मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग १: प्रस्तावना

मार्गी ·

किल्लेदार Wed, 12/24/2025 - 20:22
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. IMG_7853 IMG_20190427_113916_487

किल्लेदार Wed, 12/24/2025 - 20:22
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. IMG_7853 IMG_20190427_113916_487
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता. तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद!

तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....( २)

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अर्ध्या तासापूर्वी झालेल्या त्या सगळ्या मरणप्राय प्रसव वेदनांचा विसर पडला तोंडाचे बोळके दाखवणार्‍या निष्पाप हसण्याने. जणू माझाच जन्म झाला असावा असे वाटले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. अनहद असा एक नाद असतो म्हणे. देवांच्या वाद्यांचा. कशावरही आघात न करता हा नाद होतो. तसा नाद कुठेतरी उमटला. तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण
क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53375 स्पर्षाचे गारूड म्हणायचे की की त्या निष्पाप हसण्याचे. ज्याच्या कडून कसलीही अपेक्षा नाही. ज्याला आपल्याकडून काहिही नकोय. लौकीक अर्थाने ते नाते कसले म्हणायचे.

पहिले ‘काव्य’ प्रसवताना . . .

हेमंतकुमार ·

चामुंडराय Fri, 12/26/2025 - 23:59
छान, कविता आवडली. कुमार१ सर, तुम्ही खरेतर गद्य लिखाणाबरोबरीने पद्य - कवितेच्या क्षेत्रात देखील मुशाफिरी करायला हवी होती आणि अजूनही करायला हरकत नाही. कविता वाचून महाविद्यालयीन जीवनातील सोनेरी दिवस आठवले. त्या स्वप्नाळू काळातील शिरस्त्या प्रमाणे र ला ट जुळवून यमक साधत काही कविता केल्या होत्या खऱ्या परंतु पुढे व्यावसायिक आणिक प्रापंचिक जबाबदाऱ्यांच्या दबडघ्यात त्या मागे पडल्या आणि ते कवितांचे बाड कालौघात नष्ट झाले व मराठी साहित्य एका उदयोन्मुख कवीला मुकले. मराठी सारस्वताचे दुर्दैव (आणि वाचकांचे सुदैव), दुसरे काय? पुढे मिपा चे सदस्यत्व घेतल्यावर कविता ह्या प्रकाराला फारसा ट्यार्रपी नाही असे लक्षात आले. मग काही प्रसिद्ध कवितांचे विडंबन करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु ती केवळ शाब्दिक मोडतोड ठरली.

हेमंतकुमार Sat, 12/27/2025 - 07:48
विडंबन करण्याचा प्रयत्न केला खरा
प्रयत्न केला हे महत्त्वाचे ! येऊ द्यात अजूनही एखादी कविता. स्वागत असेल :)

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय Sat, 12/27/2025 - 20:24
पेश हैं - भारतातील ख्रिसमस आणि सांताक्लॉज बद्दलची hype बघता भारतीयांच्या सर्वसमावेशकतेनुसार ते सांताक्लॉजची आरती करायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.  डिसेंम्बरा डिसेंम्बरा ख्रिसमस सांता डिसेंम्बरा । सांताबाबाचे नाम स्मरा हो सांताबाबाचे भजन करा ।

Bhakti Sat, 12/27/2025 - 13:47
खुप छान मनोगत लिहिले आहे.खरच यमक उत्तम जुळवलि आहेत ;) ;) मला निम्म्या आयुष्यभर कविताच सुचल्या :)माझा ब्लोग २००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे. मला आजही ओळ्खीचे भेटले कि कविता करते की नाही असे कौतुकमिश्रित विचारतात.आता माझी कविता काहिशी विझली आहे,ठरवुनच विझवलि आहे !! त्या सगळ्यांचा आशय असा होता की जातिवंत कवीने फक्त कविताच करायच्या असतात; इतर कुठल्याही साहित्यप्रकारांमध्ये हातपाय मारत बसायचे नसते +११११ जेव्हा तुम्ही खरच कवितेच्या प्रेमात्,प्रान्तात मनापासुन असता ना,तेव्हा फक्त कविताच सुचतात..इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता.

हेमंतकुमार Sat, 12/27/2025 - 16:29
२००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे. अरे वा ! अभिनंदन . . इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता. अगदी ! छान काव्यमय प्रतिसाद.

चामुंडराय Fri, 12/26/2025 - 23:59
छान, कविता आवडली. कुमार१ सर, तुम्ही खरेतर गद्य लिखाणाबरोबरीने पद्य - कवितेच्या क्षेत्रात देखील मुशाफिरी करायला हवी होती आणि अजूनही करायला हरकत नाही. कविता वाचून महाविद्यालयीन जीवनातील सोनेरी दिवस आठवले. त्या स्वप्नाळू काळातील शिरस्त्या प्रमाणे र ला ट जुळवून यमक साधत काही कविता केल्या होत्या खऱ्या परंतु पुढे व्यावसायिक आणिक प्रापंचिक जबाबदाऱ्यांच्या दबडघ्यात त्या मागे पडल्या आणि ते कवितांचे बाड कालौघात नष्ट झाले व मराठी साहित्य एका उदयोन्मुख कवीला मुकले. मराठी सारस्वताचे दुर्दैव (आणि वाचकांचे सुदैव), दुसरे काय? पुढे मिपा चे सदस्यत्व घेतल्यावर कविता ह्या प्रकाराला फारसा ट्यार्रपी नाही असे लक्षात आले. मग काही प्रसिद्ध कवितांचे विडंबन करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु ती केवळ शाब्दिक मोडतोड ठरली.

हेमंतकुमार Sat, 12/27/2025 - 07:48
विडंबन करण्याचा प्रयत्न केला खरा
प्रयत्न केला हे महत्त्वाचे ! येऊ द्यात अजूनही एखादी कविता. स्वागत असेल :)

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय Sat, 12/27/2025 - 20:24
पेश हैं - भारतातील ख्रिसमस आणि सांताक्लॉज बद्दलची hype बघता भारतीयांच्या सर्वसमावेशकतेनुसार ते सांताक्लॉजची आरती करायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.  डिसेंम्बरा डिसेंम्बरा ख्रिसमस सांता डिसेंम्बरा । सांताबाबाचे नाम स्मरा हो सांताबाबाचे भजन करा ।

Bhakti Sat, 12/27/2025 - 13:47
खुप छान मनोगत लिहिले आहे.खरच यमक उत्तम जुळवलि आहेत ;) ;) मला निम्म्या आयुष्यभर कविताच सुचल्या :)माझा ब्लोग २००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे. मला आजही ओळ्खीचे भेटले कि कविता करते की नाही असे कौतुकमिश्रित विचारतात.आता माझी कविता काहिशी विझली आहे,ठरवुनच विझवलि आहे !! त्या सगळ्यांचा आशय असा होता की जातिवंत कवीने फक्त कविताच करायच्या असतात; इतर कुठल्याही साहित्यप्रकारांमध्ये हातपाय मारत बसायचे नसते +११११ जेव्हा तुम्ही खरच कवितेच्या प्रेमात्,प्रान्तात मनापासुन असता ना,तेव्हा फक्त कविताच सुचतात..इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता.

हेमंतकुमार Sat, 12/27/2025 - 16:29
२००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे. अरे वा ! अभिनंदन . . इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता. अगदी ! छान काव्यमय प्रतिसाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वयाचे एकविसावे वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि नुकताच मतदानाचा अधिकार मिळाला होता (तेव्हा तो 21व्या वर्षी मिळायचा, 18व्या नव्हे). त्यामुळे झालो बाबा आपण एकदाचे प्रौढ, ही मनात सुखद भावना. पदवी शिक्षण शेवटच्या टप्प्यात आलेलं. त्याच दरम्यान लेखन उर्मी अगदी उफाळून आली. तशी ती त्यापूर्वीच्या काही वर्षांत मनात धुमसत होतीच परंतु लेखणीपर्यंत काही पोचत नव्हती. वसतिगृहाच्या एकंदरीत सामाजिक वातावरणातून लेखनाची ठिणगी पडायला चांगली मदत झाली. मग सुरुवातीस वहीतच काही खरडकामे झाली आणि त्यानंतर सार्वजनिक लेखनात पदार्पण केले ते वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रांमधून.

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

गवि ·

टर्मीनेटर Tue, 12/23/2025 - 10:45
बोलेतो... एकदम झकास 👍 लाईक केले आहे आणि प्रतिसादही दिला आहे, आता शेअर करतो आणि चेतनाताईंचे आणखीन काही व्हिडीओज पाहुन तेही आवडल्यास त्यांच्या चॅनलला सब्स्क्राईबही करतो...

प्रचेतस Wed, 12/24/2025 - 07:20
कथा अजून ऐकली नाही पण तुमची आहे म्हटल्यावर जबराटच असणार हे नक्की. सवडीने ऐकणारच आहे. ह्या नव्या प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.

टर्मीनेटर Tue, 12/23/2025 - 10:45
बोलेतो... एकदम झकास 👍 लाईक केले आहे आणि प्रतिसादही दिला आहे, आता शेअर करतो आणि चेतनाताईंचे आणखीन काही व्हिडीओज पाहुन तेही आवडल्यास त्यांच्या चॅनलला सब्स्क्राईबही करतो...

प्रचेतस Wed, 12/24/2025 - 07:20
कथा अजून ऐकली नाही पण तुमची आहे म्हटल्यावर जबराटच असणार हे नक्की. सवडीने ऐकणारच आहे. ह्या नव्या प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
लेखनप्रकार
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता. आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका. आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा.

कथा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

अभ्या.. Tue, 12/23/2025 - 16:56
अप्रतिम, केवळ अप्रतिम. अदभुत व्हिज्युलायझेशन. आदिम ओढीचे शाश्वत लढे.. . खूप दिवसांनी चांगले काहीतरी वाचायला मिळाले आहे.

Bhakti Tue, 12/23/2025 - 18:16
खुप छान!खुपचं बारकाईने कथा लिहिली आहे. आधी वाटले रोमॅंटिक कथा आहे पण नंतर वेगळेच वळण मिळाले .तंत्रज्ञान मानवी भावनांना परिपूर्ण ओळखू शकणारच, त्यांची जागा घेऊही शकणार नाही हे मात्र वाटतं राहते.

अनामिक सदस्य गुरुवार, 12/25/2025 - 08:59
तो फट्टू, ती हुश्शार. त्याच्याकडे कुठले स्किल नाही पण तिने एकदा बघून आग पेटवणे शिकून घेतले. तो हळू हळू शिकत होता, ती मात्र पटपट शिकत होती. “जो पुरुष मला हवाय असं तुला वाटतं तो तू व्हायचा आटोकाट प्रयत्न करतो आहेस. मात्र तो पुरुष सतत विझत राहतो." अहंकार पाय निकामी करण्याआधी थांबायचं. अर्थात त्याला ते जमलं नाही. आजकाल अनेक ठिकणी किती सहजरित्या 'तो' मूर्ख तरी नाहीतर नालायक तरी दाखवला जातो, आणि 'ती' मात्र हुशार, सर्वगुणसम्प्नन्न. हेच उलट झाले तर ते चालते का? TV वरच्या जाहिराती बघा कधी, किन्वा पुणे मेट्रो मधील Do's and Don'ts ची पोस्टर्स. योग्य वागणारी ती, चुकीचे वागणारा तो.

In reply to by अनामिक सदस्य

Bhakti गुरुवार, 12/25/2025 - 10:57
हे कोणाला जाणवतेय का? तो फट्टू, ती हुश्शार.
+१ मी हे लिहिणार होते की नायक फारच साधाभोळा वाटतोय.पण आजूबाजूला असतात की असेही पुरूष! त्यामुळे लिहिले नाही :) पण स्त्रीया डॅशिंग असणाऱ्या कथा, सिनेमे,मालिका जास्त लोकप्रिय ठरतात,हेही खरं! कारण हे असावं की अशा स्त्रिया घडायची प्रोसेस अनेक काळापासून खुप संथ आहे.

In reply to by Bhakti

अनामिक सदस्य Sat, 12/27/2025 - 21:36
स्त्रीया डॅशिंग असु देत ना पण म्हणून पुरुश एकतर बावळट नाहीतर नालायक का दाखवले जातात, हा प्रश्न आहे.

In reply to by अनामिक सदस्य

हंटर गॅदरर म्हणून तो दुबळा आहे आणि निर्बुद्ध आहे. तरीही तो तिला वाचवायला जातो आणि हातातले पोर जनावरांच्या साठी सोडताना आवंढा गिळतो इतका तो सहृदय आहे. तेच मूल सहज सोडून देणारी ती मात्र सर्वगुणसंपन्न वाटली तुम्हाला? अभिमन्यू नावाच्या एका प्रचंड प्रगत गेमचा एक कोडर म्हणून मात्र तो प्रचंड हुशार आहे. मात्र एक गर्भ वाचावा म्हणून आपली सगळी कमाई पणाला न लावणारा एक कठोर व्यवहारी पुरुष देखील आहे, यावरून तो किती रिस्क अवर्स आहे हे लक्षात यावे. आयुर्वेदात किंवा आपल्या शास्त्रांत या प्रकारच्या बुद्धिला व्यवसायित्मिका बुद्धी असे म्हंटले आहे. जी स्किल बेस्ड बुद्धी आहे. आणि आपण जगात विशेषत: आजच्या जगात अशा बुद्धीवरुनच माणसांचे पगार ठरतात. दोन जगांतील द्वंद्व दाखवण्याचा एक प्रयत्न होता मात्र कुणीच वाचत नसल्याने तो फसला असे वाटते.

