तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का?
तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का?
तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का?
तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का?
तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का?
वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा.