गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचेच नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक!
असाच शिवाजीमहाराजांनी इनाम दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले!
गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्या शेतातल्या पिकांच्या रांगा, जमीनही अशी कसली की एक ढेकूळ उगा दिसत नाही अगदी सगळी माती एकसारखी!धोंडी तिला काळी आई -माय म्हणायचा.शिवकाल गेला, पवनानगरपासून लोणावळा पर्यंत लोकल सुरू झाली.पण धोंडी मात्र अजून हवालदार या उपाधीचा मान ठेवून होता.खळ्यात मोत्यासारखे धान्य झाल की तो पार लोणावळापर्यंत बलूत देऊन यायचा.गावातल्या अडचणीला सगळ्यांसाठी धावून जायचा.सारा गाव त्याला देवमाणूस म्हणायचा.धोंडीला आपल्या पूर्वजांचा मानमरातब जीवनापेक्षा प्रिय होता.हवालदार घराण्याला साजेशीस अशी त्याची कारभारीन सारजा होती गृहलक्ष्मी,अन्नपूर्णा सारे रूप तिच्यात साठलेले.पण आईपणाच्या दानाला मुकलेली.तरीही याची खंत न बाळगता ती धाकट्या दीरासाठी कोंडीसाठी यशोदेचे रूप घेत रमली.पण नवरा धोंडी अगदी मानी,कष्टाळू तर धाकला कोंडी अजून बाळबोध बुद्धीतून मोठा न झालेला.या गमतीशीर कात्रीत ती अनेकदा अडकत.
कोंडीने भावाच्या विरोधात जात अनेक उचापती केल्या.कुस्तीसाठी खुराक, दुधासाठी स्पेशल म्हैस वहिनीच्या मार्फत सारं दादाकडून पुरवून घेतलं.पण कुस्ती हारला धोंडीने विजयी किशाला उचलून घेतलं...हवालदाराला निरपेक्ष साजेसा वागला.पण कोंडी रूसून कुठंतरी जाऊन बसला ,धोंडी त्याला शोधतोय. पण तो सापडेना , हवालदार कुळाचा एकूलता एक वारीस काहीबाही स्वतः बरोबर केलं नसेल ना?,ना ना शंका धोंडीच्या मनात आल्या.शेवटी रात्री कोंडी घरी आला पण काही अपरित त्याच्या मनाने ठरवले.दुधाचा धंदा करायचा...लोकलने इतर लोकांप्रमाणे सकाळी लोणावळ्याला दूध विकायचे आणि परत लोकलने मागे फिरायचे.पण धोंडी कडाडला हवालदार आता गवळ्याचा धंदा करत कावड उचलणार?धोंडीला हे कधीच आवडले नाही.पण सारजाच्या हट्टाने आणि भावाच्या प्रेमापायी कोंडीला म्हशी घेऊन दिल्या..."पण तुझा तो पाण्यात दूध टाकून विकायाचा पापाचा पैका मला,माझ्या घरासाठी कधी वापरू नको"अशी ताकीद दिली.
धोंडी आपला शेतात कष्ट करीत राहिला.कोंडीच्या खांद्यावर दहा एकर देत तीर्थाला जाण्याची त्याची इच्छा अपूरीच राहणार, हे वाटलं.तिकडे कोंडी पण सिगारेट, खाण्यापिण्याची ऐश, नाचगाणी,वाईट मित्र यांच्या नादाला लागत होता.धोंडीला मेल्याहून मेल्यासारखे होई .पण घराण्याची पुण्याई थोर म्हणून 'सरू' सारखी शिकलेली,सालस बायको कोंडीला मागणी घालून आली असं धोंडीला वाटलं आणि आनंद झाला.धुमधड्याकात कोंडीच लग्न लावून दिलं.सारं घर तीन दिवस बत्तीच्या रोषणाईने उजाळत होता.हुस्सैनच्या म्हातारीने ताकीदच दिली होती.धोंडी सज्जन न चुकता बलूत आणून देतो.त्याच्या घरात आपल्याकडून झगमगाट व्हायलाच पाहिजे.
नव्या सुनेच्या रूपात तर धोंडीला आपली आजीच परत आली आहे असं वाटायचे."काय आज्जे नातवाने शेत चांगलं राखलं ना?" तो सरूला आनंदाने विचारायचा.गडाविषयी,पवनामाय, शेतीविषयी बोलायला लागला की धोंडीच्या राठ डोंगरातून अमृत वर्षाव होतोय असं वाटायचं,ऐकतच राहत बसावें वाटायचे.
"सरूताई ,हे शेत आता तुम्ही घेतला म्हणा, आणि आमाला मोकळं करा"
सरूला समजेना ,पण धोंडीदादा म्हणतो म्हणून तिने तसंच म्हटलं.
धोंडीला सारजाला कृतार्थ वाटलं.पण काळ्या ढगांची अचानक कळा हवालदार कुटुंबावर आली.सारजा तापाचं कारण होऊन जग सोडून गेली.सर्वात मोठा धक्का वहिनीच्या लाडक्या कोंडीला बसला.त्याने डॉक्टर आणला पण धोंडीने दूधाचा पापाचा पैसा नको करत ते उपचार होऊ दिले नाही.हाच राग धरत आणि दादा परत म्हशीसाठी पैसे देईना.तेव्हा मित्रांच्या सांगण्यावरून कोंडीने चक्क भावावर अंधारात भ्याड हल्ला केला .धोंडीला तर आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली.सरूला समजलं काय करावे कोणालाच समजना पण धोंडीने ठरवलं आणि सारं दहा एकर प्रेमाने कोंडीच्या नावावर केलं आणि स्वतः कर्ज घेत म्हशीही घेऊन दिल्या.
सारं सरळ होईल वाटत असतांनाच पवनामाय रागावली,पावसाने पाठ फिरवली,जनावर फिसकीने मेली.आता शेत नांगरायचं कसं?धोंडी सगळा दिवस एकटाच कुदळीने शेत नांगरत राहिला.पण आता कोंडीला दादाचे हाल पाहवेना.त्याने इर्जिक (सगळ्या गावच्या बैलांच्या मदतीने नांगरणी) आणायची ठरवली.
धोंडी कडाडला,"ज्या शेतात शिवाजी महाराजांचे ऋण आहे तिथे इर्जिकी लावणार, हवालदार घराण्यात असं कंदी झालं नाय,माज रगत काळ्या आईत सांडेन पण इर्जिकी शेतात नाय होणार."
दुसऱ्या दिवशी धोंडी एकटाच म्हातार्या बैलाला एकीकडे आणि स्वतःला दुसऱ्या बाजूला जुंपत नांगरणी करीत राहिला.
'तुंगी गडाचा हवालदार कष्टाने मानाने मातीत मिळाला पण इर्जिकी आणायच्या आधी आपल्या वाटचं काम करीत तिच्यात विलीन झाला '
अनेकदा स्त्री पात्राची सर्व संपन्न रेखाटनी लेखक उभी करतात.पण गोनीदांनी एक रांगड पण तरीही भाबड्या प्रेमाने ओतप्रोत एक पुरुष पात्र लीलया धोंडीच्या रूपाने उभे केले आहे.
आजही तुंगी गड मानाने पवनेकाठी धोंडीच्या निष्ठावानाची साक्ष देत उभा आहे.
या कथेवर आधारित मराठी सिनेमाही आला होता पण तो काही आता कुठे उपलब्ध दिसत नाही.पण गाणी उपलब्ध आहे, खुद्द दीदींच्या आवाजातला "पावनेर मायेला करू" आणि एक प्रसिद्ध गीत उषाताईंच्या आवाजातले आहे-"काय बाई सांगू कसं ग सांगू?'" #&128512;
तसेच संपूर्ण ओडिओ पुस्तक तूनळीवर उपलू आहे- https://youtu.be/vCz10U5SX3g?si=Eb_YZGXLsNhQHHja
-भक्ती
वाचने
8067
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडले.
भक्ती ताई.
In reply to आवडले. by खेडूत
धन्यवाद खेडूत!
सुमारे१९६८ ,६९ साली.आम्ही खेड आत्ताचे राजगुरू नगर येथे तो सिनेमा
In reply to धन्यवाद खेडूत! by Bhakti
राजगुरुनगर (खेड) समृद्धच
In reply to सुमारे१९६८ ,६९ साली.आम्ही खेड आत्ताचे राजगुरू नगर येथे तो सिनेमा by कर्नलतपस्वी
धन्यवाद !
बरोबर मी तिशीतली आहे, आणि
In reply to धन्यवाद ! by धर्मराजमुटके
धर्मराज यांच्या बरोबर अंशता सहमत.
छान लिहीले आहे.
धन्यवाद पाभे! पण..
In reply to छान लिहीले आहे. by पाषाणभेद
गोनीदांसारखा लेखक होणे नाही.
कुणा एकाची भ्रमणगाथा.(?).
In reply to गोनीदांसारखा लेखक होणे नाही. by प्रचेतस
ते तर आहेच, मी जनरली त्यांची
In reply to कुणा एकाची भ्रमणगाथा.(?). by भागो
मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा
In reply to ते तर आहेच, मी जनरली त्यांची by प्रचेतस
'हद्दपार' देखील श्री. ना.
In reply to मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा by भागो
श्री.ना. पेंडसे यांनी
In reply to मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा by भागो
एक होती आजी ही अजून एक
In reply to श्री.ना. पेंडसे यांनी by भागो
मात्र तुंबाडचे खोत ह्या
In reply to एक होती आजी ही अजून एक by प्रचेतस
नशीबवान आहात _/\_
In reply to गोनीदांसारखा लेखक होणे नाही. by प्रचेतस
गोनीदा चांगले लेखक होते ह्यात दुमत नाही, पण
In reply to गोनीदांसारखा लेखक होणे नाही. by प्रचेतस
"पडघवली"वर आधारित एक टीव्ही
In reply to गोनीदा चांगले लेखक होते ह्यात दुमत नाही, पण by टर्मीनेटर
रथचक्र श्री. ना. पेंडसेंची.
In reply to "पडघवली"वर आधारित एक टीव्ही by गवि
बरोबर.
In reply to रथचक्र श्री. ना. पेंडसेंची. by प्रचेतस
रथचक्र- कृष्णाबाई.
In reply to बरोबर. by भागो
मग पडघवली या नावानेच होती का
In reply to रथचक्र- कृष्णाबाई. by प्रचेतस
हो, ती गोनीदांच्याच कादंबरीवर
In reply to मग पडघवली या नावानेच होती का by गवि
आम्ही तेव्हा प्रॉपर कोंकणातच
In reply to हो, ती गोनीदांच्याच कादंबरीवर by प्रचेतस
'पडगुलीची आजी'
In reply to "पडघवली"वर आधारित एक टीव्ही by गवि
खूप वर्षांपूर्वी वाचले होते.
धन्यवाद!
In reply to खूप वर्षांपूर्वी वाचले होते. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खूपच छान पुस्तक परिचय
ताई, तुम्ही स्वतःचा यू ट्यूब
खूपच छान परिचय भक्ती ताई..!
पुस्तक परिचय आवडला!
'दुर्गभ्रमण गाथा' हे सगळ्यात
पुस्तक परिचय आवडला...
सर्वांना खूप खूप धन्यवाद _/\_