गणपत वाणी, सतत मागणी.
विड्या ओढून थकलेला गणपत वाणी
कवितेच्या छपराखाली
अलंकार गोळा करताना मला दिसला.
म्हणाला,
'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता
कोण कवी वापरतो?
तसा एखाद दुसरा हौशी असतो
नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?'
त्याला एकदा मालक म्हन्ले,
'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही
काव्यापेक्षा कवित्व जड
आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात
कवितेला हाणून पाडतात.
गणप्या, आता तुझं काम एकच,
अलंकार काढायचे, अन
कविता वाळत टाकायची.'
'मग काय होईल मालक?'
पिंक टाकीत मालक म्हन्ले ,
' काय होईल?
अरे, मग
काय वास्तवदर्शी,
सत्याचे खोल भान, कित्ती खर्र
वा, वा!
मिळतेच मिपावर दादही भन्नाटशी
=))
नेहमीचेच यशस्वी... पैजाराबुवा
जमतंय जमतंय! :)
कविता भन्नाट जमलीये,
तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