मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंगेश पाडगांवकरांची गीते

आनंद घारे ·

आजच सकाळी एफएम वर ऐकले. ही अजून काही त्यांची गाणी. मराठीवर्ल्ड वर संपूर्ण वाचता येतील. 1. Ghan barasat aale भुमानंद बोगम मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 2. Aaj antaryaamee उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 3. Jenvhaa tujhyaa bataannaa सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 4. Jaahalyaa kaahee chukaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 5. Kaan Hari, saang उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 6. Bhaavanancaa too लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 7. Japoon chaal pori अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 8. Saavar re, saavar re लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर हृदयनाथ मंगेशकर 9. Maan velaavunee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 10. Paanyaahoon saanj उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 11. Pahileech bhet अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 12. Akherache yetil अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 13. Jari yaa pusoon शोभा जोशी मंगेश पाडगांवकर यशवंत देव 14. Dhuke daatalele अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 15. Vaatate sarva saangaave माहित नाही मंगेश पाडगांवकर माहित नाही 16. Asaa bebhaan haa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर हृदयनाथ मंगेशकर 17. Maajhe jeevan gaane जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे 18. Dharilaa vrithaa chhand सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 19. Ootha re Raaghavaa उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 20. Tujhe geet gaanyaasaathee सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 21. Shukrataaraa manda vaaraa अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 22. Kadhi bahar, kadhi shishir सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 23. Neej maajhyaa nandalaalaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 24. Door aarta saang kunee मधुबाला जवेरी मंगेश पाडगांवकर यशवंत देव 25. Shraavanaat ghan nilaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 26. Tulaa te aathavel सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 27. Haat tujhaa haataatun अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 28. Ashee paakhare yetee सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 29. Sarva sarva visaroo de अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 30. Tyaa anaam veeraa माहित नाही मंगेश पाडगांवकर माहित नाही 31. Divas tujhe he अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 32. Shabda shabda japun सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 33. Tee raatra kusumbee अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 34. Bhet tujhee maajhee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 35. Laajoon haasane हृदयनाथ मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 36. Dilyaa ghetalyaa अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 37. Yaa janmaavar, yaa अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 38. Shabdaavaachun kalale जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे 39. Kuthe shodhishee raameshwar सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 40. Sobateelaa chandra dete लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 41. Bhaatukaleechyaa khelaamadhalee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 42. He haat ase सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 43. Jhaalee phule kalyaanchee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 44. Pausat tu bhijun aalis अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 45. Jeevanachya sohlyala jayache aahe अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 46. Aasvat hasanari prit kunachi अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 47. Hi har kunachi ? अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 48. Kale kale chanchal dole अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 49. Tu fule maluni अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 50. Budnar chandra aata सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर प्रभाकर पंडित 51. Radatach aalo yetana, pan अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 52. Mi chachal houni aale सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 53. Mi bolale n kahi सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 54. Pranam ha pranam ha मंगेश पाडगांवकर माहित नाही 55. Dukha jyane janile गजानन वाटवे मंगेश पाडगांवकर गजानन वाटवे 56. Lal fulani zulnari tu अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा "उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा" पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी फक्त चार ओळी....पण खुप काही सान्गुन जातात...! आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

नंदन 10/03/2008 - 17:13
पाडगावकरांच्या गाण्यांतल्या वेचक ओळी फार सुरेख निवडल्या आहेत. तुम्ही उल्लेख केलेल्या ओळींबरोबरच 'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवंही अतिशय आवडतं. संपता पूजा स्वरांची हात तू देशील का दाटुनि काळोख येता, तू घरी नेशील का पूर्णतेसाठीच या मी, सर्व काही साहिले शिवाय 'आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना' या वर्णनाला काय म्हणावे!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

आनंद घारे 10/03/2008 - 22:29
'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवं मलाही अतिशय आवडतं. मी ते आधी शॉर्टलिस्ट केले होते. 'तीन्ही लोक आनंदाने भरुन राहूदेरे' यासारखी कांही गाणी संपूर्णपणे अक्षर अन अक्षर 'आउट ऑफ धिस वर्ल्ड' आहेत. पण आपण एका लेखात त्यातली किती घेणार?

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या प्रतिभेला सलाम. त्यांची सलाम कविता फार आवडली. :) तसेच त्यांची एक 'गवताचे फूल' नावाची कविता माझ्या फार पूर्वी वाचनात आली होती. 'भिऊन तुझ्या शक्तिला लवून करतील सारे मुजरे, पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे' अशा आशयाचे एक कडवे आहे त्यात. कोणाला ही कविता पूर्ण माहीत असेल तर कळवावे. 'गवताचे फूल' असे नाव आहे कवितेचे. पुण्याचे पेशवे

टिउ 10/03/2008 - 22:32
कोंबडीच्या अंड्यामधुन बाहेर आले पिल्लु, अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लु! कोंबडी म्हणाली पिल्लुबाय, सांग तुला हवे काय? किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे; आणुन देइन तुला हवे असेल ते खाणे! पिल्लु म्हणाले, 'आई, दुसरे नको काही, छोट्याश्या कपामधे चहा भरुन दे, मला एका अंड्याचे ऑम्लेट करुन दे!'

मला विलक्षण भावणार्‍या काव्यपंक्ति, पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा... क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात... अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली... -डांबिसकाका

मला विलक्षण भावणार्‍या काव्यपंक्ति, पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा... क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात... अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. तरी मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली... -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 10/03/2008 - 23:27
काही काळ थबकवून टाकण्यात यशस्वी झाल्याचा परिणाम असावा..:) ह्या 'मंगेशाला' माझा साष्टांग दंडवत!! चतुरंग

सुवर्णमयी 10/03/2008 - 22:54
हे माझे आवडते काव्यसंग्रह आहेत. छोरी मधली त्यान्ची एक कविता तुला पाहिले मी हसतांना ढ्गाळलेल्या उदास दिवशी तुला पाहिले मी हसतांना तशीच हट्टी करुन जिवण जीव कुणाचासा घेतांना आठवणीतिल निळे चांदणे तीक्ष्ण बर्फ झाले गोठुनी आणि हरवल्या क्षितिजावरची जखमही आली पुन्हा दाटुनी मला वाटले पुन्हा करावी जखम तुझ्या हृदयातिल जागी उकरुनि वरचे निळे चांदणे अहेर द्यावी रात्र अभागी डोळ्यातिल पण तुझ्या चांदण्या दिसल्या थकलेल्या कोमुजुन डोळ्याखाली डोहच काळे ज्यात बुडाली नजर विस्कटुन न बोलताही मला म्हणालीसः स्मिते रंगवुन अशीच घ्यावी जमेल त्याने ठिकर्‍यांवरती रंगाची ठिगळे पसरावी आणि भासले मला म्हणालिस तशी च त्या अगतिक वाटेवर 'थकले रे..' शब्दांचे झाले काळोखाचे खोल सरोवर आणि कळले उरला केवळ काळोखच दोघांना बुडवुन डोळ्याखाली डोहच काळे तिथे उभे एकटे सुनेपण -मंगेश पाडगावकर

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:15
काळ्यानिळ्या वेदनेचा झाला काळोखाला डंख तेव्हा शपथ घालून तोडलेस माझे पंख ओ़ळखीच्या अंधारात अनोळखी झालीस तू ..खोटे खोटे हासतांना खोल किंचाळले हेतू सारेच का खोटे होते? काय सारी भूल होती? पांगार्‍याला काट्यांआधी लाल फुले आली होती? माझ्या मनी काळोखात भिनलेला डंख उरे- वेदनेच्या पांगार्‍याचे मला काटे, तुला फुले (मंगेश पाडगावकर, छोरी)

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:22
तू असतिस तर तू असतिस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातुन एक दिवाणे नवथर गाणे बकुळीच्या पुष्पापरि नाजुक फुलले असते गंधाने क्षण ही जिप्सी मधली माझी एक आवडती कविता आहे.

प्राजु 11/03/2008 - 00:26
सोनाली, अप्रतिम कविता...सार्‍याच कविता इथे दिल्याबद्दल धन्यवद. सारेच का खोटे होते? काय सारी भूल होती? पांगार्‍याला काट्यांआधी लाल फुले आली होती? पाडगांकरांच्या प्रतिभेला सलाम. - (सर्वव्यापी)प्राजु

मैत्र 21/01/2015 - 17:19
अचानक हा धागा सापडला आणि वर आणावासा वाटला.. एक कविता - ६६ साली म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली तरी आजही तितकीच लागू होते पोपट प्रवासात आगगाडीतून येताना शेताच्या लाल लाल बांधावर दिसला एक हिरवाहिरवागार पोपट. मग पोपट हिरवेगार उडाला. पोपट माझ्या मनात शिरला. पोपट माझ्या मनात फिरला मन हिरवेगार करीत, विचार हिरवेगार करीत, स्वप्ने हिरवीगार करीत. पोपट बसला खांद्यावर आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड... मी म्हटले, "मिस्टर पोपट, कसे काय?" तो म्हणाला, "मिस्टर कवी, कसे काय?" भलताच मिस्कील होता पोपट. हिरवाहिरवागार पोपट. प्रवासभर पोपट बोलत होता खूप. प्रवासभर मीही बोलत होतो खूप. पोपट म्हणाला, "मिस्टर कवी, करता काय?" मी म्हटले, "नोकरी करतो." पोपट म्हणाला, "नोकरीमध्ये करता काय?" मी म्हणालो, " नोकरीमध्ये खोटे हसतो. खोटे बोलतो. बंद गळ्याच्या मठठांना शहाणे म्हणतो. लाचारांना शूर म्हणतो. हलकटांना सज्जन म्हणतो. समर्थाच्या श्वानांना सलाम करतो. झकास करतो मूल्यांची पोपटपंची. पहिलीला पगार घेतो : रहाणीची मान जरा उंच करतो. " पोपटाने माझ्या डोळ्यांत पाहिले : मला भलतीच भीती वाटली. वाटले, हा भूल घालून नेईल मला हिरव्या हिरव्या पंखांवरून लाल लाल बांधावर. माझे एक प्रमोशन ड्यू होते : पोपटाची मला खूप भीती वाटली. पोपटाने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाहिले : डोळे भरून माझ्या डोळ्यांत पाहिले आणि तो उडून गेला. हिरव्या हिरव्या पंखांवर निळे निळे आभाळ झेलीत लाल लाल बांधाकडे पोपट एकटा उडून गेला. -- मंगेश पाडगावकर ९-१०-१९६६ (साहित्य अकादमी विजेता काव्यसंग्रह -- सलाम)

मितान 21/01/2015 - 18:14
मैत्र, हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद ! पाडगावकरांची गीते माझ्याही आवडीची. पण 'सलाम' साठी मात्र माझा पास ! अशा कविता लिहिल्याशिवाय साहित्य अकादमी मिळालेच नसते का ? ती सलाम ही कविता तर खरोखर डोक्यात जाते. विदुषक पण तशीच. या कविता वाचताना गीतकार, प्रेमकवी पाडगांकरांमध्ये कोणा जिल्ब्यापाडू नवकवी संचारला की काय असं वाटून दचकुन जातो आपण. अर्थात हे माझे वैयक्तिक मत, आवड वगेरे वगेरे... :)

आजच सकाळी एफएम वर ऐकले. ही अजून काही त्यांची गाणी. मराठीवर्ल्ड वर संपूर्ण वाचता येतील. 1. Ghan barasat aale भुमानंद बोगम मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 2. Aaj antaryaamee उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 3. Jenvhaa tujhyaa bataannaa सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 4. Jaahalyaa kaahee chukaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 5. Kaan Hari, saang उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 6. Bhaavanancaa too लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 7. Japoon chaal pori अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 8. Saavar re, saavar re लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर हृदयनाथ मंगेशकर 9. Maan velaavunee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 10. Paanyaahoon saanj उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 11. Pahileech bhet अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 12. Akherache yetil अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 13. Jari yaa pusoon शोभा जोशी मंगेश पाडगांवकर यशवंत देव 14. Dhuke daatalele अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 15. Vaatate sarva saangaave माहित नाही मंगेश पाडगांवकर माहित नाही 16. Asaa bebhaan haa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर हृदयनाथ मंगेशकर 17. Maajhe jeevan gaane जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे 18. Dharilaa vrithaa chhand सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 19. Ootha re Raaghavaa उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 20. Tujhe geet gaanyaasaathee सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 21. Shukrataaraa manda vaaraa अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 22. Kadhi bahar, kadhi shishir सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 23. Neej maajhyaa nandalaalaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 24. Door aarta saang kunee मधुबाला जवेरी मंगेश पाडगांवकर यशवंत देव 25. Shraavanaat ghan nilaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 26. Tulaa te aathavel सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 27. Haat tujhaa haataatun अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 28. Ashee paakhare yetee सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 29. Sarva sarva visaroo de अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 30. Tyaa anaam veeraa माहित नाही मंगेश पाडगांवकर माहित नाही 31. Divas tujhe he अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 32. Shabda shabda japun सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 33. Tee raatra kusumbee अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 34. Bhet tujhee maajhee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 35. Laajoon haasane हृदयनाथ मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 36. Dilyaa ghetalyaa अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 37. Yaa janmaavar, yaa अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 38. Shabdaavaachun kalale जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे 39. Kuthe shodhishee raameshwar सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव 40. Sobateelaa chandra dete लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 41. Bhaatukaleechyaa khelaamadhalee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 42. He haat ase सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 43. Jhaalee phule kalyaanchee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 44. Pausat tu bhijun aalis अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 45. Jeevanachya sohlyala jayache aahe अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 46. Aasvat hasanari prit kunachi अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 47. Hi har kunachi ? अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 48. Kale kale chanchal dole अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 49. Tu fule maluni अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 50. Budnar chandra aata सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर प्रभाकर पंडित 51. Radatach aalo yetana, pan अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव 52. Mi chachal houni aale सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे 53. Mi bolale n kahi सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे 54. Pranam ha pranam ha मंगेश पाडगांवकर माहित नाही 55. Dukha jyane janile गजानन वाटवे मंगेश पाडगांवकर गजानन वाटवे 56. Lal fulani zulnari tu अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा "उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा" पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी फक्त चार ओळी....पण खुप काही सान्गुन जातात...! आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

नंदन 10/03/2008 - 17:13
पाडगावकरांच्या गाण्यांतल्या वेचक ओळी फार सुरेख निवडल्या आहेत. तुम्ही उल्लेख केलेल्या ओळींबरोबरच 'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवंही अतिशय आवडतं. संपता पूजा स्वरांची हात तू देशील का दाटुनि काळोख येता, तू घरी नेशील का पूर्णतेसाठीच या मी, सर्व काही साहिले शिवाय 'आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना' या वर्णनाला काय म्हणावे!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

आनंद घारे 10/03/2008 - 22:29
'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवं मलाही अतिशय आवडतं. मी ते आधी शॉर्टलिस्ट केले होते. 'तीन्ही लोक आनंदाने भरुन राहूदेरे' यासारखी कांही गाणी संपूर्णपणे अक्षर अन अक्षर 'आउट ऑफ धिस वर्ल्ड' आहेत. पण आपण एका लेखात त्यातली किती घेणार?

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या प्रतिभेला सलाम. त्यांची सलाम कविता फार आवडली. :) तसेच त्यांची एक 'गवताचे फूल' नावाची कविता माझ्या फार पूर्वी वाचनात आली होती. 'भिऊन तुझ्या शक्तिला लवून करतील सारे मुजरे, पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे' अशा आशयाचे एक कडवे आहे त्यात. कोणाला ही कविता पूर्ण माहीत असेल तर कळवावे. 'गवताचे फूल' असे नाव आहे कवितेचे. पुण्याचे पेशवे

टिउ 10/03/2008 - 22:32
कोंबडीच्या अंड्यामधुन बाहेर आले पिल्लु, अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लु! कोंबडी म्हणाली पिल्लुबाय, सांग तुला हवे काय? किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे; आणुन देइन तुला हवे असेल ते खाणे! पिल्लु म्हणाले, 'आई, दुसरे नको काही, छोट्याश्या कपामधे चहा भरुन दे, मला एका अंड्याचे ऑम्लेट करुन दे!'

मला विलक्षण भावणार्‍या काव्यपंक्ति, पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा... क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात... अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली... -डांबिसकाका

मला विलक्षण भावणार्‍या काव्यपंक्ति, पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा... क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात... अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. तरी मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली... -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 10/03/2008 - 23:27
काही काळ थबकवून टाकण्यात यशस्वी झाल्याचा परिणाम असावा..:) ह्या 'मंगेशाला' माझा साष्टांग दंडवत!! चतुरंग

सुवर्णमयी 10/03/2008 - 22:54
हे माझे आवडते काव्यसंग्रह आहेत. छोरी मधली त्यान्ची एक कविता तुला पाहिले मी हसतांना ढ्गाळलेल्या उदास दिवशी तुला पाहिले मी हसतांना तशीच हट्टी करुन जिवण जीव कुणाचासा घेतांना आठवणीतिल निळे चांदणे तीक्ष्ण बर्फ झाले गोठुनी आणि हरवल्या क्षितिजावरची जखमही आली पुन्हा दाटुनी मला वाटले पुन्हा करावी जखम तुझ्या हृदयातिल जागी उकरुनि वरचे निळे चांदणे अहेर द्यावी रात्र अभागी डोळ्यातिल पण तुझ्या चांदण्या दिसल्या थकलेल्या कोमुजुन डोळ्याखाली डोहच काळे ज्यात बुडाली नजर विस्कटुन न बोलताही मला म्हणालीसः स्मिते रंगवुन अशीच घ्यावी जमेल त्याने ठिकर्‍यांवरती रंगाची ठिगळे पसरावी आणि भासले मला म्हणालिस तशी च त्या अगतिक वाटेवर 'थकले रे..' शब्दांचे झाले काळोखाचे खोल सरोवर आणि कळले उरला केवळ काळोखच दोघांना बुडवुन डोळ्याखाली डोहच काळे तिथे उभे एकटे सुनेपण -मंगेश पाडगावकर

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:15
काळ्यानिळ्या वेदनेचा झाला काळोखाला डंख तेव्हा शपथ घालून तोडलेस माझे पंख ओ़ळखीच्या अंधारात अनोळखी झालीस तू ..खोटे खोटे हासतांना खोल किंचाळले हेतू सारेच का खोटे होते? काय सारी भूल होती? पांगार्‍याला काट्यांआधी लाल फुले आली होती? माझ्या मनी काळोखात भिनलेला डंख उरे- वेदनेच्या पांगार्‍याचे मला काटे, तुला फुले (मंगेश पाडगावकर, छोरी)

सुवर्णमयी 11/03/2008 - 00:22
तू असतिस तर तू असतिस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातुन एक दिवाणे नवथर गाणे बकुळीच्या पुष्पापरि नाजुक फुलले असते गंधाने क्षण ही जिप्सी मधली माझी एक आवडती कविता आहे.

प्राजु 11/03/2008 - 00:26
सोनाली, अप्रतिम कविता...सार्‍याच कविता इथे दिल्याबद्दल धन्यवद. सारेच का खोटे होते? काय सारी भूल होती? पांगार्‍याला काट्यांआधी लाल फुले आली होती? पाडगांकरांच्या प्रतिभेला सलाम. - (सर्वव्यापी)प्राजु

मैत्र 21/01/2015 - 17:19
अचानक हा धागा सापडला आणि वर आणावासा वाटला.. एक कविता - ६६ साली म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली तरी आजही तितकीच लागू होते पोपट प्रवासात आगगाडीतून येताना शेताच्या लाल लाल बांधावर दिसला एक हिरवाहिरवागार पोपट. मग पोपट हिरवेगार उडाला. पोपट माझ्या मनात शिरला. पोपट माझ्या मनात फिरला मन हिरवेगार करीत, विचार हिरवेगार करीत, स्वप्ने हिरवीगार करीत. पोपट बसला खांद्यावर आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड... मी म्हटले, "मिस्टर पोपट, कसे काय?" तो म्हणाला, "मिस्टर कवी, कसे काय?" भलताच मिस्कील होता पोपट. हिरवाहिरवागार पोपट. प्रवासभर पोपट बोलत होता खूप. प्रवासभर मीही बोलत होतो खूप. पोपट म्हणाला, "मिस्टर कवी, करता काय?" मी म्हटले, "नोकरी करतो." पोपट म्हणाला, "नोकरीमध्ये करता काय?" मी म्हणालो, " नोकरीमध्ये खोटे हसतो. खोटे बोलतो. बंद गळ्याच्या मठठांना शहाणे म्हणतो. लाचारांना शूर म्हणतो. हलकटांना सज्जन म्हणतो. समर्थाच्या श्वानांना सलाम करतो. झकास करतो मूल्यांची पोपटपंची. पहिलीला पगार घेतो : रहाणीची मान जरा उंच करतो. " पोपटाने माझ्या डोळ्यांत पाहिले : मला भलतीच भीती वाटली. वाटले, हा भूल घालून नेईल मला हिरव्या हिरव्या पंखांवरून लाल लाल बांधावर. माझे एक प्रमोशन ड्यू होते : पोपटाची मला खूप भीती वाटली. पोपटाने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाहिले : डोळे भरून माझ्या डोळ्यांत पाहिले आणि तो उडून गेला. हिरव्या हिरव्या पंखांवर निळे निळे आभाळ झेलीत लाल लाल बांधाकडे पोपट एकटा उडून गेला. -- मंगेश पाडगावकर ९-१०-१९६६ (साहित्य अकादमी विजेता काव्यसंग्रह -- सलाम)

मितान 21/01/2015 - 18:14
मैत्र, हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद ! पाडगावकरांची गीते माझ्याही आवडीची. पण 'सलाम' साठी मात्र माझा पास ! अशा कविता लिहिल्याशिवाय साहित्य अकादमी मिळालेच नसते का ? ती सलाम ही कविता तर खरोखर डोक्यात जाते. विदुषक पण तशीच. या कविता वाचताना गीतकार, प्रेमकवी पाडगांकरांमध्ये कोणा जिल्ब्यापाडू नवकवी संचारला की काय असं वाटून दचकुन जातो आपण. अर्थात हे माझे वैयक्तिक मत, आवड वगेरे वगेरे... :)
माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. त्यांच्या या कवितांनी दिलेला संदेश पहा. माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !

धारावी दर्शन सोहळा...

सृष्टीलावण्या ·

सुमीत 10/03/2008 - 10:30
खरोखर फटकेच दिले पाहिजेत, "मुन्नाभाई एम बी बी एस" मध्ये सर्कीट त्या जपान्याला असेच विचारतो की तुम्हाला भारतात येऊन काय गरिबीच बघायची असते का? देशाचे विकॄत चित्रण करणार्‍या देशींना आणि अतिउत्साहि, अविवेकी बातमीदारांना बंदिच घातली पाहिजे.

विवेकवि 10/03/2008 - 14:44
मी सुमीतच्या म्हणण्याशी सहमत आहे.... कारण तूम्ही आपल्याच देशात (भारतात) राहता . तुम्ही शनिवार वाडा , ओ॑कारेश्वर , ई ई ई दाखवा.... असो पण ते कोणीच करणार नाही ..... विवेक वि.

माझ्या मनांतीलच भावना वरील तिघांनी व्यक्त केल्यात. मला पर्यटनाची हौस असल्यामुळे मी आमच्याकडे बाहेरगांवाहून येणा-या प्रत्येक पाहुण्याला कमला नेहरू पार्क, गेटवे, म्यूझिअम, नेहरू सेंटर वगैरे दाखवून पिळतो. हे धोबीघाटाचे काय नवीन खूळ? या वाहिनीवर खरेच कांहीतरी इलाज केला पाहिजे. सृला ताईचा नवीन अवतार - तो फोक वगैरे - पाहून बरे वाटले. मला वाटले माझीच खोबडी सरकते. या सृलाताई आमच्या कंपूत स्वागत. खरेच समाज फारच निबर आणि संवेदनाहीन झाला आहे. मणसे रस्त्यात थुंकतात, कर बुडवतात, भ्रष्टाचार करतात, फेरीवाल्याकडून खरेदी करतात. आपल्यासारखी संवेदनाशील माणसेच समाजाचा कणा आहेत. भावनांस वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

अवांतरः डोंबिवली फास्ट चित्रपट पाहील्यावर पण मला असेच वाटले होते. जेव्हा काही आदर्शवादी गोष्ट आपण प्रत्यक्षात शक्य नाही असे म्हणतो तेव्हा तो षंढपणा असतो असे मला वाटते. (मी पण त्यातलाच एक षंढ :(( कारण मला सुखी जीवन हवे आहे ना! शिवाजी हवा पण शेजारच्या घरात. आणि मावळा त्याच्या पलिकडच्या घरात. आणि आम्ही कुठे राहणार? आम्ही मात्र स्वराज्यात राहणार. स्वराज्याचे सुख तर हवे पण मग त्यासाठी खर्ची मात्र पडायला नको! हीच माझी षंढ मनोवृत्ती). १० लोक करतात म्हणून एखादी चूकीची गोष्ट मी पण का करावी? माझ्या मताला मी एक म्हणून काहीच कीम्मत नाही का? हा प्रश्न खरेच काळजाला घरे पाडून जातो. कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करणे आणि त्यातून जनमत भडकावून टी.आर्.पी. वाढवणे हा प्रकार देखील मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखाच आहे. पत्रकारीतेचा विपर्यास म्हणजे काय हे या चॅनेलवाल्यांकडून शिकावे. पत्रकारीतेमागची तळमळ आणि ध्येयनिष्ठा 'लोकहितवादी','लोकमान्य','भालाकार'(भोपटकर),'काळकार'(परांजपे) या अनेक पत्रकारांनी दाखवून दिली आहे. पण त्याकडे बघतो कोण. असो. भावनेच्या भरात जास्त बोलून गेलो. माफी असावी. सृ.ला.ताई आपण परखड मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. पुण्याचे पेशवे

धनंजय 10/03/2008 - 21:57
मुंबईचा धोबीघाट हा कामसू लोकांचे अचाट कार्यस्थळ आहे. त्यात संगणकीकरण नाही तरी दररोज लाखोंनी कपडे धुतले जाऊन व्यवस्थित ज्याचे त्याच्याकडे पोचतात. जुन्या पण कार्यक्षम कार्यपद्धतीचे हे मोठे आश्चर्य आहे. मी खुद्द गोव्याला गेल्यावर आमच्या गावच्या आठवड्याच्या बाजाराला कॅमेरा घेऊन जातो (आणि पुण्याला मंडईत). होय, तिथे उकिरडे अस्वच्छ आहेत, लोक आरडाओरडा करत आहेत, नाल्या घाण आहेत. फोटोच्या विषयास अनुसरून मी ते टिपेन किंवा न टिपेन. (सामान्यपणे, मला विविधरंगी भाज्या, फळे यांची चित्रे घ्यायची असतात.) पण गावच्या बाजारात जो जिवंतपणा आहे, तो मॉल आणि प्लास्टिकच्या पिशवीत हवाबंद भाज्यांच्या सुपरमार्केटमध्ये सापडत नाही. व्यापाराचे जुने तंत्र जोवर कार्यक्षम आहे तोवर पर्यटनाच्या योग्य आहे, असे मला वाटते. इतकेच नव्हे तर जुन्या तंत्रात काय होते, जे नव्या तंत्राने गमावले आहे, हे अभ्यास करण्यासारखे आहे. म्हणजे स्वच्छता आणि जिवंत उत्पादक-गिर्‍हाईक संवाद यांचा मेळ नवीन तंत्रज्ञानात बसवता येईल का, हे माझ्या बाजाराच्या उदाहरणात विचार करण्यालायक आहे. परदेशात पर्यटन करताना, त्यांच्या जुन्या पद्धतीने काम करणार्‍या खर्‍याखरच्या उद्योगांना प्रत्यक्ष बघण्याची माझ्यात इच्छा असते - त्यांचे शेतकाम, बागायती, कारखाने, इ.इ. त्याच प्रकारे विदेशी पर्यटकांना भारतात धोबीघाट बघण्यात रस असावा, यात काय विशेष?

१) ह्या धोबीघाटाला लागून महापालिका कचरा केंद्र आहे जे महालक्ष्मी स्थानकातून सहज दिसते. २) तद्दन बकवास हा शब्द त्यांच्या कार्यशैलीला नसून ते ज्या पाण्यात ते कपडे धुतात, ज्या काळवंडलेल्या वातावरणात धुतात त्याला उद्देशून आहे. थोडक्यात सांगायचे तर तिथे भैय्या -प्राबल्य आहे त्या वरून समजून जा. माझी विनम्र विनंती अशी की आपण प्रत्यक्ष येऊन मन भरे पर्यंत ही जागा पहावी (अगदी महालक्ष्मी स्थानकाला लागूनच आहे). हा धोबीघाट मुन्नाभाई मध्ये दाखविलेला आहे तितका पण बरा नाही. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 11/03/2008 - 01:43
२) तद्दन बकवास हा शब्द त्यांच्या कार्यशैलीला नसून ते ज्या पाण्यात ते कपडे धुतात, ज्या काळवंडलेल्या वातावरणात धुतात त्याला उद्देशून आहे. थोडक्यात सांगायचे तर तिथे भैय्या -प्राबल्य आहे त्या वरून समजून जा. हे आधी का नाही सांगीतलं.च्यायला जाईल तिथं भैय्या! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चतुरंग 10/03/2008 - 22:12
तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. आणि ज्या प्रकारे तिथली मॅनेजमेंट होते ती एक अचंबित करणारी गोष्ट आहे (जसे मुंबईचे डबेवाले की ज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे मोठमोठ्या मॅनेजमेंट कंपन्याही देतात!) तेव्हा अशा गोष्टींबाबत लाजिरवाणे काही वाटू नये. धारावी बाबत मात्र मी सहमत आहे ते मुद्दामहून दाखवणे चूकच. चतुरंग

प्राजु 11/03/2008 - 01:11
पण दाखवण्यासारख्या इतर हजार गोष्टी असताना धोबी घाट आणि धारावी का दाखवा? धोबीघाट... खरंतर माझंही असं मत आहे की धोबी घाट दाखवू नये. आणि धारावी तर.. आउट ऑफ क्वेश्चन...! - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

धनंजय 11/03/2008 - 02:52
हजार गोष्टींमधला तरतमभाव ठरवणे हे वैयक्तिक असते. काही लोक ताजमहाल न बघता थेट हिमालयात जातात. एखाद्याला नव्या इमारती आवडतात, आणि जुने भग्नावशेष बघून फार वाईट वाटते. दुसर्‍या एखाद्याला भग्नावशेषांत गतवैभव बघण्याची कल्पनाशक्ती असते, नव्या इमारतीत ती कलात्मकता दिसत नाही. माझ्या आईला शांत-एकांत देवस्थानात मूर्तीचे डोळे भरून दर्शन घ्यायला आवडते - गर्दी मुळीच आवडत नाही. बद्री-केदारला गर्दी नसती तर आईला आणखी आवडले असते. मी मात्र भीमाशंकरच्या तुडुंब जत्रेला गावकर्‍यांबरोबर गेलो - डोंगरातल्या पायवाटा पायवाटा मिळून लोकांचा प्रचंड लोंढा झाला, तसा भारावून गेलो. एखाद्याला एखादी गोष्ट भकास, त्रासदायक दिसते. दुसर्‍याला तीत काही दिव्य दिसते. अर्थात पश्चात्ताप नसलेले क्रौर्य, दुर्बलांची बेकायदा फरफट (उदा : कुंटणाखाने) हे केव्हाही पर्यटन करण्यास योग्य नाहीत. धोबीघाट त्या प्रकारात बसत नाही. धारावीची "टूर" तेथील लघु-उद्योगांच्या संदर्भात मी टीव्हीवर बघितली आहे - आणि त्या गलिच्छ पर्यावरणात स्वतःची उन्नती करून घेण्याची लोकांची दुर्दम्य शक्ती बघून मी आपल्या मऊमऊ सोफ्यावर शरमलेलो आहे. तुमची-आमची स्फूर्तिस्थाने काहीकाही एकसारखी असतील (उदा : भावार्थदीपिका), काही वेगवेगळी (उदा : धोबीघाट). पण अनेक ठिकाणून लोक भारावून जाऊ शकतात, हे समजून घेतले, की तुम्हाला आधी वाटले तसे किळसयुक्त आश्चर्य वाटणार नाही.

सचिन 11/03/2008 - 01:23
पण दाखवण्यासारख्या इतर हजार गोष्टी असताना धोबी घाट आणि धारावी का दाखवा? प्राजुशी १००% सहमत !!

मीनल 11/03/2008 - 02:45
धोबी घाट पाहताना ``अरेरे `` असे वाटते. ``अहाहा`` असे वाटते का? तिथे नेऊन highligh केले जाते ते labour intensive outdated technique of production. कोणाला काही दाखवताना चांगला भाग दाखवावा.दर्शनिय! साहनुभुती मिळवून काय होणार?आपल्या कडेची तांत्रिक कमतरता कशाला दाखवा? भारतात येऊन ५* होटेल मधे राहणारे पर्यटक १रुपया तरी त्या धोब्याला देतात का?देत असतील टिप तर ती जाते होटलच्या लोकांना जाते. अमेरिकेत काय १०० % लोक मशिन मधे कपडे धुतात काय? इथे चाळित राहणारे लोक नाहित? इथे ही अशी गावं आहेत की जिथे इन्टरनेट नाही. धोबी घाट ला घेऊन जाणा-या लोकांना काय म्हाणावे कळत नाही. देशाची जी काही आहे ती भव्यता दाखवा.दारूणता काय दाखवता?

In reply to by मीनल

धनंजय 11/03/2008 - 02:57
सर्व कार्ये यांत्रिक झालेली नाहीत, आणि त्या गोष्टी आपुलकीने दाखवतात. फ्रान्समध्ये हाताने तोडलेली द्राक्षे मोठ्या गर्वाने दाखवतात. वगैरे. भारतातलीही अयांत्रिकी मॅनेजमेंटची प्रभावी शैली बघून "अहाहा" असेच वाटते. धारावीतल्या विजिगीषू लोकांना बघून "अहाहा" असेच वाटते. तुम्हाला ती तत्त्वे बघून "अरेरे" असे तर वाटत नाही ना?

In reply to by मीनल

चतुरंग 11/03/2008 - 03:05
तांत्रिक कमतरता असण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रश्न कुठे येतो? मोठ्या प्रमाणावर कपडे धुण्याची पूर्वापार चालत आलेली एक अनोखी पध्दत, पण जी इतरत्र इतक्या कौशल्याने कदाचित वापरली जात नसेल, इतक्या साध्या नजरेने आपण त्याकडे का बघू शकत नाही? तुम्ही ती गोष्ट कशी दाखवता ह्यालाही महत्व आहेच. दाखवताना लाचारी किंवा गरिबीचे ओंगळ प्रदर्शन नसले तर ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 11/03/2008 - 03:28
तुम्ही ती गोष्ट कशी दाखवता ह्यालाही महत्व आहेच. दाखवताना लाचारी किंवा गरिबीचे ओंगळ प्रदर्शन नसले तर ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. मी माझ्या मुलांना, त्यांनी अनावश्यक वस्तूंसाठी हट्ट केला की, नेहमी, "जगात असे असंख्य लोक आहेत, ज्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही" असे सांगत असतो. त्यांना त्यातील सत्य पटत नाही. त्यांच्या दृष्टीने हे अशक्य आहे. कारण परिचितांपैकी कूणाचीच अशी परिस्थिती नाही. अशी टूर असेल, तर त्या टूर वर त्यांना नेण्यास मी उत्सुक आहे. - सर्किट

प्राजु 11/03/2008 - 02:55
मिनल.. तू झाशीची राणी आहेस.... मानलं तुला. प्रत्येक टूर गाईडने एकदा तरी तुझे मार्गदर्शन घ्यावे. - (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट 11/03/2008 - 02:57
दर्शनीय म्हणजे दाखवण्याजोगा.. प्रेक्षणीय म्हणजे पाहण्याजोगा... दाखवणार्‍याला जे दर्शनीय वाटते, ते बघणार्‍याला प्रेक्ष्हणीय वाटेलच असे नाही.. ग्राहक हाच देव मानून बघणार्‍याच्या "रीझनेबल" अपेक्षा पूर्ण कराव्यात. समजा एखाद्याला धोबीघाट बघावासा वाटत असेल, तर दाखवायला का हरकत आहे ? तसेच, धारावीचेही.. मुंबईला येऊन नुसत्या इंग्रजांनी उभारलेल्या इमारती बघायला मिळणार असतील, तर इंग्लंडहून पर्यटक मुंबईला का येतील ? ते तर त्यांना त्यांच्या देशातही मिळेल की बघायला. धोबीघाट, आणि धारावी, दोन्ही भारताचाच भाग आहे. त्या देशाच्या परंपरांचा भाग आहे. ह्या परंपरांचे आपण पाईक आहोत. त्यांचा मला अभिमान आहे. मला त्यात दारूण काहीच वाटत नाही. धारावीतील चर्मकारी उद्योग भव्यच आहे ! - सर्किट

मीनल 11/03/2008 - 05:53
काहींना पर्यटकांना धोबी घाट/झोपड्पट्टी प्रेक्षणिय वाटत असेल. कारण त्यांनी ते पाहिलेले नसते. मला म्हणायचे आहे की जे दर्शनीय म्हणजे दाखवण्याजोगे आहे तेच दाखवावे. कारण काही पर्यटक `ते` म्हणजेच भारत ही ईमे़ज त्यांच्या गावात परत जाऊन क्रिएट करतात. ताजमहाल प्रेक्षणिय तसेच दर्शनीय आहे. इंग्रजांनी उभारलेल्या इमारतीं शिवाय इतरही अनेक भारतीयांनी बांधलेले अनेक राजवाडे आहेत,कोरीव काम केलेल्या लेण्या ,देवळे आहेत. सिल्कचे छोटे मोठे कारखाने आहेत. हस्तकलेचे उदयोग आहेत. काहीही पैसे घेता सेवाभावी वृत्तीने काम करणा-या संस्था आहेत. इंग्लंडलाही नसलेले अनेक रिसर्च सेंटर्स आहेत. दाखवणा-यला कळले पाहिजे आपण काय दखवतो आहे. अहो ,` पाहणारे ` खूप तयार असतात. केवल कस्ट्मर पैसे देतो म्हणून त्याच्या कुठल्याही अपेक्षा"रीझनेबल" मानाण्याचा धंदा, भारताची ईमेज ब-याचदा डागाळू शकतो. आणि धोबी घाट/झोपड्पट्टी ह्या जर परंपरा असतील तर ह्या व्यतिरिक्त भारताच्या ब-याच उत्तम परंपरा आहेत.त्या दाखवाव्यात. मग इंग्लंडच काय जगातले अनेक पर्यटक येतील भारत पहायला. अर्थात परदेशी पर्यटकाला आवश्यक वाटणा-या सोयी ही हव्यात.उदा:- बूकिंग्ज्,संरक्षण ,योग्य ,अचूक माहिती वगैरे. धारावीत जाऊन जर चर्मकारी उद्योगाची भव्यता दाखवली जात असेल तर काही हरकत नसावी . काही अभ्यासक ते पहायलाच जातात तिथे. पण ते नाले ,सार्वजनिक संडास ,कचरा ,घाण हे जर कोणाला नुसतच पहायचे असेल आणि `अरेरे` करायचे असेल तर ते काही दर्शनीय नाही. मी सामा॑न्य माणूस आहे . मला नाले ,सार्वजनिक संडास ,कचरा ,घाण या गोष्टी दारूण वाटतात.त्याचा मला तरी अभिमान वाटत नाही. चांगल्या परंपरांची मी ही पाईक आहे . मला ही त्यांचा अभिमान आहे. बूरा मत देखो ,सूनो ,कहो आणि दिखाओ ही. म्हणजे दाखवायचच असेल तर बूरा मत दिखाओ.त्यातल अच्छा दिखाओ. आता `बूरा ` कशाला म्हणायच आणि अच्छा कशाला ते ज्याच त्याने ठरवावे.

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:13
आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे. का? धोबीघाट दाखवला तर बिघडलं कुठे? आमची भारतीय प्रतिमा इतकी तलकादू नाही की मार्गदर्शक मंडळींनी कुणाला धोबिघाट दाखवला तर तिला धक्का पोहोचेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आमची भारतीय प्रतिमा इतकी तलकादू नाही की मार्गदर्शक मंडळींनी कुणाला धोबिघाट दाखवला तर तिला धक्का पोहोचेल! मुळात भारताची जगात प्रतिमा काय आहे याचा किती लोकांनी विचार केलाय. गेले २ वर्ष मी जर्मन टीव्ही पाहत आहे (खास तात्यांसाठी: मला जर्मनसुद्धा कळते असा ह्या वाक्यापाठी प्रचाराचा हेतु नाही. नोंद घ्यावी.) तिथे भारत हा तिसर्‍या जगातील देश म्हणून दाखवितात. गेले २ वर्षात त्यांनी भारतातील गरीबी, दारिद्रय, घाण, बकालपणा सोडून काहीही दाखविलेले नाही (अपवाद फक्त टाटांच्या नॅनो कारचा, ते पण त्यांचा नाईलाज झाला कारण खुद्द बीएमडब्ल्यु, फोल्क्सवागनला जे जमले नाही ते टाटांनी करून दाखवले). मी स्वत: जर्मन टीव्हीवर भारतात कसे गटारात उतरून घाण, मैला हाताने साफ करतात त्यावर २-३ लघुपट पाहिले आहेत. आपला भारत जगाला फारच आवडतो असे म्हणणे कुपमंडूक वृत्ती झाली. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

चतुरंग 12/03/2008 - 21:05
प्रतिमेसंबंधी उद्गार काढले आहेतत्यामुळे राहवले नाही, अन्यथा तुमच्या आणि तात्यांच्या सुखसंवादात तोंड घातले नसते:) एकूणच पाश्चिमात्य जग (हे पहिले जग बरंका- हे ठरवणारे कोण? स्वतःच!) हे संभावित मनोवृत्तीचे आहे असा माझा ६ वर्षांच्या निरीक्षणाअंती बनलेला विचार आहे. जो पर्यंत त्यांच्या स्थानाला धक्का लागत नाही तो पर्यंत ते तोंड फाटेस्तोवर स्तुती करणार तिसर्‍या जगातले देश आणि लोक कसे प्रगती करत आहेत, त्यांना 'मदत' करणे आमचे कसे कर्तव्य आहे इ.इ...आणि एकदा का स्पर्धा निर्माण झाली की दुटप्पीपणा दाखवायला सुरुवात! (आठवा आठवा - अमेरिकेने नाकारलेला महासंगणक, त्यानंतर विजय भटकरांच्या विजयी नेतृत्वाखाली आपण त्यांना दिलेली 'परम' मात!). मग येन केन प्रकारेण ते इथून तिथून नाही नाही ते सगळे दाखवून चिखलफेक करणार आणि प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही जर्मनी म्हणताय तिथेही वेगळा प्रकार नाही. तिथेलेही काही किस्से मी ऐकून आहे. खरी गोम इथेच आहे की ह्या सगळ्या प्रकाराला आपण कसे तोंड देतो. तिथे जे दाखविले जाते त्याबद्दल आपापसात चर्चा होताना आपण आपल्या सहकार्‍यांसमोर भारताची चांगली प्रतिमा आणणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मी मानतो - मी स्वतः त्याबाबत जागरुक असतो. भारताबद्दल कोणी अनुदार बोलायला लागला की मी त्यांचे इथले तिथले जगभरातले प्रताप त्यांच्या पदरात (किंवा स्कर्टमध्ये म्हणा हवंतर) घालतो! असो. जरा जास्त लिहिले पण काय करणार "बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!" हे शेवटी खरेच!! चतुरंग

शरुबाबा 13/03/2008 - 16:10
सृला ताईचा नवीन अवतार - तो फोक वगैरे - पाहून बरे वाटले. मला वाटले माझीच खोबडी सरकते.

सुमीत 10/03/2008 - 10:30
खरोखर फटकेच दिले पाहिजेत, "मुन्नाभाई एम बी बी एस" मध्ये सर्कीट त्या जपान्याला असेच विचारतो की तुम्हाला भारतात येऊन काय गरिबीच बघायची असते का? देशाचे विकॄत चित्रण करणार्‍या देशींना आणि अतिउत्साहि, अविवेकी बातमीदारांना बंदिच घातली पाहिजे.

विवेकवि 10/03/2008 - 14:44
मी सुमीतच्या म्हणण्याशी सहमत आहे.... कारण तूम्ही आपल्याच देशात (भारतात) राहता . तुम्ही शनिवार वाडा , ओ॑कारेश्वर , ई ई ई दाखवा.... असो पण ते कोणीच करणार नाही ..... विवेक वि.

माझ्या मनांतीलच भावना वरील तिघांनी व्यक्त केल्यात. मला पर्यटनाची हौस असल्यामुळे मी आमच्याकडे बाहेरगांवाहून येणा-या प्रत्येक पाहुण्याला कमला नेहरू पार्क, गेटवे, म्यूझिअम, नेहरू सेंटर वगैरे दाखवून पिळतो. हे धोबीघाटाचे काय नवीन खूळ? या वाहिनीवर खरेच कांहीतरी इलाज केला पाहिजे. सृला ताईचा नवीन अवतार - तो फोक वगैरे - पाहून बरे वाटले. मला वाटले माझीच खोबडी सरकते. या सृलाताई आमच्या कंपूत स्वागत. खरेच समाज फारच निबर आणि संवेदनाहीन झाला आहे. मणसे रस्त्यात थुंकतात, कर बुडवतात, भ्रष्टाचार करतात, फेरीवाल्याकडून खरेदी करतात. आपल्यासारखी संवेदनाशील माणसेच समाजाचा कणा आहेत. भावनांस वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

अवांतरः डोंबिवली फास्ट चित्रपट पाहील्यावर पण मला असेच वाटले होते. जेव्हा काही आदर्शवादी गोष्ट आपण प्रत्यक्षात शक्य नाही असे म्हणतो तेव्हा तो षंढपणा असतो असे मला वाटते. (मी पण त्यातलाच एक षंढ :(( कारण मला सुखी जीवन हवे आहे ना! शिवाजी हवा पण शेजारच्या घरात. आणि मावळा त्याच्या पलिकडच्या घरात. आणि आम्ही कुठे राहणार? आम्ही मात्र स्वराज्यात राहणार. स्वराज्याचे सुख तर हवे पण मग त्यासाठी खर्ची मात्र पडायला नको! हीच माझी षंढ मनोवृत्ती). १० लोक करतात म्हणून एखादी चूकीची गोष्ट मी पण का करावी? माझ्या मताला मी एक म्हणून काहीच कीम्मत नाही का? हा प्रश्न खरेच काळजाला घरे पाडून जातो. कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करणे आणि त्यातून जनमत भडकावून टी.आर्.पी. वाढवणे हा प्रकार देखील मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखाच आहे. पत्रकारीतेचा विपर्यास म्हणजे काय हे या चॅनेलवाल्यांकडून शिकावे. पत्रकारीतेमागची तळमळ आणि ध्येयनिष्ठा 'लोकहितवादी','लोकमान्य','भालाकार'(भोपटकर),'काळकार'(परांजपे) या अनेक पत्रकारांनी दाखवून दिली आहे. पण त्याकडे बघतो कोण. असो. भावनेच्या भरात जास्त बोलून गेलो. माफी असावी. सृ.ला.ताई आपण परखड मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. पुण्याचे पेशवे

धनंजय 10/03/2008 - 21:57
मुंबईचा धोबीघाट हा कामसू लोकांचे अचाट कार्यस्थळ आहे. त्यात संगणकीकरण नाही तरी दररोज लाखोंनी कपडे धुतले जाऊन व्यवस्थित ज्याचे त्याच्याकडे पोचतात. जुन्या पण कार्यक्षम कार्यपद्धतीचे हे मोठे आश्चर्य आहे. मी खुद्द गोव्याला गेल्यावर आमच्या गावच्या आठवड्याच्या बाजाराला कॅमेरा घेऊन जातो (आणि पुण्याला मंडईत). होय, तिथे उकिरडे अस्वच्छ आहेत, लोक आरडाओरडा करत आहेत, नाल्या घाण आहेत. फोटोच्या विषयास अनुसरून मी ते टिपेन किंवा न टिपेन. (सामान्यपणे, मला विविधरंगी भाज्या, फळे यांची चित्रे घ्यायची असतात.) पण गावच्या बाजारात जो जिवंतपणा आहे, तो मॉल आणि प्लास्टिकच्या पिशवीत हवाबंद भाज्यांच्या सुपरमार्केटमध्ये सापडत नाही. व्यापाराचे जुने तंत्र जोवर कार्यक्षम आहे तोवर पर्यटनाच्या योग्य आहे, असे मला वाटते. इतकेच नव्हे तर जुन्या तंत्रात काय होते, जे नव्या तंत्राने गमावले आहे, हे अभ्यास करण्यासारखे आहे. म्हणजे स्वच्छता आणि जिवंत उत्पादक-गिर्‍हाईक संवाद यांचा मेळ नवीन तंत्रज्ञानात बसवता येईल का, हे माझ्या बाजाराच्या उदाहरणात विचार करण्यालायक आहे. परदेशात पर्यटन करताना, त्यांच्या जुन्या पद्धतीने काम करणार्‍या खर्‍याखरच्या उद्योगांना प्रत्यक्ष बघण्याची माझ्यात इच्छा असते - त्यांचे शेतकाम, बागायती, कारखाने, इ.इ. त्याच प्रकारे विदेशी पर्यटकांना भारतात धोबीघाट बघण्यात रस असावा, यात काय विशेष?

१) ह्या धोबीघाटाला लागून महापालिका कचरा केंद्र आहे जे महालक्ष्मी स्थानकातून सहज दिसते. २) तद्दन बकवास हा शब्द त्यांच्या कार्यशैलीला नसून ते ज्या पाण्यात ते कपडे धुतात, ज्या काळवंडलेल्या वातावरणात धुतात त्याला उद्देशून आहे. थोडक्यात सांगायचे तर तिथे भैय्या -प्राबल्य आहे त्या वरून समजून जा. माझी विनम्र विनंती अशी की आपण प्रत्यक्ष येऊन मन भरे पर्यंत ही जागा पहावी (अगदी महालक्ष्मी स्थानकाला लागूनच आहे). हा धोबीघाट मुन्नाभाई मध्ये दाखविलेला आहे तितका पण बरा नाही. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 11/03/2008 - 01:43
२) तद्दन बकवास हा शब्द त्यांच्या कार्यशैलीला नसून ते ज्या पाण्यात ते कपडे धुतात, ज्या काळवंडलेल्या वातावरणात धुतात त्याला उद्देशून आहे. थोडक्यात सांगायचे तर तिथे भैय्या -प्राबल्य आहे त्या वरून समजून जा. हे आधी का नाही सांगीतलं.च्यायला जाईल तिथं भैय्या! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चतुरंग 10/03/2008 - 22:12
तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. आणि ज्या प्रकारे तिथली मॅनेजमेंट होते ती एक अचंबित करणारी गोष्ट आहे (जसे मुंबईचे डबेवाले की ज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे मोठमोठ्या मॅनेजमेंट कंपन्याही देतात!) तेव्हा अशा गोष्टींबाबत लाजिरवाणे काही वाटू नये. धारावी बाबत मात्र मी सहमत आहे ते मुद्दामहून दाखवणे चूकच. चतुरंग

प्राजु 11/03/2008 - 01:11
पण दाखवण्यासारख्या इतर हजार गोष्टी असताना धोबी घाट आणि धारावी का दाखवा? धोबीघाट... खरंतर माझंही असं मत आहे की धोबी घाट दाखवू नये. आणि धारावी तर.. आउट ऑफ क्वेश्चन...! - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

धनंजय 11/03/2008 - 02:52
हजार गोष्टींमधला तरतमभाव ठरवणे हे वैयक्तिक असते. काही लोक ताजमहाल न बघता थेट हिमालयात जातात. एखाद्याला नव्या इमारती आवडतात, आणि जुने भग्नावशेष बघून फार वाईट वाटते. दुसर्‍या एखाद्याला भग्नावशेषांत गतवैभव बघण्याची कल्पनाशक्ती असते, नव्या इमारतीत ती कलात्मकता दिसत नाही. माझ्या आईला शांत-एकांत देवस्थानात मूर्तीचे डोळे भरून दर्शन घ्यायला आवडते - गर्दी मुळीच आवडत नाही. बद्री-केदारला गर्दी नसती तर आईला आणखी आवडले असते. मी मात्र भीमाशंकरच्या तुडुंब जत्रेला गावकर्‍यांबरोबर गेलो - डोंगरातल्या पायवाटा पायवाटा मिळून लोकांचा प्रचंड लोंढा झाला, तसा भारावून गेलो. एखाद्याला एखादी गोष्ट भकास, त्रासदायक दिसते. दुसर्‍याला तीत काही दिव्य दिसते. अर्थात पश्चात्ताप नसलेले क्रौर्य, दुर्बलांची बेकायदा फरफट (उदा : कुंटणाखाने) हे केव्हाही पर्यटन करण्यास योग्य नाहीत. धोबीघाट त्या प्रकारात बसत नाही. धारावीची "टूर" तेथील लघु-उद्योगांच्या संदर्भात मी टीव्हीवर बघितली आहे - आणि त्या गलिच्छ पर्यावरणात स्वतःची उन्नती करून घेण्याची लोकांची दुर्दम्य शक्ती बघून मी आपल्या मऊमऊ सोफ्यावर शरमलेलो आहे. तुमची-आमची स्फूर्तिस्थाने काहीकाही एकसारखी असतील (उदा : भावार्थदीपिका), काही वेगवेगळी (उदा : धोबीघाट). पण अनेक ठिकाणून लोक भारावून जाऊ शकतात, हे समजून घेतले, की तुम्हाला आधी वाटले तसे किळसयुक्त आश्चर्य वाटणार नाही.

सचिन 11/03/2008 - 01:23
पण दाखवण्यासारख्या इतर हजार गोष्टी असताना धोबी घाट आणि धारावी का दाखवा? प्राजुशी १००% सहमत !!

मीनल 11/03/2008 - 02:45
धोबी घाट पाहताना ``अरेरे `` असे वाटते. ``अहाहा`` असे वाटते का? तिथे नेऊन highligh केले जाते ते labour intensive outdated technique of production. कोणाला काही दाखवताना चांगला भाग दाखवावा.दर्शनिय! साहनुभुती मिळवून काय होणार?आपल्या कडेची तांत्रिक कमतरता कशाला दाखवा? भारतात येऊन ५* होटेल मधे राहणारे पर्यटक १रुपया तरी त्या धोब्याला देतात का?देत असतील टिप तर ती जाते होटलच्या लोकांना जाते. अमेरिकेत काय १०० % लोक मशिन मधे कपडे धुतात काय? इथे चाळित राहणारे लोक नाहित? इथे ही अशी गावं आहेत की जिथे इन्टरनेट नाही. धोबी घाट ला घेऊन जाणा-या लोकांना काय म्हाणावे कळत नाही. देशाची जी काही आहे ती भव्यता दाखवा.दारूणता काय दाखवता?

In reply to by मीनल

धनंजय 11/03/2008 - 02:57
सर्व कार्ये यांत्रिक झालेली नाहीत, आणि त्या गोष्टी आपुलकीने दाखवतात. फ्रान्समध्ये हाताने तोडलेली द्राक्षे मोठ्या गर्वाने दाखवतात. वगैरे. भारतातलीही अयांत्रिकी मॅनेजमेंटची प्रभावी शैली बघून "अहाहा" असेच वाटते. धारावीतल्या विजिगीषू लोकांना बघून "अहाहा" असेच वाटते. तुम्हाला ती तत्त्वे बघून "अरेरे" असे तर वाटत नाही ना?

In reply to by मीनल

चतुरंग 11/03/2008 - 03:05
तांत्रिक कमतरता असण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रश्न कुठे येतो? मोठ्या प्रमाणावर कपडे धुण्याची पूर्वापार चालत आलेली एक अनोखी पध्दत, पण जी इतरत्र इतक्या कौशल्याने कदाचित वापरली जात नसेल, इतक्या साध्या नजरेने आपण त्याकडे का बघू शकत नाही? तुम्ही ती गोष्ट कशी दाखवता ह्यालाही महत्व आहेच. दाखवताना लाचारी किंवा गरिबीचे ओंगळ प्रदर्शन नसले तर ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 11/03/2008 - 03:28
तुम्ही ती गोष्ट कशी दाखवता ह्यालाही महत्व आहेच. दाखवताना लाचारी किंवा गरिबीचे ओंगळ प्रदर्शन नसले तर ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. मी माझ्या मुलांना, त्यांनी अनावश्यक वस्तूंसाठी हट्ट केला की, नेहमी, "जगात असे असंख्य लोक आहेत, ज्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही" असे सांगत असतो. त्यांना त्यातील सत्य पटत नाही. त्यांच्या दृष्टीने हे अशक्य आहे. कारण परिचितांपैकी कूणाचीच अशी परिस्थिती नाही. अशी टूर असेल, तर त्या टूर वर त्यांना नेण्यास मी उत्सुक आहे. - सर्किट

प्राजु 11/03/2008 - 02:55
मिनल.. तू झाशीची राणी आहेस.... मानलं तुला. प्रत्येक टूर गाईडने एकदा तरी तुझे मार्गदर्शन घ्यावे. - (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट 11/03/2008 - 02:57
दर्शनीय म्हणजे दाखवण्याजोगा.. प्रेक्षणीय म्हणजे पाहण्याजोगा... दाखवणार्‍याला जे दर्शनीय वाटते, ते बघणार्‍याला प्रेक्ष्हणीय वाटेलच असे नाही.. ग्राहक हाच देव मानून बघणार्‍याच्या "रीझनेबल" अपेक्षा पूर्ण कराव्यात. समजा एखाद्याला धोबीघाट बघावासा वाटत असेल, तर दाखवायला का हरकत आहे ? तसेच, धारावीचेही.. मुंबईला येऊन नुसत्या इंग्रजांनी उभारलेल्या इमारती बघायला मिळणार असतील, तर इंग्लंडहून पर्यटक मुंबईला का येतील ? ते तर त्यांना त्यांच्या देशातही मिळेल की बघायला. धोबीघाट, आणि धारावी, दोन्ही भारताचाच भाग आहे. त्या देशाच्या परंपरांचा भाग आहे. ह्या परंपरांचे आपण पाईक आहोत. त्यांचा मला अभिमान आहे. मला त्यात दारूण काहीच वाटत नाही. धारावीतील चर्मकारी उद्योग भव्यच आहे ! - सर्किट

मीनल 11/03/2008 - 05:53
काहींना पर्यटकांना धोबी घाट/झोपड्पट्टी प्रेक्षणिय वाटत असेल. कारण त्यांनी ते पाहिलेले नसते. मला म्हणायचे आहे की जे दर्शनीय म्हणजे दाखवण्याजोगे आहे तेच दाखवावे. कारण काही पर्यटक `ते` म्हणजेच भारत ही ईमे़ज त्यांच्या गावात परत जाऊन क्रिएट करतात. ताजमहाल प्रेक्षणिय तसेच दर्शनीय आहे. इंग्रजांनी उभारलेल्या इमारतीं शिवाय इतरही अनेक भारतीयांनी बांधलेले अनेक राजवाडे आहेत,कोरीव काम केलेल्या लेण्या ,देवळे आहेत. सिल्कचे छोटे मोठे कारखाने आहेत. हस्तकलेचे उदयोग आहेत. काहीही पैसे घेता सेवाभावी वृत्तीने काम करणा-या संस्था आहेत. इंग्लंडलाही नसलेले अनेक रिसर्च सेंटर्स आहेत. दाखवणा-यला कळले पाहिजे आपण काय दखवतो आहे. अहो ,` पाहणारे ` खूप तयार असतात. केवल कस्ट्मर पैसे देतो म्हणून त्याच्या कुठल्याही अपेक्षा"रीझनेबल" मानाण्याचा धंदा, भारताची ईमेज ब-याचदा डागाळू शकतो. आणि धोबी घाट/झोपड्पट्टी ह्या जर परंपरा असतील तर ह्या व्यतिरिक्त भारताच्या ब-याच उत्तम परंपरा आहेत.त्या दाखवाव्यात. मग इंग्लंडच काय जगातले अनेक पर्यटक येतील भारत पहायला. अर्थात परदेशी पर्यटकाला आवश्यक वाटणा-या सोयी ही हव्यात.उदा:- बूकिंग्ज्,संरक्षण ,योग्य ,अचूक माहिती वगैरे. धारावीत जाऊन जर चर्मकारी उद्योगाची भव्यता दाखवली जात असेल तर काही हरकत नसावी . काही अभ्यासक ते पहायलाच जातात तिथे. पण ते नाले ,सार्वजनिक संडास ,कचरा ,घाण हे जर कोणाला नुसतच पहायचे असेल आणि `अरेरे` करायचे असेल तर ते काही दर्शनीय नाही. मी सामा॑न्य माणूस आहे . मला नाले ,सार्वजनिक संडास ,कचरा ,घाण या गोष्टी दारूण वाटतात.त्याचा मला तरी अभिमान वाटत नाही. चांगल्या परंपरांची मी ही पाईक आहे . मला ही त्यांचा अभिमान आहे. बूरा मत देखो ,सूनो ,कहो आणि दिखाओ ही. म्हणजे दाखवायचच असेल तर बूरा मत दिखाओ.त्यातल अच्छा दिखाओ. आता `बूरा ` कशाला म्हणायच आणि अच्छा कशाला ते ज्याच त्याने ठरवावे.

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:13
आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे. का? धोबीघाट दाखवला तर बिघडलं कुठे? आमची भारतीय प्रतिमा इतकी तलकादू नाही की मार्गदर्शक मंडळींनी कुणाला धोबिघाट दाखवला तर तिला धक्का पोहोचेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आमची भारतीय प्रतिमा इतकी तलकादू नाही की मार्गदर्शक मंडळींनी कुणाला धोबिघाट दाखवला तर तिला धक्का पोहोचेल! मुळात भारताची जगात प्रतिमा काय आहे याचा किती लोकांनी विचार केलाय. गेले २ वर्ष मी जर्मन टीव्ही पाहत आहे (खास तात्यांसाठी: मला जर्मनसुद्धा कळते असा ह्या वाक्यापाठी प्रचाराचा हेतु नाही. नोंद घ्यावी.) तिथे भारत हा तिसर्‍या जगातील देश म्हणून दाखवितात. गेले २ वर्षात त्यांनी भारतातील गरीबी, दारिद्रय, घाण, बकालपणा सोडून काहीही दाखविलेले नाही (अपवाद फक्त टाटांच्या नॅनो कारचा, ते पण त्यांचा नाईलाज झाला कारण खुद्द बीएमडब्ल्यु, फोल्क्सवागनला जे जमले नाही ते टाटांनी करून दाखवले). मी स्वत: जर्मन टीव्हीवर भारतात कसे गटारात उतरून घाण, मैला हाताने साफ करतात त्यावर २-३ लघुपट पाहिले आहेत. आपला भारत जगाला फारच आवडतो असे म्हणणे कुपमंडूक वृत्ती झाली. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

चतुरंग 12/03/2008 - 21:05
प्रतिमेसंबंधी उद्गार काढले आहेतत्यामुळे राहवले नाही, अन्यथा तुमच्या आणि तात्यांच्या सुखसंवादात तोंड घातले नसते:) एकूणच पाश्चिमात्य जग (हे पहिले जग बरंका- हे ठरवणारे कोण? स्वतःच!) हे संभावित मनोवृत्तीचे आहे असा माझा ६ वर्षांच्या निरीक्षणाअंती बनलेला विचार आहे. जो पर्यंत त्यांच्या स्थानाला धक्का लागत नाही तो पर्यंत ते तोंड फाटेस्तोवर स्तुती करणार तिसर्‍या जगातले देश आणि लोक कसे प्रगती करत आहेत, त्यांना 'मदत' करणे आमचे कसे कर्तव्य आहे इ.इ...आणि एकदा का स्पर्धा निर्माण झाली की दुटप्पीपणा दाखवायला सुरुवात! (आठवा आठवा - अमेरिकेने नाकारलेला महासंगणक, त्यानंतर विजय भटकरांच्या विजयी नेतृत्वाखाली आपण त्यांना दिलेली 'परम' मात!). मग येन केन प्रकारेण ते इथून तिथून नाही नाही ते सगळे दाखवून चिखलफेक करणार आणि प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही जर्मनी म्हणताय तिथेही वेगळा प्रकार नाही. तिथेलेही काही किस्से मी ऐकून आहे. खरी गोम इथेच आहे की ह्या सगळ्या प्रकाराला आपण कसे तोंड देतो. तिथे जे दाखविले जाते त्याबद्दल आपापसात चर्चा होताना आपण आपल्या सहकार्‍यांसमोर भारताची चांगली प्रतिमा आणणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मी मानतो - मी स्वतः त्याबाबत जागरुक असतो. भारताबद्दल कोणी अनुदार बोलायला लागला की मी त्यांचे इथले तिथले जगभरातले प्रताप त्यांच्या पदरात (किंवा स्कर्टमध्ये म्हणा हवंतर) घालतो! असो. जरा जास्त लिहिले पण काय करणार "बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!" हे शेवटी खरेच!! चतुरंग

शरुबाबा 13/03/2008 - 16:10
सृला ताईचा नवीन अवतार - तो फोक वगैरे - पाहून बरे वाटले. मला वाटले माझीच खोबडी सरकते.
आपण मुंबईत गाडीतून जाताना महालक्ष्मी पुलावर बरेचदा परदेशी पर्यटकांचा थवा दिसतो. तो महालक्ष्मीचा धोबीघाट पाहायला जमलेला असतो जे तद्दन बकवास ठिकाण आहे. आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे. माझे तर मत आहे की अश्या मार्गदर्शक मंडळींना हिरव्या सोललेल्या फोकाने बडवले पाहिजे. अशीच मध्ये एकदा झोपडपट्टी पर्यटन (Slum Tourism) / धारावी दर्शन सोहळा अशी टूम निघाली होती.

धान्दल.. गडबड ......आणि सुटका (भाग १ ??)

आपला आभि ·

पहिल्या लिखाणाच्या मानाने फार छान लिहिला आहेस. एकजण म्हणाला " कुठ काय मामा .. ह ह ह्ह (असच काही तरी हसतात अशावेळी) ..असच्च..बसलोय .. गप्पा मारत असे गमतीदार प्रसंग आपल्यावर खूप वेळा ओढवतात. मी पाचवीत असताना एक दिवस शाळेला दांडी (खोटे सांगून)मारली होती आणि माझ्या भावाने शाळेत टीचरना सांगितले की, बहीणीला ताप आला आहे ती शाळेला येणार नाही. त्याच वेळी दुपारी मस्त पैकी हिंडत होते तेव्हा सरच रस्त्यावर भेटले आणि विचारले ताप आला आहेस तर कशाला हिंडतेस? मग माझी पंचाईत झाली पण मी( त्यावेळी सुचले ते) सांगितले कि औषध आणायलाच निघाले आहे..हुश... काय प्रसंग होता.. भाग २ ची वाट पाहात आहे....

तीर्थरूपांची अति कडक शिस्त असे. हसणे, वायफळ बोलणे नाही. विनोद पूर्णपणे वर्ज्य. त्यामुळे आम्ही त्यांना अयूबखान (पाकिस्तान्चे ६५ च्या युद्धावेळीचे अध्यक्ष)नाव ठेवले. आजुबाजूची मुले घरात घुसण्यापूर्वी अयुबखान आहे का म्हणून विचारीत. एकदा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चुकीच्या मुहूर्तावर एक मूर्ख आला व विचारले अयूबखान आहे का? दुर्दैवाने त्याच्या मागोमाग अयूबखान येऊन उभे होते. काही वर्शांनी नंतर हे नाव बदलून खोमेनी असे ठेवले.

In reply to by सुधीर कांदळकर

इनोबा म्हणे 11/03/2008 - 01:26
एकदा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चुकीच्या मुहूर्तावर एक मूर्ख आला व विचारले अयूबखान आहे का? दुर्दैवाने त्याच्या मागोमाग अयूबखान येऊन उभे होते. काही वर्शांनी नंतर हे नाव बदलून खोमेनी असे ठेवले. अयूबखान आणि खोमेनी ही दोन्ही नावे आवडली बरं का! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

छोटा डॉन 10/03/2008 - 22:00
तर आ आ आ भी [ आली का आठवण ? कुणाची ते सांगण्याची गरज नाही ....] चांगले लिहले आहे. चालू दे. मला वाटते की आपण आपापले अनुभव "डिस्कस" करून एक नविन लेखमालाच बनवावी .... लै लिहण्यासारखे आहे ... भाग २ लवकरच येऊ दे ......... छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

वरदा 10/03/2008 - 22:07
मला तर एकदा दांडी मारल्याची चिठ्ठी लिहून आईची सही करताना पकडलं सरांनी..मग मारल्या बर्‍याच बंडला..आई मावशीकडे गेलेय बाबा लवकर ऑफिसला गेले वगैरे वगैरे..आणि संध्याकाळी बाजारात जात होते आईसोबत तर सर समोर दत्त म्हणून हजर... नशीब मी आईला आधीच माझी थाप सांगितली होती ती म्हणाली मी आत्ताच आले म्हणून पण मी तोपर्यंत असली घाबरले होते.....

आपला आभि 11/03/2008 - 05:48
माझा लेख पुर्ण वाचन्याचे धाडस करनार्‍या वीरांना आणि वीरांगनांना (मिपा वाले तात्या बरोबर आहे ना शब्द ?... आणि 'ladies first' का नाहि ? म्हणून समस्त आखिल भारतीय भगिनि वर्ग मिपा शाखेने डाफरू नये!!! इवलासा जीव घाबरतो ना.. तुम्हाला पहिल्यांदा लिहीन पुढच्या वेळी.. ) माझा साष्टांग नमस्कार!!! .. काय धाडस आहे तुमच. मी पण लिहून झाल्यावर वाचला नाही परत.. ''आता त्यावेळी तुम्ही वाचन्याच्या अवस्थेत होता का ?' असे म्हणून आमचे काहि हितशत्रु आमच्या पायात पाय घालायला पुढे धावतिल ..पण आम्ही फिकीर करत नाही.. काय करायचय तुम्हाला.. आम्हि चालन्याच्या पण अवस्थेत नव्हतो. झाल समाधान? काही काही लोकांना दुसरा किती 'out' होतो आणि आपण किती 'control' मध्ये असतो यातच लै म्हन्जी लै 'interest'.. यावर कधीतरी चर्चा घडवून आणूयात.. मि पा वर सुध्दा या विषयात बरेच जातिवन्त लोक आहेत..हे आमच्या चाणाक्ष नजेरेने बराबर वळखलंय बरका!! (लब्बाड कुठले..) तर हा पाहिला थेंब पचला ..मग आता पाण्याची धार लावायला हरकत नाहि. धार म्हणजे 'पहिली धार' नव्हे.. लेखनाचि धार हो...धार वरून डॉन आणि समस्त मंडळींच्या डोळ्यात आलेली चमक आम्हाला इथून पण दिसली पण तुर्तास आम्ही ती तहान काही भागवू शकत नाहि.... तर असो .. आपल्या सेवेशी सदैव आपलाच आआआभि..

विजुभाऊ 11/03/2008 - 11:29
आम्ही एकदा दहावीत असताना(एकदाच होतो) कोणालातरी एका सरानी बेदम बदडला म्हणुन आम्ही संप केला होता. शाळेच्या बाहेर सगळेउभे होतो...कोणीच शाळेत आत जायला तयार नव्हते. शाळेचा शिपाइ सर्वाना बोलावुन गेला....मग एन्ग्लिश चे सर येउन गेले..कोणी ऐकत नव्हते. मुख्याधापकंनी मग रामबाण उपयवापरला....शेव्टी त्यानी आण्णा कंग्राळकराना पाठवले....त्यानी त्यांच्या खास कमावलेल्या अवाजात सर्वाना बोलावले....तरिही आम्ही सारे बाहेरच ......मग त्यानी चन्दु नावाच्या मुलाला पकडले...त्याला वैयक्तिक विचारले..........शाळेत का आला नाहीस म्हणुन ....चन्दु ...फट्कन म्हणाला...मी आज शाळेत आलोच नाही...घरी झोपुन आहे"..............

धमाल मुलगा 11/03/2008 - 12:01
>>मग त्यानी चन्दु नावाच्या मुलाला पकडले...त्याला वैयक्तिक विचारले..........शाळेत का आला नाहीस म्हणुन ....चन्दु ...फट्कन म्हणाला...मी आज शाळेत आलोच नाही...घरी झोपुन आहे".............. हा हा हा...आयला, इब्लीस न॑बर वन दिसतोय च॑दू. मग आण्णाची पार भि॑गरी का? आआआभि, काही कारणा॑मुळे प्रतिसाद देण्यास उशीर घडला, पण तोपर्य॑त वेळ निघून गेली होती, पण बेष्ट लिवलय भौ! आमचे जुने दिवस आठवले. सुधीरकाका, आयुबखान आणि खोमेनी का? वा वा... आमच्या घरी जिल्ले-इलाही, आलमपनाह, खावि॑द इ.इ. मुघली अ॑मल असतो :) आणि मी अगदीच आबा॑ना छळायच्या मुडमध्ये असलो की 'तात् '...लै भडकतात.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 11/03/2008 - 12:11
आआआभि, काही कारणा॑मुळे प्रतिसाद देण्यास उशीर घडला, पण तोपर्य॑त वेळ निघून गेली होती, पण बेष्ट लिवलय भौ! हेच म्हणतो... तात्या.

आर्य 11/03/2008 - 15:57
ईयत्ता ८वी अ........इतिहासाचा तास (तास म्हणजे ४५ मि.) आल्या आल्या गुरुजींनी सगितलं की शास्त्राचे जोशी सर येणार नाहीत, आणि मीच सलग दोन तास घेणार आहे..............आता लागली का.........आमची गृहपाठाची वही घरी विसरलेले, (दप्तरात असूनही) अर्थत गृहपाठ न केल्याने. कुणास ठाऊक काय झालं आणी सुर्य पश्चिमेला ऊगवला, सरांनी काहिही शिक्षा न करता सोडून दिलं व सांगीतलं पुढच्या तासाला घेऊन या. ते जाम शिकवायच्या मुड मधे होते. तास सुरु झाला. मी पुस्तकातली चित्र रंगवुन झाल्यावर पेंगायला सुरवात केलेली पण्.........मागच्या बाकावर खसखस पिकत होती. झोप खाडकन ऊडाली, पुढं लक्ष लागेना, मग हळूच बाक बदललून ईष्ट मित्रांच्यात गेलो. खरा घोळ तर पुढे चालू होता, सरांना ऐका वाक्यात ४/५ वेळा 'की' म्हणायची सवय होती आणि आम्ही ते मो़जत होतो. सेंच्युरी झाल्या वर दि़क्षितांना (वर्ग-मित्र) आवरलच नाही..........हात वर करुन मला सांगीतलं " १०० वेळा झालं". ईथेच सरांनी पाहीलं................त्यांनी मागेयेऊन आम्हाला सदिछा भेट दिली, थोडा सत्कारही झाला. सरांनी आमच्या वह्या तपासल्या, त्यात मागच्या पानावर रोमन गणन पध्द्तीने (चार उभ्या रेघांवर ऐक आडवी रेध) आशा फक्त रेघोट्या होत्या. या वर त्यानी प्रश्ण केला " काय कैदी आहात काय ? हे काय चाललंय ? काय, कसले दिवस मोजतय ? " आमच्यावर काय गुजरली होति हे सांगायला नको. पण बाकावर ऊभेराहून आम्ही ऊत्तराच्या विचारांनीही हसतच होतो. खोडसाळ (आर्य)

पहिल्या लिखाणाच्या मानाने फार छान लिहिला आहेस. एकजण म्हणाला " कुठ काय मामा .. ह ह ह्ह (असच काही तरी हसतात अशावेळी) ..असच्च..बसलोय .. गप्पा मारत असे गमतीदार प्रसंग आपल्यावर खूप वेळा ओढवतात. मी पाचवीत असताना एक दिवस शाळेला दांडी (खोटे सांगून)मारली होती आणि माझ्या भावाने शाळेत टीचरना सांगितले की, बहीणीला ताप आला आहे ती शाळेला येणार नाही. त्याच वेळी दुपारी मस्त पैकी हिंडत होते तेव्हा सरच रस्त्यावर भेटले आणि विचारले ताप आला आहेस तर कशाला हिंडतेस? मग माझी पंचाईत झाली पण मी( त्यावेळी सुचले ते) सांगितले कि औषध आणायलाच निघाले आहे..हुश... काय प्रसंग होता.. भाग २ ची वाट पाहात आहे....

तीर्थरूपांची अति कडक शिस्त असे. हसणे, वायफळ बोलणे नाही. विनोद पूर्णपणे वर्ज्य. त्यामुळे आम्ही त्यांना अयूबखान (पाकिस्तान्चे ६५ च्या युद्धावेळीचे अध्यक्ष)नाव ठेवले. आजुबाजूची मुले घरात घुसण्यापूर्वी अयुबखान आहे का म्हणून विचारीत. एकदा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चुकीच्या मुहूर्तावर एक मूर्ख आला व विचारले अयूबखान आहे का? दुर्दैवाने त्याच्या मागोमाग अयूबखान येऊन उभे होते. काही वर्शांनी नंतर हे नाव बदलून खोमेनी असे ठेवले.

In reply to by सुधीर कांदळकर

इनोबा म्हणे 11/03/2008 - 01:26
एकदा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चुकीच्या मुहूर्तावर एक मूर्ख आला व विचारले अयूबखान आहे का? दुर्दैवाने त्याच्या मागोमाग अयूबखान येऊन उभे होते. काही वर्शांनी नंतर हे नाव बदलून खोमेनी असे ठेवले. अयूबखान आणि खोमेनी ही दोन्ही नावे आवडली बरं का! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

छोटा डॉन 10/03/2008 - 22:00
तर आ आ आ भी [ आली का आठवण ? कुणाची ते सांगण्याची गरज नाही ....] चांगले लिहले आहे. चालू दे. मला वाटते की आपण आपापले अनुभव "डिस्कस" करून एक नविन लेखमालाच बनवावी .... लै लिहण्यासारखे आहे ... भाग २ लवकरच येऊ दे ......... छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

वरदा 10/03/2008 - 22:07
मला तर एकदा दांडी मारल्याची चिठ्ठी लिहून आईची सही करताना पकडलं सरांनी..मग मारल्या बर्‍याच बंडला..आई मावशीकडे गेलेय बाबा लवकर ऑफिसला गेले वगैरे वगैरे..आणि संध्याकाळी बाजारात जात होते आईसोबत तर सर समोर दत्त म्हणून हजर... नशीब मी आईला आधीच माझी थाप सांगितली होती ती म्हणाली मी आत्ताच आले म्हणून पण मी तोपर्यंत असली घाबरले होते.....

आपला आभि 11/03/2008 - 05:48
माझा लेख पुर्ण वाचन्याचे धाडस करनार्‍या वीरांना आणि वीरांगनांना (मिपा वाले तात्या बरोबर आहे ना शब्द ?... आणि 'ladies first' का नाहि ? म्हणून समस्त आखिल भारतीय भगिनि वर्ग मिपा शाखेने डाफरू नये!!! इवलासा जीव घाबरतो ना.. तुम्हाला पहिल्यांदा लिहीन पुढच्या वेळी.. ) माझा साष्टांग नमस्कार!!! .. काय धाडस आहे तुमच. मी पण लिहून झाल्यावर वाचला नाही परत.. ''आता त्यावेळी तुम्ही वाचन्याच्या अवस्थेत होता का ?' असे म्हणून आमचे काहि हितशत्रु आमच्या पायात पाय घालायला पुढे धावतिल ..पण आम्ही फिकीर करत नाही.. काय करायचय तुम्हाला.. आम्हि चालन्याच्या पण अवस्थेत नव्हतो. झाल समाधान? काही काही लोकांना दुसरा किती 'out' होतो आणि आपण किती 'control' मध्ये असतो यातच लै म्हन्जी लै 'interest'.. यावर कधीतरी चर्चा घडवून आणूयात.. मि पा वर सुध्दा या विषयात बरेच जातिवन्त लोक आहेत..हे आमच्या चाणाक्ष नजेरेने बराबर वळखलंय बरका!! (लब्बाड कुठले..) तर हा पाहिला थेंब पचला ..मग आता पाण्याची धार लावायला हरकत नाहि. धार म्हणजे 'पहिली धार' नव्हे.. लेखनाचि धार हो...धार वरून डॉन आणि समस्त मंडळींच्या डोळ्यात आलेली चमक आम्हाला इथून पण दिसली पण तुर्तास आम्ही ती तहान काही भागवू शकत नाहि.... तर असो .. आपल्या सेवेशी सदैव आपलाच आआआभि..

विजुभाऊ 11/03/2008 - 11:29
आम्ही एकदा दहावीत असताना(एकदाच होतो) कोणालातरी एका सरानी बेदम बदडला म्हणुन आम्ही संप केला होता. शाळेच्या बाहेर सगळेउभे होतो...कोणीच शाळेत आत जायला तयार नव्हते. शाळेचा शिपाइ सर्वाना बोलावुन गेला....मग एन्ग्लिश चे सर येउन गेले..कोणी ऐकत नव्हते. मुख्याधापकंनी मग रामबाण उपयवापरला....शेव्टी त्यानी आण्णा कंग्राळकराना पाठवले....त्यानी त्यांच्या खास कमावलेल्या अवाजात सर्वाना बोलावले....तरिही आम्ही सारे बाहेरच ......मग त्यानी चन्दु नावाच्या मुलाला पकडले...त्याला वैयक्तिक विचारले..........शाळेत का आला नाहीस म्हणुन ....चन्दु ...फट्कन म्हणाला...मी आज शाळेत आलोच नाही...घरी झोपुन आहे"..............

धमाल मुलगा 11/03/2008 - 12:01
>>मग त्यानी चन्दु नावाच्या मुलाला पकडले...त्याला वैयक्तिक विचारले..........शाळेत का आला नाहीस म्हणुन ....चन्दु ...फट्कन म्हणाला...मी आज शाळेत आलोच नाही...घरी झोपुन आहे".............. हा हा हा...आयला, इब्लीस न॑बर वन दिसतोय च॑दू. मग आण्णाची पार भि॑गरी का? आआआभि, काही कारणा॑मुळे प्रतिसाद देण्यास उशीर घडला, पण तोपर्य॑त वेळ निघून गेली होती, पण बेष्ट लिवलय भौ! आमचे जुने दिवस आठवले. सुधीरकाका, आयुबखान आणि खोमेनी का? वा वा... आमच्या घरी जिल्ले-इलाही, आलमपनाह, खावि॑द इ.इ. मुघली अ॑मल असतो :) आणि मी अगदीच आबा॑ना छळायच्या मुडमध्ये असलो की 'तात् '...लै भडकतात.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 11/03/2008 - 12:11
आआआभि, काही कारणा॑मुळे प्रतिसाद देण्यास उशीर घडला, पण तोपर्य॑त वेळ निघून गेली होती, पण बेष्ट लिवलय भौ! हेच म्हणतो... तात्या.

आर्य 11/03/2008 - 15:57
ईयत्ता ८वी अ........इतिहासाचा तास (तास म्हणजे ४५ मि.) आल्या आल्या गुरुजींनी सगितलं की शास्त्राचे जोशी सर येणार नाहीत, आणि मीच सलग दोन तास घेणार आहे..............आता लागली का.........आमची गृहपाठाची वही घरी विसरलेले, (दप्तरात असूनही) अर्थत गृहपाठ न केल्याने. कुणास ठाऊक काय झालं आणी सुर्य पश्चिमेला ऊगवला, सरांनी काहिही शिक्षा न करता सोडून दिलं व सांगीतलं पुढच्या तासाला घेऊन या. ते जाम शिकवायच्या मुड मधे होते. तास सुरु झाला. मी पुस्तकातली चित्र रंगवुन झाल्यावर पेंगायला सुरवात केलेली पण्.........मागच्या बाकावर खसखस पिकत होती. झोप खाडकन ऊडाली, पुढं लक्ष लागेना, मग हळूच बाक बदललून ईष्ट मित्रांच्यात गेलो. खरा घोळ तर पुढे चालू होता, सरांना ऐका वाक्यात ४/५ वेळा 'की' म्हणायची सवय होती आणि आम्ही ते मो़जत होतो. सेंच्युरी झाल्या वर दि़क्षितांना (वर्ग-मित्र) आवरलच नाही..........हात वर करुन मला सांगीतलं " १०० वेळा झालं". ईथेच सरांनी पाहीलं................त्यांनी मागेयेऊन आम्हाला सदिछा भेट दिली, थोडा सत्कारही झाला. सरांनी आमच्या वह्या तपासल्या, त्यात मागच्या पानावर रोमन गणन पध्द्तीने (चार उभ्या रेघांवर ऐक आडवी रेध) आशा फक्त रेघोट्या होत्या. या वर त्यानी प्रश्ण केला " काय कैदी आहात काय ? हे काय चाललंय ? काय, कसले दिवस मोजतय ? " आमच्यावर काय गुजरली होति हे सांगायला नको. पण बाकावर ऊभेराहून आम्ही ऊत्तराच्या विचारांनीही हसतच होतो. खोडसाळ (आर्य)
१४ सप्टेबर २००२ ..महाविद्यालयीन जीवनातिल दुसर वर्ष.. (वेळ आणि वर्ष दिल्यामुले लेखास भारदस्त पणा येतो .. तुम्ही टेन्स होऊ नका ..वाचा .वाचा ) आम्हि नेहमीप्रमाने काही बोधपर (? जाणकार लोकास अधिक सान्गणे नलगे..)चित्रपट पहात आमच्या सन्गनकासमोर बसलो होतो. चित्रपट अगदी रन्गात (अनुस्वार कसा द्यायचा हो ? ) आला होता. आमच्या काहि मित्रानि चित्रपटापासुन प्रेरित होऊन सुचक हालचालि चालु केल्या होत्या. आत आत शिरणार्‍या गुदगुल गप्पा चालू होत्या.. सर्वजन आपापले ज्ञान भाण्डार उघडून बसला होते. (काय ज्ञान असत एकेकाच हो ..

पाडगांवकरांचे सहस्त्रचंद्र दर्शनाचे वर्ष

व्यंकट ·

लक्ष लक्ष सलाम. शाळेत होतो. भावसरगम कार्यक्रम रेडिओवर ऐकत असे. ७.४५ ला असे. शाळेत उशीर झाल्याबद्दल छड्या खाव्या लागल्या. पण कार्यक्रम सोडला नाही. भावसरगममध्येच पाडगावकरांची, बापटांची, विंदांची ओळख झाली. आणि संपूर्ण आयुष्य या कवींनी व्यापून टाकले. त्यांच्या गाण्यांनी. ही गाणी नसती तर आपल्याला भावनिक आधार कोणी दिला असता? आपले सांस्कृतिक जीवन सुरस करणा-या कविराजांना माझा दंडवत. खरे म्हणजे हा धागा सुरु करायलाच मिपा उघडले. पण व्यंकटराव आपण बाजी मारलीत. धन्यवाद.

विकास 10/03/2008 - 08:57
जे काही आधीच्या पिढीतील कवी राहीलेत त्यातील एक महान कवी आणि विडंबनकार. माझा ही त्यांना सलाम! तुझे गीत गाण्या साठी सूर राहूदेत पासून शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पली़कडले अशी एकाहून एक सुंदर गीते, बोलगाण्यांसारख्या कविता लिहीणार्‍या या कवी महाशयांचे एक पटकन आठवलेले त्यांचे विडंबन :) एक होती गाय, तिला कमी काय? दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या :-)))))

नवकविता ही मराठी कवितेतील एक महत्त्वाची घटना. जाणिवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनाशाठी अस्वस्थ असणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर वास्तव, विचार,भावना, संवेदना यांचा मिलाप म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता......!!! महान कवीला आमचाही सलाम.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी 10/03/2008 - 15:19
ज्यांच्या शब्दांनी सर्वांना भरभरुन आनंद दिला त्या कवीवर्यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंद घारे 10/03/2008 - 16:47
कविवर्यांना सादर प्रणाम. त्यांच्याबद्दल असे एका ओळीत लिहून भागण्यासारखे नाही. यामुळे त्यांच्या गीतांसाठी एक वेगळे पान उघडले आहे.

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:10
पाडगावकर साहेबांना आपलाही सलाम! तात्या. -- या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!

लक्ष लक्ष सलाम. शाळेत होतो. भावसरगम कार्यक्रम रेडिओवर ऐकत असे. ७.४५ ला असे. शाळेत उशीर झाल्याबद्दल छड्या खाव्या लागल्या. पण कार्यक्रम सोडला नाही. भावसरगममध्येच पाडगावकरांची, बापटांची, विंदांची ओळख झाली. आणि संपूर्ण आयुष्य या कवींनी व्यापून टाकले. त्यांच्या गाण्यांनी. ही गाणी नसती तर आपल्याला भावनिक आधार कोणी दिला असता? आपले सांस्कृतिक जीवन सुरस करणा-या कविराजांना माझा दंडवत. खरे म्हणजे हा धागा सुरु करायलाच मिपा उघडले. पण व्यंकटराव आपण बाजी मारलीत. धन्यवाद.

विकास 10/03/2008 - 08:57
जे काही आधीच्या पिढीतील कवी राहीलेत त्यातील एक महान कवी आणि विडंबनकार. माझा ही त्यांना सलाम! तुझे गीत गाण्या साठी सूर राहूदेत पासून शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पली़कडले अशी एकाहून एक सुंदर गीते, बोलगाण्यांसारख्या कविता लिहीणार्‍या या कवी महाशयांचे एक पटकन आठवलेले त्यांचे विडंबन :) एक होती गाय, तिला कमी काय? दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या :-)))))

नवकविता ही मराठी कवितेतील एक महत्त्वाची घटना. जाणिवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनाशाठी अस्वस्थ असणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर वास्तव, विचार,भावना, संवेदना यांचा मिलाप म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता......!!! महान कवीला आमचाही सलाम.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी 10/03/2008 - 15:19
ज्यांच्या शब्दांनी सर्वांना भरभरुन आनंद दिला त्या कवीवर्यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंद घारे 10/03/2008 - 16:47
कविवर्यांना सादर प्रणाम. त्यांच्याबद्दल असे एका ओळीत लिहून भागण्यासारखे नाही. यामुळे त्यांच्या गीतांसाठी एक वेगळे पान उघडले आहे.

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:10
पाडगावकर साहेबांना आपलाही सलाम! तात्या. -- या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!
मंगेश पाडगांवकर हे आज ८० व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्या निमित्त त्यांना सलाम.

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला द्यावा?

डॉ.प्रसाद दाढे ·

विसोबा खेचर 10/03/2008 - 07:13
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..? मी डॉ दाढ्यांशी पूर्णत: सहमत आहे... आपला, (प्राणप्रेमी) तात्या.

विवेकवि 10/03/2008 - 18:55
मला वाटते कि प्राण साहेबा॑पेकक्षा अजुन खुप व्यक्ती आहेत... त्या॑ना सुद्धा देऊ शकता ... विवेक वि.

दादासाहेब फाळके पुरस्कार खरे तर मला द्या. मी अनेक चित्रपट स्वखर्चाने पाहून भारतीय चित्रपटसृष्टीला किती मदत करत आहे! :) असो. चावटपणा सोडून. खरे तर हा पुरस्कार प्राण याना मिळावा असे मलाही प्रामाणिक पणे वाटते आहे. पुण्याचे पेशवे

केशवराव 11/03/2008 - 08:01
कदाचीत माझे अज्ञान असेल ; पण आत्तापर्यंत फक्त पुरुष नटांनाच हा पुरस्कार मिळाल्याचे स्मरते. [ कुणी माझे अज्ञान दूर करीलका ?] तसा काही नियमच आहे का? नसेल तर स्त्री कलाकाराचे नांवही विचारात घ्यायला काय हरकत आहे ? ------- केशवराव .

In reply to by केशवराव

नंदन 11/03/2008 - 14:53
पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार देविकाराणींना मिळाला होता. शिवाय दुर्गाबाई खोटे, लता, आशा यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलेय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

'प्राण' ह्यांना 'जीवनगौरव' हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर आता कुठला पुरस्कार देणे उचित होईल का? 'फाळके पुरस्कार' सर्वोच्च असेल तर 'जीवनगौरव' पुरस्कार का देतात?

सचिन 15/03/2008 - 16:30
येस...! प्राणलाच मिळावा ! आपणही सहमत. तो केवळ खलनायकच नव्हता तर तितक्याच ताकदीचा चरित्र अभिनेताही होता. शिवाय प्रसंगी विनोदीही (उदा : व्हिक्टोरिया नंबर २०३) ! कुठेही अतिरेकीपणा किंवा गेट अप चा सोस नाही...केवळ अभिनयाच्याच सहाय्याने भूमिका करत राहिला...

प्राणसाहेबा॑ना कुठलीही भूमिका द्या..त्या॑नी प्रत्येक भूमिकेत खर्‍या अर्थाने 'प्राण' ओतला. 'आह' मध्ये डॉक्टर, 'जिस देस मै ग॑गा बहती है' मधला डाकू॑चा म्होरक्या, 'मधुमती' मधला टि॑बर इस्टेटचा मग्रूर मालक, व्हिक्टोरीया न॑. २०३ मधला मिष्किल 'राणा', 'परिचय' मधला राजासाहब, 'ज॑जीर' मधला 'शेरखान', आणि अगदी अलिकडे म्हणजे 'खोसला का घोसला' मधला पैलवा॑नाचा उस्ताद्..किती तरी भूमिका प्राणसाहेबा॑नी आपल्या कसदार अभिनयाने र॑गविल्या. काही कलाकार उतार वयातसुद्धा देखणे दिसायचे ते म्हणजे अशोककुमार आणि प्राण! त्या॑ना शेरवानी, ब्लेझर- टाय वगैरे दिमाखदार कपडे काय मस्त शोभायचे..अशोककुमारसुद्धा 'मेरे मेहबूब' मध्ये काय शोभलाय नवाबाच्या भूमिकेत्..अस्सल लखनवी नूर

आशु जोग 12/04/2013 - 23:39
आपली इच्छा पूर्ण झाली आहे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. या निमित्ताने मी एका बातमीला धागा होण्या पासूनही वाचवले आहे.

In reply to by आशु जोग

चिरोटा 13/04/2013 - 00:04
आपणासही त्या निमित्ताने सजाधावका मिपाकर पुरस्कार मिळाला आहे. र्वात जास्त धागे वर काढणारा मिपाकर.

आशु जोग 13/04/2013 - 01:02
जाऊ दे चिरोटाराव काही करायला जाव बरं, तुमच्यासारखे मिसळकर म्हणतात आपलंच खरं -- मी या बातमीचा एक धागाच काढतो नवीन, ही धमकी समजा हवी तर

अमोल केळकर 13/04/2013 - 10:18
अभिनंदन . आज ख-या अर्थाने पुरस्कारात ' प्राण ' आला अमोल केळकर

आशु जोग 13/04/2013 - 11:15
सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला यांनाही देतील उद्याच्या काळात

सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला नाना आणी अमिताभ सोडुन बाकिच्यांची तुलना प्राण साहेबांशी होउ शकत नाही

पंचम 14/04/2013 - 12:32
शुक्रवारी प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे माझ्या वाचनात आले. त्यांना ३ मे रोजी हा पुरस्कार देण्यात येईल त्यानंतर होणारी ही चर्चा आणि त्यामागचा हेतु समजला नाही

विसोबा खेचर 10/03/2008 - 07:13
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..? मी डॉ दाढ्यांशी पूर्णत: सहमत आहे... आपला, (प्राणप्रेमी) तात्या.

विवेकवि 10/03/2008 - 18:55
मला वाटते कि प्राण साहेबा॑पेकक्षा अजुन खुप व्यक्ती आहेत... त्या॑ना सुद्धा देऊ शकता ... विवेक वि.

दादासाहेब फाळके पुरस्कार खरे तर मला द्या. मी अनेक चित्रपट स्वखर्चाने पाहून भारतीय चित्रपटसृष्टीला किती मदत करत आहे! :) असो. चावटपणा सोडून. खरे तर हा पुरस्कार प्राण याना मिळावा असे मलाही प्रामाणिक पणे वाटते आहे. पुण्याचे पेशवे

केशवराव 11/03/2008 - 08:01
कदाचीत माझे अज्ञान असेल ; पण आत्तापर्यंत फक्त पुरुष नटांनाच हा पुरस्कार मिळाल्याचे स्मरते. [ कुणी माझे अज्ञान दूर करीलका ?] तसा काही नियमच आहे का? नसेल तर स्त्री कलाकाराचे नांवही विचारात घ्यायला काय हरकत आहे ? ------- केशवराव .

In reply to by केशवराव

नंदन 11/03/2008 - 14:53
पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार देविकाराणींना मिळाला होता. शिवाय दुर्गाबाई खोटे, लता, आशा यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलेय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

'प्राण' ह्यांना 'जीवनगौरव' हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर आता कुठला पुरस्कार देणे उचित होईल का? 'फाळके पुरस्कार' सर्वोच्च असेल तर 'जीवनगौरव' पुरस्कार का देतात?

सचिन 15/03/2008 - 16:30
येस...! प्राणलाच मिळावा ! आपणही सहमत. तो केवळ खलनायकच नव्हता तर तितक्याच ताकदीचा चरित्र अभिनेताही होता. शिवाय प्रसंगी विनोदीही (उदा : व्हिक्टोरिया नंबर २०३) ! कुठेही अतिरेकीपणा किंवा गेट अप चा सोस नाही...केवळ अभिनयाच्याच सहाय्याने भूमिका करत राहिला...

प्राणसाहेबा॑ना कुठलीही भूमिका द्या..त्या॑नी प्रत्येक भूमिकेत खर्‍या अर्थाने 'प्राण' ओतला. 'आह' मध्ये डॉक्टर, 'जिस देस मै ग॑गा बहती है' मधला डाकू॑चा म्होरक्या, 'मधुमती' मधला टि॑बर इस्टेटचा मग्रूर मालक, व्हिक्टोरीया न॑. २०३ मधला मिष्किल 'राणा', 'परिचय' मधला राजासाहब, 'ज॑जीर' मधला 'शेरखान', आणि अगदी अलिकडे म्हणजे 'खोसला का घोसला' मधला पैलवा॑नाचा उस्ताद्..किती तरी भूमिका प्राणसाहेबा॑नी आपल्या कसदार अभिनयाने र॑गविल्या. काही कलाकार उतार वयातसुद्धा देखणे दिसायचे ते म्हणजे अशोककुमार आणि प्राण! त्या॑ना शेरवानी, ब्लेझर- टाय वगैरे दिमाखदार कपडे काय मस्त शोभायचे..अशोककुमारसुद्धा 'मेरे मेहबूब' मध्ये काय शोभलाय नवाबाच्या भूमिकेत्..अस्सल लखनवी नूर

आशु जोग 12/04/2013 - 23:39
आपली इच्छा पूर्ण झाली आहे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. या निमित्ताने मी एका बातमीला धागा होण्या पासूनही वाचवले आहे.

In reply to by आशु जोग

चिरोटा 13/04/2013 - 00:04
आपणासही त्या निमित्ताने सजाधावका मिपाकर पुरस्कार मिळाला आहे. र्वात जास्त धागे वर काढणारा मिपाकर.

आशु जोग 13/04/2013 - 01:02
जाऊ दे चिरोटाराव काही करायला जाव बरं, तुमच्यासारखे मिसळकर म्हणतात आपलंच खरं -- मी या बातमीचा एक धागाच काढतो नवीन, ही धमकी समजा हवी तर

अमोल केळकर 13/04/2013 - 10:18
अभिनंदन . आज ख-या अर्थाने पुरस्कारात ' प्राण ' आला अमोल केळकर

आशु जोग 13/04/2013 - 11:15
सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला यांनाही देतील उद्याच्या काळात

सलमान खान, शाहरुकखान, आमीर खान, अमिताभ, ऐश्वर्या गुलजार, नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रुतिक रोशन, राकेश रोशन, जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन, कमल हसन, चिरंजीवी, विद्या बालन, जुही चावला नाना आणी अमिताभ सोडुन बाकिच्यांची तुलना प्राण साहेबांशी होउ शकत नाही

पंचम 14/04/2013 - 12:32
शुक्रवारी प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे माझ्या वाचनात आले. त्यांना ३ मे रोजी हा पुरस्कार देण्यात येईल त्यानंतर होणारी ही चर्चा आणि त्यामागचा हेतु समजला नाही
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..?

स्ट्रिकर्स - नग्नधुमकेतू

व्यंकट ·

विसोबा खेचर 09/03/2008 - 22:51
वा व्यंकटराव, एका वेग़ळा विषयावरील लेख फार आवडला. त्यामुळे दुर्योधनाचा 'तो' भाग वज्राचा झाला नाही (केळीची पाने वज्राची झाली की नाही त्याबद्दल माहिती नाही) हा हा हा! :) ह्या विषयावर अजूनही काही (फाजील) लिहीता येईल परंतू येथेच आमुचा हा शोधनिबंध आम्ही संपवितो. अजूनही काही नवे शोध लागले तर तुमचा शोधनिबंध पुढे अवश्य सुरू ठेवावा! :) सामाजीक जबाबदारीच भान ठेवून आम्ही ह्या लेखात आम्ही कोणतेही प्रकाशचित्र वा चित्रफीत टाकलेली नाही. बरं केलंत! :)) असो, असेच वेगवेगळ्या विषयावरील उत्तमोतम लेख येऊ द्या.. आपला, (हाफ चड्डी आणि बनियानमधला मुंबईकर) तात्या.

माझ्या आठवणीनुसार भारतात 'स्ट्रिकी॑ग' (कै) प्रोतिमा बेदीने (नृत्या॑गना, कबीर बेदीची पत्नी व पूजा बेदीची आई) केले होते मु॑बईत..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

व्यंकट 10/03/2008 - 00:13
प्रोतिमा बेदींचे ते धाडस काळाच्या पडद्याआड गेलेले, पण आता त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि गूगलकडे वळलो. हिंदूस्थानटाईम्सच्या - बेअरडेअर इंडियन्स टॅबलॉईडवर त्या घटनेचा प्रोतिमा ह्यांनी केलेला खुलासा आणि तिच्या प्रेम संबंधातून उलगडणारे तिचे व्यक्तिमत्व ह्या बद्दलचा लेख उपलब्ध आहे. स्वैर अनुवाद करावासा वाटला, पण ते पुन्हा कधीतरी. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ! आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

प्राजु 09/03/2008 - 23:32
त्या प्रोतिमा बेदीच होत्या. पण भारतात बाकी कुठे असे स्ट्रिकिंग चे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही. लेख चांगला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

लिखाळ 09/03/2008 - 23:47
हे स्ट्रिकिंग वगैरे भानगड इतकी नेहमीची असेल असे वाटलेच नव्हते. यावर कधी विचारच केला नव्हता. लेख आवडला. नग्नधूमकेतू हा शब्द मस्तच योजला आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

पीयुष चावला सारखी बालगोपाल मंडळी तो साय्मण्ड्स चा स्ट्रीकर ला पाडण्याचा रानटी प्रकार पाहून भांबावून गेल्यासारखी वाटली... ( किंवा त्यांनी तशी ऍक्टिंग केली असेल्)... अं अं ..लब्बाड....:))

धनंजय 10/03/2008 - 00:24
मजा वाटली. अवांतर : "चांदणे शिंपीत जाशी" मधील ढगांबद्दलच्या ओळी स्त्रीला उद्देशूनच आहेत अशी मला चुलत-चुलत-माहिती आहे. (स्वतः मिळवलेली माहिती ही सख्खी, ऐकीव-ऐकीव ती चुलत-चुलत माहिती.) दूरदर्शनवर आशाताईंच्या एका मुलाखतीत असा प्रश्न आला की हृदयनाथ हा धाकटा भाऊ असल्यामुळे ताईशी काम करणे, कधी कठिण गेले का? गाताना अर्थ, गूढार्थ माहीत असला पाहिजे म्हणून आशाताईंनी हृदयनाथांना "चांदणे शिंपीत जाशी" चा अर्थ विचारून घेतला. हृदयनाथांना तो कवीशी चर्चेतून माहीत होता. पण "बाईला वस्त्रे काढायला सांगणे" हा अर्थ ताईला सांगताना धाकटा भाऊ म्हणून हृदयनाथांची त्रेधा झाली, अशी गमतीदार कथा त्यांनी सांगितली. अशा प्रकारची मुलाखत दूरदर्शनवर प्रत्यक्ष कोणी ऐकल्यास त्यांनी दुजोरा द्यावा. नाहीतर वाचकांसाठी ही चुलत-चुलत-चुलत-माहिती होईल.

In reply to by धनंजय

विकास 10/03/2008 - 05:21
मला आठवते त्याप्रमाणे आशाताईंना सुधीर गाडगीळ अथवा तत्सम मुलाखतकाराशी बोलताना, त्यांनी आठवण सांगीतली होती (अशा काही शब्दात, अगदी हेच शब्द नाहीत!)की: "चांदणे शिंपित जाशीच्या रेकॉर्डींगच्या वेळेस, गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी म्हणताना, बाळ जरा लाजला (ऑकवर्ड झाला या अर्थी). नंतर तरूण आहे रात्र अजूनीचे रेकॉर्डींग करताना मग मी त्याला गमतीत म्हणाले की बाळ आता तुझे कसे होणार! :-)"

In reply to by विकास

लिखाळ 10/03/2008 - 16:07
अगदी बरोबर. शब्दांच्या पलिकडे (?) या कार्यक्रमात सुधीर गाडगीळांनी आशा भोसलेंची मुलाखत घेतली होती. त्यात हा संवाद आहे. त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली. कार्यक्रम बराच जूना असावा. ८० च्या दशकातला असेल. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

विकास 10/03/2008 - 16:24
त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली.
ती जालावर आहे का? मी काल बघायचा प्रयत्न केला पण पटकन दिसली नाही. दुवा माहीत असल्यास कळवावात. धन्यवाद

सन्जोप राव 10/03/2008 - 06:53
लेख आवडला. 'नग्नधूमकेतू' हा शब्द तर फारच. प्रोतिमा बेदीचे आत्मचरित्र मी वाचले होते. विविध पुरुषांशी आपण कधी व कसा शरीरसंबंध केला याची जंत्रीच वाचल्यासारखे वाटले. देवयानी चौबळ आणि तिला सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीकिंग करायला लावणारा राजकपूर यांच्या संदर्भातली अशीच बातमी कोणे एके काळी 'श्री', 'स्क्रीन' अशा प्रकाशनांनी फोडणीला टाकली होती. असो, याबाबतचा तपशील 'तबीयतदार तज्ञ' शोधून काढतीलच. सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत वावरणे यामागे प्रसिद्धीचा हव्यास एवढे एकच कारण असेल असे वाटत नाही. काही काही वेळा मानसिक विकृती, लैंगिक कुचंबणा असे काही त्यामागे असू शकेल. अशा कृत्याबद्दल दंड ठीक आहे, पण सदर व्यक्तीला मनोविकारतज्ञांची मदत घ्यायला लावणे, हे केले की नाही ते कळाले नाही. महाविद्यालयात असताना विज्ञानाची प्रात्यक्षिके करताना सूक्ष्मजीवशास्त्रातील एका प्रयोगाला स्ट्रीकिंग असे नाव होते - अजूनही आहे. त्या वेळी स्ट्रीकिंग हा शब्दच माहिती नसल्यामुळे काही फारच भाबडे विनोद होत असत, ते आठवले. सन्जोप राव

TV-5Monde ही फ्रेंच वाहिनी पाहते. त्यावर अनेक अभिजात फ्रेंच चित्रपट इंग्रजी भाषांतरासह दाखविले जातात. त्यात फ्रान्समध्ये कला स्वातंत्र्य असल्याने बरेचदा स्त्री-पुरुषांचे संपूर्ण नग्नदर्शन घडते मात्र ही नग्नता सहजतेने येते. तो त्या कथानकाचाच भाग असल्यासारखे सादर केले जाते. भारतीय चित्रसृष्टीसारखा त्यात ओढून ताणून आणलेला भडक नागवेपणा नसतो. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विवेकवि 10/03/2008 - 14:28
नविन विषय मा॑डलात अतिषय छान वाटले. पर॑तु त्यामुळे आपल्या वरच ते शेकले... असो असेच लेखन करत रहा.. विवेक वि.

विसोबा खेचर 09/03/2008 - 22:51
वा व्यंकटराव, एका वेग़ळा विषयावरील लेख फार आवडला. त्यामुळे दुर्योधनाचा 'तो' भाग वज्राचा झाला नाही (केळीची पाने वज्राची झाली की नाही त्याबद्दल माहिती नाही) हा हा हा! :) ह्या विषयावर अजूनही काही (फाजील) लिहीता येईल परंतू येथेच आमुचा हा शोधनिबंध आम्ही संपवितो. अजूनही काही नवे शोध लागले तर तुमचा शोधनिबंध पुढे अवश्य सुरू ठेवावा! :) सामाजीक जबाबदारीच भान ठेवून आम्ही ह्या लेखात आम्ही कोणतेही प्रकाशचित्र वा चित्रफीत टाकलेली नाही. बरं केलंत! :)) असो, असेच वेगवेगळ्या विषयावरील उत्तमोतम लेख येऊ द्या.. आपला, (हाफ चड्डी आणि बनियानमधला मुंबईकर) तात्या.

माझ्या आठवणीनुसार भारतात 'स्ट्रिकी॑ग' (कै) प्रोतिमा बेदीने (नृत्या॑गना, कबीर बेदीची पत्नी व पूजा बेदीची आई) केले होते मु॑बईत..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

व्यंकट 10/03/2008 - 00:13
प्रोतिमा बेदींचे ते धाडस काळाच्या पडद्याआड गेलेले, पण आता त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि गूगलकडे वळलो. हिंदूस्थानटाईम्सच्या - बेअरडेअर इंडियन्स टॅबलॉईडवर त्या घटनेचा प्रोतिमा ह्यांनी केलेला खुलासा आणि तिच्या प्रेम संबंधातून उलगडणारे तिचे व्यक्तिमत्व ह्या बद्दलचा लेख उपलब्ध आहे. स्वैर अनुवाद करावासा वाटला, पण ते पुन्हा कधीतरी. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ! आम्ही येथे भेटू शकतो.. http://baglya.blogspot.com/

प्राजु 09/03/2008 - 23:32
त्या प्रोतिमा बेदीच होत्या. पण भारतात बाकी कुठे असे स्ट्रिकिंग चे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही. लेख चांगला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

लिखाळ 09/03/2008 - 23:47
हे स्ट्रिकिंग वगैरे भानगड इतकी नेहमीची असेल असे वाटलेच नव्हते. यावर कधी विचारच केला नव्हता. लेख आवडला. नग्नधूमकेतू हा शब्द मस्तच योजला आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

पीयुष चावला सारखी बालगोपाल मंडळी तो साय्मण्ड्स चा स्ट्रीकर ला पाडण्याचा रानटी प्रकार पाहून भांबावून गेल्यासारखी वाटली... ( किंवा त्यांनी तशी ऍक्टिंग केली असेल्)... अं अं ..लब्बाड....:))

धनंजय 10/03/2008 - 00:24
मजा वाटली. अवांतर : "चांदणे शिंपीत जाशी" मधील ढगांबद्दलच्या ओळी स्त्रीला उद्देशूनच आहेत अशी मला चुलत-चुलत-माहिती आहे. (स्वतः मिळवलेली माहिती ही सख्खी, ऐकीव-ऐकीव ती चुलत-चुलत माहिती.) दूरदर्शनवर आशाताईंच्या एका मुलाखतीत असा प्रश्न आला की हृदयनाथ हा धाकटा भाऊ असल्यामुळे ताईशी काम करणे, कधी कठिण गेले का? गाताना अर्थ, गूढार्थ माहीत असला पाहिजे म्हणून आशाताईंनी हृदयनाथांना "चांदणे शिंपीत जाशी" चा अर्थ विचारून घेतला. हृदयनाथांना तो कवीशी चर्चेतून माहीत होता. पण "बाईला वस्त्रे काढायला सांगणे" हा अर्थ ताईला सांगताना धाकटा भाऊ म्हणून हृदयनाथांची त्रेधा झाली, अशी गमतीदार कथा त्यांनी सांगितली. अशा प्रकारची मुलाखत दूरदर्शनवर प्रत्यक्ष कोणी ऐकल्यास त्यांनी दुजोरा द्यावा. नाहीतर वाचकांसाठी ही चुलत-चुलत-चुलत-माहिती होईल.

In reply to by धनंजय

विकास 10/03/2008 - 05:21
मला आठवते त्याप्रमाणे आशाताईंना सुधीर गाडगीळ अथवा तत्सम मुलाखतकाराशी बोलताना, त्यांनी आठवण सांगीतली होती (अशा काही शब्दात, अगदी हेच शब्द नाहीत!)की: "चांदणे शिंपित जाशीच्या रेकॉर्डींगच्या वेळेस, गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी म्हणताना, बाळ जरा लाजला (ऑकवर्ड झाला या अर्थी). नंतर तरूण आहे रात्र अजूनीचे रेकॉर्डींग करताना मग मी त्याला गमतीत म्हणाले की बाळ आता तुझे कसे होणार! :-)"

In reply to by विकास

लिखाळ 10/03/2008 - 16:07
अगदी बरोबर. शब्दांच्या पलिकडे (?) या कार्यक्रमात सुधीर गाडगीळांनी आशा भोसलेंची मुलाखत घेतली होती. त्यात हा संवाद आहे. त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली. कार्यक्रम बराच जूना असावा. ८० च्या दशकातला असेल. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

विकास 10/03/2008 - 16:24
त्याची चित्रफित मी अलिकडेच पाहिली.
ती जालावर आहे का? मी काल बघायचा प्रयत्न केला पण पटकन दिसली नाही. दुवा माहीत असल्यास कळवावात. धन्यवाद

सन्जोप राव 10/03/2008 - 06:53
लेख आवडला. 'नग्नधूमकेतू' हा शब्द तर फारच. प्रोतिमा बेदीचे आत्मचरित्र मी वाचले होते. विविध पुरुषांशी आपण कधी व कसा शरीरसंबंध केला याची जंत्रीच वाचल्यासारखे वाटले. देवयानी चौबळ आणि तिला सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीकिंग करायला लावणारा राजकपूर यांच्या संदर्भातली अशीच बातमी कोणे एके काळी 'श्री', 'स्क्रीन' अशा प्रकाशनांनी फोडणीला टाकली होती. असो, याबाबतचा तपशील 'तबीयतदार तज्ञ' शोधून काढतीलच. सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत वावरणे यामागे प्रसिद्धीचा हव्यास एवढे एकच कारण असेल असे वाटत नाही. काही काही वेळा मानसिक विकृती, लैंगिक कुचंबणा असे काही त्यामागे असू शकेल. अशा कृत्याबद्दल दंड ठीक आहे, पण सदर व्यक्तीला मनोविकारतज्ञांची मदत घ्यायला लावणे, हे केले की नाही ते कळाले नाही. महाविद्यालयात असताना विज्ञानाची प्रात्यक्षिके करताना सूक्ष्मजीवशास्त्रातील एका प्रयोगाला स्ट्रीकिंग असे नाव होते - अजूनही आहे. त्या वेळी स्ट्रीकिंग हा शब्दच माहिती नसल्यामुळे काही फारच भाबडे विनोद होत असत, ते आठवले. सन्जोप राव

TV-5Monde ही फ्रेंच वाहिनी पाहते. त्यावर अनेक अभिजात फ्रेंच चित्रपट इंग्रजी भाषांतरासह दाखविले जातात. त्यात फ्रान्समध्ये कला स्वातंत्र्य असल्याने बरेचदा स्त्री-पुरुषांचे संपूर्ण नग्नदर्शन घडते मात्र ही नग्नता सहजतेने येते. तो त्या कथानकाचाच भाग असल्यासारखे सादर केले जाते. भारतीय चित्रसृष्टीसारखा त्यात ओढून ताणून आणलेला भडक नागवेपणा नसतो. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विवेकवि 10/03/2008 - 14:28
नविन विषय मा॑डलात अतिषय छान वाटले. पर॑तु त्यामुळे आपल्या वरच ते शेकले... असो असेच लेखन करत रहा.. विवेक वि.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांत भारताच्या विजयापेक्षा अधिक प्रकर्षाने जी बातमी झळकली ती म्हणजे एक प्रेक्षक नग्नावस्थेत मैदानावर ऍन्ड्रू सायमंड्स च्या दिशेने धावत गेला आणि सायमंड्सने त्याला धक्का मारून पाडल्याची. अश्या नागव्याने धावण्याच्या कृत्यास पश्चिमी सभ्यतेत (?) 'स्ट्रिकींग' असे संबोधतात. विकीपिडीयानुसार स्ट्रिकींगचा शब्दशः अर्थ वेगाने जाणे असा होतो. स्ट्रिकींगचा अर्थ रहदारीच्या ठिकाणी नागव्याने ( धावत ) जाणे असा कधी झाला ते विकीपिडीयावरच वाचता येईल. अर्थात धावत जाणं महत्त्वाच नाही. काही संथपणे निर्विकार चेहर्‍यानी चालणारे सुद्धा असतात.

सारण की पुरण??

धनाधीश ·

विसोबा खेचर 09/03/2008 - 17:16
सारण हा शब्द थोडासा पांढरपेशी, उच्चवर्गीय, सभ्य, सुशिक्षित व सुसंस्कृत वगैरे वाटतो. माझ्यासारख्या मनाने बहुजनसमाजवादी असलेल्या माणसाला पुरण हाच शब्द अधिक आपला वाटतो.. असो, इतरांची मते वाचायला आवडतील. चालू द्या.. आपला, तात्या कोळी.

प्राजु 09/03/2008 - 20:25
करंजीच नव्हे, तर मोदक सुद्धा सारण भरलेलेच असतात. समोसा किंवा मटारच्या करंज्या करताना सुद्धा त्यात जे भरले जाते त्यालाही सारण असे म्हणतात. अगदी नीट सांगायचे तर.. स्टफिंग म्हणजे सारण. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. लहानमुलांसाठी करताना तूर डाळीचे पुरण करतात. आणि पुरण हे डाळींशीच (हरभरा डाळ / तूर डाळ) संबंधित असते. त्यात बाकी काही प्रकार असल्याचे ऐकिवात नाही. म्हणून तर पुरणपोळी असेच म्हणतात. म्हणजेच पुरण हे विशेष नाम आणि सारण हे सामान्य नाम असे म्हणता येईल.... हुश्श.... किती हे विश्लेषण!!! - (सर्वव्यापी)प्राजु

प्रत्येक अन्नपूर्णेस विचारला आहे. माज्या आईच्या वयाच्या अन्नपूर्णांना. कारण हे शब्द पारंपरिक आहेत. करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. माझ्या लहानपणी दिवाळीत वा समारंभप्रसंगी करंजीचे, चकल्या गाळण्याचे काम मुलेमुली करीत. चकलीचे पीठ घट्ट झाल्यावर माझ्या टारझन दादाला पाचारण करण्यात येई. आणि तो ते आम्हाला न जमणारे काम लीलया करी. व भरपूर भाव मारी. आम्हाला त्याच्या अचाट शक्तीचे भरपूर कवतिक होते. आमच्या मते माझा मामा, एक मावसभाऊ, हा एक असे सर्व दारा सिंग च्या खालोखाल थोर पैलवान. खाद्यप्रेमी

प्राजु 09/03/2008 - 20:45
करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. मी यास असहमत आहे. करंजीत भरतात ते सारणच आणि ज्यात भरतात त्याला आम्ही पारी किंवा लाटी असे म्हणतो.....आणि पुरणपोळीसाठी असते ते पुरण.... १००%. - (सर्वव्यापी)प्राजु

प्राजुशी सहमत.. सारण म्हणजे कोणतेही स्टफिंग.... मग ते पोळ्यामधील असो किंवा पारी(करंज्यामधील) मधील.. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. मग ते पारीमधे घातले तर होतात कडबू पोळी मधे घातले तर होते पुरणाची पोळी

सुधीर पाटील 09/03/2008 - 23:10
सारण म्हणजे जे सारायचे असते ते. आणि पुरण म्हणजे जे पुरक असते ते पुरण. म्हणजे वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात. आता प्राजुताईंसारख्या अभिजनांनाही हे पटेलच की.

प्राजु 09/03/2008 - 23:26
वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात मोदकात जे भरतात ते वाडग्यात ठेवले तरी ते सारणच आणि वाडग्यातले पारित भरायचे असले तरी ते पुरणच... कारण पुरण हा खास पदार्थ आहे. आणि सारण हे ते ज्यात भरायचे त्यावर तिखट की गोड .. अवलंबून असते. म्हणजे मोदकांत भरायचे ते गोड असते आणि मटारच्या करंजित किंवा समोस्यात भरायचे ते तिखट असते. पुरणाला गोड -तिखट पर्याय नसतो. ते गोडच असते. - (सर्वव्यापी)प्राजु

आर्य 10/03/2008 - 11:13
पुरणपोळीत भरतात ते पुरण आणि करंजीत भरतात सारण सारण - गुळ + (ओल्या / सुक्या) खोबर्‍याचे मिश्रण (करंजी करीत / मोदका करीता) पुरण - गुळ डाळीचे शिजवलेले मिश्रण (पुरण पोळीत / कडबु) (खवय्या) आर्य

चतुरंग 10/03/2008 - 21:09
संच (सेट) थियरी चा आधार घेतला तर 'सारण' हा एक मोठा संच ठरेल आणि 'पुरण' हा उपसंच. थोडक्यात - 'पुरण हे सारण सुध्दा असतंच पण सारण हे पुरण असतंच असं नाही'. (झाला की नाही मस्त गोंधळ;)) (अवांतर - सारण सारणं आणि पुरण पुरणं अशी एक कोटीही मनात आल्याशिवाय राहिली नाही:)) चतुरंग

ज्या शिवाय ती वस्तु पूर्ण होऊ शकत नाही ते पुरण आणि जे कुठल्याही पदार्थात सारले जाऊ शकते ते सारण. पण काय सांगावे महाराजा, एका महाराष्ट्रातल्या गावात मला असे सांगण्यात आले की पोळी म्हणजे केवळ पुरणपोळी आणि नेहेमी खातो ती चपाती. आता बोला. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर 09/03/2008 - 17:16
सारण हा शब्द थोडासा पांढरपेशी, उच्चवर्गीय, सभ्य, सुशिक्षित व सुसंस्कृत वगैरे वाटतो. माझ्यासारख्या मनाने बहुजनसमाजवादी असलेल्या माणसाला पुरण हाच शब्द अधिक आपला वाटतो.. असो, इतरांची मते वाचायला आवडतील. चालू द्या.. आपला, तात्या कोळी.

प्राजु 09/03/2008 - 20:25
करंजीच नव्हे, तर मोदक सुद्धा सारण भरलेलेच असतात. समोसा किंवा मटारच्या करंज्या करताना सुद्धा त्यात जे भरले जाते त्यालाही सारण असे म्हणतात. अगदी नीट सांगायचे तर.. स्टफिंग म्हणजे सारण. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. लहानमुलांसाठी करताना तूर डाळीचे पुरण करतात. आणि पुरण हे डाळींशीच (हरभरा डाळ / तूर डाळ) संबंधित असते. त्यात बाकी काही प्रकार असल्याचे ऐकिवात नाही. म्हणून तर पुरणपोळी असेच म्हणतात. म्हणजेच पुरण हे विशेष नाम आणि सारण हे सामान्य नाम असे म्हणता येईल.... हुश्श.... किती हे विश्लेषण!!! - (सर्वव्यापी)प्राजु

प्रत्येक अन्नपूर्णेस विचारला आहे. माज्या आईच्या वयाच्या अन्नपूर्णांना. कारण हे शब्द पारंपरिक आहेत. करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. माझ्या लहानपणी दिवाळीत वा समारंभप्रसंगी करंजीचे, चकल्या गाळण्याचे काम मुलेमुली करीत. चकलीचे पीठ घट्ट झाल्यावर माझ्या टारझन दादाला पाचारण करण्यात येई. आणि तो ते आम्हाला न जमणारे काम लीलया करी. व भरपूर भाव मारी. आम्हाला त्याच्या अचाट शक्तीचे भरपूर कवतिक होते. आमच्या मते माझा मामा, एक मावसभाऊ, हा एक असे सर्व दारा सिंग च्या खालोखाल थोर पैलवान. खाद्यप्रेमी

प्राजु 09/03/2008 - 20:45
करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. मी यास असहमत आहे. करंजीत भरतात ते सारणच आणि ज्यात भरतात त्याला आम्ही पारी किंवा लाटी असे म्हणतो.....आणि पुरणपोळीसाठी असते ते पुरण.... १००%. - (सर्वव्यापी)प्राजु

प्राजुशी सहमत.. सारण म्हणजे कोणतेही स्टफिंग.... मग ते पोळ्यामधील असो किंवा पारी(करंज्यामधील) मधील.. पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. मग ते पारीमधे घातले तर होतात कडबू पोळी मधे घातले तर होते पुरणाची पोळी

सुधीर पाटील 09/03/2008 - 23:10
सारण म्हणजे जे सारायचे असते ते. आणि पुरण म्हणजे जे पुरक असते ते पुरण. म्हणजे वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात. आता प्राजुताईंसारख्या अभिजनांनाही हे पटेलच की.

प्राजु 09/03/2008 - 23:26
वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात मोदकात जे भरतात ते वाडग्यात ठेवले तरी ते सारणच आणि वाडग्यातले पारित भरायचे असले तरी ते पुरणच... कारण पुरण हा खास पदार्थ आहे. आणि सारण हे ते ज्यात भरायचे त्यावर तिखट की गोड .. अवलंबून असते. म्हणजे मोदकांत भरायचे ते गोड असते आणि मटारच्या करंजित किंवा समोस्यात भरायचे ते तिखट असते. पुरणाला गोड -तिखट पर्याय नसतो. ते गोडच असते. - (सर्वव्यापी)प्राजु

आर्य 10/03/2008 - 11:13
पुरणपोळीत भरतात ते पुरण आणि करंजीत भरतात सारण सारण - गुळ + (ओल्या / सुक्या) खोबर्‍याचे मिश्रण (करंजी करीत / मोदका करीता) पुरण - गुळ डाळीचे शिजवलेले मिश्रण (पुरण पोळीत / कडबु) (खवय्या) आर्य

चतुरंग 10/03/2008 - 21:09
संच (सेट) थियरी चा आधार घेतला तर 'सारण' हा एक मोठा संच ठरेल आणि 'पुरण' हा उपसंच. थोडक्यात - 'पुरण हे सारण सुध्दा असतंच पण सारण हे पुरण असतंच असं नाही'. (झाला की नाही मस्त गोंधळ;)) (अवांतर - सारण सारणं आणि पुरण पुरणं अशी एक कोटीही मनात आल्याशिवाय राहिली नाही:)) चतुरंग

ज्या शिवाय ती वस्तु पूर्ण होऊ शकत नाही ते पुरण आणि जे कुठल्याही पदार्थात सारले जाऊ शकते ते सारण. पण काय सांगावे महाराजा, एका महाराष्ट्रातल्या गावात मला असे सांगण्यात आले की पोळी म्हणजे केवळ पुरणपोळी आणि नेहेमी खातो ती चपाती. आता बोला. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
Taxonomy upgrade extras
करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.

गोळी

केशवसुमार ·

वडापाव 09/03/2008 - 15:45
आवडली कविता. तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... खूप छान!! अजून कविता येऊ द्यात. आणि काही कविता ऐकीवात असल्यास 'कवितासंग्रह' या काथ्याकुटात टंकलिखीत करावे, ही विनंती. आपला नम्र, वडापाव

प्राजु 09/03/2008 - 20:17
दारू, बाई, बायको...... काही ही नाही यात. सही. केशव... आपल्याला या पथ्यामुळे पोटदुखी सुरू झाली का हो?? :)) ह्.घ्या. कविता एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रियाली 10/03/2008 - 02:47
अन मी निघून जाता तोही निघून जातो औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो मी दमात एका गिळते मग ती गोळी ही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
वांझोटे विडंबन ;-) जरा गंभीर वाटले. का माझाच काही गैरसमज??? ;-)

In reply to by प्रियाली

केशवसुमार 10/03/2008 - 10:08
प्रियालीताई, गंभीर गैरसमज झाला आहे.. विडंबन लिहिताना.. अबर चबर खाण्याने होणारी पोटदुखी येव्हढेच डोळ्यापुढे होते.. :)) आपण भलताच अर्थ समोर आणलात.. :(( (सात्त्विक) केशवसुमार..

केशवसुमार 10/03/2008 - 22:28
प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

वडापाव 09/03/2008 - 15:45
आवडली कविता. तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... खूप छान!! अजून कविता येऊ द्यात. आणि काही कविता ऐकीवात असल्यास 'कवितासंग्रह' या काथ्याकुटात टंकलिखीत करावे, ही विनंती. आपला नम्र, वडापाव

प्राजु 09/03/2008 - 20:17
दारू, बाई, बायको...... काही ही नाही यात. सही. केशव... आपल्याला या पथ्यामुळे पोटदुखी सुरू झाली का हो?? :)) ह्.घ्या. कविता एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रियाली 10/03/2008 - 02:47
अन मी निघून जाता तोही निघून जातो औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो मी दमात एका गिळते मग ती गोळी ही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
वांझोटे विडंबन ;-) जरा गंभीर वाटले. का माझाच काही गैरसमज??? ;-)

In reply to by प्रियाली

केशवसुमार 10/03/2008 - 10:08
प्रियालीताई, गंभीर गैरसमज झाला आहे.. विडंबन लिहिताना.. अबर चबर खाण्याने होणारी पोटदुखी येव्हढेच डोळ्यापुढे होते.. :)) आपण भलताच अर्थ समोर आणलात.. :(( (सात्त्विक) केशवसुमार..

केशवसुमार 10/03/2008 - 22:28
प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार
आमच प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता खुळी उगाच चरले काल रातरी काहीबाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... अंतरातली उलथापालथ मी बावरते बंद पाहूनी दार जराशी मी घाबरते तो थांबून देतो धक्का तेव्हा दारालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... ............ अन मी निघून जाता तोही

वाट फुटेल तिथे ४

सुधीर कांदळकर ·

कालिकत अणि माहेचे वर्णन चांगले होते.... हे कालिकत आणि कोझीकोडे एकच हे मला देखील ठाउक नव्हते.... माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे अहो , या लेखात जाता जाता मित्रांबरोबर केलेल्या गमती आणि संवाद यांचे वर्णन कमी आहे ,त्यामुळे कदाचित तुम्हाला एकसुरी वाटत आहे... तुमच्या मित्रांची वर्णने आणि संवाद हे कदाचित तुमच्या आधीच्या प्रवासवर्णनातील सामर्थ्य असावे असे वाटते... पण अजून भाग येउद्यात्...छान चाललंय... :)

प्राजु 09/03/2008 - 20:11
कालिकत म्हणजेच कोझिकोडे... वा ज्ञानात भर पडली. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. हे मस्त. मला आमची कोडाईकॅनल ची ट्रीप आठवली. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव 09/03/2008 - 22:38
सुधीरराव असा धीर सोडू नका बुवा. दौरा मस्तच रंगतोय. पुढच्या ठिकाणी जायला आम्ही उत्सुक आहोत तेव्हा पेट्रोल भरून तयार राहा. माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे असे म्हणून आम्हाला तुम्ही पेचात पकडताय. पण आम्ही तुम्हाला इतक्या सुखासुखी सोडणार नाही. पुढची कहाणी लवकरात लवकर पेश करावीत असा 'जनरल डायर' कडून आदेश काढायलाही आम्ही कमी करणार नाही. तेव्हा पुढे काय घडले ते शहाण्या मुलासारखे आम्हाला सांगा बघू.

अनिकेत 10/03/2008 - 00:56
कोझीकोडे हे तर आमचे घर..... येथेच असतो सध्या... माहि (माहे) केंद्रशासित प्रदेश आहे....दारू केरळाहून खूप स्वस्त....जाण्या येण्याचा खर्च सुटेल एवढी... वायनाडला नाही गेलात?? अरेरे..... केरळ... (उसासे) अनिकेत.

अनिकेत 10/03/2008 - 01:16
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते. मुळीच नाही.... पुनःप्रत्ययाचा आनंद येतोय... कालडीला मगरीने पकडल्यानेच आद्य शंकराचार्य संन्यासी बनले.. आणि बौद्धकाळात अद्वैतवाद आणि हिंदू धर्म वाचवला.... ब्राह्मसूत्र शांकरभाष्यात सर्वांचे खंडन केले... येवढ्या लहान वयात संपूर्ण देश कसा काय हिंडले असतील? माझी अजून लोकल पकडायला फाटते... गुरूवायूर miss केलेत? अरेरे... अनिकेत

विसोबा खेचर 10/03/2008 - 08:11
कांदळकरसाहेब, लेखन छान सुरू आहे, ओघवतं होत आहे. वाचायला मौज येते आहे... कृपया पुढील भागही येऊ द्या. नाउमेद होऊ नका. प प्रतिसादांचं राजकारण, अर्थकारण वगैरे कसं करायचं, हे मी तुम्हाला सवडीने शिकवेन. :)) तात्या.

बेसनलाडू 10/03/2008 - 08:36
वर्णन उत्तरोत्तर रंगतंय. वाचत आहोत, लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

धमाल मुलगा 10/03/2008 - 14:21
लय भारी...लय सापडली आहे की काका तुम्हाला. अस॑ का म्हणताय? अहो तुम्ही लिहा हो बिनधास्त. मी आहे ना वाचायला! माणसान॑ कस॑ माझ्यासारख॑ रहाव॑...(राजासारख॑ वाच॑ल॑त का? तस॑ म्हणा हव॑ तर. ) वाटल॑... लिहिल॑... कोणाला आवडल॑ आन॑द वाटतो. नाही आवडल॑, माफ करा म्हणायच॑ पुढे चालू लागायच॑. हे काय भलत॑च बोलताय? आपल्या तर आवडल॑ बॉ. हे असले हाल मी बे॑गळूरला पहिल्या॑दा गेलो होतो तेव्हा सोसले होते. पण आता जमत॑ थोड॑ थोड॑ :) असो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.... -ध मा ल.

अभिज्ञ 10/03/2008 - 20:16
सुधीरजी, वर म्हणाल्य़ाप्रमाणे "लय भारी". मला तर एकसुरि मुळिच वाटले नाही. KEEP IT UP.पुढचे भाग हि लवकर येउ द्यात! (आपल्यासारखाच एक भटक्या )अबब

चतुरंग 10/03/2008 - 20:32
अहो तुमचा अनुभव जसा असेल तसेच प्रतिबिंब लिखाणात येणार, उगीचच ओढूनताणून प्रत्येक भाग नीटनेटकाच असावा असा आग्रह का? तो नैसर्गिक असणे जास्त मजेचे आणि खर्‍या आनंदाचे! वर सतलजने लिहिल्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळीतल्या खुसखुशीत संवादांची फोडणी मात्र जरा कमी पडली, ती तेवढी पुढच्या लेखात वाढवा. बाकी आम्ही वाचतोय काळजी नको. चतुरंग

लिहिले पण नेटवरच्या तांत्रिक अडचणींमुळे चढवता आले नाहीत. तेव्हा मुंबईत होतो.नेटवरचा माझा वावर चिकाटीचा नव्हता. संपर्क तुटला तर गडबड व्हायची. नंतर घरी येणार्‍या शाळकरी पोरांनी माझ्या नावाने ब्लॉग उघडून ब्लॉगवर चढवले. http://pravaassudhirsange.blogspot.com/ इथे सापडतील. इथे छोट्या गावात तर फार गडबड होते. मी मोबाईलची नेटसेवा वापरतो. मोबाईल खिडकीबाहेर ठेवावा लागतो. पावसाळ्यात पंचाईत होते. महागडा फोन प्लॅस्टीक पिशवीत घालून पावसात ठेवायला धीर होत नाही. ३जी नेट येतेजाते. कधी कासवगतीने चालणारे २जी. मी ते मोबाईलमधून हॉटस्पॉटने लॅपटॉपला संपर्क साधून वापरतो. कधी कधी दोनतीन वेळा मोबाईल आणि लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावरच नेट मिळते. कधीकधी दोनदोन दिवस नेट मिळतच नाही. असो. आपण दाखवलेया स्वारस्याबद्दल धन्यवाद.

कंजूस 03/12/2018 - 15:13
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम होतात? माझे ३जी फोन आणि वोडाफोनची गंडलेली ३जी सेवा याला उत्तर सापडलं. रिलाअन्स वाइफाइ रूटर. अलिबाग, गुजरात, राजस्थानमध्ये आढाच तपासले. पाच एमबीपीएस स्पीड मिळतोच. हजार रुपयाच्या डबीत काम झालं.

कालिकत अणि माहेचे वर्णन चांगले होते.... हे कालिकत आणि कोझीकोडे एकच हे मला देखील ठाउक नव्हते.... माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे अहो , या लेखात जाता जाता मित्रांबरोबर केलेल्या गमती आणि संवाद यांचे वर्णन कमी आहे ,त्यामुळे कदाचित तुम्हाला एकसुरी वाटत आहे... तुमच्या मित्रांची वर्णने आणि संवाद हे कदाचित तुमच्या आधीच्या प्रवासवर्णनातील सामर्थ्य असावे असे वाटते... पण अजून भाग येउद्यात्...छान चाललंय... :)

प्राजु 09/03/2008 - 20:11
कालिकत म्हणजेच कोझिकोडे... वा ज्ञानात भर पडली. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. हे मस्त. मला आमची कोडाईकॅनल ची ट्रीप आठवली. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव 09/03/2008 - 22:38
सुधीरराव असा धीर सोडू नका बुवा. दौरा मस्तच रंगतोय. पुढच्या ठिकाणी जायला आम्ही उत्सुक आहोत तेव्हा पेट्रोल भरून तयार राहा. माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे असे म्हणून आम्हाला तुम्ही पेचात पकडताय. पण आम्ही तुम्हाला इतक्या सुखासुखी सोडणार नाही. पुढची कहाणी लवकरात लवकर पेश करावीत असा 'जनरल डायर' कडून आदेश काढायलाही आम्ही कमी करणार नाही. तेव्हा पुढे काय घडले ते शहाण्या मुलासारखे आम्हाला सांगा बघू.

अनिकेत 10/03/2008 - 00:56
कोझीकोडे हे तर आमचे घर..... येथेच असतो सध्या... माहि (माहे) केंद्रशासित प्रदेश आहे....दारू केरळाहून खूप स्वस्त....जाण्या येण्याचा खर्च सुटेल एवढी... वायनाडला नाही गेलात?? अरेरे..... केरळ... (उसासे) अनिकेत.

अनिकेत 10/03/2008 - 01:16
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते. मुळीच नाही.... पुनःप्रत्ययाचा आनंद येतोय... कालडीला मगरीने पकडल्यानेच आद्य शंकराचार्य संन्यासी बनले.. आणि बौद्धकाळात अद्वैतवाद आणि हिंदू धर्म वाचवला.... ब्राह्मसूत्र शांकरभाष्यात सर्वांचे खंडन केले... येवढ्या लहान वयात संपूर्ण देश कसा काय हिंडले असतील? माझी अजून लोकल पकडायला फाटते... गुरूवायूर miss केलेत? अरेरे... अनिकेत

विसोबा खेचर 10/03/2008 - 08:11
कांदळकरसाहेब, लेखन छान सुरू आहे, ओघवतं होत आहे. वाचायला मौज येते आहे... कृपया पुढील भागही येऊ द्या. नाउमेद होऊ नका. प प्रतिसादांचं राजकारण, अर्थकारण वगैरे कसं करायचं, हे मी तुम्हाला सवडीने शिकवेन. :)) तात्या.

बेसनलाडू 10/03/2008 - 08:36
वर्णन उत्तरोत्तर रंगतंय. वाचत आहोत, लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

धमाल मुलगा 10/03/2008 - 14:21
लय भारी...लय सापडली आहे की काका तुम्हाला. अस॑ का म्हणताय? अहो तुम्ही लिहा हो बिनधास्त. मी आहे ना वाचायला! माणसान॑ कस॑ माझ्यासारख॑ रहाव॑...(राजासारख॑ वाच॑ल॑त का? तस॑ म्हणा हव॑ तर. ) वाटल॑... लिहिल॑... कोणाला आवडल॑ आन॑द वाटतो. नाही आवडल॑, माफ करा म्हणायच॑ पुढे चालू लागायच॑. हे काय भलत॑च बोलताय? आपल्या तर आवडल॑ बॉ. हे असले हाल मी बे॑गळूरला पहिल्या॑दा गेलो होतो तेव्हा सोसले होते. पण आता जमत॑ थोड॑ थोड॑ :) असो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.... -ध मा ल.

अभिज्ञ 10/03/2008 - 20:16
सुधीरजी, वर म्हणाल्य़ाप्रमाणे "लय भारी". मला तर एकसुरि मुळिच वाटले नाही. KEEP IT UP.पुढचे भाग हि लवकर येउ द्यात! (आपल्यासारखाच एक भटक्या )अबब

चतुरंग 10/03/2008 - 20:32
अहो तुमचा अनुभव जसा असेल तसेच प्रतिबिंब लिखाणात येणार, उगीचच ओढूनताणून प्रत्येक भाग नीटनेटकाच असावा असा आग्रह का? तो नैसर्गिक असणे जास्त मजेचे आणि खर्‍या आनंदाचे! वर सतलजने लिहिल्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळीतल्या खुसखुशीत संवादांची फोडणी मात्र जरा कमी पडली, ती तेवढी पुढच्या लेखात वाढवा. बाकी आम्ही वाचतोय काळजी नको. चतुरंग

लिहिले पण नेटवरच्या तांत्रिक अडचणींमुळे चढवता आले नाहीत. तेव्हा मुंबईत होतो.नेटवरचा माझा वावर चिकाटीचा नव्हता. संपर्क तुटला तर गडबड व्हायची. नंतर घरी येणार्‍या शाळकरी पोरांनी माझ्या नावाने ब्लॉग उघडून ब्लॉगवर चढवले. http://pravaassudhirsange.blogspot.com/ इथे सापडतील. इथे छोट्या गावात तर फार गडबड होते. मी मोबाईलची नेटसेवा वापरतो. मोबाईल खिडकीबाहेर ठेवावा लागतो. पावसाळ्यात पंचाईत होते. महागडा फोन प्लॅस्टीक पिशवीत घालून पावसात ठेवायला धीर होत नाही. ३जी नेट येतेजाते. कधी कासवगतीने चालणारे २जी. मी ते मोबाईलमधून हॉटस्पॉटने लॅपटॉपला संपर्क साधून वापरतो. कधी कधी दोनतीन वेळा मोबाईल आणि लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावरच नेट मिळते. कधीकधी दोनदोन दिवस नेट मिळतच नाही. असो. आपण दाखवलेया स्वारस्याबद्दल धन्यवाद.

कंजूस 03/12/2018 - 15:13
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम होतात? माझे ३जी फोन आणि वोडाफोनची गंडलेली ३जी सेवा याला उत्तर सापडलं. रिलाअन्स वाइफाइ रूटर. अलिबाग, गुजरात, राजस्थानमध्ये आढाच तपासले. पाच एमबीपीएस स्पीड मिळतोच. हजार रुपयाच्या डबीत काम झालं.
दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी ४ ऑक्टोबर २०००. मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसाचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. सातसाडेसातला निघालो. आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फ़ा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो.

मला मराठी कविता लिहिणेही आवडते... पण

वडापाव ·

आहे की पुढील साहित्य मराठीत येऊ द्यात. 'आकाश गळण्या'चा नक्की अर्थ कळला नाही. पुढील जाणकार प्रतिसादावरून कळेलच. विचारांनी झोप न लागण्याचा अनुभव मला नाही. त्यामुळे 'माईंड' ही कविता मी समजू शकत नाही. 'द स्काय' ही कविता हुकूमशाहीविरोधि वाटली. याच्या देखील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत अहे. शेख महंमदी स्वप्ने मात्र आवडली. मी पण येतो सूर्य स्पर्शायला.

बुध्दू बैल 09/03/2008 - 15:50
आकाश गळतं म्हणजे पाऊस पडतो कांदळकर साहेब. पुढील साहित्य मराठीत यावे अशी मीही विनंती करतो. बाकी कविता छान आहेत.

In reply to by बुध्दू बैल

कवितेतील पाऊस पडण्याचा अर्थ मी विचारला. कारण मला संपूर्ण कवितेचा अर्थ कळत नाहीयै. अर्धवट अंदाज येतोय.

धनंजय 10/03/2008 - 00:06
तुम्ही इंग्रजीतही लिहिण्याचा सराव जरूर करा, जमल्यास उत्तमोत्तम इंग्रजी कविता वाचा. इंग्रजीत काव्यात्म भाषेची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली आहे, त्यामुळे त्यातली वेगळ्या तर्‍हेची नजाकत वाचकांना आवडू लागली आहे. सरावाने तुमच्या कवितांत तितकेच कौशल्य दिसू लागेल यात शंका नाही. तुमच्या अनुदिनीवर इंग्रजी कविता लिहून येथे त्यांचा दुवा दिल्यास, आम्हाला तुमच्या काव्यलेखनाच्या प्रगतीकडे बघत राहाता येईल. वरील कवितांतल्या भाषेत मराठी लकबींचा प्रभाव दिसतो. याच कवितांचे तुम्ही मराठीत पुनर्लेखन करावे, तुम्हाला उत्तम जमेल, असे वाटते. शंका १ : वरील कवितांची शैली अशी आहे, की या बालकवितांच्या दिशेने झुकलेल्या वाटतात. हा तुमचा हेतू आहे काय? असल्यास ते मनात ठेवून पुन्हा वाचून बघीन. शंका २ : शब्दांची तिहाई करणे ही तुमची खास आवड दिसते. माझ्या मते त्याने रसभंग होतो. तुम्हाला कळकळीने वाटत असेल की रसपोष होतो, तर पुन्हा वाचून बघीन... And On… And On… And On… Oh! My… My… My… Why! Why! Why! (इथे दोहराई, पण त्याच दिशेने जाते...) Except Me And Me

आहे की पुढील साहित्य मराठीत येऊ द्यात. 'आकाश गळण्या'चा नक्की अर्थ कळला नाही. पुढील जाणकार प्रतिसादावरून कळेलच. विचारांनी झोप न लागण्याचा अनुभव मला नाही. त्यामुळे 'माईंड' ही कविता मी समजू शकत नाही. 'द स्काय' ही कविता हुकूमशाहीविरोधि वाटली. याच्या देखील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत अहे. शेख महंमदी स्वप्ने मात्र आवडली. मी पण येतो सूर्य स्पर्शायला.

बुध्दू बैल 09/03/2008 - 15:50
आकाश गळतं म्हणजे पाऊस पडतो कांदळकर साहेब. पुढील साहित्य मराठीत यावे अशी मीही विनंती करतो. बाकी कविता छान आहेत.

In reply to by बुध्दू बैल

कवितेतील पाऊस पडण्याचा अर्थ मी विचारला. कारण मला संपूर्ण कवितेचा अर्थ कळत नाहीयै. अर्धवट अंदाज येतोय.

धनंजय 10/03/2008 - 00:06
तुम्ही इंग्रजीतही लिहिण्याचा सराव जरूर करा, जमल्यास उत्तमोत्तम इंग्रजी कविता वाचा. इंग्रजीत काव्यात्म भाषेची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली आहे, त्यामुळे त्यातली वेगळ्या तर्‍हेची नजाकत वाचकांना आवडू लागली आहे. सरावाने तुमच्या कवितांत तितकेच कौशल्य दिसू लागेल यात शंका नाही. तुमच्या अनुदिनीवर इंग्रजी कविता लिहून येथे त्यांचा दुवा दिल्यास, आम्हाला तुमच्या काव्यलेखनाच्या प्रगतीकडे बघत राहाता येईल. वरील कवितांतल्या भाषेत मराठी लकबींचा प्रभाव दिसतो. याच कवितांचे तुम्ही मराठीत पुनर्लेखन करावे, तुम्हाला उत्तम जमेल, असे वाटते. शंका १ : वरील कवितांची शैली अशी आहे, की या बालकवितांच्या दिशेने झुकलेल्या वाटतात. हा तुमचा हेतू आहे काय? असल्यास ते मनात ठेवून पुन्हा वाचून बघीन. शंका २ : शब्दांची तिहाई करणे ही तुमची खास आवड दिसते. माझ्या मते त्याने रसभंग होतो. तुम्हाला कळकळीने वाटत असेल की रसपोष होतो, तर पुन्हा वाचून बघीन... And On… And On… And On… Oh! My… My… My… Why! Why! Why! (इथे दोहराई, पण त्याच दिशेने जाते...) Except Me And Me
मी मराठीतही कविता लिहितो. विशेषतः मिपावर असताना माझ्या कल्पकशक्तीला प्रोत्साहन मिळते. पण यावेळी नकळतच इंग्रजीत प्रोत्साहन मिळाल्याने ही कविता सादर करतो.