मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सलाम मुंबई!!!

सर्वसाक्षी ·

प्राजु 12/03/2008 - 01:18
मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू! काय राव... छान गाणं ऐकत होते.. पण हे शिर्षक वाचून गाणं थांबवलं आणि वाचू लागले ते... डोळ्यांत पाणी आणलंत ! प्रत्येक मुंबईकराला.. चाकरमान्याला आणि चाकर मानीला माझा सलाम... प्रचंड धैर्य आहे तुमच्यात..! - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 01:39
अंगावर काटा आल रे! मी तेव्हा प्रभादेवीला नौकरी करत होतो. तिथून जवळच वरळीला स्फोट झाले होते. कसाबसा जीव मुठीत धरून तेव्हा आम्ही घरी आलो होतो! तुझ्या या लेखाने त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या! बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. अगदी खरं रे साक्षिदेवा! माझ्यामते दोनवेळची भूकच माणसाला सर्व काही शिकवते हेच खरं! दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती येस्स! एक हाडाचा मुंबईकर म्हणून अभिमानाने सांगू इच्छितो की मी देखील १३ तारखेला सकाळी माझी नेहमीची ८.३२ ची कसारा-व्हीटी डबलफास्ट लोकल पकडली होती. तिला नेहमीप्रमाणेच खच्चून गर्दी होती! असो, लेख उत्तमच आहे रे साक्षिदेवा! कुणी काही म्हटलं तरी मुंबईकरांचं स्पिरिटच वेगळं, उत्साहच वेगळा!! बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:56
सर्वप्रथम , सर्वसाक्षींचे लिखाण त्या दिवसाच्या आथवणी जाग्या करणारे , अगदी साक्षात्कारी स्वरूपाचे आहे हे नमूद करतो. मला वाटते , बाँबस्फोटाच्या दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यामागे असे दिसते की , धैर्य आणि अगतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश मुंबईकर दुसर्‍या दिवशी कामावर गेले ; पण तसे करण्यावाचून त्यांना पर्याय होता का, हेदेखील तपासावे लागेलच. मीदेखील मुंबईकरच आहे आणि मीसुद्धा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो होतो. पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

चतुरंग 12/03/2008 - 03:26
चाकरमानी अशी मुंबई तालावर काट्यांच्या पळते यंत्र असे की माणुस हा? प्रश्नच राहति येत मना ते अतिवृष्टी थैमान असो वा, स्फोटहि अघटित होता ते धावुन येई अशाच वेळी माणुसकीचे महावस्त्र ते विजीगिषा ही बघून जेव्हा जगही सारे थक्कच होते! "सलाम मुंबई!" वदण्यावाचुन शब्दच नाही ओठी ते!! चतुरंग

वरदा 12/03/2008 - 05:18
आला..सगळं पुन्हा काल घडल्यासारखं डोळ्यासमोर आलं..माझे बाबा नरीमन पॉईंटला काम करायचे सकाळी स्टेशन्वर जाऊन आज नाहीच जावसं वाटत म्हणून घरी आले (एरवी संधीवाताने पाय सुजला तरी अंबरनाथहून व्हीटी ला जाणारे काय वाटंलं त्यांना कोण जाणे). ही बुद्धी त्यांना देणार्‍या गणेशाचे कीतीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत. खूप भयंकर होतं सगळंच.... बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! नक्कीच! पण देवा गणेशा खूप भोगलंय मुंबईने... नको रे अजुन संकटं! भिती वाटते विचाराने सुद्धा... पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते. हे खरं...... न जाऊन सांगतो कुणाला.... असो...चांगला लेख... (आता कुठेही असले तरी मनाने कायम मुंबईकर) वरदा

बेसनलाडू 12/03/2008 - 06:47
सुन्न आठवणी. मी त्यावेळेस इयत्ता चौथीत असेन. मित्राच्य आईने शाळेत येऊन आम्हाला दोघांना त्याच्या घरी नेले. दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली वगैरे म्हणजे काय ते त्यावेळी कळायचेही नाही. अशा वेळी शाळा लवकर सुटल्याच्या आनंदात त्याच्या घरी गेलो आणि मोठा माणसांचे चेहरे इतके चिन्ताक्रान्त का, याचा विचार. संध्याकाळी आईबाबा घरी आल्यावर काहीबाही गोष्टी ऐकायला मिळाल्या, मात्र त्यांचे संदर्भ नि अर्थ बरेच वर्षांनी कळले. (स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय 12/03/2008 - 07:08
सर्व लोक हादरले होते. बंद न पडणार्‍या मुंबईचे सर्वांना कौतूक वाटले. मुंबईतील आठवणी शब्दांकित करून आठवणींना उजाळा दिलात.

आठवण अगदी अलिकडची, म्हणजे ११ जुलैच्या बाँबस्फोटाची. त्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मी कंपनीच्या बसमध्ये होते आणि अचानक माणसांचे लोंढे रस्त्यावरून चालताना दिसायला लागले. आम्हाला वाटले, रेल्वेची वीज गेली की काय. घरी आले तर कळले बाँबस्फोट झालेत. माझा भाऊ म्हणाला, पटकन चल. टीव्हीवरून सारखे दाखवतात आहेत की रक्तदान करा. आपण हिंदुजाला (रुग्णालय) जाऊ. हिंदुजाला जाताना जागोजागी लोक वाहतुक नियमन, घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोफत चहा-फराळ, मोफत मोबाईल वापरायला देत होती. काही ठिकाणी तर रिकाम्या जाणार्‍या खाजगी गाड्या जबरदस्तीने थांबवून जबरदस्तीने म्हातारे, स्त्रिया, मुले यांना जायची व्यवस्था करून देत होते. रक्तदान करून येताना विचार केला की माटुंगा अभाविप कार्यालयात जाऊन विचारावे काही मदत हवी का.. हे कार्यालय माटुंगा स्थानकाच्या समोरच आहे. तिथे गेलो तर बघितले की बाँबस्फोटात छिन्नविच्छिन्न गाडीचे डबे बाजूला काढले होते आणि रेल्वे पूर्ववत चालू. हे सर्व अवघ्या २ तासांत. एकच शब्द, "सलाम मुंबई". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:51
सलाम ! मी तसा बराच लहान होतो, आणि मु॑बईतही नव्हतो त्यामुळे ह्या प्रकाराच॑ गा॑भिर्य मी फक्त समजू शकतो, अनुभवाअभावी उमजू नाही शकत. पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. क्या बात है! मु॑बैकरा॑च्या जि॑दादिलीपुढे तिच्याआयला कोहिनूर हिरासुद्धा फिका पडावा ! आम्हाला सवय 'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' अश्या अस्सल पेठी प्रेमाची सवय, आणि २६ जुलैच्या प्रलयात म्हणे, लोक दोरख॑ड घेऊन पाण्यात काय ऊतरले - का तर येणार्‍या जाणार्‍या॑ना पैल गाठता यावा म्हणून. अडकलेल्या लोका॑ना चहा-बिस्किटे काय वाटली - का तर बिचारे उपाशी असतील म्हणून....कोण कुठला,कोण कुठला...माझा जीव जाईल का..माझे पैसे खर्च होतात...कशाचा कशाचा विचार नाही. म्हणूनच मु॑बै परत दुसर्‍या दिवशी उभी राहते..असा माझा कयास आहे. सलाम मु॑बै !!!

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:59
पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. खरं आहे रे धमाल्या! २६ जुलैला मुंबीत अक्षरश: प्रलयच आला होता. या त्याच्या काही भयानक आठवणी -

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ 13/03/2008 - 21:40
'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' आणिबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडुन गरजूंना मदत करण्यासाठी रोज दुपारी घरी जागावे लागत नाही. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सुमीत 12/03/2008 - 12:24
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. असू आम्ही तसे पण कुठल्याही सरकारी मदती शिवाय आम्ही संकटात एकत्र उभे राहतो. उद्धट असू पण माणुसघाणे तरी नक्कीच नाही आहोत.

In reply to by सुमीत

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:40
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. मुंबईकरांना कुठली उपाधी देणारे रीडर डायजेस्टवाले कोण लागून गेले आहेत? आम्ही त्यांना मानत नाही!! गेले बाझवत तिच्यायला!! :) आपला, (सडेतोड मुंबईकर) तात्या.

तुमच्या लेखाने क्षणात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर काटा आला. माझी बहिण तेव्हा रचना ऍकेडमी मध्ये होती.ती आणि तिच्या ४,५ मैत्रीणी कॉलेजच्या जवळच अडकल्या होत्या.एका भल्या टॅक्सीवाल्याने त्या सगळ्यांना आपल्या टॅक्सीतून त्यातील एक जण परळला राहत होती तिच्याकडे सुखरुप पोहोचवले.तिचा घरी फोन येईपर्यंतचा वेळ आम्ही कसा काढला होता आमचे आम्हालाच ठाऊक.. त्याकाळात आणि नंतरही अशा प्रत्येक अस्मानी ,सुलतानी संकटातून सावरून लवकरात लवकर मुंबई परत उभी राहिली.. खरच ,सलाम मुंबई! स्वाती

प्रमोद देव 12/03/2008 - 14:01
त्या दिवशी मी दुपारी दीडच्या सुमारास जिजीभॉय टॉवर्सजवळूनच(मुंशेबा) चर्चगेटला माझ्या कचेरीच्या इमार्तीपाशी आलो तर खालीच मला एकजण भेटला. म्हणाला, "देवसाहेब, कुठून येताय?" मी म्हटले, "आत्ताच शेयरबाजारातून येतोय." तो माझ्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला, "म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत?" मला काहीच कळेना. हा असा का बोलतोय? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली होती. शेयर बाजारात,त्या पाठोपाठ एयर इंडिया इमारत ह्या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने 'बाँबस्फोट' झालेत हे त्याच्याकडून ऐकले आणि माझ्या लक्षात आले की केवळ काही मिनिटांच्या अंतराने मी मृत्युला हुलकावणी देऊन आलो होतो. शेयर बाजाराच्या इमारतीतल्या कार पार्किंगमध्ये बाँबस्फोट झाल्यामुळे मला तो ऐकू येऊ शकलेला नसावा(त्यावेळी मी तिथून बराच दूर असावा बहुदा). माझी उत्सुकता चाळवली आणि मग मी त्याला बरोबर घेऊनच एयर-इंडिया इमारतीच्या दिशेने नरीमन पॉईंटच्या दिशेने कूच केले. तिथे गेलो तर सगळी वाहतूक रोखलेली,पोलिसांनी चहूबाजूंनी कडे केलेले, अग्नीशमनदलाचे जवान देखिल त्यांच्या कामगिरीवर हजर असलेले..... हे सगळे पाहून मी खरोखरच अचंबित झालो. एयर-इंडिया इमारतीत असलेल्या 'बँक ऑफ दुबई' ची तर पार दूर्दशा झालेली होती. आजूबाजूच्या इमारतींच्या काचांचा खच पडलेला होता. पण कुठेही भितीचा लवलेश दिसला नाही. दुसर्‍या दिवसापासूनच मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती. अवांतरः त्या अवस्थेतही कुतुहलाचा एक भाग म्हणून मी एक काचेचा मोठा तुकडा उचलला आणि एका हवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले. तो त्वरेने तिथे आला आणि मला त्यापासून परावृत्त करू लागला. माझ्या मित्राकडे(हा ही हवालदारच होता;पण साध्या कपड्यातला) लक्ष जाताच त्याने त्याला हटकले, " अरे तू इकडे कुठे?" त्यावर त्याने त्या हवालदाराच्या कानात काही तरी सांगितले आणि मग तो हवालदार माझ्याकडे अविश्वासाने बघत बघत आपल्या नेमलेल्या जागी निघून गेला.(त्याने काय सांगितले ते मला नंतर कळले; पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत नाही ह्या बद्दल क्षमस्व) असो. तर मुद्दा तो नाहीये. इथे मी निव्वळ मुंबईकरांचे कौतुक करणार नाहीये. कारण साधारण सगळीकडे हे असेच असते. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी नाही काय म्हटलंय की "शो मस्ट गो ऑन" (कोण तो 'शेक्सपियर,शेक्सपियर' करतोय? अहो "नावात काय आहे?" असे खुद्द समर्थांनी म्हटलंय!!!!) त्याप्रमाणे जन्म-मृत्यु हे चक्र असेच चालत असते आणि अगदी बाबा आदम पासून आपण सगळे हे सगळे पचवलेले आहे. क्षणभर दु:ख/खेद/संताप/राग/लोभ वगैरे जे काही असेल ते व्यक्त करायचे आणि निमुटपणे आपल्या कामाला लागायचे. ह्यालाच म्हणतात 'जीवन'.

साक्षीसेठ, आम्हाला मुंबईची ओळख होते ती दैनिकातून ,मासिके, विविध वाहिन्यांवरुन, आपल्या लेखाने बाँब स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या, त्याच बरोबर अशा घटनांनी मुंबई थबकते ती क्षणभर आणि निमुटपणे आपल्या कामाला लागते ही मुंबैची ओळख कोणाच्याही जगण्याची हिम्मत वाढवते हे मात्र खरे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण दुस-या दिवशी कामावर गेलो होतो. मुंबईकर पोट भरायला घाबरत नाही हो. एक नाही तर छप्पन नोक-या सोडतील. वडापावची गाडी चालवतील, काहिहि चांगले काम करतील व बक्कळ पैसा मिळवतील. पण कमिटमेंट पाळतोच पाळतो. जग उलटे झाले तरीहि. आम्ही दहशवाद इ. समाजविरोधी गोष्टीना कदापि शरण जाणार नाही. एखादा आमच्या हाती लागला तर त्याची धडगत नाही. हात पाय तोडून भीक मागायला बसवीन. किंबहुना दुस-या दिवशी त्याच तयारीने आम्ही कामावर जातो. कायदा काहीहि असो. नेव्हर से डाय. गर्जेल तो पडेल काय हे आमच्या बाबतीत खरे नाही. गर्जेल तो पडेलच. मी २६ जूलै ला १८ कि.मी. चालत आलो. ५४व्या वर्षी. पाणी कापत चालणे सोपे नसते महाराजा. असो. फार पिळले तुम्हाला. राहवले नाही म्हणून लिहिले. क्षमस्व.

सर्वसाक्षी 12/03/2008 - 23:05
मुंबईचा चाकरमान्या अगतिक आहे पण असहाय्य व पराभूत नाही. अगतिक माणसापुढे दोन पर्याय असतात - एक तर हात पाय गाळणे, पळुन जाणे, जीव देणे वा दुसरा परिस्थितीशी आपल्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी दोन हात करणे. मुंबईकरांवर अनेक संकटे आली आणि येतात पण त्याने कधी हात पाय गाळले नाहीत वा पळही काढला नाही. जगात अनेक ठिकाणी संकटाने लोक गर्भगळीत होउन पळत सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा मुंबईकरापुढे धैर्याखेरीज पर्याय नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. अगदी या बाँब स्फोटांचेच उदाहरण घेतले तर सुखाने सगळे मुंबईकर दुसर्‍या दिवशी रजा घेऊन घरी बसले असते व सगळे सुरळीत होईपर्यंत घराबाहेर कशाला पडा असे म्हणत बसू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट उद्या मरायचे तर आजच मरू असे म्हणत सगळे मुंबईकर बेधडक बाहेर पडले. मी आधी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या भुकेवर मात करण्यासाठी आणि आपले जीवन ताठ मानेने जगण्यासाठी मुंबईकर कायम धैर्याने वागत आला आहे आणि असाच हिमतीने वागत राहील.

वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचून मन सुन्नच होते.आणि म्हणावसे वाटते, सलाम मुंबई मुंबईच्या वरील घटनेच्या बातम्या आम्ही पेपरमधेच वाचल्या होत्या त्या आठवणी ताज्या झाल्या.

सन्जोप राव 13/03/2008 - 21:01
मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!" आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहर्‍याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहर्‍याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते. हीच प्रतिक्रिया इतरत्रही लिहिली आहे, क्षमस्व. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

लिखाळ 13/03/2008 - 21:38
संजोप रावांचे हे म्हणणे विचार करायला लावणारे आहे. युद्ध प्रसंगी सामन्य नागरिकाने दाखवायचे धैर्य वेगळे आणि अश्या प्रसंगी. अश्या प्रसंगी मुंबई बंद पडली, लोकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारवर दबाव आणला, दोषी लोकांना शोधायला मदत केली. सर्व वातावरण ढवळून निघाले असे होणे हे जास्त जीवंतपणाचे वाटते. असो. जे लोक अश्या अडचणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करतात त्यांना सलाम. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

कोलबेर 13/03/2008 - 23:45
एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे!
स्फोटांनतर मुंबई पुन्हा कशी कामाला लागली आणि ९/११ नंतर न्युयॉर्क कसे दुसर्‍या दिवशी कामाला लागले ह्याच्या उदत्तीकरणाचा कंटाळा आला आहे. जगात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये (मेट्रो) हे चालते.. त्यात मुंबई काय आणि न्युयॉर्क काय!! लेख/आठवणी आवडल्या हे वे सां न ल. -कोलबेर

हजेरीची अगतिकता फार थोड्या जणांना होती असेल. महिलावर्ग पण कामावर उपस्थित होता. भीति प्रत्येकाच्या मनांत असते. पण कर्तव्य जेव्हा भीतीवर, दहशतीवर मात करते तेव्हा ते कौतुकाला पात्र होतेच. हे मान्य न करणे हा कोतेपणाच म्हणतायेईल.

In reply to by सुधीर कांदळकर

कोलबेर 14/03/2008 - 00:08
आदल्याच दिवशी स्फोट झालेले असताना सलग दुसर्‍या दिवशी स्फोट व्हायची शक्यता आणि झालेच तर दिड कोटी लोकांच्यातील शे दोनशें मृतांमध्ये गणना व्हायचे ऑड्स विचारात घेतले तर एखाद्याची दगावण्याची शक्यता किती आहे? फारच कमी..इतकी कमी की त्यापेक्षा अधिक ऑड्स रस्ता क्रॉस करताना वाहनाने उडवल्याने/ वाहन अपघातात मृत्यू पावण्यामध्ये आहेत..जे की कोणत्याही दिवशी घडू शकते.. आणि जे टाळायला कुणीही काम सोडून घरी बसणार नाही..तेव्हा कामावर रुजु होणे ही आगतिकताही नव्हे की शौर्यही नव्हे..इतके कमी ऑड्स असताना विनाकारण एक रजा का वाया घालवा? हा सारासार हिशोब आहे..जो सगळ्याच्य मोठ्या शहरात केला जातो आणि त्यामूळे मुंबई असो वा न्युयॉर्क आपत्ती नंतर लगेच दुसर्‍या दिवशी काम चालू होते!

सर्वसाक्षी 14/03/2008 - 00:43
मुंबईकरांचे धैर्य मान्य करणे वा नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे/ अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते/ भूकंपानंतर अहमदाबादेत बहुमजली इमारतींमध्ये जागा कुणी घ्यायला तयार नव्हते.. यासारखी अनेक उदाहरणे आहेत. असो, मुंबईकरांचे कौतुक सर्वांनीच करावे अशी अपेक्षा नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कोलबेर 14/03/2008 - 01:01
मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे
ह्याची तुलना मुंबईतील बाँब स्फोटांशी होऊ शकत नाही. मला ह्या खून प्रकरणाची फारशी माहिती नाही... पण समजा एखादा सिरियल किलर दादर/मुलुंड/भांडुप अश्या भागात मुडदे पाडत फिरत असेल तर तो जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत तिथल्या राहिवाश्यांची साधारण प्रतिक्रिया पुण्यातील लोकांपेक्षा फारशी वेगळी असेल का?
अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते
अमेरिकेची (एक देश ह्या अर्थाने) तुलना मुंबई (शहराशी) होऊ शकत नाही. अतिरेकी हल्ले झालेल्या न्युयॉर्क शहराची तुलना मुंबईशी केली तर न्युयॉर्क पुन्हा कसे कामाला लागले ह्याचा उदो उदो सर्वत्र ऐकू येतो. ...तसेच लोकांनी विमानाने जाणे बंद केल होते ते अत्यंत अल्प काळासाठी जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती. काही काळानंतर अमेरिकेतली विमानसेवा आणि मुंबईतली लोकलसेवा दोन्हीही व्यवस्थीत सुरू झाले. बाँबस्फोट हे अतिरेक्यांनी केलेले भ्याड हल्ले असतात. गेल्या काही वर्षात लंडन, माद्रिद, न्युयॉर्क अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हे हल्ले झालेले आहेत.. सगळीकडे साधारण समानच प्रतिक्रिया उमटली.. शॉक-भिती-अफवा-पुनश्च सुरळीत! कुठलेच शहर हात पाय गाळून बसले नाही. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच. शेवटी मानणे वा न मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य!

In reply to by कोलबेर

सर्वसाक्षी 14/03/2008 - 21:04
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच.> मी वास्तव काय ते सांगितले. बाकी हे 'प्रकटन' दिले नसते तरी चालले असते. असो.

In reply to by सर्वसाक्षी

देवदत्त 15/03/2008 - 23:40
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. पूर्णतः सहमत. माझे आणि माझ्या बहिणीचे तर म्हणणे आहे की ज्या लोकल मध्ये बॉम्ब स्फोट झालेत ती चालू ठेवली असती तर लोक त्यातूनही घरी परतले असते. अर्थात ज्यांना घरी जाण्याची जास्त गरज/घाई आहेत ते. इतर मदत करणारे लोक भरपूर आहेत ते थांबतातच मदतीला.

In reply to by सर्वसाक्षी

सचिन 15/03/2008 - 12:01
मुम्बईचा मोठेपणा दाखविण्यासाठी नेहमी पुण्यालाच का टोचावे लागते ? पुणे इतके तुच्छ असेल तर शेकड्याने मुंबईकर पुण्याच्या डहाणूकर मधे फ्लॅट्स का घेत होते ? दुर्दैवाने अशा मोठ्या घटना मुम्बईत घडल्या ,म्हणून त्यानंतरच्या जनसमान्यांच्या प्रतिक्रिया जगाला दिसून आल्या. आणि त्यांना सर्वांना (आम्हीही) सलाम केला, करतो. पुण्यात असे हल्ले झाले नाहीत हा काही पुणेकरांचा गुन्हा ? पानशेतच्या पुराच्या वेळी माझ्या आत्याच्या संपूर्ण कुटुम्बाला शेजारच्यांनी त्यांच्या दुमजली घरातून दोर टाकून वाचविले होते. (अशी अनेक उदाहरणे --पण पेपरात आली नव्हती) रामन राघवन च्या वेळी मुंबईकर काय करीत असत ? अभ्यंकर - जोशी खून प्रकरणाला सुमारे ३० वर्षे झाली...तेव्हा सन्ध्याकाळनंतर पुणे एरवीही शान्तच असे. आणि, अलिकडे पुण्यातही एका बँकेवर अतिरेक्यांनी दरोडा घालायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध करतांना प्राण गमावले. नंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यांना पकडूनही दिले होते. आणि त्यानंतरच "साळुंके विहार" प्रकरण उजेडात आले होते.....असो मुम्बई ईज ग्रेट, याबद्दल आमचेही दुमत नाहीच !! (बाय द वे, लातूर सारख्या दुर्घटनांच्या वेळी लातूरकरांनीही तितकेच धैर्य दाखविले नाही का ?)

देवदत्त 15/03/2008 - 23:35
मी त्यादिवशी घरातच होतो, पण तुमच्या लेखाने ते समोर पाहिले असे वाटतेय. माझी दहावीची परीक्षा सुरू होती. १२ मार्चला इतिहासाचा पेपर झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास झोपून उठल्यावर माझ्या बहिणीचे आणि भावाचे ऐकले की एवढे बॉंम्बस्फोट झालेत. ते नुकतेच बाहेरून परतले होते. संध्याकाळी सातच्या बातम्यात ( की साडेसात?) पूर्ण माहिती मिळाली. रात्रीच्या बातम्यांत सांगितले की दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला आहे. आधीच ३ महिन्यांपुर्वी(डिसे/जाने) झालेल्या दंगलींमुळे थोडीफार भीती होतीच मनात. पण पुढे सर्व सुरळीत चालले. मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. सहमत. आणि हो, काहीतरी आहेच मुंबईत म्हणूनच तर मी ही पुन्हा परत आलोय. :)

शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता. रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते. मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क कल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता. शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर 16/03/2008 - 10:36
शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे. हेच म्हणतो! धन्यवाद कांदळकर साहेब! आपला, (मुंबईकर) तात्या.

प्राजु 12/03/2008 - 01:18
मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू! काय राव... छान गाणं ऐकत होते.. पण हे शिर्षक वाचून गाणं थांबवलं आणि वाचू लागले ते... डोळ्यांत पाणी आणलंत ! प्रत्येक मुंबईकराला.. चाकरमान्याला आणि चाकर मानीला माझा सलाम... प्रचंड धैर्य आहे तुमच्यात..! - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 01:39
अंगावर काटा आल रे! मी तेव्हा प्रभादेवीला नौकरी करत होतो. तिथून जवळच वरळीला स्फोट झाले होते. कसाबसा जीव मुठीत धरून तेव्हा आम्ही घरी आलो होतो! तुझ्या या लेखाने त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या! बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. अगदी खरं रे साक्षिदेवा! माझ्यामते दोनवेळची भूकच माणसाला सर्व काही शिकवते हेच खरं! दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती येस्स! एक हाडाचा मुंबईकर म्हणून अभिमानाने सांगू इच्छितो की मी देखील १३ तारखेला सकाळी माझी नेहमीची ८.३२ ची कसारा-व्हीटी डबलफास्ट लोकल पकडली होती. तिला नेहमीप्रमाणेच खच्चून गर्दी होती! असो, लेख उत्तमच आहे रे साक्षिदेवा! कुणी काही म्हटलं तरी मुंबईकरांचं स्पिरिटच वेगळं, उत्साहच वेगळा!! बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:56
सर्वप्रथम , सर्वसाक्षींचे लिखाण त्या दिवसाच्या आथवणी जाग्या करणारे , अगदी साक्षात्कारी स्वरूपाचे आहे हे नमूद करतो. मला वाटते , बाँबस्फोटाच्या दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यामागे असे दिसते की , धैर्य आणि अगतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश मुंबईकर दुसर्‍या दिवशी कामावर गेले ; पण तसे करण्यावाचून त्यांना पर्याय होता का, हेदेखील तपासावे लागेलच. मीदेखील मुंबईकरच आहे आणि मीसुद्धा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो होतो. पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

चतुरंग 12/03/2008 - 03:26
चाकरमानी अशी मुंबई तालावर काट्यांच्या पळते यंत्र असे की माणुस हा? प्रश्नच राहति येत मना ते अतिवृष्टी थैमान असो वा, स्फोटहि अघटित होता ते धावुन येई अशाच वेळी माणुसकीचे महावस्त्र ते विजीगिषा ही बघून जेव्हा जगही सारे थक्कच होते! "सलाम मुंबई!" वदण्यावाचुन शब्दच नाही ओठी ते!! चतुरंग

वरदा 12/03/2008 - 05:18
आला..सगळं पुन्हा काल घडल्यासारखं डोळ्यासमोर आलं..माझे बाबा नरीमन पॉईंटला काम करायचे सकाळी स्टेशन्वर जाऊन आज नाहीच जावसं वाटत म्हणून घरी आले (एरवी संधीवाताने पाय सुजला तरी अंबरनाथहून व्हीटी ला जाणारे काय वाटंलं त्यांना कोण जाणे). ही बुद्धी त्यांना देणार्‍या गणेशाचे कीतीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत. खूप भयंकर होतं सगळंच.... बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! नक्कीच! पण देवा गणेशा खूप भोगलंय मुंबईने... नको रे अजुन संकटं! भिती वाटते विचाराने सुद्धा... पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते. हे खरं...... न जाऊन सांगतो कुणाला.... असो...चांगला लेख... (आता कुठेही असले तरी मनाने कायम मुंबईकर) वरदा

बेसनलाडू 12/03/2008 - 06:47
सुन्न आठवणी. मी त्यावेळेस इयत्ता चौथीत असेन. मित्राच्य आईने शाळेत येऊन आम्हाला दोघांना त्याच्या घरी नेले. दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली वगैरे म्हणजे काय ते त्यावेळी कळायचेही नाही. अशा वेळी शाळा लवकर सुटल्याच्या आनंदात त्याच्या घरी गेलो आणि मोठा माणसांचे चेहरे इतके चिन्ताक्रान्त का, याचा विचार. संध्याकाळी आईबाबा घरी आल्यावर काहीबाही गोष्टी ऐकायला मिळाल्या, मात्र त्यांचे संदर्भ नि अर्थ बरेच वर्षांनी कळले. (स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय 12/03/2008 - 07:08
सर्व लोक हादरले होते. बंद न पडणार्‍या मुंबईचे सर्वांना कौतूक वाटले. मुंबईतील आठवणी शब्दांकित करून आठवणींना उजाळा दिलात.

आठवण अगदी अलिकडची, म्हणजे ११ जुलैच्या बाँबस्फोटाची. त्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मी कंपनीच्या बसमध्ये होते आणि अचानक माणसांचे लोंढे रस्त्यावरून चालताना दिसायला लागले. आम्हाला वाटले, रेल्वेची वीज गेली की काय. घरी आले तर कळले बाँबस्फोट झालेत. माझा भाऊ म्हणाला, पटकन चल. टीव्हीवरून सारखे दाखवतात आहेत की रक्तदान करा. आपण हिंदुजाला (रुग्णालय) जाऊ. हिंदुजाला जाताना जागोजागी लोक वाहतुक नियमन, घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोफत चहा-फराळ, मोफत मोबाईल वापरायला देत होती. काही ठिकाणी तर रिकाम्या जाणार्‍या खाजगी गाड्या जबरदस्तीने थांबवून जबरदस्तीने म्हातारे, स्त्रिया, मुले यांना जायची व्यवस्था करून देत होते. रक्तदान करून येताना विचार केला की माटुंगा अभाविप कार्यालयात जाऊन विचारावे काही मदत हवी का.. हे कार्यालय माटुंगा स्थानकाच्या समोरच आहे. तिथे गेलो तर बघितले की बाँबस्फोटात छिन्नविच्छिन्न गाडीचे डबे बाजूला काढले होते आणि रेल्वे पूर्ववत चालू. हे सर्व अवघ्या २ तासांत. एकच शब्द, "सलाम मुंबई". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:51
सलाम ! मी तसा बराच लहान होतो, आणि मु॑बईतही नव्हतो त्यामुळे ह्या प्रकाराच॑ गा॑भिर्य मी फक्त समजू शकतो, अनुभवाअभावी उमजू नाही शकत. पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. क्या बात है! मु॑बैकरा॑च्या जि॑दादिलीपुढे तिच्याआयला कोहिनूर हिरासुद्धा फिका पडावा ! आम्हाला सवय 'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' अश्या अस्सल पेठी प्रेमाची सवय, आणि २६ जुलैच्या प्रलयात म्हणे, लोक दोरख॑ड घेऊन पाण्यात काय ऊतरले - का तर येणार्‍या जाणार्‍या॑ना पैल गाठता यावा म्हणून. अडकलेल्या लोका॑ना चहा-बिस्किटे काय वाटली - का तर बिचारे उपाशी असतील म्हणून....कोण कुठला,कोण कुठला...माझा जीव जाईल का..माझे पैसे खर्च होतात...कशाचा कशाचा विचार नाही. म्हणूनच मु॑बै परत दुसर्‍या दिवशी उभी राहते..असा माझा कयास आहे. सलाम मु॑बै !!!

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:59
पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. खरं आहे रे धमाल्या! २६ जुलैला मुंबीत अक्षरश: प्रलयच आला होता. या त्याच्या काही भयानक आठवणी -

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ 13/03/2008 - 21:40
'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' आणिबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडुन गरजूंना मदत करण्यासाठी रोज दुपारी घरी जागावे लागत नाही. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सुमीत 12/03/2008 - 12:24
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. असू आम्ही तसे पण कुठल्याही सरकारी मदती शिवाय आम्ही संकटात एकत्र उभे राहतो. उद्धट असू पण माणुसघाणे तरी नक्कीच नाही आहोत.

In reply to by सुमीत

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:40
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. मुंबईकरांना कुठली उपाधी देणारे रीडर डायजेस्टवाले कोण लागून गेले आहेत? आम्ही त्यांना मानत नाही!! गेले बाझवत तिच्यायला!! :) आपला, (सडेतोड मुंबईकर) तात्या.

तुमच्या लेखाने क्षणात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर काटा आला. माझी बहिण तेव्हा रचना ऍकेडमी मध्ये होती.ती आणि तिच्या ४,५ मैत्रीणी कॉलेजच्या जवळच अडकल्या होत्या.एका भल्या टॅक्सीवाल्याने त्या सगळ्यांना आपल्या टॅक्सीतून त्यातील एक जण परळला राहत होती तिच्याकडे सुखरुप पोहोचवले.तिचा घरी फोन येईपर्यंतचा वेळ आम्ही कसा काढला होता आमचे आम्हालाच ठाऊक.. त्याकाळात आणि नंतरही अशा प्रत्येक अस्मानी ,सुलतानी संकटातून सावरून लवकरात लवकर मुंबई परत उभी राहिली.. खरच ,सलाम मुंबई! स्वाती

प्रमोद देव 12/03/2008 - 14:01
त्या दिवशी मी दुपारी दीडच्या सुमारास जिजीभॉय टॉवर्सजवळूनच(मुंशेबा) चर्चगेटला माझ्या कचेरीच्या इमार्तीपाशी आलो तर खालीच मला एकजण भेटला. म्हणाला, "देवसाहेब, कुठून येताय?" मी म्हटले, "आत्ताच शेयरबाजारातून येतोय." तो माझ्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला, "म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत?" मला काहीच कळेना. हा असा का बोलतोय? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली होती. शेयर बाजारात,त्या पाठोपाठ एयर इंडिया इमारत ह्या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने 'बाँबस्फोट' झालेत हे त्याच्याकडून ऐकले आणि माझ्या लक्षात आले की केवळ काही मिनिटांच्या अंतराने मी मृत्युला हुलकावणी देऊन आलो होतो. शेयर बाजाराच्या इमारतीतल्या कार पार्किंगमध्ये बाँबस्फोट झाल्यामुळे मला तो ऐकू येऊ शकलेला नसावा(त्यावेळी मी तिथून बराच दूर असावा बहुदा). माझी उत्सुकता चाळवली आणि मग मी त्याला बरोबर घेऊनच एयर-इंडिया इमारतीच्या दिशेने नरीमन पॉईंटच्या दिशेने कूच केले. तिथे गेलो तर सगळी वाहतूक रोखलेली,पोलिसांनी चहूबाजूंनी कडे केलेले, अग्नीशमनदलाचे जवान देखिल त्यांच्या कामगिरीवर हजर असलेले..... हे सगळे पाहून मी खरोखरच अचंबित झालो. एयर-इंडिया इमारतीत असलेल्या 'बँक ऑफ दुबई' ची तर पार दूर्दशा झालेली होती. आजूबाजूच्या इमारतींच्या काचांचा खच पडलेला होता. पण कुठेही भितीचा लवलेश दिसला नाही. दुसर्‍या दिवसापासूनच मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती. अवांतरः त्या अवस्थेतही कुतुहलाचा एक भाग म्हणून मी एक काचेचा मोठा तुकडा उचलला आणि एका हवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले. तो त्वरेने तिथे आला आणि मला त्यापासून परावृत्त करू लागला. माझ्या मित्राकडे(हा ही हवालदारच होता;पण साध्या कपड्यातला) लक्ष जाताच त्याने त्याला हटकले, " अरे तू इकडे कुठे?" त्यावर त्याने त्या हवालदाराच्या कानात काही तरी सांगितले आणि मग तो हवालदार माझ्याकडे अविश्वासाने बघत बघत आपल्या नेमलेल्या जागी निघून गेला.(त्याने काय सांगितले ते मला नंतर कळले; पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत नाही ह्या बद्दल क्षमस्व) असो. तर मुद्दा तो नाहीये. इथे मी निव्वळ मुंबईकरांचे कौतुक करणार नाहीये. कारण साधारण सगळीकडे हे असेच असते. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी नाही काय म्हटलंय की "शो मस्ट गो ऑन" (कोण तो 'शेक्सपियर,शेक्सपियर' करतोय? अहो "नावात काय आहे?" असे खुद्द समर्थांनी म्हटलंय!!!!) त्याप्रमाणे जन्म-मृत्यु हे चक्र असेच चालत असते आणि अगदी बाबा आदम पासून आपण सगळे हे सगळे पचवलेले आहे. क्षणभर दु:ख/खेद/संताप/राग/लोभ वगैरे जे काही असेल ते व्यक्त करायचे आणि निमुटपणे आपल्या कामाला लागायचे. ह्यालाच म्हणतात 'जीवन'.

साक्षीसेठ, आम्हाला मुंबईची ओळख होते ती दैनिकातून ,मासिके, विविध वाहिन्यांवरुन, आपल्या लेखाने बाँब स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या, त्याच बरोबर अशा घटनांनी मुंबई थबकते ती क्षणभर आणि निमुटपणे आपल्या कामाला लागते ही मुंबैची ओळख कोणाच्याही जगण्याची हिम्मत वाढवते हे मात्र खरे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण दुस-या दिवशी कामावर गेलो होतो. मुंबईकर पोट भरायला घाबरत नाही हो. एक नाही तर छप्पन नोक-या सोडतील. वडापावची गाडी चालवतील, काहिहि चांगले काम करतील व बक्कळ पैसा मिळवतील. पण कमिटमेंट पाळतोच पाळतो. जग उलटे झाले तरीहि. आम्ही दहशवाद इ. समाजविरोधी गोष्टीना कदापि शरण जाणार नाही. एखादा आमच्या हाती लागला तर त्याची धडगत नाही. हात पाय तोडून भीक मागायला बसवीन. किंबहुना दुस-या दिवशी त्याच तयारीने आम्ही कामावर जातो. कायदा काहीहि असो. नेव्हर से डाय. गर्जेल तो पडेल काय हे आमच्या बाबतीत खरे नाही. गर्जेल तो पडेलच. मी २६ जूलै ला १८ कि.मी. चालत आलो. ५४व्या वर्षी. पाणी कापत चालणे सोपे नसते महाराजा. असो. फार पिळले तुम्हाला. राहवले नाही म्हणून लिहिले. क्षमस्व.

सर्वसाक्षी 12/03/2008 - 23:05
मुंबईचा चाकरमान्या अगतिक आहे पण असहाय्य व पराभूत नाही. अगतिक माणसापुढे दोन पर्याय असतात - एक तर हात पाय गाळणे, पळुन जाणे, जीव देणे वा दुसरा परिस्थितीशी आपल्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी दोन हात करणे. मुंबईकरांवर अनेक संकटे आली आणि येतात पण त्याने कधी हात पाय गाळले नाहीत वा पळही काढला नाही. जगात अनेक ठिकाणी संकटाने लोक गर्भगळीत होउन पळत सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा मुंबईकरापुढे धैर्याखेरीज पर्याय नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. अगदी या बाँब स्फोटांचेच उदाहरण घेतले तर सुखाने सगळे मुंबईकर दुसर्‍या दिवशी रजा घेऊन घरी बसले असते व सगळे सुरळीत होईपर्यंत घराबाहेर कशाला पडा असे म्हणत बसू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट उद्या मरायचे तर आजच मरू असे म्हणत सगळे मुंबईकर बेधडक बाहेर पडले. मी आधी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या भुकेवर मात करण्यासाठी आणि आपले जीवन ताठ मानेने जगण्यासाठी मुंबईकर कायम धैर्याने वागत आला आहे आणि असाच हिमतीने वागत राहील.

वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचून मन सुन्नच होते.आणि म्हणावसे वाटते, सलाम मुंबई मुंबईच्या वरील घटनेच्या बातम्या आम्ही पेपरमधेच वाचल्या होत्या त्या आठवणी ताज्या झाल्या.

सन्जोप राव 13/03/2008 - 21:01
मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!" आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहर्‍याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहर्‍याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते. हीच प्रतिक्रिया इतरत्रही लिहिली आहे, क्षमस्व. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

लिखाळ 13/03/2008 - 21:38
संजोप रावांचे हे म्हणणे विचार करायला लावणारे आहे. युद्ध प्रसंगी सामन्य नागरिकाने दाखवायचे धैर्य वेगळे आणि अश्या प्रसंगी. अश्या प्रसंगी मुंबई बंद पडली, लोकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारवर दबाव आणला, दोषी लोकांना शोधायला मदत केली. सर्व वातावरण ढवळून निघाले असे होणे हे जास्त जीवंतपणाचे वाटते. असो. जे लोक अश्या अडचणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करतात त्यांना सलाम. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

कोलबेर 13/03/2008 - 23:45
एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे!
स्फोटांनतर मुंबई पुन्हा कशी कामाला लागली आणि ९/११ नंतर न्युयॉर्क कसे दुसर्‍या दिवशी कामाला लागले ह्याच्या उदत्तीकरणाचा कंटाळा आला आहे. जगात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये (मेट्रो) हे चालते.. त्यात मुंबई काय आणि न्युयॉर्क काय!! लेख/आठवणी आवडल्या हे वे सां न ल. -कोलबेर

हजेरीची अगतिकता फार थोड्या जणांना होती असेल. महिलावर्ग पण कामावर उपस्थित होता. भीति प्रत्येकाच्या मनांत असते. पण कर्तव्य जेव्हा भीतीवर, दहशतीवर मात करते तेव्हा ते कौतुकाला पात्र होतेच. हे मान्य न करणे हा कोतेपणाच म्हणतायेईल.

In reply to by सुधीर कांदळकर

कोलबेर 14/03/2008 - 00:08
आदल्याच दिवशी स्फोट झालेले असताना सलग दुसर्‍या दिवशी स्फोट व्हायची शक्यता आणि झालेच तर दिड कोटी लोकांच्यातील शे दोनशें मृतांमध्ये गणना व्हायचे ऑड्स विचारात घेतले तर एखाद्याची दगावण्याची शक्यता किती आहे? फारच कमी..इतकी कमी की त्यापेक्षा अधिक ऑड्स रस्ता क्रॉस करताना वाहनाने उडवल्याने/ वाहन अपघातात मृत्यू पावण्यामध्ये आहेत..जे की कोणत्याही दिवशी घडू शकते.. आणि जे टाळायला कुणीही काम सोडून घरी बसणार नाही..तेव्हा कामावर रुजु होणे ही आगतिकताही नव्हे की शौर्यही नव्हे..इतके कमी ऑड्स असताना विनाकारण एक रजा का वाया घालवा? हा सारासार हिशोब आहे..जो सगळ्याच्य मोठ्या शहरात केला जातो आणि त्यामूळे मुंबई असो वा न्युयॉर्क आपत्ती नंतर लगेच दुसर्‍या दिवशी काम चालू होते!

सर्वसाक्षी 14/03/2008 - 00:43
मुंबईकरांचे धैर्य मान्य करणे वा नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे/ अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते/ भूकंपानंतर अहमदाबादेत बहुमजली इमारतींमध्ये जागा कुणी घ्यायला तयार नव्हते.. यासारखी अनेक उदाहरणे आहेत. असो, मुंबईकरांचे कौतुक सर्वांनीच करावे अशी अपेक्षा नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कोलबेर 14/03/2008 - 01:01
मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे
ह्याची तुलना मुंबईतील बाँब स्फोटांशी होऊ शकत नाही. मला ह्या खून प्रकरणाची फारशी माहिती नाही... पण समजा एखादा सिरियल किलर दादर/मुलुंड/भांडुप अश्या भागात मुडदे पाडत फिरत असेल तर तो जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत तिथल्या राहिवाश्यांची साधारण प्रतिक्रिया पुण्यातील लोकांपेक्षा फारशी वेगळी असेल का?
अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते
अमेरिकेची (एक देश ह्या अर्थाने) तुलना मुंबई (शहराशी) होऊ शकत नाही. अतिरेकी हल्ले झालेल्या न्युयॉर्क शहराची तुलना मुंबईशी केली तर न्युयॉर्क पुन्हा कसे कामाला लागले ह्याचा उदो उदो सर्वत्र ऐकू येतो. ...तसेच लोकांनी विमानाने जाणे बंद केल होते ते अत्यंत अल्प काळासाठी जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती. काही काळानंतर अमेरिकेतली विमानसेवा आणि मुंबईतली लोकलसेवा दोन्हीही व्यवस्थीत सुरू झाले. बाँबस्फोट हे अतिरेक्यांनी केलेले भ्याड हल्ले असतात. गेल्या काही वर्षात लंडन, माद्रिद, न्युयॉर्क अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हे हल्ले झालेले आहेत.. सगळीकडे साधारण समानच प्रतिक्रिया उमटली.. शॉक-भिती-अफवा-पुनश्च सुरळीत! कुठलेच शहर हात पाय गाळून बसले नाही. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच. शेवटी मानणे वा न मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य!

In reply to by कोलबेर

सर्वसाक्षी 14/03/2008 - 21:04
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच.> मी वास्तव काय ते सांगितले. बाकी हे 'प्रकटन' दिले नसते तरी चालले असते. असो.

In reply to by सर्वसाक्षी

देवदत्त 15/03/2008 - 23:40
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. पूर्णतः सहमत. माझे आणि माझ्या बहिणीचे तर म्हणणे आहे की ज्या लोकल मध्ये बॉम्ब स्फोट झालेत ती चालू ठेवली असती तर लोक त्यातूनही घरी परतले असते. अर्थात ज्यांना घरी जाण्याची जास्त गरज/घाई आहेत ते. इतर मदत करणारे लोक भरपूर आहेत ते थांबतातच मदतीला.

In reply to by सर्वसाक्षी

सचिन 15/03/2008 - 12:01
मुम्बईचा मोठेपणा दाखविण्यासाठी नेहमी पुण्यालाच का टोचावे लागते ? पुणे इतके तुच्छ असेल तर शेकड्याने मुंबईकर पुण्याच्या डहाणूकर मधे फ्लॅट्स का घेत होते ? दुर्दैवाने अशा मोठ्या घटना मुम्बईत घडल्या ,म्हणून त्यानंतरच्या जनसमान्यांच्या प्रतिक्रिया जगाला दिसून आल्या. आणि त्यांना सर्वांना (आम्हीही) सलाम केला, करतो. पुण्यात असे हल्ले झाले नाहीत हा काही पुणेकरांचा गुन्हा ? पानशेतच्या पुराच्या वेळी माझ्या आत्याच्या संपूर्ण कुटुम्बाला शेजारच्यांनी त्यांच्या दुमजली घरातून दोर टाकून वाचविले होते. (अशी अनेक उदाहरणे --पण पेपरात आली नव्हती) रामन राघवन च्या वेळी मुंबईकर काय करीत असत ? अभ्यंकर - जोशी खून प्रकरणाला सुमारे ३० वर्षे झाली...तेव्हा सन्ध्याकाळनंतर पुणे एरवीही शान्तच असे. आणि, अलिकडे पुण्यातही एका बँकेवर अतिरेक्यांनी दरोडा घालायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध करतांना प्राण गमावले. नंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यांना पकडूनही दिले होते. आणि त्यानंतरच "साळुंके विहार" प्रकरण उजेडात आले होते.....असो मुम्बई ईज ग्रेट, याबद्दल आमचेही दुमत नाहीच !! (बाय द वे, लातूर सारख्या दुर्घटनांच्या वेळी लातूरकरांनीही तितकेच धैर्य दाखविले नाही का ?)

देवदत्त 15/03/2008 - 23:35
मी त्यादिवशी घरातच होतो, पण तुमच्या लेखाने ते समोर पाहिले असे वाटतेय. माझी दहावीची परीक्षा सुरू होती. १२ मार्चला इतिहासाचा पेपर झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास झोपून उठल्यावर माझ्या बहिणीचे आणि भावाचे ऐकले की एवढे बॉंम्बस्फोट झालेत. ते नुकतेच बाहेरून परतले होते. संध्याकाळी सातच्या बातम्यात ( की साडेसात?) पूर्ण माहिती मिळाली. रात्रीच्या बातम्यांत सांगितले की दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला आहे. आधीच ३ महिन्यांपुर्वी(डिसे/जाने) झालेल्या दंगलींमुळे थोडीफार भीती होतीच मनात. पण पुढे सर्व सुरळीत चालले. मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. सहमत. आणि हो, काहीतरी आहेच मुंबईत म्हणूनच तर मी ही पुन्हा परत आलोय. :)

शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता. रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते. मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क कल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता. शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर 16/03/2008 - 10:36
शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे. हेच म्हणतो! धन्यवाद कांदळकर साहेब! आपला, (मुंबईकर) तात्या.
आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला उद्या पंधरा वर्षे होतील. पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो.

अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला

धोंडोपंत ·

केशवसुमार 11/03/2008 - 22:21
पंत.. झकास लेख.. उस्तुक्ता मस्त ताणली आहे.. उद्या लगेच पुढचा भाग टाका.. नाहितर डोस्क्याचा भुगा होईल.. (हौराण)केशवसुमार

छोटा डॉन 11/03/2008 - 22:58
च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं... [ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?] हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर 12/03/2008 - 00:42
धोंड्या, सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस! तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!" हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं! कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय! पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही... अवांतर - मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी. सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :) तुझा, तात्या.

बेसनलाडू 12/03/2008 - 06:49
उत्कंठा लावून ठेवणारे चित्रण. पुढचे भाग लवकर येऊ द्यात. (वाचनोत्सुक)बेसनलाडू

चतुरंग 12/03/2008 - 08:03
हे असं वाचून कसं वाटलं सांगू? लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत. आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":( अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:) चतुरंग

दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी. अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात. दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली. फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:50
धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्‍याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :) मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :) पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं! असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा! माझ्या मते त्यामुळे लिहिणार्‍या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही! आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :) असो... आपला, (सुसंबद्ध!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्‍या भागात. दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती). अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:05
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा! आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :) एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल! असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. कबूल आहे... त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे... असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे... धन्यवाद... तात्या.

मनस्वी 12/03/2008 - 10:09
धोंडोपंत - पहिला भाग आवडला. ज्या frequency ने तुम्हाला "तो" इसम दिसला, त्याच frequency ने पुढचे भाग येउद्यात. मनस्वी

मनस्वी 12/03/2008 - 11:24
धोंडोपंत ज्यांना अस्वस्थ आणि कंटाळवाणे वाटते त्यांसाठी २रा भाग लवकर येउद्यात. असे हलकेफुलके वाचून मन प्रफुल्लित होते. :) (प्रफुल्लित) मनस्वी

केशवसुमार 11/03/2008 - 22:21
पंत.. झकास लेख.. उस्तुक्ता मस्त ताणली आहे.. उद्या लगेच पुढचा भाग टाका.. नाहितर डोस्क्याचा भुगा होईल.. (हौराण)केशवसुमार

छोटा डॉन 11/03/2008 - 22:58
च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं... [ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?] हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर 12/03/2008 - 00:42
धोंड्या, सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस! तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!" हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं! कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय! पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही... अवांतर - मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी. सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :) तुझा, तात्या.

बेसनलाडू 12/03/2008 - 06:49
उत्कंठा लावून ठेवणारे चित्रण. पुढचे भाग लवकर येऊ द्यात. (वाचनोत्सुक)बेसनलाडू

चतुरंग 12/03/2008 - 08:03
हे असं वाचून कसं वाटलं सांगू? लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत. आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":( अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:) चतुरंग

दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी. अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात. दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली. फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:50
धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्‍याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :) मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :) पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं! असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा! माझ्या मते त्यामुळे लिहिणार्‍या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही! आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :) असो... आपला, (सुसंबद्ध!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्‍या भागात. दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती). अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:05
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा! आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :) एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल! असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. कबूल आहे... त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे... असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे... धन्यवाद... तात्या.

मनस्वी 12/03/2008 - 10:09
धोंडोपंत - पहिला भाग आवडला. ज्या frequency ने तुम्हाला "तो" इसम दिसला, त्याच frequency ने पुढचे भाग येउद्यात. मनस्वी

मनस्वी 12/03/2008 - 11:24
धोंडोपंत ज्यांना अस्वस्थ आणि कंटाळवाणे वाटते त्यांसाठी २रा भाग लवकर येउद्यात. असे हलकेफुलके वाचून मन प्रफुल्लित होते. :) (प्रफुल्लित) मनस्वी
लेखनविषय:
3

धर्मवीर संभाजी महाराज - संस्मरण

शेखर ·

सन्जोप राव 11/03/2008 - 18:43
इतिहास, पुराणपुरुष, संस्कृतीरक्षक, परमपूज्य आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त यांच्यामुळे वगैरे सर्व- मग तिथे या संभाजी महाराजांपासून सांगलीत नक्षलवाद पसरवणार्‍या संभाजीराजांपर्यंत - आंणि त्यांची कवने गाणार्‍या सगळ्यांना कमरेपासून लवून कुर्निसात आणि शिरवाडकरांच्या चार ओळी- इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा कर पदस्थल त्यांचे आणिक चढुनि त्यावर भविष्य वाचा सन्जोप राव

देश, धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था| परमप्रतापी महातेजस्वी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्याचे पेशवे

सागर 11/03/2008 - 21:27
छत्रपति संभाजी महाराजांना माझ्या एका मित्राकडून छोटासा मुजरा - सागर "आज ११ मार्च... छत्रपति संभाजी महाराज यांची ३१९ वी पुण्यतिथी ....आजच्याच दिवशी १६८९ साली क्रूर औरंगजेबाने अमानुष पद्धतीने त्यांना ठार मारले... ... मरण स्वीकारले पण धर्म बुडू नाही दिला अशा या शूरवीर छत्रपति संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम - उदय गंगाधर सप्रे, ठाणे" संभाजीराजे-१ संभाजीराजे-२

प्राजु 12/03/2008 - 01:06
"या या शिवपुत्र संभाजीला मरणाची भिती??? अरे... या संभाजीच्या आरोळ्या सोड पण त्याच्या श्वासांचा आवाज सुद्धा तुला ऐकू येणार नाही" असे औरंगजेबाला निक्षून सांगणारा छावा एकदाच जन्मतो.. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:40
धाकल्या महाराजा॑च्या पायाशी ह्या मावळ्याचा त्रिवार मुजरा !!! श्री.श॑भुराजे म्हणजे खरा शेर! केवळ त्या॑च॑ आणि स्वराज्याच॑ दुर्दैव आडव॑ आल॑, म्हणून वरना...खाली जि॑जीपर्य॑त पोहोचलेली हि॑दवी स्वराज्यसीमा वर दिल्लीच्या ऐय्याश तक्ख्ताला फोडून नक्कीच अटकेपर्य॑त पोहोचली असती. हलकट और॑ग्याच्या प्रत्येक छळाला अस्सल म्हराठमोळ्या मुजोरीन॑ हसत स्विकारुन त्याला हतबुद्ध करणार्‍या श॑भुराजा॑चे चरणि प्रणाम. सागर, सप्रे॑च्या 'झ॑झावात' ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव. धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

सागर 12/03/2008 - 14:49
धमालराव देशमुख-पाटील, माझा मित्र उदय सप्रे हा शिवरायांच्या इतिहासाने भारुन गेलेला एक उत्तम लेखक आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा असूनही त्याची आणि माझी मैत्री आहे.... हा त्याचा मोठेपणा आहे. लवकरच उदयच्या "झंझावाता"ने अवघे मराठी साहित्यविश्व शिवकालीन होऊन जाईन याची खात्री वाटते... लवकरच माझा मित्र उदय "झंझावात"चा हा संकल्प पूर्ण करेन याची खात्री आहे .... - सागर

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:42
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. शंभूराजांना माझेही वंदन! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.

कलंत्री 12/03/2008 - 19:39
संभाजी महाराज यांच्या आत्मसमर्पणाची आठवण ताजी आहे हे पाहुन बरे वाटले. पण यांच्या आत्मार्पणाची तिथी ही पाडव्याच्या पहिल्या दिवशी पाळायला हवी. औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली पण, बाकी रोमांचकारक सविस्तर नंतर, तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. असो.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर 12/03/2008 - 23:56
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. का? आज पाळली म्हणून बिधडलं कुठे? आदराची भावना त्यामुळे थोडीच कमी होणार आहे?? व्यंकटराव म्हणतात ते योग्यच आहे. आपण मंडळी अजूनपर्यंत तारखा-तिथ्यातच अडकलेली आहोत! अर्थात, या निमित्ताने शंभूराजांचे पुष्यस्मरण करून त्यांची शूर आणि दिलेरी वृत्ती अंगी बाणवायची की तारखा तिथ्यांच्या वादात आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत बसायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे! तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. मिपाला तरी ही सूचना पाळणे आवडणार नाही. कारण एखाद्या दिलेर राजाची पुण्यतिथी वर्षातनं दोन दोनदा पाळणे हे मिपा हास्यास्पद, तसेच एक पोरखेळ समजते! आणि कुठल्याही पवित्र गोष्टीचा पोरखेळ होता कामा नये असेही मिपाला वाटते. शंभूराजे हा पोरखेळाचा विषय नक्कीच नाही! हे मिपाचं मत झालं! अर्थात, त्यातूनही एखाद्याने अगदी हट्टाने पाडव्याच्या पहिल्या दिवशीदेखील मिसळपाववर शंभूराजांचे पुण्यस्मरण केले तरी मिपाकरता ते आदरणीयच असेल. कारण मुळात मिपाला शंभूराजांच्या मृत्युच्या तारखेशी अथवा तिथीशी मतलब नसून त्यांच्यातल्या शूर, दिलेर आणि धाडसी वृत्तीशी मतलब आहे! असो.. आपला, (व्यथित) तात्या.

In reply to by कलंत्री

पाडव्याच्या पहिल्या दिवशी ?? ह्यातला पहिला दिवशी हे कळले नाही. चैत्र शुध्द प्रतिपदा- गुढीपाडवा. तो एकच दिवस साजरा केला जातो ना?

उदय सप्रे 13/03/2008 - 12:25
"औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली " हे अर्धवट सत्य आहे. खरी तिथी फाल्गुन वद्य अमावास्या अशी आहे.आणि ज्या राजाने आपली प्रजा सुखेनैव नान्दण्यासाठी आत्मसमर्पण केले त्या वीर राजाची आठवण पाडव्याला करणे हे पण योग्यच आहे.पण आपण सगळे आता मराठी पन्चान्ग पाळतो का? रोजचा दिनान्क पण मार्च १४ , २००८ असाच लिहितो ना? पाठ्यपुस्तकात पण असेच सन आणि सनावळ्या देतात - सामान्य जनतेला लक्षात राहील असे दिनान्क देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तसे लिहिले होते. असो, सूचना मान्य-मा़झ्यापुरती - कारण मी ऐतिहासिक कादन्बरी लिहितोय आणि मला या तिथी माहित आहेत, मी पाळतो ही, सगळ्यान्ना ते जमेलच असे नाही. चूक भूल द्यावी घ्यावी, आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे. मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.

अनामिका 08/04/2008 - 17:50
काय दैवदुर्विलास पहा! गेल्याच आठवड्यात विश्वास पाटिल यांची "संभाजी "कादंबरी वाचायला घेतली.एरवी २ दिवसात पुस्तक वाचुन संपवायचे हा माझा निश्चय असतो.पण या वेळेस अंमळ जरा वेळच लागला.शेवटच प्रकरण वाचायला घेतल आणि काहि केल्या पुढे वाचण्याची इच्छाच होईना.शेवटी प्रयत्नपुर्वक वाचुन काढले आणि अख्खा चैत्र पाडव्याचा दिवस रडुन काढला.संभा़जी राजांना दिलेल्या यातना वाचताना सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि ह्रुदय पिळ्वटुन निघाले. मन विषण्ण आणि व्यथित झाल. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बहुमुल्य प्राणांची आहुती दिली आणि आपण मात्र त्यांच्या मुळे मिळालेल स्वत्व सांभाळायला नालायक ठरलो .आज आपण खरच किती हतबल आहोत हा विचार मन पोखरतोय. हा पाडवा मरेपर्यंत स्मरणात राहिल. ह्या माहान वीराला मानाचा मुजरा! "अनामिका" »

सन्जोप राव 11/03/2008 - 18:43
इतिहास, पुराणपुरुष, संस्कृतीरक्षक, परमपूज्य आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त यांच्यामुळे वगैरे सर्व- मग तिथे या संभाजी महाराजांपासून सांगलीत नक्षलवाद पसरवणार्‍या संभाजीराजांपर्यंत - आंणि त्यांची कवने गाणार्‍या सगळ्यांना कमरेपासून लवून कुर्निसात आणि शिरवाडकरांच्या चार ओळी- इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा कर पदस्थल त्यांचे आणिक चढुनि त्यावर भविष्य वाचा सन्जोप राव

देश, धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था| परमप्रतापी महातेजस्वी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्याचे पेशवे

सागर 11/03/2008 - 21:27
छत्रपति संभाजी महाराजांना माझ्या एका मित्राकडून छोटासा मुजरा - सागर "आज ११ मार्च... छत्रपति संभाजी महाराज यांची ३१९ वी पुण्यतिथी ....आजच्याच दिवशी १६८९ साली क्रूर औरंगजेबाने अमानुष पद्धतीने त्यांना ठार मारले... ... मरण स्वीकारले पण धर्म बुडू नाही दिला अशा या शूरवीर छत्रपति संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम - उदय गंगाधर सप्रे, ठाणे" संभाजीराजे-१ संभाजीराजे-२

प्राजु 12/03/2008 - 01:06
"या या शिवपुत्र संभाजीला मरणाची भिती??? अरे... या संभाजीच्या आरोळ्या सोड पण त्याच्या श्वासांचा आवाज सुद्धा तुला ऐकू येणार नाही" असे औरंगजेबाला निक्षून सांगणारा छावा एकदाच जन्मतो.. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:40
धाकल्या महाराजा॑च्या पायाशी ह्या मावळ्याचा त्रिवार मुजरा !!! श्री.श॑भुराजे म्हणजे खरा शेर! केवळ त्या॑च॑ आणि स्वराज्याच॑ दुर्दैव आडव॑ आल॑, म्हणून वरना...खाली जि॑जीपर्य॑त पोहोचलेली हि॑दवी स्वराज्यसीमा वर दिल्लीच्या ऐय्याश तक्ख्ताला फोडून नक्कीच अटकेपर्य॑त पोहोचली असती. हलकट और॑ग्याच्या प्रत्येक छळाला अस्सल म्हराठमोळ्या मुजोरीन॑ हसत स्विकारुन त्याला हतबुद्ध करणार्‍या श॑भुराजा॑चे चरणि प्रणाम. सागर, सप्रे॑च्या 'झ॑झावात' ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव. धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

सागर 12/03/2008 - 14:49
धमालराव देशमुख-पाटील, माझा मित्र उदय सप्रे हा शिवरायांच्या इतिहासाने भारुन गेलेला एक उत्तम लेखक आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा असूनही त्याची आणि माझी मैत्री आहे.... हा त्याचा मोठेपणा आहे. लवकरच उदयच्या "झंझावाता"ने अवघे मराठी साहित्यविश्व शिवकालीन होऊन जाईन याची खात्री वाटते... लवकरच माझा मित्र उदय "झंझावात"चा हा संकल्प पूर्ण करेन याची खात्री आहे .... - सागर

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:42
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. शंभूराजांना माझेही वंदन! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.

कलंत्री 12/03/2008 - 19:39
संभाजी महाराज यांच्या आत्मसमर्पणाची आठवण ताजी आहे हे पाहुन बरे वाटले. पण यांच्या आत्मार्पणाची तिथी ही पाडव्याच्या पहिल्या दिवशी पाळायला हवी. औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली पण, बाकी रोमांचकारक सविस्तर नंतर, तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. असो.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर 12/03/2008 - 23:56
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. का? आज पाळली म्हणून बिधडलं कुठे? आदराची भावना त्यामुळे थोडीच कमी होणार आहे?? व्यंकटराव म्हणतात ते योग्यच आहे. आपण मंडळी अजूनपर्यंत तारखा-तिथ्यातच अडकलेली आहोत! अर्थात, या निमित्ताने शंभूराजांचे पुष्यस्मरण करून त्यांची शूर आणि दिलेरी वृत्ती अंगी बाणवायची की तारखा तिथ्यांच्या वादात आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत बसायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे! तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. मिपाला तरी ही सूचना पाळणे आवडणार नाही. कारण एखाद्या दिलेर राजाची पुण्यतिथी वर्षातनं दोन दोनदा पाळणे हे मिपा हास्यास्पद, तसेच एक पोरखेळ समजते! आणि कुठल्याही पवित्र गोष्टीचा पोरखेळ होता कामा नये असेही मिपाला वाटते. शंभूराजे हा पोरखेळाचा विषय नक्कीच नाही! हे मिपाचं मत झालं! अर्थात, त्यातूनही एखाद्याने अगदी हट्टाने पाडव्याच्या पहिल्या दिवशीदेखील मिसळपाववर शंभूराजांचे पुण्यस्मरण केले तरी मिपाकरता ते आदरणीयच असेल. कारण मुळात मिपाला शंभूराजांच्या मृत्युच्या तारखेशी अथवा तिथीशी मतलब नसून त्यांच्यातल्या शूर, दिलेर आणि धाडसी वृत्तीशी मतलब आहे! असो.. आपला, (व्यथित) तात्या.

In reply to by कलंत्री

पाडव्याच्या पहिल्या दिवशी ?? ह्यातला पहिला दिवशी हे कळले नाही. चैत्र शुध्द प्रतिपदा- गुढीपाडवा. तो एकच दिवस साजरा केला जातो ना?

उदय सप्रे 13/03/2008 - 12:25
"औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली " हे अर्धवट सत्य आहे. खरी तिथी फाल्गुन वद्य अमावास्या अशी आहे.आणि ज्या राजाने आपली प्रजा सुखेनैव नान्दण्यासाठी आत्मसमर्पण केले त्या वीर राजाची आठवण पाडव्याला करणे हे पण योग्यच आहे.पण आपण सगळे आता मराठी पन्चान्ग पाळतो का? रोजचा दिनान्क पण मार्च १४ , २००८ असाच लिहितो ना? पाठ्यपुस्तकात पण असेच सन आणि सनावळ्या देतात - सामान्य जनतेला लक्षात राहील असे दिनान्क देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तसे लिहिले होते. असो, सूचना मान्य-मा़झ्यापुरती - कारण मी ऐतिहासिक कादन्बरी लिहितोय आणि मला या तिथी माहित आहेत, मी पाळतो ही, सगळ्यान्ना ते जमेलच असे नाही. चूक भूल द्यावी घ्यावी, आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे. मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.

अनामिका 08/04/2008 - 17:50
काय दैवदुर्विलास पहा! गेल्याच आठवड्यात विश्वास पाटिल यांची "संभाजी "कादंबरी वाचायला घेतली.एरवी २ दिवसात पुस्तक वाचुन संपवायचे हा माझा निश्चय असतो.पण या वेळेस अंमळ जरा वेळच लागला.शेवटच प्रकरण वाचायला घेतल आणि काहि केल्या पुढे वाचण्याची इच्छाच होईना.शेवटी प्रयत्नपुर्वक वाचुन काढले आणि अख्खा चैत्र पाडव्याचा दिवस रडुन काढला.संभा़जी राजांना दिलेल्या यातना वाचताना सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि ह्रुदय पिळ्वटुन निघाले. मन विषण्ण आणि व्यथित झाल. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बहुमुल्य प्राणांची आहुती दिली आणि आपण मात्र त्यांच्या मुळे मिळालेल स्वत्व सांभाळायला नालायक ठरलो .आज आपण खरच किती हतबल आहोत हा विचार मन पोखरतोय. हा पाडवा मरेपर्यंत स्मरणात राहिल. ह्या माहान वीराला मानाचा मुजरा! "अनामिका" »
११ मार्च ही धर्मवीर संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. सन १६८९ मध्ये ह्या महापुरुषाने आपला देह ठेवला. मुगलानी कपटाने पकडून त्यांना हाल हाल करुन ठार मारले. धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. - (मराठी मावळा) शेखर

चारोळी म्हणजे

विजुभाऊ ·

विजुभाऊ 11/03/2008 - 17:40
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या? हो... चारोळी म्हणजे प्रेमा सरखेच....साधा अडीच अक्षरांचा शब्द्....शतकानुशतके लिहीलं जातंय त्या वर...... हा हन्त हन्त्......केशवसुमार्...हे तुम्हा कवी लोकाना सांगावं लागावं.? अं!.....( काहीतरी सुमार असावा या बोलण्याला....बॉ...) आपला चारोळी बाज .....................विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 11/03/2008 - 17:56
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 11/03/2008 - 23:04
"हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं." खरे आहे विनोबा ... बाकी आम्हाला चारोळीतले वा काव्यातले जास्त गम्य नाही ... तरीपण चालू द्यात मौनीबाबा आचार्य छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 11/03/2008 - 22:39
चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो.... जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो हे विशेष आवडलं...

प्राजु 12/03/2008 - 01:01
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:21
चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते वा! ही ओळ लै भारी! आपला, (चारोळी-बेदाण्यातला) तात्या.

वरदा 12/03/2008 - 18:24
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:)))

In reply to by वरदा

विसोबा खेचर 12/03/2008 - 18:49
प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:))) म्हणजे पुन्हा तुम्ही तो र ला ट जोडण्याचा भयानक बोअर खेळ खेळणार की काय?!! :) असो, चालू द्या! आपली काय कशाला ना नाय बा! आपण ते पानच उघडून न पाहिल्याशी कारण! :) आपला, (चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या.

In reply to by वरदा

अय्याऽऽऽ, चारोळीऽऽ? कित्ती, कित्ती छान!! चला नं विजुकाका, आपण चारोळी-चारोळी खेळू या!! कित्ती मज्जा येते!!! -प्राजुकाकू, वरदाकाकू आणि खापरगाव भगिनीसमाज आयला, चारोळी आली रे आली, पळा रे पळा!! झाली का ही पीडा परत सुरु!!:) -तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन आणि किंचित इनोबा. ह.घ्या. (जसं काही हे मुद्दाम सांगायची जरूर आहे! पण काय करणार, प्रथा पाळली पाहिजे!!)

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 14/03/2008 - 11:40
ओ डा॑बिसकाका, जरा येडे आहात का हो तुम्ही? च्यामायला, कै च्या कै प्रतिसाद टाकता राव, आयला, आख्ख॑ हापिस खुळ्यागत लागल॑ ना बघायला माझ्याकडे...पाsssर दक्षिणात्य शिणेमातल्या व्हिलनसारखा जोरजोरात खदाखदा हसत सुटलो ना मी...एकटाच. शेजारच्या डेस्कावरच॑ तामिळी येड॑ डोस्क॑ धरुन बघायलाच लागल॑ माझ्याकड॑ !!!!! धन्य आहात हो!!!!

In reply to by धमाल मुलगा

कोन रं तो आमाला येडं म्हंतोय फोकलीचा? च्यामारी, येड्यासारकं हसा तुमी आनी त्येचा दोष आमच्यावर? आमच्या पर्तिसादात काय चुकी हाये? मिपावर दोन ग्रुप हायेत, चारोळी खानारे आनि न खानारे! त्येंच्या मणात काय आलं आसंल त्ये म्या लिवलं तर काय चुकलं? आनी ही आम्ची वैय.. वैयक... वैयक्तिक (आयला जमलं!) पर्तिक्रिया हाये. त्ये मिपावर अलौड हाये. पायजे तर जर्नेल डायरियाला इचारा... -पिवळा डांबिस

विजुभाऊ 12/03/2008 - 20:01
(चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या. तात्यानु ह्यां बाकी खरा नाय हां....आंओ कोकणी असा....अच्च गोयेकांर..... माझ्या गोयंच्या कोनाक पन पुसुन मगे उलय...... तो मोरोपंत मण म्हणलय की जगी चालणे राजहंसाचे ....म्हणोन कोणि चालोची नोहे काय.. ....रागावु नको तात्या.पोरे आपलीच आहेत्.....जरा सहन कर.... जरा प्रॅक्टीस होउ देत त्यान...मग बघ कशा सिक्सरी हाणताहेत ते.

विजुभाऊ 14/03/2008 - 11:23
मराठी माणसे मराठी माणसाला कसे मागे खेचतात हे तुम्हीच दाखवुन दिले तात्या......पोरे बघा कशी घाबरली आणि तुमच्या बरोबर डांबिस काका.....त्याना चॅलेंज्. त्यानाच काय अगदी केशवसुमाराना सुद्धा.... र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? स्रूश्टीलावण्या च्या संस्क्रुतातही र ल ट न जुळावता चारोळी लिहीता येइल का?

केशवसुमार 14/03/2008 - 11:56
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं ततमाताय.. परत चार ओळि झाल्या..

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 14/03/2008 - 18:42
ततमाताय.. परत चार ओळि झाल्या.. हा हा हा. सही है भिडू तत् माताय! :) बाय द वे, 'फोकलिच्या' या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! :)) असो... सर्वमाताय नमोनम: :) आपला, तत् तात्याय! :)

विजुभाऊ 11/03/2008 - 17:40
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या? हो... चारोळी म्हणजे प्रेमा सरखेच....साधा अडीच अक्षरांचा शब्द्....शतकानुशतके लिहीलं जातंय त्या वर...... हा हन्त हन्त्......केशवसुमार्...हे तुम्हा कवी लोकाना सांगावं लागावं.? अं!.....( काहीतरी सुमार असावा या बोलण्याला....बॉ...) आपला चारोळी बाज .....................विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 11/03/2008 - 17:56
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 11/03/2008 - 23:04
"हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं." खरे आहे विनोबा ... बाकी आम्हाला चारोळीतले वा काव्यातले जास्त गम्य नाही ... तरीपण चालू द्यात मौनीबाबा आचार्य छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 11/03/2008 - 22:39
चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो.... जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो हे विशेष आवडलं...

प्राजु 12/03/2008 - 01:01
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:21
चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते वा! ही ओळ लै भारी! आपला, (चारोळी-बेदाण्यातला) तात्या.

वरदा 12/03/2008 - 18:24
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:)))

In reply to by वरदा

विसोबा खेचर 12/03/2008 - 18:49
प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:))) म्हणजे पुन्हा तुम्ही तो र ला ट जोडण्याचा भयानक बोअर खेळ खेळणार की काय?!! :) असो, चालू द्या! आपली काय कशाला ना नाय बा! आपण ते पानच उघडून न पाहिल्याशी कारण! :) आपला, (चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या.

In reply to by वरदा

अय्याऽऽऽ, चारोळीऽऽ? कित्ती, कित्ती छान!! चला नं विजुकाका, आपण चारोळी-चारोळी खेळू या!! कित्ती मज्जा येते!!! -प्राजुकाकू, वरदाकाकू आणि खापरगाव भगिनीसमाज आयला, चारोळी आली रे आली, पळा रे पळा!! झाली का ही पीडा परत सुरु!!:) -तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन आणि किंचित इनोबा. ह.घ्या. (जसं काही हे मुद्दाम सांगायची जरूर आहे! पण काय करणार, प्रथा पाळली पाहिजे!!)

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 14/03/2008 - 11:40
ओ डा॑बिसकाका, जरा येडे आहात का हो तुम्ही? च्यामायला, कै च्या कै प्रतिसाद टाकता राव, आयला, आख्ख॑ हापिस खुळ्यागत लागल॑ ना बघायला माझ्याकडे...पाsssर दक्षिणात्य शिणेमातल्या व्हिलनसारखा जोरजोरात खदाखदा हसत सुटलो ना मी...एकटाच. शेजारच्या डेस्कावरच॑ तामिळी येड॑ डोस्क॑ धरुन बघायलाच लागल॑ माझ्याकड॑ !!!!! धन्य आहात हो!!!!

In reply to by धमाल मुलगा

कोन रं तो आमाला येडं म्हंतोय फोकलीचा? च्यामारी, येड्यासारकं हसा तुमी आनी त्येचा दोष आमच्यावर? आमच्या पर्तिसादात काय चुकी हाये? मिपावर दोन ग्रुप हायेत, चारोळी खानारे आनि न खानारे! त्येंच्या मणात काय आलं आसंल त्ये म्या लिवलं तर काय चुकलं? आनी ही आम्ची वैय.. वैयक... वैयक्तिक (आयला जमलं!) पर्तिक्रिया हाये. त्ये मिपावर अलौड हाये. पायजे तर जर्नेल डायरियाला इचारा... -पिवळा डांबिस

विजुभाऊ 12/03/2008 - 20:01
(चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या. तात्यानु ह्यां बाकी खरा नाय हां....आंओ कोकणी असा....अच्च गोयेकांर..... माझ्या गोयंच्या कोनाक पन पुसुन मगे उलय...... तो मोरोपंत मण म्हणलय की जगी चालणे राजहंसाचे ....म्हणोन कोणि चालोची नोहे काय.. ....रागावु नको तात्या.पोरे आपलीच आहेत्.....जरा सहन कर.... जरा प्रॅक्टीस होउ देत त्यान...मग बघ कशा सिक्सरी हाणताहेत ते.

विजुभाऊ 14/03/2008 - 11:23
मराठी माणसे मराठी माणसाला कसे मागे खेचतात हे तुम्हीच दाखवुन दिले तात्या......पोरे बघा कशी घाबरली आणि तुमच्या बरोबर डांबिस काका.....त्याना चॅलेंज्. त्यानाच काय अगदी केशवसुमाराना सुद्धा.... र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? स्रूश्टीलावण्या च्या संस्क्रुतातही र ल ट न जुळावता चारोळी लिहीता येइल का?

केशवसुमार 14/03/2008 - 11:56
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं ततमाताय.. परत चार ओळि झाल्या..

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 14/03/2008 - 18:42
ततमाताय.. परत चार ओळि झाल्या.. हा हा हा. सही है भिडू तत् माताय! :) बाय द वे, 'फोकलिच्या' या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! :)) असो... सर्वमाताय नमोनम: :) आपला, तत् तात्याय! :)
चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी असते तुमची आमची आणि सर्वंचि सेम असते चारोळी म्हणजे एक स्वप्न असते. चारोळी म्हणजे गुलबकावलिचे फूल असते मिळाले तर कूल नाही तर भूल असते चारोळी म्हणजे एक श्वास असतो.... आवडेल त्याला दरवळणारा धूंद सुवास असतो आवडली नाहितर भपकारयाचा वास असतो..... चारोळी असते एक घरटे आवडती साठी महाल आणि नावडती साठी खुरटे चारोळी म्हणजे एक सफर असते ज्यात दोन ओळींच्या मधे भावनेचे बफर असते... चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते ज्यातल्या भावनेचे चित्र नेहमीच अती भव्य असते दोन तुझ्या दोन माझ्या असा काही सौदा नसतो देण्या घेण्याचा काही एक वाद

तुम्हाला काय वाटते?

राजमुद्रा ·

मनस्वी 11/03/2008 - 14:43
असे करून काही साध्य होत नाही. बशी फोडून नागरीकांचाच खोळंबा होतो. दंगलीत ज्येष्ठांना दुखापत होते. पी.एम्.टी. ड्रायव्हर मात्र हवी तशीच घोडदौड चालू ठेवतात. सेवेत खंड नको! त्यांना फार फार तर मेमो देउन सोडत असतील. परत घोडदौडीला मोकळे. अशावेळी पी.एम्.टी.ला / ड्रायव्हरला काय बरे शिक्षा करावी हा प्रश्णच आहे. (घोडदौडीला घाबरणारी) मनस्वी

शेखर 11/03/2008 - 18:12
जमावाची क्रुती ही बिनडोक पणाची आहे. असे करुन आपण आपल्याच संपत्तीचा नाश करतो. त्याची भरपाई पकडलेल्या लोकांकडून घेतली पाहिजे. - (अहिंसेचा पुजारी ) शेखर

छोटा डॉन 11/03/2008 - 18:50
मी आधीच कबूल करतो की बसच्या चाकाखाली मुल येणे ही खरच वाईट व गांभिर्याने घेण्यसारखी घटना आहे... जर त्या मयताच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी हा मोठ्ठा धक्का आहे. त्यामुळे चिडून कदाचित जमाव तोडफोड करत असावा .... पण आपण कधीतरी त्या "बसड्रायवरच्या" बाजूने पण विचार करायला हवा. माझा अनुभव तर असा आहे की अशा प्रकारच्या अपघातात शक्यतो चूक बस ड्रायवरची नसतेच. तोच आपला बिचारा जीव मुठीत घरून बस चालवत असतो. मला सांगा "पुणे , मुंबई , बेंगलोर ,दिल्ली " अशा प्रचंड वाहतूक असनार्‍या रस्त्यावर बस चालवणे काय जोक आहे का ? त्याला तेवढा अकलेचा भाग व माणूसकी नाही का की तो ऊगाच आपले कुणाच्या अंगावर बस चढवेल? तो काय विकॄत आहे का ? आपण हा का विचार करत नाही की चूक गाडीखाली आलेल्या माणसाची असू शकेल. आजकाल जो तो ट्राफीक मधून पुढे पळण्यासाठी पायजे तसे टर्न घेत असताना चूक एकट्या त्या बसड्रायवरची मानून फोडाफोड करण्यात काय हाशिल ? माझी थेअरी सांगतो, हे असे करणारे लोक जनरली "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" असतात किंवा अशा परिस्थितीचा फायदा उठवण्यात वाकबगार असे "समाजविघातक गुंडे-मवाली" असतात. सामान्य माणूस यात कधीही उतरत नाही. यांना "फुकटचे , आयते व हरामचे खाऊन" माज आलेला असतो, रक्तात एक रग निर्माण झाली असते मग ती उत्रवणार कुठे ? मग फायदा ऊठवा असल्या संधींचा , करा तोडाफोड ..... ह्यात ह्यांचा फायदा म्हंजे आपला हात धूऊन घेता येतो, जमलेच तर चार पैसे मिळवता येतात, आपल्या नेत्यांच्या डोळ्यात भरंयासारखे कार्य (???) करता येते [ कारण हे तर समाजासाठी चालले आहे ना ?] व वर फूकटची प्रसिद्धीही मिळते कारण आपल्यासारखा "सवंग व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा मीडिया" आख्या जगात नाही....लगेच हे लोक कॅमेरे व माईक घेऊन धावतात, कुणाचीही मुलाखत घेतात, तोडफोड करणार्‍या महाभागांचे कव्हरेज घेतात व ते टीव्हीवर हजारदा दाखवतात ....आणि एकदा का ह्या "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" वा "समाजविघातक गुंडे-मवाली" लोकांना टीव्हीवर मिरवून त्यांच्या कार्याचे सार्थक झाले की ते आयुष्यभर "समाजसेवक" म्हणून मिरवायला मोकळे मग पुढच्या निवडणूकीत कमीतकमी "नगरसेवकाचे " तिकीट तरी कुठे जात नाही , झाला राजकारणाच्या गटारीत त्यांचा प्रवेश. मग अशी ही सुवर्णसंधी हे लोक का सोडतील हो ? राहता राहिला प्रश्न देशाच्या संपतीचा , तर त्याची काळजी आहे कुणाला ? काय संमंध आमचा त्याच्याशी ? तुम्ही आमाला विचारणारे कोण ? देशाची संपत्ती म्हणजे शेवती जनतेचीच ना ? मग आम्ही बघू त्याचे काय करायचे ते , ती फोडून टाकायची का लोटून खायची ........ जय महाराष्ट्र , भारत माता की जय ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

टिउ 11/03/2008 - 20:11
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? रस्त्यावर पी.एम.टी. बसच्या आकाराच्या बाकी गाड्या सुद्धा धावत असतात. त्यांच्या अपघाताच्या बातम्या इतक्या वेळा ऐकल्या आहेत का? पुण्यात येउन बघा राव! अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर. रस्तावर गर्दी असतांना, बस स्टॉप जवळ आल्यावर बसचा स्पीड कमी करावा हे समजण्यासाठी ट्रेनिंगची गरज नसते. बाकी पी.एम्.टी.ची तोडफोड करुन काही साध्य होत नाही. गाड्या काही त्या ड्रायव्हरच्या मालकीच्या नसतात. देशाचीच संपत्ती असते. गाडी दुरुस्तीसाठी शेवटी आपल्या खिशातनंच पैसे जातात.

In reply to by टिउ

विसोबा खेचर 12/03/2008 - 08:18
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? हम्म्म! वरील मुद्दा जर ग्राह्य धरला तर जमावाचं बरोबरच आहे. निदान जमावाच्या या वर्तणुकीमुळे भविष्यात तरी आपण म्हणता त्याप्रमाणे पी एम टी आणि तिचे माजोरी बस ड्रायव्हर सुधारतील! आणि तशीही जमावाची मानसिकता हे जमावाची मानसिकता असते. ती चूक की बरोबर हे ठरवणं मुश्कील आहे! आपला, (रक्तरंजित क्रांतीवर ठाम विश्वास असलेला) तात्या.

In reply to by टिउ

जमावाची कृती कुठल्याही कोनातून पाहिले तरी समर्थनिय नाही. पण खोलात विचार करीता काही मुद्दे समोर येतात, ते असे. समाजात वैफल्यभावना (फ्रस्ट्रेशन) उच्च कोटीची आहे. गरीब -श्रीमंत दरी वाढतेच आहे. महगाई, भ्रष्टाचार, आरोग्य सेवा, वाढता जातीयवाद, धर्मवाद ह्या समस्याही आहेतच. राजकारणी आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपल्याला कोणी वाली नाही ही असुरक्षिततेची भावनासुद्धा माणसास कायदा स्वतःच्या हातात घेण्यास भाग पाडतात. जमावाकडे ताकद असते, बुद्धी नसते. जमावाच्या हिंसाचारात जबाबदारी कुणा एकट्याची नसल्यामुळे प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित मानतो आणि अक्षरशः 'हात धुवून घेतो'. प्रत्यक्ष 'त्या' घटनेने तो चिडलेला असेलही किंवा नसेलही. समाजावरील, राजकारण्यांवरील, प्रशासनावरील त्याचा समर्थनीय राग काढण्याचे साधन, संधी म्हणून तो अशा घटनांमध्ये भाग घेतो. (इतर, गुंड प्रवृत्ती, स्वार्थ, राजकारण इत्यादी मुद्दे आहेतच). अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर हे बाकी अगदी खरे आहे. मी ही अनेकदा अनुभवले आहे. बसस्टॉप पासून अंतर सोडून, मागची रहदारी अडवून बस थांबविणे, इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने दाबणे, ट्रॅफिक सिग्नल न पाळणे, बसमध्ये जागा असूनही स्टॉपवर बस न थांबविणे, क्लच न दाबता गिअर बदलणे आदी सवयी पुण्यातील बस ड्रायव्हर्सना आहेत. भांडायला गेलात तर अत्यंत माजोर्‍या शब्दात तुमचा अपमान करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. ट्रॅफिक पोलीसही त्यांचीच साथ देतात. बसची तोडफोड करून काही साध्य होत नाही. ड्रायव्हरला शिक्षा झालाखेरीज त्याची मानसिकता बदलणार नाही. वाहतुकीला शिस्त लावणे हे पोलीसांचे आणि शिस्त लावून घेणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. बाहेरच्या देशात शिस्त पाळणारा, शिस्तीचे गोडवे गाणाराही भारतात आला की कोणीच शिस्त पाळत नाही म्हणून स्वतःही शिस्त पाळणे सोडून देतो. पुण्यात वाहतुकीची/रहदारीची शिस्त न पाळणारे ९९% नागरीक हे तथाकथित सुशिक्षित आहेत. त्यांना पुणे हे विद्येचे/संस्कृतीचे माहेरघर आहे ह्याचा अभिमान आहे. परंतु, रहदारीचे नियम तोडणे, बेदरकार आणि बेजबाबदारपणे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळत वाहन चालवणे, उद्दामपणे/उर्मटपणे बोलणे ह्याला पुणेकर स्वतःचे कौशल्य आणि हुशारी मानतात, हे पुणे शहराचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. पुण्याच्या रहदारीला मुंबईसारखी शिस्त लावण्यात पुण्याचे राजकिय नेते आणि प्रशासन कमालीचे उदासिन आहे.

सचिन 11/03/2008 - 23:22
अशा पद्धतीने कायदा हातात घेणे केव्हाही चूकच!! त्या तोडफोडवाल्या कितीजणान्ना रस्त्यावर गाडी चालवण्याची अक्कल आहे ? त्यान्नी कितीदा सिग्नल पाळले आहेत ? त्यान्नी कितीदा झेब्राच्या आधी गाडी थाम्बवली आहे ? त्यान्नी कितीदा स्पीड लिमिट्स पाळली आहेत ?उजव्या बाजूने कधी तरी ओव्हरटेक केलय ? मामाने पकडल्यावर त्याच्या हातात नोटा कोम्बणारे हेच !! सामजिक शिस्तीची जाण आपल्याला कधी येणार ...बिचार्‍या ब्रम्हदेवाच्या बापालाही ठाऊक नसेल !!

व्यंकट 12/03/2008 - 19:00
>>खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर? कृती चूक, भावना सहज. >>भारताबाहेरही लोक असेच वागतात का? काही ठिकाणी हो, काही ठिकाणी नाही. >>शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते? आपल्याला सिव्हीक सेन्स नाही. व्यंकट

मी भारताबाहेर (इंग्लंड) मधे राहते. मी दोन्ही कडचे ट्रॅफिक अनुभवले आहेत. लंडन मधे.. १.सिग्नल्स सर्व चालू अवस्थेत असतात. जर खराब झाले तर २४ तासाच्या आत दुरुस्त होतात. २.९०% लोक नियम पाळतात. ३.लेन सोडायची/चेंज करायची असेल तर इंडिकेटर चा वापर करतात. ४.मोटर वे (हाय वे)वरसर्व गाड्या चांगल्या कंडिशन मधे असतात.(मॉट ) ५.सर्व डायरेक्शन असलेले बोर्ड असतात व्यवस्थीत, स्पष्ट, आणि जाहिरात नसलेले... ६.मोटर वे वर जर अपघात/रस्ता दुरुस्तीचे काम मुळे जर ट्रॅफिक जाम असेल तर अगोदर ५-१० किमी वर तुम्हाला त्याचे साइन्स दिसतील.जेणेकरून तुम्ही तुमचा रूट चेंग करू शकता. ७.राउंड अबाउट हा प्रकार सर्वात चांगला. तिथे सिग्नल नसतो पण लोक व्यवस्थीत नियमाप्रमाणेच जातात. ८.ड्रायव्हिंग लायसन्स व्यवस्थीत १ रीटन-१ प्रॅक्टीकल ने च घेता येते. तिथे वशिला इ... चालत नाही. ९.माझ्या अनुभवाने भारतापेक्षा भारताबाहेर गाडी चालवणे सोपे आहे. १०. इथे २ व्हीलर/सायकल क्वचितच दिसतात म्हणून कदाचित असेल .... ११. गावमधे रस्ते छोटे असतात मग तुम्ही एका मागून एकच जायचे तिथे ओव्हर टेक करायला जाग नसते. १२.लोकांना जायला सगळीकडे फुटपाथ असतो. लोक त्याचा उपयोग जाण्या-येण्यासाठीच करतात्.(काही ठीकाणी अपवाद सोडला तर कारण ती भाजी/फळे ची दुकाने असतील तर. पण ती दुकाने एशियनचीच असतात. १३.भारतात लोकसंख्येचा उल्लेख करावाच लागतो. कारण हे सर्व व्हायला जेवढी लोकसंख्या तेवढ्या त्यांना सोयी करून देणे कठीणच आहे. तरी सुद्धा इथे(भारताबाहेर) अपघात होतातच, नाही असे नाही, पण संख्या कमी असते कदाचित लोक कमी म्हणून असेल.. १४.अपघात झाला तर ५ मिनिटात पोलीस, एम्ब्युलन्स येते. तसेच अपघाताच्या ठिकाण चे ताबडतोब वाहन बाजुला करतात. १५.पोलिस गाडी, एम्ब्युलन्स यांना रोडवर नेहमी पहिला प्रेफरन्स असतो.. १६. रस्त्यावर काम करणार असतील तर ते पाटी लावून/साधे कंपाउंड लावून आपली जागा निश्चीत(जायला यायला जागा देऊन) करतात. तरीही मला माझा भारत देश आवडतो.कारण तिथे जी भांडायची (गाडी धडकल्यावर, जागा दिली नाही जायला तर..)मजा असते ती इथे नाही. तसेच जी मदत, आपलेपणा तो इथे दिसत नाही..असुदे शेवटी नाण्याला दोन बाजू असतात.. काही फायदे काही तोटे.... चु.भू.द्या.घ्या.

पटत नाही. आपल्याकडे आहेत ते नियम कोठे पाळले जातात? आहेत त्या सोई कोठे वापरल्या जातात. सिग्नल तोडणे नेहमीचे. तीनचाकी, दोनचाकी वाहने तर विचारूच नका. मी इतर देश पाहिले नाहीत. पण दक्षिण मुंबईतील (वांद्रे व शीवपर्यंत) रहदारी पाहा व इतर कोठलीहि रहदारी पाहा. जमीन अस्मानाचा फरक आहे. इतर ठिकाणचे ड्रायव्हर लोक कायदे खासकरून सिग्नल सर्रास मोडतात. साधा हॉर्नच पाहा कसा वाजवतात. द. मुम्बईत तेसे फारसे होत नाही. तरीहि लंडनमधे १० टक्के लो़ कायदे पाळत नाहीत हे वाचून धक्काच बसला.

मनस्वी 11/03/2008 - 14:43
असे करून काही साध्य होत नाही. बशी फोडून नागरीकांचाच खोळंबा होतो. दंगलीत ज्येष्ठांना दुखापत होते. पी.एम्.टी. ड्रायव्हर मात्र हवी तशीच घोडदौड चालू ठेवतात. सेवेत खंड नको! त्यांना फार फार तर मेमो देउन सोडत असतील. परत घोडदौडीला मोकळे. अशावेळी पी.एम्.टी.ला / ड्रायव्हरला काय बरे शिक्षा करावी हा प्रश्णच आहे. (घोडदौडीला घाबरणारी) मनस्वी

शेखर 11/03/2008 - 18:12
जमावाची क्रुती ही बिनडोक पणाची आहे. असे करुन आपण आपल्याच संपत्तीचा नाश करतो. त्याची भरपाई पकडलेल्या लोकांकडून घेतली पाहिजे. - (अहिंसेचा पुजारी ) शेखर

छोटा डॉन 11/03/2008 - 18:50
मी आधीच कबूल करतो की बसच्या चाकाखाली मुल येणे ही खरच वाईट व गांभिर्याने घेण्यसारखी घटना आहे... जर त्या मयताच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी हा मोठ्ठा धक्का आहे. त्यामुळे चिडून कदाचित जमाव तोडफोड करत असावा .... पण आपण कधीतरी त्या "बसड्रायवरच्या" बाजूने पण विचार करायला हवा. माझा अनुभव तर असा आहे की अशा प्रकारच्या अपघातात शक्यतो चूक बस ड्रायवरची नसतेच. तोच आपला बिचारा जीव मुठीत घरून बस चालवत असतो. मला सांगा "पुणे , मुंबई , बेंगलोर ,दिल्ली " अशा प्रचंड वाहतूक असनार्‍या रस्त्यावर बस चालवणे काय जोक आहे का ? त्याला तेवढा अकलेचा भाग व माणूसकी नाही का की तो ऊगाच आपले कुणाच्या अंगावर बस चढवेल? तो काय विकॄत आहे का ? आपण हा का विचार करत नाही की चूक गाडीखाली आलेल्या माणसाची असू शकेल. आजकाल जो तो ट्राफीक मधून पुढे पळण्यासाठी पायजे तसे टर्न घेत असताना चूक एकट्या त्या बसड्रायवरची मानून फोडाफोड करण्यात काय हाशिल ? माझी थेअरी सांगतो, हे असे करणारे लोक जनरली "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" असतात किंवा अशा परिस्थितीचा फायदा उठवण्यात वाकबगार असे "समाजविघातक गुंडे-मवाली" असतात. सामान्य माणूस यात कधीही उतरत नाही. यांना "फुकटचे , आयते व हरामचे खाऊन" माज आलेला असतो, रक्तात एक रग निर्माण झाली असते मग ती उत्रवणार कुठे ? मग फायदा ऊठवा असल्या संधींचा , करा तोडाफोड ..... ह्यात ह्यांचा फायदा म्हंजे आपला हात धूऊन घेता येतो, जमलेच तर चार पैसे मिळवता येतात, आपल्या नेत्यांच्या डोळ्यात भरंयासारखे कार्य (???) करता येते [ कारण हे तर समाजासाठी चालले आहे ना ?] व वर फूकटची प्रसिद्धीही मिळते कारण आपल्यासारखा "सवंग व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा मीडिया" आख्या जगात नाही....लगेच हे लोक कॅमेरे व माईक घेऊन धावतात, कुणाचीही मुलाखत घेतात, तोडफोड करणार्‍या महाभागांचे कव्हरेज घेतात व ते टीव्हीवर हजारदा दाखवतात ....आणि एकदा का ह्या "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" वा "समाजविघातक गुंडे-मवाली" लोकांना टीव्हीवर मिरवून त्यांच्या कार्याचे सार्थक झाले की ते आयुष्यभर "समाजसेवक" म्हणून मिरवायला मोकळे मग पुढच्या निवडणूकीत कमीतकमी "नगरसेवकाचे " तिकीट तरी कुठे जात नाही , झाला राजकारणाच्या गटारीत त्यांचा प्रवेश. मग अशी ही सुवर्णसंधी हे लोक का सोडतील हो ? राहता राहिला प्रश्न देशाच्या संपतीचा , तर त्याची काळजी आहे कुणाला ? काय संमंध आमचा त्याच्याशी ? तुम्ही आमाला विचारणारे कोण ? देशाची संपत्ती म्हणजे शेवती जनतेचीच ना ? मग आम्ही बघू त्याचे काय करायचे ते , ती फोडून टाकायची का लोटून खायची ........ जय महाराष्ट्र , भारत माता की जय ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

टिउ 11/03/2008 - 20:11
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? रस्त्यावर पी.एम.टी. बसच्या आकाराच्या बाकी गाड्या सुद्धा धावत असतात. त्यांच्या अपघाताच्या बातम्या इतक्या वेळा ऐकल्या आहेत का? पुण्यात येउन बघा राव! अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर. रस्तावर गर्दी असतांना, बस स्टॉप जवळ आल्यावर बसचा स्पीड कमी करावा हे समजण्यासाठी ट्रेनिंगची गरज नसते. बाकी पी.एम्.टी.ची तोडफोड करुन काही साध्य होत नाही. गाड्या काही त्या ड्रायव्हरच्या मालकीच्या नसतात. देशाचीच संपत्ती असते. गाडी दुरुस्तीसाठी शेवटी आपल्या खिशातनंच पैसे जातात.

In reply to by टिउ

विसोबा खेचर 12/03/2008 - 08:18
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? हम्म्म! वरील मुद्दा जर ग्राह्य धरला तर जमावाचं बरोबरच आहे. निदान जमावाच्या या वर्तणुकीमुळे भविष्यात तरी आपण म्हणता त्याप्रमाणे पी एम टी आणि तिचे माजोरी बस ड्रायव्हर सुधारतील! आणि तशीही जमावाची मानसिकता हे जमावाची मानसिकता असते. ती चूक की बरोबर हे ठरवणं मुश्कील आहे! आपला, (रक्तरंजित क्रांतीवर ठाम विश्वास असलेला) तात्या.

In reply to by टिउ

जमावाची कृती कुठल्याही कोनातून पाहिले तरी समर्थनिय नाही. पण खोलात विचार करीता काही मुद्दे समोर येतात, ते असे. समाजात वैफल्यभावना (फ्रस्ट्रेशन) उच्च कोटीची आहे. गरीब -श्रीमंत दरी वाढतेच आहे. महगाई, भ्रष्टाचार, आरोग्य सेवा, वाढता जातीयवाद, धर्मवाद ह्या समस्याही आहेतच. राजकारणी आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपल्याला कोणी वाली नाही ही असुरक्षिततेची भावनासुद्धा माणसास कायदा स्वतःच्या हातात घेण्यास भाग पाडतात. जमावाकडे ताकद असते, बुद्धी नसते. जमावाच्या हिंसाचारात जबाबदारी कुणा एकट्याची नसल्यामुळे प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित मानतो आणि अक्षरशः 'हात धुवून घेतो'. प्रत्यक्ष 'त्या' घटनेने तो चिडलेला असेलही किंवा नसेलही. समाजावरील, राजकारण्यांवरील, प्रशासनावरील त्याचा समर्थनीय राग काढण्याचे साधन, संधी म्हणून तो अशा घटनांमध्ये भाग घेतो. (इतर, गुंड प्रवृत्ती, स्वार्थ, राजकारण इत्यादी मुद्दे आहेतच). अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर हे बाकी अगदी खरे आहे. मी ही अनेकदा अनुभवले आहे. बसस्टॉप पासून अंतर सोडून, मागची रहदारी अडवून बस थांबविणे, इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने दाबणे, ट्रॅफिक सिग्नल न पाळणे, बसमध्ये जागा असूनही स्टॉपवर बस न थांबविणे, क्लच न दाबता गिअर बदलणे आदी सवयी पुण्यातील बस ड्रायव्हर्सना आहेत. भांडायला गेलात तर अत्यंत माजोर्‍या शब्दात तुमचा अपमान करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. ट्रॅफिक पोलीसही त्यांचीच साथ देतात. बसची तोडफोड करून काही साध्य होत नाही. ड्रायव्हरला शिक्षा झालाखेरीज त्याची मानसिकता बदलणार नाही. वाहतुकीला शिस्त लावणे हे पोलीसांचे आणि शिस्त लावून घेणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. बाहेरच्या देशात शिस्त पाळणारा, शिस्तीचे गोडवे गाणाराही भारतात आला की कोणीच शिस्त पाळत नाही म्हणून स्वतःही शिस्त पाळणे सोडून देतो. पुण्यात वाहतुकीची/रहदारीची शिस्त न पाळणारे ९९% नागरीक हे तथाकथित सुशिक्षित आहेत. त्यांना पुणे हे विद्येचे/संस्कृतीचे माहेरघर आहे ह्याचा अभिमान आहे. परंतु, रहदारीचे नियम तोडणे, बेदरकार आणि बेजबाबदारपणे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळत वाहन चालवणे, उद्दामपणे/उर्मटपणे बोलणे ह्याला पुणेकर स्वतःचे कौशल्य आणि हुशारी मानतात, हे पुणे शहराचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. पुण्याच्या रहदारीला मुंबईसारखी शिस्त लावण्यात पुण्याचे राजकिय नेते आणि प्रशासन कमालीचे उदासिन आहे.

सचिन 11/03/2008 - 23:22
अशा पद्धतीने कायदा हातात घेणे केव्हाही चूकच!! त्या तोडफोडवाल्या कितीजणान्ना रस्त्यावर गाडी चालवण्याची अक्कल आहे ? त्यान्नी कितीदा सिग्नल पाळले आहेत ? त्यान्नी कितीदा झेब्राच्या आधी गाडी थाम्बवली आहे ? त्यान्नी कितीदा स्पीड लिमिट्स पाळली आहेत ?उजव्या बाजूने कधी तरी ओव्हरटेक केलय ? मामाने पकडल्यावर त्याच्या हातात नोटा कोम्बणारे हेच !! सामजिक शिस्तीची जाण आपल्याला कधी येणार ...बिचार्‍या ब्रम्हदेवाच्या बापालाही ठाऊक नसेल !!

व्यंकट 12/03/2008 - 19:00
>>खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर? कृती चूक, भावना सहज. >>भारताबाहेरही लोक असेच वागतात का? काही ठिकाणी हो, काही ठिकाणी नाही. >>शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते? आपल्याला सिव्हीक सेन्स नाही. व्यंकट

मी भारताबाहेर (इंग्लंड) मधे राहते. मी दोन्ही कडचे ट्रॅफिक अनुभवले आहेत. लंडन मधे.. १.सिग्नल्स सर्व चालू अवस्थेत असतात. जर खराब झाले तर २४ तासाच्या आत दुरुस्त होतात. २.९०% लोक नियम पाळतात. ३.लेन सोडायची/चेंज करायची असेल तर इंडिकेटर चा वापर करतात. ४.मोटर वे (हाय वे)वरसर्व गाड्या चांगल्या कंडिशन मधे असतात.(मॉट ) ५.सर्व डायरेक्शन असलेले बोर्ड असतात व्यवस्थीत, स्पष्ट, आणि जाहिरात नसलेले... ६.मोटर वे वर जर अपघात/रस्ता दुरुस्तीचे काम मुळे जर ट्रॅफिक जाम असेल तर अगोदर ५-१० किमी वर तुम्हाला त्याचे साइन्स दिसतील.जेणेकरून तुम्ही तुमचा रूट चेंग करू शकता. ७.राउंड अबाउट हा प्रकार सर्वात चांगला. तिथे सिग्नल नसतो पण लोक व्यवस्थीत नियमाप्रमाणेच जातात. ८.ड्रायव्हिंग लायसन्स व्यवस्थीत १ रीटन-१ प्रॅक्टीकल ने च घेता येते. तिथे वशिला इ... चालत नाही. ९.माझ्या अनुभवाने भारतापेक्षा भारताबाहेर गाडी चालवणे सोपे आहे. १०. इथे २ व्हीलर/सायकल क्वचितच दिसतात म्हणून कदाचित असेल .... ११. गावमधे रस्ते छोटे असतात मग तुम्ही एका मागून एकच जायचे तिथे ओव्हर टेक करायला जाग नसते. १२.लोकांना जायला सगळीकडे फुटपाथ असतो. लोक त्याचा उपयोग जाण्या-येण्यासाठीच करतात्.(काही ठीकाणी अपवाद सोडला तर कारण ती भाजी/फळे ची दुकाने असतील तर. पण ती दुकाने एशियनचीच असतात. १३.भारतात लोकसंख्येचा उल्लेख करावाच लागतो. कारण हे सर्व व्हायला जेवढी लोकसंख्या तेवढ्या त्यांना सोयी करून देणे कठीणच आहे. तरी सुद्धा इथे(भारताबाहेर) अपघात होतातच, नाही असे नाही, पण संख्या कमी असते कदाचित लोक कमी म्हणून असेल.. १४.अपघात झाला तर ५ मिनिटात पोलीस, एम्ब्युलन्स येते. तसेच अपघाताच्या ठिकाण चे ताबडतोब वाहन बाजुला करतात. १५.पोलिस गाडी, एम्ब्युलन्स यांना रोडवर नेहमी पहिला प्रेफरन्स असतो.. १६. रस्त्यावर काम करणार असतील तर ते पाटी लावून/साधे कंपाउंड लावून आपली जागा निश्चीत(जायला यायला जागा देऊन) करतात. तरीही मला माझा भारत देश आवडतो.कारण तिथे जी भांडायची (गाडी धडकल्यावर, जागा दिली नाही जायला तर..)मजा असते ती इथे नाही. तसेच जी मदत, आपलेपणा तो इथे दिसत नाही..असुदे शेवटी नाण्याला दोन बाजू असतात.. काही फायदे काही तोटे.... चु.भू.द्या.घ्या.

पटत नाही. आपल्याकडे आहेत ते नियम कोठे पाळले जातात? आहेत त्या सोई कोठे वापरल्या जातात. सिग्नल तोडणे नेहमीचे. तीनचाकी, दोनचाकी वाहने तर विचारूच नका. मी इतर देश पाहिले नाहीत. पण दक्षिण मुंबईतील (वांद्रे व शीवपर्यंत) रहदारी पाहा व इतर कोठलीहि रहदारी पाहा. जमीन अस्मानाचा फरक आहे. इतर ठिकाणचे ड्रायव्हर लोक कायदे खासकरून सिग्नल सर्रास मोडतात. साधा हॉर्नच पाहा कसा वाजवतात. द. मुम्बईत तेसे फारसे होत नाही. तरीहि लंडनमधे १० टक्के लो़ कायदे पाळत नाहीत हे वाचून धक्काच बसला.
आज सकाळी पुणे मं.पा. येथे जमावाने ५० पेक्षा जास्त पी.एम्.टी. फोडल्या. कारण काय तर एक १२ वर्षाचा मुलगा सायकलवरून जात असताना पी.एम्.टी. च्या चाकाखाली आला. रस्त्यावर सगळीकडे काचाच काचा होत्या. खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर? भारताबाहेरही लोक असेच वागतात का? शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते? राजमुद्रा :)

धुणे वाळवणे (चित्रे)

धनंजय ·

पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".
मस्त विषय आहे. पण "वॉशिंग डर्टी लिनन इन पब्लिक" चा "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन" असा अनुवाद चपखल वाटत नाही. 'अब्रू चव्हाट्यावर आणणे'छाप एखादी म्हण वाक्संप्रदायकोशात मिळते का ते बघायला हवे.

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 11/03/2008 - 17:18
हा वाक्प्रचार मनात होता. स्वैर भाषांतरे : "शिवला काय कावळा, चिंध्या आंगणात वाळवा" - अर्थ मागच्या पिढीत समजला असता. "आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." (मराठीत वाक्प्रचारांना, म्हणींना प्रास किंवा यमक असण्याची लकब आहे.) भाषांतरात कपड्यांचा उल्लेख करायचा नसला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "अब्रू चव्हाट्यावर आणली" हेच ठीक आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:44
"आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." हा हा हा! वरील तीनही आयटेम एकदम भारी! आपला, (दुपट्यातला) तात्या.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 21:23
नाहीतर सगळे चाकोरीतून फिरणारे गरगरवून टाकते! वाळत घातलेले कपडे हा तसा अगदीच अनोखा विषय नाही कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजांमधली 'वस्त्र' ही अन्नानंतरची लगेचची गरज आहे. चित्रे छानच आहेत. "धुतली कापडं चांगली अन् वाळायला बाहेर टांगली!" हे कसे? (अवांतर - "शिवला काय कावळा.." चा अर्थ जाणून आहे;)) चतुरंग

In reply to by धनंजय

वरील प्रत्येक चित्रात एक कहाणी दडलेली दिसते आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रासाठी स्वतंत्र वाक्प्रचार, म्हण वापरल्यास अधिक चांगले.

विसोबा खेचर 11/03/2008 - 16:42
हा हा हा धन्याशेठ! धुणी वाळत घातलेल्या चित्रांची कल्पना बाकी झकास आहे! तू सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :)) परंतु चित्रं बाकी मस्तच आहेत. शेवटच्या चित्रातील रंगसंगती तर क्लासच! आपला, (चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला) तात्या.

कोलबेर 11/03/2008 - 19:26
हा हा हा!! का ते आठवत नाही पण मी सुद्धा एकदा पॉइंट अँड शूट कॅमेर्‍यानेच घरांसमोर वाळत घातलेली धुणी टिपली होती..
(चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला)तात्या.
हे वाचून त्यातले हे चित्र आठवले..ते इथे शोधून टाकले !! :) बाकी शेवटच्या चित्रातील रंगसंगती मस्तच आली आहे... अंडरस्टँडींग एक्स्पोजर नावाचे फोटोग्राफी शिकण्यासाठी उत्तम पुस्तक आहे..त्याच्या पृष्ठ क्र. ९४ वरती असाच एक अंतरवस्त्रे वाळत घातलेला ऍमस्टरडॅम मधील अप्रतिम फोटो आहे (त्या चित्राची थिम साधारण धनंजयच्य शेवटच्या चित्रासारखीच आहे)

चित्रा 18/03/2008 - 00:59
शेवटचे प्रकाशचित्रही छान. (फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र?)

In reply to by चित्रा

सर्किट 18/03/2008 - 01:28
फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र? ते कुणी काढले ह्यावर अवलंबून आहे.. :-) डिपेण्ड्स वरून एक आठवले. गर्लफ्रेंड तिच्या नवीन बॉयफ्रेण्ड ला विचारते. "तुला काय घालायला आवडते ? बॉक्सर की ब्रिफ ?" तो म्हणतो, "डिपेण्ड्स..." - सर्किट

In reply to by चित्रा

चतुरंग 18/03/2008 - 02:19
आणि फिल्मवरती वस्तूची छाया ठेवून जाणारे म्हणून छायाचित्र सुध्दा! :) म्हणून इट डिपेंड्स!! चतुरंग

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 02:25
माझ्या मते छायाचित्र हा अधिक लोकप्रिय शद्ब असला तरी प्रकाशचित्र हा जास्त बरोबर आहे. कारण कोणत्याही फोटोचे 'शॅडोज(छाया) आणि हाईलाईट्स' हे दोन्हीही मुख्य भाग असतात..त्यामुळे नुसतेच छायाचित्र म्हणणे किंचीत चुकीचे वाटते. प्रकाश किरणांनी काढलेले चित्र म्हणजे प्रकाशचित्र हे अधिक अचुक वाटते

पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".
मस्त विषय आहे. पण "वॉशिंग डर्टी लिनन इन पब्लिक" चा "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन" असा अनुवाद चपखल वाटत नाही. 'अब्रू चव्हाट्यावर आणणे'छाप एखादी म्हण वाक्संप्रदायकोशात मिळते का ते बघायला हवे.

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 11/03/2008 - 17:18
हा वाक्प्रचार मनात होता. स्वैर भाषांतरे : "शिवला काय कावळा, चिंध्या आंगणात वाळवा" - अर्थ मागच्या पिढीत समजला असता. "आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." (मराठीत वाक्प्रचारांना, म्हणींना प्रास किंवा यमक असण्याची लकब आहे.) भाषांतरात कपड्यांचा उल्लेख करायचा नसला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "अब्रू चव्हाट्यावर आणली" हेच ठीक आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:44
"आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." हा हा हा! वरील तीनही आयटेम एकदम भारी! आपला, (दुपट्यातला) तात्या.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 21:23
नाहीतर सगळे चाकोरीतून फिरणारे गरगरवून टाकते! वाळत घातलेले कपडे हा तसा अगदीच अनोखा विषय नाही कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजांमधली 'वस्त्र' ही अन्नानंतरची लगेचची गरज आहे. चित्रे छानच आहेत. "धुतली कापडं चांगली अन् वाळायला बाहेर टांगली!" हे कसे? (अवांतर - "शिवला काय कावळा.." चा अर्थ जाणून आहे;)) चतुरंग

In reply to by धनंजय

वरील प्रत्येक चित्रात एक कहाणी दडलेली दिसते आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रासाठी स्वतंत्र वाक्प्रचार, म्हण वापरल्यास अधिक चांगले.

विसोबा खेचर 11/03/2008 - 16:42
हा हा हा धन्याशेठ! धुणी वाळत घातलेल्या चित्रांची कल्पना बाकी झकास आहे! तू सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :)) परंतु चित्रं बाकी मस्तच आहेत. शेवटच्या चित्रातील रंगसंगती तर क्लासच! आपला, (चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला) तात्या.

कोलबेर 11/03/2008 - 19:26
हा हा हा!! का ते आठवत नाही पण मी सुद्धा एकदा पॉइंट अँड शूट कॅमेर्‍यानेच घरांसमोर वाळत घातलेली धुणी टिपली होती..
(चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला)तात्या.
हे वाचून त्यातले हे चित्र आठवले..ते इथे शोधून टाकले !! :) बाकी शेवटच्या चित्रातील रंगसंगती मस्तच आली आहे... अंडरस्टँडींग एक्स्पोजर नावाचे फोटोग्राफी शिकण्यासाठी उत्तम पुस्तक आहे..त्याच्या पृष्ठ क्र. ९४ वरती असाच एक अंतरवस्त्रे वाळत घातलेला ऍमस्टरडॅम मधील अप्रतिम फोटो आहे (त्या चित्राची थिम साधारण धनंजयच्य शेवटच्या चित्रासारखीच आहे)

चित्रा 18/03/2008 - 00:59
शेवटचे प्रकाशचित्रही छान. (फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र?)

In reply to by चित्रा

सर्किट 18/03/2008 - 01:28
फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र? ते कुणी काढले ह्यावर अवलंबून आहे.. :-) डिपेण्ड्स वरून एक आठवले. गर्लफ्रेंड तिच्या नवीन बॉयफ्रेण्ड ला विचारते. "तुला काय घालायला आवडते ? बॉक्सर की ब्रिफ ?" तो म्हणतो, "डिपेण्ड्स..." - सर्किट

In reply to by चित्रा

चतुरंग 18/03/2008 - 02:19
आणि फिल्मवरती वस्तूची छाया ठेवून जाणारे म्हणून छायाचित्र सुध्दा! :) म्हणून इट डिपेंड्स!! चतुरंग

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 02:25
माझ्या मते छायाचित्र हा अधिक लोकप्रिय शद्ब असला तरी प्रकाशचित्र हा जास्त बरोबर आहे. कारण कोणत्याही फोटोचे 'शॅडोज(छाया) आणि हाईलाईट्स' हे दोन्हीही मुख्य भाग असतात..त्यामुळे नुसतेच छायाचित्र म्हणणे किंचीत चुकीचे वाटते. प्रकाश किरणांनी काढलेले चित्र म्हणजे प्रकाशचित्र हे अधिक अचुक वाटते
घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)

चतुरंग ·

केशवसुमार 11/03/2008 - 11:00
चतुरंगशेठ, स्तुत्य उपक्रम्..अभिनंदन आणि शुभेच्छा.. संकल्प सिद्धिस न्या.. पहिल्या पाच रुबाया उत्तम झालेल्या आहेत... (मद्य न चाखलेला मधुशालेचा चाहता)केशवसुमार

बेसनलाडू 11/03/2008 - 11:06
नक्षीदार तरीही आकलनीय शब्दयोजना आणि लय. भावानुवाद आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. (उत्सुक)बेसनलाडू

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:31
रंगराव, सुरेखच भावानुवाद. तुमचं खरंच कौतुक वाटतं. संपूर्ण मधुशालेचा हा मराठी भावानुवाद म्हणजे मिपाकरता एक खजिनाच म्हणावा लागेल! पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती.. आपला, (मधुशालाप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 11/03/2008 - 20:32
रसिकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मूळ लेखनात काही दुरुस्त्या करता आल्या तर निर्दोष कृती देण्याचे मनसुबे तडीस जातील. नीलकांताच्या मदतीने संपादनाची शक्ती पूर्ववत स्थापित करावी ही आग्रहाची विनंती - ह्याबाबत आधीही संवाद साधलेला आहेच. ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 12/03/2008 - 16:44
('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. आपली मागणी पूर्ण केली आहे असं आम्हाला आठवतं! :) ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) नक्कीच होऊ शकते. मिसळपावला नान्या आणि मधुशाला दोघे सारखेच लाडके आहेत. येथे पंक्तिप्रपंच नाही! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 12/03/2008 - 00:21
पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती..
असेच म्हणातो!

धनंजय 11/03/2008 - 11:42
शुभेच्छा! शब्दयोजना आवडली. एक रुबाई तितकी समजली नाही "भरुन आणिला काव्यचषक हा कविस्वरुपी मद्याला" ओळीचा अर्थ लागला नाही. मुळात मोठे कल्पक समांतर रूपक आहे. द्राक्ष/वेल=भाव मद्य=कल्पना प्याला=कविता साकी=कवी** वाचक=पीणारा पुस्तक=मधुशाला ती पूर्ण साखळी अनुवादित रुबाईत लागत नाही. विशेषकरून ** ठिकाणी. बाकी अनुवादाला सलाम! आम्ही आनंदाने वाचत आहोत.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 20:37
प्रकाशित करण्याआधीच्या संपादनाच्या शेवटल्या फेरीत ही सुधारणा राहून गेली - तिथे "भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला" असे योजले होते. तात्यांनी संपादनाचा अधिकार पूर्ववत केल्यास मूळ लेखनात ही दुरुस्ती होईल. -------------------------------------------------------------- धनंजय, वरील दुरुस्ती केली आहे आता रुबाई मूळ काव्याशी सलगी दाखवते! संपादनाचे अधिकार दिल्याबद्दल तात्यांचे आभार :) चतुरंग

लिखाळ 11/03/2008 - 18:14
फार छान अनुवाद. कल्पक. एक वाटले ते मोकळेपणी सांगतो. मला काव्य, अनुवाद यातले काही कळत नसून सुद्धा धाडस करतो आहे. सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१। रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ।।१। आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२|| तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, .... मूळ हिंदी कवितेत कवी प्रत्यक्ष वाचकाला उद्देशून लिहित आहे. तसेच हिंदीमधिल 'आप' न वापरता 'तू' असे मित्रत्वाने कवी संबोधत आहे. तो वाचकाशी सरळ संवाद साधत आहे असे जाणवले. आपल्या अनुवादात मात्र आपण सर्व रसिकांशी संवाद साधत आहात. त्यामुळे थोडी औपचारिकता वाढली आहे. त्यामुळे अनुवादित कविता थेट वाचकाशी बोलण्यात थोडी मागे पडेल का? !! पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

चतुरंग 11/03/2008 - 20:39
आपली सूचना नक्कीच विचार करण्याजोगी आहे. संपूर्ण काव्याच्या अनुषंगाने तिचा वापर कसा करुन घेता येईल हे मी जरुर तपासून बघेन. चतुरंग

In reply to by लिखाळ

बहुगुणी 22/06/2008 - 18:34
चतुरंगः अतिशय आवडलेला अनुवाद, धन्यवाद. लिखाळांच्या वरील प्रतिक्रियेबद्दलः तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, या ओळीऐवजी तूच सखे जणू वारुणी माझी, मी तो आसुसला प्याला, अशी रचना केल्यास चालेल का?

In reply to by बहुगुणी

चतुरंग 22/06/2008 - 21:02
स्वागतार्ह सूचनेबद्दल आभारी आहे. आपण सर्व रसिक इतक्या आत्मियतेने ह्या अनुवादाचा विचार करत आहात ह्यातच सर्व आले! 'मधुशाला' हे अनेक वेगवेगळे आयाम दाखविणारे काव्य आहे. नुसते सखी, वारुणी किंवा एकच व्यक्ती ह्यांना उद्देशून लिहिलेले नसून ते सर्वसमावेशक तत्त्वज्ञाच्या पातळीवरही जाते, असे मला वाटते, तेव्हा काव्यात असलेल्या त्या सर्व भूमिकांना न्याय मिळेल अशीच संकल्पना वापरावी लागेल असे वाटते. चतुरंग

प्राजु 12/03/2008 - 00:51
मला वाटते धनंजय यांनी घडवून आणलेल्या चर्चेत मी आपल्याला सुचवलं होतं की आपण संपूर्ण मधुशाला मराठित आणा म्हणून... मी खरंतर वाटच पहात होते. खूप आनंद झाला आपण माझ्या विनंतीचा मान ठेवलात. एकच सांगते आपल्या या मधुशालेने मिपाची उंची आंतर जालिय मराठी जगतात बाकीच्या संकेत स्थळांपेक्षा खूप वाढली आहे. आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय सुंदर भाषा, शब्द आणि रचना.. लयबद्ध.. पुढच्या रूबायांच्या प्रतिक्षेत आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चतुरंग 12/03/2008 - 02:21
धनंजयने घडवून आणलेल्या चर्चेचा दुवा माझ्या लेखनात देण्यामागचे कारणच हे होते की ह्या लेखनाची पार्श्वभूमी काय आहे ते वाचकांना कळावे. ह्या अनुवादामागचे कारण माझे मराठीप्रेम जितके आहे तितकेच तुझ्यासारखे मि.पा. वरचे रसिकही आहेत हे नक्की! चतुरंग

यशोधरा 24/06/2008 - 09:20
चतुरंगजी, सॉरी, मला माहीत नव्हते, शोधते आता. इथे जुन्या लिंक्स देता येतील का?

केशवसुमार 11/03/2008 - 11:00
चतुरंगशेठ, स्तुत्य उपक्रम्..अभिनंदन आणि शुभेच्छा.. संकल्प सिद्धिस न्या.. पहिल्या पाच रुबाया उत्तम झालेल्या आहेत... (मद्य न चाखलेला मधुशालेचा चाहता)केशवसुमार

बेसनलाडू 11/03/2008 - 11:06
नक्षीदार तरीही आकलनीय शब्दयोजना आणि लय. भावानुवाद आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. (उत्सुक)बेसनलाडू

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:31
रंगराव, सुरेखच भावानुवाद. तुमचं खरंच कौतुक वाटतं. संपूर्ण मधुशालेचा हा मराठी भावानुवाद म्हणजे मिपाकरता एक खजिनाच म्हणावा लागेल! पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती.. आपला, (मधुशालाप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 11/03/2008 - 20:32
रसिकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मूळ लेखनात काही दुरुस्त्या करता आल्या तर निर्दोष कृती देण्याचे मनसुबे तडीस जातील. नीलकांताच्या मदतीने संपादनाची शक्ती पूर्ववत स्थापित करावी ही आग्रहाची विनंती - ह्याबाबत आधीही संवाद साधलेला आहेच. ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 12/03/2008 - 16:44
('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. आपली मागणी पूर्ण केली आहे असं आम्हाला आठवतं! :) ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) नक्कीच होऊ शकते. मिसळपावला नान्या आणि मधुशाला दोघे सारखेच लाडके आहेत. येथे पंक्तिप्रपंच नाही! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 12/03/2008 - 00:21
पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती..
असेच म्हणातो!

धनंजय 11/03/2008 - 11:42
शुभेच्छा! शब्दयोजना आवडली. एक रुबाई तितकी समजली नाही "भरुन आणिला काव्यचषक हा कविस्वरुपी मद्याला" ओळीचा अर्थ लागला नाही. मुळात मोठे कल्पक समांतर रूपक आहे. द्राक्ष/वेल=भाव मद्य=कल्पना प्याला=कविता साकी=कवी** वाचक=पीणारा पुस्तक=मधुशाला ती पूर्ण साखळी अनुवादित रुबाईत लागत नाही. विशेषकरून ** ठिकाणी. बाकी अनुवादाला सलाम! आम्ही आनंदाने वाचत आहोत.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 20:37
प्रकाशित करण्याआधीच्या संपादनाच्या शेवटल्या फेरीत ही सुधारणा राहून गेली - तिथे "भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला" असे योजले होते. तात्यांनी संपादनाचा अधिकार पूर्ववत केल्यास मूळ लेखनात ही दुरुस्ती होईल. -------------------------------------------------------------- धनंजय, वरील दुरुस्ती केली आहे आता रुबाई मूळ काव्याशी सलगी दाखवते! संपादनाचे अधिकार दिल्याबद्दल तात्यांचे आभार :) चतुरंग

लिखाळ 11/03/2008 - 18:14
फार छान अनुवाद. कल्पक. एक वाटले ते मोकळेपणी सांगतो. मला काव्य, अनुवाद यातले काही कळत नसून सुद्धा धाडस करतो आहे. सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१। रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ।।१। आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२|| तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, .... मूळ हिंदी कवितेत कवी प्रत्यक्ष वाचकाला उद्देशून लिहित आहे. तसेच हिंदीमधिल 'आप' न वापरता 'तू' असे मित्रत्वाने कवी संबोधत आहे. तो वाचकाशी सरळ संवाद साधत आहे असे जाणवले. आपल्या अनुवादात मात्र आपण सर्व रसिकांशी संवाद साधत आहात. त्यामुळे थोडी औपचारिकता वाढली आहे. त्यामुळे अनुवादित कविता थेट वाचकाशी बोलण्यात थोडी मागे पडेल का? !! पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

चतुरंग 11/03/2008 - 20:39
आपली सूचना नक्कीच विचार करण्याजोगी आहे. संपूर्ण काव्याच्या अनुषंगाने तिचा वापर कसा करुन घेता येईल हे मी जरुर तपासून बघेन. चतुरंग

In reply to by लिखाळ

बहुगुणी 22/06/2008 - 18:34
चतुरंगः अतिशय आवडलेला अनुवाद, धन्यवाद. लिखाळांच्या वरील प्रतिक्रियेबद्दलः तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, या ओळीऐवजी तूच सखे जणू वारुणी माझी, मी तो आसुसला प्याला, अशी रचना केल्यास चालेल का?

In reply to by बहुगुणी

चतुरंग 22/06/2008 - 21:02
स्वागतार्ह सूचनेबद्दल आभारी आहे. आपण सर्व रसिक इतक्या आत्मियतेने ह्या अनुवादाचा विचार करत आहात ह्यातच सर्व आले! 'मधुशाला' हे अनेक वेगवेगळे आयाम दाखविणारे काव्य आहे. नुसते सखी, वारुणी किंवा एकच व्यक्ती ह्यांना उद्देशून लिहिलेले नसून ते सर्वसमावेशक तत्त्वज्ञाच्या पातळीवरही जाते, असे मला वाटते, तेव्हा काव्यात असलेल्या त्या सर्व भूमिकांना न्याय मिळेल अशीच संकल्पना वापरावी लागेल असे वाटते. चतुरंग

प्राजु 12/03/2008 - 00:51
मला वाटते धनंजय यांनी घडवून आणलेल्या चर्चेत मी आपल्याला सुचवलं होतं की आपण संपूर्ण मधुशाला मराठित आणा म्हणून... मी खरंतर वाटच पहात होते. खूप आनंद झाला आपण माझ्या विनंतीचा मान ठेवलात. एकच सांगते आपल्या या मधुशालेने मिपाची उंची आंतर जालिय मराठी जगतात बाकीच्या संकेत स्थळांपेक्षा खूप वाढली आहे. आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय सुंदर भाषा, शब्द आणि रचना.. लयबद्ध.. पुढच्या रूबायांच्या प्रतिक्षेत आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चतुरंग 12/03/2008 - 02:21
धनंजयने घडवून आणलेल्या चर्चेचा दुवा माझ्या लेखनात देण्यामागचे कारणच हे होते की ह्या लेखनाची पार्श्वभूमी काय आहे ते वाचकांना कळावे. ह्या अनुवादामागचे कारण माझे मराठीप्रेम जितके आहे तितकेच तुझ्यासारखे मि.पा. वरचे रसिकही आहेत हे नक्की! चतुरंग

यशोधरा 24/06/2008 - 09:20
चतुरंगजी, सॉरी, मला माहीत नव्हते, शोधते आता. इथे जुन्या लिंक्स देता येतील का?
लेखनविषय:
3

अरुणोदय झाला!

ॐकार ·

सर्किट 11/03/2008 - 12:06
खूपच छान छायाचित्रे. अनेक दिवसांपासून सूर्योदय बघण्याचे मनात होते. पण आज योग आला. सकाळी खूपच लवकर होतो म्हणतात.. (शेवटच्या चित्रातील फुलांचे नाव कुणाला आठवते का ? ह्या झाडाला पांढरा चीक असतो, आणि तो डोळ्याला अपायकारक असतो असे ऐकले आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 11/03/2008 - 12:09
मारुतीला रुईची पाने वाहातात. याच्या फळांत रुईसारखा कापूस असतो. फोटो मस्तच. काही चित्रांत सूर्याभोवती खालच्या बाजूला कडे आहे... कॅमेर्‍यामुळे?

इनोबा म्हणे 11/03/2008 - 13:14
जबरदस्त! मन प्रसन्न जाहले... अवांतर: ही प्रकाशचित्रे लॉ कॉलेजमागच्या हनूमान टेकडीवरुन घेतली आहेत काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

कोलबेर 11/03/2008 - 19:31
तसा प्रत्यक्ष सुर्योदय पहाण्याचा फारच कमी वेळा योग आला आहे ;) .. तुमच्या ह्या चित्रमालेने एक प्रसन्न सुर्योदय पहायला मिळाला! धन्यवाद!!

प्राजु 11/03/2008 - 20:42
अप्रतिम चित्र.... एका झुडुपा मागे... खूपच सुंदर.. मानलं तुम्हाला... - (सर्वव्यापी)प्राजु

ॐकार 12/03/2008 - 10:57
ही टेकडी वानवडी आणि महंमदवाडी च्या मध्ये आहे. ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असल्याने सद्ध्या तरी हे सुख अनुभवता येते. माझे घर इथून १० मि. वर असल्याने मनात येईल आणि वेळ मिळेल तसे मी कधीही इथे भटकायला जातो.

सुवर्णमयी 04/04/2008 - 16:28
छायाचित्रे तर सुंदर आहेतच पण गाण्यांची निवडही आवडली. रुईची झाडे सध्या शहरात एवढ्या सहज दिसत नाहीत. मला तर या भारत भेटीत अगदी दूर जिथे वस्ती नाही तिथे एखादे रुईचे झाड दिसले असेल. बाकी या झाडाशी निगडीत सगळया आठवणी लहानपणच्या आहेत. सोनाली

मदनबाण 04/04/2008 - 16:58
सर्वच चित्रे सुंदर आहेत्,रुई च्या झाडाचे चित्र तर फार आवडले. या झाडाचा कापुस जेव्हा आकाशात उंच उडतो तेव्हा तेही पहायला मजा वाटते. ( ॐ सुर्यय नमः ) मदनबाण

ऋषिकेश 05/04/2008 - 08:53
झकास.. सगळी प्रकाशचित्रे खूप आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट 11/03/2008 - 12:06
खूपच छान छायाचित्रे. अनेक दिवसांपासून सूर्योदय बघण्याचे मनात होते. पण आज योग आला. सकाळी खूपच लवकर होतो म्हणतात.. (शेवटच्या चित्रातील फुलांचे नाव कुणाला आठवते का ? ह्या झाडाला पांढरा चीक असतो, आणि तो डोळ्याला अपायकारक असतो असे ऐकले आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 11/03/2008 - 12:09
मारुतीला रुईची पाने वाहातात. याच्या फळांत रुईसारखा कापूस असतो. फोटो मस्तच. काही चित्रांत सूर्याभोवती खालच्या बाजूला कडे आहे... कॅमेर्‍यामुळे?

इनोबा म्हणे 11/03/2008 - 13:14
जबरदस्त! मन प्रसन्न जाहले... अवांतर: ही प्रकाशचित्रे लॉ कॉलेजमागच्या हनूमान टेकडीवरुन घेतली आहेत काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

कोलबेर 11/03/2008 - 19:31
तसा प्रत्यक्ष सुर्योदय पहाण्याचा फारच कमी वेळा योग आला आहे ;) .. तुमच्या ह्या चित्रमालेने एक प्रसन्न सुर्योदय पहायला मिळाला! धन्यवाद!!

प्राजु 11/03/2008 - 20:42
अप्रतिम चित्र.... एका झुडुपा मागे... खूपच सुंदर.. मानलं तुम्हाला... - (सर्वव्यापी)प्राजु

ॐकार 12/03/2008 - 10:57
ही टेकडी वानवडी आणि महंमदवाडी च्या मध्ये आहे. ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असल्याने सद्ध्या तरी हे सुख अनुभवता येते. माझे घर इथून १० मि. वर असल्याने मनात येईल आणि वेळ मिळेल तसे मी कधीही इथे भटकायला जातो.

सुवर्णमयी 04/04/2008 - 16:28
छायाचित्रे तर सुंदर आहेतच पण गाण्यांची निवडही आवडली. रुईची झाडे सध्या शहरात एवढ्या सहज दिसत नाहीत. मला तर या भारत भेटीत अगदी दूर जिथे वस्ती नाही तिथे एखादे रुईचे झाड दिसले असेल. बाकी या झाडाशी निगडीत सगळया आठवणी लहानपणच्या आहेत. सोनाली

मदनबाण 04/04/2008 - 16:58
सर्वच चित्रे सुंदर आहेत्,रुई च्या झाडाचे चित्र तर फार आवडले. या झाडाचा कापुस जेव्हा आकाशात उंच उडतो तेव्हा तेही पहायला मजा वाटते. ( ॐ सुर्यय नमः ) मदनबाण

ऋषिकेश 05/04/2008 - 08:53
झकास.. सगळी प्रकाशचित्रे खूप आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
पुण्यभूमीत डोंगराआड उगवणार्‍या सूर्याने दिलेले दर्शन :) ही वाट दूर जाते... माझिया पाषाणहृदयी वेदनेचे झाड आहे. सूर्यकिरण सोनेरी हे... तुझ्या नभाला गडे क

(भाउबंदकी)

केशवसुमार ·

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:01
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! खरं आहे रे बाबा! अरे मिसळपावच्या दुसर्‍याच दिवशी इथे येऊन पोष्टमनने पोष्टखाते सुरू केलेन! :) 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! हा हा हा! क्या बात है केशवा! खल्लास लिहिलं आहेस! :) काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा! मस्त.. विडंबने ही सुटली नाही "केश्या" मेला आहे, हलकट असू देत, परंतु केश्याचा हा हलकटपणा आवडला आपल्याला! :) आपला, (नॉर्थ कॅरोलिनाचा पोष्टमास्तर जनरल) तात्यागजानन!

बेसनलाडू 11/03/2008 - 08:00
नेहमीचा मसाला नसला, तरीही शब्द किंवा ओळी खालीवर होणे चालूच आहे. तरी नशीब पोटदुखी नि कसलेकसले वास आलेले नाहीत :) एक शेर तर जवळजवळ जसाच्या तसा आलाय. अतिपरिचयादवज्ञा म्हटले होते, ते हेच. पण यालाही रसिकांची मस्त दाद आल्यास नवल वाटायचे नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम! (शुभेच्छुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 11/03/2008 - 08:26
अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी.. पोटदुखी नाही कशी.. झालेली दिसते आहे.. आणि वास ही येता आहे .. असो..बेटर लक साठि धन्यवाद.. (आभारी) केशवसुमार

प्राजु 11/03/2008 - 08:36
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! सॉलिड.....आवडले... - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 11/03/2008 - 10:56
जाऊ दे रे केशवा, शेवटी बेलाने, माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हे जे म्हटलं आहे ते योग्यच आहे. आहेत खरी माऊलीची लेकरे दिवटी आणि हलकट! माऊली माऊली म्हणून ऊर बडवणार्‍या काकाने (माऊलीच्या सो कॉल्ड लाडक्या लेकराने!) मिपाच्या सुरवातीच्याच काही दिवसात मिसळपाववरील एका सन्माननीय स्त्री सभासदासंदर्भात जुनी म्हण वापरून एक अत्यंत तुच्छतापूर्वक व्य नि मला पाठवावा आणि वरती शिवाय :)) असा स्माईली टाकावा याचे मला राहून राहून वाईट वाटले! च्यामारी आमचे पाय तर चिखलाने भरलेलेच आहेतच परंतु माऊलीच्या ओव्यांची पारायणे करणार्‍या माणसाने मिपावर असे धंदे करावेत यावरून त्याचे पाय चिखलात नव्हे तर मैल्यात अगदी घट्ट रुतलेले आहेत हे समजते! हम्म! काय करणार? त्या माऊलीचं दुदैव म्हणायचं आणि गप्प बसायचं! दुसरं काय!! वास्तविक ज्या माणसाचा माऊलीचा अभ्यास आहे अश्या माणसाने अद्याप व्यक्तिगत स्वार्थाच्या, तुच्छतेने भरलेल्या व्य निं च्या आणि हेवादाव्याच्या मैल्यातून बाहेर पडू नये हे पाहून माऊलीचा रेडादेखील दु:खी झाला असेल. बेला म्हणतो ते अगदी खरं आहे! कट्ट्यावरचे वासू तर्कट वाचा विष्ठा, मनही मळकट! असेच मला तो व्य नि वाचून वाटले होते! असो... आपला, (नॉर्थ कॅरोलिनाच्या कट्ट्यावरचा वासू!!) तात्या. -- बेटा श्याम, ठेव ते गीतेचे पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे बाबा ते! पण आपण नाही ना एवढे थोर! --इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:38
आमच्याच वरील प्रतिसादावरून आम्हालाही दोन ओळी सुचल्या आहेत आणि आम्हीही किंचित कवी झालो आहे! नक्की सांगा बरं का कश्या वाटल्या ते! काय करावे अता माउली विचार बुरसट, निरोप कुचकट :)) आपला, (निरोप्या) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:40
तात्या, तुम्ही पुतण्याचा व्यनि जाहीर करून एक चूक केली, आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. असो, मुळात केशवसुमारांचे विडंबन, त्यांच्या नेहमीच्या विडंबनाइतके खास नाही. कारण विडंबन चांगले व्हायला आधी मूळ कविताच अधिक चांगली असावी लागते. इथे तर मूळ कविताच विडंबनत्म्क होती, त्यामुळे विडंबन हे गंभीर हवे होते, असे वाटते. आता च्यालेंज पूर्ण करायला केसुंना दुसरी भरभक्कम कविता घ्यायला हवी. पसायदान कसे वाटते ? - (सत्कर्मी रती वाढलेला) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:49
आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. नाही, पुतण्याचा व्य नि जाहीर करून आम्ही जी चूक केली होती ती यावेळेस केलेली नाही. पुतण्याचा व्य नि आम्ही जसाच्या तसा शब्दश: जाहीर केला होता. काकांचा व्य नि आम्ही जाहीर केलेला नसून त्याचा फक्त ओझरता उल्लेख येथे केला आहे. त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:57
त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही.. चांगला निर्णय... जो जे वांछील तो ते लाहो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो... - (प्राणिजात) सर्किट

धोंडोपंत 11/03/2008 - 21:23
हा हा हा हा हा, 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! वा वा क्या बात है!! काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा. केश्या, अरे ! फार हाणलंस रे ढवळ्या पवळ्याला. आपला, (गाडीवान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:01
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! खरं आहे रे बाबा! अरे मिसळपावच्या दुसर्‍याच दिवशी इथे येऊन पोष्टमनने पोष्टखाते सुरू केलेन! :) 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! हा हा हा! क्या बात है केशवा! खल्लास लिहिलं आहेस! :) काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा! मस्त.. विडंबने ही सुटली नाही "केश्या" मेला आहे, हलकट असू देत, परंतु केश्याचा हा हलकटपणा आवडला आपल्याला! :) आपला, (नॉर्थ कॅरोलिनाचा पोष्टमास्तर जनरल) तात्यागजानन!

बेसनलाडू 11/03/2008 - 08:00
नेहमीचा मसाला नसला, तरीही शब्द किंवा ओळी खालीवर होणे चालूच आहे. तरी नशीब पोटदुखी नि कसलेकसले वास आलेले नाहीत :) एक शेर तर जवळजवळ जसाच्या तसा आलाय. अतिपरिचयादवज्ञा म्हटले होते, ते हेच. पण यालाही रसिकांची मस्त दाद आल्यास नवल वाटायचे नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम! (शुभेच्छुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 11/03/2008 - 08:26
अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी.. पोटदुखी नाही कशी.. झालेली दिसते आहे.. आणि वास ही येता आहे .. असो..बेटर लक साठि धन्यवाद.. (आभारी) केशवसुमार

प्राजु 11/03/2008 - 08:36
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! सॉलिड.....आवडले... - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 11/03/2008 - 10:56
जाऊ दे रे केशवा, शेवटी बेलाने, माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हे जे म्हटलं आहे ते योग्यच आहे. आहेत खरी माऊलीची लेकरे दिवटी आणि हलकट! माऊली माऊली म्हणून ऊर बडवणार्‍या काकाने (माऊलीच्या सो कॉल्ड लाडक्या लेकराने!) मिपाच्या सुरवातीच्याच काही दिवसात मिसळपाववरील एका सन्माननीय स्त्री सभासदासंदर्भात जुनी म्हण वापरून एक अत्यंत तुच्छतापूर्वक व्य नि मला पाठवावा आणि वरती शिवाय :)) असा स्माईली टाकावा याचे मला राहून राहून वाईट वाटले! च्यामारी आमचे पाय तर चिखलाने भरलेलेच आहेतच परंतु माऊलीच्या ओव्यांची पारायणे करणार्‍या माणसाने मिपावर असे धंदे करावेत यावरून त्याचे पाय चिखलात नव्हे तर मैल्यात अगदी घट्ट रुतलेले आहेत हे समजते! हम्म! काय करणार? त्या माऊलीचं दुदैव म्हणायचं आणि गप्प बसायचं! दुसरं काय!! वास्तविक ज्या माणसाचा माऊलीचा अभ्यास आहे अश्या माणसाने अद्याप व्यक्तिगत स्वार्थाच्या, तुच्छतेने भरलेल्या व्य निं च्या आणि हेवादाव्याच्या मैल्यातून बाहेर पडू नये हे पाहून माऊलीचा रेडादेखील दु:खी झाला असेल. बेला म्हणतो ते अगदी खरं आहे! कट्ट्यावरचे वासू तर्कट वाचा विष्ठा, मनही मळकट! असेच मला तो व्य नि वाचून वाटले होते! असो... आपला, (नॉर्थ कॅरोलिनाच्या कट्ट्यावरचा वासू!!) तात्या. -- बेटा श्याम, ठेव ते गीतेचे पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे बाबा ते! पण आपण नाही ना एवढे थोर! --इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:38
आमच्याच वरील प्रतिसादावरून आम्हालाही दोन ओळी सुचल्या आहेत आणि आम्हीही किंचित कवी झालो आहे! नक्की सांगा बरं का कश्या वाटल्या ते! काय करावे अता माउली विचार बुरसट, निरोप कुचकट :)) आपला, (निरोप्या) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:40
तात्या, तुम्ही पुतण्याचा व्यनि जाहीर करून एक चूक केली, आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. असो, मुळात केशवसुमारांचे विडंबन, त्यांच्या नेहमीच्या विडंबनाइतके खास नाही. कारण विडंबन चांगले व्हायला आधी मूळ कविताच अधिक चांगली असावी लागते. इथे तर मूळ कविताच विडंबनत्म्क होती, त्यामुळे विडंबन हे गंभीर हवे होते, असे वाटते. आता च्यालेंज पूर्ण करायला केसुंना दुसरी भरभक्कम कविता घ्यायला हवी. पसायदान कसे वाटते ? - (सत्कर्मी रती वाढलेला) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:49
आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. नाही, पुतण्याचा व्य नि जाहीर करून आम्ही जी चूक केली होती ती यावेळेस केलेली नाही. पुतण्याचा व्य नि आम्ही जसाच्या तसा शब्दश: जाहीर केला होता. काकांचा व्य नि आम्ही जाहीर केलेला नसून त्याचा फक्त ओझरता उल्लेख येथे केला आहे. त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:57
त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही.. चांगला निर्णय... जो जे वांछील तो ते लाहो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो... - (प्राणिजात) सर्किट

धोंडोपंत 11/03/2008 - 21:23
हा हा हा हा हा, 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! वा वा क्या बात है!! काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा. केश्या, अरे ! फार हाणलंस रे ढवळ्या पवळ्याला. आपला, (गाडीवान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता विडंबन लिहिण्याचे ओपन च्यालेंज मिळ्याल्या पासून विडंबनासाठी कच्चा माल शोधत होतो आणि आज पहाटे पहाटे बेसनलाडू यांची भाउबंदकी वाचनात आली.. म्हणल बघू जमतय का आपल्याला... किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! चिलटांची त्या कशाच चिंत्ता? वशिंड भरले, शिंगे दणकट! काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट विडंबने ही सुटली नाही "केश्या" मेला आहे, हलकट

वेश्याव्यवसायाची नैतिकता

धनंजय ·

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:35
धन्याशेठ, तुझ्या काथ्याकुटाचा विषय आवडला. इंटरेश्टींग आहे! :) आता माझी मतं - पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे. मी तर म्हणेन की भीष्मालादेखील स्वप्नदोष (झोपेतल्या झोपेत वीर्यस्खलन) झाला असणार. कारण मनुष्यप्राणी हा स्खलनशील आहे, आणि मेडिकल सायन्स प्रमाणे मनुष्य शरीर हे ठराविक काळापेक्षा अधिक काळ त्याच्या शरीरात तयार होणारे स्पर्मस रोखून ठेवू शकतच नाही. तेव्हा माझ्या मते भीष्म देखील ब्रह्मचारी नव्हता जर तो मनुष्यप्राणी असेल तर! आणि वीर्यस्खलन झाले की ब्रह्मचर्य संपले! मग भले ते १) स्त्रीशी संग येऊन होवो किंवा २) अपना हाथ जगन्नाथ हस्तमैथूनाने होवो किंवा झोपेतल्या झोपेत होवो! जी मंडळी १) व २) प्रमाणे वीर्यस्खलन रोखून धरू शकतात त्यांना निद्रावस्थेत ब्रह्मचर्यभंगाला सामोरे जावेच लागते लागते कारण मेडिकल सायन्सचा तसा नियमच आहे! तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय? माझ्या मते तरी नाही! कारण बाजारी नकद व्यवहारात रोगराईची भितीच अधिक असते. तेव्हा त्या वाटेला न जाणंच अधिक श्रेयस्कर! आणि मी म्हणतो की 'भुरळपाडून',' फूस लावून भोग घेणं' असं तुम्ही म्हणताय खरं पण भुरळ पाडून घेणार्‍याला किंवा घेणारीला ते समजायला नको काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही! तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही. हा हा हा! धन्याशेठ, हा तू भलताच मुद्दा मांडला आहेस. यावर मला ठाम असं एक उत्तर देता येत नाहीये! :) कारण व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर अद्याप तरी मी अविवाहीत आहे आणि अद्याप तरी कुणी कळकळीने माझ्यासमोर ह्या प्रशिक्षणाचा मुद्दा मांडलेला नाही! :) बाय द वे, 'नवविवाहितांना प्रशिक्षण देऊन' असं तू म्हटलं आहेस, त्या ऐवजी अविवाहितांना विवाहाला वर्ष सहा महिने असताना पूर्वप्रशिक्षण देण्यास काय हरकत आहे? भावी वराची/वधूची याला संमती असेल तर फारच उत्तम! बाहेरचे ट्रेनिंग कोर्सेसही जॉईन करायला नकोत! :) जोक्स अपार्ट, परंतु 'प्री मॅरिटल सेक्स' हा माझ्या मते महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात कुणा तज्ञाने मिपावर काथ्याकुटास सुरवात करावी असे वाटते. इथे या बाबत अधिक चर्चा केल्यास विषयांतर होईल! नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे. आहेस खरा तर्कशुद्ध! :) तुझ्या '४अ' या मुद्द्याशी मी पूर्णत: सहमत आहे.... त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला! बहुत करून काही श्रीमंत घरातल्या काही बायका नवर्‍याच्या अपरोक्ष खुलेआम नव्हे, तर ओळखी ओळखीत लपूनछपून दुसर्‍या पुरुषासोबत शैय्या करतात त्यांचे दर आवाच्या सव्वा असतात. माझ्या माहितीत अश्या काही चांगल्या घरंदाज, श्रीमंत, खात्यापित्या घरच्या अत्यंत देखण्या स्त्रीया आहेत! तसेच काही अभिनेत्रीही आहेत ज्यांचा उल्लेख मी रौशनीच्या एका भागत केलेला आहे! अर्थात माझं वरील म्हणणं हे काही अपवादात्मक स्त्रीयांबद्दलच आहे. खुलेआम बाजार मांडून बसणार्‍या स्त्रीयांच्या बाबतीत तू म्हणतोस त्याप्रमाणे 'कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी' हे कदाचित खरंही असू शकेल! तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी. तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्‍हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.) सहमत आहे! याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. हा शेवटचा परिच्छेद अप्रतिम! विचार करायला लावणारा! आपला, (धन्याच्या बुद्धीमत्तेचा फ्यॅन!) तात्या.

मुक्तसुनीत 11/03/2008 - 08:26
सर्वप्रथम , धनंजय यांचे एका उत्कृष्ट लेखाबद्दल अभिनंदन - आणि मिसळपावचेही. धनंजय यांचा आपल्या या लाडक्या स्थळावरचा वावर म्हणजे या स्थळाचा मानबिंदू आहे असे विधान करणे धाडसाचे होणार नाही. धनंजय यानी एका गुंतागुंतीच्या आणि अगदी जुन्या सामाजिक संस्थेविषयी उहापोह केला आहे. ('वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन्' असा उल्लेख वेश्याव्यवसायाबद्दल केला जातो.) त्यांच्या लिखाणाचे एक तात्पर्य असे असू शकते की शरीराचा क्रय आणि विक्रय या गोष्टी स्वत:मधे अनैतिक नाहीत (द ऍक्ट्स इन देमसेल्व्स आर नॉट अन्-एथिकल) . धनंजय यांच्या लिखाणाचा अजून एक अर्थ "या व्यवसायाचा डिफेन्स" असा सुद्धा घेतला जाऊ शकतो. वेगवेगळे मुद्दे मांडून ते निर्विवादपणे सिद्ध करू पाहतात, की या व्यवसायाशी संबंधित असणारे इतर घटक अनैतिक , प्रसंगी सर्वात वाईट , नीच जातीचे गुन्हेगार असू शकतात , परंतु ज्या व्यक्ति (पक्षी : वेश्या) हा व्यवसाय करतात त्या व्यक्तिना अनैतिक म्हणता येणार नाही. पर्यायाने या व्यक्तिंच्या व्यवसायालाही अनैतिक म्हणता येणार नाही. मला वाटते , अशा प्रकारचा डिफेन्स मांडायला धनंजय यांच्यासारख्या अतिशय बुद्धिमान वकिलाची गरज नाहीच. मुद्दा सोपा आहे. तो असा की, या व्यवसायात पडणार्‍या बहुतांश स्त्रिया या त्यांच्या परिस्थितीच्या शिकार असतात. (दे आर द विक्टिम्स ऑफ देअर डायर सर्कम्स्टान्सेस.) सर्व पर्याय उपलब्ध असताना वेश्याव्यवसायात उतरणार्‍या स्त्रिया किती टक्के स्त्रिया असतील यावर संशोधन होऊ शकेल ; पण कॉमन सेन्सने असे म्हणता येईल की, बहुतांश स्त्रिया इतर पर्याय उपलब्ध नसल्याने, बर्‍याचदा बळाच्या वापराने, किंवा कौटुंबिक-सामाजिक परंपरेने या व्यवसायात पडलेल्या असतात. ("पडलेल्या" असतात या क्रियापदावरूनच हे सूचित होते.) आणि यात आपण कायद्याच्या बंधनाच्या आतल्या मुलींचा मुद्दा बाजूला ठेवू - त्याना विक्रीस बसविणे सरळसरळ गुन्हा होय. आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. पण कुठल्याही गोष्टीचा असा संदर्भविरहित अर्थ लावणे - विशेषतः नैतिकतेच्या दृष्टिने - अपुरेच ठरते. सर्व समाजात , सर्व काळात स्त्रियांचे शोषण होते. या शोषणाचा सगळ्यात वाईट बाय्-प्रोडक्ट म्हणजे दि वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन. तळटीप : मित्रानो, माझ्या लिखाणात इंग्रजी शब्द अति आले आहेत. या गोष्टीची मला शरम वाटते. मी अशी आशा करतो की एक दिवस असा येईल जेव्हा मी भेसळविरहित मराठीत लिहायला शिकेन. आमेन :-)

प्राजु 11/03/2008 - 08:32
धनंजय यांनी हा विषय काथ्याकुट या सदरात का टाकला याचाच मी विचार करते आहे. कारण त्यांनी विषय मांडणी इतकी सुंदर केली आहे की इथे चर्चेला जागाच नाही. मुक्तसुनित म्हणतात त्याप्रमाणे- आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. आणि जिथे उत्तरे मिळतात तिथे चर्चा कशावर करणार? एक अतिशय विचार करायला लावणारा आणि सुंदर लेख लिहिल्याबद्दल धनंजय यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. (सर्वव्यापी)प्राजु

सहज 11/03/2008 - 11:30
जगातल्या एका सर्वात जुन्या चर्चाविषयाला (पुन्हा एकदा) हात घातला गेला आहे. नैतिक अनैतिक सर्व सापेक्ष झाले आहे. जगभरातुन अनेक माहितीपट आले आहेत व सर्वात एकच कायम धागा दिसतो की या लोकांचे (बायकांची) फसवणूक, अत्याचार, शोषण. जर का ते थांबले तर या व्यवसायात सहभागी व्हायला किती जणी (जण) येउ शकतील याचे उत्तर मिळणे कठीण नव्हे. मुक्त शारीरिक संबंधाला चालना मिळाली तर जर का हा व्यवसाय कमी होईल असे म्हणले तर पश्चिमात्य देशात हा व्यवसाय कमी व्हायला हवा पण तसे तर दिसत नाही. शिवाय मग मुक्त शारीरिक संबंधाचे तोटे दिसले (वैद्यकिय तोटे) आता भर सुरक्षित शारीरिक संबंधावर जास्त. मधल्या मधे वेश्याव्यवसाय आहे तसा आहेच. उलट (चुकीच्या दिशेने) प्रगत होत आहे. जास्त पैसा येत आहे शेवटी मग पैसा, अज्ञान, पुरवठा, मागणी यांचा जोर वाढुन बाकी सगळे फोल. व्यवसायाचे नाव काही असो सत्य फक्त शोषण, पैसा.

आनंदयात्री 11/03/2008 - 11:07
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. पटले! अन मी एक धाडसी विधान करु इच्छितो, वर उल्लेखलेल्या सर्व दोषांचे (ज्यामुळे हा व्यवसाय अनैतिक आहे) निर्मुलन जरी झाले तरी हा व्यवसाय अनैतिकच राहिल. कारणः वेश्या व्यवसाय जितका जुना तितकाच माणुस हा कळपात रहाणारा प्राणी आहे हे ही सत्य खरे. आपली आजची समाजव्यवस्था ही पोट भरल्यानंतरच्या भुकांची वा मानसिकतेची (जसे प्रेम, भविष्याबद्दलची हवी असणारी निश्चितत) फलित आहे, असे मानण्यास जागा आहे. आयुष्याच्या प्रत्येक पर्वात सर्व सामान्य माणुस हा कोणत्या ना कोणत्या नातेसंबधांवर जगत असतो, जसे लहान असतांना आई वडिलांबरोबर, तारुण्यात प्रेयसी/सहचारिणी बरोबर, प्रौढावस्थेत सहचारिणी बरोबर, म्हातारपणात सहचारिणी अन मुलांबरोबर. आता या सर्व नातेसंबधात सुखी रहायला, अहंकार जपायला त्याने/ तिने व्यवसाय करणे गरजेचे असते, खाणकामगार सुद्धा कष्ट करतांना उद्याच्या सुखी आयुष्याचाच विचार करत असतो/ असावा. वेश्या व्यवसायात जेव्हा आपल्या समाजाचा बेस असणारी कुटुंबव्यवस्थाच जेव्हा बाद होते, तेव्हा हा व्यवसाय अनैतिक ठरतो असे मला वाटते. कारण बहुतांश वेश्यांना कुटुंबे नसतात/ होउ शकत नाहित, त्यांचे उत्तरायुष्य अत्यंत वाईट परिस्थितीत जाते परिणामी 'व्यवसाय' करण्याची कारणे फलित होउ शकत नाहित. प्लस काही प्रमाणात नादी लागलेल्या विवाहित पुरुषांचे सुध्धा संसार उध्वस्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय असावे. चोरी जशी अनैतिक, ती या समाजव्यवस्थेच्या मॉडेलला पुरक नाही तसेच वेश्या व्यवसाय पण अनैतिकच तो ही पुरक नाही.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 12:52
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी या व्यवसायाला जन्म देणारे वि़कृत, षंढ (कितीही आणि कितीही खालच्या शिव्या दिल्या तरी अपुर्‍याच पडतील) पुरुष समाजात होते, आहेत आणि रहातील. ते अशा ठिकाणी जाउन आपली XX XXX घेतात. अशा व्यावासायिक स्त्रिया आहेत म्हणून कित्येक संभाव्य बलात्कार वाचतात / वाचत असतील. (माझा या विषयावर सखोल अभ्यास नाही, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.) ह्याला उपाय म्हणजे १००% सुरळीत समाजव्यवस्था आणि समाजाची १००% सात्विक मनोवृती - दोन्ही गोष्टी अशक्य आहेत! मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 12:59
करा पण, तुम्हाला जर नैतिक असे वाटत असेल तर त्याची काही कारणे द्या ! म्हणजे आम्हाला (म्हणजे माझ्यासारखे मत असणार्‍या) कळेल तरी की हा व्यवसाय नैतिक कसा आहे ते !

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 14:33
प्रथम, मी हा व्यवसाय नैतिक आहे असे म्हटलेले नाही.
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी...
ह्या समाजात अनेक अनावश्यक नैतिक आणि आवश्यक अनैतिक व्यवसाय आहेत. लाच घेणे/देणे, हुंडा घेणे/देणे, राजकारण (विशेषनाम नव्हे.. अनेक व्यवसायांतील राजकारण जे सहकार्‍यांबरोबर, कर्मचार्‍यांबरोबर खेळले जाते) असे अनेक समाजघटक आहेत पण बर्‍याचदा ते करणार्‍यांची प्रतिमा मात्र स्वच्छ असते. वेश्याव्यवसायातही वेगवेगळे स्तर आहेत - काही पैशांसाठी (तर तुम्ही म्हणाल की मग हाच व्यवसाय का.. दुसरे नैतिक व्यवसाय ती करू शकते उदा. एक अशिक्षित बाई भांडी घासणे, घरकाम करणे इ. कामे करू शकते. पण अशा बायकांवरही लांडगे टपलेले असतात. गरीब बाईमाणूस असल्याने काही बोलूही शकत नाही. आणि पाळणाघरात, लेडिज होस्टेलमध्ये प्रत्येक निराधार निरक्षर स्त्रीला काम मिळतेच असे नाही. {म्हणजे भांडीघासणे, घरकाम ही कामे करू नयेत असे मी म्हणत नाही.. तर ते व्यवसायही स्त्री साठी १००% सुरक्षित आहेत असे नाही.}), काही भरपूर पैसा असून नुसतेच मजा करण्यासाठी (समाजातील उच्च स्तरातील बायका) , एखादी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, एखादी पत्नी नवर्‍याच्या आजारासाठी, काही गावी असलेल्या घरी पैसे पुरविण्यासाठी.. अशा एक ना अनेक स्तरातील स्त्रीया असतात. तर प्रत्येक बाई ही आवडीने हा व्यवसाय पत्करत नाही. माझे म्हणणे असे की हा व्यवसाय जरी अनैतिक असला तरी तो आणि असे अनेक व्यवसाय आता समाजाचा घटक आहेत. ("वेश्याव्यवसायारहित समाज" हे हवेहवेसे पण कायम स्वप्नच रहाणार आहे. कारण पुरुष.. ज्याच्या सुप्त भावनेने ह्यास जन्म दिला.) वेळ आल्यावर सगळे पाठ फिरवतात. नातेवाईक मदत करत नाहीत. मार्ग असतो, पण प्रत्येकीला वाईट वेळ आल्यावर सापडतोच असे नाही. काही वाटा चुकतात. वाटेवर यायची काहींकडे अक्कल नसते. म्हणून त्या अनैतिक नाहीत तर व्यवसायाचे मूळ - पुरुष अनैतिक. तरी कृपया अशा अशिक्षित गरजू महिला ज्यांना समाजसेवी संस्थेकडे जायचे सुद्धा ज्ञान नसते, त्यांसाठी आपण नैतिक व्यवसायाचे पर्याय सुचवू शकता का? मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 14:46
आपण माफ केलेत आम्ही उपकृत झालोत. आणी बहुतांश अशिक्षित गरजू महिला नैतिक व्यवसायच करतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे, या कारणामुळे आम्ही कोणतेही पर्याय सुचवु शकत नाही. धन्यवाद.

"मला वेश्याव्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते," असे जवळपास कुणीही म्हणणार नाही. हा 'धंदा' शोषणावर आधारित आहे. बहुतेकांना भुलवून, फसवून ह्या व्यवसायात आणले जाते. तर अनेकांना कमाईसाठी दुसरा कुठला चांगला पर्याय उपलब्ध झाला असता तर ते इकडे वळलेच नसते. त्यामुळे हा व्यवसाय, शोषणावर आधारित इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच, अनैतिकच वाटतो. १. तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?" असे एकाने विचारल्यावर एकीने "मला 'आयएएस ऑफिसर' व्हायचे होते/आहे," असेही सांगितल्याचा एक खरा किस्सा मला एकाने ऐकवला आहे. कदाचित ती 'हाय सोसायटी'ची असती तर तिला असा प्रश्न विचारण्याची हिंमत संबंधिताला झाली नसती. किंवा तिचे असे उत्तर देणे आम्हा खोटारड्या लोकांना हास्यास्पदही वाटले नसते. असो.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 11/03/2008 - 19:51
नुसते वेश्या व्यवासायच का? धुणी भांडी करणार्‍या महिलांना देखिल हा प्रश्न (तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?)विचारला तर "मला हा व्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते" अहे कुणीही म्हणणार नाही.. कारण हे सर्व व्यवसाय समाजात फारसे प्रतिष्ठा नसणारे व्यवसाय आहेत इतकेच.. परंतू त्यामूळे ते 'अनैतिक' असलेच पाहिजेत असे मात्र नाही. धुणीवाली/ भांडीवाली ह्यांच्या कामाला कुणीही अनैतिक म्हणणार नाही!

In reply to by कोलबेर

कोलबेर, धुणीवाली आणि भांडीवाला ह्यांच्या कामाला कुणीच अनैतिक म्हणणार नाही. पण ह्या कामांत शोषण आहेच. ह्या बायांना भविष्यनिर्वाह निधी (प्रॉविडंट फ़ंड), ग्रॅच्युइटी (मराठीत काय म्हणतात), किमान वेतन मिळायला हवे. इतरांसारख्या सुट्ट्या मिळायला हव्यात. आम्ही ह्या गोष्टी देतो काय? नाही! थोडक्यात दोन्ही ठिकाणी सेवा घेणारे अनैतिक कामच करीत आहेत आणि परिस्थिती जैसे-थे राहण्यास कळत-नकळत कारणीभूतही ठरत आहेत.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 14/03/2008 - 03:18
बरोबर... धुणी वाली आणि वेश्याच कशाला..अगदी (काही) सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही हे शोषण चालते..आणि कसल्याही प्रकारचे शोषण हे अनैतिकच त्यात काहीही वाद नाही..पण म्हणून सरसकट संपूर्ण व्यवसायच अनैतिक म्हणता येईल का?..समजा वेश्या व्यवसाय कसलेही शोषण न होऊ देता चालवला तरीही तो अनैतिकच ठरेला का?

१) कोठेवाली/घरवाली ही व्यावसायिक; वेश्या ही नोकरदार/गुलाम (अनुभवातुन तीच पुढे व्यावसायिक होउ शकते) आणि ग्राहक हा गिर्‍हाईक. २) कुठलाही व्यवसाय हा ग्राहकांच्या गरजेतून निर्माण होतो. ३) नैतिक / अनैतिक, प्राकृत / विकृत सापेक्ष आहे ४) ही तुलना भुक लागली असता व घरात अन्न नसता उपहारगृहात जाणे, डबा लावणे किंवा उपाशी राहणे याच्याशी करुन पहा. ५) ही तुलना नाट्यनिर्माता , रंगकर्मी व मायबाप प्रेक्षक यांच्याशी करुन पहा ६) गणिका व्यवसाय हा पुर्वीपासुन आहे. योग्य/अयोग्य ही मतमतांतरेही पुर्वीपासूनच आहेत. ७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय? ८) हा व्यवसाय नसता तर बलात्काराचे गुन्हे वाढले असते असे म्हणणे म्हणजे या व्यवसायाचे समर्थन करणे होत नाहि. तो प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व सारखा आहे. ९) योनिशुचिता जशी गौण व्हायला लागेल तसा हा व्यवसाय वाढीस लागेल १०) वेश्यांच्या जागी आपल्या आया बहिणि असत्या तर? याचे चित्र डोळ्या समोर आणा. असे करताना स्वामी विवेकानंद यांची शिकागो ला वेश्यावस्तीकड फेरफटका मारताना " या तर आमच्या भगिनी आहेत" या बोधकथेतील वाक्याची आठवण करुन पहा. ११) http://www.misalpav.com/node/114 इथ 'पोटाला नाही आटा अन चोटाला उटण वाटा 'इथे ओशाळणारी अश्लिलता आठवते. १२) क्या करें शेवटी अपना अपना हाथ अपना अपना जगन्नाथ प्रकाश घाटपांडे

अनिकेत 11/03/2008 - 16:25
अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि बायका, हे कायमच नफा देणारे धंदे होते आणि आहेत. युरोपातील वेश्याव्यवसायावर ही एक थरारक documentary आहे.. आपल्याकडे जे नेपाळमधे किंवा गरीब राज्यांत होते तेच पूर्व युरोपातही होते. येथे नैतिकतेच्या गप्पा मारण्याआधी अवश्य पहा. पण अधिक पैशांसाठी (गरजेपोटी नव्हे!) धंदे करणार्‍या कॉलेजातील पोरी अथवा डेली सोपमधील नट्यांचा उपभोग घेण्यात गैर आहे असे मला वाटत नाही. अनिकेत

नैतिक, अनिकतेचा विचार करण्याअगोदर आमचे मत असे आहे की, वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. जशी श्रमाला प्रतिष्ठा आहे,त्या प्रमाणे. ती मिळाली की नैतिक, अनैतिक राहणार नाही असे वाटते. पण, व्यवसाय म्हणतांना वेश्यांना आर्थिक गरजा भागवता येत नाही, म्हणुन त्या वेश्या व्यवसाय करतात. जर आर्थिक संपन्नता असेल तर त्या या गोष्टीकडे वळल्या असत्या का ? याचे उत्तर मला तरी 'नाही' असेच वाटते. ती सामाजिक गरज असेलही पण प्रतिष्ठा नसल्यामुळे मोठ मोठ्या मॉल्स मधे माणूस जितक्या सहजपणे प्रवेश करतो तितक्या सहजपणाने वेश्येच्या वस्तीत प्रवेश करण्याचे धाडस करतो का ? 'नाही'. म्हणुन समाधानासाठी ( आर्थिक सुबत्ता इथे प्रश्न नाही ) येणार्‍या स्त्रिया वेगळ्या. पण अधिक नफ्यासाठी व्यवसायात येणार्‍या या गरजू स्त्रिया आहेत, आणि त्यातही उच्च गरजा पूर्ण करण्यासाठी या अशा व्यवसायात तरुण मुली, स्त्रिया दिसतात. पण,योनिशुचिता ही व्यवसायातील/ बाजारपेठेतील मुख्य अडचण असल्यामुळे येत्या काळात वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल आणि तीही भारतात यावर माझा तरी विश्वास नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वस्तूंच्या अगर सेवा पुरविण्याच्या व्यवसायात आणि या व्यवसायात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे शरीराच्या मर्यादा व मनाचे आस्तित्त्व . या मर्यादांमुळे तिला ग्राहक नाकारण्याचा हक्क असायला हवा. असे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच फूट उंच व ४० किलो वजनाच्या स्त्रीकडे १२५ - १५० किलो वजनाचा सहासाडेसहा फुटी माणूस किंवा गलिच्छ किळसवाणा पण भरपूर पैसे मोजायला तयार असणारा श्रीमंत माणूस, पोलीस, गुंड वगैरे व्यक्ती आली तर तिने काय करावे? ४अ मुद्याबाबत बहुतेक लोक सहमत होतील. असो. एक चांगली चर्चा. धन्यवाद.

धनंजय 12/03/2008 - 02:56
आणि नवीन मुद्दे आले आहेत. असे वेगवेगळे विचार वाचून चर्चा प्रगल्भ होत आहे. तात्यांनी उल्लेख केलेला विवाहपूर्व संबंधांचा मुद्दा अवांतर नाही. अविवाहित व्यक्तीला लबाडीने भोग घेणे आणि विकत भोग घेणे हे दोनच पर्याय नाहीत. दोघांच्या स्वातंत्र्यास धक्का न देता, दोघांच्या भावनांची कदर करून, दोघांच्या गरजा भागवणे हा पर्याय आहेच. या बाबतीत "दोघांच्या भावनांची कदर, स्वातंत्र्य" यांना मी बर्‍यापैकी कडक निकष लावतो तो मागे एका कवितेत चर्चिला आहे. हा पर्याय असणे माझ्या विचारधारेला समर्थन देतो - कारण हा राजमार्ग असताना जो अविवाहित व्यक्ती वेश्याबाजारामुळे चळतो, तो त्याच्या इच्छेने, वेश्याबाजाराच्या अनैतिक भुरळीमुळे नाही. काही वेश्यांना पुष्कळ शुल्क मिळते हे खरे आहे. कालच न्यू यॉर्क राज्याचे राज्यपाल गोत्यात अडकले (दुवा) त्या ठिकाणच्या वेश्या ताशी १०००-५००० डॉलर दर लावत. अशा वेश्यांना बहुतेक नकाराधिकाराचे, किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य असावे. येथे राज्यपाल स्पित्झर हे विवाहित आहेत की नाहीत, त्यांच्या कुटुंबसंस्थेवर काय परिणाम होत आहे, हे बघण्याची मुख्य जबाबदारी स्पित्झर यांचीच आहे, ते जिला भेटले त्या "क्रिस्टेन"ची (विक्रेती म्हणून) नव्हे. जर हा बाजार खरोखर मुक्त आणि स्वतंत्र व्यक्तींमधला असेल तर हा माझ्या आर्थिक चर्चेतून निसटतो. तो मी केलेल्या वेगळ्या चर्चेत याच्या नैतिकतेचा विचार व्हावा - त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांस पूर्ण माणुसकीने वागवत आहेत की नाहीत. तेही होत असेल - कोणी कोणाला जनावर किंवा वस्तू म्हणून वागवीत नसेल तर या विषयाबद्दल मला वेगळे कुठले नैतिक कुतुहल नाही. तरीही हा अपवादात्मक, दुर्मिळ मालाचा व्यापार आहे. माझा मुख्य मुद्दा बहुसंख्य वेश्यांबद्दल आहे, ज्या पूर्ण स्वातंत्र्याने व्यापार करत नाहीत. मुक्तसुनीत म्हणतात (शिवाय वेगळ्या शब्दांत प्राजु, चित्तर, अनिकेत यांनी दिलेली चित्रफीत, म्हणतात) की पर्याय उपलब्ध असताना हा पेशा कोणीही स्वीकारणार नाही. यात बळजबरी, किंवा अगतिकता आलीच. (याला अपवाद स्पित्झर यांस विक्रय करणारी, वगैरे असेल - आपल्याला माहीत नाही.) मीही तो अगतिकतेचा मुद्दा आर्थिक ताळमेळ लावून करू इच्छितो. तो मुक्तसुनीत म्हणतात तसा सोपा नाही. मागे मुंबई पोलिसांनी "सोडवलेल्या" काही वेश्यांबद्दल ऐकले होते. त्यांचे म्हणणे होते की आम्ही स्वखुषीने धंदा करत आहोत. सोडवणूक नको होती. अनिकेत यांनी दिलेल्या चित्रफितीतही काही वेश्यांचे असे मत होते, की जर इंग्लंडमधून हद्दपार होणार असतील तर गुलामगिरीतून सोडवणूकच गैरसोयीची. (इथे अगतिकता थेट दिसते, पण मुंबईत सोडवलेल्या वेश्यांच्या बाबतीत ते स्पष्ट दिसत नव्हते.) माझ्या समान मनुष्य म्हणून त्या "आपखुषी" वेश्यांची साक्ष खरी मानण्यास माझी तयारी असलीच पाहिजे. दुसर्‍या कुठल्या बाबतीत थोडाफार अगतिक असल्याचा माझा अनुभव आहे, म्हणून त्यांचे "आपखुषीचे" विश्लेषण करू इच्छितो. आर्थिक गणित करून त्यांचा बाजार स्वातंत्र्याचा नाही हे दाखवतो. सर्वच वेश्या आपण नाखुषीने या धंद्यात आहोत अशी तक्रार करत असतील (म्हणजे कारकूनही तक्रार करतात, त्यांपेक्षा जास्त!) तर या लांब सिद्धतेची गरज नव्हती. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही (टंकनदोष सुधार केला). सहज आणि काही वेगळ्या पद्धतीने प्रकाश घाटपांडे विचार करतात की येथे नैतिक/अनैतिक सापेक्ष आहे, किंवा होऊ लागले आहे. त्या दोघांच्या बहुतेक मुद्द्यांचा मी स्वीकार करत असलो तरीही पूर्ण सापेक्षता नाही असे माझे मत आहे. अधिकाधिक सापेक्षता मानूनही नैतिकतेचा विचार केला जाऊ शकतो, असे मला या चर्चेत म्हणायचे आहे. स्वातंत्र्यहरण आणि मनुष्य-मूल्य-समानता (मूल्य=किंमत) या सापेक्ष मानू नयेत, असे मला वाटते. या नैतिक मूल्याला (मूल्य=तत्त्व) इंग्रजीत गोल्डन रूल असे म्हणतात. "जसे माझ्याशी वागणे इष्ट तसे सर्वांशी वागणे इष्ट, जसे माझ्याशी वागणे अनिष्ट तसे सर्वांशी वागणे अनिष्ट". "इष्ट" म्हणजे मला जपणे, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मला स्वस्त न करणे. हे कमीतकमी तत्त्व सापेक्ष मानू नये. बाकी प्रकाश घाटपांडे म्हणतात तसे वेश्यांना आयाबहिणी मानूनच त्यांच्या व्यापारातील स्वातंत्र्याचे विश्लेषण करतो आहे. "७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?" हे अगदी चपखल माझे तर्कशास्त्र आहे - फक्त माझा निष्कर्ष आहे की विद्यापीठाशी वाटाघाटीत माझ्या बुद्धीचे मूल्य ठरवण्याचे मला जितपत स्वातंत्र्य आहे, तितके स्वातंत्र्य शरीरविक्रीच्या वाटाघाटीतही असले पाहिजे. माझ्या गणिताप्रमाणे तितके स्वातंत्र्य नाही, त्याहून खूपच कमी आहे, त्यामुळे ती बाजारपेठ अनैतिक मानावी. सहज विचार करतात की मुक्त शरीरसंबधाची मुभा असलेल्या पाश्चिमात्य देशांत वेश्याबाजार अजून कार्यरत का? त्याचे कारण हे असावे की मुक्त (मोफत) भोग घेणारे व्यक्ती आणि विकतचा भोग घेणारे व्यक्ती बहुधा वेगवेगळे असावेत. "मोफत" शरीरभोग घेण्यात भावनांचा, वेळेचा खर्च करावा लागतो, हे विसरता कामा नये. तो खर्च करण्यास जे असमर्थ आहेत, त्यांना कदाचित रोख व्यवहारच सोपा जात असावा. मनस्वी आणि घाटपांडे "या सेफ्टी-वाल्वमुळे काही संभाव्य बलत्कार टळतात" त्याच्याकडे लक्ष वेधतात. हा मुद्दा वेश्याव्यवसाय या संदर्भात लागू तर आहेच. पण नैतिकता या संदर्भात लागू नाही असे तेही म्हणतात, ते योग्यच. मनस्वी अन्य कामधंद्यासाठी मुभा नसलेल्या स्त्रियांच्या अगतिकतेबद्दल सांगतात. पण या अगतिकतेमुळे त्या कामाला लागलेल्या स्त्रियांना शुल्क ठरवायचे स्वातंत्र्य नाही हे त्यांचे मत आहे, असे त्यांच्या लिखाणावरून मी समजतो. प्राडॉ मुद्दा उपस्थित करतात की या श्रमाला प्रतिष्ठा नाही; योनिशुचितेचे स्तोम आहे, याची आठवण देतात. सुधीर कांदळकर सांगतात की सेवा पुरवण्याबाबत नकाराधिकार असल्याशिवाय हा व्यवसाय अन्य व्यवसायांपेक्षा जाचक आहे, हे पटण्यासारखे आहे. कोलबेरही श्रमबाजाराची नैतिक तत्त्वे लागू व्हावीत, अशा मताचे दिसतात. सर्वांपेक्षा आनंदयात्री वेगळा दृष्टिकोन आणतात. त्यांचे मत असे की वेश्याव्यवसाय हा समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या कुटुंबसंस्थेला घातक आहे. यातही ते दोन्हीकडून विचार करत आहेत ही त्यांच्या विचारातील प्रगल्भता आहे. वेश्येला कुटुंबसुख नकारले जाते हा त्यांचा मुद्दा एक आगळीवेगळी सहानुभूती दाखवतो. वेश्येला जोडीदार-पती मिळण्याचे सौख्य नाही, हे व्यापाराच्या दृष्टीने सक्तीचे नाही, तरी आजच्या समाजातली परिस्थिती आहे. शारिरिक इजेसारखी ही मानसिक इजा आहे. अशा प्रकारची प्रीति-वैफल्याची मानसिक इजा काही थोड्याच काही व्यवसायांत होते. कुठल्याकुठे वर्षानुवर्षे पोस्टिंग झालेले सैनिक, खतरनाक व्यवसायामुळे षंढत्व आलेले कामगार, वगैरे. या कामगारांना या इजेच्या बदल्यात ज्या प्रकारचा मोबदला मिळतो, तितपत मोबदला वेश्येला मिळाला नाही, तर तो व्यापार योग्य मूल्याचा कसा म्हणावा. (वर तात्यांनी उल्लेखलेल्या उच्चवर्गीय वेश्यांना जोडीदार-पतीचे सुख मिळत असते, ते अपवादात्मक. तसेच प्रसिद्ध सिनेनट-नट्यांना पुढे जोडीदार करता येत असावा. पण त्यांचे सेवाशुल्क बघितल्यास व्यापारातील त्यांचे स्वातंत्र्य, नकाराधिकार, वगैरे बाजारबसव्यांपेक्षा अधिक असतो हे दिसते.) वेश्यागामी व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त होते, हा दुसर्‍याबाजूनेही आनंदयात्री विचार करतात, तो योग्यच. पण त्याविषयी वरील लेखात मी थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. एक मुख्य की त्यांचे मुद्दे व्यक्तींच्या कुटुंबाचा घात होण्याबद्दल आहेत. समाजात कुटुंबव्यवस्था नष्ट होण्याबद्दल नाहीत. दुसर्‍या कोणाचे तेही मत असू शकते. पण वेश्याव्यवसाय हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे, हे चर्चेत अनेकांनी नमूद केले आहे (वर्ल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन). त्या अर्थी वेश्याव्यवसाय हजारो वर्षांत समाजातील कुटुंबव्यवस्थेला नाहिसे करू शकला नाही, त्यात तेवढी शक्ती नाही, हे उघडच आहे. मला वाटत होते की केवळ "अनेकांशी भोग भोगणे अनैतिक हे गृहीतक मानावे" असे म्हणणारे कोणी चर्चेत सहभागी होईल. त्यांच्याशी माझा वेगळा वाद झाला असता - बहुतेक एकमेकांचे मुद्दे पटले नसते. पण तेही उद्बोधक ठरले असते.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:46
>>> मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक आहे. या ऐवजी मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही. असे वाचावे.

विसुनाना 12/03/2008 - 12:38
कालपासून चर्चा वाचत असलो तरी प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळाला नाही. चर्चेचे प्रस्तावक आणि संचालक श्री. धनंजय यांनी चर्चेचा गोषवारा घेतल्यामुळे चर्चा संपली की काय अशी शंका आली. परंतु विषय फारच व्यापक असल्याने ती पुढे सुरू राहील असे वाटते. म्हणून माझेही मत - चर्चा 'वेश्या व्यवसायाची नैतिकता/अनैतिकता' या विषयावर सुरू असली तरी केवळ स्त्री वेश्यांपुरतीच मर्यादित राहिली काय अशी शंका येते. वेश्यांमध्ये लिंगपरत्वे तीन प्रकार आहेत - पुरुष वेश्या - (जिगोलो), क्लीब वेश्या आणि स्त्री वेश्या. हे तीन्ही व्यवसायप्रकार फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत. शिवाय समलैंगिक वेश्यावृत्ती आणि विषमलैंगिक वेश्यावृत्ती यांच्याबाबतही विचार झाला पाहिजे.(केवळ समलैंगिकता या विषयावर अथवा मानसिक लैंगिकता या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकेल.) माणूस हा विचारशील असला तरी प्राणी आहे. :) वंशसातत्य टिकवणे हा त्याच्या अस्तित्वाचा इतर सर्व जीवसॄष्टीप्रमाणे एक प्रमुख (कदाचित एकमेव) हेतू आहे. आणि त्यामुळे त्याला शारिरिक आणि मानसिक लैंगिक गरजा असणारच. शिवाय समलैंगिकता अनेक प्राण्यांमध्येही आढळते. निसर्गतयः अनेक भागिदारांशी संबंध ठेवण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये दिसते.या सर्व संबंधांत पशूनरांची अनेक पशूमाद्यांशी संबंध जास्त आढळतात. याउलटही काही उदाहरणे आहेत. या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करण्याची 'गरज' माणसानेच निर्माण केली आहे. कारण केवळ पशुत्वाप्रमाणे संबंध नियंत्रित केले असते (किंवा अनियंत्रित ठेवले असते तर) तर मानवसमाजातील अनेक कमजोर, दुबळ्या नरांना त्यांचे वंशसातत्य टिकवणे अशक्य होऊन बसले असते. याशिवाय अनेकसंबंधी लैगिक वर्तनामुळे शारिरिक रोगांचेही प्रमाण वाढून समाजाचा र्‍हास होण्याची शक्यता मानवाने पूर्वीच हेरली असावी. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे एकूणच लैंगिक नैतिकता (पक्षी -समाजाने मान्य केलेले शरीरसंबंध) ही मानवसमाजाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनातून निर्माण झाली आहे.किंबहुना विवाहसंस्थेचे मूळही यातच आहे.लैगिक अनैतिकता हा सर्वाधिक सामाजिक तुच्छ्तेचा आणि घृणेचा विषय आहे. Morality: the character of being in accord with the principles or standards of right conduct; right conduct; sometimes, specif., virtue in sexual conduct त्यामुळे एकाद्या व्यक्तीच्या विवाहबाह्य, विवाहपूर्व अथवा समलैंगिक संबंधांकडे समाजाने अनैतिक म्हणून पहाणे स्वाभाविकच आहे. वेश्याव्यवसाय यात मोडतो हे स्पष्टच आहे. परंतु कोणत्याही गरजा विचारांच्या सहाय्याने काबूत ठेवायच्या किंवा नाही ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. काही लोकांच्या गरजा विचारांवर मात करण्याइतक्या प्रबळ असू शकतात. तर काही लोकांना मिळणारे प्रलोभन हे विचारांवर मात करणारे असते. हे केवळ लैंगिक गरजांबाबतच नव्हे तर इतरही सर्व गरजांना लागू होते. यातूनच सामाजिक हिताची नैतिकता भंग होण्याची शक्यता निर्माण होते. (इथे पुलंचे रावसाहेब आठवतात - 'तुम्ही पण शहाणेच की वो! म्हणे चोरी कशाला करायची, मागून घ्यायचे...'किंवा 'घरी एक चांगलं सुख मिळत असलं तर माणूस बोगारवेशीत कशाला जातंय वो?') Ethics: the system or code of morals of a particular person, religion, group, profession, etc. त्यामुळे एखाद्या माणसाने स्वतःचे वर्तन हे नैतिक किंवा अनैतिक ठरवणे हा ज्याचात्याचा अधिकार आहे. असा गुंतागुंतीचा मामला आहे. माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी. (उदा. उच्चभ्रू स्त्री वेश्या, पुरुष वेश्या आणि क्लीब वेश्या.) अलेक्झांडरसारख्या पुरुषाबरोबर हेफायस्तियनचे समलैगिक संबंध होते. हेफायस्तियन हा एक प्रकारे पुरुष वेश्याच होता असे म्हणावे लागेल. तसेच काही देशात/प्रांतात (जसे गोवे - भाविणी) वंशपरंपरेने काही स्त्रिया हा व्यवसाय करतात. त्यात त्यांच्या आर्थिक फायद्याचा मोठा वाटा असतो. 'राख' हा प्रकारही याच पद्धतीचा आहे. अर्थात या भागिदारांमधील एक किंवा दोन्ही विवाहित असतील तर त्यांच्या इतर (वैवाहिक) भागिदारांचे या व्यावसायिक संबंधांमुळे (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही ना? याचाही या नैतिकतेच्या व्याख्येत विचार करावा लागेल. पण व्यावसायिक शरीर संबंधात जर कोणत्याही बाजूचे (आर्थिक, शारिरिक, मानसिक) नुकसान होत असेल तर मात्र तो अनैतिक आहे असे म्हणावे लागेल.बारबाला या कितीही उत्कृष्ट नृत्यांगना असल्या तरी त्यांच्या नृत्यातला शारीरभाव आणि कामुकता यांचा वापर त्या आर्थिक फायद्यासाठी करत होत्या हे उघड आहे. त्यामुळे अनेक पुरुषांचे आर्थिक नुकसान झाले. म्हणून तो व्यवसाय अनैतिक. केवळ अंधश्रद्धेमुळे (जसे जट आली म्हणून देवदासी) एकाद्या व्यक्तीला तिच्या मनाविरुद्ध/ तिला न कळता या व्यवसायात ढकलणे अनैतिक. गरीबीमुळे एखाद्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध हा व्यवसाय करायला लावणे अनैतिक. वेश्येच्या संबंधांमुळे जर लैंगिक आजार होणार असतील तर ते अनैतिक. रखेलीमुळे वैवाहिक जीवनात पत्नी, मुले यांची आर्थिक, मानसिक कुतरओढ झाली तर ते अनैतिक.अशी अनेक उदाहरणे देता येतील. सध्या इतकेच. श्री. धनंजय आणि इतरांची मते कळावीत. अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)

In reply to by विसुनाना

अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)
हे अवांतर नसुन मला तर समांतर वाटते. मी मराठी वरील ही चर्चा मी पाहिली नाहि. पण अशा प्रकारची मते नवीन नाहीत. आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव प्रतिवादकाच्या चेहर्‍यावर नक्कि असणार. "एवढा गरिबीचा कळवळा आहे तर आपल्या घरातील संपत्ती का नाही वाटून टाकत?" "एवढा पुळका आहे तर स्वतःच्या घरात ठेउन घ्यायचे!" "आम्ही काय अन्नछ्त्र उघाडल नाय, यवढ आसन तर सोताच्या घरात जेवायला बोलावचं" वगैरे वगैरे सदृश विधाने आपण नेहमी ऐकत असतो. जंगल कमी झाल्यावर बिबटे मानवी वस्तीत शिरतात. पाण्यासाठी ,अन्नासाठी; प्रजोत्पादनासाठी नव्हे. मग बिबट्यांच्या नावे हाकाटी होते. "एवढी बिबट्याच्या भुकेची काळजी आहे तर आपली मुल जाउ द्यात कि बिबट्याच्या तोंडात?" अशी पण चर्चा सुरु होउ शकते. "समजा ज्यांना हा सेफ्टी व्हॉल्व वाटत नाही त्यांच्या घरातील स्त्रिया समाजातल्या पुरुषी कामांधतेला बळी पडल्या तर?" असाही प्रश्न उपस्थित होतो. या आहेत म्हणुन आपल्या आयाबहिणि सुखाने जगताहेत (त्यातल्या त्यात) . स्वामी विवेकानंदांनी म्हणुन तर त्यांना भगिनी म्हटलं . अस मानणारा एक लोक प्रवाह आहे. मुरळ्या, देवदासी या समाजातील धर्मलंडांची सोय व्हावी म्हणुनच निर्माण झाल्या. त्याला 'द्यवाची शेवा' असा धार्मिक पाठिंबा दिला. मूळ प्रश्न असा आहे कि लैंगिक भुक भागली नाही म्हणुन माणुस मरत नाही. पण लैंगिक भूक हि नैसर्गिकच आहे. ती शमली नाही तर समाज स्वास्थ्य टिकेल का? असा आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 12/03/2008 - 15:37
आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव चेहेर्‍यावर होताच. चर्चेतले एक ऐकीव मत (माझे नव्हे) म्हणून अवांतरमध्ये नोंदवले. आपलेही मत ग्राह्य आहेच.

In reply to by विसुनाना

धनंजय 17/03/2008 - 08:01
तुमच्या पुढील म्हणण्याशी सहमत :
माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी.
वेश्याव्यवसायाच्या बाबतीत नैतिक गणित करत असताना या तीन प्रकारच्या शरीरविक्रेत्यांत मूलभूत फरक करून काही हशील नाही. पण तपशिलांत फरक येऊ शकेल. सामाजिक गुप्ततेमुळे आर्थिक/मानसिक/शारिरिक फायद्या-तोट्याचे गणित तिघांमध्ये वेगवेगळे येऊ शकेल. त्यामुळे एखादी बाजारपेठ कमीअधिक प्रमाणात अन्याय्य असू शकेल. या चर्चेत मी बहुतेक शरिराच्या क्रय-विक्रयाबाबत विचार केला आहे. त्यामुळे बाजार मुक्त की नाही, विक्रेत्याला आणि ग्राहकाला किंमत ठरवण्याचे किंवा नकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही, अगतिकतेमुळे अयोग्य किंमत ठरवली जात आहे की नाही, या निकषांवर न्याय-अन्याय ठरवता येतो. क्रय-विक्रय नसला तर माझ्या मते लैंगिक संबंधांच्या नैतिकतेचे वेगळे निकष असावेत - कारण बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण करता येत नाही. मग ते विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध कुठले का असेनात. बाजारात आपल्याला बराच थोड्या वेळाचा, मुदतीचा विचार करावा लागतो. देण्या-येण्याचा हिशोबखाते किंमत भरल्यानंतर सामान्यपणे बंद केले जाते. (किंवा किंमत आगाऊ दिल्यास सेवा पुरवून झाल्यानंतर हिशोबखाते बंद केले जाते.) पैशांचे हस्तांतरण होत नसेल तर हिशोबाच्या खात्याची मुदत लांब असते. त्यामुळे नैतिकता ठरवण्यासाठी सामान्य बाजाराचे निकष वापरता येणार नाहीत. तेही मूलभूत निकष विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध सर्वांनाच सारखे असावेत. कोणाचेही मानव्य मूल्य स्वस्त होता कामा नये. सामाजिक परिस्थितीमुळे विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक या प्रकारांत "मानव्य मूल्य राखणे" कमीअधिक कठिण असेल, हे तपशील वेगळेवेगळे असतीलच. "सेफ्टी वॉल्व" उपमा ठीक आहे. पण कोणीही "सेफ्टी वॉल्व" होण्यासाठी औदार्य मागणे ठीक नाही. आजकाल ज्यांना आपण प्राण देण्याचे औदार्य मागतो (खाणकामगार, अग्निशामक, सैनिक, वगैर,) त्यांना त्या मानाने शुल्क देतो. इतकेच काय सैन्यातले अधिकारी पगाराबद्दल बोलले, पगारवाढीबद्दल बोलले, तर आपण त्यांना "उदार व्हा" असे म्हणून चूप करत नाही. तसेच "उदारपणे सेफ्टी वॉल्व व्हा" म्हणून अन्याय्य बाजारात बोळवण करू नये.

लिखाळ 13/03/2008 - 20:32
धनंजय, अतिशय छान लेख. .... नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. खरेच असेच वाटते. पण यावर अनैतिकतेचा शिक्का सर्व समाजात आहेच. पहा ना आत न्युयॉर्क मधले प्रकरण. यात पैशाच्या अपव्ययाबद्दलची ओरड आहे तसेच वश्या प्रकरण हा सुद्धा महत्वचा नैतिक मुद्दा आहे. वरचे सर्व प्रतिसाद वाचून झाले नाहित. वाचत आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

कोलबेर 14/03/2008 - 03:47
विसुनानांच्या प्रतिसादातुन ह्या विषयाला असणारे अनेक कंगोरे दिसल्याने आम्हीही आमचे पावशेर त्यात टाकतो आहोत :) मुळातच 'वेश्याव्यवसाय' ह्याची सामाजिक व्याख्या आपण समजतो तितकी संकुचित नाही. पैसे मोजुन शरिर उपभोगायला देते ती वेश्या इतकाच अर्थ 'वेश्या' शब्दातुन अभिप्रेत नाही. त्यालाही अनेक कंगोरे आहेत. एखादी स्त्री जेव्हा कामात बढती मिळवण्यासाठी (आपला स्वार्थ साधुन घेण्यासाठी..विशेषतः सिनेजगतात) वरिष्ठांना शरीर भोगायला देते अश्या स्त्री ला देखिल 'वेश्या' असेच संबोधले जाते.. म्हणजेच शरीर भोगायला देण्यामागे 'पैसे' हाच एकमेव मोबदला दरवेळेस असेल असे नाही.बर्‍याचदा अश्या स्त्रियांविषयी बोलताना अमकी अमकी पेक्षा, 'सरळ पैसे मोजुन घेणारी वेश्या बरी!( नैतिकतेच्या दॄष्टीकोनातुन)' असा देखिल उल्लेख केला जातो.. म्हणजेच जेव्हा जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही मोबदल्यासाठी/फायद्यासाठी एखाद्याला संभोग करु देते ती वेश्या अशी व्याख्या योग्य ठरेल का?..तर नाही..करण कधी कधी एखाद्या मुलीला आपल्या मना विरुद्ध लग्न करावे लागते. अशा वेळेस प्रेम दुसर्‍या कोणावर जडले असले तरी समाजाच्या दबावाला बळी पडून लग्न तिसर्‍याशीच केले जाते. ह्या स्त्रियांना देखिल आपल्या मनाविरुद्ध आपले शरीर दुसर्‍याच व्यक्तिला अर्पण करावे लागते( समाजाच्या कडवेपणा टाळण्याच्या मोबदल्यात)..पण त्याला मात्र कुणीही वेश्या/अनैतिक म्हणू शकत नाही. तेव्हा ही व्याख्या देखिल बाद!! थोडक्यात विषय दिसतो तितका सोपा नाही..:)

संस्कृत साहित्यात आपला संबंध वारंवार गणिका ह्या पात्राशी येतो. किंबहूना विदूषक आणि गणिका संस्कृत साहित्याचे अभिन्न अंग आहेत. ती गणिका देहविक्रय करतेच असे नाही तर काही गणिका केवळ आपल्या गाण्याने अथवा नृत्याने ग्राहकांची घटकाभर करमणूक करणार्‍या सुद्धा असतात. तसेच ह्या गणिका चाणाक्ष असतात आणि हेरगिरीसाठी त्यांचा फार उपयोग केलेला आढळतो (माताहारी सारखा). चाणक्याने हेरगिरीसाठी सुंदर, बुद्धिमति गणिकांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

बंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एक नाट्यप्रयोगा बद्दल माहिती http://www.indiatogether.org/2008/mar/wom-dhande.htm इथे वाचा. मीन सेशू या सामाजिक कार्यकर्तीने वेश्या अन्याय मुक्ती परिषद (VAMP) व संग्राम या एनजीओ च्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतात. त्यांनी ही निर्मिती केली. सुषमा देशपांडे यांनी दिग्दर्शीत केलेला प्रयोग या दुर्लक्षित विषयावरचे जनजागरण आहे. प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश 16/03/2008 - 15:27
वैश्या बनणे हे नैतिक की अनैतिक हा चर्चेचा विषय निवडण्याबद्दल धनंजय यांचे अभिनंदन वर अनेक घटकांचा उत्तम उहापोह झाला आहे. धन्ंजय यांचा सारांशही रोचक आहे. मी जरा उशीराच चर्चेत प्रवेश करत आहे. असो. वैश्या व्यवसायाची नैतिकता.. यात वैश्या 'व्यवसाय' हा शब्दच मला खटकतो. या बाजारातील प्रत्येक विक्रेती ही "व्यावसायिक"च असते असे नाहि. कित्येक जणी (किंवा बहुतांशजणी?) ह्या नोकर असतात. खरा व्यवसाय कोणीतरी वेगळीच व्यक्ती करत असते. तेव्हा या प्रकारास केवळ एक व्यवसाय ना नजरेतून बघणे मला सर्वस्वी चूक वाटते. आता नोकरीचे निकष लावा पाहु. आमच्या (आयटी) नोकरीशी तुलना करू. आमच्याकडे उत्तम जाहिरातीसाठी नोकरदार मंडळीनी केलेली आधीची प्रोजेक्टस बढवून नवीन क्लायंटला ऐकवली जातात, कधी एखादा क्लायंट आपखूशीने कंपनीचे नाव सुचवतो, क्लायंटने दिलेल्या पैशातून त्यात काम केलेल्यांचे पगार वगैरे तर होतातच शिवाय मुळ व्यावसायिकाला उत्तम मोबदला मिळतो, अनेकदा बराच एक्पिरियन्स झाला आणि तुमच्यात 'गुण' असतील तर बढती मिळते/पगारवाढ मिळते/आपल्या हवे तेच काम करायची संधी दिली जाते, एरवी इथे काय काम करायचे, कीती करायचे, कधी करायचे हे तुमच्या हातात नसते. आता हे सगळं वैश्यांनाही लागु होत नाहि का? मग हा व्यवसाय कसा? ही तर नोकरी !!! आणि नोकरी करतान सुरवातीला चॉईस नसतो त्यात ही नैतिकता कुठे? (निदान सुरवातीला) बर्‍याचजणांचे नोकरी असते म्हणून घर चालते (फार तर फार एका व्यावसायिकाची नोकरी आवडली नाहि तर दुसरा जॉईन करता येतो ) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मित्रांनो हा लेख व त्यावरील आपल्या सर्व चर्चा लिंकद्वारे मी त्या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था यांना पाठवल्या. मीना सेशू ज्यांचा उल्लेख मी वर प्रतिक्रियांमधे केला आहे त्यांनी त्या सेक्सवर्कर साठी काम करणारी वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संघटने द्वारे प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या काही ध्वनीप्रतिक्रिया त्यानी पाठवल्या आहेत व मिसळपाव चे आभार मानले आहेत.

मोदी आणि भाजपा सत्तेत यायच्या आधी मिपावर किती गंभीर विषयांवर प्रगल्भ चर्चा वादविवादसुसंवाद व्हायचे ! कुठेही राजकीय टिप्पण्णी नाही, कोणत्याही धर्मावर , धर्मपरंपरा श्रध्दांवर , कोणत्याही जातीवर, समाजावर चिखलफेक नाही, कुठेही तारतम्य सोडून तिरकस टिप्पण्णी नाही ! हा काथ्याकुट एक अतिषय आदर्श काथ्याकुट म्हणुन पिन करुन ठेवला पाहिजे मुख्यपानावर ! बाकी - श्या: , आमच्या काळचं मिपा राहिलं नाही आता !

Trump 27/05/2022 - 12:38
उत्तम निकाल आणि उत्तम लेख
देहविक्रय बेकायदेशीर नाही, सेक्स वर्कर्सचे अधिकार, पोलीस हस्तक्षेप अयोग्य, कंडोमचा वापर हा…; SC ने मांडलेले २१ मुद्दे https://www.loksatta.com/photos/news/2945214/sex-work-is-not-illegal-the-supreme-court-order-says-sex-workers-are-entitled-to-dignity-equal-protection-under-law-scsg-91/

In reply to by Trump

उत्तम निकाल ! भारत हळुहळु पाश्चिमात्य बुरसटलेल्या नैतिकतेच्या बकवास संकल्पनांच्या जोखडातुन मुक्त होत आहे हे पाहुन छान वाटले !

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 29/05/2022 - 16:55
मार्कस ऑरेलियस, मला वाटतं त्यास व्हिक्टोरिय नैतिकता ( victorian morality ) म्हणतात. हिने ब्रिटीशकालीन भारतात प्रचंड गोंधळ घातला होता. आ.न., -गा.पै.

sunil kachure 27/05/2022 - 12:46
लोकशाही देशात धोरणात्मक निर्णय घेणे हे लोक नियुक्त सरकार चे काम आहे. लोकशाही मध्ये लोक सत्ताधारी निवडतात. आणि तेच देशाला जबाबदार असतात. किती ही चांगला निर्णय असला तरी कोर्टाने धोरणात्मक निर्णय घेणे . अयोग्य आहे. त्या मुळे वेगळा पायंडा पडू शकतो. सरकार नी तसा कायदा करावा असे निर्देश देणे इथ पर्यंत कोर्टाचे निर्णय योग्य असे समजू शकतो.

चलत मुसाफिर 29/05/2022 - 21:16
लेख फार आवडला. देहव्यापाराला 'नैतिक' मान्यता नसणे याचे एकमेव कारण म्हणजे हा व्यवसाय पुरुषसत्तेच्या पायाला समूळ हादरा देतो. बाकी दुसरे काही नाही. गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे. ही भीतीदेखील निराधार आहे हे सांगायला नको. उद्या देहविक्रय समाजमान्य झाला तरी पुरुषसत्ता त्याला पुरून उरेल आणि आपले वर्चस्व अबाधित ठेवेल यात मला तरी काहीच शंका नाही. या संदर्भात निर्णयस्वातंत्र्य वगैरे मुद्दे उगाचच उकरून काढले जातात. सफाई कामगार, मोलकरीण किंवा हमाल होण्याचीही महत्वाकांक्षा कुणी बाळगून नसते. इतकेच काय, इच्छा नसताना डॉक्टर, अभियंता, व्यापारी झालेले लोकही सापडतील. पण त्यावरून या व्यवसायांना कुणी अनैतिक ठरवत नाही.

गामा पैलवान 30/05/2022 - 02:32
चलत मुसाफिर,
गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे.
यांत भीती कसली? जर प्रत्येक बाई पुरुषसत्तेस फाट्यावर मारून वेश्या बनली, तर कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल. पुरुषांना दुसरं काय हवं? असो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. लालबत्तीवस्तीत बापाला किंमत नसते. आईला मात्र अतिशय आदराने वागवलं जातं. मग ही पुरुषसत्ताक व्यवस्था म्हणायची का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल.
थोडीशी सुधारणा - कुठलीही नाही , जीला स्वतःहुन कामक्रीडेत भाग घेण्याची इच्छा आहे ती , आणि हाच ह्या व्यवसायातील युनिक सेल पॉईंट आहे ! स्त्री-लैंगिकतेचे गूढ ह्या धाग्यावर आलेल्या काही प्रतिसादा नुसार बहुतांश स्त्रियांना कळससुख अर्थात ऑर्गॅझम हा परमोच्च आनंद लाभतच नसतो , त्या केवळ करायचे म्हणुन, कर्तव्य म्हणुन सेक्स करत असतात , परिणामी कामक्रिडेतील स्त्रीचा सहभाग बहुतांश वेळा पॅसीव्ह असतो . (काही सन्माननीय स्त्रीयांचे काही मोजके रतिक्षण ह्याला अफवाद असतीलही , पण इन जनरल "उरका पटकन" हाच अ‍ॅटिट्युड असतो.) अशा वेळेस कल्पना करा की एक स्त्री जी स्वेच्छेने कामक्रिडेत सहभाग घेत आहे , जी पैसे घेत आहे , क्लायंट ला खुष करणे हाच जिचा उद्देश आहे तिच्या सोबतचा अनुभव कसला भिन्न असेल ! तसेच पुरुषाच्या नजरेतुन - ही स्त्री आवडली तर आवडली नाहीतर आजचे पैसे अक्कलखाती, नेक्स्ट टाईम नवीन बघु, ही काही कटकटी करणार नाहीये , डोके दुखते आज नको , मूड स्विंग्स वगैरे नखरे नसणार आहेत , बस्स आत्ता आहे हा क्षण एन्जॉय करायचा आहे - carpe diem. ह्या सिचुएशन मध्ये रतिसुखाचा अनुभव काहीतरी वेगळ्याच लेव्हल वरील असावा असा अंदाज आहे ... पुरुषासाठी अन स्त्रीसाठीही!!

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 30/05/2022 - 13:19
मार्कस ऑरेलियस, तुमच्या दुरुस्तीशी सहमत आहे. 'उपलब्ध असलेल्या कुठल्याही स्त्रीस पैसे फेकून वापरता येईल' असं म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

sunil kachure 30/05/2022 - 20:03
जगाचे माहीत नाही. पण भारताची लोकसंख्या १३०, कोटी आहे. कट्टर पुरोगामी स्त्री,पुरुष. कट्टर स्त्री हीत वादी स्त्री पुरुष. देह विक्रीस समर्थन देणारे महान विचारवंत. ह्या समाजाच्या सुधारित घटकात. १) मला सून देह विक्री करणारीच हवी. २)माझी बायको देह विक्री करते हे आमचे कार्ड. ३) माझी मुलगी मी ज्या कुटुंबात देह विक्री करण्याला मान्यता आहे त्याच कुटुंबात देईल. ४ माझी आई आणि बहिण देह विक्री करतात हे आमचे visiting कार्ड. असे मोठ्या अभिमानाने सांगणारा पुरोगामी,स्त्री हक्क वाला,सुधारणावादी,देह विक्री लं पाठिंबा देणारा. मी आज पर्यंत तरी कोणी बघितला नाही. १३० कोटी लोकात एक खरा पुरोगामी नाही. आणि म्हणे गणिका सन्मानाने समाजात फिरतील. अमेरिका,ब्रिटन जे आपल्या पेक्षा १०० वर्ष पुढे आहेत तिथे पण असे घडतं नाही.

sunil kachure 30/05/2022 - 07:52
काही लॉजिक नाही ह्या विचारला की पुरुष सत्तेला हादरा बसेल म्हणून वैश्या व्यवसाय च संबंध नित्ती मत्ते शी जोडला आहे. काही लॉजिक नाही .स्त्री बाजारात विकायला उपलब्ध असणे आणि ती पण तिच्यावर काहीच जबरदस्ती न करता. स्व मर्जी नी. ही पुरुषांसाठी अस्त्यंत फायद्याची गोष्ट आहे. स्त्री काही पैसे देवून सहज उपलब्ध असेल तर पुसृषांसाठी लॉटरी च आहे.. उद्या हे सामान्य झाले समाजाने स्वीकारले तर. स्पर्धा वाढेल आणि अगदी पन्नास ,शंभर रुपयांत पण ती उपलब्ध होईल. ह्या मध्ये स्त्री चच नुकसान आहे.पुरुषांचे नाही. असे स्त्री chya हक्काच्या बाता मारून बायकांना पुरुषांच्या समोर कमी कपड्यात बार मध्ये नाचवले आणि आजुन पण नचवले जाते. देह विकायला लागणे पोटासाठी ही वेळ येणे म्हणजे खाते सर्व समाजासाठी ही लाज वाटण्यासारखे गोष्ट आहे. आणि त्याला स्त्री चा हक्क ह्या गोंडस सुवर्ण वेष्टनात पॅक करून स्त्री चे शोषण करायचा. मतलबी डाव . तसे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांचा आहे

सुबोध खरे 30/05/2022 - 09:39
हे इतकं साधं असतं तर प्रश्नच नव्हता. बहुतांश वेळेस (९९%) मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. यात आई बापानी मुलींना विकण्यापासून प्रियकराने किंवा दलालाने फसवून किंवा सरळ गुंडांमार्फत अपहरण करून मुलींना धंद्याला लावले जाते. धंदा कायदेशीर केला तर केवळ मुलीला जीवाची धमकी देऊन मी हे स्वेच्छेने करते आहे असे कोर्टात बोलायला लावले तर जबरदस्तीने या धंद्यात ढकलल्या गेलेल्या परंतु बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या मुलींना यातून बाहेर पडण्याचा मार्गच बंद होईल. आता कदाचित १-२ % मुली अशा बाहेर पडत असतील पण या नंतर ते सुद्धा बंद होण्याचा धोका आहे. दुर्दैवाने वेश्याव्यवसायातून पुनर्वसन होण्याची शक्यता एकंदर समाजाच्या मनोवृत्तीमुळे फार कमी असते. लग्न करून बाहेर पडलेल्या बहुतांश मुली नवऱ्याने टाकून दिल्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. कारण अनेक वेळेस नवरे मुलीच्या चारित्र्याचा संशय घेताना दिसतात. या मुली धंदा केल्यानंतर पुरुषाशी बोलताना जास्त मोकळ्या असतात आणि याचा अनेक अर्थ नवरे ती निर्लज्ज/ वाईट चारित्र्याची किंवा तसलीच आहे असा काढतात. पुनर्वसन करून आई बापाकडे पाठवलेल्या बहुतांश मुलींना आई बापच आपल्या खोट्या प्रतिष्ठा किंवा पुढच्या मुलींच्या लग्नात विघ्न येण्याची भीती किंवा मुलीचा भाऊ तिला स्वीकारायला तयार नसेल तर त्याला नाराज करायचे नाही म्हणून या मुलींना स्वीकारण्यास नकार देतात. अनेक वेळेस सख्खे बाप सुद्धा परत या मुलींना विकून पैसे करताना आढळतात. या मुली निरक्षर किंवा अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे चरितार्थाचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. तर अनेक मुलींना या व्यवसायात काही वर्षे घालवल्याने अंगमेहनतीचे काम करावेसे वाटत नाही त्यामुळे त्या स्वखुशीने वेष्ट्यव्यवसायात परतल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे त्यांचे पुनर्वसन वाटते तितके सोपे नाही. त्यातून काही वर्षे (१०-१५) संसारात रमल्यावर त्यांचे खटले न्यायालय उभे राहतात आणि सततच्या न्यायालयाच्या वाऱ्या ,कटकटीना कंटाळून आणि आर्थिक तंगी मुळे सुद्धा नवरे त्यांना हाकलून देतात. एकदा वेश्या व्यवसायातून बाहेर पडली कि त्यांचे दलाल त्यांच्या वर चार दमड्या खर्च करत नाहीत आणि हा सर्व आर्थिक भार सोसणे त्यांना अशक्य होते. त्यातून त्यांना पोलीस सुद्धा ज्या तर्हेने वागवतात ते पाहिले तर सभ्य माणसे सुद्धा लाजतील. पैसे नसतील तर पोलीस सुद्धा त्यांच्याकडून सर्रास शरीरसुखाची मागणी करतात मग ती आता पुनर्वसन करून संसाराला लागली का असेना? महिला पोलीस सुद्धा त्यांच्याशी अत्यंत घृणास्पद वर्तन करताना आढळतात तर पुरुषांची काय कथा? बाकी स्त्रीचे स्वातंत्र्य त्यांचे हक्क आणिस्वखुषीने वेश्या व्यवसायात पडणे हे उच्चभ्रू गटातील कॉलगर्लस, एस्कॉर्टस किंवा कॉनक्यूबाईन इ. साठी ठीकआहे.(त्यांना वेश्या म्हणणे डाऊनमार्केटआहे).

sunil kachure 30/05/2022 - 13:31
Vaisha व्यवसाय . खुप जुना आहे ब्रिटिश लोक ही अतिशय हुशार असल्या मुळे त्यांनी ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केले होते. देह विक्री व्यवसाय करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून दिली होती बाकी समाजा पासून वेगळी. एकाचे हक्क जपताना दुसऱ्याच्या हक्कावर गदा येत कामा नये. देह विक्री ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केलं. तर ते समाजाच्या,देशाच्या हिताचेच आहे. १) देश विक्री व्यवसाय करण्यासाठी प्रतेक शहरात जागा आरक्षित ठेवली जावी. थोडी लांब. २)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात ३) त्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जावी त्यांच्या मर्जी नीच करत आहेत ना ह्याची खात्री करावी. ४) देह विक्री करणाऱ्या सर्व स्त्रिया ची माहिती त्या व्यवसाचा पोर्टल वर जाहीर करावी नाव ,गाव,नातेवाईक सहित. लाज वाटण्याचे कारण नाही स्त्री मुक्त होत आहे. ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. असे मस्त. नियोजन केले तर मला नाही वाटत कोणी विरोध करेल. कोणत्या तरी ब्रिटिश कंपनीला ह्या सर्व यंत्रणेचे नियोजन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यावे. ते योग्य नियोजन करतील. मुंबई मध्ये त्यांनी योग्य काम केले आहे त्यांना अनुभव आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 30/05/2022 - 20:20
२)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात. हायला इथे अर्ध्या जनतेला डोक्यावर छप्पर नाही पण रात्रीची सोया पाहण्यासाठी सरकारने त्यांना कोठे बांधून द्यायला हवेत काय? ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. हे कुणी ठरवायचं ? ब्रिटीश कंपनीला? त्यांना भारतीय बायका कुरूप च वाटतील. मग बायकांना चांगला भाव कुणी द्यायचा? का इथे पण शेतीसारखा किमान आधारभाव द्यायचा? आणि या आधारभावाला ग्राहक आला नाही तर पैसे सरकार ने द्यायचे का? कचरे बुवा तुमच्या टंकणाऱ्या मेंदूचा आणि विचार करणाऱ्या मेंदूचा संबंध नाही हे तुम्ही सतत का सिद्ध करून देताय

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 30/05/2022 - 20:45
मी तुमची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. १)देह विक्री व्यवसायात जबरदस्ती नी स्त्रियांना ढकलल जाते. ही तुमची भीती आहे. रीतसर सर्व मुलींची चोकशी करून त्यांची सर्व ओळख पोर्टल वर जाहीर करा. हे माझे solution. पुरुषाची मकत्तेदरी स्त्री नी देह विक्री केली की नष्ट होत असेल तर अशी माहिती जाहीर करणे ही अभिमानाची गोष्ट असेल त्यांच्या नाते वाइक लोकांसाठी. सिडको किंवा म्हाडा नी अशा वस्त्या नियोजन करून उभ्या कराव्यात . गाव कुसा बाहेर. कारण एकाचे एक जपताना दुसऱ्याचे हक्क नाकारणे अयोग्य म्हणून. सिडको आणि म्हाडा नी अशा वस्त्या निर्माण केल्या म्हणजे त्या मधील जागा फुकट ध्या असा मी उल्लेख केला नाही. ज्यांना तीव्र इच्छा आहे त्यांनी ती जागा विकत घ्यायची आहे हवं बँक लोण ची सोय करावी. आराखडा आखून हा व्यवसाय म्हणून उभा केला तर रोजगार पण मिळेल. ती स्त्री आणि त्यांचे ग्राहक ह्यांना कायद्याचे संरक्षण पण मिळेल.आणि समाजातील बाकी लोकांचे हक्क पण अबाधित राहतील. प्राथमिक आरोग्य उपचार,गुप्त रोग तत्न,hiv स्पेशालिस्ट dr .. ह्यांना पण आराखड्यात जागा असेल.. Dr लोकांचा व्यवसाय वाढण्याची पण शक्यता आहे खरे ..मी परफेक्ट solution दिले आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 31/05/2022 - 13:01
मी परफेक्ट solution दिले आहे. कधी वेश्या वस्तीत गेला आहात का? त्यांच्याशी बोलला आहात का? त्यांचे प्रश्न काय? त्यानं काय हवंय? ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशाना घर विकत सोडाच भाड्याने घेणे सुद्धा परवडत नाही त्यांना बँकेच्या

लोण ची

सुविधा पुरवणार कोण? बँकेचे कर्ज देताना व्यवसायाचे काही आडाखे असतात. त्यात स्त्रीचे शरीर कसे बसवणार? जी दिसायला जास्त चांगली तिला जास्त कर्ज देणार का? हा निकष कसा ठरवायचा? तारण काय ठेवायचे? आणि त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या कडून वसुली कशाची कशी आणि कोणी करायची? उगाच उंटावरून शेळ्या हाकताय? तुमचं परफेक्ट solution तुमच्या टंकणाऱ्या मेंदूकडून आलेलं आहें. उचल हात आणि बडव कळफलक त्याचा विचार करणाऱ्या मेंदूशी काहीही संबंध दिसत नाही.

चलत मुसाफिर 30/05/2022 - 18:31
काही प्रतिसाद वाचून चंमतग वाटली. गणिका सहज उपलब्ध झाल्या तर पुरुषांचे फावेल हा समज मुदलातच गंडलेला आहे. पैसा व सामाजिक ताकद असलेल्या पुरुषांना गणिका (किंवा अन्य स्त्री) आजही मिळवता येते. देहव्यापार खुला झाला तर हे सर्व पुरुषांना सहजसाध्य होईल. तसेच देहव्यापार करणाऱ्या स्त्रीला अधिकृत हक्क मिळतील. हे पुरुषसत्तेला मुळातच नको आहे. देहव्यापार समाजसंमत झाला तर सगळ्या स्त्रिया तेच करू लागतील हा दुसरा गंडलेला समज. तसे काहीही होणार नाही. ज्या स्त्रियांना तो व्यवसाय करायचा असेल त्या तो सुरक्षित व अधिकृत रीतीने करू शकतील, इतकेच. पण याचे पुरुषसत्तेवर दूरगामी परिणाम होतील. सेक्स ही एक क्षणिक, तात्कालिक, नैसर्गिक भावना (instinct) आहे. पण तिला नाना नियम व बंधनांत कोंडले की एक प्रबळ आवेग निर्माण होतो जो जीवनाच्या प्रत्येक पैलूवर कमीअधिक परिणाम करतो. पुरुषसत्ता याचा चलाखीने वापर करते.

sunil kachure 30/05/2022 - 18:53
उत्तम नियोजन केले तर देह विक्री व्यवसाय लं कोणाचा विरोध नाही. देहविक्री लं मान्यता म्हणजे गल्ली बोळात,रहिवासी इमारती ,सार्वजनिक जागा इथे विक्षपित चाळे करण्याची परवानगी नाही..

जेम्स वांड 31/05/2022 - 10:17
वेश्या व्यवसाय हा मानवी संस्कृतीने ठरवलेल्या नैतिकतेच्या चौकटीत कधीच बसणार नाही , पण म्हणून त्याचे कायदेशीर प्रमाणीकरण करू नये असे नाही, काही देशाचे नियम आजकाल गांजा कायदेशीर करत आहेत, मला तर ते चूक वाटते, मस्तिष्कावर प्रभाव पाडून पुढे अगदी हेवी मेटल पॉयझिंग देऊ शकणाऱ्या गांज्याला कायदेशीर करणे चूक वाटते, पण वेश्या व्यवसायाबद्दल विचार करता त्याला कायदेशीर करणे हे कैक लैंगिक आजार, गुप्तरोग, एचआयव्ही इत्यादींच्या प्रसारात एक उपायकारक खोडा म्हणून वापरले जाऊ शकते, वेश्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप, त्यांना औषधपूरवठा, स्वच्छ ठिकाणे (व्यवसाय करावयास) ह्याने फक्त वेश्याच नाही तर वेश्यागमन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळींचे पण स्वास्थ्यरक्षण होऊ शकेल, वरती काचुरे ह्यांनी वेश्या व्यवसाय, आई बहीण व्हिजिटिंग कार्ड वगैरे काय काय लिहिलेले आहे, ते पटले नाही दोन कारणांसाठी १. माझ्याच लेखनात वेश्या व्यवसाय हा मानवी नितीमूल्यांच्या चौकटीत नैतिक ठरणार नाही कधीच हे मी स्पष्ट म्हणतोय आणि त्यामुळे २. काचुरे ह्यांनी (कदाचित कोणालातरी प्रतिसाद म्हणून) वेश्याव्यवसायाची व्हाईट कॉलर सर्विस इंडस्ट्री सोबत केलेली तुलना. बाकी काय, वेश्याव्यवसाय कायदेशीर केला तर तो करताना जगातील कैक फसलेली, यशस्वी उदाहरणे ठेवता येतीलच अभ्यास करायला समोर.

sunil kachure 31/05/2022 - 12:23
जगातील जास्त माहीत नाही पण भारतात खजुराव सारखी मंदिर आहेत तिथे . सेक्स ह्या विषयावर अनेक शिल्प कोरली आहेत. बघितले नाहीत पण ऐकून आहे. कामशास्त्र सारखे बाकी प्राचीन ग्रंथ पण आहेत त्याचा विषय सेक्स हाच आहे. . Evolution मुळे माणसाची प्रजाती निर्माण झाली असे दावे असले तरी.. संस्कृती, समाज व्यवस्था,निती अनिती. ह्यांची बरीच चक्र होवून गेली असावीत.. खुला सेक्स,नंतर निती मत्तेत सेक्स अडकला असेल. कोणाशी ही सेक्स करणे ह्याचा निती अनीती शी काही संबंध नाही. आणि कोणाशी ही सेक्स करणे ही अनीती. असे अनेक स्थित्यंतरे मानवी इतिहासात नक्कीच होवून गेली असणार. प्रतेक प्रकारचे चांगले वाईट परिणाम अनुभव नी माणसाला माहीत पडले असणार. म्हणून सेक्स लं निती मत्ते शी जोडले गेले असेल. एकच स्त्री संभोग करणे जी पत्नी आहे हे योग्य असे ठरवून कुटुंब व्यवस्था.आणि बाकी व्यवस्था. हे खूप अनुभवातून आलेले शहाणपण आहे. सेक्स चा संबंध अनेक गोष्टी शी आहे. संतती हा पहिला त्याचा प्रॉडक्ट आहे. त्याची जबाबदारी कोणावर तरी टाकणे अतिशय गरजेचे होते. म्हणून कुटुंब व्यवस्था आणि बाकी समाज व्यवस्था. सेक्स आणि भावनिक गुंतवणूक हा प्रश्न आहेच.

sunil kachure 31/05/2022 - 12:41
बार मध्ये कमी कपडे घालून नाचणे,विविध लोकांचे स्पर्श सहन करणे. हे त्या व्यवसाय करणाऱ्या मुली खरेच मनापासून करत असतील का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. साधे बस,ट्रेन मध्ये पण आपल्या बाजूला आपल्याला बरा वाटणारा च सहप्रवासी असावा अशी इच्छा सर्वांची असते. काही मिनिट किंवा तासाच्या प्रवासात पण आपल्याला बरा वाटणारा प्रवासी नसेल तर मन विचलित होते. बार गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलींची मानसिक अवस्था काय होत असेल. थंड डोक्याने विचार केला की जाणीव होईल. सेक्स वर्कर तर अजून खतरनाक. शारीरिक संबंध ठेवणे अशा व्यक्ती शी ह्याच्या शी काहीच ओढ नाही,आकर्षण नाही,इच्छा नाही. खुप कठीण काम आहे. मुली किंवा स्त्रिया ना ही अशी काम पोट पाणी चालण्यासाठी करावे लागत असेल तर आपल्या सिस्टीम मध्ये दोष आहे. पर स्त्री किंवा पर पुरुष ह्यांच्या शी आकर्षित होवून सेक्स करणे आणि. फक्त पैसे मिळतात म्हणून ओळख पण नसणाऱ्या व्यक्ती शी सेक्स करणे. खुप खुप फरक आहे. मानसिक त्रासाची परिसीमा आहे ती. आणि ह्या सर्व सेवांचे ग्राहक कोण तर पुरुष. पुरुषांना ऐश करण्यासाठी निर्माण झालेली गुलामगिरी ची एक पद्धत. ह्या मध्ये स्त्री चे हीत नाही. स्त्री लं कोणाशी ही तिच्या इच्छे नी सेक्स करायचा असेल तर तशी तिला परवानगी असावी हे वेगळे आहे . आणि पोटपण्यासाठी व्यवसाय म्हणून सेक्स करावा लागणे .हे वेगळे आहे. खुप फरक आहे ह्या मध्ये.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 16:34
आता हे पहा. मांजर आपल्या पिल्लांना केवळ तीन गोष्टी शिकवते: शिकार कशी करावी, कुणाला घाबरून रहावे आणि आपला बचाव कसा करावा (झाडावर चढणे, नखे पाजळणे इ.). याला फारतर 2 आठवडे लागतात. इतक्या शिक्षणावर मांजर आरामात आयुष्य जगू शकते. पण मानवाची उत्क्रांती इतकी जास्त झालेली आहे की समाजात केवळ जिवंत रहाण्यासाठी अफाट ज्ञानाची गरज पडते. पहा: भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाहतुकीचे नियम, कायदा, तंत्रज्ञान (किमानपक्षी दूरध्वनीचा वापर), लेखन-वाचन, सांस्कृतिक भान, पाककला, शेती, धर्मशास्त्र. ही यादी कितीही वाढवता येईल. हे इतके मूलभूत शिक्षण घेता घेता 18-20 वर्षे जातात. मानवाचे सरासरी आयुष्य 60-65 वर्षाचे असते. गुणोत्तर काढा. हे इतके ज्ञान आत्मसात करणे, साठवणे आणि वापरणे याकरिता मानवाला प्रचंड मोठा मेंदू विकसित करावा लागला. (मानवी मस्तक व शरीर यांचे गुणोत्तर काढा व त्याची इतर प्राण्यांशी तुलना करा. फरक लगेच उमजेल). मेंदूचा आकार हा असा भरपूर मोठा असल्यामुळे मुलांचा जन्म तुलनेत लवकर व्हावा लागतो. कारण मुलाचे डोके निसर्गाने जर मातेच्या पोटातच फार मोठे होऊ दिले तर माता आणि बाळ दोघे प्रसूतीतच मरतील. त्यामुळे मानवी अर्भके तुलनेत लवकर जन्माला येतात व जन्मानंतर वर्षानुवर्षे पालकांवर अवलंबून असतात (पशुपक्ष्यांचे असे नसते. कुत्रा साधारण 10-12 वर्षे जगतो. कुत्र्याची पिल्ले पंधरा ते वीस दिवसात जवळजवळ स्वयंपूर्ण होतात. गुणोत्तर काढा). अर्भकांची अशी प्रदीर्घकाळ देखभाल एकटीने करणे हे मानव मातेला केवळ अशक्य आहे. त्यामुळे पित्याने तिची साथ देणे सक्तीचे करण्यात आले (इतर प्राण्यांत माता आपली पिले एकटीने सांभाळते, किंबहुना पित्याला हाकलून लावते). आता हे पिल्लू माझेच आहे हा विश्वास पित्याला कसा व्हायचा? त्यामुळे कामनियम, योनिशुचिता, एकपतिव्रत ही बंधने आली. ही बंधने अंमलात आणण्यासाठी, तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे, म्हणून समाजव्यवस्था आली.

In reply to by चलत मुसाफिर

सुबोध खरे 31/05/2022 - 19:59
आपल्या प्रतिसादातील काही त्रुटी १) मानवापेक्षा उत्क्रांतीत खालच्या पायरीवर असणारे प्राणी यांच्या डी एन ए मध्ये मोठ्या प्रमाणात उपजत बुद्धी (स्मरणशक्ती) साठवलेली असते. त्यामुळे कुत्रे, मांजरं गायी हरणं आणि त्यांच्या कुळातील सर्व प्राणी हे मातेचे दूध पिणे थांबवल्यावर उपजत बुद्धीने वासाने आपले अन्न शोधून काढून आपले पोट भरू शकतात. मानवाच्या मेंदूचा विकास झाला त्याबरोबर हि उपजत बुद्धी मागे पडली. याच बरोबर मानवी मेंदूची वाढ सुरुवातीच्या काळात फार झपाट्याने होते. पहिल्या सहा महिन्यात हि वाढ ६५ % आणि १ वर्षापर्यंत मानवी मेंदू प्रौढ माणसाच्या ७५ % आकाराचा आणि २ वर्षे पर्यंत ९० % आकाराचा होतो. २) हे हार्डवेअर वाढल्या नंतर त्यात सॉफ्टवेअर लोड होण्याची प्रक्रिया चालू होते जी जन्मभर चालूच राहते. ३) मानवी शरीराची वाढ १८ वर्षापर्यंत होत असते म्हणजेच मानवी मुलाचे बालपण हे १८ वर्षे इतके लांब असते. या काळात स्त्रीला बालकाच्या संगोपनासाठी पुरुषाची गरज भासत असते. आणि अशास्थितीत पुरुषाने हे मूल माझे नाहीच म्हणून जबाबदारी झटकली तर शेतीप्रधान व्यवस्थेत स्त्रीची स्थिती फार केविलवाणी होत असे. कारण बाहेर शेती सोडून दुसरे काम नाही. तेथे काम करताना मुलाचे संगोपन कसे करणार या शिवाय बलात्कार होण्याची आणि त्यातून पुढची संतती होण्याची शक्यता फार होती ज्यामुळे असलेल्याच नव्हे तर पुढच्या बालकाच्या पोषणाचीसमस्या निर्माण होत असे. या कारणास्तव जगभर सर्व समाजात यौनशुचिता ( नवऱ्याशी एकनिष्ठता) हि कल्पना जन्माला आली. आणि या कल्पनेचा विस्तार म्हणून लग्न संस्था निर्माण झाली. स्त्री स्वातंत्र्य हि कल्पना संतती प्रतिबंधक साधने आल्यानंतरच खरी फोफावू शकली आणि त्यानंतर आधुनिक जगात स्त्रीला नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यावर तिची खरी मुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू झाली. स्त्रियांचे शोषण आदीम काळात कसे होत होते हे ज्यांना पाहायचे आहे त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीतील स्त्रियांची स्थिती याचा जरूर अभ्यास करावा.

sunil kachure 31/05/2022 - 17:04
सर्व प्रकार होवून गेले आहेत कोणाशी ही संभोग अगदी आई,बहिण ह्यांच्या शी पण(यम आणि यमी) प्राणी तर नाते पाळत नाहीत माणूस प्राणी च आहे. पण स्थिर जीवन,संतती चे पालन पोषण,स्त्री ची सुरक्षा, स्त्री साठी सुरक्षित वातावरण. पुरुष आक्रमक आहे हे नैसर्गिक आहे. पाणी नीतिमत्ता आणि परंपरा पुरुषांची आक्रमकता थोपवून ठेवतात. बहिण नागडी जरी दिसली तरी तिचा भाऊ हा पुरुष असून पण लैंगिक रित्या उत्तेजीत होत नाही का? ती स्त्री आहे हा पुरुष आहे तरी पण नाही. कारण नीतिमत्ता , समाज व्यवस्था त्या मुळे दहा वेळा फाशी असा कायदा केला असता आणि नीतिमत्ता आणि योग्य समाज व्यवस्था नसती तर . बहिण नागडी बघून भाऊ sexually उत्तेजीत झाला असता..... कायदे आणि शिक्षा ते थांबवू शकले नसते त्या मुळे देह विक्री चा संबंध मंद बुद्धी सारखा स्त्रियांच्या हक्क आणि स्त्री चे स्वतंत्र ह्याच्या शी मंद बुद्धी लोकांनी जोडू नये.

गामा पैलवान 31/05/2022 - 17:05
चलत मुसाफिर, हा कळीचा मुद्दा आहे :
तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे,
तुम्ही वर जी कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष, मुखावगुंठित वगैरे विशेषणं ल्वापारली आहेत त्यांचा निर्देश मुलांच्या संगोपानाकडेच आहे. मात्र या गोष्टी आवश्यक असल्या तरी पुरेश्या नाहीत ( necessary but not sufficient ). बाप देखील नीतिवान असावा लागतो, पण तो मुद्दा वेगळा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:34
संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवले? याचा संगोपनाशी काय संबंध? ज्ञानार्जन स्वसंरक्षण, परोपकार वगैरे ठीक आहे. नीतीमत्ता, चारित्र्य वगैरे गोष्टी म्हणजे धूर्त पुरुषसत्तेने आपला वरचष्मा अबाधित ठेवण्यासाठी काढलेली नसती टूम आहे. (या आता म्होरं. होऊनच जाऊ दे!) :-) :-)

In reply to by चलत मुसाफिर

गामा पैलवान 31/05/2022 - 23:42
चलत मुसाफिर, संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवलं, म्हणून काय विचारता ! वेश्यांना त्यांची अपत्यं त्याच वस्तीत राहावीशी वाटंत नाहीत. वेश्यांना त्यांच्या अपत्यांनी तोच धंदा केलेला आवडंत नाही. मुलगी असेल तर तीही वेश्या झालेली नको असते. मुलगा असेल तर मोठेपणी भ#वा झालेला नको असतो. भ#वा हा त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे. बाकी पर्याय कोणते ते विचारू नका. नीती व चारित्र्य म्हणजे काय ते वेश्यंना बरोब्बर ठाऊक आहे. आ.न., -गा.पै.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:22
स्त्रीची सुरक्षितता हाही एक गंडलेला मुद्दाच. सुरक्षितता कोणापासून? पुरुषांपासूनच की हो! गुंडांनी दुकान फोडू नये म्हणून त्यांना हप्ता देण्यासारखेच हे झाले. असो. एकूण माझा मुद्दाच सिद्ध होतो: योनिशुचिता न पाळणारी, लिंगस्वातंत्र्य मानणारी स्त्री पुरुषसत्तेला महाप्रचंड धोक्याची घंटी वाटते. ती तशी वाटली नसती, तर सुरक्षितता वगैरे बागुवबुवे उभे करायची गरजच नव्हती.

In reply to by चलत मुसाफिर

sunil kachure 31/05/2022 - 17:43
सुरक्षित ,स्थिर आयुष्य स्त्री आणि पुरुष दोघांचे. त्या साठी नियम आणि निती मत्ता . शारीरिक क्षमता काहीच वर्ष असते निसर्ग काही वर्षानंतर तारुण्य,शक्ती सर्व नष्ट करतो बालपणी चे १० ते १५ वर्ष आधार शिवाय जगता च येणार नाहीत माणसाच्या मुलाला. आर्थिक बाबतीत स्थिर होण्यास जी बुद्धी लागते ते शिक्षण आणि सुरक्षित निवारा. हा फक्त कुटुंब असेल तर च. आता बेरीज , वजा बाकी करा. स्वतःच्या शक्ती वर माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यातील किती वर्ष जगू शकतो. स्त्री माणूस च आहे कोणती extra ordinary प्राणी नाही तिला हेच नियम लागू आहेत

मी मराठी किडा वर वेश्यांच आयुष्य हा वृत्तपट पाहिला होता , तो शेअर करतोय. तुम्ही बाकी काही करु शकत नसला तरी त्यांच्याप्रति संवेदनशीलता ठेवा. विचार करा. धन्यवाद सूरज खटावकर, मराठी किडा व तेजस्वी सेवेकरी, सहेली संस्था https://www.youtube.com/watch?v=NIglFzYCE9U

In reply to by प्रकाश घाटपांडे

खरं तर, महाराष्ट्रातील काही दिवसातील घटना पाहिल्या शाळकरी मुलींवरील झालेले अत्याचार, विक्रुत बापांनी मुलींवर केलेले अत्याचार, राजस्थानमधील अठ्ठावीस वर्ष वयाच्या मुलांनी बावन्न वय असलेल्या स्वतःच्या आईवर केलेले बलात्कार या सर्व घट्ना पाहिल्यावर विकृतीला धर्म नसतो तर, माणसातली विकृती असते आणि तिचा स्तर दिवसेंदिवस कोणत्या स्तराला चाललं आहे, ते लक्षात येतं आणि अशावेली वेशाव्यवसायाचं महत्व अधोरेखित व्हावं. वेश्या व्यवसाय काही त्यांनी आनंदाने स्वीकारलेला नसतो. परिस्थिती, अगतिकता, आणि असंख्य गोष्टी तो वेगळा विषय आहे. कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्त्या प्रकरणी बंगालमधील आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिकच आहे. पिडितेला न्याय मिळावा म्हणून वेश्यांनी मोर्चात सहभाग घेतला झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी त्याही व्यथित झाल्या आणि मोर्चामधे त्यांच्या हातातील घोषणा फलक होते- 'प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना' याचा अर्थ असा की तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करु नका'' ही सामाजिक जाणीव ऐतिहासिक आहे. या विषयावर प्रसिद्ध लेखक, समीर गायकवाड यांनी खुप लिहिलं आहे. खुप लिहिण्या-बोलण्यासारखं पण थांबतो. घाटपांडे साहेब मिपावर येत राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 08/09/2024 - 15:10
माणूस दारू , तंबाखू शिवाय एकवेळ राहू शकतो परंतु पुरुष आणि स्त्रीला लैगिंक भूक आहे ती नैर्सगिक आहे , जिथे पुरुष स्त्री चे प्रमाण व्यस्त आहे तिथे हि भूक भागवण्याची सोय लागते ,, ती राजमार्गाने करण्याचाही सोय असेल तर त्यातील गुन्हेगारी कमी होते ( युरोपातील काही देश ) दोन्ही पुरुष वेश्या आणि स्त्री वेश्या उपलब्ध असणे असणे हे मला तरी अनैतिक वाटत नाही अनॆतिक काय तर लग्न बंधन किंवा अगदी लिव्ह इन रेलशनशिप मध्ये असताना वेश्यागमन करणे , येथे दोन्ही पुरुष आणि स्त्री हा नियम समान धरला आहे

युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स मधून नेत होते. ऍम्ब्युलन्स चालक आणि त्याच्या साथीदारांनी पेशंट च्या पत्नीचा लैंगिक छळ करायला सुरवात केली. आणि त्यासाठी पेशंट ला ऑक्सिजन मास्क काढून नंतर बाहेर फेकून दिले. एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. उज्जैन मध्ये भर दिवस, रस्त्यात, फुटपाथवर एका महिलेचा बलात्कार झाला. लोकं बघत बसली, काहींनी व्हिडिओ सुद्धा बनवले.

चौकस२१२ 09/09/2024 - 04:28
एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. यात धर्म कुठे आला? एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध जरुर करा मग प्रत्येक गुन्ह्याचे वर्णन आपण " हिंदू बहुसंख्याक भारतात गुन्हा झाला " असे करणार का ? कॉ न्ग्रेस जेव्हा सत्तेत होतती तेव्हा हि देशची ८०% लोकसख्या हिंदूच होती आणि २०१४ पासून सुद्धा .. इतका द्वेष बरा नव्हे .. अर्थात तुमच्या नादाला कोण लागणार .. बसा लावत भीतीला तुंबड्या

प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ लेख व त्यावरील प्रतिसाद पुन्हा वाचावेत. लेख जुना असल्याने काही लिंक आत्ता चालत नाहीत पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही मात्र या विषयावर निर्भया प्रकरणानंतर 2013 साली मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख व नंतर लैंगितेचे शमन हवेच हा एक लेख वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर सध्या चर्चा होताना दिसत नाही हे मला ठळक पणे जाणवले. अनेक मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले होते. जरुर वाचा. लैंगिकतेचे शमन की दमन? https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-or-aggression-36525/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 5 जाने 2013 लैंगिकतेचे शमन हवेच https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-is-needed-40206/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 12 जाने 2013 हे दोन्ही लेख तज्ञांनी आणि जिज्ञासूंनी जरुर वाचावेत. समीर गायकवाड यांचे खुलूस हे पुस्तक वेश्यांच्या जीवनावर आहे. ते ही आवर्जून विकत घेउन वाचावे. हा लेख व विषय समाजाचे लैंगिक व्यवस्थापन या मूळ विषयाचा भाग आहेत

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:35
धन्याशेठ, तुझ्या काथ्याकुटाचा विषय आवडला. इंटरेश्टींग आहे! :) आता माझी मतं - पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे. मी तर म्हणेन की भीष्मालादेखील स्वप्नदोष (झोपेतल्या झोपेत वीर्यस्खलन) झाला असणार. कारण मनुष्यप्राणी हा स्खलनशील आहे, आणि मेडिकल सायन्स प्रमाणे मनुष्य शरीर हे ठराविक काळापेक्षा अधिक काळ त्याच्या शरीरात तयार होणारे स्पर्मस रोखून ठेवू शकतच नाही. तेव्हा माझ्या मते भीष्म देखील ब्रह्मचारी नव्हता जर तो मनुष्यप्राणी असेल तर! आणि वीर्यस्खलन झाले की ब्रह्मचर्य संपले! मग भले ते १) स्त्रीशी संग येऊन होवो किंवा २) अपना हाथ जगन्नाथ हस्तमैथूनाने होवो किंवा झोपेतल्या झोपेत होवो! जी मंडळी १) व २) प्रमाणे वीर्यस्खलन रोखून धरू शकतात त्यांना निद्रावस्थेत ब्रह्मचर्यभंगाला सामोरे जावेच लागते लागते कारण मेडिकल सायन्सचा तसा नियमच आहे! तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय? माझ्या मते तरी नाही! कारण बाजारी नकद व्यवहारात रोगराईची भितीच अधिक असते. तेव्हा त्या वाटेला न जाणंच अधिक श्रेयस्कर! आणि मी म्हणतो की 'भुरळपाडून',' फूस लावून भोग घेणं' असं तुम्ही म्हणताय खरं पण भुरळ पाडून घेणार्‍याला किंवा घेणारीला ते समजायला नको काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही! तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही. हा हा हा! धन्याशेठ, हा तू भलताच मुद्दा मांडला आहेस. यावर मला ठाम असं एक उत्तर देता येत नाहीये! :) कारण व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर अद्याप तरी मी अविवाहीत आहे आणि अद्याप तरी कुणी कळकळीने माझ्यासमोर ह्या प्रशिक्षणाचा मुद्दा मांडलेला नाही! :) बाय द वे, 'नवविवाहितांना प्रशिक्षण देऊन' असं तू म्हटलं आहेस, त्या ऐवजी अविवाहितांना विवाहाला वर्ष सहा महिने असताना पूर्वप्रशिक्षण देण्यास काय हरकत आहे? भावी वराची/वधूची याला संमती असेल तर फारच उत्तम! बाहेरचे ट्रेनिंग कोर्सेसही जॉईन करायला नकोत! :) जोक्स अपार्ट, परंतु 'प्री मॅरिटल सेक्स' हा माझ्या मते महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात कुणा तज्ञाने मिपावर काथ्याकुटास सुरवात करावी असे वाटते. इथे या बाबत अधिक चर्चा केल्यास विषयांतर होईल! नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे. आहेस खरा तर्कशुद्ध! :) तुझ्या '४अ' या मुद्द्याशी मी पूर्णत: सहमत आहे.... त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला! बहुत करून काही श्रीमंत घरातल्या काही बायका नवर्‍याच्या अपरोक्ष खुलेआम नव्हे, तर ओळखी ओळखीत लपूनछपून दुसर्‍या पुरुषासोबत शैय्या करतात त्यांचे दर आवाच्या सव्वा असतात. माझ्या माहितीत अश्या काही चांगल्या घरंदाज, श्रीमंत, खात्यापित्या घरच्या अत्यंत देखण्या स्त्रीया आहेत! तसेच काही अभिनेत्रीही आहेत ज्यांचा उल्लेख मी रौशनीच्या एका भागत केलेला आहे! अर्थात माझं वरील म्हणणं हे काही अपवादात्मक स्त्रीयांबद्दलच आहे. खुलेआम बाजार मांडून बसणार्‍या स्त्रीयांच्या बाबतीत तू म्हणतोस त्याप्रमाणे 'कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी' हे कदाचित खरंही असू शकेल! तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी. तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्‍हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.) सहमत आहे! याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. हा शेवटचा परिच्छेद अप्रतिम! विचार करायला लावणारा! आपला, (धन्याच्या बुद्धीमत्तेचा फ्यॅन!) तात्या.

मुक्तसुनीत 11/03/2008 - 08:26
सर्वप्रथम , धनंजय यांचे एका उत्कृष्ट लेखाबद्दल अभिनंदन - आणि मिसळपावचेही. धनंजय यांचा आपल्या या लाडक्या स्थळावरचा वावर म्हणजे या स्थळाचा मानबिंदू आहे असे विधान करणे धाडसाचे होणार नाही. धनंजय यानी एका गुंतागुंतीच्या आणि अगदी जुन्या सामाजिक संस्थेविषयी उहापोह केला आहे. ('वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन्' असा उल्लेख वेश्याव्यवसायाबद्दल केला जातो.) त्यांच्या लिखाणाचे एक तात्पर्य असे असू शकते की शरीराचा क्रय आणि विक्रय या गोष्टी स्वत:मधे अनैतिक नाहीत (द ऍक्ट्स इन देमसेल्व्स आर नॉट अन्-एथिकल) . धनंजय यांच्या लिखाणाचा अजून एक अर्थ "या व्यवसायाचा डिफेन्स" असा सुद्धा घेतला जाऊ शकतो. वेगवेगळे मुद्दे मांडून ते निर्विवादपणे सिद्ध करू पाहतात, की या व्यवसायाशी संबंधित असणारे इतर घटक अनैतिक , प्रसंगी सर्वात वाईट , नीच जातीचे गुन्हेगार असू शकतात , परंतु ज्या व्यक्ति (पक्षी : वेश्या) हा व्यवसाय करतात त्या व्यक्तिना अनैतिक म्हणता येणार नाही. पर्यायाने या व्यक्तिंच्या व्यवसायालाही अनैतिक म्हणता येणार नाही. मला वाटते , अशा प्रकारचा डिफेन्स मांडायला धनंजय यांच्यासारख्या अतिशय बुद्धिमान वकिलाची गरज नाहीच. मुद्दा सोपा आहे. तो असा की, या व्यवसायात पडणार्‍या बहुतांश स्त्रिया या त्यांच्या परिस्थितीच्या शिकार असतात. (दे आर द विक्टिम्स ऑफ देअर डायर सर्कम्स्टान्सेस.) सर्व पर्याय उपलब्ध असताना वेश्याव्यवसायात उतरणार्‍या स्त्रिया किती टक्के स्त्रिया असतील यावर संशोधन होऊ शकेल ; पण कॉमन सेन्सने असे म्हणता येईल की, बहुतांश स्त्रिया इतर पर्याय उपलब्ध नसल्याने, बर्‍याचदा बळाच्या वापराने, किंवा कौटुंबिक-सामाजिक परंपरेने या व्यवसायात पडलेल्या असतात. ("पडलेल्या" असतात या क्रियापदावरूनच हे सूचित होते.) आणि यात आपण कायद्याच्या बंधनाच्या आतल्या मुलींचा मुद्दा बाजूला ठेवू - त्याना विक्रीस बसविणे सरळसरळ गुन्हा होय. आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. पण कुठल्याही गोष्टीचा असा संदर्भविरहित अर्थ लावणे - विशेषतः नैतिकतेच्या दृष्टिने - अपुरेच ठरते. सर्व समाजात , सर्व काळात स्त्रियांचे शोषण होते. या शोषणाचा सगळ्यात वाईट बाय्-प्रोडक्ट म्हणजे दि वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन. तळटीप : मित्रानो, माझ्या लिखाणात इंग्रजी शब्द अति आले आहेत. या गोष्टीची मला शरम वाटते. मी अशी आशा करतो की एक दिवस असा येईल जेव्हा मी भेसळविरहित मराठीत लिहायला शिकेन. आमेन :-)

प्राजु 11/03/2008 - 08:32
धनंजय यांनी हा विषय काथ्याकुट या सदरात का टाकला याचाच मी विचार करते आहे. कारण त्यांनी विषय मांडणी इतकी सुंदर केली आहे की इथे चर्चेला जागाच नाही. मुक्तसुनित म्हणतात त्याप्रमाणे- आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील. आणि जिथे उत्तरे मिळतात तिथे चर्चा कशावर करणार? एक अतिशय विचार करायला लावणारा आणि सुंदर लेख लिहिल्याबद्दल धनंजय यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. (सर्वव्यापी)प्राजु

सहज 11/03/2008 - 11:30
जगातल्या एका सर्वात जुन्या चर्चाविषयाला (पुन्हा एकदा) हात घातला गेला आहे. नैतिक अनैतिक सर्व सापेक्ष झाले आहे. जगभरातुन अनेक माहितीपट आले आहेत व सर्वात एकच कायम धागा दिसतो की या लोकांचे (बायकांची) फसवणूक, अत्याचार, शोषण. जर का ते थांबले तर या व्यवसायात सहभागी व्हायला किती जणी (जण) येउ शकतील याचे उत्तर मिळणे कठीण नव्हे. मुक्त शारीरिक संबंधाला चालना मिळाली तर जर का हा व्यवसाय कमी होईल असे म्हणले तर पश्चिमात्य देशात हा व्यवसाय कमी व्हायला हवा पण तसे तर दिसत नाही. शिवाय मग मुक्त शारीरिक संबंधाचे तोटे दिसले (वैद्यकिय तोटे) आता भर सुरक्षित शारीरिक संबंधावर जास्त. मधल्या मधे वेश्याव्यवसाय आहे तसा आहेच. उलट (चुकीच्या दिशेने) प्रगत होत आहे. जास्त पैसा येत आहे शेवटी मग पैसा, अज्ञान, पुरवठा, मागणी यांचा जोर वाढुन बाकी सगळे फोल. व्यवसायाचे नाव काही असो सत्य फक्त शोषण, पैसा.

आनंदयात्री 11/03/2008 - 11:07
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्‍यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. पटले! अन मी एक धाडसी विधान करु इच्छितो, वर उल्लेखलेल्या सर्व दोषांचे (ज्यामुळे हा व्यवसाय अनैतिक आहे) निर्मुलन जरी झाले तरी हा व्यवसाय अनैतिकच राहिल. कारणः वेश्या व्यवसाय जितका जुना तितकाच माणुस हा कळपात रहाणारा प्राणी आहे हे ही सत्य खरे. आपली आजची समाजव्यवस्था ही पोट भरल्यानंतरच्या भुकांची वा मानसिकतेची (जसे प्रेम, भविष्याबद्दलची हवी असणारी निश्चितत) फलित आहे, असे मानण्यास जागा आहे. आयुष्याच्या प्रत्येक पर्वात सर्व सामान्य माणुस हा कोणत्या ना कोणत्या नातेसंबधांवर जगत असतो, जसे लहान असतांना आई वडिलांबरोबर, तारुण्यात प्रेयसी/सहचारिणी बरोबर, प्रौढावस्थेत सहचारिणी बरोबर, म्हातारपणात सहचारिणी अन मुलांबरोबर. आता या सर्व नातेसंबधात सुखी रहायला, अहंकार जपायला त्याने/ तिने व्यवसाय करणे गरजेचे असते, खाणकामगार सुद्धा कष्ट करतांना उद्याच्या सुखी आयुष्याचाच विचार करत असतो/ असावा. वेश्या व्यवसायात जेव्हा आपल्या समाजाचा बेस असणारी कुटुंबव्यवस्थाच जेव्हा बाद होते, तेव्हा हा व्यवसाय अनैतिक ठरतो असे मला वाटते. कारण बहुतांश वेश्यांना कुटुंबे नसतात/ होउ शकत नाहित, त्यांचे उत्तरायुष्य अत्यंत वाईट परिस्थितीत जाते परिणामी 'व्यवसाय' करण्याची कारणे फलित होउ शकत नाहित. प्लस काही प्रमाणात नादी लागलेल्या विवाहित पुरुषांचे सुध्धा संसार उध्वस्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय असावे. चोरी जशी अनैतिक, ती या समाजव्यवस्थेच्या मॉडेलला पुरक नाही तसेच वेश्या व्यवसाय पण अनैतिकच तो ही पुरक नाही.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 12:52
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी या व्यवसायाला जन्म देणारे वि़कृत, षंढ (कितीही आणि कितीही खालच्या शिव्या दिल्या तरी अपुर्‍याच पडतील) पुरुष समाजात होते, आहेत आणि रहातील. ते अशा ठिकाणी जाउन आपली XX XXX घेतात. अशा व्यावासायिक स्त्रिया आहेत म्हणून कित्येक संभाव्य बलात्कार वाचतात / वाचत असतील. (माझा या विषयावर सखोल अभ्यास नाही, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.) ह्याला उपाय म्हणजे १००% सुरळीत समाजव्यवस्था आणि समाजाची १००% सात्विक मनोवृती - दोन्ही गोष्टी अशक्य आहेत! मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 12:59
करा पण, तुम्हाला जर नैतिक असे वाटत असेल तर त्याची काही कारणे द्या ! म्हणजे आम्हाला (म्हणजे माझ्यासारखे मत असणार्‍या) कळेल तरी की हा व्यवसाय नैतिक कसा आहे ते !

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 11/03/2008 - 14:33
प्रथम, मी हा व्यवसाय नैतिक आहे असे म्हटलेले नाही.
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी...
ह्या समाजात अनेक अनावश्यक नैतिक आणि आवश्यक अनैतिक व्यवसाय आहेत. लाच घेणे/देणे, हुंडा घेणे/देणे, राजकारण (विशेषनाम नव्हे.. अनेक व्यवसायांतील राजकारण जे सहकार्‍यांबरोबर, कर्मचार्‍यांबरोबर खेळले जाते) असे अनेक समाजघटक आहेत पण बर्‍याचदा ते करणार्‍यांची प्रतिमा मात्र स्वच्छ असते. वेश्याव्यवसायातही वेगवेगळे स्तर आहेत - काही पैशांसाठी (तर तुम्ही म्हणाल की मग हाच व्यवसाय का.. दुसरे नैतिक व्यवसाय ती करू शकते उदा. एक अशिक्षित बाई भांडी घासणे, घरकाम करणे इ. कामे करू शकते. पण अशा बायकांवरही लांडगे टपलेले असतात. गरीब बाईमाणूस असल्याने काही बोलूही शकत नाही. आणि पाळणाघरात, लेडिज होस्टेलमध्ये प्रत्येक निराधार निरक्षर स्त्रीला काम मिळतेच असे नाही. {म्हणजे भांडीघासणे, घरकाम ही कामे करू नयेत असे मी म्हणत नाही.. तर ते व्यवसायही स्त्री साठी १००% सुरक्षित आहेत असे नाही.}), काही भरपूर पैसा असून नुसतेच मजा करण्यासाठी (समाजातील उच्च स्तरातील बायका) , एखादी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, एखादी पत्नी नवर्‍याच्या आजारासाठी, काही गावी असलेल्या घरी पैसे पुरविण्यासाठी.. अशा एक ना अनेक स्तरातील स्त्रीया असतात. तर प्रत्येक बाई ही आवडीने हा व्यवसाय पत्करत नाही. माझे म्हणणे असे की हा व्यवसाय जरी अनैतिक असला तरी तो आणि असे अनेक व्यवसाय आता समाजाचा घटक आहेत. ("वेश्याव्यवसायारहित समाज" हे हवेहवेसे पण कायम स्वप्नच रहाणार आहे. कारण पुरुष.. ज्याच्या सुप्त भावनेने ह्यास जन्म दिला.) वेळ आल्यावर सगळे पाठ फिरवतात. नातेवाईक मदत करत नाहीत. मार्ग असतो, पण प्रत्येकीला वाईट वेळ आल्यावर सापडतोच असे नाही. काही वाटा चुकतात. वाटेवर यायची काहींकडे अक्कल नसते. म्हणून त्या अनैतिक नाहीत तर व्यवसायाचे मूळ - पुरुष अनैतिक. तरी कृपया अशा अशिक्षित गरजू महिला ज्यांना समाजसेवी संस्थेकडे जायचे सुद्धा ज्ञान नसते, त्यांसाठी आपण नैतिक व्यवसायाचे पर्याय सुचवू शकता का? मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 11/03/2008 - 14:46
आपण माफ केलेत आम्ही उपकृत झालोत. आणी बहुतांश अशिक्षित गरजू महिला नैतिक व्यवसायच करतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे, या कारणामुळे आम्ही कोणतेही पर्याय सुचवु शकत नाही. धन्यवाद.

"मला वेश्याव्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते," असे जवळपास कुणीही म्हणणार नाही. हा 'धंदा' शोषणावर आधारित आहे. बहुतेकांना भुलवून, फसवून ह्या व्यवसायात आणले जाते. तर अनेकांना कमाईसाठी दुसरा कुठला चांगला पर्याय उपलब्ध झाला असता तर ते इकडे वळलेच नसते. त्यामुळे हा व्यवसाय, शोषणावर आधारित इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच, अनैतिकच वाटतो. १. तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?" असे एकाने विचारल्यावर एकीने "मला 'आयएएस ऑफिसर' व्हायचे होते/आहे," असेही सांगितल्याचा एक खरा किस्सा मला एकाने ऐकवला आहे. कदाचित ती 'हाय सोसायटी'ची असती तर तिला असा प्रश्न विचारण्याची हिंमत संबंधिताला झाली नसती. किंवा तिचे असे उत्तर देणे आम्हा खोटारड्या लोकांना हास्यास्पदही वाटले नसते. असो.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 11/03/2008 - 19:51
नुसते वेश्या व्यवासायच का? धुणी भांडी करणार्‍या महिलांना देखिल हा प्रश्न (तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?)विचारला तर "मला हा व्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते" अहे कुणीही म्हणणार नाही.. कारण हे सर्व व्यवसाय समाजात फारसे प्रतिष्ठा नसणारे व्यवसाय आहेत इतकेच.. परंतू त्यामूळे ते 'अनैतिक' असलेच पाहिजेत असे मात्र नाही. धुणीवाली/ भांडीवाली ह्यांच्या कामाला कुणीही अनैतिक म्हणणार नाही!

In reply to by कोलबेर

कोलबेर, धुणीवाली आणि भांडीवाला ह्यांच्या कामाला कुणीच अनैतिक म्हणणार नाही. पण ह्या कामांत शोषण आहेच. ह्या बायांना भविष्यनिर्वाह निधी (प्रॉविडंट फ़ंड), ग्रॅच्युइटी (मराठीत काय म्हणतात), किमान वेतन मिळायला हवे. इतरांसारख्या सुट्ट्या मिळायला हव्यात. आम्ही ह्या गोष्टी देतो काय? नाही! थोडक्यात दोन्ही ठिकाणी सेवा घेणारे अनैतिक कामच करीत आहेत आणि परिस्थिती जैसे-थे राहण्यास कळत-नकळत कारणीभूतही ठरत आहेत.

In reply to by चित्तरंजन भट

कोलबेर 14/03/2008 - 03:18
बरोबर... धुणी वाली आणि वेश्याच कशाला..अगदी (काही) सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही हे शोषण चालते..आणि कसल्याही प्रकारचे शोषण हे अनैतिकच त्यात काहीही वाद नाही..पण म्हणून सरसकट संपूर्ण व्यवसायच अनैतिक म्हणता येईल का?..समजा वेश्या व्यवसाय कसलेही शोषण न होऊ देता चालवला तरीही तो अनैतिकच ठरेला का?

१) कोठेवाली/घरवाली ही व्यावसायिक; वेश्या ही नोकरदार/गुलाम (अनुभवातुन तीच पुढे व्यावसायिक होउ शकते) आणि ग्राहक हा गिर्‍हाईक. २) कुठलाही व्यवसाय हा ग्राहकांच्या गरजेतून निर्माण होतो. ३) नैतिक / अनैतिक, प्राकृत / विकृत सापेक्ष आहे ४) ही तुलना भुक लागली असता व घरात अन्न नसता उपहारगृहात जाणे, डबा लावणे किंवा उपाशी राहणे याच्याशी करुन पहा. ५) ही तुलना नाट्यनिर्माता , रंगकर्मी व मायबाप प्रेक्षक यांच्याशी करुन पहा ६) गणिका व्यवसाय हा पुर्वीपासुन आहे. योग्य/अयोग्य ही मतमतांतरेही पुर्वीपासूनच आहेत. ७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय? ८) हा व्यवसाय नसता तर बलात्काराचे गुन्हे वाढले असते असे म्हणणे म्हणजे या व्यवसायाचे समर्थन करणे होत नाहि. तो प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व सारखा आहे. ९) योनिशुचिता जशी गौण व्हायला लागेल तसा हा व्यवसाय वाढीस लागेल १०) वेश्यांच्या जागी आपल्या आया बहिणि असत्या तर? याचे चित्र डोळ्या समोर आणा. असे करताना स्वामी विवेकानंद यांची शिकागो ला वेश्यावस्तीकड फेरफटका मारताना " या तर आमच्या भगिनी आहेत" या बोधकथेतील वाक्याची आठवण करुन पहा. ११) http://www.misalpav.com/node/114 इथ 'पोटाला नाही आटा अन चोटाला उटण वाटा 'इथे ओशाळणारी अश्लिलता आठवते. १२) क्या करें शेवटी अपना अपना हाथ अपना अपना जगन्नाथ प्रकाश घाटपांडे

अनिकेत 11/03/2008 - 16:25
अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि बायका, हे कायमच नफा देणारे धंदे होते आणि आहेत. युरोपातील वेश्याव्यवसायावर ही एक थरारक documentary आहे.. आपल्याकडे जे नेपाळमधे किंवा गरीब राज्यांत होते तेच पूर्व युरोपातही होते. येथे नैतिकतेच्या गप्पा मारण्याआधी अवश्य पहा. पण अधिक पैशांसाठी (गरजेपोटी नव्हे!) धंदे करणार्‍या कॉलेजातील पोरी अथवा डेली सोपमधील नट्यांचा उपभोग घेण्यात गैर आहे असे मला वाटत नाही. अनिकेत

नैतिक, अनिकतेचा विचार करण्याअगोदर आमचे मत असे आहे की, वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. जशी श्रमाला प्रतिष्ठा आहे,त्या प्रमाणे. ती मिळाली की नैतिक, अनैतिक राहणार नाही असे वाटते. पण, व्यवसाय म्हणतांना वेश्यांना आर्थिक गरजा भागवता येत नाही, म्हणुन त्या वेश्या व्यवसाय करतात. जर आर्थिक संपन्नता असेल तर त्या या गोष्टीकडे वळल्या असत्या का ? याचे उत्तर मला तरी 'नाही' असेच वाटते. ती सामाजिक गरज असेलही पण प्रतिष्ठा नसल्यामुळे मोठ मोठ्या मॉल्स मधे माणूस जितक्या सहजपणे प्रवेश करतो तितक्या सहजपणाने वेश्येच्या वस्तीत प्रवेश करण्याचे धाडस करतो का ? 'नाही'. म्हणुन समाधानासाठी ( आर्थिक सुबत्ता इथे प्रश्न नाही ) येणार्‍या स्त्रिया वेगळ्या. पण अधिक नफ्यासाठी व्यवसायात येणार्‍या या गरजू स्त्रिया आहेत, आणि त्यातही उच्च गरजा पूर्ण करण्यासाठी या अशा व्यवसायात तरुण मुली, स्त्रिया दिसतात. पण,योनिशुचिता ही व्यवसायातील/ बाजारपेठेतील मुख्य अडचण असल्यामुळे येत्या काळात वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल आणि तीही भारतात यावर माझा तरी विश्वास नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वस्तूंच्या अगर सेवा पुरविण्याच्या व्यवसायात आणि या व्यवसायात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे शरीराच्या मर्यादा व मनाचे आस्तित्त्व . या मर्यादांमुळे तिला ग्राहक नाकारण्याचा हक्क असायला हवा. असे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच फूट उंच व ४० किलो वजनाच्या स्त्रीकडे १२५ - १५० किलो वजनाचा सहासाडेसहा फुटी माणूस किंवा गलिच्छ किळसवाणा पण भरपूर पैसे मोजायला तयार असणारा श्रीमंत माणूस, पोलीस, गुंड वगैरे व्यक्ती आली तर तिने काय करावे? ४अ मुद्याबाबत बहुतेक लोक सहमत होतील. असो. एक चांगली चर्चा. धन्यवाद.

धनंजय 12/03/2008 - 02:56
आणि नवीन मुद्दे आले आहेत. असे वेगवेगळे विचार वाचून चर्चा प्रगल्भ होत आहे. तात्यांनी उल्लेख केलेला विवाहपूर्व संबंधांचा मुद्दा अवांतर नाही. अविवाहित व्यक्तीला लबाडीने भोग घेणे आणि विकत भोग घेणे हे दोनच पर्याय नाहीत. दोघांच्या स्वातंत्र्यास धक्का न देता, दोघांच्या भावनांची कदर करून, दोघांच्या गरजा भागवणे हा पर्याय आहेच. या बाबतीत "दोघांच्या भावनांची कदर, स्वातंत्र्य" यांना मी बर्‍यापैकी कडक निकष लावतो तो मागे एका कवितेत चर्चिला आहे. हा पर्याय असणे माझ्या विचारधारेला समर्थन देतो - कारण हा राजमार्ग असताना जो अविवाहित व्यक्ती वेश्याबाजारामुळे चळतो, तो त्याच्या इच्छेने, वेश्याबाजाराच्या अनैतिक भुरळीमुळे नाही. काही वेश्यांना पुष्कळ शुल्क मिळते हे खरे आहे. कालच न्यू यॉर्क राज्याचे राज्यपाल गोत्यात अडकले (दुवा) त्या ठिकाणच्या वेश्या ताशी १०००-५००० डॉलर दर लावत. अशा वेश्यांना बहुतेक नकाराधिकाराचे, किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य असावे. येथे राज्यपाल स्पित्झर हे विवाहित आहेत की नाहीत, त्यांच्या कुटुंबसंस्थेवर काय परिणाम होत आहे, हे बघण्याची मुख्य जबाबदारी स्पित्झर यांचीच आहे, ते जिला भेटले त्या "क्रिस्टेन"ची (विक्रेती म्हणून) नव्हे. जर हा बाजार खरोखर मुक्त आणि स्वतंत्र व्यक्तींमधला असेल तर हा माझ्या आर्थिक चर्चेतून निसटतो. तो मी केलेल्या वेगळ्या चर्चेत याच्या नैतिकतेचा विचार व्हावा - त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांस पूर्ण माणुसकीने वागवत आहेत की नाहीत. तेही होत असेल - कोणी कोणाला जनावर किंवा वस्तू म्हणून वागवीत नसेल तर या विषयाबद्दल मला वेगळे कुठले नैतिक कुतुहल नाही. तरीही हा अपवादात्मक, दुर्मिळ मालाचा व्यापार आहे. माझा मुख्य मुद्दा बहुसंख्य वेश्यांबद्दल आहे, ज्या पूर्ण स्वातंत्र्याने व्यापार करत नाहीत. मुक्तसुनीत म्हणतात (शिवाय वेगळ्या शब्दांत प्राजु, चित्तर, अनिकेत यांनी दिलेली चित्रफीत, म्हणतात) की पर्याय उपलब्ध असताना हा पेशा कोणीही स्वीकारणार नाही. यात बळजबरी, किंवा अगतिकता आलीच. (याला अपवाद स्पित्झर यांस विक्रय करणारी, वगैरे असेल - आपल्याला माहीत नाही.) मीही तो अगतिकतेचा मुद्दा आर्थिक ताळमेळ लावून करू इच्छितो. तो मुक्तसुनीत म्हणतात तसा सोपा नाही. मागे मुंबई पोलिसांनी "सोडवलेल्या" काही वेश्यांबद्दल ऐकले होते. त्यांचे म्हणणे होते की आम्ही स्वखुषीने धंदा करत आहोत. सोडवणूक नको होती. अनिकेत यांनी दिलेल्या चित्रफितीतही काही वेश्यांचे असे मत होते, की जर इंग्लंडमधून हद्दपार होणार असतील तर गुलामगिरीतून सोडवणूकच गैरसोयीची. (इथे अगतिकता थेट दिसते, पण मुंबईत सोडवलेल्या वेश्यांच्या बाबतीत ते स्पष्ट दिसत नव्हते.) माझ्या समान मनुष्य म्हणून त्या "आपखुषी" वेश्यांची साक्ष खरी मानण्यास माझी तयारी असलीच पाहिजे. दुसर्‍या कुठल्या बाबतीत थोडाफार अगतिक असल्याचा माझा अनुभव आहे, म्हणून त्यांचे "आपखुषीचे" विश्लेषण करू इच्छितो. आर्थिक गणित करून त्यांचा बाजार स्वातंत्र्याचा नाही हे दाखवतो. सर्वच वेश्या आपण नाखुषीने या धंद्यात आहोत अशी तक्रार करत असतील (म्हणजे कारकूनही तक्रार करतात, त्यांपेक्षा जास्त!) तर या लांब सिद्धतेची गरज नव्हती. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही (टंकनदोष सुधार केला). सहज आणि काही वेगळ्या पद्धतीने प्रकाश घाटपांडे विचार करतात की येथे नैतिक/अनैतिक सापेक्ष आहे, किंवा होऊ लागले आहे. त्या दोघांच्या बहुतेक मुद्द्यांचा मी स्वीकार करत असलो तरीही पूर्ण सापेक्षता नाही असे माझे मत आहे. अधिकाधिक सापेक्षता मानूनही नैतिकतेचा विचार केला जाऊ शकतो, असे मला या चर्चेत म्हणायचे आहे. स्वातंत्र्यहरण आणि मनुष्य-मूल्य-समानता (मूल्य=किंमत) या सापेक्ष मानू नयेत, असे मला वाटते. या नैतिक मूल्याला (मूल्य=तत्त्व) इंग्रजीत गोल्डन रूल असे म्हणतात. "जसे माझ्याशी वागणे इष्ट तसे सर्वांशी वागणे इष्ट, जसे माझ्याशी वागणे अनिष्ट तसे सर्वांशी वागणे अनिष्ट". "इष्ट" म्हणजे मला जपणे, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मला स्वस्त न करणे. हे कमीतकमी तत्त्व सापेक्ष मानू नये. बाकी प्रकाश घाटपांडे म्हणतात तसे वेश्यांना आयाबहिणी मानूनच त्यांच्या व्यापारातील स्वातंत्र्याचे विश्लेषण करतो आहे. "७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?" हे अगदी चपखल माझे तर्कशास्त्र आहे - फक्त माझा निष्कर्ष आहे की विद्यापीठाशी वाटाघाटीत माझ्या बुद्धीचे मूल्य ठरवण्याचे मला जितपत स्वातंत्र्य आहे, तितके स्वातंत्र्य शरीरविक्रीच्या वाटाघाटीतही असले पाहिजे. माझ्या गणिताप्रमाणे तितके स्वातंत्र्य नाही, त्याहून खूपच कमी आहे, त्यामुळे ती बाजारपेठ अनैतिक मानावी. सहज विचार करतात की मुक्त शरीरसंबधाची मुभा असलेल्या पाश्चिमात्य देशांत वेश्याबाजार अजून कार्यरत का? त्याचे कारण हे असावे की मुक्त (मोफत) भोग घेणारे व्यक्ती आणि विकतचा भोग घेणारे व्यक्ती बहुधा वेगवेगळे असावेत. "मोफत" शरीरभोग घेण्यात भावनांचा, वेळेचा खर्च करावा लागतो, हे विसरता कामा नये. तो खर्च करण्यास जे असमर्थ आहेत, त्यांना कदाचित रोख व्यवहारच सोपा जात असावा. मनस्वी आणि घाटपांडे "या सेफ्टी-वाल्वमुळे काही संभाव्य बलत्कार टळतात" त्याच्याकडे लक्ष वेधतात. हा मुद्दा वेश्याव्यवसाय या संदर्भात लागू तर आहेच. पण नैतिकता या संदर्भात लागू नाही असे तेही म्हणतात, ते योग्यच. मनस्वी अन्य कामधंद्यासाठी मुभा नसलेल्या स्त्रियांच्या अगतिकतेबद्दल सांगतात. पण या अगतिकतेमुळे त्या कामाला लागलेल्या स्त्रियांना शुल्क ठरवायचे स्वातंत्र्य नाही हे त्यांचे मत आहे, असे त्यांच्या लिखाणावरून मी समजतो. प्राडॉ मुद्दा उपस्थित करतात की या श्रमाला प्रतिष्ठा नाही; योनिशुचितेचे स्तोम आहे, याची आठवण देतात. सुधीर कांदळकर सांगतात की सेवा पुरवण्याबाबत नकाराधिकार असल्याशिवाय हा व्यवसाय अन्य व्यवसायांपेक्षा जाचक आहे, हे पटण्यासारखे आहे. कोलबेरही श्रमबाजाराची नैतिक तत्त्वे लागू व्हावीत, अशा मताचे दिसतात. सर्वांपेक्षा आनंदयात्री वेगळा दृष्टिकोन आणतात. त्यांचे मत असे की वेश्याव्यवसाय हा समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या कुटुंबसंस्थेला घातक आहे. यातही ते दोन्हीकडून विचार करत आहेत ही त्यांच्या विचारातील प्रगल्भता आहे. वेश्येला कुटुंबसुख नकारले जाते हा त्यांचा मुद्दा एक आगळीवेगळी सहानुभूती दाखवतो. वेश्येला जोडीदार-पती मिळण्याचे सौख्य नाही, हे व्यापाराच्या दृष्टीने सक्तीचे नाही, तरी आजच्या समाजातली परिस्थिती आहे. शारिरिक इजेसारखी ही मानसिक इजा आहे. अशा प्रकारची प्रीति-वैफल्याची मानसिक इजा काही थोड्याच काही व्यवसायांत होते. कुठल्याकुठे वर्षानुवर्षे पोस्टिंग झालेले सैनिक, खतरनाक व्यवसायामुळे षंढत्व आलेले कामगार, वगैरे. या कामगारांना या इजेच्या बदल्यात ज्या प्रकारचा मोबदला मिळतो, तितपत मोबदला वेश्येला मिळाला नाही, तर तो व्यापार योग्य मूल्याचा कसा म्हणावा. (वर तात्यांनी उल्लेखलेल्या उच्चवर्गीय वेश्यांना जोडीदार-पतीचे सुख मिळत असते, ते अपवादात्मक. तसेच प्रसिद्ध सिनेनट-नट्यांना पुढे जोडीदार करता येत असावा. पण त्यांचे सेवाशुल्क बघितल्यास व्यापारातील त्यांचे स्वातंत्र्य, नकाराधिकार, वगैरे बाजारबसव्यांपेक्षा अधिक असतो हे दिसते.) वेश्यागामी व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त होते, हा दुसर्‍याबाजूनेही आनंदयात्री विचार करतात, तो योग्यच. पण त्याविषयी वरील लेखात मी थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. एक मुख्य की त्यांचे मुद्दे व्यक्तींच्या कुटुंबाचा घात होण्याबद्दल आहेत. समाजात कुटुंबव्यवस्था नष्ट होण्याबद्दल नाहीत. दुसर्‍या कोणाचे तेही मत असू शकते. पण वेश्याव्यवसाय हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे, हे चर्चेत अनेकांनी नमूद केले आहे (वर्ल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन). त्या अर्थी वेश्याव्यवसाय हजारो वर्षांत समाजातील कुटुंबव्यवस्थेला नाहिसे करू शकला नाही, त्यात तेवढी शक्ती नाही, हे उघडच आहे. मला वाटत होते की केवळ "अनेकांशी भोग भोगणे अनैतिक हे गृहीतक मानावे" असे म्हणणारे कोणी चर्चेत सहभागी होईल. त्यांच्याशी माझा वेगळा वाद झाला असता - बहुतेक एकमेकांचे मुद्दे पटले नसते. पण तेही उद्बोधक ठरले असते.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:46
>>> मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक आहे. या ऐवजी मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही. असे वाचावे.

विसुनाना 12/03/2008 - 12:38
कालपासून चर्चा वाचत असलो तरी प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळाला नाही. चर्चेचे प्रस्तावक आणि संचालक श्री. धनंजय यांनी चर्चेचा गोषवारा घेतल्यामुळे चर्चा संपली की काय अशी शंका आली. परंतु विषय फारच व्यापक असल्याने ती पुढे सुरू राहील असे वाटते. म्हणून माझेही मत - चर्चा 'वेश्या व्यवसायाची नैतिकता/अनैतिकता' या विषयावर सुरू असली तरी केवळ स्त्री वेश्यांपुरतीच मर्यादित राहिली काय अशी शंका येते. वेश्यांमध्ये लिंगपरत्वे तीन प्रकार आहेत - पुरुष वेश्या - (जिगोलो), क्लीब वेश्या आणि स्त्री वेश्या. हे तीन्ही व्यवसायप्रकार फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत. शिवाय समलैंगिक वेश्यावृत्ती आणि विषमलैंगिक वेश्यावृत्ती यांच्याबाबतही विचार झाला पाहिजे.(केवळ समलैंगिकता या विषयावर अथवा मानसिक लैंगिकता या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकेल.) माणूस हा विचारशील असला तरी प्राणी आहे. :) वंशसातत्य टिकवणे हा त्याच्या अस्तित्वाचा इतर सर्व जीवसॄष्टीप्रमाणे एक प्रमुख (कदाचित एकमेव) हेतू आहे. आणि त्यामुळे त्याला शारिरिक आणि मानसिक लैंगिक गरजा असणारच. शिवाय समलैंगिकता अनेक प्राण्यांमध्येही आढळते. निसर्गतयः अनेक भागिदारांशी संबंध ठेवण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये दिसते.या सर्व संबंधांत पशूनरांची अनेक पशूमाद्यांशी संबंध जास्त आढळतात. याउलटही काही उदाहरणे आहेत. या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करण्याची 'गरज' माणसानेच निर्माण केली आहे. कारण केवळ पशुत्वाप्रमाणे संबंध नियंत्रित केले असते (किंवा अनियंत्रित ठेवले असते तर) तर मानवसमाजातील अनेक कमजोर, दुबळ्या नरांना त्यांचे वंशसातत्य टिकवणे अशक्य होऊन बसले असते. याशिवाय अनेकसंबंधी लैगिक वर्तनामुळे शारिरिक रोगांचेही प्रमाण वाढून समाजाचा र्‍हास होण्याची शक्यता मानवाने पूर्वीच हेरली असावी. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे एकूणच लैंगिक नैतिकता (पक्षी -समाजाने मान्य केलेले शरीरसंबंध) ही मानवसमाजाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनातून निर्माण झाली आहे.किंबहुना विवाहसंस्थेचे मूळही यातच आहे.लैगिक अनैतिकता हा सर्वाधिक सामाजिक तुच्छ्तेचा आणि घृणेचा विषय आहे. Morality: the character of being in accord with the principles or standards of right conduct; right conduct; sometimes, specif., virtue in sexual conduct त्यामुळे एकाद्या व्यक्तीच्या विवाहबाह्य, विवाहपूर्व अथवा समलैंगिक संबंधांकडे समाजाने अनैतिक म्हणून पहाणे स्वाभाविकच आहे. वेश्याव्यवसाय यात मोडतो हे स्पष्टच आहे. परंतु कोणत्याही गरजा विचारांच्या सहाय्याने काबूत ठेवायच्या किंवा नाही ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. काही लोकांच्या गरजा विचारांवर मात करण्याइतक्या प्रबळ असू शकतात. तर काही लोकांना मिळणारे प्रलोभन हे विचारांवर मात करणारे असते. हे केवळ लैंगिक गरजांबाबतच नव्हे तर इतरही सर्व गरजांना लागू होते. यातूनच सामाजिक हिताची नैतिकता भंग होण्याची शक्यता निर्माण होते. (इथे पुलंचे रावसाहेब आठवतात - 'तुम्ही पण शहाणेच की वो! म्हणे चोरी कशाला करायची, मागून घ्यायचे...'किंवा 'घरी एक चांगलं सुख मिळत असलं तर माणूस बोगारवेशीत कशाला जातंय वो?') Ethics: the system or code of morals of a particular person, religion, group, profession, etc. त्यामुळे एखाद्या माणसाने स्वतःचे वर्तन हे नैतिक किंवा अनैतिक ठरवणे हा ज्याचात्याचा अधिकार आहे. असा गुंतागुंतीचा मामला आहे. माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी. (उदा. उच्चभ्रू स्त्री वेश्या, पुरुष वेश्या आणि क्लीब वेश्या.) अलेक्झांडरसारख्या पुरुषाबरोबर हेफायस्तियनचे समलैगिक संबंध होते. हेफायस्तियन हा एक प्रकारे पुरुष वेश्याच होता असे म्हणावे लागेल. तसेच काही देशात/प्रांतात (जसे गोवे - भाविणी) वंशपरंपरेने काही स्त्रिया हा व्यवसाय करतात. त्यात त्यांच्या आर्थिक फायद्याचा मोठा वाटा असतो. 'राख' हा प्रकारही याच पद्धतीचा आहे. अर्थात या भागिदारांमधील एक किंवा दोन्ही विवाहित असतील तर त्यांच्या इतर (वैवाहिक) भागिदारांचे या व्यावसायिक संबंधांमुळे (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही ना? याचाही या नैतिकतेच्या व्याख्येत विचार करावा लागेल. पण व्यावसायिक शरीर संबंधात जर कोणत्याही बाजूचे (आर्थिक, शारिरिक, मानसिक) नुकसान होत असेल तर मात्र तो अनैतिक आहे असे म्हणावे लागेल.बारबाला या कितीही उत्कृष्ट नृत्यांगना असल्या तरी त्यांच्या नृत्यातला शारीरभाव आणि कामुकता यांचा वापर त्या आर्थिक फायद्यासाठी करत होत्या हे उघड आहे. त्यामुळे अनेक पुरुषांचे आर्थिक नुकसान झाले. म्हणून तो व्यवसाय अनैतिक. केवळ अंधश्रद्धेमुळे (जसे जट आली म्हणून देवदासी) एकाद्या व्यक्तीला तिच्या मनाविरुद्ध/ तिला न कळता या व्यवसायात ढकलणे अनैतिक. गरीबीमुळे एखाद्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध हा व्यवसाय करायला लावणे अनैतिक. वेश्येच्या संबंधांमुळे जर लैंगिक आजार होणार असतील तर ते अनैतिक. रखेलीमुळे वैवाहिक जीवनात पत्नी, मुले यांची आर्थिक, मानसिक कुतरओढ झाली तर ते अनैतिक.अशी अनेक उदाहरणे देता येतील. सध्या इतकेच. श्री. धनंजय आणि इतरांची मते कळावीत. अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)

In reply to by विसुनाना

अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)
हे अवांतर नसुन मला तर समांतर वाटते. मी मराठी वरील ही चर्चा मी पाहिली नाहि. पण अशा प्रकारची मते नवीन नाहीत. आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव प्रतिवादकाच्या चेहर्‍यावर नक्कि असणार. "एवढा गरिबीचा कळवळा आहे तर आपल्या घरातील संपत्ती का नाही वाटून टाकत?" "एवढा पुळका आहे तर स्वतःच्या घरात ठेउन घ्यायचे!" "आम्ही काय अन्नछ्त्र उघाडल नाय, यवढ आसन तर सोताच्या घरात जेवायला बोलावचं" वगैरे वगैरे सदृश विधाने आपण नेहमी ऐकत असतो. जंगल कमी झाल्यावर बिबटे मानवी वस्तीत शिरतात. पाण्यासाठी ,अन्नासाठी; प्रजोत्पादनासाठी नव्हे. मग बिबट्यांच्या नावे हाकाटी होते. "एवढी बिबट्याच्या भुकेची काळजी आहे तर आपली मुल जाउ द्यात कि बिबट्याच्या तोंडात?" अशी पण चर्चा सुरु होउ शकते. "समजा ज्यांना हा सेफ्टी व्हॉल्व वाटत नाही त्यांच्या घरातील स्त्रिया समाजातल्या पुरुषी कामांधतेला बळी पडल्या तर?" असाही प्रश्न उपस्थित होतो. या आहेत म्हणुन आपल्या आयाबहिणि सुखाने जगताहेत (त्यातल्या त्यात) . स्वामी विवेकानंदांनी म्हणुन तर त्यांना भगिनी म्हटलं . अस मानणारा एक लोक प्रवाह आहे. मुरळ्या, देवदासी या समाजातील धर्मलंडांची सोय व्हावी म्हणुनच निर्माण झाल्या. त्याला 'द्यवाची शेवा' असा धार्मिक पाठिंबा दिला. मूळ प्रश्न असा आहे कि लैंगिक भुक भागली नाही म्हणुन माणुस मरत नाही. पण लैंगिक भूक हि नैसर्गिकच आहे. ती शमली नाही तर समाज स्वास्थ्य टिकेल का? असा आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 12/03/2008 - 15:37
आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव चेहेर्‍यावर होताच. चर्चेतले एक ऐकीव मत (माझे नव्हे) म्हणून अवांतरमध्ये नोंदवले. आपलेही मत ग्राह्य आहेच.

In reply to by विसुनाना

धनंजय 17/03/2008 - 08:01
तुमच्या पुढील म्हणण्याशी सहमत :
माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी.
वेश्याव्यवसायाच्या बाबतीत नैतिक गणित करत असताना या तीन प्रकारच्या शरीरविक्रेत्यांत मूलभूत फरक करून काही हशील नाही. पण तपशिलांत फरक येऊ शकेल. सामाजिक गुप्ततेमुळे आर्थिक/मानसिक/शारिरिक फायद्या-तोट्याचे गणित तिघांमध्ये वेगवेगळे येऊ शकेल. त्यामुळे एखादी बाजारपेठ कमीअधिक प्रमाणात अन्याय्य असू शकेल. या चर्चेत मी बहुतेक शरिराच्या क्रय-विक्रयाबाबत विचार केला आहे. त्यामुळे बाजार मुक्त की नाही, विक्रेत्याला आणि ग्राहकाला किंमत ठरवण्याचे किंवा नकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही, अगतिकतेमुळे अयोग्य किंमत ठरवली जात आहे की नाही, या निकषांवर न्याय-अन्याय ठरवता येतो. क्रय-विक्रय नसला तर माझ्या मते लैंगिक संबंधांच्या नैतिकतेचे वेगळे निकष असावेत - कारण बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण करता येत नाही. मग ते विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध कुठले का असेनात. बाजारात आपल्याला बराच थोड्या वेळाचा, मुदतीचा विचार करावा लागतो. देण्या-येण्याचा हिशोबखाते किंमत भरल्यानंतर सामान्यपणे बंद केले जाते. (किंवा किंमत आगाऊ दिल्यास सेवा पुरवून झाल्यानंतर हिशोबखाते बंद केले जाते.) पैशांचे हस्तांतरण होत नसेल तर हिशोबाच्या खात्याची मुदत लांब असते. त्यामुळे नैतिकता ठरवण्यासाठी सामान्य बाजाराचे निकष वापरता येणार नाहीत. तेही मूलभूत निकष विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध सर्वांनाच सारखे असावेत. कोणाचेही मानव्य मूल्य स्वस्त होता कामा नये. सामाजिक परिस्थितीमुळे विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक या प्रकारांत "मानव्य मूल्य राखणे" कमीअधिक कठिण असेल, हे तपशील वेगळेवेगळे असतीलच. "सेफ्टी वॉल्व" उपमा ठीक आहे. पण कोणीही "सेफ्टी वॉल्व" होण्यासाठी औदार्य मागणे ठीक नाही. आजकाल ज्यांना आपण प्राण देण्याचे औदार्य मागतो (खाणकामगार, अग्निशामक, सैनिक, वगैर,) त्यांना त्या मानाने शुल्क देतो. इतकेच काय सैन्यातले अधिकारी पगाराबद्दल बोलले, पगारवाढीबद्दल बोलले, तर आपण त्यांना "उदार व्हा" असे म्हणून चूप करत नाही. तसेच "उदारपणे सेफ्टी वॉल्व व्हा" म्हणून अन्याय्य बाजारात बोळवण करू नये.

लिखाळ 13/03/2008 - 20:32
धनंजय, अतिशय छान लेख. .... नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील. खरेच असेच वाटते. पण यावर अनैतिकतेचा शिक्का सर्व समाजात आहेच. पहा ना आत न्युयॉर्क मधले प्रकरण. यात पैशाच्या अपव्ययाबद्दलची ओरड आहे तसेच वश्या प्रकरण हा सुद्धा महत्वचा नैतिक मुद्दा आहे. वरचे सर्व प्रतिसाद वाचून झाले नाहित. वाचत आहे. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

कोलबेर 14/03/2008 - 03:47
विसुनानांच्या प्रतिसादातुन ह्या विषयाला असणारे अनेक कंगोरे दिसल्याने आम्हीही आमचे पावशेर त्यात टाकतो आहोत :) मुळातच 'वेश्याव्यवसाय' ह्याची सामाजिक व्याख्या आपण समजतो तितकी संकुचित नाही. पैसे मोजुन शरिर उपभोगायला देते ती वेश्या इतकाच अर्थ 'वेश्या' शब्दातुन अभिप्रेत नाही. त्यालाही अनेक कंगोरे आहेत. एखादी स्त्री जेव्हा कामात बढती मिळवण्यासाठी (आपला स्वार्थ साधुन घेण्यासाठी..विशेषतः सिनेजगतात) वरिष्ठांना शरीर भोगायला देते अश्या स्त्री ला देखिल 'वेश्या' असेच संबोधले जाते.. म्हणजेच शरीर भोगायला देण्यामागे 'पैसे' हाच एकमेव मोबदला दरवेळेस असेल असे नाही.बर्‍याचदा अश्या स्त्रियांविषयी बोलताना अमकी अमकी पेक्षा, 'सरळ पैसे मोजुन घेणारी वेश्या बरी!( नैतिकतेच्या दॄष्टीकोनातुन)' असा देखिल उल्लेख केला जातो.. म्हणजेच जेव्हा जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही मोबदल्यासाठी/फायद्यासाठी एखाद्याला संभोग करु देते ती वेश्या अशी व्याख्या योग्य ठरेल का?..तर नाही..करण कधी कधी एखाद्या मुलीला आपल्या मना विरुद्ध लग्न करावे लागते. अशा वेळेस प्रेम दुसर्‍या कोणावर जडले असले तरी समाजाच्या दबावाला बळी पडून लग्न तिसर्‍याशीच केले जाते. ह्या स्त्रियांना देखिल आपल्या मनाविरुद्ध आपले शरीर दुसर्‍याच व्यक्तिला अर्पण करावे लागते( समाजाच्या कडवेपणा टाळण्याच्या मोबदल्यात)..पण त्याला मात्र कुणीही वेश्या/अनैतिक म्हणू शकत नाही. तेव्हा ही व्याख्या देखिल बाद!! थोडक्यात विषय दिसतो तितका सोपा नाही..:)

संस्कृत साहित्यात आपला संबंध वारंवार गणिका ह्या पात्राशी येतो. किंबहूना विदूषक आणि गणिका संस्कृत साहित्याचे अभिन्न अंग आहेत. ती गणिका देहविक्रय करतेच असे नाही तर काही गणिका केवळ आपल्या गाण्याने अथवा नृत्याने ग्राहकांची घटकाभर करमणूक करणार्‍या सुद्धा असतात. तसेच ह्या गणिका चाणाक्ष असतात आणि हेरगिरीसाठी त्यांचा फार उपयोग केलेला आढळतो (माताहारी सारखा). चाणक्याने हेरगिरीसाठी सुंदर, बुद्धिमति गणिकांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

बंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एक नाट्यप्रयोगा बद्दल माहिती http://www.indiatogether.org/2008/mar/wom-dhande.htm इथे वाचा. मीन सेशू या सामाजिक कार्यकर्तीने वेश्या अन्याय मुक्ती परिषद (VAMP) व संग्राम या एनजीओ च्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतात. त्यांनी ही निर्मिती केली. सुषमा देशपांडे यांनी दिग्दर्शीत केलेला प्रयोग या दुर्लक्षित विषयावरचे जनजागरण आहे. प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश 16/03/2008 - 15:27
वैश्या बनणे हे नैतिक की अनैतिक हा चर्चेचा विषय निवडण्याबद्दल धनंजय यांचे अभिनंदन वर अनेक घटकांचा उत्तम उहापोह झाला आहे. धन्ंजय यांचा सारांशही रोचक आहे. मी जरा उशीराच चर्चेत प्रवेश करत आहे. असो. वैश्या व्यवसायाची नैतिकता.. यात वैश्या 'व्यवसाय' हा शब्दच मला खटकतो. या बाजारातील प्रत्येक विक्रेती ही "व्यावसायिक"च असते असे नाहि. कित्येक जणी (किंवा बहुतांशजणी?) ह्या नोकर असतात. खरा व्यवसाय कोणीतरी वेगळीच व्यक्ती करत असते. तेव्हा या प्रकारास केवळ एक व्यवसाय ना नजरेतून बघणे मला सर्वस्वी चूक वाटते. आता नोकरीचे निकष लावा पाहु. आमच्या (आयटी) नोकरीशी तुलना करू. आमच्याकडे उत्तम जाहिरातीसाठी नोकरदार मंडळीनी केलेली आधीची प्रोजेक्टस बढवून नवीन क्लायंटला ऐकवली जातात, कधी एखादा क्लायंट आपखूशीने कंपनीचे नाव सुचवतो, क्लायंटने दिलेल्या पैशातून त्यात काम केलेल्यांचे पगार वगैरे तर होतातच शिवाय मुळ व्यावसायिकाला उत्तम मोबदला मिळतो, अनेकदा बराच एक्पिरियन्स झाला आणि तुमच्यात 'गुण' असतील तर बढती मिळते/पगारवाढ मिळते/आपल्या हवे तेच काम करायची संधी दिली जाते, एरवी इथे काय काम करायचे, कीती करायचे, कधी करायचे हे तुमच्या हातात नसते. आता हे सगळं वैश्यांनाही लागु होत नाहि का? मग हा व्यवसाय कसा? ही तर नोकरी !!! आणि नोकरी करतान सुरवातीला चॉईस नसतो त्यात ही नैतिकता कुठे? (निदान सुरवातीला) बर्‍याचजणांचे नोकरी असते म्हणून घर चालते (फार तर फार एका व्यावसायिकाची नोकरी आवडली नाहि तर दुसरा जॉईन करता येतो ) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मित्रांनो हा लेख व त्यावरील आपल्या सर्व चर्चा लिंकद्वारे मी त्या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था यांना पाठवल्या. मीना सेशू ज्यांचा उल्लेख मी वर प्रतिक्रियांमधे केला आहे त्यांनी त्या सेक्सवर्कर साठी काम करणारी वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संघटने द्वारे प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या काही ध्वनीप्रतिक्रिया त्यानी पाठवल्या आहेत व मिसळपाव चे आभार मानले आहेत.

मोदी आणि भाजपा सत्तेत यायच्या आधी मिपावर किती गंभीर विषयांवर प्रगल्भ चर्चा वादविवादसुसंवाद व्हायचे ! कुठेही राजकीय टिप्पण्णी नाही, कोणत्याही धर्मावर , धर्मपरंपरा श्रध्दांवर , कोणत्याही जातीवर, समाजावर चिखलफेक नाही, कुठेही तारतम्य सोडून तिरकस टिप्पण्णी नाही ! हा काथ्याकुट एक अतिषय आदर्श काथ्याकुट म्हणुन पिन करुन ठेवला पाहिजे मुख्यपानावर ! बाकी - श्या: , आमच्या काळचं मिपा राहिलं नाही आता !

Trump 27/05/2022 - 12:38
उत्तम निकाल आणि उत्तम लेख
देहविक्रय बेकायदेशीर नाही, सेक्स वर्कर्सचे अधिकार, पोलीस हस्तक्षेप अयोग्य, कंडोमचा वापर हा…; SC ने मांडलेले २१ मुद्दे https://www.loksatta.com/photos/news/2945214/sex-work-is-not-illegal-the-supreme-court-order-says-sex-workers-are-entitled-to-dignity-equal-protection-under-law-scsg-91/

In reply to by Trump

उत्तम निकाल ! भारत हळुहळु पाश्चिमात्य बुरसटलेल्या नैतिकतेच्या बकवास संकल्पनांच्या जोखडातुन मुक्त होत आहे हे पाहुन छान वाटले !

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 29/05/2022 - 16:55
मार्कस ऑरेलियस, मला वाटतं त्यास व्हिक्टोरिय नैतिकता ( victorian morality ) म्हणतात. हिने ब्रिटीशकालीन भारतात प्रचंड गोंधळ घातला होता. आ.न., -गा.पै.

sunil kachure 27/05/2022 - 12:46
लोकशाही देशात धोरणात्मक निर्णय घेणे हे लोक नियुक्त सरकार चे काम आहे. लोकशाही मध्ये लोक सत्ताधारी निवडतात. आणि तेच देशाला जबाबदार असतात. किती ही चांगला निर्णय असला तरी कोर्टाने धोरणात्मक निर्णय घेणे . अयोग्य आहे. त्या मुळे वेगळा पायंडा पडू शकतो. सरकार नी तसा कायदा करावा असे निर्देश देणे इथ पर्यंत कोर्टाचे निर्णय योग्य असे समजू शकतो.

चलत मुसाफिर 29/05/2022 - 21:16
लेख फार आवडला. देहव्यापाराला 'नैतिक' मान्यता नसणे याचे एकमेव कारण म्हणजे हा व्यवसाय पुरुषसत्तेच्या पायाला समूळ हादरा देतो. बाकी दुसरे काही नाही. गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे. ही भीतीदेखील निराधार आहे हे सांगायला नको. उद्या देहविक्रय समाजमान्य झाला तरी पुरुषसत्ता त्याला पुरून उरेल आणि आपले वर्चस्व अबाधित ठेवेल यात मला तरी काहीच शंका नाही. या संदर्भात निर्णयस्वातंत्र्य वगैरे मुद्दे उगाचच उकरून काढले जातात. सफाई कामगार, मोलकरीण किंवा हमाल होण्याचीही महत्वाकांक्षा कुणी बाळगून नसते. इतकेच काय, इच्छा नसताना डॉक्टर, अभियंता, व्यापारी झालेले लोकही सापडतील. पण त्यावरून या व्यवसायांना कुणी अनैतिक ठरवत नाही.

गामा पैलवान 30/05/2022 - 02:32
चलत मुसाफिर,
गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे.
यांत भीती कसली? जर प्रत्येक बाई पुरुषसत्तेस फाट्यावर मारून वेश्या बनली, तर कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल. पुरुषांना दुसरं काय हवं? असो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. लालबत्तीवस्तीत बापाला किंमत नसते. आईला मात्र अतिशय आदराने वागवलं जातं. मग ही पुरुषसत्ताक व्यवस्था म्हणायची का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल.
थोडीशी सुधारणा - कुठलीही नाही , जीला स्वतःहुन कामक्रीडेत भाग घेण्याची इच्छा आहे ती , आणि हाच ह्या व्यवसायातील युनिक सेल पॉईंट आहे ! स्त्री-लैंगिकतेचे गूढ ह्या धाग्यावर आलेल्या काही प्रतिसादा नुसार बहुतांश स्त्रियांना कळससुख अर्थात ऑर्गॅझम हा परमोच्च आनंद लाभतच नसतो , त्या केवळ करायचे म्हणुन, कर्तव्य म्हणुन सेक्स करत असतात , परिणामी कामक्रिडेतील स्त्रीचा सहभाग बहुतांश वेळा पॅसीव्ह असतो . (काही सन्माननीय स्त्रीयांचे काही मोजके रतिक्षण ह्याला अफवाद असतीलही , पण इन जनरल "उरका पटकन" हाच अ‍ॅटिट्युड असतो.) अशा वेळेस कल्पना करा की एक स्त्री जी स्वेच्छेने कामक्रिडेत सहभाग घेत आहे , जी पैसे घेत आहे , क्लायंट ला खुष करणे हाच जिचा उद्देश आहे तिच्या सोबतचा अनुभव कसला भिन्न असेल ! तसेच पुरुषाच्या नजरेतुन - ही स्त्री आवडली तर आवडली नाहीतर आजचे पैसे अक्कलखाती, नेक्स्ट टाईम नवीन बघु, ही काही कटकटी करणार नाहीये , डोके दुखते आज नको , मूड स्विंग्स वगैरे नखरे नसणार आहेत , बस्स आत्ता आहे हा क्षण एन्जॉय करायचा आहे - carpe diem. ह्या सिचुएशन मध्ये रतिसुखाचा अनुभव काहीतरी वेगळ्याच लेव्हल वरील असावा असा अंदाज आहे ... पुरुषासाठी अन स्त्रीसाठीही!!

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 30/05/2022 - 13:19
मार्कस ऑरेलियस, तुमच्या दुरुस्तीशी सहमत आहे. 'उपलब्ध असलेल्या कुठल्याही स्त्रीस पैसे फेकून वापरता येईल' असं म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

sunil kachure 30/05/2022 - 20:03
जगाचे माहीत नाही. पण भारताची लोकसंख्या १३०, कोटी आहे. कट्टर पुरोगामी स्त्री,पुरुष. कट्टर स्त्री हीत वादी स्त्री पुरुष. देह विक्रीस समर्थन देणारे महान विचारवंत. ह्या समाजाच्या सुधारित घटकात. १) मला सून देह विक्री करणारीच हवी. २)माझी बायको देह विक्री करते हे आमचे कार्ड. ३) माझी मुलगी मी ज्या कुटुंबात देह विक्री करण्याला मान्यता आहे त्याच कुटुंबात देईल. ४ माझी आई आणि बहिण देह विक्री करतात हे आमचे visiting कार्ड. असे मोठ्या अभिमानाने सांगणारा पुरोगामी,स्त्री हक्क वाला,सुधारणावादी,देह विक्री लं पाठिंबा देणारा. मी आज पर्यंत तरी कोणी बघितला नाही. १३० कोटी लोकात एक खरा पुरोगामी नाही. आणि म्हणे गणिका सन्मानाने समाजात फिरतील. अमेरिका,ब्रिटन जे आपल्या पेक्षा १०० वर्ष पुढे आहेत तिथे पण असे घडतं नाही.

sunil kachure 30/05/2022 - 07:52
काही लॉजिक नाही ह्या विचारला की पुरुष सत्तेला हादरा बसेल म्हणून वैश्या व्यवसाय च संबंध नित्ती मत्ते शी जोडला आहे. काही लॉजिक नाही .स्त्री बाजारात विकायला उपलब्ध असणे आणि ती पण तिच्यावर काहीच जबरदस्ती न करता. स्व मर्जी नी. ही पुरुषांसाठी अस्त्यंत फायद्याची गोष्ट आहे. स्त्री काही पैसे देवून सहज उपलब्ध असेल तर पुसृषांसाठी लॉटरी च आहे.. उद्या हे सामान्य झाले समाजाने स्वीकारले तर. स्पर्धा वाढेल आणि अगदी पन्नास ,शंभर रुपयांत पण ती उपलब्ध होईल. ह्या मध्ये स्त्री चच नुकसान आहे.पुरुषांचे नाही. असे स्त्री chya हक्काच्या बाता मारून बायकांना पुरुषांच्या समोर कमी कपड्यात बार मध्ये नाचवले आणि आजुन पण नचवले जाते. देह विकायला लागणे पोटासाठी ही वेळ येणे म्हणजे खाते सर्व समाजासाठी ही लाज वाटण्यासारखे गोष्ट आहे. आणि त्याला स्त्री चा हक्क ह्या गोंडस सुवर्ण वेष्टनात पॅक करून स्त्री चे शोषण करायचा. मतलबी डाव . तसे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांचा आहे

सुबोध खरे 30/05/2022 - 09:39
हे इतकं साधं असतं तर प्रश्नच नव्हता. बहुतांश वेळेस (९९%) मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. यात आई बापानी मुलींना विकण्यापासून प्रियकराने किंवा दलालाने फसवून किंवा सरळ गुंडांमार्फत अपहरण करून मुलींना धंद्याला लावले जाते. धंदा कायदेशीर केला तर केवळ मुलीला जीवाची धमकी देऊन मी हे स्वेच्छेने करते आहे असे कोर्टात बोलायला लावले तर जबरदस्तीने या धंद्यात ढकलल्या गेलेल्या परंतु बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या मुलींना यातून बाहेर पडण्याचा मार्गच बंद होईल. आता कदाचित १-२ % मुली अशा बाहेर पडत असतील पण या नंतर ते सुद्धा बंद होण्याचा धोका आहे. दुर्दैवाने वेश्याव्यवसायातून पुनर्वसन होण्याची शक्यता एकंदर समाजाच्या मनोवृत्तीमुळे फार कमी असते. लग्न करून बाहेर पडलेल्या बहुतांश मुली नवऱ्याने टाकून दिल्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. कारण अनेक वेळेस नवरे मुलीच्या चारित्र्याचा संशय घेताना दिसतात. या मुली धंदा केल्यानंतर पुरुषाशी बोलताना जास्त मोकळ्या असतात आणि याचा अनेक अर्थ नवरे ती निर्लज्ज/ वाईट चारित्र्याची किंवा तसलीच आहे असा काढतात. पुनर्वसन करून आई बापाकडे पाठवलेल्या बहुतांश मुलींना आई बापच आपल्या खोट्या प्रतिष्ठा किंवा पुढच्या मुलींच्या लग्नात विघ्न येण्याची भीती किंवा मुलीचा भाऊ तिला स्वीकारायला तयार नसेल तर त्याला नाराज करायचे नाही म्हणून या मुलींना स्वीकारण्यास नकार देतात. अनेक वेळेस सख्खे बाप सुद्धा परत या मुलींना विकून पैसे करताना आढळतात. या मुली निरक्षर किंवा अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे चरितार्थाचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. तर अनेक मुलींना या व्यवसायात काही वर्षे घालवल्याने अंगमेहनतीचे काम करावेसे वाटत नाही त्यामुळे त्या स्वखुशीने वेष्ट्यव्यवसायात परतल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे त्यांचे पुनर्वसन वाटते तितके सोपे नाही. त्यातून काही वर्षे (१०-१५) संसारात रमल्यावर त्यांचे खटले न्यायालय उभे राहतात आणि सततच्या न्यायालयाच्या वाऱ्या ,कटकटीना कंटाळून आणि आर्थिक तंगी मुळे सुद्धा नवरे त्यांना हाकलून देतात. एकदा वेश्या व्यवसायातून बाहेर पडली कि त्यांचे दलाल त्यांच्या वर चार दमड्या खर्च करत नाहीत आणि हा सर्व आर्थिक भार सोसणे त्यांना अशक्य होते. त्यातून त्यांना पोलीस सुद्धा ज्या तर्हेने वागवतात ते पाहिले तर सभ्य माणसे सुद्धा लाजतील. पैसे नसतील तर पोलीस सुद्धा त्यांच्याकडून सर्रास शरीरसुखाची मागणी करतात मग ती आता पुनर्वसन करून संसाराला लागली का असेना? महिला पोलीस सुद्धा त्यांच्याशी अत्यंत घृणास्पद वर्तन करताना आढळतात तर पुरुषांची काय कथा? बाकी स्त्रीचे स्वातंत्र्य त्यांचे हक्क आणिस्वखुषीने वेश्या व्यवसायात पडणे हे उच्चभ्रू गटातील कॉलगर्लस, एस्कॉर्टस किंवा कॉनक्यूबाईन इ. साठी ठीकआहे.(त्यांना वेश्या म्हणणे डाऊनमार्केटआहे).

sunil kachure 30/05/2022 - 13:31
Vaisha व्यवसाय . खुप जुना आहे ब्रिटिश लोक ही अतिशय हुशार असल्या मुळे त्यांनी ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केले होते. देह विक्री व्यवसाय करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून दिली होती बाकी समाजा पासून वेगळी. एकाचे हक्क जपताना दुसऱ्याच्या हक्कावर गदा येत कामा नये. देह विक्री ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केलं. तर ते समाजाच्या,देशाच्या हिताचेच आहे. १) देश विक्री व्यवसाय करण्यासाठी प्रतेक शहरात जागा आरक्षित ठेवली जावी. थोडी लांब. २)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात ३) त्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जावी त्यांच्या मर्जी नीच करत आहेत ना ह्याची खात्री करावी. ४) देह विक्री करणाऱ्या सर्व स्त्रिया ची माहिती त्या व्यवसाचा पोर्टल वर जाहीर करावी नाव ,गाव,नातेवाईक सहित. लाज वाटण्याचे कारण नाही स्त्री मुक्त होत आहे. ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. असे मस्त. नियोजन केले तर मला नाही वाटत कोणी विरोध करेल. कोणत्या तरी ब्रिटिश कंपनीला ह्या सर्व यंत्रणेचे नियोजन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यावे. ते योग्य नियोजन करतील. मुंबई मध्ये त्यांनी योग्य काम केले आहे त्यांना अनुभव आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 30/05/2022 - 20:20
२)म्हाडा,सिडको. सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात. हायला इथे अर्ध्या जनतेला डोक्यावर छप्पर नाही पण रात्रीची सोया पाहण्यासाठी सरकारने त्यांना कोठे बांधून द्यायला हवेत काय? ५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात. हे कुणी ठरवायचं ? ब्रिटीश कंपनीला? त्यांना भारतीय बायका कुरूप च वाटतील. मग बायकांना चांगला भाव कुणी द्यायचा? का इथे पण शेतीसारखा किमान आधारभाव द्यायचा? आणि या आधारभावाला ग्राहक आला नाही तर पैसे सरकार ने द्यायचे का? कचरे बुवा तुमच्या टंकणाऱ्या मेंदूचा आणि विचार करणाऱ्या मेंदूचा संबंध नाही हे तुम्ही सतत का सिद्ध करून देताय

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 30/05/2022 - 20:45
मी तुमची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. १)देह विक्री व्यवसायात जबरदस्ती नी स्त्रियांना ढकलल जाते. ही तुमची भीती आहे. रीतसर सर्व मुलींची चोकशी करून त्यांची सर्व ओळख पोर्टल वर जाहीर करा. हे माझे solution. पुरुषाची मकत्तेदरी स्त्री नी देह विक्री केली की नष्ट होत असेल तर अशी माहिती जाहीर करणे ही अभिमानाची गोष्ट असेल त्यांच्या नाते वाइक लोकांसाठी. सिडको किंवा म्हाडा नी अशा वस्त्या नियोजन करून उभ्या कराव्यात . गाव कुसा बाहेर. कारण एकाचे एक जपताना दुसऱ्याचे हक्क नाकारणे अयोग्य म्हणून. सिडको आणि म्हाडा नी अशा वस्त्या निर्माण केल्या म्हणजे त्या मधील जागा फुकट ध्या असा मी उल्लेख केला नाही. ज्यांना तीव्र इच्छा आहे त्यांनी ती जागा विकत घ्यायची आहे हवं बँक लोण ची सोय करावी. आराखडा आखून हा व्यवसाय म्हणून उभा केला तर रोजगार पण मिळेल. ती स्त्री आणि त्यांचे ग्राहक ह्यांना कायद्याचे संरक्षण पण मिळेल.आणि समाजातील बाकी लोकांचे हक्क पण अबाधित राहतील. प्राथमिक आरोग्य उपचार,गुप्त रोग तत्न,hiv स्पेशालिस्ट dr .. ह्यांना पण आराखड्यात जागा असेल.. Dr लोकांचा व्यवसाय वाढण्याची पण शक्यता आहे खरे ..मी परफेक्ट solution दिले आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 31/05/2022 - 13:01
मी परफेक्ट solution दिले आहे. कधी वेश्या वस्तीत गेला आहात का? त्यांच्याशी बोलला आहात का? त्यांचे प्रश्न काय? त्यानं काय हवंय? ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशाना घर विकत सोडाच भाड्याने घेणे सुद्धा परवडत नाही त्यांना बँकेच्या

लोण ची

सुविधा पुरवणार कोण? बँकेचे कर्ज देताना व्यवसायाचे काही आडाखे असतात. त्यात स्त्रीचे शरीर कसे बसवणार? जी दिसायला जास्त चांगली तिला जास्त कर्ज देणार का? हा निकष कसा ठरवायचा? तारण काय ठेवायचे? आणि त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या कडून वसुली कशाची कशी आणि कोणी करायची? उगाच उंटावरून शेळ्या हाकताय? तुमचं परफेक्ट solution तुमच्या टंकणाऱ्या मेंदूकडून आलेलं आहें. उचल हात आणि बडव कळफलक त्याचा विचार करणाऱ्या मेंदूशी काहीही संबंध दिसत नाही.

चलत मुसाफिर 30/05/2022 - 18:31
काही प्रतिसाद वाचून चंमतग वाटली. गणिका सहज उपलब्ध झाल्या तर पुरुषांचे फावेल हा समज मुदलातच गंडलेला आहे. पैसा व सामाजिक ताकद असलेल्या पुरुषांना गणिका (किंवा अन्य स्त्री) आजही मिळवता येते. देहव्यापार खुला झाला तर हे सर्व पुरुषांना सहजसाध्य होईल. तसेच देहव्यापार करणाऱ्या स्त्रीला अधिकृत हक्क मिळतील. हे पुरुषसत्तेला मुळातच नको आहे. देहव्यापार समाजसंमत झाला तर सगळ्या स्त्रिया तेच करू लागतील हा दुसरा गंडलेला समज. तसे काहीही होणार नाही. ज्या स्त्रियांना तो व्यवसाय करायचा असेल त्या तो सुरक्षित व अधिकृत रीतीने करू शकतील, इतकेच. पण याचे पुरुषसत्तेवर दूरगामी परिणाम होतील. सेक्स ही एक क्षणिक, तात्कालिक, नैसर्गिक भावना (instinct) आहे. पण तिला नाना नियम व बंधनांत कोंडले की एक प्रबळ आवेग निर्माण होतो जो जीवनाच्या प्रत्येक पैलूवर कमीअधिक परिणाम करतो. पुरुषसत्ता याचा चलाखीने वापर करते.

sunil kachure 30/05/2022 - 18:53
उत्तम नियोजन केले तर देह विक्री व्यवसाय लं कोणाचा विरोध नाही. देहविक्री लं मान्यता म्हणजे गल्ली बोळात,रहिवासी इमारती ,सार्वजनिक जागा इथे विक्षपित चाळे करण्याची परवानगी नाही..

जेम्स वांड 31/05/2022 - 10:17
वेश्या व्यवसाय हा मानवी संस्कृतीने ठरवलेल्या नैतिकतेच्या चौकटीत कधीच बसणार नाही , पण म्हणून त्याचे कायदेशीर प्रमाणीकरण करू नये असे नाही, काही देशाचे नियम आजकाल गांजा कायदेशीर करत आहेत, मला तर ते चूक वाटते, मस्तिष्कावर प्रभाव पाडून पुढे अगदी हेवी मेटल पॉयझिंग देऊ शकणाऱ्या गांज्याला कायदेशीर करणे चूक वाटते, पण वेश्या व्यवसायाबद्दल विचार करता त्याला कायदेशीर करणे हे कैक लैंगिक आजार, गुप्तरोग, एचआयव्ही इत्यादींच्या प्रसारात एक उपायकारक खोडा म्हणून वापरले जाऊ शकते, वेश्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप, त्यांना औषधपूरवठा, स्वच्छ ठिकाणे (व्यवसाय करावयास) ह्याने फक्त वेश्याच नाही तर वेश्यागमन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळींचे पण स्वास्थ्यरक्षण होऊ शकेल, वरती काचुरे ह्यांनी वेश्या व्यवसाय, आई बहीण व्हिजिटिंग कार्ड वगैरे काय काय लिहिलेले आहे, ते पटले नाही दोन कारणांसाठी १. माझ्याच लेखनात वेश्या व्यवसाय हा मानवी नितीमूल्यांच्या चौकटीत नैतिक ठरणार नाही कधीच हे मी स्पष्ट म्हणतोय आणि त्यामुळे २. काचुरे ह्यांनी (कदाचित कोणालातरी प्रतिसाद म्हणून) वेश्याव्यवसायाची व्हाईट कॉलर सर्विस इंडस्ट्री सोबत केलेली तुलना. बाकी काय, वेश्याव्यवसाय कायदेशीर केला तर तो करताना जगातील कैक फसलेली, यशस्वी उदाहरणे ठेवता येतीलच अभ्यास करायला समोर.

sunil kachure 31/05/2022 - 12:23
जगातील जास्त माहीत नाही पण भारतात खजुराव सारखी मंदिर आहेत तिथे . सेक्स ह्या विषयावर अनेक शिल्प कोरली आहेत. बघितले नाहीत पण ऐकून आहे. कामशास्त्र सारखे बाकी प्राचीन ग्रंथ पण आहेत त्याचा विषय सेक्स हाच आहे. . Evolution मुळे माणसाची प्रजाती निर्माण झाली असे दावे असले तरी.. संस्कृती, समाज व्यवस्था,निती अनिती. ह्यांची बरीच चक्र होवून गेली असावीत.. खुला सेक्स,नंतर निती मत्तेत सेक्स अडकला असेल. कोणाशी ही सेक्स करणे ह्याचा निती अनीती शी काही संबंध नाही. आणि कोणाशी ही सेक्स करणे ही अनीती. असे अनेक स्थित्यंतरे मानवी इतिहासात नक्कीच होवून गेली असणार. प्रतेक प्रकारचे चांगले वाईट परिणाम अनुभव नी माणसाला माहीत पडले असणार. म्हणून सेक्स लं निती मत्ते शी जोडले गेले असेल. एकच स्त्री संभोग करणे जी पत्नी आहे हे योग्य असे ठरवून कुटुंब व्यवस्था.आणि बाकी व्यवस्था. हे खूप अनुभवातून आलेले शहाणपण आहे. सेक्स चा संबंध अनेक गोष्टी शी आहे. संतती हा पहिला त्याचा प्रॉडक्ट आहे. त्याची जबाबदारी कोणावर तरी टाकणे अतिशय गरजेचे होते. म्हणून कुटुंब व्यवस्था आणि बाकी समाज व्यवस्था. सेक्स आणि भावनिक गुंतवणूक हा प्रश्न आहेच.

sunil kachure 31/05/2022 - 12:41
बार मध्ये कमी कपडे घालून नाचणे,विविध लोकांचे स्पर्श सहन करणे. हे त्या व्यवसाय करणाऱ्या मुली खरेच मनापासून करत असतील का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. साधे बस,ट्रेन मध्ये पण आपल्या बाजूला आपल्याला बरा वाटणारा च सहप्रवासी असावा अशी इच्छा सर्वांची असते. काही मिनिट किंवा तासाच्या प्रवासात पण आपल्याला बरा वाटणारा प्रवासी नसेल तर मन विचलित होते. बार गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलींची मानसिक अवस्था काय होत असेल. थंड डोक्याने विचार केला की जाणीव होईल. सेक्स वर्कर तर अजून खतरनाक. शारीरिक संबंध ठेवणे अशा व्यक्ती शी ह्याच्या शी काहीच ओढ नाही,आकर्षण नाही,इच्छा नाही. खुप कठीण काम आहे. मुली किंवा स्त्रिया ना ही अशी काम पोट पाणी चालण्यासाठी करावे लागत असेल तर आपल्या सिस्टीम मध्ये दोष आहे. पर स्त्री किंवा पर पुरुष ह्यांच्या शी आकर्षित होवून सेक्स करणे आणि. फक्त पैसे मिळतात म्हणून ओळख पण नसणाऱ्या व्यक्ती शी सेक्स करणे. खुप खुप फरक आहे. मानसिक त्रासाची परिसीमा आहे ती. आणि ह्या सर्व सेवांचे ग्राहक कोण तर पुरुष. पुरुषांना ऐश करण्यासाठी निर्माण झालेली गुलामगिरी ची एक पद्धत. ह्या मध्ये स्त्री चे हीत नाही. स्त्री लं कोणाशी ही तिच्या इच्छे नी सेक्स करायचा असेल तर तशी तिला परवानगी असावी हे वेगळे आहे . आणि पोटपण्यासाठी व्यवसाय म्हणून सेक्स करावा लागणे .हे वेगळे आहे. खुप फरक आहे ह्या मध्ये.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 16:34
आता हे पहा. मांजर आपल्या पिल्लांना केवळ तीन गोष्टी शिकवते: शिकार कशी करावी, कुणाला घाबरून रहावे आणि आपला बचाव कसा करावा (झाडावर चढणे, नखे पाजळणे इ.). याला फारतर 2 आठवडे लागतात. इतक्या शिक्षणावर मांजर आरामात आयुष्य जगू शकते. पण मानवाची उत्क्रांती इतकी जास्त झालेली आहे की समाजात केवळ जिवंत रहाण्यासाठी अफाट ज्ञानाची गरज पडते. पहा: भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाहतुकीचे नियम, कायदा, तंत्रज्ञान (किमानपक्षी दूरध्वनीचा वापर), लेखन-वाचन, सांस्कृतिक भान, पाककला, शेती, धर्मशास्त्र. ही यादी कितीही वाढवता येईल. हे इतके मूलभूत शिक्षण घेता घेता 18-20 वर्षे जातात. मानवाचे सरासरी आयुष्य 60-65 वर्षाचे असते. गुणोत्तर काढा. हे इतके ज्ञान आत्मसात करणे, साठवणे आणि वापरणे याकरिता मानवाला प्रचंड मोठा मेंदू विकसित करावा लागला. (मानवी मस्तक व शरीर यांचे गुणोत्तर काढा व त्याची इतर प्राण्यांशी तुलना करा. फरक लगेच उमजेल). मेंदूचा आकार हा असा भरपूर मोठा असल्यामुळे मुलांचा जन्म तुलनेत लवकर व्हावा लागतो. कारण मुलाचे डोके निसर्गाने जर मातेच्या पोटातच फार मोठे होऊ दिले तर माता आणि बाळ दोघे प्रसूतीतच मरतील. त्यामुळे मानवी अर्भके तुलनेत लवकर जन्माला येतात व जन्मानंतर वर्षानुवर्षे पालकांवर अवलंबून असतात (पशुपक्ष्यांचे असे नसते. कुत्रा साधारण 10-12 वर्षे जगतो. कुत्र्याची पिल्ले पंधरा ते वीस दिवसात जवळजवळ स्वयंपूर्ण होतात. गुणोत्तर काढा). अर्भकांची अशी प्रदीर्घकाळ देखभाल एकटीने करणे हे मानव मातेला केवळ अशक्य आहे. त्यामुळे पित्याने तिची साथ देणे सक्तीचे करण्यात आले (इतर प्राण्यांत माता आपली पिले एकटीने सांभाळते, किंबहुना पित्याला हाकलून लावते). आता हे पिल्लू माझेच आहे हा विश्वास पित्याला कसा व्हायचा? त्यामुळे कामनियम, योनिशुचिता, एकपतिव्रत ही बंधने आली. ही बंधने अंमलात आणण्यासाठी, तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे, म्हणून समाजव्यवस्था आली.

In reply to by चलत मुसाफिर

सुबोध खरे 31/05/2022 - 19:59
आपल्या प्रतिसादातील काही त्रुटी १) मानवापेक्षा उत्क्रांतीत खालच्या पायरीवर असणारे प्राणी यांच्या डी एन ए मध्ये मोठ्या प्रमाणात उपजत बुद्धी (स्मरणशक्ती) साठवलेली असते. त्यामुळे कुत्रे, मांजरं गायी हरणं आणि त्यांच्या कुळातील सर्व प्राणी हे मातेचे दूध पिणे थांबवल्यावर उपजत बुद्धीने वासाने आपले अन्न शोधून काढून आपले पोट भरू शकतात. मानवाच्या मेंदूचा विकास झाला त्याबरोबर हि उपजत बुद्धी मागे पडली. याच बरोबर मानवी मेंदूची वाढ सुरुवातीच्या काळात फार झपाट्याने होते. पहिल्या सहा महिन्यात हि वाढ ६५ % आणि १ वर्षापर्यंत मानवी मेंदू प्रौढ माणसाच्या ७५ % आकाराचा आणि २ वर्षे पर्यंत ९० % आकाराचा होतो. २) हे हार्डवेअर वाढल्या नंतर त्यात सॉफ्टवेअर लोड होण्याची प्रक्रिया चालू होते जी जन्मभर चालूच राहते. ३) मानवी शरीराची वाढ १८ वर्षापर्यंत होत असते म्हणजेच मानवी मुलाचे बालपण हे १८ वर्षे इतके लांब असते. या काळात स्त्रीला बालकाच्या संगोपनासाठी पुरुषाची गरज भासत असते. आणि अशास्थितीत पुरुषाने हे मूल माझे नाहीच म्हणून जबाबदारी झटकली तर शेतीप्रधान व्यवस्थेत स्त्रीची स्थिती फार केविलवाणी होत असे. कारण बाहेर शेती सोडून दुसरे काम नाही. तेथे काम करताना मुलाचे संगोपन कसे करणार या शिवाय बलात्कार होण्याची आणि त्यातून पुढची संतती होण्याची शक्यता फार होती ज्यामुळे असलेल्याच नव्हे तर पुढच्या बालकाच्या पोषणाचीसमस्या निर्माण होत असे. या कारणास्तव जगभर सर्व समाजात यौनशुचिता ( नवऱ्याशी एकनिष्ठता) हि कल्पना जन्माला आली. आणि या कल्पनेचा विस्तार म्हणून लग्न संस्था निर्माण झाली. स्त्री स्वातंत्र्य हि कल्पना संतती प्रतिबंधक साधने आल्यानंतरच खरी फोफावू शकली आणि त्यानंतर आधुनिक जगात स्त्रीला नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यावर तिची खरी मुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू झाली. स्त्रियांचे शोषण आदीम काळात कसे होत होते हे ज्यांना पाहायचे आहे त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीतील स्त्रियांची स्थिती याचा जरूर अभ्यास करावा.

sunil kachure 31/05/2022 - 17:04
सर्व प्रकार होवून गेले आहेत कोणाशी ही संभोग अगदी आई,बहिण ह्यांच्या शी पण(यम आणि यमी) प्राणी तर नाते पाळत नाहीत माणूस प्राणी च आहे. पण स्थिर जीवन,संतती चे पालन पोषण,स्त्री ची सुरक्षा, स्त्री साठी सुरक्षित वातावरण. पुरुष आक्रमक आहे हे नैसर्गिक आहे. पाणी नीतिमत्ता आणि परंपरा पुरुषांची आक्रमकता थोपवून ठेवतात. बहिण नागडी जरी दिसली तरी तिचा भाऊ हा पुरुष असून पण लैंगिक रित्या उत्तेजीत होत नाही का? ती स्त्री आहे हा पुरुष आहे तरी पण नाही. कारण नीतिमत्ता , समाज व्यवस्था त्या मुळे दहा वेळा फाशी असा कायदा केला असता आणि नीतिमत्ता आणि योग्य समाज व्यवस्था नसती तर . बहिण नागडी बघून भाऊ sexually उत्तेजीत झाला असता..... कायदे आणि शिक्षा ते थांबवू शकले नसते त्या मुळे देह विक्री चा संबंध मंद बुद्धी सारखा स्त्रियांच्या हक्क आणि स्त्री चे स्वतंत्र ह्याच्या शी मंद बुद्धी लोकांनी जोडू नये.

गामा पैलवान 31/05/2022 - 17:05
चलत मुसाफिर, हा कळीचा मुद्दा आहे :
तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे,
तुम्ही वर जी कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष, मुखावगुंठित वगैरे विशेषणं ल्वापारली आहेत त्यांचा निर्देश मुलांच्या संगोपानाकडेच आहे. मात्र या गोष्टी आवश्यक असल्या तरी पुरेश्या नाहीत ( necessary but not sufficient ). बाप देखील नीतिवान असावा लागतो, पण तो मुद्दा वेगळा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:34
संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवले? याचा संगोपनाशी काय संबंध? ज्ञानार्जन स्वसंरक्षण, परोपकार वगैरे ठीक आहे. नीतीमत्ता, चारित्र्य वगैरे गोष्टी म्हणजे धूर्त पुरुषसत्तेने आपला वरचष्मा अबाधित ठेवण्यासाठी काढलेली नसती टूम आहे. (या आता म्होरं. होऊनच जाऊ दे!) :-) :-)

In reply to by चलत मुसाफिर

गामा पैलवान 31/05/2022 - 23:42
चलत मुसाफिर, संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवलं, म्हणून काय विचारता ! वेश्यांना त्यांची अपत्यं त्याच वस्तीत राहावीशी वाटंत नाहीत. वेश्यांना त्यांच्या अपत्यांनी तोच धंदा केलेला आवडंत नाही. मुलगी असेल तर तीही वेश्या झालेली नको असते. मुलगा असेल तर मोठेपणी भ#वा झालेला नको असतो. भ#वा हा त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे. बाकी पर्याय कोणते ते विचारू नका. नीती व चारित्र्य म्हणजे काय ते वेश्यंना बरोब्बर ठाऊक आहे. आ.न., -गा.पै.

चलत मुसाफिर 31/05/2022 - 17:22
स्त्रीची सुरक्षितता हाही एक गंडलेला मुद्दाच. सुरक्षितता कोणापासून? पुरुषांपासूनच की हो! गुंडांनी दुकान फोडू नये म्हणून त्यांना हप्ता देण्यासारखेच हे झाले. असो. एकूण माझा मुद्दाच सिद्ध होतो: योनिशुचिता न पाळणारी, लिंगस्वातंत्र्य मानणारी स्त्री पुरुषसत्तेला महाप्रचंड धोक्याची घंटी वाटते. ती तशी वाटली नसती, तर सुरक्षितता वगैरे बागुवबुवे उभे करायची गरजच नव्हती.

In reply to by चलत मुसाफिर

sunil kachure 31/05/2022 - 17:43
सुरक्षित ,स्थिर आयुष्य स्त्री आणि पुरुष दोघांचे. त्या साठी नियम आणि निती मत्ता . शारीरिक क्षमता काहीच वर्ष असते निसर्ग काही वर्षानंतर तारुण्य,शक्ती सर्व नष्ट करतो बालपणी चे १० ते १५ वर्ष आधार शिवाय जगता च येणार नाहीत माणसाच्या मुलाला. आर्थिक बाबतीत स्थिर होण्यास जी बुद्धी लागते ते शिक्षण आणि सुरक्षित निवारा. हा फक्त कुटुंब असेल तर च. आता बेरीज , वजा बाकी करा. स्वतःच्या शक्ती वर माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यातील किती वर्ष जगू शकतो. स्त्री माणूस च आहे कोणती extra ordinary प्राणी नाही तिला हेच नियम लागू आहेत

मी मराठी किडा वर वेश्यांच आयुष्य हा वृत्तपट पाहिला होता , तो शेअर करतोय. तुम्ही बाकी काही करु शकत नसला तरी त्यांच्याप्रति संवेदनशीलता ठेवा. विचार करा. धन्यवाद सूरज खटावकर, मराठी किडा व तेजस्वी सेवेकरी, सहेली संस्था https://www.youtube.com/watch?v=NIglFzYCE9U

In reply to by प्रकाश घाटपांडे

खरं तर, महाराष्ट्रातील काही दिवसातील घटना पाहिल्या शाळकरी मुलींवरील झालेले अत्याचार, विक्रुत बापांनी मुलींवर केलेले अत्याचार, राजस्थानमधील अठ्ठावीस वर्ष वयाच्या मुलांनी बावन्न वय असलेल्या स्वतःच्या आईवर केलेले बलात्कार या सर्व घट्ना पाहिल्यावर विकृतीला धर्म नसतो तर, माणसातली विकृती असते आणि तिचा स्तर दिवसेंदिवस कोणत्या स्तराला चाललं आहे, ते लक्षात येतं आणि अशावेली वेशाव्यवसायाचं महत्व अधोरेखित व्हावं. वेश्या व्यवसाय काही त्यांनी आनंदाने स्वीकारलेला नसतो. परिस्थिती, अगतिकता, आणि असंख्य गोष्टी तो वेगळा विषय आहे. कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्त्या प्रकरणी बंगालमधील आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिकच आहे. पिडितेला न्याय मिळावा म्हणून वेश्यांनी मोर्चात सहभाग घेतला झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी त्याही व्यथित झाल्या आणि मोर्चामधे त्यांच्या हातातील घोषणा फलक होते- 'प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना' याचा अर्थ असा की तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करु नका'' ही सामाजिक जाणीव ऐतिहासिक आहे. या विषयावर प्रसिद्ध लेखक, समीर गायकवाड यांनी खुप लिहिलं आहे. खुप लिहिण्या-बोलण्यासारखं पण थांबतो. घाटपांडे साहेब मिपावर येत राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 08/09/2024 - 15:10
माणूस दारू , तंबाखू शिवाय एकवेळ राहू शकतो परंतु पुरुष आणि स्त्रीला लैगिंक भूक आहे ती नैर्सगिक आहे , जिथे पुरुष स्त्री चे प्रमाण व्यस्त आहे तिथे हि भूक भागवण्याची सोय लागते ,, ती राजमार्गाने करण्याचाही सोय असेल तर त्यातील गुन्हेगारी कमी होते ( युरोपातील काही देश ) दोन्ही पुरुष वेश्या आणि स्त्री वेश्या उपलब्ध असणे असणे हे मला तरी अनैतिक वाटत नाही अनॆतिक काय तर लग्न बंधन किंवा अगदी लिव्ह इन रेलशनशिप मध्ये असताना वेश्यागमन करणे , येथे दोन्ही पुरुष आणि स्त्री हा नियम समान धरला आहे

युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स मधून नेत होते. ऍम्ब्युलन्स चालक आणि त्याच्या साथीदारांनी पेशंट च्या पत्नीचा लैंगिक छळ करायला सुरवात केली. आणि त्यासाठी पेशंट ला ऑक्सिजन मास्क काढून नंतर बाहेर फेकून दिले. एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. उज्जैन मध्ये भर दिवस, रस्त्यात, फुटपाथवर एका महिलेचा बलात्कार झाला. लोकं बघत बसली, काहींनी व्हिडिओ सुद्धा बनवले.

चौकस२१२ 09/09/2024 - 04:28
एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. यात धर्म कुठे आला? एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध जरुर करा मग प्रत्येक गुन्ह्याचे वर्णन आपण " हिंदू बहुसंख्याक भारतात गुन्हा झाला " असे करणार का ? कॉ न्ग्रेस जेव्हा सत्तेत होतती तेव्हा हि देशची ८०% लोकसख्या हिंदूच होती आणि २०१४ पासून सुद्धा .. इतका द्वेष बरा नव्हे .. अर्थात तुमच्या नादाला कोण लागणार .. बसा लावत भीतीला तुंबड्या

प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ लेख व त्यावरील प्रतिसाद पुन्हा वाचावेत. लेख जुना असल्याने काही लिंक आत्ता चालत नाहीत पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही मात्र या विषयावर निर्भया प्रकरणानंतर 2013 साली मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख व नंतर लैंगितेचे शमन हवेच हा एक लेख वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर सध्या चर्चा होताना दिसत नाही हे मला ठळक पणे जाणवले. अनेक मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले होते. जरुर वाचा. लैंगिकतेचे शमन की दमन? https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-or-aggression-36525/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 5 जाने 2013 लैंगिकतेचे शमन हवेच https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-is-needed-40206/ मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 12 जाने 2013 हे दोन्ही लेख तज्ञांनी आणि जिज्ञासूंनी जरुर वाचावेत. समीर गायकवाड यांचे खुलूस हे पुस्तक वेश्यांच्या जीवनावर आहे. ते ही आवर्जून विकत घेउन वाचावे. हा लेख व विषय समाजाचे लैंगिक व्यवस्थापन या मूळ विषयाचा भाग आहेत
या संकेतस्थळावर लोक मोठ्या मनाने, उघड्या विचारसरणीने "रौशनी" वाचत आहेत म्हणून हा चर्चाप्रस्ताव टाकतो आहे. तितक्याच उघड्या विचारसरणीने हा काथ्या कुटावा, अशी विनंती. समाजात वेश्याव्यवसायास सामान्यपणे अनैतिक मानतात, असे आपण ऐकतो, वाचतो. तो अनैतिक का हा विचार फारसा करत नाही. पण तुम्ही म्हणाल की दरोडे, खून, फसवणूक या सर्व गोष्टीही समाजात अनैतिक मानतात, त्यांच्याबद्दलही आपण फारसा "का?" असा विचार करत नाही. मग वेश्याव्यवसायात, आणि या अन्य "अनैतिक आचारांत" काही फरक असावा असे मला का वाटावे? कारण अन्य अनैतिक कृतींच्या अनुषंगाने जे काही येते त्या सर्वालाच आपण अयोग्य मानतो.