Skip to main content

अर्थकारण

रिझर्व ब्यान्के चा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट.

लेखक वारा यांनी गुरुवार, 28/07/2011 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
कालच पेपरात बातमी वाचली की रिझर्व बॅन्केच्या रेपो व रिव्हर्स रेपो दरात वाढ केली. यामुळे ग्रुह व वाहन कर्झ महागले. नव्या निर्णयामुळे रेपो रेट ०.५० ने वाढुन आता ८ टक्के झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट आता ७ टक्के झाला आहे, त्यामुळे मुदतबन्द ठेवीदाराची चान्दी झाली आहे. पण याचा परीणाम म्हणजे ऑटो आणि रिअल ईस्टेट ला फटका बसायचे चान्सेस आहेत.

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 27/07/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात.

"प्यार का पंचनामा"... सिनेमाची ओळख

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 26/07/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्यार का पंचनामा. दोन महिन्यांपूर्वी "प्यार का पंचनामा" नावाचा सिनेमा येऊन गेला.. आला कधी गेला कधी कळलाही नाही या टाईपातला हा सिनेमा. तूनळीवरती याच्या संवादांच्या काही क्लिप्स पाहिल्या होत्या. हे प्रोमोज आवडलेही होते. पण बर्‍याचदा प्रोमोज बरे असतात आणि सिनेमा कंटाळवाणा असतो त्यामुळे सिनेमाकडून फ़ार अपेक्षा नव्हती...तरीही पाहिला आणि हा सिनेमा चक्क आवडला. मजा आली. तूनळीवरची झलक http://www.youtube.com/watch?v=pwSmmJV1XvY गोष्ट सोपी आहे. रजत, निशांत आणि चौधरी या नावाचे तीन बॅचलर आय्टी इन्जिनियर्स फ़्लॅटमेट्स आहेत.

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/07/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ "येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही.

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/07/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात.

चार आणे

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 30/06/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी असतात छोट्या, त्यांच्या असण्याने किंवा असताना फारसा फरक पडलेला नसतो / पडत नाही. मात्र तरीही त्या गेल्या / नसल्या कि मात्र चुकल्यासारख होतं. मागे टाइपराइटरने शेवटचे कडकटट केले आणि आज 'चार आणे' बंद होत आहेत. माझ्या लहानपणी (म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी) ह्या चार आण्याला किंमत होती.

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

निरागस चेहेर्‍याआडचे धर्मांतर

लेखक आंसमा शख्स यांनी गुरुवार, 23/06/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार? वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता.

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/06/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला. स.न.वि.वि दि. ६ जून २०११ च्या लोकसत्तामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे. कृषी अधिकार्‍यांच्या तांत्रिक कार्यशाळेत "प्रकल्प आधारित शेती" या विषयावर मार्गदर्शन करताना "शेतकर्‍यांना फुकट काही देऊ नये, नुसते फुकट जर दिले तर शेतकरी फुकट घेण्यासाठीच बसलेले असतात, अशी शेतकर्‍यांची प्रवृत्तीच झाली आहे" अशा आशयाचे विधान केल्याचे प्रकाशित झाले आहे. डॉ. मायंदे साहेब, आपण एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान आहात आणि कुलगुरू या शब्दाची महतीसुद्धा फार मोठी आहे.