीत भर पडेल. प्राथमिक माहितीसाठी वाचा: "वादळ माथा" श्री. यशवंतराव चव्हाणांची बायोग्राफी, लेखकः राम प्रधान, राज्यपालः अरुणाचल प्रदेश आणि मग त्यातून कागदपत्रे बॅकट्रेस करीत जा!! अशा पार्श्वभुमीवर भारतीयाची हाडे नरम करण्याची भाषा एकवत नाही. आम्हालाही असे लिहितांना फारसे सुख होते असे नाही पण न्यूयॉर्कमध्ये राहून असे विचित्र प्रसंग आम्ही पाहिले आहेत. निरपराध पाकिस्तानी अब्दुल (किंवा आणखी कोणितरी) खान व त्याला उगीचच त्रास देणारा भारतीय बांधव!! नाही, पूर्ण विचाराअंती आम्ही तरी त्या अब्दुलखानाचीच बाजू घेऊ!!!! भारतमातेने आम्हाला तेच शिकवलंय, दुर्बलांचा, अनाथांचा कैवार घे!!

In reply to by आनंदयात्री

चतुरंग 22/08/2008 - 11:42
डोळेझाक आणि सरदार पटेलांसारख्या द्र्ष्ट्याची दूरदृष्टी नाकारणे असला टोकाचा करंटेपणा घडलेला आहे. ह्यात आपल्या गुप्तहेर खात्याची काही चूक असण्यापेक्षा आपल्या त्यावेळच्या नेतृत्त्वाचा दुबळेपणा झाकण्यासाठी ब्रूक्स्-हेंडरसन रिपोर्ट क्लासिफाईड झालाय! चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 23/08/2008 - 00:15
आमच्यापुरते म्हणाल तर उद्या आमच्या अब्दुलखानाला जर कोणी भारतीय उगाच तो पाकिस्तानी आहे म्हणुन त्रास देऊ लागला तर आम्हीच त्या भारतीयाची हाडे नरम करू!! जळ्ळं मरायला आम्ही कशाला तुझ्या त्या अब्दुलखानला त्रास देऊ? त्याला त्रास देण्याचा आमचा काय संबंध? तो मोठा त्याच्या घरचा! साला, आम्हाला काय पडली आहे त्याला त्रास द्यायची? कोण तो?? आणि कुणी त्रास दिला आहे त्याला? त्याआधीच हाडे नरम करण्याची भाषा?? च्यामायला बस ना घेऊन तुझ्या त्या अब्दुलखानला! कोण त्रास देत नाय तुला! च्यामारी! म्हणे भारतीयांची हाडे नरम करू..! माय फूट....! तात्या.

अरुण मनोहर 22/08/2008 - 11:01
संदर्भः http://www.misalpav.com/node/3127#comment-43809 खरतर प्राजुच्या लेखाच्या कीतीतरी बाहेर हे सगळे जात आहे. पण खालील पिडां विधान वाचून मला आक्षेप नोंदवलाच पाहीजे. पिडांने (कळत नकळत?) भारताच्या काही हितचिंतकांना अतिरेकी म्हणून दुखावले आहे. >>>पाकिस्तानात जशी काही अतिरेकी मंडळी आहेत तशीच भारतात सुद्धा आहेत जी अखंड हिंदुस्तानची स्वप्ने पहात आहेत. अशा लोकांचा सामान्य (भारतीय वा पाकिस्तानी) जनतेच्या मनोगताशी काहीही संबंध उरलेला नाही!!! मला इथे फक्त येवढेच म्हणायचे आहे की अखंड भारताची स्वप्ने पहाणारी मंडळी अतिरेकी नाहीत. पिडांने (मुद्दाम?) "अखंड हिंदुस्तानची" शब्द वापरला! हिंदुस्थान म्हणताच आम्ही ब्रीटीशांनी पेरलेले तेच धर्मांध राजकारण आणत आहोत. अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर? पण हा खूप मोठा विषय आहे. मला वाटते सारेगमाप ने झी वर नुकताच अखंड भारत स्वातंत्र्यदिन साजरा करून विषयाला उजळणी दिली आहे. ह्यावर चर्चा करायची असल्यास कृपया कोणीतरी स्वतंत्र धागा सुरू करा.

In reply to by अरुण मनोहर

मला कुणाच्या भावनांशी खेळ करायचा नाही, पण आजच्या घडीला आपले अटलबिहारी बाजपेयी म्हणाले त्याप्रमाणे "पाकिस्तान हे सत्य आहे जे कोणीही खोडून टाकू शकणार नाही!" त्यामुळे वेळोवेळी 'अखंड हिदुस्तान' चा नारा देऊन भावना भडकावणारी मंडळी ही सुद्धा अतिरेकी विचारांचीच आहेत असे आम्ही मानतो! हे आमचे मत आपल्याला पटणार नाही कदाचित, त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आपल्या मतांतराबद्दल आदरही आहे. पण ते आमचे वैयक्तिक मत आहे आणि आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहोत!!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 22/08/2008 - 12:06
अखंड भारत ही वेगळी संकल्पना आहे. फाळणी पुर्वीचा भारत, एक देश झाला आणि सर्व धर्म सहीष्णू होउन एकत्र राहीला तर? ही दिवास्वप्ने आहेत. फाळणीपूर्वीचा भारत की ब्रम्हदेश बांगलादेश पाकिस्तान अफगानिस्तानपर्यन्तचा भूप्रदेश हा कधीच एकसंध देश नव्हता. भौगोलीक /भाषीक/ सांस्कृतीक/ धार्मीक कारणांमुळे तो नेहमीच वेगळा आहे ही वस्तुस्थिती आहे. सुस्थीर पाकिस्तान ही पाकिस्तानही पेक्षा भारताची गरज आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्राजु. भारताबाहेर राहणार्‍यांचा हा प्रातिनिधिक अनुभव! अशा प्रकारचे अनुभव भारताबाहेर गेल्यावर बरेच जणांना येतात. जेव्हा क्षितिजे रुंदावतात तेव्हा दृष्टिकोनही व्यापक होतो ह्याचे तुझा हा लेख म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. लेख आवडला हे वेसांन ल. स्वाती

राघव१ 22/08/2008 - 11:25
प्राजुताई, लेख फार सुंदर आहे. कोणतेही मत व्यक्त ना करता केवळ परिस्थिती मांडलेली आहे. वाचणार्‍या सगळ्यांच्या मनात निर्माण होणारे निरनिराळे भाव हेच या लेखाचे यश आहे!! सगळीकडे चांगले-वाईट लोक असतातच. जोवर मूळ गाव समजत नाही तोवर ती तुमच्या-आमच्या सारखीच माणसे असतात अन् सर्वसमावेशक असे परिमाण त्यास लागते. तीच मानवता. जेव्हा संदर्भ देशाचे/प्रांताचे/समाजाचे/जातीचे येतात तेव्हा हे परिमाण त्यानुरूप बदलत जाते. मला वाटते सामन्य माणसाचा दृष्टिकोन अन् सत्ताधारी माणसाचा दृष्टिकोन यात असलेला मूळ फरक अशा अनुभवातून दिसून येतो. असेच लिहीत राहा. शुभेच्छा. :) राघव.

तुझ्या लेखाच्या धाग्याच्या मध्येच येउन असा धिंगाणा घातल्याबद्दल क्षमस्व!:) पण हा विषयच इतका सेन्सिटिव्ह आहे की थोडीफार चर्चा होणारच! तरी वर लिहिल्याप्रमाणे तुझा लेख आवडला. किप ईट अप!! -डांबिसकाका

नंदन 22/08/2008 - 12:15
लेख आवडला. विशेषतः मुठा वि. मिठी असा वाद रंगलेला असताना एकच सिंधू दोन्ही देशांतून वाहते याची ग्वाही देणारा. बाकी, 'यू कॅनॉट सी द पिक्चर अनलेस यू स्टेप आऊट ऑफ द फ्रेम' हे जरी सार्वत्रिक सत्य नसले, तरी बर्‍याच वेळा खरे ठरते हे मात्र खरे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

प्रियाली 22/08/2008 - 14:42
'यू कॅनॉट सी द पिक्चर अनलेस यू स्टेप आऊट ऑफ द फ्रेम' हे जरी सार्वत्रिक सत्य नसले, तरी बर्‍याच वेळा खरे ठरते हे मात्र खरे.
खरे आहे. लेख आवडला.

प्राजुचा सुंदर लेख! कधितरि परदेशी जातो तेव्हा असा अनुभव येतो की, परदेशस्थ भारतीयांपेक्षा पाकीस्तानीच आपल्याशी आपुलकीने वागतात. जेव्हा परदेशस्थ भारतीयांना कळते की हा भारतातुन आला आहे, तेव्हा लोक आपल्या पासुन अंतर ठेऊन रहातात. दोन वर्षांपुर्वी ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीत गेलो होतो. टेथे किमान २५ भारतीय लोक विविध स्तरांवर कार्यरत होते. त्यांपैकी केवळ एक व्यक्ती माझ्याशी येउन बोलत असे. बाकिच्यांनी माझ्या पासुन काही फुटांचे अंतर (जाणवेल) असे ठेवले. (कदाचीत कंपनी प्रशासनाला गैर वाटू नये म्हणून त्यांचा तो प्रयत्न असावा) माझा सहाध्यायी एक कोरियन होता. कंपनीतले समस्त कोरियन त्याच्याशी ज्या आपूलकीने वागत होते, त्यामूळे आपल्या भारतीयांची मानसिकता फार जाणवली. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

भाग्यश्री 22/08/2008 - 12:54
प्राजु.. मस्तच लेख!! खूप प्रामाणिक लिहीलायस.. बाहेर राहूनच बर्‍याच गोष्टी कळतात, वळतात हेच खरं.. इथे येऊन पाकीस्तानी जनतेशी जुळवून घ्यावचं लागेल मला! कारण आमचा इंडीयन(!) ग्रोसरीवाला पाकीस्तानी आहे! :) हे आणि असेच कितीतरी प्रसंग येतात, आणि त्यातून आपण शिकतो.. एक मात्र खरं भारतात राहून उगीचच जास्त अढी निर्माण होते, ती बाहेर राहून सुटते.. मस्त लेख! भारताबाहेर राहणार्‍या लोकांना नक्कीच अपील होईल नीट!

स्नेहश्री 22/08/2008 - 13:02
ह्या लेखावरुन मला एका पुस्तकची आठवण झाली ...मिळल्यास जरुर वाचा "कुंपणापलिकडचा देश" अतिशय सुंदर पुस्तक आहे..........जरुर वाचा आणि लेखिका आहेत " मनिषा टिकेकर" --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

पक्या 22/08/2008 - 13:38
सामान्य नागरिक मग ते कोणत्या का देशाचे असेनात्...नॉर्मल परिस्थितीत एकमेकांना भेटल्यावर चांगलेच वागतात. पाकिस्तान हा देश खरोखरीच भारतासारखा सहिष्णु आहे काय? धर्मांध राजकारणामुळे पाकीस्तान भारताचा शञू बनला आहे. आणि या शत्रूत्वाचा सामना भारताला करावाच लागतो. >>कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते (परदेशी वास्तव्य असताना ) हा आपल्या सारखाच सामन्य आहे ही भावना मनात यायची पण आपल्याच भागातला आहे हे मात्र कधीही मनात आले नाही >>गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. हिंदीमधून संवाद साधता येतो , मुलेबाळे, खाणेपिणे अशा अनेक गोष्टींवर समविचार असू शकतात ह्यामुळे जव़ळीक वाटणे गैर नाही. पण जर राजकारण , इतिहास , धर्म हे विषय चर्चेत आले तर किती जवळीक वाटेल? अवांतर - मध्यंतरी मनोज वाजपेयी, रवि किशन चा १९७१ हा भारत पाक युध्दातील युध्दकैद्यांचा सिनेमा पाहीला. त्यात भारतीय युध्दकैद्यांचा पाकिस्तानी कँप मधून पळून जाण्याचा प्रयत्न दाखवला आहे. सत्यघटनेला मध्यवर्ती ठेवून सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे . या भारतीय युध्दकैद्यांचे पाकिस्तान्यांनी अतोनात हाल केले. बरेच जण कित्येक वर्ष जेल मध्ये मातृभूमीची , आपल्या घराची ,गावाची, नातेवाईकांची याद काढत सडून मेले. त्यांना म्हणे १९८३ मध्ये शेवटचे पाहीले गेले. त्यानंतर त्यांचा अजिबात ठावठिकाणा आजतागायत लागला नाही . यातीलच ६ जणांनी पाकिस्तानी कँप मधील सक्त पहारा तोडून पलायनाचा डाव आखलेला असतो. सिनेमा बघण्यासारखा आहे. http://www.youtube.com/watch?v=P8Ama-AnoVk

मराठी_माणूस 22/08/2008 - 13:20
परदेशात आपलि मानसिकता बदलते म्हणुन वेगळा अनुभव येतो. तिथे आपल्याला असुरक्षित वाटत असते आणि आपल्या सारखे कोणि आहे का, हे आपण शोधत असतो. पाकिस्तानि बरेचसे आपल्यासारखे दिसत असल्यामुळे आणि खाण्या पिण्याच्या गोष्टित साधर्म्य असल्यामुळे ते गोर्‍या पेक्षा जवळ चे वाटतात. गोरे एक विशिष्ट अंतर ठेउन असतात. त्यामुळे ह्या जवळकित गरज हा प्रमुख धागा असतो.

विसुनाना 22/08/2008 - 13:24
विचार करायला लावणारा लेख. पाकिस्तान / बांगलादेश किंवा इतर देशातील सर्वसामान्य नागरिक मूलतः दुष्ट/वैरत्वाने प्रेरित असतील असे मुळीच वाटत नाही. किंबहुना 'वसुधैव कुटुंबकम' ही भावना उच्च पातळीवर सर्व मानवात असतेच. (जर पृथ्वीवर परग्रहवासियांचे आक्रमण झाले तर चीन त्यांच्या बाजूने अमेरिकेविरुद्ध लढणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.) पण ती जितकी खोलात जाते तितकी दुरावत जाते... पृथ्वी -आशिया-भारत-राज्य-जिल्हा-तालुका-गाव-वॉर्ड--गल्ली-शेजार-कुटुंब-अगदी सख्खे भाऊही वेळ पडली की एकमेकांशी भांडतात. धर्म-जात -पोटजात -कूळ(गोत्र); प्रांत-भाषा -पोटभाषा ही वर्तुळातली वर्तुळे अशीच आहेत. परदेशात भारतीय भेटतात तेंव्हा ते अशाच कोणत्यातरी वर्तुळापुरता विचार करत असावेत असे वाटते. सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही. आपल्या लहान वर्तुळातील समूहाने सोसलेल्या कटु अनुभवांची स्मृती अजूनही ताजी आहे. आणि ती ताजी रहावी असे अनुभव अजुनही येत आहेत. त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे.

In reply to by विसुनाना

जेव्हा माझ्या देशाचे सैनिक रात्रंदिवस पाकिस्तान च्या बंदुकीच्या टप्प्यात आहेत, ११ जुलै २००६ ला मुंम्बई त लोकल मधे झालेले साखळी बॉम्ब स्फोट अनुभवले आहेत..तेव्हा असा विचार करणं कठीण आहे.. माणुस म्हणुन एक जण चांगला असेल ही.. पण देश म्हणुन?? तुम्ही दुर आहत म्हणुन हे साजिर रुप दिसत असेल.. इथे रोज टांगती तलवार डोक्यावर असताना इतका उदात विचार करणं मला अवघड वाटतं त्यामुळे सर्वात आतील वैयक्तिक वर्तुळात पकिस्तानी कितीही मित्र वाटले तरी देशपातळीवरच्या वर्तुळात पाकिस्तान शत्रूच राहिला आहे. अगदी खर..

दातेकाका 22/08/2008 - 13:41
प्राजू अभिनन्दन. अतीशय छान लेख. जे लोक कामानिमित्त्/व्यवसायानिमित्त परदेशी रहात आहेत त्यान्च्या मनाला नक्की भिडेल. पण................ भारतात रहात असलेल्या लोकान्ना पटेलसे वाटत नाही.

अवलिया 22/08/2008 - 19:49
हे सर्व वाचुन मी एवढेच सांगु इच्छितो की मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो काफर म्हणजे जो मुसलमाण नाहि तो यांत हिंदु, इसाइ, ज्यु तसेच बौद्ध प्रामुख्याने धरावे बाकी मी कशावरही चर्चा करु शकत नाही कारण माझी मते तुम्हाला पटणार नाही वा आवडणार नाही

In reply to by अवलिया

अनिता 22/08/2008 - 22:44
नाना, >>मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट >>जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो +१०० अगदी खरे आहे...१००%. ९/११ च्या प्रस॑गान॑तर मला अनुभव आला आहे...अमेरिकेतील मॉलमधे फिरताना माझ्या मित्राल मुस्लिम लोका॑नी शहरातील मस्जिद मधे बोलाविले होते...अफगान स॑घटनेला लढाईसाठी मदत करायला. (मित्र दाढी-मिशा ठेवायचा. त्यावरुन त्या लोका॑नी बहुतेक ठरवले असावे की तो मुस्लिम असावा..) न॑तर समजले की काहि लोका॑ना अटक झाली त्या ठिकाणी.

व्यवसायानिमित्त २५ वर्षे आखातात काढताना अनेकदा विविध स्तरावरील पाकिस्तानी जनतेशी संबंध आला. अगदी बँक मॅनेजर ते हमाल असे सर्व संपर्कात होते. माझे निरिक्षण असे की मनातून सर्वच पाकिस्तानी अंतर ठेवून असतात (कांही अपवाद). अशिक्षित पाकिस्तानी त्यांचा भारतियांवरील राग लपवू शकत नाहीत. अशिक्षितांमध्येह काही सुसंस्कृत पाकिस्तानी भेटतात ते निदान तोंडदेखले तरी सामंजस्याने वागतात. सुशिक्षितांमध्ये हे सामंजस्याचे नाटक (ढोंग नाही म्हणत आहे मी) जास्त प्रभावीपणे वठविण्याचे सामर्थ्य असते. आणि ह्या सुशिक्षितांमध्येच मनापासून चांगले, मवाळ, भारताच्या चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करणारे असे पाकीस्तानी असतात. त्यांच्याशी आपले चांगले सूत जमू शकते. थोड्याफार फरकाने संस्कृती दोघांचीही सारखीच असते. काय चांगले, काय वाईट ह्यावर एकमत होते. दोन्ही देशातील सामान्य जनता 'अमन (शांतता) चाहते' पण स्वार्थी राजकारणी वैर वाढविण्यास खतपाणी घालतात ह्यावर एकमत होते. बहुतांश पाकिस्तानी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने केलेल्या प्रगतीबद्दल कौतुकोद्गार काढतात. PIA ह्या पाकिस्तानी राष्ट्रीय विमानसेवेने केलेल्या प्रवासादरम्यान १ दिवस कराचीत राहण्याची संधी मिळाली होती. तेंव्हा तिथल्या हॉटेलच्या शॉपिंग एरियातील एका दुकानात एका वयोवृद्ध पाकिस्तानीशी गप्पागोष्टी केल्या असता त्यांचे एक वाक्य मनाला फार भिडले. त्यांनी त्यांच्या बालपणी भारतात (मुंबईत) काही वर्षे घालवीली होती आणि फाळणीनंतर उर्वरीत आयुष्य पाकिस्तात घालविले आहे. मी त्यांना विचारले की, 'तुम्ही दोन्ही देश जवळून पाहिले आहेत. तुम्हाला ह्या दोन्ही देशांमध्ये काय फरक जाणवतो?' तेंव्हा ते म्हणाले, ' सीमा रेषा आखल्याने जमीनीचा बटवारा होतो, संस्कृतीचा नाही.' ह्यावर उदाहरणादाखल त्यांनी अनेक सणवार, रुढी, संगीतातील रागदारी, औषधोपचार (आयुर्वेदासह) आणि जेवण्याखाण्याच्या पध्दती ह्यातील साम्य त्यांनी मला दाखविले. जवळजवळ तास भर आमची चर्चा झाली. त्यांच्या आदबशीर उर्दूने मला अनेकदा लाजवलं. त्याच हॉटेलात उपहारगृहातील वेटरशी माझे जोरदार भांडणही झाले. PIA ने संध्याकाळच्या नाश्त्याची आणि रात्रीच्या जेवणाची कुपन्स दिली होती. कराची मुंबई प्रवासाच्या सीट्स आरक्षित करायच्या होत्या. ती सोय हॉटेलातच होती पण त्यांचा संगणक बिघडल्यामुळे तिथला कारकून प्रत्येक तिकिटासाठी फोन वरून बुकींग घेत होता आणि त्यात बराच वेळ जात होता. संध्याकाळी ५ वाजता उतरल्यावर ७ वाजेपर्यंत मी त्यांच्या कार्यालयातच बसून होतो. त्यानंतर मी उपहारगृहात चहा-सँडविचसाठी गेलो असता वेटरने 'नाश्त्याची वेळ संपली, आता नाश्ता मिळणार नाही' असे उर्मट उत्तर दिले. त्यावर त्याला मी PIA चा संगणक बिघडल्यामुळे मला उशीर झाल्याचे त्यात माझा काहीच दोष नसल्याचे सांगूनही तो ऐकेना. आणि वरून 'केव्हाही आलं तर नाशता मिळत नसतो, वेळेवर यायला पाहिजे होते' असे त्याने मला ऐकवले. ही आमची वादावादी आजूबाजूचे प्रवासी (पाकिस्तानी) ऐकत-पाहात होते. मला संताप आला. 'कसा मिळत नाही नाश्ता तेच पाहतो, तुम्ही काही फुकट देत नाही नाश्ता, मी पूर्ण पैसे मोजले आहेत' असे म्हंटले त्यावर तो मला म्हणाला 'तुला कोण नाश्ता देतो तेच मी पाहतो.' हा चॅलेंज होता. मी बसल्या जागेवरूनच आवाज चढवून मॅनेजरला बोलावले. तो लगेच आला. त्यावर प्रथम मी त्या उर्मट वेटरची तक्रार केली. तो वेटर काही बोलणार एवढ्यात त्या मॅनेजरने त्याला तिथून हाकलले. (तो संतापाने दूर जाऊन उभा राहिला) मॅनेजरने मला शांत करून समस्या काय आहे ते विचारले. मीही त्याला शांतपणे मला चहा आणि नाश्ता हवा असल्याचे सांगितले. (तो माझा हक्क होता). त्याने ताबडतोब तशी व्यवस्था केली. आम्हा सर्वाना चहा नाशता मिळाला. (आपले बाकी सर्व भारतिय, शेपूट घालून गप्प बसून होते. कोणीही माझ्या बाजूने चकार शब्दही काढला नाही.) आत वेटर आणि मॅनेजरची वादावादी झाली. 'मेरे मना करनेपरभी आपने क्यूं नाशता दिया?' असे वाक्य मला ऐकू आले. चहा नाश्ता झाल्यावर मी काउंटरवर जाऊन मॅनेजरला भेटलो, त्याचे आभार मानले आणि डीनरचे क्लोजिंग टाईम काय आहे असे विचारले. त्याने रात्री ११ असे सांगितले. नंतर आम्ही (मी आणि माझा एक मित्र) कराचीत फिरायला गेलो. रात्री १०|| वाजता परतलो. १०.५५ पर्यंत लाऊंजमध्ये संगीत ऐकत बसलो होतो. एक पाकिस्तानी कलाकार 'इक प्यार का नगमा है...' पियानोवर वाजविण्याचा प्रयत्न करीत होता. अकराला पाच कमी असताना मी मित्रासमवेत जेवायला गेलो. मॅनेजरने खास खातीरदारी केली. ह्या सर्व कथा सांगण्याचा उद्देश असा की मला दोन्ही प्रकारची माणसे भेटली. चांगलीही आणि वाईटही. पण मुख्यत्वे करून राजकारण्यांच्या प्रभावाखाली भरकटलेली. प्रतिसाद बराच मोठा होतो आहे. पण अजून एक इंटरेस्टींग गोष्ट. मस्कतमध्ये एक बलूची भेटला होता. चांगला सुशिक्षित. तो काही काळ पाकिस्तानी नेव्हीत होता. ७१च्या युद्धात भारतिय नौसेनेने एक पाकिस्तानी युद्धनौका पकडली आणि सर्वंना कैद केले. त्या कैद्यांमध्ये तो होता. ३ वर्षे भारतिय तुरूंगात युद्धकैदी म्हणून होता. तो म्हणाला, 'भारतिय नौसेना भयंकर हुषार आहे. पाकिस्तानच्या युद्धनौकेवर कबजा केल्यावर भारतिय अधिकारी पाकिस्तानी अधिकार्‍यांशी बोलत होते. मी जवळच होतो. भारतिय अधिकार्‍याने आमची नौका कराची बंदरातून निघाल्या पासून तिने कुठे-कुठे, कसा-कसा प्रवास केला ह्याचे इत्यंभूत वर्णन केले. आम्ही अवाक झालो. ते दोघेही मैत्रीपूर्ण वातावरणात एकमेकांशी बोलत होते. भारतिय सरकारने पाकिस्तानी अधिकार्‍यांना फार मानाची आणि चांगली वागणूक दिली. पण आम्हा जवानांना फार कुत्र्यासारखी वागणूक दिली. पण त्या तिन वर्षांच्या कालावधीत मला एक कळून चुकले पाकिस्तान हिन्दूस्थानवर कधीच विजय मिळवू शकणार नाही. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे.' असो. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे, हे प्रत्येक पाकिस्तानीही जाणतो पण ते स्विकारणे त्यांना फार जड जातय. भारताची तंत्रज्ञानातील प्रगती मात्र ते उघडपणे कबूल करतात. जय हिंद..

उत्तम लेख... कोणतीही बाजू न घेता आणि मनापासून लिहिलेला... विशेषतः खोटी वाटणारी अलंकारिक वाक्ये टाळल्यामुळे तर फारच बेस्ट झालं... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु 22/08/2008 - 17:23
बरिच चर्चा चर्वण झाले. कोणाचेही मन दुखवण्याच्या हेतूने हा लेख लिहिलेला नाहिये. फुलवा, टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही. कधी कधी ती शत्रूची असते, कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना. त्यासाठी स्थळ किंवा काळ याचे नियम नसतात. ड्रायव्हिंग करताना अपघात होतात. मला कोणि येऊन धडकण्याआधी मीच त्याला जाऊन धडकतो .. या मानसिकेमध्ये काय अर्थ आहे. नुकसान तुमचेच आहे. त्यापेक्षा जास्तीत जास्त सुरक्षित ड्रायव्हिंग करण्याकडे लोकांच कल असतो नाही का? नानाचेंगट, कोणत्याही देशाबद्दल मी कोणताही (चांगला/वाईट) निर्णय घेतला नाहीये. मी केवळ आणि केवळ मानसिकेतेबद्दल लिहिले आहे...तेही माझ्या . विसुनाना, सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही. मी इथे कुठेही पाकिस्तान हा भारताचा मित्र आहे हे विधान केल्याचे मला आढळले नाही. कोणताही निष्कर्ष यातून मी काढलेला नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माझा बघण्याचा दृष्टीकोन बदलला हेच यातून सांगायचे आहे मला. पुन्हा एकदा सांगते.... माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही. लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल. - (सर्वव्यापी)प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

शितल 23/08/2008 - 02:08
प्राजुने लेखातुन तीच्या आणि जे भारतीय देशाच्या बाहेर राहत आहेत त्याच्या मानसिकतेचा बदल दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे तीला व्यवस्थित साध्य झाले आहे. :)

In reply to by प्राजु

>>टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही. जगणं सोडावं असं मी कधीच म्ह्टल नाही,उलट मला कौतुक वाटते या दुर्दम्य जगण्याच्या इच्छाशक्ती चे. >> कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना. आणि महापुर आणि बॉम्ब्स्फोट याची तुलना करण्यात काय अर्थ?नैसर्गिक आपती स्थळ काळ बघत नसली तरी या मानव निर्मित आपत्ती पुर्वनियोजित असतात . विश्वबन्धुत्व वगैरे आदर्श कल्पना आहेत, पण ते त्यासाठी स्वाभिमान , देशाभिमान सोडु नये... इतकच.

सुंदर लेख. कोणताही चष्मा न चढवता लिहीलेला; म्हणूनच मनाला भिडणारा. अमेरीकेत आल्यावर खूप पाकिस्तानी भेटले. त्यातही हे हाडवैर असलेले पाकीस्तानी भारतीयांशी इतके मित्रत्वाने वागतील असे वाटले नव्हते. राहून राहून असे वाटायचेच की जर दहशतवादी पाकीस्तानात घडत असतील तर ते दहशतवादी काही दिवसांपूर्वी पाकीस्तानी नागरीकच होते ना? मग सामान्य नागरीक शांती वांछीत आहे असे कसे समजावे. त्यामुळे अमेरीकेत उतरल्यावर पाकीस्तानी लोकांना भारतीय लोकांबद्दल आलेल्या पुळक्याचे कारण समजले नाही. जसा जसा जास्त दिवस अमेरीकेत जास्त दिवस राहत गेलो तसे प्राजुने लिहील्याप्रमाणे आशियायी म्हणून हे प्रेम असल्याचे कळले. पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले. ;) माझी एक मैत्रीण आहे पाकीस्तानी. ती chase बँकेमधे personal banker आहे. एकदम फटाकडी. आणि देशी लोक पाहील्यावर तिला प्रेमाचं काय भरते येते म्हणून सांगू.(कदाचित त्यात थोडासा व्यावसायिक दृष्टीकोण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.) पण पोरगी छान होती. ;) माझ्या घराजवळ असणार्‍या मदिना नावाच्या पाकिस्तानी हॉटेलात वरचे वर जात असे. खरेतर हॉटेल होते पाकीस्तानी माणसाचे पण त्यावर पाटी होती इन्डो-पाकीस्तानी हॉटेल म्हणून. याचे कारण पाकिस्तानी रेस्टॉरंट असे लिहीले असते तर भारतीय लोक येत नाहीत असे दस्तुरखुद्द मालकानंच आम्हाला सांगितले. माझे बरेच मित्र विचारत की पाकीस्तानी वस्तू घेत तर नाहीस आणि त्या मदिनामधे जाऊन बरा हाणत असतोस सारखे सारखे. त्यावर मी त्याना म्हणत असे की 'दुटप्पी धोरण काय फक्त पाकीस्ताननेच ठेवावे काय! मी नाही ठेऊ शकत'. - (अस्सल भारतीय) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर 23/08/2008 - 00:18
पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले. जियो....! तात्या.

लिखाळ 22/08/2008 - 21:50
माझे पाकिस्तानी नागरिकांबद्दलचे मत जसे भारतात असताना होते, तसेच इथे आल्यावर सुद्धा आहे. इथले पाकिस्तानी आपल्याला पाहिल्यावर नजर टाळतात, ओळख देत नाहित असा माझा व्यक्तिगत अनुभव. ज्या एका पाकिस्तानी टॅक्सीवाल्याशी बोलणे झाले तो बरा होता. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल तितकारा नाही तसे प्रेमही नाही. ती माझ्यासारखेच सामान्य असतील अशी एक क्ल्पना करुन असतो. मी चौकटीबाहेर पाउल ठेवले तरी मी कोण असा प्रश्न पडला नाही. एखादेवेळी मानसिक चौकट बदललेली नसेल अशीही शक्यता आहेच. अनेकदा जीवनात येणारा भौतिक/लौकिक बदल आपल्याला पूर्ण बदलवून टाकेल अशी आपली धारणा असल्याने आपला दृष्टिकोनसुद्धा बदलला पाहिजे अशी आपण आपल्याला भीड तर घालत नाही ना?!! (कृपया या विधानाकडे एक विचार म्हणूनच पाहावे. वैयक्तिक रोख समजू नये ही विनंती.) --लिखाळ.

अमेयहसमनीस 23/08/2008 - 13:50
प्राजू ताई, काय आहे हा सगळा विचार आपण सीमे वर लढत असलेल्य (भारतीय) जवाना ला केन्द्रित करुन परत एकदा लिहा. अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे. अमेय

In reply to by अमेयहसमनीस

प्राजु 23/08/2008 - 19:07
अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे. आपण गफलत करता आहात. माझी मानसिकता आणि सीमेवर लढणारा जवान दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेत बसून लिहिणे सोपे आहे हा तुमचा गैरसमज आहे. अमेरिकेत असले तरी मी भारतीयच आहे. आणि तुम्हाला भारतात राहून जितका भारतीयत्वाचा अभिमान आहे तितकाच मलाही आहे. तुम्ही भारतात रहाता पण सीमेवर लढणार्‍या जवानासाठी तुम्ही काय करता श्रद्धांजली वाहण्या व्यतिरिक्त?? काहीच नाही ना. मग कोणत्या मुद्द्यावर तुम्ही वरचे विधान केले?? एक लक्षात ठेवा काहिही झालं तरी आज तुम्ही तुमच्या माणसांच्यात आहात. सुरक्षित आहात. आम्हाला इथे जी जवळची वाटतात त्यांना धरून रहावंच लागतं. काही बरं वाईट झालं तर नातेवाईकांच्याही आधी मदतीला हीच माणसं येतात. मग इथे राहणार्‍या एखाद्याचा शेजारी जर पाकिस्तानी किंवा बांग्लदेशी असेल तर विनाकारण वैर धरण्यात काय अर्थ आहे? दुसरी गोष्ट अशी, जी अमेरिकन बाइ मला भेटली, तिच्या "यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर" या वाक्यातून जर बांग्लादेशात राहणार्‍या माणसाच्या वागण्यावरून तिने भारतीय माणसालाही चांगले म्हंटले असेल तर ही शीतावरून भाताची परिक्षाच नाही का? आणि यात चूक आहे?? तेव्हा तुमचे वरील वाक्य माझ्यासाठी गैरलागू आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अमेयहसमनीस 25/08/2008 - 12:38
"यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर" हे वाक्य एका अमेरिकी माणसानी म्हणण आणि एका भारतीय माणसानी म्हणण यात बारच फरक आहे. अमेय

ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही. फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे. विनायक प्रभु

In reply to by विनायक प्रभू

ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही. फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे. ११ जुलॅ २००६ ला , मुम्बई त साखळी बॉम्ब्स्फोट झाले तेव्हा मी विरुध्द दिशेने (चर्चगेट जाणाया) गाडीत च होते.अगदी समोर.. आणि माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही असं मी म्हटल नाही.. मी माझ्या पुरतं सांगितल..

मनीषा 25/08/2008 - 12:14
मी सुद्धा हा अनुभव नेहमी घेते.. परक्या लोकांमधे पाकी/ बांग्लादेशी/श्रीलंकन , ही लोक 'आपलेच' वाटतात . पण तरी हे सुद्धा तितकच खरं कि हा आपलेपणा जो पर्यंत धर्म, राजकारण (आणि क्रिकेट) हा विषय निघत नाही तो पर्यंत. आणि वादाचा विषय असेल तेव्हा भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात. अर्थात हे माझं (निरिक्षण) मत आहे.

In reply to by मनीषा

भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात गुन्हेगारीकडे कलही भारतीयांपेक्षा पाकिस्तान्यांचा जास्त असतो असे ओमानच्या CIDचे मत आहे.

प्राजु 25/08/2008 - 19:57
प्रतिसाद दिलेल्या, चर्चा केलेल्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्‍याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते.

जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लिखाळ ·

लिखाळ 14/08/2008 - 02:13
वर दिलेला दुवा साप्ताहिक सकाळचे मुख्य पान उघडतो आहे. लेखाचा दुवा तयार होत नाहिये. कृपया मुख्य पानावर डावीकडे प्रेरणा या सदरामध्ये पहावे. लेख तेथेच आहे. कळावे. --लिखाळ.

दिगम्भा 14/08/2008 - 12:14
लिखाळराव हे भाषण अत्यंत आवडले, सर्व जवळच्या मित्रांना आवर्जून पाठवण्याजोगे आहे. नजरेला आणून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. आपल्या पारखी नजरेचे कौतुक करावे तितके थोडे आहे. - दिगम्भा

In reply to by स्वाती दिनेश

II राजे II 14/08/2008 - 13:12
वाचले ! आवडले ! पण कृत्रिम वाटत नाही... ती भाषातराची चुक आहे असे मला तरी वाटते ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

लिखाळ 14/08/2008 - 15:31
प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्वारस्याबद्दल आपणा सर्वांअचे आभार. हेच भाषण यु-ट्युब वर पहायला मिळेल. http://video.google.de/videoplay?docid=-7042428362278438455&ei=cgGkSPbiBIXq2QLs_5Uj&q=J+K+rowling+Harvard+commencement+2008&vt=lf&hl=en व्यक्तिशः मला अनुवाद आवडला. तो कृत्रीम अजिबातच वाटला नाही. यु-ट्युब वर ऐकतानासुद्धा जाणवते की साप्ताहिक सकाळ मध्ये केलेला अनुवाद चांगलाच आहे. आपलाच, --लिखाळ.

अभिज्ञ 14/08/2008 - 15:44
फारच छान भाषण . लिखाळ, एका उत्तम दुव्याबद्दल धन्यवाद. भाषण मलातरी अजिबात कृत्रिम भासले नाहि. भाषणाच्या भाषांतरापेक्षा त्यातील "आशय" महत्वाचा वाटतो. अभिज्ञ.

कलंत्री 14/08/2008 - 17:51
अपयश, अपयशातुन आलेले नैराश्य, उपजत असलेली उदासिनता, यशाचा अपुर्ण प्रयत्न इत्यादी गोष्टी जगण्यातच मजा आहे. यातील काही व्याख्या / वाक्ये आवडली. काहीवेळेस यशातून आंतरिक सुरक्षा प्राप्त होते तर कधी अपयशातून अशी शक्ती आपल्या अंतरंगात किती आहे याचा प्रत्यय येतोच येतो. सकाळचे अश्या विलक्षण लेखाबद्दल अभिनंदन करावयालाच हवे. अपयश आपल्या स्वताकडे बघण्याची स्वतंत्र अशी दृष्टी देतो हेही खरे आहे. आगे बढो.

विकास 14/08/2008 - 18:47
लिखाळांना या दुव्या संदर्भात धन्यवाद! असेच अजून एक आवडलेले भाषण आहे ते ऍपल कॉम्प्यूटर्सच्या (आणि अर्थातच आयपॉड/आय फोनच्या, पिक्सार ऍनिमेशन स्टूडीयोच्या ) स्टीव्ह जॉब्ज चे. प्रेरणा देणारे हे मूळ भाषण आहे. २००५ सालचे हे भाषण आहे पण तेंव्हा वाचले आणि कायमचे लक्षात राहीले. सुदैवाने दुवा मिळाला म्हणून देत आहे. वाचले नसल्यास अवश्य वाचा! मुख्य गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्याने स्वतः कधीच कुठली पदवी मिळवली नव्हती.... (सुरवातीचे वाक्य: I am honored to be with you today at your commencement from one of the finest universities in the world. I never graduated from college. Truth be told, this is the closest I've ever gotten to a college graduation.)

लिखाळ 15/08/2008 - 14:57
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. विकास, आपण दिलेल्या दुव्यातील भाषण पाहिले. फार छान आहे. धन्यवाद. --(भुकेला आणि खुळा) लिखाळ.

साप्ताहिक सकाळच्या संकेतस्थळावर हा लेख शोधत होतो, मिळाला नाही. मागील अंक पाहण्याची सुविधा काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे असे दिसते. त्यावेळी कुणी हा लेख सेव करुन ठेवला होता का ? किंवा आणखी कुठे हा लेख उपलब्ध आहे का ?

लिखाळ 14/08/2008 - 02:13
वर दिलेला दुवा साप्ताहिक सकाळचे मुख्य पान उघडतो आहे. लेखाचा दुवा तयार होत नाहिये. कृपया मुख्य पानावर डावीकडे प्रेरणा या सदरामध्ये पहावे. लेख तेथेच आहे. कळावे. --लिखाळ.

दिगम्भा 14/08/2008 - 12:14
लिखाळराव हे भाषण अत्यंत आवडले, सर्व जवळच्या मित्रांना आवर्जून पाठवण्याजोगे आहे. नजरेला आणून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. आपल्या पारखी नजरेचे कौतुक करावे तितके थोडे आहे. - दिगम्भा

In reply to by स्वाती दिनेश

II राजे II 14/08/2008 - 13:12
वाचले ! आवडले ! पण कृत्रिम वाटत नाही... ती भाषातराची चुक आहे असे मला तरी वाटते ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

लिखाळ 14/08/2008 - 15:31
प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्वारस्याबद्दल आपणा सर्वांअचे आभार. हेच भाषण यु-ट्युब वर पहायला मिळेल. http://video.google.de/videoplay?docid=-7042428362278438455&ei=cgGkSPbiBIXq2QLs_5Uj&q=J+K+rowling+Harvard+commencement+2008&vt=lf&hl=en व्यक्तिशः मला अनुवाद आवडला. तो कृत्रीम अजिबातच वाटला नाही. यु-ट्युब वर ऐकतानासुद्धा जाणवते की साप्ताहिक सकाळ मध्ये केलेला अनुवाद चांगलाच आहे. आपलाच, --लिखाळ.

अभिज्ञ 14/08/2008 - 15:44
फारच छान भाषण . लिखाळ, एका उत्तम दुव्याबद्दल धन्यवाद. भाषण मलातरी अजिबात कृत्रिम भासले नाहि. भाषणाच्या भाषांतरापेक्षा त्यातील "आशय" महत्वाचा वाटतो. अभिज्ञ.

कलंत्री 14/08/2008 - 17:51
अपयश, अपयशातुन आलेले नैराश्य, उपजत असलेली उदासिनता, यशाचा अपुर्ण प्रयत्न इत्यादी गोष्टी जगण्यातच मजा आहे. यातील काही व्याख्या / वाक्ये आवडली. काहीवेळेस यशातून आंतरिक सुरक्षा प्राप्त होते तर कधी अपयशातून अशी शक्ती आपल्या अंतरंगात किती आहे याचा प्रत्यय येतोच येतो. सकाळचे अश्या विलक्षण लेखाबद्दल अभिनंदन करावयालाच हवे. अपयश आपल्या स्वताकडे बघण्याची स्वतंत्र अशी दृष्टी देतो हेही खरे आहे. आगे बढो.

विकास 14/08/2008 - 18:47
लिखाळांना या दुव्या संदर्भात धन्यवाद! असेच अजून एक आवडलेले भाषण आहे ते ऍपल कॉम्प्यूटर्सच्या (आणि अर्थातच आयपॉड/आय फोनच्या, पिक्सार ऍनिमेशन स्टूडीयोच्या ) स्टीव्ह जॉब्ज चे. प्रेरणा देणारे हे मूळ भाषण आहे. २००५ सालचे हे भाषण आहे पण तेंव्हा वाचले आणि कायमचे लक्षात राहीले. सुदैवाने दुवा मिळाला म्हणून देत आहे. वाचले नसल्यास अवश्य वाचा! मुख्य गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्याने स्वतः कधीच कुठली पदवी मिळवली नव्हती.... (सुरवातीचे वाक्य: I am honored to be with you today at your commencement from one of the finest universities in the world. I never graduated from college. Truth be told, this is the closest I've ever gotten to a college graduation.)

लिखाळ 15/08/2008 - 14:57
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. विकास, आपण दिलेल्या दुव्यातील भाषण पाहिले. फार छान आहे. धन्यवाद. --(भुकेला आणि खुळा) लिखाळ.

साप्ताहिक सकाळच्या संकेतस्थळावर हा लेख शोधत होतो, मिळाला नाही. मागील अंक पाहण्याची सुविधा काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे असे दिसते. त्यावेळी कुणी हा लेख सेव करुन ठेवला होता का ? किंवा आणखी कुठे हा लेख उपलब्ध आहे का ?
लेखनविषय:
नमस्कार ! अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले. ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा. त्याबद्दल आपली प्रतिक्रियासुद्धा वाचायला आवडेल. --लिखाळ.

राम राम मंडळी...

स्मिता ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी..कसं काय चालुयं? समदं ठिकायं? दररोज ईकडुन जाणं-येणं व्ह्यायचंच... पुढं पुढं तरं ढुंकुन बघितल्या बगरं चैनचं पडेनाशी झाली बगां... तवा म्हटलं.. प्रवेश घीवुनचं टाकावा..आणि लागोलागं... "आपलचं लेकरु हायं..चुकल्या-माकाल्यासं सांभाळुन घेण्याची बी अटकळं घालावी.." आक्शी घरात असल्यासारखं वाटतं बगां... कोणं कानं पकडीतं, कोणं टपली मारतं, कोणं कौतीक करतं, कोणं कायं नि कोणं कायं.. :) चला निघते मगं, आणि सांजच्या वकुताला यीवुन बघते ...

सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण (नासाचे संस्थळ)

लिखाळ ·

मनस्वी 01/08/2008 - 17:09
धन्यवाद लिखाळ.. माहितीपूर्ण दुवा दिलास. बघतीये मी.. अप्रतिम.. सर्वांनी बघा.. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

पुढच्या वर्षी भारतात जुलै महिन्यात खग्रास ग्रहण दिसणार आहे. दुर्दैवाने तो महिना पावसाचा असल्याने ग्रहण दिसेलंच असं नाही. पण ९९ सालच्या ऑगस्टमधे आम्ही कच्छ मधे गेलो होतो आणि तेव्हा चंद्राची सावली प्रचंड वेगानी जमिनीवरून धावताना दिसली होती, ती फक्त ढगांमुळेच! (ग्रहणामुळे खगोलशास्त्र आवडलेली) यमी

लिखाळ 01/08/2008 - 17:30
आता प्रक्षेपण बहुधा बंद पडले आहे असे दिसते. येथे मला ग्रहणाबद्दल काही माहिती मिळाली. http://www.nasa.gov/topics/solarsystem/features/eclipse/index.html http://www.exploratorium.edu/eclipse/2008/index.html तसेच थेट प्रक्षेपणाचे दुवे सुद्धा तेथेच आहेत. --लिखाळ.

मनस्वी 01/08/2008 - 17:09
धन्यवाद लिखाळ.. माहितीपूर्ण दुवा दिलास. बघतीये मी.. अप्रतिम.. सर्वांनी बघा.. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

पुढच्या वर्षी भारतात जुलै महिन्यात खग्रास ग्रहण दिसणार आहे. दुर्दैवाने तो महिना पावसाचा असल्याने ग्रहण दिसेलंच असं नाही. पण ९९ सालच्या ऑगस्टमधे आम्ही कच्छ मधे गेलो होतो आणि तेव्हा चंद्राची सावली प्रचंड वेगानी जमिनीवरून धावताना दिसली होती, ती फक्त ढगांमुळेच! (ग्रहणामुळे खगोलशास्त्र आवडलेली) यमी

लिखाळ 01/08/2008 - 17:30
आता प्रक्षेपण बहुधा बंद पडले आहे असे दिसते. येथे मला ग्रहणाबद्दल काही माहिती मिळाली. http://www.nasa.gov/topics/solarsystem/features/eclipse/index.html http://www.exploratorium.edu/eclipse/2008/index.html तसेच थेट प्रक्षेपणाचे दुवे सुद्धा तेथेच आहेत. --लिखाळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ! आज सूर्यग्रहण आहे हे आपणाला माहितच आहे. नासाच्या या संकेतस्थळावर (http://www.nasa.gov/multimedia/nasatv) चीन मधून दिसणारे ग्रहण थेट दाखवत आहेत. या स्थळाची माहिती मला आताच समजली. नासाचे हे स्थळ जागातल्या अश्या काही घडामोडी नेहमीच थेट दाखवते असे दिसते आहे. म्हणजे पुढील वेळेस सुद्धा या स्थळाकडे लक्ष ठेवल्यास काही चांगले बघायला, ऐकायला मिळेल. या स्थळावर अजून काही स्वारस्यपूर्ण सापडल्यास कृपया प्रतिसादात लिहावे. अवांतर : या सारख्या तत्कालिन महत्वाच्या सूचना, सुचवण्या करण्यासाठीच खरेतर खरडफळा आहे असे वाटते.

