मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोष्टी सिनेमाच्या - भाग १

साहना ·

सर टोबी 15/06/2023 - 16:21
मला वाटते तीन एक वर्षांपूर्वी प्रवीण टोकेकर यांनी रविवार सकाळ मधून काही सुंदर इंग्रजी सिनेमांची तपशीलवार ओळख अधिक रसग्रहण अशी मालिका सादर केली होती. त्यातील फक्त द डॆ ऑफ जॅकल, सेव्हिन्ग प्रायव्हेट रायन आणि रॉबर्ट डी निरो (ज्युनिअर) चा टॅक्सी ड्राईव्हर या सिनेमांचं रसग्रहण आठवतंय. टोकेकरांचं एकूणच सिनेमा या माध्यमावर आणि कलाकारांवर खूप प्रेम असणार हे त्यांच्या लेखनातून जाणवते. जाता जाता: सुमारे वीस वर्षांपूर्वी ब्रिटिश नंदी या टोपण नावाने टोकेकरांनी विनोदी आणि उपहासात्मक असे ढिंग टांग हे सदर लिहायला सुरुवात केली. त्यांचे सुरवातीचे लेख हे बरेच धीट आणि हसत हसत टोपी उडवणारे होते. सकाळ ने त्यांची आयडेंटीटी गुप्त ठेवली होती आणि एका जंगी समारंभाद्वारे टोकेकरांची ओळख जाहीर केली होती. टिळक स्मारक मध्ये तो समारंभ झाला होता. शरद पवार, आर आर पाटील आणि अजितदादा हे त्यांचे एकदम आवडते विषय. कृषितज्ज्ञ बारामतीकर, आर्रार आबा अशी सहज ओळखू येतील अशी नावं ठेवली होती. एका हवालदाराचं आर आर पाटलांना पत्र हा तर त्यांचा हातखंडा विषय.

असे भावनाविवश करणारे चित्रपट पाहणे आवडत नाही. पण हा लेख खूप आवडला. पहिल्या महायुद्धावरील केवळ एक चित्रपट पाहिलाय - १९१७ बाकी दुसऱ्या महायद्धावरील चित्रपट आवडीचे आहेतच. पण ते युद्धपट म्हणूनच.

राघव 16/06/2023 - 14:40
आवडला परिचय! :-)
मुलांसाठी झटणारा मास्तर हि भारतीय कल्पना वाटली तरी इंग्रजी साहित्यात सुद्धा अशी पात्रें अनेक आहेत.
या धर्तीवरचा एक मॉर्गन फ्रीमनचा चित्रपट मला प्रचंड आवडतो, Lean on me! हा भारतात दिसत नाही. पण टॉरंटवरून मिळेल. आवर्जून पाहण्यासारख्या चित्रपटांपैकी एक. यातील Lean on me! हे आधीचेच एक प्रसिद्ध गीत आहे, जे चित्रपटात वापरलेले आहे.

चौथा कोनाडा 17/06/2023 - 14:47
नितांत सुंदर लेख ! लेखात दिलेल्या दोन्ही लिंक्स सुंदर आहेत ... दि एण्ड पुर्वीचे दृष्य तर अप्रतिमच ! मिस्टर चिप्स यांच्या हृदयस्पर्शी कथेवरचा तितकाच सुंदर हृदयस्पर्शी लेख वाचाय्ला मिळाला, धन्यवाद !

सर टोबी 15/06/2023 - 16:21
मला वाटते तीन एक वर्षांपूर्वी प्रवीण टोकेकर यांनी रविवार सकाळ मधून काही सुंदर इंग्रजी सिनेमांची तपशीलवार ओळख अधिक रसग्रहण अशी मालिका सादर केली होती. त्यातील फक्त द डॆ ऑफ जॅकल, सेव्हिन्ग प्रायव्हेट रायन आणि रॉबर्ट डी निरो (ज्युनिअर) चा टॅक्सी ड्राईव्हर या सिनेमांचं रसग्रहण आठवतंय. टोकेकरांचं एकूणच सिनेमा या माध्यमावर आणि कलाकारांवर खूप प्रेम असणार हे त्यांच्या लेखनातून जाणवते. जाता जाता: सुमारे वीस वर्षांपूर्वी ब्रिटिश नंदी या टोपण नावाने टोकेकरांनी विनोदी आणि उपहासात्मक असे ढिंग टांग हे सदर लिहायला सुरुवात केली. त्यांचे सुरवातीचे लेख हे बरेच धीट आणि हसत हसत टोपी उडवणारे होते. सकाळ ने त्यांची आयडेंटीटी गुप्त ठेवली होती आणि एका जंगी समारंभाद्वारे टोकेकरांची ओळख जाहीर केली होती. टिळक स्मारक मध्ये तो समारंभ झाला होता. शरद पवार, आर आर पाटील आणि अजितदादा हे त्यांचे एकदम आवडते विषय. कृषितज्ज्ञ बारामतीकर, आर्रार आबा अशी सहज ओळखू येतील अशी नावं ठेवली होती. एका हवालदाराचं आर आर पाटलांना पत्र हा तर त्यांचा हातखंडा विषय.

असे भावनाविवश करणारे चित्रपट पाहणे आवडत नाही. पण हा लेख खूप आवडला. पहिल्या महायुद्धावरील केवळ एक चित्रपट पाहिलाय - १९१७ बाकी दुसऱ्या महायद्धावरील चित्रपट आवडीचे आहेतच. पण ते युद्धपट म्हणूनच.

