तोतयांची, फक्त...

लेखनविषय:
कापल्या गेल्यांवरी तर मदार होती तोतयांची, फक्त शस्त्रे दुधार होती समजले नाही मने करपली कशाने ? सूर्य होता माजला की दुपार होती.... नाचली होतीस तू थयथया कशाला ? हाक प्रेमाची जराशी... चिकार होती उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती माणसांची त्या वयेही उतार होती 'जीवही देईन प्रेमात आज माझा' मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती तापल्यावरी उरे आर्द्रता कशाने ? साधनेला वेदनेची किनार होती

दु:ख आता फार झाले

लेखनविषय:
दु:ख आता फार झाले स्वप्नही लाचार झाले दु:ख आता फार झाले झोपलेले ते निखारे जाग येता गार झाले झुंजण्याची वेळ येता शौर्य-धैर्य बिमार झाले झुंजणारे वीर खंदे आरशांचे हार झाले खेळ येथे माकडांचे या भुईला भार झाले पान कोरे अक्षरांना सांगते आचार झाले बांधलेली भोवताली भिंत होती दार झाले उत्तरांना पेलताना प्रश्नही बेजार झाले “अभय”तेच्या ’त्या’ नशेचे बंद आता बार झाले ...............गंगाधर मुटे...........

डास ढेकुण झुरळ

मित्रानो आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात. त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून. 1 नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले.

मंतरलेले चार दिवस - भीमराव पांचाळेंसोबत !

लेखनविषय:
लेखनप्रकार
भीमराव पांचाळे नावाचा सुरांचा जादूगार कुवेतमधे येऊन गेला आणि आम्हा कुवेतकरांना त्यांच्या सुरांच्या इंद्रजालात पार अडकवून गेला. त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाहीये. खरं तर त्यातून बाहेर यावंसंच वाटत नाहीये. त्यांनी त्याच्या साधेपणाने आम्हाला कायमचं आपलंसं करुन टाकलंय. त्यांच्या सुरांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडवून टाकलंय. संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी गजलनवाज भीमराव पांचाळे आणि त्यांचे सहकारी डॉ.देवेंद्र यादव आणि जगदीश मेस्त्री कुवेतमधे आले आणि चार दिवस आम्हा सगळ्यांना त्यांचा मंतरलेला सहवास लाभला. २० जानेवारीची २०११ ची सकाळ.

शिळा घास होता

लेखनविषय:
काव्यरस
खरा कायदयाने मला फास होता कुठे न्याय ? तो फक्त आभास होता तराजू कधी पावला सांग त्यांना ? उभा जन्म ज्यांचा शिळा घास होता लुबाडून खाती सदा तूप-रोटी गुन्हेगार तेथेच हमखास होता अरे ! कायद्या काय देऊ पुरावे ? दलालीत वाटा तुझा खास होता तुझ्या चोर-वाटां मुळे न्याय मेला फरारी च आरोपि सर्रास होता अशा कायद्याला कुणी भीक घाला ? स्वतः न्याय केला ! सुरा पास होता

नेते नरमले

लेखनविषय:
नेते नरमले मोठे गरजले छोटे बरसले रेती वाहतच गोटे अडकले मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले बिल्डर म्हणताच मंत्री दचकले काजवे रात्री अभय चकाकले गंगाधर मुटे =============

'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला?

लेखनविषय:
'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला? भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला कांदा पुसे रडूनी, कांद्यास अक्कलेच्या तो ’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला? चेचून वेदनांना, पायात गाडले; पण स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला दचकून जाग येते, निद्रा लयास जाते ते घाव प्राक्तनाचे, छळती क्षणाक्षणाला सोडून भूतळाला, ती दैत्य जात गेली देऊन दान वृत्ती, या सभ्य माणसाला ना झाकते कधी ती, वस्त्रात अंग सारे मिळणार भाव कैसा, शेतीत कापसाला? समजून घे "अभय" तू नाहीत भ्याड सारे निपजेल शूर येथे, विश्वास दे उद्याला गंगाधर मुटे .............

व्याख्याच व्याख्या

लेखनविषय:
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

नाही ... (गझल)

लेखनविषय:
काव्यरस
नाही मला कधीही नव्हते म्हणायचे 'नाही'च शब्द पण का ओठात यायचे ? अवरुन घेत जातो माझ्या मनास मी तू यायचे त्वरेने ते विस्कटायचे मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी कोणा कुणास आता मग शांतवायचे ? घालीत भीक नाही मी संकटा तुला तू सारखे कशाला दारी फिरायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? - स्वानंद
Subscribe to गझल