मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पण तुमचं आमचं सेम नसतं..

५० फक्त ·

स्पा गुरुवार, 12/30/2010 - 11:24
हर्षद.... मस्त लिहिलं आहेस रे........... खरच बऱ्याच प्रेम कहाण्या या अधुऱ्याच राहतात.... (म्हणून वेळेवर प्रेम व्यक्त करा, भले समोरून नकार आला तरी चालेल) -लवगुरू स्पावडेश्वर महाराज

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:12
छाण आहे. णॉस्टॅल्जिक झालो ... :) कॉलेजात एका पोरीला फ्रेंडशिप विचारली .. दिसायला अगदीच साधारण होती. पण मी फ्रेंडशिप काय विचारली ती तर माधुरी दिक्षीतंच झाली ;) मला म्हणे "कशाला ? " मग त्या नंतर आम्ही नव्या माधुर्‍या बनवल्या नाही :) -( अधुर्‍या माधुर्‍यांच्या आठवणींत ) टारझन

In reply to by टारझन

जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 12/30/2010 - 17:19
हे असं "फ्रेंडशीप देणार का" असं का विचारतात देव जाणे.... ती काय द्यायची वस्तू आहे का?... देता का?... कशी किलो?.. असं विचारल्यासरखं वाटतं! चुचु तुला विचारली होति का गं कोणी...फ्रेंडशीप देता का म्हणुन? :)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

पर्नल नेने मराठे गुरुवार, 12/30/2010 - 17:40
हो ग ;) मला बर्याच जणानी फ्रेंडशीप विचारली होती न म्हणे मी दिली असती तर ते लोक्स सत्यनारायणाची पुजा टाकणार होते =)) =)) =)) मी एकाला दिली ग पण मग पुढे काही नाही जमले नाही :(

In reply to by शिल्पा ब

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:38
सहमत आहे. काही मुली खरोखर मंद असतात. समोरचा काय बोलतो ते बर्‍याचदा कळत नाही त्यांना. मंद मुलीची णिवड केली हीच सगळ्यात मोठी चुक आहे असे येथे खेदाने णमुद करावेसे वाटते. :)

In reply to by टारझन

शिल्पा ब गुरुवार, 12/30/2010 - 12:41
त्यापेक्षा जिच्याशी बोलायचंय तिला समजेल अशी भाषा शिकुन घ्या..बाकी मुली कदाचित मंद असतीलही....म्हणूनच बावळट मुलांना त्या मिळतात.

In reply to by शिल्पा ब

नगरीनिरंजन गुरुवार, 12/30/2010 - 12:45
खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते. (हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?) :-)

In reply to by नगरीनिरंजन

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:50
सहमत आहे. मंद आणि अक्कलशुन्य मुलींच्या मागे धावणारी पोरं बावळट नाही , महा बावळट असतात. फाट्यावर मारावं अशा पोरींना सरळ :)

In reply to by शिल्पा ब

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:56
हे कोणासाठी होतं ? :) मी मंद मुलींविषयी बोलंत होतो :) शिवाय ते मुलींविषयी असल्याने आंटीज ऑटोमॅटिकली कटऑफ होतात ;)

In reply to by शिल्पा ब

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 13:07
ख्या ख्या ख्या .. मंद पोरींच्या मागे पडंच कशाला ? साला तो महामंदते चा पुतळा पाहिल्यावर सगळ्या फँटसीज झोपतात पार =)) बाकी आपल्या वाक्यामुळे आंटीज ह्या मंद मुलींच्याही खालच्या पातळीवर आहेत ह्या वाक्याला पुष्टी मिळते ;) आता मिपा वरच्या आंटिज पासुन देव तुमचे रक्षण करो ;) अवांतर : चाळीशीतली आंटी बर्फी का काय तरी असते असं कोणत्या एका मराठी सिनेमात पाहिलं होतं. कुतुहल आहे ;) - (क्युरिअस) टारझन

In reply to by टारझन

स्मिता. गुरुवार, 12/30/2010 - 14:11
चाळीशीतली(की पस्तीस?) बाई बर्फी असते हे रमेश भाटकरने 'सवत माझी लाडकी' मध्ये मोहन जोशीला सांगितलंय. लहानपणी लई आवडलेला विनोदी सिनेमा होता तो!

In reply to by स्मिता.

स्पा गुरुवार, 12/30/2010 - 14:26
+१ तुकडा.. म्हणजे सुरमई आठवते... बर्फी च मस्त वाटत

In reply to by नगरीनिरंजन

अर्धवटराव गुरुवार, 12/30/2010 - 23:53
>>खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते. अहो पण फारशी ओळख-पाळख नसताना एकदम मुका कसा काय घ्यायचा ?? >>(हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?) बर्‍याच मुली नकोत हो... जीचा मुका घ्यावासा वाटला तिला कळलं आणि तिने दिला म्हणजे झालं... (मुकेश) अर्धवटराव

In reply to by नगरीनिरंजन

वपाडाव Wed, 11/16/2011 - 17:40
खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते.
ननि, एकदम बरोब्बर बोललात बघा.... हर्षदराव...तिला एक मोका दे नाही म्हणावं वाटलं का?

काय दिवस आठवण करून दिलेस यार मयूर पंखी आठवणी डोंबिवलीतील सोवळ्या वातावरणातून मुंबापुरीत राहायला व कॉलेजात शिकायला येणे हा एक सांस्कृतिक सुखद धक्का होता मला फ्रेंड शिप डे च्या दिवशी खूप दिवस नेत्र पल्लवी चालू असललेल्या मला तिने आंग्ल भाषेत मुझसे दोस्ती करोगे हे भर वर्गात विचारले दहावीचा निकाल ऐकतांना जसा पोटात गोळा आला होता तसा आला .अन घशाला कोरड पडली शब्द तोंडातून फुटेनासे झाले .(तिचे कोन्वेंत इंग्लिश पार डोक्यावरून गेले) मला गप्प पाहून ती हिरमुसली .आणि मी त्या दिवसापासून वर्गात बेप्पता झालो नि कट्टेकरी झालो .मग कळले त्या बिचारीला खूप वाईट वाटले माझ्या वागण्याचे (येथे आमच्या इंग्रजीचे वांदे होते हे कशाला तिला मी सांगू ? आणि माझा होता नव्हता तो अहं दुखाहून घेऊ ) आता वाटते .नेहमी खरे बोलावे असा बापूजींचा संदेश जर अमलात आणून माझी भाषिक व्यथा मी तिला सांगितली असती तर .... बापू मी तुमचे सत्याचे प्रयोग तेव्हा वाचले नव्हते हो ,

In reply to by निनाद मुक्काम …

पिवळा डांबिस गुरुवार, 12/30/2010 - 13:04
ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का? नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही.....

In reply to by पिवळा डांबिस

चिगो गुरुवार, 12/30/2010 - 17:33
>>ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का? नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही..... अरारा... अवो पिडाकाका, फ्फॉक्कन फुटलो हो मी.... =))

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/30/2010 - 15:08
ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का?
क ह र ! =)) =)) पिडांकाका ती स्वाक्षरी आहे म्हणे त्यांची.
पण तुमचं आमचं सेम नसतं..
खरे आहे :P काहीना काही फरक असतोच.

सूर्यपुत्र गुरुवार, 12/30/2010 - 17:53
एका मस्त प्रसंगाची आठवण करून दिली आहे. एकदा कॉलेजमधे एका मुलीने (जी सर्वांच्या दिलाची धडकन वगैरे होती );"Friendship Day" च्या दुसर्‍या दिवशी (कारण रविवार होता), मी कॉलेजमधे व्हरांड्यात निरीक्षण करत होतो, तेव्हा मला भर गर्दीत गाठले. आणि एकदम "Hi, Happy Friendship Day" म्हणत शेकहॅन्ड केला. आजूबाजूला असणारे सर्वजण टुकुर-टुकुर बघताहेत..... आणि आमच्या पोटातील मिक्सर सकाळचा ब्रेकफास्ट पचवण्याचे काम नॉर्मल स्पीडलिमिट कधीच क्रॉस करून शंभरपट वेगाने आपले काम करू लागला होता.....

किचेन Wed, 11/16/2011 - 17:29
आपली शाळा मुलींची आणि कोलेज बी मुलीन्च्च!त्यामुळे हि असली संधी कधी आलीच नाही. :( कामावर मात्र पोर होती.स्मार्त व्हती,कधी नव्ह ती हुशार बी व्हती! त्यामुळच बा माझा रोज सकाळच्याला न सांच्याला घ्यायला यायचा मला.त्यामुळ इथ्बी की फायदा झाला न्हायी.शेवटी गयी जवानी पाणी मै .. :(

In reply to by किचेन

वपाडाव Wed, 11/16/2011 - 17:46
तुम्ही तुमचं मन मोकळं केलंत हे फार्फार बरं केलं.... एक शंका :: आपल्या पिताश्रींनी कधी आपल्याला ड्वळ्याच्या झडपा उघडु दिल्या नाहीत, म्हणुन तर नाही तुम्ही हल्ली लग्न लावुन देण्याच्या बहाण्याने तरणे-चिकणे मुलं बघत असता....

स्पा गुरुवार, 12/30/2010 - 11:24
हर्षद.... मस्त लिहिलं आहेस रे........... खरच बऱ्याच प्रेम कहाण्या या अधुऱ्याच राहतात.... (म्हणून वेळेवर प्रेम व्यक्त करा, भले समोरून नकार आला तरी चालेल) -लवगुरू स्पावडेश्वर महाराज

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:12
छाण आहे. णॉस्टॅल्जिक झालो ... :) कॉलेजात एका पोरीला फ्रेंडशिप विचारली .. दिसायला अगदीच साधारण होती. पण मी फ्रेंडशिप काय विचारली ती तर माधुरी दिक्षीतंच झाली ;) मला म्हणे "कशाला ? " मग त्या नंतर आम्ही नव्या माधुर्‍या बनवल्या नाही :) -( अधुर्‍या माधुर्‍यांच्या आठवणींत ) टारझन

In reply to by टारझन

जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 12/30/2010 - 17:19
हे असं "फ्रेंडशीप देणार का" असं का विचारतात देव जाणे.... ती काय द्यायची वस्तू आहे का?... देता का?... कशी किलो?.. असं विचारल्यासरखं वाटतं! चुचु तुला विचारली होति का गं कोणी...फ्रेंडशीप देता का म्हणुन? :)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

पर्नल नेने मराठे गुरुवार, 12/30/2010 - 17:40
हो ग ;) मला बर्याच जणानी फ्रेंडशीप विचारली होती न म्हणे मी दिली असती तर ते लोक्स सत्यनारायणाची पुजा टाकणार होते =)) =)) =)) मी एकाला दिली ग पण मग पुढे काही नाही जमले नाही :(

In reply to by शिल्पा ब

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:38
सहमत आहे. काही मुली खरोखर मंद असतात. समोरचा काय बोलतो ते बर्‍याचदा कळत नाही त्यांना. मंद मुलीची णिवड केली हीच सगळ्यात मोठी चुक आहे असे येथे खेदाने णमुद करावेसे वाटते. :)

In reply to by टारझन

शिल्पा ब गुरुवार, 12/30/2010 - 12:41
त्यापेक्षा जिच्याशी बोलायचंय तिला समजेल अशी भाषा शिकुन घ्या..बाकी मुली कदाचित मंद असतीलही....म्हणूनच बावळट मुलांना त्या मिळतात.

In reply to by शिल्पा ब

नगरीनिरंजन गुरुवार, 12/30/2010 - 12:45
खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते. (हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?) :-)

In reply to by नगरीनिरंजन

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:50
सहमत आहे. मंद आणि अक्कलशुन्य मुलींच्या मागे धावणारी पोरं बावळट नाही , महा बावळट असतात. फाट्यावर मारावं अशा पोरींना सरळ :)

In reply to by शिल्पा ब

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 12:56
हे कोणासाठी होतं ? :) मी मंद मुलींविषयी बोलंत होतो :) शिवाय ते मुलींविषयी असल्याने आंटीज ऑटोमॅटिकली कटऑफ होतात ;)

In reply to by शिल्पा ब

टारझन गुरुवार, 12/30/2010 - 13:07
ख्या ख्या ख्या .. मंद पोरींच्या मागे पडंच कशाला ? साला तो महामंदते चा पुतळा पाहिल्यावर सगळ्या फँटसीज झोपतात पार =)) बाकी आपल्या वाक्यामुळे आंटीज ह्या मंद मुलींच्याही खालच्या पातळीवर आहेत ह्या वाक्याला पुष्टी मिळते ;) आता मिपा वरच्या आंटिज पासुन देव तुमचे रक्षण करो ;) अवांतर : चाळीशीतली आंटी बर्फी का काय तरी असते असं कोणत्या एका मराठी सिनेमात पाहिलं होतं. कुतुहल आहे ;) - (क्युरिअस) टारझन

In reply to by टारझन

स्मिता. गुरुवार, 12/30/2010 - 14:11
चाळीशीतली(की पस्तीस?) बाई बर्फी असते हे रमेश भाटकरने 'सवत माझी लाडकी' मध्ये मोहन जोशीला सांगितलंय. लहानपणी लई आवडलेला विनोदी सिनेमा होता तो!

In reply to by स्मिता.

स्पा गुरुवार, 12/30/2010 - 14:26
+१ तुकडा.. म्हणजे सुरमई आठवते... बर्फी च मस्त वाटत

In reply to by नगरीनिरंजन

अर्धवटराव गुरुवार, 12/30/2010 - 23:53
>>खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते. अहो पण फारशी ओळख-पाळख नसताना एकदम मुका कसा काय घ्यायचा ?? >>(हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?) बर्‍याच मुली नकोत हो... जीचा मुका घ्यावासा वाटला तिला कळलं आणि तिने दिला म्हणजे झालं... (मुकेश) अर्धवटराव

In reply to by नगरीनिरंजन

वपाडाव Wed, 11/16/2011 - 17:40
खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते.
ननि, एकदम बरोब्बर बोललात बघा.... हर्षदराव...तिला एक मोका दे नाही म्हणावं वाटलं का?

काय दिवस आठवण करून दिलेस यार मयूर पंखी आठवणी डोंबिवलीतील सोवळ्या वातावरणातून मुंबापुरीत राहायला व कॉलेजात शिकायला येणे हा एक सांस्कृतिक सुखद धक्का होता मला फ्रेंड शिप डे च्या दिवशी खूप दिवस नेत्र पल्लवी चालू असललेल्या मला तिने आंग्ल भाषेत मुझसे दोस्ती करोगे हे भर वर्गात विचारले दहावीचा निकाल ऐकतांना जसा पोटात गोळा आला होता तसा आला .अन घशाला कोरड पडली शब्द तोंडातून फुटेनासे झाले .(तिचे कोन्वेंत इंग्लिश पार डोक्यावरून गेले) मला गप्प पाहून ती हिरमुसली .आणि मी त्या दिवसापासून वर्गात बेप्पता झालो नि कट्टेकरी झालो .मग कळले त्या बिचारीला खूप वाईट वाटले माझ्या वागण्याचे (येथे आमच्या इंग्रजीचे वांदे होते हे कशाला तिला मी सांगू ? आणि माझा होता नव्हता तो अहं दुखाहून घेऊ ) आता वाटते .नेहमी खरे बोलावे असा बापूजींचा संदेश जर अमलात आणून माझी भाषिक व्यथा मी तिला सांगितली असती तर .... बापू मी तुमचे सत्याचे प्रयोग तेव्हा वाचले नव्हते हो ,

In reply to by निनाद मुक्काम …

पिवळा डांबिस गुरुवार, 12/30/2010 - 13:04
ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का? नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही.....

In reply to by पिवळा डांबिस

चिगो गुरुवार, 12/30/2010 - 17:33
>>ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का? नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही..... अरारा... अवो पिडाकाका, फ्फॉक्कन फुटलो हो मी.... =))

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/30/2010 - 15:08
ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का?
क ह र ! =)) =)) पिडांकाका ती स्वाक्षरी आहे म्हणे त्यांची.
पण तुमचं आमचं सेम नसतं..
खरे आहे :P काहीना काही फरक असतोच.

सूर्यपुत्र गुरुवार, 12/30/2010 - 17:53
एका मस्त प्रसंगाची आठवण करून दिली आहे. एकदा कॉलेजमधे एका मुलीने (जी सर्वांच्या दिलाची धडकन वगैरे होती );"Friendship Day" च्या दुसर्‍या दिवशी (कारण रविवार होता), मी कॉलेजमधे व्हरांड्यात निरीक्षण करत होतो, तेव्हा मला भर गर्दीत गाठले. आणि एकदम "Hi, Happy Friendship Day" म्हणत शेकहॅन्ड केला. आजूबाजूला असणारे सर्वजण टुकुर-टुकुर बघताहेत..... आणि आमच्या पोटातील मिक्सर सकाळचा ब्रेकफास्ट पचवण्याचे काम नॉर्मल स्पीडलिमिट कधीच क्रॉस करून शंभरपट वेगाने आपले काम करू लागला होता.....

किचेन Wed, 11/16/2011 - 17:29
आपली शाळा मुलींची आणि कोलेज बी मुलीन्च्च!त्यामुळे हि असली संधी कधी आलीच नाही. :( कामावर मात्र पोर होती.स्मार्त व्हती,कधी नव्ह ती हुशार बी व्हती! त्यामुळच बा माझा रोज सकाळच्याला न सांच्याला घ्यायला यायचा मला.त्यामुळ इथ्बी की फायदा झाला न्हायी.शेवटी गयी जवानी पाणी मै .. :(

In reply to by किचेन

वपाडाव Wed, 11/16/2011 - 17:46
तुम्ही तुमचं मन मोकळं केलंत हे फार्फार बरं केलं.... एक शंका :: आपल्या पिताश्रींनी कधी आपल्याला ड्वळ्याच्या झडपा उघडु दिल्या नाहीत, म्हणुन तर नाही तुम्ही हल्ली लग्न लावुन देण्याच्या बहाण्याने तरणे-चिकणे मुलं बघत असता....
3

नातं

शुचि ·

मुक्तसुनीत गुरुवार, 12/16/2010 - 03:45
लेखात मांडलेला दृष्टिकोन रोचक आहे. मैत्री, साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार आदि अनेक गोष्टी अपेक्षीत असतात. हेच जर लग्नातून मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तर दुसर्‍या नात्यातून ते मिळवायला काय हरकत आहे? कारण प्रत्येकाला लग्न उधळून देता येईलच असे नाही. असे असेल तर माणसे अशा लग्नसंबंधापासून दूर नक्की का जात नाहीत ? उपरोल्लेखित गोष्टी म्हणजेच लग्न असा माझा समज आहे. यापैकी काहीही अस्तित्त्वात नसेल तर लग्न नावाचे काहीच अस्तित्त्वात नाही. "उधळून" लावायच्या आधीच लग्न संपलेले आहे, इतकाच याचा अर्थ.

In reply to by मुक्तसुनीत

विंजिनेर गुरुवार, 12/16/2010 - 07:17
"उधळून" लावायच्या आधीच लग्न संपलेले आहे, इतकाच याचा अर्थ.
त्यांना बहुदा समाजाच्या दृष्टीकोनातून(किंवा कायदेशीर - कागदोपत्री) अस्तित्वात असलेले लग्न अभिप्रेत असावं. कारण असं पोकळ का होईना पण असलेलं लग्न समाजात वावरताना सोयिस्कर/श्रेयस्कर असावं (प्रेयस्कर नसलं तरीही).

In reply to by विंजिनेर

टारझन गुरुवार, 12/16/2010 - 11:01
वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता.
हे कडवं सर्वाधिक आवडलं !! -(%%%%) ^%%#@#

In reply to by पिंगू

स्पा गुरुवार, 12/16/2010 - 07:02
मुक्तक काही पचनी पडलं नाही. पाटणकर काढा घ्या.. पोट साफ होईल मस्त शुची .... एकदम छान लिहिलं आहेस . हल्ली online मैत्री पण याचमुळे वाढतेय का?

अश्या गोष्टी समाजात घडतात .पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतात तर सर्वात जास्त .अर्थात येथे प्रतारणा करणारे बहुतेक करून पुरुष असतात .लग्न झाल्यावर काही वर्षात संसारात गोडी वाटत नसेल तर विभक्त होणे भारतातील अनेक स्तरीय कुटुंबव्यवस्थेत शक्य नसते .समाजात हा ट्रेंड नाही आहे .मग अश्या पुरुषांसाठी डान्स बार अथवा विवाहबाह्य संबंध असतो .कारण शरीर सुख हेच काही ह्या संबंधाचा स्त्रोत नसतो तर भावनिक दृष्ट्या त्यांना आधार हवा असतो .अगदी काही दशकांपूर्वी आपल्या कर्मठ समाजात सुध्धा रखेली असणे हे काही आपल्याला नवीन नाही .अर्थात आता स्त्री पुरुष समानतेच्या काळात महिलांकडून अश्या गोष्टी घडल्या तर नवल नसावे . मी विवाहबाह्य संबंधाचे समर्थन करत नाही आहे .पण एखादी व्यक्ती आनंदी राहत असेल .व त्यात त्यांचे कुटुंब विभक्त न होता मुलांना पालक व त्यांचे प्रेम आधार मिळत असेल .तर त्याला कोण हरकत घेणार ? शेवटी समाधान मानण्यावर असते .जगात प्रत्येकाला आनंदी राहायचा अधिकार आहे .वल्ड इज नॉट इनफ (बॉंड सिरीज ) मधील एक पात्र म्हणते .' देअर नो पोइंत ऑफ लिविंग इफ यु कान्ट फील द लाइफ. हेच वाक्य टायटल ट्रक मध्ये आहे . (जे गार्बेज ह्या स्कॉटिश गायिकेने स्वर बध्द केले आहे .)

In reply to by निनाद मुक्काम …

ज्ञानेश... Sun, 12/19/2010 - 10:54
मग अश्या पुरुषांसाठी डान्स बार अथवा विवाहबाह्य संबंध असतो .कारण शरीर सुख हेच काही ह्या संबंधाचा स्त्रोत नसतो तर भावनिक दृष्ट्या त्यांना आधार हवा असतो . डान्स बारमधे 'भावनिक' आधारसुद्धा मिळतो?

गवि गुरुवार, 12/16/2010 - 07:00
प्रेम,मैत्री वगैरे छंद आहेत,लग्न म्हणजे नोकरी रोजगार आहे.छंद वगैरे ठीक,नोकरी हवीच, अशीच सबकॉन्शस प्रतिमा लग्नाची खोलवर झालेलीच आहे. अर्थातच हे हवंहवंसं अटेन्शन,मैत्री,मानसिक गरज वगैरे केवळ ती व्यक्ती 'नवरा' नाही आणि बाहेर थोडावेळ भेटतात,म्हणून टिकून आहे. बाकी लग्न हे प्रेम करुन करा किंवा ठरवून. प्रेमाची पहिली तीव्रता कधीच टिकून राहणार नाही. एकत्र नुसते राहू जरी लागले तरी आरुनफिरुन मागील दाराने अतिपरिचयात अवज्ञा,उपेक्षा,कंटाळा,रस संपणे,नात्याचे चिपाड होणे,पेप्सीतले बुडबुडे संपणे हे सर्व पुन:प्रवेश करेलच.हे सर्व नुसते एकत्र राहून. लग्न करताना तरी आवडी शेअर करणारा अशा दृष्टीने कितीजण (आणि जणी) स्थळ बघतात?त्या तर त्याचे "राहण्याचे स्थळ" पहात असतात. केवळ अमेरिकेच्या स्वर्गात तो तिला ठेवू शकेल म्हणून डाव मांडणा-या कमी असतील? आणि तो तरी काय पाहतो? गोरी सुंदर वगैरे हेच. if basis are these, तर मग नव्याचे दिन संपले की असे चष्मा नाकावर घेऊन अटेंशन किती वर्षे अपेक्षावे? लग्न म्हणजे तर फार मोठा व्यवहार आहे. ते काँट्रॅक्ट आहे.बाकी लेख उत्तमच.

In reply to by भाऊ पाटील

स्वैर परी गुरुवार, 12/16/2010 - 19:23
अगदी मनातले लिहिलेत! स्वानुभव नाही, परंतु मला देखील असे वाटते, कि लग्न झाल्यानंतर बहुदा सगळे "आता केलय ना, मग चालुद्या पुढे" अशा भावनेने संसाराचा गाडा हाकत असावेत. अपवाद असतीलहि काही, पण हाताच्या बोटावर मोजण्याईतके! बाकि, लेख तर सुरेखच, लिखाणाची शैली आवडली.

In reply to by गवि

@लग्न करताना तरी आवडी शेअर करणारा अशा दृष्टीने कितीजण (आणि जणी) स्थळ बघतात?त्या तर त्याचे "राहण्याचे स्थळ" पहात असतात. केवळ अमेरिकेच्या स्वर्गात तो तिला ठेवू शकेल म्हणून डाव मांडणा-या कमी असतील? आणि तो तरी काय पाहतो? गोरी सुंदर वगैरे हेच. if basis are these, तर मग नव्याचे दिन संपले की असे चष्मा नाकावर घेऊन अटेंशन किती वर्षे अपेक्षावे? लग्न म्हणजे तर फार मोठा व्यवहार आहे. ते काँट्रॅक्ट आहे +१ अप्रतिम भाषेत भावना व्यक्त केल्या तुम्ही ह्याच भावना पद्यात म्हणजे कांदेपोहे ह्या सिनेमाचा चा टायटल ट्रेक

नेत्रेश गुरुवार, 12/16/2010 - 07:06
* साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार या गोष्टी मैत्रीला परिपुर्ण करणार्‍या असुन मैत्रीचाच भाग आहेत. आता या मैत्री मध्ये नवर्‍यापासुन लपवण्यासारखे काय आहे? की खरेच काही लपवण्यासारखे आहे जे ईथे लिहीले नाही? * कदाचित आत्ता नसेल पण भविष्यात असु शकेल या आशेपोटी लपवाछपवी चालली आहे? आत्ता विवाह तोडता येत नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा बॅकप असावा म्हणुन? (बॅकप भावनिक आधारासाठी, जमल्यास अधीक गोष्टींसाठी) * की काही 'थ्रील' म्हणुन चोरुन भेटणे चालु आहे? पण पकडले गेली तर 'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारा आना' अशी अवस्था.

इंटरनेटस्नेही गुरुवार, 12/16/2010 - 07:46
आवडलं. शुचिताईंच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य आहे की त्या जेव्हा लिहतात तेव्हा नुसतं पांढर्‍यावर काळं करत नाहीत, तर कथाविषय आपल्या समोर जणु प्रत्यक्ष घडतेयं असा मांडतात. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

In reply to by शिल्पा ब

इंटरनेटस्नेही Fri, 12/17/2010 - 02:29
अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद ! आपले कार्यबाहुल्य आटोपले वाटतं ;) धन्यवाद! ;) - (रिकामटेकडा) इंट्या.

मनीषा गुरुवार, 12/16/2010 - 09:18
प्रत्येक नात्यात माणूस वेगवेगळा असतो.., वेगळा वागतो. तुम्हाला आवडणारा हा मित्रं नवरा म्हणून कसा असेल? कसा वागेल ? माहित नाही . सो फार सो गुड. कुढत / रडत स्वतःची प्रतारणा करत जगण्यापेक्षा मी नवर्‍याशी प्रतारणा करून जगणं स्वीकारलं आहे हे फारसं आवडलं नाही शेवटी -- known devil is better than unknown friend .

In reply to by मनीषा

पैसा गुरुवार, 12/16/2010 - 19:41
हेच म्हणते. जरी कथा काल्पनिक असली तरी, नवर्‍याची फसवणूक करणे हे न पटणारे आहे. फसवणूक करण्याची जरूर वाटावी, याचा अर्थ या महिलेची मित्राबद्दलची भावना परदर्शक नसावी. आताच्या काळात मित्र/मैत्रीण कोणाचेही (नवर्‍याचे/बायकोचे) असू शकतात. त्यात लपवण्यासारखं काय आहे? उलट बरेचदा, काही काळाने असा मित्र नवर्‍याचाही मित्र होऊन जातो. नवर्‍याबरोबरचं आपलं नातं रुक्ष का झालं याचा या उदाहरणातील महिलेने देखील विचार करायची गरज आहे. टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. तिने जर हात पुढे केला तर ते नातं अजून सुधारू शकेल. आपल्या अशा मित्राबद्दल आपण आपल्या मुलाना सांगू शकतो का, याचा एकवेळ प्रामाणिक विचार केला तरी बर्‍याच गोष्टी आपाआपल्या जागी जातील.

In reply to by पैसा

इंटरनेटस्नेही Fri, 12/17/2010 - 02:47
उलट बरेचदा, काही काळाने असा मित्र नवर्‍याचाही मित्र होऊन जातो. हेच म्हणतो. - (मैत्रीणीच्या बॉयफ्रेंड बरोबर बीअर पिणारा, आणि नंतर मैत्रीणीच्या शिव्या खाणारा) इंट्या.

वेताळ गुरुवार, 12/16/2010 - 09:45
विचार करायला लावणारे व काळजाचे ठाव घेणारे मुक्तक आहे.माणुस हा कितीही झाले तरी एक प्राणी आहे व तो त्या वळणावर नक्कीच जाणार हे लेखिकेने अतिशय सुंदर शब्दात मांडले आहे.लग्न हा एक नात्याचा सोन्याचा पिंजरा आहे . हे सत्य खुप कमी लोकाना उमगते.विवाहबाह्य संबधाना नाके मुरडणार्‍या तथाकथिक समाज ठेकेदारांच्या तोडावर एक सणसणीत चपराक इथे नायिका मारते आहे. विवाहबाह्य संबध चांगले कि वाईट ह्या गर्तेत अडकलेल्या नवोदिताना हा लेख योग्य मार्गदर्शन करतो (माझा मेल आयडी हवा असेल तर व्यनी करा).छोटयाच लेखात लेखिकेला बरेच प्रश्न विचारात घेता आले नाहीत तरी पुढील लेखात त्यावर लेखिका योग्य तो प्रकाश टाकतीलच.जीवनातले खुपच अभिजात व मौलिक मार्गदर्शन हा लेख करतो ह्या बद्दल कोणाचे ही दुमत नसावे.

समीरसूर गुरुवार, 12/16/2010 - 10:19
पण खूप महत्वाचा आहे, विशेषतः आजकालची जगण्याची धावपळ, शर्यतीत पुढे राहण्याची अहमअहिका, त्यातून संवादाला मिळणारा कमी वेळ, टीव्हीसारख्या सवतीचं किंवा सवत्याचं घरावर होणारं आक्रमण, निव्वळ चंगळवादावर आधारलेली सुखाची कल्पना, पब मध्ये तीन तास नाचलो, पाच पेग दारू प्यालो, सिगारेटी फुंकल्या, बेहोश होऊन घामाच्या धारा पुसत ठणठणणार्‍या कर्कश संगीतावर नाचलो म्हणजे मला अमाप सुख मिळाले अशा हास्यास्पद कल्पना...अशा कित्येक बाबींमुळे आपआपसातला संवाद कमी होतोय. शिवाय नैसर्गिक उर्मी, बदलाची ओढ, आयुष्यात काहीतरी वेगळं असण्याची धडपड यामुळे अशी अनामिक ओढ पुरुषाला किंवा स्त्रीला कुणाकडे तरी ओढत असावी. ही ओढ नैसर्गिकच असावी असे वाटते. शेवटी माणूस हा एक प्राणी आहे. पण माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे म्हणून कुठे थांबायचे, कुठली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही हे ठरवता आले म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते.

गवि गुरुवार, 12/16/2010 - 10:31
आवडलं. Only except for: >>>>>>>>>>> कुठली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही हे ठरवता आले म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते. >>>>>>>>>>> Question: कुठली लक्ष्मणरेषा नाही ओलांडायची ? शारिरिक ओलांडली तर प्रतारणा,वाईट.मनांची ओलांडली तर मर्यादा राखली असे ?

नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 11:16
मुक्तक आवडलं. काल्पनिक असल्यामुळे ठीकच आहे. :) प्रत्यक्ष असेल तर 'तोल ढळत नाही ना?' यावर बारीक लक्ष ठेवणे चांगले. कारण त्या व्यक्तीच्या "आहारी जात असल्याची" चिह्ने दिसत आहेत. विशेषतः चोरून भेटण्याची कृती.

In reply to by नितिन थत्ते

समीरसूर गुरुवार, 12/16/2010 - 14:22
प्रत्यक्षातली अशी नाती हाताबाहेर गेल्याची काही उदाहरणे मला माहित आहेत. आयुष्यात भयंकर उलथापालथ घडवून आणतात असल्या गोष्टी. पण एखादा चांगला मित्र असणे किंवा मैत्रीण असणे यात काही वावगे नाही. आपल्या भावना कुठल्याच नात्याच्या अपेक्षांचे ओझे न बाळगता कुणासोबत शेअर करता आल्या तर असल्या मैत्रीमध्ये काही वावगे नसावे. पण म्हणतात ना, एक परका पुरुष आणि एक परकी स्त्री यांच्यातले नाते कधीच निखळ मैत्रीचे वगैरे असत नाही. काही अंशी शारीरिक आकर्षण असल्याशिवाय स्त्री आणि पुरुष एकमेकांकडे ओढले जाऊ शकत नाहीत. इन फॅक्ट, पुरुष आणि स्त्री यांच्यातली एकमेकांविषयी असलेली सुप्त ओढ ही एक खूप हळवी आणि नाजूक भावना आहे. खूप नैसर्गिक आहे ते. म्हणूनच मानलेला भाऊ किंवा मानलेली बहीण या नात्यांवर माझा तितकासा विश्वास नाही. शाळेत असतांना मुलींकडून राख्या बांधून घेणे हा एक तसलाच भंपक प्रकार होता. ज्या मूर्ख लोकांनी हा प्रकार सुरु केला असेल ते खरच संत असतील. ज्या मुलीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घ्यायची त्याच मुलीवर मग बाकीचे दिवस लाईन मारायची असले प्रकार सर्रास व्हायचे. आणि ते त्या वयात होणारच, किंबहुना ते कुठल्याही वयात होणारच... निसर्ग नियम आहे तो... तो नियम जर तसा नसता तर जग किती रुक्ष आणि कोरडे होऊन गेले असते याची कल्पना करु शकत नाही.

नगरीनिरंजन गुरुवार, 12/16/2010 - 13:25
>>वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता. हे आधी बरोबर वाटले पण तो बॅचलर आहे हे वाचल्यावर वरील वाक्य विचित्र वाटले. या नात्यातून नक्की काय हवे आहे हा प्रश्न पडला. 'कुगार'पणा करणार्‍या स्त्रीला असा पुरुष नक्कीच पसंत पडणार नाही आणि एक मित्र म्हणून संवेदनशील आणि स्त्रियांचे मन समजून घेणारा हवा असेल तर ते गुण एका बॅचलर (तेही चाळिशीच्या) पुरुषात कदापिही सापडणार नाहीत. हे नातं नसून स्त्रीच्या बाजूने एक रूटीनच्या कंटाळ्यावरची रिअ‍ॅक्शन किंवा इन्फॅच्युएशन किंवा सेवन यिअर इच असण्याचा संभव अधिक वाटतो आणि पुरुषाच्या बाजूने एक फ्लिंग.

गणेशा गुरुवार, 12/16/2010 - 17:35
कथेतील नायिकेला प्रेम .. भावनात्मक गुंतवनुक .. मैत्री .. आधार ..स्नेह हे तीच्या नवर्याकडुन मिळत नाही .. म्हणुन ह्या सर्व गोष्टींमुळे ती दुसर्या पुरुषाकडुन हे मिळवत असतानाचे तीचे चित्रण छान दाखविले आहे .. आवडले .. परंतु नविन साथीदार हा मित्र म्हणुन या सर्व गोष्टी देतो आहे .. कारण मित्र हे नातच खुप ग्रेट आहे .. ते कधी कधी पती या नात्यापेक्षा ही श्रेष्ठ ठरते .. परंतु येथे मैत्रीच्या पलीकडील आकर्षण ही आहे .. आकर्षणं हे मैत्री नावाच्या कमळात असलेला काळसर भुंगा आहे .. त्या मैत्रीची गोडी तो शोषुन घेवु शकतो .. ह्या गोष्टीची जान ही नायिकेने ठेवले पाहिजे असे वाटते ... अवांतर : लग्न म्हणजे काय ? पुण्यात राहत असताना फार तर कात्रज - हडपसर वाला नवरा चालेल .. कींवा ठाण्यात राहताना फारतर कल्यान - डोंबीवली चालेल असे दृष्टीकोण बदलले पाहिजे .. सिनेमा गृहात अंधारात हातात हात घेवुन पाहिलेले चित्र आणि उजेडात ..संसारात एकमेकांत निभवायचे नातं हे नक्कीच वेगळे असते, हे जाणले पाहिजे पुरुषाने ही शरीरापलीकडे ..गोर्‍या कातडि कडे न बघता .. मनाचा ठाव घेणे गरजेचे आहे.. आणि हे ज्यांना जमते तेच खर्या मैत्रीचा अर्थ पाहु हि शकतात .. वेगवगळी नाती हि अशेच असतात ... एकमेकात गुंतलेले .. पती हे नातं ही असेच आहे .. मित्र.. सखा .. नवरा .. वडिल .. या सर्व नात्यांचे मिश्रण म्हणजे पती ... योग्य पती/पत्नी होणे म्हणजे सर्व नात्यांचे रेशमी धागे जपण्यासारखे आहे असे वाटते .. ---------------

यकु गुरुवार, 12/16/2010 - 20:08
मुक्तक काल्पनिक असले तरी समाजात वास्तवात जे घडते ते समोर मांडण्याची रिस्क लेखिकेने घेतली आहे. त्याबद्दल अभिनंदन!! माझे व्यक्तिशः निरिक्षण असे आहे की काहीकाळानंतर असा तथाकथित मित्र देखील बेचव ठरतो आणि या मुक्तकात लग्नाचे जे झाले आहे तेच अशा मैत्रिचे होते. आगे क्या होता है? मग पुढे असलेच मित्र शोधण्याची गरज (!) निर्माण होते... ( चटक लागते? ) आणि मग पुढे बसणारे अनेक शिक्के पचवायला तयार व्हावे लागते.

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/16/2010 - 22:20
लिखाण आवडलं, विचार पटलेच असं नाही. असा कोणी मित्र असण्यात वावगं मला तरी वाटत नाही. पण कथानायिकेने ही गोष्ट नवर्‍याला सांगितली नसेल तर मात्र मला ते चूक वाटतं; (म्हणजे असा कोणी माझा मित्र असेल तर ते माझ्या नवर्‍यापासून लपवून ठेवणार नाही). अर्थात कथेत नवर्‍याला ही गोष्ट सांगितली आहे, वा नवर्‍यापासून लपवली आहे असा स्पष्ट उल्लेख नाही. स्त्री-पुरूषांचीही मैत्री होणं सहाजिक आहे, आणि समीरसूर म्हणतात त्याप्रमाणे सुप्त आकर्षणामुळेही अशी मैत्री होऊ शकते. त्यात अनैसर्गिक काहीही नाही. पण मैत्री मैत्रीच्याच पातळीवर ठेवणं आणि सर्वच नातेसंबंधांमधे आवश्यकतेएवढी पारदर्शकता ठेवणं हे जास्त महत्त्वाच!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिक गुरुवार, 12/16/2010 - 22:39
अदितीच्या मताशी खूप सहमत आहे. मलाही अश्या मैत्रीमधे काही वावगं वाटत नाही, पण तुम्ही काय करता किंवा तुमच्या मित्रांबद्दलची माहिती तुमच्या जोडीदाराला असायला हवी. मुक्तकातील नायीका म्हणते की प्रत्येकालाच लग्न उधळून लावता येईल असे नाही... पण जे नातं विश्वासावर जोपासल्या गेलंय (?) त्यात अशी अपारदर्शकता का असावी? शिवाय या नवीन नात्याबद्दल जोडीदाराला कळल्यावर त्याला तुमचं नातं हे फक्त मैत्रीपुरतंच मर्यादीत आहे हे कसं कळावं किंवा फक्त मैत्री आहे यावर विश्वास तरी का ठेवावा? अजून एक शंका म्हणजे नायीकेच्या मित्रालाही फक्तं मैत्रीच हवी आहे की अजून पुढे काही? आणि कालांतराने ह्या मैत्रीमधेही कोरडेपणा येणार नाही याची खात्री काय? ही मैत्री जोपासण्यापे़क्षा मी जोडीदाराबरोबर निर्माण झालेल्या कोरड्या नात्यात पुन्हा ओलावा कसा आणता येईल याचा प्रयत्न करीन.

रन्गराव गुरुवार, 12/16/2010 - 22:51
वर लई भावनात्मक आणि सात्विक कॅटेगिरीतले प्रतिसाद आले आहेत. स्त्रियांच्या थोड्या अनप्रिडेक्टेबल मनोवृत्तीचा विचार केला तर थोडे वेगळे निष्कर्श काढता येतात. १. स्त्रीयांना पुरूषांना कंट्रोल मध्ये ठेवायला आवडत. ज्यांना कंट्रोल करायला अवघड असत असे पुरूष अजून जास्त आवडतात. पण ज्यादिवशी ती त्याला मुठीत आणते, थ्रील संपलेलं असत कदाचित. आणि जर कथेतल्या स्त्रीचा पती पत्नीची प्रत्येक गोष्ट बिनविरोध ऐकणारा असेल तर तो फार इंटरेस्टींग प्राणी नसेल. मग कंट्रोल करायला कुणी ईंट्रेस्टींग सापड्ला की त्याच्यावर वर्चस्व मिळवायची धडपड. स्मार्ट स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त होतं. कारण त्यांना नेहमी काही ना काही आवाहन हव असतं. चाळीसाव्या वर्षीही लग्न वगैरे असल्या कचाट्यात न पडणारा स्वच्छंदी प्राणी म्हणजे भारीच आवाहन असणार. आणि त्याच कामच्या वेळी तिला भाव न देण पण इतर वेळी हसवण ही सगळी त्याच्या वांड असण्याची लक्षण. किती ताणायचं ते परफेक्ट माहीत असणारा माणूस. २. चोरून भेटणे वगैरे गुंता: आपल्या पतीला उगाच इनसेक्युअर फील होउ नये म्हणून घेतलेली एक काळजी असू शकते. हो आणि आता त्या नात्यामध्ये लक्ष्मण रेखा काय ती त्याच ओलांडण. जरा जास्तीच अतिरंजक वाटल. जर आयुष्यात कधी एखादी बाई बॉस म्हणून मिळाली तर तिला हो ला हो म्हणायचा गाढवपणा करू नका, सुरुवातीला छान जमेल पण काही दिवसान ती एकतर दुसर्या इंट्रेस्टींग एम्प्लोयीवर खूष होईल किंवा तुमचा गुलामासारखा वापर करेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रन्गराव गुरुवार, 12/16/2010 - 23:01
तुमची प्रतिक्रिया वाचून तर स्मायली पण रडायला लागल्या आहेत म्हणून टाकल्या नाहीत. :( ही खाली पडून हसण्याची स्मायली होती बघा काय केलत त्याचं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रन्गराव गुरुवार, 12/16/2010 - 23:14
जास्ती नादाला लागू नका नाहीतर कथेतल्या नायिकेसारखा व्हायच (इथ तर डोक्यावरचे सगळे केस शिल्लक असलेला बॅड बॉय आहे)! वर जे काही लिहिलं आहे त्याचा स्वत:च पुरावा बनाल!

In reply to by रन्गराव

रेवती Fri, 12/17/2010 - 01:26
वैयक्तिक शेरेबाजी टाळा रन्गराव! तुमच्या खासगी आयुष्याचा अदितीने कुठेही उल्लेख केलेला नसताना आपण अशी प्रतिक्रिया देत आहात.

In reply to by रन्गराव

नीट समजलं नाही. "नीट अभ्यास केलात तर लोळून हसणार्‍या इमोटीकॉनचा एच्टीएमेल कोड लिहीता येईल" असा सल्ला देण्याचा आणि (सो कॉल्ड) बॅड बॉय मित्र असण्याचा काय संबंध? पण तुम्ही काही लिहीलं आहेत म्हणजे एकदम 'फनी-फनी' असणार म्हणून हसून घेते.

In reply to by रन्गराव

नितिन थत्ते Fri, 12/17/2010 - 08:19
सदर आयडी इगोसेण्ट्रिक असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या मालिकेतच लक्षात आले होते. ते येथे परत दिसून येत आहे. प्रतिसाद वैयक्तिक वाटत असल्यास उडवावा.

In reply to by शिल्पा ब

स्वानन्द Sun, 12/19/2010 - 18:20
केवढी ती घाई भांडण्याची! जाऊ दे तुम्ही असंच हो ला हो म्हणत रहा हो..भांडायला मिळाल्याशी मतलब ;)

बेसनलाडू Fri, 12/17/2010 - 00:27
आज कल चे लव हे असेच असते, हे पचवणे त्या नावाचा चित्रपट पाहताना जड गेले; पण हा लेख वाचून ते पटवून घ्यायला अजिबात कष्ट पडले नाहीत. सैफ अली खानच्या प्रेमापोटी लग्न झालेल्या दिवशीच नवर्‍याचा त्याग करणारी आणि तो करताना "चाहिये तो मैं वापस आकर तुम्हें सॉरी बोलुंगी" असे नवर्‍याला ऐकवणारी दीपिका पडुकोण हे जर आजच्या स्त्रीचे प्रतीक असेल, तर संपलेच. सध्या तरी तिला (पक्षी त्या व्यक्तिरेखेला) आधुनिक स्त्रीचे प्रतीक न समजता अपवादच समजतो आहे. स्त्रियांच्या मानसिक सशक्तपणाचे, कणखरपणाचे गुणगान आजवर ऐकून होतो; पण लेखातील स्त्रीच्या विचारांनी या गुणगानाचा पुनर्विचार करायला भाग पाडले. (प्रेक्षक)बेसनलाडू मित्रत्त्वाचे नाते, जोडीदार (नवरा/बायको) म्हणून असलेले नाते आणि निव्वळ आकर्षण यांचा सारासार विचार न होता मोठी गल्लत होते आहे की काय, असे वाटून गेले. मागे एकदा विवाहबाह्य संबंधांवरील धाग्यावर कोणीतरी 'जोडीदाराच्या माहितीबाहेर आणखीही कोणी (प्रतिजोडीदार म्हणून) आयुष्यात असणे काही गैर नाही' याचे समर्थन केले होते, तेव्हा खूप मोठा धक्का बसला होता. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे 'मर्यादा' फक्त शारीरिक पातळीवर असेल आणि ती ओलांडणे पाप वाटत असेल, तर तो फार संकुचित विचार आहे. शरीराने मर्यादा ओलांडली नसेल, पण मनाने आधीच ओलांडली असेल, तर तेथेच जोडीदाराबरोबरचे नाते संपले आहे, असे म्हणण्यात काय गैर आहे? असो. (विचारवंत)बेसनलाडू 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हे सहजच आठवले. लेखात वर्णन केलेल्या फुलपाखरी नात्यामागे सुसाट धावणार्‍यांनी लक्षात ठेवावे असे. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

शिल्पा ब Fri, 12/17/2010 - 00:41
नवीन हिंदी पिच्चर पाहणे सोडा...मनावर वाईट परिणाम होईल ;) आणि पिच्चर मधल्या गोष्टी खऱ्या नसतात...आवडत नसला तरी लग्न झाल्यावर बायका राहतात त्याच्याबरोबर...कमीतकमी भारतीय बायका तरी... स्वतःचे लग्न बरे वाईट कसे का असेना, ते सोडून गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंडशी लग्न करणारा/ री अजूनतरी पाहण्यात नाही...लोक दुसरी बायको करतात (कायदा इथे काढू नका) पण दुसरा नवरा करायची सोय नाही...काय तो विचार आधी करून मगच पाऊल उचलावे...नुसतंच थ्रील हवं असेल तर sky diving , rock climbing वगैरे प्रकार आहेत..बाकी ज्याची त्याची मर्जी. पण सहसा नवऱ्याला बायकोचा मित्र पचनी पडत नाही हेच खरं..

In reply to by शिल्पा ब

बेसनलाडू Fri, 12/17/2010 - 01:01
कायद्याच्या परवानगीबाहेर दुसरी बायको करणारे नवरे आहेत तशाच दुसरा नवरा करणार्‍या बायकाही असतीलच की; नसतील कशावरून? (जिज्ञासू)बेसनलाडू बाकी थ्रिल्स बाबत सहमत. (सहमत)बेसनलाडू आणि 'सहसा' या वाक्यातून प्रतीत होणार्‍या शेवटच्या वाक्यातील जनरलायजेशनशी असहमत :) बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्‍याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते ;) बायकोचा डबल उद्धार तिच्याच पुढ्यात करण्याची सुवर्णसंधी याव्यतिरिक्त कोणती असेल? ;) (सर्वांनी ह. घ्या.) :) (असहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

शिल्पा ब Fri, 12/17/2010 - 01:06
कायद्याच्या परवानगीबाहेर दुसरी बायको करणारे नवरे आहेत तशाच दुसरा नवरा करणार्‍या बायकाही असतीलच की; नसतील कशावरून? असतील की...पण सर्रास नाही...परदेशात असे प्रकार चालतात असे ऐकुन आहे...जर्मनीतील निनाद हे अधिक सांगु शकतील. बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्‍याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते होतेच असं नाही...बर्‍याचदा तसे नसते...नुसतं वाटुन काय होतंय का? चालायचंच

In reply to by शिल्पा ब

http://www.yourdictionary.com/boy-toy युरोपात सगळे लोण अमेरिकेतून येत बॉय टोय का काही तरी म्हणतात बुंआ अश्या प्रकाराला

In reply to by बेसनलाडू

आणि 'सहसा' या वाक्यातून प्रतीत होणार्‍या शेवटच्या वाक्यातील जनरलायजेशनशी असहमत Smile बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्‍याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते Wink बायकोचा डबल उद्धार तिच्याच पुढ्यात करण्याची सुवर्णसंधी याव्यतिरिक्त कोणती असेल?
(असहमत)बेसनलाडू यांच्याशी सहमत. तसेच नवर्‍याच्या मैत्रिणीसोबत बसून नवर्‍याच्या नावाने खडेफोड करण्यासारखी दुसरी संधी नाही ... असं माझ्या काही मित्रांचा पश्चात्ताप पाहून मत झालेलं आहे. तर मग बेला, कधी भेटवतो आहेस तुझ्या बायकोला?? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्मिता. Sun, 12/19/2010 - 10:46
बेला यांच्या प्रतिक्रियेतील अदितीने हायलाईट केलेल्या भागासकट पूर्ण प्रतिक्रियेशी सहमत.

In reply to by शिल्पा ब

नगरीनिरंजन Fri, 12/17/2010 - 07:16
विवाहबाह्य प्रेमप्रकरण आणि sky diving , rock climbing यातलं थ्रील सारखंच आहे? असेल तर मग एक नैतिक आणि दुसरं अनैतिक कशावरून ठरतं? एखाद्याचा/ची जोडीदार दुसर्‍या भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर sky diving , rock climbing करायला गेल्यास ते योग्य की अयोग्य? दुसर्‍या भिन्नलिंगी व्यक्ती बरोबर काय काय केलं म्हणजे ते नैतिक असतं आणि काय काय अनैतिक असतं? या जगात आपला/ली जोडीदार सोडून दुसर्‍या भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण कधीच न वाटलेला/ली मानव असेल?

In reply to by शिल्पा ब

नगरीनिरंजन Fri, 12/17/2010 - 08:23
ते मान्य. बहुतेकवेळा थ्रीलसाठीच असली प्रेमप्रकरणे होतात. घरकी मुर्गी हळूहळू दाल बराबर होते आणि मग बाहेरची दाल मुर्गीपेक्षा रुचकर वाटते. लवकर ओसरणारं असलं तरी यातलं थ्रील sky diving, rock climbing पेक्षा खूप जास्त असावं.

कवितानागेश Fri, 12/17/2010 - 00:45
लिहिण्याची शैली नेहमीप्रमाणेच छान. पण खरे तर 'मैत्री' म्हटली की तिथे 'स्त्री-पुरुष' फरक असतो का मला अजून कळले नाहीये. म्हणजे स्त्रियांची मैत्री स्त्रियांशी असली तर चालेल आणि पुरुषांशी असली तर उगीचच तिथे 'लैंगिकतेची किनार' जोडली जाईल (किंवा उलट ), असे प्रत्येकवेळेस का गृहीत धरायचे? ज्यांची मैत्री आहे, ते, व जे 'बाहेरून' बघतायत, ते, अशा सगळ्यांचाच हा गोंधळ दिसतो. कथानायीकेची मनस्थिती अशीच गोंधळाची वाटतेय. (अगदी वास्तववादी आहे! अशी मनस्थिती अनेकांची असते).विरुद्धलिंगी व्यक्तीशी असलेली मैत्री 'मैत्री' साठी आहे, की अजून कशासाठी हे जोपर्यंत व्यक्तीला स्वतःला समजत नाही, तोपर्यंत 'गिल्ट' पण सुरुच रहाते. कथानयिकेचा 'मित्र' बेपर्वाईएनी वागतो, हे 'चालते', पण नवरा बेपर्वाईनी वागला तर चालत नाहे, यातूनच खरे तर, नवरा-बायकोचे नाते खरच किती 'खोल' आहे हे कळते. त्यामूळे ही 'मैत्री' नसून 'बंडखोरी' वाटते! शिवाय पती-पत्नी दोघांनीही जोडीदाराकडून उगीचच अती-आदर्श वागणुकीच्या अपेक्षा ठेवल्या तर हा गोंधळ वाढतच जातो. मला वाटते, acceptance जितका जास्त, तितके नाते समृद्ध.

म्हणुन मी बरी न माझा नवरा बरा... नकोच ते मित्रबित्र्....हवित कशाला ती नसती लफडी. पटत नसेल तर सरळ घटस्फोट घ्यावा नाहितर ग्पगुमान घरात बसावे :( नान्स जरा जिमेलवर ये रे ;) =)) =))

शुचि Fri, 12/17/2010 - 02:05
लेखात दाखविलेल्या अप्रामाणिक वृत्तीचे समर्थन करण्याचा हेतू कुठेही नाही. हा केवळ कल्पनाविलास आहे. जेव्हा एखादं लग्नं टिकलेलं असतं तेव्हा कुठेतरी बारीक, रेशमी धाग्याच्या जीवावर ते तगलेलं असतं मग तो धागा मूल असो वा कधीकाळी नवर्‍याने केलेलं बायकोचं किंवा व्हाईसे व्हर्सा आजरपण असो. माझं स्पष्ट मत हे आहे की - लग्नाच्या बाहेर (शारीरीक) संबंध ठेवायचे असतील तर सरळ नवर्‍याची परवानगी घ्यावी जी की ९९% केसेस मध्ये मिळणार नाही अथवा मग घटस्फोट घेऊन काय ती स्वातंत्र्याची इच्छा पुरवावी. पण कल्पनेमध्ये आपल्याला हवं तसं वागायचं स्वातंत्र्य असतं आणि वरील मुक्तक हा केवळ कल्पनाविलास च आहे. समाजात किती लोक वरील बाईप्रमाणे वागतात त्याचा मला अजीबात अंदाज नाही ना जाणून घ्यायची इच्छा. पण काल अतिशय उद्विग्न मनोवस्थेमध्ये हे मुक्तक सुचले आणि मी ते लिहून काढले. आय फेल्ट ग्रेट आफ्टर धिस!!! मी यावर विश्वास ठेवते की गर्तेत कोसळायला प्रयत्न करावे लागत नाहीत पण आपण गर्तेत कोसळू नये, आपले अधःपतन होऊ नये , मिळालेली एखादी गोष्ट टिकावी याकरता मात्र सातत्याने प्रयत्न करावे लागतात मग ते लग्न का असेना. रोपाला नख लावणं सोपं असतं पण त्याला जपणं हे कठीण काम असतं. हे गाणं या संदर्भात आठवतं - I beg your pardon, I never promised you a rose garden. Along with the sunshine, There's gotta be a little rain sometimes.

In reply to by शुचि

रन्गराव Fri, 12/17/2010 - 08:41
चांगल केलत. काहीही चुकल नाही. तुमचा कल्पनाविलास हे तुमच राज्य! संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा. you needed to vent out and u did it. तुम्हाला बरं वाटल ना, झाल मग. प्रतिक्रिया मनावर घेऊ नकात. आणि इतका बोल्ड विषय हँडल केलात तोही इतक्या सुंदररित्या त्याचच कौतुक वाटत.

In reply to by रन्गराव

Pain Mon, 12/20/2010 - 09:23
संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा तुम्ही त्या लोकांना ओळखत नसताना आणि काहीही पुरावे नसताना त्यांनी सज्जनपणाचा मुखवटा चढवलाय आणि भोंदू आहेत असे बिनबुडाचे आरोप कशाला करता ? लेख कल्पनाविलासावर आहे हे सगळ्यांना माहिती आहेच, लोक प्रत्यक्षात घडणार्‍या/ घडू शकणार्‍या गोष्टींबद्दल बोलत आहेत. समजत नसेल तर विचारा आधी.

वेताळ Sat, 12/18/2010 - 10:02
आता पुढच्या लेखात त्यानी विवाहित पुरुषानी दुसर्‍या विवाहित स्त्रीयाना कसे पटवावे ह्याबद्दल फॅण्टसी लिहावी अशी विनंती करतो.कारण अश्या लेखाची खुप आवश्यकता आहे.

मुक्तसुनीत गुरुवार, 12/16/2010 - 03:45
लेखात मांडलेला दृष्टिकोन रोचक आहे. मैत्री, साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार आदि अनेक गोष्टी अपेक्षीत असतात. हेच जर लग्नातून मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तर दुसर्‍या नात्यातून ते मिळवायला काय हरकत आहे? कारण प्रत्येकाला लग्न उधळून देता येईलच असे नाही. असे असेल तर माणसे अशा लग्नसंबंधापासून दूर नक्की का जात नाहीत ? उपरोल्लेखित गोष्टी म्हणजेच लग्न असा माझा समज आहे. यापैकी काहीही अस्तित्त्वात नसेल तर लग्न नावाचे काहीच अस्तित्त्वात नाही. "उधळून" लावायच्या आधीच लग्न संपलेले आहे, इतकाच याचा अर्थ.

In reply to by मुक्तसुनीत

विंजिनेर गुरुवार, 12/16/2010 - 07:17
"उधळून" लावायच्या आधीच लग्न संपलेले आहे, इतकाच याचा अर्थ.
त्यांना बहुदा समाजाच्या दृष्टीकोनातून(किंवा कायदेशीर - कागदोपत्री) अस्तित्वात असलेले लग्न अभिप्रेत असावं. कारण असं पोकळ का होईना पण असलेलं लग्न समाजात वावरताना सोयिस्कर/श्रेयस्कर असावं (प्रेयस्कर नसलं तरीही).

In reply to by विंजिनेर

टारझन गुरुवार, 12/16/2010 - 11:01
वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता.
हे कडवं सर्वाधिक आवडलं !! -(%%%%) ^%%#@#

In reply to by पिंगू

स्पा गुरुवार, 12/16/2010 - 07:02
मुक्तक काही पचनी पडलं नाही. पाटणकर काढा घ्या.. पोट साफ होईल मस्त शुची .... एकदम छान लिहिलं आहेस . हल्ली online मैत्री पण याचमुळे वाढतेय का?

अश्या गोष्टी समाजात घडतात .पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतात तर सर्वात जास्त .अर्थात येथे प्रतारणा करणारे बहुतेक करून पुरुष असतात .लग्न झाल्यावर काही वर्षात संसारात गोडी वाटत नसेल तर विभक्त होणे भारतातील अनेक स्तरीय कुटुंबव्यवस्थेत शक्य नसते .समाजात हा ट्रेंड नाही आहे .मग अश्या पुरुषांसाठी डान्स बार अथवा विवाहबाह्य संबंध असतो .कारण शरीर सुख हेच काही ह्या संबंधाचा स्त्रोत नसतो तर भावनिक दृष्ट्या त्यांना आधार हवा असतो .अगदी काही दशकांपूर्वी आपल्या कर्मठ समाजात सुध्धा रखेली असणे हे काही आपल्याला नवीन नाही .अर्थात आता स्त्री पुरुष समानतेच्या काळात महिलांकडून अश्या गोष्टी घडल्या तर नवल नसावे . मी विवाहबाह्य संबंधाचे समर्थन करत नाही आहे .पण एखादी व्यक्ती आनंदी राहत असेल .व त्यात त्यांचे कुटुंब विभक्त न होता मुलांना पालक व त्यांचे प्रेम आधार मिळत असेल .तर त्याला कोण हरकत घेणार ? शेवटी समाधान मानण्यावर असते .जगात प्रत्येकाला आनंदी राहायचा अधिकार आहे .वल्ड इज नॉट इनफ (बॉंड सिरीज ) मधील एक पात्र म्हणते .' देअर नो पोइंत ऑफ लिविंग इफ यु कान्ट फील द लाइफ. हेच वाक्य टायटल ट्रक मध्ये आहे . (जे गार्बेज ह्या स्कॉटिश गायिकेने स्वर बध्द केले आहे .)

In reply to by निनाद मुक्काम …

ज्ञानेश... Sun, 12/19/2010 - 10:54
मग अश्या पुरुषांसाठी डान्स बार अथवा विवाहबाह्य संबंध असतो .कारण शरीर सुख हेच काही ह्या संबंधाचा स्त्रोत नसतो तर भावनिक दृष्ट्या त्यांना आधार हवा असतो . डान्स बारमधे 'भावनिक' आधारसुद्धा मिळतो?

गवि गुरुवार, 12/16/2010 - 07:00
प्रेम,मैत्री वगैरे छंद आहेत,लग्न म्हणजे नोकरी रोजगार आहे.छंद वगैरे ठीक,नोकरी हवीच, अशीच सबकॉन्शस प्रतिमा लग्नाची खोलवर झालेलीच आहे. अर्थातच हे हवंहवंसं अटेन्शन,मैत्री,मानसिक गरज वगैरे केवळ ती व्यक्ती 'नवरा' नाही आणि बाहेर थोडावेळ भेटतात,म्हणून टिकून आहे. बाकी लग्न हे प्रेम करुन करा किंवा ठरवून. प्रेमाची पहिली तीव्रता कधीच टिकून राहणार नाही. एकत्र नुसते राहू जरी लागले तरी आरुनफिरुन मागील दाराने अतिपरिचयात अवज्ञा,उपेक्षा,कंटाळा,रस संपणे,नात्याचे चिपाड होणे,पेप्सीतले बुडबुडे संपणे हे सर्व पुन:प्रवेश करेलच.हे सर्व नुसते एकत्र राहून. लग्न करताना तरी आवडी शेअर करणारा अशा दृष्टीने कितीजण (आणि जणी) स्थळ बघतात?त्या तर त्याचे "राहण्याचे स्थळ" पहात असतात. केवळ अमेरिकेच्या स्वर्गात तो तिला ठेवू शकेल म्हणून डाव मांडणा-या कमी असतील? आणि तो तरी काय पाहतो? गोरी सुंदर वगैरे हेच. if basis are these, तर मग नव्याचे दिन संपले की असे चष्मा नाकावर घेऊन अटेंशन किती वर्षे अपेक्षावे? लग्न म्हणजे तर फार मोठा व्यवहार आहे. ते काँट्रॅक्ट आहे.बाकी लेख उत्तमच.

In reply to by भाऊ पाटील

स्वैर परी गुरुवार, 12/16/2010 - 19:23
अगदी मनातले लिहिलेत! स्वानुभव नाही, परंतु मला देखील असे वाटते, कि लग्न झाल्यानंतर बहुदा सगळे "आता केलय ना, मग चालुद्या पुढे" अशा भावनेने संसाराचा गाडा हाकत असावेत. अपवाद असतीलहि काही, पण हाताच्या बोटावर मोजण्याईतके! बाकि, लेख तर सुरेखच, लिखाणाची शैली आवडली.

In reply to by गवि

@लग्न करताना तरी आवडी शेअर करणारा अशा दृष्टीने कितीजण (आणि जणी) स्थळ बघतात?त्या तर त्याचे "राहण्याचे स्थळ" पहात असतात. केवळ अमेरिकेच्या स्वर्गात तो तिला ठेवू शकेल म्हणून डाव मांडणा-या कमी असतील? आणि तो तरी काय पाहतो? गोरी सुंदर वगैरे हेच. if basis are these, तर मग नव्याचे दिन संपले की असे चष्मा नाकावर घेऊन अटेंशन किती वर्षे अपेक्षावे? लग्न म्हणजे तर फार मोठा व्यवहार आहे. ते काँट्रॅक्ट आहे +१ अप्रतिम भाषेत भावना व्यक्त केल्या तुम्ही ह्याच भावना पद्यात म्हणजे कांदेपोहे ह्या सिनेमाचा चा टायटल ट्रेक

नेत्रेश गुरुवार, 12/16/2010 - 07:06
* साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार या गोष्टी मैत्रीला परिपुर्ण करणार्‍या असुन मैत्रीचाच भाग आहेत. आता या मैत्री मध्ये नवर्‍यापासुन लपवण्यासारखे काय आहे? की खरेच काही लपवण्यासारखे आहे जे ईथे लिहीले नाही? * कदाचित आत्ता नसेल पण भविष्यात असु शकेल या आशेपोटी लपवाछपवी चालली आहे? आत्ता विवाह तोडता येत नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा बॅकप असावा म्हणुन? (बॅकप भावनिक आधारासाठी, जमल्यास अधीक गोष्टींसाठी) * की काही 'थ्रील' म्हणुन चोरुन भेटणे चालु आहे? पण पकडले गेली तर 'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारा आना' अशी अवस्था.

इंटरनेटस्नेही गुरुवार, 12/16/2010 - 07:46
आवडलं. शुचिताईंच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य आहे की त्या जेव्हा लिहतात तेव्हा नुसतं पांढर्‍यावर काळं करत नाहीत, तर कथाविषय आपल्या समोर जणु प्रत्यक्ष घडतेयं असा मांडतात. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

In reply to by शिल्पा ब

इंटरनेटस्नेही Fri, 12/17/2010 - 02:29
अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद ! आपले कार्यबाहुल्य आटोपले वाटतं ;) धन्यवाद! ;) - (रिकामटेकडा) इंट्या.

मनीषा गुरुवार, 12/16/2010 - 09:18
प्रत्येक नात्यात माणूस वेगवेगळा असतो.., वेगळा वागतो. तुम्हाला आवडणारा हा मित्रं नवरा म्हणून कसा असेल? कसा वागेल ? माहित नाही . सो फार सो गुड. कुढत / रडत स्वतःची प्रतारणा करत जगण्यापेक्षा मी नवर्‍याशी प्रतारणा करून जगणं स्वीकारलं आहे हे फारसं आवडलं नाही शेवटी -- known devil is better than unknown friend .

In reply to by मनीषा

पैसा गुरुवार, 12/16/2010 - 19:41
हेच म्हणते. जरी कथा काल्पनिक असली तरी, नवर्‍याची फसवणूक करणे हे न पटणारे आहे. फसवणूक करण्याची जरूर वाटावी, याचा अर्थ या महिलेची मित्राबद्दलची भावना परदर्शक नसावी. आताच्या काळात मित्र/मैत्रीण कोणाचेही (नवर्‍याचे/बायकोचे) असू शकतात. त्यात लपवण्यासारखं काय आहे? उलट बरेचदा, काही काळाने असा मित्र नवर्‍याचाही मित्र होऊन जातो. नवर्‍याबरोबरचं आपलं नातं रुक्ष का झालं याचा या उदाहरणातील महिलेने देखील विचार करायची गरज आहे. टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. तिने जर हात पुढे केला तर ते नातं अजून सुधारू शकेल. आपल्या अशा मित्राबद्दल आपण आपल्या मुलाना सांगू शकतो का, याचा एकवेळ प्रामाणिक विचार केला तरी बर्‍याच गोष्टी आपाआपल्या जागी जातील.

In reply to by पैसा

इंटरनेटस्नेही Fri, 12/17/2010 - 02:47
उलट बरेचदा, काही काळाने असा मित्र नवर्‍याचाही मित्र होऊन जातो. हेच म्हणतो. - (मैत्रीणीच्या बॉयफ्रेंड बरोबर बीअर पिणारा, आणि नंतर मैत्रीणीच्या शिव्या खाणारा) इंट्या.

वेताळ गुरुवार, 12/16/2010 - 09:45
विचार करायला लावणारे व काळजाचे ठाव घेणारे मुक्तक आहे.माणुस हा कितीही झाले तरी एक प्राणी आहे व तो त्या वळणावर नक्कीच जाणार हे लेखिकेने अतिशय सुंदर शब्दात मांडले आहे.लग्न हा एक नात्याचा सोन्याचा पिंजरा आहे . हे सत्य खुप कमी लोकाना उमगते.विवाहबाह्य संबधाना नाके मुरडणार्‍या तथाकथिक समाज ठेकेदारांच्या तोडावर एक सणसणीत चपराक इथे नायिका मारते आहे. विवाहबाह्य संबध चांगले कि वाईट ह्या गर्तेत अडकलेल्या नवोदिताना हा लेख योग्य मार्गदर्शन करतो (माझा मेल आयडी हवा असेल तर व्यनी करा).छोटयाच लेखात लेखिकेला बरेच प्रश्न विचारात घेता आले नाहीत तरी पुढील लेखात त्यावर लेखिका योग्य तो प्रकाश टाकतीलच.जीवनातले खुपच अभिजात व मौलिक मार्गदर्शन हा लेख करतो ह्या बद्दल कोणाचे ही दुमत नसावे.

समीरसूर गुरुवार, 12/16/2010 - 10:19
पण खूप महत्वाचा आहे, विशेषतः आजकालची जगण्याची धावपळ, शर्यतीत पुढे राहण्याची अहमअहिका, त्यातून संवादाला मिळणारा कमी वेळ, टीव्हीसारख्या सवतीचं किंवा सवत्याचं घरावर होणारं आक्रमण, निव्वळ चंगळवादावर आधारलेली सुखाची कल्पना, पब मध्ये तीन तास नाचलो, पाच पेग दारू प्यालो, सिगारेटी फुंकल्या, बेहोश होऊन घामाच्या धारा पुसत ठणठणणार्‍या कर्कश संगीतावर नाचलो म्हणजे मला अमाप सुख मिळाले अशा हास्यास्पद कल्पना...अशा कित्येक बाबींमुळे आपआपसातला संवाद कमी होतोय. शिवाय नैसर्गिक उर्मी, बदलाची ओढ, आयुष्यात काहीतरी वेगळं असण्याची धडपड यामुळे अशी अनामिक ओढ पुरुषाला किंवा स्त्रीला कुणाकडे तरी ओढत असावी. ही ओढ नैसर्गिकच असावी असे वाटते. शेवटी माणूस हा एक प्राणी आहे. पण माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे म्हणून कुठे थांबायचे, कुठली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही हे ठरवता आले म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते.

गवि गुरुवार, 12/16/2010 - 10:31
आवडलं. Only except for: >>>>>>>>>>> कुठली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही हे ठरवता आले म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते. >>>>>>>>>>> Question: कुठली लक्ष्मणरेषा नाही ओलांडायची ? शारिरिक ओलांडली तर प्रतारणा,वाईट.मनांची ओलांडली तर मर्यादा राखली असे ?

नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 11:16
मुक्तक आवडलं. काल्पनिक असल्यामुळे ठीकच आहे. :) प्रत्यक्ष असेल तर 'तोल ढळत नाही ना?' यावर बारीक लक्ष ठेवणे चांगले. कारण त्या व्यक्तीच्या "आहारी जात असल्याची" चिह्ने दिसत आहेत. विशेषतः चोरून भेटण्याची कृती.

In reply to by नितिन थत्ते

समीरसूर गुरुवार, 12/16/2010 - 14:22
प्रत्यक्षातली अशी नाती हाताबाहेर गेल्याची काही उदाहरणे मला माहित आहेत. आयुष्यात भयंकर उलथापालथ घडवून आणतात असल्या गोष्टी. पण एखादा चांगला मित्र असणे किंवा मैत्रीण असणे यात काही वावगे नाही. आपल्या भावना कुठल्याच नात्याच्या अपेक्षांचे ओझे न बाळगता कुणासोबत शेअर करता आल्या तर असल्या मैत्रीमध्ये काही वावगे नसावे. पण म्हणतात ना, एक परका पुरुष आणि एक परकी स्त्री यांच्यातले नाते कधीच निखळ मैत्रीचे वगैरे असत नाही. काही अंशी शारीरिक आकर्षण असल्याशिवाय स्त्री आणि पुरुष एकमेकांकडे ओढले जाऊ शकत नाहीत. इन फॅक्ट, पुरुष आणि स्त्री यांच्यातली एकमेकांविषयी असलेली सुप्त ओढ ही एक खूप हळवी आणि नाजूक भावना आहे. खूप नैसर्गिक आहे ते. म्हणूनच मानलेला भाऊ किंवा मानलेली बहीण या नात्यांवर माझा तितकासा विश्वास नाही. शाळेत असतांना मुलींकडून राख्या बांधून घेणे हा एक तसलाच भंपक प्रकार होता. ज्या मूर्ख लोकांनी हा प्रकार सुरु केला असेल ते खरच संत असतील. ज्या मुलीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घ्यायची त्याच मुलीवर मग बाकीचे दिवस लाईन मारायची असले प्रकार सर्रास व्हायचे. आणि ते त्या वयात होणारच, किंबहुना ते कुठल्याही वयात होणारच... निसर्ग नियम आहे तो... तो नियम जर तसा नसता तर जग किती रुक्ष आणि कोरडे होऊन गेले असते याची कल्पना करु शकत नाही.

नगरीनिरंजन गुरुवार, 12/16/2010 - 13:25
>>वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता. हे आधी बरोबर वाटले पण तो बॅचलर आहे हे वाचल्यावर वरील वाक्य विचित्र वाटले. या नात्यातून नक्की काय हवे आहे हा प्रश्न पडला. 'कुगार'पणा करणार्‍या स्त्रीला असा पुरुष नक्कीच पसंत पडणार नाही आणि एक मित्र म्हणून संवेदनशील आणि स्त्रियांचे मन समजून घेणारा हवा असेल तर ते गुण एका बॅचलर (तेही चाळिशीच्या) पुरुषात कदापिही सापडणार नाहीत. हे नातं नसून स्त्रीच्या बाजूने एक रूटीनच्या कंटाळ्यावरची रिअ‍ॅक्शन किंवा इन्फॅच्युएशन किंवा सेवन यिअर इच असण्याचा संभव अधिक वाटतो आणि पुरुषाच्या बाजूने एक फ्लिंग.

गणेशा गुरुवार, 12/16/2010 - 17:35
कथेतील नायिकेला प्रेम .. भावनात्मक गुंतवनुक .. मैत्री .. आधार ..स्नेह हे तीच्या नवर्याकडुन मिळत नाही .. म्हणुन ह्या सर्व गोष्टींमुळे ती दुसर्या पुरुषाकडुन हे मिळवत असतानाचे तीचे चित्रण छान दाखविले आहे .. आवडले .. परंतु नविन साथीदार हा मित्र म्हणुन या सर्व गोष्टी देतो आहे .. कारण मित्र हे नातच खुप ग्रेट आहे .. ते कधी कधी पती या नात्यापेक्षा ही श्रेष्ठ ठरते .. परंतु येथे मैत्रीच्या पलीकडील आकर्षण ही आहे .. आकर्षणं हे मैत्री नावाच्या कमळात असलेला काळसर भुंगा आहे .. त्या मैत्रीची गोडी तो शोषुन घेवु शकतो .. ह्या गोष्टीची जान ही नायिकेने ठेवले पाहिजे असे वाटते ... अवांतर : लग्न म्हणजे काय ? पुण्यात राहत असताना फार तर कात्रज - हडपसर वाला नवरा चालेल .. कींवा ठाण्यात राहताना फारतर कल्यान - डोंबीवली चालेल असे दृष्टीकोण बदलले पाहिजे .. सिनेमा गृहात अंधारात हातात हात घेवुन पाहिलेले चित्र आणि उजेडात ..संसारात एकमेकांत निभवायचे नातं हे नक्कीच वेगळे असते, हे जाणले पाहिजे पुरुषाने ही शरीरापलीकडे ..गोर्‍या कातडि कडे न बघता .. मनाचा ठाव घेणे गरजेचे आहे.. आणि हे ज्यांना जमते तेच खर्या मैत्रीचा अर्थ पाहु हि शकतात .. वेगवगळी नाती हि अशेच असतात ... एकमेकात गुंतलेले .. पती हे नातं ही असेच आहे .. मित्र.. सखा .. नवरा .. वडिल .. या सर्व नात्यांचे मिश्रण म्हणजे पती ... योग्य पती/पत्नी होणे म्हणजे सर्व नात्यांचे रेशमी धागे जपण्यासारखे आहे असे वाटते .. ---------------

यकु गुरुवार, 12/16/2010 - 20:08
मुक्तक काल्पनिक असले तरी समाजात वास्तवात जे घडते ते समोर मांडण्याची रिस्क लेखिकेने घेतली आहे. त्याबद्दल अभिनंदन!! माझे व्यक्तिशः निरिक्षण असे आहे की काहीकाळानंतर असा तथाकथित मित्र देखील बेचव ठरतो आणि या मुक्तकात लग्नाचे जे झाले आहे तेच अशा मैत्रिचे होते. आगे क्या होता है? मग पुढे असलेच मित्र शोधण्याची गरज (!) निर्माण होते... ( चटक लागते? ) आणि मग पुढे बसणारे अनेक शिक्के पचवायला तयार व्हावे लागते.

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/16/2010 - 22:20
लिखाण आवडलं, विचार पटलेच असं नाही. असा कोणी मित्र असण्यात वावगं मला तरी वाटत नाही. पण कथानायिकेने ही गोष्ट नवर्‍याला सांगितली नसेल तर मात्र मला ते चूक वाटतं; (म्हणजे असा कोणी माझा मित्र असेल तर ते माझ्या नवर्‍यापासून लपवून ठेवणार नाही). अर्थात कथेत नवर्‍याला ही गोष्ट सांगितली आहे, वा नवर्‍यापासून लपवली आहे असा स्पष्ट उल्लेख नाही. स्त्री-पुरूषांचीही मैत्री होणं सहाजिक आहे, आणि समीरसूर म्हणतात त्याप्रमाणे सुप्त आकर्षणामुळेही अशी मैत्री होऊ शकते. त्यात अनैसर्गिक काहीही नाही. पण मैत्री मैत्रीच्याच पातळीवर ठेवणं आणि सर्वच नातेसंबंधांमधे आवश्यकतेएवढी पारदर्शकता ठेवणं हे जास्त महत्त्वाच!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिक गुरुवार, 12/16/2010 - 22:39
अदितीच्या मताशी खूप सहमत आहे. मलाही अश्या मैत्रीमधे काही वावगं वाटत नाही, पण तुम्ही काय करता किंवा तुमच्या मित्रांबद्दलची माहिती तुमच्या जोडीदाराला असायला हवी. मुक्तकातील नायीका म्हणते की प्रत्येकालाच लग्न उधळून लावता येईल असे नाही... पण जे नातं विश्वासावर जोपासल्या गेलंय (?) त्यात अशी अपारदर्शकता का असावी? शिवाय या नवीन नात्याबद्दल जोडीदाराला कळल्यावर त्याला तुमचं नातं हे फक्त मैत्रीपुरतंच मर्यादीत आहे हे कसं कळावं किंवा फक्त मैत्री आहे यावर विश्वास तरी का ठेवावा? अजून एक शंका म्हणजे नायीकेच्या मित्रालाही फक्तं मैत्रीच हवी आहे की अजून पुढे काही? आणि कालांतराने ह्या मैत्रीमधेही कोरडेपणा येणार नाही याची खात्री काय? ही मैत्री जोपासण्यापे़क्षा मी जोडीदाराबरोबर निर्माण झालेल्या कोरड्या नात्यात पुन्हा ओलावा कसा आणता येईल याचा प्रयत्न करीन.

रन्गराव गुरुवार, 12/16/2010 - 22:51
वर लई भावनात्मक आणि सात्विक कॅटेगिरीतले प्रतिसाद आले आहेत. स्त्रियांच्या थोड्या अनप्रिडेक्टेबल मनोवृत्तीचा विचार केला तर थोडे वेगळे निष्कर्श काढता येतात. १. स्त्रीयांना पुरूषांना कंट्रोल मध्ये ठेवायला आवडत. ज्यांना कंट्रोल करायला अवघड असत असे पुरूष अजून जास्त आवडतात. पण ज्यादिवशी ती त्याला मुठीत आणते, थ्रील संपलेलं असत कदाचित. आणि जर कथेतल्या स्त्रीचा पती पत्नीची प्रत्येक गोष्ट बिनविरोध ऐकणारा असेल तर तो फार इंटरेस्टींग प्राणी नसेल. मग कंट्रोल करायला कुणी ईंट्रेस्टींग सापड्ला की त्याच्यावर वर्चस्व मिळवायची धडपड. स्मार्ट स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त होतं. कारण त्यांना नेहमी काही ना काही आवाहन हव असतं. चाळीसाव्या वर्षीही लग्न वगैरे असल्या कचाट्यात न पडणारा स्वच्छंदी प्राणी म्हणजे भारीच आवाहन असणार. आणि त्याच कामच्या वेळी तिला भाव न देण पण इतर वेळी हसवण ही सगळी त्याच्या वांड असण्याची लक्षण. किती ताणायचं ते परफेक्ट माहीत असणारा माणूस. २. चोरून भेटणे वगैरे गुंता: आपल्या पतीला उगाच इनसेक्युअर फील होउ नये म्हणून घेतलेली एक काळजी असू शकते. हो आणि आता त्या नात्यामध्ये लक्ष्मण रेखा काय ती त्याच ओलांडण. जरा जास्तीच अतिरंजक वाटल. जर आयुष्यात कधी एखादी बाई बॉस म्हणून मिळाली तर तिला हो ला हो म्हणायचा गाढवपणा करू नका, सुरुवातीला छान जमेल पण काही दिवसान ती एकतर दुसर्या इंट्रेस्टींग एम्प्लोयीवर खूष होईल किंवा तुमचा गुलामासारखा वापर करेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रन्गराव गुरुवार, 12/16/2010 - 23:01
तुमची प्रतिक्रिया वाचून तर स्मायली पण रडायला लागल्या आहेत म्हणून टाकल्या नाहीत. :( ही खाली पडून हसण्याची स्मायली होती बघा काय केलत त्याचं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रन्गराव गुरुवार, 12/16/2010 - 23:14
जास्ती नादाला लागू नका नाहीतर कथेतल्या नायिकेसारखा व्हायच (इथ तर डोक्यावरचे सगळे केस शिल्लक असलेला बॅड बॉय आहे)! वर जे काही लिहिलं आहे त्याचा स्वत:च पुरावा बनाल!

In reply to by रन्गराव

रेवती Fri, 12/17/2010 - 01:26
वैयक्तिक शेरेबाजी टाळा रन्गराव! तुमच्या खासगी आयुष्याचा अदितीने कुठेही उल्लेख केलेला नसताना आपण अशी प्रतिक्रिया देत आहात.

In reply to by रन्गराव

नीट समजलं नाही. "नीट अभ्यास केलात तर लोळून हसणार्‍या इमोटीकॉनचा एच्टीएमेल कोड लिहीता येईल" असा सल्ला देण्याचा आणि (सो कॉल्ड) बॅड बॉय मित्र असण्याचा काय संबंध? पण तुम्ही काही लिहीलं आहेत म्हणजे एकदम 'फनी-फनी' असणार म्हणून हसून घेते.

In reply to by रन्गराव

नितिन थत्ते Fri, 12/17/2010 - 08:19
सदर आयडी इगोसेण्ट्रिक असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या मालिकेतच लक्षात आले होते. ते येथे परत दिसून येत आहे. प्रतिसाद वैयक्तिक वाटत असल्यास उडवावा.

In reply to by शिल्पा ब

स्वानन्द Sun, 12/19/2010 - 18:20
केवढी ती घाई भांडण्याची! जाऊ दे तुम्ही असंच हो ला हो म्हणत रहा हो..भांडायला मिळाल्याशी मतलब ;)

बेसनलाडू Fri, 12/17/2010 - 00:27
आज कल चे लव हे असेच असते, हे पचवणे त्या नावाचा चित्रपट पाहताना जड गेले; पण हा लेख वाचून ते पटवून घ्यायला अजिबात कष्ट पडले नाहीत. सैफ अली खानच्या प्रेमापोटी लग्न झालेल्या दिवशीच नवर्‍याचा त्याग करणारी आणि तो करताना "चाहिये तो मैं वापस आकर तुम्हें सॉरी बोलुंगी" असे नवर्‍याला ऐकवणारी दीपिका पडुकोण हे जर आजच्या स्त्रीचे प्रतीक असेल, तर संपलेच. सध्या तरी तिला (पक्षी त्या व्यक्तिरेखेला) आधुनिक स्त्रीचे प्रतीक न समजता अपवादच समजतो आहे. स्त्रियांच्या मानसिक सशक्तपणाचे, कणखरपणाचे गुणगान आजवर ऐकून होतो; पण लेखातील स्त्रीच्या विचारांनी या गुणगानाचा पुनर्विचार करायला भाग पाडले. (प्रेक्षक)बेसनलाडू मित्रत्त्वाचे नाते, जोडीदार (नवरा/बायको) म्हणून असलेले नाते आणि निव्वळ आकर्षण यांचा सारासार विचार न होता मोठी गल्लत होते आहे की काय, असे वाटून गेले. मागे एकदा विवाहबाह्य संबंधांवरील धाग्यावर कोणीतरी 'जोडीदाराच्या माहितीबाहेर आणखीही कोणी (प्रतिजोडीदार म्हणून) आयुष्यात असणे काही गैर नाही' याचे समर्थन केले होते, तेव्हा खूप मोठा धक्का बसला होता. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे 'मर्यादा' फक्त शारीरिक पातळीवर असेल आणि ती ओलांडणे पाप वाटत असेल, तर तो फार संकुचित विचार आहे. शरीराने मर्यादा ओलांडली नसेल, पण मनाने आधीच ओलांडली असेल, तर तेथेच जोडीदाराबरोबरचे नाते संपले आहे, असे म्हणण्यात काय गैर आहे? असो. (विचारवंत)बेसनलाडू 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हे सहजच आठवले. लेखात वर्णन केलेल्या फुलपाखरी नात्यामागे सुसाट धावणार्‍यांनी लक्षात ठेवावे असे. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

शिल्पा ब Fri, 12/17/2010 - 00:41
नवीन हिंदी पिच्चर पाहणे सोडा...मनावर वाईट परिणाम होईल ;) आणि पिच्चर मधल्या गोष्टी खऱ्या नसतात...आवडत नसला तरी लग्न झाल्यावर बायका राहतात त्याच्याबरोबर...कमीतकमी भारतीय बायका तरी... स्वतःचे लग्न बरे वाईट कसे का असेना, ते सोडून गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंडशी लग्न करणारा/ री अजूनतरी पाहण्यात नाही...लोक दुसरी बायको करतात (कायदा इथे काढू नका) पण दुसरा नवरा करायची सोय नाही...काय तो विचार आधी करून मगच पाऊल उचलावे...नुसतंच थ्रील हवं असेल तर sky diving , rock climbing वगैरे प्रकार आहेत..बाकी ज्याची त्याची मर्जी. पण सहसा नवऱ्याला बायकोचा मित्र पचनी पडत नाही हेच खरं..

In reply to by शिल्पा ब

बेसनलाडू Fri, 12/17/2010 - 01:01
कायद्याच्या परवानगीबाहेर दुसरी बायको करणारे नवरे आहेत तशाच दुसरा नवरा करणार्‍या बायकाही असतीलच की; नसतील कशावरून? (जिज्ञासू)बेसनलाडू बाकी थ्रिल्स बाबत सहमत. (सहमत)बेसनलाडू आणि 'सहसा' या वाक्यातून प्रतीत होणार्‍या शेवटच्या वाक्यातील जनरलायजेशनशी असहमत :) बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्‍याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते ;) बायकोचा डबल उद्धार तिच्याच पुढ्यात करण्याची सुवर्णसंधी याव्यतिरिक्त कोणती असेल? ;) (सर्वांनी ह. घ्या.) :) (असहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

शिल्पा ब Fri, 12/17/2010 - 01:06
कायद्याच्या परवानगीबाहेर दुसरी बायको करणारे नवरे आहेत तशाच दुसरा नवरा करणार्‍या बायकाही असतीलच की; नसतील कशावरून? असतील की...पण सर्रास नाही...परदेशात असे प्रकार चालतात असे ऐकुन आहे...जर्मनीतील निनाद हे अधिक सांगु शकतील. बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्‍याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते होतेच असं नाही...बर्‍याचदा तसे नसते...नुसतं वाटुन काय होतंय का? चालायचंच

In reply to by शिल्पा ब

http://www.yourdictionary.com/boy-toy युरोपात सगळे लोण अमेरिकेतून येत बॉय टोय का काही तरी म्हणतात बुंआ अश्या प्रकाराला

In reply to by बेसनलाडू

आणि 'सहसा' या वाक्यातून प्रतीत होणार्‍या शेवटच्या वाक्यातील जनरलायजेशनशी असहमत Smile बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्‍याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते Wink बायकोचा डबल उद्धार तिच्याच पुढ्यात करण्याची सुवर्णसंधी याव्यतिरिक्त कोणती असेल?
(असहमत)बेसनलाडू यांच्याशी सहमत. तसेच नवर्‍याच्या मैत्रिणीसोबत बसून नवर्‍याच्या नावाने खडेफोड करण्यासारखी दुसरी संधी नाही ... असं माझ्या काही मित्रांचा पश्चात्ताप पाहून मत झालेलं आहे. तर मग बेला, कधी भेटवतो आहेस तुझ्या बायकोला?? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्मिता. Sun, 12/19/2010 - 10:46
बेला यांच्या प्रतिक्रियेतील अदितीने हायलाईट केलेल्या भागासकट पूर्ण प्रतिक्रियेशी सहमत.

In reply to by शिल्पा ब

नगरीनिरंजन Fri, 12/17/2010 - 07:16
विवाहबाह्य प्रेमप्रकरण आणि sky diving , rock climbing यातलं थ्रील सारखंच आहे? असेल तर मग एक नैतिक आणि दुसरं अनैतिक कशावरून ठरतं? एखाद्याचा/ची जोडीदार दुसर्‍या भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर sky diving , rock climbing करायला गेल्यास ते योग्य की अयोग्य? दुसर्‍या भिन्नलिंगी व्यक्ती बरोबर काय काय केलं म्हणजे ते नैतिक असतं आणि काय काय अनैतिक असतं? या जगात आपला/ली जोडीदार सोडून दुसर्‍या भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण कधीच न वाटलेला/ली मानव असेल?

In reply to by शिल्पा ब

नगरीनिरंजन Fri, 12/17/2010 - 08:23
ते मान्य. बहुतेकवेळा थ्रीलसाठीच असली प्रेमप्रकरणे होतात. घरकी मुर्गी हळूहळू दाल बराबर होते आणि मग बाहेरची दाल मुर्गीपेक्षा रुचकर वाटते. लवकर ओसरणारं असलं तरी यातलं थ्रील sky diving, rock climbing पेक्षा खूप जास्त असावं.

कवितानागेश Fri, 12/17/2010 - 00:45
लिहिण्याची शैली नेहमीप्रमाणेच छान. पण खरे तर 'मैत्री' म्हटली की तिथे 'स्त्री-पुरुष' फरक असतो का मला अजून कळले नाहीये. म्हणजे स्त्रियांची मैत्री स्त्रियांशी असली तर चालेल आणि पुरुषांशी असली तर उगीचच तिथे 'लैंगिकतेची किनार' जोडली जाईल (किंवा उलट ), असे प्रत्येकवेळेस का गृहीत धरायचे? ज्यांची मैत्री आहे, ते, व जे 'बाहेरून' बघतायत, ते, अशा सगळ्यांचाच हा गोंधळ दिसतो. कथानायीकेची मनस्थिती अशीच गोंधळाची वाटतेय. (अगदी वास्तववादी आहे! अशी मनस्थिती अनेकांची असते).विरुद्धलिंगी व्यक्तीशी असलेली मैत्री 'मैत्री' साठी आहे, की अजून कशासाठी हे जोपर्यंत व्यक्तीला स्वतःला समजत नाही, तोपर्यंत 'गिल्ट' पण सुरुच रहाते. कथानयिकेचा 'मित्र' बेपर्वाईएनी वागतो, हे 'चालते', पण नवरा बेपर्वाईनी वागला तर चालत नाहे, यातूनच खरे तर, नवरा-बायकोचे नाते खरच किती 'खोल' आहे हे कळते. त्यामूळे ही 'मैत्री' नसून 'बंडखोरी' वाटते! शिवाय पती-पत्नी दोघांनीही जोडीदाराकडून उगीचच अती-आदर्श वागणुकीच्या अपेक्षा ठेवल्या तर हा गोंधळ वाढतच जातो. मला वाटते, acceptance जितका जास्त, तितके नाते समृद्ध.

म्हणुन मी बरी न माझा नवरा बरा... नकोच ते मित्रबित्र्....हवित कशाला ती नसती लफडी. पटत नसेल तर सरळ घटस्फोट घ्यावा नाहितर ग्पगुमान घरात बसावे :( नान्स जरा जिमेलवर ये रे ;) =)) =))

शुचि Fri, 12/17/2010 - 02:05
लेखात दाखविलेल्या अप्रामाणिक वृत्तीचे समर्थन करण्याचा हेतू कुठेही नाही. हा केवळ कल्पनाविलास आहे. जेव्हा एखादं लग्नं टिकलेलं असतं तेव्हा कुठेतरी बारीक, रेशमी धाग्याच्या जीवावर ते तगलेलं असतं मग तो धागा मूल असो वा कधीकाळी नवर्‍याने केलेलं बायकोचं किंवा व्हाईसे व्हर्सा आजरपण असो. माझं स्पष्ट मत हे आहे की - लग्नाच्या बाहेर (शारीरीक) संबंध ठेवायचे असतील तर सरळ नवर्‍याची परवानगी घ्यावी जी की ९९% केसेस मध्ये मिळणार नाही अथवा मग घटस्फोट घेऊन काय ती स्वातंत्र्याची इच्छा पुरवावी. पण कल्पनेमध्ये आपल्याला हवं तसं वागायचं स्वातंत्र्य असतं आणि वरील मुक्तक हा केवळ कल्पनाविलास च आहे. समाजात किती लोक वरील बाईप्रमाणे वागतात त्याचा मला अजीबात अंदाज नाही ना जाणून घ्यायची इच्छा. पण काल अतिशय उद्विग्न मनोवस्थेमध्ये हे मुक्तक सुचले आणि मी ते लिहून काढले. आय फेल्ट ग्रेट आफ्टर धिस!!! मी यावर विश्वास ठेवते की गर्तेत कोसळायला प्रयत्न करावे लागत नाहीत पण आपण गर्तेत कोसळू नये, आपले अधःपतन होऊ नये , मिळालेली एखादी गोष्ट टिकावी याकरता मात्र सातत्याने प्रयत्न करावे लागतात मग ते लग्न का असेना. रोपाला नख लावणं सोपं असतं पण त्याला जपणं हे कठीण काम असतं. हे गाणं या संदर्भात आठवतं - I beg your pardon, I never promised you a rose garden. Along with the sunshine, There's gotta be a little rain sometimes.

In reply to by शुचि

रन्गराव Fri, 12/17/2010 - 08:41
चांगल केलत. काहीही चुकल नाही. तुमचा कल्पनाविलास हे तुमच राज्य! संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा. you needed to vent out and u did it. तुम्हाला बरं वाटल ना, झाल मग. प्रतिक्रिया मनावर घेऊ नकात. आणि इतका बोल्ड विषय हँडल केलात तोही इतक्या सुंदररित्या त्याचच कौतुक वाटत.

In reply to by रन्गराव

Pain Mon, 12/20/2010 - 09:23
संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा तुम्ही त्या लोकांना ओळखत नसताना आणि काहीही पुरावे नसताना त्यांनी सज्जनपणाचा मुखवटा चढवलाय आणि भोंदू आहेत असे बिनबुडाचे आरोप कशाला करता ? लेख कल्पनाविलासावर आहे हे सगळ्यांना माहिती आहेच, लोक प्रत्यक्षात घडणार्‍या/ घडू शकणार्‍या गोष्टींबद्दल बोलत आहेत. समजत नसेल तर विचारा आधी.

वेताळ Sat, 12/18/2010 - 10:02
आता पुढच्या लेखात त्यानी विवाहित पुरुषानी दुसर्‍या विवाहित स्त्रीयाना कसे पटवावे ह्याबद्दल फॅण्टसी लिहावी अशी विनंती करतो.कारण अश्या लेखाची खुप आवश्यकता आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
******काल्पनिक कथावस्तू/मुक्तक****** ______________________________________________________ अधून मधून आम्ही भेटत असतो. आताशा तो मला पूर्वीपेक्षाही जास्त आवडू लागला आहे कारण जितक्या वेळा आम्ही भेटतो तितक्या वेळा त्याची ओळख पटते तर कधी नव्याने होते. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे की माझं काही त्याच्यापासून लपून कसं रहात नाही? त्याचे भेदक डोळे नीर्विकारपणे माझा ठाव घेतात. मिश्किल कुठला! वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही.

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

राजेश घासकडवी ·

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 07:25
वाईट झाले.. खूप वाईट झाले... :-) असो, पण लेक टाहो च्या पूर्वेला आम्ही कोकणातले लोक अमेरिका म्हणत नाही. त्यामुळे प. पू. मां अदिती ह्या अमेरिकेत येत नाहीत.

Pain Tue, 11/30/2010 - 08:13
हाहाहा :) मस्त. वादळाच्या संभाव्य मार्गाची मिसळभोक्ता, बेसनलाडू, सहज, विकास, चित्रा, प्राजक्ता, शुचि, शिल्पा ब वगैरे अमेरिकास्थित मिपाकरांना कल्पना द्यावी.

क्रेमर Tue, 11/30/2010 - 08:39
बातमी खरी असल्यास दुर्दैवी आहे. करावा तितका निषेध थोडाच आहे. परिणाम होईल किंवा नाही हे माहीत नाही पण जागरूक नागरिकांनी श्रीमती क्लिंटन व श्रीयूत ओबामा यांना निरोप पाठवून निषेध (शब्दमर्यादा पाहून निषेधाची लांबी ठरवावी) व्यक्त करावा. डिसेंबरात काही सन्माननीय अमेरिकास्थित भारतीय राजधानीत ठिय्या आंदोलन करणार आहे, असेही वाचनात आले आहे. सक्रिय नागरिक त्यातही सहभागी होऊ शकतील, असे वाटते.

मुक्तसुनीत Tue, 11/30/2010 - 08:58
"पुण्याची मैना : अनस्टॉपेबल : एक डोके उठवणारी ब्याद" - बराकसूर "टेक्ससमधे भुताचा पाय ?" - चिंतातुर डुब्या "आपण इंचाइंचाने टेक्सस मधून माघार घेत आहोत काय ?" - सुका बोंबिल "अदिता - एक डेंजर मुव्ही" - विवाद "संगीत नाटक - १७६० - कार्टी उसगावात घुसली" "३_१४ खानसाहिबांचे टेक्ससप्रेम नव्याने जागे झालेले आहे" - निद्राशून्य. "दडपलेल्या एनारायांची कहाणी" - नका बाई लाजू....

In reply to by मुक्तसुनीत

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 10:12
'कधी सोडणार भारतवर्षा? : पुणेरी रडका' - आशाधरू कुठे '३_१४ वाईच आवरा' - बडबडबिहारी 'शब्द भागती ते - किति बोले ही बाई' - मीउसात येने 'डेसिबेलचे ठणाणे वाजलेच पाहिजे...' - आत्ता बोललेतर

Nile Tue, 11/30/2010 - 09:08
बातमी वाचुन तुर्तास फक्त, "आयच्या गावात!" इतकाच उद्गार स्फुटतो आहे! इतर प्रतिसाद शॉक उतरल्यावर. -लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ. ;-)

In reply to by Nile

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 09:18
-लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ.
कोकणस्थ बनण्याचा क्षीण प्रयत्न! तुम्ही टाहो फोडला तरी त्या लेकाला ऐकू येणार नाही इतके लांब राहाता! आठशे मैल! त्यापेक्षा तुम्ही वादळाच्या केंद्रस्थानाला अधिक जवळ असाल.

In reply to by राजेश घासकडवी

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 09:21
हे लोक लेकाचे कुठेतरी टेक्सास बिक्सास मध्ये येतात, आणि घरी आईवडिलांना अमेरिकेत आलो म्हणून सांगतात. ह्यांच्यावर बंदी घालायला हवी.

In reply to by Nile

बेसनलाडू Tue, 11/30/2010 - 10:59
कोकणस्थांची डेफिनीशन टाहोच्या पुर्वेकडील अशी दिली आहे ना? मग. सनीवेलचे सूर्यनगर आणि फेअर ओक्स ची ओकवाडी करून तसेच महाराष्ट्र मंडळ काढून, त्यात फूट पाडून एकाची दोन मंडळे करून कोकणस्थांनी कॅलिफोर्नियाचा कोकण केला आहे (महाराष्ट्र सरकारने अद्याप कोकणाचा कॅलिफोर्निया केला नसला तरी) त्यामुळे टाहोच्या पश्चिमेकडे असलेला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया हीच कोकणास्थांची मायभूमी होय. (सारस्वत)बेसनलाडू

In reply to by मिसळभोक्ता

विकास Tue, 11/30/2010 - 21:40
जर टेक्सास अमेरिकेत नसेल तर अमेरिकेचा मागचा राष्ट्राध्यक्ष हा विदेशी नागरीक होता! :-)

ऋषिकेश Tue, 11/30/2010 - 09:16
वा वा वा वा! विकिलिक्स जे करत आहे ते योग्यच आहे. आधी जनतेला एक सांगून दुसरेच निर्णय घ्यायचे आनि आता ओरड करायची हे चुकीचे आहे. (भारतात (अचानक) शांतता अशी हेडलाईन असेल का? ;) )

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 10:26
खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत आहात .. सर्व मनापासुन पटले .. एकदम बरोबर आहे .. तुम्ही इतके जबरदस्त पद्धतीने लिहिले आहे की आम्हाला काय बोलावे तेच कळत नाहिये .. अश्या लेखनामुळे आणि त्यातील विचारांच्या देवाणघेवाण करण्यामुळे ही नक्कीच समाजात उल्लेखनिय बदल घडतीलच घडतील.. आणि असे वैचारीक पद्धतीने समाजात सर्व ठीकाणी माहीती दिली गेली पाहिजे असे वाटते .. अवांतर : १.० कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा २.० टॉप - ५ मध्ये येण्यासाठी चाललेली केवलवाणी धडपड ३.० तद्दन मसालेदार, धंदेवाईक आणि युसलेस माहिती देणारा धागा ४.० बाकी अजुन सुचेल तसे. अति अवांतर : कोण ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ. अदितीअम्मादेवी, ऊर्फ अदिती अवखळकर पाटील ऊर्फ जोजोकाकू ऊर्फ आज्जीबाई ऊर्फ दुर्बिटणेताई ? धन्यवाद :) - डॉन्या

In reply to by छोटा डॉन

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 10:43
आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद. (ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. तेव्हा आपण "धन्यवाद" आहात.)

In reply to by मिसळभोक्ता

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 10:49
>>आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद. चुक, १० गुण कापले आहेत. सध्या आम्ही 'ब्राझिल / स्पेन' मध्ये इंटरेस्टेड आहोत. >>ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. कुणीतरी म्हणजे नक्की कोण ? आपल्यास सांगण्यास खेद होतो की आपले स्टेटमेंट सरकारसारखेच 'मोघम' आहे, उपयोगी माहीत आपण दाबुन ठेवली आहे असे सांगतो. >>तेव्हा आपण "धन्यवाद" आहात. छे, तुम्ही फारच अशक्य प्रचंड आहात.

In reply to by छोटा डॉन

स्वानन्द Tue, 11/30/2010 - 10:49
सहमत. नुसती चमकुगिरी करते ही बाई. स्वतःच सांगत फिरायचं सगळीकडे. पब्लिसिटी स्टंट नुसता! बाकी बरंच झालं, ब्याद गेल्ली :) आता उसाचं काही खरं नाही!

कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा
अगदी अगदी. हे सर्व वाचुन आमच्या अ‍ॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला. बाकी चालु द्या...

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 10:58
>>हे सर्व वाचुन आमच्या अ‍ॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला. "आंतरजालावर सर्वांनाच सर्व गोष्टी समजतील आणि समजाव्यात असे आमचे अजिबात मत नाही" हे आमचे अतिशय प्रसिद्ध स्टेटमेंट आहे, बहुदा तुम्हाला ते माहित असेलच. जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ?
त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 11:06
>>त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ह्यासंबंधी आम्ही अजुन एक वाक्य सांगतो. Leaked data are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital. मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ? ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ?
उगाच त्या हिरव्या अदितीच्या धाग्यावर प्रतिसाद वाढुन तिची TRP वाढायला नको म्हणून पुढिल चर्चा खव अथवा व्यनीतुन करु.

या चर्चेमागे मुळात प्रश्न 'सरकारला काही विशिष्ट व्हीजाविषयक माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे का? असावा का?' असा वाटतो. आदर्श व्हीजाव्यवस्थेत तसा तो नसावा असं मला वाटतं. आदर्श व्हीजा व्यवस्था म्हणजे जिथे व्हीजा नाहीत, कुठल्याही सेना नाहीत, काड्या नाहीत ... मात्र जर आपल्या काड्या परदेशात पाठवणं, अनधिकृतरीत्या इतर विद्यापीठांमध्ये नोकर्‍या देणं हे सरकारकडून जनतेला अपेक्षित असेल तर त्यांची माहिती फक्त मोजक्या लोकांना असावी ही सरकारची अपेक्षा रास्त वाटते. काड्या घालयलाही हव्यात आणि भांडणंही नकोत हे दोन्ही साध्य कसं करणार? प्रश्न असा येतो की या रास्त व्हीजा अर्जातून मिळालेल्या व्हीजाचा गैरवापर होतो आहे का? तसा तो होऊ नये यासाठी अधूनमधून काही जबाबदार आंजासंस्थांना आपल्या मार्गाने अशी माहिती मिळवून ती प्रसिद्ध करता यावी. हा एक प्रकारे अंतर्गत काड्याघालूपणाच आहे. काड्यांवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सरकारतर्फे जशी काड्याघालूगिरी करते, तशीच सरकारवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी आंजासंस्थांतर्फे काड्याघालूगिरी देखील व्हावी. इथे ती दुधारी तलवार सरकारवर उलटते. आम्ही (सरकार) करणार त्याच काड्या योग्य व इतरांच्या (जनतेची) चूक हे म्हणता येत नाही. तेव्हा माझं थोडक्यात मत असं की तूर्तास तरी दोन्ही काड्या चालू राहाव्या. मात्र दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. म्हणजे सरकारने आपल्याला गैरसोयीची काड्या विषयक माहिती दडपून ठेवू नये. व प्रकाशकांनी आपल्या हाती माहिती आली तर ती प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ आणि व्हीजा सुरक्षेला धोका नाही याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करावा. मूळ काद्या काय स्वरूपाच्या आहेत याचा अंदाज येत नसल्याने वरील भूमिकांच्या आधारे कुठच्याच पक्षाची बाजू घेता येत नाही. आदिमाया दुर्बिटणे हिरव्या माजाचे सत्त्व माझ्या लाभु दे लिखाणा काड्यांना येउं दे गा दुतोंडीची कसोटी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 11:07
बाबानुकर्णाला विचारुया.. ए, मला झोपू दे ना आता.. तुला काही मिमंबलटोनिया मिळाले कॉई विचार मग..

आनंदयात्री Tue, 11/30/2010 - 11:09
आता मराठी आंतरजालाचे काही खरे नाही !! एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार .. म्याडमसाठी अमरिक्कन सरकारने ऑस्टिन पॉवर्स वापरुन लवकरच दुर्बिण बांधायला घ्यावी हीच ख्रिस्ताचरणी प्रार्थना ..

In reply to by आनंदयात्री

आमोद शिंदे Tue, 11/30/2010 - 21:34
एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार ..
काय शब्द आहे!! हाहाहा आंतरजाल 'झिझवणे'!!

In reply to by इन्द्र्राज पवार

बाबा रे, इन्द्रा, कसं समजावणार तुला? मी डिपेंडंट व्हिजावर जाते आहे ... ते काही काम नाहीये म्हणून! काम असतं (इथे किंवा तिथेही) तर का गेले असते?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 11:52
याचा अर्थ अमेरिकेने हे कारस्थान खूप पूर्वीपासून प्लॅन केलेलं आहे. निरुपद्रवी वाटणारा डिपेंडंट व्हिसा राजरोसपणे देता यावा म्हणून नवऱ्यालादेखील नोकरी देववली आहे. खरं काम कोणाचं व काय आहे हे सर्वांना माहीत आहे. उगीच नाही एवढी लोकं विरोध करत. मी आपला मुकाट्याने अदितीचं स्वागत केल्याचं पुन्हा एकदा लिहितो. अमेरिकन सरकारशी वाकड्यात जाणं मला एवढ्यात तरी परवडायचं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश, किती दिवस तू असं तुझं खरं रूप बदलणार आहेस? आता परासारख्या काही "चाणाक्ष" लोकांच्या लक्षात आलंच आहे की तू ही सरकारसाठी काम करतो आहेस आणि मी तिथे येण्याच्या कारस्थानात सामील आहेस ते!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कवितानागेश Tue, 11/30/2010 - 11:54
म्हणजे तिकडे लगेच काम करता येणार नाही? मग वेळच वेळ! इथे काड्याच काड्या! ...उगीच खूष होतायत सगळे. अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!

In reply to by कवितानागेश

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 12:00
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
त्यापेक्षा तुम्ही अदिती यांना ते ध्यान, मौन, विपश्यना वगैरे का शिकवत नाही? त्यांचं नाही तरी जगाचं तरी कल्याण होईल.

In reply to by राजेश घासकडवी

कवितानागेश Wed, 12/01/2010 - 09:17
अदितीला हे असले शिकवता शिकवता माझीच भिवंडी झाली म्हणजे?? ....त्यापेक्षा तिला भवानी तिर्थंकरांच्या डायरीतली अजून थोडी पाने चोरून, लेख लिहू देत!

In reply to by कवितानागेश

श्रावण मोडक Tue, 11/30/2010 - 12:54
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
­अर्रे? ­­­भरतकाम, वि­णकाम ­(पहिल्या ­अक्षराचे ­शुद्­धले­खन, ­शुद्­धले­खन...­­!)­ हीही खु­षखबर ­आहे होय! वा... वा... ते काय म्ह­णतात ना दु­धात सा­खर... तसं ­झालं हे! ;­)

In reply to by श्रावण मोडक

बेसनलाडू Tue, 11/30/2010 - 13:26
हीही खु­षखबर ­आहे होय! वा... वा... ते काय म्ह­णतात ना दु­धात सा­खर... तसं ­झालं हे! ;­) अपत्याच्या जन्माने नागरिकत्त्वाची शिडी वापरून अमेरिकन नागरिकत्त्व मिळवायचा ही&हि प्रयत्न असला तरी आवडला म्हटले पाहिजे ;) (भारतीय)बेसनलाडू असे झाल्याने हिरवा माज आयताच जीवनाचे अविभाज्य अंग बनणार, हेही ओघाने आलेच. त्यामुळे आता अमेरिकास्थित हिरव्या माजोरड्यांकडून तो शिकायला नको ;) (अमेरिकास्थित)बेसनलाडू (सर्व संबंधितांनी ह. घ्या.)

शिल्पा ब Tue, 11/30/2010 - 11:23
कशाला येताय इथे? नाही म्हणजे काय काम आहे असं प्रेमाने विचारलं हो!!! ( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)

In reply to by शिल्पा ब

( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)
सहमत सहमत सहमत ! एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिंतामणी Wed, 12/01/2010 - 01:08
सहमत सहमत सहमत ! एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते. सहमत सहमत सहमत ! त्याच बरोबर असे वाटले की.......................... जाउ दे. जाण्या-याला कशाला दुखवा. शुभास्ते पंथानः संतु:

In reply to by चिंतामणी

शिल्पा ब Wed, 12/01/2010 - 07:18
अहो फक्त भारतातून अमेरिकेत जाणार आहे...जगातून नाही....दुखवा इथेच काय दुखवायचं ते

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 15:00
एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.
पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?
बसु आणि बोलु एकदा.
पर्‍या, "तुझा भाव काय"?
अदिती... 'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड. 'रेट' म्हण ग ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड.
कार्पेटखालचा दांभिक कचरा बर्‍याच दिवसांत साफ न केल्यामुळे बहुदा असा मध्यमवर्गीय भावूक शब्द आठवला. असो. बाकी काय म्हणालात तुमचा रेट?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 15:15
होलसेल डिस्काऊंट देतो का हो तो? पर्‍या, "तुझा भाव काय"?
पण त्यासाठी एक लक्षात ठेवायचं. फार भाव द्यायचा नाही. भाव करायचा. काही कष्टमर नुसते अय्या म्हणून पळून जातात. आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची. मग द्यायचे थोडे जास्त. शेवटी त्यालाही पोट आहेच ना.

In reply to by राजेश घासकडवी

बाकी काय म्हणालात तुमचा रेट?
नका विचारु. तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे.
आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची.
अशा लोकांना आम्ही रँबोकडे पाठवतो ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय Wed, 12/01/2010 - 16:06
तसं नाही. तुम्ही काहीतरी फुकट देता आहात त्याचे अप्रुप आहे. ;) बाकी पुणेद्वेष्ट्यांचा खच आहे मिपावर. त्याचे एवढे कौतुक नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 15:39
अगं, इतका घोटाळा कसा गं करतेस. पुण्यातले फेमस दुकानदार ते. आपण कष्टमर. (दुकानदाराने दिलेल्या कष्टाने मरतो तो)

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी इतके कसे हो तुम्ही अडाणी? आता सर्कारी म्हटल्यावर घोटाळा होणारच ना?? अजून हिरवी झाले नाहीये मी!

In reply to by राजेश घासकडवी

मी तुमच्या स्वभावाचा (पक्षी : पुणेद्वेष) उल्लेख केलेला आहे !! विनाकारण अकारण केलेले आरोप सहन केले जाणार नाहीत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 16:17
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. एका विक्षिप्त पुणेरी दुकानदाराची कहाणी सांगितली तर शहरद्वेषाचा आरोप पदरात पडतो. तोही एका पुणेरी दुकानदाराकडून. विनाकारण + अकारण!

In reply to by राजेश घासकडवी

बघा तुम्ही आता मला चोर म्हणत आहात. कित्ती कित्ती द्वेष भरलाय तुमच्या विषारी मनात. अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ? *आजकाल आपापल्या गावातल्या संपादकांना पकडून राहिलेले बरे असते. जल्ला कधी सदस्यत्वावर कुर्‍हाड आली तर उपयोग होतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 16:30
अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ?
जबाबदार हे विशेषण पुणेकर साठी आहे की संपादक साठी? तुमच्या कोणाविषयी अतिरेकी अपेक्षा आहेत असं म्हणू? मीही हाक मारतो ना हिरव्या संपादकांना. होऊनच जाऊदेत. कोण आहे रे तिकडे?

In reply to by राजेश घासकडवी

खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच पुणेकर संपादक. हि द्विरुक्ती आहे. असो... तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन Wed, 12/01/2010 - 16:37
तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.
=)) =)) =)) =)) और ये लगा सिक्सर !!! दंगा बास करा रे आता ;) - छोटा डॉन

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 16:40
अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर... असं दुहीचं राजकारण खेळताय, ते महागात पडेल. वेळ जायला वेळ लागत नाही. अशीही वेळ येईल की तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल. आणि ते होईल तेव्हा पहिला वार....

In reply to by राजेश घासकडवी

अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर...
हे बघा गुर्जी, सचिन जबाबदारीने खेळला असे जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा नेहरा खेळला नाही असा त्याचा अर्थ काढायचा नसतो. ते वाक्य सचिनच्या कौतुकापुरते सिमित असते. तुमच्यासारखे नारदमुनी उगाच अर्थाचे अनर्थ तयार करुन जालिय दंगली पेटवता आणि त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजुन घेता. आत तरी जागे व्हा, निदान बिहारच्या उदाहरणावरुन तरी शहाणे व्हा ! असो... डान्रावांनी दंगा नको म्हणल्याने आम्ही आता अंमळ विश्रांती घेतो. देर इज आलवेज अ फस्ट टैम आलवेज अ नेक्स्ट टैम... (घासुगुर्जी) नेक्स्ट टैम... दबंग परा पांडे

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल.
अजून सव्वा-दीड तासांत अंधारच होईल हो गुर्जी!

बद्दु Tue, 11/30/2010 - 11:27
बाकी काही असो...." पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले. ".... हे वाक्य काळजाला भिडलं...

sagarparadkar Tue, 11/30/2010 - 12:01
न्युझीलंड वासी --- किविस्थ जपानवासी -- जपानस्थ किंवा नवसूर्यभूमिस्थ ऑस्ट्रेलियावासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय पूर्वयुरोपवासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय ब्रिटनवासी -- आंग्लभूमिस्थ अमेरिकावासी -- ईस्टकोस्ट्स्थ (पूर्वतटस्थ), मध्यभूमिस्थ, पर्वत्भूमिस्थ, वेस्ट्कोस्टस्थ (पश्चिमतटस्थ) आखात वासी -- मरूभूमिस्थ / मध्यपूर्वस्थ / तैलभूमिस्थ

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 07:25
वाईट झाले.. खूप वाईट झाले... :-) असो, पण लेक टाहो च्या पूर्वेला आम्ही कोकणातले लोक अमेरिका म्हणत नाही. त्यामुळे प. पू. मां अदिती ह्या अमेरिकेत येत नाहीत.

Pain Tue, 11/30/2010 - 08:13
हाहाहा :) मस्त. वादळाच्या संभाव्य मार्गाची मिसळभोक्ता, बेसनलाडू, सहज, विकास, चित्रा, प्राजक्ता, शुचि, शिल्पा ब वगैरे अमेरिकास्थित मिपाकरांना कल्पना द्यावी.

क्रेमर Tue, 11/30/2010 - 08:39
बातमी खरी असल्यास दुर्दैवी आहे. करावा तितका निषेध थोडाच आहे. परिणाम होईल किंवा नाही हे माहीत नाही पण जागरूक नागरिकांनी श्रीमती क्लिंटन व श्रीयूत ओबामा यांना निरोप पाठवून निषेध (शब्दमर्यादा पाहून निषेधाची लांबी ठरवावी) व्यक्त करावा. डिसेंबरात काही सन्माननीय अमेरिकास्थित भारतीय राजधानीत ठिय्या आंदोलन करणार आहे, असेही वाचनात आले आहे. सक्रिय नागरिक त्यातही सहभागी होऊ शकतील, असे वाटते.

मुक्तसुनीत Tue, 11/30/2010 - 08:58
"पुण्याची मैना : अनस्टॉपेबल : एक डोके उठवणारी ब्याद" - बराकसूर "टेक्ससमधे भुताचा पाय ?" - चिंतातुर डुब्या "आपण इंचाइंचाने टेक्सस मधून माघार घेत आहोत काय ?" - सुका बोंबिल "अदिता - एक डेंजर मुव्ही" - विवाद "संगीत नाटक - १७६० - कार्टी उसगावात घुसली" "३_१४ खानसाहिबांचे टेक्ससप्रेम नव्याने जागे झालेले आहे" - निद्राशून्य. "दडपलेल्या एनारायांची कहाणी" - नका बाई लाजू....

In reply to by मुक्तसुनीत

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 10:12
'कधी सोडणार भारतवर्षा? : पुणेरी रडका' - आशाधरू कुठे '३_१४ वाईच आवरा' - बडबडबिहारी 'शब्द भागती ते - किति बोले ही बाई' - मीउसात येने 'डेसिबेलचे ठणाणे वाजलेच पाहिजे...' - आत्ता बोललेतर

Nile Tue, 11/30/2010 - 09:08
बातमी वाचुन तुर्तास फक्त, "आयच्या गावात!" इतकाच उद्गार स्फुटतो आहे! इतर प्रतिसाद शॉक उतरल्यावर. -लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ. ;-)

In reply to by Nile

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 09:18
-लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ.
कोकणस्थ बनण्याचा क्षीण प्रयत्न! तुम्ही टाहो फोडला तरी त्या लेकाला ऐकू येणार नाही इतके लांब राहाता! आठशे मैल! त्यापेक्षा तुम्ही वादळाच्या केंद्रस्थानाला अधिक जवळ असाल.

In reply to by राजेश घासकडवी

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 09:21
हे लोक लेकाचे कुठेतरी टेक्सास बिक्सास मध्ये येतात, आणि घरी आईवडिलांना अमेरिकेत आलो म्हणून सांगतात. ह्यांच्यावर बंदी घालायला हवी.

In reply to by Nile

बेसनलाडू Tue, 11/30/2010 - 10:59
कोकणस्थांची डेफिनीशन टाहोच्या पुर्वेकडील अशी दिली आहे ना? मग. सनीवेलचे सूर्यनगर आणि फेअर ओक्स ची ओकवाडी करून तसेच महाराष्ट्र मंडळ काढून, त्यात फूट पाडून एकाची दोन मंडळे करून कोकणस्थांनी कॅलिफोर्नियाचा कोकण केला आहे (महाराष्ट्र सरकारने अद्याप कोकणाचा कॅलिफोर्निया केला नसला तरी) त्यामुळे टाहोच्या पश्चिमेकडे असलेला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया हीच कोकणास्थांची मायभूमी होय. (सारस्वत)बेसनलाडू

In reply to by मिसळभोक्ता

विकास Tue, 11/30/2010 - 21:40
जर टेक्सास अमेरिकेत नसेल तर अमेरिकेचा मागचा राष्ट्राध्यक्ष हा विदेशी नागरीक होता! :-)

ऋषिकेश Tue, 11/30/2010 - 09:16
वा वा वा वा! विकिलिक्स जे करत आहे ते योग्यच आहे. आधी जनतेला एक सांगून दुसरेच निर्णय घ्यायचे आनि आता ओरड करायची हे चुकीचे आहे. (भारतात (अचानक) शांतता अशी हेडलाईन असेल का? ;) )

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 10:26
खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत आहात .. सर्व मनापासुन पटले .. एकदम बरोबर आहे .. तुम्ही इतके जबरदस्त पद्धतीने लिहिले आहे की आम्हाला काय बोलावे तेच कळत नाहिये .. अश्या लेखनामुळे आणि त्यातील विचारांच्या देवाणघेवाण करण्यामुळे ही नक्कीच समाजात उल्लेखनिय बदल घडतीलच घडतील.. आणि असे वैचारीक पद्धतीने समाजात सर्व ठीकाणी माहीती दिली गेली पाहिजे असे वाटते .. अवांतर : १.० कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा २.० टॉप - ५ मध्ये येण्यासाठी चाललेली केवलवाणी धडपड ३.० तद्दन मसालेदार, धंदेवाईक आणि युसलेस माहिती देणारा धागा ४.० बाकी अजुन सुचेल तसे. अति अवांतर : कोण ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ. अदितीअम्मादेवी, ऊर्फ अदिती अवखळकर पाटील ऊर्फ जोजोकाकू ऊर्फ आज्जीबाई ऊर्फ दुर्बिटणेताई ? धन्यवाद :) - डॉन्या

In reply to by छोटा डॉन

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 10:43
आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद. (ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. तेव्हा आपण "धन्यवाद" आहात.)

In reply to by मिसळभोक्ता

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 10:49
>>आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद. चुक, १० गुण कापले आहेत. सध्या आम्ही 'ब्राझिल / स्पेन' मध्ये इंटरेस्टेड आहोत. >>ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. कुणीतरी म्हणजे नक्की कोण ? आपल्यास सांगण्यास खेद होतो की आपले स्टेटमेंट सरकारसारखेच 'मोघम' आहे, उपयोगी माहीत आपण दाबुन ठेवली आहे असे सांगतो. >>तेव्हा आपण "धन्यवाद" आहात. छे, तुम्ही फारच अशक्य प्रचंड आहात.

In reply to by छोटा डॉन

स्वानन्द Tue, 11/30/2010 - 10:49
सहमत. नुसती चमकुगिरी करते ही बाई. स्वतःच सांगत फिरायचं सगळीकडे. पब्लिसिटी स्टंट नुसता! बाकी बरंच झालं, ब्याद गेल्ली :) आता उसाचं काही खरं नाही!

कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा
अगदी अगदी. हे सर्व वाचुन आमच्या अ‍ॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला. बाकी चालु द्या...

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 10:58
>>हे सर्व वाचुन आमच्या अ‍ॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला. "आंतरजालावर सर्वांनाच सर्व गोष्टी समजतील आणि समजाव्यात असे आमचे अजिबात मत नाही" हे आमचे अतिशय प्रसिद्ध स्टेटमेंट आहे, बहुदा तुम्हाला ते माहित असेलच. जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ?
त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन Tue, 11/30/2010 - 11:06
>>त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ह्यासंबंधी आम्ही अजुन एक वाक्य सांगतो. Leaked data are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital. मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ? ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ?
उगाच त्या हिरव्या अदितीच्या धाग्यावर प्रतिसाद वाढुन तिची TRP वाढायला नको म्हणून पुढिल चर्चा खव अथवा व्यनीतुन करु.

या चर्चेमागे मुळात प्रश्न 'सरकारला काही विशिष्ट व्हीजाविषयक माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे का? असावा का?' असा वाटतो. आदर्श व्हीजाव्यवस्थेत तसा तो नसावा असं मला वाटतं. आदर्श व्हीजा व्यवस्था म्हणजे जिथे व्हीजा नाहीत, कुठल्याही सेना नाहीत, काड्या नाहीत ... मात्र जर आपल्या काड्या परदेशात पाठवणं, अनधिकृतरीत्या इतर विद्यापीठांमध्ये नोकर्‍या देणं हे सरकारकडून जनतेला अपेक्षित असेल तर त्यांची माहिती फक्त मोजक्या लोकांना असावी ही सरकारची अपेक्षा रास्त वाटते. काड्या घालयलाही हव्यात आणि भांडणंही नकोत हे दोन्ही साध्य कसं करणार? प्रश्न असा येतो की या रास्त व्हीजा अर्जातून मिळालेल्या व्हीजाचा गैरवापर होतो आहे का? तसा तो होऊ नये यासाठी अधूनमधून काही जबाबदार आंजासंस्थांना आपल्या मार्गाने अशी माहिती मिळवून ती प्रसिद्ध करता यावी. हा एक प्रकारे अंतर्गत काड्याघालूपणाच आहे. काड्यांवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सरकारतर्फे जशी काड्याघालूगिरी करते, तशीच सरकारवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी आंजासंस्थांतर्फे काड्याघालूगिरी देखील व्हावी. इथे ती दुधारी तलवार सरकारवर उलटते. आम्ही (सरकार) करणार त्याच काड्या योग्य व इतरांच्या (जनतेची) चूक हे म्हणता येत नाही. तेव्हा माझं थोडक्यात मत असं की तूर्तास तरी दोन्ही काड्या चालू राहाव्या. मात्र दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. म्हणजे सरकारने आपल्याला गैरसोयीची काड्या विषयक माहिती दडपून ठेवू नये. व प्रकाशकांनी आपल्या हाती माहिती आली तर ती प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ आणि व्हीजा सुरक्षेला धोका नाही याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करावा. मूळ काद्या काय स्वरूपाच्या आहेत याचा अंदाज येत नसल्याने वरील भूमिकांच्या आधारे कुठच्याच पक्षाची बाजू घेता येत नाही. आदिमाया दुर्बिटणे हिरव्या माजाचे सत्त्व माझ्या लाभु दे लिखाणा काड्यांना येउं दे गा दुतोंडीची कसोटी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता Tue, 11/30/2010 - 11:07
बाबानुकर्णाला विचारुया.. ए, मला झोपू दे ना आता.. तुला काही मिमंबलटोनिया मिळाले कॉई विचार मग..

आनंदयात्री Tue, 11/30/2010 - 11:09
आता मराठी आंतरजालाचे काही खरे नाही !! एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार .. म्याडमसाठी अमरिक्कन सरकारने ऑस्टिन पॉवर्स वापरुन लवकरच दुर्बिण बांधायला घ्यावी हीच ख्रिस्ताचरणी प्रार्थना ..

In reply to by आनंदयात्री

आमोद शिंदे Tue, 11/30/2010 - 21:34
एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार ..
काय शब्द आहे!! हाहाहा आंतरजाल 'झिझवणे'!!

In reply to by इन्द्र्राज पवार

बाबा रे, इन्द्रा, कसं समजावणार तुला? मी डिपेंडंट व्हिजावर जाते आहे ... ते काही काम नाहीये म्हणून! काम असतं (इथे किंवा तिथेही) तर का गेले असते?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 11:52
याचा अर्थ अमेरिकेने हे कारस्थान खूप पूर्वीपासून प्लॅन केलेलं आहे. निरुपद्रवी वाटणारा डिपेंडंट व्हिसा राजरोसपणे देता यावा म्हणून नवऱ्यालादेखील नोकरी देववली आहे. खरं काम कोणाचं व काय आहे हे सर्वांना माहीत आहे. उगीच नाही एवढी लोकं विरोध करत. मी आपला मुकाट्याने अदितीचं स्वागत केल्याचं पुन्हा एकदा लिहितो. अमेरिकन सरकारशी वाकड्यात जाणं मला एवढ्यात तरी परवडायचं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश, किती दिवस तू असं तुझं खरं रूप बदलणार आहेस? आता परासारख्या काही "चाणाक्ष" लोकांच्या लक्षात आलंच आहे की तू ही सरकारसाठी काम करतो आहेस आणि मी तिथे येण्याच्या कारस्थानात सामील आहेस ते!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कवितानागेश Tue, 11/30/2010 - 11:54
म्हणजे तिकडे लगेच काम करता येणार नाही? मग वेळच वेळ! इथे काड्याच काड्या! ...उगीच खूष होतायत सगळे. अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!

In reply to by कवितानागेश

राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 12:00
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
त्यापेक्षा तुम्ही अदिती यांना ते ध्यान, मौन, विपश्यना वगैरे का शिकवत नाही? त्यांचं नाही तरी जगाचं तरी कल्याण होईल.

In reply to by राजेश घासकडवी

कवितानागेश Wed, 12/01/2010 - 09:17
अदितीला हे असले शिकवता शिकवता माझीच भिवंडी झाली म्हणजे?? ....त्यापेक्षा तिला भवानी तिर्थंकरांच्या डायरीतली अजून थोडी पाने चोरून, लेख लिहू देत!

In reply to by कवितानागेश

श्रावण मोडक Tue, 11/30/2010 - 12:54
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
­अर्रे? ­­­भरतकाम, वि­णकाम ­(पहिल्या ­अक्षराचे ­शुद्­धले­खन, ­शुद्­धले­खन...­­!)­ हीही खु­षखबर ­आहे होय! वा... वा... ते काय म्ह­णतात ना दु­धात सा­खर... तसं ­झालं हे! ;­)

In reply to by श्रावण मोडक

बेसनलाडू Tue, 11/30/2010 - 13:26
हीही खु­षखबर ­आहे होय! वा... वा... ते काय म्ह­णतात ना दु­धात सा­खर... तसं ­झालं हे! ;­) अपत्याच्या जन्माने नागरिकत्त्वाची शिडी वापरून अमेरिकन नागरिकत्त्व मिळवायचा ही&हि प्रयत्न असला तरी आवडला म्हटले पाहिजे ;) (भारतीय)बेसनलाडू असे झाल्याने हिरवा माज आयताच जीवनाचे अविभाज्य अंग बनणार, हेही ओघाने आलेच. त्यामुळे आता अमेरिकास्थित हिरव्या माजोरड्यांकडून तो शिकायला नको ;) (अमेरिकास्थित)बेसनलाडू (सर्व संबंधितांनी ह. घ्या.)

शिल्पा ब Tue, 11/30/2010 - 11:23
कशाला येताय इथे? नाही म्हणजे काय काम आहे असं प्रेमाने विचारलं हो!!! ( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)

In reply to by शिल्पा ब

( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)
सहमत सहमत सहमत ! एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिंतामणी Wed, 12/01/2010 - 01:08
सहमत सहमत सहमत ! एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते. सहमत सहमत सहमत ! त्याच बरोबर असे वाटले की.......................... जाउ दे. जाण्या-याला कशाला दुखवा. शुभास्ते पंथानः संतु:

In reply to by चिंतामणी

शिल्पा ब Wed, 12/01/2010 - 07:18
अहो फक्त भारतातून अमेरिकेत जाणार आहे...जगातून नाही....दुखवा इथेच काय दुखवायचं ते

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 15:00
एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.
पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?
बसु आणि बोलु एकदा.
पर्‍या, "तुझा भाव काय"?
अदिती... 'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड. 'रेट' म्हण ग ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड.
कार्पेटखालचा दांभिक कचरा बर्‍याच दिवसांत साफ न केल्यामुळे बहुदा असा मध्यमवर्गीय भावूक शब्द आठवला. असो. बाकी काय म्हणालात तुमचा रेट?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 15:15
होलसेल डिस्काऊंट देतो का हो तो? पर्‍या, "तुझा भाव काय"?
पण त्यासाठी एक लक्षात ठेवायचं. फार भाव द्यायचा नाही. भाव करायचा. काही कष्टमर नुसते अय्या म्हणून पळून जातात. आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची. मग द्यायचे थोडे जास्त. शेवटी त्यालाही पोट आहेच ना.

In reply to by राजेश घासकडवी

बाकी काय म्हणालात तुमचा रेट?
नका विचारु. तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे.
आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची.
अशा लोकांना आम्ही रँबोकडे पाठवतो ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय Wed, 12/01/2010 - 16:06
तसं नाही. तुम्ही काहीतरी फुकट देता आहात त्याचे अप्रुप आहे. ;) बाकी पुणेद्वेष्ट्यांचा खच आहे मिपावर. त्याचे एवढे कौतुक नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 15:39
अगं, इतका घोटाळा कसा गं करतेस. पुण्यातले फेमस दुकानदार ते. आपण कष्टमर. (दुकानदाराने दिलेल्या कष्टाने मरतो तो)

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी इतके कसे हो तुम्ही अडाणी? आता सर्कारी म्हटल्यावर घोटाळा होणारच ना?? अजून हिरवी झाले नाहीये मी!

In reply to by राजेश घासकडवी

मी तुमच्या स्वभावाचा (पक्षी : पुणेद्वेष) उल्लेख केलेला आहे !! विनाकारण अकारण केलेले आरोप सहन केले जाणार नाहीत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 16:17
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. एका विक्षिप्त पुणेरी दुकानदाराची कहाणी सांगितली तर शहरद्वेषाचा आरोप पदरात पडतो. तोही एका पुणेरी दुकानदाराकडून. विनाकारण + अकारण!

In reply to by राजेश घासकडवी

बघा तुम्ही आता मला चोर म्हणत आहात. कित्ती कित्ती द्वेष भरलाय तुमच्या विषारी मनात. अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ? *आजकाल आपापल्या गावातल्या संपादकांना पकडून राहिलेले बरे असते. जल्ला कधी सदस्यत्वावर कुर्‍हाड आली तर उपयोग होतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 16:30
अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ?
जबाबदार हे विशेषण पुणेकर साठी आहे की संपादक साठी? तुमच्या कोणाविषयी अतिरेकी अपेक्षा आहेत असं म्हणू? मीही हाक मारतो ना हिरव्या संपादकांना. होऊनच जाऊदेत. कोण आहे रे तिकडे?

In reply to by राजेश घासकडवी

खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच पुणेकर संपादक. हि द्विरुक्ती आहे. असो... तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन Wed, 12/01/2010 - 16:37
तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.
=)) =)) =)) =)) और ये लगा सिक्सर !!! दंगा बास करा रे आता ;) - छोटा डॉन

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश घासकडवी Wed, 12/01/2010 - 16:40
अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर... असं दुहीचं राजकारण खेळताय, ते महागात पडेल. वेळ जायला वेळ लागत नाही. अशीही वेळ येईल की तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल. आणि ते होईल तेव्हा पहिला वार....

In reply to by राजेश घासकडवी

अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर...
हे बघा गुर्जी, सचिन जबाबदारीने खेळला असे जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा नेहरा खेळला नाही असा त्याचा अर्थ काढायचा नसतो. ते वाक्य सचिनच्या कौतुकापुरते सिमित असते. तुमच्यासारखे नारदमुनी उगाच अर्थाचे अनर्थ तयार करुन जालिय दंगली पेटवता आणि त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजुन घेता. आत तरी जागे व्हा, निदान बिहारच्या उदाहरणावरुन तरी शहाणे व्हा ! असो... डान्रावांनी दंगा नको म्हणल्याने आम्ही आता अंमळ विश्रांती घेतो. देर इज आलवेज अ फस्ट टैम आलवेज अ नेक्स्ट टैम... (घासुगुर्जी) नेक्स्ट टैम... दबंग परा पांडे

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल.
अजून सव्वा-दीड तासांत अंधारच होईल हो गुर्जी!

बद्दु Tue, 11/30/2010 - 11:27
बाकी काही असो...." पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले. ".... हे वाक्य काळजाला भिडलं...

sagarparadkar Tue, 11/30/2010 - 12:01
न्युझीलंड वासी --- किविस्थ जपानवासी -- जपानस्थ किंवा नवसूर्यभूमिस्थ ऑस्ट्रेलियावासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय पूर्वयुरोपवासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय ब्रिटनवासी -- आंग्लभूमिस्थ अमेरिकावासी -- ईस्टकोस्ट्स्थ (पूर्वतटस्थ), मध्यभूमिस्थ, पर्वत्भूमिस्थ, वेस्ट्कोस्टस्थ (पश्चिमतटस्थ) आखात वासी -- मरूभूमिस्थ / मध्यपूर्वस्थ / तैलभूमिस्थ
वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ.

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

चार्वाक - एक न-दर्शन

आळश्यांचा राजा ·

वारकरि रशियात Wed, 11/17/2010 - 17:00
खंडन-मंडनासाठी अर्धरथी / रथी / महारथी आहेतच..... पण याचा समावेश षड्दर्शनांत होतो असे आहे ते कां? पण (बव्हंशी) सर्व मुद्दे (व्यवस्थित) आले आहेत.

अवलिया Wed, 11/17/2010 - 17:37
उत्तम आढावा. माझ्या मनातले बरेच मुद्दे आपण घेतले आहेत. बाकीचे जाणकार जे काही खंडन मंडन करायचे असेल ते करतीलच. थोडी माहिती माधवाच्या सर्वदर्शन संग्रहातील चार्वाक दर्शन या भागाविषयी - माधवाने चार्वाकाचे मत म्हणुन जे श्लोक दिले आहेत ते बदलुन दिले आहेत यावर अनेक जण अनेक ठिकाणी बोलत असतात. माझ्याकडे जी प्रत आहे तिच्या नुसार त्यात दोन्ही श्लोक दिले आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार काही पाठभेद आढळतात. काही जुन्या हस्तलिखित प्रतींमधे फक्त नास्ति मृत्युर्गोचर असा उल्लेख आढळतो तर काहींमधे दोन्ही ठिकाणी ऋणं ...पिबेत असा उल्लेख आढळतो. माधवाच्या पुर्वीच्या काही वेगळ्या ग्रंथामधे सुद्धा ऋणं..पिबेत असा उल्लेख आढळतो. त्यामुळे "विशिष्ट हेतुसाठी श्लोक बदलला" असे उल्लेख करुन त्याचे कर्तृत्व माधवाकडे दिले.जे योग्य असावे असे मला वाटत नाही. यावर अजुन संशोधन व्हायला हवे. @वारकरी रशियात चार्वाक दर्शन षडदर्शंनांमधे धरले जात नाही असे मला वाटते.

In reply to by अवलिया

वारकरि रशियात गुरुवार, 11/18/2010 - 10:55
नानाजी, अवांतर१) एकूण सोळा दर्शने आहेत असे वाचले होते. अवांतर २) माझ्या अभ्यासात तसेच मला मान्य असलेल्या विचारधारेनुसार षड्दर्शने: जैमिनीय पूर्वमीमांसा, बादरायण व्यासांची उत्तरमीमांसा, कणादांचे वैशेषिकशास्त्र, गौतमांचे न्यायशास्त्र कपिलमहामुनींचे सांख्यशास्त्र व पतंजलींचे योगशास्त्र. हीच आहेत. अवांतर ३) पण एका अन्य विचारधारेप्रमाणे''षड्दर्शनसमुच्चया' त वरील सहांचे मिळून तीन व अन्य तीन (पैकी एक चार्वाक) अशी विभागणी केली आहे असे वाचले होते. त्यामुळे माझा उगाचच गोंधळ झाला होता! असो. चार्वाकाच्या विचारसरणीबाबत आणखीही लिहिण्यासारखे कांही आहे, बघुया वेळ कसा होतो ते. तोवर जाणकार ज्ञानात भर घालत राहतीलच.

विसुनाना Wed, 11/17/2010 - 18:00
लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे.
-माझेही याच दिशेने सुरू होते. नव्हे! आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो. पण प्रत्यक्षात मात्र 'चारुवाक' लोकायत आचारपद्धती अवलंबतो असे माझे मत आहे. चारुवाक = Hypocrisy. या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह खूप पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही ग्रंथांविना वाहतो आहे. कारण तो स्वयंभू आचारप्रवाह आहे - त्याला लिखित बंधंनांची गरज नाही. *अपवादांचे स्वागत आणि अभिनंदन.

In reply to by विसुनाना

या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह खूप पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही ग्रंथांविना वाहतो आहे. कारण तो स्वयंभू आचारप्रवाह आहे - त्याला लिखित बंधंनांची गरज नाही.
सहमत आहे. चारुवाक = Hypocrisy हे समीकरण पटत नाही.

In reply to by विसुनाना

अवलिया Mon, 11/22/2010 - 11:50
आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो. बराचसा सहमत आहे. आणि म्हणुनच जे खरोखरच असे अध्यात्मिक होते, आहेत किंवा असतील त्यांचे अनेकांना सुप्त आकर्षण असावे. आणि असे अध्यात्मिक होते, आहेत, असतील म्हणुनच त्यांचे खोटे अनुकरण करुन तुंबड्या भरणारे ढोंगी पण समा़जात होते, आहेत, असतील. म्हणुनच सर्वसाधारण मनुष्याचा दृष्टिकोन बहुधा दुर्योधनाच्या तोंडुनच वदवला गेला आहे जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर्जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति | केनापि देवेन हृदि स्थितेन यथानियुक्तोऽस्मि तथा करोमि ||

धमाल मुलगा Wed, 11/17/2010 - 17:55
बापरे! दोन्ही बाजूंचे मुद्दे पटतायत मला (ऑफकोर्स, ह्या विषयाच्या अज्ञानापोटीच.). पण वाचतो आहे. आवडीनं वाचतो आहे. जमेल तसं, समजेल तितकं उमजुन घेतो आहे.

श्री. रा. रा. आ. रा. जी, आपला लेख वाचला. त्यातल्या पहिल्या परिच्छेदामुळे आपले पहिले अभिनंदन करतो. दुसर्‍या परिच्छेदामुळे दुसरे अभिनंदन. नुसतीच गंमत न बघता किंवा एखादा प्रतिसाद देऊन बाजूला न होता, आपण नीट असे लेखन करून धागा टाकलात. बरेच लोक इथे असे आहेत की त्यांनीही असेच वर्तन ठेवल्यास मिपावरील लेखनाच्या दर्ज्याची काळजी करायची गरज भासणार नाही. असो. ;) बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चांगभलं Wed, 11/17/2010 - 21:39
बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद. नशिब माझ....मान्य केलत......

विकास Wed, 11/17/2010 - 19:49
दोन्ही लेख आत्ताच वाचले. विषय श्री. शरद यांच्या मूळ माहितीलेखाप्रमाणेच चांगला हाताळला आहे. माझे या संदर्भात डिटेल वाचन नाही, पण या दोन्ही लेखांमुळे उत्सुकता चाळावली गेली आहे. काही प्रश्नः लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे. मला कल्पना आहे की हे आपले मत आहे. तरी देखील केवळ उत्सुकतेपोटी विचारत आहे (not questioning) गैरसमज नसावा, हे पण केवळ आपलेच मत आहे का कुठे वाचनात आले आहे? आपण लिहीलेले मधूरवाणीचे - चार्वाक आणि विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy, यात काही फरक आहे का? Hypocrisy मधूर वाणीने होऊ शकते म्हणून हा प्रश्न! धन्यवाद!

In reply to by विकास

केवळ आपलेच मत आहे का कुठे वाचनात आले आहे?
एकूणच असा निष्कर्ष काढणे फार अवघड नाही. आणि असे वाचनातही आलेले आहे. वाचनात दोन्ही बाजू आल्यात, दर्शन असावे, आणि दर्शन नव्हते, अशा दोन्ही. दर्शन नव्हते हे मत विचारांती पटण्यासारखे वाटते. विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy मला पटत नाही. चार्वाकांची मते प्रामाणिक आहेत असे वाटते. खोडता येतात. म्हणजे ढोंगी होत नाहीत. त्यांना म्हणायचे असावे, तोंडाने भज गोविंदम म्हणायचे, पण त्यात अपेक्षित असलेली साधना करायची नाही, ही हिपोक्रसी. चार्वाकांना ढोंगी म्हणायची गरज नाही.

धनंजय गुरुवार, 11/18/2010 - 05:01
लोकायत, चार्वाक ... अशिक्षित विचारसरणी, प्रतिष्ठित विचारसरणी असेही मत वाचले आहे, की दोन्ही प्रकार होते. प्रतिष्ठित विचारसरणी लुप्त झाल्यानंतर त्यातील काही तत्त्वे अशिक्षित विचारसरणीशी समांतर असल्यामुळे त्या दोहोंची गल्लत झाली... स्रोत परामर्श प्रकाशनाच्या निबंधसंग्रहापैकी एक निबंध. नेमके शीर्षक, प्रकाशनवर्श बगैरे पुस्तक तपासून मग देईन. (एक-दोन आठवड्यांच्या विलंबानंतर. क्षमस्व.)

In reply to by धनंजय

थँक्स! तुम्ही मनावर घेतले तर या विषयावर बराच प्रकाश पडू शकेल. ज्याप्रमाणे अणुवादाचे खंडन लिहिलेत तसेच याही विषयावर लिहावे ही विनंती!

अवलिया गुरुवार, 11/18/2010 - 12:51
चार्वाकमताने वेदऋचा ह्या अर्थहीन असल्याचे प्रतिपादन केले जाते त्यात अनेकदा उल्लेख केलेला जर्फरीतुर्फरी ऋचा ऋग्वेदातील दशम मंडलातील १०६ व्या सुक्तातील ६ वी ऋचा (१०.१०६.६) (उदात्तअनुदात्त स्वर दिलेले नाहीत) सृण्येव जर्भरी तुर्फरीतू नैतोशेव तुर्फरी पर्फरिका | उदन्यजेव जेमना मदेरु ता मे जरय्वजरं मरायु || ( हे अश्विनीकुमारांनो) तुम्ही अंकुश (सृणि) लावावयास योग्य अशा मत्त हत्तींप्रमाणे शरिर झुकवणारे (जर्भरी) मारणारे (तुर्फरी) संतोष देणार्‍या मनुष्याच्या पुत्रांसारखे (नैतोशेव) विनाश करणारे (तुर्फरी) धनाची भर करणारे (पर्फरिका) जलातुन उत्पन्न होणार्‍या वस्तुंप्रमाणे निर्मल (उदन्यजेव) विजय प्राप्त करणारे (जेमना) मदाने युक्त (मदेरु) आहात, तेव्हा तुम्ही माझ्या जरेने युक्त (जरायु) आणि मरणशील (मरायु) अशा शरीराला जरारहीत करावे. *** माधवाने सर्वदर्शसंग्रहात एकुण १६ दर्शनांची माहिती दिली असुन एकेका दर्शनाची एकेका अध्यायात अशी माहिती दिली आहे. दर्शनांचा क्रम माधवाच्या मताने विचार करण्यास योग्य अशा क्रमाने दिला असुन चार्वाक दर्शन पहिले आणि अद्वैत दर्शन शेवटी दिले आहे. यानुसार माधवाचा अद्वैताकडे असलेला ओढा स्पष्ट दिसत असला तरी प्रत्येक दर्शनाची माहिती त्याने जणू काही त्या दर्शनाचा प्रणेताच देत आहे अशा व्यवस्थित पणे दिलेली आहे. अद्वैत दर्शनाकडे (शंकरमत) त्याचा असलेला ओढा हा त्या ग्रंथात अद्वैत दर्शनाच्या (शंकरमत) अध्यायाच्या शेवटी सकलदर्शनशिरोSलंकार रत्नं या शब्दांनी सुचित होतो. तर चार्वाक दर्शनाच्या शेवटी असलेली त्याची टीप अशी "तस्माद्बहुनां प्राणिनामनुग्रहार्थ चार्वाकमतमाश्रणीयमिती रमणीयम्". इतर कोणत्याही दर्शनाच्या अंतभागी त्याने कोणतेही मत दिलेले नाही.

तुमच्याशी सहमत आहे. (काय म्हणता आहात ते गृहीत धरुन!) मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे. त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून. त्या अर्थाने त्याला चार्वाकच म्हटले पाहिजे. असो. वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे, आणि वेद अर्थहीन आहेत अशी दोन्ही विधाने करण्यालाच मुळात काही अर्थ नाही. अर्थहीन म्हणावे, तर या वेदांच्या पायावरच तर महत्त्वाची दर्शने उभी आहेत. मग ती दर्शने पण अर्थहीन म्हणावी का? वेदांगे पण अर्थहीन म्हणावी का? धनुर्वेद, आयुर्वेद इ. उपवेद पण अर्थहीन का? संगीत, नृत्य, नाट्य आदि कला ज्या दर्शनांच्या पायावर उन्नत झाल्या त्या सगळ्याच अर्थहीन का? अगदी अलीकडचे उदाहरण वैदिक गणिताचे आहे. त्याच्या निर्मात्याने, भारती कृष्णतीर्थांनी, या अजब गणिती पद्धतीचे दिलेले स्पष्टीकरण (रॅशनल!) बुद्धीला न पटणारे आहे. (वेदांतील – अथर्ववेदातील – काही सूत्रांचे ‘गूढ’ अर्थ त्यांच्या अंत:प्रज्ञेला दिसले, समजले.) तरीही ते गणित समोर आहे, उपलब्ध आहे, नाकारता येत नाही. म्हणजे वेदांमध्ये वरवर जर्फरी तुर्फरी अशी अर्थहीनता दिसली तरी त्याने गंडून जायचे कारण नाही. तसेच, वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे. सगळेच ज्ञान आहे, तर वापरा ना. कशाला नवीन शोध लावत बसताय, आणि पश्चिमेने नवीन तंत्र देण्याची वाट बघत बसताय?

In reply to by आळश्यांचा राजा

अवलिया Mon, 11/22/2010 - 11:49
>>>मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे. हे बहुधा त्याने ब्राह्मण भागांविषयी व्यक्त केलेले मत आहे. मंत्रांबद्दल सुद्धा अनेक जणांचे विविध मते सापडतात. >>>त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून +१ >>वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे. सहमत आहे. म्हणुनच सुज्ञ माणसाने कुणाच्याही व्यक्त केलेल्या मतावर संपूर्णपणे विसंबुन न रहाता स्वतः काय आहे हे जाणुनच मग त्याप्रमाणे योग्य अयोग्य असे प्रतिपादन करणे जास्त योग्य आहे असे मला वाटते.

वारकरि रशियात Wed, 11/17/2010 - 17:00
खंडन-मंडनासाठी अर्धरथी / रथी / महारथी आहेतच..... पण याचा समावेश षड्दर्शनांत होतो असे आहे ते कां? पण (बव्हंशी) सर्व मुद्दे (व्यवस्थित) आले आहेत.

अवलिया Wed, 11/17/2010 - 17:37
उत्तम आढावा. माझ्या मनातले बरेच मुद्दे आपण घेतले आहेत. बाकीचे जाणकार जे काही खंडन मंडन करायचे असेल ते करतीलच. थोडी माहिती माधवाच्या सर्वदर्शन संग्रहातील चार्वाक दर्शन या भागाविषयी - माधवाने चार्वाकाचे मत म्हणुन जे श्लोक दिले आहेत ते बदलुन दिले आहेत यावर अनेक जण अनेक ठिकाणी बोलत असतात. माझ्याकडे जी प्रत आहे तिच्या नुसार त्यात दोन्ही श्लोक दिले आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार काही पाठभेद आढळतात. काही जुन्या हस्तलिखित प्रतींमधे फक्त नास्ति मृत्युर्गोचर असा उल्लेख आढळतो तर काहींमधे दोन्ही ठिकाणी ऋणं ...पिबेत असा उल्लेख आढळतो. माधवाच्या पुर्वीच्या काही वेगळ्या ग्रंथामधे सुद्धा ऋणं..पिबेत असा उल्लेख आढळतो. त्यामुळे "विशिष्ट हेतुसाठी श्लोक बदलला" असे उल्लेख करुन त्याचे कर्तृत्व माधवाकडे दिले.जे योग्य असावे असे मला वाटत नाही. यावर अजुन संशोधन व्हायला हवे. @वारकरी रशियात चार्वाक दर्शन षडदर्शंनांमधे धरले जात नाही असे मला वाटते.

In reply to by अवलिया

वारकरि रशियात गुरुवार, 11/18/2010 - 10:55
नानाजी, अवांतर१) एकूण सोळा दर्शने आहेत असे वाचले होते. अवांतर २) माझ्या अभ्यासात तसेच मला मान्य असलेल्या विचारधारेनुसार षड्दर्शने: जैमिनीय पूर्वमीमांसा, बादरायण व्यासांची उत्तरमीमांसा, कणादांचे वैशेषिकशास्त्र, गौतमांचे न्यायशास्त्र कपिलमहामुनींचे सांख्यशास्त्र व पतंजलींचे योगशास्त्र. हीच आहेत. अवांतर ३) पण एका अन्य विचारधारेप्रमाणे''षड्दर्शनसमुच्चया' त वरील सहांचे मिळून तीन व अन्य तीन (पैकी एक चार्वाक) अशी विभागणी केली आहे असे वाचले होते. त्यामुळे माझा उगाचच गोंधळ झाला होता! असो. चार्वाकाच्या विचारसरणीबाबत आणखीही लिहिण्यासारखे कांही आहे, बघुया वेळ कसा होतो ते. तोवर जाणकार ज्ञानात भर घालत राहतीलच.

विसुनाना Wed, 11/17/2010 - 18:00
लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे.
-माझेही याच दिशेने सुरू होते. नव्हे! आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो. पण प्रत्यक्षात मात्र 'चारुवाक' लोकायत आचारपद्धती अवलंबतो असे माझे मत आहे. चारुवाक = Hypocrisy. या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह खूप पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही ग्रंथांविना वाहतो आहे. कारण तो स्वयंभू आचारप्रवाह आहे - त्याला लिखित बंधंनांची गरज नाही. *अपवादांचे स्वागत आणि अभिनंदन.

In reply to by विसुनाना

या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह खूप पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही ग्रंथांविना वाहतो आहे. कारण तो स्वयंभू आचारप्रवाह आहे - त्याला लिखित बंधंनांची गरज नाही.
सहमत आहे. चारुवाक = Hypocrisy हे समीकरण पटत नाही.

In reply to by विसुनाना

अवलिया Mon, 11/22/2010 - 11:50
आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो. बराचसा सहमत आहे. आणि म्हणुनच जे खरोखरच असे अध्यात्मिक होते, आहेत किंवा असतील त्यांचे अनेकांना सुप्त आकर्षण असावे. आणि असे अध्यात्मिक होते, आहेत, असतील म्हणुनच त्यांचे खोटे अनुकरण करुन तुंबड्या भरणारे ढोंगी पण समा़जात होते, आहेत, असतील. म्हणुनच सर्वसाधारण मनुष्याचा दृष्टिकोन बहुधा दुर्योधनाच्या तोंडुनच वदवला गेला आहे जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर्जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति | केनापि देवेन हृदि स्थितेन यथानियुक्तोऽस्मि तथा करोमि ||

धमाल मुलगा Wed, 11/17/2010 - 17:55
बापरे! दोन्ही बाजूंचे मुद्दे पटतायत मला (ऑफकोर्स, ह्या विषयाच्या अज्ञानापोटीच.). पण वाचतो आहे. आवडीनं वाचतो आहे. जमेल तसं, समजेल तितकं उमजुन घेतो आहे.

श्री. रा. रा. आ. रा. जी, आपला लेख वाचला. त्यातल्या पहिल्या परिच्छेदामुळे आपले पहिले अभिनंदन करतो. दुसर्‍या परिच्छेदामुळे दुसरे अभिनंदन. नुसतीच गंमत न बघता किंवा एखादा प्रतिसाद देऊन बाजूला न होता, आपण नीट असे लेखन करून धागा टाकलात. बरेच लोक इथे असे आहेत की त्यांनीही असेच वर्तन ठेवल्यास मिपावरील लेखनाच्या दर्ज्याची काळजी करायची गरज भासणार नाही. असो. ;) बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चांगभलं Wed, 11/17/2010 - 21:39
बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद. नशिब माझ....मान्य केलत......

विकास Wed, 11/17/2010 - 19:49
दोन्ही लेख आत्ताच वाचले. विषय श्री. शरद यांच्या मूळ माहितीलेखाप्रमाणेच चांगला हाताळला आहे. माझे या संदर्भात डिटेल वाचन नाही, पण या दोन्ही लेखांमुळे उत्सुकता चाळावली गेली आहे. काही प्रश्नः लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे. मला कल्पना आहे की हे आपले मत आहे. तरी देखील केवळ उत्सुकतेपोटी विचारत आहे (not questioning) गैरसमज नसावा, हे पण केवळ आपलेच मत आहे का कुठे वाचनात आले आहे? आपण लिहीलेले मधूरवाणीचे - चार्वाक आणि विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy, यात काही फरक आहे का? Hypocrisy मधूर वाणीने होऊ शकते म्हणून हा प्रश्न! धन्यवाद!

In reply to by विकास

केवळ आपलेच मत आहे का कुठे वाचनात आले आहे?
एकूणच असा निष्कर्ष काढणे फार अवघड नाही. आणि असे वाचनातही आलेले आहे. वाचनात दोन्ही बाजू आल्यात, दर्शन असावे, आणि दर्शन नव्हते, अशा दोन्ही. दर्शन नव्हते हे मत विचारांती पटण्यासारखे वाटते. विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy मला पटत नाही. चार्वाकांची मते प्रामाणिक आहेत असे वाटते. खोडता येतात. म्हणजे ढोंगी होत नाहीत. त्यांना म्हणायचे असावे, तोंडाने भज गोविंदम म्हणायचे, पण त्यात अपेक्षित असलेली साधना करायची नाही, ही हिपोक्रसी. चार्वाकांना ढोंगी म्हणायची गरज नाही.

धनंजय गुरुवार, 11/18/2010 - 05:01
लोकायत, चार्वाक ... अशिक्षित विचारसरणी, प्रतिष्ठित विचारसरणी असेही मत वाचले आहे, की दोन्ही प्रकार होते. प्रतिष्ठित विचारसरणी लुप्त झाल्यानंतर त्यातील काही तत्त्वे अशिक्षित विचारसरणीशी समांतर असल्यामुळे त्या दोहोंची गल्लत झाली... स्रोत परामर्श प्रकाशनाच्या निबंधसंग्रहापैकी एक निबंध. नेमके शीर्षक, प्रकाशनवर्श बगैरे पुस्तक तपासून मग देईन. (एक-दोन आठवड्यांच्या विलंबानंतर. क्षमस्व.)

In reply to by धनंजय

थँक्स! तुम्ही मनावर घेतले तर या विषयावर बराच प्रकाश पडू शकेल. ज्याप्रमाणे अणुवादाचे खंडन लिहिलेत तसेच याही विषयावर लिहावे ही विनंती!

अवलिया गुरुवार, 11/18/2010 - 12:51
चार्वाकमताने वेदऋचा ह्या अर्थहीन असल्याचे प्रतिपादन केले जाते त्यात अनेकदा उल्लेख केलेला जर्फरीतुर्फरी ऋचा ऋग्वेदातील दशम मंडलातील १०६ व्या सुक्तातील ६ वी ऋचा (१०.१०६.६) (उदात्तअनुदात्त स्वर दिलेले नाहीत) सृण्येव जर्भरी तुर्फरीतू नैतोशेव तुर्फरी पर्फरिका | उदन्यजेव जेमना मदेरु ता मे जरय्वजरं मरायु || ( हे अश्विनीकुमारांनो) तुम्ही अंकुश (सृणि) लावावयास योग्य अशा मत्त हत्तींप्रमाणे शरिर झुकवणारे (जर्भरी) मारणारे (तुर्फरी) संतोष देणार्‍या मनुष्याच्या पुत्रांसारखे (नैतोशेव) विनाश करणारे (तुर्फरी) धनाची भर करणारे (पर्फरिका) जलातुन उत्पन्न होणार्‍या वस्तुंप्रमाणे निर्मल (उदन्यजेव) विजय प्राप्त करणारे (जेमना) मदाने युक्त (मदेरु) आहात, तेव्हा तुम्ही माझ्या जरेने युक्त (जरायु) आणि मरणशील (मरायु) अशा शरीराला जरारहीत करावे. *** माधवाने सर्वदर्शसंग्रहात एकुण १६ दर्शनांची माहिती दिली असुन एकेका दर्शनाची एकेका अध्यायात अशी माहिती दिली आहे. दर्शनांचा क्रम माधवाच्या मताने विचार करण्यास योग्य अशा क्रमाने दिला असुन चार्वाक दर्शन पहिले आणि अद्वैत दर्शन शेवटी दिले आहे. यानुसार माधवाचा अद्वैताकडे असलेला ओढा स्पष्ट दिसत असला तरी प्रत्येक दर्शनाची माहिती त्याने जणू काही त्या दर्शनाचा प्रणेताच देत आहे अशा व्यवस्थित पणे दिलेली आहे. अद्वैत दर्शनाकडे (शंकरमत) त्याचा असलेला ओढा हा त्या ग्रंथात अद्वैत दर्शनाच्या (शंकरमत) अध्यायाच्या शेवटी सकलदर्शनशिरोSलंकार रत्नं या शब्दांनी सुचित होतो. तर चार्वाक दर्शनाच्या शेवटी असलेली त्याची टीप अशी "तस्माद्बहुनां प्राणिनामनुग्रहार्थ चार्वाकमतमाश्रणीयमिती रमणीयम्". इतर कोणत्याही दर्शनाच्या अंतभागी त्याने कोणतेही मत दिलेले नाही.

तुमच्याशी सहमत आहे. (काय म्हणता आहात ते गृहीत धरुन!) मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे. त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून. त्या अर्थाने त्याला चार्वाकच म्हटले पाहिजे. असो. वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे, आणि वेद अर्थहीन आहेत अशी दोन्ही विधाने करण्यालाच मुळात काही अर्थ नाही. अर्थहीन म्हणावे, तर या वेदांच्या पायावरच तर महत्त्वाची दर्शने उभी आहेत. मग ती दर्शने पण अर्थहीन म्हणावी का? वेदांगे पण अर्थहीन म्हणावी का? धनुर्वेद, आयुर्वेद इ. उपवेद पण अर्थहीन का? संगीत, नृत्य, नाट्य आदि कला ज्या दर्शनांच्या पायावर उन्नत झाल्या त्या सगळ्याच अर्थहीन का? अगदी अलीकडचे उदाहरण वैदिक गणिताचे आहे. त्याच्या निर्मात्याने, भारती कृष्णतीर्थांनी, या अजब गणिती पद्धतीचे दिलेले स्पष्टीकरण (रॅशनल!) बुद्धीला न पटणारे आहे. (वेदांतील – अथर्ववेदातील – काही सूत्रांचे ‘गूढ’ अर्थ त्यांच्या अंत:प्रज्ञेला दिसले, समजले.) तरीही ते गणित समोर आहे, उपलब्ध आहे, नाकारता येत नाही. म्हणजे वेदांमध्ये वरवर जर्फरी तुर्फरी अशी अर्थहीनता दिसली तरी त्याने गंडून जायचे कारण नाही. तसेच, वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे. सगळेच ज्ञान आहे, तर वापरा ना. कशाला नवीन शोध लावत बसताय, आणि पश्चिमेने नवीन तंत्र देण्याची वाट बघत बसताय?

In reply to by आळश्यांचा राजा

अवलिया Mon, 11/22/2010 - 11:49
>>>मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे. हे बहुधा त्याने ब्राह्मण भागांविषयी व्यक्त केलेले मत आहे. मंत्रांबद्दल सुद्धा अनेक जणांचे विविध मते सापडतात. >>>त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून +१ >>वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे. सहमत आहे. म्हणुनच सुज्ञ माणसाने कुणाच्याही व्यक्त केलेल्या मतावर संपूर्णपणे विसंबुन न रहाता स्वतः काय आहे हे जाणुनच मग त्याप्रमाणे योग्य अयोग्य असे प्रतिपादन करणे जास्त योग्य आहे असे मला वाटते.
लेखनप्रकार
चार्वाक या दर्शनाला थोडंसं झुकतं माप देण्याचा एक ट्रेंड दिसतो. या दर्शनाला बंडखोर दर्शन मानले जाते. भाकडकथांवर विश्वास न ठेवणारे, परलोक न मानणारे, केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानणारे, शब्दप्रामाण्यावर विश्वास न ठेवणारे असे हे दर्शन आधुनिक वैज्ञानिक विचारधारेशी मिळतेजुळते आहे असे अनेकांना प्रथमदर्शनी वाटते. (भोंदू) वैदिक विचारांवर आघात (!) करणारे दर्शन म्हणून ब्राह्मणेतर (ब्राह्मणविरोधी) मंडळींमध्ये या दर्शनाविषयी प्रेम दिसते. जातीपातींचा विचार सोडून दिल्यासही एकूणच सुशिक्षित वर्गामध्ये अंधश्रद्धेच्या ठाम विरोधात असलेल्या या दर्शनाविषयी सॉफ्ट कॉर्नर असतो.

भाषिक संपत्ती

मृत्युन्जय ·

In reply to by मितान

बेसनलाडू Tue, 10/26/2010 - 22:44
मस्त, खुसखुशीत लेख. खूप मजा आली वाचताना. (वाचक)बेसनलाडू अवांतर - कंसातील वाक्ये सूचक कोपरखळ्यांसारखी असली, तरी एकंदर लेखाच्या संदर्भात विचार करता अनावश्यक वाटली. (अवांतर)बेसनलाडू

सूड Tue, 10/26/2010 - 17:45
मिपावर वाचलेल्या एका (शिवी/ अपशब्द काय म्हणू ?) शब्दासाठी मी मिलिंद बोकिलांचं 'शाळा' वाचल्याचं आठवलं. :)

हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले रे एकदम. मस्त फटाके वाजवले आहेस :) हे लेखन वाचता वाचता बिकांच्या ह्या लेखाची खास आठवण येउन गेली.

sagarparadkar Tue, 10/26/2010 - 17:49
>> पण आपण संस्कृती संस्कृती जी म्हणतो ती आपल्याला पुलं, शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचुन आठवेल की या शिव्या ऐकुन? काय म्हणता? पु. लं. चे 'रावसाहेब' वाचून पण आठवेल की संस्कृती ... ते (पक्षी रावसाहेब) काय असंस्कृत होते का?

sagarparadkar Tue, 10/26/2010 - 17:55
व. पुं. चा 'भांडणारा जोशी' पण एके ठिकाणी चिंता व्यक्त करतो की मराठीतल्या शिव्या आता फारच जुन्या झाल्यात, आणि नवीन शिव्या काही तयार होत नाहीत, कोण हे काम करणारेय काही कळत नाही ... :) ते ऐकून माझ्या काही 'पेठेतल्या' मित्रवर्यांनी हे काम स्वीकारले होते पण उदर्निर्वाहाची कामे इतकी वाढली कि त्यांपुढे ह्या कामाकडे मग पारच दुर्लक्ष झाले ... :-)

In reply to by sagarparadkar

मृत्युन्जय Tue, 10/26/2010 - 17:58
काही हरकत नाही. आजही भावे हायस्कूल किंवा नूमवि किंवा सेंट विमलीज च्या बाहेर रोज एक तास उभे राहिलात तर ज्ञानात प्रचंड भर पडेल. ते वयच तसे असते. आणि त्या वयातले सगळे मित्रही आठवणीत तसेच भ च्या बाराखडीतलेच असतात.

In reply to by मृत्युन्जय

एक Tue, 10/26/2010 - 22:11
आमची शाळा आहेच तशी!! आजही मित्राशी बोलताना त्याने पहिल्या ४-५ शब्दात "प्रेमळ" पणे विचारपूस केली नाही तर शंका येते कि याला काय झालं? चिडला वगैरे कि काय? वय वाढलं तसं तोंडावर मान बरेच जण द्यायला लागतात त्यावेळी जमिनीवर येण्यासाठी मित्रांचे हेच ४ "प्रेमळ" शब्द कामी येतात.. --सेंट भावियन्स..

प्रमोद्_पुणे Tue, 10/26/2010 - 18:00
"अच्चीत गच्ची......" ही शिवी तर फार फार पॉप्युलर अशीच एक म्हणजे "आली घुली..." शाळा फक्त मुलांची.. मुतारीमध्ये अशा काही शिव्या असायच्या की त्यावर एक पुस्तक निघेल. आणि हो काही सदस्यांच्या माहीतीसाठी ह्या शिव्यांना (देणार्‍याना आणि खाणार्‍याना) जातीचे बंधन नव्हते! बाकी लेख मस्त...

पैसा Tue, 10/26/2010 - 19:37
शीर्षक वाचून धागा उघडला आणि भलतीच संपत्ती निघाली. पण मस्त खुसखुशीत लेख आहे. बरोबरच, बिकांच्या लेखाची लिंक दिल्याबद्दल पराला धन्यवाद!

धमाल मुलगा Tue, 10/26/2010 - 19:45
भेटीअंती आपल्या चरणि शिंगलमाल्टचा अभिषेक करणेत येईल असे आम्ही जाहीर करतो. अरे, काय माणूस आहेस का मजा? कं लिवलंय...कं लिवलंय!

तिमा Tue, 10/26/2010 - 20:19
लेख आवडला. आम्ही वापरत असलेल्या शिव्या व प्रसिध्द गाण्यांची विडंबने आठवून डोळे पाणावले.

प्रदीप Tue, 10/26/2010 - 20:38
आवडला. भाषिक संपत्तिवरून मला माझ्या एका ऑस्ट्रेलियन सहकार्‍याने एकदा 'आपण पहाटे उठलो' हे 'I woke up at sparrow-fart' असे सांगितले होते, ते आठवले!

नगरीनिरंजन Tue, 10/26/2010 - 20:47
च्यामायला! येकदम ध्वज फडकाव लेखन की रे भावा! उगंच एकमेकाला शिव्या घालून याराना दाखवायच्या वयातले दिवस आठवले. (अवांतरः ओ पुपे, तुमच्या त्या 'परायी बात खच्ची सोळा आणेच सच्ची' ला दुसरी ओळ 'अच्चीत गुच्ची...' बसतंय का बघा जरा. )

In reply to by नगरीनिरंजन

अहो ते त्यावरूनच लिहीले होते. ;) समझनेवाले को इशारा काफी है असं काहीतरी म्हणतात म्हणे. ;)

मिसळपाव Tue, 10/26/2010 - 21:51
...मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे. आपला मुद्दा सहजपणे, सुसंस्कृतपणे, शिव्या न वापरता समोरच्याला पटवुन देण्यात खरे कसब आहे. सगळे मुद्दे संपल्यावर गुद्दे सुरु करण्यापुर्वी वापरायची भाषा म्हणजे शिव्या. ... १०००% सहमत! हॉस्टेलच्या आपल्या खोलीबाहेर मित्रांचं टोळकं नाहि तर प्रिन्सिपल पु.ल. ना घेउन आलेले आहेत हे लक्षात न येउन एकाने 'भडव्यो, जरा थांबाल तर काय मराल?' असं लडिवाळपणे विचारल्यावर खुद्द पु.ल.नी सुद्धा त्याला 'तो पहिला शब्द कधी विसरू नको बरं का' असं सांगितलं होतं !!

सुहास.. Tue, 10/26/2010 - 22:05
_/\_ _/\_ _/\_ बाकी का माहीती माझ्या तोंडुन निघण जरा अवघडच हाय (न पिता..पण पिलोतरी मित्र,स्नेही, ओळखी-पाळखींच्या साठी साध हलकट निघत॑ नाय तोंडातनं (एक टिंग्या सोडुन) )

आयला, इना तू ... निरागस नव्हतास! नाटक मात्र चांगलं करायचास हो!! लिखाण एकदम ए१! म्हणजे नक्की काय ते चारचौघांत नको, उगाच मुलीच्या आयडीतून शिव्या पाहून तुझ्या 'निरागस' मनाला कष्ट व्हायचे!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय Tue, 10/26/2010 - 22:40
अगं मी तर शिव्या देताना माझे स्वतःचे कान पण बंद करुन घेतो. (शिव्या लिहिताना डोळे बंद करुन घेतो). इतका निरागस आहे मी. (हा निरागस शब्द शाळेतल्या अर्थाने घ्यावा). पण तु बोल बिन्धास्त. काय आहे की भाषिक ज्ञानात जितकी भर पडेल तितकी चांगलीच आहे.

पिवळा डांबिस Tue, 10/26/2010 - 22:58
विशेषतः जुना विस्वण (सॉरी, सॉरी, विषय!!) ताज्या सद्यवर्तमानपत्रात गुंडाळल्यामुळे वाचायला अधिक मजा आली!! अभिनंदन!! पण बिकाचा मूळ प्रश्न शिल्लक रहातोच... "सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?" ;) निरागस बामण, पिडां

रन्गराव Wed, 10/27/2010 - 07:59
जमलं गडया! काम फत्ते! अवांतर: जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडं! ;)

In reply to by रन्गराव

मृत्युन्जय Wed, 10/27/2010 - 10:07
जे शिंपडायचे होते ते शिंपडुन झाले रन्गराव. आख्ख्या महाराष्ट्रातल्या शिव्या कोळुन प्यायलो आहे मी. सगळ्या शिव्या इथे दिल्या असत्या तर तुम्हाला फेफरे आले असते. आणि आमचे मान्यवर सुहृद श्री. परा राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे एक वेगळे सेंसोर बॉर्ड उघडायला लागले असते शिव्यांच्या स्क्रीनिंगसाठी. आता कुठे गोमुत्र शिंपडायचे आणि कुठे शिवांबु ते तुमचे तुम्ही बघुन घ्या.

In reply to by मृत्युन्जय

रन्गराव Wed, 10/27/2010 - 11:10
पण आयला कॉम्पलिमेंट होती ती. असो आणि कोळून पिण्याबाबतचा आपला दावा बरोबर का चुक हे ठरवायला स्पर्धा ठेवावी लागेल एक ;) मग अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला फेफरे येतील. :) सांगायचा उद्देश असा की नवीन शोध लागणे कधीही थांबत नाही आणि ज्ञान नेहमी अपूर्णच असत, तस तुम्ही लेखात म्हंटलय सुद्धा बहुतेक. असो बाकी लिहिताय मात्र मजेशीर :)

In reply to by रन्गराव

मितभाषी Wed, 10/27/2010 - 11:22
जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडंआयला खपलो. =)) =)) आणि अजुन एक मनातील जागे झालेले विकार जाण्यासाठी शांती करा अथवा खिशात उडीद घेवुन उंबराला तांबड्यात गरके(पक्षी : प्रदक्षिणा) घाला. ;) बाकी लेख रापचिक.

शहराजाद Wed, 10/27/2010 - 09:05
शिव्या मायभाषेची जवळीक साधुन देतात, त्या मर्दानगीचे लक्षण आहे, ते मित्रत्वाचे प्रतीक आहे वगैरे वगैरे झूट आहे हे कळुन चुकले. गाडी चालवताना चुकुन समोरचा रिक्षावाला मध्ये घुसला की अल्लदपणे त्याच्या आइची विचारपूस होउ शकते. पण हा सुसंस्कृतपणा नाही. हा सभ्यपणा नाही. मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे.
अगदी नेमक्या शब्दांत मांडलेत. मात्र, मला तरी अगदी कचकावून, ह्रूदयापासून निघणारी शिवी मायबोलीतूनच घालता येते. एरवी भावना पुरेशा शुध्द स्वरूपात प्रकटल्याचे समाधान मिळत नाही.

शिल्पा ब Wed, 10/27/2010 - 10:49
मस्त खुसखुशीत लेख...पण मुलीसुद्धा शिव्या देतात याचे आश्चर्य का वाटले तुम्हाला हे काही कळले नाही बॉ !! आम्ही जवळीक करु नये की काय? ;)

In reply to by शिल्पा ब

मृत्युन्जय Wed, 10/27/2010 - 10:58
पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित काहीतरी वेगळे वाटले असेल. पण धक्का मात्र नव्हता बसला. एका मुलीला सिगारेट फुंकताना बघुन मात्र पहिल्यांदा मला धक्का बसला होता. खुपच वेगळे वाटले होते. नंतर सवय झाली. असे बघा जेव्हा पहिल्यांदा माझ्या खुपच जवळच्या मित्राने सिगारेट ओढली तेव्हासुद्धा मला आश्चर्य वाटले होते. मुलींनी हे करावे किंवा हे करु नये अश्या अर्थाने बसलेला धक्का नव्हता तो.

धागाकर्ते श्री.मृत्युंजय याना माहितच असेल की, कोल्हापुरी भाषा आणि शिव्या यात तसा जास्त भेदाभेद नाही. किंबहुना एखादा कोल्हापुरी पाटील्/पवार शुध्द बोलायला लागला की, गावातील थोर्र सहकारी मित्र लगेच टोमणा (आमच्या भाषेत मंडळाची किक) मारतात, 'च्यायला, हे ब्येनं पुन्याला क्काय शिकायला गेलं, पार मात्रंच झालं की...!" "ढापण्या" आणि "बॅटरी" ही त्यातल्यात्यात 'बर्‍यापैकी' लिहिता येण्यासारखी विशेषणे आहेत. मी पंजाबच्या ग्रामीण भागात फिरलो आहे. दिल्लीत असताना काही पंजाबी मित्रही झाले होते/आहेत, त्यांच्यासमवेत एकदा गुरुदासपूरमध्ये कट्ट्याचा योग आला होता. त्यावेळी तेथील दोघांचौघांची ओळख झाल्यावर त्यातील एकाने माझ्याशी हस्तांदोलन तर केलेच पण दिल्लीच्या मित्राकडे पाहून म्हणाला, "ये इंदर पुत्तर तो हलकट दिखता भला ! क्यूं?" मी हादरलोच. मी 'हलकट'? कशामुळे? मी दिल्लीवाल्याकडे पाहिले तर तो गुरदासपूरवाल्याला सांगत होता....'नही, इंदरतुस्सी कुछ दिनसे बिमार होना !". मी त्याला बाजूला घेवून विचारले की, तो मला 'हलकट' का म्हणतोय....? तर हा बिच्चू हसला आणि म्हणाला...."अरे ऐसी कोई बात नही....पंजाबीमें हलकट का मतलब होता है "लाईट वेट". तू वजनाने थोडा कमी दिसतोस ना म्हणून तो तसे म्हणाला..." ~ मी मनी म्हणालो, 'वाहे गुरू !" पंजाबी टर्म "चक दे फट्टे...." अलिकडे इकडे फार फेमस झालेली आपण पाहतो, ऐकतो ('चक दे इंडिया' मुळे)....पण प्रत्यक्षात तिथल्या ग्रामीण भाषेत, "अरे भाड्या/अगं भवाने आवर कामं पटापट"... या अर्थानेच आई/सासूबाई वापरतात...(चक दे = उचल.... फट्टे = लाकूडसामान.... म्हणून, 'आवर आवर जेवणाची वेळ झालीय'...या अर्थाने). पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

>>पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इथे कसे काय अवांतर होईल बुवा ?? इथेच ते मुद्द्याला धरून होईल. त्यामुळे तुम्ही इथे त्या गमती सांगाव्यात असा प्रस्ताव मी मांडतो. इथे सांगायच्या नसतील तर वेगळा लेख लिहा. पण लिहा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप Wed, 10/27/2010 - 13:08
म्हणतो. इंदर, लिहाच तुम्ही ते येथे. बाय द वे, वरील 'हलकट' हे [हलका -हलकट-(हलकेस्ट?)] असे काहीसे असावे असे वाटते. त्यावरून (अवांतर) आठवले, आमच्या कॉलेजसमोर एक अगदी खास मराठी 'मिल्क बार' होते. ते तीन बंधू मिळून चालवायचे. मराठी रेस्टॉरंटात नेहमी होते तसे हे मालक लोक विरूद्ध नोकरचाकर असा नेहमीचा थाट तेथे असायचा. काही कारणांमुळे नोकर सदैव मालकांशी फटकून असायचे, त्याचा फायदा घेऊन कॉलेजातील टारगट मुले जे खात त्यापेक्षा कमी बिल देऊन जात असत. मालक नेहमी नोकरांवर गल्ल्यावरून ओरडत असायचे. त्या तीन भावांपैकी मधल्याने अगदी हिटलर छाप मिशा ठेवलेल्या. त्याच्या नोकरांवर डाफरणे व ह्या मिशा हे मिळून पोरांनी त्याचे नाव ठेवले- हिटलर. अर्थात धाकटा झाला 'हिट' व सर्वात मोठा झाला 'हिटलेस्ट'!

मस्तं लेख रे मित्रा. बाकी मायझंव हा शब्द कोकणातल्या बायका देखील अगदी सहज बोलून जातात. हे मी स्वतः ऐकलं आहे. विशेषतः म्हातार्‍या किंवा जुन्या पिढीतल्या बायका. गंमत वाटली होती पहील्यांदा ऐकून.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा Wed, 10/27/2010 - 18:15
एक एकांकिका करायला घेतली होती कालेजात असताना (हा 'मी कॉलेजात जात होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही, एकांकिका करत होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न आहे.' ;) ), पण त्यात पावलापावलावर "अक्करमाश्या मांयझया' असे शब्द होते. आमचे गुर्जी पडले देशावरचे, त्यांना लाख समजाऊन सांगितलं, की अहो, आपल्याकडं च्यायला किंवा ए रत्ताळ्या... वगैरेसारखं अगदी सर्रास वापरले जाणारे कोकणातले शब्द आहेत ते...बाकी काही नाही झालं, आमची आयकार्डं जप्त करुन घेतली मास्तरानं. :(

शाहरुख Wed, 10/27/2010 - 23:28
कोल्हापूर आणि शिव्यावरुन एक फार जुनी गोष्ट आठवली.. मी एका शिवाजी पेठेतल्या मित्राकडे गेलो होतो..त्याच्या घरुन दोघे कुठेतरी जायला निघालो..घराबाहेर २-३ वर्षांचा एक मुलगा खेळत होता..मित्राने सहज त्याच्या डोक्यात टपली मारली..तर मुलगा म्हणाला "ए लवल्या, मालतोस का" माफ करा, शिवीत फुली घातल्यास गोष्ट कळाली नसती :-)

अडगळ गुरुवार, 10/28/2010 - 04:42
अवांतर : ज्ञानेश्वरीतील एका मजेदार शिवीसाठी "एक महान शिवी" हा म्.वा.धोंडांचा लेख जरूर वाचावा.(ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी) ------------------------------------------ अंगावर ट्रक घालून ड्रायव्हर म्हणाला दिखता नही मादरचोद , दिखता नही ? किर्‍यानिष्ट क्लीनर (अडगळ)

सन्जोप राव गुरुवार, 10/28/2010 - 04:24
शिव्यांबाबतचा हा झणझणीत लेख वाचून तोंडाची बाबळी गेली. (कोल्लापूरकरांना हे कळावे. इतरांनी माडगूळकरांचा 'हॅलो, मिस्टर डेथ' आठवून 'तोंडाची अळशी गेली' असे वाचावे). 'रांडेच्या' किंवा 'रांड्या' हा शब्द कोल्हापुरात 'अरे' या अर्थाने वापरतात. 'रांड' हा शब्द तर अतीवापराने आपला तिखटपणा हरवूनच बसला आहे. बायकोला फक्त याच शब्दाने संबोधणारा दळवींचा 'प्रवासी' आठवावा. 'उंडगी' या शिवीचेही तसेच. 'तुमचे पत्र मिळाले आणि मला चार दिवस कुठेतरी उंडगेपणाने फिरुन आल्यासारखे वाटले' असे जी.ए.कुलकर्णींनी अनंतराव कुलकर्णींना लिहीले आहे. (दोघेही कुलकर्णी हा फक्त योगायोग म्हणावा. ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे काही यात शोधू नये) . 'गवतात उंडगेपणाने चरत जाणार्‍या ढोरासारखे माझे वाचन आहे' यात तर 'उंडगा' या शब्द शिवी म्हणून न येता सभ्य क्रियविशेषण म्हणूनच येतो. बाकी कोल्हापूर हे महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असल्याने खास कानडी ढंगाच्या म्हणून ज्या मराठी शिव्या आहेत, त्या अगदी रसरशीत आहेत. 'व्हयमाले', 'हादरगित्तीच्या', 'खज्जाळीच्या', सुक्काळीच्च्या' या शिव्या या लेखामुळे अगदी सकाळी सकाळी आठवल्या आणि गुरुचरित्राचे पारायण केल्यासारखे वाटले.

स्पंदना गुरुवार, 10/28/2010 - 08:39
माझ्या एका मामाला त्याच्या आत्त्या कडुन 'शिव्यांचा पाढा ' म्हटला तरच गोळ्या( तेंव्हा चोकलेट नव्हती) मिळायच्या. कोल्हापुरी असल्यान शिव्या माहिती आहेत पण बहुतेक शिव्या आई किम्वा बहिण अश्या स्त्री नातेवाइकांवर असल्याने थोडासा निषेध. बाकी लेखा बद्दल ' च्यामारी तुम्ही तर फर्स्टक्लास लिहिलय राव'

In reply to by मितान

बेसनलाडू Tue, 10/26/2010 - 22:44
मस्त, खुसखुशीत लेख. खूप मजा आली वाचताना. (वाचक)बेसनलाडू अवांतर - कंसातील वाक्ये सूचक कोपरखळ्यांसारखी असली, तरी एकंदर लेखाच्या संदर्भात विचार करता अनावश्यक वाटली. (अवांतर)बेसनलाडू

सूड Tue, 10/26/2010 - 17:45
मिपावर वाचलेल्या एका (शिवी/ अपशब्द काय म्हणू ?) शब्दासाठी मी मिलिंद बोकिलांचं 'शाळा' वाचल्याचं आठवलं. :)

हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले रे एकदम. मस्त फटाके वाजवले आहेस :) हे लेखन वाचता वाचता बिकांच्या ह्या लेखाची खास आठवण येउन गेली.

sagarparadkar Tue, 10/26/2010 - 17:49
>> पण आपण संस्कृती संस्कृती जी म्हणतो ती आपल्याला पुलं, शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचुन आठवेल की या शिव्या ऐकुन? काय म्हणता? पु. लं. चे 'रावसाहेब' वाचून पण आठवेल की संस्कृती ... ते (पक्षी रावसाहेब) काय असंस्कृत होते का?

sagarparadkar Tue, 10/26/2010 - 17:55
व. पुं. चा 'भांडणारा जोशी' पण एके ठिकाणी चिंता व्यक्त करतो की मराठीतल्या शिव्या आता फारच जुन्या झाल्यात, आणि नवीन शिव्या काही तयार होत नाहीत, कोण हे काम करणारेय काही कळत नाही ... :) ते ऐकून माझ्या काही 'पेठेतल्या' मित्रवर्यांनी हे काम स्वीकारले होते पण उदर्निर्वाहाची कामे इतकी वाढली कि त्यांपुढे ह्या कामाकडे मग पारच दुर्लक्ष झाले ... :-)

In reply to by sagarparadkar

मृत्युन्जय Tue, 10/26/2010 - 17:58
काही हरकत नाही. आजही भावे हायस्कूल किंवा नूमवि किंवा सेंट विमलीज च्या बाहेर रोज एक तास उभे राहिलात तर ज्ञानात प्रचंड भर पडेल. ते वयच तसे असते. आणि त्या वयातले सगळे मित्रही आठवणीत तसेच भ च्या बाराखडीतलेच असतात.

In reply to by मृत्युन्जय

एक Tue, 10/26/2010 - 22:11
आमची शाळा आहेच तशी!! आजही मित्राशी बोलताना त्याने पहिल्या ४-५ शब्दात "प्रेमळ" पणे विचारपूस केली नाही तर शंका येते कि याला काय झालं? चिडला वगैरे कि काय? वय वाढलं तसं तोंडावर मान बरेच जण द्यायला लागतात त्यावेळी जमिनीवर येण्यासाठी मित्रांचे हेच ४ "प्रेमळ" शब्द कामी येतात.. --सेंट भावियन्स..

प्रमोद्_पुणे Tue, 10/26/2010 - 18:00
"अच्चीत गच्ची......" ही शिवी तर फार फार पॉप्युलर अशीच एक म्हणजे "आली घुली..." शाळा फक्त मुलांची.. मुतारीमध्ये अशा काही शिव्या असायच्या की त्यावर एक पुस्तक निघेल. आणि हो काही सदस्यांच्या माहीतीसाठी ह्या शिव्यांना (देणार्‍याना आणि खाणार्‍याना) जातीचे बंधन नव्हते! बाकी लेख मस्त...

पैसा Tue, 10/26/2010 - 19:37
शीर्षक वाचून धागा उघडला आणि भलतीच संपत्ती निघाली. पण मस्त खुसखुशीत लेख आहे. बरोबरच, बिकांच्या लेखाची लिंक दिल्याबद्दल पराला धन्यवाद!

धमाल मुलगा Tue, 10/26/2010 - 19:45
भेटीअंती आपल्या चरणि शिंगलमाल्टचा अभिषेक करणेत येईल असे आम्ही जाहीर करतो. अरे, काय माणूस आहेस का मजा? कं लिवलंय...कं लिवलंय!

तिमा Tue, 10/26/2010 - 20:19
लेख आवडला. आम्ही वापरत असलेल्या शिव्या व प्रसिध्द गाण्यांची विडंबने आठवून डोळे पाणावले.

प्रदीप Tue, 10/26/2010 - 20:38
आवडला. भाषिक संपत्तिवरून मला माझ्या एका ऑस्ट्रेलियन सहकार्‍याने एकदा 'आपण पहाटे उठलो' हे 'I woke up at sparrow-fart' असे सांगितले होते, ते आठवले!

नगरीनिरंजन Tue, 10/26/2010 - 20:47
च्यामायला! येकदम ध्वज फडकाव लेखन की रे भावा! उगंच एकमेकाला शिव्या घालून याराना दाखवायच्या वयातले दिवस आठवले. (अवांतरः ओ पुपे, तुमच्या त्या 'परायी बात खच्ची सोळा आणेच सच्ची' ला दुसरी ओळ 'अच्चीत गुच्ची...' बसतंय का बघा जरा. )

In reply to by नगरीनिरंजन

अहो ते त्यावरूनच लिहीले होते. ;) समझनेवाले को इशारा काफी है असं काहीतरी म्हणतात म्हणे. ;)

मिसळपाव Tue, 10/26/2010 - 21:51
...मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे. आपला मुद्दा सहजपणे, सुसंस्कृतपणे, शिव्या न वापरता समोरच्याला पटवुन देण्यात खरे कसब आहे. सगळे मुद्दे संपल्यावर गुद्दे सुरु करण्यापुर्वी वापरायची भाषा म्हणजे शिव्या. ... १०००% सहमत! हॉस्टेलच्या आपल्या खोलीबाहेर मित्रांचं टोळकं नाहि तर प्रिन्सिपल पु.ल. ना घेउन आलेले आहेत हे लक्षात न येउन एकाने 'भडव्यो, जरा थांबाल तर काय मराल?' असं लडिवाळपणे विचारल्यावर खुद्द पु.ल.नी सुद्धा त्याला 'तो पहिला शब्द कधी विसरू नको बरं का' असं सांगितलं होतं !!

सुहास.. Tue, 10/26/2010 - 22:05
_/\_ _/\_ _/\_ बाकी का माहीती माझ्या तोंडुन निघण जरा अवघडच हाय (न पिता..पण पिलोतरी मित्र,स्नेही, ओळखी-पाळखींच्या साठी साध हलकट निघत॑ नाय तोंडातनं (एक टिंग्या सोडुन) )

आयला, इना तू ... निरागस नव्हतास! नाटक मात्र चांगलं करायचास हो!! लिखाण एकदम ए१! म्हणजे नक्की काय ते चारचौघांत नको, उगाच मुलीच्या आयडीतून शिव्या पाहून तुझ्या 'निरागस' मनाला कष्ट व्हायचे!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय Tue, 10/26/2010 - 22:40
अगं मी तर शिव्या देताना माझे स्वतःचे कान पण बंद करुन घेतो. (शिव्या लिहिताना डोळे बंद करुन घेतो). इतका निरागस आहे मी. (हा निरागस शब्द शाळेतल्या अर्थाने घ्यावा). पण तु बोल बिन्धास्त. काय आहे की भाषिक ज्ञानात जितकी भर पडेल तितकी चांगलीच आहे.

पिवळा डांबिस Tue, 10/26/2010 - 22:58
विशेषतः जुना विस्वण (सॉरी, सॉरी, विषय!!) ताज्या सद्यवर्तमानपत्रात गुंडाळल्यामुळे वाचायला अधिक मजा आली!! अभिनंदन!! पण बिकाचा मूळ प्रश्न शिल्लक रहातोच... "सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?" ;) निरागस बामण, पिडां

रन्गराव Wed, 10/27/2010 - 07:59
जमलं गडया! काम फत्ते! अवांतर: जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडं! ;)

In reply to by रन्गराव

मृत्युन्जय Wed, 10/27/2010 - 10:07
जे शिंपडायचे होते ते शिंपडुन झाले रन्गराव. आख्ख्या महाराष्ट्रातल्या शिव्या कोळुन प्यायलो आहे मी. सगळ्या शिव्या इथे दिल्या असत्या तर तुम्हाला फेफरे आले असते. आणि आमचे मान्यवर सुहृद श्री. परा राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे एक वेगळे सेंसोर बॉर्ड उघडायला लागले असते शिव्यांच्या स्क्रीनिंगसाठी. आता कुठे गोमुत्र शिंपडायचे आणि कुठे शिवांबु ते तुमचे तुम्ही बघुन घ्या.

In reply to by मृत्युन्जय

रन्गराव Wed, 10/27/2010 - 11:10
पण आयला कॉम्पलिमेंट होती ती. असो आणि कोळून पिण्याबाबतचा आपला दावा बरोबर का चुक हे ठरवायला स्पर्धा ठेवावी लागेल एक ;) मग अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला फेफरे येतील. :) सांगायचा उद्देश असा की नवीन शोध लागणे कधीही थांबत नाही आणि ज्ञान नेहमी अपूर्णच असत, तस तुम्ही लेखात म्हंटलय सुद्धा बहुतेक. असो बाकी लिहिताय मात्र मजेशीर :)

In reply to by रन्गराव

मितभाषी Wed, 10/27/2010 - 11:22
जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडंआयला खपलो. =)) =)) आणि अजुन एक मनातील जागे झालेले विकार जाण्यासाठी शांती करा अथवा खिशात उडीद घेवुन उंबराला तांबड्यात गरके(पक्षी : प्रदक्षिणा) घाला. ;) बाकी लेख रापचिक.

शहराजाद Wed, 10/27/2010 - 09:05
शिव्या मायभाषेची जवळीक साधुन देतात, त्या मर्दानगीचे लक्षण आहे, ते मित्रत्वाचे प्रतीक आहे वगैरे वगैरे झूट आहे हे कळुन चुकले. गाडी चालवताना चुकुन समोरचा रिक्षावाला मध्ये घुसला की अल्लदपणे त्याच्या आइची विचारपूस होउ शकते. पण हा सुसंस्कृतपणा नाही. हा सभ्यपणा नाही. मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे.
अगदी नेमक्या शब्दांत मांडलेत. मात्र, मला तरी अगदी कचकावून, ह्रूदयापासून निघणारी शिवी मायबोलीतूनच घालता येते. एरवी भावना पुरेशा शुध्द स्वरूपात प्रकटल्याचे समाधान मिळत नाही.

शिल्पा ब Wed, 10/27/2010 - 10:49
मस्त खुसखुशीत लेख...पण मुलीसुद्धा शिव्या देतात याचे आश्चर्य का वाटले तुम्हाला हे काही कळले नाही बॉ !! आम्ही जवळीक करु नये की काय? ;)

In reply to by शिल्पा ब

मृत्युन्जय Wed, 10/27/2010 - 10:58
पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित काहीतरी वेगळे वाटले असेल. पण धक्का मात्र नव्हता बसला. एका मुलीला सिगारेट फुंकताना बघुन मात्र पहिल्यांदा मला धक्का बसला होता. खुपच वेगळे वाटले होते. नंतर सवय झाली. असे बघा जेव्हा पहिल्यांदा माझ्या खुपच जवळच्या मित्राने सिगारेट ओढली तेव्हासुद्धा मला आश्चर्य वाटले होते. मुलींनी हे करावे किंवा हे करु नये अश्या अर्थाने बसलेला धक्का नव्हता तो.

धागाकर्ते श्री.मृत्युंजय याना माहितच असेल की, कोल्हापुरी भाषा आणि शिव्या यात तसा जास्त भेदाभेद नाही. किंबहुना एखादा कोल्हापुरी पाटील्/पवार शुध्द बोलायला लागला की, गावातील थोर्र सहकारी मित्र लगेच टोमणा (आमच्या भाषेत मंडळाची किक) मारतात, 'च्यायला, हे ब्येनं पुन्याला क्काय शिकायला गेलं, पार मात्रंच झालं की...!" "ढापण्या" आणि "बॅटरी" ही त्यातल्यात्यात 'बर्‍यापैकी' लिहिता येण्यासारखी विशेषणे आहेत. मी पंजाबच्या ग्रामीण भागात फिरलो आहे. दिल्लीत असताना काही पंजाबी मित्रही झाले होते/आहेत, त्यांच्यासमवेत एकदा गुरुदासपूरमध्ये कट्ट्याचा योग आला होता. त्यावेळी तेथील दोघांचौघांची ओळख झाल्यावर त्यातील एकाने माझ्याशी हस्तांदोलन तर केलेच पण दिल्लीच्या मित्राकडे पाहून म्हणाला, "ये इंदर पुत्तर तो हलकट दिखता भला ! क्यूं?" मी हादरलोच. मी 'हलकट'? कशामुळे? मी दिल्लीवाल्याकडे पाहिले तर तो गुरदासपूरवाल्याला सांगत होता....'नही, इंदरतुस्सी कुछ दिनसे बिमार होना !". मी त्याला बाजूला घेवून विचारले की, तो मला 'हलकट' का म्हणतोय....? तर हा बिच्चू हसला आणि म्हणाला...."अरे ऐसी कोई बात नही....पंजाबीमें हलकट का मतलब होता है "लाईट वेट". तू वजनाने थोडा कमी दिसतोस ना म्हणून तो तसे म्हणाला..." ~ मी मनी म्हणालो, 'वाहे गुरू !" पंजाबी टर्म "चक दे फट्टे...." अलिकडे इकडे फार फेमस झालेली आपण पाहतो, ऐकतो ('चक दे इंडिया' मुळे)....पण प्रत्यक्षात तिथल्या ग्रामीण भाषेत, "अरे भाड्या/अगं भवाने आवर कामं पटापट"... या अर्थानेच आई/सासूबाई वापरतात...(चक दे = उचल.... फट्टे = लाकूडसामान.... म्हणून, 'आवर आवर जेवणाची वेळ झालीय'...या अर्थाने). पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

>>पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इथे कसे काय अवांतर होईल बुवा ?? इथेच ते मुद्द्याला धरून होईल. त्यामुळे तुम्ही इथे त्या गमती सांगाव्यात असा प्रस्ताव मी मांडतो. इथे सांगायच्या नसतील तर वेगळा लेख लिहा. पण लिहा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रदीप Wed, 10/27/2010 - 13:08
म्हणतो. इंदर, लिहाच तुम्ही ते येथे. बाय द वे, वरील 'हलकट' हे [हलका -हलकट-(हलकेस्ट?)] असे काहीसे असावे असे वाटते. त्यावरून (अवांतर) आठवले, आमच्या कॉलेजसमोर एक अगदी खास मराठी 'मिल्क बार' होते. ते तीन बंधू मिळून चालवायचे. मराठी रेस्टॉरंटात नेहमी होते तसे हे मालक लोक विरूद्ध नोकरचाकर असा नेहमीचा थाट तेथे असायचा. काही कारणांमुळे नोकर सदैव मालकांशी फटकून असायचे, त्याचा फायदा घेऊन कॉलेजातील टारगट मुले जे खात त्यापेक्षा कमी बिल देऊन जात असत. मालक नेहमी नोकरांवर गल्ल्यावरून ओरडत असायचे. त्या तीन भावांपैकी मधल्याने अगदी हिटलर छाप मिशा ठेवलेल्या. त्याच्या नोकरांवर डाफरणे व ह्या मिशा हे मिळून पोरांनी त्याचे नाव ठेवले- हिटलर. अर्थात धाकटा झाला 'हिट' व सर्वात मोठा झाला 'हिटलेस्ट'!

मस्तं लेख रे मित्रा. बाकी मायझंव हा शब्द कोकणातल्या बायका देखील अगदी सहज बोलून जातात. हे मी स्वतः ऐकलं आहे. विशेषतः म्हातार्‍या किंवा जुन्या पिढीतल्या बायका. गंमत वाटली होती पहील्यांदा ऐकून.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा Wed, 10/27/2010 - 18:15
एक एकांकिका करायला घेतली होती कालेजात असताना (हा 'मी कॉलेजात जात होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही, एकांकिका करत होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न आहे.' ;) ), पण त्यात पावलापावलावर "अक्करमाश्या मांयझया' असे शब्द होते. आमचे गुर्जी पडले देशावरचे, त्यांना लाख समजाऊन सांगितलं, की अहो, आपल्याकडं च्यायला किंवा ए रत्ताळ्या... वगैरेसारखं अगदी सर्रास वापरले जाणारे कोकणातले शब्द आहेत ते...बाकी काही नाही झालं, आमची आयकार्डं जप्त करुन घेतली मास्तरानं. :(

शाहरुख Wed, 10/27/2010 - 23:28
कोल्हापूर आणि शिव्यावरुन एक फार जुनी गोष्ट आठवली.. मी एका शिवाजी पेठेतल्या मित्राकडे गेलो होतो..त्याच्या घरुन दोघे कुठेतरी जायला निघालो..घराबाहेर २-३ वर्षांचा एक मुलगा खेळत होता..मित्राने सहज त्याच्या डोक्यात टपली मारली..तर मुलगा म्हणाला "ए लवल्या, मालतोस का" माफ करा, शिवीत फुली घातल्यास गोष्ट कळाली नसती :-)

अडगळ गुरुवार, 10/28/2010 - 04:42
अवांतर : ज्ञानेश्वरीतील एका मजेदार शिवीसाठी "एक महान शिवी" हा म्.वा.धोंडांचा लेख जरूर वाचावा.(ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी) ------------------------------------------ अंगावर ट्रक घालून ड्रायव्हर म्हणाला दिखता नही मादरचोद , दिखता नही ? किर्‍यानिष्ट क्लीनर (अडगळ)

सन्जोप राव गुरुवार, 10/28/2010 - 04:24
शिव्यांबाबतचा हा झणझणीत लेख वाचून तोंडाची बाबळी गेली. (कोल्लापूरकरांना हे कळावे. इतरांनी माडगूळकरांचा 'हॅलो, मिस्टर डेथ' आठवून 'तोंडाची अळशी गेली' असे वाचावे). 'रांडेच्या' किंवा 'रांड्या' हा शब्द कोल्हापुरात 'अरे' या अर्थाने वापरतात. 'रांड' हा शब्द तर अतीवापराने आपला तिखटपणा हरवूनच बसला आहे. बायकोला फक्त याच शब्दाने संबोधणारा दळवींचा 'प्रवासी' आठवावा. 'उंडगी' या शिवीचेही तसेच. 'तुमचे पत्र मिळाले आणि मला चार दिवस कुठेतरी उंडगेपणाने फिरुन आल्यासारखे वाटले' असे जी.ए.कुलकर्णींनी अनंतराव कुलकर्णींना लिहीले आहे. (दोघेही कुलकर्णी हा फक्त योगायोग म्हणावा. ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे काही यात शोधू नये) . 'गवतात उंडगेपणाने चरत जाणार्‍या ढोरासारखे माझे वाचन आहे' यात तर 'उंडगा' या शब्द शिवी म्हणून न येता सभ्य क्रियविशेषण म्हणूनच येतो. बाकी कोल्हापूर हे महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असल्याने खास कानडी ढंगाच्या म्हणून ज्या मराठी शिव्या आहेत, त्या अगदी रसरशीत आहेत. 'व्हयमाले', 'हादरगित्तीच्या', 'खज्जाळीच्या', सुक्काळीच्च्या' या शिव्या या लेखामुळे अगदी सकाळी सकाळी आठवल्या आणि गुरुचरित्राचे पारायण केल्यासारखे वाटले.

स्पंदना गुरुवार, 10/28/2010 - 08:39
माझ्या एका मामाला त्याच्या आत्त्या कडुन 'शिव्यांचा पाढा ' म्हटला तरच गोळ्या( तेंव्हा चोकलेट नव्हती) मिळायच्या. कोल्हापुरी असल्यान शिव्या माहिती आहेत पण बहुतेक शिव्या आई किम्वा बहिण अश्या स्त्री नातेवाइकांवर असल्याने थोडासा निषेध. बाकी लेखा बद्दल ' च्यामारी तुम्ही तर फर्स्टक्लास लिहिलय राव'
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

स्टेपनीची गरज

डॉ.श्रीराम दिवटे ·

In reply to by विनायक प्रभू

>>>>लेख आवडला प्रभुसरांशी सहमत...! :) 'स्टेपनीची गरज' शिर्षकावरुन लेखनातील आशयासंबंधी अपेक्षा वाढल्या होत्या. स्टेपनी कशा कशाला म्हणतात. वगैरे, इत्यादि. असो...! -दिलीप बिरुटे

सूड Mon, 09/13/2010 - 16:36
डोक्यावरुन गेलं !! कदाचित प्रेमत्रिकोण (Love Triangle ) असावा. तीन बिंदू खालीलप्रमाणे. चालक, गाडी, स्टेपनी

विजुभाऊ Mon, 09/13/2010 - 17:08
स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा जास्त डेकोरेटेड , हवेशीर ठेवावे लागते. पण नुस्त्या स्टेपनीच्या भरोशावर प्रवास चालू ठेवला तर स्टेपनी पंक्चर झाल्यावर मात्र गाडी पूर्णच खाली बसते. आडरस्त्याला पंक्चरवाला मिळत नाही. त्यातून जॅक तुटलेला असेल तर दुसरी गाडी थांबवून उसना जॅक मागून घ्यावा लागतो ;)

In reply to by चतुरंग

हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत आहे. स्वति घरात नसताना कंडू शमनार्थ रुण्डिरा खावी| ती ही घरात नसताना स्वहस्तेच बुद्ली दाबावी || याचा अर्थ साधारण असा होतो की सुंठ घरात नसेल तर कंडू म्हणजे खोकला थांबवण्यासाठी खडीसाखर खावी. ती ही म्हणजे खडीसाखरही घरात नसेल तर आपल्याच हाताने (बुद्ली) पडजीभ दाबावी. तस्मात डॉ साहेब ** ठेवा सांगण्यासाठी इतक्या शब्दांचा खटाटोप? प्रतिसाद संपादीत केला आहे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राजेश घासकडवी Tue, 09/14/2010 - 08:34
श्री. पेशवे, इथे गाड्या, प्रवास, त्यातल्या अडचणी, ड्रायव्हरांचे प्रश्न असल्या विषयांवर चर्चा चालू असताना तुम्ही जे अश्लीलतेकडे झुकणारे लिहिले आहे त्याचा तीव्र निषेध. बाई ठेवणे, ** राखणे, ** दाबणे हे अवांतर आहे. कृपया सदर विषयावर लिहिता येत नसेल तर किमान चर्चेमध्ये गोंधळ माजवू नये ही विनंती. आता काही जणांना नसतो ड्रायव्हिंगचा अनुभव, किंवा गती नसते, अॅक्सिडेंट वगैरे झालेले असतात. म्हणून आकस धरून असे वाह्यात वर्तन करू नये. संपादक यात लक्ष घालतील काय?

sagarparadkar Mon, 09/13/2010 - 19:46
धन्य हो डॉक्टरसाहेब ... साष्टांग नमस्कार इथे कसा दर्शवायचा माहीत नाही म्हणून __/\__ एव्ह्ढ्यावरच भागवून घ्या ... कदाचित ___^_/ असा दर्शवता येईल ... >> तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा हल्लीच्या स्टेपनीला ती स्टेपनी आहे हे कळले तर गाडी नुसतीच थंडावेल की कायमचीच बंद पडेल किंवा कसे .... स्टेपनी वापरण्याचा अनुभव नसल्याने सांगता येणार नाही ...

माजगावकर Mon, 09/13/2010 - 20:30
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. गाडीचा वापर जास्त असणार्यांसाठी.. परंतु ती लावायची वेळ न येणे बरं.. अर्थात इतर चार चाकांबरोबर तिचे हवा-पाणी देखील नियमित तपासून घेतो..

In reply to by माजगावकर

धमाल मुलगा Mon, 09/13/2010 - 20:46
है शाब्बास्स! य्ये हुई ना ब्बात! डॉक्टरसाहेबांच्या लेखाचं सार्थक झालं असं म्हणेन मी. -धमायक प्रभु.

In reply to by माजगावकर

टिउ Tue, 09/14/2010 - 02:06
माजगावकर, अहो तुमच्याकडे ऑलरेडी चार चाकं असतांना अजुन स्टेपनी कशाला पाहीजे? तुमच्यासारख्या लोकांमुळे स्टेपन्यांचे भाव वाढलेत हल्ली... ;)

शहराजाद Tue, 09/14/2010 - 01:50
स्टोरेजच्या सोयीसाठी स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असण्याची पद्धत आहे. पण गाडी ओढून नेण्याच्या कामी ती मूळ चाकाइतकी स्थिर आणि सुरक्षित कधीच नसते, एवढे लक्षात असूद्या.

In reply to by शहराजाद

वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना साधारणता हे माहित असते. आणि म्हणूनच ते स्टेपनी ला मूळ चाक म्हणून नाही वापरत. मूळ चाक ते मूळ चाक आणि स्टेपनी ती स्टेपनी !!! कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! (तलवारी उपसल्या जाण्याची वाट पाहणारा) वि. मे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! अहो कसं आहे.. चालकानी स्टेप्नी बाळगणे आणि गाडीला स्टेप्नी आहे हे न कळणे जसे असते तसे गाडीनेच स्टेप्नी किंवा पर्यायी स्टँड ठेवणे आणि चालकाला याची खबरबात नसणे हे ही असते म्हणूनही असेल कदाचित.

In reply to by शहराजाद

Pain Tue, 09/14/2010 - 23:06
मी जेव्हा पंक्चर चाक काढून स्टेपनी लावली होती तेव्हा दोन्हीवर लिहिलेला साइझ पाहिला होता. सारखाच होता. मूळ चाकापेक्षा लहान आकार असणे अयोग्य आहे. (कदाचित तुम्ही दुचाकीबद्दल बोलत असाल, मी चारचाकीबद्दल बोलत आहे.)

In reply to by Pain

शहराजाद Wed, 09/15/2010 - 00:01
काही गाड्यांची स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असते. ठेवण्याच्या सोयीसाठी हे करतात असे कळले. माझा मुद्दा , मूळ चाकाचीच निगा राखून स्टेपनीची गरजच भासू नये अशी काळजी घेणे इष्ट. यापुढे प्रत्येकाची मर्जी.

In reply to by Pain

अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत. भारतात मी छोटी स्टेपनी नाही पाहिली. असेलही, काही खास अनुभव नाही. अमेरिकेत डिकीत (ट्रंक म्हणायचे बरे, डिकी म्हटले की काहीतरी वेगळेच समजतात) सहजपणे बसावे म्हणून स्टेपनी छोटी बनवतात. अशी स्टेपनी असेल तर ५५ मैल प्रती तास या गतीपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची नसते. यातून नक्की काय काय अर्थ लोक काढतील ते तो एक श्रीराम जाणे (देव, धागाप्रवर्तक नाही)

राजेश घासकडवी Tue, 09/14/2010 - 07:54
बहुतेक वेळा आपली स्टेपनी आपण कायम गाडीतच बाळगावी अशी सिस्टिम असते. पण हा संसाधनांचा शुद्ध अपव्यय आहे. म्हणून मी नवीन सिस्टिमचा विचार करत होतो. समजा असं केलं तर? स्टेपनी गाडीत बाळगायचीच नाही. गाडी पंक्चर झाली की मेकॅनिकला फोन करायचा, मग तो आपल्याला हवी तशी स्टेपनी आणून देईल. तात्पुरती वापरायची. नंतर मेकॅनिकला परत करायची. कशाला उगाच ती विकत घ्यायची? आणि कायम बाळगून पेट्रोल अधिक खर्च करायचं? मुळात गाडी विकत घेतली त्यात खर्च आहेच. बरं, मेकॅनिकलाही भाडं मिळेल, आणि इतर कस्टमरांना वापरायला देता येईल. थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. तसं म्हटलं तर ती आधी कोणी इतर कस्टमरांनी वापरली आहे म्हणून आपल्याला तरी कुठे फरक पडतो? मग थोड्या स्टेपन्या खूप लोकांना पुरतील, व एकंदरीत समाजाचा स्टेपनी-विषयक खर्च देखील कमी होईल. दर वेळी सेफ्टी जरा चेक करून घ्यावी लागेल, पण मान्यवर गराजनी जर स्टेपन्या पुरवल्या तर तो धोकादेखील कमी होईल. काही लोकांच्या मते सामाजिक वर्दळ सुरळीतपणे चालण्यासाठी अशी सिस्टिम उपयोगी ठरेल. नाहीतर काही लोक चाक पंक्चर झालं आणि स्टेपनी परवडली नाही की दुसऱ्याच्या गाड्यांची चाकं बळजबरीने पळवतात... खरं तर आख्खी गाडीच भाड्याने घेता आली तर? अशीच कल्पना मी आधी देखील मांडली होती. पण अनुमोदनाच्या औष्ठ्यसेवेपलिकडे कोणी काही केलं नाही. ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी Tue, 09/14/2010 - 09:27
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे साली. अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. आपण वापरतो नं तिला. मग अशी नावे का बरे ठेवायची ? त्रास तर माझी गाडी पण देते, कदाचित तुमच्या गाडी पेक्षा जास्त, खूप खूप आवाज करते, खूप हादरे बसतात. माझा सगळा पगार तिच्यासाठीच संपतो. गाडी नसेल तर कित्ती कित्ती , कशा कशाचे, हाल होतील ते विचार करा. वर्षातून एक-दोन वेळाच स्मूथ चालते. (गाडीला इच्छित स्थळी जायचे असेल तरच ) माझी गाडी स्वस्तात घेतली होती, पण आता मेंटेनन्स खर्चच जास्त होतो. सप्लायर कडे जास्त गाड्या होत्या, आमची गाडी हि पहिलीच मोडेल. त्यामुळे स्वस्तात दिली त्याने. गाडी जुनी देऊन नवीन मिळेल अशी काय योजना आहे काय ?(वाट्टेल तेवढा खर्च करायला तयार आहे) सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.

In reply to by गांधीवादी

राजेश घासकडवी Tue, 09/14/2010 - 10:41
अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.
तुमचा गैरसमज होतोय. नावं गाडीला ठेवलेलीच नाहीत. प्रवासालाही नाहीत (तो प्रवास सुंदर होता...) गाडीच्या लायसेन्सिंगच्या नियमाला नावं ठेवली आहेत. समाजवादी अर्थकारणाच्या विचारसरणीत गाडी ही चैनीची वस्तु समजली गेली - आणि प्रत्येकाला एकच गाडी - तीही मोठ्या मिनतवारीने मिळणार...
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
हे फारच पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह झालं. स्टेपनीचं बघा जरा...

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी Tue, 09/14/2010 - 11:13
OK OK असं होय,समजले. थोडा गोंधळ उडालेला होता. सहमत आहे. >>स्टेपनीचं बघा जरा... गाडी ने कितीही त्रास दिला तरी अजून काय कुठेच पंचर नाही. एकदम शॉल्लीट MRF चे आहेत आमचे टायर्स, त्यामुळे हा सल्ला कामाचा नाहि

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते Tue, 09/14/2010 - 10:59
सोय हवी पण स्टेपनी सांभाळायला नको हा कोता-चंगळवादी विचार केल्याबद्दल घासकडवी यांचा निषेध. गाडी आणि चाके यांचे गुणोत्तर तसे आहे म्हणून एका गाडीला चार चाके आणि एक स्टेपनी ठेवण्याची पद्धत असावी. गुणोत्तर वेगळे असते तर दोन स्टेपन्याठेवण्याची किंवा घासकडवींच्या मनोराज्याप्रमाणे स्टेपनी भाड्याने मिळण्याची पद्धत आली असती. स्टेपनी ठेवायची नसेल तर आधी चाकांची निर्मिती कमी करावी लागेल.

In reply to by राजेश घासकडवी

मी_ओंकार Wed, 09/15/2010 - 09:48
थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. काही स्टेपनींना साबण चोळून ही चकाचक करतात असे ऐकून आहे. - (ऐकीवातला)

वेताळ Tue, 09/14/2010 - 09:42
त्याच्या करीता काही सुचना आहेत का?पुर्वी बजाज स्कुटरला स्टेफनी असायची .आताच्या स्कुटरला स्टेफनी नसते. त्यामुळे खुपच कुचंबणा होते.रस्त्यावर हात हालवत उभे रहावे लागते.

चिगो Tue, 09/14/2010 - 15:59
अवो, ते हात हलवत म्हन्ले... काय्यच्या क्काय..

काही लोक गाडी 'एकहाती' वापरण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे गाडी तंदुरुस्त राहते म्हणे! आम्ही त्यांना विचारतो पंक्चर झाल्यावर कितीही तुम्ही एकहाती वापरली असली तरी स्टेपनी लागतेच. आता मोटरसायकलसारख्या दुचाकीला स्टेपनी लावताच येत नाही. त्यांनी काय करायच? गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंतात. स्टेपनीचा शोध यातुनच लागला असावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

एकहाती गाडी वापरल्याने गाडीचेच नव्हे तर चालकाचेही आरोग्य चांगले राहते. नाहीतर इतर कोणी गाडी नीट नाही वापरली तर गाडी खिळखिळी होऊ शकते त्यामुळे चालकाचेही जजमेंट चुकू शकते ना!

In reply to by विनायक प्रभू

>>>>लेख आवडला प्रभुसरांशी सहमत...! :) 'स्टेपनीची गरज' शिर्षकावरुन लेखनातील आशयासंबंधी अपेक्षा वाढल्या होत्या. स्टेपनी कशा कशाला म्हणतात. वगैरे, इत्यादि. असो...! -दिलीप बिरुटे

सूड Mon, 09/13/2010 - 16:36
डोक्यावरुन गेलं !! कदाचित प्रेमत्रिकोण (Love Triangle ) असावा. तीन बिंदू खालीलप्रमाणे. चालक, गाडी, स्टेपनी

विजुभाऊ Mon, 09/13/2010 - 17:08
स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा जास्त डेकोरेटेड , हवेशीर ठेवावे लागते. पण नुस्त्या स्टेपनीच्या भरोशावर प्रवास चालू ठेवला तर स्टेपनी पंक्चर झाल्यावर मात्र गाडी पूर्णच खाली बसते. आडरस्त्याला पंक्चरवाला मिळत नाही. त्यातून जॅक तुटलेला असेल तर दुसरी गाडी थांबवून उसना जॅक मागून घ्यावा लागतो ;)

In reply to by चतुरंग

हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत आहे. स्वति घरात नसताना कंडू शमनार्थ रुण्डिरा खावी| ती ही घरात नसताना स्वहस्तेच बुद्ली दाबावी || याचा अर्थ साधारण असा होतो की सुंठ घरात नसेल तर कंडू म्हणजे खोकला थांबवण्यासाठी खडीसाखर खावी. ती ही म्हणजे खडीसाखरही घरात नसेल तर आपल्याच हाताने (बुद्ली) पडजीभ दाबावी. तस्मात डॉ साहेब ** ठेवा सांगण्यासाठी इतक्या शब्दांचा खटाटोप? प्रतिसाद संपादीत केला आहे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राजेश घासकडवी Tue, 09/14/2010 - 08:34
श्री. पेशवे, इथे गाड्या, प्रवास, त्यातल्या अडचणी, ड्रायव्हरांचे प्रश्न असल्या विषयांवर चर्चा चालू असताना तुम्ही जे अश्लीलतेकडे झुकणारे लिहिले आहे त्याचा तीव्र निषेध. बाई ठेवणे, ** राखणे, ** दाबणे हे अवांतर आहे. कृपया सदर विषयावर लिहिता येत नसेल तर किमान चर्चेमध्ये गोंधळ माजवू नये ही विनंती. आता काही जणांना नसतो ड्रायव्हिंगचा अनुभव, किंवा गती नसते, अॅक्सिडेंट वगैरे झालेले असतात. म्हणून आकस धरून असे वाह्यात वर्तन करू नये. संपादक यात लक्ष घालतील काय?

sagarparadkar Mon, 09/13/2010 - 19:46
धन्य हो डॉक्टरसाहेब ... साष्टांग नमस्कार इथे कसा दर्शवायचा माहीत नाही म्हणून __/\__ एव्ह्ढ्यावरच भागवून घ्या ... कदाचित ___^_/ असा दर्शवता येईल ... >> तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा हल्लीच्या स्टेपनीला ती स्टेपनी आहे हे कळले तर गाडी नुसतीच थंडावेल की कायमचीच बंद पडेल किंवा कसे .... स्टेपनी वापरण्याचा अनुभव नसल्याने सांगता येणार नाही ...

माजगावकर Mon, 09/13/2010 - 20:30
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. गाडीचा वापर जास्त असणार्यांसाठी.. परंतु ती लावायची वेळ न येणे बरं.. अर्थात इतर चार चाकांबरोबर तिचे हवा-पाणी देखील नियमित तपासून घेतो..

In reply to by माजगावकर

धमाल मुलगा Mon, 09/13/2010 - 20:46
है शाब्बास्स! य्ये हुई ना ब्बात! डॉक्टरसाहेबांच्या लेखाचं सार्थक झालं असं म्हणेन मी. -धमायक प्रभु.

In reply to by माजगावकर

टिउ Tue, 09/14/2010 - 02:06
माजगावकर, अहो तुमच्याकडे ऑलरेडी चार चाकं असतांना अजुन स्टेपनी कशाला पाहीजे? तुमच्यासारख्या लोकांमुळे स्टेपन्यांचे भाव वाढलेत हल्ली... ;)

शहराजाद Tue, 09/14/2010 - 01:50
स्टोरेजच्या सोयीसाठी स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असण्याची पद्धत आहे. पण गाडी ओढून नेण्याच्या कामी ती मूळ चाकाइतकी स्थिर आणि सुरक्षित कधीच नसते, एवढे लक्षात असूद्या.

In reply to by शहराजाद

वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना साधारणता हे माहित असते. आणि म्हणूनच ते स्टेपनी ला मूळ चाक म्हणून नाही वापरत. मूळ चाक ते मूळ चाक आणि स्टेपनी ती स्टेपनी !!! कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! (तलवारी उपसल्या जाण्याची वाट पाहणारा) वि. मे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! अहो कसं आहे.. चालकानी स्टेप्नी बाळगणे आणि गाडीला स्टेप्नी आहे हे न कळणे जसे असते तसे गाडीनेच स्टेप्नी किंवा पर्यायी स्टँड ठेवणे आणि चालकाला याची खबरबात नसणे हे ही असते म्हणूनही असेल कदाचित.

In reply to by शहराजाद

Pain Tue, 09/14/2010 - 23:06
मी जेव्हा पंक्चर चाक काढून स्टेपनी लावली होती तेव्हा दोन्हीवर लिहिलेला साइझ पाहिला होता. सारखाच होता. मूळ चाकापेक्षा लहान आकार असणे अयोग्य आहे. (कदाचित तुम्ही दुचाकीबद्दल बोलत असाल, मी चारचाकीबद्दल बोलत आहे.)

In reply to by Pain

शहराजाद Wed, 09/15/2010 - 00:01
काही गाड्यांची स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असते. ठेवण्याच्या सोयीसाठी हे करतात असे कळले. माझा मुद्दा , मूळ चाकाचीच निगा राखून स्टेपनीची गरजच भासू नये अशी काळजी घेणे इष्ट. यापुढे प्रत्येकाची मर्जी.

In reply to by Pain

अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत. भारतात मी छोटी स्टेपनी नाही पाहिली. असेलही, काही खास अनुभव नाही. अमेरिकेत डिकीत (ट्रंक म्हणायचे बरे, डिकी म्हटले की काहीतरी वेगळेच समजतात) सहजपणे बसावे म्हणून स्टेपनी छोटी बनवतात. अशी स्टेपनी असेल तर ५५ मैल प्रती तास या गतीपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची नसते. यातून नक्की काय काय अर्थ लोक काढतील ते तो एक श्रीराम जाणे (देव, धागाप्रवर्तक नाही)

राजेश घासकडवी Tue, 09/14/2010 - 07:54
बहुतेक वेळा आपली स्टेपनी आपण कायम गाडीतच बाळगावी अशी सिस्टिम असते. पण हा संसाधनांचा शुद्ध अपव्यय आहे. म्हणून मी नवीन सिस्टिमचा विचार करत होतो. समजा असं केलं तर? स्टेपनी गाडीत बाळगायचीच नाही. गाडी पंक्चर झाली की मेकॅनिकला फोन करायचा, मग तो आपल्याला हवी तशी स्टेपनी आणून देईल. तात्पुरती वापरायची. नंतर मेकॅनिकला परत करायची. कशाला उगाच ती विकत घ्यायची? आणि कायम बाळगून पेट्रोल अधिक खर्च करायचं? मुळात गाडी विकत घेतली त्यात खर्च आहेच. बरं, मेकॅनिकलाही भाडं मिळेल, आणि इतर कस्टमरांना वापरायला देता येईल. थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. तसं म्हटलं तर ती आधी कोणी इतर कस्टमरांनी वापरली आहे म्हणून आपल्याला तरी कुठे फरक पडतो? मग थोड्या स्टेपन्या खूप लोकांना पुरतील, व एकंदरीत समाजाचा स्टेपनी-विषयक खर्च देखील कमी होईल. दर वेळी सेफ्टी जरा चेक करून घ्यावी लागेल, पण मान्यवर गराजनी जर स्टेपन्या पुरवल्या तर तो धोकादेखील कमी होईल. काही लोकांच्या मते सामाजिक वर्दळ सुरळीतपणे चालण्यासाठी अशी सिस्टिम उपयोगी ठरेल. नाहीतर काही लोक चाक पंक्चर झालं आणि स्टेपनी परवडली नाही की दुसऱ्याच्या गाड्यांची चाकं बळजबरीने पळवतात... खरं तर आख्खी गाडीच भाड्याने घेता आली तर? अशीच कल्पना मी आधी देखील मांडली होती. पण अनुमोदनाच्या औष्ठ्यसेवेपलिकडे कोणी काही केलं नाही. ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी Tue, 09/14/2010 - 09:27
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे साली. अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. आपण वापरतो नं तिला. मग अशी नावे का बरे ठेवायची ? त्रास तर माझी गाडी पण देते, कदाचित तुमच्या गाडी पेक्षा जास्त, खूप खूप आवाज करते, खूप हादरे बसतात. माझा सगळा पगार तिच्यासाठीच संपतो. गाडी नसेल तर कित्ती कित्ती , कशा कशाचे, हाल होतील ते विचार करा. वर्षातून एक-दोन वेळाच स्मूथ चालते. (गाडीला इच्छित स्थळी जायचे असेल तरच ) माझी गाडी स्वस्तात घेतली होती, पण आता मेंटेनन्स खर्चच जास्त होतो. सप्लायर कडे जास्त गाड्या होत्या, आमची गाडी हि पहिलीच मोडेल. त्यामुळे स्वस्तात दिली त्याने. गाडी जुनी देऊन नवीन मिळेल अशी काय योजना आहे काय ?(वाट्टेल तेवढा खर्च करायला तयार आहे) सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.

In reply to by गांधीवादी

राजेश घासकडवी Tue, 09/14/2010 - 10:41
अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.
तुमचा गैरसमज होतोय. नावं गाडीला ठेवलेलीच नाहीत. प्रवासालाही नाहीत (तो प्रवास सुंदर होता...) गाडीच्या लायसेन्सिंगच्या नियमाला नावं ठेवली आहेत. समाजवादी अर्थकारणाच्या विचारसरणीत गाडी ही चैनीची वस्तु समजली गेली - आणि प्रत्येकाला एकच गाडी - तीही मोठ्या मिनतवारीने मिळणार...
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
हे फारच पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह झालं. स्टेपनीचं बघा जरा...

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी Tue, 09/14/2010 - 11:13
OK OK असं होय,समजले. थोडा गोंधळ उडालेला होता. सहमत आहे. >>स्टेपनीचं बघा जरा... गाडी ने कितीही त्रास दिला तरी अजून काय कुठेच पंचर नाही. एकदम शॉल्लीट MRF चे आहेत आमचे टायर्स, त्यामुळे हा सल्ला कामाचा नाहि

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते Tue, 09/14/2010 - 10:59
सोय हवी पण स्टेपनी सांभाळायला नको हा कोता-चंगळवादी विचार केल्याबद्दल घासकडवी यांचा निषेध. गाडी आणि चाके यांचे गुणोत्तर तसे आहे म्हणून एका गाडीला चार चाके आणि एक स्टेपनी ठेवण्याची पद्धत असावी. गुणोत्तर वेगळे असते तर दोन स्टेपन्याठेवण्याची किंवा घासकडवींच्या मनोराज्याप्रमाणे स्टेपनी भाड्याने मिळण्याची पद्धत आली असती. स्टेपनी ठेवायची नसेल तर आधी चाकांची निर्मिती कमी करावी लागेल.

In reply to by राजेश घासकडवी

मी_ओंकार Wed, 09/15/2010 - 09:48
थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. काही स्टेपनींना साबण चोळून ही चकाचक करतात असे ऐकून आहे. - (ऐकीवातला)

वेताळ Tue, 09/14/2010 - 09:42
त्याच्या करीता काही सुचना आहेत का?पुर्वी बजाज स्कुटरला स्टेफनी असायची .आताच्या स्कुटरला स्टेफनी नसते. त्यामुळे खुपच कुचंबणा होते.रस्त्यावर हात हालवत उभे रहावे लागते.

चिगो Tue, 09/14/2010 - 15:59
अवो, ते हात हलवत म्हन्ले... काय्यच्या क्काय..

काही लोक गाडी 'एकहाती' वापरण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे गाडी तंदुरुस्त राहते म्हणे! आम्ही त्यांना विचारतो पंक्चर झाल्यावर कितीही तुम्ही एकहाती वापरली असली तरी स्टेपनी लागतेच. आता मोटरसायकलसारख्या दुचाकीला स्टेपनी लावताच येत नाही. त्यांनी काय करायच? गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंतात. स्टेपनीचा शोध यातुनच लागला असावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

एकहाती गाडी वापरल्याने गाडीचेच नव्हे तर चालकाचेही आरोग्य चांगले राहते. नाहीतर इतर कोणी गाडी नीट नाही वापरली तर गाडी खिळखिळी होऊ शकते त्यामुळे चालकाचेही जजमेंट चुकू शकते ना!
लेखनविषय:
लेखनप्रकार
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की. स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे.

मैसूर

मृत्युन्जय ·

छोटा डॉन Fri, 08/20/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय Fri, 08/20/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण Fri, 08/20/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल Fri, 08/20/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान Fri, 08/20/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू Sat, 08/21/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती Sat, 08/21/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब Mon, 08/23/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?

छोटा डॉन Fri, 08/20/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय Fri, 08/20/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण Fri, 08/20/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल Fri, 08/20/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान Fri, 08/20/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू Sat, 08/21/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती Sat, 08/21/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब Mon, 08/23/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?
3

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

इंटरनेटस्नेही ·

आगाऊ कार्टा गुरुवार, 07/29/2010 - 15:39
माझे मोबाईल मुळे नव्हे तर मोबाईलचेच नुकसान झाले आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री पार्टी करुन आम्ही सुमारे ११ वाजताच्या दरम्यान CCD (कॅफे कॉफी डे) मिरामार येथे गेलो. सगळ्यांनी कॉफी मागवली आणि गप्पा मारत बसलो होतो. मी लगेच माझा मोबाईल (Nokia 5610 xpress music with 3.2 MP camera) काढून फोटो काढायला सुरुवात केली. कॉफी आल्यावर मोबाईल टेबलावर ठेवला आणि कॉफी प्यायला सुरुवात केली. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही निघालो आणि आपापल्या रुमवर गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना लक्षात आले की मोबाईल गायब आहे. मग शोधाशोध सुरु. CCD मध्ये जाऊन पण आलो पण काही उपयोग झाला नाही. मित्रांनी पण जाम शिव्या घातल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/05/2010 - 18:46
मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. सहमत आहे. मोबाईल सोबत असल्यावर आपण एकटे असलो तरी आपण आपल्या लोकांशी कनेक्टेड आहोत असे वाटत असते. गर्दी गोंगाटात हेडफोन कानाला लावले आणि आपली आवडती गाणी लागली की, सर्व कोलाहलापासून आपण दूर जातो. मनातले विचार मनसोक्त मागे पुढे धावत असतात. नुकसानीचे म्हणाल तर मी पाहिले आहे की, मोबाईलवर बोलतांना देहभान हरपून बोलत चालणा-यांची गम्मत वाटत असते. आपल्याच नादात रस्त्यावरुन याला त्याला धडकत चालत असतात. एकाच जागेवर चकरा मारत बोलणारे, मोठमोठ्याने बोलणारे, डोळे बंद करुन बोलणारे, मोबाईलवर बोलणा-यांचे निरिक्षण केले की मजा येते. तोंडावर हात ठेवून बोलणारे, एकदा कानाला आणि एकदा तोंडाला मोबाईल लावणारे, दुचाकीवरुन जातांना खांदा आणि कान याच्यात मोबाईल दाबून बोलणारे तर विचारु नका. अपघाताला आमंत्रण देणारे वरीलपैकी एखादा प्रसंग नक्की असू शकतो हे मात्र तितकेच खरे आहे. आपल्याकडे थ्रीजी सुविधा आल्यावर म्हणे बोलणारा दिसणार आहे, मोबाईलवर वेगाने नेटस्पीड मिळणार आहे, असे काय नी काय ऐकून आहे, त्याची सुविधा मिळाली की अजून काही ना काही घडणार आहे तेव्हा त्याचे स्वागत करण्याची मी तरी वाट पाहात आहे. :) अवांतर : मोबाईल वर मिळणार्‍या थ्रीजी सुविधेची माहिती द्या रे कोणीतरी ? -दिलीप बिरुटे

आगाऊ कार्टा गुरुवार, 07/29/2010 - 15:39
माझे मोबाईल मुळे नव्हे तर मोबाईलचेच नुकसान झाले आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री पार्टी करुन आम्ही सुमारे ११ वाजताच्या दरम्यान CCD (कॅफे कॉफी डे) मिरामार येथे गेलो. सगळ्यांनी कॉफी मागवली आणि गप्पा मारत बसलो होतो. मी लगेच माझा मोबाईल (Nokia 5610 xpress music with 3.2 MP camera) काढून फोटो काढायला सुरुवात केली. कॉफी आल्यावर मोबाईल टेबलावर ठेवला आणि कॉफी प्यायला सुरुवात केली. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही निघालो आणि आपापल्या रुमवर गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना लक्षात आले की मोबाईल गायब आहे. मग शोधाशोध सुरु. CCD मध्ये जाऊन पण आलो पण काही उपयोग झाला नाही. मित्रांनी पण जाम शिव्या घातल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/05/2010 - 18:46
मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. सहमत आहे. मोबाईल सोबत असल्यावर आपण एकटे असलो तरी आपण आपल्या लोकांशी कनेक्टेड आहोत असे वाटत असते. गर्दी गोंगाटात हेडफोन कानाला लावले आणि आपली आवडती गाणी लागली की, सर्व कोलाहलापासून आपण दूर जातो. मनातले विचार मनसोक्त मागे पुढे धावत असतात. नुकसानीचे म्हणाल तर मी पाहिले आहे की, मोबाईलवर बोलतांना देहभान हरपून बोलत चालणा-यांची गम्मत वाटत असते. आपल्याच नादात रस्त्यावरुन याला त्याला धडकत चालत असतात. एकाच जागेवर चकरा मारत बोलणारे, मोठमोठ्याने बोलणारे, डोळे बंद करुन बोलणारे, मोबाईलवर बोलणा-यांचे निरिक्षण केले की मजा येते. तोंडावर हात ठेवून बोलणारे, एकदा कानाला आणि एकदा तोंडाला मोबाईल लावणारे, दुचाकीवरुन जातांना खांदा आणि कान याच्यात मोबाईल दाबून बोलणारे तर विचारु नका. अपघाताला आमंत्रण देणारे वरीलपैकी एखादा प्रसंग नक्की असू शकतो हे मात्र तितकेच खरे आहे. आपल्याकडे थ्रीजी सुविधा आल्यावर म्हणे बोलणारा दिसणार आहे, मोबाईलवर वेगाने नेटस्पीड मिळणार आहे, असे काय नी काय ऐकून आहे, त्याची सुविधा मिळाली की अजून काही ना काही घडणार आहे तेव्हा त्याचे स्वागत करण्याची मी तरी वाट पाहात आहे. :) अवांतर : मोबाईल वर मिळणार्‍या थ्रीजी सुविधेची माहिती द्या रे कोणीतरी ? -दिलीप बिरुटे
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ९

जयंत कुलकर्णी ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/07/2011 - 20:39
मेंदु म्हंजी साला केमिकल लोच्याच हाये! अनुभुती हा प्रांतच काही और आहे. सहमत आहे. कुलकर्णी साहेब, लेखमालिकेतील लेखांची ’प्रिंट’ काढून सर्व लेखन निवांत क्षणी अगदी मन लावून वाचावे लागेल. संग्रही ठेवावी अशी लेखमाला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस Fri, 04/08/2011 - 10:30
मेंदु म्हंजी साला केमिकल लोच्याच हाये! अनुभुती हा प्रांतच काही और आहे. केवळ फोलिस आफिसर आणि प्रोफेश्वर यांच्या पंगतीत बसायचं म्हणून हा अभिप्राय दिला आहे...... बाकी आमच्या मेंदूला परमेश्वर काय आणि सैतान काय, सगळे सारखेच!!!!! आयला, गरिबाला कसला परमेश्वर?

(विशेष करुन उन्हाळ्यात) भुभु चे गार गार ओले नाक मला कपाळाला लावल्यावर लाविली थंड उटी वाळ्याची सखीच्या कुचकलशा ती अशी अनुभुती येते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/07/2011 - 20:39
मेंदु म्हंजी साला केमिकल लोच्याच हाये! अनुभुती हा प्रांतच काही और आहे. सहमत आहे. कुलकर्णी साहेब, लेखमालिकेतील लेखांची ’प्रिंट’ काढून सर्व लेखन निवांत क्षणी अगदी मन लावून वाचावे लागेल. संग्रही ठेवावी अशी लेखमाला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस Fri, 04/08/2011 - 10:30
मेंदु म्हंजी साला केमिकल लोच्याच हाये! अनुभुती हा प्रांतच काही और आहे. केवळ फोलिस आफिसर आणि प्रोफेश्वर यांच्या पंगतीत बसायचं म्हणून हा अभिप्राय दिला आहे...... बाकी आमच्या मेंदूला परमेश्वर काय आणि सैतान काय, सगळे सारखेच!!!!! आयला, गरिबाला कसला परमेश्वर?

(विशेष करुन उन्हाळ्यात) भुभु चे गार गार ओले नाक मला कपाळाला लावल्यावर लाविली थंड उटी वाळ्याची सखीच्या कुचकलशा ती अशी अनुभुती येते.
3