मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाणी

शिव कन्या ·
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना विचार करायचा देवा, पाण्याला इतके झोके देताना उसंत घ्यायची देवा.... उसळून पुन्हा आदळते पाणी खडक द्यायचा देवा... दोन डोळे पुरत नाहीत पाण्याचा संसार पेलताना... देवा, आता पाण्याचे तीर्थ करा अन् पाण्यातून मुक्ती द्या.... शिवकन्या

निघताना....

शिव कन्या ·

श्वेता२४ 24/08/2018 - 12:21
तरल कविता आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण हे खासच

राघव 30/08/2018 - 10:30
प्रतिसाद देण्यासाठी खास लॉग ईन व्हावे असे काहीतरी! आवडले! :-)

श्वेता२४ 24/08/2018 - 12:21
तरल कविता आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण हे खासच

राघव 30/08/2018 - 10:30
प्रतिसाद देण्यासाठी खास लॉग ईन व्हावे असे काहीतरी! आवडले! :-)
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

काळाची उबळ

माहितगार ·

लेखकाच्या भावनांशी काही अंशी सहमत देखिल आहे. होते असे एखाद्या दिवशी. अशा वेळी सगळे कामधंदे टाकुन मस्त कुठेतरी भटकायला जावे. यू नीड अ ब्रेक मॅन... (आली उबळ तर खोगो चघळ या आमच्या आगामी पुस्तकामधुन साभार) पैजारबुवा,

लेखकाच्या भावनांशी काही अंशी सहमत देखिल आहे. होते असे एखाद्या दिवशी. अशा वेळी सगळे कामधंदे टाकुन मस्त कुठेतरी भटकायला जावे. यू नीड अ ब्रेक मॅन... (आली उबळ तर खोगो चघळ या आमच्या आगामी पुस्तकामधुन साभार) पैजारबुवा,
लेखनविषय:
खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत ! खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, जेव्हा माणूस विचार करावयास शिकला तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल. सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज गुन्हेगारी आभाळाला टेकली राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली महागाईचा पारावर गेला प्रदुषणाने कळस केला प्रगती कशी प्रतिगामी झाली प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले स्

अत्तर

शिव कन्या ·

एस 13/09/2017 - 00:09
अत्तराचं आपलं बरं असतं बंद दाराआड कपाटाच्या कुठल्याश्या खणात भरजरी शालूला नाहीतर ठेवणीतल्या कोटाला बिलगून मंदपणे दरवळत राहतं जुन्या आठवणींच्या रम्य जगात हरवून जावं तसं त्याला ना घडीचा सोस ना उन्हपावसाचा मारा ना धुण्याचा सासुरवास नाजूक कळीसारखं कोमेजतं लग्गेच . . . . . अत्तरही कापडासारखं टिकतं, तर?

एस 13/09/2017 - 00:09
अत्तराचं आपलं बरं असतं बंद दाराआड कपाटाच्या कुठल्याश्या खणात भरजरी शालूला नाहीतर ठेवणीतल्या कोटाला बिलगून मंदपणे दरवळत राहतं जुन्या आठवणींच्या रम्य जगात हरवून जावं तसं त्याला ना घडीचा सोस ना उन्हपावसाचा मारा ना धुण्याचा सासुरवास नाजूक कळीसारखं कोमेजतं लग्गेच . . . . . अत्तरही कापडासारखं टिकतं, तर?
लेखनविषय:
कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या

विद्यार्थ्यांनो...

पुंबा ·

arunjoshi123 07/09/2017 - 16:04
जगातली कोणतीच गोष्ट अखंड चिकित्सेच्या पलिकडली नाही, कोणाबद्दलही कोणताही प्रश्न विचारावा, आपल्याला सगळं कळतं असं समजून प्रत्येकाला आपल्यासारखं बदलून घ्यावं तुमच्यात दोष असूच शकत नाहीत हे मान्य करायला लावा सगळ्यांना. पालक, गुरु सांगतील ते अनैतिक, नीच, खोटारडं असणारच हा विचार सोडू नका, त्यांच्या शंका, त्यांचे आक्षेप धुडकावून करून आपल्या वाटेने चाआपल्या, कारण कळतं सगळं तुम्हालाच. तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच व्यसनांची छोटी शलाका, आम्ही का करू त्याचा बंदोबस्त व्यवस्थीत, तुम्ही फक्त आणि फक्त लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा. देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जर तर तेवढंच त्यांना निर्भत्सण्यासाठी, सोडण्यासाठी पुरे माना. मग तुम्ही सगळे असे सगळे टिवीवर डिबेट करणारांसारखे, शहाणे , शिक्षित, सिविलाइज्ड, आधुनिक व्हाल, तुमच्या दिशाहिनतेला दिशाहिनता कोण म्हटतं आम्ही पाहून घेऊ. रँडमली ओरीयेंटेड, निर्णयक्षम, ज्ञानी , अभ्यासू आणि आधुनिक म्हणून इतके अम असालच कि जो चूक मानाल त्याचा खात्मा कराल. लक्षात ठेवा, मनःशांती, प्रेम आदी ग्यानोबा- तुकारामाचे फालतू लाड तुमच्याकरीता नाहीत. आम्ही वर्षानुवर्षे चालवलेली चिकित्सा बंद झाली तर आमच्या बिनकाम्यांना पोसणार्‍या व्यवस्था बुडतील आमच्यासहित. चला, प्रश्नचिन्हांची उभारणी चालूये, एका हाताचे अंतर घ्या, रांग धरा, एकही गोष्ट चिकित्सेवाचून सोडू नका, त्या मायबापाची चिकित्सा करायला सांगणार्‍याला सोडून बरं का.

In reply to by arunjoshi123

पुंबा 07/09/2017 - 17:04
अजो, एवढ्या भलत्याच टोकाला का नेत आहात गोष्टी? चिकित्सा म्हणजे अवमान असे तुम्ही मानता का? चिकित्सा, चुका दिसणे, शंका/प्रश्न विचारणे केवळ अहंकारातूनच येऊ शकते का? निखळ जिज्ञासा हे विद्यार्थ्याचे कल्याण करणारी व्हर्च्यु आहे की नाही? मन:शांती, प्रेम हे चिकित्सा ह्या मुल्याच्या विरोधी कसे? माझ्या मते, आई- वडिल, गुरू, देव(मंत्र्यांच्या शब्दात भगवान, अल्ला, गॉड) हे प्रश्नातीत आहेत असे सांगणे चुकीचे आहे. उलट प्रश्न बिनधास्त विचारा, त्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा हा सल्ला अधिक श्रेयस्कर आहे. प्रश्न विचारले की डोळे वटारणार्‍या आईबापांची पिढी नष्ट होतेय अश्या वेळी घड्याळाचे काटे मागे फिरवण्याचा यत्न कशासाठी? प्रश्न विचारता न आल्याने उत्तर शोधण्याचे स्किल देखिल डेव्हलप होत नाही असे मला वाटते. त्या दृष्टीने हे चुकीचे आहे. अर्थात, चिकित्सा आणी व्यक्तिचा सन्मान करणे ह्या व्यस्त गोष्टी नाहीत हे रूजवणेदेखिल गरजेचे आहेच.

In reply to by पुंबा

arunjoshi123 07/09/2017 - 17:30
मला टोकाचा वा साधाही विरोध करायचा नाही. प्रत्येक गोष्टिला मर्यादा असावी. त्यात चिकित्सा देखिल येते. बालपणी कशाची चिकित्सा करावी याला अजूनच जास्त मर्यादा असाव्यात. कारण चिकित्सा कशी करायची याचं कोणतं फ्रेमवर्क त्या वयात नसतं म्हणून मुले कुठेही वाहवत जाऊ शकतात. पालक, शिक्षक, देश, धर्म यांची चिकित्सा करावी इतकी बुद्धी लहानपणी नसते. शिवाय यांची चिकित्सा केलीच तर कोणकोणत्या बाबींची करावी, काय अर्थ काढावा, कसे वागावे याची उत्तरे काहीही निघू शकतात. ================ मंत्र्यांना अभिप्रेत नसू शकतील असे बरेच उद्देश आणि परिणाम आपण आपल्या कवितेत घातले आहेत. त्याच्या विरुद्ध बाजूचे मी माझ्या पायरसीमधे घातले आहेत. अर्थात दोहोंचं संतुलन असावं हे स्पष्टच आहे. ================= जे लोक स्वतः अत्यंत उत्तम संस्कारात वाढतात त्यांना सार्वजनिक आत्मनिर्णयनाची रिस्क कळत नाही. त्याचे एक उदाहरण आपण असाव्यात. मात्र भारतातल्या सामान्य मुलाला मात्र पालक, गुरुजन, ईश्वरप्रणित मूल्ये आदर्श मानून मोठे होणे आवश्यक आहे. विवेक, संस्कार जास्त महत्त्वाचे. चिकित्सा म्हणजे चांगुलपण नव्हे. शिवाय आवश्यक देखिल नाही कंपल्सरिली. अगोदर चांगले व्हा, चिकित्सा कशी करायची, कशाची करायची ते शिका , मग करा. ==================== विद्यार्थ्यांचा मूळ कल बिघडण्याकडे असतो, आणि पालक, गुरु आणि समाजाच्या त्रिमितिय प्रेशरमधे ते जागेवर राहातात (किमान हळू बिघडतात) असं माझं व्यक्तिगत निरिक्षण आहे म्हणून प्रतिसाद लिहिला. ================================ अपवादात्मक ठिकाणी मुलांनी चिकित्साच काय, यांना सरळ धाब्यावर बसवावे. पण जनरल आव्हान काय असावं?

In reply to by arunjoshi123

पुंबा 07/09/2017 - 18:36
चिकित्सा मरू द्या. तिथे स्वतःहून विचार करणे अभिप्रेत आहे. अगदी लहान मुले ते करू शकतील असे नाही. पण प्रश्न विचारण्यात काय प्रॉब्लेम आहे? प्रश्न विचारून उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणे याची पुढली पायरी स्वयंबुद्धीने चिकित्सा असेल. प्रश्न विचारण्याला मनाई असेल तर पुढचे होणार नाही. शिवाय किती वयानंतर चिकित्सा करण्याची मुभा हे कसे ठरवणार?
पण जनरल आव्हान काय असावं?
बिनधास्त प्रश्न विचारा..

दोन्ही बाजू आवडल्या, व काहिशा पटल्याही. पण ही दोन्ही टोके सांधायची कशी? प्रत्येकाच्या घडवणूकीमधे आई वडिल किंवा गुरु यांचे एक निश्चित योगदान असते. अर्थात हे सर्वजण सर्वज्ञ किंवा परिपूर्ण नसतात. (किंबहूना या जगात कोणीच परिपूर्ण नाही. ) पण त्यांना आपल्या पाल्ल्या बद्दल किंवा विद्यार्थ्या बद्दल आपुलकी आणि तळमळ असते. ते लोक जे काही देतात किंवा शिकवतात ते या तळमळीपोटीच. त्यांनी दिलेल्या योगदानाची आणि त्याच बरोबरीने त्यांच्या मर्यादांची जाणीव ठेवत त्यांच्याशी संवाद साधला तर दोन्ही बाजूंचा समन्वय साधता येईल. पैजारबुवा,

गामा पैलवान 09/09/2017 - 02:12
सौरा, एक अध्याहृत गोष्ट म्हणजे ज्याला सत्य शोधायचंय अशानेच या तिघांची चिकित्सा टाळावी. ज्यांना सत्य शोधायची खाज नाही त्यांनी खुशाल कोणाचीही हवी तेव्हढी चिकित्सा करावी. असो. सत्य शोधायची इच्छा असूनही विवेकानंद त्यांच्या गुरूंची म्हणजे रामकृष्ण परमहंसांची सदैव परीक्षा घ्यायचे. अगदी गुरु मृत्युशय्येवर असतांना देखील त्यांची परीक्षा घेतली. मात्र त्यासाठी विवेकानंदांसारखी कुशाग्र मेधा हवी. इथे मी बुद्धीच्या ऐवजी मेधा हा शब्द मुद्दाम वापरला आहे. सर्वसामान्य लोकं सत्याच्या शोधात असले तरी ते विवेकानंदांइतके मेधावान नसतात. म्हणून अशांनी देव,गुरू व पालकांची चिकित्सा करू नये. आ.न., -गा.पै.

arunjoshi123 07/09/2017 - 16:04
जगातली कोणतीच गोष्ट अखंड चिकित्सेच्या पलिकडली नाही, कोणाबद्दलही कोणताही प्रश्न विचारावा, आपल्याला सगळं कळतं असं समजून प्रत्येकाला आपल्यासारखं बदलून घ्यावं तुमच्यात दोष असूच शकत नाहीत हे मान्य करायला लावा सगळ्यांना. पालक, गुरु सांगतील ते अनैतिक, नीच, खोटारडं असणारच हा विचार सोडू नका, त्यांच्या शंका, त्यांचे आक्षेप धुडकावून करून आपल्या वाटेने चाआपल्या, कारण कळतं सगळं तुम्हालाच. तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच व्यसनांची छोटी शलाका, आम्ही का करू त्याचा बंदोबस्त व्यवस्थीत, तुम्ही फक्त आणि फक्त लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा. देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जर तर तेवढंच त्यांना निर्भत्सण्यासाठी, सोडण्यासाठी पुरे माना. मग तुम्ही सगळे असे सगळे टिवीवर डिबेट करणारांसारखे, शहाणे , शिक्षित, सिविलाइज्ड, आधुनिक व्हाल, तुमच्या दिशाहिनतेला दिशाहिनता कोण म्हटतं आम्ही पाहून घेऊ. रँडमली ओरीयेंटेड, निर्णयक्षम, ज्ञानी , अभ्यासू आणि आधुनिक म्हणून इतके अम असालच कि जो चूक मानाल त्याचा खात्मा कराल. लक्षात ठेवा, मनःशांती, प्रेम आदी ग्यानोबा- तुकारामाचे फालतू लाड तुमच्याकरीता नाहीत. आम्ही वर्षानुवर्षे चालवलेली चिकित्सा बंद झाली तर आमच्या बिनकाम्यांना पोसणार्‍या व्यवस्था बुडतील आमच्यासहित. चला, प्रश्नचिन्हांची उभारणी चालूये, एका हाताचे अंतर घ्या, रांग धरा, एकही गोष्ट चिकित्सेवाचून सोडू नका, त्या मायबापाची चिकित्सा करायला सांगणार्‍याला सोडून बरं का.

In reply to by arunjoshi123

पुंबा 07/09/2017 - 17:04
अजो, एवढ्या भलत्याच टोकाला का नेत आहात गोष्टी? चिकित्सा म्हणजे अवमान असे तुम्ही मानता का? चिकित्सा, चुका दिसणे, शंका/प्रश्न विचारणे केवळ अहंकारातूनच येऊ शकते का? निखळ जिज्ञासा हे विद्यार्थ्याचे कल्याण करणारी व्हर्च्यु आहे की नाही? मन:शांती, प्रेम हे चिकित्सा ह्या मुल्याच्या विरोधी कसे? माझ्या मते, आई- वडिल, गुरू, देव(मंत्र्यांच्या शब्दात भगवान, अल्ला, गॉड) हे प्रश्नातीत आहेत असे सांगणे चुकीचे आहे. उलट प्रश्न बिनधास्त विचारा, त्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा हा सल्ला अधिक श्रेयस्कर आहे. प्रश्न विचारले की डोळे वटारणार्‍या आईबापांची पिढी नष्ट होतेय अश्या वेळी घड्याळाचे काटे मागे फिरवण्याचा यत्न कशासाठी? प्रश्न विचारता न आल्याने उत्तर शोधण्याचे स्किल देखिल डेव्हलप होत नाही असे मला वाटते. त्या दृष्टीने हे चुकीचे आहे. अर्थात, चिकित्सा आणी व्यक्तिचा सन्मान करणे ह्या व्यस्त गोष्टी नाहीत हे रूजवणेदेखिल गरजेचे आहेच.

In reply to by पुंबा

arunjoshi123 07/09/2017 - 17:30
मला टोकाचा वा साधाही विरोध करायचा नाही. प्रत्येक गोष्टिला मर्यादा असावी. त्यात चिकित्सा देखिल येते. बालपणी कशाची चिकित्सा करावी याला अजूनच जास्त मर्यादा असाव्यात. कारण चिकित्सा कशी करायची याचं कोणतं फ्रेमवर्क त्या वयात नसतं म्हणून मुले कुठेही वाहवत जाऊ शकतात. पालक, शिक्षक, देश, धर्म यांची चिकित्सा करावी इतकी बुद्धी लहानपणी नसते. शिवाय यांची चिकित्सा केलीच तर कोणकोणत्या बाबींची करावी, काय अर्थ काढावा, कसे वागावे याची उत्तरे काहीही निघू शकतात. ================ मंत्र्यांना अभिप्रेत नसू शकतील असे बरेच उद्देश आणि परिणाम आपण आपल्या कवितेत घातले आहेत. त्याच्या विरुद्ध बाजूचे मी माझ्या पायरसीमधे घातले आहेत. अर्थात दोहोंचं संतुलन असावं हे स्पष्टच आहे. ================= जे लोक स्वतः अत्यंत उत्तम संस्कारात वाढतात त्यांना सार्वजनिक आत्मनिर्णयनाची रिस्क कळत नाही. त्याचे एक उदाहरण आपण असाव्यात. मात्र भारतातल्या सामान्य मुलाला मात्र पालक, गुरुजन, ईश्वरप्रणित मूल्ये आदर्श मानून मोठे होणे आवश्यक आहे. विवेक, संस्कार जास्त महत्त्वाचे. चिकित्सा म्हणजे चांगुलपण नव्हे. शिवाय आवश्यक देखिल नाही कंपल्सरिली. अगोदर चांगले व्हा, चिकित्सा कशी करायची, कशाची करायची ते शिका , मग करा. ==================== विद्यार्थ्यांचा मूळ कल बिघडण्याकडे असतो, आणि पालक, गुरु आणि समाजाच्या त्रिमितिय प्रेशरमधे ते जागेवर राहातात (किमान हळू बिघडतात) असं माझं व्यक्तिगत निरिक्षण आहे म्हणून प्रतिसाद लिहिला. ================================ अपवादात्मक ठिकाणी मुलांनी चिकित्साच काय, यांना सरळ धाब्यावर बसवावे. पण जनरल आव्हान काय असावं?

In reply to by arunjoshi123

पुंबा 07/09/2017 - 18:36
चिकित्सा मरू द्या. तिथे स्वतःहून विचार करणे अभिप्रेत आहे. अगदी लहान मुले ते करू शकतील असे नाही. पण प्रश्न विचारण्यात काय प्रॉब्लेम आहे? प्रश्न विचारून उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणे याची पुढली पायरी स्वयंबुद्धीने चिकित्सा असेल. प्रश्न विचारण्याला मनाई असेल तर पुढचे होणार नाही. शिवाय किती वयानंतर चिकित्सा करण्याची मुभा हे कसे ठरवणार?
पण जनरल आव्हान काय असावं?
बिनधास्त प्रश्न विचारा..

दोन्ही बाजू आवडल्या, व काहिशा पटल्याही. पण ही दोन्ही टोके सांधायची कशी? प्रत्येकाच्या घडवणूकीमधे आई वडिल किंवा गुरु यांचे एक निश्चित योगदान असते. अर्थात हे सर्वजण सर्वज्ञ किंवा परिपूर्ण नसतात. (किंबहूना या जगात कोणीच परिपूर्ण नाही. ) पण त्यांना आपल्या पाल्ल्या बद्दल किंवा विद्यार्थ्या बद्दल आपुलकी आणि तळमळ असते. ते लोक जे काही देतात किंवा शिकवतात ते या तळमळीपोटीच. त्यांनी दिलेल्या योगदानाची आणि त्याच बरोबरीने त्यांच्या मर्यादांची जाणीव ठेवत त्यांच्याशी संवाद साधला तर दोन्ही बाजूंचा समन्वय साधता येईल. पैजारबुवा,

गामा पैलवान 09/09/2017 - 02:12
सौरा, एक अध्याहृत गोष्ट म्हणजे ज्याला सत्य शोधायचंय अशानेच या तिघांची चिकित्सा टाळावी. ज्यांना सत्य शोधायची खाज नाही त्यांनी खुशाल कोणाचीही हवी तेव्हढी चिकित्सा करावी. असो. सत्य शोधायची इच्छा असूनही विवेकानंद त्यांच्या गुरूंची म्हणजे रामकृष्ण परमहंसांची सदैव परीक्षा घ्यायचे. अगदी गुरु मृत्युशय्येवर असतांना देखील त्यांची परीक्षा घेतली. मात्र त्यासाठी विवेकानंदांसारखी कुशाग्र मेधा हवी. इथे मी बुद्धीच्या ऐवजी मेधा हा शब्द मुद्दाम वापरला आहे. सर्वसामान्य लोकं सत्याच्या शोधात असले तरी ते विवेकानंदांइतके मेधावान नसतात. म्हणून अशांनी देव,गुरू व पालकांची चिकित्सा करू नये. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
काव्यरस
देव, गुरू आणि पालक चिकित्सेच्या पलिकडले आहेत, त्यांना कुठलेही प्रश्न विचारू नयेत, जसे असतील तसे स्विकारावेत. त्यांच्यात दोष असू शकत नाहीत हे मुकाट्याने मान्य करा. जे जे हे सांगतील ते ते नैतिक, महान, अंतिम सत्य, तुमच्या शंका, तुमचे आक्षेप म्यानबंद करून त्यांच्या वाटेने चालू पडा. तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच सत्याची छोटी शलाका, आम्ही त्याचा बंदोबस्त करू व्यवस्थीत, तुम्ही फक्त ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा. देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जरी तरी तेच पुनःपुन्हा पुजा. तुम्ही सगळे असे प्रश्न न विचारणारे, गुणवान, कधीही बंड करण्याची शक्यता नसणारे व्हाल

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

(बंदीपायी जीवा लागलीसे वाट)

स्वामी संकेतानंद ·

पैसा 12/12/2016 - 16:44
झालो कॅशलेस आपोआप।।
=)) सगळे एका झटक्यात एकसारखे झाले का नाय! =)) महिना झाला, अजून तेच सुरू आहे का? कुठे आहेस तू स्वाम्या? दिल्लीत का दगडांच्या देशात? मला इकडे गोव्यात काय प्रॉब्लेम नाही बघ! ते गुलाबी गांधीजी मासेवाले पण आरामात घेतात. =))

In reply to by संदीप डांगे

मला पण घ्या तुमच्या क्लबात! माझा विश्वास डळमळाय लागलाय. अर्थात मी नुसत्या चर्चा वाचुन मत बनवतेय, प्रत्यक्ष काय चाललंय हे बघु तर शकत नाही. पण आता मलाही तुम्हा लोकांचे काही काही मुद्दे पटायला लागलेत. -(कुंपणावरची) पिरा!

In reply to by पिलीयन रायडर

प्रीत-मोहर 13/12/2016 - 11:01
नोटबंदीचा अज्जीबात त्रास झाला नसला तरीही माझा विश्वास थोडाफार डळमळीत झालाय. मलापण घ्या तुमच्यात

In reply to by संदीप डांगे

@देशद्रोही क्लब आपले स्वागत करतंय रंगास्वामी!!!››› =)) आता नमोरुग्ण तुम्हाला खवळून मारायला येणार! =))

पैसा 12/12/2016 - 16:44
झालो कॅशलेस आपोआप।।
=)) सगळे एका झटक्यात एकसारखे झाले का नाय! =)) महिना झाला, अजून तेच सुरू आहे का? कुठे आहेस तू स्वाम्या? दिल्लीत का दगडांच्या देशात? मला इकडे गोव्यात काय प्रॉब्लेम नाही बघ! ते गुलाबी गांधीजी मासेवाले पण आरामात घेतात. =))

In reply to by संदीप डांगे

मला पण घ्या तुमच्या क्लबात! माझा विश्वास डळमळाय लागलाय. अर्थात मी नुसत्या चर्चा वाचुन मत बनवतेय, प्रत्यक्ष काय चाललंय हे बघु तर शकत नाही. पण आता मलाही तुम्हा लोकांचे काही काही मुद्दे पटायला लागलेत. -(कुंपणावरची) पिरा!

In reply to by पिलीयन रायडर

प्रीत-मोहर 13/12/2016 - 11:01
नोटबंदीचा अज्जीबात त्रास झाला नसला तरीही माझा विश्वास थोडाफार डळमळीत झालाय. मलापण घ्या तुमच्यात

In reply to by संदीप डांगे

@देशद्रोही क्लब आपले स्वागत करतंय रंगास्वामी!!!››› =)) आता नमोरुग्ण तुम्हाला खवळून मारायला येणार! =))
लेखनविषय:
बंदीपायी जीवा लागलीसे वाट। उभा रात्रंदिवस रांगेमध्ये।। गणिताचा तास विना झंडू बाम। तैसे एटीएम डोकेदुखी।। खिसा खुळखुळा जीव कासावीस। झालो कॅशलेस आपोआप।। भोगतोय भक्त परी हर्ष करी। नोट आहे भारी गुलाबी जी।। स्वाम्या म्हणे मज द्यावी एक नोट। भाजपाला वोट देत नाही।। - स्वामी संकेतानंद

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या ·
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या ·

अभ्या.. 14/10/2016 - 12:01
छान. दोन काट्यातले अंतर जाणवले. . मनाचा एकांत, उत्तम एकांत अशी टुकार लाईन डोक्यात आलेली पण आवरली. ;)

सिरुसेरि 17/10/2016 - 16:51
छान कविता . आपल्या कुटुंबियांना सोडुन परदेशात कामाला आलेल्याची घालमेल जाणवली . मनाचा एकांत - स्मरणाचा काटा ओळ वाचुन "जळणाला लाकुड - गुरांना चारा" हि चाल आठवली .

अभ्या.. 14/10/2016 - 12:01
छान. दोन काट्यातले अंतर जाणवले. . मनाचा एकांत, उत्तम एकांत अशी टुकार लाईन डोक्यात आलेली पण आवरली. ;)

सिरुसेरि 17/10/2016 - 16:51
छान कविता . आपल्या कुटुंबियांना सोडुन परदेशात कामाला आलेल्याची घालमेल जाणवली . मनाचा एकांत - स्मरणाचा काटा ओळ वाचुन "जळणाला लाकुड - गुरांना चारा" हि चाल आठवली .
आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या