अनिल अवचट यांचे "माझे छंद" आणि त्यांचि ईतरहि बरिच पुस्तके.
एका वेगळ्याच जीवनशैलिचे दर्शन होते. आयुष्याचा आनंद किति वेगवेगळ्या पद्धतिंनि आणि स्वयंपाकासारख्या लहान लहान गोष्टिंमधुनहि घेता येतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
इतर सर्व मिपाकरांचे अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची तोंडओळख करुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.
फार छान पुस्तक... तसंच स्वतःविषयी, माणसं अनेक पुस्तकं आहेत. मुलखावेगळा माणुस... अतिशय साध्या शब्दात लिहिण्याची शैली.. आणि आजूबाजूला असलेल्या पण ज्यावर आपण सहसा फार विचार करत नाही किंवा कल्पना नसते अशा गोष्टी...
जगाचं संकेत न बाळगता फक्त स्वत:च्या मनाप्रमाणे आयुष्य जगलेला माणुस... आणि तरीही इतक्या लोकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे.. ओरिगामी चे मास्टर आहेत.. मुक्तांगण, कष्टकरी लोकांसाठी केलेलं काम किंवा त्यांचे हाल लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न, मेंटल हॉस्पिटलचं पत्नीबरोबर केलेलं काम.. विलक्षण आहे सारं .. एक असाधारण सहजता आहे सगळ्यात..
त्यांचे साप्ताहिक सकाळ किंवा सकाळ दिवाळी अंकांचे लेख अतिशय उत्तम असतात..
अनिल अवचट यांचे "माझे छंद"
गेल्याच आठवड्यात हे पुस्तक वाचले
प्रत्येक छन्द स्वतन्त्र पुस्तक होऊ शकेल.
चित्रे स्केचेस काष्ठ शिल्पे फोटोग्राफी बासरी.... हा माणूस नक्की काय जगला आहे आष्चर्य वाटते
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
स्वभाव विभाव
डॉ आनंद नाडकर्णी. ...
त्याचाच शब्दात विचार भावना वर्तन या विभाव त्रयीतुन बनणार्या स्वभावाच्या संगती विसंगती यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
जरा थोडे अधीक लिहा ना या पुस्तकाबद्दल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
डॉ. आनंद नाडकर्णी हे ट्।ण्याला मानसोपचारतज्ञ आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने तयार केलेल्या Rational emotive theory बद्दल लिहिले आहे. म्हणजेच विवेकनिश्ट विचारसरणी..
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हि थेअरि वापरुन स्वताच्या स्वभावात तर बदल केलाच पण त्याच्याकडे येणार्या अनेक लोकांना हि थेअरि छोट्या गोश्टित वापरण्यास सागुन त्यांचे मोठे प्रश्न्न सोडवले आहेत..परिक्षेत येणारे टेन्शन पासुन जवळ्च्याचा म्रुत्यु इत्यादि अडचणिंवर मात कशि करायचि याचे मार्गदर्शन त्यांनि ह्या पुस्त्कात छोटि उदा. देउन केले आहे..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
मूळ कन्नड भाषेत लिहिली गेलेली "पर्व" ही कादंबरी अत्भुत आहे.
डॉ.एस.एल. भैरप्पा यांनी स्वतः १२ वर्षे उत्तर भारतात कुरुक्षेत्र, कर्णाच्या मृत्युस्थानी, गुजरात मधे द्वारका अशा शेकडो ठिकाणी भ्रमंती करुन अतिशय अभ्यास करुन महाभारताचे हे कथानक रचले आहे.
त्या काळात प्रत्येक ठिकाणचे हवामान कसे होते आणि कोणत्या प्रकारचे अन्न खाण्यात उपयोगी आणले जात होते अशा बारीक-सारीक गोष्टींचा श्री भैरप्पा यांनी अभ्यास केल्याचे पानोपानी जाणवते.