गवि Fri, 12/26/2025 - 13:21
हा एक उत्तम प्रयोग आहे आणि खूपच आवडला. असेच काहीतरी वेगळ्या वाटेवरचे लेखन येत रहावे. कोणालाच पूर्ण चांगले किंवा वाईट, उदात्त किंवा क्षुद्र, लायक अथवा नालायक असे न दाखवता माणसं जशी असतात तशी दाखवणं आवडलं. विश्व कितीही बदलो. AI चे जग येवो वा पुन्हा एकदा फिरून अश्मयुग येवो. माणसांचे हे पीळ सुंभ कितीही जळला तरी नाहीसे होणार नाहीत. बाकी जाता जाता.. जे आदिम युग आणि जीवनमान या कथेत दाखवले आहे ते पुन्हा एकदा कृत्रिमरित्या वसवले जाणे आणि काळाचे चक्र नाकारून उलटे फिरण्याचे प्रचंड आकर्षण तयार होणे, आणि त्याला प्रचंड किंमत येणे हे वाटते तितके काल्पनिक नाही. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. ता. क. या निमित्ताने तुम्ही मिरजेजवळच्या दंडोबा परिसराची मानसिक सफर घडवून आणलीत. खूप दशकांनी. :-)

टर्मीनेटर Fri, 12/26/2025 - 16:33
हे कोणाला जाणवतेय का?
@ अनामिक सदस्य 'तुम उडते पंछी के पर गिनने वाले लोग हो' वगैरे सारख्या हिंदी म्हणी तुम्ही ऐकल्या असतील, पण 'तुम उडते पंछी के झाX गिनने वाले लोग' हो अशी म्हण आम्ही आमच्या बाबतीत लोकांना म्हणताना ऐकले आहे 😂 आत्मस्तुती वगैरे वाटेल पण 'असल्या लोकांना' आजपर्यंत फक्त पेललेच नाही तर रेललेले आहे.. भोळी भाबडी जनता त्यांच्या अजेंडा/प्रोपगंडाला फसते पण सगळेच वाचक तेवढे बावळट नसतात हे तुम्ही आपल्या प्रतिसादातून दाखवून दिले आहे 👍 हॅट्सऑफ बॉस...

अभ्या.. Tue, 12/23/2025 - 16:56
अप्रतिम, केवळ अप्रतिम. अदभुत व्हिज्युलायझेशन. आदिम ओढीचे शाश्वत लढे.. . खूप दिवसांनी चांगले काहीतरी वाचायला मिळाले आहे.

Bhakti Tue, 12/23/2025 - 18:16
खुप छान!खुपचं बारकाईने कथा लिहिली आहे. आधी वाटले रोमॅंटिक कथा आहे पण नंतर वेगळेच वळण मिळाले .तंत्रज्ञान मानवी भावनांना परिपूर्ण ओळखू शकणारच, त्यांची जागा घेऊही शकणार नाही हे मात्र वाटतं राहते.

अनामिक सदस्य गुरुवार, 12/25/2025 - 08:59
तो फट्टू, ती हुश्शार. त्याच्याकडे कुठले स्किल नाही पण तिने एकदा बघून आग पेटवणे शिकून घेतले. तो हळू हळू शिकत होता, ती मात्र पटपट शिकत होती. “जो पुरुष मला हवाय असं तुला वाटतं तो तू व्हायचा आटोकाट प्रयत्न करतो आहेस. मात्र तो पुरुष सतत विझत राहतो." अहंकार पाय निकामी करण्याआधी थांबायचं. अर्थात त्याला ते जमलं नाही. आजकाल अनेक ठिकणी किती सहजरित्या 'तो' मूर्ख तरी नाहीतर नालायक तरी दाखवला जातो, आणि 'ती' मात्र हुशार, सर्वगुणसम्प्नन्न. हेच उलट झाले तर ते चालते का? TV वरच्या जाहिराती बघा कधी, किन्वा पुणे मेट्रो मधील Do's and Don'ts ची पोस्टर्स. योग्य वागणारी ती, चुकीचे वागणारा तो.

In reply to by अनामिक सदस्य

Bhakti गुरुवार, 12/25/2025 - 10:57
हे कोणाला जाणवतेय का? तो फट्टू, ती हुश्शार.
+१ मी हे लिहिणार होते की नायक फारच साधाभोळा वाटतोय.पण आजूबाजूला असतात की असेही पुरूष! त्यामुळे लिहिले नाही :) पण स्त्रीया डॅशिंग असणाऱ्या कथा, सिनेमे,मालिका जास्त लोकप्रिय ठरतात,हेही खरं! कारण हे असावं की अशा स्त्रिया घडायची प्रोसेस अनेक काळापासून खुप संथ आहे.

In reply to by Bhakti

अनामिक सदस्य Sat, 12/27/2025 - 21:36
स्त्रीया डॅशिंग असु देत ना पण म्हणून पुरुश एकतर बावळट नाहीतर नालायक का दाखवले जातात, हा प्रश्न आहे.

In reply to by अनामिक सदस्य

हंटर गॅदरर म्हणून तो दुबळा आहे आणि निर्बुद्ध आहे. तरीही तो तिला वाचवायला जातो आणि हातातले पोर जनावरांच्या साठी सोडताना आवंढा गिळतो इतका तो सहृदय आहे. तेच मूल सहज सोडून देणारी ती मात्र सर्वगुणसंपन्न वाटली तुम्हाला? अभिमन्यू नावाच्या एका प्रचंड प्रगत गेमचा एक कोडर म्हणून मात्र तो प्रचंड हुशार आहे. मात्र एक गर्भ वाचावा म्हणून आपली सगळी कमाई पणाला न लावणारा एक कठोर व्यवहारी पुरुष देखील आहे, यावरून तो किती रिस्क अवर्स आहे हे लक्षात यावे. आयुर्वेदात किंवा आपल्या शास्त्रांत या प्रकारच्या बुद्धिला व्यवसायित्मिका बुद्धी असे म्हंटले आहे. जी स्किल बेस्ड बुद्धी आहे. आणि आपण जगात विशेषत: आजच्या जगात अशा बुद्धीवरुनच माणसांचे पगार ठरतात. दोन जगांतील द्वंद्व दाखवण्याचा एक प्रयत्न होता मात्र कुणीच वाचत नसल्याने तो फसला असे वाटते.

गवि Fri, 12/26/2025 - 13:21
हा एक उत्तम प्रयोग आहे आणि खूपच आवडला. असेच काहीतरी वेगळ्या वाटेवरचे लेखन येत रहावे. कोणालाच पूर्ण चांगले किंवा वाईट, उदात्त किंवा क्षुद्र, लायक अथवा नालायक असे न दाखवता माणसं जशी असतात तशी दाखवणं आवडलं. विश्व कितीही बदलो. AI चे जग येवो वा पुन्हा एकदा फिरून अश्मयुग येवो. माणसांचे हे पीळ सुंभ कितीही जळला तरी नाहीसे होणार नाहीत. बाकी जाता जाता.. जे आदिम युग आणि जीवनमान या कथेत दाखवले आहे ते पुन्हा एकदा कृत्रिमरित्या वसवले जाणे आणि काळाचे चक्र नाकारून उलटे फिरण्याचे प्रचंड आकर्षण तयार होणे, आणि त्याला प्रचंड किंमत येणे हे वाटते तितके काल्पनिक नाही. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. ता. क. या निमित्ताने तुम्ही मिरजेजवळच्या दंडोबा परिसराची मानसिक सफर घडवून आणलीत. खूप दशकांनी. :-)

टर्मीनेटर Fri, 12/26/2025 - 16:33
हे कोणाला जाणवतेय का?
@ अनामिक सदस्य 'तुम उडते पंछी के पर गिनने वाले लोग हो' वगैरे सारख्या हिंदी म्हणी तुम्ही ऐकल्या असतील, पण 'तुम उडते पंछी के झाX गिनने वाले लोग' हो अशी म्हण आम्ही आमच्या बाबतीत लोकांना म्हणताना ऐकले आहे 😂 आत्मस्तुती वगैरे वाटेल पण 'असल्या लोकांना' आजपर्यंत फक्त पेललेच नाही तर रेललेले आहे.. भोळी भाबडी जनता त्यांच्या अजेंडा/प्रोपगंडाला फसते पण सगळेच वाचक तेवढे बावळट नसतात हे तुम्ही आपल्या प्रतिसादातून दाखवून दिले आहे 👍 हॅट्सऑफ बॉस...
लेखनविषय:
लेखनप्रकार
---------- अलिकडं ------------ सगळ्यात आधी त्यांना जाणवला तो निसर्गाच्या सर्व हालचालींनी गजबजलेला एकांत. कुठलाही गोंगाट नाही. काटेरी झुडुपांवरून सर्र असा आवाज करत वाहणारे वारे. पक्षांची किलबिल. तळपायाखाली एखाद्या सपाट दगडाची रुतणारी ऊब. शहरातल्या घरातल्या मधल्या डिजिटल भिंतींना कंटाळून ते इथे भटकत होते. त्या भिंतींच्या आत तीच रोजची 32k पिक्सेलमधली भांडणं करून ते वैतागले होते. ज्या ज्या त्रासदायक आठवणी ते काढत त्या त्या भिंतींवर लगेच प्रोजेक्ट होत. ती किंचाळायची, “तू मला कंट्रोल करू बघतोस”.

तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दार लाव गं जरा... गोपिकाबाई करवादतात. त्यांना स्वतःलाच त्याचा आवाज परका वाटतो. कुठूनतरी दुरुन आल्यासारखा , कोणातरी दुसर्‍याचाच. इतका परका की त्यानाच कोणीतरी दार लावायला सांगितले असावे असा. क्षणभर अचंभीत व्हायला होते. कोण आलंय या वेळेला म्हणून त्या इकडे तिकडे पहातात. खोलीमधे एक टेबल. त्यावर पाण्याचा जग. सभोवताली औषधांची पिलावळ. गोपीकाबाईना ती औषधाची बाटली आनि तीच्याभोवती असलेल्या छोट्या बाटल्या पाहून उगाचंच जीवतीची आथवण होते.असेच असते ना जीवती मातेचे चित्र. एक स्त्री पिलाबाळांनी लगडलेली. फणसाच्या झाडाला फणस लगडलेले असावे तशी पोरे तीच्या अंगाखाड्यावर लगडलेले असतात.

माझे पहिले कवितेचे पुस्तक Nightingale in the Shadows गुलामांच्या भाषेतच

विवेकपटाईत ·

गवि गुरुवार, 12/18/2025 - 11:54
अभिनंदन. पुढील वेळेसाठी एक बारीकशी सुचवणी. डबल डॅश किंवा लांबडी डॅश ही खास चॅट जिपीटी आऊटपुटची निशाणी आहे. तुम्ही स्वतः भाषांतर केले असले आणि जिपीटीचा उपयोग मर्यादित सुधारणा किंवा बदल यांसाठी केला असेल, तरीही अशा खुणांमुळे तो थेट चॅट जिपीटी कॉपी पेस्ट मजकूर असल्याचे जाणवते. अशा लांब डॅशेस काढून टाकल्या तर बरे होईल. उदा. blushed आणि endless नंतर येणारे चिन्ह. Seeing her, I softly whistled. Seeing me, she blushed—just a little. No words, just glances, And a smile tucked in her cheek. Let there be storms, Let worldly toil be endless— Still, in her eyes, Spring blossoms forever.

विवेकपटाईत गुरुवार, 12/18/2025 - 13:06
काही आधी अनुवाद करून मग चाट जीपीटी वर टाकल्या, त्यामुळे मोठ्या लाईन्स आहे.त्या मला ही आवडल्या..बाकी अधिकांश कविता चार सहा लाईन्स असल्याने गरज पडली नाही. उदा: From Peepal to Money Plant The peepal tree left the village breeze behind. In the city flat, it became a money plant. Packaged in Verse I shape emotions, sour-sweet, bitter-hot, into neat, tempting parcels of fast-food flavour, and call them Poems.

गवि गुरुवार, 12/18/2025 - 11:54
अभिनंदन. पुढील वेळेसाठी एक बारीकशी सुचवणी. डबल डॅश किंवा लांबडी डॅश ही खास चॅट जिपीटी आऊटपुटची निशाणी आहे. तुम्ही स्वतः भाषांतर केले असले आणि जिपीटीचा उपयोग मर्यादित सुधारणा किंवा बदल यांसाठी केला असेल, तरीही अशा खुणांमुळे तो थेट चॅट जिपीटी कॉपी पेस्ट मजकूर असल्याचे जाणवते. अशा लांब डॅशेस काढून टाकल्या तर बरे होईल. उदा. blushed आणि endless नंतर येणारे चिन्ह. Seeing her, I softly whistled. Seeing me, she blushed—just a little. No words, just glances, And a smile tucked in her cheek. Let there be storms, Let worldly toil be endless— Still, in her eyes, Spring blossoms forever.

विवेकपटाईत गुरुवार, 12/18/2025 - 13:06
काही आधी अनुवाद करून मग चाट जीपीटी वर टाकल्या, त्यामुळे मोठ्या लाईन्स आहे.त्या मला ही आवडल्या..बाकी अधिकांश कविता चार सहा लाईन्स असल्याने गरज पडली नाही. उदा: From Peepal to Money Plant The peepal tree left the village breeze behind. In the city flat, it became a money plant. Packaged in Verse I shape emotions, sour-sweet, bitter-hot, into neat, tempting parcels of fast-food flavour, and call them Poems.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चित्र या महिन्यात मी माझे पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. त्यामागची कथा अशी आहे— सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सौ.ची बहीण, वय 80च्या पुढे असलेली, मला म्हणाली: “विवेक, तुझ्या कविता उत्तम आहेत. त्या इंग्रजीत अनुवाद करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित कर. लागेल तर मी त्यांचे संपादन करून देईन.” माझ्या सौ.ची आतेबहीण, डॉ. उषा बंदे— आयआयएएस शिमला येथील माजी फेलो—गेल्या 50 वर्षांपासून विविध इंग्रजी वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमित लेखन करत आहेत.

विक्रम-वेताळ कथा: जानव्याचे गूढ आणि मिपानगरीचा तिढा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

Bhakti गुरुवार, 12/18/2025 - 10:25
बाई.. सकाळी सकाळी खो खो हसत सुटले :) मग तपासले जानवं खरच गायबल की ओ!! खरंय परंपरावादी Vs सत्यशोधन हा सामना सर्वच सोशल मिडियाभर पसरलाय.दोन्हीकडची मंडळी खुपच संवेदनशील झाली आहेत. सर दर महिन्याला मिपानगरीची अशी कथा सादर करा. मी नसते सोडत मिपा बघा ;) :)

अभ्या.. गुरुवार, 12/18/2025 - 12:18
परवाच त्या स्मशानात जाऊन मिपा संविधान कोरलेला भग्न दगड पाहून आलो. आसपास विखुरलेल्या चारपाच वीरगळ सदृश दगडातून आवाज येत होता. "कसला सनातन आणि मिपाधर्म घेऊन बसलात. धर्मनिरपेक्षतेच्या प्रेमाने आम्ही केलेलं बलिदान कुणाला आठवणार नाही. आमच्यासाठी हे बलिदान असलं तरी अंधभक्तानी झुंडशाहीने केलेल्या हत्या आहेत" . आम्ही हळूच म्हणले "भेटू लवकरच"

टर्मीनेटर गुरुवार, 12/18/2025 - 14:15
झकास लेख आहे सर... एकदम 'चांदोबा' मधली विक्रम-वेताळ कथा वाचत असल्याचा फील आला!
"प्राचीन मिपानगरी राज्यात राजा नीलसेन आणि प्रशानसेन नावाचे दोन भाऊ मिळून राज्य करत होते. सोबतीला चतुर, विद्वान सल्लागारही होते, दरबारात, सल्लागारांचा मोठा दबदबा होता.
इथे फक्त एक बदल सुचवावासा वाटतो की... दरबारात दबदबा असलेल्या 'चतुर, विद्वान सल्लागारांपैकी' कोणाकडेच 'डॅमेज झाल्यावर ते कंट्रोल करण्यापेक्षा ते डॅमेज होऊच नये ह्यासाठी काय करावे' हा विचार करण्याची क्षमता नव्हती असे आज दुर्दैवाने म्हणावे लागत आहे 😀 अर्थात अजूनही परिस्थिती तेवढीही हाताबाहेर गेली आहे असे वाटत नाही, पण त्यासाठी कोणाकडूनही' आपला राजकीय / वैचारिक अजेंडा राबवण्यासाठी होणारा मिपाचा वापर थांबवल्यास पुढचा काळ ह्या प्रतिष्ठित संकेतस्थळासाठी वैभवशालीअसेल ह्यात मलातरी काही शंका नाही... 'भावनांमे बह गया हैं' टाईप प्रतिसाद वाटल्यास क्षमस्व 😂

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/18/2025 - 21:03
'प्लॅसिबो' इफेक्टपेक्षा बियर इफेक्ट जास्त आहे, असे कोणी तरी दरबारात हळू आवाजात बोललं होतं.
पुराव्या प्रित्यर्थ जुन्या जाणत्या दरबारी ने अंधारदिव्यांच्या लेखनाचे उत्खनत केले. तिथे त्यांना स्वगत या लेखनात सज्जड पुरावा मिळाला. तिथे हा सूर्य हा जयद्रथ म्हणून हा प्लासिबो इफेक्ट नसून बियर इफेक्ट च आहे हे वादातीत पणे सिद्ध केले. प्रा. चिरुटे यांनी अंधारदिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात लेख वाचता येत नसल्याने सोबतीला चिरुटाचा प्रकाश ही घेतला व गतकाळात असलेल्या स्वगताचे अक्षर न अक्षर वाचून काढले. वाचताना फारच श्रम पडल्याने सोबत "श्रमपरिहार"ही चालू होता. एका उत्कट क्षणी त्यांना गोमूत्र व बिअर यांचा घट्ट स्ंबंध आढळला. तोपर्यंत वेताळ हा विक्रमादित्याच्या खांद्यावरुन उडून परत झाडाला लटकता झाला

आतापर्यंत च्या माझ्या उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. पण धागा अप्रकाशित व्ह्यायची ही पहिलीच वेळ आहे. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. मी हा मानापमानाचा मुद्दा न मानता विषय इथे सोडून देत आहे. पण धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मूकवाचक Fri, 12/19/2025 - 13:09
हा विषय एका धाग्यापुरता मर्यादित न ठेवता व्यापक अर्थाने बघायला हवे. हिंदूंच्या श्रद्धा, रूढी, परंपरा आणि प्रतिके (त्या कितीही निरूपद्रवी असल्या तरी!) हा विनोदनिर्मीतीचा हक्काचा विषय आहे, त्यावर प्रतिक्रिया उमटत नाहीत हे गृहीतक आता तितकेसे खरे राहिलेले नाही. ठराविक लोकांच्या धार्मिक भावनांची गळवे ठसठसतात असा काही जण नेहेमी उपहास करताना दिसतात. यापैकी बहुसंख्य लोकांची जातीय भावनांची गळवे ठसठसतात ही वस्तुस्थिती लपून राहात नाही. अशाच टोकाच्या भावना ठराविक तत्वज्ञान, महापुरूष यांच्या बाबतीत असतात. त्या अर्थाने 'गळवे मुक्त' व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कितीही लपवले तरी आपल्याला अप्रिय असलेल्या विचारसरणीचे लोक सत्तेवर मांड ठोकून बसलेले आहेत हे सहन न झाल्याने कित्येक विचारवंतांची गळवे ठसठसतात हे लपून राहिलेले नाही. तेव्हा लेखकाच्या दृष्टीने हलक्या फुलक्या असलेल्या लेखावर विरोधी प्रतिक्रिया येणे फारसे अनपेक्षित नाही. असो.

अनन्त अवधुत Fri, 12/19/2025 - 13:34
जोर्दार लेख झालाय. एकदम विक्रम वेताळची आठवण झाली. फोटू पण चांदोबा मधला वाटतो. जानव्यावरचा लेख वाचला होता, पण धाग्याचे कश्मिर कधी झाले ते कळले नाही.

स्वधर्म Fri, 12/19/2025 - 15:26
जबरी लेख. असा लेख लिहायला लेखकच पाहिजे. म्हणून म्हणतो तेथे पाहिजे जातीचे. आपल्या 'तसल्या' जातींचा संबंध नाही बरं का इथे! लेख उडाला पण नवे प्रतिसाद वाचता आले नाहीत व मोठ्याच मनोरंजनास मुकलो असे वाटते.

सर्व वाचक मिपाकर, लेखक, प्रतिसादकर्ते यांनी लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तहेदिलसे शुक्रिया. लेखन प्रोत्साहन उत्साहवर्धक असल्यामुळे लिहायला बळ येतं. विक्रम वेताळाचे चित्र AI च्या सौजन्याने होतं. डिस्क्लेमर : विक्रम आणि वेताळाची ही कथा पूर्ण काल्पनिक होती. सदरील कथेत येणारे पात्र, नावे, कथा, राज्यनावे आणि तत्सम गोष्टी काल्पनिकच होत्या, कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :) -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Sat, 12/20/2025 - 13:01
"कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :)"
😀. यश असो की अपयश, त्याचे श्रेय/जवाबदारी ही अशाप्रसंगी सामुहिकच असते, आणि झालीच असेल काही चुकी तर ती मान्य करण्यात कमीपणा न मानता उलट अशा खुस्खुशीत लेखाच्या माध्यमातुन ती स्विकारुन पुढे जाणे हे चांगलेच आहे की! त्यामुळे खुलाशाची आवश्यकता नव्हती... कंकाकांच्या हे बरोबर लक्षात आलेले दिसले म्हणुनच त्यांच्या प्रतिसादावर 'With no regrets...' असा उप-प्रतिसादही दिला! (योगायोगांवर पुर्ण विश्वास असलेला) - टर्मीनेटर

नावातकायआहे Tue, 12/23/2025 - 11:45
'नवीन डेटा पॅक दे रे' (सलील कुलकर्णी यांची कविता) नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर "थुंकीन" म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो. रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही, कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही. कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको, आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको. खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी. दिशाहीन द्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा. चाले बोटे धारधार, शब्दांमधून डंख मार. घेरून एखाद्याला, वेडा करून टाकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव, ज्याला वाटेल जसे वाटेल धरून खुशाल बडव. आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे फसवे रूप. जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल, धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे. जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही, सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू. धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल, तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल, ज्याच्या सोबत कोणी नसेल. आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ. मग घेऊन नवीन नाव, नवा फोटो नवा डाव. त्याच शिव्या तेच शाप, त्याच शिड्या तेच साप. वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो, जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो. थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे, एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे. नवा डेटा पॅक दे, आभाळावर थुंकीन म्हणतो. नवा डेटा पॅक दे रे...

In reply to by नावातकायआहे

धर्मराजमुटके Tue, 12/30/2025 - 17:26
नवीन डेटा पॅक दे रे मुळात पहिले वाक्यच चुकीचे वाटत आहे "दे रे" कशाला ? विकतच का घेत नाही ? स्वतःच्या पैशाने डेटा पॅक मारला तरच थुंकण्यात मजा आहे.

युयुत्सु Tue, 12/23/2025 - 11:57
सन्मानाने जगण्यासाठी माणसाला धर्माची गरज आहे का? याचे उत्तर नाही असे आहे, पण धर्मवेड्या लोकांना स्वीकारता येत नाही. वेळच्यावेळी प्रामाणिक पणे कर भरणे, सिग्नल आणि रांगांचा आदर करणे, गाडी चालवतांना मोबाईलवर न बोलणे इतके साधे नियम पाळले की देशाचे असंख्य प्रश्न वेगाने सुटतील. मग जानव्या सारख्या धर्मचिन्हांची गरज उरणार नाही...

कांदा लिंबू Mon, 12/29/2025 - 14:57
सदर लेखात परंपरा या शब्दाचा उल्लेख नऊ वेळा झाला आहे आणि प्रत्येक वेळी तो नकारात्मक, हेटाळणीपूर्ण अर्थाने झाला आहे. शाळेत शिकलेल्या आणि दररोज म्हटलेल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेत परंपरा या शब्दाचा उल्लेख दोन वेळा झाला आहे आणि दोन्ही वेळा तो सकारात्मक, आदरपूर्ण अर्थाने झाला आहे. मिपाकरांनी हा लेख योग्य मानावा की ती प्रतिज्ञा योग्य मानावी? --- भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद

In reply to by कांदा लिंबू

कांदा लिंबू Wed, 12/31/2025 - 16:16
बाकी, वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले की, बगल द्यायची सदर धागालेखकाची ही काही पहिलीच वेळ नाही.

In reply to by कंजूस

कंजूस काका, नव-लेखकास घटना, पात्र, आणि विषय मिळाला की, वेताळ विक्रमाच्या पाठीवर शंभर टक्के बसणार आणि एक कथा येणार. आपलं प्रोत्साहन असू दे. -दिलीप बिरुटे

Bhakti गुरुवार, 12/18/2025 - 10:25
बाई.. सकाळी सकाळी खो खो हसत सुटले :) मग तपासले जानवं खरच गायबल की ओ!! खरंय परंपरावादी Vs सत्यशोधन हा सामना सर्वच सोशल मिडियाभर पसरलाय.दोन्हीकडची मंडळी खुपच संवेदनशील झाली आहेत. सर दर महिन्याला मिपानगरीची अशी कथा सादर करा. मी नसते सोडत मिपा बघा ;) :)

अभ्या.. गुरुवार, 12/18/2025 - 12:18
परवाच त्या स्मशानात जाऊन मिपा संविधान कोरलेला भग्न दगड पाहून आलो. आसपास विखुरलेल्या चारपाच वीरगळ सदृश दगडातून आवाज येत होता. "कसला सनातन आणि मिपाधर्म घेऊन बसलात. धर्मनिरपेक्षतेच्या प्रेमाने आम्ही केलेलं बलिदान कुणाला आठवणार नाही. आमच्यासाठी हे बलिदान असलं तरी अंधभक्तानी झुंडशाहीने केलेल्या हत्या आहेत" . आम्ही हळूच म्हणले "भेटू लवकरच"

टर्मीनेटर गुरुवार, 12/18/2025 - 14:15
झकास लेख आहे सर... एकदम 'चांदोबा' मधली विक्रम-वेताळ कथा वाचत असल्याचा फील आला!
"प्राचीन मिपानगरी राज्यात राजा नीलसेन आणि प्रशानसेन नावाचे दोन भाऊ मिळून राज्य करत होते. सोबतीला चतुर, विद्वान सल्लागारही होते, दरबारात, सल्लागारांचा मोठा दबदबा होता.
इथे फक्त एक बदल सुचवावासा वाटतो की... दरबारात दबदबा असलेल्या 'चतुर, विद्वान सल्लागारांपैकी' कोणाकडेच 'डॅमेज झाल्यावर ते कंट्रोल करण्यापेक्षा ते डॅमेज होऊच नये ह्यासाठी काय करावे' हा विचार करण्याची क्षमता नव्हती असे आज दुर्दैवाने म्हणावे लागत आहे 😀 अर्थात अजूनही परिस्थिती तेवढीही हाताबाहेर गेली आहे असे वाटत नाही, पण त्यासाठी कोणाकडूनही' आपला राजकीय / वैचारिक अजेंडा राबवण्यासाठी होणारा मिपाचा वापर थांबवल्यास पुढचा काळ ह्या प्रतिष्ठित संकेतस्थळासाठी वैभवशालीअसेल ह्यात मलातरी काही शंका नाही... 'भावनांमे बह गया हैं' टाईप प्रतिसाद वाटल्यास क्षमस्व 😂

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/18/2025 - 21:03
'प्लॅसिबो' इफेक्टपेक्षा बियर इफेक्ट जास्त आहे, असे कोणी तरी दरबारात हळू आवाजात बोललं होतं.
पुराव्या प्रित्यर्थ जुन्या जाणत्या दरबारी ने अंधारदिव्यांच्या लेखनाचे उत्खनत केले. तिथे त्यांना स्वगत या लेखनात सज्जड पुरावा मिळाला. तिथे हा सूर्य हा जयद्रथ म्हणून हा प्लासिबो इफेक्ट नसून बियर इफेक्ट च आहे हे वादातीत पणे सिद्ध केले. प्रा. चिरुटे यांनी अंधारदिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात लेख वाचता येत नसल्याने सोबतीला चिरुटाचा प्रकाश ही घेतला व गतकाळात असलेल्या स्वगताचे अक्षर न अक्षर वाचून काढले. वाचताना फारच श्रम पडल्याने सोबत "श्रमपरिहार"ही चालू होता. एका उत्कट क्षणी त्यांना गोमूत्र व बिअर यांचा घट्ट स्ंबंध आढळला. तोपर्यंत वेताळ हा विक्रमादित्याच्या खांद्यावरुन उडून परत झाडाला लटकता झाला

