Skip to main content

करुण

विखुरलेला चंद्र - अंतिम

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/12/2012 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
तिला माहीत होते तिला जावेच लागेल ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं ---- अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय शिकार्‍याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत पाण्यावर झुलणार्‍या तार्‍यांचे ते शेपूट ते अजूनही तसेच मोहक आहे ----- पण तो चंद्र, तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्‍यातून ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन पाण्यावर वाहत वाहत किनार्‍याला लागतोय ------ जातांना तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस... ~~~(समाप्त)~~~ |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१२/२०१२)
काव्यरस

जगत रहायच,जगत रहायच

लेखक कौस्तुभ आपटे यांनी गुरुवार, 20/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच झाडाने जन्म दिलेल्या फुलासाठी फुलाने जन्मदात्या झाडासाठी कधी प्रेम म्हणून, कधी कर्तव्य म्हणून कधी ओझे म्हणून, कधी नाइलाज म्हणून तेच तेच करत रहायच जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच स्वप्नांच्या अपमार्जकाचे फुगे हवे मधे सोडत रहायच काही पहायचे उंच उडताना काही तेंव्हाच फुटताना अमिबाच्या विभाजनासारख एकातून दूसरी, दुसर्यातून तीसरी वासना प्रसृत करत रहायच जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच गवताने पहायचे झाडाकडे झाडाने डोंगराकडे, अन डोंगराने उंच आकाशाकडे आणि मांडायच समीकरण आपल्या खुजेपणाचे. भुकंप झाला तरी बेहत्तर उंची आपली वाढवत रहायच जगत रहायच,
काव्यरस

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

मी काय करू??..........

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 02/12/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही

नेहेमीच असं होतं, असं नाहि !

लेखक जेनी... यांनी बुधवार, 28/11/2012 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमीच असं होतं ,असं नाहि.. पण जेव्हा होतं ,तेव्हा सगळ बेचैन होतं कुठल्याशा एका अनामिक भितीनं , सगळच जग हळुहळु व्यापून जातं ... अश्यावेळी मायेच्या एकाच शब्दाची फुंकरहि बास होते पण ती भोवताली घुटमळणार्‍या कुठल्याच मुखातुन येत नाहि. असं का?.. अगदी कासाविस ..! बराच वेळ जातो ,सुचत मात्र काहिच नाहि , आजुबाजुला खळखळुन हसणारं कुणीतरी हवय असं वाटु लागतं ..पण ..पण आत्ता कुणीच नाहि ! कुठेतरी शुन्यात नजर लागते,फार उशिर झालाय ह्याचीहि तेव्हा काळजी नसते.. कुठे जायचय ?
काव्यरस

बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली... :-(

लेखक केदारविदिवेकर यांनी शनिवार, 24/11/2012 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
चिरकालस्य मनी विराजिले जाणार ते म्हणुनी हृदयसम्राट कहविले गेले इति इहलोकीचा कालखंड संपवूनी गेले पण मनी एक मशाल धगधगती ठेवुनी गेले -- के डी ---------------------------------------------------- अनेकांचं काळीज आज, दूर कुठे हरवलं पाहूया, पुन्हा कधीतरी का ते सापडतं ? सापडेल कधी 'ताळ्यावर', याची शाश्वती नाही देव पुन्हा असा कोण पाठवेल याचा नेम नाही जयाने निर्मिले तयाने, बोलावणे आज पाठविले संपला कार्यभाग त्यांचा, मगच मृत्यूसर्प सरसावले प्राण निघून गेला त्यांचा, ज्योत मनात सदैव लावूनी गेले हृदय-सम्राट उगाच ना विराजीले, कर्तुत्व तैसेची दाविले -- के डी
काव्यरस

मनातलं सांगताच येईना.....................

लेखक खान यांनी रविवार, 11/11/2012 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
वाडग्या-वाडग्यांनी तुझा आग्रह मला नाकारता येईना म्हावरांचं कालवण पोटात मंथन करतंय ... वेदनेची बारीक कळही मला थांबवता येईना भरत आलेली बादलीच परत परत रिकामी होतेय ... खाल्लं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता पचवता येईना आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ... इनोचा ग्लास घशात उलटला तरी अजिबातच आवाज थांबेना कधीतरी चांगला ढेकर येईल आपलीच समजुत घालतोय ...
काव्यरस

<<मनातलं सांगताच येईना>>

लेखक प्रास यांनी शनिवार, 10/11/2012 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे?

अभिशाप जीवनाचा

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 02/11/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद) आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला जगणे उदासवाणे, माझे करून गेला नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84
काव्यरस