मुक्तक

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
26 Sep 2022 - 1:14 pm

पेरणा

कोण शिकवते कळ्यांना
कसे, केव्हां उमलायचे
कोण शिकवते पानांना
केव्हां कसे गळायचे

ऋतुराज वसंत येता
झाडे बहरून येती
निसर्ग चक्र फिरता
होती फुले कळ्यांची

श्वानास कसे कळते
मास भादव्याचा आला
खरचं गरज आहे का?
हे सर्व शिकवावयाची
बुद्धिमान मानवाला!!!

जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची

उकळीकैच्याकैकविताजाणिवमुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदओली चटणी

वेडा वेडा पाऊस..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
24 Sep 2022 - 8:07 am

वेडा वेडा पाऊस..

वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस?
काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस..

छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला,
होतं असं चुकून, कळावं ना पावसाला?
वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला.
म्हणून भिजले,
नको ना रे भलता अर्थ लावूस!

भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना?
बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना?
घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना?
म्हणून थांबले,
नको की रे भलता अर्थ लावूस!

पाऊसकविताप्रेमकाव्यमुक्तक

लद्दाख

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Sep 2022 - 8:08 pm

भूशास्त्राच्या अंकलिपीची
पाने इथली उलटी
रंगभारले पहाड, अवघड
रस्त्याची वेलांटी

रण वाळूचे पायतळी अन्
हिमकण माथ्यावरती
किती विरोधाभास पचवुनी
फुलते इथली सृष्टी

रंग नभाचे प्राशुनी वाहे
निवळशंख हे पाणी
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
मिश्रण केले कोणी

(नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

निसर्गमुक्त कवितामुक्तक

कण अमृताचे......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Sep 2022 - 12:05 pm

आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही

पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही

करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही

झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही

आयुष्यमुक्त कविताकवितामुक्तक

मिपा कट्टा पुणे २०२२....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
17 Sep 2022 - 8:43 am

सारे रोजचे तरीही.....
हवे हवेसे वाटे
निशाचे ते जाणे
आणी उषाचे भेटणे

गवाक्षातून झाके
सोनसळी तिरीप
पुन्हा नव्याने येतो
जगण्या हुरूप

सारे रोजचे तरीही.....

पालवी फुटते
रात्रीच्या स्वप्नानां
अधिरते मन
कवेत घ्यायाला

गेले कालचे विरून
निराशेचे सुर
मन आभाळी आले
ढग आशेचे भरून

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे......

दमून भागून
जीव झाला क्लांत
पुन्हा घरट्यात येतो
घ्याया विश्राम निवांत

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे
निशाचे ते येणे.....

festivalsआनंदकंद वृत्तमुक्त कवितामुक्तक

आठवणीतला गणेशोत्सव

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
15 Sep 2022 - 8:01 pm

रात्रीचे साडेअकरा वाजले, आणि मी फोनाफोनी सुरू केली. पोलीस कंट्रोल, महापालिका, फायर ब्रिगेड, अन्य वर्तमानपत्रातल्या रात्रपाळीच्या रिपोर्टरांशीही फोनवर बोललो. नवी एडिशन काढावी लागेल असं काही फारसं घडलं नाहीये, याची खात्री करून घेतली, आणि मी आवराआवर केली. तो १९८९ सालातला गणेशचतुर्थीच्या आधीचा दिवस होता. चतुर्थीला सुट्टी होती. ‘उद्या अंक नाही’ अशी चौकट पेपरात ज्या मोजक्याच दिवशी छापली जाते, त्यापैकी हा एक दिवस! मी तयार होऊन थांबलो आणि काही वेळातच एक जाडजूड पिशवी खांद्यावर घेऊन सन्मित्र तानाजी कोलते Tanaji Kolte दाखल झाले. तानाजी तेव्हा माझा सीनियर सहकारी होता.

मुक्तकप्रकटन

जळण नसलेल्या तिरडीवर...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
10 Sep 2022 - 3:27 pm

लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर,

काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ ll
-संत नामदेव

स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार.

😀😁
______________________________

कवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाप्रकटनविरंगुळा

अनंत चतुर्दशी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
9 Sep 2022 - 11:32 pm

आज अनंत चतुर्दशी.दूरदर्शनवर गणपती विसर्जन व मिरवणुकीची दृश्ये दाखवत होते.लालबागचा राजा,कसबा गणपती, नागपूरचा राजा,कधी नाशिक कधी नागपूर शहरातली दृश्ये ,जणू दूरदर्शन संजय आणी मी धृतराष्ट्र.

जसे वय वाढते तसे येणारा प्रत्येक दिवस भूतकाळात जरूर घेऊन जातो. तसाच आजचा दिवस सुद्धा....

एक दोन तीन चार ....
माणिक मोती बडे हुशार....

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनअनुभवविरंगुळा

घराची ऊब

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
7 Sep 2022 - 9:46 am

प्रत्येक घराला एक प्रकारचा उबदारपणा असतो. आणि साधारणपणे माणूस आपल्या घरात एकदम समाधानी असतो. कितीही दिवस बाहेर गेलं तरी घरी आल्यावर एक प्रकारचं समाधान, मोकळेपणा मिळतो तो काही वेगळाच. ४ दिवस घर बंद करून जावं तर आल्या आल्या घरात एक प्रकारचा वास येतो. जणू घर सांगत असत कि असं दारं, खिडक्या बंद करून मला सोडून तुम्ही कसे जाता? आधी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या काय करायचं तर दारं खिडक्या मोकळ्या उघडून टाकायच्या. घराला स्वच्छ हवेचा श्वास घेऊ द्यायचा. मग घर पण कसं मोकळं होत. मनमोकळेपणाने तेही आपलं स्वागत करतं.

मुक्तकअनुभव