नशिब
नशिबाच काय घेऊन बसलात हो
ते कधी साथ देत तर कधी नाही
मनगटात ताकद हवी खर तर
नाहितर् राजयोग पण कामाचा नाही
परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो
कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो
कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता
नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता
हिच सवय मग अंगवळणी पडत जाते
अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते
थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही
प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी?