मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(अधिकार)

केशवसुमार ·

विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 20:16
कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे या पेक्षा कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते

In reply to by विजुभाऊ

धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 12:48
कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते » हाहाहाहा. तुमचं पार मीटररीडिंग चुकलेलं दिसतं. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 17:57
...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... (बापमाणूस) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 18:12
मला कुणाकडेही तक्रार करायची गरज नाही.शेळपट कोण आहे ते सर्वांना माहीत्र आहे.स्वतःच्या नावाने लिहीणारा की स्वतःचे नाव लपवणारा? तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आणिबाणीचा शासनकर्ता गुरुवार, 03/20/2008 - 18:28
धम्मकलाडूंचा येथील प्रतिसाद उडवला आहे. ...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. धम्मकलाडू आणि इनोबांना दोघांनाही जाहीर मारामार्‍या करण्याची एकेक संधी देण्यात आली आहे व समसमान न्याय केला आहे! कृपया पुढील मारामार्‍या एकमेकांच्या खरडीत किंवा एकमेकांना पोष्टकार्ड पाठवून करा. इतर लोकांना मूळ काव्याचा आस्वाद घेता यावा या करता हे पाऊल उचलले आहे! -- जनरल डायर.

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 20:34
मस्त रे केशवा! आज काय छापखाना चालू केला काय :० मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे अगदी बरुबर.. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 21:13
आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे आजचा 'कल' (ट्रेंड) बरोबर पकडला आहे. 'संततधार खासच आहे. मजा आली. शुभेच्छा.

वरदा Wed, 03/12/2008 - 21:34
अँटीक म्हणायचय ना तुम्हाला? ऍटीक म्हणजे माळा ज्यावर सगळ्या घरातल्या नको असलेल्या गोष्टी नेऊन टाकतो तो..... बाकी विडंबन नेहेमीप्रमाणे झकास...तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही...

In reply to by वरदा

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 01:10
तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही... नाही हो! खरे तर केशव आधी विडंबने पाडतो आणि नंतर लोक त्याच्यावर कविता रचतात.:( बाकी वरदाताई बर्‍याच दिवसानी दिसत आहेत. काय घरी खुप काम असते वाटतं? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by वरदा

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:57
वरदाताई, मनोगत आणि मिसळपावच्या टंकलेखन खिडकीतली ही तांत्रिक चूक आहे.. मनोगतावर 'अँटीक' टंकित करून ते इथे चिकटवले की 'ऍटीक' का दिसते कोणास ठाऊक.. (बुचकळ्यात)केशवसुमार

विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 07:13
मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे केशवा, आपण मानतो बुवा तुझा अधिकार! मस्त विडंबन... तात्या.

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:58
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!! (आभारी) केशवसुमार

प्राजु Fri, 03/14/2008 - 08:16
किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे हेच आवडले.. उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.. थोडिशी बिझी आहे आजकाल.. - (सर्वव्यापी)प्राजु

मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 15:08
किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे
आवडले!

विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 20:16
कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे या पेक्षा कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते

In reply to by विजुभाऊ

धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 12:48
कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते » हाहाहाहा. तुमचं पार मीटररीडिंग चुकलेलं दिसतं. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 17:57
...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... (बापमाणूस) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 18:12
मला कुणाकडेही तक्रार करायची गरज नाही.शेळपट कोण आहे ते सर्वांना माहीत्र आहे.स्वतःच्या नावाने लिहीणारा की स्वतःचे नाव लपवणारा? तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आणिबाणीचा शासनकर्ता गुरुवार, 03/20/2008 - 18:28
धम्मकलाडूंचा येथील प्रतिसाद उडवला आहे. ...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. धम्मकलाडू आणि इनोबांना दोघांनाही जाहीर मारामार्‍या करण्याची एकेक संधी देण्यात आली आहे व समसमान न्याय केला आहे! कृपया पुढील मारामार्‍या एकमेकांच्या खरडीत किंवा एकमेकांना पोष्टकार्ड पाठवून करा. इतर लोकांना मूळ काव्याचा आस्वाद घेता यावा या करता हे पाऊल उचलले आहे! -- जनरल डायर.

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 20:34
मस्त रे केशवा! आज काय छापखाना चालू केला काय :० मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे अगदी बरुबर.. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 21:13
आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे आजचा 'कल' (ट्रेंड) बरोबर पकडला आहे. 'संततधार खासच आहे. मजा आली. शुभेच्छा.

वरदा Wed, 03/12/2008 - 21:34
अँटीक म्हणायचय ना तुम्हाला? ऍटीक म्हणजे माळा ज्यावर सगळ्या घरातल्या नको असलेल्या गोष्टी नेऊन टाकतो तो..... बाकी विडंबन नेहेमीप्रमाणे झकास...तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही...

In reply to by वरदा

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 01:10
तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही... नाही हो! खरे तर केशव आधी विडंबने पाडतो आणि नंतर लोक त्याच्यावर कविता रचतात.:( बाकी वरदाताई बर्‍याच दिवसानी दिसत आहेत. काय घरी खुप काम असते वाटतं? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by वरदा

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:57
वरदाताई, मनोगत आणि मिसळपावच्या टंकलेखन खिडकीतली ही तांत्रिक चूक आहे.. मनोगतावर 'अँटीक' टंकित करून ते इथे चिकटवले की 'ऍटीक' का दिसते कोणास ठाऊक.. (बुचकळ्यात)केशवसुमार

विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 07:13
मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे केशवा, आपण मानतो बुवा तुझा अधिकार! मस्त विडंबन... तात्या.

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:58
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!! (आभारी) केशवसुमार

प्राजु Fri, 03/14/2008 - 08:16
किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे हेच आवडले.. उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.. थोडिशी बिझी आहे आजकाल.. - (सर्वव्यापी)प्राजु

मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 15:08
किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे
आवडले!
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल अधिकार किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे चार रंगांनी बघा बदले कशी दृष्टी जगाची आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे भाव थोडे वेगळे डोळ्यात माझ्या पाहिले अन लाज थोडी, घाबरे तो काय ही करणार आहे वाट रुळलेली कशाला चालुया दोघे पुन्हा ही ह्या प्रवासाने जगाचे मोडले संसार आहे मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे

एका वाक्यात उत्तर द्या

प्रेमसाई ·

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 17:32
ह्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यास तुमचे नशिब. अवांतरः या प्रश्न्नाला किती गुण मिळणार याचा उल्लेख असावा.(ह. घ्या. किंवा कशाला घेता?) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

वरदा Wed, 03/12/2008 - 17:43
रोज आपण ज्या लेन मधून ड्राईव्ह करु तीच अडकून राहीली आणि बाकी सगळे लोक पुढे जाताना दिसले की समजावं हेच आपलं नशीब (ट्रॅफिकला कंटाळलेली) वरदा

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:03
या प्रश्नाचे उत्तर घेण्याची तसदी आम्ही घेतली हे तुमचे नशिब व हे उत्तर देण्यासाठी मला २ तास विचार करावा लागला हे माझे (फूटके) नशिब ..... अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब .... "प्राजू" ने अजून "चारोळी" लिहून नशिब म्हणजे काय याचे उत्तर दिले नाही हे अजून एक नशिब ... "स्वाती-राजेशने किंवा पेठकर काकांनी " यावर "नशिब कसे बनवतात्/घडवतात" याची रेसिपी दिली नाही हे पण एक नशिब .... "सर्कीट" ने "मी नशिब मानत नाही व बाकीचे मानत असल्यास मला माहित नाही " असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ... "धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... "केशवसुमारां" नी "कशी नशिबाने थट्टा मांडली" या गाण्याच्या विडंबनातून प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... "धोंडोपंतकाकांनी " तुमच्या नशिबासाठी "तुमची कुंडली मांडली नाही हे नशिब .... "संजोपरावांचा कशी नशिबाने थट्टा मांडली " हा लेख तुम्ही वाचला नसल्यास फुटलेले तुमचे नशिब .... "इनोबांनी" नशिब म्हणजे काय आहे याचे उत्तर दिले आहेच .... "तात्यांनी " असेच नशिब घडवत रहा , आम्ही बघतो आहोत असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 19:08
असला जबरा प्रतिसाद मिळावा हे एक नशिब. डॉन्या लेका मस्तच रे! (ह. ह. पु. वा.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Wed, 03/12/2008 - 21:40
अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब .... अरे बाबा, त्या प्रेमसाईंची मी कशाला काढू? त्यांनी बिचार्‍यांनी माझं काय घोडं मारलंय? बाकी डॉन्या तू दूर बंगळूरात असल्याने तुला पायाचे अंगठे धरून उभा करता येत नाही हे माझं (फुटकं) आणि तुझं (चांगलं) नशीब!! :)) थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :)) आणि प्रेमसाई, तुमच्या प्रश्नाला आमचे म्हातार्‍याचे एका वाक्यात उत्तरः "नशीब म्हणजे, जे ओळखण्यात चूक होऊ शकते, पण जे कधीही बदलता येत नाही ते!" आपला, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 22:04
"थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :)"" काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा" होईल ... बाकी अंगठे धरण्याचे म्हणताल तर मला आता त्याचे काही वाटत नाही [ कारण मास्तरची नजर फिरल्याफिरल्या लगेच खाली कसे बसायचे ह्याचा आम्ही लहानपणीच "क्र्याश कोर्स " केला होता .... ह. घ्या किंवा घेऊ नका ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 00:45
काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा"होईल ... का नाही होणार?,च्यायला मराठी माणसाला मारायला जर कन्नड वेदीका येणार असेल तर आम्हालाही आमचे हत्यार बाहेर काढावे लागेल. पुण्यातली कर्नाटक शाळा फोडून टाकतो रात्रीच्या रात्री. बाकी पार्टीवाले घटना घडल्यानंतर निषेध करतात आपण च्यायला आधी करायचा नवा पायंडा पाडू. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

पिवळा डांबिस गुरुवार, 03/13/2008 - 10:18
आम्हाला बंगळूरमधले दुसरे कुठले गुंड माहिती नाहीत हो!!!:(( हेच एक माहिती होते जे लोकनियुक्त प्रतिनिधींचा अपमान करतात ते! :)) प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला, ह्या डॉन्याला ठीकठाक करायला!! :)) आमची हरकत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 10:41
प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो. (एकमेका साह्य करु | अवघे होऊ श्रीमंत) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन गुरुवार, 03/13/2008 - 15:43
"असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो." आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे. तेव्हा आमच्या बंदोबस्तास जत तुम्ही माणसे पाठवणार असताल तर आम्ही एवढेच म्हणू ... "ऊदयीक येणार असाल तर आजच या" बेंगरूळ शेर चंद्रराव छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 19:56
आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे आई जगदंबा आहे की समर्थ आहेत? एकदाच काय ते बोला राव! परत परत डोक्याची मंडई नको. "ऊदयीक येणार असाल तर आजच या" आज नाही जमणार राव.आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे. उद्या सकाळीच मी सनी सिंगापूरच्या जत्रेला निघालो आहे.यायला दोन तीन दिवस तरी लागतील.परत आल्यानंतर संपर्क करतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन गुरुवार, 03/13/2008 - 20:58
"आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आह" आहाहा .. ऐकुन लैच मस्त वाटलं बघा .... शेवटी कोणीतरी झुलु जाणणारा .... आमच्या त्या कार्यक्रमास शुभेच्छा .... अवांतर : आम्ही कधी काळी लिहलेले एक गीत आज झुलु लोकात फार फेमस आहे .... आम्ही तर असे ऐकले आहे की तेथिल लहान मुले संध्याकाळी "शुभंकरोती कल्याणम्" च्या जागी म्हणत असतात ... असो. डुडुंबा झुब्मा गन्त्ता. चामुंडा कुम्बा डुंगडुंग .... [ म्हणजे आता बास झाले. नंतर भेटू ...] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा गुरुवार, 03/13/2008 - 15:45
"धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... घ्या..आता ह्याच्यावर आम्ही काय "हाण तिच्याआयला" म्हणणार ? आयला ह्या डॉन्याचा खर॑च ब॑दोबस्त करायला पायजेल, लैच मोकाट झालाय हल्ली. तू भेट रे एकदा, मग सा॑गतो तुला नशिब म्हणजे काय ते! ओ प्रेमसाई, हे वरच॑ वाक्य तुमच्यासाठी नव्हत॑ बर॑ का..ते डॉन्यासाठी. नशिब म्हणजे काय हे एव्हढ॑ ठाऊक नाही पण ते दिसायला फुटक्या खापरासारख॑ असाव॑ असा आमचा अ॑दाज.

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:08
अरेरेरे...... छोटा डॉन ने याचे इतके मोठे उत्तर द्यावे.. छ्या... नशिब .. दुसरं काय?? (ह्.घ्या.) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:11
"प्राजूने व इनोबांनी " लगेच २ मिनिटात प्रतिसाद देऊन मला "टोला" हणावा हेच आमचे नशिब .... ह.घ्या . छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 19:34
अरे छोटा डॉन, नशिब आपले आपणच घडवतो म्हणजे ही एक प्रकारची रेसिपीच... ही तुला समजली नाही हे.....नशिब

वरदा Wed, 03/12/2008 - 20:37
इंडिकेटर लावून त्या लाईनमधे जायचं(घुसायचं). हे तुझे नशीब नाही का?:)))) मी शिफ्ट झाले की नेमकी ती दुसरी लेन स्लो जायला लागते गं...:(

वरदा Wed, 03/12/2008 - 21:24
हे हे हे :))))) अहो ती मिळवण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो हेही नशिब......

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 03/13/2008 - 02:49
नशीब म्हणजे स्वत:चे अपयश आणि दुसर्‍याच्या यशाला श्रेय देण्याची जागा....... उदा : केशाच्या विडंबनाला एवढे प्रतिसाद कसे बॉ ? -> (दुसर्‍याच्या कविता वापरुनही)सालं त्याचं नशीबं चांगलं. अन् माझ्या लिखाणाला प्रतिसाद कसे नाही बॉ ? -> (मी एवढा प्रतिभासंपन्न असुनही)सालं आमचं नशीबच XX. काय समजलं ना? आपला, ('नशीब'वान) छोटी टिंगी ;)

विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 06:45
आयुष्यातले योग आणि भोग यांच्या सरमिसळीला नशीब म्हणतात! आपला, (योगापेक्षा भोग मोठे आहेत हे मानणारा!) तात्या.

मनस्वी गुरुवार, 03/13/2008 - 09:42
लायकी नसताना प्रोजेक्ट मॅनेजर बनणे - हे पीएमचे गुड लक आणि तो पीएम आपल्याला येणे हे आमचे बॅड लक मनस्वी

मुकुल१ गुरुवार, 03/13/2008 - 09:57
जानी ये नसिब नसिब खेलना बंद करो, देखो बकार्डी तुम्हे बुला रही हैं, कहां हो तुम..

विजुभाऊ गुरुवार, 03/13/2008 - 13:01
नशीब म्हणजे मांजर..आपण उंदीर मांजरा पासून सुटका हवी असेल तर उंदीर मारायचे औषध उपयोगी ठरेल.... मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/13/2008 - 13:12
एखादे यश सहज प्राप्त झाले तर ते आपले 'कौशल्य'; पण तेच यश दुसर्‍याने कौशल्याने मिळविले तर ते त्याचे 'नशिब'.

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 17:32
ह्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यास तुमचे नशिब. अवांतरः या प्रश्न्नाला किती गुण मिळणार याचा उल्लेख असावा.(ह. घ्या. किंवा कशाला घेता?) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

वरदा Wed, 03/12/2008 - 17:43
रोज आपण ज्या लेन मधून ड्राईव्ह करु तीच अडकून राहीली आणि बाकी सगळे लोक पुढे जाताना दिसले की समजावं हेच आपलं नशीब (ट्रॅफिकला कंटाळलेली) वरदा

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:03
या प्रश्नाचे उत्तर घेण्याची तसदी आम्ही घेतली हे तुमचे नशिब व हे उत्तर देण्यासाठी मला २ तास विचार करावा लागला हे माझे (फूटके) नशिब ..... अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब .... "प्राजू" ने अजून "चारोळी" लिहून नशिब म्हणजे काय याचे उत्तर दिले नाही हे अजून एक नशिब ... "स्वाती-राजेशने किंवा पेठकर काकांनी " यावर "नशिब कसे बनवतात्/घडवतात" याची रेसिपी दिली नाही हे पण एक नशिब .... "सर्कीट" ने "मी नशिब मानत नाही व बाकीचे मानत असल्यास मला माहित नाही " असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ... "धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... "केशवसुमारां" नी "कशी नशिबाने थट्टा मांडली" या गाण्याच्या विडंबनातून प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... "धोंडोपंतकाकांनी " तुमच्या नशिबासाठी "तुमची कुंडली मांडली नाही हे नशिब .... "संजोपरावांचा कशी नशिबाने थट्टा मांडली " हा लेख तुम्ही वाचला नसल्यास फुटलेले तुमचे नशिब .... "इनोबांनी" नशिब म्हणजे काय आहे याचे उत्तर दिले आहेच .... "तात्यांनी " असेच नशिब घडवत रहा , आम्ही बघतो आहोत असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 19:08
असला जबरा प्रतिसाद मिळावा हे एक नशिब. डॉन्या लेका मस्तच रे! (ह. ह. पु. वा.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Wed, 03/12/2008 - 21:40
अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब .... अरे बाबा, त्या प्रेमसाईंची मी कशाला काढू? त्यांनी बिचार्‍यांनी माझं काय घोडं मारलंय? बाकी डॉन्या तू दूर बंगळूरात असल्याने तुला पायाचे अंगठे धरून उभा करता येत नाही हे माझं (फुटकं) आणि तुझं (चांगलं) नशीब!! :)) थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :)) आणि प्रेमसाई, तुमच्या प्रश्नाला आमचे म्हातार्‍याचे एका वाक्यात उत्तरः "नशीब म्हणजे, जे ओळखण्यात चूक होऊ शकते, पण जे कधीही बदलता येत नाही ते!" आपला, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 22:04
"थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :)"" काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा" होईल ... बाकी अंगठे धरण्याचे म्हणताल तर मला आता त्याचे काही वाटत नाही [ कारण मास्तरची नजर फिरल्याफिरल्या लगेच खाली कसे बसायचे ह्याचा आम्ही लहानपणीच "क्र्याश कोर्स " केला होता .... ह. घ्या किंवा घेऊ नका ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 00:45
काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा"होईल ... का नाही होणार?,च्यायला मराठी माणसाला मारायला जर कन्नड वेदीका येणार असेल तर आम्हालाही आमचे हत्यार बाहेर काढावे लागेल. पुण्यातली कर्नाटक शाळा फोडून टाकतो रात्रीच्या रात्री. बाकी पार्टीवाले घटना घडल्यानंतर निषेध करतात आपण च्यायला आधी करायचा नवा पायंडा पाडू. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

पिवळा डांबिस गुरुवार, 03/13/2008 - 10:18
आम्हाला बंगळूरमधले दुसरे कुठले गुंड माहिती नाहीत हो!!!:(( हेच एक माहिती होते जे लोकनियुक्त प्रतिनिधींचा अपमान करतात ते! :)) प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला, ह्या डॉन्याला ठीकठाक करायला!! :)) आमची हरकत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 10:41
प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो. (एकमेका साह्य करु | अवघे होऊ श्रीमंत) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन गुरुवार, 03/13/2008 - 15:43
"असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो." आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे. तेव्हा आमच्या बंदोबस्तास जत तुम्ही माणसे पाठवणार असताल तर आम्ही एवढेच म्हणू ... "ऊदयीक येणार असाल तर आजच या" बेंगरूळ शेर चंद्रराव छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 19:56
आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे आई जगदंबा आहे की समर्थ आहेत? एकदाच काय ते बोला राव! परत परत डोक्याची मंडई नको. "ऊदयीक येणार असाल तर आजच या" आज नाही जमणार राव.आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे. उद्या सकाळीच मी सनी सिंगापूरच्या जत्रेला निघालो आहे.यायला दोन तीन दिवस तरी लागतील.परत आल्यानंतर संपर्क करतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन गुरुवार, 03/13/2008 - 20:58
"आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आह" आहाहा .. ऐकुन लैच मस्त वाटलं बघा .... शेवटी कोणीतरी झुलु जाणणारा .... आमच्या त्या कार्यक्रमास शुभेच्छा .... अवांतर : आम्ही कधी काळी लिहलेले एक गीत आज झुलु लोकात फार फेमस आहे .... आम्ही तर असे ऐकले आहे की तेथिल लहान मुले संध्याकाळी "शुभंकरोती कल्याणम्" च्या जागी म्हणत असतात ... असो. डुडुंबा झुब्मा गन्त्ता. चामुंडा कुम्बा डुंगडुंग .... [ म्हणजे आता बास झाले. नंतर भेटू ...] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा गुरुवार, 03/13/2008 - 15:45
"धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... घ्या..आता ह्याच्यावर आम्ही काय "हाण तिच्याआयला" म्हणणार ? आयला ह्या डॉन्याचा खर॑च ब॑दोबस्त करायला पायजेल, लैच मोकाट झालाय हल्ली. तू भेट रे एकदा, मग सा॑गतो तुला नशिब म्हणजे काय ते! ओ प्रेमसाई, हे वरच॑ वाक्य तुमच्यासाठी नव्हत॑ बर॑ का..ते डॉन्यासाठी. नशिब म्हणजे काय हे एव्हढ॑ ठाऊक नाही पण ते दिसायला फुटक्या खापरासारख॑ असाव॑ असा आमचा अ॑दाज.

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:08
अरेरेरे...... छोटा डॉन ने याचे इतके मोठे उत्तर द्यावे.. छ्या... नशिब .. दुसरं काय?? (ह्.घ्या.) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:11
"प्राजूने व इनोबांनी " लगेच २ मिनिटात प्रतिसाद देऊन मला "टोला" हणावा हेच आमचे नशिब .... ह.घ्या . छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 19:34
अरे छोटा डॉन, नशिब आपले आपणच घडवतो म्हणजे ही एक प्रकारची रेसिपीच... ही तुला समजली नाही हे.....नशिब

वरदा Wed, 03/12/2008 - 20:37
इंडिकेटर लावून त्या लाईनमधे जायचं(घुसायचं). हे तुझे नशीब नाही का?:)))) मी शिफ्ट झाले की नेमकी ती दुसरी लेन स्लो जायला लागते गं...:(

वरदा Wed, 03/12/2008 - 21:24
हे हे हे :))))) अहो ती मिळवण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो हेही नशिब......

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 03/13/2008 - 02:49
नशीब म्हणजे स्वत:चे अपयश आणि दुसर्‍याच्या यशाला श्रेय देण्याची जागा....... उदा : केशाच्या विडंबनाला एवढे प्रतिसाद कसे बॉ ? -> (दुसर्‍याच्या कविता वापरुनही)सालं त्याचं नशीबं चांगलं. अन् माझ्या लिखाणाला प्रतिसाद कसे नाही बॉ ? -> (मी एवढा प्रतिभासंपन्न असुनही)सालं आमचं नशीबच XX. काय समजलं ना? आपला, ('नशीब'वान) छोटी टिंगी ;)

विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 06:45
आयुष्यातले योग आणि भोग यांच्या सरमिसळीला नशीब म्हणतात! आपला, (योगापेक्षा भोग मोठे आहेत हे मानणारा!) तात्या.

मनस्वी गुरुवार, 03/13/2008 - 09:42
लायकी नसताना प्रोजेक्ट मॅनेजर बनणे - हे पीएमचे गुड लक आणि तो पीएम आपल्याला येणे हे आमचे बॅड लक मनस्वी

मुकुल१ गुरुवार, 03/13/2008 - 09:57
जानी ये नसिब नसिब खेलना बंद करो, देखो बकार्डी तुम्हे बुला रही हैं, कहां हो तुम..

विजुभाऊ गुरुवार, 03/13/2008 - 13:01
नशीब म्हणजे मांजर..आपण उंदीर मांजरा पासून सुटका हवी असेल तर उंदीर मारायचे औषध उपयोगी ठरेल.... मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/13/2008 - 13:12
एखादे यश सहज प्राप्त झाले तर ते आपले 'कौशल्य'; पण तेच यश दुसर्‍याने कौशल्याने मिळविले तर ते त्याचे 'नशिब'.
नशिब कशाला म्हणतात

मुकुट परत मिळाला..

विवेकवि ·

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 17:36
हरवला कधी/कुणाचा/कोठून होता? अवांतरः विवेकराव आधीची बातमीही द्यायला हवी होती. नाहीतर नक्की काय सांगायचे आहे ते लक्षात येत नाही. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 18:17
मुकुट, मंदिर ,दर्गे ,पाल्ख्या ,केस,भिंती यात्रा यांचा बंदोबस्त करण्यातच आपले पोलिस दिवसाचे १४/१६ तास जुंपलेले असतात. तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? रिकामटेकडे लोक या सगळ्या गोष्टीना अवास्ताव महत्व देतात्...त्यात भर म्हणून प्रसार माध्यमे ही ताळ्तंत्र सोडुन "सबसे तेज" प्रकाशित करतात. आपणही ते चघळत बसतो...... तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? २४ तास दिल्या जाणार्या बातम्यांमुळे कोणाचे जनरल नॉलेज वाढले ,कोणाचे पोट भरले ,(बातमीदार वगळता) असे मला तरी दिसले नाही. "के "ने सुरु होणार्या सिरीयल्स्.....पहात बसणारी आपला जनता....वीज पुरत नाही म्हणून लोड्शेडींग सहन करणारी आपली जनता (या सिरीयल्स्बंद केल्या तर किती गावाना वीज मिळेल ,किती कारखाने चालतील .......असा विचार केला आहे कधी?) तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? या सगळ्यामुळे मनस्ताप होणारा...पण काहीही करु न शकणारा निष्क्रिय विजुभाऊ

व्यंकट Wed, 03/12/2008 - 18:53
तुकाराम महाराजांचा मुखवटा म्हणायचय का? असल्यास आपल्या इतर प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. वृत्तपत्रे वाचत रहा. उत्तरे मिळतील. व्यंकट

विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 06:42
आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला. वाचून आन॑द झाला .. मलाही आनंद झाला... तात्या.

मनस्वी गुरुवार, 03/13/2008 - 10:16
ही घटना कुरळेवाडीतील आहे. कुरळेवाडीत बबन लुकतुके आणि जनाजी मुंगळे यांची हौशी नाटककंपनी आहे. शनिवारी रात्री या नाटककंपनीचा "द्रौपदीचे वस्त्रहरण" चा प्रयोग होता. ऐनवेळेस लक्षात आले की मुंगळ्यांचा (श्रीकृष्णाचे पात्र) मुकुट सापडत नाहीये. म्हणून वेळ निभावून नेण्यासाठी लुकतुक्यांनी मंदिरातील मुकुट मुंगळ्यांना आणून दिला. इकडे "मंदिरात मुकुट चोरीला गेला" अशी खळबळ उडाली. प्रयोग संपल्यावर लुकतुक्यांनी झाला प्रकार सांगितला, समस्त नाटकमंडळींनी जाहीर माफी मागितली आणि मुकुट साभार परत केला. मंदिराचे चिटणीस मुरकुटे आणि गावकर्‍यांनी नाटककंपनीची अनेक वर्षांपासूनची विनामूल्य आणि उस्फुर्त सेवा यांचा विचार करता त्यांना माफ केले आणि मुरकुट्यांनी नाटककंपनीला रुपये ५०१ मुकुट घेण्यासाठी देणगीच्या स्वरुपात दिले. मनस्वी

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 10:48
दैनिक टोळभैरव(संपादक: इनोबा ठाकरे) (सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध किंमत: २.५० रु.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मनस्वी Mon, 03/17/2008 - 14:50
दैनिक बोंबाबोंब अतिशय परखड आणि भेदक विचारांचे वृत्तपत्र (किंमत २ रु २५ पै) इनोबा म्हणतात त्या टोळभैरवामध्ये आणि बोंबाबोंबमध्ये नेहेमी अटीतटीची competition असते! मनस्वी

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 17:36
हरवला कधी/कुणाचा/कोठून होता? अवांतरः विवेकराव आधीची बातमीही द्यायला हवी होती. नाहीतर नक्की काय सांगायचे आहे ते लक्षात येत नाही. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 18:17
मुकुट, मंदिर ,दर्गे ,पाल्ख्या ,केस,भिंती यात्रा यांचा बंदोबस्त करण्यातच आपले पोलिस दिवसाचे १४/१६ तास जुंपलेले असतात. तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? रिकामटेकडे लोक या सगळ्या गोष्टीना अवास्ताव महत्व देतात्...त्यात भर म्हणून प्रसार माध्यमे ही ताळ्तंत्र सोडुन "सबसे तेज" प्रकाशित करतात. आपणही ते चघळत बसतो...... तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? २४ तास दिल्या जाणार्या बातम्यांमुळे कोणाचे जनरल नॉलेज वाढले ,कोणाचे पोट भरले ,(बातमीदार वगळता) असे मला तरी दिसले नाही. "के "ने सुरु होणार्या सिरीयल्स्.....पहात बसणारी आपला जनता....वीज पुरत नाही म्हणून लोड्शेडींग सहन करणारी आपली जनता (या सिरीयल्स्बंद केल्या तर किती गावाना वीज मिळेल ,किती कारखाने चालतील .......असा विचार केला आहे कधी?) तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? या सगळ्यामुळे मनस्ताप होणारा...पण काहीही करु न शकणारा निष्क्रिय विजुभाऊ

व्यंकट Wed, 03/12/2008 - 18:53
तुकाराम महाराजांचा मुखवटा म्हणायचय का? असल्यास आपल्या इतर प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. वृत्तपत्रे वाचत रहा. उत्तरे मिळतील. व्यंकट

विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 06:42
आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला. वाचून आन॑द झाला .. मलाही आनंद झाला... तात्या.

मनस्वी गुरुवार, 03/13/2008 - 10:16
ही घटना कुरळेवाडीतील आहे. कुरळेवाडीत बबन लुकतुके आणि जनाजी मुंगळे यांची हौशी नाटककंपनी आहे. शनिवारी रात्री या नाटककंपनीचा "द्रौपदीचे वस्त्रहरण" चा प्रयोग होता. ऐनवेळेस लक्षात आले की मुंगळ्यांचा (श्रीकृष्णाचे पात्र) मुकुट सापडत नाहीये. म्हणून वेळ निभावून नेण्यासाठी लुकतुक्यांनी मंदिरातील मुकुट मुंगळ्यांना आणून दिला. इकडे "मंदिरात मुकुट चोरीला गेला" अशी खळबळ उडाली. प्रयोग संपल्यावर लुकतुक्यांनी झाला प्रकार सांगितला, समस्त नाटकमंडळींनी जाहीर माफी मागितली आणि मुकुट साभार परत केला. मंदिराचे चिटणीस मुरकुटे आणि गावकर्‍यांनी नाटककंपनीची अनेक वर्षांपासूनची विनामूल्य आणि उस्फुर्त सेवा यांचा विचार करता त्यांना माफ केले आणि मुरकुट्यांनी नाटककंपनीला रुपये ५०१ मुकुट घेण्यासाठी देणगीच्या स्वरुपात दिले. मनस्वी

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 10:48
दैनिक टोळभैरव(संपादक: इनोबा ठाकरे) (सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध किंमत: २.५० रु.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

मनस्वी Mon, 03/17/2008 - 14:50
दैनिक बोंबाबोंब अतिशय परखड आणि भेदक विचारांचे वृत्तपत्र (किंमत २ रु २५ पै) इनोबा म्हणतात त्या टोळभैरवामध्ये आणि बोंबाबोंबमध्ये नेहेमी अटीतटीची competition असते! मनस्वी
आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला. वाचून आन॑द झाला .. पण चोरणारी व्यक्यी कोण ? काय हेतू चोरण्याचा ? आपले काय मत आहे आपली मते कळवावी...

काही दुर्मिळ फोटू...

विसोबा खेचर ·

आनंदयात्री Wed, 03/12/2008 - 15:32
सुंदर फोटो. (अण्णा, अटलजी, पवारसाहेब अन बाबूजी ),(सावरकर सदनापाशी बाबूजी) हे फोटो विशेष आवडले. सावरकर सदनापाशी बाबूजी हा एकदम वेगळा फोटो आहे, तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्याचा असावा असा, साधेपण दिसुन येतो.

शेखर Wed, 03/12/2008 - 14:03
तात्या फोटो मिपावर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद..... बाबुजींची गाण्यांची बात काही औरच आहे..... कितीही दशके गेली तरी गाणी अजुनही कानांना गोड वाटतात. शेखर...

प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 14:14
अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम! तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही!

In reply to by प्रमोद देव

अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम! तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन Wed, 03/12/2008 - 14:27
अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम! तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही! -- असेच म्हणतो. आनंदयात्रींनी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या फोटोतून त्यांचा साधेपणा दिसून येतो. अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

आनंदयात्री Wed, 03/12/2008 - 15:30
>> किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :) खल्लास ....... बर सातव्या फोटोतले बाबुजींच्या बाजुला डावीकडे नौशाद आहेत ना ? अन उजवीकडचे कोण ??

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 16:18
बर सातव्या फोटोतले बाबुजींच्या बाजुला डावीकडे नौशाद आहेत ना ? हो, नौशादजीच आहेत. मोंगल ए आझम चित्रपटातील त्यांचं 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये' हे माझं अत्यंत आवडतं गाणं! अन उजवीकडचे कोण ?? उजवीकडचे खळेसाहेब आहेत. त्यांचं, जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले हे गाणंही माझं अतिशय आवडतं गाणं. दिदी अक्षरश: सुरी चालवते काळजावरून! असो.. आपला, (दिदीचा दिवाना) तात्या.

In reply to by नंदन

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 18:28
अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :) नंदनराव, सही अभिप्राय. त्याचप्रमाणे "देव आपणांत आहे....शीर झुकवोनिया पाहे" "तुझ्या माझ्या जड देही....देव भरोनिया राही" असेही सांगत असावेत. आपला, (सश्रद्ध) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 14:34
अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :) शाब्बास नंदन.

सुमीत Wed, 03/12/2008 - 14:41
खुष केलेत तुम्ही आम्हा मिपा करांना, दुर्मिळ छायाचित्रे, भाग्य आमचे की आपण ते प्रकाशित केलेत :) गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो! खरोखर, आजचे होतकअरू गायक बिनधास्त मतां साठी भिका मागतात पण लाज मात्र आम्हालाच येते.

विसुनाना Wed, 03/12/2008 - 15:26
अलभ्य लाभ! ही छायाचित्र बघायचं भाग्य तात्यांमुळं लाभलं... अवांतर - हीराबाईं बडोदेकरांच्या बाजूला यशवंतराव चव्हाण दिसत आहेत. (आज त्यांचा जन्मदिवस - १२ मार्च १९१३)

अवलिया Wed, 03/12/2008 - 15:19
गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो! खरे आहे आजकालचे पोरे अशी भिका मागतात की फोरासरोडच्या रांडा पण गि-हाइकाला अशी गळेपडुपणा करत नसतील सगळाच भिकारचोट पणा माजलाय ... नाना

विवेकवि Wed, 03/12/2008 - 17:11
धन्यवाद तात्या ... बाबुजी॑च्या आठवणी जाग्या झाल्या.. असेच काही फोटो मला पण टाकायला आवडतील .. मि.पा ला चे आज धन्यवाद ..... विवेक वि.

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 17:11
जाता जाता म्हणावेसे वाटते... धन्य ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती । ह्या मणिकांचन योगाबद्दल तात्यांना हृदयत: धन्यवाद. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

किशोरी Wed, 03/12/2008 - 17:14
खरच दुर्मिळ फोटो,तात्या फोटो मिपावर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.....

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 17:16
शेवटच्या छायाचित्रात सावरकर राष्ट्रीय स्मारक (उद्यान गणेशासमोरचे) आहे. सावरकर सदन नव्हे. कारण सावरकर सदन बालमोहनच्या गल्लीत आहे आणि त्याला लागून समुद्र नाही. हा पुतळा सावरकर राष्ट्रीय स्मारक इथलाच आहे. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 17:25
या फोटो च्या निमित्याने जुन्या गाण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.दुर्मिळ फोटो बद्द्ल धन्यवाद. त्यावेळची मंडळी एका गाण्यासठी किती कष्ट घेत होती? आणि आता दिवसाला १०० गाणी म्हणून रेकॉर्ड करतात. .....असो नविन गाणी सुद्धा त्यावेळेपुरती हिट होतातच.:)))

वरदा Wed, 03/12/2008 - 18:21
आज दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झाली माझी...खूप मस्त वाटलं फोटो पाहून आणि तुमची टिप्पणीही खूप छान आहे. "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो! १००% सहमत

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 18:22
वा वा वा वा तात्या, अप्रतिम छायाचित्रे. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग Wed, 03/12/2008 - 19:09
अहो दिवसाची सुरुवात अशा मांदियाळीच्या दर्शनाने व्हावी ह्यापरते भाग्य ते कोणते! बाबूजींसारख्या असामान्य सूरसाधकाचा सहवास तुम्हाला लाभलेला असणे हे तर तुमचे पूर्वजन्मीचे सुकृत आहे असे वाटते. ही दुर्मिळ प्रकाशचित्रे दिल्याबद्दल मी ऋणी आहे! आणि प्रत्येक चित्रासोबतची आपली खास टिप्पणीही उल्लेखनीय. चतुरंग

In reply to by चतुरंग

चित्रा Fri, 03/14/2008 - 17:15
बाबूजींसारख्या असामान्य सूरसाधकाचा सहवास तुम्हाला लाभलेला असणे हे तर तुमचे पूर्वजन्मीचे सुकृत आहे असे वाटते. ही दुर्मिळ प्रकाशचित्रे दिल्याबद्दल मी ऋणी आहे! आणि प्रत्येक चित्रासोबतची आपली खास टिप्पणीही उल्लेखनीय. धन्यवाद तात्या.

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:20
वरती सगळ्यांनी इतके सुंदर प्रतिसाद दिले आहेत की माझ्याकडे आता शब्दच नाहीत. हे फोटो मिपावर यावे या सारखे मिपाचे आणि मिपाकरांचे सुदैव ते कोणते असेल... प्रेमसाई, यालाच कदाचित नशिब म्हणत असतील.... याचे श्रेय तात्यांना जाते.. धन्यवाद तात्या. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:25
"प्रेमसाई, यालाच कदाचित नशिब म्हणत असतील...." धन्यवाद तात्या .... मी तर असे म्हणेन की "देणार्‍याचे हजारो हात , फाटकी आमची झोळी " .... नशिबवान छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

झकासराव Wed, 03/12/2008 - 19:21
तुने तो दिल खुष कर दिया यार :) प्रत्येक फोटो छान आणि त्यावरची टिप्पण्णी मस्त आहे. मतांची भीक>>>. हे अगदी पटल मनापासुन.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Sat, 03/15/2008 - 00:06
अटलजी व पॉवरसाहेब वगळता. हा हा हा, बरं बरं! पॉवरसाहेबांचं समजू शकतो हो! पण अटलजी हा माणूस मला अतिशय आवडतो. खूप गोड आणि मिश्किल माणूस आहे तो! राजकारणाच्या चिखलात पडला नसता तर फार बरं झालं असतं! असो...! आपला, (अटलजी प्रेमी) तात्या.

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 21:55
सहमत आहे. ते शेवटचे प्रकाशचित्र स्मारकाचे. सदनाचे नव्हे. स्मारकासमोरच पार्कातील कट्ट्यावर जवळजवळ दहापंधरा वर्षे आमचा रोजचा अड्डा जमायचा.

टिउ गुरुवार, 03/13/2008 - 01:08
ही सर्व दुर्मिळ छायाचित्रे इथे प्रकाशित केल्यबद्दल तुमचे मनःपुर्वक आभार. :)

ऋषिकेश गुरुवार, 03/13/2008 - 21:51
तात्या, ह्या छा.चिं. बद्दल शतश: आभार.. खूप छान वाटलं बघून -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवराव Fri, 03/14/2008 - 14:38
तात्या ; खरेच मन भारावून गेले. प्रकाश चित्रें दुर्मिळच पण एका सांगितीक स्मृती रंजनात [नॉस्टॅलजिआ ] घेवून गेली. चित्र क्र. ५ च्या टिप्पणीत मा. यशवंतरावांना का वगळले ? - - - - - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

विसोबा खेचर Fri, 03/14/2008 - 18:49
चित्र क्र. ५ च्या टिप्पणीत मा. यशवंतरावांना का वगळले ? त्यांच्या नांवाचा उल्लेख करायचा राहूनच गेला खरा! क्षमस्व.... काही एक नितिमत्ता, सभ्यता, सुसंस्कृतता असलेले जे काही मोजके राजकारणी होते त्यांत यशवंतरावांचं नांव आवर्जून घ्यावं लागेल हे मात्र नक्की... तात्या.

सन्जोप राव Fri, 03/14/2008 - 19:43
चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं! बरं का मंडळी, फार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. संध्याकाळची वेळ होती. मुंबापुरीतल्या एका त्यातल्या त्यात शांत गल्लीतून मी आणि छगन्या रमतगमत फिरत होतो. आमचा छगन्या म्हणजे एक भारी व्यक्तीमत्व बरं का! कुठही जायचं म्हटलं की आधी स्वारी माझ्या दारात येऊन साद घालणार,"झेंगट्या, आहेस का मायजयां वागानं खाल्ला तुला?' (मायजयां ही आमच्या कोकणातली बोलीभासा आसा हां! नायतर पुन्ना माज्या चावडीवर होळीची लाकडं जमवीन मी!) झेंगट्या हे काही माझं खरं नाव नाही बरं का मंडळी! पण दोस्तांत मी झेंगट्या याच नावानं ओळखला जातो. हां, तर सांगत काय होतो, अशी छ्गन्याची साद आली की मी निमूटपणे लेंगाबिंगा चढवून पायताणं घालायला लागायचो. छगन्या तोवर "काय मावशी, तब्येत काय म्हणते आता?" अशा चौकशा करुन बेसनाचा लाडूबिडू खाऊन पायजम्याला हात पुसत उभा असायचा.तर असा एकदा छगन्याबरोबर फिरायला बाहेर पडलो. फिरताफिरता किती लांब आलो ते कळालंच नाही. नेहमीप्रमाणं काहीतरी गुणगुणत होतो. एकदोन जागा झिंझोटीच्या अंगानं गेल्या आणि वरच्या गॅलरीतून अचानक आवाज आला " भालो, खूब भालो - कौन गाना गाता हाय?" मंडळी, आवाज ओळखीचा वाटला आणि वर वळून पाहिलं तसा अंगावर सर्रकन काटाच आला ! वरच्या मजल्यावरुन साक्षात थोरले बर्मनदा खाली बघत होते. थोरले बर्मनदा म्हणजे आमचे आराध्य दैवत बरं का मंडळी! आम्ही डोळे भरून पहात राहिलो. नकळत पायातली पायताणे काढून छातीशी धरली. बर्मनदांनी त्यांच्या गुरख्याला काहीतरी ओरडून सांगितलं गुरखा लगबगीनं आमच्या जवळ आला. आम्ही नजर न हलवता अमिताभने मुलाला आणि सुनेला तिरुपती बालाजीच्या पायावर घालताना बघावं तशा भक्तीभावानं वर बघत होतो. "आय, लडका लोग, टुमको शाब बुलाटा हाय" गुरखा दरडावणीच्या स्वरात म्हणाला. काय सांगू मंडळी, अहो, 'पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा' अशी आमची अवस्था झालेली. लगबगीनं आम्ही पायर्‍या चढून वर गेलो. बर्मनदा झोपाळ्यावर बसले होते. तोंडात भरपूर रंगलेले पान होतेच. आम्ही त्यांच्या पायावर लोळणच घेतली. "अरे बेटा, गले मिलो -" बर्मनदांनी आम्हाला उराशी धरले. "अब सुनाओ, जो नीचे गा रहे थे.." अहो, बर्मनदांसमोर गायचं म्हणजे काय खायचं काम आहे का मंडळी! आम्ही मनातल्या मनात रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि पेटी पुढे ओढली. झिंझोटी म्हणजे आमचा आवडता राग बरं का मंडळी! साधारण अर्धा तास आम्ही तो आळवला. बर्मनदा तल्लीन होऊन ऐकत होते. "जिओ बेटा जिओ, क्या तैयारी हाय! अब ये सुनो - " असं म्हणून बर्मनदानी आमच्याच सुरावटीवर बांधलेली रचना आपल्या खड्या आवाजात गायला सुरुवात केली "मोसे छल किये जाय हाय रे हाय देखो सैंया बेईमान -" (पुढे ती रचना खूप गाजली वगैरे सगळा इतिहास आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!) बर्मनदांच्या घरुन चमचम, शोंदेश वगैरे खाऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने आम्ही पायर्‍या उतरत होतो तेवढ्यात खालच्या मजल्यावरुन "ऑरे झेंगट्या, तुम इदर क्या करता हाय?" अशी आणखी एक हाक ऐकू आली. टी शर्ट आणि शॉर्टसमधली एक चष्मीश गोलमटोल आकृती घरातल्या घरात फुटबॉल खेळत होती. हा आपला पंचम बरं का मंडळी! माझ्या गणेशोत्सवातल्या गाण्याच्या कार्यक्रमात कधीतरी तंबोरा धरायला वगैरे यायचा. 'रैना बीती जाय - ' चा वेळी सुरुवातीचा आलाप कसा घ्यायचा यावर रडकुंडीला आला होता बिचारा. 'झेंगट्या. बचा लो यार. दीदी का गाना हाय, अच्छा होना चाहिये - ' असं म्हणत माझ्या घरी आला होता. तेंव्हा त्याला पुढ्यात बसवून त्याच्या गळ्यातनं ती जागा घोटवून घेतली होती. पुढे ते गाणं खूप गाजलं. त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी - बर्मनदांच्या घरुन बाहेर पडलो. मन धुंद झालं होतं. ही संगीताची धुंदी काही वेगळीच चीज आहे बरं का मंडळी! चालत चालत पेडर रोडवर कधी आलो ते कळालंच नाही. अचानकच आजूबाजूची गर्दी वाढल्याचं जाणवलं. लोक टाचा उंच करकरुन बघत होते. आम्हीही गर्दीत सामिल झालो. पांढऱ्या शुभ्र साडीतल्या लतादीदी गच्चीत फेऱ्या मारत होत्या. त्यांचा दारवान पांडुरंग माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे (आम्ही दोघे पास्कलच्या अड्ड्यावर - पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!) "काय झेंगट्या, तंबाखू काढ गड्या!" पांडुरंग म्हणाला. मी पुडी त्याच्या हातात ठेवली. "दीदी भेटतील का रे पाच मिनिटं?" मी भीतभीतच त्याला विचारलं. "थांब हां जरा - मी विचारुन येतो - ही तंबाखू धर जरा तोवर" पांड्या माझ्या हातात मळलेली तंबाखू देऊन हात झटकत आत गेला. इकडे आम्ही माना उंचावून बघतोय, हातात मळलेली तंबाखू सत्यनारायणाचा प्रसाद धरावा तशी धरलेली आणि दीदींच्या गच्चीतल्या फेऱ्या सुरुच! पाच मिनिटे झाली असतील नसतील. पांड्या धापा टाकत खाली आला "लेका झेंगट्या, दीदी कालपास्नं तुला फोन लावतायत. तू काहीतरी बील भरलं नाहीस म्हणून तुझा फोन बंद आहे, असं काहीतरी रेकॉर्डिंग ऐकू येतंय म्हणे. मला म्हणाल्या, "संगीतात काय जादू असते बघ पांडुरंग! मंगेशीनं आपणहून त्याला पाठवला!" मंगेशी म्हणजे आमचं आणखी एक श्रद्धास्थान बरं का मंडळी! "जा लवकर वर!" आम्ही परत पायताणे काढून छातीशी धरली. वर गेलो. दीदींच्या फेऱ्या संपल्या होत्या. आमच्याकडं बघून त्या नेहमीप्रमाणं प्रसन्न हसल्या. "या, या, झेंगटराव, अहो कित्ती दिवस झाले, काही गाठ नाही, भेट नाही-" दीदींच्या तोंडून 'कित्ती' हा शब्द ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे बरं का मंडळी! आम्हाला वाटलं आता 'आयेगा आनेवाला-' म्हणतायत की काय! पण त्या म्हणाल्या, "चपला, तिथं दाराशी ठेवल्या तरी चालतील!" मग आम्ही बसलो. दीदींनी पन्हं मागवलं. दीदींच्या घरचं पन्हं म्हणजे काय चीज आहे मंडळी! छगन्यानं बावळटासारखं तीनतीनदा मागून घेतलं. "अहो, तुमची मुद्दाम आठवण झाली म्हणजे मीरेची काही भजनं रेकॉर्ड करत्येय. बाळचं डायरेक्शन आहे, पण त्यातल्या काही जागा अपुऱ्या वाटतायत मला! आता हेच बघा" दीदींनी चष्मा सावरत आमच्यापुढं कागद ठेवला. आम्ही पुन्हा एकदा रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि हार्मोनियम पुढं ओढला. पुढं ती भजनं खूप गाजली वगैरे -पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 00:19
प्रतिक्रिया छान आहे! बाय द वे ही ऐहिकताई पुण्याला राहते का हो? कुठल्यातरी कॉलीजात शिकवते म्हणे! :) असो, ही प्रतिक्रिया अगदी हौशीहौशीने इथे छापल्याबद्दल धन्यवाद राव साहेब! असेच मिपावर येत रहा आणि इतरांच्या प्रतिक्रिया अगदी हौशीहौशीने देत रहा ही विनंती! तुमचं मराठी आंतरजालावरचं वाचन पाहून आम्ही बरेच प्रभावित झालो आहोत. उद्या मिपाने कुठला विशेषांक काढायचं ठरवलंच तर आम्हीही तुम्हाला एक कप चाय आणि वीस रुपये रोजी या बोलीवर 'विशेषांक-संपादक' म्हणून कामावर ठेवू! :) तात्या. -- काही काही माणसं किती जळू आणि कोत्या मनोवृत्तीची असतात नै! :)

In reply to by विसोबा खेचर

बाबुजी म्हणजे संगीतातील माझे दैवत. या गानतप्स्वी माणसाचे आपल्या सरकारने म्हणावे तसे चीज केले नाही. बरे विसोबा खेचर आणि तात्या म्हणजे एकच व्यक्ती आहेत का ? दुसरे असे कि मला तात्या अभ्यंकर साहेबाना प्रत्यक्ष भेटायचे आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळू शकेल काय?

देवदत्त Sun, 03/30/2008 - 23:27
छान छायाचित्रे. पाहून आनंद झाला. तात्यांचे आभार.

सूड गुरुवार, 03/10/2016 - 21:17
खायचे आणि दाखवायचे ओळखण्याबद्दल मिपावरती जितकं शिकता येतं तितकं दुसरीकडे कदाचितच शिकता येईल...सहज आपलं एक निरीक्षण!!

आनंदयात्री Wed, 03/12/2008 - 15:32
सुंदर फोटो. (अण्णा, अटलजी, पवारसाहेब अन बाबूजी ),(सावरकर सदनापाशी बाबूजी) हे फोटो विशेष आवडले. सावरकर सदनापाशी बाबूजी हा एकदम वेगळा फोटो आहे, तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्याचा असावा असा, साधेपण दिसुन येतो.

शेखर Wed, 03/12/2008 - 14:03
तात्या फोटो मिपावर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद..... बाबुजींची गाण्यांची बात काही औरच आहे..... कितीही दशके गेली तरी गाणी अजुनही कानांना गोड वाटतात. शेखर...

प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 14:14
अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम! तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही!

In reply to by प्रमोद देव

अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम! तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन Wed, 03/12/2008 - 14:27
अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्यावरील भाष्यही तितकेच अप्रतिम! तात्या अभिनंदन आणि मन:पूर्वक आभारही! -- असेच म्हणतो. आनंदयात्रींनी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या फोटोतून त्यांचा साधेपणा दिसून येतो. अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

आनंदयात्री Wed, 03/12/2008 - 15:30
>> किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :) खल्लास ....... बर सातव्या फोटोतले बाबुजींच्या बाजुला डावीकडे नौशाद आहेत ना ? अन उजवीकडचे कोण ??

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 16:18
बर सातव्या फोटोतले बाबुजींच्या बाजुला डावीकडे नौशाद आहेत ना ? हो, नौशादजीच आहेत. मोंगल ए आझम चित्रपटातील त्यांचं 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये' हे माझं अत्यंत आवडतं गाणं! अन उजवीकडचे कोण ?? उजवीकडचे खळेसाहेब आहेत. त्यांचं, जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले हे गाणंही माझं अतिशय आवडतं गाणं. दिदी अक्षरश: सुरी चालवते काळजावरून! असो.. आपला, (दिदीचा दिवाना) तात्या.

In reply to by नंदन

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 18:28
अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :) नंदनराव, सही अभिप्राय. त्याचप्रमाणे "देव आपणांत आहे....शीर झुकवोनिया पाहे" "तुझ्या माझ्या जड देही....देव भरोनिया राही" असेही सांगत असावेत. आपला, (सश्रद्ध) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 14:34
अवांतर - बाबूजी बहुतेक पवारसाहेबांना 'डाव मांडून भांडून मोडू नको' असा सल्ला देत असावेत, किंवा 'सोडी सोनियाचा पिंजरा' :) शाब्बास नंदन.

सुमीत Wed, 03/12/2008 - 14:41
खुष केलेत तुम्ही आम्हा मिपा करांना, दुर्मिळ छायाचित्रे, भाग्य आमचे की आपण ते प्रकाशित केलेत :) गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो! खरोखर, आजचे होतकअरू गायक बिनधास्त मतां साठी भिका मागतात पण लाज मात्र आम्हालाच येते.

विसुनाना Wed, 03/12/2008 - 15:26
अलभ्य लाभ! ही छायाचित्र बघायचं भाग्य तात्यांमुळं लाभलं... अवांतर - हीराबाईं बडोदेकरांच्या बाजूला यशवंतराव चव्हाण दिसत आहेत. (आज त्यांचा जन्मदिवस - १२ मार्च १९१३)

अवलिया Wed, 03/12/2008 - 15:19
गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो! खरे आहे आजकालचे पोरे अशी भिका मागतात की फोरासरोडच्या रांडा पण गि-हाइकाला अशी गळेपडुपणा करत नसतील सगळाच भिकारचोट पणा माजलाय ... नाना

विवेकवि Wed, 03/12/2008 - 17:11
धन्यवाद तात्या ... बाबुजी॑च्या आठवणी जाग्या झाल्या.. असेच काही फोटो मला पण टाकायला आवडतील .. मि.पा ला चे आज धन्यवाद ..... विवेक वि.

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 17:11
जाता जाता म्हणावेसे वाटते... धन्य ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती । ह्या मणिकांचन योगाबद्दल तात्यांना हृदयत: धन्यवाद. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

किशोरी Wed, 03/12/2008 - 17:14
खरच दुर्मिळ फोटो,तात्या फोटो मिपावर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.....

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 17:16
शेवटच्या छायाचित्रात सावरकर राष्ट्रीय स्मारक (उद्यान गणेशासमोरचे) आहे. सावरकर सदन नव्हे. कारण सावरकर सदन बालमोहनच्या गल्लीत आहे आणि त्याला लागून समुद्र नाही. हा पुतळा सावरकर राष्ट्रीय स्मारक इथलाच आहे. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 17:25
या फोटो च्या निमित्याने जुन्या गाण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.दुर्मिळ फोटो बद्द्ल धन्यवाद. त्यावेळची मंडळी एका गाण्यासठी किती कष्ट घेत होती? आणि आता दिवसाला १०० गाणी म्हणून रेकॉर्ड करतात. .....असो नविन गाणी सुद्धा त्यावेळेपुरती हिट होतातच.:)))

वरदा Wed, 03/12/2008 - 18:21
आज दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झाली माझी...खूप मस्त वाटलं फोटो पाहून आणि तुमची टिप्पणीही खूप छान आहे. "माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो! १००% सहमत

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 18:22
वा वा वा वा तात्या, अप्रतिम छायाचित्रे. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग Wed, 03/12/2008 - 19:09
अहो दिवसाची सुरुवात अशा मांदियाळीच्या दर्शनाने व्हावी ह्यापरते भाग्य ते कोणते! बाबूजींसारख्या असामान्य सूरसाधकाचा सहवास तुम्हाला लाभलेला असणे हे तर तुमचे पूर्वजन्मीचे सुकृत आहे असे वाटते. ही दुर्मिळ प्रकाशचित्रे दिल्याबद्दल मी ऋणी आहे! आणि प्रत्येक चित्रासोबतची आपली खास टिप्पणीही उल्लेखनीय. चतुरंग

In reply to by चतुरंग

चित्रा Fri, 03/14/2008 - 17:15
बाबूजींसारख्या असामान्य सूरसाधकाचा सहवास तुम्हाला लाभलेला असणे हे तर तुमचे पूर्वजन्मीचे सुकृत आहे असे वाटते. ही दुर्मिळ प्रकाशचित्रे दिल्याबद्दल मी ऋणी आहे! आणि प्रत्येक चित्रासोबतची आपली खास टिप्पणीही उल्लेखनीय. धन्यवाद तात्या.

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:20
वरती सगळ्यांनी इतके सुंदर प्रतिसाद दिले आहेत की माझ्याकडे आता शब्दच नाहीत. हे फोटो मिपावर यावे या सारखे मिपाचे आणि मिपाकरांचे सुदैव ते कोणते असेल... प्रेमसाई, यालाच कदाचित नशिब म्हणत असतील.... याचे श्रेय तात्यांना जाते.. धन्यवाद तात्या. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:25
"प्रेमसाई, यालाच कदाचित नशिब म्हणत असतील...." धन्यवाद तात्या .... मी तर असे म्हणेन की "देणार्‍याचे हजारो हात , फाटकी आमची झोळी " .... नशिबवान छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

झकासराव Wed, 03/12/2008 - 19:21
तुने तो दिल खुष कर दिया यार :) प्रत्येक फोटो छान आणि त्यावरची टिप्पण्णी मस्त आहे. मतांची भीक>>>. हे अगदी पटल मनापासुन.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Sat, 03/15/2008 - 00:06
अटलजी व पॉवरसाहेब वगळता. हा हा हा, बरं बरं! पॉवरसाहेबांचं समजू शकतो हो! पण अटलजी हा माणूस मला अतिशय आवडतो. खूप गोड आणि मिश्किल माणूस आहे तो! राजकारणाच्या चिखलात पडला नसता तर फार बरं झालं असतं! असो...! आपला, (अटलजी प्रेमी) तात्या.

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 21:55
सहमत आहे. ते शेवटचे प्रकाशचित्र स्मारकाचे. सदनाचे नव्हे. स्मारकासमोरच पार्कातील कट्ट्यावर जवळजवळ दहापंधरा वर्षे आमचा रोजचा अड्डा जमायचा.

टिउ गुरुवार, 03/13/2008 - 01:08
ही सर्व दुर्मिळ छायाचित्रे इथे प्रकाशित केल्यबद्दल तुमचे मनःपुर्वक आभार. :)

ऋषिकेश गुरुवार, 03/13/2008 - 21:51
तात्या, ह्या छा.चिं. बद्दल शतश: आभार.. खूप छान वाटलं बघून -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवराव Fri, 03/14/2008 - 14:38
तात्या ; खरेच मन भारावून गेले. प्रकाश चित्रें दुर्मिळच पण एका सांगितीक स्मृती रंजनात [नॉस्टॅलजिआ ] घेवून गेली. चित्र क्र. ५ च्या टिप्पणीत मा. यशवंतरावांना का वगळले ? - - - - - - - - - - केशवराव.

In reply to by केशवराव

विसोबा खेचर Fri, 03/14/2008 - 18:49
चित्र क्र. ५ च्या टिप्पणीत मा. यशवंतरावांना का वगळले ? त्यांच्या नांवाचा उल्लेख करायचा राहूनच गेला खरा! क्षमस्व.... काही एक नितिमत्ता, सभ्यता, सुसंस्कृतता असलेले जे काही मोजके राजकारणी होते त्यांत यशवंतरावांचं नांव आवर्जून घ्यावं लागेल हे मात्र नक्की... तात्या.

सन्जोप राव Fri, 03/14/2008 - 19:43
चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं! बरं का मंडळी, फार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. संध्याकाळची वेळ होती. मुंबापुरीतल्या एका त्यातल्या त्यात शांत गल्लीतून मी आणि छगन्या रमतगमत फिरत होतो. आमचा छगन्या म्हणजे एक भारी व्यक्तीमत्व बरं का! कुठही जायचं म्हटलं की आधी स्वारी माझ्या दारात येऊन साद घालणार,"झेंगट्या, आहेस का मायजयां वागानं खाल्ला तुला?' (मायजयां ही आमच्या कोकणातली बोलीभासा आसा हां! नायतर पुन्ना माज्या चावडीवर होळीची लाकडं जमवीन मी!) झेंगट्या हे काही माझं खरं नाव नाही बरं का मंडळी! पण दोस्तांत मी झेंगट्या याच नावानं ओळखला जातो. हां, तर सांगत काय होतो, अशी छ्गन्याची साद आली की मी निमूटपणे लेंगाबिंगा चढवून पायताणं घालायला लागायचो. छगन्या तोवर "काय मावशी, तब्येत काय म्हणते आता?" अशा चौकशा करुन बेसनाचा लाडूबिडू खाऊन पायजम्याला हात पुसत उभा असायचा.तर असा एकदा छगन्याबरोबर फिरायला बाहेर पडलो. फिरताफिरता किती लांब आलो ते कळालंच नाही. नेहमीप्रमाणं काहीतरी गुणगुणत होतो. एकदोन जागा झिंझोटीच्या अंगानं गेल्या आणि वरच्या गॅलरीतून अचानक आवाज आला " भालो, खूब भालो - कौन गाना गाता हाय?" मंडळी, आवाज ओळखीचा वाटला आणि वर वळून पाहिलं तसा अंगावर सर्रकन काटाच आला ! वरच्या मजल्यावरुन साक्षात थोरले बर्मनदा खाली बघत होते. थोरले बर्मनदा म्हणजे आमचे आराध्य दैवत बरं का मंडळी! आम्ही डोळे भरून पहात राहिलो. नकळत पायातली पायताणे काढून छातीशी धरली. बर्मनदांनी त्यांच्या गुरख्याला काहीतरी ओरडून सांगितलं गुरखा लगबगीनं आमच्या जवळ आला. आम्ही नजर न हलवता अमिताभने मुलाला आणि सुनेला तिरुपती बालाजीच्या पायावर घालताना बघावं तशा भक्तीभावानं वर बघत होतो. "आय, लडका लोग, टुमको शाब बुलाटा हाय" गुरखा दरडावणीच्या स्वरात म्हणाला. काय सांगू मंडळी, अहो, 'पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा' अशी आमची अवस्था झालेली. लगबगीनं आम्ही पायर्‍या चढून वर गेलो. बर्मनदा झोपाळ्यावर बसले होते. तोंडात भरपूर रंगलेले पान होतेच. आम्ही त्यांच्या पायावर लोळणच घेतली. "अरे बेटा, गले मिलो -" बर्मनदांनी आम्हाला उराशी धरले. "अब सुनाओ, जो नीचे गा रहे थे.." अहो, बर्मनदांसमोर गायचं म्हणजे काय खायचं काम आहे का मंडळी! आम्ही मनातल्या मनात रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि पेटी पुढे ओढली. झिंझोटी म्हणजे आमचा आवडता राग बरं का मंडळी! साधारण अर्धा तास आम्ही तो आळवला. बर्मनदा तल्लीन होऊन ऐकत होते. "जिओ बेटा जिओ, क्या तैयारी हाय! अब ये सुनो - " असं म्हणून बर्मनदानी आमच्याच सुरावटीवर बांधलेली रचना आपल्या खड्या आवाजात गायला सुरुवात केली "मोसे छल किये जाय हाय रे हाय देखो सैंया बेईमान -" (पुढे ती रचना खूप गाजली वगैरे सगळा इतिहास आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!) बर्मनदांच्या घरुन चमचम, शोंदेश वगैरे खाऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने आम्ही पायर्‍या उतरत होतो तेवढ्यात खालच्या मजल्यावरुन "ऑरे झेंगट्या, तुम इदर क्या करता हाय?" अशी आणखी एक हाक ऐकू आली. टी शर्ट आणि शॉर्टसमधली एक चष्मीश गोलमटोल आकृती घरातल्या घरात फुटबॉल खेळत होती. हा आपला पंचम बरं का मंडळी! माझ्या गणेशोत्सवातल्या गाण्याच्या कार्यक्रमात कधीतरी तंबोरा धरायला वगैरे यायचा. 'रैना बीती जाय - ' चा वेळी सुरुवातीचा आलाप कसा घ्यायचा यावर रडकुंडीला आला होता बिचारा. 'झेंगट्या. बचा लो यार. दीदी का गाना हाय, अच्छा होना चाहिये - ' असं म्हणत माझ्या घरी आला होता. तेंव्हा त्याला पुढ्यात बसवून त्याच्या गळ्यातनं ती जागा घोटवून घेतली होती. पुढे ते गाणं खूप गाजलं. त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी - बर्मनदांच्या घरुन बाहेर पडलो. मन धुंद झालं होतं. ही संगीताची धुंदी काही वेगळीच चीज आहे बरं का मंडळी! चालत चालत पेडर रोडवर कधी आलो ते कळालंच नाही. अचानकच आजूबाजूची गर्दी वाढल्याचं जाणवलं. लोक टाचा उंच करकरुन बघत होते. आम्हीही गर्दीत सामिल झालो. पांढऱ्या शुभ्र साडीतल्या लतादीदी गच्चीत फेऱ्या मारत होत्या. त्यांचा दारवान पांडुरंग माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे (आम्ही दोघे पास्कलच्या अड्ड्यावर - पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!) "काय झेंगट्या, तंबाखू काढ गड्या!" पांडुरंग म्हणाला. मी पुडी त्याच्या हातात ठेवली. "दीदी भेटतील का रे पाच मिनिटं?" मी भीतभीतच त्याला विचारलं. "थांब हां जरा - मी विचारुन येतो - ही तंबाखू धर जरा तोवर" पांड्या माझ्या हातात मळलेली तंबाखू देऊन हात झटकत आत गेला. इकडे आम्ही माना उंचावून बघतोय, हातात मळलेली तंबाखू सत्यनारायणाचा प्रसाद धरावा तशी धरलेली आणि दीदींच्या गच्चीतल्या फेऱ्या सुरुच! पाच मिनिटे झाली असतील नसतील. पांड्या धापा टाकत खाली आला "लेका झेंगट्या, दीदी कालपास्नं तुला फोन लावतायत. तू काहीतरी बील भरलं नाहीस म्हणून तुझा फोन बंद आहे, असं काहीतरी रेकॉर्डिंग ऐकू येतंय म्हणे. मला म्हणाल्या, "संगीतात काय जादू असते बघ पांडुरंग! मंगेशीनं आपणहून त्याला पाठवला!" मंगेशी म्हणजे आमचं आणखी एक श्रद्धास्थान बरं का मंडळी! "जा लवकर वर!" आम्ही परत पायताणे काढून छातीशी धरली. वर गेलो. दीदींच्या फेऱ्या संपल्या होत्या. आमच्याकडं बघून त्या नेहमीप्रमाणं प्रसन्न हसल्या. "या, या, झेंगटराव, अहो कित्ती दिवस झाले, काही गाठ नाही, भेट नाही-" दीदींच्या तोंडून 'कित्ती' हा शब्द ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे बरं का मंडळी! आम्हाला वाटलं आता 'आयेगा आनेवाला-' म्हणतायत की काय! पण त्या म्हणाल्या, "चपला, तिथं दाराशी ठेवल्या तरी चालतील!" मग आम्ही बसलो. दीदींनी पन्हं मागवलं. दीदींच्या घरचं पन्हं म्हणजे काय चीज आहे मंडळी! छगन्यानं बावळटासारखं तीनतीनदा मागून घेतलं. "अहो, तुमची मुद्दाम आठवण झाली म्हणजे मीरेची काही भजनं रेकॉर्ड करत्येय. बाळचं डायरेक्शन आहे, पण त्यातल्या काही जागा अपुऱ्या वाटतायत मला! आता हेच बघा" दीदींनी चष्मा सावरत आमच्यापुढं कागद ठेवला. आम्ही पुन्हा एकदा रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि हार्मोनियम पुढं ओढला. पुढं ती भजनं खूप गाजली वगैरे -पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 00:19
प्रतिक्रिया छान आहे! बाय द वे ही ऐहिकताई पुण्याला राहते का हो? कुठल्यातरी कॉलीजात शिकवते म्हणे! :) असो, ही प्रतिक्रिया अगदी हौशीहौशीने इथे छापल्याबद्दल धन्यवाद राव साहेब! असेच मिपावर येत रहा आणि इतरांच्या प्रतिक्रिया अगदी हौशीहौशीने देत रहा ही विनंती! तुमचं मराठी आंतरजालावरचं वाचन पाहून आम्ही बरेच प्रभावित झालो आहोत. उद्या मिपाने कुठला विशेषांक काढायचं ठरवलंच तर आम्हीही तुम्हाला एक कप चाय आणि वीस रुपये रोजी या बोलीवर 'विशेषांक-संपादक' म्हणून कामावर ठेवू! :) तात्या. -- काही काही माणसं किती जळू आणि कोत्या मनोवृत्तीची असतात नै! :)

In reply to by विसोबा खेचर

बाबुजी म्हणजे संगीतातील माझे दैवत. या गानतप्स्वी माणसाचे आपल्या सरकारने म्हणावे तसे चीज केले नाही. बरे विसोबा खेचर आणि तात्या म्हणजे एकच व्यक्ती आहेत का ? दुसरे असे कि मला तात्या अभ्यंकर साहेबाना प्रत्यक्ष भेटायचे आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळू शकेल काय?

देवदत्त Sun, 03/30/2008 - 23:27
छान छायाचित्रे. पाहून आनंद झाला. तात्यांचे आभार.

सूड गुरुवार, 03/10/2016 - 21:17
खायचे आणि दाखवायचे ओळखण्याबद्दल मिपावरती जितकं शिकता येतं तितकं दुसरीकडे कदाचितच शिकता येईल...सहज आपलं एक निरीक्षण!!
सदर फोटू मला बाबुजींच्या घरनं मिळालेले आहेत. आमच्या ललितामावशींनी हे फोटू मला दिले आहेत. मिपाकरांसाठी येथे देत आहे! श्रेय : श्रीमती ललिता फडके, श्री श्रीधर फडके. टिप्पणी : तात्या अभ्यंकर... १) दिदी, मन्नादा आणि बाबूजी! कुणाचा गळा अधिक गोड, या प्रश्नाचं उत्तर मला तरी अद्याप मिळालेलं नाही! २) बहुतेक 'ज्योती कलश छलके'च्या आठवणी ताज्या होत असाव्यात!

अशा व्यक्ती अशा वल्ली १ - अच्युत गणपुले भाग दुसरा.

धोंडोपंत ·

मनस्वी Wed, 03/12/2008 - 13:49
हा पण भाग छान पण... आठवल्यांची बायको यायच्या आत त्यांना कोपर्‍यात का नाही घेतले! मनस्वी

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 13:58
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की! असो, बाकी हाही भाग मस्त मजेशीर... छानच लिहितोसस तू! वेलणकर म्हणजे त्या कार्याचे कंत्राटदार - मनोगतकार महामहोपाध्याय प्रातःस्मरणीय आदरणीय वंदनीय माननीय महेशराव वेलणकर नव्हेत. हा हा हा! :) एकामागून एक दोन बशा उपमा पोटात गेल्यावर ते जरा माणसात आल्यासारखे वाटले. हे पण मस्त! आपला, तात्या वेलणकर! :)

केशवसुमार Wed, 03/12/2008 - 14:06
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली.. छ्या बॉ, कोण असेल हा माणूस.. हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती.. (अजून हैराण्)केशवसुमार..

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 14:14
प॑त, आपण भविष्यविषयक लेख मोठ्या हातोटीने लिहिता हे ठाऊक होत॑, पण, व्यक्तिचित्रही काय ऊत्तम लिहिता हो! पहिल्या भागाला प्रतिसाद देऊ देऊ म्हणेपर्य॑त दुसरा भाग हजर !! वा वा. भट्टी छान जमली आहे, आवडली. :-) आणि...आपण बा॑गड्या-त॑गड्या टाईप शिरियला पण ल्हिता का काय? एकदम पर्फेक्ट 'क्रमशः' येत॑य :-) (ह.घ्या.) अवा॑तरः बा॑गड्या-त॑गड्या हा वाक्प्रचार (!) बा॑गडीत बा॑गड्या (एका लग्नान॑तर बक्कळ लफडी) आणि त॑गडीत त॑गड्या (घरगुती / व्यावसायिक / राजकारणातील कबड्डी) ह्या॑चा स॑गम आहे. कृपया हे 'अश्लील' नाही याची नो॑द घ्यावी. तात्या...अभ्भी तुमकू रोशनी का अगला एपिसोड लिखनाईच पडे॑गा, नै तो हमकू लगे॑गा के तात्याबा बिर्यानी खा खा के इतना खुश हो गया के उस टैम पे सोया तो अभ्भीतक उठ्ठ्याच नै | :-))

आनंदयात्री Wed, 03/12/2008 - 14:24
एकता कपुरची उपमा जरा साधीच झाली, आम्ही तुम्हाला न्युज चॅनलची उपमा देउत. आता दिवसात २ भाग टाका मग !! बाकी भट्टी छान जमलीये बरका. (मारले की नाही एकदम मनोगती वाक्य !!)

छानच जमले आहेत दोन्ही लेख. मी दोन्ही एकदमच बघितले. पहिला वाचला... मग वाटले दुसर्‍या भागात खुलासा होईल, पण कसले काय? धोंडोपंत, के.एल.पी.डी. दिली काय? किती ताणणार? बिपिन.

किशोरी Wed, 03/12/2008 - 17:08
प॑त दोन्ही भाग एकदम मस्त्,उत्सुकता लागली आहे, कोन असतील ते गणपुले आता लवकर सांगुन टाका.

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 17:19
उत्तम जमले आहे...आमची उत्सुकता ताणायला. अहो किती उत्साहाने वाचत होते कि आज हा माणूस कोण आहे ते कळेल.. पण...जाऊ दे तुम्ही वाट पाहायला लावलीतच. हा भाग पण मस्त जमला आहे.

वरदा Wed, 03/12/2008 - 17:40
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली.. पटले..कसली ताणलेय...सांगा ना लवकर कोण हे गणपुले काय करतात....

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 17:53
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद. लोकहो, तुमची उत्कंठा ताणली गेली हे चांगले आहे. जी वल्ली समजण्यासाठी आम्हांला एवढी वाट पहावी लागली ,त्यातील थोडीशी धग आपल्यापर्यंत पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो, ही श्री व्याडेश्वराची कृपा. लवकरच आम्ही तुम्हाला अच्युत गणपुल्याची भेट घडवू. आपला, (आश्वासक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 20:18
वाचकांशी थेट संवाद साधण्याची लकब छान आहे. कथन प्रवाही, प्रसन्न आणि वेगवान. त्यामुळे भाग छोटे वाटतात. मोठे हवे होते. दादरचा हा परिसर माझ्या खास ओळखीचा. म्हणून जास्तच रमलो. उत्सुकता छान ताणलेली आहे. अवांतर. या विठ्ठल मंदिरात एकदा गोवींदराव पेटीवर्धन यांनी कीर्तनाला साथ केली होती. धन्यवाद. पु भा वाट पाहात आहे.

धोंडोपंत गुरुवार, 03/13/2008 - 09:52
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की! आपला, तात्या वेलणकर! :) हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती.. (अजून हैराण्)केशवसुमार.. एकदम मान्य. यापुढील भाग अंमळ मोठे लिहू. या भागात गणपुल्याला पुढे आणायचे नाही असे धोरण होते. त्यामुळे त्याच्या एन्ट्रीच्या आधीच पडदा टाकावा लागला. आपला, (सूत्रधार) धोंडोपंत कांदळकर साहेब, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपणाला लेखन आवडले हे वाचून आनंद झाला. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चित्तरंजन भट गुरुवार, 03/13/2008 - 11:45
साध्या, सोप्या, ओघवत्या मराठी भाषेतले उत्तम लिखाण. पंत, पुढच्या भागाची वाट बघतो आहे.

मनस्वी Wed, 03/12/2008 - 13:49
हा पण भाग छान पण... आठवल्यांची बायको यायच्या आत त्यांना कोपर्‍यात का नाही घेतले! मनस्वी

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 13:58
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की! असो, बाकी हाही भाग मस्त मजेशीर... छानच लिहितोसस तू! वेलणकर म्हणजे त्या कार्याचे कंत्राटदार - मनोगतकार महामहोपाध्याय प्रातःस्मरणीय आदरणीय वंदनीय माननीय महेशराव वेलणकर नव्हेत. हा हा हा! :) एकामागून एक दोन बशा उपमा पोटात गेल्यावर ते जरा माणसात आल्यासारखे वाटले. हे पण मस्त! आपला, तात्या वेलणकर! :)

केशवसुमार Wed, 03/12/2008 - 14:06
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली.. छ्या बॉ, कोण असेल हा माणूस.. हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती.. (अजून हैराण्)केशवसुमार..

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 14:14
प॑त, आपण भविष्यविषयक लेख मोठ्या हातोटीने लिहिता हे ठाऊक होत॑, पण, व्यक्तिचित्रही काय ऊत्तम लिहिता हो! पहिल्या भागाला प्रतिसाद देऊ देऊ म्हणेपर्य॑त दुसरा भाग हजर !! वा वा. भट्टी छान जमली आहे, आवडली. :-) आणि...आपण बा॑गड्या-त॑गड्या टाईप शिरियला पण ल्हिता का काय? एकदम पर्फेक्ट 'क्रमशः' येत॑य :-) (ह.घ्या.) अवा॑तरः बा॑गड्या-त॑गड्या हा वाक्प्रचार (!) बा॑गडीत बा॑गड्या (एका लग्नान॑तर बक्कळ लफडी) आणि त॑गडीत त॑गड्या (घरगुती / व्यावसायिक / राजकारणातील कबड्डी) ह्या॑चा स॑गम आहे. कृपया हे 'अश्लील' नाही याची नो॑द घ्यावी. तात्या...अभ्भी तुमकू रोशनी का अगला एपिसोड लिखनाईच पडे॑गा, नै तो हमकू लगे॑गा के तात्याबा बिर्यानी खा खा के इतना खुश हो गया के उस टैम पे सोया तो अभ्भीतक उठ्ठ्याच नै | :-))

आनंदयात्री Wed, 03/12/2008 - 14:24
एकता कपुरची उपमा जरा साधीच झाली, आम्ही तुम्हाला न्युज चॅनलची उपमा देउत. आता दिवसात २ भाग टाका मग !! बाकी भट्टी छान जमलीये बरका. (मारले की नाही एकदम मनोगती वाक्य !!)

छानच जमले आहेत दोन्ही लेख. मी दोन्ही एकदमच बघितले. पहिला वाचला... मग वाटले दुसर्‍या भागात खुलासा होईल, पण कसले काय? धोंडोपंत, के.एल.पी.डी. दिली काय? किती ताणणार? बिपिन.

किशोरी Wed, 03/12/2008 - 17:08
प॑त दोन्ही भाग एकदम मस्त्,उत्सुकता लागली आहे, कोन असतील ते गणपुले आता लवकर सांगुन टाका.

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 17:19
उत्तम जमले आहे...आमची उत्सुकता ताणायला. अहो किती उत्साहाने वाचत होते कि आज हा माणूस कोण आहे ते कळेल.. पण...जाऊ दे तुम्ही वाट पाहायला लावलीतच. हा भाग पण मस्त जमला आहे.

वरदा Wed, 03/12/2008 - 17:40
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली.. पटले..कसली ताणलेय...सांगा ना लवकर कोण हे गणपुले काय करतात....

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 17:53
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद. लोकहो, तुमची उत्कंठा ताणली गेली हे चांगले आहे. जी वल्ली समजण्यासाठी आम्हांला एवढी वाट पहावी लागली ,त्यातील थोडीशी धग आपल्यापर्यंत पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो, ही श्री व्याडेश्वराची कृपा. लवकरच आम्ही तुम्हाला अच्युत गणपुल्याची भेट घडवू. आपला, (आश्वासक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 20:18
वाचकांशी थेट संवाद साधण्याची लकब छान आहे. कथन प्रवाही, प्रसन्न आणि वेगवान. त्यामुळे भाग छोटे वाटतात. मोठे हवे होते. दादरचा हा परिसर माझ्या खास ओळखीचा. म्हणून जास्तच रमलो. उत्सुकता छान ताणलेली आहे. अवांतर. या विठ्ठल मंदिरात एकदा गोवींदराव पेटीवर्धन यांनी कीर्तनाला साथ केली होती. धन्यवाद. पु भा वाट पाहात आहे.

धोंडोपंत गुरुवार, 03/13/2008 - 09:52
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की! आपला, तात्या वेलणकर! :) हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती.. (अजून हैराण्)केशवसुमार.. एकदम मान्य. यापुढील भाग अंमळ मोठे लिहू. या भागात गणपुल्याला पुढे आणायचे नाही असे धोरण होते. त्यामुळे त्याच्या एन्ट्रीच्या आधीच पडदा टाकावा लागला. आपला, (सूत्रधार) धोंडोपंत कांदळकर साहेब, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपणाला लेखन आवडले हे वाचून आनंद झाला. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चित्तरंजन भट गुरुवार, 03/13/2008 - 11:45
साध्या, सोप्या, ओघवत्या मराठी भाषेतले उत्तम लिखाण. पंत, पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
लेखनविषय:
3

खेळ माझा संपला

केशवसुमार ·

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 11:59
केशवा मस्तच रे! बाकी काही म्हण तुझी ईश्टाईल काही औरच कुणी काहीही म्हणो...आपण आपला धोपटमार्ग सोडू नये... हवं तर मार्गात येणार्‍याला धोपटा.... स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हे तर अती जबरा.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 12:10
वा वा!!! बेष्ट. पण के.सु.बोवा, घाबरा, बावरा, का मुखाचा चंद्रमा ? अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा? आणि प्रेमाने तिने मज, प्रश्न होता टाकला ! ह्यात 'चोर'सी अथवा तत्सम काही टाकणार होता का आपण? च्यामारी माझा जरा गैरसमज झाला ते 'चोळीसी' वाचून, म्हणून इचारल॑...बा.आ.का.का.क.ना.हे ज.जा.आ. (बाकी आपल्याला काव्यातल॑ काही कळत नाही हे जगजाहीर आहेच!) आपला, चावट ध मा ल.

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 12:46
स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हा हा हा, खल्लास विडंबन... तात्या.

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 15:10
वा वा वा वा वा, केशवसुमार, बेफाम विडंबन. बेफाम. क्या बात है!!!! अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा? केवळ दोन अक्षर बदलून ही काय झकास ओळ झालेय? हॅट्स ऑफ. याला प्रतिभा असे म्हणतात. झकास. आमच्या एका स्नेह्यांनी असेच "सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?" या गीताचे आता तरी देशील का? एवढा एकमात्र बदल करून केलेले विडंबन आठवले. स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हा हा हा. हे ही सुंदर . ह ह पु वा. आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग Wed, 03/12/2008 - 16:30
शंकर पाटलांच्या भाषेत सांगायचं तर "पिश्टान तापावं तसा तापलायस की!" स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हे बाकी जबरा. एकच गोची - दिलेला दुवा 'तुम्हावर केली मी मर्जि बहाल' ह्या गाण्यावर उघडतो आहे! (बहुदा त्यावरही तुमची मर्जी बसलेली दिसते येऊद्या आणखी एक झकास विडंबन!:) चतुरंग

In reply to by चतुरंग

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:52
चतुरंगशेठ, चूक झालीय खरी.. पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो.. अता जनरल डायर ला पण पत्र पाठवतो.. (खजिल)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

सरपंच गुरुवार, 03/13/2008 - 17:28
पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो.. आता योग्य तो बदल केला आहे. आपले पत्र वाचले नाही त्यामुळे उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत! परंतु त्याचबरोबर, भविष्यात निदान दुवे तरी बरोबर देत चला, ही आग्रहाची विनंती! :) आपला, (झोपाळू) सरपंच.

किशोरी Wed, 03/12/2008 - 17:25
>>स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला हा हा हा हा:)) विडंबन एकदम मस्त!!

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 17:29
केशवराव, नेहमीप्रमाणे याही वेळी सुंदर विडंबन केले आहे. स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! ह. ह. पु. वा.:)))))

वरदा Wed, 03/12/2008 - 18:30
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! कसलं सही....कसं सुचतं हो तुम्हाला...मी म्हणते प्रत्येक विडंबनाबरोबर तुमच्या चरणकमलांचा फोटू टाकत चला...आम्ही पाया पडतो... निव्वळ अप्रतिम...

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:01
देव तुम्हाला भरपूर विडंबने करण्यासाठी भरपूर कविता आणि गझला देवो... स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हाहाहा..हाहाहा... - (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 20:26
झकास. धन्य ती प्रतिभा. हसतांना लिहिणे सुचत नाही. शब्द तोकडे. बेला च्या प्रतिसादामुळे जीव भांड्यात पडला. विडंबनाचा पंखा सुधीर कांदळकर

सर्किट गुरुवार, 03/13/2008 - 02:58
वा वा !! विशेषतः "बाटाच्या बुटांनी" मधून घडवलेला अनुप्रास सुंदरच ! - सर्किट

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:53
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 11:59
केशवा मस्तच रे! बाकी काही म्हण तुझी ईश्टाईल काही औरच कुणी काहीही म्हणो...आपण आपला धोपटमार्ग सोडू नये... हवं तर मार्गात येणार्‍याला धोपटा.... स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हे तर अती जबरा.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 12:10
वा वा!!! बेष्ट. पण के.सु.बोवा, घाबरा, बावरा, का मुखाचा चंद्रमा ? अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा? आणि प्रेमाने तिने मज, प्रश्न होता टाकला ! ह्यात 'चोर'सी अथवा तत्सम काही टाकणार होता का आपण? च्यामारी माझा जरा गैरसमज झाला ते 'चोळीसी' वाचून, म्हणून इचारल॑...बा.आ.का.का.क.ना.हे ज.जा.आ. (बाकी आपल्याला काव्यातल॑ काही कळत नाही हे जगजाहीर आहेच!) आपला, चावट ध मा ल.

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 12:46
स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हा हा हा, खल्लास विडंबन... तात्या.

धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 15:10
वा वा वा वा वा, केशवसुमार, बेफाम विडंबन. बेफाम. क्या बात है!!!! अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा? केवळ दोन अक्षर बदलून ही काय झकास ओळ झालेय? हॅट्स ऑफ. याला प्रतिभा असे म्हणतात. झकास. आमच्या एका स्नेह्यांनी असेच "सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?" या गीताचे आता तरी देशील का? एवढा एकमात्र बदल करून केलेले विडंबन आठवले. स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हा हा हा. हे ही सुंदर . ह ह पु वा. आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग Wed, 03/12/2008 - 16:30
शंकर पाटलांच्या भाषेत सांगायचं तर "पिश्टान तापावं तसा तापलायस की!" स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हे बाकी जबरा. एकच गोची - दिलेला दुवा 'तुम्हावर केली मी मर्जि बहाल' ह्या गाण्यावर उघडतो आहे! (बहुदा त्यावरही तुमची मर्जी बसलेली दिसते येऊद्या आणखी एक झकास विडंबन!:) चतुरंग

In reply to by चतुरंग

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:52
चतुरंगशेठ, चूक झालीय खरी.. पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो.. अता जनरल डायर ला पण पत्र पाठवतो.. (खजिल)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

सरपंच गुरुवार, 03/13/2008 - 17:28
पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो.. आता योग्य तो बदल केला आहे. आपले पत्र वाचले नाही त्यामुळे उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत! परंतु त्याचबरोबर, भविष्यात निदान दुवे तरी बरोबर देत चला, ही आग्रहाची विनंती! :) आपला, (झोपाळू) सरपंच.

किशोरी Wed, 03/12/2008 - 17:25
>>स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला हा हा हा हा:)) विडंबन एकदम मस्त!!

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 17:29
केशवराव, नेहमीप्रमाणे याही वेळी सुंदर विडंबन केले आहे. स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! ह. ह. पु. वा.:)))))

वरदा Wed, 03/12/2008 - 18:30
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! कसलं सही....कसं सुचतं हो तुम्हाला...मी म्हणते प्रत्येक विडंबनाबरोबर तुमच्या चरणकमलांचा फोटू टाकत चला...आम्ही पाया पडतो... निव्वळ अप्रतिम...

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:01
देव तुम्हाला भरपूर विडंबने करण्यासाठी भरपूर कविता आणि गझला देवो... स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हाहाहा..हाहाहा... - (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 20:26
झकास. धन्य ती प्रतिभा. हसतांना लिहिणे सुचत नाही. शब्द तोकडे. बेला च्या प्रतिसादामुळे जीव भांड्यात पडला. विडंबनाचा पंखा सुधीर कांदळकर

सर्किट गुरुवार, 03/13/2008 - 02:58
वा वा !! विशेषतः "बाटाच्या बुटांनी" मधून घडवलेला अनुप्रास सुंदरच ! - सर्किट

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:53
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
बेसनलाडवांने सांगून सुद्धा "केश्या" ने आपला हट्ट सोडला नाही..

...फिरवा चला आरी पुन्हा!!

केशवसुमार ·

बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 09:21
एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले. जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! लई बेस! (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

चित्तरंजन भट गुरुवार, 03/13/2008 - 01:40
"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 10:40
केशवा खल्लास रे!लय भारी......! सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? जबरा............ "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:03
वावावा..... करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...! - (सर्वव्यापी)प्राजु

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ (आपला पंखा) छोटी टिंगी ;)

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 22:18
मान लिया सरकार. चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच. करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे शब्द झकास. आपल्या प्रतिभेस दंडवत.

रविराज गुरुवार, 03/13/2008 - 02:23
खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!! सगळीच कडवी एकसे एक भारी. -रवी.

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:49
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 09:21
एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले. जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! लई बेस! (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

चित्तरंजन भट गुरुवार, 03/13/2008 - 01:40
"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.

इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 10:40
केशवा खल्लास रे!लय भारी......! सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? जबरा............ "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Wed, 03/12/2008 - 19:03
वावावा..... करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...! - (सर्वव्यापी)प्राजु

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ (आपला पंखा) छोटी टिंगी ;)

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 22:18
मान लिया सरकार. चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच. करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे शब्द झकास. आपल्या प्रतिभेस दंडवत.

रविराज गुरुवार, 03/13/2008 - 02:23
खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!! सगळीच कडवी एकसे एक भारी. -रवी.

केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 16:49
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल ...त्याचीच ओढा री पुन्हा!! ............................................................. ...फिरवा चला आरी पुन्हा!! ............................................................. सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? सार्‍याच विषयांचे असे पेपर तरी देऊ कसे... लाजू नको नापास हो...येईल रे वारी पुन्हा ! ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला... खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा ! जीमेत मी जातो जरी...

सलाम मुंबई!!!

सर्वसाक्षी ·

प्राजु Wed, 03/12/2008 - 01:18
मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू! काय राव... छान गाणं ऐकत होते.. पण हे शिर्षक वाचून गाणं थांबवलं आणि वाचू लागले ते... डोळ्यांत पाणी आणलंत ! प्रत्येक मुंबईकराला.. चाकरमान्याला आणि चाकर मानीला माझा सलाम... प्रचंड धैर्य आहे तुमच्यात..! - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 01:39
अंगावर काटा आल रे! मी तेव्हा प्रभादेवीला नौकरी करत होतो. तिथून जवळच वरळीला स्फोट झाले होते. कसाबसा जीव मुठीत धरून तेव्हा आम्ही घरी आलो होतो! तुझ्या या लेखाने त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या! बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. अगदी खरं रे साक्षिदेवा! माझ्यामते दोनवेळची भूकच माणसाला सर्व काही शिकवते हेच खरं! दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती येस्स! एक हाडाचा मुंबईकर म्हणून अभिमानाने सांगू इच्छितो की मी देखील १३ तारखेला सकाळी माझी नेहमीची ८.३२ ची कसारा-व्हीटी डबलफास्ट लोकल पकडली होती. तिला नेहमीप्रमाणेच खच्चून गर्दी होती! असो, लेख उत्तमच आहे रे साक्षिदेवा! कुणी काही म्हटलं तरी मुंबईकरांचं स्पिरिटच वेगळं, उत्साहच वेगळा!! बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

मुक्तसुनीत Wed, 03/12/2008 - 02:56
सर्वप्रथम , सर्वसाक्षींचे लिखाण त्या दिवसाच्या आथवणी जाग्या करणारे , अगदी साक्षात्कारी स्वरूपाचे आहे हे नमूद करतो. मला वाटते , बाँबस्फोटाच्या दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यामागे असे दिसते की , धैर्य आणि अगतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश मुंबईकर दुसर्‍या दिवशी कामावर गेले ; पण तसे करण्यावाचून त्यांना पर्याय होता का, हेदेखील तपासावे लागेलच. मीदेखील मुंबईकरच आहे आणि मीसुद्धा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो होतो. पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

चतुरंग Wed, 03/12/2008 - 03:26
चाकरमानी अशी मुंबई तालावर काट्यांच्या पळते यंत्र असे की माणुस हा? प्रश्नच राहति येत मना ते अतिवृष्टी थैमान असो वा, स्फोटहि अघटित होता ते धावुन येई अशाच वेळी माणुसकीचे महावस्त्र ते विजीगिषा ही बघून जेव्हा जगही सारे थक्कच होते! "सलाम मुंबई!" वदण्यावाचुन शब्दच नाही ओठी ते!! चतुरंग

वरदा Wed, 03/12/2008 - 05:18
आला..सगळं पुन्हा काल घडल्यासारखं डोळ्यासमोर आलं..माझे बाबा नरीमन पॉईंटला काम करायचे सकाळी स्टेशन्वर जाऊन आज नाहीच जावसं वाटत म्हणून घरी आले (एरवी संधीवाताने पाय सुजला तरी अंबरनाथहून व्हीटी ला जाणारे काय वाटंलं त्यांना कोण जाणे). ही बुद्धी त्यांना देणार्‍या गणेशाचे कीतीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत. खूप भयंकर होतं सगळंच.... बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! नक्कीच! पण देवा गणेशा खूप भोगलंय मुंबईने... नको रे अजुन संकटं! भिती वाटते विचाराने सुद्धा... पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते. हे खरं...... न जाऊन सांगतो कुणाला.... असो...चांगला लेख... (आता कुठेही असले तरी मनाने कायम मुंबईकर) वरदा

बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 06:47
सुन्न आठवणी. मी त्यावेळेस इयत्ता चौथीत असेन. मित्राच्य आईने शाळेत येऊन आम्हाला दोघांना त्याच्या घरी नेले. दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली वगैरे म्हणजे काय ते त्यावेळी कळायचेही नाही. अशा वेळी शाळा लवकर सुटल्याच्या आनंदात त्याच्या घरी गेलो आणि मोठा माणसांचे चेहरे इतके चिन्ताक्रान्त का, याचा विचार. संध्याकाळी आईबाबा घरी आल्यावर काहीबाही गोष्टी ऐकायला मिळाल्या, मात्र त्यांचे संदर्भ नि अर्थ बरेच वर्षांनी कळले. (स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय Wed, 03/12/2008 - 07:08
सर्व लोक हादरले होते. बंद न पडणार्‍या मुंबईचे सर्वांना कौतूक वाटले. मुंबईतील आठवणी शब्दांकित करून आठवणींना उजाळा दिलात.

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 08:42
आठवण अगदी अलिकडची, म्हणजे ११ जुलैच्या बाँबस्फोटाची. त्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मी कंपनीच्या बसमध्ये होते आणि अचानक माणसांचे लोंढे रस्त्यावरून चालताना दिसायला लागले. आम्हाला वाटले, रेल्वेची वीज गेली की काय. घरी आले तर कळले बाँबस्फोट झालेत. माझा भाऊ म्हणाला, पटकन चल. टीव्हीवरून सारखे दाखवतात आहेत की रक्तदान करा. आपण हिंदुजाला (रुग्णालय) जाऊ. हिंदुजाला जाताना जागोजागी लोक वाहतुक नियमन, घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोफत चहा-फराळ, मोफत मोबाईल वापरायला देत होती. काही ठिकाणी तर रिकाम्या जाणार्‍या खाजगी गाड्या जबरदस्तीने थांबवून जबरदस्तीने म्हातारे, स्त्रिया, मुले यांना जायची व्यवस्था करून देत होते. रक्तदान करून येताना विचार केला की माटुंगा अभाविप कार्यालयात जाऊन विचारावे काही मदत हवी का.. हे कार्यालय माटुंगा स्थानकाच्या समोरच आहे. तिथे गेलो तर बघितले की बाँबस्फोटात छिन्नविच्छिन्न गाडीचे डबे बाजूला काढले होते आणि रेल्वे पूर्ववत चालू. हे सर्व अवघ्या २ तासांत. एकच शब्द, "सलाम मुंबई". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 11:51
सलाम ! मी तसा बराच लहान होतो, आणि मु॑बईतही नव्हतो त्यामुळे ह्या प्रकाराच॑ गा॑भिर्य मी फक्त समजू शकतो, अनुभवाअभावी उमजू नाही शकत. पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. क्या बात है! मु॑बैकरा॑च्या जि॑दादिलीपुढे तिच्याआयला कोहिनूर हिरासुद्धा फिका पडावा ! आम्हाला सवय 'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' अश्या अस्सल पेठी प्रेमाची सवय, आणि २६ जुलैच्या प्रलयात म्हणे, लोक दोरख॑ड घेऊन पाण्यात काय ऊतरले - का तर येणार्‍या जाणार्‍या॑ना पैल गाठता यावा म्हणून. अडकलेल्या लोका॑ना चहा-बिस्किटे काय वाटली - का तर बिचारे उपाशी असतील म्हणून....कोण कुठला,कोण कुठला...माझा जीव जाईल का..माझे पैसे खर्च होतात...कशाचा कशाचा विचार नाही. म्हणूनच मु॑बै परत दुसर्‍या दिवशी उभी राहते..असा माझा कयास आहे. सलाम मु॑बै !!!

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 12:59
पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. खरं आहे रे धमाल्या! २६ जुलैला मुंबीत अक्षरश: प्रलयच आला होता. या त्याच्या काही भयानक आठवणी -

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ गुरुवार, 03/13/2008 - 21:40
'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' आणिबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडुन गरजूंना मदत करण्यासाठी रोज दुपारी घरी जागावे लागत नाही. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सुमीत Wed, 03/12/2008 - 12:24
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. असू आम्ही तसे पण कुठल्याही सरकारी मदती शिवाय आम्ही संकटात एकत्र उभे राहतो. उद्धट असू पण माणुसघाणे तरी नक्कीच नाही आहोत.

In reply to by सुमीत

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 12:40
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. मुंबईकरांना कुठली उपाधी देणारे रीडर डायजेस्टवाले कोण लागून गेले आहेत? आम्ही त्यांना मानत नाही!! गेले बाझवत तिच्यायला!! :) आपला, (सडेतोड मुंबईकर) तात्या.

स्वाती दिनेश Wed, 03/12/2008 - 12:49
तुमच्या लेखाने क्षणात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर काटा आला. माझी बहिण तेव्हा रचना ऍकेडमी मध्ये होती.ती आणि तिच्या ४,५ मैत्रीणी कॉलेजच्या जवळच अडकल्या होत्या.एका भल्या टॅक्सीवाल्याने त्या सगळ्यांना आपल्या टॅक्सीतून त्यातील एक जण परळला राहत होती तिच्याकडे सुखरुप पोहोचवले.तिचा घरी फोन येईपर्यंतचा वेळ आम्ही कसा काढला होता आमचे आम्हालाच ठाऊक.. त्याकाळात आणि नंतरही अशा प्रत्येक अस्मानी ,सुलतानी संकटातून सावरून लवकरात लवकर मुंबई परत उभी राहिली.. खरच ,सलाम मुंबई! स्वाती

प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 14:01
त्या दिवशी मी दुपारी दीडच्या सुमारास जिजीभॉय टॉवर्सजवळूनच(मुंशेबा) चर्चगेटला माझ्या कचेरीच्या इमार्तीपाशी आलो तर खालीच मला एकजण भेटला. म्हणाला, "देवसाहेब, कुठून येताय?" मी म्हटले, "आत्ताच शेयरबाजारातून येतोय." तो माझ्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला, "म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत?" मला काहीच कळेना. हा असा का बोलतोय? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली होती. शेयर बाजारात,त्या पाठोपाठ एयर इंडिया इमारत ह्या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने 'बाँबस्फोट' झालेत हे त्याच्याकडून ऐकले आणि माझ्या लक्षात आले की केवळ काही मिनिटांच्या अंतराने मी मृत्युला हुलकावणी देऊन आलो होतो. शेयर बाजाराच्या इमारतीतल्या कार पार्किंगमध्ये बाँबस्फोट झाल्यामुळे मला तो ऐकू येऊ शकलेला नसावा(त्यावेळी मी तिथून बराच दूर असावा बहुदा). माझी उत्सुकता चाळवली आणि मग मी त्याला बरोबर घेऊनच एयर-इंडिया इमारतीच्या दिशेने नरीमन पॉईंटच्या दिशेने कूच केले. तिथे गेलो तर सगळी वाहतूक रोखलेली,पोलिसांनी चहूबाजूंनी कडे केलेले, अग्नीशमनदलाचे जवान देखिल त्यांच्या कामगिरीवर हजर असलेले..... हे सगळे पाहून मी खरोखरच अचंबित झालो. एयर-इंडिया इमारतीत असलेल्या 'बँक ऑफ दुबई' ची तर पार दूर्दशा झालेली होती. आजूबाजूच्या इमारतींच्या काचांचा खच पडलेला होता. पण कुठेही भितीचा लवलेश दिसला नाही. दुसर्‍या दिवसापासूनच मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती. अवांतरः त्या अवस्थेतही कुतुहलाचा एक भाग म्हणून मी एक काचेचा मोठा तुकडा उचलला आणि एका हवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले. तो त्वरेने तिथे आला आणि मला त्यापासून परावृत्त करू लागला. माझ्या मित्राकडे(हा ही हवालदारच होता;पण साध्या कपड्यातला) लक्ष जाताच त्याने त्याला हटकले, " अरे तू इकडे कुठे?" त्यावर त्याने त्या हवालदाराच्या कानात काही तरी सांगितले आणि मग तो हवालदार माझ्याकडे अविश्वासाने बघत बघत आपल्या नेमलेल्या जागी निघून गेला.(त्याने काय सांगितले ते मला नंतर कळले; पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत नाही ह्या बद्दल क्षमस्व) असो. तर मुद्दा तो नाहीये. इथे मी निव्वळ मुंबईकरांचे कौतुक करणार नाहीये. कारण साधारण सगळीकडे हे असेच असते. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी नाही काय म्हटलंय की "शो मस्ट गो ऑन" (कोण तो 'शेक्सपियर,शेक्सपियर' करतोय? अहो "नावात काय आहे?" असे खुद्द समर्थांनी म्हटलंय!!!!) त्याप्रमाणे जन्म-मृत्यु हे चक्र असेच चालत असते आणि अगदी बाबा आदम पासून आपण सगळे हे सगळे पचवलेले आहे. क्षणभर दु:ख/खेद/संताप/राग/लोभ वगैरे जे काही असेल ते व्यक्त करायचे आणि निमुटपणे आपल्या कामाला लागायचे. ह्यालाच म्हणतात 'जीवन'.

साक्षीसेठ, आम्हाला मुंबईची ओळख होते ती दैनिकातून ,मासिके, विविध वाहिन्यांवरुन, आपल्या लेखाने बाँब स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या, त्याच बरोबर अशा घटनांनी मुंबई थबकते ती क्षणभर आणि निमुटपणे आपल्या कामाला लागते ही मुंबैची ओळख कोणाच्याही जगण्याची हिम्मत वाढवते हे मात्र खरे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 21:40
मी पण दुस-या दिवशी कामावर गेलो होतो. मुंबईकर पोट भरायला घाबरत नाही हो. एक नाही तर छप्पन नोक-या सोडतील. वडापावची गाडी चालवतील, काहिहि चांगले काम करतील व बक्कळ पैसा मिळवतील. पण कमिटमेंट पाळतोच पाळतो. जग उलटे झाले तरीहि. आम्ही दहशवाद इ. समाजविरोधी गोष्टीना कदापि शरण जाणार नाही. एखादा आमच्या हाती लागला तर त्याची धडगत नाही. हात पाय तोडून भीक मागायला बसवीन. किंबहुना दुस-या दिवशी त्याच तयारीने आम्ही कामावर जातो. कायदा काहीहि असो. नेव्हर से डाय. गर्जेल तो पडेल काय हे आमच्या बाबतीत खरे नाही. गर्जेल तो पडेलच. मी २६ जूलै ला १८ कि.मी. चालत आलो. ५४व्या वर्षी. पाणी कापत चालणे सोपे नसते महाराजा. असो. फार पिळले तुम्हाला. राहवले नाही म्हणून लिहिले. क्षमस्व.

सर्वसाक्षी Wed, 03/12/2008 - 23:05
मुंबईचा चाकरमान्या अगतिक आहे पण असहाय्य व पराभूत नाही. अगतिक माणसापुढे दोन पर्याय असतात - एक तर हात पाय गाळणे, पळुन जाणे, जीव देणे वा दुसरा परिस्थितीशी आपल्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी दोन हात करणे. मुंबईकरांवर अनेक संकटे आली आणि येतात पण त्याने कधी हात पाय गाळले नाहीत वा पळही काढला नाही. जगात अनेक ठिकाणी संकटाने लोक गर्भगळीत होउन पळत सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा मुंबईकरापुढे धैर्याखेरीज पर्याय नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. अगदी या बाँब स्फोटांचेच उदाहरण घेतले तर सुखाने सगळे मुंबईकर दुसर्‍या दिवशी रजा घेऊन घरी बसले असते व सगळे सुरळीत होईपर्यंत घराबाहेर कशाला पडा असे म्हणत बसू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट उद्या मरायचे तर आजच मरू असे म्हणत सगळे मुंबईकर बेधडक बाहेर पडले. मी आधी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या भुकेवर मात करण्यासाठी आणि आपले जीवन ताठ मानेने जगण्यासाठी मुंबईकर कायम धैर्याने वागत आला आहे आणि असाच हिमतीने वागत राहील.

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 23:56
वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचून मन सुन्नच होते.आणि म्हणावसे वाटते, सलाम मुंबई मुंबईच्या वरील घटनेच्या बातम्या आम्ही पेपरमधेच वाचल्या होत्या त्या आठवणी ताज्या झाल्या.

सन्जोप राव गुरुवार, 03/13/2008 - 21:01
मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!" आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहर्‍याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहर्‍याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते. हीच प्रतिक्रिया इतरत्रही लिहिली आहे, क्षमस्व. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

लिखाळ गुरुवार, 03/13/2008 - 21:38
संजोप रावांचे हे म्हणणे विचार करायला लावणारे आहे. युद्ध प्रसंगी सामन्य नागरिकाने दाखवायचे धैर्य वेगळे आणि अश्या प्रसंगी. अश्या प्रसंगी मुंबई बंद पडली, लोकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारवर दबाव आणला, दोषी लोकांना शोधायला मदत केली. सर्व वातावरण ढवळून निघाले असे होणे हे जास्त जीवंतपणाचे वाटते. असो. जे लोक अश्या अडचणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करतात त्यांना सलाम. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

कोलबेर गुरुवार, 03/13/2008 - 23:45
एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे!
स्फोटांनतर मुंबई पुन्हा कशी कामाला लागली आणि ९/११ नंतर न्युयॉर्क कसे दुसर्‍या दिवशी कामाला लागले ह्याच्या उदत्तीकरणाचा कंटाळा आला आहे. जगात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये (मेट्रो) हे चालते.. त्यात मुंबई काय आणि न्युयॉर्क काय!! लेख/आठवणी आवडल्या हे वे सां न ल. -कोलबेर

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/13/2008 - 22:14
हजेरीची अगतिकता फार थोड्या जणांना होती असेल. महिलावर्ग पण कामावर उपस्थित होता. भीति प्रत्येकाच्या मनांत असते. पण कर्तव्य जेव्हा भीतीवर, दहशतीवर मात करते तेव्हा ते कौतुकाला पात्र होतेच. हे मान्य न करणे हा कोतेपणाच म्हणतायेईल.

In reply to by सुधीर कांदळकर

कोलबेर Fri, 03/14/2008 - 00:08
आदल्याच दिवशी स्फोट झालेले असताना सलग दुसर्‍या दिवशी स्फोट व्हायची शक्यता आणि झालेच तर दिड कोटी लोकांच्यातील शे दोनशें मृतांमध्ये गणना व्हायचे ऑड्स विचारात घेतले तर एखाद्याची दगावण्याची शक्यता किती आहे? फारच कमी..इतकी कमी की त्यापेक्षा अधिक ऑड्स रस्ता क्रॉस करताना वाहनाने उडवल्याने/ वाहन अपघातात मृत्यू पावण्यामध्ये आहेत..जे की कोणत्याही दिवशी घडू शकते.. आणि जे टाळायला कुणीही काम सोडून घरी बसणार नाही..तेव्हा कामावर रुजु होणे ही आगतिकताही नव्हे की शौर्यही नव्हे..इतके कमी ऑड्स असताना विनाकारण एक रजा का वाया घालवा? हा सारासार हिशोब आहे..जो सगळ्याच्य मोठ्या शहरात केला जातो आणि त्यामूळे मुंबई असो वा न्युयॉर्क आपत्ती नंतर लगेच दुसर्‍या दिवशी काम चालू होते!

सर्वसाक्षी Fri, 03/14/2008 - 00:43
मुंबईकरांचे धैर्य मान्य करणे वा नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे/ अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते/ भूकंपानंतर अहमदाबादेत बहुमजली इमारतींमध्ये जागा कुणी घ्यायला तयार नव्हते.. यासारखी अनेक उदाहरणे आहेत. असो, मुंबईकरांचे कौतुक सर्वांनीच करावे अशी अपेक्षा नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कोलबेर Fri, 03/14/2008 - 01:01
मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे
ह्याची तुलना मुंबईतील बाँब स्फोटांशी होऊ शकत नाही. मला ह्या खून प्रकरणाची फारशी माहिती नाही... पण समजा एखादा सिरियल किलर दादर/मुलुंड/भांडुप अश्या भागात मुडदे पाडत फिरत असेल तर तो जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत तिथल्या राहिवाश्यांची साधारण प्रतिक्रिया पुण्यातील लोकांपेक्षा फारशी वेगळी असेल का?
अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते
अमेरिकेची (एक देश ह्या अर्थाने) तुलना मुंबई (शहराशी) होऊ शकत नाही. अतिरेकी हल्ले झालेल्या न्युयॉर्क शहराची तुलना मुंबईशी केली तर न्युयॉर्क पुन्हा कसे कामाला लागले ह्याचा उदो उदो सर्वत्र ऐकू येतो. ...तसेच लोकांनी विमानाने जाणे बंद केल होते ते अत्यंत अल्प काळासाठी जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती. काही काळानंतर अमेरिकेतली विमानसेवा आणि मुंबईतली लोकलसेवा दोन्हीही व्यवस्थीत सुरू झाले. बाँबस्फोट हे अतिरेक्यांनी केलेले भ्याड हल्ले असतात. गेल्या काही वर्षात लंडन, माद्रिद, न्युयॉर्क अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हे हल्ले झालेले आहेत.. सगळीकडे साधारण समानच प्रतिक्रिया उमटली.. शॉक-भिती-अफवा-पुनश्च सुरळीत! कुठलेच शहर हात पाय गाळून बसले नाही. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच. शेवटी मानणे वा न मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य!

In reply to by कोलबेर

सर्वसाक्षी Fri, 03/14/2008 - 21:04
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच.> मी वास्तव काय ते सांगितले. बाकी हे 'प्रकटन' दिले नसते तरी चालले असते. असो.

In reply to by सर्वसाक्षी

देवदत्त Sat, 03/15/2008 - 23:40
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. पूर्णतः सहमत. माझे आणि माझ्या बहिणीचे तर म्हणणे आहे की ज्या लोकल मध्ये बॉम्ब स्फोट झालेत ती चालू ठेवली असती तर लोक त्यातूनही घरी परतले असते. अर्थात ज्यांना घरी जाण्याची जास्त गरज/घाई आहेत ते. इतर मदत करणारे लोक भरपूर आहेत ते थांबतातच मदतीला.

In reply to by सर्वसाक्षी

सचिन Sat, 03/15/2008 - 12:01
मुम्बईचा मोठेपणा दाखविण्यासाठी नेहमी पुण्यालाच का टोचावे लागते ? पुणे इतके तुच्छ असेल तर शेकड्याने मुंबईकर पुण्याच्या डहाणूकर मधे फ्लॅट्स का घेत होते ? दुर्दैवाने अशा मोठ्या घटना मुम्बईत घडल्या ,म्हणून त्यानंतरच्या जनसमान्यांच्या प्रतिक्रिया जगाला दिसून आल्या. आणि त्यांना सर्वांना (आम्हीही) सलाम केला, करतो. पुण्यात असे हल्ले झाले नाहीत हा काही पुणेकरांचा गुन्हा ? पानशेतच्या पुराच्या वेळी माझ्या आत्याच्या संपूर्ण कुटुम्बाला शेजारच्यांनी त्यांच्या दुमजली घरातून दोर टाकून वाचविले होते. (अशी अनेक उदाहरणे --पण पेपरात आली नव्हती) रामन राघवन च्या वेळी मुंबईकर काय करीत असत ? अभ्यंकर - जोशी खून प्रकरणाला सुमारे ३० वर्षे झाली...तेव्हा सन्ध्याकाळनंतर पुणे एरवीही शान्तच असे. आणि, अलिकडे पुण्यातही एका बँकेवर अतिरेक्यांनी दरोडा घालायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध करतांना प्राण गमावले. नंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यांना पकडूनही दिले होते. आणि त्यानंतरच "साळुंके विहार" प्रकरण उजेडात आले होते.....असो मुम्बई ईज ग्रेट, याबद्दल आमचेही दुमत नाहीच !! (बाय द वे, लातूर सारख्या दुर्घटनांच्या वेळी लातूरकरांनीही तितकेच धैर्य दाखविले नाही का ?)

देवदत्त Sat, 03/15/2008 - 23:35
मी त्यादिवशी घरातच होतो, पण तुमच्या लेखाने ते समोर पाहिले असे वाटतेय. माझी दहावीची परीक्षा सुरू होती. १२ मार्चला इतिहासाचा पेपर झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास झोपून उठल्यावर माझ्या बहिणीचे आणि भावाचे ऐकले की एवढे बॉंम्बस्फोट झालेत. ते नुकतेच बाहेरून परतले होते. संध्याकाळी सातच्या बातम्यात ( की साडेसात?) पूर्ण माहिती मिळाली. रात्रीच्या बातम्यांत सांगितले की दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला आहे. आधीच ३ महिन्यांपुर्वी(डिसे/जाने) झालेल्या दंगलींमुळे थोडीफार भीती होतीच मनात. पण पुढे सर्व सुरळीत चालले. मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. सहमत. आणि हो, काहीतरी आहेच मुंबईत म्हणूनच तर मी ही पुन्हा परत आलोय. :)

सुधीर कांदळकर Sun, 03/16/2008 - 09:16
शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता. रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते. मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क कल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता. शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 10:36
शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे. हेच म्हणतो! धन्यवाद कांदळकर साहेब! आपला, (मुंबईकर) तात्या.

प्राजु Wed, 03/12/2008 - 01:18
मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू! काय राव... छान गाणं ऐकत होते.. पण हे शिर्षक वाचून गाणं थांबवलं आणि वाचू लागले ते... डोळ्यांत पाणी आणलंत ! प्रत्येक मुंबईकराला.. चाकरमान्याला आणि चाकर मानीला माझा सलाम... प्रचंड धैर्य आहे तुमच्यात..! - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 01:39
अंगावर काटा आल रे! मी तेव्हा प्रभादेवीला नौकरी करत होतो. तिथून जवळच वरळीला स्फोट झाले होते. कसाबसा जीव मुठीत धरून तेव्हा आम्ही घरी आलो होतो! तुझ्या या लेखाने त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या! बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. अगदी खरं रे साक्षिदेवा! माझ्यामते दोनवेळची भूकच माणसाला सर्व काही शिकवते हेच खरं! दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती येस्स! एक हाडाचा मुंबईकर म्हणून अभिमानाने सांगू इच्छितो की मी देखील १३ तारखेला सकाळी माझी नेहमीची ८.३२ ची कसारा-व्हीटी डबलफास्ट लोकल पकडली होती. तिला नेहमीप्रमाणेच खच्चून गर्दी होती! असो, लेख उत्तमच आहे रे साक्षिदेवा! कुणी काही म्हटलं तरी मुंबईकरांचं स्पिरिटच वेगळं, उत्साहच वेगळा!! बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

मुक्तसुनीत Wed, 03/12/2008 - 02:56
सर्वप्रथम , सर्वसाक्षींचे लिखाण त्या दिवसाच्या आथवणी जाग्या करणारे , अगदी साक्षात्कारी स्वरूपाचे आहे हे नमूद करतो. मला वाटते , बाँबस्फोटाच्या दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यामागे असे दिसते की , धैर्य आणि अगतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश मुंबईकर दुसर्‍या दिवशी कामावर गेले ; पण तसे करण्यावाचून त्यांना पर्याय होता का, हेदेखील तपासावे लागेलच. मीदेखील मुंबईकरच आहे आणि मीसुद्धा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो होतो. पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

चतुरंग Wed, 03/12/2008 - 03:26
चाकरमानी अशी मुंबई तालावर काट्यांच्या पळते यंत्र असे की माणुस हा? प्रश्नच राहति येत मना ते अतिवृष्टी थैमान असो वा, स्फोटहि अघटित होता ते धावुन येई अशाच वेळी माणुसकीचे महावस्त्र ते विजीगिषा ही बघून जेव्हा जगही सारे थक्कच होते! "सलाम मुंबई!" वदण्यावाचुन शब्दच नाही ओठी ते!! चतुरंग

वरदा Wed, 03/12/2008 - 05:18
आला..सगळं पुन्हा काल घडल्यासारखं डोळ्यासमोर आलं..माझे बाबा नरीमन पॉईंटला काम करायचे सकाळी स्टेशन्वर जाऊन आज नाहीच जावसं वाटत म्हणून घरी आले (एरवी संधीवाताने पाय सुजला तरी अंबरनाथहून व्हीटी ला जाणारे काय वाटंलं त्यांना कोण जाणे). ही बुद्धी त्यांना देणार्‍या गणेशाचे कीतीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत. खूप भयंकर होतं सगळंच.... बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! नक्कीच! पण देवा गणेशा खूप भोगलंय मुंबईने... नको रे अजुन संकटं! भिती वाटते विचाराने सुद्धा... पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते. हे खरं...... न जाऊन सांगतो कुणाला.... असो...चांगला लेख... (आता कुठेही असले तरी मनाने कायम मुंबईकर) वरदा

बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 06:47
सुन्न आठवणी. मी त्यावेळेस इयत्ता चौथीत असेन. मित्राच्य आईने शाळेत येऊन आम्हाला दोघांना त्याच्या घरी नेले. दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली वगैरे म्हणजे काय ते त्यावेळी कळायचेही नाही. अशा वेळी शाळा लवकर सुटल्याच्या आनंदात त्याच्या घरी गेलो आणि मोठा माणसांचे चेहरे इतके चिन्ताक्रान्त का, याचा विचार. संध्याकाळी आईबाबा घरी आल्यावर काहीबाही गोष्टी ऐकायला मिळाल्या, मात्र त्यांचे संदर्भ नि अर्थ बरेच वर्षांनी कळले. (स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय Wed, 03/12/2008 - 07:08
सर्व लोक हादरले होते. बंद न पडणार्‍या मुंबईचे सर्वांना कौतूक वाटले. मुंबईतील आठवणी शब्दांकित करून आठवणींना उजाळा दिलात.

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 08:42
आठवण अगदी अलिकडची, म्हणजे ११ जुलैच्या बाँबस्फोटाची. त्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मी कंपनीच्या बसमध्ये होते आणि अचानक माणसांचे लोंढे रस्त्यावरून चालताना दिसायला लागले. आम्हाला वाटले, रेल्वेची वीज गेली की काय. घरी आले तर कळले बाँबस्फोट झालेत. माझा भाऊ म्हणाला, पटकन चल. टीव्हीवरून सारखे दाखवतात आहेत की रक्तदान करा. आपण हिंदुजाला (रुग्णालय) जाऊ. हिंदुजाला जाताना जागोजागी लोक वाहतुक नियमन, घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोफत चहा-फराळ, मोफत मोबाईल वापरायला देत होती. काही ठिकाणी तर रिकाम्या जाणार्‍या खाजगी गाड्या जबरदस्तीने थांबवून जबरदस्तीने म्हातारे, स्त्रिया, मुले यांना जायची व्यवस्था करून देत होते. रक्तदान करून येताना विचार केला की माटुंगा अभाविप कार्यालयात जाऊन विचारावे काही मदत हवी का.. हे कार्यालय माटुंगा स्थानकाच्या समोरच आहे. तिथे गेलो तर बघितले की बाँबस्फोटात छिन्नविच्छिन्न गाडीचे डबे बाजूला काढले होते आणि रेल्वे पूर्ववत चालू. हे सर्व अवघ्या २ तासांत. एकच शब्द, "सलाम मुंबई". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 11:51
सलाम ! मी तसा बराच लहान होतो, आणि मु॑बईतही नव्हतो त्यामुळे ह्या प्रकाराच॑ गा॑भिर्य मी फक्त समजू शकतो, अनुभवाअभावी उमजू नाही शकत. पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. क्या बात है! मु॑बैकरा॑च्या जि॑दादिलीपुढे तिच्याआयला कोहिनूर हिरासुद्धा फिका पडावा ! आम्हाला सवय 'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' अश्या अस्सल पेठी प्रेमाची सवय, आणि २६ जुलैच्या प्रलयात म्हणे, लोक दोरख॑ड घेऊन पाण्यात काय ऊतरले - का तर येणार्‍या जाणार्‍या॑ना पैल गाठता यावा म्हणून. अडकलेल्या लोका॑ना चहा-बिस्किटे काय वाटली - का तर बिचारे उपाशी असतील म्हणून....कोण कुठला,कोण कुठला...माझा जीव जाईल का..माझे पैसे खर्च होतात...कशाचा कशाचा विचार नाही. म्हणूनच मु॑बै परत दुसर्‍या दिवशी उभी राहते..असा माझा कयास आहे. सलाम मु॑बै !!!

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 12:59
पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. खरं आहे रे धमाल्या! २६ जुलैला मुंबीत अक्षरश: प्रलयच आला होता. या त्याच्या काही भयानक आठवणी -

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ गुरुवार, 03/13/2008 - 21:40
'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' आणिबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडुन गरजूंना मदत करण्यासाठी रोज दुपारी घरी जागावे लागत नाही. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सुमीत Wed, 03/12/2008 - 12:24
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. असू आम्ही तसे पण कुठल्याही सरकारी मदती शिवाय आम्ही संकटात एकत्र उभे राहतो. उद्धट असू पण माणुसघाणे तरी नक्कीच नाही आहोत.

In reply to by सुमीत

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 12:40
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. मुंबईकरांना कुठली उपाधी देणारे रीडर डायजेस्टवाले कोण लागून गेले आहेत? आम्ही त्यांना मानत नाही!! गेले बाझवत तिच्यायला!! :) आपला, (सडेतोड मुंबईकर) तात्या.

स्वाती दिनेश Wed, 03/12/2008 - 12:49
तुमच्या लेखाने क्षणात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर काटा आला. माझी बहिण तेव्हा रचना ऍकेडमी मध्ये होती.ती आणि तिच्या ४,५ मैत्रीणी कॉलेजच्या जवळच अडकल्या होत्या.एका भल्या टॅक्सीवाल्याने त्या सगळ्यांना आपल्या टॅक्सीतून त्यातील एक जण परळला राहत होती तिच्याकडे सुखरुप पोहोचवले.तिचा घरी फोन येईपर्यंतचा वेळ आम्ही कसा काढला होता आमचे आम्हालाच ठाऊक.. त्याकाळात आणि नंतरही अशा प्रत्येक अस्मानी ,सुलतानी संकटातून सावरून लवकरात लवकर मुंबई परत उभी राहिली.. खरच ,सलाम मुंबई! स्वाती

प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 14:01
त्या दिवशी मी दुपारी दीडच्या सुमारास जिजीभॉय टॉवर्सजवळूनच(मुंशेबा) चर्चगेटला माझ्या कचेरीच्या इमार्तीपाशी आलो तर खालीच मला एकजण भेटला. म्हणाला, "देवसाहेब, कुठून येताय?" मी म्हटले, "आत्ताच शेयरबाजारातून येतोय." तो माझ्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला, "म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत?" मला काहीच कळेना. हा असा का बोलतोय? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली होती. शेयर बाजारात,त्या पाठोपाठ एयर इंडिया इमारत ह्या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने 'बाँबस्फोट' झालेत हे त्याच्याकडून ऐकले आणि माझ्या लक्षात आले की केवळ काही मिनिटांच्या अंतराने मी मृत्युला हुलकावणी देऊन आलो होतो. शेयर बाजाराच्या इमारतीतल्या कार पार्किंगमध्ये बाँबस्फोट झाल्यामुळे मला तो ऐकू येऊ शकलेला नसावा(त्यावेळी मी तिथून बराच दूर असावा बहुदा). माझी उत्सुकता चाळवली आणि मग मी त्याला बरोबर घेऊनच एयर-इंडिया इमारतीच्या दिशेने नरीमन पॉईंटच्या दिशेने कूच केले. तिथे गेलो तर सगळी वाहतूक रोखलेली,पोलिसांनी चहूबाजूंनी कडे केलेले, अग्नीशमनदलाचे जवान देखिल त्यांच्या कामगिरीवर हजर असलेले..... हे सगळे पाहून मी खरोखरच अचंबित झालो. एयर-इंडिया इमारतीत असलेल्या 'बँक ऑफ दुबई' ची तर पार दूर्दशा झालेली होती. आजूबाजूच्या इमारतींच्या काचांचा खच पडलेला होता. पण कुठेही भितीचा लवलेश दिसला नाही. दुसर्‍या दिवसापासूनच मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती. अवांतरः त्या अवस्थेतही कुतुहलाचा एक भाग म्हणून मी एक काचेचा मोठा तुकडा उचलला आणि एका हवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले. तो त्वरेने तिथे आला आणि मला त्यापासून परावृत्त करू लागला. माझ्या मित्राकडे(हा ही हवालदारच होता;पण साध्या कपड्यातला) लक्ष जाताच त्याने त्याला हटकले, " अरे तू इकडे कुठे?" त्यावर त्याने त्या हवालदाराच्या कानात काही तरी सांगितले आणि मग तो हवालदार माझ्याकडे अविश्वासाने बघत बघत आपल्या नेमलेल्या जागी निघून गेला.(त्याने काय सांगितले ते मला नंतर कळले; पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत नाही ह्या बद्दल क्षमस्व) असो. तर मुद्दा तो नाहीये. इथे मी निव्वळ मुंबईकरांचे कौतुक करणार नाहीये. कारण साधारण सगळीकडे हे असेच असते. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी नाही काय म्हटलंय की "शो मस्ट गो ऑन" (कोण तो 'शेक्सपियर,शेक्सपियर' करतोय? अहो "नावात काय आहे?" असे खुद्द समर्थांनी म्हटलंय!!!!) त्याप्रमाणे जन्म-मृत्यु हे चक्र असेच चालत असते आणि अगदी बाबा आदम पासून आपण सगळे हे सगळे पचवलेले आहे. क्षणभर दु:ख/खेद/संताप/राग/लोभ वगैरे जे काही असेल ते व्यक्त करायचे आणि निमुटपणे आपल्या कामाला लागायचे. ह्यालाच म्हणतात 'जीवन'.

साक्षीसेठ, आम्हाला मुंबईची ओळख होते ती दैनिकातून ,मासिके, विविध वाहिन्यांवरुन, आपल्या लेखाने बाँब स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या, त्याच बरोबर अशा घटनांनी मुंबई थबकते ती क्षणभर आणि निमुटपणे आपल्या कामाला लागते ही मुंबैची ओळख कोणाच्याही जगण्याची हिम्मत वाढवते हे मात्र खरे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 21:40
मी पण दुस-या दिवशी कामावर गेलो होतो. मुंबईकर पोट भरायला घाबरत नाही हो. एक नाही तर छप्पन नोक-या सोडतील. वडापावची गाडी चालवतील, काहिहि चांगले काम करतील व बक्कळ पैसा मिळवतील. पण कमिटमेंट पाळतोच पाळतो. जग उलटे झाले तरीहि. आम्ही दहशवाद इ. समाजविरोधी गोष्टीना कदापि शरण जाणार नाही. एखादा आमच्या हाती लागला तर त्याची धडगत नाही. हात पाय तोडून भीक मागायला बसवीन. किंबहुना दुस-या दिवशी त्याच तयारीने आम्ही कामावर जातो. कायदा काहीहि असो. नेव्हर से डाय. गर्जेल तो पडेल काय हे आमच्या बाबतीत खरे नाही. गर्जेल तो पडेलच. मी २६ जूलै ला १८ कि.मी. चालत आलो. ५४व्या वर्षी. पाणी कापत चालणे सोपे नसते महाराजा. असो. फार पिळले तुम्हाला. राहवले नाही म्हणून लिहिले. क्षमस्व.

सर्वसाक्षी Wed, 03/12/2008 - 23:05
मुंबईचा चाकरमान्या अगतिक आहे पण असहाय्य व पराभूत नाही. अगतिक माणसापुढे दोन पर्याय असतात - एक तर हात पाय गाळणे, पळुन जाणे, जीव देणे वा दुसरा परिस्थितीशी आपल्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी दोन हात करणे. मुंबईकरांवर अनेक संकटे आली आणि येतात पण त्याने कधी हात पाय गाळले नाहीत वा पळही काढला नाही. जगात अनेक ठिकाणी संकटाने लोक गर्भगळीत होउन पळत सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा मुंबईकरापुढे धैर्याखेरीज पर्याय नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. अगदी या बाँब स्फोटांचेच उदाहरण घेतले तर सुखाने सगळे मुंबईकर दुसर्‍या दिवशी रजा घेऊन घरी बसले असते व सगळे सुरळीत होईपर्यंत घराबाहेर कशाला पडा असे म्हणत बसू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट उद्या मरायचे तर आजच मरू असे म्हणत सगळे मुंबईकर बेधडक बाहेर पडले. मी आधी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या भुकेवर मात करण्यासाठी आणि आपले जीवन ताठ मानेने जगण्यासाठी मुंबईकर कायम धैर्याने वागत आला आहे आणि असाच हिमतीने वागत राहील.

स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 23:56
वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचून मन सुन्नच होते.आणि म्हणावसे वाटते, सलाम मुंबई मुंबईच्या वरील घटनेच्या बातम्या आम्ही पेपरमधेच वाचल्या होत्या त्या आठवणी ताज्या झाल्या.

सन्जोप राव गुरुवार, 03/13/2008 - 21:01
मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!" आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहर्‍याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहर्‍याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते. हीच प्रतिक्रिया इतरत्रही लिहिली आहे, क्षमस्व. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

लिखाळ गुरुवार, 03/13/2008 - 21:38
संजोप रावांचे हे म्हणणे विचार करायला लावणारे आहे. युद्ध प्रसंगी सामन्य नागरिकाने दाखवायचे धैर्य वेगळे आणि अश्या प्रसंगी. अश्या प्रसंगी मुंबई बंद पडली, लोकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारवर दबाव आणला, दोषी लोकांना शोधायला मदत केली. सर्व वातावरण ढवळून निघाले असे होणे हे जास्त जीवंतपणाचे वाटते. असो. जे लोक अश्या अडचणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करतात त्यांना सलाम. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

कोलबेर गुरुवार, 03/13/2008 - 23:45
एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे!
स्फोटांनतर मुंबई पुन्हा कशी कामाला लागली आणि ९/११ नंतर न्युयॉर्क कसे दुसर्‍या दिवशी कामाला लागले ह्याच्या उदत्तीकरणाचा कंटाळा आला आहे. जगात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये (मेट्रो) हे चालते.. त्यात मुंबई काय आणि न्युयॉर्क काय!! लेख/आठवणी आवडल्या हे वे सां न ल. -कोलबेर

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/13/2008 - 22:14
हजेरीची अगतिकता फार थोड्या जणांना होती असेल. महिलावर्ग पण कामावर उपस्थित होता. भीति प्रत्येकाच्या मनांत असते. पण कर्तव्य जेव्हा भीतीवर, दहशतीवर मात करते तेव्हा ते कौतुकाला पात्र होतेच. हे मान्य न करणे हा कोतेपणाच म्हणतायेईल.

In reply to by सुधीर कांदळकर

कोलबेर Fri, 03/14/2008 - 00:08
आदल्याच दिवशी स्फोट झालेले असताना सलग दुसर्‍या दिवशी स्फोट व्हायची शक्यता आणि झालेच तर दिड कोटी लोकांच्यातील शे दोनशें मृतांमध्ये गणना व्हायचे ऑड्स विचारात घेतले तर एखाद्याची दगावण्याची शक्यता किती आहे? फारच कमी..इतकी कमी की त्यापेक्षा अधिक ऑड्स रस्ता क्रॉस करताना वाहनाने उडवल्याने/ वाहन अपघातात मृत्यू पावण्यामध्ये आहेत..जे की कोणत्याही दिवशी घडू शकते.. आणि जे टाळायला कुणीही काम सोडून घरी बसणार नाही..तेव्हा कामावर रुजु होणे ही आगतिकताही नव्हे की शौर्यही नव्हे..इतके कमी ऑड्स असताना विनाकारण एक रजा का वाया घालवा? हा सारासार हिशोब आहे..जो सगळ्याच्य मोठ्या शहरात केला जातो आणि त्यामूळे मुंबई असो वा न्युयॉर्क आपत्ती नंतर लगेच दुसर्‍या दिवशी काम चालू होते!

सर्वसाक्षी Fri, 03/14/2008 - 00:43
मुंबईकरांचे धैर्य मान्य करणे वा नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे/ अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते/ भूकंपानंतर अहमदाबादेत बहुमजली इमारतींमध्ये जागा कुणी घ्यायला तयार नव्हते.. यासारखी अनेक उदाहरणे आहेत. असो, मुंबईकरांचे कौतुक सर्वांनीच करावे अशी अपेक्षा नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कोलबेर Fri, 03/14/2008 - 01:01
मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे
ह्याची तुलना मुंबईतील बाँब स्फोटांशी होऊ शकत नाही. मला ह्या खून प्रकरणाची फारशी माहिती नाही... पण समजा एखादा सिरियल किलर दादर/मुलुंड/भांडुप अश्या भागात मुडदे पाडत फिरत असेल तर तो जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत तिथल्या राहिवाश्यांची साधारण प्रतिक्रिया पुण्यातील लोकांपेक्षा फारशी वेगळी असेल का?
अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते
अमेरिकेची (एक देश ह्या अर्थाने) तुलना मुंबई (शहराशी) होऊ शकत नाही. अतिरेकी हल्ले झालेल्या न्युयॉर्क शहराची तुलना मुंबईशी केली तर न्युयॉर्क पुन्हा कसे कामाला लागले ह्याचा उदो उदो सर्वत्र ऐकू येतो. ...तसेच लोकांनी विमानाने जाणे बंद केल होते ते अत्यंत अल्प काळासाठी जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती. काही काळानंतर अमेरिकेतली विमानसेवा आणि मुंबईतली लोकलसेवा दोन्हीही व्यवस्थीत सुरू झाले. बाँबस्फोट हे अतिरेक्यांनी केलेले भ्याड हल्ले असतात. गेल्या काही वर्षात लंडन, माद्रिद, न्युयॉर्क अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हे हल्ले झालेले आहेत.. सगळीकडे साधारण समानच प्रतिक्रिया उमटली.. शॉक-भिती-अफवा-पुनश्च सुरळीत! कुठलेच शहर हात पाय गाळून बसले नाही. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच. शेवटी मानणे वा न मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य!

In reply to by कोलबेर

सर्वसाक्षी Fri, 03/14/2008 - 21:04
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच.> मी वास्तव काय ते सांगितले. बाकी हे 'प्रकटन' दिले नसते तरी चालले असते. असो.

In reply to by सर्वसाक्षी

देवदत्त Sat, 03/15/2008 - 23:40
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. पूर्णतः सहमत. माझे आणि माझ्या बहिणीचे तर म्हणणे आहे की ज्या लोकल मध्ये बॉम्ब स्फोट झालेत ती चालू ठेवली असती तर लोक त्यातूनही घरी परतले असते. अर्थात ज्यांना घरी जाण्याची जास्त गरज/घाई आहेत ते. इतर मदत करणारे लोक भरपूर आहेत ते थांबतातच मदतीला.

In reply to by सर्वसाक्षी

सचिन Sat, 03/15/2008 - 12:01
मुम्बईचा मोठेपणा दाखविण्यासाठी नेहमी पुण्यालाच का टोचावे लागते ? पुणे इतके तुच्छ असेल तर शेकड्याने मुंबईकर पुण्याच्या डहाणूकर मधे फ्लॅट्स का घेत होते ? दुर्दैवाने अशा मोठ्या घटना मुम्बईत घडल्या ,म्हणून त्यानंतरच्या जनसमान्यांच्या प्रतिक्रिया जगाला दिसून आल्या. आणि त्यांना सर्वांना (आम्हीही) सलाम केला, करतो. पुण्यात असे हल्ले झाले नाहीत हा काही पुणेकरांचा गुन्हा ? पानशेतच्या पुराच्या वेळी माझ्या आत्याच्या संपूर्ण कुटुम्बाला शेजारच्यांनी त्यांच्या दुमजली घरातून दोर टाकून वाचविले होते. (अशी अनेक उदाहरणे --पण पेपरात आली नव्हती) रामन राघवन च्या वेळी मुंबईकर काय करीत असत ? अभ्यंकर - जोशी खून प्रकरणाला सुमारे ३० वर्षे झाली...तेव्हा सन्ध्याकाळनंतर पुणे एरवीही शान्तच असे. आणि, अलिकडे पुण्यातही एका बँकेवर अतिरेक्यांनी दरोडा घालायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध करतांना प्राण गमावले. नंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यांना पकडूनही दिले होते. आणि त्यानंतरच "साळुंके विहार" प्रकरण उजेडात आले होते.....असो मुम्बई ईज ग्रेट, याबद्दल आमचेही दुमत नाहीच !! (बाय द वे, लातूर सारख्या दुर्घटनांच्या वेळी लातूरकरांनीही तितकेच धैर्य दाखविले नाही का ?)

देवदत्त Sat, 03/15/2008 - 23:35
मी त्यादिवशी घरातच होतो, पण तुमच्या लेखाने ते समोर पाहिले असे वाटतेय. माझी दहावीची परीक्षा सुरू होती. १२ मार्चला इतिहासाचा पेपर झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास झोपून उठल्यावर माझ्या बहिणीचे आणि भावाचे ऐकले की एवढे बॉंम्बस्फोट झालेत. ते नुकतेच बाहेरून परतले होते. संध्याकाळी सातच्या बातम्यात ( की साडेसात?) पूर्ण माहिती मिळाली. रात्रीच्या बातम्यांत सांगितले की दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला आहे. आधीच ३ महिन्यांपुर्वी(डिसे/जाने) झालेल्या दंगलींमुळे थोडीफार भीती होतीच मनात. पण पुढे सर्व सुरळीत चालले. मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. सहमत. आणि हो, काहीतरी आहेच मुंबईत म्हणूनच तर मी ही पुन्हा परत आलोय. :)

सुधीर कांदळकर Sun, 03/16/2008 - 09:16
शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता. रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते. मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क कल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता. शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 10:36
शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे. हेच म्हणतो! धन्यवाद कांदळकर साहेब! आपला, (मुंबईकर) तात्या.
आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला उद्या पंधरा वर्षे होतील. पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो.

अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला

धोंडोपंत ·

केशवसुमार Tue, 03/11/2008 - 22:21
पंत.. झकास लेख.. उस्तुक्ता मस्त ताणली आहे.. उद्या लगेच पुढचा भाग टाका.. नाहितर डोस्क्याचा भुगा होईल.. (हौराण)केशवसुमार

छोटा डॉन Tue, 03/11/2008 - 22:58
च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं... [ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?] हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 00:42
धोंड्या, सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस! तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!" हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं! कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय! पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही... अवांतर - मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी. सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :) तुझा, तात्या.

बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 06:49
उत्कंठा लावून ठेवणारे चित्रण. पुढचे भाग लवकर येऊ द्यात. (वाचनोत्सुक)बेसनलाडू

चतुरंग Wed, 03/12/2008 - 08:03
हे असं वाचून कसं वाटलं सांगू? लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत. आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":( अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:) चतुरंग

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 09:21
दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी. अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात. दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली. फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 09:50
धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्‍याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :) मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :) पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं! असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा! माझ्या मते त्यामुळे लिहिणार्‍या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही! आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :) असो... आपला, (सुसंबद्ध!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 10:31
प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्‍या भागात. दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती). अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 11:05
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा! आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :) एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल! असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. कबूल आहे... त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे... असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे... धन्यवाद... तात्या.

मनस्वी Wed, 03/12/2008 - 10:09
धोंडोपंत - पहिला भाग आवडला. ज्या frequency ने तुम्हाला "तो" इसम दिसला, त्याच frequency ने पुढचे भाग येउद्यात. मनस्वी

मनस्वी Wed, 03/12/2008 - 11:24
धोंडोपंत ज्यांना अस्वस्थ आणि कंटाळवाणे वाटते त्यांसाठी २रा भाग लवकर येउद्यात. असे हलकेफुलके वाचून मन प्रफुल्लित होते. :) (प्रफुल्लित) मनस्वी

केशवसुमार Tue, 03/11/2008 - 22:21
पंत.. झकास लेख.. उस्तुक्ता मस्त ताणली आहे.. उद्या लगेच पुढचा भाग टाका.. नाहितर डोस्क्याचा भुगा होईल.. (हौराण)केशवसुमार

छोटा डॉन Tue, 03/11/2008 - 22:58
च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं... [ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?] हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 00:42
धोंड्या, सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस! तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!" हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं! कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय! पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही... अवांतर - मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी. सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :) तुझा, तात्या.

बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 06:49
उत्कंठा लावून ठेवणारे चित्रण. पुढचे भाग लवकर येऊ द्यात. (वाचनोत्सुक)बेसनलाडू

चतुरंग Wed, 03/12/2008 - 08:03
हे असं वाचून कसं वाटलं सांगू? लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत. आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":( अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:) चतुरंग

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 09:21
दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी. अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात. दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली. फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 09:50
धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्‍याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :) मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :) पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं! असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा! माझ्या मते त्यामुळे लिहिणार्‍या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही! आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :) असो... आपला, (सुसंबद्ध!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Wed, 03/12/2008 - 10:31
प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्‍या भागात. दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती). अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 11:05
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा! आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :) एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल! असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. कबूल आहे... त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे... असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे... धन्यवाद... तात्या.

मनस्वी Wed, 03/12/2008 - 10:09
धोंडोपंत - पहिला भाग आवडला. ज्या frequency ने तुम्हाला "तो" इसम दिसला, त्याच frequency ने पुढचे भाग येउद्यात. मनस्वी

मनस्वी Wed, 03/12/2008 - 11:24
धोंडोपंत ज्यांना अस्वस्थ आणि कंटाळवाणे वाटते त्यांसाठी २रा भाग लवकर येउद्यात. असे हलकेफुलके वाचून मन प्रफुल्लित होते. :) (प्रफुल्लित) मनस्वी
लेखनविषय:
3

धर्मवीर संभाजी महाराज - संस्मरण

शेखर ·

सन्जोप राव Tue, 03/11/2008 - 18:43
इतिहास, पुराणपुरुष, संस्कृतीरक्षक, परमपूज्य आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त यांच्यामुळे वगैरे सर्व- मग तिथे या संभाजी महाराजांपासून सांगलीत नक्षलवाद पसरवणार्‍या संभाजीराजांपर्यंत - आंणि त्यांची कवने गाणार्‍या सगळ्यांना कमरेपासून लवून कुर्निसात आणि शिरवाडकरांच्या चार ओळी- इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा कर पदस्थल त्यांचे आणिक चढुनि त्यावर भविष्य वाचा सन्जोप राव

देश, धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था| परमप्रतापी महातेजस्वी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्याचे पेशवे

सागर Tue, 03/11/2008 - 21:27
छत्रपति संभाजी महाराजांना माझ्या एका मित्राकडून छोटासा मुजरा - सागर "आज ११ मार्च... छत्रपति संभाजी महाराज यांची ३१९ वी पुण्यतिथी ....आजच्याच दिवशी १६८९ साली क्रूर औरंगजेबाने अमानुष पद्धतीने त्यांना ठार मारले... ... मरण स्वीकारले पण धर्म बुडू नाही दिला अशा या शूरवीर छत्रपति संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम - उदय गंगाधर सप्रे, ठाणे" संभाजीराजे-१ संभाजीराजे-२

प्राजु Wed, 03/12/2008 - 01:06
"या या शिवपुत्र संभाजीला मरणाची भिती??? अरे... या संभाजीच्या आरोळ्या सोड पण त्याच्या श्वासांचा आवाज सुद्धा तुला ऐकू येणार नाही" असे औरंगजेबाला निक्षून सांगणारा छावा एकदाच जन्मतो.. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 11:40
धाकल्या महाराजा॑च्या पायाशी ह्या मावळ्याचा त्रिवार मुजरा !!! श्री.श॑भुराजे म्हणजे खरा शेर! केवळ त्या॑च॑ आणि स्वराज्याच॑ दुर्दैव आडव॑ आल॑, म्हणून वरना...खाली जि॑जीपर्य॑त पोहोचलेली हि॑दवी स्वराज्यसीमा वर दिल्लीच्या ऐय्याश तक्ख्ताला फोडून नक्कीच अटकेपर्य॑त पोहोचली असती. हलकट और॑ग्याच्या प्रत्येक छळाला अस्सल म्हराठमोळ्या मुजोरीन॑ हसत स्विकारुन त्याला हतबुद्ध करणार्‍या श॑भुराजा॑चे चरणि प्रणाम. सागर, सप्रे॑च्या 'झ॑झावात' ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव. धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

सागर Wed, 03/12/2008 - 14:49
धमालराव देशमुख-पाटील, माझा मित्र उदय सप्रे हा शिवरायांच्या इतिहासाने भारुन गेलेला एक उत्तम लेखक आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा असूनही त्याची आणि माझी मैत्री आहे.... हा त्याचा मोठेपणा आहे. लवकरच उदयच्या "झंझावाता"ने अवघे मराठी साहित्यविश्व शिवकालीन होऊन जाईन याची खात्री वाटते... लवकरच माझा मित्र उदय "झंझावात"चा हा संकल्प पूर्ण करेन याची खात्री आहे .... - सागर

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 11:42
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. शंभूराजांना माझेही वंदन! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.

कलंत्री Wed, 03/12/2008 - 19:39
संभाजी महाराज यांच्या आत्मसमर्पणाची आठवण ताजी आहे हे पाहुन बरे वाटले. पण यांच्या आत्मार्पणाची तिथी ही पाडव्याच्या पहिल्या दिवशी पाळायला हवी. औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली पण, बाकी रोमांचकारक सविस्तर नंतर, तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. असो.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 23:56
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. का? आज पाळली म्हणून बिधडलं कुठे? आदराची भावना त्यामुळे थोडीच कमी होणार आहे?? व्यंकटराव म्हणतात ते योग्यच आहे. आपण मंडळी अजूनपर्यंत तारखा-तिथ्यातच अडकलेली आहोत! अर्थात, या निमित्ताने शंभूराजांचे पुष्यस्मरण करून त्यांची शूर आणि दिलेरी वृत्ती अंगी बाणवायची की तारखा तिथ्यांच्या वादात आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत बसायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे! तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. मिपाला तरी ही सूचना पाळणे आवडणार नाही. कारण एखाद्या दिलेर राजाची पुण्यतिथी वर्षातनं दोन दोनदा पाळणे हे मिपा हास्यास्पद, तसेच एक पोरखेळ समजते! आणि कुठल्याही पवित्र गोष्टीचा पोरखेळ होता कामा नये असेही मिपाला वाटते. शंभूराजे हा पोरखेळाचा विषय नक्कीच नाही! हे मिपाचं मत झालं! अर्थात, त्यातूनही एखाद्याने अगदी हट्टाने पाडव्याच्या पहिल्या दिवशीदेखील मिसळपाववर शंभूराजांचे पुण्यस्मरण केले तरी मिपाकरता ते आदरणीयच असेल. कारण मुळात मिपाला शंभूराजांच्या मृत्युच्या तारखेशी अथवा तिथीशी मतलब नसून त्यांच्यातल्या शूर, दिलेर आणि धाडसी वृत्तीशी मतलब आहे! असो.. आपला, (व्यथित) तात्या.

In reply to by कलंत्री

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 18:04
पाडव्याच्या पहिल्या दिवशी ?? ह्यातला पहिला दिवशी हे कळले नाही. चैत्र शुध्द प्रतिपदा- गुढीपाडवा. तो एकच दिवस साजरा केला जातो ना?

उदय सप्रे गुरुवार, 03/13/2008 - 12:25
"औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली " हे अर्धवट सत्य आहे. खरी तिथी फाल्गुन वद्य अमावास्या अशी आहे.आणि ज्या राजाने आपली प्रजा सुखेनैव नान्दण्यासाठी आत्मसमर्पण केले त्या वीर राजाची आठवण पाडव्याला करणे हे पण योग्यच आहे.पण आपण सगळे आता मराठी पन्चान्ग पाळतो का? रोजचा दिनान्क पण मार्च १४ , २००८ असाच लिहितो ना? पाठ्यपुस्तकात पण असेच सन आणि सनावळ्या देतात - सामान्य जनतेला लक्षात राहील असे दिनान्क देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तसे लिहिले होते. असो, सूचना मान्य-मा़झ्यापुरती - कारण मी ऐतिहासिक कादन्बरी लिहितोय आणि मला या तिथी माहित आहेत, मी पाळतो ही, सगळ्यान्ना ते जमेलच असे नाही. चूक भूल द्यावी घ्यावी, आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे. मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.

अनामिका Tue, 04/08/2008 - 17:50
काय दैवदुर्विलास पहा! गेल्याच आठवड्यात विश्वास पाटिल यांची "संभाजी "कादंबरी वाचायला घेतली.एरवी २ दिवसात पुस्तक वाचुन संपवायचे हा माझा निश्चय असतो.पण या वेळेस अंमळ जरा वेळच लागला.शेवटच प्रकरण वाचायला घेतल आणि काहि केल्या पुढे वाचण्याची इच्छाच होईना.शेवटी प्रयत्नपुर्वक वाचुन काढले आणि अख्खा चैत्र पाडव्याचा दिवस रडुन काढला.संभा़जी राजांना दिलेल्या यातना वाचताना सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि ह्रुदय पिळ्वटुन निघाले. मन विषण्ण आणि व्यथित झाल. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बहुमुल्य प्राणांची आहुती दिली आणि आपण मात्र त्यांच्या मुळे मिळालेल स्वत्व सांभाळायला नालायक ठरलो .आज आपण खरच किती हतबल आहोत हा विचार मन पोखरतोय. हा पाडवा मरेपर्यंत स्मरणात राहिल. ह्या माहान वीराला मानाचा मुजरा! "अनामिका" »

सन्जोप राव Tue, 03/11/2008 - 18:43
इतिहास, पुराणपुरुष, संस्कृतीरक्षक, परमपूज्य आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त यांच्यामुळे वगैरे सर्व- मग तिथे या संभाजी महाराजांपासून सांगलीत नक्षलवाद पसरवणार्‍या संभाजीराजांपर्यंत - आंणि त्यांची कवने गाणार्‍या सगळ्यांना कमरेपासून लवून कुर्निसात आणि शिरवाडकरांच्या चार ओळी- इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा कर पदस्थल त्यांचे आणिक चढुनि त्यावर भविष्य वाचा सन्जोप राव

देश, धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था| परमप्रतापी महातेजस्वी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्याचे पेशवे

सागर Tue, 03/11/2008 - 21:27
छत्रपति संभाजी महाराजांना माझ्या एका मित्राकडून छोटासा मुजरा - सागर "आज ११ मार्च... छत्रपति संभाजी महाराज यांची ३१९ वी पुण्यतिथी ....आजच्याच दिवशी १६८९ साली क्रूर औरंगजेबाने अमानुष पद्धतीने त्यांना ठार मारले... ... मरण स्वीकारले पण धर्म बुडू नाही दिला अशा या शूरवीर छत्रपति संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम - उदय गंगाधर सप्रे, ठाणे" संभाजीराजे-१ संभाजीराजे-२

प्राजु Wed, 03/12/2008 - 01:06
"या या शिवपुत्र संभाजीला मरणाची भिती??? अरे... या संभाजीच्या आरोळ्या सोड पण त्याच्या श्वासांचा आवाज सुद्धा तुला ऐकू येणार नाही" असे औरंगजेबाला निक्षून सांगणारा छावा एकदाच जन्मतो.. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 11:40
धाकल्या महाराजा॑च्या पायाशी ह्या मावळ्याचा त्रिवार मुजरा !!! श्री.श॑भुराजे म्हणजे खरा शेर! केवळ त्या॑च॑ आणि स्वराज्याच॑ दुर्दैव आडव॑ आल॑, म्हणून वरना...खाली जि॑जीपर्य॑त पोहोचलेली हि॑दवी स्वराज्यसीमा वर दिल्लीच्या ऐय्याश तक्ख्ताला फोडून नक्कीच अटकेपर्य॑त पोहोचली असती. हलकट और॑ग्याच्या प्रत्येक छळाला अस्सल म्हराठमोळ्या मुजोरीन॑ हसत स्विकारुन त्याला हतबुद्ध करणार्‍या श॑भुराजा॑चे चरणि प्रणाम. सागर, सप्रे॑च्या 'झ॑झावात' ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव. धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

सागर Wed, 03/12/2008 - 14:49
धमालराव देशमुख-पाटील, माझा मित्र उदय सप्रे हा शिवरायांच्या इतिहासाने भारुन गेलेला एक उत्तम लेखक आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा असूनही त्याची आणि माझी मैत्री आहे.... हा त्याचा मोठेपणा आहे. लवकरच उदयच्या "झंझावाता"ने अवघे मराठी साहित्यविश्व शिवकालीन होऊन जाईन याची खात्री वाटते... लवकरच माझा मित्र उदय "झंझावात"चा हा संकल्प पूर्ण करेन याची खात्री आहे .... - सागर

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 11:42
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. शंभूराजांना माझेही वंदन! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.

कलंत्री Wed, 03/12/2008 - 19:39
संभाजी महाराज यांच्या आत्मसमर्पणाची आठवण ताजी आहे हे पाहुन बरे वाटले. पण यांच्या आत्मार्पणाची तिथी ही पाडव्याच्या पहिल्या दिवशी पाळायला हवी. औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली पण, बाकी रोमांचकारक सविस्तर नंतर, तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. असो.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 23:56
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. का? आज पाळली म्हणून बिधडलं कुठे? आदराची भावना त्यामुळे थोडीच कमी होणार आहे?? व्यंकटराव म्हणतात ते योग्यच आहे. आपण मंडळी अजूनपर्यंत तारखा-तिथ्यातच अडकलेली आहोत! अर्थात, या निमित्ताने शंभूराजांचे पुष्यस्मरण करून त्यांची शूर आणि दिलेरी वृत्ती अंगी बाणवायची की तारखा तिथ्यांच्या वादात आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत बसायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे! तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. मिपाला तरी ही सूचना पाळणे आवडणार नाही. कारण एखाद्या दिलेर राजाची पुण्यतिथी वर्षातनं दोन दोनदा पाळणे हे मिपा हास्यास्पद, तसेच एक पोरखेळ समजते! आणि कुठल्याही पवित्र गोष्टीचा पोरखेळ होता कामा नये असेही मिपाला वाटते. शंभूराजे हा पोरखेळाचा विषय नक्कीच नाही! हे मिपाचं मत झालं! अर्थात, त्यातूनही एखाद्याने अगदी हट्टाने पाडव्याच्या पहिल्या दिवशीदेखील मिसळपाववर शंभूराजांचे पुण्यस्मरण केले तरी मिपाकरता ते आदरणीयच असेल. कारण मुळात मिपाला शंभूराजांच्या मृत्युच्या तारखेशी अथवा तिथीशी मतलब नसून त्यांच्यातल्या शूर, दिलेर आणि धाडसी वृत्तीशी मतलब आहे! असो.. आपला, (व्यथित) तात्या.

In reply to by कलंत्री

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 18:04
पाडव्याच्या पहिल्या दिवशी ?? ह्यातला पहिला दिवशी हे कळले नाही. चैत्र शुध्द प्रतिपदा- गुढीपाडवा. तो एकच दिवस साजरा केला जातो ना?

उदय सप्रे गुरुवार, 03/13/2008 - 12:25
"औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली " हे अर्धवट सत्य आहे. खरी तिथी फाल्गुन वद्य अमावास्या अशी आहे.आणि ज्या राजाने आपली प्रजा सुखेनैव नान्दण्यासाठी आत्मसमर्पण केले त्या वीर राजाची आठवण पाडव्याला करणे हे पण योग्यच आहे.पण आपण सगळे आता मराठी पन्चान्ग पाळतो का? रोजचा दिनान्क पण मार्च १४ , २००८ असाच लिहितो ना? पाठ्यपुस्तकात पण असेच सन आणि सनावळ्या देतात - सामान्य जनतेला लक्षात राहील असे दिनान्क देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तसे लिहिले होते. असो, सूचना मान्य-मा़झ्यापुरती - कारण मी ऐतिहासिक कादन्बरी लिहितोय आणि मला या तिथी माहित आहेत, मी पाळतो ही, सगळ्यान्ना ते जमेलच असे नाही. चूक भूल द्यावी घ्यावी, आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे. मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.

अनामिका Tue, 04/08/2008 - 17:50
काय दैवदुर्विलास पहा! गेल्याच आठवड्यात विश्वास पाटिल यांची "संभाजी "कादंबरी वाचायला घेतली.एरवी २ दिवसात पुस्तक वाचुन संपवायचे हा माझा निश्चय असतो.पण या वेळेस अंमळ जरा वेळच लागला.शेवटच प्रकरण वाचायला घेतल आणि काहि केल्या पुढे वाचण्याची इच्छाच होईना.शेवटी प्रयत्नपुर्वक वाचुन काढले आणि अख्खा चैत्र पाडव्याचा दिवस रडुन काढला.संभा़जी राजांना दिलेल्या यातना वाचताना सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि ह्रुदय पिळ्वटुन निघाले. मन विषण्ण आणि व्यथित झाल. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बहुमुल्य प्राणांची आहुती दिली आणि आपण मात्र त्यांच्या मुळे मिळालेल स्वत्व सांभाळायला नालायक ठरलो .आज आपण खरच किती हतबल आहोत हा विचार मन पोखरतोय. हा पाडवा मरेपर्यंत स्मरणात राहिल. ह्या माहान वीराला मानाचा मुजरा! "अनामिका" »
११ मार्च ही धर्मवीर संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. सन १६८९ मध्ये ह्या महापुरुषाने आपला देह ठेवला. मुगलानी कपटाने पकडून त्यांना हाल हाल करुन ठार मारले. धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. - (मराठी मावळा) शेखर