मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे पहिले कवितेचे पुस्तक Nightingale in the Shadows गुलामांच्या भाषेतच

विवेकपटाईत ·

गवि 18/12/2025 - 11:54
अभिनंदन. पुढील वेळेसाठी एक बारीकशी सुचवणी. डबल डॅश किंवा लांबडी डॅश ही खास चॅट जिपीटी आऊटपुटची निशाणी आहे. तुम्ही स्वतः भाषांतर केले असले आणि जिपीटीचा उपयोग मर्यादित सुधारणा किंवा बदल यांसाठी केला असेल, तरीही अशा खुणांमुळे तो थेट चॅट जिपीटी कॉपी पेस्ट मजकूर असल्याचे जाणवते. अशा लांब डॅशेस काढून टाकल्या तर बरे होईल. उदा. blushed आणि endless नंतर येणारे चिन्ह. Seeing her, I softly whistled. Seeing me, she blushed—just a little. No words, just glances, And a smile tucked in her cheek. Let there be storms, Let worldly toil be endless— Still, in her eyes, Spring blossoms forever.

विवेकपटाईत 18/12/2025 - 13:06
काही आधी अनुवाद करून मग चाट जीपीटी वर टाकल्या, त्यामुळे मोठ्या लाईन्स आहे.त्या मला ही आवडल्या..बाकी अधिकांश कविता चार सहा लाईन्स असल्याने गरज पडली नाही. उदा: From Peepal to Money Plant The peepal tree left the village breeze behind. In the city flat, it became a money plant. Packaged in Verse I shape emotions, sour-sweet, bitter-hot, into neat, tempting parcels of fast-food flavour, and call them Poems.

गवि 18/12/2025 - 11:54
अभिनंदन. पुढील वेळेसाठी एक बारीकशी सुचवणी. डबल डॅश किंवा लांबडी डॅश ही खास चॅट जिपीटी आऊटपुटची निशाणी आहे. तुम्ही स्वतः भाषांतर केले असले आणि जिपीटीचा उपयोग मर्यादित सुधारणा किंवा बदल यांसाठी केला असेल, तरीही अशा खुणांमुळे तो थेट चॅट जिपीटी कॉपी पेस्ट मजकूर असल्याचे जाणवते. अशा लांब डॅशेस काढून टाकल्या तर बरे होईल. उदा. blushed आणि endless नंतर येणारे चिन्ह. Seeing her, I softly whistled. Seeing me, she blushed—just a little. No words, just glances, And a smile tucked in her cheek. Let there be storms, Let worldly toil be endless— Still, in her eyes, Spring blossoms forever.

विवेकपटाईत 18/12/2025 - 13:06
काही आधी अनुवाद करून मग चाट जीपीटी वर टाकल्या, त्यामुळे मोठ्या लाईन्स आहे.त्या मला ही आवडल्या..बाकी अधिकांश कविता चार सहा लाईन्स असल्याने गरज पडली नाही. उदा: From Peepal to Money Plant The peepal tree left the village breeze behind. In the city flat, it became a money plant. Packaged in Verse I shape emotions, sour-sweet, bitter-hot, into neat, tempting parcels of fast-food flavour, and call them Poems.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चित्र या महिन्यात मी माझे पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. त्यामागची कथा अशी आहे— सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सौ.ची बहीण, वय 80च्या पुढे असलेली, मला म्हणाली: “विवेक, तुझ्या कविता उत्तम आहेत. त्या इंग्रजीत अनुवाद करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित कर. लागेल तर मी त्यांचे संपादन करून देईन.” माझ्या सौ.ची आतेबहीण, डॉ. उषा बंदे— आयआयएएस शिमला येथील माजी फेलो—गेल्या 50 वर्षांपासून विविध इंग्रजी वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमित लेखन करत आहेत.

विक्रम-वेताळ कथा: जानव्याचे गूढ आणि मिपानगरीचा तिढा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

Bhakti 18/12/2025 - 10:25
बाई.. सकाळी सकाळी खो खो हसत सुटले :) मग तपासले जानवं खरच गायबल की ओ!! खरंय परंपरावादी Vs सत्यशोधन हा सामना सर्वच सोशल मिडियाभर पसरलाय.दोन्हीकडची मंडळी खुपच संवेदनशील झाली आहेत. सर दर महिन्याला मिपानगरीची अशी कथा सादर करा. मी नसते सोडत मिपा बघा ;) :)

अभ्या.. 18/12/2025 - 12:18
परवाच त्या स्मशानात जाऊन मिपा संविधान कोरलेला भग्न दगड पाहून आलो. आसपास विखुरलेल्या चारपाच वीरगळ सदृश दगडातून आवाज येत होता. "कसला सनातन आणि मिपाधर्म घेऊन बसलात. धर्मनिरपेक्षतेच्या प्रेमाने आम्ही केलेलं बलिदान कुणाला आठवणार नाही. आमच्यासाठी हे बलिदान असलं तरी अंधभक्तानी झुंडशाहीने केलेल्या हत्या आहेत" . आम्ही हळूच म्हणले "भेटू लवकरच"

टर्मीनेटर 18/12/2025 - 14:15
झकास लेख आहे सर... एकदम 'चांदोबा' मधली विक्रम-वेताळ कथा वाचत असल्याचा फील आला!
"प्राचीन मिपानगरी राज्यात राजा नीलसेन आणि प्रशानसेन नावाचे दोन भाऊ मिळून राज्य करत होते. सोबतीला चतुर, विद्वान सल्लागारही होते, दरबारात, सल्लागारांचा मोठा दबदबा होता.
इथे फक्त एक बदल सुचवावासा वाटतो की... दरबारात दबदबा असलेल्या 'चतुर, विद्वान सल्लागारांपैकी' कोणाकडेच 'डॅमेज झाल्यावर ते कंट्रोल करण्यापेक्षा ते डॅमेज होऊच नये ह्यासाठी काय करावे' हा विचार करण्याची क्षमता नव्हती असे आज दुर्दैवाने म्हणावे लागत आहे 😀 अर्थात अजूनही परिस्थिती तेवढीही हाताबाहेर गेली आहे असे वाटत नाही, पण त्यासाठी कोणाकडूनही' आपला राजकीय / वैचारिक अजेंडा राबवण्यासाठी होणारा मिपाचा वापर थांबवल्यास पुढचा काळ ह्या प्रतिष्ठित संकेतस्थळासाठी वैभवशालीअसेल ह्यात मलातरी काही शंका नाही... 'भावनांमे बह गया हैं' टाईप प्रतिसाद वाटल्यास क्षमस्व 😂

'प्लॅसिबो' इफेक्टपेक्षा बियर इफेक्ट जास्त आहे, असे कोणी तरी दरबारात हळू आवाजात बोललं होतं.
पुराव्या प्रित्यर्थ जुन्या जाणत्या दरबारी ने अंधारदिव्यांच्या लेखनाचे उत्खनत केले. तिथे त्यांना स्वगत या लेखनात सज्जड पुरावा मिळाला. तिथे हा सूर्य हा जयद्रथ म्हणून हा प्लासिबो इफेक्ट नसून बियर इफेक्ट च आहे हे वादातीत पणे सिद्ध केले. प्रा. चिरुटे यांनी अंधारदिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात लेख वाचता येत नसल्याने सोबतीला चिरुटाचा प्रकाश ही घेतला व गतकाळात असलेल्या स्वगताचे अक्षर न अक्षर वाचून काढले. वाचताना फारच श्रम पडल्याने सोबत "श्रमपरिहार"ही चालू होता. एका उत्कट क्षणी त्यांना गोमूत्र व बिअर यांचा घट्ट स्ंबंध आढळला. तोपर्यंत वेताळ हा विक्रमादित्याच्या खांद्यावरुन उडून परत झाडाला लटकता झाला

आतापर्यंत च्या माझ्या उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. पण धागा अप्रकाशित व्ह्यायची ही पहिलीच वेळ आहे. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. मी हा मानापमानाचा मुद्दा न मानता विषय इथे सोडून देत आहे. पण धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मूकवाचक 19/12/2025 - 13:09
हा विषय एका धाग्यापुरता मर्यादित न ठेवता व्यापक अर्थाने बघायला हवे. हिंदूंच्या श्रद्धा, रूढी, परंपरा आणि प्रतिके (त्या कितीही निरूपद्रवी असल्या तरी!) हा विनोदनिर्मीतीचा हक्काचा विषय आहे, त्यावर प्रतिक्रिया उमटत नाहीत हे गृहीतक आता तितकेसे खरे राहिलेले नाही. ठराविक लोकांच्या धार्मिक भावनांची गळवे ठसठसतात असा काही जण नेहेमी उपहास करताना दिसतात. यापैकी बहुसंख्य लोकांची जातीय भावनांची गळवे ठसठसतात ही वस्तुस्थिती लपून राहात नाही. अशाच टोकाच्या भावना ठराविक तत्वज्ञान, महापुरूष यांच्या बाबतीत असतात. त्या अर्थाने 'गळवे मुक्त' व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कितीही लपवले तरी आपल्याला अप्रिय असलेल्या विचारसरणीचे लोक सत्तेवर मांड ठोकून बसलेले आहेत हे सहन न झाल्याने कित्येक विचारवंतांची गळवे ठसठसतात हे लपून राहिलेले नाही. तेव्हा लेखकाच्या दृष्टीने हलक्या फुलक्या असलेल्या लेखावर विरोधी प्रतिक्रिया येणे फारसे अनपेक्षित नाही. असो.

अनन्त अवधुत 19/12/2025 - 13:34
जोर्दार लेख झालाय. एकदम विक्रम वेताळची आठवण झाली. फोटू पण चांदोबा मधला वाटतो. जानव्यावरचा लेख वाचला होता, पण धाग्याचे कश्मिर कधी झाले ते कळले नाही.

स्वधर्म 19/12/2025 - 15:26
जबरी लेख. असा लेख लिहायला लेखकच पाहिजे. म्हणून म्हणतो तेथे पाहिजे जातीचे. आपल्या 'तसल्या' जातींचा संबंध नाही बरं का इथे! लेख उडाला पण नवे प्रतिसाद वाचता आले नाहीत व मोठ्याच मनोरंजनास मुकलो असे वाटते.

सर्व वाचक मिपाकर, लेखक, प्रतिसादकर्ते यांनी लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तहेदिलसे शुक्रिया. लेखन प्रोत्साहन उत्साहवर्धक असल्यामुळे लिहायला बळ येतं. विक्रम वेताळाचे चित्र AI च्या सौजन्याने होतं. डिस्क्लेमर : विक्रम आणि वेताळाची ही कथा पूर्ण काल्पनिक होती. सदरील कथेत येणारे पात्र, नावे, कथा, राज्यनावे आणि तत्सम गोष्टी काल्पनिकच होत्या, कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :) -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/12/2025 - 13:01
"कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :)"
😀. यश असो की अपयश, त्याचे श्रेय/जवाबदारी ही अशाप्रसंगी सामुहिकच असते, आणि झालीच असेल काही चुकी तर ती मान्य करण्यात कमीपणा न मानता उलट अशा खुस्खुशीत लेखाच्या माध्यमातुन ती स्विकारुन पुढे जाणे हे चांगलेच आहे की! त्यामुळे खुलाशाची आवश्यकता नव्हती... कंकाकांच्या हे बरोबर लक्षात आलेले दिसले म्हणुनच त्यांच्या प्रतिसादावर 'With no regrets...' असा उप-प्रतिसादही दिला! (योगायोगांवर पुर्ण विश्वास असलेला) - टर्मीनेटर

'नवीन डेटा पॅक दे रे' (सलील कुलकर्णी यांची कविता) नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर "थुंकीन" म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो. रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही, कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही. कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको, आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको. खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी. दिशाहीन द्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा. चाले बोटे धारधार, शब्दांमधून डंख मार. घेरून एखाद्याला, वेडा करून टाकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव, ज्याला वाटेल जसे वाटेल धरून खुशाल बडव. आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे फसवे रूप. जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल, धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे. जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही, सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू. धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल, तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल, ज्याच्या सोबत कोणी नसेल. आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ. मग घेऊन नवीन नाव, नवा फोटो नवा डाव. त्याच शिव्या तेच शाप, त्याच शिड्या तेच साप. वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो, जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो. थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे, एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे. नवा डेटा पॅक दे, आभाळावर थुंकीन म्हणतो. नवा डेटा पॅक दे रे...

