मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेश्याव्यवसायाची नैतिकता

धनंजय ·

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:35
धन्याशेठ, तुझ्या काथ्याकुटाचा विषय आवडला. इंटरेश्टींग आहे! :) आता माझी मतं - पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे. मी तर म्हणेन की भीष्मालादेखील स्वप्नदोष (झोपेतल्या झोपेत वीर्यस्खलन) झाला असणार. कारण मनुष्यप्राणी हा स्खलनशील आहे, आणि मेडिकल सायन्स प्रमाणे मनुष्य शरीर हे ठराविक काळापेक्षा अधिक काळ त्याच्या शरीरात तयार होणारे स्पर्मस रोखून ठेवू शकतच नाही. तेव्हा माझ्या मते भीष्म देखील ब्रह्मचारी नव्हता जर तो मनुष्यप्राणी असेल तर! आणि वीर्यस्खलन झाले की ब्रह्मचर्य संपले! मग भले ते १) स्त्रीशी संग येऊन होवो किंवा २) अपना हाथ जगन्नाथ हस्तमैथूनाने होवो किंवा झोपेतल्या झोपेत होवो! जी मंडळी १) व २) प्रमाणे वीर्यस्खलन रोखून धरू शकतात त्यांना निद्रावस्थेत ब्रह्मचर्यभंगाला सामोरे जावेच लागते लागते कारण मेडिकल सायन्सचा तसा नियमच आहे! तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय? माझ्या मते तरी नाही! कारण बाजारी नकद व्यवहारात रोगराईची भितीच अधिक असते. तेव्हा त्या वाटेला न जाणंच अधिक श्रेयस्कर! आणि मी म्हणतो की 'भुरळपाडून',' फूस लावून भोग घेणं' असं तुम्ही म्हणताय खरं पण भुरळ पाडून घेणार्‍याला किंवा घेणारीला ते समजायला नको काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही! तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही. हा हा हा! धन्याशेठ, हा तू भलताच मुद्दा मांडला आहेस. यावर मला ठाम असं एक उत्तर देता येत नाहीये! :) कारण व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर अद्याप तरी मी अविवाहीत आहे आणि अद्याप तरी कुणी कळकळीने माझ्यासमोर ह्या प्रशिक्षणाचा मुद्दा मांडलेला नाही! :) बाय द वे, 'नवविवाहितांना प्रशिक्षण देऊन' असं तू म्हटलं आहेस, त्या ऐवजी अविवाहितांना विवाहाला वर्ष सहा महिने असताना पूर्वप्रशिक्षण देण्यास काय हरकत आहे? भावी वराची/वधूची याला संमती असेल तर फारच उत्तम! बाहेरचे ट्रेनिंग कोर्सेसही जॉईन करायला नकोत! :) जोक्स अपार्ट, परंतु 'प्री मॅरिटल सेक्स' हा माझ्या मते महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात कुणा तज्ञाने मिपावर काथ्याकुटास सुरवात करावी असे वाटते. इथे या बाबत अधिक चर्चा केल्यास विषयांतर होईल! नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे. आहेस खरा तर्कशुद्ध! :) तुझ्या '४अ' या मुद्द्याशी मी पूर्णत: सहमत आहे.... त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला! बहुत करून काही श्रीमंत घरातल्या काही बायका नवर्‍याच्या अपरोक्ष खुलेआम नव्हे, तर ओळखी ओळखीत लपूनछपून दुसर्‍या पुरुषासोबत शैय्या करतात त्यांचे दर आवाच्या सव्वा असतात. माझ्या माहितीत अश्या काही चांगल्या घरंदाज, श्रीमंत, खात्यापित्या घरच्या अत्यंत देखण्या स्त्रीया आहेत! तसेच काही अभिनेत्रीही आहेत ज्यांचा उल्लेख मी रौशनीच्या एका भागत केलेला आहे! अर्थात माझं वरील म्हणणं हे काही अपवादात्मक स्त्रीयांबद्दलच आहे. खुलेआम बाजार मांडून बसणार्‍या स्त्रीयांच्या बाबतीत तू म्हणतोस त्याप्रमाणे 'कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी' हे कदाचित खरंही असू शकेल! तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी. तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्‍हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.) सहमत आहे! याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. हा शेवटचा परिच्छेद अप्रतिम! विचार करायला लावणारा! आपला, (धन्याच्या बुद्धीमत्तेचा फ्यॅन!) तात्या.

मुक्तसुनीत 11/03/2008 - 08:26
सर्वप्रथम , धनंजय यांचे एका उत्कृष्ट लेखाबद्दल अभिनंदन - आणि मिसळपावचेही. धनंजय यांचा आपल्या या लाडक्या स्थळावरचा वावर म्हणजे या स्थळाचा मानबिंदू आहे असे विधान करणे धाडसाचे होणार नाही. धनंजय यानी एका गुंतागुंतीच्या आणि अगदी जुन्या सामाजिक संस्थेविषयी उहापोह केला आहे. ('वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन्' असा उल्लेख वेश्याव्यवसायाबद्दल केला जातो.) त्यांच्या लिखाणाचे एक तात्पर्य असे असू शकते की शरीराचा क्रय आणि विक्रय या गोष्टी स्वत:मधे अनैतिक नाहीत (द ऍक्ट्स इन देमसेल्व्स आर नॉट अन्-एथिकल) . धनंजय यांच्या लिखाणाचा अजून एक अर्थ "या व्यवसायाचा डिफेन्स" असा सुद्धा घेतला जाऊ शकतो. वेगवेगळे मुद्दे मांडून ते निर्विवादपणे सिद्ध करू पाहतात, की या व्यवसायाशी संबंधित असणारे इतर घटक अनैतिक , प्रसंगी सर्वात वाईट , नीच जातीचे गुन्हेगार असू शकतात , परंतु ज्या व्यक्ति (पक्षी : वेश्या) हा व्यवसाय करतात त्या व्यक्तिना अनैतिक म्हणता येणार नाही. पर्यायाने या व्यक्तिंच्या व्यवसायालाही अनैतिक म्हणता येणार नाही. मला वाटते , अशा प्रकारचा डिफेन्स मांडायला धनंजय यांच्यासारख्या अतिशय बुद्धिमान वकिलाची गरज नाहीच. मुद्दा सोपा आहे. तो असा की, या व्यवसायात पडणार्‍या बहुतांश स्त्रिया या त्यांच्या परिस्थितीच्या शिकार असतात. (दे आर द विक्टिम्स ऑफ देअर डायर सर्कम्स्टान्सेस.) सर्व पर्याय उपलब्ध असताना वेश्याव्यवसायात उतरणार्‍या स्त्रिया किती टक्के स्त्रिया असतील यावर संशोधन होऊ शकेल ; पण कॉमन सेन्सने असे म्हणता येईल की, बहुतांश स्त्रिया इतर पर्याय उपलब्ध नसल्याने, बर्‍याचदा बळाच्या वापराने, किंवा कौटुंबिक-सामाजिक परंपरेने या व्यवसायात पडलेल्या असतात. ("पडलेल्या" असतात या क्रियापदावरूनच हे सूचित होते.) आणि यात आपण कायद्याच्या बंधनाच्या आतल्या मुलींचा मुद्दा बाजूला ठेवू - त्याना विक्रीस बसविणे सरळसरळ गुन्हा होय. आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. पण कुठल्याही गोष्टीचा असा संदर्भविरहित अर्थ लावणे - विशेषतः नैतिकतेच्या दृष्टिने - अपुरेच ठरते. सर्व समाजात , सर्व काळात स्त्रियांचे शोषण होते. या शोषणाचा सगळ्यात वाईट बाय्-प्रोडक्ट म्हणजे दि वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन. तळटीप : मित्रानो, माझ्या लिखाणात इंग्रजी शब्द अति आले आहेत. या गोष्टीची मला शरम वाटते. मी अशी आशा करतो की एक दिवस असा येईल जेव्हा मी भेसळविरहित मराठीत लिहायला शिकेन. आमेन :-)

प्राजु 11/03/2008 - 08:32
धनंजय यांनी हा विषय काथ्याकुट या सदरात का टाकला याचाच मी विचार करते आहे. कारण त्यांनी विषय मांडणी इतकी सुंदर केली आहे की इथे चर्चेला जागाच नाही. मुक्तसुनित म्हणतात त्याप्रमाणे- आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. आणि जिथे उत्तरे मिळतात तिथे चर्चा कशावर करणार? एक अतिशय विचार करायला लावणारा आणि सुंदर लेख लिहिल्याबद्दल धनंजय यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. (सर्वव्यापी)प्राजु

सहज 11/03/2008 - 11:30
जगातल्या एका सर्वात जुन्या चर्चाविषयाला (पुन्हा एकदा) हात घातला गेला आहे. नैतिक अनैतिक सर्व सापेक्ष झाले आहे. जगभरातुन अनेक माहितीपट आले आहेत व सर्वात एकच कायम धागा दिसतो की या लोकांचे (बायकांची) फसवणूक, अत्याचार, शोषण. जर का ते थांबले तर या व्यवसायात सहभागी व्हायला किती जणी (जण) येउ शकतील याचे उत्तर मिळणे कठीण नव्हे. मुक्त शारीरिक संबंधाला चालना मिळाली तर जर का हा व्यवसाय कमी होईल असे म्हणले तर पश्चिमात्य देशात हा व्यवसाय कमी व्हायला हवा पण तसे तर दिसत नाही. शिवाय मग मुक्त शारीरिक संबंधाचे तोटे दिसले (वैद्यकिय तोटे) आता भर सुरक्षित शारीरिक संबंधावर जास्त. मधल्या मधे वेश्याव्यवसाय आहे तसा आहेच. उलट (चुकीच्या दिशेने) प्रगत होत आहे. जास्त पैसा येत आहे शेवटी मग पैसा, अज्ञान, पुरवठा, मागणी यांचा जोर वाढुन बाकी सगळे फोल. व्यवसायाचे नाव काही असो सत्य फक्त शोषण, पैसा.

आनंदयात्री 11/03/2008 - 11:07
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. पटले! अन मी एक धाडसी विधान करु इच्छितो, वर उल्लेखलेल्या सर्व दोषांचे (ज्यामुळे हा व्यवसाय अनैतिक आहे) निर्मुलन जरी झाले तरी हा व्यवसाय अनैतिकच राहिल. कारणः वेश्या व्यवसाय जितका जुना तितकाच माणुस हा कळपात रहाणारा प्राणी आहे हे ही सत्य खरे. आपली आजची समाजव्यवस्था ही पोट भरल्यानंतरच्या भुकांची वा मानसिकतेची (जसे प्रेम, भविष्याबद्दलची हवी असणारी निश्चितत) फलित आहे, असे मानण्यास जागा आहे. आयुष्याच्या प्रत्येक पर्वात सर्व सामान्य माणुस हा कोणत्या ना कोणत्या नातेसंबधांवर जगत असतो, जसे लहान असतांना आई वडिलांबरोबर, तारुण्यात प्रेयसी/सहचारिणी बरोबर, प्रौढावस्थेत सहचारिणी बरोबर, म्हातारपणात सहचारिणी अन मुलांबरोबर. आता या सर्व नातेसंबधात सुखी रहायला, अहंकार जपायला त्याने/ तिने व्यवसाय करणे गरजेचे असते, खाणकामगार सुद्धा कष्ट करतांना उद्याच्या सुखी आयुष्याचाच विचार करत असतो/ असावा. वेश्या व्यवसायात जेव्हा आपल्या समाजाचा बेस असणारी कुटुंबव्यवस्थाच जेव्हा बाद होते, तेव्हा हा व्यवसाय अनैतिक ठरतो असे मला वाटते. कारण बहुतांश वेश्यांना कुटुंबे नसतात/ होउ शकत नाहित, त्यांचे उत्तरायुष्य अत्यंत वाईट परिस्थितीत जाते परिणामी 'व्यवसाय' करण्याची कारणे फलित होउ शकत नाहित. प्लस काही प्रमाणात नादी लागलेल्या विवाहित पुरुषांचे सुध्धा संसार उध्वस्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय असावे. चोरी जशी अनैतिक, ती या समाजव्यवस्थेच्या मॉडेलला पुरक नाही तसेच वेश्या व्यवसाय पण अनैतिकच तो ही पुरक नाही.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 12:52
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी या व्यवसायाला जन्म देणारे वि़कृत, षंढ (कितीही आणि कितीही खालच्या शिव्या दिल्या तरी अपुर्‍याच पडतील) पुरुष समाजात होते, आहेत आणि रहातील. ते अशा ठिकाणी जाउन आपली XX XXX घेतात. अशा व्यावासायिक स्त्रिया आहेत म्हणून कित्येक संभाव्य बलात्कार वाचतात / वाचत असतील. (माझा या विषयावर सखोल अभ्यास नाही, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.) ह्याला उपाय म्हणजे १००% सुरळीत समाजव्यवस्था आणि समाजाची १००% सात्विक मनोवृती - दोन्ही गोष्टी अशक्य आहेत! मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 12:59
करा पण, तुम्हाला जर नैतिक असे वाटत असेल तर त्याची काही कारणे द्या ! म्हणजे आम्हाला (म्हणजे माझ्यासारखे मत असणार्‍या) कळेल तरी की हा व्यवसाय नैतिक कसा आहे ते !

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 14:33
प्रथम, मी हा व्यवसाय नैतिक आहे असे म्हटलेले नाही.
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी...
ह्या समाजात अनेक अनावश्यक नैतिक आणि आवश्यक अनैतिक व्यवसाय आहेत. लाच घेणे/देणे, हुंडा घेणे/देणे, राजकारण (विशेषनाम नव्हे.. अनेक व्यवसायांतील राजकारण जे सहकार्‍यांबरोबर, कर्मचार्‍यांबरोबर खेळले जाते) असे अनेक समाजघटक आहेत पण बर्‍याचदा ते करणार्‍यांची प्रतिमा मात्र स्वच्छ असते. वेश्याव्यवसायातही वेगवेगळे स्तर आहेत - काही पैशांसाठी (तर तुम्ही म्हणाल की मग हाच व्यवसाय का.. दुसरे नैतिक व्यवसाय ती करू शकते उदा. एक अशिक्षित बाई भांडी घासणे, घरकाम करणे इ. कामे करू शकते. पण अशा बायकांवरही लांडगे टपलेले असतात. गरीब बाईमाणूस असल्याने काही बोलूही शकत नाही. आणि पाळणाघरात, लेडिज होस्टेलमध्ये प्रत्येक निराधार निरक्षर स्त्रीला काम मिळतेच असे नाही. {म्हणजे भांडीघासणे, घरकाम ही कामे करू नयेत असे मी म्हणत नाही.. तर ते व्यवसायही स्त्री साठी १००% सुरक्षित आहेत असे नाही.}), काही भरपूर पैसा असून नुसतेच मजा करण्यासाठी (समाजातील उच्च स्तरातील बायका) , एखादी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, एखादी पत्नी नवर्‍याच्या आजारासाठी, काही गावी असलेल्या घरी पैसे पुरविण्यासाठी.. अशा एक ना अनेक स्तरातील स्त्रीया असतात. तर प्रत्येक बाई ही आवडीने हा व्यवसाय पत्करत नाही. माझे म्हणणे असे की हा व्यवसाय जरी अनैतिक असला तरी तो आणि असे अनेक व्यवसाय आता समाजाचा घटक आहेत. ("वेश्याव्यवसायारहित समाज" हे हवेहवेसे पण कायम स्वप्नच रहाणार आहे. कारण पुरुष.. ज्याच्या सुप्त भावनेने ह्यास जन्म दिला.) वेळ आल्यावर सगळे पाठ फिरवतात. नातेवाईक मदत करत नाहीत. मार्ग असतो, पण प्रत्येकीला वाईट वेळ आल्यावर सापडतोच असे नाही. काही वाटा चुकतात. वाटेवर यायची काहींकडे अक्कल नसते. म्हणून त्या अनैतिक नाहीत तर व्यवसायाचे मूळ - पुरुष अनैतिक. तरी कृपया अशा अशिक्षित गरजू महिला ज्यांना समाजसेवी संस्थेकडे जायचे सुद्धा ज्ञान नसते, त्यांसाठी आपण नैतिक व्यवसायाचे पर्याय सुचवू शकता का? मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 14:46
आपण माफ केलेत आम्ही उपकृत झालोत. आणी बहुतांश अशिक्षित गरजू महिला नैतिक व्यवसायच करतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे, या कारणामुळे आम्ही कोणतेही पर्याय सुचवु शकत नाही. धन्यवाद.

"मला वेश्याव्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते," असे जवळपास कुणीही म्हणणार नाही. हा 'धंदा' शोषणावर आधारित आहे. बहुतेकांना भुलवून, फसवून ह्या व्यवसायात आणले जाते. तर अनेकांना कमाईसाठी दुसरा कुठला चांगला पर्याय उपलब्ध झाला असता तर ते इकडे वळलेच नसते. त्यामुळे हा व्यवसाय, शोषणावर आधारित इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच, अनैतिकच वाटतो. १. तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?" असे एकाने विचारल्यावर एकीने "मला 'आयएएस ऑफिसर' व्हायचे होते/आहे," असेही सांगितल्याचा एक खरा किस्सा मला एकाने ऐकवला आहे. कदाचित ती 'हाय सोसायटी'ची असती तर तिला असा प्रश्न विचारण्याची हिंमत संबंधिताला झाली नसती. किंवा तिचे असे उत्तर देणे आम्हा खोटारड्या लोकांना हास्यास्पदही वाटले नसते. असो.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 11/03/2008 - 19:51
नुसते वेश्या व्यवासायच का? धुणी भांडी करणार्‍या महिलांना देखिल हा प्रश्न (तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?)विचारला तर "मला हा व्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते" अहे कुणीही म्हणणार नाही.. कारण हे सर्व व्यवसाय समाजात फारसे प्रतिष्ठा नसणारे व्यवसाय आहेत इतकेच.. परंतू त्यामूळे ते 'अनैतिक' असलेच पाहिजेत असे मात्र नाही. धुणीवाली/ भांडीवाली ह्यांच्या कामाला कुणीही अनैतिक म्हणणार नाही!

In reply to by कोलबेर

कोलबेर, धुणीवाली आणि भांडीवाला ह्यांच्या कामाला कुणीच अनैतिक म्हणणार नाही. पण ह्या कामांत शोषण आहेच. ह्या बायांना भविष्यनिर्वाह निधी (प्रॉविडंट फ़ंड), ग्रॅच्युइटी (मराठीत काय म्हणतात), किमान वेतन मिळायला हवे. इतरांसारख्या सुट्ट्या मिळायला हव्यात. आम्ही ह्या गोष्टी देतो काय? नाही! थोडक्यात दोन्ही ठिकाणी सेवा घेणारे अनैतिक कामच करीत आहेत आणि परिस्थिती जैसे-थे राहण्यास कळत-नकळत कारणीभूतही ठरत आहेत.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 14/03/2008 - 03:18
बरोबर... धुणी वाली आणि वेश्याच कशाला..अगदी (काही) सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही हे शोषण चालते..आणि कसल्याही प्रकारचे शोषण हे अनैतिकच त्यात काहीही वाद नाही..पण म्हणून सरसकट संपूर्ण व्यवसायच अनैतिक म्हणता येईल का?..समजा वेश्या व्यवसाय कसलेही शोषण न होऊ देता चालवला तरीही तो अनैतिकच ठरेला का?

१) कोठेवाली/घरवाली ही व्यावसायिक; वेश्या ही नोकरदार/गुलाम (अनुभवातुन तीच पुढे व्यावसायिक होउ शकते) आणि ग्राहक हा गिर्‍हाईक. २) कुठलाही व्यवसाय हा ग्राहकांच्या गरजेतून निर्माण होतो. ३) नैतिक / अनैतिक, प्राकृत / विकृत सापेक्ष आहे ४) ही तुलना भुक लागली असता व घरात अन्न नसता उपहारगृहात जाणे, डबा लावणे किंवा उपाशी राहणे याच्याशी करुन पहा. ५) ही तुलना नाट्यनिर्माता , रंगकर्मी व मायबाप प्रेक्षक यांच्याशी करुन पहा ६) गणिका व्यवसाय हा पुर्वीपासुन आहे. योग्य/अयोग्य ही मतमतांतरेही पुर्वीपासूनच आहेत. ७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय? ८) हा व्यवसाय नसता तर बलात्काराचे गुन्हे वाढले असते असे म्हणणे म्हणजे या व्यवसायाचे समर्थन करणे होत नाहि. तो प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व सारखा आहे. ९) योनिशुचिता जशी गौण व्हायला लागेल तसा हा व्यवसाय वाढीस लागेल १०) वेश्यांच्या जागी आपल्या आया बहिणि असत्या तर? याचे चित्र डोळ्या समोर आणा. असे करताना स्वामी विवेकानंद यांची शिकागो ला वेश्यावस्तीकड फेरफटका मारताना " या तर आमच्या भगिनी आहेत" या बोधकथेतील वाक्याची आठवण करुन पहा. ११) http://www.misalpav.com/node/114 इथ 'पोटाला नाही आटा अन चोटाला उटण वाटा 'इथे ओशाळणारी अश्लिलता आठवते. १२) क्या करें शेवटी अपना अपना हाथ अपना अपना जगन्नाथ प्रकाश घाटपांडे

अनिकेत 11/03/2008 - 16:25
अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि बायका, हे कायमच नफा देणारे धंदे होते आणि आहेत. युरोपातील वेश्याव्यवसायावर ही एक थरारक documentary आहे.. आपल्याकडे जे नेपाळमधे किंवा गरीब राज्यांत होते तेच पूर्व युरोपातही होते. येथे नैतिकतेच्या गप्पा मारण्याआधी अवश्य पहा. पण अधिक पैशांसाठी (गरजेपोटी नव्हे!) धंदे करणार्‍या कॉलेजातील पोरी अथवा डेली सोपमधील नट्यांचा उपभोग घेण्यात गैर आहे असे मला वाटत नाही. अनिकेत

नैतिक, अनिकतेचा विचार करण्याअगोदर आमचे मत असे आहे की, वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. जशी श्रमाला प्रतिष्ठा आहे,त्या प्रमाणे. ती मिळाली की नैतिक, अनैतिक राहणार नाही असे वाटते. पण, व्यवसाय म्हणतांना वेश्यांना आर्थिक गरजा भागवता येत नाही, म्हणुन त्या वेश्या व्यवसाय करतात. जर आर्थिक संपन्नता असेल तर त्या या गोष्टीकडे वळल्या असत्या का ? याचे उत्तर मला तरी 'नाही' असेच वाटते. ती सामाजिक गरज असेलही पण प्रतिष्ठा नसल्यामुळे मोठ मोठ्या मॉल्स मधे माणूस जितक्या सहजपणे प्रवेश करतो तितक्या सहजपणाने वेश्येच्या वस्तीत प्रवेश करण्याचे धाडस करतो का ? 'नाही'. म्हणुन समाधानासाठी ( आर्थिक सुबत्ता इथे प्रश्न नाही ) येणार्‍या स्त्रिया वेगळ्या. पण अधिक नफ्यासाठी व्यवसायात येणार्‍या या गरजू स्त्रिया आहेत, आणि त्यातही उच्च गरजा पूर्ण करण्यासाठी या अशा व्यवसायात तरुण मुली, स्त्रिया दिसतात. पण,योनिशुचिता ही व्यवसायातील/ बाजारपेठेतील मुख्य अडचण असल्यामुळे येत्या काळात वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल आणि तीही भारतात यावर माझा तरी विश्वास नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वस्तूंच्या अगर सेवा पुरविण्याच्या व्यवसायात आणि या व्यवसायात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे शरीराच्या मर्यादा व मनाचे आस्तित्त्व . या मर्यादांमुळे तिला ग्राहक नाकारण्याचा हक्क असायला हवा. असे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच फूट उंच व ४० किलो वजनाच्या स्त्रीकडे १२५ - १५० किलो वजनाचा सहासाडेसहा फुटी माणूस किंवा गलिच्छ किळसवाणा पण भरपूर पैसे मोजायला तयार असणारा श्रीमंत माणूस, पोलीस, गुंड वगैरे व्यक्ती आली तर तिने काय करावे? ४अ मुद्याबाबत बहुतेक लोक सहमत होतील. असो. एक चांगली चर्चा. धन्यवाद.

धनंजय 12/03/2008 - 02:56
आणि नवीन मुद्दे आले आहेत. असे वेगवेगळे विचार वाचून चर्चा प्रगल्भ होत आहे. तात्यांनी उल्लेख केलेला विवाहपूर्व संबंधांचा मुद्दा अवांतर नाही. अविवाहित व्यक्तीला लबाडीने भोग घेणे आणि विकत भोग घेणे हे दोनच पर्याय नाहीत. दोघांच्या स्वातंत्र्यास धक्का न देता, दोघांच्या भावनांची कदर करून, दोघांच्या गरजा भागवणे हा पर्याय आहेच. या बाबतीत "दोघांच्या भावनांची कदर, स्वातंत्र्य" यांना मी बर्‍यापैकी कडक निकष लावतो तो मागे एका कवितेत चर्चिला आहे. हा पर्याय असणे माझ्या विचारधारेला समर्थन देतो - कारण हा राजमार्ग असताना जो अविवाहित व्यक्ती वेश्याबाजारामुळे चळतो, तो त्याच्या इच्छेने, वेश्याबाजाराच्या अनैतिक भुरळीमुळे नाही. काही वेश्यांना पुष्कळ शुल्क मिळते हे खरे आहे. कालच न्यू यॉर्क राज्याचे राज्यपाल गोत्यात अडकले (दुवा) त्या ठिकाणच्या वेश्या ताशी १०००-५००० डॉलर दर लावत. अशा वेश्यांना बहुतेक नकाराधिकाराचे, किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य असावे. येथे राज्यपाल स्पित्झर हे विवाहित आहेत की नाहीत, त्यांच्या कुटुंबसंस्थेवर काय परिणाम होत आहे, हे बघण्याची मुख्य जबाबदारी स्पित्झर यांचीच आहे, ते जिला भेटले त्या "क्रिस्टेन"ची (विक्रेती म्हणून) नव्हे. जर हा बाजार खरोखर मुक्त आणि स्वतंत्र व्यक्तींमधला असेल तर हा माझ्या आर्थिक चर्चेतून निसटतो. तो मी केलेल्या वेगळ्या चर्चेत याच्या नैतिकतेचा विचार व्हावा - त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांस पूर्ण माणुसकीने वागवत आहेत की नाहीत. तेही होत असेल - कोणी कोणाला जनावर किंवा वस्तू म्हणून वागवीत नसेल तर या विषयाबद्दल मला वेगळे कुठले नैतिक कुतुहल नाही. तरीही हा अपवादात्मक, दुर्मिळ मालाचा व्यापार आहे. माझा मुख्य मुद्दा बहुसंख्य वेश्यांबद्दल आहे, ज्या पूर्ण स्वातंत्र्याने व्यापार करत नाहीत. मुक्तसुनीत म्हणतात (शिवाय वेगळ्या शब्दांत प्राजु, चित्तर, अनिकेत यांनी दिलेली चित्रफीत, म्हणतात) की पर्याय उपलब्ध असताना हा पेशा कोणीही स्वीकारणार नाही. यात बळजबरी, किंवा अगतिकता आलीच. (याला अपवाद स्पित्झर यांस विक्रय करणारी, वगैरे असेल - आपल्याला माहीत नाही.) मीही तो अगतिकतेचा मुद्दा आर्थिक ताळमेळ लावून करू इच्छितो. तो मुक्तसुनीत म्हणतात तसा सोपा नाही. मागे मुंबई पोलिसांनी "सोडवलेल्या" काही वेश्यांबद्दल ऐकले होते. त्यांचे म्हणणे होते की आम्ही स्वखुषीने धंदा करत आहोत. सोडवणूक नको होती. अनिकेत यांनी दिलेल्या चित्रफितीतही काही वेश्यांचे असे मत होते, की जर इंग्लंडमधून हद्दपार होणार असतील तर गुलामगिरीतून सोडवणूकच गैरसोयीची. (इथे अगतिकता थेट दिसते, पण मुंबईत सोडवलेल्या वेश्यांच्या बाबतीत ते स्पष्ट दिसत नव्हते.) माझ्या समान मनुष्य म्हणून त्या "आपखुषी" वेश्यांची साक्ष खरी मानण्यास माझी तयारी असलीच पाहिजे. दुसर्‍या कुठल्या बाबतीत थोडाफार अगतिक असल्याचा माझा अनुभव आहे, म्हणून त्यांचे "आपखुषीचे" विश्लेषण करू इच्छितो. आर्थिक गणित करून त्यांचा बाजार स्वातंत्र्याचा नाही हे दाखवतो. सर्वच वेश्या आपण नाखुषीने या धंद्यात आहोत अशी तक्रार करत असतील (म्हणजे कारकूनही तक्रार करतात, त्यांपेक्षा जास्त!) तर या लांब सिद्धतेची गरज नव्हती. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही (टंकनदोष सुधार केला). सहज आणि काही वेगळ्या पद्धतीने प्रकाश घाटपांडे विचार करतात की येथे नैतिक/अनैतिक सापेक्ष आहे, किंवा होऊ लागले आहे. त्या दोघांच्या बहुतेक मुद्द्यांचा मी स्वीकार करत असलो तरीही पूर्ण सापेक्षता नाही असे माझे मत आहे. अधिकाधिक सापेक्षता मानूनही नैतिकतेचा विचार केला जाऊ शकतो, असे मला या चर्चेत म्हणायचे आहे. स्वातंत्र्यहरण आणि मनुष्य-मूल्य-समानता (मूल्य=किंमत) या सापेक्ष मानू नयेत, असे मला वाटते. या नैतिक मूल्याला (मूल्य=तत्त्व) इंग्रजीत गोल्डन रूल असे म्हणतात. "जसे माझ्याशी वागणे इष्ट तसे सर्वांशी वागणे इष्ट, जसे माझ्याशी वागणे अनिष्ट तसे सर्वांशी वागणे अनिष्ट". "इष्ट" म्हणजे मला जपणे, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मला स्वस्त न करणे. हे कमीतकमी तत्त्व सापेक्ष मानू नये. बाकी प्रकाश घाटपांडे म्हणतात तसे वेश्यांना आयाबहिणी मानूनच त्यांच्या व्यापारातील स्वातंत्र्याचे विश्लेषण करतो आहे. "७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?" हे अगदी चपखल माझे तर्कशास्त्र आहे - फक्त माझा निष्कर्ष आहे की विद्यापीठाशी वाटाघाटीत माझ्या बुद्धीचे मूल्य ठरवण्याचे मला जितपत स्वातंत्र्य आहे, तितके स्वातंत्र्य शरीरविक्रीच्या वाटाघाटीतही असले पाहिजे. माझ्या गणिताप्रमाणे तितके स्वातंत्र्य नाही, त्याहून खूपच कमी आहे, त्यामुळे ती बाजारपेठ अनैतिक मानावी. सहज विचार करतात की मुक्त शरीरसंबधाची मुभा असलेल्या पाश्चिमात्य देशांत वेश्याबाजार अजून कार्यरत का? त्याचे कारण हे असावे की मुक्त (मोफत) भोग घेणारे व्यक्ती आणि विकतचा भोग घेणारे व्यक्ती बहुधा वेगवेगळे असावेत. "मोफत" शरीरभोग घेण्यात भावनांचा, वेळेचा खर्च करावा लागतो, हे विसरता कामा नये. तो खर्च करण्यास जे असमर्थ आहेत, त्यांना कदाचित रोख व्यवहारच सोपा जात असावा. मनस्वी आणि घाटपांडे "या सेफ्टी-वाल्वमुळे काही संभाव्य बलत्कार टळतात" त्याच्याकडे लक्ष वेधतात. हा मुद्दा वेश्याव्यवसाय या संदर्भात लागू तर आहेच. पण नैतिकता या संदर्भात लागू नाही असे तेही म्हणतात, ते योग्यच. मनस्वी अन्य कामधंद्यासाठी मुभा नसलेल्या स्त्रियांच्या अगतिकतेबद्दल सांगतात. पण या अगतिकतेमुळे त्या कामाला लागलेल्या स्त्रियांना शुल्क ठरवायचे स्वातंत्र्य नाही हे त्यांचे मत आहे, असे त्यांच्या लिखाणावरून मी समजतो. प्राडॉ मुद्दा उपस्थित करतात की या श्रमाला प्रतिष्ठा नाही; योनिशुचितेचे स्तोम आहे, याची आठवण देतात. सुधीर कांदळकर सांगतात की सेवा पुरवण्याबाबत नकाराधिकार असल्याशिवाय हा व्यवसाय अन्य व्यवसायांपेक्षा जाचक आहे, हे पटण्यासारखे आहे. कोलबेरही श्रमबाजाराची नैतिक तत्त्वे लागू व्हावीत, अशा मताचे दिसतात. सर्वांपेक्षा आनंदयात्री वेगळा दृष्टिकोन आणतात. त्यांचे मत असे की वेश्याव्यवसाय हा समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या कुटुंबसंस्थेला घातक आहे. यातही ते दोन्हीकडून विचार करत आहेत ही त्यांच्या विचारातील प्रगल्भता आहे. वेश्येला कुटुंबसुख नकारले जाते हा त्यांचा मुद्दा एक आगळीवेगळी सहानुभूती दाखवतो. वेश्येला जोडीदार-पती मिळण्याचे सौख्य नाही, हे व्यापाराच्या दृष्टीने सक्तीचे नाही, तरी आजच्या समाजातली परिस्थिती आहे. शारिरिक इजेसारखी ही मानसिक इजा आहे. अशा प्रकारची प्रीति-वैफल्याची मानसिक इजा काही थोड्याच काही व्यवसायांत होते. कुठल्याकुठे वर्षानुवर्षे पोस्टिंग झालेले सैनिक, खतरनाक व्यवसायामुळे षंढत्व आलेले कामगार, वगैरे. या कामगारांना या इजेच्या बदल्यात ज्या प्रकारचा मोबदला मिळतो, तितपत मोबदला वेश्येला मिळाला नाही, तर तो व्यापार योग्य मूल्याचा कसा म्हणावा. (वर तात्यांनी उल्लेखलेल्या उच्चवर्गीय वेश्यांना जोडीदार-पतीचे सुख मिळत असते, ते अपवादात्मक. तसेच प्रसिद्ध सिनेनट-नट्यांना पुढे जोडीदार करता येत असावा. पण त्यांचे सेवाशुल्क बघितल्यास व्यापारातील त्यांचे स्वातंत्र्य, नकाराधिकार, वगैरे बाजारबसव्यांपेक्षा अधिक असतो हे दिसते.) वेश्यागामी व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त होते, हा दुसर्‍याबाजूनेही आनंदयात्री विचार करतात, तो योग्यच. पण त्याविषयी वरील लेखात मी थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. एक मुख्य की त्यांचे मुद्दे व्यक्तींच्या कुटुंबाचा घात होण्याबद्दल आहेत. समाजात कुटुंबव्यवस्था नष्ट होण्याबद्दल नाहीत. दुसर्‍या कोणाचे तेही मत असू शकते. पण वेश्याव्यवसाय हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे, हे चर्चेत अनेकांनी नमूद केले आहे (वर्ल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन). त्या अर्थी वेश्याव्यवसाय हजारो वर्षांत समाजातील कुटुंबव्यवस्थेला नाहिसे करू शकला नाही, त्यात तेवढी शक्ती नाही, हे उघडच आहे. मला वाटत होते की केवळ "अनेकांशी भोग भोगणे अनैतिक हे गृहीतक मानावे" असे म्हणणारे कोणी चर्चेत सहभागी होईल. त्यांच्याशी माझा वेगळा वाद झाला असता - बहुतेक एकमेकांचे मुद्दे पटले नसते. पण तेही उद्बोधक ठरले असते.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:46
>>> मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक आहे. या ऐवजी मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही. असे वाचावे.

विसुनाना 12/03/2008 - 12:38
कालपासून चर्चा वाचत असलो तरी प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळाला नाही. चर्चेचे प्रस्तावक आणि संचालक श्री. धनंजय यांनी चर्चेचा गोषवारा घेतल्यामुळे चर्चा संपली की काय अशी शंका आली. परंतु विषय फारच व्यापक असल्याने ती पुढे सुरू राहील असे वाटते. म्हणून माझेही मत - चर्चा 'वेश्या व्यवसायाची नैतिकता/अनैतिकता' या विषयावर सुरू असली तरी केवळ स्त्री वेश्यांपुरतीच मर्यादित राहिली काय अशी शंका येते. वेश्यांमध्ये लिंगपरत्वे तीन प्रकार आहेत - पुरुष वेश्या - (जिगोलो), क्लीब वेश्या आणि स्त्री वेश्या. हे तीन्ही व्यवसायप्रकार फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत. शिवाय समलैंगिक वेश्यावृत्ती आणि विषमलैंगिक वेश्यावृत्ती यांच्याबाबतही विचार झाला पाहिजे.(केवळ समलैंगिकता या विषयावर अथवा मानसिक लैंगिकता या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकेल.) माणूस हा विचारशील असला तरी प्राणी आहे. :) वंशसातत्य टिकवणे हा त्याच्या अस्तित्वाचा इतर सर्व जीवसॄष्टीप्रमाणे एक प्रमुख (कदाचित एकमेव) हेतू आहे. आणि त्यामुळे त्याला शारिरिक आणि मानसिक लैंगिक गरजा असणारच. शिवाय समलैंगिकता अनेक प्राण्यांमध्येही आढळते. निसर्गतयः अनेक भागिदारांशी संबंध ठेवण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये दिसते.या सर्व संबंधांत पशूनरांची अनेक पशूमाद्यांशी संबंध जास्त आढळतात. याउलटही काही उदाहरणे आहेत. या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करण्याची 'गरज' माणसानेच निर्माण केली आहे. कारण केवळ पशुत्वाप्रमाणे संबंध नियंत्रित केले असते (किंवा अनियंत्रित ठेवले असते तर) तर मानवसमाजातील अनेक कमजोर, दुबळ्या नरांना त्यांचे वंशसातत्य टिकवणे अशक्य होऊन बसले असते. याशिवाय अनेकसंबंधी लैगिक वर्तनामुळे शारिरिक रोगांचेही प्रमाण वाढून समाजाचा र्‍हास होण्याची शक्यता मानवाने पूर्वीच हेरली असावी. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे एकूणच लैंगिक नैतिकता (पक्षी -समाजाने मान्य केलेले शरीरसंबंध) ही मानवसमाजाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनातून निर्माण झाली आहे.किंबहुना विवाहसंस्थेचे मूळही यातच आहे.लैगिक अनैतिकता हा सर्वाधिक सामाजिक तुच्छ्तेचा आणि घृणेचा विषय आहे. Morality: the character of being in accord with the principles or standards of right conduct; right conduct; sometimes, specif., virtue in sexual conduct त्यामुळे एकाद्या व्यक्तीच्या विवाहबाह्य, विवाहपूर्व अथवा समलैंगिक संबंधांकडे समाजाने अनैतिक म्हणून पहाणे स्वाभाविकच आहे. वेश्याव्यवसाय यात मोडतो हे स्पष्टच आहे. परंतु कोणत्याही गरजा विचारांच्या सहाय्याने काबूत ठेवायच्या किंवा नाही ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. काही लोकांच्या गरजा विचारांवर मात करण्याइतक्या प्रबळ असू शकतात. तर काही लोकांना मिळणारे प्रलोभन हे विचारांवर मात करणारे असते. हे केवळ लैंगिक गरजांबाबतच नव्हे तर इतरही सर्व गरजांना लागू होते. यातूनच सामाजिक हिताची नैतिकता भंग होण्याची शक्यता निर्माण होते. (इथे पुलंचे रावसाहेब आठवतात - 'तुम्ही पण शहाणेच की वो! म्हणे चोरी कशाला करायची, मागून घ्यायचे...'किंवा 'घरी एक चांगलं सुख मिळत असलं तर माणूस बोगारवेशीत कशाला जातंय वो?') Ethics: the system or code of morals of a particular person, religion, group, profession, etc. त्यामुळे एखाद्या माणसाने स्वतःचे वर्तन हे नैतिक किंवा अनैतिक ठरवणे हा ज्याचात्याचा अधिकार आहे. असा गुंतागुंतीचा मामला आहे. माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी. (उदा. उच्चभ्रू स्त्री वेश्या, पुरुष वेश्या आणि क्लीब वेश्या.) अलेक्झांडरसारख्या पुरुषाबरोबर हेफायस्तियनचे समलैगिक संबंध होते. हेफायस्तियन हा एक प्रकारे पुरुष वेश्याच होता असे म्हणावे लागेल. तसेच काही देशात/प्रांतात (जसे गोवे - भाविणी) वंशपरंपरेने काही स्त्रिया हा व्यवसाय करतात. त्यात त्यांच्या आर्थिक फायद्याचा मोठा वाटा असतो. 'राख' हा प्रकारही याच पद्धतीचा आहे. अर्थात या भागिदारांमधील एक किंवा दोन्ही विवाहित असतील तर त्यांच्या इतर (वैवाहिक) भागिदारांचे या व्यावसायिक संबंधांमुळे (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही ना? याचाही या नैतिकतेच्या व्याख्येत विचार करावा लागेल. पण व्यावसायिक शरीर संबंधात जर कोणत्याही बाजूचे (आर्थिक, शारिरिक, मानसिक) नुकसान होत असेल तर मात्र तो अनैतिक आहे असे म्हणावे लागेल.बारबाला या कितीही उत्कृष्ट नृत्यांगना असल्या तरी त्यांच्या नृत्यातला शारीरभाव आणि कामुकता यांचा वापर त्या आर्थिक फायद्यासाठी करत होत्या हे उघड आहे. त्यामुळे अनेक पुरुषांचे आर्थिक नुकसान झाले. म्हणून तो व्यवसाय अनैतिक. केवळ अंधश्रद्धेमुळे (जसे जट आली म्हणून देवदासी) एकाद्या व्यक्तीला तिच्या मनाविरुद्ध/ तिला न कळता या व्यवसायात ढकलणे अनैतिक. गरीबीमुळे एखाद्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध हा व्यवसाय करायला लावणे अनैतिक. वेश्येच्या संबंधांमुळे जर लैंगिक आजार होणार असतील तर ते अनैतिक. रखेलीमुळे वैवाहिक जीवनात पत्नी, मुले यांची आर्थिक, मानसिक कुतरओढ झाली तर ते अनैतिक.अशी अनेक उदाहरणे देता येतील. सध्या इतकेच. श्री. धनंजय आणि इतरांची मते कळावीत. अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)

In reply to by विसुनाना

अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)
हे अवांतर नसुन मला तर समांतर वाटते. मी मराठी वरील ही चर्चा मी पाहिली नाहि. पण अशा प्रकारची मते नवीन नाहीत. आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव प्रतिवादकाच्या चेहर्‍यावर नक्कि असणार. "एवढा गरिबीचा कळवळा आहे तर आपल्या घरातील संपत्ती का नाही वाटून टाकत?" "एवढा पुळका आहे तर स्वतःच्या घरात ठेउन घ्यायचे!" "आम्ही काय अन्नछ्त्र उघाडल नाय, यवढ आसन तर सोताच्या घरात जेवायला बोलावचं" वगैरे वगैरे सदृश विधाने आपण नेहमी ऐकत असतो. जंगल कमी झाल्यावर बिबटे मानवी वस्तीत शिरतात. पाण्यासाठी ,अन्नासाठी; प्रजोत्पादनासाठी नव्हे. मग बिबट्यांच्या नावे हाकाटी होते. "एवढी बिबट्याच्या भुकेची काळजी आहे तर आपली मुल जाउ द्यात कि बिबट्याच्या तोंडात?" अशी पण चर्चा सुरु होउ शकते. "समजा ज्यांना हा सेफ्टी व्हॉल्व वाटत नाही त्यांच्या घरातील स्त्रिया समाजातल्या पुरुषी कामांधतेला बळी पडल्या तर?" असाही प्रश्न उपस्थित होतो. या आहेत म्हणुन आपल्या आयाबहिणि सुखाने जगताहेत (त्यातल्या त्यात) . स्वामी विवेकानंदांनी म्हणुन तर त्यांना भगिनी म्हटलं . अस मानणारा एक लोक प्रवाह आहे. मुरळ्या, देवदासी या समाजातील धर्मलंडांची सोय व्हावी म्हणुनच निर्माण झाल्या. त्याला 'द्यवाची शेवा' असा धार्मिक पाठिंबा दिला. मूळ प्रश्न असा आहे कि लैंगिक भुक भागली नाही म्हणुन माणुस मरत नाही. पण लैंगिक भूक हि नैसर्गिकच आहे. ती शमली नाही तर समाज स्वास्थ्य टिकेल का? असा आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 12/03/2008 - 15:37
आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव चेहेर्‍यावर होताच. चर्चेतले एक ऐकीव मत (माझे नव्हे) म्हणून अवांतरमध्ये नोंदवले. आपलेही मत ग्राह्य आहेच.

In reply to by विसुनाना

धनंजय 17/03/2008 - 08:01
तुमच्या पुढील म्हणण्याशी सहमत :
माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी.
वेश्याव्यवसायाच्या बाबतीत नैतिक गणित करत असताना या तीन प्रकारच्या शरीरविक्रेत्यांत मूलभूत फरक करून काही हशील नाही. पण तपशिलांत फरक येऊ शकेल. सामाजिक गुप्ततेमुळे आर्थिक/मानसिक/शारिरिक फायद्या-तोट्याचे गणित तिघांमध्ये वेगवेगळे येऊ शकेल. त्यामुळे एखादी बाजारपेठ कमीअधिक प्रमाणात अन्याय्य असू शकेल. या चर्चेत मी बहुतेक शरिराच्या क्रय-विक्रयाबाबत विचार केला आहे. त्यामुळे बाजार मुक्त की नाही, विक्रेत्याला आणि ग्राहकाला किंमत ठरवण्याचे किंवा नकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही, अगतिकतेमुळे अयोग्य किंमत ठरवली जात आहे की नाही, या निकषांवर न्याय-अन्याय ठरवता येतो. क्रय-विक्रय नसला तर माझ्या मते लैंगिक संबंधांच्या नैतिकतेचे वेगळे निकष असावेत - कारण बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण करता येत नाही. मग ते विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध कुठले का असेनात. बाजारात आपल्याला बराच थोड्या वेळाचा, मुदतीचा विचार करावा लागतो. देण्या-येण्याचा हिशोबखाते किंमत भरल्यानंतर सामान्यपणे बंद केले जाते. (किंवा किंमत आगाऊ दिल्यास सेवा पुरवून झाल्यानंतर हिशोबखाते बंद केले जाते.) पैशांचे हस्तांतरण होत नसेल तर हिशोबाच्या खात्याची मुदत लांब असते. त्यामुळे नैतिकता ठरवण्यासाठी सामान्य बाजाराचे निकष वापरता येणार नाहीत. तेही मूलभूत निकष विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध सर्वांनाच सारखे असावेत. कोणाचेही मानव्य मूल्य स्वस्त होता कामा नये. सामाजिक परिस्थितीमुळे विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक या प्रकारांत "मानव्य मूल्य राखणे" कमीअधिक कठिण असेल, हे तपशील वेगळेवेगळे असतीलच. "सेफ्टी वॉल्व" उपमा ठीक आहे. पण कोणीही "सेफ्टी वॉल्व" होण्यासाठी औदार्य मागणे ठीक नाही. आजकाल ज्यांना आपण प्राण देण्याचे औदार्य मागतो (खाणकामगार, अग्निशामक, सैनिक, वगैर,) त्यांना त्या मानाने शुल्क देतो. इतकेच काय सैन्यातले अधिकारी पगाराबद्दल बोलले, पगारवाढीबद्दल बोलले, तर आपण त्यांना "उदार व्हा" असे म्हणून चूप करत नाही. तसेच "उदारपणे सेफ्टी वॉल्व व्हा" म्हणून अन्याय्य बाजारात बोळवण करू नये.

लिखाळ 13/03/2008 - 20:32
धनंजय, अतिशय छान लेख. .... नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. खरेच असेच वाटते. पण यावर अनैतिकतेचा शिक्का सर्व समाजात आहेच. पहा ना आत न्युयॉर्क मधले प्रकरण. यात पैशाच्या अपव्ययाबद्दलची ओरड आहे तसेच वश्या प्रकरण हा सुद्धा महत्वचा नैतिक मुद्दा आहे. वरचे सर्व प्रतिसाद वाचून झाले नाहित. वाचत आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

कोलबेर 14/03/2008 - 03:47
विसुनानांच्या प्रतिसादातुन ह्या विषयाला असणारे अनेक कंगोरे दिसल्याने आम्हीही आमचे पावशेर त्यात टाकतो आहोत :) मुळातच 'वेश्याव्यवसाय' ह्याची सामाजिक व्याख्या आपण समजतो तितकी संकुचित नाही. पैसे मोजुन शरिर उपभोगायला देते ती वेश्या इतकाच अर्थ 'वेश्या' शब्दातुन अभिप्रेत नाही. त्यालाही अनेक कंगोरे आहेत. एखादी स्त्री जेव्हा कामात बढती मिळवण्यासाठी (आपला स्वार्थ साधुन घेण्यासाठी..विशेषतः सिनेजगतात) वरिष्ठांना शरीर भोगायला देते अश्या स्त्री ला देखिल 'वेश्या' असेच संबोधले जाते.. म्हणजेच शरीर भोगायला देण्यामागे 'पैसे' हाच एकमेव मोबदला दरवेळेस असेल असे नाही.बर्‍याचदा अश्या स्त्रियांविषयी बोलताना अमकी अमकी पेक्षा, 'सरळ पैसे मोजुन घेणारी वेश्या बरी!( नैतिकतेच्या दॄष्टीकोनातुन)' असा देखिल उल्लेख केला जातो.. म्हणजेच जेव्हा जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही मोबदल्यासाठी/फायद्यासाठी एखाद्याला संभोग करु देते ती वेश्या अशी व्याख्या योग्य ठरेल का?..तर नाही..करण कधी कधी एखाद्या मुलीला आपल्या मना विरुद्ध लग्न करावे लागते. अशा वेळेस प्रेम दुसर्‍या कोणावर जडले असले तरी समाजाच्या दबावाला बळी पडून लग्न तिसर्‍याशीच केले जाते. ह्या स्त्रियांना देखिल आपल्या मनाविरुद्ध आपले शरीर दुसर्‍याच व्यक्तिला अर्पण करावे लागते( समाजाच्या कडवेपणा टाळण्याच्या मोबदल्यात)..पण त्याला मात्र कुणीही वेश्या/अनैतिक म्हणू शकत नाही. तेव्हा ही व्याख्या देखिल बाद!! थोडक्यात विषय दिसतो तितका सोपा नाही..:)

संस्कृत साहित्यात आपला संबंध वारंवार गणिका ह्या पात्राशी येतो. किंबहूना विदूषक आणि गणिका संस्कृत साहित्याचे अभिन्न अंग आहेत. ती गणिका देहविक्रय करतेच असे नाही तर काही गणिका केवळ आपल्या गाण्याने अथवा नृत्याने ग्राहकांची घटकाभर करमणूक करणार्‍या सुद्धा असतात. तसेच ह्या गणिका चाणाक्ष असतात आणि हेरगिरीसाठी त्यांचा फार उपयोग केलेला आढळतो (माताहारी सारखा). चाणक्याने हेरगिरीसाठी सुंदर, बुद्धिमति गणिकांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

बंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एक नाट्यप्रयोगा बद्दल माहिती http://www.indiatogether.org/2008/mar/wom-dhande.htm इथे वाचा. मीन सेशू या सामाजिक कार्यकर्तीने वेश्या अन्याय मुक्ती परिषद (VAMP) व संग्राम या एनजीओ च्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतात. त्यांनी ही निर्मिती केली. सुषमा देशपांडे यांनी दिग्दर्शीत केलेला प्रयोग या दुर्लक्षित विषयावरचे जनजागरण आहे. प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश 16/03/2008 - 15:27
वैश्या बनणे हे नैतिक की अनैतिक हा चर्चेचा विषय निवडण्याबद्दल धनंजय यांचे अभिनंदन वर अनेक घटकांचा उत्तम उहापोह झाला आहे. धन्ंजय यांचा सारांशही रोचक आहे. मी जरा उशीराच चर्चेत प्रवेश करत आहे. असो. वैश्या व्यवसायाची नैतिकता.. यात वैश्या 'व्यवसाय' हा शब्दच मला खटकतो. या बाजारातील प्रत्येक विक्रेती ही "व्यावसायिक"च असते असे नाहि. कित्येक जणी (किंवा बहुतांशजणी?) ह्या नोकर असतात. खरा व्यवसाय कोणीतरी वेगळीच व्यक्ती करत असते. तेव्हा या प्रकारास केवळ एक व्यवसाय ना नजरेतून बघणे मला सर्वस्वी चूक वाटते. आता नोकरीचे निकष लावा पाहु. आमच्या (आयटी) नोकरीशी तुलना करू. आमच्याकडे उत्तम जाहिरातीसाठी नोकरदार मंडळीनी केलेली आधीची प्रोजेक्टस बढवून नवीन क्लायंटला ऐकवली जातात, कधी एखादा क्लायंट आपखूशीने कंपनीचे नाव सुचवतो, क्लायंटने दिलेल्या पैशातून त्यात काम केलेल्यांचे पगार वगैरे तर होतातच शिवाय मुळ व्यावसायिकाला उत्तम मोबदला मिळतो, अनेकदा बराच एक्पिरियन्स झाला आणि तुमच्यात 'गुण' असतील तर बढती मिळते/पगारवाढ मिळते/आपल्या हवे तेच काम करायची संधी दिली जाते, एरवी इथे काय काम करायचे, कीती करायचे, कधी करायचे हे तुमच्या हातात नसते. आता हे सगळं वैश्यांनाही लागु होत नाहि का? मग हा व्यवसाय कसा? ही तर नोकरी !!! आणि नोकरी करतान सुरवातीला चॉईस नसतो त्यात ही नैतिकता कुठे? (निदान सुरवातीला) बर्‍याचजणांचे नोकरी असते म्हणून घर चालते (फार तर फार एका व्यावसायिकाची नोकरी आवडली नाहि तर दुसरा जॉईन करता येतो ) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मित्रांनो हा लेख व त्यावरील आपल्या सर्व चर्चा लिंकद्वारे मी त्या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था यांना पाठवल्या. मीना सेशू ज्यांचा उल्लेख मी वर प्रतिक्रियांमधे केला आहे त्यांनी त्या सेक्सवर्कर साठी काम करणारी वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संघटने द्वारे प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या काही ध्वनीप्रतिक्रिया त्यानी पाठवल्या आहेत व मिसळपाव चे आभार मानले आहेत.

मोदी आणि भाजपा सत्तेत यायच्या आधी मिपावर किती गंभीर विषयांवर प्रगल्भ चर्चा वादविवादसुसंवाद व्हायचे ! कुठेही राजकीय टिप्पण्णी नाही, कोणत्याही धर्मावर , धर्मपरंपरा श्रध्दांवर , कोणत्याही जातीवर, समाजावर चिखलफेक नाही, कुठेही तारतम्य सोडून तिरकस टिप्पण्णी नाही ! हा काथ्याकुट एक अतिषय आदर्श काथ्याकुट म्हणुन पिन करुन ठेवला पाहिजे मुख्यपानावर ! बाकी - श्या: , आमच्या काळचं मिपा राहिलं नाही आता !

Trump 27/05/2022 - 12:38
उत्तम निकाल आणि उत्तम लेख
देहविक्रय बेकायदेशीर नाही, सेक्स वर्कर्सचे अधिकार, पोलीस हस्तक्षेप अयोग्य, कंडोमचा वापर हा…; SC ने मांडलेले २१ मुद्दे https://www.loksatta.com/photos/news/2945214/sex-work-is-not-illegal-the-supreme-court-order-says-sex-workers-are-entitled-to-dignity-equal-protection-under-law-scsg-91/

In reply to by Trump

उत्तम निकाल ! भारत हळुहळु पाश्चिमात्य बुरसटलेल्या नैतिकतेच्या बकवास संकल्पनांच्या जोखडातुन मुक्त होत आहे हे पाहुन छान वाटले !

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 29/05/2022 - 16:55
मार्कस ऑरेलियस, मला वाटतं त्यास व्हिक्टोरिय नैतिकता ( victorian morality ) म्हणतात. हिने ब्रिटीशकालीन भारतात प्रचंड गोंधळ घातला होता. आ.न., -गा.पै.

sunil kachure 27/05/2022 - 12:46
लोकशाही देशात धोरणात्मक निर्णय घेणे हे लोक नियुक्त सरकार चे काम आहे. लोकशाही मध्ये लोक सत्ताधारी निवडतात. आणि तेच देशाला जबाबदार असतात. किती ही चांगला निर्णय असला तरी कोर्टाने धोरणात्मक निर्णय घेणे . अयोग्य आहे. त्या मुळे वेगळा पायंडा पडू शकतो. सरकार नी तसा कायदा करावा असे निर्देश देणे इथ पर्यंत कोर्टाचे निर्णय योग्य असे समजू शकतो.

चलत मुसाफिर 29/05/2022 - 21:16
लेख फार आवडला. देहव्यापाराला 'नैतिक' मान्यता नसणे याचे एकमेव कारण म्हणजे हा व्यवसाय पुरुषसत्तेच्या पायाला समूळ हादरा देतो. बाकी दुसरे काही नाही. गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे. ही भीतीदेखील निराधार आहे हे सांगायला नको. उद्या देहविक्रय समाजमान्य झाला तरी पुरुषसत्ता त्याला पुरून उरेल आणि आपले वर्चस्व अबाधित ठेवेल यात मला तरी काहीच शंका नाही. या संदर्भात निर्णयस्वातंत्र्य वगैरे मुद्दे उगाचच उकरून काढले जातात. सफाई कामगार, मोलकरीण किंवा हमाल होण्याचीही महत्वाकांक्षा कुणी बाळगून नसते. इतकेच काय, इच्छा नसताना डॉक्टर, अभियंता, व्यापारी झालेले लोकही सापडतील. पण त्यावरून या व्यवसायांना कुणी अनैतिक ठरवत नाही.

गामा पैलवान 30/05/2022 - 02:32
चलत मुसाफिर,
गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे.
यांत भीती कसली? जर प्रत्येक बाई पुरुषसत्तेस फाट्यावर मारून वेश्या बनली, तर कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल. पुरुषांना दुसरं काय हवं? असो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. लालबत्तीवस्तीत बापाला किंमत नसते. आईला मात्र अतिशय आदराने वागवलं जातं. मग ही पुरुषसत्ताक व्यवस्था म्हणायची का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल.
थोडीशी सुधारणा - कुठलीही नाही , जीला स्वतःहुन कामक्रीडेत भाग घेण्याची इच्छा आहे ती , आणि हाच ह्या व्यवसायातील युनिक सेल पॉईंट आहे ! स्त्री-लैंगिकतेचे गूढ ह्या धाग्यावर आलेल्या काही प्रतिसादा नुसार बहुतांश स्त्रियांना कळससुख अर्थात ऑर्गॅझम हा परमोच्च आनंद लाभतच नसतो , त्या केवळ करायचे म्हणुन, कर्तव्य म्हणुन सेक्स करत असतात , परिणामी कामक्रिडेतील स्त्रीचा सहभाग बहुतांश वेळा पॅसीव्ह असतो . (काही सन्माननीय स्त्रीयांचे काही मोजके रतिक्षण ह्याला अफवाद असतीलही , पण इन जनरल "उरका पटकन" हाच अ‍ॅटिट्युड असतो.) अशा वेळेस कल्पना करा की एक स्त्री जी स्वेच्छेने कामक्रिडेत सहभाग घेत आहे , जी पैसे घेत आहे , क्लायंट ला खुष करणे हाच जिचा उद्देश आहे तिच्या सोबतचा अनुभव कसला भिन्न असेल ! तसेच पुरुषाच्या नजरेतुन - ही स्त्री आवडली तर आवडली नाहीतर आजचे पैसे अक्कलखाती, नेक्स्ट टाईम नवीन बघु, ही काही कटकटी करणार नाहीये , डोके दुखते आज नको , मूड स्विंग्स वगैरे नखरे नसणार आहेत , बस्स आत्ता आहे हा क्षण एन्जॉय करायचा आहे - carpe diem. ह्या सिचुएशन मध्ये रतिसुखाचा अनुभव काहीतरी वेगळ्याच लेव्हल वरील असावा असा अंदाज आहे ... पुरुषासाठी अन स्त्रीसाठीही!!

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 30/05/2022 - 13:19
मार्कस ऑरेलियस, तुमच्या दुरुस्तीशी सहमत आहे. 'उपलब्ध असलेल्या कुठल्याही स्त्रीस पैसे फेकून वापरता येईल' असं म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

sunil kachure 30/05/2022 - 20:03
जगाचे माहीत नाही. पण भारताची लोकसंख्या १३०, कोटी आहे. कट्टर पुरोगामी स्त्री,पुरुष. कट्टर स्त्री हीत वादी स्त्री पुरुष. देह विक्रीस समर्थन देणारे महान विचारवंत. ह्या समाजाच्या सुधारित घटकात. १) मला सून देह विक्री करणारीच हवी. २)माझी बायको देह विक्री करते हे आमचे कार्ड. ३) माझी मुलगी मी ज्या कुटुंबात देह विक्री करण्याला मान्यता आहे त्याच कुटुंबात देईल. ४ माझी आई आणि बहिण देह विक्री करतात हे आमचे visiting कार्ड. असे मोठ्या अभिमानाने सांगणारा पुरोगामी,स्त्री हक्क वाला,सुधारणावादी,देह विक्री लं पाठिंबा देणारा. मी आज पर्यंत तरी कोणी बघितला नाही. १३० कोटी लोकात एक खरा पुरोगामी नाही. आणि म्हणे गणिका सन्मानाने समाजात फिरतील. अमेरिका,ब्रिटन जे आपल्या पेक्षा १०० वर्ष पुढे आहेत तिथे पण असे घडतं नाही.

sunil kachure 30/05/2022 - 07:52
काही लॉजिक नाही ह्या विचारला की पुरुष सत्तेला हादरा बसेल म्हणून वैश्या व्यवसाय च संबंध नित्ती मत्ते शी जोडला आहे. काही लॉजिक नाही .स्त्री बाजारात विकायला उपलब्ध असणे आणि ती पण तिच्यावर काहीच जबरदस्ती न करता. स्व मर्जी नी. ही पुरुषांसाठी अस्त्यंत फायद्याची गोष्ट आहे. स्त्री काही पैसे देवून सहज उपलब्ध असेल तर पुसृषांसाठी लॉटरी च आहे.. उद्या हे सामान्य झाले समाजाने स्वीकारले तर. स्पर्धा वाढेल आणि अगदी पन्नास ,शंभर रुपयांत पण ती उपलब्ध होईल. ह्या मध्ये स्त्री चच नुकसान आहे.पुरुषांचे नाही. असे स्त्री chya हक्काच्या बाता मारून बायकांना पुरुषांच्या समोर कमी कपड्यात बार मध्ये नाचवले आणि आजुन पण नचवले जाते. देह विकायला लागणे पोटासाठी ही वेळ येणे म्हणजे खाते सर्व समाजासाठी ही लाज वाटण्यासारखे गोष्ट आहे. आणि त्याला स्त्री चा हक्क ह्या गोंडस सुवर्ण वेष्टनात पॅक करून स्त्री चे शोषण करायचा. मतलबी डाव . तसे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांचा आहे

सुबोध खरे 30/05/2022 - 09:39
हे इतकं साधं असतं तर प्रश्नच नव्हता. बहुतांश वेळेस (९९%) मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. यात आई बापानी मुलींना विकण्यापासून प्रियकराने किंवा दलालाने फसवून किंवा सरळ गुंडांमार्फत अपहरण करून मुलींना धंद्याला लावले जाते. धंदा कायदेशीर केला तर केवळ मुलीला जीवाची धमकी देऊन मी हे स्वेच्छेने करते आहे असे कोर्टात बोलायला लावले तर जबरदस्तीने या धंद्यात ढकलल्या गेलेल्या परंतु बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या मुलींना यातून बाहेर पडण्याचा मार्गच बंद होईल. आता कदाचित १-२ % मुली अशा बाहेर पडत असतील पण या नंतर ते सुद्धा बंद होण्याचा धोका आहे. दुर्दैवाने वेश्याव्यवसायातून पुनर्वसन होण्याची शक्यता एकंदर समाजाच्या मनोवृत्तीमुळे फार कमी असते. लग्न करून बाहेर पडलेल्या बहुतांश मुली नवऱ्याने टाकून दिल्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. कारण अनेक वेळेस नवरे मुलीच्या चारित्र्याचा संशय घेताना दिसतात. या मुली धंदा केल्यानंतर पुरुषाशी बोलताना जास्त मोकळ्या असतात आणि याचा अनेक अर्थ नवरे ती निर्लज्ज/ वाईट चारित्र्याची किंवा तसलीच आहे असा काढतात. पुनर्वसन करून आई बापाकडे पाठवलेल्या बहुतांश मुलींना आई बापच आपल्या खोट्या प्रतिष्ठा किंवा पुढच्या मुलींच्या लग्नात विघ्न येण्याची भीती किंवा मुलीचा भाऊ तिला स्वीकारायला तयार नसेल तर त्याला नाराज करायचे नाही म्हणून या मुलींना स्वीकारण्यास नकार देतात. अनेक वेळेस सख्खे बाप सुद्धा परत या मुलींना विकून पैसे करताना आढळतात. या मुली निरक्षर किंवा अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे चरितार्थाचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. तर अनेक मुलींना या व्यवसायात काही वर्षे घालवल्याने अंगमेहनतीचे काम करावेसे वाटत नाही त्यामुळे त्या स्वखुशीने वेष्ट्यव्यवसायात परतल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे त्यांचे पुनर्वसन वाटते तितके सोपे नाही. त्यातून काही वर्षे (१०-१५) संसारात रमल्यावर त्यांचे खटले न्यायालय उभे राहतात आणि सततच्या न्यायालयाच्या वाऱ्या ,कटकटीना कंटाळून आणि आर्थिक तंगी मुळे सुद्धा नवरे त्यांना हाकलून देतात. एकदा वेश्या व्यवसायातून बाहेर पडली कि त्यांचे दलाल त्यांच्या वर चार दमड्या खर्च करत नाहीत आणि हा सर्व आर्थिक भार सोसणे त्यांना अशक्य होते. त्यातून त्यांना पोलीस सुद्धा ज्या तर्हेने वागवतात ते पाहिले तर सभ्य माणसे सुद्धा लाजतील. पैसे नसतील तर पोलीस सुद्धा त्यांच्याकडून सर्रास शरीरसुखाची मागणी करतात मग ती आता पुनर्वसन करून संसाराला लागली का असेना? महिला पोलीस सुद्धा त्यांच्याशी अत्यंत घृणास्पद वर्तन करताना आढळतात तर पुरुषांची काय कथा? बाकी स्त्रीचे स्वातंत्र्य त्यांचे हक्क आणिस्वखुषीने वेश्या व्यवसायात पडणे हे उच्चभ्रू गटातील कॉलगर्लस, एस्कॉर्टस किंवा कॉनक्यूबाईन इ. साठी ठीकआहे.(त्यांना वेश्या म्हणणे डाऊनमार्केटआहे).

sunil kachure 30/05/2022 - 13:31
Vaisha व्यवसाय . खुप जुना आहे ब्रिटिश लोक ही अतिशय हुशार असल्या मुळे त्यांनी ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केले होते. देह विक्री व्यवसाय करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून दिली होती बाकी समाजा पासून वेगळी. एकाचे हक्क जपताना दुसऱ्याच्या हक्कावर गदा येत कामा नये. देह विक्री ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केलं. तर ते समाजाच्या,देशाच्या हिताचेच आहे. १) देश विक्री व्यवसाय करण्यासाठी प्रतेक शहरात जागा आरक्षित ठेवली जावी. थोडी लांब. २)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात ३) त्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जावी त्यांच्या मर्जी नीच करत आहेत ना ह्याची खात्री करावी. ४) देह विक्री करणाऱ्या सर्व स्त्रिया ची माहिती त्या व्यवसाचा पोर्टल वर जाहीर करावी नाव ,गाव,नातेवाईक सहित. लाज वाटण्याचे कारण नाही स्त्री मुक्त होत आहे. ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. असे मस्त. नियोजन केले तर मला नाही वाटत कोणी विरोध करेल. कोणत्या तरी ब्रिटिश कंपनीला ह्या सर्व यंत्रणेचे नियोजन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यावे. ते योग्य नियोजन करतील. मुंबई मध्ये त्यांनी योग्य काम केले आहे त्यांना अनुभव आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 30/05/2022 - 20:20
२)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात. हायला इथे अर्ध्या जनतेला डोक्यावर छप्पर नाही पण रात्रीची सोया पाहण्यासाठी सरकारने त्यांना कोठे बांधून द्यायला हवेत काय? ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. हे कुणी ठरवायचं ? ब्रिटीश कंपनीला? त्यांना भारतीय बायका कुरूप च वाटतील. मग बायकांना चांगला भाव कुणी द्यायचा? का इथे पण शेतीसारखा किमान आधारभाव द्यायचा? आणि या आधारभावाला ग्राहक आला नाही तर पैसे सरकार ने द्यायचे का? कचरे बुवा तुमच्या टंकणाऱ्या मेंदूचा आणि विचार करणाऱ्या मेंदूचा संबंध नाही हे तुम्ही सतत का सिद्ध करून देताय

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 30/05/2022 - 20:45
मी तुमची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. १)देह विक्री व्यवसायात जबरदस्ती नी स्त्रियांना ढकलल जाते. ही तुमची भीती आहे. रीतसर सर्व मुलींची चोकशी करून त्यांची सर्व ओळख पोर्टल वर जाहीर करा. हे माझे solution. पुरुषाची मकत्तेदरी स्त्री नी देह विक्री केली की नष्ट होत असेल तर अशी माहिती जाहीर करणे ही अभिमानाची गोष्ट असेल त्यांच्या नाते वाइक लोकांसाठी. सिडको किंवा म्हाडा नी अशा वस्त्या नियोजन करून उभ्या कराव्यात . गाव कुसा बाहेर. कारण एकाचे एक जपताना दुसऱ्याचे हक्क नाकारणे अयोग्य म्हणून. सिडको आणि म्हाडा नी अशा वस्त्या निर्माण केल्या म्हणजे त्या मधील जागा फुकट ध्या असा मी उल्लेख केला नाही. ज्यांना तीव्र इच्छा आहे त्यांनी ती जागा विकत घ्यायची आहे हवं बँक लोण ची सोय करावी. आराखडा आखून हा व्यवसाय म्हणून उभा केला तर रोजगार पण मिळेल. ती स्त्री आणि त्यांचे ग्राहक ह्यांना कायद्याचे संरक्षण पण मिळेल.आणि समाजातील बाकी लोकांचे हक्क पण अबाधित राहतील. प्राथमिक आरोग्य उपचार,गुप्त रोग तत्न,hiv स्पेशालिस्ट dr .. ह्यांना पण आराखड्यात जागा असेल.. Dr लोकांचा व्यवसाय वाढण्याची पण शक्यता आहे खरे ..मी परफेक्ट solution दिले आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 31/05/2022 - 13:01
मी परफेक्ट solution दिले आहे. कधी वेश्या वस्तीत गेला आहात का? त्यांच्याशी बोलला आहात का? त्यांचे प्रश्न काय? त्यानं काय हवंय? ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशाना घर विकत सोडाच भाड्याने घेणे सुद्धा परवडत नाही त्यांना बँकेच्या

लोण ची

सुविधा पुरवणार कोण? बँकेचे कर्ज देताना व्यवसायाचे काही आडाखे असतात. त्यात स्त्रीचे शरीर कसे बसवणार? जी दिसायला जास्त चांगली तिला जास्त कर्ज देणार का? हा निकष कसा ठरवायचा? तारण काय ठेवायचे? आणि त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या कडून वसुली कशाची कशी आणि कोणी करायची? उगाच उंटावरून शेळ्या हाकताय? तुमचं परफेक्ट solution तुमच्या टंकणाऱ्या मेंदूकडून आलेलं आहें. उचल हात आणि बडव कळफलक त्याचा विचार करणाऱ्या मेंदूशी काहीही संबंध दिसत नाही.

चलत मुसाफिर 30/05/2022 - 18:31
काही प्रतिसाद वाचून चंमतग वाटली. गणिका सहज उपलब्ध झाल्या तर पुरुषांचे फावेल हा समज मुदलातच गंडलेला आहे. पैसा व सामाजिक ताकद असलेल्या पुरुषांना गणिका (किंवा अन्य स्त्री) आजही मिळवता येते. देहव्यापार खुला झाला तर हे सर्व पुरुषांना सहजसाध्य होईल. तसेच देहव्यापार करणाऱ्या स्त्रीला अधिकृत हक्क मिळतील. हे पुरुषसत्तेला मुळातच नको आहे. देहव्यापार समाजसंमत झाला तर सगळ्या स्त्रिया तेच करू लागतील हा दुसरा गंडलेला समज. तसे काहीही होणार नाही. ज्या स्त्रियांना तो व्यवसाय करायचा असेल त्या तो सुरक्षित व अधिकृत रीतीने करू शकतील, इतकेच. पण याचे पुरुषसत्तेवर दूरगामी परिणाम होतील. सेक्स ही एक क्षणिक, तात्कालिक, नैसर्गिक भावना (instinct) आहे. पण तिला नाना नियम व बंधनांत कोंडले की एक प्रबळ आवेग निर्माण होतो जो जीवनाच्या प्रत्येक पैलूवर कमीअधिक परिणाम करतो. पुरुषसत्ता याचा चलाखीने वापर करते.

sunil kachure 30/05/2022 - 18:53
उत्तम नियोजन केले तर देह विक्री व्यवसाय लं कोणाचा विरोध नाही. देहविक्री लं मान्यता म्हणजे गल्ली बोळात,रहिवासी इमारती ,सार्वजनिक जागा इथे विक्षपित चाळे करण्याची परवानगी नाही..

जेम्स वांड 31/05/2022 - 10:17
वेश्या व्यवसाय हा मानवी संस्कृतीने ठरवलेल्या नैतिकतेच्या चौकटीत कधीच बसणार नाही , पण म्हणून त्याचे कायदेशीर प्रमाणीकरण करू नये असे नाही, काही देशाचे नियम आजकाल गांजा कायदेशीर करत आहेत, मला तर ते चूक वाटते, मस्तिष्कावर प्रभाव पाडून पुढे अगदी हेवी मेटल पॉयझिंग देऊ शकणाऱ्या गांज्याला कायदेशीर करणे चूक वाटते, पण वेश्या व्यवसायाबद्दल विचार करता त्याला कायदेशीर करणे हे कैक लैंगिक आजार, गुप्तरोग, एचआयव्ही इत्यादींच्या प्रसारात एक उपायकारक खोडा म्हणून वापरले जाऊ शकते, वेश्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप, त्यांना औषधपूरवठा, स्वच्छ ठिकाणे (व्यवसाय करावयास) ह्याने फक्त वेश्याच नाही तर वेश्यागमन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळींचे पण स्वास्थ्यरक्षण होऊ शकेल, वरती काचुरे ह्यांनी वेश्या व्यवसाय, आई बहीण व्हिजिटिंग कार्ड वगैरे काय काय लिहिलेले आहे, ते पटले नाही दोन कारणांसाठी १. माझ्याच लेखनात वेश्या व्यवसाय हा मानवी नितीमूल्यांच्या चौकटीत नैतिक ठरणार नाही कधीच हे मी स्पष्ट म्हणतोय आणि त्यामुळे २. काचुरे ह्यांनी (कदाचित कोणालातरी प्रतिसाद म्हणून) वेश्याव्यवसायाची व्हाईट कॉलर सर्विस इंडस्ट्री सोबत केलेली तुलना. बाकी काय, वेश्याव्यवसाय कायदेशीर केला तर तो करताना जगातील कैक फसलेली, यशस्वी उदाहरणे ठेवता येतीलच अभ्यास करायला समोर.

sunil kachure 31/05/2022 - 12:23
जगातील जास्त माहीत नाही पण भारतात खजुराव सारखी मंदिर आहेत तिथे . सेक्स ह्या विषयावर अनेक शिल्प कोरली आहेत. बघितले नाहीत पण ऐकून आहे. कामशास्त्र सारखे बाकी प्राचीन ग्रंथ पण आहेत त्याचा विषय सेक्स हाच आहे. . Evolution मुळे माणसाची प्रजाती निर्माण झाली असे दावे असले तरी.. संस्कृती, समाज व्यवस्था,निती अनिती. ह्यांची बरीच चक्र होवून गेली असावीत.. खुला सेक्स,नंतर निती मत्तेत सेक्स अडकला असेल. कोणाशी ही सेक्स करणे ह्याचा निती अनीती शी काही संबंध नाही. आणि कोणाशी ही सेक्स करणे ही अनीती. असे अनेक स्थित्यंतरे मानवी इतिहासात नक्कीच होवून गेली असणार. प्रतेक प्रकारचे चांगले वाईट परिणाम अनुभव नी माणसाला माहीत पडले असणार. म्हणून सेक्स लं निती मत्ते शी जोडले गेले असेल. एकच स्त्री संभोग करणे जी पत्नी आहे हे योग्य असे ठरवून कुटुंब व्यवस्था.आणि बाकी व्यवस्था. हे खूप अनुभवातून आलेले शहाणपण आहे. सेक्स चा संबंध अनेक गोष्टी शी आहे. संतती हा पहिला त्याचा प्रॉडक्ट आहे. त्याची जबाबदारी कोणावर तरी टाकणे अतिशय गरजेचे होते. म्हणून कुटुंब व्यवस्था आणि बाकी समाज व्यवस्था. सेक्स आणि भावनिक गुंतवणूक हा प्रश्न आहेच.

sunil kachure 31/05/2022 - 12:41
बार मध्ये कमी कपडे घालून नाचणे,विविध लोकांचे स्पर्श सहन करणे. हे त्या व्यवसाय करणाऱ्या मुली खरेच मनापासून करत असतील का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. साधे बस,ट्रेन मध्ये पण आपल्या बाजूला आपल्याला बरा वाटणारा च सहप्रवासी असावा अशी इच्छा सर्वांची असते. काही मिनिट किंवा तासाच्या प्रवासात पण आपल्याला बरा वाटणारा प्रवासी नसेल तर मन विचलित होते. बार गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलींची मानसिक अवस्था काय होत असेल. थंड डोक्याने विचार केला की जाणीव होईल. सेक्स वर्कर तर अजून खतरनाक. शारीरिक संबंध ठेवणे अशा व्यक्ती शी ह्याच्या शी काहीच ओढ नाही,आकर्षण नाही,इच्छा नाही. खुप कठीण काम आहे. मुली किंवा स्त्रिया ना ही अशी काम पोट पाणी चालण्यासाठी करावे लागत असेल तर आपल्या सिस्टीम मध्ये दोष आहे. पर स्त्री किंवा पर पुरुष ह्यांच्या शी आकर्षित होवून सेक्स करणे आणि. फक्त पैसे मिळतात म्हणून ओळख पण नसणाऱ्या व्यक्ती शी सेक्स करणे. खुप खुप फरक आहे. मानसिक त्रासाची परिसीमा आहे ती. आणि ह्या सर्व सेवांचे ग्राहक कोण तर पुरुष. पुरुषांना ऐश करण्यासाठी निर्माण झालेली गुलामगिरी ची एक पद्धत. ह्या मध्ये स्त्री चे हीत नाही. स्त्री लं कोणाशी ही तिच्या इच्छे नी सेक्स करायचा असेल तर तशी तिला परवानगी असावी हे वेगळे आहे . आणि पोटपण्यासाठी व्यवसाय म्हणून सेक्स करावा लागणे .हे वेगळे आहे. खुप फरक आहे ह्या मध्ये.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 16:34
आता हे पहा. मांजर आपल्या पिल्लांना केवळ तीन गोष्टी शिकवते: शिकार कशी करावी, कुणाला घाबरून रहावे आणि आपला बचाव कसा करावा (झाडावर चढणे, नखे पाजळणे इ.). याला फारतर 2 आठवडे लागतात. इतक्या शिक्षणावर मांजर आरामात आयुष्य जगू शकते. पण मानवाची उत्क्रांती इतकी जास्त झालेली आहे की समाजात केवळ जिवंत रहाण्यासाठी अफाट ज्ञानाची गरज पडते. पहा: भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाहतुकीचे नियम, कायदा, तंत्रज्ञान (किमानपक्षी दूरध्वनीचा वापर), लेखन-वाचन, सांस्कृतिक भान, पाककला, शेती, धर्मशास्त्र. ही यादी कितीही वाढवता येईल. हे इतके मूलभूत शिक्षण घेता घेता 18-20 वर्षे जातात. मानवाचे सरासरी आयुष्य 60-65 वर्षाचे असते. गुणोत्तर काढा. हे इतके ज्ञान आत्मसात करणे, साठवणे आणि वापरणे याकरिता मानवाला प्रचंड मोठा मेंदू विकसित करावा लागला. (मानवी मस्तक व शरीर यांचे गुणोत्तर काढा व त्याची इतर प्राण्यांशी तुलना करा. फरक लगेच उमजेल). मेंदूचा आकार हा असा भरपूर मोठा असल्यामुळे मुलांचा जन्म तुलनेत लवकर व्हावा लागतो. कारण मुलाचे डोके निसर्गाने जर मातेच्या पोटातच फार मोठे होऊ दिले तर माता आणि बाळ दोघे प्रसूतीतच मरतील. त्यामुळे मानवी अर्भके तुलनेत लवकर जन्माला येतात व जन्मानंतर वर्षानुवर्षे पालकांवर अवलंबून असतात (पशुपक्ष्यांचे असे नसते. कुत्रा साधारण 10-12 वर्षे जगतो. कुत्र्याची पिल्ले पंधरा ते वीस दिवसात जवळजवळ स्वयंपूर्ण होतात. गुणोत्तर काढा). अर्भकांची अशी प्रदीर्घकाळ देखभाल एकटीने करणे हे मानव मातेला केवळ अशक्य आहे. त्यामुळे पित्याने तिची साथ देणे सक्तीचे करण्यात आले (इतर प्राण्यांत माता आपली पिले एकटीने सांभाळते, किंबहुना पित्याला हाकलून लावते). आता हे पिल्लू माझेच आहे हा विश्वास पित्याला कसा व्हायचा? त्यामुळे कामनियम, योनिशुचिता, एकपतिव्रत ही बंधने आली. ही बंधने अंमलात आणण्यासाठी, तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे, म्हणून समाजव्यवस्था आली.

In reply to by चलत मुसाफिर

सुबोध खरे 31/05/2022 - 19:59
आपल्या प्रतिसादातील काही त्रुटी १) मानवापेक्षा उत्क्रांतीत खालच्या पायरीवर असणारे प्राणी यांच्या डी एन ए मध्ये मोठ्या प्रमाणात उपजत बुद्धी (स्मरणशक्ती) साठवलेली असते. त्यामुळे कुत्रे, मांजरं गायी हरणं आणि त्यांच्या कुळातील सर्व प्राणी हे मातेचे दूध पिणे थांबवल्यावर उपजत बुद्धीने वासाने आपले अन्न शोधून काढून आपले पोट भरू शकतात. मानवाच्या मेंदूचा विकास झाला त्याबरोबर हि उपजत बुद्धी मागे पडली. याच बरोबर मानवी मेंदूची वाढ सुरुवातीच्या काळात फार झपाट्याने होते. पहिल्या सहा महिन्यात हि वाढ ६५ % आणि १ वर्षापर्यंत मानवी मेंदू प्रौढ माणसाच्या ७५ % आकाराचा आणि २ वर्षे पर्यंत ९० % आकाराचा होतो. २) हे हार्डवेअर वाढल्या नंतर त्यात सॉफ्टवेअर लोड होण्याची प्रक्रिया चालू होते जी जन्मभर चालूच राहते. ३) मानवी शरीराची वाढ १८ वर्षापर्यंत होत असते म्हणजेच मानवी मुलाचे बालपण हे १८ वर्षे इतके लांब असते. या काळात स्त्रीला बालकाच्या संगोपनासाठी पुरुषाची गरज भासत असते. आणि अशास्थितीत पुरुषाने हे मूल माझे नाहीच म्हणून जबाबदारी झटकली तर शेतीप्रधान व्यवस्थेत स्त्रीची स्थिती फार केविलवाणी होत असे. कारण बाहेर शेती सोडून दुसरे काम नाही. तेथे काम करताना मुलाचे संगोपन कसे करणार या शिवाय बलात्कार होण्याची आणि त्यातून पुढची संतती होण्याची शक्यता फार होती ज्यामुळे असलेल्याच नव्हे तर पुढच्या बालकाच्या पोषणाचीसमस्या निर्माण होत असे. या कारणास्तव जगभर सर्व समाजात यौनशुचिता ( नवऱ्याशी एकनिष्ठता) हि कल्पना जन्माला आली. आणि या कल्पनेचा विस्तार म्हणून लग्न संस्था निर्माण झाली. स्त्री स्वातंत्र्य हि कल्पना संतती प्रतिबंधक साधने आल्यानंतरच खरी फोफावू शकली आणि त्यानंतर आधुनिक जगात स्त्रीला नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यावर तिची खरी मुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू झाली. स्त्रियांचे शोषण आदीम काळात कसे होत होते हे ज्यांना पाहायचे आहे त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीतील स्त्रियांची स्थिती याचा जरूर अभ्यास करावा.

sunil kachure 31/05/2022 - 17:04
सर्व प्रकार होवून गेले आहेत कोणाशी ही संभोग अगदी आई,बहिण ह्यांच्या शी पण(यम आणि यमी) प्राणी तर नाते पाळत नाहीत माणूस प्राणी च आहे. पण स्थिर जीवन,संतती चे पालन पोषण,स्त्री ची सुरक्षा, स्त्री साठी सुरक्षित वातावरण. पुरुष आक्रमक आहे हे नैसर्गिक आहे. पाणी नीतिमत्ता आणि परंपरा पुरुषांची आक्रमकता थोपवून ठेवतात. बहिण नागडी जरी दिसली तरी तिचा भाऊ हा पुरुष असून पण लैंगिक रित्या उत्तेजीत होत नाही का? ती स्त्री आहे हा पुरुष आहे तरी पण नाही. कारण नीतिमत्ता , समाज व्यवस्था त्या मुळे दहा वेळा फाशी असा कायदा केला असता आणि नीतिमत्ता आणि योग्य समाज व्यवस्था नसती तर . बहिण नागडी बघून भाऊ sexually उत्तेजीत झाला असता..... कायदे आणि शिक्षा ते थांबवू शकले नसते त्या मुळे देह विक्री चा संबंध मंद बुद्धी सारखा स्त्रियांच्या हक्क आणि स्त्री चे स्वतंत्र ह्याच्या शी मंद बुद्धी लोकांनी जोडू नये.

गामा पैलवान 31/05/2022 - 17:05
चलत मुसाफिर, हा कळीचा मुद्दा आहे :
तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे,
तुम्ही वर जी कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष, मुखावगुंठित वगैरे विशेषणं ल्वापारली आहेत त्यांचा निर्देश मुलांच्या संगोपानाकडेच आहे. मात्र या गोष्टी आवश्यक असल्या तरी पुरेश्या नाहीत ( necessary but not sufficient ). बाप देखील नीतिवान असावा लागतो, पण तो मुद्दा वेगळा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:34
संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवले? याचा संगोपनाशी काय संबंध? ज्ञानार्जन स्वसंरक्षण, परोपकार वगैरे ठीक आहे. नीतीमत्ता, चारित्र्य वगैरे गोष्टी म्हणजे धूर्त पुरुषसत्तेने आपला वरचष्मा अबाधित ठेवण्यासाठी काढलेली नसती टूम आहे. (या आता म्होरं. होऊनच जाऊ दे!) :-) :-)

In reply to by चलत मुसाफिर

गामा पैलवान 31/05/2022 - 23:42
चलत मुसाफिर, संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवलं, म्हणून काय विचारता ! वेश्यांना त्यांची अपत्यं त्याच वस्तीत राहावीशी वाटंत नाहीत. वेश्यांना त्यांच्या अपत्यांनी तोच धंदा केलेला आवडंत नाही. मुलगी असेल तर तीही वेश्या झालेली नको असते. मुलगा असेल तर मोठेपणी भ#वा झालेला नको असतो. भ#वा हा त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे. बाकी पर्याय कोणते ते विचारू नका. नीती व चारित्र्य म्हणजे काय ते वेश्यंना बरोब्बर ठाऊक आहे. आ.न., -गा.पै.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:22
स्त्रीची सुरक्षितता हाही एक गंडलेला मुद्दाच. सुरक्षितता कोणापासून? पुरुषांपासूनच की हो! गुंडांनी दुकान फोडू नये म्हणून त्यांना हप्ता देण्यासारखेच हे झाले. असो. एकूण माझा मुद्दाच सिद्ध होतो: योनिशुचिता न पाळणारी, लिंगस्वातंत्र्य मानणारी स्त्री पुरुषसत्तेला महाप्रचंड धोक्याची घंटी वाटते. ती तशी वाटली नसती, तर सुरक्षितता वगैरे बागुवबुवे उभे करायची गरजच नव्हती.

In reply to by चलत मुसाफिर

sunil kachure 31/05/2022 - 17:43
सुरक्षित ,स्थिर आयुष्य स्त्री आणि पुरुष दोघांचे. त्या साठी नियम आणि निती मत्ता . शारीरिक क्षमता काहीच वर्ष असते निसर्ग काही वर्षानंतर तारुण्य,शक्ती सर्व नष्ट करतो बालपणी चे १० ते १५ वर्ष आधार शिवाय जगता च येणार नाहीत माणसाच्या मुलाला. आर्थिक बाबतीत स्थिर होण्यास जी बुद्धी लागते ते शिक्षण आणि सुरक्षित निवारा. हा फक्त कुटुंब असेल तर च. आता बेरीज , वजा बाकी करा. स्वतःच्या शक्ती वर माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यातील किती वर्ष जगू शकतो. स्त्री माणूस च आहे कोणती extra ordinary प्राणी नाही तिला हेच नियम लागू आहेत

मी मराठी किडा वर वेश्यांच आयुष्य हा वृत्तपट पाहिला होता , तो शेअर करतोय. तुम्ही बाकी काही करु शकत नसला तरी त्यांच्याप्रति संवेदनशीलता ठेवा. विचार करा. धन्यवाद सूरज खटावकर, मराठी किडा व तेजस्वी सेवेकरी, सहेली संस्था https://www.youtube.com/watch?v=NIglFzYCE9U

In reply to by प्रकाश घाटपांडे

खरं तर, महाराष्ट्रातील काही दिवसातील घटना पाहिल्या शाळकरी मुलींवरील झालेले अत्याचार, विक्रुत बापांनी मुलींवर केलेले अत्याचार, राजस्थानमधील अठ्ठावीस वर्ष वयाच्या मुलांनी बावन्न वय असलेल्या स्वतःच्या आईवर केलेले बलात्कार या सर्व घट्ना पाहिल्यावर विकृतीला धर्म नसतो तर, माणसातली विकृती असते आणि तिचा स्तर दिवसेंदिवस कोणत्या स्तराला चाललं आहे, ते लक्षात येतं आणि अशावेली वेशाव्यवसायाचं महत्व अधोरेखित व्हावं. वेश्या व्यवसाय काही त्यांनी आनंदाने स्वीकारलेला नसतो. परिस्थिती, अगतिकता, आणि असंख्य गोष्टी तो वेगळा विषय आहे. कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्त्या प्रकरणी बंगालमधील आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिकच आहे. पिडितेला न्याय मिळावा म्हणून वेश्यांनी मोर्चात सहभाग घेतला झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी त्याही व्यथित झाल्या आणि मोर्चामधे त्यांच्या हातातील घोषणा फलक होते- 'प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना' याचा अर्थ असा की तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करु नका'' ही सामाजिक जाणीव ऐतिहासिक आहे. या विषयावर प्रसिद्ध लेखक, समीर गायकवाड यांनी खुप लिहिलं आहे. खुप लिहिण्या-बोलण्यासारखं पण थांबतो. घाटपांडे साहेब मिपावर येत राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 08/09/2024 - 15:10
माणूस दारू , तंबाखू शिवाय एकवेळ राहू शकतो परंतु पुरुष आणि स्त्रीला लैगिंक भूक आहे ती नैर्सगिक आहे , जिथे पुरुष स्त्री चे प्रमाण व्यस्त आहे तिथे हि भूक भागवण्याची सोय लागते ,, ती राजमार्गाने करण्याचाही सोय असेल तर त्यातील गुन्हेगारी कमी होते ( युरोपातील काही देश ) दोन्ही पुरुष वेश्या आणि स्त्री वेश्या उपलब्ध असणे असणे हे मला तरी अनैतिक वाटत नाही अनॆतिक काय तर लग्न बंधन किंवा अगदी लिव्ह इन रेलशनशिप मध्ये असताना वेश्यागमन करणे , येथे दोन्ही पुरुष आणि स्त्री हा नियम समान धरला आहे

युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स मधून नेत होते. ऍम्ब्युलन्स चालक आणि त्याच्या साथीदारांनी पेशंट च्या पत्नीचा लैंगिक छळ करायला सुरवात केली. आणि त्यासाठी पेशंट ला ऑक्सिजन मास्क काढून नंतर बाहेर फेकून दिले. एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. उज्जैन मध्ये भर दिवस, रस्त्यात, फुटपाथवर एका महिलेचा बलात्कार झाला. लोकं बघत बसली, काहींनी व्हिडिओ सुद्धा बनवले.

चौकस२१२ 09/09/2024 - 04:28
एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. यात धर्म कुठे आला? एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध जरुर करा मग प्रत्येक गुन्ह्याचे वर्णन आपण " हिंदू बहुसंख्याक भारतात गुन्हा झाला " असे करणार का ? कॉ न्ग्रेस जेव्हा सत्तेत होतती तेव्हा हि देशची ८०% लोकसख्या हिंदूच होती आणि २०१४ पासून सुद्धा .. इतका द्वेष बरा नव्हे .. अर्थात तुमच्या नादाला कोण लागणार .. बसा लावत भीतीला तुंबड्या

प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ लेख व त्यावरील प्रतिसाद पुन्हा वाचावेत. लेख जुना असल्याने काही लिंक आत्ता चालत नाहीत पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही मात्र या विषयावर निर्भया प्रकरणानंतर 2013 साली मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख व नंतर लैंगितेचे शमन हवेच हा एक लेख वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर सध्या चर्चा होताना दिसत नाही हे मला ठळक पणे जाणवले. अनेक मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले होते. जरुर वाचा. लैंगिकतेचे शमन की दमन? https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-or-aggression-36525/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 5 जाने 2013 लैंगिकतेचे शमन हवेच https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-is-needed-40206/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 12 जाने 2013 हे दोन्ही लेख तज्ञांनी आणि जिज्ञासूंनी जरुर वाचावेत. समीर गायकवाड यांचे खुलूस हे पुस्तक वेश्यांच्या जीवनावर आहे. ते ही आवर्जून विकत घेउन वाचावे. हा लेख व विषय समाजाचे लैंगिक व्यवस्थापन या मूळ विषयाचा भाग आहेत

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:35
धन्याशेठ, तुझ्या काथ्याकुटाचा विषय आवडला. इंटरेश्टींग आहे! :) आता माझी मतं - पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे. मी तर म्हणेन की भीष्मालादेखील स्वप्नदोष (झोपेतल्या झोपेत वीर्यस्खलन) झाला असणार. कारण मनुष्यप्राणी हा स्खलनशील आहे, आणि मेडिकल सायन्स प्रमाणे मनुष्य शरीर हे ठराविक काळापेक्षा अधिक काळ त्याच्या शरीरात तयार होणारे स्पर्मस रोखून ठेवू शकतच नाही. तेव्हा माझ्या मते भीष्म देखील ब्रह्मचारी नव्हता जर तो मनुष्यप्राणी असेल तर! आणि वीर्यस्खलन झाले की ब्रह्मचर्य संपले! मग भले ते १) स्त्रीशी संग येऊन होवो किंवा २) अपना हाथ जगन्नाथ हस्तमैथूनाने होवो किंवा झोपेतल्या झोपेत होवो! जी मंडळी १) व २) प्रमाणे वीर्यस्खलन रोखून धरू शकतात त्यांना निद्रावस्थेत ब्रह्मचर्यभंगाला सामोरे जावेच लागते लागते कारण मेडिकल सायन्सचा तसा नियमच आहे! तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय? माझ्या मते तरी नाही! कारण बाजारी नकद व्यवहारात रोगराईची भितीच अधिक असते. तेव्हा त्या वाटेला न जाणंच अधिक श्रेयस्कर! आणि मी म्हणतो की 'भुरळपाडून',' फूस लावून भोग घेणं' असं तुम्ही म्हणताय खरं पण भुरळ पाडून घेणार्‍याला किंवा घेणारीला ते समजायला नको काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही! तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही. हा हा हा! धन्याशेठ, हा तू भलताच मुद्दा मांडला आहेस. यावर मला ठाम असं एक उत्तर देता येत नाहीये! :) कारण व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर अद्याप तरी मी अविवाहीत आहे आणि अद्याप तरी कुणी कळकळीने माझ्यासमोर ह्या प्रशिक्षणाचा मुद्दा मांडलेला नाही! :) बाय द वे, 'नवविवाहितांना प्रशिक्षण देऊन' असं तू म्हटलं आहेस, त्या ऐवजी अविवाहितांना विवाहाला वर्ष सहा महिने असताना पूर्वप्रशिक्षण देण्यास काय हरकत आहे? भावी वराची/वधूची याला संमती असेल तर फारच उत्तम! बाहेरचे ट्रेनिंग कोर्सेसही जॉईन करायला नकोत! :) जोक्स अपार्ट, परंतु 'प्री मॅरिटल सेक्स' हा माझ्या मते महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात कुणा तज्ञाने मिपावर काथ्याकुटास सुरवात करावी असे वाटते. इथे या बाबत अधिक चर्चा केल्यास विषयांतर होईल! नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे. आहेस खरा तर्कशुद्ध! :) तुझ्या '४अ' या मुद्द्याशी मी पूर्णत: सहमत आहे.... त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला! बहुत करून काही श्रीमंत घरातल्या काही बायका नवर्‍याच्या अपरोक्ष खुलेआम नव्हे, तर ओळखी ओळखीत लपूनछपून दुसर्‍या पुरुषासोबत शैय्या करतात त्यांचे दर आवाच्या सव्वा असतात. माझ्या माहितीत अश्या काही चांगल्या घरंदाज, श्रीमंत, खात्यापित्या घरच्या अत्यंत देखण्या स्त्रीया आहेत! तसेच काही अभिनेत्रीही आहेत ज्यांचा उल्लेख मी रौशनीच्या एका भागत केलेला आहे! अर्थात माझं वरील म्हणणं हे काही अपवादात्मक स्त्रीयांबद्दलच आहे. खुलेआम बाजार मांडून बसणार्‍या स्त्रीयांच्या बाबतीत तू म्हणतोस त्याप्रमाणे 'कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी' हे कदाचित खरंही असू शकेल! तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी. तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्‍हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.) सहमत आहे! याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. हा शेवटचा परिच्छेद अप्रतिम! विचार करायला लावणारा! आपला, (धन्याच्या बुद्धीमत्तेचा फ्यॅन!) तात्या.

मुक्तसुनीत 11/03/2008 - 08:26
सर्वप्रथम , धनंजय यांचे एका उत्कृष्ट लेखाबद्दल अभिनंदन - आणि मिसळपावचेही. धनंजय यांचा आपल्या या लाडक्या स्थळावरचा वावर म्हणजे या स्थळाचा मानबिंदू आहे असे विधान करणे धाडसाचे होणार नाही. धनंजय यानी एका गुंतागुंतीच्या आणि अगदी जुन्या सामाजिक संस्थेविषयी उहापोह केला आहे. ('वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन्' असा उल्लेख वेश्याव्यवसायाबद्दल केला जातो.) त्यांच्या लिखाणाचे एक तात्पर्य असे असू शकते की शरीराचा क्रय आणि विक्रय या गोष्टी स्वत:मधे अनैतिक नाहीत (द ऍक्ट्स इन देमसेल्व्स आर नॉट अन्-एथिकल) . धनंजय यांच्या लिखाणाचा अजून एक अर्थ "या व्यवसायाचा डिफेन्स" असा सुद्धा घेतला जाऊ शकतो. वेगवेगळे मुद्दे मांडून ते निर्विवादपणे सिद्ध करू पाहतात, की या व्यवसायाशी संबंधित असणारे इतर घटक अनैतिक , प्रसंगी सर्वात वाईट , नीच जातीचे गुन्हेगार असू शकतात , परंतु ज्या व्यक्ति (पक्षी : वेश्या) हा व्यवसाय करतात त्या व्यक्तिना अनैतिक म्हणता येणार नाही. पर्यायाने या व्यक्तिंच्या व्यवसायालाही अनैतिक म्हणता येणार नाही. मला वाटते , अशा प्रकारचा डिफेन्स मांडायला धनंजय यांच्यासारख्या अतिशय बुद्धिमान वकिलाची गरज नाहीच. मुद्दा सोपा आहे. तो असा की, या व्यवसायात पडणार्‍या बहुतांश स्त्रिया या त्यांच्या परिस्थितीच्या शिकार असतात. (दे आर द विक्टिम्स ऑफ देअर डायर सर्कम्स्टान्सेस.) सर्व पर्याय उपलब्ध असताना वेश्याव्यवसायात उतरणार्‍या स्त्रिया किती टक्के स्त्रिया असतील यावर संशोधन होऊ शकेल ; पण कॉमन सेन्सने असे म्हणता येईल की, बहुतांश स्त्रिया इतर पर्याय उपलब्ध नसल्याने, बर्‍याचदा बळाच्या वापराने, किंवा कौटुंबिक-सामाजिक परंपरेने या व्यवसायात पडलेल्या असतात. ("पडलेल्या" असतात या क्रियापदावरूनच हे सूचित होते.) आणि यात आपण कायद्याच्या बंधनाच्या आतल्या मुलींचा मुद्दा बाजूला ठेवू - त्याना विक्रीस बसविणे सरळसरळ गुन्हा होय. आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. पण कुठल्याही गोष्टीचा असा संदर्भविरहित अर्थ लावणे - विशेषतः नैतिकतेच्या दृष्टिने - अपुरेच ठरते. सर्व समाजात , सर्व काळात स्त्रियांचे शोषण होते. या शोषणाचा सगळ्यात वाईट बाय्-प्रोडक्ट म्हणजे दि वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन. तळटीप : मित्रानो, माझ्या लिखाणात इंग्रजी शब्द अति आले आहेत. या गोष्टीची मला शरम वाटते. मी अशी आशा करतो की एक दिवस असा येईल जेव्हा मी भेसळविरहित मराठीत लिहायला शिकेन. आमेन :-)

प्राजु 11/03/2008 - 08:32
धनंजय यांनी हा विषय काथ्याकुट या सदरात का टाकला याचाच मी विचार करते आहे. कारण त्यांनी विषय मांडणी इतकी सुंदर केली आहे की इथे चर्चेला जागाच नाही. मुक्तसुनित म्हणतात त्याप्रमाणे- आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. आणि जिथे उत्तरे मिळतात तिथे चर्चा कशावर करणार? एक अतिशय विचार करायला लावणारा आणि सुंदर लेख लिहिल्याबद्दल धनंजय यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. (सर्वव्यापी)प्राजु

सहज 11/03/2008 - 11:30
जगातल्या एका सर्वात जुन्या चर्चाविषयाला (पुन्हा एकदा) हात घातला गेला आहे. नैतिक अनैतिक सर्व सापेक्ष झाले आहे. जगभरातुन अनेक माहितीपट आले आहेत व सर्वात एकच कायम धागा दिसतो की या लोकांचे (बायकांची) फसवणूक, अत्याचार, शोषण. जर का ते थांबले तर या व्यवसायात सहभागी व्हायला किती जणी (जण) येउ शकतील याचे उत्तर मिळणे कठीण नव्हे. मुक्त शारीरिक संबंधाला चालना मिळाली तर जर का हा व्यवसाय कमी होईल असे म्हणले तर पश्चिमात्य देशात हा व्यवसाय कमी व्हायला हवा पण तसे तर दिसत नाही. शिवाय मग मुक्त शारीरिक संबंधाचे तोटे दिसले (वैद्यकिय तोटे) आता भर सुरक्षित शारीरिक संबंधावर जास्त. मधल्या मधे वेश्याव्यवसाय आहे तसा आहेच. उलट (चुकीच्या दिशेने) प्रगत होत आहे. जास्त पैसा येत आहे शेवटी मग पैसा, अज्ञान, पुरवठा, मागणी यांचा जोर वाढुन बाकी सगळे फोल. व्यवसायाचे नाव काही असो सत्य फक्त शोषण, पैसा.

आनंदयात्री 11/03/2008 - 11:07
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. पटले! अन मी एक धाडसी विधान करु इच्छितो, वर उल्लेखलेल्या सर्व दोषांचे (ज्यामुळे हा व्यवसाय अनैतिक आहे) निर्मुलन जरी झाले तरी हा व्यवसाय अनैतिकच राहिल. कारणः वेश्या व्यवसाय जितका जुना तितकाच माणुस हा कळपात रहाणारा प्राणी आहे हे ही सत्य खरे. आपली आजची समाजव्यवस्था ही पोट भरल्यानंतरच्या भुकांची वा मानसिकतेची (जसे प्रेम, भविष्याबद्दलची हवी असणारी निश्चितत) फलित आहे, असे मानण्यास जागा आहे. आयुष्याच्या प्रत्येक पर्वात सर्व सामान्य माणुस हा कोणत्या ना कोणत्या नातेसंबधांवर जगत असतो, जसे लहान असतांना आई वडिलांबरोबर, तारुण्यात प्रेयसी/सहचारिणी बरोबर, प्रौढावस्थेत सहचारिणी बरोबर, म्हातारपणात सहचारिणी अन मुलांबरोबर. आता या सर्व नातेसंबधात सुखी रहायला, अहंकार जपायला त्याने/ तिने व्यवसाय करणे गरजेचे असते, खाणकामगार सुद्धा कष्ट करतांना उद्याच्या सुखी आयुष्याचाच विचार करत असतो/ असावा. वेश्या व्यवसायात जेव्हा आपल्या समाजाचा बेस असणारी कुटुंबव्यवस्थाच जेव्हा बाद होते, तेव्हा हा व्यवसाय अनैतिक ठरतो असे मला वाटते. कारण बहुतांश वेश्यांना कुटुंबे नसतात/ होउ शकत नाहित, त्यांचे उत्तरायुष्य अत्यंत वाईट परिस्थितीत जाते परिणामी 'व्यवसाय' करण्याची कारणे फलित होउ शकत नाहित. प्लस काही प्रमाणात नादी लागलेल्या विवाहित पुरुषांचे सुध्धा संसार उध्वस्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय असावे. चोरी जशी अनैतिक, ती या समाजव्यवस्थेच्या मॉडेलला पुरक नाही तसेच वेश्या व्यवसाय पण अनैतिकच तो ही पुरक नाही.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 12:52
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी या व्यवसायाला जन्म देणारे वि़कृत, षंढ (कितीही आणि कितीही खालच्या शिव्या दिल्या तरी अपुर्‍याच पडतील) पुरुष समाजात होते, आहेत आणि रहातील. ते अशा ठिकाणी जाउन आपली XX XXX घेतात. अशा व्यावासायिक स्त्रिया आहेत म्हणून कित्येक संभाव्य बलात्कार वाचतात / वाचत असतील. (माझा या विषयावर सखोल अभ्यास नाही, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.) ह्याला उपाय म्हणजे १००% सुरळीत समाजव्यवस्था आणि समाजाची १००% सात्विक मनोवृती - दोन्ही गोष्टी अशक्य आहेत! मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 12:59
करा पण, तुम्हाला जर नैतिक असे वाटत असेल तर त्याची काही कारणे द्या ! म्हणजे आम्हाला (म्हणजे माझ्यासारखे मत असणार्‍या) कळेल तरी की हा व्यवसाय नैतिक कसा आहे ते !

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 14:33
प्रथम, मी हा व्यवसाय नैतिक आहे असे म्हटलेले नाही.
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी...
ह्या समाजात अनेक अनावश्यक नैतिक आणि आवश्यक अनैतिक व्यवसाय आहेत. लाच घेणे/देणे, हुंडा घेणे/देणे, राजकारण (विशेषनाम नव्हे.. अनेक व्यवसायांतील राजकारण जे सहकार्‍यांबरोबर, कर्मचार्‍यांबरोबर खेळले जाते) असे अनेक समाजघटक आहेत पण बर्‍याचदा ते करणार्‍यांची प्रतिमा मात्र स्वच्छ असते. वेश्याव्यवसायातही वेगवेगळे स्तर आहेत - काही पैशांसाठी (तर तुम्ही म्हणाल की मग हाच व्यवसाय का.. दुसरे नैतिक व्यवसाय ती करू शकते उदा. एक अशिक्षित बाई भांडी घासणे, घरकाम करणे इ. कामे करू शकते. पण अशा बायकांवरही लांडगे टपलेले असतात. गरीब बाईमाणूस असल्याने काही बोलूही शकत नाही. आणि पाळणाघरात, लेडिज होस्टेलमध्ये प्रत्येक निराधार निरक्षर स्त्रीला काम मिळतेच असे नाही. {म्हणजे भांडीघासणे, घरकाम ही कामे करू नयेत असे मी म्हणत नाही.. तर ते व्यवसायही स्त्री साठी १००% सुरक्षित आहेत असे नाही.}), काही भरपूर पैसा असून नुसतेच मजा करण्यासाठी (समाजातील उच्च स्तरातील बायका) , एखादी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, एखादी पत्नी नवर्‍याच्या आजारासाठी, काही गावी असलेल्या घरी पैसे पुरविण्यासाठी.. अशा एक ना अनेक स्तरातील स्त्रीया असतात. तर प्रत्येक बाई ही आवडीने हा व्यवसाय पत्करत नाही. माझे म्हणणे असे की हा व्यवसाय जरी अनैतिक असला तरी तो आणि असे अनेक व्यवसाय आता समाजाचा घटक आहेत. ("वेश्याव्यवसायारहित समाज" हे हवेहवेसे पण कायम स्वप्नच रहाणार आहे. कारण पुरुष.. ज्याच्या सुप्त भावनेने ह्यास जन्म दिला.) वेळ आल्यावर सगळे पाठ फिरवतात. नातेवाईक मदत करत नाहीत. मार्ग असतो, पण प्रत्येकीला वाईट वेळ आल्यावर सापडतोच असे नाही. काही वाटा चुकतात. वाटेवर यायची काहींकडे अक्कल नसते. म्हणून त्या अनैतिक नाहीत तर व्यवसायाचे मूळ - पुरुष अनैतिक. तरी कृपया अशा अशिक्षित गरजू महिला ज्यांना समाजसेवी संस्थेकडे जायचे सुद्धा ज्ञान नसते, त्यांसाठी आपण नैतिक व्यवसायाचे पर्याय सुचवू शकता का? मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 14:46
आपण माफ केलेत आम्ही उपकृत झालोत. आणी बहुतांश अशिक्षित गरजू महिला नैतिक व्यवसायच करतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे, या कारणामुळे आम्ही कोणतेही पर्याय सुचवु शकत नाही. धन्यवाद.

"मला वेश्याव्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते," असे जवळपास कुणीही म्हणणार नाही. हा 'धंदा' शोषणावर आधारित आहे. बहुतेकांना भुलवून, फसवून ह्या व्यवसायात आणले जाते. तर अनेकांना कमाईसाठी दुसरा कुठला चांगला पर्याय उपलब्ध झाला असता तर ते इकडे वळलेच नसते. त्यामुळे हा व्यवसाय, शोषणावर आधारित इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच, अनैतिकच वाटतो. १. तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?" असे एकाने विचारल्यावर एकीने "मला 'आयएएस ऑफिसर' व्हायचे होते/आहे," असेही सांगितल्याचा एक खरा किस्सा मला एकाने ऐकवला आहे. कदाचित ती 'हाय सोसायटी'ची असती तर तिला असा प्रश्न विचारण्याची हिंमत संबंधिताला झाली नसती. किंवा तिचे असे उत्तर देणे आम्हा खोटारड्या लोकांना हास्यास्पदही वाटले नसते. असो.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 11/03/2008 - 19:51
नुसते वेश्या व्यवासायच का? धुणी भांडी करणार्‍या महिलांना देखिल हा प्रश्न (तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?)विचारला तर "मला हा व्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते" अहे कुणीही म्हणणार नाही.. कारण हे सर्व व्यवसाय समाजात फारसे प्रतिष्ठा नसणारे व्यवसाय आहेत इतकेच.. परंतू त्यामूळे ते 'अनैतिक' असलेच पाहिजेत असे मात्र नाही. धुणीवाली/ भांडीवाली ह्यांच्या कामाला कुणीही अनैतिक म्हणणार नाही!

In reply to by कोलबेर

कोलबेर, धुणीवाली आणि भांडीवाला ह्यांच्या कामाला कुणीच अनैतिक म्हणणार नाही. पण ह्या कामांत शोषण आहेच. ह्या बायांना भविष्यनिर्वाह निधी (प्रॉविडंट फ़ंड), ग्रॅच्युइटी (मराठीत काय म्हणतात), किमान वेतन मिळायला हवे. इतरांसारख्या सुट्ट्या मिळायला हव्यात. आम्ही ह्या गोष्टी देतो काय? नाही! थोडक्यात दोन्ही ठिकाणी सेवा घेणारे अनैतिक कामच करीत आहेत आणि परिस्थिती जैसे-थे राहण्यास कळत-नकळत कारणीभूतही ठरत आहेत.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 14/03/2008 - 03:18
बरोबर... धुणी वाली आणि वेश्याच कशाला..अगदी (काही) सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही हे शोषण चालते..आणि कसल्याही प्रकारचे शोषण हे अनैतिकच त्यात काहीही वाद नाही..पण म्हणून सरसकट संपूर्ण व्यवसायच अनैतिक म्हणता येईल का?..समजा वेश्या व्यवसाय कसलेही शोषण न होऊ देता चालवला तरीही तो अनैतिकच ठरेला का?

१) कोठेवाली/घरवाली ही व्यावसायिक; वेश्या ही नोकरदार/गुलाम (अनुभवातुन तीच पुढे व्यावसायिक होउ शकते) आणि ग्राहक हा गिर्‍हाईक. २) कुठलाही व्यवसाय हा ग्राहकांच्या गरजेतून निर्माण होतो. ३) नैतिक / अनैतिक, प्राकृत / विकृत सापेक्ष आहे ४) ही तुलना भुक लागली असता व घरात अन्न नसता उपहारगृहात जाणे, डबा लावणे किंवा उपाशी राहणे याच्याशी करुन पहा. ५) ही तुलना नाट्यनिर्माता , रंगकर्मी व मायबाप प्रेक्षक यांच्याशी करुन पहा ६) गणिका व्यवसाय हा पुर्वीपासुन आहे. योग्य/अयोग्य ही मतमतांतरेही पुर्वीपासूनच आहेत. ७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय? ८) हा व्यवसाय नसता तर बलात्काराचे गुन्हे वाढले असते असे म्हणणे म्हणजे या व्यवसायाचे समर्थन करणे होत नाहि. तो प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व सारखा आहे. ९) योनिशुचिता जशी गौण व्हायला लागेल तसा हा व्यवसाय वाढीस लागेल १०) वेश्यांच्या जागी आपल्या आया बहिणि असत्या तर? याचे चित्र डोळ्या समोर आणा. असे करताना स्वामी विवेकानंद यांची शिकागो ला वेश्यावस्तीकड फेरफटका मारताना " या तर आमच्या भगिनी आहेत" या बोधकथेतील वाक्याची आठवण करुन पहा. ११) http://www.misalpav.com/node/114 इथ 'पोटाला नाही आटा अन चोटाला उटण वाटा 'इथे ओशाळणारी अश्लिलता आठवते. १२) क्या करें शेवटी अपना अपना हाथ अपना अपना जगन्नाथ प्रकाश घाटपांडे

अनिकेत 11/03/2008 - 16:25
अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि बायका, हे कायमच नफा देणारे धंदे होते आणि आहेत. युरोपातील वेश्याव्यवसायावर ही एक थरारक documentary आहे.. आपल्याकडे जे नेपाळमधे किंवा गरीब राज्यांत होते तेच पूर्व युरोपातही होते. येथे नैतिकतेच्या गप्पा मारण्याआधी अवश्य पहा. पण अधिक पैशांसाठी (गरजेपोटी नव्हे!) धंदे करणार्‍या कॉलेजातील पोरी अथवा डेली सोपमधील नट्यांचा उपभोग घेण्यात गैर आहे असे मला वाटत नाही. अनिकेत

नैतिक, अनिकतेचा विचार करण्याअगोदर आमचे मत असे आहे की, वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. जशी श्रमाला प्रतिष्ठा आहे,त्या प्रमाणे. ती मिळाली की नैतिक, अनैतिक राहणार नाही असे वाटते. पण, व्यवसाय म्हणतांना वेश्यांना आर्थिक गरजा भागवता येत नाही, म्हणुन त्या वेश्या व्यवसाय करतात. जर आर्थिक संपन्नता असेल तर त्या या गोष्टीकडे वळल्या असत्या का ? याचे उत्तर मला तरी 'नाही' असेच वाटते. ती सामाजिक गरज असेलही पण प्रतिष्ठा नसल्यामुळे मोठ मोठ्या मॉल्स मधे माणूस जितक्या सहजपणे प्रवेश करतो तितक्या सहजपणाने वेश्येच्या वस्तीत प्रवेश करण्याचे धाडस करतो का ? 'नाही'. म्हणुन समाधानासाठी ( आर्थिक सुबत्ता इथे प्रश्न नाही ) येणार्‍या स्त्रिया वेगळ्या. पण अधिक नफ्यासाठी व्यवसायात येणार्‍या या गरजू स्त्रिया आहेत, आणि त्यातही उच्च गरजा पूर्ण करण्यासाठी या अशा व्यवसायात तरुण मुली, स्त्रिया दिसतात. पण,योनिशुचिता ही व्यवसायातील/ बाजारपेठेतील मुख्य अडचण असल्यामुळे येत्या काळात वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल आणि तीही भारतात यावर माझा तरी विश्वास नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वस्तूंच्या अगर सेवा पुरविण्याच्या व्यवसायात आणि या व्यवसायात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे शरीराच्या मर्यादा व मनाचे आस्तित्त्व . या मर्यादांमुळे तिला ग्राहक नाकारण्याचा हक्क असायला हवा. असे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच फूट उंच व ४० किलो वजनाच्या स्त्रीकडे १२५ - १५० किलो वजनाचा सहासाडेसहा फुटी माणूस किंवा गलिच्छ किळसवाणा पण भरपूर पैसे मोजायला तयार असणारा श्रीमंत माणूस, पोलीस, गुंड वगैरे व्यक्ती आली तर तिने काय करावे? ४अ मुद्याबाबत बहुतेक लोक सहमत होतील. असो. एक चांगली चर्चा. धन्यवाद.

धनंजय 12/03/2008 - 02:56
आणि नवीन मुद्दे आले आहेत. असे वेगवेगळे विचार वाचून चर्चा प्रगल्भ होत आहे. तात्यांनी उल्लेख केलेला विवाहपूर्व संबंधांचा मुद्दा अवांतर नाही. अविवाहित व्यक्तीला लबाडीने भोग घेणे आणि विकत भोग घेणे हे दोनच पर्याय नाहीत. दोघांच्या स्वातंत्र्यास धक्का न देता, दोघांच्या भावनांची कदर करून, दोघांच्या गरजा भागवणे हा पर्याय आहेच. या बाबतीत "दोघांच्या भावनांची कदर, स्वातंत्र्य" यांना मी बर्‍यापैकी कडक निकष लावतो तो मागे एका कवितेत चर्चिला आहे. हा पर्याय असणे माझ्या विचारधारेला समर्थन देतो - कारण हा राजमार्ग असताना जो अविवाहित व्यक्ती वेश्याबाजारामुळे चळतो, तो त्याच्या इच्छेने, वेश्याबाजाराच्या अनैतिक भुरळीमुळे नाही. काही वेश्यांना पुष्कळ शुल्क मिळते हे खरे आहे. कालच न्यू यॉर्क राज्याचे राज्यपाल गोत्यात अडकले (दुवा) त्या ठिकाणच्या वेश्या ताशी १०००-५००० डॉलर दर लावत. अशा वेश्यांना बहुतेक नकाराधिकाराचे, किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य असावे. येथे राज्यपाल स्पित्झर हे विवाहित आहेत की नाहीत, त्यांच्या कुटुंबसंस्थेवर काय परिणाम होत आहे, हे बघण्याची मुख्य जबाबदारी स्पित्झर यांचीच आहे, ते जिला भेटले त्या "क्रिस्टेन"ची (विक्रेती म्हणून) नव्हे. जर हा बाजार खरोखर मुक्त आणि स्वतंत्र व्यक्तींमधला असेल तर हा माझ्या आर्थिक चर्चेतून निसटतो. तो मी केलेल्या वेगळ्या चर्चेत याच्या नैतिकतेचा विचार व्हावा - त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांस पूर्ण माणुसकीने वागवत आहेत की नाहीत. तेही होत असेल - कोणी कोणाला जनावर किंवा वस्तू म्हणून वागवीत नसेल तर या विषयाबद्दल मला वेगळे कुठले नैतिक कुतुहल नाही. तरीही हा अपवादात्मक, दुर्मिळ मालाचा व्यापार आहे. माझा मुख्य मुद्दा बहुसंख्य वेश्यांबद्दल आहे, ज्या पूर्ण स्वातंत्र्याने व्यापार करत नाहीत. मुक्तसुनीत म्हणतात (शिवाय वेगळ्या शब्दांत प्राजु, चित्तर, अनिकेत यांनी दिलेली चित्रफीत, म्हणतात) की पर्याय उपलब्ध असताना हा पेशा कोणीही स्वीकारणार नाही. यात बळजबरी, किंवा अगतिकता आलीच. (याला अपवाद स्पित्झर यांस विक्रय करणारी, वगैरे असेल - आपल्याला माहीत नाही.) मीही तो अगतिकतेचा मुद्दा आर्थिक ताळमेळ लावून करू इच्छितो. तो मुक्तसुनीत म्हणतात तसा सोपा नाही. मागे मुंबई पोलिसांनी "सोडवलेल्या" काही वेश्यांबद्दल ऐकले होते. त्यांचे म्हणणे होते की आम्ही स्वखुषीने धंदा करत आहोत. सोडवणूक नको होती. अनिकेत यांनी दिलेल्या चित्रफितीतही काही वेश्यांचे असे मत होते, की जर इंग्लंडमधून हद्दपार होणार असतील तर गुलामगिरीतून सोडवणूकच गैरसोयीची. (इथे अगतिकता थेट दिसते, पण मुंबईत सोडवलेल्या वेश्यांच्या बाबतीत ते स्पष्ट दिसत नव्हते.) माझ्या समान मनुष्य म्हणून त्या "आपखुषी" वेश्यांची साक्ष खरी मानण्यास माझी तयारी असलीच पाहिजे. दुसर्‍या कुठल्या बाबतीत थोडाफार अगतिक असल्याचा माझा अनुभव आहे, म्हणून त्यांचे "आपखुषीचे" विश्लेषण करू इच्छितो. आर्थिक गणित करून त्यांचा बाजार स्वातंत्र्याचा नाही हे दाखवतो. सर्वच वेश्या आपण नाखुषीने या धंद्यात आहोत अशी तक्रार करत असतील (म्हणजे कारकूनही तक्रार करतात, त्यांपेक्षा जास्त!) तर या लांब सिद्धतेची गरज नव्हती. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही (टंकनदोष सुधार केला). सहज आणि काही वेगळ्या पद्धतीने प्रकाश घाटपांडे विचार करतात की येथे नैतिक/अनैतिक सापेक्ष आहे, किंवा होऊ लागले आहे. त्या दोघांच्या बहुतेक मुद्द्यांचा मी स्वीकार करत असलो तरीही पूर्ण सापेक्षता नाही असे माझे मत आहे. अधिकाधिक सापेक्षता मानूनही नैतिकतेचा विचार केला जाऊ शकतो, असे मला या चर्चेत म्हणायचे आहे. स्वातंत्र्यहरण आणि मनुष्य-मूल्य-समानता (मूल्य=किंमत) या सापेक्ष मानू नयेत, असे मला वाटते. या नैतिक मूल्याला (मूल्य=तत्त्व) इंग्रजीत गोल्डन रूल असे म्हणतात. "जसे माझ्याशी वागणे इष्ट तसे सर्वांशी वागणे इष्ट, जसे माझ्याशी वागणे अनिष्ट तसे सर्वांशी वागणे अनिष्ट". "इष्ट" म्हणजे मला जपणे, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मला स्वस्त न करणे. हे कमीतकमी तत्त्व सापेक्ष मानू नये. बाकी प्रकाश घाटपांडे म्हणतात तसे वेश्यांना आयाबहिणी मानूनच त्यांच्या व्यापारातील स्वातंत्र्याचे विश्लेषण करतो आहे. "७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?" हे अगदी चपखल माझे तर्कशास्त्र आहे - फक्त माझा निष्कर्ष आहे की विद्यापीठाशी वाटाघाटीत माझ्या बुद्धीचे मूल्य ठरवण्याचे मला जितपत स्वातंत्र्य आहे, तितके स्वातंत्र्य शरीरविक्रीच्या वाटाघाटीतही असले पाहिजे. माझ्या गणिताप्रमाणे तितके स्वातंत्र्य नाही, त्याहून खूपच कमी आहे, त्यामुळे ती बाजारपेठ अनैतिक मानावी. सहज विचार करतात की मुक्त शरीरसंबधाची मुभा असलेल्या पाश्चिमात्य देशांत वेश्याबाजार अजून कार्यरत का? त्याचे कारण हे असावे की मुक्त (मोफत) भोग घेणारे व्यक्ती आणि विकतचा भोग घेणारे व्यक्ती बहुधा वेगवेगळे असावेत. "मोफत" शरीरभोग घेण्यात भावनांचा, वेळेचा खर्च करावा लागतो, हे विसरता कामा नये. तो खर्च करण्यास जे असमर्थ आहेत, त्यांना कदाचित रोख व्यवहारच सोपा जात असावा. मनस्वी आणि घाटपांडे "या सेफ्टी-वाल्वमुळे काही संभाव्य बलत्कार टळतात" त्याच्याकडे लक्ष वेधतात. हा मुद्दा वेश्याव्यवसाय या संदर्भात लागू तर आहेच. पण नैतिकता या संदर्भात लागू नाही असे तेही म्हणतात, ते योग्यच. मनस्वी अन्य कामधंद्यासाठी मुभा नसलेल्या स्त्रियांच्या अगतिकतेबद्दल सांगतात. पण या अगतिकतेमुळे त्या कामाला लागलेल्या स्त्रियांना शुल्क ठरवायचे स्वातंत्र्य नाही हे त्यांचे मत आहे, असे त्यांच्या लिखाणावरून मी समजतो. प्राडॉ मुद्दा उपस्थित करतात की या श्रमाला प्रतिष्ठा नाही; योनिशुचितेचे स्तोम आहे, याची आठवण देतात. सुधीर कांदळकर सांगतात की सेवा पुरवण्याबाबत नकाराधिकार असल्याशिवाय हा व्यवसाय अन्य व्यवसायांपेक्षा जाचक आहे, हे पटण्यासारखे आहे. कोलबेरही श्रमबाजाराची नैतिक तत्त्वे लागू व्हावीत, अशा मताचे दिसतात. सर्वांपेक्षा आनंदयात्री वेगळा दृष्टिकोन आणतात. त्यांचे मत असे की वेश्याव्यवसाय हा समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या कुटुंबसंस्थेला घातक आहे. यातही ते दोन्हीकडून विचार करत आहेत ही त्यांच्या विचारातील प्रगल्भता आहे. वेश्येला कुटुंबसुख नकारले जाते हा त्यांचा मुद्दा एक आगळीवेगळी सहानुभूती दाखवतो. वेश्येला जोडीदार-पती मिळण्याचे सौख्य नाही, हे व्यापाराच्या दृष्टीने सक्तीचे नाही, तरी आजच्या समाजातली परिस्थिती आहे. शारिरिक इजेसारखी ही मानसिक इजा आहे. अशा प्रकारची प्रीति-वैफल्याची मानसिक इजा काही थोड्याच काही व्यवसायांत होते. कुठल्याकुठे वर्षानुवर्षे पोस्टिंग झालेले सैनिक, खतरनाक व्यवसायामुळे षंढत्व आलेले कामगार, वगैरे. या कामगारांना या इजेच्या बदल्यात ज्या प्रकारचा मोबदला मिळतो, तितपत मोबदला वेश्येला मिळाला नाही, तर तो व्यापार योग्य मूल्याचा कसा म्हणावा. (वर तात्यांनी उल्लेखलेल्या उच्चवर्गीय वेश्यांना जोडीदार-पतीचे सुख मिळत असते, ते अपवादात्मक. तसेच प्रसिद्ध सिनेनट-नट्यांना पुढे जोडीदार करता येत असावा. पण त्यांचे सेवाशुल्क बघितल्यास व्यापारातील त्यांचे स्वातंत्र्य, नकाराधिकार, वगैरे बाजारबसव्यांपेक्षा अधिक असतो हे दिसते.) वेश्यागामी व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त होते, हा दुसर्‍याबाजूनेही आनंदयात्री विचार करतात, तो योग्यच. पण त्याविषयी वरील लेखात मी थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. एक मुख्य की त्यांचे मुद्दे व्यक्तींच्या कुटुंबाचा घात होण्याबद्दल आहेत. समाजात कुटुंबव्यवस्था नष्ट होण्याबद्दल नाहीत. दुसर्‍या कोणाचे तेही मत असू शकते. पण वेश्याव्यवसाय हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे, हे चर्चेत अनेकांनी नमूद केले आहे (वर्ल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन). त्या अर्थी वेश्याव्यवसाय हजारो वर्षांत समाजातील कुटुंबव्यवस्थेला नाहिसे करू शकला नाही, त्यात तेवढी शक्ती नाही, हे उघडच आहे. मला वाटत होते की केवळ "अनेकांशी भोग भोगणे अनैतिक हे गृहीतक मानावे" असे म्हणणारे कोणी चर्चेत सहभागी होईल. त्यांच्याशी माझा वेगळा वाद झाला असता - बहुतेक एकमेकांचे मुद्दे पटले नसते. पण तेही उद्बोधक ठरले असते.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:46
>>> मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक आहे. या ऐवजी मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही. असे वाचावे.

विसुनाना 12/03/2008 - 12:38
कालपासून चर्चा वाचत असलो तरी प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळाला नाही. चर्चेचे प्रस्तावक आणि संचालक श्री. धनंजय यांनी चर्चेचा गोषवारा घेतल्यामुळे चर्चा संपली की काय अशी शंका आली. परंतु विषय फारच व्यापक असल्याने ती पुढे सुरू राहील असे वाटते. म्हणून माझेही मत - चर्चा 'वेश्या व्यवसायाची नैतिकता/अनैतिकता' या विषयावर सुरू असली तरी केवळ स्त्री वेश्यांपुरतीच मर्यादित राहिली काय अशी शंका येते. वेश्यांमध्ये लिंगपरत्वे तीन प्रकार आहेत - पुरुष वेश्या - (जिगोलो), क्लीब वेश्या आणि स्त्री वेश्या. हे तीन्ही व्यवसायप्रकार फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत. शिवाय समलैंगिक वेश्यावृत्ती आणि विषमलैंगिक वेश्यावृत्ती यांच्याबाबतही विचार झाला पाहिजे.(केवळ समलैंगिकता या विषयावर अथवा मानसिक लैंगिकता या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकेल.) माणूस हा विचारशील असला तरी प्राणी आहे. :) वंशसातत्य टिकवणे हा त्याच्या अस्तित्वाचा इतर सर्व जीवसॄष्टीप्रमाणे एक प्रमुख (कदाचित एकमेव) हेतू आहे. आणि त्यामुळे त्याला शारिरिक आणि मानसिक लैंगिक गरजा असणारच. शिवाय समलैंगिकता अनेक प्राण्यांमध्येही आढळते. निसर्गतयः अनेक भागिदारांशी संबंध ठेवण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये दिसते.या सर्व संबंधांत पशूनरांची अनेक पशूमाद्यांशी संबंध जास्त आढळतात. याउलटही काही उदाहरणे आहेत. या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करण्याची 'गरज' माणसानेच निर्माण केली आहे. कारण केवळ पशुत्वाप्रमाणे संबंध नियंत्रित केले असते (किंवा अनियंत्रित ठेवले असते तर) तर मानवसमाजातील अनेक कमजोर, दुबळ्या नरांना त्यांचे वंशसातत्य टिकवणे अशक्य होऊन बसले असते. याशिवाय अनेकसंबंधी लैगिक वर्तनामुळे शारिरिक रोगांचेही प्रमाण वाढून समाजाचा र्‍हास होण्याची शक्यता मानवाने पूर्वीच हेरली असावी. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे एकूणच लैंगिक नैतिकता (पक्षी -समाजाने मान्य केलेले शरीरसंबंध) ही मानवसमाजाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनातून निर्माण झाली आहे.किंबहुना विवाहसंस्थेचे मूळही यातच आहे.लैगिक अनैतिकता हा सर्वाधिक सामाजिक तुच्छ्तेचा आणि घृणेचा विषय आहे. Morality: the character of being in accord with the principles or standards of right conduct; right conduct; sometimes, specif., virtue in sexual conduct त्यामुळे एकाद्या व्यक्तीच्या विवाहबाह्य, विवाहपूर्व अथवा समलैंगिक संबंधांकडे समाजाने अनैतिक म्हणून पहाणे स्वाभाविकच आहे. वेश्याव्यवसाय यात मोडतो हे स्पष्टच आहे. परंतु कोणत्याही गरजा विचारांच्या सहाय्याने काबूत ठेवायच्या किंवा नाही ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. काही लोकांच्या गरजा विचारांवर मात करण्याइतक्या प्रबळ असू शकतात. तर काही लोकांना मिळणारे प्रलोभन हे विचारांवर मात करणारे असते. हे केवळ लैंगिक गरजांबाबतच नव्हे तर इतरही सर्व गरजांना लागू होते. यातूनच सामाजिक हिताची नैतिकता भंग होण्याची शक्यता निर्माण होते. (इथे पुलंचे रावसाहेब आठवतात - 'तुम्ही पण शहाणेच की वो! म्हणे चोरी कशाला करायची, मागून घ्यायचे...'किंवा 'घरी एक चांगलं सुख मिळत असलं तर माणूस बोगारवेशीत कशाला जातंय वो?') Ethics: the system or code of morals of a particular person, religion, group, profession, etc. त्यामुळे एखाद्या माणसाने स्वतःचे वर्तन हे नैतिक किंवा अनैतिक ठरवणे हा ज्याचात्याचा अधिकार आहे. असा गुंतागुंतीचा मामला आहे. माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी. (उदा. उच्चभ्रू स्त्री वेश्या, पुरुष वेश्या आणि क्लीब वेश्या.) अलेक्झांडरसारख्या पुरुषाबरोबर हेफायस्तियनचे समलैगिक संबंध होते. हेफायस्तियन हा एक प्रकारे पुरुष वेश्याच होता असे म्हणावे लागेल. तसेच काही देशात/प्रांतात (जसे गोवे - भाविणी) वंशपरंपरेने काही स्त्रिया हा व्यवसाय करतात. त्यात त्यांच्या आर्थिक फायद्याचा मोठा वाटा असतो. 'राख' हा प्रकारही याच पद्धतीचा आहे. अर्थात या भागिदारांमधील एक किंवा दोन्ही विवाहित असतील तर त्यांच्या इतर (वैवाहिक) भागिदारांचे या व्यावसायिक संबंधांमुळे (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही ना? याचाही या नैतिकतेच्या व्याख्येत विचार करावा लागेल. पण व्यावसायिक शरीर संबंधात जर कोणत्याही बाजूचे (आर्थिक, शारिरिक, मानसिक) नुकसान होत असेल तर मात्र तो अनैतिक आहे असे म्हणावे लागेल.बारबाला या कितीही उत्कृष्ट नृत्यांगना असल्या तरी त्यांच्या नृत्यातला शारीरभाव आणि कामुकता यांचा वापर त्या आर्थिक फायद्यासाठी करत होत्या हे उघड आहे. त्यामुळे अनेक पुरुषांचे आर्थिक नुकसान झाले. म्हणून तो व्यवसाय अनैतिक. केवळ अंधश्रद्धेमुळे (जसे जट आली म्हणून देवदासी) एकाद्या व्यक्तीला तिच्या मनाविरुद्ध/ तिला न कळता या व्यवसायात ढकलणे अनैतिक. गरीबीमुळे एखाद्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध हा व्यवसाय करायला लावणे अनैतिक. वेश्येच्या संबंधांमुळे जर लैंगिक आजार होणार असतील तर ते अनैतिक. रखेलीमुळे वैवाहिक जीवनात पत्नी, मुले यांची आर्थिक, मानसिक कुतरओढ झाली तर ते अनैतिक.अशी अनेक उदाहरणे देता येतील. सध्या इतकेच. श्री. धनंजय आणि इतरांची मते कळावीत. अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)

In reply to by विसुनाना

अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)
हे अवांतर नसुन मला तर समांतर वाटते. मी मराठी वरील ही चर्चा मी पाहिली नाहि. पण अशा प्रकारची मते नवीन नाहीत. आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव प्रतिवादकाच्या चेहर्‍यावर नक्कि असणार. "एवढा गरिबीचा कळवळा आहे तर आपल्या घरातील संपत्ती का नाही वाटून टाकत?" "एवढा पुळका आहे तर स्वतःच्या घरात ठेउन घ्यायचे!" "आम्ही काय अन्नछ्त्र उघाडल नाय, यवढ आसन तर सोताच्या घरात जेवायला बोलावचं" वगैरे वगैरे सदृश विधाने आपण नेहमी ऐकत असतो. जंगल कमी झाल्यावर बिबटे मानवी वस्तीत शिरतात. पाण्यासाठी ,अन्नासाठी; प्रजोत्पादनासाठी नव्हे. मग बिबट्यांच्या नावे हाकाटी होते. "एवढी बिबट्याच्या भुकेची काळजी आहे तर आपली मुल जाउ द्यात कि बिबट्याच्या तोंडात?" अशी पण चर्चा सुरु होउ शकते. "समजा ज्यांना हा सेफ्टी व्हॉल्व वाटत नाही त्यांच्या घरातील स्त्रिया समाजातल्या पुरुषी कामांधतेला बळी पडल्या तर?" असाही प्रश्न उपस्थित होतो. या आहेत म्हणुन आपल्या आयाबहिणि सुखाने जगताहेत (त्यातल्या त्यात) . स्वामी विवेकानंदांनी म्हणुन तर त्यांना भगिनी म्हटलं . अस मानणारा एक लोक प्रवाह आहे. मुरळ्या, देवदासी या समाजातील धर्मलंडांची सोय व्हावी म्हणुनच निर्माण झाल्या. त्याला 'द्यवाची शेवा' असा धार्मिक पाठिंबा दिला. मूळ प्रश्न असा आहे कि लैंगिक भुक भागली नाही म्हणुन माणुस मरत नाही. पण लैंगिक भूक हि नैसर्गिकच आहे. ती शमली नाही तर समाज स्वास्थ्य टिकेल का? असा आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 12/03/2008 - 15:37
आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव चेहेर्‍यावर होताच. चर्चेतले एक ऐकीव मत (माझे नव्हे) म्हणून अवांतरमध्ये नोंदवले. आपलेही मत ग्राह्य आहेच.

In reply to by विसुनाना

धनंजय 17/03/2008 - 08:01
तुमच्या पुढील म्हणण्याशी सहमत :
माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी.
वेश्याव्यवसायाच्या बाबतीत नैतिक गणित करत असताना या तीन प्रकारच्या शरीरविक्रेत्यांत मूलभूत फरक करून काही हशील नाही. पण तपशिलांत फरक येऊ शकेल. सामाजिक गुप्ततेमुळे आर्थिक/मानसिक/शारिरिक फायद्या-तोट्याचे गणित तिघांमध्ये वेगवेगळे येऊ शकेल. त्यामुळे एखादी बाजारपेठ कमीअधिक प्रमाणात अन्याय्य असू शकेल. या चर्चेत मी बहुतेक शरिराच्या क्रय-विक्रयाबाबत विचार केला आहे. त्यामुळे बाजार मुक्त की नाही, विक्रेत्याला आणि ग्राहकाला किंमत ठरवण्याचे किंवा नकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही, अगतिकतेमुळे अयोग्य किंमत ठरवली जात आहे की नाही, या निकषांवर न्याय-अन्याय ठरवता येतो. क्रय-विक्रय नसला तर माझ्या मते लैंगिक संबंधांच्या नैतिकतेचे वेगळे निकष असावेत - कारण बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण करता येत नाही. मग ते विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध कुठले का असेनात. बाजारात आपल्याला बराच थोड्या वेळाचा, मुदतीचा विचार करावा लागतो. देण्या-येण्याचा हिशोबखाते किंमत भरल्यानंतर सामान्यपणे बंद केले जाते. (किंवा किंमत आगाऊ दिल्यास सेवा पुरवून झाल्यानंतर हिशोबखाते बंद केले जाते.) पैशांचे हस्तांतरण होत नसेल तर हिशोबाच्या खात्याची मुदत लांब असते. त्यामुळे नैतिकता ठरवण्यासाठी सामान्य बाजाराचे निकष वापरता येणार नाहीत. तेही मूलभूत निकष विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध सर्वांनाच सारखे असावेत. कोणाचेही मानव्य मूल्य स्वस्त होता कामा नये. सामाजिक परिस्थितीमुळे विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक या प्रकारांत "मानव्य मूल्य राखणे" कमीअधिक कठिण असेल, हे तपशील वेगळेवेगळे असतीलच. "सेफ्टी वॉल्व" उपमा ठीक आहे. पण कोणीही "सेफ्टी वॉल्व" होण्यासाठी औदार्य मागणे ठीक नाही. आजकाल ज्यांना आपण प्राण देण्याचे औदार्य मागतो (खाणकामगार, अग्निशामक, सैनिक, वगैर,) त्यांना त्या मानाने शुल्क देतो. इतकेच काय सैन्यातले अधिकारी पगाराबद्दल बोलले, पगारवाढीबद्दल बोलले, तर आपण त्यांना "उदार व्हा" असे म्हणून चूप करत नाही. तसेच "उदारपणे सेफ्टी वॉल्व व्हा" म्हणून अन्याय्य बाजारात बोळवण करू नये.

लिखाळ 13/03/2008 - 20:32
धनंजय, अतिशय छान लेख. .... नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. खरेच असेच वाटते. पण यावर अनैतिकतेचा शिक्का सर्व समाजात आहेच. पहा ना आत न्युयॉर्क मधले प्रकरण. यात पैशाच्या अपव्ययाबद्दलची ओरड आहे तसेच वश्या प्रकरण हा सुद्धा महत्वचा नैतिक मुद्दा आहे. वरचे सर्व प्रतिसाद वाचून झाले नाहित. वाचत आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

कोलबेर 14/03/2008 - 03:47
विसुनानांच्या प्रतिसादातुन ह्या विषयाला असणारे अनेक कंगोरे दिसल्याने आम्हीही आमचे पावशेर त्यात टाकतो आहोत :) मुळातच 'वेश्याव्यवसाय' ह्याची सामाजिक व्याख्या आपण समजतो तितकी संकुचित नाही. पैसे मोजुन शरिर उपभोगायला देते ती वेश्या इतकाच अर्थ 'वेश्या' शब्दातुन अभिप्रेत नाही. त्यालाही अनेक कंगोरे आहेत. एखादी स्त्री जेव्हा कामात बढती मिळवण्यासाठी (आपला स्वार्थ साधुन घेण्यासाठी..विशेषतः सिनेजगतात) वरिष्ठांना शरीर भोगायला देते अश्या स्त्री ला देखिल 'वेश्या' असेच संबोधले जाते.. म्हणजेच शरीर भोगायला देण्यामागे 'पैसे' हाच एकमेव मोबदला दरवेळेस असेल असे नाही.बर्‍याचदा अश्या स्त्रियांविषयी बोलताना अमकी अमकी पेक्षा, 'सरळ पैसे मोजुन घेणारी वेश्या बरी!( नैतिकतेच्या दॄष्टीकोनातुन)' असा देखिल उल्लेख केला जातो.. म्हणजेच जेव्हा जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही मोबदल्यासाठी/फायद्यासाठी एखाद्याला संभोग करु देते ती वेश्या अशी व्याख्या योग्य ठरेल का?..तर नाही..करण कधी कधी एखाद्या मुलीला आपल्या मना विरुद्ध लग्न करावे लागते. अशा वेळेस प्रेम दुसर्‍या कोणावर जडले असले तरी समाजाच्या दबावाला बळी पडून लग्न तिसर्‍याशीच केले जाते. ह्या स्त्रियांना देखिल आपल्या मनाविरुद्ध आपले शरीर दुसर्‍याच व्यक्तिला अर्पण करावे लागते( समाजाच्या कडवेपणा टाळण्याच्या मोबदल्यात)..पण त्याला मात्र कुणीही वेश्या/अनैतिक म्हणू शकत नाही. तेव्हा ही व्याख्या देखिल बाद!! थोडक्यात विषय दिसतो तितका सोपा नाही..:)

संस्कृत साहित्यात आपला संबंध वारंवार गणिका ह्या पात्राशी येतो. किंबहूना विदूषक आणि गणिका संस्कृत साहित्याचे अभिन्न अंग आहेत. ती गणिका देहविक्रय करतेच असे नाही तर काही गणिका केवळ आपल्या गाण्याने अथवा नृत्याने ग्राहकांची घटकाभर करमणूक करणार्‍या सुद्धा असतात. तसेच ह्या गणिका चाणाक्ष असतात आणि हेरगिरीसाठी त्यांचा फार उपयोग केलेला आढळतो (माताहारी सारखा). चाणक्याने हेरगिरीसाठी सुंदर, बुद्धिमति गणिकांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

बंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एक नाट्यप्रयोगा बद्दल माहिती http://www.indiatogether.org/2008/mar/wom-dhande.htm इथे वाचा. मीन सेशू या सामाजिक कार्यकर्तीने वेश्या अन्याय मुक्ती परिषद (VAMP) व संग्राम या एनजीओ च्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतात. त्यांनी ही निर्मिती केली. सुषमा देशपांडे यांनी दिग्दर्शीत केलेला प्रयोग या दुर्लक्षित विषयावरचे जनजागरण आहे. प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश 16/03/2008 - 15:27
वैश्या बनणे हे नैतिक की अनैतिक हा चर्चेचा विषय निवडण्याबद्दल धनंजय यांचे अभिनंदन वर अनेक घटकांचा उत्तम उहापोह झाला आहे. धन्ंजय यांचा सारांशही रोचक आहे. मी जरा उशीराच चर्चेत प्रवेश करत आहे. असो. वैश्या व्यवसायाची नैतिकता.. यात वैश्या 'व्यवसाय' हा शब्दच मला खटकतो. या बाजारातील प्रत्येक विक्रेती ही "व्यावसायिक"च असते असे नाहि. कित्येक जणी (किंवा बहुतांशजणी?) ह्या नोकर असतात. खरा व्यवसाय कोणीतरी वेगळीच व्यक्ती करत असते. तेव्हा या प्रकारास केवळ एक व्यवसाय ना नजरेतून बघणे मला सर्वस्वी चूक वाटते. आता नोकरीचे निकष लावा पाहु. आमच्या (आयटी) नोकरीशी तुलना करू. आमच्याकडे उत्तम जाहिरातीसाठी नोकरदार मंडळीनी केलेली आधीची प्रोजेक्टस बढवून नवीन क्लायंटला ऐकवली जातात, कधी एखादा क्लायंट आपखूशीने कंपनीचे नाव सुचवतो, क्लायंटने दिलेल्या पैशातून त्यात काम केलेल्यांचे पगार वगैरे तर होतातच शिवाय मुळ व्यावसायिकाला उत्तम मोबदला मिळतो, अनेकदा बराच एक्पिरियन्स झाला आणि तुमच्यात 'गुण' असतील तर बढती मिळते/पगारवाढ मिळते/आपल्या हवे तेच काम करायची संधी दिली जाते, एरवी इथे काय काम करायचे, कीती करायचे, कधी करायचे हे तुमच्या हातात नसते. आता हे सगळं वैश्यांनाही लागु होत नाहि का? मग हा व्यवसाय कसा? ही तर नोकरी !!! आणि नोकरी करतान सुरवातीला चॉईस नसतो त्यात ही नैतिकता कुठे? (निदान सुरवातीला) बर्‍याचजणांचे नोकरी असते म्हणून घर चालते (फार तर फार एका व्यावसायिकाची नोकरी आवडली नाहि तर दुसरा जॉईन करता येतो ) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मित्रांनो हा लेख व त्यावरील आपल्या सर्व चर्चा लिंकद्वारे मी त्या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था यांना पाठवल्या. मीना सेशू ज्यांचा उल्लेख मी वर प्रतिक्रियांमधे केला आहे त्यांनी त्या सेक्सवर्कर साठी काम करणारी वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संघटने द्वारे प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या काही ध्वनीप्रतिक्रिया त्यानी पाठवल्या आहेत व मिसळपाव चे आभार मानले आहेत.

मोदी आणि भाजपा सत्तेत यायच्या आधी मिपावर किती गंभीर विषयांवर प्रगल्भ चर्चा वादविवादसुसंवाद व्हायचे ! कुठेही राजकीय टिप्पण्णी नाही, कोणत्याही धर्मावर , धर्मपरंपरा श्रध्दांवर , कोणत्याही जातीवर, समाजावर चिखलफेक नाही, कुठेही तारतम्य सोडून तिरकस टिप्पण्णी नाही ! हा काथ्याकुट एक अतिषय आदर्श काथ्याकुट म्हणुन पिन करुन ठेवला पाहिजे मुख्यपानावर ! बाकी - श्या: , आमच्या काळचं मिपा राहिलं नाही आता !

Trump 27/05/2022 - 12:38
उत्तम निकाल आणि उत्तम लेख
देहविक्रय बेकायदेशीर नाही, सेक्स वर्कर्सचे अधिकार, पोलीस हस्तक्षेप अयोग्य, कंडोमचा वापर हा…; SC ने मांडलेले २१ मुद्दे https://www.loksatta.com/photos/news/2945214/sex-work-is-not-illegal-the-supreme-court-order-says-sex-workers-are-entitled-to-dignity-equal-protection-under-law-scsg-91/

In reply to by Trump

उत्तम निकाल ! भारत हळुहळु पाश्चिमात्य बुरसटलेल्या नैतिकतेच्या बकवास संकल्पनांच्या जोखडातुन मुक्त होत आहे हे पाहुन छान वाटले !

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 29/05/2022 - 16:55
मार्कस ऑरेलियस, मला वाटतं त्यास व्हिक्टोरिय नैतिकता ( victorian morality ) म्हणतात. हिने ब्रिटीशकालीन भारतात प्रचंड गोंधळ घातला होता. आ.न., -गा.पै.

sunil kachure 27/05/2022 - 12:46
लोकशाही देशात धोरणात्मक निर्णय घेणे हे लोक नियुक्त सरकार चे काम आहे. लोकशाही मध्ये लोक सत्ताधारी निवडतात. आणि तेच देशाला जबाबदार असतात. किती ही चांगला निर्णय असला तरी कोर्टाने धोरणात्मक निर्णय घेणे . अयोग्य आहे. त्या मुळे वेगळा पायंडा पडू शकतो. सरकार नी तसा कायदा करावा असे निर्देश देणे इथ पर्यंत कोर्टाचे निर्णय योग्य असे समजू शकतो.

चलत मुसाफिर 29/05/2022 - 21:16
लेख फार आवडला. देहव्यापाराला 'नैतिक' मान्यता नसणे याचे एकमेव कारण म्हणजे हा व्यवसाय पुरुषसत्तेच्या पायाला समूळ हादरा देतो. बाकी दुसरे काही नाही. गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे. ही भीतीदेखील निराधार आहे हे सांगायला नको. उद्या देहविक्रय समाजमान्य झाला तरी पुरुषसत्ता त्याला पुरून उरेल आणि आपले वर्चस्व अबाधित ठेवेल यात मला तरी काहीच शंका नाही. या संदर्भात निर्णयस्वातंत्र्य वगैरे मुद्दे उगाचच उकरून काढले जातात. सफाई कामगार, मोलकरीण किंवा हमाल होण्याचीही महत्वाकांक्षा कुणी बाळगून नसते. इतकेच काय, इच्छा नसताना डॉक्टर, अभियंता, व्यापारी झालेले लोकही सापडतील. पण त्यावरून या व्यवसायांना कुणी अनैतिक ठरवत नाही.

गामा पैलवान 30/05/2022 - 02:32
चलत मुसाफिर,
गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे.
यांत भीती कसली? जर प्रत्येक बाई पुरुषसत्तेस फाट्यावर मारून वेश्या बनली, तर कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल. पुरुषांना दुसरं काय हवं? असो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. लालबत्तीवस्तीत बापाला किंमत नसते. आईला मात्र अतिशय आदराने वागवलं जातं. मग ही पुरुषसत्ताक व्यवस्था म्हणायची का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल.
थोडीशी सुधारणा - कुठलीही नाही , जीला स्वतःहुन कामक्रीडेत भाग घेण्याची इच्छा आहे ती , आणि हाच ह्या व्यवसायातील युनिक सेल पॉईंट आहे ! स्त्री-लैंगिकतेचे गूढ ह्या धाग्यावर आलेल्या काही प्रतिसादा नुसार बहुतांश स्त्रियांना कळससुख अर्थात ऑर्गॅझम हा परमोच्च आनंद लाभतच नसतो , त्या केवळ करायचे म्हणुन, कर्तव्य म्हणुन सेक्स करत असतात , परिणामी कामक्रिडेतील स्त्रीचा सहभाग बहुतांश वेळा पॅसीव्ह असतो . (काही सन्माननीय स्त्रीयांचे काही मोजके रतिक्षण ह्याला अफवाद असतीलही , पण इन जनरल "उरका पटकन" हाच अ‍ॅटिट्युड असतो.) अशा वेळेस कल्पना करा की एक स्त्री जी स्वेच्छेने कामक्रिडेत सहभाग घेत आहे , जी पैसे घेत आहे , क्लायंट ला खुष करणे हाच जिचा उद्देश आहे तिच्या सोबतचा अनुभव कसला भिन्न असेल ! तसेच पुरुषाच्या नजरेतुन - ही स्त्री आवडली तर आवडली नाहीतर आजचे पैसे अक्कलखाती, नेक्स्ट टाईम नवीन बघु, ही काही कटकटी करणार नाहीये , डोके दुखते आज नको , मूड स्विंग्स वगैरे नखरे नसणार आहेत , बस्स आत्ता आहे हा क्षण एन्जॉय करायचा आहे - carpe diem. ह्या सिचुएशन मध्ये रतिसुखाचा अनुभव काहीतरी वेगळ्याच लेव्हल वरील असावा असा अंदाज आहे ... पुरुषासाठी अन स्त्रीसाठीही!!

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 30/05/2022 - 13:19
मार्कस ऑरेलियस, तुमच्या दुरुस्तीशी सहमत आहे. 'उपलब्ध असलेल्या कुठल्याही स्त्रीस पैसे फेकून वापरता येईल' असं म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

sunil kachure 30/05/2022 - 20:03
जगाचे माहीत नाही. पण भारताची लोकसंख्या १३०, कोटी आहे. कट्टर पुरोगामी स्त्री,पुरुष. कट्टर स्त्री हीत वादी स्त्री पुरुष. देह विक्रीस समर्थन देणारे महान विचारवंत. ह्या समाजाच्या सुधारित घटकात. १) मला सून देह विक्री करणारीच हवी. २)माझी बायको देह विक्री करते हे आमचे कार्ड. ३) माझी मुलगी मी ज्या कुटुंबात देह विक्री करण्याला मान्यता आहे त्याच कुटुंबात देईल. ४ माझी आई आणि बहिण देह विक्री करतात हे आमचे visiting कार्ड. असे मोठ्या अभिमानाने सांगणारा पुरोगामी,स्त्री हक्क वाला,सुधारणावादी,देह विक्री लं पाठिंबा देणारा. मी आज पर्यंत तरी कोणी बघितला नाही. १३० कोटी लोकात एक खरा पुरोगामी नाही. आणि म्हणे गणिका सन्मानाने समाजात फिरतील. अमेरिका,ब्रिटन जे आपल्या पेक्षा १०० वर्ष पुढे आहेत तिथे पण असे घडतं नाही.

sunil kachure 30/05/2022 - 07:52
काही लॉजिक नाही ह्या विचारला की पुरुष सत्तेला हादरा बसेल म्हणून वैश्या व्यवसाय च संबंध नित्ती मत्ते शी जोडला आहे. काही लॉजिक नाही .स्त्री बाजारात विकायला उपलब्ध असणे आणि ती पण तिच्यावर काहीच जबरदस्ती न करता. स्व मर्जी नी. ही पुरुषांसाठी अस्त्यंत फायद्याची गोष्ट आहे. स्त्री काही पैसे देवून सहज उपलब्ध असेल तर पुसृषांसाठी लॉटरी च आहे.. उद्या हे सामान्य झाले समाजाने स्वीकारले तर. स्पर्धा वाढेल आणि अगदी पन्नास ,शंभर रुपयांत पण ती उपलब्ध होईल. ह्या मध्ये स्त्री चच नुकसान आहे.पुरुषांचे नाही. असे स्त्री chya हक्काच्या बाता मारून बायकांना पुरुषांच्या समोर कमी कपड्यात बार मध्ये नाचवले आणि आजुन पण नचवले जाते. देह विकायला लागणे पोटासाठी ही वेळ येणे म्हणजे खाते सर्व समाजासाठी ही लाज वाटण्यासारखे गोष्ट आहे. आणि त्याला स्त्री चा हक्क ह्या गोंडस सुवर्ण वेष्टनात पॅक करून स्त्री चे शोषण करायचा. मतलबी डाव . तसे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांचा आहे

सुबोध खरे 30/05/2022 - 09:39
हे इतकं साधं असतं तर प्रश्नच नव्हता. बहुतांश वेळेस (९९%) मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. यात आई बापानी मुलींना विकण्यापासून प्रियकराने किंवा दलालाने फसवून किंवा सरळ गुंडांमार्फत अपहरण करून मुलींना धंद्याला लावले जाते. धंदा कायदेशीर केला तर केवळ मुलीला जीवाची धमकी देऊन मी हे स्वेच्छेने करते आहे असे कोर्टात बोलायला लावले तर जबरदस्तीने या धंद्यात ढकलल्या गेलेल्या परंतु बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या मुलींना यातून बाहेर पडण्याचा मार्गच बंद होईल. आता कदाचित १-२ % मुली अशा बाहेर पडत असतील पण या नंतर ते सुद्धा बंद होण्याचा धोका आहे. दुर्दैवाने वेश्याव्यवसायातून पुनर्वसन होण्याची शक्यता एकंदर समाजाच्या मनोवृत्तीमुळे फार कमी असते. लग्न करून बाहेर पडलेल्या बहुतांश मुली नवऱ्याने टाकून दिल्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. कारण अनेक वेळेस नवरे मुलीच्या चारित्र्याचा संशय घेताना दिसतात. या मुली धंदा केल्यानंतर पुरुषाशी बोलताना जास्त मोकळ्या असतात आणि याचा अनेक अर्थ नवरे ती निर्लज्ज/ वाईट चारित्र्याची किंवा तसलीच आहे असा काढतात. पुनर्वसन करून आई बापाकडे पाठवलेल्या बहुतांश मुलींना आई बापच आपल्या खोट्या प्रतिष्ठा किंवा पुढच्या मुलींच्या लग्नात विघ्न येण्याची भीती किंवा मुलीचा भाऊ तिला स्वीकारायला तयार नसेल तर त्याला नाराज करायचे नाही म्हणून या मुलींना स्वीकारण्यास नकार देतात. अनेक वेळेस सख्खे बाप सुद्धा परत या मुलींना विकून पैसे करताना आढळतात. या मुली निरक्षर किंवा अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे चरितार्थाचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. तर अनेक मुलींना या व्यवसायात काही वर्षे घालवल्याने अंगमेहनतीचे काम करावेसे वाटत नाही त्यामुळे त्या स्वखुशीने वेष्ट्यव्यवसायात परतल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे त्यांचे पुनर्वसन वाटते तितके सोपे नाही. त्यातून काही वर्षे (१०-१५) संसारात रमल्यावर त्यांचे खटले न्यायालय उभे राहतात आणि सततच्या न्यायालयाच्या वाऱ्या ,कटकटीना कंटाळून आणि आर्थिक तंगी मुळे सुद्धा नवरे त्यांना हाकलून देतात. एकदा वेश्या व्यवसायातून बाहेर पडली कि त्यांचे दलाल त्यांच्या वर चार दमड्या खर्च करत नाहीत आणि हा सर्व आर्थिक भार सोसणे त्यांना अशक्य होते. त्यातून त्यांना पोलीस सुद्धा ज्या तर्हेने वागवतात ते पाहिले तर सभ्य माणसे सुद्धा लाजतील. पैसे नसतील तर पोलीस सुद्धा त्यांच्याकडून सर्रास शरीरसुखाची मागणी करतात मग ती आता पुनर्वसन करून संसाराला लागली का असेना? महिला पोलीस सुद्धा त्यांच्याशी अत्यंत घृणास्पद वर्तन करताना आढळतात तर पुरुषांची काय कथा? बाकी स्त्रीचे स्वातंत्र्य त्यांचे हक्क आणिस्वखुषीने वेश्या व्यवसायात पडणे हे उच्चभ्रू गटातील कॉलगर्लस, एस्कॉर्टस किंवा कॉनक्यूबाईन इ. साठी ठीकआहे.(त्यांना वेश्या म्हणणे डाऊनमार्केटआहे).

sunil kachure 30/05/2022 - 13:31
Vaisha व्यवसाय . खुप जुना आहे ब्रिटिश लोक ही अतिशय हुशार असल्या मुळे त्यांनी ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केले होते. देह विक्री व्यवसाय करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून दिली होती बाकी समाजा पासून वेगळी. एकाचे हक्क जपताना दुसऱ्याच्या हक्कावर गदा येत कामा नये. देह विक्री ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केलं. तर ते समाजाच्या,देशाच्या हिताचेच आहे. १) देश विक्री व्यवसाय करण्यासाठी प्रतेक शहरात जागा आरक्षित ठेवली जावी. थोडी लांब. २)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात ३) त्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जावी त्यांच्या मर्जी नीच करत आहेत ना ह्याची खात्री करावी. ४) देह विक्री करणाऱ्या सर्व स्त्रिया ची माहिती त्या व्यवसाचा पोर्टल वर जाहीर करावी नाव ,गाव,नातेवाईक सहित. लाज वाटण्याचे कारण नाही स्त्री मुक्त होत आहे. ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. असे मस्त. नियोजन केले तर मला नाही वाटत कोणी विरोध करेल. कोणत्या तरी ब्रिटिश कंपनीला ह्या सर्व यंत्रणेचे नियोजन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यावे. ते योग्य नियोजन करतील. मुंबई मध्ये त्यांनी योग्य काम केले आहे त्यांना अनुभव आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 30/05/2022 - 20:20
२)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात. हायला इथे अर्ध्या जनतेला डोक्यावर छप्पर नाही पण रात्रीची सोया पाहण्यासाठी सरकारने त्यांना कोठे बांधून द्यायला हवेत काय? ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. हे कुणी ठरवायचं ? ब्रिटीश कंपनीला? त्यांना भारतीय बायका कुरूप च वाटतील. मग बायकांना चांगला भाव कुणी द्यायचा? का इथे पण शेतीसारखा किमान आधारभाव द्यायचा? आणि या आधारभावाला ग्राहक आला नाही तर पैसे सरकार ने द्यायचे का? कचरे बुवा तुमच्या टंकणाऱ्या मेंदूचा आणि विचार करणाऱ्या मेंदूचा संबंध नाही हे तुम्ही सतत का सिद्ध करून देताय

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 30/05/2022 - 20:45
मी तुमची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. १)देह विक्री व्यवसायात जबरदस्ती नी स्त्रियांना ढकलल जाते. ही तुमची भीती आहे. रीतसर सर्व मुलींची चोकशी करून त्यांची सर्व ओळख पोर्टल वर जाहीर करा. हे माझे solution. पुरुषाची मकत्तेदरी स्त्री नी देह विक्री केली की नष्ट होत असेल तर अशी माहिती जाहीर करणे ही अभिमानाची गोष्ट असेल त्यांच्या नाते वाइक लोकांसाठी. सिडको किंवा म्हाडा नी अशा वस्त्या नियोजन करून उभ्या कराव्यात . गाव कुसा बाहेर. कारण एकाचे एक जपताना दुसऱ्याचे हक्क नाकारणे अयोग्य म्हणून. सिडको आणि म्हाडा नी अशा वस्त्या निर्माण केल्या म्हणजे त्या मधील जागा फुकट ध्या असा मी उल्लेख केला नाही. ज्यांना तीव्र इच्छा आहे त्यांनी ती जागा विकत घ्यायची आहे हवं बँक लोण ची सोय करावी. आराखडा आखून हा व्यवसाय म्हणून उभा केला तर रोजगार पण मिळेल. ती स्त्री आणि त्यांचे ग्राहक ह्यांना कायद्याचे संरक्षण पण मिळेल.आणि समाजातील बाकी लोकांचे हक्क पण अबाधित राहतील. प्राथमिक आरोग्य उपचार,गुप्त रोग तत्न,hiv स्पेशालिस्ट dr .. ह्यांना पण आराखड्यात जागा असेल.. Dr लोकांचा व्यवसाय वाढण्याची पण शक्यता आहे खरे ..मी परफेक्ट solution दिले आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 31/05/2022 - 13:01
मी परफेक्ट solution दिले आहे. कधी वेश्या वस्तीत गेला आहात का? त्यांच्याशी बोलला आहात का? त्यांचे प्रश्न काय? त्यानं काय हवंय? ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशाना घर विकत सोडाच भाड्याने घेणे सुद्धा परवडत नाही त्यांना बँकेच्या

लोण ची

सुविधा पुरवणार कोण? बँकेचे कर्ज देताना व्यवसायाचे काही आडाखे असतात. त्यात स्त्रीचे शरीर कसे बसवणार? जी दिसायला जास्त चांगली तिला जास्त कर्ज देणार का? हा निकष कसा ठरवायचा? तारण काय ठेवायचे? आणि त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या कडून वसुली कशाची कशी आणि कोणी करायची? उगाच उंटावरून शेळ्या हाकताय? तुमचं परफेक्ट solution तुमच्या टंकणाऱ्या मेंदूकडून आलेलं आहें. उचल हात आणि बडव कळफलक त्याचा विचार करणाऱ्या मेंदूशी काहीही संबंध दिसत नाही.

चलत मुसाफिर 30/05/2022 - 18:31
काही प्रतिसाद वाचून चंमतग वाटली. गणिका सहज उपलब्ध झाल्या तर पुरुषांचे फावेल हा समज मुदलातच गंडलेला आहे. पैसा व सामाजिक ताकद असलेल्या पुरुषांना गणिका (किंवा अन्य स्त्री) आजही मिळवता येते. देहव्यापार खुला झाला तर हे सर्व पुरुषांना सहजसाध्य होईल. तसेच देहव्यापार करणाऱ्या स्त्रीला अधिकृत हक्क मिळतील. हे पुरुषसत्तेला मुळातच नको आहे. देहव्यापार समाजसंमत झाला तर सगळ्या स्त्रिया तेच करू लागतील हा दुसरा गंडलेला समज. तसे काहीही होणार नाही. ज्या स्त्रियांना तो व्यवसाय करायचा असेल त्या तो सुरक्षित व अधिकृत रीतीने करू शकतील, इतकेच. पण याचे पुरुषसत्तेवर दूरगामी परिणाम होतील. सेक्स ही एक क्षणिक, तात्कालिक, नैसर्गिक भावना (instinct) आहे. पण तिला नाना नियम व बंधनांत कोंडले की एक प्रबळ आवेग निर्माण होतो जो जीवनाच्या प्रत्येक पैलूवर कमीअधिक परिणाम करतो. पुरुषसत्ता याचा चलाखीने वापर करते.

sunil kachure 30/05/2022 - 18:53
उत्तम नियोजन केले तर देह विक्री व्यवसाय लं कोणाचा विरोध नाही. देहविक्री लं मान्यता म्हणजे गल्ली बोळात,रहिवासी इमारती ,सार्वजनिक जागा इथे विक्षपित चाळे करण्याची परवानगी नाही..

जेम्स वांड 31/05/2022 - 10:17
वेश्या व्यवसाय हा मानवी संस्कृतीने ठरवलेल्या नैतिकतेच्या चौकटीत कधीच बसणार नाही , पण म्हणून त्याचे कायदेशीर प्रमाणीकरण करू नये असे नाही, काही देशाचे नियम आजकाल गांजा कायदेशीर करत आहेत, मला तर ते चूक वाटते, मस्तिष्कावर प्रभाव पाडून पुढे अगदी हेवी मेटल पॉयझिंग देऊ शकणाऱ्या गांज्याला कायदेशीर करणे चूक वाटते, पण वेश्या व्यवसायाबद्दल विचार करता त्याला कायदेशीर करणे हे कैक लैंगिक आजार, गुप्तरोग, एचआयव्ही इत्यादींच्या प्रसारात एक उपायकारक खोडा म्हणून वापरले जाऊ शकते, वेश्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप, त्यांना औषधपूरवठा, स्वच्छ ठिकाणे (व्यवसाय करावयास) ह्याने फक्त वेश्याच नाही तर वेश्यागमन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळींचे पण स्वास्थ्यरक्षण होऊ शकेल, वरती काचुरे ह्यांनी वेश्या व्यवसाय, आई बहीण व्हिजिटिंग कार्ड वगैरे काय काय लिहिलेले आहे, ते पटले नाही दोन कारणांसाठी १. माझ्याच लेखनात वेश्या व्यवसाय हा मानवी नितीमूल्यांच्या चौकटीत नैतिक ठरणार नाही कधीच हे मी स्पष्ट म्हणतोय आणि त्यामुळे २. काचुरे ह्यांनी (कदाचित कोणालातरी प्रतिसाद म्हणून) वेश्याव्यवसायाची व्हाईट कॉलर सर्विस इंडस्ट्री सोबत केलेली तुलना. बाकी काय, वेश्याव्यवसाय कायदेशीर केला तर तो करताना जगातील कैक फसलेली, यशस्वी उदाहरणे ठेवता येतीलच अभ्यास करायला समोर.

sunil kachure 31/05/2022 - 12:23
जगातील जास्त माहीत नाही पण भारतात खजुराव सारखी मंदिर आहेत तिथे . सेक्स ह्या विषयावर अनेक शिल्प कोरली आहेत. बघितले नाहीत पण ऐकून आहे. कामशास्त्र सारखे बाकी प्राचीन ग्रंथ पण आहेत त्याचा विषय सेक्स हाच आहे. . Evolution मुळे माणसाची प्रजाती निर्माण झाली असे दावे असले तरी.. संस्कृती, समाज व्यवस्था,निती अनिती. ह्यांची बरीच चक्र होवून गेली असावीत.. खुला सेक्स,नंतर निती मत्तेत सेक्स अडकला असेल. कोणाशी ही सेक्स करणे ह्याचा निती अनीती शी काही संबंध नाही. आणि कोणाशी ही सेक्स करणे ही अनीती. असे अनेक स्थित्यंतरे मानवी इतिहासात नक्कीच होवून गेली असणार. प्रतेक प्रकारचे चांगले वाईट परिणाम अनुभव नी माणसाला माहीत पडले असणार. म्हणून सेक्स लं निती मत्ते शी जोडले गेले असेल. एकच स्त्री संभोग करणे जी पत्नी आहे हे योग्य असे ठरवून कुटुंब व्यवस्था.आणि बाकी व्यवस्था. हे खूप अनुभवातून आलेले शहाणपण आहे. सेक्स चा संबंध अनेक गोष्टी शी आहे. संतती हा पहिला त्याचा प्रॉडक्ट आहे. त्याची जबाबदारी कोणावर तरी टाकणे अतिशय गरजेचे होते. म्हणून कुटुंब व्यवस्था आणि बाकी समाज व्यवस्था. सेक्स आणि भावनिक गुंतवणूक हा प्रश्न आहेच.

sunil kachure 31/05/2022 - 12:41
बार मध्ये कमी कपडे घालून नाचणे,विविध लोकांचे स्पर्श सहन करणे. हे त्या व्यवसाय करणाऱ्या मुली खरेच मनापासून करत असतील का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. साधे बस,ट्रेन मध्ये पण आपल्या बाजूला आपल्याला बरा वाटणारा च सहप्रवासी असावा अशी इच्छा सर्वांची असते. काही मिनिट किंवा तासाच्या प्रवासात पण आपल्याला बरा वाटणारा प्रवासी नसेल तर मन विचलित होते. बार गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलींची मानसिक अवस्था काय होत असेल. थंड डोक्याने विचार केला की जाणीव होईल. सेक्स वर्कर तर अजून खतरनाक. शारीरिक संबंध ठेवणे अशा व्यक्ती शी ह्याच्या शी काहीच ओढ नाही,आकर्षण नाही,इच्छा नाही. खुप कठीण काम आहे. मुली किंवा स्त्रिया ना ही अशी काम पोट पाणी चालण्यासाठी करावे लागत असेल तर आपल्या सिस्टीम मध्ये दोष आहे. पर स्त्री किंवा पर पुरुष ह्यांच्या शी आकर्षित होवून सेक्स करणे आणि. फक्त पैसे मिळतात म्हणून ओळख पण नसणाऱ्या व्यक्ती शी सेक्स करणे. खुप खुप फरक आहे. मानसिक त्रासाची परिसीमा आहे ती. आणि ह्या सर्व सेवांचे ग्राहक कोण तर पुरुष. पुरुषांना ऐश करण्यासाठी निर्माण झालेली गुलामगिरी ची एक पद्धत. ह्या मध्ये स्त्री चे हीत नाही. स्त्री लं कोणाशी ही तिच्या इच्छे नी सेक्स करायचा असेल तर तशी तिला परवानगी असावी हे वेगळे आहे . आणि पोटपण्यासाठी व्यवसाय म्हणून सेक्स करावा लागणे .हे वेगळे आहे. खुप फरक आहे ह्या मध्ये.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 16:34
आता हे पहा. मांजर आपल्या पिल्लांना केवळ तीन गोष्टी शिकवते: शिकार कशी करावी, कुणाला घाबरून रहावे आणि आपला बचाव कसा करावा (झाडावर चढणे, नखे पाजळणे इ.). याला फारतर 2 आठवडे लागतात. इतक्या शिक्षणावर मांजर आरामात आयुष्य जगू शकते. पण मानवाची उत्क्रांती इतकी जास्त झालेली आहे की समाजात केवळ जिवंत रहाण्यासाठी अफाट ज्ञानाची गरज पडते. पहा: भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाहतुकीचे नियम, कायदा, तंत्रज्ञान (किमानपक्षी दूरध्वनीचा वापर), लेखन-वाचन, सांस्कृतिक भान, पाककला, शेती, धर्मशास्त्र. ही यादी कितीही वाढवता येईल. हे इतके मूलभूत शिक्षण घेता घेता 18-20 वर्षे जातात. मानवाचे सरासरी आयुष्य 60-65 वर्षाचे असते. गुणोत्तर काढा. हे इतके ज्ञान आत्मसात करणे, साठवणे आणि वापरणे याकरिता मानवाला प्रचंड मोठा मेंदू विकसित करावा लागला. (मानवी मस्तक व शरीर यांचे गुणोत्तर काढा व त्याची इतर प्राण्यांशी तुलना करा. फरक लगेच उमजेल). मेंदूचा आकार हा असा भरपूर मोठा असल्यामुळे मुलांचा जन्म तुलनेत लवकर व्हावा लागतो. कारण मुलाचे डोके निसर्गाने जर मातेच्या पोटातच फार मोठे होऊ दिले तर माता आणि बाळ दोघे प्रसूतीतच मरतील. त्यामुळे मानवी अर्भके तुलनेत लवकर जन्माला येतात व जन्मानंतर वर्षानुवर्षे पालकांवर अवलंबून असतात (पशुपक्ष्यांचे असे नसते. कुत्रा साधारण 10-12 वर्षे जगतो. कुत्र्याची पिल्ले पंधरा ते वीस दिवसात जवळजवळ स्वयंपूर्ण होतात. गुणोत्तर काढा). अर्भकांची अशी प्रदीर्घकाळ देखभाल एकटीने करणे हे मानव मातेला केवळ अशक्य आहे. त्यामुळे पित्याने तिची साथ देणे सक्तीचे करण्यात आले (इतर प्राण्यांत माता आपली पिले एकटीने सांभाळते, किंबहुना पित्याला हाकलून लावते). आता हे पिल्लू माझेच आहे हा विश्वास पित्याला कसा व्हायचा? त्यामुळे कामनियम, योनिशुचिता, एकपतिव्रत ही बंधने आली. ही बंधने अंमलात आणण्यासाठी, तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे, म्हणून समाजव्यवस्था आली.

In reply to by चलत मुसाफिर

सुबोध खरे 31/05/2022 - 19:59
आपल्या प्रतिसादातील काही त्रुटी १) मानवापेक्षा उत्क्रांतीत खालच्या पायरीवर असणारे प्राणी यांच्या डी एन ए मध्ये मोठ्या प्रमाणात उपजत बुद्धी (स्मरणशक्ती) साठवलेली असते. त्यामुळे कुत्रे, मांजरं गायी हरणं आणि त्यांच्या कुळातील सर्व प्राणी हे मातेचे दूध पिणे थांबवल्यावर उपजत बुद्धीने वासाने आपले अन्न शोधून काढून आपले पोट भरू शकतात. मानवाच्या मेंदूचा विकास झाला त्याबरोबर हि उपजत बुद्धी मागे पडली. याच बरोबर मानवी मेंदूची वाढ सुरुवातीच्या काळात फार झपाट्याने होते. पहिल्या सहा महिन्यात हि वाढ ६५ % आणि १ वर्षापर्यंत मानवी मेंदू प्रौढ माणसाच्या ७५ % आकाराचा आणि २ वर्षे पर्यंत ९० % आकाराचा होतो. २) हे हार्डवेअर वाढल्या नंतर त्यात सॉफ्टवेअर लोड होण्याची प्रक्रिया चालू होते जी जन्मभर चालूच राहते. ३) मानवी शरीराची वाढ १८ वर्षापर्यंत होत असते म्हणजेच मानवी मुलाचे बालपण हे १८ वर्षे इतके लांब असते. या काळात स्त्रीला बालकाच्या संगोपनासाठी पुरुषाची गरज भासत असते. आणि अशास्थितीत पुरुषाने हे मूल माझे नाहीच म्हणून जबाबदारी झटकली तर शेतीप्रधान व्यवस्थेत स्त्रीची स्थिती फार केविलवाणी होत असे. कारण बाहेर शेती सोडून दुसरे काम नाही. तेथे काम करताना मुलाचे संगोपन कसे करणार या शिवाय बलात्कार होण्याची आणि त्यातून पुढची संतती होण्याची शक्यता फार होती ज्यामुळे असलेल्याच नव्हे तर पुढच्या बालकाच्या पोषणाचीसमस्या निर्माण होत असे. या कारणास्तव जगभर सर्व समाजात यौनशुचिता ( नवऱ्याशी एकनिष्ठता) हि कल्पना जन्माला आली. आणि या कल्पनेचा विस्तार म्हणून लग्न संस्था निर्माण झाली. स्त्री स्वातंत्र्य हि कल्पना संतती प्रतिबंधक साधने आल्यानंतरच खरी फोफावू शकली आणि त्यानंतर आधुनिक जगात स्त्रीला नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यावर तिची खरी मुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू झाली. स्त्रियांचे शोषण आदीम काळात कसे होत होते हे ज्यांना पाहायचे आहे त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीतील स्त्रियांची स्थिती याचा जरूर अभ्यास करावा.

sunil kachure 31/05/2022 - 17:04
सर्व प्रकार होवून गेले आहेत कोणाशी ही संभोग अगदी आई,बहिण ह्यांच्या शी पण(यम आणि यमी) प्राणी तर नाते पाळत नाहीत माणूस प्राणी च आहे. पण स्थिर जीवन,संतती चे पालन पोषण,स्त्री ची सुरक्षा, स्त्री साठी सुरक्षित वातावरण. पुरुष आक्रमक आहे हे नैसर्गिक आहे. पाणी नीतिमत्ता आणि परंपरा पुरुषांची आक्रमकता थोपवून ठेवतात. बहिण नागडी जरी दिसली तरी तिचा भाऊ हा पुरुष असून पण लैंगिक रित्या उत्तेजीत होत नाही का? ती स्त्री आहे हा पुरुष आहे तरी पण नाही. कारण नीतिमत्ता , समाज व्यवस्था त्या मुळे दहा वेळा फाशी असा कायदा केला असता आणि नीतिमत्ता आणि योग्य समाज व्यवस्था नसती तर . बहिण नागडी बघून भाऊ sexually उत्तेजीत झाला असता..... कायदे आणि शिक्षा ते थांबवू शकले नसते त्या मुळे देह विक्री चा संबंध मंद बुद्धी सारखा स्त्रियांच्या हक्क आणि स्त्री चे स्वतंत्र ह्याच्या शी मंद बुद्धी लोकांनी जोडू नये.

गामा पैलवान 31/05/2022 - 17:05
चलत मुसाफिर, हा कळीचा मुद्दा आहे :
तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे,
तुम्ही वर जी कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष, मुखावगुंठित वगैरे विशेषणं ल्वापारली आहेत त्यांचा निर्देश मुलांच्या संगोपानाकडेच आहे. मात्र या गोष्टी आवश्यक असल्या तरी पुरेश्या नाहीत ( necessary but not sufficient ). बाप देखील नीतिवान असावा लागतो, पण तो मुद्दा वेगळा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:34
संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवले? याचा संगोपनाशी काय संबंध? ज्ञानार्जन स्वसंरक्षण, परोपकार वगैरे ठीक आहे. नीतीमत्ता, चारित्र्य वगैरे गोष्टी म्हणजे धूर्त पुरुषसत्तेने आपला वरचष्मा अबाधित ठेवण्यासाठी काढलेली नसती टूम आहे. (या आता म्होरं. होऊनच जाऊ दे!) :-) :-)

In reply to by चलत मुसाफिर

गामा पैलवान 31/05/2022 - 23:42
चलत मुसाफिर, संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवलं, म्हणून काय विचारता ! वेश्यांना त्यांची अपत्यं त्याच वस्तीत राहावीशी वाटंत नाहीत. वेश्यांना त्यांच्या अपत्यांनी तोच धंदा केलेला आवडंत नाही. मुलगी असेल तर तीही वेश्या झालेली नको असते. मुलगा असेल तर मोठेपणी भ#वा झालेला नको असतो. भ#वा हा त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे. बाकी पर्याय कोणते ते विचारू नका. नीती व चारित्र्य म्हणजे काय ते वेश्यंना बरोब्बर ठाऊक आहे. आ.न., -गा.पै.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:22
स्त्रीची सुरक्षितता हाही एक गंडलेला मुद्दाच. सुरक्षितता कोणापासून? पुरुषांपासूनच की हो! गुंडांनी दुकान फोडू नये म्हणून त्यांना हप्ता देण्यासारखेच हे झाले. असो. एकूण माझा मुद्दाच सिद्ध होतो: योनिशुचिता न पाळणारी, लिंगस्वातंत्र्य मानणारी स्त्री पुरुषसत्तेला महाप्रचंड धोक्याची घंटी वाटते. ती तशी वाटली नसती, तर सुरक्षितता वगैरे बागुवबुवे उभे करायची गरजच नव्हती.

In reply to by चलत मुसाफिर

sunil kachure 31/05/2022 - 17:43
सुरक्षित ,स्थिर आयुष्य स्त्री आणि पुरुष दोघांचे. त्या साठी नियम आणि निती मत्ता . शारीरिक क्षमता काहीच वर्ष असते निसर्ग काही वर्षानंतर तारुण्य,शक्ती सर्व नष्ट करतो बालपणी चे १० ते १५ वर्ष आधार शिवाय जगता च येणार नाहीत माणसाच्या मुलाला. आर्थिक बाबतीत स्थिर होण्यास जी बुद्धी लागते ते शिक्षण आणि सुरक्षित निवारा. हा फक्त कुटुंब असेल तर च. आता बेरीज , वजा बाकी करा. स्वतःच्या शक्ती वर माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यातील किती वर्ष जगू शकतो. स्त्री माणूस च आहे कोणती extra ordinary प्राणी नाही तिला हेच नियम लागू आहेत

मी मराठी किडा वर वेश्यांच आयुष्य हा वृत्तपट पाहिला होता , तो शेअर करतोय. तुम्ही बाकी काही करु शकत नसला तरी त्यांच्याप्रति संवेदनशीलता ठेवा. विचार करा. धन्यवाद सूरज खटावकर, मराठी किडा व तेजस्वी सेवेकरी, सहेली संस्था https://www.youtube.com/watch?v=NIglFzYCE9U

In reply to by प्रकाश घाटपांडे

खरं तर, महाराष्ट्रातील काही दिवसातील घटना पाहिल्या शाळकरी मुलींवरील झालेले अत्याचार, विक्रुत बापांनी मुलींवर केलेले अत्याचार, राजस्थानमधील अठ्ठावीस वर्ष वयाच्या मुलांनी बावन्न वय असलेल्या स्वतःच्या आईवर केलेले बलात्कार या सर्व घट्ना पाहिल्यावर विकृतीला धर्म नसतो तर, माणसातली विकृती असते आणि तिचा स्तर दिवसेंदिवस कोणत्या स्तराला चाललं आहे, ते लक्षात येतं आणि अशावेली वेशाव्यवसायाचं महत्व अधोरेखित व्हावं. वेश्या व्यवसाय काही त्यांनी आनंदाने स्वीकारलेला नसतो. परिस्थिती, अगतिकता, आणि असंख्य गोष्टी तो वेगळा विषय आहे. कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्त्या प्रकरणी बंगालमधील आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिकच आहे. पिडितेला न्याय मिळावा म्हणून वेश्यांनी मोर्चात सहभाग घेतला झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी त्याही व्यथित झाल्या आणि मोर्चामधे त्यांच्या हातातील घोषणा फलक होते- 'प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना' याचा अर्थ असा की तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करु नका'' ही सामाजिक जाणीव ऐतिहासिक आहे. या विषयावर प्रसिद्ध लेखक, समीर गायकवाड यांनी खुप लिहिलं आहे. खुप लिहिण्या-बोलण्यासारखं पण थांबतो. घाटपांडे साहेब मिपावर येत राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 08/09/2024 - 15:10
माणूस दारू , तंबाखू शिवाय एकवेळ राहू शकतो परंतु पुरुष आणि स्त्रीला लैगिंक भूक आहे ती नैर्सगिक आहे , जिथे पुरुष स्त्री चे प्रमाण व्यस्त आहे तिथे हि भूक भागवण्याची सोय लागते ,, ती राजमार्गाने करण्याचाही सोय असेल तर त्यातील गुन्हेगारी कमी होते ( युरोपातील काही देश ) दोन्ही पुरुष वेश्या आणि स्त्री वेश्या उपलब्ध असणे असणे हे मला तरी अनैतिक वाटत नाही अनॆतिक काय तर लग्न बंधन किंवा अगदी लिव्ह इन रेलशनशिप मध्ये असताना वेश्यागमन करणे , येथे दोन्ही पुरुष आणि स्त्री हा नियम समान धरला आहे

युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स मधून नेत होते. ऍम्ब्युलन्स चालक आणि त्याच्या साथीदारांनी पेशंट च्या पत्नीचा लैंगिक छळ करायला सुरवात केली. आणि त्यासाठी पेशंट ला ऑक्सिजन मास्क काढून नंतर बाहेर फेकून दिले. एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. उज्जैन मध्ये भर दिवस, रस्त्यात, फुटपाथवर एका महिलेचा बलात्कार झाला. लोकं बघत बसली, काहींनी व्हिडिओ सुद्धा बनवले.

चौकस२१२ 09/09/2024 - 04:28
एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. यात धर्म कुठे आला? एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध जरुर करा मग प्रत्येक गुन्ह्याचे वर्णन आपण " हिंदू बहुसंख्याक भारतात गुन्हा झाला " असे करणार का ? कॉ न्ग्रेस जेव्हा सत्तेत होतती तेव्हा हि देशची ८०% लोकसख्या हिंदूच होती आणि २०१४ पासून सुद्धा .. इतका द्वेष बरा नव्हे .. अर्थात तुमच्या नादाला कोण लागणार .. बसा लावत भीतीला तुंबड्या

प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ लेख व त्यावरील प्रतिसाद पुन्हा वाचावेत. लेख जुना असल्याने काही लिंक आत्ता चालत नाहीत पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही मात्र या विषयावर निर्भया प्रकरणानंतर 2013 साली मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख व नंतर लैंगितेचे शमन हवेच हा एक लेख वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर सध्या चर्चा होताना दिसत नाही हे मला ठळक पणे जाणवले. अनेक मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले होते. जरुर वाचा. लैंगिकतेचे शमन की दमन? https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-or-aggression-36525/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 5 जाने 2013 लैंगिकतेचे शमन हवेच https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-is-needed-40206/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 12 जाने 2013 हे दोन्ही लेख तज्ञांनी आणि जिज्ञासूंनी जरुर वाचावेत. समीर गायकवाड यांचे खुलूस हे पुस्तक वेश्यांच्या जीवनावर आहे. ते ही आवर्जून विकत घेउन वाचावे. हा लेख व विषय समाजाचे लैंगिक व्यवस्थापन या मूळ विषयाचा भाग आहेत
या संकेतस्थळावर लोक मोठ्या मनाने, उघड्या विचारसरणीने "रौशनी" वाचत आहेत म्हणून हा चर्चाप्रस्ताव टाकतो आहे. तितक्याच उघड्या विचारसरणीने हा काथ्या कुटावा, अशी विनंती. समाजात वेश्याव्यवसायास सामान्यपणे अनैतिक मानतात, असे आपण ऐकतो, वाचतो. तो अनैतिक का हा विचार फारसा करत नाही. पण तुम्ही म्हणाल की दरोडे, खून, फसवणूक या सर्व गोष्टीही समाजात अनैतिक मानतात, त्यांच्याबद्दलही आपण फारसा "का?" असा विचार करत नाही. मग वेश्याव्यवसायात, आणि या अन्य "अनैतिक आचारांत" काही फरक असावा असे मला का वाटावे? कारण अन्य अनैतिक कृतींच्या अनुषंगाने जे काही येते त्या सर्वालाच आपण अयोग्य मानतो.

भाउबंदकी

बेसनलाडू ·

सचिन 11/03/2008 - 02:07
बेसनलाडूजी, "स्वतःचा स्वानुभव" की काय ? असो, पण कविता आवडली ! BALANCE चाङ्गला आहे.

प्राजु 11/03/2008 - 02:24
"स्वतःचा स्वानुभव" की काय ? अहो.. मुलिंची कन्याशाळा नका हो करू... कविता छान आहे. भाऊबंदकीचे चांगले वर्णन केले आहे. नव्या वातावरणात अगदी फिट्ट बसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 11/03/2008 - 02:11
अखेर नॉर्थ कॅरोलिनावरून सूत्र हलली म्हणायची! :)) पण कविता बाकी झकास... चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! अगदी खरं! वशिंड भरलेल्या आणि शिंग दणकट असलेल्या पुतण्यांच्या संस्थाळवर काका हल्ली वाचनमात्रच असतात! झणझणीत तिखट मिसळ काकांना पचली नाही म्हणायची! :) माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हम्म! खरं आहे! नकली आयडी घेऊन दुसर्‍याच्या कविता तिसर्‍याच संस्थळावर टाकण्याचा दिवटेपणा माऊलीच्याच लेकरांनी करावा या सारखं माऊलीचं दुसरं दर्दैव ते काय! :) असो, छान कविता... आपला, (निदान माऊलीचं नांव घेऊन किंवा तिची झूल पांघरून संस्थळांवर पालथे धंदे न करणारा!) तात्या.

इनोबा म्हणे 11/03/2008 - 02:47
काका कुठला?पुतणे कुठले? भाउबंदकी होवो बळकट आपण वकील आहात काय? च्यायला भाऊबंदकीच्या नावाखाली गळे काढणारे स्वत: त्याच पाण्यात उभे राहून दूसयांना कोरडे रहायला सांगत आहेत. बे.ला. आपण एक चांगले कवि आहात यात दूमत नाही,पण त्याचा वापर कसा करत आहात यावर सगळं अवलंबून आहे.उगाच वाद वाढवत बसू नये ही विनंती. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बेसनलाडू 11/03/2008 - 03:24
आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? (शालजोडीतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

इनोबा म्हणे 11/03/2008 - 10:59
आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? हा उपदेश नसून विनंती आहे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by व्यंकट

बेसनलाडू 11/03/2008 - 04:09
अहो मुळातच तशा शरसंधानास व्यासरचित महाभारताची परवानगीच आहे :) (शब्दशिखंडीआडचा)बेसनलाडू

संदर्भ माहीत असते तर दु:खच झाले असते. असो. कविता छानच आहे. माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! वर्णन जोरदार आहे.

सचिन 11/03/2008 - 02:07
बेसनलाडूजी, "स्वतःचा स्वानुभव" की काय ? असो, पण कविता आवडली ! BALANCE चाङ्गला आहे.

प्राजु 11/03/2008 - 02:24
"स्वतःचा स्वानुभव" की काय ? अहो.. मुलिंची कन्याशाळा नका हो करू... कविता छान आहे. भाऊबंदकीचे चांगले वर्णन केले आहे. नव्या वातावरणात अगदी फिट्ट बसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 11/03/2008 - 02:11
अखेर नॉर्थ कॅरोलिनावरून सूत्र हलली म्हणायची! :)) पण कविता बाकी झकास... चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! अगदी खरं! वशिंड भरलेल्या आणि शिंग दणकट असलेल्या पुतण्यांच्या संस्थाळवर काका हल्ली वाचनमात्रच असतात! झणझणीत तिखट मिसळ काकांना पचली नाही म्हणायची! :) माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हम्म! खरं आहे! नकली आयडी घेऊन दुसर्‍याच्या कविता तिसर्‍याच संस्थळावर टाकण्याचा दिवटेपणा माऊलीच्याच लेकरांनी करावा या सारखं माऊलीचं दुसरं दर्दैव ते काय! :) असो, छान कविता... आपला, (निदान माऊलीचं नांव घेऊन किंवा तिची झूल पांघरून संस्थळांवर पालथे धंदे न करणारा!) तात्या.

इनोबा म्हणे 11/03/2008 - 02:47
काका कुठला?पुतणे कुठले? भाउबंदकी होवो बळकट आपण वकील आहात काय? च्यायला भाऊबंदकीच्या नावाखाली गळे काढणारे स्वत: त्याच पाण्यात उभे राहून दूसयांना कोरडे रहायला सांगत आहेत. बे.ला. आपण एक चांगले कवि आहात यात दूमत नाही,पण त्याचा वापर कसा करत आहात यावर सगळं अवलंबून आहे.उगाच वाद वाढवत बसू नये ही विनंती. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बेसनलाडू 11/03/2008 - 03:24
आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? (शालजोडीतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

इनोबा म्हणे 11/03/2008 - 10:59
आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? हा उपदेश नसून विनंती आहे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by व्यंकट

बेसनलाडू 11/03/2008 - 04:09
अहो मुळातच तशा शरसंधानास व्यासरचित महाभारताची परवानगीच आहे :) (शब्दशिखंडीआडचा)बेसनलाडू

संदर्भ माहीत असते तर दु:खच झाले असते. असो. कविता छानच आहे. माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! वर्णन जोरदार आहे.
कट्ट्यावरचे वासू तर्कट वाचा विष्ठा, मनही मळकट! मांड्यांची चव कोणा कळली? म्हटले सगळे - "तळकट, तुपकट!" माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! काका कुठला?पुतणे कुठले? भाउबंदकी होवो बळकट

नान्या..!

विसोबा खेचर ·

प्राजु 11/03/2008 - 01:55
पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) काय पण छंद...! असतो एकेकाला.. काय करणार? छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्या नकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवा गणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :)) हाहाहा.. तात्या, खरंच मलाही शंका आली ही जेव्हा मी पहिलं वाक्य वाचलं गणपती बसण्याचा उल्लेख आला लेखात तेव्हा... मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :) हे मात्र एकदम भारी... सह्हीच.. नाना नवाथे या व्यक्तिमत्त्वातील साधेपणाचे कंगोरे अतिशय सुंदर वर्णन केले आहेत तुम्ही. नेहमी प्रमाणेच.. सरस व्यक्तिचित्र.. - (सर्वव्यापी)प्राजु

बेसनलाडू 11/03/2008 - 02:02
खास तात्यांच्या शैलीतील उत्तम व्यक्तिचित्र. काही काही वाक्यं तर निव्वळ लाजवाब. जसे - नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो! :) मर्तिकसम्राट हा शब्द तर भारीच आवडला. हे व्यक्तिचित्र जरा आखडते घेतले आहे का? की मुळातच फक्त तोंडओळखच करून द्यायची होती? (आस्वादक)बेसनलाडू

सर्किट 11/03/2008 - 02:19
खल्लास. (मर्तिक सम्राटाचे व्यक्तिचित्र आवडले, म्हणून...) बाकी बे.ला. शी सहमत, जरा आखडते घेतल्यासारखे वाटले आहे.. - सर्किट

चतुरंग 11/03/2008 - 02:33
तुमच्या व्यक्तिचित्र लिखाणावरची भाईकाकांची सावली अगदी जाणवते! मर्तिकसम्राट नानूचे चित्रणही असेच हटके. (थोडा सफाईचा हात कमी पडला असे मला जाणवले, कुठे-कुठे तेच उल्लेख दोनवेळा आलेले दिसले...) पण एकून तुमचा ह्या लेखनप्रकारावर हात बसलेला आहे ह्यात शंका नाही. जोरदार अभिनंदन! चतुरंग

मुक्तसुनीत 11/03/2008 - 02:39
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे .... पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 11/03/2008 - 07:40
> पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-) एकेक वल्ली जमायला लागल्या आहेत.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 11/03/2008 - 10:23
लेख तात्या स्टाइल मधे आहे ... आवडला हे. सा. न लगे .. आता आमची किरकिर : बरे झाले यात क्रमशः नव्हते ! नाही आम्हा वाचक लोकांना अजुन एका लेखमालेचा ट्रॅक ठेवावा लागला असता.

व्यंकट 11/03/2008 - 03:13
सगळ्यात आधी क्रमशः आहे का ते पाहीलं, नव्हतं हे बरं आहे. >> गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" हे आवडले. " :) " जरा जास्ती वेळा पडलयं, सहज म्हणून मोजलं तर २२ वेळा भरलं. ऑल्मोस्ट पूर्णविरामाला स्बस्टीट्यूट. बाकी वल्ली उत्तमच रेखाटली गेलीये ! आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

आपला आभि 11/03/2008 - 06:06
तात्या एकदम 'काटा 'लेख लिहला आहे.. माझ्या डोळ्या समोर तर आमच्या गावात राहनारे शामादादा आले.. त्यांचा पण हाच छन्द होता... तिरडी कशी बाधावी ? खान्दा कसा आणि कुनी द्यावा ? झटपट अंघोळ कशी उरकावी ? .. लाकडावर झोपवल्यावर आग नीट लागन्यासाठी काय काय करावे ? या विषयात त्यांना आजच्या जमान्यात 'Ph D' सहज मिळाली असती.. स्मशानात भाषणे देण्याचा प्रकार तर औरच !!!!!.... त्यावर काहितरी येवूद्या.. (विनंती आहे हो .. आम्हाला काही उद्योगच नाहित ना लेख वाचन्याशिवाय..) आपला आआआभि

"राजद्वारे श्मशाने च य: तिष्ठति स: बान्धव: ।" तोच खरा बान्धव जो राजाचे किंवा यमाचे बोलावणे आल्यावर आपल्याला दरवाजापर्यंत सोबत करतो. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सहज 11/03/2008 - 08:20
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे .... मुक्तसुनित यांच्याशी सहमत!

प्रमोद देव 11/03/2008 - 08:32
नान्या आवडला. तरीही तात्या 'नान्या'कडे तू हवे तितके लक्ष दिलेले दिसत नाहीये असे राहून राहून वाटतेय. एखाद्या खमंग पदार्थात 'मीठ' घालायचे राहून गेले असावे तसे झालेय. शांतचित्ताने पुन्हा एकदा संपादनाचे सोपस्कार करून त्यात सुधारणा करावीस अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो.

धोंडोपंत 11/03/2008 - 08:39
तात्या, अप्रतिम व्यक्तिचित्र. मजा आली वाचून. अत्यंत सुंदर. बोलकं, ओघवतं कथन. क्या बात है!! आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com


तात्या,
तुमच्या नान्या आवडला राव आपल्याला !!!

मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :) हाहाहाहा, हे तर लै भारी !!! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 11/03/2008 - 11:40
असा नान्या प्रत्येक गावात एक तरी असतोच का? आमच्या गावातही एक गृहस्थ असेच मर्तिकसम्राट आहेत. बर॑, जे काही "मर्तिकसम्राट" पाहिलेत, ते सगळे असेच साधे सरळ, भोळे-भाबडे, आहे त्यात समाधानी असे असतात. खरी..अस्स्ल माणूसकी पहायची असेल तर एखाद्या 'नान्या' शी फक्त ओळख करुन घ्या...मैत्रीसुद्धा नाही म्हणत मी. ती आपोआप होऊन जाते. बाकी, डोळ्यासमोर चित्र उभे करण्याची एकदम टिपिकल तात्या-इश्टाईल. खास करून गणपतीच्या आरतीचा आणि त्यान॑तरचा गाण्याचा किस्सा आवडला. तरी पण तात्याबा, उरकल्यासारख॑ का वाटत॑य? आपला, एका 'नान्या'चा मित्र -ध मा ल.

विसुनाना 11/03/2008 - 12:52
चित्रण! तात्या, ज्याम आवडला तुमचा 'नाना नवाथे'. (आता इतर लेखनही असेच एकटाकी किंवा एकटंकी संपवा, ही मल्लीनाथी)

शेखर 11/03/2008 - 12:56
तात्यांचे लिखाण एकदम लाजबाब असते. प्रत्यक्ष नान्याला भेटल्या सारखे वाटले ..... शेखर

In reply to by नंदन

विसोबा खेचर 11/03/2008 - 13:22
'नेहमीच्या गिर्‍हाईकाला फसवू नका, मिस्टर' आठवले :) धन्यवाद रे नंदनसायबा, मी तर खूपच लहान आणि कडमड्या लेखक आहे, परंतु माझ्या मते आज परिस्थिती अशी आहे की लहानमोठ्या सर्वच लेखकांना व्यक्तिचित्रण करायचे असेल तर भाईकाकांचे बोट धरल्यशिवाय पुढे जाता येणार नाही! मी फक्त त्यांचा वरदहस्त माझ्यावर रहावा एवढेच चिंतितो आणि माझ्या लेखनावर त्यांची सहज सावली तरी पडवी एवढेच पाहतो. कुठेही नक्कल होऊ न देण्याचा मात्र कसोशिने प्रयत्न करतो. तरीही खूप जड जातं आणि सांभाळावं लागतं! :) आजदेखील माझा एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही! स्वप्नातही आंगठा न मागणार्‍या या प्रेमळ गुरूकडे मनोमन माझी एकलव्यासारखी तालिम सुरू आहे, कितपत यश येतं ते पाहायचं! अवांतर - व्यंकटेशतात्या माडगुळकरांच्या व्यक्तिरेखाही मला अतिशय आवडतात. तात्या माडगुळकरांची 'माणदेशी माणसं' वाचून तर मी थक्कच झालो. फारच सुरेख! एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे! असो, आपला, (भाईकाकांच्या व्यक्तिचित्रांनी सगळं आयुष्यच भारावून गेलेला!) तात्या. -- मात्र जगाच्या दृष्टीने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतकाच शुद्ध होता! -- (रावसाहेब!)

राजमुद्रा 11/03/2008 - 15:08
तात्याबा नान्या आवडला! आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आमच्या धीर धरण्याला सीमा आहेत :) फार ताणल्याने तुटतील अशी (प्रेमळ) धमकी मी तुम्हाला देत आहे. राजमुद्रा :)

सुमीत 11/03/2008 - 17:24
तात्यांचा हातखंडाच आहे प्रभावी व्यक्ती चित्रण करण्याचा. तात्यांना व्यक्तीचित्रण आवडते आणि ती आवड खरे तर त्यांच्या लोकसंग्रह जमवायच्या आवडी मुळेच आहे.

लिखाळ 11/03/2008 - 17:58
तात्या, नेहमी प्रमाणेच व्यक्तिचित्रण आवडले. खास. सुरुवातीपासूनच नाना ही व्यक्ती अंगकाठीने कशी असेल याचे मनाशी चित्र रंगवले आणि ते आपण केलेल्या वर्णनाशी जुळले. तुमचा व्यक्तिचित्रणात हातखंडाच आहे. पण या पूर्ण लेखात एकदाही एखद्या पात्राबद्दल 'यावर सुद्धा एक स्वतंत्र लेख लिहावा' असे आपण लिहिले नसल्याने, हा लेख आखडल्यासारख झाला आहे की काय ? असे अनेकांना वाटले असेल :) शिंत्रे गुरुजींची मालिका पूर्ण झाली का? त्याचा दुवा देता का? पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:40
आपल्यासारख्या चोखंदळ वाचकाने सर्वांशी थोडी थोडी सहमती दाखवली हेच आमच्याकरता मोप आहे! बाय द वे, गोळेकाकांचा संदर्भ आवडला. बाकी गोळेकाका तसा भला माणूस हो! :) असो, आपला, (गोळेकाकांच्या संतुलीत आहारविषयक नियमांचा शिष्य!) तात्या.

किशोरी 11/03/2008 - 18:39
नान्या तर आवडलेच पण लेख वाचुन त्यांच्या चिऊला पाहण्याची खूप इच्छा झाली मजा आली वाचुन !!

मर्तिकसम्राट छानच. गणगोतापैकी असण्याचा अभिमान, चिऊचे भुर्रकन येऊन बिलगणे, पुलंचा एकेरी उल्लेख. वाह. .............. वा. वर्णनातील अनौपचारिकता व आपल्या मैत्रीतील जिव्हाळा ठाव घेणारा. अप्रतिम. राजमुद्राताईंना रुसावे लागू देऊ नका. नाहीतर आम्ही लेखणीसंपावर जाऊ. 'पेन डाऊन' ऐवजी 'की बोर्ड ऑफ्फ'. धन्यवाद. रोशनीची वाट पाहात आहे. सुधीर कांदळकर

वरदा 11/03/2008 - 20:36
खूप छान आहे हेही व्यक्तिचित्र एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे! ते सा. न. ला. आम्हाला दिसतय ते तुमच्या सगळ्या व्यक्तीचित्रातून आणि ह्याचं कारण तुमचं सहज माणसं जोडणं आहे हेही नक्की.. सगळ्या व्यक्तीचित्रात एक सहजता असते तुमच्या सहज गप्पा मारताना, प्रतिसाद देताना तुम्ही जसं लिहिता तिच भाषा व्यक्तिचित्रात असते. त्यामुळे ते एकदम ओरिजिनल बनतं आणि वाचायला खूप मजा येते. अभिनंदन ह्या उत्क्रुष्ठ व्यक्तिचित्राबद्दल!

सर्वसाक्षी 11/03/2008 - 22:58
जोरदार! खरेतर अंत्यविधीला जाणे ही एक सामाजिक गरज आहे. अनेकदा गेलेल्याच्या घरचे सगळे मोठ्या वयाचे असतात, मुलेबाळे जवळ नसतात मग धावपळ करायला कुणीतरी हव ना? मी देखिल एकवेळ लग्न चुकवतो पण ओळखीत कुणी गेले तर आवर्जुन जातो. बाकी व्यक्तिचित्र तुझ्या खास शैलितलं, आवडल हो!

किशोरी 12/03/2008 - 17:36
लेख तर छानच आहे ,आणी गुरुजीच नाव टिल्लू असत हे वाचुन गुरुजी जीन्स मधे,केस रंगवलेले अस चित्र डोळ्यासमोर उभ राहील :))))

विसोबा खेचर 13/03/2008 - 07:59
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार मानतो... प्रतिसाद न देणार्‍यांचेही अनेकानेक आभार! बघून घेईन तिच्यायला! ---- (स्वगत!) :) काही मंडळींनी लेख संपवतांना जरा घाई झाली आहे किंवा लेख थोडा गुंडाळला गेला आहे असं मोकळेपणाने कळवलं त्यांचे आभार मानतो. परंतु लिहिताना मला तरी व्यक्तिश: तसं जाणवलं नाही. जसं जमेल तसं लिहीत गेलो. असो... लिखाळराव, शिंत्रेगुरुजींची आठवण करून दिल्याबदल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो! साफ विसरूनच गेलो होतो. मनोगतावर शिंत्रेगुरुजींना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तूर्तास त्याचे पहिले दोन भाग माझ्या ब्लॉगावर प्रसिद्ध करत आहे. ते आपल्याला इथे आणि इथे वाचता येतील. तिसरा भाग लवकरच लिहीन. रौशनीबद्दलही काही मंडळींनी विचारलं आहे, तीही लौकरच पुरी करण्याचा प्रयत्न करतो. रोजच्या कामधंद्यातून थोडा निवांतपणा मिळायला हवा! पुन्हा एकदा सर्वांचे आभार.. नान्याचं व्यक्तिचित्र मी आमच्या भाईकाकांची आयुष्यभर साथ करणार्‍या आणि त्यांना सांभाळणार्‍या सुनिताबाईंच्या चरणी अर्पण करतो... तात्या.

प्राजु 11/03/2008 - 01:55
पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) काय पण छंद...! असतो एकेकाला.. काय करणार? छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्या नकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवा गणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :)) हाहाहा.. तात्या, खरंच मलाही शंका आली ही जेव्हा मी पहिलं वाक्य वाचलं गणपती बसण्याचा उल्लेख आला लेखात तेव्हा... मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :) हे मात्र एकदम भारी... सह्हीच.. नाना नवाथे या व्यक्तिमत्त्वातील साधेपणाचे कंगोरे अतिशय सुंदर वर्णन केले आहेत तुम्ही. नेहमी प्रमाणेच.. सरस व्यक्तिचित्र.. - (सर्वव्यापी)प्राजु

बेसनलाडू 11/03/2008 - 02:02
खास तात्यांच्या शैलीतील उत्तम व्यक्तिचित्र. काही काही वाक्यं तर निव्वळ लाजवाब. जसे - नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो! :) मर्तिकसम्राट हा शब्द तर भारीच आवडला. हे व्यक्तिचित्र जरा आखडते घेतले आहे का? की मुळातच फक्त तोंडओळखच करून द्यायची होती? (आस्वादक)बेसनलाडू

सर्किट 11/03/2008 - 02:19
खल्लास. (मर्तिक सम्राटाचे व्यक्तिचित्र आवडले, म्हणून...) बाकी बे.ला. शी सहमत, जरा आखडते घेतल्यासारखे वाटले आहे.. - सर्किट

चतुरंग 11/03/2008 - 02:33
तुमच्या व्यक्तिचित्र लिखाणावरची भाईकाकांची सावली अगदी जाणवते! मर्तिकसम्राट नानूचे चित्रणही असेच हटके. (थोडा सफाईचा हात कमी पडला असे मला जाणवले, कुठे-कुठे तेच उल्लेख दोनवेळा आलेले दिसले...) पण एकून तुमचा ह्या लेखनप्रकारावर हात बसलेला आहे ह्यात शंका नाही. जोरदार अभिनंदन! चतुरंग

मुक्तसुनीत 11/03/2008 - 02:39
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे .... पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 11/03/2008 - 07:40
> पुलंचा बापू काणे आणि मिरासदारांचा कथानायक यांचा क्रॉस्-ब्रीड म्हणजे तात्यांचा नान्या ! :-) एकेक वल्ली जमायला लागल्या आहेत.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 11/03/2008 - 10:23
लेख तात्या स्टाइल मधे आहे ... आवडला हे. सा. न लगे .. आता आमची किरकिर : बरे झाले यात क्रमशः नव्हते ! नाही आम्हा वाचक लोकांना अजुन एका लेखमालेचा ट्रॅक ठेवावा लागला असता.

व्यंकट 11/03/2008 - 03:13
सगळ्यात आधी क्रमशः आहे का ते पाहीलं, नव्हतं हे बरं आहे. >> गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" हे आवडले. " :) " जरा जास्ती वेळा पडलयं, सहज म्हणून मोजलं तर २२ वेळा भरलं. ऑल्मोस्ट पूर्णविरामाला स्बस्टीट्यूट. बाकी वल्ली उत्तमच रेखाटली गेलीये ! आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

आपला आभि 11/03/2008 - 06:06
तात्या एकदम 'काटा 'लेख लिहला आहे.. माझ्या डोळ्या समोर तर आमच्या गावात राहनारे शामादादा आले.. त्यांचा पण हाच छन्द होता... तिरडी कशी बाधावी ? खान्दा कसा आणि कुनी द्यावा ? झटपट अंघोळ कशी उरकावी ? .. लाकडावर झोपवल्यावर आग नीट लागन्यासाठी काय काय करावे ? या विषयात त्यांना आजच्या जमान्यात 'Ph D' सहज मिळाली असती.. स्मशानात भाषणे देण्याचा प्रकार तर औरच !!!!!.... त्यावर काहितरी येवूद्या.. (विनंती आहे हो .. आम्हाला काही उद्योगच नाहित ना लेख वाचन्याशिवाय..) आपला आआआभि

"राजद्वारे श्मशाने च य: तिष्ठति स: बान्धव: ।" तोच खरा बान्धव जो राजाचे किंवा यमाचे बोलावणे आल्यावर आपल्याला दरवाजापर्यंत सोबत करतो. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सहज 11/03/2008 - 08:20
तात्यांना भाषेची उत्तम जाण असल्याने, थोडे कॅज्युअल असे वाटणारे त्यांचे लिखाणसुद्धा दर्जेदार बनते. माणसांचे बारकावे, त्यांच्या लकबी, त्यांच्यातल्या गमतीदार वाटतील अशा विसंगती आणि या सगळ्याला मैत्रीची , माणुसकीची किनार. अहो, बेत बिर्याणीचा असो की साध्या कोशींबीरीचा , ते करणे जाणत्याचे .... मुक्तसुनित यांच्याशी सहमत!

प्रमोद देव 11/03/2008 - 08:32
नान्या आवडला. तरीही तात्या 'नान्या'कडे तू हवे तितके लक्ष दिलेले दिसत नाहीये असे राहून राहून वाटतेय. एखाद्या खमंग पदार्थात 'मीठ' घालायचे राहून गेले असावे तसे झालेय. शांतचित्ताने पुन्हा एकदा संपादनाचे सोपस्कार करून त्यात सुधारणा करावीस अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो.

धोंडोपंत 11/03/2008 - 08:39
तात्या, अप्रतिम व्यक्तिचित्र. मजा आली वाचून. अत्यंत सुंदर. बोलकं, ओघवतं कथन. क्या बात है!! आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com


तात्या,
तुमच्या नान्या आवडला राव आपल्याला !!!

मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :) हाहाहाहा, हे तर लै भारी !!! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 11/03/2008 - 11:40
असा नान्या प्रत्येक गावात एक तरी असतोच का? आमच्या गावातही एक गृहस्थ असेच मर्तिकसम्राट आहेत. बर॑, जे काही "मर्तिकसम्राट" पाहिलेत, ते सगळे असेच साधे सरळ, भोळे-भाबडे, आहे त्यात समाधानी असे असतात. खरी..अस्स्ल माणूसकी पहायची असेल तर एखाद्या 'नान्या' शी फक्त ओळख करुन घ्या...मैत्रीसुद्धा नाही म्हणत मी. ती आपोआप होऊन जाते. बाकी, डोळ्यासमोर चित्र उभे करण्याची एकदम टिपिकल तात्या-इश्टाईल. खास करून गणपतीच्या आरतीचा आणि त्यान॑तरचा गाण्याचा किस्सा आवडला. तरी पण तात्याबा, उरकल्यासारख॑ का वाटत॑य? आपला, एका 'नान्या'चा मित्र -ध मा ल.

विसुनाना 11/03/2008 - 12:52
चित्रण! तात्या, ज्याम आवडला तुमचा 'नाना नवाथे'. (आता इतर लेखनही असेच एकटाकी किंवा एकटंकी संपवा, ही मल्लीनाथी)

शेखर 11/03/2008 - 12:56
तात्यांचे लिखाण एकदम लाजबाब असते. प्रत्यक्ष नान्याला भेटल्या सारखे वाटले ..... शेखर

In reply to by नंदन

विसोबा खेचर 11/03/2008 - 13:22
'नेहमीच्या गिर्‍हाईकाला फसवू नका, मिस्टर' आठवले :) धन्यवाद रे नंदनसायबा, मी तर खूपच लहान आणि कडमड्या लेखक आहे, परंतु माझ्या मते आज परिस्थिती अशी आहे की लहानमोठ्या सर्वच लेखकांना व्यक्तिचित्रण करायचे असेल तर भाईकाकांचे बोट धरल्यशिवाय पुढे जाता येणार नाही! मी फक्त त्यांचा वरदहस्त माझ्यावर रहावा एवढेच चिंतितो आणि माझ्या लेखनावर त्यांची सहज सावली तरी पडवी एवढेच पाहतो. कुठेही नक्कल होऊ न देण्याचा मात्र कसोशिने प्रयत्न करतो. तरीही खूप जड जातं आणि सांभाळावं लागतं! :) आजदेखील माझा एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही! स्वप्नातही आंगठा न मागणार्‍या या प्रेमळ गुरूकडे मनोमन माझी एकलव्यासारखी तालिम सुरू आहे, कितपत यश येतं ते पाहायचं! अवांतर - व्यंकटेशतात्या माडगुळकरांच्या व्यक्तिरेखाही मला अतिशय आवडतात. तात्या माडगुळकरांची 'माणदेशी माणसं' वाचून तर मी थक्कच झालो. फारच सुरेख! एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे! असो, आपला, (भाईकाकांच्या व्यक्तिचित्रांनी सगळं आयुष्यच भारावून गेलेला!) तात्या. -- मात्र जगाच्या दृष्टीने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतकाच शुद्ध होता! -- (रावसाहेब!)

राजमुद्रा 11/03/2008 - 15:08
तात्याबा नान्या आवडला! आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आता रौशनी कधी? आमच्या धीर धरण्याला सीमा आहेत :) फार ताणल्याने तुटतील अशी (प्रेमळ) धमकी मी तुम्हाला देत आहे. राजमुद्रा :)

सुमीत 11/03/2008 - 17:24
तात्यांचा हातखंडाच आहे प्रभावी व्यक्ती चित्रण करण्याचा. तात्यांना व्यक्तीचित्रण आवडते आणि ती आवड खरे तर त्यांच्या लोकसंग्रह जमवायच्या आवडी मुळेच आहे.

लिखाळ 11/03/2008 - 17:58
तात्या, नेहमी प्रमाणेच व्यक्तिचित्रण आवडले. खास. सुरुवातीपासूनच नाना ही व्यक्ती अंगकाठीने कशी असेल याचे मनाशी चित्र रंगवले आणि ते आपण केलेल्या वर्णनाशी जुळले. तुमचा व्यक्तिचित्रणात हातखंडाच आहे. पण या पूर्ण लेखात एकदाही एखद्या पात्राबद्दल 'यावर सुद्धा एक स्वतंत्र लेख लिहावा' असे आपण लिहिले नसल्याने, हा लेख आखडल्यासारख झाला आहे की काय ? असे अनेकांना वाटले असेल :) शिंत्रे गुरुजींची मालिका पूर्ण झाली का? त्याचा दुवा देता का? पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:40
आपल्यासारख्या चोखंदळ वाचकाने सर्वांशी थोडी थोडी सहमती दाखवली हेच आमच्याकरता मोप आहे! बाय द वे, गोळेकाकांचा संदर्भ आवडला. बाकी गोळेकाका तसा भला माणूस हो! :) असो, आपला, (गोळेकाकांच्या संतुलीत आहारविषयक नियमांचा शिष्य!) तात्या.

किशोरी 11/03/2008 - 18:39
नान्या तर आवडलेच पण लेख वाचुन त्यांच्या चिऊला पाहण्याची खूप इच्छा झाली मजा आली वाचुन !!

मर्तिकसम्राट छानच. गणगोतापैकी असण्याचा अभिमान, चिऊचे भुर्रकन येऊन बिलगणे, पुलंचा एकेरी उल्लेख. वाह. .............. वा. वर्णनातील अनौपचारिकता व आपल्या मैत्रीतील जिव्हाळा ठाव घेणारा. अप्रतिम. राजमुद्राताईंना रुसावे लागू देऊ नका. नाहीतर आम्ही लेखणीसंपावर जाऊ. 'पेन डाऊन' ऐवजी 'की बोर्ड ऑफ्फ'. धन्यवाद. रोशनीची वाट पाहात आहे. सुधीर कांदळकर

वरदा 11/03/2008 - 20:36
खूप छान आहे हेही व्यक्तिचित्र एकंदरीतच 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात लाडका साहित्यप्रकार आहे! ते सा. न. ला. आम्हाला दिसतय ते तुमच्या सगळ्या व्यक्तीचित्रातून आणि ह्याचं कारण तुमचं सहज माणसं जोडणं आहे हेही नक्की.. सगळ्या व्यक्तीचित्रात एक सहजता असते तुमच्या सहज गप्पा मारताना, प्रतिसाद देताना तुम्ही जसं लिहिता तिच भाषा व्यक्तिचित्रात असते. त्यामुळे ते एकदम ओरिजिनल बनतं आणि वाचायला खूप मजा येते. अभिनंदन ह्या उत्क्रुष्ठ व्यक्तिचित्राबद्दल!

सर्वसाक्षी 11/03/2008 - 22:58
जोरदार! खरेतर अंत्यविधीला जाणे ही एक सामाजिक गरज आहे. अनेकदा गेलेल्याच्या घरचे सगळे मोठ्या वयाचे असतात, मुलेबाळे जवळ नसतात मग धावपळ करायला कुणीतरी हव ना? मी देखिल एकवेळ लग्न चुकवतो पण ओळखीत कुणी गेले तर आवर्जुन जातो. बाकी व्यक्तिचित्र तुझ्या खास शैलितलं, आवडल हो!

किशोरी 12/03/2008 - 17:36
लेख तर छानच आहे ,आणी गुरुजीच नाव टिल्लू असत हे वाचुन गुरुजी जीन्स मधे,केस रंगवलेले अस चित्र डोळ्यासमोर उभ राहील :))))

विसोबा खेचर 13/03/2008 - 07:59
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार मानतो... प्रतिसाद न देणार्‍यांचेही अनेकानेक आभार! बघून घेईन तिच्यायला! ---- (स्वगत!) :) काही मंडळींनी लेख संपवतांना जरा घाई झाली आहे किंवा लेख थोडा गुंडाळला गेला आहे असं मोकळेपणाने कळवलं त्यांचे आभार मानतो. परंतु लिहिताना मला तरी व्यक्तिश: तसं जाणवलं नाही. जसं जमेल तसं लिहीत गेलो. असो... लिखाळराव, शिंत्रेगुरुजींची आठवण करून दिल्याबदल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो! साफ विसरूनच गेलो होतो. मनोगतावर शिंत्रेगुरुजींना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तूर्तास त्याचे पहिले दोन भाग माझ्या ब्लॉगावर प्रसिद्ध करत आहे. ते आपल्याला इथे आणि इथे वाचता येतील. तिसरा भाग लवकरच लिहीन. रौशनीबद्दलही काही मंडळींनी विचारलं आहे, तीही लौकरच पुरी करण्याचा प्रयत्न करतो. रोजच्या कामधंद्यातून थोडा निवांतपणा मिळायला हवा! पुन्हा एकदा सर्वांचे आभार.. नान्याचं व्यक्तिचित्र मी आमच्या भाईकाकांची आयुष्यभर साथ करणार्‍या आणि त्यांना सांभाळणार्‍या सुनिताबाईंच्या चरणी अर्पण करतो... तात्या.
"तात्या, पोष्टाजवळचा टकल्या सातपुते खपला रे. वेळ असेल तर ये!" रात्री अकराच्या सुमारास जरा कुठे डोळा लागतो न लागतो तोच नान्याचा फोन! शिवनाथ पांडुरंग नवाथे, ऊर्फ नाना नवाथे, ऊर्फ नान्या! हा प्राणी मला कधी भेटला, कधी आमची घट्ट दोस्ती जमली आणि कधी हा माझा झाला ते कळलंच नाही. नान्याला मर्तिकं पोचवायची भारी हौस. छंदच म्हणा ना! जरा ओळखीपाळखीतलं कुणी मरायचा अवकाश, नान्या त्या घरात सर्वात पहिल्यांदा हजर! नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो!

विरह

सचिन ·

सर्किट 11/03/2008 - 00:07
मस्त कविता. पण पुन्हा तिला जवळ केले तर घरे पडतील काळजाला हे तर मस्तच !! - सर्किट

इनोबा म्हणे 11/03/2008 - 00:24
तुमच्या आमच्या सारख्या भावी साहित्यिकांना हा धूर किती गरजेचा आहे याचा अजूनही कुणालाच अंदाज आलेला दिसत नाही.समाजाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा.(तुम्ही गंभीर होऊ नका म्हणजे झालं) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 11/03/2008 - 00:35
अप्रतिम कविता... एकदमच आवडली.. गुगली आहे खरी... - (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट 11/03/2008 - 01:41
adhun madhun samarthyadata gGaDev is undefined ashi error deto ani devanagri typing band padatay. mhanoon english madhe pratisad. आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

सचिन 11/03/2008 - 01:45
माझ्यासारख्या नवोदिताच्या (आतापर्यन्तच्या) दोनही कवितन्ना मि.पा. वाचकान्नी उत्साहवर्धक प्रतिसाद दिलाय ! जर्रानवाजीका तेहेदिलसे शुक्रिया !!!

सर्किट 11/03/2008 - 00:07
मस्त कविता. पण पुन्हा तिला जवळ केले तर घरे पडतील काळजाला हे तर मस्तच !! - सर्किट

इनोबा म्हणे 11/03/2008 - 00:24
तुमच्या आमच्या सारख्या भावी साहित्यिकांना हा धूर किती गरजेचा आहे याचा अजूनही कुणालाच अंदाज आलेला दिसत नाही.समाजाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा.(तुम्ही गंभीर होऊ नका म्हणजे झालं) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 11/03/2008 - 00:35
अप्रतिम कविता... एकदमच आवडली.. गुगली आहे खरी... - (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट 11/03/2008 - 01:41
adhun madhun samarthyadata gGaDev is undefined ashi error deto ani devanagri typing band padatay. mhanoon english madhe pratisad. आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

सचिन 11/03/2008 - 01:45
माझ्यासारख्या नवोदिताच्या (आतापर्यन्तच्या) दोनही कवितन्ना मि.पा. वाचकान्नी उत्साहवर्धक प्रतिसाद दिलाय ! जर्रानवाजीका तेहेदिलसे शुक्रिया !!!
मनावर दगड ठेवून म्हणालो तिला तुझा माझा सम्बन्ध आता सम्पला म्हणाली , हेच ऐकवण्यासाठी जवळ केले होतेस का मला ? आताशा एकटेपणा अक्षरशः खायला उठतो जिवाला पण पुन्हा तिला जवळ केले तर घरे पडतील काळजाला तिच्या नाही, तरी माझ्या घरचे विरोध नक्कीच करणार आणि त्यान्च्यापर्यन्त आमची कुणकुण तर गेलीच असणार आमचा समेट घडवायला मित्र सारे आतुर झालेत म्हणूनच रूमवरचे सारे ASH TRAY मी केव्हाच फेकून दिलेत (कवितेचे नाव "मोठी गोल्ड फ्लेक" ठेवणार होतो, पण मग सस्पेन्स राहिला नसता !)

पट्टी सामोसा

चकली ·

वरदा 10/03/2008 - 22:55
लावण्याऐवजी त्या पुरीचा कोन करुन हातानेच बंद करते मी समोसे...बाकी क्रुती सेम्...मस्त गरम गरम खावेसे वाट्टायत...

चकली 10/03/2008 - 22:56
समोश्या विषयी माहीती इथे वाचायला मिळेल. समोसा/ सामोसा हा शब्द कसा आला असावा म्हणून गूगलींग केलं तेव्हा हे सापडले दुवा चकली http://chakali.blogspot.com

प्राजु 11/03/2008 - 00:12
मग याला पट्टीचे समोसे का म्हणतात? माझी समजूत होती की, पोळपाटावर मोठी पोळी लाटून त्याच्या पट्ट्या कापायच्या आणि सुरुवातीला भाजी भरून उरलेली पट्टी त्रिकोणी घडी घालत समोसे बनवायचे ... म्हणजे माझ्या या कल्पनेला सुरूंग लागला.. :) बाकी इतर समोसे सुद्धा ती पोळी मधोमध कापूनच बनवत होते मी. पण पट्टीचे समोसे .. जरा अवघड वाटत होते.. आता नक्की करून बघेन. कृती एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु

प्राजु 11/03/2008 - 00:28
करणारे माझ्यासारखे असतिल तर काय उपयोग.. मी नुसतेच पट्टीची खाणारी... - (सर्वव्यापी)प्राजु आवांतर : चतुरंग, विनोद आवडला.

भिजवलेल्या पीठाच्या पोळ्या करताना... प्रथम एक पीठाची गोळी घेऊन त्याची छोटी पुरी लाटावी. त्या पुरीला तेल लावावे व त्यावर तांदळाची पीठी लावावी. दुसरी गोळी घेऊन तेवढीच पुरी लाटून त्या पुरीवर ठेवावी. दोन्ही पुर्‍या एकत्रितपणे फुलक्या एवढ्या लाटाव्यात. तव्यावर मंद भाजावी (चकलीने सांगितल्याप्रमाणे) डाग पडू देउ नयेत. गरम असतानाच त्याचे सुरीने अर्धे २ भाग करावे. त्या भागाचे २-२ भाग करावेत कारण २ पुर्‍या तेलाने चिकटवल्यामूळे सहज वेगळे वेगळे भाग होतात. म्हणजे एकूण ४ अर्धे भाग होतात. सारण भरेपर्यंत ओल्या फडक्याखाली ठेवाव्यात.पोळी न भाजलेल्या भागात सारण भरून तळतात. हे सामोसे नेहमी सामोसे करतो त्यापेक्षा छोटे करतात त्यामुळे एका पोळीचे छोटे छोटे भाग पट्टीसारखे दिसतात म्हणून याला पट्टीचे सामोसे म्हणत असतील असा माझा अंदाज...... टीपः पट्ट्या अदल्यादिवशी करून फ्रिजमध्ये एअर टाईट डब्यात ठेवाव्या व दुसर्‍या दिवशी सारण भरून सामोसे करावेत.

In reply to by स्वाती राजेश

चकली 11/03/2008 - 21:28
स्वाती, उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ! यामुळे पट्टि सामोसा आणि साधा सामोसा यातला फरक समजला. पुढ्च्यावेळी तू सांगितलेस तसे करून बघेन! चकली http://chakali.blogspot.com

प्राजु 11/03/2008 - 01:29
आत्ताच मी " हे नेहमिच्या समोस्यांप्रमाणेच करायचे " या निष्कर्षाला आले होते. त्यात आता ही वेगळीच कृती तू दिलीस. म्हणजे मला सांग, एका पोळीचे नक्की किती भाग होतात. चतकोर असे ४ का? आणि मग त्यात सारण भरायचे का? आणि त्या एकावर एक ठेवून का लाटायच्या? आणि कापताना दोन्ही एकत्रच कापायच्या का? आणि सारण भरताना डबल लेयर मध्ये भरायचे का? छे किती हे प्रश्न.... - (प्रचंड गोंधळेली)प्राजु

१.प्रथम २ छोटे पीठाचे गोळे घे. २.पुरीएवढे दोन्ही लाट. ३.एकावर तेल लाव व तांदळाचे पीठ भुरभुरव. ४.दोन्ही पुर्‍या एकमेकांवर ठेऊन फुलक्याएवढ्या लाट. ५.मंद पांढर्‍या भाज.काळे डाग पडून देऊ नकोस. ६.प्रथम ती अर्धी कर म्हणजे भाकरी सारखे त्याचे पदर सुटलेले दिसतील. ७. ते पदर वेगळे वेगळे कर म्हणजे तुझ्याकडे अर्ध्या अर्ध्या ४ फुलक्या झाल्या. ८.त्या फुलक्या च्या आतील म्हणजे न भाजलेल्या भागात सारण घालून तळणे. कळले नसेल तर आणखी डिटेल्स देऊ का?

प्राजु 11/03/2008 - 02:00
हे अगदी नीट समजलं.. आत करेन्...फार डोकं खाल्लं का ग मी तुझं?? धन्यवाद.. :)स्वाती. - (सर्वव्यापी)प्राजु

मला आवडते...जर कुणी विचारले (कुकींग) तर कारण मी सुद्धा असेच कुणाचे तरी डोके खाल्ले असेन ना?:)))) त्याची ही फळे आहेत म्हणजे तू डोके खातेस ही फळे नव्हेत, मला चांगले पदार्थ येतात ही फळे.

आपला आभि 11/03/2008 - 06:14
बरेच काही काही वाचलं... पण एवढच कळल की पदार्थ खातानाच नव्हे तर पाककृती वाचताना सुद्धा जीभेला चव जाणवते.. कुठल्या हाटिलात मिळतात हो हे सामुसे .. जाउन खायला बरे.. आम्ही बनवायला जाव तर सामोस्याचा बटाटे वडा व्हायचा... हॅ हॅ हॅ... मि पा भगिनी वर्ग येकदम 'form' मध्ये... आपला खादाड आणि आळशी (by default) आआआभि

सोनम 18/07/2009 - 20:07
पट्टीचे समोसे छान आहेत. करुन पाहिले पाहिजे. :) :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

वरदा 10/03/2008 - 22:55
लावण्याऐवजी त्या पुरीचा कोन करुन हातानेच बंद करते मी समोसे...बाकी क्रुती सेम्...मस्त गरम गरम खावेसे वाट्टायत...

चकली 10/03/2008 - 22:56
समोश्या विषयी माहीती इथे वाचायला मिळेल. समोसा/ सामोसा हा शब्द कसा आला असावा म्हणून गूगलींग केलं तेव्हा हे सापडले दुवा चकली http://chakali.blogspot.com

प्राजु 11/03/2008 - 00:12
मग याला पट्टीचे समोसे का म्हणतात? माझी समजूत होती की, पोळपाटावर मोठी पोळी लाटून त्याच्या पट्ट्या कापायच्या आणि सुरुवातीला भाजी भरून उरलेली पट्टी त्रिकोणी घडी घालत समोसे बनवायचे ... म्हणजे माझ्या या कल्पनेला सुरूंग लागला.. :) बाकी इतर समोसे सुद्धा ती पोळी मधोमध कापूनच बनवत होते मी. पण पट्टीचे समोसे .. जरा अवघड वाटत होते.. आता नक्की करून बघेन. कृती एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु

प्राजु 11/03/2008 - 00:28
करणारे माझ्यासारखे असतिल तर काय उपयोग.. मी नुसतेच पट्टीची खाणारी... - (सर्वव्यापी)प्राजु आवांतर : चतुरंग, विनोद आवडला.

भिजवलेल्या पीठाच्या पोळ्या करताना... प्रथम एक पीठाची गोळी घेऊन त्याची छोटी पुरी लाटावी. त्या पुरीला तेल लावावे व त्यावर तांदळाची पीठी लावावी. दुसरी गोळी घेऊन तेवढीच पुरी लाटून त्या पुरीवर ठेवावी. दोन्ही पुर्‍या एकत्रितपणे फुलक्या एवढ्या लाटाव्यात. तव्यावर मंद भाजावी (चकलीने सांगितल्याप्रमाणे) डाग पडू देउ नयेत. गरम असतानाच त्याचे सुरीने अर्धे २ भाग करावे. त्या भागाचे २-२ भाग करावेत कारण २ पुर्‍या तेलाने चिकटवल्यामूळे सहज वेगळे वेगळे भाग होतात. म्हणजे एकूण ४ अर्धे भाग होतात. सारण भरेपर्यंत ओल्या फडक्याखाली ठेवाव्यात.पोळी न भाजलेल्या भागात सारण भरून तळतात. हे सामोसे नेहमी सामोसे करतो त्यापेक्षा छोटे करतात त्यामुळे एका पोळीचे छोटे छोटे भाग पट्टीसारखे दिसतात म्हणून याला पट्टीचे सामोसे म्हणत असतील असा माझा अंदाज...... टीपः पट्ट्या अदल्यादिवशी करून फ्रिजमध्ये एअर टाईट डब्यात ठेवाव्या व दुसर्‍या दिवशी सारण भरून सामोसे करावेत.

In reply to by स्वाती राजेश

चकली 11/03/2008 - 21:28
स्वाती, उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ! यामुळे पट्टि सामोसा आणि साधा सामोसा यातला फरक समजला. पुढ्च्यावेळी तू सांगितलेस तसे करून बघेन! चकली http://chakali.blogspot.com

प्राजु 11/03/2008 - 01:29
आत्ताच मी " हे नेहमिच्या समोस्यांप्रमाणेच करायचे " या निष्कर्षाला आले होते. त्यात आता ही वेगळीच कृती तू दिलीस. म्हणजे मला सांग, एका पोळीचे नक्की किती भाग होतात. चतकोर असे ४ का? आणि मग त्यात सारण भरायचे का? आणि त्या एकावर एक ठेवून का लाटायच्या? आणि कापताना दोन्ही एकत्रच कापायच्या का? आणि सारण भरताना डबल लेयर मध्ये भरायचे का? छे किती हे प्रश्न.... - (प्रचंड गोंधळेली)प्राजु

१.प्रथम २ छोटे पीठाचे गोळे घे. २.पुरीएवढे दोन्ही लाट. ३.एकावर तेल लाव व तांदळाचे पीठ भुरभुरव. ४.दोन्ही पुर्‍या एकमेकांवर ठेऊन फुलक्याएवढ्या लाट. ५.मंद पांढर्‍या भाज.काळे डाग पडून देऊ नकोस. ६.प्रथम ती अर्धी कर म्हणजे भाकरी सारखे त्याचे पदर सुटलेले दिसतील. ७. ते पदर वेगळे वेगळे कर म्हणजे तुझ्याकडे अर्ध्या अर्ध्या ४ फुलक्या झाल्या. ८.त्या फुलक्या च्या आतील म्हणजे न भाजलेल्या भागात सारण घालून तळणे. कळले नसेल तर आणखी डिटेल्स देऊ का?

प्राजु 11/03/2008 - 02:00
हे अगदी नीट समजलं.. आत करेन्...फार डोकं खाल्लं का ग मी तुझं?? धन्यवाद.. :)स्वाती. - (सर्वव्यापी)प्राजु

मला आवडते...जर कुणी विचारले (कुकींग) तर कारण मी सुद्धा असेच कुणाचे तरी डोके खाल्ले असेन ना?:)))) त्याची ही फळे आहेत म्हणजे तू डोके खातेस ही फळे नव्हेत, मला चांगले पदार्थ येतात ही फळे.

आपला आभि 11/03/2008 - 06:14
बरेच काही काही वाचलं... पण एवढच कळल की पदार्थ खातानाच नव्हे तर पाककृती वाचताना सुद्धा जीभेला चव जाणवते.. कुठल्या हाटिलात मिळतात हो हे सामुसे .. जाउन खायला बरे.. आम्ही बनवायला जाव तर सामोस्याचा बटाटे वडा व्हायचा... हॅ हॅ हॅ... मि पा भगिनी वर्ग येकदम 'form' मध्ये... आपला खादाड आणि आळशी (by default) आआआभि

सोनम 18/07/2009 - 20:07
पट्टीचे समोसे छान आहेत. करुन पाहिले पाहिजे. :) :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
Taxonomy upgrade extras
मला खूप आवडणारा पदार्थ : पट्टी सामोसा साहित्य: २ वाट्या मैदा १ वाटी बेसन मोहन घालायला ४ चमचे तेल १ ते दिड वाटी मटार २ बटाटे ३-४ मीरच्या पाउण वाटी ओले खोबरे फोडणीचे साहित्य: ३-४ चमचे तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद १ चमचा गरम मसाला १ चमचा लिंबू रस मीठ तळण्यासाठी तेल कृती: १) सर्वप्रथम मैदा व बेसन एकत्र करावे. ४-५ चमचे तेल कडकडीत गरम करावे आणि पिठाला मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. पाणी घालून पिठ घट्टसर मळावे व झाकून ठेवावे. २) बटाटे सोलून त्याच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करावे.

हॉकीचा बोजवारा!

पिवळा डांबिस ·

सचिन 10/03/2008 - 23:32
हा एक कधीच न सम्पणारा विषय आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही दुर्लक्षित आहे. विचार करा की त्या खेळाडून्ना मोटिव्हेशन काय असेल ? पैसे कोणाला नकोत ? ८-१० देशन्चा "वर्ल्ड कप" जिन्कणे हे खरोखरीच इतके ग्रेट आहे का ? आता तर चक्क लिलाव चलू आहे क्रिकेट मधे ! इतर खेळान्च्या खेळाडून्ना काय मोबदल मिळतो ? मी देखील क्रिकेटचा डाय हार्ड चाहता आहे...पण कुठेतरी कहीतरी चुकते आहे खास !!

छोटा डॉन 10/03/2008 - 23:45
आजकाल मी भारताच्या हॉकीच्या बातम्या ह्या " भारत सरकारने अमक्या अमक्या घटनेचा निषेध नोंदवला " या चालीवरच अतिशय निर्वीकारपणे व मुर्दाड मनाने वाचत असतो ... कारण त्याविषयी आता बोलण्यासारखे व करण्यासारखे काहिही राहिले नाही .... सारा कारभार आता " रामभरोसे व गिलसाहेब भरोसे" चालू आहे.... त्यामुळे आजची बातमी "भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकच्या पात्रता फेरीतच पराभूत झाला." मी वाचली व "के पी एस गिलच्या **** चा घो " म्हणून मनातून थूंकुन टाकली ... त्यापेक्षा जास्त मी काहि करू शकत नाही व करण्याची इच्छा नाही ... आपण येवड्।या पोटतिडकीने लिहलात याबद्दल आपल्याला असलेल्या अपेक्षांचे कौतूक करू वाटते ... मी तर म्हणेन की "भारतीय हॉकी फेडरेशन , पदाधिकारी व ते निर्लज्ज खेडाळू" हे चौकात फटके मारण्याच्या लायकीचे पण उरले नाहित ... राहता राहिला प्रश्न दिलेल्या पैशाचा , तर मी असे म्हणेन की "भारताच्या हॉकीच्या सुवर्णयुगाचे श्राद्ध घालणार्‍या खेडाळूंची दक्षिणा म्हणून " हे पैसे दिले असे समजावे ... कुठे त्यांची तुलना पाकिस्तान , हॉलंड, ऑसीज् , इंग्लंड सारख्या जिगरबाज टीमशी करता ... त्यांना बसूदे कोडगेपणाने आपल्या निर्लज्जपणाचे प्रदर्शन करत .... बास झाले. मी पण आता "ध्यानचंद च्या" आत्म्याची क्षमा मागून व "भारतीय हॉकी फेडरेशन , पदाधिकारी व ते निर्लज्ज खेडाळू व के पी एस गिलच्या **** चा घो " या विषयाला कायमचा "रामराम ठोकतो" .......... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भारतीय हॉकीला दरिद्री कळा आली आहे हे ठीक पण त्याची कारणमिमांसा करता असे दिसते की याला खेळाडू, पदाधिकार्‍यांएवढेच 'टर्फ'चे मैदानही कारणीभूत आहे. कारण टर्फवर खेळताना बॉलचा वेग जास्त असल्याकारणाने कौशल्यापेक्षा शारिरीक क्षमता जास्त निर्णायक असते. आणि भारतीय खेळाडू शारिरीक क्षमतेत नक्कीच कमी आहेत. पूर्वी जेव्हा हिरवळीच्या मैदानावरून हॉकी टर्फच्या मैदानावर खेळवायचा निर्णय झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया या एकमेव देशाने याला विरोध केला कारण त्यामुळे कारण चेंडू हाताळण्याचा कौशल्यापेक्षा वेगाने पळण्यालाच जास्त महत्व राहीले असते. आणि ऑस्ट्रेलियन महासंघाने भारताला या विरोधात सामिल करून घेण्यासाठी ध्यानचंद यांच्या कौशल्याचाच दाखला दिला होता. पण भारताने यात सामिल होणे नाकारले. असो, पण भारतातील खेळाडूंनी स्वतःची शारिरीक क्षमता वाढवणे हा त्याला योग्य पर्याय आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोलबेर 11/03/2008 - 04:46
छान माहिती दिलीत. हिरवळीच्या मैदानासाठी ऑस्ट्रेलियाला पाठींबा न देणे हे र्‍हस्व दृष्टीचे लक्षण आहे. भारताची हॉकीमधे पीछेहाट का होत असावी ते आता लक्षात आले.

हा पोलिसातील माणूस खरेतर भारतीय हॉकीला सुधारायला आणला होता पण म्हातारपणामुळे तो भ्रमिष्ट झाला आहे आणि सत्ता सर्व पडद्यामागून ज्योतिकुमार नावाचा माणूस चालवितो (इति इंडिया टीव्ही). आज सर्वजण गिललाच दोषी ठरवित आहेत पण ज्योतिकुमार मात्र सुरक्षित खेळ्या खेळत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे अगदी धनराजसुद्धा गिलने पैसे खाल्ले असे म्हणत नाहीये. हा पोलिसी माणूस पैश्याच्या बाबतीत भ्रष्टाचारमुक्त आहे. आयएचएफ सध्या शासकीय नियंत्रणाखाली आणणे हा एकच इलाज दिसतो आहे. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

मोहन 11/03/2008 - 15:41
हॉकी काय किंवा क्रिकेट काय. कुठल्याही खेळाच्या महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या पदाला काळ मर्यादा घालायला हवी. ती पाच वर्षापेक्ष जास्त नसावी. ( अन्यथा १४ वर्षे पदभार सांभाळलेले गीलसाहेब ईंस्टंट कॉफी चे दाखले देत आहेत! ) सध्याची बापाची जहागीर चालवण्याची पध्दत अमुलाग्र बदलायला हवी. खेल मंत्रालयाला जास्त अधीकार देवून प्रत्येक महासंघाच्या कार्यपध्धतीचा वार्षिक आढावा घेण्यात यावा. मंत्री पाच वर्षात एकदा बदलण्याची शक्यता असल्याने थोडा फार वचक राहू शकण्याची आशा आहे. मंत्र्यांनी वचक दिल्यास सूधारणा होवू शकते हे रेलमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. ( खेलप्रेमी ) मोहन

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:03
हॉकीपटूंनी उपोषण वगैरेच्या धमक्या देत सरकारवर दबाव आणत काही रक्कम उपटली होती. अशी उपोषणं वगैरे करून रक्कम उकळणं हेच मुळात मला चुकीचं वाटतं, लाचारीचं वाटतं! आता ती रक्कम व्याजासकट वसूल करून घ्यावी काय? १) सरकारने मुळात रक्कम देतांनाच विचार करायला हवा होता. २) रक्कम बिनाअट दिली गेली होती का? तशी दिली गेली असेल तर आता रक्कम वसूल करणे माझ्या मते अयोग्य होईल... आपला, (न्यायमूर्ती) तात्या.

मुकुल१ 12/03/2008 - 16:36
आपल्या पैकी किती जणांनी हॉकीची मॅच पदरचे पैसे खर्चून बघीतली आहे? खरं उत्तर द्या! ही आपली उदासीनताच हॉकीच्या नाशाला जबाबदार आहे. मला सांगा, हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही त्याची लोकप्रियता की ती आहे? आपल्या पैकी प्रत्येक जण क्रिकेट खेळलेला असतो, पण हॉकी.. नो वे! लोकप्रिय खेळांच्या मागे मिडीया असणार आणि मिडीयेच्या पाठींब्याने तो खेळ अधीक लोकप्रिय होणार. हे एक चक्र आहे. क्रिकेटच्या बाबतीतही हेच झाल आहे. आता हरल्या नंतर सगळ्यांना साक्षात्कार झाला की अरे खरचं की हा आपला राष्ट्रीय खेळ आहे त्याच्या साठी काहीतरी केलं पाहीजे. आता हे सगळेजण करणार काय तर प्रशिक्षकाने राजिनामा द्यावा, गिल यांनी निघुन जावं, ध्यानचंद यांच नाव शंभर वेळा घ्यावं आणि तथाकथीत जाणकार बोलवून एकमेकाना शिव्या घालाव्या. याने काय साध्य होणार? खेळासाठी काही ठोस उपाययोजना होणार आहे का? काही नाही. दोनचार दिवस चौकशीचा फार्स होईल, मिडिया ला दुसरी बातमी मीळेल, क्रिकेटचे सामने चालू झाल्यावर हॉकी हा आपला रष्ट्रिय खेळ आहे हे आपण विसरुन जावू व आपली या खेळाबद्दलची उदासीनता अशीच चढत्या भाजणीत ठेवू. मुकुल

करता येत नाही मग चेंडू प्रतिपक्षाचे खेळाडू सहज काढून घेतात, वेग कमी पडतो आणि पास घेता येत नाही. मग काय होणार? स्टॉप वॉच हाती घ्या आणि पाहा १. आपल्या डी पासून प्रतिपक्षाच्या डी पर्यंत चेंडू पास न देता सरळ न्यायला आपल्या खेळाडूंना किती वेळ लागतो व तेच काम प्रतिपक्ष किती वेळात करतो. २. ताब्यात असलेला चेंडू आपले खेळाडू आपल्या ताब्यात किती वेळ ठेवू शकतात? आणि प्रतिपक्ष किती वेळ ठेवू शकतो? मग लक्षात येते की आपल्याकडे मूळ कौशल्यच तोकडे आहे. पाकिस्तानी व ऑस्ट्रेलियनांकडे सर्वागीण कौशल्य आहे. हॉलंड (नेदरर्लँड) चे खेळाडू अतिशय वेगवान अशा लाकडी पृष्ठावर खेळण्याचा सराव करतात. त्यामुळे अतिशय वेगात देखील ते चेंडूचा ताबा कायम ठेवू शकतात. बाकी सगळे युरोपिअन खेळाडू आपल्या खेळाडूपेक्षा जास्त वेगात धावू शकतात. आपण इतकी वर्षे कसे असेच बाद कसे झालो नाही हे आश्चर्यच आहे. आणि लबाड युरोपिअन लोकांनी अंडरकटिंगविरोधी नियम आणून आपले दात पाडून टाकले. या सर्व प्राथमिक त्रुटि ज्या मला समजतात, खेळाडूंना व पदाधिका-यांना ठाऊक असणारच. आण्खी माझासारख्या सामान्याला न कळणा-या पण अनेक गोष्टी असतीलच. त्या त्रूटि का दूर होत नाहीत हे पण कोडेच आहे. आपण फक्त पाहायचे. एक निराश हॉकीरसिक सुधीर कांदळकर.

याला खेळाडू, पदाधिकार्‍यांएवढेच 'टर्फ'चे मैदानही कारणीभूत आहे. कारण टर्फवर खेळताना बॉलचा वेग जास्त असल्याकारणाने कौशल्यापेक्षा शारिरीक क्षमता जास्त निर्णायक असते. आणि भारतीय खेळाडू शारिरीक क्षमतेत नक्कीच कमी आहेत. पटण्या सारखे नाही. टर्फवर शारिरीक क्षमता जास्त लागते कबूल, पण टर्फवर खेळायचा निर्णय होऊन किती वर्षे झाली? का आपले खेळाडू ऍडॅप्ट करू शकले नाहीत? पाकिस्तानचे खेळाडू करू शकतात तर आपले का नाहीत? पाकिस्तानी माणसाची शारिरीक क्षमता भारतीयांपेक्षा सर्रास जास्त आहे काय? रक्कम बिनाअट दिली गेली होती का? तशी दिली गेली असेल तर आता रक्कम वसूल करणे माझ्या मते अयोग्य होईल... वा तात्या, तुम्ही तर साहित्यिक! शब्दांचा कीस कसला काढता? त्यातील भावना, उपरोधिकता जाणून घ्या ना! आपल्या पैकी किती जणांनी हॉकीची मॅच पदरचे पैसे खर्चून बघीतली आहे? खरं उत्तर द्या! लोक कशाला बघणार? काही चमकदार खेळ दाखवला, मॅच जिंकल्या तर लोकं बघणार! नुसता राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्याने काय होतंय? अजितपाल सिंगच्या टीमने ऑलिंपिक मेडल जिंकलं होतं तेंव्हा लोकांनी कौतुक केलं होतंच ना! त्यावेळी तर गल्लीगल्लीत मुलं हॉकी खेळायला लागली होती. कौतुक करून घ्यायला हातून तसाच पराक्रम घडायला नको? मग लक्षात येते की आपल्याकडे मूळ कौशल्यच तोकडे आहे. बरोबर बोललात सुधीरभाऊ! आणि ते वाढवण्याची मुख्य जबाबदारी खेळाडूंची नाही काय? अरे सेमिफायनलला हरलांत तर आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्हाला क्वालिफाय पण होता येऊ नये? आणि स्वत:ला राष्ट्रीय खेळाडू म्हणवता? आयला, थूत तुमच्या जिंदगानीवर!!! आपण या वेळि ग्याप घेतलि आहे आय होप सो! आय रीअली, रीअली होप सो..... वरील प्रतिकिया देणार्‍यांचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. पण खेळाडूंच्या बाबतीत म्हणाल तर तुमचा तो व्यवसाय आहे ना? आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक न रहाणारी माणसं सन्मानाच्या अपेक्षेत पाहिली की आमचं रक्त खवळतं! असो! -डांबिसकाका

आयसीसी २०१७ च्या फायनलच्या दिवशी सगळ्या ऑनलाईन पेप्रांत १ ली बातमी क्रिकेटचीच होती. जसजशी भारतीय टीम हरत गेली तसतसे मग भारताने पाकीस्तानला हॉकीत चारी मुंड्या चीत केले याची बातमी पहिल्या पानावर यायला लागली. एकंदरीत उगवत्या सुर्याला नमस्कार कसा करावा हे माध्यमांकडून शिकावे.

सचिन 10/03/2008 - 23:32
हा एक कधीच न सम्पणारा विषय आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही दुर्लक्षित आहे. विचार करा की त्या खेळाडून्ना मोटिव्हेशन काय असेल ? पैसे कोणाला नकोत ? ८-१० देशन्चा "वर्ल्ड कप" जिन्कणे हे खरोखरीच इतके ग्रेट आहे का ? आता तर चक्क लिलाव चलू आहे क्रिकेट मधे ! इतर खेळान्च्या खेळाडून्ना काय मोबदल मिळतो ? मी देखील क्रिकेटचा डाय हार्ड चाहता आहे...पण कुठेतरी कहीतरी चुकते आहे खास !!

छोटा डॉन 10/03/2008 - 23:45
आजकाल मी भारताच्या हॉकीच्या बातम्या ह्या " भारत सरकारने अमक्या अमक्या घटनेचा निषेध नोंदवला " या चालीवरच अतिशय निर्वीकारपणे व मुर्दाड मनाने वाचत असतो ... कारण त्याविषयी आता बोलण्यासारखे व करण्यासारखे काहिही राहिले नाही .... सारा कारभार आता " रामभरोसे व गिलसाहेब भरोसे" चालू आहे.... त्यामुळे आजची बातमी "भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकच्या पात्रता फेरीतच पराभूत झाला." मी वाचली व "के पी एस गिलच्या **** चा घो " म्हणून मनातून थूंकुन टाकली ... त्यापेक्षा जास्त मी काहि करू शकत नाही व करण्याची इच्छा नाही ... आपण येवड्।या पोटतिडकीने लिहलात याबद्दल आपल्याला असलेल्या अपेक्षांचे कौतूक करू वाटते ... मी तर म्हणेन की "भारतीय हॉकी फेडरेशन , पदाधिकारी व ते निर्लज्ज खेडाळू" हे चौकात फटके मारण्याच्या लायकीचे पण उरले नाहित ... राहता राहिला प्रश्न दिलेल्या पैशाचा , तर मी असे म्हणेन की "भारताच्या हॉकीच्या सुवर्णयुगाचे श्राद्ध घालणार्‍या खेडाळूंची दक्षिणा म्हणून " हे पैसे दिले असे समजावे ... कुठे त्यांची तुलना पाकिस्तान , हॉलंड, ऑसीज् , इंग्लंड सारख्या जिगरबाज टीमशी करता ... त्यांना बसूदे कोडगेपणाने आपल्या निर्लज्जपणाचे प्रदर्शन करत .... बास झाले. मी पण आता "ध्यानचंद च्या" आत्म्याची क्षमा मागून व "भारतीय हॉकी फेडरेशन , पदाधिकारी व ते निर्लज्ज खेडाळू व के पी एस गिलच्या **** चा घो " या विषयाला कायमचा "रामराम ठोकतो" .......... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भारतीय हॉकीला दरिद्री कळा आली आहे हे ठीक पण त्याची कारणमिमांसा करता असे दिसते की याला खेळाडू, पदाधिकार्‍यांएवढेच 'टर्फ'चे मैदानही कारणीभूत आहे. कारण टर्फवर खेळताना बॉलचा वेग जास्त असल्याकारणाने कौशल्यापेक्षा शारिरीक क्षमता जास्त निर्णायक असते. आणि भारतीय खेळाडू शारिरीक क्षमतेत नक्कीच कमी आहेत. पूर्वी जेव्हा हिरवळीच्या मैदानावरून हॉकी टर्फच्या मैदानावर खेळवायचा निर्णय झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया या एकमेव देशाने याला विरोध केला कारण त्यामुळे कारण चेंडू हाताळण्याचा कौशल्यापेक्षा वेगाने पळण्यालाच जास्त महत्व राहीले असते. आणि ऑस्ट्रेलियन महासंघाने भारताला या विरोधात सामिल करून घेण्यासाठी ध्यानचंद यांच्या कौशल्याचाच दाखला दिला होता. पण भारताने यात सामिल होणे नाकारले. असो, पण भारतातील खेळाडूंनी स्वतःची शारिरीक क्षमता वाढवणे हा त्याला योग्य पर्याय आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोलबेर 11/03/2008 - 04:46
छान माहिती दिलीत. हिरवळीच्या मैदानासाठी ऑस्ट्रेलियाला पाठींबा न देणे हे र्‍हस्व दृष्टीचे लक्षण आहे. भारताची हॉकीमधे पीछेहाट का होत असावी ते आता लक्षात आले.

हा पोलिसातील माणूस खरेतर भारतीय हॉकीला सुधारायला आणला होता पण म्हातारपणामुळे तो भ्रमिष्ट झाला आहे आणि सत्ता सर्व पडद्यामागून ज्योतिकुमार नावाचा माणूस चालवितो (इति इंडिया टीव्ही). आज सर्वजण गिललाच दोषी ठरवित आहेत पण ज्योतिकुमार मात्र सुरक्षित खेळ्या खेळत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे अगदी धनराजसुद्धा गिलने पैसे खाल्ले असे म्हणत नाहीये. हा पोलिसी माणूस पैश्याच्या बाबतीत भ्रष्टाचारमुक्त आहे. आयएचएफ सध्या शासकीय नियंत्रणाखाली आणणे हा एकच इलाज दिसतो आहे. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

मोहन 11/03/2008 - 15:41
हॉकी काय किंवा क्रिकेट काय. कुठल्याही खेळाच्या महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या पदाला काळ मर्यादा घालायला हवी. ती पाच वर्षापेक्ष जास्त नसावी. ( अन्यथा १४ वर्षे पदभार सांभाळलेले गीलसाहेब ईंस्टंट कॉफी चे दाखले देत आहेत! ) सध्याची बापाची जहागीर चालवण्याची पध्दत अमुलाग्र बदलायला हवी. खेल मंत्रालयाला जास्त अधीकार देवून प्रत्येक महासंघाच्या कार्यपध्धतीचा वार्षिक आढावा घेण्यात यावा. मंत्री पाच वर्षात एकदा बदलण्याची शक्यता असल्याने थोडा फार वचक राहू शकण्याची आशा आहे. मंत्र्यांनी वचक दिल्यास सूधारणा होवू शकते हे रेलमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. ( खेलप्रेमी ) मोहन

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:03
हॉकीपटूंनी उपोषण वगैरेच्या धमक्या देत सरकारवर दबाव आणत काही रक्कम उपटली होती. अशी उपोषणं वगैरे करून रक्कम उकळणं हेच मुळात मला चुकीचं वाटतं, लाचारीचं वाटतं! आता ती रक्कम व्याजासकट वसूल करून घ्यावी काय? १) सरकारने मुळात रक्कम देतांनाच विचार करायला हवा होता. २) रक्कम बिनाअट दिली गेली होती का? तशी दिली गेली असेल तर आता रक्कम वसूल करणे माझ्या मते अयोग्य होईल... आपला, (न्यायमूर्ती) तात्या.

मुकुल१ 12/03/2008 - 16:36
आपल्या पैकी किती जणांनी हॉकीची मॅच पदरचे पैसे खर्चून बघीतली आहे? खरं उत्तर द्या! ही आपली उदासीनताच हॉकीच्या नाशाला जबाबदार आहे. मला सांगा, हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही त्याची लोकप्रियता की ती आहे? आपल्या पैकी प्रत्येक जण क्रिकेट खेळलेला असतो, पण हॉकी.. नो वे! लोकप्रिय खेळांच्या मागे मिडीया असणार आणि मिडीयेच्या पाठींब्याने तो खेळ अधीक लोकप्रिय होणार. हे एक चक्र आहे. क्रिकेटच्या बाबतीतही हेच झाल आहे. आता हरल्या नंतर सगळ्यांना साक्षात्कार झाला की अरे खरचं की हा आपला राष्ट्रीय खेळ आहे त्याच्या साठी काहीतरी केलं पाहीजे. आता हे सगळेजण करणार काय तर प्रशिक्षकाने राजिनामा द्यावा, गिल यांनी निघुन जावं, ध्यानचंद यांच नाव शंभर वेळा घ्यावं आणि तथाकथीत जाणकार बोलवून एकमेकाना शिव्या घालाव्या. याने काय साध्य होणार? खेळासाठी काही ठोस उपाययोजना होणार आहे का? काही नाही. दोनचार दिवस चौकशीचा फार्स होईल, मिडिया ला दुसरी बातमी मीळेल, क्रिकेटचे सामने चालू झाल्यावर हॉकी हा आपला रष्ट्रिय खेळ आहे हे आपण विसरुन जावू व आपली या खेळाबद्दलची उदासीनता अशीच चढत्या भाजणीत ठेवू. मुकुल

करता येत नाही मग चेंडू प्रतिपक्षाचे खेळाडू सहज काढून घेतात, वेग कमी पडतो आणि पास घेता येत नाही. मग काय होणार? स्टॉप वॉच हाती घ्या आणि पाहा १. आपल्या डी पासून प्रतिपक्षाच्या डी पर्यंत चेंडू पास न देता सरळ न्यायला आपल्या खेळाडूंना किती वेळ लागतो व तेच काम प्रतिपक्ष किती वेळात करतो. २. ताब्यात असलेला चेंडू आपले खेळाडू आपल्या ताब्यात किती वेळ ठेवू शकतात? आणि प्रतिपक्ष किती वेळ ठेवू शकतो? मग लक्षात येते की आपल्याकडे मूळ कौशल्यच तोकडे आहे. पाकिस्तानी व ऑस्ट्रेलियनांकडे सर्वागीण कौशल्य आहे. हॉलंड (नेदरर्लँड) चे खेळाडू अतिशय वेगवान अशा लाकडी पृष्ठावर खेळण्याचा सराव करतात. त्यामुळे अतिशय वेगात देखील ते चेंडूचा ताबा कायम ठेवू शकतात. बाकी सगळे युरोपिअन खेळाडू आपल्या खेळाडूपेक्षा जास्त वेगात धावू शकतात. आपण इतकी वर्षे कसे असेच बाद कसे झालो नाही हे आश्चर्यच आहे. आणि लबाड युरोपिअन लोकांनी अंडरकटिंगविरोधी नियम आणून आपले दात पाडून टाकले. या सर्व प्राथमिक त्रुटि ज्या मला समजतात, खेळाडूंना व पदाधिका-यांना ठाऊक असणारच. आण्खी माझासारख्या सामान्याला न कळणा-या पण अनेक गोष्टी असतीलच. त्या त्रूटि का दूर होत नाहीत हे पण कोडेच आहे. आपण फक्त पाहायचे. एक निराश हॉकीरसिक सुधीर कांदळकर.

याला खेळाडू, पदाधिकार्‍यांएवढेच 'टर्फ'चे मैदानही कारणीभूत आहे. कारण टर्फवर खेळताना बॉलचा वेग जास्त असल्याकारणाने कौशल्यापेक्षा शारिरीक क्षमता जास्त निर्णायक असते. आणि भारतीय खेळाडू शारिरीक क्षमतेत नक्कीच कमी आहेत. पटण्या सारखे नाही. टर्फवर शारिरीक क्षमता जास्त लागते कबूल, पण टर्फवर खेळायचा निर्णय होऊन किती वर्षे झाली? का आपले खेळाडू ऍडॅप्ट करू शकले नाहीत? पाकिस्तानचे खेळाडू करू शकतात तर आपले का नाहीत? पाकिस्तानी माणसाची शारिरीक क्षमता भारतीयांपेक्षा सर्रास जास्त आहे काय? रक्कम बिनाअट दिली गेली होती का? तशी दिली गेली असेल तर आता रक्कम वसूल करणे माझ्या मते अयोग्य होईल... वा तात्या, तुम्ही तर साहित्यिक! शब्दांचा कीस कसला काढता? त्यातील भावना, उपरोधिकता जाणून घ्या ना! आपल्या पैकी किती जणांनी हॉकीची मॅच पदरचे पैसे खर्चून बघीतली आहे? खरं उत्तर द्या! लोक कशाला बघणार? काही चमकदार खेळ दाखवला, मॅच जिंकल्या तर लोकं बघणार! नुसता राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्याने काय होतंय? अजितपाल सिंगच्या टीमने ऑलिंपिक मेडल जिंकलं होतं तेंव्हा लोकांनी कौतुक केलं होतंच ना! त्यावेळी तर गल्लीगल्लीत मुलं हॉकी खेळायला लागली होती. कौतुक करून घ्यायला हातून तसाच पराक्रम घडायला नको? मग लक्षात येते की आपल्याकडे मूळ कौशल्यच तोकडे आहे. बरोबर बोललात सुधीरभाऊ! आणि ते वाढवण्याची मुख्य जबाबदारी खेळाडूंची नाही काय? अरे सेमिफायनलला हरलांत तर आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्हाला क्वालिफाय पण होता येऊ नये? आणि स्वत:ला राष्ट्रीय खेळाडू म्हणवता? आयला, थूत तुमच्या जिंदगानीवर!!! आपण या वेळि ग्याप घेतलि आहे आय होप सो! आय रीअली, रीअली होप सो..... वरील प्रतिकिया देणार्‍यांचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. पण खेळाडूंच्या बाबतीत म्हणाल तर तुमचा तो व्यवसाय आहे ना? आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक न रहाणारी माणसं सन्मानाच्या अपेक्षेत पाहिली की आमचं रक्त खवळतं! असो! -डांबिसकाका

आयसीसी २०१७ च्या फायनलच्या दिवशी सगळ्या ऑनलाईन पेप्रांत १ ली बातमी क्रिकेटचीच होती. जसजशी भारतीय टीम हरत गेली तसतसे मग भारताने पाकीस्तानला हॉकीत चारी मुंड्या चीत केले याची बातमी पहिल्या पानावर यायला लागली. एकंदरीत उगवत्या सुर्याला नमस्कार कसा करावा हे माध्यमांकडून शिकावे.
आजच्या पेपरातील बातमी: "भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकच्या पात्रता फेरीतच पराभूत झाला." माझा प्रश्नः जेंव्हा भारतीय क्रिकेट संघावर २०/२० चषक जिंकल्याबद्दल बक्षिसांची खैरात झाली होती तेंव्हा काही (३-४) हॉकीपटूंनी उपोषण वगैरेच्या धमक्या देत सरकारवर दबाव आणत काही रक्कम उपटली होती. आता ती रक्कम व्याजासकट वसूल करून घ्यावी काय? (खरंतर त्यांना चौकात उभे करून फटके मारावेत काय असे विचारणार होतो, पण आपण पाकिस्तान नाही याची आठवण ठेवत आहे...) तुमचे काय मत आहे? संतप्त, पिवळा डांबिस

किवता

छत्रपति ·

धमाल मुलगा 10/03/2008 - 17:19
महाराज, कविता कोणाची आहे त्याचा कृपया उल्लेख करावा ही विन॑ती. बाकी सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे. आवडल॑ हो.

पुर्वार्ध तसा रंगला नाही. कवी चाचपडतोय असे वाटले. तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत. गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत. कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत. या द्विपदी आवडल्या. शुभेच्छा.

प्राजु 11/03/2008 - 00:57
तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत. ही द्विपदी आवडली. आणि आपल्याला किवता या ऐवजी कविता म्हणायचे आहे का? खुलासा करावा. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा 10/03/2008 - 17:19
महाराज, कविता कोणाची आहे त्याचा कृपया उल्लेख करावा ही विन॑ती. बाकी सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे. आवडल॑ हो.

पुर्वार्ध तसा रंगला नाही. कवी चाचपडतोय असे वाटले. तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत. गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत. कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत. या द्विपदी आवडल्या. शुभेच्छा.

प्राजु 11/03/2008 - 00:57
तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत. ही द्विपदी आवडली. आणि आपल्याला किवता या ऐवजी कविता म्हणायचे आहे का? खुलासा करावा. - (सर्वव्यापी)प्राजु
कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे. नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे. मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे. सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे. तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे. हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे. मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे. कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत कळालच नाही तर काय अर्थ

उखाणे

राजमुद्रा ·

विसोबा खेचर 10/03/2008 - 16:07
तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ मी त्याची तर्री ते माझी मिसळ इश्य! इश्य! कस्स! कस्स! :) लाजलो बरं का मी! :)) आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.

धमाल मुलगा 10/03/2008 - 16:55
खास मि. पा. च्या मालकिण (सौ.अनुष्का) उखाणा घेईल तेव्हा हे एकदम पेश्शल :))))) आणि त्यावर तात्याबा॑च॑ इश्य! इश्य! कस्स! कस्स! :) लाजलो बरं का मी! :)) लय भारी !!!! माझा एक ला॑बचा भाऊ (नात्याने बर॑का, नायतर उगाच चावत बसाल किती अ॑तराने अन् उत्तरेकडून का दक्षिणेकडून करत) तर हा, स्वतःच्या लग्नात भयानक कावला होता. जो उठायचा तो नाव घ्यायचा आग्रह करायचा. बर॑ हे महाराज सणकी...(भाऊ कोनाचा है म्हाराजा...म॑ग) त्यातून बिचार्‍याने काहीतरी ४-५ उखाणे कुठून-कुठून शोधून आणले होते. तर लोका॑चा आग्रह खासकरून वहिनीकडच्या॑चा, सारख॑ सारख॑ एकच्या एकच नको, नवा उखाणा हवा...हे ऐकून भाऊराया पिसाळलाच.... त्यान॑ एकच टाकला, पब्लीकची बोलतीच ब॑द. " पा॑ढरी को॑बडी पट्ट्या-पट्ट्याची, अन् अनिता माझ्या एका रट्ट्याची !!!!! आता ह्यापेक्षा वेगळा आणि नवा उखाणा हवा असेल तर मला नवी बायको आणून द्या! " आता बोला........ अवा॑तरः राजमुद्राताई, तयारी जोरात दिसतीये...उखाणे जमवण॑ चालू झालेल॑ आहे अस॑ दिसत॑य. :) तयारीला मदत लागेल नाही? सा॑ग हो कधी येऊ ते :)))))

श्रावणात बरसती रिमझिम धारा। मी पिते कॉफी हे घालतात वारा ।। *-*-*-*-*-*-* एका हातात पिशवी, एका हातात रुमाल । नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल ।। > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा 10/03/2008 - 17:45
माझी बायको उर्वशी .. बाकी सगळ्या म्हशी .... खल्ल्ल्ल्ल्लास्स्स्स्स !!!!!!

राजमुद्रा 10/03/2008 - 18:09
श्रावणात बरसती रिमझिम धारा। मी पिते कॉफी हे घालतात वारा ।। एका हातात पिशवी, एका हातात रुमाल । नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल ।। बशीत बशी ... बशीत बशी बशीत बशी ... बशीत बशी माझी बायको उर्वशी .. बाकी सगळ्या म्हशी .... समानतेचे आहे युग, कामाची करूया वाटणी मी करेन चहा,....राव वाटतील चटणी. खल्लास! एक से बढकर एक :) लगे रहो! राजमुद्रा :)

वरदा 10/03/2008 - 19:23
एका मैत्रीणीच्या नवर्‍याने घेतला लग्नाला झाली दोन वर्ष, आता बसतायत संसाराचे चटके ...च्या ब्युटीपार्लरच्या बिलाने, माझ्या खिशाला फटके. आणि मैत्रीणीने घेतलेला समुद्राकाठची आहे, मऊ मऊ वाळु ..राव दिसतात साधे, पण आहेत मात्र चालु

वरदा 10/03/2008 - 19:27
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर नि माहेर ..रावांच्या संसारात, प्रेमाचा आहेर.

In reply to by वरदा

माझी दुनिया 12/03/2008 - 11:10
असाच एक मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण ..............चं नाव घेते...............ची सून शिवाय उखाण्याची पध्दत जुनी, उखाणा मात्र हवा नवा, रोजंच ..........., .............( टोपणनाव) करायचं तर उखाणा कशाला हवा ? माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

प्राजु 10/03/2008 - 19:36
तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ मी त्याची तर्री ते माझी मिसळ इश्य! इश्य! कस्स! कस्स! :) लाजलो बरं का मी! :)) आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या. हे काहीतरी भलंतच घडतं आहे? तात्यांनी लाजावं??? जोक होता का?? ह्.घ्य. माझाही एक उखाणा.. उंच उंच डोंगर हिरवे.. त्याला टेकतं आभाळ.. ..... रावांचं काय नाव घेऊ.... कपाळ???????? "अ" रावांबरोबर सिनेमा पहायला गेले सायको... "ब" रावांचे नाव घेते "क" रावांची बायको....... :)))))) एक टिपिकल उखाणा.. जो ज्यांना उखाणे रचता येत नाही अशा स्त्रिया घेतात.. निलवर्ण नभात शोभतो शशि... ... नाव घेते....... दिवशी.. (इथे मग मंगळागौरी, दिवाळी, पाडवा, संक्रांतसण असे दिवस) सुर्यापरी रूप आणि चंद्रापरी मुख आहे... .... माझी बायको तर हेच तर खरे दु:ख आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु

मदनबाण 11/03/2008 - 09:53
मला ई-पत्रा द्वारे आलेले काही उखाणे :-- अंगणात पेरले पोतेभर गहू लिस्ट आहे मोठी कोणाकोणाचे नाव घेऊ? ------------------------------------ इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय ----- अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय? ------------------------------------------ गणपतीच्या देवळात शंकराची आरती गणपतराव गेले वरती नी मी राहिले खालती ------------------------------------------- समुद्राच्या काठावर मऊमऊ वाळु गणपतराव दिसतात साधे,पण आतुन एकदम चालू ---------------------------------------------- रेशमी सदर्‍या ला प्लास्टिकचे बक्कल गणपतरावांना आहे टक्कल,पण डोक्यात नाही अक्क्ल ------------------------------------------------- पहिली सोनी,दुसरी मनी,तिसरी जनी सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी ------------------------------------- शिडीवर शिडी बत्त्तीस शिडी गणपतराव ओढतात विडी न मी लावते काडी ---------------------------------------- कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र ------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र ----------------------------------------- निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान ----- आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान ------------------------------------------

धमाल मुलगा 11/03/2008 - 11:07
कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र ------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र ??? कुत्र॑ ??? अरे कशाला काही धरब॑ध आहे की नाही??? हा हन्त हन्त!!! धर्म बुडाला हो !!! :)))))) च्यायला हा उखाणा वाचून मी फुल्टू फ्लॅट.... अरे काय चाललय काय? मी वापरु का माझ्या लग्नात हा उखाणा? निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान ----- आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान हा हा हा.....ए डॉन्या, हा बघ खास तुझ्या बायकोसाठी बनवलाय :))) (ह्याला म्हणतात, "आपल॑ ठेवायच॑ झाकून अन् दुसर्‍याच॑ बघायच॑ वाकून " हा उखाणा फक्त डॉन्यासाठी काय? आमच्या वाग्दत्त पणती..आपल॑, पत्नीन॑ वाचला तर युरेका...युरेका अस॑ (स-वस्त्र !) ओरडत आख्खी सदाशिव पेठ पालथी घालेल.)

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:15
राम नगरकरांच्या रामनगरीतला एक उखाणा आठवत आहे. तो काहीसा असा होत-- डोक्याला फेटा अन् कमरेला शेला बाबूराव मेला म्हणून गणपतराव केला! आपला, (गणपतराव) तात्या.

विवेकवि 11/03/2008 - 11:49
जाऊ बाई जोरात मधला एक ऊखाणा.. चा॑दीच्या ताटात जिलबीचे तुकडे घास भरवते मरतुकड्या थोबाड कर ईकडे... समोरच्या कोनाड्यात ठेवले होते गहू .......राव गेले दौर्यावर आता जरा ..... रावा॑कडे पाहू.... विनोदी आहेत फारसा विचार करु नये.. विवेक वि.

धमाल मुलगा 11/03/2008 - 11:53
ऍलुमिनीयमच्या ताटलीत शिळ्या भाकरीचे तुकडे घास भरवते मुडद्या थोबाड कर इकडे.. ह.ह.पु.वा.. आयला,केशवखुमार शेठ इथ॑ पण विड॑बन? लय म्हणजे लय जबरा आहात बॉ. माझ्या माहितीतला उखाणा साधारणतः असा आहे.. सोन्याच्या ताटात जिलबीचे तुकडे -----रावा॑च॑ नाव घेते, लक्ष द्या इकडे. पाय...शेठ पाय कुठे आहेत? फोटू काढून देव्हार्‍यात..नको, फ्लेक्स मारून भर चौकातच लावतो...२० फूट x २० फूट मापात.

राजमुद्रा 11/03/2008 - 13:53
मी उगाचच रडत होते की उखाणे घ्यायची पध्दत कमी होत चालली आहे म्हणून, इथे तर उखाण्यांवर उखाणे पडताहेत वा वा ! लगे रहो रे बाबांनो .... :) राजमुद्रा :)

मदनबाण 11/03/2008 - 18:04
मला ई-पत्रा द्वारे आलेला अजुन एक उखाणा :-- जर ऐश्वर्या राय ने उखाणा घेतला तर तो असा असेल :-- सलमान आणि विवेक ला लग्नाचे दिले होते वचन, दोघांना टांग देऊन धरला अभिषेक बच्चन...... --------------------------------------------- शगुन च्या मिठाईला चांदीचे कव्हर, अभिषेक चे नाव घेते मी सलमान ची लव्हर...... मदनबाण

किशोरी 11/03/2008 - 18:17
अरे वा!! लग्नाच्या मांडवात आल्या सारखे वाटते आहे :)) बाकी उखाणे तर एकदम ढिंच्याक आहेत >>तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ मी त्याची तर्री ते माझी मिसळ मस्त आहे!! >>कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र ------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र हा तर पहील्यांदाच ऐकला,चला लग्न ठरल्यावर कुठला उखाणा घ्यायचा म्हणुन काळजी नको :)) माझा पण एक् कोनाड्यात ठेवले होते गहु... लग्न नाही झाल तर नाव कुनाच घेऊ...

In reply to by किशोरी

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:50
चला लग्न ठरल्यावर कुठला उखाणा घ्यायचा म्हणुन काळजी नको :)) म्हणजे?? अजून आपले लग्न व्हायचे आहे वाटतं! बरं बरं, आमच्याही मनापासून शुभेच्छा बरं का! सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवा बरं का! :) आपला, (अविवाहीत!) तात्या. अवांतर - १ वरील 'अविवाहीत' हा शब्द लिहिण्यामागे कोणताही क्लू देण्याचा हेतूवजा प्रयत्न नाही! :) अवांतर - २ अवांतर १ सकट वरील संपूर्ण प्रतिसाद स्ट्र्क्ट्ली 'हलकेच घ्या' या सदरात मोडतो/मोडावा असे आम्ही जाहीर करतो! :) आपला, (थोडासा मजेशीर!) तात्या.

विजुभाऊ 12/03/2008 - 11:00
अविवाहित ब्राह्मण .....लग्नाला भटजी म्हणून चालतो काय?( हे म्हणजे लग्नात गणपती ची पूजा करावी...प्र.: मग गणपतीच्या लग्नात त्याने कोणाची पूजा केली होती?...सारखे झाले) तज्ञानी खुलासा करावा............ आपला शन्केखोर विजुभाऊ

In reply to by आनंदयात्री

इनोबा म्हणे 12/03/2008 - 11:35
आपला भ्रमण ध्वनी क्रमांक दिलात तर बरे होईल.धोंडोपंत फार महागात पडतात हो! (फुकट ते पौष्टीक मानणारा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

जाता जाता कोणीतरी धोंडोपंतसुद्धा पौरोहित्य करतात असा प्रचार करत आहे. सावधान. हा तर marketing चा प्रयत्न दिसतोय. (स्वस्त तेच मस्त मानणारी) सृलाताई. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:39
जाता जाता कोणीतरी धोंडोपंतसुद्धा पौरोहित्य करतात असा प्रचार करत आहे. छ्या! धोंड्या काय पौरोहित्य करणार कप्पाळ? त्याला फोकलिच्याला अथर्वशीर्षापलिकडे काही म्हणता येत नाही! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 12/03/2008 - 14:11
:) :) :) कोण कुठे कशा संदर्भात शिव्या खाईल, काही भरवसाच नाही बाबा !! असो ... आहेच जिन्दादिल मिसळ्पाव आमचे !! मिसळधर्माचा विजय असो !! धोंडोपंतांचा, सृष्टीलावण्येचा, विसोबा खेचरांचा, अन राहिलच तर आनंदयात्रीचा विजय असो !! विजय असो !! विजय असो !! विजय असो !!

In reply to by विसोबा खेचर

अथर्वशीर्ष येते हेच खूप नाही का... मी तर असे गुरुजी पाहिलेत की त्यांना धड अथर्वशीर्ष पण पूर्ण येत नाही (हे मी गीतेवर हात ठेऊन म्हणायला तयार आहे) पण फक्त गणेशोत्सवात त्यांचा तोरा पाहायचा. असो. अवांतर: (तात्या नोंद घ्यावी.) सहज एक विनोद आठवला. एक खेडूत प्रवचनकारांना म्हणतो, महाराज, ज्ञानेश्वरीत किती अध्याय आहेत. प्रवचनकार वसकन् ओरडतो, "ज्ञानेश्वरांनी सुरवातीलाच सांगितले आहे, ॐ न मोजी अध्याय..." > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

राजमुद्रा 12/03/2008 - 12:11
मुग्ध करून टाकतात रातराणीच्या कळ्या ----- रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं ---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकललं हा हा हा :) राजमुद्रा :)

किशोरी 12/03/2008 - 12:28
>>म्हणजे?? अजून आपले लग्न व्हायचे आहे वाटतं! बरं बरं, आमच्याही मनापासून शुभेच्छा बरं का! सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवा बरं का! :) धन्यवाद तात्या!! आणी लग्नाला तर बोलवणारच हो,आधी एखादा नमुना तर भेटु दे(लग्नाआधी कीतीही छान वाट्ला तरी, लग्नानंतर आपल्याला नमुना भेटला आहे अस बरेच जण म्हणतात :)) >>वरील 'अविवाहीत' हा शब्द लिहिण्यामागे कोणताही क्लू देण्याचा हेतूवजा प्रयत्न नाही! :) हा हा हा हा....बर झाल सांगितलत :)) अहो तात्या तुम्ही आधीच अनुष्का पसंत करुन ठेवली आहे,नाहीतर अविवाहीत शब्द क्लू म्हणुन घेतला असता :)))) (आगाऊपणाबद्द्ल माफी करा,मजेत लिहीले आहे) :)

किशोरी 12/03/2008 - 17:20
>>गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं ---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकललं हा हा हा हा :)))) कुठुन सुचतात हो तुम्हाला असे उखाणे,मजा आली

मदनबाण 29/03/2008 - 08:02
ई-पत्रा द्वारे आलेले अजुन काही नवीनउखाणे:-- १) आजघर माजघर माजघराला नाही दार गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार ------------------------------------- २) लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास ------------------------------------- ३) गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास ------------------------------------- ४) विड्याच्या पानावर पाव शेर कात गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ ------------------------------------- ५) गोव्यावरुन आणले काजु गणपतरावांच्या थोबाडात वाजवायला मी का लाजु ------------------------------------- ६) अलिकडे अमेरिका पलिकडे अमेरिका नाव घ्यायला सांगु नका मी आहे कुमारीका -------------------------------------

उदय सप्रे 01/04/2008 - 09:47
हा उखाणा आहे, कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा ! अगाध असते देवाची करणी निर्मितो नारळात पाणी शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी" !

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 01/04/2008 - 10:03
अगाध असते देवाची करणी निर्मितो नारळात पाणी शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी" ! क्लास! :)

nit05 07/01/2009 - 18:20
विड्याच्या पानावर पाव शेर कात गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ एक दम क्लास आहे.

ऋचा 07/01/2009 - 18:37
अजुन एक... खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका मी तुझी मांजर तु माझा बोका "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अनिल हटेला 07/01/2009 - 18:40
पेश है.....
हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , आरे ते जाउ देत, त्या हंड्याचा बॅलन्स बघा....
बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

योगी९०० 07/01/2009 - 19:50
द्रौपदी काय उखाणा घेईल ओ...? (मला माहित आहे पण थोडा चावट आहे म्हणून येथे देत नाही). कोणाला चांगला माहित आहे का? खादाडमाऊ

मूखदूर्बळ 13/01/2009 - 10:42
द्रौपदीचा उखाणा : . प्रेमाचा घास दिला नाही म्हणून अमूकराव भडकले प्रत्येकाला भरवता भरवता माझेच 'पंच'प्राण अडकले . मल्लीकाबाईंच्या अहोंचा उखाणा : . सोन्याच्या चुलीवर चांदीचा तवा मल्लीकाबाईंच्या केसात बारा गावच्या उवा .

सुहास. 15/01/2009 - 17:32
"चन्द्र वाढतो कलेकलेनी " "हीचे वजन वाढते किलोकिलोनी" (किलोकिलोनी नव्हे टनाटनानी) सुहास..... माहीती-त॑त्रज्ञानामधील गोदामाचा अभिया॑त्रीकी....

स्पृहा 16/01/2009 - 16:06
अजुन एक... झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु, ---दिसतात जसे डुकराचे पिलु

मदनबाण 02/01/2014 - 12:47
सध्या अच्चीत गच्चीचा उखाणा व्हॅट्सअपवर जोरात फिरत आहे... त्यामुळेच हा धागा देखील आठवला. ;) बाकीत गच्चीत झाड हे किती लाडिक {नाटकी} पणाने म्हंटले आहे ते मला फार फार आवडले. ;) बाकी दुसर्‍या धाग्याचाही दुवा देतो... वाचकांनी लुफ्त घ्यावा. ;) ..उखाणे (काहीच्या बाही)..

In reply to by मदनबाण

सूड 02/01/2014 - 14:55
>>बाकीत गच्चीत झाड हे किती लाडिक {नाटकी} पणाने म्हंटले आहे ते मला फार फार आवडलं. अगदी. कामतकाकूंनी ती जागा अगदी झकासच घेतलीय.

विसोबा खेचर 10/03/2008 - 16:07
तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ मी त्याची तर्री ते माझी मिसळ इश्य! इश्य! कस्स! कस्स! :) लाजलो बरं का मी! :)) आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.

धमाल मुलगा 10/03/2008 - 16:55
खास मि. पा. च्या मालकिण (सौ.अनुष्का) उखाणा घेईल तेव्हा हे एकदम पेश्शल :))))) आणि त्यावर तात्याबा॑च॑ इश्य! इश्य! कस्स! कस्स! :) लाजलो बरं का मी! :)) लय भारी !!!! माझा एक ला॑बचा भाऊ (नात्याने बर॑का, नायतर उगाच चावत बसाल किती अ॑तराने अन् उत्तरेकडून का दक्षिणेकडून करत) तर हा, स्वतःच्या लग्नात भयानक कावला होता. जो उठायचा तो नाव घ्यायचा आग्रह करायचा. बर॑ हे महाराज सणकी...(भाऊ कोनाचा है म्हाराजा...म॑ग) त्यातून बिचार्‍याने काहीतरी ४-५ उखाणे कुठून-कुठून शोधून आणले होते. तर लोका॑चा आग्रह खासकरून वहिनीकडच्या॑चा, सारख॑ सारख॑ एकच्या एकच नको, नवा उखाणा हवा...हे ऐकून भाऊराया पिसाळलाच.... त्यान॑ एकच टाकला, पब्लीकची बोलतीच ब॑द. " पा॑ढरी को॑बडी पट्ट्या-पट्ट्याची, अन् अनिता माझ्या एका रट्ट्याची !!!!! आता ह्यापेक्षा वेगळा आणि नवा उखाणा हवा असेल तर मला नवी बायको आणून द्या! " आता बोला........ अवा॑तरः राजमुद्राताई, तयारी जोरात दिसतीये...उखाणे जमवण॑ चालू झालेल॑ आहे अस॑ दिसत॑य. :) तयारीला मदत लागेल नाही? सा॑ग हो कधी येऊ ते :)))))

श्रावणात बरसती रिमझिम धारा। मी पिते कॉफी हे घालतात वारा ।। *-*-*-*-*-*-* एका हातात पिशवी, एका हातात रुमाल । नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल ।। > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा 10/03/2008 - 17:45
माझी बायको उर्वशी .. बाकी सगळ्या म्हशी .... खल्ल्ल्ल्ल्लास्स्स्स्स !!!!!!

राजमुद्रा 10/03/2008 - 18:09
श्रावणात बरसती रिमझिम धारा। मी पिते कॉफी हे घालतात वारा ।। एका हातात पिशवी, एका हातात रुमाल । नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल ।। बशीत बशी ... बशीत बशी बशीत बशी ... बशीत बशी माझी बायको उर्वशी .. बाकी सगळ्या म्हशी .... समानतेचे आहे युग, कामाची करूया वाटणी मी करेन चहा,....राव वाटतील चटणी. खल्लास! एक से बढकर एक :) लगे रहो! राजमुद्रा :)

वरदा 10/03/2008 - 19:23
एका मैत्रीणीच्या नवर्‍याने घेतला लग्नाला झाली दोन वर्ष, आता बसतायत संसाराचे चटके ...च्या ब्युटीपार्लरच्या बिलाने, माझ्या खिशाला फटके. आणि मैत्रीणीने घेतलेला समुद्राकाठची आहे, मऊ मऊ वाळु ..राव दिसतात साधे, पण आहेत मात्र चालु

वरदा 10/03/2008 - 19:27
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर नि माहेर ..रावांच्या संसारात, प्रेमाचा आहेर.

In reply to by वरदा

माझी दुनिया 12/03/2008 - 11:10
असाच एक मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण ..............चं नाव घेते...............ची सून शिवाय उखाण्याची पध्दत जुनी, उखाणा मात्र हवा नवा, रोजंच ..........., .............( टोपणनाव) करायचं तर उखाणा कशाला हवा ? माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

प्राजु 10/03/2008 - 19:36
तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ मी त्याची तर्री ते माझी मिसळ इश्य! इश्य! कस्स! कस्स! :) लाजलो बरं का मी! :)) आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या. हे काहीतरी भलंतच घडतं आहे? तात्यांनी लाजावं??? जोक होता का?? ह्.घ्य. माझाही एक उखाणा.. उंच उंच डोंगर हिरवे.. त्याला टेकतं आभाळ.. ..... रावांचं काय नाव घेऊ.... कपाळ???????? "अ" रावांबरोबर सिनेमा पहायला गेले सायको... "ब" रावांचे नाव घेते "क" रावांची बायको....... :)))))) एक टिपिकल उखाणा.. जो ज्यांना उखाणे रचता येत नाही अशा स्त्रिया घेतात.. निलवर्ण नभात शोभतो शशि... ... नाव घेते....... दिवशी.. (इथे मग मंगळागौरी, दिवाळी, पाडवा, संक्रांतसण असे दिवस) सुर्यापरी रूप आणि चंद्रापरी मुख आहे... .... माझी बायको तर हेच तर खरे दु:ख आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु

मदनबाण 11/03/2008 - 09:53
मला ई-पत्रा द्वारे आलेले काही उखाणे :-- अंगणात पेरले पोतेभर गहू लिस्ट आहे मोठी कोणाकोणाचे नाव घेऊ? ------------------------------------ इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय ----- अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय? ------------------------------------------ गणपतीच्या देवळात शंकराची आरती गणपतराव गेले वरती नी मी राहिले खालती ------------------------------------------- समुद्राच्या काठावर मऊमऊ वाळु गणपतराव दिसतात साधे,पण आतुन एकदम चालू ---------------------------------------------- रेशमी सदर्‍या ला प्लास्टिकचे बक्कल गणपतरावांना आहे टक्कल,पण डोक्यात नाही अक्क्ल ------------------------------------------------- पहिली सोनी,दुसरी मनी,तिसरी जनी सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी ------------------------------------- शिडीवर शिडी बत्त्तीस शिडी गणपतराव ओढतात विडी न मी लावते काडी ---------------------------------------- कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र ------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र ----------------------------------------- निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान ----- आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान ------------------------------------------

धमाल मुलगा 11/03/2008 - 11:07
कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र ------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र ??? कुत्र॑ ??? अरे कशाला काही धरब॑ध आहे की नाही??? हा हन्त हन्त!!! धर्म बुडाला हो !!! :)))))) च्यायला हा उखाणा वाचून मी फुल्टू फ्लॅट.... अरे काय चाललय काय? मी वापरु का माझ्या लग्नात हा उखाणा? निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान ----- आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान हा हा हा.....ए डॉन्या, हा बघ खास तुझ्या बायकोसाठी बनवलाय :))) (ह्याला म्हणतात, "आपल॑ ठेवायच॑ झाकून अन् दुसर्‍याच॑ बघायच॑ वाकून " हा उखाणा फक्त डॉन्यासाठी काय? आमच्या वाग्दत्त पणती..आपल॑, पत्नीन॑ वाचला तर युरेका...युरेका अस॑ (स-वस्त्र !) ओरडत आख्खी सदाशिव पेठ पालथी घालेल.)

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:15
राम नगरकरांच्या रामनगरीतला एक उखाणा आठवत आहे. तो काहीसा असा होत-- डोक्याला फेटा अन् कमरेला शेला बाबूराव मेला म्हणून गणपतराव केला! आपला, (गणपतराव) तात्या.

विवेकवि 11/03/2008 - 11:49
जाऊ बाई जोरात मधला एक ऊखाणा.. चा॑दीच्या ताटात जिलबीचे तुकडे घास भरवते मरतुकड्या थोबाड कर ईकडे... समोरच्या कोनाड्यात ठेवले होते गहू .......राव गेले दौर्यावर आता जरा ..... रावा॑कडे पाहू.... विनोदी आहेत फारसा विचार करु नये.. विवेक वि.

धमाल मुलगा 11/03/2008 - 11:53
ऍलुमिनीयमच्या ताटलीत शिळ्या भाकरीचे तुकडे घास भरवते मुडद्या थोबाड कर इकडे.. ह.ह.पु.वा.. आयला,केशवखुमार शेठ इथ॑ पण विड॑बन? लय म्हणजे लय जबरा आहात बॉ. माझ्या माहितीतला उखाणा साधारणतः असा आहे.. सोन्याच्या ताटात जिलबीचे तुकडे -----रावा॑च॑ नाव घेते, लक्ष द्या इकडे. पाय...शेठ पाय कुठे आहेत? फोटू काढून देव्हार्‍यात..नको, फ्लेक्स मारून भर चौकातच लावतो...२० फूट x २० फूट मापात.

राजमुद्रा 11/03/2008 - 13:53
मी उगाचच रडत होते की उखाणे घ्यायची पध्दत कमी होत चालली आहे म्हणून, इथे तर उखाण्यांवर उखाणे पडताहेत वा वा ! लगे रहो रे बाबांनो .... :) राजमुद्रा :)

मदनबाण 11/03/2008 - 18:04
मला ई-पत्रा द्वारे आलेला अजुन एक उखाणा :-- जर ऐश्वर्या राय ने उखाणा घेतला तर तो असा असेल :-- सलमान आणि विवेक ला लग्नाचे दिले होते वचन, दोघांना टांग देऊन धरला अभिषेक बच्चन...... --------------------------------------------- शगुन च्या मिठाईला चांदीचे कव्हर, अभिषेक चे नाव घेते मी सलमान ची लव्हर...... मदनबाण

किशोरी 11/03/2008 - 18:17
अरे वा!! लग्नाच्या मांडवात आल्या सारखे वाटते आहे :)) बाकी उखाणे तर एकदम ढिंच्याक आहेत >>तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ मी त्याची तर्री ते माझी मिसळ मस्त आहे!! >>कुत्र्यात कुत्र अल्सेशियन कुत्र ------ बांधले गळ्यात मंगळ्सुत्र हा तर पहील्यांदाच ऐकला,चला लग्न ठरल्यावर कुठला उखाणा घ्यायचा म्हणुन काळजी नको :)) माझा पण एक् कोनाड्यात ठेवले होते गहु... लग्न नाही झाल तर नाव कुनाच घेऊ...

In reply to by किशोरी

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:50
चला लग्न ठरल्यावर कुठला उखाणा घ्यायचा म्हणुन काळजी नको :)) म्हणजे?? अजून आपले लग्न व्हायचे आहे वाटतं! बरं बरं, आमच्याही मनापासून शुभेच्छा बरं का! सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवा बरं का! :) आपला, (अविवाहीत!) तात्या. अवांतर - १ वरील 'अविवाहीत' हा शब्द लिहिण्यामागे कोणताही क्लू देण्याचा हेतूवजा प्रयत्न नाही! :) अवांतर - २ अवांतर १ सकट वरील संपूर्ण प्रतिसाद स्ट्र्क्ट्ली 'हलकेच घ्या' या सदरात मोडतो/मोडावा असे आम्ही जाहीर करतो! :) आपला, (थोडासा मजेशीर!) तात्या.

विजुभाऊ 12/03/2008 - 11:00
अविवाहित ब्राह्मण .....लग्नाला भटजी म्हणून चालतो काय?( हे म्हणजे लग्नात गणपती ची पूजा करावी...प्र.: मग गणपतीच्या लग्नात त्याने कोणाची पूजा केली होती?...सारखे झाले) तज्ञानी खुलासा करावा............ आपला शन्केखोर विजुभाऊ

In reply to by आनंदयात्री

इनोबा म्हणे 12/03/2008 - 11:35
आपला भ्रमण ध्वनी क्रमांक दिलात तर बरे होईल.धोंडोपंत फार महागात पडतात हो! (फुकट ते पौष्टीक मानणारा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

जाता जाता कोणीतरी धोंडोपंतसुद्धा पौरोहित्य करतात असा प्रचार करत आहे. सावधान. हा तर marketing चा प्रयत्न दिसतोय. (स्वस्त तेच मस्त मानणारी) सृलाताई. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:39
जाता जाता कोणीतरी धोंडोपंतसुद्धा पौरोहित्य करतात असा प्रचार करत आहे. छ्या! धोंड्या काय पौरोहित्य करणार कप्पाळ? त्याला फोकलिच्याला अथर्वशीर्षापलिकडे काही म्हणता येत नाही! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 12/03/2008 - 14:11
:) :) :) कोण कुठे कशा संदर्भात शिव्या खाईल, काही भरवसाच नाही बाबा !! असो ... आहेच जिन्दादिल मिसळ्पाव आमचे !! मिसळधर्माचा विजय असो !! धोंडोपंतांचा, सृष्टीलावण्येचा, विसोबा खेचरांचा, अन राहिलच तर आनंदयात्रीचा विजय असो !! विजय असो !! विजय असो !! विजय असो !!

In reply to by विसोबा खेचर

अथर्वशीर्ष येते हेच खूप नाही का... मी तर असे गुरुजी पाहिलेत की त्यांना धड अथर्वशीर्ष पण पूर्ण येत नाही (हे मी गीतेवर हात ठेऊन म्हणायला तयार आहे) पण फक्त गणेशोत्सवात त्यांचा तोरा पाहायचा. असो. अवांतर: (तात्या नोंद घ्यावी.) सहज एक विनोद आठवला. एक खेडूत प्रवचनकारांना म्हणतो, महाराज, ज्ञानेश्वरीत किती अध्याय आहेत. प्रवचनकार वसकन् ओरडतो, "ज्ञानेश्वरांनी सुरवातीलाच सांगितले आहे, ॐ न मोजी अध्याय..." > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

राजमुद्रा 12/03/2008 - 12:11
मुग्ध करून टाकतात रातराणीच्या कळ्या ----- रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं ---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकललं हा हा हा :) राजमुद्रा :)

किशोरी 12/03/2008 - 12:28
>>म्हणजे?? अजून आपले लग्न व्हायचे आहे वाटतं! बरं बरं, आमच्याही मनापासून शुभेच्छा बरं का! सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवा बरं का! :) धन्यवाद तात्या!! आणी लग्नाला तर बोलवणारच हो,आधी एखादा नमुना तर भेटु दे(लग्नाआधी कीतीही छान वाट्ला तरी, लग्नानंतर आपल्याला नमुना भेटला आहे अस बरेच जण म्हणतात :)) >>वरील 'अविवाहीत' हा शब्द लिहिण्यामागे कोणताही क्लू देण्याचा हेतूवजा प्रयत्न नाही! :) हा हा हा हा....बर झाल सांगितलत :)) अहो तात्या तुम्ही आधीच अनुष्का पसंत करुन ठेवली आहे,नाहीतर अविवाहीत शब्द क्लू म्हणुन घेतला असता :)))) (आगाऊपणाबद्द्ल माफी करा,मजेत लिहीले आहे) :)

किशोरी 12/03/2008 - 17:20
>>गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं ---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकललं हा हा हा हा :)))) कुठुन सुचतात हो तुम्हाला असे उखाणे,मजा आली

मदनबाण 29/03/2008 - 08:02
ई-पत्रा द्वारे आलेले अजुन काही नवीनउखाणे:-- १) आजघर माजघर माजघराला नाही दार गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार ------------------------------------- २) लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास ------------------------------------- ३) गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास ------------------------------------- ४) विड्याच्या पानावर पाव शेर कात गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ ------------------------------------- ५) गोव्यावरुन आणले काजु गणपतरावांच्या थोबाडात वाजवायला मी का लाजु ------------------------------------- ६) अलिकडे अमेरिका पलिकडे अमेरिका नाव घ्यायला सांगु नका मी आहे कुमारीका -------------------------------------

उदय सप्रे 01/04/2008 - 09:47
हा उखाणा आहे, कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा ! अगाध असते देवाची करणी निर्मितो नारळात पाणी शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी" !

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 01/04/2008 - 10:03
अगाध असते देवाची करणी निर्मितो नारळात पाणी शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी" ! क्लास! :)

nit05 07/01/2009 - 18:20
विड्याच्या पानावर पाव शेर कात गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ एक दम क्लास आहे.

ऋचा 07/01/2009 - 18:37
अजुन एक... खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका मी तुझी मांजर तु माझा बोका "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अनिल हटेला 07/01/2009 - 18:40
पेश है.....
हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , हंड्यावर हंडा ,हंड्यावर हंडा , आरे ते जाउ देत, त्या हंड्याचा बॅलन्स बघा....
बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

योगी९०० 07/01/2009 - 19:50
द्रौपदी काय उखाणा घेईल ओ...? (मला माहित आहे पण थोडा चावट आहे म्हणून येथे देत नाही). कोणाला चांगला माहित आहे का? खादाडमाऊ

मूखदूर्बळ 13/01/2009 - 10:42
द्रौपदीचा उखाणा : . प्रेमाचा घास दिला नाही म्हणून अमूकराव भडकले प्रत्येकाला भरवता भरवता माझेच 'पंच'प्राण अडकले . मल्लीकाबाईंच्या अहोंचा उखाणा : . सोन्याच्या चुलीवर चांदीचा तवा मल्लीकाबाईंच्या केसात बारा गावच्या उवा .

सुहास. 15/01/2009 - 17:32
"चन्द्र वाढतो कलेकलेनी " "हीचे वजन वाढते किलोकिलोनी" (किलोकिलोनी नव्हे टनाटनानी) सुहास..... माहीती-त॑त्रज्ञानामधील गोदामाचा अभिया॑त्रीकी....

स्पृहा 16/01/2009 - 16:06
अजुन एक... झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु, ---दिसतात जसे डुकराचे पिलु

मदनबाण 02/01/2014 - 12:47
सध्या अच्चीत गच्चीचा उखाणा व्हॅट्सअपवर जोरात फिरत आहे... त्यामुळेच हा धागा देखील आठवला. ;) बाकीत गच्चीत झाड हे किती लाडिक {नाटकी} पणाने म्हंटले आहे ते मला फार फार आवडले. ;) बाकी दुसर्‍या धाग्याचाही दुवा देतो... वाचकांनी लुफ्त घ्यावा. ;) ..उखाणे (काहीच्या बाही)..

In reply to by मदनबाण

सूड 02/01/2014 - 14:55
>>बाकीत गच्चीत झाड हे किती लाडिक {नाटकी} पणाने म्हंटले आहे ते मला फार फार आवडलं. अगदी. कामतकाकूंनी ती जागा अगदी झकासच घेतलीय.
उखाणे, म्हटंलं की मला पु. ल. चा 'समोरच्या कोनाड्यात उभी हींदमाता, बेंबटेरावाचं नाव घेते माझा नंबर पहिला' हा उखाणा आठवतो.तसं उखाण्याचं वेड आजकाल थोडं कमीच झालं आहे. तरीही वाचायला गोड वाटतात. असे म्हणतात की चारोळ्या हा कवितेतला नवा प्रकार. पण मी म्हणेन हे उखाणे म्हणजे आपल्या जुन्या चारोळ्याच (की दोनओळ्या)की!

अनुदिनींच्या शोधात...

वडापाव ·

आनंद घारे 10/03/2008 - 16:57
अनुदिन्यांची संख्या नऊशेच्या वर गेली आहे. लवकर आपली अनुदिनी सुरू करा म्हणजे पहिल्या हजारात याल. आणखी कांही दिवसांनी सगळेच लिहिणारे झाल्यावर वाचणारे दुर्मिळ होतील!

ह्या इथे आनंदकाका घारे (आनंदघन) यांची अनुदिनी दिसेल जी मराठीचे वैभव आहे विशेषत: त्यांचे चंद्र या विषयावरील लेख छानच आहेत. इंग्रजी मध्ये चालणार असतील तर मी माझ्या अल्पस्वल्प बुद्धिने ह्या इथे काहीतरी पांढर्‍यावर काळे केलेले आहे.. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

आनंद घारे 10/03/2008 - 16:57
अनुदिन्यांची संख्या नऊशेच्या वर गेली आहे. लवकर आपली अनुदिनी सुरू करा म्हणजे पहिल्या हजारात याल. आणखी कांही दिवसांनी सगळेच लिहिणारे झाल्यावर वाचणारे दुर्मिळ होतील!

ह्या इथे आनंदकाका घारे (आनंदघन) यांची अनुदिनी दिसेल जी मराठीचे वैभव आहे विशेषत: त्यांचे चंद्र या विषयावरील लेख छानच आहेत. इंग्रजी मध्ये चालणार असतील तर मी माझ्या अल्पस्वल्प बुद्धिने ह्या इथे काहीतरी पांढर्‍यावर काळे केलेले आहे.. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
जुन्या-नव्या, माहितीचे वाटप करणा-या, गंमतीशीर अशा अनुदिनी असतात. या अनुदिनींवरील माहिती, काव्ये, अनुभव, विनोद, यांनी समाधानकारक असे मनोरंजन होते. अशाच नव्या अनुदिनींच्या शोधात........ (उदा. blogspot.com, wordpress.com, अथवा अजून एखादी)

क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले - पुण्यतिथी

शेखर ·

राजमुद्रा 10/03/2008 - 12:48
आज आम्ही सर्व मुली ज्यांच्या कर्तुत्वामुळे शिक्षण घेत आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहात आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे विनम्र अभिवादन! जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. राजमुद्रा :)

राजमुद्रा 10/03/2008 - 12:50
पुण्यात मुलींची पहिली शाळेची स्थापना - १ जानेवारी १९४८ यातील साल १९४८ ऍवजी १८४८ आहे का? मला स्वतःला ते माहित नाही तसे नसल्यास क्षमा असावी राजमुद्रा :)

एक स्त्री म्हणून सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे ऋण खरोखरच मान्य करायला हवे. स्री - शिक्षण, घटनेने स्रियांना दिलेले समान अधिकार हे पाहून भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय असल्याचा गर्व वाटतो. सावित्रीबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

आनंद घारे 10/03/2008 - 16:53
सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७) साता-याजवळच्या नायगांव येथे जन्मलेल्या सावित्रीबाई थोर समाजसुधारक होत्या. या कार्यात त्यांना त्यांचे पति महात्मा ज्योतीराव फुले यांचेकडून प्रोत्साहन मिळाले. ब्रिटीश राजवटीमध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी झटणारी ती पहिली स्त्री होती. पुणे येथे सुरू झालेल्या महिलांच्या पहिल्या विद्यालयामधील पहिली शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला. स्त्रियांचे शिक्षण व पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये होणा-या जाचापासून तिची मुक्तता करणे, विधवांचे विवाह आणि अस्पृष्यतानिवारण ही त्यांनी आपल्या जीवनाची उद्दिष्टे ठरवली. सन १८५२ मध्ये त्यांनी अस्पृष्य मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडली. १९६८ साली त्यांनी अस्पृष्यांना आपल्या विहिरीमधून पाणी भरण्यासाठी आमंत्रित केले. १९७३ मध्ये एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजासाठी एक उदाहरण घालून दिले. ज्या काळांत स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते, त्या काळांत त्यांचे चौफेर कार्य इतर महिलांच्या तुलनेने ठळकपणे उठून दिसण्यासारखे होते. पुण्याच्या सनातनी लोकांनी त्यांच्या या तत्कालिन रूढीविरुध्द जाणा-या "अघोरी" कामगिरीवर जळजळीत टीकास्त्र सोडले व त्याला कडाडून विरोध केला. तरीही सत्यशोधक समाजाची सक्रिय सदस्य राहून त्या अस्पृष्य व महिलांच्या मुक्तीसाठी झटत राहिल्या.

वरदा 10/03/2008 - 19:11
जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. १००% सहमत. स्री - शिक्षण, घटनेने स्रियांना दिलेले समान अधिकार हे पाहून भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय असल्याचा गर्व वाटतो. खरं आहे.

दगडफेक केली. त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे मारले. तरी त्या विचलित झाल्या नाहीत. त्यांना सहस्र प्रणाम. शेखरशेठ आपण हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 11/03/2008 - 01:35
आज आम्ही सर्व मुली ज्यांच्या कर्तुत्वामुळे शिक्षण घेत आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहात आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे विनम्र अभिवादन! जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. राजमुद्राताईंशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

आपला आभि 11/03/2008 - 06:23
इनोदी लेख .. काळजाला हात घालणारे (आणि ते वडून काढणारे), भावनिक वगैरे वगैरे... असल काहि लिहनारे कमी नाहीत ..पण तुम्ही काहि सत्य आणि स्फुर्तीदायी लिहित आहत हे पाहुन , वाचुन आनन्द वाटला .. लिहीत रहा... --- थोरांच्या उपकारावर या दुनियेत अंग फुगवून वावरनारं आपल एक चिलट आआआभि

राजमुद्रा 10/03/2008 - 12:48
आज आम्ही सर्व मुली ज्यांच्या कर्तुत्वामुळे शिक्षण घेत आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहात आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे विनम्र अभिवादन! जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. राजमुद्रा :)

राजमुद्रा 10/03/2008 - 12:50
पुण्यात मुलींची पहिली शाळेची स्थापना - १ जानेवारी १९४८ यातील साल १९४८ ऍवजी १८४८ आहे का? मला स्वतःला ते माहित नाही तसे नसल्यास क्षमा असावी राजमुद्रा :)

एक स्त्री म्हणून सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे ऋण खरोखरच मान्य करायला हवे. स्री - शिक्षण, घटनेने स्रियांना दिलेले समान अधिकार हे पाहून भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय असल्याचा गर्व वाटतो. सावित्रीबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

आनंद घारे 10/03/2008 - 16:53
सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७) साता-याजवळच्या नायगांव येथे जन्मलेल्या सावित्रीबाई थोर समाजसुधारक होत्या. या कार्यात त्यांना त्यांचे पति महात्मा ज्योतीराव फुले यांचेकडून प्रोत्साहन मिळाले. ब्रिटीश राजवटीमध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी झटणारी ती पहिली स्त्री होती. पुणे येथे सुरू झालेल्या महिलांच्या पहिल्या विद्यालयामधील पहिली शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला. स्त्रियांचे शिक्षण व पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये होणा-या जाचापासून तिची मुक्तता करणे, विधवांचे विवाह आणि अस्पृष्यतानिवारण ही त्यांनी आपल्या जीवनाची उद्दिष्टे ठरवली. सन १८५२ मध्ये त्यांनी अस्पृष्य मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडली. १९६८ साली त्यांनी अस्पृष्यांना आपल्या विहिरीमधून पाणी भरण्यासाठी आमंत्रित केले. १९७३ मध्ये एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजासाठी एक उदाहरण घालून दिले. ज्या काळांत स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते, त्या काळांत त्यांचे चौफेर कार्य इतर महिलांच्या तुलनेने ठळकपणे उठून दिसण्यासारखे होते. पुण्याच्या सनातनी लोकांनी त्यांच्या या तत्कालिन रूढीविरुध्द जाणा-या "अघोरी" कामगिरीवर जळजळीत टीकास्त्र सोडले व त्याला कडाडून विरोध केला. तरीही सत्यशोधक समाजाची सक्रिय सदस्य राहून त्या अस्पृष्य व महिलांच्या मुक्तीसाठी झटत राहिल्या.

वरदा 10/03/2008 - 19:11
जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. १००% सहमत. स्री - शिक्षण, घटनेने स्रियांना दिलेले समान अधिकार हे पाहून भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय असल्याचा गर्व वाटतो. खरं आहे.

दगडफेक केली. त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे मारले. तरी त्या विचलित झाल्या नाहीत. त्यांना सहस्र प्रणाम. शेखरशेठ आपण हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 11/03/2008 - 01:35
आज आम्ही सर्व मुली ज्यांच्या कर्तुत्वामुळे शिक्षण घेत आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहात आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे विनम्र अभिवादन! जर यांनी आयुष्यात कष्ट सहन केले नसते तर आज मी कुठे असते याची कल्पना सुद्धा करता येत नाही. राजमुद्राताईंशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

आपला आभि 11/03/2008 - 06:23
इनोदी लेख .. काळजाला हात घालणारे (आणि ते वडून काढणारे), भावनिक वगैरे वगैरे... असल काहि लिहनारे कमी नाहीत ..पण तुम्ही काहि सत्य आणि स्फुर्तीदायी लिहित आहत हे पाहुन , वाचुन आनन्द वाटला .. लिहीत रहा... --- थोरांच्या उपकारावर या दुनियेत अंग फुगवून वावरनारं आपल एक चिलट आआआभि
क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनी विनम्र अभिवादन. थोडक्यात जीवनपट...... जन्म - ३ जानेवारी १८३१ लग्न - १८४० शिक्षणाची सुरवात - १८४१ मराठवाड्यात शाळेची स्थापना - १८४७ पुण्यात मुलींची पहिली शाळेची स्थापना - १ जानेवारी १९४८ प्रौढांसाठी शाळा चालू - १८४९ निधन - १० मार्च १८९७ - (नतमस्तक) शेखर