✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हू एम आय!

प
प्राजु यांनी
Wed, 08/20/2008 - 02:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18938 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

द
दातेकाका Fri, 08/22/2008 - 13:41 नवीन

हू एम आय?

प्राजू अभिनन्दन. अतीशय छान लेख. जे लोक कामानिमित्त्/व्यवसायानिमित्त परदेशी रहात आहेत त्यान्च्या मनाला नक्की भिडेल. पण................ भारतात रहात असलेल्या लोकान्ना पटेलसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 08/22/2008 - 19:49 नवीन

हे सर्व

हे सर्व वाचुन मी एवढेच सांगु इच्छितो की मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो काफर म्हणजे जो मुसलमाण नाहि तो यांत हिंदु, इसाइ, ज्यु तसेच बौद्ध प्रामुख्याने धरावे बाकी मी कशावरही चर्चा करु शकत नाही कारण माझी मते तुम्हाला पटणार नाही वा आवडणार नाही
  • Log in or register to post comments
अ
अनिता Fri, 08/22/2008 - 22:44 नवीन

खरे आहे...

नाना, >>मुसलमान जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो चांगला वागतो विशेषतः काफरांशी तर याउलट >>जेव्हा तो अतिशय सुरक्षित असतो तेव्हा काफरांना सपविण्यची किंवा त्याना मुसलमान बनविण्याची इच्छा बाळगतो +१०० अगदी खरे आहे...१००%. ९/११ च्या प्रस॑गान॑तर मला अनुभव आला आहे...अमेरिकेतील मॉलमधे फिरताना माझ्या मित्राल मुस्लिम लोका॑नी शहरातील मस्जिद मधे बोलाविले होते...अफगान स॑घटनेला लढाईसाठी मदत करायला. (मित्र दाढी-मिशा ठेवायचा. त्यावरुन त्या लोका॑नी बहुतेक ठरवले असावे की तो मुस्लिम असावा..) न॑तर समजले की काहि लोका॑ना अटक झाली त्या ठिकाणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/22/2008 - 14:56 नवीन

मी पाहिलेले पाकिस्तानी....

व्यवसायानिमित्त २५ वर्षे आखातात काढताना अनेकदा विविध स्तरावरील पाकिस्तानी जनतेशी संबंध आला. अगदी बँक मॅनेजर ते हमाल असे सर्व संपर्कात होते. माझे निरिक्षण असे की मनातून सर्वच पाकिस्तानी अंतर ठेवून असतात (कांही अपवाद). अशिक्षित पाकिस्तानी त्यांचा भारतियांवरील राग लपवू शकत नाहीत. अशिक्षितांमध्येह काही सुसंस्कृत पाकिस्तानी भेटतात ते निदान तोंडदेखले तरी सामंजस्याने वागतात. सुशिक्षितांमध्ये हे सामंजस्याचे नाटक (ढोंग नाही म्हणत आहे मी) जास्त प्रभावीपणे वठविण्याचे सामर्थ्य असते. आणि ह्या सुशिक्षितांमध्येच मनापासून चांगले, मवाळ, भारताच्या चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करणारे असे पाकीस्तानी असतात. त्यांच्याशी आपले चांगले सूत जमू शकते. थोड्याफार फरकाने संस्कृती दोघांचीही सारखीच असते. काय चांगले, काय वाईट ह्यावर एकमत होते. दोन्ही देशातील सामान्य जनता 'अमन (शांतता) चाहते' पण स्वार्थी राजकारणी वैर वाढविण्यास खतपाणी घालतात ह्यावर एकमत होते. बहुतांश पाकिस्तानी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने केलेल्या प्रगतीबद्दल कौतुकोद्गार काढतात. PIA ह्या पाकिस्तानी राष्ट्रीय विमानसेवेने केलेल्या प्रवासादरम्यान १ दिवस कराचीत राहण्याची संधी मिळाली होती. तेंव्हा तिथल्या हॉटेलच्या शॉपिंग एरियातील एका दुकानात एका वयोवृद्ध पाकिस्तानीशी गप्पागोष्टी केल्या असता त्यांचे एक वाक्य मनाला फार भिडले. त्यांनी त्यांच्या बालपणी भारतात (मुंबईत) काही वर्षे घालवीली होती आणि फाळणीनंतर उर्वरीत आयुष्य पाकिस्तात घालविले आहे. मी त्यांना विचारले की, 'तुम्ही दोन्ही देश जवळून पाहिले आहेत. तुम्हाला ह्या दोन्ही देशांमध्ये काय फरक जाणवतो?' तेंव्हा ते म्हणाले, ' सीमा रेषा आखल्याने जमीनीचा बटवारा होतो, संस्कृतीचा नाही.' ह्यावर उदाहरणादाखल त्यांनी अनेक सणवार, रुढी, संगीतातील रागदारी, औषधोपचार (आयुर्वेदासह) आणि जेवण्याखाण्याच्या पध्दती ह्यातील साम्य त्यांनी मला दाखविले. जवळजवळ तास भर आमची चर्चा झाली. त्यांच्या आदबशीर उर्दूने मला अनेकदा लाजवलं. त्याच हॉटेलात उपहारगृहातील वेटरशी माझे जोरदार भांडणही झाले. PIA ने संध्याकाळच्या नाश्त्याची आणि रात्रीच्या जेवणाची कुपन्स दिली होती. कराची मुंबई प्रवासाच्या सीट्स आरक्षित करायच्या होत्या. ती सोय हॉटेलातच होती पण त्यांचा संगणक बिघडल्यामुळे तिथला कारकून प्रत्येक तिकिटासाठी फोन वरून बुकींग घेत होता आणि त्यात बराच वेळ जात होता. संध्याकाळी ५ वाजता उतरल्यावर ७ वाजेपर्यंत मी त्यांच्या कार्यालयातच बसून होतो. त्यानंतर मी उपहारगृहात चहा-सँडविचसाठी गेलो असता वेटरने 'नाश्त्याची वेळ संपली, आता नाश्ता मिळणार नाही' असे उर्मट उत्तर दिले. त्यावर त्याला मी PIA चा संगणक बिघडल्यामुळे मला उशीर झाल्याचे त्यात माझा काहीच दोष नसल्याचे सांगूनही तो ऐकेना. आणि वरून 'केव्हाही आलं तर नाशता मिळत नसतो, वेळेवर यायला पाहिजे होते' असे त्याने मला ऐकवले. ही आमची वादावादी आजूबाजूचे प्रवासी (पाकिस्तानी) ऐकत-पाहात होते. मला संताप आला. 'कसा मिळत नाही नाश्ता तेच पाहतो, तुम्ही काही फुकट देत नाही नाश्ता, मी पूर्ण पैसे मोजले आहेत' असे म्हंटले त्यावर तो मला म्हणाला 'तुला कोण नाश्ता देतो तेच मी पाहतो.' हा चॅलेंज होता. मी बसल्या जागेवरूनच आवाज चढवून मॅनेजरला बोलावले. तो लगेच आला. त्यावर प्रथम मी त्या उर्मट वेटरची तक्रार केली. तो वेटर काही बोलणार एवढ्यात त्या मॅनेजरने त्याला तिथून हाकलले. (तो संतापाने दूर जाऊन उभा राहिला) मॅनेजरने मला शांत करून समस्या काय आहे ते विचारले. मीही त्याला शांतपणे मला चहा आणि नाश्ता हवा असल्याचे सांगितले. (तो माझा हक्क होता). त्याने ताबडतोब तशी व्यवस्था केली. आम्हा सर्वाना चहा नाशता मिळाला. (आपले बाकी सर्व भारतिय, शेपूट घालून गप्प बसून होते. कोणीही माझ्या बाजूने चकार शब्दही काढला नाही.) आत वेटर आणि मॅनेजरची वादावादी झाली. 'मेरे मना करनेपरभी आपने क्यूं नाशता दिया?' असे वाक्य मला ऐकू आले. चहा नाश्ता झाल्यावर मी काउंटरवर जाऊन मॅनेजरला भेटलो, त्याचे आभार मानले आणि डीनरचे क्लोजिंग टाईम काय आहे असे विचारले. त्याने रात्री ११ असे सांगितले. नंतर आम्ही (मी आणि माझा एक मित्र) कराचीत फिरायला गेलो. रात्री १०|| वाजता परतलो. १०.५५ पर्यंत लाऊंजमध्ये संगीत ऐकत बसलो होतो. एक पाकिस्तानी कलाकार 'इक प्यार का नगमा है...' पियानोवर वाजविण्याचा प्रयत्न करीत होता. अकराला पाच कमी असताना मी मित्रासमवेत जेवायला गेलो. मॅनेजरने खास खातीरदारी केली. ह्या सर्व कथा सांगण्याचा उद्देश असा की मला दोन्ही प्रकारची माणसे भेटली. चांगलीही आणि वाईटही. पण मुख्यत्वे करून राजकारण्यांच्या प्रभावाखाली भरकटलेली. प्रतिसाद बराच मोठा होतो आहे. पण अजून एक इंटरेस्टींग गोष्ट. मस्कतमध्ये एक बलूची भेटला होता. चांगला सुशिक्षित. तो काही काळ पाकिस्तानी नेव्हीत होता. ७१च्या युद्धात भारतिय नौसेनेने एक पाकिस्तानी युद्धनौका पकडली आणि सर्वंना कैद केले. त्या कैद्यांमध्ये तो होता. ३ वर्षे भारतिय तुरूंगात युद्धकैदी म्हणून होता. तो म्हणाला, 'भारतिय नौसेना भयंकर हुषार आहे. पाकिस्तानच्या युद्धनौकेवर कबजा केल्यावर भारतिय अधिकारी पाकिस्तानी अधिकार्‍यांशी बोलत होते. मी जवळच होतो. भारतिय अधिकार्‍याने आमची नौका कराची बंदरातून निघाल्या पासून तिने कुठे-कुठे, कसा-कसा प्रवास केला ह्याचे इत्यंभूत वर्णन केले. आम्ही अवाक झालो. ते दोघेही मैत्रीपूर्ण वातावरणात एकमेकांशी बोलत होते. भारतिय सरकारने पाकिस्तानी अधिकार्‍यांना फार मानाची आणि चांगली वागणूक दिली. पण आम्हा जवानांना फार कुत्र्यासारखी वागणूक दिली. पण त्या तिन वर्षांच्या कालावधीत मला एक कळून चुकले पाकिस्तान हिन्दूस्थानवर कधीच विजय मिळवू शकणार नाही. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे.' असो. मनुष्यबळ आणि बुद्धीच्या बळावर भारतिय सेना पाकिस्तानच्या कितितरी पुढे आहे, हे प्रत्येक पाकिस्तानीही जाणतो पण ते स्विकारणे त्यांना फार जड जातय. भारताची तंत्रज्ञानातील प्रगती मात्र ते उघडपणे कबूल करतात. जय हिंद..
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 08/22/2008 - 16:11 नवीन

उत्तम

उत्तम लेख... कोणतीही बाजू न घेता आणि मनापासून लिहिलेला... विशेषतः खोटी वाटणारी अलंकारिक वाक्ये टाळल्यामुळे तर फारच बेस्ट झालं... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/22/2008 - 17:23 नवीन

या लेखावर

बरिच चर्चा चर्वण झाले. कोणाचेही मन दुखवण्याच्या हेतूने हा लेख लिहिलेला नाहिये. फुलवा, टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही. कधी कधी ती शत्रूची असते, कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना. त्यासाठी स्थळ किंवा काळ याचे नियम नसतात. ड्रायव्हिंग करताना अपघात होतात. मला कोणि येऊन धडकण्याआधी मीच त्याला जाऊन धडकतो .. या मानसिकेमध्ये काय अर्थ आहे. नुकसान तुमचेच आहे. त्यापेक्षा जास्तीत जास्त सुरक्षित ड्रायव्हिंग करण्याकडे लोकांच कल असतो नाही का? नानाचेंगट, कोणत्याही देशाबद्दल मी कोणताही (चांगला/वाईट) निर्णय घेतला नाहीये. मी केवळ आणि केवळ मानसिकेतेबद्दल लिहिले आहे...तेही माझ्या . विसुनाना, सर्वसामान्य पाकिस्तानी हे सर्वसामान्य भारतीयांशी मित्रत्वाने वागत असतील. पण म्हणून एक देश म्हणून पाक भारताचा मित्र ठरत नाही. मी इथे कुठेही पाकिस्तान हा भारताचा मित्र आहे हे विधान केल्याचे मला आढळले नाही. कोणताही निष्कर्ष यातून मी काढलेला नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माझा बघण्याचा दृष्टीकोन बदलला हेच यातून सांगायचे आहे मला. पुन्हा एकदा सांगते.... माझी मानसिकता बदलली... इतकंच. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी.. इतर अनेक जाती उपजाती आहेत. वर करणी शांत असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद असतातच. पण जेव्हा भैय्या लोकांविरूद्ध लढायची वेळ आली तेव्हा सगळा महाराष्ट्र उभा राहिला... हेच लॉजिक मी इथे वापरले आहे. यातून कोणी कोणत्या निष्कर्षापर्यंत यावे अशी अपेक्षा नाही. लेखामध्ये मांडलेली मते ही केवळ माझीआणि माझीच आहेत. ती कोणावरही लादण्याचा माझा प्रयत्न नाही आणि कधीही नसेल. - (सर्वव्यापी)प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 08/23/2008 - 02:08 नवीन

मला वाटते..

प्राजुने लेखातुन तीच्या आणि जे भारतीय देशाच्या बाहेर राहत आहेत त्याच्या मानसिकतेचा बदल दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे तीला व्यवस्थित साध्य झाले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पद्मश्री चित्रे Sat, 08/23/2008 - 14:46 नवीन

प्राजु,

>>टांगती तलवार काय हो सगळीकडेच असते. पण म्हणून जगणं कोणी सोडून देत नाही. जगणं सोडावं असं मी कधीच म्ह्टल नाही,उलट मला कौतुक वाटते या दुर्दम्य जगण्याच्या इच्छाशक्ती चे. >> कधी भूकंप, कधी महापूर कधी ९/११ सारख्या घटना. आणि महापुर आणि बॉम्ब्स्फोट याची तुलना करण्यात काय अर्थ?नैसर्गिक आपती स्थळ काळ बघत नसली तरी या मानव निर्मित आपत्ती पुर्वनियोजित असतात . विश्वबन्धुत्व वगैरे आदर्श कल्पना आहेत, पण ते त्यासाठी स्वाभिमान , देशाभिमान सोडु नये... इतकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 08/22/2008 - 21:22 नवीन

सुंदर लेख...

सुंदर लेख. कोणताही चष्मा न चढवता लिहीलेला; म्हणूनच मनाला भिडणारा. अमेरीकेत आल्यावर खूप पाकिस्तानी भेटले. त्यातही हे हाडवैर असलेले पाकीस्तानी भारतीयांशी इतके मित्रत्वाने वागतील असे वाटले नव्हते. राहून राहून असे वाटायचेच की जर दहशतवादी पाकीस्तानात घडत असतील तर ते दहशतवादी काही दिवसांपूर्वी पाकीस्तानी नागरीकच होते ना? मग सामान्य नागरीक शांती वांछीत आहे असे कसे समजावे. त्यामुळे अमेरीकेत उतरल्यावर पाकीस्तानी लोकांना भारतीय लोकांबद्दल आलेल्या पुळक्याचे कारण समजले नाही. जसा जसा जास्त दिवस अमेरीकेत जास्त दिवस राहत गेलो तसे प्राजुने लिहील्याप्रमाणे आशियायी म्हणून हे प्रेम असल्याचे कळले. पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले. ;) माझी एक मैत्रीण आहे पाकीस्तानी. ती chase बँकेमधे personal banker आहे. एकदम फटाकडी. आणि देशी लोक पाहील्यावर तिला प्रेमाचं काय भरते येते म्हणून सांगू.(कदाचित त्यात थोडासा व्यावसायिक दृष्टीकोण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.) पण पोरगी छान होती. ;) माझ्या घराजवळ असणार्‍या मदिना नावाच्या पाकिस्तानी हॉटेलात वरचे वर जात असे. खरेतर हॉटेल होते पाकीस्तानी माणसाचे पण त्यावर पाटी होती इन्डो-पाकीस्तानी हॉटेल म्हणून. याचे कारण पाकिस्तानी रेस्टॉरंट असे लिहीले असते तर भारतीय लोक येत नाहीत असे दस्तुरखुद्द मालकानंच आम्हाला सांगितले. माझे बरेच मित्र विचारत की पाकीस्तानी वस्तू घेत तर नाहीस आणि त्या मदिनामधे जाऊन बरा हाणत असतोस सारखे सारखे. त्यावर मी त्याना म्हणत असे की 'दुटप्पी धोरण काय फक्त पाकीस्ताननेच ठेवावे काय! मी नाही ठेऊ शकत'. - (अस्सल भारतीय) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/23/2008 - 00:18 नवीन

पण तरीही

पण तरीही पाकीस्तानी वस्तू कधीही घेतली नाही. आणि कोणी नवीन वस्तू घेण्याआधी मत विचारले तर त्याचा मेक पाकीस्तानी असेल तर काहीतरी दोष काढोन त्या माणसाला ती वस्तू घेण्यापासून परावृत्त करण्याचे काम मनोभावे केले. जियो....! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ल
लिखाळ Fri, 08/22/2008 - 21:50 नवीन

मी तोच !

माझे पाकिस्तानी नागरिकांबद्दलचे मत जसे भारतात असताना होते, तसेच इथे आल्यावर सुद्धा आहे. इथले पाकिस्तानी आपल्याला पाहिल्यावर नजर टाळतात, ओळख देत नाहित असा माझा व्यक्तिगत अनुभव. ज्या एका पाकिस्तानी टॅक्सीवाल्याशी बोलणे झाले तो बरा होता. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल तितकारा नाही तसे प्रेमही नाही. ती माझ्यासारखेच सामान्य असतील अशी एक क्ल्पना करुन असतो. मी चौकटीबाहेर पाउल ठेवले तरी मी कोण असा प्रश्न पडला नाही. एखादेवेळी मानसिक चौकट बदललेली नसेल अशीही शक्यता आहेच. अनेकदा जीवनात येणारा भौतिक/लौकिक बदल आपल्याला पूर्ण बदलवून टाकेल अशी आपली धारणा असल्याने आपला दृष्टिकोनसुद्धा बदलला पाहिजे अशी आपण आपल्याला भीड तर घालत नाही ना?!! (कृपया या विधानाकडे एक विचार म्हणूनच पाहावे. वैयक्तिक रोख समजू नये ही विनंती.) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अमेयहसमनीस Sat, 08/23/2008 - 13:50 नवीन

प्राजू

प्राजू ताई, काय आहे हा सगळा विचार आपण सीमे वर लढत असलेल्य (भारतीय) जवाना ला केन्द्रित करुन परत एकदा लिहा. अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे. अमेय
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 08/23/2008 - 19:07 नवीन

अमेय..

