मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रद्धांजली

बिपीन सुरेश सांगळे ·

सौंदाळा 15/07/2024 - 10:16
मजेशीर यावरुन एक सत्य घटना आठवली. काही वर्षांपूर्वी पुण्यात कात्रज भागात एका महिलेचे मंगळसूत्र मारले होते आणि काही दिवसांनी त्या मंगळसूत्र चोराचा फोटो कोणाच्या तरी बॅनरवर शुभेच्छुक म्हणून झळकला होता. महिलेने पोलिसांना दाखवून नंतर चोरट्याला अटक झाली होती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:23
+१ मजेशीर आहे! मंगळसूत्र चोराचा किस्सा भारीच. मला ह्या कथेवरुन मध्यंतरी त्या 'ढिंच्याक पुजा'ने केलेली स्वतःच्या मॄत्युच्या पोस्टची नौटंकी आठवली 😀

In reply to by पॅट्रीक जेड

टर्मीनेटर 16/07/2024 - 21:28
स्मरणशक्ती आता दगा द्यायला लागली कि काय असा संशय आल्याने खात्री केल्यावर लक्षात आले कि ह्या दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना थोडीफार सारखीच असल्याने प्रतिसादातल्या तपशिलात थोडासा घोळ झाला आहे 😀 कथा वाचताना ढिंच्याक पूजाच आठवली होती त्यासाठी कदाचित 'एक्क्या' प्रमाणेच पूजाच्या बाबतीत सहा एक वर्षांपूर्वी कुठल्याशा चॅनलने तिच्या मृत्यूची बातमी चालवण्याचा केलेला खोडसाळपणा कारणीभूत ठरला असावा आणि त्या घटनेच्या आठवणीत पूनम पांडेने मध्यंतरी स्वतःच केलेल्या चीप पब्लिसिटी स्टंटच्या संदर्भाची भेसळ झाली असावी 😂 तपशिलातला घोळ लक्षात आणून दिलात त्यासाठी आपले आभार!

वाचक मंडळी नमस्कार आणि आभार . जसं सुचतो तसं लिहितो . अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही असंच वाटतं . पुन्हा धन्यवाद . स्नेह असावा .

अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही विषय चांगला आहे पण वर्णन स्केची आहे. प्रसंग ,स्थळ,काळ,वातावरण निर्मिती यावर अजून स्पष्टीकरण हवे होते. कथेतील किरदार मनावर पकड घेण्या आगोदरच संपले आहेत. व्यक्तीचित्रांचे रेखाटन विस्तारपूर्वक केल्याने त्या आपल्या बरोबरच आहेत असे वाटते. आणी मग वाचक सुद्धा कथेतील एक किरदार बनून जातो. कथा प्रवाही बनते. मी काही तज्ञ वगैरे नाही पण कथा वाचून झाल्यावर प्रतिसाद वाचताना, जसं सुचले तसं लिहिले . एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . नायक कुठून आला,गावाशी काय संबंध, एस टी स्टॅन्ड नाही का? शाळेपाशी उतरला तर काही जुन्या आठवणी, मुक्कामाची होती का पुढे जाणारी, किती दिवसांनी गावात आला,कोणी ओळखीचे भेटले का नाही...... अशा अनेकविध अंगाने कथा फुलवून सांगायची. मुळात कथा या प्रकारात दोन मुख्य पात्र कथाकार आणी वाचक. या दोघांमधे संवाद घडला तर ती कथा. एकांगी कथा ,मग कथानक कितीही सशक्त असले तरी मनावर पकड घेत नाही. वाचक बिटवीन द लाईन आपल्या पद्धतीने वाचतो व कथा मुळ कथानका पासुन भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथा आवडली.

म्हणण्यापेक्षा, कथा सांगणारा व कथा ऐकणारा असे जास्त प्रासंगिक ठरेल. कथाकार वाचक एकमेकांना बघत ,जवळ नसून सुद्धा एकमेकाची सान्निध्यात आहेत असे भासले की कथा जमली असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे.

चौथा कोनाडा 17/07/2024 - 20:21
हा ... हा .... हा .... भारी अ‍ॅण्टी-क्लायमॅक्स ! गावात अश्या खोडया, कुरापती लै चालतात ! नुसती धमाल असतेय ! आमच्या गावात यात्रेनंतर च्या व्यापारयांच्या / सेवकांच्या जेवणावळीत भांग टाकून घडलेले किस्से कित्येक महिने चघळले जायचे ! ते आठवत ! पुढ्चे दोन चार महिने येड्यासारखे हसत सुटायचे ! बिपीन सुरेश सांगळे// मस्त झकास किस्सा ! तुमचा अश्या कथालेखनात हात खंडा आहेच ! मजा आली !

सौंदाळा 15/07/2024 - 10:16
मजेशीर यावरुन एक सत्य घटना आठवली. काही वर्षांपूर्वी पुण्यात कात्रज भागात एका महिलेचे मंगळसूत्र मारले होते आणि काही दिवसांनी त्या मंगळसूत्र चोराचा फोटो कोणाच्या तरी बॅनरवर शुभेच्छुक म्हणून झळकला होता. महिलेने पोलिसांना दाखवून नंतर चोरट्याला अटक झाली होती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:23
+१ मजेशीर आहे! मंगळसूत्र चोराचा किस्सा भारीच. मला ह्या कथेवरुन मध्यंतरी त्या 'ढिंच्याक पुजा'ने केलेली स्वतःच्या मॄत्युच्या पोस्टची नौटंकी आठवली 😀

In reply to by पॅट्रीक जेड

टर्मीनेटर 16/07/2024 - 21:28
स्मरणशक्ती आता दगा द्यायला लागली कि काय असा संशय आल्याने खात्री केल्यावर लक्षात आले कि ह्या दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना थोडीफार सारखीच असल्याने प्रतिसादातल्या तपशिलात थोडासा घोळ झाला आहे 😀 कथा वाचताना ढिंच्याक पूजाच आठवली होती त्यासाठी कदाचित 'एक्क्या' प्रमाणेच पूजाच्या बाबतीत सहा एक वर्षांपूर्वी कुठल्याशा चॅनलने तिच्या मृत्यूची बातमी चालवण्याचा केलेला खोडसाळपणा कारणीभूत ठरला असावा आणि त्या घटनेच्या आठवणीत पूनम पांडेने मध्यंतरी स्वतःच केलेल्या चीप पब्लिसिटी स्टंटच्या संदर्भाची भेसळ झाली असावी 😂 तपशिलातला घोळ लक्षात आणून दिलात त्यासाठी आपले आभार!

वाचक मंडळी नमस्कार आणि आभार . जसं सुचतो तसं लिहितो . अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही असंच वाटतं . पुन्हा धन्यवाद . स्नेह असावा .

अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही विषय चांगला आहे पण वर्णन स्केची आहे. प्रसंग ,स्थळ,काळ,वातावरण निर्मिती यावर अजून स्पष्टीकरण हवे होते. कथेतील किरदार मनावर पकड घेण्या आगोदरच संपले आहेत. व्यक्तीचित्रांचे रेखाटन विस्तारपूर्वक केल्याने त्या आपल्या बरोबरच आहेत असे वाटते. आणी मग वाचक सुद्धा कथेतील एक किरदार बनून जातो. कथा प्रवाही बनते. मी काही तज्ञ वगैरे नाही पण कथा वाचून झाल्यावर प्रतिसाद वाचताना, जसं सुचले तसं लिहिले . एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . नायक कुठून आला,गावाशी काय संबंध, एस टी स्टॅन्ड नाही का? शाळेपाशी उतरला तर काही जुन्या आठवणी, मुक्कामाची होती का पुढे जाणारी, किती दिवसांनी गावात आला,कोणी ओळखीचे भेटले का नाही...... अशा अनेकविध अंगाने कथा फुलवून सांगायची. मुळात कथा या प्रकारात दोन मुख्य पात्र कथाकार आणी वाचक. या दोघांमधे संवाद घडला तर ती कथा. एकांगी कथा ,मग कथानक कितीही सशक्त असले तरी मनावर पकड घेत नाही. वाचक बिटवीन द लाईन आपल्या पद्धतीने वाचतो व कथा मुळ कथानका पासुन भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथा आवडली.

म्हणण्यापेक्षा, कथा सांगणारा व कथा ऐकणारा असे जास्त प्रासंगिक ठरेल. कथाकार वाचक एकमेकांना बघत ,जवळ नसून सुद्धा एकमेकाची सान्निध्यात आहेत असे भासले की कथा जमली असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे.

चौथा कोनाडा 17/07/2024 - 20:21
हा ... हा .... हा .... भारी अ‍ॅण्टी-क्लायमॅक्स ! गावात अश्या खोडया, कुरापती लै चालतात ! नुसती धमाल असतेय ! आमच्या गावात यात्रेनंतर च्या व्यापारयांच्या / सेवकांच्या जेवणावळीत भांग टाकून घडलेले किस्से कित्येक महिने चघळले जायचे ! ते आठवत ! पुढ्चे दोन चार महिने येड्यासारखे हसत सुटायचे ! बिपीन सुरेश सांगळे// मस्त झकास किस्सा ! तुमचा अश्या कथालेखनात हात खंडा आहेच ! मजा आली !
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रद्धांजली एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . रात्रीची वेळ. सगळीकडे शांत. असणारच ना .गाव छोटं होतं. मुख्य रस्त्यावरची दुकानं बंद झालेली. वर्दळ नाहीच . तशीही गावातली बरीचशी मंडळी शहराकडे. त्याच्या वयाची तर बहुतेक सारीच. काही अपवाद सोडता . एक छोटा चौक आला .छेदणारे दोन रस्ते म्हणून चौक म्हणायचं . चारी बाजूला सारं मोकळंच. माळरान नुसतं. कोपऱ्यावर चहाची एक टपरी. अर्थात तीही बंद झालेली. एकुलता एक लाईटचा खांब. अंधुक प्रकाश फेकणारा आणि त्या खांबाला लावलेला एक बॅनर . त्याच अंधुक प्रकाशात दिसणारा ... श्रद्धांजलीचा . त्यावर फोटो - एकनाथचा ... त्याचा शाळेतला खास मित्र.

मिपा कला संग्रहालय - ३ .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण.

प्रसाद गोडबोले ·
नमस्कार मिपाकर हो ! मिपा कलादालन ह्या लेखमालिकेतील हा तिसरा धागा सुरु करत आहे : .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण. ह्या धाग्यावर ऐतिहासिक व्यक्ती , किंवा प्रसंग ह्यांची चित्रे द्यावीत. प्रतिसादात हे टेम्प्लेट वापरल्यास सर्वांनाच सोयीचे होईल . प्रतिसाद शीर्षक : चित्राचे नाव प्रतिसाद : चित्राचे नाव चित्रकाराचे नाव : इंटरनेटवरील लिंक पर्यायी लिंक: सर्व चित्रांची लिंक : चित्र : टिप्पण्णी : हे चित्र तुम्हाला का आवडते किंव्वा तुमची चित्राविषयी काही मते असल्यास.

चित्राचे नाव :पेशवा दरबार चित्रकाराचे नाव : थॉमस डॅनियल इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Daniell चित्र : 1 टिप्पण्णी : हे माझ्या आवडत्या चित्रांपैकी एक. ह्या चित्रावरुन पेशवा काळात असलेल्या शनिवार वाड्याची भव्यता आणि समृध्दी दिसुन येते. पेशव्यांच्या बैठकी मागे श्री गणेशाची भव्य मुर्ती (की चित्र? ) होते असे ऐकुन आहे, मात्र ह्या चित्रात श्री विष्णुंची चतुर्भुज रुपातील मुर्तीही दिसत आहे !

Bhakti 15/07/2024 - 11:58
पशुपति सिंधू संस्कृती मोहोर एक शिल्प A माहिती नाही हे या धाग्यात बसते की नाही पण एक ऐतिहासिक चित्रण/शिल्प/मोहोर काय योग्य वाटेल त्यात हे बसवावे. कधी कधी ना एखाद्या प्रश्नावर अनेकदा तिथंच घुटमळते, उत्तर का मिळत नाही हे सतावते.तेव्हा मी हे शिल्प आठवते.म्हटलं तर याचं उत्तर मिळालं हा प्राण्यांनी वेढलेला त्यांचा देव पशुपती आहे.तर काहींचं म्हणणं ही दुर्गा देवी,तर काही हा योगी शिव,तीन मुख?चार मुख? अशी ना ना प्रश्न याभोवती जमा होतात.उत्तर जे तुम्हाला समाधान देईल ते!

In reply to by Bhakti

पशुपती.... पशुपती.... वैगरे करत .. लगेच आपण भारतीयांनी हवेत जायची गरज नाही ... एखाद्या गोऱ्या माणसाने (इंग्रजाने ) संशोधन वैगरे करून ही मुद्रा शोधली आणि तिला पशुपती वैगरे म्हटलं तर लगेच आपण भारतीयांनी ... बघा बघा आमची संस्कृती यंव आणि त्यांव करण्याची तशी गरज नसते.. तत्कालीन मूलनिवासी वैगरे जमातीतील एखादा पारंपरिक पोशाख वैगरे असेल तो, कुठल्यातरी कार्यक्रमाचा .... त्याचेच चित्रण मातीच्या मुद्रेत केले गेलं असेल ... p

नुकतेच चित्रगुप्त काका ह्यांच्या सोबत आमचे औंधचे म्युझियम पाहण्याचा योग आला ... तिथे पाहिलेले हे एक अफलातून चित्र ओलेती एस.जी. ठाकूर सिंग Oleti

In reply to by राघव

सुरिया 26/02/2025 - 12:30
दीनानाथ दलालांनी अशाप्रकारची बरीच चित्रे केली असली तरी हे त्यांचे नाही. शैली वेगळी आहे. अ‍ॅनॉटोमी दलाल साकारत तशी नाहीये. मुख्य म्हणजे ठाकूर सिंगाची सही आहे डाव्या बाजुला खाली. दलाल मुख्यत्वे कमर्शिअल कामे करीत. कॅलेंडर वगैरे साठी जरी असे चित्र केले तरी त्यांची लफ्फेदार सही असली असती. अगदी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या शिष्यांनी जरी काम केले तरी त्यावर त्यांच्याच सहीतला द हे अक्षर एका छोट्या त्रिकोणात बसवलेली स्वाक्षरी असायची. तस्मात हे चित्र दलालांचे नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सुरिया 26/02/2025 - 17:16
अफलातून वगैरेर वाटले असेल हे चित्र तर वास्तविक पाहता गोडबोल्यांना एक अनाहूत सल्ला द्यावा वाटतो. अध्यात्म, अभंग, अर्थ पुरेसे आहे. उगी कलेच्या उंटाच्या कशाला मागे लागता? तुमची चुकलीय ती ट्रेन. द्या सोडून.

In reply to by विवेकपटाईत

हीच का तुमची सिंधू घाटी सभ्यता ?? ज्या सावरकरांना मानता . त्यांनीच एक प्रश्न विचारला होता. गाय ही जर माते समान, तिचे मल मुत्र प्राशन करणे जर पवित्र ... तर तुमच्या जन्मदात्या आईचे सुद्धा मल मुत्र प्राशन तुम्ही का करत नाही ?? सदर फोटोतील व्यक्ती तथाकथित डॉक्टर आहे .. फोटो पाहून वाटतं .. खरं आहे ... शिकला म्हणजे अक्कल असेलच असे काही नाही ... शेवटी शहाणपण स्वतःच्या डोक्याने विचार करून येतं ... . . . a

सुरिया 27/02/2025 - 13:27
सिंधुघाटी वैदिक सभ्यता
काहीही फेकतो हा माणूस बिनधास्त. काय संबंध सिंधू संस्कृतीचा आणि वेदाचा आणि वैदिक धर्माचा? आणि असेल तर त्या बैलाच्या वर लिहिलेले वाचून दाखवा बरं. वेदात असेलच ना हि लिपी.

चित्राचे नाव :पेशवा दरबार चित्रकाराचे नाव : थॉमस डॅनियल इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Daniell चित्र : 1 टिप्पण्णी : हे माझ्या आवडत्या चित्रांपैकी एक. ह्या चित्रावरुन पेशवा काळात असलेल्या शनिवार वाड्याची भव्यता आणि समृध्दी दिसुन येते. पेशव्यांच्या बैठकी मागे श्री गणेशाची भव्य मुर्ती (की चित्र? ) होते असे ऐकुन आहे, मात्र ह्या चित्रात श्री विष्णुंची चतुर्भुज रुपातील मुर्तीही दिसत आहे !

Bhakti 15/07/2024 - 11:58
पशुपति सिंधू संस्कृती मोहोर एक शिल्प A माहिती नाही हे या धाग्यात बसते की नाही पण एक ऐतिहासिक चित्रण/शिल्प/मोहोर काय योग्य वाटेल त्यात हे बसवावे. कधी कधी ना एखाद्या प्रश्नावर अनेकदा तिथंच घुटमळते, उत्तर का मिळत नाही हे सतावते.तेव्हा मी हे शिल्प आठवते.म्हटलं तर याचं उत्तर मिळालं हा प्राण्यांनी वेढलेला त्यांचा देव पशुपती आहे.तर काहींचं म्हणणं ही दुर्गा देवी,तर काही हा योगी शिव,तीन मुख?चार मुख? अशी ना ना प्रश्न याभोवती जमा होतात.उत्तर जे तुम्हाला समाधान देईल ते!

In reply to by Bhakti

पशुपती.... पशुपती.... वैगरे करत .. लगेच आपण भारतीयांनी हवेत जायची गरज नाही ... एखाद्या गोऱ्या माणसाने (इंग्रजाने ) संशोधन वैगरे करून ही मुद्रा शोधली आणि तिला पशुपती वैगरे म्हटलं तर लगेच आपण भारतीयांनी ... बघा बघा आमची संस्कृती यंव आणि त्यांव करण्याची तशी गरज नसते.. तत्कालीन मूलनिवासी वैगरे जमातीतील एखादा पारंपरिक पोशाख वैगरे असेल तो, कुठल्यातरी कार्यक्रमाचा .... त्याचेच चित्रण मातीच्या मुद्रेत केले गेलं असेल ... p

नुकतेच चित्रगुप्त काका ह्यांच्या सोबत आमचे औंधचे म्युझियम पाहण्याचा योग आला ... तिथे पाहिलेले हे एक अफलातून चित्र ओलेती एस.जी. ठाकूर सिंग Oleti

In reply to by राघव

सुरिया 26/02/2025 - 12:30
दीनानाथ दलालांनी अशाप्रकारची बरीच चित्रे केली असली तरी हे त्यांचे नाही. शैली वेगळी आहे. अ‍ॅनॉटोमी दलाल साकारत तशी नाहीये. मुख्य म्हणजे ठाकूर सिंगाची सही आहे डाव्या बाजुला खाली. दलाल मुख्यत्वे कमर्शिअल कामे करीत. कॅलेंडर वगैरे साठी जरी असे चित्र केले तरी त्यांची लफ्फेदार सही असली असती. अगदी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या शिष्यांनी जरी काम केले तरी त्यावर त्यांच्याच सहीतला द हे अक्षर एका छोट्या त्रिकोणात बसवलेली स्वाक्षरी असायची. तस्मात हे चित्र दलालांचे नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सुरिया 26/02/2025 - 17:16
अफलातून वगैरेर वाटले असेल हे चित्र तर वास्तविक पाहता गोडबोल्यांना एक अनाहूत सल्ला द्यावा वाटतो. अध्यात्म, अभंग, अर्थ पुरेसे आहे. उगी कलेच्या उंटाच्या कशाला मागे लागता? तुमची चुकलीय ती ट्रेन. द्या सोडून.

In reply to by विवेकपटाईत

हीच का तुमची सिंधू घाटी सभ्यता ?? ज्या सावरकरांना मानता . त्यांनीच एक प्रश्न विचारला होता. गाय ही जर माते समान, तिचे मल मुत्र प्राशन करणे जर पवित्र ... तर तुमच्या जन्मदात्या आईचे सुद्धा मल मुत्र प्राशन तुम्ही का करत नाही ?? सदर फोटोतील व्यक्ती तथाकथित डॉक्टर आहे .. फोटो पाहून वाटतं .. खरं आहे ... शिकला म्हणजे अक्कल असेलच असे काही नाही ... शेवटी शहाणपण स्वतःच्या डोक्याने विचार करून येतं ... . . . a

सुरिया 27/02/2025 - 13:27
सिंधुघाटी वैदिक सभ्यता
काहीही फेकतो हा माणूस बिनधास्त. काय संबंध सिंधू संस्कृतीचा आणि वेदाचा आणि वैदिक धर्माचा? आणि असेल तर त्या बैलाच्या वर लिहिलेले वाचून दाखवा बरं. वेदात असेलच ना हि लिपी.

