मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ईंग्लिश व्याकरणाबाबत मदत हवी आहे Expla'i'nation का नाही?

शानबा५१२ ·

In reply to by सुनील

शानबा५१२ 26/09/2010 - 21:07
'hairs are' न होता 'hair is' होत,ह्याला कारण आहे,तसे सर्वच गोष्टींना आहे. बाकी 'पिंग' हे 'पिन्ग' अस वाचतात मग 'सिंह' हे 'सिन्ह' असे न वाचता 'सिम्ह' का वाचतात?

In reply to by शानबा५१२

सुनील 26/09/2010 - 21:14
आवो, बोलून चालून भाषा आहे ती! गणितासारखी २+२=४, अशी थोडीच चालणार आहे? कुठल्या हिंदी चित्रपटात आहे ते - To टू, Do डू पण Go ......? असो, GHOTI ह्या शब्दाचा उच्चार काय होतो?

In reply to by सुनील

शानबा५१२ 26/09/2010 - 21:27
ह्या शब्दांना अपवाद वगैरे म्हणत असावेत व ह्यांना काही कारण नसावे पण मी विचारलेल्या प्रश्नांना कारण आहे.'सिम्ह'च का ह्याचे उत्तर मी विसरलो आहे,पाचवीत असताना माहीती झाले होते. कृपया 'माहीत्या' मिळवुन उत्तर द्यावे. - आर.आर. आबा

In reply to by शानबा५१२

विजुभाऊ 26/09/2010 - 21:35
मराठी वाचताना एखा शब्दाच्या अगोदरच्या शब्दावर अनुस्वार असेल तर नियमाप्रमाणे नन्तरच्या शब्दाच्या गटात असलेले सानुनासीक अक्षर उच्चारात येते उदा : ट ठ ड ढ ण या मुळे खन्ड असे न उच्चारता खण्ड असे उच्चारले जाते. तसेच पिंग या शब्दाचा उच्चर पिङ्ग असा होतो क ख ग घ ङ या ह टा मुळे गंगा हा शब्द गन्गा असा न उच्चारता गङ्गा असा उच्चारतात त थ द ध न य गटा मुळे दंत हा शब्द दन्त असा उच्चारतात य र ल व स श या गटात अनुनासीक नाही त्यामुळे सिंह या शब्दाचा उच्चार सिम्व्ह असा होतो. त्या अपभ्रंश सिंघ असा देखील होतो. इंग्रजी भाषेत एम आणि एन हे दोनच अक्षरे अनुनासीक म्हणून येतात त्यामुळे मराठीतले अनेक उच्चार इंग्रजीत होत नाहीत. अर्थात हे प्रत्येक भाषे बाबत होतच असते. मराठीतला ज्ञ या अक्षराचा गुजराती उच्चार ग्न असा होतो. तर हिंदी उच्चार ग्य असा होतो.

In reply to by विजुभाऊ

शानबा५१२ 27/09/2010 - 08:30
खुप खुप धन्यवाद, ही मीहीती पहील्यांदाच समजली. सानुनासीक अक्षर हे अस काही ईंग्लिशमधे असेल असे वाटत नाही. म्हणुन माझा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

In reply to by शानबा५१२

डावखुरा 27/09/2010 - 00:44
सिम्व्ह असा उच्चार करताना खुपदा ऐकलंय... आणि ज्ञ चा उच्चार गुजरातीत ग्न होतो त्यासाठी उदा.. जिग्नेश..हाच शब्द मराठीत जिज्ञेश असा उच्चारला जातो... बाकी Explanation की Explaination हा घोटाळा अमेरिकन आणि ब्रिटीश्,फ्रेन्च अशा प्रचलित असणार्‍या अ‍ॅक्सेंट पध्दतीमुळे होत असावा...

In reply to by डावखुरा

शानबा५१२ 27/09/2010 - 08:37
अ‍ॅक्सेंट चा व ह्याचा काही संबंध नाही. अमेरीकेत प्रचलित असणारे पण मुळ वेगळे असणारे शब्द. aluminium - aluminum metre - meter centre - center असे खुप आहेत. माझा प्रश्नाबाबत एखादा नियम लागु होतो जो मी शोधत आहे.

धनंजय 27/09/2010 - 02:13
आणखी काही उदाहरणे : exclaim -> exclamation pronounce -> pronunciation वेगळ्या प्रत्ययाची आणखी उदाहरणे : prevail -> prevalence abound -> abundance explain -> explanatory (पुढील उदाहरणात दुहेरी स्वर स्पेलिंगमध्ये नाणवत नाही, पण उच्चारात दुहेरीचा एकेरी झालेला स्पष्ट कळतो -) incline (इन्क्लाइन) -> inclination (इन्क्लिनेशन) अशा परिस्थितीत दुहेरी स्वराच्या जागेवर एकेरी स्वर येतो, हा बदल हे इंग्रजीमध्ये नियमितच आहे.

In reply to by धनंजय

शानबा५१२ 27/09/2010 - 08:42
incline (इन्क्लाइन) -> inclination (इन्क्लिनेशन) spelling बदलल्याने उच्चार बदललेत.ह्या बदलात e काढुन ation लावावे हा नियम आहे.अधिक माहीती मिळवत आहे. ह्यासारखाच नियम explain ह्या शब्दाला लागु होत असावा. धन्यवाद,उत्तराच्या जवळ आलो आहोत.आपणही प्रयत्न(विचारपुस) करा.

In reply to by शानबा५१२

धनंजय 27/09/2010 - 19:27
उच्चार वेगळा असल्यामुळे स्पेलिंग वेगळे आहे. भाषेत ध्वनी=उच्चार हा आधी असतो. स्पेलिंग हे नंतर असते. आणि तुम्ही म्हणता तो नियम : "पुढल्या 'e'मुळे आदल्या स्वराचा उच्चार 'मोठा' होतो" यापेक्षा व्यापक आहे. "पुढल्या निराघात स्वरामुळे आदल्या स्वराचा उच्चार 'मोठा' होतो" असा आहे. बघा : incline (इन्क्लाइन) -> inclining (इन्क्लाइनिंग) येथे पुढे 'e' नसून निराघात 'i' आहे. म्हणून आदल्या 'i'चा उच्चार 'मोठा' आहे. तसेच climax (क्लायमॅक्स) येथे पुढील निराघात 'a' आहे. म्हणून आदल्या 'i'चा उच्चार 'मोठा' आहे.

(श्री.धनंजय यांचाच प्रतिसाद पुढे नेत आहे....) इंग्लिश व्याकरणाच्या नियमांची जंत्री देताना एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे सोमवारचा रूल सोमवारला लावला म्हणजे तो मंगळवारलादेखील चालेल असे होत नाही. याला कारण म्हणजे या भाषेच्या वापरातील लवचिकता (Flexibility) जी जवळपास जगात सर्वत्र वापरात आहे. त्यामुळे प्रारंभ-प्रत्ययाचा रूल उत्तरगामी प्रत्ययाला का लागू होत नाही ही शंका निघत नाही. असो. 'explain' ह्या क्रीयापदाला '-tion' हा प्रत्यय(suffix) लावताना 'explaination' असे न होता 'explanation' का होते? ~~ असे न होण्यामागे भाषेत असा नियम (वा धारणा म्हणू या हवे तर...) की ज्यावेळी 'Consonant' ने क्रियापद संपते आणि त्या Consonant च्या अगोदर स्पेलिंगमध्ये लागोपाठ दोन 'Vowels' येत असतील तर '-tion' हा उत्तरगामी प्रत्यय लावताना त्याचे रुपांतर “-ation” मध्ये करावे आणि मूळ क्रियापदातील 'Consonant' च्या अगोदरचे एक 'Vowel' कमी करावे (इथे 'i' चा लोप झाला.) ~~ 'Maintain' या क्रियापदाचे 'Maintenance ' असे नामात रूपांतर होताना हाच नियम लागू होतो. इन्द्रा (जाता जाता या संदर्भातच, पण थोडेसे अवांतर ~~ खुद्द बीबीसीवर ग्रामरच्या किचकट स्वरूपाविषयी एकदा सखोल चर्चा झाली होती. त्याचा विषय होता "Schools to rethink 'i before e" (चर्चेतील तज्ज्ञांनी जी उदाहरणे दिली तीत आपल्या रोजच्या वाचनातील "Receive, Seize, Caffeine, Ceiling, Science, View, Piece, Species, Eight, Thief, Beige, Field" या सम शब्दांचा वापर करताना 'ई' ला किती व का महत्व द्यावे हाच कळीचा मुद्दा झाला होता. ~~ यावर पुढे केव्हातरी इथे चर्चा व्हावी असे वाटते.)

In reply to by इन्द्र्राज पवार

धनंजय 27/09/2010 - 19:34
वरती दिलेला नियम जवळजवळ बरोबर असावा. बहुधा नियमाची व्याप्ती फार मर्यादित होते आहे. "-tion" वेगळ्या अन्य प्रत्ययांनासुद्धा हा नियम लागू आहे. बघावे : explain -> explanatory येथे वेगळ्या प्रत्ययाच्या ठिकाणी हाच बदल होतो आहे. आणि उच्चाराऐवजी स्पेलिंगकडे लक्ष दिल्यामुळे व्याप्ती थोडीशी अयोग्यही होत आहे. detain -> detention retain -> retention (येथे आघात त्याच ठिकाणी राहिल्यामुळे एकेरी स्वर वेगळा आहे. व्युत्पत्तीच्या दृष्टीने detention मधील स्वर अधिक प्राचीन आहे. परंतु इंग्रजीपुरते बोलायचे झाले तर 'detain' हे मूळ रूप आणि त्याला जोडलेला '-tion' हा प्रत्यय मानायला काहीच हरकत नाही.) शिवाय : contain -> continence abound -> abundance (येथे पाणिनीचे संस्कृतबाबत निरीक्षण सामांतर्यामुळे उपयोगी ठरावे : "एच इग्घ्रस्वादेशे" -> 'ए'/'ऐ'चे ह्रस्वरूप 'इ' आहे, आणि 'ओ'/'औ'चे ह्रस्वरूप 'उ' आहे. इंग्रजीमध्ये साघात ह्रस्वरूपे जशीच्यातशी असतात. पण निराघात ह्रस्वरूपे पाणिनीच्या या जोडणीने दिली जातात.)

In reply to by इन्द्र्राज पवार

शानबा५१२ 27/09/2010 - 19:40
खुप खुप आभार पवारसर, आता एक विनंती ह्या माहीतीचा स्त्रोत कळेल का? एखादे पुस्तक असल्यास सांगावे. मिपावर पहील्यांदा अपेक्षित मदत मिळाली. विजुभाउ,धनंजय आपले व ईतर सर्वांचे आभार!

In reply to by शानबा५१२

धनंजय 27/09/2010 - 21:30
"फोनोटॅक्टिक्स" बघा. इंग्लंडातील बोलीतील उच्चारांशी/स्पेलिंगांशी संबंधित विकीलेखसुद्धा चांगलाच आहे. त्यातील बहुतेक मुद्दे अमेरिकन बोलीतल्या उच्चारांना/स्पेलिंगांना लागू पडतात.

In reply to by सुनील

शानबा५१२ 26/09/2010 - 21:07
'hairs are' न होता 'hair is' होत,ह्याला कारण आहे,तसे सर्वच गोष्टींना आहे. बाकी 'पिंग' हे 'पिन्ग' अस वाचतात मग 'सिंह' हे 'सिन्ह' असे न वाचता 'सिम्ह' का वाचतात?

In reply to by शानबा५१२

सुनील 26/09/2010 - 21:14
आवो, बोलून चालून भाषा आहे ती! गणितासारखी २+२=४, अशी थोडीच चालणार आहे? कुठल्या हिंदी चित्रपटात आहे ते - To टू, Do डू पण Go ......? असो, GHOTI ह्या शब्दाचा उच्चार काय होतो?

In reply to by सुनील

शानबा५१२ 26/09/2010 - 21:27
ह्या शब्दांना अपवाद वगैरे म्हणत असावेत व ह्यांना काही कारण नसावे पण मी विचारलेल्या प्रश्नांना कारण आहे.'सिम्ह'च का ह्याचे उत्तर मी विसरलो आहे,पाचवीत असताना माहीती झाले होते. कृपया 'माहीत्या' मिळवुन उत्तर द्यावे. - आर.आर. आबा

In reply to by शानबा५१२

विजुभाऊ 26/09/2010 - 21:35
मराठी वाचताना एखा शब्दाच्या अगोदरच्या शब्दावर अनुस्वार असेल तर नियमाप्रमाणे नन्तरच्या शब्दाच्या गटात असलेले सानुनासीक अक्षर उच्चारात येते उदा : ट ठ ड ढ ण या मुळे खन्ड असे न उच्चारता खण्ड असे उच्चारले जाते. तसेच पिंग या शब्दाचा उच्चर पिङ्ग असा होतो क ख ग घ ङ या ह टा मुळे गंगा हा शब्द गन्गा असा न उच्चारता गङ्गा असा उच्चारतात त थ द ध न य गटा मुळे दंत हा शब्द दन्त असा उच्चारतात य र ल व स श या गटात अनुनासीक नाही त्यामुळे सिंह या शब्दाचा उच्चार सिम्व्ह असा होतो. त्या अपभ्रंश सिंघ असा देखील होतो. इंग्रजी भाषेत एम आणि एन हे दोनच अक्षरे अनुनासीक म्हणून येतात त्यामुळे मराठीतले अनेक उच्चार इंग्रजीत होत नाहीत. अर्थात हे प्रत्येक भाषे बाबत होतच असते. मराठीतला ज्ञ या अक्षराचा गुजराती उच्चार ग्न असा होतो. तर हिंदी उच्चार ग्य असा होतो.

In reply to by विजुभाऊ

शानबा५१२ 27/09/2010 - 08:30
खुप खुप धन्यवाद, ही मीहीती पहील्यांदाच समजली. सानुनासीक अक्षर हे अस काही ईंग्लिशमधे असेल असे वाटत नाही. म्हणुन माझा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

In reply to by शानबा५१२

डावखुरा 27/09/2010 - 00:44
सिम्व्ह असा उच्चार करताना खुपदा ऐकलंय... आणि ज्ञ चा उच्चार गुजरातीत ग्न होतो त्यासाठी उदा.. जिग्नेश..हाच शब्द मराठीत जिज्ञेश असा उच्चारला जातो... बाकी Explanation की Explaination हा घोटाळा अमेरिकन आणि ब्रिटीश्,फ्रेन्च अशा प्रचलित असणार्‍या अ‍ॅक्सेंट पध्दतीमुळे होत असावा...

In reply to by डावखुरा

शानबा५१२ 27/09/2010 - 08:37
अ‍ॅक्सेंट चा व ह्याचा काही संबंध नाही. अमेरीकेत प्रचलित असणारे पण मुळ वेगळे असणारे शब्द. aluminium - aluminum metre - meter centre - center असे खुप आहेत. माझा प्रश्नाबाबत एखादा नियम लागु होतो जो मी शोधत आहे.

धनंजय 27/09/2010 - 02:13
आणखी काही उदाहरणे : exclaim -> exclamation pronounce -> pronunciation वेगळ्या प्रत्ययाची आणखी उदाहरणे : prevail -> prevalence abound -> abundance explain -> explanatory (पुढील उदाहरणात दुहेरी स्वर स्पेलिंगमध्ये नाणवत नाही, पण उच्चारात दुहेरीचा एकेरी झालेला स्पष्ट कळतो -) incline (इन्क्लाइन) -> inclination (इन्क्लिनेशन) अशा परिस्थितीत दुहेरी स्वराच्या जागेवर एकेरी स्वर येतो, हा बदल हे इंग्रजीमध्ये नियमितच आहे.

In reply to by धनंजय

शानबा५१२ 27/09/2010 - 08:42
incline (इन्क्लाइन) -> inclination (इन्क्लिनेशन) spelling बदलल्याने उच्चार बदललेत.ह्या बदलात e काढुन ation लावावे हा नियम आहे.अधिक माहीती मिळवत आहे. ह्यासारखाच नियम explain ह्या शब्दाला लागु होत असावा. धन्यवाद,उत्तराच्या जवळ आलो आहोत.आपणही प्रयत्न(विचारपुस) करा.

In reply to by शानबा५१२

धनंजय 27/09/2010 - 19:27
उच्चार वेगळा असल्यामुळे स्पेलिंग वेगळे आहे. भाषेत ध्वनी=उच्चार हा आधी असतो. स्पेलिंग हे नंतर असते. आणि तुम्ही म्हणता तो नियम : "पुढल्या 'e'मुळे आदल्या स्वराचा उच्चार 'मोठा' होतो" यापेक्षा व्यापक आहे. "पुढल्या निराघात स्वरामुळे आदल्या स्वराचा उच्चार 'मोठा' होतो" असा आहे. बघा : incline (इन्क्लाइन) -> inclining (इन्क्लाइनिंग) येथे पुढे 'e' नसून निराघात 'i' आहे. म्हणून आदल्या 'i'चा उच्चार 'मोठा' आहे. तसेच climax (क्लायमॅक्स) येथे पुढील निराघात 'a' आहे. म्हणून आदल्या 'i'चा उच्चार 'मोठा' आहे.

(श्री.धनंजय यांचाच प्रतिसाद पुढे नेत आहे....) इंग्लिश व्याकरणाच्या नियमांची जंत्री देताना एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे सोमवारचा रूल सोमवारला लावला म्हणजे तो मंगळवारलादेखील चालेल असे होत नाही. याला कारण म्हणजे या भाषेच्या वापरातील लवचिकता (Flexibility) जी जवळपास जगात सर्वत्र वापरात आहे. त्यामुळे प्रारंभ-प्रत्ययाचा रूल उत्तरगामी प्रत्ययाला का लागू होत नाही ही शंका निघत नाही. असो. 'explain' ह्या क्रीयापदाला '-tion' हा प्रत्यय(suffix) लावताना 'explaination' असे न होता 'explanation' का होते? ~~ असे न होण्यामागे भाषेत असा नियम (वा धारणा म्हणू या हवे तर...) की ज्यावेळी 'Consonant' ने क्रियापद संपते आणि त्या Consonant च्या अगोदर स्पेलिंगमध्ये लागोपाठ दोन 'Vowels' येत असतील तर '-tion' हा उत्तरगामी प्रत्यय लावताना त्याचे रुपांतर “-ation” मध्ये करावे आणि मूळ क्रियापदातील 'Consonant' च्या अगोदरचे एक 'Vowel' कमी करावे (इथे 'i' चा लोप झाला.) ~~ 'Maintain' या क्रियापदाचे 'Maintenance ' असे नामात रूपांतर होताना हाच नियम लागू होतो. इन्द्रा (जाता जाता या संदर्भातच, पण थोडेसे अवांतर ~~ खुद्द बीबीसीवर ग्रामरच्या किचकट स्वरूपाविषयी एकदा सखोल चर्चा झाली होती. त्याचा विषय होता "Schools to rethink 'i before e" (चर्चेतील तज्ज्ञांनी जी उदाहरणे दिली तीत आपल्या रोजच्या वाचनातील "Receive, Seize, Caffeine, Ceiling, Science, View, Piece, Species, Eight, Thief, Beige, Field" या सम शब्दांचा वापर करताना 'ई' ला किती व का महत्व द्यावे हाच कळीचा मुद्दा झाला होता. ~~ यावर पुढे केव्हातरी इथे चर्चा व्हावी असे वाटते.)

In reply to by इन्द्र्राज पवार

धनंजय 27/09/2010 - 19:34
वरती दिलेला नियम जवळजवळ बरोबर असावा. बहुधा नियमाची व्याप्ती फार मर्यादित होते आहे. "-tion" वेगळ्या अन्य प्रत्ययांनासुद्धा हा नियम लागू आहे. बघावे : explain -> explanatory येथे वेगळ्या प्रत्ययाच्या ठिकाणी हाच बदल होतो आहे. आणि उच्चाराऐवजी स्पेलिंगकडे लक्ष दिल्यामुळे व्याप्ती थोडीशी अयोग्यही होत आहे. detain -> detention retain -> retention (येथे आघात त्याच ठिकाणी राहिल्यामुळे एकेरी स्वर वेगळा आहे. व्युत्पत्तीच्या दृष्टीने detention मधील स्वर अधिक प्राचीन आहे. परंतु इंग्रजीपुरते बोलायचे झाले तर 'detain' हे मूळ रूप आणि त्याला जोडलेला '-tion' हा प्रत्यय मानायला काहीच हरकत नाही.) शिवाय : contain -> continence abound -> abundance (येथे पाणिनीचे संस्कृतबाबत निरीक्षण सामांतर्यामुळे उपयोगी ठरावे : "एच इग्घ्रस्वादेशे" -> 'ए'/'ऐ'चे ह्रस्वरूप 'इ' आहे, आणि 'ओ'/'औ'चे ह्रस्वरूप 'उ' आहे. इंग्रजीमध्ये साघात ह्रस्वरूपे जशीच्यातशी असतात. पण निराघात ह्रस्वरूपे पाणिनीच्या या जोडणीने दिली जातात.)

In reply to by इन्द्र्राज पवार

शानबा५१२ 27/09/2010 - 19:40
खुप खुप आभार पवारसर, आता एक विनंती ह्या माहीतीचा स्त्रोत कळेल का? एखादे पुस्तक असल्यास सांगावे. मिपावर पहील्यांदा अपेक्षित मदत मिळाली. विजुभाउ,धनंजय आपले व ईतर सर्वांचे आभार!

In reply to by शानबा५१२

धनंजय 27/09/2010 - 21:30
"फोनोटॅक्टिक्स" बघा. इंग्लंडातील बोलीतील उच्चारांशी/स्पेलिंगांशी संबंधित विकीलेखसुद्धा चांगलाच आहे. त्यातील बहुतेक मुद्दे अमेरिकन बोलीतल्या उच्चारांना/स्पेलिंगांना लागू पडतात.
'explain' ह्या क्रीयापदाला '-tion' हा प्रत्यय(suffix) लावताना 'explaination' असे न होता 'explanation' का होते? 'n' च्या आधी 'i' हे vowel असल्यामुळे एखादा नियम लागु झाला असावा अस वाटत्,पण गुगलवर काही माहीती मिळाली नाही.म्हणुन ईथे आपणास विचारतो आहे. मला खुप दीवसांपासुन हा प्रश्न होता.मधे हा प्रश्न मनातुन अनुत्तरीतच(?) राहुन निघुन गेला,पण आज पुन्हा लक्षात आला तेव्हा रहावले नाही. कृपया माहीतीगारांनी शंका दुर करावी.

धक धक करने लगा...

डॉ.श्रीराम दिवटे ·

गांधीवादी 26/09/2010 - 11:53
आप्का लिखा हुआ पडके दिल मे 'कुचकुच' होने लगा. तमाम हिंदी चित्रपट सृष्टीचे पोट ह्या 'दिल' नामक पंप मुळेच चालते, ते थांबून कसे चालेल. ते धडकलेच पाहिजे. लेख आवडला हे.सां.न.ल.

गांधीवादी 26/09/2010 - 11:53
आप्का लिखा हुआ पडके दिल मे 'कुचकुच' होने लगा. तमाम हिंदी चित्रपट सृष्टीचे पोट ह्या 'दिल' नामक पंप मुळेच चालते, ते थांबून कसे चालेल. ते धडकलेच पाहिजे. लेख आवडला हे.सां.न.ल.
कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी.

पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!!

मस्त कलंदर ·

मस्त कलंदर 24/09/2010 - 00:27
एक राहिलेच. मी हा चित्रपट पाहून दोन महिने उलटून गेले असतील. आज बहुगुणींशी बोलताना आज अचानक हा चित्रपट आठवला. यावर लिहायचे असे खूप दिवसांपासून मनात होतेच म्हणून आज बसल्या बसल्या लिहून काढले. आज अप्रत्यक्षरित्या बहुगुणीकाकांमुळे हा लेख लिहिला गेला म्हणून त्यांचे आभार!!!

पुष्करिणी 24/09/2010 - 00:32
मला आवडलाय हा सिनेमा. नीना कुळकर्णीचा रोल मस्त आहे, तशी चारचौघांच्या भाषेत सुखी असणारी पण आंतरिक रूखरूख असलेलं व्यक्तिमत्व छान साकारलय.

रेवती 24/09/2010 - 00:35
मस्त सिनेमा आहे हा! मी दोनवेळा पाहिलाय. आजकाल तूनळी किंवा आपलीमराठीवर दिसत नाही पण!:( मला त्यातलं नितळ आरस्पानी गाणं खूप आवडलय. कुठे मिळेल हा सिनेमा? सगळ्यांचे अभिनयही छान झालेत! माझ्या मैत्रिणीच्या आईला कोड आहे. आधी ते माहित नव्हते. ती अशीच आईला घेउन आली आणि मला मनातल्यामनात जरा धक्का बसला. एखाद्या मिनिटात सरावले आणि नंतर काहीच वाटले नाही.

मस्त कलंदर 24/09/2010 - 00:45
माझ्या एका मैत्रिणीला पाहायला आले होते. एकदम मुलाचे बाबा साडी थोडीशी वरती धरून पाय दाखव म्हणाले. क्षणभर तिला काही संदर्भ लागला नाही. आई आणि ताई, "असे चालतेच गं, दाखव तू पाय" असे म्हणाल्या. पाहुणे गेल्यावर तिने असे का केले असे विचारल्यावरून, "पायावर काही पांढरे डाग तर नाहीत, (पक्षी: मुलगी पांढर्‍या पायाची तर नाही) अशी खात्री करून घेण्यासाठी असे करतात" असे तिला उत्तर मिळाले. यावर ती मैत्रिण घरच्यांवर जाम भडकली. "जर का मला असे पुन्हा कुणी करायला सांगितले तर मुलगी पाहायला येतात की जनावरे खरेदी करायला? असे सरळ त्या पाहुण्यांना विचारेन" असा तिने घरच्यांना सज्जड दम दिला होता. सुदैवाने असा प्रसंगच नंतर ओढवला नाही..

In reply to by मस्त कलंदर

टिउ 24/09/2010 - 01:36
हाईट आहे च्यायला! असलं काही ऐकलं की मला मुलीच्या घरच्यांचाच जास्त संताप येतो. तेव्हाच्या तेव्हा हाकलुन द्यायला पाहिजे होतं पाहुण्यांना!

In reply to by मस्त कलंदर

मृत्युन्जय 24/09/2010 - 13:39
बोंबला. कोड पायावर नसुन अजुन दुसरीकडेच असले असते तर किंवा त्यांना तसा संशय असला असता तर? तो माणुस खुळचट पण मला विचाराल तर तितकीच चुक तुमच्या मैत्रिणीच्या घरच्यांची पण आहे. तुमच्या मैत्रिणीला माहित नसेल कदाचित पण तिच्या घरच्यांना तर माहिती होते ना काय चाललं आहे ते. अश्या लोकांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवावा.

In reply to by मृत्युन्जय

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:09
मलाही अगदी अस्साच राग आला होता त्या लोकांचा. अशा अमानवी प्रथा अजून चालू आहेत हे आपलेच दुर्दैव, दुसरं काय?

In reply to by मस्त कलंदर

शाहरुख 24/09/2010 - 23:59
तुझ्या मैत्रिणीच्या आईला आणि ताईला माझ्या वतीने चार शिव्या दे घरी जाऊन ! चित्रपट परिचय आवडला.

सुनील 24/09/2010 - 00:58
(पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!) असे एक चित्र-विडंबन टाकायचा मोह महत्प्रयासाने आवरला!! बाकी चित्रपट अद्याप पाहिला नाही. म्हणून - नो कमेन्ट्स!

नंदन 24/09/2010 - 01:12
चित्रपटाची ओळख अतिशय आवडली. अजून पाहिला नाही, पण वेगळ्या विषयासोबतच त्यातल्या अ-प्रचारकी टोनमुळे पहावासा वाटतो आहे. >>> पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? --- माझ्या परिचयात अशी एक व्यक्ती आहे. भर उन्हाळ्यातल्या ट्रेकलाही लांब बाह्यांचा शर्ट आणि फुलपँट घालून येण्याइतपत ती व्यक्ती दक्षता घेत असली तरी, चेहर्‍यावरच्या कोडांमुळे तो प्रयत्न फारसा यशस्वी ठरत नाही. कामाच्या ठिकाणी किंवा मित्रांसोबत असताना काही फरक पडत नसला, तरी लग्न जुळताना प्रश्न येतो आहे. यावरून आठवलं, लग्नात वराचे पाय धुण्याची प्रथा ही मुलाच्या पायावर काही कोडाचे डाग वगैरे नाहीत ना हे तपासण्याच्या उदात्त हेतूने सुरु झाली, असं एका संस्कृती-जाज्वल्य-अभिमानी व्यक्तीकडून ऐकलं होतं :). यात तर्काशी फारकत कितपत घेतली आहे, सगळ्याच परंपरांना शास्त्रीय आधार असल्याचा अट्टाहास किती आणि सत्य किती, याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल. त्यात भाग घेण्याची मुभा/पात्रता/इच्छा नाही. किंचित अवांतर - नितळ शब्दाच्या रूढ अर्थासोबतच मोल्सवर्थवर दिलेला (दुवा) हा दुसरा अप्रचलित अर्थ (सात पाताळांपैकी एकाचे नाव*) देखील कदाचित इथे अभिप्रेत असू शकेल. *अधिक अवांतर - 'अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल, पा- ताल' अशी सप्तपातालांची नावं मोल्सवर्थवरच सापडतात. त्यात नितळ कुठे आलं ते मात्र कळलं नाही. कोणी जाणकार याबद्दल अधिक सांगू शकेल का?*

In reply to by नंदन

शुचि 24/09/2010 - 01:37
पण लग्नात पाय धूत असताना ती गोष्ट कळून लग्न मोडायचं म्हणजे जरा जास्तच ऊशीर नाही का? जरा इल्लॉजीकलच वाटतं. ते ही अशा समाजात जिथे लग्न एकदा जमलं की सुद्धा ते मोडणं थोडं टॅबू च समजलं जातं.

In reply to by चित्रा

पैसा 24/09/2010 - 22:31
सिनेमाची ओळख पण तेवढ्याच नितळ भाषेत करून दिली आहेस! बघायला हवाच.

प्रियाली 24/09/2010 - 02:37
अगदी अशीच पण याही पेक्षा वाईट आणि वेगळ्या वळणाने जाणारी गोष्ट आयुष्यात पाहिलेली आहे. मुलगी अतिशय हुशार. मेडिकलला गेली. तिथे तिचे प्रेमही जुळले पण नंतर लक्षात आले की तिच्या अंगावर पांढरे डाग येत आहेत. (हे लग्ना आधी झाले की नंतर ते आठवत नाही.) त्या मुलाने काहीही म्हटले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या घरीही काही विरोध झाल्याचे आठवत नाही. परंतु या मुलीच्या आईने (स्वतःला सुशिक्षित वगैरे म्हणवणार्‍या) या गुणवान मुलीला घराचे दार बंद केले. का तर मुलगी अवलक्षणी आहे म्हणून. जन्मदात्री असे करू शकते हा विचारच नकोसा वाटतो. या मुलीचा भाऊही अतिशय शिकलेला आहे. त्याने या प्रकारामुळे घराचे नाव टाकले. सध्या मी भारतात नाही पण जेव्हा होते तेव्हा कित्येक वर्षे या मुलांना घराच्या दिशेने फिरकलेले पाहिले नव्हते. :( --- चित्रपटाची करून दिलेली ओळख आवडली. नेटावर उपलब्ध आहे का?

सहज 24/09/2010 - 06:18
उत्तम परिक्षण. चित्रपट यादीत टाकला गेला आहे.

चतुरंग 24/09/2010 - 07:13
चित्रपट सुरेखच आहे. आणि तू म्हटलेस तसा कोणतीही संदेशा संदेशी करण्याच्या भानगडीत न पडल्याने आपसूकच आपण जास्त अंर्मुख होऊन विचारात पडतो. कामे उत्तमच झाली आहेत. कै.विजय तेंडुलकरांचे आजोबा फार छान वठले आहेत! जरूर पहावा असा चित्रपट. सातवी आठवीत आमच्या वर्गात एक मुलगी होती तिला चेहेर्‍यावर कोड होते त्यामुळे ती सतत एकटी असे, तिला मोजक्याच मैत्रिणी होत्या पण त्यांच्याशी तिचे चांगले जमे पुढे ती बदली होऊन गेली असावी त्यामुळे पुढे काय ते माहीत नाही. एकूण आपल्या समाजात आतापर्यंत परिस्थिती बर्‍यापैकी सुधारली असावी. अगदी माणूस टाळून त्याला वाळीत टाकण्यापर्यंत तरी मजल नक्कीच जात नसेल. लग्नसंबंध होताना मात्र कितपत सामावून घेतले जात असावे ह्याबद्दल साशंक आहे.

बट्ट्याबोळ 24/09/2010 - 09:26
खूप सुंदर चित्रपट आहे. यातील दोन प्रसंग माझ्या नेहेमी लक्षात राहतातः १. व्हेरिगेटेड प्लँट्स - पानांवर विविध डाग असूनही सुंदर दिसणारी झाडे, याचा कोडाशी संबंध जोडणारा प्रसंग. २. एक गाणं: "अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार उजेडातल्या रखरखलेल्या, हटवादी अन् दुर्मुखलेल्या अगणित चेहे-यांच्या गर्दीला कवेत घेई अंधार .. शांत शांत अंधार ..." १०-१५ वेळा चित्रपट बघितला आहे.

In reply to by बट्ट्याबोळ

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:09
व्हेरिगेटेड प्लँट्स - पानांवर विविध डाग असूनही सुंदर दिसणारी झाडे, याचा कोडाशी संबंध जोडणारा प्रसंग.
अगदी... म्हणून तर इंद्राजदाला दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलं आहे की, प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगून जाते आणि एकही गोष्ट अनाठाई म्हणून वाटत नाही.. या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल लिहायचे राहिले होते, ती उणीव तुम्ही, परा आणि रंगाकाकांनी भरून काढली. :)

चित्रपट ओळख आवडली. चित्रपट मिळवून जरूर बघणारच. आमच्या शेजार्‍यांचा एक जावई (बहुदा) जन्मजातच संपूर्ण पांढरा आहे. वयाने तो माझ्यापेक्षा बराच मोठा असल्यामुळे मी माझ्या लहानपणापासून त्याला पहाते आहे. आधी थोडीशी भीतीच वाटली त्याची, पण एकदा त्याने गप्पा मारायला सुरूवात केली तेव्हापासून मैत्रीच झाली. त्याच्या मागे मी आईबाबांना त्याच्या अशा वर्णाबद्दल विचारलं आणि त्यांनीही जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं सांगितलं. पण मुख्य गोष्ट हीच सांगितली, "त्याच्या शरीरात रंगद्रव्य, मेलॅनिन कमी आहे म्हणून त्याचा रंग असा; हा काही रोग नाही. तुझा हातसुद्धा पहा, फ्रॉकच्या बाह्या जिथे संपतात तिथे हातावर रंगांमधे कसा फरक दिसतो ते!" मके, तुझा प्रश्न अगदीच अस्थानी नाही. याच 'जावया'बद्दल आमच्या बिल्डींगमधलेच लोक काय काय बोलायचे ते ही आमच्या कानावर पडायचं!

"अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात...." ~~ घडू शकतात, घडत राहतात [चित्रपटातील याच कारणाने नव्हे तर इतरही अनेक पैलू असतात] प्रत्येक घरात या प्रकारची एखादी वेदना ठसठसत असतेच असते. प्रश्न आहे तो तिला शमविण्याचा ! पण दुर्दैवाने तसे करण्याचे प्रयत्न फार दुर्बल असतात (जसे या चित्रपटातील ती टीव्ही सीरिअल्समध्ये काम करणारी आत्या, जी नीरजाचा तिरस्कार करीत नाही तर योग्य मेकअप करून रूपातील ते वैगुण्य झाकण्याची प्रॅक्टीकल सूचना करते). शतकानुशतके स्त्री-पुरुषाच्या '१०० टक्के निरोगी' पणाच्या ज्या कल्पना समाजमनात भिनल्या आहेत त्यामध्ये ज्या काही दृश्य घटकांना स्थान नाही, तीत कोड बर्‍याच वरच्या क्रमांकावर आहे, हे नाकारून चालत नाहीच. इथे भावनेचा प्रश्न नसून 'पुढील पिढीतही उतरला, तर काय?" हा जीवघेणा प्रश्न ज्येष्ठांच्या मनात सर्पासारखा सळसळत असेल तर ते दोषास पात्र होऊ शकत नाहीत. (सहज जाता जाता >> येथील 'कौलां"च्या भाऊगर्दीत जर असा एक कौल निघाला की "तुम्ही आपल्या घरी कोड असलेली व्यक्ती जावई/सून म्हणून स्वीकाराल का?" ~~ तर होकाराची टक्केवारी किती असू शकेल?) ~~ 'नीतळ' नायिका नीरजा किमान उच्चशिक्षित आहे, डॉक्टर आहे....जरी अनन्यबरोबर ती संसार करू शकली नाही (....मी चित्रपट पाहिलेला नाही, पण धागाकर्तीने उत्कृष्ट लिखाणाद्वारे, आणि फ्रेम्सद्वारे चित्रपट असा उलगडून दाखविला आहे, की जणू प्रत्यक्ष समोर पाहातच आहे) तरी एकटीने का होईना ती या व्यवहारी जगात आपले पुढील आयुष्य बुद्धीकौशल्यावर समर्थपणे व्यतीत करू शकेल. पण समाजातील सर्वच महाश्वेतांच्या बाबतीत हे घडू शकणार नाही आणि कायमपणे डागाची ती डागणी अंगावर घेऊन कुढीत आयुष्य काढत राहण्याचा प्रवास करावा लागेल हे कटू असले तरी सत्य आहे हे मानावे लागेल. वर एका प्रतिसादात अदिती म्हणते "....मग तर माझी त्याच्याशी मैत्रीच जुळली..." ~ असे कितीजणाच्या बाबतीत होऊ शकते? त्यात निदान 'पुरुष' असल्याने किमान तो बाहेर कामानिमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने का होईना मोकळेपणा अनुभवत असेल, पण मुलीच्याबाबतीत फार फार अडचणी येतात, आणि त्यातही दुर्दैव असे की ती आपले ते शल्य इतरांसमवेत शेअरही करू शकत नाही कारण परत तीच व्यथा....'निरोगी' समाजात मिसळण्याचा न्यूनगंड ! "दुसर्‍या बाईंशी कुणी पंगा घेण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी भल्याभल्यांना अधिकाराने आणि त्यांच्या ज्ञानाने गारद केलेय." ~~ हा तुम्ही पाहिलेला एक अनुभव...म्हणजेच इथे ज्ञानाचा मुद्दा किती महत्वाचा आहे ही बाब अधोरेखीत व्हावी. या व्यथेने पिडलेल्यांना खरे तर आधार आहे तो उच्च शिक्षणाचा... कारण कथेतील भावभावनांचा कल्लोळ कितीही चर्चीला तरी शेवटी या व्यवहारी जगात त्या व्यथेने पिडीत असलेल्यांना खर्‍या अर्थाने आधार कुठला असेल तो शिक्षणाचाच....जगण्यासाठी. "पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान." ~~ हे शेवटचे वाक्य (निदान मला तरी...) नीटसे समजले नाही. या वाक्यातील "न" काय आहे? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मस्त कलंदर 24/09/2010 - 14:39
"पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान."
टायपो हो. नंतर लक्षात आले होते पण भापो होईल म्हणून कुणा संपादकांना सांगितले नव्हते.
शतकानुशतके स्त्री-पुरुषाच्या '१०० टक्के निरोगी' पणाच्या ज्या कल्पना समाजमनात भिनल्या आहेत त्यामध्ये ज्या काही दृश्य घटकांना स्थान नाही, तीत कोड बर्‍याच वरच्या क्रमांकावर आहे, हे नाकारून चालत नाहीच.
चित्रपटाच्या पहिल्याच दृष्यात ती पुण्याला जायची तयारी करत असताना तिच्या मनातले यावरचे काही विचार दाखवले आहेत. तिला आलेले अनुभव हळूहळू तिच्या स्वभावाला अंतर्मुख, अबोल कसे बनवत गेले हे त्यातून कळते. ती पटकन आपल्या मनातले भाव चेहर्‍यावर दिसू देत नाही. खरंतर मी मुद्दाम इथे प्रत्येक गोष्ट नमूद नाही केली. पण चित्रपट, पात्रे किंबहुना व्यक्तिरेखा, संवाद, प्रत्येक पात्राचे विचार, प्रत्येक फ्रेम.. सगळ्याला काही अर्थ आहे.
म्हणजेच इथे ज्ञानाचा मुद्दा किती महत्वाचा आहे ही बाब अधोरेखीत व्हावी.
अर्थात. नीरजाने ही तेच केलेय. ज्ञानामुळे निदान एवढी प्रगल्भता येते की ती सौंदर्य म्हणजेच आयुष्यातली इतिकर्तव्यता नाही, त्याहीपलिकडे बरेच काही आहे हे माणसाला सांगते. माझ्या लोकल इंट्रानेटवर लोक अगदी टेराबाईटीमध्ये चित्रपट, गाणी, पुस्तके, सॉफ्टवेअर्स शेअर करतात. त्यामुळे चित्रपट कुठून डाऊनलोडवायचा ते माहित नाही. परा, गणपा आणि माहितगारांनी इथे नंदनवावे. (सौजन्यः टिंग्या)

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 25/09/2010 - 23:51
येथील 'कौलां"च्या भाऊगर्दीत जर असा एक कौल निघाला की "तुम्ही आपल्या घरी कोड असलेली व्यक्ती जावई/सून म्हणून स्वीकाराल का?" ~~ तर होकाराची टक्केवारी किती असू शकेल? असहमत. काही दिवसांपूर्वी आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न कराल का असा कौल होता. या धाग्यात कोडासंबंधी लिहिले आहे. एखाद्या गोष्टीने पीडीत असणार्‍या गोष्टींबद्दल सहानुभूती आहे किंवा आपण त्या गोष्टी मानत नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी "लग्न करा" हा धोशा पटत नाही. तसे असेल तर एखाद्याला/एखादीला इतर धर्म, जाती, देश, तसेच वेगवेगळ्या समस्यांनी गांजलेल्या उदा. शेतकरी आत्महत्या, दुश्काळ, पूर, सामाजिक समस्या उदा. वेश्या (ही मिपावरील लेटेस्ट हिट थीम. ज्यांच्यापासून दूर राहायचे आणि जमल्यास मदत करायची तर ते सोडून इथले लोक त्यांचा फायदा उठवतात, मैत्री करतात आणि वाचक या सगळ्याची प्रशंसा करतात ;) ), वैद्यकीय समस्या: कॅन्सर, एड्स, डिस्लेक्सिया, पा, कोड या आणि अशा प्रत्येक गटातील एकाशी/एकीशी लग्न करावे लागेल. लग्न करणे आणि पुढचे आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवणे, कुटुंब वगैरे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असून एखाद्या व्यक्तीला योग्य वाटेल त्याप्रकारे ती तिच्या जोडीदाराची निवड करेल, ते तिचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. यासाठीचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. इथे तावातावाने आक्षेप घेणार्‍यांनी लोक साक्षरता, आरोग्य, व्यसने, धर्म, जात, शिक्षण, पगार, रंग, रूप, चष्मा, उंची, जाडी, स्वभाव यासारख्या किंवा इतर अनेक गोष्टींच्या आधारे त्यांचे जोडीदार निवडलेले आहेत/ निवडतील. त्यांना एखाद्या गोष्टीचा संशय आल्यास तपासणीही करतील/ केली असेल. ज्याने एकही पाप केले नाही त्यानेच दगड मारायला पुढे यावे. इथे कोडाविषयी चर्चा सुरु आहे आणि वरती सांगितलेल्या एक हकीकतीत कोडाचे डाग पाहण्याला तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ती पद्धत अयोग्य आहे, पण दुर्दैवाने त्रासदायक गोष्टी लपवल्या जात असल्याने त्यांनी त्यांच्या पद्धतीने खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येईल. आपल्या देशात कोणी उठसूठ घटस्फोट घेत नाही/ घेउ शकत नाही त्यामुळे एकदा बंधनात अड्कण्याआधीच खात्री करून घेतली तर त्यात फारसे चूक नाही. (वधुवरांची संपूर्ण वैद्यकीय तपासणीचे अहवाल* एकमेकांना दिले तर उत्तमच)

In reply to by Pain

"आपण त्या गोष्टी मानत नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी "लग्न करा" हा धोशा पटत नाही." ~ तुम्ही मांडलेल्या ह्या लॉजिकशी असहमती दाखविण्याचे काहीच कारण नाही, इतके ते बिनतोड आहे. माणसाच्या आयुष्यात 'लग्न' ही एक अशी अवस्था आहे की अब्जाधिश आणि भिक्षाधिश या दोन्ही घटकांना जीवनसाथीची निसर्गनियमानुसार गरजच असते आणि त्या बंधनात राहण्यासाठी ज्या काही प्राथमिक अवस्था पार पाडाव्या लागतात (दोन्ही पक्षांना) त्यात एकमेकाची सर्वार्थाने ओळख ~ शारीरिक्+मानसिक ~ असणे हे क्रमप्राप्त असतेच असते. शेवटी मानले तर हा नशिबाचा खेळ, जुगार किंवा दैवेच्छा असेच असते. त्यामुळे ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःसाठी, अपत्यासाठी, मित्रासाठी अशा प्रकारच्या बंधनाचे कंकण घेण्यास पुढे सरसावते त्यावेळी जर ती एक्स्ट्राकॉशस राहिली तर तो तिचा दोष मानता येणार नाही. समाजात ज्या शारीरिक व्यंगाकडे एक भीतीदायक नजर लावली जाते तिच्याबद्दल सहानुभूती बाळगणारी व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर ती कितपत स्वीकारायला तयार आहे, हे पाहण्याचे मीटर म्हणजे त्या व्यंग असलेल्या व्यक्तीकडे 'लग्न' नजरेने पाहणे, इतपतच त्या लग्नाचे इररिफ्युटेबल ऑप्शन. जर 'मी ते मानत नाही' असे म्हणत व्यंग असलेल्या व्यक्तीस या अर्थाने आपल्या घरात स्वीकारले तर ती तशी कृती करणारी व्यक्ती नक्कीच वंदनीय आहे. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या पण शैक्षणिकदृष्ट्या सातत्याने आघाडीवर असलेल्या शहरात एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्याना दोन मुली. दोघीही उच्चविद्याविभुषित, पैकी एकीचा प्रेमविवाह होणार तर दुसरीचे रितिरिवाजानुसार ठरत आले होते.. आईवडिल प्रसिध्द, निरोगी, मुलीही तशाच, होणारे नवरेही त्याच दर्जाचे....सारे काही आलबेल. कुठलीही तक्रार नाही. लग्नाची बोलणीही अगदी दहा पंधरा मिनिटात संपली. पण अशावेळी डॉक्टरांचे थोरले बंधू उपस्थित पाहुण्यांना उद्देश्यून उभे राहून बोलू लागले ~ "लग्नाची बोलणी पुढे चालू राहण्यापूर्वी मी या मुलींचा थोरला काका या नात्याने एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या तीन भावात मी थोरला आहे. माझी दोन्ही लहान भावंडे निरोगी जन्माला आली पण मला वयाच्या १० व्या वर्षी कोडाने डसले आणि तो कायम राहिला आहे. त्यामुळे मी जरी आजन्म अविवाहित राहिलो असलो तरी दोघेही भाऊ निरोगी आहेत, त्यांची अपत्येही. भावांचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा संसार उभा केला आहे आणि आत्या त्यांच्या मुलींचा विवाह आज निश्चित होत आहे. पण पुढे माझ्यावरून माझ्या पुतणीस जर बोलणार असाल तर ते आताच बोला. विचार करा आणि मगच लग्नाची पुढील बोलणी करा. ही बाब मी अशारितीने जाहीर करून सांगणार आहे याची दोन्ही मुलींना कल्पना दिली आहे, आणि त्यांचा त्याबद्द्ल होकारही घेतला आहे..." काकांच्या या बोलण्यावर फक्त तीनचार मिनिटे दोन्ही नियोजित वरांकडील मंडळींत हलक्या आवाजात चर्चा झाली....आणि पाचव्या मिनिटालाच दोन्ही पक्ष साखरपुड्याच्या तयारीला आनंदाने पुढे सरसावली. आज या घडीला त्या दोन्ही मुली आपआपल्या सासरी आणि व्यवसायाच्या जागी यशस्वी जीवन जगत आहेत. ~ म्हणजेच याचा अर्थ असा की, 'लग्न' या घटकात सत्याला त्या त्या वेळी सामोरे गेले तर पुढील कित्येक शक्यता आपोआप मोडीत निघतात. इन्द्रा

अतिशय सुंदर चित्रपटाची तेवढीच सुंदर ओळख करुन दिली आहेस ग :) कोल्हापुरला असताना हा चित्रपट बघण्याचा योग आला. अर्धा चित्रपट व्हायच्या आतच आपण बाहेर निघुन येणार असे आधी वाटले होते, पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि त्यात कसे आणि कधी हरवुन गेलो तेच कळले नाही. नितळची वेबसाईट देखील बघणेबल आहे एकदम. आणि त्यातले हे एक मस्त गाणे :-

In reply to by प्रकाश घाटपांडे

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:10
पुण्यात डॉ माया तुळपुळे यांनी श्चेता असोसिएशन द्वारा यावर खुप काम केल आहे.
हे मला माहित नव्हते. डॉ. माया तुळपुळेच बहुधा या चित्रपटाच्या निर्माती आहेत.

अब् क 24/09/2010 - 17:15
आता शेवट काय होतो हे मी आता इथे सांगत नाही.????????????? हे अस का दिलय? पेपर मधे परिक्शन दिल्यासारख??????????

In reply to by अब् क

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:16
जर कुणाला चित्रपट पाहायचा असेल, तर पूर्ण माहिती वाचून त्यांचा रसभंग होऊ नये म्हणून शेवट सांगितला नाही. तरी मला अजून मुद्देसूद पुस्तक-चित्रपट परिचय लिहिता येत नाही असे माझे स्वतःचेच मत आहे. न राहवून बरेचसे कथानक लिहलं जातंच.

'नितळ' खूप दिवसांपासून आहे. आता शक्यतो लवकवरच बघायचा प्रयत्न करतो ! सिनेमा जितका साधा-सोपा आहे (असं तू लिहिलं आहेस) तसाच तुझा लेखही साधा-सोपा पण मनापासून लिहिला गेल्याने आवडलाय.

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:06
हा सिनेमा मी तसा एकदाच पाहिला.. पण आणखी कितीही वेळा मी तो पाहू शकेन. जर पाहिल्या पाहिल्या परिचय लिहिला असता तर त्यात मी अजून भर घालू शकले असते. हा दोन महिन्याहूनही अधिक काळानंतरचा आफ्टरइफेक्ट इतका जबरदस्त आहे, तर पाहिल्या पाहिल्यानंतरचा किती असेल कल्पना करा!!!!

In reply to by प्रभो

रेवती 25/09/2010 - 20:40
नाही सापडत रे! आपली मराठीवर होता तेंव्हा दोनदा पाहिला मी! अगदी साधा सोपा सिनेमा इतका परिणामकारक झालाय... दीपा लागूंचे काम भन्नाट्......तशी सगळ्यांचीच कामे छान झालीयेत. त्यातली आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अतोनात अत्याचार, अन्याय असे दिसत नसूनही माणसाच्या मानसिकतेमध्ये सुधारणा होण्याच्या जागा दिसतात. असे सिनेमे अंतर्मुख करतात तर पोलीस, अत्याचारांचे सिनेमे आवश्यक असले तरी वाईट वाटण्यापलिकडे आपल्याकडून काही होऊ शकत नाही.

प्रदीप 25/09/2010 - 19:44
चित्रपट परिचय, व त्यावरील चर्चाही. विशेषतः नंदन व इंद्रा ह्यांचे प्रतिसाद आवडले. प्रियाली ह्यांनी लिहीलेल्या घटनेने मात्र थक्क झालो. जितके जास्त पहावयास जावे तितका माणूस कळत नाही हेच खरे शेवटी! एका चांगल्या चित्रपटावरील उत्कट परिचय व त्यावरून घडवून आणलेली चर्चा आनंद देऊन गेली.

मस्त कलंदर 25/09/2010 - 20:53
http://www.onlinedownloadlink.com/index.php/archives/1824 किंवा इथे http://rehmananwar.blogspot.com/2010/04/download-free-marathi-movie-nital-high.html दोन्ही ठिकाणी सिनेमा ८ भागांत उपलब्ध आहे.

राघव 26/09/2010 - 07:02
बघायलाच हवा. आणखी एक चित्रपट मी खूप शोधला पण कुठेच सापडला नाही - गंध. हाही असाच सर्वांगसुंदर चित्रपट. कधीतरी लिहावे म्हणतो त्यावर. नीना कुळकर्णींचा अभिनय निव्वळ अप्रतीम!

रोचीन 27/09/2010 - 11:33
टि. व्ही. वर लागला होता तेव्हा पाहीला. अर्धवटच पाहीला पण जे काय पाहील ते आवडलं. पण एक खटकलं ते म्हणजे कि तिच्या चेहेर्यावरचे डाग अ‍ॅक्चुअल कोडाचे डाग नसून लहानपणी तेल चेहेर्यावर उडून पड्लेले आहेत असे दाखवलेले आहे. (निदान त्या आव्रुत्तीत तरि हे कारण दाखवले होतं.) त्यामुळे थोडासा रसभ्ग झाल्यासरखा वाटतो. पण चित्रपट छानच आहे. @रेवतीताई, >>त्यातली आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अतोनात अत्याचार, अन्याय असे दिसत नसूनही माणसाच्या मानसिकतेमध्ये सुधारणा होण्याच्या जागा दिसतात. १००% सहमत. आमच्या नात्यात एका मामींना चाळिशीनंतर हातावर थोडे कोड उठले होते. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाला खुपच प्रॉब्लेम आला होता. मुलगी दिसाय्ला चांगली, पेशाने इंजिनीअर असून सुद्धा तीचे लग्न जवळ्जवळ ३५शीनंतर झाले. ते सुद्धा एका कमी शिकलेल्या मुलाशी. पुधे तिचा संसार चांगला झाला पण सुरुवातीला झालेला त्रास खुपच होता.

एस 08/08/2016 - 00:46
आज हिच्याशी डॉ. सुमती क्षेत्रमाडेंच्या 'महाश्वेता' या कादंबरीबद्दल चर्चा करत असताना 'नितळ' हा चित्रपट आणि मस्त कलंदर यांच्या या लेखाची आठवण आली. प्रतिसादही मननीय आहेत.

चतुरंग 08/08/2016 - 01:04
'नितळ' फारच नितळ सिनेमा आहे! कामं सगळ्याच टीमची एकसोएक झाली आहेत. यातलं तेंडुलकरांच्या तोंडी असलेलं एक वाक्य मनात घर करुन आहे - "सत्यदर्शनानं निर्माण झालेली इच्छाशक्ती ही नियतीपेक्षा केव्हांही श्रेष्ठ असते!"

मस्त कलंदर 24/09/2010 - 00:27
एक राहिलेच. मी हा चित्रपट पाहून दोन महिने उलटून गेले असतील. आज बहुगुणींशी बोलताना आज अचानक हा चित्रपट आठवला. यावर लिहायचे असे खूप दिवसांपासून मनात होतेच म्हणून आज बसल्या बसल्या लिहून काढले. आज अप्रत्यक्षरित्या बहुगुणीकाकांमुळे हा लेख लिहिला गेला म्हणून त्यांचे आभार!!!

पुष्करिणी 24/09/2010 - 00:32
मला आवडलाय हा सिनेमा. नीना कुळकर्णीचा रोल मस्त आहे, तशी चारचौघांच्या भाषेत सुखी असणारी पण आंतरिक रूखरूख असलेलं व्यक्तिमत्व छान साकारलय.

रेवती 24/09/2010 - 00:35
मस्त सिनेमा आहे हा! मी दोनवेळा पाहिलाय. आजकाल तूनळी किंवा आपलीमराठीवर दिसत नाही पण!:( मला त्यातलं नितळ आरस्पानी गाणं खूप आवडलय. कुठे मिळेल हा सिनेमा? सगळ्यांचे अभिनयही छान झालेत! माझ्या मैत्रिणीच्या आईला कोड आहे. आधी ते माहित नव्हते. ती अशीच आईला घेउन आली आणि मला मनातल्यामनात जरा धक्का बसला. एखाद्या मिनिटात सरावले आणि नंतर काहीच वाटले नाही.

मस्त कलंदर 24/09/2010 - 00:45
माझ्या एका मैत्रिणीला पाहायला आले होते. एकदम मुलाचे बाबा साडी थोडीशी वरती धरून पाय दाखव म्हणाले. क्षणभर तिला काही संदर्भ लागला नाही. आई आणि ताई, "असे चालतेच गं, दाखव तू पाय" असे म्हणाल्या. पाहुणे गेल्यावर तिने असे का केले असे विचारल्यावरून, "पायावर काही पांढरे डाग तर नाहीत, (पक्षी: मुलगी पांढर्‍या पायाची तर नाही) अशी खात्री करून घेण्यासाठी असे करतात" असे तिला उत्तर मिळाले. यावर ती मैत्रिण घरच्यांवर जाम भडकली. "जर का मला असे पुन्हा कुणी करायला सांगितले तर मुलगी पाहायला येतात की जनावरे खरेदी करायला? असे सरळ त्या पाहुण्यांना विचारेन" असा तिने घरच्यांना सज्जड दम दिला होता. सुदैवाने असा प्रसंगच नंतर ओढवला नाही..

In reply to by मस्त कलंदर

टिउ 24/09/2010 - 01:36
हाईट आहे च्यायला! असलं काही ऐकलं की मला मुलीच्या घरच्यांचाच जास्त संताप येतो. तेव्हाच्या तेव्हा हाकलुन द्यायला पाहिजे होतं पाहुण्यांना!

In reply to by मस्त कलंदर

मृत्युन्जय 24/09/2010 - 13:39
बोंबला. कोड पायावर नसुन अजुन दुसरीकडेच असले असते तर किंवा त्यांना तसा संशय असला असता तर? तो माणुस खुळचट पण मला विचाराल तर तितकीच चुक तुमच्या मैत्रिणीच्या घरच्यांची पण आहे. तुमच्या मैत्रिणीला माहित नसेल कदाचित पण तिच्या घरच्यांना तर माहिती होते ना काय चाललं आहे ते. अश्या लोकांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवावा.

In reply to by मृत्युन्जय

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:09
मलाही अगदी अस्साच राग आला होता त्या लोकांचा. अशा अमानवी प्रथा अजून चालू आहेत हे आपलेच दुर्दैव, दुसरं काय?

In reply to by मस्त कलंदर

शाहरुख 24/09/2010 - 23:59
तुझ्या मैत्रिणीच्या आईला आणि ताईला माझ्या वतीने चार शिव्या दे घरी जाऊन ! चित्रपट परिचय आवडला.

सुनील 24/09/2010 - 00:58
(पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!) असे एक चित्र-विडंबन टाकायचा मोह महत्प्रयासाने आवरला!! बाकी चित्रपट अद्याप पाहिला नाही. म्हणून - नो कमेन्ट्स!

नंदन 24/09/2010 - 01:12
चित्रपटाची ओळख अतिशय आवडली. अजून पाहिला नाही, पण वेगळ्या विषयासोबतच त्यातल्या अ-प्रचारकी टोनमुळे पहावासा वाटतो आहे. >>> पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? --- माझ्या परिचयात अशी एक व्यक्ती आहे. भर उन्हाळ्यातल्या ट्रेकलाही लांब बाह्यांचा शर्ट आणि फुलपँट घालून येण्याइतपत ती व्यक्ती दक्षता घेत असली तरी, चेहर्‍यावरच्या कोडांमुळे तो प्रयत्न फारसा यशस्वी ठरत नाही. कामाच्या ठिकाणी किंवा मित्रांसोबत असताना काही फरक पडत नसला, तरी लग्न जुळताना प्रश्न येतो आहे. यावरून आठवलं, लग्नात वराचे पाय धुण्याची प्रथा ही मुलाच्या पायावर काही कोडाचे डाग वगैरे नाहीत ना हे तपासण्याच्या उदात्त हेतूने सुरु झाली, असं एका संस्कृती-जाज्वल्य-अभिमानी व्यक्तीकडून ऐकलं होतं :). यात तर्काशी फारकत कितपत घेतली आहे, सगळ्याच परंपरांना शास्त्रीय आधार असल्याचा अट्टाहास किती आणि सत्य किती, याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल. त्यात भाग घेण्याची मुभा/पात्रता/इच्छा नाही. किंचित अवांतर - नितळ शब्दाच्या रूढ अर्थासोबतच मोल्सवर्थवर दिलेला (दुवा) हा दुसरा अप्रचलित अर्थ (सात पाताळांपैकी एकाचे नाव*) देखील कदाचित इथे अभिप्रेत असू शकेल. *अधिक अवांतर - 'अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल, पा- ताल' अशी सप्तपातालांची नावं मोल्सवर्थवरच सापडतात. त्यात नितळ कुठे आलं ते मात्र कळलं नाही. कोणी जाणकार याबद्दल अधिक सांगू शकेल का?*

In reply to by नंदन

शुचि 24/09/2010 - 01:37
पण लग्नात पाय धूत असताना ती गोष्ट कळून लग्न मोडायचं म्हणजे जरा जास्तच ऊशीर नाही का? जरा इल्लॉजीकलच वाटतं. ते ही अशा समाजात जिथे लग्न एकदा जमलं की सुद्धा ते मोडणं थोडं टॅबू च समजलं जातं.

In reply to by चित्रा

पैसा 24/09/2010 - 22:31
सिनेमाची ओळख पण तेवढ्याच नितळ भाषेत करून दिली आहेस! बघायला हवाच.

प्रियाली 24/09/2010 - 02:37
अगदी अशीच पण याही पेक्षा वाईट आणि वेगळ्या वळणाने जाणारी गोष्ट आयुष्यात पाहिलेली आहे. मुलगी अतिशय हुशार. मेडिकलला गेली. तिथे तिचे प्रेमही जुळले पण नंतर लक्षात आले की तिच्या अंगावर पांढरे डाग येत आहेत. (हे लग्ना आधी झाले की नंतर ते आठवत नाही.) त्या मुलाने काहीही म्हटले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या घरीही काही विरोध झाल्याचे आठवत नाही. परंतु या मुलीच्या आईने (स्वतःला सुशिक्षित वगैरे म्हणवणार्‍या) या गुणवान मुलीला घराचे दार बंद केले. का तर मुलगी अवलक्षणी आहे म्हणून. जन्मदात्री असे करू शकते हा विचारच नकोसा वाटतो. या मुलीचा भाऊही अतिशय शिकलेला आहे. त्याने या प्रकारामुळे घराचे नाव टाकले. सध्या मी भारतात नाही पण जेव्हा होते तेव्हा कित्येक वर्षे या मुलांना घराच्या दिशेने फिरकलेले पाहिले नव्हते. :( --- चित्रपटाची करून दिलेली ओळख आवडली. नेटावर उपलब्ध आहे का?

सहज 24/09/2010 - 06:18
उत्तम परिक्षण. चित्रपट यादीत टाकला गेला आहे.

चतुरंग 24/09/2010 - 07:13
चित्रपट सुरेखच आहे. आणि तू म्हटलेस तसा कोणतीही संदेशा संदेशी करण्याच्या भानगडीत न पडल्याने आपसूकच आपण जास्त अंर्मुख होऊन विचारात पडतो. कामे उत्तमच झाली आहेत. कै.विजय तेंडुलकरांचे आजोबा फार छान वठले आहेत! जरूर पहावा असा चित्रपट. सातवी आठवीत आमच्या वर्गात एक मुलगी होती तिला चेहेर्‍यावर कोड होते त्यामुळे ती सतत एकटी असे, तिला मोजक्याच मैत्रिणी होत्या पण त्यांच्याशी तिचे चांगले जमे पुढे ती बदली होऊन गेली असावी त्यामुळे पुढे काय ते माहीत नाही. एकूण आपल्या समाजात आतापर्यंत परिस्थिती बर्‍यापैकी सुधारली असावी. अगदी माणूस टाळून त्याला वाळीत टाकण्यापर्यंत तरी मजल नक्कीच जात नसेल. लग्नसंबंध होताना मात्र कितपत सामावून घेतले जात असावे ह्याबद्दल साशंक आहे.

बट्ट्याबोळ 24/09/2010 - 09:26
खूप सुंदर चित्रपट आहे. यातील दोन प्रसंग माझ्या नेहेमी लक्षात राहतातः १. व्हेरिगेटेड प्लँट्स - पानांवर विविध डाग असूनही सुंदर दिसणारी झाडे, याचा कोडाशी संबंध जोडणारा प्रसंग. २. एक गाणं: "अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार उजेडातल्या रखरखलेल्या, हटवादी अन् दुर्मुखलेल्या अगणित चेहे-यांच्या गर्दीला कवेत घेई अंधार .. शांत शांत अंधार ..." १०-१५ वेळा चित्रपट बघितला आहे.

In reply to by बट्ट्याबोळ

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:09
व्हेरिगेटेड प्लँट्स - पानांवर विविध डाग असूनही सुंदर दिसणारी झाडे, याचा कोडाशी संबंध जोडणारा प्रसंग.
अगदी... म्हणून तर इंद्राजदाला दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलं आहे की, प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगून जाते आणि एकही गोष्ट अनाठाई म्हणून वाटत नाही.. या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल लिहायचे राहिले होते, ती उणीव तुम्ही, परा आणि रंगाकाकांनी भरून काढली. :)

चित्रपट ओळख आवडली. चित्रपट मिळवून जरूर बघणारच. आमच्या शेजार्‍यांचा एक जावई (बहुदा) जन्मजातच संपूर्ण पांढरा आहे. वयाने तो माझ्यापेक्षा बराच मोठा असल्यामुळे मी माझ्या लहानपणापासून त्याला पहाते आहे. आधी थोडीशी भीतीच वाटली त्याची, पण एकदा त्याने गप्पा मारायला सुरूवात केली तेव्हापासून मैत्रीच झाली. त्याच्या मागे मी आईबाबांना त्याच्या अशा वर्णाबद्दल विचारलं आणि त्यांनीही जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं सांगितलं. पण मुख्य गोष्ट हीच सांगितली, "त्याच्या शरीरात रंगद्रव्य, मेलॅनिन कमी आहे म्हणून त्याचा रंग असा; हा काही रोग नाही. तुझा हातसुद्धा पहा, फ्रॉकच्या बाह्या जिथे संपतात तिथे हातावर रंगांमधे कसा फरक दिसतो ते!" मके, तुझा प्रश्न अगदीच अस्थानी नाही. याच 'जावया'बद्दल आमच्या बिल्डींगमधलेच लोक काय काय बोलायचे ते ही आमच्या कानावर पडायचं!

"अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात...." ~~ घडू शकतात, घडत राहतात [चित्रपटातील याच कारणाने नव्हे तर इतरही अनेक पैलू असतात] प्रत्येक घरात या प्रकारची एखादी वेदना ठसठसत असतेच असते. प्रश्न आहे तो तिला शमविण्याचा ! पण दुर्दैवाने तसे करण्याचे प्रयत्न फार दुर्बल असतात (जसे या चित्रपटातील ती टीव्ही सीरिअल्समध्ये काम करणारी आत्या, जी नीरजाचा तिरस्कार करीत नाही तर योग्य मेकअप करून रूपातील ते वैगुण्य झाकण्याची प्रॅक्टीकल सूचना करते). शतकानुशतके स्त्री-पुरुषाच्या '१०० टक्के निरोगी' पणाच्या ज्या कल्पना समाजमनात भिनल्या आहेत त्यामध्ये ज्या काही दृश्य घटकांना स्थान नाही, तीत कोड बर्‍याच वरच्या क्रमांकावर आहे, हे नाकारून चालत नाहीच. इथे भावनेचा प्रश्न नसून 'पुढील पिढीतही उतरला, तर काय?" हा जीवघेणा प्रश्न ज्येष्ठांच्या मनात सर्पासारखा सळसळत असेल तर ते दोषास पात्र होऊ शकत नाहीत. (सहज जाता जाता >> येथील 'कौलां"च्या भाऊगर्दीत जर असा एक कौल निघाला की "तुम्ही आपल्या घरी कोड असलेली व्यक्ती जावई/सून म्हणून स्वीकाराल का?" ~~ तर होकाराची टक्केवारी किती असू शकेल?) ~~ 'नीतळ' नायिका नीरजा किमान उच्चशिक्षित आहे, डॉक्टर आहे....जरी अनन्यबरोबर ती संसार करू शकली नाही (....मी चित्रपट पाहिलेला नाही, पण धागाकर्तीने उत्कृष्ट लिखाणाद्वारे, आणि फ्रेम्सद्वारे चित्रपट असा उलगडून दाखविला आहे, की जणू प्रत्यक्ष समोर पाहातच आहे) तरी एकटीने का होईना ती या व्यवहारी जगात आपले पुढील आयुष्य बुद्धीकौशल्यावर समर्थपणे व्यतीत करू शकेल. पण समाजातील सर्वच महाश्वेतांच्या बाबतीत हे घडू शकणार नाही आणि कायमपणे डागाची ती डागणी अंगावर घेऊन कुढीत आयुष्य काढत राहण्याचा प्रवास करावा लागेल हे कटू असले तरी सत्य आहे हे मानावे लागेल. वर एका प्रतिसादात अदिती म्हणते "....मग तर माझी त्याच्याशी मैत्रीच जुळली..." ~ असे कितीजणाच्या बाबतीत होऊ शकते? त्यात निदान 'पुरुष' असल्याने किमान तो बाहेर कामानिमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने का होईना मोकळेपणा अनुभवत असेल, पण मुलीच्याबाबतीत फार फार अडचणी येतात, आणि त्यातही दुर्दैव असे की ती आपले ते शल्य इतरांसमवेत शेअरही करू शकत नाही कारण परत तीच व्यथा....'निरोगी' समाजात मिसळण्याचा न्यूनगंड ! "दुसर्‍या बाईंशी कुणी पंगा घेण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी भल्याभल्यांना अधिकाराने आणि त्यांच्या ज्ञानाने गारद केलेय." ~~ हा तुम्ही पाहिलेला एक अनुभव...म्हणजेच इथे ज्ञानाचा मुद्दा किती महत्वाचा आहे ही बाब अधोरेखीत व्हावी. या व्यथेने पिडलेल्यांना खरे तर आधार आहे तो उच्च शिक्षणाचा... कारण कथेतील भावभावनांचा कल्लोळ कितीही चर्चीला तरी शेवटी या व्यवहारी जगात त्या व्यथेने पिडीत असलेल्यांना खर्‍या अर्थाने आधार कुठला असेल तो शिक्षणाचाच....जगण्यासाठी. "पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान." ~~ हे शेवटचे वाक्य (निदान मला तरी...) नीटसे समजले नाही. या वाक्यातील "न" काय आहे? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मस्त कलंदर 24/09/2010 - 14:39
"पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान."
टायपो हो. नंतर लक्षात आले होते पण भापो होईल म्हणून कुणा संपादकांना सांगितले नव्हते.
शतकानुशतके स्त्री-पुरुषाच्या '१०० टक्के निरोगी' पणाच्या ज्या कल्पना समाजमनात भिनल्या आहेत त्यामध्ये ज्या काही दृश्य घटकांना स्थान नाही, तीत कोड बर्‍याच वरच्या क्रमांकावर आहे, हे नाकारून चालत नाहीच.
चित्रपटाच्या पहिल्याच दृष्यात ती पुण्याला जायची तयारी करत असताना तिच्या मनातले यावरचे काही विचार दाखवले आहेत. तिला आलेले अनुभव हळूहळू तिच्या स्वभावाला अंतर्मुख, अबोल कसे बनवत गेले हे त्यातून कळते. ती पटकन आपल्या मनातले भाव चेहर्‍यावर दिसू देत नाही. खरंतर मी मुद्दाम इथे प्रत्येक गोष्ट नमूद नाही केली. पण चित्रपट, पात्रे किंबहुना व्यक्तिरेखा, संवाद, प्रत्येक पात्राचे विचार, प्रत्येक फ्रेम.. सगळ्याला काही अर्थ आहे.
म्हणजेच इथे ज्ञानाचा मुद्दा किती महत्वाचा आहे ही बाब अधोरेखीत व्हावी.
अर्थात. नीरजाने ही तेच केलेय. ज्ञानामुळे निदान एवढी प्रगल्भता येते की ती सौंदर्य म्हणजेच आयुष्यातली इतिकर्तव्यता नाही, त्याहीपलिकडे बरेच काही आहे हे माणसाला सांगते. माझ्या लोकल इंट्रानेटवर लोक अगदी टेराबाईटीमध्ये चित्रपट, गाणी, पुस्तके, सॉफ्टवेअर्स शेअर करतात. त्यामुळे चित्रपट कुठून डाऊनलोडवायचा ते माहित नाही. परा, गणपा आणि माहितगारांनी इथे नंदनवावे. (सौजन्यः टिंग्या)

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 25/09/2010 - 23:51
येथील 'कौलां"च्या भाऊगर्दीत जर असा एक कौल निघाला की "तुम्ही आपल्या घरी कोड असलेली व्यक्ती जावई/सून म्हणून स्वीकाराल का?" ~~ तर होकाराची टक्केवारी किती असू शकेल? असहमत. काही दिवसांपूर्वी आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न कराल का असा कौल होता. या धाग्यात कोडासंबंधी लिहिले आहे. एखाद्या गोष्टीने पीडीत असणार्‍या गोष्टींबद्दल सहानुभूती आहे किंवा आपण त्या गोष्टी मानत नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी "लग्न करा" हा धोशा पटत नाही. तसे असेल तर एखाद्याला/एखादीला इतर धर्म, जाती, देश, तसेच वेगवेगळ्या समस्यांनी गांजलेल्या उदा. शेतकरी आत्महत्या, दुश्काळ, पूर, सामाजिक समस्या उदा. वेश्या (ही मिपावरील लेटेस्ट हिट थीम. ज्यांच्यापासून दूर राहायचे आणि जमल्यास मदत करायची तर ते सोडून इथले लोक त्यांचा फायदा उठवतात, मैत्री करतात आणि वाचक या सगळ्याची प्रशंसा करतात ;) ), वैद्यकीय समस्या: कॅन्सर, एड्स, डिस्लेक्सिया, पा, कोड या आणि अशा प्रत्येक गटातील एकाशी/एकीशी लग्न करावे लागेल. लग्न करणे आणि पुढचे आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवणे, कुटुंब वगैरे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असून एखाद्या व्यक्तीला योग्य वाटेल त्याप्रकारे ती तिच्या जोडीदाराची निवड करेल, ते तिचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. यासाठीचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. इथे तावातावाने आक्षेप घेणार्‍यांनी लोक साक्षरता, आरोग्य, व्यसने, धर्म, जात, शिक्षण, पगार, रंग, रूप, चष्मा, उंची, जाडी, स्वभाव यासारख्या किंवा इतर अनेक गोष्टींच्या आधारे त्यांचे जोडीदार निवडलेले आहेत/ निवडतील. त्यांना एखाद्या गोष्टीचा संशय आल्यास तपासणीही करतील/ केली असेल. ज्याने एकही पाप केले नाही त्यानेच दगड मारायला पुढे यावे. इथे कोडाविषयी चर्चा सुरु आहे आणि वरती सांगितलेल्या एक हकीकतीत कोडाचे डाग पाहण्याला तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ती पद्धत अयोग्य आहे, पण दुर्दैवाने त्रासदायक गोष्टी लपवल्या जात असल्याने त्यांनी त्यांच्या पद्धतीने खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येईल. आपल्या देशात कोणी उठसूठ घटस्फोट घेत नाही/ घेउ शकत नाही त्यामुळे एकदा बंधनात अड्कण्याआधीच खात्री करून घेतली तर त्यात फारसे चूक नाही. (वधुवरांची संपूर्ण वैद्यकीय तपासणीचे अहवाल* एकमेकांना दिले तर उत्तमच)

In reply to by Pain

"आपण त्या गोष्टी मानत नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी "लग्न करा" हा धोशा पटत नाही." ~ तुम्ही मांडलेल्या ह्या लॉजिकशी असहमती दाखविण्याचे काहीच कारण नाही, इतके ते बिनतोड आहे. माणसाच्या आयुष्यात 'लग्न' ही एक अशी अवस्था आहे की अब्जाधिश आणि भिक्षाधिश या दोन्ही घटकांना जीवनसाथीची निसर्गनियमानुसार गरजच असते आणि त्या बंधनात राहण्यासाठी ज्या काही प्राथमिक अवस्था पार पाडाव्या लागतात (दोन्ही पक्षांना) त्यात एकमेकाची सर्वार्थाने ओळख ~ शारीरिक्+मानसिक ~ असणे हे क्रमप्राप्त असतेच असते. शेवटी मानले तर हा नशिबाचा खेळ, जुगार किंवा दैवेच्छा असेच असते. त्यामुळे ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःसाठी, अपत्यासाठी, मित्रासाठी अशा प्रकारच्या बंधनाचे कंकण घेण्यास पुढे सरसावते त्यावेळी जर ती एक्स्ट्राकॉशस राहिली तर तो तिचा दोष मानता येणार नाही. समाजात ज्या शारीरिक व्यंगाकडे एक भीतीदायक नजर लावली जाते तिच्याबद्दल सहानुभूती बाळगणारी व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर ती कितपत स्वीकारायला तयार आहे, हे पाहण्याचे मीटर म्हणजे त्या व्यंग असलेल्या व्यक्तीकडे 'लग्न' नजरेने पाहणे, इतपतच त्या लग्नाचे इररिफ्युटेबल ऑप्शन. जर 'मी ते मानत नाही' असे म्हणत व्यंग असलेल्या व्यक्तीस या अर्थाने आपल्या घरात स्वीकारले तर ती तशी कृती करणारी व्यक्ती नक्कीच वंदनीय आहे. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या पण शैक्षणिकदृष्ट्या सातत्याने आघाडीवर असलेल्या शहरात एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्याना दोन मुली. दोघीही उच्चविद्याविभुषित, पैकी एकीचा प्रेमविवाह होणार तर दुसरीचे रितिरिवाजानुसार ठरत आले होते.. आईवडिल प्रसिध्द, निरोगी, मुलीही तशाच, होणारे नवरेही त्याच दर्जाचे....सारे काही आलबेल. कुठलीही तक्रार नाही. लग्नाची बोलणीही अगदी दहा पंधरा मिनिटात संपली. पण अशावेळी डॉक्टरांचे थोरले बंधू उपस्थित पाहुण्यांना उद्देश्यून उभे राहून बोलू लागले ~ "लग्नाची बोलणी पुढे चालू राहण्यापूर्वी मी या मुलींचा थोरला काका या नात्याने एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या तीन भावात मी थोरला आहे. माझी दोन्ही लहान भावंडे निरोगी जन्माला आली पण मला वयाच्या १० व्या वर्षी कोडाने डसले आणि तो कायम राहिला आहे. त्यामुळे मी जरी आजन्म अविवाहित राहिलो असलो तरी दोघेही भाऊ निरोगी आहेत, त्यांची अपत्येही. भावांचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा संसार उभा केला आहे आणि आत्या त्यांच्या मुलींचा विवाह आज निश्चित होत आहे. पण पुढे माझ्यावरून माझ्या पुतणीस जर बोलणार असाल तर ते आताच बोला. विचार करा आणि मगच लग्नाची पुढील बोलणी करा. ही बाब मी अशारितीने जाहीर करून सांगणार आहे याची दोन्ही मुलींना कल्पना दिली आहे, आणि त्यांचा त्याबद्द्ल होकारही घेतला आहे..." काकांच्या या बोलण्यावर फक्त तीनचार मिनिटे दोन्ही नियोजित वरांकडील मंडळींत हलक्या आवाजात चर्चा झाली....आणि पाचव्या मिनिटालाच दोन्ही पक्ष साखरपुड्याच्या तयारीला आनंदाने पुढे सरसावली. आज या घडीला त्या दोन्ही मुली आपआपल्या सासरी आणि व्यवसायाच्या जागी यशस्वी जीवन जगत आहेत. ~ म्हणजेच याचा अर्थ असा की, 'लग्न' या घटकात सत्याला त्या त्या वेळी सामोरे गेले तर पुढील कित्येक शक्यता आपोआप मोडीत निघतात. इन्द्रा

अतिशय सुंदर चित्रपटाची तेवढीच सुंदर ओळख करुन दिली आहेस ग :) कोल्हापुरला असताना हा चित्रपट बघण्याचा योग आला. अर्धा चित्रपट व्हायच्या आतच आपण बाहेर निघुन येणार असे आधी वाटले होते, पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि त्यात कसे आणि कधी हरवुन गेलो तेच कळले नाही. नितळची वेबसाईट देखील बघणेबल आहे एकदम. आणि त्यातले हे एक मस्त गाणे :-

In reply to by प्रकाश घाटपांडे

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:10
पुण्यात डॉ माया तुळपुळे यांनी श्चेता असोसिएशन द्वारा यावर खुप काम केल आहे.
हे मला माहित नव्हते. डॉ. माया तुळपुळेच बहुधा या चित्रपटाच्या निर्माती आहेत.

अब् क 24/09/2010 - 17:15
आता शेवट काय होतो हे मी आता इथे सांगत नाही.????????????? हे अस का दिलय? पेपर मधे परिक्शन दिल्यासारख??????????

In reply to by अब् क

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:16
जर कुणाला चित्रपट पाहायचा असेल, तर पूर्ण माहिती वाचून त्यांचा रसभंग होऊ नये म्हणून शेवट सांगितला नाही. तरी मला अजून मुद्देसूद पुस्तक-चित्रपट परिचय लिहिता येत नाही असे माझे स्वतःचेच मत आहे. न राहवून बरेचसे कथानक लिहलं जातंच.

'नितळ' खूप दिवसांपासून आहे. आता शक्यतो लवकवरच बघायचा प्रयत्न करतो ! सिनेमा जितका साधा-सोपा आहे (असं तू लिहिलं आहेस) तसाच तुझा लेखही साधा-सोपा पण मनापासून लिहिला गेल्याने आवडलाय.

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 24/09/2010 - 22:06
हा सिनेमा मी तसा एकदाच पाहिला.. पण आणखी कितीही वेळा मी तो पाहू शकेन. जर पाहिल्या पाहिल्या परिचय लिहिला असता तर त्यात मी अजून भर घालू शकले असते. हा दोन महिन्याहूनही अधिक काळानंतरचा आफ्टरइफेक्ट इतका जबरदस्त आहे, तर पाहिल्या पाहिल्यानंतरचा किती असेल कल्पना करा!!!!

In reply to by प्रभो

रेवती 25/09/2010 - 20:40
नाही सापडत रे! आपली मराठीवर होता तेंव्हा दोनदा पाहिला मी! अगदी साधा सोपा सिनेमा इतका परिणामकारक झालाय... दीपा लागूंचे काम भन्नाट्......तशी सगळ्यांचीच कामे छान झालीयेत. त्यातली आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अतोनात अत्याचार, अन्याय असे दिसत नसूनही माणसाच्या मानसिकतेमध्ये सुधारणा होण्याच्या जागा दिसतात. असे सिनेमे अंतर्मुख करतात तर पोलीस, अत्याचारांचे सिनेमे आवश्यक असले तरी वाईट वाटण्यापलिकडे आपल्याकडून काही होऊ शकत नाही.

प्रदीप 25/09/2010 - 19:44
चित्रपट परिचय, व त्यावरील चर्चाही. विशेषतः नंदन व इंद्रा ह्यांचे प्रतिसाद आवडले. प्रियाली ह्यांनी लिहीलेल्या घटनेने मात्र थक्क झालो. जितके जास्त पहावयास जावे तितका माणूस कळत नाही हेच खरे शेवटी! एका चांगल्या चित्रपटावरील उत्कट परिचय व त्यावरून घडवून आणलेली चर्चा आनंद देऊन गेली.

मस्त कलंदर 25/09/2010 - 20:53
http://www.onlinedownloadlink.com/index.php/archives/1824 किंवा इथे http://rehmananwar.blogspot.com/2010/04/download-free-marathi-movie-nital-high.html दोन्ही ठिकाणी सिनेमा ८ भागांत उपलब्ध आहे.

राघव 26/09/2010 - 07:02
बघायलाच हवा. आणखी एक चित्रपट मी खूप शोधला पण कुठेच सापडला नाही - गंध. हाही असाच सर्वांगसुंदर चित्रपट. कधीतरी लिहावे म्हणतो त्यावर. नीना कुळकर्णींचा अभिनय निव्वळ अप्रतीम!

रोचीन 27/09/2010 - 11:33
टि. व्ही. वर लागला होता तेव्हा पाहीला. अर्धवटच पाहीला पण जे काय पाहील ते आवडलं. पण एक खटकलं ते म्हणजे कि तिच्या चेहेर्यावरचे डाग अ‍ॅक्चुअल कोडाचे डाग नसून लहानपणी तेल चेहेर्यावर उडून पड्लेले आहेत असे दाखवलेले आहे. (निदान त्या आव्रुत्तीत तरि हे कारण दाखवले होतं.) त्यामुळे थोडासा रसभ्ग झाल्यासरखा वाटतो. पण चित्रपट छानच आहे. @रेवतीताई, >>त्यातली आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अतोनात अत्याचार, अन्याय असे दिसत नसूनही माणसाच्या मानसिकतेमध्ये सुधारणा होण्याच्या जागा दिसतात. १००% सहमत. आमच्या नात्यात एका मामींना चाळिशीनंतर हातावर थोडे कोड उठले होते. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाला खुपच प्रॉब्लेम आला होता. मुलगी दिसाय्ला चांगली, पेशाने इंजिनीअर असून सुद्धा तीचे लग्न जवळ्जवळ ३५शीनंतर झाले. ते सुद्धा एका कमी शिकलेल्या मुलाशी. पुधे तिचा संसार चांगला झाला पण सुरुवातीला झालेला त्रास खुपच होता.

एस 08/08/2016 - 00:46
आज हिच्याशी डॉ. सुमती क्षेत्रमाडेंच्या 'महाश्वेता' या कादंबरीबद्दल चर्चा करत असताना 'नितळ' हा चित्रपट आणि मस्त कलंदर यांच्या या लेखाची आठवण आली. प्रतिसादही मननीय आहेत.

चतुरंग 08/08/2016 - 01:04
'नितळ' फारच नितळ सिनेमा आहे! कामं सगळ्याच टीमची एकसोएक झाली आहेत. यातलं तेंडुलकरांच्या तोंडी असलेलं एक वाक्य मनात घर करुन आहे - "सत्यदर्शनानं निर्माण झालेली इच्छाशक्ती ही नियतीपेक्षा केव्हांही श्रेष्ठ असते!"
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्‍या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट. चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.

मराठा लाईट इनफंट्री भाग - ६

जयंत कुलकर्णी ·

जिप्सी 21/09/2010 - 16:58
फार आवड्लं काका ! पहील्या ५ लेखांची लिंक टाकली तर बर होईल, माझे मधले काही भाग वाचायचे राहीलेत. परत मि.पा.वर लिखाण चालू केल्याबद्दल आभार.

In reply to by जिप्सी

मस्त कलंदर 22/09/2010 - 20:39
माझेही मधले काही भाग वाचायचे राहिले आहेत. तेव्हा आधीच्या भागाच्या लिंक्स दिल्यात तर सर्वांनाच वाचायला बरे पडेल.

निनाद 22/09/2010 - 05:30
मी मागे ऑस्ट्रेलियन सैनीकांच्या गलिपोली यथील युद्धा विषयी एक कार्यक्रम ऐकत होतो. 'स्टोरीज फ्रॉम गलिपोली'. (Stories from Gallipoli Presented by Steve Sailah, ABC Audio) यात सैनिकांच्या मुलाखती आहेत. त्यात एक सैनीक आपली कहाणी सांगतांना म्हणतो की, "भयंकर थंडी होती, पण गरम पाणी मात्र फक्त गोर्‍या सैनीकांनाच घेण्याची मुभा होती." तुमचे लेखन वाचल्यावर आठवले. थोडक्यात या काळात सैनिकांतही भेदभाव होता आणि 'इतर सैनिकांसाठी''परिस्थिती अजूनच खडतर होती. या पार्श्वभूमीवर आपल्या सैनिकांचे यश अजूनच मोठे आहे हे निश्चित! ही सीडी माझ्याकडे आहे, कुणाला ऐकण्याची इच्छा असल्यास पाठवू शकेन.

जिप्सी 21/09/2010 - 16:58
फार आवड्लं काका ! पहील्या ५ लेखांची लिंक टाकली तर बर होईल, माझे मधले काही भाग वाचायचे राहीलेत. परत मि.पा.वर लिखाण चालू केल्याबद्दल आभार.

In reply to by जिप्सी

मस्त कलंदर 22/09/2010 - 20:39
माझेही मधले काही भाग वाचायचे राहिले आहेत. तेव्हा आधीच्या भागाच्या लिंक्स दिल्यात तर सर्वांनाच वाचायला बरे पडेल.

निनाद 22/09/2010 - 05:30
मी मागे ऑस्ट्रेलियन सैनीकांच्या गलिपोली यथील युद्धा विषयी एक कार्यक्रम ऐकत होतो. 'स्टोरीज फ्रॉम गलिपोली'. (Stories from Gallipoli Presented by Steve Sailah, ABC Audio) यात सैनिकांच्या मुलाखती आहेत. त्यात एक सैनीक आपली कहाणी सांगतांना म्हणतो की, "भयंकर थंडी होती, पण गरम पाणी मात्र फक्त गोर्‍या सैनीकांनाच घेण्याची मुभा होती." तुमचे लेखन वाचल्यावर आठवले. थोडक्यात या काळात सैनिकांतही भेदभाव होता आणि 'इतर सैनिकांसाठी''परिस्थिती अजूनच खडतर होती. या पार्श्वभूमीवर आपल्या सैनिकांचे यश अजूनच मोठे आहे हे निश्चित! ही सीडी माझ्याकडे आहे, कुणाला ऐकण्याची इच्छा असल्यास पाठवू शकेन.
3

भाषांतरकारांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स

वर्षा ·
३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे.

कास .. फुलांचे पठार २०१०

उपेन्द्र ·

सुनील 20/09/2010 - 05:28
अप्रतिम नजारा!! कासच्या पठाराला आता युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. अधिक माहिती येथे.

In reply to by शिल्पा ब

उपेन्द्र 20/09/2010 - 22:41
वेल्वेट वाली फुलं खूप कमी प्रमाणात आहेत.. पण निळ्या जांभळ्या मखमली रंगावरील परागकणांचे पिवळे धम्मक ठिपके लगेच लक्ष वेधून घेतात...

मोहन 20/09/2010 - 11:04
उपेन्द्र धन्यवाद. ७-८ वर्षापूर्वी गेलो होतो तेंव्हा फारच मजा आली होती. चार वर्षापूर्वी माझ्या परदेशी पाहुण्यांना घेवून गेलो तेंव्हा सातार्यातला रस्ता फारच खराब होता. फुले उमलायला नुकतीच सूरवात झाली होती त्यामुळे जरा पचका झाला होता. या विकांता पर्यंत हा नजारा टिकेल असे वाटते का? परत जायची ईछा आहे. मोहन

बेसनलाडू 20/09/2010 - 22:38
नयनरम्य परिसर आणि तितकीच मोहक प्रकाशचित्रे. येथे दिल्याबद्दल धन्यवाद! (आभारी)बेसनलाडू

सुनील 20/09/2010 - 05:28
अप्रतिम नजारा!! कासच्या पठाराला आता युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. अधिक माहिती येथे.

In reply to by शिल्पा ब

उपेन्द्र 20/09/2010 - 22:41
वेल्वेट वाली फुलं खूप कमी प्रमाणात आहेत.. पण निळ्या जांभळ्या मखमली रंगावरील परागकणांचे पिवळे धम्मक ठिपके लगेच लक्ष वेधून घेतात...

मोहन 20/09/2010 - 11:04
उपेन्द्र धन्यवाद. ७-८ वर्षापूर्वी गेलो होतो तेंव्हा फारच मजा आली होती. चार वर्षापूर्वी माझ्या परदेशी पाहुण्यांना घेवून गेलो तेंव्हा सातार्यातला रस्ता फारच खराब होता. फुले उमलायला नुकतीच सूरवात झाली होती त्यामुळे जरा पचका झाला होता. या विकांता पर्यंत हा नजारा टिकेल असे वाटते का? परत जायची ईछा आहे. मोहन

बेसनलाडू 20/09/2010 - 22:38
नयनरम्य परिसर आणि तितकीच मोहक प्रकाशचित्रे. येथे दिल्याबद्दल धन्यवाद! (आभारी)बेसनलाडू
3

असा मी आसामीया...

चिगो ·

गणेशा 14/09/2010 - 17:24
माहिती आवडली .. भाषा साधर्म्याबद्दल चे पहिल्यांदाच वाचले . धन्यवाद. आन्खिन आसामीया बद्दल, त्यांच्या प्रथा, न्रुत्य .. वागणे .. आणि तुमचे अनुभव आल्यास आवडेल -

मितान 14/09/2010 - 17:34
छोटासा पण चांगला लेख :) मग आसामी भाषेत "शतायुषी भव " ला " हतायुषी भव " म्हणतात का ;) :)) कृपया तुम्ही राहाता त्या भागाबद्दल अजून लिहा ही आग्रहाची विनंती :)

चिगो 14/09/2010 - 17:46
खरंतर मला एक खेळही सुचवायचा होता.. आपल्या नावाचे अहोमीयात रुपांतर करुन बघा.. मजा येईल..

धमाल मुलगा 14/09/2010 - 18:28
वा! उपेक्षित राज्यांपैकी एका राज्याबद्दलची काहीतरी माहिती यायला सुरु झाली ह्याचा आनंद वाटला. धन्यवाद चिगो. लेख आवडला. आणखी माहितीच्या प्रतिक्षेत. :) >>"क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो बौध्द भिख्खु ह्या उच्चाराचा उगम अहोमिया किंवा त्याशी नातं सांगणार्‍या भाषेतुन असावा काय असा प्रश्न पडला.

आसाम.. सुंदर राज्य मी जवळपास १३ महीने राहलोय, धुलियाजन, शिवसागर आणी जोहराहट मध्ये. धुलियाजनला १० महीने होतो. आसाम मध्ये जमीन फार सुपीक आहे, पावसाळ्यात भात पेरतात आणी तीन - चार महीन्यांनी कापायला येतात; मध्ये काहीही मेहनत नाही तरी भरपुर पीक येते. इथल्या लोकांबद्दल काय लिहायचे, माणुसकी असलेली लोकं आहेत इथे; नेहमीच मदतीला तयार असतात! हसतमुखाने!! काझिरंगामध्ये घालवलेले दोन दिवस, गॅलरीतून दिसणारा चहाचा मळा, सकाळी त्यावर पसरलेली धुक्याची शाल, रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती, बांबूच्या कोवळ्या कोंबांचे लोणचे, ब्रंहपुत्रा नदी (हिला नदी म्हणावी की सागर; खुप मोठे पात्र आहे हिचे), माजोली बेटं, काझिरंगा मधले ६ सिटर, ८ सिटर हत्ती (हत्तीची माणसं वाहून नेण्याची क्षमता), शीतल मासा (वाफवलेला-केळीच्या पानात), खुप काही अनुभवलेय... खुप बाकी पण आहे.

चिगो 14/09/2010 - 19:24
छान प्रतिक्रीया दिलीत.. सुंदर लिहीलयं. @ धमु, ह्या सोनेरी चित्राला लागलेलं गालबोट हे "बाहेरच्यांना फायदा होतोय आपला" ह्या भावनेतुन लागलयं. "मनसे"वादी जोडे हाणतील, पण "आमच्या जिवावर जगताहेत" चा हिंसक परिपाक शेवटी हाच असतो. (उल्फा, बोडो वगैरे)... ह्या विषयावर नंतर लिहीन. थँक्स...

In reply to by चिगो

धमाल मुलगा 14/09/2010 - 19:46
आपल्याशी सहमत. नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल. माझ्या माहितीतला एक एक्स-उल्फा म्हणायचा, 'Where is your government ? Are we not part of India? Why we are always neglected?" त्याचे हे विचार होते ते शरणागतीनंतरचे....सक्रिय असताना काय असेल कोण जाणे. शक्य झाल्यास ह्या बाजुवरही नक्की लिहा.

In reply to by धमाल मुलगा

मला मिळालेली थोडीफार माहीती... एका आसामी सहकार्‍याकडुन इंग्रजांनी आसाम मध्ये बंगाली लोकाना जास्त शक्ती (पॉवर) दिली होती. असे म्हणतात की सरकारी कार्यालयात बंगाली लोक मोठ्या पदावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्यात बदल अपेक्षीत होता, पण झाला नाही. आसामी तरुण शिकुन पण बेरोजगार राहू लागले कारण बंगाल मधुनच नवीन भरती होऊ लागली होती. माझ्या माहीतीप्रमाणे उल्फाची सुरूवात सुशिक्षीत बेरोजगार आसामी तरुणांनी केली. ध्येय्य होते स्थानिकांना नोकरी मिळवून देणे. पण नंतर राजकारण घुसले आणी आता आपण पहात आहोत काय चालु आहे....

In reply to by शुचि

गणेशा 14/09/2010 - 21:04
>> च" चा उच्चार "सो" असा होतो. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा, म्हणुन कदाचीत शुची = ख्होसो असे म्हणत असतील बहुतेक उगाच आपला प्रयत्न केला आहे.

चिगो 14/09/2010 - 23:00
@धमु, नक्की लिहीन ह्या विषयावर, पण त्याआधी मला थोडा सवीस्तर विचार आणि अभ्यास करावा लागेल.. @शुचि, तुमच्या नावाचा उच्चार "हुसि" किंवा "ख्हुसि" असा होईल. (मात्रा असलेल्या अक्षरांचा, तसेच शेवटच्या अक्षराचा उच्चार "ओ"कारांत नसतो.)

माहिती आहेत का? मला वाटतं हे नाव बरोबर आहे. 'लोकप्रभा'च्या अंकांमधे त्यांची आसामवरची लेखमाला वाचली होती. ते गेली तीसेक वर्षे महराष्ट्रातून आसाममधे काही ना काही कारणाने जातायत. लोकप्रभाच्या गेल्या वर्षातल्या वगैरे वेब एडिशन्स शोधल्यात तर त्यांचे लेख मिळतील. --------- तुम्हीही आसामबद्दल जितकं लिहाल आणि फोटू द्याल ते वाचायला / बघायला आवडेलच.

Pain 15/09/2010 - 04:29
१३व्या शतकात येथे "अहोम" राजवटीची स्थापना झाली. "लासित बोरफुकान" हा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक वीरपुरुष ! त्याने गोलाघाट येथे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात युद्ध लढुन मुघलांचा पराभव केला. भले शाबास :) आसाम व इतर ६ राज्ये: इतर प्रश्नांसारखीच सरकारची या बाबतीतली आजतागायत असलेली अनास्था संतापजनक आहे पण आता सुधारून काही उपयोग नाही. थोड्याच वर्षांचे सोबती :(

Pain 15/09/2010 - 11:37
मी काही दिवसांपूर्वी एका आसामच्या मुलीला भेटलो होतो. प्रचंड दहशत आहे. लोक घरे, दुकानांवर वगैरे भारताचा झेंडाही लावायलाही घाबरतात.

चिगो 15/09/2010 - 11:48
नका इतकं टेंशन घेऊ.. इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत. Perceptions are stronger than reality.. आणखी थोडी माहिती साठली की लिहीतो पुढे..

In reply to by चिगो

इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत.
ह्यासाठीच तुम्ही ह्या विषयावर थोडे सविस्तर लिहा. ह्या लेखातली माहिती आवडली. फोटु तर हवेतच. प्रशांत ह्यांचे प्रतिसाद देखील आवडले.

गणेशा 14/09/2010 - 17:24
माहिती आवडली .. भाषा साधर्म्याबद्दल चे पहिल्यांदाच वाचले . धन्यवाद. आन्खिन आसामीया बद्दल, त्यांच्या प्रथा, न्रुत्य .. वागणे .. आणि तुमचे अनुभव आल्यास आवडेल -

मितान 14/09/2010 - 17:34
छोटासा पण चांगला लेख :) मग आसामी भाषेत "शतायुषी भव " ला " हतायुषी भव " म्हणतात का ;) :)) कृपया तुम्ही राहाता त्या भागाबद्दल अजून लिहा ही आग्रहाची विनंती :)

चिगो 14/09/2010 - 17:46
खरंतर मला एक खेळही सुचवायचा होता.. आपल्या नावाचे अहोमीयात रुपांतर करुन बघा.. मजा येईल..

धमाल मुलगा 14/09/2010 - 18:28
वा! उपेक्षित राज्यांपैकी एका राज्याबद्दलची काहीतरी माहिती यायला सुरु झाली ह्याचा आनंद वाटला. धन्यवाद चिगो. लेख आवडला. आणखी माहितीच्या प्रतिक्षेत. :) >>"क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो बौध्द भिख्खु ह्या उच्चाराचा उगम अहोमिया किंवा त्याशी नातं सांगणार्‍या भाषेतुन असावा काय असा प्रश्न पडला.

आसाम.. सुंदर राज्य मी जवळपास १३ महीने राहलोय, धुलियाजन, शिवसागर आणी जोहराहट मध्ये. धुलियाजनला १० महीने होतो. आसाम मध्ये जमीन फार सुपीक आहे, पावसाळ्यात भात पेरतात आणी तीन - चार महीन्यांनी कापायला येतात; मध्ये काहीही मेहनत नाही तरी भरपुर पीक येते. इथल्या लोकांबद्दल काय लिहायचे, माणुसकी असलेली लोकं आहेत इथे; नेहमीच मदतीला तयार असतात! हसतमुखाने!! काझिरंगामध्ये घालवलेले दोन दिवस, गॅलरीतून दिसणारा चहाचा मळा, सकाळी त्यावर पसरलेली धुक्याची शाल, रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती, बांबूच्या कोवळ्या कोंबांचे लोणचे, ब्रंहपुत्रा नदी (हिला नदी म्हणावी की सागर; खुप मोठे पात्र आहे हिचे), माजोली बेटं, काझिरंगा मधले ६ सिटर, ८ सिटर हत्ती (हत्तीची माणसं वाहून नेण्याची क्षमता), शीतल मासा (वाफवलेला-केळीच्या पानात), खुप काही अनुभवलेय... खुप बाकी पण आहे.

चिगो 14/09/2010 - 19:24
छान प्रतिक्रीया दिलीत.. सुंदर लिहीलयं. @ धमु, ह्या सोनेरी चित्राला लागलेलं गालबोट हे "बाहेरच्यांना फायदा होतोय आपला" ह्या भावनेतुन लागलयं. "मनसे"वादी जोडे हाणतील, पण "आमच्या जिवावर जगताहेत" चा हिंसक परिपाक शेवटी हाच असतो. (उल्फा, बोडो वगैरे)... ह्या विषयावर नंतर लिहीन. थँक्स...

In reply to by चिगो

धमाल मुलगा 14/09/2010 - 19:46
आपल्याशी सहमत. नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल. माझ्या माहितीतला एक एक्स-उल्फा म्हणायचा, 'Where is your government ? Are we not part of India? Why we are always neglected?" त्याचे हे विचार होते ते शरणागतीनंतरचे....सक्रिय असताना काय असेल कोण जाणे. शक्य झाल्यास ह्या बाजुवरही नक्की लिहा.

In reply to by धमाल मुलगा

मला मिळालेली थोडीफार माहीती... एका आसामी सहकार्‍याकडुन इंग्रजांनी आसाम मध्ये बंगाली लोकाना जास्त शक्ती (पॉवर) दिली होती. असे म्हणतात की सरकारी कार्यालयात बंगाली लोक मोठ्या पदावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्यात बदल अपेक्षीत होता, पण झाला नाही. आसामी तरुण शिकुन पण बेरोजगार राहू लागले कारण बंगाल मधुनच नवीन भरती होऊ लागली होती. माझ्या माहीतीप्रमाणे उल्फाची सुरूवात सुशिक्षीत बेरोजगार आसामी तरुणांनी केली. ध्येय्य होते स्थानिकांना नोकरी मिळवून देणे. पण नंतर राजकारण घुसले आणी आता आपण पहात आहोत काय चालु आहे....

In reply to by शुचि

गणेशा 14/09/2010 - 21:04
>> च" चा उच्चार "सो" असा होतो. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा, म्हणुन कदाचीत शुची = ख्होसो असे म्हणत असतील बहुतेक उगाच आपला प्रयत्न केला आहे.

चिगो 14/09/2010 - 23:00
@धमु, नक्की लिहीन ह्या विषयावर, पण त्याआधी मला थोडा सवीस्तर विचार आणि अभ्यास करावा लागेल.. @शुचि, तुमच्या नावाचा उच्चार "हुसि" किंवा "ख्हुसि" असा होईल. (मात्रा असलेल्या अक्षरांचा, तसेच शेवटच्या अक्षराचा उच्चार "ओ"कारांत नसतो.)

माहिती आहेत का? मला वाटतं हे नाव बरोबर आहे. 'लोकप्रभा'च्या अंकांमधे त्यांची आसामवरची लेखमाला वाचली होती. ते गेली तीसेक वर्षे महराष्ट्रातून आसाममधे काही ना काही कारणाने जातायत. लोकप्रभाच्या गेल्या वर्षातल्या वगैरे वेब एडिशन्स शोधल्यात तर त्यांचे लेख मिळतील. --------- तुम्हीही आसामबद्दल जितकं लिहाल आणि फोटू द्याल ते वाचायला / बघायला आवडेलच.

Pain 15/09/2010 - 04:29
१३व्या शतकात येथे "अहोम" राजवटीची स्थापना झाली. "लासित बोरफुकान" हा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक वीरपुरुष ! त्याने गोलाघाट येथे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात युद्ध लढुन मुघलांचा पराभव केला. भले शाबास :) आसाम व इतर ६ राज्ये: इतर प्रश्नांसारखीच सरकारची या बाबतीतली आजतागायत असलेली अनास्था संतापजनक आहे पण आता सुधारून काही उपयोग नाही. थोड्याच वर्षांचे सोबती :(

Pain 15/09/2010 - 11:37
मी काही दिवसांपूर्वी एका आसामच्या मुलीला भेटलो होतो. प्रचंड दहशत आहे. लोक घरे, दुकानांवर वगैरे भारताचा झेंडाही लावायलाही घाबरतात.

चिगो 15/09/2010 - 11:48
नका इतकं टेंशन घेऊ.. इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत. Perceptions are stronger than reality.. आणखी थोडी माहिती साठली की लिहीतो पुढे..

In reply to by चिगो

इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत.
ह्यासाठीच तुम्ही ह्या विषयावर थोडे सविस्तर लिहा. ह्या लेखातली माहिती आवडली. फोटु तर हवेतच. प्रशांत ह्यांचे प्रतिसाद देखील आवडले.
मी आसाम मध्ये कामाला आहे. इथे आल्यावर इथली भाषा व ह्या प्रांताविषजी माहिती मिळाली ती आपल्यासोबत शेयर करीत आहे.. अहोमीया भाषेत आणि मराठीत शब्दांच्या बाबतीत बरेच साम्य आहे. (बाय द वे, आसामीया/ अहोमीया माणसाला "आसामी" म्हणू नका. त्याचा इथे अर्थ wrong doer / criminal असा होतो.) अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे".

स्टेपनीची गरज

डॉ.श्रीराम दिवटे ·

In reply to by विनायक प्रभू

>>>>लेख आवडला प्रभुसरांशी सहमत...! :) 'स्टेपनीची गरज' शिर्षकावरुन लेखनातील आशयासंबंधी अपेक्षा वाढल्या होत्या. स्टेपनी कशा कशाला म्हणतात. वगैरे, इत्यादि. असो...! -दिलीप बिरुटे

सूड 13/09/2010 - 16:36
डोक्यावरुन गेलं !! कदाचित प्रेमत्रिकोण (Love Triangle ) असावा. तीन बिंदू खालीलप्रमाणे. चालक, गाडी, स्टेपनी

विजुभाऊ 13/09/2010 - 17:08
स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा जास्त डेकोरेटेड , हवेशीर ठेवावे लागते. पण नुस्त्या स्टेपनीच्या भरोशावर प्रवास चालू ठेवला तर स्टेपनी पंक्चर झाल्यावर मात्र गाडी पूर्णच खाली बसते. आडरस्त्याला पंक्चरवाला मिळत नाही. त्यातून जॅक तुटलेला असेल तर दुसरी गाडी थांबवून उसना जॅक मागून घ्यावा लागतो ;)

In reply to by चतुरंग

हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत आहे. स्वति घरात नसताना कंडू शमनार्थ रुण्डिरा खावी| ती ही घरात नसताना स्वहस्तेच बुद्ली दाबावी || याचा अर्थ साधारण असा होतो की सुंठ घरात नसेल तर कंडू म्हणजे खोकला थांबवण्यासाठी खडीसाखर खावी. ती ही म्हणजे खडीसाखरही घरात नसेल तर आपल्याच हाताने (बुद्ली) पडजीभ दाबावी. तस्मात डॉ साहेब ** ठेवा सांगण्यासाठी इतक्या शब्दांचा खटाटोप? प्रतिसाद संपादीत केला आहे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

श्री. पेशवे, इथे गाड्या, प्रवास, त्यातल्या अडचणी, ड्रायव्हरांचे प्रश्न असल्या विषयांवर चर्चा चालू असताना तुम्ही जे अश्लीलतेकडे झुकणारे लिहिले आहे त्याचा तीव्र निषेध. बाई ठेवणे, ** राखणे, ** दाबणे हे अवांतर आहे. कृपया सदर विषयावर लिहिता येत नसेल तर किमान चर्चेमध्ये गोंधळ माजवू नये ही विनंती. आता काही जणांना नसतो ड्रायव्हिंगचा अनुभव, किंवा गती नसते, अॅक्सिडेंट वगैरे झालेले असतात. म्हणून आकस धरून असे वाह्यात वर्तन करू नये. संपादक यात लक्ष घालतील काय?

sagarparadkar 13/09/2010 - 19:46
धन्य हो डॉक्टरसाहेब ... साष्टांग नमस्कार इथे कसा दर्शवायचा माहीत नाही म्हणून __/\__ एव्ह्ढ्यावरच भागवून घ्या ... कदाचित ___^_/ असा दर्शवता येईल ... >> तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा हल्लीच्या स्टेपनीला ती स्टेपनी आहे हे कळले तर गाडी नुसतीच थंडावेल की कायमचीच बंद पडेल किंवा कसे .... स्टेपनी वापरण्याचा अनुभव नसल्याने सांगता येणार नाही ...

माजगावकर 13/09/2010 - 20:30
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. गाडीचा वापर जास्त असणार्यांसाठी.. परंतु ती लावायची वेळ न येणे बरं.. अर्थात इतर चार चाकांबरोबर तिचे हवा-पाणी देखील नियमित तपासून घेतो..

In reply to by माजगावकर

धमाल मुलगा 13/09/2010 - 20:46
है शाब्बास्स! य्ये हुई ना ब्बात! डॉक्टरसाहेबांच्या लेखाचं सार्थक झालं असं म्हणेन मी. -धमायक प्रभु.

In reply to by माजगावकर

टिउ 14/09/2010 - 02:06
माजगावकर, अहो तुमच्याकडे ऑलरेडी चार चाकं असतांना अजुन स्टेपनी कशाला पाहीजे? तुमच्यासारख्या लोकांमुळे स्टेपन्यांचे भाव वाढलेत हल्ली... ;)

शहराजाद 14/09/2010 - 01:50
स्टोरेजच्या सोयीसाठी स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असण्याची पद्धत आहे. पण गाडी ओढून नेण्याच्या कामी ती मूळ चाकाइतकी स्थिर आणि सुरक्षित कधीच नसते, एवढे लक्षात असूद्या.

In reply to by शहराजाद

वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना साधारणता हे माहित असते. आणि म्हणूनच ते स्टेपनी ला मूळ चाक म्हणून नाही वापरत. मूळ चाक ते मूळ चाक आणि स्टेपनी ती स्टेपनी !!! कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! (तलवारी उपसल्या जाण्याची वाट पाहणारा) वि. मे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! अहो कसं आहे.. चालकानी स्टेप्नी बाळगणे आणि गाडीला स्टेप्नी आहे हे न कळणे जसे असते तसे गाडीनेच स्टेप्नी किंवा पर्यायी स्टँड ठेवणे आणि चालकाला याची खबरबात नसणे हे ही असते म्हणूनही असेल कदाचित.

In reply to by शहराजाद

Pain 14/09/2010 - 23:06
मी जेव्हा पंक्चर चाक काढून स्टेपनी लावली होती तेव्हा दोन्हीवर लिहिलेला साइझ पाहिला होता. सारखाच होता. मूळ चाकापेक्षा लहान आकार असणे अयोग्य आहे. (कदाचित तुम्ही दुचाकीबद्दल बोलत असाल, मी चारचाकीबद्दल बोलत आहे.)

In reply to by Pain

शहराजाद 15/09/2010 - 00:01
काही गाड्यांची स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असते. ठेवण्याच्या सोयीसाठी हे करतात असे कळले. माझा मुद्दा , मूळ चाकाचीच निगा राखून स्टेपनीची गरजच भासू नये अशी काळजी घेणे इष्ट. यापुढे प्रत्येकाची मर्जी.

In reply to by Pain

अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत. भारतात मी छोटी स्टेपनी नाही पाहिली. असेलही, काही खास अनुभव नाही. अमेरिकेत डिकीत (ट्रंक म्हणायचे बरे, डिकी म्हटले की काहीतरी वेगळेच समजतात) सहजपणे बसावे म्हणून स्टेपनी छोटी बनवतात. अशी स्टेपनी असेल तर ५५ मैल प्रती तास या गतीपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची नसते. यातून नक्की काय काय अर्थ लोक काढतील ते तो एक श्रीराम जाणे (देव, धागाप्रवर्तक नाही)

बहुतेक वेळा आपली स्टेपनी आपण कायम गाडीतच बाळगावी अशी सिस्टिम असते. पण हा संसाधनांचा शुद्ध अपव्यय आहे. म्हणून मी नवीन सिस्टिमचा विचार करत होतो. समजा असं केलं तर? स्टेपनी गाडीत बाळगायचीच नाही. गाडी पंक्चर झाली की मेकॅनिकला फोन करायचा, मग तो आपल्याला हवी तशी स्टेपनी आणून देईल. तात्पुरती वापरायची. नंतर मेकॅनिकला परत करायची. कशाला उगाच ती विकत घ्यायची? आणि कायम बाळगून पेट्रोल अधिक खर्च करायचं? मुळात गाडी विकत घेतली त्यात खर्च आहेच. बरं, मेकॅनिकलाही भाडं मिळेल, आणि इतर कस्टमरांना वापरायला देता येईल. थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. तसं म्हटलं तर ती आधी कोणी इतर कस्टमरांनी वापरली आहे म्हणून आपल्याला तरी कुठे फरक पडतो? मग थोड्या स्टेपन्या खूप लोकांना पुरतील, व एकंदरीत समाजाचा स्टेपनी-विषयक खर्च देखील कमी होईल. दर वेळी सेफ्टी जरा चेक करून घ्यावी लागेल, पण मान्यवर गराजनी जर स्टेपन्या पुरवल्या तर तो धोकादेखील कमी होईल. काही लोकांच्या मते सामाजिक वर्दळ सुरळीतपणे चालण्यासाठी अशी सिस्टिम उपयोगी ठरेल. नाहीतर काही लोक चाक पंक्चर झालं आणि स्टेपनी परवडली नाही की दुसऱ्याच्या गाड्यांची चाकं बळजबरीने पळवतात... खरं तर आख्खी गाडीच भाड्याने घेता आली तर? अशीच कल्पना मी आधी देखील मांडली होती. पण अनुमोदनाच्या औष्ठ्यसेवेपलिकडे कोणी काही केलं नाही. ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी 14/09/2010 - 09:27
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे साली. अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. आपण वापरतो नं तिला. मग अशी नावे का बरे ठेवायची ? त्रास तर माझी गाडी पण देते, कदाचित तुमच्या गाडी पेक्षा जास्त, खूप खूप आवाज करते, खूप हादरे बसतात. माझा सगळा पगार तिच्यासाठीच संपतो. गाडी नसेल तर कित्ती कित्ती , कशा कशाचे, हाल होतील ते विचार करा. वर्षातून एक-दोन वेळाच स्मूथ चालते. (गाडीला इच्छित स्थळी जायचे असेल तरच ) माझी गाडी स्वस्तात घेतली होती, पण आता मेंटेनन्स खर्चच जास्त होतो. सप्लायर कडे जास्त गाड्या होत्या, आमची गाडी हि पहिलीच मोडेल. त्यामुळे स्वस्तात दिली त्याने. गाडी जुनी देऊन नवीन मिळेल अशी काय योजना आहे काय ?(वाट्टेल तेवढा खर्च करायला तयार आहे) सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.

In reply to by गांधीवादी

अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.
तुमचा गैरसमज होतोय. नावं गाडीला ठेवलेलीच नाहीत. प्रवासालाही नाहीत (तो प्रवास सुंदर होता...) गाडीच्या लायसेन्सिंगच्या नियमाला नावं ठेवली आहेत. समाजवादी अर्थकारणाच्या विचारसरणीत गाडी ही चैनीची वस्तु समजली गेली - आणि प्रत्येकाला एकच गाडी - तीही मोठ्या मिनतवारीने मिळणार...
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
हे फारच पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह झालं. स्टेपनीचं बघा जरा...

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी 14/09/2010 - 11:13
OK OK असं होय,समजले. थोडा गोंधळ उडालेला होता. सहमत आहे. >>स्टेपनीचं बघा जरा... गाडी ने कितीही त्रास दिला तरी अजून काय कुठेच पंचर नाही. एकदम शॉल्लीट MRF चे आहेत आमचे टायर्स, त्यामुळे हा सल्ला कामाचा नाहि

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 14/09/2010 - 10:59
सोय हवी पण स्टेपनी सांभाळायला नको हा कोता-चंगळवादी विचार केल्याबद्दल घासकडवी यांचा निषेध. गाडी आणि चाके यांचे गुणोत्तर तसे आहे म्हणून एका गाडीला चार चाके आणि एक स्टेपनी ठेवण्याची पद्धत असावी. गुणोत्तर वेगळे असते तर दोन स्टेपन्याठेवण्याची किंवा घासकडवींच्या मनोराज्याप्रमाणे स्टेपनी भाड्याने मिळण्याची पद्धत आली असती. स्टेपनी ठेवायची नसेल तर आधी चाकांची निर्मिती कमी करावी लागेल.

In reply to by राजेश घासकडवी

मी_ओंकार 15/09/2010 - 09:48
थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. काही स्टेपनींना साबण चोळून ही चकाचक करतात असे ऐकून आहे. - (ऐकीवातला)

वेताळ 14/09/2010 - 09:42
त्याच्या करीता काही सुचना आहेत का?पुर्वी बजाज स्कुटरला स्टेफनी असायची .आताच्या स्कुटरला स्टेफनी नसते. त्यामुळे खुपच कुचंबणा होते.रस्त्यावर हात हालवत उभे रहावे लागते.

चिगो 14/09/2010 - 15:59
अवो, ते हात हलवत म्हन्ले... काय्यच्या क्काय..

काही लोक गाडी 'एकहाती' वापरण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे गाडी तंदुरुस्त राहते म्हणे! आम्ही त्यांना विचारतो पंक्चर झाल्यावर कितीही तुम्ही एकहाती वापरली असली तरी स्टेपनी लागतेच. आता मोटरसायकलसारख्या दुचाकीला स्टेपनी लावताच येत नाही. त्यांनी काय करायच? गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंतात. स्टेपनीचा शोध यातुनच लागला असावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

एकहाती गाडी वापरल्याने गाडीचेच नव्हे तर चालकाचेही आरोग्य चांगले राहते. नाहीतर इतर कोणी गाडी नीट नाही वापरली तर गाडी खिळखिळी होऊ शकते त्यामुळे चालकाचेही जजमेंट चुकू शकते ना!

In reply to by विनायक प्रभू

>>>>लेख आवडला प्रभुसरांशी सहमत...! :) 'स्टेपनीची गरज' शिर्षकावरुन लेखनातील आशयासंबंधी अपेक्षा वाढल्या होत्या. स्टेपनी कशा कशाला म्हणतात. वगैरे, इत्यादि. असो...! -दिलीप बिरुटे

सूड 13/09/2010 - 16:36
डोक्यावरुन गेलं !! कदाचित प्रेमत्रिकोण (Love Triangle ) असावा. तीन बिंदू खालीलप्रमाणे. चालक, गाडी, स्टेपनी

विजुभाऊ 13/09/2010 - 17:08
स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा जास्त डेकोरेटेड , हवेशीर ठेवावे लागते. पण नुस्त्या स्टेपनीच्या भरोशावर प्रवास चालू ठेवला तर स्टेपनी पंक्चर झाल्यावर मात्र गाडी पूर्णच खाली बसते. आडरस्त्याला पंक्चरवाला मिळत नाही. त्यातून जॅक तुटलेला असेल तर दुसरी गाडी थांबवून उसना जॅक मागून घ्यावा लागतो ;)

In reply to by चतुरंग

हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत आहे. स्वति घरात नसताना कंडू शमनार्थ रुण्डिरा खावी| ती ही घरात नसताना स्वहस्तेच बुद्ली दाबावी || याचा अर्थ साधारण असा होतो की सुंठ घरात नसेल तर कंडू म्हणजे खोकला थांबवण्यासाठी खडीसाखर खावी. ती ही म्हणजे खडीसाखरही घरात नसेल तर आपल्याच हाताने (बुद्ली) पडजीभ दाबावी. तस्मात डॉ साहेब ** ठेवा सांगण्यासाठी इतक्या शब्दांचा खटाटोप? प्रतिसाद संपादीत केला आहे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

श्री. पेशवे, इथे गाड्या, प्रवास, त्यातल्या अडचणी, ड्रायव्हरांचे प्रश्न असल्या विषयांवर चर्चा चालू असताना तुम्ही जे अश्लीलतेकडे झुकणारे लिहिले आहे त्याचा तीव्र निषेध. बाई ठेवणे, ** राखणे, ** दाबणे हे अवांतर आहे. कृपया सदर विषयावर लिहिता येत नसेल तर किमान चर्चेमध्ये गोंधळ माजवू नये ही विनंती. आता काही जणांना नसतो ड्रायव्हिंगचा अनुभव, किंवा गती नसते, अॅक्सिडेंट वगैरे झालेले असतात. म्हणून आकस धरून असे वाह्यात वर्तन करू नये. संपादक यात लक्ष घालतील काय?

sagarparadkar 13/09/2010 - 19:46
धन्य हो डॉक्टरसाहेब ... साष्टांग नमस्कार इथे कसा दर्शवायचा माहीत नाही म्हणून __/\__ एव्ह्ढ्यावरच भागवून घ्या ... कदाचित ___^_/ असा दर्शवता येईल ... >> तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा हल्लीच्या स्टेपनीला ती स्टेपनी आहे हे कळले तर गाडी नुसतीच थंडावेल की कायमचीच बंद पडेल किंवा कसे .... स्टेपनी वापरण्याचा अनुभव नसल्याने सांगता येणार नाही ...

माजगावकर 13/09/2010 - 20:30
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. गाडीचा वापर जास्त असणार्यांसाठी.. परंतु ती लावायची वेळ न येणे बरं.. अर्थात इतर चार चाकांबरोबर तिचे हवा-पाणी देखील नियमित तपासून घेतो..

In reply to by माजगावकर

धमाल मुलगा 13/09/2010 - 20:46
है शाब्बास्स! य्ये हुई ना ब्बात! डॉक्टरसाहेबांच्या लेखाचं सार्थक झालं असं म्हणेन मी. -धमायक प्रभु.

In reply to by माजगावकर

टिउ 14/09/2010 - 02:06
माजगावकर, अहो तुमच्याकडे ऑलरेडी चार चाकं असतांना अजुन स्टेपनी कशाला पाहीजे? तुमच्यासारख्या लोकांमुळे स्टेपन्यांचे भाव वाढलेत हल्ली... ;)

शहराजाद 14/09/2010 - 01:50
स्टोरेजच्या सोयीसाठी स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असण्याची पद्धत आहे. पण गाडी ओढून नेण्याच्या कामी ती मूळ चाकाइतकी स्थिर आणि सुरक्षित कधीच नसते, एवढे लक्षात असूद्या.

In reply to by शहराजाद

वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना साधारणता हे माहित असते. आणि म्हणूनच ते स्टेपनी ला मूळ चाक म्हणून नाही वापरत. मूळ चाक ते मूळ चाक आणि स्टेपनी ती स्टेपनी !!! कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! (तलवारी उपसल्या जाण्याची वाट पाहणारा) वि. मे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! अहो कसं आहे.. चालकानी स्टेप्नी बाळगणे आणि गाडीला स्टेप्नी आहे हे न कळणे जसे असते तसे गाडीनेच स्टेप्नी किंवा पर्यायी स्टँड ठेवणे आणि चालकाला याची खबरबात नसणे हे ही असते म्हणूनही असेल कदाचित.

In reply to by शहराजाद

Pain 14/09/2010 - 23:06
मी जेव्हा पंक्चर चाक काढून स्टेपनी लावली होती तेव्हा दोन्हीवर लिहिलेला साइझ पाहिला होता. सारखाच होता. मूळ चाकापेक्षा लहान आकार असणे अयोग्य आहे. (कदाचित तुम्ही दुचाकीबद्दल बोलत असाल, मी चारचाकीबद्दल बोलत आहे.)

In reply to by Pain

शहराजाद 15/09/2010 - 00:01
काही गाड्यांची स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असते. ठेवण्याच्या सोयीसाठी हे करतात असे कळले. माझा मुद्दा , मूळ चाकाचीच निगा राखून स्टेपनीची गरजच भासू नये अशी काळजी घेणे इष्ट. यापुढे प्रत्येकाची मर्जी.

In reply to by Pain

अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत. भारतात मी छोटी स्टेपनी नाही पाहिली. असेलही, काही खास अनुभव नाही. अमेरिकेत डिकीत (ट्रंक म्हणायचे बरे, डिकी म्हटले की काहीतरी वेगळेच समजतात) सहजपणे बसावे म्हणून स्टेपनी छोटी बनवतात. अशी स्टेपनी असेल तर ५५ मैल प्रती तास या गतीपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची नसते. यातून नक्की काय काय अर्थ लोक काढतील ते तो एक श्रीराम जाणे (देव, धागाप्रवर्तक नाही)

बहुतेक वेळा आपली स्टेपनी आपण कायम गाडीतच बाळगावी अशी सिस्टिम असते. पण हा संसाधनांचा शुद्ध अपव्यय आहे. म्हणून मी नवीन सिस्टिमचा विचार करत होतो. समजा असं केलं तर? स्टेपनी गाडीत बाळगायचीच नाही. गाडी पंक्चर झाली की मेकॅनिकला फोन करायचा, मग तो आपल्याला हवी तशी स्टेपनी आणून देईल. तात्पुरती वापरायची. नंतर मेकॅनिकला परत करायची. कशाला उगाच ती विकत घ्यायची? आणि कायम बाळगून पेट्रोल अधिक खर्च करायचं? मुळात गाडी विकत घेतली त्यात खर्च आहेच. बरं, मेकॅनिकलाही भाडं मिळेल, आणि इतर कस्टमरांना वापरायला देता येईल. थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. तसं म्हटलं तर ती आधी कोणी इतर कस्टमरांनी वापरली आहे म्हणून आपल्याला तरी कुठे फरक पडतो? मग थोड्या स्टेपन्या खूप लोकांना पुरतील, व एकंदरीत समाजाचा स्टेपनी-विषयक खर्च देखील कमी होईल. दर वेळी सेफ्टी जरा चेक करून घ्यावी लागेल, पण मान्यवर गराजनी जर स्टेपन्या पुरवल्या तर तो धोकादेखील कमी होईल. काही लोकांच्या मते सामाजिक वर्दळ सुरळीतपणे चालण्यासाठी अशी सिस्टिम उपयोगी ठरेल. नाहीतर काही लोक चाक पंक्चर झालं आणि स्टेपनी परवडली नाही की दुसऱ्याच्या गाड्यांची चाकं बळजबरीने पळवतात... खरं तर आख्खी गाडीच भाड्याने घेता आली तर? अशीच कल्पना मी आधी देखील मांडली होती. पण अनुमोदनाच्या औष्ठ्यसेवेपलिकडे कोणी काही केलं नाही. ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी 14/09/2010 - 09:27
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे साली. अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. आपण वापरतो नं तिला. मग अशी नावे का बरे ठेवायची ? त्रास तर माझी गाडी पण देते, कदाचित तुमच्या गाडी पेक्षा जास्त, खूप खूप आवाज करते, खूप हादरे बसतात. माझा सगळा पगार तिच्यासाठीच संपतो. गाडी नसेल तर कित्ती कित्ती , कशा कशाचे, हाल होतील ते विचार करा. वर्षातून एक-दोन वेळाच स्मूथ चालते. (गाडीला इच्छित स्थळी जायचे असेल तरच ) माझी गाडी स्वस्तात घेतली होती, पण आता मेंटेनन्स खर्चच जास्त होतो. सप्लायर कडे जास्त गाड्या होत्या, आमची गाडी हि पहिलीच मोडेल. त्यामुळे स्वस्तात दिली त्याने. गाडी जुनी देऊन नवीन मिळेल अशी काय योजना आहे काय ?(वाट्टेल तेवढा खर्च करायला तयार आहे) सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.

In reply to by गांधीवादी

अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.
तुमचा गैरसमज होतोय. नावं गाडीला ठेवलेलीच नाहीत. प्रवासालाही नाहीत (तो प्रवास सुंदर होता...) गाडीच्या लायसेन्सिंगच्या नियमाला नावं ठेवली आहेत. समाजवादी अर्थकारणाच्या विचारसरणीत गाडी ही चैनीची वस्तु समजली गेली - आणि प्रत्येकाला एकच गाडी - तीही मोठ्या मिनतवारीने मिळणार...
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
हे फारच पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह झालं. स्टेपनीचं बघा जरा...

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी 14/09/2010 - 11:13
OK OK असं होय,समजले. थोडा गोंधळ उडालेला होता. सहमत आहे. >>स्टेपनीचं बघा जरा... गाडी ने कितीही त्रास दिला तरी अजून काय कुठेच पंचर नाही. एकदम शॉल्लीट MRF चे आहेत आमचे टायर्स, त्यामुळे हा सल्ला कामाचा नाहि

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 14/09/2010 - 10:59
सोय हवी पण स्टेपनी सांभाळायला नको हा कोता-चंगळवादी विचार केल्याबद्दल घासकडवी यांचा निषेध. गाडी आणि चाके यांचे गुणोत्तर तसे आहे म्हणून एका गाडीला चार चाके आणि एक स्टेपनी ठेवण्याची पद्धत असावी. गुणोत्तर वेगळे असते तर दोन स्टेपन्याठेवण्याची किंवा घासकडवींच्या मनोराज्याप्रमाणे स्टेपनी भाड्याने मिळण्याची पद्धत आली असती. स्टेपनी ठेवायची नसेल तर आधी चाकांची निर्मिती कमी करावी लागेल.

In reply to by राजेश घासकडवी

मी_ओंकार 15/09/2010 - 09:48
थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. काही स्टेपनींना साबण चोळून ही चकाचक करतात असे ऐकून आहे. - (ऐकीवातला)

वेताळ 14/09/2010 - 09:42
त्याच्या करीता काही सुचना आहेत का?पुर्वी बजाज स्कुटरला स्टेफनी असायची .आताच्या स्कुटरला स्टेफनी नसते. त्यामुळे खुपच कुचंबणा होते.रस्त्यावर हात हालवत उभे रहावे लागते.

चिगो 14/09/2010 - 15:59
अवो, ते हात हलवत म्हन्ले... काय्यच्या क्काय..

काही लोक गाडी 'एकहाती' वापरण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे गाडी तंदुरुस्त राहते म्हणे! आम्ही त्यांना विचारतो पंक्चर झाल्यावर कितीही तुम्ही एकहाती वापरली असली तरी स्टेपनी लागतेच. आता मोटरसायकलसारख्या दुचाकीला स्टेपनी लावताच येत नाही. त्यांनी काय करायच? गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंतात. स्टेपनीचा शोध यातुनच लागला असावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

एकहाती गाडी वापरल्याने गाडीचेच नव्हे तर चालकाचेही आरोग्य चांगले राहते. नाहीतर इतर कोणी गाडी नीट नाही वापरली तर गाडी खिळखिळी होऊ शकते त्यामुळे चालकाचेही जजमेंट चुकू शकते ना!
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की. स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे.

सगळे सगळे चांदोबा

गोगोल ·

Nile 11/09/2010 - 12:47
धन्यवाद! लिंक आवडली, चाल्लो झाडावर लगेच*. * का चाल्लो या प्रश्नाचे उत्तर माहित असुनही प्रश्न विचारलात तर डोक्याची शंभर शकले होउन पायाशी लोळु लागतील. -निळ्या वेताळ.

आनंदयात्री 11/09/2010 - 13:34
वाह ! गणेशोत्सवाची उत्तम भेट समजावे या लिंकला !! (साईट द्रुपाल आधारितच असावी असे वाटतेय)

चिंतामणी 11/09/2010 - 18:15
बालपणात नेउन सोडलेत आम्हाला. हंममममममममममम बरेच दिवस पुरेल हा खजीना आता.

Pain 12/09/2010 - 09:39
इथे फक्त थोडेसे नवीन भाग आहेत का ? मी जुन्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी वाचायला गेलो आणि पोपट झाला. -------- दुपारी ते टूल बहुदा चालले नाही माझ्या browser मध्ये. आत्ता उघडले. प्रचंड धन्यवाद. जुने अंक मला कुठेच मिळाले नव्हते.

सुनील 12/09/2010 - 00:58
अहाहा! बालपणीच्या कित्येक आठवणी "चांदोबा"शी निगडीत आहेत! "वाचनखूण" साठवण्याची सोय कधी उपलब्ध होणार?

शुचि 12/09/2010 - 02:57
आई ग!!!!!!!!!! पहीली कथा आज (गणपती बसल्याच्या दिवशी) वाचली ती ही गणेश पुराणातली - भाद्रपद चतुर्थीची गणपतीची. ईतकं गोड वाटलं वाचून - वर्ष =१९८२, महीना = जून फारच मोठा खजीना सापडलाय.

गोगोल साहेब, मजा आणलीत... ऐंशीच्या दशकातल्या सुरुवातीचे बरेच अंक वाचले होते .. ते शोधत आहे... आता मी भल्लूक मान्त्रिक असं एक क्यारेक्टर असलेली एक कथा शोधत आहे.. आणि एक जाहिरात असायची कोणत्यातरी बँकेची.. " मी आहे मिंटी एक खारोटी" अशी

In reply to by भडकमकर मास्तर

Pain 12/09/2010 - 09:58
मी शाक्तपंथीय लोक असलेली एक गोष्ट शोधणार आहे; त्यातला नायक (बहुदा अनुक्रमे १, ३, ५, ७) डोकी असलेले साप मारत मारत एकामागून एक दरवाजे पार करत जातो तिथपर्यंत वाचली होती. रामायणही सुंदर होते.

गोगोल गोगोल गोगोल गोगोल गोगोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल !!!!!!!! माझ्याकडून तुम्हाला १००१ गोड गोड गोड गोड गोड मोदक !!!!! मी मॅड झालो आहे..... आता "मिसळपाव" ला रामराम..... जितका वेळ माझा स्वतःचा म्हणून माझ्याकडे आहे तो सगळा सगळा सगळा सगळा सगळा "चांदोबा" बरोबर व्यतीत करणार !!!!! माझ्याबरोबर मी माझ्या मामाला - (जे स्वतः आम्हाला त्यांच्या लहानपणी ते वाचत असलेल्या 'काशांचा किल्ला' बद्दल डोळे मोठे करून सांगत असत).... खुळे करणार...त्यांना प्रत्यक्ष भेटूनच हा खजिना उलगडणार कारण त्यांच्या चेहर्‍यावरील अविश्वसनीय भाव मला टिपायचे आहेत. थॅन्क्सस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स ! इन्द्रा

In reply to by गोगोल

थॅन्क्स गोगोल फॉर द अप्रेसिएशन.... पण 'चांदोबा' ची नशा आता माझ्या डोक्यात इतकी भिनली आहे की, येथील (रोहटकमधील) तीन मित्रांसमवेत एका फिल्ड वर्कला जावे की न जावे या मनःस्थितीत होतो, पण आता जाण्याचे नक्की केले आहे, कारण कामानंतर तेथील एका फार्म हाऊसवर आमच्या मुक्काम असतो. वर्क शेड्युल रिपोर्टचे काम संपल्यानंतर आणि भोजनानंतर बाकीचे झोपी गेल्यावर मी 'चांदोबा' बरोबर मनसोक्त फिरणार....फिरणारच आता....एकटा ! [एरवी एफएम बँड रेडिओची साथ असायची...पण आता चक्रपाणींचा चांदोबा ! बाय द वे...तुम्हाला हा खजिना कसा काय समजला/सापडला? इन्द्रा

माझ्याकडे चंदामामा हे हिन्दी मासिक १९४९ ते २००६ सर्व महिन्यांचे अंक उपलब्ध आहेत RAR format मध्ये.कोणाला हवे असल्यास मी मोफत देण्यास तयार आहे.

Nile 11/09/2010 - 12:47
धन्यवाद! लिंक आवडली, चाल्लो झाडावर लगेच*. * का चाल्लो या प्रश्नाचे उत्तर माहित असुनही प्रश्न विचारलात तर डोक्याची शंभर शकले होउन पायाशी लोळु लागतील. -निळ्या वेताळ.

आनंदयात्री 11/09/2010 - 13:34
वाह ! गणेशोत्सवाची उत्तम भेट समजावे या लिंकला !! (साईट द्रुपाल आधारितच असावी असे वाटतेय)

चिंतामणी 11/09/2010 - 18:15
बालपणात नेउन सोडलेत आम्हाला. हंममममममममममम बरेच दिवस पुरेल हा खजीना आता.

Pain 12/09/2010 - 09:39
इथे फक्त थोडेसे नवीन भाग आहेत का ? मी जुन्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी वाचायला गेलो आणि पोपट झाला. -------- दुपारी ते टूल बहुदा चालले नाही माझ्या browser मध्ये. आत्ता उघडले. प्रचंड धन्यवाद. जुने अंक मला कुठेच मिळाले नव्हते.

सुनील 12/09/2010 - 00:58
अहाहा! बालपणीच्या कित्येक आठवणी "चांदोबा"शी निगडीत आहेत! "वाचनखूण" साठवण्याची सोय कधी उपलब्ध होणार?

शुचि 12/09/2010 - 02:57
आई ग!!!!!!!!!! पहीली कथा आज (गणपती बसल्याच्या दिवशी) वाचली ती ही गणेश पुराणातली - भाद्रपद चतुर्थीची गणपतीची. ईतकं गोड वाटलं वाचून - वर्ष =१९८२, महीना = जून फारच मोठा खजीना सापडलाय.

गोगोल साहेब, मजा आणलीत... ऐंशीच्या दशकातल्या सुरुवातीचे बरेच अंक वाचले होते .. ते शोधत आहे... आता मी भल्लूक मान्त्रिक असं एक क्यारेक्टर असलेली एक कथा शोधत आहे.. आणि एक जाहिरात असायची कोणत्यातरी बँकेची.. " मी आहे मिंटी एक खारोटी" अशी

In reply to by भडकमकर मास्तर

Pain 12/09/2010 - 09:58
मी शाक्तपंथीय लोक असलेली एक गोष्ट शोधणार आहे; त्यातला नायक (बहुदा अनुक्रमे १, ३, ५, ७) डोकी असलेले साप मारत मारत एकामागून एक दरवाजे पार करत जातो तिथपर्यंत वाचली होती. रामायणही सुंदर होते.

गोगोल गोगोल गोगोल गोगोल गोगोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल !!!!!!!! माझ्याकडून तुम्हाला १००१ गोड गोड गोड गोड गोड मोदक !!!!! मी मॅड झालो आहे..... आता "मिसळपाव" ला रामराम..... जितका वेळ माझा स्वतःचा म्हणून माझ्याकडे आहे तो सगळा सगळा सगळा सगळा सगळा "चांदोबा" बरोबर व्यतीत करणार !!!!! माझ्याबरोबर मी माझ्या मामाला - (जे स्वतः आम्हाला त्यांच्या लहानपणी ते वाचत असलेल्या 'काशांचा किल्ला' बद्दल डोळे मोठे करून सांगत असत).... खुळे करणार...त्यांना प्रत्यक्ष भेटूनच हा खजिना उलगडणार कारण त्यांच्या चेहर्‍यावरील अविश्वसनीय भाव मला टिपायचे आहेत. थॅन्क्सस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स ! इन्द्रा

In reply to by गोगोल

थॅन्क्स गोगोल फॉर द अप्रेसिएशन.... पण 'चांदोबा' ची नशा आता माझ्या डोक्यात इतकी भिनली आहे की, येथील (रोहटकमधील) तीन मित्रांसमवेत एका फिल्ड वर्कला जावे की न जावे या मनःस्थितीत होतो, पण आता जाण्याचे नक्की केले आहे, कारण कामानंतर तेथील एका फार्म हाऊसवर आमच्या मुक्काम असतो. वर्क शेड्युल रिपोर्टचे काम संपल्यानंतर आणि भोजनानंतर बाकीचे झोपी गेल्यावर मी 'चांदोबा' बरोबर मनसोक्त फिरणार....फिरणारच आता....एकटा ! [एरवी एफएम बँड रेडिओची साथ असायची...पण आता चक्रपाणींचा चांदोबा ! बाय द वे...तुम्हाला हा खजिना कसा काय समजला/सापडला? इन्द्रा

माझ्याकडे चंदामामा हे हिन्दी मासिक १९४९ ते २००६ सर्व महिन्यांचे अंक उपलब्ध आहेत RAR format मध्ये.कोणाला हवे असल्यास मी मोफत देण्यास तयार आहे.
http://www.chandamama.com/archive/storyArchive.php?lng=MAR मज्जा करा :)

मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग!

चतुरंग ·

In reply to by परिकथेतील राजकुमार

चतुरंग 10/09/2010 - 18:53
मूव सुचवता येणार नाहीये तर ३ ग्रँमा नी सुचवलेल्या खेळ्यांवरती तुम्ही मतदान करु शकाल. सर्वाधिक मतानुसार खेळी ठरवून ती केल्या जाईल! :) खास रेटिंग किंवा क्वालिफिकेशन गरजेचे नाही तुम्ही ऑनलाईन जाऊन मत देऊ शकता!

In reply to by चतुरंग

प्रिय ग्यारी कास्पारोव, सप्रेम नमस्कार तुला चेस तमाशात सहभागी झालेलं पाहून आश्चर्य वाटलं... मान्य करतो, हा जो मलगा खेळायला येतो तो आपापल्या परिने गुणी आहे. बुद्धिबळात काही एक प्रयत्न करणारा आहे धडपडणारा आहे. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती तर असेलच नक्की) की तो केवळ एक खेळाचा बाजार आहे? तिथे तुझ्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे आंतरजालावरच्य मूर्खांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने जालीय आर्थिक राजकारणाचं असतं.. या मूववर मतदान करणार्‍या लोकांची अक्कल ती किती आणि असे मतदान वगैरे करून बुद्धिबळ खेळ होत नसतो हे कोणीतरी सांगा रे बाबा यांना ...... पोल्गर कास्पारोव वगैरे मंडळींनी या असल्या दिखाऊ तमाशात भाग घ्यावा हे पाहून वाईट वाटलं... का ही अशी अधोगती आणि तीही अचानक? अरे हा खेळ म्हणजे गाणंबजावणं नाही की जिथे फक्त एक एसेमेस पाठवून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या बुद्धिबळ खेळाची स्पर्धा आहे ना ती? तू कसा काय असा जालीय बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास? अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चा खेळ कर की.. खूप चांगला खेळतोस, अजूनही चांगला खेळशील.ब्बॉट्विनिक, फिशर्,कापाब्लान्का यांची नावं घेतली की चेस म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.या असल्या शोबाजीच्या वाममार्गाला कसाकाय लागलास रे तू? मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांच्या खेळ्या ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत ज्ञानी जनजनांचा...जालीय मतदान पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..! असो, जे मनात आलं ते सांगितलं... तुझ्या खेळाचा नेहमीच चाहता भडकमकर मास्तर

In reply to by भडकमकर मास्तर

शहराजाद 11/09/2010 - 04:30
मास्तर, तुमच्याइतक्या कळकळीने नाही तरी ही स्पर्धा म्हणजे काहीशी ओढून ताणून नावीन्य आणण्याची युक्ती वाटली. काळ्याने जो मार खाल्ला तो जर असल्या बहुमताने ठरणाऱ्या खेळ्यांऐवजी एकच ग्रॅंडमास्टर खेळला असता तर खाल्ला असता का, असा प्रश्न पडला. टॅक्टिकल प्ले होणं ठीक आहे, पण स्ट्रॅटेजिक प्ले अशा सिस्टीममधून कसा येणार? चतुरंग त्याचं समर्पक उत्तर देतील अशी आशा आहे. मात्र मास्तर, तुमच्या सहीतली चेष्टा इथे विसंगत वाटली... :)

In reply to by यशोधरा

चतुरंग 10/09/2010 - 19:21
संपादित करुन निखिलकडे सोपवले आहे. प्रसिद्ध करण्यापूर्वी पीडीएफ करता येते का ते तपासून जरा नीटनेटके करुन देतो आहे तो. लवकरच प्रकाशित होईल.

चतुरंग 10/09/2010 - 19:24
पानावरती सगळ्यात उजवीकडे वरच्याबाजूला Join the game म्हणून टॅब आहे तिथे क्लिकवून तुम्ही खेळात भाग घेऊ शकता. तुम्हाला chess.com वरती अकाऊंट काढण्याची विनंती होईल किंवा तुम्ही फेसबुक अकाऊंट वरुनही जॉइन करु शकता.

चतुरंग 11/09/2010 - 06:03
ते दुर्दैवाने खरे ठरले असे म्हणायची वेळ यावी इतका वाईट झाला आजचा सामना. ---------------------------- ह्या सगळ्या प्रकाराबद्दल सविस्तरच लिहायला हवे. प्रथमतः मला ज्यावेळी हे समजले की असा सामना होणार आहे त्यावेळी सहाजिकच माझ्या मनात त्याची तुलना १९९९ मधे कास्पारोव विरुद्ध जग ह्या सामन्याशी झाली. तो सामना आणि हा सामना ह्यात फारच फरक आहेत हे मला सगळे नियम वाचल्यावर समजले परंतु तोपर्यंत मी हा लेख लिहिलेला होता. नियमातला सगळ्यात मोठा विनोद म्हणजे प्रत्येकाला खेळी करण्यासाठी १ मिनिट एवढाच वेळ देण्यात आला होता. आणि मॅग्नुस बरोबर खेळणार होते ते तीन ग्रँडमास्टर्स - ते खेळीचा पर्याय देणार आणि त्यापैकी एक खेळी इंटरनेटवरुन लोकांनी निवडायची असा सारा मामला होता - म्हणजे मुळात मॅग्नुस विरुद्ध ग्रँमा असाच सामना होता हे जग बीग ही सगळी सेल्समन पिच होती! ;) हे सगळे करायला १ मिनिटच देणे हे त्याहून हास्यास्पद होते!! कास्पारोव विरुद्धचा सामना हा एका खेळीला २४ तास अशा प्रकारे खेळवला गेला आणि त्यात अक्षरशः हजारो लोकांनी भाग घेऊन खेळ्यांवर विचारविनिमय करुन मग खेळ केला होता. हा डाव तब्बल ४ महिने सुरु होता! त्यामुळे सहाजिकच मॅग्नुसचे पारडे जड होते. तो एकटाच खेळणार आणि तीन ग्रँमा पैकी एकाची खेळी कितीही उत्कृष्ठ असली तरी बहुमताच्या जोरावर दुसरीच कुठलीतरी खेळी नक्की होऊन खेळली जाऊ शकेल (आणि ती शक्यता जास्त कारण नेटावरुन खेळणारे काही झाले तरी ग्रँमा दर्जाचे खेळायची संभावना ती किती?) अशा प्रकारे डाव सुरु झाला आणि साधारण १० खेळीपासूनच लोकांनी दिवे लावायला सुरुवात केली तेव्हाच कास्पारोव म्हणाला की एकूण सगळा प्रकार बघता हा डाव गेल्यातच जमा आहे! अवघ्या दोन अडीच तासात आणि ४४ खेळ्यात डाव संपला. हा डाव बघितला तर अजिबात विश्लेषण वगैरे करायच्या पातळीचा डावच नाहीये! ------------------------------------ मग ह्या सगळ्या फियास्कोचे कारण काय असावे? ह्या सगळ्या प्रकारामागे मला वेगळेच राजकारण दिसते आहे. ग्रँडस्लॅम मास्टर्सची पहिली फेरी ३ ते ८ सप्टेंबर अशी शांघायला झाली. त्यातून अ‍ॅलेक्सी शिरोव आणि व्लादिमीर क्रामनिक हे दोघे पुढच्या फेरीत गेले. ९ ते १५ ऑक्टोबर अशी बिलबाओ (स्पेन) मधे दुसरी फेरी होणार आहे. तिथे आनंद, मॅग्नुस कार्लसन, क्रामनिक आणि शिरोव खेळतील. पुढे जानेवरीत कोरेस स्पर्धा आहे (म्हणजे ह्यावेळेपासून टाटा स्टील नावाने ती ओळखली जाईल कारण कोरेस त्यांनी विकत घेतलीये.) ही सगळी तयारी २०१२ च्या विश्वविजेतेपदाच्या पायर्‍या आहेत! आता ह्यामागचे राजकारण समजू शकते. कार्लसनचा सल्लागार म्हणून कास्पारोव काम करतोय. तसेच कास्पारोवचे फिडेशी संबंध आता ताणलेले नसले तरी फारसे मित्रत्वाचेही नाहीत. फिडेच्या कार्यकारिणीवर कोणीही ग्रँडमास्टर्स नसून खेळातले फारसे न समजणारे इतरच लोक आहेत अशी त्याची कित्येक वर्षांपासूनची तक्रार आहे (त्यात तथ्यही आहे म्हणा). कास्पारोवचा डोळा फिडे अध्यक्षपदावर आहे. आजची जी इवेंट न्यूयॉर्कमधे झाली त्यातून दोन गोष्टी कास्पारोवला साधायच्या आहेत असे दिसते - एकतर त्याचा चेला कार्लसनला प्रोजेक्ट करणे आणि त्याल जिंकवून त्याचा दबदबा वाढवणे जेणेकरुन आनंदवर त्याचा अप्रत्यक्ष दबाव येईल आणि दुसरे म्हणजे आपली प्रसिद्धी वाढवून फिडेच्या अध्यक्षपदाकडे आपला घोडा दामटवणे! अन्यथा आजच्या इवेंट (होय मी ह्याला इवेंटच म्हणेन) मधे इतका सहभाग घेण्याचे कास्पारोवला कारण दिसत नाही. ही स्पर्धा नव्हतीच हे मार्केटिंग होते. गाण्याच्या स्पर्धांचे किंवा नाचाच्या स्पर्धांचे जे पेव फुटले आहे तसे ह्या बुद्धीबळाचेही होऊ लागले आहे की काय ह्या चिंतेने मला मात्र बेचैनी आली आहे! -------------------------------- एकूणच झटपट पब्लिसिटी आणि ताबडतोब किर्ती ह्याची लागलेली खोड जर वाढत गेली तर खरे तारे न चमकता क्षणभर तळपून लगेच विझणार्‍या उल्कांचे प्रमाण वाढत जाणार की काय असे वाटू लागते. (विचारात पडलेला)चतुरंग

In reply to by चतुरंग

"खरे तारे न चमकता क्षणभर तळपून लगेच विझणार्‍या उल्कांचे प्रमाण वाढत जाणार की काय असे वाटू लागते." +१ भीती रास्त आहे/

In reply to by परिकथेतील राजकुमार

चतुरंग 10/09/2010 - 18:53
मूव सुचवता येणार नाहीये तर ३ ग्रँमा नी सुचवलेल्या खेळ्यांवरती तुम्ही मतदान करु शकाल. सर्वाधिक मतानुसार खेळी ठरवून ती केल्या जाईल! :) खास रेटिंग किंवा क्वालिफिकेशन गरजेचे नाही तुम्ही ऑनलाईन जाऊन मत देऊ शकता!

In reply to by चतुरंग

प्रिय ग्यारी कास्पारोव, सप्रेम नमस्कार तुला चेस तमाशात सहभागी झालेलं पाहून आश्चर्य वाटलं... मान्य करतो, हा जो मलगा खेळायला येतो तो आपापल्या परिने गुणी आहे. बुद्धिबळात काही एक प्रयत्न करणारा आहे धडपडणारा आहे. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती तर असेलच नक्की) की तो केवळ एक खेळाचा बाजार आहे? तिथे तुझ्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे आंतरजालावरच्य मूर्खांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने जालीय आर्थिक राजकारणाचं असतं.. या मूववर मतदान करणार्‍या लोकांची अक्कल ती किती आणि असे मतदान वगैरे करून बुद्धिबळ खेळ होत नसतो हे कोणीतरी सांगा रे बाबा यांना ...... पोल्गर कास्पारोव वगैरे मंडळींनी या असल्या दिखाऊ तमाशात भाग घ्यावा हे पाहून वाईट वाटलं... का ही अशी अधोगती आणि तीही अचानक? अरे हा खेळ म्हणजे गाणंबजावणं नाही की जिथे फक्त एक एसेमेस पाठवून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या बुद्धिबळ खेळाची स्पर्धा आहे ना ती? तू कसा काय असा जालीय बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास? अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चा खेळ कर की.. खूप चांगला खेळतोस, अजूनही चांगला खेळशील.ब्बॉट्विनिक, फिशर्,कापाब्लान्का यांची नावं घेतली की चेस म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.या असल्या शोबाजीच्या वाममार्गाला कसाकाय लागलास रे तू? मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांच्या खेळ्या ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत ज्ञानी जनजनांचा...जालीय मतदान पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..! असो, जे मनात आलं ते सांगितलं... तुझ्या खेळाचा नेहमीच चाहता भडकमकर मास्तर

In reply to by भडकमकर मास्तर

शहराजाद 11/09/2010 - 04:30
मास्तर, तुमच्याइतक्या कळकळीने नाही तरी ही स्पर्धा म्हणजे काहीशी ओढून ताणून नावीन्य आणण्याची युक्ती वाटली. काळ्याने जो मार खाल्ला तो जर असल्या बहुमताने ठरणाऱ्या खेळ्यांऐवजी एकच ग्रॅंडमास्टर खेळला असता तर खाल्ला असता का, असा प्रश्न पडला. टॅक्टिकल प्ले होणं ठीक आहे, पण स्ट्रॅटेजिक प्ले अशा सिस्टीममधून कसा येणार? चतुरंग त्याचं समर्पक उत्तर देतील अशी आशा आहे. मात्र मास्तर, तुमच्या सहीतली चेष्टा इथे विसंगत वाटली... :)

In reply to by यशोधरा

चतुरंग 10/09/2010 - 19:21
संपादित करुन निखिलकडे सोपवले आहे. प्रसिद्ध करण्यापूर्वी पीडीएफ करता येते का ते तपासून जरा नीटनेटके करुन देतो आहे तो. लवकरच प्रकाशित होईल.

चतुरंग 10/09/2010 - 19:24
पानावरती सगळ्यात उजवीकडे वरच्याबाजूला Join the game म्हणून टॅब आहे तिथे क्लिकवून तुम्ही खेळात भाग घेऊ शकता. तुम्हाला chess.com वरती अकाऊंट काढण्याची विनंती होईल किंवा तुम्ही फेसबुक अकाऊंट वरुनही जॉइन करु शकता.

चतुरंग 11/09/2010 - 06:03
ते दुर्दैवाने खरे ठरले असे म्हणायची वेळ यावी इतका वाईट झाला आजचा सामना. ---------------------------- ह्या सगळ्या प्रकाराबद्दल सविस्तरच लिहायला हवे. प्रथमतः मला ज्यावेळी हे समजले की असा सामना होणार आहे त्यावेळी सहाजिकच माझ्या मनात त्याची तुलना १९९९ मधे कास्पारोव विरुद्ध जग ह्या सामन्याशी झाली. तो सामना आणि हा सामना ह्यात फारच फरक आहेत हे मला सगळे नियम वाचल्यावर समजले परंतु तोपर्यंत मी हा लेख लिहिलेला होता. नियमातला सगळ्यात मोठा विनोद म्हणजे प्रत्येकाला खेळी करण्यासाठी १ मिनिट एवढाच वेळ देण्यात आला होता. आणि मॅग्नुस बरोबर खेळणार होते ते तीन ग्रँडमास्टर्स - ते खेळीचा पर्याय देणार आणि त्यापैकी एक खेळी इंटरनेटवरुन लोकांनी निवडायची असा सारा मामला होता - म्हणजे मुळात मॅग्नुस विरुद्ध ग्रँमा असाच सामना होता हे जग बीग ही सगळी सेल्समन पिच होती! ;) हे सगळे करायला १ मिनिटच देणे हे त्याहून हास्यास्पद होते!! कास्पारोव विरुद्धचा सामना हा एका खेळीला २४ तास अशा प्रकारे खेळवला गेला आणि त्यात अक्षरशः हजारो लोकांनी भाग घेऊन खेळ्यांवर विचारविनिमय करुन मग खेळ केला होता. हा डाव तब्बल ४ महिने सुरु होता! त्यामुळे सहाजिकच मॅग्नुसचे पारडे जड होते. तो एकटाच खेळणार आणि तीन ग्रँमा पैकी एकाची खेळी कितीही उत्कृष्ठ असली तरी बहुमताच्या जोरावर दुसरीच कुठलीतरी खेळी नक्की होऊन खेळली जाऊ शकेल (आणि ती शक्यता जास्त कारण नेटावरुन खेळणारे काही झाले तरी ग्रँमा दर्जाचे खेळायची संभावना ती किती?) अशा प्रकारे डाव सुरु झाला आणि साधारण १० खेळीपासूनच लोकांनी दिवे लावायला सुरुवात केली तेव्हाच कास्पारोव म्हणाला की एकूण सगळा प्रकार बघता हा डाव गेल्यातच जमा आहे! अवघ्या दोन अडीच तासात आणि ४४ खेळ्यात डाव संपला. हा डाव बघितला तर अजिबात विश्लेषण वगैरे करायच्या पातळीचा डावच नाहीये! ------------------------------------ मग ह्या सगळ्या फियास्कोचे कारण काय असावे? ह्या सगळ्या प्रकारामागे मला वेगळेच राजकारण दिसते आहे. ग्रँडस्लॅम मास्टर्सची पहिली फेरी ३ ते ८ सप्टेंबर अशी शांघायला झाली. त्यातून अ‍ॅलेक्सी शिरोव आणि व्लादिमीर क्रामनिक हे दोघे पुढच्या फेरीत गेले. ९ ते १५ ऑक्टोबर अशी बिलबाओ (स्पेन) मधे दुसरी फेरी होणार आहे. तिथे आनंद, मॅग्नुस कार्लसन, क्रामनिक आणि शिरोव खेळतील. पुढे जानेवरीत कोरेस स्पर्धा आहे (म्हणजे ह्यावेळेपासून टाटा स्टील नावाने ती ओळखली जाईल कारण कोरेस त्यांनी विकत घेतलीये.) ही सगळी तयारी २०१२ च्या विश्वविजेतेपदाच्या पायर्‍या आहेत! आता ह्यामागचे राजकारण समजू शकते. कार्लसनचा सल्लागार म्हणून कास्पारोव काम करतोय. तसेच कास्पारोवचे फिडेशी संबंध आता ताणलेले नसले तरी फारसे मित्रत्वाचेही नाहीत. फिडेच्या कार्यकारिणीवर कोणीही ग्रँडमास्टर्स नसून खेळातले फारसे न समजणारे इतरच लोक आहेत अशी त्याची कित्येक वर्षांपासूनची तक्रार आहे (त्यात तथ्यही आहे म्हणा). कास्पारोवचा डोळा फिडे अध्यक्षपदावर आहे. आजची जी इवेंट न्यूयॉर्कमधे झाली त्यातून दोन गोष्टी कास्पारोवला साधायच्या आहेत असे दिसते - एकतर त्याचा चेला कार्लसनला प्रोजेक्ट करणे आणि त्याल जिंकवून त्याचा दबदबा वाढवणे जेणेकरुन आनंदवर त्याचा अप्रत्यक्ष दबाव येईल आणि दुसरे म्हणजे आपली प्रसिद्धी वाढवून फिडेच्या अध्यक्षपदाकडे आपला घोडा दामटवणे! अन्यथा आजच्या इवेंट (होय मी ह्याला इवेंटच म्हणेन) मधे इतका सहभाग घेण्याचे कास्पारोवला कारण दिसत नाही. ही स्पर्धा नव्हतीच हे मार्केटिंग होते. गाण्याच्या स्पर्धांचे किंवा नाचाच्या स्पर्धांचे जे पेव फुटले आहे तसे ह्या बुद्धीबळाचेही होऊ लागले आहे की काय ह्या चिंतेने मला मात्र बेचैनी आली आहे! -------------------------------- एकूणच झटपट पब्लिसिटी आणि ताबडतोब किर्ती ह्याची लागलेली खोड जर वाढत गेली तर खरे तारे न चमकता क्षणभर तळपून लगेच विझणार्‍या उल्कांचे प्रमाण वाढत जाणार की काय असे वाटू लागते. (विचारात पडलेला)चतुरंग

In reply to by चतुरंग

"खरे तारे न चमकता क्षणभर तळपून लगेच विझणार्‍या उल्कांचे प्रमाण वाढत जाणार की काय असे वाटू लागते." +१ भीती रास्त आहे/
आज न्यूयॉर्कमधे बुद्धीबळाचा एक डाव सुरु होतोय. अजून बरोब्बर साडेतीन तासांनी अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता. वयाच्या तेराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आणि आता बिल्बाओ इंटरनॅशनल मधे विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरवण्याच्या स्पर्धेतला खेळाडू नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग! मॅग्नुस फक्त १९ वर्षांचा आहे आणि आज जगातला अव्वल दर्जाचा खेळाडू समजला जातो. फिडेच्या यादीत तो आत्ता पहिल्या क्रमांकावर आहे! न्यूयॉर्कमधल्या कूपर स्क्वेअर हॉटेलमधल्या पेंटहाऊस मधे हा सामना रंगेल.