मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम

निमिष सोनार ·

चौथा कोनाडा 25/09/2022 - 17:20
खुप छान माहिती ! नविन नविन असताना जून एंडला भेट दिली होती झपुर्झा म्युझियमला. (तेव्हा प्रवेश विनामूल्य होता) हाफ डे फॅमिली ट्रीप साठी साठी पुण्यापासून जवळ अतिशय सुंदर ठिकाण आहे! आर्ट लव्हर्ससाठी मेजवानी आहे ! एखादा मिपा कट्टा इथे झाला तर मजा येईल.

In reply to by कंजूस

जागा महाग होत आहेत आणि अशा संस्था चालवणे अवघड होत चालले आहे. अशा संस्थांसाठी जागा ही सर्वात अवघड गोष्ट असावी.

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा 26/09/2022 - 17:58
बरोबर ! ... पण फक्त जागा नाही, दैनंदिन खर्च, सेवक वर्गांचे पगार, देखभाल इत्यादि...

गुगल मॅप्सवर खूप फोटो उपलब्ध आहेत. उत्तम संग्रह दिसतोय. त्यात खडकवासला बॅकवॉटर जवळ असल्याने संग्रहालय + इतर फिरणं असा फुल्ल दिवस कार्यक्रम करण्याचा पर्याय आहेच.

चौथा कोनाडा 25/09/2022 - 17:20
खुप छान माहिती ! नविन नविन असताना जून एंडला भेट दिली होती झपुर्झा म्युझियमला. (तेव्हा प्रवेश विनामूल्य होता) हाफ डे फॅमिली ट्रीप साठी साठी पुण्यापासून जवळ अतिशय सुंदर ठिकाण आहे! आर्ट लव्हर्ससाठी मेजवानी आहे ! एखादा मिपा कट्टा इथे झाला तर मजा येईल.

In reply to by कंजूस

जागा महाग होत आहेत आणि अशा संस्था चालवणे अवघड होत चालले आहे. अशा संस्थांसाठी जागा ही सर्वात अवघड गोष्ट असावी.

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा 26/09/2022 - 17:58
बरोबर ! ... पण फक्त जागा नाही, दैनंदिन खर्च, सेवक वर्गांचे पगार, देखभाल इत्यादि...

गुगल मॅप्सवर खूप फोटो उपलब्ध आहेत. उत्तम संग्रह दिसतोय. त्यात खडकवासला बॅकवॉटर जवळ असल्याने संग्रहालय + इतर फिरणं असा फुल्ल दिवस कार्यक्रम करण्याचा पर्याय आहेच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते. येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे.

नेताजीचे सहवासात - भाग २ - आ

शशिकांत ओक ·

आझाद हिंद सेनेतील सैनिकांना जेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात सेवानिवृत्ती वेतन देण्यात आले तेव्हा वैद्यकीय सेवेतील सैनीकाचे अभिलेख वाचावयास मीळाले. एक अशीच केस संदर्भासाठी, https://www-hindustantimes-com.cdn.ampproject.org/v/s/www.hindustantimes.com/india/ina-veteran-gets-pension-after-55-yrs/story-Ef2vieTsEZEGUoYdmu5eyN_amp.html?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQKKAFQArABIIACAw%3D%3D

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 18/09/2022 - 17:30
उशीरा का होईना शिपाई हरबन्स सिंह यांना भारतीय आझाद हिंद सेनेत प्रवेश केल्यानंतर डिसमिस होऊन पण निवृत्ती वेतन मिळावे म्हणून कोर्टात निर्णय मिळाला!

आझाद हिंद सेनेतील सैनिकांना जेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात सेवानिवृत्ती वेतन देण्यात आले तेव्हा वैद्यकीय सेवेतील सैनीकाचे अभिलेख वाचावयास मीळाले. एक अशीच केस संदर्भासाठी, https://www-hindustantimes-com.cdn.ampproject.org/v/s/www.hindustantimes.com/india/ina-veteran-gets-pension-after-55-yrs/story-Ef2vieTsEZEGUoYdmu5eyN_amp.html?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQKKAFQArABIIACAw%3D%3D

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 18/09/2022 - 17:30
उशीरा का होईना शिपाई हरबन्स सिंह यांना भारतीय आझाद हिंद सेनेत प्रवेश केल्यानंतर डिसमिस होऊन पण निवृत्ती वेतन मिळावे म्हणून कोर्टात निर्णय मिळाला!
लेखनविषय:
लेखनप्रकार
३ ८

नेताजींचे सहवासात

लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण

महायुद्ध संपल्यावर केंव्हा एकदा घरी जाऊन पडतो असे सर्व सैनिकांस वाटू लागते.

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

पराग१२२६३ ·

कोणे एके काळी, माझा एक मित्र, चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, ह्या गाडीतून आणायचा आणि नंतर घरोघरी ठाणे, डोंबिवली आणि परीसरात विकायचा.... 1990च्या सुमारास .. त्याची ही आवडती गाडी ... आता चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, कुठेही मिळते...

सुबोध खरे 17/09/2022 - 09:46
पण आता पुन्हा WCAM-2 इंजिन या गाडीला जोडलं जात आहे. पण त्यामुळं पर्यावरणानुकूल HOG (Head-on-Generation) तंत्रज्ञानावर ही गाडी चालवणं आता बंद झालं आहे. आताच ३० ऑगस्ट २२ रोजी मी मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेसने व्हिस्टाडोमने गेलो तेंव्हा तिला WAP -७ हेच इंजिन होते. आणि तसेही माझ्या दवाखान्याच्या समोरूनच संध्याकाळी सव्वा सहा साडे सहाच्या मध्ये हि गाडी मुलुंड हुन जाते तेंव्हा सुद्धा कधी WCAM -२ हे इंजिन लावलेलं पाहिलं नाही.

In reply to by सुबोध खरे

पराग१२२६३ 18/09/2022 - 10:35
सुबोधजी, WAP-7 हे काही दिवस या गाडीला जोडलं जात आहे अधूनमधून. पण WCAM-2/3 हे जास्त दिवस जोडलं जात आहे. मी १ सप्टेंबरला दख्खनच्या राणीनं पुण्याला येत असतानाही शेजारून गेलेल्या दख्खन एक्सप्रेसला WAP-7 होतं. आता बऱ्याच लोहमार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं इंजिनांच्या उपलब्धतेनुसार हे बदलत असतं.

सुबोध खरे 17/09/2022 - 09:50
हि गाडी जाताना आणि विशेषतः येताना ठाण्याला थांबत असल्याने पुण्याहून येण्यासाठी मला फार सोयीची होती. पुण्यात एम बी बी एस नंतर एम डी करत असताना शनिवार अर्धा दिवस काम करून सव्वातीनला या गाडी बसले कि संध्याकाळी ७ पर्यंत मुलुंड ला घरी पोचत असे. सोमवारी पहाटे इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून नऊ पर्यंत पुण्याला पोचणे हा माझा कार्यक्रम कित्येक वेळेस झालेला आहे.

कंजूस 17/09/2022 - 10:15
बाकी बसध्ये असतात तशा सीट्सवाले डबे रेल्वेने आणखी आणू नयेत. समोरासमोर तीन तीन सीट्सवाले जुनेच चांगले होते. आता तर काही सीट्समधले अंतरही ( leg room) वाढवलेले सापडले. दूरच्या गाड्यांना दोन्ही टोकांना जे सामान्य ( unreserved ,seating) डबे असतात त्यात काही टू टिअर असायचे. ते फारच आरामदायी असत. या पुण्याच्या गाड्या घाटात ठाकूरवाडी,जामरूंग,मंकीहिल इथे थांबत आणि लहान मुले,माकडे आणि आदीवासी सर्वांचीच सोय व्हायची. हल्ली हे स्टॉप्सही बेभरवशाचे झाले आणि घाटातील माकडेही कमी झाली आणि मुलांची आवडही बदलली. उन्हाळ्यातल्या करवंदे,जांभळे,कैऱ्यांची आवड जाऊन चाकलेटं आली. माकडांचे चाळे पाहण्यापेक्षा लहानथोर सबवेसर्फर आणि गोट्या पाडणे मोबाईल गेमसमध्ये,कार्टुनात गुंतली. कर्जत स्टेशनचे दिवाडकर फेम लगदा बटाटेवडे( जीआइ ट्याग घेणारेत म्हणे) कधी घेतो असे आता होत नाही आणि कर्जत स्टॉपही गायब झाला. असली चहा स्टेशनला लागून दुकानात आणि खमंग बटाटेवडे (दगडे यांचा)मात्र कर्जत बाजारात मिळतात. ते फलाटावर विकायला येत नाहीत. चिंचवड स्टेशनवरचा सिंधी माणूस फार छान चहा देतो.

गुजरात, राजस्थान कडे जाण्यासाठी पुण्यावरून जाणाऱ्या गाड्या नसल्यामुळे ही तीन वीस ची गाडी आमच्याकरता लाईफ लाईन होती.

कोणे एके काळी, माझा एक मित्र, चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, ह्या गाडीतून आणायचा आणि नंतर घरोघरी ठाणे, डोंबिवली आणि परीसरात विकायचा.... 1990च्या सुमारास .. त्याची ही आवडती गाडी ... आता चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, कुठेही मिळते...

सुबोध खरे 17/09/2022 - 09:46
पण आता पुन्हा WCAM-2 इंजिन या गाडीला जोडलं जात आहे. पण त्यामुळं पर्यावरणानुकूल HOG (Head-on-Generation) तंत्रज्ञानावर ही गाडी चालवणं आता बंद झालं आहे. आताच ३० ऑगस्ट २२ रोजी मी मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेसने व्हिस्टाडोमने गेलो तेंव्हा तिला WAP -७ हेच इंजिन होते. आणि तसेही माझ्या दवाखान्याच्या समोरूनच संध्याकाळी सव्वा सहा साडे सहाच्या मध्ये हि गाडी मुलुंड हुन जाते तेंव्हा सुद्धा कधी WCAM -२ हे इंजिन लावलेलं पाहिलं नाही.

In reply to by सुबोध खरे

पराग१२२६३ 18/09/2022 - 10:35
सुबोधजी, WAP-7 हे काही दिवस या गाडीला जोडलं जात आहे अधूनमधून. पण WCAM-2/3 हे जास्त दिवस जोडलं जात आहे. मी १ सप्टेंबरला दख्खनच्या राणीनं पुण्याला येत असतानाही शेजारून गेलेल्या दख्खन एक्सप्रेसला WAP-7 होतं. आता बऱ्याच लोहमार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं इंजिनांच्या उपलब्धतेनुसार हे बदलत असतं.

सुबोध खरे 17/09/2022 - 09:50
हि गाडी जाताना आणि विशेषतः येताना ठाण्याला थांबत असल्याने पुण्याहून येण्यासाठी मला फार सोयीची होती. पुण्यात एम बी बी एस नंतर एम डी करत असताना शनिवार अर्धा दिवस काम करून सव्वातीनला या गाडी बसले कि संध्याकाळी ७ पर्यंत मुलुंड ला घरी पोचत असे. सोमवारी पहाटे इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून नऊ पर्यंत पुण्याला पोचणे हा माझा कार्यक्रम कित्येक वेळेस झालेला आहे.

कंजूस 17/09/2022 - 10:15
बाकी बसध्ये असतात तशा सीट्सवाले डबे रेल्वेने आणखी आणू नयेत. समोरासमोर तीन तीन सीट्सवाले जुनेच चांगले होते. आता तर काही सीट्समधले अंतरही ( leg room) वाढवलेले सापडले. दूरच्या गाड्यांना दोन्ही टोकांना जे सामान्य ( unreserved ,seating) डबे असतात त्यात काही टू टिअर असायचे. ते फारच आरामदायी असत. या पुण्याच्या गाड्या घाटात ठाकूरवाडी,जामरूंग,मंकीहिल इथे थांबत आणि लहान मुले,माकडे आणि आदीवासी सर्वांचीच सोय व्हायची. हल्ली हे स्टॉप्सही बेभरवशाचे झाले आणि घाटातील माकडेही कमी झाली आणि मुलांची आवडही बदलली. उन्हाळ्यातल्या करवंदे,जांभळे,कैऱ्यांची आवड जाऊन चाकलेटं आली. माकडांचे चाळे पाहण्यापेक्षा लहानथोर सबवेसर्फर आणि गोट्या पाडणे मोबाईल गेमसमध्ये,कार्टुनात गुंतली. कर्जत स्टेशनचे दिवाडकर फेम लगदा बटाटेवडे( जीआइ ट्याग घेणारेत म्हणे) कधी घेतो असे आता होत नाही आणि कर्जत स्टॉपही गायब झाला. असली चहा स्टेशनला लागून दुकानात आणि खमंग बटाटेवडे (दगडे यांचा)मात्र कर्जत बाजारात मिळतात. ते फलाटावर विकायला येत नाहीत. चिंचवड स्टेशनवरचा सिंधी माणूस फार छान चहा देतो.

गुजरात, राजस्थान कडे जाण्यासाठी पुण्यावरून जाणाऱ्या गाड्या नसल्यामुळे ही तीन वीस ची गाडी आमच्याकरता लाईफ लाईन होती.
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.

नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

शशिकांत ओक ·

विवेकपटाईत 16/09/2022 - 09:00
लेख आवडला. वाचल्या सारखा वाटला. 1980 पूर्वी आम्ही जुन्या दिल्लीत राहत होतो. मी लहान असताना तुमचे काका आमच्या घरी आलेले आठवते. त्यांनी लिहलेली अनेक पुस्तके घरी होती बहुधा त्यावेळी वाचन झाले असावे.

In reply to by विवेकपटाईत

शशिकांत ओक 16/09/2022 - 10:55
आपल्या घरी काका आले होते हे वाचून आनंद झाला. यावरून आठवले की मी जनकपुरी नवी दिल्ली येथे राहात असे. तेंव्हा ते व काकू ग्रेटर कैलाश च्या घरून आमच्या घरी राहायला येत असत. लॉस एंजल्स मधे झालेल्या ऑलिंपिक खेळांचा विसर्जन समारंभ पहायला ते आले होते.

शशिकांत ओक 16/09/2022 - 15:51
श्री ज्ञानेबाचे पैजार जी, सन २०१३सालात भाग १ मिपावर सादर केला होता. आता त्यात सादर केलेले फोटो टायनीपिकने आपली मोफत सुविधा बंद केल्याने ते फोटो आता दिसत नाहीत. त्या नंतर ई बुक रूपाने भाग - एक बनवला होता. आता नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याच्या निमित्ताने ईबुक रूपात दुसरा भाग सादर केला होता. लिखाण फार लांबलचक असेल तर वाचकांचा धीर राहात नाही म्हणून इथे भाग ला २ तुकडे करून सादर करत आहे.

विवेकपटाईत 16/09/2022 - 09:00
लेख आवडला. वाचल्या सारखा वाटला. 1980 पूर्वी आम्ही जुन्या दिल्लीत राहत होतो. मी लहान असताना तुमचे काका आमच्या घरी आलेले आठवते. त्यांनी लिहलेली अनेक पुस्तके घरी होती बहुधा त्यावेळी वाचन झाले असावे.

In reply to by विवेकपटाईत

शशिकांत ओक 16/09/2022 - 10:55
आपल्या घरी काका आले होते हे वाचून आनंद झाला. यावरून आठवले की मी जनकपुरी नवी दिल्ली येथे राहात असे. तेंव्हा ते व काकू ग्रेटर कैलाश च्या घरून आमच्या घरी राहायला येत असत. लॉस एंजल्स मधे झालेल्या ऑलिंपिक खेळांचा विसर्जन समारंभ पहायला ते आले होते.

शशिकांत ओक 16/09/2022 - 15:51
श्री ज्ञानेबाचे पैजार जी, सन २०१३सालात भाग १ मिपावर सादर केला होता. आता त्यात सादर केलेले फोटो टायनीपिकने आपली मोफत सुविधा बंद केल्याने ते फोटो आता दिसत नाहीत. त्या नंतर ई बुक रूपाने भाग - एक बनवला होता. आता नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याच्या निमित्ताने ईबुक रूपात दुसरा भाग सादर केला होता. लिखाण फार लांबलचक असेल तर वाचकांचा धीर राहात नाही म्हणून इथे भाग ला २ तुकडे करून सादर करत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

१

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

नेताजींचे सहवासात लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

        

कै . पुरुषोत्तम ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो.

कै.

दावत-ए-बिर्याणी

पर्णिका ·

विजुभाऊ 13/09/2022 - 10:02
https://youtu.be/MC9iRsoHS04 हा देखील एक हटके सिनेमा. नायकाला हॉटेल व्यवसायाबद्दल काहीच प्रेम नसते. त्याच्या नशिबी वडीलाम्कडून एक छोटेसे रेस्टौरन्ट येते. नसीरौद्दीन शाह चे काम छान आहे. मनस्वी कलाकार आपल्या कलेला कसा फुलवतो हे पहायला आवडते. थोडा स्लो वाटेल पण छान आहे.

सर टोबी 13/09/2022 - 22:42
मिताली पालकर, अभय देओल, आणि विजय राजचा एक सुंदर सिनेमा. गाड्या चोरून विकण्याची टोळी चालवणाऱ्या गुंडाचा आवडता बकरा चोरून गाडीच्या बदल्यात बकरा परत करण्याचं साधं कथानक. अंडर वर्ल्डचं चक्रावून टाकणारं चित्रण आणि सगळ्याच कलाकारांचा सुंदर अभिनय यासाठी पाहावाच असा चित्रपट.

In reply to by सर टोबी

पर्णिका 15/09/2022 - 03:19
चॉपस्टिकस बघितला नाही अजून ... पण कन्सेप्ट छान वाटतेय. मिथिला पालकर आवडतेच. अभय देओल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, इम्रान हाश्मी यांचे चित्रपट सहसा निराश करत नाहीत. अजून काही मला आवडलेले चित्रपट : The Hundred-Foot Journey - फ्रान्समधील निसर्गरम्य, छोट्याशा गावांतील ही गोष्ट. स्थलांतरित भारतीय कुटुंबाने नव्याने सुरु केलेले रेस्तराँ आणि त्याच रस्त्यावर असलेले नावाजलेले रेस्तराँ यांच्यातील संघर्ष, स्पर्धा मस्त घेतली आहे. उत्तम कलाकार, उत्कृष्ट कथा. Julie & Julia - Meryl Streep ची फॅन असल्याने आवडलाच. आणि अर्थातच Ratatouille - काय लिहू ? निव्वळ अप्रतिम...

विजुभाऊ 13/09/2022 - 10:02
https://youtu.be/MC9iRsoHS04 हा देखील एक हटके सिनेमा. नायकाला हॉटेल व्यवसायाबद्दल काहीच प्रेम नसते. त्याच्या नशिबी वडीलाम्कडून एक छोटेसे रेस्टौरन्ट येते. नसीरौद्दीन शाह चे काम छान आहे. मनस्वी कलाकार आपल्या कलेला कसा फुलवतो हे पहायला आवडते. थोडा स्लो वाटेल पण छान आहे.

सर टोबी 13/09/2022 - 22:42
मिताली पालकर, अभय देओल, आणि विजय राजचा एक सुंदर सिनेमा. गाड्या चोरून विकण्याची टोळी चालवणाऱ्या गुंडाचा आवडता बकरा चोरून गाडीच्या बदल्यात बकरा परत करण्याचं साधं कथानक. अंडर वर्ल्डचं चक्रावून टाकणारं चित्रण आणि सगळ्याच कलाकारांचा सुंदर अभिनय यासाठी पाहावाच असा चित्रपट.

In reply to by सर टोबी

पर्णिका 15/09/2022 - 03:19
चॉपस्टिकस बघितला नाही अजून ... पण कन्सेप्ट छान वाटतेय. मिथिला पालकर आवडतेच. अभय देओल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, इम्रान हाश्मी यांचे चित्रपट सहसा निराश करत नाहीत. अजून काही मला आवडलेले चित्रपट : The Hundred-Foot Journey - फ्रान्समधील निसर्गरम्य, छोट्याशा गावांतील ही गोष्ट. स्थलांतरित भारतीय कुटुंबाने नव्याने सुरु केलेले रेस्तराँ आणि त्याच रस्त्यावर असलेले नावाजलेले रेस्तराँ यांच्यातील संघर्ष, स्पर्धा मस्त घेतली आहे. उत्तम कलाकार, उत्कृष्ट कथा. Julie & Julia - Meryl Streep ची फॅन असल्याने आवडलाच. आणि अर्थातच Ratatouille - काय लिहू ? निव्वळ अप्रतिम...
लेखनविषय:
लेखनप्रकार
पांचाली आपल्या आजी-आजोबांसोबत कोलकत्ता शहरांत राहत असते. त्या तिघांच्या नात्यांत प्रेम, आपुलकी, काळजी तर आहेच पण त्यापलीकडेही जाऊन मोकळी मैत्रीही आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला आहे. तिची अमेरिकेत येण्याची तयारी सुरु असतांनाच त्या कुटुंबाला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. आणि खास आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांचाली लखनऊला येते. तिला तिच्या आजीची बिर्याणीची (सिक्रेट) रेसिपी शोधायची आहे. त्यासाठी ती तिच्या आजीच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटते. या प्रवासात तिला तिच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी हळुवारपणे उलगडत जाते.

ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

निमिष सोनार ·

अनुस्वार 11/09/2022 - 12:39
चित्रपट उत्तरार्धात बराच भरकटला आहे अशी परीक्षणं वाचनात आली आहेत. त्याबद्दल जरा सांगा. आणि 'गुप्त'चं गुपित गुप्तच ठेवायला हवं होतं.

कपिलमुनी 11/09/2022 - 12:55
डायरेक्ट रिव्ह्यू ? एवढं धाडस ? आता तुमच्यावर बहिष्कार घालणार, वाळीत टाकणार. तुमच्या धाग्यावर प्रतिसाद देणार नाहीत. तुमच्या बाकी पोस्ट वर पण बहिष्कार घालणार...

दुर्दैवाने चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला असे बोलून फारसे काही हाती लागत नाही. कारण खिशातून पैसे गेलेलेच असतात. चित्रपट बनविण्यार्‍यांचे खिसे भरले जातात आणि पदरी मात्र निराशा येते. कोणी चित्रपट बघायला स्पॉन्सर करणार असेल तर कदाचित चित्रपट बघीतला जाईल. काल युटूब वर दुवा आला होता पण अगोदरच चित्रपटाचे ट्रेलर बघून त्यात बघण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. राहता राहिली गोष्ट परदेशी चित्रपटांची. ते देखील मला आवडत नाहीत. बहुसंख्य परदेशी चित्रपटांत लक्ख सुर्यप्रकाश असा नसतोच. कायमच पडद्यावर निळा / काळा रंग व्यापून राहिलेला असतो. अवेंजर्स म्हणा किंवा अजून कोणतेही व्हीएफएक्स वापरलेले चित्रपट म्हणा, एकंदरीत लेझर शो ची आताशबाजी मला स्वतःला झेपतच नाही. (दुसर्‍यांना आवडत असेल त्यांना मी बहिष्कार घाला असे सांगणार नाही). त्यामानाने संथ मल्यालळ चित्रपट बघायला छान वाटतात. थ्री डी चष्म्यांबद्द्ल देखील थोडेसे : चित्रपट गृहांत पुरविले जाणारे थ्री डी भंगार दर्जाचे असतात. त्यातून बराच वेळ चित्रपट पाहिला की डोळे दुखायला लागतात. शिवाय तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही दृष्ये इतकी वेगवान असतात की काय घडले याचे मेंदूला नीट आकलन होत नाही. बाकी बॉयकॉटास्त्राचा संबंध धर्माशी नाही तर बॉलीवूड स्टार्सना जमीनीवर आणण्यासाठी आहे. याची सुरुवात कोविड काळापासून झाली. बॉलीवूडकरांचे पीआर सांभाळणार्‍या अनेक संस्थांनी त्यांना एअरपोर्ट चे फोटो टाकू नका, पार्ट्यांचे फोटो टाकू नका अशा सुचना केल्या होत्या. काही कलाकारांनी ऐकले काहींनी नाही. यातूनच जनतेत रोषाची सुरुवात झाली आहे असे वाटते. (चुकभूल माफ असावी). कोरोना काळात सोनू सुद ची लोकप्रियता इतकी वाढली की दक्षिणेच्या एका कलाकाराने त्याला चित्रपटात मारहाण करण्याचे दृष्य चित्रीत करण्यास नकार दिला होता. जनतेत त्यामुळे वाईट संदेश जाईल अशी त्याला भिती वाटत होती. त्या अर्थाने इथून पुढे सोनू सूद ला खलनायकाच्या भुमिका रंगविणे अवघडच जाणार असे दिसते. त्याला नायकाची भुमिका देऊन एखाद्याने चित्रपट काढला तर तो चित्रपट अफाट पैसा आणी प्रसिद्धी कमवेल असे वाटते. अवांतर : ब्रह्मास्त्र वर आधारीत ही एक चित्रफित युट्यूब वर पाहण्यात आली. एकंदरीत सादरीकरण छान वाटले. भाषेचा बिहारी टोन मस्त आहे.

In reply to by धर्मराजमुटके

भुजंग पाटील 14/09/2022 - 06:52
मागच्या २-३ दिवसात "चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला" हा नवीन प्रचारमुद्दा काही युटूब (पेड?) रिव्ह्युवर्स कडून ऐकण्यात येतोय.

In reply to by भुजंग पाटील

चौथा कोनाडा 21/09/2022 - 13:01
"चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला"
हा ... हा ... हा ... मला जर पैसे मिळाले तर मी ही असा लेख लिहिन.... ते ही सिनेमा बघता !

प्रसाद_१९८२ 11/09/2022 - 14:24
पाहिलाय हा चित्रपट. अगदीच भिकार आहे. जरुरीपेक्षा जास्त VFX चा मारा, कर्कश्य BGM व नको तिथे सुरु होणारी गाणी याने अक्षरशः डोके दुखत होते. चित्रपटाची सुरुवात 'सुपर हिरो' टाईप होते व शेवट तोच टिपीकल बॉलीवुड रोमांसने. बॉयकॉट वगैरे गेला खड्ड्यात. मात्र हा चित्रपट पाहून, तीन तास करमणूक होईल या उद्देशाने पाहायला गेलात तर पदरी निराशाच येईल.

पिक्चर आहे. VFX-अस्त्र इतकं आहे की बाकी सग़ळ्याची गरज काय असं वाटतं. आणि रिव्यु लिहायच्या नादात सुरुवातीचा सर्प्राइज cameo appearance लिहून टाकलात !

बोलघेवडा 11/09/2022 - 19:45
आत्ताच बघून आलो. काही मारक मुद्दे 1. सतत बॅकग्राउंड म्युझिकचा वापर. 2. ढिसाळ पटकथा. शो अँड टेल चा अभाव. उदाहरणार्थ जर एखाद पात्र तुम्हाला शिकारी म्हणून दाखवायचं असेल तर हे खूप मोठे शिकारी आहेत असं नुसतं सांगून उपयोग नसतो. तर त्याच्या धाडशी शिकारीचे शॉट्स दाखवून ते इस्टेब्लिश करावं लागतं. त्याचा संपूर्ण अभाव असल्याने पात्र खोलवर रुजत नाहीत. बराचसा वेळ फालतू गोष्टी दाखवण्यात घालवला आहे. 3. अचानक घाई गडबडीचे प्रसंग सुरू होतात. टेम्पो (लय) वर खाली होत राहतो. 4. फँटसी प्रकारात मोडत असला तरी अश्या चित्रपटात सुद्धा कोण काय करू शकत काय नाही याच एक लॉजिक असत. ते नक्की इथे समजत नाही. आता काही तारक मुद्दे 1. भव्य दिव्य सफाईतदार VFX. थरारक साहसदृष्ये. 3Dमध्येच बघणे. 2.हिंदू धर्म चे सण आणि शुभ प्रतीकांचा सढळ हस्ते वापर आणि गौरव (ग्लोरिफिकेशन) हा ठळक बदल दिसून आला. 3. केसरिया गाणे ;) 4. पुढचा भाग अजून चांगला समजण्यासाठी माझ्याकडून 3 स्टार्स 5 पैकी. थिएटर मध्ये जाऊन एकदा अनुभव घेण्यास हरकत नसावी असे वाटले.

सिनेमा घरांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ शकतो असा एक कायदा मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला होता.त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. अजूनही बाहेरील पदार्थ न्यायला बंदी आहेच. मिपाकरांचे याबद्द्ल काय अनुभव आहेत ? जालावर शोधले असता किमान पुण्यात याविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी 1800- 222-365 हा नंबर उपलब्ध आहे असे दिसते. इतर ठिकाणच्या बद्द्ल कोणाचे काय अनुभव आहेत ?

In reply to by धर्मराजमुटके

तर्कवादी 12/09/2022 - 19:06
अजूनही बाहेरील पदार्थ न्यायला बंदी आहेच. मिपाकरांचे याबद्द्ल काय अनुभव आहेत ?
पिंपरी-चिंचवडमध्ये तरी नेवू शकतो. आता बॅग्ज तपासणेही बंद केले

In reply to by निमिष सोनार

देव आनंदच्या पडेल सिनेमांची स्तूती, काही पत्रकार करत असत ... गोल्डीच्या मुलाखतीत वाचले होते ....

Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली https://www.lokmat.com/bollywood/brahmastras-box-office-numbers-are-60-70-fake-figures-kangana-ranaut-a590/amp/ --------- ‘काही ट्रेड अ‍ॅनालिस्ट ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिसचे आकड्यांची छेडछाड करून ते सादर करत आहेत. बॉक्स ऑफिस आकड्या खेळ करणाऱ्या या लोकांना यासाठी मोठी रक्कम दिली जाते. ही आकड्यांची हेराफेरी भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी हेराफेरी म्हटली जाऊ शकले. यात 50-70 टक्के आकडे फेक आहेत, असं ट्विट निर्माता-लेखक एरे मृदुला कॅथर यांनी केलं आहे. कंगनाने हे ट्विट रिशेअर करत, ‘ब्रह्मास्त्र’ची मजा घेतली आहे. ‘वाह, हा नवा निच्चांक आहे, 70 टक्के,’ अशा शब्दांत कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सला जोरदार टोला लगावला आहे. --------

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 12/09/2022 - 09:36
‘ब्रह्मास्त्र’चे शोज आता ‘या’ वेळेतही? प्रेक्षकांच्या मागणीला जोर https://www.loksatta.com/manoranjan/brahmastra-special-shows-screening-at-midnight-alia-bhatt-called-magic-of-movies-spg93-3122204/

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 12/09/2022 - 10:06
कंगना राणावत दुसऱ्यांच्या बॉक्स ऑफिस वर हसते म्हणजे मोठा जोक म्हणायचा. कंगणाच्या शेवटी आलेल्या सिनेमाचे लाईफटाईम कलेक्शन आहे ३.७७ करोड, बजेट होते ८५ करोड. आठव्या दिवशी तब्बल २० तिकिटे विकून रेकॉर्ड ब्रेकिंग ४४२० रु. निव्वळ मिळवले. ५०-७०% आकडे फेक म्हणे. अगदी ९०% फेक म्हणले तरी ७.५ कोटी एका दिवसात कमावले आहेत, कंगणाबाईंच्या सिनेमाच्या पूर्ण कालावधीच्या कलेक्शनच्या जवळपास दुप्पट. त्यामुळे कंगणाबाईंनी "आपण हसे लोकांना, शेंबूड आपल्या नाकाला" ह्याचे मस्त उदाहरण दिले आहे.

चौथा कोनाडा 12/09/2022 - 17:33
चांगले रसग्रहण केले आहे, वाचून सिनेमा पाहायला उद्युक्त होईल असे.... पण एकंदरीत, विषय आणि लांबी, पसरटपणा, मुख्य विषय सोडून मधूनच प्रेमकथा दाखवणे हे पाहता मी ब्रम्हअस्त्र पाहीन असं वाटत नाही!

अनन्त अवधुत 12/09/2022 - 19:13
असे ठरवले होते. सुपर हीरो चित्रपट आवडतात, त्यामुळे हा आवडेल असे वाटत होते. पण
रणवीर कपूर आणि आलिया भट चे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्ट ने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते.
हा चित्रपट सुद्धा इतर हिंदी चित्रपटांप्रमाणे गाणी आणि प्रेमकथाच असेल तर आपला पास.

कॉमी 13/09/2022 - 07:10
सिनेमाचा सगळ्यात प्रसिद्ध सेलिंग पॉईंट व्हिएफएक्स आहे, पण व्यक्तिष: मला त्यात सुद्धा काही ग्राऊंडब्रेकिंग आढळले नाही. उगाच झगमगीत रंगीबेरंगी लहरी पुन्हा पुन्हा पाहायच्या. काही विशेष वाटले नाही. मारामारीचे प्रसंग प्रचंड बोर झाले. संवाद लेखन तद्दन बकवास आहे. इतके ऑकवर्ड आणि अनैसर्गिक संवाद बऱ्याच दिवसांनी सिनेमात पाहिले. रोशनी काय, बटन काय आणि काय. खासकरून शिवा-ईशा संवाद तर सपशेल गंडले आहेत. शिवा तीस वर्षाचा असतो असे दाखवलंय. पण चार दिवसांत हा आणि ईशा प्रेमाच्या आणाभाका काय घेतात, तूच माझं जीवन टाईप बाता काय मारतात, काही मोठे गुपित उघड केल्यासारखे "आय लव्ह यू" काय म्हणतात- १४ वर्षांचा पोरांनी लिहिल्यासारखे वाटतात संवाद. पटकथेचे सुद्धा थोड्या फार प्रमाणात तसेच आहे. व्हिलनला त्याचे उद्दिष्ट साध्य करून मिळणार काय समजत नाही. शिवा-ईशा सोडून कोणत्याही पात्राला डेव्हलप करण्याची तसदी घेतली नाहीये. अमिताभ बच्चनच्या पत्राबद्दल तो गुरु आहे इतकेच काय ते समजते. मग गुरु असण्यासोबत बाकी जे काही पात्रवैशिष्ठे आहेत ती सिनेमात दिणार नाहीत, प्रेक्षकांनीच यापूर्वी आलेल्या भारी गुरु पात्रांवरून ते गुण अमिताभ मध्ये भरून घ्यावेत (ओबी वॅन,डम्बलडोअर, गॅनडॉल्फ इत्यादी.) शिवाचे दोन मित्र दाखवलेत सुरुवातीला, ते गल्ली भाषेत बा भाई करत असतात- त्यांची साधी नावं सुद्धा आपल्याला समजत नाहीत, आणि ते पुढे कुठे येत पण नाहीत. स्क्रिप्ट मध्ये बहुदा "शिवा कूल आहे दाखवण्यासाठी त्याच्यासोबत दोन हँडसम मित्र दाखवा" इतकेच लिहिलेले. सिनेमातला एक मोठा गेस्ट स्टार सुद्धा फार एक्साईट करू शकला नाही. केसरिया आणि देवा हि दोन्ही गाणी सिनेमात छान वाटतात. पहिलं गाणं "डान्सका भूत चढेया" भंपक वाटलं. सरतशेवटी, खुद्द शिवा आणि ईशा हि प्रमुख पात्रे सुद्धा आजिबात चांगल्या रंगवली नाहीयेत. "ते एकमेकांवर किनई खूप खप प्लेम कलतात" हे पुरेसे मोटिव्हेशन नाहीये. खासकरून ते एकमेकांना काही दिवसांपेक्षा जास्त ओळखत नाहीत असे असताना. सिनेमातली चांगली गोष्ट- रणबीर आलिया दोघेही सुप्रीम चिकने दिसतात. खासकरून आलिया. फार नेत्रसुखद आहे ती ह्या सिनेमात. एकूण, सिनेमा फडतूस आहे असे माझे मत झाले. पण, अस्त्राव्हर्स हि कल्पना, व्हिएफएक्स चे बजेट संवाद पटकथा लेखनाकडे वळल्यास अतिशय जबरदस्त होऊ शकते असे वाटते. This has me intrigued.

In reply to by कॉमी

चौथा कोनाडा 13/09/2022 - 11:48
हो... अगदी भंपक आहे ते डान्स का भूत वालं गाणं. विविध भारतीवर ब्रम्हास्त्रचा गाण्याचा रतीब लावलाय. अतिशय सामान्य गाणी आहेत. अरजित सिंग केसरिया गाण्यात रेकतो... सर्दाळलेल्या कुमार सानूसारखी वाटचाल सुरू आहे त्याची. आता पर्यंतच्या आंजा वरील चर्चेवरून एकंदरीत ब्रम्हास्त्रला लोकांनी नाकारलेले आहे असं दिसतंय!

खबो जाप 13/09/2022 - 12:03
हे म्हणजे असे झाले कि एखादा रोज उठून तुमच्या विषयी खोंटेंनाटे पसरवून तुमची बदनामी करतोय आणि करत राहील तरीपण तुम्ही जाऊद्याहो त्यांच्याकडे कार्यक्रम आहे चला जाऊयात म्हणून उपदेश देता आहात. जो पर्यंत हे लोक केलेल्या चुकांची माफी मागून प्रामाणिकपणे पुढे असे काही करणार नाही ह्याची ग्वाही देत नाहीत तो पर्यंत असेच चालू राहिले पाहिजे. इथे कुणीही रस्त्यावर उतरून किंव्हा तोडफोड करून पिक्चर बघू नका म्हणून जबरदस्ती करत नाही आहे, फक्त आवाहन करत आहेत. पिक्चर थेटरात जऊन , स्वतःच्या पैशाने , फुकटात कुणी तिकीट काढले म्हणून किव्हा फुकट कुठे मिळतोय म्हणून बघणे ह्याला कुणी अडवू शकत नाही

यश राज 13/09/2022 - 16:57
नुकत्याच प्रसारमाध्यंमांमध्ये फिरत असलेल्या ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या काही क्लिप्स बघितल्या. त्यात २ गोष्टी प्रकर्षाने खटकल्या १. रणबिर आणि आलिया यांचा फालतु मुद्राभिनय. २. अगदी निरर्थक, पाणचट आणि थुकरट डॉयलोग ऐकायला मिळाले. जसे "लाईट उस रोशनी का नाम है जो अन्धेरो से बडी है" ... हात तिज्यायला आम्हाला माहितच नव्हतं व्हय की लाईट काय असतंय ते.. लोकांनी इतरत्र उडवल्याप्रमाणे लवकरच असे डॉयलॉग पण ऐकु येतिल "वाटर उस पानी का नाम है जो प्यास से बडी है" "फायर उस आग का नाम है जो ठंड भगाती है" "स्पेस उस आकाश का नाम है जो उपर रहता है" " अर्थ उस धरती का नाम है जिसपे हम रहते है " असाच एक इतर .. "शिवा ! वो देखो लाईट आ गयी " ... हा हा हा कै च्या कै. अरे काय मजाक चाललय का .. कोणितरी सोम्या गोम्या (हुसैन दलाल) उठतं आणि प्रसवतंय थुकरट डायलॉग . म्हणे या बंडल चित्रपटा साठी दिग्दर्शकाने १० वर्षे लावली. अजुन एक म्हणजे दसरा सणाच्या वेळेस वाजणारे एक गाणे. गाण्याचे बोल काय तर म्हणे "डांस का भुत " , "सुफियाना सी पार्टिया" .. अरे सण काय आणि तु नाचतोय कसा आणि गाण्याचे बोल काय , काहीही घुसवाल. दसर्याला कोणत्या सुफियाना सी पार्टिया होतात म्हणे, याला ऊर्दुचे अतिक्रमण नाही म्हणायचे का? या सर्व आणि इतरही बरयाच कारणांनी जसे की कलाकारांची मग्रुरी, हे चित्रपट बघण्याची इच्छा होत नाही. राहिला प्रश्न ,प्रेक्षक नसताना सुद्धा कोटी च्या कोटी उड्डाणे घेणारी आकडवारी दाखवली जातेय त्यांच ऑडिट कसं होत? यावर कोणी जाणकार प्रकाश टाकु शकतं का? बॉयकॉट गॅंग

In reply to by यश राज

यश राज 13/09/2022 - 17:04
वरिल प्रतिक्रिया अर्धवट्च प्रकाशित झाली. बॉयकॉट गॅंग विरुद्ध इतर असा प्रसारमाध्यमांवर चित्र आहे. बॉयकॉट गॅंग चित्रपटाचा विरोध करत आहेत व इतर बाकीचे चित्रपट कीती चांगला आहे , किती कमावले , जरुर बघा हे हिरीरीने सांगत आहेत जसा चित्रपटाकडुन मिळालेला नफा या समर्थन करणार्यांना मिळणार आहे. मुळात चित्रपट सुमार असल्याने बॉयकॉट गॅंग ला करण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.

In reply to by यश राज

चौथा कोनाडा 13/09/2022 - 17:17
यश राज ,.. हा हा हहा सही हैं

😄

मुळात चित्रपट सुमार असल्याने बॉयकॉट गॅंग ला करण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.
म्हणूनच चेव चढाललाय !

In reply to by यश राज

सौंदाळा 13/09/2022 - 18:00
मल्टी स्टारर, बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची प्रोडक्शन कॉस्ट बर्‍याच प्रमाणात वसूल झालेली असते असे वाचले / ऐकले होते. गाण्यांचे हक्क, सॅटेलाईट राईट्स, मिडीया पार्टनर्स वगैरेंकडून कोट्यावधी रुपये पहिल्या दिवसाआधीच मिळालेले असतात. त्यामुळे शक्यतो निर्मात तोट्यात जातच नाही. (हल्ली ही समीकरणे बदलली आहेत का ठाऊक नाही.)

In reply to by यश राज

बॉयकॉट गॅंग ला माझे मुळीच समर्थन नाही. तुम्हाला सर्वात विरोधी घेतली म्हणजे तुम्ही देशद्रोही असले युक्तिवाद मला पटत नाहीत. असो...... तुमचे निरीक्षण मात्र चांगले आहे. चित्रपट पाहून पूर्ण भ्रमनिरास झाला. १. रणबिर आणि आलिया यांचा फालतु मुद्राभिनय.. बत्तड चेहरा काय असतो हे कळते. कुठे भीती, प्रेम, आश्चर्य नाही. expressions नाहीत. अभिनयात नापास झालेले starkids २. अगदी निरर्थक, पाणचट आणि थुकरट डॉयलोग ऐकायला मिळाले. खरंच वात आणणारे dialogues. कुठे सवादफेख नाही. एका ओळीपेखा मोठे वाक्य नाही. कदाचित पाठांतर जमत नसेल. "अग्निअस्त्र प्रकटम " हे ह्यांचे संस्कृत चे ज्ञान!!!!!!!!!.. काही अभ्यास केला नाही. भूमिका वाचली नाही....समजली नाही किंव्हा समजण्याची लायकी आणि पात्रता नाही. ३. प्रसंगाला न शोभणारी गाणी..... नाच ........कुठेही काहीपण अचानय होते थोडक्यात काय........प्रेक्षकांना गृहीत धरायचे........आम्ही स्टार ....काही पण दाखवू तुम्ही बघणार हा माज. .........खरोखर चांगल्या संकल्पने ची चिरफाड केली आहे.

चित्रपट पाहून भ्रमनिरास झाला. MARVEL STYLE काहीतरी बघायला मिळेल अशी थोडी महाफात अपेक्षा होती. पण शेवटी भिकार बॉलीवूड style कचरा बगाव लागला. रणवीर, आलिया पूर्ण एकाच आणि मक्ख चेहरा घेऊन वावरतात. राग, लोभ, भीती, आश्चर्य असे कोणतेच भाव चेहर्यावर बघायला मिळत नाही. प्रत्येक frame मध्ये आलिया च्या चेहऱ्यावर फॅन ठेवून केस उडवले आहेत. ती पूर्ण movie एकाच चेहरा दाखवते. कुठे ताळमेळ नाही. भंपक dialogues काय .....अर्रर्र डोक्याचा भुगा. ढिसाळ पटकथा, अजब दिग्दर्शन. तोच तोच बॉलीवूड मसाला आणी कोंबडी पण बदलत नाही. माझ्याकडून १ स्टार्स 5 पैकी.

अनुस्वार 11/09/2022 - 12:39
चित्रपट उत्तरार्धात बराच भरकटला आहे अशी परीक्षणं वाचनात आली आहेत. त्याबद्दल जरा सांगा. आणि 'गुप्त'चं गुपित गुप्तच ठेवायला हवं होतं.

कपिलमुनी 11/09/2022 - 12:55
डायरेक्ट रिव्ह्यू ? एवढं धाडस ? आता तुमच्यावर बहिष्कार घालणार, वाळीत टाकणार. तुमच्या धाग्यावर प्रतिसाद देणार नाहीत. तुमच्या बाकी पोस्ट वर पण बहिष्कार घालणार...

दुर्दैवाने चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला असे बोलून फारसे काही हाती लागत नाही. कारण खिशातून पैसे गेलेलेच असतात. चित्रपट बनविण्यार्‍यांचे खिसे भरले जातात आणि पदरी मात्र निराशा येते. कोणी चित्रपट बघायला स्पॉन्सर करणार असेल तर कदाचित चित्रपट बघीतला जाईल. काल युटूब वर दुवा आला होता पण अगोदरच चित्रपटाचे ट्रेलर बघून त्यात बघण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. राहता राहिली गोष्ट परदेशी चित्रपटांची. ते देखील मला आवडत नाहीत. बहुसंख्य परदेशी चित्रपटांत लक्ख सुर्यप्रकाश असा नसतोच. कायमच पडद्यावर निळा / काळा रंग व्यापून राहिलेला असतो. अवेंजर्स म्हणा किंवा अजून कोणतेही व्हीएफएक्स वापरलेले चित्रपट म्हणा, एकंदरीत लेझर शो ची आताशबाजी मला स्वतःला झेपतच नाही. (दुसर्‍यांना आवडत असेल त्यांना मी बहिष्कार घाला असे सांगणार नाही). त्यामानाने संथ मल्यालळ चित्रपट बघायला छान वाटतात. थ्री डी चष्म्यांबद्द्ल देखील थोडेसे : चित्रपट गृहांत पुरविले जाणारे थ्री डी भंगार दर्जाचे असतात. त्यातून बराच वेळ चित्रपट पाहिला की डोळे दुखायला लागतात. शिवाय तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही दृष्ये इतकी वेगवान असतात की काय घडले याचे मेंदूला नीट आकलन होत नाही. बाकी बॉयकॉटास्त्राचा संबंध धर्माशी नाही तर बॉलीवूड स्टार्सना जमीनीवर आणण्यासाठी आहे. याची सुरुवात कोविड काळापासून झाली. बॉलीवूडकरांचे पीआर सांभाळणार्‍या अनेक संस्थांनी त्यांना एअरपोर्ट चे फोटो टाकू नका, पार्ट्यांचे फोटो टाकू नका अशा सुचना केल्या होत्या. काही कलाकारांनी ऐकले काहींनी नाही. यातूनच जनतेत रोषाची सुरुवात झाली आहे असे वाटते. (चुकभूल माफ असावी). कोरोना काळात सोनू सुद ची लोकप्रियता इतकी वाढली की दक्षिणेच्या एका कलाकाराने त्याला चित्रपटात मारहाण करण्याचे दृष्य चित्रीत करण्यास नकार दिला होता. जनतेत त्यामुळे वाईट संदेश जाईल अशी त्याला भिती वाटत होती. त्या अर्थाने इथून पुढे सोनू सूद ला खलनायकाच्या भुमिका रंगविणे अवघडच जाणार असे दिसते. त्याला नायकाची भुमिका देऊन एखाद्याने चित्रपट काढला तर तो चित्रपट अफाट पैसा आणी प्रसिद्धी कमवेल असे वाटते. अवांतर : ब्रह्मास्त्र वर आधारीत ही एक चित्रफित युट्यूब वर पाहण्यात आली. एकंदरीत सादरीकरण छान वाटले. भाषेचा बिहारी टोन मस्त आहे.

In reply to by धर्मराजमुटके

भुजंग पाटील 14/09/2022 - 06:52
मागच्या २-३ दिवसात "चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला" हा नवीन प्रचारमुद्दा काही युटूब (पेड?) रिव्ह्युवर्स कडून ऐकण्यात येतोय.

In reply to by भुजंग पाटील

चौथा कोनाडा 21/09/2022 - 13:01
"चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला"
हा ... हा ... हा ... मला जर पैसे मिळाले तर मी ही असा लेख लिहिन.... ते ही सिनेमा बघता !

प्रसाद_१९८२ 11/09/2022 - 14:24
पाहिलाय हा चित्रपट. अगदीच भिकार आहे. जरुरीपेक्षा जास्त VFX चा मारा, कर्कश्य BGM व नको तिथे सुरु होणारी गाणी याने अक्षरशः डोके दुखत होते. चित्रपटाची सुरुवात 'सुपर हिरो' टाईप होते व शेवट तोच टिपीकल बॉलीवुड रोमांसने. बॉयकॉट वगैरे गेला खड्ड्यात. मात्र हा चित्रपट पाहून, तीन तास करमणूक होईल या उद्देशाने पाहायला गेलात तर पदरी निराशाच येईल.

पिक्चर आहे. VFX-अस्त्र इतकं आहे की बाकी सग़ळ्याची गरज काय असं वाटतं. आणि रिव्यु लिहायच्या नादात सुरुवातीचा सर्प्राइज cameo appearance लिहून टाकलात !

बोलघेवडा 11/09/2022 - 19:45
आत्ताच बघून आलो. काही मारक मुद्दे 1. सतत बॅकग्राउंड म्युझिकचा वापर. 2. ढिसाळ पटकथा. शो अँड टेल चा अभाव. उदाहरणार्थ जर एखाद पात्र तुम्हाला शिकारी म्हणून दाखवायचं असेल तर हे खूप मोठे शिकारी आहेत असं नुसतं सांगून उपयोग नसतो. तर त्याच्या धाडशी शिकारीचे शॉट्स दाखवून ते इस्टेब्लिश करावं लागतं. त्याचा संपूर्ण अभाव असल्याने पात्र खोलवर रुजत नाहीत. बराचसा वेळ फालतू गोष्टी दाखवण्यात घालवला आहे. 3. अचानक घाई गडबडीचे प्रसंग सुरू होतात. टेम्पो (लय) वर खाली होत राहतो. 4. फँटसी प्रकारात मोडत असला तरी अश्या चित्रपटात सुद्धा कोण काय करू शकत काय नाही याच एक लॉजिक असत. ते नक्की इथे समजत नाही. आता काही तारक मुद्दे 1. भव्य दिव्य सफाईतदार VFX. थरारक साहसदृष्ये. 3Dमध्येच बघणे. 2.हिंदू धर्म चे सण आणि शुभ प्रतीकांचा सढळ हस्ते वापर आणि गौरव (ग्लोरिफिकेशन) हा ठळक बदल दिसून आला. 3. केसरिया गाणे ;) 4. पुढचा भाग अजून चांगला समजण्यासाठी माझ्याकडून 3 स्टार्स 5 पैकी. थिएटर मध्ये जाऊन एकदा अनुभव घेण्यास हरकत नसावी असे वाटले.

सिनेमा घरांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ शकतो असा एक कायदा मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला होता.त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. अजूनही बाहेरील पदार्थ न्यायला बंदी आहेच. मिपाकरांचे याबद्द्ल काय अनुभव आहेत ? जालावर शोधले असता किमान पुण्यात याविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी 1800- 222-365 हा नंबर उपलब्ध आहे असे दिसते. इतर ठिकाणच्या बद्द्ल कोणाचे काय अनुभव आहेत ?

In reply to by धर्मराजमुटके

तर्कवादी 12/09/2022 - 19:06
अजूनही बाहेरील पदार्थ न्यायला बंदी आहेच. मिपाकरांचे याबद्द्ल काय अनुभव आहेत ?
पिंपरी-चिंचवडमध्ये तरी नेवू शकतो. आता बॅग्ज तपासणेही बंद केले

In reply to by निमिष सोनार

देव आनंदच्या पडेल सिनेमांची स्तूती, काही पत्रकार करत असत ... गोल्डीच्या मुलाखतीत वाचले होते ....

Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली https://www.lokmat.com/bollywood/brahmastras-box-office-numbers-are-60-70-fake-figures-kangana-ranaut-a590/amp/ --------- ‘काही ट्रेड अ‍ॅनालिस्ट ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिसचे आकड्यांची छेडछाड करून ते सादर करत आहेत. बॉक्स ऑफिस आकड्या खेळ करणाऱ्या या लोकांना यासाठी मोठी रक्कम दिली जाते. ही आकड्यांची हेराफेरी भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी हेराफेरी म्हटली जाऊ शकले. यात 50-70 टक्के आकडे फेक आहेत, असं ट्विट निर्माता-लेखक एरे मृदुला कॅथर यांनी केलं आहे. कंगनाने हे ट्विट रिशेअर करत, ‘ब्रह्मास्त्र’ची मजा घेतली आहे. ‘वाह, हा नवा निच्चांक आहे, 70 टक्के,’ अशा शब्दांत कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सला जोरदार टोला लगावला आहे. --------

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 12/09/2022 - 09:36
‘ब्रह्मास्त्र’चे शोज आता ‘या’ वेळेतही? प्रेक्षकांच्या मागणीला जोर https://www.loksatta.com/manoranjan/brahmastra-special-shows-screening-at-midnight-alia-bhatt-called-magic-of-movies-spg93-3122204/

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 12/09/2022 - 10:06
कंगना राणावत दुसऱ्यांच्या बॉक्स ऑफिस वर हसते म्हणजे मोठा जोक म्हणायचा. कंगणाच्या शेवटी आलेल्या सिनेमाचे लाईफटाईम कलेक्शन आहे ३.७७ करोड, बजेट होते ८५ करोड. आठव्या दिवशी तब्बल २० तिकिटे विकून रेकॉर्ड ब्रेकिंग ४४२० रु. निव्वळ मिळवले. ५०-७०% आकडे फेक म्हणे. अगदी ९०% फेक म्हणले तरी ७.५ कोटी एका दिवसात कमावले आहेत, कंगणाबाईंच्या सिनेमाच्या पूर्ण कालावधीच्या कलेक्शनच्या जवळपास दुप्पट. त्यामुळे कंगणाबाईंनी "आपण हसे लोकांना, शेंबूड आपल्या नाकाला" ह्याचे मस्त उदाहरण दिले आहे.

चौथा कोनाडा 12/09/2022 - 17:33
चांगले रसग्रहण केले आहे, वाचून सिनेमा पाहायला उद्युक्त होईल असे.... पण एकंदरीत, विषय आणि लांबी, पसरटपणा, मुख्य विषय सोडून मधूनच प्रेमकथा दाखवणे हे पाहता मी ब्रम्हअस्त्र पाहीन असं वाटत नाही!

अनन्त अवधुत 12/09/2022 - 19:13
असे ठरवले होते. सुपर हीरो चित्रपट आवडतात, त्यामुळे हा आवडेल असे वाटत होते. पण
रणवीर कपूर आणि आलिया भट चे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्ट ने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते.
हा चित्रपट सुद्धा इतर हिंदी चित्रपटांप्रमाणे गाणी आणि प्रेमकथाच असेल तर आपला पास.

कॉमी 13/09/2022 - 07:10
सिनेमाचा सगळ्यात प्रसिद्ध सेलिंग पॉईंट व्हिएफएक्स आहे, पण व्यक्तिष: मला त्यात सुद्धा काही ग्राऊंडब्रेकिंग आढळले नाही. उगाच झगमगीत रंगीबेरंगी लहरी पुन्हा पुन्हा पाहायच्या. काही विशेष वाटले नाही. मारामारीचे प्रसंग प्रचंड बोर झाले. संवाद लेखन तद्दन बकवास आहे. इतके ऑकवर्ड आणि अनैसर्गिक संवाद बऱ्याच दिवसांनी सिनेमात पाहिले. रोशनी काय, बटन काय आणि काय. खासकरून शिवा-ईशा संवाद तर सपशेल गंडले आहेत. शिवा तीस वर्षाचा असतो असे दाखवलंय. पण चार दिवसांत हा आणि ईशा प्रेमाच्या आणाभाका काय घेतात, तूच माझं जीवन टाईप बाता काय मारतात, काही मोठे गुपित उघड केल्यासारखे "आय लव्ह यू" काय म्हणतात- १४ वर्षांचा पोरांनी लिहिल्यासारखे वाटतात संवाद. पटकथेचे सुद्धा थोड्या फार प्रमाणात तसेच आहे. व्हिलनला त्याचे उद्दिष्ट साध्य करून मिळणार काय समजत नाही. शिवा-ईशा सोडून कोणत्याही पात्राला डेव्हलप करण्याची तसदी घेतली नाहीये. अमिताभ बच्चनच्या पत्राबद्दल तो गुरु आहे इतकेच काय ते समजते. मग गुरु असण्यासोबत बाकी जे काही पात्रवैशिष्ठे आहेत ती सिनेमात दिणार नाहीत, प्रेक्षकांनीच यापूर्वी आलेल्या भारी गुरु पात्रांवरून ते गुण अमिताभ मध्ये भरून घ्यावेत (ओबी वॅन,डम्बलडोअर, गॅनडॉल्फ इत्यादी.) शिवाचे दोन मित्र दाखवलेत सुरुवातीला, ते गल्ली भाषेत बा भाई करत असतात- त्यांची साधी नावं सुद्धा आपल्याला समजत नाहीत, आणि ते पुढे कुठे येत पण नाहीत. स्क्रिप्ट मध्ये बहुदा "शिवा कूल आहे दाखवण्यासाठी त्याच्यासोबत दोन हँडसम मित्र दाखवा" इतकेच लिहिलेले. सिनेमातला एक मोठा गेस्ट स्टार सुद्धा फार एक्साईट करू शकला नाही. केसरिया आणि देवा हि दोन्ही गाणी सिनेमात छान वाटतात. पहिलं गाणं "डान्सका भूत चढेया" भंपक वाटलं. सरतशेवटी, खुद्द शिवा आणि ईशा हि प्रमुख पात्रे सुद्धा आजिबात चांगल्या रंगवली नाहीयेत. "ते एकमेकांवर किनई खूप खप प्लेम कलतात" हे पुरेसे मोटिव्हेशन नाहीये. खासकरून ते एकमेकांना काही दिवसांपेक्षा जास्त ओळखत नाहीत असे असताना. सिनेमातली चांगली गोष्ट- रणबीर आलिया दोघेही सुप्रीम चिकने दिसतात. खासकरून आलिया. फार नेत्रसुखद आहे ती ह्या सिनेमात. एकूण, सिनेमा फडतूस आहे असे माझे मत झाले. पण, अस्त्राव्हर्स हि कल्पना, व्हिएफएक्स चे बजेट संवाद पटकथा लेखनाकडे वळल्यास अतिशय जबरदस्त होऊ शकते असे वाटते. This has me intrigued.

In reply to by कॉमी

चौथा कोनाडा 13/09/2022 - 11:48
हो... अगदी भंपक आहे ते डान्स का भूत वालं गाणं. विविध भारतीवर ब्रम्हास्त्रचा गाण्याचा रतीब लावलाय. अतिशय सामान्य गाणी आहेत. अरजित सिंग केसरिया गाण्यात रेकतो... सर्दाळलेल्या कुमार सानूसारखी वाटचाल सुरू आहे त्याची. आता पर्यंतच्या आंजा वरील चर्चेवरून एकंदरीत ब्रम्हास्त्रला लोकांनी नाकारलेले आहे असं दिसतंय!

खबो जाप 13/09/2022 - 12:03
हे म्हणजे असे झाले कि एखादा रोज उठून तुमच्या विषयी खोंटेंनाटे पसरवून तुमची बदनामी करतोय आणि करत राहील तरीपण तुम्ही जाऊद्याहो त्यांच्याकडे कार्यक्रम आहे चला जाऊयात म्हणून उपदेश देता आहात. जो पर्यंत हे लोक केलेल्या चुकांची माफी मागून प्रामाणिकपणे पुढे असे काही करणार नाही ह्याची ग्वाही देत नाहीत तो पर्यंत असेच चालू राहिले पाहिजे. इथे कुणीही रस्त्यावर उतरून किंव्हा तोडफोड करून पिक्चर बघू नका म्हणून जबरदस्ती करत नाही आहे, फक्त आवाहन करत आहेत. पिक्चर थेटरात जऊन , स्वतःच्या पैशाने , फुकटात कुणी तिकीट काढले म्हणून किव्हा फुकट कुठे मिळतोय म्हणून बघणे ह्याला कुणी अडवू शकत नाही

यश राज 13/09/2022 - 16:57
नुकत्याच प्रसारमाध्यंमांमध्ये फिरत असलेल्या ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या काही क्लिप्स बघितल्या. त्यात २ गोष्टी प्रकर्षाने खटकल्या १. रणबिर आणि आलिया यांचा फालतु मुद्राभिनय. २. अगदी निरर्थक, पाणचट आणि थुकरट डॉयलोग ऐकायला मिळाले. जसे "लाईट उस रोशनी का नाम है जो अन्धेरो से बडी है" ... हात तिज्यायला आम्हाला माहितच नव्हतं व्हय की लाईट काय असतंय ते.. लोकांनी इतरत्र उडवल्याप्रमाणे लवकरच असे डॉयलॉग पण ऐकु येतिल "वाटर उस पानी का नाम है जो प्यास से बडी है" "फायर उस आग का नाम है जो ठंड भगाती है" "स्पेस उस आकाश का नाम है जो उपर रहता है" " अर्थ उस धरती का नाम है जिसपे हम रहते है " असाच एक इतर .. "शिवा ! वो देखो लाईट आ गयी " ... हा हा हा कै च्या कै. अरे काय मजाक चाललय का .. कोणितरी सोम्या गोम्या (हुसैन दलाल) उठतं आणि प्रसवतंय थुकरट डायलॉग . म्हणे या बंडल चित्रपटा साठी दिग्दर्शकाने १० वर्षे लावली. अजुन एक म्हणजे दसरा सणाच्या वेळेस वाजणारे एक गाणे. गाण्याचे बोल काय तर म्हणे "डांस का भुत " , "सुफियाना सी पार्टिया" .. अरे सण काय आणि तु नाचतोय कसा आणि गाण्याचे बोल काय , काहीही घुसवाल. दसर्याला कोणत्या सुफियाना सी पार्टिया होतात म्हणे, याला ऊर्दुचे अतिक्रमण नाही म्हणायचे का? या सर्व आणि इतरही बरयाच कारणांनी जसे की कलाकारांची मग्रुरी, हे चित्रपट बघण्याची इच्छा होत नाही. राहिला प्रश्न ,प्रेक्षक नसताना सुद्धा कोटी च्या कोटी उड्डाणे घेणारी आकडवारी दाखवली जातेय त्यांच ऑडिट कसं होत? यावर कोणी जाणकार प्रकाश टाकु शकतं का? बॉयकॉट गॅंग

In reply to by यश राज

यश राज 13/09/2022 - 17:04
वरिल प्रतिक्रिया अर्धवट्च प्रकाशित झाली. बॉयकॉट गॅंग विरुद्ध इतर असा प्रसारमाध्यमांवर चित्र आहे. बॉयकॉट गॅंग चित्रपटाचा विरोध करत आहेत व इतर बाकीचे चित्रपट कीती चांगला आहे , किती कमावले , जरुर बघा हे हिरीरीने सांगत आहेत जसा चित्रपटाकडुन मिळालेला नफा या समर्थन करणार्यांना मिळणार आहे. मुळात चित्रपट सुमार असल्याने बॉयकॉट गॅंग ला करण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.

In reply to by यश राज

चौथा कोनाडा 13/09/2022 - 17:17
यश राज ,.. हा हा हहा सही हैं

😄

मुळात चित्रपट सुमार असल्याने बॉयकॉट गॅंग ला करण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.
म्हणूनच चेव चढाललाय !

In reply to by यश राज

सौंदाळा 13/09/2022 - 18:00
मल्टी स्टारर, बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची प्रोडक्शन कॉस्ट बर्‍याच प्रमाणात वसूल झालेली असते असे वाचले / ऐकले होते. गाण्यांचे हक्क, सॅटेलाईट राईट्स, मिडीया पार्टनर्स वगैरेंकडून कोट्यावधी रुपये पहिल्या दिवसाआधीच मिळालेले असतात. त्यामुळे शक्यतो निर्मात तोट्यात जातच नाही. (हल्ली ही समीकरणे बदलली आहेत का ठाऊक नाही.)

In reply to by यश राज

बॉयकॉट गॅंग ला माझे मुळीच समर्थन नाही. तुम्हाला सर्वात विरोधी घेतली म्हणजे तुम्ही देशद्रोही असले युक्तिवाद मला पटत नाहीत. असो...... तुमचे निरीक्षण मात्र चांगले आहे. चित्रपट पाहून पूर्ण भ्रमनिरास झाला. १. रणबिर आणि आलिया यांचा फालतु मुद्राभिनय.. बत्तड चेहरा काय असतो हे कळते. कुठे भीती, प्रेम, आश्चर्य नाही. expressions नाहीत. अभिनयात नापास झालेले starkids २. अगदी निरर्थक, पाणचट आणि थुकरट डॉयलोग ऐकायला मिळाले. खरंच वात आणणारे dialogues. कुठे सवादफेख नाही. एका ओळीपेखा मोठे वाक्य नाही. कदाचित पाठांतर जमत नसेल. "अग्निअस्त्र प्रकटम " हे ह्यांचे संस्कृत चे ज्ञान!!!!!!!!!.. काही अभ्यास केला नाही. भूमिका वाचली नाही....समजली नाही किंव्हा समजण्याची लायकी आणि पात्रता नाही. ३. प्रसंगाला न शोभणारी गाणी..... नाच ........कुठेही काहीपण अचानय होते थोडक्यात काय........प्रेक्षकांना गृहीत धरायचे........आम्ही स्टार ....काही पण दाखवू तुम्ही बघणार हा माज. .........खरोखर चांगल्या संकल्पने ची चिरफाड केली आहे.

चित्रपट पाहून भ्रमनिरास झाला. MARVEL STYLE काहीतरी बघायला मिळेल अशी थोडी महाफात अपेक्षा होती. पण शेवटी भिकार बॉलीवूड style कचरा बगाव लागला. रणवीर, आलिया पूर्ण एकाच आणि मक्ख चेहरा घेऊन वावरतात. राग, लोभ, भीती, आश्चर्य असे कोणतेच भाव चेहर्यावर बघायला मिळत नाही. प्रत्येक frame मध्ये आलिया च्या चेहऱ्यावर फॅन ठेवून केस उडवले आहेत. ती पूर्ण movie एकाच चेहरा दाखवते. कुठे ताळमेळ नाही. भंपक dialogues काय .....अर्रर्र डोक्याचा भुगा. ढिसाळ पटकथा, अजब दिग्दर्शन. तोच तोच बॉलीवूड मसाला आणी कोंबडी पण बदलत नाही. माझ्याकडून १ स्टार्स 5 पैकी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल.

लाल सिंग चढ्ढा

सोत्रि ·

चौथा कोनाडा 14/08/2022 - 18:24
परिचय आवडला. सिनेमा उत्तरार्धात विस्कळीत आहे असे वाचले, सोत्री, असं काही जाणवलं का ? छान लिहिलं आहे, ज्यामुळे सिनेमा पाहायला प्रवृत्त होऊ शकेल. बाकी बॉयकॉट करणाऱ्यांनी करावे, ज्यांना पाहायचा आहे ते त्यातली सशक्त कथानक आणि अभिनय, दिग्दर्शन इत्यादी बद्दल ऐकून पहातीलच.

In reply to by चौथा कोनाडा

सोत्रि 14/08/2022 - 19:05
नाही, कथानक प्रवाही आहे, त्यामुळे विस्कळीतपणा कुठे असा जाणवत नाही. आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं. हा सिनेमा चुकवण्यात काहीच पॅाइंट नाही, नक्की बघाच!! -(सिनेप्रेमी) सोकाजी

कपिलमुनी 14/08/2022 - 18:42
लोक काय म्हणतील ? किंवा बँन करून देशभक्ती दाखवायच्या जमान्यात असा रीह्यू टाकणे अभिनंदनीय आहे .

जेम्स वांड 14/08/2022 - 21:50
अभिनिवेश विरहित रिव्ह्यू आवडला, लालसिंग चढ्ढा नक्की पाहण्यात येईलच.

गणेशा 14/08/2022 - 21:55
धन्यवाद... आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये शांत, पूर्वग्रह विरहित मत नक्कीच आनंददायी आहे.. सिनेमा आवडू वा ना आवडू हे व्यक्ती सापेक्ष असु शकते, परंतु प्रमाणिक मत महत्वाचे.. नक्की पाहण्याचा प्रयत्न करतो

In reply to by गणेशा

चौकस२१२ 15/08/2022 - 09:52
आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये हेच तत्व काश्मीर फाईल बघताना लागू होतं .... तेवहा मात्र काही लोकांची हि टकळी चालू होती कि " काश्मीर फाईल म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा प्रचार मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता ! ते चालत ?

In reply to by चौकस२१२

जेम्स वांड 15/08/2022 - 10:08
लाल सिंग चढ्ढा हा सेन्सॉर बोर्डाने पास केला वगैरे वाचनात येतं आहे पुरोगामी जनतेकडून, त्यांना माझे एकच म्हणणं आहे की सेन्सॉरने तर काश्मीर फाईल्स पण certify केला होता की ! तेव्हा सेन्सॉर बोर्ड मेंबर्स फारच उजवे सरकार प्रेमी अन् लाल सिंग चढ्ढा वेळी लिबरल होते असे होऊ शकत नाही. प्रॉब्लेम हा आहे की भारतात धर्म जात प्रांत याच्या पलीकडे जाऊन लोक सोयीने लिबरल अन् सोयीने उजवे असतात आपापल्या सोयीनुसार.

In reply to by जेम्स वांड

चौकस२१२ 15/08/2022 - 13:29
हो ना आणि आँधी वर बंदी आणली होती तेव्हा किंवा किस्सा कुर्सी का यावरील बंदी आणली तेव्हा कुठे होते " लिबरल्स " "सध्या हुकूमशाही चालू आहे भारतात " असे सतत गुणगुणणे या "टुल किट " मधील हे अजून एक टुल असो आमीर खान ने मेहनत घेऊन चित्रपट बनवला असणारं यात शंका नाही आणि काम हि चांगले केले असणार मुद्दा फक्त मूळ हेतूचा असतो .... तरी सुद्धा आधी बघून मग पुढेच बोलेन असे म्हणतो पिके सुद्धा "मूळ हेतू अंधश्रदेला खत पाणी घालू नका" या संदेशामुळे आवडला पण तेव्हाच मनात हा हि विचार आला "अरे पण हा संदेश इस्लाम आणि ख्रस्ती धर्मावर पण तेवढ्याच जोराने त्या चित्रपटात दाखवलं असता तर "खर्या अर्थाने तो चित्रपट सर्वधर्म समभावी झाला असता "

In reply to by चौकस२१२

किस्सा कुर्सी का मला वाटते ७८ साली हा सीनेमा प्रदर्शित झाला होता. जोधपूर मधे असताना बघीतला.एकच शो झाला व बंद झाला. शबाना आझमी चे नाव जनता व ती गुंगी असते. शहरात प्लेग झाला म्हणून सरकार उंदीर मारण्याची योजना काढते. प्रती उंदीर काही मोबदला मीळायचा. जनता दहा उदिर मारून सरकारी कार्यालयात मोबदला मागायला येते. उंदीर तीनेच मारले हे तीला सिद्ध करावयास सांगतात. मागून एक जण येतो पन्नास टक्के कमीशन देऊन उंदीर न मारता पैसे क्षणात घेऊन जातो. एवढाच प्रसंग आठवतो.

In reply to by चौकस२१२

कॉमी 15/08/2022 - 11:06
मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता !
बहिष्कार ? ह्या सिनेमावर सर्वधर्मभाव वाल्यांनी बहिष्कार घातलेला ? हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.

In reply to by कॉमी

हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
चुकून बघीतला ना ? मग तुम्हाला एक डाव माफी देऊन टाकू :)

In reply to by कॉमी

चौकस२१२ 15/08/2022 - 13:31
जरा मिपावरचे जुने धागे वाचा .. ओळीने असे चित्रपट फक्त भाजप च्या काळात कसे निर्माण झाले असा सुर होता काश्मीर फाईल ५०० करोड घेऊन गेला तेव्हा कितीजणा च्या नाकाला मिरच्या झोंबलया

In reply to by चौकस२१२

कॉमी 15/08/2022 - 18:50
बॉयकोट झालेला हे पटवण्यासाठी "मिपाचे धागे वाचा" असा सल्ला असेल तर त्या बॉयकॉटला कसला अर्थ? इथे राहुल देशपांडेने सिनेमा बघितला तर त्याच्या वॉल वर जाऊन ओरडणे चालू आहे.

In reply to by चौकस२१२

गणेशा 16/08/2022 - 09:18
चौकस साहेब, हो सर्वच कलाकृतीना माझे म्हणणे लागू आहे, त्यात "काही लोकांनी तेंव्हा " असे फलाना सांगण्याची काय गरज? मी स्वतः या काही लोकात येत नाही.. आणि मणिकर्णिका, तान्हाजी, बाजीराव मस्तानी हे चित्रपट मी सिनेमा गृहात जाऊन पाहिलेत.. कोण काय बहिष्कार घालत होते यावर मी विश्वास का ठेवावा? आणि माझे बोलणे general एकच आहे, सर्वांना सेम, उगाच याला एक आणि दुसऱ्या वेळेस दुसरे असे नाही.. अवघड आहे.. म्हणजे मत मांडायचे का नाही...? काश्मिर फाईल्स बद्दल न बघता मी बोललो होतो का? काही पण कुठे जोडता आहात.. बाकी त्यात मणिकर्णिका आणि तान्हाजी हे दोन्ही सिनेमे मला अजिबात आवडले नव्हते, बाजीराव मस्तानी भारी होता.. हे माझे वयक्तिक मत आहे.. कारण मी ते पाहिलेले आहेत. लाल सिंग चड्डा मात्र मी अजून पाहिला नाही.. वेळ नाहीये सध्या..

सुजित जाधव 15/08/2022 - 07:51
आजकाल सिनेमा बघायच्या आधीच शुल्लक कारणावरून त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची घाणेरडी प्रथा चालू झाली आहे. चित्रपट हे एक मनोरंजनाचे साधन आहे आणि त्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहायला हवं असं वाटतं. तुमचा पूर्वग्रह विरहित रिव्ह्यू आवडला..

टिलू 15/08/2022 - 07:51
मी हि कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा चित्रपट पाहिला. आमिर खान आणि मोना सिंगचा अभिनय आवडला. आमिर खान ने पंजाबी लहेजा अतिशय सहजतेने आत्मसात केला आहे. पण चित्रपट अतिशय संथ वाटला. काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते. युद्धात त्याने केलेली घोडचूक कशी काय खपून जाते हे अजून एक कोडं. कदाचित यामुळेच कोणीतरी या चित्रपटावर केस दाखल केली असे ऐकले. भारतीय सैन्याबाबत अशा गोष्टी दाखवताना आमिर खान आणि टीम ने अजून थोडा अभ्यास करायला हवा होता असे वाटून गेले. असो.

चौकस२१२ 15/08/2022 - 09:47
काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते. या बाबत हि प्रतिक्रिय हि बघवि https://www.youtube.com/watch?v=aVscKmEtDUQ

In reply to by चौकस२१२

मदनबाण 15/08/2022 - 13:14
@ चौकस२१२ लिंक बद्धल धन्यवाद. चड्डी सिंग च्या वादात अतुल कुलकर्णी चे नाव काही दिवसां पासुन येत आहे. व्हिडियोत [ तुम्ही दिलेल्या ] अतुलचे काही जुने ट्विट्स आहेत. काही काळा पूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंट मध्ये त्यांनी एक छोटा बदल केलेला काही लोकांच्या लक्षात आला [ तो मी खाली देत आहे. ] या सर्व घटनाक्रमांमुळे अतुल कुलकर्णी ची "दुसरी बाजु " माझ्या आणि अनेक इतर जणांच्या लक्षात आली हे मात्र नक्की ! @ सोत्रि तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली. मी चित्रपट पाहिला नाही आणि पाहणार नाही. [ अगदी फुकट उपलब्ध झाला तरी ] परंतु जालावरचे अनेक रिव्हूज वाचुन गेल्या २-४ दिवसात या चित्रपटा बद्धल बरीच माहिती समोर आली आहे आणि अजुनही येत आहे. तुमची वरती एक प्रतिक्रिया वाचली ती अशी :- आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं. कारगिल युद्धातील अतिरेक्याला वाचवुन त्याच्याशी व्यवसाय करणार्‍या व्यक्तिरेखेला तुम्ही चपखलं भारतियकरण समजत आहात हे जाणवतं. ज्या पकिस्तानने त्यांच्या अतिरेकी आणि सौनिकांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला ! कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना अमानविय यातना देऊन ठार केले. अश्याच एका पाकिस्तानी अतिरेकी व्यक्तीरेखेला या चित्रपटात नायक ? वाचवतो ? हे कुठल्या विचारसरणीचे भारतियकरण करणे आहे ? जरा सांगा ना प्लीज ! बर मूळ चित्रपट मी पाहिला आहे, त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister

In reply to by मदनबाण

चौकस२१२ 15/08/2022 - 13:44
त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. हे असे असेल तर आमिर कितीही चांगला कलाकार असला तरी त्याचा आणि लेखकाचा धिक्कार हिंदी चित्रपटात सृष्टीत ओढून ताणून "सरहद के ऊस पार से प्यार जताना" असल्या आत्मघातकी विचारसरणीचा हा अजून एक भाग.. हिंमत असेल तर अमीर ने मराठीतील "हलाला " चा रिमेक करावा आणि एर्दोगन मॅडम ना पहिल्या प्रीमियर ला बोलवावे

In reply to by मदनबाण

सौंदाळा 15/08/2022 - 14:04
सहमत. ढिसाळ कथानक आहे. सुरुवातीला थोडा बरा वाटला पण नंतर पाकिस्तानी सैनिकाला वाचवून त्याचा भारतीय लष्कराला पत्ता पण नाही. वरून त्याला बिजनेस पार्टनर करणे. अर्धवट असून करोडोंचा धंदा उभा करणे. पाहिजे तेव्हा करीना किंवा अमीर एकमेकांसमोर हजर होणे मग ते मुंबई, दिल्ली, पंजाब काहीही असो. यामुळे नंतर इंटरेस्ट संपला.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कॉमी 15/08/2022 - 21:51
मायबोलीवर अमितव ह्यांनी दिलेल्या प्रतिसादातून-
त्या पाकिस्तानी मेजरच्या तोंडून पाक विरोधी, मुस्लिम धर्माविरोधी कित्येक संवाद आहेत. तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे.

In reply to by कॉमी

मदनबाण 15/08/2022 - 22:24
तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे. हे तत्वज्ञान / उपरती इडियन आर्मीने पाय छाटल्या नंतर आली का ? एव्हढ होत तर कारगिल युद्धात काय लपाछुपी किंवा पकडापकडी खेळाला आला होता काय ? इंडियन आर्मी ही जगात शौर्य, पराक्रम,साहस यासाठी जगविख्यात आहेत, ते अतिरेक्यांना ७२ हुरांकडे डायरेक्टच पाठवतात. बरं मूळ कथानकात असे काही नसताना हे मुद्दामुन केले गेले आहे यात तीळमात्र शंका नाही. जाता जाता:- इंडियन आर्मीवरील माझे आवडते कोट्स देऊन जातो. १] “May God have mercy on our enemies, because we won't.” २] “It is God's duty to forgive the enemies, but it's our duty to convene a meeting between the two."

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister

In reply to by कॉमी

मदनबाण 16/08/2022 - 10:26
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द टॉप प्रतिसाद दिल्याने दुर्लक्षणीय प्रतिसाद. तुमची कल्पनाशक्ती दाणगी दिसतेय ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare

In reply to by मदनबाण

कॉमी 15/08/2022 - 22:50
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या. त्यात पाकिस्तानी सैनिक घेऊन काहीही चुकीचा संदेश दिलेला नाहीये, उलट चांगलाच संदेश आहे. मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते. नवी गोष्ट लिहायलाच हवी. मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे- गंप सरकारविरोधी अँटी वॉर प्रोटेस्ट मध्ये गेला असतो, आणि तिथे चक्क एक सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जातो. मूळ सिनेमात काही फक्त आर्मीचा उदोउदो नाहीये. आणि मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते.

In reply to by कॉमी

मदनबाण 16/08/2022 - 10:26
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या. काय सांगता ? काल्पनिक गोष्टीत देखील काहीतरी लॉजिक असले पाहिजे ना ? अतिरेक्या बरोबर बिझनेस करणे हा देशद्रोह आहे ही साधी गोष्ट जर कोणाला माहित नसेल / समजत नसेल किंवा तसा मुद्दामुन आव आणत असेल, तोच व्यक्ती असा काल्पनिक वायझेड पणा करु शकतो आणि त्याचे समर्थन करु शकतो. मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते. अतिरेक्या बरोबर मैत्री करुन, व्यवसाय करुन करोडो छापणे हे तुमच्या मते बद्धिमानपणाचे लक्षण असावे ! :))) मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे- मी देखील हेच म्हणतो... सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जात असला तरी ज्या देशाशी युद्ध चालले आहे त्यांच्याच सैनिका बरोबर बिझनेस करण्याचा वायझेडपणा त्यांनी अजिबात केलेला नाही. मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते. मुळात काल्पनिक कथानकाच्या नावावर अतिरेक्याला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न म्हणजे सैन्याचा अपमान आणि राष्ट्रद्रोह देखील आहे. तुम्ही कितीही कल्पना शक्ती लावली आणि ती हवी तशी ताणली तरी अतिरेक्याचे समर्थन करु शकत नाही. उध्या अश्या कल्पनाशक्तीचा वापर करुन कसाबचे आणि अफजल गुरु चे देखील ग्लोरिफिकेशन केले जाईल ! जाता जाता :- चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare

In reply to by मदनबाण

कॉमी 20/08/2022 - 10:57
चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !
इतके कष्ट होत असताना तुम्ही ह्या धाग्यावर पो टाकण्याची गरज नव्हती. पुढच्या वेळेस पो टाकणार नसाल तर थेट थांबा, नोटीस देण्याची आवश्यकता नाही. :)

प्रचेतस 15/08/2022 - 13:19
समतोल, पूर्वग्रहविरहित परीक्षण फार आवडले. आमिरचा फॅन असल्याने चित्रपट पाहणार आहेच. पण पीके पासून आमिरच्या अभिनयात एक तोच तोच पणा जाणवतोय.

In reply to by प्रचेतस

चिन्मना 15/08/2022 - 16:34
खरे आहे. आमिर खानच्या अभिनयात आता तोचतोचपणा जाणवू लागला आहे. त्यामुळे आमिर खान आवडत असूनही हा पिक्चर कदाचित पाहणार नाही. ओटीटीवर आल्यावर ठरवू. मात्र परीक्षण नक्कीच आवडले.

विवेकपटाईत 15/08/2022 - 18:25
पूर्वी हिंदी सिनेमात प्राण हिरोईनच्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये अफूची गोळी मिसळायचा. पण हिरो सावध असल्यामुळे हिरोईन नेहमी वाचायची. तसाच हा सिनेमा आहे. सोशल मीडियाने सिनेमाचा हेतू उघड केला. कलाकार उत्तम असेल तर टूल किटचा उद्देश साध्य होतो. जसा माचिस सिनेमात झाला होता. तो सिनेमा पाहिल्यावर अनेकांचे मत झाले सरकार, प्रशासन, पोलीस अत्याचारामुळे लोक आतंकवादी बनतात. आतंकवादी कोमल हृदयाचे चप्पा चप्पा गाणारे असतात. ज्या सिनेमात मंद बुध्दीचा सैनिक दाखविला आहे. त्या सिनेमाची प्रशंसा करणारा लेख इथे चालतो. शेवटी विचार स्वतंत्रता महत्वाची. फक्त इतिहासाचे सत्य दाखविणारा माझा लेख मात्र संपादकांनी उडविला होता. किमान आता तरी पुन्हा धाग्यावर संपादकांनी दाखविण्याचे धारिष्ट्य दाखवावे.

डँबिस००७ 15/08/2022 - 22:21
लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा भारतीय जनतेने लोकशाहीत मान्य अश्या पद्धतीने बॉयकॉट करुन फ्लॉप यशस्वी केल्याने सगळ्या पुरोगाम्यांचे व लिबरल्सचे धाबे दणाणले आहेत. एक तर शांततापुर्ण खळ्ळ खट्याक न करता सुद्धा आपला विरोध दाखवु शकतो हे प्रकर्शाने जाणवले. भारतात गोदी मिडीया चालवणार्या उजवीकडे कलंडलेल्या केंद्र सरकारचा ह्या सिनेमाविरुद्ध कोणत्याही निर्देश नसतानाही असा बॉयकॉट यशस्वी केल्याने जनतेचे अभिनंदन ! लाल सिंग चढ्ढा सिनेमा पुर्ण डब्ब्यात गेल्यावरही तो सिनेमा म्हणजे अप्रतिम कलाकृती होती अस सांगणारे मिडीयातले "ध्रुव राठी" सारखे लोक पैसे घेऊनच आपले मत मांडतात हे पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध झाले. आमिर खान हा "देश प्रेमी" आहे त्यामुळे माझ्या सिनेमाचा बॉयकॉट करु नका अस विनवत राहीला पण त्याच्या सिनेमाचा बॉयकॉट हा तो हिंदु हेटर आहे म्हणून हिंदु जनतेने केलेला आहे हेच त्याला उमगले नाही. स्वःताला देश प्रेमी आहे अस जनतेला समजवणार्या आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच. काही वर्षांपुर्वी उप राष्ट्रपती असलेल्या हामिद अंसारी ने सुद्धा १५ ऑगस्टला झेंड्याला सलाम न करण्याचा हक्क बजावला होता. त्यावेळेला ही लिबरल्सनां त्यात काही गैर वाटल नाही. पण फक्त मुसलमानांसाठी जन्मलेल्या पाकिस्तानातले लोक नेते, मौलवी, अध्यक्ष सर्वेच पाकिस्तानच्या सब्ज परचमला ( हिरव्या झेंड्याला) सलाम करतात. त्यावेळेला त्यांचा ईस्लाम धर्म त्यांच्या अश्या वागण्याच्या आड येत नाही. मग भारतातल्याच मुसलमानांना तिरंग्याला सलाम करताना ईस्लाम का आड येतो ? सलमान रश्दी ह्यांच्या वर सॅटॅनिक वर्सेस (१९८८) नावाच पुस्तक लिहील्यानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर व त्यांच्यावरच्या ईराणच्या खोमेनीने काढलेल्या फतव्या नंतर १० वर्षांनी एका २४ वर्षांच्या युवकाने ( हादि मतार) चाकुने न्युयॉर्क मध्ये हल्ला केला. सॅटॅनिक वर्सेस कधीही न वाचलेल्या ह्या युवकाच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या व त्याने अश्या लेखकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला ज्याच्या बद्दल काहीही माहीती सुद्धा नव्हते. आमिर खानच्या सिनेमांनी ह्यांच्या भावना कश्याकाय दुखतात अस विचारणार्या लोकांना माझा प्रश्न एकच आहे. हिंदुंच्या भावनाना केराची टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ?

In reply to by डँबिस००७

चौकस२१२ 16/08/2022 - 03:12
हिंदुंच्या भावनाना केराची टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ? हाच तर मंत्र आहे स्वतःला पुरोगामी न्हाणवून घेणाऱ्यांचा आता यावर अरुंधती रॉय ताई / महेश भट इत्यादी काय म्हणतात हे बघणे रोचक ठरेल का यात हि त्यान्ना फॅसिष्ठ हात दिसेल !

अर्धवटराव 15/08/2022 - 22:31
म्हणजे आम्हि शितावरुन भाताची केलेली परिक्षा चुकली म्हणायची.. ट्रेलर वरुन तर चित्रपट फारच गचाळ वाटला. आमिर खानचा म्हणुन धूम-३, ठग्स ऑफ हिन्दुस्तान, मंगल पांडे वगैरे चित्रपट बघितले तेंव्हा उगाच पैसा/वेळ वाया गेल्याचा फील आला होता. लाल सिंगचा ट्रेलर बघुन तर निदान खास टिकीट काढुन सिनेमा बघायला जायचं नाहि हेच ठरवलं होतं.. पण आता सोत्रींनी तारीफ केली आहे म्हटल्यावर परत विचार करतोय...

तर्कवादी 16/08/2022 - 00:58
पीके सिनेमातील काही दृष्य ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत आणि त्यामुळे आमिर खान हा हिंदू विरोधी ठरवला गेला !! .. पीके सिनेमातली दृष्य ही खरेच हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत असं मानूयात. पण तरी त्याचा दोषी आमिर खान ? म्हणजे निर्माता-दिग्दर्शक-लेखक विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी यांनी फक्त झोपा काढल्यात आणि "कर रे बाबा तुला वाटतील ती दृष्य आणि तुला आवडेल ते संवाद तू म्हण" असं आमिरला मोकाट सोडलं होतं का ? चित्रपटातील कथा/पटकथा/संवाद /आशय ही लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी असते की अभिनेत्याची ? पीके नंतर चोप्रा-हिरानी-जोशी या त्रयींचा संजू नावाचा - एके ५६ रायफल बाळगणार्‍या संजय दत्तचे काहीसे उदात्तीकरण करणारा चित्रपट आला आणि ५८६ कोटी कमावून गेला. पण त्यावेळी बॉयकॉटची हाक आली नाही ते कसे ? बाकी लालसिंग चढ्ढा मी पाहिला नाही - आणि बहुधा बघणारही नाही- कारण एकतर आमिर खानचा अतिरेकी अभिनय - मला आमिर खानचा "तलाश" मधला अभिनय जास्त आवडतो- पण त्याने तसा अभिनय केला की चित्रपट फ्लॉप होतो - तर ते असो. आणि दुसरी गोष्ट - मी बघितलेल्या चित्रपट परिक्षणाच्या एका चित्रफितीनुसार कमी बुद्ध्यांकचा व्यक्ती भारतीय लष्करात भरती केलेला दाखवणे हे मुळातच गंडलेले कथानक आहे. फॉरेस्ट गम्प या अमेरिकी चित्रपटासाठी ते कथानक योग्य ठरते कारण अमेरिकेने व्हिएतनाम युध्दाच्या वेळी असला भयंकर प्रकार केला होता त्यामुळे त्यांची युद्धात खूप जीवित हानीही झाली होती (मी याबद्दल मुळातून वाचलेलं नाही सदर चित्रफितीत जे सांगितलंय ते मी लिहित आहे, त्यामुळे तपशीलात काही त्रुटी असू शकतील). पण भारतीय सैन्यात असला काही भयंकर प्रकार कधी घडलेला नाही. त्यामुळे अतुल कुलकर्णींना मूळ अमेरिकी चित्रपट कितीही आवडला असला तरी त्याचे भारतीयीकरण करण्याची कल्पना मुळातच चुकलेली आहे असे मला वाटते.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 16/08/2022 - 04:54
चोप्रा-हिरानी-जोशी तर्कवादी तुम्ही निदर्शनास आणून दिलेला हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे हे मान्य पिके मधील एकांगि पणा बद्दल अर्थातच चोप्रा-हिरानी-जोशी जबादार आहेत , आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो ... यौग्य नाही माहित आहे पण आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही किंवा तसा हेतू नाही

In reply to by चौकस२१२

तर्कवादी 16/08/2022 - 17:48
आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही किंवा तसा हेतू नाही
निदान मिपाकरांमध्ये तशी प्रवृत्ती नाही हे समजून बरे वाटले. पण इतर समाजमाध्यमांवर अशी प्रवृत्ती ही आढळून येते. मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्‍या पोलीस अधिकार्‍याची भूमिका रंगवली होती. बाकी या विषयावरही ध्रुव राठीची चित्रफीत बघण्याजोगी आहे.
आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो .
आमिर, शाहरुख, सलमान व अक्षय कुमार या चौघांचे चित्रपट हे मुख्यतः त्यांचे चित्रपट म्हणूनच ओळखले जातात. चित्रपटाच्या यशापयाशाचे श्रेय (वा दोष) दिग्दर्शकापेक्षा या नायकांना जास्त दिले जाते त्यामुळे असेल कदाचित. शाहरुख व सलमान हे अनेकदा त्यांच्या चित्रपटाचे निर्माते/सहनिर्मातेही असतात. तर सलमान सारखा अभिनेता चित्रपट करताना स्वतःच्या चाहत्यांचा खूप विचार करतो हे ही दिसून येते. पण तरी काहीही असले तरी माझ्या मते अंतिम जबाबदारी ही दिग्दर्शक व निर्माता यांचीच असली पाहिजे. खास करुन पीके बद्दल बोलायचे तर विवि चोप्रा, हिरानी हे स्वतः प्रथितयश व्यावसायिक आहेत. मुन्नाभाईच्या चित्रपटांमुळे हिरानीचे नाव आधीच खूप मोठे झाले होते. त्यामुळे अगदी आमिर खान सारखा अभिनेताही पटकथेत काही ढवळाढवळ करु शकला असेल असे संभवत नाही.

In reply to by तर्कवादी

मदनबाण 16/08/2022 - 22:02
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्‍या पोलीस अधिकार्‍याची भूमिका रंगवली होती. आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare

In reply to by मदनबाण

तर्कवादी 17/08/2022 - 00:15
आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद. पण आता थोडी अधिक माहिती घेवूयात. पण त्या आधी काही प्रश्न : Anti India म्हणजे काय ? हे काही देशविघातक कृत्त्य असेल आणि देशविघातक कृत्त्य करणार्‍यांना आमिर खान पैसे पुरवत असेल तर काही गंभीर गुन्हे दाखल होवू शकतात , मग तसे का होत नाही ? NIA , CBI ईत्यादींकडून आमिर खानची चौकशी का होत नाही ? गेला बाजार आपल्या ED वा Income Tax चीही धाड नाही असे का ? आता थोडी अधिक आणि अगदी सहज मिळू शकलेली माहिती - आपण आणखी खोलवर ही जावू शकता सदर ट्विटमध्ये नमूद केलेली IPSMF ही संस्था काय आहे ? IPSMF अर्थात INDEPENDENT AND PUBLIC-SPIRITED MEDIA FOUNDATION च्या साईटवर गेल्यास काय दिसते ?Chief Executive Officer आहेत सुनील राजशेखर. बाकी टीम मधली नावे आहेत जयक्रिष्न ई, आदित्य नडिग, अविनाश हुकेरी , अपर्णा अय्यर, ग्रीष्मा सुकुरामन ईत्यादी. The Board of Trustees ची नावे बघू १) अमोल पालेकर (अरे बापरे !!) २) सी बी भावे [Mr. Bhave was Chairman of the Securities and Exchange Board of India (SEBI), as well as Chairman and Managing Director of National Securities Depository Limited (NSDL)[] ३) मुकूंद पद्मनाभन ४) रुक्मिणी बॅनर्जी ५) श्याम दिवाण ६) टी एन निनाण या पैकी प्रत्येकाचा संक्षिप्त परिचय या दुव्यावर आहे आणि तो आवर्जुन वाचण्याजोगा आहे. प्रतिसादाची लांबी आणखी वाढू नये म्हणून मी सगळंच पेस्ट करत नाही. बर संस्थेच्या देणगीदारांची नावे पण साईटवर आहेत. ती आता मराठीत टंकण्याचा कंटाळा करुन कॉपी-पेस्ट करतो, माफी असावी Azim Premji Philanthropic Initiatives Pvt Ltd Pirojsha Godrej Foundation Cyrus Guzder Rohini Nilekani Philanthropies Kiran Mazumdar Shaw Rohinton and Anu Aga Family Discretionary No.2 Trust, RDA Holdings Pvt Ltd Lal Family Foundation Sri Nataraja Trust Manipal Education and Medical Group India Pvt Ltd Piramal Enterprises Ltd Tejaskiran Pharmachem India Pvt Ltd, Viditi Investment Pvt Ltd, Unimed Technologies Ltd, Quality Investment Pvt Ltd यातील काही संस्थांबद्दल आपणास थोडीफार माहिती असू शकते. पण मग या सगळ्या Anti India / Anti Hindu आहेत काय ?
If you buy a ticket for #LaalSinghChaddha it means you are funding indirectly IPSMF.
मग याच न्यायाने अजिम प्रेमजींच्या विप्रोमध्ये वा अनु आगांच्या थर्मॅक्स मध्ये काम करणे म्हणजे सदर कंपन्याना नफा मिळवून देणे व पर्यायाने IPSMF देणगी मिळवून देणे झाले की !! [ Lal Family म्हणजे बहुधा Eicher Motors कंपनीचे मालक असावेत - म्हणजे बुलेट घेणंही IPSMF देणगी मिळवून देणे .. असो] तर प्रखर देशभक्त म्हणून या देणगीदार सर्व संस्थांशी संबंध तोडायला हवेत नाही का ? पण या यादीत आमिर खानचे नाव का नाही ? म्हणजे तो बहुतेक इतर देणगीदारांच्या तुलनेत खूप कमी देणगी देत असावा काय ? कंजूष कुठला.. मग त्याकरिताही त्याचा निषेध करायला हरकत नाही. बाकी IPSMF चा पत्ता बंगळूरुचा आहे. मग आणि केंद्र आणि कर्नाटकातील राज्य सरकारांनी मिळून सदर Anti India / Anti Hindu संस्थेच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत तातडीने. बाकी ट्वीट मध्ये नमूद Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. बाकीच्या २ साईट्स अजून फारशी माहिती घेतलेली नाही. पण एक गंमत म्हणजे द वायरला टाटा ट्रस्टकडूनही देणगी मिळालेली आहे (आली का पंचाईत) Wire मदनबाणजी आपण एक ज्येष्ठ मिपाकर आहात. आपल्या आसपास चालणार्‍या प्रोपागंडावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

डँबिस००७ 17/08/2022 - 02:16
तर्कवादी, Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. मदनबाण साहेबांच्या प्रतिसादाला मूद्देसुद प्रतिसाद देताना ईथे येऊन तुम्ही अडखळलात !! Alt News जर तुम्हाला Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही तर तुमच्या नजरेत जरूर काही तरी गडबड आहे. Alt News चा मालक महम्मद झूबेर हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे. https://www.google.ae/amp/s/m.thewire.in/article/law/supreme-court-mohammed-zubair-bail-uttar-pradesh/amp https://www.google.ae/amp/s/www.thehindu.com/news/national/bail-sought-for-alt-news-founder-mohammed-zubair-lawyer-says-he-is-facing-death-threats/article65610739.ece/amp/ नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे. त्याच्यामूळेच नूपुर शर्मा विरुद्ध मुसलमानात रोष निर्माण झाला व त्याची परिणीती म्हणुन १८-२० हिंदुंच्या निघृण हत्त्या झाल्या. हे तर फक्त अल्ट न्यूज बद्दल आहे. "द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे. अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!

In reply to by डँबिस००७

सर टोबी 17/08/2022 - 10:37
कसा दिला हे नीट समजावून घेतले असते तर तो अजूनही गुन्हेगार आहे हे आडून आडून सुचवण्याचा प्रयत्न केला नसता. त्याला बंदिवासात ठेवण्याचे कुठलेही सबळ कारण सरकार पक्षाकडे नव्हते आणि त्याला या उप्पर बंदिवासात ठेवता येणार नाही इतकी कणखर भूमिका न्यायालयाने घेतली आहे. एवढेच नाही तर न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून मिळाली नाही या कारणास्तव वेळकाढूपणा पोलिसांनी करू नये हे देखील न्यायालयाने पहिले. एरवी भक्त अशा बाबतीत काय म्हणतात? ते सणसणीत चपराक वगैरे?

In reply to by चांदणे संदीप

मदनबाण 17/08/2022 - 11:52
मी जे वरती ट्विट दिले आहे त्याचा संदर्भ पत्रकार अजीत भारती यांच्या व्हिडियोतुन घेतला आहे, ते पत्रकार आहेत तेव्हा त्यांनी दिलेली माहिती योग्यच असावी असा विचार करुन मी हा संदर्भ इथे दिला. मोहम्मद ज़ुबैर वर अधिक माहिती घेताना मला २ संदर्भ मिळाले ते इथे देऊन ठेवतो. या प्रोपागंडा न्ञुज नसाव्यात अशी अपेक्षा आहे. ताबीज का हुआ 'उल्टा असर' तो बुजुर्ग से 'जय श्री राम' बुलवाकर काट दी दाढ़ी: Alt News के वायरल Video का सच Unremorseful after triggering a hate wave that claimed the lives of Hindus, Mohammed Zubair returns on Twitter to whitewash Jihadi violence

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar

In reply to by डँबिस००७

तर्कवादी 17/08/2022 - 12:18
डँबिसजी मी कुठेही अडखळलो नाही.
हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे.
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद !! हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? बरं तो ट्वीट नेमका काय होता ? इथे बघता येईल ते ट्वीट. म्हणजे झुबेरने किसि से ना कहना या चित्रपटातले एक दृष्य ट्वीटमध्ये वापरले. त्याने त्यात काही फेरफार केला काय ? ते ही बघता येईल YouTube वर चित्रपट आहे. मग किसि से ना कहना या चित्रपटाचे लेखक सचिन भौमिक व दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनाही हिंदूविरोधी ठरवायला हवे. अभिनेता फारुक शेख तर बाय डिफॉल्ट हिंदू विरोधी असेलच !!
नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे.
अच्छा, मग नूपुर शर्माचे मूळ वक्तव्य काय होते त्याची चित्रफीत आपण देवू शकता का ? आणि जर नूपुर शर्माचे काहीच चुकले नाही तर भाजपने तिला पदावरुन दूर का केले असावे, शिवाय तुम्ही म्हणता तसे झुबेरने वक्तव्य तोडून मोडून दाखवले असेल तर त्याच्याविरोधात त्याबद्दल खटला दाखल करायला हवा, त्याबद्दल त्याला अटक व्हायला हवी. .. पण त्याला २०२२ मध्ये अटक करायला २०१८ च्या ट्वीटची गरज का भासली. असो,नुपूर शर्मा हे पुर्णतः वेगळे प्रकरण आहे. मदनबाण यांनी उपस्थित केलेला मूळ मुद्दा IPSMF मुख्यतः बद्दल होता, त्याबद्दलही आपण अधिक माहिती दिलीत तर आवडेलच.
"द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे.
खरंय.. मी पण द वायर बद्दलची काही माहिती वर दिली आहेच पण आपण त्या मुद्द्यावर काहीच बोलला नाहीत. असो.
अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!
हेटाळणीजनक टिप्पणी टाळावी. "अभ्यास वाढवा ", "तुम्हाला काय कळतं ?" वगैरे अर्थाची वाक्ये टाकून उगाच समोरच्याला चिडविण्याचा प्रयत्न करु नये. आपणास जी माहिती आहे ती आपण द्यावी. सगळ्या जगाचं सगळं ज्ञान कुणालाच नसतं. आपल्याकडे समोरच्यापेक्षा काही अधिक माहिती असेल तर आपण नक्कीच सांगावी पण त्यात समोरच्याची हेटाळणीकरण्याचा सूर नसावा. आपण ज्येष्ठ मिपाकर आहात आणि मिपावर सकारात्मक वातावरणात मुद्देसूद चर्चा कशा कराव्यात हे आपणास अवगत असेलच असो.

In reply to by तर्कवादी

सुरिया 17/08/2022 - 13:50
@तर्कवादी, युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे. कीपीटप. "अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.

In reply to by सुरिया

तर्कवादी 17/08/2022 - 15:00
युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे.
धन्यवाद सुरियाजी..
"अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.
आणखी ते "वाढदिवसाच्या शुभेच्छा" पण. हे सर्व हेटाळणीजनक / चिथावणी देणारे वाक्य टाळून सकारात्मक चर्चा व्हायला हवी,

In reply to by तर्कवादी

डँबिस००७ 17/08/2022 - 14:23
तर्कवादीजी, हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो. झुबरवर ८ केस दाखल झालेल्या आहेत. झुबेरला अटक करण्यासाठी २०१८ पासुन केसेस पेंडीग असताना २०२२ च्या केसवर अटक कशी करता येईल ?

In reply to by डँबिस००७

तर्कवादी 17/08/2022 - 14:57
अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो.
अर्थात आपण आपणास हवा तो अर्थ काढू शकता ? आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने विचार करुन सदर ट्वीट खरेच हिंदू विरोधी / हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे का हे पण ठरवू शकता. बाकी झुबेर हाच चर्चेचा केंद्रबिंदू करण्यात मला रस नाही. मदनबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट मधील IPSMF आणि IPSMF ला देणगी देणे हा प्रमुख मुद्दा होता त्याबद्दल अधिक चर्चा होवू शकेल.

In reply to by तर्कवादी

निनाद 18/08/2022 - 09:28
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्‍या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत. The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे. The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते. संदर्भ देणार नाही, शोधा.

In reply to by निनाद

तर्कवादी 18/08/2022 - 12:27
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्‍या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत.
असेलही कदाचित. Altnews, The Wire, The Caravan ह्यापैकी प्रत्येकी वेगळ्या धाग्यांचे विषय होवू शकतील. सहजपणे मिळालेल्या माहितीत The Wire च्या देणगीदारांत टाटा ट्रस्टचे नाव सापडले ते मी लिहिले बाकी या प्रत्येकाच्या खोलात जाण्याकरिता हा धागा योग्य नाही असे माझे मत आहे. असो. पण मदणबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट्मध्ये केलेला मूळ मुद्दा आमिर खानच्या IPSMF ला देणगी देण्यासंदर्भात होती. त्या IPSMF बद्दल मी बरीच माहिती दिली आहे. त्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये अमोल पालेकर आणि इतर काहि दिग्गजांची नावे आहेत. देणगीदारांत अनु आगा, अजिम प्रेमजी यांच्या ट्रस्टची नावेही आहेत. पण या मुद्द्यांवर पुढे चर्चा झालीच नाही.. असो.
The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे.
असे म्हणतात का ? म्हणत असतील बुवा ...
The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते.
शक्य आहे. वरील ट्वीट ज्यांचे आहे ते विजय पटेल भाजपचे कार्यकर्ते आहेत. तर राजकीय पक्षांच्या नेते / कार्यकर्ते स्वतःच्या संस्था, युट्युब चॅनेल चालवू शकतातच की.
संदर्भ देणार नाही, शोधा.
नाही देणार तर नका देवू संदर्भ.. आग्रह नाही..मला जेवढी शोधाशोध कराविशी वाटली तेवढी केली आणि इतके मला समजले की IPSMF ला देणगी देणे हा काही गुन्हा नाही की पाप नाही !!

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 30/08/2022 - 15:55
पीके चित्रपटामुळे अभिनेता आमिर खानला (फक्त अभिनेताच हं.. लेखन, दिग्दर्शन , निर्मितीत त्याचा सहभाग नव्हता) बहिष्काराला सामोरे जावे लागत असेल तर जितेंद्र जोशींनी (अभिनेते आणि निर्मातेसुद्धा - चित्रपट गोदावरी) या एकाच दृष्यातून त्यांच्या पुढील सात जन्माच्या चित्रपटांवर बहिष्कार घालायची सोय करुन ठेवलीये असे म्हणता येईल... अरे हो पण इतके पाप केल्यावर त्यांच्या आत्म्याला गती वगैरे मिळून पुनर्जन्म लाभेला का हा देखील प्रश्नच आहे म्हणा !! असो.. दृष्य बघा.. हॅव फन !!

In reply to by तर्कवादी

मदनबाण 30/08/2022 - 17:21
जाता जाता :- च्यामारी आमिरच्या बुडास लागलेली आग विझली असेल मला वाटले होते, पण त्याच्या डाव्या भक्तांची अजुन मजबुत जळतेय इतकं मात्र नक्की ! :))) ते काय म्हण हाय ? हं, गिरे तो भी टांग उप्पर ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)

डँबिस००७ 16/08/2022 - 01:08
"मदनबाण" तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली. अगदी नेमक्या शब्दात तुम्ही लिहीलत. ईतक असुन सुद्धा काही आपलच कस खर हे सांगत आहेत. काश्मिर फाईल्स वरच्या धागा आल्या आल्या, तो सिनेमाचा विषय राहीला बाजूला तर "विवेक अग्नीहोत्री" कसा वाईट हे सांगण्यासाठी ह्यांनी किती आटापीटा केला होता ते आठवले.

आग्या१९९० 16/08/2022 - 08:34
दाभोलकरांना फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दिसतात, इतर इतर धर्मातील दूर करायची हिम्मत करत नाही असे काही आक्षेप घ्यायचे. आमिर खान हिंदूंच्या अंधश्रध्दाबद्दल काही बोलला तर त्यालाही नावं ठेवायची. म्हणजे एका हिंदूंनी दुसऱ्या धर्मात ढवळाढवळ केली तर ते ह्यांना चालणार ,फक्त आमच्या धर्मात करू नका.

चौकस२१२ 16/08/2022 - 10:31
आग्या ... म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ... ती हिंमत नाही यांच्यात मग ते समाज कार्यातून असो, समाजप्रबोधनातून असो , कलाकृतीतून असो , चित्रपट / नाटक / साहित्यातून असो काह्ही माध्यम असले तरी हा नियम पाळावा पिके मधील हिंदू धर्मातील अंधश्रद्धा बाहेर आणली यात माझ्यसारख्याला चांगलेच वाटते .. पण ते करताना इतर धर्मातील अश्या चालिरीनवर जास्त बोलण्याची हिंमत हे लोक दाखवत नाहीत .. हा ढोंगी पणा आता उघडकीला आलाय .... दिसला हिंदू कि मार टपली .. लै सहन केलं मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .

In reply to by चौकस२१२

आग्या१९९० 16/08/2022 - 21:01
म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ... ती हिंमत नाही यांच्यात अनिसचे संबंधित धर्माचे कार्यकर्ते त्यांच्या धर्मातील अनिष्ट रूढी निर्मूलनाचे कार्य करत आहेत. शुद्ध हेतू ठेवून तुम्हीही हे काम करण्याची हिम्मत करू शकता. फक्त बोटं दाखवण्याचा शुरपणा सोडावा लागेल.

In reply to by सुखी

आग्या१९९० 16/08/2022 - 22:35
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/mumbai-news/controversial-miracle-man-passes-away-in-vasai/story-7ffxk1zATKeY2xQaZSOKQM_amp.html अनिसला साथ द्या. त्यांच्या सोबत काम केले की बऱ्याचशा शंका दूर होतील. अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.

In reply to by आग्या१९९०

वामन देशमुख 16/08/2022 - 23:26
अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.
हमीद दाभोलकरांनी लेखी हमी दिलीय का? अंनिस ने हमीद दाभोलकरांना माफ केलंय का? संदर्भः http://www.misalpav.com/node/37392 तिथून साभारः विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले. सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले. हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या! बाकी चालू द्या.

In reply to by चौकस२१२

तर्कवादी 17/08/2022 - 00:39
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .
हलाला तर नाही पाहिला पण शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा (मशिदीवरील भोंग्याचा विषय) पाहिला, अतिशय आवडला आणि या चित्रपटाबद्दल (तसेच हलालाबद्दलही) मुस्लिम संघटनांनी शिवाजी पाटील यांचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही.

In reply to by तर्कवादी

मदनबाण 17/08/2022 - 11:00
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय मी हा चित्रपट पाहिला आहे.उत्तम चित्रपट आहे. जेव्हा या चित्रपटा बद्धल बोलले जात होते तेव्हा या चित्रपटाच्या निर्म्याताचा एक व्हिडियो मी मिपावर दिल्याचे स्मरते. आज तो व्हिडियो इथे परत देतो. चित्रपट प्रदर्शीत झाल्यावर काही आंदोलने झाली की नाही या बद्धल माहिती नाही,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते. सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता. एका शीख व्यक्तीचे मुस्लिम मुली बरोबर लग्न होऊन ती नंतर गर्भवती होऊन मुलास जन्म घालते, तसेच तीचे नाव सकीना होते हे सुद्धा अशांती दुतांना सहन झाले नव्हते. जितक मला माहित आहे त्यानुसार बहुतेक भोपाळ मध्ये थेटर देखील जाळण्यात आले होते. संदर्भ :- Religious protests against period film Gadar put free speech on the boil Gadar Protests In Lucknow 'Disruption of 'Gadar' part of sinister plan'

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar

In reply to by मदनबाण

तर्कवादी 17/08/2022 - 15:53
,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते.
२०१६ साली चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून त्रास झाला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. RC मध्ये चित्रपट पास केला त्यावेळी ८ मुस्लिम व्यक्तीही ज्युरी म्हणून आल्या होत्या हे पण निर्माता कागणे याने सांगितले आहे. आणि त्यानंतर निर्मात्याने भोंगा चित्रपट बनवला. असो.
सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता.
हे खरंय.आणि सर्वच धर्मातील माथेफिरु धर्मांधाचा निषेध करायला हवाच. गदरच्या वेळी गदारोळ झाला होता हे मलाही आठतंय. तसेच बॉम्बे चित्रपटातही नायिका मुस्लिम व नायक हिंदू असल्याने काही मुस्लिम संघटनांकडून विरोध झाला होता. मुंबई दंगलींचा विषय तसा ताजाच होता, अतिशय संवेदनशील विषय होता. काही निदर्शने हिंसकही असावीत बहुधा. पण या सगळ्यांची व्याप्ती किती होती ते आता आठवत नाही. मी हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात जावून बघितले होते. बॉम्बे प्रदर्शित झाला तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या आई वडिलांनी काळजीपोटी आधी मला चित्रपटगृहात जाण्याची परवानगी दिली नाही. पण नंतर पुण्यात तरी काही गडबड झाल्याच्या विशेष काही बातम्या आल्या नाहीत तशी मला परवानगी मिळाली आणि मी दापोडीच्या अरुण या चित्रपटगृहात एकट्याने जावून बॉम्बे चित्रपट पाहिला.

गवि 16/08/2022 - 13:08
अनेक प्रतिसाद सिनेमा न बघताच आल्याचे (नेहमीप्रमाणे) दिसते. हे रोचक आहे. कोणाची तरी मते, अर्धवट सीन, ट्रेलर असे पाहून फायनल आग्रही आणि तपशीलवार मत देणे. स्टाम्प मारणे हे अनाकलनीय आहे. पुलंचे अंतूशेट जसे झापे बाजूला करुन घटकाभर एकच प्याला नाटक झलक रुपात बघतात आणि "सिंधूचा पार्टी कन्डम, यापेक्षा दशावतारी बरे" अशी निर्णायक मते देतो तसे काहीसे सर्वत्रच घडताना दिसते. मग मत अति समर्थक असो किंवा अति विरोधी.. चित्रपट प्रत्यक्ष बघितला की बहुतांश वेळा जी हवा केली गेली होती तसे तितके त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते असे सिद्ध झाल्याचीच उदाहरणे आहेत. अर्थात अद्याप चित्रपट बघितला नसल्याने चित्रपटाबद्दल निवाडा देणे शक्य नाही. केवळ निरीक्षण नोंदवले.

चित्रपटाची ओळख आवडली. पाहणे आहेच. पण, चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, असे जे वाटायचे त्याची परिक्षण वाचून खात्री पटली. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 17/08/2022 - 10:20
बिरुटे सर चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार? एक टक्का सुद्धा नाही याची मला १०० % खात्री आहे. पुरोगामी दुटप्पीपणा हा असा असतो.

In reply to by सुबोध खरे

जेम्स वांड 17/08/2022 - 15:11
सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार?
असे वाचन वगैरे न करणारे अजून काही उपरे आता दिल्लीत राहणार आहेत रेफ्युजी म्हणून. रोहींग्या म्हणतात बुआ त्यांना.

In reply to by आनन्दा

>>> आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट campaign मुळे पडला? नै नै...लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते. उलट या बायकॉटमुळे सिनेमा उरलेल्या दिवसात सिनेमा अधिक चर्चेत राहील. आज सिनेमा पाचव्या दिवशी पन्नास कोटीच्या जवळ जवळ पोचला आहे. माध्यमांमधून सिनेमाला 'मिला जुला रिस्पॉन्स मिल रहा है' अशा बातम्या आहेत त्यामुळे सिनेमा नफ्यात राहणार आहे. सिनेमा शौकीन पब्लिक तर, सिनेमा पाहिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते.
हा सिनेमा कारणांमुळे पडला ( म्हणजे अपेक्षित यश नाही )- १. खान मंडळींविरुद्ध / प्रस्थापित बॉलिवूड कलाकरांबद्दलचा रोष २. काश्मीर फाईल्स नंतर प्रस्थापित हिरो हिरविनी 'खर्‍या' म्हणजे आधुनिक हिंदू अस्मितेच्या प्रश्नांना भिडत नाही हा पसरलेला समज ३. नेत्रदीपक दाक्षिणात्य चित्रपटांपुढे बॉलीवूड फिके आहे असा पसरत चाललेला समज ४. आमीर खान/ किरण राव यांची तथाकथित देशद्रोही वक्तव्ये ( जी इथून पुढे आयुष्यभर त्यांना छळत राहणार ) ५. बॉयकॉट मोहीम शिवाय या बॉयकॉट मोहीमेने "एनी पब्लीसिटी इज गुड पब्लिसिटी" अशी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजिदेखील चालतेच हा गैरसमज खोडून काढला. अर्थात हे चित्रपट निर्मात्यांनाच लागू आहे. स्वतः आमिर खानचे इन्स्टा/ट्विटर अनुयायी वाढलेच असतील. नवराष्ट्रवादी अदलित लोकांनी झुंड देखील असाच मुद्दामहून नाकारला. त्यात राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, जातद्रोही, पंथद्रोही, भाजपद्रोही, मोदीद्रोही, रास्वसद्रोही काहीही नव्हते. त्यामुळे इथून पुढे "रंग दे बसंती", "लगान", "दिल चाहता है" सारखे एखादी पिढी झपाटणारे चित्रपटसुद्धा तयार होतील का नाही याची मला खात्री वाटेनाशी झाली आहे. तुलनेने दक्षिणी प्रेक्षकांत एखाद्या हिरोप्रती निष्ठा जास्त ठळक असल्याने आणि त्याचवेळी प्रयोगशीलतेचे चाहते असणारे लोकही अनेक असल्याने तेच अशी रिस्क घेऊ शकतात. त्यामुळे उत्तरेकडचे किंवा बॉलीवूडचे चित्रपट आता गायपट्ट्यातील अदलित नवराष्ट्रवादी भारतीयांना शरण जाणार हे नक्की.

डँबिस००७ 16/08/2022 - 19:04
लाल सिंग चढ्ढा मुळे बरेच सेलिब्रीटी आता लाईनीवर आलेत. काही दिवसांपुर्वी ला.सिं.च. च्या बॉयकॉटची खिल्ली उडवत एका कार्यक्रमात कॅमेरा समोर "आम्हाला सूद्धा बॉयकॉट कराना प्लिज" म्हणणार्या अनुराग कश्यप व तापसी पन्नु ला आता ऊपरती झालेली आहे. तापसी पन्नु सारख्या अत्यंत अहंकारी हिँंदु हेटर अभिनेत्रीचे आता तेवर बदलले दिसत आहे. बॉयकॉटची भिती र्‍हितीक रोशनला सूद्धा भेडसावत आहे.

कपिलमुनी 16/08/2022 - 21:32
बॉयकॉट गँग मुळे पिक्चर चालात किंवा पडत असते तर भाजप क्वीन कंगनाचे पिक्चर सुपरहिट झाले असते.. खुद्द शेठ चा पिक्चर सुपर फ्लॉप आहे तर बाकीच्यांची काय कथा... भूल भू २ हिट झालाच की... लोकांना वेगळा विषय , फ्रेश चेहरे हवे आहेत... आणि सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत

डँबिस००७ 16/08/2022 - 22:51
ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या शुटींग करता तुर्कस्तानात जाऊन लेडी एर्दोगनला तिच्या महालात जाऊन भेटलेला आमिर खान स्वःताला देश प्रेमी म्हणवतो. कौन बनेगा करोडपती मध्ये झेंड्याला सलाम न करणारा आमिर खान आपल्या घरावर तिरंगा फडकवतो, ह्यांना वाटत जनतेला (हिंदु) सहज मुर्ख बनवता येते.

In reply to by डँबिस००७

निनाद 18/08/2022 - 09:38
ह्यांना वाटतं हिंदु जनतेला सहज मुर्ख बनवता येते.- पण समाज जागा झाला आहे आणि हेच त्यांना पचत नाहीये. हे समाजद्रोही ठेचलेच पाहिजेत. मी पैसे देऊन खान लोकांचा पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना. त्यानंतर यांना पैसे कधीही दिलेले नाहीत, मरेस्तोवर कधी देणारही नाही! सिनेमा पडेल आहे अभिनेता उघडा पडलेला आहे. तेच ते व्हिएफएक्स चे तारुण्य आणि तोच तो माकडछाप अभिनय लोक तरी कितीकाळ पाहणार?

सुबोध खरे 17/08/2022 - 10:36
आमीर खान ने आपला दुटप्पीपणा अनेक वेळेस सिद्ध केलेला आहे. इरोडगन यांच्या बायकोला भेटल्यापासून तर तो लोकांच्या मनातून साफच उतरला आहे कुठेही कधीही समाजसुधारक लोकाना केवळ हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा कशा काय दिसतात? हे एक कोडे आहे. भेकड पणा हा पुरोगामी लोकांचा स्थायीभाव असल्याने इस्लाम मधील सरळ सरळ दिसणाऱ्या अन्धश्रद्धा आणि अमानुषपणा बद्दल त्यांची तोंडे कायमच बंद असतात. भारतात प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक अधिकारांबद्दल उच्चरवाने बोम्ब मारणाऱ्या पुरोगाम्यांनी तलाकपीडित महिला भारतात किती आहेत याची साधी आकडेवारी सुद्धा उपलब्ध नाही या बद्दल कधी तोंड उघडलेले मी पाहिलेले नाही. भारतीय राज्यघटनेबद्दल दुहाई देणारे सर्वच पुरोगामी समान नागरी कायदा सारख्या घटनेच्या मूलभूत कलम ४४ बद्दल गेली ७५ वर्षे कधीही आग्रहाने बोलताना दिसत नाहीत. Article 44 in The Constitution Of India 1949 44. Uniform civil code for the citizens The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India शेवटी एकच म्हणावेसे वाटते. उद्या दाऊद इब्राहिम ने जर चित्रपट काढला आणि त्यात दिग्गज कलाकार असतील तरी कलेसाठी कला म्हणून मी तो कधीही पाहणार नाही. हि एकच वृत्ती आहे कि जे म्हणतात पाकिस्तानी क्रिकेटर्सची काय चूक आहे? त्यांना पण भारतात बोलवा आणि आय पी एल मधून कोट्यवधी रुपयांची खैरात करा. बॉलिवूड कडे एकंदर पैसा कुठून आणि कसा येतो याची माहिती मिळाल्यानंतर गेली कित्येक वर्षे एकंदर सिनेमे पाहणेच मी बंद केले आहे. त्यामुळे लालसिंग चड्ढा कसाही असला तरी मला शष्प फरक पडत नाही.

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 17/08/2022 - 10:44
" होईना काही, जीवाची लाही ". सध्या पुरोगाम्यांचे सरकार नाही ना? करा ना अहिंदू धर्मातील अंधश्रद्धा दूर. किती दिवस पुरोगाम्यांचे तुणतुणे वाजवणार?

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 17/08/2022 - 10:56
डोळे बंद करून पातळी कशी समजते? काही सिद्धी प्राप्त झाली का? उपाय योजना करा प्रत्येक समस्येवर. सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या.

चौथा कोनाडा 14/08/2022 - 18:24
परिचय आवडला. सिनेमा उत्तरार्धात विस्कळीत आहे असे वाचले, सोत्री, असं काही जाणवलं का ? छान लिहिलं आहे, ज्यामुळे सिनेमा पाहायला प्रवृत्त होऊ शकेल. बाकी बॉयकॉट करणाऱ्यांनी करावे, ज्यांना पाहायचा आहे ते त्यातली सशक्त कथानक आणि अभिनय, दिग्दर्शन इत्यादी बद्दल ऐकून पहातीलच.

In reply to by चौथा कोनाडा

सोत्रि 14/08/2022 - 19:05
नाही, कथानक प्रवाही आहे, त्यामुळे विस्कळीतपणा कुठे असा जाणवत नाही. आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं. हा सिनेमा चुकवण्यात काहीच पॅाइंट नाही, नक्की बघाच!! -(सिनेप्रेमी) सोकाजी

कपिलमुनी 14/08/2022 - 18:42
लोक काय म्हणतील ? किंवा बँन करून देशभक्ती दाखवायच्या जमान्यात असा रीह्यू टाकणे अभिनंदनीय आहे .

जेम्स वांड 14/08/2022 - 21:50
अभिनिवेश विरहित रिव्ह्यू आवडला, लालसिंग चढ्ढा नक्की पाहण्यात येईलच.

गणेशा 14/08/2022 - 21:55
धन्यवाद... आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये शांत, पूर्वग्रह विरहित मत नक्कीच आनंददायी आहे.. सिनेमा आवडू वा ना आवडू हे व्यक्ती सापेक्ष असु शकते, परंतु प्रमाणिक मत महत्वाचे.. नक्की पाहण्याचा प्रयत्न करतो

In reply to by गणेशा

चौकस२१२ 15/08/2022 - 09:52
आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये हेच तत्व काश्मीर फाईल बघताना लागू होतं .... तेवहा मात्र काही लोकांची हि टकळी चालू होती कि " काश्मीर फाईल म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा प्रचार मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता ! ते चालत ?

In reply to by चौकस२१२

जेम्स वांड 15/08/2022 - 10:08
लाल सिंग चढ्ढा हा सेन्सॉर बोर्डाने पास केला वगैरे वाचनात येतं आहे पुरोगामी जनतेकडून, त्यांना माझे एकच म्हणणं आहे की सेन्सॉरने तर काश्मीर फाईल्स पण certify केला होता की ! तेव्हा सेन्सॉर बोर्ड मेंबर्स फारच उजवे सरकार प्रेमी अन् लाल सिंग चढ्ढा वेळी लिबरल होते असे होऊ शकत नाही. प्रॉब्लेम हा आहे की भारतात धर्म जात प्रांत याच्या पलीकडे जाऊन लोक सोयीने लिबरल अन् सोयीने उजवे असतात आपापल्या सोयीनुसार.

In reply to by जेम्स वांड

चौकस२१२ 15/08/2022 - 13:29
हो ना आणि आँधी वर बंदी आणली होती तेव्हा किंवा किस्सा कुर्सी का यावरील बंदी आणली तेव्हा कुठे होते " लिबरल्स " "सध्या हुकूमशाही चालू आहे भारतात " असे सतत गुणगुणणे या "टुल किट " मधील हे अजून एक टुल असो आमीर खान ने मेहनत घेऊन चित्रपट बनवला असणारं यात शंका नाही आणि काम हि चांगले केले असणार मुद्दा फक्त मूळ हेतूचा असतो .... तरी सुद्धा आधी बघून मग पुढेच बोलेन असे म्हणतो पिके सुद्धा "मूळ हेतू अंधश्रदेला खत पाणी घालू नका" या संदेशामुळे आवडला पण तेव्हाच मनात हा हि विचार आला "अरे पण हा संदेश इस्लाम आणि ख्रस्ती धर्मावर पण तेवढ्याच जोराने त्या चित्रपटात दाखवलं असता तर "खर्या अर्थाने तो चित्रपट सर्वधर्म समभावी झाला असता "

In reply to by चौकस२१२

किस्सा कुर्सी का मला वाटते ७८ साली हा सीनेमा प्रदर्शित झाला होता. जोधपूर मधे असताना बघीतला.एकच शो झाला व बंद झाला. शबाना आझमी चे नाव जनता व ती गुंगी असते. शहरात प्लेग झाला म्हणून सरकार उंदीर मारण्याची योजना काढते. प्रती उंदीर काही मोबदला मीळायचा. जनता दहा उदिर मारून सरकारी कार्यालयात मोबदला मागायला येते. उंदीर तीनेच मारले हे तीला सिद्ध करावयास सांगतात. मागून एक जण येतो पन्नास टक्के कमीशन देऊन उंदीर न मारता पैसे क्षणात घेऊन जातो. एवढाच प्रसंग आठवतो.

In reply to by चौकस२१२

कॉमी 15/08/2022 - 11:06
मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता !
बहिष्कार ? ह्या सिनेमावर सर्वधर्मभाव वाल्यांनी बहिष्कार घातलेला ? हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.

In reply to by कॉमी

हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
चुकून बघीतला ना ? मग तुम्हाला एक डाव माफी देऊन टाकू :)

In reply to by कॉमी

चौकस२१२ 15/08/2022 - 13:31
जरा मिपावरचे जुने धागे वाचा .. ओळीने असे चित्रपट फक्त भाजप च्या काळात कसे निर्माण झाले असा सुर होता काश्मीर फाईल ५०० करोड घेऊन गेला तेव्हा कितीजणा च्या नाकाला मिरच्या झोंबलया

In reply to by चौकस२१२

कॉमी 15/08/2022 - 18:50
बॉयकोट झालेला हे पटवण्यासाठी "मिपाचे धागे वाचा" असा सल्ला असेल तर त्या बॉयकॉटला कसला अर्थ? इथे राहुल देशपांडेने सिनेमा बघितला तर त्याच्या वॉल वर जाऊन ओरडणे चालू आहे.

In reply to by चौकस२१२

गणेशा 16/08/2022 - 09:18
चौकस साहेब, हो सर्वच कलाकृतीना माझे म्हणणे लागू आहे, त्यात "काही लोकांनी तेंव्हा " असे फलाना सांगण्याची काय गरज? मी स्वतः या काही लोकात येत नाही.. आणि मणिकर्णिका, तान्हाजी, बाजीराव मस्तानी हे चित्रपट मी सिनेमा गृहात जाऊन पाहिलेत.. कोण काय बहिष्कार घालत होते यावर मी विश्वास का ठेवावा? आणि माझे बोलणे general एकच आहे, सर्वांना सेम, उगाच याला एक आणि दुसऱ्या वेळेस दुसरे असे नाही.. अवघड आहे.. म्हणजे मत मांडायचे का नाही...? काश्मिर फाईल्स बद्दल न बघता मी बोललो होतो का? काही पण कुठे जोडता आहात.. बाकी त्यात मणिकर्णिका आणि तान्हाजी हे दोन्ही सिनेमे मला अजिबात आवडले नव्हते, बाजीराव मस्तानी भारी होता.. हे माझे वयक्तिक मत आहे.. कारण मी ते पाहिलेले आहेत. लाल सिंग चड्डा मात्र मी अजून पाहिला नाही.. वेळ नाहीये सध्या..

सुजित जाधव 15/08/2022 - 07:51
आजकाल सिनेमा बघायच्या आधीच शुल्लक कारणावरून त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची घाणेरडी प्रथा चालू झाली आहे. चित्रपट हे एक मनोरंजनाचे साधन आहे आणि त्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहायला हवं असं वाटतं. तुमचा पूर्वग्रह विरहित रिव्ह्यू आवडला..

टिलू 15/08/2022 - 07:51
मी हि कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा चित्रपट पाहिला. आमिर खान आणि मोना सिंगचा अभिनय आवडला. आमिर खान ने पंजाबी लहेजा अतिशय सहजतेने आत्मसात केला आहे. पण चित्रपट अतिशय संथ वाटला. काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते. युद्धात त्याने केलेली घोडचूक कशी काय खपून जाते हे अजून एक कोडं. कदाचित यामुळेच कोणीतरी या चित्रपटावर केस दाखल केली असे ऐकले. भारतीय सैन्याबाबत अशा गोष्टी दाखवताना आमिर खान आणि टीम ने अजून थोडा अभ्यास करायला हवा होता असे वाटून गेले. असो.

चौकस२१२ 15/08/2022 - 09:47
काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते. या बाबत हि प्रतिक्रिय हि बघवि https://www.youtube.com/watch?v=aVscKmEtDUQ

In reply to by चौकस२१२

मदनबाण 15/08/2022 - 13:14
@ चौकस२१२ लिंक बद्धल धन्यवाद. चड्डी सिंग च्या वादात अतुल कुलकर्णी चे नाव काही दिवसां पासुन येत आहे. व्हिडियोत [ तुम्ही दिलेल्या ] अतुलचे काही जुने ट्विट्स आहेत. काही काळा पूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंट मध्ये त्यांनी एक छोटा बदल केलेला काही लोकांच्या लक्षात आला [ तो मी खाली देत आहे. ] या सर्व घटनाक्रमांमुळे अतुल कुलकर्णी ची "दुसरी बाजु " माझ्या आणि अनेक इतर जणांच्या लक्षात आली हे मात्र नक्की ! @ सोत्रि तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली. मी चित्रपट पाहिला नाही आणि पाहणार नाही. [ अगदी फुकट उपलब्ध झाला तरी ] परंतु जालावरचे अनेक रिव्हूज वाचुन गेल्या २-४ दिवसात या चित्रपटा बद्धल बरीच माहिती समोर आली आहे आणि अजुनही येत आहे. तुमची वरती एक प्रतिक्रिया वाचली ती अशी :- आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं. कारगिल युद्धातील अतिरेक्याला वाचवुन त्याच्याशी व्यवसाय करणार्‍या व्यक्तिरेखेला तुम्ही चपखलं भारतियकरण समजत आहात हे जाणवतं. ज्या पकिस्तानने त्यांच्या अतिरेकी आणि सौनिकांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला ! कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना अमानविय यातना देऊन ठार केले. अश्याच एका पाकिस्तानी अतिरेकी व्यक्तीरेखेला या चित्रपटात नायक ? वाचवतो ? हे कुठल्या विचारसरणीचे भारतियकरण करणे आहे ? जरा सांगा ना प्लीज ! बर मूळ चित्रपट मी पाहिला आहे, त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister

In reply to by मदनबाण

चौकस२१२ 15/08/2022 - 13:44
त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे. हे असे असेल तर आमिर कितीही चांगला कलाकार असला तरी त्याचा आणि लेखकाचा धिक्कार हिंदी चित्रपटात सृष्टीत ओढून ताणून "सरहद के ऊस पार से प्यार जताना" असल्या आत्मघातकी विचारसरणीचा हा अजून एक भाग.. हिंमत असेल तर अमीर ने मराठीतील "हलाला " चा रिमेक करावा आणि एर्दोगन मॅडम ना पहिल्या प्रीमियर ला बोलवावे

In reply to by मदनबाण

सौंदाळा 15/08/2022 - 14:04
सहमत. ढिसाळ कथानक आहे. सुरुवातीला थोडा बरा वाटला पण नंतर पाकिस्तानी सैनिकाला वाचवून त्याचा भारतीय लष्कराला पत्ता पण नाही. वरून त्याला बिजनेस पार्टनर करणे. अर्धवट असून करोडोंचा धंदा उभा करणे. पाहिजे तेव्हा करीना किंवा अमीर एकमेकांसमोर हजर होणे मग ते मुंबई, दिल्ली, पंजाब काहीही असो. यामुळे नंतर इंटरेस्ट संपला.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कॉमी 15/08/2022 - 21:51
मायबोलीवर अमितव ह्यांनी दिलेल्या प्रतिसादातून-
त्या पाकिस्तानी मेजरच्या तोंडून पाक विरोधी, मुस्लिम धर्माविरोधी कित्येक संवाद आहेत. तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे.

In reply to by कॉमी

मदनबाण 15/08/2022 - 22:24
तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे. हे तत्वज्ञान / उपरती इडियन आर्मीने पाय छाटल्या नंतर आली का ? एव्हढ होत तर कारगिल युद्धात काय लपाछुपी किंवा पकडापकडी खेळाला आला होता काय ? इंडियन आर्मी ही जगात शौर्य, पराक्रम,साहस यासाठी जगविख्यात आहेत, ते अतिरेक्यांना ७२ हुरांकडे डायरेक्टच पाठवतात. बरं मूळ कथानकात असे काही नसताना हे मुद्दामुन केले गेले आहे यात तीळमात्र शंका नाही. जाता जाता:- इंडियन आर्मीवरील माझे आवडते कोट्स देऊन जातो. १] “May God have mercy on our enemies, because we won't.” २] “It is God's duty to forgive the enemies, but it's our duty to convene a meeting between the two."

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister

In reply to by कॉमी

मदनबाण 16/08/2022 - 10:26
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द टॉप प्रतिसाद दिल्याने दुर्लक्षणीय प्रतिसाद. तुमची कल्पनाशक्ती दाणगी दिसतेय ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare

In reply to by मदनबाण

कॉमी 15/08/2022 - 22:50
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या. त्यात पाकिस्तानी सैनिक घेऊन काहीही चुकीचा संदेश दिलेला नाहीये, उलट चांगलाच संदेश आहे. मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते. नवी गोष्ट लिहायलाच हवी. मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे- गंप सरकारविरोधी अँटी वॉर प्रोटेस्ट मध्ये गेला असतो, आणि तिथे चक्क एक सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जातो. मूळ सिनेमात काही फक्त आर्मीचा उदोउदो नाहीये. आणि मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते.

