मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६)

Anand More ·

एस 27/02/2016 - 20:49
मत मांडण्याऐवजी जास्त भर हा तथ्ये व घटनांचे विश्लेषण करण्यावर दिल्यामुळे तुमच्या लेखमालेला निश्चितच वजन प्राप्त झाले आहे. पुभाप्र.

In reply to by एस

पगला गजोधर 29/02/2016 - 14:56
तथ्ये व घटनांचे विश्लेषण करण्यावर दिल्यामुळे तुमच्या लेखमालेला निश्चितच वजन प्राप्त झाले आहे. पुभाप्र.
१००००००००००००००००००००००००००००+

आरोह 27/02/2016 - 21:12
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे साहेब? देशाविरुद्ध घोषणा हे समर्थनीय आहे असे सांगायचे आहे का तुम्हाला? मग सांगा एका वाक्यात.त्यासाठी एव्हडे शब्दांचे बुडबुडे कशासाठी? भारतीय दंडसाहित, जागतिक दंडसाहित, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उद्या तुमचा बंड्या शेजारच्या काकांचे गुणगान गाऊन तुम्हाला शिव्या घायाला लागला तर?..कंमोन्सेन्स,लॉजिक काही वापराचे आहे कि नाही. तुम्हाला पण intellectual,पुरोगामी ह्या पदव्या हव्यात काय?

नेत्रेश 27/02/2016 - 22:26
> "उद्या तुमचा बंड्या शेजारच्या काकांचे गुणगान गाऊन तुम्हाला शिव्या घायाला लागला तर?.." तर काय? बंड्याला 'बापद्रोहाच्या' आरोपाखाली तुरुंगात टाकणार? की घरातुन हाकलुन देणार (घर वडीलोपार्जीत असेल, किंवा बंड्या लहान असेल तर तेही करता येणार नाही) न्यायालये ही कॉमनसेन्स वर चालत नाहीत, कायद्यावर चालतात. तेच कायदे, त्यांचा उगम, त्याची कारणे आपल्याला समजतील अशा सोप्या भाषेत मोरे सर सांगत आहेत. मोरेसर, अत्यंत माहीतीपुर्ण लेखमाला. धन्यवाद.

In reply to by नेत्रेश

आनन्दा 28/02/2016 - 15:35
तर काय? बंड्याला 'बापद्रोहाच्या' आरोपाखाली तुरुंगात टाकणार? की घरातुन हाकलुन देणार (घर वडीलोपार्जीत असेल, किंवा बंड्या लहान असेल तर तेही करता येणार नाही)
हे दोनच उपाय आहेत का? बंड्याच्या कानाखाली वाजवणे हा पण एक उपाय आहे, आणि मला खात्री आहे कोणताही बाप हा अधिकार नक्कीच वापरेल.

In reply to by नेत्रेश

बंड्या १) शेजारचे काका झिंदाबाद २) आपला बाप मुर्दाबाद ३) वरील १ व २ अशा तीन प्रकारात काय अन्वयार्थ काढायचा असा प्रश्न आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

तर्राट जोकर 29/02/2016 - 13:40
बाप आणि बंड्या हे उदाहरणच चुकतंय. इथे बाप कोण आणि बंड्या कोण हेच ठरत नाही अजून. हे उदाहरण देणारे देशभक्त स्वतःला बाप समजतायत आणि देशद्रोही घोषणा देणार्‍यांना बंड्या. लॉजिक चुकतंय असं कुणालाच वाटत नाही. भारतीय संस्कृतीत मुलांना आपली संपत्ती समजल्या जाते तेच इथं दिसतंय. देश हा बाप, त्याचे देशवासी ही त्याची मुले हे ते लॉजिक. देशद्रोह्यांना दंड देण्याचा मनमानी अधिकार हवा असल्याकारणाने हे उदाहरण निखालसपणे पसरवलं जातंय. आता देश म्हणजेच देशवासी, स्वतःच स्वतःची मुले कशी? इथे सगळेच बंड्या आहेत, बाप कोणीही नाही. बंड्यांचा कळप आहे. काही बंडे बंड करत आहेत, त्यांना वेगळा कळप आणि वेगळी जागा पाहिजे. त्यांना समजवावं की संपवावं ह्याबद्दल उरलेल्या बंड्यांमधे वाद चालु आहे. संपवाबंड्यांच्या लेखी समजबंडे हे बंडखोर बंड्यांच्या सोबत आहेत असे समजतायत. समजबंडे हे बंडखोरांना आपल्यात ठेवून कळप आणि जागा फुटण्याचा धोका टाळण्यासाठी आग्रही आहेत. संपवबंडे बंडखोरांना ठेचून कळप आणि जागा धोक्यात टाकतायत. परिस्थिती उन्मादाच्या भरात बिघडत जाईल. कोण बंडखोर आणि कोण कळपबंडे कळणार नाही. एक दिवस कळपच राहणार नाही अशाने. खुलासा: इथे समजबंडे म्हणजे डावे नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

इथे सगळेच बंड्या आहेत, बाप कोणीही नाही
इथे सरकार ही खाजगी मालमत्ता व तिच्यावर फक्त आमचाच अधिकार आहे असे वाटणारे असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?

आरोह 28/02/2016 - 01:18
मग त्या बंड्याचे काय करायचे? कि ह्या बापद्रोह बद्दल त्याचा सत्कार करायचा? न्यायालये कॉमन्सन्सवर चालत नाहीत ..कायद्यावर चालतात आणि त्यांनीच अफजल ला फाशी दिली का दिली फाशी? उगाच दिली का? याकुब, अफजल जर कोणाचे हिरो असू शकतात तर त्या लोकांकडे तुम्ही कशा नजरेने बघणार? कसाब ला पण घ्या बरोबर आणि ह्या सगळ्यांना विरोध करणाऱ्यांना कायदेशीर तत्वज्ञानाचे डोस पाजयचे. सादया सरळ गोष्टींचा किस पाडत राहायचे..

In reply to by आरोह

कपिलमुनी 28/02/2016 - 07:09
समर्थनीय नाही. बंड्याचे समर्थन नाही पण बंड्याच न्यायालयात गेला तर बापाला बंड्याचे हक्क द्यावे लागतात . मग बाप किंवा बंड्याच पेक्षा कायदा काय म्हणतो ते अशा प्रसंगी महत्वाचा ठरते.तिथे त्या घोषणा कायदेशीर ठरल्या तर ? ( पूर्वी तसा झाला आहे)

आरोह 28/02/2016 - 14:48
उद्या न्यायालयाने सांगितले कि बाबारे घाला देशाला शिव्या तो तुमचा हक्क आहे. तुम्ही काही गुन्हा केलेला नाही. मग काय होईल.. असो, देशाला शिव्या घालणे वेगळे आणि सरकारला वेगळे. देशाला शिव्या घालणे हे चूक कि बरोबर इतका साधा प्रश्न आहे, लेखन मुद्दे सून आहे , लेख माहितीपूर्ण आहे हे सगळे ठीक पण नक्की त्याचा उद्देश काय आहे? समर्थनीय आहे कि असमर्थनीय? हा तो प्रश्न आहे. सरकारला विरोध करायला कोणी रोखलाय?

"व्यक्ती/पक्ष/संस्थेला शिव्याशाप देणे" आणि "देशाचे विभाजन करण्याच्या, देशाला बरबाद करण्याच्या, न्यायव्यवस्था खुनी आहे, अश्या घोषणा देणे" या दोन्हीत जमीन-अस्मानाचा फरक आहे, हेच समजत नसेल किंवा समजून घ्यायचे नसेल किंवा मान्य नसेल तर मग... ते एक वाक्यात सांगितले काय आणि शब्दांची महाप्रचंड उतरंड मांडून त्यावरून फसवत घसरत तिथपर्यंत नेलं काय, मुद्दलात काहीच फरक नसतो... पण कृतीत, कृतीमागच्या भावनेत आणि अंतिम परिणामात जमीन-अस्मानाचा फरक असतो !

आरोह 28/02/2016 - 16:11
फरक असतो ना,intelectuals हि पदवी मिळते. गरीब बिचार्या लोंकाना (कोकरांना !)काय वाटत, वा वा काय मुद्देसूद, विचारात सुस्पष्टतात(?),माहितीपूर्ण, लेखन..आणि काय काय..

आरोह 28/02/2016 - 16:39
तुमच्यासाठी नाही ते..तुम्ही काहीतरी ह्याच्यापेक्षा सोप्या गोष्टी वाचा.. उगाच हा पण dose जास्त होईल तुम्हाला

सुबोध खरे 28/02/2016 - 18:42
भारताचे महाधिवक्ता श्री सोली सोराबजी यांचे या विषयाबद्दलचे मत खाली वाचा There are reports about ‘anti-India slogans’ such as “Bharat ki barbaadi tak’ in JNU Who said it? When did he say it? It has to be established in a court of law. Mind you, you must make allowance in the context, circumstances. Apna country mein toh (In our country,) everyone says so and so zindabad, murdabad. Take it in context. Don’t be hyper-sensitive. But if it goes to that nature where someone says cut India into pieces... that certainly would amount to sedition. There is a feeling that freedom of expression is under siege in the country. What is your view? Who prevented the citizens from criticising the government? Those who have criticised the government have they been put in jail as was done during the Emergency? Tell me, those who returned awards against intolerance and those speaking daily against government, have they been penalised or faced any consequences? Even a person like (Arvind) Kejriwal calls the PM a ‘psychopath’, ‘coward’, ‘liar’. This is in bad taste, but nobody has taken any action against him... What intolerance is there? I can’t understand. पूर्ण मुलाखत खालील दुव्यावर वाचा http://www.hindustantimes.com/india/strike-down-misuse-not-sedition-law-former-attorney-general-sorabjee/story-cnWjKkvGIjHGpJ58i3OKcP.html

छान माहीती.
स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षाचे राज्य संपले आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारने, १९५० पासून तयार झालेले कलम १२४A चे सरकारद्रोह हे स्वरूप कधी आपल्या फायद्यासाठी तर कधी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी तर कधी देशहितासाठी वापरण्याचा प्रयत्न केला.
आजच्या मटातील 'धावते जग' सदरात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी असेच काही म्हटले आहे.

एस 27/02/2016 - 20:49
मत मांडण्याऐवजी जास्त भर हा तथ्ये व घटनांचे विश्लेषण करण्यावर दिल्यामुळे तुमच्या लेखमालेला निश्चितच वजन प्राप्त झाले आहे. पुभाप्र.

In reply to by एस

पगला गजोधर 29/02/2016 - 14:56
तथ्ये व घटनांचे विश्लेषण करण्यावर दिल्यामुळे तुमच्या लेखमालेला निश्चितच वजन प्राप्त झाले आहे. पुभाप्र.
१००००००००००००००००००००००००००००+

आरोह 27/02/2016 - 21:12
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे साहेब? देशाविरुद्ध घोषणा हे समर्थनीय आहे असे सांगायचे आहे का तुम्हाला? मग सांगा एका वाक्यात.त्यासाठी एव्हडे शब्दांचे बुडबुडे कशासाठी? भारतीय दंडसाहित, जागतिक दंडसाहित, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उद्या तुमचा बंड्या शेजारच्या काकांचे गुणगान गाऊन तुम्हाला शिव्या घायाला लागला तर?..कंमोन्सेन्स,लॉजिक काही वापराचे आहे कि नाही. तुम्हाला पण intellectual,पुरोगामी ह्या पदव्या हव्यात काय?

नेत्रेश 27/02/2016 - 22:26
> "उद्या तुमचा बंड्या शेजारच्या काकांचे गुणगान गाऊन तुम्हाला शिव्या घायाला लागला तर?.." तर काय? बंड्याला 'बापद्रोहाच्या' आरोपाखाली तुरुंगात टाकणार? की घरातुन हाकलुन देणार (घर वडीलोपार्जीत असेल, किंवा बंड्या लहान असेल तर तेही करता येणार नाही) न्यायालये ही कॉमनसेन्स वर चालत नाहीत, कायद्यावर चालतात. तेच कायदे, त्यांचा उगम, त्याची कारणे आपल्याला समजतील अशा सोप्या भाषेत मोरे सर सांगत आहेत. मोरेसर, अत्यंत माहीतीपुर्ण लेखमाला. धन्यवाद.

In reply to by नेत्रेश

आनन्दा 28/02/2016 - 15:35
तर काय? बंड्याला 'बापद्रोहाच्या' आरोपाखाली तुरुंगात टाकणार? की घरातुन हाकलुन देणार (घर वडीलोपार्जीत असेल, किंवा बंड्या लहान असेल तर तेही करता येणार नाही)
हे दोनच उपाय आहेत का? बंड्याच्या कानाखाली वाजवणे हा पण एक उपाय आहे, आणि मला खात्री आहे कोणताही बाप हा अधिकार नक्कीच वापरेल.

In reply to by नेत्रेश

बंड्या १) शेजारचे काका झिंदाबाद २) आपला बाप मुर्दाबाद ३) वरील १ व २ अशा तीन प्रकारात काय अन्वयार्थ काढायचा असा प्रश्न आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

तर्राट जोकर 29/02/2016 - 13:40
बाप आणि बंड्या हे उदाहरणच चुकतंय. इथे बाप कोण आणि बंड्या कोण हेच ठरत नाही अजून. हे उदाहरण देणारे देशभक्त स्वतःला बाप समजतायत आणि देशद्रोही घोषणा देणार्‍यांना बंड्या. लॉजिक चुकतंय असं कुणालाच वाटत नाही. भारतीय संस्कृतीत मुलांना आपली संपत्ती समजल्या जाते तेच इथं दिसतंय. देश हा बाप, त्याचे देशवासी ही त्याची मुले हे ते लॉजिक. देशद्रोह्यांना दंड देण्याचा मनमानी अधिकार हवा असल्याकारणाने हे उदाहरण निखालसपणे पसरवलं जातंय. आता देश म्हणजेच देशवासी, स्वतःच स्वतःची मुले कशी? इथे सगळेच बंड्या आहेत, बाप कोणीही नाही. बंड्यांचा कळप आहे. काही बंडे बंड करत आहेत, त्यांना वेगळा कळप आणि वेगळी जागा पाहिजे. त्यांना समजवावं की संपवावं ह्याबद्दल उरलेल्या बंड्यांमधे वाद चालु आहे. संपवाबंड्यांच्या लेखी समजबंडे हे बंडखोर बंड्यांच्या सोबत आहेत असे समजतायत. समजबंडे हे बंडखोरांना आपल्यात ठेवून कळप आणि जागा फुटण्याचा धोका टाळण्यासाठी आग्रही आहेत. संपवबंडे बंडखोरांना ठेचून कळप आणि जागा धोक्यात टाकतायत. परिस्थिती उन्मादाच्या भरात बिघडत जाईल. कोण बंडखोर आणि कोण कळपबंडे कळणार नाही. एक दिवस कळपच राहणार नाही अशाने. खुलासा: इथे समजबंडे म्हणजे डावे नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

इथे सगळेच बंड्या आहेत, बाप कोणीही नाही
इथे सरकार ही खाजगी मालमत्ता व तिच्यावर फक्त आमचाच अधिकार आहे असे वाटणारे असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?

आरोह 28/02/2016 - 01:18
मग त्या बंड्याचे काय करायचे? कि ह्या बापद्रोह बद्दल त्याचा सत्कार करायचा? न्यायालये कॉमन्सन्सवर चालत नाहीत ..कायद्यावर चालतात आणि त्यांनीच अफजल ला फाशी दिली का दिली फाशी? उगाच दिली का? याकुब, अफजल जर कोणाचे हिरो असू शकतात तर त्या लोकांकडे तुम्ही कशा नजरेने बघणार? कसाब ला पण घ्या बरोबर आणि ह्या सगळ्यांना विरोध करणाऱ्यांना कायदेशीर तत्वज्ञानाचे डोस पाजयचे. सादया सरळ गोष्टींचा किस पाडत राहायचे..

In reply to by आरोह

कपिलमुनी 28/02/2016 - 07:09
समर्थनीय नाही. बंड्याचे समर्थन नाही पण बंड्याच न्यायालयात गेला तर बापाला बंड्याचे हक्क द्यावे लागतात . मग बाप किंवा बंड्याच पेक्षा कायदा काय म्हणतो ते अशा प्रसंगी महत्वाचा ठरते.तिथे त्या घोषणा कायदेशीर ठरल्या तर ? ( पूर्वी तसा झाला आहे)

आरोह 28/02/2016 - 14:48
उद्या न्यायालयाने सांगितले कि बाबारे घाला देशाला शिव्या तो तुमचा हक्क आहे. तुम्ही काही गुन्हा केलेला नाही. मग काय होईल.. असो, देशाला शिव्या घालणे वेगळे आणि सरकारला वेगळे. देशाला शिव्या घालणे हे चूक कि बरोबर इतका साधा प्रश्न आहे, लेखन मुद्दे सून आहे , लेख माहितीपूर्ण आहे हे सगळे ठीक पण नक्की त्याचा उद्देश काय आहे? समर्थनीय आहे कि असमर्थनीय? हा तो प्रश्न आहे. सरकारला विरोध करायला कोणी रोखलाय?

"व्यक्ती/पक्ष/संस्थेला शिव्याशाप देणे" आणि "देशाचे विभाजन करण्याच्या, देशाला बरबाद करण्याच्या, न्यायव्यवस्था खुनी आहे, अश्या घोषणा देणे" या दोन्हीत जमीन-अस्मानाचा फरक आहे, हेच समजत नसेल किंवा समजून घ्यायचे नसेल किंवा मान्य नसेल तर मग... ते एक वाक्यात सांगितले काय आणि शब्दांची महाप्रचंड उतरंड मांडून त्यावरून फसवत घसरत तिथपर्यंत नेलं काय, मुद्दलात काहीच फरक नसतो... पण कृतीत, कृतीमागच्या भावनेत आणि अंतिम परिणामात जमीन-अस्मानाचा फरक असतो !

आरोह 28/02/2016 - 16:11
फरक असतो ना,intelectuals हि पदवी मिळते. गरीब बिचार्या लोंकाना (कोकरांना !)काय वाटत, वा वा काय मुद्देसूद, विचारात सुस्पष्टतात(?),माहितीपूर्ण, लेखन..आणि काय काय..

आरोह 28/02/2016 - 16:39
तुमच्यासाठी नाही ते..तुम्ही काहीतरी ह्याच्यापेक्षा सोप्या गोष्टी वाचा.. उगाच हा पण dose जास्त होईल तुम्हाला

सुबोध खरे 28/02/2016 - 18:42
भारताचे महाधिवक्ता श्री सोली सोराबजी यांचे या विषयाबद्दलचे मत खाली वाचा There are reports about ‘anti-India slogans’ such as “Bharat ki barbaadi tak’ in JNU Who said it? When did he say it? It has to be established in a court of law. Mind you, you must make allowance in the context, circumstances. Apna country mein toh (In our country,) everyone says so and so zindabad, murdabad. Take it in context. Don’t be hyper-sensitive. But if it goes to that nature where someone says cut India into pieces... that certainly would amount to sedition. There is a feeling that freedom of expression is under siege in the country. What is your view? Who prevented the citizens from criticising the government? Those who have criticised the government have they been put in jail as was done during the Emergency? Tell me, those who returned awards against intolerance and those speaking daily against government, have they been penalised or faced any consequences? Even a person like (Arvind) Kejriwal calls the PM a ‘psychopath’, ‘coward’, ‘liar’. This is in bad taste, but nobody has taken any action against him... What intolerance is there? I can’t understand. पूर्ण मुलाखत खालील दुव्यावर वाचा http://www.hindustantimes.com/india/strike-down-misuse-not-sedition-law-former-attorney-general-sorabjee/story-cnWjKkvGIjHGpJ58i3OKcP.html

छान माहीती.
स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षाचे राज्य संपले आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारने, १९५० पासून तयार झालेले कलम १२४A चे सरकारद्रोह हे स्वरूप कधी आपल्या फायद्यासाठी तर कधी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी तर कधी देशहितासाठी वापरण्याचा प्रयत्न केला.
आजच्या मटातील 'धावते जग' सदरात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी असेच काही म्हटले आहे.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ -------------------------------------- पर्शियन ऐवजी इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर व्हावा या मागणीचे खंदे समर्थक, इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचा आणि इंग्रजी भाषेतून शिक्षणाचा पाया घातल्याने भारतात कुप्रसिद्ध झालेल्या मेकॉले साहेबांनी Indian Penal Code म्हणजे भारतीय दंड संहितेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)

Anand More ·

वाचतो आहे. गेल्या भागात भारताचं स्वातंत्र्य, तत्कालीन संस्थानांचं विलिनीकरण आणि राज्यघटना लिहिणं ही सगळी आवश्यक पार्श्वभूमीची बैठक चांगली जमलेली आहे. लिहीत राहा.

बोका-ए-आझम 26/02/2016 - 09:24
एकच सुधारणा सुचवू इच्छितो - नियोजन मंडळ किंवा Planning Commission हे राज्यघटनेने बनवलेलं नाही. वित्तमंडळ किंवा Finance Commission हे बनवलेलं आहे. नियोजन मंडळ जर घटनेने बनवलं असतं तर नीती आयोगाची स्थापनाच होऊ शकली नसती.

In reply to by बोका-ए-आझम

एस 26/02/2016 - 10:12
हेच म्हणायला आलो होतो. १५ मार्च १९५० रोजी नियोजन मंडळाची स्थापना झाली. त्यामागे पं. नेहरूंवर सोविएत महासंघातील संबंधित प्रणालीचा पडलेला प्रभाव कारणीभूत होता. अर्थात, अशा नियोजन मंडळाची वा आयोगाची कल्पना सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना डॉ. साहांच्या पुढाकारातून अस्तित्त्वात आली होती. अगदी तत्कालीन ब्रिटिश सरकारनेही दोनवेळा नियोजन मंडळ स्थापन केले होते. या सर्व स्वातंत्र्यपूर्व घटनांचीही पार्श्वभूमी याला होती.

पगला गजोधर 26/02/2016 - 09:36
मोरेसर अतिशय सुंदर लेखमाला आहे…. तुमची ही लेखमाला, 'मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?', याचं मिसळपाववरील उत्कृष्ठ उदाहरण आहे. तुमच्या लक्षात, एक गोष्ट आलीय का, आत्तापर्यंत ? तुमच्या लेखावर प्रतिक्रिया हळू हळू कमी होत चालल्यात … जसे जसे तुम्ही, साध्या शब्दात, मुद्देसूदपणे, तत्कालीन पंतप्रधान नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, यांच्या निर्णय व कामगिरीचा तार्किक उहापोह केला, त्यामुळे कितीतरी कंपूबाज भक्तांची निराशा झाली असावी, कारण तुमच्या लेखातून त्यांच्यावर कुजबुज आरोप करण्याची संधी काही त्याना फारशी मिळाली नसावी. सरदार पटेल विरुद्ध नेहरू, महात्मा गांधी विरुद्ध डॉ आंबेडकर, अशी झुंज लावण्यासाठी मसाला सुद्धा , तुमच्या या लेखमालिकेतून त्यांना मिळत नसावा… असो, मला मात्र तुमची ही लेखमाला खरंच आवडली. असेच लिहित रहा.

In reply to by पगला गजोधर

प्रत्येक ठिकाणी भक्त आणि बाकीचे असे वर्गीकरण करायची कावीळ झाली कि काय होते त्याचे उदाहरण म्हणजे तुमची प्रतिक्रिया! लेखमाला चांगली आहेच आणि म्हणूनच सगळे नीट वाचून प्रतिक्रिया देतायत. नको तिथे चिखलात दगड मारायची तुम्हाला हौस आहे का हो?

बोका-ए-आझम 26/02/2016 - 10:15
लेख कधी टाकलाय ते बघा. किती वाचनं झाली आहेत ते बघा. प्रतिक्रिया जास्त म्हणजे लेखाचा दर्जा जास्त असं होत नाही हे चुकीचं गृहीतक आहे हे मी तुम्हाला एवढी छान ' खुशबू ' नावाची कादंबरी लिहिल्यानंतर सांगावं म्हणजे जरा जास्तच होतंय असं नाही तुम्हाला वाटत? अभिव्यक्तीस्वातंत्र्यात प्रतिक्रिया न देण्याचंही स्वातंत्र्य आहे. ते काही लोक उपभोगताहेत. काय फरक पडतो?

In reply to by बोका-ए-आझम

पगला गजोधर 26/02/2016 - 10:51
तुमच्यासारखे प्रतिक्रीया देवून, लेखामधे वँल्युअँड करणारे, फार कमी लोकं आहेत. तुम्हाला वा तुमच्यासारख्या चांगल्या वाचकांना गृहीत ठेवून, माझी वरची प्रतिक्रिया नव्हती. असो, अभिव्यक्तीस्वातंत्र्यात प्रतिक्रिया न देण्याचंही स्वातंत्र्य आहे. हे मला मान्य आहे. उदा. नेहरुजींची प्रतिमा लेखातून उजळ होतीये, असा संशय, काहींना आला, की लगेच नेहरू व लेडी माउंटबँटन, याविषयी कुजबुजी पिंका टाकून त्यांचे प्रतिक्रिया देण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काहींनी लगेच व्यक्तही केले… सदर लेखं भारताविषयी आहे, याची जाणीव करून दिल्यावर, आपला तेव्हडा अभ्यास नाही, याविषयीचा साक्षात्कार पण त्यांना झाला. अश्या लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याआड, मौन धारण केले आहे काय ? अशी शंका मनाला स्पर्शून गेली. प्रतिक्रियांची संख्या व लेखाचा दर्जा, याचा परस्पर संबंध, प्रत्येक वेळी असतोच, असा काही नियम नाही, हेही मान्य. मी फक्त मोरेसरांच्या लेख क्र १ ते आता, प्रतिक्रिया संख्या कमी जास्त असतील, पण त्यांचा एकंदरीत ट्रेंड उतरता मला भासला, म्हणून मी प्रतिक्रिया व तिच्यामागील माझे गटफिलिंग दिले. मी चूकही असू शकतो, याची मला कल्पना आहे.

In reply to by बोका-ए-आझम

आनन्दा 26/02/2016 - 11:00
जाऊद्या हो. ते त्यांच्या चश्म्यातून बघतायत.. तटस्थता म्हणजे काय हे त्यांना देखील माहीत नाही.. किंवा अनेक दिवस विरोधी मते मांडून ते पूर्ण पणे विरोधी पक्षात गेलेत. त्यांना बहुधा हे माहीत नसावे की मिपावर तटस्थ लेखनाचा नेहमीच पुरस्कार होतो. हे म्हणजे आपण वादग्रस्त विधाने करायची आणि लोक अंगावर आले की हे बघा कसे अंगावर येतात असे ओरडायचे. असो. त्यांच्यामुळे लेखाचे गांभीर्य उगीच कमी होत जाते. मोरे सर - लेखमाला वाचत आहे. आता हे सगळे जनेयु ला कसे अ‍ॅप्लाय होते हे पाहण्याची उत्सुकता आहे.

[अवांतर : देशासाठी झटलेली तेव्हाची काँग्रेस ही कधीच विसर्जित झाली आहे,त्या काँग्रेसमध्ये डावे-उजवे-कम्युनिस्ट सगळ्या प्रकारचे लोक होते. आताच्या काँग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.(हे माझे मत अवांतर आहे,तरीही मांडावेसे वाटले)] बाकि लेख छान आहे.

सुधीर१३७ 29/02/2016 - 19:27
१६ डिसेंबर १९४ ला नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. १६ डिसेंबर १९४ असे हवे.

विकास 29/02/2016 - 21:51
सर्व प्रथम माझे मत - देशाचे तुकडे करण्याची भाषा आक्षेपार्ह आहे आणि त्याला विरोध करण्यात काही गैर नाही, जर प्रकरण गंभीर आहे हे सिद्ध होऊ शकले (उदा अतिरेकी संबंध, घातपाताचे प्लॅन्स वगैरे) तर कायद्याने योग्य नियंत्रण आणण्यात पण काही गैर नाही ... मात्र याचा अर्थ भाषण स्वातंत्र्याला मर्यादा आणणे मला व्यक्तीगतरीत्या मान्य नाही. मात्र आत्ता जे काही चालले आहे त्यातला उद्देश साधा आहे, प्रस्थापित सरकारला नावे ठेवणे आणि सातत्याने बदनामी करणे. मंथरा जशी सतत कैकयीचे ब्रेनवॉशिंग करत होती तसे सध्या सामान्यांचे ब्रेनवॉशिंग करणे चालू आहे. यात सामान्यांना कैकयी म्हणण्याचा उद्देश नाही कारण ते ब्रेन वॉशिंग करून घेण्यास तयार नाहीत ;) पण माध्यमे आणि तथाकथीत विचारवंतांना मात्र मंथरा म्हणावेसे वाटत आहे. याचे अजून एक कारण म्हणजे ९ डिसेंबर २०१२ चा तेहलका मधील वृत्तांत...

Democratic protest. 8,000 Sedition cases. Is this a free country?

ऑ? तेहलकाचे आभार की त्यांनी यावर लेख लिहीला पण कोणत्याच माध्यमांनी आणि विचारवंतांनी आवाज उठवल्याचे आठवत नाही... आवार्ड वापसी झाली का या बिचार्‍या ८००० साठी? त्यांच्यावरील केस चे काय झाले? हे असे क्से? का फक्त जे एन यु मधे झाले तरच टॉलरन्स खतरेमे अशी बोंब ठोकायची?

In reply to by विकास

तर्राट जोकर 29/02/2016 - 22:23
ह्या व्हाटअबाउटरीच्या रोगाचं लौकर काहीतरी करा ब्वा.

In reply to by तर्राट जोकर

विकास 01/03/2016 - 02:32
बोली भाषेत लिवा की जरा... जे एन यु च्या विद्यार्थांच्या संदर्भात कोर्टात केस आहे. मला खात्री आहे की उद्यापर्यंत कन्हैया बाहेर येईल. तेच ऑलमोस्ट पण नक्की किती वेळात ते माहीत नाही पण उमर आदी च्या बाबतीत देखील होईल. ते जाउंदेत पण त्यासाठी तमाशा करत तमाम भारतीय जनतेची संसद ओलीस धरली आहे. ती देखील अशांनी की जे सत्तेत असताना ८००० सामान्यांवर देशद्रोहाचा आरोप केला होता. कोणी बोलले नाही कारण ते बिचारे त्यांच्या मागण्यासाठी लढत होते, देश फोडायची अथवा दहशतवाद्याच्या हैतात्म्याबद्दल लढत नव्हते...

In reply to by तर्राट जोकर

विकास 01/03/2016 - 17:55
आजचे सत्ताधारी काय करत होते? असं कसं म्हणता साहेब? कानफाट्या तो कानफाट्या! अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना! त्या व्यक्तीस्वातंत्र्याचा लोप झाल्याबद्दलच तर स्वातंत्र्याचे रखवाले त्यांच्यानावाने जाहीर निषेध करत आणि वाण वाटत हिंडत आहेत ना! पण आज जे सहीष्णू आणि स्वातंत्र्याचे रखवाले आहेत, ते त्यावेळेस मुग गिळून का बसले होते हा प्रश्न आहे.

In reply to by विकास

तर्राट जोकर 01/03/2016 - 20:10
असं कसं असं कसं? म्हणजे सत्ताधार्‍यांना कुठलाच प्रश्न विचारु नये असेच सुचवत आहात ना वेगळ्या शब्दात? तेही तर्कहिन शब्दबंबाळ वाक्य लिहून. आपल्यावर आले की कोपर्‍यात दडायचे. दुसरीकडे बोट दाखवायची सवय कधी जाईल एवढेच विचारले, त्यालाच व्हाटअबाउटरी म्हणतात.

In reply to by तर्राट जोकर

विकास 02/03/2016 - 00:23
कोपर्‍यात दडलो नाही, तुम्हाला कॉर्नर करत आहे... :) सत्ताधार्‍यांना प्रश्न विचाराना! सरकार आपलंच तर आहे! आपला पहीला हक्क! पण आत्तापर्यंत विचारले नाहीत असे म्हणायचे आहे का? बरं माझा मुद्दा परत सांगतो. या सरकारला १२४अ कलम वापरणे योग्य वाटले, ते योग्य न वाटल्याने त्यांच्यावर टिका झाली. आता आधीच्या सरकारने पण १२४ अ वापरले. जे आत्ता वापरतात त्यांना त्यात काय अयोग्य वाटणार? पण जे आत्ता त्याला विरोध करतात त्यांचा त्यावेळेस देखील विरोध असायलाच हवा ना? मग मुग गिळून का बसलात? ते सरकार देखील चूक होते इतके तरी किमान म्हणायची तयारी आहे का?

In reply to by विकास

तर्राट जोकर 02/03/2016 - 00:34
आता आधीच्या सरकारने पण १२४ अ वापरले. जे आत्ता वापरतात त्यांना त्यात काय अयोग्य वाटणार? >> हे जनतेची काळजी करणारे भाजपाचे लोक यांना तेव्हा का वाटले नाही हा प्रश्न विचारायचा नाही? फक्त त्यांनीच प्रश्न विचारायचे? साठ वर्षात काय केले, साठ वर्षात काय केले म्हणून कंठशोष करण्यात पाच वर्ष घालवणार काय? आपली जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून येत नसते. पण जे आत्ता त्याला विरोध करतात त्यांचा त्यावेळेस देखील विरोध असायलाच हवा ना? मग मुग गिळून का बसलात? ते सरकार देखील चूक होते इतके तरी किमान म्हणायची तयारी आहे का? >> त्या वेळेस का मूग गिळुन बसलात हा प्रश्न विचारणे म्हणजेच मुळ मुद्द्यावरुन शिताफीने लक्ष वळवुन भलतीकडे संभ्रम निर्माण करणे. दोन बाबींमधे फक्त १२४अचा मुद्दा समान आहे म्हणुन तुम्ही कॉर्नर करु जाताय. फसाल बरं स्वतःच. तुम्ही मला कॉर्नर करु शकत नाही. विसरा. सरकारची बाजू तुम्ही इथे ती अधिकृतपणे मांडत आहात काय? तसे असेल तर माझा पेटारा मी उघडेन. मग कुठलाच कॉर्नर तुम्हालाच सापडायचा नाही.

In reply to by तर्राट जोकर

विकास 02/03/2016 - 01:44
तुम्ही मला कॉर्नर करु शकत नाही. गोलगोल फिरता आहात म्हणून कॉर्नर नाही असे वाटते आहे.... मुळ मुद्द्यावरुन शिताफीने लक्ष वळवुन मुळ मुद्याबद्दल बोललोय की अभ्यास करा म्हणजे समजेल. तरी देखील नवनीत मार्गदर्शकासारखे थोडक्यात समजवायचा प्रयत्न करतो. आता हे ज्ञानरुपी जल आपल्याला लाभेल अशी आशा आहे. निराशा झाल्यास वेडी आशा होती असे म्हणेन... :)
  1. मला व्यक्तीस्वातंत्र्यावर मर्यादा आणलेल्या आवडत नाहीत
  2. पण स्वातंत्याबरोबर जबाबदारी देखील येते. त्यामुळे या संदर्भात जर देशाचे तुकडे करण्याची भाषा ज्याने कोणी केली असेल त्याला समज मिळेल इतकी शिक्षा झाल्यास आश्चर्य वाटायला नको की अन्याय्य वाटायला नको.
  3. मला असे वाटते आहे की कन्हैय्याच्या बाबतीत पोलीस सिद्ध करू शकणार नाहीत आणि कोर्ट त्याला बाइज्जत मोकळे करेल. (बघुयात, घोडा-मैदान जवळ आहे)
  4. उमर आणि इतरांच्या बाबतीत मात्र कदाचीत किमान समज देण्यापर्यंत कोर्ट जाऊ शकेल. मात्र त्याबाबतीत स्वयंघोषित विचारवंत आणि तथाकथीत निधर्मी हे ह्या न्यायाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू लागतील.
  5. आता १२४ अ हे दिल्ली पोलीसांनी पक्षि गृहमंत्रालयाच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनुमतीने ज्या काही घोषणा दिसल्या त्यामुळे लावले. पण मला वाटते तसे हैदराबाद विद्यापिठातील विद्यार्थ्यांना अफझलवरून गळा काढला तरी लावले गेले नव्हते.
  6. जर सरकारने हे कलम उठसुठ लावले अथवा इतर कुठल्याही पद्धतीने व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला तर त्याचा निषेधच आहे आणि तसा तो करेन देखील. पण या सरकारच्या बाबतीत जितके बोलले गेले आहे त्यावरून भारतात व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असे केवळ एखादा द्वेषाच्या नशेतलाच म्हणू शकेल.
सरकारची बाजू तुम्ही इथे ती अधिकृतपणे मांडत आहात काय? अधिकृत शब्दाचा अर्थ मला वाटते विंग्रजीत Official असा आहे अर्थात जो (या संदर्भात) सरकारचे घटनेनुसार प्रतिनिधित्व करतो अशांसाठी आहे. मी त्या वर्गात मोडत नाही...मै तो एक आम आदमी हूं! (पण "त्यातला' नाही!) :) तसे असेल तर माझा पेटारा मी उघडेन. मग कुठलाच कॉर्नर तुम्हालाच सापडायचा नाही. अहो नि:संकोच उघडा! असे लाजायचे कारण ते काय? तेव्हढे मिपाच्या अधिकृत धोरणात बसते आहे ना तितके बघा, म्हणजे झालं!

In reply to by विकास

तर्राट जोकर 02/03/2016 - 09:52
गोलगोल फिरता आहात म्हणून कॉर्नर नाही असे वाटते आहे.... >> गोल गोल तर तुम्हीच फिरत आहात. मी सरळ विचारले आता सत्तेत असणार्‍यांना हा आठ हजारांवर झालेला अन्याय अन्याय वाटत नाही का? तेव्हा ते काय करत होते? ह्या प्रश्नाचा आताच्या कन्हया प्रश्नाशी न जोडता स्वतंत्र उत्तर द्या.

In reply to by तर्राट जोकर

विकास 02/03/2016 - 21:39
अहो मला वाटले तुम्ही विचारवंत आहात. इथे काय आपले उगाच सर्कसच्या रिंगणात फिरल्यासारखे चालले आहे? ;) तुम्ही विचारत आहातः तेव्हा ते काय करत होते?. त्याला उत्तर म्हणून, आधी लिहीलेले परत चिकटवतो:
अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना!
म्हणजे तेंव्हा देखील त्यांना (म्हणजे आत्ताच्या सरकारपक्षाला) गळचेपी मान्यच होती असे मी समजतो. ;) पण तुम्हाला आणि तुमच्यासारख्या विचारवंतांना ती गळचेपी मान्य होती का ह प्रश्न आहे. आता निरुत्तर झाल्याने उत्तर देता येत नसेल तर राहूंदेत. भोंदूपणा हा केवळ धार्मिकतेचे बुरखे पांघरणारे बुवाबाबाच करतात असे नाही तर निधर्मतेचे बुरखे घालणारे विचारवंत देखील करतात झालं!

In reply to by विकास

तर्राट जोकर 02/03/2016 - 21:45
अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना! >> हे तुम्ही कबूल केले आहे काय? कबूल केले असेल तर मग दुसर्‍याला प्रश्न विचारण्याचा अधिकार उरत नाही. दॅट्स इट. उगा निरुत्तर केल्याचे इमले कशापाई बांधायचे?

अर्धवटराव 02/03/2016 - 04:43
टायटलमधले ते जे.एन.यु., राष्ट्रवाद वगैरे शब्द वाचुन हा धागा उघडलाच नव्हता. छान माहिती मिळते आहे. अवांतरः इथेही खरुज काढलीच पब्लीकने. चालायचच.

वाचतो आहे. गेल्या भागात भारताचं स्वातंत्र्य, तत्कालीन संस्थानांचं विलिनीकरण आणि राज्यघटना लिहिणं ही सगळी आवश्यक पार्श्वभूमीची बैठक चांगली जमलेली आहे. लिहीत राहा.

बोका-ए-आझम 26/02/2016 - 09:24
एकच सुधारणा सुचवू इच्छितो - नियोजन मंडळ किंवा Planning Commission हे राज्यघटनेने बनवलेलं नाही. वित्तमंडळ किंवा Finance Commission हे बनवलेलं आहे. नियोजन मंडळ जर घटनेने बनवलं असतं तर नीती आयोगाची स्थापनाच होऊ शकली नसती.

In reply to by बोका-ए-आझम

एस 26/02/2016 - 10:12
हेच म्हणायला आलो होतो. १५ मार्च १९५० रोजी नियोजन मंडळाची स्थापना झाली. त्यामागे पं. नेहरूंवर सोविएत महासंघातील संबंधित प्रणालीचा पडलेला प्रभाव कारणीभूत होता. अर्थात, अशा नियोजन मंडळाची वा आयोगाची कल्पना सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना डॉ. साहांच्या पुढाकारातून अस्तित्त्वात आली होती. अगदी तत्कालीन ब्रिटिश सरकारनेही दोनवेळा नियोजन मंडळ स्थापन केले होते. या सर्व स्वातंत्र्यपूर्व घटनांचीही पार्श्वभूमी याला होती.

पगला गजोधर 26/02/2016 - 09:36
मोरेसर अतिशय सुंदर लेखमाला आहे…. तुमची ही लेखमाला, 'मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?', याचं मिसळपाववरील उत्कृष्ठ उदाहरण आहे. तुमच्या लक्षात, एक गोष्ट आलीय का, आत्तापर्यंत ? तुमच्या लेखावर प्रतिक्रिया हळू हळू कमी होत चालल्यात … जसे जसे तुम्ही, साध्या शब्दात, मुद्देसूदपणे, तत्कालीन पंतप्रधान नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, यांच्या निर्णय व कामगिरीचा तार्किक उहापोह केला, त्यामुळे कितीतरी कंपूबाज भक्तांची निराशा झाली असावी, कारण तुमच्या लेखातून त्यांच्यावर कुजबुज आरोप करण्याची संधी काही त्याना फारशी मिळाली नसावी. सरदार पटेल विरुद्ध नेहरू, महात्मा गांधी विरुद्ध डॉ आंबेडकर, अशी झुंज लावण्यासाठी मसाला सुद्धा , तुमच्या या लेखमालिकेतून त्यांना मिळत नसावा… असो, मला मात्र तुमची ही लेखमाला खरंच आवडली. असेच लिहित रहा.

In reply to by पगला गजोधर

प्रत्येक ठिकाणी भक्त आणि बाकीचे असे वर्गीकरण करायची कावीळ झाली कि काय होते त्याचे उदाहरण म्हणजे तुमची प्रतिक्रिया! लेखमाला चांगली आहेच आणि म्हणूनच सगळे नीट वाचून प्रतिक्रिया देतायत. नको तिथे चिखलात दगड मारायची तुम्हाला हौस आहे का हो?

बोका-ए-आझम 26/02/2016 - 10:15
लेख कधी टाकलाय ते बघा. किती वाचनं झाली आहेत ते बघा. प्रतिक्रिया जास्त म्हणजे लेखाचा दर्जा जास्त असं होत नाही हे चुकीचं गृहीतक आहे हे मी तुम्हाला एवढी छान ' खुशबू ' नावाची कादंबरी लिहिल्यानंतर सांगावं म्हणजे जरा जास्तच होतंय असं नाही तुम्हाला वाटत? अभिव्यक्तीस्वातंत्र्यात प्रतिक्रिया न देण्याचंही स्वातंत्र्य आहे. ते काही लोक उपभोगताहेत. काय फरक पडतो?

In reply to by बोका-ए-आझम

पगला गजोधर 26/02/2016 - 10:51
तुमच्यासारखे प्रतिक्रीया देवून, लेखामधे वँल्युअँड करणारे, फार कमी लोकं आहेत. तुम्हाला वा तुमच्यासारख्या चांगल्या वाचकांना गृहीत ठेवून, माझी वरची प्रतिक्रिया नव्हती. असो, अभिव्यक्तीस्वातंत्र्यात प्रतिक्रिया न देण्याचंही स्वातंत्र्य आहे. हे मला मान्य आहे. उदा. नेहरुजींची प्रतिमा लेखातून उजळ होतीये, असा संशय, काहींना आला, की लगेच नेहरू व लेडी माउंटबँटन, याविषयी कुजबुजी पिंका टाकून त्यांचे प्रतिक्रिया देण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काहींनी लगेच व्यक्तही केले… सदर लेखं भारताविषयी आहे, याची जाणीव करून दिल्यावर, आपला तेव्हडा अभ्यास नाही, याविषयीचा साक्षात्कार पण त्यांना झाला. अश्या लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याआड, मौन धारण केले आहे काय ? अशी शंका मनाला स्पर्शून गेली. प्रतिक्रियांची संख्या व लेखाचा दर्जा, याचा परस्पर संबंध, प्रत्येक वेळी असतोच, असा काही नियम नाही, हेही मान्य. मी फक्त मोरेसरांच्या लेख क्र १ ते आता, प्रतिक्रिया संख्या कमी जास्त असतील, पण त्यांचा एकंदरीत ट्रेंड उतरता मला भासला, म्हणून मी प्रतिक्रिया व तिच्यामागील माझे गटफिलिंग दिले. मी चूकही असू शकतो, याची मला कल्पना आहे.

In reply to by बोका-ए-आझम

आनन्दा 26/02/2016 - 11:00
जाऊद्या हो. ते त्यांच्या चश्म्यातून बघतायत.. तटस्थता म्हणजे काय हे त्यांना देखील माहीत नाही.. किंवा अनेक दिवस विरोधी मते मांडून ते पूर्ण पणे विरोधी पक्षात गेलेत. त्यांना बहुधा हे माहीत नसावे की मिपावर तटस्थ लेखनाचा नेहमीच पुरस्कार होतो. हे म्हणजे आपण वादग्रस्त विधाने करायची आणि लोक अंगावर आले की हे बघा कसे अंगावर येतात असे ओरडायचे. असो. त्यांच्यामुळे लेखाचे गांभीर्य उगीच कमी होत जाते. मोरे सर - लेखमाला वाचत आहे. आता हे सगळे जनेयु ला कसे अ‍ॅप्लाय होते हे पाहण्याची उत्सुकता आहे.

[अवांतर : देशासाठी झटलेली तेव्हाची काँग्रेस ही कधीच विसर्जित झाली आहे,त्या काँग्रेसमध्ये डावे-उजवे-कम्युनिस्ट सगळ्या प्रकारचे लोक होते. आताच्या काँग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.(हे माझे मत अवांतर आहे,तरीही मांडावेसे वाटले)] बाकि लेख छान आहे.

सुधीर१३७ 29/02/2016 - 19:27
१६ डिसेंबर १९४ ला नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. १६ डिसेंबर १९४ असे हवे.

विकास 29/02/2016 - 21:51
सर्व प्रथम माझे मत - देशाचे तुकडे करण्याची भाषा आक्षेपार्ह आहे आणि त्याला विरोध करण्यात काही गैर नाही, जर प्रकरण गंभीर आहे हे सिद्ध होऊ शकले (उदा अतिरेकी संबंध, घातपाताचे प्लॅन्स वगैरे) तर कायद्याने योग्य नियंत्रण आणण्यात पण काही गैर नाही ... मात्र याचा अर्थ भाषण स्वातंत्र्याला मर्यादा आणणे मला व्यक्तीगतरीत्या मान्य नाही. मात्र आत्ता जे काही चालले आहे त्यातला उद्देश साधा आहे, प्रस्थापित सरकारला नावे ठेवणे आणि सातत्याने बदनामी करणे. मंथरा जशी सतत कैकयीचे ब्रेनवॉशिंग करत होती तसे सध्या सामान्यांचे ब्रेनवॉशिंग करणे चालू आहे. यात सामान्यांना कैकयी म्हणण्याचा उद्देश नाही कारण ते ब्रेन वॉशिंग करून घेण्यास तयार नाहीत ;) पण माध्यमे आणि तथाकथीत विचारवंतांना मात्र मंथरा म्हणावेसे वाटत आहे. याचे अजून एक कारण म्हणजे ९ डिसेंबर २०१२ चा तेहलका मधील वृत्तांत...

Democratic protest. 8,000 Sedition cases. Is this a free country?

ऑ? तेहलकाचे आभार की त्यांनी यावर लेख लिहीला पण कोणत्याच माध्यमांनी आणि विचारवंतांनी आवाज उठवल्याचे आठवत नाही... आवार्ड वापसी झाली का या बिचार्‍या ८००० साठी? त्यांच्यावरील केस चे काय झाले? हे असे क्से? का फक्त जे एन यु मधे झाले तरच टॉलरन्स खतरेमे अशी बोंब ठोकायची?

In reply to by विकास

तर्राट जोकर 29/02/2016 - 22:23
ह्या व्हाटअबाउटरीच्या रोगाचं लौकर काहीतरी करा ब्वा.

In reply to by तर्राट जोकर

विकास 01/03/2016 - 02:32
बोली भाषेत लिवा की जरा... जे एन यु च्या विद्यार्थांच्या संदर्भात कोर्टात केस आहे. मला खात्री आहे की उद्यापर्यंत कन्हैया बाहेर येईल. तेच ऑलमोस्ट पण नक्की किती वेळात ते माहीत नाही पण उमर आदी च्या बाबतीत देखील होईल. ते जाउंदेत पण त्यासाठी तमाशा करत तमाम भारतीय जनतेची संसद ओलीस धरली आहे. ती देखील अशांनी की जे सत्तेत असताना ८००० सामान्यांवर देशद्रोहाचा आरोप केला होता. कोणी बोलले नाही कारण ते बिचारे त्यांच्या मागण्यासाठी लढत होते, देश फोडायची अथवा दहशतवाद्याच्या हैतात्म्याबद्दल लढत नव्हते...

In reply to by तर्राट जोकर

विकास 01/03/2016 - 17:55
आजचे सत्ताधारी काय करत होते? असं कसं म्हणता साहेब? कानफाट्या तो कानफाट्या! अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना! त्या व्यक्तीस्वातंत्र्याचा लोप झाल्याबद्दलच तर स्वातंत्र्याचे रखवाले त्यांच्यानावाने जाहीर निषेध करत आणि वाण वाटत हिंडत आहेत ना! पण आज जे सहीष्णू आणि स्वातंत्र्याचे रखवाले आहेत, ते त्यावेळेस मुग गिळून का बसले होते हा प्रश्न आहे.

In reply to by विकास

तर्राट जोकर 01/03/2016 - 20:10
असं कसं असं कसं? म्हणजे सत्ताधार्‍यांना कुठलाच प्रश्न विचारु नये असेच सुचवत आहात ना वेगळ्या शब्दात? तेही तर्कहिन शब्दबंबाळ वाक्य लिहून. आपल्यावर आले की कोपर्‍यात दडायचे. दुसरीकडे बोट दाखवायची सवय कधी जाईल एवढेच विचारले, त्यालाच व्हाटअबाउटरी म्हणतात.

In reply to by तर्राट जोकर

विकास 02/03/2016 - 00:23
कोपर्‍यात दडलो नाही, तुम्हाला कॉर्नर करत आहे... :) सत्ताधार्‍यांना प्रश्न विचाराना! सरकार आपलंच तर आहे! आपला पहीला हक्क! पण आत्तापर्यंत विचारले नाहीत असे म्हणायचे आहे का? बरं माझा मुद्दा परत सांगतो. या सरकारला १२४अ कलम वापरणे योग्य वाटले, ते योग्य न वाटल्याने त्यांच्यावर टिका झाली. आता आधीच्या सरकारने पण १२४ अ वापरले. जे आत्ता वापरतात त्यांना त्यात काय अयोग्य वाटणार? पण जे आत्ता त्याला विरोध करतात त्यांचा त्यावेळेस देखील विरोध असायलाच हवा ना? मग मुग गिळून का बसलात? ते सरकार देखील चूक होते इतके तरी किमान म्हणायची तयारी आहे का?

In reply to by विकास

तर्राट जोकर 02/03/2016 - 00:34
आता आधीच्या सरकारने पण १२४ अ वापरले. जे आत्ता वापरतात त्यांना त्यात काय अयोग्य वाटणार? >> हे जनतेची काळजी करणारे भाजपाचे लोक यांना तेव्हा का वाटले नाही हा प्रश्न विचारायचा नाही? फक्त त्यांनीच प्रश्न विचारायचे? साठ वर्षात काय केले, साठ वर्षात काय केले म्हणून कंठशोष करण्यात पाच वर्ष घालवणार काय? आपली जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून येत नसते. पण जे आत्ता त्याला विरोध करतात त्यांचा त्यावेळेस देखील विरोध असायलाच हवा ना? मग मुग गिळून का बसलात? ते सरकार देखील चूक होते इतके तरी किमान म्हणायची तयारी आहे का? >> त्या वेळेस का मूग गिळुन बसलात हा प्रश्न विचारणे म्हणजेच मुळ मुद्द्यावरुन शिताफीने लक्ष वळवुन भलतीकडे संभ्रम निर्माण करणे. दोन बाबींमधे फक्त १२४अचा मुद्दा समान आहे म्हणुन तुम्ही कॉर्नर करु जाताय. फसाल बरं स्वतःच. तुम्ही मला कॉर्नर करु शकत नाही. विसरा. सरकारची बाजू तुम्ही इथे ती अधिकृतपणे मांडत आहात काय? तसे असेल तर माझा पेटारा मी उघडेन. मग कुठलाच कॉर्नर तुम्हालाच सापडायचा नाही.

In reply to by तर्राट जोकर

विकास 02/03/2016 - 01:44
तुम्ही मला कॉर्नर करु शकत नाही. गोलगोल फिरता आहात म्हणून कॉर्नर नाही असे वाटते आहे.... मुळ मुद्द्यावरुन शिताफीने लक्ष वळवुन मुळ मुद्याबद्दल बोललोय की अभ्यास करा म्हणजे समजेल. तरी देखील नवनीत मार्गदर्शकासारखे थोडक्यात समजवायचा प्रयत्न करतो. आता हे ज्ञानरुपी जल आपल्याला लाभेल अशी आशा आहे. निराशा झाल्यास वेडी आशा होती असे म्हणेन... :)
  1. मला व्यक्तीस्वातंत्र्यावर मर्यादा आणलेल्या आवडत नाहीत
  2. पण स्वातंत्याबरोबर जबाबदारी देखील येते. त्यामुळे या संदर्भात जर देशाचे तुकडे करण्याची भाषा ज्याने कोणी केली असेल त्याला समज मिळेल इतकी शिक्षा झाल्यास आश्चर्य वाटायला नको की अन्याय्य वाटायला नको.
  3. मला असे वाटते आहे की कन्हैय्याच्या बाबतीत पोलीस सिद्ध करू शकणार नाहीत आणि कोर्ट त्याला बाइज्जत मोकळे करेल. (बघुयात, घोडा-मैदान जवळ आहे)
  4. उमर आणि इतरांच्या बाबतीत मात्र कदाचीत किमान समज देण्यापर्यंत कोर्ट जाऊ शकेल. मात्र त्याबाबतीत स्वयंघोषित विचारवंत आणि तथाकथीत निधर्मी हे ह्या न्यायाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू लागतील.
  5. आता १२४ अ हे दिल्ली पोलीसांनी पक्षि गृहमंत्रालयाच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनुमतीने ज्या काही घोषणा दिसल्या त्यामुळे लावले. पण मला वाटते तसे हैदराबाद विद्यापिठातील विद्यार्थ्यांना अफझलवरून गळा काढला तरी लावले गेले नव्हते.
  6. जर सरकारने हे कलम उठसुठ लावले अथवा इतर कुठल्याही पद्धतीने व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला तर त्याचा निषेधच आहे आणि तसा तो करेन देखील. पण या सरकारच्या बाबतीत जितके बोलले गेले आहे त्यावरून भारतात व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असे केवळ एखादा द्वेषाच्या नशेतलाच म्हणू शकेल.
सरकारची बाजू तुम्ही इथे ती अधिकृतपणे मांडत आहात काय? अधिकृत शब्दाचा अर्थ मला वाटते विंग्रजीत Official असा आहे अर्थात जो (या संदर्भात) सरकारचे घटनेनुसार प्रतिनिधित्व करतो अशांसाठी आहे. मी त्या वर्गात मोडत नाही...मै तो एक आम आदमी हूं! (पण "त्यातला' नाही!) :) तसे असेल तर माझा पेटारा मी उघडेन. मग कुठलाच कॉर्नर तुम्हालाच सापडायचा नाही. अहो नि:संकोच उघडा! असे लाजायचे कारण ते काय? तेव्हढे मिपाच्या अधिकृत धोरणात बसते आहे ना तितके बघा, म्हणजे झालं!

In reply to by विकास

तर्राट जोकर 02/03/2016 - 09:52
गोलगोल फिरता आहात म्हणून कॉर्नर नाही असे वाटते आहे.... >> गोल गोल तर तुम्हीच फिरत आहात. मी सरळ विचारले आता सत्तेत असणार्‍यांना हा आठ हजारांवर झालेला अन्याय अन्याय वाटत नाही का? तेव्हा ते काय करत होते? ह्या प्रश्नाचा आताच्या कन्हया प्रश्नाशी न जोडता स्वतंत्र उत्तर द्या.

In reply to by तर्राट जोकर

विकास 02/03/2016 - 21:39
अहो मला वाटले तुम्ही विचारवंत आहात. इथे काय आपले उगाच सर्कसच्या रिंगणात फिरल्यासारखे चालले आहे? ;) तुम्ही विचारत आहातः तेव्हा ते काय करत होते?. त्याला उत्तर म्हणून, आधी लिहीलेले परत चिकटवतो:
अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना!
म्हणजे तेंव्हा देखील त्यांना (म्हणजे आत्ताच्या सरकारपक्षाला) गळचेपी मान्यच होती असे मी समजतो. ;) पण तुम्हाला आणि तुमच्यासारख्या विचारवंतांना ती गळचेपी मान्य होती का ह प्रश्न आहे. आता निरुत्तर झाल्याने उत्तर देता येत नसेल तर राहूंदेत. भोंदूपणा हा केवळ धार्मिकतेचे बुरखे पांघरणारे बुवाबाबाच करतात असे नाही तर निधर्मतेचे बुरखे घालणारे विचारवंत देखील करतात झालं!

In reply to by विकास

तर्राट जोकर 02/03/2016 - 21:45
अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना! >> हे तुम्ही कबूल केले आहे काय? कबूल केले असेल तर मग दुसर्‍याला प्रश्न विचारण्याचा अधिकार उरत नाही. दॅट्स इट. उगा निरुत्तर केल्याचे इमले कशापाई बांधायचे?

अर्धवटराव 02/03/2016 - 04:43
टायटलमधले ते जे.एन.यु., राष्ट्रवाद वगैरे शब्द वाचुन हा धागा उघडलाच नव्हता. छान माहिती मिळते आहे. अवांतरः इथेही खरुज काढलीच पब्लीकने. चालायचच.
भाग १ | भाग २ | भाग ३ |भाग ४ ----------------------------- कोणी देश अखंड रहावा म्हणून झटत होते. तर कोणी आपले संस्थान टिकावे म्हणून. कोणी स्वार्थाने अंध झाले होते तर कोणी परमार्थाने धुंद झाले होते. कोणी हक्क टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करत होते तर कोणी कर्तव्यपूर्तीसाठी झटत होते.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)

Anand More ·

आनन्दा 25/02/2016 - 07:10
मला अजून एक प्रश्न हळूहळू पडू लागला आहे. नेहरू आणि लेडी / माऊंटबॅटन यांच्या मधुर संबंधांमधील राजकारणात नेमका फायदा कोणी करून घेतला? म्हणजे नेहरू विनिंग साईडला होते की माऊंटबॅटन?

In reply to by Anand More

आनन्दा 25/02/2016 - 08:56
माझा तेव्हढा अभ्यास नाही. त्यामुळे मी राजघराणं, गॅरीभौ किंवा इतर दिग्गजांना यावर धागा काढायची विनंती करतो.. नाहीतर मग आहेच एक काथ्याकूट. पण आत्ता लगेच नको. असो - या विषयावरील चर्चा इथेच थांबवू.

पगला गजोधर 25/02/2016 - 17:29
a DEAR FRIEND, Friends have been urging me to write to you for the sake of humanity. But I have resisted their request, because of the feeling that any letter from me would be an impertinence. Something tells me that I must not calculate and that I must make my appeal for whatever it may be worth. It is quite clear that you are today the one person in the world who can prevent a war which may reduce humanity to a savage state. Must you pay that price for an object however worthy it may appear to you to be? Will you listen to the appeal of one who has deliberately shunned the method of war not without considerable success? Any way I anticipate your forgiveness, if I have erred in writing to you. I remain, Your sincere friend, M. K. Gandhi

आनन्दा 25/02/2016 - 07:10
मला अजून एक प्रश्न हळूहळू पडू लागला आहे. नेहरू आणि लेडी / माऊंटबॅटन यांच्या मधुर संबंधांमधील राजकारणात नेमका फायदा कोणी करून घेतला? म्हणजे नेहरू विनिंग साईडला होते की माऊंटबॅटन?

In reply to by Anand More

आनन्दा 25/02/2016 - 08:56
माझा तेव्हढा अभ्यास नाही. त्यामुळे मी राजघराणं, गॅरीभौ किंवा इतर दिग्गजांना यावर धागा काढायची विनंती करतो.. नाहीतर मग आहेच एक काथ्याकूट. पण आत्ता लगेच नको. असो - या विषयावरील चर्चा इथेच थांबवू.

पगला गजोधर 25/02/2016 - 17:29
a DEAR FRIEND, Friends have been urging me to write to you for the sake of humanity. But I have resisted their request, because of the feeling that any letter from me would be an impertinence. Something tells me that I must not calculate and that I must make my appeal for whatever it may be worth. It is quite clear that you are today the one person in the world who can prevent a war which may reduce humanity to a savage state. Must you pay that price for an object however worthy it may appear to you to be? Will you listen to the appeal of one who has deliberately shunned the method of war not without considerable success? Any way I anticipate your forgiveness, if I have erred in writing to you. I remain, Your sincere friend, M. K. Gandhi
भाग १ | भाग २ | भाग ३ ------------- काश्मीर प्रश्नाचे वेगळे[पण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो. जुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)

Anand More ·

बोका-ए-आझम 24/02/2016 - 00:10
ज्या जवाहरलाल नेहरूंच्या देखरेखीखाली काश्मीरचं भारतात विलीनीकरण झालं त्याच नेहरुंचा पक्ष असलेला काँग्रेस पक्ष, ज्याचे सरचिटणीस त्याच नेहरुंचे पणतू राहुल गांधी आहेत; त्याच काँग्रेस पक्षाचे लोक त्याच जवाहरलाल नेहरूंच्या नावे उभारल्या गेलेल्या विद्यापीठात काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करत आहेत आणि नेहरूंच्या काँग्रेसला विरोध करणारे आणि नेहरूंनी गांधीहत्येनंतर ज्यांच्यावर बंदी घातली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून आलेले भाजपवाले या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याचं समर्थन करताहेत. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी कदाचित ' कुणाचे तरी डोके ठिकाणावर आहे काय ' असा अग्रलेख नक्कीच लिहिला होता. रच्याकने जुनागढ नवाबाच्या विरोधात जे काही उठाव झाले, त्यातला एक चोरवाड नावाच्या खेड्यातही झाला होता. त्या उठावात धीरजलाल अंबानी नावाचा एक तरुण सहभागी झाला होता. (संदर्भ - The Polyester Prince by Hamish McDonald)

In reply to by बोका-ए-आझम

आनन्दा 24/02/2016 - 09:54
दुसर्‍या बाजूने विचार केल्यास नेहरू नेहमीच शस्त्रे वापरून विलीनीकरण करण्याच्या विरोधात होते आणि पटेल भारताचे बाल्कनायझेशन होण्याच्या विरोधात होते असा देखील होतो. मग राहुल गांधींच्या भूमिकेचे नवल वाटू नये.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 24/02/2016 - 10:06
Where Diplomacy Ends, War Starts , अशी असावी. (महाभारतातील लोककथेत सुद्धा, कृष्णशिष्ठाई विफल झाल्यावरच, युद्ध सुरु झाले. असं काहीसं आहे… याचा अर्थ सरळ आहे, प्रथम शिष्ठाई … जी त्यांनी जवळ जवळ ३००+ संस्थानाच्या बाबतीत दाखवली, आणि जिथे शिष्ठाई विफल झाली, तिथे सैन्य. असो पण नाव ठेवायचंच असं एकदा ठरवलं की, की सोयीस्कर रित्या विसरून जायचं, हरीसिंगाने सैनिकी मदत मागितल्यावर, प्रथम सामीलनाम्यावर सही मगच भारतीय सैन्य, अशी अट दुतांकरावी ठेवणारे, नेहरुच होते.)

In reply to by पगला गजोधर

आनन्दा 24/02/2016 - 14:26
बाकी तुमचे उदाहरण माझ्या वरच्या वाक्यालाच पुष्टी देतय.
हरीसिंगाने सैनिकी मदत मागितल्यावर, प्रथम सामीलनाम्यावर सही मगच भारतीय सैन्य, अशी अट दुतांकरावी ठेवणारे, नेहरुच होते.)
मी काय म्हटले आहे ते परत वाचा. नेहरू सैनिकी कारवाईच्या विरोधात होते, आणि शक्य तिथे त्यांनी ती टाळायचाच प्रयत्न केला असे इतिहास सांगतो. नेहरू मुत्सद्देगिरीत कमी होते असे मी म्हटलेले नाही. पण तुम्ही वत जे उदाहरण दिले आहे, त्यात देखील, आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 24/02/2016 - 14:57
आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले.
0

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 24/02/2016 - 15:05
तुमचे विधान समजण्यात काही गडबड होतेय का? असे असेल तर स्पष्ट करा प्लीज. तुमचा रोख लक्षात येत नाही.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 24/02/2016 - 15:04
आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले. >> रे भगवान! आनंदाभाऊ, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय आहे, जत्रेत पाल कुठे मांडायची हा नाही.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 24/02/2016 - 18:31
हे हे.. म्हणूनच.. हैद्राबादमध्ये आपण तेच तर केले.. नबाब तयार नव्हता, मग काहीतरी कुसपट काढून सैनिकी कारवाई केलीच ना. तिथे कागदी घोडे नाचवत नाही बसले.. युक्रेनमध्ये रशिया पण साधारण असेच करत आहे. नेहरूंनी आधी सही करा असे सांगितले ही त्यांची चूक होती असे मला म्हणायचे नाही.. परती गजोधरसाहेबांचा तसा समज झाल्याचे दिसले म्हणून मी तसे म्हटले. पण नेहरूंचा ओढा रक्तपाताविना विलीनीकरणाकडे होता, तर पटेलांचा ओढा कोणत्याही मार्गाने विलीनीकरण करण्याकडे होता. एक साधा प्रश्न विचारतो - जर हरिसिंगाने सही करत नाही असे सांगितले असते तर नेहरू आणि पटेल कसे वागले असते? नेहरूंनी तरीही त्याच वेगाने सैनिकी कारवाई करण्यास अनुकूल झाले असते का? पटेल आणि नेहरूंमध्ये तेव्हा मतभेद झाले असते का? इतिहासामध्ये कोणीही बरोबर आणि चूक असे म्हणता येत नाही. नेता उपलब्ध पर्यायांमधून निर्णाय घेतो. काळाच्या कसोटीवर काही निर्णय बरोबर ठरतात, काही चुकतात. भक्त जेव्हा हे समजतील तो सुदीन.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 24/02/2016 - 18:40
जर हरिसिंगाने सही करत नाही असे सांगितले असते तर नेहरू आणि पटेल कसे वागले असते? >> पाकिस्तानी घुसखोरांकडून सुरक्षेचा त्याच्याकडे दुसरा काही उपाय होता का? नेहरूंनी तरीही त्याच वेगाने सैनिकी कारवाई करण्यास अनुकूल झाले असते का? >> ते नेहरूंना माहित. पटेल आणि नेहरूंमध्ये तेव्हा मतभेद झाले असते का? >> ते त्या दोघांना माहित. >> आम्ही भक्त नाही. जो आम्हाला मतदानापुर्वी खंबा देतो त्यालाच निवडून आणणार्‍या प्रामाणिक जनतेचे प्रतिनिधी आहोत.

In reply to by तर्राट जोकर

जो आम्हाला मतदानापुर्वी खंबा देतो त्यालाच निवडून आणणार्‍या प्रामाणिक जनतेचे प्रतिनिधी आहोत. लोकशाहीत जनता जेव्हा सर्व समाजाचा स्वार्थ न बघता असा तात्कालिक व्यक्तिगत स्वार्थ पाहणारी असते तेव्हा त्या जनतेला समाजाचा नाही तर व्यक्तीगत (स्वतःचा/नेत्यांचा) स्वार्थ पाहणारे नेते मिळतात... हा लोकशाहीचा मूळ गुणधर्म असलेला अभिशाप आहे... आणि यातच भारतिय लोकशाहीचे दुर्दैव लपलेले आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर 24/02/2016 - 19:24
काय करणार, आहे हे असे आहे. कधी खंबा, कधी गप्पा, आम्ही कशानेही भुलवल्या जातो. जे कबूल केले ते मिळाले नाही त्याला पुढच्या टर्मला झोपवतो. काही विचारवंत आम्हाला सुज्ञ म्हणतात काही मूर्ख. आम्हासचि न ठावे आमचे अंतर, लोकशाही आहे फक्त जंतर-मंतर

In reply to by बोका-ए-आझम

गॅरी ट्रुमन 24/02/2016 - 10:22
आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी कदाचित ' कुणाचे तरी डोके ठिकाणावर आहे काय ' असा अग्रलेख नक्कीच लिहिला होता.
आणि जे.एन.यु मधील प्राध्यापकांना उद्देशून 'हे आमचे गुरूच नव्हेत' असाही अग्रलेख लोकमान्य टिळकांनी नक्कीच लिहिला असता :)

पगला गजोधर 24/02/2016 - 09:30
ज्या जवाहरलाल नेहरूंच्या देखरेखीखाली काश्मीरचं भारतात विलीनीकरण झालं, त्याच नेहरूंना काश्मीरवरून (इतिहास वाचण्याचे श्रम न घेता)आजही २१ व्या शतकात शिव्या घालणारे पाहिलेत, आणि अशी ही लोकं, पुणे महानगर पालिकेतील, उदीर पकडणार्या विभागाचा, काही केल्या विसर पडू देत नाही आपल्याला. असो, मोरेसर सुंदर लेखं, आपल्या सारखे इतिहासाचे शिक्षक आजच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळाले, तर खूप छान होईल हो. नाहीतर, काही कुजबुज इतिहास शिक्षक त्यांना चुकीचा इतिहास शिकावतच राहतील, किंवा आता काय त्यांचच राज्य, इतिहास पाठ्यक्रमही बदलला तरी, आश्चर्य वाटू नये…

In reply to by पगला गजोधर

बोका-ए-आझम 24/02/2016 - 10:11
अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं हे ऐकून डोळे पाणावले!आतापर्यंत शिकवला गेलेला इतिहास पूर्ण खरा आहे हे ऐकून तर अजूनच!

In reply to by बोका-ए-आझम

पगला गजोधर 24/02/2016 - 10:15
जुनागढ चा वझीर, हा दुसरा तिसरा कोणी नसून झुल्फिकार अली भुत्तो चा बाप , बेनझीर चा आजोबा हा होय. जुनागढ मधून राज-सत्ता, राज-सुखं त्यागायला लागून पाकिस्तानात निर्वासित म्हणून जाण्यामागे, नेहरू व तत्कालीन नवभारतिय-राजकीय सत्ता कारणीभूत , अशी अढी मनात ठेवून, भुत्तो बाप-लेक जन्मभर वागले… एक वेळ गवत खावू पण भारताच्या नाशाचे कारण बनण्यास समर्थ अणुबॉम्ब मिळवूच, अशी कटुता झुल्फिकार याने बाळगण्यामागे, हीच मनातील कटुता असावी.

In reply to by पगला गजोधर

बोका-ए-आझम 24/02/2016 - 11:12
मला तर अजून एक कारण वाटतं. पाकिस्तानात नेहमीच पंजाबचं वर्चस्व राहिलेलं आहे. भुत्तो हे सिंधमधले. त्यामुळे लष्करावरचा पंजाबी प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी अतिरेकी भारतद्वेष्टेपणा दाखवलेला असू शकतो.

ते सगळं लोकशाही जनमत वगैरे जाऊद्या. राष्ट्राने आपली ताकद वाढवत रहायचं असतं. जोपर्यंत पुरेशी ताकद येत नाही तोवर शांत रहावे आणि ताकद आल्यावर सरळ घाव घालून तुकडा पाडून घ्यायचा. जनमत, जिनोसाईड वगैरे गोष्टी बोलाचा भात या सदरातच येतात. १९७० मधे एकत्रित पाकीस्तानातला लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणूकीचा कल सरळ सरळ मुजिबुर्रहिमन ला मिळाला होता. परंतु त्याच्या विरोधात ह्यायाखानास अमेरीकेने पूर्ण मदत केली. इतकेच नव्हे तर ह्यायाखानाने पूर्व पाकिस्तानात केलेल्या कत्तली अमेरीकेने पद्धतशीर दुर्लक्षिल्या. कारण अमेरीकेला स्वतःच्या राष्ट्राचे हीत साधायचे होते. अधिक माहीतीसाठी ब्लड टेलेग्राम पुस्तक वाचावे. देशहीतासाठी कुठे कठोर व्हावे लागले तर जरूर व्हावे. उद्या गरज पडली तर काश्मीरला द्यावे स्वतंत्र करून आणि काश्मिरला जाणारा सगळा सप्लाय थांबवावा काश्मिरातून येणार्‍या सफरचंदांवर भरमसाठ ड्युटी लावावी. मागे जम्मू ला आंदोलन झाले अमरनाथ यात्रेवरून तेव्हा कसे सगळे लायनीवर आले होते. फक्त जम्मूतून श्रीनगर कडे जाणारा मार्ग बंद पाडून मोठा परिणाम साधला होता. घ्या म्हणावे स्वातंत्र्य आणि चिन आणि पाकीस्तानच्या वळचणीला जाऊन बसा.

बोका-ए-आझम 24/02/2016 - 00:10
ज्या जवाहरलाल नेहरूंच्या देखरेखीखाली काश्मीरचं भारतात विलीनीकरण झालं त्याच नेहरुंचा पक्ष असलेला काँग्रेस पक्ष, ज्याचे सरचिटणीस त्याच नेहरुंचे पणतू राहुल गांधी आहेत; त्याच काँग्रेस पक्षाचे लोक त्याच जवाहरलाल नेहरूंच्या नावे उभारल्या गेलेल्या विद्यापीठात काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करत आहेत आणि नेहरूंच्या काँग्रेसला विरोध करणारे आणि नेहरूंनी गांधीहत्येनंतर ज्यांच्यावर बंदी घातली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून आलेले भाजपवाले या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याचं समर्थन करताहेत. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी कदाचित ' कुणाचे तरी डोके ठिकाणावर आहे काय ' असा अग्रलेख नक्कीच लिहिला होता. रच्याकने जुनागढ नवाबाच्या विरोधात जे काही उठाव झाले, त्यातला एक चोरवाड नावाच्या खेड्यातही झाला होता. त्या उठावात धीरजलाल अंबानी नावाचा एक तरुण सहभागी झाला होता. (संदर्भ - The Polyester Prince by Hamish McDonald)

In reply to by बोका-ए-आझम

आनन्दा 24/02/2016 - 09:54
दुसर्‍या बाजूने विचार केल्यास नेहरू नेहमीच शस्त्रे वापरून विलीनीकरण करण्याच्या विरोधात होते आणि पटेल भारताचे बाल्कनायझेशन होण्याच्या विरोधात होते असा देखील होतो. मग राहुल गांधींच्या भूमिकेचे नवल वाटू नये.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 24/02/2016 - 10:06
Where Diplomacy Ends, War Starts , अशी असावी. (महाभारतातील लोककथेत सुद्धा, कृष्णशिष्ठाई विफल झाल्यावरच, युद्ध सुरु झाले. असं काहीसं आहे… याचा अर्थ सरळ आहे, प्रथम शिष्ठाई … जी त्यांनी जवळ जवळ ३००+ संस्थानाच्या बाबतीत दाखवली, आणि जिथे शिष्ठाई विफल झाली, तिथे सैन्य. असो पण नाव ठेवायचंच असं एकदा ठरवलं की, की सोयीस्कर रित्या विसरून जायचं, हरीसिंगाने सैनिकी मदत मागितल्यावर, प्रथम सामीलनाम्यावर सही मगच भारतीय सैन्य, अशी अट दुतांकरावी ठेवणारे, नेहरुच होते.)

In reply to by पगला गजोधर

आनन्दा 24/02/2016 - 14:26
बाकी तुमचे उदाहरण माझ्या वरच्या वाक्यालाच पुष्टी देतय.
हरीसिंगाने सैनिकी मदत मागितल्यावर, प्रथम सामीलनाम्यावर सही मगच भारतीय सैन्य, अशी अट दुतांकरावी ठेवणारे, नेहरुच होते.)
मी काय म्हटले आहे ते परत वाचा. नेहरू सैनिकी कारवाईच्या विरोधात होते, आणि शक्य तिथे त्यांनी ती टाळायचाच प्रयत्न केला असे इतिहास सांगतो. नेहरू मुत्सद्देगिरीत कमी होते असे मी म्हटलेले नाही. पण तुम्ही वत जे उदाहरण दिले आहे, त्यात देखील, आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 24/02/2016 - 14:57
आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले.
0

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 24/02/2016 - 15:05
तुमचे विधान समजण्यात काही गडबड होतेय का? असे असेल तर स्पष्ट करा प्लीज. तुमचा रोख लक्षात येत नाही.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 24/02/2016 - 15:04
आधी सैनिकी कारवाई करून भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर आता विलीन व्हा असे सांगायचे हा देखील उपाय होता. पण नेहरूंनी ते टाळले. >> रे भगवान! आनंदाभाऊ, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय आहे, जत्रेत पाल कुठे मांडायची हा नाही.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा 24/02/2016 - 18:31
हे हे.. म्हणूनच.. हैद्राबादमध्ये आपण तेच तर केले.. नबाब तयार नव्हता, मग काहीतरी कुसपट काढून सैनिकी कारवाई केलीच ना. तिथे कागदी घोडे नाचवत नाही बसले.. युक्रेनमध्ये रशिया पण साधारण असेच करत आहे. नेहरूंनी आधी सही करा असे सांगितले ही त्यांची चूक होती असे मला म्हणायचे नाही.. परती गजोधरसाहेबांचा तसा समज झाल्याचे दिसले म्हणून मी तसे म्हटले. पण नेहरूंचा ओढा रक्तपाताविना विलीनीकरणाकडे होता, तर पटेलांचा ओढा कोणत्याही मार्गाने विलीनीकरण करण्याकडे होता. एक साधा प्रश्न विचारतो - जर हरिसिंगाने सही करत नाही असे सांगितले असते तर नेहरू आणि पटेल कसे वागले असते? नेहरूंनी तरीही त्याच वेगाने सैनिकी कारवाई करण्यास अनुकूल झाले असते का? पटेल आणि नेहरूंमध्ये तेव्हा मतभेद झाले असते का? इतिहासामध्ये कोणीही बरोबर आणि चूक असे म्हणता येत नाही. नेता उपलब्ध पर्यायांमधून निर्णाय घेतो. काळाच्या कसोटीवर काही निर्णय बरोबर ठरतात, काही चुकतात. भक्त जेव्हा हे समजतील तो सुदीन.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर 24/02/2016 - 18:40
जर हरिसिंगाने सही करत नाही असे सांगितले असते तर नेहरू आणि पटेल कसे वागले असते? >> पाकिस्तानी घुसखोरांकडून सुरक्षेचा त्याच्याकडे दुसरा काही उपाय होता का? नेहरूंनी तरीही त्याच वेगाने सैनिकी कारवाई करण्यास अनुकूल झाले असते का? >> ते नेहरूंना माहित. पटेल आणि नेहरूंमध्ये तेव्हा मतभेद झाले असते का? >> ते त्या दोघांना माहित. >> आम्ही भक्त नाही. जो आम्हाला मतदानापुर्वी खंबा देतो त्यालाच निवडून आणणार्‍या प्रामाणिक जनतेचे प्रतिनिधी आहोत.

In reply to by तर्राट जोकर

जो आम्हाला मतदानापुर्वी खंबा देतो त्यालाच निवडून आणणार्‍या प्रामाणिक जनतेचे प्रतिनिधी आहोत. लोकशाहीत जनता जेव्हा सर्व समाजाचा स्वार्थ न बघता असा तात्कालिक व्यक्तिगत स्वार्थ पाहणारी असते तेव्हा त्या जनतेला समाजाचा नाही तर व्यक्तीगत (स्वतःचा/नेत्यांचा) स्वार्थ पाहणारे नेते मिळतात... हा लोकशाहीचा मूळ गुणधर्म असलेला अभिशाप आहे... आणि यातच भारतिय लोकशाहीचे दुर्दैव लपलेले आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर 24/02/2016 - 19:24
काय करणार, आहे हे असे आहे. कधी खंबा, कधी गप्पा, आम्ही कशानेही भुलवल्या जातो. जे कबूल केले ते मिळाले नाही त्याला पुढच्या टर्मला झोपवतो. काही विचारवंत आम्हाला सुज्ञ म्हणतात काही मूर्ख. आम्हासचि न ठावे आमचे अंतर, लोकशाही आहे फक्त जंतर-मंतर

In reply to by बोका-ए-आझम

गॅरी ट्रुमन 24/02/2016 - 10:22
आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी कदाचित ' कुणाचे तरी डोके ठिकाणावर आहे काय ' असा अग्रलेख नक्कीच लिहिला होता.
आणि जे.एन.यु मधील प्राध्यापकांना उद्देशून 'हे आमचे गुरूच नव्हेत' असाही अग्रलेख लोकमान्य टिळकांनी नक्कीच लिहिला असता :)

पगला गजोधर 24/02/2016 - 09:30
ज्या जवाहरलाल नेहरूंच्या देखरेखीखाली काश्मीरचं भारतात विलीनीकरण झालं, त्याच नेहरूंना काश्मीरवरून (इतिहास वाचण्याचे श्रम न घेता)आजही २१ व्या शतकात शिव्या घालणारे पाहिलेत, आणि अशी ही लोकं, पुणे महानगर पालिकेतील, उदीर पकडणार्या विभागाचा, काही केल्या विसर पडू देत नाही आपल्याला. असो, मोरेसर सुंदर लेखं, आपल्या सारखे इतिहासाचे शिक्षक आजच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळाले, तर खूप छान होईल हो. नाहीतर, काही कुजबुज इतिहास शिक्षक त्यांना चुकीचा इतिहास शिकावतच राहतील, किंवा आता काय त्यांचच राज्य, इतिहास पाठ्यक्रमही बदलला तरी, आश्चर्य वाटू नये…

In reply to by पगला गजोधर

बोका-ए-आझम 24/02/2016 - 10:11
अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं हे ऐकून डोळे पाणावले!आतापर्यंत शिकवला गेलेला इतिहास पूर्ण खरा आहे हे ऐकून तर अजूनच!

In reply to by बोका-ए-आझम

पगला गजोधर 24/02/2016 - 10:15
जुनागढ चा वझीर, हा दुसरा तिसरा कोणी नसून झुल्फिकार अली भुत्तो चा बाप , बेनझीर चा आजोबा हा होय. जुनागढ मधून राज-सत्ता, राज-सुखं त्यागायला लागून पाकिस्तानात निर्वासित म्हणून जाण्यामागे, नेहरू व तत्कालीन नवभारतिय-राजकीय सत्ता कारणीभूत , अशी अढी मनात ठेवून, भुत्तो बाप-लेक जन्मभर वागले… एक वेळ गवत खावू पण भारताच्या नाशाचे कारण बनण्यास समर्थ अणुबॉम्ब मिळवूच, अशी कटुता झुल्फिकार याने बाळगण्यामागे, हीच मनातील कटुता असावी.

In reply to by पगला गजोधर

बोका-ए-आझम 24/02/2016 - 11:12
मला तर अजून एक कारण वाटतं. पाकिस्तानात नेहमीच पंजाबचं वर्चस्व राहिलेलं आहे. भुत्तो हे सिंधमधले. त्यामुळे लष्करावरचा पंजाबी प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी अतिरेकी भारतद्वेष्टेपणा दाखवलेला असू शकतो.

ते सगळं लोकशाही जनमत वगैरे जाऊद्या. राष्ट्राने आपली ताकद वाढवत रहायचं असतं. जोपर्यंत पुरेशी ताकद येत नाही तोवर शांत रहावे आणि ताकद आल्यावर सरळ घाव घालून तुकडा पाडून घ्यायचा. जनमत, जिनोसाईड वगैरे गोष्टी बोलाचा भात या सदरातच येतात. १९७० मधे एकत्रित पाकीस्तानातला लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणूकीचा कल सरळ सरळ मुजिबुर्रहिमन ला मिळाला होता. परंतु त्याच्या विरोधात ह्यायाखानास अमेरीकेने पूर्ण मदत केली. इतकेच नव्हे तर ह्यायाखानाने पूर्व पाकिस्तानात केलेल्या कत्तली अमेरीकेने पद्धतशीर दुर्लक्षिल्या. कारण अमेरीकेला स्वतःच्या राष्ट्राचे हीत साधायचे होते. अधिक माहीतीसाठी ब्लड टेलेग्राम पुस्तक वाचावे. देशहीतासाठी कुठे कठोर व्हावे लागले तर जरूर व्हावे. उद्या गरज पडली तर काश्मीरला द्यावे स्वतंत्र करून आणि काश्मिरला जाणारा सगळा सप्लाय थांबवावा काश्मिरातून येणार्‍या सफरचंदांवर भरमसाठ ड्युटी लावावी. मागे जम्मू ला आंदोलन झाले अमरनाथ यात्रेवरून तेव्हा कसे सगळे लायनीवर आले होते. फक्त जम्मूतून श्रीनगर कडे जाणारा मार्ग बंद पाडून मोठा परिणाम साधला होता. घ्या म्हणावे स्वातंत्र्य आणि चिन आणि पाकीस्तानच्या वळचणीला जाऊन बसा.
भाग १ भाग २ ------------- जुनागढ हे आजच्या गुजरात मधील एक संस्थान. इथल्या नवाबाने १५ ऑगस्ट १९४७ ला माउंटबॅटनच्या भौगोलिक जवळिकीचा सिद्धांत धुडकावून लावत पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. युक्तिवाद होता, समुद्रमार्गे पाकिस्तान जवळ आहे. मंगरूळ आणि बाबरीवाडा हे जुनागढचे दोन अंकित प्रदेश होते. त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या इच्छेप्रमाणे पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. म्हणून नवाबाने या दोन प्रदेशात आपले सैन्य पाठवले. त्यामुळे आजूबाजूची इतर संस्थाने खवळली आणि त्यानी आपापले सैन्य जुनागढच्या सीमेवर नेवून भारतीय सरकारला साकडे घातले. आणि जुनागढ मध्ये एक अस्थायी सरकार देखील स्थापण्यात आले.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)

Anand More ·

पगला गजोधर 23/02/2016 - 11:51
माउंटबॅटनने वेगवेगळ्या संस्थानिकांना बोलावले आणि सार्वभौमत्व सोडून भारतीय घटनेच्या चौकटीत आपले संस्थान आणण्याच्या "विलीनीकरणाच्या करारावर - Merger Agreement " सही करण्यास सांगितले. तनखे मिळतील, स्थावर जंगम मालमत्ता राखण्याचा हक्क मिळेल असे सांगितले गेले. आणि हे पण सांगितले गेले की नंतर
(सामील व्हायला खीळखीळ केल्यानंतर)
यापेक्षा कमी फायद्याच्या करारावर स्वाक्षरी करावी लागेल. जनतेने उठाव केला
(कॉंग्रेस कार्यकर्ते जनतेत मिसळून, जनतेला भारताच्या बाजूने उठाव करायला उद्युक्त करण्यास सक्षम होते, आठवा: जुनागढ/हैद्राबाद स्वातंत्र्यलढा )
तर भारत सरकार जबाबदार नाही
(भारत सैन्य पाठवून पोलिसी कार्यवाही करू शकते आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ब्रिटन त्या कारवाईला भारताची अंतर्गत समस्या म्हणून बघेल)
आणि त्यावेळी मदत पण करू शकणार नाही.

