✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आता कशाला उद्दयाची बात

श — श्रीकृष्ण सामंत, Wed, 06/25/2008 - 22:08

प्रतिक्रिया द्या
3528 वाचन

💬 प्रतिसाद (9)

घाई नको बाई अशी..

सहज
Wed, 06/25/2008 - 22:20 नवीन
सामंत साहेब आज न लिहता उद्या लिहले असते तरी चालले असते!! ;-) आज उद्या कधीतरी इतर लोकांना प्रतिसाद द्या मग परवापासुन परत लेख, कविता लिहा. कृ. ह. घ्या.
  • Log in or register to post comments

उद्याचा उद्दा

श्रीकृष्ण सामंत
Wed, 06/25/2008 - 22:31 नवीन
उद्दाचा उद्दया म्हणजेच तुमच्या भाषेत "परवा" ते तर मी करीतच आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

??

विसोबा खेचर
Sat, 06/28/2008 - 08:32 नवीन
काल, आज, उद्या? अहो काय ह्या कोलांट्या उड्या लावल्या आहेत? तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे ते कालही कळलं नव्हतं, आजही कळत नाहीये आणि उद्याही बहुदा कळणार नाही! :) आपला, (फक्त कालचा अन् आजचा, उद्याचं माहीत नसलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments

माझं म्हणणं

श्रीकृष्ण सामंत
Mon, 06/30/2008 - 22:11 नवीन
नमस्कार तात्याराव, म्हणूनच मी फक्त एव्हडंच म्हणत आहे "आता कशाल उद्दाची बात" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

???

शेखस्पिअर
Mon, 06/30/2008 - 21:58 नवीन
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात?
  • Log in or register to post comments

कविता आणि पिणे

श्रीकृष्ण सामंत
Mon, 06/30/2008 - 22:41 नवीन
शेख-स्पिअर साहेब, प्याले रिचवून कविता सुचण्याचे दिवस आता गेले साहेब. एव्हडं खरं माझी ही कविता एकदा वाचून पिल्या सारखं कदाचीत वाटावं. किंवा पिऊन ही कविता एकदा वाचल्यावर "त्यापेक्षा आणखी एक पेला बरा" असंही वाटणं संभवतं. कविता सुचण्यासाठी प्याले रिचविण्याचे निमीत्त करणं हे काही खरं नाही बघा! मी स्वतः मात्र "सुपारीचं खांड" पण खात नाही.पेले कुठून रिचविणार सांगा? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

किती प्याले ????

अभिज्ञ
Mon, 06/30/2008 - 22:44 नवीन
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात? :( सामंतजी, आपण काय करावे आणि काय करु नये हे सांगायचा मला काहिहि अधिकार नाहि. तरिहि एक गोष्ट खटकली ती सांगाविशी वाटते, आपले इथे बरेच लेखन आढळले,किमान तीस धाग्यांवर आपल्या प्रतिक्रिया आहेत. अन त्यातले २८ धागे हे आपणच सुरु केलेले आहेत.फ़ार क्वचित आपण इतर विषयांना प्रतिसाद देताना दिसता. इथे लिहिणारा प्रत्येकजण हा बाकिच्यांच्या लिखाणावर ब-या वाइट का होइना प्रतिक्रिया देताना आढळतो. तसा प्रकार आपल्या बाबतीत घडताना दिसत नाहि. इथे बाकिच्यांना प्रतिक्रिया लिहायलाच पाहिजे असा काहि नियम वगैरे नाहि..नसावा.... परंतु इथला एक नियमित वाचक म्हणून हि बाब खटकली,म्हणुनच ह्या प्रतिक्रियेचा खटाटोप. असो, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

अभिज्ञराव..

विसोबा खेचर
Mon, 06/30/2008 - 23:45 नवीन
अभिज्ञराव, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. आपल्या प्रतिक्रियेत काही वावगं असेल तर ते इतकंच की आपल्या प्रतिसादाचा 'आता कशाला उद्याची बात...' या कवितेशी काहीही संबंध नाही. ते विषयांतर वाटते व आपण आपले मत सामंतसाहेबांना पोष्टकार्ड पाठवून कळवायला हवे होतेत! असो, बाकी मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. परंतु सोडून द्या! कुणाला प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवाय, अहो असतो एकेकाचा कुणालाही दाद न देण्याचा स्वभाव! त्याला काय इलाज? किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल! कारणं अनेक असू शकतात... असो, आपला, (विश्लेषक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

क.लो.अ.ही वि.

श्रीकृष्ण सामंत
Tue, 07/01/2008 - 03:53 नवीन
अभिज्ञजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.आपलं ऑबझरवेशन खरं आहे,आपल्याला खटकण्याजोग आहे,आणि आपल्या प्रतिक्रियेचा खटाटोप अगदी योग्य आहे. त्याचं असं आहे,मला ह्या संस्थळावर येवून अवघे एक दोन आठवडे झाले असतील.ह्या बहुचर्चीत संस्थाळावर मी एव्हडा रमून जाण्याचं मुख्य कारण माझ्या कविता अथवा लेखावर एव्हड्या अंतःकरणापासून लिहिलेल्या प्रतिक्रिया येतात की माझा मीच त्या वाचून आणि त्याला उत्तर देवून हरवून जातो. आता पावेतो मी माझ्या लेखनावरच्या प्रतिक्रियेचा सूर,नूर आणि किती धूर होतो ते निरखून पहात आणि वाचत होतो. मी या संस्थाळावरचे लेखन वाचत नाही असं नाही.पण एव्हडं खरं की जात्याच मी टिका केलीच पाहिजे म्हणून करायला उद्दयुक्त होत नाही.याचा अर्थ इतर तसं करतात असं मला मुळीच म्हणायचं नाही,नव्हे तर मला ते तंत्र कदाचीत जमत नसावं.पण मनाला अत्यंत भावलेलं एखाद्दा लेखनाचं भरभरून प्रशंसा करायला मागे पुढे पहात नाही. आता इथे आल्यावर जरा सराव झाल्याने बघुया कसं जमतं ते. तात्यांचं टिकास्त्र,डॉ,दिलीपजीचं मार्गदर्शन,फटू,बेसनलाडू,आपल्या सारखे अभिज्ञ यांच्या सुचना,अरूण मनोहर,सहज,राजे,शितल,विजूभाऊ,मदनबाण,पक्या,धृव,वैशाली हसबनीस,विश्वजीत,मयुरे लपते,चतुरंग,प्राजु,शेखर,यशोधरा,चाणाक्य,रुपेश आणि -कुणी चुकलं असेल तर ते अवधाने असं समजू नये- वगैरेची प्रशंसा त्याशिवाय आणखी किती तरी लोकांच्या प्रतिक्रिया वाचून लेखन करायला स्फुर्ति येते हे मात्र नक्कीच. वेळात वेळ काढून माझी पण प्रतिक्रिया देण्याचा मी प्रयत्न करीन. "किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल!" असा चुकून सुद्धा विचार माझ्या मनात येणं म्हणजे पाप होईल. अहो लेखन ही निर्मिती आहे.अशी माझी धारणा आहे. आणि प्रत्येक लेखाचा मला आदर आहे. मीच माझ्या एका कवितेत म्हणतो " प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे" आपल्या सगळ्यांचा माझ्यावर कृपालोभ,कृपादृष्टी आणि लेखनावर वक्रदृष्टी ठेवून सुद्धा माझ्या वर लोभ असावा हीच विनंती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा