मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्थकारण

थोडे सहजच

ऋषिकेश ·
लेखनप्रकार
स्थळः एक प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान संस्था वेळ: सकाळची संवादः कर्मचारी१: अरे आपल्या कँपसमधल्या गेस्टहाऊसमधे नव्या खेळांच्या सोयीबरोबर स्विमिंग पूलही होतोय कर्मचारी२: हो का? वा! वा! आता पुढल्या क्लायंट व्हिजिटला त्याला तिथेच उतरवता येईल. ही सोय नसल्याने आपल्या क्लायंटला वेगळ्या हॉटेलात उतरवावं लागे. कारण आता बाकी कंपन्यांमधे ती सोय आहे ना! क.१: मला नाही हा तसं वाटत! क्लायंटला फक्त उत्तम काम हवं असतं त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं.

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

प्यारे१ ·
काव्यरस
मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल.... तर थोडी माहिती. गीत- मुन्नी बदनाम हुई' चित्रपट - दबंग्ग संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला) हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात. मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.

जपान मध्ये पुन्हा भुकंप

विनायक बेलापुरे ·
लेखनप्रकार
जपान मध्ये नुकताच पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. हा भुकंप ७.१ रिश्टर चा असून ११ मार्च च्या भुकंपाहऊन त्याचा केंद्र बिंदू जपानच्या अधिक जवळ आहे. सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

गंगाधर मुटे ·
लेखनप्रकार
कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे? जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही.

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·
3