मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

काही चारोळ्या..........

sanjubaba ·
१) आत्मपरीक्षण करताना काही दोष राहून गेले असतील.... माझ्या स्वार्थ आ सोबत काही चुका वाहून गेल्या असतील..... २) आनंदाचे आज मजला भरते आले असे....... समजत होतो ज्याना वाघ ते निघाले ससे....... ३) देवा किती तारे आहेत तुझ्या आकाशात...... इतके तर नसतील च जितक्या आकां शा माझ्या मनात........ ४) जाणून बुजून झालेला माझा जन्म भ्रमात गेला..... वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला....... ५) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते......

चारवांतर

परिकथेतील राजकुमार ·
चारवांतर = चार ओळी अवांतर मी टोमणा मारला नाही मी अपमान हि केला नाही मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी अवांतरपणा केला नाही ! महाकवी टारवांतर आमची प्रेरणा :- मी मोर्चा नेला नाही मी संप हि केला नाही .... कवी (?) संदीप खरे

एक रुबाई किंवा चारोळी

दत्ता काळे ·
मी रचलेल्या ह्या चार ओळी चारोळीमध्ये मोडतील कि रुबाईमध्ये ते माझ्या लक्षात येत नाही. पापणी लवली तरीही कळते डोळ्यामधली भाषा कळते मज ते रुप गोजिरे पदर असो वा गोषा

असचं वाटलं म्हणुन|

केदार केसकर ·
मित्रांनो, मी खरतरं चारोळी वगैरे करत नाही. पण अचानक ही काल सुचली. इथे देत आहे. कशी वाटतेय नक्की सांगा. उजेडापेक्षा अंधारातच मला जास्त बरं वाटतं| लपवून ठेवलेलं पाणी तिथे सहज डोळ्यात साठतं| मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो| काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| लो.अ. केदार

संक्रांतीच्या शुभेच्छा

नंदन ·
१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. २. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल. अल्फा असो वा याहू!

खेळ दोन ओळींचा - २

राघव ·
खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! मागल्यावेळी तर भन्नाट डोकी चाललेली.. यावेळी बघुयात कसे काय जमते ते! मुमुक्षु :)

पाउस

ब्रिटिश ·
ये रे ये रे पावसा तुला देते पैसा अंतरीचा दाह सांग विझवु मी कैसा ये ग ये ग सरी माझे मडके भरी जीव आता थांबना पेटले मी ऊरी सर आली धाऊन मडके गेले वाहुन यौवनाच्या वर्षावात आले मी न्हाउन पाउस कस्सा बाई छान माझ सगळ भिजल रान घागर माझी आक्खी भरली हरपून गेल बाई भान मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय) »

नवागताच्या दोन चारोळ्या

दत्ता काळे ·
आत्मसमर्पित माझी कविता विडंबनाच्या वेदीवरती परशूलाही लाज वाटते कविता माझी मुग्ध हासते * * * * * * माझी कविता, लयबध्द मयु री .... मनाच्या अंगणात ती खेळे निष्णात पारधी मागे, हाती विडंबनाचे जाळे

चारोळ्या

mina ·
परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात किती मोठ भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात !! ............................. ............................ काळाचे बांध फुटून जातात वाहून जाते पाणी तरिही मैत्रीचा अंकूर तग धरुन राहतो कारण भिजत राहतात त्या फक्त आठवणी ! ............................... ............................