In reply to by नावातकायआहे

नवीन डेटा पॅक दे रे मुळात पहिले वाक्यच चुकीचे वाटत आहे "दे रे" कशाला ? विकतच का घेत नाही ? स्वतःच्या पैशाने डेटा पॅक मारला तरच थुंकण्यात मजा आहे.

युयुत्सु 23/12/2025 - 11:57
सन्मानाने जगण्यासाठी माणसाला धर्माची गरज आहे का? याचे उत्तर नाही असे आहे, पण धर्मवेड्या लोकांना स्वीकारता येत नाही. वेळच्यावेळी प्रामाणिक पणे कर भरणे, सिग्नल आणि रांगांचा आदर करणे, गाडी चालवतांना मोबाईलवर न बोलणे इतके साधे नियम पाळले की देशाचे असंख्य प्रश्न वेगाने सुटतील. मग जानव्या सारख्या धर्मचिन्हांची गरज उरणार नाही...

कांदा लिंबू 29/12/2025 - 14:57
सदर लेखात परंपरा या शब्दाचा उल्लेख नऊ वेळा झाला आहे आणि प्रत्येक वेळी तो नकारात्मक, हेटाळणीपूर्ण अर्थाने झाला आहे. शाळेत शिकलेल्या आणि दररोज म्हटलेल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेत परंपरा या शब्दाचा उल्लेख दोन वेळा झाला आहे आणि दोन्ही वेळा तो सकारात्मक, आदरपूर्ण अर्थाने झाला आहे. मिपाकरांनी हा लेख योग्य मानावा की ती प्रतिज्ञा योग्य मानावी? --- भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद

In reply to by कंजूस

कंजूस काका, नव-लेखकास घटना, पात्र, आणि विषय मिळाला की, वेताळ विक्रमाच्या पाठीवर शंभर टक्के बसणार आणि एक कथा येणार. आपलं प्रोत्साहन असू दे. -दिलीप बिरुटे

Bhakti 18/12/2025 - 10:25
बाई.. सकाळी सकाळी खो खो हसत सुटले :) मग तपासले जानवं खरच गायबल की ओ!! खरंय परंपरावादी Vs सत्यशोधन हा सामना सर्वच सोशल मिडियाभर पसरलाय.दोन्हीकडची मंडळी खुपच संवेदनशील झाली आहेत. सर दर महिन्याला मिपानगरीची अशी कथा सादर करा. मी नसते सोडत मिपा बघा ;) :)

अभ्या.. 18/12/2025 - 12:18
परवाच त्या स्मशानात जाऊन मिपा संविधान कोरलेला भग्न दगड पाहून आलो. आसपास विखुरलेल्या चारपाच वीरगळ सदृश दगडातून आवाज येत होता. "कसला सनातन आणि मिपाधर्म घेऊन बसलात. धर्मनिरपेक्षतेच्या प्रेमाने आम्ही केलेलं बलिदान कुणाला आठवणार नाही. आमच्यासाठी हे बलिदान असलं तरी अंधभक्तानी झुंडशाहीने केलेल्या हत्या आहेत" . आम्ही हळूच म्हणले "भेटू लवकरच"

टर्मीनेटर 18/12/2025 - 14:15
झकास लेख आहे सर... एकदम 'चांदोबा' मधली विक्रम-वेताळ कथा वाचत असल्याचा फील आला!
"प्राचीन मिपानगरी राज्यात राजा नीलसेन आणि प्रशानसेन नावाचे दोन भाऊ मिळून राज्य करत होते. सोबतीला चतुर, विद्वान सल्लागारही होते, दरबारात, सल्लागारांचा मोठा दबदबा होता.
इथे फक्त एक बदल सुचवावासा वाटतो की... दरबारात दबदबा असलेल्या 'चतुर, विद्वान सल्लागारांपैकी' कोणाकडेच 'डॅमेज झाल्यावर ते कंट्रोल करण्यापेक्षा ते डॅमेज होऊच नये ह्यासाठी काय करावे' हा विचार करण्याची क्षमता नव्हती असे आज दुर्दैवाने म्हणावे लागत आहे 😀 अर्थात अजूनही परिस्थिती तेवढीही हाताबाहेर गेली आहे असे वाटत नाही, पण त्यासाठी कोणाकडूनही' आपला राजकीय / वैचारिक अजेंडा राबवण्यासाठी होणारा मिपाचा वापर थांबवल्यास पुढचा काळ ह्या प्रतिष्ठित संकेतस्थळासाठी वैभवशालीअसेल ह्यात मलातरी काही शंका नाही... 'भावनांमे बह गया हैं' टाईप प्रतिसाद वाटल्यास क्षमस्व 😂

'प्लॅसिबो' इफेक्टपेक्षा बियर इफेक्ट जास्त आहे, असे कोणी तरी दरबारात हळू आवाजात बोललं होतं.
पुराव्या प्रित्यर्थ जुन्या जाणत्या दरबारी ने अंधारदिव्यांच्या लेखनाचे उत्खनत केले. तिथे त्यांना स्वगत या लेखनात सज्जड पुरावा मिळाला. तिथे हा सूर्य हा जयद्रथ म्हणून हा प्लासिबो इफेक्ट नसून बियर इफेक्ट च आहे हे वादातीत पणे सिद्ध केले. प्रा. चिरुटे यांनी अंधारदिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात लेख वाचता येत नसल्याने सोबतीला चिरुटाचा प्रकाश ही घेतला व गतकाळात असलेल्या स्वगताचे अक्षर न अक्षर वाचून काढले. वाचताना फारच श्रम पडल्याने सोबत "श्रमपरिहार"ही चालू होता. एका उत्कट क्षणी त्यांना गोमूत्र व बिअर यांचा घट्ट स्ंबंध आढळला. तोपर्यंत वेताळ हा विक्रमादित्याच्या खांद्यावरुन उडून परत झाडाला लटकता झाला

आतापर्यंत च्या माझ्या उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. पण धागा अप्रकाशित व्ह्यायची ही पहिलीच वेळ आहे. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. मी हा मानापमानाचा मुद्दा न मानता विषय इथे सोडून देत आहे. पण धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मूकवाचक 19/12/2025 - 13:09
हा विषय एका धाग्यापुरता मर्यादित न ठेवता व्यापक अर्थाने बघायला हवे. हिंदूंच्या श्रद्धा, रूढी, परंपरा आणि प्रतिके (त्या कितीही निरूपद्रवी असल्या तरी!) हा विनोदनिर्मीतीचा हक्काचा विषय आहे, त्यावर प्रतिक्रिया उमटत नाहीत हे गृहीतक आता तितकेसे खरे राहिलेले नाही. ठराविक लोकांच्या धार्मिक भावनांची गळवे ठसठसतात असा काही जण नेहेमी उपहास करताना दिसतात. यापैकी बहुसंख्य लोकांची जातीय भावनांची गळवे ठसठसतात ही वस्तुस्थिती लपून राहात नाही. अशाच टोकाच्या भावना ठराविक तत्वज्ञान, महापुरूष यांच्या बाबतीत असतात. त्या अर्थाने 'गळवे मुक्त' व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कितीही लपवले तरी आपल्याला अप्रिय असलेल्या विचारसरणीचे लोक सत्तेवर मांड ठोकून बसलेले आहेत हे सहन न झाल्याने कित्येक विचारवंतांची गळवे ठसठसतात हे लपून राहिलेले नाही. तेव्हा लेखकाच्या दृष्टीने हलक्या फुलक्या असलेल्या लेखावर विरोधी प्रतिक्रिया येणे फारसे अनपेक्षित नाही. असो.

अनन्त अवधुत 19/12/2025 - 13:34
जोर्दार लेख झालाय. एकदम विक्रम वेताळची आठवण झाली. फोटू पण चांदोबा मधला वाटतो. जानव्यावरचा लेख वाचला होता, पण धाग्याचे कश्मिर कधी झाले ते कळले नाही.

स्वधर्म 19/12/2025 - 15:26
जबरी लेख. असा लेख लिहायला लेखकच पाहिजे. म्हणून म्हणतो तेथे पाहिजे जातीचे. आपल्या 'तसल्या' जातींचा संबंध नाही बरं का इथे! लेख उडाला पण नवे प्रतिसाद वाचता आले नाहीत व मोठ्याच मनोरंजनास मुकलो असे वाटते.

सर्व वाचक मिपाकर, लेखक, प्रतिसादकर्ते यांनी लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तहेदिलसे शुक्रिया. लेखन प्रोत्साहन उत्साहवर्धक असल्यामुळे लिहायला बळ येतं. विक्रम वेताळाचे चित्र AI च्या सौजन्याने होतं. डिस्क्लेमर : विक्रम आणि वेताळाची ही कथा पूर्ण काल्पनिक होती. सदरील कथेत येणारे पात्र, नावे, कथा, राज्यनावे आणि तत्सम गोष्टी काल्पनिकच होत्या, कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :) -दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/12/2025 - 13:01
"कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :)"
😀. यश असो की अपयश, त्याचे श्रेय/जवाबदारी ही अशाप्रसंगी सामुहिकच असते, आणि झालीच असेल काही चुकी तर ती मान्य करण्यात कमीपणा न मानता उलट अशा खुस्खुशीत लेखाच्या माध्यमातुन ती स्विकारुन पुढे जाणे हे चांगलेच आहे की! त्यामुळे खुलाशाची आवश्यकता नव्हती... कंकाकांच्या हे बरोबर लक्षात आलेले दिसले म्हणुनच त्यांच्या प्रतिसादावर 'With no regrets...' असा उप-प्रतिसादही दिला! (योगायोगांवर पुर्ण विश्वास असलेला) - टर्मीनेटर

'नवीन डेटा पॅक दे रे' (सलील कुलकर्णी यांची कविता) नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर "थुंकीन" म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो. रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही, कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही. कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको, आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको. खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी. दिशाहीन द्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा. चाले बोटे धारधार, शब्दांमधून डंख मार. घेरून एखाद्याला, वेडा करून टाकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे... खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव, ज्याला वाटेल जसे वाटेल धरून खुशाल बडव. आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे फसवे रूप. जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल, धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे. जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही, सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू. धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल, तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल, ज्याच्या सोबत कोणी नसेल. आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ. मग घेऊन नवीन नाव, नवा फोटो नवा डाव. त्याच शिव्या तेच शाप, त्याच शिड्या तेच साप. वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो, जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो. थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे, एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे. नवा डेटा पॅक दे, आभाळावर थुंकीन म्हणतो. नवा डेटा पॅक दे रे...

In reply to by नावातकायआहे

नवीन डेटा पॅक दे रे मुळात पहिले वाक्यच चुकीचे वाटत आहे "दे रे" कशाला ? विकतच का घेत नाही ? स्वतःच्या पैशाने डेटा पॅक मारला तरच थुंकण्यात मजा आहे.

युयुत्सु 23/12/2025 - 11:57
सन्मानाने जगण्यासाठी माणसाला धर्माची गरज आहे का? याचे उत्तर नाही असे आहे, पण धर्मवेड्या लोकांना स्वीकारता येत नाही. वेळच्यावेळी प्रामाणिक पणे कर भरणे, सिग्नल आणि रांगांचा आदर करणे, गाडी चालवतांना मोबाईलवर न बोलणे इतके साधे नियम पाळले की देशाचे असंख्य प्रश्न वेगाने सुटतील. मग जानव्या सारख्या धर्मचिन्हांची गरज उरणार नाही...

कांदा लिंबू 29/12/2025 - 14:57
सदर लेखात परंपरा या शब्दाचा उल्लेख नऊ वेळा झाला आहे आणि प्रत्येक वेळी तो नकारात्मक, हेटाळणीपूर्ण अर्थाने झाला आहे. शाळेत शिकलेल्या आणि दररोज म्हटलेल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेत परंपरा या शब्दाचा उल्लेख दोन वेळा झाला आहे आणि दोन्ही वेळा तो सकारात्मक, आदरपूर्ण अर्थाने झाला आहे. मिपाकरांनी हा लेख योग्य मानावा की ती प्रतिज्ञा योग्य मानावी? --- भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद

In reply to by कंजूस

कंजूस काका, नव-लेखकास घटना, पात्र, आणि विषय मिळाला की, वेताळ विक्रमाच्या पाठीवर शंभर टक्के बसणार आणि एक कथा येणार. आपलं प्रोत्साहन असू दे. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार

घनदाट जंगल, मध्यरात्र उलटून गेली होती. ती रात्र नुसती अंधारी नव्हती, काळाकुट्ट अंधार, डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, असा तो गडद अंधार, आकाशात चंद्र नव्हता आणि ता-यांचे अस्तित्व ढगाआड होते. स्मशानाकडे जाणाऱ्या त्या वाटेवर भयाण शांतता पसरलेली होती. हवेतील गारठा वाढत होता, वारा नव्हता, तर धारदार शस्त्रासारखा तो वारा बोचत होता. झाडांच्या फांद्या एकमेकांना घासून विचित्र आवाज येत होता. मधूनच घुबडांचा आवाज घूं घूं आवाज आणि लांडग्यांचे रडण्याने काळजाचा ठोका चुकावा अशी ती रात्र.

मुळ्याचा चटका

Bhakti ·

टर्मीनेटर 18/12/2025 - 15:01
मुळ्याची (सुकी परतून केलेली भाजी आणि कोशिंबीर आवडत असल्याने) 'मुळ्याचा चटका' ही आवडेल ह्यात शंका नाही, फक्त मी,
भिजवलेली हरभरा डाळ, मूग, मिरच्या, दोन चमचे कोथिंबीर, लसूण पाकळ्य मिक्सरमध्ये वाटून घ्या.
ऐवजी अक्खी डाळ (मला आवडत असल्याने) घालून हे बनवून खाणार 👍

कंजूस 18/12/2025 - 16:52
नेहमी करतो. फक्त प्रश्न असा आहे की थंडीच्या दिवसांत बाजारात मिळणारे मुळेच चांगले असतात. एरवीचे राठ, कडवट मिळतात.

श्वेता२४ 18/12/2025 - 20:54
माझ्या आठवणी प्रमाणे मी खूप लहान असताना म्हणजे अगदी दुसरी तिसरीत हा पदार्थ खाल्ला होता. माझी आजी करायची आणि चटका केला की मी एखादी पोळी जास्तच खायचे इतका तो आवडायचा. आजी गेल्यानंतर खायचा कधी योग आला नाही पण आता सासरी गेल्यानंतर मी हा पदार्थ आवर्जून करते व घरात सगळ्यांना हा पदार्थ आवडतो. शक्यतो दोन आठवड्यातून एकदा तरी आम्ही हा पदार्थ करतोच करतो. अगदी माझ्या मुलाला देखील हा पदार्थ आवडतो. फक्त मी लसूण ऐवजी आले घालून हा चटका करते.

टर्मीनेटर 18/12/2025 - 15:01
मुळ्याची (सुकी परतून केलेली भाजी आणि कोशिंबीर आवडत असल्याने) 'मुळ्याचा चटका' ही आवडेल ह्यात शंका नाही, फक्त मी,
भिजवलेली हरभरा डाळ, मूग, मिरच्या, दोन चमचे कोथिंबीर, लसूण पाकळ्य मिक्सरमध्ये वाटून घ्या.
ऐवजी अक्खी डाळ (मला आवडत असल्याने) घालून हे बनवून खाणार 👍

कंजूस 18/12/2025 - 16:52
नेहमी करतो. फक्त प्रश्न असा आहे की थंडीच्या दिवसांत बाजारात मिळणारे मुळेच चांगले असतात. एरवीचे राठ, कडवट मिळतात.

श्वेता२४ 18/12/2025 - 20:54
माझ्या आठवणी प्रमाणे मी खूप लहान असताना म्हणजे अगदी दुसरी तिसरीत हा पदार्थ खाल्ला होता. माझी आजी करायची आणि चटका केला की मी एखादी पोळी जास्तच खायचे इतका तो आवडायचा. आजी गेल्यानंतर खायचा कधी योग आला नाही पण आता सासरी गेल्यानंतर मी हा पदार्थ आवर्जून करते व घरात सगळ्यांना हा पदार्थ आवडतो. शक्यतो दोन आठवड्यातून एकदा तरी आम्ही हा पदार्थ करतोच करतो. अगदी माझ्या मुलाला देखील हा पदार्थ आवडतो. फक्त मी लसूण ऐवजी आले घालून हा चटका करते.
मुळ्याचा चटका लिंबू, दही असे घालून चटकदार, हिरव्या मिरच्या घालून झणझणीत, वरून भुरभुरलेली कोथिंबीर, खोबरे आणि मुख्य म्हणजे कच्च्या (रॉ) चवीच्या भाज्या, फळे यांच्या कोशिंबिरी, वाटलेली डाळ, कोसांबरी पहिल्यापासून फार आवडतात. या सर्व वर्णनात तंतोतंत बसणारी कैरीची डाळ तर जीव की प्राण आहे.इतर हळदी-कुंकू मागे पडले. पण कैरीची डाळ, पन्हे, पानाफुलांनी गंधित चैत्र... यासाठीच चैत्रगौर मी खूप उत्साहाने करते. आता ऐन थंडीत कोण बरे अशा पाककृतीत परफेक्ट बसणार? गाजर? नाही, तो गोडगोड हलव्यातच बरा... तर तो मुळा! वेगवेगळ्या पदार्थांची नावे घेतली की पंचेंद्रिये सळसळायला हवीत!

पुस्तक परिचय : शाश्वत: लेखक संजीव कोटकर

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय शाश्वत : लेखक संजीव कोटकर कथासंग्रह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस चराचरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीमधे एक कथा आहे. ती कथा कुठेतरी आपल्या भावनाना स्पर्ष करणारी आहे. संजीव कोटकरांच्या शाश्वत या कथासंग्रहातील कथा या आपल्या आजुबाजूला घडणार्‍या किंवा पाहिलेल्या वाटतात. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकवतात. या कतासंग्रहात एकुण १५ कथा आहेत.आपल्या सभोवताली घडणार्‍या.यातील पात्रे काहीवेळा सजीव तर काहीवेळा निर्जीव पण भावना असलेल्या बस्तू आहेत. कथा लिहीताना लेखक मोठे काही तत्वज्ञान सांगितल्याचा आव आणत नाही.

-> ए० जी० आय०ची चाहूल?

युयुत्सु ·

रोचक म्हणण्यापेक्षा हे सर्व भयावह होईल असे वाटते आहे. एवीतेवी सर्व कामे यंत्राद्वारेच केली जात होती आतापर्यंत, एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? (मुन्नाभाई/सर्किट च्या भाषेत अगर हम हल चलायेंगे तर बैल क्या करेगा?) उत्तरोत्तर मनुष्य आपली विचार करण्याचीच शक्ती गमावुन बसेल असे वाटते.

युयुत्सु 16/12/2025 - 09:08
मला वाटते ए०जी०आय० इतकी गंभीर समस्या बनेल असे वाटत नाही. एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? आज मनुष्य जे करू शकत नाही किंवा मानवी प्रतिष्ठेला जिथे धक्का पोचतो अशा ठिकाणी यंत्रमानव निश्चितपणे उपयोगी आहे. तसेच मानवी बुद्धीमत्तेच्या आवाक्यात न येणार्‍या क्षेत्रांमध्ये ए०जी०आय० ची मोठी मदत होईल.

रोचक म्हणण्यापेक्षा हे सर्व भयावह होईल असे वाटते आहे. एवीतेवी सर्व कामे यंत्राद्वारेच केली जात होती आतापर्यंत, एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? (मुन्नाभाई/सर्किट च्या भाषेत अगर हम हल चलायेंगे तर बैल क्या करेगा?) उत्तरोत्तर मनुष्य आपली विचार करण्याचीच शक्ती गमावुन बसेल असे वाटते.

युयुत्सु 16/12/2025 - 09:08
मला वाटते ए०जी०आय० इतकी गंभीर समस्या बनेल असे वाटत नाही. एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? आज मनुष्य जे करू शकत नाही किंवा मानवी प्रतिष्ठेला जिथे धक्का पोचतो अशा ठिकाणी यंत्रमानव निश्चितपणे उपयोगी आहे. तसेच मानवी बुद्धीमत्तेच्या आवाक्यात न येणार्‍या क्षेत्रांमध्ये ए०जी०आय० ची मोठी मदत होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ए० जी० आय०ची चाहूल? -राजीव उपाध्ये ए०आय० जगतावर आत्ताच एक मोठी बातमी येऊन आदळली आहे. टोकीयो मधील ’इंटिग्रल ए०आय०’ नावाच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की त्यांनी पहिले सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप असे एक नवे मॉडेल बनवले आहे. यातला गमतीचा भाग म्हणजे ’सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप’ ही शब्दरचना! अत्यंत सावध पणे केलेला हा दावा ए०जी०आय० अवतरल्याचेच संकेत देतो. एखादी तंत्रप्रणाली जर मानवापेक्षा वरचढ किंवा खांद्याला खांदा लावून कार्य करू शकत असेल तर ते जाहिर करण्यासाठी आढेवेढे कशाला घ्यायचे?

'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

टर्मीनेटर ·

खटपट्या 11/12/2025 - 23:54
चित्रपट पाहिला खुप छान वाटला. अक्षय खन्ना हा कलाकार म्हणून ग्रेट वाटला. आहेच. राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार.

चित्रपट प्रचंड गाजतोय. पण ह्या निमित्ताने मला एक प्रश्न पडलाय.सत्याचा अंश असलेल्या अश्या स्पाय ऑपरेशन वर चित्रपट काढुन आपण भविष्यातील स्पाय ऑपरेशन तर धोक्यात आणत नाही आहोत ना? म्हणजे समजा ह्या चित्रपटात अमुक एक भारताचा स्पाय पाकिस्ताना कसा इनफिल्ट्रेट झाला.तिथल्या कुणाकुणा कडुन कसे कसे साहाय्य मिळाले हे दाखवुन भले काल्पनिक का होईना तो मार्ग तर पुढे कायमचा बंद होऊन जाईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

कॉमी 12/12/2025 - 11:24
काल्पनिक मार्ग दिग्दर्शकाला सुचत असेल तर तो रॉ, आयएसआय ह्यांना आधी सुचला असेल ह्याची शक्यता जास्त.

In reply to by कानडाऊ योगेशु

गामा पैलवान 14/12/2025 - 15:19
कानडाऊ योगेशु, प्रत्यक्षांत हेरगिरी अशी होत नसते. खरीखुरी हेरगिरी हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. तो लंबितवाणा ( = लांबलचक ) असून तुकड्यातुकड्याने होतो. असंख्य तुकड्यांचं विश्लेषण करून नेमका निष्कर्ष साधणे हा हेरगिरीचा पाया आहे. तो जर दाखवीत बसलं तर चित्रपट भयंकर रटाळ होईल. पडद्यावर दिसतं ते अनेक असंबद्ध तुकडे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा मसालेदार प्रकारे जुळवून सादर केलेलं नाटक असतं. आ.न., -गा.पै.

कांदा लिंबू 12/12/2025 - 09:14
टर्मी भौ, तुम्ही शिफारस केलीय म्हणजे सिनेमा पाहावाच लागणार. आज संध्याकाळी बघतो, जमते का ते. बाकी, लांबलचक लिहिलंय तरी खिळवून ठेवणारं लिहिलंय हेवेसांन.

Bhakti 12/12/2025 - 10:52
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय, त्यामुळे असा चित्रपट आलाय हे समजलं.यात चक्क रणवीर असूनही मला चित्रपटाविषयी माहिती नव्हते ;) बहुतेक ओटीटीवर यायची वाट पाहणार!

सौंदाळा 15/12/2025 - 10:08
परवाच पाहिला आणि आवडला. अगदी बेहद्द आवडला असे नाही म्हणणार कारण काही घटना खूपच प्रेडीक्टेबल होत्या पण बघताना मजा आली. दुसरा भाग पण नक्की बघणार

टर्मीनेटर 15/12/2025 - 13:01
किल्लेदार । खटपट्या । राजेंद्र मेहेंदळे । कानडाऊ योगेशु । कॉमी । गामा पैलवान । कांदा लिंबू । Bhakti । प्रचेतस । सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ खटपट्या
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
+१००० तुम्हालाही राकेश बेदीचे काम आवडते असे जाणवले. एका मित्राने आग्रही शिफारस केल्याने त्याचा (राकेश बेदीचा) हा पॉडकास्ट पहिला. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बऱ्याच गोष्टी ह्यातून नव्याने समजल्या, तुम्हालाही कदाचित त्या ऐकायला आवडतील! @ राजेंद्र मेहेंदळे
"अक्षय खन्नाचा खलनायकाच्या रुपात याच वर्षात दुसरा स्ट्रोक"
येस्स... तुम्ही 'धुरंधर' बघणारच आहात, तेव्हा तुम्हालाही पहिल्यापेक्षा हा दुसरा 'स्ट्रोक' जास्त खणखणीत असल्याचे जाणवेल अशी मला खात्री आहे! @ कानडाऊ योगेशु वर गापैंनी लिहिलंय ते बरोबर आहे. ध्येयाप्रती सर्वोच्च पातळीवरची समर्पित वृत्ती, पराकोटीचा संयम आणि समोरच्याचा संपूर्ण विश्वास संपादन करेपर्यंत कुठल्याही थराला जाण्याची तयारी ह्या गोष्टी हेराकडे असतील तर 'अमुक कालावधीत गुंतवणूक डबल' वगैरे सारख्या अमिषाला, आधी अशा बोगस योजनांमुळे फसवणूक झालेल्या लोकांबद्दलच्या बातम्या ऐकून/वाचूनही वारंवार लोकं नव्याने बळी पडतात त्याप्रमाणे ह्या गोष्टीही सतत होतंच असतात/राहणार. हे कसे होऊ शकते ह्याचे काही प्रमाणात उत्तर या चित्रपटातूनही मिळते. @ कांदा लिंबू - अवश्य बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला तेही सांगा. @ भक्ती
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय,
ते गाणं नाहीये, पार्शवसंगीत म्हणता येईल... पण खूपच व्हायरल होतोय तो सीन आणि त्यावरचे किस्से 😀 @ प्रचेतस - अवश्य बघा... तुम्हालाही आवडेल! @ सौंदाळा
दुसरा भाग पण नक्की बघणार
मला आत्तापासूनच खूप वेध लागलेत त्याचे! कारण आता कथानक कसे वळण घेईल, काय काय घटना बघायला मिळतील ह्याविषयी मनात जे खूप अंदाज बांधून ठेवलेत ते खरे ठरतात का हे जाणून घ्यायचे आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

खटपट्या 15/12/2025 - 21:56
आपल्याकडे जसे शिरीष कणेकर आणि दिलीप प्रभावळ्कर एकपात्त्री प्रयोग करतात तसे राकेश बेदी हे अडीज तासाचा एकपात्रि प्रयोग करतात. युट्युब वर मसाज म्हणून टाइप केल्यास मिळेल.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 16/12/2025 - 20:51
प्रतिसादात Bhakti पाहून वाटलं,टर्मिनेटरपण बदलले.कृत्रिम प्रतिसाद देऊ लागले.पण नंतर @भक्ती पाहून बरं वाटलं, टर्मिनेटर पहिल्यासारखेच आहेत खात्री पटली ;) धुरंधरचे शीर्षकगीत ऐकलं,ओहो माझा फेवरेट हनुमानकाईंड(Hanumankind)ने रॅप केलंय..जबरी :) :)

कांदा लिंबू 16/12/2025 - 01:35
सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू आहे. पावणेदहाच्या शोची कशीबशी दोन तिकिटे मिळाली. सिनेमा पाहून येऊन आता, रात्री दीड वाजता, हे लिहीत आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा अजून एकदा सिनेमा बघायला जाणार आहे. ‌ 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

In reply to by कांदा लिंबू

खटपट्या 17/12/2025 - 01:42
दोनदा बघावासा वाटला म्हणजे प्रचंड हीट जाणार, गेला आहेच. पण ५०० करोड च्या पण वर जाइल असे वाटत आहे. बाकी खान कंपनीचे सिनेमे ८०० करोड वगैरे करतात यावर माझा विश्वास नाही. असो.

निनाद 17/12/2025 - 04:50
चित्रपटाची मांडणी जरा तुटक झाली आहे. संपादनावर अजून लक्ष द्यायला हवे होते. बाकी फोनचे योग्य मॉडेल्स दाखवणे वगैरे सांभाळले आहे. पण तेच लक्ष फ्लॅट स्क्रीन मॉनिटर्स टिव्ही वगैरे मध्ये द्यायला हवे होते. २००० च्या सुमारास त्यांचे प्लाझ्मा टिव्ही असत. ते खूप जड होते, त्याकाळात प्रोजेक्शन टीव्ही असत होते. हमझाची मोटर सायकल पण खूप नवीन मॉडेलची आहे. हे सहज टाळता आले असते. असो. कथा मस्त आहे. हाताळणी पण चांगली आहे. पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता. सगळे काही खुल्लम खुल्ला दाखवले आहे असे वाटले. पहिल्यांदा भारतीय चित्रपटाने पाकिस्तान विषयी असलेली एक ऑकवर्ड पोझिशन सोडून दिली आहे असे वाटले. एकदम रोखठोक! २६/११ ची दृष्ये परिणामकारक आहेत. शेवट अपूर्ण सोडून दिला आहे. अर्थात ही एक प्रेक्षकांना बांधून ठेवायची खेळी आहे हे नक्की. पार्श्व संगीतात जुन्या गाण्यांचा वापर खूप मस्त केला आहे. पण नवीन गाणी जरा चांगली द्या हो! आज ची गाणी गुणगुणता येत नसतील अजून वीस वर्षांनी येणार्‍या सिनेमांनी पार्श्व संगीतात कोणती गाणी वापरायची? प्लिज नवीन गाणी जरा चांगली द्या असे म्हणावेसे वाटते आहे. अक्षय खन्नाचा खलनायक जबरदस्त! राकेश बेदी ला वेगळा रोल दिला आहे.
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
सहमत!

In reply to by निनाद

पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता.
पूर्वीच्या जुन्या किंवा अगदी अलिकडच्या थरार पटांमध्ये शत्रूचे नाव कधीही स्पष्टपणे उच्चारले जात नसे. सरहद के पार ,पडोसी मुल्क अथवा दुश्मन देश से असे शब्दप्रयोग योजले जात होते. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता तो. पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख पहिल्यांदी बहुदा बॉर्डर चित्रपटात आला आणि त्याचा टाईम्स मध्ये रिव्यु वाचताना त्यात एक ओळ अशी होती कि "फायनली द एनिमि हॅज बीन आयडेंटीफाईड इन हिन्दी सिनेमा" त्यानंतर अगदी स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख होतो अश्या चित्रपटात. पण तिथे पण उगाच काही ना काही लव अँगल आणुन वगैरे ते न्युट्रलाईज करण्याचे काहींचे किडे असतात. माझ्यामते ह्या चित्रपटापासुन सरळ सरळ ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट मध्ये पाकिस्तान ला दाखवले आहे आणि हे बर्याच जणांना खुपते आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

फक्त पाकिस्तानच नाही तर दुबई, कतार, बांगलादेश आणि नेपाळ च ही नाव हवालाच्या संवादात घेतलं आहे. पाकिस्तानातून जो काही थोडा पैसा मिळतं होता त्यासाठी पाकिस्तानच नाव टाळत असावेत. काही चित्रपटात काहीच कारण नसताना एखाद पाकिस्तानी character पण दाखवलेल आहे.

मदनबाण 18/12/2025 - 16:24
या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच बाहेर आली. या चित्रपटामुळे आपल्या देशात राहणार्‍या पाकिस्तानी अनौरस औलादींना विशेष त्रास झाला. त्यांना ते लाल सिंग चड्ढा टाईप टुकार चित्रपटांना डोक्यावर घेऊन पाकिस्तानच्या बाजुने लेझिम खेळायची हौस असते ना! :))) वायआरफच्या भिकार स्पाय साम्राज्याला पेटती काडी लावण्याचे आणि भिकार खानावळी चे उरले सुरलेले जिहादी कपडे फाडण्याचे काम या चित्रपटाने केलेले दिसत आहे. चित्रपट बहुधा ओटीटी वर आल्यावर पाहिन, मात्र एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे या एका चित्रपटाने पाकड्यांचा बुरखा जगात अगदी टराटरा फाडला आहे. जाता जाता: चित्रपटातील शरारत गाणं बर्‍यापैकी हिट झाल्याने आता अनेक पक्षी जीव त्यावर रील्स बनवत आहेत. आयेषा खानला देखील बरीच प्रसिद्धी या गाण्याने दिली आहे, बाई उड्या मारुन मारुन नितंब अगदी लईत डोलवुन स्टेज वर नृत्य करताना पाहण्यात आल्या आहेत! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

टर्मीनेटर 18/12/2025 - 16:55
अगदी अगदी.. तुम्हाला काय वाटले, इथले (पाकिस्तान समर्थक) डावे आणि पुरोगामी ह्या चित्रपटाविषयी काहीच न बोलता गप्प बसलेत ते काय उगीच का? त्या भाडखाऊंना ना धड चित्रपटाची बाजू घेता येत्ये ना त्याचा विरोध करता येतोय... लैच अवघड जागेचे दुखणे आहे राव, 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' टाईप्स 😂

In reply to by टर्मीनेटर

कॉमी 18/12/2025 - 19:11
मला सिनेमा आवडला. ट्रेलर पाहूनच आवडला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी पाहिला. सिनेमाच राजकारण पटते का नाही हा भाग अलाहिदा. पण जे राजकारण दाखवले आहे त्यात हेतूबाबत काही आक्षेपार्ह वाटले नाही. खेरीज सिनेमा चांगला होता. केरळ फाईल्स वैगेरे सिनेमांचे ट्रेलर पाहून अत्यंत बटबटीत सिनेमे आहेत असे वाटते. धुरंधर तांत्रिक दृष्टीत अतिशय सुपर्ब आहे.

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 19/12/2025 - 13:01
एकच नंबर टर्मिभाऊ, लई मोठी कोंडी सोडवली तुम्ही. चायला एक टाईम असा गांडू होता की जरा शब्द इकडे तिकडे झाला की प्रतिसाद उडायचा. शिवाय वरून दट्ट्या की भावना कितीही तीव्र असल्या तरी शब्द संयमित ठेवायचे. आम्ही बिचारे आबे तुबे कडू भाड्या सारख्या विशेषणात वाढलेली प्रजा. इथले काही बाईलभाडे आणि त्यांचे लिहिणे बघून कुठल्या भाषेत उद्धार करावा हा प्रश्न पडायचा पण तुम्ही भारी काम केले. जशा भावना तशाच उतरवायच्या हा फंडा एक नंबर. आता मागे सरकणे नाही. एकेकाला उभाट्यानेच.......

खटपट्या 11/12/2025 - 23:54
चित्रपट पाहिला खुप छान वाटला. अक्षय खन्ना हा कलाकार म्हणून ग्रेट वाटला. आहेच. राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार.

चित्रपट प्रचंड गाजतोय. पण ह्या निमित्ताने मला एक प्रश्न पडलाय.सत्याचा अंश असलेल्या अश्या स्पाय ऑपरेशन वर चित्रपट काढुन आपण भविष्यातील स्पाय ऑपरेशन तर धोक्यात आणत नाही आहोत ना? म्हणजे समजा ह्या चित्रपटात अमुक एक भारताचा स्पाय पाकिस्ताना कसा इनफिल्ट्रेट झाला.तिथल्या कुणाकुणा कडुन कसे कसे साहाय्य मिळाले हे दाखवुन भले काल्पनिक का होईना तो मार्ग तर पुढे कायमचा बंद होऊन जाईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

कॉमी 12/12/2025 - 11:24
काल्पनिक मार्ग दिग्दर्शकाला सुचत असेल तर तो रॉ, आयएसआय ह्यांना आधी सुचला असेल ह्याची शक्यता जास्त.

In reply to by कानडाऊ योगेशु

गामा पैलवान 14/12/2025 - 15:19
कानडाऊ योगेशु, प्रत्यक्षांत हेरगिरी अशी होत नसते. खरीखुरी हेरगिरी हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. तो लंबितवाणा ( = लांबलचक ) असून तुकड्यातुकड्याने होतो. असंख्य तुकड्यांचं विश्लेषण करून नेमका निष्कर्ष साधणे हा हेरगिरीचा पाया आहे. तो जर दाखवीत बसलं तर चित्रपट भयंकर रटाळ होईल. पडद्यावर दिसतं ते अनेक असंबद्ध तुकडे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा मसालेदार प्रकारे जुळवून सादर केलेलं नाटक असतं. आ.न., -गा.पै.

कांदा लिंबू 12/12/2025 - 09:14
टर्मी भौ, तुम्ही शिफारस केलीय म्हणजे सिनेमा पाहावाच लागणार. आज संध्याकाळी बघतो, जमते का ते. बाकी, लांबलचक लिहिलंय तरी खिळवून ठेवणारं लिहिलंय हेवेसांन.

Bhakti 12/12/2025 - 10:52
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय, त्यामुळे असा चित्रपट आलाय हे समजलं.यात चक्क रणवीर असूनही मला चित्रपटाविषयी माहिती नव्हते ;) बहुतेक ओटीटीवर यायची वाट पाहणार!

सौंदाळा 15/12/2025 - 10:08
परवाच पाहिला आणि आवडला. अगदी बेहद्द आवडला असे नाही म्हणणार कारण काही घटना खूपच प्रेडीक्टेबल होत्या पण बघताना मजा आली. दुसरा भाग पण नक्की बघणार

टर्मीनेटर 15/12/2025 - 13:01
किल्लेदार । खटपट्या । राजेंद्र मेहेंदळे । कानडाऊ योगेशु । कॉमी । गामा पैलवान । कांदा लिंबू । Bhakti । प्रचेतस । सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ खटपट्या
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
+१००० तुम्हालाही राकेश बेदीचे काम आवडते असे जाणवले. एका मित्राने आग्रही शिफारस केल्याने त्याचा (राकेश बेदीचा) हा पॉडकास्ट पहिला. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बऱ्याच गोष्टी ह्यातून नव्याने समजल्या, तुम्हालाही कदाचित त्या ऐकायला आवडतील! @ राजेंद्र मेहेंदळे
"अक्षय खन्नाचा खलनायकाच्या रुपात याच वर्षात दुसरा स्ट्रोक"
येस्स... तुम्ही 'धुरंधर' बघणारच आहात, तेव्हा तुम्हालाही पहिल्यापेक्षा हा दुसरा 'स्ट्रोक' जास्त खणखणीत असल्याचे जाणवेल अशी मला खात्री आहे! @ कानडाऊ योगेशु वर गापैंनी लिहिलंय ते बरोबर आहे. ध्येयाप्रती सर्वोच्च पातळीवरची समर्पित वृत्ती, पराकोटीचा संयम आणि समोरच्याचा संपूर्ण विश्वास संपादन करेपर्यंत कुठल्याही थराला जाण्याची तयारी ह्या गोष्टी हेराकडे असतील तर 'अमुक कालावधीत गुंतवणूक डबल' वगैरे सारख्या अमिषाला, आधी अशा बोगस योजनांमुळे फसवणूक झालेल्या लोकांबद्दलच्या बातम्या ऐकून/वाचूनही वारंवार लोकं नव्याने बळी पडतात त्याप्रमाणे ह्या गोष्टीही सतत होतंच असतात/राहणार. हे कसे होऊ शकते ह्याचे काही प्रमाणात उत्तर या चित्रपटातूनही मिळते. @ कांदा लिंबू - अवश्य बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला तेही सांगा. @ भक्ती
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय,
ते गाणं नाहीये, पार्शवसंगीत म्हणता येईल... पण खूपच व्हायरल होतोय तो सीन आणि त्यावरचे किस्से 😀 @ प्रचेतस - अवश्य बघा... तुम्हालाही आवडेल! @ सौंदाळा
दुसरा भाग पण नक्की बघणार
मला आत्तापासूनच खूप वेध लागलेत त्याचे! कारण आता कथानक कसे वळण घेईल, काय काय घटना बघायला मिळतील ह्याविषयी मनात जे खूप अंदाज बांधून ठेवलेत ते खरे ठरतात का हे जाणून घ्यायचे आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

खटपट्या 15/12/2025 - 21:56
आपल्याकडे जसे शिरीष कणेकर आणि दिलीप प्रभावळ्कर एकपात्त्री प्रयोग करतात तसे राकेश बेदी हे अडीज तासाचा एकपात्रि प्रयोग करतात. युट्युब वर मसाज म्हणून टाइप केल्यास मिळेल.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 16/12/2025 - 20:51
प्रतिसादात Bhakti पाहून वाटलं,टर्मिनेटरपण बदलले.कृत्रिम प्रतिसाद देऊ लागले.पण नंतर @भक्ती पाहून बरं वाटलं, टर्मिनेटर पहिल्यासारखेच आहेत खात्री पटली ;) धुरंधरचे शीर्षकगीत ऐकलं,ओहो माझा फेवरेट हनुमानकाईंड(Hanumankind)ने रॅप केलंय..जबरी :) :)

कांदा लिंबू 16/12/2025 - 01:35
सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू आहे. पावणेदहाच्या शोची कशीबशी दोन तिकिटे मिळाली. सिनेमा पाहून येऊन आता, रात्री दीड वाजता, हे लिहीत आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा अजून एकदा सिनेमा बघायला जाणार आहे. ‌ 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

In reply to by कांदा लिंबू

खटपट्या 17/12/2025 - 01:42
दोनदा बघावासा वाटला म्हणजे प्रचंड हीट जाणार, गेला आहेच. पण ५०० करोड च्या पण वर जाइल असे वाटत आहे. बाकी खान कंपनीचे सिनेमे ८०० करोड वगैरे करतात यावर माझा विश्वास नाही. असो.

निनाद 17/12/2025 - 04:50
चित्रपटाची मांडणी जरा तुटक झाली आहे. संपादनावर अजून लक्ष द्यायला हवे होते. बाकी फोनचे योग्य मॉडेल्स दाखवणे वगैरे सांभाळले आहे. पण तेच लक्ष फ्लॅट स्क्रीन मॉनिटर्स टिव्ही वगैरे मध्ये द्यायला हवे होते. २००० च्या सुमारास त्यांचे प्लाझ्मा टिव्ही असत. ते खूप जड होते, त्याकाळात प्रोजेक्शन टीव्ही असत होते. हमझाची मोटर सायकल पण खूप नवीन मॉडेलची आहे. हे सहज टाळता आले असते. असो. कथा मस्त आहे. हाताळणी पण चांगली आहे. पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता. सगळे काही खुल्लम खुल्ला दाखवले आहे असे वाटले. पहिल्यांदा भारतीय चित्रपटाने पाकिस्तान विषयी असलेली एक ऑकवर्ड पोझिशन सोडून दिली आहे असे वाटले. एकदम रोखठोक! २६/११ ची दृष्ये परिणामकारक आहेत. शेवट अपूर्ण सोडून दिला आहे. अर्थात ही एक प्रेक्षकांना बांधून ठेवायची खेळी आहे हे नक्की. पार्श्व संगीतात जुन्या गाण्यांचा वापर खूप मस्त केला आहे. पण नवीन गाणी जरा चांगली द्या हो! आज ची गाणी गुणगुणता येत नसतील अजून वीस वर्षांनी येणार्‍या सिनेमांनी पार्श्व संगीतात कोणती गाणी वापरायची? प्लिज नवीन गाणी जरा चांगली द्या असे म्हणावेसे वाटते आहे. अक्षय खन्नाचा खलनायक जबरदस्त! राकेश बेदी ला वेगळा रोल दिला आहे.
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
सहमत!

In reply to by निनाद

पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता.
पूर्वीच्या जुन्या किंवा अगदी अलिकडच्या थरार पटांमध्ये शत्रूचे नाव कधीही स्पष्टपणे उच्चारले जात नसे. सरहद के पार ,पडोसी मुल्क अथवा दुश्मन देश से असे शब्दप्रयोग योजले जात होते. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता तो. पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख पहिल्यांदी बहुदा बॉर्डर चित्रपटात आला आणि त्याचा टाईम्स मध्ये रिव्यु वाचताना त्यात एक ओळ अशी होती कि "फायनली द एनिमि हॅज बीन आयडेंटीफाईड इन हिन्दी सिनेमा" त्यानंतर अगदी स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख होतो अश्या चित्रपटात. पण तिथे पण उगाच काही ना काही लव अँगल आणुन वगैरे ते न्युट्रलाईज करण्याचे काहींचे किडे असतात. माझ्यामते ह्या चित्रपटापासुन सरळ सरळ ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट मध्ये पाकिस्तान ला दाखवले आहे आणि हे बर्याच जणांना खुपते आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

फक्त पाकिस्तानच नाही तर दुबई, कतार, बांगलादेश आणि नेपाळ च ही नाव हवालाच्या संवादात घेतलं आहे. पाकिस्तानातून जो काही थोडा पैसा मिळतं होता त्यासाठी पाकिस्तानच नाव टाळत असावेत. काही चित्रपटात काहीच कारण नसताना एखाद पाकिस्तानी character पण दाखवलेल आहे.

मदनबाण 18/12/2025 - 16:24
या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच बाहेर आली. या चित्रपटामुळे आपल्या देशात राहणार्‍या पाकिस्तानी अनौरस औलादींना विशेष त्रास झाला. त्यांना ते लाल सिंग चड्ढा टाईप टुकार चित्रपटांना डोक्यावर घेऊन पाकिस्तानच्या बाजुने लेझिम खेळायची हौस असते ना! :))) वायआरफच्या भिकार स्पाय साम्राज्याला पेटती काडी लावण्याचे आणि भिकार खानावळी चे उरले सुरलेले जिहादी कपडे फाडण्याचे काम या चित्रपटाने केलेले दिसत आहे. चित्रपट बहुधा ओटीटी वर आल्यावर पाहिन, मात्र एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे या एका चित्रपटाने पाकड्यांचा बुरखा जगात अगदी टराटरा फाडला आहे. जाता जाता: चित्रपटातील शरारत गाणं बर्‍यापैकी हिट झाल्याने आता अनेक पक्षी जीव त्यावर रील्स बनवत आहेत. आयेषा खानला देखील बरीच प्रसिद्धी या गाण्याने दिली आहे, बाई उड्या मारुन मारुन नितंब अगदी लईत डोलवुन स्टेज वर नृत्य करताना पाहण्यात आल्या आहेत! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

टर्मीनेटर 18/12/2025 - 16:55
अगदी अगदी.. तुम्हाला काय वाटले, इथले (पाकिस्तान समर्थक) डावे आणि पुरोगामी ह्या चित्रपटाविषयी काहीच न बोलता गप्प बसलेत ते काय उगीच का? त्या भाडखाऊंना ना धड चित्रपटाची बाजू घेता येत्ये ना त्याचा विरोध करता येतोय... लैच अवघड जागेचे दुखणे आहे राव, 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' टाईप्स 😂

In reply to by टर्मीनेटर

कॉमी 18/12/2025 - 19:11
मला सिनेमा आवडला. ट्रेलर पाहूनच आवडला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी पाहिला. सिनेमाच राजकारण पटते का नाही हा भाग अलाहिदा. पण जे राजकारण दाखवले आहे त्यात हेतूबाबत काही आक्षेपार्ह वाटले नाही. खेरीज सिनेमा चांगला होता. केरळ फाईल्स वैगेरे सिनेमांचे ट्रेलर पाहून अत्यंत बटबटीत सिनेमे आहेत असे वाटते. धुरंधर तांत्रिक दृष्टीत अतिशय सुपर्ब आहे.

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 19/12/2025 - 13:01
एकच नंबर टर्मिभाऊ, लई मोठी कोंडी सोडवली तुम्ही. चायला एक टाईम असा गांडू होता की जरा शब्द इकडे तिकडे झाला की प्रतिसाद उडायचा. शिवाय वरून दट्ट्या की भावना कितीही तीव्र असल्या तरी शब्द संयमित ठेवायचे. आम्ही बिचारे आबे तुबे कडू भाड्या सारख्या विशेषणात वाढलेली प्रजा. इथले काही बाईलभाडे आणि त्यांचे लिहिणे बघून कुठल्या भाषेत उद्धार करावा हा प्रश्न पडायचा पण तुम्ही भारी काम केले. जशा भावना तशाच उतरवायच्या हा फंडा एक नंबर. आता मागे सरकणे नाही. एकेकाला उभाट्यानेच.......
लेखनविषय:
लेखनप्रकार

सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

तू

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
ग्रीष्म-तप्त भूमीवर तू तर सर सर मृगसर कोसळणारी विकल-विव्हल प्राणांवर फुंकर घालुनी सांत्वन तू करणारी क्षणभंगुरता गर्वे मिरवीत चिरंतनासम तू फुलणारी परंपरांचे अवजड बंधन सहज समूळ तू झुगारणारी कोलाहल भवताली त्यावर प्रशांत शिडकावा करणारी भळभळते व्रण माझे बांधून भरजरी पैठणी तू उरणारी

अमेरिकेतील गुजराती मंड्ळ

खटपट्या ·

खटपट्या जी, अतिशय उत्तम झाला आहे लेख, हसून हसून वाट लागली मध्ये. सध्या मिपावर मस्त धागे येत आहेत, घाटपांडे सरांच्या धाग्यानंतर हा धागा. मराठी मंडळ नी मराठी कम्युमिटीवर एवढं वाचलं आहे की बाहेरच्या देशात दुसऱ्या राज्यातील लोकांचे गट असतील हे विसरूनच गेलो होतो. बाकी ह्या गुजरात्यांचे कार्यक्रम फार करमणूक असतात. एकदा मी आणी माझा दक्षिण भारतीय मॅनेजर भर नवरात्रीत अहमदाबादला गेलो होतो. मॅनेजर ट्रेनिंग द्यायला आला होता, उत्तम ट्रॅनिंग मिळाली म्हणून त्याच्या गुजराती शिष्यांनी त्याला गुरुदक्षिणा म्हणून गरब्याच्या कार्यक्रमाचे दोन पास दिले. आता तो एकटा दोन पास घेऊन काय करणार? उरलेला एक छातीला लावून तर फिरणार नाही, जेवता जेवता तो मला बोलला चल बाहुबली हे काय आहे ते पाहून येऊ. नंतर कळाल की त्याला गरबा हा काय प्रकार असतो हेच माहीत नव्हत, आम्ही गरबा केंद्राच्या दिशेने शिष्यांनी दिलेल्या एका बाईकवर निघालो, रस्त्यात खूपच सुंदर सजलेल्या मोकळे केस सोडलेल्या, घागरा चुनारिवाल्या सुंदर सुंदर मुली पाहून फार खुश झालो, त्यांच्या सोबतचे मुल अतिशय फालतू कुर्ते घालून होते. गरबा केंद्रात गेल्यावर आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. मला महाराष्ट्रात १०० गरबा खेळणारे नि त्याना पाहायला १००० जमलेले अशी गर्दी पाहायची सवय होती पण इथे उलट कार्यक्रम होता गरबा खेळणारे हजार तर पहायला १० देखील नव्हते. आम्ही दोघेच गरबा पाहत उभे होते, शिष्यांच्या विनंतीवरून मॅनेजरही गरब्यात घुसला, पहिले दोन चार वेळा चुकला नंतर मस्त गरबा खेळू लागला, त्याची वाकडी तिकडी वाढलेली दाढी नी मळकट टी शर्ट नसता तर कुणाला कळालही नसतं की हा गुजराती नाही, त्याच्या मागे मी देखील गरब्यात घुसलो नि खेळू लागलो, थोड्या वेळाने मलाच आश्चर्य वाटले की मी इतका चांगला गरबा खेळतोय. महत्वाचं म्हणजे तिथे कुणी मला ऑब्सर्व करणार नव्हत समोरून मुलींची रांग टिपरीवर टिपरी हाणत मुलांच्या रांगेच्या विरुद्ध दिशेने जात होती, एक एक सुंदर मुलगी पास व्हायची. मज्जा आली होती. :)

खटपट्या 10/12/2025 - 22:49
धन्यवाद, मुंबैत बहुतेक जण गरबा खेळणार्‍या मुलींना बघायला जातात हे खरे आहे. आता तर खूप अनैतिक प्रकार देखील चालतात असे ऐकले आहे.

कंजूस 11/12/2025 - 05:44
आवडला लेख. धंद्यात साहसी वृत्ती ठेवणारे असतात गुजराती लोक. काही लोक त्यांना शत्रू मानतात पण ते कुणाला शत्रू मानत नाहीत. मराठी लोकांचं बोलायचं तर काही जण धंदा काढतात वाढवतात पण त्यांची मुलं तो धंदा चालू ठेवत नाहीत. शिक्षण घेऊन नोकऱ्याच करतात. शनिवार रविवार सुट्टी, इतर सुट्ट्या. हीच मजा. तर धंध्यामध्ये लोकांचे सण उत्सव तेव्हा यांची कमाई हा हिशोब असतो.जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा मजा करतात. ही पद्धत बऱ्याच मराठी लोकांना पटत नाही. तर असो.

मदनबाण 11/12/2025 - 11:46
खटपट्या सेठ, सुरेख लेखन ! गरबा म्हणजे अनेक पक्षी जीव एकाच ठिकाणी पाहण्याची संधी! अर्थात गरबा खेळणाचा आनंद देखील तितकाच धमाल असतो. व्यापार हाच त्यांचा डीएनए असल्याने सगळं केम छो मजा मा असंच अनेक वेळी दिसते. [ खाखरा थेपला प्रेमी ] :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandhar

गुजराती लोक एकमेकांना पकडुन असतात असे पाहिले आहे. शिक्षणानिमित्त मुंबईत व नंतर कामानिमित्त बेंगलोरमध्ये असताना सुरवातीच्या दिवसात राहण्याची सोय पाहण्यासाठी कॉटबेसिस्,पी.जी वगैरे शोधत होतो तेव्हा गुजरात्यांच्या बर्याच धर्मशाळा दिसल्या.मुंबई मध्ये व बेंगलोरमध्येही.बेंगलोरमध्ये एक महाराष्ट्र मंडळ सोडले तर दुसरी काहीच व्यवस्था नव्हती.

In reply to by कानडाऊ योगेशु

कंजूस 11/12/2025 - 16:18
अगदी शैक्षणिक शिष्यवृत्त्या, ते माथेरान महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी राहण्याची स्वस्तातली सोय सुद्धा असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

खटपट्या 11/12/2025 - 19:34
परदेशात जैन लोकांचे खायचे वांदे होतात कारण ते होटेल मधले खाउ शकत नाहीत. म्हणून त्यांनी पेइंग गेस्ट ची साइट बनवली आहे. ज्या शहरात जायचे असेल त्या शहरातील जैन लोक येणार्‍या माणसाची जेवणाची आणि राहण्याची सोय करतात. त्यात दोघांचाही फायदा होतो आणि त्यांचा धर्म ही अबाधीत राहतो.

गामा पैलवान 11/12/2025 - 19:23
आमचे गुजरातेत अनेक मराठी भाषिक नातेवाईक आहेत. त्यांची मनोधारणा स्थानिक गुजरात्यांशी मिळतीजुळती आहे. अनेकांचा व्यवसाय आहे. अगदी नोकरदार माणूस असला तरी भागभांडवल बाजारात काहीतरी व्यवहार करणारच. किंवा छोटंसं दुकान वा टपरी चालवणार. वा भाड्याने तरी देणार. फावल्या वेळांत चकाट्या पिटतांना कधी दिसणार नाही. हा मातीचा गुण म्हणावा का? -गा.पै.

विजुभाऊ 12/12/2025 - 16:06
हा मातीचा गुण म्हणावा का?
माझ्या ओळखीचे काही गुजराथी पुणे लोक्स , ठाणे सातारा कोल्हापुर येथे आहेत. पण त्या पैकी कोणीही कोणत्याही पुढार्‍याच्या मागे दादा बापू महाराज अप्पा असे म्हणत फिरत नाहीत, कोणीही गप्पा मारतानाही राजकारण या विषयावर बोलत नाही. कोणीच सेना उबाठासेना मनसे या बाबत चर्चा करत नाही. कोणीही संजय राउतांचे भाषण ऐकत नाही. कोणीही समोरचा माणूस गुजराथी / मराठी आहे हे माहीत असूनही हिंदीत बोलत नाही. त्यामुळे हा मातीचा गुण नसावा असे वाटते

In reply to by विजुभाऊ

+ सहमत आहे. माझ्याही ओळखीचे अनेक गुजराती आहेत, पण स्वत गुजराती असूनही ते कधीही मोदी मोदी, भाजप भाजप करत नाहीत, बाटचे जास्त मोठी बांग देतात त्याप्रमाणे अनेक मराठी लोक मोदी मोदी भाजप भाजप करत छाती पिटताना पाहिले आहेत.

जुइ 13/12/2025 - 20:56
जबरी निरीक्षण! लेख आवडला!

चावटमेला 14/12/2025 - 15:57
चांगला लेख. युके मध्ये मला गुजराती लोकांचे दोन ठळक गट आढळून आले. पहिला म्हणजे भारतातून आलेले गुजराती, आणि दुसरा म्हणजे इदी अमिन सत्तेत आल्यानंतर निर्वासित म्हणून आलेले अफ्रिकन गुजराती. ह्या दोन गटांच्या चालीरीती, विचारसरणी ह्यांत मोठा फरक दिसतो. आफ्रिकन गुजराती जास्त इंग्रजाळलेले, बर्‍याच अंशी सर्रास मांसाहार करणारे, दारू पिणारे दिसून येतात, शिवाय भारतीय म्हणवून घेणे त्यांना आवडत नाही, ईस्ट आफ्रिकन अशी ओळख सांगतात. ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत. भारतीय गुजराथ्यांच्या पिढ्या जास्त करून व्यवसायांत आहेत, तर आफ्रिकन लोक मोठ्या प्रमाणांत नोकर्‍यांमध्ये आहेत. ह्या आफ्रिकन गुजराथ्यांची वस्ती बव्हंशी लंडन मधील हॅरो उपनगर, किंवा लेस्टर शहरात आहे. भारतीय गुजराती संपूर्ण युकेभर पसरलेले आहेत.

In reply to by चावटमेला

ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत.
गुजराथ्यांमध्ये जात पात प्रकार कितपत पाळला जातो ह्याबाबत काही माहिती आहे का? पटेल,शहा (बहुदा गांधी) ह्या व्यतिरिक्त अन्य आडनावाची गुजराथी व्यक्तीच सर्रास गुजराथबाहेर दिसत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

गुजरातमध्ये आजही जात‑पात अस्तित्वात आहे. शहरांमध्ये तिचा प्रभाव तुलनेने कमी जाणवतो, पण ग्रामीण भागात तो अधिक ठळकपणे दिसतो. राजपूत समाजात ते काही प्रमाणात जास्त आढळतं. जैन आणि वैष्णव समुदायातही जातीतलेच विवाह पसंत केले जातात. तरीही, बदल होत आहेत—आधुनिक शिक्षण, नोकरी, परदेशात जाणं, शहरी जीवन अशा अनेक कारणांमुळे लोकांच्या विचारसरणीत मोकळेपणा येत आहे. मेहता, गांधी, शाह ही आडनावे जैन आणि वैष्णव—दोन्ही समाजांमध्ये आढळतात. जैन, मेहता, गांधी, शाह आणि जोशी ही आडनावे गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळेच त्या लोकांची संख्या बाहेर जास्त असल्यासारखी वाटते. पण इतर गुजराती—उदा. बटलिवाला, ***वाला, कोठारी, कोळी—हे विविध ठिकाणी आणि विविध व्यवसायांत दिसतात. --- फक्त नावाने गुजराती असलेला एक मराठी ;)

In reply to by चावटमेला

गामा पैलवान 15/12/2025 - 19:16
चावटमेला, मी अनेक वर्षं इंग्लंडात असूनही ही निरीक्षणे मला जाणवली नाहीत. तुमच्या मर्मभेदी दृष्टीस मन:पूर्वक दाद देतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चावटमेला 15/12/2025 - 22:46
धन्यवाद. मर्मग्राही वगैरे काही नाही हो, बर्‍याच ईस्ट आफ्रिकन गुजराथ्यांशी नोकरीच्या ठिकाणी संपर्क येतो, त्यांच्याशी होणार्‍या संवादांतून समजलेली माहिती.

अभ्या.. 17/12/2025 - 11:02
मला अमेरिकेतील नाही पण जर्मनीतील दोन गुजरात्यांचा आलेला अनुभव नमूद करतो. पहिला गुजराती टिपिकल पटेल जो आम्ही जे घर भाड्याने घेतले त्याचा आधिचा भाडेकरु. मालक अर्थात जर्मन. पटेलाला ते घर सोडताना त्याचे सगळे फर्निचर नव्या भाडेकरुच्या गळ्यात घालायचे होते कारण त्याअने नवीन घेतेलेले घर फुल्ली फर्निश्ड होते. आणि त्याची मार्केट व्हॅल्यु अगदी नव्या प्रमाणे पटेलिणीला अपेक्षित होती. त्यामागचा तिचा युक्तीवाद की तुम्हाला नवीन फर्निचर ऑर्डर केले तरी असेंबल वगैरे करावे लागेल म्हणून ते नव्याच्या किमतीत घ्या. त्यासाठी तिने इतका प्रचंड आणि चिकाटीने युक्तीवाद केला की बस्स. आणि तिचे म्हणणे मान्य करण्यातच शहाणपण आहे हे ती वारंवार पटवून देत होती. त्यासाठी दोन कारणे की एकतर ते १० वर्षे सिनिअर आहेत जर्मनीत आणि दुसरे म्हणजे लहानश्या ह्या गावात आमची कम्युनिटी इंडीयाप्रमाणेच स्ट्रॉन्ग आहे, कुठेतरी वास्ता पडेलच. सगळे धुडकावले पण तरीही जाता जाता बर्‍याच निरुपयोगी वस्तू, काचा आमच्या गळ्यात मारुन पळाय्चा प्लान होता (कारण वस्तूंचे दिस्पोजल अवघड) पण तिला घेऊन जायला भाग पाडले. त्यासाठी तिने फोनवरुन जी हॅरेस्मेंट आणि ताबा देताना जी अडवाअडवी केली त्याला तोड नाही. दुसरा एक गुजराती फर्निचर असेंबल करणारा अनाधिकृत पणे कारण तो स्टुडंट होता आणी त्याला त्याची प्रॅक्टीस होती म्हणे. एकतर प्रचंड आकडा कोट करुन तो प्रिंटेड बिल देणार नव्हता. आणि हे काम गुपचूप करावे असा अग्रह होता कारण आपल्या माथाडी कामगाराप्रमाणे जर्मन अधिकृत असेंब्लर त्याचे पैसे पुन्हा वसूल करु श्कतात शिवाय त्याने तो गुजराती अडचणीत आला असता. त्याच्या एकतृतिआंश पैश्यात हंगेरीच्या एका असेंब्लरने २ तासात काम करुन दिले तेही अधिकृत बिलासह. हंगेरीचीही आर्थिक स्थिती फारच नाजूक आणि बेरोजगारी आहे असे त्याच्याशी बोलण्यातून कळले पण ह्या कामासाठी गुजरात्याने जी तंत्रे आणि बोलबच्च्न लावले ती अस्सल गुजरात्याला शोभणारीच होती.

खटपट्या जी, अतिशय उत्तम झाला आहे लेख, हसून हसून वाट लागली मध्ये. सध्या मिपावर मस्त धागे येत आहेत, घाटपांडे सरांच्या धाग्यानंतर हा धागा. मराठी मंडळ नी मराठी कम्युमिटीवर एवढं वाचलं आहे की बाहेरच्या देशात दुसऱ्या राज्यातील लोकांचे गट असतील हे विसरूनच गेलो होतो. बाकी ह्या गुजरात्यांचे कार्यक्रम फार करमणूक असतात. एकदा मी आणी माझा दक्षिण भारतीय मॅनेजर भर नवरात्रीत अहमदाबादला गेलो होतो. मॅनेजर ट्रेनिंग द्यायला आला होता, उत्तम ट्रॅनिंग मिळाली म्हणून त्याच्या गुजराती शिष्यांनी त्याला गुरुदक्षिणा म्हणून गरब्याच्या कार्यक्रमाचे दोन पास दिले. आता तो एकटा दोन पास घेऊन काय करणार? उरलेला एक छातीला लावून तर फिरणार नाही, जेवता जेवता तो मला बोलला चल बाहुबली हे काय आहे ते पाहून येऊ. नंतर कळाल की त्याला गरबा हा काय प्रकार असतो हेच माहीत नव्हत, आम्ही गरबा केंद्राच्या दिशेने शिष्यांनी दिलेल्या एका बाईकवर निघालो, रस्त्यात खूपच सुंदर सजलेल्या मोकळे केस सोडलेल्या, घागरा चुनारिवाल्या सुंदर सुंदर मुली पाहून फार खुश झालो, त्यांच्या सोबतचे मुल अतिशय फालतू कुर्ते घालून होते. गरबा केंद्रात गेल्यावर आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. मला महाराष्ट्रात १०० गरबा खेळणारे नि त्याना पाहायला १००० जमलेले अशी गर्दी पाहायची सवय होती पण इथे उलट कार्यक्रम होता गरबा खेळणारे हजार तर पहायला १० देखील नव्हते. आम्ही दोघेच गरबा पाहत उभे होते, शिष्यांच्या विनंतीवरून मॅनेजरही गरब्यात घुसला, पहिले दोन चार वेळा चुकला नंतर मस्त गरबा खेळू लागला, त्याची वाकडी तिकडी वाढलेली दाढी नी मळकट टी शर्ट नसता तर कुणाला कळालही नसतं की हा गुजराती नाही, त्याच्या मागे मी देखील गरब्यात घुसलो नि खेळू लागलो, थोड्या वेळाने मलाच आश्चर्य वाटले की मी इतका चांगला गरबा खेळतोय. महत्वाचं म्हणजे तिथे कुणी मला ऑब्सर्व करणार नव्हत समोरून मुलींची रांग टिपरीवर टिपरी हाणत मुलांच्या रांगेच्या विरुद्ध दिशेने जात होती, एक एक सुंदर मुलगी पास व्हायची. मज्जा आली होती. :)

खटपट्या 10/12/2025 - 22:49
धन्यवाद, मुंबैत बहुतेक जण गरबा खेळणार्‍या मुलींना बघायला जातात हे खरे आहे. आता तर खूप अनैतिक प्रकार देखील चालतात असे ऐकले आहे.

कंजूस 11/12/2025 - 05:44
आवडला लेख. धंद्यात साहसी वृत्ती ठेवणारे असतात गुजराती लोक. काही लोक त्यांना शत्रू मानतात पण ते कुणाला शत्रू मानत नाहीत. मराठी लोकांचं बोलायचं तर काही जण धंदा काढतात वाढवतात पण त्यांची मुलं तो धंदा चालू ठेवत नाहीत. शिक्षण घेऊन नोकऱ्याच करतात. शनिवार रविवार सुट्टी, इतर सुट्ट्या. हीच मजा. तर धंध्यामध्ये लोकांचे सण उत्सव तेव्हा यांची कमाई हा हिशोब असतो.जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा मजा करतात. ही पद्धत बऱ्याच मराठी लोकांना पटत नाही. तर असो.

मदनबाण 11/12/2025 - 11:46
खटपट्या सेठ, सुरेख लेखन ! गरबा म्हणजे अनेक पक्षी जीव एकाच ठिकाणी पाहण्याची संधी! अर्थात गरबा खेळणाचा आनंद देखील तितकाच धमाल असतो. व्यापार हाच त्यांचा डीएनए असल्याने सगळं केम छो मजा मा असंच अनेक वेळी दिसते. [ खाखरा थेपला प्रेमी ] :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandhar

गुजराती लोक एकमेकांना पकडुन असतात असे पाहिले आहे. शिक्षणानिमित्त मुंबईत व नंतर कामानिमित्त बेंगलोरमध्ये असताना सुरवातीच्या दिवसात राहण्याची सोय पाहण्यासाठी कॉटबेसिस्,पी.जी वगैरे शोधत होतो तेव्हा गुजरात्यांच्या बर्याच धर्मशाळा दिसल्या.मुंबई मध्ये व बेंगलोरमध्येही.बेंगलोरमध्ये एक महाराष्ट्र मंडळ सोडले तर दुसरी काहीच व्यवस्था नव्हती.

In reply to by कानडाऊ योगेशु

कंजूस 11/12/2025 - 16:18
अगदी शैक्षणिक शिष्यवृत्त्या, ते माथेरान महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी राहण्याची स्वस्तातली सोय सुद्धा असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

खटपट्या 11/12/2025 - 19:34
परदेशात जैन लोकांचे खायचे वांदे होतात कारण ते होटेल मधले खाउ शकत नाहीत. म्हणून त्यांनी पेइंग गेस्ट ची साइट बनवली आहे. ज्या शहरात जायचे असेल त्या शहरातील जैन लोक येणार्‍या माणसाची जेवणाची आणि राहण्याची सोय करतात. त्यात दोघांचाही फायदा होतो आणि त्यांचा धर्म ही अबाधीत राहतो.

गामा पैलवान 11/12/2025 - 19:23
आमचे गुजरातेत अनेक मराठी भाषिक नातेवाईक आहेत. त्यांची मनोधारणा स्थानिक गुजरात्यांशी मिळतीजुळती आहे. अनेकांचा व्यवसाय आहे. अगदी नोकरदार माणूस असला तरी भागभांडवल बाजारात काहीतरी व्यवहार करणारच. किंवा छोटंसं दुकान वा टपरी चालवणार. वा भाड्याने तरी देणार. फावल्या वेळांत चकाट्या पिटतांना कधी दिसणार नाही. हा मातीचा गुण म्हणावा का? -गा.पै.

विजुभाऊ 12/12/2025 - 16:06
हा मातीचा गुण म्हणावा का?
माझ्या ओळखीचे काही गुजराथी पुणे लोक्स , ठाणे सातारा कोल्हापुर येथे आहेत. पण त्या पैकी कोणीही कोणत्याही पुढार्‍याच्या मागे दादा बापू महाराज अप्पा असे म्हणत फिरत नाहीत, कोणीही गप्पा मारतानाही राजकारण या विषयावर बोलत नाही. कोणीच सेना उबाठासेना मनसे या बाबत चर्चा करत नाही. कोणीही संजय राउतांचे भाषण ऐकत नाही. कोणीही समोरचा माणूस गुजराथी / मराठी आहे हे माहीत असूनही हिंदीत बोलत नाही. त्यामुळे हा मातीचा गुण नसावा असे वाटते

In reply to by विजुभाऊ

+ सहमत आहे. माझ्याही ओळखीचे अनेक गुजराती आहेत, पण स्वत गुजराती असूनही ते कधीही मोदी मोदी, भाजप भाजप करत नाहीत, बाटचे जास्त मोठी बांग देतात त्याप्रमाणे अनेक मराठी लोक मोदी मोदी भाजप भाजप करत छाती पिटताना पाहिले आहेत.

जुइ 13/12/2025 - 20:56
जबरी निरीक्षण! लेख आवडला!

चावटमेला 14/12/2025 - 15:57
चांगला लेख. युके मध्ये मला गुजराती लोकांचे दोन ठळक गट आढळून आले. पहिला म्हणजे भारतातून आलेले गुजराती, आणि दुसरा म्हणजे इदी अमिन सत्तेत आल्यानंतर निर्वासित म्हणून आलेले अफ्रिकन गुजराती. ह्या दोन गटांच्या चालीरीती, विचारसरणी ह्यांत मोठा फरक दिसतो. आफ्रिकन गुजराती जास्त इंग्रजाळलेले, बर्‍याच अंशी सर्रास मांसाहार करणारे, दारू पिणारे दिसून येतात, शिवाय भारतीय म्हणवून घेणे त्यांना आवडत नाही, ईस्ट आफ्रिकन अशी ओळख सांगतात. ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत. भारतीय गुजराथ्यांच्या पिढ्या जास्त करून व्यवसायांत आहेत, तर आफ्रिकन लोक मोठ्या प्रमाणांत नोकर्‍यांमध्ये आहेत. ह्या आफ्रिकन गुजराथ्यांची वस्ती बव्हंशी लंडन मधील हॅरो उपनगर, किंवा लेस्टर शहरात आहे. भारतीय गुजराती संपूर्ण युकेभर पसरलेले आहेत.

In reply to by चावटमेला

ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत.
गुजराथ्यांमध्ये जात पात प्रकार कितपत पाळला जातो ह्याबाबत काही माहिती आहे का? पटेल,शहा (बहुदा गांधी) ह्या व्यतिरिक्त अन्य आडनावाची गुजराथी व्यक्तीच सर्रास गुजराथबाहेर दिसत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

गुजरातमध्ये आजही जात‑पात अस्तित्वात आहे. शहरांमध्ये तिचा प्रभाव तुलनेने कमी जाणवतो, पण ग्रामीण भागात तो अधिक ठळकपणे दिसतो. राजपूत समाजात ते काही प्रमाणात जास्त आढळतं. जैन आणि वैष्णव समुदायातही जातीतलेच विवाह पसंत केले जातात. तरीही, बदल होत आहेत—आधुनिक शिक्षण, नोकरी, परदेशात जाणं, शहरी जीवन अशा अनेक कारणांमुळे लोकांच्या विचारसरणीत मोकळेपणा येत आहे. मेहता, गांधी, शाह ही आडनावे जैन आणि वैष्णव—दोन्ही समाजांमध्ये आढळतात. जैन, मेहता, गांधी, शाह आणि जोशी ही आडनावे गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळेच त्या लोकांची संख्या बाहेर जास्त असल्यासारखी वाटते. पण इतर गुजराती—उदा. बटलिवाला, ***वाला, कोठारी, कोळी—हे विविध ठिकाणी आणि विविध व्यवसायांत दिसतात. --- फक्त नावाने गुजराती असलेला एक मराठी ;)

In reply to by चावटमेला

गामा पैलवान 15/12/2025 - 19:16
चावटमेला, मी अनेक वर्षं इंग्लंडात असूनही ही निरीक्षणे मला जाणवली नाहीत. तुमच्या मर्मभेदी दृष्टीस मन:पूर्वक दाद देतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चावटमेला 15/12/2025 - 22:46
धन्यवाद. मर्मग्राही वगैरे काही नाही हो, बर्‍याच ईस्ट आफ्रिकन गुजराथ्यांशी नोकरीच्या ठिकाणी संपर्क येतो, त्यांच्याशी होणार्‍या संवादांतून समजलेली माहिती.

अभ्या.. 17/12/2025 - 11:02
मला अमेरिकेतील नाही पण जर्मनीतील दोन गुजरात्यांचा आलेला अनुभव नमूद करतो. पहिला गुजराती टिपिकल पटेल जो आम्ही जे घर भाड्याने घेतले त्याचा आधिचा भाडेकरु. मालक अर्थात जर्मन. पटेलाला ते घर सोडताना त्याचे सगळे फर्निचर नव्या भाडेकरुच्या गळ्यात घालायचे होते कारण त्याअने नवीन घेतेलेले घर फुल्ली फर्निश्ड होते. आणि त्याची मार्केट व्हॅल्यु अगदी नव्या प्रमाणे पटेलिणीला अपेक्षित होती. त्यामागचा तिचा युक्तीवाद की तुम्हाला नवीन फर्निचर ऑर्डर केले तरी असेंबल वगैरे करावे लागेल म्हणून ते नव्याच्या किमतीत घ्या. त्यासाठी तिने इतका प्रचंड आणि चिकाटीने युक्तीवाद केला की बस्स. आणि तिचे म्हणणे मान्य करण्यातच शहाणपण आहे हे ती वारंवार पटवून देत होती. त्यासाठी दोन कारणे की एकतर ते १० वर्षे सिनिअर आहेत जर्मनीत आणि दुसरे म्हणजे लहानश्या ह्या गावात आमची कम्युनिटी इंडीयाप्रमाणेच स्ट्रॉन्ग आहे, कुठेतरी वास्ता पडेलच. सगळे धुडकावले पण तरीही जाता जाता बर्‍याच निरुपयोगी वस्तू, काचा आमच्या गळ्यात मारुन पळाय्चा प्लान होता (कारण वस्तूंचे दिस्पोजल अवघड) पण तिला घेऊन जायला भाग पाडले. त्यासाठी तिने फोनवरुन जी हॅरेस्मेंट आणि ताबा देताना जी अडवाअडवी केली त्याला तोड नाही. दुसरा एक गुजराती फर्निचर असेंबल करणारा अनाधिकृत पणे कारण तो स्टुडंट होता आणी त्याला त्याची प्रॅक्टीस होती म्हणे. एकतर प्रचंड आकडा कोट करुन तो प्रिंटेड बिल देणार नव्हता. आणि हे काम गुपचूप करावे असा अग्रह होता कारण आपल्या माथाडी कामगाराप्रमाणे जर्मन अधिकृत असेंब्लर त्याचे पैसे पुन्हा वसूल करु श्कतात शिवाय त्याने तो गुजराती अडचणीत आला असता. त्याच्या एकतृतिआंश पैश्यात हंगेरीच्या एका असेंब्लरने २ तासात काम करुन दिले तेही अधिकृत बिलासह. हंगेरीचीही आर्थिक स्थिती फारच नाजूक आणि बेरोजगारी आहे असे त्याच्याशी बोलण्यातून कळले पण ह्या कामासाठी गुजरात्याने जी तंत्रे आणि बोलबच्च्न लावले ती अस्सल गुजरात्याला शोभणारीच होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी आजपर्यंत अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, बे एरिया या भागातील मराठी मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, पण गुजराती मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना कधीच हजेरी लावली नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती. मराठी लोकांना राग आला तरी चालेल, पण मराठी मंडळांत प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मला डॉलर्स द्यावे लागले, या उलट गुजराती मंडळात मात्र आवजाव घर तुम्हारा होते, (पैसे की कोई कमी नही है) मुळात गुजराती मंडळात का गेलो?

बेपत्ता बायको, आरोपी नवरा आणि शून्य खून-पुरावा !

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 17/12/2025 - 18:37
सर्वांना धन्यवाद ! गुगलनुसार फ्रान्समध्ये नार्कोटेस्टचा पुरावा न्यायालयात विश्वसनीय मानला जात नाही. तिथे ज्युरींच्या मताला अधिक महत्त्व दिलेले दिसते. “intime conviction” (the inner belief of the jurors and judges).

कुमार सर, हा लेख माबोवर आधीही वाचल आहे. छान आहे. एक असाच आरुषी तलवार केसवरही करावा ही विनंती. मी अनेकवेळा ती केस वाचली, अगदी चॅट जीपीटीला आरुषीच्या पालकाना आरोपी ठरवणारा वकील बनवले व डिपसिकला बचाव म्हणून ठरवून वादविवाद घडवला पण त्यातूनही काहीही निष्पन्न झाले नाही डीपसिक आणी चॅट जीपीटी दोघानीही हे मान्य केले की सबळ पुरावे नाहीत. नेमके काय घडले असावे हा प्रश्न कधीच सुटत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अ.बा. इरफान खान चा तलवार हा चित्रपट पाहिला आहे का? आरुषि हत्याकांडावरच आधारित आहे. सत्याच्या बर्याच जवळ पोहोचणारा चित्रपट आहे.

हेमंतकुमार 17/12/2025 - 18:37
सर्वांना धन्यवाद ! गुगलनुसार फ्रान्समध्ये नार्कोटेस्टचा पुरावा न्यायालयात विश्वसनीय मानला जात नाही. तिथे ज्युरींच्या मताला अधिक महत्त्व दिलेले दिसते. “intime conviction” (the inner belief of the jurors and judges).

कुमार सर, हा लेख माबोवर आधीही वाचल आहे. छान आहे. एक असाच आरुषी तलवार केसवरही करावा ही विनंती. मी अनेकवेळा ती केस वाचली, अगदी चॅट जीपीटीला आरुषीच्या पालकाना आरोपी ठरवणारा वकील बनवले व डिपसिकला बचाव म्हणून ठरवून वादविवाद घडवला पण त्यातूनही काहीही निष्पन्न झाले नाही डीपसिक आणी चॅट जीपीटी दोघानीही हे मान्य केले की सबळ पुरावे नाहीत. नेमके काय घडले असावे हा प्रश्न कधीच सुटत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अ.बा. इरफान खान चा तलवार हा चित्रपट पाहिला आहे का? आरुषि हत्याकांडावरच आधारित आहे. सत्याच्या बर्याच जवळ पोहोचणारा चित्रपट आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
15 डिसेंबर 2020 . . . जगभरात कोविड-19ने थैमान घातलेले, बहुतेक देशांत अधूनमधून टाळेबंदीचे वातावरण आणि जनता हवालदिल झालेली. त्या दिवशी मध्यरात्री फ्रान्समधील एका गावात एक चक्रावून टाकणारी अन् मती गुंग करणारी घटना घडली. चाळीशीतल्या Jubillar जोडप्यातली पत्नी त्या मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. पुढील पाच वर्षात तिचा ठावठिकाणा लागलेला नव्हता आणि तिचे प्रेतसुद्धा मिळाले नाही - अगदी आपल्याकडचा ‘दृश्यम’ आठवला असेल ना? मात्र पोलिसांनी त्या बाईच्या नवऱ्याला अटक करून ठेवली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस भारतात व्हावा।।

kvponkshe ·

विवेकपटाईत 10/12/2025 - 09:30
मुले अमेरिकेत गेली याचा आनंद प्रत्येक पालकाला होतो. माझा मुलगा अमेरिकेत आहे हे तू सल्ला सांगताना त्यांची छाती 56 याच्यापेक्षा जास्त मोठी होते. पण पंच्याहत्तरी उलटल्यानंतर कोणता वृद्धाश्रम उत्तम आहे याच्या शोध घ्यावा लागतो. अमेरिकेतील मुलांनी जर फायनान्स केले नाही तर शेवट अत्यंत दारुण होतो. बाकी अमेरिकेत ही लोक भारतीय संस्कार जपतात. दारू आणि ड्रग्स पासून दूर असलेल्या मुलांचे भविष्य तिथे ही उज्ज्वल आहे.

बरं झाले खुश नाही झालात. आयुष्याच्या संध्याकाळी सूड उगवून देखील काही फायदा नसतो. जी गोष्ट ज्यावेळी हवी त्यावेळी मिळाली नाही तर जे नुकसान होऊन गेले ते भरता येत नाही. सुड देखील तरुण वयातच घेता आला तर मजा आहे.

In reply to by धर्मराजमुटके

विजुभाऊ 10/12/2025 - 11:27
सुड देखील तरुण वयातच घेता आला तर मजा आहे.
एकदम पटले. आणि जे काही घडले यात लेखकाचे काय कर्तृत्व आहे?सूड हा काही पॅसिव्ह गोष्ट नाहिय्ये. त्यासाठी स्वतः काहितरी करावे लागते.

खरेतर स्वप्नललनेने तसा काहीही विश्वासघात केला नाही व हा सारा एकतर्फी मामला होता.उलट प्रत्यक्ष तोंडावर नकार देऊन पाण उतारा न करता आडुन आडुन आता माझ्या बद्दल विचार करणे सोड हे सुचविले.खरेतर लेखकाने तिचे आभार मानायला हवेत. मी ही लग्नाच्या मार्केट मध्ये उभा असताना काही जणींनी नकार दिला होता व त्याचा राग आला होता पण मी देखील काही जणींना नकार कळवला होता. त्यामुळे आधी वाटत असलेली सूडाची भावना कालांतराने नाहीशी झाली. ही मराठी शॉर्ट्फिल्म बघण्यासारखी आहे.

विवेकपटाईत 10/12/2025 - 09:30
मुले अमेरिकेत गेली याचा आनंद प्रत्येक पालकाला होतो. माझा मुलगा अमेरिकेत आहे हे तू सल्ला सांगताना त्यांची छाती 56 याच्यापेक्षा जास्त मोठी होते. पण पंच्याहत्तरी उलटल्यानंतर कोणता वृद्धाश्रम उत्तम आहे याच्या शोध घ्यावा लागतो. अमेरिकेतील मुलांनी जर फायनान्स केले नाही तर शेवट अत्यंत दारुण होतो. बाकी अमेरिकेत ही लोक भारतीय संस्कार जपतात. दारू आणि ड्रग्स पासून दूर असलेल्या मुलांचे भविष्य तिथे ही उज्ज्वल आहे.

बरं झाले खुश नाही झालात. आयुष्याच्या संध्याकाळी सूड उगवून देखील काही फायदा नसतो. जी गोष्ट ज्यावेळी हवी त्यावेळी मिळाली नाही तर जे नुकसान होऊन गेले ते भरता येत नाही. सुड देखील तरुण वयातच घेता आला तर मजा आहे.

In reply to by धर्मराजमुटके

विजुभाऊ 10/12/2025 - 11:27
सुड देखील तरुण वयातच घेता आला तर मजा आहे.
एकदम पटले. आणि जे काही घडले यात लेखकाचे काय कर्तृत्व आहे?सूड हा काही पॅसिव्ह गोष्ट नाहिय्ये. त्यासाठी स्वतः काहितरी करावे लागते.

खरेतर स्वप्नललनेने तसा काहीही विश्वासघात केला नाही व हा सारा एकतर्फी मामला होता.उलट प्रत्यक्ष तोंडावर नकार देऊन पाण उतारा न करता आडुन आडुन आता माझ्या बद्दल विचार करणे सोड हे सुचविले.खरेतर लेखकाने तिचे आभार मानायला हवेत. मी ही लग्नाच्या मार्केट मध्ये उभा असताना काही जणींनी नकार दिला होता व त्याचा राग आला होता पण मी देखील काही जणींना नकार कळवला होता. त्यामुळे आधी वाटत असलेली सूडाची भावना कालांतराने नाहीशी झाली. ही मराठी शॉर्ट्फिल्म बघण्यासारखी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९९९ साली आमचे स्टेशनरी चे भाड्याचे दुकान होते . त्याच्या कामानिमित्त मला अनेकांकडे जावे लागे. त्यात एक दूरचे नातेवाईक होते त्यांच्या कडे नेहमी जाणे होई. त्या नातेवाईकांची एक मुलगी होती. मी त्या वेळी ऐन तारुण्यात होतो, लग्नाळू होतो. ती मुलगी मला आवडत असे. तिला सुद्धा माहित होते की मी तिच्यावर लट्टू आहे. माझी हिरो होंडाची cd १०० SS घेऊन मी त्यांच्या कडे सामान द्यायला दोन एक आठवड्यातून जात असे. ती घरात असावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असे, आणि ती दिसली की मनात फुले उमलत असत. ते लोकही मला चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नसत.