अमेरिकेत बसून बोलणे आणि लिहिणे वेगळे आणि सोपे आहे. आपण गफलत करता आहात. माझी मानसिकता आणि सीमेवर लढणारा जवान दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेत बसून लिहिणे सोपे आहे हा तुमचा गैरसमज आहे. अमेरिकेत असले तरी मी भारतीयच आहे. आणि तुम्हाला भारतात राहून जितका भारतीयत्वाचा अभिमान आहे तितकाच मलाही आहे. तुम्ही भारतात रहाता पण सीमेवर लढणार्‍या जवानासाठी तुम्ही काय करता श्रद्धांजली वाहण्या व्यतिरिक्त?? काहीच नाही ना. मग कोणत्या मुद्द्यावर तुम्ही वरचे विधान केले?? एक लक्षात ठेवा काहिही झालं तरी आज तुम्ही तुमच्या माणसांच्यात आहात. सुरक्षित आहात. आम्हाला इथे जी जवळची वाटतात त्यांना धरून रहावंच लागतं. काही बरं वाईट झालं तर नातेवाईकांच्याही आधी मदतीला हीच माणसं येतात. मग इथे राहणार्‍या एखाद्याचा शेजारी जर पाकिस्तानी किंवा बांग्लदेशी असेल तर विनाकारण वैर धरण्यात काय अर्थ आहे? दुसरी गोष्ट अशी, जी अमेरिकन बाइ मला भेटली, तिच्या "यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर" या वाक्यातून जर बांग्लादेशात राहणार्‍या माणसाच्या वागण्यावरून तिने भारतीय माणसालाही चांगले म्हंटले असेल तर ही शीतावरून भाताची परिक्षाच नाही का? आणि यात चूक आहे?? तेव्हा तुमचे वरील वाक्य माझ्यासाठी गैरलागू आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेयहसमनीस
अ
अमेयहसमनीस Mon, 08/25/2008 - 12:38 नवीन

"यू पिपल आर

"यू पिपल आर रिअली नाईस बाय नेचर" हे वाक्य एका अमेरिकी माणसानी म्हणण आणि एका भारतीय माणसानी म्हणण यात बारच फरक आहे. अमेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विनायक प्रभू Sat, 08/23/2008 - 20:06 नवीन

किती खरे.

ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही. फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sun, 08/24/2008 - 17:36 नवीन

हो..

ज्यानी स्फोटातली प्रेते बघीतली त्याना माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही. फुलवा तु बघीतली आहेस का? टी. वी वर नव्हे. ११ जुलॅ २००६ ला , मुम्बई त साखळी बॉम्ब्स्फोट झाले तेव्हा मी विरुध्द दिशेने (चर्चगेट जाणाया) गाडीत च होते.अगदी समोर.. आणि माणुसकी चे दवबीन्दु टाइप विचार जमणारच नाही असं मी म्हटल नाही.. मी माझ्या पुरतं सांगितल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
म
मनीषा Mon, 08/25/2008 - 12:14 नवीन

लेख आवडला

मी सुद्धा हा अनुभव नेहमी घेते.. परक्या लोकांमधे पाकी/ बांग्लादेशी/श्रीलंकन , ही लोक 'आपलेच' वाटतात . पण तरी हे सुद्धा तितकच खरं कि हा आपलेपणा जो पर्यंत धर्म, राजकारण (आणि क्रिकेट) हा विषय निघत नाही तो पर्यंत. आणि वादाचा विषय असेल तेव्हा भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात. अर्थात हे माझं (निरिक्षण) मत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2008 - 14:14 नवीन

वृत्ती..

भारतीय लोकं तुलनेने जास्त सहिष्णु असतात गुन्हेगारीकडे कलही भारतीयांपेक्षा पाकिस्तान्यांचा जास्त असतो असे ओमानच्या CIDचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
प्राजु Mon, 08/25/2008 - 19:57 नवीन

प्रतिसाद

प्रतिसाद दिलेल्या, चर्चा केलेल्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा