मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रात्रीच्या पावसाने

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काव्यरस
काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . तुझ्या घरातील काही गळक्या कौलांना वाहून घेऊन आला वाहत वाहत त्या कौलांनी माझ्या घराशी आधार घेतला त्यांनी माझ्या मनाचा नकळत ठाव घेतला . . पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा ना? राख उडवतो आणि निखारे भडकावतो . खरचं काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०३/२०१३)

वाचने 2724 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अनिदेश 29/03/2013 - 12:51
आधी दूष्काळ...आता पाऊस :).....छान आहे :)

नानबा 29/03/2013 - 14:22
मिका, तोडलंस मित्रा... कमाल म्हणजे प्रचंड कमाल आवडली कविता...
येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा ना? राख उडवतो आणि निखारे भडकावतो
व्वाह वा !

प्रसाद गोडबोले 31/03/2013 - 09:06
पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? >>> छान !!

स्पंदना 02/04/2013 - 16:21
सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही?
आणि फक्त या ओळीच अर्थगर्भ. कदाचित बाकिची कविता मला कळली नसेल. .