पगला गजोधर 23/02/2016 - 11:51
माउंटबॅटनने वेगवेगळ्या संस्थानिकांना बोलावले आणि सार्वभौमत्व सोडून भारतीय घटनेच्या चौकटीत आपले संस्थान आणण्याच्या "विलीनीकरणाच्या करारावर - Merger Agreement " सही करण्यास सांगितले. तनखे मिळतील, स्थावर जंगम मालमत्ता राखण्याचा हक्क मिळेल असे सांगितले गेले. आणि हे पण सांगितले गेले की नंतर
(सामील व्हायला खीळखीळ केल्यानंतर)
यापेक्षा कमी फायद्याच्या करारावर स्वाक्षरी करावी लागेल. जनतेने उठाव केला
(कॉंग्रेस कार्यकर्ते जनतेत मिसळून, जनतेला भारताच्या बाजूने उठाव करायला उद्युक्त करण्यास सक्षम होते, आठवा: जुनागढ/हैद्राबाद स्वातंत्र्यलढा )
तर भारत सरकार जबाबदार नाही
(भारत सैन्य पाठवून पोलिसी कार्यवाही करू शकते आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ब्रिटन त्या कारवाईला भारताची अंतर्गत समस्या म्हणून बघेल)
आणि त्यावेळी मदत पण करू शकणार नाही.
भाग १ ------------------------ आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १)

Anand More ·

माहितगार 21/02/2016 - 21:27
१) पौराणिक इतिहासांना अधिकृत इतिहास म्हणून स्विकारणे जड जाते म्हणून त्यावर मी भर देत नाही परंतु अश्वमेध यज्ञांचे (खखोदेजा पण एक राजकीय संस्कृतीचा अंशाची शक्यता म्हणून पाहता येईल -परशुरामाचे पृथ्वी जिंकणे, राम,अगस्त्याचे दक्षिणेत का काय येणे इत्यादी कथा कथा म्हणून बाजूस ठेवल्या तरी त्या मिथ्सचा मानसिक प्रभावही नाकारता येत नाही) अधिक उल्लेख असावेत ज्यात घोडा वर्षभरासाठी का काय सोडला जाई (जाणकारांनी दुरुस्त्या सुचवाव्यात) तो वर्षाभरात जिकडे जाईल तेवढा भूभाग जिंकला जाई. या अश्वमेध प्रकारात कितीही वर्णन केले तरी त्या काळात पूर्ण भारतभराची भूमी जिंकली गेली असे म्हणणे कठीण असावे पण यशस्वी राजाचा अश्वमेधाचा घोडा ज्या कोणत्या दिशेने गेला तेवढी एकसंघता येत असणार आणि बर्‍या पैकी फ्रीक्वेन्सीने बदलत असणार. म्हणजे वेगवेगळ्या भारतातीलच वेगवेगळ्या टोकाच्या राजांच्या खाली जगण्याचे जमवून घेण्याचे कौशल्य आणि संस्कृती राजघराणी आणि भारतीय समाजात वसत असावी असे म्हणता येईल का ? २) हस्तिनापूर अथवा दिल्लीचे पूर्ण भारतावर प्रत्येकवेळी राज्य नसले तरी मुख्य प्रभाव अगदी पौराणिक काळापासून हस्तिनापूर अथवा दिल्लीचा होता हे खूपही डाऊनप्ले करता येत नाही. ३) भारतास गणराज्य -लोकांनी चालवलेल्या अथवा लोकांचा प्रभाव असलेल्या राज्यांची सवय होती- याबाबत जाणकार अधिक प्रकाश टाकतील पण मला गौतम बुद्धाच्या संन्यासपुर्व कथा लोकशाही प्रभावाच्या दृष्टीने पुरेशी रिलायेबल वाटते अर्थात जाणकार अधिक सांगू शकतील

माहितगार 21/02/2016 - 21:33
१) राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते. २) बर्‍याच वेळा एकाच राजाचा एकछत्रि अंमल नसलातरीही इमिडीएट अथवा एक्सटेंडेड परिवार राजघराण्यांचे राज्य अ‍ॅड केले तर राजपरिवारांचा प्रभाव अधिक मोठा दिसू शकतो.

विष्णूपुराण काय म्हणते किंवा रोमन साम्राज्याचा इतिहास काय म्हणतो यावर आजच्या जगाच्या राष्ट्रांची नावे किंवा सीमा ठरत नसून आजच्या जागतिक राजकीय परिस्थितीत आजच्या घडीला ज्या सीमा मान्य आहेत त्यावरून त्या ठरतात. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

देशांत सद्य सीमा मान्य नसलेले त्या बदलायचे प्रयत्न करत आले आहेत, भविष्यातही करत राहतील. त्याचप्रमाणे, त्या सीमांचा अभिमान असणार्‍यांना त्या सीमांचे रक्षण करण्याचा हक्क आहे आणि तो भविष्यातही असणार आहे. सर्वसाधारणपणे, देशाच्या सीमांचे आणि सन्मानाचे रक्षण करण्याचे प्रयत्न करणे हा देशभक्तीचा एक भाग समजला जातो. तर, कोणते खरे अथवा काल्पनिक कारण पुढे करून देशाचे तुकडे करण्याची भाषा करणे, देशाला बरबाद करण्याची भाषा करणे आणि / किंवा तसे उघड अथवा गुप्त प्रयत्न करणे हा देशद्रोह समजला जातो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे ज्या विष्णूपुराणाने लेखाची सुरुवात केली गेली आहे त्यातला एक शब्दही वाचला नसलेलेच लोक भारतात अतीबहुसंख्येने आहेत व त्यांना विष्णूपुराणात काय लिहिले आहे याबाबत फार काही आस्था आहे असेही नाही... याबाबत कोणाच्या मनात नक्की संशय आहे काय ???! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 22/02/2016 - 18:09
माझ्या मते देश म्ह्॑णजे चलन अर्थव्यवस्था संस्कृति एक असलेला समूह नव्हे तर तो समूह ज्या भू भागावर रहातो त्या भागाचे अस्तिव लोक व शासनासह जपणारी एक व्यवस्था. अर्थात दुसर्‍या महायुद्धात एकत्र पणे लढलेल्या दोस्तांच्या फौजा त्यावेळी एका प्रशासनाखाली लढल्या असतील तर युरोपातील प्रमुख शासने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होतेच. म्हन्जे मिलिटरी म्हणजे देश असेही नव्हे. तर देश म्ह॑न्जे शास्ता. त्याच्या विरूद्ध कारवाईत सक्रिय भाग म्हणजे देशद्रोह. नुसती घोषणा म्हन्जे देशद्रोह नव्हे. मग ती डाव्यानी केलेली असो की स्वामिनी.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 24/02/2016 - 10:00
थोडासा फरक मला करावासा वाटतो.. १. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. २. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्‍यापैकी बदलतो माझ्या मते.

माहितगार 21/02/2016 - 21:56
१) उपरोक्त धागा लेखात भारताची सांस्कृतीक एकात्मता सॉलीड अंडर प्ले होते आहे. वस्तुतः राजे लोक वरच्यावर आपापसात लढत राज्यांच्या सीमा बदलत त्याच्याशी सामान्य जनतेचे देणे घेणे प्रत्येक वेळी असेच असे नव्हे, पण राजकारणेतर भारतीय संस्कृती हि एकसंघ होती. २) मी सांस्कृतिक म्हणतो काही जण धार्मिक म्हणतील, कुंभमेळे, यात्रा, आणि काशी यात्रेचे विशेष महत्व होते ज्यातून सांस्कृतिक देवाण घेवाणीचा एक भाग होत होता. ३) अध्यात्मिक विचारांचे पुरस्करते अखंड भारतात कुठून कुठे भ्रमण करतील याचा नेम नसे पण पूर्ण भारतीय उपमहाद्वीप वेगवेगळे विचारप्रणाली घेऊन पिंजून काढला जात असे त्यात अध्यात्मिक वैचारीक आणि सांस्कृतीक प्रभाव अखंड भारतावर पडत. ४) भारतातील अनेकानेक आदीवासी जमातींचे स्वरुप भटक्या जमातींचे होते ज्यात मुंडा ते धनगर ते बंजारा ते डोंबारी सांगण्याचा उद्देश आजच्या भाषेत मनोरंजन आणि कलापथकांचेही भारतभर भ्रमण असे. व्यापारी वर्गांचेही भारतभर भ्रमण असे. ५) असंख्य सांस्कृतिक गोष्टी, विश्वास आणि मिथके अखंड भारताच्या या टोकापासून त्या टोका पर्यंत पसरलेली आढळतात मग त्यात कुंकू,बांगड्या,मेंदी,रांगोळी,दिवे लावणे,सण,उत्स्व,संगित,नृत्य, शाक्त शैव असोत अथवा जैन अथवा बौद्ध अनेकानेक मिथके देशाच्या एका टोका पासून दुसर्‍या टोका पर्यंत दिसतात. गुढीसारख्या काठीपूजा आणि बगाड परंपरा मुलतः वैदीक पूर्व असाव्यात, आई हा शब्द एकदम आसामी आणि मग मराठी भाषेत एकाच अर्थाने येतो हे सांस्कृतीक एकतेच्या दीर्घ परंपरे शिवाय घडले असेल का ? उत्तर आणि पुर्व भारतात काली म्हणतात महाराष्ट्रात काळूबाई म्हणतात, वैदीकांनी मुर्तीपूजा हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भाग नसतानाही सामावून घेतल्या मुळे अनेक परंपरा वैदीकांच्या वाटतात पण त्या मुलतः वैदीक पुर्व काळापासून समस्त भारतात चालत असाव्यात मग त्यात शितला देवी उत्तर ते दक्षीण सर्वत्र दिसते. दत्तसंप्रदाय नाथ संप्रदाय किती म्हणून संप्रदायांचे अनुयायी भारतभर वावरले आहेत, गुरुनानकांनी अर्धा भारत पालथा घातला त्यांचे शेवटचे गुरु महाराष्ट्र कर्नाटक आदी भागात पोहोचले, महानुभाव पंथ पंजाबातही आहे हे आम्ही विसरूनच जातो, नामदेव महाराष्ट्रातून पंजाबात गेले सांस्कृतिक देवाण घेवाणीची किती म्हणून उदाहरणे देता येतील ४) उपरोक्त धागा लेख परकीयांच्या आणि भारतास एकसंघ बघु इच्छित नसलेल्यांच्या भारताचे केवळ राजकीय तुकडे बघु इच्छिणार्‍यांच्या थेअरीने प्रभावित नाहीना अशी प्राथमिक साशंकता वाटते.

माहितगार 21/02/2016 - 23:25
१) शुचिता, पावित्र्य, पातिव्रत्य इत्यादी संकल्पनातील मिथके आजच्या घडीला कुणाला आवडोत अथवा न आवडओत त्यांचे प्रभाव संपूर्ण भारतीय उपखंडात एकसारखे होते सती सारखी प्रथा वाइट होती हे खरे पण राजस्थान ते पश्चिम बंगाल आधुनिक दळणवळणाच्या साधन नसलेल्या काळासाठी केवढे मोठे अंतर आहे ते ! तसेच जातीयता आणि वर्णवाद म्हणजे प्रथा परंपरा चांगल्या असोत अथवा वाइट असोत पण सांस्कृतिक एकसंघतेच्या परिचायक नव्हत्या असे कसे म्हणता येईल ? २) उदाहरणार्थ वर्मा हे क्षत्रिय आडनाव पश्चिमेच्या उत्तरेच्या मध्यभारत्तातल्या ते केरळपर्यंतच्या राजांच्या आडनावात आढळते -आणि राजपरिवारांच्या एक्स्टेंडेड फॅमिलीज बद्दल मी आधी ही लिहिले आहे- महाराष्ट्रातील मराठा समाजातील असंख्य आडनावात कुठे राजस्थानी कुठे दाक्षिणात्य कुठे पुर्वेच्या आडनावांशी सरमिसळ दिसते. चांभार ते ब्राह्मण अशा अनेक तत्कालीन व्यावसायीक जाती भारतभर पसरलेल्या होत्या. तथाकथीत डाव्यांनी स्वतकडेच पाहीलेतर कम्युनीस्ट आयडीऑलॉजी येण्याच्या आधी पासून केरळ ते बंगाली कितीतरी सांस्कृतिक संबंध आणि आंतरभाषिक विवाहांची बर्‍यापैकी उदाहरणे असावित. ३) अज्ञात इतिहासाचा अंदाजा जसा भाषांवरून येतो तो गावांच्या नावांवरून येतो कारण बहुतांश गावांची नावे गाव/वसती पहिल्यांदा वसताना पडत असतात, मी स्वतः भारतातील महाराष्ट्रातील असंख्य गावांची नावे आसाम ते सिंध काश्मिर ते कन्याकुमारी अनेक राज्यांच्या याद्यातून तपासली आहेत आणि बहुतांश गावांची नावे भारताच्या या टोका पासून त्या टोका पर्यंत आढळतात ४) अगदी देवयानी खोब्रागडेला आमेरीकेतल्या वागणूक खटकते तेव्हा तामिळनाडू ते काश्मिर नव्हे पुर्व ते पश्चिम भारतच नव्हे पाकीस्तानी लोकांची सुद्धा एकसारखी भावना असते त्या मागे केवळ आमेरीकेचा विरोध नसतो आम्हा सर्वांची मुळ विचार प्रवृत्ती एकसारखी आहे हे कारण असते. ५) पाकीस्तानातील अँंथ्रॉपॉलॉजीस्ट सुद्धा धर्म बदलला तरी विवीध सांस्कृतिक प्रभाव कसे टिकून राहीले याचे साद्यंत वर्णन करतात. अशी किती म्हणून सांस्कृतिक एकसंघतेची उदाहर

माहितगार 22/02/2016 - 00:21
१) राष्ट्र म्हणजे समाजमन हि या धागा लेखकाची व्याख्या असेल आणि सामान्य भारतीय उपमहाद्वीपातील समाजमनाची संस्कृती वर विवीध प्रतिसादातून मांडल्या प्रमाणे एकसंघ असेल तर भारतीय समाजमनाची राष्ट्रीयता आधी पासूनच अस्तीत्वात होती असा त्याचा अर्थ होतो किंवा कसे ? २) पाकीस्तानी इतिहासकारपण पेशव्यांनी दिल्लीचे तख्त उलथवण्याचा विचार केला नाही, १८५७ उठावा मध्ये दिल्लीच्या बादशहास पुन्हा नेऊन बसवले याची सकारात्मक दखल घेतात आणि धागालेखक समाजमनात एकराष्ट्रीयता १९४७ पुर्वी नव्हती ? नवा शोध कमाल आहे !! ३) लाल बाल पाल देशाच्या तीन टोकाला स्वदेशीचा आग्रह धरत होते जनता त्यात सहभागी होत होती तेव्हा स्वदेशीचा अर्थ पंजाबात वेगळा, महाराष्ट्रात वेगळा बंगालात वेगळा होता का काय ? ४) भारतातले वेगवेगळे क्रांतीकारी फाशीवर जाताना केवळ त्यांच्या त्यांच्या भौगोलीक भागासाथी फाशीवर जात होते का काय ? सुभाषचंद्राची आझाद हिंद सेना तुकड्या तुकड्यांच्या भारतासाठी परकीयांशी लढली नसावी. ५) विवेकानंदांनी स्वतःचे कार्य चालु करण्यापुर्वी अखंड भारत प्रवासकरत केवळ मी संन्यासी आहे हे सांगून स्वतःचे नावही न सांगता समजावून घेतला ६) महात्मा गांधींना भारतात वापस आल्यावर गोपाळकृष्ण गोखल्यांनी (नावाबाबत चुभूदेघे) राजकारण हा उद्देश डोक्यात न ठेवता संपुर्ण भारत फिरून समजून घेण्यास सांगितला आणि त्यांनी तसे केले. ७) -स्वातंत्र्य पुर्व काँग्रेस विषयी सध्याचे आकस बाजूला ठेऊन समजून घेतले तर -महात्मा गांधींचा राष्ट्रवाद स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य मागणारा नव्हता, सामान्य जनतेसाठी स्वातंत्र्य मागणारा होता त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना खेड्यापाड्यात जाण्यासाठी सांगितले त्यांचे कार्यकर्ते खरोखर खेड्यापाड्यात जात होते स्वातंत्र्य मिळाल्या नंतर अगदी डाऊन ट्रोडन साठी त्यात काय असेल नव्या राज्याचे स्वरुप कसे असेल हे जनतेस समजावून सांगितले जात होते हे तेव्हाचा इतिहास बारकाईने अभ्यासल्यास लक्षात येईल आणि धागा लेखक म्हणताहेत कि समाज मनात राष्ट्र ही भावना स्वातंत्र्यापुर्वी जागृत करण्यासाठी काहीच केले गेले नाही. -आताच्या काळातली माध्यमे शिक्षण त्याकाळातली समाजमन घडवण्यातली मेहनत सांगण्यात कमी पडत असेल - किंवा तुमच्या अपेक्षेला प्रमाणे परिणाम तुम्हाला जाणवत नसतील त्याची कारणे इतरत्रही असू शकतात - पण समाजमन घडवण्याचे कष्ट घेतले नव्हते स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जनतेला काय मिळणार आहे हे जनतेला माहित नव्हते असे नसावे. ८) गांधी-नेहरुंचा आणि काँग्रेसच्या राजकीय राष्ट्रवादाचा आधार निश्चितपणे सांस्कृतिक होता, आसेतू हिमाचल एवढाच मर्यादीत होता. या राष्ट्रवादाची मर्यादा इतकी सुस्पष्ट होती कि कॉंग्रेसच काय तत्कालीन संघानेही श्रीलंकासुद्धा भारतास जोडून घेण्याचा स्वप्नातही विचार केला नसावा -उलटपक्षी न्याय्य तत्वावर वसुधैवकुटूंबकम ची जी काही रचना अस्तीतात येईल त्यात सर्व -राष्ट्रवाद बाजूला ठेऊन भारत मानसिक दृष्ट्या नेहमीच तयार राहीला आहे- आपल्या सांस्कृतिक एकसंघ राष्ट्रातील लोकांच्या हिताची बाजू घेणे गुन्हा कसा काय होऊ शकतो ? महात्मा गांधी भारतीय राष्ट्रवादाबद्दल म्हणतात माझ्या संस्कृतीसाठी लोकांच्या हित आणि विकासासाठी आम्हाला राष्ट्रवादाच्या भितींची गरज आहे पण आमच्या घराच्या खिडक्या देवाण घेवाणीसाठी उघड्या असतील- संघीय धर्माधिष्ठीत राष्ट्रवादाचा मी समर्थक आहे असे नाही, त्यांनी हिटलर आणि इझ्राएलचे प्रतिक्रीयावादातून क्तीही गुण गायले तरीही हिंदू त्याला धर्मही म्हणता येतनाही त्याचे तत्वज्ञानच इतपत व्यापक नक्कीच आहे की तुम्ही उपासना कोणत्याही पद्धतीने करा त्यावर कसलेच बंधन नाही म्हणजे उपासकांनी कितीही नॅरोमाईंडेडाणा केला तरिही मुळातच तत्वज्ञात बर्‍यापैकी उदार आहे त्यात समस्या नव्हत्या असे नाही कुठलेही परंपरावादी सहज बदलत नाहीत पण पुरोगामी चळाळींना कुरकुरत का होईना स्वतःस परंपरावादीही भारतात स्वतःसातत्याने बदलत पुरोगामीत्वाचे एकेकपाऊल अल्पशा उशीराने का होईना स्विकारताना दिसतात, अरबस्ताना प्रमाणे तुम्ही इथे अचानक काळाच्या मागे जाल असा कितीही बागुलबुवा उभ केला तरीही तसे होणे सहज शक्य नसावे - तरीही भारतीय राष्ट्रवादाला हिरहिरीने आक्रमक स्वरुप नकारात्मक रंगात रंगवण्याचा सातत्याने प्रय्तन का केले जातात तेव्हा त्यातील अंतस्थ हेतु शंकास्पद होतात.

In reply to by माहितगार

गॅरी ट्रुमन 22/02/2016 - 12:32
भारत सांस्कृतिक दृष्ट्या एक होता याविषयी (बहुतांश) दुमत असू नये.प्रश्न आहे की भारत हा राजकीय दृष्ट्या एक होता का हा. सांस्कृतिकदृष्ट्या एक असणे आणि राजकीय दृष्ट्या एक असणे या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. बिस्मार्कने जर्मन एकीकरणासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर जर्मनी हा राजकीय दृष्ट्या एक देश झाला.जर्मनीतून फुटून निघावे वगैरे मागणी एखाद्या प्रांतातून आजही होताना दिसत नाही (जी स्पेनमध्ये कॅटालोनिया किंवा युके मध्ये आर्यलंडमध्ये झाली). १९४५ नंतर जर्मनीचे कृत्रिमरित्या दोन तुकडे पाडले गेले त्यानंतरही आपण एकत्र यावे ही भावना जर्मन लोकांमध्ये प्रबळ होतीच. तेव्हा जर्मनी सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे असे म्हणता येईल असे म्हणायला हरकत नसावी. पण जर्मन एकीकरण झाले त्यापूर्वी जर्मनी राजकीयदृष्ट्या एक नव्हता.हीच गोष्ट इटालियन एकीकरणापूर्वीच्या इटलीविषयी. तेव्हा भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या एक होता असे म्हटले तरी ब्रिटिशपूर्व काळात राजकीय दृष्ट्या भारत एक होता असे कसे म्हणता येईल? वरील आणि इतर प्रतिसादात तुम्ही एक तर सांस्कृतिक एकतेची उदाहरणे दिली आहेत किंवा ब्रिटिश आल्यानंतरच्या काळाची उदाहरणे दिली आहेत. ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा अगदी १८५७ मध्ये आपल्याकडे जी काही परिस्थिती होती ती राजकीयदृष्ट्या एकतेची नक्कीच नव्हती.काही उदाहरणे--- १. पानिपतचे युध्द हे भारतीय विरूध्द अफगाण होते असे म्हटले जाते.ते तसे खरोखरच होते का? का ते मराठे विरूध्द इतर सगळे (सूरजमल जाटाचा अपवाद वगळता) असे होते? अहमदशहा अब्दालीला बोलावले कोणी? नजीबखानाने, जो सांस्कृतिकदृष्ट्या एक होता त्याच भौगोलिक भागातील एकाने. अब्दालीबरोबर अयोध्येचा शुजाउद्दौला होताच. त्याच्या सैन्यात असलेले हिंदू गोसावी पण अब्दालीच्याच बाजूने होते असेही वाचले आहे. २. नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांचे आरमार बुडवले. म्हणजे पेशवे आणि आंग्रे यांची संस्कृती फार वेगळी होती अशातला भाग नाही.पण त्यांच्यात राजकीय वर्चस्वावरून खटके होते हे कसे नाकारता येईल?त्यातही पेशव्यांनी त्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली यावरून या लढाईसाठी राजकीय कारण अधिक महत्वाचे होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? ३. राणी लक्ष्मीबाईनेही ब्रिटिशांनी दत्तकविधान नाकारायचा निर्णय मागे घेतल्यास बंडवाल्यांपासून ब्रिटिशांपासून सुरक्षित ठेऊ अशी ऑफर दिली होती (संदर्भ: बिपीन चंद्रा यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स पान ३). म्हणजे भारत देश राजकीयदृष्ट्या एक करावा वगैरे गोष्टी राणी लक्ष्मीबाईलाही महत्वाच्या नव्हत्याच आणि तिची पण लॉयल्टी तिच्या संस्थानाविषयी होती असे म्हटले तर काय चुकले? तिची घोषणाही 'मेरी झाशी नही दूंगी' अशी होती तर 'मेरा भारत नही दूंगी' अशी नव्हती. अशी इतरही उदाहरणे देता येतील. भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक वगैरे आपण म्हणत असलो तरी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची कुठे संस्कृती एक होती? किंबहुना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्याला राजकीय स्वरूप आले त्याचे मूळ कारण हेच सांस्कृतिक फरक होते असे म्हटले तर काय चुकले? म्हणजे शिवाजी महाराजांनी जी मूल्ये अभिप्रेत होती ती जर आदिलशहा आणि मोंगल अंगीकारत असते तर स्वराज्यासाठी लढायची गरजच शिवाजी महाराजांना पडली नसती.पण या सांस्कृतिक मूल्यांमध्ये इतकी तफावत होती म्हणूनच महाराजांचा लढा उभा राहिला.समजा औरंगजेबाऐवजी दारा शुकोह सत्तेत आला असता तर कदाचित महाराजांचा लढा मोंगलांविरूध्द नसताही. तीच गोष्ट शीख आणि मोंगलांची.शीख पंथाची स्थापना झाल्यापासून पिढ्यानपिढ्या शीख आणि मोंगल यांच्यात हाडवैर होते.शीख आणि हिंदूंमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या बरेच साम्य होतेच--किंबहुना हिंदू कुटुंबांमधील सर्वात मोठा मुलगा शीख होण्याची परंपरा अगदी अलीकडल्या काळापर्यंत चालू होती (माझ्या पंजाबी मित्राच्या आजोबांचा मोठा भाऊ शीख झाला होता). पण मोंगल आणि शीख यांच्यात कसलेच सांस्कृतिक साम्य नव्हते.१८५७ मध्ये शीख ब्रिटिशांच्या बाजूने का उभे राहिले? कारण मोंगल बाहशहा बंडवाल्यांच्या बाजूने म्हटल्यावर मोंगल आणि शीख यांच्यातील पिढ्यानपिढ्यांचे हाडवैर लक्षात घेता हे होणे स्वाभाविक नाही का? तेव्हा भारत सांस्कृतिकदृष्ट्याही १००% एक होता असे म्हणता येणार नाही. अर्थातच आताच्या काळातील राष्ट्रवादाचे मूळ (बहुतांश असलेल्या) सांस्कृतिक एकतेत होते ही गोष्ट जशी नाकारण्यात अर्थ नाही त्याप्रमाणेच ब्रिटिश राज्यामुळे भारतीयांमध्ये आपण राजकीयदृष्ट्याही एक होऊ ही भावना वाढीस लागली हे पण नाकारण्यात अर्थ नाही असे मला वाटते. अनेकदा दोनपैकी एका टोकाचे मत मांडणारे लोक दिसतात.मला वाटते या बाबतीत दोन्ही टोके टाळून अधिक न्युअन्स्ड मत ठेवणे श्रेयस्कर.

In reply to by गॅरी ट्रुमन

तर्राट जोकर 22/02/2016 - 12:43
प्रतिसाद खूप आवडला आणि पटला. भारत राजकिय दृष्ट्या एक नव्हता हे सत्य लपवण्यासाठी संस्कृतीचे दुबळे कारण पुढे केले जाते.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 22/02/2016 - 13:44
आपण मी आधी केलेल्या विश्लेषणाच्या बर्‍याच भागाची दखल घेतली नसावी. १) एक मुस्लीम लिगच्या अपवाद सोडून दिला -त्यांनीही अत्यल्पकाळ का होईना दिल्लीत कॉंंग्रेस सोबत प्रयोग करुन पाहीला- भारतीय समाजमनाची एक राष्ट्र म्हणून घडन केली होती का एकसंघ राष्ट्रासाठीची इच्छा शक्ती जागृत होती का होय, तत्कालीन कॉंग्रेसचा प्रभाव भारतव्यापी होता - हे आकडेवारीनेही सिद्ध होते- त्यांनी एकसंघराष्ट्राचेच रुप जनतेच्या डोळ्यासमोर ठेऊन राजकीय जागृती व्यवस्थीतपणे घडवलेली होती, तसे नसते तर महात्मा गांधी उपोषण करताहेत अखंडभारत हलतो आहे असे चित्र दिसले नसते. २) भारतातील स्वातंत्र्य लढ्याचे स्वरुप आम्ही ब्रिटीशांच्या एकछत्री अमंलाकाही रहायचे नाही म्हणुन स्वांत्र्य लढा असे नव्हते, ३) तुम्ही बिस्मार्कोत्तर एकत्रित जर्मनीचे उदाहरण देताय पण ते १८६० ते १८७१ या काळात झाले त्यापुर्विच बहुतांश भारत ब्रिटिशांकडून एक करून झाला होता - भारत लिखीत इतिहासात ब्रिटीशांपुर्वी सम्राट चंद्रगुप्त ते अशोक तीन पिढ्यांचा काळ, मोगलांचा काळ बर्‍याच पिढ्या आणि औरंगजेबाच्या काळात सर्वाधिक भूभाग - याचे आपण क्रेडीट कुठेच देत नाही आपल्या पेक्षा जर्मनीचा एकत्र राहिल्याचा एकुण काळ आपल्या पेक्षा कितीतरी कमी भरतो तरी भारताच्या एकत्रिकरणाचा इतिहास कमी भरतो म्हणायचे ? ३) पौराणिक इतिहासांना अधिकृत इतिहास म्हणून स्विकारणे जड जाते म्हणून त्यावर मी भर देत नाही परंतु अश्वमेध यज्ञांचे (खखोदेजा पण एक राजकीय संस्कृतीचा अंशाची शक्यता म्हणून पाहता येईल -परशुरामाचे पृथ्वी जिंकणे, राम,अगस्त्याचे दक्षिणेत का काय येणे इत्यादी कथा कथा म्हणून बाजूस ठेवल्या तरी त्या मिथ्सचा मानसिक प्रभावही नाकारता येत नाही) अधिक उल्लेख असावेत ज्यात घोडा वर्षभरासाठी का काय सोडला जाई (जाणकारांनी दुरुस्त्या सुचवाव्यात) तो वर्षाभरात जिकडे जाईल तेवढा भूभाग जिंकला जाई. या अश्वमेध प्रकारात कितीही वर्णन केले तरी त्या काळात पूर्ण भारतभराची भूमी जिंकली गेली असे म्हणणे कठीण असावे पण यशस्वी राजाचा अश्वमेधाचा घोडा ज्या कोणत्या दिशेने गेला तेवढी एकसंघता येत असणार आणि बर्‍या पैकी फ्रीक्वेन्सीने बदलत असणार. म्हणजे वेगवेगळ्या भारतातीलच वेगवेगळ्या टोकाच्या राजांच्या खाली जगण्याचे जमवून घेण्याचे कौशल्य आणि संस्कृती राजघराणी आणि भारतीय समाजात वसत असावी असे म्हणता येईल का ? ३) हस्तिनापूर अथवा दिल्लीचे पूर्ण भारतावर प्रत्येकवेळी राज्य नसले तरी मुख्य प्रभाव अगदी पौराणिक काळापासून हस्तिनापूर अथवा दिल्लीचा होता हे खूपही डाऊनप्ले करता येत नाही. राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते. ४) बर्‍याच वेळा एकाच राजाचा एकछत्रि अंमल नसलातरीही इमिडीएट अथवा एक्सटेंडेड परिवार राजघराण्यांचे राज्य अ‍ॅड केले तर राजपरिवारांचा प्रभाव अधिक मोठा दिसू शकतो.
त्याचे मूळ कारण हेच सांस्कृतिक फरक होते असे म्हटले तर काय चुकले?
- आपण लोक विवीधतेला विसंगती म्हणुन दाखवून भारत एकसंघ नव्हता म्हणून एकसंघ राहू शकत नाही अशा तर्कावर येऊ इच्छित आहात का ? लोकमान्य टिळक शिवाजी जयंती साजरी करताना राष्ट्रपुरुष कोणत्या धर्मातून आला ते महत्वाचे नाही असे सांगत होते, उद्याचा राष्ट्रपुरुष कदाचित मुस्लिमही असू शकेल म्हणजे विवीधतेमुळे सांस्कृतिक फरक असतील पण राष्ट्र उभारणीची वेळ येते तेव्हा सास्कृतिक फरक दुय्यम होतात आणि एकात्मता महत्वाची होते. आणि कुठे कमी पडत असेल तर शक्यतोवर गांधीजींच्या मार्गाने अखंड भारत एक ठेवावा -पण तोच एकमेव मार्ग नव्हे- ते जमले नाही तर अगदी बिस्मार्कचा सशस्त्र मार्ग वापरुन विरोधकांना साम दाम दंड भेदाने नेस्त नाबूत करुनही भारत एक ठेवावा. भारताची विना अट अक्षुण्ण एकसंघता आणि अगदी कोणत्याहि किमतीवर कारण तुम्हीच जे सांगू इच्छिता आहात की जग म्हणजे तुम्ही किती वेळ एकत्र होता हे मोजते आणि एकत्र राहील्याचा अधिकाधिक काळ मोजला जाण्याचा एकमेव मार्ग अधिकाधिक काळ एकत्र रहाणे होय त्याला तरणोपाय नाही. एकत्र न राहणे म्हणजे भविष्यातील भारतीय संस्कृती बाहेरच्या पारतंत्र्यांना आमंत्रण देणे होय. अर्थात मागे काही चुका झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फोडा आणि झोडा नितीस सहानुभूती देणर्‍या विश्लेषणांना कोणत्याही माझ्या सारख्या देशप्रेमी व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती असणार नाही.

In reply to by माहितगार

गॅरी ट्रुमन 22/02/2016 - 14:16
मागे काही चुका झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फोडा आणि झोडा नितीस सहानुभूती देणर्‍या विश्लेषणांना कोणत्याही माझ्या सारख्या देशप्रेमी व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती असणार नाही.
माझीही नाही.
एकत्र न राहणे म्हणजे भविष्यातील भारतीय संस्कृती बाहेरच्या पारतंत्र्यांना आमंत्रण देणे होय.
सहमत आहे. मुद्दा एवढाच की पूर्वी भारत हा राजकीय दृष्ट्या एक होता हे म्हणण्यासारखी परिस्थिती होती असे मला तरी वाटत नाही. आणि मी असे म्हणत आहे याचा अर्थ सद्यकालीन भारत हा देशच नाही किंवा तत्सम कुठचेतरी गुडघ्यातले डावे विचार मला मान्य आहेत असे अजिबात नाही.
एक मुस्लीम लिगच्या अपवाद सोडून दिला -त्यांनीही अत्यल्पकाळ का होईना दिल्लीत कॉंंग्रेस सोबत प्रयोग करुन पाहीला- भारतीय समाजमनाची एक राष्ट्र म्हणून घडन केली होती का एकसंघ राष्ट्रासाठीची इच्छा शक्ती जागृत होती का होय, तत्कालीन कॉंग्रेसचा प्रभाव भारतव्यापी होता - हे आकडेवारीनेही सिद्ध होते- त्यांनी एकसंघराष्ट्राचेच रुप जनतेच्या डोळ्यासमोर ठेऊन राजकीय जागृती व्यवस्थीतपणे घडवलेली होती, तसे नसते तर महात्मा गांधी उपोषण करताहेत अखंडभारत हलतो आहे असे चित्र दिसले नसते.
काँग्रेसचा प्रभाव सर्वत्र होता हे कोणीच नाकारत नाही.पण परत एकदा-- काँग्रेसची स्थापना कधी झाली? १८८५ मध्ये. म्हणजे भारतात ब्रिटिश राज्य स्थिरावल्यानंतर. माझा मुद्दा भारतात ब्रिटिश येण्यापूर्वीचा आहे.
तुम्ही बिस्मार्कोत्तर एकत्रित जर्मनीचे उदाहरण देताय पण ते १८६० ते १८७१ या काळात झाले त्यापुर्विच बहुतांश भारत ब्रिटिशांकडून एक करून झाला होता
तोच तर माझा मुद्दा आहे. भारताला राजकीय स्वरूपात एकत्र आणण्यात ब्रिटिशांची भूमिका नक्कीच आहे. अर्थात ते त्यांचे ध्येयही नव्हते.पण सर्वत्र ब्रिटिश अंमल आल्यामुळे या घटनेचा तो एक भले अनइंटेंटेड परिणाम होता. तेव्हा सध्याच्या भारतीय राष्ट्रवादात आपल्या बहुतांश सांस्कृतिक एकतेचे योगदान आहे तसेच ब्रिटिश अंमलामुळे झालेल्या या अनइंटेंडेड परिणामाचेही आहे.
भारत लिखीत इतिहासात ब्रिटीशांपुर्वी सम्राट चंद्रगुप्त ते अशोक तीन पिढ्यांचा काळ, मोगलांचा काळ बर्‍याच पिढ्या आणि औरंगजेबाच्या काळात सर्वाधिक भूभाग - याचे आपण क्रेडीट कुठेच देत नाही
सम्राट चंद्रगुप्त ते अशोक म्हणजे २२००-२३०० वर्षांपूर्वीचा काळ होता.त्या काळात भारत राजकीय दृष्ट्या एक होता याचे महत्व कोणीच नाकारत नाही. पण मोंगलांचा काळ किंवा औरंगजेबाचा काळ??? सॉरी. मोंगल किंवा औरंगजेब हे मला कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत.असल्या गणंगांच्या नेतृत्वाखाली भारत एक असण्यापेक्षा ब्रिटिशांच्या अंमलाखाली एक असलेला कधीही परवडला (माझ्या दृष्टीने-- इतरांचे माहित नाही आणि याबद्दल कोणतीही चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही).
राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते.
हेच युरोपविषयीही बोलता येईल. ब्रिटिश राजपुत्रांचीही लग्ने इतर--फ्रेंच, जर्मन वगैरे देशांमधील राजकन्यांशी होत होती. रॉबर्ट वॉलपोलला इंग्लंडचा पहिला पंतप्रधान म्हणतात तो पंतप्रधान म्हणून कसा पुढे आला? त्यावेळी राजाचेही मंत्रीमंडळ असे.पहिला जॉर्ज राजाचा जन्म जर्मनीतील हॅनोव्हरचा होता आणि त्याला इंग्लिश भाषाही व्यवस्थित बोलता येत नसे. अशा परिस्थितीत मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून रॉबर्ट वॉलपोलच्या हातात सुत्रे गेली आणि तो इंग्लंडचा पहिला पंतप्रधान म्हणून प्रसिध्द झाला. याच पहिल्या जॉर्जची पत्नी सोफिया ही जर्मन होती.असे इतर अनेक राजांविषयी लिहिता येईल. मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून दिले होते ही गोष्ट तर प्रसिध्दच आहे. म्हणजे परस्परांबरोबर लग्नसंबंध असणे एवढ्याच कारणावरून राजकीय ऐक्य होते असे म्हणता येणार नाही. असो. मी जे काही लिहिले आहे त्याचा अर्थ पूर्वी भारत एक नव्हता म्हणून आताही असू नये वगैरे कोणी काढू नका. असल्या फालतू विचारांना मी फाट्यावर मारतो. रेसिडेंट नॉन-इंडिअन म्हणतात की भारताला राजकीय ऐक्य केवळ ब्रिटिशांमुळेच मिळाले तर त्याचवेळी अगदी कट्टर भारतीय संस्कृतीवाले म्हणतात की ते केवळ भारतीय संस्कृतीच्या एकत्मतेमुळे मिळाले. मला वाटते की सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. एवढाह माझा मुद्दा आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 22/02/2016 - 14:33
अल्प मतांतरे अद्याप आहेत पण काळाच्या ओघात चर्चा होत राहिल, तुमच्या प्रतिसादामुळे माझे मेगाबायटी प्रतिसाद कुणीतरी वाचले याची खात्री होऊन बरे वाटले. :) प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

असंका 24/02/2016 - 11:47
तुमच्या प्रतिसादामुळे माझे मेगाबायटी प्रतिसाद कुणीतरी वाचले याची खात्री होऊन बरे वाटले.
सुंदर लिहिलं आहेत. माझी खात्री आहे की अनेकांनी आपले प्रतिसाद वाचून मनातल्या मनात त्याला दाद दिली आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 22/02/2016 - 22:33
यावर एक मतप्रवाह असा आहे की रेल्वे आणि सनदी सेवा या गोष्टी भारतात एका राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरल्या. याबद्दल तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by बोका-ए-आझम

गॅरी ट्रुमन 23/02/2016 - 11:46
यावर एक मतप्रवाह असा आहे की रेल्वे आणि सनदी सेवा या गोष्टी भारतात एका राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरल्या.
रेल्वे किंवा सनदी सेवा किंवा अमुक एका गोष्टीच्या प्रभावापेक्षा मी ब्रिटिश राज्याविषयी लिहितो. मला वाटते की पूर्ण भारतात ब्रिटिशांचा अंमल असल्यामुळे एक गोष्ट नक्कीच झाली-- आपण कुठल्या लहान राज्याचे नागरिक असण्यापेक्षा भारताचे (भले ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या) नागरिक आहोत ही भावना प्रबळ झाली. काँग्रेस स्थापन व्हायच्या अगोदर दक्षिणेत मद्रास महाजन सभा, कलकत्याला (तशाच स्वरूपाची एक संस्था--नाव विसरलो) वगैरे संस्था स्थापन झाल्या होत्या.त्यांचा उद्देश 'नेटिव्हांचे' (पक्षी सर्व भारतीयांचे-- अमुक एका राज्याच्या नागरिकांचे नाही) हितरक्षण करणे हा होता. याच संस्थांचे लोक काँग्रेसमध्ये एकत्र आले.पूर्वी सांस्कृतिक पातळीवर जरी भारतीय एक असले तरी राजकीय पातळीवर एक यायला ज्या कॅटॅलिस्टची गरज होती ती गरज ब्रिटिश राज्याने पूर्ण केली असे मला वाटते. ब्रिटिश राज्य नसते तर ही भावना पूर्ण देशात कधीच आली नसती असे नक्कीच नाही पण त्याला किती वेळ लागला असता हे मात्र सांगता येणार नाही. आणि भारतात तसे काही व्हावे असा ब्रिटिशांचा उद्देश होता असेही नक्कीच नाही. पण अनेकदा होते असे की एखादी गोष्ट त्या उद्देशाने केली नसली तरी त्याचा अनइंटेंडेड परिणाम म्हणून दुसरी एखादी चांगली गोष्ट होते. माझा हे लिहिण्याचा उद्देश इतकाच की आपण भारतीय राष्ट्रवादी असलो तरी सध्या ज्या स्वरूपात भारतीय राष्ट्रवाद आहे त्या स्वरूपात येण्यासाठी मुळातील (बहुतांश) सांस्कृतिक ऐक्याबरोबरच ब्रिटिश राज्याचा हा अनइंटेंडेड परिणामसुध्दा कारणीभूत आहे आणि त्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली (कॅटॅलिस्ट) असे मला वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याकाळातील भारतातील परिस्थिती लक्षात घेता कोणीतरी बाहेरचे येऊन हातपाय पसरणार हे होणे अगदी क्रमप्राप्त होते.अशा प्रसंगी पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोक येण्यापेक्षा ब्रिटिश आले हे त्यातल्या त्यात बरे झाले असेच मला वाटते. अर्थात हे लिहिल्यामुळे मला काळा इंग्रज वगैरे म्हणणारे लोक आहेतच. अशांना फाट्यावर मारत आहे. असो. ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

कपिलमुनी 23/02/2016 - 21:24
क्लिंटन भौंसाठी ओबामा हे सदस्य नाम राखून ठेवावी ही विनंती ! ;) ( हलके घ्या )

माहितगार 22/02/2016 - 00:44
एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते रिपब्लिक म्हणजे गणराज्यच असणार आहे, समतेच तत्व त्यात अध्यार्‍हुत असणार आहे कारण गांधीअन स्वातंत्र्य लढ्याची संकल्पनाच स्वातंत्र्य विथ अ परपज अँड परपज इज बेनीफीट ऑफ द कॉमन मॅन हे अत्यंत सष्ट होते काँग्रेसी असोत वा काँग्रेसेतर बहुसंख्य राजकीय पक्षांची राजेशाही पुन्हा आणणे नाही या बाबत सहमती होती, या विषयाची फारशी साशंकता कल्पनेच्या राज्यात रमलेल्या दोनचार राजांच्या पलिकडे कुणाच्याही मनात त्याही काळात राहण्याचे काहीही कारण नव्हते. अगदी मुस्लिम लिगलाही गणराज्यच अभिप्रेत होते त्यांनी पाकीस्तानातही संस्थानिकांचे विलिनीकरणच केले. बहुतांश संस्थानिकांनी विलिनीकरणच्या वेळी फारशी खळखळही केली नाही सैनिकी दृष्ट्या त्यांना ते शक्यही असणार नव्हते, आणि संस्थानी जनतेचाही ओढा स्वच्छपणे लोकशाही राज्यव्यवस्थांकडे होता. तसे नसते तर १८५७ प्रमाणे उठाव दिसले असते दोन-चार अतीशहाण्या संस्थानिका शिवाय इतर कुणी प्रयत्नही केले नाहीत आणि दोनचा अती शहाणे भारतात असो का पाकीस्तानात त्यांची विलिनीकरणे करवली गेली तत्कालीन संस्थनीय जनतेस लोकशाहीचीच आकांक्षा होती. भारतीय राज्यघटने रुसवे फुगवे काढण्यापुरते काही राज्यांना कधी मधी अधिक माप मिळते पन सर्व घटक राज्यांना सर्वसाधारन पणे राज्यघटनेच्या माध्यमातून विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत. परकीय गुप्तहेरसंस्थांच्या आहारी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि राज्यघटना नीट न शिकलेल्या लोकांना फितवले जाते आहे हे दुर्दैवी आहे.

In reply to by माहितगार

आनन्दा 22/02/2016 - 10:10
एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी.
एव्हढेच लिहायला आलो होतो. सध्या लोक्सत्तामध्ये सदानंद मोरे यांचे एक सदर चालू आहे, त्यात परवाच त्यांनी फाळणी आणि त्यापेक्षा संस्थाने विलीनीकरणाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट या वाक्याला छेद देणारी आहे. ब्रिटिशांनी जर लोकनियुक्त सरकारशीच करार केले असते तर ही विलीनीकरणाची समस्याच निर्माण झाली नसती. जाताजाता - लेखकाला सल्ला तुम्ही एका फार मोठ्या संवेदनशील विषयाला हात घातलेला आहे, त्यामुळे लिहिताना खूप विचार करून आणि अभ्यास करून लिहा. तुमचा मिपावरच्या लेखनाचा इतिहास एका संवेदनशील लेखकाचा आहे म्हणून किमान चर्चा तरी होतेय, नाहीतर एव्हाना या धाग्यावर प्रतिसादांची राळ उडाली असती. बाकी तोच तुमचा हेतू असेल तर चालूद्या.

In reply to by आनन्दा

आनन्दा 22/02/2016 - 10:12
सॉरी, मला शेषराव मोरे म्हणायचे होते. ये मोरे मोरे बहोत कन्फ्युजन हो गया. लेखक पण मोरे, ते पण मोरे. कृ. ह.घ्या.

माहितगार 22/02/2016 - 00:50
अलेक्झांडर असो इराण असो अफगाण असो अथवा ब्रिटीश, भारतातील अनेक छोट्या छोट्या राज्यांमुळे परकीय आक्रमणांना तोंड देणे कठीण गेले हा इतिहास सर्व राजकीय दृष्टीकोणांच्या नेत्यांपुढे स्पष्ट होता - त्यामूळे मुस्लिम लिगचा आगाऊपणा सोडला तर - सर्वसाधारण पणे सर्व नेत्यांचे देशाच्या भावी एकसंघतेच्या गरजे बाबत आणि एकात्मतेच्या गरजे बाबत सर्व साधारण सहमती राहिलेली होती.

माहितगार 22/02/2016 - 00:54
मी वर नमुद केलेल्या बर्‍याच बाजु धागा लेखकाच्या विश्लेषणातून निसटल्या असाव्यात म्हणून त्यांचे लेखन तथ्य आणि तर्कसुसंगतेच्या निकषावर कितपत टिकते या बाबत दाट शंका आहेत आणि म्हणून धागा लेखाशी आमची असहमती

Anand More 22/02/2016 - 01:25
अहो... हा माझ्या लेखमालेचा पहिला भाग होता.... थोडे थांबला असतात तरकदाचित काही मुद्दे लिहावे लागले नसते तुम्हाला... पण, इतक्या सविस्तर प्रतिसादांसाठी धन्यवाद...

In reply to by Anand More

माहितगार 22/02/2016 - 11:20
सरजी, आपल्या मुद्याचा पाया कुठेतरी कच्चा राहीला असे आम्हाला जाणवले ते आम्ही एळीच मांडण्याचा अल्पसा प्रयास केला. प्रतिसादांची मनमोकळे पणाने नोंद घेतलीत छान वाटले

तर्राट जोकर 22/02/2016 - 02:01
माहितगारजी, जम्पिंग ऑन द कन्क्लुजन म्हणतात ते हेच. अजून मोरेंनी त्यांना काय म्हणायचे आहे हे पुर्ण मांडलेही नाही त्याआधीच आपण त्यांना काय म्हणायचे आहे हे सांगुन मोकळे झालात, त्यावर आपले प्रति-विचार मांडून टाकलेत. अतिघाई संकटात नेई.

In reply to by तर्राट जोकर

माहितगार 22/02/2016 - 11:06
तजो, मुळीच नाही उलटपक्षी पुढे चालून माझ्या विचारांच्या बाजूने लिहिणार आहेत का विरुद्ध हे माहित नसताना धागा लेखातील तथ्य आणि तर्क विषयक उणीवा मांडल्या आहेत.

अगम्य 22/02/2016 - 02:36
शेषराव मोरे साहेबांचे हे चारही लेख अतिशय उत्कृष्ट आहेत. अभिनिवेश रहित, तथ्याधारित लेखन. http://www.loksatta.com/sampadkiya-category/sanskrutsanwad/ दोन्ही मोऱ्यांच्या पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.

अजया 22/02/2016 - 09:26
माहितगारांचे टायर दुरूस्तीचे दुकान असावे असा संशय येतोय :) धागा खिळे टाकून पंक्चर केलात की!!आता दुरुस्तीला लेखकाला तुमच्याकडे येणे आले :)

In reply to by अजया

माहितगार 22/02/2016 - 11:13
धागा लेखकाची गाडी इतर कुणी पसरलेल्या खिळ्यांना न खिळे न चुकवता चालली होती, मागच्या गाड्यांनाही खिळ्यांवरुन नेऊ होती, टायर-ट्यूबला मुळचीच बरीच मोठ मोठी भोकं आहेत आणि गाडी पुढे जाण्याच्या आधी पंक्चर काढून दिले तर धागा लेखकाचा नैतर नै किमान काही वाचकांचा प्रवास अधिक सुखरुअ होईल म्हणून आम्ही टायर-ट्यूबला तर्क आणि तथ्याच्या पाण्यात घालून बुडबुडे आणि भोके दाखवून दिली नैतर खिळेवाल्या रस्त्यावरुन जाताना समद्या वाचकांच्या गाड्या पंक्चर झाल्या असत्या नै का

पगला गजोधर 22/02/2016 - 10:50
मोरेसर, अतिशय छान लिहिलंय… पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत…
राजांनी स्वातंत्र्य लढा केला नव्हता. तो केला होता जनतेने. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी. शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला एक मोठा भूभाग ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त होत एक देश म्हणून प्रस्थापित झाला. महामानव बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली, जगातली सर्वात मोठी अशी लिखित स्वरूपातली राज्यघटना तयार झाली होती. पण तिचे मर्म लोकांना कळायचे बाकी होते.
आणि इतिहासात नेहमी पाहतो, राज्ये / राजेशाही / सामंतशाही, ह्या धर्माला हाताशी धरून, स्वतःचा कंट्रोल जनतेवर ठेवतात. (उदा. राजा हा देवाचा अवतार आहे, अश्या समजुतीना बळ देणे ), राजेशाही / सामंतशाही यांना स्वतःचा उदो उदो व्हावा म्हणून धर्ममार्तंडाना स्पॉन्सर करत असतात. (युरोपातील राजेशाह्या चर्चला स्पॉन्सर करायचे ते अश्याच साठी)
एकाकडून (राजे / सामंत) घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी (जनतेच्या प्रतिनिधीशी).
म्हणजेच राजे /सामंतशाही लोकांच्या, मानसिकते नुसार, महात्मा गांधीजींमुळे राजसत्तेचा कंट्रोल जनतेच्या हाती गेला, त्यामुळे सामंतशाही लोकांना महात्मा, त्यांचे शत्रू वाटले गेले असतील, तर आश्चर्य वाटायला नको. याबाबतीत तुषार गांधी यांनी केलेले वक्तव्य पहा.
गांधी हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल ग्वाल्हेर येथून मिळाले होते. ग्वाल्हेरचे जिवाजीराजे शिंदे यांचा एडीसी असलेल्या ए. ए. वैद्य यांना मिळलेली इटली मेडचे हे पिस्तूल होते. हे पिस्तूल कुणी उपलब्ध करून दिले? या पिस्तूलला फॅसिस्ट स्पेशल म्हणून ओळखले जात होते. ही बाब कपूर आयोगातून समोर आली आहे.

भारतात इंग्लड मध्ये शिकेल्या भारतीय पुढार्यांनी भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढली , तेव्हा एक देश म्हणून भारत कसा असावा ह्या बद्दल च्या अनके संकल्पना ह्या त्या लोकांनी परदेशातून घेल्त्या सेकुल्यार ते लोकशाही भाषा स्वातंत्र्य ते भारतीय कायदे जे बहुसंख्य जुनाट असून बदलले पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी कि स्वतंत्र भारतात लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला अनेक दशके प्रबळ विरोधी पक्ष नव्हता ह्याचे त्यांना फावले. स्वातंत्र्य मिळालेल्या दिवशी भारतात ठिकठिकाणी धार्मिक दंगे चाली होते तर आतच्या पाकिस्तान व बांगला देश मध्ये हिंदूचा सरसकट नरसंहार चालला होता त्यावेळी आम्ही धर्म निरपेक्ष आहोत पाकिस्तान संकल्पना आम्हाला मान्य नाही हे गांधी नेहरू ह्यांनी ठर्वेलेले धोरण पुढे जिन्हा ह्यांच्या हिंसेच्या धोरणापुढे फिके पढून पाकिस्तान निर्मितीला मान्यता दिली ही मान्यता दिली तेव्हा खरे तर आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वांना त्यांनी तिलांजली दिली.अशावेळी उरलेल्या भारताला परत धर्म निरपेक्ष च्या खुंटीला बांधण्याचे पातक ह्या लोकांच्या हातून घडले त्यावेळी लोकांच्या ह्या विषयावर मतदान करण्याचा अधिकार असता तर त्यांनी धर्मनिरपेक्ष ह्या तत्व्याला मान्यता दिली नसती कारण त्यावेळी सुद्धा व आजही ह्या संकल्पनेशी पुरेशी माहिती खेड्यातील व शहरातील लोकांना माहिती नाही अनेकांना माहिती आहे पण मान्य माही ह्यातून धर्मनिरपेक्ष आपण नावापुरेते आहोत व राष्ट्रावाद्द त्यावर प्रतिसाद दुसर्या भागात जर तो आला तर ,,, आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे

भारत सांस्कृतिक दृष्ट्या एक नव्हता ना तो राजकीय दृष्ट्याही एक नव्हता. तस्मात भारतीय गणराज्याचे तुकडे करावे आणि आमचे पुण्याचे राज्य आम्हाला परत द्यावे. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहमत :) पण आमचा पाठिंबा एका तडजोडशून्य अटीवर... आम्ही राहतो ते पुण्याचे उपनगर पुणे राष्ट्रातले आमचे स्वायत्त संस्थान व्हाय्ला पायजेल ;) =))

माहितगार 21/02/2016 - 21:27
१) पौराणिक इतिहासांना अधिकृत इतिहास म्हणून स्विकारणे जड जाते म्हणून त्यावर मी भर देत नाही परंतु अश्वमेध यज्ञांचे (खखोदेजा पण एक राजकीय संस्कृतीचा अंशाची शक्यता म्हणून पाहता येईल -परशुरामाचे पृथ्वी जिंकणे, राम,अगस्त्याचे दक्षिणेत का काय येणे इत्यादी कथा कथा म्हणून बाजूस ठेवल्या तरी त्या मिथ्सचा मानसिक प्रभावही नाकारता येत नाही) अधिक उल्लेख असावेत ज्यात घोडा वर्षभरासाठी का काय सोडला जाई (जाणकारांनी दुरुस्त्या सुचवाव्यात) तो वर्षाभरात जिकडे जाईल तेवढा भूभाग जिंकला जाई. या अश्वमेध प्रकारात कितीही वर्णन केले तरी त्या काळात पूर्ण भारतभराची भूमी जिंकली गेली असे म्हणणे कठीण असावे पण यशस्वी राजाचा अश्वमेधाचा घोडा ज्या कोणत्या दिशेने गेला तेवढी एकसंघता येत असणार आणि बर्‍या पैकी फ्रीक्वेन्सीने बदलत असणार. म्हणजे वेगवेगळ्या भारतातीलच वेगवेगळ्या टोकाच्या राजांच्या खाली जगण्याचे जमवून घेण्याचे कौशल्य आणि संस्कृती राजघराणी आणि भारतीय समाजात वसत असावी असे म्हणता येईल का ? २) हस्तिनापूर अथवा दिल्लीचे पूर्ण भारतावर प्रत्येकवेळी राज्य नसले तरी मुख्य प्रभाव अगदी पौराणिक काळापासून हस्तिनापूर अथवा दिल्लीचा होता हे खूपही डाऊनप्ले करता येत नाही. ३) भारतास गणराज्य -लोकांनी चालवलेल्या अथवा लोकांचा प्रभाव असलेल्या राज्यांची सवय होती- याबाबत जाणकार अधिक प्रकाश टाकतील पण मला गौतम बुद्धाच्या संन्यासपुर्व कथा लोकशाही प्रभावाच्या दृष्टीने पुरेशी रिलायेबल वाटते अर्थात जाणकार अधिक सांगू शकतील

माहितगार 21/02/2016 - 21:33
१) राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते. २) बर्‍याच वेळा एकाच राजाचा एकछत्रि अंमल नसलातरीही इमिडीएट अथवा एक्सटेंडेड परिवार राजघराण्यांचे राज्य अ‍ॅड केले तर राजपरिवारांचा प्रभाव अधिक मोठा दिसू शकतो.

विष्णूपुराण काय म्हणते किंवा रोमन साम्राज्याचा इतिहास काय म्हणतो यावर आजच्या जगाच्या राष्ट्रांची नावे किंवा सीमा ठरत नसून आजच्या जागतिक राजकीय परिस्थितीत आजच्या घडीला ज्या सीमा मान्य आहेत त्यावरून त्या ठरतात. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

देशांत सद्य सीमा मान्य नसलेले त्या बदलायचे प्रयत्न करत आले आहेत, भविष्यातही करत राहतील. त्याचप्रमाणे, त्या सीमांचा अभिमान असणार्‍यांना त्या सीमांचे रक्षण करण्याचा हक्क आहे आणि तो भविष्यातही असणार आहे. सर्वसाधारणपणे, देशाच्या सीमांचे आणि सन्मानाचे रक्षण करण्याचे प्रयत्न करणे हा देशभक्तीचा एक भाग समजला जातो. तर, कोणते खरे अथवा काल्पनिक कारण पुढे करून देशाचे तुकडे करण्याची भाषा करणे, देशाला बरबाद करण्याची भाषा करणे आणि / किंवा तसे उघड अथवा गुप्त प्रयत्न करणे हा देशद्रोह समजला जातो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे ज्या विष्णूपुराणाने लेखाची सुरुवात केली गेली आहे त्यातला एक शब्दही वाचला नसलेलेच लोक भारतात अतीबहुसंख्येने आहेत व त्यांना विष्णूपुराणात काय लिहिले आहे याबाबत फार काही आस्था आहे असेही नाही... याबाबत कोणाच्या मनात नक्की संशय आहे काय ???! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 22/02/2016 - 18:09
माझ्या मते देश म्ह्॑णजे चलन अर्थव्यवस्था संस्कृति एक असलेला समूह नव्हे तर तो समूह ज्या भू भागावर रहातो त्या भागाचे अस्तिव लोक व शासनासह जपणारी एक व्यवस्था. अर्थात दुसर्‍या महायुद्धात एकत्र पणे लढलेल्या दोस्तांच्या फौजा त्यावेळी एका प्रशासनाखाली लढल्या असतील तर युरोपातील प्रमुख शासने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होतेच. म्हन्जे मिलिटरी म्हणजे देश असेही नव्हे. तर देश म्ह॑न्जे शास्ता. त्याच्या विरूद्ध कारवाईत सक्रिय भाग म्हणजे देशद्रोह. नुसती घोषणा म्हन्जे देशद्रोह नव्हे. मग ती डाव्यानी केलेली असो की स्वामिनी.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 24/02/2016 - 10:00
थोडासा फरक मला करावासा वाटतो.. १. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. २. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्‍यापैकी बदलतो माझ्या मते.

माहितगार 21/02/2016 - 21:56
१) उपरोक्त धागा लेखात भारताची सांस्कृतीक एकात्मता सॉलीड अंडर प्ले होते आहे. वस्तुतः राजे लोक वरच्यावर आपापसात लढत राज्यांच्या सीमा बदलत त्याच्याशी सामान्य जनतेचे देणे घेणे प्रत्येक वेळी असेच असे नव्हे, पण राजकारणेतर भारतीय संस्कृती हि एकसंघ होती. २) मी सांस्कृतिक म्हणतो काही जण धार्मिक म्हणतील, कुंभमेळे, यात्रा, आणि काशी यात्रेचे विशेष महत्व होते ज्यातून सांस्कृतिक देवाण घेवाणीचा एक भाग होत होता. ३) अध्यात्मिक विचारांचे पुरस्करते अखंड भारतात कुठून कुठे भ्रमण करतील याचा नेम नसे पण पूर्ण भारतीय उपमहाद्वीप वेगवेगळे विचारप्रणाली घेऊन पिंजून काढला जात असे त्यात अध्यात्मिक वैचारीक आणि सांस्कृतीक प्रभाव अखंड भारतावर पडत. ४) भारतातील अनेकानेक आदीवासी जमातींचे स्वरुप भटक्या जमातींचे होते ज्यात मुंडा ते धनगर ते बंजारा ते डोंबारी सांगण्याचा उद्देश आजच्या भाषेत मनोरंजन आणि कलापथकांचेही भारतभर भ्रमण असे. व्यापारी वर्गांचेही भारतभर भ्रमण असे. ५) असंख्य सांस्कृतिक गोष्टी, विश्वास आणि मिथके अखंड भारताच्या या टोकापासून त्या टोका पर्यंत पसरलेली आढळतात मग त्यात कुंकू,बांगड्या,मेंदी,रांगोळी,दिवे लावणे,सण,उत्स्व,संगित,नृत्य, शाक्त शैव असोत अथवा जैन अथवा बौद्ध अनेकानेक मिथके देशाच्या एका टोका पासून दुसर्‍या टोका पर्यंत दिसतात. गुढीसारख्या काठीपूजा आणि बगाड परंपरा मुलतः वैदीक पूर्व असाव्यात, आई हा शब्द एकदम आसामी आणि मग मराठी भाषेत एकाच अर्थाने येतो हे सांस्कृतीक एकतेच्या दीर्घ परंपरे शिवाय घडले असेल का ? उत्तर आणि पुर्व भारतात काली म्हणतात महाराष्ट्रात काळूबाई म्हणतात, वैदीकांनी मुर्तीपूजा हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भाग नसतानाही सामावून घेतल्या मुळे अनेक परंपरा वैदीकांच्या वाटतात पण त्या मुलतः वैदीक पुर्व काळापासून समस्त भारतात चालत असाव्यात मग त्यात शितला देवी उत्तर ते दक्षीण सर्वत्र दिसते. दत्तसंप्रदाय नाथ संप्रदाय किती म्हणून संप्रदायांचे अनुयायी भारतभर वावरले आहेत, गुरुनानकांनी अर्धा भारत पालथा घातला त्यांचे शेवटचे गुरु महाराष्ट्र कर्नाटक आदी भागात पोहोचले, महानुभाव पंथ पंजाबातही आहे हे आम्ही विसरूनच जातो, नामदेव महाराष्ट्रातून पंजाबात गेले सांस्कृतिक देवाण घेवाणीची किती म्हणून उदाहरणे देता येतील ४) उपरोक्त धागा लेख परकीयांच्या आणि भारतास एकसंघ बघु इच्छित नसलेल्यांच्या भारताचे केवळ राजकीय तुकडे बघु इच्छिणार्‍यांच्या थेअरीने प्रभावित नाहीना अशी प्राथमिक साशंकता वाटते.

माहितगार 21/02/2016 - 23:25
१) शुचिता, पावित्र्य, पातिव्रत्य इत्यादी संकल्पनातील मिथके आजच्या घडीला कुणाला आवडोत अथवा न आवडओत त्यांचे प्रभाव संपूर्ण भारतीय उपखंडात एकसारखे होते सती सारखी प्रथा वाइट होती हे खरे पण राजस्थान ते पश्चिम बंगाल आधुनिक दळणवळणाच्या साधन नसलेल्या काळासाठी केवढे मोठे अंतर आहे ते ! तसेच जातीयता आणि वर्णवाद म्हणजे प्रथा परंपरा चांगल्या असोत अथवा वाइट असोत पण सांस्कृतिक एकसंघतेच्या परिचायक नव्हत्या असे कसे म्हणता येईल ? २) उदाहरणार्थ वर्मा हे क्षत्रिय आडनाव पश्चिमेच्या उत्तरेच्या मध्यभारत्तातल्या ते केरळपर्यंतच्या राजांच्या आडनावात आढळते -आणि राजपरिवारांच्या एक्स्टेंडेड फॅमिलीज बद्दल मी आधी ही लिहिले आहे- महाराष्ट्रातील मराठा समाजातील असंख्य आडनावात कुठे राजस्थानी कुठे दाक्षिणात्य कुठे पुर्वेच्या आडनावांशी सरमिसळ दिसते. चांभार ते ब्राह्मण अशा अनेक तत्कालीन व्यावसायीक जाती भारतभर पसरलेल्या होत्या. तथाकथीत डाव्यांनी स्वतकडेच पाहीलेतर कम्युनीस्ट आयडीऑलॉजी येण्याच्या आधी पासून केरळ ते बंगाली कितीतरी सांस्कृतिक संबंध आणि आंतरभाषिक विवाहांची बर्‍यापैकी उदाहरणे असावित. ३) अज्ञात इतिहासाचा अंदाजा जसा भाषांवरून येतो तो गावांच्या नावांवरून येतो कारण बहुतांश गावांची नावे गाव/वसती पहिल्यांदा वसताना पडत असतात, मी स्वतः भारतातील महाराष्ट्रातील असंख्य गावांची नावे आसाम ते सिंध काश्मिर ते कन्याकुमारी अनेक राज्यांच्या याद्यातून तपासली आहेत आणि बहुतांश गावांची नावे भारताच्या या टोका पासून त्या टोका पर्यंत आढळतात ४) अगदी देवयानी खोब्रागडेला आमेरीकेतल्या वागणूक खटकते तेव्हा तामिळनाडू ते काश्मिर नव्हे पुर्व ते पश्चिम भारतच नव्हे पाकीस्तानी लोकांची सुद्धा एकसारखी भावना असते त्या मागे केवळ आमेरीकेचा विरोध नसतो आम्हा सर्वांची मुळ विचार प्रवृत्ती एकसारखी आहे हे कारण असते. ५) पाकीस्तानातील अँंथ्रॉपॉलॉजीस्ट सुद्धा धर्म बदलला तरी विवीध सांस्कृतिक प्रभाव कसे टिकून राहीले याचे साद्यंत वर्णन करतात. अशी किती म्हणून सांस्कृतिक एकसंघतेची उदाहर

माहितगार 22/02/2016 - 00:21
१) राष्ट्र म्हणजे समाजमन हि या धागा लेखकाची व्याख्या असेल आणि सामान्य भारतीय उपमहाद्वीपातील समाजमनाची संस्कृती वर विवीध प्रतिसादातून मांडल्या प्रमाणे एकसंघ असेल तर भारतीय समाजमनाची राष्ट्रीयता आधी पासूनच अस्तीत्वात होती असा त्याचा अर्थ होतो किंवा कसे ? २) पाकीस्तानी इतिहासकारपण पेशव्यांनी दिल्लीचे तख्त उलथवण्याचा विचार केला नाही, १८५७ उठावा मध्ये दिल्लीच्या बादशहास पुन्हा नेऊन बसवले याची सकारात्मक दखल घेतात आणि धागालेखक समाजमनात एकराष्ट्रीयता १९४७ पुर्वी नव्हती ? नवा शोध कमाल आहे !! ३) लाल बाल पाल देशाच्या तीन टोकाला स्वदेशीचा आग्रह धरत होते जनता त्यात सहभागी होत होती तेव्हा स्वदेशीचा अर्थ पंजाबात वेगळा, महाराष्ट्रात वेगळा बंगालात वेगळा होता का काय ? ४) भारतातले वेगवेगळे क्रांतीकारी फाशीवर जाताना केवळ त्यांच्या त्यांच्या भौगोलीक भागासाथी फाशीवर जात होते का काय ? सुभाषचंद्राची आझाद हिंद सेना तुकड्या तुकड्यांच्या भारतासाठी परकीयांशी लढली नसावी. ५) विवेकानंदांनी स्वतःचे कार्य चालु करण्यापुर्वी अखंड भारत प्रवासकरत केवळ मी संन्यासी आहे हे सांगून स्वतःचे नावही न सांगता समजावून घेतला ६) महात्मा गांधींना भारतात वापस आल्यावर गोपाळकृष्ण गोखल्यांनी (नावाबाबत चुभूदेघे) राजकारण हा उद्देश डोक्यात न ठेवता संपुर्ण भारत फिरून समजून घेण्यास सांगितला आणि त्यांनी तसे केले. ७) -स्वातंत्र्य पुर्व काँग्रेस विषयी सध्याचे आकस बाजूला ठेऊन समजून घेतले तर -महात्मा गांधींचा राष्ट्रवाद स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य मागणारा नव्हता, सामान्य जनतेसाठी स्वातंत्र्य मागणारा होता त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना खेड्यापाड्यात जाण्यासाठी सांगितले त्यांचे कार्यकर्ते खरोखर खेड्यापाड्यात जात होते स्वातंत्र्य मिळाल्या नंतर अगदी डाऊन ट्रोडन साठी त्यात काय असेल नव्या राज्याचे स्वरुप कसे असेल हे जनतेस समजावून सांगितले जात होते हे तेव्हाचा इतिहास बारकाईने अभ्यासल्यास लक्षात येईल आणि धागा लेखक म्हणताहेत कि समाज मनात राष्ट्र ही भावना स्वातंत्र्यापुर्वी जागृत करण्यासाठी काहीच केले गेले नाही. -आताच्या काळातली माध्यमे शिक्षण त्याकाळातली समाजमन घडवण्यातली मेहनत सांगण्यात कमी पडत असेल - किंवा तुमच्या अपेक्षेला प्रमाणे परिणाम तुम्हाला जाणवत नसतील त्याची कारणे इतरत्रही असू शकतात - पण समाजमन घडवण्याचे कष्ट घेतले नव्हते स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जनतेला काय मिळणार आहे हे जनतेला माहित नव्हते असे नसावे. ८) गांधी-नेहरुंचा आणि काँग्रेसच्या राजकीय राष्ट्रवादाचा आधार निश्चितपणे सांस्कृतिक होता, आसेतू हिमाचल एवढाच मर्यादीत होता. या राष्ट्रवादाची मर्यादा इतकी सुस्पष्ट होती कि कॉंग्रेसच काय तत्कालीन संघानेही श्रीलंकासुद्धा भारतास जोडून घेण्याचा स्वप्नातही विचार केला नसावा -उलटपक्षी न्याय्य तत्वावर वसुधैवकुटूंबकम ची जी काही रचना अस्तीतात येईल त्यात सर्व -राष्ट्रवाद बाजूला ठेऊन भारत मानसिक दृष्ट्या नेहमीच तयार राहीला आहे- आपल्या सांस्कृतिक एकसंघ राष्ट्रातील लोकांच्या हिताची बाजू घेणे गुन्हा कसा काय होऊ शकतो ? महात्मा गांधी भारतीय राष्ट्रवादाबद्दल म्हणतात माझ्या संस्कृतीसाठी लोकांच्या हित आणि विकासासाठी आम्हाला राष्ट्रवादाच्या भितींची गरज आहे पण आमच्या घराच्या खिडक्या देवाण घेवाणीसाठी उघड्या असतील- संघीय धर्माधिष्ठीत राष्ट्रवादाचा मी समर्थक आहे असे नाही, त्यांनी हिटलर आणि इझ्राएलचे प्रतिक्रीयावादातून क्तीही गुण गायले तरीही हिंदू त्याला धर्मही म्हणता येतनाही त्याचे तत्वज्ञानच इतपत व्यापक नक्कीच आहे की तुम्ही उपासना कोणत्याही पद्धतीने करा त्यावर कसलेच बंधन नाही म्हणजे उपासकांनी कितीही नॅरोमाईंडेडाणा केला तरिही मुळातच तत्वज्ञात बर्‍यापैकी उदार आहे त्यात समस्या नव्हत्या असे नाही कुठलेही परंपरावादी सहज बदलत नाहीत पण पुरोगामी चळाळींना कुरकुरत का होईना स्वतःस परंपरावादीही भारतात स्वतःसातत्याने बदलत पुरोगामीत्वाचे एकेकपाऊल अल्पशा उशीराने का होईना स्विकारताना दिसतात, अरबस्ताना प्रमाणे तुम्ही इथे अचानक काळाच्या मागे जाल असा कितीही बागुलबुवा उभ केला तरीही तसे होणे सहज शक्य नसावे - तरीही भारतीय राष्ट्रवादाला हिरहिरीने आक्रमक स्वरुप नकारात्मक रंगात रंगवण्याचा सातत्याने प्रय्तन का केले जातात तेव्हा त्यातील अंतस्थ हेतु शंकास्पद होतात.

In reply to by माहितगार

गॅरी ट्रुमन 22/02/2016 - 12:32
भारत सांस्कृतिक दृष्ट्या एक होता याविषयी (बहुतांश) दुमत असू नये.प्रश्न आहे की भारत हा राजकीय दृष्ट्या एक होता का हा. सांस्कृतिकदृष्ट्या एक असणे आणि राजकीय दृष्ट्या एक असणे या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. बिस्मार्कने जर्मन एकीकरणासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर जर्मनी हा राजकीय दृष्ट्या एक देश झाला.जर्मनीतून फुटून निघावे वगैरे मागणी एखाद्या प्रांतातून आजही होताना दिसत नाही (जी स्पेनमध्ये कॅटालोनिया किंवा युके मध्ये आर्यलंडमध्ये झाली). १९४५ नंतर जर्मनीचे कृत्रिमरित्या दोन तुकडे पाडले गेले त्यानंतरही आपण एकत्र यावे ही भावना जर्मन लोकांमध्ये प्रबळ होतीच. तेव्हा जर्मनी सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे असे म्हणता येईल असे म्हणायला हरकत नसावी. पण जर्मन एकीकरण झाले त्यापूर्वी जर्मनी राजकीयदृष्ट्या एक नव्हता.हीच गोष्ट इटालियन एकीकरणापूर्वीच्या इटलीविषयी. तेव्हा भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या एक होता असे म्हटले तरी ब्रिटिशपूर्व काळात राजकीय दृष्ट्या भारत एक होता असे कसे म्हणता येईल? वरील आणि इतर प्रतिसादात तुम्ही एक तर सांस्कृतिक एकतेची उदाहरणे दिली आहेत किंवा ब्रिटिश आल्यानंतरच्या काळाची उदाहरणे दिली आहेत. ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा अगदी १८५७ मध्ये आपल्याकडे जी काही परिस्थिती होती ती राजकीयदृष्ट्या एकतेची नक्कीच नव्हती.काही उदाहरणे--- १. पानिपतचे युध्द हे भारतीय विरूध्द अफगाण होते असे म्हटले जाते.ते तसे खरोखरच होते का? का ते मराठे विरूध्द इतर सगळे (सूरजमल जाटाचा अपवाद वगळता) असे होते? अहमदशहा अब्दालीला बोलावले कोणी? नजीबखानाने, जो सांस्कृतिकदृष्ट्या एक होता त्याच भौगोलिक भागातील एकाने. अब्दालीबरोबर अयोध्येचा शुजाउद्दौला होताच. त्याच्या सैन्यात असलेले हिंदू गोसावी पण अब्दालीच्याच बाजूने होते असेही वाचले आहे. २. नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांचे आरमार बुडवले. म्हणजे पेशवे आणि आंग्रे यांची संस्कृती फार वेगळी होती अशातला भाग नाही.पण त्यांच्यात राजकीय वर्चस्वावरून खटके होते हे कसे नाकारता येईल?त्यातही पेशव्यांनी त्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली यावरून या लढाईसाठी राजकीय कारण अधिक महत्वाचे होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? ३. राणी लक्ष्मीबाईनेही ब्रिटिशांनी दत्तकविधान नाकारायचा निर्णय मागे घेतल्यास बंडवाल्यांपासून ब्रिटिशांपासून सुरक्षित ठेऊ अशी ऑफर दिली होती (संदर्भ: बिपीन चंद्रा यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स पान ३). म्हणजे भारत देश राजकीयदृष्ट्या एक करावा वगैरे गोष्टी राणी लक्ष्मीबाईलाही महत्वाच्या नव्हत्याच आणि तिची पण लॉयल्टी तिच्या संस्थानाविषयी होती असे म्हटले तर काय चुकले? तिची घोषणाही 'मेरी झाशी नही दूंगी' अशी होती तर 'मेरा भारत नही दूंगी' अशी नव्हती. अशी इतरही उदाहरणे देता येतील. भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक वगैरे आपण म्हणत असलो तरी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची कुठे संस्कृती एक होती? किंबहुना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्याला राजकीय स्वरूप आले त्याचे मूळ कारण हेच सांस्कृतिक फरक होते असे म्हटले तर काय चुकले? म्हणजे शिवाजी महाराजांनी जी मूल्ये अभिप्रेत होती ती जर आदिलशहा आणि मोंगल अंगीकारत असते तर स्वराज्यासाठी लढायची गरजच शिवाजी महाराजांना पडली नसती.पण या सांस्कृतिक मूल्यांमध्ये इतकी तफावत होती म्हणूनच महाराजांचा लढा उभा राहिला.समजा औरंगजेबाऐवजी दारा शुकोह सत्तेत आला असता तर कदाचित महाराजांचा लढा मोंगलांविरूध्द नसताही. तीच गोष्ट शीख आणि मोंगलांची.शीख पंथाची स्थापना झाल्यापासून पिढ्यानपिढ्या शीख आणि मोंगल यांच्यात हाडवैर होते.शीख आणि हिंदूंमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या बरेच साम्य होतेच--किंबहुना हिंदू कुटुंबांमधील सर्वात मोठा मुलगा शीख होण्याची परंपरा अगदी अलीकडल्या काळापर्यंत चालू होती (माझ्या पंजाबी मित्राच्या आजोबांचा मोठा भाऊ शीख झाला होता). पण मोंगल आणि शीख यांच्यात कसलेच सांस्कृतिक साम्य नव्हते.१८५७ मध्ये शीख ब्रिटिशांच्या बाजूने का उभे राहिले? कारण मोंगल बाहशहा बंडवाल्यांच्या बाजूने म्हटल्यावर मोंगल आणि शीख यांच्यातील पिढ्यानपिढ्यांचे हाडवैर लक्षात घेता हे होणे स्वाभाविक नाही का? तेव्हा भारत सांस्कृतिकदृष्ट्याही १००% एक होता असे म्हणता येणार नाही. अर्थातच आताच्या काळातील राष्ट्रवादाचे मूळ (बहुतांश असलेल्या) सांस्कृतिक एकतेत होते ही गोष्ट जशी नाकारण्यात अर्थ नाही त्याप्रमाणेच ब्रिटिश राज्यामुळे भारतीयांमध्ये आपण राजकीयदृष्ट्याही एक होऊ ही भावना वाढीस लागली हे पण नाकारण्यात अर्थ नाही असे मला वाटते. अनेकदा दोनपैकी एका टोकाचे मत मांडणारे लोक दिसतात.मला वाटते या बाबतीत दोन्ही टोके टाळून अधिक न्युअन्स्ड मत ठेवणे श्रेयस्कर.

In reply to by गॅरी ट्रुमन

तर्राट जोकर 22/02/2016 - 12:43
प्रतिसाद खूप आवडला आणि पटला. भारत राजकिय दृष्ट्या एक नव्हता हे सत्य लपवण्यासाठी संस्कृतीचे दुबळे कारण पुढे केले जाते.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 22/02/2016 - 13:44
आपण मी आधी केलेल्या विश्लेषणाच्या बर्‍याच भागाची दखल घेतली नसावी. १) एक मुस्लीम लिगच्या अपवाद सोडून दिला -त्यांनीही अत्यल्पकाळ का होईना दिल्लीत कॉंंग्रेस सोबत प्रयोग करुन पाहीला- भारतीय समाजमनाची एक राष्ट्र म्हणून घडन केली होती का एकसंघ राष्ट्रासाठीची इच्छा शक्ती जागृत होती का होय, तत्कालीन कॉंग्रेसचा प्रभाव भारतव्यापी होता - हे आकडेवारीनेही सिद्ध होते- त्यांनी एकसंघराष्ट्राचेच रुप जनतेच्या डोळ्यासमोर ठेऊन राजकीय जागृती व्यवस्थीतपणे घडवलेली होती, तसे नसते तर महात्मा गांधी उपोषण करताहेत अखंडभारत हलतो आहे असे चित्र दिसले नसते. २) भारतातील स्वातंत्र्य लढ्याचे स्वरुप आम्ही ब्रिटीशांच्या एकछत्री अमंलाकाही रहायचे नाही म्हणुन स्वांत्र्य लढा असे नव्हते, ३) तुम्ही बिस्मार्कोत्तर एकत्रित जर्मनीचे उदाहरण देताय पण ते १८६० ते १८७१ या काळात झाले त्यापुर्विच बहुतांश भारत ब्रिटिशांकडून एक करून झाला होता - भारत लिखीत इतिहासात ब्रिटीशांपुर्वी सम्राट चंद्रगुप्त ते अशोक तीन पिढ्यांचा काळ, मोगलांचा काळ बर्‍याच पिढ्या आणि औरंगजेबाच्या काळात सर्वाधिक भूभाग - याचे आपण क्रेडीट कुठेच देत नाही आपल्या पेक्षा जर्मनीचा एकत्र राहिल्याचा एकुण काळ आपल्या पेक्षा कितीतरी कमी भरतो तरी भारताच्या एकत्रिकरणाचा इतिहास कमी भरतो म्हणायचे ? ३) पौराणिक इतिहासांना अधिकृत इतिहास म्हणून स्विकारणे जड जाते म्हणून त्यावर मी भर देत नाही परंतु अश्वमेध यज्ञांचे (खखोदेजा पण एक राजकीय संस्कृतीचा अंशाची शक्यता म्हणून पाहता येईल -परशुरामाचे पृथ्वी जिंकणे, राम,अगस्त्याचे दक्षिणेत का काय येणे इत्यादी कथा कथा म्हणून बाजूस ठेवल्या तरी त्या मिथ्सचा मानसिक प्रभावही नाकारता येत नाही) अधिक उल्लेख असावेत ज्यात घोडा वर्षभरासाठी का काय सोडला जाई (जाणकारांनी दुरुस्त्या सुचवाव्यात) तो वर्षाभरात जिकडे जाईल तेवढा भूभाग जिंकला जाई. या अश्वमेध प्रकारात कितीही वर्णन केले तरी त्या काळात पूर्ण भारतभराची भूमी जिंकली गेली असे म्हणणे कठीण असावे पण यशस्वी राजाचा अश्वमेधाचा घोडा ज्या कोणत्या दिशेने गेला तेवढी एकसंघता येत असणार आणि बर्‍या पैकी फ्रीक्वेन्सीने बदलत असणार. म्हणजे वेगवेगळ्या भारतातीलच वेगवेगळ्या टोकाच्या राजांच्या खाली जगण्याचे जमवून घेण्याचे कौशल्य आणि संस्कृती राजघराणी आणि भारतीय समाजात वसत असावी असे म्हणता येईल का ? ३) हस्तिनापूर अथवा दिल्लीचे पूर्ण भारतावर प्रत्येकवेळी राज्य नसले तरी मुख्य प्रभाव अगदी पौराणिक काळापासून हस्तिनापूर अथवा दिल्लीचा होता हे खूपही डाऊनप्ले करता येत नाही. राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते. ४) बर्‍याच वेळा एकाच राजाचा एकछत्रि अंमल नसलातरीही इमिडीएट अथवा एक्सटेंडेड परिवार राजघराण्यांचे राज्य अ‍ॅड केले तर राजपरिवारांचा प्रभाव अधिक मोठा दिसू शकतो.
त्याचे मूळ कारण हेच सांस्कृतिक फरक होते असे म्हटले तर काय चुकले?
- आपण लोक विवीधतेला विसंगती म्हणुन दाखवून भारत एकसंघ नव्हता म्हणून एकसंघ राहू शकत नाही अशा तर्कावर येऊ इच्छित आहात का ? लोकमान्य टिळक शिवाजी जयंती साजरी करताना राष्ट्रपुरुष कोणत्या धर्मातून आला ते महत्वाचे नाही असे सांगत होते, उद्याचा राष्ट्रपुरुष कदाचित मुस्लिमही असू शकेल म्हणजे विवीधतेमुळे सांस्कृतिक फरक असतील पण राष्ट्र उभारणीची वेळ येते तेव्हा सास्कृतिक फरक दुय्यम होतात आणि एकात्मता महत्वाची होते. आणि कुठे कमी पडत असेल तर शक्यतोवर गांधीजींच्या मार्गाने अखंड भारत एक ठेवावा -पण तोच एकमेव मार्ग नव्हे- ते जमले नाही तर अगदी बिस्मार्कचा सशस्त्र मार्ग वापरुन विरोधकांना साम दाम दंड भेदाने नेस्त नाबूत करुनही भारत एक ठेवावा. भारताची विना अट अक्षुण्ण एकसंघता आणि अगदी कोणत्याहि किमतीवर कारण तुम्हीच जे सांगू इच्छिता आहात की जग म्हणजे तुम्ही किती वेळ एकत्र होता हे मोजते आणि एकत्र राहील्याचा अधिकाधिक काळ मोजला जाण्याचा एकमेव मार्ग अधिकाधिक काळ एकत्र रहाणे होय त्याला तरणोपाय नाही. एकत्र न राहणे म्हणजे भविष्यातील भारतीय संस्कृती बाहेरच्या पारतंत्र्यांना आमंत्रण देणे होय. अर्थात मागे काही चुका झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फोडा आणि झोडा नितीस सहानुभूती देणर्‍या विश्लेषणांना कोणत्याही माझ्या सारख्या देशप्रेमी व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती असणार नाही.

In reply to by माहितगार

गॅरी ट्रुमन 22/02/2016 - 14:16
मागे काही चुका झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फोडा आणि झोडा नितीस सहानुभूती देणर्‍या विश्लेषणांना कोणत्याही माझ्या सारख्या देशप्रेमी व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती असणार नाही.
माझीही नाही.
एकत्र न राहणे म्हणजे भविष्यातील भारतीय संस्कृती बाहेरच्या पारतंत्र्यांना आमंत्रण देणे होय.
सहमत आहे. मुद्दा एवढाच की पूर्वी भारत हा राजकीय दृष्ट्या एक होता हे म्हणण्यासारखी परिस्थिती होती असे मला तरी वाटत नाही. आणि मी असे म्हणत आहे याचा अर्थ सद्यकालीन भारत हा देशच नाही किंवा तत्सम कुठचेतरी गुडघ्यातले डावे विचार मला मान्य आहेत असे अजिबात नाही.
एक मुस्लीम लिगच्या अपवाद सोडून दिला -त्यांनीही अत्यल्पकाळ का होईना दिल्लीत कॉंंग्रेस सोबत प्रयोग करुन पाहीला- भारतीय समाजमनाची एक राष्ट्र म्हणून घडन केली होती का एकसंघ राष्ट्रासाठीची इच्छा शक्ती जागृत होती का होय, तत्कालीन कॉंग्रेसचा प्रभाव भारतव्यापी होता - हे आकडेवारीनेही सिद्ध होते- त्यांनी एकसंघराष्ट्राचेच रुप जनतेच्या डोळ्यासमोर ठेऊन राजकीय जागृती व्यवस्थीतपणे घडवलेली होती, तसे नसते तर महात्मा गांधी उपोषण करताहेत अखंडभारत हलतो आहे असे चित्र दिसले नसते.
काँग्रेसचा प्रभाव सर्वत्र होता हे कोणीच नाकारत नाही.पण परत एकदा-- काँग्रेसची स्थापना कधी झाली? १८८५ मध्ये. म्हणजे भारतात ब्रिटिश राज्य स्थिरावल्यानंतर. माझा मुद्दा भारतात ब्रिटिश येण्यापूर्वीचा आहे.
तुम्ही बिस्मार्कोत्तर एकत्रित जर्मनीचे उदाहरण देताय पण ते १८६० ते १८७१ या काळात झाले त्यापुर्विच बहुतांश भारत ब्रिटिशांकडून एक करून झाला होता
तोच तर माझा मुद्दा आहे. भारताला राजकीय स्वरूपात एकत्र आणण्यात ब्रिटिशांची भूमिका नक्कीच आहे. अर्थात ते त्यांचे ध्येयही नव्हते.पण सर्वत्र ब्रिटिश अंमल आल्यामुळे या घटनेचा तो एक भले अनइंटेंटेड परिणाम होता. तेव्हा सध्याच्या भारतीय राष्ट्रवादात आपल्या बहुतांश सांस्कृतिक एकतेचे योगदान आहे तसेच ब्रिटिश अंमलामुळे झालेल्या या अनइंटेंडेड परिणामाचेही आहे.
भारत लिखीत इतिहासात ब्रिटीशांपुर्वी सम्राट चंद्रगुप्त ते अशोक तीन पिढ्यांचा काळ, मोगलांचा काळ बर्‍याच पिढ्या आणि औरंगजेबाच्या काळात सर्वाधिक भूभाग - याचे आपण क्रेडीट कुठेच देत नाही
सम्राट चंद्रगुप्त ते अशोक म्हणजे २२००-२३०० वर्षांपूर्वीचा काळ होता.त्या काळात भारत राजकीय दृष्ट्या एक होता याचे महत्व कोणीच नाकारत नाही. पण मोंगलांचा काळ किंवा औरंगजेबाचा काळ??? सॉरी. मोंगल किंवा औरंगजेब हे मला कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत.असल्या गणंगांच्या नेतृत्वाखाली भारत एक असण्यापेक्षा ब्रिटिशांच्या अंमलाखाली एक असलेला कधीही परवडला (माझ्या दृष्टीने-- इतरांचे माहित नाही आणि याबद्दल कोणतीही चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही).
राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते.
हेच युरोपविषयीही बोलता येईल. ब्रिटिश राजपुत्रांचीही लग्ने इतर--फ्रेंच, जर्मन वगैरे देशांमधील राजकन्यांशी होत होती. रॉबर्ट वॉलपोलला इंग्लंडचा पहिला पंतप्रधान म्हणतात तो पंतप्रधान म्हणून कसा पुढे आला? त्यावेळी राजाचेही मंत्रीमंडळ असे.पहिला जॉर्ज राजाचा जन्म जर्मनीतील हॅनोव्हरचा होता आणि त्याला इंग्लिश भाषाही व्यवस्थित बोलता येत नसे. अशा परिस्थितीत मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून रॉबर्ट वॉलपोलच्या हातात सुत्रे गेली आणि तो इंग्लंडचा पहिला पंतप्रधान म्हणून प्रसिध्द झाला. याच पहिल्या जॉर्जची पत्नी सोफिया ही जर्मन होती.असे इतर अनेक राजांविषयी लिहिता येईल. मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून दिले होते ही गोष्ट तर प्रसिध्दच आहे. म्हणजे परस्परांबरोबर लग्नसंबंध असणे एवढ्याच कारणावरून राजकीय ऐक्य होते असे म्हणता येणार नाही. असो. मी जे काही लिहिले आहे त्याचा अर्थ पूर्वी भारत एक नव्हता म्हणून आताही असू नये वगैरे कोणी काढू नका. असल्या फालतू विचारांना मी फाट्यावर मारतो. रेसिडेंट नॉन-इंडिअन म्हणतात की भारताला राजकीय ऐक्य केवळ ब्रिटिशांमुळेच मिळाले तर त्याचवेळी अगदी कट्टर भारतीय संस्कृतीवाले म्हणतात की ते केवळ भारतीय संस्कृतीच्या एकत्मतेमुळे मिळाले. मला वाटते की सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. एवढाह माझा मुद्दा आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

माहितगार 22/02/2016 - 14:33
अल्प मतांतरे अद्याप आहेत पण काळाच्या ओघात चर्चा होत राहिल, तुमच्या प्रतिसादामुळे माझे मेगाबायटी प्रतिसाद कुणीतरी वाचले याची खात्री होऊन बरे वाटले. :) प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

असंका 24/02/2016 - 11:47
तुमच्या प्रतिसादामुळे माझे मेगाबायटी प्रतिसाद कुणीतरी वाचले याची खात्री होऊन बरे वाटले.
सुंदर लिहिलं आहेत. माझी खात्री आहे की अनेकांनी आपले प्रतिसाद वाचून मनातल्या मनात त्याला दाद दिली आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 22/02/2016 - 22:33
यावर एक मतप्रवाह असा आहे की रेल्वे आणि सनदी सेवा या गोष्टी भारतात एका राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरल्या. याबद्दल तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by बोका-ए-आझम

गॅरी ट्रुमन 23/02/2016 - 11:46
यावर एक मतप्रवाह असा आहे की रेल्वे आणि सनदी सेवा या गोष्टी भारतात एका राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरल्या.
रेल्वे किंवा सनदी सेवा किंवा अमुक एका गोष्टीच्या प्रभावापेक्षा मी ब्रिटिश राज्याविषयी लिहितो. मला वाटते की पूर्ण भारतात ब्रिटिशांचा अंमल असल्यामुळे एक गोष्ट नक्कीच झाली-- आपण कुठल्या लहान राज्याचे नागरिक असण्यापेक्षा भारताचे (भले ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या) नागरिक आहोत ही भावना प्रबळ झाली. काँग्रेस स्थापन व्हायच्या अगोदर दक्षिणेत मद्रास महाजन सभा, कलकत्याला (तशाच स्वरूपाची एक संस्था--नाव विसरलो) वगैरे संस्था स्थापन झाल्या होत्या.त्यांचा उद्देश 'नेटिव्हांचे' (पक्षी सर्व भारतीयांचे-- अमुक एका राज्याच्या नागरिकांचे नाही) हितरक्षण करणे हा होता. याच संस्थांचे लोक काँग्रेसमध्ये एकत्र आले.पूर्वी सांस्कृतिक पातळीवर जरी भारतीय एक असले तरी राजकीय पातळीवर एक यायला ज्या कॅटॅलिस्टची गरज होती ती गरज ब्रिटिश राज्याने पूर्ण केली असे मला वाटते. ब्रिटिश राज्य नसते तर ही भावना पूर्ण देशात कधीच आली नसती असे नक्कीच नाही पण त्याला किती वेळ लागला असता हे मात्र सांगता येणार नाही. आणि भारतात तसे काही व्हावे असा ब्रिटिशांचा उद्देश होता असेही नक्कीच नाही. पण अनेकदा होते असे की एखादी गोष्ट त्या उद्देशाने केली नसली तरी त्याचा अनइंटेंडेड परिणाम म्हणून दुसरी एखादी चांगली गोष्ट होते. माझा हे लिहिण्याचा उद्देश इतकाच की आपण भारतीय राष्ट्रवादी असलो तरी सध्या ज्या स्वरूपात भारतीय राष्ट्रवाद आहे त्या स्वरूपात येण्यासाठी मुळातील (बहुतांश) सांस्कृतिक ऐक्याबरोबरच ब्रिटिश राज्याचा हा अनइंटेंडेड परिणामसुध्दा कारणीभूत आहे आणि त्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली (कॅटॅलिस्ट) असे मला वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याकाळातील भारतातील परिस्थिती लक्षात घेता कोणीतरी बाहेरचे येऊन हातपाय पसरणार हे होणे अगदी क्रमप्राप्त होते.अशा प्रसंगी पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोक येण्यापेक्षा ब्रिटिश आले हे त्यातल्या त्यात बरे झाले असेच मला वाटते. अर्थात हे लिहिल्यामुळे मला काळा इंग्रज वगैरे म्हणणारे लोक आहेतच. अशांना फाट्यावर मारत आहे. असो. ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

कपिलमुनी 23/02/2016 - 21:24
क्लिंटन भौंसाठी ओबामा हे सदस्य नाम राखून ठेवावी ही विनंती ! ;) ( हलके घ्या )

माहितगार 22/02/2016 - 00:44
एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते रिपब्लिक म्हणजे गणराज्यच असणार आहे, समतेच तत्व त्यात अध्यार्‍हुत असणार आहे कारण गांधीअन स्वातंत्र्य लढ्याची संकल्पनाच स्वातंत्र्य विथ अ परपज अँड परपज इज बेनीफीट ऑफ द कॉमन मॅन हे अत्यंत सष्ट होते काँग्रेसी असोत वा काँग्रेसेतर बहुसंख्य राजकीय पक्षांची राजेशाही पुन्हा आणणे नाही या बाबत सहमती होती, या विषयाची फारशी साशंकता कल्पनेच्या राज्यात रमलेल्या दोनचार राजांच्या पलिकडे कुणाच्याही मनात त्याही काळात राहण्याचे काहीही कारण नव्हते. अगदी मुस्लिम लिगलाही गणराज्यच अभिप्रेत होते त्यांनी पाकीस्तानातही संस्थानिकांचे विलिनीकरणच केले. बहुतांश संस्थानिकांनी विलिनीकरणच्या वेळी फारशी खळखळही केली नाही सैनिकी दृष्ट्या त्यांना ते शक्यही असणार नव्हते, आणि संस्थानी जनतेचाही ओढा स्वच्छपणे लोकशाही राज्यव्यवस्थांकडे होता. तसे नसते तर १८५७ प्रमाणे उठाव दिसले असते दोन-चार अतीशहाण्या संस्थानिका शिवाय इतर कुणी प्रयत्नही केले नाहीत आणि दोनचा अती शहाणे भारतात असो का पाकीस्तानात त्यांची विलिनीकरणे करवली गेली तत्कालीन संस्थनीय जनतेस लोकशाहीचीच आकांक्षा होती. भारतीय राज्यघटने रुसवे फुगवे काढण्यापुरते काही राज्यांना कधी मधी अधिक माप मिळते पन सर्व घटक राज्यांना सर्वसाधारन पणे राज्यघटनेच्या माध्यमातून विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत. परकीय गुप्तहेरसंस्थांच्या आहारी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि राज्यघटना नीट न शिकलेल्या लोकांना फितवले जाते आहे हे दुर्दैवी आहे.

In reply to by माहितगार

आनन्दा 22/02/2016 - 10:10
एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी.
एव्हढेच लिहायला आलो होतो. सध्या लोक्सत्तामध्ये सदानंद मोरे यांचे एक सदर चालू आहे, त्यात परवाच त्यांनी फाळणी आणि त्यापेक्षा संस्थाने विलीनीकरणाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट या वाक्याला छेद देणारी आहे. ब्रिटिशांनी जर लोकनियुक्त सरकारशीच करार केले असते तर ही विलीनीकरणाची समस्याच निर्माण झाली नसती. जाताजाता - लेखकाला सल्ला तुम्ही एका फार मोठ्या संवेदनशील विषयाला हात घातलेला आहे, त्यामुळे लिहिताना खूप विचार करून आणि अभ्यास करून लिहा. तुमचा मिपावरच्या लेखनाचा इतिहास एका संवेदनशील लेखकाचा आहे म्हणून किमान चर्चा तरी होतेय, नाहीतर एव्हाना या धाग्यावर प्रतिसादांची राळ उडाली असती. बाकी तोच तुमचा हेतू असेल तर चालूद्या.

In reply to by आनन्दा

आनन्दा 22/02/2016 - 10:12
सॉरी, मला शेषराव मोरे म्हणायचे होते. ये मोरे मोरे बहोत कन्फ्युजन हो गया. लेखक पण मोरे, ते पण मोरे. कृ. ह.घ्या.

माहितगार 22/02/2016 - 00:50
अलेक्झांडर असो इराण असो अफगाण असो अथवा ब्रिटीश, भारतातील अनेक छोट्या छोट्या राज्यांमुळे परकीय आक्रमणांना तोंड देणे कठीण गेले हा इतिहास सर्व राजकीय दृष्टीकोणांच्या नेत्यांपुढे स्पष्ट होता - त्यामूळे मुस्लिम लिगचा आगाऊपणा सोडला तर - सर्वसाधारण पणे सर्व नेत्यांचे देशाच्या भावी एकसंघतेच्या गरजे बाबत आणि एकात्मतेच्या गरजे बाबत सर्व साधारण सहमती राहिलेली होती.

माहितगार 22/02/2016 - 00:54
मी वर नमुद केलेल्या बर्‍याच बाजु धागा लेखकाच्या विश्लेषणातून निसटल्या असाव्यात म्हणून त्यांचे लेखन तथ्य आणि तर्कसुसंगतेच्या निकषावर कितपत टिकते या बाबत दाट शंका आहेत आणि म्हणून धागा लेखाशी आमची असहमती

Anand More 22/02/2016 - 01:25
अहो... हा माझ्या लेखमालेचा पहिला भाग होता.... थोडे थांबला असतात तरकदाचित काही मुद्दे लिहावे लागले नसते तुम्हाला... पण, इतक्या सविस्तर प्रतिसादांसाठी धन्यवाद...

In reply to by Anand More

माहितगार 22/02/2016 - 11:20
सरजी, आपल्या मुद्याचा पाया कुठेतरी कच्चा राहीला असे आम्हाला जाणवले ते आम्ही एळीच मांडण्याचा अल्पसा प्रयास केला. प्रतिसादांची मनमोकळे पणाने नोंद घेतलीत छान वाटले

तर्राट जोकर 22/02/2016 - 02:01
माहितगारजी, जम्पिंग ऑन द कन्क्लुजन म्हणतात ते हेच. अजून मोरेंनी त्यांना काय म्हणायचे आहे हे पुर्ण मांडलेही नाही त्याआधीच आपण त्यांना काय म्हणायचे आहे हे सांगुन मोकळे झालात, त्यावर आपले प्रति-विचार मांडून टाकलेत. अतिघाई संकटात नेई.

In reply to by तर्राट जोकर

माहितगार 22/02/2016 - 11:06
तजो, मुळीच नाही उलटपक्षी पुढे चालून माझ्या विचारांच्या बाजूने लिहिणार आहेत का विरुद्ध हे माहित नसताना धागा लेखातील तथ्य आणि तर्क विषयक उणीवा मांडल्या आहेत.

अगम्य 22/02/2016 - 02:36
शेषराव मोरे साहेबांचे हे चारही लेख अतिशय उत्कृष्ट आहेत. अभिनिवेश रहित, तथ्याधारित लेखन. http://www.loksatta.com/sampadkiya-category/sanskrutsanwad/ दोन्ही मोऱ्यांच्या पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.

अजया 22/02/2016 - 09:26
माहितगारांचे टायर दुरूस्तीचे दुकान असावे असा संशय येतोय :) धागा खिळे टाकून पंक्चर केलात की!!आता दुरुस्तीला लेखकाला तुमच्याकडे येणे आले :)

In reply to by अजया

माहितगार 22/02/2016 - 11:13
धागा लेखकाची गाडी इतर कुणी पसरलेल्या खिळ्यांना न खिळे न चुकवता चालली होती, मागच्या गाड्यांनाही खिळ्यांवरुन नेऊ होती, टायर-ट्यूबला मुळचीच बरीच मोठ मोठी भोकं आहेत आणि गाडी पुढे जाण्याच्या आधी पंक्चर काढून दिले तर धागा लेखकाचा नैतर नै किमान काही वाचकांचा प्रवास अधिक सुखरुअ होईल म्हणून आम्ही टायर-ट्यूबला तर्क आणि तथ्याच्या पाण्यात घालून बुडबुडे आणि भोके दाखवून दिली नैतर खिळेवाल्या रस्त्यावरुन जाताना समद्या वाचकांच्या गाड्या पंक्चर झाल्या असत्या नै का

पगला गजोधर 22/02/2016 - 10:50
मोरेसर, अतिशय छान लिहिलंय… पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत…
राजांनी स्वातंत्र्य लढा केला नव्हता. तो केला होता जनतेने. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी. शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला एक मोठा भूभाग ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त होत एक देश म्हणून प्रस्थापित झाला. महामानव बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली, जगातली सर्वात मोठी अशी लिखित स्वरूपातली राज्यघटना तयार झाली होती. पण तिचे मर्म लोकांना कळायचे बाकी होते.
आणि इतिहासात नेहमी पाहतो, राज्ये / राजेशाही / सामंतशाही, ह्या धर्माला हाताशी धरून, स्वतःचा कंट्रोल जनतेवर ठेवतात. (उदा. राजा हा देवाचा अवतार आहे, अश्या समजुतीना बळ देणे ), राजेशाही / सामंतशाही यांना स्वतःचा उदो उदो व्हावा म्हणून धर्ममार्तंडाना स्पॉन्सर करत असतात. (युरोपातील राजेशाह्या चर्चला स्पॉन्सर करायचे ते अश्याच साठी)
एकाकडून (राजे / सामंत) घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी (जनतेच्या प्रतिनिधीशी).
म्हणजेच राजे /सामंतशाही लोकांच्या, मानसिकते नुसार, महात्मा गांधीजींमुळे राजसत्तेचा कंट्रोल जनतेच्या हाती गेला, त्यामुळे सामंतशाही लोकांना महात्मा, त्यांचे शत्रू वाटले गेले असतील, तर आश्चर्य वाटायला नको. याबाबतीत तुषार गांधी यांनी केलेले वक्तव्य पहा.
गांधी हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल ग्वाल्हेर येथून मिळाले होते. ग्वाल्हेरचे जिवाजीराजे शिंदे यांचा एडीसी असलेल्या ए. ए. वैद्य यांना मिळलेली इटली मेडचे हे पिस्तूल होते. हे पिस्तूल कुणी उपलब्ध करून दिले? या पिस्तूलला फॅसिस्ट स्पेशल म्हणून ओळखले जात होते. ही बाब कपूर आयोगातून समोर आली आहे.

भारतात इंग्लड मध्ये शिकेल्या भारतीय पुढार्यांनी भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढली , तेव्हा एक देश म्हणून भारत कसा असावा ह्या बद्दल च्या अनके संकल्पना ह्या त्या लोकांनी परदेशातून घेल्त्या सेकुल्यार ते लोकशाही भाषा स्वातंत्र्य ते भारतीय कायदे जे बहुसंख्य जुनाट असून बदलले पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी कि स्वतंत्र भारतात लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला अनेक दशके प्रबळ विरोधी पक्ष नव्हता ह्याचे त्यांना फावले. स्वातंत्र्य मिळालेल्या दिवशी भारतात ठिकठिकाणी धार्मिक दंगे चाली होते तर आतच्या पाकिस्तान व बांगला देश मध्ये हिंदूचा सरसकट नरसंहार चालला होता त्यावेळी आम्ही धर्म निरपेक्ष आहोत पाकिस्तान संकल्पना आम्हाला मान्य नाही हे गांधी नेहरू ह्यांनी ठर्वेलेले धोरण पुढे जिन्हा ह्यांच्या हिंसेच्या धोरणापुढे फिके पढून पाकिस्तान निर्मितीला मान्यता दिली ही मान्यता दिली तेव्हा खरे तर आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वांना त्यांनी तिलांजली दिली.अशावेळी उरलेल्या भारताला परत धर्म निरपेक्ष च्या खुंटीला बांधण्याचे पातक ह्या लोकांच्या हातून घडले त्यावेळी लोकांच्या ह्या विषयावर मतदान करण्याचा अधिकार असता तर त्यांनी धर्मनिरपेक्ष ह्या तत्व्याला मान्यता दिली नसती कारण त्यावेळी सुद्धा व आजही ह्या संकल्पनेशी पुरेशी माहिती खेड्यातील व शहरातील लोकांना माहिती नाही अनेकांना माहिती आहे पण मान्य माही ह्यातून धर्मनिरपेक्ष आपण नावापुरेते आहोत व राष्ट्रावाद्द त्यावर प्रतिसाद दुसर्या भागात जर तो आला तर ,,, आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे

भारत सांस्कृतिक दृष्ट्या एक नव्हता ना तो राजकीय दृष्ट्याही एक नव्हता. तस्मात भारतीय गणराज्याचे तुकडे करावे आणि आमचे पुण्याचे राज्य आम्हाला परत द्यावे. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहमत :) पण आमचा पाठिंबा एका तडजोडशून्य अटीवर... आम्ही राहतो ते पुण्याचे उपनगर पुणे राष्ट्रातले आमचे स्वायत्त संस्थान व्हाय्ला पायजेल ;) =))
"विष्णू पुराण" म्हणते की, उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे.

दिल से सलूट....

dipak bhutekar ·
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

रुग्णालयांशी संलग्न दुकानातून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही -------

पुणे मुंग्रापं ·

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:38
छान ,हे डॉक्टर लोक हल्ली फारच माजोरी झाले आहेत.पुर्वी यांची वैयक्तीक प्रॅक्टीस असायची ,आता हे टोळ्या करुन दरोडा टाकायच्या तयारीत असतात,CT MRI घेऊन त्यातूनही पैसा छापतात.मेडीकलचे म्हणाल तर यांच्याच नात्यातल्या सोम्यागोम्याला डी.फार्म करुन तिथे लुबाडायला बसवलेले असते.अनेक ठीकाणी पेशंटच्या नातेवाईकांनी यांना रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे पण ही लोक सुधारायचे नाव घेत नाहीत.

In reply to by गरिब चिमणा

खटपट्या 19/02/2016 - 03:34
क्रुपया सरसकटीकरण करु नका. कमीतकमी पैशांमधे जास्तीत जास्त सेवा देण्याची इच्छा असणारे डॉक्टरही परीचयाचे आहेत.

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 19/02/2016 - 09:26
रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे अगदी अगदी ठाण्यातील धर्मादाय चाललेले सिंघानिया रुग्णालय असेच बंद पाडलेले आहे. जय महाराष्ट्र फक्त गरीब ठाणेकर आता स्वस्तात उपचारासाठी कुठे जातात ते विचारू नका.

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:50
मिपावरचे डॉक काय ,त्यांच्याच लोकांची बाजू घेणार .रुग्णाने जागरुक असणे गरजेचे आहे.सातार्यात एखाद्या डॉक्टरने /हॉस्पीटलने जास्त बिल लावले तर लोक थेट उदयनराजेंकडे जातात,तिकडून फोन आला की मग बिल अर्ध्यावर करतात म्हणे.

In reply to by गरिब चिमणा

अन्नू 13/02/2016 - 18:06
सातार्‍याचे का? छान, मग आमचेच बंधू! ;) सातारा हॉस्पिटल हे नाव ऐकले आहे का? रोजचे किती पैसे छापतात ते लोक, हे जरा तिथल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विचारुन बघा जरा. :) अवांतर- याच उदयनजींचा वरदहस्त आहे म्हणे यांना, (खरं खोटं अलाहीदा) ;)

सुबोध खरे 13/02/2016 - 18:58
बहुसंख्य मोठ्या रुग्णालयात स्वतःचे औषधालय असते. तो एक रुग्णसेवेचा भाग असतो तसाच रुग्णालयाच्या नफ्याचा भाग असतो. कोणत्याही औषधाच्या किमती पैकी १५-२० % हा औषधालयाचा/ कोणत्याही केमिस्टचा नफा असतो. यात तेथे काम करणाऱ्या डॉक्टरला नफ्याचा भाग काही मिळत नाही तर ती "रुग्णालयाकडे" जातो. असे "मोठे" रुग्णालय पूर्ण खाजगी( तेथे काम करणाऱ्या डॉक्टरच्या मालकीचे) असेल तर गोष्ट वेगळी पण तसे क्वचित असते. पण म्हणून कोणत्याही रुग्णालयाने औषध आमच्याच औषधालयातूनच घेतले पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. हे एखाद्या लग्नाचा हॉल आमच्याच कंत्राटदाराचे कंत्राट घेतले पाहिजे म्हणून सर्रास आग्रह धरतात तसेच आहे. जर "लिहून दिलेलेच" औषध रुग्ण बाहेरून चांगल्या केमिस्ट किंवा कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून कडून आणत असेल तर तसे करण्यासाठी कोणतीही आडकाठी नसावी. काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-medicines-market-in-india-assocham-45393 औषध बनावट निघाले तरी चूक "डॉक्टर"चीच असते. कारण ते "लुटायलाच" बसलेले असतात. अशा परिस्थितीत तेथे काम करणारे डॉक्टर बेफाट आरोप करणारे रुग्ण आणि तेथील व्यवस्थापन यांच्या कात्रीत सापडलेला असतो. बाकी शहाण्या माणसाने आज डॉक्टर होऊ नये असे माझे स्पष्ट मत बनलेले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

आनन्दा 15/02/2016 - 09:26
खरेकाकांशा सहमत. पण तरीही दुप्पट किंमत आकारणे असमर्थनीय. मुद्दा बाहेरून औषधे आणण्याचा तर आहेच, पण त्याबरोबरच जास्त किंमत आकारण्याचा पण आहे. (त्यांनी एम आर पी पेक्षा जास्ती घेतले नाहीच म्हणा. नाहीतरी एमआरपी म्हणजे हल्ली टाईमपासच झालेला आहे.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 13/02/2016 - 21:58
काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...
याबाबत एक शंका...मोठ्ठी हॉस्पिटल्स कदाचित त्यांच्याकडच्या केमिस्टकडे ठेवली जाणारी औषधे पारखून घेत असतील...as a part of quality control...जी हॉस्पिटल्स लहान आहेत...ते लोक स्वतःच कदाचित जाणतेपणे अथवा अजाणतेपणे डुप्लिकेट औषधे ठेवत असतील तर???

मलाही हा अनुभव वडिलांच्या आजारपणात मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात आलेला आहे. त्यांना १ महिना रोज एक इंजेक्षन सकाळ संध्याकाळ घ्यायचे होते २१०० रु चे एक असलेले ते इंजेक्षन मी बाहेरुन ९०० रु. मध्ये आणले होते म्हणून व्यवस्थापनाबरोबर खूप वाद झाला होता पण आमचा डॉक्टर माझ्या बाजूने उभा राहीला आणि ते प्रकरण मिटले...

मदनबाण 18/02/2016 - 07:25
ग्राहक पंचायत इथे लिहती झाली आहे याचा विशेष आनंद आहे. असेच लिखाण आणि माहिती देणे चालु राहु दे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

कपिलमुनी 18/02/2016 - 07:40
हॉस्पिटलचेच स्टेंट अँजिओप्लास्टीला वापरायचे याच्यासारखी लूट नसेल

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 18/02/2016 - 09:43
मुनिवर आपले हे विधान अज्ञानजन्य आणि पुर्वग्रहदुषित किंवा अपुर्या माहितीवर आधारित आहे यात शंका नाही. यात दोन भाग आहेत. एक म्हणजे जेंव्हा आपली अँजिओ ग्राफी होते तोवर आपल्याला कोणत्या आकाराचा आणि किती लांबीचा स्टेंट लागेल हे समजणे शक्य नाही. प्रत्येक माणसाचा आंगठ्याचा ठसा दुसर्याशी मिळत नाही मग त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या कशा मिळणार हा मुलभूत फरक लोक समजावून घेत नाहीत. त्यातून रक्तवाहिन्यांचे जाळे आणि त्यात आलेले अडथळे हे कसे सारखे असणार म्हणजेच स्टेन्ट बसविण्यासाठी तितक्या जाडीचा त्याच आकाराचा आणि त्याच लांबीचा स्टेन्ट प्रत्येकाला वेगळा असतो. साधे कापडाच्या दुकानात गेलात तर प्यान्टचे रंग,लांबी, कंबर आकार हे वेगळे असतात. एवढे सगळे स्टेंट रुग्णालयाच्या औषधालयात ठेवावे लागतात. त्याच्या इन्व्हेंटरी ची किंमत कोण देणार? मोठ्या कापडाच्या दुकानात मिळणारे कापड महाग का असते याचे उत्तर शोधा. दुसरी गोष्ट-- आपण हॉटेलात बाहेरचे पदार्थ आणून खाऊ शकता का? किंवा होंडा च्या शो रूम मध्ये बाहेरून आणलेले सुटे भाग लावून मिळतील का? येथे तर तुमच्या शरीराच्या आत बसवलेला भाग एकदा बसवला कि काढता येत नाही अशा परिस्थितीत कोणते रुग्णालय बाहेरून आणलेला स्टेंट वापरून धोका पत्करतील? राहिली गोष्ट त्याच्या एम आर पी ची. डोळ्यात मोतीबिंदू नंतर बसवायचे भिंग रुपये ३०००/- पासून ३५०००/- पर्यंत मिळते कारण ते कमी दर्जाचे तंत्रज्ञान आहे आणि म्हणून भारतीय उत्पादक त्याचे उत्पादन करतात. स्टेंट हे अजून तरी आयात केले जातात. त्याची एम आर पी एक ते सव्वा लाख असून ते रुग्णालयांना ६५ हजार ते एक लाखाला मिळतात. यासाठी सरकारने ते जीवनावश्यक औषध किमत नियंत्रण कायद्याखाली आणायला पाहिजे.म्हणजे उत्पादन किमतीच्या १५- ३० % पेक्षा जास्त किंमत कंपन्यांना लावता येणार नाही. एका कॅथ लैब ची किंमत कमीत कमी ५ कोटी रुपयाच्या आसपास असते त्याशिवाय त्याला लागणारी जागा, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, बाकी उपकरणे, तंत्रज्ञ यांचे पगार याचा खर्च १० कोटीच्या पुढे जातो. तो करणे सामान्य सोडाच असामान्य डॉक्टरच्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून हे उपचार महागडे होत जातात. रुग्णालये चालविणारे डॉक्टर नसून एम बी ए किंवा उद्योगपती आहेत आणि ते नफ्यासाठीच रुग्णालये चालवितात. औषध कंपन्या चालविणारे हि डॉक्टर नसतात. त्यांना आमिषे दाखवून गळाला लावणारे हि डॉक्टर नसतात. "गळाला लागणारे" डॉक्टर यांचे येथे समर्थन नाही परंतु असे डॉक्टर या साखळीतील एक सर्वात "कमजोर कडी" आहेत ज्यांना कुणीही उठावे आणि कसेही ठोकावे. कारण आरोग्य आणि जीव हि एक पूज्य गोमाता आहे आणि डॉक्टरने रुग्णासाठी आपले आयुष्य आणि जीव ओवाळून टाकावा अशी समाजाची अपेक्षा आहे. बाकी औषध कंपन्या, विमा कंपन्या, कोर्पोरेट घराणी यांनी काहीही केलेले चालते. जालावर मोबाईल, टीव्ही किंवा क्यामेरा घेतला तर एम आर पी च्या ४० % स्वस्त का मिळतो आणि शोरूम मध्ये एम आर पी लाच का मिळतो.याचे उत्तर सर्वाना माहित आहे. पण त्यांना(शोरूमला ) कुणी लुटारू म्हणताना आढळले नाही. एवढेच कशाला चेन्नैला पूर आला तेंव्हा चेन्नई ते हैदराबाद तिकीट विमान कंपन्यांनी २८ हजार रुपयाला विकले. अँजिओप्लास्टी सरसकट आवश्यक आहे का किंवा आवश्यक नसताना ती केली याचा टाहो फोडणारे आणि त्यांना उद्युक्त करणारे बालाजी ताम्बेन्सारखे/ केरळ आयुर्वेद लोक आहेत. त्याचा ९०%( अँजिओप्लास्टी केली नाही तरी काही होणार नाही) आणि १०%( जे रुग्ण रुग्णालयात पोहोचणारच नाहीत) या सांख्यिकीचा प्रतीवाद मी इतर कुठे तरी केला आहे. कुणाला हवा असेल तर तो त्यांनी शोधावा. असो. कुणीही उठावे आणि वस्तुस्थिती माहित नसताना डॉक्टरना लुटारू म्हणावे याचा प्रतिवाद करायचा आता मला उद्वेग ही आला आहे आणि कंटाळा सुद्धा. मी यावर आता कोणताही वाद करणार नाही किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न हि करणार नाही. प्रत्येकाने आपल्या(गैर) समजुतीप्रमाणे मत बनवावे. इति लेखनसीमा

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 18/02/2016 - 19:40
डॉक्टर, मी कुठेही डॉक्टरना लुटारू म्हणालो नाही . मला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबद्दल बोलायचे होते. हॉस्पिटलची मॅनेजमेंट या गोष्टी करू देत नाही. पुण्यातल्या एका फार मोठ्या हॉस्पिटलमधला वैयक्तीक अनुभव सांगतो , तिथल्या भल्या डॉक्टरनेच हा सल्ला दिला होता , इथे स्टेंट घातलात तर महाग पडेल कारण मला यांचेच ईक्विपमेंट वापरावे लगतात. तुम्ही अमूक ठिकाणी ऑपरेशन करा. मी स्वतः येउन करतो. कारण बहुतांश सर्जन हे व्हिजिटींग असतात. बाकी माझा स्वतःच् माधव बाग , किलेशन थेरेपी , तांबे यां सारख्या गोष्टींवर विश्वास नाही. ( तो मुद्दा का लिहिला हेच कळला नाही ). आणि डॉक्टरांवर राग , आरोप नाही. पण स्टेंट ची प्रॉडक्शन कॉस्ट, इंपोर्ट कॉस्ट आणि सेलींग कॉस्ट यात खूप फरक आहे . पेशंट असो कि डॉक्तर , चांगल्या -वाईट प्रवृत्ती दोन्हीकडे असतात. सरसकटीकरण नको हीच इच्छा!

In reply to by सुबोध खरे

चिगो 19/02/2016 - 16:24
ह्या व्हिडीयो मध्ये दाखवलेली पद्धत वापरात आहे का? किंवा आपल्यामते ह्याप्रकारची सर्जरी होणे शक्य आहे का? मिपावरील अन्य डॉक्टरांनी/तज्ञांनी आपली मते मांडावीत, ही विनंती..

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:38
छान ,हे डॉक्टर लोक हल्ली फारच माजोरी झाले आहेत.पुर्वी यांची वैयक्तीक प्रॅक्टीस असायची ,आता हे टोळ्या करुन दरोडा टाकायच्या तयारीत असतात,CT MRI घेऊन त्यातूनही पैसा छापतात.मेडीकलचे म्हणाल तर यांच्याच नात्यातल्या सोम्यागोम्याला डी.फार्म करुन तिथे लुबाडायला बसवलेले असते.अनेक ठीकाणी पेशंटच्या नातेवाईकांनी यांना रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे पण ही लोक सुधारायचे नाव घेत नाहीत.

In reply to by गरिब चिमणा

खटपट्या 19/02/2016 - 03:34
क्रुपया सरसकटीकरण करु नका. कमीतकमी पैशांमधे जास्तीत जास्त सेवा देण्याची इच्छा असणारे डॉक्टरही परीचयाचे आहेत.

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 19/02/2016 - 09:26
रट्टे देऊन ,हॉस्पीटले तोडून यांना धडा शिकवला आहे अगदी अगदी ठाण्यातील धर्मादाय चाललेले सिंघानिया रुग्णालय असेच बंद पाडलेले आहे. जय महाराष्ट्र फक्त गरीब ठाणेकर आता स्वस्तात उपचारासाठी कुठे जातात ते विचारू नका.

गरिब चिमणा 13/02/2016 - 17:50
मिपावरचे डॉक काय ,त्यांच्याच लोकांची बाजू घेणार .रुग्णाने जागरुक असणे गरजेचे आहे.सातार्यात एखाद्या डॉक्टरने /हॉस्पीटलने जास्त बिल लावले तर लोक थेट उदयनराजेंकडे जातात,तिकडून फोन आला की मग बिल अर्ध्यावर करतात म्हणे.

In reply to by गरिब चिमणा

अन्नू 13/02/2016 - 18:06
सातार्‍याचे का? छान, मग आमचेच बंधू! ;) सातारा हॉस्पिटल हे नाव ऐकले आहे का? रोजचे किती पैसे छापतात ते लोक, हे जरा तिथल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विचारुन बघा जरा. :) अवांतर- याच उदयनजींचा वरदहस्त आहे म्हणे यांना, (खरं खोटं अलाहीदा) ;)

सुबोध खरे 13/02/2016 - 18:58
बहुसंख्य मोठ्या रुग्णालयात स्वतःचे औषधालय असते. तो एक रुग्णसेवेचा भाग असतो तसाच रुग्णालयाच्या नफ्याचा भाग असतो. कोणत्याही औषधाच्या किमती पैकी १५-२० % हा औषधालयाचा/ कोणत्याही केमिस्टचा नफा असतो. यात तेथे काम करणाऱ्या डॉक्टरला नफ्याचा भाग काही मिळत नाही तर ती "रुग्णालयाकडे" जातो. असे "मोठे" रुग्णालय पूर्ण खाजगी( तेथे काम करणाऱ्या डॉक्टरच्या मालकीचे) असेल तर गोष्ट वेगळी पण तसे क्वचित असते. पण म्हणून कोणत्याही रुग्णालयाने औषध आमच्याच औषधालयातूनच घेतले पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. हे एखाद्या लग्नाचा हॉल आमच्याच कंत्राटदाराचे कंत्राट घेतले पाहिजे म्हणून सर्रास आग्रह धरतात तसेच आहे. जर "लिहून दिलेलेच" औषध रुग्ण बाहेरून चांगल्या केमिस्ट किंवा कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून कडून आणत असेल तर तसे करण्यासाठी कोणतीही आडकाठी नसावी. काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-medicines-market-in-india-assocham-45393 औषध बनावट निघाले तरी चूक "डॉक्टर"चीच असते. कारण ते "लुटायलाच" बसलेले असतात. अशा परिस्थितीत तेथे काम करणारे डॉक्टर बेफाट आरोप करणारे रुग्ण आणि तेथील व्यवस्थापन यांच्या कात्रीत सापडलेला असतो. बाकी शहाण्या माणसाने आज डॉक्टर होऊ नये असे माझे स्पष्ट मत बनलेले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

आनन्दा 15/02/2016 - 09:26
खरेकाकांशा सहमत. पण तरीही दुप्पट किंमत आकारणे असमर्थनीय. मुद्दा बाहेरून औषधे आणण्याचा तर आहेच, पण त्याबरोबरच जास्त किंमत आकारण्याचा पण आहे. (त्यांनी एम आर पी पेक्षा जास्ती घेतले नाहीच म्हणा. नाहीतरी एमआरपी म्हणजे हल्ली टाईमपासच झालेला आहे.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा 13/02/2016 - 21:58
काही वेळेस रुग्ण त्या औषध ऐवजी दुसरे औषध "स्वस्त" मिळते म्हणून आणतात. हे दुसरे औषध जर एखाद्या प्रथितयश कंपनीचे असेल तर ठीक आहे अन्यथा औषध जर कमी दर्जाचे किंवा बनावट असेल आणि रुग्णाला आराम मिळाला नाही तर याची जबाबदारी डॉक्टरवरच येते. अशा ठिकाणी डॉक्टर धोका पत्करण्यास तयार नसतात. भारतात मिळणाऱ्या औषधांपैकी २५ % औषधे बनावट असतात. Fake drugs constitute 25% of domestic medicines market in India: ASSOCHAM http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...
याबाबत एक शंका...मोठ्ठी हॉस्पिटल्स कदाचित त्यांच्याकडच्या केमिस्टकडे ठेवली जाणारी औषधे पारखून घेत असतील...as a part of quality control...जी हॉस्पिटल्स लहान आहेत...ते लोक स्वतःच कदाचित जाणतेपणे अथवा अजाणतेपणे डुप्लिकेट औषधे ठेवत असतील तर???

मलाही हा अनुभव वडिलांच्या आजारपणात मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात आलेला आहे. त्यांना १ महिना रोज एक इंजेक्षन सकाळ संध्याकाळ घ्यायचे होते २१०० रु चे एक असलेले ते इंजेक्षन मी बाहेरुन ९०० रु. मध्ये आणले होते म्हणून व्यवस्थापनाबरोबर खूप वाद झाला होता पण आमचा डॉक्टर माझ्या बाजूने उभा राहीला आणि ते प्रकरण मिटले...

मदनबाण 18/02/2016 - 07:25
ग्राहक पंचायत इथे लिहती झाली आहे याचा विशेष आनंद आहे. असेच लिखाण आणि माहिती देणे चालु राहु दे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

कपिलमुनी 18/02/2016 - 07:40
हॉस्पिटलचेच स्टेंट अँजिओप्लास्टीला वापरायचे याच्यासारखी लूट नसेल

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 18/02/2016 - 09:43
मुनिवर आपले हे विधान अज्ञानजन्य आणि पुर्वग्रहदुषित किंवा अपुर्या माहितीवर आधारित आहे यात शंका नाही. यात दोन भाग आहेत. एक म्हणजे जेंव्हा आपली अँजिओ ग्राफी होते तोवर आपल्याला कोणत्या आकाराचा आणि किती लांबीचा स्टेंट लागेल हे समजणे शक्य नाही. प्रत्येक माणसाचा आंगठ्याचा ठसा दुसर्याशी मिळत नाही मग त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या कशा मिळणार हा मुलभूत फरक लोक समजावून घेत नाहीत. त्यातून रक्तवाहिन्यांचे जाळे आणि त्यात आलेले अडथळे हे कसे सारखे असणार म्हणजेच स्टेन्ट बसविण्यासाठी तितक्या जाडीचा त्याच आकाराचा आणि त्याच लांबीचा स्टेन्ट प्रत्येकाला वेगळा असतो. साधे कापडाच्या दुकानात गेलात तर प्यान्टचे रंग,लांबी, कंबर आकार हे वेगळे असतात. एवढे सगळे स्टेंट रुग्णालयाच्या औषधालयात ठेवावे लागतात. त्याच्या इन्व्हेंटरी ची किंमत कोण देणार? मोठ्या कापडाच्या दुकानात मिळणारे कापड महाग का असते याचे उत्तर शोधा. दुसरी गोष्ट-- आपण हॉटेलात बाहेरचे पदार्थ आणून खाऊ शकता का? किंवा होंडा च्या शो रूम मध्ये बाहेरून आणलेले सुटे भाग लावून मिळतील का? येथे तर तुमच्या शरीराच्या आत बसवलेला भाग एकदा बसवला कि काढता येत नाही अशा परिस्थितीत कोणते रुग्णालय बाहेरून आणलेला स्टेंट वापरून धोका पत्करतील? राहिली गोष्ट त्याच्या एम आर पी ची. डोळ्यात मोतीबिंदू नंतर बसवायचे भिंग रुपये ३०००/- पासून ३५०००/- पर्यंत मिळते कारण ते कमी दर्जाचे तंत्रज्ञान आहे आणि म्हणून भारतीय उत्पादक त्याचे उत्पादन करतात. स्टेंट हे अजून तरी आयात केले जातात. त्याची एम आर पी एक ते सव्वा लाख असून ते रुग्णालयांना ६५ हजार ते एक लाखाला मिळतात. यासाठी सरकारने ते जीवनावश्यक औषध किमत नियंत्रण कायद्याखाली आणायला पाहिजे.म्हणजे उत्पादन किमतीच्या १५- ३० % पेक्षा जास्त किंमत कंपन्यांना लावता येणार नाही. एका कॅथ लैब ची किंमत कमीत कमी ५ कोटी रुपयाच्या आसपास असते त्याशिवाय त्याला लागणारी जागा, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, बाकी उपकरणे, तंत्रज्ञ यांचे पगार याचा खर्च १० कोटीच्या पुढे जातो. तो करणे सामान्य सोडाच असामान्य डॉक्टरच्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून हे उपचार महागडे होत जातात. रुग्णालये चालविणारे डॉक्टर नसून एम बी ए किंवा उद्योगपती आहेत आणि ते नफ्यासाठीच रुग्णालये चालवितात. औषध कंपन्या चालविणारे हि डॉक्टर नसतात. त्यांना आमिषे दाखवून गळाला लावणारे हि डॉक्टर नसतात. "गळाला लागणारे" डॉक्टर यांचे येथे समर्थन नाही परंतु असे डॉक्टर या साखळीतील एक सर्वात "कमजोर कडी" आहेत ज्यांना कुणीही उठावे आणि कसेही ठोकावे. कारण आरोग्य आणि जीव हि एक पूज्य गोमाता आहे आणि डॉक्टरने रुग्णासाठी आपले आयुष्य आणि जीव ओवाळून टाकावा अशी समाजाची अपेक्षा आहे. बाकी औषध कंपन्या, विमा कंपन्या, कोर्पोरेट घराणी यांनी काहीही केलेले चालते. जालावर मोबाईल, टीव्ही किंवा क्यामेरा घेतला तर एम आर पी च्या ४० % स्वस्त का मिळतो आणि शोरूम मध्ये एम आर पी लाच का मिळतो.याचे उत्तर सर्वाना माहित आहे. पण त्यांना(शोरूमला ) कुणी लुटारू म्हणताना आढळले नाही. एवढेच कशाला चेन्नैला पूर आला तेंव्हा चेन्नई ते हैदराबाद तिकीट विमान कंपन्यांनी २८ हजार रुपयाला विकले. अँजिओप्लास्टी सरसकट आवश्यक आहे का किंवा आवश्यक नसताना ती केली याचा टाहो फोडणारे आणि त्यांना उद्युक्त करणारे बालाजी ताम्बेन्सारखे/ केरळ आयुर्वेद लोक आहेत. त्याचा ९०%( अँजिओप्लास्टी केली नाही तरी काही होणार नाही) आणि १०%( जे रुग्ण रुग्णालयात पोहोचणारच नाहीत) या सांख्यिकीचा प्रतीवाद मी इतर कुठे तरी केला आहे. कुणाला हवा असेल तर तो त्यांनी शोधावा. असो. कुणीही उठावे आणि वस्तुस्थिती माहित नसताना डॉक्टरना लुटारू म्हणावे याचा प्रतिवाद करायचा आता मला उद्वेग ही आला आहे आणि कंटाळा सुद्धा. मी यावर आता कोणताही वाद करणार नाही किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न हि करणार नाही. प्रत्येकाने आपल्या(गैर) समजुतीप्रमाणे मत बनवावे. इति लेखनसीमा

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 18/02/2016 - 19:40
डॉक्टर, मी कुठेही डॉक्टरना लुटारू म्हणालो नाही . मला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबद्दल बोलायचे होते. हॉस्पिटलची मॅनेजमेंट या गोष्टी करू देत नाही. पुण्यातल्या एका फार मोठ्या हॉस्पिटलमधला वैयक्तीक अनुभव सांगतो , तिथल्या भल्या डॉक्टरनेच हा सल्ला दिला होता , इथे स्टेंट घातलात तर महाग पडेल कारण मला यांचेच ईक्विपमेंट वापरावे लगतात. तुम्ही अमूक ठिकाणी ऑपरेशन करा. मी स्वतः येउन करतो. कारण बहुतांश सर्जन हे व्हिजिटींग असतात. बाकी माझा स्वतःच् माधव बाग , किलेशन थेरेपी , तांबे यां सारख्या गोष्टींवर विश्वास नाही. ( तो मुद्दा का लिहिला हेच कळला नाही ). आणि डॉक्टरांवर राग , आरोप नाही. पण स्टेंट ची प्रॉडक्शन कॉस्ट, इंपोर्ट कॉस्ट आणि सेलींग कॉस्ट यात खूप फरक आहे . पेशंट असो कि डॉक्तर , चांगल्या -वाईट प्रवृत्ती दोन्हीकडे असतात. सरसकटीकरण नको हीच इच्छा!

In reply to by सुबोध खरे

चिगो 19/02/2016 - 16:24
ह्या व्हिडीयो मध्ये दाखवलेली पद्धत वापरात आहे का? किंवा आपल्यामते ह्याप्रकारची सर्जरी होणे शक्य आहे का? मिपावरील अन्य डॉक्टरांनी/तज्ञांनी आपली मते मांडावीत, ही विनंती..
सुमारे सात वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात आमचा नातू चि. इशान याला व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आला. पुढे ते इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले व त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. ताबडतोब त्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्याला ADEM नावाचा दुर्मिळ रोग झाला आहे ,असे मेंदूविकाराचे तज्ञ डॉ. दिवटे यांनी निदान केले. त्यावर एकमेव इलाज म्हणून Iviglob या आयात केलेल्या औषधाची इंजेक्शन्स रोज तीन वेळा याप्रमाणे पाच दिवस देण्यात आली. तो ९ जानेवारी ते १३ फ़ेब्रुवारी या मुदतीत सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होता. औषधोपचार लागू पडून तो बरा झाला याबद्दल आम्ही हॉस्पिटलचे मनापासून आभारी आहोत.

राशोमोन (भाग - २) चित्रपट

Anand More ·

सिरुसेरि 20/02/2016 - 15:06
राशोमोनला खुप प्रसिद्धी मिळाली . त्यामानाने "सेवन सामुराई" , "द लास्ट सामुराई" , "४७ रोनीन" हे चित्रपट चांगले आहेत .

In reply to by स्पा

Anand More 20/02/2016 - 17:38
स्पा, हा सगळा गमतीदार प्रकार आहे … मी काही बोललो की तुम्ही सगळे लेखकाने काय करावे? जनातलं मनातलं चे नियम काय? फेसबुकच्या कुठल्या सवयी इथे आणि नये? असल्या आचार संहिता सांगतात आणि मागून येउन चिमटे, धपाटे, टपल्या मारून पळून जाता. ररा इथून का गेले असावेत याचा थोडा अंदाज येतोय मला. माझ्यातही तुम्हाला हूछभ्रू म्हणून चिडवायला अजून एक गिऱ्हाईक मिळालं असं वाटतंय मला. लवकर इथून गाशा गुंडाळावा हेच उत्तम.

In reply to by Anand More

अभ्या.. 20/02/2016 - 18:26
मी काही बोललो की तुम्ही सगळे लेखकाने काय करावे? जनातलं मनातलं चे नियम काय? फेसबुकच्या कुठल्या सवयी इथे आणि नये? असल्या आचार संहिता सांगतात आणि मागून येउन चिमटे, धपाटे, टपल्या मारून पळून जाता
तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे. मिपा हे सर्वांसाठीच आहे. तुम्हाला जसे प्रतिसाद मिळावे असे वाटते अन लिहिता तसेच इतर बरेच जण लिहितात. आपण किती जणांचे वाचता? किती प्रतिसाद दिलेत? फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय. नुसते हार मिळाले की वावावा अन कांदे बटाटे येताच मेंबरावर आगपाखड करायची ही सवय काही आज पाहीलेली नाही. बाकी ररांबरोबर आपला परिचय आहेच. कारण त्यांना विचारुन घ्यावे. सगळ्यात महत्त्वाचे
लवकर इथून गाशा गुंडाळावा हेच उत्तम.
वेल्कम टू "जातो मी" क्लब ;)

In reply to by सिरुसेरि

Anand More 20/02/2016 - 17:36
सिरुसेरि, माणसांप्रमाणे चित्रपट देखील नशीब काढून येत असतील काय? कुणास ठाऊक. पण एखादी चांगली कलाकृती मागे पडणे आणि इतर कलाकृती वाखाणली जाणे हे अनेक ठिकाणी दिसून येते. शेवटी चित्रपटातून कला दिसत असली तारे चित्रपट हा एक बेभरवशाचा धंदा आहे हेच खरं.

सिरुसेरि 20/02/2016 - 15:06
राशोमोनला खुप प्रसिद्धी मिळाली . त्यामानाने "सेवन सामुराई" , "द लास्ट सामुराई" , "४७ रोनीन" हे चित्रपट चांगले आहेत .

In reply to by स्पा

Anand More 20/02/2016 - 17:38
स्पा, हा सगळा गमतीदार प्रकार आहे … मी काही बोललो की तुम्ही सगळे लेखकाने काय करावे? जनातलं मनातलं चे नियम काय? फेसबुकच्या कुठल्या सवयी इथे आणि नये? असल्या आचार संहिता सांगतात आणि मागून येउन चिमटे, धपाटे, टपल्या मारून पळून जाता. ररा इथून का गेले असावेत याचा थोडा अंदाज येतोय मला. माझ्यातही तुम्हाला हूछभ्रू म्हणून चिडवायला अजून एक गिऱ्हाईक मिळालं असं वाटतंय मला. लवकर इथून गाशा गुंडाळावा हेच उत्तम.

In reply to by Anand More

अभ्या.. 20/02/2016 - 18:26
मी काही बोललो की तुम्ही सगळे लेखकाने काय करावे? जनातलं मनातलं चे नियम काय? फेसबुकच्या कुठल्या सवयी इथे आणि नये? असल्या आचार संहिता सांगतात आणि मागून येउन चिमटे, धपाटे, टपल्या मारून पळून जाता
तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे. मिपा हे सर्वांसाठीच आहे. तुम्हाला जसे प्रतिसाद मिळावे असे वाटते अन लिहिता तसेच इतर बरेच जण लिहितात. आपण किती जणांचे वाचता? किती प्रतिसाद दिलेत? फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय. नुसते हार मिळाले की वावावा अन कांदे बटाटे येताच मेंबरावर आगपाखड करायची ही सवय काही आज पाहीलेली नाही. बाकी ररांबरोबर आपला परिचय आहेच. कारण त्यांना विचारुन घ्यावे. सगळ्यात महत्त्वाचे
लवकर इथून गाशा गुंडाळावा हेच उत्तम.
वेल्कम टू "जातो मी" क्लब ;)

In reply to by सिरुसेरि

Anand More 20/02/2016 - 17:36
सिरुसेरि, माणसांप्रमाणे चित्रपट देखील नशीब काढून येत असतील काय? कुणास ठाऊक. पण एखादी चांगली कलाकृती मागे पडणे आणि इतर कलाकृती वाखाणली जाणे हे अनेक ठिकाणी दिसून येते. शेवटी चित्रपटातून कला दिसत असली तारे चित्रपट हा एक बेभरवशाचा धंदा आहे हेच खरं.
भाग १ ---------------------- मी चित्रपट पाहणार नव्हतो. आणि न पाहताच जर त्यावर काही लिहिले असते तर माझ्या मतावर तुमच्या मताची दाट छाया पडली असती किंवा माझे मत परप्रकाशित राहिले असते. याचा अर्थ असा नव्हे की मला जाणवलेला चित्रपटाचा अर्थ तुम्हाला जाणवलेल्या अर्थाच्या पूर्ण विरुद्ध आहे.

राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

Anand More ·

बोका-ए-आझम 12/02/2016 - 19:03
यात अजून एक मुद्दा हा मांडावासा वाटतो की सत्य जाणून घ्यायचा हेतू काय आहे? दुस-या शब्दांत - सत्य का जाणून घ्यायचं? जर माझ्या आयुष्यात सत्य काय हे जाणून घेतल्यामुळे फरक पडत असेल तर मी जरुर त्यासाठी प्रयत्न करीन पण जर मला काहीही फरक पडत नसेल तर सत्य काय आणि असत्य काय - हे दोन्हीही माझ्यासाठी सारखेच. मी जर उंदीर असेन तर एखादं मांजर प्रकाशात कसं दिसतं हे जाणून घेण्याने मला फरक पडतो. मी जर माणूस असेन (मांजर हा ज्याचा भक्षक नाही असा प्राणी या अर्थाने हा शब्द घ्यावा) तर who cares?

In reply to by बोका-ए-आझम

एस 12/02/2016 - 19:36
सत्य शोधण्यामागचे कारण हे वैयक्तिक असायलाच हवे असे नाही. सत्य जाणून घेण्यामागच्या जिज्ञासेच्या मुळाशी मानवी जीवात नैसर्गिकरित्या असलेले कुतूहल आहे. यात माझ्या जीवनात काय व किती फरक पडला हा इतर अनेक उद्देशांपैकी एक उद्देश असू शकतो, परंतु एकमेव नाही.

In reply to by एस

बोका-ए-आझम 12/02/2016 - 21:11
हाच सामान्य आणि असामान्य माणसांमधला फरक आहे. अर्थात नोबेल पारितोषिक आणि इतर मानमरातब मिळवणं हा हेतूही आज असू शकतो. पूर्वी जेव्हा असं काही नव्हतं तेव्हाच्या शास्त्रज्ञांनी ज्ञान या एकाच उद्देशाने संशोधन केलं. मेंडेलीफने सर्व मूलद्रव्यांची आवर्तसारणी बनवली किंवा गॅलिलिओने Law of Falling Bodies ची प्रयोगाने सिद्धता दिली त्यामागे तुम्ही म्हणताय तशी निरपेक्ष वृत्ती असावी. रच्याकने युक्लिडने भूमितीची रचना आमचा छळ करण्यासाठी केलेली आहे असं शाळेत वाटायचं. आता अर्थात त्याचं महत्व समजतं. :)

In reply to by बोका-ए-आझम

Anand More 13/02/2016 - 10:45
सत्य जाणून घ्यायचा हेतू कुतूहल हाच असावा. आणि कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्यामुळे माझ्या लेखी सत्यशोधन ही देखील मुळातील नैसर्गिक प्रवृत्तीच ठरते. कुतूहलाच्या मागे आपले अस्तित्व टिकवणे ही आदिम प्रेरणा असावी. इतर प्राण्यांप्रमाणे आपण केवळ नैसर्गिक निवान जगत नसून आपण सामाजिक जीवन जगत असतो, त्यामुळे आपल्या कुतूहलाच्या मागे अस्तित्व टिकवण्याच्या नैसर्गिक प्रेरणेबरोबरच इतरही अनेक प्रेरणा काम काम करीत असतात . वर सांगितल्याप्रमाणे सत्यशोधन ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे हे मान्य झाल्यास ती सर्व प्राण्यात त्यांच्या आयुष्याच्या लांबीप्रमाणे आणि अस्तित्व टिकवून ठेवायला लागणाऱ्या धडपडीप्रमाणे आढळून येते हे मान्य करायला सोपे जाईल. पण सत्यप्रस्थापन हा मात्र सामाजिक जीवन जगणाऱ्या मनुष्य प्राण्याचा गुणविशेष आहे. एकाच समाजात राहणाऱ्या आणि परस्परावलंबी असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या सत्यशोधनानंतर त्यांना जाणवलेले सत्य जेंव्हा ते प्रकट करतात तेंव्हा त्या व्यक्त सत्याचे रूप एकच रहात नाही तर ते वेगवेगळे दिसते. मग कुठले सत्य खरे हा प्रश्न पडतो आणि सत्य प्रस्थापना हा एक नवीनच उद्योग मानवाला करावासा वाटतो. आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात. रमतारामांची आणि माझीलेखमाला मुख्यत्वे या सत्यप्रस्थापनेबाबत आणि त्यात येणाऱ्या अडचणीबाबत आहे. शक्य झाल्यास माझ्या याच लेखातील "सत्याचे अन्वेषण / आकलन" आणि "सत्याचे प्रकटीकरण" या शीर्षकाखाली लिहिलेले परिच्छेद पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला या लेखनामागची भूमिका जाणवेल.

In reply to by Anand More

Anand More 13/02/2016 - 11:32
वरच्या माझ्या प्रतिसादातील, "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." या वाक्याला "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य त्यांना पटले तर तेच अंतिम मानून उरलेल्या इतरांनीदेखील त्याला मान्य करावे, जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." असे वाचा, ही विनंती.

In reply to by Anand More

सटक 17/02/2016 - 02:30
सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला आहे आपण. सत्य हे तुम्ही सांगितलेल्या मर्यादांनी बाध्य आहेच परंतु इतर सर्व गोष्टी बरोबर असतानाही सत्याचे आकलन हवे तसेच होईल असे म्हणणे धाडसाचे आहे. सत्य हा शेवटी संवाद आहे असे मला वाटते. घटनाक्रमाचे सुसुत्रीकरण करण्यासाठी आपण जे framework बनवतो त्याला ढोबळमनाने सत्यान्वेषण असे म्हणता येइल. ह्या अर्थाने ती आदिम प्रेरणा आहे हे बरोबर आहे आणि नाईलाजाने मानवाच्या अस्तित्वाबरोबरच ते अस्तित्वात येते. तरीही सत्य हे personal असतेच. वैज्ञानिक सत्याचा येवढा बोलबाला असण्याचे कारण असे आहे की ते काही विशिष्ठ स्थितींमध्ये पुनर्गठित होऊ शकते. कितीही अवघड आणि हास्यास्पद वाटले तरी. वानगीदाखल म्हणायचे तर JFK assassination ज्या प्रसिद्ध single bullet theory चा वापर करून विषद केले गेले ती प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवली होती (म्हणे!). पण येवढा एकच निकष सत्याला लावता येत नाही. "मी रात्री २ वाजता फलाटावरून बाहेर आलो..चिटपाखरूही नव्हते..काय करणार ह्या विचारात असतानाच स्वामींनीच रिक्षा पाठवली!" हे ही सांगणार्‍याच्या द्र्ष्टीने सत्यच आहे हे विसरून चालणार नाही. पुन्हा सत्य आकलन होण्यात आपण "उपस्थित" असणे हा ही महत्वाचा भाग आहे..ज्ञानेंद्रिये उत्तम काम करत असली तरी आपण गाडी चालवत चालवत घरी येतो आणि कसे आलो ते आठवत नाही हा ही सार्वत्रिक अनुभव आहे. सत्याचे आकलन हे अजूनही बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. उदाहरणादाखल Thumbs Up ची खूण आपल्याकडे ठेंगा दाखवणे अशी वापरली जात असल्याने तिचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि पाश्चातत्य लोकांना अभिप्रेत असलेला अर्थ वेगवेगळे आहेत; हा झाला सांस्कृतिक गोंधळ! (हे उदाहरण साक्ष देण्याच्या दृष्टीने वाचावे. कुणी कुणाला अंगठा वर करून दाखवला तर भारतीय माणूस म्हणेल की तो त्याला वाकुल्या दाखवत होता आणि पाश्चात्य म्हणेल की त्याला प्रोत्साहन देत होता) Total Blackout नावाच्या एका कार्यक्रमात अंधारामुळे माणसाच्या आकलनशक्तीत कसे फसवे बदल होतात ह्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळते. याच मर्यादांनी बाध्य सत्याचे प्रकटीकरणही असणे ओघाने आलेच! मुद्रा ज्यांना कळत नाहीत त्यांना भारतीय नृत्यातून काही सांगण्याचा प्रयत्न करणे(म्हणजे काही कळण्याची अपेक्षा करणे) अवघडच! त्यामुळे, प्रत्येक सत्य हा सादरकर्त्याचा स्वतःचा अविष्कार असते असे मला वाटते. आता हे आपणास महिती असलेले सत्य दुसर्‍यास सांगणे ह्या अर्थाने पाहिले तर अर्थातच ते बदलणार! म्हणजे बदलेलच असे नाही पण बदलणार नाहीच असे कसे म्हणणार? प्रत्येक कलाकार स्वतःच्या कलाकृतीमधून दर्शकाला (प्रेक्षकाला) आपल्याला जाणवलेल्या सत्याचे दर्शन घडवत असतो. दुर्बोधता ही केवळ lack of reference असते असे मला वाटते. येथे जाणवलेले हा शब्द ह्यासाठी की ते सत्य त्याला व्यक्त पातळीवर कळले असेलच असे नाही, पण जाणवणे शक्य आहे. (म्हणजे मातेचा स्तन जवळ आल्यावर तान्ह्या बाळाला आता स्तनपान करायचे आहे हे जाणवते तसेच.) कलाकार जेवढा प्रेक्षकाच्या frame of reference च्या बाहेर जातो तेवढा तो अधिकाधिक abstract किंवा दुर्बोध होत जातो. (येथे किंवा हा शब्द either/or असा नाही तर..आकळला तर abstract आणि नाकळला तर दुर्बोध असा वापरला आहे) महत्वाची गोष्ट अशी की आकळणे आणि नाकळणे ह्या दोन्ही गोष्टी दर्शकावर (प्रेक्षकावर) अवलंबून आहेत. कलाकारावर नाहीत. अंततः सत्य हे संवादाशिवाय अस्तित्व राखत नाही असे वाटते. जे मला जाणवले तेच माझ्यासाठी सत्य! अगदी नैसर्गिक सत्य जरी घेतले तरी ते निसर्ग व साक्षी (nature and observer) ह्यांचा संवाद आहे. म्हणूनच कितीही सफरचंदे पडत असली तरी त्यामागचे गुरुत्वाकर्षण न्यूटनला जसे कळले तसे इतरांना नाही कारण इतरांचा संवाद नाही. आता येते सामाजिक सत्य प्रस्थापन. हे तर केवळ सोय आहे! ज्या समूहाला जे जे ज्या ज्या वेळी सोयीचे वाटते ते सामाजिक सत्य म्हणून स्वीकारण्यात येते. सर्व धर्म हे ह्या प्रकारच्या सत्याची प्रमुख उदाहरणे आहेत. सामाजिक सत्याला सत्य (पुराव्याने शाबित करता येण्यासारखे या अर्थाने) ह्या दृष्टीने फारसे महत्व नाही. अर्थात हे तेव्हा चूक ठरते जेव्हा अश्या एखद्या सत्याचा अंगिकार केलेला समाज दुसर्‍या एखाद्या समाजाच्या दु:खाला कारणीभूत होतो. मग त्याच्या विरोधात अजून सत्ये मांडली जातात आणि त्यांचा पुरस्कारही होतो. पुन्हा हे ही सत्य संवादात्म झाले. टीपः हे सर्व केवळ आपला लेख व प्रतिसाद वाचून लिहिले आहे..मूळ चित्रपट पाहिलेला नाही आणि लेखही वाचलेले नाहीत.

In reply to by सटक

Anand More 17/02/2016 - 22:46
आपण छान विचार मांडलेत. इतक्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण मी सत्य अन्वेषणाबद्दल काहीही बोललो नसून सत्याचे आकलन आणि नंतर त्याचे प्रकटीकरण याबद्दल माझे विचार मांडले आहेत. तुमचा सत्य म्हणजे संवाद हा विचार देखील त्याच अंगाने जातो. जमल्यास चित्रपट पहाल का ? आणि माझे लेखन पण एकदा नजरेखालून घालून त्यावर प्रतिसाद दिलात तर वाचायला आवडेल मला.

In reply to by Anand More

सटक 17/02/2016 - 23:42
सत्यशोधन ही जर का नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर मग सत्याचे आकलन हे सत्याच्या अन्वेषणाचे फलितच असेल असा विचार माझ्या लेखनामागे होता. सत्याचे अन्वेषण आधी आणि मग आकलन हा नैसर्गिक ओघ आहे. आकलनात अन्वेषण अंतर्भूत आहे असे आपणास वाटत नाही का? प्रकटीकरणावरही मी त्याच अंगाने बोललो आहे. अन्वेषण-आकलन-सात्मीकरण-प्रकटन हा माझ्यामते जास्ती पटणारा Process Flow असावा. सात्मीकरणाशिवाय प्रकटन शक्य नसल्याने आकलन झालेले सत्य आणि नंतर प्रकट होणारे सत्य ह्यात फरक अपेक्षित आहे. असो. चित्रपट बघून काही वेगळेही वाटू शकेल कदाचित.

In reply to by सटक

Anand More 18/02/2016 - 13:12
तुमचे टोपणनाव असे आहे की मी तुम्हाला दादा, साहेब, ताई, बाई, वहिनी, जी वगैरे काहीही अतिरिक्त संबोधन लावू शकत नाही. म्हणून केवळ टोपणनाव वापरून संबोधतोय. त्यात कुठेही एकेरीवर यायचा इरादा नाही. आपल्याबद्दल आणि आपल्या लेखनाबद्दल पूर्ण आदर राखूनच मी प्रतिसाद देतो आहे. माझ्या या लेखमालेत सत्यशोधन हा मुद्दा कधीच नव्हता. आता मागे वळून बघताना मी एका मुद्द्याला शीर्षक म्हणून "सत्याचे अन्वेषण / आकलन" हा शब्द प्रयोग केला तो चुकला असे मला वाटू लागले आहे. त्या शीर्षकाखाली माझे सगळे मुद्दे केवळ "सत्याचे आकलन" या संकल्पनेभोवतीच गुंफलेले आहेत. एकदा वाटले की संपादकांना विनंती करून ते शीर्षक बदलून घ्यावे. पण त्याने अनेक प्रतिसाद निरर्थक वाटले असते म्हणून मी तशी विनंती करीत नाही आहे. मी सत्य शोधन एक नैसर्गिक प्रवृत्ती मानतो आणि तुम्ही आधी मांडलेला, संवादाचा आणि सत्याच्या व्यक्तिगत आविष्काराचा मुद्दा मला पूर्णपणे पटलेला आहे. किंबहुना, माझा मुद्दा अजून स्पष्ट करण्यासाठी मी असे म्हणीन की, नैसर्गिक सत्यांबद्दल सत्यशोधन ही विचारपूर्वक केलेली गोष्ट नसावी. याउलट, स्वभावानुसार, ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेसनुसार, आणि बाह्य वातावरणानुसार माणसाला अशी नैसर्गिक सत्ये जाणवत असावीत. नंतर माणूस त्याबद्दल जो काही विचार करतो ते त्या सत्याच्या प्रकटनाची त्याच्या मनात झालेली सुरवात असते. थोडे अलंकारिक बोलायचे झाले तर मी "नैसर्गिक सत्य जाणवणे ही बर्फाचा कडा तुटण्यासारखी अचानक घडणारी घटना मानतो. त्यात शोधन किंवा अन्वेषण याचा भाग कमी आणि केवळ त्या क्षणाला साक्षी असणे हीच त्या माणसाची मोठी उपलब्धी मानतो" असे म्हणेन. आता रहाता राहिला या लेखाचा, चित्रपटाचा आणि लेखमालेचा मुद्दा. ह्या तीनही गोष्टी गुरुत्वाकर्षण, आण्विक बल अश्या संकल्पनांच्या नैसर्गिक सत्याबद्दल बोलत नाहीत. याउलट एका घटनेचा वेगवेगळ्या लोकांनी कसा लावला आणि प्रत्येकाला आपली बाजूच सत्य आहे असे वाटते, या बद्दल बोलत आहेत. या सर्व लोकांपैकी कोण सत्य बोलतोय? कोण असत्य बोलतोय? याबद्दल स्वत: कुरोसावा, नंतर ररा आणि त्यानंतर मी कुणीच काहीही भाष्य केलेले नाही आहे. तर ज्या गोष्टी आपण करतो किंवा आपण बघतो त्याबद्दलचे आपले मत (ज्याला आपण आपले वैयक्तिक सत्य म्हणू शकतो) ते मूळ सत्यापासून भिन्न असू शकते. त्यात आपल्या स्वप्रतिमेचा, स्वप्रतिमाप्रेमाचा, संस्कारांचा, पूर्वग्रहांचा, आयुष्यातील तत्कालीन गरजांचा किती मोठा प्रभाव असतो त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. खून झालाय ही एक सत्य घटना आहे. पण तो का झाला? त्यामागची भूमिका काय होती? तो होण्यापूर्वी कोण कसे वागले याबद्दलचे सर्व लोकांचे आकलन पूर्णतया भिन्न आहे. कारण हे सर्व लोक, मी वर उल्लेखिलेल्या प्रभावांपासून मुक्त नाहीत. जेंव्हा मनुष्य कोणत्याही व्यवस्थेची उभारणी करतो, तेंव्हा त्यासाठी मूळ घटक जर निर्जीव असेल किंवा असल्या प्रभावांपासून मुक्त असेल तर ती व्यवस्था उभी करणे आणि तिला तिच्या मूळ स्वरूपात ठेवणे सोपे असते. पण जर ती व्यवस्था कुटुंबाची किंवा समाजाची असेल तर तिचा लघुत्तम एकक म्हणजे मनुष्य असतो आणि तो या प्रभावांपासून कधीच मुक्त नसतो. त्यामुळे अश्या व्यवस्थांमध्ये सत्य कायमच धूसर असते आणि जाणवलेले सत्य (Realized Truth) आपोआप मागे पडून उत्पादन केलेले सत्य (Manufactured Truth) बाजी मारते असा या पहिल्या लेखाचा सूर आहे. आणि असे का होत असावे त्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण मी तिसऱ्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी तुम्हाला चित्रपट पहा आणि तीनही लेख वाचा अशी विनंती केली होती.

In reply to by Anand More

सटक 18/02/2016 - 20:54
म्हणजे माझे संदर्भाविरहित स्पष्टीकरण झाले तर.. ;) आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले.. दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील. तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही. असो, आपले विचार पटताहेत, थोडे fine tuning सोडल्यास. पुढील लेखनास शुभेच्छा! आणि संबोधन जाऊद्या हो..संवाद महत्वाचा!

In reply to by सटक

Anand More 19/02/2016 - 11:32
शेवटी "असो" म्हणून थांबलात तरीही काही सांगावेसे वाटले म्हणून लिहितोय.
आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील.
हे तुमचे मत मला पटले आहे.
तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही.
कदाचित मी थोडा धाडसी असीन ;-) सात्मीकरणात देखील व्यक्ती आपल्या पूर्वानुभवांना आणि कल्पनेला वापरून सत्याचे एक सुसंगत चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत असते असे मला वाटते. म्हणजे इथे आपले आकलन इतरांपुढे प्रकट करावे की नाही याचा विचार जरी नसला तरी ते आकलन विचारांच्या सहाय्याने सुसंगत करून स्वतःच्या मनात प्रकट करणे सुरु होते. म्हणून मी त्याला प्रकटीकरणाची पहिली पायरी असे म्हटले. आपले विचार थोड्या ट्युनिंग च्या फरकाने बरेचसे जुळतात अश्या अर्थाचे तुमचे विधान मला पटले आहे. आपल्याशी संवाद करून आनंद झाला.

In reply to by Anand More

सटक 20/02/2016 - 00:13
संवादाची अशी गंमत आहे पहा. रेषा येत रहातात आणि आकृती उमटत रहाते! तर..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
तुमची ही भूमिका स्पष्ट केलीत हे फार छान केलेत. आकलन हे मी ह्यापूर्वी estimate/calculate अश्या अर्थाने वापरलेले जास्ती पाहिले आहे. त्यामुळे सहजलब्ध झालेले ज्ञान अशी आपण जी त्याची फोड करता आहात ती मला दिसली नाही चटकन. आकलनामध्ये कार्य अपेक्षित आहे. म्हणजे माहिती ताडून बघणे, त्यावर आधारित अदमास बांधणे इ. इ. शोधन ह्या शब्दाचेही तसेच आहे. "धातू शोधन" हे जास्ती वेळा वाचल्याने, शोधणे हा मराठी अर्थ मी त्याला सहसा लावलेला पाहिलेला नाही. शुद्धीकरण असाच जास्ती. आपण म्हणता त्याप्रमाणे अपघाती मिळालेले ज्ञान ह्याला वेगळा शब्द सुचवू म्हणेन तर तो ही चट्कन आठवत नाही! वेगवेगळ्या माणसांनी बघितलेले एकच दृश्य ही संकल्पना वापरून Vantage Point नावाचा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जमल्यास बघा. चांगला आहे. अर्थात तुम्ही भरपूर खोल संकल्पनेबद्दल बोलताय. तुम्ही आता पुरेसे कुतुहल वाढवल्यामुळे मी आता राशोमान बघेन. जमल्यास सांगेन कसा वाटला ते. सत्याचे सुसंगत चित्र, हम्म्म्म..चांगली संकल्पना आहे! शक्य आहे. प्रत्यक्ष दृश्य असेल तर मग तर नक्कीच! अवांतर: आपल्या शेवटच्या वाक्यातले आनंद आवडले...येवढे लिहून मी ही 'सटक"तो!

In reply to by सटक

Anand More 20/02/2016 - 13:11
तुम्ही माझे लेखन बारकाईने वाचले आहे हे जाणवून खूप बरे वाटले. असे जाणकार वाचक असतील तर मी शब्द अधिक विचार करून वापरायला हवेत हे देखील जाणवले. तुम्ही सांगितलेले शब्दार्थ पटले आहेत पण माझ्या प्रतिसादामुळे, माझ्या शब्द प्रयोजनाच्या मागील भूमिका समजून, माझ्या विचारांची दिशा लक्षात येत असावी असे वाटते आणि माझे शब्दप्रयोग अगदीच मूर्खपणा वाटत नसावेत याची खात्रीदेखील वाटते आहे. तुम्ही ज्या दृष्टीने हा पहिला लेख वाचला त्यामुळे थोडासा धीट होऊन, मी तुम्हाला तिसरा भाग वाचण्याची विनंती करीन. कारण तो लिहिल्यानंतर माझा मीच खूप खूष झालो होतो. त्यावरच्या प्रतिसादांमध्ये सिरुसेरी यांनी कमल हसनच्या "वीरुमंडी" (सांदीयार)या तामिळ चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तो तू नळीवर शोधून ठेवला आहे. पण बघायचा बाकी आहे. आता त्या बरोबर Vantage Point पण बघीन. धन्यवाद.

In reply to by जयंत कुलकर्णी

त्यातून काही वेगळा अर्थ निघतोय का पहा....पण मला आवडलेली एक गोष्ट ती असी की तुम्ही त्यावर एवढ्या गंभीरपणे विचार करताय ते. श्री रमताराम यांनीही fantastic| लिहिले आहे यात काही शंकाच नाही....

In reply to by जयंत कुलकर्णी

Anand More 13/02/2016 - 11:39
श्री. कुलकर्णी, लिंक बद्दल धन्यवाद आणि कौतुकाबद्दल देखील. आपले लेखन वाचले. खूप छान आहे. आपण राशोमोनचे भारतीयीकरण अतिशय समर्थपणे केले आहे. पण मी अजून राशोमोनच्या धुंदीत असल्याने मला तो शेवटचा झिरना गेटचा सांधा मनात मूळ गोष्टीशी जुळवता आला नाही. ही लेखमाला संपल्यावर पुन्हा वाचीन आणि माझे विचार मांडेन. तोपर्यंत तुमची त्या शेवटच्या भागाच्या सांध्याची भूमिका मांडलीत तर माझ्या विचाराला दिशा मिळू शकेल.

विवेक ठाकूर 14/02/2016 - 15:11
तरीही इतकी भुक्कड लेखमाला मी त्यापूर्वी कधीही वाचली नव्हती. आता विषय निघालाच आहे तर लिहीतो, सत्यशोधन म्हणजे फॅक्ट फाइंडींग नव्हे. एक काल्पनिक कथा घेऊन त्यावर आठ क्लिष्ट भाग लिहून, सतरा बाजूंनी डोकेफोड करायची आणि पुन्हा `सत्य तुम्हीच शोधा' असा भोंगळपणा करत, वाचकांची वाट लावायची याला थोर कलाकृती म्हणत नाहीत. कलेनं लोकरंजन झालं पाहिजे, रसिकांनी तुमच्यासाठी स्वतःचा वेळ दिलायं, त्यांना आनंद मिळायला हवा असं माझं मत आहे. लेखकानं भारंभार लिहून किंवा त्यावर चित्रपट वगैरे काढून, स्वतःचं कन्फ्यूजन वाचकांच्या माथी मारणं आणि त्याला `सत्यशोधन वगैरे म्हणणं ही केवळ भंकस आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 16:37
सदर चित्रपटात उत्तर प्रेक्षकांवर सोडून काय मनोरंजन साधलंय ? खुद्द रमतारामांनी शेवटच्या लेखात, स्वतःच्या प्रतिसादातच स्वतःचा मानसिक गोंधळ नकळतपणे उघड केला आहे : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल. कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न? त्याला न आगा ना पिछा. आणि पुढे तर हद्दच केली आहे! त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणजे मर्म अजून यांना सुद्धा गवसलेलं नाही! आणि अपेक्षा काय तर वाचकांची पुरती काशी झाल्याशिवाय त्यांना `मर्म' कळणार नाही. पण इतका पसारा बघून, इथले सदस्यही बावरलेले दिसतात. मूळ प्रश्नाचीच जर उकल होत नाही तर नवे प्रश्न (आणि तेही मूलभूत?) निर्माण करुन काय मनोरंजन साधलंय? थोडक्यात, मूळ प्रश्न टांगणीला आणि नवे `मूलभूत प्रश्न' जोपर्यंत वाचकांच्या मनाचा `ताबा' घेत नाही तोपर्यंत त्यांना, लेखकानं `ओरिजनल' काशी काय घातलीये तेच कळणार नाही! याला तुम्ही लोकरंजन म्हणता?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 14/02/2016 - 16:44
मी मला जे हवं ते घेतो... कधी कधी ते समोरच्याने दिलेही नसेल..त्या बाबतीत मी एकलव्य आहे... तुम्ही माझा तिसरा लेख वाचला का? रमतारामांना दिसलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या गोष्टी मला दिसल्या असे मी नमूद केले आहे... ते देखील तुम्हाला आवडलेच पाहिजे असा माझा आग्रह नाही.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 16:50
चित्रपटाच्या शेवटाबद्दल आणि ररांच्या या प्रतिसादाबद्दल तुम्हाला प्रामाणिकपणे काय वाटतं? पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल.

In reply to by विवेक ठाकूर

श्री ठाकूर, जो चित्रपट जगात आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांना भुरळ पाडत आला आहे, आणि जो चित्रपटसृस्टीतील एक माईलस्टोन म्हणून ओळखला जातो त्या सिनेमाला भुक्कड म्हणणे याला काय म्हणावे हे कळत नाही. शिवाय प्रतिसादात "घंट्याचे" "काशी घालणे" या असल्या शब्दांचा मी निषेध करत आहे. असो. अर्थात याचा उपयोग होणार नाही याची कल्पना आहे पण सगळ्यांनीच हे चालवून घेतले असे उद्या कोणी म्हणायला नको म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by जयंत कुलकर्णी

विवेक ठाकूर 14/02/2016 - 17:47
तुम्ही ररांच्या प्रतिसादाबद्दल किंवा चित्रपटाच्या शेवटा बद्दल जर काही पटेलसे लिहू शकलात तर मी सुद्धा उपरोक्त शब्दांचा पुनर्विचार करीन . ररांच्या नांवामुळे सदस्य बोलले नसतील इतकंच . एनी वे , वरच्या प्रतिसादाबद्दल तुमचं किंवा आनंदश्रींच मत काय आहे ?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 14/02/2016 - 18:01
आनंदश्री.... मला तर कुस्तीचा फड मारून आल्यासारखं वाटतंय... अहो ठाकूर साहेब माझं मत मी खाली दिलं आहे.. आणि मी तितकंच सांगू शकेन असे मला वाटते.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 18:16
तुम्ही माझ्या तीन साध्या प्रश्नांची उत्तरं द्याल का? १) तुम्हाला चित्रपट नक्की काय सांगतो ते कळलंय का? २) `त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा' हे प्रश्न कुठले? ३) त्या प्रश्नांनी मनाचा ताबा घेण्याचा (कारण ते चित्रपटाचा भागच नाहीत) आणि चित्रपट समजण्याचा काय संबंध आहे? आणि तुमच्याकडे उत्तरं नसतील तर ते प्रामाणिकपणे मान्य कराल का?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 14/02/2016 - 18:42
देतो की, 1) नाही 2) ररांच्या मनातले प्रश्न मी ओळखू शकलो नाही 3) प्रश्न कुठले हेच ओळखले नाही तर त्यांचा चित्रपटाशी संबंध काय ते मी सांगू शकत नाही.. हत्ती आणि सात आंधळ्याच्या गोष्टीतील मी एक आंधळा म्हणून घ्यायला तयार आहे..

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 21:35
खालच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलंय तसा तुमची पीसं वगैरे काढण्याचा अजिबात उद्देश नव्हता. ररांनी लोकांना उगीच गुगली टाकून स्वतःचं अज्ञान झाकण्याचा प्रयत्न केला होता अशी माझी खात्री आहे. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही तसं काही केलं नाहीत. तुमच्या हलक्या फुलक्या लेखनाचे इथे अनेक फॅन्स आहेत. तुमच्याकडे सुरेख शैली आणि उत्तम मांडणी आहे. तस्मात, तुम्ही तुमच्याच स्टाइलनं लिहीत राहा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !

Anand More 14/02/2016 - 17:03
ररांना जे भावले ते त्यांनी लिहिले..मला हा चित्रपट समजला आहे... या तुम्हालापण समजावतो आणि मी सांगीन तोच त्याचा अंतिम अर्थ आहे असा त्यांचा अभिनिवेश मला कुठे जाणवला नाही... आणि मी थोडा गुण गाईन आवडी वर विश्वास ठेऊन व्यक्त होणारा आहे... त्यामुळे माझे विचार त्याच दिशेने धावतात

श्री मोरे, तुम्हाला जे भावले, जे आवडले त्याबद्दल आपण लिहीत रहा. आपण म्हटलेलेच आहे की ते सगळ्यांना आवडावेच असा तुमचा आग्रह नाही आणि ते शक्यही नाही. असे वितंडवाद घालणारे प्रतिसाद आले तर त्याला उत्तर देत बसू नका. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे....

In reply to by जयंत कुलकर्णी

मारवा 15/02/2016 - 12:54
कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे.... मनोरंजना च्या जागी सत्याला अनुभवाला हे शब्द टाकले तरी चपखल बसेल असे वाटते.

In reply to by सिद्धेश महाजन

Anand More 14/02/2016 - 17:30
मिपावरच्या लेखमालेच्या पहिल्या भागाची लिंक माझ्या वरील लेखाच्या सुरुवातीला दिली आहे... आणि ही ररांच्या ब्लॉगची लिंक http://ramataram.blogspot.in/2012/02/blog-post.html?m=1

Anand More 14/02/2016 - 19:17
तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे... पण ठाकूरांचे आडनाव बदललेले त्यांना चालेल का? चला... जाऊद्या हो... मला आपलं वाटलं, हलकं फुलकं न लिहिता, ज्याला सगळे पटकन वैचारिक, तात्विक, विश्लेषणात्मक वगैरे म्हणतील आणि मग माझी किर्ती वाढेल असे काही पोस्टून थोडा भाव खावा... पण तुम्ही तर माझी पिसंच काढलीत... तरीदेखील, अगम्य असल्याने इतरांनी दुर्लक्षिलेला माझा हा धागा तुमच्या प्रतिसादांमुळे वर येतोय, म्हणून धन्यवाद :-)

Anand More 14/02/2016 - 23:06
तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून हुरूप वाढलाय म्हणून थोडे लिहितोय. पण मला पुस्तकांची आणि चित्रपटांची आवड आहे. त्यांचे मी दोन प्रकारात वर्गीकरण करतो. १) जे विशिष्ट प्रश्न मांडून त्याचे उत्तर देतात. त्यामुळे ते अर्थवाही असतात. सुखांत किंवा दु:खांत असतात. त्यांचे निष्कर्ष आपल्याला पटणे किंवा न पटणे इतकेच होऊ शकते. २) जे केवळ गोष्टी मांडतात. प्रश्न पण आपले आपण ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण आपली आपणच ठरवावीत अशी काहीशी त्यांची योजना असते. त्यामुळे ते अनेकांना निरर्थक वाटतात. वेळकाढू देखील. अशी दुसऱ्या प्रकारची पुस्तके वाचणे किंवा चित्रपट पाहणे आणि नंतर त्यावर विचार करणे म्हणजे ढगात प्राणी किंवा विविध आकार शोधण्यासारखे खुळचट आहे असे अनेकांना वाटू शकते. पण ज्यांना तो खेळ आवडतो त्यांना मात्र त्यात खूप मजा येते. मला स्वतःला दुर्बोध कविता कमी कळतात आणि त्यांना अर्थ लावण्याचे प्रयत्न आनंददायी वाटत नाहीत. तसेच काहीसे नृत्य आणि शिल्प आणि नवचित्रकलेच्या बाबतीत. याचा अर्थ फक्त इतकाच की मला त्यांची भाषा कळत नाही. त्या कलाकाराला त्या कलाकृतीतून त्याला पडलेला प्रश्न आणि त्याचे त्याला गवसलेले उत्तर मांडायचे असेल तर मी त्याचा रसास्वाद घेऊ शकतो. पण या कलांच्या कलाकाराला, मीच प्रश्न ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण मीच शोधावीत असे वाटत असेल तर मात्र मी तिथून पळ काढतो. मला न कळलेल्या चित्राला जेंव्हा कोणी देहभान विसरून पहात राहिलेला दिसतो तेंव्हा मी पण त्या रसिकावर, त्या कलाकृतीवर आणि त्या कलाकारावर थोडा वैतागतो. आणि थोडासा जळतो देखील. पण ते तितकेच. कारण त्याचा अर्थ मी उत्क्रांतीमध्ये किंवा रसिकपणामध्ये कुठे कमी आहे असा होत नाही. फक्त आपल्याला ती भाषा येत नाही असे समजून मी शरणागती पत्करतो आणि जी जमते तिच्याकडे पुन्हा वळतो. मला संगीत आवडते पण कोणी रागांची नावे, सम, मिंड, ताल वगैरे बोलू लागला, किंवा फक्त रागाची आलापी ऐकवू लागला की मी बहिरा असल्यासारखा त्याच्याकडे बघत राहतो. कारण त्या रागाच्या आलापीत मला आनंद आपोआप मिळत नाही आणि तो शोधताही येत नाही. कदाचित या चित्रपटाने अनेकांना ढगात प्राणी आणि आकार शोधण्याचा आनंद दिला असेल आणि तितक्याच अनेकांना आपली फसगत झाली, हाती काहीच आले नाही असा वैतागवाणा अनुभव देखील दिला असेल. ज्यांना आनंद दिला त्यांना ढगात सारखेच प्राणी दिसले असतील याची खात्री ते लोक स्वतः पण देऊ शकत नाहीत. पण याचा अर्थ त्यांचा आनंद खोटा ठरत नाही. ररांना आणि मला या चित्रपटाने वेगवेगळे रूप दाखवले आहे हे तुम्ही वाचलेच असेल. पण त्यामुळे ररांचे किंवा माझे आकलन अंतिम ठरत नाही. त्यात कोणी उजवे किंवा डावे ठरत नाही. आणि दोन आकलने निघाली म्हणून चित्रकृती दुय्यम ठरत नाही. फक्त कुरोसावाने चित्रपट जगासमोर मांडला. तर आधी ररा आणि मग मी आमचे स्वतंत्र आकलन मिपावर मांडले. ते तुम्हाला भिडले नाही इतकेच. त्यात चांगले - वाईट, रसिक - अरसिक, परिष्कृत - अपरीष्कृत असे काहीच नाही. माझा खेळ मला अजूनही आवडतो. पण तो तुम्ही पण आवडून घ्या त्याला चांगले म्हणा अशी माझी काही जबरदस्ती नाही. त्याला वाईट म्हणायचे की नाही, आणि मला किंवा माझ्यासारख्यांना खुळ्यात काढायचे की नाही तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही दोघांनी स्पष्टपणे तुमचा मुद्दा मांडलात त्यामुळे तुमच्याशी बोलता येईल असा विश्वास वाटला. आणि माझ्या, तीन लेखात विभागलेल्या कल्पनाविस्ताराला जोड म्हणून हा एक लांब प्रतिसाद दिला आहे. तुमच्याशी बोलून आनंद वाटला.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 15/02/2016 - 12:24
कोणत्याही कलाविष्कारात कलाकार आणि रसिकांची कनेक्टीविटी प्राथमिक आहे. ती नसेल तर विषयच संपला ! माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते. जर अनुभव सच्चा असेल तर साध्या शब्दातून सुद्धा तो रसिकांना भिडतो. फर्स्ट हँड अनुभवाला दुर्बोधतेचं डेकोरेशन लागत नाही. अर्थात, उक्तट अनुभवासमवेत सौंदर्याचा परिपोष करणारी अभिव्यक्ती असेल तर ती अविस्मरणीय ठरते.

मारवा 15/02/2016 - 12:47
माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते
आपण बर्यापैकी सुबोध आहात तर आपल्या मते वरील प्रकारात मोडत असलेल्या कलाकारांची एखाद उदाहरणे द्याल का ?

मारवा 15/02/2016 - 13:22
आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.

मारवा 15/02/2016 - 13:22
आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.

In reply to by मारवा

विवेक ठाकूर 15/02/2016 - 14:33
कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते कवितेतल्या पहिल्या तीन कडव्यांमधे बालकवी आणि वाचक यांच्या अनुभवविश्वात फारसा फरक नसतो. ते एक साध्या शब्दात केलेलं, लयबद्ध आणि उत्तम असं, चित्रदर्शी निसर्गचित्रण आहे. ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे. अनुभवांची फारकत या कडव्यात आणि त्यातल्या त्यात, शेवटच्या ओळीत होते : झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर. आणि इथे बालकवी दुर्बोध होत नाहीत तर अभिव्यक्तीशी इमान राखून व्यक्तीगत होतात. म्हणजे त्यांची निसर्गाशी इतकी तद्रुपता साधते की त्यांना औदुंबर ही व्यक्ती वाटते. त्याहूनही थोर म्हणजे कवितेत, `असला औदुंबर' ही `जळात बसला'शी, बालकवींनी साधलेली शब्दांची लयकारी! मूळात ही कविता दुर्बोध नाही तर मोनालिसाच्या हास्यासारखी गूढ आहे. कारण `झाकाळुनी जळ गोड काळिमा' ही ओळ, जीवनातल्या सर्वात रहस्यमयी काळ्या रंगाचा निर्देश करते. आणि कवितेच्या शेवटाला सॉलिड स्पेस निर्माण करुन देते. जर बालकवींची मुलाखत घेतली असती आणि त्यांनाच अर्थ विचारला असता, तर इतकी सरळ कविता लिहीणार्‍यानं मनातलं सरळ सांगून टाकलं असतं. मग या कवितेचे रसिकांनी वेगवेगळे अर्थ काढले सुद्धा नसते. किंवा तुम्ही म्हणता तसा स्वतःच्या अर्थाचा आग्रह कुणी धरला नसता. तस्मात, प्रश्न अर्थाच्या दुराग्रहाबद्दल नाही, अभिव्यक्तीच्या दुर्बोधतेबद्दल आणि कलाकारनं ती, कोणतंही क्लॅरिफिकेशन न देता, हेतुपुरस्सर तशीच ठेवून, रसिकांना चकवण्याबद्दल आहे.

दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा आणि? ग्रेस दुर्बोध म्हणजे वर जे वर्णन केलय तसे "फेक" होते? की मोनालिसा सारखे गुढ? हे कोण ठरवणार? त्यांनीच एका कवितेत "दुर्बोधतेची बेसरबिंदी" असा शब्दप्रयोग केलाय..

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 15/02/2016 - 17:19
मोनालिसाचं हास्य गूढ आहे त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यावर ते हास्य कळत नाही असं नाही, तर तिच्या हास्याची अनेक कारणं वाटतात. ती प्रत्येक वेळी दर्शकाच्या मूडप्रमाणे बदलत जातात. पिकासोची चित्रं दुर्बोध आहेत, कितीही वेळा पाहिली तरी पिकासोला काय व्यक्त करायचंय, ते नक्की काहीच कळत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

ग्रेसची कविता काय आहे मग? तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ गुढ? ते स्वतः तर दुर्बोध आहे म्हणतात.

मोरे.. मला तुमचा लेख खरंच फारसा कळला नाहीये. मुळ रमताराम ह्यांचाही लेख वाचलेला नाही. मला जेव्हा जमेल तेव्हा हे वाचुन मी तुमच्या लेखावर प्रतिसाद देईन. सध्या तरी माझा पास!

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 15/02/2016 - 15:10
हायला. मला वाटले पिरातैला तरी कळले असेल. तिला माहीती असते बरीच. मी प्रस्तावनेनंतर हात वर केले. सविस्तर वाचायचीच कॅपॅकिटी नाही माझी कळणे लांबच राहिले.

In reply to by पिलीयन रायडर

Anand More 15/02/2016 - 15:15
हो. ह्या लेखाचा संदर्भ लागण्यासाठी ररांचे मूळ लेखन वाचल्याने जास्त मदत होईल कारण हा लेख त्यांच्या मुलाच्या आठ भागांच्या लेखमालेतल्या पहिल्या लेखावरचे माझे विचार आहे. आणि माझे हे तीनही लेख म्हणजे ररांच्या मूळ लेखनावर मी दिलेला प्रतिसाद आहे. त्यामुळे चित्रपट बघणे, ररांचे मूळ लेखन वाचणे आणि मग माझे विचार वाचले तर कदाचित तुम्हाला संदर्भ जवळून जाणवतील. या चित्रपटाचे माझे आणि ररांचे आकलन वेगळे आहे, जे मी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात मांडले आहे. त्यामुळे या लेखमालेताला हा पहिला भाग सोडून देणे आणि फक्त चित्रपट बघून दुसरा आणि तिसरा भाग वाचणे हा देखील एक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे.

In reply to by Anand More

हो, ते लक्षात आलं की आधी ररांचे लेख वाचावे लागतील. पण मुळात ते ही समजायला इतक्या क्लिष्ट भाषेतलं काही समजायला हवं. तुम्ही कुठल्या तरी प्रतिसादात लिहीलय की लेख दुर्लक्षित राहिला आहे. तुम्हाला कदाचित त्याची काही खंत नसेलही, पण उगाच सांगावं वाटलं की तुमचे लेख आवर्जुन वाचले जातातच. पण किमान मला तरी इतकं Abstract / दुर्बोध (मला चपखल शब्दही सापडत नाहीये!) समजत नाही. किंवा त्यात एवढा रस वाटत नाही. कदाचित बर्‍याच जणांचे तसेच होत असावे. पण तुम्ही लिहीलाय म्हणुन प्रयत्न करायची इच्छा होतेय. थोड्या शांत मनाने प्रयत्न नक्की करेन!

In reply to by पिलीयन रायडर

Anand More 15/02/2016 - 15:51
तुमचा प्रतिसाद वाचून मला खरंच Oscar मिळाल्यासारखं वाटतंय. पण "किंवा त्यात एवढा रस वाटत नाही." हे तुमचे वाक्य मला पटते. माझे पण असे अनेकदा होते. एखादे पुस्तक आणून ठेवतो. पहिली काही पाने वाचून रस नाही वाटला तर ठेवून देतो. नंतर पुस्तक परत बोलावते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे लेखनात रस वाटला नाही तर मी दुर्लक्ष न करता विषयाची मनात नोंद करून बाजूला ठेवतो. मग ते यॊग्य वेळी परत बोलावतेच.

Anand More 15/02/2016 - 15:07
Abstract कला आणि अंतहीन किंवा अनेकांत रचना यांच्याशी कसे जुळायचे हा प्रश्न थोडा कठीण आहे. मी स्वतः abstract कथा, कविता यांच्याशी झटकन एकरूप होऊ शकत नाही. पण अंतहीन किंवा अनेकांत रचनांशी जुळवून घ्यायला मला किंचित सोपे जाते. याचा अर्थ प्रत्येक अंतहीन किंवा अनेकांत रचना मला भावतीलच अशी खात्री मी देऊ शकत नाही. अंतहीन कथा कादंबऱ्या खूप वाचल्या आहेत. त्याची सुरवात झाली ती अनंतमूर्तींच्या संस्कार पासून. मग भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्या देखील वाचल्या आणि मग हळू हळू सवय होत गेली. पण याचा अर्थ अनंतमूर्तींचे भैरप्पांचे सर्वच साहित्य आवडले असे नाही. पण एखाद्या लेखकाचे सर्वच साहित्य आपल्याला आवडलेच पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही. तसा कुठला करार कलाकार आणि रसिकांमध्ये असतो असे मला वाटत नाही. त्यामुळे कलाकारावर लोकरंजनाचे दडपण राहू नये आणि रसिकांवर कलेने भुरळ घालावी, कलाकाराच्या कीर्तीने नव्हे अश्या मताचा मी आहे. भैरप्पा माझे आवडते लेखक असून त्यांची तीन चार पुस्तके मला अत्यंत सुमार वाटतात आणि ३-४ वर्षापूर्वीचे आवरण तर मला प्रचारकी वाटते. अनंतमूर्तींचे संस्कार प्रचंड आवडून देखील त्यांची बाकीची पुस्तके मला संग्रही ठेवण्यासारखी वाटली नाहीत. आणि माझे दैवत पु. ल. देशपांडे यांनी केलेला Old Man and the Sea चा एका कोळियाने हा अनुवाद फसलेला आहे असे माझे मत आहे. जी ए कुलकर्णी यांची सर्व ग्रंथसंपदा संग्रही असून त्यातील सर्वच कथा मला सारखाच आनंद देतात असे नाही. आणि गो नी दांडेकरांचे अजुनी नाही जागे गोकुळ हे पुस्तक मला त्यांच्या इतर पुस्तकांपुढे सुमार वाटते. पण मी हे देखील मान्य करतो की भैराप्पांची, अनंतमूर्तींची, देशपांडेंची, कुलकर्णींची जी पुस्तके / कथा मला भिडत नाहीत ती कदाचित इतरांना अतीव सौंदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतात. कुरोसावाच्या या चित्रपटाने मला भुरळ घातली याचा अर्थ इतकाच की मी त्याची पुढील कलाकृती बघायला उत्सुक असेन. पण म्हणून ते आवडलीच पाहिजे अशी माझ्यावर कुठली सक्ती नाही. आणि ती नाही आवडली नाही तर कुरोसावाने माझी फसगत केली असेही नाही. जी कलाकृती मला आवडली ती मला ज्या कारणांमुळे आवडली त्याचा कारणांमुळे इतरांना आवडावी असा माझा आग्रह नाही. आणि जी कलाकृती मला आवडणार नाही तिने इतरांना आनंद देऊच नये असेही नाही. एक मात्र खरे की कलेच्या प्रांतात दुर्बोधतेची झूल पांघरून आपली सुमार प्रतिभा लपवणारे अनेक कलाकार असतात. पण तसे ते सर्वच क्षेत्रात असतात. मी वर कुठेतरी सांगितल्याप्रमाणे, मी "गुण गाईन आवडी" अश्या स्वभावाचा असल्याने, माझ्या मते ज्यांनी दुर्बोधतेची झूल पांघरली आहे ते देखील मला न कळू शकणारा एखादा सौंदर्याविष्कार करत असतील असे मानण्यास मी तयार असतो. आणि हो, ररां बद्दल माझे मत तुमच्या त्यांच्या बद्दलच्या मला जाणवलेल्या मतापेक्षा खूपच जास्त अनुकूल आणि उजवे आहे, इतके सांगून मी थांबतो.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 16/02/2016 - 13:16
नित्शे या प्रसिद्ध तत्ववेत्त्याचं एक सुरेख वचन आहे : `टू यूज द अदर इज द हायेस्ट इम्मोरॅलिटी' (दुसर्‍याला वापरणं ही सर्वात मोठी अनैतिकता आहे). अंतहीन रचना जर केवळ लेखकाला पडलेले प्रश्न मांडून, उत्तराची प्रामाणिक विचारणा करण्याऐवजी, ते प्रश्नच किती उच्च आहेत आणि शोधा तुम्ही उत्तरं असा आव आणत असेल तर ते `स्वतःच्या मानसिक गुंत्यासाठी दुसर्‍याला वापरणं आहे. राशोमोनच्या संदर्भात तुम्ही याविषयी काय म्हणाल?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 16/02/2016 - 15:48
नीत्शे असं पण म्हणाला होता की, You have your way. I have my way. As for the right way, the correct way, and the only way, it does not exist. त्यामुळे ररांबद्दल बोलणे आपण थांबवूया. कारण नीत्शे हे पण म्हणाला होता की Anyone who has declared someone else to be an idiot, a bad apple, is annoyed when it turns out in the end that he isn't. त्यामुळे ररा माझ्या अंदाजापेक्षा कमी वाईट किंवा जास्त चांगले निघाले तर मला दु:ख होऊ शकते, आणि मला दु:खी व्हायला आवडत नाही. तो हे पण म्हणाला की, There are no facts, only interpretations. आणि तो हे पण म्हणाला होता की All things are subject to interpretation whichever interpretation prevails at a given time is a function of power and not truth. म्हणजे मी त्याची ही वाकये राशोमोन च्या समर्थनार्थ वापरू शकतो मी तर त्याच्या The surest way to corrupt a youth is to instruct him to hold in higher esteem those who think alike than those who think differently.या अवतरणावर देखील विश्वास ठेवतो त्यामुळे कुरोसावाचे, ररांचे, तुमचे आणि माझे मत वेगळे असू शकते आणि तरीही आपल्यापैकी कोणीही वाईट नाही हे मी जाणून आहे. मला वाटते पहिल्या कमेंटच्या शीर्षकात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ररा इथे नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे आपण थांबवूया. तुम्हाला चित्रपट आवडला नाही त्यावर मी भारंभार लिहून मिपाच्या सर्व्हरवर भार आणला आहे असे तुम्हाला वाटण्याचीही शक्यता आहे. पण सोडलेला बाण, निघालेला शब्द आणि पोस्ट केलेला धागा परत घेता येत नाही त्यामुळे ह्या नकोश्या झालेल्या तीन भागाच्या लेखमालेचे अस्तित्व सहन करा किंवा हिच्याकडे सरळ दुर्लक्ष करा. जमलं तर मी काहीतरी हलकं फुलकं घेऊन येईन. तिथे आपण सगळे मिळून हसूया. :-)

In reply to by Anand More

मोरेजी.. आपने दिल जीत लिया!! खुप आवडला तुमचा हा प्रतिसाद! ही सगळीच अवतरणे विचार करण्याजोगी आहेत..

In reply to by Anand More

आणि शिवाय एकदा या जगात आलो की आईच्या दुधापासून ते तिरडीपर्यंत आपण किती जणांचा वापर करतो याचा हिशेब परमेश्र्वराच्या बापालाही शक्य नाही त्यामुळे त्यातून उदभवणारी नैतिकता/अनैतिकता हाच एक मोठा भ्रम आहे..... :-)

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 16/02/2016 - 17:23
तुम्ही चर्चा वेगळ्या वळणावर नेली आहे. ज्या अंतहीन कलाविष्काराबद्दल तुम्ही लिहीलंय, त्यात कलाकार रसिकांना वापरतो का ? असा प्रश्न आहे.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 16/02/2016 - 19:47
विवेक, मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते. परंतु चित्रपट आणि या लेखमाला या दोघांनीही मला आनंद दिलेला असल्याने मला त्यातला फोलपणा जाणवणे अशक्य होते आणि अजूनही अशक्यच आहे. तुम्ही म्हणता ते कलाकाराने रसिकांना वापरणे मला सर्वत्र दिसते. काही वेळा ते मला आवडते आणि काही वेळेला नाही. राशोमोन, मेट्रिक्स यासारख्या चित्रपटात मला ते आवडले तर अजय देवगणचा ओमकारा, नंदिता दासचा फायर किंवा क्रिस्तोफर नोलान चा Inception चित्रपट बघून मला माझी फसगत झाली असे मला वाटले होते. पण मला त्या कलाकृती जास्त भावल्या नाहीत, याचा अर्थ त्या कलाकृतीचा मी जाहीर पणे निषेध करावा असे काही मला वाटले नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 17/02/2016 - 16:54
मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे ठरवायला मला दुसर्‍याची मदत लागत नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे मला तत्त्वज्ञानात सुतराम रस नाही. कारण तुम्ही किंवा ररांनी फॅक्ट फाइंडींगचे जे पाच की सहा विकल्प कल्पिले आहेत, तो निव्वळ वेगवेगळ्या संकल्पनांचा खेळ आहे. त्यातून जीवनोपयोगी किंवा ठोस असं काहीही निघू शकत नाही. तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे. ते, `आध्यात्मिक सत्यशोधन' म्हणजे `फाइंडींग द अब्सोल्यूट' नव्हे. तर तो केवळ फॅक्ट फाइंडींग करता किंवा सगळंच कसं `व्यक्तिगत आहे' आणि म्हणून सगळंच आधांतरी (खरं तर `चूक') आहे, हे दाखवण्याचा आटापिटा आहे. तरीही एक वेगळा अँगल म्हणून तुमचा शेवटचा लेख नक्की वाचीन.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 17/02/2016 - 22:38
।।।तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे.।।। मूळ लेखात सत्यशोधन असा उल्लेख किंवा त्यावरची चर्चा नाही. तो शब्द, बोका - ए - आझमच्या प्रतिसादामुळे झालेल्या चर्चेत आला आहे. ती चर्चा मूळ लेखापेक्षा वेगळ्या दिशेने गेली आहे. मूळ लेखात "अन्वेषण / आकलन" असा शब्द असला तरी त्याखाली मांडलेले मुद्दे आकलन या शब्दाच्या अनुशंगानेच आले आहेत. त्यापुढे देखील मी सत्याच्या प्रकटीकरणाबद्दल बोललो आहे. अन्वेषण आणि शोधन यांच्याभोवती माझी मांडणी नाही. मी वर कुठल्या तरी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. पण त्यामागे सत्यशोधन असा कुठला ही हेतू नव्हता तर कुरोसावा नावाच्या माणसाने बनवलेली एक चित्रकृती होती जी त्याने का बनवली त्याचे कारण कुणालाही ठाऊक नसावे, आणि जी मला का आवडली, त्याचे कारण देखील तसेच अज्ञात आहे. तुमच्या तिसरा लेख वाचण्याच्या आश्वासनामुळे मी खरोखरच आनंदी झालो आहे. (आता यापुढचे मी सगळे विनोदाने लिहित आहे. आवडले नसल्यास कृपया सोडून द्या) कारण पहिल्या भागाच्या दैदिप्यमान यशानंतर दुसरा आणि तिसरा भाग म्हणजे अगदीच रया गेलेला बहादूरशहा जफर सारखा शेवटचा नामधारी सम्राट वाटतो आहे. तुमच्या आश्वासनामुळे मी घाबरलो नाही आहे. उलट तुमच्यात मला एक हक्काचा वाचक लाभल्याचे समाधान मिळाले आहे. तुमच्या निरंतर मिळणाऱ्या प्रतिसादांमुळे तिसऱ्या भागाचा धागा देखील आता वर येईल अश्या रोमांचकारी कल्पनांमुळे माझे हृदय थडथडू लागले आहे. आणि मी माझ्या तिसऱ्या लेखाच्या अभ्यासाला लागलो आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 17/02/2016 - 23:03
सत्य निश्चिती / प्रस्थापना या खाली सर्व ठिकाणी : एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत..... असाच उल्लेख आहे... पुढे सत्याचे अन्वेषण / आकलन आणि सत्याचे प्रकटीकरण वगैरे आहे. पण तुम्ही म्हणतायं त्याप्रमाणे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. असे असेल तर ओके.

In reply to by स्पा

Anand More 15/02/2016 - 16:35
हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड आणि तिखट लिहिता हो तुम्ही. अगदी साप भी मरे और लाठी भी न टूटे ची आठवण झाली. असू द्या की. आपल्याला आवडेल तितके घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. आपण कुठे वट सावित्रीचे व्रत करणार आहोत. आणि हो, एकाचा मनमिळावू दुसऱ्याचा हुछभ्रू असू शकतो.

In reply to by Anand More

जमल्यास "स्पा"चा खालील लेख वाचलात तर फार उत्तम http://www.misalpav.com/node/28293 त्यांच्या कॅमेरातून पण असेच बोल येतात.

पैसा 15/02/2016 - 17:17
वाचते आहे. एक गोष्ट अनेकांनी आपाआपल्या दृष्टीकोनातून पाहून मांडावी हेच तर राशोमानमधे आहे ना? मग दुसर्‍याने लिहिलेल्या लिखाणाला शेलकी विशेषणे लावून लोकांना कसला आनंद मिळतो देवजाणे! ररा आजोबा, आतातरी या आणि मौन सोडा. हल्लीच्या अनेक धाग्यांप्रमाणे हा धागाही "जाना था जापान पँहुच गये चीन" झाला आहे. आनंदबुवा ट्यार्पीसाठी खुश व्हा!

In reply to by पैसा

Anand More 15/02/2016 - 17:27
खरे तर मी पण हेच म्हणणार होतो.... की एकच गोष्ट कुणाला आनंद देऊन लिहायला प्रवृत्त करते आणि कुणाला ती भंपक वाटते.... हा देखिल राशोमोनचा एक अन्वयार्थ लावता येईल.... आणि ट्यार्पी साठी मी कालच आभार मानले आहेत.... आता तुमचेही मनःपूर्वक आभार

सतिश गावडे 15/02/2016 - 22:58
ररा कुठे गायबलेत? पूर्वी कधीतरी त्यांच्याशी गाठभेट व्हायची एकाच एरीयात राहत असल्याने. असो, यानिमित्ताने मी हा सिनेमा पाहिला. छान आहे सिनेमा.

विवेक ठाकूर 18/02/2016 - 10:39
असं दिसतंय. ररांचा प्रतिसाद पुन्हा उधृत करतो : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल ररांनी शेवटापर्यंत मालिका रेटत नेली आणि वाचकांना, काही तरी फार अनमोल आणि कल्पनेच्या पलिकडचं रहस्य उलगडणार आहे, अशा भ्रमात ठेवलं. आनंदनी इतक्या प्रतिसादांनंतर तरी, हा जो प्रामाणिकपणा दाखवला आहे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. तो न दाखवणं, याला मी `वाचकांना वापरणं' म्हणतो आणि नित्शे त्यालाच हायेस्ट इम्मॉरॅलिटी म्हणतो. तस्मात, आनंदनी वरच्या प्रतिसादात जे काही तत्वज्ञानाचे उतारे दिलेत ते मुद्याशी असंबधित ठरतात. ररा शेवटी हाइट करतात : कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणून मी म्हंटलं होतं की कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न ? आणि त्यांच्या सोडवणूकीचा चित्रपट समजण्याशी काय संबंध! निषेध नोंदवणार्‍यांना आता तरी, शब्दापलिकडे जाऊन, मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 18/02/2016 - 12:14
तुम्हाला माझे विनोद कळतात आणि आवडतात असे गृहीत धरून मी म्हणेन, "किती लिहिता हो तुम्ही ठाकूर साहेब; आणि ते सुद्धा मागे पिवळा रंगबिंग लावून. कसले मजबूत हात असतील हो तुमचे. शोलेच्या पटकथेत थोडा बदल करून मी लिहीन, ये हाथ मुझे दे दो ठाकूर … आपके हाथ मुझे दे दो ।" अहो मी ढगात प्राणी शोधण्याच्या माझ्या निरर्थक खेळाबद्दल प्रामाणिकपणे इतक्या प्रतिसादानंतर आत्ता नाही, फार आधी म्हणजे दिनांक १४/२/२०१६ रोजी २३:०६ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादातच बोललो आहे. त्यामुळे मी या चर्चेमध्ये पहिल्यापासूनच प्रामाणिक आहे हे सत्य पुराव्याने शाबीत होते. मी दिनांक १६/०२/२०१६ रोजी १५:४८ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ररां बद्दल बोलणे थांबवले आहे. त्यांच्याबद्दलचे माझे मत केवळ ते स्वतःच बदलू शकतात. आणि त्यांच्या बद्दल असलेल्या तुमच्या मताला बदलण्याच्या बाबतीत ते स्वतःदेखील असमर्थ असतील अशी माझी आता खात्री पटली आहे. त्यामुळे तो आधीच संपलेला विषय मी पुन्हा एकदा संपला आहे असे जाहीर करतो. मला कल्पना आहे की, माझे असे एकतर्फी जाहीर करणे तुम्हाला आवडणार नाही. आणि तुम्ही नाही-नाही म्हणत पुन्हा तोच विषय काढाल. पण सध्या मला विनोदी लेखन करण्यास कुठलाच विषय सुचत नाही आहे. (मी अल्प प्रतिभेचा मनुष्य आहे. किंवा कदाचित तुम्ही सर्व आखुडशिंगी, बहुदुधी मिपा कर माझ्या सारख्या लंगड्या गायीचे, "नवीन" म्हणून कौतुक करीत असाल अशी मला दाट शंका आहे) त्यामुळे "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" या दुव्यावर टिचकी मारीत राहणे, आणि एक नवीन प्रतिक्रिया आली अशी सूचना मिळाली की अधाश्यासारखे तिथे टिचकी मारून, ती तुमचीच आहे हे पाहून, स्मित हास्य करून, मग ती वाचून, विजयी वीराच्या मुद्रेने, पाताळविजयम मधल्या राक्षसासारखा हसत, मी माझी दीर्घ प्रतिक्रिया लिहित बसतो आहे. मला तर असे वाटू लागले आहे की आपण दोघेही विक्रम वेताळ चा खेळ खेळत आहोत. आता, "विक्रम कोण? आणि वेताळ कोण?", या सत्याच्या बाबतीत आपले दोघांचे आकलन वेगवेगळे असू शकते. त्यावर कोणी नवा कुरोसावा नवा चित्रपट काढू शकतो. त्याबद्दल कोणी नवीन ररा आठ भागांची नवीन लेखमाला लिहू शकतो. त्यावर प्रतिक्रिया म्हणून कोणी नवीन आनंद मोरे आपली तीन भागातील दीर्घ प्रतिक्रिया लिहू शकतो. आणि मग त्यावर कोणी नवीन विवेक ठाकूर साद प्रतिसादांची सरबत्ती चढवू शकतो. ही साखळी अशीच अनेकांत किंवा अंतहीन चालू राहू शकते. आणि याला कुणी ढगात प्राणी शोधण्याचा निरर्थक खेळ असे म्हणू शकतो तर कुणी दुसऱ्याला वापरणारी सर्वात मोठी अनैतिकता देखील म्हणू शकतो. अश्या प्रकारे बाकी मिपाकरांना कायम डब्बल फोडणी घातलेली मिसळ खायला मिळत राहील. मला वाटते आपण दोघे आता मिपाकरांकडून करमणूक कर देखील घेऊ शकतो. बोला करूया का पार्टनरशिप? या सिरीजवरचे माझे इतर दोन लेख तुमची आतुरतेने वाट पहात आहेत. त्या दोनी ल्येकारांकडेबी लक्ष असू द्या वो ठाकूर सायब. लई गुणाची हायती माजी ल्येकरं. मला लई जीव लावलंया बगा त्येंनी. तुमास्नी बी लावतीलाच बगा. आन न्हाय लावला तर म्हारू नगा बरं का त्येस्नी. अजून धाकली हायत. वाईच वाट बगा. ती जरी फुडे थोरली न्हाय जाली तरीबी तुम्ही कनवाळू होशीला आणि माज्या बरूबर गमती कराया येशीला असं माला उगा वाटून ऱ्हायलंया बगा.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 18/02/2016 - 12:25
तुमच्या निरागस प्रामाणिकपणाचा चाहता आहेच, ररांबद्दल तुमच्या प्रेमाचाही आदर आहे. तुमचे दोन्ही लेख वाचून, आवडले तर निश्चित प्रतिसाद देईन. एखादा नवा आयाम कळला तर पूर्वग्रहसोडून, मनसोक्त दाद देण्याचा माझाही स्वभाव आहे.

In reply to by विवेक ठाकूर

अभ्या.. 18/02/2016 - 12:41
इस खुशीके मौकेपर पूरे कायनात मे जश्न मनाया जाये. इत्र के दिप जलाये जाये, पटाखोंकी आतिषबाजीसे फलकमें सैकडो तारोंकी ......................................काय ते करा एकदाचे..............

बोका-ए-आझम 12/02/2016 - 19:03
यात अजून एक मुद्दा हा मांडावासा वाटतो की सत्य जाणून घ्यायचा हेतू काय आहे? दुस-या शब्दांत - सत्य का जाणून घ्यायचं? जर माझ्या आयुष्यात सत्य काय हे जाणून घेतल्यामुळे फरक पडत असेल तर मी जरुर त्यासाठी प्रयत्न करीन पण जर मला काहीही फरक पडत नसेल तर सत्य काय आणि असत्य काय - हे दोन्हीही माझ्यासाठी सारखेच. मी जर उंदीर असेन तर एखादं मांजर प्रकाशात कसं दिसतं हे जाणून घेण्याने मला फरक पडतो. मी जर माणूस असेन (मांजर हा ज्याचा भक्षक नाही असा प्राणी या अर्थाने हा शब्द घ्यावा) तर who cares?

In reply to by बोका-ए-आझम

एस 12/02/2016 - 19:36
सत्य शोधण्यामागचे कारण हे वैयक्तिक असायलाच हवे असे नाही. सत्य जाणून घेण्यामागच्या जिज्ञासेच्या मुळाशी मानवी जीवात नैसर्गिकरित्या असलेले कुतूहल आहे. यात माझ्या जीवनात काय व किती फरक पडला हा इतर अनेक उद्देशांपैकी एक उद्देश असू शकतो, परंतु एकमेव नाही.

In reply to by एस

बोका-ए-आझम 12/02/2016 - 21:11
हाच सामान्य आणि असामान्य माणसांमधला फरक आहे. अर्थात नोबेल पारितोषिक आणि इतर मानमरातब मिळवणं हा हेतूही आज असू शकतो. पूर्वी जेव्हा असं काही नव्हतं तेव्हाच्या शास्त्रज्ञांनी ज्ञान या एकाच उद्देशाने संशोधन केलं. मेंडेलीफने सर्व मूलद्रव्यांची आवर्तसारणी बनवली किंवा गॅलिलिओने Law of Falling Bodies ची प्रयोगाने सिद्धता दिली त्यामागे तुम्ही म्हणताय तशी निरपेक्ष वृत्ती असावी. रच्याकने युक्लिडने भूमितीची रचना आमचा छळ करण्यासाठी केलेली आहे असं शाळेत वाटायचं. आता अर्थात त्याचं महत्व समजतं. :)

In reply to by बोका-ए-आझम

Anand More 13/02/2016 - 10:45
सत्य जाणून घ्यायचा हेतू कुतूहल हाच असावा. आणि कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्यामुळे माझ्या लेखी सत्यशोधन ही देखील मुळातील नैसर्गिक प्रवृत्तीच ठरते. कुतूहलाच्या मागे आपले अस्तित्व टिकवणे ही आदिम प्रेरणा असावी. इतर प्राण्यांप्रमाणे आपण केवळ नैसर्गिक निवान जगत नसून आपण सामाजिक जीवन जगत असतो, त्यामुळे आपल्या कुतूहलाच्या मागे अस्तित्व टिकवण्याच्या नैसर्गिक प्रेरणेबरोबरच इतरही अनेक प्रेरणा काम काम करीत असतात . वर सांगितल्याप्रमाणे सत्यशोधन ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे हे मान्य झाल्यास ती सर्व प्राण्यात त्यांच्या आयुष्याच्या लांबीप्रमाणे आणि अस्तित्व टिकवून ठेवायला लागणाऱ्या धडपडीप्रमाणे आढळून येते हे मान्य करायला सोपे जाईल. पण सत्यप्रस्थापन हा मात्र सामाजिक जीवन जगणाऱ्या मनुष्य प्राण्याचा गुणविशेष आहे. एकाच समाजात राहणाऱ्या आणि परस्परावलंबी असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या सत्यशोधनानंतर त्यांना जाणवलेले सत्य जेंव्हा ते प्रकट करतात तेंव्हा त्या व्यक्त सत्याचे रूप एकच रहात नाही तर ते वेगवेगळे दिसते. मग कुठले सत्य खरे हा प्रश्न पडतो आणि सत्य प्रस्थापना हा एक नवीनच उद्योग मानवाला करावासा वाटतो. आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात. रमतारामांची आणि माझीलेखमाला मुख्यत्वे या सत्यप्रस्थापनेबाबत आणि त्यात येणाऱ्या अडचणीबाबत आहे. शक्य झाल्यास माझ्या याच लेखातील "सत्याचे अन्वेषण / आकलन" आणि "सत्याचे प्रकटीकरण" या शीर्षकाखाली लिहिलेले परिच्छेद पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला या लेखनामागची भूमिका जाणवेल.

In reply to by Anand More

Anand More 13/02/2016 - 11:32
वरच्या माझ्या प्रतिसादातील, "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." या वाक्याला "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य त्यांना पटले तर तेच अंतिम मानून उरलेल्या इतरांनीदेखील त्याला मान्य करावे, जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." असे वाचा, ही विनंती.

In reply to by Anand More

सटक 17/02/2016 - 02:30
सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला आहे आपण. सत्य हे तुम्ही सांगितलेल्या मर्यादांनी बाध्य आहेच परंतु इतर सर्व गोष्टी बरोबर असतानाही सत्याचे आकलन हवे तसेच होईल असे म्हणणे धाडसाचे आहे. सत्य हा शेवटी संवाद आहे असे मला वाटते. घटनाक्रमाचे सुसुत्रीकरण करण्यासाठी आपण जे framework बनवतो त्याला ढोबळमनाने सत्यान्वेषण असे म्हणता येइल. ह्या अर्थाने ती आदिम प्रेरणा आहे हे बरोबर आहे आणि नाईलाजाने मानवाच्या अस्तित्वाबरोबरच ते अस्तित्वात येते. तरीही सत्य हे personal असतेच. वैज्ञानिक सत्याचा येवढा बोलबाला असण्याचे कारण असे आहे की ते काही विशिष्ठ स्थितींमध्ये पुनर्गठित होऊ शकते. कितीही अवघड आणि हास्यास्पद वाटले तरी. वानगीदाखल म्हणायचे तर JFK assassination ज्या प्रसिद्ध single bullet theory चा वापर करून विषद केले गेले ती प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवली होती (म्हणे!). पण येवढा एकच निकष सत्याला लावता येत नाही. "मी रात्री २ वाजता फलाटावरून बाहेर आलो..चिटपाखरूही नव्हते..काय करणार ह्या विचारात असतानाच स्वामींनीच रिक्षा पाठवली!" हे ही सांगणार्‍याच्या द्र्ष्टीने सत्यच आहे हे विसरून चालणार नाही. पुन्हा सत्य आकलन होण्यात आपण "उपस्थित" असणे हा ही महत्वाचा भाग आहे..ज्ञानेंद्रिये उत्तम काम करत असली तरी आपण गाडी चालवत चालवत घरी येतो आणि कसे आलो ते आठवत नाही हा ही सार्वत्रिक अनुभव आहे. सत्याचे आकलन हे अजूनही बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. उदाहरणादाखल Thumbs Up ची खूण आपल्याकडे ठेंगा दाखवणे अशी वापरली जात असल्याने तिचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि पाश्चातत्य लोकांना अभिप्रेत असलेला अर्थ वेगवेगळे आहेत; हा झाला सांस्कृतिक गोंधळ! (हे उदाहरण साक्ष देण्याच्या दृष्टीने वाचावे. कुणी कुणाला अंगठा वर करून दाखवला तर भारतीय माणूस म्हणेल की तो त्याला वाकुल्या दाखवत होता आणि पाश्चात्य म्हणेल की त्याला प्रोत्साहन देत होता) Total Blackout नावाच्या एका कार्यक्रमात अंधारामुळे माणसाच्या आकलनशक्तीत कसे फसवे बदल होतात ह्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळते. याच मर्यादांनी बाध्य सत्याचे प्रकटीकरणही असणे ओघाने आलेच! मुद्रा ज्यांना कळत नाहीत त्यांना भारतीय नृत्यातून काही सांगण्याचा प्रयत्न करणे(म्हणजे काही कळण्याची अपेक्षा करणे) अवघडच! त्यामुळे, प्रत्येक सत्य हा सादरकर्त्याचा स्वतःचा अविष्कार असते असे मला वाटते. आता हे आपणास महिती असलेले सत्य दुसर्‍यास सांगणे ह्या अर्थाने पाहिले तर अर्थातच ते बदलणार! म्हणजे बदलेलच असे नाही पण बदलणार नाहीच असे कसे म्हणणार? प्रत्येक कलाकार स्वतःच्या कलाकृतीमधून दर्शकाला (प्रेक्षकाला) आपल्याला जाणवलेल्या सत्याचे दर्शन घडवत असतो. दुर्बोधता ही केवळ lack of reference असते असे मला वाटते. येथे जाणवलेले हा शब्द ह्यासाठी की ते सत्य त्याला व्यक्त पातळीवर कळले असेलच असे नाही, पण जाणवणे शक्य आहे. (म्हणजे मातेचा स्तन जवळ आल्यावर तान्ह्या बाळाला आता स्तनपान करायचे आहे हे जाणवते तसेच.) कलाकार जेवढा प्रेक्षकाच्या frame of reference च्या बाहेर जातो तेवढा तो अधिकाधिक abstract किंवा दुर्बोध होत जातो. (येथे किंवा हा शब्द either/or असा नाही तर..आकळला तर abstract आणि नाकळला तर दुर्बोध असा वापरला आहे) महत्वाची गोष्ट अशी की आकळणे आणि नाकळणे ह्या दोन्ही गोष्टी दर्शकावर (प्रेक्षकावर) अवलंबून आहेत. कलाकारावर नाहीत. अंततः सत्य हे संवादाशिवाय अस्तित्व राखत नाही असे वाटते. जे मला जाणवले तेच माझ्यासाठी सत्य! अगदी नैसर्गिक सत्य जरी घेतले तरी ते निसर्ग व साक्षी (nature and observer) ह्यांचा संवाद आहे. म्हणूनच कितीही सफरचंदे पडत असली तरी त्यामागचे गुरुत्वाकर्षण न्यूटनला जसे कळले तसे इतरांना नाही कारण इतरांचा संवाद नाही. आता येते सामाजिक सत्य प्रस्थापन. हे तर केवळ सोय आहे! ज्या समूहाला जे जे ज्या ज्या वेळी सोयीचे वाटते ते सामाजिक सत्य म्हणून स्वीकारण्यात येते. सर्व धर्म हे ह्या प्रकारच्या सत्याची प्रमुख उदाहरणे आहेत. सामाजिक सत्याला सत्य (पुराव्याने शाबित करता येण्यासारखे या अर्थाने) ह्या दृष्टीने फारसे महत्व नाही. अर्थात हे तेव्हा चूक ठरते जेव्हा अश्या एखद्या सत्याचा अंगिकार केलेला समाज दुसर्‍या एखाद्या समाजाच्या दु:खाला कारणीभूत होतो. मग त्याच्या विरोधात अजून सत्ये मांडली जातात आणि त्यांचा पुरस्कारही होतो. पुन्हा हे ही सत्य संवादात्म झाले. टीपः हे सर्व केवळ आपला लेख व प्रतिसाद वाचून लिहिले आहे..मूळ चित्रपट पाहिलेला नाही आणि लेखही वाचलेले नाहीत.

In reply to by सटक

Anand More 17/02/2016 - 22:46
आपण छान विचार मांडलेत. इतक्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण मी सत्य अन्वेषणाबद्दल काहीही बोललो नसून सत्याचे आकलन आणि नंतर त्याचे प्रकटीकरण याबद्दल माझे विचार मांडले आहेत. तुमचा सत्य म्हणजे संवाद हा विचार देखील त्याच अंगाने जातो. जमल्यास चित्रपट पहाल का ? आणि माझे लेखन पण एकदा नजरेखालून घालून त्यावर प्रतिसाद दिलात तर वाचायला आवडेल मला.

In reply to by Anand More

सटक 17/02/2016 - 23:42
सत्यशोधन ही जर का नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर मग सत्याचे आकलन हे सत्याच्या अन्वेषणाचे फलितच असेल असा विचार माझ्या लेखनामागे होता. सत्याचे अन्वेषण आधी आणि मग आकलन हा नैसर्गिक ओघ आहे. आकलनात अन्वेषण अंतर्भूत आहे असे आपणास वाटत नाही का? प्रकटीकरणावरही मी त्याच अंगाने बोललो आहे. अन्वेषण-आकलन-सात्मीकरण-प्रकटन हा माझ्यामते जास्ती पटणारा Process Flow असावा. सात्मीकरणाशिवाय प्रकटन शक्य नसल्याने आकलन झालेले सत्य आणि नंतर प्रकट होणारे सत्य ह्यात फरक अपेक्षित आहे. असो. चित्रपट बघून काही वेगळेही वाटू शकेल कदाचित.

In reply to by सटक

Anand More 18/02/2016 - 13:12
तुमचे टोपणनाव असे आहे की मी तुम्हाला दादा, साहेब, ताई, बाई, वहिनी, जी वगैरे काहीही अतिरिक्त संबोधन लावू शकत नाही. म्हणून केवळ टोपणनाव वापरून संबोधतोय. त्यात कुठेही एकेरीवर यायचा इरादा नाही. आपल्याबद्दल आणि आपल्या लेखनाबद्दल पूर्ण आदर राखूनच मी प्रतिसाद देतो आहे. माझ्या या लेखमालेत सत्यशोधन हा मुद्दा कधीच नव्हता. आता मागे वळून बघताना मी एका मुद्द्याला शीर्षक म्हणून "सत्याचे अन्वेषण / आकलन" हा शब्द प्रयोग केला तो चुकला असे मला वाटू लागले आहे. त्या शीर्षकाखाली माझे सगळे मुद्दे केवळ "सत्याचे आकलन" या संकल्पनेभोवतीच गुंफलेले आहेत. एकदा वाटले की संपादकांना विनंती करून ते शीर्षक बदलून घ्यावे. पण त्याने अनेक प्रतिसाद निरर्थक वाटले असते म्हणून मी तशी विनंती करीत नाही आहे. मी सत्य शोधन एक नैसर्गिक प्रवृत्ती मानतो आणि तुम्ही आधी मांडलेला, संवादाचा आणि सत्याच्या व्यक्तिगत आविष्काराचा मुद्दा मला पूर्णपणे पटलेला आहे. किंबहुना, माझा मुद्दा अजून स्पष्ट करण्यासाठी मी असे म्हणीन की, नैसर्गिक सत्यांबद्दल सत्यशोधन ही विचारपूर्वक केलेली गोष्ट नसावी. याउलट, स्वभावानुसार, ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेसनुसार, आणि बाह्य वातावरणानुसार माणसाला अशी नैसर्गिक सत्ये जाणवत असावीत. नंतर माणूस त्याबद्दल जो काही विचार करतो ते त्या सत्याच्या प्रकटनाची त्याच्या मनात झालेली सुरवात असते. थोडे अलंकारिक बोलायचे झाले तर मी "नैसर्गिक सत्य जाणवणे ही बर्फाचा कडा तुटण्यासारखी अचानक घडणारी घटना मानतो. त्यात शोधन किंवा अन्वेषण याचा भाग कमी आणि केवळ त्या क्षणाला साक्षी असणे हीच त्या माणसाची मोठी उपलब्धी मानतो" असे म्हणेन. आता रहाता राहिला या लेखाचा, चित्रपटाचा आणि लेखमालेचा मुद्दा. ह्या तीनही गोष्टी गुरुत्वाकर्षण, आण्विक बल अश्या संकल्पनांच्या नैसर्गिक सत्याबद्दल बोलत नाहीत. याउलट एका घटनेचा वेगवेगळ्या लोकांनी कसा लावला आणि प्रत्येकाला आपली बाजूच सत्य आहे असे वाटते, या बद्दल बोलत आहेत. या सर्व लोकांपैकी कोण सत्य बोलतोय? कोण असत्य बोलतोय? याबद्दल स्वत: कुरोसावा, नंतर ररा आणि त्यानंतर मी कुणीच काहीही भाष्य केलेले नाही आहे. तर ज्या गोष्टी आपण करतो किंवा आपण बघतो त्याबद्दलचे आपले मत (ज्याला आपण आपले वैयक्तिक सत्य म्हणू शकतो) ते मूळ सत्यापासून भिन्न असू शकते. त्यात आपल्या स्वप्रतिमेचा, स्वप्रतिमाप्रेमाचा, संस्कारांचा, पूर्वग्रहांचा, आयुष्यातील तत्कालीन गरजांचा किती मोठा प्रभाव असतो त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. खून झालाय ही एक सत्य घटना आहे. पण तो का झाला? त्यामागची भूमिका काय होती? तो होण्यापूर्वी कोण कसे वागले याबद्दलचे सर्व लोकांचे आकलन पूर्णतया भिन्न आहे. कारण हे सर्व लोक, मी वर उल्लेखिलेल्या प्रभावांपासून मुक्त नाहीत. जेंव्हा मनुष्य कोणत्याही व्यवस्थेची उभारणी करतो, तेंव्हा त्यासाठी मूळ घटक जर निर्जीव असेल किंवा असल्या प्रभावांपासून मुक्त असेल तर ती व्यवस्था उभी करणे आणि तिला तिच्या मूळ स्वरूपात ठेवणे सोपे असते. पण जर ती व्यवस्था कुटुंबाची किंवा समाजाची असेल तर तिचा लघुत्तम एकक म्हणजे मनुष्य असतो आणि तो या प्रभावांपासून कधीच मुक्त नसतो. त्यामुळे अश्या व्यवस्थांमध्ये सत्य कायमच धूसर असते आणि जाणवलेले सत्य (Realized Truth) आपोआप मागे पडून उत्पादन केलेले सत्य (Manufactured Truth) बाजी मारते असा या पहिल्या लेखाचा सूर आहे. आणि असे का होत असावे त्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण मी तिसऱ्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी तुम्हाला चित्रपट पहा आणि तीनही लेख वाचा अशी विनंती केली होती.

In reply to by Anand More

सटक 18/02/2016 - 20:54
म्हणजे माझे संदर्भाविरहित स्पष्टीकरण झाले तर.. ;) आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले.. दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील. तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही. असो, आपले विचार पटताहेत, थोडे fine tuning सोडल्यास. पुढील लेखनास शुभेच्छा! आणि संबोधन जाऊद्या हो..संवाद महत्वाचा!

In reply to by सटक

Anand More 19/02/2016 - 11:32
शेवटी "असो" म्हणून थांबलात तरीही काही सांगावेसे वाटले म्हणून लिहितोय.
आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील.
हे तुमचे मत मला पटले आहे.
तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही.
कदाचित मी थोडा धाडसी असीन ;-) सात्मीकरणात देखील व्यक्ती आपल्या पूर्वानुभवांना आणि कल्पनेला वापरून सत्याचे एक सुसंगत चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत असते असे मला वाटते. म्हणजे इथे आपले आकलन इतरांपुढे प्रकट करावे की नाही याचा विचार जरी नसला तरी ते आकलन विचारांच्या सहाय्याने सुसंगत करून स्वतःच्या मनात प्रकट करणे सुरु होते. म्हणून मी त्याला प्रकटीकरणाची पहिली पायरी असे म्हटले. आपले विचार थोड्या ट्युनिंग च्या फरकाने बरेचसे जुळतात अश्या अर्थाचे तुमचे विधान मला पटले आहे. आपल्याशी संवाद करून आनंद झाला.