विलक्षणाच्या उभ्या पिकावर

अनन्त्_यात्री ·

अथांग आकाश 14/07/2024 - 16:57
छान कविता! अनन्त्_यात्री तुम्हाला कवितेतलं काही कळंत नाही. शिकवणी लावा सर्वज्ञानी कॅटरपिलर कडे :)

अथांग आकाश 14/07/2024 - 16:57
छान कविता! अनन्त्_यात्री तुम्हाला कवितेतलं काही कळंत नाही. शिकवणी लावा सर्वज्ञानी कॅटरपिलर कडे :)
लेखनविषय:
विलक्षणाच्या उभ्या पिकावर देण्या खडा पहारा पाहिजेत-जे भेदू शकतील स्थळकाळाची कारा पाहिजेत ते - नेणीव ज्यांची जाणिवेतुनी झरते अर्थगर्भ मौनातही ज्यांचे रोमरोम रुणझुणते पाहिजेत-जे उत्स्फूर्तीच्या पुष्करणीचे पाणी पिऊनी खोदतिल अमूर्तावरी अकल्पिताची लेणी पाहिजेत-जे अज्ञेयावर कलम करुनी ज्ञाताचे विलक्षणाचे वाण बनवुनी घेतील पीक उद्याचे

पवनाकांठचा धोंडी (ऐसी अक्षरे-१९)

Bhakti ·

खेडूत 14/07/2024 - 06:38
आवडले. खूप वर्षांपूर्वी वाचल्यामुळे काहीं प्रसंग विसरले होते. उजळणी झाली, आता परत वाचायला हवं.

In reply to by खेडूत

भागो 16/07/2024 - 12:50
भक्ती ताई. ह्या परीच्या बद्दल अनेक धन्यवाद. शाळा कॉलेजच्या झोपी गेलेल्या मराठी साहित्य विश्वाच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा जे हाती पडेल ते वाचत सुटलो होतो. आणि आता... प्लीज अशीच पुस्तके निवडा आणि रसग्रहण करा.

Bhakti 14/07/2024 - 08:48
धन्यवाद खेडूत! इतरत्र ह्या पुस्तकाच्या परिचयावर मिळालेली रोमांचित माहिती.
तुंग गडावर हा हवालदार आप्पांना प्रत्यक्ष भेटला होता. त्यातूनच ' पवना काठ चा. धोंडी,' जन्माला आला.सुमारे१९६८ ,६९ साली.आम्ही खेड आत्ताचे राजगुरू नगर येथे तो सिनेमा लागल्याचे आठवते आहे. सदर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचाही प्रसंग असाच नोंद घेण्यासारखा आहे. शेवटचा सीन आहे. धोंडी आपल्या शेतात बैलाच्या जोडीला(गर्जन च्या) उभा राहून जमीन नांगरत असतो आणि अती श्रमाने रक्ताची उलटी होऊन तो वावरत पडतो. धोंडी आणि कोंडी ची भूमिका चंद्रकांत व सूर्यकांत यांनी केली आहे. त्यांचें बाबत काय बोलावे. कोंडीला हा प्रकार समजतो. वावरकडे कोंडी कधी फिरकत ही नसतो.तो वाव रात इर्जिक आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो. धोंडीच्या जुन्या मताला हा अपमान वाटतो. धोंडी बाबत झालेला हा प्रकार कोंडीला समजतो.तो दादा म्हणून टाहो फोडून धावत येतो व दादाच्या निष्प्राण कलेवराला मिठी मारतो. हा प्रसंग शेवट इतका प्रभावीपणे त्यांनी केला की प्रसंग संपला. चित्रीकरण झाले पण तो कॅमेरामन, व इतर कामगार ही हमसून हमसून रडत होते..!!

In reply to by Bhakti

होय, सिद्धेश्वर टाॅकिज मधे लागला होता. मी पण तेव्हांच पाहिला. आमच्या गावातील श्री हरकशेठ कासवा हे चित्रपटगृहाचे मालक,मुलांसाठी ऐतिहासिक, सामाजिक, देशभक्ती अशा विविध विषयांवर चित्रपट परिक्षा झाल्यावर लावायचे व पंचवीस पैसे फक्त तिकीट ठेवायचे. आमच्या गावात एक समृद्ध वाचनालय आहे. त्यामुळे लहानपणापासून वाचनाची गोडी लागली.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/07/2024 - 12:15
राजगुरुनगर (खेड) समृद्धच वाटतं आहे.परवा सुट्टी आहे जावा काय फिरायला तिकडे ;)

ही सगळी पुस्तके मराठी माणसाने वयाच्या २०-३० वर्षात वाचली पाहीजे तुम्हाला अंमळ उशीरच झाला म्हणायचा किंवा तुम्ही खरोखरीच त्या वयाचे असाल. माझ्या आवडत्या लेखकांत गोनिदांचा क्रमांक सगळ्यात वर आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 14/07/2024 - 12:13
बरोबर मी तिशीतली आहे, आणि
बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.
गोनीदां प्राचीन लेखक? नाही ओ जोपर्यंत हे दुर्ग ,गड आहेत तो पर्यंत ते नित्य नवे प्रत्येक दुर्गप्रेमीला त्याचेच सवंगडी वाटणार 😀

गोनिदा,मिरासदार,शंकर पाटील, आण्णाभाऊ साठे श्री ना पेंडसे ,व्यंकटेश माडगूळकर,जि ए आणी असे अनेक उत्तम लेखकांचे साहीत्य लहानपणी वाचले पण आता पुन्हा वाचतोय कारण त्यातली अवीट गोडी आजही तशीच आहे. फकिरा,गारंबिचा बापू,शितू,पडघवली गावाकडच्या गोष्टी ,काजळमाया..... आणी इतर मुद्दाम उपलब्ध करून मागील एक वर्षात वाचली आहेत.

पाषाणभेद 14/07/2024 - 19:09
छान लिहीले आहे. पण शिर्षकातले ऐसी अक्षरे चा संदर्भ काढून टाकायला हवा होता. मला सर्व वेबसाईट सारख्याच आत्मियतेच्या आहेत, पण हे असले शिर्षक द्यायला नको होते. @संपादक: या लेखाचे शिर्षक संपादित करावे.

In reply to by पाषाणभेद

Bhakti 14/07/2024 - 21:25
धन्यवाद पाभे! पण.. ऐसी अक्षरे ....मेळवीन ही पूर्ण ओळ वापरत असे . नंतर मेळवीन शब्द मलाच जड वाटू लागला म्हणून काढला. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे ही,अशी रसाळ अक्षरे(पुस्तके) मराठीत आहे ज्यांचा मला आनंद घ्यावयाचा आहे _/\_ इतर संपादन करण्यासारखे काही संबंध नाही (काहीतरीच ;))इतकही सोमिवर संबंध लावत बसू नये,#दिलबडाहोनाचाहिए 😀

प्रचेतस 15/07/2024 - 08:48
गोनीदांसारखा लेखक होणे नाही. त्यांची अजून काही पुस्तके सुचवेन. लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी (सध्या कुठेच मिळत नाही) तांबडफुटी (सध्या कुठेच मिळत नाही) कादंबरीमय शिवकाल माचीवरला बुधा जैत रे जैत वाघरु/त्या तिथे रूखातळी आनंदवनभुवनी जवळपास त्यांची सर्व पुस्तके संग्रही आहेतच.

In reply to by भागो

प्रचेतस 15/07/2024 - 09:20
ते तर आहेच, मी जनरली त्यांची फारशी वाचली जात नाहीत अशी पुस्तके दिलीत. अन्यथा त्यांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत. शितू, पडघवली, स्मरणगाथा, दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दहा दुर्ग दहा दिवस, आम्ही भगीरथाचे पुत्र, मृण्मयी, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो, तुका आकाशाएव्हढा.

In reply to by प्रचेतस

भागो 16/07/2024 - 12:05
मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा वाचली होती. त्याचे लेखक कोण? कुणाला माहित आहे का? माझ्या मते श्री ना पेंडसे हे जबरदस्त ताकदीचे लेखक होते. उदा. आई आहे शेतात.

In reply to by भागो

प्रचेतस 16/07/2024 - 12:10
'हद्दपार' देखील श्री. ना. पेंडसेंचीच. दुर्गेश्वर बुरोंडीच्या राजेमास्तरांची ही कथा. ह्या कादंबरीतले दापोलीचे गॅडनीचे चर्च अजूनही तेथे भग्नावस्थेत आहे. पेंडश्यांच्या टॉप फाईव्ह मधे हद्दपार, तुंबाडचे खोत, लव्हाळी, हत्या, गारंबीचा बापू ह्यांचा समावेश व्हावा. बरेचजण रथचक्रला पेंडश्यांची सर्वोत्तम मानतात पण मला मात्र ती विशेष आवडली नाही.

In reply to by भागो

भागो 16/07/2024 - 12:14
श्री.ना. पेंडसे यांनी ‘खडकावरील हिरवळ’ (1941) हे व्यक्तिचित्रण, तर ‘एल्गार’ (1949), ‘हद्दपार’ (1950), ‘गारंबीचा बापू’ (1952), ‘हत्या’ (1954), ‘यशोदा’ (1957), ‘कलंदर’ (1959), ‘रथचक्र’ (1962), ‘लव्हाळी’ (1966), ‘ऑक्टोपस’ (1973), ‘आकांत’ (1981), ‘तुंबाडचे खोत’ (1987), ‘गारंबीची राधा’ (1993), ‘कामेरू’ (1998), ‘आभाळाची हाक’ (2007) या कादंबऱ्या लिहिल्या. माफी आई आहे शेतात ही र वा दिघे ह्यांची आहे,

In reply to by प्रचेतस

प्रचेतस 16/07/2024 - 12:19
मात्र तुंबाडचे खोत ह्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ महाकादंबरीनंतर त्यांचा आलेख खालावत गेला. राधा, कामेरु नंतर तर एक होती आजी, आभाळाची हाक खूप साधारण वाटल्या.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/07/2024 - 11:50
नशीबवान आहात _/\_ खरोखरच महाराष्ट्राचे भूषण गो नी दांडेकर यांची साहित्य संपदा हिरीरीने नव्या पिढीपर्यंत नेत राहयला हवी.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:38
गोनीदा चांगले लेखक होते ह्यात दुमत नाही, पण त्यांचे लेखन मलातरी 'कालातीत' वाटले नसल्याने असेल कदाचीत पण आपण दिलेल्या यादीतली बहुतेक सर्व आणि बाकिचीही पुस्तके वाचली असली तरी त्यांचे एक 'पडघवली' वगळता अन्य कुठल्याही पुस्तकाचे कथानक अजिबात आठवत नाही. एका ठरवीक वयात त्यांच्या पुस्तकांनी निश्चीतच वाचनानंद मिळवुन दिला हे मात्र नक्की!

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/07/2024 - 11:30
"पडघवली"वर आधारित एक टीव्ही सीरियल फार फार पूर्वी दूरदर्शन वर आलीं होती असे स्मरते. रथचक्र नाव होते की काय.. लालन सारंग त्यात होत्या असे वाटते. चुभुदेघे. तेरा एपिसोड किंवा मर्यादित एपिसोड असणाऱ्या साप्ताहिक सिरियलांचे ते दिवस. पुढील एपिसोडसाठी एक आठवडा वाट बघणे. पेशंस आपोआप डेव्हलप होत असे. धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय. बरे वाईट असे काही नाही. खूप बदल होत असतात हे खरे.

In reply to by गवि

प्रचेतस 16/07/2024 - 12:24
हो, ती गोनीदांच्याच कादंबरीवर आधारीत होती. रथचक्रवर देखील मराठी मालिका आली होती. आणि बापूवर तर काशिनाथ घाणेकर अभिनित चित्रपटच आला होता.

In reply to by प्रचेतस

गवि 16/07/2024 - 12:59
आम्ही तेव्हा प्रॉपर कोंकणातच राहत असल्याने अशा सीरियल्स आपल्या आसपास घडणाऱ्या घटना असाव्यात असेच वाटत असे.

In reply to by गवि

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:31
मला पडघवली कादंबरी लक्षात राहण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे गोनीदांची हि एकमेव कादंबरी मी दोनवेळा वाचली आहे आणि दुसरे कारण असे कि खूप लहान असताना, म्हणजे अर्धी चड्डीचं काय कुठलीच चड्डी न घालण्याच्या वयापासून 'स्ट्रेचलॉन'च्या चड्ड्या घालण्याच्या वयापर्यंत आजोळी जायचो तेव्हा मामाच्या जुन्या मोठ्या घराच्या पडवीत एक 'पडगुलीची आजी' मुक्कामाला होती. जुन्या काळच्या अनिष्ट रीती-परंपरांची बळी ठरल्याने केशवपन केलेली, तांबडे लुगडे नसणारी ही बालविधवा 'आजी' खरंतर आईच्या आईची म्हणजे माझ्या आजीची 'मावशी आजी' म्हणजे माझी खापर पणजी होती. पण घरातले लहान-मोठे सगळेच तिला 'पडगुलीची आजी' असेच म्हणत. मूळ-बाळ नव्हतेच आणि सासरच्या मंडळींचा अजिबात आधार नसलेल्या आपल्या मावशी आजीचा माझ्या आजी, आजोबा आणि मामाने तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रेमाने सांभाळ केला होता. थोडे मोठे झाल्यावर कळले कि ही खापरपणजी 'पडघवलीची' सासुरवाशीण होती आणि त्या गावाच्या नावाचा (कोकणी माणसांच्या जन्मजात सवयीला अनुसरून 😀) बोलीभाषेत अपभ्रंश झाल्याने तिला सगळेजण 'पडगुलीची' आजी म्हणत!
धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय.
+१००० बिंज वॉचींग करुन वेब सिरिजचा अख्खा सिझन बघण्याची मजा काही औरच... पण त्यातही पुढच्या सिझनची फार वाट पहायला लागली तर मजा जाते! त्यामुळे चित्रपट पहाण्याला मी प्राधान्य देतो. पण त्यातही 'कटप्पाने बाहुबलीको क्यु मारा?' ह्याचे उत्तर मिळायला उत्तरार्धाची वाट पहायला लागलेला काळही फार कंटाळवाणा वाटला होता. त्याबाबतीत अनुराग कश्यपला पैकीच्या पैकी मार्क्स द्यावेसे वाटतात. गँग्स ऑफ वासेपुरचा दुसरा भाग त्याने केवळ पंधरा की वीस दिवसात प्रदर्शित केल्याने मजा आली होती,

सौंदाळा 15/07/2024 - 10:12
खूप वर्षांपूर्वी वाचले होते. वाचताना कित्येकदा डोळयातून पाणी आले. धोंडीचे राकट, रांगडा, हळवा, कुटुंबवत्सल असे सर्वच स्वभाव गोनीदांनी प्रचंड ताकदीने दाखवले आहेत. पुस्तक ओळख मस्तच पण खरच सांगतो हे पुस्तक परत वाचणे भावनिकदृष्ट्या शक्य नाही मला तरी.

श्वेता२४ 15/07/2024 - 21:33
कसे काय कुणास ठाऊक पण हे पुस्तक मात्र वाचायचे राहून गेले .आता वेळ काढून नक्की वाचणे आले. तुम्ही लिहिलंच आहेत का सुंदर की खरंच ते पुस्तकच वाचले आहे की काय असं वाटत होतं खूप छान पुस्तक परिचय

सुजित जाधव 16/07/2024 - 07:45
खूपच छान परिचय भक्ती ताई..! यावर्षीच्या जानेवारी महिन्यात मी गो. नी. दांडेकर यांचं माचीवरला बुधा हे पाहिलं पुस्तक वाचलं. त्यानंतर मी त्यांच्या आणखी पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली.. तेव्हापासून शितू आणि पवनाकडचा धोंडी ही दोन पुस्तकं माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेत. तुमच्या लेखामुळे ती वाचायची उत्सुकता आणखीनच वाढलीये.. लवकरच वाचेन..

किल्लेदार 17/07/2024 - 20:40
'दुर्गभ्रमण गाथा' हे सगळ्यात आवडते पुस्तक. गोनीदांची 'दुर्गभ्रमण गाथा' आणि 'दुर्गदर्शन' ही दोनच पुस्तकं वाचलीत. बाकीच्या कथा असल्यामुळे वाचल्या नाहीत. प्रस्तावनाच काय सुंदर लिहिली आहे. "किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे. कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्‍या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्‍या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे. कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं - मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे. ते असो - पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला. आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो."

खेडूत 14/07/2024 - 06:38
आवडले. खूप वर्षांपूर्वी वाचल्यामुळे काहीं प्रसंग विसरले होते. उजळणी झाली, आता परत वाचायला हवं.

In reply to by खेडूत

भागो 16/07/2024 - 12:50
भक्ती ताई. ह्या परीच्या बद्दल अनेक धन्यवाद. शाळा कॉलेजच्या झोपी गेलेल्या मराठी साहित्य विश्वाच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा जे हाती पडेल ते वाचत सुटलो होतो. आणि आता... प्लीज अशीच पुस्तके निवडा आणि रसग्रहण करा.

Bhakti 14/07/2024 - 08:48
धन्यवाद खेडूत! इतरत्र ह्या पुस्तकाच्या परिचयावर मिळालेली रोमांचित माहिती.
तुंग गडावर हा हवालदार आप्पांना प्रत्यक्ष भेटला होता. त्यातूनच ' पवना काठ चा. धोंडी,' जन्माला आला.सुमारे१९६८ ,६९ साली.आम्ही खेड आत्ताचे राजगुरू नगर येथे तो सिनेमा लागल्याचे आठवते आहे. सदर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचाही प्रसंग असाच नोंद घेण्यासारखा आहे. शेवटचा सीन आहे. धोंडी आपल्या शेतात बैलाच्या जोडीला(गर्जन च्या) उभा राहून जमीन नांगरत असतो आणि अती श्रमाने रक्ताची उलटी होऊन तो वावरत पडतो. धोंडी आणि कोंडी ची भूमिका चंद्रकांत व सूर्यकांत यांनी केली आहे. त्यांचें बाबत काय बोलावे. कोंडीला हा प्रकार समजतो. वावरकडे कोंडी कधी फिरकत ही नसतो.तो वाव रात इर्जिक आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो. धोंडीच्या जुन्या मताला हा अपमान वाटतो. धोंडी बाबत झालेला हा प्रकार कोंडीला समजतो.तो दादा म्हणून टाहो फोडून धावत येतो व दादाच्या निष्प्राण कलेवराला मिठी मारतो. हा प्रसंग शेवट इतका प्रभावीपणे त्यांनी केला की प्रसंग संपला. चित्रीकरण झाले पण तो कॅमेरामन, व इतर कामगार ही हमसून हमसून रडत होते..!!

In reply to by Bhakti

होय, सिद्धेश्वर टाॅकिज मधे लागला होता. मी पण तेव्हांच पाहिला. आमच्या गावातील श्री हरकशेठ कासवा हे चित्रपटगृहाचे मालक,मुलांसाठी ऐतिहासिक, सामाजिक, देशभक्ती अशा विविध विषयांवर चित्रपट परिक्षा झाल्यावर लावायचे व पंचवीस पैसे फक्त तिकीट ठेवायचे. आमच्या गावात एक समृद्ध वाचनालय आहे. त्यामुळे लहानपणापासून वाचनाची गोडी लागली.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/07/2024 - 12:15
राजगुरुनगर (खेड) समृद्धच वाटतं आहे.परवा सुट्टी आहे जावा काय फिरायला तिकडे ;)

ही सगळी पुस्तके मराठी माणसाने वयाच्या २०-३० वर्षात वाचली पाहीजे तुम्हाला अंमळ उशीरच झाला म्हणायचा किंवा तुम्ही खरोखरीच त्या वयाचे असाल. माझ्या आवडत्या लेखकांत गोनिदांचा क्रमांक सगळ्यात वर आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 14/07/2024 - 12:13
बरोबर मी तिशीतली आहे, आणि
बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.
गोनीदां प्राचीन लेखक? नाही ओ जोपर्यंत हे दुर्ग ,गड आहेत तो पर्यंत ते नित्य नवे प्रत्येक दुर्गप्रेमीला त्याचेच सवंगडी वाटणार 😀

गोनिदा,मिरासदार,शंकर पाटील, आण्णाभाऊ साठे श्री ना पेंडसे ,व्यंकटेश माडगूळकर,जि ए आणी असे अनेक उत्तम लेखकांचे साहीत्य लहानपणी वाचले पण आता पुन्हा वाचतोय कारण त्यातली अवीट गोडी आजही तशीच आहे. फकिरा,गारंबिचा बापू,शितू,पडघवली गावाकडच्या गोष्टी ,काजळमाया..... आणी इतर मुद्दाम उपलब्ध करून मागील एक वर्षात वाचली आहेत.

पाषाणभेद 14/07/2024 - 19:09
छान लिहीले आहे. पण शिर्षकातले ऐसी अक्षरे चा संदर्भ काढून टाकायला हवा होता. मला सर्व वेबसाईट सारख्याच आत्मियतेच्या आहेत, पण हे असले शिर्षक द्यायला नको होते. @संपादक: या लेखाचे शिर्षक संपादित करावे.

In reply to by पाषाणभेद

Bhakti 14/07/2024 - 21:25
धन्यवाद पाभे! पण.. ऐसी अक्षरे ....मेळवीन ही पूर्ण ओळ वापरत असे . नंतर मेळवीन शब्द मलाच जड वाटू लागला म्हणून काढला. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे ही,अशी रसाळ अक्षरे(पुस्तके) मराठीत आहे ज्यांचा मला आनंद घ्यावयाचा आहे _/\_ इतर संपादन करण्यासारखे काही संबंध नाही (काहीतरीच ;))इतकही सोमिवर संबंध लावत बसू नये,#दिलबडाहोनाचाहिए 😀

प्रचेतस 15/07/2024 - 08:48
गोनीदांसारखा लेखक होणे नाही. त्यांची अजून काही पुस्तके सुचवेन. लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी (सध्या कुठेच मिळत नाही) तांबडफुटी (सध्या कुठेच मिळत नाही) कादंबरीमय शिवकाल माचीवरला बुधा जैत रे जैत वाघरु/त्या तिथे रूखातळी आनंदवनभुवनी जवळपास त्यांची सर्व पुस्तके संग्रही आहेतच.

In reply to by भागो

प्रचेतस 15/07/2024 - 09:20
ते तर आहेच, मी जनरली त्यांची फारशी वाचली जात नाहीत अशी पुस्तके दिलीत. अन्यथा त्यांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत. शितू, पडघवली, स्मरणगाथा, दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दहा दुर्ग दहा दिवस, आम्ही भगीरथाचे पुत्र, मृण्मयी, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो, तुका आकाशाएव्हढा.

In reply to by प्रचेतस

भागो 16/07/2024 - 12:05
मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा वाचली होती. त्याचे लेखक कोण? कुणाला माहित आहे का? माझ्या मते श्री ना पेंडसे हे जबरदस्त ताकदीचे लेखक होते. उदा. आई आहे शेतात.

In reply to by भागो

प्रचेतस 16/07/2024 - 12:10
'हद्दपार' देखील श्री. ना. पेंडसेंचीच. दुर्गेश्वर बुरोंडीच्या राजेमास्तरांची ही कथा. ह्या कादंबरीतले दापोलीचे गॅडनीचे चर्च अजूनही तेथे भग्नावस्थेत आहे. पेंडश्यांच्या टॉप फाईव्ह मधे हद्दपार, तुंबाडचे खोत, लव्हाळी, हत्या, गारंबीचा बापू ह्यांचा समावेश व्हावा. बरेचजण रथचक्रला पेंडश्यांची सर्वोत्तम मानतात पण मला मात्र ती विशेष आवडली नाही.

In reply to by भागो

भागो 16/07/2024 - 12:14
श्री.ना. पेंडसे यांनी ‘खडकावरील हिरवळ’ (1941) हे व्यक्तिचित्रण, तर ‘एल्गार’ (1949), ‘हद्दपार’ (1950), ‘गारंबीचा बापू’ (1952), ‘हत्या’ (1954), ‘यशोदा’ (1957), ‘कलंदर’ (1959), ‘रथचक्र’ (1962), ‘लव्हाळी’ (1966), ‘ऑक्टोपस’ (1973), ‘आकांत’ (1981), ‘तुंबाडचे खोत’ (1987), ‘गारंबीची राधा’ (1993), ‘कामेरू’ (1998), ‘आभाळाची हाक’ (2007) या कादंबऱ्या लिहिल्या. माफी आई आहे शेतात ही र वा दिघे ह्यांची आहे,

In reply to by प्रचेतस

प्रचेतस 16/07/2024 - 12:19
मात्र तुंबाडचे खोत ह्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ महाकादंबरीनंतर त्यांचा आलेख खालावत गेला. राधा, कामेरु नंतर तर एक होती आजी, आभाळाची हाक खूप साधारण वाटल्या.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/07/2024 - 11:50
नशीबवान आहात _/\_ खरोखरच महाराष्ट्राचे भूषण गो नी दांडेकर यांची साहित्य संपदा हिरीरीने नव्या पिढीपर्यंत नेत राहयला हवी.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:38
गोनीदा चांगले लेखक होते ह्यात दुमत नाही, पण त्यांचे लेखन मलातरी 'कालातीत' वाटले नसल्याने असेल कदाचीत पण आपण दिलेल्या यादीतली बहुतेक सर्व आणि बाकिचीही पुस्तके वाचली असली तरी त्यांचे एक 'पडघवली' वगळता अन्य कुठल्याही पुस्तकाचे कथानक अजिबात आठवत नाही. एका ठरवीक वयात त्यांच्या पुस्तकांनी निश्चीतच वाचनानंद मिळवुन दिला हे मात्र नक्की!

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/07/2024 - 11:30
"पडघवली"वर आधारित एक टीव्ही सीरियल फार फार पूर्वी दूरदर्शन वर आलीं होती असे स्मरते. रथचक्र नाव होते की काय.. लालन सारंग त्यात होत्या असे वाटते. चुभुदेघे. तेरा एपिसोड किंवा मर्यादित एपिसोड असणाऱ्या साप्ताहिक सिरियलांचे ते दिवस. पुढील एपिसोडसाठी एक आठवडा वाट बघणे. पेशंस आपोआप डेव्हलप होत असे. धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय. बरे वाईट असे काही नाही. खूप बदल होत असतात हे खरे.

In reply to by गवि

प्रचेतस 16/07/2024 - 12:24
हो, ती गोनीदांच्याच कादंबरीवर आधारीत होती. रथचक्रवर देखील मराठी मालिका आली होती. आणि बापूवर तर काशिनाथ घाणेकर अभिनित चित्रपटच आला होता.

In reply to by प्रचेतस

गवि 16/07/2024 - 12:59
आम्ही तेव्हा प्रॉपर कोंकणातच राहत असल्याने अशा सीरियल्स आपल्या आसपास घडणाऱ्या घटना असाव्यात असेच वाटत असे.

In reply to by गवि

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:31
मला पडघवली कादंबरी लक्षात राहण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे गोनीदांची हि एकमेव कादंबरी मी दोनवेळा वाचली आहे आणि दुसरे कारण असे कि खूप लहान असताना, म्हणजे अर्धी चड्डीचं काय कुठलीच चड्डी न घालण्याच्या वयापासून 'स्ट्रेचलॉन'च्या चड्ड्या घालण्याच्या वयापर्यंत आजोळी जायचो तेव्हा मामाच्या जुन्या मोठ्या घराच्या पडवीत एक 'पडगुलीची आजी' मुक्कामाला होती. जुन्या काळच्या अनिष्ट रीती-परंपरांची बळी ठरल्याने केशवपन केलेली, तांबडे लुगडे नसणारी ही बालविधवा 'आजी' खरंतर आईच्या आईची म्हणजे माझ्या आजीची 'मावशी आजी' म्हणजे माझी खापर पणजी होती. पण घरातले लहान-मोठे सगळेच तिला 'पडगुलीची आजी' असेच म्हणत. मूळ-बाळ नव्हतेच आणि सासरच्या मंडळींचा अजिबात आधार नसलेल्या आपल्या मावशी आजीचा माझ्या आजी, आजोबा आणि मामाने तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रेमाने सांभाळ केला होता. थोडे मोठे झाल्यावर कळले कि ही खापरपणजी 'पडघवलीची' सासुरवाशीण होती आणि त्या गावाच्या नावाचा (कोकणी माणसांच्या जन्मजात सवयीला अनुसरून 😀) बोलीभाषेत अपभ्रंश झाल्याने तिला सगळेजण 'पडगुलीची' आजी म्हणत!
धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय.
+१००० बिंज वॉचींग करुन वेब सिरिजचा अख्खा सिझन बघण्याची मजा काही औरच... पण त्यातही पुढच्या सिझनची फार वाट पहायला लागली तर मजा जाते! त्यामुळे चित्रपट पहाण्याला मी प्राधान्य देतो. पण त्यातही 'कटप्पाने बाहुबलीको क्यु मारा?' ह्याचे उत्तर मिळायला उत्तरार्धाची वाट पहायला लागलेला काळही फार कंटाळवाणा वाटला होता. त्याबाबतीत अनुराग कश्यपला पैकीच्या पैकी मार्क्स द्यावेसे वाटतात. गँग्स ऑफ वासेपुरचा दुसरा भाग त्याने केवळ पंधरा की वीस दिवसात प्रदर्शित केल्याने मजा आली होती,

सौंदाळा 15/07/2024 - 10:12
खूप वर्षांपूर्वी वाचले होते. वाचताना कित्येकदा डोळयातून पाणी आले. धोंडीचे राकट, रांगडा, हळवा, कुटुंबवत्सल असे सर्वच स्वभाव गोनीदांनी प्रचंड ताकदीने दाखवले आहेत. पुस्तक ओळख मस्तच पण खरच सांगतो हे पुस्तक परत वाचणे भावनिकदृष्ट्या शक्य नाही मला तरी.

श्वेता२४ 15/07/2024 - 21:33
कसे काय कुणास ठाऊक पण हे पुस्तक मात्र वाचायचे राहून गेले .आता वेळ काढून नक्की वाचणे आले. तुम्ही लिहिलंच आहेत का सुंदर की खरंच ते पुस्तकच वाचले आहे की काय असं वाटत होतं खूप छान पुस्तक परिचय

सुजित जाधव 16/07/2024 - 07:45
खूपच छान परिचय भक्ती ताई..! यावर्षीच्या जानेवारी महिन्यात मी गो. नी. दांडेकर यांचं माचीवरला बुधा हे पाहिलं पुस्तक वाचलं. त्यानंतर मी त्यांच्या आणखी पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली.. तेव्हापासून शितू आणि पवनाकडचा धोंडी ही दोन पुस्तकं माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेत. तुमच्या लेखामुळे ती वाचायची उत्सुकता आणखीनच वाढलीये.. लवकरच वाचेन..

किल्लेदार 17/07/2024 - 20:40
'दुर्गभ्रमण गाथा' हे सगळ्यात आवडते पुस्तक. गोनीदांची 'दुर्गभ्रमण गाथा' आणि 'दुर्गदर्शन' ही दोनच पुस्तकं वाचलीत. बाकीच्या कथा असल्यामुळे वाचल्या नाहीत. प्रस्तावनाच काय सुंदर लिहिली आहे. "किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे. कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्‍या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्‍या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे. कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं - मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे. ते असो - पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला. आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो."
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचेच नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक! असाच शिवाजीमहाराजांनी इनाम दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले! गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्य

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

पाषाणभेद ·

गवि 13/07/2024 - 11:42
मला खासे, खर्चे (वर्ग १), खर्चे (वर्ग २) किंवा खर्चे (वर्ग ३) * यापैकी कोणतीही पत्रिका न आल्याने दुखावला गेलो असून त्यामुळे मौन असेन. बाकी, झाले का एकदाचे संपन्न? आता पुढील सोहळा काही बाकी आहे का? पोस्ट वेडिंग संमेलन वगैरे? *तळटीप: खासे: सोन्याच्या वर्खाची पत्रिका, बसायला पाट, ताटाला पाट, चांदीची ताटे, श्रीखंड पुरी, मसालेभात, उदबत्ती घरे सोन्याची खर्चे (वर्ग १): जाड कार्ड रंगीत पत्रिका, बसायला पाट, जमिनीवर ताट, पितळी ताटे, साखर भात, मागून साधा भात कढी, उदबत्ती घरे पितळेची खर्चे (वर्ग २): पातळ कार्ड दुरंगी पत्रिका, बसायला जाजम, केळीचे पान, जिलबी, मठ्ठा, वरण भात तूप, उदबत्ती घरे बटाट्याची खर्चे (वर्ग ३): तोंडी निमंत्रण, बसायला जाजम, जमिनीवर पत्रावळ, गोड बुंदी, ताक, वरण भात वनस्पती तूप, उदबत्ती नाही. ढोबळ श्रेय अव्हेर: चिंवि जोशी. (किंवा जोग)

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 13:09
हे राम. काय हो हे?? काही यमक बिमक लय बिय दुरून तरी? समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता बेंबट्यारावांचे नाव घेते माझा नंबर पहिला? इथे ओशाळल्या सौ. धोंडो भिकाजी.

In reply to by गवि

Bhakti 13/07/2024 - 13:31
अहो,धोंडोजी यमक काय फक्त लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी नसतय, जरा उखाणा 'घेऊन'तर बगा,कानास गोडच लयीतच लागील.. नाही पटलं तर राहूं द्या ! सगळेच हुशार नसतात की ओ!

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 14:25
अहो,धोंडोजी
माझाच गणपुले??? अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?! बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.

In reply to by गवि

Bhakti 13/07/2024 - 16:10
अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?! नाय वाचत,आमचे हेच देशपांडे हायेती,तवा देशपांड्यांना देशपांड्यांचा लई अभिमान,गावी देशपांड्यांकडं कपाट भरभरू पु.लं.ची बुकं पण गावी आम्हाला स्वैपाकघरातून फुरसत मिळाली असती तर वाचली अस्ती..
बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.
हेच बेस्ट :) पण रच्याकने पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 16/07/2024 - 13:27
माझाच गणपुले???
😀 😀 😀
पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.
पु.लं. नक्की वाचा, ऐका, बघाच... एकदा का तुम्हाला त्यांच्या वाक्या वाक्यातलाच काय तर शब्दा शब्दातला विनोद आणि त्याचा दर्जा समजायला लागला की तुम्हीपण आमच्यासारख्या पु.लं.च्या 'डाय हार्ड' फॅनक्लबमध्ये कधी सहभागी व्हाल ते तुम्हालाही समजणार नाही 😀 स्वगत : आता गविंनी 'गणपुलेंचा' विषय काढलाच आहे म्हंटल्यावर आता'मद्राशी राम', 'पंजाबी मारुती', 'बंगाली सीता' वगैरेंची उजळणी करण्यासाठी आज हे ऐकणे ओघाने आलेच 😂

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 16/07/2024 - 13:43
होय होय ! 😀 रावसाहेब ऐकले बेळगावी भाषेचा लहेजा वापरून काय कमाल कथाकथन करतात पुलं :) नंतर बिगर इयत्ता शाळा ते मैट्रिक प्रवास दामले मास्तरांच्या गोष्टी खुपचं धमाल ;)
आताच्या लहान मुलाला विचारलं तर म्हणाला कीजे का कशात आहे, म्हणजे आताचे मुलं किलोवर घेतात काय..?
जवळच्या देशपांडेचं नाही तर साक्षात 'पुलं देशपांड्यांचं' तरी ऐकते म्हणून आमचे हे देशपांडे जरातरी सुखावले ;)

Bhakti 13/07/2024 - 13:38
जोन सेना,किम कार्देशन आणल्या सुबक बाहूल्या सोन्या- हिर्याच्या कपड्यांत नीताबाई सजल्या धजल्या -मु केश अं बानी आता बर्र हाई काय गविशेठ?का अजून आमी नापास..

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 14:28
आता हे कसं बरोबर जमलं? शाब्बास. - प्राध्यापक परखडकर * *तळटीप: एक डाव धोबीपछाड चित्रपटातील काल्पनिक पात्र. धोंडो भिकाजी जोशींसारखेच.

आमचाही एक प्रयत्न ! सोन्याच्या ताटात चांदीचे चमचे घास भरवते अनंत्या, थोबाड कर इकडे ! सोन्याची सायकल , तिला भरतो हवा | मी चाललो परगावा, राधिकाला जीव लावा.

पाऊसपाण्याचे दिवस वारा वाहे भरारा अंबानीच्या महालात निताबाय चा दरारा हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 13/07/2024 - 20:57
हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो
हे कहर आहे =)) थेट दृश्यच डोळयांसमोर आले ना, काय हे कर्नलसाहेब =))

विवाहाला हजर होते सगळे हॉलिवूड बॉलिवूड अंबानींचा थाट पाहुन जळले माझे संपादकीय बूड गिरीश कुबेर https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-dhanajirao-marriage-ceremony-amy-95-4478365/

"सिताच्या" पतीच्या नावाचा, देशभर गवगवा.. परी.. "नीताच्या" पतीचेच आहे इधर राज... अनंत माझ्या चरणांशी.. लक्ष्मी कुबेरा.. काही लागल्यास.. माझ्याकडे माग...

बाय द वे ..पु ल देशपांडे .. हे कट्टर समाजवादी होते .. म्हणजे "देशपांडे' असण्याचा माज दाखवण्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य समाजाचे निरीक्षण (विनोदी पद्धतीने ) लिहले ... त्यामुळे फ्यान असाल तर समाजवाद्यांना शिव्या देण्याआधी .. एकदा २ सेकंड थांबून बघा ..

गवि 13/07/2024 - 11:42
मला खासे, खर्चे (वर्ग १), खर्चे (वर्ग २) किंवा खर्चे (वर्ग ३) * यापैकी कोणतीही पत्रिका न आल्याने दुखावला गेलो असून त्यामुळे मौन असेन. बाकी, झाले का एकदाचे संपन्न? आता पुढील सोहळा काही बाकी आहे का? पोस्ट वेडिंग संमेलन वगैरे? *तळटीप: खासे: सोन्याच्या वर्खाची पत्रिका, बसायला पाट, ताटाला पाट, चांदीची ताटे, श्रीखंड पुरी, मसालेभात, उदबत्ती घरे सोन्याची खर्चे (वर्ग १): जाड कार्ड रंगीत पत्रिका, बसायला पाट, जमिनीवर ताट, पितळी ताटे, साखर भात, मागून साधा भात कढी, उदबत्ती घरे पितळेची खर्चे (वर्ग २): पातळ कार्ड दुरंगी पत्रिका, बसायला जाजम, केळीचे पान, जिलबी, मठ्ठा, वरण भात तूप, उदबत्ती घरे बटाट्याची खर्चे (वर्ग ३): तोंडी निमंत्रण, बसायला जाजम, जमिनीवर पत्रावळ, गोड बुंदी, ताक, वरण भात वनस्पती तूप, उदबत्ती नाही. ढोबळ श्रेय अव्हेर: चिंवि जोशी. (किंवा जोग)

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 13:09
हे राम. काय हो हे?? काही यमक बिमक लय बिय दुरून तरी? समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता बेंबट्यारावांचे नाव घेते माझा नंबर पहिला? इथे ओशाळल्या सौ. धोंडो भिकाजी.

In reply to by गवि

Bhakti 13/07/2024 - 13:31
अहो,धोंडोजी यमक काय फक्त लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी नसतय, जरा उखाणा 'घेऊन'तर बगा,कानास गोडच लयीतच लागील.. नाही पटलं तर राहूं द्या ! सगळेच हुशार नसतात की ओ!

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 14:25
अहो,धोंडोजी
माझाच गणपुले??? अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?! बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.

In reply to by गवि

Bhakti 13/07/2024 - 16:10
अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?! नाय वाचत,आमचे हेच देशपांडे हायेती,तवा देशपांड्यांना देशपांड्यांचा लई अभिमान,गावी देशपांड्यांकडं कपाट भरभरू पु.लं.ची बुकं पण गावी आम्हाला स्वैपाकघरातून फुरसत मिळाली असती तर वाचली अस्ती..
बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.
हेच बेस्ट :) पण रच्याकने पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 16/07/2024 - 13:27
माझाच गणपुले???
😀 😀 😀
पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.
पु.लं. नक्की वाचा, ऐका, बघाच... एकदा का तुम्हाला त्यांच्या वाक्या वाक्यातलाच काय तर शब्दा शब्दातला विनोद आणि त्याचा दर्जा समजायला लागला की तुम्हीपण आमच्यासारख्या पु.लं.च्या 'डाय हार्ड' फॅनक्लबमध्ये कधी सहभागी व्हाल ते तुम्हालाही समजणार नाही 😀 स्वगत : आता गविंनी 'गणपुलेंचा' विषय काढलाच आहे म्हंटल्यावर आता'मद्राशी राम', 'पंजाबी मारुती', 'बंगाली सीता' वगैरेंची उजळणी करण्यासाठी आज हे ऐकणे ओघाने आलेच 😂

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 16/07/2024 - 13:43
होय होय ! 😀 रावसाहेब ऐकले बेळगावी भाषेचा लहेजा वापरून काय कमाल कथाकथन करतात पुलं :) नंतर बिगर इयत्ता शाळा ते मैट्रिक प्रवास दामले मास्तरांच्या गोष्टी खुपचं धमाल ;)
आताच्या लहान मुलाला विचारलं तर म्हणाला कीजे का कशात आहे, म्हणजे आताचे मुलं किलोवर घेतात काय..?
जवळच्या देशपांडेचं नाही तर साक्षात 'पुलं देशपांड्यांचं' तरी ऐकते म्हणून आमचे हे देशपांडे जरातरी सुखावले ;)

Bhakti 13/07/2024 - 13:38
जोन सेना,किम कार्देशन आणल्या सुबक बाहूल्या सोन्या- हिर्याच्या कपड्यांत नीताबाई सजल्या धजल्या -मु केश अं बानी आता बर्र हाई काय गविशेठ?का अजून आमी नापास..

In reply to by Bhakti

गवि 13/07/2024 - 14:28
आता हे कसं बरोबर जमलं? शाब्बास. - प्राध्यापक परखडकर * *तळटीप: एक डाव धोबीपछाड चित्रपटातील काल्पनिक पात्र. धोंडो भिकाजी जोशींसारखेच.

आमचाही एक प्रयत्न ! सोन्याच्या ताटात चांदीचे चमचे घास भरवते अनंत्या, थोबाड कर इकडे ! सोन्याची सायकल , तिला भरतो हवा | मी चाललो परगावा, राधिकाला जीव लावा.

पाऊसपाण्याचे दिवस वारा वाहे भरारा अंबानीच्या महालात निताबाय चा दरारा हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 13/07/2024 - 20:57
हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो
हे कहर आहे =)) थेट दृश्यच डोळयांसमोर आले ना, काय हे कर्नलसाहेब =))

विवाहाला हजर होते सगळे हॉलिवूड बॉलिवूड अंबानींचा थाट पाहुन जळले माझे संपादकीय बूड गिरीश कुबेर https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-dhanajirao-marriage-ceremony-amy-95-4478365/

"सिताच्या" पतीच्या नावाचा, देशभर गवगवा.. परी.. "नीताच्या" पतीचेच आहे इधर राज... अनंत माझ्या चरणांशी.. लक्ष्मी कुबेरा.. काही लागल्यास.. माझ्याकडे माग...

बाय द वे ..पु ल देशपांडे .. हे कट्टर समाजवादी होते .. म्हणजे "देशपांडे' असण्याचा माज दाखवण्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य समाजाचे निरीक्षण (विनोदी पद्धतीने ) लिहले ... त्यामुळे फ्यान असाल तर समाजवाद्यांना शिव्या देण्याआधी .. एकदा २ सेकंड थांबून बघा ..
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

( )129210... अङ्कानां वामतो गति।।

प्रसाद गोडबोले ·

डिक्शनरी डिक्शनरी = {"इंडेक्स" : "अर्ग्युमेंट", "०":"अनात्मवाद, इहवाद", "१":" एककल्ली एकेश्वरवाद", "२":"अनेकत्ववाद ", " ९":"विशिष्ठाद्वैतवाद ", "२":"द्वैतवाद", "१":"मायावाद, विवर्तवाद", " (ब्लँक स्पेस)" : "( )"}

In reply to by गवि

नाही नाही. १ दिसत जरी दोनदा असला तरी त्यांच्या स्थानात फरक आहे , पहिला १० आहे आणि दुसरा १,००,००० असा आहे. इंडेक्स स्वतंत्रच आहे. परंतु त्याने लेख अजुन जास्त कॉम्प्लिकेट करायला नको म्हणुन सहज सोप्पे लिहिले. बाकी दोही इंडेक्स ना असाईन केलेल्या अर्ग्युमेंट्स मध्ये फरक आहे !

In reply to by चित्रगुप्त

सगळी 'फिलॉसॉफी' अर्थशून्य/अनावश्यक
हरकत नाही. पहिलं ० शुन्य , एकक स्थानाचे शुन्य त्याविचाराचेच इंडेक्स आहे. तुम्हाला ते पटत असेल तर तिथं थांबा. ते पटेनासे झाले तर पुढील इंडेक्स वर या! जे कळेल जे पटेल जे सुलभ वाटेल तिथं थांबा ! सर्व स्वान्तःसुखाय आहे हे :) ( )१२९२१०

कांदा लिंबू 12/07/2024 - 10:04
तत्वज्ञान व एस्क्यूएल् सारखे विदासंच यांची सांगड घातलेली आवडली. --- मा पामराला आत्ताच comprehend होत नाहीय, पण चित्तचक्षुवेधक वाटत आहे. अजून विचार करून मग लिहीन. --- चर्चा वाचत आहे. वर गविंना पडलेला प्रश्न मलाही पडलाय, दिलेले उत्तर काही समजले नाही. --- अवांतर: प्रत्यक्ष जगातील नैसर्गिक वा मानवी माहिती / ज्ञान / अनुभव यांचा spectrum अमर्यादित आहे. कोणत्याही भाषेतील datatypes हे मर्यादित आहेत. म्हणून माहिती / ज्ञान / अनुभव हे विदासंचात साठवताना typecasting करावी लागते. त्यात मग ती माहिती / ज्ञान / अनुभव इत्यादींच्या काही छटा गळून पडतात.

In reply to by कांदा लिंबू

गवि 12/07/2024 - 10:22
चला. कोणाला तरी तशाच शंका पडल्या हे वाचून हुरूप आला. आता आणखी एक. नऊपर्यंतच समजेल, सिंगल डिजिट, ९९ डबल डिजिट वगैरे हे उदाहरणसुद्धा एका विशिष्ट गृहीतकावर आधारित आहे. हातांची बोटे, दशमान यात एक डिजिट, दोन डिजिट असे संभवते. समजा बायनरी आकलन आहे, तर एक किंवा शून्य. संपला विषय. समजा काही कारणाने माझ्या जगात हेक्झा डेसिमल बेस असेल तर पूर्ण वेगळे चित्र होईल. तेव्हा त्यात न जाता अन्य काही मांडणी हवी का? इतरही अनेक विचार मनात येतात. आणि हेच गोडबोल्यांचे यश. वास्तविक शून्य हेच सत्य आहे हे कळलेले असूनही अशा जगात पनोरमिक टूर अरेंज करून, भरपूर स्थलदर्शन करवून आणतो असे म्हणत म्हणत शेवटी त्याच शून्य जागी नेऊन पोचवणारा अध्यात्मिक केसरी टूर आयोजक. महाडांबिस मनुष्य. ;-)

In reply to by गवि

९ हे केवळ उदाहरण म्हणुन वापरलं आहे. लोकं परमेश्वराला अनंत / इन्फायनाईट म्हणतात पण हे विधान मॅथेमॅटिकली रिगरस नाही. ( मॅथेमॅटिकल रिगर : https://en.wikipedia.org/wiki/Rigour) कारण इनफिनिटी म्हणजे नक्की कोणती इनफिनिटी. इनफिनिटी काही एक नाही. अनेक आहेत . इनफायनाईट इन्फिनिटी आहेत . काही छोट्या इनफिनिटी आहेत काही मोठ्ठ्या इनफिनिटी आहेत. तस्मात इनफिनिटी हा शब्द वापरणे मला भोंगळ वाटले. पण ९ अंकाचे तसे नाही. तुम्ही एकक जाणणारे असलात तर ९ एकच आहे, आणि तो तुम्ही समजुन घेऊ शकता. its not incomprehensible. तेच दोन अंकी संख्यात गेलात तर ९९ होईल . तीन अंकी मध्ये ९९९ . RGB सिस्टीम मध्ये गेलात तर (255,255,255) , hexadecimal मध्ये FFFFFF. But you understand what I am trying to say here? It's "Everything" but It's not infinity ! शिवाय तसेही इन्डेक्स म्हणुन आपल्याला अंक वापरायचा आहे आणि इनफिनिटी हा अंक नाही, केवळ संकल्पना आहे. ज्याला इन्फिनिटी इन्फिनिटी असं म्हणत आहेत त्याचे प्रॉपर रिप्रेझेंटेशन ९ हे आहे. म्हणुनच कदाचित ९ ला संकृतसाहित्यात ब्रह्मसंख्या असे म्हणतात !
वास्तविक शून्य हेच सत्य आहे
तुम्ही स्टेपबाय स्टेप इन्डेक्स, लॉजिकल अर्ग्युमेंट्स सह फॉलो करत गेलात तर ते एकक स्थानातलं शुन्य आणि ( )१२९२१० ह्यातल्या १ लाखाच्या अलिकडे असलेलं शुन्य / ब्लँक स्पेस ह्या दोहोत फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल ! They are different ... And once you see it, you can not "un-see" it! ह्यालाच माऊली "अधिक देखणे तरी निरंजन पाहणे " असं म्हणतात ! किंव्वा अमृतानुभवात अजुन सुंदर उपमा देतात माऊली - शिवदर्शनाचा सोहळा !
येहवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा । भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥
काय बोलु , काय एक्स्प्लेन करणार , कसं करणार वर्णन !
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
:)

In reply to by कर्नलतपस्वी

.जर माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर माझा इन्डेक्स नंबर एक शुन्य बाजीराव.(चिं त्र्य खानोलकर).. ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग | तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग || कबीरदास.

In reply to by कर्नलतपस्वी

नमस्कार कर्नल सर , एक शून्य बाजीराव हे काय आहे मला माहीती नाही. माझ्या लेखात मी भारतीय अध्यात्मिक दर्शनशात्रात जे अद्वैत वेदान्त आहे (जे सांगते की तत्वमसि! ) त्याचे लॉजिकल प्रूफ लिहिण्याच्या प्रयत्न केला आहे. ()१२९२१० ह्यातील प्रत्येक संख्या माझ्या करिता एकेक तार्किक विधान आहे , आणि संस्कृत मध्ये अंक डावीकडुन मोजतात/ वाचतात. तस्मात ० अर्थात चार्वाकाचा नास्तिक निरिश्वरवाद पासुन एकेक विधान करत मागील विधान कसे अपुरे / असत्य आहे ह्याचे पुरावे देत देत शेवटी () अद्वैताचा अनुभव कसा घेता येईल ह्याची लाईन ऑफ अर्ग्युमेंट्स दिलेली आहे. बस्स. इतकेच. तुम्ही कबिराचा दोहा उधृत केला , पण त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे काही त्या दोह्यातुन कळत नाही , खुद्द कबीरच म्हणतोय की जाग सके तो जाग. मी माझ्या लेखात कसे जागता येईल ह्याची प्रोसेस लिहिली आहे. ह्या पेक्षा अजुन सोप्पं करुन मला तुर्तास तरी लिहिता येत नाहीये. जमेल तेव्हा प्रयत्न करेन च. कारण - Once you see it you can't unsee it . :) इत्यलम.

कंजूस 12/07/2024 - 11:00
रिकामी जागा वेगळी आणि 'शून्य' वेगळे. कारण 'तिथे काही नाही' हे स्पष्ट म्हणणे म्हणजे शून्य. रिकामी जागा म्हणजे तिथे आपण जाऊन पाहिलंच नाही की तिथे काय आहे. उदाहरणार्थ - पचमढीला किंवा माथेरानला आपण फिरत आहोत. वाटेत कुणीच नाही. प्रत्येक { व्ह्यू} पॉइंटला जाऊन पाहतो तो कसा आहे. पाहिल्यावर आपण म्हणतो १/२/३/.../९/१० आहे. पण एखाद्या ठिकाणी उतरून पाहून आलोच नाही तर () रिकामी जागा. Null . पण पाहून आल्यावर वाटतं की उगाच वेळ गेला ,नाही गेलो तर ठीक झालं असतं. म्हणजे 'शून्य'. आणखी एक शक्यता असते ती म्हणजे त्य वाटेने परत येणारे भेटतात व सांगतात की काही नाही पाहण्यासारखे. म्हणजे शून्याची आयती अनुभूती घेतली. आपला निर्णय होतो की जायचे नाही. शून्याचा अनुभव देणारे अगदी ऐन वेळेला भेटले तर ? नाही भेटले तर? थांबू नका. असाही वेळ वाया जाईलच.

In reply to by Bhakti

अंकप्रवास ९२१०१९० असा आहे
ग्रेट. प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळे. आपला आपण मार्ग चालायचा. आपले आपणच दीप व्हायचं. अत्त दीप भव! चरैवति चरैवाति!

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 27/07/2024 - 04:48
प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळे
प्रवास वेगळा understanding वेगळं हे ठीक पण गंतव्य कसे काय वेगळे? - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गंतव्य कसे काय वेगळे?
कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे. कित्येक जण नास्तिक मते मानणारे आहेत जे ० शुन्य वर थांबले आहेत. काही जण फक्त १ च मी म्हणतो तो देव खरा बाकी सब झुट ह्या मतावर ठाम आहेत ते आपण पाहतोच आसपास. कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी || असे म्हणणारे सावतामाळी हे पॅनथेईस्ट अर्थात ९ वर थांबले आहेत असे म्हणाता येईल. बाकी अनेक भारतीय भोळे भाबडे भाविक जे 'अनेक इश्वर असले तरी मुळात एक आहे' अन मी दुसरा ह्या द्वैतावर , २ वर थांब्ले आहेत. आमचे एक अत्यंत जवळचे मित्र सगळं वाचुन समजुन देखील शेवटी द्वैतच सत्य आहे , द्वैतच जास्त भावते असे मानणारे आहेत. बहुतांश भारतीय सम्प्रदाय इस्कॉन बिस्कॉन वगैरे ह्यात मोडतात. बाकी बहुतांश संत आणि विशेषकरुन मराठी संत अद्वैती आहेत ते १ , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणुन त्याच्याही परे गेले आहेत. मला स्वतःला अद्वैत जे मी ( ब्लँक स्पेस) ने इंडेक्स केले आहे ते भावते. तुकोबांच्या शब्दात -
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥ देखोनि न देखें प्रपंच दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥ तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तो सीण वाटतसे ॥४॥
आवड ज्याची त्याची ! म्हणुन म्हणालो , प्रत्येकाचे गंतव्य वेगळे !

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 28/07/2024 - 18:21
कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे.
मग तो थांबा होणार नाही का गंतव्याच्या मार्गावरचा? मोक्ष, निर्वाण, निब्बाण, जजमेंट डे, कयामत हे गंतव्य आहे, हे सर्व मनुष्यप्राण्यांसाठी सेमच असेल, वेगळे नाही. - (मार्गस्थ) सोकाजी

In reply to by सोत्रि

नाही, हे सत्य नाही. तुमच्या विचारसरणी नुसार तुमची मोक्षाची व्याख्या बदलते. द्वैत वाद , विशिष्ठडवैत , अद्वैत प्रत्येक धारणेत मोक्षाची व्याख्या वेगळी आहे. बौद्ध ज्याला निब्बान म्हणतात ते अजून तिसरे वेगळे आहे. मला मध्वाचार्य, रामानुज , शंकराचार्य आणि बौद्ध तिघेही त्यांच्या व्याख्यानेऊसर मोक्षाप्रत पोहचलेले वाटतात. मोक्ष हा एकच असू शकतो हा विचार एकांगी आहे. १.

नठ्यारा 24/07/2024 - 02:57
प्रगो, लेख रोचक आहे. पण आवर्तन कसं दाखवायचं तुमच्या इंडेक्सात? अनंतत्व ( = इन्फिनिटी ) म्हणजे काय हे आवर्तनाच्या सहाय्यानेच समजू शकते. ज्याला ब्रह्मसंख्या ९ म्हणतात ती आवर्तनाची शेवटची कडी आहे. त्याच्या पुढे १ आणि ० घेऊन १० लिहावे लागतात. षोडशमान पद्धतीत F नंतर १० लिहावे लागतात. अष्टमान पद्धतीत ७ नंतर १० येतात. दशमानात ९९ नंतर १०० लिहावे लागतात, तर षोडशमानात FF नंतर १०० येतात. अशा रीतीने पुढील आवर्तन सुरू होते एकंदरीत ब्रह्मसंख्या ही पहिल्या आवर्तनाची शेवटची कडी आहे. ती कुठे बसवायची? आ.न., -ना.न.

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 29/07/2024 - 18:29
पुनरपि जननं पुनरपि मरणं ही आवर्तनं आहेत. ती खंडणारा किंवा पुढील आवर्तन सुरू करणारा अंक ९, ९९, ९९९, .... , इत्यादि. बस इतकंच. षोडशमान पद्धतीत F, FF, FFF, .... , इत्यादि. अष्टमानात ७, ७७, ७७७, .... , इत्यादि. -नाठाळ नठ्या

सोत्रि 28/07/2024 - 18:16
हे स्वांतसुखाय आहे असं म्हटल्यामुळे माझं डिक्शनरीबद्दलचं मत माझ्या आकलनानुसार मांडतो. डिक्शनरी = {"इंडेक्स" : "अर्ग्युमेंट", "०":"अनात्मवाद", "१":"एकेश्वरवाद", " ९":"इतर्_सर्व_वाद"}
  1. सगळे ९ चे अवतार असल्याने २, दशम व त्यापुढील पटीतल्या ११, २२, किंव ९९ सगळे ९ ह्या इंडेक्समधे मांडता येतील.
  2. तुमच्या डिक्शनरीत इहवाद हा शून्य इंडेक्समधे आला होता. तोही ह्या ९ ह्या इंडेक्समधे मोडला आहे. इहवाद आणि अनात्मवाद एकदम वेगळे असल्याने ते एकाच इंडेक्समधे मांडता येणार नाहीत.
  3. काहीच स्थायी नसून सर्व अवकाश आहे हे अनात्मवादचं मूळ आहे त्यामुळे (ब्लँक स्पेस)" : "( ) हे ० इंडेक्समधेच मांडता येतंय/li>
- (मुमुक्षू) सोकाजी

स्वधर्म 30/07/2024 - 20:33
लहानपणी घरच्यांबरोबर बाबामहाराज वगैरे निरूपणकारांना ऐकायला गेलो आहे. ते एकेका ओवीवर दोन दोन तास रसाळ प्रवचन करत. घरच्यांना त्याविषयी अपार आदर वाटे. नंतर स्वामी चिन्मयानंद, नवीन दयानंद सरस्वती यांचे गीतेवरील ग्रंथ वाचून काही वेळ प्रभावित झालो होतो. सध्या असे वाटते, की संकल्पनांची वेगळीच मांडणी करून भाषेवरील प्रभुत्वाने काही तरी अगम्य कोणी बोलत असेल, तर तो त्यांचा खेळ किंवा छंद आहे. त्याचा सत्याशी संबंध आहे, या अंधश्रध्देतून बाहेर पडल्यामुळे मोकळे वाटते. बर्याच लोकांना आपल्यावर कोणत्या संकल्पनांचं जोखड आहे याच पत्ताच नसतो, पण चालायचंच. टीप: समजा एका कारखान्यात मोजपट्ट्या बनवत आहेत आणि आपल्याला त्या किती अचूक आहेत हे मोजायचे आहे. तर त्याच कारखान्यातल्या दुसर्या मोजपट्टीने अचूकता मोजता येत नसते. त्यासाठी व्हर्निअर कॅलिपरसारखे मूलत: वेगळे व अधिक अचूक उपकरण लागते. मानवी जीवनाचे उद्दिष्ट, सार्थकता, कारण, पुढे काय होते इ. मानवाला मोजता येणार नाही असे वाटते. तळटीप: यामुळे आता मला कोणत्यातरी गट क्रमांकात ढकलण्यात येईल पण त्याचा मला किंवा कुणालाच कसलाही फरक पडणार नाही, हे आधीच नोंदवून ठेवतो.

