मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रार्थना

यशोधरा ·

मराठमोळा 25/07/2010 - 13:27
प्रार्थना मस्तच!! :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

श्रावण मोडक 25/07/2010 - 13:38
वा... सुरेख!
शब्दकळा सरे सरली जाणीव उरते नेणीव सावर रे..
जबरदस्त. सामर्थ्याचे.

पांथस्थ 25/07/2010 - 13:37
उत्कट, सुंदर, भक्तिमय...प्रार्थना आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर छान योग जुळून आला आहे. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

दत्ता काळे 25/07/2010 - 14:18
कविता आवडली. फक्त तापलेल्या जीवा उटी चंदनाची तुझ्या आठवाची माव तैसी... ..माव चा अर्थ इथे काय अपेक्षीत आहे ?

In reply to by दत्ता काळे

यशोधरा 26/07/2010 - 13:06
माव हा शब्द मी प्रथम श्रीसाईचरित्रात वाचलाय. याप्रमाणे, जया मनी जैसा भाव| तया तैसा अनुभव| दाविसी दयाघना| ऐसी तुझी ही माव || मी तरी इथे ह्याचा अर्थ, किमया/ परिणाम अश्या अर्थी घेतला आहे, आणि तसाच वापरला आहे. चुकत असल्यास जरुर सांगावे, तशी दुरुस्ती करेन. धन्यवाद.

In reply to by यशोधरा

माव हा शब्द मी पण आधी ऐकला आहे कुठेतरी... त्यावरून आणि इथे यशोने दिलेल्या ओवीवरून मला माव या शब्दाचा अर्थ 'माया' असाच वाटत आलेला आहे.

मराठमोळा 25/07/2010 - 13:27
प्रार्थना मस्तच!! :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

श्रावण मोडक 25/07/2010 - 13:38
वा... सुरेख!
शब्दकळा सरे सरली जाणीव उरते नेणीव सावर रे..
जबरदस्त. सामर्थ्याचे.

पांथस्थ 25/07/2010 - 13:37
उत्कट, सुंदर, भक्तिमय...प्रार्थना आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर छान योग जुळून आला आहे. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

दत्ता काळे 25/07/2010 - 14:18
कविता आवडली. फक्त तापलेल्या जीवा उटी चंदनाची तुझ्या आठवाची माव तैसी... ..माव चा अर्थ इथे काय अपेक्षीत आहे ?

In reply to by दत्ता काळे

यशोधरा 26/07/2010 - 13:06
माव हा शब्द मी प्रथम श्रीसाईचरित्रात वाचलाय. याप्रमाणे, जया मनी जैसा भाव| तया तैसा अनुभव| दाविसी दयाघना| ऐसी तुझी ही माव || मी तरी इथे ह्याचा अर्थ, किमया/ परिणाम अश्या अर्थी घेतला आहे, आणि तसाच वापरला आहे. चुकत असल्यास जरुर सांगावे, तशी दुरुस्ती करेन. धन्यवाद.

In reply to by यशोधरा

माव हा शब्द मी पण आधी ऐकला आहे कुठेतरी... त्यावरून आणि इथे यशोने दिलेल्या ओवीवरून मला माव या शब्दाचा अर्थ 'माया' असाच वाटत आलेला आहे.
लेखनविषय:
काव्यरस

पाध्यांचे मनोगत

नितिन थत्ते ·

मितभाषी 23/07/2010 - 12:06
माझिया सत्तेस काही धार नाही | सर्व शक्ती मालकाची "क्या करूं?" >>>>>>> हा हा हा लै भारी. =)) =)) =)) =)) येवु द्या अजुन.

अवलिया 23/07/2010 - 13:29
जे झाले ते झाले... खाली सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनी संयमाने घ्यावे, याला माझी तरी काही हरकत नाही. म्हणुन पहिला प्रतिसाद स्वहस्ते संपादित करत आहे. आशा आहे बदल सर्वांच्यात आणि सर्वत्र दिसावा :) --अवलिया चला ! सगळे मिळुन बदल घडवु !! :)

सहज 23/07/2010 - 12:42
थत्ते सर्व संपादकांना पिंजर्‍यात उभे केले तर हा तिढा कधीच सुटणार नाही. सर्व सदस्यांचे काही चुकत नाही तसे सर्वच संपादकांचेही चुकत नसणार. संपादकांना आत्मपरिक्षण करु द्या, त्यांचे पाध्ये व इश्यु त्यांना सॉर्ट-आउट करु द्या. व सदस्यांची देखील तितकीच जबाबदारी आहे. दुर्दैवाने सदस्य केस बाय केस स्वतंत्र विचारपुर्वक प्रॉब्लेम हाताळायचा सोडून सर्व संपादकांविरुद्ध आवाज करु लागले तर मग सत्तेतल्या ज्यांचे चुकते तरी त्यांचे फावते आहे. अर्थात सत्तेवरच्या कोणाचे कधी चुकत नाही असा समज असेल तर मग काही अर्थच उरत नाही. "कंटकांचे मनोगत" यायला एकाहुन आधीक विडंबक तयारीचे आहेत. बरेचदा किंचीत दृष्टिकोनातला व गैरसमजुतीचा भाग जास्त असतो व दोन्ही बाजुने संयम सुटल्याने प्रश्न चिघळत आहे. सगळ्यांनी जरा थंड घेउया काही दिवस. टु बी फेअर संपादकांना काल बरेच काम करावे लागले. त्यांना देखील जालापलीकडे आयुष्य आहे.

In reply to by सहज

श्रावण मोडक 23/07/2010 - 12:55
यातला समंजसपणाचा सूर सगळ्यांमध्ये आला तरी खूप भरून पावलं म्हणता येईल!

In reply to by श्रावण मोडक

नितिन थत्ते 23/07/2010 - 13:12
समंजसपणाचा सूर दिसावा याच्याशी सहमत आहे. सहज यांच्या प्रतिसादानुसार डिस्क्लेमर टाकला आहे. आधिकारिक धोरणावरील चर्चेतच माझ्याकडून संयमाची घोषणा झाली आणि संयमाची अंमलबजावणीही माझ्याकडून झाली. माझ्या निवेदनात उल्लेखलेल्या धाग्यांवरही मी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. काल चिंतातुरजंतु यांचा धागा उडवण्यावरून पुन्हा गदारोळ झाला म्हणून आज धागा टाकला. नितिन थत्ते

आमचे प्रतिसाद वातावरण बिघडवणारे असतात म्हणून इथे प्रतिसाद टाकत नाही. [( पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

मराठमोळा 23/07/2010 - 14:16
थत्ते साहेबांनी पुन्हा खराटा हातात घेतला की काय? :P आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

क्रेमर 23/07/2010 - 16:32
विडंबन मस्तच झाले आहे. प्रतिसादांमुळे धागा उडायला (निमित्त मिळायला) नको म्हणून आणखी लिहित नाही. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

पंगा 23/07/2010 - 20:25
विडंबन (किंवा हे जे काही असेल ते) मस्तच झाले आहे याच्याशी सहमत आहे. प्रतिसादामुळे मिसळपाव प्रशासनाला त्रास व्हायला (निमित्त मिळायला) नको म्हणून आणखी लिहू शकत नाही. - पंडित गागाभट्ट. _____________________ बाकी हे असेच चालायचे. चालू द्या.

केशवसुमार 23/07/2010 - 17:44
थत्तेशेठ, यावे यावे आमच्या विडंबन पंथात आपले स्वागत.. (विडंबक)केशवसुमार मनोगताचा हा भाग उत्तम. फक्त दुसर्‍या कडव्यात यमक सांभाळायला हवे होते (आणि संख्या वाढ ही अमची सुरू).. क्रमश:चा पुढचा भाग लवकर टाका (वाचक)केशवसुमार साला हे संपादक आणि विडंबक अशा दोन टोप्यांमुळे आमचा लोचा झाले आहे.. विडंबकाने लिहीले की लोक संपादका ने लिहीले आहे म्हणतात.. (कोंडीत सापडलेला)केशवसुमार सहजशेठ ने सुचलेल्या शिर्षकात विडंबन तयार केले होते..पण आता इथे प्रतिसादातून बर्‍याच वाल्यांचे वाल्मिकी (नाना तुमच्या रामायणावरच्या लेखनाचा ह्यात काहिही संदर्भ नाही गैरसमज नको)होताना बघून ते विडंबन न प्रकाशित करायचा निर्णय घेतला.. ह्या मुळे जर वातावरण सुधारणार असेल तर तेही करून बघू ..नाना म्हणतो तसे चला ! सगळे मिळुन बदल घडवु !! (मिपाकर)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

नितिन थत्ते 23/07/2010 - 18:04
साक्षात केसूकडून कौतुक झालेले पाहून हुश्श झाले. :) >>फक्त दुसर्‍या कडव्यात यमक सांभाळायला हवे होते बरोबर आहे. पण ते जमले नाही. तुम्हीच सुचवा ;) >>साला हे संपादक आणि विडंबक अशा दोन टोप्यांमुळे आमचा लोचा झाले आहे.. विडंबकाने लिहीले की लोक संपादका ने लिहीले आहे म्हणतात.. संपादकाच्या विषयात विडंबन नाही केले की झाले. :) >>नाना म्हणतो तसे चला ! सगळे मिळुन बदल घडवु सहमत आहे. क्रमश: रद्द करावे म्हणतो :? नितिन थत्ते

In reply to by चतुरंग

श्रावण मोडक 23/07/2010 - 18:25
आता केसुरंगाला पण कोणीतरी सांगा रे
हाहाहाहा... तरी बरं 'खुदके साथ बाता'च आहे. ;) गाईचं गोमूत्र असं एम्फॅसीस अ‍ॅड झालेलं नाहीये. ;)

In reply to by चतुरंग

श्रावण मोडक 23/07/2010 - 18:33
अ‍ॅपल ज्यूस आणि बिअर ह्यांचे शेजारी शेजारी ठेवलेले ग्लास लांबून सारखेच दिसतात!
खरंय सालं. आमच्यासारखे त्यामुळंच गंडतात. अ‍ॅपल ज्यूस म्हणून हाती घेतो तो ग्लास नेमका बिअरचा निघतो... ;)

रामदास 23/07/2010 - 18:41
प्रगतीचे हे पाऊल पडते संघटनेचा मंत्र जपा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ......हे गाणे आठवले. थत्ते ,नाना आणि सर्वांचे अभिनंदन.

मूळ कारण लोकशाही, ती सरेना | या ओळीत खवचटपणा अगदी ठासून भरला आहे. छानच. क्रमशः लवकरच येऊ द्यात.

मितभाषी 23/07/2010 - 12:06
माझिया सत्तेस काही धार नाही | सर्व शक्ती मालकाची "क्या करूं?" >>>>>>> हा हा हा लै भारी. =)) =)) =)) =)) येवु द्या अजुन.

अवलिया 23/07/2010 - 13:29
जे झाले ते झाले... खाली सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनी संयमाने घ्यावे, याला माझी तरी काही हरकत नाही. म्हणुन पहिला प्रतिसाद स्वहस्ते संपादित करत आहे. आशा आहे बदल सर्वांच्यात आणि सर्वत्र दिसावा :) --अवलिया चला ! सगळे मिळुन बदल घडवु !! :)

सहज 23/07/2010 - 12:42
थत्ते सर्व संपादकांना पिंजर्‍यात उभे केले तर हा तिढा कधीच सुटणार नाही. सर्व सदस्यांचे काही चुकत नाही तसे सर्वच संपादकांचेही चुकत नसणार. संपादकांना आत्मपरिक्षण करु द्या, त्यांचे पाध्ये व इश्यु त्यांना सॉर्ट-आउट करु द्या. व सदस्यांची देखील तितकीच जबाबदारी आहे. दुर्दैवाने सदस्य केस बाय केस स्वतंत्र विचारपुर्वक प्रॉब्लेम हाताळायचा सोडून सर्व संपादकांविरुद्ध आवाज करु लागले तर मग सत्तेतल्या ज्यांचे चुकते तरी त्यांचे फावते आहे. अर्थात सत्तेवरच्या कोणाचे कधी चुकत नाही असा समज असेल तर मग काही अर्थच उरत नाही. "कंटकांचे मनोगत" यायला एकाहुन आधीक विडंबक तयारीचे आहेत. बरेचदा किंचीत दृष्टिकोनातला व गैरसमजुतीचा भाग जास्त असतो व दोन्ही बाजुने संयम सुटल्याने प्रश्न चिघळत आहे. सगळ्यांनी जरा थंड घेउया काही दिवस. टु बी फेअर संपादकांना काल बरेच काम करावे लागले. त्यांना देखील जालापलीकडे आयुष्य आहे.

In reply to by सहज

श्रावण मोडक 23/07/2010 - 12:55
यातला समंजसपणाचा सूर सगळ्यांमध्ये आला तरी खूप भरून पावलं म्हणता येईल!

In reply to by श्रावण मोडक

नितिन थत्ते 23/07/2010 - 13:12
समंजसपणाचा सूर दिसावा याच्याशी सहमत आहे. सहज यांच्या प्रतिसादानुसार डिस्क्लेमर टाकला आहे. आधिकारिक धोरणावरील चर्चेतच माझ्याकडून संयमाची घोषणा झाली आणि संयमाची अंमलबजावणीही माझ्याकडून झाली. माझ्या निवेदनात उल्लेखलेल्या धाग्यांवरही मी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. काल चिंतातुरजंतु यांचा धागा उडवण्यावरून पुन्हा गदारोळ झाला म्हणून आज धागा टाकला. नितिन थत्ते

आमचे प्रतिसाद वातावरण बिघडवणारे असतात म्हणून इथे प्रतिसाद टाकत नाही. [( पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

मराठमोळा 23/07/2010 - 14:16
थत्ते साहेबांनी पुन्हा खराटा हातात घेतला की काय? :P आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

क्रेमर 23/07/2010 - 16:32
विडंबन मस्तच झाले आहे. प्रतिसादांमुळे धागा उडायला (निमित्त मिळायला) नको म्हणून आणखी लिहित नाही. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

पंगा 23/07/2010 - 20:25
विडंबन (किंवा हे जे काही असेल ते) मस्तच झाले आहे याच्याशी सहमत आहे. प्रतिसादामुळे मिसळपाव प्रशासनाला त्रास व्हायला (निमित्त मिळायला) नको म्हणून आणखी लिहू शकत नाही. - पंडित गागाभट्ट. _____________________ बाकी हे असेच चालायचे. चालू द्या.

केशवसुमार 23/07/2010 - 17:44
थत्तेशेठ, यावे यावे आमच्या विडंबन पंथात आपले स्वागत.. (विडंबक)केशवसुमार मनोगताचा हा भाग उत्तम. फक्त दुसर्‍या कडव्यात यमक सांभाळायला हवे होते (आणि संख्या वाढ ही अमची सुरू).. क्रमश:चा पुढचा भाग लवकर टाका (वाचक)केशवसुमार साला हे संपादक आणि विडंबक अशा दोन टोप्यांमुळे आमचा लोचा झाले आहे.. विडंबकाने लिहीले की लोक संपादका ने लिहीले आहे म्हणतात.. (कोंडीत सापडलेला)केशवसुमार सहजशेठ ने सुचलेल्या शिर्षकात विडंबन तयार केले होते..पण आता इथे प्रतिसादातून बर्‍याच वाल्यांचे वाल्मिकी (नाना तुमच्या रामायणावरच्या लेखनाचा ह्यात काहिही संदर्भ नाही गैरसमज नको)होताना बघून ते विडंबन न प्रकाशित करायचा निर्णय घेतला.. ह्या मुळे जर वातावरण सुधारणार असेल तर तेही करून बघू ..नाना म्हणतो तसे चला ! सगळे मिळुन बदल घडवु !! (मिपाकर)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

नितिन थत्ते 23/07/2010 - 18:04
साक्षात केसूकडून कौतुक झालेले पाहून हुश्श झाले. :) >>फक्त दुसर्‍या कडव्यात यमक सांभाळायला हवे होते बरोबर आहे. पण ते जमले नाही. तुम्हीच सुचवा ;) >>साला हे संपादक आणि विडंबक अशा दोन टोप्यांमुळे आमचा लोचा झाले आहे.. विडंबकाने लिहीले की लोक संपादका ने लिहीले आहे म्हणतात.. संपादकाच्या विषयात विडंबन नाही केले की झाले. :) >>नाना म्हणतो तसे चला ! सगळे मिळुन बदल घडवु सहमत आहे. क्रमश: रद्द करावे म्हणतो :? नितिन थत्ते

In reply to by चतुरंग

श्रावण मोडक 23/07/2010 - 18:25
आता केसुरंगाला पण कोणीतरी सांगा रे
हाहाहाहा... तरी बरं 'खुदके साथ बाता'च आहे. ;) गाईचं गोमूत्र असं एम्फॅसीस अ‍ॅड झालेलं नाहीये. ;)

In reply to by चतुरंग

श्रावण मोडक 23/07/2010 - 18:33
अ‍ॅपल ज्यूस आणि बिअर ह्यांचे शेजारी शेजारी ठेवलेले ग्लास लांबून सारखेच दिसतात!
खरंय सालं. आमच्यासारखे त्यामुळंच गंडतात. अ‍ॅपल ज्यूस म्हणून हाती घेतो तो ग्लास नेमका बिअरचा निघतो... ;)

रामदास 23/07/2010 - 18:41
प्रगतीचे हे पाऊल पडते संघटनेचा मंत्र जपा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे ......हे गाणे आठवले. थत्ते ,नाना आणि सर्वांचे अभिनंदन.

मूळ कारण लोकशाही, ती सरेना | या ओळीत खवचटपणा अगदी ठासून भरला आहे. छानच. क्रमशः लवकरच येऊ द्यात.
लेखनविषय:
काव्यरस
निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते. परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे.

आठवण आणि ……

निरन्जन वहालेकर ·

क्रेमर 22/07/2010 - 19:02
मस्त कविता -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

अवलिया 22/07/2010 - 19:08
सहमत (लाल अक्षरे सोडुन ;) ) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

क्रेमर 22/07/2010 - 19:02
मस्त कविता -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

अवलिया 22/07/2010 - 19:08
सहमत (लाल अक्षरे सोडुन ;) ) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
लेखनविषय:
काव्यरस
आठवण आणि …… वादळ, वारा, पावसातहि भेटीस येणे अपूर्व होते, प्रीतिचे ते क्षण उन्मादी मनांत माझ्या ठसले होते प्रेमकहाणी विफल आपुली प्रारब्धाचे देणे होते, विधिलिखित हे भालीचे त्या समयी मज कळले नव्हते. निशब्द अधिकार तुजवर बिम्बवित मी गेलो नसतो, स्वप्न मोगरा फुलवीत मनींचा सुगंधित मी जाहलो नसतो. जीर्ण घराच्या मज भिंतीवरची तसविर तुझी चिरतरुण आहे, गाली खळी अन ओठ गुलाबी त्यांत आजहि तसेच आहे निरंजन वहाळेकर

गीत : सूर आज माझे का अबोल झाले

पाषाणभेद ·

सागर 20/07/2010 - 16:23
पाषाणभेदा, सुंदर काव्यपुष्प गुंफले आहेस खास करुन तिसरे कडवे सुरेख गुंफिले आहेस. तिसर्‍या कडव्याची ताकद अफाट असल्यामुळे पहिल्या २ कडव्यांना झुंझावे लागते एवढे नक्की. मैफलीत माझ्या कधी मालकंस आला वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले असा काव्यप्रकार गुंफणे एक तर कठीण. त्यामुळे तुझे अभिनंदन :) एवढ्या सुंदर कवितेस ....... ... वाचकांचे प्रतिसाद का अबोल झाले? :(

सागर 20/07/2010 - 16:23
पाषाणभेदा, सुंदर काव्यपुष्प गुंफले आहेस खास करुन तिसरे कडवे सुरेख गुंफिले आहेस. तिसर्‍या कडव्याची ताकद अफाट असल्यामुळे पहिल्या २ कडव्यांना झुंझावे लागते एवढे नक्की. मैफलीत माझ्या कधी मालकंस आला वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले असा काव्यप्रकार गुंफणे एक तर कठीण. त्यामुळे तुझे अभिनंदन :) एवढ्या सुंदर कवितेस ....... ... वाचकांचे प्रतिसाद का अबोल झाले? :(
काव्यरस
सूर आज माझे का अबोल झाले
आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले सूर आज माझे का अबोल झाले ||धृ|| माझ्या हृदयीच्या छेडूनी सप्त तारा आरोह अवरोहा संगे चाले मन भरारा असलेच कितीक राग नित्य नवे ऐकले ||१|| झंकारूनी स्वरांना घेवूनी रोज ताना ओठी माझ्या येई फुलोनी नवा तराणा कसले आता गाणे कसले नवे तराणे ||२|| मैफलीत माझ्या कधी मालकंस आला वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले ||३|| आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले सूर आज माझे क

कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला

पाषाणभेद ·
काव्यरस
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ|| वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१|| कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२|| पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू

शून्य

sur_nair ·

Manoj Katwe 15/07/2010 - 07:30
शून्य भारत, शून्य महासत्ता शून्य जनता, शून्य राजकारणी शून्य कायदे, शून्य कर्ते शून्य घोडेबाजार, शून्य लोकशाही शून्य महागाई, शून्य समृद्धी जिकडे तिकडे चोहीकडे शून्य शून्य शून्य शून्य आकाशात, पाताळात शून्य शून्य शून्य शून्य धरतीवर, समुद्रात शून्य शून्य शून्य शून्य आत, बाहेर शून्य शून्य शून्य शून्य शहाणे, वेडे शून्य शून्य शून्य शून्य मी शून्य शून्य शून्य शून्य तुम्ही सगळे शून्य शून्य शून्य शून्य (कृ. हलके घेणे ) सर्वांत लहान शून्य शून्य शून्य शून्य अनंतालाही लाजवेल शून्य शून्य शून्य शून्य शून्य + शून्य = शून्य शून्य - शून्य = शून्य शून्य X शून्य = शून्य शून्य / शून्य = शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य हा प्रतिसाद लिहिताना माझ्या मनात आलेले विचार शून्य शून्य शून्य शून्य ह्यावर तुम्ही मला जे फेकून माराल ते पण शून्य शून्य शून्य शून्य ......................... हि कविता काय संपणारच नाय असे दिसते राव मी लिहिलेल्या ह्या कवितेत एक फार मोठी गंभीर चूक आहे, ती ओळखा पाहू ओळखणार्यास मोठे शून्य बक्षीस --------------------------------------------- अवांतर : मला एकदा शून्य भेटला होता, एकदम हताश दिसत होता तो, मी विचारले काय झाले म्हणून, त्याने सांगितले कि त्याचा जन्म इथलाच, भारतातला (आता महाराष्ट्र का कर्नाटक कि बिहार, ते विचारू नका ) त्याला जरा जग हिंडून यायचे आहे . मी म्हणालो, जा कि मग , बघू ये जरा बाहेरचे जग, यावर तो म्हणाला कि त्याला इथल्या राजकारण्यांच्या संवेदनशील मनाने इतके जखडून ठेवले आहे कि पुढील अनंत काळापर्यंत शून्यचा आणि राजकारण्यांच्या संवेदनशील मनाचा संबंध कधी तुटणार नाही असे दिसत आहे. मी आपली गाडीला किक मारली आणि त्याला कधीतरी थोडे स्वातंत्र्य मिळावे असा विचार करून निघालो

शरद 15/07/2010 - 07:37
नेति नेति "ब्रह्मा" च्या संदर्भात पूर्वासुरींनी न इति, न इति असे हताशपणे म्हटले आहे. कारण कोणतेही विशेषण त्याला लावता येत नाही. ते आदिही नाही, त्याला अंतही नाही, इत्यदि. या कवितेत कवीला आजूबाजूला दिसणारे सर्वच शून्यवत वाटत आहे.आजूबाजूलाच कशाला, स्वत:कडे बघतांनाही हीच भावना प्रबळ झालेली आहे. ईशावास्योपनिषदांमधील "पूर्णमद: पूर्णमिदं .. " ची छायाही दिसून येते. "शून्यवाद" हे दर्शन आपण विचारात नाही घेतले तरी चालेल. कारण त्याचा अभ्यास हल्ली होत नाही. असो. या व अशा कवितांबाबत दोन गोष्टी विचारात घ्यावयास पाहिजेत. पहिली म्हणजे जीवन खरेच इतके शून्यवत आहे का ? चित्विलासवाद म्हणतो "नाही". पण ज्ञानेश्वरच कशाला, आजचे बोरकर, पाडगांवकर यांनाही जीवनात आनंद दिसून येतोच की ! अर्धा कप रिकामा हे खरेच, पण अर्धा भरलेला आहे त्याकडेही बघता येतेच की. अर्थात कवीने काय बघावे हे आपण कोण सांगणार ? दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रकारच्या कविता ह्या वाण्याच्या याद्या होवू शकतात. कोणतेही नाम घ्या, त्याला तेच विशेषण जोडा. या चक्रात आरती प्रभूंसारखे कवीही अडकलेले दिसते. कोठे थांबावयाचे याचे भान राखणेही महत्वाचे. इथे कवीने कविता लांबविली नाही हे योग्यच. स्वताला अंतर्मुख करावयास लावणारी एक छान कविता. शरद

In reply to by शरद

sur_nair 15/07/2010 - 23:43
सविस्तर व उत्तम प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. फक्त एक सांगावेसे वाटते कि एखाद्या कवितेतून वा इतर कालाविष्कारातून कवी /कलाकाराबद्दल तर्क लावणे योग्य नव्हे. "कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून", आणि "समयीच्या शुभ्र कळ्या"/ "नाही कशी म्हणू तुला" लिहिणारे आरती प्रभू काय किंवा इतर कवी/ कलाकार असो , ही सर्व एक मनाची अवस्था असते. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिले आहे " दीपकी दीपक लावियल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या ". ह्या कवितेचा संदर्भाच द्यायचा तर माझ्या मनात कुठेतरी "One Flew Over The Cuckoo's Nest" हा चित्रपट होता.

Manoj Katwe 15/07/2010 - 07:30
शून्य भारत, शून्य महासत्ता शून्य जनता, शून्य राजकारणी शून्य कायदे, शून्य कर्ते शून्य घोडेबाजार, शून्य लोकशाही शून्य महागाई, शून्य समृद्धी जिकडे तिकडे चोहीकडे शून्य शून्य शून्य शून्य आकाशात, पाताळात शून्य शून्य शून्य शून्य धरतीवर, समुद्रात शून्य शून्य शून्य शून्य आत, बाहेर शून्य शून्य शून्य शून्य शहाणे, वेडे शून्य शून्य शून्य शून्य मी शून्य शून्य शून्य शून्य तुम्ही सगळे शून्य शून्य शून्य शून्य (कृ. हलके घेणे ) सर्वांत लहान शून्य शून्य शून्य शून्य अनंतालाही लाजवेल शून्य शून्य शून्य शून्य शून्य + शून्य = शून्य शून्य - शून्य = शून्य शून्य X शून्य = शून्य शून्य / शून्य = शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य हा प्रतिसाद लिहिताना माझ्या मनात आलेले विचार शून्य शून्य शून्य शून्य ह्यावर तुम्ही मला जे फेकून माराल ते पण शून्य शून्य शून्य शून्य ......................... हि कविता काय संपणारच नाय असे दिसते राव मी लिहिलेल्या ह्या कवितेत एक फार मोठी गंभीर चूक आहे, ती ओळखा पाहू ओळखणार्यास मोठे शून्य बक्षीस --------------------------------------------- अवांतर : मला एकदा शून्य भेटला होता, एकदम हताश दिसत होता तो, मी विचारले काय झाले म्हणून, त्याने सांगितले कि त्याचा जन्म इथलाच, भारतातला (आता महाराष्ट्र का कर्नाटक कि बिहार, ते विचारू नका ) त्याला जरा जग हिंडून यायचे आहे . मी म्हणालो, जा कि मग , बघू ये जरा बाहेरचे जग, यावर तो म्हणाला कि त्याला इथल्या राजकारण्यांच्या संवेदनशील मनाने इतके जखडून ठेवले आहे कि पुढील अनंत काळापर्यंत शून्यचा आणि राजकारण्यांच्या संवेदनशील मनाचा संबंध कधी तुटणार नाही असे दिसत आहे. मी आपली गाडीला किक मारली आणि त्याला कधीतरी थोडे स्वातंत्र्य मिळावे असा विचार करून निघालो

शरद 15/07/2010 - 07:37
नेति नेति "ब्रह्मा" च्या संदर्भात पूर्वासुरींनी न इति, न इति असे हताशपणे म्हटले आहे. कारण कोणतेही विशेषण त्याला लावता येत नाही. ते आदिही नाही, त्याला अंतही नाही, इत्यदि. या कवितेत कवीला आजूबाजूला दिसणारे सर्वच शून्यवत वाटत आहे.आजूबाजूलाच कशाला, स्वत:कडे बघतांनाही हीच भावना प्रबळ झालेली आहे. ईशावास्योपनिषदांमधील "पूर्णमद: पूर्णमिदं .. " ची छायाही दिसून येते. "शून्यवाद" हे दर्शन आपण विचारात नाही घेतले तरी चालेल. कारण त्याचा अभ्यास हल्ली होत नाही. असो. या व अशा कवितांबाबत दोन गोष्टी विचारात घ्यावयास पाहिजेत. पहिली म्हणजे जीवन खरेच इतके शून्यवत आहे का ? चित्विलासवाद म्हणतो "नाही". पण ज्ञानेश्वरच कशाला, आजचे बोरकर, पाडगांवकर यांनाही जीवनात आनंद दिसून येतोच की ! अर्धा कप रिकामा हे खरेच, पण अर्धा भरलेला आहे त्याकडेही बघता येतेच की. अर्थात कवीने काय बघावे हे आपण कोण सांगणार ? दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रकारच्या कविता ह्या वाण्याच्या याद्या होवू शकतात. कोणतेही नाम घ्या, त्याला तेच विशेषण जोडा. या चक्रात आरती प्रभूंसारखे कवीही अडकलेले दिसते. कोठे थांबावयाचे याचे भान राखणेही महत्वाचे. इथे कवीने कविता लांबविली नाही हे योग्यच. स्वताला अंतर्मुख करावयास लावणारी एक छान कविता. शरद

In reply to by शरद

sur_nair 15/07/2010 - 23:43
सविस्तर व उत्तम प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. फक्त एक सांगावेसे वाटते कि एखाद्या कवितेतून वा इतर कालाविष्कारातून कवी /कलाकाराबद्दल तर्क लावणे योग्य नव्हे. "कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून", आणि "समयीच्या शुभ्र कळ्या"/ "नाही कशी म्हणू तुला" लिहिणारे आरती प्रभू काय किंवा इतर कवी/ कलाकार असो , ही सर्व एक मनाची अवस्था असते. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिले आहे " दीपकी दीपक लावियल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या ". ह्या कवितेचा संदर्भाच द्यायचा तर माझ्या मनात कुठेतरी "One Flew Over The Cuckoo's Nest" हा चित्रपट होता.
लेखनविषय:
काव्यरस
शून्य शून्य गाव शून्य वस्ती शून्य झाडे शून्य घरटी शून्य खिडक्या शून्य दारे शून्य भिंती शून्य वारे शून्य दिवा शून्य वाती शून्य पणती शून्य ज्योती शून्य शब्द शून्य अर्थ शून्य ओळी शून्य पानी शून्य डोळे शून्य आसू शून्य गाली शून्य हासू शून्य अधिक शून्य वजा शून्य हाती शून्य बाकी शून्य जगतो शून्य आम्ही शून्य सारे शून्य मीही सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/

टंकेल वीडंबक जैं न काहीं

धनंजय ·

मिसळभोक्ता 09/07/2010 - 22:09
मुख्य म्हणजे वृत्त चपखल ! सर्वच तांत्रिक बाबी चोख ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

नितिन थत्ते 09/07/2010 - 22:29
विडंबन धनंजयनी केले म्हणजे हे सर्व आलेच. असो. केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

श्रावण मोडक 09/07/2010 - 22:51
+२. विशेषतः केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे, हे वाक्य! :)

In reply to by श्रावण मोडक

केशवसुमार 09/07/2010 - 23:02
मस्त विडंबन.. (वाचक)केशवसुमार श्रामो, ही सगळी पॉल ऑक्टोपसची कमाल..;) ऑक्टोपस भविष्य सांगायला लागल्या पासून पोपट गाण्याचे कार्यक्रम करायला लागले आहेत असे ऐकीवात येते आहे.. (विस्थापीत)केशवसुमार

In reply to by श्रावण मोडक

विशेषतः केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे, हे वाक्य!
आता कुठे लाईन मारतात ते ? स्वगतः- तरिच काल मला कॅफेचा पत्ता विचारत होते तर... उत्सुक ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by चतुरंग

सहज 10/07/2010 - 07:13
>वा! धन्याशेठचे विडंबन एकदम मस्त! सहमत. कृपया लाईन बदलु नका, तुमच्या इतकी दर्जेदार व मुख्य म्हणजे वैविध्यपूर्ण विडंबने अजुन तरी इथे पहाण्यात नाहीत हो. :-)

रेवती 09/07/2010 - 22:59
विडंबन छान, हसू आणणारे मात्रा, वृत मला कळत नाही त्यामुळे जास्त काही बोलणे नाही.;) रेवती

क्रेमर 09/07/2010 - 23:44
तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून,
विशेष आवडले.

मुक्तसुनीत 10/07/2010 - 00:59
कुंथेल वैचारिक जैं न काहीं, तैं चीवडाया मिळणार नाहीं. कोठून धागे मिळतील ठोक? शिमग्या नि पोळ्यासि मुकतील लोक. ॥१॥ . विचार लोकांत जरी विकें ना, खाज्रेपणी खूप रुची जनांना. करावया माज कोणी न लाजो, छद्मीपणाचा सुकाळ राहो! ॥२॥ . त्या-त्याच चोथा चर्चा फिरून, प्रश्नावली तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीचारवान् जैं बिचारा! ॥३॥

In reply to by श्रावण मोडक

भारी म्हणजे काय? एकदम भारीच की हो... शिवाय ऑलखीचं वाटतंय ते वेगळंच. वा!!! मुसुशेठ, वा!!! चांगलीच माहिती दिलीत हो. :D बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश 10/07/2010 - 10:49
धनंजय आणि मुसुशेठ, लै भारी विडंबन! मुसुशेठ ने दिलेला 'खाज्रे'पणा थेट भिडला ;) ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

धनंजय 11/07/2010 - 01:40
माझ्या विडंबनाच्या प्रयत्नाचा दिलेल्या प्रोत्साहनाबाबत सर्वांचे आभार. मध्ये "(वर्तूळ)", "{वाघूळ}" "|वातूळ|" वगैरे "गारगोट्यूळांचे वादळ हल्लीहल्लीच एके दिवशी झाले. आठवतच असेल. माझ्यासारख्याच या हौशी विडंबकांबद्दल टीका करता येत नाही. भाईकाकांनी स्वतःच्या लेखणीने आम्हा ऐर्‍यागैर्‍यांसाठी ज्ञानोबा माउलीने दिलेले पर्मिट पोचवलेले आहे :
"राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शहाणें । आणिकें काय कोणें । चालावेचिना ॥"
माउलीने राजहंसाला मात्र बेडौल चालण्याचे पर्मिट दिलेले नाही. ज्या विडंबकांना लीलया यमके-वृत्त सांभाळता येते, त्यांचा माल आपण वेगळ्या तराजूवरती तोलतो. कोणाला वाटेल की येथे "विडंबन हे परप्रकाशित आहे" वगैरे, विडंबनविरोधी टीका मी करणार आहे. मुळीच नाही. परप्रकाशित असले तरी विडंबनात स्वयंप्रतिभ कला असावी लागते, असे मी मांडणार आहे. विडंबनाची तुलना करावी अजायबघरातील शीशमहालाशी. तिथल्या आरशांत आपला चेहरा बघितला की तो इतका गमतीदार दिसतो, की पुन्हापुन्हा हसावेसे वाटते. पण मग कुठल्याही मोडक्या-तोडक्या आरशात तोंड बघायला आपण तिकिटाचे पैसे देतो का? नाही. असा आरसा स्वस्तातसुद्धा विकत घेत नाही. अजायबघरातला शीशा "उगाच कसाही" वेडावाकडा नसतो. तो बनवायला कारागीर लागतो. प्रतिबिंब कसे वाकडे होणार, त्याची योजना कारागिराने आखलेली असते. प्रतिबिंबात मूळ वस्तूची ओळख सहज पटेल, अशा प्रकारेच बदल होतात. मात्र झालेल्या बदलाने व्यंग्यपूर्ण आकार प्रतिबिंबात येतो. तो बदल बघणार्‍याला अगदी नाविन्यपूर्ण हवा. काही अ-पूर्व, विलक्षण बघून आनंदाने हसू फुटावे. मूळ आकार ओळखीचा ठेवणे आणि अनोळखी-विलक्षण बनवणे या विरुद्ध प्रक्रियांमध्ये तोल साधायची कसरतच असते. ही उत्तम विडंबकाकडून आम्हा आस्वादकांना अपेक्षित असते. १. मूळ कविता निवडण्यात नेमकेपणा वाचकाला जाणवावा. विडंबकांना याची चांगली कल्पना असते - म्हणून स्फूर्तिस्थानाचा निर्देश "अमक्यातमक्याची अप्रतिम गझल" वगैरे शब्दांनी करतात. मात्र कित्येकदा कच्चा मालच रटाळ असतो. विडंबनात मुळातल्या कवितेची आकृती शोधण्यात वाचकाला मजा वाटली पाहिजे. मुळातली कविता इतका तरी ठसा उमटवू शकली पाहिजे. २. मूळ कवितेत कमीतकमी शब्दबदल करून अर्थ जास्तीतजास्त वेगळा हवा. तर मजा येते. कमीतकमी बदल केल्यामुळे मुळातली आकृती स्मरत राहाते. अर्थात फरक खूप असल्यामुळे नव्या-जुन्या अर्थांची विसंगती गुदगुल्या करत राहाते. नवीन अर्थ ती लुटुपुटूची लढत जिंकण्याइतका स्वतंत्र आणि समर्थ हवा. हा अर्थ एकजिनसी असला, तरच परप्रकाशित आकृतीच्या वरती विडंबकाची प्रतिभा लखलखते. ३. विडंबनांचे विडंबन करायच्या भानगडीत अव्वल विडंबक क्वचितच पडत असावेत. तसे केल्यास "कुठली आकृती स्मृतीत यावी?" याचा भलताच गोंधळ वाचकाला होऊ शकतो. भोज्या ठरलेला नसला तर अर्थांच्या लपंडावाचा खेळ गमतीचा राहूच शकत नाही. उदाहरण बघूया : रामदासस्वामींचा श्लोक
"मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे । जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥"
त्याचे पु. ल. देशपांड्यांनी केलेले उत्तम विडंबन येथील वाचकांना ठाऊक असेलच :
"मना सज्जना ट्रामपंथेचि जावे । तरी वाचतो एक आणा स्वभावे ।..."
याचे झेरॉक्सचे-झेरॉक्स काढल्यासारखे काळेबेद्रे विडंबन निकृष्ट असते?
"मना सज्जना ग्रामगंगेसि जावे । तिथे कुंथती देख कोणी स्वभावे ।..."
येथे कुठली मूळ आकृती ठसवून मग त्याच्या विकृतीची गंमत अनुभवायची, तेच कळत नाही. करायचेच तर मुळातल्या श्लोकाचे नव्याने विडंबन करायला घ्यावे.
"मना सज्जना सक्तिपंथेची जावे । तरी यम्म्यल्ये होइजे तू स्वभावे । जनीं गुंड ते सर्व जोडूनी घ्यावे । मनी-फंड खावा खिसेही भरावे ॥"
... (अर्थात ही सुद्धा उच्च दर्जाची रचना नाही. पण वरील डबल-झेरॉक्सपेक्षा हीत थोडा अधिक दम आहे, हे मान्य केले पाहिजे.) - - - मिसळपावावरचे वाचक मला, किंवा अन्य कविकिरडूंना "मस्त", "+१", "अप्रतिम" वगैरे प्रोत्साहन देतात. भोळ्या सांबासारखा हा त्यांचा आशीर्वाद देण्यास तत्पर स्वभाव आहे. मोठी तपश्चर्या केलेल्या विडंबन-ऋषींनी मात्र एवढ्यावर समाधान मानू नये. दयाळू मिसळपावकर तोषतील अशी विडंबने ते दिवसाला दोन-चार रचू शकतात. त्यांनी स्वतःच्या वेगळ्या "कडक" निकषांवर विडंबन घासून बघावे : "रचना आपल्या कौशल्याला साजेशी आहे का?" कित्येकदा विडंबन वाचून पुन्हापुन्हा खात्री करून घ्यावी लागते - "छे छे! आपल्या याने हे रचले!" आणि खरे तर मिसळपावकर रसिकांनीही दुहेरी निकष वापरायला काय हरकत आहे? गल्लीत टेनिस बॉल क्रिकेट खेळणार्‍यांना आपण सहजासहजी शाबासकी देतो. म्हणून काय आपण मुंबई संघाकडून तितक्याच टाकटूक कौशल्याची अपेक्षा करतो का? नव्हे. खूप अधिक अपेक्षा करतो. मला तेंडुलकरासारखी बॅट फिरवता येत नाही, म्हणून गल्लीतल्या माझ्यापेक्षा बर्‍या पोरांना संघात पाठवू देऊ काय? आपल्या हातात कौशल्य नसले, तरी फार-फार उच्च कौशल्य दिसू शकतील असे डोळे आपल्यापाशी आहेत.

मिसळभोक्ता 09/07/2010 - 22:09
मुख्य म्हणजे वृत्त चपखल ! सर्वच तांत्रिक बाबी चोख ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

नितिन थत्ते 09/07/2010 - 22:29
विडंबन धनंजयनी केले म्हणजे हे सर्व आलेच. असो. केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

श्रावण मोडक 09/07/2010 - 22:51
+२. विशेषतः केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे, हे वाक्य! :)

In reply to by श्रावण मोडक

केशवसुमार 09/07/2010 - 23:02
मस्त विडंबन.. (वाचक)केशवसुमार श्रामो, ही सगळी पॉल ऑक्टोपसची कमाल..;) ऑक्टोपस भविष्य सांगायला लागल्या पासून पोपट गाण्याचे कार्यक्रम करायला लागले आहेत असे ऐकीवात येते आहे.. (विस्थापीत)केशवसुमार

In reply to by श्रावण मोडक

विशेषतः केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे, हे वाक्य!
आता कुठे लाईन मारतात ते ? स्वगतः- तरिच काल मला कॅफेचा पत्ता विचारत होते तर... उत्सुक ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by चतुरंग

सहज 10/07/2010 - 07:13
>वा! धन्याशेठचे विडंबन एकदम मस्त! सहमत. कृपया लाईन बदलु नका, तुमच्या इतकी दर्जेदार व मुख्य म्हणजे वैविध्यपूर्ण विडंबने अजुन तरी इथे पहाण्यात नाहीत हो. :-)

रेवती 09/07/2010 - 22:59
विडंबन छान, हसू आणणारे मात्रा, वृत मला कळत नाही त्यामुळे जास्त काही बोलणे नाही.;) रेवती

क्रेमर 09/07/2010 - 23:44
तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून,
विशेष आवडले.

मुक्तसुनीत 10/07/2010 - 00:59
कुंथेल वैचारिक जैं न काहीं, तैं चीवडाया मिळणार नाहीं. कोठून धागे मिळतील ठोक? शिमग्या नि पोळ्यासि मुकतील लोक. ॥१॥ . विचार लोकांत जरी विकें ना, खाज्रेपणी खूप रुची जनांना. करावया माज कोणी न लाजो, छद्मीपणाचा सुकाळ राहो! ॥२॥ . त्या-त्याच चोथा चर्चा फिरून, प्रश्नावली तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीचारवान् जैं बिचारा! ॥३॥

In reply to by श्रावण मोडक

भारी म्हणजे काय? एकदम भारीच की हो... शिवाय ऑलखीचं वाटतंय ते वेगळंच. वा!!! मुसुशेठ, वा!!! चांगलीच माहिती दिलीत हो. :D बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश 10/07/2010 - 10:49
धनंजय आणि मुसुशेठ, लै भारी विडंबन! मुसुशेठ ने दिलेला 'खाज्रे'पणा थेट भिडला ;) ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

धनंजय 11/07/2010 - 01:40
माझ्या विडंबनाच्या प्रयत्नाचा दिलेल्या प्रोत्साहनाबाबत सर्वांचे आभार. मध्ये "(वर्तूळ)", "{वाघूळ}" "|वातूळ|" वगैरे "गारगोट्यूळांचे वादळ हल्लीहल्लीच एके दिवशी झाले. आठवतच असेल. माझ्यासारख्याच या हौशी विडंबकांबद्दल टीका करता येत नाही. भाईकाकांनी स्वतःच्या लेखणीने आम्हा ऐर्‍यागैर्‍यांसाठी ज्ञानोबा माउलीने दिलेले पर्मिट पोचवलेले आहे :
"राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शहाणें । आणिकें काय कोणें । चालावेचिना ॥"
माउलीने राजहंसाला मात्र बेडौल चालण्याचे पर्मिट दिलेले नाही. ज्या विडंबकांना लीलया यमके-वृत्त सांभाळता येते, त्यांचा माल आपण वेगळ्या तराजूवरती तोलतो. कोणाला वाटेल की येथे "विडंबन हे परप्रकाशित आहे" वगैरे, विडंबनविरोधी टीका मी करणार आहे. मुळीच नाही. परप्रकाशित असले तरी विडंबनात स्वयंप्रतिभ कला असावी लागते, असे मी मांडणार आहे. विडंबनाची तुलना करावी अजायबघरातील शीशमहालाशी. तिथल्या आरशांत आपला चेहरा बघितला की तो इतका गमतीदार दिसतो, की पुन्हापुन्हा हसावेसे वाटते. पण मग कुठल्याही मोडक्या-तोडक्या आरशात तोंड बघायला आपण तिकिटाचे पैसे देतो का? नाही. असा आरसा स्वस्तातसुद्धा विकत घेत नाही. अजायबघरातला शीशा "उगाच कसाही" वेडावाकडा नसतो. तो बनवायला कारागीर लागतो. प्रतिबिंब कसे वाकडे होणार, त्याची योजना कारागिराने आखलेली असते. प्रतिबिंबात मूळ वस्तूची ओळख सहज पटेल, अशा प्रकारेच बदल होतात. मात्र झालेल्या बदलाने व्यंग्यपूर्ण आकार प्रतिबिंबात येतो. तो बदल बघणार्‍याला अगदी नाविन्यपूर्ण हवा. काही अ-पूर्व, विलक्षण बघून आनंदाने हसू फुटावे. मूळ आकार ओळखीचा ठेवणे आणि अनोळखी-विलक्षण बनवणे या विरुद्ध प्रक्रियांमध्ये तोल साधायची कसरतच असते. ही उत्तम विडंबकाकडून आम्हा आस्वादकांना अपेक्षित असते. १. मूळ कविता निवडण्यात नेमकेपणा वाचकाला जाणवावा. विडंबकांना याची चांगली कल्पना असते - म्हणून स्फूर्तिस्थानाचा निर्देश "अमक्यातमक्याची अप्रतिम गझल" वगैरे शब्दांनी करतात. मात्र कित्येकदा कच्चा मालच रटाळ असतो. विडंबनात मुळातल्या कवितेची आकृती शोधण्यात वाचकाला मजा वाटली पाहिजे. मुळातली कविता इतका तरी ठसा उमटवू शकली पाहिजे. २. मूळ कवितेत कमीतकमी शब्दबदल करून अर्थ जास्तीतजास्त वेगळा हवा. तर मजा येते. कमीतकमी बदल केल्यामुळे मुळातली आकृती स्मरत राहाते. अर्थात फरक खूप असल्यामुळे नव्या-जुन्या अर्थांची विसंगती गुदगुल्या करत राहाते. नवीन अर्थ ती लुटुपुटूची लढत जिंकण्याइतका स्वतंत्र आणि समर्थ हवा. हा अर्थ एकजिनसी असला, तरच परप्रकाशित आकृतीच्या वरती विडंबकाची प्रतिभा लखलखते. ३. विडंबनांचे विडंबन करायच्या भानगडीत अव्वल विडंबक क्वचितच पडत असावेत. तसे केल्यास "कुठली आकृती स्मृतीत यावी?" याचा भलताच गोंधळ वाचकाला होऊ शकतो. भोज्या ठरलेला नसला तर अर्थांच्या लपंडावाचा खेळ गमतीचा राहूच शकत नाही. उदाहरण बघूया : रामदासस्वामींचा श्लोक
"मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे । जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥"
त्याचे पु. ल. देशपांड्यांनी केलेले उत्तम विडंबन येथील वाचकांना ठाऊक असेलच :
"मना सज्जना ट्रामपंथेचि जावे । तरी वाचतो एक आणा स्वभावे ।..."
याचे झेरॉक्सचे-झेरॉक्स काढल्यासारखे काळेबेद्रे विडंबन निकृष्ट असते?
"मना सज्जना ग्रामगंगेसि जावे । तिथे कुंथती देख कोणी स्वभावे ।..."
येथे कुठली मूळ आकृती ठसवून मग त्याच्या विकृतीची गंमत अनुभवायची, तेच कळत नाही. करायचेच तर मुळातल्या श्लोकाचे नव्याने विडंबन करायला घ्यावे.
"मना सज्जना सक्तिपंथेची जावे । तरी यम्म्यल्ये होइजे तू स्वभावे । जनीं गुंड ते सर्व जोडूनी घ्यावे । मनी-फंड खावा खिसेही भरावे ॥"
... (अर्थात ही सुद्धा उच्च दर्जाची रचना नाही. पण वरील डबल-झेरॉक्सपेक्षा हीत थोडा अधिक दम आहे, हे मान्य केले पाहिजे.) - - - मिसळपावावरचे वाचक मला, किंवा अन्य कविकिरडूंना "मस्त", "+१", "अप्रतिम" वगैरे प्रोत्साहन देतात. भोळ्या सांबासारखा हा त्यांचा आशीर्वाद देण्यास तत्पर स्वभाव आहे. मोठी तपश्चर्या केलेल्या विडंबन-ऋषींनी मात्र एवढ्यावर समाधान मानू नये. दयाळू मिसळपावकर तोषतील अशी विडंबने ते दिवसाला दोन-चार रचू शकतात. त्यांनी स्वतःच्या वेगळ्या "कडक" निकषांवर विडंबन घासून बघावे : "रचना आपल्या कौशल्याला साजेशी आहे का?" कित्येकदा विडंबन वाचून पुन्हापुन्हा खात्री करून घ्यावी लागते - "छे छे! आपल्या याने हे रचले!" आणि खरे तर मिसळपावकर रसिकांनीही दुहेरी निकष वापरायला काय हरकत आहे? गल्लीत टेनिस बॉल क्रिकेट खेळणार्‍यांना आपण सहजासहजी शाबासकी देतो. म्हणून काय आपण मुंबई संघाकडून तितक्याच टाकटूक कौशल्याची अपेक्षा करतो का? नव्हे. खूप अधिक अपेक्षा करतो. मला तेंडुलकरासारखी बॅट फिरवता येत नाही, म्हणून गल्लीतल्या माझ्यापेक्षा बर्‍या पोरांना संघात पाठवू देऊ काय? आपल्या हातात कौशल्य नसले, तरी फार-फार उच्च कौशल्य दिसू शकतील असे डोळे आपल्यापाशी आहेत.
काव्यरस
टंकेल वीडंबक जैं न काहीं . टंकेल वीडंबक जैं न काहीं, तैं हासयाला मिळणार नाहीं. कोठून पद्यें मिळतील ठोक? सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥ . कवित्व लोकांत जरी विकें ना, विडंबनीं खूप रुची जनांना. झाकावया लाज कवी न पाहो, विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥ . तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीडंबक जैं बिचारा!

पुन्हा एकदा

jaypal ·

चतुरंग 09/07/2010 - 19:51
वा छान कविता. तू तर छुपा रुस्तुम निघालास! आम्हाला वाटलं होतं तू फक्त चित्रं टाकून हसवतोस पण तू गंभीरही बनवतोस! (आणखी एखादं कडवं चाललं असतं रे! चुटपुट लागून संपली कविता..) चतुरंग

पाषाणभेद 10/07/2010 - 18:21
मस्त कवितांचा पाऊस चालू आहे. अवांतरः फोटोतल्याने/ लीने घातलेल्या स्टॉकिंग्ज नैसर्गीक रंगाच्या वाटत नाही. जरी वाटत असल्या तरी ते खुपच चमकत आहेत. कृपया नैसर्गीक रंग वाटेल अशा स्टॉकिंग्जवालीचा फोटो टाकावा असे वाटते. तुमच्यासारख्या नवनविन फोटो शोधणार्‍याला हे शक्य आहे. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

शानबा५१२ 12/07/2010 - 19:40
चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल
माझा आक्षेप आहे. भिजुन कोणती गोष्ट हलकी होते जे जयपालने मन हलक केल? वास्तवात असलेल्या गोष्टींची तुलना केली की त्याला 'उपमा'(नाश्त्याला खातो तो पण उपमाच का?) म्हणतात. ह्याला काय म्हणायच 'जयपाल-तारे'? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

चतुरंग 09/07/2010 - 19:51
वा छान कविता. तू तर छुपा रुस्तुम निघालास! आम्हाला वाटलं होतं तू फक्त चित्रं टाकून हसवतोस पण तू गंभीरही बनवतोस! (आणखी एखादं कडवं चाललं असतं रे! चुटपुट लागून संपली कविता..) चतुरंग

पाषाणभेद 10/07/2010 - 18:21
मस्त कवितांचा पाऊस चालू आहे. अवांतरः फोटोतल्याने/ लीने घातलेल्या स्टॉकिंग्ज नैसर्गीक रंगाच्या वाटत नाही. जरी वाटत असल्या तरी ते खुपच चमकत आहेत. कृपया नैसर्गीक रंग वाटेल अशा स्टॉकिंग्जवालीचा फोटो टाकावा असे वाटते. तुमच्यासारख्या नवनविन फोटो शोधणार्‍याला हे शक्य आहे. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

शानबा५१२ 12/07/2010 - 19:40
चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल
माझा आक्षेप आहे. भिजुन कोणती गोष्ट हलकी होते जे जयपालने मन हलक केल? वास्तवात असलेल्या गोष्टींची तुलना केली की त्याला 'उपमा'(नाश्त्याला खातो तो पण उपमाच का?) म्हणतात. ह्याला काय म्हणायच 'जयपाल-तारे'? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल मनमुराद रडाव वाटत ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत जळेल सारी वस्ती म्हणुन ठसका काढुन उठाव लागत मग काय? आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल fsdfs

असच काहीसं

नेहमी आनंदी ·

अवलिया 03/07/2010 - 11:27
मस्त :) --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

अवलिया 03/07/2010 - 11:27
मस्त :) --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
लेखनविषय:
काव्यरस
निर्ढावलेला श्वास अंतरंगात कोंडतो आहे उसळलेला अश्रू सांडण्या साठी तळमळतो आहे शकले माझ्या मनाची झाली..... होतील अजुन ही........ भाव मनीचा सामोरी पोचण्या अडखळतो आहे कसे रोखू या आत्म्याच्या तडफडीला जाता जाता श्वास का घुसमटतो आहे चाहुल कुणाची लागली........ का लागली........ परतीची वाट आता घरंगळती आहे... कानात गुज तुझी माझ्या झंकारु दे ओठातले स्मित माझ्या तुझ्या नयनात दिसु दे साद घातली मी त्या परतीच्या वाटेला धावत ही आली ती माझ्या धरुन हाताला घुसमट, तडफड सोडुन श्वास ही मोकळा झाला अनिवार भावना तरी ही अडखळली ग तुझ्या पर्यन्त पोचण्याला.... प्रसन्ना जीके

प्रलय

निरन्जन वहालेकर ·

अवलिया 03/07/2010 - 10:52
छान ! --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

अवलिया 03/07/2010 - 10:52
छान ! --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
लेखनविषय:
काव्यरस
प्रलय......... " येते “ म्हणून सांगून गेली, परतुनी ना आली पुन्हा. वाट पाहुनी जीव शिणला, दाटल्या अन्तरी यातना. परतीच्या वाटेवर तुझ्या, सजविला आसवांचा ताटवा . जाहले निर्माल्य त्याचे, येशील तू केधवा ? अनमोल निर्माल्य हे गंगेत कुठल्या वाहवू ? महापुराचा प्रलय नंतर, एकला कसा मी थोपवू ? निरंजन वहाळेकर