In reply to by Anand More

सटक 20/02/2016 - 00:13
संवादाची अशी गंमत आहे पहा. रेषा येत रहातात आणि आकृती उमटत रहाते! तर..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
तुमची ही भूमिका स्पष्ट केलीत हे फार छान केलेत. आकलन हे मी ह्यापूर्वी estimate/calculate अश्या अर्थाने वापरलेले जास्ती पाहिले आहे. त्यामुळे सहजलब्ध झालेले ज्ञान अशी आपण जी त्याची फोड करता आहात ती मला दिसली नाही चटकन. आकलनामध्ये कार्य अपेक्षित आहे. म्हणजे माहिती ताडून बघणे, त्यावर आधारित अदमास बांधणे इ. इ. शोधन ह्या शब्दाचेही तसेच आहे. "धातू शोधन" हे जास्ती वेळा वाचल्याने, शोधणे हा मराठी अर्थ मी त्याला सहसा लावलेला पाहिलेला नाही. शुद्धीकरण असाच जास्ती. आपण म्हणता त्याप्रमाणे अपघाती मिळालेले ज्ञान ह्याला वेगळा शब्द सुचवू म्हणेन तर तो ही चट्कन आठवत नाही! वेगवेगळ्या माणसांनी बघितलेले एकच दृश्य ही संकल्पना वापरून Vantage Point नावाचा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जमल्यास बघा. चांगला आहे. अर्थात तुम्ही भरपूर खोल संकल्पनेबद्दल बोलताय. तुम्ही आता पुरेसे कुतुहल वाढवल्यामुळे मी आता राशोमान बघेन. जमल्यास सांगेन कसा वाटला ते. सत्याचे सुसंगत चित्र, हम्म्म्म..चांगली संकल्पना आहे! शक्य आहे. प्रत्यक्ष दृश्य असेल तर मग तर नक्कीच! अवांतर: आपल्या शेवटच्या वाक्यातले आनंद आवडले...येवढे लिहून मी ही 'सटक"तो!

In reply to by सटक

Anand More 20/02/2016 - 13:11
तुम्ही माझे लेखन बारकाईने वाचले आहे हे जाणवून खूप बरे वाटले. असे जाणकार वाचक असतील तर मी शब्द अधिक विचार करून वापरायला हवेत हे देखील जाणवले. तुम्ही सांगितलेले शब्दार्थ पटले आहेत पण माझ्या प्रतिसादामुळे, माझ्या शब्द प्रयोजनाच्या मागील भूमिका समजून, माझ्या विचारांची दिशा लक्षात येत असावी असे वाटते आणि माझे शब्दप्रयोग अगदीच मूर्खपणा वाटत नसावेत याची खात्रीदेखील वाटते आहे. तुम्ही ज्या दृष्टीने हा पहिला लेख वाचला त्यामुळे थोडासा धीट होऊन, मी तुम्हाला तिसरा भाग वाचण्याची विनंती करीन. कारण तो लिहिल्यानंतर माझा मीच खूप खूष झालो होतो. त्यावरच्या प्रतिसादांमध्ये सिरुसेरी यांनी कमल हसनच्या "वीरुमंडी" (सांदीयार)या तामिळ चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तो तू नळीवर शोधून ठेवला आहे. पण बघायचा बाकी आहे. आता त्या बरोबर Vantage Point पण बघीन. धन्यवाद.

In reply to by जयंत कुलकर्णी

त्यातून काही वेगळा अर्थ निघतोय का पहा....पण मला आवडलेली एक गोष्ट ती असी की तुम्ही त्यावर एवढ्या गंभीरपणे विचार करताय ते. श्री रमताराम यांनीही fantastic| लिहिले आहे यात काही शंकाच नाही....

In reply to by जयंत कुलकर्णी

Anand More 13/02/2016 - 11:39
श्री. कुलकर्णी, लिंक बद्दल धन्यवाद आणि कौतुकाबद्दल देखील. आपले लेखन वाचले. खूप छान आहे. आपण राशोमोनचे भारतीयीकरण अतिशय समर्थपणे केले आहे. पण मी अजून राशोमोनच्या धुंदीत असल्याने मला तो शेवटचा झिरना गेटचा सांधा मनात मूळ गोष्टीशी जुळवता आला नाही. ही लेखमाला संपल्यावर पुन्हा वाचीन आणि माझे विचार मांडेन. तोपर्यंत तुमची त्या शेवटच्या भागाच्या सांध्याची भूमिका मांडलीत तर माझ्या विचाराला दिशा मिळू शकेल.

विवेक ठाकूर 14/02/2016 - 15:11
तरीही इतकी भुक्कड लेखमाला मी त्यापूर्वी कधीही वाचली नव्हती. आता विषय निघालाच आहे तर लिहीतो, सत्यशोधन म्हणजे फॅक्ट फाइंडींग नव्हे. एक काल्पनिक कथा घेऊन त्यावर आठ क्लिष्ट भाग लिहून, सतरा बाजूंनी डोकेफोड करायची आणि पुन्हा `सत्य तुम्हीच शोधा' असा भोंगळपणा करत, वाचकांची वाट लावायची याला थोर कलाकृती म्हणत नाहीत. कलेनं लोकरंजन झालं पाहिजे, रसिकांनी तुमच्यासाठी स्वतःचा वेळ दिलायं, त्यांना आनंद मिळायला हवा असं माझं मत आहे. लेखकानं भारंभार लिहून किंवा त्यावर चित्रपट वगैरे काढून, स्वतःचं कन्फ्यूजन वाचकांच्या माथी मारणं आणि त्याला `सत्यशोधन वगैरे म्हणणं ही केवळ भंकस आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 16:37
सदर चित्रपटात उत्तर प्रेक्षकांवर सोडून काय मनोरंजन साधलंय ? खुद्द रमतारामांनी शेवटच्या लेखात, स्वतःच्या प्रतिसादातच स्वतःचा मानसिक गोंधळ नकळतपणे उघड केला आहे : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल. कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न? त्याला न आगा ना पिछा. आणि पुढे तर हद्दच केली आहे! त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणजे मर्म अजून यांना सुद्धा गवसलेलं नाही! आणि अपेक्षा काय तर वाचकांची पुरती काशी झाल्याशिवाय त्यांना `मर्म' कळणार नाही. पण इतका पसारा बघून, इथले सदस्यही बावरलेले दिसतात. मूळ प्रश्नाचीच जर उकल होत नाही तर नवे प्रश्न (आणि तेही मूलभूत?) निर्माण करुन काय मनोरंजन साधलंय? थोडक्यात, मूळ प्रश्न टांगणीला आणि नवे `मूलभूत प्रश्न' जोपर्यंत वाचकांच्या मनाचा `ताबा' घेत नाही तोपर्यंत त्यांना, लेखकानं `ओरिजनल' काशी काय घातलीये तेच कळणार नाही! याला तुम्ही लोकरंजन म्हणता?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 14/02/2016 - 16:44
मी मला जे हवं ते घेतो... कधी कधी ते समोरच्याने दिलेही नसेल..त्या बाबतीत मी एकलव्य आहे... तुम्ही माझा तिसरा लेख वाचला का? रमतारामांना दिसलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या गोष्टी मला दिसल्या असे मी नमूद केले आहे... ते देखील तुम्हाला आवडलेच पाहिजे असा माझा आग्रह नाही.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 16:50
चित्रपटाच्या शेवटाबद्दल आणि ररांच्या या प्रतिसादाबद्दल तुम्हाला प्रामाणिकपणे काय वाटतं? पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल.

In reply to by विवेक ठाकूर

श्री ठाकूर, जो चित्रपट जगात आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांना भुरळ पाडत आला आहे, आणि जो चित्रपटसृस्टीतील एक माईलस्टोन म्हणून ओळखला जातो त्या सिनेमाला भुक्कड म्हणणे याला काय म्हणावे हे कळत नाही. शिवाय प्रतिसादात "घंट्याचे" "काशी घालणे" या असल्या शब्दांचा मी निषेध करत आहे. असो. अर्थात याचा उपयोग होणार नाही याची कल्पना आहे पण सगळ्यांनीच हे चालवून घेतले असे उद्या कोणी म्हणायला नको म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by जयंत कुलकर्णी

विवेक ठाकूर 14/02/2016 - 17:47
तुम्ही ररांच्या प्रतिसादाबद्दल किंवा चित्रपटाच्या शेवटा बद्दल जर काही पटेलसे लिहू शकलात तर मी सुद्धा उपरोक्त शब्दांचा पुनर्विचार करीन . ररांच्या नांवामुळे सदस्य बोलले नसतील इतकंच . एनी वे , वरच्या प्रतिसादाबद्दल तुमचं किंवा आनंदश्रींच मत काय आहे ?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 14/02/2016 - 18:01
आनंदश्री.... मला तर कुस्तीचा फड मारून आल्यासारखं वाटतंय... अहो ठाकूर साहेब माझं मत मी खाली दिलं आहे.. आणि मी तितकंच सांगू शकेन असे मला वाटते.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 18:16
तुम्ही माझ्या तीन साध्या प्रश्नांची उत्तरं द्याल का? १) तुम्हाला चित्रपट नक्की काय सांगतो ते कळलंय का? २) `त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा' हे प्रश्न कुठले? ३) त्या प्रश्नांनी मनाचा ताबा घेण्याचा (कारण ते चित्रपटाचा भागच नाहीत) आणि चित्रपट समजण्याचा काय संबंध आहे? आणि तुमच्याकडे उत्तरं नसतील तर ते प्रामाणिकपणे मान्य कराल का?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 14/02/2016 - 18:42
देतो की, 1) नाही 2) ररांच्या मनातले प्रश्न मी ओळखू शकलो नाही 3) प्रश्न कुठले हेच ओळखले नाही तर त्यांचा चित्रपटाशी संबंध काय ते मी सांगू शकत नाही.. हत्ती आणि सात आंधळ्याच्या गोष्टीतील मी एक आंधळा म्हणून घ्यायला तयार आहे..

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 14/02/2016 - 21:35
खालच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलंय तसा तुमची पीसं वगैरे काढण्याचा अजिबात उद्देश नव्हता. ररांनी लोकांना उगीच गुगली टाकून स्वतःचं अज्ञान झाकण्याचा प्रयत्न केला होता अशी माझी खात्री आहे. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही तसं काही केलं नाहीत. तुमच्या हलक्या फुलक्या लेखनाचे इथे अनेक फॅन्स आहेत. तुमच्याकडे सुरेख शैली आणि उत्तम मांडणी आहे. तस्मात, तुम्ही तुमच्याच स्टाइलनं लिहीत राहा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !

Anand More 14/02/2016 - 17:03
ररांना जे भावले ते त्यांनी लिहिले..मला हा चित्रपट समजला आहे... या तुम्हालापण समजावतो आणि मी सांगीन तोच त्याचा अंतिम अर्थ आहे असा त्यांचा अभिनिवेश मला कुठे जाणवला नाही... आणि मी थोडा गुण गाईन आवडी वर विश्वास ठेऊन व्यक्त होणारा आहे... त्यामुळे माझे विचार त्याच दिशेने धावतात

श्री मोरे, तुम्हाला जे भावले, जे आवडले त्याबद्दल आपण लिहीत रहा. आपण म्हटलेलेच आहे की ते सगळ्यांना आवडावेच असा तुमचा आग्रह नाही आणि ते शक्यही नाही. असे वितंडवाद घालणारे प्रतिसाद आले तर त्याला उत्तर देत बसू नका. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे....

In reply to by जयंत कुलकर्णी

मारवा 15/02/2016 - 12:54
कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे.... मनोरंजना च्या जागी सत्याला अनुभवाला हे शब्द टाकले तरी चपखल बसेल असे वाटते.

In reply to by सिद्धेश महाजन

Anand More 14/02/2016 - 17:30
मिपावरच्या लेखमालेच्या पहिल्या भागाची लिंक माझ्या वरील लेखाच्या सुरुवातीला दिली आहे... आणि ही ररांच्या ब्लॉगची लिंक http://ramataram.blogspot.in/2012/02/blog-post.html?m=1

Anand More 14/02/2016 - 19:17
तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे... पण ठाकूरांचे आडनाव बदललेले त्यांना चालेल का? चला... जाऊद्या हो... मला आपलं वाटलं, हलकं फुलकं न लिहिता, ज्याला सगळे पटकन वैचारिक, तात्विक, विश्लेषणात्मक वगैरे म्हणतील आणि मग माझी किर्ती वाढेल असे काही पोस्टून थोडा भाव खावा... पण तुम्ही तर माझी पिसंच काढलीत... तरीदेखील, अगम्य असल्याने इतरांनी दुर्लक्षिलेला माझा हा धागा तुमच्या प्रतिसादांमुळे वर येतोय, म्हणून धन्यवाद :-)

Anand More 14/02/2016 - 23:06
तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून हुरूप वाढलाय म्हणून थोडे लिहितोय. पण मला पुस्तकांची आणि चित्रपटांची आवड आहे. त्यांचे मी दोन प्रकारात वर्गीकरण करतो. १) जे विशिष्ट प्रश्न मांडून त्याचे उत्तर देतात. त्यामुळे ते अर्थवाही असतात. सुखांत किंवा दु:खांत असतात. त्यांचे निष्कर्ष आपल्याला पटणे किंवा न पटणे इतकेच होऊ शकते. २) जे केवळ गोष्टी मांडतात. प्रश्न पण आपले आपण ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण आपली आपणच ठरवावीत अशी काहीशी त्यांची योजना असते. त्यामुळे ते अनेकांना निरर्थक वाटतात. वेळकाढू देखील. अशी दुसऱ्या प्रकारची पुस्तके वाचणे किंवा चित्रपट पाहणे आणि नंतर त्यावर विचार करणे म्हणजे ढगात प्राणी किंवा विविध आकार शोधण्यासारखे खुळचट आहे असे अनेकांना वाटू शकते. पण ज्यांना तो खेळ आवडतो त्यांना मात्र त्यात खूप मजा येते. मला स्वतःला दुर्बोध कविता कमी कळतात आणि त्यांना अर्थ लावण्याचे प्रयत्न आनंददायी वाटत नाहीत. तसेच काहीसे नृत्य आणि शिल्प आणि नवचित्रकलेच्या बाबतीत. याचा अर्थ फक्त इतकाच की मला त्यांची भाषा कळत नाही. त्या कलाकाराला त्या कलाकृतीतून त्याला पडलेला प्रश्न आणि त्याचे त्याला गवसलेले उत्तर मांडायचे असेल तर मी त्याचा रसास्वाद घेऊ शकतो. पण या कलांच्या कलाकाराला, मीच प्रश्न ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण मीच शोधावीत असे वाटत असेल तर मात्र मी तिथून पळ काढतो. मला न कळलेल्या चित्राला जेंव्हा कोणी देहभान विसरून पहात राहिलेला दिसतो तेंव्हा मी पण त्या रसिकावर, त्या कलाकृतीवर आणि त्या कलाकारावर थोडा वैतागतो. आणि थोडासा जळतो देखील. पण ते तितकेच. कारण त्याचा अर्थ मी उत्क्रांतीमध्ये किंवा रसिकपणामध्ये कुठे कमी आहे असा होत नाही. फक्त आपल्याला ती भाषा येत नाही असे समजून मी शरणागती पत्करतो आणि जी जमते तिच्याकडे पुन्हा वळतो. मला संगीत आवडते पण कोणी रागांची नावे, सम, मिंड, ताल वगैरे बोलू लागला, किंवा फक्त रागाची आलापी ऐकवू लागला की मी बहिरा असल्यासारखा त्याच्याकडे बघत राहतो. कारण त्या रागाच्या आलापीत मला आनंद आपोआप मिळत नाही आणि तो शोधताही येत नाही. कदाचित या चित्रपटाने अनेकांना ढगात प्राणी आणि आकार शोधण्याचा आनंद दिला असेल आणि तितक्याच अनेकांना आपली फसगत झाली, हाती काहीच आले नाही असा वैतागवाणा अनुभव देखील दिला असेल. ज्यांना आनंद दिला त्यांना ढगात सारखेच प्राणी दिसले असतील याची खात्री ते लोक स्वतः पण देऊ शकत नाहीत. पण याचा अर्थ त्यांचा आनंद खोटा ठरत नाही. ररांना आणि मला या चित्रपटाने वेगवेगळे रूप दाखवले आहे हे तुम्ही वाचलेच असेल. पण त्यामुळे ररांचे किंवा माझे आकलन अंतिम ठरत नाही. त्यात कोणी उजवे किंवा डावे ठरत नाही. आणि दोन आकलने निघाली म्हणून चित्रकृती दुय्यम ठरत नाही. फक्त कुरोसावाने चित्रपट जगासमोर मांडला. तर आधी ररा आणि मग मी आमचे स्वतंत्र आकलन मिपावर मांडले. ते तुम्हाला भिडले नाही इतकेच. त्यात चांगले - वाईट, रसिक - अरसिक, परिष्कृत - अपरीष्कृत असे काहीच नाही. माझा खेळ मला अजूनही आवडतो. पण तो तुम्ही पण आवडून घ्या त्याला चांगले म्हणा अशी माझी काही जबरदस्ती नाही. त्याला वाईट म्हणायचे की नाही, आणि मला किंवा माझ्यासारख्यांना खुळ्यात काढायचे की नाही तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही दोघांनी स्पष्टपणे तुमचा मुद्दा मांडलात त्यामुळे तुमच्याशी बोलता येईल असा विश्वास वाटला. आणि माझ्या, तीन लेखात विभागलेल्या कल्पनाविस्ताराला जोड म्हणून हा एक लांब प्रतिसाद दिला आहे. तुमच्याशी बोलून आनंद वाटला.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 15/02/2016 - 12:24
कोणत्याही कलाविष्कारात कलाकार आणि रसिकांची कनेक्टीविटी प्राथमिक आहे. ती नसेल तर विषयच संपला ! माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते. जर अनुभव सच्चा असेल तर साध्या शब्दातून सुद्धा तो रसिकांना भिडतो. फर्स्ट हँड अनुभवाला दुर्बोधतेचं डेकोरेशन लागत नाही. अर्थात, उक्तट अनुभवासमवेत सौंदर्याचा परिपोष करणारी अभिव्यक्ती असेल तर ती अविस्मरणीय ठरते.

मारवा 15/02/2016 - 12:47
माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते
आपण बर्यापैकी सुबोध आहात तर आपल्या मते वरील प्रकारात मोडत असलेल्या कलाकारांची एखाद उदाहरणे द्याल का ?

मारवा 15/02/2016 - 13:22
आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.

मारवा 15/02/2016 - 13:22
आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.

In reply to by मारवा

विवेक ठाकूर 15/02/2016 - 14:33
कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते कवितेतल्या पहिल्या तीन कडव्यांमधे बालकवी आणि वाचक यांच्या अनुभवविश्वात फारसा फरक नसतो. ते एक साध्या शब्दात केलेलं, लयबद्ध आणि उत्तम असं, चित्रदर्शी निसर्गचित्रण आहे. ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे. अनुभवांची फारकत या कडव्यात आणि त्यातल्या त्यात, शेवटच्या ओळीत होते : झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर. आणि इथे बालकवी दुर्बोध होत नाहीत तर अभिव्यक्तीशी इमान राखून व्यक्तीगत होतात. म्हणजे त्यांची निसर्गाशी इतकी तद्रुपता साधते की त्यांना औदुंबर ही व्यक्ती वाटते. त्याहूनही थोर म्हणजे कवितेत, `असला औदुंबर' ही `जळात बसला'शी, बालकवींनी साधलेली शब्दांची लयकारी! मूळात ही कविता दुर्बोध नाही तर मोनालिसाच्या हास्यासारखी गूढ आहे. कारण `झाकाळुनी जळ गोड काळिमा' ही ओळ, जीवनातल्या सर्वात रहस्यमयी काळ्या रंगाचा निर्देश करते. आणि कवितेच्या शेवटाला सॉलिड स्पेस निर्माण करुन देते. जर बालकवींची मुलाखत घेतली असती आणि त्यांनाच अर्थ विचारला असता, तर इतकी सरळ कविता लिहीणार्‍यानं मनातलं सरळ सांगून टाकलं असतं. मग या कवितेचे रसिकांनी वेगवेगळे अर्थ काढले सुद्धा नसते. किंवा तुम्ही म्हणता तसा स्वतःच्या अर्थाचा आग्रह कुणी धरला नसता. तस्मात, प्रश्न अर्थाच्या दुराग्रहाबद्दल नाही, अभिव्यक्तीच्या दुर्बोधतेबद्दल आणि कलाकारनं ती, कोणतंही क्लॅरिफिकेशन न देता, हेतुपुरस्सर तशीच ठेवून, रसिकांना चकवण्याबद्दल आहे.

दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा आणि? ग्रेस दुर्बोध म्हणजे वर जे वर्णन केलय तसे "फेक" होते? की मोनालिसा सारखे गुढ? हे कोण ठरवणार? त्यांनीच एका कवितेत "दुर्बोधतेची बेसरबिंदी" असा शब्दप्रयोग केलाय..

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 15/02/2016 - 17:19
मोनालिसाचं हास्य गूढ आहे त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यावर ते हास्य कळत नाही असं नाही, तर तिच्या हास्याची अनेक कारणं वाटतात. ती प्रत्येक वेळी दर्शकाच्या मूडप्रमाणे बदलत जातात. पिकासोची चित्रं दुर्बोध आहेत, कितीही वेळा पाहिली तरी पिकासोला काय व्यक्त करायचंय, ते नक्की काहीच कळत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

ग्रेसची कविता काय आहे मग? तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ गुढ? ते स्वतः तर दुर्बोध आहे म्हणतात.

मोरे.. मला तुमचा लेख खरंच फारसा कळला नाहीये. मुळ रमताराम ह्यांचाही लेख वाचलेला नाही. मला जेव्हा जमेल तेव्हा हे वाचुन मी तुमच्या लेखावर प्रतिसाद देईन. सध्या तरी माझा पास!

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 15/02/2016 - 15:10
हायला. मला वाटले पिरातैला तरी कळले असेल. तिला माहीती असते बरीच. मी प्रस्तावनेनंतर हात वर केले. सविस्तर वाचायचीच कॅपॅकिटी नाही माझी कळणे लांबच राहिले.

In reply to by पिलीयन रायडर

Anand More 15/02/2016 - 15:15
हो. ह्या लेखाचा संदर्भ लागण्यासाठी ररांचे मूळ लेखन वाचल्याने जास्त मदत होईल कारण हा लेख त्यांच्या मुलाच्या आठ भागांच्या लेखमालेतल्या पहिल्या लेखावरचे माझे विचार आहे. आणि माझे हे तीनही लेख म्हणजे ररांच्या मूळ लेखनावर मी दिलेला प्रतिसाद आहे. त्यामुळे चित्रपट बघणे, ररांचे मूळ लेखन वाचणे आणि मग माझे विचार वाचले तर कदाचित तुम्हाला संदर्भ जवळून जाणवतील. या चित्रपटाचे माझे आणि ररांचे आकलन वेगळे आहे, जे मी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात मांडले आहे. त्यामुळे या लेखमालेताला हा पहिला भाग सोडून देणे आणि फक्त चित्रपट बघून दुसरा आणि तिसरा भाग वाचणे हा देखील एक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे.

In reply to by Anand More

हो, ते लक्षात आलं की आधी ररांचे लेख वाचावे लागतील. पण मुळात ते ही समजायला इतक्या क्लिष्ट भाषेतलं काही समजायला हवं. तुम्ही कुठल्या तरी प्रतिसादात लिहीलय की लेख दुर्लक्षित राहिला आहे. तुम्हाला कदाचित त्याची काही खंत नसेलही, पण उगाच सांगावं वाटलं की तुमचे लेख आवर्जुन वाचले जातातच. पण किमान मला तरी इतकं Abstract / दुर्बोध (मला चपखल शब्दही सापडत नाहीये!) समजत नाही. किंवा त्यात एवढा रस वाटत नाही. कदाचित बर्‍याच जणांचे तसेच होत असावे. पण तुम्ही लिहीलाय म्हणुन प्रयत्न करायची इच्छा होतेय. थोड्या शांत मनाने प्रयत्न नक्की करेन!

In reply to by पिलीयन रायडर

Anand More 15/02/2016 - 15:51
तुमचा प्रतिसाद वाचून मला खरंच Oscar मिळाल्यासारखं वाटतंय. पण "किंवा त्यात एवढा रस वाटत नाही." हे तुमचे वाक्य मला पटते. माझे पण असे अनेकदा होते. एखादे पुस्तक आणून ठेवतो. पहिली काही पाने वाचून रस नाही वाटला तर ठेवून देतो. नंतर पुस्तक परत बोलावते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे लेखनात रस वाटला नाही तर मी दुर्लक्ष न करता विषयाची मनात नोंद करून बाजूला ठेवतो. मग ते यॊग्य वेळी परत बोलावतेच.

Anand More 15/02/2016 - 15:07
Abstract कला आणि अंतहीन किंवा अनेकांत रचना यांच्याशी कसे जुळायचे हा प्रश्न थोडा कठीण आहे. मी स्वतः abstract कथा, कविता यांच्याशी झटकन एकरूप होऊ शकत नाही. पण अंतहीन किंवा अनेकांत रचनांशी जुळवून घ्यायला मला किंचित सोपे जाते. याचा अर्थ प्रत्येक अंतहीन किंवा अनेकांत रचना मला भावतीलच अशी खात्री मी देऊ शकत नाही. अंतहीन कथा कादंबऱ्या खूप वाचल्या आहेत. त्याची सुरवात झाली ती अनंतमूर्तींच्या संस्कार पासून. मग भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्या देखील वाचल्या आणि मग हळू हळू सवय होत गेली. पण याचा अर्थ अनंतमूर्तींचे भैरप्पांचे सर्वच साहित्य आवडले असे नाही. पण एखाद्या लेखकाचे सर्वच साहित्य आपल्याला आवडलेच पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही. तसा कुठला करार कलाकार आणि रसिकांमध्ये असतो असे मला वाटत नाही. त्यामुळे कलाकारावर लोकरंजनाचे दडपण राहू नये आणि रसिकांवर कलेने भुरळ घालावी, कलाकाराच्या कीर्तीने नव्हे अश्या मताचा मी आहे. भैरप्पा माझे आवडते लेखक असून त्यांची तीन चार पुस्तके मला अत्यंत सुमार वाटतात आणि ३-४ वर्षापूर्वीचे आवरण तर मला प्रचारकी वाटते. अनंतमूर्तींचे संस्कार प्रचंड आवडून देखील त्यांची बाकीची पुस्तके मला संग्रही ठेवण्यासारखी वाटली नाहीत. आणि माझे दैवत पु. ल. देशपांडे यांनी केलेला Old Man and the Sea चा एका कोळियाने हा अनुवाद फसलेला आहे असे माझे मत आहे. जी ए कुलकर्णी यांची सर्व ग्रंथसंपदा संग्रही असून त्यातील सर्वच कथा मला सारखाच आनंद देतात असे नाही. आणि गो नी दांडेकरांचे अजुनी नाही जागे गोकुळ हे पुस्तक मला त्यांच्या इतर पुस्तकांपुढे सुमार वाटते. पण मी हे देखील मान्य करतो की भैराप्पांची, अनंतमूर्तींची, देशपांडेंची, कुलकर्णींची जी पुस्तके / कथा मला भिडत नाहीत ती कदाचित इतरांना अतीव सौंदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतात. कुरोसावाच्या या चित्रपटाने मला भुरळ घातली याचा अर्थ इतकाच की मी त्याची पुढील कलाकृती बघायला उत्सुक असेन. पण म्हणून ते आवडलीच पाहिजे अशी माझ्यावर कुठली सक्ती नाही. आणि ती नाही आवडली नाही तर कुरोसावाने माझी फसगत केली असेही नाही. जी कलाकृती मला आवडली ती मला ज्या कारणांमुळे आवडली त्याचा कारणांमुळे इतरांना आवडावी असा माझा आग्रह नाही. आणि जी कलाकृती मला आवडणार नाही तिने इतरांना आनंद देऊच नये असेही नाही. एक मात्र खरे की कलेच्या प्रांतात दुर्बोधतेची झूल पांघरून आपली सुमार प्रतिभा लपवणारे अनेक कलाकार असतात. पण तसे ते सर्वच क्षेत्रात असतात. मी वर कुठेतरी सांगितल्याप्रमाणे, मी "गुण गाईन आवडी" अश्या स्वभावाचा असल्याने, माझ्या मते ज्यांनी दुर्बोधतेची झूल पांघरली आहे ते देखील मला न कळू शकणारा एखादा सौंदर्याविष्कार करत असतील असे मानण्यास मी तयार असतो. आणि हो, ररां बद्दल माझे मत तुमच्या त्यांच्या बद्दलच्या मला जाणवलेल्या मतापेक्षा खूपच जास्त अनुकूल आणि उजवे आहे, इतके सांगून मी थांबतो.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 16/02/2016 - 13:16
नित्शे या प्रसिद्ध तत्ववेत्त्याचं एक सुरेख वचन आहे : `टू यूज द अदर इज द हायेस्ट इम्मोरॅलिटी' (दुसर्‍याला वापरणं ही सर्वात मोठी अनैतिकता आहे). अंतहीन रचना जर केवळ लेखकाला पडलेले प्रश्न मांडून, उत्तराची प्रामाणिक विचारणा करण्याऐवजी, ते प्रश्नच किती उच्च आहेत आणि शोधा तुम्ही उत्तरं असा आव आणत असेल तर ते `स्वतःच्या मानसिक गुंत्यासाठी दुसर्‍याला वापरणं आहे. राशोमोनच्या संदर्भात तुम्ही याविषयी काय म्हणाल?

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 16/02/2016 - 15:48
नीत्शे असं पण म्हणाला होता की, You have your way. I have my way. As for the right way, the correct way, and the only way, it does not exist. त्यामुळे ररांबद्दल बोलणे आपण थांबवूया. कारण नीत्शे हे पण म्हणाला होता की Anyone who has declared someone else to be an idiot, a bad apple, is annoyed when it turns out in the end that he isn't. त्यामुळे ररा माझ्या अंदाजापेक्षा कमी वाईट किंवा जास्त चांगले निघाले तर मला दु:ख होऊ शकते, आणि मला दु:खी व्हायला आवडत नाही. तो हे पण म्हणाला की, There are no facts, only interpretations. आणि तो हे पण म्हणाला होता की All things are subject to interpretation whichever interpretation prevails at a given time is a function of power and not truth. म्हणजे मी त्याची ही वाकये राशोमोन च्या समर्थनार्थ वापरू शकतो मी तर त्याच्या The surest way to corrupt a youth is to instruct him to hold in higher esteem those who think alike than those who think differently.या अवतरणावर देखील विश्वास ठेवतो त्यामुळे कुरोसावाचे, ररांचे, तुमचे आणि माझे मत वेगळे असू शकते आणि तरीही आपल्यापैकी कोणीही वाईट नाही हे मी जाणून आहे. मला वाटते पहिल्या कमेंटच्या शीर्षकात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ररा इथे नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे आपण थांबवूया. तुम्हाला चित्रपट आवडला नाही त्यावर मी भारंभार लिहून मिपाच्या सर्व्हरवर भार आणला आहे असे तुम्हाला वाटण्याचीही शक्यता आहे. पण सोडलेला बाण, निघालेला शब्द आणि पोस्ट केलेला धागा परत घेता येत नाही त्यामुळे ह्या नकोश्या झालेल्या तीन भागाच्या लेखमालेचे अस्तित्व सहन करा किंवा हिच्याकडे सरळ दुर्लक्ष करा. जमलं तर मी काहीतरी हलकं फुलकं घेऊन येईन. तिथे आपण सगळे मिळून हसूया. :-)

In reply to by Anand More

मोरेजी.. आपने दिल जीत लिया!! खुप आवडला तुमचा हा प्रतिसाद! ही सगळीच अवतरणे विचार करण्याजोगी आहेत..

In reply to by Anand More

आणि शिवाय एकदा या जगात आलो की आईच्या दुधापासून ते तिरडीपर्यंत आपण किती जणांचा वापर करतो याचा हिशेब परमेश्र्वराच्या बापालाही शक्य नाही त्यामुळे त्यातून उदभवणारी नैतिकता/अनैतिकता हाच एक मोठा भ्रम आहे..... :-)

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 16/02/2016 - 17:23
तुम्ही चर्चा वेगळ्या वळणावर नेली आहे. ज्या अंतहीन कलाविष्काराबद्दल तुम्ही लिहीलंय, त्यात कलाकार रसिकांना वापरतो का ? असा प्रश्न आहे.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 16/02/2016 - 19:47
विवेक, मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते. परंतु चित्रपट आणि या लेखमाला या दोघांनीही मला आनंद दिलेला असल्याने मला त्यातला फोलपणा जाणवणे अशक्य होते आणि अजूनही अशक्यच आहे. तुम्ही म्हणता ते कलाकाराने रसिकांना वापरणे मला सर्वत्र दिसते. काही वेळा ते मला आवडते आणि काही वेळेला नाही. राशोमोन, मेट्रिक्स यासारख्या चित्रपटात मला ते आवडले तर अजय देवगणचा ओमकारा, नंदिता दासचा फायर किंवा क्रिस्तोफर नोलान चा Inception चित्रपट बघून मला माझी फसगत झाली असे मला वाटले होते. पण मला त्या कलाकृती जास्त भावल्या नाहीत, याचा अर्थ त्या कलाकृतीचा मी जाहीर पणे निषेध करावा असे काही मला वाटले नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 17/02/2016 - 16:54
मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे ठरवायला मला दुसर्‍याची मदत लागत नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे मला तत्त्वज्ञानात सुतराम रस नाही. कारण तुम्ही किंवा ररांनी फॅक्ट फाइंडींगचे जे पाच की सहा विकल्प कल्पिले आहेत, तो निव्वळ वेगवेगळ्या संकल्पनांचा खेळ आहे. त्यातून जीवनोपयोगी किंवा ठोस असं काहीही निघू शकत नाही. तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे. ते, `आध्यात्मिक सत्यशोधन' म्हणजे `फाइंडींग द अब्सोल्यूट' नव्हे. तर तो केवळ फॅक्ट फाइंडींग करता किंवा सगळंच कसं `व्यक्तिगत आहे' आणि म्हणून सगळंच आधांतरी (खरं तर `चूक') आहे, हे दाखवण्याचा आटापिटा आहे. तरीही एक वेगळा अँगल म्हणून तुमचा शेवटचा लेख नक्की वाचीन.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 17/02/2016 - 22:38
।।।तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे.।।। मूळ लेखात सत्यशोधन असा उल्लेख किंवा त्यावरची चर्चा नाही. तो शब्द, बोका - ए - आझमच्या प्रतिसादामुळे झालेल्या चर्चेत आला आहे. ती चर्चा मूळ लेखापेक्षा वेगळ्या दिशेने गेली आहे. मूळ लेखात "अन्वेषण / आकलन" असा शब्द असला तरी त्याखाली मांडलेले मुद्दे आकलन या शब्दाच्या अनुशंगानेच आले आहेत. त्यापुढे देखील मी सत्याच्या प्रकटीकरणाबद्दल बोललो आहे. अन्वेषण आणि शोधन यांच्याभोवती माझी मांडणी नाही. मी वर कुठल्या तरी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. पण त्यामागे सत्यशोधन असा कुठला ही हेतू नव्हता तर कुरोसावा नावाच्या माणसाने बनवलेली एक चित्रकृती होती जी त्याने का बनवली त्याचे कारण कुणालाही ठाऊक नसावे, आणि जी मला का आवडली, त्याचे कारण देखील तसेच अज्ञात आहे. तुमच्या तिसरा लेख वाचण्याच्या आश्वासनामुळे मी खरोखरच आनंदी झालो आहे. (आता यापुढचे मी सगळे विनोदाने लिहित आहे. आवडले नसल्यास कृपया सोडून द्या) कारण पहिल्या भागाच्या दैदिप्यमान यशानंतर दुसरा आणि तिसरा भाग म्हणजे अगदीच रया गेलेला बहादूरशहा जफर सारखा शेवटचा नामधारी सम्राट वाटतो आहे. तुमच्या आश्वासनामुळे मी घाबरलो नाही आहे. उलट तुमच्यात मला एक हक्काचा वाचक लाभल्याचे समाधान मिळाले आहे. तुमच्या निरंतर मिळणाऱ्या प्रतिसादांमुळे तिसऱ्या भागाचा धागा देखील आता वर येईल अश्या रोमांचकारी कल्पनांमुळे माझे हृदय थडथडू लागले आहे. आणि मी माझ्या तिसऱ्या लेखाच्या अभ्यासाला लागलो आहे.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 17/02/2016 - 23:03
सत्य निश्चिती / प्रस्थापना या खाली सर्व ठिकाणी : एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत..... असाच उल्लेख आहे... पुढे सत्याचे अन्वेषण / आकलन आणि सत्याचे प्रकटीकरण वगैरे आहे. पण तुम्ही म्हणतायं त्याप्रमाणे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. असे असेल तर ओके.

In reply to by स्पा

Anand More 15/02/2016 - 16:35
हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड आणि तिखट लिहिता हो तुम्ही. अगदी साप भी मरे और लाठी भी न टूटे ची आठवण झाली. असू द्या की. आपल्याला आवडेल तितके घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. आपण कुठे वट सावित्रीचे व्रत करणार आहोत. आणि हो, एकाचा मनमिळावू दुसऱ्याचा हुछभ्रू असू शकतो.

In reply to by Anand More

जमल्यास "स्पा"चा खालील लेख वाचलात तर फार उत्तम http://www.misalpav.com/node/28293 त्यांच्या कॅमेरातून पण असेच बोल येतात.

पैसा 15/02/2016 - 17:17
वाचते आहे. एक गोष्ट अनेकांनी आपाआपल्या दृष्टीकोनातून पाहून मांडावी हेच तर राशोमानमधे आहे ना? मग दुसर्‍याने लिहिलेल्या लिखाणाला शेलकी विशेषणे लावून लोकांना कसला आनंद मिळतो देवजाणे! ररा आजोबा, आतातरी या आणि मौन सोडा. हल्लीच्या अनेक धाग्यांप्रमाणे हा धागाही "जाना था जापान पँहुच गये चीन" झाला आहे. आनंदबुवा ट्यार्पीसाठी खुश व्हा!

In reply to by पैसा

Anand More 15/02/2016 - 17:27
खरे तर मी पण हेच म्हणणार होतो.... की एकच गोष्ट कुणाला आनंद देऊन लिहायला प्रवृत्त करते आणि कुणाला ती भंपक वाटते.... हा देखिल राशोमोनचा एक अन्वयार्थ लावता येईल.... आणि ट्यार्पी साठी मी कालच आभार मानले आहेत.... आता तुमचेही मनःपूर्वक आभार

सतिश गावडे 15/02/2016 - 22:58
ररा कुठे गायबलेत? पूर्वी कधीतरी त्यांच्याशी गाठभेट व्हायची एकाच एरीयात राहत असल्याने. असो, यानिमित्ताने मी हा सिनेमा पाहिला. छान आहे सिनेमा.

विवेक ठाकूर 18/02/2016 - 10:39
असं दिसतंय. ररांचा प्रतिसाद पुन्हा उधृत करतो : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल ररांनी शेवटापर्यंत मालिका रेटत नेली आणि वाचकांना, काही तरी फार अनमोल आणि कल्पनेच्या पलिकडचं रहस्य उलगडणार आहे, अशा भ्रमात ठेवलं. आनंदनी इतक्या प्रतिसादांनंतर तरी, हा जो प्रामाणिकपणा दाखवला आहे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. तो न दाखवणं, याला मी `वाचकांना वापरणं' म्हणतो आणि नित्शे त्यालाच हायेस्ट इम्मॉरॅलिटी म्हणतो. तस्मात, आनंदनी वरच्या प्रतिसादात जे काही तत्वज्ञानाचे उतारे दिलेत ते मुद्याशी असंबधित ठरतात. ररा शेवटी हाइट करतात : कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणून मी म्हंटलं होतं की कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न ? आणि त्यांच्या सोडवणूकीचा चित्रपट समजण्याशी काय संबंध! निषेध नोंदवणार्‍यांना आता तरी, शब्दापलिकडे जाऊन, मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by विवेक ठाकूर

Anand More 18/02/2016 - 12:14
तुम्हाला माझे विनोद कळतात आणि आवडतात असे गृहीत धरून मी म्हणेन, "किती लिहिता हो तुम्ही ठाकूर साहेब; आणि ते सुद्धा मागे पिवळा रंगबिंग लावून. कसले मजबूत हात असतील हो तुमचे. शोलेच्या पटकथेत थोडा बदल करून मी लिहीन, ये हाथ मुझे दे दो ठाकूर … आपके हाथ मुझे दे दो ।" अहो मी ढगात प्राणी शोधण्याच्या माझ्या निरर्थक खेळाबद्दल प्रामाणिकपणे इतक्या प्रतिसादानंतर आत्ता नाही, फार आधी म्हणजे दिनांक १४/२/२०१६ रोजी २३:०६ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादातच बोललो आहे. त्यामुळे मी या चर्चेमध्ये पहिल्यापासूनच प्रामाणिक आहे हे सत्य पुराव्याने शाबीत होते. मी दिनांक १६/०२/२०१६ रोजी १५:४८ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ररां बद्दल बोलणे थांबवले आहे. त्यांच्याबद्दलचे माझे मत केवळ ते स्वतःच बदलू शकतात. आणि त्यांच्या बद्दल असलेल्या तुमच्या मताला बदलण्याच्या बाबतीत ते स्वतःदेखील असमर्थ असतील अशी माझी आता खात्री पटली आहे. त्यामुळे तो आधीच संपलेला विषय मी पुन्हा एकदा संपला आहे असे जाहीर करतो. मला कल्पना आहे की, माझे असे एकतर्फी जाहीर करणे तुम्हाला आवडणार नाही. आणि तुम्ही नाही-नाही म्हणत पुन्हा तोच विषय काढाल. पण सध्या मला विनोदी लेखन करण्यास कुठलाच विषय सुचत नाही आहे. (मी अल्प प्रतिभेचा मनुष्य आहे. किंवा कदाचित तुम्ही सर्व आखुडशिंगी, बहुदुधी मिपा कर माझ्या सारख्या लंगड्या गायीचे, "नवीन" म्हणून कौतुक करीत असाल अशी मला दाट शंका आहे) त्यामुळे "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" या दुव्यावर टिचकी मारीत राहणे, आणि एक नवीन प्रतिक्रिया आली अशी सूचना मिळाली की अधाश्यासारखे तिथे टिचकी मारून, ती तुमचीच आहे हे पाहून, स्मित हास्य करून, मग ती वाचून, विजयी वीराच्या मुद्रेने, पाताळविजयम मधल्या राक्षसासारखा हसत, मी माझी दीर्घ प्रतिक्रिया लिहित बसतो आहे. मला तर असे वाटू लागले आहे की आपण दोघेही विक्रम वेताळ चा खेळ खेळत आहोत. आता, "विक्रम कोण? आणि वेताळ कोण?", या सत्याच्या बाबतीत आपले दोघांचे आकलन वेगवेगळे असू शकते. त्यावर कोणी नवा कुरोसावा नवा चित्रपट काढू शकतो. त्याबद्दल कोणी नवीन ररा आठ भागांची नवीन लेखमाला लिहू शकतो. त्यावर प्रतिक्रिया म्हणून कोणी नवीन आनंद मोरे आपली तीन भागातील दीर्घ प्रतिक्रिया लिहू शकतो. आणि मग त्यावर कोणी नवीन विवेक ठाकूर साद प्रतिसादांची सरबत्ती चढवू शकतो. ही साखळी अशीच अनेकांत किंवा अंतहीन चालू राहू शकते. आणि याला कुणी ढगात प्राणी शोधण्याचा निरर्थक खेळ असे म्हणू शकतो तर कुणी दुसऱ्याला वापरणारी सर्वात मोठी अनैतिकता देखील म्हणू शकतो. अश्या प्रकारे बाकी मिपाकरांना कायम डब्बल फोडणी घातलेली मिसळ खायला मिळत राहील. मला वाटते आपण दोघे आता मिपाकरांकडून करमणूक कर देखील घेऊ शकतो. बोला करूया का पार्टनरशिप? या सिरीजवरचे माझे इतर दोन लेख तुमची आतुरतेने वाट पहात आहेत. त्या दोनी ल्येकारांकडेबी लक्ष असू द्या वो ठाकूर सायब. लई गुणाची हायती माजी ल्येकरं. मला लई जीव लावलंया बगा त्येंनी. तुमास्नी बी लावतीलाच बगा. आन न्हाय लावला तर म्हारू नगा बरं का त्येस्नी. अजून धाकली हायत. वाईच वाट बगा. ती जरी फुडे थोरली न्हाय जाली तरीबी तुम्ही कनवाळू होशीला आणि माज्या बरूबर गमती कराया येशीला असं माला उगा वाटून ऱ्हायलंया बगा.

In reply to by Anand More

विवेक ठाकूर 18/02/2016 - 12:25
तुमच्या निरागस प्रामाणिकपणाचा चाहता आहेच, ररांबद्दल तुमच्या प्रेमाचाही आदर आहे. तुमचे दोन्ही लेख वाचून, आवडले तर निश्चित प्रतिसाद देईन. एखादा नवा आयाम कळला तर पूर्वग्रहसोडून, मनसोक्त दाद देण्याचा माझाही स्वभाव आहे.

In reply to by विवेक ठाकूर

अभ्या.. 18/02/2016 - 12:41
इस खुशीके मौकेपर पूरे कायनात मे जश्न मनाया जाये. इत्र के दिप जलाये जाये, पटाखोंकी आतिषबाजीसे फलकमें सैकडो तारोंकी ......................................काय ते करा एकदाचे..............
ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल.