मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

हे वाचा: बगळा

अनुस्वार ·
Bagla कटाक्ष- लेखक: प्रसाद कुमठेकर प्रकाशन: पार पब्लिकेशन्स पहिली आवृत्ती: २०१६ पृष्ठे: १५८ किंमत: ₹३०० ओळख- चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'.

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३ ·
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

शीतलउवाच ·
लेखनविषय:
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

शीतलउवाच ·
लेखनविषय:
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो. तो – आज काय सुट्टी आहे का? ते – नाही. तो – मग कामावर का जात नाही ? ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ? तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे…. ते – बरं पुढे ? तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल…. ते –बरं मग? तो – मग काय, निवान्त बसता येईल .. ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की…..

काय आहे 'अज्ञात पानिपत'

कंजूस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काय आहे 'अज्ञात पानिपत' गाभा :- अज्ञात पानिपत पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन. 'अज्ञात पानिपत' ( मराठी: इतिहास -संशोधन ) लेखक - मनोज दाणी पाने ८३०. (किंमत १३००रु, ) प्रकाशन Merven Technologies.,११ जून २०२३ . पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था इथून. उपलब्ध : सह्याद्री बुक्स ISBN 978-81956210-4-0 सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.

हे‌ वाचा: शीतयुद्ध सदानंद

अनुस्वार ·
लेखनविषय:
 कटाक्ष: लेखक - श्याम मनोहर प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन प्रथम आवृत्ती - १९८७, सध्या दुसरी आवृत्ती (२००७) (पुनर्मुद्रण २०२३) पृष्ठ संख्या - १२२ किंमत - ₹१७५ ओळख: या लघु-कादंबरीला अर्पणपत्रिका नाही तसेच प्रस्तावनाही नाही.

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

कॉमी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात." मार्टिन स्कॉर्सेजी हा जगप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आजच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांच्या यादीत त्याची गणना होते.

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

Bhakti ·
लेखनप्रकार
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती. तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.