आतापर्यंत च्या माझ्या उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. पण धागा अप्रकाशित व्ह्यायची ही पहिलीच वेळ आहे. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. मी हा मानापमानाचा मुद्दा न मानता विषय इथे सोडून देत आहे. पण धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मूकवाचक Fri, 12/19/2025 - 13:09
हा विषय एका धाग्यापुरता मर्यादित न ठेवता व्यापक अर्थाने बघायला हवे. हिंदूंच्या श्रद्धा, रूढी, परंपरा आणि प्रतिके (त्या कितीही निरूपद्रवी असल्या तरी!) हा विनोदनिर्मीतीचा हक्काचा विषय आहे, त्यावर प्रतिक्रिया उमटत नाहीत हे गृहीतक आता तितकेसे खरे राहिलेले नाही. ठराविक लोकांच्या धार्मिक भावनांची गळवे ठसठसतात असा काही जण नेहेमी उपहास करताना दिसतात. यापैकी बहुसंख्य लोकांची जातीय भावनांची गळवे ठसठसतात ही वस्तुस्थिती लपून राहात नाही. अशाच टोकाच्या भावना ठराविक तत्वज्ञान, महापुरूष यांच्या बाबतीत असतात. त्या अर्थाने 'गळवे मुक्त' व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कितीही लपवले तरी आपल्याला अप्रिय असलेल्या विचारसरणीचे लोक सत्तेवर मांड ठोकून बसलेले आहेत हे सहन न झाल्याने कित्येक विचारवंतांची गळवे ठसठसतात हे लपून राहिलेले नाही. तेव्हा लेखकाच्या दृष्टीने हलक्या फुलक्या असलेल्या लेखावर विरोधी प्रतिक्रिया येणे फारसे अनपेक्षित नाही. असो.

अनन्त अवधुत Fri, 12/19/2025 - 13:34
जोर्दार लेख झालाय. एकदम विक्रम वेताळची आठवण झाली. फोटू पण चांदोबा मधला वाटतो. जानव्यावरचा लेख वाचला होता, पण धाग्याचे कश्मिर कधी झाले ते कळले नाही.

स्वधर्म Fri, 12/19/2025 - 15:26
जबरी लेख. असा लेख लिहायला लेखकच पाहिजे. म्हणून म्हणतो तेथे पाहिजे जातीचे. आपल्या 'तसल्या' जातींचा संबंध नाही बरं का इथे! लेख उडाला पण नवे प्रतिसाद वाचता आले नाहीत व मोठ्याच मनोरंजनास मुकलो असे वाटते.

सर्व वाचक मिपाकर, लेखक, प्रतिसादकर्ते यांनी लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तहेदिलसे शुक्रिया. लेखन प्रोत्साहन उत्साहवर्धक असल्यामुळे लिहायला बळ येतं. विक्रम वेताळाचे चित्र AI च्या सौजन्याने होतं. डिस्क्लेमर : विक्रम आणि वेताळाची ही कथा पूर्ण काल्पनिक होती. सदरील कथेत येणारे पात्र, नावे, कथा, राज्यनावे आणि तत्सम गोष्टी काल्पनिकच होत्या, कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :) -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Sat, 12/20/2025 - 13:01
"कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :)"
😀. यश असो की अपयश, त्याचे श्रेय/जवाबदारी ही अशाप्रसंगी सामुहिकच असते, आणि झालीच असेल काही चुकी तर ती मान्य करण्यात कमीपणा न मानता उलट अशा खुस्खुशीत लेखाच्या माध्यमातुन ती स्विकारुन पुढे जाणे हे चांगलेच आहे की! त्यामुळे खुलाशाची आवश्यकता नव्हती... कंकाकांच्या हे बरोबर लक्षात आलेले दिसले म्हणुनच त्यांच्या प्रतिसादावर 'With no regrets...' असा उप-प्रतिसादही दिला! (योगायोगांवर पुर्ण विश्वास असलेला) - टर्मीनेटर

नावातकायआहे Tue, 12/23/2025 - 11:45
'नवीन डेटा पॅक दे रे' (सलील कुलकर्णी यांची कविता) नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर "थुंकीन" म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो. रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही, कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही. कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको, आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको. खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी. दिशाहीन द्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा. चाले बोटे धारधार, शब्दांमधून डंख मार. घेरून एखाद्याला, वेडा करून टाकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव, ज्याला वाटेल जसे वाटेल धरून खुशाल बडव. आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे फसवे रूप. जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल, धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे. जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही, सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू. धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल, तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल, ज्याच्या सोबत कोणी नसेल. आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ. मग घेऊन नवीन नाव, नवा फोटो नवा डाव. त्याच शिव्या तेच शाप, त्याच शिड्या तेच साप. वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो, जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो. थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे, एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे. नवा डेटा पॅक दे, आभाळावर थुंकीन म्हणतो. नवा डेटा पॅक दे रे...

In reply to by नावातकायआहे

धर्मराजमुटके Tue, 12/30/2025 - 17:26
नवीन डेटा पॅक दे रे मुळात पहिले वाक्यच चुकीचे वाटत आहे "दे रे" कशाला ? विकतच का घेत नाही ? स्वतःच्या पैशाने डेटा पॅक मारला तरच थुंकण्यात मजा आहे.

युयुत्सु Tue, 12/23/2025 - 11:57
सन्मानाने जगण्यासाठी माणसाला धर्माची गरज आहे का? याचे उत्तर नाही असे आहे, पण धर्मवेड्या लोकांना स्वीकारता येत नाही. वेळच्यावेळी प्रामाणिक पणे कर भरणे, सिग्नल आणि रांगांचा आदर करणे, गाडी चालवतांना मोबाईलवर न बोलणे इतके साधे नियम पाळले की देशाचे असंख्य प्रश्न वेगाने सुटतील. मग जानव्या सारख्या धर्मचिन्हांची गरज उरणार नाही...

कांदा लिंबू Mon, 12/29/2025 - 14:57
सदर लेखात परंपरा या शब्दाचा उल्लेख नऊ वेळा झाला आहे आणि प्रत्येक वेळी तो नकारात्मक, हेटाळणीपूर्ण अर्थाने झाला आहे. शाळेत शिकलेल्या आणि दररोज म्हटलेल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेत परंपरा या शब्दाचा उल्लेख दोन वेळा झाला आहे आणि दोन्ही वेळा तो सकारात्मक, आदरपूर्ण अर्थाने झाला आहे. मिपाकरांनी हा लेख योग्य मानावा की ती प्रतिज्ञा योग्य मानावी? --- भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद

In reply to by कांदा लिंबू

कांदा लिंबू Wed, 12/31/2025 - 16:16
बाकी, वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले की, बगल द्यायची सदर धागालेखकाची ही काही पहिलीच वेळ नाही.

