मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

दशानन ·

पण राज्या नियतीची लेखणी दुर्दवाने खुपच वाकडी होती तुझ्या तिरडीला देखील गड्या चार खांद्यांची वाणवा होती.... शेवटच्या प्रवासाला चार आधाराचे खांदे मिळू नये इतकी बेक्कार नियती. पण, असे कशामुळे [केवळ नशीब] वगैरे काही समजले नाही राव....! बाकी लकीर, जख्म,दर्द,वजनी, अशा शब्दांनी राजेंचे लेखन ओळखू आले. [ह.घ्या] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 01/09/2010 - 11:47
खांदे पाहीजेतच का? शववाहिकेतुन नेतात की सर्रास आता. सरांशी सहमत!

In reply to by दशानन

अवलिया 01/09/2010 - 11:56
तसलेच आहेत ते.. दोघेही जीमेलवर ठरवुन प्रतिसाद देतात आपल्यासारख्या लेखकांनी असल्यांकडे दुर्लक्ष करावे ही हात जोडुन विनंती लिहित रहा..

असुर 31/08/2010 - 23:46
कविता (खरेतर कवितेहूनही अधिक काहीतरी आहे त्यात) आवडली. "तडफडत जावे कोठे तरी येथे आरसा दाखवणारे अनेक होते" हे विशेष! --असुर

पण राज्या नियतीची लेखणी दुर्दवाने खुपच वाकडी होती तुझ्या तिरडीला देखील गड्या चार खांद्यांची वाणवा होती.... शेवटच्या प्रवासाला चार आधाराचे खांदे मिळू नये इतकी बेक्कार नियती. पण, असे कशामुळे [केवळ नशीब] वगैरे काही समजले नाही राव....! बाकी लकीर, जख्म,दर्द,वजनी, अशा शब्दांनी राजेंचे लेखन ओळखू आले. [ह.घ्या] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 01/09/2010 - 11:47
खांदे पाहीजेतच का? शववाहिकेतुन नेतात की सर्रास आता. सरांशी सहमत!

In reply to by दशानन

अवलिया 01/09/2010 - 11:56
तसलेच आहेत ते.. दोघेही जीमेलवर ठरवुन प्रतिसाद देतात आपल्यासारख्या लेखकांनी असल्यांकडे दुर्लक्ष करावे ही हात जोडुन विनंती लिहित रहा..

असुर 31/08/2010 - 23:46
कविता (खरेतर कवितेहूनही अधिक काहीतरी आहे त्यात) आवडली. "तडफडत जावे कोठे तरी येथे आरसा दाखवणारे अनेक होते" हे विशेष! --असुर
लेखनविषय:
काव्यरस
माणूस म्हणून जगण्याची ही किंमत नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे शब्दांची लकीर खुप मोठी होती घाव शब्दांचे चार छोटे होते पण जख्म जरा मोठी होती लपवावे काय आता येथे व्रण चेहर्‍यावर पडले होते नको नको म्हणत असताना दर्द पदरी पडला होता लवपावे काय व दाखवावे काय आपल्यातच खोट दिसली होती चार पुस्तके कमी शिकलो त्यांची ही किंमत खुप वजनी होती काय खरं व काय खोटं नशीबाची थट्टाच थोरं होती वाहत जावे असेल ठरवले तरी जमीनीचे वळण खुप वेगळे होते तडफडत जावे कोठे तरी येथे आरसा दाखवणारे अनेक होते माणूस म्हणून जगण्याची ही किंमत जरा खरंच मोठी होती... मेल्यावर तरी समाधान लाभेल मुक्त हो

“( अ ) द्वितिय ” प्रेम

निरन्जन वहालेकर ·

In reply to by पाषाणभेद

होय ! अगदी बरोबर ! ! " प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला. चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. .

In reply to by पाषाणभेद

होय ! अगदी बरोबर ! ! " प्रेम तव जरी ना लाभले,' असेच लिहिले होते प्रकाशित करताना काहितरी घोटाळा झाला. चूक निदर्शनास आणून दिली धन्यवाद पाषाणभेद साहेब. .
लेखनविषय:
काव्यरस
“( अ ) द्वितिय ” प्रेम प्रीतीत संगत तुझी, मज कधी ना लाभली, साथ संगत नव्हती कुणाची, पण वेदनांनी मज दिली. खेद नाही, राग नाही, प्रेम तव जरी ला लाभले, वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. निरंजन वहाळेकर

देवा तु चुकलास

प्रीत-मोहर ·

एक अनामी 30/08/2010 - 21:23
अतिशय सुंदर कविता... ही कविता वाचल्यावर संदीप खरे यांची एक कविता आठवली... (देवाला उद्देशून) "जाब तुला रे कुणी पुसावा...."

एक अनामी 31/08/2010 - 20:00
तुम्ही उणीवा ही सांगा असं म्हण्ताच आहात तर एकच सांगतो... ही तशी उणीव नाही म्हणता येणार पण... तुमची कविता वाचून वाटलं नाही की तुम्हाला कधी मराठी शब्दांची उणीव भासावी पण मग एका ओळीत इंग्रजी शब्द वापरायचं प्रयोजन नाही कळलं...

In reply to by एक अनामी

प्रीत-मोहर 01/09/2010 - 10:19
सहज वापरले.....आपण जस बोलताना वापरतो ना तस....कारण माझ्या मनात जसजस येत गेल लिहित गेले मी......त्याला शुद्ध लिहायचा ही प्रयत्न केला नाही.... असो..तुमच्या सुचनेबद्दल आभार ..यापुढे अस नाही करणार..... ही कविता आता मी बदलु नाही शकत..सो...

शिल्पा ब 01/09/2010 - 10:30
ठीक आहे...आता तुम्ही लोकं नाही का artificial intelligence च्या मागे लागलाय...मी ते करून पाहिलं माणसाच्या बाबतीत...फारसं काही जमलं नाही..सगळ्या घरचाच (पक्षी : पृथ्वीचा) नाश करायला निघालात तुम्ही... आता पुढच्या वेळी वेगळं काहीतरी करेन..आणि सगळ्याच बाबतीत मलाच का हो वेठीला धरतात तुम्ही मानव? (मानवच म्हणवून घेता न तुम्ही ? नाव काही लक्षात राहत नाही आजकाल)..देव सुद्धा चुकतो.. :-) असो.. कविता, गाणं काय म्हणतात ते छान जमलंय.

एक अनामी 30/08/2010 - 21:23
अतिशय सुंदर कविता... ही कविता वाचल्यावर संदीप खरे यांची एक कविता आठवली... (देवाला उद्देशून) "जाब तुला रे कुणी पुसावा...."

एक अनामी 31/08/2010 - 20:00
तुम्ही उणीवा ही सांगा असं म्हण्ताच आहात तर एकच सांगतो... ही तशी उणीव नाही म्हणता येणार पण... तुमची कविता वाचून वाटलं नाही की तुम्हाला कधी मराठी शब्दांची उणीव भासावी पण मग एका ओळीत इंग्रजी शब्द वापरायचं प्रयोजन नाही कळलं...

In reply to by एक अनामी

प्रीत-मोहर 01/09/2010 - 10:19
सहज वापरले.....आपण जस बोलताना वापरतो ना तस....कारण माझ्या मनात जसजस येत गेल लिहित गेले मी......त्याला शुद्ध लिहायचा ही प्रयत्न केला नाही.... असो..तुमच्या सुचनेबद्दल आभार ..यापुढे अस नाही करणार..... ही कविता आता मी बदलु नाही शकत..सो...

शिल्पा ब 01/09/2010 - 10:30
ठीक आहे...आता तुम्ही लोकं नाही का artificial intelligence च्या मागे लागलाय...मी ते करून पाहिलं माणसाच्या बाबतीत...फारसं काही जमलं नाही..सगळ्या घरचाच (पक्षी : पृथ्वीचा) नाश करायला निघालात तुम्ही... आता पुढच्या वेळी वेगळं काहीतरी करेन..आणि सगळ्याच बाबतीत मलाच का हो वेठीला धरतात तुम्ही मानव? (मानवच म्हणवून घेता न तुम्ही ? नाव काही लक्षात राहत नाही आजकाल)..देव सुद्धा चुकतो.. :-) असो.. कविता, गाणं काय म्हणतात ते छान जमलंय.
लेखनविषय:
काव्यरस
देवा तू चुकलास.... माणसाला बनवताना मन का दिलेस? सगळं साठवण्याची कुवत का दिलीस? टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात... न कळते तर बरं झालं असतं.... आता केलीस ती चूक केलीस पुन्हा मात्र चुकू नकोस..... माणसासारखा बनू नकोस.... माणूस काय......

हे खेळ संचिताचे .....!

गंगाधर मुटे ·

मदनबाण 01/09/2010 - 08:35
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला सुंदर... पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला वा...

विसोबा खेचर 02/09/2010 - 10:24
संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला
सुंदर.! देवप्रिया वृत्ताबद्दल काही माहितीपर लिहावे ही विनंती.. तात्या.

मदनबाण 01/09/2010 - 08:35
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला सुंदर... पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला वा...

विसोबा खेचर 02/09/2010 - 10:24
संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला
सुंदर.! देवप्रिया वृत्ताबद्दल काही माहितीपर लिहावे ही विनंती.. तात्या.
लेखनविषय:
काव्यरस
हे खेळ संचिताचे .....! काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू" हस्त माझा रेखतांना का असा भांबावला हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला गंगाधर मुटे ..................

इतिहास

यशवंतकुलकर्णी ·

मुक्तसुनीत 30/08/2010 - 03:16
कविता रोचक आहे. मिशाळ माणसाच्या मेंदूचे वजन कसे समजले या संभ्रमात आहे :-)

हा साहित्यातील एक नवा प्रवाह आहे.... (या प्रत्येक वाक्यानंतर डोळा मारणारी स्मायली पहावी) या प्रकारचा हा अगदी पहिलाच प्रयत्न आहे... मला आशा आहे की कवि इथून पुढं अशाच कविता करू लागतील... निखीलजी, पुस्तकानं नाही, मिशाळ माणसाच्या मुलाखतीनं वाट लावली... त्यांच्या मुलाखतीतील काही मौक्तीके: १. गागाभट्टाने शिवाजी महाराजांकडून भरपूर लाच उपटली २. आज हिंदूंची परिस्थिती अत्यंत लाजीरवाणी आहे ३. ज्ञानेश्वरीची ओरिजीनल प्रत राजवाड्य़ांनी बदलली...या माणसाने ज्ञानेश्वरीमध्ये हुबेहुब हव्या त्या ओव्या लिहून काढल्या इत्यादी...इत्यादी...

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूळ पुस्तक वाचलेलं नाही, मुलाखत ऐकलेली नाही. तरीही सदर कवितारूपी प्रकटन आणि प्रतिसादामुळे थोडा थोडा उजेड पडला असं वाटत आहे.

मुक्तसुनीत 30/08/2010 - 03:16
कविता रोचक आहे. मिशाळ माणसाच्या मेंदूचे वजन कसे समजले या संभ्रमात आहे :-)

हा साहित्यातील एक नवा प्रवाह आहे.... (या प्रत्येक वाक्यानंतर डोळा मारणारी स्मायली पहावी) या प्रकारचा हा अगदी पहिलाच प्रयत्न आहे... मला आशा आहे की कवि इथून पुढं अशाच कविता करू लागतील... निखीलजी, पुस्तकानं नाही, मिशाळ माणसाच्या मुलाखतीनं वाट लावली... त्यांच्या मुलाखतीतील काही मौक्तीके: १. गागाभट्टाने शिवाजी महाराजांकडून भरपूर लाच उपटली २. आज हिंदूंची परिस्थिती अत्यंत लाजीरवाणी आहे ३. ज्ञानेश्वरीची ओरिजीनल प्रत राजवाड्य़ांनी बदलली...या माणसाने ज्ञानेश्वरीमध्ये हुबेहुब हव्या त्या ओव्या लिहून काढल्या इत्यादी...इत्यादी...

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूळ पुस्तक वाचलेलं नाही, मुलाखत ऐकलेली नाही. तरीही सदर कवितारूपी प्रकटन आणि प्रतिसादामुळे थोडा थोडा उजेड पडला असं वाटत आहे.
लेखनविषय:
काव्यरस
आजकाल असं होत नाही; पण भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवरच्या धाग्यात प्रतिक्रिया देता-देता हात आवरला आणि झोपी गेलो. झोपेतल्या-झोपेत ह्या खालच्या ओळी बडबडत होतो म्हणे; कुणीतरी त्या लिहून घेतल्यात, मी त्या इथं टाकतो. आता जिथे प्रतिक्रिया द्यायची होती तो धागाच सापडत नाहीय (सवय होईपर्यंत असंच होणार).

व्यथा

राजेश घासकडवी ·

विसुनाना 16/08/2010 - 15:30
काही कल्पना, मिसरे चांगले आहेत.
काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा? मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी
इ.
राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती,
यावरून इथला हा शेर आठवला - उकंड्यातल्या फडक्याला त्या मिंध्या चिंध्या ठिगळत जाती - कुणा कळावे कशाकशाचा येथे झेंडा फडकत जातो? :). असो. अजून गझला याव्यात ही अपेक्षा.

असुर 16/08/2010 - 16:50
>>>ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा? वा!!!! --असुर

विसुनाना 16/08/2010 - 15:30
काही कल्पना, मिसरे चांगले आहेत.
काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा? मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी
इ.
राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती,
यावरून इथला हा शेर आठवला - उकंड्यातल्या फडक्याला त्या मिंध्या चिंध्या ठिगळत जाती - कुणा कळावे कशाकशाचा येथे झेंडा फडकत जातो? :). असो. अजून गझला याव्यात ही अपेक्षा.

असुर 16/08/2010 - 16:50
>>>ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा? वा!!!! --असुर
लेखनविषय:
काव्यरस
काय सांगू अंधकारा या चिरागाची व्यथा? काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा? ही मिजाशी आज कोत्या काजव्यां व्हावी कशी? पौर्णिमेला ग्रासलेल्या चंद्रम्याची ही व्यथा मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी काय सांगू या गजांना अंतरीची ही व्यथा राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती, रक्तरंजी भर्जरी या क्रांतिवस्त्राची व्यथा? बोलणेही खुंटले जेव्हा मला फर्मावले कर्णदोषी, मूक लोकां सांग जा तूझी व्यथा ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा?

जीणं

अमोल मेंढे ·
लेखनविषय:
काव्यरस
कुणीही येतं आणी ... भुकेलेल्याला अन्न मिळावं असं तुटुन पडतं... कुस्करुन जातं... पन्नासची नोट अंगावर फेकुन... त्याच्या प्रेमात मी पडले... अन् ... पळुन आले त्याच्या बरोबर... राजा राणीच्या सुखी संसाराच्या अपेक्षेत... पण शेवटी राजानेच राणीचा घात केला... आणी फक्त दहा हजारात माझा सौदा झाला... सुरुवातीला वाटायचं ... असल्या जीण्यापेक्षा.. आत्महत्याच करावी... पण आता सवय झालीय... अन् कालची सीता.. आजची सितारा म्हणुन बाजारात उभी राहलीय... तेव्हापासुन गल्लीत उभं राहुन... गिर्‍हाईकांची वाट पाहणं... आणी स्वत:ला कुस्करुन घेऊन... त्यांचं समाधान करणं... हेच आमचं जीणं.... हेच आमचं जीणं...

आईचं छप्पर.

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 25/07/2013 - 19:00
चारपाच दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेकडो घरांची झालेली पडझड आणि उध्वस्त झालेले संसार आज बघितले आणि या कवितेची आठवण झाली. :( :(

गंगाधर मुटे 25/07/2013 - 19:00
चारपाच दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेकडो घरांची झालेली पडझड आणि उध्वस्त झालेले संसार आज बघितले आणि या कवितेची आठवण झाली. :( :(
लेखनविषय:
काव्यरस
आईचं छप्पर. कडाक्यात भांडतात मेघ गडगड करून भरून येते नभाला अश्रू ढाळते वरूण ...! अश्रू बनती गारा वादळ तांडव करी गारठल्या हवेसवे विजेस हिंव भरी ...! हिंव भरल्या विजेस ताप चढवी गारा तिला पांघराया छप्पर नेतो वारा ...! छप्पर उडल्या संसारात ब्रम्हपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! पोहतांना पुस्तक वही सरस्वती भिजते माती करून जीवाची चूल उल्हे निजते ....! गरजत्या पावसात चोळी झबले न्हाती पदराखाली लेकरं कवटाळती छाती ....! ...गंगाधर मुटे.. . ( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री) ( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालत

पाऊस वेडा

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
काव्यरस
पाऊस वेडा ================= पाऊस वेडा मोर मनाचा मेघ पाहता हर्षुन जातो.. मेघ बावरा जीव मोराचा ग्रीष्म लागता आतुर होतो.. थेंब आठव ठेवा मनाचा अनुरागी हरपून जातो.. मेघ बावरा मोर जिवाचा नाच नाचरा सागर होतो.. पाऊस वेडा मोर मनाचा थेंब सरीत शहारून जातो.. प्रीत बावरा पिसारा मोराचा भिजून चिक चिक होतो.. आनंद फुलोरा मनोरथांचा वादळ झडीत थिजून जातो.. सर आतुर हर्षित जिवाचा गहिवर डोळी बोलका होतो.. चिखल भिजल्या स्वप्नांचा पिसा पिसातून गळून जातो.. वेडा पाऊस मोरा मनीचा ढग फुटीत भोवरा होतो.. नाच नाचऱ्या फुलेर मनाचा हुंकार कंठीच राहतो.. उजाड भुंडक्या मनमोराचा हुंदका पाऊस होतो.. पाऊस वेडा मोर मनाचा काळ सरीं

तो पाऊस

सुनिल पाटकर ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या अंगणातला पाऊस माझ्या अंगणातला पाऊस शेतात मरमर राबणा-या ढवळ्या-पवळ्याचा पाऊस टोपलीतून भाकरी आणणा-या अनवाणी पावलांचा पाऊस एका छत्रीत भिजलेल्या अनेक प्रेमकथांचा पाऊस रानफूलांच्या वाटेवर हरवून गेलेला पाऊस वाफाळलेल्या चहाच्या कपात चिंब भिजलेला पाऊस डोक्यावरून घेतलेल्या रजईत दडून बसलेला पाऊस पाण्यात भिरभिरणा-या कागदी होड्यांचा पाऊस गरागरा फिरणा-या इवल्याशा छत्रीतला पाऊस पावसात मनसोक्त भिजणारी चिमुकली मुलं पाहिली की आठवतो मला तो पाऊस आभाळा एवढा डोंगर कवेत घेऊन आलेला पाऊस डोंगराखाली गाडलेले ते, इवलेसे जीव आठवले की माझ्याही डोळ्यातून बरसतो न थांबणारा तो पाऊस