महाभारताचे हे कथानक आत्तापर्यंत वाचलेल्या महाभारतकथांना हादरवून सोडते एवढे नक्की.
सौ. उमा कुलकर्णी यांनी या सुंदर कादंबरीचा तेवढाच सुंदर अनुवाद मराठीतून केलेला आहे.
पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेले हे सुंदर पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे.
(इतिहासप्रेमी) सागर
हे पुस्तक वाचल्यानंतर विचारप्रक्रिया बदलली. महाभारताकडे पहाण्याचा नवा वास्तववादी दृष्टिकोन मिळाला.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
मागच्याच आठवड्या चित्र॑कार रवी परांजपे यांचे आत्म चरीत्र वाचले. एका कमर्शीयल आर्टीस्टचा प्रवास कसा होतो ते फारच छान सांगितले आहे.
त्यांची स्केचेस/ चित्रे/ इलस्ट्रेशन्स यावर भरभरून बोलले आहेत ते
विजुभाउंनी म्हटल्याप्रमाणे "तोत्तोचान्"आणि तिला तोमोई शाळेतून 'आपण जसे आहोत तसेच' जगण्यासाठी मिळालेले पाठबळ.
दुसरं म्हणजे, नॉट विदाऊट माय डॉटर" इराणमधील अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत काम करणा-या "मूडी"या इराणी डॉक्टरशी लग्न केलेल्या बेटीची आणि तिच्या लहानग्या 'माहतोब'ची ही गोष्ट. अमेरिकेतली नोकरी गेल्यावर ही गोष्ट बेटीपासून लपवून मुडी तिला आणि माहतोबला इराणला घेऊन जातो, हळूहळू तिचा पासपोर्ट, क्रेडिट कार्ड जप्त करतो, फोनवरून तिच्या नातेवाईकांशी संपर्क करायला बंदी घालतो आणि तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात. अत्यंत धर्मांध, गलिच्छ आणि स्त्रियांना केवळ त्यांच्या नव-यांची मालमत्ता समजणा-या अशा परक्या देशात बेटीचा तिच्याच नव-याकडून आणि नातेवाईकांकडून शारिरिक, मानसिक छळ सुरु होतो. बेटीचे हे इराणमधले अठरा महिने आणि शेवटी तिने स्वत:ची आणि माहतोबची करून घेतलेली सुटका ह्याची रोमांचक कहाणी. सत्य कल्पितापेक्षा किती अद्भुत असू शकता ह्याचा प्रत्यय देणारं पुस्तक.
बाकी इतिहासातले भावनेचे पैलू उलगडून दाखवणारं स्वामी
, शांता शेळक्यांचं मेघदूताचं भावांतर वगैरे वगैरे...
उत्तमोत्तम पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यांचेच आभार!
थ्री कप्स ऑफ टी :
हे आजादकश्मीर/अफगाणीस्थान भागात शाळा चालवणार्या एकाचे अनुभव असलेले पुस्तक खरेच रोमांचक आहे. शिक्षणामुळे समाजाची जडणघडण कशी होत जाते याचे सुंदर वर्णन आहे पुस्तकात. लेखक आठवत नाही. मेहता प्रकाशनाने पर्काशित केलेय हे पुस्तक
ही एक अफाट कादंबरी आहे एका विशाल पटा वर ही घडते. आपल्या महाभारत स्टाइल यात एकाच कुटुंबाच्या अनेक पिढ्यांचे व माणसांचे एक जबरद्स्त असे चित्रीकरण येते जे अत्यंत सुसंघटीत पणे मांड्ले जाते. यात लॅटीन अमेरीके च्या एका काल्पनिक गावा चा आणि त्या फाउंडर च्या कुटुंबाचा एक विलक्षण असा प्रवास मांडला जातो, यात कधीही वाचली नसतील अशी एका पेक्षा एक भन्नाट पात्रे आणी मति अक्षरशः गुंग करणारी प्रसंगे एका मागो माग येत जातात तरीही कथानक अत्यंत आखिव रेखिव जरा ही पसरत नाही यातील पात्रे त्यांची फिलॉसॉफी याचे काही वर्णन येते की ज्याचे नाव ते. ही वाचल्यानंतर मला बर्याच दिवसांनी ही माहीती कळली की या लेखकाला १९८२ चा नोबेल पुरस्कार साहीत्या साठी मिळालेला आहे आणि याची ही कादंबरी ही विश्व साहीत्यातील एक महान कादंबरी मानण्यात येते.यातील काही कोट्स देण्याचा मोह आवरत नाही ही वाचा म्हणजे कादंबरीची थोडी आयडीया येइल.