In reply to by स्वधर्म

आता मला कोणत्यातरी गट क्रमांकात ढकलण्यात येईल पण त्याचा मला किंवा कुणालाच कसलाही फरक पडणार नाही
कोणत्याही गटात कधीही कोणाला ढकलता येत नसतं , गट क्रमांक तुमच्या जन्मापासुनच्या संस्कारांन्नी निर्धारित होत असतात. ज्यांनी स्वामी चिनमयानंद आणि तशाच लोकांकडुन खरेच काहीतरी अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास केला असेल , श्रीमदाद्य शंकराचार्य ह्यांन्नी केलेले बौध्द मत खंडन , द्वैत , शाक्त , शैव , मीमांसक , द्वैतवाद आदि अन्य मतांचे केलेले खंडन वाचले असेल त्यांन्ना वरील लेखात उधृत केलेली विचारसरणी स्टेप बाय स्टेप लॉजिकल अर्ग्युमेंट्स आहेत आणि ते लक्षात रहावेत म्हणुन त्यांन्ना ()१२९२१० हे इंडेक्सिंग केलेले आहे हे नक्कीच लक्षात येईल . ज्याच्या लक्षात येईल त्याचा येईल ! "जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती अंधश्रध्दा , संकल्पनांचे जोखड वगैरे वगैरे" ही कोणत्या गटाची विचारसरणी आहे हे तुमचे तुम्हालाही जाणवत असेलच ! मला तुम्हाला कोणत्या गटात ढकलण्याची गरजच नाही. तुम्ही ऑलरेडीच तिथे आहात ! आणि तुम्ही मला उपरोधिक टीकात्मक बोलत असलात तरी ह्या लेखाच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा गट कोणता हे लक्षात येत आहे ह्यातच मला समाधान आहे ! मला अभ्यास करताना एकदा ऐकण्यात आले होते की ढोबळमानाने की महायान आणि थेरवाद बौध्द मतात एक मोठ्ठा फरक आहे तो म्हणजे - महायान म्हणतो की एकदा आपल्याला आपलं मुळस्वरुप लक्षात आलं की बाकी सगळं शुन्यच आहे तस्मात आपल्याला काहीच करायची गरज नाही , एकदा आपण बुध्दत्वाला पोहचलो की बस. आणि थेरवाद मतात - आपण सर्वच बुध्दत्वाला प्राप्त होत नाही तोवर धर्मचक्र परिवर्तन चालु राहिले पाहिजे कारण प्रत्येकाचे निर्वाण महत्वाचे आहे, केवळ आपले निर्वाण साधुन पुरेसे नाही. म्हणुन त्यामध्ये बोधीसत्व ही कन्सेप्ट आहे . किंव्वा व्हाईस-अ-वर्सा. मी काही ह्यातील एक्क्ष्पर्ट नाही. पण हे जरं असं असेल तर मला स्वतःला महायान विचारधारा भावते. मला कोणाला काहीही शिकवण्यात रस नाही. लेखन करणे हा माझा छंदच आहे. Now you understand what do I mean by - "हे सगळं स्वांन्तःसुखाय आहे. " तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।। मनःपुर्वक धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/07/2024 - 04:14
गुरुदेव, तुकाराम महाराजांच्या वेदांचा तो अर्थ| आंम्हासीच ठावा| येरांनी व्हावा| भार माथा|| या ओवीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. बाकी आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे गंध उभे लावावे की आडवे यावरही आपल्याकडे एका गाढवावरुन जाणार नाहीत, इतके ग्रंथ आहेत, पण त्यांचा काय उपयोग? असे म्हटलेच होते. त्यामुळे थांबावे, हे ठीक. हिमालयातल्या गुरुजींनी म्हटलेच होते, की त्यांना कळायला वीस वर्षे लागली पण तुमची गोष्टच वेगळी! हजारांत एखाद्याला असतो, तेवढा आत्मविश्वास तुंम्नेहाला आहे, त्यांचे नेहमीच कौतुक वाटते. त्याबद्दल अभिनंदन. टीप: मी पण उपहासाने नाही म्हणत. तळटीप: मागच्या तळटीपेचा उपयोग झाला नाही, पण तुंम्ही गट गट खेळायला माझी कसलीच हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

पर्फेक्ट ! बाकी काही नसेल पण गट १ आणि २, आणि त्यांची विचारसरणी ही मी केलेली मांडणी तुम्हाला आता व्यवस्थित कळते हे पाहुन मला समाधान झाले. किमान एक तरी विचार तुमच्या पर्यंत पोहचला ह्यातच मला आनंद आहे ! बाकी कसल्याच तळटीपांचा मला आता उपयोगच होत नाही आता . यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके। तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।। त्यामुळे मी आता फक्त खेळतच आहे ! मनःपुर्वक धन्यवाद ! :) अवांतर : बाकी आगरकरांचे सोडुन द्या , शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांचे पुर्ण नावही माहीत नसेल कोणाला. =)))) आगरकर, साने आणि भावे ह्यां तिघांच्यात टफ कॉम्पिटिशन आहे भाऊ =))))

In reply to by स्वधर्म

कॉमी 30/07/2024 - 23:02
सध्या असे वाटते, की संकल्पनांची वेगळीच मांडणी करून भाषेवरील प्रभुत्वाने काही तरी अगम्य कोणी बोलत असेल, तर तो त्यांचा खेळ किंवा छंद आहे. त्याचा सत्याशी संबंध आहे, या अंधश्रध्देतून बाहेर पडल्यामुळे मोकळे वाटते. बर्याच लोकांना आपल्यावर कोणत्या संकल्पनांचं जोखड आहे याच पत्ताच नसतो
असेच वाटते.

In reply to by कॉमी

असेच वाटते.
पर्फेक्ट ! धन्यवाद कॉमी. तुम्ही लेखातील किंव्वा त्यावरील अन्य प्रतिसादातील कशावरही काहीही प्रतिसाद न देता न चुकता गट. क्रमांक. २ मधील लोकांचा जो विचार असेल असे ज्या प्रतिसादातुन स्पष्ट जाणवते त्यावरच प्रतिसाद दिलात. तुमचं "असेच वाटतं" असे म्हणणे ह्याचा अर्थच "माझा मेंदुही अशाच प्रकारे विचार करतो" असा आहे ! आणि माणसांचे विचार हे जन्मापासुन झालेल्या संस्कारांनी ठरत असल्याने जन्मापासुनच तुमचा गट निश्चित होत जातो, (गट बदलता येत नाहीच अशातला भाग नाही , पण गट बदलणे वाढत्या वयाबरोबर दुरापास्त होत जाते. ) मी वरच म्हणलो त्याप्रमाणे - कोणी कोणाला कोणत्याही गटात ढकलु शकत नाही, आपला गट हा आपल्या जन्मापासुन आपल्यावर झालेल्या संस्कारांमधुन आपोआप ठरत असतो. आपला गट कोणता हे ज्याने त्याने आपले आपण समजुन घ्यायचे असते . Its a process of self discovery. मला मनापासुन आनंद आहे की मी तुमचा गट क्र. २ अगदी व्यवस्थित ओळखला आहे ! आणि हा एक प्रकारे पुरावाच आहे की मला माझा गट क्र.१ व्यवस्थित कळालेला आहे ! बाकी तुम्हाला अजुन काही वाटत असल्यास आवर्जुन सांगा. This is actually very very helpful. (No sarcasm intended at all.) मनःपुर्वक धन्यवाद !

कॉमी 31/07/2024 - 19:51
विश्व आहे हाच पुरावा आहे कोणीतरी विश्वकर्मा अर्थात निर्माता असल्याचा. तस्मात् एक देव आहे. शिव. बस १.
जर प्रत्येक गोष्टीचा त्या गोष्टीपेक्षा वेगळा निर्माता असतो हे गृहितक मानले तर कोणतेही special pleading न करता विश्वानिर्मात्याचा निर्माता कोण हा प्रश्न उभा राहतो.

In reply to by कॉमी

नठ्यारा 31/07/2024 - 20:16
कॉमी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विश्वनिर्मात्याचा कोणीतरी निर्माता असणारंच. अशा परमनिर्मात्यास स्वयंसिद्ध, अपौरुषेय, इत्यादि विशेषणे लावली जातात. तो दिसंत नाही, पण त्याच्यामुळे डोळे पाहू शकतात. त्याचा आवाज येत नाही, पण कान त्याच्यामुळे आवाज ऐकू शकतात. वगैरे वगैरे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by कॉमी

नठ्यारा 01/08/2024 - 17:55
कॉमी, स्वप्न खरं की जागृतावस्था खरी? स्वप्न खरं धरलं तर त्याचा निर्माता कोण? स्वप्न स्वयंसिद्ध आहे का? स्वप्न पडतांना तर ते स्वयंसिद्धच वाटंत असतं. पण जागृतीमुळे त्याला बाधा येते. उद्या जागृतावास्थेसही कशावरून इतर काही अवस्थेची बाधा होणार नाही? आ.न., -ना.न.

In reply to by नठ्यारा

कॉमी 01/08/2024 - 19:37
स्वप्नावस्था केवळ आपल्या मेंदूत असते. आता तिला खरे म्हणायचे कीं खोटे हे तुमच्या शब्दकोशात खरे म्हणजे काय ह्यावर अवलंबुन आहे. हा. पण "मुंबईत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान आहे" हे जितके खरे आहे तितके खरे स्वप्नात काही नसते. आपण ज्या अर्थे खरे किंवा खोटे हे शब्द जनरली वापरतो त्या प्रमाणे स्वप्न खोटी असतात.

कॉमी 01/08/2024 - 06:52
आणि मग जर हा एक निर्माता बाजूला केला की जे उरते, ते जे की निर्माता नाही, ते झालं निर्माणसाहित्य. म्हणजे शक्ती. शिव नाही ते शक्ति. शिव आहे तसेच शक्तीही आहे. शिव आणि शक्ति
हे केवळ रुपकात्मक, कवितेचे मटेरियल वाटते. ह्याचा खरोखर सत्याशी काही संबंध आहे असे वाटतं नाही. बाकी उर्वरित विचारांबाबत. शिव शक्ती हि द्वयी घेऊन शेवटी सगळीकडे चेतना असण्याची शक्यता असल्याने सगळे शिव आहे हे वाचायला छान आहे, विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे. लेखनाचा फ्लो छान आहे. पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते. सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.

In reply to by कॉमी

सोत्रि 01/08/2024 - 12:00
पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते.
सहमत, शाब्दिक पातळीवर कितिही चर्चा केली तर ती शब्दबंबाळच होणार.
सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.
त्याचे ज्ञान होणे शक्य आहे. ध्यानमार्गाचा अवलंब केल्यास ते शक्य आहे हे ध्यानमार्गाच्या स्वानभुवावरून सांगू शकतो. - (ध्यानमार्गी) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 01/08/2024 - 19:32
पण माझा तो प्रश्न नाही. तसे ज्ञान झाल्याने सुद्धा काय फरक पडतो? म्हणजे मी ऑलरेडी मानतो कीं सगळे प्राणी कार्बन बेसड लाईफ फॉर्म आहेत. पण म्हणून काय मी सगळे कार्बन बेस्ड लाईफ फॉर्म हे एकच आहेत असे म्हणायला जातं नाही. कोंबडी आणि माणूस हे एकच होष्टीचे बनले असले तरी भिन्न entity आहेत. Made of the same stuff आणि non dual ह्या भिन्न कल्पना आहेत.

In reply to by कॉमी

गवि 01/08/2024 - 20:31
विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे.
एवढेच महत्वाचे आहे कारण आपण फक्त विचारच करू शकतो या विषयावर. सुरुवात, शेवट , निर्मिती करणारे कोणीतरी, बाऊंडरी वगैरे असलीच पाहिजे ही आपल्या विचारांची मर्यादा आहे. कारण आपण सुरुवात आणि शेवट असलेले आहोत. कुंपणे असलेले आहोत. आपण या खेरीज कल्पनाच करू शकत नाही. कोणीतरी ईषणा केल्याशिवाय काहीतरी "अस्तित्वात" येऊच शकत नाही अशी घट्ट समजूत ही आपल्या मर्यादित परीघाची देणगी. आणि तो तोडून आपण जगू शकणार नाही.

डिक्शनरी डिक्शनरी = {"इंडेक्स" : "अर्ग्युमेंट", "०":"अनात्मवाद, इहवाद", "१":" एककल्ली एकेश्वरवाद", "२":"अनेकत्ववाद ", " ९":"विशिष्ठाद्वैतवाद ", "२":"द्वैतवाद", "१":"मायावाद, विवर्तवाद", " (ब्लँक स्पेस)" : "( )"}

In reply to by गवि

नाही नाही. १ दिसत जरी दोनदा असला तरी त्यांच्या स्थानात फरक आहे , पहिला १० आहे आणि दुसरा १,००,००० असा आहे. इंडेक्स स्वतंत्रच आहे. परंतु त्याने लेख अजुन जास्त कॉम्प्लिकेट करायला नको म्हणुन सहज सोप्पे लिहिले. बाकी दोही इंडेक्स ना असाईन केलेल्या अर्ग्युमेंट्स मध्ये फरक आहे !

In reply to by चित्रगुप्त

सगळी 'फिलॉसॉफी' अर्थशून्य/अनावश्यक
हरकत नाही. पहिलं ० शुन्य , एकक स्थानाचे शुन्य त्याविचाराचेच इंडेक्स आहे. तुम्हाला ते पटत असेल तर तिथं थांबा. ते पटेनासे झाले तर पुढील इंडेक्स वर या! जे कळेल जे पटेल जे सुलभ वाटेल तिथं थांबा ! सर्व स्वान्तःसुखाय आहे हे :) ( )१२९२१०

कांदा लिंबू 12/07/2024 - 10:04
तत्वज्ञान व एस्क्यूएल् सारखे विदासंच यांची सांगड घातलेली आवडली. --- मा पामराला आत्ताच comprehend होत नाहीय, पण चित्तचक्षुवेधक वाटत आहे. अजून विचार करून मग लिहीन. --- चर्चा वाचत आहे. वर गविंना पडलेला प्रश्न मलाही पडलाय, दिलेले उत्तर काही समजले नाही. --- अवांतर: प्रत्यक्ष जगातील नैसर्गिक वा मानवी माहिती / ज्ञान / अनुभव यांचा spectrum अमर्यादित आहे. कोणत्याही भाषेतील datatypes हे मर्यादित आहेत. म्हणून माहिती / ज्ञान / अनुभव हे विदासंचात साठवताना typecasting करावी लागते. त्यात मग ती माहिती / ज्ञान / अनुभव इत्यादींच्या काही छटा गळून पडतात.

In reply to by कांदा लिंबू

गवि 12/07/2024 - 10:22
चला. कोणाला तरी तशाच शंका पडल्या हे वाचून हुरूप आला. आता आणखी एक. नऊपर्यंतच समजेल, सिंगल डिजिट, ९९ डबल डिजिट वगैरे हे उदाहरणसुद्धा एका विशिष्ट गृहीतकावर आधारित आहे. हातांची बोटे, दशमान यात एक डिजिट, दोन डिजिट असे संभवते. समजा बायनरी आकलन आहे, तर एक किंवा शून्य. संपला विषय. समजा काही कारणाने माझ्या जगात हेक्झा डेसिमल बेस असेल तर पूर्ण वेगळे चित्र होईल. तेव्हा त्यात न जाता अन्य काही मांडणी हवी का? इतरही अनेक विचार मनात येतात. आणि हेच गोडबोल्यांचे यश. वास्तविक शून्य हेच सत्य आहे हे कळलेले असूनही अशा जगात पनोरमिक टूर अरेंज करून, भरपूर स्थलदर्शन करवून आणतो असे म्हणत म्हणत शेवटी त्याच शून्य जागी नेऊन पोचवणारा अध्यात्मिक केसरी टूर आयोजक. महाडांबिस मनुष्य. ;-)

In reply to by गवि

९ हे केवळ उदाहरण म्हणुन वापरलं आहे. लोकं परमेश्वराला अनंत / इन्फायनाईट म्हणतात पण हे विधान मॅथेमॅटिकली रिगरस नाही. ( मॅथेमॅटिकल रिगर : https://en.wikipedia.org/wiki/Rigour) कारण इनफिनिटी म्हणजे नक्की कोणती इनफिनिटी. इनफिनिटी काही एक नाही. अनेक आहेत . इनफायनाईट इन्फिनिटी आहेत . काही छोट्या इनफिनिटी आहेत काही मोठ्ठ्या इनफिनिटी आहेत. तस्मात इनफिनिटी हा शब्द वापरणे मला भोंगळ वाटले. पण ९ अंकाचे तसे नाही. तुम्ही एकक जाणणारे असलात तर ९ एकच आहे, आणि तो तुम्ही समजुन घेऊ शकता. its not incomprehensible. तेच दोन अंकी संख्यात गेलात तर ९९ होईल . तीन अंकी मध्ये ९९९ . RGB सिस्टीम मध्ये गेलात तर (255,255,255) , hexadecimal मध्ये FFFFFF. But you understand what I am trying to say here? It's "Everything" but It's not infinity ! शिवाय तसेही इन्डेक्स म्हणुन आपल्याला अंक वापरायचा आहे आणि इनफिनिटी हा अंक नाही, केवळ संकल्पना आहे. ज्याला इन्फिनिटी इन्फिनिटी असं म्हणत आहेत त्याचे प्रॉपर रिप्रेझेंटेशन ९ हे आहे. म्हणुनच कदाचित ९ ला संकृतसाहित्यात ब्रह्मसंख्या असे म्हणतात !
वास्तविक शून्य हेच सत्य आहे
तुम्ही स्टेपबाय स्टेप इन्डेक्स, लॉजिकल अर्ग्युमेंट्स सह फॉलो करत गेलात तर ते एकक स्थानातलं शुन्य आणि ( )१२९२१० ह्यातल्या १ लाखाच्या अलिकडे असलेलं शुन्य / ब्लँक स्पेस ह्या दोहोत फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल ! They are different ... And once you see it, you can not "un-see" it! ह्यालाच माऊली "अधिक देखणे तरी निरंजन पाहणे " असं म्हणतात ! किंव्वा अमृतानुभवात अजुन सुंदर उपमा देतात माऊली - शिवदर्शनाचा सोहळा !
येहवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा । भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥
काय बोलु , काय एक्स्प्लेन करणार , कसं करणार वर्णन !
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
:)

In reply to by कर्नलतपस्वी

.जर माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर माझा इन्डेक्स नंबर एक शुन्य बाजीराव.(चिं त्र्य खानोलकर).. ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग | तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग || कबीरदास.

In reply to by कर्नलतपस्वी

नमस्कार कर्नल सर , एक शून्य बाजीराव हे काय आहे मला माहीती नाही. माझ्या लेखात मी भारतीय अध्यात्मिक दर्शनशात्रात जे अद्वैत वेदान्त आहे (जे सांगते की तत्वमसि! ) त्याचे लॉजिकल प्रूफ लिहिण्याच्या प्रयत्न केला आहे. ()१२९२१० ह्यातील प्रत्येक संख्या माझ्या करिता एकेक तार्किक विधान आहे , आणि संस्कृत मध्ये अंक डावीकडुन मोजतात/ वाचतात. तस्मात ० अर्थात चार्वाकाचा नास्तिक निरिश्वरवाद पासुन एकेक विधान करत मागील विधान कसे अपुरे / असत्य आहे ह्याचे पुरावे देत देत शेवटी () अद्वैताचा अनुभव कसा घेता येईल ह्याची लाईन ऑफ अर्ग्युमेंट्स दिलेली आहे. बस्स. इतकेच. तुम्ही कबिराचा दोहा उधृत केला , पण त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे काही त्या दोह्यातुन कळत नाही , खुद्द कबीरच म्हणतोय की जाग सके तो जाग. मी माझ्या लेखात कसे जागता येईल ह्याची प्रोसेस लिहिली आहे. ह्या पेक्षा अजुन सोप्पं करुन मला तुर्तास तरी लिहिता येत नाहीये. जमेल तेव्हा प्रयत्न करेन च. कारण - Once you see it you can't unsee it . :) इत्यलम.

कंजूस 12/07/2024 - 11:00
रिकामी जागा वेगळी आणि 'शून्य' वेगळे. कारण 'तिथे काही नाही' हे स्पष्ट म्हणणे म्हणजे शून्य. रिकामी जागा म्हणजे तिथे आपण जाऊन पाहिलंच नाही की तिथे काय आहे. उदाहरणार्थ - पचमढीला किंवा माथेरानला आपण फिरत आहोत. वाटेत कुणीच नाही. प्रत्येक { व्ह्यू} पॉइंटला जाऊन पाहतो तो कसा आहे. पाहिल्यावर आपण म्हणतो १/२/३/.../९/१० आहे. पण एखाद्या ठिकाणी उतरून पाहून आलोच नाही तर () रिकामी जागा. Null . पण पाहून आल्यावर वाटतं की उगाच वेळ गेला ,नाही गेलो तर ठीक झालं असतं. म्हणजे 'शून्य'. आणखी एक शक्यता असते ती म्हणजे त्य वाटेने परत येणारे भेटतात व सांगतात की काही नाही पाहण्यासारखे. म्हणजे शून्याची आयती अनुभूती घेतली. आपला निर्णय होतो की जायचे नाही. शून्याचा अनुभव देणारे अगदी ऐन वेळेला भेटले तर ? नाही भेटले तर? थांबू नका. असाही वेळ वाया जाईलच.

In reply to by Bhakti

अंकप्रवास ९२१०१९० असा आहे
ग्रेट. प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळे. आपला आपण मार्ग चालायचा. आपले आपणच दीप व्हायचं. अत्त दीप भव! चरैवति चरैवाति!

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 27/07/2024 - 04:48
प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळे
प्रवास वेगळा understanding वेगळं हे ठीक पण गंतव्य कसे काय वेगळे? - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by सोत्रि

गंतव्य कसे काय वेगळे?
कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे. कित्येक जण नास्तिक मते मानणारे आहेत जे ० शुन्य वर थांबले आहेत. काही जण फक्त १ च मी म्हणतो तो देव खरा बाकी सब झुट ह्या मतावर ठाम आहेत ते आपण पाहतोच आसपास. कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी || असे म्हणणारे सावतामाळी हे पॅनथेईस्ट अर्थात ९ वर थांबले आहेत असे म्हणाता येईल. बाकी अनेक भारतीय भोळे भाबडे भाविक जे 'अनेक इश्वर असले तरी मुळात एक आहे' अन मी दुसरा ह्या द्वैतावर , २ वर थांब्ले आहेत. आमचे एक अत्यंत जवळचे मित्र सगळं वाचुन समजुन देखील शेवटी द्वैतच सत्य आहे , द्वैतच जास्त भावते असे मानणारे आहेत. बहुतांश भारतीय सम्प्रदाय इस्कॉन बिस्कॉन वगैरे ह्यात मोडतात. बाकी बहुतांश संत आणि विशेषकरुन मराठी संत अद्वैती आहेत ते १ , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणुन त्याच्याही परे गेले आहेत. मला स्वतःला अद्वैत जे मी ( ब्लँक स्पेस) ने इंडेक्स केले आहे ते भावते. तुकोबांच्या शब्दात -
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥ देखोनि न देखें प्रपंच दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥ तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तो सीण वाटतसे ॥४॥
आवड ज्याची त्याची ! म्हणुन म्हणालो , प्रत्येकाचे गंतव्य वेगळे !

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 28/07/2024 - 18:21
कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे.
मग तो थांबा होणार नाही का गंतव्याच्या मार्गावरचा? मोक्ष, निर्वाण, निब्बाण, जजमेंट डे, कयामत हे गंतव्य आहे, हे सर्व मनुष्यप्राण्यांसाठी सेमच असेल, वेगळे नाही. - (मार्गस्थ) सोकाजी

In reply to by सोत्रि

नाही, हे सत्य नाही. तुमच्या विचारसरणी नुसार तुमची मोक्षाची व्याख्या बदलते. द्वैत वाद , विशिष्ठडवैत , अद्वैत प्रत्येक धारणेत मोक्षाची व्याख्या वेगळी आहे. बौद्ध ज्याला निब्बान म्हणतात ते अजून तिसरे वेगळे आहे. मला मध्वाचार्य, रामानुज , शंकराचार्य आणि बौद्ध तिघेही त्यांच्या व्याख्यानेऊसर मोक्षाप्रत पोहचलेले वाटतात. मोक्ष हा एकच असू शकतो हा विचार एकांगी आहे. १.

नठ्यारा 24/07/2024 - 02:57
प्रगो, लेख रोचक आहे. पण आवर्तन कसं दाखवायचं तुमच्या इंडेक्सात? अनंतत्व ( = इन्फिनिटी ) म्हणजे काय हे आवर्तनाच्या सहाय्यानेच समजू शकते. ज्याला ब्रह्मसंख्या ९ म्हणतात ती आवर्तनाची शेवटची कडी आहे. त्याच्या पुढे १ आणि ० घेऊन १० लिहावे लागतात. षोडशमान पद्धतीत F नंतर १० लिहावे लागतात. अष्टमान पद्धतीत ७ नंतर १० येतात. दशमानात ९९ नंतर १०० लिहावे लागतात, तर षोडशमानात FF नंतर १०० येतात. अशा रीतीने पुढील आवर्तन सुरू होते एकंदरीत ब्रह्मसंख्या ही पहिल्या आवर्तनाची शेवटची कडी आहे. ती कुठे बसवायची? आ.न., -ना.न.

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 29/07/2024 - 18:29
पुनरपि जननं पुनरपि मरणं ही आवर्तनं आहेत. ती खंडणारा किंवा पुढील आवर्तन सुरू करणारा अंक ९, ९९, ९९९, .... , इत्यादि. बस इतकंच. षोडशमान पद्धतीत F, FF, FFF, .... , इत्यादि. अष्टमानात ७, ७७, ७७७, .... , इत्यादि. -नाठाळ नठ्या

सोत्रि 28/07/2024 - 18:16
हे स्वांतसुखाय आहे असं म्हटल्यामुळे माझं डिक्शनरीबद्दलचं मत माझ्या आकलनानुसार मांडतो. डिक्शनरी = {"इंडेक्स" : "अर्ग्युमेंट", "०":"अनात्मवाद", "१":"एकेश्वरवाद", " ९":"इतर्_सर्व_वाद"}
  1. सगळे ९ चे अवतार असल्याने २, दशम व त्यापुढील पटीतल्या ११, २२, किंव ९९ सगळे ९ ह्या इंडेक्समधे मांडता येतील.
  2. तुमच्या डिक्शनरीत इहवाद हा शून्य इंडेक्समधे आला होता. तोही ह्या ९ ह्या इंडेक्समधे मोडला आहे. इहवाद आणि अनात्मवाद एकदम वेगळे असल्याने ते एकाच इंडेक्समधे मांडता येणार नाहीत.
  3. काहीच स्थायी नसून सर्व अवकाश आहे हे अनात्मवादचं मूळ आहे त्यामुळे (ब्लँक स्पेस)" : "( ) हे ० इंडेक्समधेच मांडता येतंय/li>
- (मुमुक्षू) सोकाजी

स्वधर्म 30/07/2024 - 20:33
लहानपणी घरच्यांबरोबर बाबामहाराज वगैरे निरूपणकारांना ऐकायला गेलो आहे. ते एकेका ओवीवर दोन दोन तास रसाळ प्रवचन करत. घरच्यांना त्याविषयी अपार आदर वाटे. नंतर स्वामी चिन्मयानंद, नवीन दयानंद सरस्वती यांचे गीतेवरील ग्रंथ वाचून काही वेळ प्रभावित झालो होतो. सध्या असे वाटते, की संकल्पनांची वेगळीच मांडणी करून भाषेवरील प्रभुत्वाने काही तरी अगम्य कोणी बोलत असेल, तर तो त्यांचा खेळ किंवा छंद आहे. त्याचा सत्याशी संबंध आहे, या अंधश्रध्देतून बाहेर पडल्यामुळे मोकळे वाटते. बर्याच लोकांना आपल्यावर कोणत्या संकल्पनांचं जोखड आहे याच पत्ताच नसतो, पण चालायचंच. टीप: समजा एका कारखान्यात मोजपट्ट्या बनवत आहेत आणि आपल्याला त्या किती अचूक आहेत हे मोजायचे आहे. तर त्याच कारखान्यातल्या दुसर्या मोजपट्टीने अचूकता मोजता येत नसते. त्यासाठी व्हर्निअर कॅलिपरसारखे मूलत: वेगळे व अधिक अचूक उपकरण लागते. मानवी जीवनाचे उद्दिष्ट, सार्थकता, कारण, पुढे काय होते इ. मानवाला मोजता येणार नाही असे वाटते. तळटीप: यामुळे आता मला कोणत्यातरी गट क्रमांकात ढकलण्यात येईल पण त्याचा मला किंवा कुणालाच कसलाही फरक पडणार नाही, हे आधीच नोंदवून ठेवतो.

In reply to by स्वधर्म

आता मला कोणत्यातरी गट क्रमांकात ढकलण्यात येईल पण त्याचा मला किंवा कुणालाच कसलाही फरक पडणार नाही
कोणत्याही गटात कधीही कोणाला ढकलता येत नसतं , गट क्रमांक तुमच्या जन्मापासुनच्या संस्कारांन्नी निर्धारित होत असतात. ज्यांनी स्वामी चिनमयानंद आणि तशाच लोकांकडुन खरेच काहीतरी अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास केला असेल , श्रीमदाद्य शंकराचार्य ह्यांन्नी केलेले बौध्द मत खंडन , द्वैत , शाक्त , शैव , मीमांसक , द्वैतवाद आदि अन्य मतांचे केलेले खंडन वाचले असेल त्यांन्ना वरील लेखात उधृत केलेली विचारसरणी स्टेप बाय स्टेप लॉजिकल अर्ग्युमेंट्स आहेत आणि ते लक्षात रहावेत म्हणुन त्यांन्ना ()१२९२१० हे इंडेक्सिंग केलेले आहे हे नक्कीच लक्षात येईल . ज्याच्या लक्षात येईल त्याचा येईल ! "जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती अंधश्रध्दा , संकल्पनांचे जोखड वगैरे वगैरे" ही कोणत्या गटाची विचारसरणी आहे हे तुमचे तुम्हालाही जाणवत असेलच ! मला तुम्हाला कोणत्या गटात ढकलण्याची गरजच नाही. तुम्ही ऑलरेडीच तिथे आहात ! आणि तुम्ही मला उपरोधिक टीकात्मक बोलत असलात तरी ह्या लेखाच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा गट कोणता हे लक्षात येत आहे ह्यातच मला समाधान आहे ! मला अभ्यास करताना एकदा ऐकण्यात आले होते की ढोबळमानाने की महायान आणि थेरवाद बौध्द मतात एक मोठ्ठा फरक आहे तो म्हणजे - महायान म्हणतो की एकदा आपल्याला आपलं मुळस्वरुप लक्षात आलं की बाकी सगळं शुन्यच आहे तस्मात आपल्याला काहीच करायची गरज नाही , एकदा आपण बुध्दत्वाला पोहचलो की बस. आणि थेरवाद मतात - आपण सर्वच बुध्दत्वाला प्राप्त होत नाही तोवर धर्मचक्र परिवर्तन चालु राहिले पाहिजे कारण प्रत्येकाचे निर्वाण महत्वाचे आहे, केवळ आपले निर्वाण साधुन पुरेसे नाही. म्हणुन त्यामध्ये बोधीसत्व ही कन्सेप्ट आहे . किंव्वा व्हाईस-अ-वर्सा. मी काही ह्यातील एक्क्ष्पर्ट नाही. पण हे जरं असं असेल तर मला स्वतःला महायान विचारधारा भावते. मला कोणाला काहीही शिकवण्यात रस नाही. लेखन करणे हा माझा छंदच आहे. Now you understand what do I mean by - "हे सगळं स्वांन्तःसुखाय आहे. " तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।। मनःपुर्वक धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/07/2024 - 04:14
गुरुदेव, तुकाराम महाराजांच्या वेदांचा तो अर्थ| आंम्हासीच ठावा| येरांनी व्हावा| भार माथा|| या ओवीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. बाकी आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे गंध उभे लावावे की आडवे यावरही आपल्याकडे एका गाढवावरुन जाणार नाहीत, इतके ग्रंथ आहेत, पण त्यांचा काय उपयोग? असे म्हटलेच होते. त्यामुळे थांबावे, हे ठीक. हिमालयातल्या गुरुजींनी म्हटलेच होते, की त्यांना कळायला वीस वर्षे लागली पण तुमची गोष्टच वेगळी! हजारांत एखाद्याला असतो, तेवढा आत्मविश्वास तुंम्नेहाला आहे, त्यांचे नेहमीच कौतुक वाटते. त्याबद्दल अभिनंदन. टीप: मी पण उपहासाने नाही म्हणत. तळटीप: मागच्या तळटीपेचा उपयोग झाला नाही, पण तुंम्ही गट गट खेळायला माझी कसलीच हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

पर्फेक्ट ! बाकी काही नसेल पण गट १ आणि २, आणि त्यांची विचारसरणी ही मी केलेली मांडणी तुम्हाला आता व्यवस्थित कळते हे पाहुन मला समाधान झाले. किमान एक तरी विचार तुमच्या पर्यंत पोहचला ह्यातच मला आनंद आहे ! बाकी कसल्याच तळटीपांचा मला आता उपयोगच होत नाही आता . यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके। तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।। त्यामुळे मी आता फक्त खेळतच आहे ! मनःपुर्वक धन्यवाद ! :) अवांतर : बाकी आगरकरांचे सोडुन द्या , शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांचे पुर्ण नावही माहीत नसेल कोणाला. =)))) आगरकर, साने आणि भावे ह्यां तिघांच्यात टफ कॉम्पिटिशन आहे भाऊ =))))

In reply to by स्वधर्म

कॉमी 30/07/2024 - 23:02
सध्या असे वाटते, की संकल्पनांची वेगळीच मांडणी करून भाषेवरील प्रभुत्वाने काही तरी अगम्य कोणी बोलत असेल, तर तो त्यांचा खेळ किंवा छंद आहे. त्याचा सत्याशी संबंध आहे, या अंधश्रध्देतून बाहेर पडल्यामुळे मोकळे वाटते. बर्याच लोकांना आपल्यावर कोणत्या संकल्पनांचं जोखड आहे याच पत्ताच नसतो
असेच वाटते.

In reply to by कॉमी

असेच वाटते.
पर्फेक्ट ! धन्यवाद कॉमी. तुम्ही लेखातील किंव्वा त्यावरील अन्य प्रतिसादातील कशावरही काहीही प्रतिसाद न देता न चुकता गट. क्रमांक. २ मधील लोकांचा जो विचार असेल असे ज्या प्रतिसादातुन स्पष्ट जाणवते त्यावरच प्रतिसाद दिलात. तुमचं "असेच वाटतं" असे म्हणणे ह्याचा अर्थच "माझा मेंदुही अशाच प्रकारे विचार करतो" असा आहे ! आणि माणसांचे विचार हे जन्मापासुन झालेल्या संस्कारांनी ठरत असल्याने जन्मापासुनच तुमचा गट निश्चित होत जातो, (गट बदलता येत नाहीच अशातला भाग नाही , पण गट बदलणे वाढत्या वयाबरोबर दुरापास्त होत जाते. ) मी वरच म्हणलो त्याप्रमाणे - कोणी कोणाला कोणत्याही गटात ढकलु शकत नाही, आपला गट हा आपल्या जन्मापासुन आपल्यावर झालेल्या संस्कारांमधुन आपोआप ठरत असतो. आपला गट कोणता हे ज्याने त्याने आपले आपण समजुन घ्यायचे असते . Its a process of self discovery. मला मनापासुन आनंद आहे की मी तुमचा गट क्र. २ अगदी व्यवस्थित ओळखला आहे ! आणि हा एक प्रकारे पुरावाच आहे की मला माझा गट क्र.१ व्यवस्थित कळालेला आहे ! बाकी तुम्हाला अजुन काही वाटत असल्यास आवर्जुन सांगा. This is actually very very helpful. (No sarcasm intended at all.) मनःपुर्वक धन्यवाद !

कॉमी 31/07/2024 - 19:51
विश्व आहे हाच पुरावा आहे कोणीतरी विश्वकर्मा अर्थात निर्माता असल्याचा. तस्मात् एक देव आहे. शिव. बस १.
जर प्रत्येक गोष्टीचा त्या गोष्टीपेक्षा वेगळा निर्माता असतो हे गृहितक मानले तर कोणतेही special pleading न करता विश्वानिर्मात्याचा निर्माता कोण हा प्रश्न उभा राहतो.

In reply to by कॉमी

नठ्यारा 31/07/2024 - 20:16
कॉमी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विश्वनिर्मात्याचा कोणीतरी निर्माता असणारंच. अशा परमनिर्मात्यास स्वयंसिद्ध, अपौरुषेय, इत्यादि विशेषणे लावली जातात. तो दिसंत नाही, पण त्याच्यामुळे डोळे पाहू शकतात. त्याचा आवाज येत नाही, पण कान त्याच्यामुळे आवाज ऐकू शकतात. वगैरे वगैरे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by कॉमी

नठ्यारा 01/08/2024 - 17:55
कॉमी, स्वप्न खरं की जागृतावस्था खरी? स्वप्न खरं धरलं तर त्याचा निर्माता कोण? स्वप्न स्वयंसिद्ध आहे का? स्वप्न पडतांना तर ते स्वयंसिद्धच वाटंत असतं. पण जागृतीमुळे त्याला बाधा येते. उद्या जागृतावास्थेसही कशावरून इतर काही अवस्थेची बाधा होणार नाही? आ.न., -ना.न.

In reply to by नठ्यारा

कॉमी 01/08/2024 - 19:37
स्वप्नावस्था केवळ आपल्या मेंदूत असते. आता तिला खरे म्हणायचे कीं खोटे हे तुमच्या शब्दकोशात खरे म्हणजे काय ह्यावर अवलंबुन आहे. हा. पण "मुंबईत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान आहे" हे जितके खरे आहे तितके खरे स्वप्नात काही नसते. आपण ज्या अर्थे खरे किंवा खोटे हे शब्द जनरली वापरतो त्या प्रमाणे स्वप्न खोटी असतात.

कॉमी 01/08/2024 - 06:52
आणि मग जर हा एक निर्माता बाजूला केला की जे उरते, ते जे की निर्माता नाही, ते झालं निर्माणसाहित्य. म्हणजे शक्ती. शिव नाही ते शक्ति. शिव आहे तसेच शक्तीही आहे. शिव आणि शक्ति
हे केवळ रुपकात्मक, कवितेचे मटेरियल वाटते. ह्याचा खरोखर सत्याशी काही संबंध आहे असे वाटतं नाही. बाकी उर्वरित विचारांबाबत. शिव शक्ती हि द्वयी घेऊन शेवटी सगळीकडे चेतना असण्याची शक्यता असल्याने सगळे शिव आहे हे वाचायला छान आहे, विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे. लेखनाचा फ्लो छान आहे. पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते. सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.

In reply to by कॉमी

सोत्रि 01/08/2024 - 12:00
पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते.
सहमत, शाब्दिक पातळीवर कितिही चर्चा केली तर ती शब्दबंबाळच होणार.
सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.
त्याचे ज्ञान होणे शक्य आहे. ध्यानमार्गाचा अवलंब केल्यास ते शक्य आहे हे ध्यानमार्गाच्या स्वानभुवावरून सांगू शकतो. - (ध्यानमार्गी) सोकाजी

In reply to by सोत्रि

कॉमी 01/08/2024 - 19:32
पण माझा तो प्रश्न नाही. तसे ज्ञान झाल्याने सुद्धा काय फरक पडतो? म्हणजे मी ऑलरेडी मानतो कीं सगळे प्राणी कार्बन बेसड लाईफ फॉर्म आहेत. पण म्हणून काय मी सगळे कार्बन बेस्ड लाईफ फॉर्म हे एकच आहेत असे म्हणायला जातं नाही. कोंबडी आणि माणूस हे एकच होष्टीचे बनले असले तरी भिन्न entity आहेत. Made of the same stuff आणि non dual ह्या भिन्न कल्पना आहेत.

In reply to by कॉमी

गवि 01/08/2024 - 20:31
विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे.
एवढेच महत्वाचे आहे कारण आपण फक्त विचारच करू शकतो या विषयावर. सुरुवात, शेवट , निर्मिती करणारे कोणीतरी, बाऊंडरी वगैरे असलीच पाहिजे ही आपल्या विचारांची मर्यादा आहे. कारण आपण सुरुवात आणि शेवट असलेले आहोत. कुंपणे असलेले आहोत. आपण या खेरीज कल्पनाच करू शकत नाही. कोणीतरी ईषणा केल्याशिवाय काहीतरी "अस्तित्वात" येऊच शकत नाही अशी घट्ट समजूत ही आपल्या मर्यादित परीघाची देणगी. आणि तो तोडून आपण जगू शकणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वगतः १.मला मॉडर्न्स सायन्स/ मॅथेमॅटिक्स मधील संकल्पना आपल्या तत्वज्ञानाशी जोडायला फार आवडते. एस.क्यु.एल मध्ये इंडेक्सिंग हा प्रकार असतो प्रत्येक रो ला एक इंडेक्स लावली की सगळे सॉर्ट, फिल्टर वगैरे ऑपरेशन्स सुपरफास्ट होतात. किंवा गुगलने सर्वच इंटरर्नेटवर जे केले आहे तसे इंडेक्सिन्ग. म्हणजे कसं की गोष्टी शोधणे सोपे होते. किंवा अजुन सोपे उदाहरण म्हणजे आता आपल्या पयथॉन मध्ये डिक्शनरी डेटा टाईप असतो ज्यात key : value अशा पेयर असल्याने कोणतेही सर्च ऑपरेशन सोप्पे होउन जाते. तसे आपल्या तत्वज्ञानाच्या बाबतीत करता आलं तर मजा येईल.

कुठे हरवली टूथपावडर ?

vcdatrange ·

In reply to by कंजूस

सुबोध खरे 11/07/2024 - 20:23
प्राणी म्हातारे झाले कि त्यांचे दात पडायला लागतात यामुळे त्यांना अन्न प्राशन करणे अशक्य होऊन ते अशक्त होऊन मृत्युमुखी पडतात. अजून तरी प्राण्यामध्ये कवळी वापरण्याची फॅशन आलेली माझ्या ऐकिवात नाही

In reply to by Nitin Palkar

सुबोध खरे 15/07/2024 - 09:50
हरिणाचे दात पडले तर त्याला गवत तोडून खाणे अशक्य होईल आणि उपासमारीने अशक्त झाल्याने तो सहज शिकाऱ्याला बळी पडेल. या उलट वाघ सिंहाचे दात पडले तर तो शिकारीला धरणार कसे आणि मारून मांस खाणार कसे? प्राणिजातीत वृद्धापकाळ हा फार काळ नसतो. तो मानवात आणि मानवाने पाळलेल्या प्राण्यातच असतो. इतरत्र नाही

In reply to by सुबोध खरे

कंजूस 15/07/2024 - 10:51
दात पडण्याएवढे थांबावे लागतच नाही. प्राणी दमू लागला की आपोआपच शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतो. शिकारी प्राण्यांत नव्या जोमाचे भाईबांधव त्यांना मारतात.

चित्रगुप्त 11/07/2024 - 17:34
कंजूस यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल तसेच पतंजलीच्या 'दंतकांती' मंजन आणि पेस्ट बद्दल लिहावे ही विनंती. मी स्वतः काही काळापासून टूथब्रश वापरणे बंद केलेले आहे, कारण त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ लागली (सॉफ्ट ब्रशने सुद्धा) याशिवाय ब्रशने दातांच्या फटींमधे अडकलेल्या अन्नाचे एकूण एक सूक्ष्मकण निघत नाहीत, हे वॉटर फ्लॉस वापरू लागल्यावर उघड झाले. त्यामुळे आता प्रत्येक जेवणानंतर पतंजली पेस्ट आणि मंजन दोन्ही बोटाने रगडून (यामुळे हिरड्यांनाही फायदा होतो) त्यानंतर वॉटर फ्लॉस आणि शेवटी तुरटीच्या खड्यावर ओले बोट घासून त्याने हिरड्यांचे मसाज करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे लक्षात आले, तसेच करत आहे. दिवसातून दोन-तीनदा मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणेही उत्तम.

सुबोध खरे 11/07/2024 - 20:21
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली गुणसूत्रे आणि जीन्स. आपल्या तोंडात तयार होणारी लाळ हि कशा तर्हेची असते यावर आपल्या तोंडाचे आरोग्य अवलंबून असते. दुर्दैवाने मला मिळालेली गुणसूत्रे उत्तम दर्जाची नसल्यामुळे माझ्या दातात फटी निर्माण होण्याची सुरुवात शाळेत असतानाच झाली. गेली ५० वर्षे मी रात्री झोपण्यापूर्वी नियमित उत्तम तर्हेने आपले मुख प्रक्षालन करत आलो असलो तरी प्रत्येक दात किडण्याचे प्रमाण काही कमी झाले नाही. स्वतः डॉक्टर असल्याने दातांच्या डॉक्टर कडे जाऊन माझे सर्व दात अजूनही शाबूत ठेवण्याचे सत्कर्म मी केलेले आहे. नायर रुग्णालयाच्या दंतविकार खात्यात जाऊन संपूर्ण तपासणी करून घेतली त्यावर माझी लाळ जास्त आम्लधर्मीय आहे त्यामुळे दाताचे इनॅमल लवकर झिजते असे समजले. परंतु माझ्या पत्नीचे दात इतकी काळजी ने घेताही एकंदर जास्त चांगले राहिलेले आहेत. सुदैवाने दोन्ही मुलांनी याबाबतीत पत्नीकडून गुसूत्रे घेतल्याने त्यांच्या दातात कीड होण्याचे प्रमाण नगण्य आहे. कोणतेही अन्न खाल्यावर खळखळून चूळ भरून दातातील जास्तीत जास्त अन्नकण स्वच्छ करणे हा एकमेव उत्तम उपाय आहे. आपण कोणती टूथपेस्ट/ पावडर वापरता यापेक्षा आपण आपले मुख कितीआणि किती वेळा स्वच्छ ठेवता यावर आपल्या तोंडाचे आणि दाताचे आरोग्य जास्त अवलंबून आहे. बाकी दातांची पावडर म्हणून विको वज्रदंती वापरणाऱ्या लोकांचे इनॅमल जास्त झिजलेले सर्रास आढळून आले होते. नायर रुग्णालयात याला vajradanti abrasion असे नामाभिमान दिलेले होते. कोणतीही गोष्ट केवळ हरबल किंवा वनस्पतीजन्य आहे म्हणून सुरक्षित आहे हा फार मोठा गैरसमज भारतीय समाजात आढळतो. धोत्रा, कुचला, तंबाखू, अफू आणि चरस/गांजा या सुद्धा वनस्पतीच आहेत ( अशा अनेक वनस्पती आपल्या जीवाला धोकादायक असतात) हे मी सर्वाना नम्रपणे दृष्टीस आणून देऊ इच्छितो

लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे. असो. बाजारातील एखाद्या चांगल्या प्रॉडक्टबद्दल मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. वैयक्तीक बोलायचे झाले तर आम्ही लहानपणापासून कोलगेट टुथपावडर, नोगीछाप काला दंतमंजन, विठोवा दंतमंजन, विको वज्रदंती, डाबर लाल दंतमंजन, चुलीतली राखूंडी आणि मीठ असे सगळे प्रकारचे दंतमंजन वापरुन पाहिले. टुथपेस्टदेखील अनेक प्रकारच्या वापरुन पाहिल्या, दिवसातून दहा वेळा थोबाड धुतले तरी दातांनी पितांबर ल्यायला सुरुवात केली आहे. यापेक्षा तंबाखुच्या मशेरीने दात घासले असते तर बरे झाले असते असे वाटते. निदान तोंडातले किडे तरी मेले असते. असो.

चित्रगुप्त 11/07/2024 - 22:39
लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे.
--- लई भारी राव.

कंजूस 12/07/2024 - 05:30
मुद्यावर येऊन .... १. ब्रशने दातांत अडकलेले अन्नकण सोडवणे सोपे जाते. मग चूळ भरून काढून टाकते सोपे जाते. २. दात पांढरे करायचे गुण असलेली वस्तू दंतमंजन, पेस्ट यामध्ये मिसळलेली असणार. ३. तोंडातली दुर्गंधी तात्पुरती काढण्यासाठी कोळसापूड(लोणारी कोळसा / charcoal) किंवा इतर असली तरी कायमची दूर करण्यासाठी पचनसंस्थाच सुधारावी लागते. ४. दात भक्कम करण्यासाठी मात्र हे वरवरचे घासणे काही कामाचे नसते ते प्रत्येकाच्या मूळ आरोग्यावरच अवलंबून असते. त्यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही घट्ट राहतात. हा गुण बाहेरून निर्माण करता येत नाही, टूथपेस्टनेही नाही.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 13/07/2024 - 23:27
पतंजलीचे दंतकांति पेस्ट आणि मंजन दोन्ही चांगले आहे. आम्ही वर्षानुवर्षे वापरत आहोत.

पॅट्रीक जेड 15/07/2024 - 19:33
थंड पाणी तोंडात घेतलं की दाताना ठणका बसतो, ह्यावर कॉमन सोल्यूशन सांगितल लोकांनी के सैनसोडाईन वापरा. पण अनेक सैनसोडाईन ट्यूब्स ने माझ्या दातांपुढे हात टेकले.

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 15/07/2024 - 21:16
पॅजे, याबद्दल डेंटिस्ट काय म्हणतात? आवश्यक असेल तर इलाज करण्यात उशीर करु नका. सहकार नगर मधे राहणाऱ्या डॉ पाटील यांचा नंबर हवा तर मी विचारुन कळवतो. उत्तम डेंटिस्ट आहेत.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 11/07/2024 - 20:23
प्राणी म्हातारे झाले कि त्यांचे दात पडायला लागतात यामुळे त्यांना अन्न प्राशन करणे अशक्य होऊन ते अशक्त होऊन मृत्युमुखी पडतात. अजून तरी प्राण्यामध्ये कवळी वापरण्याची फॅशन आलेली माझ्या ऐकिवात नाही

In reply to by Nitin Palkar

सुबोध खरे 15/07/2024 - 09:50
हरिणाचे दात पडले तर त्याला गवत तोडून खाणे अशक्य होईल आणि उपासमारीने अशक्त झाल्याने तो सहज शिकाऱ्याला बळी पडेल. या उलट वाघ सिंहाचे दात पडले तर तो शिकारीला धरणार कसे आणि मारून मांस खाणार कसे? प्राणिजातीत वृद्धापकाळ हा फार काळ नसतो. तो मानवात आणि मानवाने पाळलेल्या प्राण्यातच असतो. इतरत्र नाही

In reply to by सुबोध खरे

कंजूस 15/07/2024 - 10:51
दात पडण्याएवढे थांबावे लागतच नाही. प्राणी दमू लागला की आपोआपच शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतो. शिकारी प्राण्यांत नव्या जोमाचे भाईबांधव त्यांना मारतात.

चित्रगुप्त 11/07/2024 - 17:34
कंजूस यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल तसेच पतंजलीच्या 'दंतकांती' मंजन आणि पेस्ट बद्दल लिहावे ही विनंती. मी स्वतः काही काळापासून टूथब्रश वापरणे बंद केलेले आहे, कारण त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ लागली (सॉफ्ट ब्रशने सुद्धा) याशिवाय ब्रशने दातांच्या फटींमधे अडकलेल्या अन्नाचे एकूण एक सूक्ष्मकण निघत नाहीत, हे वॉटर फ्लॉस वापरू लागल्यावर उघड झाले. त्यामुळे आता प्रत्येक जेवणानंतर पतंजली पेस्ट आणि मंजन दोन्ही बोटाने रगडून (यामुळे हिरड्यांनाही फायदा होतो) त्यानंतर वॉटर फ्लॉस आणि शेवटी तुरटीच्या खड्यावर ओले बोट घासून त्याने हिरड्यांचे मसाज करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे लक्षात आले, तसेच करत आहे. दिवसातून दोन-तीनदा मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणेही उत्तम.

सुबोध खरे 11/07/2024 - 20:21
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली गुणसूत्रे आणि जीन्स. आपल्या तोंडात तयार होणारी लाळ हि कशा तर्हेची असते यावर आपल्या तोंडाचे आरोग्य अवलंबून असते. दुर्दैवाने मला मिळालेली गुणसूत्रे उत्तम दर्जाची नसल्यामुळे माझ्या दातात फटी निर्माण होण्याची सुरुवात शाळेत असतानाच झाली. गेली ५० वर्षे मी रात्री झोपण्यापूर्वी नियमित उत्तम तर्हेने आपले मुख प्रक्षालन करत आलो असलो तरी प्रत्येक दात किडण्याचे प्रमाण काही कमी झाले नाही. स्वतः डॉक्टर असल्याने दातांच्या डॉक्टर कडे जाऊन माझे सर्व दात अजूनही शाबूत ठेवण्याचे सत्कर्म मी केलेले आहे. नायर रुग्णालयाच्या दंतविकार खात्यात जाऊन संपूर्ण तपासणी करून घेतली त्यावर माझी लाळ जास्त आम्लधर्मीय आहे त्यामुळे दाताचे इनॅमल लवकर झिजते असे समजले. परंतु माझ्या पत्नीचे दात इतकी काळजी ने घेताही एकंदर जास्त चांगले राहिलेले आहेत. सुदैवाने दोन्ही मुलांनी याबाबतीत पत्नीकडून गुसूत्रे घेतल्याने त्यांच्या दातात कीड होण्याचे प्रमाण नगण्य आहे. कोणतेही अन्न खाल्यावर खळखळून चूळ भरून दातातील जास्तीत जास्त अन्नकण स्वच्छ करणे हा एकमेव उत्तम उपाय आहे. आपण कोणती टूथपेस्ट/ पावडर वापरता यापेक्षा आपण आपले मुख कितीआणि किती वेळा स्वच्छ ठेवता यावर आपल्या तोंडाचे आणि दाताचे आरोग्य जास्त अवलंबून आहे. बाकी दातांची पावडर म्हणून विको वज्रदंती वापरणाऱ्या लोकांचे इनॅमल जास्त झिजलेले सर्रास आढळून आले होते. नायर रुग्णालयात याला vajradanti abrasion असे नामाभिमान दिलेले होते. कोणतीही गोष्ट केवळ हरबल किंवा वनस्पतीजन्य आहे म्हणून सुरक्षित आहे हा फार मोठा गैरसमज भारतीय समाजात आढळतो. धोत्रा, कुचला, तंबाखू, अफू आणि चरस/गांजा या सुद्धा वनस्पतीच आहेत ( अशा अनेक वनस्पती आपल्या जीवाला धोकादायक असतात) हे मी सर्वाना नम्रपणे दृष्टीस आणून देऊ इच्छितो

लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे. असो. बाजारातील एखाद्या चांगल्या प्रॉडक्टबद्दल मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. वैयक्तीक बोलायचे झाले तर आम्ही लहानपणापासून कोलगेट टुथपावडर, नोगीछाप काला दंतमंजन, विठोवा दंतमंजन, विको वज्रदंती, डाबर लाल दंतमंजन, चुलीतली राखूंडी आणि मीठ असे सगळे प्रकारचे दंतमंजन वापरुन पाहिले. टुथपेस्टदेखील अनेक प्रकारच्या वापरुन पाहिल्या, दिवसातून दहा वेळा थोबाड धुतले तरी दातांनी पितांबर ल्यायला सुरुवात केली आहे. यापेक्षा तंबाखुच्या मशेरीने दात घासले असते तर बरे झाले असते असे वाटते. निदान तोंडातले किडे तरी मेले असते. असो.

चित्रगुप्त 11/07/2024 - 22:39
लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे.
--- लई भारी राव.

कंजूस 12/07/2024 - 05:30
मुद्यावर येऊन .... १. ब्रशने दातांत अडकलेले अन्नकण सोडवणे सोपे जाते. मग चूळ भरून काढून टाकते सोपे जाते. २. दात पांढरे करायचे गुण असलेली वस्तू दंतमंजन, पेस्ट यामध्ये मिसळलेली असणार. ३. तोंडातली दुर्गंधी तात्पुरती काढण्यासाठी कोळसापूड(लोणारी कोळसा / charcoal) किंवा इतर असली तरी कायमची दूर करण्यासाठी पचनसंस्थाच सुधारावी लागते. ४. दात भक्कम करण्यासाठी मात्र हे वरवरचे घासणे काही कामाचे नसते ते प्रत्येकाच्या मूळ आरोग्यावरच अवलंबून असते. त्यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही घट्ट राहतात. हा गुण बाहेरून निर्माण करता येत नाही, टूथपेस्टनेही नाही.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 13/07/2024 - 23:27
पतंजलीचे दंतकांति पेस्ट आणि मंजन दोन्ही चांगले आहे. आम्ही वर्षानुवर्षे वापरत आहोत.

पॅट्रीक जेड 15/07/2024 - 19:33
थंड पाणी तोंडात घेतलं की दाताना ठणका बसतो, ह्यावर कॉमन सोल्यूशन सांगितल लोकांनी के सैनसोडाईन वापरा. पण अनेक सैनसोडाईन ट्यूब्स ने माझ्या दातांपुढे हात टेकले.

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 15/07/2024 - 21:16
पॅजे, याबद्दल डेंटिस्ट काय म्हणतात? आवश्यक असेल तर इलाज करण्यात उशीर करु नका. सहकार नगर मधे राहणाऱ्या डॉ पाटील यांचा नंबर हवा तर मी विचारुन कळवतो. उत्तम डेंटिस्ट आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Porter’s five forces analysis चे स्टडी नोट्स वाचत असताना असाच आमच्या काळातलं एक प्रोडक्ट आठवलं. दात घासण्यासाठी शुभ्र सफेद गोडसर चवीची टूथ पावडर टीनच्या डब्यात यायची. आता केवळ Online विक्रीस उपलब्ध असलेली टूथ पावडर अस्तंगत कधी आणि का झाली? मीठ, खडू किंवा बेकिंग सोडा असलेले घरगुती आणि उत्पादित टूथ पावडर 19 व्या शतकात त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. टूथ पावडरची उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.

मिपा कला संग्रहालय - २.निसर्गचित्रण

प्रसाद गोडबोले ·
नमस्कार ! ह्या लेखमालिकेतील हा तिसरा धागा - निसर्ग चित्रण . प्रत्येक देशात, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या निसर्गचित्रणाच्या शैली विकसीत झाल्या. ह्या धाग्यावर आपण आपल्याला आवडलेल्या निसर्ग चित्रांचा संग्रह करुयात. चला तर मग !

चित्राचे नाव - १. स्टारी नाईट चित्रकाराचे नाव (कालखंड) : व्हिन्सेंट वॅन गोह चित्रशैली : पोस्ट इम्प्रेशनिस्ट ( ह्याचा नक्की अर्थ काय मला माहीत नाही, ज्यांनी ह्यावर सविस्तर अभ्यास केला आहे त्यांनी जरुर ह्यावर लिहावे ही विनंती.) इंटरनेटवरील लिंक : https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Van_Gogh_-_Starry_Night_-_Google_Art_Project.jpg/1280px-Van_Gogh_-_Starry_Night_-_Google_Art_Project.jpg सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक: https://commons.wikimedia.org/wiki/De_sterrennacht इथे अनेक चित्रे आहेत : https://commons.wikimedia.org/wiki/Vincent_van_Gogh चित्र s टिप्पण्णी : व्हिन्सेंट वॅन गोह ह्याला एक लोकोत्तर चित्रकार मानले जाते. ह्याचे जीवन एका टिपिकल कलाकार माणासाचे जीवन कसे असेल असे आपल्याला वाटते तसे आहे. त्याने काढलेल्या प्रत्येक चित्रात त्याची शैली प्रकर्षाने जाणवुन येते. त्याची अजुन दोन चित्रे मला फार आवडतात - Wheat Field with Cypresses , Almond blossom. मी वर त्याचा मोठ्ठ्या चित्र गॅलरीची लिंक दिलेली आहेच. मिपाकरांनी जरुर त्याचा आस्वाद घ्यावा , त्यांनाही आवडल्यास आपण ती चित्रे येथे उद्धृत करु शकता ! अवांतर स्वगत : माझे कलाक्षेत्रातील शिक्षण शुन्य आहे. मी तसा संख्याशास्त्र , गणित , अर्थशास्त्र , फायनान्स अश्या अर्थात कलेच्या नजरेतुन पाहिल्यास रुक्ष वाटणार्‍या विषयांचा विद्यार्थी होते, आहे. आणी मग असाच अभ्यास करता करता एके दिवशी लक्षात आले की जगातील सगळ्यात पहिले ग्रेट बँकर्स - इटली मधील मेदीची फॅमिली - त्यांन्नी मायकल अँजेलोला फुल्ल स्पॉन्सरशिप दिलेली होती त्याच्या कलेचा आविष्कार करण्याकरिता. तिथे पहिल्यांदा जाणीव झाली की अर्थशास्त्र तुम्हाला कसं जगायचं हा प्रश्न सोडवायला मदत करेल पण का जगायचं ? माणासाचं जीवन आणि प्राण्यांच्या जीवनात फरक तो काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कलेतुनच मिळेल. नंतर वाचनात कळाले की व्हिन्सेंट वॅन गोह ह्याचे एक पोर्ट्रेट चित्र तब्बल ८७ मिलियन डॉलर ला विकले गेले ! सो फायनान्स च्या दृष्टीने पाहिल्यास अभिजात चित्रे कला ही एकप्रकारची आर्थिक गुंतवणुक आहे की ज्याचे व्हॅल्युएशन करणे कर्मकठीण काम आहे ! मायकल अँजेलो च्या डेव्हिड ची किंमत काय ठरवणार ! सरकार काय ठरवणार किंमत कलेची? सो अभिजात कला असा सटल अ‍ॅसेट क्लास आहे ज्याच्यावर सरकार ला टॅक्स लावता येणार नाहीये . ना इनकम टॅक्स , ना बिजनेस टॅक्स , ना वेल्थ टॅक्स ! व्हॉला . Now it makes a lot more sense to learn to appreciate the Art !

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 11/07/2024 - 13:42
सरकार काय ठरवणार किंमत कलेची? सो अभिजात कला असा सटल अ‍ॅसेट क्लास आहे ज्याच्यावर सरकार ला टॅक्स लावता येणार नाहीये . ना इनकम टॅक्स , ना बिजनेस टॅक्स , ना वेल्थ टॅक्स ! सरकार कलेची किंमत नाही ठरवत पण जर ती "कलावस्तू" खरेदी आणि विक्री करण्याचा धंदा कोणी केला तर त्या उलाढालीवर विविध कर बसतात ( कोणतेही सरकार ते सोडत नाही, आणि का सोडावे जर व्यक्ती लाढाल करीत असेल तर कलाकृती असो व धान्य सगळे सारखेच ) साधा इनकॉलम टॅक्स / कॅपिटल गेन टॅक्स / इत्यादी ...देशाप्रमाणे वेगळे ( अर्हताःत पूर्ण टॅक्स मुक्त देश असले तर गोष्ट वेगळी )

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 19/07/2024 - 05:51
आज पहिल्यन्दाज या नवीन तंत्राचा उपयोग करून निर्माण केलेले हे चित्र आवडले , (बाकी वेळेला चांदोबा चे रूपांतर बघून कंटाळा आला होता/ नावीन्य राहिले नवहते )

चित्रकाराचे नाव : Katsushika Hokusai चित्रशैली : Woodblock printing in Japan इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/File:Tsunami_by_hokusai_19th_century.jpg सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक: https://commons.wikimedia.org/wiki/De_sterrennacht चित्र t टिपण्णी : ह्या चित्राला "जगातील सर्वात जास्त वेळा पुनर्निर्मित केलेले चित्र " असे म्हणतात. ह्या चित्राने अनेक जगप्रसिध्द चित्रकार जसे वॅन गोह, मोनेट ह्यांना प्रेरणा दिली !

