आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल.
खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्या की वाईट हे ठरूच नये!
सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:))
अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :)
तात्या.
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे?
आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली.
विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा.
>>
अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद.....
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही.
(तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत.
थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही.
उदा:
झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले.
झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले.
इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा.
पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल.
गोवर्या थापणारीला, आपले घर सारवणार्या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.)
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते.
संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत.
मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते.
एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का?
शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे .
तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले?
मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!!
ह्.भ्.प. मनोज महाराज
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे.
म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे.
गवत खाणार्या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो.
बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच.
आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते.
मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!)
असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते.
आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले).
विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले.
- सर्किट
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.
आजानुकर्ण शी सहमत आहे.
१) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही.
२) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे.
३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे.
४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे.
(चविष्ट)
प्रकाश घाटपांडे
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
वारकर्यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्या एकाने किस्सा सांगितला. वारकर्यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते.
शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ
ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते.
जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....
प्रतिक्रिया
:)
हम्म
तेच तर!
मलमूत्र हे ओंगळ नव्हे,पण तो विनोद नव्हता
मान्य आहे
अवांतर
दुर्गंधाबाबत एक विचार
विचार करावा
पटणारा प्रतिसाद
मॅच्युरिटी
+१
सहमत आहे
हो.बरोबर
गोमुत्र आणि शेण
रोचक लेख
सोनखत
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की