“They were so close to each other that they preferred death to separation.”
“He sank into the rocking chair, the same one in which Rebecca had sat during the early days of the house to give embroidery lessons, and in which Amaranta had played Chinese checkers with Colonel Gerineldo Marquez, and in which Amarana Ursula had sewn the tiny clothing for the child, and in that flash of lucidity he became aware that he was unable to bear in his soul the crushing weight of so much past.”
“In all the houses keys to memorizing objects and feelings had been written. But the system demanded so much vigilance and moral strength that many succumbed to the spell of an imaginary reality, one invented by themselves, which was less practical for them but more comforting.”
“In that way the long-awaited visit, for which both had prepared questions and had even anticipated answers, was once more the usual everyday conversation.”
मिलिंद बोकील यांच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक.....
वाचायला घेतले की संपवल्याशिवाय खाली ठेववत नाही...
कितीही वेळा वाचले तरी नवीन वाटते दर वेळी.........
वातावरण निर्मिती अफलातून आहे......
हे पुस्तक मी सध्या वाचत आहे अजुन पुर्ण वाचुन झालेले नाही जितका भाग वाचला त्या विषयी
अमिताव घोष अतिशय आवडता लेखक त्याची बरेच दिवसांपासुन पेन्डींग असलेली द ग्लास पॅलेस सध्या वाचतोय. ही सुद्धा सुंदरच भट्टी जमवलेली आहे. मंडाले आणि रत्नागिरी पहीली दोन प्रकरणे संपली. घोष ने कादंबरीसाठी ५ वर्षे अतीपरीश्रम घेतलेले आहेत ते जाणवतात. कादंबरीची सुरुवात मंडालेत ब्रिटीश फौजांनी केलेल्या आक्रमणातुन होते. बर्माचा राजा थिबॉ त्याची फॅमिली ला इंग्रज युद्धात नमवुन रत्नागिरीला त्यांची रवानगी करतात.निर्वासित केलेल्या थिबॉ चे रत्नागिरीतले वास्तव्य, त्याचा एकाकीपणा, नॉस्टॅल्जीया, त्याच्या चार मुली, नोकर त्यांचे अफेयर्स, क्रुर राणी, बदलता भारत, श्रुड साहेब, राजाच हळुहळु होत जाणार डिग्रेडेशन, तिकडे बर्मातला सागवानचा बर्माटीक चा प्रचंड व्यापार, त्यातला हत्तींचा वापर. तिथला भन्नाट निसर्ग, साहेबाची धंद्यातली इन्व्हेन्शन्स, साहेबाच्या महत्वाकांक्षेने पोखरत जाणारा बर्मा, त्यातले आपल्याला सहसा अपरीचीत असणार्या रेसेस व लोक. फारच सुंदर उतरलय. इतिहासाची प्रचंड माहीती असुनही ती कादंबरीवर अजिबात हावी न होउ देता घोष मोठ्या कुशलतेने संक्रमणातुन जात असलेले लोक समाज फार सुंदर रेखाटतात. अत्यंत वाचनीय उत्कंठावर्धक वगैरे वगैरे आहे. इथे घोषची कॅरेक्टर्स सुरुवातीला तरी मनाची पकड घेत नाहीत पण हळुहळु ती डोक्यात सेटल होऊ लागतात. घोष ला कॅरेक्टर बिंबवायला वेळ लागतोय कारण त्याचा फोकस बहुधा जास्त मोठा असा काळावर आहे. तरी सर्वस्व गमावलेला थिबॉ फार ट्रॅजिक रेखाटलाय तो मनात घर करुन राहतो. मंडालेच्या राजवाड्यातील मुख्य हॉलला द ग्लास पॅलेस नाव त्यावरुन हे शीर्षक. कादंबरीचे मुखपृष्ठ निव्वळ अप्रतिम आहे. त्यावरची जे एम कोएट्जी ची मोजक्या शब्दातली प्रतिक्रीया पुस्तकाविषयी बरेच काही सांगुन जाते. एक सॅम्पल देण्याचा मोह आवरत नाही. ब्रिटीश आर्मीत लढणार्या भारतीय सैनिकांविषयी चा हा संवाद बघा
