करुण
पाध्यांचे मनोगत
निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते.
परंतु दुसर्या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे.
आठवण आणि ……
आठवण आणि ……
वादळ, वारा, पावसातहि
भेटीस येणे अपूर्व होते,
प्रीतिचे ते क्षण उन्मादी
मनांत माझ्या ठसले होते
प्रेमकहाणी विफल आपुली
प्रारब्धाचे देणे होते,
विधिलिखित हे भालीचे
त्या समयी मज कळले नव्हते.
निशब्द अधिकार तुजवर
बिम्बवित मी गेलो नसतो,
स्वप्न मोगरा फुलवीत मनींचा
सुगंधित मी जाहलो नसतो.
जीर्ण घराच्या मज भिंतीवरची
तसविर तुझी चिरतरुण आहे,
गाली खळी अन ओठ गुलाबी
त्यांत आजहि तसेच आहे
निरंजन वहाळेकर
गीत : सूर आज माझे का अबोल झाले
सूर आज माझे का अबोल झाले
आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले
सूर आज माझे का अबोल झाले ||धृ||
माझ्या हृदयीच्या छेडूनी सप्त तारा
आरोह अवरोहा संगे चाले मन भरारा
असलेच कितीक राग नित्य नवे ऐकले ||१||
झंकारूनी स्वरांना घेवूनी रोज ताना
ओठी माझ्या येई फुलोनी नवा तराणा
कसले आता गाणे कसले नवे तराणे ||२||
मैफलीत माझ्या कधी मालकंस आला
वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला
मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले ||३||
आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले
सूर आज माझे क
काव्यरस
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ||
वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात
सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१||
कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी
हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२||
पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना
तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू
शून्य
शून्य
शून्य गाव शून्य वस्ती
शून्य झाडे शून्य घरटी
शून्य खिडक्या शून्य दारे
शून्य भिंती शून्य वारे
शून्य दिवा शून्य वाती
शून्य पणती शून्य ज्योती
शून्य शब्द शून्य अर्थ
शून्य ओळी शून्य पानी
शून्य डोळे शून्य आसू
शून्य गाली शून्य हासू
शून्य अधिक शून्य वजा
शून्य हाती शून्य बाकी
शून्य जगतो शून्य आम्ही
शून्य सारे शून्य मीही
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस
टंकेल वीडंबक जैं न काहीं
टंकेल वीडंबक जैं न काहीं
.
टंकेल वीडंबक जैं न काहीं,
तैं हासयाला मिळणार नाहीं.
कोठून पद्यें मिळतील ठोक?
सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥
.
कवित्व लोकांत जरी विकें ना,
विडंबनीं खूप रुची जनांना.
झाकावया लाज कवी न पाहो,
विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥
.
तीं-तींच चोथा यमकें फिरून,
कथानकें तीच फिकी विरून,
स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा,
रुसेल वीडंबक जैं बिचारा!
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा
आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल
मनमुराद रडाव वाटत
ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत
जळेल सारी वस्ती म्हणुन
ठसका काढुन उठाव लागत
मग काय?
आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल
काव्यरस
असच काहीसं
निर्ढावलेला श्वास अंतरंगात कोंडतो आहे
उसळलेला अश्रू सांडण्या साठी तळमळतो आहे
शकले माझ्या मनाची झाली.....
होतील अजुन ही........
भाव मनीचा सामोरी पोचण्या अडखळतो आहे
कसे रोखू या आत्म्याच्या तडफडीला
जाता जाता श्वास का घुसमटतो आहे
चाहुल कुणाची लागली........
का लागली........
परतीची वाट आता घरंगळती आहे...
कानात गुज तुझी माझ्या झंकारु दे
ओठातले स्मित माझ्या तुझ्या नयनात दिसु दे
साद घातली मी त्या परतीच्या वाटेला
धावत ही आली ती माझ्या धरुन हाताला
घुसमट, तडफड सोडुन श्वास ही मोकळा झाला
अनिवार भावना तरी ही अडखळली ग तुझ्या पर्यन्त पोचण्याला....
प्रसन्ना जीके
काव्यरस
प्रलय
प्रलय.........
" येते “ म्हणून सांगून गेली,
परतुनी ना आली पुन्हा.
वाट पाहुनी जीव शिणला,
दाटल्या अन्तरी यातना.
परतीच्या वाटेवर तुझ्या,
सजविला आसवांचा ताटवा .
जाहले निर्माल्य त्याचे,
येशील तू केधवा ?
अनमोल निर्माल्य हे
गंगेत कुठल्या वाहवू ?
महापुराचा प्रलय नंतर,
एकला कसा मी थोपवू ?
निरंजन वहाळेकर
काव्यरस
मिसळपाव