In reply to by कंजूस

कंजूस काका, नव-लेखकास घटना, पात्र, आणि विषय मिळाला की, वेताळ विक्रमाच्या पाठीवर शंभर टक्के बसणार आणि एक कथा येणार. आपलं प्रोत्साहन असू दे. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार

घनदाट जंगल, मध्यरात्र उलटून गेली होती. ती रात्र नुसती अंधारी नव्हती, काळाकुट्ट अंधार, डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, असा तो गडद अंधार, आकाशात चंद्र नव्हता आणि ता-यांचे अस्तित्व ढगाआड होते. स्मशानाकडे जाणाऱ्या त्या वाटेवर भयाण शांतता पसरलेली होती. हवेतील गारठा वाढत होता, वारा नव्हता, तर धारदार शस्त्रासारखा तो वारा बोचत होता. झाडांच्या फांद्या एकमेकांना घासून विचित्र आवाज येत होता. मधूनच घुबडांचा आवाज घूं घूं आवाज आणि लांडग्यांचे रडण्याने काळजाचा ठोका चुकावा अशी ती रात्र.

मुळ्याचा चटका

Bhakti ·

टर्मीनेटर गुरुवार, 12/18/2025 - 15:01
मुळ्याची (सुकी परतून केलेली भाजी आणि कोशिंबीर आवडत असल्याने) 'मुळ्याचा चटका' ही आवडेल ह्यात शंका नाही, फक्त मी,
भिजवलेली हरभरा डाळ, मूग, मिरच्या, दोन चमचे कोथिंबीर, लसूण पाकळ्य मिक्सरमध्ये वाटून घ्या.
ऐवजी अक्खी डाळ (मला आवडत असल्याने) घालून हे बनवून खाणार 👍

कंजूस गुरुवार, 12/18/2025 - 16:52
नेहमी करतो. फक्त प्रश्न असा आहे की थंडीच्या दिवसांत बाजारात मिळणारे मुळेच चांगले असतात. एरवीचे राठ, कडवट मिळतात.

श्वेता२४ गुरुवार, 12/18/2025 - 20:54
माझ्या आठवणी प्रमाणे मी खूप लहान असताना म्हणजे अगदी दुसरी तिसरीत हा पदार्थ खाल्ला होता. माझी आजी करायची आणि चटका केला की मी एखादी पोळी जास्तच खायचे इतका तो आवडायचा. आजी गेल्यानंतर खायचा कधी योग आला नाही पण आता सासरी गेल्यानंतर मी हा पदार्थ आवर्जून करते व घरात सगळ्यांना हा पदार्थ आवडतो. शक्यतो दोन आठवड्यातून एकदा तरी आम्ही हा पदार्थ करतोच करतो. अगदी माझ्या मुलाला देखील हा पदार्थ आवडतो. फक्त मी लसूण ऐवजी आले घालून हा चटका करते.

जुइ गुरुवार, 12/18/2025 - 23:56
मुळे घरात सगळ्यांना आवडतात, तो ही वेगळी पाकृ करुन पाहीन. धन्यवाद!

टर्मीनेटर गुरुवार, 12/18/2025 - 15:01
मुळ्याची (सुकी परतून केलेली भाजी आणि कोशिंबीर आवडत असल्याने) 'मुळ्याचा चटका' ही आवडेल ह्यात शंका नाही, फक्त मी,
भिजवलेली हरभरा डाळ, मूग, मिरच्या, दोन चमचे कोथिंबीर, लसूण पाकळ्य मिक्सरमध्ये वाटून घ्या.
ऐवजी अक्खी डाळ (मला आवडत असल्याने) घालून हे बनवून खाणार 👍

कंजूस गुरुवार, 12/18/2025 - 16:52
नेहमी करतो. फक्त प्रश्न असा आहे की थंडीच्या दिवसांत बाजारात मिळणारे मुळेच चांगले असतात. एरवीचे राठ, कडवट मिळतात.

श्वेता२४ गुरुवार, 12/18/2025 - 20:54
माझ्या आठवणी प्रमाणे मी खूप लहान असताना म्हणजे अगदी दुसरी तिसरीत हा पदार्थ खाल्ला होता. माझी आजी करायची आणि चटका केला की मी एखादी पोळी जास्तच खायचे इतका तो आवडायचा. आजी गेल्यानंतर खायचा कधी योग आला नाही पण आता सासरी गेल्यानंतर मी हा पदार्थ आवर्जून करते व घरात सगळ्यांना हा पदार्थ आवडतो. शक्यतो दोन आठवड्यातून एकदा तरी आम्ही हा पदार्थ करतोच करतो. अगदी माझ्या मुलाला देखील हा पदार्थ आवडतो. फक्त मी लसूण ऐवजी आले घालून हा चटका करते.

जुइ गुरुवार, 12/18/2025 - 23:56
मुळे घरात सगळ्यांना आवडतात, तो ही वेगळी पाकृ करुन पाहीन. धन्यवाद!
मुळ्याचा चटका लिंबू, दही असे घालून चटकदार, हिरव्या मिरच्या घालून झणझणीत, वरून भुरभुरलेली कोथिंबीर, खोबरे आणि मुख्य म्हणजे कच्च्या (रॉ) चवीच्या भाज्या, फळे यांच्या कोशिंबिरी, वाटलेली डाळ, कोसांबरी पहिल्यापासून फार आवडतात. या सर्व वर्णनात तंतोतंत बसणारी कैरीची डाळ तर जीव की प्राण आहे.इतर हळदी-कुंकू मागे पडले. पण कैरीची डाळ, पन्हे, पानाफुलांनी गंधित चैत्र... यासाठीच चैत्रगौर मी खूप उत्साहाने करते. आता ऐन थंडीत कोण बरे अशा पाककृतीत परफेक्ट बसणार? गाजर? नाही, तो गोडगोड हलव्यातच बरा... तर तो मुळा! वेगवेगळ्या पदार्थांची नावे घेतली की पंचेंद्रिये सळसळायला हवीत!

पुस्तक परिचय : शाश्वत: लेखक संजीव कोटकर

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय शाश्वत : लेखक संजीव कोटकर कथासंग्रह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस चराचरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीमधे एक कथा आहे. ती कथा कुठेतरी आपल्या भावनाना स्पर्ष करणारी आहे. संजीव कोटकरांच्या शाश्वत या कथासंग्रहातील कथा या आपल्या आजुबाजूला घडणार्‍या किंवा पाहिलेल्या वाटतात. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकवतात. या कतासंग्रहात एकुण १५ कथा आहेत.आपल्या सभोवताली घडणार्‍या.यातील पात्रे काहीवेळा सजीव तर काहीवेळा निर्जीव पण भावना असलेल्या बस्तू आहेत. कथा लिहीताना लेखक मोठे काही तत्वज्ञान सांगितल्याचा आव आणत नाही.