“In Singapore, as a young man, I worked for a time as a hospital orderly. The patients were mainly sepoys like these—Indians, back from fighting wars for their English masters. I still remember the smell of gangrenous bandages on amputated limbs; the night-time screams of twenty-year-old boys, sitting upright in their beds. They were peasants, those men, from small countryside villages: their clothes and turbans still smelt of wood-smoke and dung fires. ‘What makes you fight,’ I would ask them, ‘when you should be planting your fields at home?’ ‘Money,’ they’d say, and yet all they earned was a few annas a day, not much more than a dockyard coolie. For a few coins they would allow their masters to use them as they wished, to destroy every trace of resistance to the power of the English. It always amazed me: Chinese peasants would never do this—allow themselves to be used to fight other people’s wars with so little profit for themselves. I would look into those faces and I would ask myself: What would it be like if I had something to defend—a home, a country, a family—and I found myself attacked by these ghostly men, these trusting boys? How do you fight an enemy who fights from neither enmity nor anger but in submission to orders from superiors, without protest and without conscience?
“In English they use a word—it comes from the Bible—evil. I used to think of it when I talked to those soldiers. What other word could you use to describe their willingness to kill for their masters, to follow any command, no matter what it entailed? And yet, in the hospital, these sepoys would give me gifts, tokens of their gratitude—a carved flute, an orange. I would look into their eyes and see also a kind of innocence, a simplicity. These men, who would think nothing of setting fire to whole villages if their officers ordered, they too had a certain kind of innocence. An innocent evil. I could think of nothing more dangerous.”
“Saya.” Rajkumar shrugged offhandedly. “They’re just tools. Without minds of their own. They count for nothing.”
द गॉडफादर, गॉन विथ द विंड, फॉल ऑफ जायंट्स, ऑक्टॉपस, सायक्यामोर रो, उत्तरयोगी, गुड टू ग्रेट, स्वामी, नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील), व्यक्ती आणि वल्ली, चार नगरातले माझे विश्व (जयंत नारळीकर) आणि अजून बरीच पुस्तके...यातली मी काही दोनदा वाचली आहेत.
प्रतिक्रिया
पार्टनर
अनिल अवचट..
"छंदांविषयी"
"माझे छंद"
स्वभाव
जरा थोडे
डॉ. आनंद
माझी आवड
"पर्व" ही कादंबरी अत्भुत आहे
वास्तववादी दृष्टिकोन
मागच्याच
विजुभाउंन
थ्री कप्स ऑफ टी :
नॉट विदौट माय डॉटर बद्दल बराच
रमलखुणा
गॅब्रिएल गार्सीया मार्क्वेझ चे वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड
१ होता कार्वर , शिवाजी
चकवाचांदण
शाळा.....
शातारामा बद्दल जितका उहापोह
बरीच पाने रटाळ वाटली
द ग्लास पॅलेस हे अमिताव घोष चे पुस्तक मी सध्या वाचत आहे.
हा परिच्छेद खूप आवडला
...आणि अजून बरीच पुस्तके