In reply to by कॉमी

मदनबाण 16/08/2022 - 10:26
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या. काय सांगता ? काल्पनिक गोष्टीत देखील काहीतरी लॉजिक असले पाहिजे ना ? अतिरेक्या बरोबर बिझनेस करणे हा देशद्रोह आहे ही साधी गोष्ट जर कोणाला माहित नसेल / समजत नसेल किंवा तसा मुद्दामुन आव आणत असेल, तोच व्यक्ती असा काल्पनिक वायझेड पणा करु शकतो आणि त्याचे समर्थन करु शकतो. मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते. अतिरेक्या बरोबर मैत्री करुन, व्यवसाय करुन करोडो छापणे हे तुमच्या मते बद्धिमानपणाचे लक्षण असावे ! :))) मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे- मी देखील हेच म्हणतो... सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जात असला तरी ज्या देशाशी युद्ध चालले आहे त्यांच्याच सैनिका बरोबर बिझनेस करण्याचा वायझेडपणा त्यांनी अजिबात केलेला नाही. मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते. मुळात काल्पनिक कथानकाच्या नावावर अतिरेक्याला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न म्हणजे सैन्याचा अपमान आणि राष्ट्रद्रोह देखील आहे. तुम्ही कितीही कल्पना शक्ती लावली आणि ती हवी तशी ताणली तरी अतिरेक्याचे समर्थन करु शकत नाही. उध्या अश्या कल्पनाशक्तीचा वापर करुन कसाबचे आणि अफजल गुरु चे देखील ग्लोरिफिकेशन केले जाईल ! जाता जाता :- चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare

In reply to by मदनबाण

कॉमी 20/08/2022 - 10:57
चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !
इतके कष्ट होत असताना तुम्ही ह्या धाग्यावर पो टाकण्याची गरज नव्हती. पुढच्या वेळेस पो टाकणार नसाल तर थेट थांबा, नोटीस देण्याची आवश्यकता नाही. :)

प्रचेतस 15/08/2022 - 13:19
समतोल, पूर्वग्रहविरहित परीक्षण फार आवडले. आमिरचा फॅन असल्याने चित्रपट पाहणार आहेच. पण पीके पासून आमिरच्या अभिनयात एक तोच तोच पणा जाणवतोय.

In reply to by प्रचेतस

चिन्मना 15/08/2022 - 16:34
खरे आहे. आमिर खानच्या अभिनयात आता तोचतोचपणा जाणवू लागला आहे. त्यामुळे आमिर खान आवडत असूनही हा पिक्चर कदाचित पाहणार नाही. ओटीटीवर आल्यावर ठरवू. मात्र परीक्षण नक्कीच आवडले.

विवेकपटाईत 15/08/2022 - 18:25
पूर्वी हिंदी सिनेमात प्राण हिरोईनच्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये अफूची गोळी मिसळायचा. पण हिरो सावध असल्यामुळे हिरोईन नेहमी वाचायची. तसाच हा सिनेमा आहे. सोशल मीडियाने सिनेमाचा हेतू उघड केला. कलाकार उत्तम असेल तर टूल किटचा उद्देश साध्य होतो. जसा माचिस सिनेमात झाला होता. तो सिनेमा पाहिल्यावर अनेकांचे मत झाले सरकार, प्रशासन, पोलीस अत्याचारामुळे लोक आतंकवादी बनतात. आतंकवादी कोमल हृदयाचे चप्पा चप्पा गाणारे असतात. ज्या सिनेमात मंद बुध्दीचा सैनिक दाखविला आहे. त्या सिनेमाची प्रशंसा करणारा लेख इथे चालतो. शेवटी विचार स्वतंत्रता महत्वाची. फक्त इतिहासाचे सत्य दाखविणारा माझा लेख मात्र संपादकांनी उडविला होता. किमान आता तरी पुन्हा धाग्यावर संपादकांनी दाखविण्याचे धारिष्ट्य दाखवावे.

डँबिस००७ 15/08/2022 - 22:21
लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा भारतीय जनतेने लोकशाहीत मान्य अश्या पद्धतीने बॉयकॉट करुन फ्लॉप यशस्वी केल्याने सगळ्या पुरोगाम्यांचे व लिबरल्सचे धाबे दणाणले आहेत. एक तर शांततापुर्ण खळ्ळ खट्याक न करता सुद्धा आपला विरोध दाखवु शकतो हे प्रकर्शाने जाणवले. भारतात गोदी मिडीया चालवणार्या उजवीकडे कलंडलेल्या केंद्र सरकारचा ह्या सिनेमाविरुद्ध कोणत्याही निर्देश नसतानाही असा बॉयकॉट यशस्वी केल्याने जनतेचे अभिनंदन ! लाल सिंग चढ्ढा सिनेमा पुर्ण डब्ब्यात गेल्यावरही तो सिनेमा म्हणजे अप्रतिम कलाकृती होती अस सांगणारे मिडीयातले "ध्रुव राठी" सारखे लोक पैसे घेऊनच आपले मत मांडतात हे पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध झाले. आमिर खान हा "देश प्रेमी" आहे त्यामुळे माझ्या सिनेमाचा बॉयकॉट करु नका अस विनवत राहीला पण त्याच्या सिनेमाचा बॉयकॉट हा तो हिंदु हेटर आहे म्हणून हिंदु जनतेने केलेला आहे हेच त्याला उमगले नाही. स्वःताला देश प्रेमी आहे अस जनतेला समजवणार्या आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच. काही वर्षांपुर्वी उप राष्ट्रपती असलेल्या हामिद अंसारी ने सुद्धा १५ ऑगस्टला झेंड्याला सलाम न करण्याचा हक्क बजावला होता. त्यावेळेला ही लिबरल्सनां त्यात काही गैर वाटल नाही. पण फक्त मुसलमानांसाठी जन्मलेल्या पाकिस्तानातले लोक नेते, मौलवी, अध्यक्ष सर्वेच पाकिस्तानच्या सब्ज परचमला ( हिरव्या झेंड्याला) सलाम करतात. त्यावेळेला त्यांचा ईस्लाम धर्म त्यांच्या अश्या वागण्याच्या आड येत नाही. मग भारतातल्याच मुसलमानांना तिरंग्याला सलाम करताना ईस्लाम का आड येतो ? सलमान रश्दी ह्यांच्या वर सॅटॅनिक वर्सेस (१९८८) नावाच पुस्तक लिहील्यानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर व त्यांच्यावरच्या ईराणच्या खोमेनीने काढलेल्या फतव्या नंतर १० वर्षांनी एका २४ वर्षांच्या युवकाने ( हादि मतार) चाकुने न्युयॉर्क मध्ये हल्ला केला. सॅटॅनिक वर्सेस कधीही न वाचलेल्या ह्या युवकाच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या व त्याने अश्या लेखकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला ज्याच्या बद्दल काहीही माहीती सुद्धा नव्हते. आमिर खानच्या सिनेमांनी ह्यांच्या भावना कश्याकाय दुखतात अस विचारणार्या लोकांना माझा प्रश्न एकच आहे. हिंदुंच्या भावनाना केराची टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ?

In reply to by डँबिस००७

चौकस२१२ 16/08/2022 - 03:12
हिंदुंच्या भावनाना केराची टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ? हाच तर मंत्र आहे स्वतःला पुरोगामी न्हाणवून घेणाऱ्यांचा आता यावर अरुंधती रॉय ताई / महेश भट इत्यादी काय म्हणतात हे बघणे रोचक ठरेल का यात हि त्यान्ना फॅसिष्ठ हात दिसेल !

अर्धवटराव 15/08/2022 - 22:31
म्हणजे आम्हि शितावरुन भाताची केलेली परिक्षा चुकली म्हणायची.. ट्रेलर वरुन तर चित्रपट फारच गचाळ वाटला. आमिर खानचा म्हणुन धूम-३, ठग्स ऑफ हिन्दुस्तान, मंगल पांडे वगैरे चित्रपट बघितले तेंव्हा उगाच पैसा/वेळ वाया गेल्याचा फील आला होता. लाल सिंगचा ट्रेलर बघुन तर निदान खास टिकीट काढुन सिनेमा बघायला जायचं नाहि हेच ठरवलं होतं.. पण आता सोत्रींनी तारीफ केली आहे म्हटल्यावर परत विचार करतोय...

तर्कवादी 16/08/2022 - 00:58
पीके सिनेमातील काही दृष्य ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत आणि त्यामुळे आमिर खान हा हिंदू विरोधी ठरवला गेला !! .. पीके सिनेमातली दृष्य ही खरेच हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत असं मानूयात. पण तरी त्याचा दोषी आमिर खान ? म्हणजे निर्माता-दिग्दर्शक-लेखक विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी यांनी फक्त झोपा काढल्यात आणि "कर रे बाबा तुला वाटतील ती दृष्य आणि तुला आवडेल ते संवाद तू म्हण" असं आमिरला मोकाट सोडलं होतं का ? चित्रपटातील कथा/पटकथा/संवाद /आशय ही लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी असते की अभिनेत्याची ? पीके नंतर चोप्रा-हिरानी-जोशी या त्रयींचा संजू नावाचा - एके ५६ रायफल बाळगणार्‍या संजय दत्तचे काहीसे उदात्तीकरण करणारा चित्रपट आला आणि ५८६ कोटी कमावून गेला. पण त्यावेळी बॉयकॉटची हाक आली नाही ते कसे ? बाकी लालसिंग चढ्ढा मी पाहिला नाही - आणि बहुधा बघणारही नाही- कारण एकतर आमिर खानचा अतिरेकी अभिनय - मला आमिर खानचा "तलाश" मधला अभिनय जास्त आवडतो- पण त्याने तसा अभिनय केला की चित्रपट फ्लॉप होतो - तर ते असो. आणि दुसरी गोष्ट - मी बघितलेल्या चित्रपट परिक्षणाच्या एका चित्रफितीनुसार कमी बुद्ध्यांकचा व्यक्ती भारतीय लष्करात भरती केलेला दाखवणे हे मुळातच गंडलेले कथानक आहे. फॉरेस्ट गम्प या अमेरिकी चित्रपटासाठी ते कथानक योग्य ठरते कारण अमेरिकेने व्हिएतनाम युध्दाच्या वेळी असला भयंकर प्रकार केला होता त्यामुळे त्यांची युद्धात खूप जीवित हानीही झाली होती (मी याबद्दल मुळातून वाचलेलं नाही सदर चित्रफितीत जे सांगितलंय ते मी लिहित आहे, त्यामुळे तपशीलात काही त्रुटी असू शकतील). पण भारतीय सैन्यात असला काही भयंकर प्रकार कधी घडलेला नाही. त्यामुळे अतुल कुलकर्णींना मूळ अमेरिकी चित्रपट कितीही आवडला असला तरी त्याचे भारतीयीकरण करण्याची कल्पना मुळातच चुकलेली आहे असे मला वाटते.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 16/08/2022 - 04:54
चोप्रा-हिरानी-जोशी तर्कवादी तुम्ही निदर्शनास आणून दिलेला हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे हे मान्य पिके मधील एकांगि पणा बद्दल अर्थातच चोप्रा-हिरानी-जोशी जबादार आहेत , आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो ... यौग्य नाही माहित आहे पण आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही किंवा तसा हेतू नाही

In reply to by चौकस२१२

तर्कवादी 16/08/2022 - 17:48
आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही किंवा तसा हेतू नाही
निदान मिपाकरांमध्ये तशी प्रवृत्ती नाही हे समजून बरे वाटले. पण इतर समाजमाध्यमांवर अशी प्रवृत्ती ही आढळून येते. मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्‍या पोलीस अधिकार्‍याची भूमिका रंगवली होती. बाकी या विषयावरही ध्रुव राठीची चित्रफीत बघण्याजोगी आहे.
आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो .
आमिर, शाहरुख, सलमान व अक्षय कुमार या चौघांचे चित्रपट हे मुख्यतः त्यांचे चित्रपट म्हणूनच ओळखले जातात. चित्रपटाच्या यशापयाशाचे श्रेय (वा दोष) दिग्दर्शकापेक्षा या नायकांना जास्त दिले जाते त्यामुळे असेल कदाचित. शाहरुख व सलमान हे अनेकदा त्यांच्या चित्रपटाचे निर्माते/सहनिर्मातेही असतात. तर सलमान सारखा अभिनेता चित्रपट करताना स्वतःच्या चाहत्यांचा खूप विचार करतो हे ही दिसून येते. पण तरी काहीही असले तरी माझ्या मते अंतिम जबाबदारी ही दिग्दर्शक व निर्माता यांचीच असली पाहिजे. खास करुन पीके बद्दल बोलायचे तर विवि चोप्रा, हिरानी हे स्वतः प्रथितयश व्यावसायिक आहेत. मुन्नाभाईच्या चित्रपटांमुळे हिरानीचे नाव आधीच खूप मोठे झाले होते. त्यामुळे अगदी आमिर खान सारखा अभिनेताही पटकथेत काही ढवळाढवळ करु शकला असेल असे संभवत नाही.

In reply to by तर्कवादी

मदनबाण 16/08/2022 - 22:02
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्‍या पोलीस अधिकार्‍याची भूमिका रंगवली होती. आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare

In reply to by मदनबाण

तर्कवादी 17/08/2022 - 00:15
आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद. पण आता थोडी अधिक माहिती घेवूयात. पण त्या आधी काही प्रश्न : Anti India म्हणजे काय ? हे काही देशविघातक कृत्त्य असेल आणि देशविघातक कृत्त्य करणार्‍यांना आमिर खान पैसे पुरवत असेल तर काही गंभीर गुन्हे दाखल होवू शकतात , मग तसे का होत नाही ? NIA , CBI ईत्यादींकडून आमिर खानची चौकशी का होत नाही ? गेला बाजार आपल्या ED वा Income Tax चीही धाड नाही असे का ? आता थोडी अधिक आणि अगदी सहज मिळू शकलेली माहिती - आपण आणखी खोलवर ही जावू शकता सदर ट्विटमध्ये नमूद केलेली IPSMF ही संस्था काय आहे ? IPSMF अर्थात INDEPENDENT AND PUBLIC-SPIRITED MEDIA FOUNDATION च्या साईटवर गेल्यास काय दिसते ?Chief Executive Officer आहेत सुनील राजशेखर. बाकी टीम मधली नावे आहेत जयक्रिष्न ई, आदित्य नडिग, अविनाश हुकेरी , अपर्णा अय्यर, ग्रीष्मा सुकुरामन ईत्यादी. The Board of Trustees ची नावे बघू १) अमोल पालेकर (अरे बापरे !!) २) सी बी भावे [Mr. Bhave was Chairman of the Securities and Exchange Board of India (SEBI), as well as Chairman and Managing Director of National Securities Depository Limited (NSDL)[] ३) मुकूंद पद्मनाभन ४) रुक्मिणी बॅनर्जी ५) श्याम दिवाण ६) टी एन निनाण या पैकी प्रत्येकाचा संक्षिप्त परिचय या दुव्यावर आहे आणि तो आवर्जुन वाचण्याजोगा आहे. प्रतिसादाची लांबी आणखी वाढू नये म्हणून मी सगळंच पेस्ट करत नाही. बर संस्थेच्या देणगीदारांची नावे पण साईटवर आहेत. ती आता मराठीत टंकण्याचा कंटाळा करुन कॉपी-पेस्ट करतो, माफी असावी Azim Premji Philanthropic Initiatives Pvt Ltd Pirojsha Godrej Foundation Cyrus Guzder Rohini Nilekani Philanthropies Kiran Mazumdar Shaw Rohinton and Anu Aga Family Discretionary No.2 Trust, RDA Holdings Pvt Ltd Lal Family Foundation Sri Nataraja Trust Manipal Education and Medical Group India Pvt Ltd Piramal Enterprises Ltd Tejaskiran Pharmachem India Pvt Ltd, Viditi Investment Pvt Ltd, Unimed Technologies Ltd, Quality Investment Pvt Ltd यातील काही संस्थांबद्दल आपणास थोडीफार माहिती असू शकते. पण मग या सगळ्या Anti India / Anti Hindu आहेत काय ?
If you buy a ticket for #LaalSinghChaddha it means you are funding indirectly IPSMF.
मग याच न्यायाने अजिम प्रेमजींच्या विप्रोमध्ये वा अनु आगांच्या थर्मॅक्स मध्ये काम करणे म्हणजे सदर कंपन्याना नफा मिळवून देणे व पर्यायाने IPSMF देणगी मिळवून देणे झाले की !! [ Lal Family म्हणजे बहुधा Eicher Motors कंपनीचे मालक असावेत - म्हणजे बुलेट घेणंही IPSMF देणगी मिळवून देणे .. असो] तर प्रखर देशभक्त म्हणून या देणगीदार सर्व संस्थांशी संबंध तोडायला हवेत नाही का ? पण या यादीत आमिर खानचे नाव का नाही ? म्हणजे तो बहुतेक इतर देणगीदारांच्या तुलनेत खूप कमी देणगी देत असावा काय ? कंजूष कुठला.. मग त्याकरिताही त्याचा निषेध करायला हरकत नाही. बाकी IPSMF चा पत्ता बंगळूरुचा आहे. मग आणि केंद्र आणि कर्नाटकातील राज्य सरकारांनी मिळून सदर Anti India / Anti Hindu संस्थेच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत तातडीने. बाकी ट्वीट मध्ये नमूद Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. बाकीच्या २ साईट्स अजून फारशी माहिती घेतलेली नाही. पण एक गंमत म्हणजे द वायरला टाटा ट्रस्टकडूनही देणगी मिळालेली आहे (आली का पंचाईत) Wire मदनबाणजी आपण एक ज्येष्ठ मिपाकर आहात. आपल्या आसपास चालणार्‍या प्रोपागंडावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

डँबिस००७ 17/08/2022 - 02:16
तर्कवादी, Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. मदनबाण साहेबांच्या प्रतिसादाला मूद्देसुद प्रतिसाद देताना ईथे येऊन तुम्ही अडखळलात !! Alt News जर तुम्हाला Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही तर तुमच्या नजरेत जरूर काही तरी गडबड आहे. Alt News चा मालक महम्मद झूबेर हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे. https://www.google.ae/amp/s/m.thewire.in/article/law/supreme-court-mohammed-zubair-bail-uttar-pradesh/amp https://www.google.ae/amp/s/www.thehindu.com/news/national/bail-sought-for-alt-news-founder-mohammed-zubair-lawyer-says-he-is-facing-death-threats/article65610739.ece/amp/ नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे. त्याच्यामूळेच नूपुर शर्मा विरुद्ध मुसलमानात रोष निर्माण झाला व त्याची परिणीती म्हणुन १८-२० हिंदुंच्या निघृण हत्त्या झाल्या. हे तर फक्त अल्ट न्यूज बद्दल आहे. "द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे. अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!

In reply to by डँबिस००७

सर टोबी 17/08/2022 - 10:37
कसा दिला हे नीट समजावून घेतले असते तर तो अजूनही गुन्हेगार आहे हे आडून आडून सुचवण्याचा प्रयत्न केला नसता. त्याला बंदिवासात ठेवण्याचे कुठलेही सबळ कारण सरकार पक्षाकडे नव्हते आणि त्याला या उप्पर बंदिवासात ठेवता येणार नाही इतकी कणखर भूमिका न्यायालयाने घेतली आहे. एवढेच नाही तर न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून मिळाली नाही या कारणास्तव वेळकाढूपणा पोलिसांनी करू नये हे देखील न्यायालयाने पहिले. एरवी भक्त अशा बाबतीत काय म्हणतात? ते सणसणीत चपराक वगैरे?

In reply to by चांदणे संदीप

मदनबाण 17/08/2022 - 11:52
मी जे वरती ट्विट दिले आहे त्याचा संदर्भ पत्रकार अजीत भारती यांच्या व्हिडियोतुन घेतला आहे, ते पत्रकार आहेत तेव्हा त्यांनी दिलेली माहिती योग्यच असावी असा विचार करुन मी हा संदर्भ इथे दिला. मोहम्मद ज़ुबैर वर अधिक माहिती घेताना मला २ संदर्भ मिळाले ते इथे देऊन ठेवतो. या प्रोपागंडा न्ञुज नसाव्यात अशी अपेक्षा आहे. ताबीज का हुआ 'उल्टा असर' तो बुजुर्ग से 'जय श्री राम' बुलवाकर काट दी दाढ़ी: Alt News के वायरल Video का सच Unremorseful after triggering a hate wave that claimed the lives of Hindus, Mohammed Zubair returns on Twitter to whitewash Jihadi violence

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar

In reply to by डँबिस००७

तर्कवादी 17/08/2022 - 12:18
डँबिसजी मी कुठेही अडखळलो नाही.
हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे.
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद !! हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? बरं तो ट्वीट नेमका काय होता ? इथे बघता येईल ते ट्वीट. म्हणजे झुबेरने किसि से ना कहना या चित्रपटातले एक दृष्य ट्वीटमध्ये वापरले. त्याने त्यात काही फेरफार केला काय ? ते ही बघता येईल YouTube वर चित्रपट आहे. मग किसि से ना कहना या चित्रपटाचे लेखक सचिन भौमिक व दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनाही हिंदूविरोधी ठरवायला हवे. अभिनेता फारुक शेख तर बाय डिफॉल्ट हिंदू विरोधी असेलच !!
नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे.
अच्छा, मग नूपुर शर्माचे मूळ वक्तव्य काय होते त्याची चित्रफीत आपण देवू शकता का ? आणि जर नूपुर शर्माचे काहीच चुकले नाही तर भाजपने तिला पदावरुन दूर का केले असावे, शिवाय तुम्ही म्हणता तसे झुबेरने वक्तव्य तोडून मोडून दाखवले असेल तर त्याच्याविरोधात त्याबद्दल खटला दाखल करायला हवा, त्याबद्दल त्याला अटक व्हायला हवी. .. पण त्याला २०२२ मध्ये अटक करायला २०१८ च्या ट्वीटची गरज का भासली. असो,नुपूर शर्मा हे पुर्णतः वेगळे प्रकरण आहे. मदनबाण यांनी उपस्थित केलेला मूळ मुद्दा IPSMF मुख्यतः बद्दल होता, त्याबद्दलही आपण अधिक माहिती दिलीत तर आवडेलच.
"द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे.
खरंय.. मी पण द वायर बद्दलची काही माहिती वर दिली आहेच पण आपण त्या मुद्द्यावर काहीच बोलला नाहीत. असो.
अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!
हेटाळणीजनक टिप्पणी टाळावी. "अभ्यास वाढवा ", "तुम्हाला काय कळतं ?" वगैरे अर्थाची वाक्ये टाकून उगाच समोरच्याला चिडविण्याचा प्रयत्न करु नये. आपणास जी माहिती आहे ती आपण द्यावी. सगळ्या जगाचं सगळं ज्ञान कुणालाच नसतं. आपल्याकडे समोरच्यापेक्षा काही अधिक माहिती असेल तर आपण नक्कीच सांगावी पण त्यात समोरच्याची हेटाळणीकरण्याचा सूर नसावा. आपण ज्येष्ठ मिपाकर आहात आणि मिपावर सकारात्मक वातावरणात मुद्देसूद चर्चा कशा कराव्यात हे आपणास अवगत असेलच असो.

In reply to by तर्कवादी

सुरिया 17/08/2022 - 13:50
@तर्कवादी, युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे. कीपीटप. "अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.

In reply to by सुरिया

तर्कवादी 17/08/2022 - 15:00
युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे.
धन्यवाद सुरियाजी..
"अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.
आणखी ते "वाढदिवसाच्या शुभेच्छा" पण. हे सर्व हेटाळणीजनक / चिथावणी देणारे वाक्य टाळून सकारात्मक चर्चा व्हायला हवी,

In reply to by तर्कवादी

डँबिस००७ 17/08/2022 - 14:23
तर्कवादीजी, हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो. झुबरवर ८ केस दाखल झालेल्या आहेत. झुबेरला अटक करण्यासाठी २०१८ पासुन केसेस पेंडीग असताना २०२२ च्या केसवर अटक कशी करता येईल ?

In reply to by डँबिस००७

तर्कवादी 17/08/2022 - 14:57
अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो.
अर्थात आपण आपणास हवा तो अर्थ काढू शकता ? आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने विचार करुन सदर ट्वीट खरेच हिंदू विरोधी / हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे का हे पण ठरवू शकता. बाकी झुबेर हाच चर्चेचा केंद्रबिंदू करण्यात मला रस नाही. मदनबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट मधील IPSMF आणि IPSMF ला देणगी देणे हा प्रमुख मुद्दा होता त्याबद्दल अधिक चर्चा होवू शकेल.

In reply to by तर्कवादी

निनाद 18/08/2022 - 09:28
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्‍या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत. The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे. The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते. संदर्भ देणार नाही, शोधा.

In reply to by निनाद

तर्कवादी 18/08/2022 - 12:27
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्‍या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत.
असेलही कदाचित. Altnews, The Wire, The Caravan ह्यापैकी प्रत्येकी वेगळ्या धाग्यांचे विषय होवू शकतील. सहजपणे मिळालेल्या माहितीत The Wire च्या देणगीदारांत टाटा ट्रस्टचे नाव सापडले ते मी लिहिले बाकी या प्रत्येकाच्या खोलात जाण्याकरिता हा धागा योग्य नाही असे माझे मत आहे. असो. पण मदणबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट्मध्ये केलेला मूळ मुद्दा आमिर खानच्या IPSMF ला देणगी देण्यासंदर्भात होती. त्या IPSMF बद्दल मी बरीच माहिती दिली आहे. त्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये अमोल पालेकर आणि इतर काहि दिग्गजांची नावे आहेत. देणगीदारांत अनु आगा, अजिम प्रेमजी यांच्या ट्रस्टची नावेही आहेत. पण या मुद्द्यांवर पुढे चर्चा झालीच नाही.. असो.
The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे.
असे म्हणतात का ? म्हणत असतील बुवा ...
The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते.
शक्य आहे. वरील ट्वीट ज्यांचे आहे ते विजय पटेल भाजपचे कार्यकर्ते आहेत. तर राजकीय पक्षांच्या नेते / कार्यकर्ते स्वतःच्या संस्था, युट्युब चॅनेल चालवू शकतातच की.
संदर्भ देणार नाही, शोधा.
नाही देणार तर नका देवू संदर्भ.. आग्रह नाही..मला जेवढी शोधाशोध कराविशी वाटली तेवढी केली आणि इतके मला समजले की IPSMF ला देणगी देणे हा काही गुन्हा नाही की पाप नाही !!

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 30/08/2022 - 15:55
पीके चित्रपटामुळे अभिनेता आमिर खानला (फक्त अभिनेताच हं.. लेखन, दिग्दर्शन , निर्मितीत त्याचा सहभाग नव्हता) बहिष्काराला सामोरे जावे लागत असेल तर जितेंद्र जोशींनी (अभिनेते आणि निर्मातेसुद्धा - चित्रपट गोदावरी) या एकाच दृष्यातून त्यांच्या पुढील सात जन्माच्या चित्रपटांवर बहिष्कार घालायची सोय करुन ठेवलीये असे म्हणता येईल... अरे हो पण इतके पाप केल्यावर त्यांच्या आत्म्याला गती वगैरे मिळून पुनर्जन्म लाभेला का हा देखील प्रश्नच आहे म्हणा !! असो.. दृष्य बघा.. हॅव फन !!

In reply to by तर्कवादी

मदनबाण 30/08/2022 - 17:21
जाता जाता :- च्यामारी आमिरच्या बुडास लागलेली आग विझली असेल मला वाटले होते, पण त्याच्या डाव्या भक्तांची अजुन मजबुत जळतेय इतकं मात्र नक्की ! :))) ते काय म्हण हाय ? हं, गिरे तो भी टांग उप्पर ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)

डँबिस००७ 16/08/2022 - 01:08
"मदनबाण" तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली. अगदी नेमक्या शब्दात तुम्ही लिहीलत. ईतक असुन सुद्धा काही आपलच कस खर हे सांगत आहेत. काश्मिर फाईल्स वरच्या धागा आल्या आल्या, तो सिनेमाचा विषय राहीला बाजूला तर "विवेक अग्नीहोत्री" कसा वाईट हे सांगण्यासाठी ह्यांनी किती आटापीटा केला होता ते आठवले.

आग्या१९९० 16/08/2022 - 08:34
दाभोलकरांना फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दिसतात, इतर इतर धर्मातील दूर करायची हिम्मत करत नाही असे काही आक्षेप घ्यायचे. आमिर खान हिंदूंच्या अंधश्रध्दाबद्दल काही बोलला तर त्यालाही नावं ठेवायची. म्हणजे एका हिंदूंनी दुसऱ्या धर्मात ढवळाढवळ केली तर ते ह्यांना चालणार ,फक्त आमच्या धर्मात करू नका.

चौकस२१२ 16/08/2022 - 10:31
आग्या ... म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ... ती हिंमत नाही यांच्यात मग ते समाज कार्यातून असो, समाजप्रबोधनातून असो , कलाकृतीतून असो , चित्रपट / नाटक / साहित्यातून असो काह्ही माध्यम असले तरी हा नियम पाळावा पिके मधील हिंदू धर्मातील अंधश्रद्धा बाहेर आणली यात माझ्यसारख्याला चांगलेच वाटते .. पण ते करताना इतर धर्मातील अश्या चालिरीनवर जास्त बोलण्याची हिंमत हे लोक दाखवत नाहीत .. हा ढोंगी पणा आता उघडकीला आलाय .... दिसला हिंदू कि मार टपली .. लै सहन केलं मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .

In reply to by चौकस२१२

आग्या१९९० 16/08/2022 - 21:01
म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ... ती हिंमत नाही यांच्यात अनिसचे संबंधित धर्माचे कार्यकर्ते त्यांच्या धर्मातील अनिष्ट रूढी निर्मूलनाचे कार्य करत आहेत. शुद्ध हेतू ठेवून तुम्हीही हे काम करण्याची हिम्मत करू शकता. फक्त बोटं दाखवण्याचा शुरपणा सोडावा लागेल.

In reply to by सुखी

आग्या१९९० 16/08/2022 - 22:35
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/mumbai-news/controversial-miracle-man-passes-away-in-vasai/story-7ffxk1zATKeY2xQaZSOKQM_amp.html अनिसला साथ द्या. त्यांच्या सोबत काम केले की बऱ्याचशा शंका दूर होतील. अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.

In reply to by आग्या१९९०

वामन देशमुख 16/08/2022 - 23:26
अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.
हमीद दाभोलकरांनी लेखी हमी दिलीय का? अंनिस ने हमीद दाभोलकरांना माफ केलंय का? संदर्भः http://www.misalpav.com/node/37392 तिथून साभारः विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले. सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले. हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या! बाकी चालू द्या.

In reply to by चौकस२१२

तर्कवादी 17/08/2022 - 00:39
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .
हलाला तर नाही पाहिला पण शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा (मशिदीवरील भोंग्याचा विषय) पाहिला, अतिशय आवडला आणि या चित्रपटाबद्दल (तसेच हलालाबद्दलही) मुस्लिम संघटनांनी शिवाजी पाटील यांचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही.

In reply to by तर्कवादी

मदनबाण 17/08/2022 - 11:00
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय मी हा चित्रपट पाहिला आहे.उत्तम चित्रपट आहे. जेव्हा या चित्रपटा बद्धल बोलले जात होते तेव्हा या चित्रपटाच्या निर्म्याताचा एक व्हिडियो मी मिपावर दिल्याचे स्मरते. आज तो व्हिडियो इथे परत देतो. चित्रपट प्रदर्शीत झाल्यावर काही आंदोलने झाली की नाही या बद्धल माहिती नाही,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते. सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता. एका शीख व्यक्तीचे मुस्लिम मुली बरोबर लग्न होऊन ती नंतर गर्भवती होऊन मुलास जन्म घालते, तसेच तीचे नाव सकीना होते हे सुद्धा अशांती दुतांना सहन झाले नव्हते. जितक मला माहित आहे त्यानुसार बहुतेक भोपाळ मध्ये थेटर देखील जाळण्यात आले होते. संदर्भ :- Religious protests against period film Gadar put free speech on the boil Gadar Protests In Lucknow 'Disruption of 'Gadar' part of sinister plan'

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar

In reply to by मदनबाण

तर्कवादी 17/08/2022 - 15:53
,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते.
२०१६ साली चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून त्रास झाला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. RC मध्ये चित्रपट पास केला त्यावेळी ८ मुस्लिम व्यक्तीही ज्युरी म्हणून आल्या होत्या हे पण निर्माता कागणे याने सांगितले आहे. आणि त्यानंतर निर्मात्याने भोंगा चित्रपट बनवला. असो.
सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता.
हे खरंय.आणि सर्वच धर्मातील माथेफिरु धर्मांधाचा निषेध करायला हवाच. गदरच्या वेळी गदारोळ झाला होता हे मलाही आठतंय. तसेच बॉम्बे चित्रपटातही नायिका मुस्लिम व नायक हिंदू असल्याने काही मुस्लिम संघटनांकडून विरोध झाला होता. मुंबई दंगलींचा विषय तसा ताजाच होता, अतिशय संवेदनशील विषय होता. काही निदर्शने हिंसकही असावीत बहुधा. पण या सगळ्यांची व्याप्ती किती होती ते आता आठवत नाही. मी हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात जावून बघितले होते. बॉम्बे प्रदर्शित झाला तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या आई वडिलांनी काळजीपोटी आधी मला चित्रपटगृहात जाण्याची परवानगी दिली नाही. पण नंतर पुण्यात तरी काही गडबड झाल्याच्या विशेष काही बातम्या आल्या नाहीत तशी मला परवानगी मिळाली आणि मी दापोडीच्या अरुण या चित्रपटगृहात एकट्याने जावून बॉम्बे चित्रपट पाहिला.

गवि 16/08/2022 - 13:08
अनेक प्रतिसाद सिनेमा न बघताच आल्याचे (नेहमीप्रमाणे) दिसते. हे रोचक आहे. कोणाची तरी मते, अर्धवट सीन, ट्रेलर असे पाहून फायनल आग्रही आणि तपशीलवार मत देणे. स्टाम्प मारणे हे अनाकलनीय आहे. पुलंचे अंतूशेट जसे झापे बाजूला करुन घटकाभर एकच प्याला नाटक झलक रुपात बघतात आणि "सिंधूचा पार्टी कन्डम, यापेक्षा दशावतारी बरे" अशी निर्णायक मते देतो तसे काहीसे सर्वत्रच घडताना दिसते. मग मत अति समर्थक असो किंवा अति विरोधी.. चित्रपट प्रत्यक्ष बघितला की बहुतांश वेळा जी हवा केली गेली होती तसे तितके त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते असे सिद्ध झाल्याचीच उदाहरणे आहेत. अर्थात अद्याप चित्रपट बघितला नसल्याने चित्रपटाबद्दल निवाडा देणे शक्य नाही. केवळ निरीक्षण नोंदवले.

चित्रपटाची ओळख आवडली. पाहणे आहेच. पण, चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, असे जे वाटायचे त्याची परिक्षण वाचून खात्री पटली. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 17/08/2022 - 10:20
बिरुटे सर चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार? एक टक्का सुद्धा नाही याची मला १०० % खात्री आहे. पुरोगामी दुटप्पीपणा हा असा असतो.

In reply to by सुबोध खरे

जेम्स वांड 17/08/2022 - 15:11
सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार?
असे वाचन वगैरे न करणारे अजून काही उपरे आता दिल्लीत राहणार आहेत रेफ्युजी म्हणून. रोहींग्या म्हणतात बुआ त्यांना.

In reply to by आनन्दा

>>> आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट campaign मुळे पडला? नै नै...लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते. उलट या बायकॉटमुळे सिनेमा उरलेल्या दिवसात सिनेमा अधिक चर्चेत राहील. आज सिनेमा पाचव्या दिवशी पन्नास कोटीच्या जवळ जवळ पोचला आहे. माध्यमांमधून सिनेमाला 'मिला जुला रिस्पॉन्स मिल रहा है' अशा बातम्या आहेत त्यामुळे सिनेमा नफ्यात राहणार आहे. सिनेमा शौकीन पब्लिक तर, सिनेमा पाहिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते.
हा सिनेमा कारणांमुळे पडला ( म्हणजे अपेक्षित यश नाही )- १. खान मंडळींविरुद्ध / प्रस्थापित बॉलिवूड कलाकरांबद्दलचा रोष २. काश्मीर फाईल्स नंतर प्रस्थापित हिरो हिरविनी 'खर्‍या' म्हणजे आधुनिक हिंदू अस्मितेच्या प्रश्नांना भिडत नाही हा पसरलेला समज ३. नेत्रदीपक दाक्षिणात्य चित्रपटांपुढे बॉलीवूड फिके आहे असा पसरत चाललेला समज ४. आमीर खान/ किरण राव यांची तथाकथित देशद्रोही वक्तव्ये ( जी इथून पुढे आयुष्यभर त्यांना छळत राहणार ) ५. बॉयकॉट मोहीम शिवाय या बॉयकॉट मोहीमेने "एनी पब्लीसिटी इज गुड पब्लिसिटी" अशी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजिदेखील चालतेच हा गैरसमज खोडून काढला. अर्थात हे चित्रपट निर्मात्यांनाच लागू आहे. स्वतः आमिर खानचे इन्स्टा/ट्विटर अनुयायी वाढलेच असतील. नवराष्ट्रवादी अदलित लोकांनी झुंड देखील असाच मुद्दामहून नाकारला. त्यात राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, जातद्रोही, पंथद्रोही, भाजपद्रोही, मोदीद्रोही, रास्वसद्रोही काहीही नव्हते. त्यामुळे इथून पुढे "रंग दे बसंती", "लगान", "दिल चाहता है" सारखे एखादी पिढी झपाटणारे चित्रपटसुद्धा तयार होतील का नाही याची मला खात्री वाटेनाशी झाली आहे. तुलनेने दक्षिणी प्रेक्षकांत एखाद्या हिरोप्रती निष्ठा जास्त ठळक असल्याने आणि त्याचवेळी प्रयोगशीलतेचे चाहते असणारे लोकही अनेक असल्याने तेच अशी रिस्क घेऊ शकतात. त्यामुळे उत्तरेकडचे किंवा बॉलीवूडचे चित्रपट आता गायपट्ट्यातील अदलित नवराष्ट्रवादी भारतीयांना शरण जाणार हे नक्की.

डँबिस००७ 16/08/2022 - 19:04
लाल सिंग चढ्ढा मुळे बरेच सेलिब्रीटी आता लाईनीवर आलेत. काही दिवसांपुर्वी ला.सिं.च. च्या बॉयकॉटची खिल्ली उडवत एका कार्यक्रमात कॅमेरा समोर "आम्हाला सूद्धा बॉयकॉट कराना प्लिज" म्हणणार्या अनुराग कश्यप व तापसी पन्नु ला आता ऊपरती झालेली आहे. तापसी पन्नु सारख्या अत्यंत अहंकारी हिँंदु हेटर अभिनेत्रीचे आता तेवर बदलले दिसत आहे. बॉयकॉटची भिती र्‍हितीक रोशनला सूद्धा भेडसावत आहे.

कपिलमुनी 16/08/2022 - 21:32
बॉयकॉट गँग मुळे पिक्चर चालात किंवा पडत असते तर भाजप क्वीन कंगनाचे पिक्चर सुपरहिट झाले असते.. खुद्द शेठ चा पिक्चर सुपर फ्लॉप आहे तर बाकीच्यांची काय कथा... भूल भू २ हिट झालाच की... लोकांना वेगळा विषय , फ्रेश चेहरे हवे आहेत... आणि सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत

डँबिस००७ 16/08/2022 - 22:51
ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या शुटींग करता तुर्कस्तानात जाऊन लेडी एर्दोगनला तिच्या महालात जाऊन भेटलेला आमिर खान स्वःताला देश प्रेमी म्हणवतो. कौन बनेगा करोडपती मध्ये झेंड्याला सलाम न करणारा आमिर खान आपल्या घरावर तिरंगा फडकवतो, ह्यांना वाटत जनतेला (हिंदु) सहज मुर्ख बनवता येते.

In reply to by डँबिस००७

निनाद 18/08/2022 - 09:38
ह्यांना वाटतं हिंदु जनतेला सहज मुर्ख बनवता येते.- पण समाज जागा झाला आहे आणि हेच त्यांना पचत नाहीये. हे समाजद्रोही ठेचलेच पाहिजेत. मी पैसे देऊन खान लोकांचा पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना. त्यानंतर यांना पैसे कधीही दिलेले नाहीत, मरेस्तोवर कधी देणारही नाही! सिनेमा पडेल आहे अभिनेता उघडा पडलेला आहे. तेच ते व्हिएफएक्स चे तारुण्य आणि तोच तो माकडछाप अभिनय लोक तरी कितीकाळ पाहणार?

सुबोध खरे 17/08/2022 - 10:36
आमीर खान ने आपला दुटप्पीपणा अनेक वेळेस सिद्ध केलेला आहे. इरोडगन यांच्या बायकोला भेटल्यापासून तर तो लोकांच्या मनातून साफच उतरला आहे कुठेही कधीही समाजसुधारक लोकाना केवळ हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा कशा काय दिसतात? हे एक कोडे आहे. भेकड पणा हा पुरोगामी लोकांचा स्थायीभाव असल्याने इस्लाम मधील सरळ सरळ दिसणाऱ्या अन्धश्रद्धा आणि अमानुषपणा बद्दल त्यांची तोंडे कायमच बंद असतात. भारतात प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक अधिकारांबद्दल उच्चरवाने बोम्ब मारणाऱ्या पुरोगाम्यांनी तलाकपीडित महिला भारतात किती आहेत याची साधी आकडेवारी सुद्धा उपलब्ध नाही या बद्दल कधी तोंड उघडलेले मी पाहिलेले नाही. भारतीय राज्यघटनेबद्दल दुहाई देणारे सर्वच पुरोगामी समान नागरी कायदा सारख्या घटनेच्या मूलभूत कलम ४४ बद्दल गेली ७५ वर्षे कधीही आग्रहाने बोलताना दिसत नाहीत. Article 44 in The Constitution Of India 1949 44. Uniform civil code for the citizens The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India शेवटी एकच म्हणावेसे वाटते. उद्या दाऊद इब्राहिम ने जर चित्रपट काढला आणि त्यात दिग्गज कलाकार असतील तरी कलेसाठी कला म्हणून मी तो कधीही पाहणार नाही. हि एकच वृत्ती आहे कि जे म्हणतात पाकिस्तानी क्रिकेटर्सची काय चूक आहे? त्यांना पण भारतात बोलवा आणि आय पी एल मधून कोट्यवधी रुपयांची खैरात करा. बॉलिवूड कडे एकंदर पैसा कुठून आणि कसा येतो याची माहिती मिळाल्यानंतर गेली कित्येक वर्षे एकंदर सिनेमे पाहणेच मी बंद केले आहे. त्यामुळे लालसिंग चड्ढा कसाही असला तरी मला शष्प फरक पडत नाही.

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 17/08/2022 - 10:44
" होईना काही, जीवाची लाही ". सध्या पुरोगाम्यांचे सरकार नाही ना? करा ना अहिंदू धर्मातील अंधश्रद्धा दूर. किती दिवस पुरोगाम्यांचे तुणतुणे वाजवणार?

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० 17/08/2022 - 10:56
डोळे बंद करून पातळी कशी समजते? काही सिद्धी प्राप्त झाली का? उपाय योजना करा प्रत्येक समस्येवर. सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते.

चित्रपट समीक्षण - एकदा काय झालं...

श्रीगणेशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- "एकदा काय झालं..." ही एक गोष्टींची गोष्ट -- https://youtu.be/WTxGpSs5UaY ---- ही कथा म्हणजे वडील-मुलाच्या नात्यावर खूप वेगळं, नवीन काहीतरी असावं, अशी अपेक्षा ट्रेलर मधून निर्माण होते. गोष्टींतून जगणं शिकणारा, शिकविणारा बाप, आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या सर्वस्वी अवलंबून असणारा मुलगा, गोष्टींतून चालणारं शाळेतलं शिक्षण, सर्व काही उत्सुकता ताणणारं! तशी कथा थोडी अनपेक्षित वळण घेते मध्यावर, पण एवढीही नवीन वाटत नाही.

अधुनिक तीर्थक्षेत्रे....

कर्नलतपस्वी ·

सावरकरांची ही कविता मला ज्ञात नव्हती . ही कविता खरेच सावरकरांनी लिहिली असेल तर , कट्टर हिंदुत्ववादी असुनही , मला सावरकरांची कीव करावीशी वाटते. भगतसिंगाच्या बाबतीत सावरकारांचा अभ्यास किती होता देव जाणे . पण भगतसिंग सोशॅलिस्ट कम्युनिस्ट विचारसरणीचा माणुस होता. आज तो जर जिवंत असता तर अन्य सोशॅलिस्ट कम्युनिस्ट विचारसरणीचे लोकं जसे सावरकरांना व्हिलन मानतात , माफीवीर म्हणातात , आणि काहीकाही तर स्वातंत्र्यवीर ह्या शब्दाची विटंबना करुन संडासवीर असे म्हणतात तसेच भगतसिंगानेही म्हणले असते ह्यात शंका नाही. एकवेळ ते इंग्रज परवडले पण कम्युनिस्ट नको . अगदी खिलजी, औरंगजेब अन अब्दाली ही परवडतील पण कम्युनिस्ट नको . बाकी राजगुरुंविषयी जास्त माहीत नाही , फोटो पाहिले घर साधेसे पण छान दिसत आहे , नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते !

In reply to by प्रसाद गोडबोले

अपरिपक्व व पूर्वग्रहदूषित प्रतीसाद वाचून घोर निराशा झाली. दुश्मनी मृत्यूनंतर संपते असे सेनेत शिकवले जाते. संपूर्ण कुटुंब पारतंत्र्यात होरपळून निघाले,इंग्रजासारख्या बलाढ्य सत्तेला भिती वाटली म्हणून फाशीची शिक्षा दिली. गपचुप अंत्यसंस्कार केले. भले विचार पटत नसतील पण प्रत्येक स्वतंत्रता सेनानी आदरणीय वाटतो. मराठी माणसाला क्रांतिवीर राजगुरू बद्दल माहीत नसावे वाचून वाईट वाटले. पंजाबात देवासमान यांना मानतात. घर छोटे वाटते, एकदा येवून बघा समजेल . राजकिय मत व देशभक्ती यातला फरक समजत नसेल तर स्वतःचे मत स्वतः जवळ ठेवले तर बरे होईल. जर तर च्या भाषेला काहीच किंमत नसते. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान, त्याग केला त्याच्याबद्दल राजकीय मते बाजुला ठेवून कृतज्ञता बाळगायलाच हवी कारण यज्ञात प्रत्येक समिधा महत्वाची असते. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याचा प्रयत्न करू नका. श. भगत सिह करोडो लोकांच्या हृदय सिंहासनावर मृत्युंजय बनून बसले आहेत. आपल्याला पुजणारे जाऊ द्या ओळखणारे किती याची यादी तपासुन पहा. शहरातील पाच पुतळे... मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले , मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद्गारले , मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती ! - कुसुमाग्रज

In reply to by कर्नलतपस्वी

तुम्ही गडबड करत आहात . रिअ‍ॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम मधील फरक लक्षात घ्या. भगतसिंग कम्युनिस्ट / सोशॅलिस्ट होता आणि आजच्या काळात एकही कम्युनिस्ट सोशॅलिस्ट सावरकारांच्या विषयी गौरवोद्गार काढत नाही ही वस्तुस्थिती आहे. एकदम रिअ‍ॅलिझम . भगतसिंग जिवंत असते तर त्यान्नीही सावरकरांना शिव्याच घातल्या असत्या ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्यात काही जरतर नाहीये , एकदम रिअ‍ॅलिझम .
राजकिय मत व देशभक्ती यातला फरक समजत नसेल तर स्वतःचे मत स्वतः जवळ ठेवले तर बरे होईल.
सोशलमीडीयावर सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथे पुरोगामी महाराष्ट्रात सावरकरांना संडासवीर म्हणतात , टिळकांना भटमान्य टिळक म्हणातात , त्यामानाने मी काहीच बोललेलो नाहीये. मी माझे मत व्यक्त करत राहीन , तुम्हाला हरकत असेल तर तुम्ही दुर्लक्षित करु शकता . पण दुसर्‍याचा आवाज दाबणे , त्याचे मत मांडूच न देणे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रतीक झाले , आपण असे करत इछित असाल तर मात्र त्याला जमेल तिथे जमेल तसा विरोध करत राहाने हे माणुस म्हणुन मी माझे कर्तव्य समजतो.
आपल्याला पुजणारे जाऊ द्या ओळखणारे किती याची यादी तपासुन पहा
. त्याने काय फरक पडतो ? खुनी कम्युनिस्ट चे गव्हेरा ला जगभर लोकं पुजतात , त्याचे फोटो टी शर्ट वर लाऊन मिरवतात , तो ही मृत्युंजय की फ्रित्युंजय बनुन बसला आहे म्हणुन तो ग्रेट ठरतो काय ? उगाचच काहीही . ७५ वर्षं झाली स्वातंत्र्याला . आता तरी आपण रोमँटिसिझन ची झुल उतरवुन वास्तववादी चष्म्यातुन सर्व बाजुंनी वेगवेगळ्या अँगल्स ने इतिहासातील लोकांचा विचार करायला हवा . ट्वायलाईट ऑफ आयडॉल्स मध्ये फ्रेडरिक नीचा म्हणतो तसे आपण सुध्दा फिलॉसॉफाईझ विथ हॅमर करायला शिकले पाहिजे . जे तुम्हाला आदर्श वाटत आहेत त्यांन्ना हातोडीने ठोका , जर ते टिकले तर ते खर्‍या अर्थाने आदर्श आहेत अन्यथा नाही. मी आधी लहानपणी सावरकारांचा खुप मोठ्ठा फॅन होतो पण सावरकर ह्या हातोडीच्या टेस्ट मध्ये फेल झाले आहेत . आणि भगतसिंग सुध्दा !

In reply to by प्रसाद गोडबोले

रिअ‍ॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम मधील फरक लक्षात घ्या. भगतसिंग देशभक्त होते.स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा दिला. फासावर गेले.बलिदान दिले. त्यांनी त्यांच्या विचार,बुद्धी आणी सदसद्विवेक प्रमाणे देशसेवा केली.त्याकरता त्यांना अभिवादन. ही रियालीटी आहे रोमॅन्टिसिझम नाही. त्यांची विचारसरणी वेगळी म्हणून देशप्रेम ,देशसेवा डोळ्याआड करता येत नाही. मतस्वातंत्र्य आहे असायलाच हवे. जे गेले त्यांनी देशाकरता काय केले तेवढे लक्षात घ्या.त्यांची विचारधारा पटत नाही म्हणून असभ्य भाषाप्रयोग करणे उचित नाही असे मला वाटते. बाकी माझ्या लेखा मुळे किवा तु म्ही दिलेल्या प्रतिसादाने कुणाचे मत बदलेलं असे काही नाही . प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणी पूर्णविराम.

In reply to by कर्नलतपस्वी

आता तुम्ही विषय बदलत आहात .
असभ्य भाषाप्रयोग
माझ्या प्रतिसादात भगतसिंग बद्दल एक जरी असभ्य भाषा प्रयोग दिसल्याचे दाखवा , मी तात्काळ माफी मागेन . अन तसेही आमचे प्रतिसाद उडवायला अनेक लोकं उत्सुक असतात मिपावर . काही गैर लिहिले असेल तर तो प्रतिसाद क्षणार्धात उडवला जाईल. बाकी हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं सावरकरांना संडासवीर अन टिळकांना भटमान्य टिळक म्हणतात ही फॅक्ट आहे . हा मी केलेला असभ्य भाषाप्रयोग नसुन , मी केवळ वस्तुस्थिती दाखवुन तुमचे डोळे उघडायचा प्रयत्न केला आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

क्लिंटन 13/08/2022 - 16:07
कर्नलतपस्वींच्या एका उत्तम प्रवासवर्णनपर लेखात फाटे फुटायला नकोत पण तरीही विषय निघालाच आहे म्हणून हा एकच प्रतिसाद लिहितो. यावर आणखी काहीही लिहिणार नाही. तुमच्याइतकाच मी पण कम्युनिझमचा विरोधक आहे हे आतापर्यंत वेगवेगळ्या चर्चेत लिहिलेच आहे. त्याविषयी शंका नसावी. तरीही भगतसिंगांविषयी दोन गोष्टी लिहिता येतील. ते फासावर गेले तेव्हा ते २३ वर्षांचे होते. असे म्हणतात की तुम्ही वयाच्या २० व्या वर्षी कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या ४० व्या वर्षी कम्युनिस्ट राहिला असाल तर तुम्हाला डोकं नाही. भगतसिंग त्याच स्वप्नाळू वयातील होते. याचा अर्थ ते आयुष्यभर कम्युनिस्टच राहिले असते असे नाही. दुसरे म्हणजे भगतसिंग फाशी गेले १९३१ मध्ये. त्यावेळेस रशियात कम्युनिस्ट क्रांती झाली त्याला १३ वर्षे झाली होती. तसेच त्यावेळेस दळणवळणाची साधने आताच्या मानाने बरीच मर्यादित होती. त्यामुळे कम्युनिझमचे काय वाईट परिणाम होऊ शकतील याची माहिती भारतात कळली असेलच असे नाही. भगतसिंगांनी कम्युनिझमवर बरेच वाचन केले होते हे माहित आहे. पण नुसते पुस्तकात दिलेले वाचून कम्युनिझम बर्‍याच जणांना अपील होऊ शकेल कारण वरकरणी कोणतीही वाईट किंवा चुकीची मागणी त्यात केलेली नसते पण प्रत्यक्षात अंमलात आणायला गेल्यावर कम्युनिझम सगळीकडेच अपयशी ठरलेले दिसेल. फक्त भगतसिंग असताना त्याची उदाहरणे जगभरात दिसलेली नव्हती. त्यामुळे या बाबतीत भगतसिंगांना कम्युनिझममुळे कशी वाट लागते हे समोर दिसत असूनही त्यानंतरच्या काळातही कम्युनिस्ट राहिलेल्यांबरोबर एकाच तागडीत तोलू नये असे वाटते.
भगतसिंग जिवंत असते तर त्यान्नीही सावरकरांना शिव्याच घातल्या असत्या ह्यात तिळमात्र शंका नाही.
ही जरतरची गोष्ट झाली. नक्की काय झाले असते हे सांगायला आपल्याकडे कसलाच आधार नाही. भगतसिंग स्वातंत्र्योत्तर काळात असते आणि त्यांनी कम्युनिस्ट राज्य आणायचा प्रयत्न केला असता तर त्यांनाही विरोधच केला असता. त्यांनी सावरकरांना शिव्या घातल्या असत्या तरी ते आपल्याला मान्य झाले नसते हे नक्कीच. पण आपण ज्याला मानतो त्याला शिव्या घालणे हे एकच एखादा नेता न आवडण्याचे कारण असू नये. लालबहादूर शास्त्री सुध्दा जनसंघावर भरपूर टीका करायचे (त्या काळात टीका असली तरी ती संयत भाषेत केली जायची त्यामुळे शिव्या घालायचे असे म्हणत नाही) पण त्यामुळे १९६५ च्या युध्दात त्यांनी देशाचे केलेल्या नेतृत्वाचे महत्व कसे कमी होईल? तेव्हा समजा भगतसिंगांनी सावरकरांना शिव्या घातल्या असत्या किंवा अगदी कम्युनिस्ट राज्य आणायचा प्रयत्न केला असता तर त्याकारणासाठी भगतसिंगांनाही विरोधच केला असता. तरीही त्या परिस्थितही १९२९-३० मधील भगतसिंगांचे स्वातंत्र्यलढ्यासाठी जे काही योगदान होते त्याचे महत्व कमी होणार नाही. तेव्हा नंतरच्या काळातील ठोकताळे २२-२३ वर्षांच्या १९३०-३१ मधील भगतसिंगांना वापरू नयेत इतकेच.

In reply to by क्लिंटन

भगतसिंगांचे स्वातंत्र्यलढ्यासाठी जे काही योगदान
मी माझे सर्व प्रतिसाद परत नीट वाचले. मी कोणत्याही प्रतिसादात भगतसिंग ह्यांच्या स्वातंत्र्यातील योगदानाविषयी अवाक्षर देखील काढलेले नाही. मी कोठेही भगतसिंग ह्यांच्या विषयी असभ्य भाषेत बोललो आहे असे मलातरी वाटत नाही. तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटल्यास माझ्या निदर्शनास आणुन द्या , मला माझी चुक मान्य करायला आणि सुधारायला लाज वाटणार नाही. पण सावरकरांना माफीवीर आणि टिळकांना भटमान्य म्हणतात ही फॅक्ट आहे, राजगुरु अजुन सुपात आहेत , तेही कधीना कधी जात्यात येणार आहेतच ! (बाकी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये भारतीयांचे योगदान किती हाच बेसीक प्रश्न आहे . पण तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. )
तेव्हा नंतरच्या काळातील ठोकताळे २२-२३ वर्षांच्या १९३०-३१ मधील भगतसिंगांना वापरू नयेत इतकेच.
ओके . हा मुद्दा पटला. भगतसिंग ह्यांचे कम्युनिझम म्हणजे स्वप्नाळू वयातील, पोरसवदा वयात सगळ्यांनाच असतो तसला जोश होता, पुढे वयात आल्यावर कम्युनिझममुळे कशी वाट लागते हे पाहिले असते तर त्यांचे विचार वेगळे असते असे जर कोणी म्हणत असेल तर त्याला बेनीफीट ऑफ डाऊट देता येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

असभ्य भाषाप्रयोग तुम्ही असभ्य भाषाप्रयोग केला असे मी ही म्हटले नाही. प्रतिसादात सावरकर टिळक यांच्या बद्दल ज्या कुणी केला त्याच्याबद्दल मी बोलत आहे. एक मानसिकता समाजात रूजताना दिसते आणी त्याचेच वाईट वाटते. बाकी क्लिंटनजी बरोबर सहमत आहे. आपले स्पष्ट प्रतिपादन नेहमीच वाचतो कधी पटते कधी नाही. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. क लो आ.

In reply to by प्रसाद गोडबोले

नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते ! राजगुरुनगर, तालुका खेड पुणे.... माहीत नाही पश्चिम की पुर्व पण महाराष्ट्रात जरूर आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते !
हे पुणे जिल्ह्यातील खेड आहे. राजगुरुंचे गाव असल्याने आता राजगुरुनगर म्हणतात. हा पश्चिम महाराष्ट्रच आहे

राजगुरु माझ्या आजोबांचे कुठलेतरी भाउ लागतात असे नाते आहे. मी बेल्हे, ता. जुन्नर इथे शिकलो, वाढलो. शाळेत आमचे देव गुरुजी सांगायचे की राजगुरुंच्या मागे इंग्रज लागले होते तेव्हा गुंगारा देण्यासाठी ते आमच्या घरातील बळदात लपले होते. माझा चुलत भाउ आर्मी मधून रिटायर झाला. माझे चुलते त्याच्याकडे पंजाब मधे गेले होते तेव्हा ची ही बातमी मी जपून ठेवली आहे. शान से मनेगी भगत सिंह की जन्मशती : सीएम भास्कर न्यूज 23 March 2006 चंडीगढ़/फिरोजपुर पंजाब सरकार अगले साल शहीद भगत सिंह केक्00वें जन्म दिवस पर राज्य स्तरीय समारोह आयोजित करेगी, भगत सिंह की जन्मशती को सरकार धूमधाम से मनाएगी। हुसैनीवाला में शहीद भगत सिंह, राजगुरु और सुखदेव को शहीदी दिवस पर श्रृद्धाजलिं देने के बाद मुख्यमंत्री ने कहा कि पंजाब के प्रसिद्ध और गुमनामी में खो गए आजादी के शहीदों को याद करने के लिए पंजाब सरकार विशेष प्रयास कर रही है। जनसभा को संबोधित करते हुए मुख्यमंत्री ने कहा कि आजादी के लिए अपनी जान की कुर्बानी देने वालों से युवाओं को प्रेरणा लेनी चाहिए। उन्होंने बताया कि आजादी के संघर्ष और उसके बाद विभिन्न लड़ाइयों में हिस्सा लेने वाले पंजाब के शहीदों का एक डाटा तैयार किया जा रहा है। मुख्यमंत्री ने शहीद राजगुरु के निकट संबंधी वामन रामचंद्र घाटपांडे और लक्ष्मी वामन घाटपांडे का सम्मान भी किया। शहीद भगत सिंह के भतीजों बब्बर सिंह और मेजर जनरल श्योरण सिंह को भी सम्मानित किया गया। कैप्टन सिंह ने फिरोजपुर डिवीजन के कमिश्नर कुलबीर सिंह सिद्धृू की लिखी किताब ‘कॉमरेड इन ऑर्म्स’ का विमोचन भी किया। फिरोजपुर प्रशासन ने फिरोजपुर से हुसैनीवाला के लिए लोकल बस सर्विस भी शुरू की है ताकि लोग शहीदी स्मारक पर अपनी श्रृद्धा के फूल अर्पित कर सके। मुख्यमंत्री ने क्भ्वीं पंजाब बटालियन द्वारा बनाया गया एक स्मारक भी राष्ट्र को समर्पित किया। यह स्मारक हुसैनीवाला में शहीद हुए फौजियों की याद में बनाया गया है। उपमुख्यमंत्री राजिंद्र कौर भट्ठल ने भी शहीदों को श्रृद्धांजलि दी।

क्लिंटन 13/08/2022 - 12:04
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपल्या आजूबाजूला दिसत असलेल्या एकूण वातावरणाला अनुसरून असलेला समयोचित लेख आवडला.

क्लिंटन 14/08/2022 - 11:57
हुसेनीवाला हे ठिकाण स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात होते आणि क्रांतीकारकांचे समाधीस्थळ सध्या आहे ती जागाही पाकिस्तानात होती. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्यावर अंत्यसंस्कार केले ती जागा भारतात यावी अशी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसह अनेकांची इच्छा होती. त्याप्रमाणे १९६१ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान 'लँड स्वॅप अ‍ॅग्रीमेंट' झाले आणि या जागेच्या आणि आजूबाजूच्या जमिनीच्या बदल्यात भारताची काही जमिन पाकिस्तानला दिली. https://www.tribuneindia.com/news/archive/editorials/a-bridge-in-hussainiwala-637045 नंतर त्या जागेवर आता आहे ते स्मारक बांधण्यात आले. १९८० च्या दशकात- मला वाटते १९८६ मध्ये राजीव गांधींनी त्या स्मारकाचे उद्घाटन केले.

Marathi_Mulgi 21/08/2022 - 00:02
कर्नल तपस्वींनी हुस्सैनीवालाची माहिती दिलीच आहे. तरीही माझा लेख देण्याचा मोह आवरत नाही. ही भारताची प्रेरणास्थळे आहेत जी फारशी प्रसिद्ध नाहीत. त्यांना जरूर नकाशावर आणले पाहिजे. https://manaschitre.blogspot.com/?m=1

@मराठी_मुलगी,आपला लेख वाचला. छान लिहिलय. आपण अजुन काही लिहीता का? वाचायला आवडेल. आपला ब्लॉग हिन्दीत आहे.

सावरकरांची ही कविता मला ज्ञात नव्हती . ही कविता खरेच सावरकरांनी लिहिली असेल तर , कट्टर हिंदुत्ववादी असुनही , मला सावरकरांची कीव करावीशी वाटते. भगतसिंगाच्या बाबतीत सावरकारांचा अभ्यास किती होता देव जाणे . पण भगतसिंग सोशॅलिस्ट कम्युनिस्ट विचारसरणीचा माणुस होता. आज तो जर जिवंत असता तर अन्य सोशॅलिस्ट कम्युनिस्ट विचारसरणीचे लोकं जसे सावरकरांना व्हिलन मानतात , माफीवीर म्हणातात , आणि काहीकाही तर स्वातंत्र्यवीर ह्या शब्दाची विटंबना करुन संडासवीर असे म्हणतात तसेच भगतसिंगानेही म्हणले असते ह्यात शंका नाही. एकवेळ ते इंग्रज परवडले पण कम्युनिस्ट नको . अगदी खिलजी, औरंगजेब अन अब्दाली ही परवडतील पण कम्युनिस्ट नको . बाकी राजगुरुंविषयी जास्त माहीत नाही , फोटो पाहिले घर साधेसे पण छान दिसत आहे , नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते !

In reply to by प्रसाद गोडबोले

अपरिपक्व व पूर्वग्रहदूषित प्रतीसाद वाचून घोर निराशा झाली. दुश्मनी मृत्यूनंतर संपते असे सेनेत शिकवले जाते. संपूर्ण कुटुंब पारतंत्र्यात होरपळून निघाले,इंग्रजासारख्या बलाढ्य सत्तेला भिती वाटली म्हणून फाशीची शिक्षा दिली. गपचुप अंत्यसंस्कार केले. भले विचार पटत नसतील पण प्रत्येक स्वतंत्रता सेनानी आदरणीय वाटतो. मराठी माणसाला क्रांतिवीर राजगुरू बद्दल माहीत नसावे वाचून वाईट वाटले. पंजाबात देवासमान यांना मानतात. घर छोटे वाटते, एकदा येवून बघा समजेल . राजकिय मत व देशभक्ती यातला फरक समजत नसेल तर स्वतःचे मत स्वतः जवळ ठेवले तर बरे होईल. जर तर च्या भाषेला काहीच किंमत नसते. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान, त्याग केला त्याच्याबद्दल राजकीय मते बाजुला ठेवून कृतज्ञता बाळगायलाच हवी कारण यज्ञात प्रत्येक समिधा महत्वाची असते. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याचा प्रयत्न करू नका. श. भगत सिह करोडो लोकांच्या हृदय सिंहासनावर मृत्युंजय बनून बसले आहेत. आपल्याला पुजणारे जाऊ द्या ओळखणारे किती याची यादी तपासुन पहा. शहरातील पाच पुतळे... मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले , मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद्गारले , मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती ! - कुसुमाग्रज

In reply to by कर्नलतपस्वी

तुम्ही गडबड करत आहात . रिअ‍ॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम मधील फरक लक्षात घ्या. भगतसिंग कम्युनिस्ट / सोशॅलिस्ट होता आणि आजच्या काळात एकही कम्युनिस्ट सोशॅलिस्ट सावरकारांच्या विषयी गौरवोद्गार काढत नाही ही वस्तुस्थिती आहे. एकदम रिअ‍ॅलिझम . भगतसिंग जिवंत असते तर त्यान्नीही सावरकरांना शिव्याच घातल्या असत्या ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्यात काही जरतर नाहीये , एकदम रिअ‍ॅलिझम .
राजकिय मत व देशभक्ती यातला फरक समजत नसेल तर स्वतःचे मत स्वतः जवळ ठेवले तर बरे होईल.
सोशलमीडीयावर सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथे पुरोगामी महाराष्ट्रात सावरकरांना संडासवीर म्हणतात , टिळकांना भटमान्य टिळक म्हणातात , त्यामानाने मी काहीच बोललेलो नाहीये. मी माझे मत व्यक्त करत राहीन , तुम्हाला हरकत असेल तर तुम्ही दुर्लक्षित करु शकता . पण दुसर्‍याचा आवाज दाबणे , त्याचे मत मांडूच न देणे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रतीक झाले , आपण असे करत इछित असाल तर मात्र त्याला जमेल तिथे जमेल तसा विरोध करत राहाने हे माणुस म्हणुन मी माझे कर्तव्य समजतो.
आपल्याला पुजणारे जाऊ द्या ओळखणारे किती याची यादी तपासुन पहा
. त्याने काय फरक पडतो ? खुनी कम्युनिस्ट चे गव्हेरा ला जगभर लोकं पुजतात , त्याचे फोटो टी शर्ट वर लाऊन मिरवतात , तो ही मृत्युंजय की फ्रित्युंजय बनुन बसला आहे म्हणुन तो ग्रेट ठरतो काय ? उगाचच काहीही . ७५ वर्षं झाली स्वातंत्र्याला . आता तरी आपण रोमँटिसिझन ची झुल उतरवुन वास्तववादी चष्म्यातुन सर्व बाजुंनी वेगवेगळ्या अँगल्स ने इतिहासातील लोकांचा विचार करायला हवा . ट्वायलाईट ऑफ आयडॉल्स मध्ये फ्रेडरिक नीचा म्हणतो तसे आपण सुध्दा फिलॉसॉफाईझ विथ हॅमर करायला शिकले पाहिजे . जे तुम्हाला आदर्श वाटत आहेत त्यांन्ना हातोडीने ठोका , जर ते टिकले तर ते खर्‍या अर्थाने आदर्श आहेत अन्यथा नाही. मी आधी लहानपणी सावरकारांचा खुप मोठ्ठा फॅन होतो पण सावरकर ह्या हातोडीच्या टेस्ट मध्ये फेल झाले आहेत . आणि भगतसिंग सुध्दा !

In reply to by प्रसाद गोडबोले

रिअ‍ॅलिझम आणि रोमॅन्टिसिझम मधील फरक लक्षात घ्या. भगतसिंग देशभक्त होते.स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा दिला. फासावर गेले.बलिदान दिले. त्यांनी त्यांच्या विचार,बुद्धी आणी सदसद्विवेक प्रमाणे देशसेवा केली.त्याकरता त्यांना अभिवादन. ही रियालीटी आहे रोमॅन्टिसिझम नाही. त्यांची विचारसरणी वेगळी म्हणून देशप्रेम ,देशसेवा डोळ्याआड करता येत नाही. मतस्वातंत्र्य आहे असायलाच हवे. जे गेले त्यांनी देशाकरता काय केले तेवढे लक्षात घ्या.त्यांची विचारधारा पटत नाही म्हणून असभ्य भाषाप्रयोग करणे उचित नाही असे मला वाटते. बाकी माझ्या लेखा मुळे किवा तु म्ही दिलेल्या प्रतिसादाने कुणाचे मत बदलेलं असे काही नाही . प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणी पूर्णविराम.

In reply to by कर्नलतपस्वी

आता तुम्ही विषय बदलत आहात .
असभ्य भाषाप्रयोग
माझ्या प्रतिसादात भगतसिंग बद्दल एक जरी असभ्य भाषा प्रयोग दिसल्याचे दाखवा , मी तात्काळ माफी मागेन . अन तसेही आमचे प्रतिसाद उडवायला अनेक लोकं उत्सुक असतात मिपावर . काही गैर लिहिले असेल तर तो प्रतिसाद क्षणार्धात उडवला जाईल. बाकी हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं सावरकरांना संडासवीर अन टिळकांना भटमान्य टिळक म्हणतात ही फॅक्ट आहे . हा मी केलेला असभ्य भाषाप्रयोग नसुन , मी केवळ वस्तुस्थिती दाखवुन तुमचे डोळे उघडायचा प्रयत्न केला आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

क्लिंटन 13/08/2022 - 16:07
कर्नलतपस्वींच्या एका उत्तम प्रवासवर्णनपर लेखात फाटे फुटायला नकोत पण तरीही विषय निघालाच आहे म्हणून हा एकच प्रतिसाद लिहितो. यावर आणखी काहीही लिहिणार नाही. तुमच्याइतकाच मी पण कम्युनिझमचा विरोधक आहे हे आतापर्यंत वेगवेगळ्या चर्चेत लिहिलेच आहे. त्याविषयी शंका नसावी. तरीही भगतसिंगांविषयी दोन गोष्टी लिहिता येतील. ते फासावर गेले तेव्हा ते २३ वर्षांचे होते. असे म्हणतात की तुम्ही वयाच्या २० व्या वर्षी कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या ४० व्या वर्षी कम्युनिस्ट राहिला असाल तर तुम्हाला डोकं नाही. भगतसिंग त्याच स्वप्नाळू वयातील होते. याचा अर्थ ते आयुष्यभर कम्युनिस्टच राहिले असते असे नाही. दुसरे म्हणजे भगतसिंग फाशी गेले १९३१ मध्ये. त्यावेळेस रशियात कम्युनिस्ट क्रांती झाली त्याला १३ वर्षे झाली होती. तसेच त्यावेळेस दळणवळणाची साधने आताच्या मानाने बरीच मर्यादित होती. त्यामुळे कम्युनिझमचे काय वाईट परिणाम होऊ शकतील याची माहिती भारतात कळली असेलच असे नाही. भगतसिंगांनी कम्युनिझमवर बरेच वाचन केले होते हे माहित आहे. पण नुसते पुस्तकात दिलेले वाचून कम्युनिझम बर्‍याच जणांना अपील होऊ शकेल कारण वरकरणी कोणतीही वाईट किंवा चुकीची मागणी त्यात केलेली नसते पण प्रत्यक्षात अंमलात आणायला गेल्यावर कम्युनिझम सगळीकडेच अपयशी ठरलेले दिसेल. फक्त भगतसिंग असताना त्याची उदाहरणे जगभरात दिसलेली नव्हती. त्यामुळे या बाबतीत भगतसिंगांना कम्युनिझममुळे कशी वाट लागते हे समोर दिसत असूनही त्यानंतरच्या काळातही कम्युनिस्ट राहिलेल्यांबरोबर एकाच तागडीत तोलू नये असे वाटते.
भगतसिंग जिवंत असते तर त्यान्नीही सावरकरांना शिव्याच घातल्या असत्या ह्यात तिळमात्र शंका नाही.
ही जरतरची गोष्ट झाली. नक्की काय झाले असते हे सांगायला आपल्याकडे कसलाच आधार नाही. भगतसिंग स्वातंत्र्योत्तर काळात असते आणि त्यांनी कम्युनिस्ट राज्य आणायचा प्रयत्न केला असता तर त्यांनाही विरोधच केला असता. त्यांनी सावरकरांना शिव्या घातल्या असत्या तरी ते आपल्याला मान्य झाले नसते हे नक्कीच. पण आपण ज्याला मानतो त्याला शिव्या घालणे हे एकच एखादा नेता न आवडण्याचे कारण असू नये. लालबहादूर शास्त्री सुध्दा जनसंघावर भरपूर टीका करायचे (त्या काळात टीका असली तरी ती संयत भाषेत केली जायची त्यामुळे शिव्या घालायचे असे म्हणत नाही) पण त्यामुळे १९६५ च्या युध्दात त्यांनी देशाचे केलेल्या नेतृत्वाचे महत्व कसे कमी होईल? तेव्हा समजा भगतसिंगांनी सावरकरांना शिव्या घातल्या असत्या किंवा अगदी कम्युनिस्ट राज्य आणायचा प्रयत्न केला असता तर त्याकारणासाठी भगतसिंगांनाही विरोधच केला असता. तरीही त्या परिस्थितही १९२९-३० मधील भगतसिंगांचे स्वातंत्र्यलढ्यासाठी जे काही योगदान होते त्याचे महत्व कमी होणार नाही. तेव्हा नंतरच्या काळातील ठोकताळे २२-२३ वर्षांच्या १९३०-३१ मधील भगतसिंगांना वापरू नयेत इतकेच.

In reply to by क्लिंटन

भगतसिंगांचे स्वातंत्र्यलढ्यासाठी जे काही योगदान
मी माझे सर्व प्रतिसाद परत नीट वाचले. मी कोणत्याही प्रतिसादात भगतसिंग ह्यांच्या स्वातंत्र्यातील योगदानाविषयी अवाक्षर देखील काढलेले नाही. मी कोठेही भगतसिंग ह्यांच्या विषयी असभ्य भाषेत बोललो आहे असे मलातरी वाटत नाही. तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटल्यास माझ्या निदर्शनास आणुन द्या , मला माझी चुक मान्य करायला आणि सुधारायला लाज वाटणार नाही. पण सावरकरांना माफीवीर आणि टिळकांना भटमान्य म्हणतात ही फॅक्ट आहे, राजगुरु अजुन सुपात आहेत , तेही कधीना कधी जात्यात येणार आहेतच ! (बाकी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये भारतीयांचे योगदान किती हाच बेसीक प्रश्न आहे . पण तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. )
तेव्हा नंतरच्या काळातील ठोकताळे २२-२३ वर्षांच्या १९३०-३१ मधील भगतसिंगांना वापरू नयेत इतकेच.
ओके . हा मुद्दा पटला. भगतसिंग ह्यांचे कम्युनिझम म्हणजे स्वप्नाळू वयातील, पोरसवदा वयात सगळ्यांनाच असतो तसला जोश होता, पुढे वयात आल्यावर कम्युनिझममुळे कशी वाट लागते हे पाहिले असते तर त्यांचे विचार वेगळे असते असे जर कोणी म्हणत असेल तर त्याला बेनीफीट ऑफ डाऊट देता येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

असभ्य भाषाप्रयोग तुम्ही असभ्य भाषाप्रयोग केला असे मी ही म्हटले नाही. प्रतिसादात सावरकर टिळक यांच्या बद्दल ज्या कुणी केला त्याच्याबद्दल मी बोलत आहे. एक मानसिकता समाजात रूजताना दिसते आणी त्याचेच वाईट वाटते. बाकी क्लिंटनजी बरोबर सहमत आहे. आपले स्पष्ट प्रतिपादन नेहमीच वाचतो कधी पटते कधी नाही. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. क लो आ.

In reply to by प्रसाद गोडबोले

नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते ! राजगुरुनगर, तालुका खेड पुणे.... माहीत नाही पश्चिम की पुर्व पण महाराष्ट्रात जरूर आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

नशीब की हे घर पश्चिम महाराष्ट्रात नव्हते त्यांचे घर नाहीतर १९४८ मध्ये नक्कीच वाचले नसते !
हे पुणे जिल्ह्यातील खेड आहे. राजगुरुंचे गाव असल्याने आता राजगुरुनगर म्हणतात. हा पश्चिम महाराष्ट्रच आहे

राजगुरु माझ्या आजोबांचे कुठलेतरी भाउ लागतात असे नाते आहे. मी बेल्हे, ता. जुन्नर इथे शिकलो, वाढलो. शाळेत आमचे देव गुरुजी सांगायचे की राजगुरुंच्या मागे इंग्रज लागले होते तेव्हा गुंगारा देण्यासाठी ते आमच्या घरातील बळदात लपले होते. माझा चुलत भाउ आर्मी मधून रिटायर झाला. माझे चुलते त्याच्याकडे पंजाब मधे गेले होते तेव्हा ची ही बातमी मी जपून ठेवली आहे. शान से मनेगी भगत सिंह की जन्मशती : सीएम भास्कर न्यूज 23 March 2006 चंडीगढ़/फिरोजपुर पंजाब सरकार अगले साल शहीद भगत सिंह केक्00वें जन्म दिवस पर राज्य स्तरीय समारोह आयोजित करेगी, भगत सिंह की जन्मशती को सरकार धूमधाम से मनाएगी। हुसैनीवाला में शहीद भगत सिंह, राजगुरु और सुखदेव को शहीदी दिवस पर श्रृद्धाजलिं देने के बाद मुख्यमंत्री ने कहा कि पंजाब के प्रसिद्ध और गुमनामी में खो गए आजादी के शहीदों को याद करने के लिए पंजाब सरकार विशेष प्रयास कर रही है। जनसभा को संबोधित करते हुए मुख्यमंत्री ने कहा कि आजादी के लिए अपनी जान की कुर्बानी देने वालों से युवाओं को प्रेरणा लेनी चाहिए। उन्होंने बताया कि आजादी के संघर्ष और उसके बाद विभिन्न लड़ाइयों में हिस्सा लेने वाले पंजाब के शहीदों का एक डाटा तैयार किया जा रहा है। मुख्यमंत्री ने शहीद राजगुरु के निकट संबंधी वामन रामचंद्र घाटपांडे और लक्ष्मी वामन घाटपांडे का सम्मान भी किया। शहीद भगत सिंह के भतीजों बब्बर सिंह और मेजर जनरल श्योरण सिंह को भी सम्मानित किया गया। कैप्टन सिंह ने फिरोजपुर डिवीजन के कमिश्नर कुलबीर सिंह सिद्धृू की लिखी किताब ‘कॉमरेड इन ऑर्म्स’ का विमोचन भी किया। फिरोजपुर प्रशासन ने फिरोजपुर से हुसैनीवाला के लिए लोकल बस सर्विस भी शुरू की है ताकि लोग शहीदी स्मारक पर अपनी श्रृद्धा के फूल अर्पित कर सके। मुख्यमंत्री ने क्भ्वीं पंजाब बटालियन द्वारा बनाया गया एक स्मारक भी राष्ट्र को समर्पित किया। यह स्मारक हुसैनीवाला में शहीद हुए फौजियों की याद में बनाया गया है। उपमुख्यमंत्री राजिंद्र कौर भट्ठल ने भी शहीदों को श्रृद्धांजलि दी।

क्लिंटन 13/08/2022 - 12:04
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपल्या आजूबाजूला दिसत असलेल्या एकूण वातावरणाला अनुसरून असलेला समयोचित लेख आवडला.

क्लिंटन 14/08/2022 - 11:57
हुसेनीवाला हे ठिकाण स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात होते आणि क्रांतीकारकांचे समाधीस्थळ सध्या आहे ती जागाही पाकिस्तानात होती. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्यावर अंत्यसंस्कार केले ती जागा भारतात यावी अशी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसह अनेकांची इच्छा होती. त्याप्रमाणे १९६१ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान 'लँड स्वॅप अ‍ॅग्रीमेंट' झाले आणि या जागेच्या आणि आजूबाजूच्या जमिनीच्या बदल्यात भारताची काही जमिन पाकिस्तानला दिली. https://www.tribuneindia.com/news/archive/editorials/a-bridge-in-hussainiwala-637045 नंतर त्या जागेवर आता आहे ते स्मारक बांधण्यात आले. १९८० च्या दशकात- मला वाटते १९८६ मध्ये राजीव गांधींनी त्या स्मारकाचे उद्घाटन केले.

Marathi_Mulgi 21/08/2022 - 00:02
कर्नल तपस्वींनी हुस्सैनीवालाची माहिती दिलीच आहे. तरीही माझा लेख देण्याचा मोह आवरत नाही. ही भारताची प्रेरणास्थळे आहेत जी फारशी प्रसिद्ध नाहीत. त्यांना जरूर नकाशावर आणले पाहिजे. https://manaschitre.blogspot.com/?m=1

@मराठी_मुलगी,आपला लेख वाचला. छान लिहिलय. आपण अजुन काही लिहीता का? वाचायला आवडेल. आपला ब्लॉग हिन्दीत आहे.
लेखनविषय:
राजगुरुनगर ते हुसैनीवाला...... "मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..." - हुतात्मा भगतसिंग २३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते. "हा भगतसिंग, हाय हा