राघव 16/06/2023 - 14:40
आवडला परिचय! :-)
मुलांसाठी झटणारा मास्तर हि भारतीय कल्पना वाटली तरी इंग्रजी साहित्यात सुद्धा अशी पात्रें अनेक आहेत.
या धर्तीवरचा एक मॉर्गन फ्रीमनचा चित्रपट मला प्रचंड आवडतो, Lean on me! हा भारतात दिसत नाही. पण टॉरंटवरून मिळेल. आवर्जून पाहण्यासारख्या चित्रपटांपैकी एक. यातील Lean on me! हे आधीचेच एक प्रसिद्ध गीत आहे, जे चित्रपटात वापरलेले आहे.

चौथा कोनाडा 17/06/2023 - 14:47
नितांत सुंदर लेख ! लेखात दिलेल्या दोन्ही लिंक्स सुंदर आहेत ... दि एण्ड पुर्वीचे दृष्य तर अप्रतिमच ! मिस्टर चिप्स यांच्या हृदयस्पर्शी कथेवरचा तितकाच सुंदर हृदयस्पर्शी लेख वाचाय्ला मिळाला, धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
गोष्टी सिनेमाच्या - भाग १ लहानपणी शांता शेळके ह्यांची चित्रपट विषयक काही पुस्तके मला कुणी वाचायला दिली होती. त्यांत माझ्या आठवणी प्रमाणे काही इंग्रजी चित्रपटांचा सारांश दिला होता. हे अनेक चित्रपट जुने होते आणि ग्रामीण भागांत (आणि शहरांत सुद्धा अनेक ठिकाणी) कुठे केबल आणि इंटरनेट नसल्याने त्या काळी मला बघता आले नाहीत. पण तरुणपणी ते सर्व चित्रपट मी आवर्जून पाहिले. शांता शेळके ह्यांनी मला इंग्रजी चित्रपट न पाहता सुद्धा चित्रपटांची आवड लावली असे म्हणू शकते. त्या काळी हॉलिवूड चित्रपटांची एक डिक्शनरी यायची त्यांत शेकडो चित्रपटांची माहिती येत असे, म्हणजे ३-४ वाक्यांत चित्रपटाची कथा आणि एक रेटिंग.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

सुपरहिरो क्लॉ-एक्स वर एक लघुपट

विजयशेट्टी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, बर्‍याच लोकांना आठवत असेल की राज कॉमिक्स एक शॉर्ट फिल्म घेऊन आली होती, बहुधा फक्त 2, प्रत्येकाकडून पैसे गोळा केले होते, त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता असताना, ज्यांनी मास फंडिंग दिले त्यांना क्रेडिट सुद्धा मिळाले नाही (असे असावे) डोगा लोक शॉर्ट फिल्म बद्दल माहितीही नव्हती आणि काही प्रकाशन त्यांच्या व्यक्तिरेखेची शॉर्ट फिल्म काढणार होते, राज कॉमिकचे नाव विसरले लोकांनी नागराजची सिरीयल घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नकार मिळाला आणि मालिका खूप चांगली निघाली .

प्रॉफेट : खलील जिब्रान : पुस्तक परिचय

विजुभाऊ ·

चित्रगुप्त 31/05/2023 - 02:36
खलील जिब्रानच्या साहित्याचा थोडक्यात करून दिलेला परिचय आवडला. अनेक आभार विजुभाऊ. श्री. अनंत काणेकर (१९०५-८०) यांनी खलील जिब्रान यांच्या काही कथांचे केलेले अनुवाद १९६७-६८ च्या सुमारास मी वाचले, तेंव्हा अगदी भारून गेलो होतो. गंमत म्हणजे काणेकरांनी (बहुतेक- चूभूद्याघ्या) 'खलिल गिब्रान' अशा टोपण नावाने जिब्रान च्या शैलीतच काही कथा लिहून प्रसुद्ध केल्या होत्या असे आठवते आहे. या लेखाच्या निमित्ताने एवढ्या वर्षांनी पुन्हा जिब्रानची आठवण येऊन जालावर शोध घेता त्याची चित्रे बघायला मिळाली, आणि १९०८ ते १९१२ या काळात त्याने पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला होता वगैरे माहिती मिळाली. त्याची काही चित्रे- ... ... ... यातले अगदी शेवटले चित्र हे खलिल जिब्रान याचे १८९८-९९ मधील व्यक्तिचित्र आहे. चित्रकारः Lilla Cabot Perry (American, 1848 - 1933)

विजुभाऊ +चित्रगुप्त =खलिल जिब्रान. फक्त नावच माहीती. पण सुदर परिचय म्हणेन. मिळाल्यास जरूर वाचेन. काही पुस्तके सर्व कालीक असतात जसे पंचतंत्र तसेच वाटते. सपनों का विश्वास करो, क्योंकि उनमें शाश्वतता का दरवाज़ा छिपा हुआ है। मृत्यु से डरना उस गड़रिए से डरने की तरह है, जो कि जब राजा के सामने खड़ा होता है, जिसके हाथ सम्मान में उसकी ओर बढ़ते हैं। -अनुवादित -ख जि

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 31/05/2023 - 08:04
हेच म्हणते! त्याचप्रमाणे सिक्रेट हेही इंग्रजी पुस्तक अशाच लाईफ फिलोसोफीसाठी प्रसिद्ध आहे.

याच पुस्तकातील एक अनुवादित कवीता अंतरजालावर सापडली. कदाचीत कविवर्य सांगू इच्छीतात. प्रेम म्हणजे समर्पण. कदाचित प्रेम करताना कान,नाक,डोळे व बुद्धी जागृत ठेवून प्रेम करा. जरा जपून जपून चाल पुढे धोका आहे. याचे मुळ इंग्रजी भाषेतील शब्द आहेत का, असल्यास डकवाल का? प्रेम प्रेम का संकेत मिलते ही अनुगामी बन जाओ उसका हालाँकि उसके रास्ते कठिन और दुर्गम हैं और जब उसकी बाँहें घेरें तुम्हें, समर्पण कर दो हालाँकि उसके पंखों में छिपे तलवार, तुम्हें लहूलुहान कर सकते हैं, फिर भी और जब वह शब्दों में प्रकट हो उसमें विश्वास रखो हालाँकि उसके शब्द तुम्हारे सपनों को तार-तार कर सकते हैं जैसे उत्तरी बर्फीली हवा उपवन को बरबाद कर देती है। क्योंकि प्रेम यदि तुम्हें सम्राट बना सकता है तो तुम्हारा बलिदान भी ले सकता है। प्रेम कभी देता है विस्तार तो कभी काट देता है पर। जैसे वह, तुम्हारे शिखर तक उठता है और धूप में काँपती कोमलतम शाखा तक को बचाता है वैसे ही, वह तुम्हारी गहराई तक उतरता है और जमीन से तुम्हारी जड़ों को हिला देता है अनाज के पूला की तरह, वह तुम्हें इकट्ठा करता है अपने लिए वह तुम्हें यंत्र में डालता है ताकि तुम अपने आवरण के बाहर आ जाओ।

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/05/2023 - 11:59
हि घ्या... लैच मोठी आहे 😀 When love beckons to you, follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth. • Like sheaves of corn he gathers you unto himself. He threshes you to make you naked. He sifts you to free you from your husks. He grinds you to whiteness. He kneads you until you are pliant; And then he assigns you to his sacred fire, that you may become sacred bread for God’s sacred feast. All these things shall love do unto you that you may know the secrets of your heart, and in that knowledge become a fragment of Life’s heart. But if in your fear you would seek only love’s peace and love’s pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love’s threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. • Love gives naught but itself and takes naught but from itself. Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. When you love you should not say, “God is in my heart,” but rather, “I am in the heart of God.” And think not you can direct the course of love, for love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself. But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own under- standing of love; And to bleed willingly and joyfully. To wake at dawn with a winged heart and give thanks for another day of loving; To rest at the noon hour and meditate love’s ecstasy; To return home at eventide with grati- tude; And then to sleep with a prayer for the beloved in your heart and a song of praise upon your lips. - Khalil Gibran

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर भौ. माझ्या समजदाणी नुसार अनुवादित कवीते मधे एक लव्ह जिहाद सारखी चेतावणी आहे. कवी, प्रेम या अत्युच्च समर्पणाच्या वेळी सुद्धा सजग आहे असे वाटते. वरिजनल मिळाली पडताळून बघतो. मग पुन्हा प्रतीसादतो.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/05/2023 - 20:59
खलील जिब्रान - आपला आपला देश : हिरे आणि हिरकण्या (गद्यकाव्य, बालसाहित्य, मूळ अरबी-उर्दू. मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी) खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद स्मिता लिमये), प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर खलील जिब्रान संच (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) . या पुस्तकात जिब्रानच्या २० कथा समाविष्ट आहेत. खलील जिब्रान - रैहाना (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) जिब्रान खलील जिब्रान : जीवन आणि साहित्य (लेखक - श्रीपाद जोशी जिब्रानच्या नीतिकथा (अनुवादक - श्रीपाद जोशी) देवदूत (त्र्यं.वि. सरदेशमुख प्रेषित (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि प्रॉफेट (मराठी अनुवाद जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१). या पुस्तकाचे संपादन आचार्य शं.द. जावडेकर आणि आचार्य स.ज. भागवत यांनी केले आहे. या पुस्तकात खलिल जिब्रानने ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर चिंतन केले आहे. द प्रॉफेट, द मॅडमन (दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अनुवाद, डॉ. सहदेव चौगुले-शिंदे. प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर बंडखोर आत्मे (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद काका कालेलकर). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत. रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा अनंत काणेकर यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९) वॉंडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद काका कालेलकर) वेडा (अनुवादक - श्रीपाद जोशी) सॅन्ड ॲन्ड फोम (मराठी अनुवाद काका कालेलकर) सलमा (तुटलेले पंख) : कादंबरी, अनुवादक - श्रीपाद जोशी. .....

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ 01/06/2023 - 18:40
प्रॉफेट चा मराठी मधे अनुवाद झालेला आहे हे माहीत नव्हते. मी बा भ बोरकरांनी कोकणी भाषेत केलेले रुपांतर वाचले होते. खलील जिब्रान ने म्हणे त्याचे लेखन अगोदर फ्रेंच लिहीले होते आणि त्या नंतर ते इंग्रजीत रुपांतरीत केले त्यामुळे त्यातली भाषा थोडी कवितेकडे झुकते

चौथा कोनाडा 01/06/2023 - 19:47
सुंदर परिचय. उधृत केलेले उतारे, तत्वज्ञान अतिशय रोचक आणि महत्त्वाचे आहे. किंचित आधी वाचले आहे.. इथे छान माहिती मिळाली. चित्रगुप्त, कर्नल, भक्ति, टर्मी यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. वाचण्याच्या यादीत पुस्तके समाविष्ट केली आहेत. धन्यवाद विजू भाऊ

चित्रगुप्त 01/06/2023 - 20:41
. Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 . . Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 जिब्रानला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला जाण्यासाठी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या 'मेरी हॅस्केल' हिने उद्युक्त केले आणि संपूर्ण आर्थिक मदत केली होती. या दोघातील मधुर नात्यावर एक लेखः https://www.themarginalian.org/2017/01/20/kahlil-gibran-mary-haskell-love-letters/#:~:text=But%20there%20would%20have%20been,and%20she%20nearly%20thirty%2Done.

काहीच ठाऊक नसते. हे पुस्तक आता वाचावे लागणार. माझ्या एका मित्राने मुलाचे नाव जिब्रान ठेवले आहे. चांगल्या पुस्तकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त 31/05/2023 - 02:36
खलील जिब्रानच्या साहित्याचा थोडक्यात करून दिलेला परिचय आवडला. अनेक आभार विजुभाऊ. श्री. अनंत काणेकर (१९०५-८०) यांनी खलील जिब्रान यांच्या काही कथांचे केलेले अनुवाद १९६७-६८ च्या सुमारास मी वाचले, तेंव्हा अगदी भारून गेलो होतो. गंमत म्हणजे काणेकरांनी (बहुतेक- चूभूद्याघ्या) 'खलिल गिब्रान' अशा टोपण नावाने जिब्रान च्या शैलीतच काही कथा लिहून प्रसुद्ध केल्या होत्या असे आठवते आहे. या लेखाच्या निमित्ताने एवढ्या वर्षांनी पुन्हा जिब्रानची आठवण येऊन जालावर शोध घेता त्याची चित्रे बघायला मिळाली, आणि १९०८ ते १९१२ या काळात त्याने पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला होता वगैरे माहिती मिळाली. त्याची काही चित्रे- ... ... ... यातले अगदी शेवटले चित्र हे खलिल जिब्रान याचे १८९८-९९ मधील व्यक्तिचित्र आहे. चित्रकारः Lilla Cabot Perry (American, 1848 - 1933)

विजुभाऊ +चित्रगुप्त =खलिल जिब्रान. फक्त नावच माहीती. पण सुदर परिचय म्हणेन. मिळाल्यास जरूर वाचेन. काही पुस्तके सर्व कालीक असतात जसे पंचतंत्र तसेच वाटते. सपनों का विश्वास करो, क्योंकि उनमें शाश्वतता का दरवाज़ा छिपा हुआ है। मृत्यु से डरना उस गड़रिए से डरने की तरह है, जो कि जब राजा के सामने खड़ा होता है, जिसके हाथ सम्मान में उसकी ओर बढ़ते हैं। -अनुवादित -ख जि

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 31/05/2023 - 08:04
हेच म्हणते! त्याचप्रमाणे सिक्रेट हेही इंग्रजी पुस्तक अशाच लाईफ फिलोसोफीसाठी प्रसिद्ध आहे.

याच पुस्तकातील एक अनुवादित कवीता अंतरजालावर सापडली. कदाचीत कविवर्य सांगू इच्छीतात. प्रेम म्हणजे समर्पण. कदाचित प्रेम करताना कान,नाक,डोळे व बुद्धी जागृत ठेवून प्रेम करा. जरा जपून जपून चाल पुढे धोका आहे. याचे मुळ इंग्रजी भाषेतील शब्द आहेत का, असल्यास डकवाल का? प्रेम प्रेम का संकेत मिलते ही अनुगामी बन जाओ उसका हालाँकि उसके रास्ते कठिन और दुर्गम हैं और जब उसकी बाँहें घेरें तुम्हें, समर्पण कर दो हालाँकि उसके पंखों में छिपे तलवार, तुम्हें लहूलुहान कर सकते हैं, फिर भी और जब वह शब्दों में प्रकट हो उसमें विश्वास रखो हालाँकि उसके शब्द तुम्हारे सपनों को तार-तार कर सकते हैं जैसे उत्तरी बर्फीली हवा उपवन को बरबाद कर देती है। क्योंकि प्रेम यदि तुम्हें सम्राट बना सकता है तो तुम्हारा बलिदान भी ले सकता है। प्रेम कभी देता है विस्तार तो कभी काट देता है पर। जैसे वह, तुम्हारे शिखर तक उठता है और धूप में काँपती कोमलतम शाखा तक को बचाता है वैसे ही, वह तुम्हारी गहराई तक उतरता है और जमीन से तुम्हारी जड़ों को हिला देता है अनाज के पूला की तरह, वह तुम्हें इकट्ठा करता है अपने लिए वह तुम्हें यंत्र में डालता है ताकि तुम अपने आवरण के बाहर आ जाओ।

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 31/05/2023 - 11:59
हि घ्या... लैच मोठी आहे 😀 When love beckons to you, follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth. • Like sheaves of corn he gathers you unto himself. He threshes you to make you naked. He sifts you to free you from your husks. He grinds you to whiteness. He kneads you until you are pliant; And then he assigns you to his sacred fire, that you may become sacred bread for God’s sacred feast. All these things shall love do unto you that you may know the secrets of your heart, and in that knowledge become a fragment of Life’s heart. But if in your fear you would seek only love’s peace and love’s pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love’s threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. • Love gives naught but itself and takes naught but from itself. Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. When you love you should not say, “God is in my heart,” but rather, “I am in the heart of God.” And think not you can direct the course of love, for love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself. But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own under- standing of love; And to bleed willingly and joyfully. To wake at dawn with a winged heart and give thanks for another day of loving; To rest at the noon hour and meditate love’s ecstasy; To return home at eventide with grati- tude; And then to sleep with a prayer for the beloved in your heart and a song of praise upon your lips. - Khalil Gibran

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर भौ. माझ्या समजदाणी नुसार अनुवादित कवीते मधे एक लव्ह जिहाद सारखी चेतावणी आहे. कवी, प्रेम या अत्युच्च समर्पणाच्या वेळी सुद्धा सजग आहे असे वाटते. वरिजनल मिळाली पडताळून बघतो. मग पुन्हा प्रतीसादतो.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/05/2023 - 20:59
खलील जिब्रान - आपला आपला देश : हिरे आणि हिरकण्या (गद्यकाव्य, बालसाहित्य, मूळ अरबी-उर्दू. मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी) खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद स्मिता लिमये), प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर खलील जिब्रान संच (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) . या पुस्तकात जिब्रानच्या २० कथा समाविष्ट आहेत. खलील जिब्रान - रैहाना (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) जिब्रान खलील जिब्रान : जीवन आणि साहित्य (लेखक - श्रीपाद जोशी जिब्रानच्या नीतिकथा (अनुवादक - श्रीपाद जोशी) देवदूत (त्र्यं.वि. सरदेशमुख प्रेषित (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि प्रॉफेट (मराठी अनुवाद जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१). या पुस्तकाचे संपादन आचार्य शं.द. जावडेकर आणि आचार्य स.ज. भागवत यांनी केले आहे. या पुस्तकात खलिल जिब्रानने ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर चिंतन केले आहे. द प्रॉफेट, द मॅडमन (दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अनुवाद, डॉ. सहदेव चौगुले-शिंदे. प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर बंडखोर आत्मे (अनुवादक - श्रीपाद जोशी) दि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद काका कालेलकर). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत. रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा अनंत काणेकर यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९) वॉंडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद काका कालेलकर) वेडा (अनुवादक - श्रीपाद जोशी) सॅन्ड ॲन्ड फोम (मराठी अनुवाद काका कालेलकर) सलमा (तुटलेले पंख) : कादंबरी, अनुवादक - श्रीपाद जोशी. .....

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ 01/06/2023 - 18:40
प्रॉफेट चा मराठी मधे अनुवाद झालेला आहे हे माहीत नव्हते. मी बा भ बोरकरांनी कोकणी भाषेत केलेले रुपांतर वाचले होते. खलील जिब्रान ने म्हणे त्याचे लेखन अगोदर फ्रेंच लिहीले होते आणि त्या नंतर ते इंग्रजीत रुपांतरीत केले त्यामुळे त्यातली भाषा थोडी कवितेकडे झुकते

चौथा कोनाडा 01/06/2023 - 19:47
सुंदर परिचय. उधृत केलेले उतारे, तत्वज्ञान अतिशय रोचक आणि महत्त्वाचे आहे. किंचित आधी वाचले आहे.. इथे छान माहिती मिळाली. चित्रगुप्त, कर्नल, भक्ति, टर्मी यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. वाचण्याच्या यादीत पुस्तके समाविष्ट केली आहेत. धन्यवाद विजू भाऊ

चित्रगुप्त 01/06/2023 - 20:41
. Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 . . Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972 जिब्रानला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला जाण्यासाठी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या 'मेरी हॅस्केल' हिने उद्युक्त केले आणि संपूर्ण आर्थिक मदत केली होती. या दोघातील मधुर नात्यावर एक लेखः https://www.themarginalian.org/2017/01/20/kahlil-gibran-mary-haskell-love-letters/#:~:text=But%20there%20would%20have%20been,and%20she%20nearly%20thirty%2Done.

काहीच ठाऊक नसते. हे पुस्तक आता वाचावे लागणार. माझ्या एका मित्राने मुलाचे नाव जिब्रान ठेवले आहे. चांगल्या पुस्तकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रॉफेटः खलील जिब्रान.. प्रॉफेट हे अगदी छोटेखानी पुस्तक . त्यातल्या भाषेने अगोदर लक्ष्य वेधून घेतले. आणि मजकुराने वेड लावले. पुस्तक कधी वाचले हे आता लक्ष्यात नाही. पण रजनीशांची प्रवचने ऐकताना त्याचा उल्लेख बरेचदा होतो. प्रॉफेट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील १०० पेक्षाही जास्त भाषांमधे या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. ( बोरकरांनी याचा कोकणी मधे अनुवाद केला आहे) खलील जिब्रान हा मूळचा लेबनान मधला. कुटुंबा समवेत तो अमेरीकेत आला.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

पराग१२२६३ ·

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.
लेखनविषय:
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.

ती आणि इतर.... "सायलेन्स इस नॉट दि ऑप्शन....!!!"

मधुरा कुलकर्णी ·

प्रतिक्रियेचे होणारे गंभीर परिणाम आणी होणारा त्रास यामुळे सर्वसामान्य माणूस या पासून दुर राहातो. त्याची तडफड जरूर होते पण गुंड,पोलीस न्यायालये यांना शिंगावर घेण्याचे धाडस तो करू शकत नाही.

प्रतिक्रियेचे होणारे गंभीर परिणाम आणी होणारा त्रास यामुळे सर्वसामान्य माणूस या पासून दुर राहातो. त्याची तडफड जरूर होते पण गुंड,पोलीस न्यायालये यांना शिंगावर घेण्याचे धाडस तो करू शकत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
#LatePost             वास्तविक हे चित्रपट समीक्षण मी खूप आधी लिहिलं होतं... पण प्रकाशित करायचा मुहुर्त आत्ता लागलाय असं म्हणायला हरकत नाही...              खरंतर चित्रपट समीक्षण हा व्यक्तिपरत्वे भिन्न मत दर्शवणारा लेख आहे.. पण तरी एखादा चांगला चित्रपट आणि त्याच समीक्षण करणं आणि मास कम्युनिकेशन साधून एखादा जनुईन चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणं...

चित्रपट समीक्षा -- The Man from Earth (2007)

श्रीगणेशा ·

"पठाण" हा चित्रपट अगदी फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये..... सकाळी बघायला सुरुवात केली आणि पुन्हा ठेवून दिला. कंटेनरवरील फायटींग पर्यंत आलोय आता पुढे काही झेपेल, असे काही वाटत नाही. बाकी थोडक्यातल्या ष्टोरीवरुन'द मॅन फ्रॉम अर्थ' पाहणे आले. धन्स. अजून या शिवाय काही, अडकले सुटले या टाईपचे सिनेमे असतील तर सुचवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर्कवादी 30/03/2023 - 00:02
नक्की आवडेल,
अजून या शिवाय काही, अडकले सुटले या टाईपचे सिनेमे असतील तर सुचवा.
एकदम "No nonsense" चित्रपट. सध्याच्या पद्धतीप्रमाणे असलेला मसाला नाही, उगाचच चटपटीत - नाट्यमत संवाद , कर्कश पार्श्वसंगीत , नायिकेची (इथे नायक असा कुणी नाहीच) नाट्यमय एन्ट्री, ओढून ताणून भावूक दृष्य, असलं काहीच नसलेला साधा सरळ , वास्तववादी चित्रपट.. (zee5) थोडा वेगळा भावूक चित्रपट बघायचा असेल तर Salt bridge बघू शकता. मी Jiocinema वर बघितला होता. पण आता तो तिथे बहुधा नहीये shemaroome वर मिळेल. अगदी जबरदस्त आहे असं मी म्हणत नाही पण "No nonsense" तरी नक्कीच. मला तरी आवडला ... आणि यातील दोन गाण्यांच्या मी अक्षरशः प्रेमात पडलोय (खाली दुवे देत आहे) https://youtu.be/jpponOTaNJQ https://youtu.be/UF2W5fJBoOY

खूप आशेने उघडलेला धागा. एवढ्या चांगल्या कलाकृतीबद्दल इतके त्रोटक लिखाण? सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

श्रीगणेशा 27/03/2023 - 21:19
कथेतील बारकावे इथे लिहिले तर चित्रपट पाहताना उत्सुकता कमी होऊ शकते. त्यामुळे थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, एवढ्या चांगल्या चित्रपटाबद्दल अजून लिहिता आले असते, हे मान्य. सध्या याच चित्रपटाचा दुसरा भाग पाहत आहे.

In reply to by श्रीगणेशा

कथेतील बारकावे इथे लिहिले तर चित्रपट पाहताना उत्सुकता कमी होऊ शकते.
On the contrary, बारकावे लिहून आणि वाचून उत्सुकता आणखी वाढू शकते. (अर्थात बारकावे म्हणजे तलाश मधील करीना आणि कहानी मधील विद्या बालन यांचे डिटेल्स सांगणे नव्हे. पण हे कोणत्याही सस्पेन्स असलेल्या चित्रपटाविषयी लागू होईल. इतर चित्रपटाबाबतीत विस्ताराने वाचल्यावर तो बघताना जास्त आनंद मिळू शकतोच)

In reply to by श्रीगणेशा

सध्या याच चित्रपटाचा दुसरा भाग पाहत आहे.
दुसरा भाग कुणाला रेकमेंड करण्याइतका नाही आवडला. कुणाला आवडूही शकतो. मला एक नेहमीच वाटत राहिले आहे ते म्हणजे, या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा भव्य दिव्य रिमेक होऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करून १४,००० वर्षातले काही ठळक प्रसंग जे चित्रपटात चर्चेत आलेले आहेत त्यांना दृश्य स्वरूप देऊन प्रेक्षकांना अजून एक दृक-श्राव्य मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळू शकते. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

श्रीगणेशा 09/04/2023 - 10:22
दुसरा भाग २०१७ मधे, म्हणजे पहिला भाग आल्यानंतर दहा वर्षांनी आला. पण ती कथा, पहिल्या भागानंतर उंचावलेल्या अपेक्षांच्या जवळपासही पोहोचत नाही. दुसऱ्या भागाचा शेवट थोडासा गूढ ठेवला आहे, कदाचित तिसऱ्या भागाच्या तयारीसाठी.
१४,००० वर्षातले काही ठळक प्रसंग जे चित्रपटात चर्चेत आलेले आहेत त्यांना दृश्य स्वरूप देऊन...
कथा लेखकाला नेमकं असं सादरीकरण आणि पटकथेत कोणताही बदल नको होता: https://manfromearth.com/mfe/

उपेक्षित 10/04/2023 - 12:19
हॉलिवूड मधील काही चित्रपट अक्षरशः मास्टरपीस आहेत, कधी कधी खूप कौतुक आणि आश्चर्य वाटत कि साला इतक्या बारकाव्यांसकट कसे काय इतक्या सहज ती लोक एखादी कलाकृती सादर करतात ? असो, The Revenant/ The Shawshank Redemption / Inception / The Dark Knight / Dunkirk / Joker / cast away / The Terminal / No Escape / The Godfather / The Exorcist / The Lord of the Rings: पूर्ण सिरीज / ३०० हे आणि अजून अगणित मास्टरपीस आहेत जे कितीही वेळा आपण पाहू शकतो.

"पठाण" हा चित्रपट अगदी फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये..... सकाळी बघायला सुरुवात केली आणि पुन्हा ठेवून दिला. कंटेनरवरील फायटींग पर्यंत आलोय आता पुढे काही झेपेल, असे काही वाटत नाही. बाकी थोडक्यातल्या ष्टोरीवरुन'द मॅन फ्रॉम अर्थ' पाहणे आले. धन्स. अजून या शिवाय काही, अडकले सुटले या टाईपचे सिनेमे असतील तर सुचवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर्कवादी 30/03/2023 - 00:02
नक्की आवडेल,
अजून या शिवाय काही, अडकले सुटले या टाईपचे सिनेमे असतील तर सुचवा.
एकदम "No nonsense" चित्रपट. सध्याच्या पद्धतीप्रमाणे असलेला मसाला नाही, उगाचच चटपटीत - नाट्यमत संवाद , कर्कश पार्श्वसंगीत , नायिकेची (इथे नायक असा कुणी नाहीच) नाट्यमय एन्ट्री, ओढून ताणून भावूक दृष्य, असलं काहीच नसलेला साधा सरळ , वास्तववादी चित्रपट.. (zee5) थोडा वेगळा भावूक चित्रपट बघायचा असेल तर Salt bridge बघू शकता. मी Jiocinema वर बघितला होता. पण आता तो तिथे बहुधा नहीये shemaroome वर मिळेल. अगदी जबरदस्त आहे असं मी म्हणत नाही पण "No nonsense" तरी नक्कीच. मला तरी आवडला ... आणि यातील दोन गाण्यांच्या मी अक्षरशः प्रेमात पडलोय (खाली दुवे देत आहे) https://youtu.be/jpponOTaNJQ https://youtu.be/UF2W5fJBoOY

खूप आशेने उघडलेला धागा. एवढ्या चांगल्या कलाकृतीबद्दल इतके त्रोटक लिखाण? सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

श्रीगणेशा 27/03/2023 - 21:19
कथेतील बारकावे इथे लिहिले तर चित्रपट पाहताना उत्सुकता कमी होऊ शकते. त्यामुळे थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, एवढ्या चांगल्या चित्रपटाबद्दल अजून लिहिता आले असते, हे मान्य. सध्या याच चित्रपटाचा दुसरा भाग पाहत आहे.

In reply to by श्रीगणेशा

कथेतील बारकावे इथे लिहिले तर चित्रपट पाहताना उत्सुकता कमी होऊ शकते.
On the contrary, बारकावे लिहून आणि वाचून उत्सुकता आणखी वाढू शकते. (अर्थात बारकावे म्हणजे तलाश मधील करीना आणि कहानी मधील विद्या बालन यांचे डिटेल्स सांगणे नव्हे. पण हे कोणत्याही सस्पेन्स असलेल्या चित्रपटाविषयी लागू होईल. इतर चित्रपटाबाबतीत विस्ताराने वाचल्यावर तो बघताना जास्त आनंद मिळू शकतोच)

In reply to by श्रीगणेशा

सध्या याच चित्रपटाचा दुसरा भाग पाहत आहे.
दुसरा भाग कुणाला रेकमेंड करण्याइतका नाही आवडला. कुणाला आवडूही शकतो. मला एक नेहमीच वाटत राहिले आहे ते म्हणजे, या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा भव्य दिव्य रिमेक होऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करून १४,००० वर्षातले काही ठळक प्रसंग जे चित्रपटात चर्चेत आलेले आहेत त्यांना दृश्य स्वरूप देऊन प्रेक्षकांना अजून एक दृक-श्राव्य मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळू शकते. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

श्रीगणेशा 09/04/2023 - 10:22
दुसरा भाग २०१७ मधे, म्हणजे पहिला भाग आल्यानंतर दहा वर्षांनी आला. पण ती कथा, पहिल्या भागानंतर उंचावलेल्या अपेक्षांच्या जवळपासही पोहोचत नाही. दुसऱ्या भागाचा शेवट थोडासा गूढ ठेवला आहे, कदाचित तिसऱ्या भागाच्या तयारीसाठी.
१४,००० वर्षातले काही ठळक प्रसंग जे चित्रपटात चर्चेत आलेले आहेत त्यांना दृश्य स्वरूप देऊन...
कथा लेखकाला नेमकं असं सादरीकरण आणि पटकथेत कोणताही बदल नको होता: https://manfromearth.com/mfe/

उपेक्षित 10/04/2023 - 12:19
हॉलिवूड मधील काही चित्रपट अक्षरशः मास्टरपीस आहेत, कधी कधी खूप कौतुक आणि आश्चर्य वाटत कि साला इतक्या बारकाव्यांसकट कसे काय इतक्या सहज ती लोक एखादी कलाकृती सादर करतात ? असो, The Revenant/ The Shawshank Redemption / Inception / The Dark Knight / Dunkirk / Joker / cast away / The Terminal / No Escape / The Godfather / The Exorcist / The Lord of the Rings: पूर्ण सिरीज / ३०० हे आणि अजून अगणित मास्टरपीस आहेत जे कितीही वेळा आपण पाहू शकतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या मिपावरीलच एका धाग्यात "The Man from Earth" या चित्रपटाबद्दल वाचलं. मिपाकरांना आवडला, म्हणजे चित्रपट चांगला असणारच, याची खात्री होती. पण हल्ली सवयीप्रमाणे, चित्रपट पाहताना अपेक्षा तशा बाजूलाच ठेवलेल्या असतात. उगीच नंतर वेळ वाया गेल्याची खंत राहत नाही.

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग ३ -- कुटुंब

श्रीगणेशा ·

अनुवाद आवडला. संक्षेप मधे एवढा प्रभावी तर संपूर्ण पुस्तक अनुवादले तर खुप मनोरंजक व प्रबोधनात्मक ठरू शकते. प्रयत्न करा. शुभेच्छा.

श्रीगणेशा 26/02/2023 - 11:48
धन्यवाद कर्नल साहेब _/\_ "कुटुंब" या विषयावर पूर्ण (ओळ नी ओळ) अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे, सुरुवात करताना पुस्तक परिचय म्हणून केली पण आता पूर्ण अनुवाद करावा असा मानस आहे.

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा 24/05/2023 - 20:10
धन्यवाद कुमार सर! खरं तर इंग्रजी मधील हे पुस्तक, एका अमेरिकन लेखकाने मूळ फ्रेंच मधील पुस्तकाचा केलेला अनुवादच आहे. पण तो इंग्रजी अनुवाद, मूळ पुस्तक वाटावा, एव्हढा छान झाला आहे. (अर्थातच मूळ फ्रेंच पुस्तक वाचलं, तर ते वाचन अजून प्रभावी ठरेल, पण त्यासाठी फ्रेंच भाषा शिकावी लागेल :-))

अनुवाद आवडला. संक्षेप मधे एवढा प्रभावी तर संपूर्ण पुस्तक अनुवादले तर खुप मनोरंजक व प्रबोधनात्मक ठरू शकते. प्रयत्न करा. शुभेच्छा.

श्रीगणेशा 26/02/2023 - 11:48
धन्यवाद कर्नल साहेब _/\_ "कुटुंब" या विषयावर पूर्ण (ओळ नी ओळ) अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे, सुरुवात करताना पुस्तक परिचय म्हणून केली पण आता पूर्ण अनुवाद करावा असा मानस आहे.

In reply to by हेमंतकुमार

श्रीगणेशा 24/05/2023 - 20:10
धन्यवाद कुमार सर! खरं तर इंग्रजी मधील हे पुस्तक, एका अमेरिकन लेखकाने मूळ फ्रेंच मधील पुस्तकाचा केलेला अनुवादच आहे. पण तो इंग्रजी अनुवाद, मूळ पुस्तक वाटावा, एव्हढा छान झाला आहे. (अर्थातच मूळ फ्रेंच पुस्तक वाचलं, तर ते वाचन अजून प्रभावी ठरेल, पण त्यासाठी फ्रेंच भाषा शिकावी लागेल :-))
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे.

जानरावन कांतारा पायला

मित्रहो ·

टर्मीनेटर 10/01/2023 - 09:48
वऱ्हाडी ठेचा आवडला 👍 हा सिनेमा पाहिलेला नाही (आणि पाहण्याची शक्यताही नाही 😀) त्यामुळे सगळे संदर्भ लागले नसले तरी वाचायला मजा आली!

सिनेमा चकटफु घरीच पाहीला आहे, त्यामुळे पैसे वाचले पण डोक्याला शॉट झाला. मात्र आता हे विडंबन वाचुन मस्त करमणुक झाली. तो फॉरेस्ट ऑफिसर ड्वेन जॉन्सनसारखा दिसतो. (जर्नी टु द सेंटर ऑफ द अर्थ किवा नवीन जुमांजी बघा)

मित्रहो 11/01/2023 - 10:20
धन्यवाद टर्मीनेटर, राजेंद्र मेहेंदळे, नि३सोलपुरकर, Bhakti, कुमार १ कालच जाहीर झालेल्या ऑस्करच्या नामांकन यादीत उत्कृष्ठ सिनेमा आणि उत्कृष्ठ अभिनेता या दोन पुरस्कारासाठी कांतारा टिकून आहे. त्याच यादीत मराठी सिनेमा मी वसंतराव देखील आहे.

श्वेता२४ 13/01/2023 - 14:20
मस्तच लिहीलं आहे. माझी एक विदर्भातली मैत्रीण अशीच बोलते. त्यामुळे हा लहेजा माहित होता. मजा आली वाचताना.

टर्मीनेटर 10/01/2023 - 09:48
वऱ्हाडी ठेचा आवडला 👍 हा सिनेमा पाहिलेला नाही (आणि पाहण्याची शक्यताही नाही 😀) त्यामुळे सगळे संदर्भ लागले नसले तरी वाचायला मजा आली!

सिनेमा चकटफु घरीच पाहीला आहे, त्यामुळे पैसे वाचले पण डोक्याला शॉट झाला. मात्र आता हे विडंबन वाचुन मस्त करमणुक झाली. तो फॉरेस्ट ऑफिसर ड्वेन जॉन्सनसारखा दिसतो. (जर्नी टु द सेंटर ऑफ द अर्थ किवा नवीन जुमांजी बघा)

मित्रहो 11/01/2023 - 10:20
धन्यवाद टर्मीनेटर, राजेंद्र मेहेंदळे, नि३सोलपुरकर, Bhakti, कुमार १ कालच जाहीर झालेल्या ऑस्करच्या नामांकन यादीत उत्कृष्ठ सिनेमा आणि उत्कृष्ठ अभिनेता या दोन पुरस्कारासाठी कांतारा टिकून आहे. त्याच यादीत मराठी सिनेमा मी वसंतराव देखील आहे.

श्वेता२४ 13/01/2023 - 14:20
मस्तच लिहीलं आहे. माझी एक विदर्भातली मैत्रीण अशीच बोलते. त्यामुळे हा लहेजा माहित होता. मजा आली वाचताना.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(खालील लेखात कांतारा या सिनेमाची गोष्ट काहीशी सविस्तर सांगितली आहे.त्यामुळे ज्यांनी याआधी चित्रपट बघितला नाही त्यांच्यासाठी चित्रपट बघण्याच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो. साधारण अडीच वर्षानंतर वऱ्हाडी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतोय. खूप दिवसानंतर जानराव आलेत. ) अमदा आमच्या भागात कसा पाणी पडला तुम्हाले तर मालूमच हाय. माणूस माणूस पाणी धसल होतं वावरात, आठ दिस झाले तरी टोंगळा टोंगळा गाढणं होत. वावरात जाची सोय नव्हती. तो आपला ग्यानबा नाही तसा मोठा कास्तकार हाय तो, पण देवाच्या मर्जीपुढ का चालते जी. त्याच वावर तर नदीच्या काठावरच हाय पाणी उतराच नाव घेत नव्हतं.

परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३ ·
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.