मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजचा सुधारक ची कोंडी - प्रतिक्रिया १ व २ वर लेखकाचे प्रत्युत्तर

प्रकाश घाटपांडे · · काथ्याकूट
आता यावर डॉ. राहुल पाटील यांची प्रतिक्रिया बघा. Ajacha Sudharak 428 Ajacha sudharak 429 Ajacha Sudharak 430 Ajacha Sudharak 431 Ajacha Sudharak 432

वाचने 5542 वाचनखूण प्रतिक्रिया 2

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 19:11
ह्यांचे म्हणणे योग्यच आहे. आपण बर्‍याच गोष्टींचा उगीचच बाऊ करतो. श्लील-अश्लील ह्यांच्या व्याख्या आता बदलायला हव्यात असे वाटायला लागलेय. पुनरुत्पादन हा जगाचा नियमच आहे आणि त्याबद्दलची माणसाच्या शरीरात असलेली यंत्रणा ही फार महत्वाची आहे. त्याबद्दलच्या गैरसमजूती दूर करणे हे केव्हांही योग्यच ठरते आणि ते डॉ. पाटील ह्यांच्यासारखे त्या विषयातले तज्ञ करत आहेत ही चांगली बाब आहे. प्रकाशराव हे इथे प्रसिद्ध करून आपणही एक सत्कृत्य केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार.

विकास Fri, 12/14/2007 - 20:28
लैंगीक शिक्षणाबद्दल आणि डॉ. राहूल पाटील यांनी ज्या पद्धतीने माहीती दिली आहे त्याबद्दल अश्लील वाटायचा प्रश्न नाही. पण उदाहरण म्हणून ज्या भाषेत तरूण मुले हेच शिक्षण एकमेकांना देतात त्याला आणि आ.सु. मधील लेखाला समान तोलणे मात्र बरोबर वाटणार नाही. थोडक्यात लेख आणि अश्लीलपणा यात फरक आहे.
अवांतरः हा किस्सा आधी पण कधीतरी लिहीला आहे. कॉलेजमधे असताना, डॉ. आनंद नाडकर्णींचे "कामसंवाद" म्हणून एक व्याख्यान आयोजीत केले होते. तमाम प्राध्यापक मंडळी कावरीबावरी झाली होती, आडून विरोध करून तो कार्यक्रम टाळायचा प्रयत्न ही करून पाहीला. पण शेवटी कार्यक्रम झाला. मराठी मंडळाचा कार्यक्रम असूनही त्यात तमाम अमराठी (जे इतर वेळेस मराठी येत नाही म्हणायचे असेही!) आले होते. हॉल ठिच्च भरला होता. मुलांकडून तमाम प्रश्न नंतर विचारले गेले, सावधपणा म्हणून ते लिहून आणि वाचून नंतर विचारले. त्यात प्रश्नांमधून सेक्स या विषयावरील उत्सुकता नक्कीच दिसत होती, पण त्यात एकही प्रश्न "चीप"/"पांचट"/"अश्लील" नव्हता. थोडक्यात कुठेही वेडावाकडा प्रकार न होता तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सुरवातीपासून तो ज्या पद्धतीने चालू झाला, त्याला शेप केले गेले हे होते. त्यात विनोद होते, हसत खेळत होता, एरंडेल प्यायल्यासारखे कोणाचेही चेहरे नव्हते तरी देखील सभ्यतेच्या घरसगुंडीवर कोणीही बसले नव्हते...पण तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गोष्टी बिघडू शकतात, एकदा कारण घसरगुंडीवरून घसरणे खालीच होते....मग तक्रार करण्यात काहीच अर्थ नसतो.
अर्थात ह्या सर्वगोष्टींमधे "कलेक्टीव्ह बॅलन्सिंग ऍक्ट" लागते, अशक्य नाही, पण त्यासाठी प्रत्येकाचीच काहीना काहीतरी जबाबदारी आहे असे वाटते..