गवि 12/07/2024 - 11:52
सेशेल्स या अद्भुत जादुई बेटांची सेल्फ ड्राईव्ह सफर करताना अवचित माझी कार अनपेक्षितपणे एका जंगलात लपलेल्या प्रशस्त बंगल्यासमोर आली. तिथे एक कलाकार राहतो असे तिथल्या पाटीवरून वाटलं. मग आत गेलो तर सर्वत्र रिकामे आणि शांत. निर्जन. तरीही नेटाने आत घुसून शोधल्यावर एका खोलीचे दार उघडे दिसले. त्यात बसून जेरार्ड नावाचा चित्रकार पेंटिंग करत होता. पूर्ण चित्त एकाग्र. सेशेल्स आणि एकूण विषुववृत्ताच्या लगत असलेल्या बेटांवर आढळणारी सर्वात ठळक गोष्ट म्हणजे दाट जंगले, पाम प्रकारची झाडे, आणि रंगांची प्रचंड विविधता. जणू निसर्ग आपल्या pallet मधले सर्वच्या सर्व रंग आणि छटा वापरण्याचा हट्ट धरून रंगकाम करतो तिथे. तर पहिल्या दर्शनात ती चित्रे अतिशय रंगीबेरंगी आहेत इतकेच वाटू शकेल. पण बारकाईने बघितले तर ही शैली त्या प्रदेशासाठी बेहद्द फिट होते. मला खूपच आवडली. बारीक बारीक विभागांत एकेक रंग भरत बसणे ही त्याची चिकाटी मी तिथे प्रत्यक्ष बघितली. त्याने उत्साहाने काही अन्य चित्रे दाखवली. एक गॅलरी पण बनवली होती तिथेच. रंगांच्या पसाऱ्यात हरवलेला, त्या अतिशय सुंदर बेटावर एकटा राहणारा तो मनुष्य पाहून काहीतरी विलक्षण वाटले. माझ्या सेशल्स संबंधित धाग्यावर मी याबद्दल त्याच्या फोटोंसह लिहिले होते. त्याची वेबसाईट सापडली. http://www.gerarddevoud.com/ हा मी तिथे गेलो असताना घेतलेला फोटो. बाकी त्याच्या वेब साईट वरून इमेज एम्बेड होत नाहीयेत B

किल्लेदार 19/07/2024 - 00:14
Pacoyao नावाचा एक चायनीज चित्रकार आहे. शैली कुठली माहित नाही पण चित्र फारच सुरेख आहेत. इंस्टाग्राम वर बघता येतील. Pacoyao

Bhakti 23/07/2024 - 11:42
चित्रकाराचे नाव- अमांडा हर्जमन (कॅनबेरा) काळ-अर्वाचिन अमांडाची इतर चित्रे-https://cargocollective.com/amandaherzman शैली-वनस्पति आणि लोकसाहित्यकार कलाकार.वनस्पती आणि बुरशी, त्यांची पौराणिक कथा, कल्पनारम्य, इतिहास आणि लोककथा यांच्या विलक्षण जगाचा शोध घेतो. याच्या चित्रांची ओळख कृष्णाच्या गोष्टीतल्या पारिजातक हरण कथेसाठी चित्र शोधतांना झाली.वनस्पतीशास्त्र शिकतांना हर्बेनिअम (झाडांची वाळवून चौकोनी कागदावर प्रेस करत चिकटवून केलेली साठवण) हा एक महत्त्वाचा भाग असतो.त्यात अनेक जणांकडे त्या झाडांची स्केच,चित्रे तयार करण्याची कला असते.अमांडा वनस्पती,बुरशी,औषधी वनस्पती यांची चित्रे बनवतोच पण त्याविषयी पौराणिक/लोकसाहित्यातील कथाही फुलां-पानांसह मांडतो.त्याने यासाठी पारिजात -सूर्यकथाही सुंदर रंगवली आहे.पारिजातक आवडत असल्याने या चित्राने मला मोहिनी घातली नाही तर विशेषच :) कथा पौराणिक धाग्यावर बाकी रात्री उमलणारी फुले आणि आकाशीय(सूर्य/चंद्र निगडीत फुले)फुले इथे देते. *आकाशीय फुले अ *रात्री उमलणारी फुले आ

चित्राचे नाव - १. स्टारी नाईट चित्रकाराचे नाव (कालखंड) : व्हिन्सेंट वॅन गोह चित्रशैली : पोस्ट इम्प्रेशनिस्ट ( ह्याचा नक्की अर्थ काय मला माहीत नाही, ज्यांनी ह्यावर सविस्तर अभ्यास केला आहे त्यांनी जरुर ह्यावर लिहावे ही विनंती.) इंटरनेटवरील लिंक : https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Van_Gogh_-_Starry_Night_-_Google_Art_Project.jpg/1280px-Van_Gogh_-_Starry_Night_-_Google_Art_Project.jpg सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक: https://commons.wikimedia.org/wiki/De_sterrennacht इथे अनेक चित्रे आहेत : https://commons.wikimedia.org/wiki/Vincent_van_Gogh चित्र s टिप्पण्णी : व्हिन्सेंट वॅन गोह ह्याला एक लोकोत्तर चित्रकार मानले जाते. ह्याचे जीवन एका टिपिकल कलाकार माणासाचे जीवन कसे असेल असे आपल्याला वाटते तसे आहे. त्याने काढलेल्या प्रत्येक चित्रात त्याची शैली प्रकर्षाने जाणवुन येते. त्याची अजुन दोन चित्रे मला फार आवडतात - Wheat Field with Cypresses , Almond blossom. मी वर त्याचा मोठ्ठ्या चित्र गॅलरीची लिंक दिलेली आहेच. मिपाकरांनी जरुर त्याचा आस्वाद घ्यावा , त्यांनाही आवडल्यास आपण ती चित्रे येथे उद्धृत करु शकता ! अवांतर स्वगत : माझे कलाक्षेत्रातील शिक्षण शुन्य आहे. मी तसा संख्याशास्त्र , गणित , अर्थशास्त्र , फायनान्स अश्या अर्थात कलेच्या नजरेतुन पाहिल्यास रुक्ष वाटणार्‍या विषयांचा विद्यार्थी होते, आहे. आणी मग असाच अभ्यास करता करता एके दिवशी लक्षात आले की जगातील सगळ्यात पहिले ग्रेट बँकर्स - इटली मधील मेदीची फॅमिली - त्यांन्नी मायकल अँजेलोला फुल्ल स्पॉन्सरशिप दिलेली होती त्याच्या कलेचा आविष्कार करण्याकरिता. तिथे पहिल्यांदा जाणीव झाली की अर्थशास्त्र तुम्हाला कसं जगायचं हा प्रश्न सोडवायला मदत करेल पण का जगायचं ? माणासाचं जीवन आणि प्राण्यांच्या जीवनात फरक तो काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कलेतुनच मिळेल. नंतर वाचनात कळाले की व्हिन्सेंट वॅन गोह ह्याचे एक पोर्ट्रेट चित्र तब्बल ८७ मिलियन डॉलर ला विकले गेले ! सो फायनान्स च्या दृष्टीने पाहिल्यास अभिजात चित्रे कला ही एकप्रकारची आर्थिक गुंतवणुक आहे की ज्याचे व्हॅल्युएशन करणे कर्मकठीण काम आहे ! मायकल अँजेलो च्या डेव्हिड ची किंमत काय ठरवणार ! सरकार काय ठरवणार किंमत कलेची? सो अभिजात कला असा सटल अ‍ॅसेट क्लास आहे ज्याच्यावर सरकार ला टॅक्स लावता येणार नाहीये . ना इनकम टॅक्स , ना बिजनेस टॅक्स , ना वेल्थ टॅक्स ! व्हॉला . Now it makes a lot more sense to learn to appreciate the Art !

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 11/07/2024 - 13:42
सरकार काय ठरवणार किंमत कलेची? सो अभिजात कला असा सटल अ‍ॅसेट क्लास आहे ज्याच्यावर सरकार ला टॅक्स लावता येणार नाहीये . ना इनकम टॅक्स , ना बिजनेस टॅक्स , ना वेल्थ टॅक्स ! सरकार कलेची किंमत नाही ठरवत पण जर ती "कलावस्तू" खरेदी आणि विक्री करण्याचा धंदा कोणी केला तर त्या उलाढालीवर विविध कर बसतात ( कोणतेही सरकार ते सोडत नाही, आणि का सोडावे जर व्यक्ती लाढाल करीत असेल तर कलाकृती असो व धान्य सगळे सारखेच ) साधा इनकॉलम टॅक्स / कॅपिटल गेन टॅक्स / इत्यादी ...देशाप्रमाणे वेगळे ( अर्हताःत पूर्ण टॅक्स मुक्त देश असले तर गोष्ट वेगळी )

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 19/07/2024 - 05:51
आज पहिल्यन्दाज या नवीन तंत्राचा उपयोग करून निर्माण केलेले हे चित्र आवडले , (बाकी वेळेला चांदोबा चे रूपांतर बघून कंटाळा आला होता/ नावीन्य राहिले नवहते )

चित्रकाराचे नाव : Katsushika Hokusai चित्रशैली : Woodblock printing in Japan इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/File:Tsunami_by_hokusai_19th_century.jpg सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक: https://commons.wikimedia.org/wiki/De_sterrennacht चित्र t टिपण्णी : ह्या चित्राला "जगातील सर्वात जास्त वेळा पुनर्निर्मित केलेले चित्र " असे म्हणतात. ह्या चित्राने अनेक जगप्रसिध्द चित्रकार जसे वॅन गोह, मोनेट ह्यांना प्रेरणा दिली !

गवि 12/07/2024 - 11:52
सेशेल्स या अद्भुत जादुई बेटांची सेल्फ ड्राईव्ह सफर करताना अवचित माझी कार अनपेक्षितपणे एका जंगलात लपलेल्या प्रशस्त बंगल्यासमोर आली. तिथे एक कलाकार राहतो असे तिथल्या पाटीवरून वाटलं. मग आत गेलो तर सर्वत्र रिकामे आणि शांत. निर्जन. तरीही नेटाने आत घुसून शोधल्यावर एका खोलीचे दार उघडे दिसले. त्यात बसून जेरार्ड नावाचा चित्रकार पेंटिंग करत होता. पूर्ण चित्त एकाग्र. सेशेल्स आणि एकूण विषुववृत्ताच्या लगत असलेल्या बेटांवर आढळणारी सर्वात ठळक गोष्ट म्हणजे दाट जंगले, पाम प्रकारची झाडे, आणि रंगांची प्रचंड विविधता. जणू निसर्ग आपल्या pallet मधले सर्वच्या सर्व रंग आणि छटा वापरण्याचा हट्ट धरून रंगकाम करतो तिथे. तर पहिल्या दर्शनात ती चित्रे अतिशय रंगीबेरंगी आहेत इतकेच वाटू शकेल. पण बारकाईने बघितले तर ही शैली त्या प्रदेशासाठी बेहद्द फिट होते. मला खूपच आवडली. बारीक बारीक विभागांत एकेक रंग भरत बसणे ही त्याची चिकाटी मी तिथे प्रत्यक्ष बघितली. त्याने उत्साहाने काही अन्य चित्रे दाखवली. एक गॅलरी पण बनवली होती तिथेच. रंगांच्या पसाऱ्यात हरवलेला, त्या अतिशय सुंदर बेटावर एकटा राहणारा तो मनुष्य पाहून काहीतरी विलक्षण वाटले. माझ्या सेशल्स संबंधित धाग्यावर मी याबद्दल त्याच्या फोटोंसह लिहिले होते. त्याची वेबसाईट सापडली. http://www.gerarddevoud.com/ हा मी तिथे गेलो असताना घेतलेला फोटो. बाकी त्याच्या वेब साईट वरून इमेज एम्बेड होत नाहीयेत B

किल्लेदार 19/07/2024 - 00:14
Pacoyao नावाचा एक चायनीज चित्रकार आहे. शैली कुठली माहित नाही पण चित्र फारच सुरेख आहेत. इंस्टाग्राम वर बघता येतील. Pacoyao

Bhakti 23/07/2024 - 11:42
चित्रकाराचे नाव- अमांडा हर्जमन (कॅनबेरा) काळ-अर्वाचिन अमांडाची इतर चित्रे-https://cargocollective.com/amandaherzman शैली-वनस्पति आणि लोकसाहित्यकार कलाकार.वनस्पती आणि बुरशी, त्यांची पौराणिक कथा, कल्पनारम्य, इतिहास आणि लोककथा यांच्या विलक्षण जगाचा शोध घेतो. याच्या चित्रांची ओळख कृष्णाच्या गोष्टीतल्या पारिजातक हरण कथेसाठी चित्र शोधतांना झाली.वनस्पतीशास्त्र शिकतांना हर्बेनिअम (झाडांची वाळवून चौकोनी कागदावर प्रेस करत चिकटवून केलेली साठवण) हा एक महत्त्वाचा भाग असतो.त्यात अनेक जणांकडे त्या झाडांची स्केच,चित्रे तयार करण्याची कला असते.अमांडा वनस्पती,बुरशी,औषधी वनस्पती यांची चित्रे बनवतोच पण त्याविषयी पौराणिक/लोकसाहित्यातील कथाही फुलां-पानांसह मांडतो.त्याने यासाठी पारिजात -सूर्यकथाही सुंदर रंगवली आहे.पारिजातक आवडत असल्याने या चित्राने मला मोहिनी घातली नाही तर विशेषच :) कथा पौराणिक धाग्यावर बाकी रात्री उमलणारी फुले आणि आकाशीय(सूर्य/चंद्र निगडीत फुले)फुले इथे देते. *आकाशीय फुले अ *रात्री उमलणारी फुले आ

द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प आता 'रखडणार' कि 'साकारणार'?

टर्मीनेटर ·

कपिलमुनी 10/07/2024 - 19:46
ही बेटे सर्व भारतीय नागरिकांच्या अधिवासासाठी खुली आहेत का ? तिकडेच जाऊन राहावे

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:47
८३६ लहान-मोठी बेटे, उप-द्वीपे आणि आऊटक्रॉप्सचा समावेश असलेल्या 'अंदमान आणि निकोबार' द्वीपसमूहातील केवळ ३१ बेटांवर मानवी वस्ती आहे. भारताचाच भाग असला तरी त्यापैकी अनेक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहेत तर काही ठिकाणी जाण्यासाठी 'परमिट' असणे अनिवार्य आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथे व्यवसायाची संधी आणि नव्याने निर्माण होणाऱ्या 'वर्ल्ड क्लास' किनारी शहरांमध्ये राहण्याचा योग्य आल्यास मलातरी ह्या "भारताबाहेरच्या भारतात" (शब्दसमूह सौजन्य : राजेंद्र मेहेंदळे) जाऊन राहायला नक्कीच आवडेल 😀

कंजूस 11/07/2024 - 06:14
सर्व माहिती संकलित करून लिहिलेला लेख आवडला. या विषयावर माझं वाचन नाही. अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:59
अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.
शक्यतो 'ग्रीन एनर्जी'वरच भर दिला जाणार असल्याने सौर उर्जा हा मुख्य स्त्रोत असुन उर्जेची उर्वरीत गरज भागवण्यासाठी' गॅस पॉवर प्लांट' चे नियोजन आहे. बेटाच्या दोन तृतीयांश भागावर 'बायोस्फियर रिझर्व्ह' आणि 'गॅलेथिया नॅशनल पार्क' असल्याने प्रदुषण नियंत्रणासाठी पेट्रोल डिझेलच्या वापर जवळपास नगण्य असेल. शिवाय 'ग्रेट निकोबार' बेटावर पाच नद्या असल्याने भविष्यात त्यांवर लहान-मोठी धरणे बांधुन जलविद्युत आणि समुद्राच्या लाटांपासुन 'टायडल पॉवर' निर्मिती करणेही शक्य आहे!

Nitin Palkar 14/07/2024 - 13:52
टर्मिनेटरजी, तुमच्या लेखनाचा मी पहिल्यापासून पंखा आहे. कोणतेही प्रवास वर्णन असो की हिंगासारख्या विषयावरचे लेखन असो अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि सुरेख प्रकाश चित्रे ही तुमची वैशिष्ट्ये नेहमीच अनुभवास येतात. अभ्यासपूर्ण अशा या लेखामुळे माहितीत भर पडली. पुलेशु. _/\_

कपिलमुनी 10/07/2024 - 19:46
ही बेटे सर्व भारतीय नागरिकांच्या अधिवासासाठी खुली आहेत का ? तिकडेच जाऊन राहावे

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:47
८३६ लहान-मोठी बेटे, उप-द्वीपे आणि आऊटक्रॉप्सचा समावेश असलेल्या 'अंदमान आणि निकोबार' द्वीपसमूहातील केवळ ३१ बेटांवर मानवी वस्ती आहे. भारताचाच भाग असला तरी त्यापैकी अनेक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहेत तर काही ठिकाणी जाण्यासाठी 'परमिट' असणे अनिवार्य आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथे व्यवसायाची संधी आणि नव्याने निर्माण होणाऱ्या 'वर्ल्ड क्लास' किनारी शहरांमध्ये राहण्याचा योग्य आल्यास मलातरी ह्या "भारताबाहेरच्या भारतात" (शब्दसमूह सौजन्य : राजेंद्र मेहेंदळे) जाऊन राहायला नक्कीच आवडेल 😀

कंजूस 11/07/2024 - 06:14
सर्व माहिती संकलित करून लिहिलेला लेख आवडला. या विषयावर माझं वाचन नाही. अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:59
अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.
शक्यतो 'ग्रीन एनर्जी'वरच भर दिला जाणार असल्याने सौर उर्जा हा मुख्य स्त्रोत असुन उर्जेची उर्वरीत गरज भागवण्यासाठी' गॅस पॉवर प्लांट' चे नियोजन आहे. बेटाच्या दोन तृतीयांश भागावर 'बायोस्फियर रिझर्व्ह' आणि 'गॅलेथिया नॅशनल पार्क' असल्याने प्रदुषण नियंत्रणासाठी पेट्रोल डिझेलच्या वापर जवळपास नगण्य असेल. शिवाय 'ग्रेट निकोबार' बेटावर पाच नद्या असल्याने भविष्यात त्यांवर लहान-मोठी धरणे बांधुन जलविद्युत आणि समुद्राच्या लाटांपासुन 'टायडल पॉवर' निर्मिती करणेही शक्य आहे!

Nitin Palkar 14/07/2024 - 13:52
टर्मिनेटरजी, तुमच्या लेखनाचा मी पहिल्यापासून पंखा आहे. कोणतेही प्रवास वर्णन असो की हिंगासारख्या विषयावरचे लेखन असो अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि सुरेख प्रकाश चित्रे ही तुमची वैशिष्ट्ये नेहमीच अनुभवास येतात. अभ्यासपूर्ण अशा या लेखामुळे माहितीत भर पडली. पुलेशु. _/\_
लेखनविषय:
लेखनप्रकार

१७ जून २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संपर्क) आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश ह्यांनी जारी केलेल्या निवेदनात 'ग्रेट निकोबार' येथील प्रकल्पांसाठी दिलेल्या सर्व मंजुरी तात्काळ स्थगित करण्याची आणि संबंधित संसदीय समित्यांकडून छाननीसह प्रस्तावित प्रकल्पाचा सखोल आढावा घेण्याची मागणी केल्यावर भारताचा 'द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प' हा अति

गझल

बिपीन सुरेश सांगळे ·

सायंकाळ, बाहेर पाऊस, तीची आठवण, आणि गझल. सगळं लेखनात जुळवून आणलं तुम्ही पण.. काही खास ओळी, शायरी, अशी मैफिल तुम्हीही लेखनात रंगवायला पाहिजे होती असे वाटले. ”कौन है इस रिम-झिम के पीछे छुपा हुआ ये आँसू सारे के सारे किस के हैं”’ -दिलीप बिरुटे ( पाऊस आठवणीतला )

चित्रगुप्त 10/07/2024 - 23:11
हाण्ण त्यजायला. -- तो कोण शामकुमार का कोण, त्याचा अगदी के.एल.पी.डी. पोपट झाला. लई माज आला होता त्याहिले. पोरगीबी लईच चॅप्टर. मजा आली. कोणीतरी असा पोपट होण्याबद्दलच्या गजला, शेर टाका असले तर. वाचकाला अगदी गुंगावत ठेऊन अगदी शेवटी अनपेक्षित वळण घेऊन संपणारी कथा लाजवाब.

सायंकाळ, बाहेर पाऊस, तीची आठवण, आणि गझल. सगळं लेखनात जुळवून आणलं तुम्ही पण.. काही खास ओळी, शायरी, अशी मैफिल तुम्हीही लेखनात रंगवायला पाहिजे होती असे वाटले. ”कौन है इस रिम-झिम के पीछे छुपा हुआ ये आँसू सारे के सारे किस के हैं”’ -दिलीप बिरुटे ( पाऊस आठवणीतला )

चित्रगुप्त 10/07/2024 - 23:11
हाण्ण त्यजायला. -- तो कोण शामकुमार का कोण, त्याचा अगदी के.एल.पी.डी. पोपट झाला. लई माज आला होता त्याहिले. पोरगीबी लईच चॅप्टर. मजा आली. कोणीतरी असा पोपट होण्याबद्दलच्या गजला, शेर टाका असले तर. वाचकाला अगदी गुंगावत ठेऊन अगदी शेवटी अनपेक्षित वळण घेऊन संपणारी कथा लाजवाब.
लेखनविषय:
गझल संध्याकाळची वेळ . मोठं रोमँटिक वातावरण ! बाहेर मुसळधार पाऊस. धरतीशी लडिवाळ नाही तर जोरकस सलगी करणाऱ्या आषाढसरी ! त्या सभागृहात कार्यक्रम रंगात आला होता . गझलांचा कार्यक्रम. शांतपणे ,आतल्या अगदी आतल्या जखमा कुरवाळणारा . तुडुंब गर्दी होती. त्यातही तरुणाईची खरी गर्दी . बाकी थोडीफार पिकली पानं होती ; पण ती घरी वेळ जात नाही म्हणून आलेली . कारण तसंच होतं ना. कार्यक्रम शामकुमारचा होता . तरुण , राजबिंडा ,नवोदित गझल गायक . पण तयारी अशी की पार बुजुर्ग वाटावा . त्यामुळेच तर गर्दी होती आणि तरुण मुलांची जास्त अन हो मुलींचीही . असतं वय एखाद्यावर जीव टाकायचं . येड लागायचं .