79 साल मध्ये एक हिंदी फिल्म आली होती, सरगम.
काहींना ते आठवत असेल, हिट पिक्चर होतं, गाणीही खुप गाजली.
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं.
गीतकार होते आनंद बक्षी. 'परबत के इस पार' या गाण्यात ते लिहून गेले,
ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश
गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस
ह्या ओळी आनंद बक्षी साहेबांनी का लिहील्या असतील ? हा प्रश्न मला अनेक वर्षे पडला आहे.
बरं,स्टोरीलाईनची गरज म्हणून लिहीलंअसेल म्हणावं तर बक्षी हे सिध्दहस्त कवी होते.