मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

फ्रॅन्केनस्टाइन

प्रचेतस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
a मेरी शेलीची एकमेव कादंबरी असलेली 'फ्रॅन्केनस्टाईन ऑर द मॉडर्न प्रोमेथियस' ही कादंबरी खरं तर फार पूर्वीच वाचली होती. व्हिक्टोरियन गॉथिक काळात घडले गेलेले कथानक अतिशय जबरदस्त होते. खरे ब्रॅम स्ट्रोकरची ड्रॅक्युला आणि शेलीची फ्रॅन्केनस्टाईन आजही जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणल्या जातात. खरं तर भयकादंबर्‍यांना असा दर्जा मिळणे हे भाग्याचेच.

गावाची ख्याती

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो. सोबत काही बिस्किटे ही खाल्ली.

मित्रमंडळांची नावे

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली. त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा. पुढचे शब्द गविं आहेत. मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता. संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ... एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते.

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार ·
लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी ·
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.