1) देवाला मी सांगितले
आणू नको कुणावरही ही वेळ.....
मांडू नको आयुष्याचा
तू पुन्हा असा खेळ......
2) मी करतो साजरा उत्सव
माझ्या हृदयातील दु:खाचा.....
मी तर जगेल कसबसा
प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा.......
3) आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
4) तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
5) जर जायचेच होते आयुष्यातून
तर जीवनात का आलिस....
राख भरली स रांगोळीत
आणि रंग घेऊन गेलिस.......
6) सगळे काही संपवले मी
पण त्याआधी तूच संपवले होते.....
मनातले ओठांवर आलेच नाही
तू सारे काही लपवले होत
वा
कातळवेडे पक्षी
अतिशय
In reply to अतिशय by विसोबा खेचर
असेच
अप्रतिम!
मस्तच..
चारोळ्या
मस्तच.
हे एक 'स्व' काव्य