जी.एम.आर.टी. ला सहल- कोणकोण येणार

विजुभाऊ ·

मी येयीन पण शनी-रवी वारी. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

मी आहे... पुढल्या महिन्यातला एखादा रविवार चालेल..______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन 29/07/2008 - 17:04
जावा जावा ! आमचा लांबून टाटा .. पण दुर्बिणी तोडू नका ... त्या बिचार्‍या संहिता तैंची नोकरी जाईल. आणि मला पण बघायला जायचंय ... मजा करा लेकहो .... नारायणगाव ला कुठे तरी लै भारी वडापाव मिळतो ... चापा मस्त पैकी कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

अमितकुमार 29/07/2008 - 17:19
नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना.....

अमोल केळकर 29/07/2008 - 17:25
यायची इच्छा आहे. १६ ऑगस्ट ला जमेल का ते पहावे. लागुन सुट्ट्या आहेत. अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नमस्कार, यायची इच्छा तर आहे पण तारीख समजल्यावरच ठरवता येईल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वरद 29/07/2008 - 21:03
विजूभाउ फक्त एक आठवडा आधी सांगा.... “to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”

गणा मास्तर 30/07/2008 - 06:49
नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना..... एकदा नक्की खा

मला असं वाटतंय की तिथे बाहेर फिरायचं असल्याने आपण पावसाळ्यानंतर जाणं उत्तम! दुसरी गोष्ट मला इथली कागदी घोडी नाचवायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे येत्या रविवारी नको. आणि रविवारपर्यंत माझा घसा सुटला नाही तर माझी मोठ्ठी पंचाईत होईल. आपण पावसानंतर गेलेलं बरं, म्हणजे बाहेर फिरताना आणि हादडतानाही फार विचार नाही करावा लागणार. (घसा बसलेली, सर्दट) अदिती. अवांतरः कुबड्या तोपर्यंत परत ये! तात्या तुम्ही ठाणे/मुंबईचे लोकही येऊ शकता. अदिती.

मन 30/07/2008 - 14:58
यायची इच्छा आहे. १५ ऑगस्ट्ला जमेल का ? शुक्रवार येतोय जोडुन वीकांताला. आपलाच, मनोबा

मी येयीन पण शनी-रवी वारी. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

मी आहे... पुढल्या महिन्यातला एखादा रविवार चालेल..______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन 29/07/2008 - 17:04
जावा जावा ! आमचा लांबून टाटा .. पण दुर्बिणी तोडू नका ... त्या बिचार्‍या संहिता तैंची नोकरी जाईल. आणि मला पण बघायला जायचंय ... मजा करा लेकहो .... नारायणगाव ला कुठे तरी लै भारी वडापाव मिळतो ... चापा मस्त पैकी कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

अमितकुमार 29/07/2008 - 17:19
नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना.....

अमोल केळकर 29/07/2008 - 17:25
यायची इच्छा आहे. १६ ऑगस्ट ला जमेल का ते पहावे. लागुन सुट्ट्या आहेत. अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नमस्कार, यायची इच्छा तर आहे पण तारीख समजल्यावरच ठरवता येईल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वरद 29/07/2008 - 21:03
विजूभाउ फक्त एक आठवडा आधी सांगा.... “to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”

गणा मास्तर 30/07/2008 - 06:49
नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना..... एकदा नक्की खा

मला असं वाटतंय की तिथे बाहेर फिरायचं असल्याने आपण पावसाळ्यानंतर जाणं उत्तम! दुसरी गोष्ट मला इथली कागदी घोडी नाचवायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे येत्या रविवारी नको. आणि रविवारपर्यंत माझा घसा सुटला नाही तर माझी मोठ्ठी पंचाईत होईल. आपण पावसानंतर गेलेलं बरं, म्हणजे बाहेर फिरताना आणि हादडतानाही फार विचार नाही करावा लागणार. (घसा बसलेली, सर्दट) अदिती. अवांतरः कुबड्या तोपर्यंत परत ये! तात्या तुम्ही ठाणे/मुंबईचे लोकही येऊ शकता. अदिती.

मन 30/07/2008 - 14:58
यायची इच्छा आहे. १५ ऑगस्ट्ला जमेल का ? शुक्रवार येतोय जोडुन वीकांताला. आपलाच, मनोबा
लेखनविषय:
लेखनप्रकार
जी.एम.आर.टी. ला सहल काढायचा बेत ठरतो आहे. जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप : http://www.misalpav.com/node/2738 जी.एम.आर.टी. ला अभ्याससहल: http://www.misalpav.com/node/2738#comment-38198 मी आत्ताच माझ्या एका बॉसशी बोलले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जर आपला एक ग्रुप घेऊन गेलो तर चालेल. आपल्याला फक्त वाहतूक आणि जेवण यांची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो. माहितीजालावर लिहिलं आहे की फक्त शुक्रवारीच तिथे जाता येईल.

मिपा विरह - एक चिडचिड....अर्थातच 'आपल्या ह्या हव्याहव्याशा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम चे काय करायचे?' :)

मनिष ·

अन्जलि 28/07/2008 - 16:03
मि ११० % सहमत आहे. माझिहि हिच अवस्था होते मग ठरवते कि आता मिपावर मुळिच फिरकायचे नाहि पण मग रहावत नाहि आणि आपोआप मिपावर पोचते काम रहाते बाजुलाच.

पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!! याला का हो जीभ बाहेर काढता? मी तर पिडाकाका एट अल ची फ्यान झाले आहे. (मिपा ऍडिक्ट) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मनिष 28/07/2008 - 20:23
फॅन आहे. जीभ (माझ्या) आगाऊपणाबद्द्ल बाहेर काढली. - मनिष अवांतर - माझ्यासाठी 'तू'च ठिक आहे.

अन्जलि 28/07/2008 - 16:03
मि ११० % सहमत आहे. माझिहि हिच अवस्था होते मग ठरवते कि आता मिपावर मुळिच फिरकायचे नाहि पण मग रहावत नाहि आणि आपोआप मिपावर पोचते काम रहाते बाजुलाच.

पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!! याला का हो जीभ बाहेर काढता? मी तर पिडाकाका एट अल ची फ्यान झाले आहे. (मिपा ऍडिक्ट) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मनिष 28/07/2008 - 20:23
फॅन आहे. जीभ (माझ्या) आगाऊपणाबद्द्ल बाहेर काढली. - मनिष अवांतर - माझ्यासाठी 'तू'च ठिक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वि.सू. :- शीर्षक वाचून घाबरू नका...गंभीर काहीच नाही खाली! वाचून बघा....:) गेल्या आठवड्यात कामामुळे आणि करामुळे -- दोन्ही कर, आपले हात; सदा-सर्वकाळ गुंतले होते, त्यामुळे इथे येणे जमलेच नाही...नाही म्हणायला तल्ल्फ फार व्हायची पण सी.ए.