मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

'ती' एक बातमी!!

निनाव ·
लेखनविषय:
काव्यरस
सांज होता वाट आंधळी जनावरांची काया भयाण करणारी मात्र , जंगल म्हण्जे जनावरेच नि शहर असायला माणसेच असा काही नियम नाही रक्त वाहिले का कुणी पाहिले का खोल किती जखमा चौकशी चा चष्मा घातले लोखंडी सळे वय होते खुळे सगळे मात्र कळे तरी निरपराध मी रोज रोज तेच रस्ते वेगळे नावे वेगळी भुकेल्यांची ताटे भरली उद्वेगांची गर्दी निराशेत सरली वेशी वर लखतरे मोकाट जनावरे लपलेली 'समोर' मात्र 'न' दिसणारी रडणारी ओरडणारी सोसून छळ प्राण सोडणारी निष्पाप… निरागस लक्ष वेधणारी निर्लज्जांचे , बाधिरांचे, पुन्हा एक बातमी उद्या च्या अंकात सांडलेल्या स्याहीनं ओरबाडलेल्या कागदावर लिहिणारी… सांज होता वाट आंधळी जनावरांच

अन्नधान्य स्वस्त आहे

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

रेघ

मिसळलेला काव्यप्रेमी ·
काव्यरस
पिकासोपासून हुसेनपर्यंत कोणाचेही कुठलेही चित्र ऊचलून पहावे प्रत्येक चित्रात एक विविक्षित रेघ असते खरं तर भव्य कॅनव्हासवर ती अगदीच लहानशी असते अहो ते पिकासो अन् हुसेनही जाऊ दे मोरपीस पाहिलयं कधी निरखुन? त्या सुंदर रंगसंगतीतही एक बारीक रेघ असते पिसाच्या बरोब्बर मधोमध बर्‍याचदा या रेघेचा संदर्भ चित्रकारालासुद्धा समजलेलाच असतो असेही नाही पण त्या रेघेशिवाय चित्र मात्र अपूर्ण असते माझ्या असण्यामध्ये तुझे अस्तित्व त्या रेघेसारखे आहे ---- एकाकी तळ्याच्या नितळ पाण्यात दिसण्यार्‍या सूर्याच्या प्रतिबिंबासारखी आहेस तू सूर्यचं पण तरी शितल, पाण्यात आहे ना... सुस्पष्ट, स्वच्छ, निव्वळ तेज अन् याच तेजाने ऊजळ

दारु पुराण

Bhagwanta Wayal ·
लेखनविषय:
काव्यरस
दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥ रोज येतो दरु पिऊन बाटली खिशामद्ये घेऊन सांगे रुबाबात येऊन चल वाढ मला भोजन रोज हवी मच्छी मटण बायको आण्ल सांगा कुठुन रागाने ऊठतो पेटून अर्ध्या जेवणावर ऊठुन होते त्याची चालू,ही बडबड आता ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥ मुले कावरीबावरी होऊन आईच्या पदराखाली लपून ऊपाशी पोटी जाती झोपून याची थोडीही नाही त्याला जाण आई त्यांची कष्ट करुन देई मुलांना चांगले शिक्षण मुलेही हुशार आणि गुणवान फेडतील आईचे त्यांच्या ऋण मुलेच खरी तिची संपत्ती व सत्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥२॥ दहा तारखेला होतो पगार जमे सारा मित्र परिवार दरु पिऊन चाल

धरण उषाला कोरड घशाला

Bhagwanta Wayal ·
लेखनविषय:
काव्यरस
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत हांडाभर पाण्यासाठी आम

प्रवास

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रवास चालू आहे माझा शून्याकडून क्षितिजाकडे . . अथक, अविरत . . थांबता नाही येणार मला खूप थकलोय, पण थांबलो तर मन रागावेल आणि पाय तर चालायला नकार देतायत जाऊन जाऊन कुठे पोहोचणार? क्षितीज तर एक रेघ.. आणि शून्य? ते काय? सुरवात केलेल्या बिंदुला गोल फिरून पोहचणारी एक वळसे घेणारी रेघच ना? . . मग का चालावे? पण मन, ते का ऐकत नाही? मनालाच ठाऊक विचारले जरी सांगता थोडीच येणार आहे त्याला? आणि सांगितलेच तरी कळणार कोणाला इथे? जाऊ दे त्यापेक्षा हा प्रवास काय वाईट आहे? चालू ठेऊया शून्याकडून क्षितिजाकडे . अथक, अविरत |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०५/२०११) (हो, साधारण दोन वर्षांपूर्वी लिहीलेली हि कविता आहे.)

वेदना

रेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई वेदना मुकेपणाची, सलत आत राही निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई ... रेशा

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

अश्वत्थामा

सुयशतात्या ·
लेखनविषय:
काव्यरस
या अश्वत्थामम्याला कुठे शोधू तो एक पुण्यश्लोक माणूस निर्दयी राजकारणी म्हणून हिणवलेला एक न्यायी म्हणून नावाजलेला मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संधीशोधू राजकारण्या लोकांन मध्ये ऊराशी खोल जखम झालेला एकटे पणाशी नाते जोडून विरक्त झालेला मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या विरक्ततेच्या पांघ्ररूणात लपलेल्या ढोंगी लोकांन मध्ये रक्तपाताशी जवळचे नाते सांगणारा कठोर म्हणून नावाजलेला मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संरक्षणाशी नाते असलेल्या ढोंगी लोकांन मध्ये अमरतेचा शाप असणारा भळभळणारी जखम बाळगणारा सांगा ना कूठे शोधू या पुण्यश्लोक माणसाला......

रात्रीच्या पावसाने

मिसळलेला काव्यप्रेमी ·
काव्यरस
काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . तुझ्या घरातील काही गळक्या कौलांना वाहून घेऊन आला वाहत वाहत त्या कौलांनी माझ्या घराशी आधार घेतला त्यांनी माझ्या मनाचा नकळत ठाव घेतला . . पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा